कथा संकलन.



"पोटात दुखते"

एक दिवस पार्थ कामावरून घरी येतो राधिका झोपलेली असते तिच्या पोटात दुखत असते ती पार्थला सांगायचा प्रयत्न करते पण त्याचे मन दुसऱ्या कामात असते.

त्याची आई स्वयंपाक करता करता त्याला बोलते "मलाच स्वयंपाक करायचा होता तर बायको कशाला केली,तिला कसला कंटाला येतो बाकीच्या बायका नौकरीवरून आल्यावर काम करतच नाही का ?"

आईचे बोलणे ऐकून पार्थ रागात राधिकाला उठवतो आणि स्वयंपाक करायला लावतो तिचा एकही शब्द ऐकून न घेता म्हणतो ,"पोट दुखल्याने माणूस मरत नाही".

त्याची आई आऩंदी असते,"याला म्हणतात खरा पुरूष".
राधिका ढसाढसा रडते पण स्वयंपाक करते ७-८ लोकांचा आणि सगळे काम करून झोपी जाते जेवन न करता,पार्थच्या मनात राग असतो म्हणून तो तिच्याशी काहीच बोलत नाही ,ती हुंदके देऊन रडत असतेआणि

पार्थ कानात बोळे टाकून झोपी जातो व म्हणतो ,"काय सारख छोट्या छोट्या गोष्टीला रडू येत तू जा बाई एकदाचीच निघून जा माझ्या जिवनातून "

राधिका रडता रडता एक जोराचा हुंदका देते आणि शांत होते ," बर झाल एकदाची झोपली आता मला शांत झोप येईल.
सकाळी बराच वेळ झालेला असतो पण ती काही ऊठत नाही पार्थ रूम मधून बाहेर येतो त्याच्या आईची बडबड सुरूच असते,पण आता पार्थ आईला समजवायचा प्रयत्न करतो ,"अग आई तिला खरच बर नसेल,रोज सगळ करून जाते ना ती."

"शेवटी बायकोचाच झालास ना आता आमच कशाला ऐकशील," आईकडे दुर्लक्ष करून पार्थ रूम मधे जातो राधिकाला प्रेमाने हाक मारतो ३-४ दा पण ती काही ऊठत नाही तो तिला हलवतो तेव्हा त्याला जाणवते की ती एकदम गार पडली आहे आणि त्याला response देत नाहीये.

तो लगेच तिला दवाखान्यात नेतो,डॉक्टर तिला मृत सांगतात पार्थला हादरा बसतो.
reports आल्यावर डॉक्टर सांगतात की ulcer फुटल्यामुळे तिचा मृत्यु झाला तुम्ही जर लगेच काल आनलं असत तर ती वाचली असती ,body मध्ये poision पसरल्यामुळे रात्री ११.३० ला तिचा मृत्यु झाला.

पार्थला तिचा शेवटचा हुंदका आठवतो आणि तो रडायला लागतो त्याला स्वतःचा राग येतो.

" राधिका सगळे नाते सोडून माझ्या सोबत आली माझे सगळे नाते जपले आणि मी तिला समजून न घेता तिच काहीही न ऐकता तिच्याशी असा वागलो,माझ्यामुळे ती गेली" पण आता तो काही करू शकत नव्हता ती नेहमीसाठी त्याला सोडून गेली होती आता तीनेही त्याच्याशी अबोला धरला होता आणि तोही कायमचा.

मित्रहो:-
व्यक्ती जिवंत असेपर्यंत त्याची काळजी घ्या त्याला समजून घ्या ,त्याच्या मरणानंतर रडून काही अर्थ नाही कारण मरणानंतर शत्रूही रडतात.

आपल्या घरातील व्यक्तिवर खुप प्रेम करा...
आज तुम्ही त्यांना जवळ केले तर उद्या ते तुम्हाला जवळ घेतील..
राग आल्यास शांततेने समाजवा..प्रेमात

आज ती सुन आहे..तुमची

उद्या तुमची मुलगीही कोणाची तरी सुन होणार आहे...
हे विसरु नका....

धन्यवाद्.

No comments:

Post a Comment