✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🎇 दि. 10/09/2022 वार - शनिवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 🎇 . *दिनविशेष . 🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••💥 ठळक घडामोडी :-★ १९६६ - भारतीय संसदेने पंजाब पुनर्रचना कायद्याला संमत केला व पूर्व पंजाबचे (नकाशा चित्रीत) विघटन होऊन पंजाब व हरियाणा अशी दोन राज्ये आणि चंदिगढ केंद्र शासित प्रदेश अस्तित्त्वात आले.★ १९७४ - गिनी-बिसाउला पोर्तुगालपासून स्वातंत्र्य.★ १९७५ - व्हायकिंग-२ हे अमेरिकन मानवविरहित अंतराळयान मंगळ ग्रहाकडे झेपावले.💥 जन्म :-★ १४८७ - पोप जुलियस तिसरा★ १८८७ - गोविंद वल्लभ पंत, भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील नेते.★ १९३४ - रॉजर मारिस, अमेरिकन बेसबॉल खेळाडू.★ १९४८ - भक्ती बर्वे, मराठी अभिनेत्री.💥 मृत्यू :-★ १९६४ - पं. श्रीधर पार्सेकर, नामवंत व्हायोलिनवादक*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या! राज्यात दोन वर्षांनंतर विसर्जन मिरवणुकीचा जल्लोष, मुंबईचा राजा, लालबागचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ, ढोलताशाचा गजरात बाप्पाची मिरवणूक*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *नागपूर जिल्ह्यातील चार हजारांवर मतदान केंद्रात मतदार ओळखपत्र आणि आधार कार्डची लिंकिंग रविवारी करण्यात येईल. नागरिकांनी आपल्या बीएलओशी संपर्क साधावा असे आवाहन प्रशासनाने केले आहे.*••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *देशातील 15 राज्यांमध्ये लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव, 75 हजार गायींचा मृत्यू, दूध उत्पादनात घट, लम्पी चर्मरोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी सांगली जिल्ह्यात मनाई आदेश लागू, जनावर बाजार, बैलगाडी शर्यतींवरही बंदी*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *सरकारकडून शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी 3 हजार 501 कोटींची घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांचा कार्यकाळ पूर्ण होत असल्याने मुंबई विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरूपदी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. डी. टी. शिर्के यांची नियुक्ती*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *सात दशकांचा राजेशाही प्रवास संपला, ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचं निधन, भारतात एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भालाफेकपटू नीरज चोप्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा, डायमंड लीग जिंकत ऐतिहासिक कामगिरी, केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्याकडून डायमंड ट्रॉफी जिंकणाऱ्या नीरज चोप्राचं कौतुक*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गौरव गाथा ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मराठवाडा मुक्तीसंग्राम गौरव गाथा*भाग तिसरा - कर्मयोगी साहेबराव देशमुख बारडकरYou Tube Video link 👇🏼https://youtu.be/Pv-TfA8_H7w~~~~~~~~~~~~~~~~~~~*निवेदन :- नासा येवतीकर, विषय शिक्षक, कन्या शाळा धर्माबाद, 9423625769**Subscribe my Channel*~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *‘ओझोन डे’* जीवसृष्टीच्या संरक्षणासाठी निसर्गाने दोन महत्त्वाच्या उपाययोजना करून ठेवल्या आहेत. त्या म्हणजे