✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दि. 01/10/2022 वार - शनिवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 🎇 . *दिनविशेष . 🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*आंतरराष्ट्रीय कॉफी दिन**आंतरराष्ट्रीयवृद्ध व्यक्ती दिन**आंतरराष्ट्रीय संगीत दिन*इ💥 ठळक घडामोडी :-◆१८३७-भारतातील पाहिले टपाल कार्यालय सुरू झाले.◆१९५८ - नासाची स्थापना.💥 जन्म :-◆१९०४ - ए.के. गोपालन, भारतीय कम्युनिस्ट नेता.◆१९१९ - ग.दि. माडगूळकर, मराठी कवी.💥 मृत्यू :-◆१९४२ - अँट्स पीप, एस्टोनियाचा पंतप्रधान.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *सर्वसामान्यांना महागाईचा झटका, 1 ऑक्टोबरपासून CNG-PNG च्या दरात वाढ, केंद्र सरकारनं नैसर्गिक गॅसची किंमत तब्बल 40 टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राजधानी दिल्लीमध्ये 5G सेवेचा शुभारंभ होणार*••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *नाशिक महापालिकेतील गेल्या पाच वर्षांपासून प्रलंबित नोकर भरतीसाठी राज्य सरकारकडून हिरवा कंदील मिळाला आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *पुढील 3 ते 4 दिवस राज्याच्या काही भागांत ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय.*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गांधीनगर-मुंबई 'वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन'ला दाखवला हिरवा झेंडा, मुंबईकरांसाठी आजपासून सेवेत*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *'गोष्ट एका पैठणी' हा राष्ट्रीय पुरस्कार विजेता सिनेमा 2 ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *अग्निपथ योजनेअंतर्गत 100 पदांसाठी सुमारे अडीच लाख महिलांनी लष्करी पोलिसांच्या (सीएमपी) सैन्य दलात भरतीसाठी नोंदणी केली आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••*व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/9mamp5qoB9o~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *दृष्टी तशी सृष्टी*https://nasayeotikar.blogspot.com/2018/05/30.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *साडेतीन अब्ज वर्षांपूर्वी ते दहा कोटी वर्षांपूर्वीपर्यंतचा सजीवांचा इतिहास काय ?* 📙मानवी आयुष्याचा काळ जेमतेम ७०-८० वर्षांचा आहे. जास्तीत जास्त १०० वर्षे धरली, तरीही त्याच्या दृष्टीने हजारभर वर्षे म्हणजे फार पुरातन काळ होतो. पण पृथ्वीवरील सजीवांचा इतिहास व त्यांची आजवरची वाटचाल पाहावयाची झाली, तर किमान दहा कोटी वर्षे मागे जावे लागते. दहा कोटी वर्षे मागे जाण्याचे कारण म्हणजे सध्याची आपल्याला ज्ञात असलेली पृथ्वी, तिच्यावरील खंडे, तेथील हवामान हे या सुमाराला रंगरूपाला वा आकाराला येऊ लागले. त्याला आता दहा कोटी वर्षांचा काळ लोटला आहे. या आधीचे प्राणी, वनस्पती हे कसे होते आणि त्यांची सध्याच्या सजीवांशी कितपत जवळीक होती, यांची उत्तरे या अतिप्राचीन कालखंडामध्येच शोधावी लागतात. आपले घर कसे होते, कोणी बांधले, येथे पूर्वी काय होते, गाव वसले कधी, त्याआधी जंगल होते काय - या प्रश्नांची तशी सामान्य माणूस आपल्या वडील, आजोबा, पणजोबांकडे चौकशी करतो, त्यात आस्था दाखवतो, अगदी तशीच आस्था शास्त्रज्ञांना या गोष्टींबद्दल नेहमी वाटत आली आहे.साडेतीन अब्ज वर्षांपूर्वीची अलगी या स्वरूपातील वनस्पती ऑस्ट्रेलियातील शार्कबे या भागातील फॉसिल्समध्ये सापडली आहे. वनस्पतीजीवनाचा हा उपलब्ध झालेला सर्वात जुना पुरावा. पंचेचाळीस कोटी वर्षांपूर्वी गोड्या पाण्यात व त्याच्या काठावर वनस्पती फोफावू लागल्या होत्या. प्रत्यक्ष झाडे या स्वरूपात वनस्पतीजीवन आढळले आहे, त्याला यावरही तीन कोटी वर्षे जावी लागली. एकपेशीय वा बुरशीजन्य वनस्पतींपासून ही प्रगती होण्याला एवढा मोठा काळ गेला आहे. बेचाळीस कोटी वर्षांपूर्वी या वनस्पती सर्वत्र पसरू लागल्या. बहुधा याच सुमाराला या वनस्पतींवर वाढणारे व त्यांच्या कुजण्यातून अन्नपोषण मिळवणारे सजीव प्राणी निर्माण झाले असावेत. सुमारे सदतीस कोटी वर्षांपूर्वी या काळात या प्राण्यांतूनच काही पृष्ठवंशीय किंवा व्हटेंब्रेट्स निर्माण झाले असणार. सरपटणारे रेप्टाईल जातीचे हे पृष्ठवंशीय प्राणी सर्वत्र वावरू लागले, पण उंच डोंगर पार करण्याकरता त्यांना अजून काही कालखंड लागला. अंदाजे सव्वीस कोटी वर्षांपूर्वी या प्राण्यांचा आकार वाढत गेला व त्यांनी सर्व पृथ्वीवर फेरफटका मारायला सुरुवात केली. आता त्यांना जमिनीवरचे विविध अडसर अडवू शकत नव्हते. रेप्टाईल या प्रकारातील पृष्ठवंशीय प्राण्यांचे दोन प्रकारांत याच सुमाराला रूपांतर झालेले आढळते. सस्तन प्राणी व मॅमल जातीकडे एका प्रकारची वाटचाल सुरू झाली, तर दुसरा प्रकार डायनाॅसाॅर या प्रकारात रूपांतरित होत गेला.आज वाचायला आश्चर्य वाटेल, पण संपूर्ण दिवसांवर या महाकाय डायनाॅसाॅरचेच राज्य असे व केवळ अंधारात यांना कमी दिसत असल्याने अन्य सस्तन प्राणी निकाराची भूमिका बजावत. नेमकी कारणे ज्ञात नाहीत; पण दहा कोटी ते सात कोटी वर्षांपूर्वीच्या दरम्यान हे महाकाय प्राणी पृथ्वीवरून अचानक नष्टप्राय झाले. त्यानंतरचा काळ म्हणजे सस्तन पृष्ठवंशीय प्राण्यांचा आहे. त्यांपैकीच एक म्हणजे माणूस. यांचे दिवसा व रात्री पृथ्वीवर अबाधित प्राबल्य आहे. निदान तसे आपण तरी समजतो.विविध कालखंडांचा क्रम पुढीलप्रमाणे : डेव्हिनियन (३७ कोटी वर्षांपूर्वी)पर्मियन (२७ कोटी वर्षांपूर्वी) ज्युरासिक (१७ कोटी वर्षांपूर्वी) क्रेटेशन (१० ते ७ कोटी वर्षांपूर्वी)*'सृष्टिविज्ञान गाथा' या पुस्तकातुन* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*“ विश्रांती देणारे एकमेव औषध म्हणजे झोप. ”**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) २०२० चा चित्रपट सृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला प्राप्त झाला ? २) अलीकडेच मशिदीत पाऊल ठेवणारे किंवा मदरशात जाऊन विद्यार्थ्यांशी बोलणारे पहिले संघप्रमुख कोण ठरले आहेत ?३) आंतररष्ट्रीय व्याघ्रदिन केव्हा साजरा केला जातो ?४) कठीण कवचाची फळांची नावे सांगा.५) भारतात पहिली बुलेट ट्रेन कोणत्या दोन शहरादरम्यान धावणार आहे ?*उत्तरे :-* १) आशा पारेख ( ७९ ), प्रसिध्द अभिनेत्री २) मोहन भागवत, संघप्रमुख, रा. स्व. संघ ३) २९ जुलै ४) नारळ, अक्रोड, कवठ, बदाम इत्यादी ५) मुंबई ते अहमदाबाद *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••● डॉ. सौ.सारीका शिंदे, संभाजीनगर.(श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे यांची कन्या)● अर्जुन वाकोरे● विशाल मस्के● निलेश पंतमवार● व्यंकट रेड्डी मुडेले● गोविंदराव इपकलवार● आनंद पेंडकर● व्यंकटेश काटकर, विचारवेध ● गजानन काळे ● सुभाष टेकाळे ● श्रीकांत भोसके ● माधव शिंदे ● साईनाथ पलीकोंडावार*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*'मानवी' नात्यांमधील ओलावा हा जन्मजात असतो. तो सगळ्यांच्याच मनात झिरपत असतो. पण बरेचदा आम्हीच अनेक आवरणांचे थर लेपून त्यात प्रतिबंध तयार करतो. इथूनच 'मैत्री'च्या नात्यांमधील दुरावे, विसंवाद प्रसवतात. स्वत:कडे दोष घेऊन नाते जपण्याची क्रिया आत्मशुद्धीकडे नेणारी असते. त्यातून ख-याखु-या अस्सल 'मैत्री'ची नाती निर्माण होतात.**बरेचदा आपल्या पुढाकारातून व घडलेल्या संवादातून दुभंगलेली मने सांधली जातात पण त्याकरिता मुखवटे उतरवून माणूस वाचता यायला हवा. मनात क्षमाभाव जागृत ठेवायला हवा. निर्मळ, शुद्ध प्रेमभाव बाळगल्यास वाट्याला येणारी निराशा गळून पडेल, आणि 'मैत्री' अभंग राहिल.. हीच भावना जीवनदर्शी महाकवी 'मिर्झा गालिब' अगदी सहजपणे सांगून जातात.....* *" कुछ इस तरह मैने* *जिंदगी को आसान कर दिया,* *किसी से मांग ली माफी,* *किसी को माफ कर दिया !"* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●••💥💥💥💥💥💥💥💥💥 *श्री संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• कोणत्या चित्रात कोणते आणि कसे रंग द्यायचे हे आपण आपल्या कल्पकतेने ठरवून ते चित्र पूर्ण करतो.पण जीवनाचे सुंदर चित्र बनवण्यासाठी कुठे,कसे रंग भरावे हे लवकर लक्षात येत नाही.जीवनाच्या चित्रात रंग भरण्यासाठी कल्पकतेबरोबर, कठोर परिश्रमाचीही आवश्यकता लागते, परिस्थितीनुसार कोणत्या वेळी कोणता रंग भरावा याचेही ज्ञान असावे लागते.कधीकधी घाई केली तर आपण ठरवलेल्या रंगांमध्ये एखाद्या रंगाचे प्रमाण कमीजास्त झाले तर त्या रंगाचा बेरंगही होऊन जातो.सांगण्याचा तात्पर्य हा की, परिस्थितीनुसार रंग बदलण्याचीही आपली तयारी ठेवायला हवी आणि समयसुचकतेनुसार विचार करुन जीवनाचे सुंदर चित्र काढायलाही आणि रंगवायलाही आले पाहिजे.नाहीतर जीवनच रंगहीन बनून जाईल.खरंच मूळातच जीवन सुंदर आहे आणि त्या सुंदर जीवनाला अधिक सुंदर बनवण्यासाठी वेगवेगळ्या रंगरुपी छटांचेही ज्ञान आणि कल्पकता ज्यांना अवगत आहे आणि ज्यांना साध्य करता येते त्यांना आपल्या जीवनाचे चित्र छान आणि सुंदर बनवता येते. हे मात्र खरे आहे.© व्यंकटेश काटकर,नांदेड.संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३.🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *कुत्रा आणि लांडगा*एक लांडगा फार दिवस उपाशी राहिल्यामुळे रोड झाला होता. काहीतरी खायला मिळाले तर पहावे म्हणून तो चांदण्या रात्री फिरत होता. तेव्हा त्याला एका कुणब्याच्या झोपडीजवळ दारावर एक लठ्ठ कुत्रा बसलेला दिसला. त्याने त्याला रामराम करून त्याचा आदरसत्कार केल्यावर लांडगा त्याला म्हणाला, ''तू फार चांगला दिसतोस, तुझ्यासारखा देखणा व धष्टपुष्ट प्राणी आजपर्यंत मी पाहिला नाही. याचे कारण तरी काय? मी तुझ्यापेक्षा जास्त उद्योग करतो, पण मला पोटभर खायला मिळत नाही.'' कुत्रा म्हणाला, ''अरे, मी करतो ते तू करशील तर माझ्यासारखाच तूही सुखी होशील.''त्यावर लांडग्याने विचारले, ''तू काय करतोस?'' कुत्रा म्हणाला, ''दुसरे काही नाही. रात्रीच्या वेळी मालकाच्या दारापुढे पाहारा करून मी चोराला येऊ देत नाही.'' लांडगा म्हणाला, ''एवढंच ना? ते मी मनापासून करीन बाबा. अरे मी रानात भटकत थंडीवारा सोसतो तर मला घराच्या सावलीत बसून पोटभर अन्न मिळाल्यास दुसरे काय पाहिजे?'' याप्रमाणे दोघांमध्ये बोलणे चालले असता कुत्र्याच्या गळ्याला दोरीचा करकोचा पडलेला लांडग्याने पाहिला. तेव्हा तो कुत्र्याला म्हणाला, ''मित्रा, तुझ्या गळ्यात काय रे हे?'' कुत्रा म्हणाला, ''अं हं. ते काही नाही.'' लांडगा म्हणाला, ''तरी पण काय ते मला कळू देत.'' कुत्रा म्हणाला, ''अरे, मी थोडासा द्वाड आहे, लोकांना चावतो, म्हणून मी दिवसा झोपलो तर रात्री चांगला पहारा करीन म्हणून माझा मालक मला दोरीने बंधून ठेवतो पण दिवस मावळला की तो मला सोडतोच. मग मी वाटेल ते करतो, वाटेल तिकडे फिरतो. खाण्यापिण्याविषयी विचारशील तर माझा मालक आपल्या हाताने मला भाकरी खाऊ घालतो. घरची सगळीच माणसं मला मायेने वागवतात. पानावर उरलेली भाकरी माझ्याशिवाय दुसर्‍या कोणाला देत नाहीत. तेव्हा तू पहा, माझ्यासारखा वागशील तर तही सुखी होशील.'' ते ऐकताच लांडगा मागच्यामागे पळू लागला. त्याला हाका मारीत कुत्रा म्हणाला, ''अरे, असा पळतोस काय?'' लांडगा दुरूनच म्हणाला, ''नको रे बाबा मला ते सुख, ते तुझे तुलाच लाभो. स्वतंत्रपणे वाटेल तसे वागता येत असेल तर तसली गोष्ट मला सांग, तुझ्यासारखे बांधून ठेऊन जर मला कोणी राजा केले तर ते राजेपणदेखील मला नको!''तात्पर्य : स्वतंत्रपणा असताना गरिबीही चांगली. पण परतंत्रपणा असेल तर श्रीमंतीचाही काही उपयोग नाही.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दि. 30/09/2022 वार - शुक्रवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 🎇 . *दिनविशेष . 🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आंतरराष्ट्रीय भाषांतर दिन* 💥 ठळक घडामोडी :-◆ १९९३ - लातूर, किल्लारी भागात तीव्र भूकंप हजारो मृत्युमुखी, लाखो बेघर.💥 जन्म :-◆ १९३३ - प्रभाकर पंडित, मराठी संगीतकार.◆१९६२ - शान, भारतीय संगीतकार.◆१९८०-मार्टिना हिंगीस , लाँनटेनिस खेळाडू💥 मृत्यू :-◆ २००१- माजी रेल्वे मंत्री,नागरी हवाई वाहतूक मंत्री ,कांग्रेसचे नेते माधवराव शिवाजीराव शिंदे (सिंधिया) यांचा विमान अपघातात मृत्यू.◆ १९९२ - गंगाधर देवराव खानोलकर, मराठी लेखक.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *राज्य सरकारचं भेट, मुंबई महापालिकेचे कर्मचारी, महापालिकेचे शिक्षक, बेस्टचे कर्मचारी यांना दिवाळी बोनस जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरींची मोठी घोषणा! कारमध्ये 6 एअरबॅगची अंमलबजावणी पुढील वर्षापासून*••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *काश्मीरमध्ये मोठ्या घातपाताचा कट उधळला, सुरक्षा दलांकडून प्रत्येक बसची चौकशी*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *अमेरिकेच्या फ्लोरिडा राज्याला इयान वादळाचा फटका, २५ लाख नागरिकांचं स्थलांतर*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर देशातील सर्वात उंच केबल-स्टेड ब्रीज, प्रवास होणार आणखी जलद*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *सीमाभागात मराठी बांधवांवर अन्याय होत असताना अंबाबाई मंदिरात कन्नड भाषेत बोर्ड का? मराठी एकीकरण समितीचा संताप*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *धर्माबाद जि. नांदेड येथे वीज पडून एका शाळकरी मुलींचा मृत्यू*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••*Opposite Words विरुद्धार्थी शब्द👇**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/HUnNmxyrG7A~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *लोभाचे फळ*https://nasayeotikar.blogspot.com/2018/05/29.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *दमा म्हणजे नेमके काय ?* 📙रुग्णाला दमवतो म्हणूनच या आजाराला दमा असे नाव पडले असावे ! अस्थमा, ब्राँकायटिस, व्हीझ, बाळदमा यांत धाप लागणे हे प्रमुख लक्षण असते. काही गंभीर हृदयाच्या आजारात व फुप्फुसाच्या आजारातही धाप लागणे हे लक्षण दिसून येते. पण दमा या आजारात इतर कोणतीही कारणे नसताना श्वासनलिकांचा आकार लहान होतो. श्वासनलिकांमध्ये असलेले गोलाकार स्नायू कोणतेही ज्ञात कारण नसताना आकुंचन पावल्याने ही क्रिया घडून येते. अर्थातच फुप्फुसांना होणारा शुद्ध हवेचा पुरवठा कमी पडू लागतो. श्वासाची क्रिया जलद गतीने करावी लागते. एरवी जी क्रिया घडत असल्याचे भान कोणत्याही प्राणिमात्राला ठेवावे लागत नाही, ते भान वा जाणीव होऊ लागते. यालाच दमा असे म्हणतात.दम्याचा परिणाम होऊन फुफ्फुसांची लवचिकता कमी होत जाते. लवचिकता कमी झाल्यावर प्राणवायू घेणे व दूषित कार्बन डायऑक्साईड वायू बाहेर टाकणे या क्रियेमध्ये शिथिलता येते. शरीराला प्राणवायू हळूहळू कमी पडू लागतो. चयापचयाच्या क्रियेसाठी प्राणवायूची गरज सतत लागते. ती पूर्ण होईनाशी होते. हे टाळण्यासाठी दम्याच्या विकाराकडे गंभीरपणे लक्ष देणे आवश्यक आहे.दमा हा थोडाफार अनुवांशिक असू शकतो. शहरी वातावरणातील धूर, धूळ, विविध रासायनिक प्रदूषण यांमुळे दम्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. विशेषत: २० वर्षांच्या आतील मुलामुलींना दमा असणे हे २५ वर्षांपूर्वीपेक्षा चक्क दसपटींनी वाढले आहे. शहरातील प्रदूषणाचा हा दृश्य परिणाम भयानकच आहे.दम्याचे नेमके कारण काय, हे आजही कोणाला माहित नाही. काहीजणांच्या बाबतीत अॅलर्जी हे कारण आढळते. एखाद्या पदार्थाच्या, एखाद्या वासाच्या वा एखाद्या रसायनाच्या वासाने, स्पर्शाने, संपर्काने दमा उफाळून आल्याची उदाहरणे आहेत. पण सर्वांचाच दमा तसा नसतो. काहींना जास्त श्रमानंतर दमा सुरू होऊ शकतो, तर काहींना व्यायामाने बरे वाटून दमा कमीही होतो. या प्रकारच्या उलटसुलट निष्कर्षांमुळे दम्याचा इलाज कठीण होऊन बसला आहे. थोडेफार पथ्यपाणी ज्याचे त्याला कळत असेल तसे करणे, हाच याचा थोडासा प्रतिबंधक भाग होतो.दम्यामुळे साऱ्या आयुष्यावरती निराशा झाकोळून राहावी, अशी परिस्थिती गेल्या १५-२० वर्षांत राहिलेली नाही, एवढाच यातील महत्त्वाचा दिलासा आहे. त्यापूर्वी मात्र चांगली परिणामकारक औषधे उपलब्ध नव्हती. त्यामुळे दम्याचा त्रास सुरू झाला की, नेहमीचे उद्योग करणे अशक्य होऊन विश्रांती घेणे एवढाच एक उपाय राहत असे. हल्ली मात्र कमीत कमी दुष्परिणाम असणारी, सहजगत्या रुग्णालाच वापरता येतील अशा स्वरूपातील औषध उपलब्ध आहेत. इंजेक्शनद्वारे औषधांचा उपयोग करणे दम्याच्या बाबतीत आजकाल क्वचितच जरुरीचे भासते. अर्थातच डॉक्टरी सल्ल्यानुसार वापरता येणाऱ्या इनहेलर (Inhaler) मधून खोल श्वास घेऊन, थेट फुप्फुसांपर्यंत अगदी नेमका औषधांचा डोस जाऊन, श्वासनलिकांचे आकुंचन कमी करता येणे शक्य होते.दमा सुरू झाल्यावर खूप त्रास होऊ लागल्यावर इलाज करण्याऐवजी सुरू होताच इलाज केल्यास तो लवकर आटोक्यात येतो; हेही सिद्ध झाले आहे. ज्या आजारात आजार्‍याला रोगाची पूर्ण जाणीव व इलाजाचे स्वरूप माहित असणे अत्यावश्यक आहे, स्वतःच तातडीने इलाज सुरू करणे आवश्यक आहे, कोणावरही अवलंबून राहणे चुकीचे आहे, अशा मोजक्या आजारात दमा मोडतो. म्हणूनच दम्याचा विकार असल्यास प्राथमिक इलाजाचे स्वरूप नीट माहित करून घ्यावे.*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*“ एक चागंली माता शंभर शिक्षकांच्या मोलाची असते. ”**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) जगात सर्वाधिक स्थलांतरित होणाऱ्यांमध्ये प्रथम क्रमांकाचा देश कोणता ?२) दक्षिण आशियातील ब्रेल लिपीतला पहिला शब्दकोष असा मान मिळविलेल्या शब्दकोशाचे नाव काय ?३) राष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२२ कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला ?४) सिलिकॉन या मूलद्रव्याची संज्ञा काय आहे ?५) जागतिक गेंडा दिवस केव्हा साजरा केला जातो ?*उत्तरे :-* १) भारत २) हेमकोष, आसामी शब्दकोष ३) जम्मू काश्मीर ४) SI ५) २२ सप्टेंबर *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••● प्रमोद रत्नाळीकर● अनुराग वानरे● निलेश सुंकेवार● सतीश दमकोंडवार● पोतन्ना डेबेवार● देवन भोयर● महेश घुगारे● विशाल जारे पाटील● मन्मथ लिमशेट्टे● संतोष भालके*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*आज घटस्थापना होऊन नवरात्रौत्सवाला प्रारंभ होईल. नऊ दिवस दुर्गादेवीची पूजा केली जाईल. घटामध्ये माती घालून त्यात बी रूजत घातलं जातं. देवीसमोर अखंड दीप लावला जातो. देवीपुढे क्रमाक्रमाने वाढत जाणा-या फुलांच्या माळा बांधल्या जातात, आरत्या म्हटल्या जातात. दिवसभर देवी भागवत, श्रीदुर्गासप्तशतीची पारायणं केली जातात. 'जय आंबे माता' असा मोठ्या आवाजात पुकारा केला जातो. रात्री रस्त्यावर मंडप घालून जागोजागी दांडिया खेळला जातो. देवीच्या मंदिरात मोठ्या प्रमाणात रोषणाई केली जाते. नवरात्रीचे नऊ दिवस संपून जातील. मंदिरातल्या किंवा देवघरातल्या देवीचा उत्सव वर्षानुवर्षे साजरे केले जातात**पण मनात प्रश्न येतो तो घराघरात वावरणा-या देवीचं काय? माता, भगिनी, कन्या, सून, नात या रूपात वावरणा-या देवीचा प्रश्न कधी सुटणार? मंदिरात पूजा आरती करणारे देवीभक्त घरातील देवीकडे कधी लक्ष देणार? प्रत्यक्ष देवाने स्त्री-पुरूष असा भेदभाव कधीही केला नव्हता. प्राचीन काळी पुरूषांनी प्रथम देवीचीच मंदिरं उभारली, मग मधल्या काळात असं काय घडलं ? मध्यंतरी वाचलेली एक गोष्ट मला आठवते. एकदा प्रत्यक्ष देव आणि पृथ्वीवरचा माणूस यांची अकस्मात भेट झाली. गंमत म्हणजे लगेचच दोघांनीही एकमेकांशी बोलताना पहिलं वाक्य उच्चारलं, 'माझी निर्मिती केल्याबद्दल तुझे मन:पूर्वक आभार !' "खरोखरच प्रथम कोणी कोणाची निर्मिती केली? देवाने माणसाची की माणसाने देवाची ?"* • • ● ‼ *रामकृष्णहरी* ‼● • •🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸 *संजय नलावडे, मुंबई* *मोबाईल - 9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *काव्यांगण* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••शाळा बंद धोरण सरकारचं धोरण काही कळत नाही बुवासरकारी शाळा बंद करून खाजगीकरणाला देती हवागाव तेथे शाळा असायलाच हवीलहान लहान चिमुकली लेकरं कसे जातील दूर गावी ?लोकसंख्याच्या प्रमाणात विद्यार्थी संख्या ही असेल कमीसरकार असे शाळा बंद करूनकसे देईल शिक्षणाची हमी ?गावोगावच्या शाळा बंद झाली तर अनेक शिक्षक अतिरिक्त ठरतीलडी. एड. पदविका धारक नवीन शिक्षकांची पदे कसे भरतील ?शिक्षण हक्क कायदा ठरला फक्त कागदावरस्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात गरिबांची मुलं वाऱ्यावरमायबाप सरकार नका करू असे गैरसोयगरिबांच्या शिक्षणाची दारावरच करा सोयदारावरच करा सोय ........- नासा येवतीकर, विषय शिक्षक,कन्या शाळा धर्माबाद जि. नांदेड9423625769•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• प्रत्येकाला आपल्या जीवनात आनंद मिळवायचा असेल तर प्रथम एकाकी जीवन व एकांतात राहणे सोडून द्यावे.कारण एकाकी जीवनात नको ते विचार मनात येतात आणि त्रस्त करतात.त्याचा परिणाम स्वत:च्या जीवन जगण्याच्या जीवनशैलीवर होतो आणि त्यामुळे सुखासमाधानाने असलेले जीवन दु:खात जगत असल्याचे वाटते.त्यापेक्षा इतरांच्या सानिध्यात राहून त्यांच्या आनंदी जीवनात आपणही राहावे.असे केल्याने आपल्या मनात आणि मनावर असलेले दडपण थोड्याप्रमाणात कमी होण्यास मदत होते.इतर लोक कसे जगतात याचेही अवलोकन करता येते.आपण दु:खी कशामुळे आहोत याचेही कारण शोधता येईल आणि शेवटी जीवन आनंदी जीवन कसे जगता येईल याचेही आपल्याला कौशल्य प्राप्त करता येईल.खरे जीवन जगण्याचा मंत्र आपल्या एकटेपणात मिळणार नाही तर इतरांच्या सानिध्यात राहिल्याने मिळतो हे आपल्याला नक्कीच मिळेल.© व्यंकटेश काटकर,नांदेड.संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३.🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *सदाचरण*फार वर्षापूर्वी वाराणसी येथे देवमित्र नावाचे राजपुरोहित राहत होते. राजाला राजपुरोहितांच्‍या विद्वत्तेचा व योग्‍यतेचा यथायोग्‍य आदर होता म्‍हणूनच तो त्‍यांची प्रत्‍येक गोष्‍ट ऐकत असे. प्रजेमध्‍येसुद्धा राजपुरोहितांबद्दल सन्‍मानपूर्वक आदर होता. एक दिवस राजपुरोहितांना वाटले की राजा आणि इतर सर्व प्रजा आपल्‍याला इतक्‍या आदरपूर्वक का वागवतात याचे कारण जाणून घ्‍यावे. राजपुरोहितांनी हे जाणून घेण्‍यासाठी एक गुप्‍त योजना बनविली. दुस-या दिवशी त्‍यानी दरबारातून परतताना राजाच्‍या खजिन्‍यातून एक सुवर्णमुद्रा गुपचुप उचलून घेतली. हे खजिनदाराने पाहिले पण ते पाहून त्‍याने न पाहिल्‍यासारखे केले. हा प्रकार परत दुस-या दिवशीही घडला. राजपुरोहितांनी पुन्‍हा दुस-या दिवशी हळूच एक सुवर्णमुद्रा उचलली व स्‍वत:जवळ ठेवली. तिस-या दिवशी त्‍यांनी एक मुठभर सुवर्णमुद्रा उचलल्‍या व खिशात भरल्‍या. यावेळी मात्र खजिनदाराने सैनिकांना बोलावले व राजपुरोहितांना कैद करण्‍यास सांगितले. राजपुरोहितांना कैद झाली ही गोष्‍ट राजाच्‍या कानावर गेली. न्‍यायदान करताना राजाने आपला निर्णय दिला की राजपुरोहितांकडून घडलेल्‍या या चुकीबद्दल त्‍यांना तीन महिने सक्त कारावासाची सजा देण्‍यात यावी. तीनवेळेला त्‍यांनी कोषातून धन चोरले म्‍हणून तीन महिने सजा देण्‍यात आली आहे जेणेकरून ते पुन्‍हा असा अपराध करण्‍यात यशस्‍वी होणार नाही. या न्‍यायावर राजाने राजपुरोहितांची प्रतिक्रिया विचारली. राजपुरोहितांनी राजाला यामागील कारण सांगताना,'' राजन, मी काही अट्टल चोर नाही. मी फक्त जाणून घेण्‍यास इच्‍छुक होतो की लोक कशामुळे मला सन्‍मान देतात, वैयक्तिक माझा सन्‍मान करतात की मी करत असलेल्‍या सदाचरणाचा लोक सन्‍मान करतात. पण आता माझ्या लक्षात आले आले आहे की लोक हे माझ्या विद्वत्तेपेक्षा माझ्या सदाचरणाला महत्‍व देतात. गैरवर्तणूक करताच मी दंडास प्राप्‍त झालो आणि त्‍यावेळेला माझी विद्वत्ता, संपत्ती, मानमरातब हे काहीही मदतीला आले नाही. माझे सद आचरण हेच माझ्या सन्‍मानाचे कारण आहे हे मला समजून चुकले आहे. मी माझ्या गैरवर्तणुकीबद्दल आपली क्षमा मागतो.'' राजाने यावर सांगितले,''राजपुरोहित महाराज, तुम्‍ही कोणत्‍याही भावनेतून जरी हे कार्य केले असले तरी तुम्‍हाला दंड होणे क्रमप्राप्त आहे तरी तुम्‍ही शिक्षेस तयार राहा.'' राजपुरोहितांनी राजाचे म्‍हणणे ऐकले व स्‍वत:ला सैनिकांच्‍या स्‍वाधीन केले.*तात्‍पर्य :-सदाचरण हेच मनुष्‍याचे धन आहे.**संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🎇 दि. 29/09/2022 वार - गुरूवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 🎇 . *दिनविशेष . 🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••💥 ठळक घडामोडी :-★ १२२७ - क्रुसेडमध्ये भाग न घेतल्याबद्दल पोप ग्रेगोरी नवव्याने पवित्र रोमन सम्राट फ्रेडरिक दुसऱ्याला (चित्रित) वाळीत टाकले.★ १९९२ - ब्राझीलचे अध्यक्ष फर्नांडो कोलोर डी मेलो यांच्यावर महाभियोग चालवण्यात आला.★ २०१६ - उरी हल्ल्याच्या अकरा दिवसांनंतर, भारतीय लष्कराने पाकिस्तान-प्रशासित काश्मीरमध्ये संशयित अतिरेक्यांवर "सर्जिकल स्ट्राइक" केले.💥 जन्म :-★ १७८६ - ग्वादालुपे व्हिक्टोरिया, मेक्सिकोचा पहिला राष्ट्राध्यक्ष.★ १९५१ - मिशेल बाशेलेट, चिले देशाची पहिली स्त्री राष्ट्राध्यक्ष.★ १९५६ - सेबास्टियन को, इंग्लिश धावपटू💥 मृत्यू :-★ १९८७ - हेन्री फोर्ड दुसरा, अमेरिकन उद्योगपती.★ २००१ - न्विन व्हान थ्यु, दक्षिण व्हियेतनामचा राष्ट्राध्यक्ष.★ २००६ - वॉल्टर हॅडली, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *दिल्लीत झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत नरेंद्र मोदी सरकारकडून 78 दिवसांचा बोनस मंजूर, कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदा जल्लोषात होणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील आर व्यंकटरमणी यांची देशाच्या अॅटर्नी जनरलपदी पुढील तीन वर्षासाठी नियुक्ती*••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *नवी दिल्ली: प्रचंड कर्जात बुडालेल्या व्होडाफोन आयडियाच्या २५.५ कोटी ग्राहकांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. नोव्हेंबरपासून कंपनीचं नेटवर्क बंद होऊ शकतं.*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांची २५ हजार रुपये बोनसची मागणी, महापालिकेच्या कर्मचारी समन्वय समितीच्या बैठकीत मागणी मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीनंतर दिवाळी बोनसबाबत निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *पुण्यात वाहतुकीसाठी अडथळा ठरणारा चांदणी चौकातील पूल पाडण्याची तयारी सुरु झालीय. 1 ऑक्टोबरला पूल पाडला जाणार आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *कोल्हापूर महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत “माता सुरक्षित तर घर सुरक्षित” अभियानाचा शुभारंभ, 26 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर या कालावधीत हे अभियान राबवलं जाणार आहे*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *नवरात्रीनिमित्त पंढरपूरच्या विठ्ठल मंदिर गाभाऱ्यात आकर्षक आणि नयनरम्य फुलांची सजावट करण्यात आलीय..*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••*Antonyms words विरुद्धार्थी शब्द👇**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/capZhRn1maI~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आधारकार्डचा इतिहास*सध्या भारतात कोणत्याही कामासाठी एक महत्वाचे डाकूमेंट बनलेले आधार कार्ड कसा जन्म घेतला ..........!पूर्ण माहिती खालील लिंकवर वाचता येईल.https://nasayeotikar.blogspot.com/2015/10/blog-post.htmlलेखक - नासा येवतीकर, धर्माबाद•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *जीपीएस म्हणजे काय ?* 📙हल्ली पर्यटन करण्याची एक चांगली सवय सर्वसामान्यांना लागलेली आहे. पर्यटनाचा फार मोठा फायदा आपणाला होत असतो. त्या ठिकाणचं राहणीमान, भौगोलिक संपन्नता, सामान्यांचे प्रश्न या निमित्ताने समजण्यास मदत होते. अर्थात तसा दृष्टीकोन ठेवून पर्यटन केले तरच बरं का ! असे पर्यटनाला गेलो तर रस्ते सापडणे किंवा ठिकाण मिळणे काहीवेळा अवघड होते. प्रत्येक वेळी कोणाला तरी पत्ता विचारत राहणं सुद्धा नकोसं वाटतं. पण आता एक नवी प्रणाली आपल्या हातात आलेली आहे. जीपीएस त्याचं नाव. मोबाइलमध्ये असलेल्या या सिस्टीममध्ये नुसतं ठिकाण टाइप केलं किंवा आवाजाच्या माध्यमातून जरी सांगितलं तरी आपणाला त्या ठिकाणी सहीसलामत पोहोचवण्याचं काम ही जीपीएस यंत्रणा करते.एखाद्या गावाचं किंवा ठिकाणाचं स्थान आपण त्याच्या अक्षांश आणि रेखांशावरून ठरवू शकतो. पण एव्हरेस्टचं ठिकाण निश्चित करण्यासाठी एवढीच माहिती पुरेशी नाही. कारण लांबी, रुंदी बरोबरच उंचीचीही जोड त्यासाठी आवश्यक आहे. तीन मितीतील म्हणजे थ्री डायमेन्शनमधील माहिती मिळाली तरच आपण कोणत्याही ठिकाणचा पत्ता निश्चित करू शकतो. आता प्रश्न एवढाच उरतो की, या तीन मितींची माहिती मिळवायची कशी ? ती माहिती मिळवायची असेल तर उपग्रहांची मदत घेतली पाहिजे. आणि तेही भूस्थिर उपग्रह. हे उपग्रह जवळपास छत्तीस हजार किलोमीटर अंतरावर असतात. पृथ्वी ज्या वेगाने स्वतःभोवती फिरत आहे त्याच वेगाने ते पृथ्वीबरोबर फिरत असतात. त्यामुळे पृथ्वीच्या दृष्टीने ते स्थिर वाटतात. म्हणूनच त्यांना भूस्थिर उपग्रह म्हणतात. कमीत कमी तीन भूस्थिर उपग्रह एकमेकाला एकशे वीस अंशाचा कोन करतील अशा पद्धतीने अवकाशात ठेवले तर आपणाला जगातील कोणत्याही ठिकाणची माहिती तरंग लहरींच्या माध्यमातून समजते. तीनपेक्षा जास्त उपग्रह ठेवले तर माहितीची अचूकता वाढू शकते.दिशादर्शक प्रणाली म्हणजे ठिकाणांची माहिती देणाऱ्या उपग्रहांचा समूह. सध्या सर्वात लोकप्रिय असणारी दिशादर्शक प्रणाली ही अमेरिकेची आहे. तिला जीपीएस म्हणजे 'ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम' म्हणतात. वापरण्यास अत्यंत सोपी असल्यामुळे ती सध्या सर्वमान्य झालेली आहे. अमेरिकेबरोबरच इतर देशांच्या सुद्धा दिशादर्शक प्रणाली अस्तित्वात आहेत. त्यामध्ये रशियाची ग्लोनास किंवा ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टिम, युरोपीय समुदायाची गॅलिलिओ, चीनची बेंड्डु, जपानची रक्वासी झेनिथ सॅटेलाईट सिस्टीम कार्यरत आहेत.भारताचीही स्वतःची दिशादर्शक प्रणाली आहे. तीचे नाव आहे आयआरएनएसएस (Indian Regional Navigation Satellite System) ही दिशादर्शक प्रणाली केवळ स्मार्टफोन पुरतीच मर्यादित न राहता तिचे अनेकविध उपयोग आहेत. आपत्ती व्यवस्थापन, वाहनांचा शोध, मोबाइल फोन यंत्रणेशी समन्वय, अचूक नकाशे, पर्यटक आणि गिर्यारोहकांना दिशादर्शनासाठी, वाहक चालकांना दृश्य आणि ध्वनींसह दिशा सांगण्याबरोबरच लष्करासाठी ती उपयुक्त असल्यामुळे काहीवेळा धोकासुद्धा संभवतो. भारताच्या या दिशादर्शक प्रणालीचा एकूण खर्च एक हजार चारशे वीस कोटी रुपये आहे. जीपीएसवर सध्या अवलंबून असणाऱ्यांनी आणि विकासाचे फायदे घेणाऱ्यांनी तरी अंतराळ संशोधनासाठी होणाऱ्या खर्चाच्या बाबतीत विचार करण्याची गरज आहे. ज्या उपेक्षित घटकांना या विकासाचे फायदे मिळत नाहीत त्यांचा विचार करणं आवश्यक आहे.*- नितीन शिंदे**'अंतराळ समजून घेताना' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*“ चुका करणे हा माणसाचा, परंतु क्षमा करणे हा ईश्वराचा गुणधर्म आहे. ”**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• १) भारताचे परराष्ट्र मंत्री/विदेश मंत्री ( Foreign minister ) कोण आहेत ?२) बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात सिंहाची ( Lion ) जोडी कोणत्या ठिकाणाहून येणार आहे ?३) प्रख्यात कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचा जन्म कोठे झाला ?४) जिवंत असेपर्यंत वाढ होणारे सजीव कोणते ?५) अनेक बिया असलेली फळे सांगा.*उत्तरे :-* १) एस. जयशंकर २) सक्करबाग उद्यान, जुनागढ, गुजरात ३) कानपूर, उत्तरप्रदेश ( २५ डिसेंबर १९६३ ) ४) वनस्पती ५) सीताफळ, फणस, टरबूज, पेरू इत्यादी *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••● प्रथमेश नागोराव येवतीकर● राजेश सामला● संदेश जाधव● महेश राखेवार● गणेश पेटेकर● मारोती वाघमारे ● अजय मिसाळे*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*खरंच, काही 'उपकार' असे असतात, की त्यांची परतफेड होऊ शकत नाही. काही 'उपकार' सदैव स्मरणात ठेवायचे असतात व कोणतेच 'उपकार' विसरायचे नसतात. अलिकडे कृतज्ञतेची जाणिव तरी कितपत शिल्लक राहिलेली आहे ? ज्याचा आधार घेऊन माणूस पुढे सरकतो, त्या आधारालाच नंतर धक्का देऊन बाजूला केलं जातं. यालाच जगरहाटी म्हणण्याची हिणकसता ब-याचवेळी तुम्ही आम्ही आपण सारे स्विकारतो.**माझ्यावर झालेले माझ्या माता-पित्यांचे, गुरूंचे, व्यक्तिगत वाटचाल करीत असताना सभोवतीच्या असंख्य ज्ञात-अज्ञात लोकांचे 'उपकार' हे माझ्या स्मरणकप्प्यातील एक सुगंधी भाग आहे, ही अगदी सामान्य भावना सातत्याने तेवत ठेवणे, म्हणजेच आपण आपले 'माणूसपण' जिवंत ठेवणे होय. या भावनेचाच जर विसर पडणार असेल, तर आपण पाषाणवत झालो आहोत हे कोणी वेगळे सांगण्याची गरज नाही. 'उपकार' फेडायचे नाहीत, तर ते सदैव स्मरणात ताजे राहतील अशी व्यवस्था करायची, कारण पुढच्या क्षणाचे भविष्य कोण सांगू शकेल ?* ••☆‼ *रामकृष्णहरी* ‼☆•• 🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹 *--संजय नलावडे, चांदिवली मुंबई* 📱 9167937040•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••काही माणसे आपल्या जीवनात खूप काही कमवण्याच्या प्रयत्नांमध्ये बरंच काही विसरुन जातात.त्यांना कमवण्याच्या मोह आवरत नाही.त्यांना वाटते की,आपल्यासारखे दुसरे कोणी पुढे जाऊ नये व या जगात आपल्यासारखे वैभवसंपन्न दुसरे राहू नये पण ह्या मोहापायी तो रक्ताच्या नात्याला, मित्राला आणि इतरांनाही विसरायला लागतो.अशा त्याच्या हावरट वृत्तीमुळे सारं सारं विसरुन एकटाच सुसाट धावायला लागतो, परंतु अशा कृतीमुळे आणि लालची कृतीमुळे तो स्वत:चेही जवळ आलेले सुख दूर करुन नको त्या सुखासाठी मागे लागल्यामुळे जीवनात असमाधानाशिवाय काहीच मिळणार नाही हे त्याला समजायला पाहिजे. कितीही कमावले तरी आपल्यासोबत काहीच घेऊन जाता येत नाही. माणसाने गरजा भागविण्यापुरते प्रयत्न करावेत.इतरांना तोडून, इतरांची मने कलुषित करुन जीवन जगणे म्हणजे मनुष्य जीवनाला काहीच अर्थ नाही. कोणताही मोह अति केल्याने जीवनाला घातकच असतो हे लक्षात असू द्यावे.*व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *सकारत्मक दृष्टिकोन*एक व्यापारी आपल्या दोन उंटावर माल लादून गावागावातून तो विकत असे. असाच एका गावात त्याने दिवसभर विक्री केली. रात्र झाल्याने तिथेच एका मंदिराच्या आवारात मुक्काम करण्याचे त्याने ठरवले. मैदानातील झाडाला उंट बांधून स्वतः मंदिराच्या ओसरीत झोपायचं असा विचार तो करतो. दोन्ही उंटांना झाडाजवळ नेतो. एका उंटाला दोरीने बांधतो. मात्र दुसऱ्या उंटाला बांधायला जातो तर दोरी कमी पडते. आता काय करावे ? पंचाईत झाली. उंट तसाच मोकळा ठेवणे शक्य नव्हते. व्यापारी परेशान झाला. इकडे तिकडे एखादी दोरी सापडतीय का ते पाहून लागला. ती काही दिसेना. त्याची परेशानी पाहून मंदिराचा पुजारी त्याच्या जवळ येऊन म्हणाला, "अरे. पहिल्या उंटाला बांधले तसेच दुसऱ्याला बांध." "महाराज, पण दोरी नाहीये न"पुजारी म्हणाला, "तू नुसतं दोरी बांधल्याचा नाटक कर"त्याप्रमाणे व्यापाऱ्याने खोटे खोटेच उंटाला दोरी बांधली. आश्चर्य म्हणजे त्यानंतर तो दुसरा उंटही निवांत खाली बसला.सकाळी व्यापारी उठून, सगळे आवरून दुसऱ्या गावी जायला निघाला. झाडाजवळ येऊन पहिल्या उंटाची दोरी सोडली. तो उंट उभा राहिला. दुसऱ्या उंटाला काही दोरी बांधलेली नव्हतीच म्हणून व्यापाऱ्याने त्या दुसऱ्याला फक्त "झ्याक झ्याक" असा आवाज देऊन उठवले. पण तो दुसरा उंट काही उठेना. व्यापारी पुन्हा परेशान. तिथेच उभा असलेला पुजारी हसू लागला. तो म्हणाला, "अरे, तो उठणार नाही. कारण तू त्याची दोरी कुठे काढलीस?""पण महाराज, मी दोरी बांधलीच कुठे होती ? नुसते नाटक केले होते न "पुजारी म्हणाला, "नाटक तुझ्यासाठी होते. पण त्याला तर ते खरेच वाटले होते न. म्हणून आता ती काल्पनिक दोरी सोडव. मग पहा"त्याप्रमाणे व्यापाऱ्याने दोरी काढल्याचे नाटक केले. आणि काय आश्चर्य ? तो दुसरा उंट तटकन उठला की !! व्यापारी चकित झाला !!पुजारी म्हणाला "जसा हा उंट अदृष्य दोरीने बांधला गेला तसेच आपणही जुन्या, कालबाह्य रूढीमध्ये अडकलॊ आहोत. "ती" अदृश्य दोरी काढून टाकण्याची इच्छाच नाही तर आपण पुढच्या (आनंदाच्या) गावी जाणार कसे ?तुमच्या आनंदाच्या वाटेत तुमच्या शिवाय दुसरा कोणीही अडथळा आणू शकत नाही. निष्कारण स्वतःच स्वतःला बांधून घेतलेल्या अनेक "दोऱ्या" सोडवून पहा. नक्की आनंदी व्हाल !! आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार आहे. सकारात्मक विचार करा व आनंदी रहा.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दि. 28/09/2022 वार - बुधवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 🎇 . *दिनविशेष . 🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••💥 ठळक घडामोडी :-जागतिक कर्णबधीर दिनGreen Consumer Day💥 जन्म :-◆१९८२- अभिनव बिंद्रा,ओलीम्पिक स्पर्धेत वैयक्तिक सुवर्णपदक मिळवणारा पहिला भारतीय.◆१९२९ - लता मंगेशकर, भारतीय पार्श्वगायक. ◆१९८२- रणबीर कपूर,अभिनेता.◆१९४७- शेख हसीना ,बांगलादेशच्या १० व्या पंतप्रधान.💥 मृत्यू :-●२०१२-ब्रजेश मिश्रा ,राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार.●१९१४ - रिचर्ड सीयर्स, अमेरिकन उद्योगपती. ●१८९५-लुई पाश्चर,फ्रेंच सूक्ष्मशास्त्रज्ञ.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *शिंदे-फडणवीस सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, राज्यपाल नियुक्त 12 आमदारांसंदर्भात कोणतीही प्रक्रिया न करण्याचे निर्देश*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गासाठी 10 टक्के आरक्षणावर सुनावणी पूर्ण, निकाल राखीव ठेवण्याचा घटनापीठाचा निर्णय*••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *पृथ्वीचा विनाश टाळण्यासाठी नासाचं 'डार्ट मिशन', लघुग्रहावर धडकलं अंतराळयान*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मध्ये रेल्वेचा मुख्य अभियंता लाच घेताना सीबीआयच्या जाळ्यात, एक लाखाची लाच घेताना अटक*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *पुण्याच्या आंबेगाव तालुक्यात शाळेची बस पलटी झाली. बसमध्ये 44 विद्यार्थी आणि 3 शिक्षक होते. त्यातील सात विद्यार्थी गंभीर जखमी झालेत.*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *नागपुरातील साडेचारशे मराठी शाळांवर संकट, 20 पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळा होणार समायोजित*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात टी20 मालिका, केरळच्या तिरुवनंतपुरम येथील ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियम येथे खेळवला जाणार पहिला सामना.*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••*The Loin and the Mouse👇**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/LUHDSa-9ZIM~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *लता मंगेशकर* स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांची आज जयंती. लता मंगेशकर यांचा जन्म २८ सप्टेंबर १९२९ साली मंगेशकर कुटुंबात झाला. त्या भारताच्या हिंदी चित्रपटसृष्टीच्या ख्यातनाम गायक-गायिकांपैकी एक आहेत. हिंदी संगीत-विश्वात त्यांना 'लता-दीदी' म्हणून ओळखले जाते. त्यांना भारताची गान कोकिळा असे ही म्हटले जाते. लता मंगेशकरांच्या कारकिर्दीची सुरूवात इ.स. १९४२ मध्ये झाली आणि ती कारकिर्द सहा दशकांपेक्षा अधिक काळ टिकून आहे. त्यांनी ९८० पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांची गाणी गायली असून, विसाहून अधिक प्रादेशिक भारतीय भाषांमध्ये (प्रामुख्याने मराठी) गायन केले आहे. 06 फेब्रुवारी 2022 रोजी मुंबईमध्ये त्यांचे निधन झाले. लता दीदींना विनम्र अभिवादन ....! ~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *गुगल*माहितीचा महास्फोट घडवणाऱ्या गुगलचा काल वाढदिवस. इंटरनेच्या युगात गुगल म्हणजे सर्व काही. काही शोधायचे असेल तर नेहमीच गुगलला प्राध्यान्य दिले जाते. अभ्यासाच्या काही नोट्स काढायच्या असतील तर काही संदर्भ पाहिजे असेल गुगला सर्च केले जाते. कुठे फिरायला जायचे असेल तर अंतर किती कोठे आहे ठिकाण, तसेच युट्यूबवर काही गाणी ऐकायची असतील किंवा व्हिडिओ पाहायचा असेल अथवा मेल चेक करायचा असेल तर यावरील उपाय म्हणजे गुगल जवळ आहे.आपण काही गुगलला विचारले तर गुगल आपल्या माहितीसाठी सदैव तयार. गुगल म्हणजे इंटनेटवर एक विश्वचं. एवढे सर्व गुगलवर असते. जरी गुगल कंपनीची ७ सप्टेंबर १९९८ रोजी स्थापन झाली. मेन्लो पार्कमधील सुसान वोजसिकी गॅरेजमध्ये लॅरी पेज व सर्जेई ब्रिन यांनी १९९८ मध्ये लावलेल्या छोटय़ाशा गुगलच्या रोपटय़ाचा आता वटवृक्ष झाला आहे. पेज आणि ब्रेन यांनी गूगलचं नाव ‘बॅकरब’ असं ठेवले होते. पण, नंतर ते गुगल असे करण्यात आले. २००५ पासून कंपनीने २७ सप्टेंबर हा दिवस वाढदिवसासाठी जाहीर केला. या पाठीमागचे कारण म्हणजे २७ सप्टेंबर रोजी सर्वात अधिक पेज व्हू मिळाल्याची घोषणा करण्यात आली होती आणि याच दिवशी आपला वाढदिवस साजरा करण्यात यावा असा गुगलचा अट्टाहास होता, तेव्हापासून गुगलचा वाढदिवस सत्तावीस सप्टेंबर रोजी करण्यास सुरुवात झाली. कंपनीच्या स्थापनेपासून २००४ पर्यंत कंपनी ७ सप्टेंबर या दिवशी वाढदिवस साजरा करत होती. 'गुगल' ही गणिती संज्ञा आहे. एकावर शंभर शून्ये दिल्यावर जो आकडा येतो त्याला गुगल म्हटले जाते. मिल्टन सिरोट्टा या गणितज्ज्ञाने ही संकल्पना शोधून काढली व वापरली. जगातील प्रचंड माहितीच्या साठ्याचे व्यवस्थापन करणे व जगातील कोणालाही ही माहिती सहजगत्या उपलब्ध करून देणे हा हेतू असल्याने कंपनीचे नाव 'गुगल' ठेवण्यात आले. आजकाल गुगल सर्च इंजिन इतके प्रचंड लोकप्रिय झालेले आहे की 'to google' असे क्रियापदच इंग्रजीत तयार झालेले आहे. गुगल ही जगातील एक मोठी कंपनी असून, केवळ भूतकाळात समाधान मानणारी नाही. त्यांनी त्यांच्या मुख्य शोधयंत्रात सुधारणा केली असून, इतर अनेक उपकरणांवर त्याचा वापर कसा वाढवता येईल याचा विचार केला आहे. १९९८ मध्ये गुगलने तंत्रज्ञानाचे जग नाटय़मयरीत्या बदलून टाकले व सर्च इंजिन म्हणजे शोधयंत्र कायमचे सुधारून टाकले. गुगलने जग बदलले, अब्जावधी लोक ऑनलाइन आले. इंटरनेटची विक्रमी वाढ झाली. आता तुम्ही तुमच्या खिशातील छोटय़ाशा मोबाइलवर असलेल्या गुगलने कुठल्याही प्रश्नाचे उत्तर शोधू शकता. गुगलला वाढदिवसाच्या शुभेच्छा.*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*“ आनंदाने उड्या मारणारा प्रत्येकजण सुखी असतोच असे नाही. ”**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) 'अर्धी भाकरी खा पण मुलांना शिकवा' असे नेहमी आपल्या कीर्तनात कोण म्हणत असत ?२) चायना नॅशनल स्पेस एडमिनिस्ट्रेशन ( CNSA ) या चीनच्या अंतराळ संशोधन संस्थेने अंतराळ पर्यटनासाठी काय तयार करण्याचे ठरविले आहे ?३) यंदा ऑस्करच्या शर्यतीत बाजी मारणाऱ्या गुजराती चित्रपटाचे नाव काय ?४) एक बी असलेली फळे कोणती ?५) शून्य अंश मूळ रेखावृत्त व विषुववृत्त कोणत्या ठिकाणी एकमेकांना छेदतात ?*उत्तरे :-* १) संत गाडगेबाबा २) अवकाशयान ३) छेलो शो ( इंग्रजीत - द लास्ट शो ) ४) आंबा, आवळा, बोर, खजूर इत्यादी ५) अटलांटिक महासागर *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••● लक्ष्मीकांत श्रीकांत सोरटे● प्रशांत राऊतखेडकर● सचिन बावणे● साईनाथ कानगुलवार*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*'उन्नती आणि यश' ही प्रक्रीया सोपी नाही. त्यात खाचखळगे असतातच. एक साधा न्याय आपण लक्षात घेतला पाहिजे की, जो परिक्षेत पास होण्याची अपेक्षा बाळगुन असतो त्याचीच परिक्षा घेतली जाते. हेच उदाहरण जीवनात सर्वत्र आहे. एक परिक्षा पास झालात, की पुढची परिक्षा अशी ही श्रृंखला न संपणारी असते. जो हरला तो संपला. हा नैसर्गिक न्याय आहे. ज्याला याची जाणीव झाली तो समाजजीवनात उडी घेतो. कोणतेही आवडीचे क्षेत्र आपलेसे करणे, त्यात प्राविण्य मिळविणे, त्यातून आसपासच्या लोकांचे कल्याण साधने हे त्याच्या अंगवळणी पडते.**हे सगळे ज्याला समजते त्या समाजपुरूषांच्या ठिकाणी तुम्हाला कधी दु:ख दिसत नाही. त्याच्या चेह-यावरचे भाव प्ररेणादायी असतात, ते प्रेरणेचे क्षण निर्माण करतात. अशा व्यक्ति अल्पसंख्येत असतात, त्यांचे पीक फारसे येत नाही. एखादा समाजचिंतक असणे हे सामाजिक आरोग्याचे लक्षण आहे. आज सर्वत्र एकच ओरड असते, की मोठी माणसे राहिली नाहीत. मला वाटते की ती आहेत पण आपल्याला दिसत नाही. त्यासाठी आपली दृष्टी स्वच्छ हवी..!* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●••💥💥💥💥💥💥💥💥💥 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• प्रत्येकाला आपल्या जीवनात आनंद मिळवायचा असेल तर प्रथम एकाकी जीवन व एकांतात राहणे सोडून द्यावे.कारण एकाकी जीवनात नको ते विचार मनात येतात आणि त्रस्त करतात.त्याचा परिणाम स्वत:च्या जीवन जगण्याच्या जीवनशैलीवर होतो आणि त्यामुळे सुखासमाधानाने असलेले जीवन दु:खात जगत असल्याचे वाटते.त्यापेक्षा इतरांच्या सानिध्यात राहून त्यांच्या आनंदी जीवनात आपणही राहावे.असे केल्याने आपल्या मनात आणि मनावर असलेले दडपण थोड्याप्रमाणात कमी होण्यास मदत होते.इतर लोक कसे जगतात याचेही अवलोकन करता येते.आपण दु:खी कशामुळे आहोत याचेही कारण शोधता येईल आणि शेवटी जीवन आनंदी जीवन कसे जगता येईल याचेही आपल्याला कौशल्य प्राप्त करता येईल.खरे जीवन जगण्याचा मंत्र आपल्या एकटेपणात मिळणार नाही तर इतरांच्या सानिध्यात राहिल्याने मिळतो हे आपल्याला नक्कीच मिळेल.© व्यंकटेश काटकर,नांदेड.संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३.🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *खरे अपयश*एकदा एक रीपोर्टर एका मोठ्या यशस्वी उद्योजकाची मुलाखत घेत होता. त्याने विचारले, "सर, तुमच्या यशाचे रहस्य काय आहे?"यावर तो साठीकडे झुकलेला उद्योजक बोलला, "माझ्या यशाचं रहस्य मी वेळोवेळी घेतलेल्या योग्य निर्णयांत आहे"रीपोर्टर ने ते उत्तर लिहून घेतले आणि आणखीन एक प्रश्न विचारला, "मग मला सांगा सर, योग्य निर्णय घ्यायला तुम्ही कसे शिकलात?"यावर एका क्षणाचाही विलंब न करता त्या व्यावसायिकाने उत्तर दिले, "अनुभव *(Experience )* . मला आयुष्यात अनुभवाने बरंच काही शिकवलं !"हे ही उत्तर रीपोर्टर ने लिहून घेतलं आणि लगेचच उस्फुर्तपणे पुढचा विचारला, " तुम्ही हे सर्व अनुभव कसे मिळवले ?"यावर उद्योजक मिष्कील हसला, आणि थोडा पुढे झुकत रीपोर्टरच्या कानाजवळ जाऊन म्हणाला, "माझ्या आयुष्यात मी घेतलेल्या चुकीच्या निर्णयांमुळे !!"*तात्पर्य**आयुष्यात काही निर्णय चुकतात, काही बरोबर ठरतात. कधी यश येतं तर कधी अपयश, पण जर अपयशातून आपण काहीच शिकलो नाही तर ते खरं अपयश असतं.**संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🎇 दि. 24/09/2022 वार - शनिवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 🎇 . *दिनविशेष . 🎇 * 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••💥 ठळक घडामोडी :-◆१९३२ - पुणे करारावर स्वाक्षर्‍या करण्यात आल्या.◆ १९९५ - मृत्युंजय या कादंबरीसाठी शिवाजी सावंत यांना 'भारतीय ज्ञानपीठ' या संस्थेतर्फे 'मूर्तिदेवी पुरस्कार' जाहीर.◆ २००७ - २०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २००७ मालिकेतील दक्षिण आफ़्रिकेतील जोहान्सबर्ग येथे झालेला अंतिम सामना महेंद्रसिंह धोनीच्या नेतृ्त्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने ५ धावांनी जिंकला.💥 जन्म :-●१९१५ - प्रभाकर शंकर मुजुमदार, चित्रपट कलावंत.●१९२१ - स.गं. मालशे, लेखक व समीक्षक.💥 मृत्यू :-★ १९९२ - सर्वमित्र सिकरी, भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश.★१९९८ - वासुदेव पाळंदे, दिग्दर्शक व संघटक.★२००२ - श्रीपाद रघुनाथ जोशी, - शब्दकोशकार, अनुवादक*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात नवरात्रोत्सवाची तयारी अंतिम टप्यात, देवीच्या सोन्याच्या दागिन्यांची स्वच्छता*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *नाशिक मनपाचे निवारा केद्रांत 200 हून अधिक बेघरांना 'सहारा', बँक खात्यांसह आधारकार्डही मिळणार*••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *लेबनॉनमधून स्थलांतरित आणि निर्वासितांना घेऊन जाणारी बोट सीरियाच्या किनारपट्टीवर उलटल्याने तब्बल 61 जणांचा मृत्यू झाला आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *देशांतर्गत बाजारात तांदळाच्या किंमतीत वाढ होणार, कारण.....अन्न मंत्रालयानं दिली सविस्तर माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *शिवाजी पार्कवर ठाकरेंचाच दसरा मेळावा, राज्यभरात जल्लोष, बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात वाटले पेढे*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *नागपूर: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी२० मालिकेच्या दुसऱ्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा 6 गडी राखून केला पराभव*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *महान फलंदाजांपैकी एक असलेल्या सचिन तेंडुलकर याच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया लेजेंड्सने Road Safety World Series मध्ये इंग्लंड लिजेंड्सचा 40 धावांनी पराभव केला*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••*Who I am?ओळखा पाहू मी कोण?👇**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/7S5TNtg2gos~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मतदार जागृती आवश्यक* https://nasayeotikar.blogspot.com/2018/02/blog-post_11.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय ?* 📙घरात घर हरघडीला ट्रान्सफॉर्मर लागतो, तर घराबाहेर, विशेषतः औद्योगिक पुरवठ्यासाठीही ट्रान्सफॉर्मरशिवाय भागत नाही. पण या दोन्हींमध्ये महत्त्वाचा फरक आहे. घरात वापरला जातो, त्यामध्ये विजेचा दाब कमी करून तीन, सहा, नऊ व बारा व्होल्ट्स इतका ठेवला जातो. या कमी केलेल्या दाबाचा वापर करून मग छोटे दिवे, नाइट लॅम्प, रेडिओ ट्रांजिस्टर, रेकॉर्ड प्लेअर, खेळणी यांचा उपयोग केला जातो. याउलट कारखान्यांना लागणारी वीज, शहराला दूरवरुन केला जाणारा पुरवठा हा अतिउच्च दाबाचा असतो. यासाठी ठिकठिकाणी दाब वाढवणारे ट्रान्सफॉर्मर बसवलेले असतात. वीजकेंद्रांपासून वीज आणण्यासाठीही त्यांचा वापर केला जातो.ट्रान्सफॉर्मरमध्ये विजेचा दाब लहानाचा जास्त वा जास्तीचा लहान केला जातो. या दोन्हींसाठी पद्धत एकच वापरली जाते. ती म्हणजे दोन्ही लोखंडी पट्ट्यांच्या सांगण्यावर (core) शेजारीशेजारी तारांचे वेटोळे गुंडाळले जाते. एक असते प्राथमिक, तर दुसरे दुय्यम. विजेचा प्रवाह जितका कमी वा जास्त करावयाचा, दाब कमी वा वाढवायाचा, तितके वेटाळ्यातील वेढे कमी जास्त केले जातात. प्राथमिक वेटोळ्यापेक्षा दुय्यम वेटोळ्यामधील वेढे जास्त असले, तर प्रवाहदाब वाढतो. याउलट स्थितीत तो कमी होतो.खरे म्हणजे दोन्ही वेटोळी ही पूर्णतः वेगळी असतात. पहिल्या वेटोळ्यात विद्युतप्रवाह येतो व बाहेर पडतो. हा अर्थातच अल्टर्नेटिंग करंट वा AC असतो. यामुळे सांगाड्यात विद्युतचुंबकीय क्षेत्र निर्माण होते व त्याचा परिणाम होऊन शेजारील दुसऱ्या वेटोळ्यातून प्रवाह वाहणे सुरू होतो. याचा दाब वेटोळ्याच्या वेढ्यांच्या संख्येनुसार वाढतो वा कमी होतो.ट्रान्सफॉर्मर छोटा असो वा मोठा; ज्यावेळी दाब कमी होतो, तेव्हा प्रवाह वाढतो; याउलट दाब वाढला, तर प्रवाहाची शक्ती कमी होत जाते. पण याचा फायदा वीज वाहून नेण्याच्या तारांच्या आकारमानात बदल करता आल्याने होतो. प्रवाहाची शक्ती कमी झाल्याने अतिदाबाच्या तारांची जाडी खूपच कमी ठेवता येते.ट्रान्सफॉर्मरचा वापर झाल्याने अनेक बाबतीत सोय होऊ शकते. वाहनांमध्ये जेमतेम बारा व्होल्टचा प्रवाह निर्माण होतो; पण त्यावर संस्कार करून, अतिदाबाच्या प्रवाहाची निर्मिती करून ठिणग्या पाडण्याचे व वाहन चालवण्याचे काम केले जाते, याउलट लहान मुले खेळताना चुकूनही धक्का बसू नये, अशी खेळणी वीज प्रवाहाचा दाब अत्यल्प ठेवून बनवली जातात.*'सृष्टी विज्ञानगाथा या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*“ जेथे मान निर्मळ असते, तेथे थोड्या शब्दांनी काम होते. ”**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) 'पक्षी जगतातील अभियंता' असे कोणत्या पक्ष्याला म्हटले जाते ?२) नुकतेच टेनिसमधून निवृत्ती जाहीर करणाऱ्या महान टेनिसपटूचे नाव काय आहे ?३) जगात सध्या गेंड्याची संख्या किती आहे ?४) भारताची सर्वात वेगवान रेल्वे कोणती ?५) 'राष्ट्रीय बालिका दिवस' केव्हा साजरा केला जातो ?*उत्तरे :-* १) सुगरण/बया २) रॉजर फेडरर, स्वित्झरलंड ३) २९ हजार ४) वंदे भारत ५) २४ जानेवारी *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••● डॉ. तोफिख खान पठाण● सारंग दलाल, नांदेड● राजू यादव, हैद्राबाद● ओमसेठ गंजेवार, धर्माबाद● विरेश भगवान भंडारे● सतीश आरेवाड● रोहित शिंदे● अरविंद ठक्करवाड● राजेश गाजुलवाड● दिग्विजय अभिजित राजूरकर● प्रथम सुनील नामेवार● अक्षत मनोज तानुरकर*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*अखंड काम करणारी माणसं थकत नाहीत, याचे कारण त्यांचे कामावर प्रेम असते. ओव्हरटाईम करताना फक्त पैसा मनात नसतो, तर त्यात आपण अडचणीत कंपनीच्या उपयोगी येतो, हा ही भाव असतो. जिथे फक्त पैशांचा विचार होतो तिथे आयुष्यभर राबले, तरी पाठीवर शाबासकीची थाप मिळत नाही. उलट 'जन्माला आला...' या म्हणीप्रमाणे अवस्था होते. ज्यांना हे समजत नाही ती माणसे फक्त थकत जातात.**उत्साहाने भरलेला नवा दिवस त्यांच्या वाट्याला येत नाही. काम ढकलायचे एवढीच धारणा असते. स्वेच्छानिवृत्त, निवृत्त, आणि निवृत्तीनंतर काम करणारे या तीनही भागांमध्ये जे लोक येतात त्यांच्याशी कर्मावरची निष्ठा या विषयावर जर आपण बोललो, तर तिघांचीही उत्तरं भिन्न भिन्न असतात. एखादी भाजी करताना खूप कष्ट पडत असतील आणि नोकरीवरून आल्यावर एखाद्या गृहिणीने ती केली, तर ती नाही म्हणणार नाही; पण भाजीला चव मात्र नसेल. याचा अर्थ ज्या कृतीत मन नसते ती ढेपाळते, चुकते आणि मग थकवा देते. याकरीता दिवसभरात कमी काम झाले, तरी चालेल; पण ते मन:पुर्वक आणि निष्ठेने व्हावे. मग व्यक्तीचा आणि व्यक्तीच्या कामाचा विकास शक्य होतो.* *॥ रामकृष्णहरी ॥*☘☘☘☘☘☘☘☘☘ *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *काव्यांगण* ! !🌟•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••शाळा कॉलेजमधील मित्र-मैत्रिणीचे *......... गेट-टूगेदर ........*कॉलेज मधील मित्र-मैत्रिणीभेटत आहेत कित्येक वर्षांनीमनात दाटल्या जुन्या आठवणीओठावर तेच जुनेच गाणीआनंदाचे ते दिवस मंतरलेलेएकमेकांत जीव गुंतलेलेएकमेकांपासून विभक्त होतांनानयनात किती अश्रू दाटलेलेसंसाराच्या या रहाटगाड्यातविसरून गेलो मी स्वतःला आज पुन्हा या गाठी भेटीनेअर्थ मिळाला माझ्या जीवनालागेले ते दिवस सरला तो काळपुन्हा असा आनंद मिळणे नाहीआयुष्याचे काय खरे असते ?जीवनात भेट होईल की नाहीशालेय जीवनातील मित्र-मैत्रिणींचेगेट टूगेदर व्हावे एकदा तरीकोण सुखात कोण आहे दुःखातयाची माहिती ही मिळेल खरीखुरी- नासा येवतीकर, धर्माबाद- 9423625769•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ज्यांच्याकडे धन, संपत्ती, ऐश्वर्य, नोकरचाकर आणि अभिमान आहे तो फार श्रीमंत आहे असे काहींना वाटत असेल तर ते चुकीचे आहे त्यापेक्षा ज्यांच्याकडे आई-वडील आहेत, तो निरंतर त्यांची सेवा करतो,त्यांचे मन कधीही दुखवत नाही, त्यांना वंदन करुन दैनंदिन कामाला लागतो,त्याला कशाचाही गर्व नाही अशी माणसे या जगात फार श्रीमंत आहेत आणि भाग्यवानदेखील आहेत.© व्यंकटेश काटकर,नांदेड.संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३.🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मोठीच त्याची सावली*सूर्य नुकताच मावळत होता. एक कोल्हा त्याच्या गुहेतून आळसावत उठला. त्याला शिकारीला जाण्याची तशी घाई नव्हती. त्या जंगलात भरपूर गुबगुबीत हरणे व मांसल ससे होते. एखादा प्राणी कोल्हय़ाला सहज सापडायचा. कोल्हय़ाने आसपास नजर फिरवली तर सूर्याच्या किरणामुळे गुहेच्या भिंतीवर पडलेली त्याची सावली त्याला दिसली. स्वत:ची मोठी सावली पाहून कोल्हा खूश झाला व स्वत:शीच म्हणाला,'' वा! मी आकाराने किती मोठा आहे!! मी जर एवढा मोठा असेन तर त्या क्षुद्र सिंहाला मी का घाबरू? तो सिंह स्वत:ला जंगलाचा राजा समजतो. आज मी त्याला दाखवतो की जंगलाचा खरा राजा कोण आहे!'' कोल्हय़ाचे हे वाक्य हवेत विरते न विरते तोच त्याला एक जोरदार गर्जना ऐकू आली. मागोमाग कोल्हय़ाच्या मोठय़ा सावलीला त्याहीपेक्षा मोठय़ा सावलीने झाकून टाकले. ती सिंहाची सावली होती. त्याने एक पंजा कोल्हय़ाला मारताच कोल्हा धूळ चाटू लागला.''आता सांग, जंगलाचा खरा राजा कोण आहे?''''आपणच आहात, हुजूर'' जखमी झालेला कोल्हा कण्हत म्हणाला. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दि. 23/09/2022 वार - शुक्रवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 🎇 . *दिनविशेष . 🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••💥 ठळक घडामोडी :-◆१८७३ - महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.◆१८८४ - महात्मा फुले यांचे सहकारी रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांनी बाँबे मिल हँड्‌स असोसिएशन ही गिरणी कामगार संघटना स्थापना केली. संघटित कामगार चळवळीची ही सुरवात होय.💥 जन्म :-●१९११ - राप्पल संगमेश्‍वर कृष्णन, भारतीय भौतिकशास्त्रज्ञ.●१९२० - भालबा केळकर, मराठी लेखक, नाट्यअभिनेते.● १९४३ - तनुजा, हिंदी चित्रपट अभिनेत्री.●१९५० - डॉ. अभय बंग. ●१९५७ - कुमार शानू, पार्श्वगायक.💥 मृत्यू :-★१९६४ - भार्गवराव विठ्ठल ऊर्फ मामा वरेरकर, नाटककार.★ १९९९ - गिरीश घाणेकर - मराठी चित्रपट, जाहिरातपट निर्माते.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *रुपयाने मोडले सगळे रेकॉर्ड ! इतिहासातील सर्वात मोठी घसरण, सणासुदीला वाढणार महागाई*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मेटाव्हर्ससाठी लागणारे कौशल्य निर्माण करण्यासाठी स्टार्टअप प्रोग्राम लॉन्च; आयटी मंत्रालयाचा उपक्रम*••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *काँग्रेसला 19 ऑक्टोबरला नवा अध्यक्ष मिळणार, निवडणुकीचे नोटिफिकेशन जारी, काँग्रेस अध्यक्षपदासाठी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि खासदार शशी थरुर यांचे नाव चर्चेत*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *विधानसभा अध्यक्षांकडून नागपुरात होत असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वतयारीचा आढावा*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *रूपी बँकेला हायकोर्टाचा दिलासा, परवाना रद्द करण्याच्या निर्देशाला 17 ऑक्टोबरपर्यंत मुंबई उच्च न्यायालयाची स्थगिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *हैदराबादमध्ये भारत-ऑस्ट्रेलिया सामन्याच्या तिकीट खरेदीसाठी आलेल्या प्रेक्षकांमुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली. त्यामुळे पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *आयपीएल सामन्यांची धुमधाम आता देशभर, सामने पुन्हा Home-Away फॉर्मेटमध्ये, सौरव गांगुलीची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••*Month of the Year 👇**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/gZjoOzwNoTs~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*दोषमुक्तीसाठी आत्मपरीक्षण*https://nasayeotikar.blogspot.com/2018/08/blog-post_95.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *वाचनाची गरज* विद्यार्थ्यांनीशिकवण्याच्या आधी वाचले पाहिजे हे आपण पाहिले. मात्र वाचलेले लक्षात राहण्यासाठी काही क्लृप्त्या आहेत. वाचलेले समजणे जेवढे महत्त्वाचे आहे तेवढेच ते लक्षात ठेवणे व पाहिजे तेव्हा आठवणे महत्त्वाचे आहे. खाणे जेवढे महत्त्वाचे असते तेवढेच महत्त्वाचे पचवणे असते. वाचण केलेले समजून लक्षात ठेवण्याची व ती वेळेवर आठवण्याची प्रक्रिया पाहू या. वाचनानंतर झोप महत्त्वाची आहे किंवा झोपेतून जागे झाल्यावर वाचन केल्यास फायद्याचे ठरते. म्हणून रात्री झोपण्यापूर्वी वाचनाचा सराव केला पाहिजे. ज्यांना झोप लागत नाही. झोपेच्या गोळ्या घ्याव्या लागतात. त्यांच्यासाठी वाचन हे एक वरदान आहे. वाचन हे निद्रानाशावर रामबाण औषध आहे. रोज रात्री झोपण्यापूर्वी वाचन केल्यास रात्री झोपेत अर्धचेतन मनाद्वारे त्याच्यावर प्रक्रिया केली जाते.सकाळी किंवा पहाटे झोपेतून उठल्याबरोबर वाचन केल्यास स्मरणशक्ती सुधारते, कारण झोप पूर्ण झाल्यावर मेंदू व मन ताजेतवाने झालेले असते. त्यामुळे आपली काम करण्याची क्षमता उत्तम असते. नुसते वाचनच नाही तर इतर कोणतीही गोष्ट झोपेतून उठल्याबरोबर केल्यास फायदेशीर ठरते.सकाळी अथवा पहाटे काम उरकण्याचा वेग कमालीचा उच्च असतो. त्यामुळे पहाटे वाचण्याचे व लिहण्याचे अनेक फायदे आहेत. सकाळी उठल्याबरोबर किंवा रात्री झोपण्यापूर्वी वाचणे हे उपयुक्त आहेच. मात्र दिवसभरात आपल्याला जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा वाचलेले चांगलेच ठरते. वाचलेले दीर्घकाळ स्मरणात राहण्यासाठी काही उपाय आहेत.** ध्यान – नियमित ध्यान केल्यास वाचनाचा वेग व एकाग्रता वाढते. आकलन क्षमता सुध्दा सुधारते. ध्यान दररोज केल्यास त्याचे इतरही फायदे होतात. मनावरील ताण कमी होण्यास व विचारांवर कंट्रोल मिळवण्यासाठी ध्यान महत्त्वाचे आहे. ध्यानामुळे सजगता वाढते.** त्राटक – त्राटक साधना स्मरणशक्ती साठी खूपच लाभदायी आहे. त्राटक करण्याची पध्दती म्हणजे एक मेणबत्ती पेटवून ठेवा. डोळ्याच्या व नजरेच्या समांतरउंचीवर ठेवा. डोळ्याची पापणी न पाडता एकटक त्या मेणबत्तीच्या ज्योतीकडे पहात रहा. सुरवातीला डोळ्यात जळजळ वाटेल. डोळ्यातून पाणीसुध्दा येईल. डोळ्यात जळजळ व्हायला लागल्यास अथवा डोळ्यातून पाणी यायला लागल्यास त्राटक साधना थांबवा. नंतर पुन्हा थोड्या वेळाने प्रयत्न करावेत. टप्प्याटप्प्याने हाकालावधी वाढवत दहा मिनिटांपर्यंत न्यावा.त्राटक करण्याची अजून एक पध्दती आहे. एका मोठ्या कागदावर मध्यभागी एक सेमी व्यासाचे वर्तुळ काढा. हे वर्तुळ पूर्ण रंगवून घ्या. हा कागद नजरेच्या समांतर उंचीवर ठेवून वरील प्रमाणेच कृती करा. त्राटक साधनेचा कालावधी हा एका बैठकीत १० मिनिटांपर्यंत होण्याचे आपले लक्ष्य असले पाहिजे.** प्राणायाम – प्राणायाम केल्यास मेंदूला होणारा रक्तातील ऑक्सिजन पुरवठा जास्त प्रमाणात होतो. त्यामुळे मेंदू तल्लख होतो. प्राणायामाच्या सोप्या पध्दती आहेत. अनुलोम व विलोमाची पाच आवर्तने दिवसातून दोनदा केली पाहिजेत. अनुलोम व विलोम करण्याची प्रक्रिया पाहू या. उजवी नाकपुडी हाताच्या बोटाने बंद करुन डाव्या नाकपुडीने शक्य तितका श्वास घ्यावा. मग डावी नाकपुडी बंद करुन उजव्या नाकपुडीने श्वास सोडून द्यावा. परत उजव्या नाकपुडीने श्वास घ्यावा आणि डाव्या नाकपुडीने सोडावा. या दोन्ही प्रक्रियेला एकत्रित पणे अनुलोम व विलोम म्हणतात. अशी पाच आवर्तने सकाळी एकदा व सायंकाळी एकदा करावीत किंवा आपल्याला वेळ मिळेल तेव्हा सुध्दा केल्यास चालेल.वाचनातून अधिकाधिक ज्ञान प्राप्त करुन आपल्या शिक्षणाच्या कक्षा रुंदावल्या पाहिजेत. जीवनात यशस्वी होण्यासाठी वाचन ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. वाचनाचे आकलन होणे सुध्दा महत्त्वाचे आहे. वाचन केल्यावर वाचलेल्या विषयाच्या नोट्स काढाव्यात. नंतर वेळ मिळाल्यास त्या नोट्स वाचाव्यात. नोट्स काढणे शक्य नसल्यास वाचलेल्या विषयावर एखाद्या व्यक्तीसोबत चर्चा करावी. त्यामुळे त्या व्यक्तीला त्या वाचनाचा लाभ आपण देऊ शकतो. मात्र त्यापेक्षा आपलाच जास्त फायदा त्यातून होतो. वाचलेला विषय लक्षात राहण्यासाठी आपल्याला त्याची मदत होते. वाचन वाढवून जीवन समृध्द व यशस्वी बनवण्यासाठी खूप खूप शुभेच्छा! *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*“ मरणापेक्षा जीवन जगण्याला जास्त धैर्य लागते. ”**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) कर्तव्यपथ आणि इंडिया गेटजवळ उभारलेल्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याचे मूर्तिकार कोण ?२) आंतररष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावणारे पहिले तीन क्रिकेटपटू कोण आहेत ?३) जगातील सर्वात वेगवान रेल्वे कोणती ?४) कोणत्या राज्यसरकारने नीती आयोगाच्या धर्तीवर राज्यस्तरीय संस्था स्थापन करण्याची घोषणा केली आहे ?५) ब्रिटनची महाराणी एलिझाबेथ यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात जगातील किती देशांना भेटी दिल्या ?*उत्तरे :-* १) अरुण योगीराज २) सचिन तेंडूलकर, भारत ( १०० शतके ), विराट कोहली, भारत ( ७१ शतके ), रिकी पाँटिंग, ऑस्ट्रेलिया ( ७१ शतके ) ३) बुलेट ट्रेन ४) महाराष्ट्र ५) ११७ देश*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••◆ डॉ. सुरेश येवतीकर, वरिष्ठ व्यवस्थापकमहाराष्ट्र ग्रामीण बँक, औरंगाबाद◆ सौ. प्राजक्ता कुलकर्णी-पाठक, पुणे◆ रविंद्र जवादे, साहित्यिक◆ विशाल मनवर◆ प्रदीप माळगे◆ वीणा खानविलकर◆ साई सुरेंद्र गादेकर◆ संगीता क्षीरसागर*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*मानवी संबंधांमध्ये एकमेकांशी बोलणं, संवाद साधणं, हास्यविनोद करणं, भांडण करणं, रडणं, ओरडणं या क्रिया घडण्यासाठी शब्दांची गरज असते, पण कधी कधी शब्दांपेक्षा शरीरभाषा तुलनेने आधिक प्रभावी ठरत असते. त्यातून 'शब्दांविण संवादु' या उक्तीप्रमाणे 'ये ह्रदयीचे ते ह्रदयी' भाव पोचवणं सहज साध्य होत असतं. या 'देहबोली'वरून समोरच्याच्या मनातील भावना समजून घेता येतात.**अबोलपणे व्यक्त होणा-या देहबोलीत अनेक संकेत व संदेश दडलेले असतात. देहबोलीवरून समजून घेणं म्हणजे 'मनकवडा' असणं. समोरच्याची देहबोली ओळखून कोणाशी संबंध वाढवायचे व कोणाशी मर्यादित ठेवायचे हे ठरवता येते, सावध होता येते. ही देहबोली आत्मसात करण्यासाठी लोकांमध्ये मिसळायला हवं, संवाद साधता यायला हवा, निरीक्षण वाढवायला हवं. अनुभवाच्या आणि सरावाच्या कसोटीवर आपण समोरच्याची 'देहबोली' नक्कीच ऐकू व समजू शकू.* *॥ रामकृष्णहरी ॥*🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाईल - 9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *काव्यांगण* ! !🌟•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••जुन्या सावकारी ऋणासारखाकसा जीवना तू उणा सारखाविसरलाच जाणार मीही उद्याशकासारखा वा हुणासारखाजरी सत्य आले पुरासारखेउभा ठाकलो मी तृणासारखाअशी कागदा नाळ तोडू नकोइथे शब्द माझा भ्रुणासारखामला तूच शोधीत ये ना कधीतुझ्या शोधतो मी खुणा सारखा— अभिजीत दातेसौजन्य :- इंटरनेट•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••ज्या सागरातून उसळणाऱ्या लाटा तीव्र गतीने किना-याकडे झेपावत येतात तेव्हा असे समजायचे की, नक्कीच किना-याचे नुकसान होणार आहे.त्यापासून सावध होण्याचा इशाराही दिला जातो.पण ज्या लाटा सागरातून किना-याकडे हळूहळू मार्गक्रमण करत येतात तेव्हा त्याच लाटा किना-याचे सौंदर्य वाढवतात आणि मानवी मनाला आल्हादकारक वाटतात.अशाच पध्दतीने मानवी मनाचेही लाटासारखेच आहे.काहीच विचार न करता अचानक एकाएकी घेतलेले निर्णय कधीकधी चालत असलेल्या चांगल्या जीवनाला नुकसान करु शकतात.असे निर्णय घेताना शांत चित्ताने आणि सारासारविचारपूर्वक घेतले तर सर्वांनाच फायदा होईल.असेच जीवनात सागरातल्या शांत लाटाप्रमाणे राहून जीवनालाही किना-यासारखे सुंदर बनवता येईल.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद..९४२१८३९५९०.🌊🌊🌊🌊🌊🌊🌊🌊 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *निर्मळता*गुरु शिष्य भ्रमंतीला निघाले होते. फिरता फिरता ते एका जंगलात येऊन पोहोचले. जंगलात काही अंतरावर एक झरा वाहत होता. गुरुजींना तहान लागली होती. त्यांनी शिष्याच्या हाती कमंडलू दिले आणि त्याला पाणी घेऊन येण्यास सांगितले. शिष्य झऱ्या पाशी गेला आणि त्याला असे दिसले कि तेथून नुकतेच बैल गाड्या गेल्या आहेत, बैल पाण्यातून गेल्याने पाणी खूप गढूळ झाले आहे. पाण्यात झाडाची पाने पडलेली आहेत. त्याने विचार केला असे घाण झालेले पाणी गुरूंसाठी नेणे योग्य नाही. तो तसाच परत गुरूंकडे गेला आणि म्हणाला,"गुरुजी, पाणी खूप गढूळ आहे, आपल्याला दुसरी काही तरी व्यवस्था पहावी लागेल." गुरुजी म्हणाले," अरे त्यापेक्षा तू असे कर पुन्हा त्या झऱ्यापाशी जा आणि पुन्हा पाणी आणण्याचा प्रयत्न कर." शिष्य गेला, त्याला पुन्हा पाणी गढूळ दिसले, तो परत आला, गुरूंनी त्याला परत पाठवले, असे चार पाच वेळेला झाले. शेवटी शिष्य कंटाळला, त्याच्या चेहऱ्यावर नाराजीचे आणि कंटाळलेले भाव दिसू लागले पण शिष्य गुरुज्ञा मोडायला तयार नव्हता. गुरूंनी त्याला परत पाणी आणायला पाठवले. आताच्या वेळी त्याला मात्र आश्चर्य वाटले कारण या वेळी पाणी अगदी नितळ, स्वछ नि निर्मळ होते. त्याने ते पाणी कमंडलू मध्ये भरले आणि गुरूंसाठी घेऊन आला. गुरूंनी पाणी प्राशन केले आणि शिष्याला म्हणाले,"वत्सा ! आपल्या मनात सुद्धा असेच कुविचारांचे बैल धिंगाणा घालत असतात. ते मनाची निर्मळता कमी करून मनाला मलिन करण्याचा प्रयत्न करतात. पण आपण त्यापासून सावध राहिले पाहिजे. कुविचारांचा प्रभाव आपल्या मनावर होणार नाही याची दक्षता आपण घेतली पाहिजे. मनाच्या झऱ्यातील पाणी शांत होण्याची प्रतिक्षा जर आपण केली तर मनात कायम स्वच्छ, चांगले विचार येतील. भावनेच्या भरात कधीही निर्णय घेऊ नये."तात्पर्य :- भावनेच्‍या भरात कोणतेही निर्णय घेऊ नयेत. मनात कायम स्‍वच्‍छ, चांगले विचार कसे येतील हेच पाहावे.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दि. 22/09/2022 वार - गुरूवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 🎇 . *दिनविशेष . 🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••💥 ठळक घडामोडी :-★ १५९९ - भारतावर राज्य करणाऱ्या ईस्ट इंडिया कंपनीच्या स्थापनेचा प्रस्ताव★ १८२७ - जोसेफ स्मिथ जुनियरच्या म्हणण्यानुसार मोरोनी देवदूताने त्याला सोन्याच्या पत्र्यावर लिहीलेली मॉर्मोनपंथाची कथा दिली. (चित्रित)★ १९५५ - ब्रिटनमध्ये टेलिव्हिजनचे व्यावसायिकरण सुरू, सहा मिनीटांची जाहिरात ★ २०१३ - पाकिस्तानच्या पेशावर शहरात मुस्लिम दहशतवाद्यांनी चर्चच्या बाहेर हल्ला करून ७५ लोकांना ठार केले आणि १३० लोकांना जखमी केले💥 जन्म :-★ १७९१ - मायकेल फॅरेडे, इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ.★ १८८७ - कर्मवीर भाऊराव पाटील, रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक.💥 मृत्यू :-★ १५३९ - गुरू नानक, शीख धर्माचे संस्थापक.★ १९९१ - दुर्गा खोटे, अभिनेत्री★२०११ - मन्सुर अली खान पतौडी यांचे निधन *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *NPS रद्द करुन जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करा ; राज्यभर शिक्षकांची बाईक रॅली*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *गडचिरोलीत दोन जहाल नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण, माओवाद्यांना मोठा धक्का, जनआंदोलनातून नक्षली शहरी भागात प्रभाव वाढवण्याच्या तयारीत ? सुरक्षा यंत्रणेत सहभागी होण्याची शक्यता*••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *घाटकोपरमध्ये ओला चालकाची रिक्षा, टेम्पो, बाईकला धडक; आठ जण जखमी, तीन विद्यार्थ्यांचाही समावेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *फिफाचा नियोजित कार्यक्रम उशिरा, उपमुख्यमंत्री अजित पवार अडीच तास ताटकळत, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री वेळेवर न पोहोचल्याने मंत्रालयातून बाहेर*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *पत्राचाळ संदर्भातील भाजप आमदार अतुल भातखळकरांच्या आरोपांनंतर शरद पवारांचं राज्य सरकारला आव्हान, लवकरात लवकर चौकशी करण्याची मागणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *कॉमेडी किंग राजू श्रीवास्तवने घेतला जगाचा निरोप; राजू श्रीवास्तव यांनी वयाच्या 59 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, मुंबईत चालवली होती रिक्षा; 50 रुपये घेऊन बर्थ-डे पार्टीत स्टँडअप कॉमेडी, राजू श्रीवास्तव यांना फ्रेश मॉर्निंग बुलेटिन टीमकडून भावपूर्ण श्रद्धांजली !*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी खुशखबर, कोकणकन्या एक्स्प्रेस आता 'सुपरफास्ट', गाडी क्रमांक आणि वेळापत्रकही बदललं*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••Class 1st*My fruit basket👇**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/y-VbWtmOi5E~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *पालकांचे मुख्याध्यापकांस पत्र*https://nasayeotikar.blogspot.com/2018/06/blog-post_29.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••📙 *डायनॅमो म्हणजे काय ?* 📙डायनॅमो म्हणजे वीजउत्पादनाचे यंत्र. या यंत्राची ताकद व आकारावरून त्याला निरनिराळी नावे दिली जातात. डायनॅमो म्हटला की, सायकल वा मोटारसायकलसाठी वापरला जाणारा वीजउत्पादक समोर येतो. जनरेटर म्हटला की, घरासाठी, छोट्या कारखान्यांसाठी वीज निर्माण करणारे यंत्र समोर येते. वीजकेंद्रांसाठी याचीच मोठी भावंडे म्हणजे भलीमोठी विद्युतजनित्रे वापरली जातात.डायनॅमोचे तत्त्व *मायकल फॅरडे* यांनी १८३१ साली शोधले. त्याआधीच्या काळात वीज छोट्या बॅटरीत रासायनिक प्रक्रियेतूनच मिळवली जात असे. सलग वीज वापरणे हे त्यामुळे अर्थातच महागडे व अवघडही होते. डायनॅमोचे तत्त्व वापरून विजेचा वापर सुरू झाला आणि सारे चित्रच बदलून गेले.कोणत्याही डायनॅमोमध्ये मुख्यत: लोहचुंबक तांब्याच्या तारेच्या वेटोळ्याभोवती फिरतो व त्यामुळे उत्पन्न होणाऱ्या विजेचा वापर तारेच्या वेटोळ्याच्या दोन टोकांमधून घेऊन केला जातो. याउलट परिस्थिती पण असू शकते. म्हणजेच एखाद्या स्थिर चुंबकाभोवती तारेचे वेटोळे फिरत राहते. चुंबकीय क्षेत्र ज्यावेळी तारेच्या वेटोळ्याने छेडले जाते, त्यावेळी वीजनिर्मिती होते. डायनॅमो फिरवण्यासाठी वापरली जाणारी यांत्रिक ताकद हीच या पद्धतीत विद्युतनिर्मितीमध्ये बदलली जाते. एका ऊर्जेचे दुसऱ्या स्वरूपात रूपांतर केले जाऊन हीच ऊर्जा आपण दिव्याच्या उष्णतेच्या स्वरूपात उजेड पाडण्यासाठी वापरतो.डायनॅमोचा वापर सुरू झाला आणि वीजनिर्मितीच्या क्षेत्रात झपाट्याने प्रगती सुरू झाली. १८६७ साली मोठ्या प्रमाणावर वीजनिर्मिती करणारी केंद्रेही कार्यरत झाली होती. पण मुख्यतः डायनॅमोचा फायदा दुचाकी वाहनांसाठी आजही होतो. आडनिडय़ा अंधार्‍या रस्त्याला जाताना विजेरी वापरण्याऐवजी डायनॅमो चाकाला लावून फिरेल, अशी व्यवस्था केली की, सायकलचा पुढचा रस्ता स्वच्छ दिसू लागतो. एवढी त्यातून निर्माण होणाऱ्या विजेची दिव्याला पुरवली जाणारी शक्ती असते.सर्व प्रकारच्या वाहनांमध्ये दिवे, हाॅर्न्स, वाहनांमधील छोटी मोठी यंत्रे, (रेडिओ, पाणी साफ करणारा वायपर, निरनिराळे इंडिकेटर्स) चालवण्यासाठी जास्त ताकदीचा डायनॅमोचा वापर केला जातो. एवढेच नव्हे, तर यातून तयार होणारी जास्तीची वीज रासायनिक विद्युतघटात साठवून ठेवण्याची पण अंगभूत व्यवस्था सर्व चारचाकी वाहनात केलेली असते. वाहन सुरू करत असताना किंवा वाहन बंद असताना हीच विद्युतघटातील ऊर्जा वापरून यंत्राकरवी काम करून घेता येते.सहसा दुचाकी वाहनांसाठी वापर केला असता डायनॅमोमधून दीड ते बारा व्होल्ट या दाबाची वीज निर्माण केली जाते.*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*You only lose when you give up.* *(तुम्ही तेव्हाच हरता जेव्हा तुम्ही सोडून देता.)**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) नामिबियातून ८ चित्त्यांना भारतात आणणाऱ्या बी - ७४७ या जेट विमानावर कोणत्या प्राण्याचे चित्र रंगवण्यात आले होते ?२) कॉम्रेड ही दक्षिण आफ्रिकेत आयोजित होणारी जगातील सर्वात मोठी लांब पल्ल्याची मॅरेथॉन ( ९० किमी ) स्पर्धेत सहभागी झालेल्या गोंदियातील धावपटूचे नाव काय ?३) कर्तव्यपथ आणि इंडिया गेटजवळ उभारण्यात आलेल्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याची उंची किती आहे ?४) ब्रिटनच्या सम्राटपदी ( राजा ) कोणाची निवड झालेली आहे ?५) इ. स.१४०० मध्ये भारताकडे येणारा सागरी महामार्ग कोणी शोधून काढला ?*उत्तरे :-* १) वाघ ( भारताचा राष्ट्रीय प्राणी ) २) बिंदेशसिंह ढाकरवार, गोंदिया ३) २८ फिट ४) चार्ल्स तिसरे ५) वास्को द गामा *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••● सागर घडमोडे● गंगाधर चिमटलवार● खंडोबा खांडरे● सुनील फाळके● श्याम सुरने● आनंद दुड्डे*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*मानवी जीवनात 'प्रेम' या भावनेला अनन्यसाधारण महत्व आहे. एखाद्याच्या वागण्या-बोलण्यात प्रेम नसेल, तर 'कोरडा रे कोरडा' असे म्हणून त्याला दुय्यम ठरविले जाते. प्रेम ही जीवनातील सर्वोच्च अवस्था असून त्याद्वारे जग जिंकता येते. शत्रूलाही मित्र बनवता येते. याच प्रेमाचे एक रूप भक्ती हे असून त्यामध्ये आपल्याला भारतातील सर्वच संतांचा समावेश करावा लागेल. या प्रेमाचाच उत्कट आणि उच्च अविष्कार जर भक्ती असेल, तर प्रेमदेखील आपल्याला शांती आणि मोक्ष मिळवून देण्याची पहिली पायरी आहे हे लक्षात घेतले पाहिजे.**या भक्तप्रेमाचे स्वरूप इतरांपेक्षा वेगळे असते. तो मागत नाही; पण काही लपवतही नाही. तो जे आहे ते स्वत:सहित उधळून टाकतो. म्हणजेच स्वत:ला तो पूर्णपणे भगवंताच्या ताब्यात देतो. मी अपात्र आहे, अशीच कायम भावना ठेवणे हे त्या प्रेमाचे खरे लक्षण असते. योग्यता नसताना मला आयुष्यात खूप काही मिळाले, अशी ज्याला जाणीव असते, तो भक्त भगवंताच्या कृपेचा खरा पाईक असतो.* ••● ‼ *रामकृष्णहरी* ‼ ●•• 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••वाईट विचार करणारी माणसे स्वत:चेच काय पण इतरांचेही चांगले व्हावे असे कधीही त्यांना सुचत नाही.नेहमी त्यांच्या मनात इतरांना दु:ख कसे देता येईल,त्यांचे असलेले चांगले मन कसे विचलीत करता येईल आणि त्यांना कसा त्रास देता येईल याचाच नेहमी वाईट विचार करत असतात.त्यामुळे त्यांच्या ह्या असूरी वृत्तीमुळे ते जीवनात कधीही समाधानी आणि यशस्वी होऊ शकत नाहीत.अशा वृत्ती असणा-या माणसांचा सहवासात राहणे म्हणजे विषारी सापांशी मैत्री करुन सर्वनाश करुन घेणे होय.© व्यंकटेश काटकर,नांदेडसंवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३🐉🍁🐉🍁🐉🍁🐉🍁🐉 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *कष्टरूपी राजहंस* एक जमीनदार होता. त्‍याला त्‍याच्‍या वाडवडीलांपासून खूप संपत्ती मिळालेली होती. अतिश्रीमंतीमुळे तो खूप आळशी बनला होता. त्‍याचा दिवस हा टवाळक्या करणे व हुक्का ओढत बाजेवर पडून राहणे यातच जात असे. त्‍याच्‍या या आळशीपणाचा फायदा त्‍याचे नोकरचाकर इमानेइतबारे घेत असत. त्‍याचे नातेवाईकही या आळशी स्‍वभावाला ओळखून होते व तेही त्‍याच्‍या संपत्तीचा गैरफायदा घेत असत, त्‍याची संपत्ती हळूहळू का होईना साफ करण्‍यात ते मश्‍गुल होते. एकदा परगावाहून जमिनदाराचा एक मित्र त्‍याला भेटण्‍यासाठी आला होता. त्‍याने हे सर्व नोकरचाकरांचे, नातेवाईकांचे वर्तन पाहिले व मित्राला कसे लुटले जात आहे हे त्‍याच्‍या लक्षात आले. त्‍याने हे जमिनदाराच्‍या कानावर घातले पण तो इतका आळशी होता की त्‍याने मित्राच्‍या बोलण्‍याकडे लक्षच दिले नाही. शेवटी त्‍याने एक हुकुमी एक्का वापरला. तो जमिनदाराला म्‍हणाला,’’ मित्रा, मला असे एक संतमहात्‍मा माहित आहेत की जे तुझी संपत्ती दुप्‍पट करून देऊ शकतील. फक्त तू त्‍यांच्‍या दर्शनाला चल व ते जसे सांगतील तसे तू वाग. तुझी संपत्ती अजून वाढेल.’’ जमिनदाराला पैशाची हाव सुटली व तो संतांकडे जाण्‍यास तयार झाला. संतांकडे जाऊन दर्शन घेतले व संतांना मार्गदर्शन करण्‍यास सांगितल्‍यावर ते म्‍हणाले,’’ तुझ्या शेतामध्‍ये एक राजहंस रोज पहाटे सूर्योदयापूर्वी येत असतो त्‍याचे दर्शन तू घेतल्‍यास तुझ्या संपत्तीत प्रचंड वाढ होईल. मात्र इतर कोणीही त्‍या राजहंसाला पाहण्‍यापूर्वी तू पाहणे गरजेचे आहे.’’ दुस-याच दिवशी जमिनदार लोभाने का होईना पहाटे उठला व शेतात गेला. त्‍याला तेथे एक आश्‍चर्यकारक दृश्‍य दिसले. त्‍याचा एक नातेवाईक पाठीवर धान्‍याचे भरलेले एक पोते शेतातून चोरून घेऊन चाललेला दिसला. नातेवाईकाला जमिनदाराने विचारले असता तो नातेवाईक ओशाळा झाला व माफी मागू लागला. जमिनदार लवकर उठला असल्‍याने तो दूध पिण्‍यासाठी गोठ्यामध्‍ये गेला तर तेथे अजून एक चकित करणारे दृश्‍य त्‍याला दिसले. त्‍याचे नोकर हे दूधामध्‍ये पाणी मिसळून दूध वाढवित होते व वाढविलेले दूध हे बाजूला ठेवून त्‍याचे पैसे मिळविण्‍यासंबंधी चर्चा करत होते. जमिनदाराने हे ऐकले व नोकरांना कामावरून काढण्‍याची धमकी देताच ते गयावया करू लागले व काम प्रामाणिकपणे करू असे त्‍यांनी सांगितले. जमिनदार आता रोजच लवकर उठू लागला व राजहंसाचे दर्शन घेण्‍यासाठी शेतात जाऊ लागला. यामुळे सगळे नोकरचाकर, नातेवाईक, धान्यचोर यांना मालक शेतात हजर असतो याची जरब बसली व ते चोरी करेनासे झाले. लवकर उठून शेतात फेरफटका मारल्‍याने जमिनादाराची तब्‍येत पण सुधारू लागली. चोरी कमी झाल्‍याने दूधदुभते, धान्‍य, पीक, भाजीपाला यातून जमिनदाराचे धन अजूनच वाढू लागले. पण राजहंस कसा दिसत नाही हा प्रश्‍न घेऊन तो संतांकडे गेला असता महात्‍मा म्‍हणाले,’’ अरे तुला तर तो राजहंस दिसला पण तू त्‍याला ओळखू शकला नाही. परिश्रम,कष्टरुपी नावाचा एक राजहंस तुझ्या आयुष्‍यात आला आणि त्‍याने तुझ्यातल्‍या आळशीपणाला दूर करून तुझ्या धनाची वाढ करून दिली.’’*तात्‍पर्य :- कष्टरुपी, परिश्रमरूपी परिस ज्‍यांच्‍या ज्‍यांच्‍या आयुष्‍याला स्‍पर्श करतो त्‍यांच्‍या जीवनाचे सोने बनते.मेहनतीचे फळ नेहमीच गोड असते.**संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दि. 21/09/2022 वार - बुधवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 🎇 . *दिनविशेष . 🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*आंतरराष्ट्रीय शांति दिन*💥 ठळक घडामोडी :-◆ १९९५ - भारतात अनेक व्यक्तिंनी दावा केला की गणपतीच्या मूर्तीसमोर दूध ठेवले असता त्याने ते दूध प्यायले.◆ २००३ - गॅलेलियो या अंतराळयानाने मुद्दामहून गुरूच्या वातावरणात प्रवेश केला. अत्यंत दाबामुळे यान नाश पावले.💥 जन्म :-●१९३२ - पंडित जितेंद्र अभिषेकी, भारतीय-मराठी गायक, मराठी संगीतकार.●१९८० - करीना कपूर, भारतीय अभिनेत्री.💥 मृत्यू :-◆ १९९९ - पुरुषोत्तम दारव्हेकर, मराठी नाटककार, मराठी नाट्यदिग्दर्शक.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *पुणे विद्यापीठात 'ABVP'चं ठिय्या आंदोलन, परीक्षा शुल्क माफ करण्याची मागणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *आफ्रिकेतून भारतात आणलेल्या चित्त्यांना बिष्णोई समाजाचा विरोध; पंतप्रधान मोदींना लिहिले पत्र*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *कोरोना काळातील राजकीय आणि सामाजिक गुन्हे मागे, राज्य सरकारची घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *नवरात्रौत्सव काळात अंबाबाई मंदिरात पेड ई-पास सुविधा दिली जाणार, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिली माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मदर डेअरीने गेल्या महिन्यात दिल्ली-एनसीआरमध्ये दुधाच्या दरात 2 रुपयांनी वाढ केली होती. त्यानंतर पुन्हा एकदा वाढ होण्याचे संकेत आहेत.*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *काश्मीरमध्ये चित्रपट पाहणं शक्य, 1ऑक्टोबरपासून श्रीनगर इथं राज्यातलं पहिलं मल्टिप्लेक्स सुरू होणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *पुण्याच्या सरहद संस्थेकडून कारगिल मॅरेथॉनचं आयोजन, राज्यातील धावपटूंचाही सहभाग*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••*Learn Action words कृतीयुक्त शब्द👇**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/v82KSVHetDI~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *लघुकथा - चोरी*https://nasayeotikar.blogspot.com/2019/09/blog-post_20.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••📙 *टिश्यू कल्चर म्हणजे काय ?* 📙टिश्यू कल्चर हा शब्द अलीकडे वरचेवर कानावर पडत असला व त्याचा वापर सरसहा सुरू झाला असला तरीही १९०२ साली म्हणजे शंभरापेक्षा जास्त वर्षांपूर्वी *जी. हाबरलँड* यांनी टिश्यू कल्चरची पद्धत शोधून ती यशस्वी करून दाखवली होती. त्यांनाच या शास्त्राचा प्रणेता मानले जाते. एका पेशीपासून संपूर्ण वनस्पतीची, झाडाची, रोपाची निर्मिती करणे म्हणजे 'टिशू कल्चर' असे म्हणता येईल. ही निर्मिती कृत्रिमरीत्या तयार केलेल्या वातावरणात वा प्रयोगशाळेत केली जाते. याला टोटी पोटन्सी असा शब्द वापरला जातो. प्राण्यांच्या एकाच पेशीपासून असे बनत नाही म्हणून त्यांना 'प्युरोपोटंट' असे समजले जाते. त्यासाठी क्लोनिंगची पद्धत वापरली जाते.टिशू कल्चरमध्ये पेशीसंवर्धन करण्यासाठी विविध पूरक माध्यमांचा वापर केला जातो. या माध्यमांतून वाढीला अावश्यक सर्व घटकांचा पुरवठा होतो. एकपशीयपासून छोट्या रोपापर्यंतचा प्रवास अत्यंत नाजूकपणे जपावा लागतो. त्यानंतर ही रोपे लागवडीयोग्य झाल्यावर प्रयोगशाळेतून बाहेर नेतात. मुराशिगे स्कूग यांनी १९६२ मध्ये वापरलेले माध्यम, गँबर्ग यांचे १९६८ चे माध्यम, शेंक व हिल्डर ब्रॅण्ड यांचे १९७२ चे माध्यम अशा काही माध्यमे या वृद्धीसाठी वापरली जातात. नियंत्रित तापमानात, जंतूविरहित अवस्थेत प्रयोगशाळेतच ही वाढ होत असते.या साऱ्या प्रक्रियेदरम्यान तयार होणारी सर्व रोपे पूर्णतः एकसारखी असतात. त्यामुळे एकाच प्रकारची, एकाच रंगाची फुले देणारी, एकाच दिवशी फुलणारी अशी रोपे तयार करणे शक्य झाले आहे. शोभिवंत रोपवाटीकांसाठीची रोपटी, केळीच्या बागांसाठीची छोटी रोपे अशांसाठी टिश्यू कल्चरचा वापर फार मोठ्या प्रमाणावर केला जातो. काही आठवड्यांत काही लाख रोपे तयार करणे, त्यांची निर्यात करणे हे केवळ या पद्धतीमुळेच शक्य होते.टिशू कल्चरमुळे दुर्मिळ वनस्पतींचे जतन व वृद्धी, फलोद्यान व उद्यानवृक्षांसाठीची एकसारखी निर्मिती, संशोधन यासाठी अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. महत्त्वाची व व्यवहारातील अत्यंत उपयुक्त गोष्ट म्हणजे खतांचा कमी वापर करून, किडीला सक्षमपणे तोंड देऊ शकणारी, अल्पकाळात पिके देणारी, भरघोस उत्पन्न देणारी वा दुष्काळी वातावरणातही तग धरणारी अशी वनस्पती निर्माण करणे शक्य झाले आहे.या साऱ्या प्रक्रियेतून दुय्यम उत्पादन म्हणूनही काही गोष्टी संशोधकांच्या हाती लागत गेल्या आहेत. काही प्रतिजैविके, रोगनाशके, अल्कलाॅइड्स, हार्मोन्स यांची निर्मिती शक्य होते. एकंदरीतच फार मोठे भांडवल, तज्ज्ञांची देखरेख व अद्ययावत प्रयोगशाळांची आवश्यकता असलेला हा टिश्यू कल्चरचा पसारा व आवाका आपल्या दैनंदिन जीवनाला वेढत चालला आहे.*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*“ चांगले पुस्तक म्हणजे मानवी आत्म्याचे अतिशुद्धी सार असते. ”**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) मध्यप्रदेशच्या पालपूर - कुनो राष्ट्रीय उद्यानात १७ सप्टेंबर २०२२ ला सोडण्यात आलेले ८ चित्ते कोणत्या देशातून आले ?२) 'मिस्टर आयपीएल' अशी ओळख असलेल्या क्रिकेटपटूचे नाव काय ?३) जगात सर्वात जास्त जड पाण्याची निर्मिती कोणता देश करतो ?४) डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार कोणत्या कार्याशी संबंधित आहे ?५) कीटकभक्षी वनस्पतींची नावे सांगा.*उत्तरे :-* १) नामिबिया २) सुरेश रैना ३) भारत ४) सामाजिक कार्य ५) घटपर्णी, व्हिनस फ्लायट्रॅप, ड्रॉसेरा *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••● जिग्नेश क्रांती बुद्धेवार● कु. आद्या साईनाथ लखमावाड● सौ. वर्षाराणी मारोती होनशेट्टे● सचिन तोटावाड● विष्णू गंभीरे● निशांत जिंदमवार● प्रकाश जाधव● स्मिता मिरजकर वडजे● आकाश कोलपकर● गोविंद पाटील*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*श्रीपूर येथील राजा यांच्‍या निधनानंतर त्‍यांचा मुलगा राजवीरसिंह याला राज्‍यपदी बसविण्‍यात आले. राजवीर वडिलांसारखाच साहसी होता पण अनुभव पाठीशी कमी असल्‍यामुळे अनेकदा संकटात तो घाबरत असे. अशावेळी त्‍याची माता त्‍याला हिंमत देत असे व योग्‍य मार्गदर्शन करून संकटातून बाहेर काढत असे. शेजारच्‍या राज्‍यातील गंगानगरमधील राजा भीमसेन याची श्रीपूरवर नजर होती. एके दिवशी भीमसेनने श्रीपूरवर आक्रमण केले. दोन्‍ही सैन्‍ये एकमेकांना भिडली, तुंबळ युद्ध झाले. भीमसेनकडे सैनिक खूप प्रमाणात होते. दोनच दिवसात भीमसेन यांनी चार मैल भागावर आपला ताबा मिळविला. राजवीरच्‍या तोंडून कमी सैनिकांमुळे आपल्‍याला हार पत्‍करावी लागली हे ऐकले तेव्‍हा राजमातेने मनातल्‍या मनात काही ठरवले.**राजवीर झोपण्‍याआधी राजमातेचे दर्शन घेण्‍यासाठी आला तेव्‍हा राजमाता लहान लहान सहा लाकडाच्‍या काड्या एकत्र बांधून लोखंडाच्‍या मोठ्या तुकड्याला तोडण्‍याचा प्रयत्‍न करीत असलेली पाहिली. राजवीरने मातेला विचारले,’’आई, सहा लाकडाच्‍या काड्या एकत्र करूनही लोखंडाला तोडू शकत नाही’’ राजमाता म्‍हणाली,’’खरं बोललास, संख्‍येने मजबुतीला पराजित केले जाऊ शकत नाही त्‍याप्रमाणे आपले वीर सैनिक आणि तू या लोखंडासारखे मजबूत व्‍हा. शत्रूची कितीही संख्‍या तुम्‍हाला तोडू शकणार नाही अशी ताकद तुमच्‍यात आहे ती जागृत करा. तुमच्‍या मजबुतीसमोर शत्रू गुडघे टेकेल.’’ राजवीरने याप्रमाणे केले व त्‍याने भीमसेनाला हरवून युद्धात विजय संपादन केला. दृढ मनोबलाने हारलेले युद्धही जिंकता येते. काही वेळेला दृढनिश्‍चय, ठाम मनोबल हेच यशाचे इंगित असते.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●••🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••शोध घ्यायचा असतो तो चांगल्या विचारांचा,बोध घ्यायचा असतो तो गोष्टींचा,सहवास मिळवायचा असतो तो सर्जनशील व्यक्तींचा ज्यामुळे आपल्या जीवनात महत्वाचे बदल होण्यास अनुकूल ठरेल.जेव्हा केव्हा आपण विचार करायचा तर यावेळी वरील तीन गोष्टींबाबत नक्कीच करावा अन्यथा आपल्या जीवनाचे नक्कीच नुकसान होऊ शकेल की,जे आपल्या जीवनासाठी बाधक ठरेल.आपली आपल्या माणसांत आणि इतर लोकांत कवडीचीही किंमत राहणार नाही.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद..९४२१८३९५९०.🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *गैरसमज आणि अनुमान**एक छोटा मुलगा आपल्या दोन हातात दोन पेरू घेऊन उभा असतो ,त्याची ताई हसतहसत म्हणाली,"दादा एक पेरु मला दे". तेवढ्यात त्याने तो पेरू दाताने कुरतडला.त्याची ताई काहीच बोलली नाही. मुलाने दुसरा पेरूही दाताने कुरतडला. आपल्या भावाची ही कृती बघून त्याची ताई नुसती बघतच राहिली व तिच्या चेहऱ्यावरील हसू गायब झाले*. *तेव्हा तिच्या लहानग्या भावानेे चिमुकले हात पुढे करुन कुरतडलेल्या दोन्ही पेरूंपैकी एक पुढे केला व म्हणाला "ताई , हा घे.हा जास्त गोड आहे." ताईच्या डोळ्यात पाणी आले...**प्रत्येक वेळी आपले निष्कर्ष बरोबर असतीलच, अस नाही*...*एखाद्याची कृती पूर्ण होईपर्यंत घाईघाईत निष्कर्ष काढून गैरसमज करून घेण्यापेक्षा ते गैरसमज दूर करण्यात आणि समोरच्याला समजून घेण्यातच मनुष्याचे हित असते.**संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दि. 20/09/2022 वार - मंगळवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 🎇 . *दिनविशेष . 🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••💥 ठळक घडामोडी :-◆१६३३ - पृथ्वी सूर्याभोवती फिरत असल्याचे प्रतिपादन केल्या बद्दल गॅलेलियोवर खटला चालवण्यात आला.💥 जन्म :-● १८५४ - नारायण गुरु, केरळमधील समाजसुधारक .●१८९७ - नारायण भिकाजी परुळेकर ऊर्फ नानासाहेब परुळेकर, मराठी पत्रकार.● १९२१ - पनानमल पंजाबी, भारतीय क्रिकेट खेळाडू.●१९२२ - द. न. गोखले, चरित्र वाङ्मयाचे संशोधक व मराठी शुद्धलेखनाचे ज्येष्ठ अभ्यासक.●१९२५ - राम सातवा तथा आनंद माहिडोल, थायलंडचा राजा.● १९४४ - रमेश सक्सेना, भारतीय क्रिकेट खेळाडू.💥 मृत्यू :-◆ १९९६ - दया पवार, मराठी साहित्यिक.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *राज्य मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षेचं संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय. २१ फेब्रुवारी २०२३ ते २० मार्च २०२३ दरम्यान बारावीच्या परीक्षा होणार आहेत. तर दहावीच्या परीक्षा दोन मार्च २०२३ ते २५ मार्च २०२३ दरम्यान होणार आहेत.*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *राज्यात पावसाचा जोर कमी, आज मराठवाड्यासह विदर्भात पावसाचा 'यलो' अलर्ट*••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर, राष्ट्रवादी आणि भाजपची सरशी, काँग्रेसची पिछेहाट*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *संजय राऊत यांचा जेलमधील मुक्काम वाढला, कोठडी 14 दिवसांनी वाढली, पत्राचाळ घोटाळ्यातील मास्टरमाईंड संजय राऊतच, आरोपपत्रात ईडीचा दावा*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *सणासुदीच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांवर आर्थिक संक्रांत? शिंदे सरकारच्या निर्णयामुळे महामंडळ पेचात*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *बीड जिल्ह्यातील माजलगाव धरणात डॉक्टरचा शोध घेताना बुडालेल्या कोल्हापूरच्या जवानाचाही मृत्यू, मच्छिमारांच्या जाळ्यात अडकल्याने करूण अंत*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *जगभरातल्या 500 प्रतिनिधींच्या उपस्थितीत राणी एलिझाबेथला अखेरचा निरोप*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *उद्याची काळजी आज कशाला*https://nasayeotikar.blogspot.com/2018/08/blog-post_8.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••📙 *जायरोस्कोप म्हणजे काय ?* 📙होकायंत्र ज्यावेळी स्थिर राहू शकत नाही, हेलकावे, वळणे, हिंदकळणे यांमुळे त्याचा लोहचुंबक दिशा नीट दाखवायला जेव्हा असमर्थ ठरू लागतो, त्या वेळी जाइरोस्कोप वापरावा लागतो. जमिनीला समांतर स्वरूपात होकायंत्र स्थिर असेल, तेव्हा त्यावरून नेमकी दिशा ज्ञात करून घेता येते. पण पाण्यावर जेव्हा एखादे जहाज वादळात सापडून सतत हेलकावू लागते, तेव्हा आपण पकडलेली दिशा कोणती, असा प्रश्न उद्भवतो. अशीच काहीशी स्थिती विमानात येते.जायरोस्कोप म्हणजे एक जड, स्वतःभोवती फिरणारे चक्रच असते. एका विशिष्ट अक्षाभोवती हे चक्र अत्यंत वेगाने फिरू शकते. या अक्षाची दिशा त्याभोवती असलेल्या मोजपट्टीवर पाहिजे त्या ठिकाणी स्थिर करून मग हे चक्र फिरवायला सुरुवात करतात. थोडक्यात म्हणजे होकायंत्रावरून प्रवासाचे अक्षांश रेखांश पक्के ठरले की सुकाणूची दिशा पकडण्यासाठी जायरोस्कोप स्थिर करून त्याचे चक्र फिरवायला सुरुवात केली जाते. एकदा का चक्र वेगाने फिरू लागले की, याची दिशा हलवणे व त्याचा फिरणारा चक्राचा पृष्ठभाग अक्ष बदलून फिरणे ही जवळपास न होणारी गोष्ट बनते.चक्राने घेतलेला स्वतः भोवतीचा वेग केंद्रीभूत होऊन अशी काही अक्षाभोवती पकड घेतो की ती पकड हलणे व्यवहारत: अशक्य असते. यालाच जायरोस्कोपिक इनर्शिया' किंवा 'जडत्व' असे म्हणतात. यासाठी एकाच गोष्टीची आवश्यकता असते, ती म्हणजे चक्राचा फिरण्याचा वेग अबाधित राखणे. हा वेग जर काही कारणाने कमी होऊ लागला, तर मात्र ज्या आधारावर जायरोस्कोप उभा केलेला, आधारलेला असतो, त्यालाच तो संथपणे गोलाकार फेरी घालू लागतो.जायरोस्कोपचा वापर होकायंत्राच्या जोडीला सर्व प्रकारच्या लांब पल्ल्याच्या जल व हवेतील प्रवासासाठी केला जातो. होकायंत्र वाचणे व त्याचा वापर करणे हे तल्लख खलाशाचे व अधिकाऱ्याचे काम; पण या ऐवजी जाइरोस्कोप दाखवेल ती दिशा पकडणे ही मात्र कोणाही माणसाला जमणारी गोष्ट असू शकते. हाही महत्त्वाचा उपयोग नाही काय ? अंतराळ प्रवासात होकायंत्र बिनकामी ठरते; पण जाइरोस्कोप वापरता येतो. *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*“ विश्वास ठेवा चुकीतुनही चांगले निष्पन्न होते. ”**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1) *रयत शिक्षण संस्थेचे बोधचिन्ह कोणते ?* वटवृक्ष2) *भावी पिढीचा शिल्पकार कोणाला म्हटले जाते ?* शिक्षक3) *'खेड्याकडे चला' अशी हाक कोणी दिली ?* महात्मा गांधी4) *ऑलिम्पिक ध्वज सर्वात प्रथम कोणत्या वर्षी फडकविण्यात आले ?* 1920 ( बेल्जियम )5) *1 एकर म्हणजे किती आर ?* 40 आर*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••● जिग्नेश क्रांती बुद्धेवार ( सिम्बॅा )● शीतल प्रभू● पांडुरंग कोकरे● धम्मकीर्ती कांबळे● संगीता देशमुख, वसमत● उमेश वडजे पाटील● गणेश भोसले● सुरेश जमपंनगिरे*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*एखादा रिक्षावाला प्रवाशाची चुकून राहिलेली सोन्या-नाण्यांची थैली घर शोधत त्याच्या घरी पोहचवून देतो, आणि मोबदल्यात बक्षिसी नाकारतो. ही प्रामाणिकता थक्क करते! जगण्यासाठी ज्यांचा संघर्ष असतो...आपल्या पायावर जे धड उभेही नसतात, अशा लोकांचे देणारे हात मागे येत नाहीत. कारण माणुसकीवरील त्यांची निष्ठा कुठल्या अपेक्षांची मोहताज नसते. वाट्याला अंधार असला तरी हे लोक उजेड वाटत राहतात जगाला. लौकिक अर्थाचं यश त्यांच्याकडे नसतं, पण त्यांचं निर्मळ जगणं अंतर्मुख करतं माणसाला. फाटक्या आयुष्याला ठिगळ लावत राहयची आणि मूल्य जपत राहायची, हा त्यांचा जीवनधर्म असतो. चांगुलपणाची व सत्याची प्रेरणा देणा-या अशा घटना अंत:करणाचे डोळे करून बघायच्या असतात.**'सच काम किया जग मे जिसने, उसने प्रभुनाम लिया न लिया' असं राष्ट्रसंत तुकडोजींनी सांगितलं. पण आपण उलट जगतो. 'प्रभुनाम लिया जग मे जिसने, उसने सच काम किया न किया' ही आपली धार्मिकता असते. आपले भक्तीचे, प्रतिष्ठेचे शिक्षक विचित्र असतात. आपल्या पायांवर उभं रहाताना ज्यांचे पाय थरथरतात आणि तरीही समाजाला जे इमान देतात, त्यांच्या दातृत्वाच्या हातांना आपणही कृतज्ञतेची फुलं दिली तर? असं लहान होऊन... हाताला हात देऊन निरपेक्ष जगता आलं तर आपसुकच जगणं सुगंधित होते. किती अनोखा आहे माणूस !* *॥ रामकृष्णहरी ॥*🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••ज्या व्यक्ती अश्रूंचा सहारा घेऊन जगतात त्या जीवनात कुठेतरी पराभव पत्करलेल्या असतात किंवा त्यांच्या मनावर कुठेतरी आघात झालेला असतो किंवा कुणीतरी मनाविरुद्ध करण्यासाठी प्रवृत्त केलेले असते.हे जरी खरे असले तरी अशा व्यक्ती शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या कमकुवत झाल्याने त्यांना जीवनात जगण्याची काही अपेक्षा उरली नाही किंवा आता आपण जगून तरी काय करावे असा सतत विचार करत आणि डोळ्यांत अश्रू आणून कसेबसे जीवन जगतात.अशा दुबळ्या मनाने जीवन जगण्यापासून जीवनाला परावृत्त करायचे असेल तर जीवनात आणि आपल्यासमोर चांगले जीवन जगण्याची उमेद प्रथमत: नजरेसमोर ठेवायला हवी, नेहमी आपण काहीतरी असले तरी मी कोणत्याही कठीण प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी सक्षम आहे असा उदात्त विचार करून जगायला शिकले पाहिजे,कुणीजरी आपले मन दुखवण्याचा प्रयत्न केलातरी मी त्याकडे दुर्लक्ष करीन असाही सकारात्मक विचार केला आणि मन घट्ट करून जगायला शिकले तर अश्रूंचा आधार घेऊन जगायची काही गरजच भासणार नाही.जीवन तर सुखदु:खाने भरलेले आहे ते कुणाच्या वाट्याला कमी-जास्त असणारच.सुख जास्त झाले म्हणून जास्तही त्या सुखाचा अतिरेक होऊ द्यायचा नाही आणि दु:ख झाले म्हणून अति दु:खी व्हायचे नाही.आपण सारेजण सुखदु:खाच्या चक्रव्युहात अडकलेलोच आहोत आणि त्या चक्रव्युहाला भेदूनच चांगले जीवन जगायचे आहे हे लक्षात ठेवायला हवे.व्यंकटेश काटकर,नांदेडसंवाद..९४२१८३९५९०🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *खरी आई कि खोटी आई*एका आठ वर्षाच्‍या मुलाची आई देवाघरी जाते. मुलाच्‍या संगोपनात काही अडचण येऊ नये म्‍हणून वडील दुसरे लग्‍न करून त्‍या मुलासाठी नवीन आई घरी घेऊन येतात. एक महिन्‍यानंतर वडील मुलाला विचारतात,''बेटा, तुला ही नवीन आई कशी काय वाटते?तुझी देवाघरी गेलेली आई चांगली की ही नवीन आई चांगली आहे?'' यावर मुलगा उत्तर देतो,'' बाबा, ही नवीन आलेली आईच खरी आहे आणि देवाघरी गेलेली आई खोटी होती.'' हे अचानक आलेले उत्तर पाहून वडील संभ्रमात पडतात. त्‍यांना समजत नाही की मुलगा काय बोलतो आहे? म्‍हणून पुन्‍हा त्‍या मुलाला विचारतात,'' अरे तुला असे का वाटते ते मला सांग? जिने तुला नऊ महिने पोटात सांभाळले, प्रसुतीवेदना सहन करून जन्‍म दिला ती आई तुला खोटी कशी काय वाटते? आणि ही काल आलेली नवीन आई मात्र तुला खरी कशी काय वाटते?'' मुलगा म्‍हणतो,'' बाबा, मी खूप खोडकर आहे हे तुम्‍हाला माहितीच आहे. देवाघरी गेलेली माझी आई माझ्या खोड्यांना कंटाळून नेहमी मला '' जर तु खोड्या केल्‍या तर तुला मी खायला देणार नाही'' असे म्‍हणत असे. पण तिचे न ऐकता मी सतत खोड्या करत असे. पण ती मात्र मला जेवण देण्‍यासाठी उन्‍हातान्‍हात पूर्ण गावात मला शोधत असे व मला वेळप्रसंगी रागवून, मारून घरी आणत असे व मला स्‍वत:च्‍या मांडीवर बसवून खाऊपिऊ घालत असे आणि ही नवीन आईही पण '' जर तु खोड्या केल्‍या तर तुला मी खायला देणार नाही'' असेच म्‍हणते आणि खरं सांगू का बाबा तुम्‍हाला? गेल्‍या तीन दिवसात खरेच तिने मला खायला दिलेले नाही. म्‍हणूनच मी तिला खरी आई असे म्‍हणत आहे.''तात्‍पर्य :- आपली आई ही देवाने दिलेली सर्वात मोठी देणगी आहे.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दि. 19/09/2022 वार - सोमवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 🎇 . *दिनविशेष . 🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••💥 ठळक घडामोडी :-◆२००७ - ट्‌वेंटी-२० क्रिकेटमध्ये एकाच षटकात सहा षटकार मारण्याची कामगिरी करणारा युवराज सिंग पहिलाच क्रिकेटपटू ठरला. त्याने क्रिकेटच्या इतिहासातील सर्वाधिक वेगवान अर्धशतक नोंदविताना पन्नास धावा करण्यासाठी फक्त १२ चेंडू घेतले.💥 जन्म :-◆१८६७ - पंडित श्रीपाद दामोदर सातवळेकर, मराठी चित्रकार, वेदाभ्यासक.💥 मृत्यू :-"●१९३६ - पंडित विष्णू नारायण भातखंडे, भारतीय संगीतकार, संगीतज्ञ.●२००१ - अनंतराव दामले, प्रभात फिल्म कंपनीचे संचालक.●२००२ - प्रिया तेंडुलकर, अभिनेत्री .● २००७ - दत्ता डावजेकर ऊर्फ डीडी, संगीतकार.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *आपचे दिल्लीत 'राष्ट्रीय अधिवेशन', भाजपविरोधात करणार शक्तिप्रदर्शन, आमदार खासदारांसह प्रमुख नेते राहणार उपस्थित*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *राज्यातील 547 ग्रामपंचायतींसाठी 76 टक्के मतदान, राज्यातील 51 ग्रामपंचायती या आधीच बिनविरोध झाल्या आहेत. इतर ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल सोमवारी जाहीर करण्यात येईल.*••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करावे, या मागणीसाठी मुंबईत आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनकर्त्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भेट घेतलीय.*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मुंबईसह राज्यभर पावसाची जोरदार हजेरी, विदर्भासह मराठवाड्यात यलो अलर्ट, जायकवाडी धरणातून 1 लाख 13 हजार क्यूसेकनं पाण्याचा विसर्ग, 620 कुटुंबांना स्थलांतराच्या सूचना*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ * दोन दिवसीय साखर परिषदेला पुण्यात सुरुवात, शरद पवारांच्या हस्ते उद्घाटन, साखर कारखान्यांचा होणार सन्मान, जळगाव जिल्ह्यातील साखर कारखाने लवकरच होणार सुरू, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ * तैवानमध्ये 24 तासांत भूकंपाचे 100 धक्के, जपानमध्ये त्सुनामीचा इशारा*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *नागपूर मेट्रोचा ब्रँड अँबेसेडर व्हायला आवडेल, बॅडमिंटनपटू मालविका बनसोड ने व्यक्त केली भावना*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *परावलंबी जीवन*https://nasayeotikar.blogspot.com/2017/10/blog-post_28.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••📙 *जाडेपणा म्हणजे नेमके काय ?* 📙शरीरातील चरबीचे प्रमाण नको एवढे वाढत गेले, तर जाडी व वजन वाढते. चरबी प्रत्येकाच्या शरीरात असतेच, पण तिचे सर्व शरीरभर योग्य त्या पद्धतीत विवरण करण्याची व्यवस्था निसर्गानेच केलेली असते. जेव्हा आपण गरजेपेक्षा जास्त खाऊ लागतो, तेव्हा ही व्यवस्था बिघडायला सुरुवात होते. खाण्यात आलेल्या अन्नातून उष्मांक मिळतात. हे उष्मांक जेव्हा रोजच्या रोज खर्च होत नाहीत, तेव्हा शरीर ते साठवू लागते. ही साठवण्याची शरीराची पद्धत म्हणजे चरबीचा साठा वाढवणे.पोटावर, मांड्यांमधील जागेत, नितंबांवरील व हातांच्या दंडामागील भागात प्रथम चरबी साठू लागते. पुरुषांमध्ये जाड माणसाला सफरचंदाचा, तर स्त्रियांमध्ये पीअर या फळाचा आकार प्राप्त होऊ लागतो. सर्वसाधारण आकडेवारीनुसार उंची, वय व वजन यांचे जेवढे प्रमाण असायला हवे, त्यापेक्षा वजन जास्त असेल, तर माणूस जात आहे, त्याने चरबी साठवायला सुरुवात केली आहे, असे समजावे. याखेरीज कातडीमधील चरबीचा साठा रास्त व जास्त आहे, हे ठरवण्यासाठी विशिष्ट पद्धतीचे चिमटेही मिळतात. या बाबतीत सोपा घरगुती अंदाज म्हणजे दंडामागील कातडी छोट्या चिमटीत पकडता आली तर चरबीचा साठा रास्त व न आली तर जास्त, असे समजावे !प्रत्येक प्राण्यामध्ये चरबीचा साठा करणे व वापरणे यांवर निसर्ग नियंत्रण ठेवतो. पण माणूस त्याच्या अति खाण्याने व ऐदी वागणुकीने हे नियंत्रण झुगारू पाहतो. साखर, लोणी व मोटार वाहन वापर यांमुळे मानवाने स्वतःचे संतुलन घालवले आहे, असे डॉक्टर मंडळी म्हणतात. वाहनांमुळे हालचाल संपली, साखरेने नको असलेले उष्मांक पोटात वाढू लागले, तर लोण्यामुळे चक्क चरबीच पोटात वाढू लागली. विसाव्या शतकात जाड माणसांचे प्रमाण व त्यातून उद्भवणाऱ्या आजारांचे प्रमाण वाढले आहे.जाड माणसाला जास्त घाम येतो. घामाला वास येत राहतो. थकवा जाणवतो, धाप लागते, जास्त तहान लागते, सतत खावेसे वाटते, खाऊनही समाधान होत नाही. या साध्या साध्या लक्षणानंतरही लक्ष दिले नाही, तर हळूहळू जाड माणसाच्या शरीरात मधुमेह, रक्तदाब, रक्तवाहिन्यांचे विकार व त्यांतूनच उद्भवणारा हृदयविकार यांचा शिरकाव होतो. वजन जास्त वाढल्याने सांध्यांची झीज होत जाऊन सांधेदुखी, तर पायांतील रक्तवाहिन्यांना शिथिलपणा आल्याने पायांत रक्त साचून पाय दुखणे, सूज येणे सुरू होते. जाड माणसे अपघाताला जास्त निमंत्रण देतात. रस्ता ओलांडताना अचानक आलेले वाहन धडकणे, जिन्यावर तोल न सावरता येणे यांतून हे अपघात घडतात.पूर्ण उपवासाने जाडी कमी करणे हे सोपे आहे. पण कमी केलेली जाडी तशीच टिकवणे हे मात्र अत्यंत कठीण काम आहे. एका आकडेवारीनुसार जाडी कमी केलेल्यांतील जेमतेम ५ टक्के लोकच ती तशीच टिकवण्यात यशस्वी होतात. एकंदरीत खाण्यापिण्याच्या पद्धतीत व जीवनपद्धतीत अत्यंत नियमितपणा आणून सुयोग्य व्यायाम केला, तरच जाडी आटोक्यात राहू शकते.स्त्रियांमध्ये प्रसूतीनंतर, विद्यार्थ्यांत बैठे काम सुरू झाल्यावर, मध्यम वयात म्हणजे चाळीस ते पन्नास या दरम्यान वजन वाढू लागते. नियमित व्यायाम केल्यास आणि तेलकट, तळकट व गोड खाणे मोजकेच ठेवल्यास जाड होण्याची भीती बाळगायची गरज नाही. हजारभर जाड माणसात एखाद्याचीच जाडी अनुवांशिक असते. ती आटोक्यात आणणे मात्र डॉक्टरांनाच शक्य असते. पण उरलेले सर्वजण मात्र 'हे कोणालाच शक्य नाही', अशा समजुतीत वावरतात.जगातील सर्वात जाड इसम 'जॉन मुनाॅक' याचे वजन होते सहाशे पस्तीस किलोग्रॅम. १९८३ साली त्याचे जेमतेम बेचाळीसाव्या वर्षी निधन झाले. हा विक्रम आजही अबाधित आहे.*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*“विचार करा निर्णय घ्या, आणि तुम्हाला जे योग्य वाटत तेच करा.”**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) प्रथम विश्वकप क्रिकेट स्पर्धा केव्हा आयोजित करण्यात आली होती ?२) फुलपाखरास 'राज्य फुलपाखराचा दर्जा' देणारे पहिले राज्य कोणते ?३) नवनिर्वाचित पंतप्रधान म्हणून लिज ट्रस ह्या ब्रिटनच्या कितव्या महिला पंतप्रधान झाल्या आहेत ?४) एक अमेरिकन माणूस एका वर्षात सरासरी किती जोडे विकत घेतो ?५) मंगोलिया या देशाचा दौरा करणारे पहिले भारतीय सरंक्षणमंत्री कोण ?*उत्तरे :-* १) १९७५ २) महाराष्ट्र ३) तिसऱ्या ४) ८ जोडे ( भारत - २ जोडे ) ५) राजनाथ सिंह *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••● सुरज आर बोम्मावार● ठाकूर रविंदसिंह परिहार● अभय कुळकजाईकर● प्रवीण साधू● आनंद पाटील, नाशिक● मनीष बिरादार● सचिन कौठवाड● तृषा गंगाधर तिपनोड*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]~~~~~~~~~~~~~~~~~~~या समुहात join होण्यासाठी खालील लिंकद्वारे join होता येईल. https://chat.whatsapp.com/DaK0QvLfzbe6E1coFTHAsC•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*एक भिकारी आयुष्यभर भीक मागत राहिला. भीक मागून मागून जमा करत राहिला. हे नाही ते नाही करत करत आधिक मागत राहिला. देवाला त्याची दया यायची. त्याने कधी कोणाला आयुष्यात काही दिले नाही तर त्याला आनंद व समाधान कसे मिळणार? देवही चिंतेत पडला. देण्याचा आनंद काय असतो हे प्रत्यक्ष समजावून सांगण्यासाठी देवच एक दिवस भिका-याच्या दारावर भीक मागायला उभा राहिला. त्याने आरोळी ठोकली. 'देssरे बाssबाss भिका-याला काहीतरी.' भिका-याच्याच घरी भीक मागायला भिकारी? त्याने कानाडोळा केला, नंतर त्याला समजावण्याचा व धमकावण्याचाही प्रयत्न केला. पण दारावरचा भिकारी हटला नाही. देssरे बाssबा च्या आरोळ्या काही थांबत नव्हत्या.**भिका-याचीही भीक मागायला निघायची वेळ झालेली. परंतु दारावरचा भिकारी हटायला तयार नव्हता. त्यापासून सुटका व्हावी म्हणून शेवटी भीक मागून जमा केलेल्या धान्याच्या ढिगातील एक दाणा उचलून तो भिका-याच्या कटो-यात टाकतो. एक दाणा का होईना भीक मिळाली म्हणून दारातील भिकारी निघून जातो. एक दाणा कमी झाला म्हणून भिकारी हळहळत ढिगा-याकडे बघतो. ढिगा-यावर काहीतरी चमकत आहे हे पाहून तो जवळ जातो. ती चमकणारी वस्तू सोन्याचा दाणा असतो. भीक दिलेला ढिगावरचा एक दाणा कमी न होता सोन्याचा झाला. संपूर्ण धान्याचा ढिगच भिका-याच्या कटो-यात टाकला असता तर..? आता भिका-याने संपूर्ण आयुष्यच देऊन टाकले आहे. पण माझ्यातल्या भिका-याचे काय? त्याला कळले आहे पण अजूनही 'वळले' मात्र नाही.* *॥ रामकृष्णहरी ॥*🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀 *श्री संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल- 9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••सुखदु:खाच्या सागरातून जीवनरुपी नौका जो मानव चांगल्या प्रकारे जो चालवतो आणि तरुन जातो त्यालाच जीवन म्हणजे काय हे नक्कीच कळलेले असते.अशा सुंदर जीवनाला अधिक सुंदर कसे बनवता येईल त्यासाठी जो सुखातही आणि दु:खातही निरंतर प्रयत्न करतो आणि सुखदुःखाला समान मानतो तोच जीवनात यशस्वी होतो.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद.९४२१८३९५९०.🚣🏼‍♀🚣🏻🚣🏼‍♀🚣🏻🚣🏼‍♀🚣🏻🚣🏼‍♀🚣🏻🚣🏼‍♀ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *अति तेथे माती*एकदा एक राजहंस एका बगळय़ाला म्हणाला, 'काय रे, तू आधाशी! पाण्यातला कोणताही प्राणी खायला तू मागे-पुढे पाहात नाहीस. बरे-वाईट, नासके-चांगले हा फरकसुद्धा तुला समजत नाही. माझे पाहा, मी फक्त पूर्ण उमललेल्या कमळातले तंतू तेवढे खाईन, दुसरा कसलाही पदार्थ माझ्या घशाखाली जाणार नाही.' आणि मला तसे आवडणार नाही.त्यावर बगळा म्हणाला, 'माझ्या दृष्टीने असा चोखंदळपणा बारकावा असणे बरे नव्हे. ज्यावेळी जे मिळेल ते खावे अन् सुखी राहावे. खाण्याचा पदार्थ दिसला की, तो खावा हेच शहाणपणाचे.' असे म्हणून बगळा उडाला व जवळच्या तलावाकाठी गेला. तेथे कडेला त्याला मासा दिसला. तेव्हा विचार न करता त्याने तो एकदम गिळला, पण आत असलेला गळ घशाला लागून तो जिवास मुकला. राजहंस आपले आवडते खाणे खाण्यासाठी दुसर्‍या कमळे असलेल्या तळय़ात गेला, पण तेथे हंस धरण्यासाठी जाळे असल्यामुळे तेथे तो अडकला.*तात्पर्यः कोणतीही गोष्ट अति केल्यावर त्याचे परिणाम भोगावे लागते म्हणून कोणत्याही गोष्टीचा अतिरेक नको.अति तेथे माती होणारच.**संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दि. 16/09/2022 वार - शुक्रवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 🎇 . *दिनविशेष . 🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*जागतिक ओझोन संरक्षण दिन*💥 ठळक घडामोडी :-●१९६३ - झेरॉक्स ९१४ या प्रतिमुद्रक यंत्राचे पहिले प्रात्यक्षिक. ●१९६३- मलायाला स्वातंत्र्य.या देशाने मलेशिया हे नाव स्वीकारले.💥 जन्म :-◆१९१६ - एम.एस. सुब्बलक्ष्मी, कर्नाटक शैलीतील गायिका.◆ १९४२ - ना. धों. महानोर, निसर्ग कवी, शेतकरी, आमदार.💥 मृत्यू :-●१९८९ - हेमंत कुमार मुखोपाध्याय, प्रसिद्ध गायक, संगीतकार.● १९९४ - जयवंत दळवी, मराठी साहित्यिक.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली कॅबिनेटने हिमाचल, यूपीसह पाच राज्यातील गोंड समुदायासह इतर काही समुदायांना अनुसूचित जमातीचा दिला दर्जा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अर्थात DRDO चा विस्तार, सहा आयआयटीमध्ये उभारणार समन्वय केंद्र, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची मंजूरी*••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *MHT CET परीक्षेचा निकाल जाहीर, PCM गटातून 13 तर PCB गटातून 14 विद्यार्थ्यांना 100 पर्सेंटाईल गुण, या परीक्षेला राज्यभरातून 2,31,264 बसले होते.*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *आदिवासींना शिक्षण आणि रोजगार एकाच छताखाली मिळणार असल्याची मंत्री विजयकुमार गावित यांची ग्वाही*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *तब्बल 70 वर्षानंतर भारतात चित्ता दिसणार ! नामिबियातून 8 चित्ते भारतात आणणार, जम्बोजेट सज्ज*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *मुंबईत नेत्रविकारांसाठी विशेष रुग्णालय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी 20 वर्ल्डकपसाठी वेस्ट विंडिज संघाची घोषणा, आंद्रे रसेल आणि सुनिल नारायण यांना वगळले*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• * 🎯 🚀 *गौरव - गाथा* 🎯 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मा. सौ. वर्षा ठाकूर - घुगे मॅडम, यांच्या संकल्पनेतील अभिनव उपक्रम*मराठवाडा मुक्तीसंग्राम गौरव गाथा*भाग - आठवामराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्यातील थोर स्वातंत्र्य सेनानी श्री नामदेवराव नवले पाटील यांची माहिती जरूर पहा आणि शाळेतील विद्यार्थ्यांना देखील दाखवावेVideo खालील लिंकवर उपलब्ध.https://youtu.be/c68juf4PdtI~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 निवेदन - नासा येवतीकर 📢* विषय शिक्षक, कन्या शाळा धर्माबाद,📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *दूरदर्शन* १५ सप्टेंबर ‘दूरदर्शन’ या केंद्र सरकारने सुरू केलेल्या देशातील पहिल्या दूरचित्रवाणी वाहिनीचा वाढदिवस.१५ सप्टेंबर, १९५९ रोजी एक छोटासा ट्रान्समीटर व स्टुडिओ यांच्या साह्याने दूरदर्शनचे काम चालू झाले. राजधानीत दूरदर्शनची ही मुहूर्तमेढ रोवली जाताना ज्येष्ठ साहित्यिक पु. ल. देशपांडे यांचा त्यात मोलाचा वाटा होता. दुरदर्शनचे पहिले संचालक होते प्रत्येक मराठी माणसाचे लाडके व्यक्तिमत्व पु. ल. देशपांडे! पु. लं. देशपांडेनीच "दुरदर्शन" हे नाव सुचवले.दूरदर्शनवरुन बातमीपत्राची नियमित सेवा १९६५ पासून सुरु झाली. १९७२ मध्ये दूरदर्शन सेवा मुंबईत आली. १९७५ मध्ये चेन्नई, श्रीनगर, अमृतसर व लखनौ या शहरांमध्ये दूरदर्शनचे प्रसारण सुरु झाले. उपग्रहाद्वारे सामाजिक शिक्षण अथवा अत्याधुनिक तंत्रज्ञानातून सामाजिक शिक्षण देण्याचा पहिला प्रयोग भारतात केला गेला. सॅटेलाईट इंस्ट्रक्शनल टेलेव्हिजन एक्सपरीमेंटची चाचणी १९७५-७६ या वर्षी घेण्यात आली. याद्वारेच जगात प्रथमच सामाजिक शिक्षणाचा प्रचार घरोघरी करण्यात आला.१९८२ मध्ये दिल्ली आणि अन्य ट्रान्समिटर्स दरम्यान उपग्रहांमार्फ़त प्रसारण सुरु करण्यात आले. १९८२ मध्ये टीव्ही रंगीत झाला. पंतप्रधानांचे लाल किल्ल्यावरचे भाषण देश पाहू लागला आणि ‘नॅशनल ब्रॉडकास्टर’ ही दूरदर्शनची ओळख रुजली. ‘ऑल इंडिया रेडिओ’च्या सावलीतून दूरदर्शन बाहेर आले. १९८५ नंतर घरोघरी दूरचित्रवाणी संच दिसू लागले आणि मालिकांविषयीच्या चर्चा रंगू लागल्या. चिमणराव आणि गुंड्याभाऊ, चाळ नावाची वाचाळ वस्ती, गोट्या, बंदिनी, एक शुन्य शुन्य, सर्जा राजा, प्रतिभा आणि प्रतिमा, ज्ञानदीप, आमची माती आमची माणसं या मालिका ज्ञान, माहिती आणि निखळ मनोरंजन देण्याचं काम करीत होत्या. व्यत्यय नावाची पाटीही चांगलीच भाव खावून जायची. हिंदीतल्या बुनियाद, हमलोग, ये जो है जिंदगी, रजनी, तमस, रामायण, महाभारत, द वर्ल्ड धिस वीक, दर्पण या मालिकांनी तर मनोरंजनाच्या विश्वात अफाट प्रेक्षक वर्ग मिळवला. अनंत भावे, प्रदीप भिडे, शम्मी नारंग, अविनाश कौर सरीन यांचे आत्मविश्वासाने परिपूर्ण असलेले वृत्तनिवेदन प्रेक्षकांना भारावणारे असेच होते. गेल्या दोन दशकांत झालेल्या संज्ञापन क्रांतीमुळे दूरदर्शनचा भारतातला एकाधिकार संपत गेला. *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*“ उपाशी पोटी साधे अन्न देखील रुचकर लागते. ”**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) दिल्लीतील राजपथचे 'कर्तव्यपथ' असे नामकरण कोणाच्या हस्ते झाले ?२) नकाशातील खालच्या बाजूची दिशा कोणती ?३) नेपाळकडून आयपीएल खेळणारा पहिला खेळाडू कोण ?४) पहिले ई - गव्हनर्स धोरण राबविणारे राज्य कोणते ?५) काटकोनापेक्षा लहान कोनाला काय म्हणतात ?*उत्तरे :-* १) पंतप्रधान नरेंद्र मोदी २) दक्षिण ३) संदीप लामिछाने,२२ वर्ष, दिल्ली कॅपिटलल्स ४) महाराष्ट्र ५) लघुकोन *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••● प्रसाद मुतनवाड● लक्ष्मणराव भवरे● साईराम पिंगळे● मंगेश यादव● संतोषभाई ओझा● विठ्ठल आढाव● कृष्णा डाफने*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *"एका चांगल्या गोष्टीबरोबर दुसरी वाईट गोष्ट सोबतच असते. माणूस विद्वान तर आहे, पण त्याला धन आणि मानाची अपेक्षा असेल तर? ही अपेक्षाच त्याचा नाश करत असते, ही सिद्ध झालेली गोष्ट आहे." अपेक्षेसोबत अपेक्षाभंग असतो, हे पटवून देण्यासाठी प्रमाणाची आवश्यकता नाही. "आपण ज्या ज्या इच्छा करतो, जेवढ्या अपेक्षा बाळगतो त्या सर्वच्या सर्वच पूर्ण कशा होऊ शकतील? पण माणूस हे समजून घेत नाही. हे पाहिजे, ते पाहिजे या आणि अशा अनेक वासना माणसाला शेवटी भीक मागायला लावत असतात." हव्यासापोटी भिकेला लागण्याची वेळ आली तरी माणूस शहाणा होत नाही.**जुगारात मिळण्याची अपेक्षा सर्व घालवून बसते. राज्यच काय पण बायकोला सुद्धा 'डावात' हरून बसल्याची साक्ष महाभारतासारखे ग्रंथ देतात. संत तुकाराम आपल्याला शहाणं करण्याचा प्रयत्न करत आहेत. इच्छेतून अपमानित होण्याची वेळ येणार नाही ही काळजी घेतलीच पाहिजे. "एखाद्या गाढवाचं 'राजहंस' असं अलंकारीक नाव जरी ठेवलं, तरी त्या नावाचं त्या गाढवाला काय भूषण वाटणार आहे?" गाढवाची राजहंस नाव ठेवण्याइतकीसुद्धा पात्रता नसते आणि त्याला त्याचं भूषणही वाटत नसतं.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●••💥💥💥💥💥💥💥💥💥 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल- 9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *प्रेरणादायी विचार* ! !🌟•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••कळेना काहीहीवाटेत काट्यांचे पडले सडेएकेक सल...कुणाचे कुणाला कधी का असेपुरते बळ?वाटच नुसती हलली असेवाटत राहीहरेक मनात असेच सदायेते का काही?असते तरी का आपले मन आपले खरे? काहीही, कुठेही खुपले जरा, जातात चिरे ऋतूंचे मातीशी असते नाते तसेच हे का? कळेना काहीही असतो जसा प्राक्तन झोका...वासंती मुझुमदार( साभार : साधना दिवाळी अंक )•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• कोणत्याही परिस्थितीची जाणीव असलेली व्यक्ती कितीही आणि कोणत्याही परिस्थितीला तोंड द्यायला घाबरत नाही.कारण त्याला माहित असते की,आपण घाबरलो तर समोर असलेली परिस्थिती आपल्या पाठीमागे भूतासारखी मागेच लागते आणि जर नाही घाबरलो तर ती तशीच माघारी फिरते.अशा व्यक्तीला परिस्थितीच जगण्याची जाणीव करून देते आणि त्यातून मार्गही दाखवते.त्यामुळे जीवन जगण्याची आशा पल्लवित करते.ज्या व्यक्तीला कोणत्याही परिस्थितीची जाणीव नाही किंवा कोणतीही त्यातून मार्ग काढण्याची कल्पना नाही अशा व्यक्तीच्या जीवनात कोणतीही परिस्थिती क्षुल्लक असली तरी ती भित्र्या सशासारखीच असते. अशी व्यक्ती कोणत्याही परिस्थितीवर मात करु शकत नाही किंवा जीवनात यशस्वी होऊ शकत नाही.कोणत्या परिस्थितीला कसे आणि कोणत्या प्रकारे तोंड द्यायचे याचे थोडेही ज्ञान अवगत नाही किंवा जाणीवही नाही अशा व्यक्तीकडून कोणताही गुण इतरांना घेण्यासाठी मिळणार नाही.समोर असलेल्या परिस्थितीला निभावून नेण्यासाठी आपल्या मनामध्ये परिस्थितीनुरुप जाणीव निर्माण व्हायला हवी.अशी जाणीव प्रत्येकाच्या मनामध्ये उपजतच असते फक्त थोडा विचार करायला शिकले पाहिजे.जाणीव ही एक आपल्याला चांगले जीवन जगण्यासाठी बळ आणि प्रेरणाच देते.त्यामुळे आपल्यातील जाणीवेला नेहमी जीवंत ठेवायला शिकले पाहिजे.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद..९४२१८३९५९०.🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🥙•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *लोभाची शिक्षा*एक इसम यजमानाकडे पूजाअर्चा करून आपला चरितार्थ चालवत होता. दुर्दैवाने देशात दुष्‍काळ पडला. त्‍यामुळे इसमला रोजच्‍या जेवणाची भ्रांत पडली, यापेक्षा मरण पत्‍करलेले परवडले असा विचार करून तो जंगलात गेला. तेथे वाघाला पाहिले. इसमाने विचार केला, या वाघाने मला जर खाल्‍ले तर तर त्‍याची भूक भागेल व माझीही मृत्‍यूची इच्‍छा पूर्ण होईल. तसा तो वाघासमोर उभा राहिला. वाघ मनुष्‍यवाणीत बोलू लागला,''तू असा माझ्यासमोर का उभा आहेस'' इसमाने आपली कर्मकहाणी त्‍याला सांगितली. तेव्‍हा वाघाला त्‍याची दया आली. तो प्रत्‍यक्षात वाघ नसून वाघाचे रूप घेतलेली वनदेवता होती. वनदेवतेने आपले खरे रूप प्रगट करून त्‍याला एक हजार सुवर्णमुद्रा व धान्‍य दिले व भविष्‍यात कधीही आत्‍महत्‍येचा विचार करू नकोस असे बजावून त्‍याला परत पाठविले. इसम अत्‍यानंदाने घरी परतला. दुस-या दिवशी एक सुवर्णमुद्रा घेऊन तो दुकानदाराकडे सामान खरेदी करण्‍यासाठी गेला तेव्‍हा दुकानदाराने या सुवर्णमुद्रा तुला कोठे मिळाल्‍या असे विचारले असता भाबडेपणाने त्या इसमाने खरेखरे सर्व सांगून टाकले. लोभी दुकानदाराला तोंडाला पाणी सुटले. त्‍यानेही तसेच वागण्‍याचे ठरविले. दुस-याच दिवशी त्‍याने जंगलात जाऊन त्‍याच ठिकाणी ठिय्या मांडला. वाघ त्‍याच्‍यासमोर प्रगटला. त्‍याला व्‍यापा-याने खोटी कर्मकहाणी सांगितली. वाघाला तत्‍काळ समजले, हा खोटे बोलत आहे, त्‍याने त्‍याच्‍यावर हल्‍ला चढवला आणि जखमी व्‍यापा-याला सुनावले, आज तुला जिवंत सोडत आहे ज्‍यायोगे तू असे धाडस पुन्‍हा करणार नाहीसतात्‍पर्य – लोभाने माणसाच्‍या जीवावरही बेतू शकते, लोभ माणसाचे नुकसान करतो. लोभ टाळणे आवश्‍यक आहे.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in📱 9403046894•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दि. 15/09/2022 वार - गुरूवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 🎇 . *दिनविशेष . 🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••💥 ठळक घडामोडी :-★ १९३५ - स्वस्तिकचे चिन्ह असलेला ध्वज (चित्रीत) नाझी जर्मनीने आपला राष्ट्रध्वज म्हणून अंगीकारला.★ १९४७ - जपानला टायफून कॅथलीन या मोठ्या वादळाचा तडाखा ज्यात १,०७७ ठार.★ २००८ - लेहमान ब्रदर्स या कंपनीने दिवाळे काढले💥 जन्म :-★ १२५४ - मार्को पोलो, इटालियन फिरस्ता.★ १८६० - सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैया, भारतीय अभियंता.★ १८७६ - शरदचंद्र चट्टोपाध्याय, बंगाली साहित्यिक.★ १९०९ - सी.एन. अण्णादुराई, तामीळनाडूचे मुख्यमंत्री.💥 मृत्यू :-★ १९२६ - रुडॉल्फ क्रिस्टॉफ युकेन, जर्मन तत्वज्ञानी आणि नोबेल पारितोषिक विजेते★ १९७३ - गुस्ताफ सहावा अ‍ॅडॉल्फ, स्वीडनचा राजा.★ २००८ - गंगाधर गाडगीळ, मराठी लेखक*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *मॉस्कोतील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा आणि तैलचित्राचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *राज्यात जोरदार पावसाचा अंदाज, कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट, पंचगंगा नदी मोसमात तिसऱ्यांदा पात्राबाहेर, अलमट्टी धरणातून दीड लाख क्युसेकने पाण्याचा विसर्ग*••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्यावर 19 सप्टेंबर रोजी अंत्यसंस्कारात, राष्ट्रपती मुर्मू राहणार उपस्थित, ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांचं गुरुवारी 8 सप्टेंबर रोजी निधन झालं*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *सणासुदीच्या काळात एलपीजी गॅस सिलेंडर स्वस्त होण्याची शक्यता आहे. त्यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न सुरु आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मराठवाडा, तेलंगणा, कर्नाटकातील विद्यापीठांमध्ये हैदराबाद मुक्ती संग्राम दिन साजरा केला जावा, अशी सूचना यूजीसीने दिली आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *आंतरराष्ट्रीय बाजारात पाम तेलाच्या किंमतीत ४० टक्के घट झालीये. त्यामुळे खाद्य तेल लवकरच स्वस्त होणार, ऐन सणासुदीच्या काळात सामान्यांना दिलासा मिळणार आहे*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *महाराष्ट्र केसरी स्पर्धा पुण्यात होणार आहे. महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा थरार पुणेकरांना या वर्षाच्या अखेरीस कोथरूडमध्ये अनुभवायला मिळणार आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• * 🎯 🚀 *गौरव - गाथा* 🎯 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मा. सौ. वर्षा ठाकूर - घुगे मॅडम, यांच्या संकल्पनेतील अभिनव उपक्रम*मराठवाडा मुक्तीसंग्राम गौरव गाथा*भाग - सातवामराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्यातील थोर स्वातंत्र्य सेनानी हुतात्मा गोविंदराव पानसरे यांची माहिती जरूर पहा आणि शाळेतील विद्यार्थ्यांना देखील दाखवावेVideo खालील लिंकवर उपलब्ध.https://youtu.be/di-nkoyfGwg~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 निवेदन - नासा येवतीकर 📢* विषय शिक्षक, कन्या शाळा धर्माबाद,📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *‘ओझोन डे’* जीवसृष्टीच्या संरक्षणासाठी निसर्गाने दोन महत्त्वाच्या उपाययोजना करून ठेवल्या आहेत. त्या म्हणजे पृथ्वीभोवती चुंबकीय गोल आणि ओझोनचा थर. यातील चुंबकीय गोल अत्यंत ऊर्जस्व कणांपासून जीवसृष्टीचे रक्षण करतो, तर ओझोनचा थर जीवसृष्टीला धोकादायक असणाऱ्या अतिनील किरणांना भूपृष्ठापर्यंत येऊ देत नाही. हा ओझोनचा थर नसता तर कदाचित पृथ्वीवर जीवसृष्टीच झाली नसती. मात्र, या ओझोनच्या थरालाच वाढत्या प्रदूषणामुळे भगदाड पडले असून, ते दिवसेंदिवस आणखी मोठे होत आहे. त्यामुळे तज्ज्ञांच्या मते, जीवसृष्टीच्या संरक्षणासाठी आता रोजच ‘ओझोन डे’ साजरा करण्याची वेळ आली आहे. भूपृष्ठापासून दहा किलोमीटर अंतरापर्यंतच्या वातावरणाला तपांबर (ट्रोपोस्फिअर) असे नाव आहे. मेघ, वारे, पाऊस, विजांचा चमचमाट, चक्रीवादळे, वगैरे नैसर्गिक घटना याच स्तरात घडतात. तपांबराच्या पुढे ५० कि.मी.अंतरापर्यंतच्या वातावरणाच्या विभागाला स्थितांबर (स्ट्रॅटोस्फिअर) असे म्हणतात. वातावरणातील एकंदर ओझोनपैकी १० टक्के तपांबरात आहे, तर ९० टक्के स्थितांबरात आहे. त्यातही भूपृष्ठापासून १५-३० कि.मी. पट्ट्यात ओझोनचे प्रमाण जास्त आहे. या पट्ट्यात हवेच्या दशलक्ष रेणूंमागे २६८ रेणू ओझोनचे असतात. या ओझोनच्या स्तरामुळेच आपल्या सर्वांचे अतिनील किरणांपासून संरक्षण होते. पारंपरिक स्थितांबर (ओझोन स्तर)ला छिद्र पडण्यास कारणीभूत असणाऱ्या सीएफसी वायूचा वापर वाढला म्हणून हायड्रोफ्लोरोकार्बन (एचएफसी)चा वापर होऊ लागला. त्यातही वेगवेगळे प्रकार असल्याने जागतिक तापमानात वाढ वार्षिक सात टक्क्यांनी वाढली. जागतिक तापमानाचा धोका आणखी वाढला आहे. त्याचीच काळजी घेणे अनिवार्य बनले आहे. त्यामुळे ३६५ दिवसांमध्ये एकदाच ‘ओझोन डे’ साजरा करून हा प्रश्न सुटणार नाही. रोजच हा दिवस साजरा करावा..संदर्भ. डॉ. पी. डी. राऊत. *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*Actions speaks louder than words.* *( कृती ही शब्दांपेक्षा/गोष्टी हाकण्यापेक्षा जास्त सांगून जाते. )**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) केंद्र सरकारने नुकतेच 'राजपथ' च्या ऐवजी आता कोणते नामकरण केले आहे ?२) जगातील कोणत्या कंपनीने चक्क रोबोटची मुख्य कार्यकारी अधिकारी ( CEO ) म्हणून नियुक्ती केली आहे ?३) संत ज्ञानेश्वरांच्या बहिणीचे नाव काय होते ?४) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून काम केले ?५) विम्बल्डन किताब जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण ?*उत्तरे :-* १) कर्तव्यपथ २) चिनी मेटाव्हर्स ३) मुक्ताबाई ४) सिडनेहॅम कॉलेज ५) सानिया मिर्झा *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••◆ डॉ. हंसराज वैद्य◆ श्रीनाथ संतोष येवतीकर◆ शीतल वाघमारे◆ विजय धडेकर◆ मनोज साळवे◆ माधव पांगरीकर◆ अभिमन्यू चव्हाण◆ राजेंद्र होले◆ एकनाथ जिंकले*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*सर सी.व्ही.रमण एकदा भौतिकशास्त्राच्या संशोधक पदासाठी मुलाखती घेत होते. मुलाखती संपवून निघताना एक विद्यार्थी त्यांना तिथंच घुटमळताना दिसला. नोकरीसाठी नाकारला गेलेला तो तरूण येरझारा मारताना पाहून सर रमण रागावले. त्याच्या हेतूबद्दल शंका येऊन रमण यांनी त्याला फटकारलं. तो तरूण नम्रतेने म्हणाला,'सर, गैरसमज करून घेऊ नका. नोकरी मिळावी म्हणून वशिला लावण्यासाठी मी थांबलो नाही. आपल्या कार्यालयाकडून येण्या-जाण्याचं भाडं चुकून आधिक मिळालं आहे. ते परत करण्यासाठी मी संबंधीत बाबूला शोधत आहे.**त्याचे हे विचार ऐकून सर रमण प्रभावित झाले. त्यांना सुखद धक्का बसला आणि ते म्हणाले,'मित्रा, तुझं भौतिकचं ज्ञान कमी आहे. प्रयत्नानं ते वाढवता येईल. पण तुझ्या अंतरीचा प्रामाणिकपणा दुर्लभ आहे. पुस्तकी ज्ञानापेक्षा ही मूल्य कितीतरी मोठी आहेत. संशोधक म्हणून तुझी निवड झाली, असं समज.' हा निवडीनंतरचा आकस्मिक आनंद त्याच्या डोळ्यात मावला नाही. निर्णय ऐकताक्षणीच तरूणाच्या डोळ्यांना धारा लागल्या. कृतज्ञतेच्या धारा! संघर्षाच्या वादळातही त्यानं अंतरीचा सत्याचा दिवा विझू दिला नव्हता. परीक्षेच्या व ज्ञानाच्या पलिकडे काही जीवनमूल्यं असतात, हे समजून घेत कुण्या गरजवंताच्या गुणांची कदर करणारे 'रमण' असतात जगात, आणि निवड झाली नसतानाही कुणाचे पैसे परत करण्यासाठी अस्वस्थ होणारे इमानदार तरूणही!* *॥ रामकृष्णहरी ॥* 🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌟! ! *काव्यांगण - रोज एक कविता* ! !🌟•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *।। विचार ।।*बुध्दीवंत करतात चांगला विचारम्हणूनच असतो चांगला आचारजो चांगले विचार करून बोलतोत्याच्या जीवनात असतो सदाचारजास्त संपत्तीची आस धरूनकमविणारा करतो सदा भ्रष्टाचारमैत्री वाढेल आणि टिकेल हीजर असतील आपले सुविचारवाईट बोलण्याने साथ तुटतेम्हणून करू नये कधी अविचार मोकळेपणाने जो करतो संवादसमाजात त्याचा होई मुक्त संचार - नागोराव सा. येवतीकर, मु. येवती ता. धर्माबाद 9423625769•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ज्याप्रमाणे सोन्याचा व्यापार करणारा व्यापारी किंवा सोन्याचे दागिने बनवणारा सोनार सोने पाहिल्याबरोबर किती चांगले आहे हे आपल्या नजरेने,हातात घेऊन आणि एका विशिष्ट दगडाच्या कसोटीवर घासून ओळखतो त्याचप्रमाणे चतुर,चाणाक्ष आणि मनकवड्या व्यक्ती समोर असणा-या आणि समोर आलेल्या व्यक्तींना आपल्या नजरेंनी तेव्हाच ओळखतात.कोण चांगल्या विचारांची,कोणत्या कारणासाठी आपल्याकडे आली आहेत,ती कोणत्या हेतूने आली आहेत,कोणत्या स्वभावधर्माची आहेत,आपण त्यांना कशाप्रकारे उत्तर द्यायचे किंवा आपण त्याला मदत करायची का नाही याचे ज्ञान नक्कीच असते.यावरुनच माणसे आपल्या नजरेने पहायला,वाचायला आणि शिकायला पाहिजे.यासाठी आपल्याला माणसांच्या मनाचे थोडे शास्त्र आपणही शिकले तर भविष्यात होणारे संभाव्य धोके टळू शकतील आणि आपले जीवन सुखावह होऊ शकेल.© व्यंकटेश काटकर,नांदेडसंवाद.९४२१८३९५९०/८०८७९१७०६३.🌱🌹🌱🌹🌱🌹🌱🌹🌱 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *साप आणि खेकडा*एक साप आणि एक खेकडा एकमेकांचे मित्र होते. खेकडा सरळ वागणारा होता. त्याने सापाला चांगल्या रीतीने वागण्याचा खूप वेळा उपदेश केला, परंतु सापाने तिकडे लक्ष दिले नाही.एके दिवशीसाप अंग ताणून विश्रांती घेत असताना खेकड्याने त्याला मारून टाकले व त्याच्याकडे बघून तो म्हणाला, 'तू आता जसा सरळ आहेस तसाच नेहमी राहिला असतास तर ही स्थिती कशाला झाली असती ?*तात्पर्य - राजमार्ग सोडून वाकड्या मार्गाने जाणारा मनुष्य नेहमीच संकटात सापडतो.**संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in📱 9403046894•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🎇 दि. 10/09/2022 वार - शनिवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 🎇 . *दिनविशेष . 🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••💥 ठळक घडामोडी :-★ १९६६ - भारतीय संसदेने पंजाब पुनर्रचना कायद्याला संमत केला व पूर्व पंजाबचे (नकाशा चित्रीत) विघटन होऊन पंजाब व हरियाणा अशी दोन राज्ये आणि चंदिगढ केंद्र शासित प्रदेश अस्तित्त्वात आले.★ १९७४ - गिनी-बिसाउला पोर्तुगालपासून स्वातंत्र्य.★ १९७५ - व्हायकिंग-२ हे अमेरिकन मानवविरहित अंतराळयान मंगळ ग्रहाकडे झेपावले.💥 जन्म :-★ १४८७ - पोप जुलियस तिसरा★ १८८७ - गोविंद वल्लभ पंत, भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील नेते.★ १९३४ - रॉजर मारिस, अमेरिकन बेसबॉल खेळाडू.★ १९४८ - भक्ती बर्वे, मराठी अभिनेत्री.💥 मृत्यू :-★ १९६४ - पं. श्रीधर पार्सेकर, नामवंत व्हायोलिनवादक*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या! राज्यात दोन वर्षांनंतर विसर्जन मिरवणुकीचा जल्लोष, मुंबईचा राजा, लालबागचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ, ढोलताशाचा गजरात बाप्पाची मिरवणूक*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *नागपूर जिल्ह्यातील चार हजारांवर मतदान केंद्रात मतदार ओळखपत्र आणि आधार कार्डची लिंकिंग रविवारी करण्यात येईल. नागरिकांनी आपल्या बीएलओशी संपर्क साधावा असे आवाहन प्रशासनाने केले आहे.*••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *देशातील 15 राज्यांमध्ये लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव, 75 हजार गायींचा मृत्यू, दूध उत्पादनात घट, लम्पी चर्मरोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी सांगली जिल्ह्यात मनाई आदेश लागू, जनावर बाजार, बैलगाडी शर्यतींवरही बंदी*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *सरकारकडून शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी 3 हजार 501 कोटींची घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांचा कार्यकाळ पूर्ण होत असल्याने मुंबई विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरूपदी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. डी. टी. शिर्के यांची नियुक्ती*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *सात दशकांचा राजेशाही प्रवास संपला, ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचं निधन, भारतात एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भालाफेकपटू नीरज चोप्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा, डायमंड लीग जिंकत ऐतिहासिक कामगिरी, केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्याकडून डायमंड ट्रॉफी जिंकणाऱ्या नीरज चोप्राचं कौतुक*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गौरव गाथा ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मराठवाडा मुक्तीसंग्राम गौरव गाथा*भाग तिसरा - कर्मयोगी साहेबराव देशमुख बारडकरYou Tube Video link 👇🏼https://youtu.be/Pv-TfA8_H7w~~~~~~~~~~~~~~~~~~~*निवेदन :- नासा येवतीकर, विषय शिक्षक, कन्या शाळा धर्माबाद, 9423625769**Subscribe my Channel*~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *‘ओझोन डे’* जीवसृष्टीच्या संरक्षणासाठी निसर्गाने दोन महत्त्वाच्या उपाययोजना करून ठेवल्या आहेत. त्या म्हणजे पृथ्वीभोवती चुंबकीय गोल आणि ओझोनचा थर. यातील चुंबकीय गोल अत्यंत ऊर्जस्व कणांपासून जीवसृष्टीचे रक्षण करतो, तर ओझोनचा थर जीवसृष्टीला धोकादायक असणाऱ्या अतिनील किरणांना भूपृष्ठापर्यंत येऊ देत नाही. हा ओझोनचा थर नसता तर कदाचित पृथ्वीवर जीवसृष्टीच झाली नसती. मात्र, या ओझोनच्या थरालाच वाढत्या प्रदूषणामुळे भगदाड पडले असून, ते दिवसेंदिवस आणखी मोठे होत आहे. त्यामुळे तज्ज्ञांच्या मते, जीवसृष्टीच्या संरक्षणासाठी आता रोजच ‘ओझोन डे’ साजरा करण्याची वेळ आली आहे. भूपृष्ठापासून दहा किलोमीटर अंतरापर्यंतच्या वातावरणाला तपांबर (ट्रोपोस्फिअर) असे नाव आहे. मेघ, वारे, पाऊस, विजांचा चमचमाट, चक्रीवादळे, वगैरे नैसर्गिक घटना याच स्तरात घडतात. तपांबराच्या पुढे ५० कि.मी.अंतरापर्यंतच्या वातावरणाच्या विभागाला स्थितांबर (स्ट्रॅटोस्फिअर) असे म्हणतात. वातावरणातील एकंदर ओझोनपैकी १० टक्के तपांबरात आहे, तर ९० टक्के स्थितांबरात आहे. त्यातही भूपृष्ठापासून १५-३० कि.मी. पट्ट्यात ओझोनचे प्रमाण जास्त आहे. या पट्ट्यात हवेच्या दशलक्ष रेणूंमागे २६८ रेणू ओझोनचे असतात. या ओझोनच्या स्तरामुळेच आपल्या सर्वांचे अतिनील किरणांपासून संरक्षण होते. पारंपरिक स्थितांबर (ओझोन स्तर)ला छिद्र पडण्यास कारणीभूत असणाऱ्या सीएफसी वायूचा वापर वाढला म्हणून हायड्रोफ्लोरोकार्बन (एचएफसी)चा वापर होऊ लागला. त्यातही वेगवेगळे प्रकार असल्याने जागतिक तापमानात वाढ वार्षिक सात टक्क्यांनी वाढली. जागतिक तापमानाचा धोका आणखी वाढला आहे. त्याचीच काळजी घेणे अनिवार्य बनले आहे. त्यामुळे ३६५ दिवसांमध्ये एकदाच ‘ओझोन डे’ साजरा करून हा प्रश्न सुटणार नाही. रोजच हा दिवस साजरा करावा..संदर्भ. डॉ. पी. डी. राऊत. *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*Actions speaks louder than words.**( कृती ही शब्दांपेक्षा/गोष्टी हाकण्यापेक्षा जास्त सांगून जाते. )**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) दिल्लीचे उपमुख्यमंत्री कोण आहेत ?२) अखिल भारतीय फुटबॉल महासंघाला ८५ वर्षात पहिल्यांदाच खेळाडू अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली ?३) शिक्षक असलेले राष्ट्रपतिपदी विराजमान झालेले राष्ट्रपती किती व कोणते ?४) इंग्लंडच्या पंतप्रधानपदासाठी होणारी मतदान प्रक्रिया पूर्ण करणारे पहिले भारतवंशीय कोण ठरले आहेत ?५) संसर्गजन्य किंवा संक्रामक रोगांची उदाहरणे सांगा.*उत्तरे :-* १) मनीष सिसोदिया २) कल्याण चौबे ३) दोन - डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् व द्रौपदी मुर्मू ४) ऋषी सुनक ५) क्षय, कावीळ, अतिसार, पटकी, विषमज्वर इत्यादी *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••◆ समृद्धी नागनाथ चात्रे◆ संतोष पांडागळे◆ ईश्वर यमूल, नांदेड◆ गणेश कोकुलवार, नांदेड◆ नागनाथ शिंदे, नांदेड◆ ज्ञानेश्वर इरलोड◆ प्रवीण भिसे पाटील◆ आकाश गाडे◆ राजू सूर्यवंशी◆ रोहित मुडेवार◆ संभाजी साळुंके◆ विजय गड्डम◆ प्रसाद पुदेवाड◆ राजेश बाबुराव चिटकूलवार◆ विश्वांभर पपुलवाड*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*सर सी.व्ही.रमण एकदा भौतिकशास्त्राच्या संशोधक पदासाठी मुलाखती घेत होते. मुलाखती संपवून निघताना एक विद्यार्थी त्यांना तिथंच घुटमळताना दिसला. नोकरीसाठी नाकारला गेलेला तो तरूण येरझारा मारताना पाहून सर रमण रागावले. त्याच्या हेतूबद्दल शंका येऊन रमण यांनी त्याला फटकारलं. तो तरूण नम्रतेने म्हणाला,'सर, गैरसमज करून घेऊ नका. नोकरी मिळावी म्हणून वशिला लावण्यासाठी मी थांबलो नाही. आपल्या कार्यालयाकडून येण्या-जाण्याचं भाडं चुकून आधिक मिळालं आहे. ते परत करण्यासाठी मी संबंधीत बाबूला शोधत आहे.**त्याचे हे विचार ऐकून सर रमण प्रभावित झाले. त्यांना सुखद धक्का बसला आणि ते म्हणाले,'मित्रा, तुझं भौतिकचं ज्ञान कमी आहे. प्रयत्नानं ते वाढवता येईल. पण तुझ्या अंतरीचा प्रामाणिकपणा दुर्लभ आहे. पुस्तकी ज्ञानापेक्षा ही मूल्य कितीतरी मोठी आहेत. संशोधक म्हणून तुझी निवड झाली, असं समज.' हा निवडीनंतरचा आकस्मिक आनंद त्याच्या डोळ्यात मावला नाही. निर्णय ऐकताक्षणीच तरूणाच्या डोळ्यांना धारा लागल्या. कृतज्ञतेच्या धारा! संघर्षाच्या वादळातही त्यानं अंतरीचा सत्याचा दिवा विझू दिला नव्हता. परीक्षेच्या व ज्ञानाच्या पलिकडे काही जीवनमूल्यं असतात, हे समजून घेत कुण्या गरजवंताच्या गुणांची कदर करणारे 'रमण' असतात जगात, आणि निवड झाली नसतानाही कुणाचे पैसे परत करण्यासाठी अस्वस्थ होणारे इमानदार तरूणही!* *॥ रामकृष्णहरी ॥* 🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌟! ! *काव्यांगण - रोज एक कविता* ! !🌟•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*बालकविता - सूर्यदादा*-------------------सूर्यदादा ऐक ना रेकिती कोपला तू रेनको रे तापू इतकाहोई जीव हैराण रे ।सूर्यदादा काय सांगूरस्ते घरे हे सिमेंटचे जंगल सारे सिमेंटचेनाव नाही सावलीचे ।सूर्यदादा ऊन प्रखरघरे त्यात तापून जातीलोडशेडिंगचा त्रास अतित्यात आजार बळावती ।पिण्यास नाही रे पाणीगेली झाड झुडपं वाळूनीतूच कर आता तरी काहीजीवाची होते लाहीलाही ।---------------------- अरुण वि. देशपांडे, पुणे9850177342--------------------•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ज्याप्रमाणे सोन्याचा व्यापार करणारा व्यापारी किंवा सोन्याचे दागिने बनवणारा सोनार सोने पाहिल्याबरोबर किती चांगले आहे हे आपल्या नजरेने,हातात घेऊन आणि एका विशिष्ट दगडाच्या कसोटीवर घासून ओळखतो त्याचप्रमाणे चतुर,चाणाक्ष आणि मनकवड्या व्यक्ती समोर असणा-या आणि समोर आलेल्या व्यक्तींना आपल्या नजरेंनी तेव्हाच ओळखतात.कोण चांगल्या विचारांची,कोणत्या कारणासाठी आपल्याकडे आली आहेत,ती कोणत्या हेतूने आली आहेत,कोणत्या स्वभावधर्माची आहेत,आपण त्यांना कशाप्रकारे उत्तर द्यायचे किंवा आपण त्याला मदत करायची का नाही याचे ज्ञान नक्कीच असते.यावरुनच माणसे आपल्या नजरेने पहायला,वाचायला आणि शिकायला पाहिजे.यासाठी आपल्याला माणसांच्या मनाचे थोडे शास्त्र आपणही शिकले तर भविष्यात होणारे संभाव्य धोके टळू शकतील आणि आपले जीवन सुखावह होऊ शकेल.© व्यंकटेश काटकर,नांदेडसंवाद.९४२१८३९५९०/८०८७९१७०६३.🌱🌹🌱🌹🌱🌹🌱🌹🌱 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *साप आणि खेकडा*एक साप आणि एक खेकडा एकमेकांचे मित्र होते. खेकडा सरळ वागणारा होता. त्याने सापाला चांगल्या रीतीने वागण्याचा खूप वेळा उपदेश केला, परंतु सापाने तिकडे लक्ष दिले नाही.एके दिवशीसाप अंग ताणून विश्रांती घेत असताना खेकड्याने त्याला मारून टाकले व त्याच्याकडे बघून तो म्हणाला, 'तू आता जसा सरळ आहेस तसाच नेहमी राहिला असतास तर ही स्थिती कशाला झाली असती ?*तात्पर्य - राजमार्ग सोडून वाकड्या मार्गाने जाणारा मनुष्य नेहमीच संकटात सापडतो.**संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in📱 9403046894•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दि. 09/09/2022 वार - शुक्रवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 🎇 . *दिनविशेष . 🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••💥 ठळक घडामोडी :-◆१९९४ - सचिन तेंडुलकरने श्रीलंकेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपल्या एकदिवसीय क्रिकेटमधील कारकिर्दीतले पहिले शतक ठोकले💥 जन्म :-◆१९४१ - डेनिस रिची, अमेरिकन संगणकशास्त्रज्ञ.◆ १९६७ - अक्षय कुमार, हिंदी चित्रपट अभिनेता.◆ १९७४ - विक्रम बात्रा, भारतीय थलसेना अधिकारी.💥 मृत्यू :-◆२०१० - वसंत नीलकंठ गुप्ते, मराठी कामगार चळवळ कार्यकर्ते, लेखक.◆ २०१५ - दत्तात्रय हेलसकर, जालना*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *गणेश विसर्जनासाठी राज्यभर कडक बंदोबस्त, अनेक ठिकाणी वाहतूक मार्गात बदल, गणेश विसर्जनासाठी मुंबई सज्ज, पंधरा हजार पोलीस आणि SRPF च्या तुकड्या तैनात*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *गोकुळकडून गाय दूध खरेदी दरात 15 दिवसांत दुसऱ्यांदा वाढ, 11 सप्टेंबरपासून होणार अंमलबजावणी*••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *ठाण्यात ढगफुटीसदृश पाऊस; तासाभरात 71 मिमी पावसाची नोंद तर मुसळधार पावसानं मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *ब्रिटनच्या महाराणी क्वीन एलिझाबेथ डॉक्टरांच्या देखरेखीखाली, प्रकृती चिंताजनक असल्याचं वृत्त*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *देशात यंदा 3 हजार 157 लाख टन अन्नधान्याच्या उत्पादनाचा अंदाज, डाळींसह तेलबियांचं उत्पादनही वाढणार : कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *नागपूरमध्ये सोमवारी 12 सप्टेंबरपासून सकाळी 6.15 ते रात्री 10 पर्यंत चालणार मेट्रो सेवा*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *विराट कोहलीच्या वादळी शतकाच्या जोरावर भारतानं अफगाणिस्तानचा 101 धावांनी केला पराभव*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300~~~~~~~~~~~~~~~~~~~*मराठवाडा मुक्तीसंग्राम गौरव गाथा*भाग दुसरा - श्री गोविंदभाई श्रॉफhttps://youtu.be/GQdy7jj7QII*Subscribe Channel**🎤 निवेदक - नासा येवतीकर 📢*विषय शिक्षक, कन्या शाळा धर्माबाद,📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*एक पाऊल स्वच्छतेसाठी ......!*भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी म्हणत, ' प्रत्येक कामाची सुरुवात स्वच्छतेपासून करावी. ' .........https://nasayeotikar.blogspot.com/2018/03/blog-post_25.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *क्लोरीन म्हणजे काय ?* 📙खाण्याचे मीठ व पिण्याच्या पाण्याची शुद्धता या दोन महत्वाच्या गोष्टी क्लोरीनमुळेच शक्य झाल्या आहेत. क्लोरीन हा वायू स्वरूपात मिळवला व साठवला जातो. मात्र नैसर्गिकरित्या क्लोरीन आढळत नाही. सोडियम बरोबर त्याचे संयुग पटकन बनते. त्यालाच आपण मीठ म्हणतो. ‍१७७४ साली शील यांनी त्याचा शोध लावला. फिकट हिरव्या रंगावरून ग्रीक भाषेतील क्लोराॅस या शब्दावरून त्याचे नाव पडले आहे. क्लोरीन हा वायू मुख्यतः पाणी शुद्ध करण्याच्या ब्लिचिंग पावडरमध्ये वापरला जातो. त्याच्यामुळे पाण्यातील जंतू मरतात व मुक्त झालेला क्लोरिन हवेत मिसळतो. अगदी सहज पूर्ण झालेल्या या प्रक्रियेमुळेच आपण मोठ्या प्रमाणावर पाण्याचे शुद्धीकरण करून गावे, शहरे, महानगरे यांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करू शकतो.क्लोरिनचे अनेक औद्योगिक उपयोगही आहेत. क्लोरीनचा गैरवापर करून पहिल्या महायुद्धात शत्रूच्या सैनिकांवर त्या वायूचा मारा केला गेला होता. फुप्फुसदाहाने त्यांचा त्यात मृत्यू ओढवला. कोणत्याही जिवंत प्राण्यांसाठी क्लोरीन हा अतिशय घातक वायू आहे. मात्र संयुग स्वरूपातील त्याची उपयुक्तता वादातीत ठरावी. माणसाच्या खाण्यातील एक अत्यावश्यक घटक म्हणजे मीठ. शरीरातील सोडीयमचा साठा अनेक शरीरातील क्रियांना मदत करतो. असा हा घटक म्हणजे सोडियम व क्लोरीनचे संयुग होय. भूल देण्यासाठी कित्येक दशके वापरले गेलेले क्लोरोफार्म हे द्रव्यही क्लोरीनचेच संयुग. क्लोरिनमुळे अनेक पदार्थांचे ऑक्सिडेशन होते. त्यामुळे अनेक रंग, डाग यांचा रंगीतपणा जातो. कपड्यांना नवीन रंग देण्यापूर्वी, कपडे स्वच्छ करण्यासाठी ब्लिचिंग पद्धतीच्या प्रक्रियेत याचा वापर केला जातो. हायड्रोक्लोरिक अॅसिड मध्ये क्लोरिन असतो व विद्राव्य म्हणून त्याचा वापर अनेक उद्योगांत केला जातो. कार्बनबरोबरचे त्याचे संयुग कार्बनटेट्राक्लोराईड एक उत्तम विद्राव्य आहे. त्याचा वापर आग विझवण्यासाठी केला जातो.क्लोरीनची निर्मिती इलेक्ट्रोलायसिस पद्धतीने केली जाते. समुद्राचे पाणी किंवा पोटॅशियमबरोबरची त्याची निसर्गात सापडणारी संयुगे यांचा वापर त्यासाठी केला जातो. एका परीने या वायूचा शोध हा मानवी प्रगतीला लागलेला मोठा हातभारच आहे, यात शंका नाही.*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*“ जो माणूस स्वतःला सुखी समजत नाही तो कधीच सुखी नसतो. ”**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते ?२) ब्लुमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार गौतम अडाणी जगात कितव्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत ?३) हॉकीचे जादूगार ध्यानचंद यांना भारत सरकारने पद्मभूषण पुरस्काराने कोणत्या वर्षी गौरविण्यात आले ?४) टोकियो ऑलिंपिकमध्ये सुवर्ण जिंकून देणारा नीरज चोप्राचा भाल्याला BCCI ने किती रुपयात खरेदी केला ?५) INS विक्रांतचे घोषवाक्य ' जयेम सं युधि स्पृध:' चा अर्थ काय आहे ?*उत्तरे :-* १) डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् २) तिसऱ्या, संपत्ती - ११ लाख कोटी रुपये / १३७.४ अब्ज डॉलर ३) १९५६ ४) दीड कोटी ५) माझ्याविरुद्ध लढतील त्या सर्वांना मी पराभूत करीन.*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••● गणेश कल्याणकर, नांदेड● महेश ठाकरे, सकाळ प्रतिनिधी, अमरावती● पंढरीनाथ डोईफोडे येवतीकर● श्रीकांत पाटील, येवती● उमाकांत कोटूरवार● गंगाधर गुरलोड, येवती● मारोती ताकलोर● अर्षद खान● किशन माटकर● रमेश पेंडकर● गोविंदराव ईपकलवार*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*यज्ञ, विवाह, ई. धार्मिक विधींचे वेळी अग्रपूजेचा-म्हणजे प्रथम -पूजेचा मान कोणत्या देवाला द्यावा, याबद्दल एकदा देवांमध्ये वाद सुरु झाला. प्रत्येकाला हा मान आपल्याला मिळावा असे वाटू लागले.अखेर हा तंटा ब्रम्हदेवांकडे गेला असता, ते म्हणाले, 'आपण कुणाही एका देवाला अग्रपूजेचा मान दिला, तर इतर देव नाराज होतील. तेव्हा हा निर्णय कसा घ्यावा, याचा मी एक मार्ग सुचवतो. जो देव या पृथ्वीला प्रदक्षिणा घालून सर्वात अगोदर माझ्याकडे येईल, त्याला हा अग्रपूजेचा मान बहाल केला जावा.'सर्वच देवांना हा तोडगा मान्य करावा लागला. मग प्रत्येकजण आपापल्या वाहनांवर स्वार होऊन, पृथ्वी प्रदक्षिणेला निघाला. कुणी वाघावर, कुणी गरुडावर तर कुणी मोरावर.**श्रीगणेशाने विचार केला 'आपलं वाहन उंदीर, एकतर त्यावर बसून पृथ्वी प्रदक्षिणा करणं अशक्य आणि दुसरं म्हणजे ते शक्य झालंच, तरी या स्पर्धेत विजयी होणं हे त्याहूनही अशक्य!' हा विचार मनात येताच त्याला एक युक्ती सुचली. त्याबरोबर तो घरी गेला व पार्वतीला म्हणाला, 'आई, तू थोडा वेळ बाबांजवळ जाऊन बसतेस का? 'पार्वती म्हणाली, 'ही रे काय थट्टा आरंभलीस? 'यावर शंकर म्हणाले,'तो सांगतोय तर येऊन बैस ना तू माझ्याजवळ. पार्वती शंकराजवळ जाऊन बसताच, गणेश त्या दोघांना सात प्रदक्षिणा घालून पुन्हा ब्रम्हदेवाकडे आला, हा स्थूलदेही गणपती पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करुन एवढ्या लवकर कसा परत आला, असा ब्रम्हदेवांना प्रश्न पडला, पण गणेशाने आपण योजलेल्या युक्तीची माहिती देताच ब्रम्हदेवांना त्यांच॔ म्हणणं मान्य करावं लागलं. सर्व देवांपुढे उभे राहून ब्रम्हदेव म्हणाले, 'आई ही पृथ्वीस्वरुप असून, वडील नारायणस्वरुप आहेत. त्यामुळे त्यांना घातलेली प्रदक्षिणा ही पृथ्वीप्रदक्षिणेपेक्षाही श्रेष्ठ आहे. महाबुध्दीवान गणेशाने त्याच्या आई-वडिलांना एकच नव्हे, तर सात प्रदक्षिणा घातल्या व तो सर्वांच्या आधी मजकडे आला; म्हणून अग्रपूजेचा अधिकारी 'श्रीगणेश' असल्याचा निर्णय मी देत आहे.'* ••●‼ *श्रीगणेशाय नम:*‼●•• ☘☘☘☘☘☘☘☘☘ *संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल- 9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌟! ! *काव्यांगण - रोज एक कविता* ! !🌟•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*भान मैत्रीचे*ठेवुनिच भान या मैत्रीचे जपूया जीवनभर नातीनकोत हेवेदावे मैत्रीमध्येपाळू नकाच जातीपाती असावे भान अशा मैत्रीचेजपुया नाती सगळे छाननको रुसवे-फुगवे नखरेद्यावा परस्परांनाही मानटिकवावी निरंतर नातीराखावाच मानसन्मानठेवूनि भान सुंदर मैत्रीचेफुलावी अशी मैत्री छान देऊया मैत्रीचा हात हातीपीडित दु:खी पामरालादेवाजीची ही कृपा मर्जीवरदहस्त असा लेकराला बांधू रेशमी बंध नात्यांचाजुळवून मैत्रीचे अतूट धागेजीवन हे क्षणभंगुर असतासोडून देऊ रागरुसवे मागेफुलावीच मैत्री कुसुमासमदरवळावा नात्यांचा सुगंधहात साह्याचा देऊनी हातीराहू आनंदाने होऊ बेधूंदसौ.भारती सावंत, मुंबई•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••कोणत्याही क्षेत्रात यश आणि प्रगती व्हायची असेल तर त्यासाठी ठराविक कालावधी,वेळ, जिद्द,सातत्य,परिश्रम,ज्ञान, तंत्रज्ञान आणि कौशल्य हवे असते तर याशिवाय प्रगती होत नाही.याउलट अधोगतीचे आहे.अधोगतीला कोणतीही अट नाही.कोणत्याही क्षणी माणसाच्या डोक्यात कोणतेही विध्वंसक वाईट विचार आले की,अधोगती ही क्रांतीरुपाने होते आणि त्यांचे परिणाम सर्वांनाच भोगावे लागतात.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३.🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *घोडा आणि नदी*एकदा एका माणसाला त्याच्या घोड्यासमवेत एक नदी पार करायची असते. परंतु त्याला नदीची खोली माहीत नसल्याने तो तिथेच काठावर विचार करत बसतो. मदतीसाठी आजुबाजुला पाहत असताना त्याला तेथे एक लहान मुलगा दिसतो. तेव्हा त्या माणसाने लहान मुलाला नदीच्या खोलीबद्दल विचारले.मुलाने घोड्याकडे एकदा पाहीले आणि क्षणभर थांबुन तो विश्वासाने म्हणाला, " निश्चींतपणे जा, तुमचा घोडा नदी सहज पार करु शकेल".मुलाचा सल्ला मानुन त्या माणसाने नदी पार करण्यास सुरुवात केली. परंतु नदीच्या मध्यावर पोहोचल्यावर त्याच्या लक्षात आले की नदी खुप खोल आहे. आणि तो जवळ जवळ बुडायलाच आला.कसाबसा तो त्यातून सावरला आणि बाहेर येउन त्या मुलावर जोरात खेकसला. मुलगा पुरता घाबरला होता आणि घाबरत घाबरतच बोलला, "पण माझी बदके तर खुप लहान आहेत आणि ते दररोज नदी पार करतात. त्यांचे पाय तर तुमच्या घोड्यापेक्षा खुप लहान आहेत."उगाच कोणाचाही सल्ला ऐकण्याआधी त्यांना खरोखरच काही माहीती आहे का ते जाणुन घ्या....प्रत्येकजण आपआपल्या अनुभवाने सल्ला देतात. तो सल्ला कितपत योग्य आणि बरोबर आहे ते जाणून घेणे महत्त्वाचे आहे.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in📱 9403046894•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दि. 08/09/2022 वार - गुरूवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 🎇. *दिनविशेष . 🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस*💥 ठळक घडामोडी :-★ १८३१ - विल्यम चौथा इंग्लंडच्या राजेपदी.★ १९०० - अमेरिकेच्या गॅल्व्हेस्टन शहरावर आलेल्या हरिकेनमुळे ८,००० ठार.★ १९४५ - शीतयुद्ध-अमेरिकेचे सैनिक दक्षिण कोरियात दाखल.★ १९६६ - स्टार ट्रेक (चित्रित) मालिकेच्या पहिल्या भागाचे प्रसारण.💥 जन्म :-★ ११५७ - रिचर्ड पहिला, इंग्लंडचा राजा.★ १२०७ - सांचो दुसरा, पोर्तुगालचा राजा.★ १८३० - फ्रेडरिक मिस्त्राल, नोबेल पारितोषिक विजेता फ्रेंच कवी.★ १९३३ - आशा भोसले, भारतीय पार्श्वगायक (चित्रित).💥 मृत्यू :-★ ७०१ - पोप सर्जियस पहिला (चित्रित).★ १९६५ - हेर्मान स्टॉडिंगर, नोबेल पारितोषिक विजेता जर्मन रसायनशास्त्रज्ञ.★ १९८० - विल्लर्ड लिब्बी, नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ.★ १९८१ - हिदेकी युकावा, नोबेल पारितोषिक विजेता जर्मन भौतिकशास्त्रज्ञ.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *दिवाळीनंतर निवडणुकांचा बार? मुंबईसह महत्त्वाच्या महापालिकांच्या निवडणुका नोव्हेंबरमध्ये घेण्यासाठी हालचाली, राज्यातील 1166 ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर; 13 ऑक्टोबरला मतदान, सरपंचपदासाठी थेट निवडणूक*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मुंबई, ठाणे, पनवेलसह उपनगरात विजेच्या कडकडासह मुसळधार पाऊस, अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण*••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *महाराष्ट्र सत्तासंघर्ष: निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीबाबत पुढील सुनावणी 27 सप्टेंबर रोजी; सुप्रीम कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *आता कारच्या मागील सीटवर बसणाऱ्यांनाही सीट बेल्ट लावणे असेल बंधनकारक*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *इंडिया गेटवरील नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्यापासून ते राष्ट्रपती भवनापर्यंतचा संपूर्ण परिसर म्हणजे 'कर्तव्यपथ'चे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज होणार उदघाटन*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने बुधवारी रात्री उशिरा NEET UG 2022 चा निकाल जाहीर केला. महाराष्ट्रातून ऋषि विनय बालसे या विद्यार्थ्याने 710 मार्क पटकावले आहेत.*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *रोमांचक सामन्यात पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर विजय, भारताचं आशिया कप स्पर्धेतील आव्हान संपलं*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300~~~~~~~~~~~~~~~~~~~*मराठवाडा मुक्तीसंग्राम गौरव गाथा**भाग पहिला - विशेष माहिती*https://youtu.be/rL2dyVMCbY4~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 निवेदन - नासा येवतीकर 📢*विषय शिक्षक, कन्या शाळा धर्माबाद,📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *प्रत्येक शाळेला संरक्षण भिंत हवे*https://nasayeotikar.blogspot.com/2018/01/blog-post_15.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *गरम पाण्याचे झरे* 📙हिमालयात प्रवासाला जाणारे परतल्यावर नेहमीच एक आश्चर्याचा किस्सा सांगतात. गंगोत्रीच्या वाटेवर वाटेत काही कुंडे लागतात. कुडकुडणारी थंडी, दूरवर डोंगरमाथ्यावर सफेद बर्फाचे थर आणि या कुंडातून मात्र पाण्यातून चक्क वाफा निघत असतात. हात बुडवला तर चटका बसतो. एवढेच नवे अनेक जण जवळचे तांदूळ त्या पाण्यात काहीवेळा कापडी पुरचुंडी बांधून धरतात व आयता शिजलेला भात खातात. हे पाणी काढून मनसोक्त आंघोळ करण्याचा मोहही कोणी आवरून धरत नाही. असाच पण जरा वेगळा अनुभव वज्रेश्वरीला महाराष्ट्रात येतो. पण येथील झऱ्यांचे पाणी गंधक मिश्रित उग्र वासाचे आहे. येथील उष्ण पाण्यात अंघोळ करून निसर्गोपचार करून घेणाऱ्यांचीही कायम गर्दी उसळलेली असते. जगात असे गरम पाण्याचे कित्येक झरे आहेत. तसेच फक्त वाफेचेही झरे आहेत. वाफेच्या झर्‍यातून फक्त जोरात वाफ उसळून एखाद्या प्रेशरकुकरप्रमाणे तेथे शिट्टीचा आवाजही येत राहतो. या सगळ्या प्रकाराचे मूळ भूगर्भात खोलवर घडणाऱ्या घडामोडीत आहे. सुमारे तीस एक किलोमीटर खोलीवर तप्त मध्यावरणाचा पाण्याच्या वाहत्या साठ्याशी संबंध येतो. तिथे वाफ कोंडू लागते. या वाफेच्या दाबाने जमिनीतील खडकातील काही भेगांतून मार्ग काढला जाऊ शकतो. त्यातूनच हे झरे निर्माण होतात. काही ठिकाणी ज्वालामुखीच्या मुखापासून काही ठराविक अंतरावर प्रथम वाफेचे व नंतर गरम पाण्याचे झरे सलगपणे आढळतात. पण अनेक ठिकाणी ज्वालामुखीचा अलीकडच्या ज्ञात काळात कधीच संबंध आलेला नसतो. हेही लक्षात घ्यायला लागेल. यातही एक मोठा फरक आहे. वाफेचे झरे मधूनमधून नाहीसे होतात, पण गरम पाण्याचे झरे मात्र सलगपणे वर्षानुवर्षे उकळताना दिसतात. काही झर्‍यांत गंधकाचा अंश सापडतो. ते नक्कीच ज्वालामुखीच्या उगमाशी संबंधित असावेत असा संशय घ्यायला जागा आहे.पृथ्वीचा गाभा अत्यंत गरम आहे मध्यावरणही अतितप्त आहे. पण बाह्यावरणाचा काही भाग बऱ्याच ठिकाणी भरपूर गरम आहे असेही लक्षात आले आहे. आईसलँड, न्यूझीलंड येथील काही भागात जेमतेम एक ते तीन किलोमीटर अंतर खोलवर बोअरिंगचे छिद्र पाडले असता भूगर्भातील गरम पाणी व वाफ मिळवता येते असा अनुभव आहे. जरी एवढे खोल छिद्र पाडणे अत्यंत महागडे असले तरी यातून मिळणारी ऊर्जा ही अनेक वर्षे पुरणार असल्याने हा खर्च परवडतो. हे गरम पाणी वा वाफ वापरून घरे उष्ण ठेवण्याचा वा विद्युतनिर्मिती उद्योग यातूनच केला जातो. येथेही गमतीचा भाग कसा आहे बघा. आइसलँड व न्यूझीलंडसारख्या थंड प्रदेशातही निसर्गाने ही सोय करून ठेवली आहे.*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*“ एक चागंली माता शंभर शिक्षकांच्या मोलाची असते. ”**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1) *'राष्ट्रीय युवक दिन' केव्हा साजरा केला जातो ?* 12 जानेवारी2) *विधानसभेचा कार्यकाल किती वर्षाचा असतो ?* 5 वर्ष3) *विधानसभेच्या सदस्याला काय म्हणतात ?* आमदार4) *महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोठे होते ?* नागपूर5) *राज्याचा प्रमुख कोण असतो ?* राज्यपाल*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••◆ एल. एन. गोडबोले, विस्तार अधिकारी, अर्धापुर◆ नवाब पाशा शेख◆ मिर्झा खालेद बेग◆ शंकर सारगोड◆ कृष्णा हंबर्डे◆ बालाजी वारले◆ योगेश जंगले*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*एक छोटी कथा सांगितली जाते. एका दुष्काळी प्रदेशातील एक दुष्काळी गाव. नद्या, विहिरी आटलेल्या, पाण्यासाठी दशदिशा, आम्हा फिरविशी जगदीशा...अशी अवस्था. पावसाळा सुरू होतो. पाऊस काही येईना. शेवटी सगळा गाव एकत्र येतो. गंभीर परिस्थितीवर गंभीर चर्चा होते. उपाय सुचविले जातात. शेवटचा प्रयत्न म्हणून गावालगतच्या डोंगरावर जाऊन पावसासाठी देवाची प्रार्थना करायचे ठरते. सारा गाव ठरल्याप्रमाणे एकत्र येतो. थकलेली, तहानलेली पावलं नव्या उमेदीनं डोंगराकडे चालायला लागतात.**या सर्व मोठ्या माणसांमध्ये एक मुलगा हातात छत्री घेऊन चालत असतो. या मुलाकडे बघून सर्वांना आश्चर्य वाटते. पावसाचा टिपूस नाही. येण्याची शक्यताही नाही आणि हा चिमुरडा सोबत छत्री घेऊन आलाय. शेवटी एकजण त्या चिमुरड्याला विचारतो..'बाळा, तू ही छत्री सोबत आणलीस?' छोटा मुलगा उत्तरतो. 'पावसासाठी प्रार्थना करायला आपण डोंगरावर जात आहोत आणि मी प्रार्थना केल्यावर पाऊस येणारच आहे. म्हणून मी छत्री सोबत घेतलीय.' हा स्वत:च्या प्रार्थनेवरचा ठाम विश्वास! एकूण दुसरं पाऊल पडणार आहे. या विश्वासावरच पहिलं पाऊल उचलावं लागतं.* 〰 ‼ *रामकृष्णहरी* ‼ 〰 🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻 *संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••ज्यांनी आपल्या जीवनात कधीही असत्याला थारा दिला नाही,मनात कुणाचेही वाईट चिंतले नाही, इतरांकडे कधी वक्रदृष्टीने पाहिले नाही,दुस-या चे ते माझे कधी म्हटले नाही,कधीही कशाची मनात लालसा ठेवली नाही,कधीही कुणासोबत स्पर्धा केली नाही,जीवनात जे काही करायचे ते आपल्या प्रयत्नाने करायचे,जे काही शक्य आहे ते आपण मन लावून करायचे,जे काही मिळेल त्यात समाधानाने स्वीकारायचे असे गुण ज्यांच्या जीवनात परिपूर्ण आहेत तीच माणसे आपल्या जीवनात सुखी व समृद्ध होऊ शकतात आणि तीच माणसे इतरांना आपल्या जीवनासारखे जीवन जगण्यासाठी प्रेरीत करतात आणि आपणही त्यांचे गुण आत्मसात करून चांगले जीवन जगण्याचा मार्ग स्वीकारला पाहिजे तरच आपल्या जीवनाचे खरे कल्याण होईल.© व्यंकटेश काटकर,नांदेड.संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३.🌾🌹🌾🌹🌾🌹🌾🌹🌾🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*एक गुरूंच्‍या घरी एक शिष्‍य मनोभावे गुरुंची सेवा करून शिक्षण घेत होता. त्‍याच्‍या या सेवेमुळे गुरु त्‍याच्‍यावर प्रसन्न होते. शिक्षण् पूर्ण झाल्‍यावर विद्यार्थी घरी जाण्‍यासाठी निघाला तेव्‍हा गुरुंकडे त्‍याने जाण्‍याची आज्ञा मागितली तेव्‍हा गुरुंनी त्‍याला आशीर्वाद म्‍हणून एक आरसा भेट दिला व सांगितले की, हा दिव्‍य आरसा (दर्पण) असून यात मानवी मनात चालणारे विचार प्रगट होऊन दिसतात. विद्यार्थी मोठा आनंदीत झाला. हा आरसा खरेच कार्य करतो की नाही याची शहानिशा करण्‍यासाठी त्‍याने लगेच आपल्‍या गुरुंसमोर हा आरसा धरला व गुरुंच्‍या मनात कोणते भाव आहेत, दुर्गुण आहेत हे पाहू लागला आणि गुरुंच्‍या समोर आरसा धरताच त्‍याच्‍या चेह-यावरचा रंग पार उडाला कारण तो आरसा गुरुंच्‍या अंतकरणात मोह, अहंकार, क्रोध आदि विकार दाखवित होता. त्‍याला याचे फारच दु:ख झाले की आपण ज्‍या गुरुची मनोभावे पूजा केली, ज्‍यांना पूर्ण ईश्र्वराचा दर्जा दिला त्‍यांच्‍या मनातही विकार आहेत, ते सुद्धा मानवी विकारापासून अजून सुटलेले नाहीत याचे त्‍याला वैषम्‍य वाटले. तो गुरुंना काहीच न बोलता तो आरसा घेवून गुरुकुलातून निघाला, रस्‍त्‍यात भेटणा-या प्रत्‍येकाच्‍या मनातील भाव पाहणे हे त्‍याचे कामच झाले होते. गावी परत जाताच त्‍याने आपल्‍या प्रत्‍येक परिचिताबरोबर हा प्रयोग करून पाहिला. त्‍याला प्रत्‍येकाच्‍या हृदयात कोणता ना कोणता दुर्गुण दिसून आला. शेवट त्‍याने आपल्‍या जन्‍मदात्‍या आई वडीलांच्‍या समोरही हा आरसा ठेवला. ते दोघेही पण त्‍यातून सुटले नाहीत. त्‍यांच्‍या हृदयात पण त्‍याला काही ना काही दुर्गुण दिसले. शेवटी या गोष्‍टीचा त्‍याला मनोमन राग आला व तो गुरुकुलातील गुरुंकडे धावला. गुरुंपाशी जाऊन मोठ्या विनम्रपणे तो म्‍हणाला,’’ गुरुदेव, मी आपण दिलेल्‍या या आरशातून प्रत्‍येकाच्‍या मनात, हृदयात, अंत:करणात डोकावून पाहिले आणि मला असे जाणवले की प्रत्‍येकाच्‍याच मनात काही ना काही विकार आहेच, काही ना काही दोष आहे. एखाद्याच्‍या मनात कमी तर कुणाच्‍या मनात जास्‍त असे विकार, दोष भरून राहिले आहेत. हे पाहून मी फार दु:खी झालो आहे, कृपया मला मार्गदर्शन करा.’’ गुरुंनी काहीच न बोलता तो आरसा फक्त त्‍याच्‍याकडे केला आणि काय आश्र्चर्य त्‍याला त्‍याच्‍या मनाच्‍या प्रत्‍येक कोप-यात राग, द्वेष, अहंकार, क्रोध, माया आदि दुर्गुण भरून राहिलेले दिसले. गुरुजी म्‍हणाले,’’ वत्‍सा, हा आरसा मी तुला तुझे दुर्गुण पाहून ते कमी करण्‍यासाठी दिला होता पण तू दुस-यांचे दुर्गुण पाहत बसलास आणि नको तितका वेळ खर्च केलास, अरे याच कालात जर तू जर स्‍वत:चे अवलोकन केले असते तर तुला तुझ्यातील दुर्गुण सुधारता आले असते. याच काळात तु एक असामान्‍य व्‍यक्ती झाला असता. मानवाची ही कमतरता आहे, कमजोरी आहे की तो दुस-यातील दुर्गुण पाहत बसतो आणि स्‍वत:ला सुधारण्‍याचा प्रयत्‍नही करत नाही. हेच या आरशातून मला तुला शिकवायचे होते. जे तुला शिकता आले नाही.’’**तात्‍पर्य – आपण नेहमीच दुस-या व्‍यक्तीचे दुर्गुण बघतो, त्‍यावर टीका करतो पण आपल्‍यातील दुर्गुणांवर आपले कधीच लक्ष जात....**संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in📱 9403046894•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दि. 07/09/2022 वार - बुधवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 🎇. *दिनविशेष . 🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *वेद दिन*💥 ठळक घडामोडी :-●१९५३ - निकिता ख्रुश्चेव सोवियेत संघाच्या सर्वेसर्वापदी.● १९०६- बँक आफ इंडिया ची स्थापना झाली.💥 जन्म :-◆ १९३६ - बडी हॉली, अमेरिकन गायक, संगीतकार.◆ १९५५ - अझहर खान, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.💥 मृत्यू :-●१५५२ - गुरु अनंग देव, दुसरे शीख गुरु.● १९५३ - भगवान रघुनाथ कुळकर्णी, मराठी कवी, लेखक.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *आर्थिक दुर्बल घटकांच्या 10 टक्के आरक्षण वैधतेबाबतची सुनावणी 13 सप्टेंबरपासून सुरु होणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *शेख हसीना यांनी घेतली मोदींची भेट, भारत-बांगलादेशमध्ये झाले 7 करार*••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *कोरोनाविरोधातील लढाईला बळ; नाकावाटे दिल्या जाणाऱ्या लशीला मंजुरी*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *शिक्षक दिनी पंतप्रधानांची मोठी घोषणा; PM-SHRI योजनेंतर्गत 14 हजार 500 शाळा अपग्रेड होणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *पावसाचा जोर वाढणार, करपणाऱ्या पिकांना मिळणार जीवदान तर रब्बीसाठी पहिली सलामी, गणपती विसर्जनाच्या वेळी कोल्हापूर, सांगली, सातारसह अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *पाच वर्षांमध्ये रस्ते अपघातात 41 हजार जणांचा मृत्यू, आरटीआयमधून धक्कादायक माहिती समोर*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *आशिया चषकातील सुपर 4 लढतीमध्ये भारताचा हा सलग दुसरा पराभव आहे. या पराभवासह भारतीय संघाचं स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••*पाचवी - रोमन संख्यचिन्हांची ओळख👇**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/IpHmSTqxpio~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *जागरूक पालकच खरे मालक* वास्तविक पाहता शिक्षण प्रक्रियेत विद्यार्थ्यासोबत त्यास शिकविणारे शिक्षक जेवढे जबाबदार आहेत त्याच्याच तुलनेत त्यांचे पालक सुद्धा विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत कारणीभूत घटक आहेत. शाळेतील शिक्षक मुलांवर चांगले संस्कार होण्यासाठी विविध उपक्रम राबवत जीवाचे रान करतांना, विद्यार्थ्यांच्या घरात मात्र दूषित वातावरण असेल तर पालथ्या घागरीवर पाणी नव्हे का ? ज्या ठिकाणी शिक्षक व पालक यांच्यात विद्यार्थ्यांच्या प्रगतीबाबत संवाद घडून येतो त्याच ठिकाणी आपणाला विद्यार्थ्यांची गुणवत्ता आणि प्रगती आढळून येते.......https://nasayeotikar.blogspot.com/2018/05/blog-post_61.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *संस्कारक्षम जीवन**जीवनात संस्काराचे खूप महत्त्व आहे.* संस्काराशिवाय जीवन शून्य असते. संस्कारच मनुष्याला श्रेष्ठ बनवितात व उत्तरम आकार देतात. सर्वोत्तम जीवनाचा पाया उत्तम संस्कारांवरच अवलंबून असतो. संस्काराशिवाय जीवन म्हणजे ब्रेक नसलेल्या गाडीप्रमाणे असते. आदर्श जीवनाचा पाया म्हणजे संस्कारच आहेत. संस्कारक्षमतेविना जीवन म्हणजे पाण्याविणा मासा. कारण माशाच्या अस्तित्वासाठी पाणी हवेच तसेच मनुष्याच्या या जीवनाला उत्तम आकार हे संस्कारच देऊ शकतात. संस्कार म्हणजे मनुष्याच्या अंगी असणारे सद्विचार, सद्गुण. संस्कारशिल व्यक्‍तीच स्वतःची व समाजाची उन्नती करू शकतो हे आपणाला पाहिला मिळते आणि हेच संस्कार व्यवहारिक जीवनाबरोबर पारमार्थिक उन्नतीदेखील करून देते.त्यामुळेच एक चांगला व्यक्‍ती बनण्याची सुरुवात ही प्रत्येकाची आपल्या घरापासून सुरु होते. त्यामुळे ज्याच्या अंगी संस्कारयुक्‍त आचार विचार असतील त्याच्याद्वारे सर्व व्यवहार नियमबद्ध चाकोरीत चालतात. प्रकृतीही आपल्या नियमाने चालते. जसे कि, दिवस-रात्र, महिने, ऋतु सर्वकाही नियमाने चालतात.हिवाळा आणि उन्हाळा पण निसर्गनियमांप्रमाणे येतात व जातात. यामुळेच जगातील सर्व व्यवहार व्यवस्थितरितीने पार पाडतात. हे सर्व जगाच्या कल्याणासाठी घडत असते. असेच संस्कारित असणाऱ्या व्यक्‍तीकडूनही अशाप्रकार सर्वकाही नियमावलीनेच घडते.म्हणून मानवसमाजाने देखील आपले जीवन सुखी होण्यासाठी चांगले संस्कार स्वतःमध्ये रूजविले पाहिजे. या सर्व गोष्टींची सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे घरातूनच व्हायला पाहिजे. एक चांगला मनुष्य व आदर्श नागरिक बनविण्याची सुरुवात घरातूनच व्हायला हवी. *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*“ जो माणूस स्वतःला सुखी समजत नाही तो कधीच सुखी नसतो. ”**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) भारतात गिधाडांची संख्या झपाट्याने कमी होण्याचे मुख्य कारण काय ? २) सर्वाधिक सातव्यांदा आशिया चषक स्पर्धा खेळणारा भारतीय क्रिकेटपटू कोण ?३) तांदूळ उत्पादनात जगातील पहिल्या क्रमांकाचा देश कोणता ?४) चंद्राचा परिवलन व परिभ्रमण कालावधी कसा असतो ?५) स्वदेशी बनावटीची पहिली विमानवाहू विक्रांत युद्धनौकाची लांबी, रुंदी व उंची किती मीटर आहे ? *उत्तरे :-* १) डायक्लोफेनक औषध - ह्या औषधाने बाधीत मेलेल्या गुरांचे मांस खाल्यास मूत्रपिंड निकामी होते. २) रोहित शर्मा ३) चीन ४) समान ५) लांबी - २६२ मी, रुंदी - ६२ मी, उंची - ५९ मी *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••● प्र. श्री. जाधव● त्र्यंबक स्वामी● गजानन जाधव● भारत पाटील● सुमीत पेटेकर● हणमंत गायकवाड● गोविंद पटेल● सिद्धू पुरी● भास्कर चटलोड● दशरथ याटलवार● प्रवीण कुमार ● पवन धनडु*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*"या जगात अनेक जातीचे प्राणी, अनेक जातीच्या वनस्पती इ. आहेत. (आंब्याची जात गोड चवीची तर कारल्याची जात कडू चवीची.) अशा अनेक जातींचे अनेक वेगवेगळे रंग आहेत. अशा अनेकविध जाती आणि त्यांच्या गुणधर्मानुसार व्यक्त होणारे रंग-ढंग एकत्र येऊन तर 'जग' हे नाव निर्माण झालं आहे." या जगात खूप काही असलं तरी हिताचं जे मोजकंच आहे, त्याला खरी किंमत आहे. 'शब्दज्ञान' किती मर्यादित असतं, याचं बोधक उदाहरण म्हणजे "उजेड काजव्यातूनही निघतो, पण तो फक्त त्याच्या पार्श्वभागापूरताच उजेड देतो, आणि तेही कायम नाही देत; तर चालू-बंद, चालू-बंद असा देतो." शब्दज्ञान हे काजव्याच्या उजेडासारखं आहे. ते देणा-याच्यासुद्धा समोर प्रकाश पाडत नाही. असा उजेड जगाला काय प्रकाश देणार? शब्दज्ञानानं समाजाचं जाऊ द्या, स्वतःचंही भलं होऊ शकत नाही.**स्वतःसहीत समाजाचंही भलं करायचं असेल, तर कॉपी-पेस्ट बंद झालं पाहिजे. ज्ञान आता शब्दांचं नको तर अनुभवाचं असायला हवं.--**तुका म्हणे झरा । आहे मुळचाची खरा ।।**तुकोबा म्हणतात, "माझं ज्ञान हे काही कुठून आयात केलेलं नाही. ते कॉपी केलेलं नाही. माझ्या ज्ञानाचा जो झरा आहे, तो माझ्या अंतःकरणातून प्रकट होतो." याउलट शब्दज्ञानी माणसाचं ज्ञान समुद्राइतकं विशाल दिसत असलं, तरी ते अनेक नद्या, नाले, झरे यांच्यावाटे आलेलं आहे. जरी विशाल असला तरी समुद्राचं पाणी तहानलेल्याची तहान भागू शकत नाही, तसं शब्दज्ञान लोकांचं भलं करू शकत नाही. त्यासाठी आवश्यकता आहे ती अनुभवाच्या झ-याचीच.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल- 9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌟! ! *काव्यांगण - रोज एक कविता* ! !🌟•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*।। फुलपाखरू नि काटे ।।*फुलपाखरू जेंव्हा जेंव्हा जातेरस शोषण्यासाठी फुलांकडेतेंव्हा तेंव्हा तिचे लक्ष असतेफुलांच्या झाडावरील काट्याकडेसंकटाचा सामना करावा लागतोम्हणून ती फुलांकडे जाणे सोडत नाहीअंगाला काटे टोचतात म्हणूनफुलांतील रस घेणे सोडत नाहीमिळेल किती ही कष्ट वायेवो किती ही संकटेआपले कर्म सोडायचे नाहीसांगते फुलपाखरू नि काटे- नासा येवतीकर, 9423625769•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••ज्या व्यक्ती अश्रूंचा सहारा घेऊन जगतात त्या जीवनात कुठेतरी पराभव पत्करलेल्या असतात किंवा त्यांच्या मनावर कुठेतरी आघात झालेला असतो किंवा कुणीतरी मनाविरुद्ध करण्यासाठी प्रवृत्त केलेले असते.हे जरी खरे असले तरी अशा व्यक्ती शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या कमकुवत झाल्याने त्यांना जीवनात जगण्याची काही अपेक्षा उरली नाही किंवा आता आपण जगून तरी काय करावे असा सतत विचार करत आणि डोळ्यांत अश्रू आणून कसेबसे जीवन जगतात.अशा दुबळ्या मनाने जीवन जगण्यापासून जीवनाला परावृत्त करायचे असेल तर जीवनात आणि आपल्यासमोर चांगले जीवन जगण्याची उमेद प्रथमत: नजरेसमोर ठेवायला हवी, नेहमी आपण काहीतरी असले तरी मी कोणत्याही कठीण प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी सक्षम आहे असा उदात्त विचार करून जगायला शिकले पाहिजे,कुणीजरी आपले मन दुखवण्याचा प्रयत्न केलातरी मी त्याकडे दुर्लक्ष करीन असाही सकारात्मक विचार केला आणि मन घट्ट करून जगायला शिकले तर अश्रूंचा आधार घेऊन जगायची काही गरजच भासणार नाही.जीवन तर सुखदु:खाने भरलेले आहे ते कुणाच्या वाट्याला कमी-जास्त असणारच.सुख जास्त झाले म्हणून जास्तही त्या सुखाचा अतिरेक होऊ द्यायचा नाही आणि दु:ख झाले म्हणून अति दु:खी व्हायचे नाही.आपण सारेजण सुखदु:खाच्या चक्रव्युहात अडकलेलोच आहोत आणि त्या चक्रव्युहाला भेदूनच चांगले जीवन जगायचे आहे हे लक्षात ठेवायला हवे.व्यंकटेश काटकर,नांदेडसंवाद..९४२१८३९५९०🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मनाची एकाग्रता*एकेकाळी एक वृद्ध योद्धा होता. त्‍याच्‍या काळातील तो सर्वत्र प्रसिद्ध असा योद्धा होता. त्‍याला कोणत्‍याही प्रकारच्‍या युद्धात कुणीच हरवू शकत नसे. त्‍याची ख्‍याती सर्वत्र पसरली होती. त्‍याने त्‍याच्‍या शिष्‍यांना व मुलांना युद्धकलेचे शिक्षण देण्‍यास सुरुवात केली होती. त्‍याचवेळी एक तरूण योद्धाही प्रसिद्ध होत होता. दिग्‍गज योद्धेही तरूण योद्ध्यासमोर हार मानत असत. प्रतिस्‍पर्ध्‍याचे कच्‍चे दुवे ओळखून त्‍याला सहज पराभूत करण्‍यात त्‍याचा हातखंडा होता. अतिशय कमी कालावधीत त्‍याने वृद्ध योद्धा सोडल्‍यास सर्व योद्ध्यांना पराभूत केले होते. त्‍याचे नाव सर्वत्र गाजू लागले. मिळणारी प्रसिद्धीचा आता त्‍याच्‍या मनात अहंकार जागृत झाला. त्‍याने विचार केला की या वृद्धालाही हरवून 'अजिंक्‍य' हे बिरूद लावून मिरवू. त्‍याने वृद्ध योद्ध्याला आव्‍हान दिले. शिष्‍यांनी मनाई केली तरी वृद्धाने त्‍याचे आव्‍हान स्‍वीकारले. तरूण योद्धा ठरलेल्‍या दिवशी वेळेवर रणांगणात येऊन उभा राहिला. भविष्‍यातील विजयाची कल्‍पना मनात धरून तो आनंदी होत होता. पण वृद्ध मात्र शांत आणि संयमित स्थितीमध्‍ये त्‍याच्‍यासमोर उभा होता. युद्ध सुरु झाले. तरूणाच्‍या प्रत्‍येक वाराला वृद्धाकडे प्रतिवार तयार होता.तरूण योद्धा हळूहळू का होईना दमू लागला आणि आपण युद्ध हरतो आहे हे लक्षात येताच त्‍याने वृद्धाला अपशब्‍द वापरण्‍यास सुरुवात केली. जेणेकरून वृद्धाचे लक्ष विचलित होईल पण त्‍याचा उपयोग झाला नाही. वृद्ध अविचल राहिला त्‍याचा संयम ढळला नाही. अखेरीस तरूण योद्धा पराजित झाला. त्‍याने स्‍वत:हून हार पत्‍करली व तेथून पराजित होऊन निघून गेला. तो गेल्‍यावर शिष्‍यांनी व वृद्धाच्‍या मुलांनी वृद्धाला विचारले,''बाबा, तो तरूण तुम्‍हाला अपशब्‍द वापरत होता तरी तुम्‍ही शांत कसे राहिलात'' तेव्‍हा वृद्ध गुरु म्‍हणाला,'' मुलांनो कोणत्‍याही युद्धात शारीरिक बळाबरोबरच मनाची एकाग्रता महत्‍वाची असते. कोणत्‍याही परिस्थितीत मन कणखर असेल तर तुमचा विजय निश्चित आहे.''*तात्‍पर्य : मनाची एकाग्रता साधल्‍याने बरेचशी कामे साध्‍य होतात. मन एकाग्र करून कोणतेही काम केल्‍यास हमखास यश मिळतेच.**संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in📱 9403046894•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दि. 06/09/2022 वार - मंगळवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 🎇 . *दिनविशेष . 🎇 * 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••💥 ठळक घडामोडी :-●१९६५ - भारत-पाकिस्तान दुसरे युद्ध-भारताने पाकिस्तानवर हल्ला केला.●१९६६ - दक्षिण आफ्रिकेच्या पंतप्रधान हेन्ड्रिक व्हेरवोर्डची संसदेत भोसकून हत्या.💥 जन्म :-◆ १९२९ - यश जोहर, भारतीय चित्रपट निर्माता.◆ १९७१ - देवांग गांधी, भारतीय क्रिकेट खेळाडू.💥 मृत्यू :-●१९६६ - हेन्ड्रिक व्हेरवोर्ड, दक्षिण आफ्रिकेचा पंतप्रधान.●१९९० - लेन हटन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *शाळांना पायाभूत सुविधा देण्यासाठी निधींची कमतरता पडू देणार नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *शिक्षक दिनानिमित्त नांदेड जिल्हा परिषदेच्या आमची शाळा आम्ही चालवू उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील सर्व शाळेतून एकाच दिवशी स्वयंशासन दिन साजरा*••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *शिक्षक दिनाच्या निमित्ताने देशातील 46 शिक्षकांचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारानं गौरव, त्यात महाराष्ट्रातील तीन शिक्षकांचा समावेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *राजकीय शक्ती आणि गणेशभक्ती! मुंबई महापालिका निवडणुकांच्या तोंडावर अमित शाह मुंबई दौऱ्यावर*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मुंबई अहमदाबाद हायवेवर 118 किलोमीटरच्या पट्ट्यात 29 धोकादायक ब्लॅक स्पॉट; वर्षभरात चारशेच्या आसपास बळी*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *लिझ ट्रस ब्रिटनचे नवीन पंतप्रधान, भारतीय वंशाचे ऋषी सुनक पराभूत*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *शिक्षकदिनी यूजीसीचं गिफ्ट; 5 वेगवेगळे अनुदान आणि फेलोशिपची घोषणा; सावित्रीबाईंच्या नावानंही एक फेलोशिप*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••*Home Things Class 3rd Revision👇**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/EeKe5Pr4Stk~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*बलात्काराचे वाढते प्रमाण कधी थांबणार ?*https://nasayeotikar.blogspot.com/2018/04/blog-post_15.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *कुष्ठरोग म्हणजे काय ?* 📙कुष्ठरोग हा एक संसर्गजन्य आजार आहे. यावर प्रतिबंधक लस तयार झाली आहे, पण ती अद्याप प्रयोगावस्थेत आहे. याखेरीज तिचा वापर कसा करावा, याविषयी शास्त्रज्ञ व डॉक्टर यांच्यामध्येच अजून एकमत नाही. मात्र विविध प्रकारच्या औषधांचा वापर करून कुष्ठरोग निर्मूलन आता आवाक्यात आले आहे. असे जागतिक आरोग्य संघटनेला वाटते. दर दहा हजार व्यक्तींमागे एक रुग्ण असे प्रमाण सध्या भारतात आढळते. अगदी प्रारंभिक अवस्थेतील रोगाचे निदान करून त्यावर औषधांचा उपयोग केल्यास कुष्ठरोग पूर्णपणे बरा करता येतो. कुष्ठरोग काटकीसारख्या दिसणाऱ्या सूक्ष्मजंतूंमुळे होतो. त्यांची कृत्रिम वाढ करणे शक्य झालेले नाही. या रोगाचे जंतू मानवी शरीरात जेव्हा प्रवेश करतात, तेव्हा त्यांचा पेशीजालाशी संघर्ष होतो. एका प्रकारात या संघर्षात जंतू व पेशीजाल या दोन्हींचा नाश घडतो. या प्रकाराला 'नॉन लेप्रोमॅटस' किंवा 'असंसर्गिक' समजतात. म्हणजे रोगाचे परिणाम जरी शरीरावर दिसत असले, तरी त्यात जंतू नसल्याने ही व्यक्ती संसर्ग देऊ शकत नाही. दुसऱ्या प्रकारात मात्र जंतूंची अनिर्बंध वाढ होत राहते. तेथे रुग्णाची प्रतिकारशक्ती कमी असते. मात्र जंतुंची संख्या वाढत गेल्यामुळे सर्व शरीरभर रोग पसरत राहतो. प्राथमिक अवस्थेत पेशीजाल फारसे नष्ट होत नाही. विकोपाला गेल्यावर मात्र ढोबळ चिन्हे दिसून येतात. हा प्रकार सांसर्गिक असतो. महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुष्ठरोग अत्यंत मंदगतीने वाढणारा आजार आहे. सुरुवातीची लक्षणे व प्रगत अवस्थेतील चिन्हे यात फारच फरक आहे. समाजासमोर प्रगत अवस्थाच येत असल्याने या रुग्णांबद्दल एक प्रचंड भीती व तिरस्कार अनेक शतके समाजात घट्ट गैरसमजुती निर्माण करत आहे. शारीरिक विद्रुपता व त्यापासून होणारे सामाजिक व आर्थिक परिणाम टाळण्यासाठी रोगाची सुरुवातीची लक्षणे ओळखून इलाज सुरू करणे महत्त्वाचे ठरते. शरीराच्या कोणत्याही भागावर त्वचेच्या रंगापेक्षा वेगळ्या रंगाचा लालसर चट्टा व डाग दिसून या रोगाची सुरुवात होते. कोडाप्रमाणे हे डाग पांढरे नसतात. अतिगडद त्वचेवरील डाग लक्षात यायला वेळही लागतो. मात्र महत्त्वाची गोष्ट म्हणजे या जागीच्या त्वचेचे स्पर्श, उष्णता व वेदना या तिन्हींचे ज्ञान गेलेले असते. अशा जागीची त्वचा किंचित खरवडून तिची सूक्ष्मदर्शक यंत्राखाली तपासणी करतात. त्यात रोगाचे जंतू असतील, तर तो सांसर्गिक प्रकार ठरवला जातो. जंतू नसतील, तो असांसर्गिक असतो. भारतातील सुमारे ८० टक्के रूग्ण असांसर्गिक प्रकारात असतात. जेमतेम २० टक्के रुग्णांचाच इतरांना संसर्ग होऊ शकतो.मुख्य गोष्ट म्हणजे दोन्ही प्रकारच्या रुग्णांना एक ते दोन वर्षे औषधयोजनेची गरज असते. अन्यथा अतिसंथपणे वाढणाऱ्या या रोगाचे चट्टे अनेक ठिकाणी दिसू लागतात. हातापायांची बोटे वाकडी होणे, क्षते पडणे, जखमा चिघळणे हे मुख्यतः संवेदना नष्ट झाल्याने वाढत जाते. रोगाचा उद्भव झाल्याने चेहऱ्यावरच्या गाठी, कानाच्या पाळ्यांवर व नाकावर येणारी विद्रुपता, भुवयांचे केस जाणे यांमुळे प्रगत अवस्थेतील रुग्ण हा समाजातून बाहेर फेकला जायला सुरुवात होते. पण ही अवस्था न आलेली किमान ९० टक्के कुष्ठरोगी समाजातच वावरत असतात. त्यांच्यामुळे होणारा संसर्ग टाळण्यासाठी त्यांच्यावर निदान व उपचार करणे हाच एकमेव प्रतिबंधाचा उपाय राहतो. कुष्ठरोग हाही एक जंतुजन्य रोग असून तो पूर्ण बरा होऊ शकतो, ही महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायलाच हवी.*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*“ सर्वांनी एकत्र श्रम केल्याने कठीण काम हलके होते. ”**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) देशातील स्वदेशी बनावटीची पहिली विमानवाहू युद्धनौकेचे नाव काय ?२) गहू उत्पादनात जगात पहिल्या क्रमांकाचा देश कोणता ?३) दूषित हवा, पाणी, अन्न व वाहक ( कीटक व प्राणी ) यांच्यामार्फत पसरणाऱ्या रोगांना काय म्हणतात ?४) भारताच्या कोणत्या फलंदाजाला ' शैलीदार फलंदाज ' म्हणून ओळखले जाते ?५) ज्या रेषेच्या दोन्ही बाजूस खंड असतात, त्या रेषेला काय म्हणतात ?*उत्तरे :-* १) आयएनएस विक्रांत २) चीन ३) संसर्गजन्य रोग ४) व्हीव्हीएस लक्ष्मण ५) रेषाखंड *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••● सुनील ठाणेकर, देगलूर● गणेश शिंदे, शहापूर, ठाणे● महेश वडजे● विठ्ठल तुकडेकर● रितेश पोकलवार● प्रशिक कैवारे● विकास डुमणे● अनिल सोनकांबळे● आनंद गायकवाड● सचिन पाटील*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*तारूण्य आणि संगत यांचे महत्व विशद करताना जैन मुनीं तरूण सागर महाराज सांगतात, 'आपले मित्र, चित्र आंणि चरित्र नेहमी पवित्र ठेवा; कारण तेच खरे जीवनाचे अस्त्र आहे. तुम्हाला तर हे माहित आहे की., चारित्र्याचे पतन होण्यासाठी बहुधा चुकीचे मित्र आणि चुकीचे चित्र यांचाच हात असतो. चुकीचे मित्र आणि चुकीचे चित्र हेच चारित्र्य नष्ट करण्याचे शस्त्र आहे किंवा असेही म्हणता येईल की, कधीही न चुकणारे ब्रम्हास्त्र आहे.' तारुण्याच्या सळसळत्या उर्जेवर स्वार्थी व्यवस्थांचा डोळा असतो. त्यामुळेच तारूण्याची ऊर्जा सैरभैर करून तिला आपल्या इच्छेप्रमाणे वापरण्याचे धूर्त राजकारण या स्वार्थी व्यवस्था करत असतात. तारुण्याच्या ऐन उमेदीचा कालखंड निरर्थकपणे या स्वार्थी व्यवस्थेच्या नेतृत्वामागे घालविला जातो.**एखादी पाण्याची बाटली वापरून फेकून द्यावी, त्या पद्धतीने तरुणांच्या ऊर्जेचा वापर करून त्यांना शेवटी फेकून दिले जाते. सर्व बाजूंनी निष्क्रिय केलेल्या तरूणांवर शेवटी पश्चात्तापाची वेळ येते. तारूण्याचे रखरखीत वाळवंट होते. आपले तारूण्य विवेकशून्य व्यवस्थेच्या हाती द्यायचे की, स्वत:वर विश्वास ठेवत स्वकर्तृत्वाच्या बळावर समाज जीवनात उजळवून टाकायचे हे ज्याला समजले, त्याला तारुण्याचा खरा अर्थ कळला. माजी राष्ट्रपती डाॅ. ए.पी.जे. अब्दुल कलाम हे युवकांना देशाची संपत्ती म्हणायचे, ही संपत्ती देशासाठी आपत्ती ठरू नये म्हणून तरूणांनी आपले मित्र विचारपूर्वक निवडावेत.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल- 9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌟! ! *काव्यांगण - रोज एक कविता* ! !🌟•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*।। गावपण ।।*पूर्वी गावातली लोकं वागत होती प्रेमानेदुःखात प्रत्येकांच्याधावून येती वेगानेजरी घरं असली लहानपण मन मात्र होतं मोठंफसवेगिरी करत नसतवागत नव्हते कोणी खोटंगावातल्या गावात होताचालत सारा व्यवहारकामाच्या मोबदल्यातधान्य मिळत होते फारपैसा घुसला घराघरांतसंपली ही बलुतेदारीकोणत्याही कामांसाठीपैसाच लागतो भारीशेजारधर्म अजूनहीटिकून आहे गावातसण उत्सव असेल घरीसर्व उभे राही दारात- नासा येवतीकर, धर्माबाद9423625769 या सदरसाठी आपली कविता 9423625769 वर whatsapp करावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••ज्याप्रमाणे सुगंधीत असलेल्या फुलांना आम्ही सुगंधीत आहोत म्हणून तुम्ही आमच्याकडे या आणि सुगंध घ्या असं कधीच म्हणावं लागतं नाही.आपोआपच सुगंध असणा-या फुलांकडे लोक आकर्षित होतात. त्याचप्रमाणे सज्जन माणसे कधीच कुणाला म्हणत नाहीत की,तुम्हीआमच्याकडे आमच्या सहवासात या आणि आमचे सद्गुण घ्या. आपोआपच सर्वसामान्य माणसे सज्जनांच्या सहवासात जाऊन आपल्यातील असलेल्या दुर्गुणावर मात करुन सद्गुणी होण्याचा प्रयत्न करतात.तात्पर्य असा की सद्गुणांचा सहवास हाच दुर्गुणावर मात करु शकतो.त्यासाठी आपली मानसिकता असावी लागते.© व्यंकटेश काटकर,नांदेडसंवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *त्‍यागाचे महत्‍व*फार वर्षापूर्वी एक स्‍वाभिमानी राजा होऊन गेला. त्‍याचे राज्‍य मोठे होते आणि अपार संपत्तीने खजिना भरलेला होता. त्‍याचे महाल सोन्‍यापासून बनलेले होते. नोकरचाकरांची रेलचेल होती. मात्र त्‍याचे सल्‍लागार त्‍याच्‍या अहंकाराला प्रोत्‍साहन देत होते. एकदा त्‍याच्‍या दरबारात एक तेज:पुंज साधू आला. राजाला पाहूनच त्‍याने ओळखले की राजाला फार गर्व चढला आहे. राजाने मोठ्या तो-यात विचारले,''तुला काय पाहिजे?'' साधू म्‍हणाला,'' राजन, मला तुझ्याकडून काहीच नको आहे. उलट मीच तुला काहीतरी देण्‍यास आलो आहे.'' राजाचा अहंकार दुखावला व राजा मोठ्याने ओरडला,''लहान तोंडी मोठा घास घेतोस. लाज वाटते का नाही. तुझ्याजवळ फुटकी कवडी नाही अन तू मला काय देणार?'' साधू मंद स्मित करत म्‍हणाला,''राजन, त्‍यागाशिवाय भोगाला चव येत नाही. वैभवात जेव्‍हा त्‍याग समाविष्‍ट होते तेव्‍हा तो वंदनीय आणि प्रशंसनीय ठरतो. त्‍याग येताच अहंकार दूर होतो. आसक्ती दूर होते आणि मन परमात्‍म्‍याकडे पोहोचण्‍यासाठी तयार होते.'' फकीराच्‍या राजा खजील झाला आणि त्‍याचे डोळे उघडले. त्‍याने गर्वाचा त्‍याग केला.तात्‍पर्य :- त्‍यागाने अहंकाराचा नाश होतो. अहंकार हा मनुष्‍याचे नुकसान करतो.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in📱 9403046894•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दि. 05/09/2022 वार - सोमवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 .🎇 *दिनविशेष . 🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *शिक्षक दिन*💥 ठळक घडामोडी :-◆२००५ - मंडाला एरलाइन्स फ्लाइट ०९१ हे बोईंग ७३७-२०० प्रकारचे विमान इंडोनेशियातील सुमात्रा बेटावरील दाट वस्तीच्या भागात कोसळले. विमानातील १०४ व जमीनीवरील ३९ व्यक्ती ठार.💥 जन्म :-◆१८८८ - सर्वपल्ली राधाकृष्णन, भारताचे दुसरे राष्ट्रपती.◆१९१० - फिरोझ पालिया, भारतीय क्रिकेट खेळाडू.💥 मृत्यू :-●१९९७ - मदर तेरेसा, समाजसेविका.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *देशातील सामान्य नागरिक गर्तेत अडकला असून, पंतप्रधान मोदी केवळ दोन उद्योगपतींसाठी काम करत आहेत, अशा शब्दात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधलाय.*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *चायनीज लोन अप्लिकेशन प्रकरणी ED ची मुंबईत छापेमारी, 17 कोटी रुपये जप्त*••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *जगाला कळणार भारताची ताकद, येत्या काळात भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनेल*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मुंबईत अवजड वाहनांना प्रवेशबंदी, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाचा निर्णय, आता वाहतूक पोलिसांवरच होणार कारवाई; ई-चलान मशिन ऐवजी खासगी मोबाईल वापरल्यास दंड*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचं कार अपघातात दुर्दैवी निधन, उद्योगविश्वावर शोककळा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले अपघाताच्या चौकशीचे आदेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *औरंगाबाद जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे पिके आडवी*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळण्यात आलेल्या आशिया चषक स्पर्धेच्या सुपर-4 फेरीतील दुसऱ्या सामन्यात भारताला पाकिस्तानकडून पराभव स्वीकारावा लागला.*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *शिक्षकदिन विशेष लेख**बदलत्या काळात शिक्षकांची भूमिका*https://bit.ly/2kiaD5Gलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *काँक्रिट म्हणजे काय ?* 📙एखादी चर्चा चालू आहे. विविध सूचना केल्या जात आहेत. त्यावर फक्त चर्चाच होते आहे. पुन्हा सूचना येतात. पुन्हा चर्चा. अशा वेळी कोणीतरी वैतागून म्हणते, 'काहीतरी काँक्रीट घडू द्या ना !' म्हणजेच मूर्त किंवा साकार असे त्याला सुचवायचे असते.एखादी अत्यंत पक्की, नीट साधलेली, एकत्र बांधलेली गोष्ट म्हणजे काँक्रीट. व्यवहारात गेली सत्तर एक वर्षे काँक्रिट म्हणजे सिमेंट काँक्रिटच होय. सिमेंटचा शोध लागून वापर सुरू झाल्यावर त्यापासून विविध मिश्रणे वापरली गेली. सिमेंट व वाळूचे मिश्रण कायम पक्के राहत नाही. सिमेंट व खडी एकमेकांना बांधून राहत नाहीत. पण सिमेंट, बारीक वाळू, जाड वाळू, खडी यांचे मिश्रण करून त्यात योग्य प्रमाणात पाणी घालून कालवले, तर ते हवे तेवढे पक्के होते. अगदी दगडच म्हणा ना ! याला काँक्रिट किंवा शास्त्रीय भाषेत प्लेन सिमेंट काँक्रीट (PCC) म्हणतात.खूप मोठा भार सहन करण्याचा या काँक्रेटचा गुण बघून त्याचा वापर सुरू झाला. रस्ते बनवणे, विमानांच्या धावपट्टय़ा तयार करणे यांसाठी सिमेंट वापर वापरतात व धरणे बांधताना भिंतीसाठी काँक्रिटचे प्रचंड ठोकळेच वापरतात. एवढेच काय, पण समुद्र हटवण्यासाठीसुद्धा काँक्रिटचे मोठे आकाराचे विविध ठोकळे वापरून फुटणाऱ्या लाटांचा जोर त्यावर येईल, अशी व्यवस्था केली जाते. रेल्वेसाठी रूळ टाकताना जमिनीत जे स्लिपर्स आडवे घातले जातात, तेही गेली काही वर्षे काँक्रिटचेच वापरले जातात. एखाद्या पुलाचा पाया वा एखाद्या अतिउंच इमारतीचा पाया खोदून झाला की, प्रथम त्या खड्ड्यांमध्ये जवळपास फूटभर जाडीचे पीसीसीच ओतले जाते. ते पक्के झाले की मग त्यावर पुढचे काम सुरू होते.आपल्या देशात जवळपास न वापरला गेलेला पण अनेक देशांत उपयोगात आणलेला पीसीसीचा एक वापर म्हणजे अणुबाँब स्फोटापासून वाचवण्यासाठी तयार केलेली सुरक्षाघरे. या सुरक्षाघरांच्या भिंती दोन ते तीन फूट जाडीच्या पीसीसीने बनवतात. छतासाठी व पिलर्ससाठी सुद्धा खास रिएन्फोर्स्ड काँक्रीट (म्हणजे सळ्या घालून ताकद वाढवलेले, ताण सोसू शकणारे) वापरलेले असते. या काँक्रिटच्या जाडीतून रेडिओ उत्सर्जन आत पोहोचू शकत नाही.यासारखा दुसरा एक महत्त्वाचा उपयोग म्हणजे महासत्तांनी तयार केलेली आंतरखंडीय क्षेपणास्त्रे व त्यांवर बसवलेले अण्वस्त्रे सुरक्षित ठेवायला तयार केलेली महाप्रचंड तळघरे. यांना 'सिलो' म्हणतात. यांची बांधणीसुद्धा अशीच तीन तीन फूट जाडीच्या काँक्रिटने केलेली असते. शत्रूच्या क्षेपणास्त्रानेसुद्धा विध्वंस होणार नाही, इतकी पक्की रचना या सिलोंची असते. काँक्रिटच्या पक्केपणाचा महिमा हा असा आहे.*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*“ दुसऱ्याला शिकवीत असतांना माणूस स्वतःला शिकवीत असतो. ”**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1) *'शिक्षक दिन' केव्हा साजरा केला जातो ?* 5 सप्टेंबर2) *शिक्षक दिन कोणाच्या जन्म दिवसानिमित्त साजरा केला जातो ?* डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन3) *जगात किती देशात शिक्षक दिवस साजरा केला जातो ?* 1004) *भारतात कोणत्या वर्षी प्रथम शिक्षक दिवस साजरा केला गेला ?* 19625) *डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म केव्हा झाला ?* 5 सप्टेंबर 1888*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••● सौरभ सुरेश सावंत, नांदेड● नितीन शिंदे● रत्नाकर चिखले● राजकुमार काळे● रत्नजित पाटील पटारे● धोंडोपंत मानवतकर● लक्ष्मीनारायण येरकलवार● नरेश रेड्डी● पांडुरंग बोमले*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*गरीब माणसाला घरापासून दूर राहून पोटाच्या चार घासासाठी प्रचंड मरमर करावी लागते. पण पैशावाल्याच्या बाबतीत हे होत नाही. "एका बसल्या ठिकाणी त्याचा व्यापार चालतो. त्याला घर सोडून कुठेही जावं लागत नाही." गरीबाला एका वस्तूसाठी पैशाअभावी कुढत मरावं लागतं. शेवटपर्यंत ती वस्तू मिळेलच असं होतं नाही. पण "श्रीमंताला मात्र पाहिजे असणारी कोणतीही वस्तू रानावनातच काय या पृथ्वीतलावर कुठंही असली तरी पैशाच्या जोरावर मिळवणं सोपं असतं आणि वस्तू कोणतीही असू द्या, कितीही अनमोल असू द्या, कितीही महत्वाची असू द्या, शक्यतो जास्तीचे पैसे देऊन मिळवता येणार नाही, इतकी ती अवघड नसतेच." थोडे जास्त पैसे देऊन अति मौल्यवान वस्तुसुद्धा पैश्यावाल्याला सहज मिळवता येते.**म्हणून, पैसा माणसाच्या आयुष्यात यासाठी महत्वाचा आहे. पैसा वाईट मार्गाने कमवायचा तर नाहीच, पण चांगल्या मार्गाने खूप पैसा कमवून तो वाईट मार्गावर खर्च सुद्धा नाही करायचा. चांगल्या मार्गाने कमावलेला खूप पैसा 'आनंदी आणि सुखकर आयुष्य' जगण्यासाठी खर्च करायचा आहे. पैशाचा लोभ नाही आणि तिरस्कारही नाही. त्याची हाव नको आणि त्याच्याविषयी विरक्ती नको. पैसा कमवताना आनंदाने कमवायचा तसाच तो खर्च करतानासुद्धा जीवनात आनंदच असला पाहिजे. एवढा सुंदर असा 'मध्यम मार्ग' संतानी आपल्याला दिला आहे..* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●••🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱 *संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल- 9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌟! ! *काव्यांगण - रोज एक कविता* ! !🌟•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*गुरू देव*मुलांना देउनी आत्मज्ञानजागरूक त्यांना बनवीशिक्षणाने होतो विकासगुरुजीं सदा हेच शिकवीजगण्याची रीत कळतेशत्रू असो की दानव गुरुच्या संपर्कात येऊन बनतात सर्वच मानवगुरु शेवटी गुरु असतोत्याला जगात नाही तोडत्यांचे बोलणे ऐकलो नाहीजीवनाला मिळते वेगळे मोडप्रत्येकाला असतो गुरुत्याविना मिळत नाही यशआपल्या थोड्या अज्ञानामुळेआपणांस कोणीही करतो वशम्हणून गुरुला देव मानूनीसदा त्यांची सेवा करूशिक्षकदिनाच्या निमित्तानेसदविचाराची कास धरु© नासा येवतीकर, कन्या शाळा धर्माबाद, जि. नांदेड 9423625769•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••सर्वसामान्य माणसाच्या जीवनात मागचे दिवस आठवले की,अंगावर रोमांच उभे राहतात आणि भूतकाळ जसा एखाद्या चित्रपटातील क्रमाक्रमाने प्रसंग आठवायला लागतात.असे प्रसंग पुन्हा आपल्यासमोर उभे राहू नये म्हणून तो मागच्या प्रसंगातून काहीतरी शिकतो आणि म्हणतो पुन्हा असे दिवस माझ्या नशिबाला येऊ नयेत.भूतकाळही आपला एक समर्थ गुरूच असतो.जी झालेली चूक पुन्हा होऊ नये याची वारंवार सूचना करत असतो.विचारी माणूस मागच्या आठवणी जाणून पुढे पाऊल टाकत असतो. जर का असे नाही केले तर पुन्हा येरे मागचे हाल अशी अवस्था होऊन बसते.ती अवस्था ते प्रसंग येऊ नये असे वाटत असेल तर आपल्या प्रयत्नाने ते नक्कीच दूर करता येतात.आपल्याच हाताने आणि अथक परिश्रमाने ते काळोखी ढग दूर करता येतात.केवळ विचार करून चालणार नाही तर त्याला आपल्या आत्मविश्वासाची आणि प्रयत्नांची सांगड घालावी लागते. त्यामुळे नक्कीच आपले जीवन परिपूर्ण होऊन जाईल. भविष्याचा वेध हा भूतकाळातूनच घेता येतो आणि जीवन समृद्ध करता येते.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद ९४२१८३९५९०/८०८७९१७०६३.🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *ज्ञानाचा दिवा सतत तेवत ठेवा*द्रोणाचार्य जेंव्हा गुरुकुलामध्ये वर्गात कौरव आणि पांडवांना शिकविण्यासाठी गेले तेंव्हा ते अत्यंत प्रसन्न होते. द्रोणाचार्य स्वतः परम गुरु होते. मात्र त्यांना एका दिव्य ज्ञानाचा अनुभव आला होता. आणि तोच त्यांच्या सर्व अस्तित्वातून अभिव्यक्त होत होता. वर्गात गुरुदेव आल्याबरोबर त्यांनी तोच अनुभव विद्यार्थ्यांना सांगितला. त्यांनी सांगितले कि काल रात्री एक अशी घटना घडली कि, अर्जुन आश्रमात भोजन करीत होता. बाकी विद्यार्थ्यांचे भोजन आटोपले होते. रात्र बरीच झाली होती. अर्जुन एका दिव्याच्या प्रकाशात भोजन करत होता. अचानक हवेची झुळूक आली आणि दिवा विझला. मात्र त्यानंतरही अर्जुन भोजन करत राहिला.अंधारातही त्याला भोजन करण्यास बाधा वाटली नाही. भोजन पूर्ण झाले आणि अर्जुन उठला आणि धनुर्भ्यास करू लागला. गुरुनी पुढे सांगितले, बाणांचा आवाज ऐकून मी बाहेर आलो तेंव्हा अर्जुनाने मला सांगितले कि भोजनादरम्यान मला अंधाराचे काही वाटले नाही तसेच बाण चालवितानाही मला अंधाराचा अडसर आला नाही. बघा गुरुवर्य ! आपल्या कृपेमुळे मला अंधारातही बाण लक्ष्यापर्यंत पोहोचविता येत आहेत. गुरुजी म्हणाले,"अर्जुनाचा हा प्रयत्न अनुकरणीय आहे. दिवा फक्त उजेडाचा प्रसार करतो पण अंधारात मात्र ज्ञानाच्या दिव्याने, हृदयातील आत्मज्योतीने जर सराव केला तर कोणतेच काम अशक्य नाही."तात्पर्य :- सरावानेच माणूस लक्ष्य प्राप्त करू शकतो. एक विशिष्ट उंची गाठण्यासाठी, यश प्राप्तीसाठी अंतरीच्या ज्ञान ज्योतीला जागृत करणे गरजेचे आहे.ज्ञानारुपी दिवा नेहमी तेवत ठेवत राहणे.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in📱 9403046894•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दि. 03/09/2022 वार - शनिवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 🎇. *दिनविशेष . 🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••💥 ठळक घडामोडी :-◆ १९७१-कतारला स्वातंत्र्य मिळाले.◆ १९१६-अँनी बेझंट यांनी 'होमरूल लीग 'ची स्थापना केली.💥 जन्म :-● १९६५ - चार्ली शीन, अमेरिकन अभिनेता.● १९७६ - विवेक ओबेरॉय, हिंदी चित्रपट अभिनेता.💥 मृत्यू :-● १९६७ - अनंत हरी गद्रे, मराठी समाजसुधारक.● १९९१ - फ्रँक काप्रा, अमेरिकन चित्रपट दिग्दर्शक.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *जगाला कळणार 'मेड इन इंडिया'ची ताकद, पहिली स्वदेशी युद्धनौका आयएनएस विक्रांत नौदलात सामील, भारतीय नौदलाला मिळाला नवा झेंडा; पंतप्रधान म्हणाले, 'हा ध्वज शिवरायांना समर्पित'*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *दसरा मेळाव्याकरता शिंदे गटाकडून अखेर मुंबई महापालिकेत परवानगीचा अर्ज, शिवाजी पार्क मैदानासाठी सदा सरवणकरांकडून अर्ज दाखल*••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *पटसंख्येच्या तुलनेत राज्यात शिक्षकांची संख्या अधिक, सुविधा असतानाही शिक्षणाचा दर्जा का सुधारत नाही ? प्रशांत बंब यांचा सवाल*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *BMC निवडणुकीत नवीन समीकरण ? केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यात राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मान्सूनचा परतीचा प्रवास लांबला, सप्टेंबर महिन्यातही जोरदार पाऊस; IMD ने वर्तवला सुधारीत अंदाज*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *महाराष्ट्रात पुन्हा वादळ उठणार, आता काँग्रेसचा गट फुटणार ? देवेंद्र फडणवीस आणि अशोक चव्हाणांच्या भेटीनं राजकीय चर्चांना उधाण; भेटीत राजकीय चर्चा झाली नसल्याचं अशोक चव्हाण याचं स्पष्टीकरण*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *आशिया चषक स्पर्धेत पाकिस्तानने हाँगकाँगला पराभूत करत सुपर 4 मध्ये मिळवली एन्ट्री ज्यामुळे आता पुन्हा एकदा भारत विरुद्ध पाकिस्तान हा हायवोल्टेज सामना रविवारी पार पडणार आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••कै. सायन्ना गुरुजी येवतीकर यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त राज्यस्तरीय*ऍक्टिव्ह टीचर्स अवॉर्ड 2022* http://nasayeotikar.blogspot.com/2022/09/active-teachers-award-2022.htmlसर्व विजेत्यांचे मनस्वी अभिनंदन .......!________________________•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••*Telling the time👇**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/Np63m86Rvu4~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *कार्बनचक्र म्हणजे काय ?* 📙पृथ्वीवरील प्रत्येक सजीवामध्ये कार्बनचे अस्तित्व आहे. मात्र वातावरणातील कार्बन डायऑक्साइड वायूचे प्रमाण अत्यल्प आहे. प्राणवायूशिवाय कोणताच सजीव जगात नाही, हे आपल्याला माहीत आहेच. हवेतील प्राणवायू कायम राखण्याचे महत्त्वाचे काम वनस्पती करत असतात. हे काम जर झाले नसते, तर वातावरणातील प्राणवायू कधीच संपला असता. रात्रंदिवस वनस्पती हे जे काम करत असतात, त्यातून कार्बनचक्र अव्याहत चालू राहते. क्लोरोफिल या हिरव्या द्रव्याचा या प्रक्रियेत महत्त्वाचा भाग असतो. बहुतांश वनस्पती क्लोरोफिलचा वापर करून स्वतःचे अन्न तयार करतात. जमिनीतून मिळवलेले पाणी व अन्य अनेक रसायने यांचा यासाठी वापर होतो. मुख्यत: शर्करा तयार करताना वनस्पती सूर्यप्रकाशाचा दिवसा उपयोग करून घेतात. या क्रियेत वनस्पती हवेतील कार्बन डायऑक्साइड शोषून घेतात. ही क्रिया पुढील प्रमाणे होते -Energy + 6H2O ⬆ 6CO2 »» C6H12O6 + 6O2 ⬆यातून ग्लुकोज तयार होऊन तिचा वनस्पती वापर करतात व हवेमध्ये ऑक्सिजन बाहेर टाकला जातो. रात्रीच्या वेळी मात्र सूर्यप्रकाशाचा अभाव असल्याने ही क्रिया घडत नाही. फक्त वनस्पतींचे श्वसन चालू राहते. त्यात प्राणवायू आत घेतला जाऊन कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो. वनस्पतींच्या वाढीसाठी लागणारा कार्बन प्रकाश संश्लेषण क्रियेद्वारेच मिळवला जातो. वनस्पतींच्या फांद्या, खोड, पाने बनवण्यात कार्बनचा मोठा वाटा असतो.वनस्पतीचे आयुष्य संपल्यावर शिल्लक राहतो, तो कार्बनचाच मोठा भाग असतो. मात्र हवेतील प्राणवायूचे प्रमाण कायम राखण्यात या सार्‍या प्रक्रियेचा मोठा वाटा असतो.*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*“ इतिहास हा काळाचा साक्षीदार असतो आणि सत्याचा प्रकाश असतो. ”**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) महाराष्ट्राचे कृषिमंत्री कोण आहेत?२) एका वन-डे सामन्यात सर्वाधिक विकेट कोणी घेतले ?३) पृथ्वीवर पूर्व -पश्चिम दिशेत असलेल्या काल्पनिक आडव्या रेषाना काय म्हणतात ?४) लष्करावर खर्च करण्यात जगात भारताचा कितवा क्रमांक लागतो ?५) ९० अंश मापाच्या कोनाला काय म्हणतात ?उत्तरे :- १) अब्दुल सत्तार २) चामिंडा वास, श्रीलंका ( ८ बळी ) ३) अक्षवृत्ते ४) तिसरा ५) काटकोन *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••● सौ. शिवकांता बिज्जेवार, नांदेड● महेंद्र सोनेवाने, साहित्यिक, गोंदिया● आशिष हातोडे● राज कुमारे● प्रदीप पंदिलवाड● भिमराव सोनटक्के*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*"जो घाबरतो तो वाया जातो. पाण्यात पडल्यावर जो संयम ठेवत नाही, तो शेवटी गटांगळ्या खातो." 'बी' पेरलं की लगेचंच त्याचं झाड तयार होऊन त्याची फळं खायला मिळावीत, एवढा उतावीळपणा असणारी काही माणसं पाहायला मिळतात. पण असं होत नाही, उलट असं न झाल्याचं दुःखं मात्र नक्की होत असतं. म्हणून कोणत्याही कामात माणसानं संयम राखणं आवश्यक आहे. दुःखं कितीही मोठं असलं तरी 'काळ' हा त्यावर इलाज आहे. पण त्यासाठी काही वेळ जाऊ देण्याची वाट मात्र पहावी लागते. तेवढी वेळ जाऊ देण्याइतका संयम माणसाला ठेवावा लागतो. दुःखात व्यसनाच्या आहारी जाणे किंवा आत्महत्या करून घेणे, या गोष्टी माणसाच्या हातून घडतात.**याबरोबरच कामात प्रचंड घाई करणारी माणसंसुद्धा पाहायला मिळतात. 'अति घाई, संकटात नेई' असं रस्त्यावरील फलकांवर वाचायलाही मिळते. विशाल वटवृक्षाची सुरुवात एका छोट्याशा कोंबापासून होते. जर हे "उगवलेलं कोंब मध्यातच वाळून गेलं तर ते वाया जातं. त्याप्रमाणं 'उतावीळ' माणसाची बुद्धी वाया जाणारीच समजावी. "कोंब वाळल्यावर जसं त्याचा वटवृक्ष बनणार नाही हे आपल्याला कळतं, तसं उतावीळपणा केल्यानं काम पूर्ण होणार नाही, हेही आपण समजून घेतलं पाहिजे.* ••● ‼ *रामकृष्णहरी* ‼ ●•• 🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌟! ! *काव्यांगण - रोज एक कविता* ! !🌟•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*कविता - स्पंदने*-----------जमाना बदलला म्हणेआता काॅम्पुटर आला.....कामं व्हायला लागलीत पटपटपण जिवंत हाताला कामचउरलं नाही.....बेकारांचे कारखाने मात्र निर्माणहोतायतं क्षणाक्षणाला...दारिद्र्यांचे आक्रोशमाॅनिटरमध्ये साचत नाहीतआणि वात्सल्याची स्पंदनंकि बोर्ड मध्ये नाचत नाहीत..,म्हणे आम्ही ग्लोबल झालो...शेजार्‍यांच्या अंत्ययात्रे दिवशीदार लावून घेणारी संस्कृतीनिर्माण झाली या तंत्रज्ञानामुळं...तुम्ही कितीही पुढे जा,पण..आईच्या दूधानं तृप्त झालेल्यालेकराचा ढेकरातील आनंदमोजण्याचं यंत्र तुम्हीशोधू शकणार नाहीहे मात्र नक्की.....-आबासाहेब निर्मळे.नविन वसाहत पेठ वडगांव,ता.हातकणंगले जि.कोल्हापूर.9028090266.•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••काही लोकांच्या बाबतीत पैसा म्हणजे सर्वस्व आहे आणि पैशामुळे काहीही मिळवता येते.पैशामुळे तुम्हाला तुमच्या भौतिक सुविधा मिळवता येतात परंतु इतरांचे मन मिळवता येत नाही.इतरांचे मन जिंकायचे असेल तर या ठिकाणी पैसा चालत नाही.त्यासाठी हवे तुमचे उदार अंतःकरण,तुमची दुस-याबद्दलची आत्मियता,प्रेम इतरांना दिलात तर तेही तुमच्यावर अधिक प्रेम करायला लागतील.यासाठी तुमच्या जवळ असलेल्या पैशाची गरज नाही.एवढे सत्य आहे पैशाने सारे काही खरेदी करता येईल पण जगात असलेल्या सर्व जीवांचे मन आणि प्रेम कधीच खरेदी करता येत नाही.मग तुमच्या जगण्याला काय अर्थ आहे ?© व्यंकटेश काटकर, नांदेड९४२१८३९५९०/८०८७९१७०६३ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *योग्य निर्णय*एक कुंभार मातीची चिलम बनवित होता. चिलमचा आकार केला सुध्दा ... पण थोड्याच वेळात त्याने तो आकार बदलला..मातीने विचारले, अरे कुंभार दादा, तु छान चिलीम बनविली होती. मग का परत बदल केला?कुंभार म्हणाला, मी चिलम बनवत असताना माझी मति बदलली आणि घागर बनविण्याचा निर्णय घेतला.मातीने म्हणाली, कुंभार दादा, तुमची मति बदलल्या मुळे, माझे जीवनपण बदलले,मी चिलम झाले असते तर मी ही जळाले असते आणि दुसऱ्यांना ही जाळले असते ! आता मी घागर झाल्यावर मी ही शीतल राहिल आणि इतरांना ही शीतलता देइल.*तात्पर्य : जीवनात सुयोग्य निर्णय घेतल्यास, आपल्याला ही आनंद मिळतो आणि आपल्या मुळे इतरांना ही आनंद मिळतो.**संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in📱 9403046894•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दि. 02/09/2022 वार - शुक्रवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 🎇. *दिनविशेष . 🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••💥 ठळक घडामोडी :-★ १९४५ - जपानी आत्मसमर्पणाचा करारनामावर स्वाक्षरी करुन (चित्रीत) औपचारिकपणे दुसरे महायुद्ध समाप्त झाले.★ १९४६ - भारताचे अंतरिम सरकार स्थापन झाले.★ २००८ - गूगल ने गूगल क्रोम हे आंतरजाल न्याहाळक सुरु केले.💥 जन्म :-★ १८५३ - विल्हेल्म ऑस्टवाल्ड, नोबेल पारितोषिक विजेता जर्मन रसायनशास्त्रज्ञ.★ १९५२ - जिमी कॉनोर्स, अमेरिकेचा टेनिस खेळाडू.★ १९६६ - सलमा हायेक, मेक्सिकोची अभिनेत्री.★ १९८८ - इशांत शर्मा, भारतीय क्रिकेट खेळाडू.💥 मृत्यू :-★ १९६९ - हो चि मिन्ह, व्हियेतनामचा राष्ट्राध्यक्ष.★ १९७३ - जे.आर.आर. टॉल्कीन, इंग्लिश लेखक.★ २००९ - वाय.एस. राजशेखर रेड्डी, आंध्र प्रदेशचा मुख्यमंत्री.★ २०११ - श्रीनिवास खळे, मराठी संगीतकार‎*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *सर्वसामान्यांना दिलासा! इंडियन ऑईलनं १९ किलोच्या व्यवसायिक गॅस सिलिंडरच्या दरात १०० रुपयांपर्यंत कमी केली आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *गर्भाशयाच्या कर्करोगावर पहिल्या स्वदेशी लसीचं सीरम इन्स्टिट्यूटकडून लाँचिंग, गर्भाशयाच्या कर्करोगावरील लसीची किंमत 200 ते 400 रुपये असण्याची शक्यता : अदर पुनावाला*••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *2024 मध्ये सत्तेवर यायचंय, शिवसेनेसोबतच्या युतीनंतर संभाजी ब्रिगेड कामाला, मराठा सेवा संघात मोठे बदल*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *आमदार प्रशांत बंब यांचा नवा बॉम्ब; शिक्षक, पदवीधर मतदारसंघ बंद करण्याची मागणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *महाराष्ट्रात आत्तापर्यंत सरासरीपेक्षा 18 टक्के अधिक पाऊस, नाशिकसह वर्धा जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *राज ठाकरेंची केवळ सदिच्छा भेट, कोणतीही राजकीय चर्चा नाही, एकनाथ शिंदे यांची स्पष्टोक्ती*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *टीम इंडिया आणि अफगाणिस्तान संघानं आशिया चषकाच्या सुपर 4 मध्ये आपलं स्थान केलं पक्कं केलं*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••*Learn Wild animals जंगली प्राण्यांची ओळख👇**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/LR9yPbGBL2E~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• गणेशोत्सव 2022 निमित्ताने पहिल्या चारोळी लेखन स्पर्धेचे परीक्षण श्री अरविंद कुलकर्णी, पुणे यांनी केले आहे आणि विजेती चारोळी आहे आई ज्याची पार्वतीपिता ज्याचा महेशमूषकावर बसून आलाआपला लाडका गणेश !दर्शन जोशी, संगमनेर7972849435अभिनंदन ! अभिनंदन !~~~~~~~~~~~~~~~~~~~*गणेशोत्सव - 2022 निमित्ताने*दुसरी स्पर्धा - मोदक विषयावर चारोळी लिहा आणि बक्षीस जिंकाhttps://www.facebook.com/100003503492582/posts/5131314210328645/चारोळी लिहिण्यासाठी वरील लिंकवर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ संयोजक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *कावीळ म्हणजे काय ?* 📙कावीळ किंवा कामला हा एक स्वतंत्र विकार मानण्यापेक्षा ते एक रोगलक्षण मानणे सयुक्तिक आहे. यकृतातून बाहेर जाणाऱ्या पित्तरसापेक्षा अधिक पित्तरस यकृतात तयार होऊ लागला म्हणजे कावीळ होते. जास्तीचा शिल्लक राहिलेला पित्ताचा भाग रक्तात मिसळला जातो व सर्व शरीरभर पसरतो. यातूनच डोळ्यांचा पांढरा भाग पिवळा दिसू लागतो. त्वचेचा रंग पिवळसर होऊ लागतो. लघवी पिवळी होते व तीव्र काविळीत लालसर पिवळी दिसते. पित्त यकृतातून बाहेर पडताना पित्तनलिकेत किंवा प्रत्यक्ष यकृतांतर्गत अडथळा निर्माण झाला, तर शौचास पांढरेफिके होऊ लागते.कावीळ हे यकृतविकृतीचे किंवा रक्तातील तांबड्यापेशी जास्त नाश पावत असल्याचे चिन्ह होय. या रोगाचे निदान मुत्रपरीक्षेतून व रक्ताच्या चाचण्यांतून होते. नवजात बालकाला रक्तपेशींचे दान निसर्गाने जरा सढळपणे दिलेले असते. त्यामुळे जन्मानंतर काही दिवसांतच या जास्तीच्या पेशी नाश पावतात व मंद स्वरूपात कावीळ उद्भवते. पण ती आपोआपच थोड्याच दिवसांत नाहीशी होते. क्वचित ती तीव्र स्वरूपात व अगदी पहिल्या दुसऱ्या दिवशीच दिसल्यास त्या बालकाला फोटोथेरपी हा अल्ट्राव्हाॅयलेट किरणांचा उपचार दिला जातो. हिमोलायटिक ऍनिमिया या रक्तक्षयाच्या आजारातही रक्तपेशींचा नाश होत असल्याने कावीळ होते. मूळ कारण दूर झाल्यास ती बरी होते.आपण सहसा काविळीचा रुग्ण पाहतो, तो विषाणूजन्य पाण्यातून झालेल्या संसर्गाचा बळी असतो. तोंडावाटे पाण्यातून हे विषाणू शरीरात प्रवेश करतात व त्यामुळे यकृताला सूज येते, कार्यात अडथळा होतो. यकृताचे तांबड्या रक्तपेशी नष्ट करण्याचे काम नीट न झाल्याने कावीळ दिसू लागते. मळमळ, ओकारी, भूक मंदावणे, गुबारा धरणे, शरीराला कंड सुटणे, मलावरोध ही लक्षणे प्राधान्याने सर्वच रुग्णांत दिसतात. डोळ्यांचा, त्वचेचा व मूत्राचा रंग पिवळा होतो, तर शौचास पांढरट चिकणमातीसारखे होऊ लागते. पचनास आवश्यक पित्तरसाचा अभाव झाल्याने ही लक्षणे दिसतात. सामान्यपणे पाच ते दहा दिवसांत हा आजार बरा होतो.दुसऱ्या प्रकारच्या काविळीत म्हणजे रक्ताद्वारे संसर्ग होणाऱ्या काविळीत विषाणू एकाच्या रक्तातून दुसऱ्याच्या शरीरात प्रवेश करतात. इंजेक्शनच्या सुया, शस्त्रक्रियेच्या सुया वा रक्त यांच्याशी सतत संपर्क येणाऱ्या सिस्टर, डॉक्टर यांसारखी व्यक्ती, सर्जन यांना हा संसर्ग होण्याची शक्यता असते. ही कावीळ तीव्र स्वरूपाची असून बरी व्हायला खूप वेळ लागतो. काही वेळा यकृतदाह होऊन यकृताचे काम कायमचेच मंदावत जाते. यालाच 'लिव्हर सिर्‍हाॅसिस' असे म्हणतात. सिर्‍हाॅसिसमध्ये यकृत आक्रसत जाऊन त्याचे काम बंद पडत जाते. हा एक गंभीर रोग आहे. सध्या काविळीची लस (हेपॅटायटिस बी) टोचली जाते, ती या प्रकारच्या काविळीला प्रतिबंध करते. या प्रकारच्या काविळीवर उपचार नसल्याने प्रतिबंध हाच योग्य उपाय तर ठरतो.अंथरुणात पडून पूर्ण विश्रांती, तोंडावाटे भरपूर शर्करायुक्त पेयद्रव्ये, हलका कर्बयुक्त आहार घेतल्यास सर्वसामान्य कावीळ आपोआप नियंत्रणात येते. तीव्र लक्षणांत शिरेवाटे ग्लुकोज सलाईन देऊन रुग्णाच्या पचनसंस्थेला आराम देऊन मदत केली जाते.कावीळ हा विषाणूजन्य आजार असल्याने रुग्णाशी संपर्क आल्यास हात स्वच्छ धुणे, त्याची भांडी, अंथरूण, कपडे यांची वेगळी व्यवस्था करणे व अन्य लोकांनी पाणी उकळून पिणे हा प्रतिबंधाचा महत्त्वाचा मार्ग असतो.शेवटी पण महत्त्वाचे, काविळीची लक्षणे व प्रत्यक्ष संसर्ग होण्याची कारणे जरी दूर झाली, तरी रुग्णाच्या डोळ्यांचा रंग काही आठवडे पिवळसर राहतो व हळूहळू नेहमीसारखा होतो.*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*A positive attitude can overcome a negative situation.** ( सकारात्मक दृष्टीकोनाने नकारात्मक परिस्थितीवर मात करू शकते. )**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••● राजाराम राठोड, शिक्षक, नांदेड● प्रवीण इंगळे● शरद शेळकांडे, जुन्नर● विठ्ठल पाटील● किशोर तळोकार साहित्यिक, अमरावती● अनुजा देशमुख, साहित्यिक, नाशिक● रवी भलगे*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*"जो घाबरतो तो वाया जातो. पाण्यात पडल्यावर जो संयम ठेवत नाही, तो शेवटी गटांगळ्या खातो." 'बी' पेरलं की लगेचंच त्याचं झाड तयार होऊन त्याची फळं खायला मिळावीत, एवढा उतावीळपणा असणारी काही माणसं पाहायला मिळतात. पण असं होत नाही, उलट असं न झाल्याचं दुःखं मात्र नक्की होत असतं. म्हणून कोणत्याही कामात माणसानं संयम राखणं आवश्यक आहे. दुःखं कितीही मोठं असलं तरी 'काळ' हा त्यावर इलाज आहे. पण त्यासाठी काही वेळ जाऊ देण्याची वाट मात्र पहावी लागते. तेवढी वेळ जाऊ देण्याइतका संयम माणसाला ठेवावा लागतो. दुःखात व्यसनाच्या आहारी जाणे किंवा आत्महत्या करून घेणे, या गोष्टी माणसाच्या हातून घडतात.**याबरोबरच कामात प्रचंड घाई करणारी माणसंसुद्धा पाहायला मिळतात. 'अति घाई, संकटात नेई' असं रस्त्यावरील फलकांवर वाचायलाही मिळते. विशाल वटवृक्षाची सुरुवात एका छोट्याशा कोंबापासून होते. जर हे "उगवलेलं कोंब मध्यातच वाळून गेलं तर ते वाया जातं. त्याप्रमाणं 'उतावीळ' माणसाची बुद्धी वाया जाणारीच समजावी. "कोंब वाळल्यावर जसं त्याचा वटवृक्ष बनणार नाही हे आपल्याला कळतं, तसं उतावीळपणा केल्यानं काम पूर्ण होणार नाही, हेही आपण समजून घेतलं पाहिजे.* ••● ‼ *रामकृष्णहरी* ‼ ●•• 🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌟! ! *काव्यांगण - रोज एक कविता* ! !🌟•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*शेवटी निसर्गच राजा!!*🙏😊🙏😊🙏😊🙏मुग सोयाबिन फुलतोय,चारा झोकात डूलतोय !मका ही होऊन ताठ,पावसाची पहातोय वाट!!स्वयंघोषित जल तज्ञांची,मिटवली त्याने खाज!यंदा भरपूर पावसाचे,खोटे ठरले सारे अंदाज!!कितीही वापरा यंत्रणा,ठेवा लक्ष अष्टो प्रहरी!वाडवडिलांनी सांगून ठेवलंय,निसर्ग आहे लहरी!!शास्त्रज्ञ समजती बाप स्वत:ला,पण तो तर आहे आजा!आपण पामर असह्य बापुडे,आणि निसर्ग आहे राजा!! *राजेंद्र नारायणे* 9850608131•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••सर्वसामान्य माणसाच्या जीवनात मागचे दिवस आठवले की,अंगावर रोमांच उभे राहतात आणि भूतकाळ जसा एखाद्या चित्रपटातील क्रमाक्रमाने प्रसंग आठवायला लागतात.असे प्रसंग पुन्हा आपल्यासमोर उभे राहू नये म्हणून तो मागच्या प्रसंगातून काहीतरी शिकतो आणि म्हणतो पुन्हा असे दिवस माझ्या नशिबाला येऊ नयेत.भूतकाळही आपला एक समर्थ गुरूच असतो.जी झालेली चूक पुन्हा होऊ नये याची वारंवार सूचना करत असतो.विचारी माणूस मागच्या आठवणी जाणून पुढे पाऊल टाकत असतो. जर का असे नाही केले तर पुन्हा येरे मागचे हाल अशी अवस्था होऊन बसते.ती अवस्था ते प्रसंग येऊ नये असे वाटत असेल तर आपल्या प्रयत्नाने ते नक्कीच दूर करता येतात.आपल्याच हाताने आणि अथक परिश्रमाने ते काळोखी ढग दूर करता येतात.केवळ विचार करून चालणार नाही तर त्याला आपल्या आत्मविश्वासाची आणि प्रयत्नांची सांगड घालावी लागते. त्यामुळे नक्कीच आपले जीवन परिपूर्ण होऊन जाईल. भविष्याचा वेध हा भूतकाळातूनच घेता येतो आणि जीवन समृद्ध करता येते.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद ९४२१८३९५९०/८०८७९१७०६३.🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *लोभी माणूस*एका लोभी माणसाने आपला सगळा पैसा शेतात पुरून ठेवला होता. तेथे दिवसातून दोन वेळा जाऊन त्या पुरलेल्या जागेकडे पाहून तो मोठे समाधान मानीत असे. ते त्याचे वागणे त्याच्या नोकराने पाहिले व त्याने तर्क केला की, आपला मालक या जागेकडे नेहमी पाहतो, तेव्हा तेथे काहीतरी पुरलेले असावे. रात्री त्याने तेथे जावून खणून पाहिले तर आत बरेच धन त्याला दिसले. ते घेऊन तो पळून गेला. दुसर्‍या दिवशी तो लोभी माणूस नेहमीप्रमाणे तेथे येऊन पाहतो तर सगळे धन चोरीला गेलेले त्याला दिसले. मग तो डोके बडवून घेत रडू लागला. तेव्हा त्याचा शेजारी त्याच्याजवळ येऊन रडण्याचे कारण विचारू लागला. लोभी माणसाने घडलेली हकीकत त्याला सांगितली. ते ऐकून शेजारी म्हणाला, ''अरे मला वाटते की तसे तुझे काहीच गेले नाही. आपला पैसा येथेच आहे, असे समजून तू पूर्वीप्रमाणेच या जागेकडे पहात जा म्हणजे झाले.''तात्पर्य : लोभी माणसे पैसे असून दारिद्र्यी व अशांना पैश्यांचा उपयोग न होता दुसरेच कोणीतरी त्याचा उपयोग करून घेतात. जवळ असलेला पैसा वापरायचा नाही तर तो चोरीला गेल्यावर शोक करण्यात काय अर्थ?*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in📱 9403046894•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~