पृथ्वीभोवती चुंबकीय गोल आणि ओझोनचा थर. यातील चुंबकीय गोल अत्यंत ऊर्जस्व कणांपासून जीवसृष्टीचे रक्षण करतो, तर ओझोनचा थर जीवसृष्टीला धोकादायक असणाऱ्या अतिनील किरणांना भूपृष्ठापर्यंत येऊ देत नाही. हा ओझोनचा थर नसता तर कदाचित पृथ्वीवर जीवसृष्टीच झाली नसती. मात्र, या ओझोनच्या थरालाच वाढत्या प्रदूषणामुळे भगदाड पडले असून, ते दिवसेंदिवस आणखी मोठे होत आहे. त्यामुळे तज्ज्ञांच्या मते, जीवसृष्टीच्या संरक्षणासाठी आता रोजच ‘ओझोन डे’ साजरा करण्याची वेळ आली आहे. भूपृष्ठापासून दहा किलोमीटर अंतरापर्यंतच्या वातावरणाला तपांबर (ट्रोपोस्फिअर) असे नाव आहे. मेघ, वारे, पाऊस, विजांचा चमचमाट, चक्रीवादळे, वगैरे नैसर्गिक घटना याच स्तरात घडतात. तपांबराच्या पुढे ५० कि.मी.अंतरापर्यंतच्या वातावरणाच्या विभागाला स्थितांबर (स्ट्रॅटोस्फिअर) असे म्हणतात. वातावरणातील एकंदर ओझोनपैकी १० टक्के तपांबरात आहे, तर ९० टक्के स्थितांबरात आहे. त्यातही भूपृष्ठापासून १५-३० कि.मी. पट्ट्यात ओझोनचे प्रमाण जास्त आहे. या पट्ट्यात हवेच्या दशलक्ष रेणूंमागे २६८ रेणू ओझोनचे असतात. या ओझोनच्या स्तरामुळेच आपल्या सर्वांचे अतिनील किरणांपासून संरक्षण होते. पारंपरिक स्थितांबर (ओझोन स्तर)ला छिद्र पडण्यास कारणीभूत असणाऱ्या सीएफसी वायूचा वापर वाढला म्हणून हायड्रोफ्लोरोकार्बन (एचएफसी)चा वापर होऊ लागला. त्यातही वेगवेगळे प्रकार असल्याने जागतिक तापमानात वाढ वार्षिक सात टक्क्यांनी वाढली. जागतिक तापमानाचा धोका आणखी वाढला आहे. त्याचीच काळजी घेणे अनिवार्य बनले आहे. त्यामुळे ३६५ दिवसांमध्ये एकदाच ‘ओझोन डे’ साजरा करून हा प्रश्न सुटणार नाही. रोजच हा दिवस साजरा करावा..संदर्भ. डॉ. पी. डी. राऊत. *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*Actions speaks louder than words.**( कृती ही शब्दांपेक्षा/गोष्टी हाकण्यापेक्षा जास्त सांगून जाते. )**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) दिल्लीचे उपमुख्यमंत्री कोण आहेत ?२) अखिल भारतीय फुटबॉल महासंघाला ८५ वर्षात पहिल्यांदाच खेळाडू अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली ?३) शिक्षक असलेले राष्ट्रपतिपदी विराजमान झालेले राष्ट्रपती किती व कोणते ?४) इंग्लंडच्या पंतप्रधानपदासाठी होणारी मतदान प्रक्रिया पूर्ण करणारे पहिले भारतवंशीय कोण ठरले आहेत ?५) संसर्गजन्य किंवा संक्रामक रोगांची उदाहरणे सांगा.*उत्तरे :-* १) मनीष सिसोदिया २) कल्याण चौबे ३) दोन - डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् व द्रौपदी मुर्मू ४) ऋषी सुनक ५) क्षय, कावीळ, अतिसार, पटकी, विषमज्वर इत्यादी *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••◆ समृद्धी नागनाथ चात्रे◆ संतोष पांडागळे◆ ईश्वर यमूल, नांदेड◆ गणेश कोकुलवार, नांदेड◆ नागनाथ शिंदे, नांदेड◆ ज्ञानेश्वर इरलोड◆ प्रवीण भिसे पाटील◆ आकाश गाडे◆ राजू सूर्यवंशी◆ रोहित मुडेवार◆ संभाजी साळुंके◆ विजय गड्डम◆ प्रसाद पुदेवाड◆ राजेश बाबुराव चिटकूलवार◆ विश्वांभर पपुलवाड*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*सर सी.व्ही.रमण एकदा भौतिकशास्त्राच्या संशोधक पदासाठी मुलाखती घेत होते. मुलाखती संपवून निघताना एक विद्यार्थी त्यांना तिथंच घुटमळताना दिसला. नोकरीसाठी नाकारला गेलेला तो तरूण येरझारा मारताना पाहून सर रमण रागावले. त्याच्या हेतूबद्दल शंका येऊन रमण यांनी त्याला फटकारलं. तो तरूण नम्रतेने म्हणाला,'सर, गैरसमज करून घेऊ नका. नोकरी मिळावी म्हणून वशिला लावण्यासाठी मी थांबलो नाही. आपल्या कार्यालयाकडून येण्या-जाण्याचं भाडं चुकून आधिक मिळालं आहे. ते परत करण्यासाठी मी संबंधीत बाबूला शोधत आहे.**त्याचे हे विचार ऐकून सर रमण प्रभावित झाले. त्यांना सुखद धक्का बसला आणि ते म्हणाले,'मित्रा, तुझं भौतिकचं ज्ञान कमी आहे. प्रयत्नानं ते वाढवता येईल. पण तुझ्या अंतरीचा प्रामाणिकपणा दुर्लभ आहे. पुस्तकी ज्ञानापेक्षा ही मूल्य कितीतरी मोठी आहेत. संशोधक म्हणून तुझी निवड झाली, असं समज.' हा निवडीनंतरचा आकस्मिक आनंद त्याच्या डोळ्यात मावला नाही. निर्णय ऐकताक्षणीच तरूणाच्या डोळ्यांना धारा लागल्या. कृतज्ञतेच्या धारा! संघर्षाच्या वादळातही त्यानं अंतरीचा सत्याचा दिवा विझू दिला नव्हता. परीक्षेच्या व ज्ञानाच्या पलिकडे काही जीवनमूल्यं असतात, हे समजून घेत कुण्या गरजवंताच्या गुणांची कदर करणारे 'रमण' असतात जगात, आणि निवड झाली नसतानाही कुणाचे पैसे परत करण्यासाठी अस्वस्थ होणारे इमानदार तरूणही!* *॥ रामकृष्णहरी ॥* 🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌟! ! *काव्यांगण - रोज एक कविता* ! !🌟•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*बालकविता - सूर्यदादा*-------------------सूर्यदादा ऐक ना रेकिती कोपला तू रेनको रे तापू इतकाहोई जीव हैराण रे ।सूर्यदादा काय सांगूरस्ते घरे हे सिमेंटचे जंगल सारे सिमेंटचेनाव नाही सावलीचे ।सूर्यदादा ऊन प्रखरघरे त्यात तापून जातीलोडशेडिंगचा त्रास अतित्यात आजार बळावती ।पिण्यास नाही रे पाणीगेली झाड झुडपं वाळूनीतूच कर आता तरी काहीजीवाची होते लाहीलाही ।---------------------- अरुण वि. देशपांडे, पुणे9850177342--------------------•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ज्याप्रमाणे सोन्याचा व्यापार करणारा व्यापारी किंवा सोन्याचे दागिने बनवणारा सोनार सोने पाहिल्याबरोबर किती चांगले आहे हे आपल्या नजरेने,हातात घेऊन आणि एका विशिष्ट दगडाच्या कसोटीवर घासून ओळखतो त्याचप्रमाणे चतुर,चाणाक्ष आणि मनकवड्या व्यक्ती समोर असणा-या आणि समोर आलेल्या व्यक्तींना आपल्या नजरेंनी तेव्हाच ओळखतात.कोण चांगल्या विचारांची,कोणत्या कारणासाठी आपल्याकडे आली आहेत,ती कोणत्या हेतूने आली आहेत,कोणत्या स्वभावधर्माची आहेत,आपण त्यांना कशाप्रकारे उत्तर द्यायचे किंवा आपण त्याला मदत करायची का नाही याचे ज्ञान नक्कीच असते.यावरुनच माणसे आपल्या नजरेने पहायला,वाचायला आणि शिकायला पाहिजे.यासाठी आपल्याला माणसांच्या मनाचे थोडे शास्त्र आपणही शिकले तर भविष्यात होणारे संभाव्य धोके टळू शकतील आणि आपले जीवन सुखावह होऊ शकेल.© व्यंकटेश काटकर,नांदेडसंवाद.९४२१८३९५९०/८०८७९१७०६३.🌱🌹🌱🌹🌱🌹🌱🌹🌱 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *साप आणि खेकडा*एक साप आणि एक खेकडा एकमेकांचे मित्र होते. खेकडा सरळ वागणारा होता. त्याने सापाला चांगल्या रीतीने वागण्याचा खूप वेळा उपदेश केला, परंतु सापाने तिकडे लक्ष दिले नाही.एके दिवशीसाप अंग ताणून विश्रांती घेत असताना खेकड्याने त्याला मारून टाकले व त्याच्याकडे बघून तो म्हणाला, 'तू आता जसा सरळ आहेस तसाच नेहमी राहिला असतास तर ही स्थिती कशाला झाली असती ?*तात्पर्य - राजमार्ग सोडून वाकड्या मार्गाने जाणारा मनुष्य नेहमीच संकटात सापडतो.**संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in📱 9403046894•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment