✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 21/09/2019 वार - शनिवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आंतरराष्ट्रीय शांति दिन* 💥 ठळक घडामोडी :- ◆ १९९५ - भारतात अनेक व्यक्तिंनी दावा केला की गणपतीच्या मूर्तीसमोर दूध ठेवले असता त्याने ते दूध प्यायले. ◆ २००३ - गॅलेलियो या अंतराळयानाने मुद्दामहून गुरूच्या वातावरणात प्रवेश केला. अत्यंत दाबामुळे यान नाश पावले. 💥 जन्म :- ●१९३२ - पंडित जितेंद्र अभिषेकी, भारतीय-मराठी गायक, मराठी संगीतकार. ●१९८० - करीना कपूर, भारतीय अभिनेत्री. 💥 मृत्यू :- ◆ १९९९ - पुरुषोत्तम दारव्हेकर, मराठी नाटककार, मराठी नाट्यदिग्दर्शक. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *कोणत्याही क्षणी विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजण्याची शक्यता* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *मंदीवर उतारा म्हणून केंद्रीय अर्थमंत्र्यांकडून कॉर्पोरेट टॅक्समध्ये जवळपास 10 टक्क्यांची कपात, शेअर बाजारात विक्रमी उसळी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *10 दिवसांत खड्डे बुजवले नाही तर कारवाई अटळ, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदेंचा इशारा, खड्डे बुजवायला सुरुवात* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *किरकोळ बाजारात कांद्यानं साठी गाठली, नवी मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये कांद्याची आवक मंदावली, शेतकरी समाधानी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *साडेचार वर्षात सवर्ण आणि अनुसूचित जातींमधला तणाव वाढला, महाराष्ट्र पोलिसांचा निवडणूक आयोगाकडे अहवाल सादर, 14 जिल्हे संवेदनशील म्हणून घोषित* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *रोहित शर्मा आणि महेंद्रसिंह धोनीची साथ मिळाल्यामुळेच विराट कोहली सर्वोत्तम कर्णधार ठरला, माजी सलामीवीर गौतम गंभीरने विराटचे कान टोचले* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *नूर सुलतान (कझाकस्तान) : भारताचा अव्वल पैलवान बजरंग पुनियाने जागतिक कुस्ती विजेतेपद स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई केली आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *लघुकथा - चोरी* https://nasayeotikar.blogspot.com/2019/09/blog-post_20.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *टिश्यू कल्चर म्हणजे काय ?* 📙 टिश्यू कल्चर हा शब्द अलीकडे वरचेवर कानावर पडत असला व त्याचा वापर सरसहा सुरू झाला असला तरीही १९०२ साली म्हणजे शंभरापेक्षा जास्त वर्षांपूर्वी *जी. हाबरलँड* यांनी टिश्यू कल्चरची पद्धत शोधून ती यशस्वी करून दाखवली होती. त्यांनाच या शास्त्राचा प्रणेता मानले जाते. एका पेशीपासून संपूर्ण वनस्पतीची, झाडाची, रोपाची निर्मिती करणे म्हणजे 'टिशू कल्चर' असे म्हणता येईल. ही निर्मिती कृत्रिमरीत्या तयार केलेल्या वातावरणात वा प्रयोगशाळेत केली जाते. याला टोटी पोटन्सी असा शब्द वापरला जातो. प्राण्यांच्या एकाच पेशीपासून असे बनत नाही म्हणून त्यांना 'प्युरोपोटंट' असे समजले जाते. त्यासाठी क्लोनिंगची पद्धत वापरली जाते. टिशू कल्चरमध्ये पेशीसंवर्धन करण्यासाठी विविध पूरक माध्यमांचा वापर केला जातो. या माध्यमांतून वाढीला अावश्यक सर्व घटकांचा पुरवठा होतो. एकपशीयपासून छोट्या रोपापर्यंतचा प्रवास अत्यंत नाजूकपणे जपावा लागतो. त्यानंतर ही रोपे लागवडीयोग्य झाल्यावर प्रयोगशाळेतून बाहेर नेतात. मुराशिगे स्कूग यांनी १९६२ मध्ये वापरलेले माध्यम, गँबर्ग यांचे १९६८ चे माध्यम, शेंक व हिल्डर ब्रॅण्ड यांचे १९७२ चे माध्यम अशा काही माध्यमे या वृद्धीसाठी वापरली जातात. नियंत्रित तापमानात, जंतूविरहित अवस्थेत प्रयोगशाळेतच ही वाढ होत असते. या साऱ्या प्रक्रियेदरम्यान तयार होणारी सर्व रोपे पूर्णतः एकसारखी असतात. त्यामुळे एकाच प्रकारची, एकाच रंगाची फुले देणारी, एकाच दिवशी फुलणारी अशी रोपे तयार करणे शक्य झाले आहे. शोभिवंत रोपवाटीकांसाठीची रोपटी, केळीच्या बागांसाठीची छोटी रोपे अशांसाठी टिश्यू कल्चरचा वापर फार मोठ्या प्रमाणावर केला जातो. काही आठवड्यांत काही लाख रोपे तयार करणे, त्यांची निर्यात करणे हे केवळ या पद्धतीमुळेच शक्य होते. टिशू कल्चरमुळे दुर्मिळ वनस्पतींचे जतन व वृद्धी, फलोद्यान व उद्यानवृक्षांसाठीची एकसारखी निर्मिती, संशोधन यासाठी अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. महत्त्वाची व व्यवहारातील अत्यंत उपयुक्त गोष्ट म्हणजे खतांचा कमी वापर करून, किडीला सक्षमपणे तोंड देऊ शकणारी, अल्पकाळात पिके देणारी, भरघोस उत्पन्न देणारी वा दुष्काळी वातावरणातही तग धरणारी अशी वनस्पती निर्माण करणे शक्य झाले आहे. या साऱ्या प्रक्रियेतून दुय्यम उत्पादन म्हणूनही काही गोष्टी संशोधकांच्या हाती लागत गेल्या आहेत. काही प्रतिजैविके, रोगनाशके, अल्कलाॅइड्स, हार्मोन्स यांची निर्मिती शक्य होते. एकंदरीतच फार मोठे भांडवल, तज्ज्ञांची देखरेख व अद्ययावत प्रयोगशाळांची आवश्यकता असलेला हा टिश्यू कल्चरचा पसारा व आवाका आपल्या दैनंदिन जीवनाला वेढत चालला आहे. *'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *“ चांगले पुस्तक म्हणजे मानवी आत्म्याचे अतिशुद्धी सार असते. ”* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *चोवीस तास ऑक्सिजन पुरवठा करणारा वृक्ष कोणता ?* पिंपळ 2) *गावातील कोतवालांची संख्या कशावरून ठरते ?* लोकसंख्या 3) *महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला 'उद्योग जिल्हा' म्हणून घोषित करण्यात आले ?* रायगड 4) *'राज्यात प्रत्येक गावात एकतरी शाळा असली पाहिजे' ही आज्ञा कोणी काढली ?* छत्रपती शाहू महाराज 5) *भारतीय साहित्य क्षेत्रातील सर्वात मोठा पुरस्कार कोणता ?* ज्ञानपीठ पुरस्कार *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● जिग्नेश क्रांती बुद्धेवार ●  कु. आद्या साईनाथ लखमावाड ●  सौ. वर्षाराणी मारोती होनशेट्टे ● सचिन तोटावाड ●  विष्णू गंभीरे ●  निशांत जिंदमवार ●  प्रकाश जाधव ●  स्मिता मिरजकर वडजे ●  आकाश कोलपकर ● गोविंद पाटील *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *श्रीपूर येथील राजा यांच्‍या निधनानंतर त्‍यांचा मुलगा राजवीरसिंह याला राज्‍यपदी बसविण्‍यात आले. राजवीर वडिलांसारखाच साहसी होता पण अनुभव पाठीशी कमी असल्‍यामुळे अनेकदा संकटात तो घाबरत असे. अशावेळी त्‍याची माता त्‍याला हिंमत देत असे व योग्‍य मार्गदर्शन करून संकटातून बाहेर काढत असे. शेजारच्‍या राज्‍यातील गंगानगरमधील राजा भीमसेन याची श्रीपूरवर नजर होती. एके दिवशी भीमसेनने श्रीपूरवर आक्रमण केले. दोन्‍ही सैन्‍ये एकमेकांना भिडली, तुंबळ युद्ध झाले. भीमसेनकडे सैनिक खूप प्रमाणात होते. दोनच दिवसात भीमसेन यांनी चार मैल भागावर आपला ताबा मिळविला. राजवीरच्‍या तोंडून कमी सैनिकांमुळे आपल्‍याला हार पत्‍करावी लागली हे ऐकले तेव्‍हा राजमातेने मनातल्‍या मनात काही ठरवले.* *राजवीर झोपण्‍याआधी राजमातेचे दर्शन घेण्‍यासाठी आला तेव्‍हा राजमाता लहान लहान सहा लाकडाच्‍या काड्या एकत्र बांधून लोखंडाच्‍या मोठ्या तुकड्याला तोडण्‍याचा प्रयत्‍न करीत असलेली पाहिली. राजवीरने मातेला विचारले,’’आई, सहा लाकडाच्‍या काड्या एकत्र करूनही लोखंडाला तोडू शकत नाही’’ राजमाता म्‍हणाली,’’खरं बोललास, संख्‍येने मजबुतीला पराजित केले जाऊ शकत नाही त्‍याप्रमाणे आपले वीर सैनिक आणि तू या लोखंडासारखे मजबूत व्‍हा. शत्रूची कितीही संख्‍या तुम्‍हाला तोडू शकणार नाही अशी ताकद तुमच्‍यात आहे ती जागृत करा. तुमच्‍या मजबुतीसमोर शत्रू गुडघे टेकेल.’’ राजवीरने याप्रमाणे केले व त्‍याने भीमसेनाला हरवून युद्धात विजय संपादन केला. दृढ मनोबलाने हारलेले युद्धही जिंकता येते. काही वेळेला दृढनिश्‍चय, ठाम मनोबल हेच यशाचे इंगित असते.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो,* *काय कधी संपल्या वेदना,* *पुन्हा नवा अवतार कशाला।* *जन्म दिला जर एकटीने,* *मग नेणारे हे चार कशाला।* *असा विचार करणारा एक तर ठार* *वेडा असू शकतो ,नाहीतर एक* *अलौकिक व्यक्तिमत्त्व तरी असू* *शकतो.* *पण मित्रांनो सहजीवनाची गोडी,* *आणि समूहातील आनंद* *काही औरच असतो.* *समूहाच्या वर्तनातून एक गोष्ट जाणवली,ती म्हणजे ,मी एखादा विचार मांडला किंवा कितीही पटवून* *सांगितला तरी त्याचा प्रभाव* *स्वीकारनाराची तयारी* *समोरच्या माणसाची काय* *आहे.त्यावर अवलंबून आहे.* *कारण," एखाद्या माणसावर इतरांच्या* *विचारांचा परिणाम* *तोपर्यंत होत नाही,जोपर्यंत तो स्वतः* *परिणाम होऊ देत नाही"* *आणि हाच खरा निसर्गाचा सिद्धांत* *आहे. so खंबीर* *राहा,आपल्या विचारांची पकड ढिली* *होऊ देऊ नका.* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• शोध घ्यायचा असतो तो चांगल्या विचारांचा,बोध घ्यायचा असतो तो गोष्टींचा,सहवास मिळवायचा असतो तो सर्जनशील व्यक्तींचा ज्यामुळे आपल्या जीवनात महत्वाचे बदल होण्यास अनुकूल ठरेल.जेव्हा केव्हा आपण विचार करायचा तर यावेळी वरील तीन गोष्टींबाबत नक्कीच करावा अन्यथा आपल्या जीवनाचे नक्कीच नुकसान होऊ शकेल की,जे आपल्या जीवनासाठी बाधक ठरेल.आपली आपल्या माणसांत आणि इतर लोकांत कवडीचीही किंमत राहणार नाही. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद..९४२१८३९५९०. 🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *गैरसमज आणि अनुमान* *एक छोटा मुलगा आपल्या दोन हातात दोन पेरू घेऊन उभा असतो ,त्याची ताई हसतहसत म्हणाली,"दादा एक पेरु मला दे". तेवढ्यात त्याने तो पेरू दाताने कुरतडला.त्याची ताई काहीच बोलली नाही. मुलाने दुसरा पेरूही दाताने कुरतडला. आपल्या भावाची ही कृती बघून त्याची ताई नुसती बघतच राहिली व तिच्या चेहऱ्यावरील हसू गायब झाले*. *तेव्हा तिच्या लहानग्या भावानेे चिमुकले हात पुढे करुन कुरतडलेल्या दोन्ही पेरूंपैकी एक पुढे केला व म्हणाला "ताई , हा घे.हा जास्त गोड आहे." ताईच्या डोळ्यात पाणी आले...* *प्रत्येक वेळी आपले निष्कर्ष बरोबर असतीलच, अस नाही*... *एखाद्याची कृती पूर्ण होईपर्यंत घाईघाईत निष्कर्ष काढून गैरसमज करून घेण्यापेक्षा ते गैरसमज दूर करण्यात आणि समोरच्याला समजून घेण्यातच मनुष्याचे हित असते.* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

*भाषिक उपक्रम* (दिनांक २०-०९-२०१९) उपक्रमाचे नावः रंगाची ओळख व त्या रंगाची वस्तूचीं ओळख *इयत्ताः पहिली /दुसरी* उपक्रमात समाविष्ट रंगाची नावे - १)पांढरा २) निळा ३) हिरवा ४) लाल ५) काळा ६) पिवळा *उद्दिष्टः* रंगाची ओळख होणे, विविध वस्तूंच्या नावाची रंगासहित माहिती होणे, शब्दसंपत्ती वाढणे, आनंद निर्मिती होणे. *कृतीः* वर्ग पहिलीतील विद्यार्थ्यांना वरील विविध रंगाच्या कार्डस दाखवणे ते त्या रंगाची नावं सांगतील अश्याच रंगाची त्यांनी काय पाहिले त्या वस्तूंची नावे तोंडी सांगतील वर्ग दुसरीतील विद्यार्थ्यांनी तोंडी सांगून ते वहीत लेखनही करतील. *फलितः* विद्यार्थ्यांना आनंददायी वाटते, वर्गात चर्चा होते, विद्यार्थ्यांच्या, विचारशक्तीला चालना मिळते. 〰〰〰〰〰〰〰 ✍ प्रमिला सेनकुडे जि.प.प्रा.शाळा गोजेगाव ता.हदगाव जिल्हा नांदेड. 〰〰〰〰〰〰〰

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 20/09/2019 वार - शुक्रवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- ◆१६३३ - पृथ्वी सूर्याभोवती फिरत असल्याचे प्रतिपादन केल्या बद्दल गॅलेलियोवर खटला चालवण्यात आला. 💥 जन्म :- ● १८५४ - नारायण गुरु, केरळमधील समाजसुधारक . ●१८९७ - नारायण भिकाजी परुळेकर ऊर्फ नानासाहेब परुळेकर, मराठी पत्रकार. ● १९२१ - पनानमल पंजाबी, भारतीय क्रिकेट खेळाडू. ●१९२२ - द. न. गोखले, चरित्र वाङ्मयाचे संशोधक व मराठी शुद्धलेखनाचे ज्येष्ठ अभ्यासक. ●१९२५ - राम सातवा तथा आनंद माहिडोल, थायलंडचा राजा. ● १९४४ - रमेश सक्सेना, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- ◆ १९९६ - दया पवार, मराठी साहित्यिक. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *हवामान विभागाकडून आज मुंबईसह परिसरात पावसाचा रेड अलर्ट जारी; समु्द्रात 3.85 मीटर उंच लाटा येण्याची शक्यता, मुसळधार पावसामुळे मुंबईसह आसपासच्या शहरांतील शाळा, महाविद्यालयांना सुटी जाहीर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचं स्वदेशी 'तेजस' विमानातून उड्डाण, तेजसमधून भरारी घेणारे पहिले संरक्षणमंत्री* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *मुंबई महापालिका कर्मचार्‍यांना खुशखबर, दिवाळीआधीच बोनस मंजूर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *परळी-वैद्यनाथ देवस्थानचा रेल्वेच्या राष्ट्रीय तीर्थस्थळांच्या यादीत समावेश, रेल्वे मंत्रालयाचं मुंडे भगिनींना पत्र* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *राजू शेट्टी विधानसभा निवडणूक लढवणार, शिरोळ मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा घटक पक्षांचा आग्रह* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *एअर मार्शल आरकेएस भदौरिया असतील भारताचे नवीन एअर चीफ मार्शल, बीएस धनोओ 30 सप्टेंबरला होत आहेत निवृत्त* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *मोहाली : क्रिकेटपटू विराट कोहलीच्या खणखणीत अर्धशतकाच्या जोरावर टीम इंडियाने मोहालीच्या दुसऱ्या ट्वेन्टी ट्वेन्टीत दक्षिण आफ्रिकेचा सात विकेट्सनी धुव्वा उडवला.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ बुलेटीनची audio clip ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे https://sharechat.com/post/d0W3GwE ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *उद्याची काळजी आज कशाला* https://nasayeotikar.blogspot.com/2018/08/blog-post_8.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *जायरोस्कोप म्हणजे काय ?* 📙 होकायंत्र ज्यावेळी स्थिर राहू शकत नाही, हेलकावे, वळणे, हिंदकळणे यांमुळे त्याचा लोहचुंबक दिशा नीट दाखवायला जेव्हा असमर्थ ठरू लागतो, त्या वेळी जाइरोस्कोप वापरावा लागतो. जमिनीला समांतर स्वरूपात होकायंत्र स्थिर असेल, तेव्हा त्यावरून नेमकी दिशा ज्ञात करून घेता येते. पण पाण्यावर जेव्हा एखादे जहाज वादळात सापडून सतत हेलकावू लागते, तेव्हा आपण पकडलेली दिशा कोणती, असा प्रश्न उद्भवतो. अशीच काहीशी स्थिती विमानात येते. जायरोस्कोप म्हणजे एक जड, स्वतःभोवती फिरणारे चक्रच असते. एका विशिष्ट अक्षाभोवती हे चक्र अत्यंत वेगाने फिरू शकते. या अक्षाची दिशा त्याभोवती असलेल्या मोजपट्टीवर पाहिजे त्या ठिकाणी स्थिर करून मग हे चक्र फिरवायला सुरुवात करतात. थोडक्यात म्हणजे होकायंत्रावरून प्रवासाचे अक्षांश रेखांश पक्के ठरले की सुकाणूची दिशा पकडण्यासाठी जायरोस्कोप स्थिर करून त्याचे चक्र फिरवायला सुरुवात केली जाते. एकदा का चक्र वेगाने फिरू लागले की, याची दिशा हलवणे व त्याचा फिरणारा चक्राचा पृष्ठभाग अक्ष बदलून फिरणे ही जवळपास न होणारी गोष्ट बनते. चक्राने घेतलेला स्वतः भोवतीचा वेग केंद्रीभूत होऊन अशी काही अक्षाभोवती पकड घेतो की ती पकड हलणे व्यवहारत: अशक्य असते. यालाच जायरोस्कोपिक इनर्शिया' किंवा 'जडत्व' असे म्हणतात. यासाठी एकाच गोष्टीची आवश्यकता असते, ती म्हणजे चक्राचा फिरण्याचा वेग अबाधित राखणे. हा वेग जर काही कारणाने कमी होऊ लागला, तर मात्र ज्या आधारावर जायरोस्कोप उभा केलेला, आधारलेला असतो, त्यालाच तो संथपणे गोलाकार फेरी घालू लागतो. जायरोस्कोपचा वापर होकायंत्राच्या जोडीला सर्व प्रकारच्या लांब पल्ल्याच्या जल व हवेतील प्रवासासाठी केला जातो. होकायंत्र वाचणे व त्याचा वापर करणे हे तल्लख खलाशाचे व अधिकाऱ्याचे काम; पण या ऐवजी जाइरोस्कोप दाखवेल ती दिशा पकडणे ही मात्र कोणाही माणसाला जमणारी गोष्ट असू शकते. हाही महत्त्वाचा उपयोग नाही काय ? अंतराळ प्रवासात होकायंत्र बिनकामी ठरते; पण जाइरोस्कोप वापरता येतो. *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *“ विश्वास ठेवा चुकीतुनही चांगले निष्पन्न होते. ”* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *रयत शिक्षण संस्थेचे बोधचिन्ह कोणते ?* वटवृक्ष 2) *भावी पिढीचा शिल्पकार कोणाला म्हटले जाते ?* शिक्षक 3) *'खेड्याकडे चला' अशी हाक कोणी दिली ?* महात्मा गांधी 4) *ऑलिम्पिक ध्वज सर्वात प्रथम कोणत्या वर्षी फडकविण्यात आले ?* 1920 ( बेल्जियम ) 5) *1 एकर म्हणजे किती आर ?* 40 आर *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● जिग्नेश क्रांती बुद्धेवार ( सिम्बॅा ) ●  शीतल प्रभू ●  पांडुरंग कोकरे ●  धम्मकीर्ती कांबळे ●  संगीता देशमुख, वसमत ●  उमेश वडजे पाटील ●  गणेश भोसले ●  सुरेश जमपंनगिरे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *एखादा रिक्षावाला प्रवाशाची चुकून राहिलेली सोन्या-नाण्यांची थैली घर शोधत त्याच्या घरी पोहचवून देतो, आणि मोबदल्यात बक्षिसी नाकारतो. ही प्रामाणिकता थक्क करते! जगण्यासाठी ज्यांचा संघर्ष असतो...आपल्या पायावर जे धड उभेही नसतात, अशा लोकांचे देणारे हात मागे येत नाहीत. कारण माणुसकीवरील त्यांची निष्ठा कुठल्या अपेक्षांची मोहताज नसते. वाट्याला अंधार असला तरी हे लोक उजेड वाटत राहतात जगाला. लौकिक अर्थाचं यश त्यांच्याकडे नसतं, पण त्यांचं निर्मळ जगणं अंतर्मुख करतं माणसाला. फाटक्या आयुष्याला ठिगळ लावत राहयची आणि मूल्य जपत राहायची, हा त्यांचा जीवनधर्म असतो. चांगुलपणाची व सत्याची प्रेरणा देणा-या अशा घटना अंत:करणाचे डोळे करून बघायच्या असतात.* *'सच काम किया जग मे जिसने, उसने प्रभुनाम लिया न लिया' असं राष्ट्रसंत तुकडोजींनी सांगितलं. पण आपण उलट जगतो. 'प्रभुनाम लिया जग मे जिसने, उसने सच काम किया न किया' ही आपली धार्मिकता असते. आपले भक्तीचे, प्रतिष्ठेचे शिक्षक विचित्र असतात. आपल्या पायांवर उभं रहाताना ज्यांचे पाय थरथरतात आणि तरीही समाजाला जे इमान देतात, त्यांच्या दातृत्वाच्या हातांना आपणही कृतज्ञतेची फुलं दिली तर? असं लहान होऊन... हाताला हात देऊन निरपेक्ष जगता आलं तर आपसुकच जगणं सुगंधित होते. किती अनोखा आहे माणूस !* *॥ रामकृष्णहरी ॥* 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो,* *माणूस पेरायला शिकलं पाहिजे.* *ऊबंटू चित्रपटात खूप छान प्रार्थना* *आहे.* *हीच आमुची प्रार्थना अन हेच आमचे* *मागणे.* *माणसाने माणसाशी माणसासम* *वागणे।* *बहिणाबाई म्हणतात , अरे माणसा* *माणसा कधी होशील* *माणूस।* *माणसाचा असा कसा झाला रे* *कानुस।* *माणसा इथे मी तुझे गीत गावे।* *असे गीत गावे तुझे हिट व्हावे।* *माणूस घडविणे आणि जपणे फार* *महत्वाचे आहे.* *खरचं काही माणसं आपल्या* *आयुष्यात नशिबाने येतात . आणि* *यासारखी श्रीमंतीही नाही.* *मोगऱ्याच फूल ओंजळीत* *घेतलं की त्याचा गंध* *मनाला, शरीराला प्रसन्न करून* *जातो.. सहवासातील माणसाचं* *देखील असंच असतं... काही माणसं काही क्षणातच मनाला खूप* *आवडतात...आपली होऊन* *जातात ...तर काही कितीही* *सहवासात राहिली तरी* *आतून ओढ नसतेच...* *चेहरा बघण्यापेक्षा नेहमीच समोरच्याच्या मनात उतरून* *बघावं ...शोधूनही तिथं माणूसपण सापडत नसेल तर त्याच सुंदर* *दिसनही मग ओंगळवाणे वाटतं.... शरीराची* *सुंदरता वया बरोबर संपते तर मनाची सुंदरता शेवटपर्यंत टिकून* *राहते...शरीराला वय असतं ....मनाला ते कधीच नसतं...शेवटी काय आपण* *व्यक्तीच्या स्वभावाच्या प्रेमात असतो... शरीर तर निमित्त मात्र* *असतं... माणसाच्या स्वभावात गोडवा, शालिनता,प्रामाणिकपणा* *आणि विनयशिलता असेल तर त्याची काही क्षण जरी सोबत मिळाली तरी* *ती हवीहवीशी वाटते... म्हणूनच बाहेर लक्ष दिव्याची* *सुंदर आरास असूनही देवघरातील समईच्या तेजापुढं आपण* *नतमस्तक होतो...आयुष्यात अशी माणसं कधी भेटली तर* *त्यांच्यावर जीवापाड प्रेम करावं...!* *आपल्या आवडत्या माणसाचं आपल्या सोबत असणं ही* *आयुष्यातील सगळ्यात मोठी कमाई... ती प्रत्येकाच्या वाट्याला* *येतेच असं नाही...माणुस टिकवण आपल्या हातात असतं काही क्षणिक* *सुखासाठी नातं विसरतात .काही विश्वास गमावून* *बसतात . काही केसाने गळा कापायला मागे पुढे पहात* *नाही .शेवटी पश्चाताप च हाती येणार हे विधिलिखित आहे माझं काय किंवा* *कोणाचेही फक्त जो माणुस तुम्हाला समजला जो तुमच्या* *वर खुप निष्ठा ठेवून प्रेम करतो त्याचा तिरस्कार करु* *नका .कारण तो प्रत्येक वळणावर तुम्हाला भेटणार आहे. मग अशा* *माणसाप्रती भळभळणाऱ्या जखमाचे घाव देऊ नका. पण आजकाल अशी* *माणसं भेटतात तरी कुठे ? नशिबानं कधी भेटलीच* *तर हळुवार जतन करून ठेवावीत.... कदाचित पुन्हा भेटतील न* *भेटतील ?* *मला माणूस हवाय,मला माणूस* *हवाय।* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ज्या व्यक्ती अश्रूंचा सहारा घेऊन जगतात त्या जीवनात कुठेतरी पराभव पत्करलेल्या असतात किंवा त्यांच्या मनावर कुठेतरी आघात झालेला असतो किंवा कुणीतरी मनाविरुद्ध करण्यासाठी प्रवृत्त केलेले असते.हे जरी खरे असले तरी अशा व्यक्ती शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या कमकुवत झाल्याने त्यांना जीवनात जगण्याची काही अपेक्षा उरली नाही किंवा आता आपण जगून तरी काय करावे असा सतत विचार करत आणि डोळ्यांत अश्रू आणून कसेबसे जीवन जगतात.अशा दुबळ्या मनाने जीवन जगण्यापासून जीवनाला परावृत्त करायचे असेल तर जीवनात आणि आपल्यासमोर चांगले जीवन जगण्याची उमेद प्रथमत: नजरेसमोर ठेवायला हवी, नेहमी आपण काहीतरी असले तरी मी कोणत्याही कठीण प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी सक्षम आहे असा उदात्त विचार करून जगायला शिकले पाहिजे,कुणीजरी आपले मन दुखवण्याचा प्रयत्न केलातरी मी त्याकडे दुर्लक्ष करीन असाही सकारात्मक विचार केला आणि मन घट्ट करून जगायला शिकले तर अश्रूंचा आधार घेऊन जगायची काही गरजच भासणार नाही.जीवन तर सुखदु:खाने भरलेले आहे ते कुणाच्या वाट्याला कमी-जास्त असणारच.सुख जास्त झाले म्हणून जास्तही त्या सुखाचा अतिरेक होऊ द्यायचा नाही आणि दु:ख झाले म्हणून अति दु:खी व्हायचे नाही.आपण सारेजण सुखदु:खाच्या चक्रव्युहात अडकलेलोच आहोत आणि त्या चक्रव्युहाला भेदूनच चांगले जीवन जगायचे आहे हे लक्षात ठेवायला हवे. व्यंकटेश काटकर,नांदेड संवाद..९४२१८३९५९० 🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *खरी आई कि खोटी आई* एका आठ वर्षाच्‍या मुलाची आई देवाघरी जाते. मुलाच्‍या संगोपनात काही अडचण येऊ नये म्‍हणून वडील दुसरे लग्‍न करून त्‍या मुलासाठी नवीन आई घरी घेऊन येतात. एक महिन्‍यानंतर वडील मुलाला विचारतात,''बेटा, तुला ही नवीन आई कशी काय वाटते?तुझी देवाघरी गेलेली आई चांगली की ही नवीन आई चांगली आहे?'' यावर मुलगा उत्तर देतो,'' बाबा, ही नवीन आलेली आईच खरी आहे आणि देवाघरी गेलेली आई खोटी होती.'' हे अचानक आलेले उत्तर पाहून वडील संभ्रमात पडतात. त्‍यांना समजत नाही की मुलगा काय बोलतो आहे? म्‍हणून पुन्‍हा त्‍या मुलाला विचारतात,'' अरे तुला असे का वाटते ते मला सांग? जिने तुला नऊ महिने पोटात सांभाळले, प्रसुतीवेदना सहन करून जन्‍म दिला ती आई तुला खोटी कशी काय वाटते? आणि ही काल आलेली नवीन आई मात्र तुला खरी कशी काय वाटते?'' मुलगा म्‍हणतो,'' बाबा, मी खूप खोडकर आहे हे तुम्‍हाला माहितीच आहे. देवाघरी गेलेली माझी आई माझ्या खोड्यांना कंटाळून नेहमी मला '' जर तु खोड्या केल्‍या तर तुला मी खायला देणार नाही'' असे म्‍हणत असे. पण तिचे न ऐकता मी सतत खोड्या करत असे. पण ती मात्र मला जेवण देण्‍यासाठी उन्‍हातान्‍हात पूर्ण गावात मला शोधत असे व मला वेळप्रसंगी रागवून, मारून घरी आणत असे व मला स्‍वत:च्‍या मांडीवर बसवून खाऊपिऊ घालत असे आणि ही नवीन आईही पण '' जर तु खोड्या केल्‍या तर तुला मी खायला देणार नाही'' असेच म्‍हणते आणि खरं सांगू का बाबा तुम्‍हाला? गेल्‍या तीन दिवसात खरेच तिने मला खायला दिलेले नाही. म्‍हणूनच मी तिला खरी आई असे म्‍हणत आहे.'' तात्‍पर्य :- आपली आई ही देवाने दिलेली सर्वात मोठी देणगी आहे. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 19/09/2019 वार - गुरूवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- ◆२००७ - ट्‌वेंटी-२० क्रिकेटमध्ये एकाच षटकात सहा षटकार मारण्याची कामगिरी करणारा युवराज सिंग पहिलाच क्रिकेटपटू ठरला. त्याने क्रिकेटच्या इतिहासातील सर्वाधिक वेगवान अर्धशतक नोंदविताना पन्नास धावा करण्यासाठी फक्त १२ चेंडू घेतले. 💥 जन्म :- ◆१८६७ - पंडित श्रीपाद दामोदर सातवळेकर, मराठी चित्रकार, वेदाभ्यासक. 💥 मृत्यू :- "●१९३६ - पंडित विष्णू नारायण भातखंडे, भारतीय संगीतकार, संगीतज्ञ. ●२००१ - अनंतराव दामले, प्रभात फिल्म कंपनीचे संचालक. ●२००२ - प्रिया तेंडुलकर, अभिनेत्री . ● २००७ - दत्ता डावजेकर ऊर्फ डीडी, संगीतकार. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *मुंबई :  येणाऱ्या विधानसभेची निवडणूक ईव्हीएम मशीनवर होणार असून बॅलेट पेपर आता इतिहास जमा होताहेत, असं मत देशाचे मुख्य निवडणूक अधिकारी सुनील अरोरा यांनी मुंबईत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केले आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारताच्या नियंत्रणाखाली, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांचं मोठं विधान, दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकलाही खडेबोल* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *राज्यात पाऊस पुन्हा सक्रीय होणार, हवामान खात्याचा अंदाज, येत्या 48 तासात मुंबईसह पुण्यात मुसळधार पावसाचा इशारा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *17 नोव्हेंबरला सरन्यायधीशांच्या निवृत्तीपूर्वी अयोध्या प्रकरणी निकाली काढण्याचे सुप्रीम कोर्टाचे संकेत, वकिलांना महत्त्वाच्या सूचना* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *नांदेड, औरंगाबादेत खासगी कोचिंग क्लासेसवर आयकर विभागाच्या धाडी; कर चुकवल्याचा संशय* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *नवी दिल्ली: देशातील ११ लाख रेल्वे कर्मचाऱ्यांना या वर्षी ७८ दिवसांचे वेतन बोनस म्हणून देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *भारताची दक्षिण आफ्रिकेवर सात विकेटनी मात, कर्णधार विराट कोहलीचे शानदार अर्धशतक* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ या बुलेटीनची audioclip ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे. https://sharechat.com/post/n1P5Oqa ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *परावलंबी जीवन* https://nasayeotikar.blogspot.com/2017/10/blog-post_28.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *जाडेपणा म्हणजे नेमके काय ?* 📙 शरीरातील चरबीचे प्रमाण नको एवढे वाढत गेले, तर जाडी व वजन वाढते. चरबी प्रत्येकाच्या शरीरात असतेच, पण तिचे सर्व शरीरभर योग्य त्या पद्धतीत विवरण करण्याची व्यवस्था निसर्गानेच केलेली असते. जेव्हा आपण गरजेपेक्षा जास्त खाऊ लागतो, तेव्हा ही व्यवस्था बिघडायला सुरुवात होते. खाण्यात आलेल्या अन्नातून उष्मांक मिळतात. हे उष्मांक जेव्हा रोजच्या रोज खर्च होत नाहीत, तेव्हा शरीर ते साठवू लागते. ही साठवण्याची शरीराची पद्धत म्हणजे चरबीचा साठा वाढवणे. पोटावर, मांड्यांमधील जागेत, नितंबांवरील व हातांच्या दंडामागील भागात प्रथम चरबी साठू लागते. पुरुषांमध्ये जाड माणसाला सफरचंदाचा, तर स्त्रियांमध्ये पीअर या फळाचा आकार प्राप्त होऊ लागतो. सर्वसाधारण आकडेवारीनुसार उंची, वय व वजन यांचे जेवढे प्रमाण असायला हवे, त्यापेक्षा वजन जास्त असेल, तर माणूस जात आहे, त्याने चरबी साठवायला सुरुवात केली आहे, असे समजावे. याखेरीज कातडीमधील चरबीचा साठा रास्त व जास्त आहे, हे ठरवण्यासाठी विशिष्ट पद्धतीचे चिमटेही मिळतात. या बाबतीत सोपा घरगुती अंदाज म्हणजे दंडामागील कातडी छोट्या चिमटीत पकडता आली तर चरबीचा साठा रास्त व न आली तर जास्त, असे समजावे ! प्रत्येक प्राण्यामध्ये चरबीचा साठा करणे व वापरणे यांवर निसर्ग नियंत्रण ठेवतो. पण माणूस त्याच्या अति खाण्याने व ऐदी वागणुकीने हे नियंत्रण झुगारू पाहतो. साखर, लोणी व मोटार वाहन वापर यांमुळे मानवाने स्वतःचे संतुलन घालवले आहे, असे डॉक्टर मंडळी म्हणतात. वाहनांमुळे हालचाल संपली, साखरेने नको असलेले उष्मांक पोटात वाढू लागले, तर लोण्यामुळे चक्क चरबीच पोटात वाढू लागली. विसाव्या शतकात जाड माणसांचे प्रमाण व त्यातून उद्भवणाऱ्या आजारांचे प्रमाण वाढले आहे. जाड माणसाला जास्त घाम येतो. घामाला वास येत राहतो. थकवा जाणवतो, धाप लागते, जास्त तहान लागते, सतत खावेसे वाटते, खाऊनही समाधान होत नाही. या साध्या साध्या लक्षणानंतरही लक्ष दिले नाही, तर हळूहळू जाड माणसाच्या शरीरात मधुमेह, रक्तदाब, रक्तवाहिन्यांचे विकार व त्यांतूनच उद्भवणारा हृदयविकार यांचा शिरकाव होतो. वजन जास्त वाढल्याने सांध्यांची झीज होत जाऊन सांधेदुखी, तर पायांतील रक्तवाहिन्यांना शिथिलपणा आल्याने पायांत रक्त साचून पाय दुखणे, सूज येणे सुरू होते. जाड माणसे अपघाताला जास्त निमंत्रण देतात. रस्ता ओलांडताना अचानक आलेले वाहन धडकणे, जिन्यावर तोल न सावरता येणे यांतून हे अपघात घडतात. पूर्ण उपवासाने जाडी कमी करणे हे सोपे आहे. पण कमी केलेली जाडी तशीच टिकवणे हे मात्र अत्यंत कठीण काम आहे. एका आकडेवारीनुसार जाडी कमी केलेल्यांतील जेमतेम ५ टक्के लोकच ती तशीच टिकवण्यात यशस्वी होतात. एकंदरीत खाण्यापिण्याच्या पद्धतीत व जीवनपद्धतीत अत्यंत नियमितपणा आणून सुयोग्य व्यायाम केला, तरच जाडी आटोक्यात राहू शकते. स्त्रियांमध्ये प्रसूतीनंतर, विद्यार्थ्यांत बैठे काम सुरू झाल्यावर, मध्यम वयात म्हणजे चाळीस ते पन्नास या दरम्यान वजन वाढू लागते. नियमित व्यायाम केल्यास आणि तेलकट, तळकट व गोड खाणे मोजकेच ठेवल्यास जाड होण्याची भीती बाळगायची गरज नाही. हजारभर जाड माणसात एखाद्याचीच जाडी अनुवांशिक असते. ती आटोक्यात आणणे मात्र डॉक्टरांनाच शक्य असते. पण उरलेले सर्वजण मात्र 'हे कोणालाच शक्य नाही', अशा समजुतीत वावरतात. जगातील सर्वात जाड इसम 'जॉन मुनाॅक' याचे वजन होते सहाशे पस्तीस किलोग्रॅम. १९८३ साली त्याचे जेमतेम बेचाळीसाव्या वर्षी निधन झाले. हा विक्रम आजही अबाधित आहे. *'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *“विचार करा निर्णय घ्या, आणि तुम्हाला जे योग्य वाटत तेच करा.”* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *भारताची राष्ट्रीय लिपी कोणती ?* देवनागरी 2) *भारताचा जगप्रसिद्ध बुद्धीबळपटू कोण ?* विश्वनाथन आनंद 3) *1 टन म्हणजे किती क्विंटल ?* 10 क्विंटल 4) *पहिली ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या वर्षी झाल्या ?* इ स 1896 5) *आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचा मुख्यालय कोठे आहे ?* लुसाने ( स्वित्झर्लंड ) *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● सुरज आर बोम्मावार ●  ठाकूर रविंदसिंह परिहार ●  अभय कुळकजाईकर ●  प्रवीण साधू ●  आनंद पाटील, नाशिक ●  मनीष बिरादार ●  सचिन कौठवाड ●  तृषा गंगाधर तिपनोड *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] ~~~~~~~~~~~~~~~~~~~ या समुहात join होण्यासाठी खालील लिंकद्वारे join होता येईल. https://chat.whatsapp.com/DaK0QvLfzbe6E1coFTHAsC •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *एक भिकारी आयुष्यभर भीक मागत राहिला. भीक मागून मागून जमा करत राहिला. हे नाही ते नाही करत करत आधिक मागत राहिला. देवाला त्याची दया यायची. त्याने कधी कोणाला आयुष्यात काही दिले नाही तर त्याला आनंद व समाधान कसे मिळणार? देवही चिंतेत पडला. देण्याचा आनंद काय असतो हे प्रत्यक्ष समजावून सांगण्यासाठी देवच एक दिवस भिका-याच्या दारावर भीक मागायला उभा राहिला. त्याने आरोळी ठोकली. 'देssरे बाssबाss भिका-याला काहीतरी.' भिका-याच्याच घरी भीक मागायला भिकारी? त्याने कानाडोळा केला, नंतर त्याला समजावण्याचा व धमकावण्याचाही प्रयत्न केला. पण दारावरचा भिकारी हटला नाही. देssरे बाssबा च्या आरोळ्या काही थांबत नव्हत्या.* *भिका-याचीही भीक मागायला निघायची वेळ झालेली. परंतु दारावरचा भिकारी हटायला तयार नव्हता. त्यापासून सुटका व्हावी म्हणून शेवटी भीक मागून जमा केलेल्या धान्याच्या ढिगातील एक दाणा उचलून तो भिका-याच्या कटो-यात टाकतो. एक दाणा का होईना भीक मिळाली म्हणून दारातील भिकारी निघून जातो. एक दाणा कमी झाला म्हणून भिकारी हळहळत ढिगा-याकडे बघतो. ढिगा-यावर काहीतरी चमकत आहे हे पाहून तो जवळ जातो. ती चमकणारी वस्तू सोन्याचा दाणा असतो. भीक दिलेला ढिगावरचा एक दाणा कमी न होता सोन्याचा झाला. संपूर्ण धान्याचा ढिगच भिका-याच्या कटो-यात टाकला असता तर..? आता भिका-याने संपूर्ण आयुष्यच देऊन टाकले आहे. पण माझ्यातल्या भिका-याचे काय? त्याला कळले आहे पण अजूनही 'वळले' मात्र नाही.* *॥ रामकृष्णहरी ॥* 🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀 *श्री संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल- 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो* *कर्तृत्ववान माणसाचे लक्षण वर्णन* *करतांना मंगेश* *पाडगावकरांनी खूप छान लिहिलं* *आहे,* *ते म्हणतात,* *आयुष्य विधात्याच्या वहीतलं पान* *असत।* *रिकामं तर रिकामं ,लिहिलं तर छान* *असत।* *शेवटचं पान मृत्यू अन पहिलं पान* *जन्म असत।* *पाने आपणच भरायची, कारण ते* *आपलंच कर्म असत।* *हे करत असतांना काही माणसं* *कोल्ह्याला द्राक्ष आंबट सारखी* *वागतात, पण प्रत्यक्षात वास्तव मात्र वेगळं असत. आपल्याला शरीरूपी* *मिळालेल्या अनमोल देणगीचा वापर जर खुबीने केला तर* *कोळश्याच्या खाणीतूनही हिरा जन्माला आल्याशिवाय राहत नाही.* *दाखलाच द्यायचा झाला तर मी बालाजी मंजुळे यांचा देईन.*नागराज तर सगळ्यांनाच सैराट ने माहीत केला,पण त्यांच्याच घरातला भाऊबंधकीतला बालाजी .दगडफोडी जमात, आईवडील दगड फोडणारे, सतत भटकंती,* *भाऊबहीणी,खाणारी तोंड जास्त, कमवणारी कमी सगळं* *बिऱ्हाड पाठीवर, कधी कौतुक झालं तरी गर्व झाला* *नाही. अनेक वेळेस अपमानाची वेळ आली पण राग नावाची चीज* *नाही. राग आलाच तर दोन घाव दगडावर जास्त पडायचे पण कुणाला* *उलट बोलणे नाही. परिणाम* *काय झाला.* " *जैसा बोया वैसा पाया"* *सुसंस्कृत ,मेहनती संततीची पेरणी केली. बालाजीला डावा डोळा* *नाही,उजव्या डोळ्याने 15 % * *दिसते,अठराविश्व दारिद्र्य,* *अज्ञान, तरीही ध्येय आणि स्वप्न साकार केले.2008 ची बॅच, देशात* *राज्यशास्रात पहिला, महाराष्ट्रात 8 व्या रँकने पठ्ठा* *आय.ए. एस.झाला,अख्खा तामिळनाडू डोक्यावर घेऊन* *नाचतोय.* *रडणे सोडावे,लढणे शिकावे ,बस* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• सुखदु:खाच्या सागरातून जीवनरुपी नौका जो मानव चांगल्या प्रकारे जो चालवतो आणि तरुन जातो त्यालाच जीवन म्हणजे काय हे नक्कीच कळलेले असते.अशा सुंदर जीवनाला अधिक सुंदर कसे बनवता येईल त्यासाठी जो सुखातही आणि दु:खातही निरंतर प्रयत्न करतो आणि सुखदुःखाला समान मानतो तोच जीवनात यशस्वी होतो. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद.९४२१८३९५९०. 🚣🏼‍♀🚣🏻🚣🏼‍♀🚣🏻🚣🏼‍♀🚣🏻🚣🏼‍♀🚣🏻🚣🏼‍♀ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *अति तेथे माती* एकदा एक राजहंस एका बगळय़ाला म्हणाला, 'काय रे, तू आधाशी! पाण्यातला कोणताही प्राणी खायला तू मागे-पुढे पाहात नाहीस. बरे-वाईट, नासके-चांगले हा फरकसुद्धा तुला समजत नाही. माझे पाहा, मी फक्त पूर्ण उमललेल्या कमळातले तंतू तेवढे खाईन, दुसरा कसलाही पदार्थ माझ्या घशाखाली जाणार नाही.' आणि मला तसे आवडणार नाही. त्यावर बगळा म्हणाला, 'माझ्या दृष्टीने असा चोखंदळपणा बारकावा असणे बरे नव्हे. ज्यावेळी जे मिळेल ते खावे अन् सुखी राहावे. खाण्याचा पदार्थ दिसला की, तो खावा हेच शहाणपणाचे.' असे म्हणून बगळा उडाला व जवळच्या तलावाकाठी गेला. तेथे कडेला त्याला मासा दिसला. तेव्हा विचार न करता त्याने तो एकदम गिळला, पण आत असलेला गळ घशाला लागून तो जिवास मुकला. राजहंस आपले आवडते खाणे खाण्यासाठी दुसर्‍या कमळे असलेल्या तळय़ात गेला, पण तेथे हंस धरण्यासाठी जाळे असल्यामुळे तेथे तो अडकला. *तात्पर्यः कोणतीही गोष्ट अति केल्यावर त्याचे परिणाम भोगावे लागते म्हणून कोणत्याही गोष्टीचा अतिरेक नको.अति तेथे माती होणारच.* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 18/09/2019 वार - बुधवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- ◆१९०६ - चक्रीवादळ व त्यानंतर आलेल्या त्सुनामीने हाँगकाँगमध्ये १०,००० बळी घेतले. ◆१९९८ - आयकानची स्थापना. 💥 जन्म :- ◆१७०९ - सॅम्युएल जॉन्सन, इंग्लिश कवी, पत्रकार, समीक्षक. 💥 मृत्यू :- ◆१९९३ - असित सेन, विनोदी अभिनेते व दिग्दर्शक. ◆१९९५ - काका हाथरसी उर्फ प्रभुलाल गर्ग, हिंदी कवी. ◆१९९९ - अरुण वासुदेव कर्नाटकी, चित्रपट दिग्दर्शक. ◆२००२ - शिवाजी सावंत, मराठी साहित्यिक. ◆२००४ - डॉ. भालचंद्र दिनकर फडके, मराठी समीक्षक, साहित्यिक. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *पेट्रोल-डिझेलचे दर 5 ते 6 रुपयाने वाढण्याची शक्यता, सौदी अरेबियातील अराम्को कंपनीच्या तेल विहिरींवरच्या ड्रोन हल्ल्यानंतर इंधन टंचाईचं संकट* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *नाशिक जिल्ह्यातील गिरणा धरण 100 टक्के भरले, धरणाचे 2 दरवाजे उघडण्यात आले असून गिरणा नदीत पाण्याचा विसर्ग सुरु* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *30 सप्टेंबरपर्यंत आरेतील वृक्षतोड करणार नाही, राज्य सरकारची हायकोर्टात माहिती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *केंद्रीय निवडणूक आयुक्तांची आज पत्रकार परिषद, राज्यातील निवडणुकीची माहिती देणार, मात्र निवडणूक जाहीर होणार नाही* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *अहमदनगर : आरक्षणाच्या मागणीसाठी वंजारी समाज आक्रमक, संगमनेर प्रांत कार्यालयावर भव्य मोर्चा, हजारोंच्या संख्येने समाज बांधव एकवटले, अहमदनगर शहरातून काढला भव्य मोर्चा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *सोलापूर : शरद पवार यांचे सोलापुरात आगमन, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा दौऱ्याला सुरुवात, शरद पवारांचे चार पुतळा चौकात जल्लोषात स्वागत* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *भारतीय क्रिकेटवर पुन्हा मॅचफिक्सिंगचे सावट, महिला क्रिकेटपटूची तक्रार, याप्रकरणी बंगळुरु पोलीस ठाण्यात राकेश बाफना व जितेंद्र कोठारी यांच्याविरुद्ध तक्रार नोंदवली आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *बुडती हे जन न देखवे डोळा* https://nasayeotikar.blogspot.com/2018/05/35.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *‘ओझोन डे’* जीवसृष्टीच्या संरक्षणासाठी निसर्गाने दोन महत्त्वाच्या उपाययोजना करून ठेवल्या आहेत. त्या म्हणजे पृथ्वीभोवती चुंबकीय गोल आणि ओझोनचा थर. यातील चुंबकीय गोल अत्यंत ऊर्जस्व कणांपासून जीवसृष्टीचे रक्षण करतो, तर ओझोनचा थर जीवसृष्टीला धोकादायक असणाऱ्या अतिनील किरणांना भूपृष्ठापर्यंत येऊ देत नाही. हा ओझोनचा थर नसता तर कदाचित पृथ्वीवर जीवसृष्टीच झाली नसती. मात्र, या ओझोनच्या थरालाच वाढत्या प्रदूषणामुळे भगदाड पडले असून, ते दिवसेंदिवस आणखी मोठे होत आहे. त्यामुळे तज्ज्ञांच्या मते, जीवसृष्टीच्या संरक्षणासाठी आता रोजच ‘ओझोन डे’ साजरा करण्याची वेळ आली आहे. भूपृष्ठापासून दहा किलोमीटर अंतरापर्यंतच्या वातावरणाला तपांबर (ट्रोपोस्फिअर) असे नाव आहे. मेघ, वारे, पाऊस, विजांचा चमचमाट, चक्रीवादळे, वगैरे नैसर्गिक घटना याच स्तरात घडतात. तपांबराच्या पुढे ५० कि.मी.अंतरापर्यंतच्या वातावरणाच्या विभागाला स्थितांबर (स्ट्रॅटोस्फिअर) असे म्हणतात. वातावरणातील एकंदर ओझोनपैकी १० टक्के तपांबरात आहे, तर ९० टक्के स्थितांबरात आहे. त्यातही भूपृष्ठापासून १५-३० कि.मी. पट्ट्यात ओझोनचे प्रमाण जास्त आहे. या पट्ट्यात हवेच्या दशलक्ष रेणूंमागे २६८ रेणू ओझोनचे असतात. या ओझोनच्या स्तरामुळेच आपल्या सर्वांचे अतिनील किरणांपासून संरक्षण होते. पारंपरिक स्थितांबर (ओझोन स्तर)ला छिद्र पडण्यास कारणीभूत असणाऱ्या सीएफसी वायूचा वापर वाढला म्हणून हायड्रोफ्लोरोकार्बन (एचएफसी)चा वापर होऊ लागला. त्यातही वेगवेगळे प्रकार असल्याने जागतिक तापमानात वाढ वार्षिक सात टक्क्यांनी वाढली. जागतिक तापमानाचा धोका आणखी वाढला आहे. त्याचीच काळजी घेणे अनिवार्य बनले आहे. त्यामुळे ३६५ दिवसांमध्ये एकदाच ‘ओझोन डे’ साजरा करून हा प्रश्न सुटणार नाही. रोजच हा दिवस साजरा करावा.. संदर्भ. डॉ. पी. डी. राऊत. *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *Actions speaks louder than words.* *( कृती ही शब्दांपेक्षा/गोष्टी हाकण्यापेक्षा जास्त सांगून जाते. )* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *मौर्य साम्राज्याचा संस्थापक कोण होता ?* चंद्रगुप्त मौर्य 2) *प्रसिद्ध लाल किल्ला कोठे आहे ?* दिल्ली 3) *शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी काशीहून कोणाला बोलावण्यात आले होते ?* गागाभट्ट 4) *शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्याचा प्रमुख कोण होता ?* बहिर्जी नाईक 5) *ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केव्हा झाली ?* इ स 1600 *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● किरण इंदू केंद्रे, संपादक, किशोर मासिक ● ठाकूर रविसिंह परिहार ●  सुदर्शन वाघमारे ●  सचिन महाजन ●  रामकृष्ण काकाणी ●  योगेश सुधाकर मुक्कावार ●  देवेंद्र रेड्डी गडमोड ●  योगेश शंकरोड ●  सुनील पाटील बोमले *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *सर सी.व्ही.रमण एकदा भौतिकशास्त्राच्या संशोधक पदासाठी मुलाखती घेत होते. मुलाखती संपवून निघताना एक विद्यार्थी त्यांना तिथंच घुटमळताना दिसला. नोकरीसाठी नाकारला गेलेला तो तरूण येरझारा मारताना पाहून सर रमण रागावले. त्याच्या हेतूबद्दल शंका येऊन रमण यांनी त्याला फटकारलं. तो तरूण नम्रतेने म्हणाला,'सर, गैरसमज करून घेऊ नका. नोकरी मिळावी म्हणून वशिला लावण्यासाठी मी थांबलो नाही. आपल्या कार्यालयाकडून येण्या-जाण्याचं भाडं चुकून आधिक मिळालं आहे. ते परत करण्यासाठी मी संबंधीत बाबूला शोधत आहे.* *त्याचे हे विचार ऐकून सर रमण प्रभावित झाले. त्यांना सुखद धक्का बसला आणि ते म्हणाले,'मित्रा, तुझं भौतिकचं ज्ञान कमी आहे. प्रयत्नानं ते वाढवता येईल. पण तुझ्या अंतरीचा प्रामाणिकपणा दुर्लभ आहे. पुस्तकी ज्ञानापेक्षा ही मूल्य कितीतरी मोठी आहेत. संशोधक म्हणून तुझी निवड झाली, असं समज.' हा निवडीनंतरचा आकस्मिक आनंद त्याच्या डोळ्यात मावला नाही. निर्णय ऐकताक्षणीच तरूणाच्या डोळ्यांना धारा लागल्या. कृतज्ञतेच्या धारा! संघर्षाच्या वादळातही त्यानं अंतरीचा सत्याचा दिवा विझू दिला नव्हता. परीक्षेच्या व ज्ञानाच्या पलिकडे काही जीवनमूल्यं असतात, हे समजून घेत कुण्या गरजवंताच्या गुणांची कदर करणारे 'रमण' असतात जगात, आणि निवड झाली नसतानाही कुणाचे पैसे परत करण्यासाठी अस्वस्थ होणारे इमानदार तरूणही!* *॥ रामकृष्णहरी ॥* 🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *दोस्तांनो,* *🏻नसीब तो उनका भी होता है,जिनके* *हात नहीं होते।* *ऊस डोंगा परी रस नाही डोंगा,हे चोखामेळा सांगतो.* *कर्तव्य हीच आपली काशी वि. द.घाटे सांगतात.* *✍तुकाराम महाराज अभ्यासाचेच उदाहरण देतात.* *ज्ञानदेवांनी कर्मानेच चांगदेवाना हताश केले.🏻तुकडोजी महाराज कष्टालाच देव* *मानत.* *गाडगेबाबा तर आळश्याच्या डोक्यात काठी घालत.* *सांगायच हेच की कामावर निष्ठा ठेवा,यश मागोमाग चालेल.* *विधाता चित्रपट आठवत असेल तर नक्कीच तुम्हीपण तकदिर आणि* *तसबीर यात थोडावेळ का होईना गुरफटून जाल. तसे* *अमर,अकबर,अँथोनी,स्वामी समर्थ यांचेवर देऊळबंद असे चित्रपट येऊन* *गेले.आपली मती* *भरकटते,आपल्या* *🏻मनगटावरचा आपलाच विश्वास डळमळीत होतो.कारण आपल्या* *समोर अशी काही उदाहरणे दिली जातात की विचारशक्ती कुंठित होते.* *⚫हे *वाचून तुम्ही मला नक्की नास्तिक म्हणाल पण आजवर मी जे जे धर्मग्रंथ वाचले,ऐकले ,अनुभवले त्यात कुठेही* *माझे नाव घ्या,माझे पूजन करा,नारळ चढवा,नैवद्य द्या हा* *उल्लेख नाही.उल्लेख आहे तो* *फक्त आणि फक्त कर्माचा.🤝🏻काम* *करत जा, मी* *तुमच्यात आहे हेच भगवंत सांगत* *आलेले दिसेल.* *म्हणून ध्यानात घ्या----* *जर हातावरच्या रेषेवर भाग्य आणि* *पैसा लिहिलेला असता तर कष्ट कुणीच* *केले नसते,* *मित्रांनो आपले नशीब कुणीही दुसरा* *घडवू शकत* *नाही,प्रामाणिकपणे कष्ट आणि कष्ट* *करत रहा, तो दिवस लांब* *नसणार जेव्हा दुनिया तुम्हाला सलाम* *करेल.* *अशोक कुमावत* *(राष्ट्रपती पुरस्कार विजेते*) 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ज्याप्रमाणे सोन्याचा व्यापार करणारा व्यापारी किंवा सोन्याचे दागिने बनवणारा सोनार सोने पाहिल्याबरोबर किती चांगले आहे हे आपल्या नजरेने,हातात घेऊन आणि एका विशिष्ट दगडाच्या कसोटीवर घासून ओळखतो त्याचप्रमाणे चतुर,चाणाक्ष आणि मनकवड्या व्यक्ती समोर असणा-या आणि समोर आलेल्या व्यक्तींना आपल्या नजरेंनी तेव्हाच ओळखतात.कोण चांगल्या विचारांची,कोणत्या कारणासाठी आपल्याकडे आली आहेत,ती कोणत्या हेतूने आली आहेत,कोणत्या स्वभावधर्माची आहेत,आपण त्यांना कशाप्रकारे उत्तर द्यायचे किंवा आपण त्याला मदत करायची का नाही याचे ज्ञान नक्कीच असते.यावरुनच माणसे आपल्या नजरेने पहायला,वाचायला आणि शिकायला पाहिजे.यासाठी आपल्याला माणसांच्या मनाचे थोडे शास्त्र आपणही शिकले तर भविष्यात होणारे संभाव्य धोके टळू शकतील आणि आपले जीवन सुखावह होऊ शकेल. © व्यंकटेश काटकर,नांदेड संवाद.९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🌱🌹🌱🌹🌱🌹🌱🌹🌱 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *साप आणि खेकडा* एक साप आणि एक खेकडा एकमेकांचे मित्र होते. खेकडा सरळ वागणारा होता. त्याने सापाला चांगल्या रीतीने वागण्याचा खूप वेळा उपदेश केला, परंतु सापाने तिकडे लक्ष दिले नाही. एके दिवशीसाप अंग ताणून विश्रांती घेत असताना खेकड्याने त्याला मारून टाकले व त्याच्याकडे बघून तो म्हणाला, 'तू आता जसा सरळ आहेस तसाच नेहमी राहिला असतास तर ही स्थिती कशाला झाली असती ? *तात्पर्य - राजमार्ग सोडून वाकड्या मार्गाने जाणारा मनुष्य नेहमीच संकटात सापडतो.* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 17/09/2019 वार - मंगळवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *राष्ट्रीय श्रम दिवस* *विश्वकर्मा जयंती* *मराठवाडा मुक्ती संग्राम दिन* 💥 ठळक घडामोडी :- ◆२००४ - हरिकेन आयव्हनने अमेरिकेच्या फ्लोरिडा राज्यातील पेन्साकोला शहराजवळ किनारा गाठला व संपत्तीची अमाप हानी केली. 💥 जन्म :- ●१८७९ - पेरियार ई.व्ही. रामसामी, भारतीय समाजसुधारक. ●१८८५ - प्रबोधनकार ठाकरे उर्फ केशव सीताराम ठाकरे - पत्रकार, समाजसुधारक, वक्ते. 💥 मृत्यू :- ◆१९९९ - हसरत जयपुरी, गीतकार. ◆ २००२ - वसंत बापट, कवी. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *विधानसभेसाठी आघाडीचा फॉर्म्युला ठरला, काँग्रेस-राष्ट्रवादी 125-125 जागांवर लढणार तर 38 जागा मित्रपक्षांना, युतीच्या जागावाटपाचं घोंगडं भिजतंच* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *शिवसेना-भाजपची स्वबळावर निवडणूक लढण्याची चाचपणी, युती न झाल्यास नारायण राणे भाजपमध्ये तर छगन भुजबळ शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चा* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *प्रत्येक गोष्ट कोर्टानेच बघायची का?, फूड सेफ्टी कायद्यावरुन हायकोर्टाचा राज्य सरकारला उद्विग्न सवाल, अधिकाऱ्यांचीही कानउघाडणी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीचा सुप्रीम कोर्टाने अहवाल मागवला, गरज पडल्यास सरन्यायाधीश स्वत: काश्मीरला जाणार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *आयुष्मान खुरानाच्या 'ड्रीम गर्ल'चं बॉक्स ऑफिसवर धुमशान, राझी, उरीसह अनेक चित्रपटांच्या कमाईचे विक्रम मोडले, तीन दिवसात साडे चव्वेचाळीस कोटींची कमाई * ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आज केंद्रीय निवडणूक आयुक्त आणि इतर दोन वरिष्ठ अधिकारी येणार मुंबईत, त्यामुळे येत्या 2 दिवसांत विधानसभा निवडणुकांचं बिगूल वाजण्याची शक्यता आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *इंग्लंडची ऑस्ट्रेलियावर 135 धावांनी मात, 1972 नंतर पहिल्यांदाच अॅशेस मालिका अनिर्णित* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ बुलेटीनची audioclip ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे. https://sharechat.com/post/q1OWE57 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मराठवाडा मुक्तीसंग्राम दिवस* https://nasayeotikar.blogspot.com/2016/09/17-september.html?m=1 लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *जलविद्युतनिर्मिती म्हणजे काय ?* 📙 पाणी उंचावरून नेहमीच समुद्रपातळीकडे झेपावत असते. मग हा वेग पातळीनुसार वाढतो वा मंदावतो. जेव्हा ही पातळी खूप उंच असेल तेव्हा या वाहणाऱ्या पाण्याच्या जोराचा वापर करून जलविद्युतनिर्मिती केली जाते. उंच डोंगरमाथ्यावर असलेले धरणाचे पाणी प्रचंड आकाराच्या पाइपमधून बांधलेल्या जलविद्युतगृहातील जनित्रावर सोडले जाते. या पाण्याच्या ताकदीने ही अवाढव्य जनित्रे फिरतात व विद्युतनिर्मिती होते. संपूर्ण भारतात अशा स्वरूपाचे प्रकल्प एकूण विजेच्या ६ टक्के वीज निर्माण करून आपली गरज भागवतात. कोयना प्रकल्प हा त्यातीलच एक आहे. कोयनानगर येथे धरण बांधून तेथील पाणी पाईपमधून वीस किमी दूरवरील पोफळी येथे वाहून नेले जाते. या दरम्यान असलेल्या जवळजवळ सरळ उताराचा परिणाम म्हणून या पाण्याचा वेग व ताकद गुरुत्वाकर्षणाने वाढते व त्यापासून खूपच मोठय़ा प्रमाणात वीज निर्माण होते. मुळशी येथे धरण बांधून तेथील पाणी खोपोली येथेपर्यंत असेच खोलवर वाहून आणले जाते व तेथील विद्युतनिर्मिती केंद्र चालवले जाते. पाण्याच्या साठ्याची पातळी व जनित्राची पातळी यात फरक जितका जास्त तितकी वीजनिर्मिती अधिक करता येऊ शकते. यात आणखीही एक बाब ध्यानात ठेवावी लागते. वीज ही बाराही महिने लागणारी गोष्ट आहे. तिचा वापरपण रोज दिवसा जास्त व रात्री कमी होत जातो. पाण्याचा साठा मात्र फक्त पावसाळ्यातच होणार असतो. पाण्याचा सर्वच साठा वापरण्यायुक्त नसतो तर धरणात साठत जाणारा गाळ लक्षात घेऊन पाणी घेण्याची जागा ठरवावी लागते. यामुळे जलविद्युतनिर्मितीचे गणित फार थोड्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर उपयुक्त ठरू शकते. अन्य ठिकाणी तिचा वापर पूरक म्हणून वा साखळीयंत्रणेचा (Grid) भाग म्हणूनच करावा लागतो. पूरक वापर म्हणून, साखळीयंत्रणेचा भाग म्हणून जेव्हा जलविद्युत वापरली जाते, तेव्हा जगात काही ठिकाणी एक गमतीदार योजना वापरली जाते. पाण्याच्या साठय़ातून जनित्रावर कोसळणारे पाणी पुन्हा साठवले जाते. रात्रीच्या वेळी जेव्हा अन्यत्र विजेचा वापर अगदी कमी असतो, तेव्हा इतरत्र निर्माण झालेली, पण न वापरली जाणारी वीज वापरून हेच पाणी याच जनित्रांचा पंपासारखे उलटा वापर करून मूळ साठ्यात पाठवले जाते. वीज साठवून ठेवता येणे अवघड असल्याने रात्रीच्या वेळी नको असलेली, वाया जाणारी, स्वस्त उपलब्ध असणारी वीज वापरण्याची ही पद्धत आहे. यासाठी फार मोठे तांत्रिक बदल करण्याची गरज पडत नाही, तर फक्त योग्य वेळी व योग्य तितका वेळ यंत्रणेच्या वीजपुरवठा नियंत्रणाची दिशा बदलण्याची गरज असते. याखेरीज खूप उंचावरून पाण्याचा वा नदीचा प्रवाह लांबवर वाहत जाणार असेल, तर विविध पातळ्यांवर जलविद्युतनिर्मिती केंद्रे उभारता येतात. भाक्रानांगल येथे किंवा सरदार सरोवर या प्रकल्पात ही योजना राबवली जाईल. टेनेसी व्हॅली योजना या पद्धतीतच काम करते. लांबवरचा विचार करता जलविद्युत ही स्वस्त पडते. देखभाल कमी लागते. पण सुरुवातीचा भांडवली खर्च खूपच मोठा असतो. जलविद्युत केंद्र उभारताना बांधाव्या लागणाऱ्या धरणांमुळे विस्थापितांची संख्या नेहमीच मोठी असते. त्यामुळे त्याला समाजाचा विरोध होतोच; पण औष्णिक विद्युतनिर्मितीमुळे होणारे वातावरणातील प्रदूषण आसपासच्या गावांवर विपरीत परिणाम करत असतेच. त्यातून निर्माण होणारी प्रचंड प्रमाणावरची राख, काजळी, धुर यांची विल्हेवाट लावणे हाही एक फार मोठा प्रश्न म्हणून काही वर्षांनी उभा राहतो. दूरगामी विचार करून कशाला सामोरे जायचे हे ठरवणे सोपे मात्र नक्कीच नाही. *'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *“ इतिहास हा काळाचा साक्षीदार असतो आणि सत्याचा प्रकाश असतो. ”* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *पंचायत राजची व्यवस्था कोणत्या साली अस्तित्वात आली ?* 1962 2) *शेतकऱ्यांना 7/12 व 8-अ चे उतारे कोण देतो ?* तलाठी 3) *महसूल खाताचा वर्ग-2 चा अधिकारी कोण असतो ?* तहसीलदार 4) *'तालुका दंडाधिकारी' म्हणून कोण काम पाहतो ?* तहसीलदार 5) *'ऑस्कर' या पुरस्कारासाठी नामांकन झालेला पहिला मराठी चित्रपट कोणता ?* श्वास ( 2004 ) *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● मा. नरेंद्र मोदी, पंतप्रधान ● कु.स्वराज्ञा चंद्रकांत इंद्राक्षे ●  बालाजी गाडेवाड ●  जितेंद्र टेकाळे ●  ज्ञानेश्वर पाटील ●  श्रीनिवास वंगल ●  दयाकर रेड्डी ●  किसन कोनापुरे ●  अक्षय वानोले *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *ज्या महापुरूषांनी आपलं कर्तृत्व सिद्ध केले आहे, ज्यांनी समाजासमोर आपले आदर्श उभे केले आहेत, ज्यांच्या विचारांनी समाजाला दिशा आणि गती मिळाली. अशा महापुरूषांचे पुतळे आपण उभे करतो किंवा केले आहेत. त्यांच्या विचारांची एक रेष पुसण्यासाठी ताकद न काळात असते न व्यवस्थेत. अर्थात, या पदापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी त्यांच्या आयुष्याची पुरेपूर किमंत मोजलेली असते. शाळा-महाविद्यालय तथा विद्यापीठीय पदव्यांची भेंडोळी त्यांनी मिळवलेली नसते. त्यांनी ज्या परिक्षा दिलेल्या असतात; जे पेपर सोडवलेले असतात; ते सामान्यांच्या आवाक्याबाहेरचे असतात.* *त्यांचा व्यासंग, त्यांची साधना, त्यांचा त्याग, त्यांची सेवा, त्याचं कर्तृत्व यामुळे त्यांनी गगनाएवढी उंची गाठलेली असते. मात्र, त्यांना एका झटक्यात आपण दगडाचा पुतळा करून खुजं करून टाकतो. याचं भान जसं आपल्याला नसतं, तसंच त्यांनी उभ्या केलेल्या मूल्यांचा न आपला अभ्यास असतो न तपास केलेला असतो. जयंती-पुण्यतिथीत मिरवणूक काढून डीजेच्या तालावर नाचून घेणे. ही त्यांच्या कार्याप्रती आपण परत केलेली पावती आपल्या स्वत:लाच वाटत असते. हाच मोठा विनोद आहे. ज्यांनी समाजाच्या उद्धारासाठी आपली संपूर्ण हयात खर्ची घातली, अशा महापुरूषांचे विचार आपल्या मनात रूजविण्याऐवजी आपण अतिशय उथळ कृतीत रममाण झालो आहोत. त्यांनी त्यांचे जे विचार इथल्या मातीत पेरलेले असतात, त्यांचे दरसाल उगवून येणे महत्वाचे असते. आपण थेट कोंभानाच खुरपं लावतो.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱 *संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल- 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो,* *आपल्याला जुन्या अभ्यासात एक* *कविता होती,* *अरे अरे कळसा नको वळून तू पाहू,* *पायरीचा मी दगड ,अरे तुझाच की* *भाऊ।* *खरंय आज क्षणाक्षणाला माणुसकी* *हरवत चालल्याची* *उदाहरणे आपण पावलो पावली* *अनुभवतो आहे.* *माणूस म्हणून जन्मा आलो,माणूस* *म्हणून जगेन मी । ही* *भावना प्रत्येकाच्या ठाई असणं* *आवश्यक आहे.* *यावर कबीरजी खूप छान भाष्य* *करतात.👉* *प्रेमभाव  एक  चाहिए ,*  *भेष  अनेक  बनाय  |* *चाहे  घर  में  वास  कर ,*  *चाहे  बन  को  जाए  |*        *मानवाचा धर्म मानवता .* *मानवता जपायची तर मानवाच्या* *अंतरात प्रेमभावनेचे* *अधिष्ठान महत्वाचे आहे. त्या शिवाय* *मानवता व मानव्य कसं* *प्रवाहित होणार ?  भौगोलिक व* *भौतिक परिस्थितीशी समायोजन* *साधण्यासाठी भिन्न वेष* *परिधान करा .   विभिन्न प्रकारच्या वास्तूत  किवा वनात वास्तव्य करा ते परिस्थितीनुरूप* *स्वाभाविक आहे. परंतु त्यात अवडंबर असता कामा नये. सत्य  व प्रेमभाव हाच खर्‍या जीवनाचा मुलाधार आहे.* *त्यामुळे जीवनाची गोडी व सुंदरता वाढते  म्हणून* *माणसाने  अशाश्वत अवडंबराच्या व बुवाबाजीच्या नादी* *लागून जगण्याला  विनाकारणच अंधानुकरणी व भंपक* *बनवू नये . ते मानवतेला* *पूरक असू शकत नाही.* *आणि* *शोभतही नाही.*        *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• घर जेव्हा बांधलं जातं तेव्हा मुख्यत: पायाभरणीचा विचार केला जातो, नंतर भिंतीचा आणि त्यानंतर डोक्यावर असणा-या छताचा.हे जरी खरं असलं तरी यात प्रामुख्याने रेती, सिमेंट,वीटा,गजाळी आणि बांधकाम करणा-या कारागिरांचे कौशल्य लागते.केवळ कोणत्याही एका घटकावर घर पूर्ण होत नाही. त्याचप्रमाणे माणसांच्या व्यक्तिमत्त्व विकासाचे आहे.जर व्यक्तिमत्त्व विकासाचे पहायचे झाले तर लहानपणी घरात असणा-या आईवडिलांचे संस्कार, नंतर घरातल्या इतर रक्तातल्या नात्यातील लोकांचे संस्कार,परिसरातील मित्र,शेजारी यांच्या सहवासातून घडलेले संस्कार,शाळेतील शिक्षकांकडून घडवल्या गेलेले संस्कार आणि पुस्तकांच्या माध्यमातून वाचनातून मनावर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष घडल्या गेलेले संस्कार या सर्व घटकातून मिळालेली उत्तम संस्कारांची पायाभरणी हीच खरी माणसांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी लागणारे घटक आहेत.यातील एखाद्या जरी घटकांकडून कमतरता भासली तर व्यक्तिमत्त्व विकास व्हावा तितका होऊ शकत नाही.हे सारे घटक माणसांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी लागणारे पायाभूत घटक आहेत.ज्याप्रमाणे घर मजबूत करण्यासाठी पायाभरणी आणि त्यासाठी लागणारे बांधकाम साहित्य उत्कृष्ट दर्जाचे असायला हवे तेव्हाच घर कुठे चांगले सुंदर बनू शकते त्याचप्रमाणे व्यक्तिमत्त्व विकासासाठी लागणारे वरील उल्लेखिलेल्या घटकांची नितांत गरज आहे.यातला एकजरी घटक कमी पडला तर माणसांच्या व्यक्तिमत्त्व विकासाचा पाया कच्चा राहू शकतो.म्हणून यांना आपल्या जीवनात महत्त्वाचे खरे स्थान आहे हे विसरून चालणार नाही. © व्यंकटेश काटकर, नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🏠🏕🏠🏕🏠🏕🏠🏕🏠🏕🏠 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आजी आणि दरोडेखोर* एका जंगलामध्ये *एक म्हतारी* आणि तिची नात राहत होती आणि त्याच जंगलामध्ये *चार दरोडेखोर* लुटमार करण्यासाठी येत असंत . एके दिवशी लुटमार करता करता संध्याकाळ झाली आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची सुरुवात झाली . ते चार दरोडेखोर जंगलामध्ये *आश्रयासाठी* सैरभैर पळु लागले . अचानक त्यांना म्हतारीची *झोपडी* दिसली .आणि ते म्हतारीच्या झोपडीकडे गेले. म्हतारीने त्यांना रात्री साठी आश्रय दिला. म्हतारीने जेवण बनवले सर्वजन जेवायला बसले आणि जेवता जेवता *पाप पुण्याचा विषय* निघाला. प्रत्येकजण आपल्या परीने विषय मांडत होता. शेवटी म्हतारीने *पैज लावली*. बाहेर विजा पडत आहेत प्रत्येकाने त्या समोरच्या झाडाला शिवुन पुन्हा झोपडीमध्ये यायचे *ज्याच्या अंगावर विज पडेल तो पापी आणि जो सुखरुप पुन्हा झोपडीत येईल तो पुण्यवान.* प्रथम १ ला दरोडेखोर गेला झाडाला शिवुन सुखरुप झोपडीत आला. असे दुसरा गेला ,तिसरा गेला, चौथा गेला. आणि सर्वजण सुखरुप झोपडीत आले. आता पाळी आली म्हतारी आणि तिच्या नातीवर म्हतारीला मनामध्ये प्रश्न पडला की हे चारही दरोडेखोर पुण्यवान निघाले आपण नक्कीच पापी आहोत, विज आपल्याच अंगावर पडणार असा विचार करत असताना तिने नातीला कडेवर घेतले आणी झोपडीच्या बाहेर पाऊल टाकले. त्याचक्षणी *विजेचा कडकडाट* होऊन विज त्या झोपडीवर पडली आणि क्षणार्धात ते चारही दरोडेखोर जागीच *भस्मसात* झाले. *तात्पर्य * *एका पुण्यवान माणसाच्या आश्रयामूळे* आजही चार पापी माणसं जगु शकतात. पण त्याने *साथ* सोडली तर ते चारही भस्मसात होऊ शकतात. म्हणून *पुण्याचा वाटा* नेहमी घेत रहा. ते कधी संकटाच्या वेळी आडवे येइल हे आपल्याला ही नाही समजनार. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 16/09/2019 वार - सोमवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *जागतिक ओझोन संरक्षण दिन* 💥 ठळक घडामोडी :- ●१९६३ - झेरॉक्स ९१४ या प्रतिमुद्रक यंत्राचे पहिले प्रात्यक्षिक. ●१९६३- मलायाला स्वातंत्र्य.या देशाने मलेशिया हे नाव स्वीकारले. 💥 जन्म :- ◆१९१६ - एम.एस. सुब्बलक्ष्मी, कर्नाटक शैलीतील गायिका. ◆ १९४२ - ना. धों. महानोर, निसर्ग कवी, शेतकरी, आमदार. 💥 मृत्यू :- ●१९८९ - हेमंत कुमार मुखोपाध्याय, प्रसिद्ध गायक, संगीतकार. ● १९९४ - जयवंत दळवी, मराठी साहित्यिक. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *पाकिस्तानने दहशतवादास खतपाणी घालणे थांबवावे अन्यथा पाकिस्तानचे तुकडे होणे अटळ, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला सुनावले* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *अमरावती ( आंध्रप्रदेश ) :- गोदावरीत पर्यटकांनी भरलेली नाव उलटली ; 11 जणांचा मृत्यू तर 27 जण बेपत्ता, एनडीआरएफचे युद्धपातळीवर बचावकार्य सुरू* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजप युतीवर 19 सप्टेंबरला शिक्कामोर्तब, नाशिकमधील महाजनादेश यात्रेच्या समारोप कार्यक्रमात घोषणेची शक्यता* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *बंडखोरांनी अबाकिक आणि खुराइस येथील तेल क्षेत्रांवर हवाई हल्ले केल्यानंतर सौदी अरेबियाने ५० टक्के अर्थात निम्मं तेल उत्पादन थांबण्याचा घेतला निर्णय* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *निवडणूक लढवायला सज्ज, जनआशीर्वाद यात्रेत आदित्य ठाकरे यांचं सूचक विधान* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *मुंबई : भारतीय अंडर नाईन्टिन संघानं बांगलादेशवर निसटती मात करुन सातव्यांदा आशिया चषकावर आपलं नाव कोरलं* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणारा पहिला टी-२० सामना सतत कोसळणाऱ्या पावसामुळे रद्द* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ बुलेटीनची audio clip ऐकण्यासाठीखालील लिंक वर क्लीक करावे. https://sharechat.com/post/rgAWllK ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *गरज तेथे मदत करा* https://nasayeotikar.blogspot.com/2018/05/blog-post_8.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *दूरदर्शन* १५ सप्टेंबर ‘दूरदर्शन’ या केंद्र सरकारने सुरू केलेल्या देशातील पहिल्या दूरचित्रवाणी वाहिनीचा वाढदिवस. १५ सप्टेंबर, १९५९ रोजी एक छोटासा ट्रान्समीटर व स्टुडिओ यांच्या साह्याने दूरदर्शनचे काम चालू झाले. राजधानीत दूरदर्शनची ही मुहूर्तमेढ रोवली जाताना ज्येष्ठ साहित्यिक पु. ल. देशपांडे यांचा त्यात मोलाचा वाटा होता. दुरदर्शनचे पहिले संचालक होते प्रत्येक मराठी माणसाचे लाडके व्यक्तिमत्व पु. ल. देशपांडे! पु. लं. देशपांडेनीच "दुरदर्शन" हे नाव सुचवले. दूरदर्शनवरुन बातमीपत्राची नियमित सेवा १९६५ पासून सुरु झाली. १९७२ मध्ये दूरदर्शन सेवा मुंबईत आली. १९७५ मध्ये चेन्नई, श्रीनगर, अमृतसर व लखनौ या शहरांमध्ये दूरदर्शनचे प्रसारण सुरु झाले. उपग्रहाद्वारे सामाजिक शिक्षण अथवा अत्याधुनिक तंत्रज्ञानातून सामाजिक शिक्षण देण्याचा पहिला प्रयोग भारतात केला गेला. सॅटेलाईट इंस्ट्रक्शनल टेलेव्हिजन एक्सपरीमेंटची चाचणी १९७५-७६ या वर्षी घेण्यात आली. याद्वारेच जगात प्रथमच सामाजिक शिक्षणाचा प्रचार घरोघरी करण्यात आला. १९८२ मध्ये दिल्ली आणि अन्य ट्रान्समिटर्स दरम्यान उपग्रहांमार्फ़त प्रसारण सुरु करण्यात आले. १९८२ मध्ये टीव्ही रंगीत झाला. पंतप्रधानांचे लाल किल्ल्यावरचे भाषण देश पाहू लागला आणि ‘नॅशनल ब्रॉडकास्टर’ ही दूरदर्शनची ओळख रुजली. ‘ऑल इंडिया रेडिओ’च्या सावलीतून दूरदर्शन बाहेर आले. १९८५ नंतर घरोघरी दूरचित्रवाणी संच दिसू लागले आणि मालिकांविषयीच्या चर्चा रंगू लागल्या. चिमणराव आणि गुंड्याभाऊ, चाळ नावाची वाचाळ वस्ती, गोट्या, बंदिनी, एक शुन्य शुन्य, सर्जा राजा, प्रतिभा आणि प्रतिमा, ज्ञानदीप, आमची माती आमची माणसं या मालिका ज्ञान, माहिती आणि निखळ मनोरंजन देण्याचं काम करीत होत्या. व्यत्यय नावाची पाटीही चांगलीच भाव खावून जायची. हिंदीतल्या बुनियाद, हमलोग, ये जो है जिंदगी, रजनी, तमस, रामायण, महाभारत, द वर्ल्ड धिस वीक, दर्पण या मालिकांनी तर मनोरंजनाच्या विश्वात अफाट प्रेक्षक वर्ग मिळवला. अनंत भावे, प्रदीप भिडे, शम्मी नारंग, अविनाश कौर सरीन यांचे आत्मविश्वासाने परिपूर्ण असलेले वृत्तनिवेदन प्रेक्षकांना भारावणारे असेच होते. गेल्या दोन दशकांत झालेल्या संज्ञापन क्रांतीमुळे दूरदर्शनचा भारतातला एकाधिकार संपत गेला. *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *“ उपाशी पोटी साधे अन्न देखील रुचकर लागते. ”* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *आशिया खंडातील सर्वात मोठा खत कारखाना कोठे आहे ?* सिंद्री ( झारखंड ) 2) *मुंग्यांच्या निवाऱ्याला काय म्हणतात ?* वारूळ 3) *पक्ष्याच्या निवाऱ्याला काय म्हणतात ?* घरटे 4) *बाबा आमटे यांचे पूर्ण नाव काय ?* मुरलीधर देविदास आमटे 5) *अण्णा हजारे यांचे पूर्ण नाव काय ?* किसन बाबुराव हजारे *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● प्रसाद मुतनवाड ●  लक्ष्मणराव भवरे ●  साईराम पिंगळे ● मंगेश यादव ● संतोषभाई ओझा ● विठ्ठल आढाव ● कृष्णा डाफने *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *"एका चांगल्या गोष्टीबरोबर दुसरी वाईट गोष्ट सोबतच असते. माणूस विद्वान तर आहे, पण त्याला धन आणि मानाची अपेक्षा असेल तर? ही अपेक्षाच त्याचा नाश करत असते, ही सिद्ध झालेली गोष्ट आहे." अपेक्षेसोबत अपेक्षाभंग असतो, हे पटवून देण्यासाठी प्रमाणाची आवश्यकता नाही. "आपण ज्या ज्या इच्छा करतो, जेवढ्या अपेक्षा बाळगतो त्या सर्वच्या सर्वच पूर्ण कशा होऊ शकतील? पण माणूस हे समजून घेत नाही. हे पाहिजे, ते पाहिजे या आणि अशा अनेक वासना माणसाला शेवटी भीक मागायला लावत असतात." हव्यासापोटी भिकेला लागण्याची वेळ आली तरी माणूस शहाणा होत नाही.* *जुगारात मिळण्याची अपेक्षा सर्व घालवून बसते. राज्यच काय पण बायकोला सुद्धा 'डावात' हरून बसल्याची साक्ष महाभारतासारखे ग्रंथ देतात. संत तुकाराम आपल्याला शहाणं करण्याचा प्रयत्न करत आहेत. इच्छेतून अपमानित होण्याची वेळ येणार नाही ही काळजी घेतलीच पाहिजे. "एखाद्या गाढवाचं 'राजहंस' असं अलंकारीक नाव जरी ठेवलं, तरी त्या नावाचं त्या गाढवाला काय भूषण वाटणार आहे?" गाढवाची राजहंस नाव ठेवण्याइतकीसुद्धा पात्रता नसते आणि त्याला त्याचं भूषणही वाटत नसतं.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 💥💥💥💥💥💥💥💥💥 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल- 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *छोटा प्रयोग करून बघा,* *कोणत्याही परिस्थितीत विचारांमध्ये* *सकारात्मकता* *ठेवा,प्रसंग कितीही छोटा असुद्या* *आपण मात्र मनाला नकारात्मक* *विचाराचा स्पर्श होऊ देऊ* *नका,आपण अलगद संकटातून बाहेर* *पडतो.* *एक लक्षात ठेवा जहरी विषापेक्षाही* *नकारात्मक विचार* *भयंकर विषारी असतात. *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• कोणत्याही परिस्थितीची जाणीव असलेली व्यक्ती कितीही आणि कोणत्याही परिस्थितीला तोंड द्यायला घाबरत नाही.कारण त्याला माहित असते की,आपण घाबरलो तर समोर असलेली परिस्थिती आपल्या पाठीमागे भूतासारखी मागेच लागते आणि जर नाही घाबरलो तर ती तशीच माघारी फिरते.अशा व्यक्तीला परिस्थितीच जगण्याची जाणीव करून देते आणि त्यातून मार्गही दाखवते.त्यामुळे जीवन जगण्याची आशा पल्लवित करते. ज्या व्यक्तीला कोणत्याही परिस्थितीची जाणीव नाही किंवा कोणतीही त्यातून मार्ग काढण्याची कल्पना नाही अशा व्यक्तीच्या जीवनात कोणतीही परिस्थिती क्षुल्लक असली तरी ती भित्र्या सशासारखीच असते. अशी व्यक्ती कोणत्याही परिस्थितीवर मात करु शकत नाही किंवा जीवनात यशस्वी होऊ शकत नाही.कोणत्या परिस्थितीला कसे आणि कोणत्या प्रकारे तोंड द्यायचे याचे थोडेही ज्ञान अवगत नाही किंवा जाणीवही नाही अशा व्यक्तीकडून कोणताही गुण इतरांना घेण्यासाठी मिळणार नाही.समोर असलेल्या परिस्थितीला निभावून नेण्यासाठी आपल्या मनामध्ये परिस्थितीनुरुप जाणीव निर्माण व्हायला हवी.अशी जाणीव प्रत्येकाच्या मनामध्ये उपजतच असते फक्त थोडा विचार करायला शिकले पाहिजे.जाणीव ही एक आपल्याला चांगले जीवन जगण्यासाठी बळ आणि प्रेरणाच देते.त्यामुळे आपल्यातील जाणीवेला नेहमी जीवंत ठेवायला शिकले पाहिजे. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद..९४२१८३९५९०. 🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂 🥙•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *लोभाची शिक्षा* एक इसम यजमानाकडे पूजाअर्चा करून आपला चरितार्थ चालवत होता. दुर्दैवाने देशात दुष्‍काळ पडला. त्‍यामुळे इसमला रोजच्‍या जेवणाची भ्रांत पडली, यापेक्षा मरण पत्‍करलेले परवडले असा विचार करून तो जंगलात गेला. तेथे वाघाला पाहिले. इसमाने विचार केला, या वाघाने मला जर खाल्‍ले तर तर त्‍याची भूक भागेल व माझीही मृत्‍यूची इच्‍छा पूर्ण होईल. तसा तो वाघासमोर उभा राहिला. वाघ मनुष्‍यवाणीत बोलू लागला,''तू असा माझ्यासमोर का उभा आहेस'' इसमाने आपली कर्मकहाणी त्‍याला सांगितली. तेव्‍हा वाघाला त्‍याची दया आली. तो प्रत्‍यक्षात वाघ नसून वाघाचे रूप घेतलेली वनदेवता होती. वनदेवतेने आपले खरे रूप प्रगट करून त्‍याला एक हजार सुवर्णमुद्रा व धान्‍य दिले व भविष्‍यात कधीही आत्‍महत्‍येचा विचार करू नकोस असे बजावून त्‍याला परत पाठविले. इसम अत्‍यानंदाने घरी परतला. दुस-या दिवशी एक सुवर्णमुद्रा घेऊन तो दुकानदाराकडे सामान खरेदी करण्‍यासाठी गेला तेव्‍हा दुकानदाराने या सुवर्णमुद्रा तुला कोठे मिळाल्‍या असे विचारले असता भाबडेपणाने त्या इसमाने खरेखरे सर्व सांगून टाकले. लोभी दुकानदाराला तोंडाला पाणी सुटले. त्‍यानेही तसेच वागण्‍याचे ठरविले. दुस-याच दिवशी त्‍याने जंगलात जाऊन त्‍याच ठिकाणी ठिय्या मांडला. वाघ त्‍याच्‍यासमोर प्रगटला. त्‍याला व्‍यापा-याने खोटी कर्मकहाणी सांगितली. वाघाला तत्‍काळ समजले, हा खोटे बोलत आहे, त्‍याने त्‍याच्‍यावर हल्‍ला चढवला आणि जखमी व्‍यापा-याला सुनावले, आज तुला जिवंत सोडत आहे ज्‍यायोगे तू असे धाडस पुन्‍हा करणार नाहीस तात्‍पर्य – लोभाने माणसाच्‍या जीवावरही बेतू शकते, लोभ माणसाचे नुकसान करतो. लोभ टाळणे आवश्‍यक आहे. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 14/09/2019 वार - शनिवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~ https://fmbuletin2019.blogspot.com/2019/09/4-0650-0700.html •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *राष्ट्रीय हिंदी दिवस* 💥 ठळक घडामोडी :- ◆२००० - मायक्रोसॉफ्टने आपल्या एम.एस.-डॉस या संगणकप्रणालीची शेवटची आवृत्ती (८.०) प्रकाशित केली. याचबरोबर विंडोज एम.ई. या प्रणालीचेही वितरण सुरू केले. ◆१९६०- OPEC ( Organisation Of The Petroleum Exporting Countries) ची स्थापना . ◆१९५९-सोव्हिएत संघाचे लुना २ हे अंतरिक्षयान चंद्रावर कोसळले.चंद्रावर पोहोचणारी ही पहिली मानवनिर्मित वस्तू होती. 💥 जन्म :- ●१९२३- स्व. राम जेठमलानी , माजी केंद्रीय कायदामंत्री,कायदेपंडित. ●१९१९ - न्यालचंद शाह, भारतीय क्रिकेट खेळाडू. ● १९६३ - रॉबिन सिंग, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- ●२०११ - हरिश्चंद्र माधव बिराजदार, मराठी पहिलवानी कुस्तीगीर व प्रशिक्षक. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याला सुरूवात, 19 सप्टेंबरला नाशिकमध्ये होणार समारोप* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजेंचा उद्या दिल्लीत भाजप प्रवेश, राजेंची ट्विटरद्वारे माहिती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *मंत्रिमंडळ विस्तारप्रकरणी राज्य सरकारला अखेर मोठा दिलासा, मंत्रिमंडळ विस्ताराला आव्हान देणारी याचिका हायकोर्टानं फेटाळली, पक्ष बदलणाऱ्या नेत्यांचा फैसला आगामी निवडणुकीत मतदारच करतील, सुनावणीदरम्यान हायकोर्टाचं* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *निवड रद्द झालेल्या 118 सहायक मोटार वाहन निरीक्षकांची अतिरिक्त पदावर नियुक्ती करणार, परिवहन मंत्री दिवाकर रावते यांची माहिती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *येत्या 31 डिसेंबरपर्यंत बांद्रा स्कायवॉकची दुरुस्ती करुन तो पुन्हा खुला करणार, मुंबई महापालिका प्रशासनाची उच्च न्यायालयात ग्वाही* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *भोपाळमध्ये गणपती विसर्जनादरम्यान मोठी दुर्घटना, बोट उलटून 11 जणांचा मृत्यू* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *10 सरकारी बँकांच्या विलिनिकरणाच्या निर्णयाविरोधात बँक कर्मचाऱ्यांच्या चार संघटनांनी 26 आणि 27 सप्टेंबर रोजी संपाचा दिला इशारा, चौथा शनिवार आणि रविवार या सुट्टीच्या दिवसांना जोडून हा संप पुकारण्यात आल्यानं बँकेचे कामकाज चार दिवस ठप्प राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *राष्ट्रीय हिंदी दिवस* देश में 14 सितंबर 1953 को पहली बार हिंदी दिवस मनाया गया और उसके बाद से ही हर साल 14 सितंबर को पूरे देश में हिंदी दिवस बड़े ही उत्साह के साथ मनाया जाने लगा.  हिंदी ने हमें दुनियाभर में पहचान दिलाई है. भारत ही नहीं बल्कि दुनिया भर के कई देशों में हिंदी बोली जाती है. हिंदी विश्व की प्राचीन, समृद्ध और सरल भाषा है. राष्‍ट्रपिता महात्‍मा गांधी ने हिंदी को जनमानस की भाषा कहा था. उन्‍होंने 1918 में आयोजित हिंदी साहित्‍य सम्‍मेलन में हिंदी को राष्‍ट्र भाषा बनाने के लिए कहा था. भारत सालों तक अंग्रेजों का गुलाम  रहा. इसी वजह से उस गुलामी का असर लंबे समय तक देखने को मिला. यहां तक कि इसका प्रभाव भाषा में भी पड़ा. वैसे तो हिंदी दुनिया की तीसरी ऐसी भाषा है जिसे सबसे ज्‍यादा लोग बोलते हैं लेकिन इसके बावजूद हिंदी को अपने ही देश में हीन भावना से देखा जाता है. आमतौर पर हिंदी बोलने वाले को पिछड़ा और अंग्रेजी में अपनी बात कहने वाले को आधुनिक कहा जाता है. इसे हिंदी का दुर्भाग्‍य ही कहा जाएगा कि इतनी समृद्ध भाषा कोष होने के बावजूद आज हिंदी लिखते और बोलते वक्‍त ज्‍यादातर अंग्रेजी भाषा के शब्‍दों का इस्‍तेमाल किया जाता है. और तो और हिंदी के कई शब्‍द चलन से ही हट गए. ऐसे में हिंदी दिवस को मनाना जरूरी है ताकि लोगों को यह याद रहे कि हिंदी उनकी राजभाषा है और उसका सम्‍मान व प्रचार-प्रसार करना उनका कर्तव्‍य है. हिंदी दिवस मनाने के पीछे मंशा यही है कि लोगों को एहसास दिलाया जा सके कि जब तक वे इसका इस्‍तेमाल नहीं करेंगे तब तक इस भाषा का विकास नहीं होगा.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ संकलन :- *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *मेहंदीने हात कसे रंगतात ?* 📙 मुलीचे हात पिवळे केले की सुटलो. असं पूर्वीचे वधुपिते म्हणत असत. कारण पारंपारिकरित्या लग्नाच्या आधी नवऱ्या मुलीला आणि मुलालाही हळद लावून स्नान घालण्याचा प्रघात आहे. अजूनही तो चालू आहे. पण आजकालच्या लग्नात नवर्या मुलीचे आणि तिच्या बरोबर इतर महिलांचेही हातपाय मेहंदीने रंगून काढण्याची प्रथा वाढीला आलेली आहे. अनेक बारीक बारीक नक्षीदार मेहंदींनं हात पावलं आणि कपाळ किंवा गालही रंगवण्यासाठी खास कलाकारांना आमंत्रण दिलं जातं. या मेंदीचा लालसर रंग गोऱ्या आणि सावळ्याही कातडीवर खुलून दिसतो. पण ही किमया नेमकी साध्य होते कशी? लाॅसोनिया इनर्मिस या वैज्ञानिक नावांनं ओळखल्या जाणाऱ्या झुडपांची पानं यासाठी वापरली जातात. मध्यपूर्वेत याला हिना म्हणतात आणि भारत उपखंड वगळल्यास इतरत्र हेच नाव जास्त प्रचलित आहे. ही पानं इतर पत्री सारखी हिरवी असली तरी त्यांच्यामध्ये लाॅसोनिया या नावाचं लाल शेंदरी रंगाचं रंगद्रव्य असतं. नेपाळच्या जातकुळीतला या रसायनाचा रेणू अमिनो आम्लापेक्षा थोडासा मोठा आणि ग्लुकोज सारख्या प्राथमिक शर्करेच्या रेणूपेक्षा थोडासा लहान असतो. मेहंदीच्या झुडपांच्याही वेगवेगळ्या जाती आहेत. प्रत्येक जातीतील रंगद्रव्यात थोडाफार फरक असल्याने त्या रंगांचा छटेमध्येही फरक आढळतो. सामान्यत: हा रंग लाल नारिंगी असला तरी बुर्गुडी मद्दयासारखा दालचिनी सारखा तपकिरी, काळसर चॉकलेटी चेरी सारखा गडद लाल, अशा वेगवेगळ्या रंगांची मेंदी मिळते. आपल्या कातडीच्या वरच्या थरातल्या पेशींच्या बाह्य आवरणामधील फाॅस्फोलिपीड रसायनाच्या किंवा त्या पेशीला प्रथिनांच्या रेणूपेक्षा या रसायनाचे रेणू लहान असतात. व सहजगत्या त्यांच्यात मिसळून जातात. प्रथिनांच्या रेणूंना ते मिठी मारून बसतात. केसांमधल्या कॅरॅटीन या प्रथिनाशी त्यांची प्रक्रिया होते. जर केसांमध्ये कॅरेटीनचं प्रमाण जास्त असेल तर लाॅसोनियाही जास्त प्रमाणात तिथं रुतून बसतो व केसांचा रंग लक्षणीयरित्या पालटतो. साधारणत: अठ्ठेचाळीस तासानंतर तो काळसर होऊ लागतो. पानांमधला रंग उतरून कातडी मध्ये किंवा केसांमध्ये जिरावा यासाठी त्या पानांच्या वाटण्यात लिंबाचा रंग मिसळला जातो. त्यातला सायट्रिक आम्ल रंग अधिक गडद करतं. तळहातावरच्या किंवा तळपायावरच्या कातडीत शिरलेल्याल्या लाॅसोनियाला जर वाफेचा स्पर्श झाला तर त्याचा रंग गडद तपकिरी किंवा काळसर बनतो. *बाळ फोंडके यांच्या 'कसं' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *“ खोटारडा जेव्हा खर बोलतो, तेव्हा कुणीही त्याच्यावर विश्वास ठेवत नाही. ”* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *हिंदी दिवस केव्हा साजरा केला जातो ?* 14 सप्टेंबर 2) *केळीचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यात होते ?* तामिळनाडू 3) *भारतातील सर्वात लांब धरण कोणते ?* हिराकुंड 4) *कोणत्या प्राण्याचे ह्रदय सर्वात मोठे असते ?* जिराफ 5) *आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे मुख्यालय कोठे आहे ?* वाशिंग्टन *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● सायन्ना गुरुजी येवतीकर ●  विवेक जैपाल ठाकूर ●  मेधा पुराणिक देसाई ●  अशोक चव्हाण, माहूर ●  सदाशिव जाधव ●  अनिल लांडगे ●  नितीन भोसले ●  सतीश कोटगीरे ● बालाजी कुदाळे ● उषा नळगीरे ● मधुसूदन कुलकर्णी *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*    [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मृत्यूपूर्वी आपण आपला मृत्यूदिन जाणू शकत नाही. मरण पावल्यानंतर आपली पुण्यतिथी, आपल्याकडे पाप्याचीही मेल्यावर पापतिथी नव्हे, पुण्यतिथीच कशी पार पडेल, हा प्रश्नच अर्थशून्य आहे. आप मर गये, दुनिया डुब गयी ॥ मृत्यू झाल्यानंतर मुक्ती मिळावी अशी तीव्र इच्छा असते. मरणापूर्वी एकदातरी देवाचे दर्शन व्हावे अशी भक्तांची आंतरिक ओढ असते. परंतु संत तुकारामांप्रमाणे सदेह स्वर्गात जाण्यासाठीचा स्वर्गाचा व्हिसा इतर कुणासही लागू नाही.* *पुण्यकर्मे केल्याने मोक्ष मिळतो का? अहो, एकदाचा सोक्षमोक्ष झाल्यावर कसला मोक्ष? भक्तिभावे सतत नामस्मरण केल्यानेही मृत्यू सुखद होतो काय? नाही...! तुम्ही देवभक्त आहात की दैत्यभक्त याच्याशी मृत्यूला कर्तव्य नाही. मृत्यू स्थितप्रज्ञ आहे. पापपुण्य, सुख-दु:ख, खरे-खोटे, राव-रंक सर्व मनुष्यनिर्मित आहेत. भूकंप आस्तिक-नास्तिक पाहात नाही. सर्वांना एकाच वेळी भुईत दफन करतो. तुफान सज्जन-दुर्जन असा भेद मुळीच ठेवत नाही. मृत्यू हाच एकमेव पूर्ण आणि अंतिम सत्य आहे. पण हा मृत्यू कसा अनुभवायचा? मृत्यूचा अनुभव सांगायला मृत व्यक्ति कुठे उपलब्ध असते. परंतु मृत्यू अनुभवत मृत्यूच्या सर्वोच्च परमानंदासह विश्वरूपाशी एकरूप होता येते, संत ज्ञानेश्वर, संत विनोबा भावे, स्वा. सावरकर हे या अनुभवांसह शून्यरूप झालेत.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• ☀☀🌟☀☀☀☀☀☀ *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल- 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो* *दोस्त दोस्त ना रहा,प्यार प्यार ना रहा।* *जिंदगी हमे तेरा एतबार ना रहा।* *🕺असे उदास चेहरे रस्त्या-रस्त्यावर* *हल्ली बघायला* *मिळतात.सन्मार्ग* *दाखवणारे वाटाडे कुठे दिसत नाही.* *आज, साधू साधनेत कमी आणि* *साधनात जास्त प्रमाणात* *वावरतांना आपण* *पाहतो.फक्त पाहत नाही तर त्याच्या* *अंधश्रधारूपी विषारी* *वृक्षांना खत पाणी घालतो आणि* *आपल्याच विनाशासाठी* *वाढवतो.तारूण्य आणि संगत यांचे* *महत्व विशद करताना* *डॉ* *.कलाम 'आपले मित्र, चित्र आंणि* *चरित्र नेहमी पवित्र ठेवा; असे सांगतात.कारण तेच खरे जीवनाचे* *अस्त्र आहे. तुम्हाला तर हे माहित आहे की., चारित्र्याचे पतन* *होण्यासाठी बहुधा चुकीचे मित्र आणि चुकीचे चित्र यांचाच हात* *असतो. चुकीचे मित्र आणि चुकीचे चित्र हेच चारित्र्य नष्ट* *करण्याचे शस्त्र आहे किंवा असेही म्हणता येईल की, कधीही न चुकणारे* *ब्रम्हास्त्र आहे.' तारुण्याच्या सळसळत्या उर्जेवर* *स्वार्थी व्यवस्थांचा डोळा असतो. त्यामुळेच तारूण्याची ऊर्जा सैरभैर* *करून तिला आपल्या इच्छेप्रमाणे वापरण्याचे धूर्त* *राजकारण या स्वार्थी व्यवस्था करत असतात. तारुण्याच्या ऐन उमेदीचा* *कालखंड निरर्थकपणे या स्वार्थी व्यवस्थेच्या नेतृत्वामागे* *घालविला जातो.** *एखादी पाण्याची बाटली वापरून फेकून द्यावी, त्या पद्धतीने तरुणांच्या ऊर्जेचा वापर करून त्यांना शेवटी फेकून दिले जाते. सर्व बाजूंनी निष्क्रिय केलेल्या तरूणांवर शेवटी पश्चात्तापाची वेळ येते. तारूण्याचे रखरखीत वाळवंट होते. आपले तारूण्य विवेकशून्य व्यवस्थेच्या हाती द्यायचे की, स्वत:वर विश्वास ठेवत स्वकर्तृत्वाच्या बळावर समाज जीवनात उजळवून टाकायचे हे ज्याला समजले, त्याला तारुण्याचा खरा अर्थ कळला. माजी राष्ट्रपती डाॅ. ए.पी.जे. अब्दुल कलाम हे युवकांना देशाची संपत्ती म्हणायचे, ही संपत्ती देशासाठी आपत्ती ठरू नये म्हणून तरूणांनी आपले मित्र विचारपूर्वक निवडावेत.* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• प्रत्येकाच्या जीवनात निराशा ही सवतीसारखी नेहमी मनाला छळत असते.ती सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने मनाला विचलीत करते.अशा स्थितीतून तिला हद्दपार करण्यासाठी काही ना काहीतरी करण्यासाठी तो आशेकडे धावतो आणि त्यातुन सुटका करून घेतो.अर्थात जीवनात निराशेने घर केले तर नक्कीच आशेचा शोध घेऊन निराशेला बाजूला सारतो आणि जीवन निराशेतून मुक्त करतो.निराशा जरी जीवनात आली तरी घाबरायचे नाही तिला हिमतीने तोंड देत आशेचा शोध घ्यायला शिकले पाहिजे आणि त्यादृष्टीने प्रयत्न केले पाहिजे.हीच आपल्या जीवनाची खरी परीक्षा आहे. © व्यंकटेश काटकर,नांदेड संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🥗•••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *विद्या विनियेन शोभते* राजा ज्ञानसेनच्‍या दरबारात दररोज शास्‍त्रार्थ केला जात असे. विद्वान लोक तेथे शास्‍त्रासंबंधी चर्चा करण्‍यासाठी येत असत. जे विद्वान लोक शास्‍त्रात पारंगत किंवा वादविवादात जिंकत असत ते विजयी म्‍हणून घोषित केले जात असत त्‍यांना राजा धन आणि मान देऊन सन्‍मानित करत असे. एक दिवस राजा ज्ञानसेनाच्‍या दरबारात असाच शास्‍त्रार्थ चालला होता. त्‍या सभेत पंडित भारवी याला विजयी घोषित करण्‍यात आले. राजाने त्‍याचा भरसभेत सत्‍कार केला व मान देण्‍यासाठी त्‍याची हत्तीवरून मिरवणूक काढली. त्‍याच्‍या विद्वत्तेच्‍या सन्‍मानार्थ राजा स्‍वत: त्‍याला चव-या ढाळत त्‍याला घरापर्यंत सोडण्‍यास आला. भारवी एवढ्या मोठ्या सन्‍मानाने घरी आला हे पाहून भारवीच्‍या आईवडीलांना आकाश ठेंगणे झाले. घरी आल्‍याबरोबर भारवीने मातेला साष्‍टांग नमस्‍कार केला पण पित्‍याला मात्र उपेक्षेने उभ्‍याउभ्‍याच नमस्‍कार केला. त्‍याच्‍या वर्तनात हे साफ दिसून येत होते की जणू काही पित्‍याला हे सुचवित होता बघा माझा किती सन्‍मान झाला आहे, माझ्या ज्ञानाला किती किंमत मिळते आहे, स्‍वत: राजा हत्तीवर चव-या ढाळत मला सोडायला घरी आला आहे. पित्‍याने त्‍याच्‍या त्‍याही नमस्‍काराचा स्‍वीकार केला आणि त्‍याला चिरंजीवी भव असे म्‍हटले. गोष्‍ट इथेच संपली असे नाही. मात्‍यापित्‍यांला हे भारवीचे वागणे खटकले. ते दोघेही उदास राहू लागले. भारवीच्‍या यशाने ते जेवढे आनंदी राहायला पाहिजे होते तितके ते आनंदी नव्‍हते. याचे कारणही स्‍पष्‍ट होते की भारवीला यश पचविता आले नव्‍हते व तो ते आईवडीलांना दर्शवित होता. तो यशाच्‍या धुंदीत शिष्‍टाचार आणि विनम्रतेला विसरून गेला होता. थोड्या दिवसांनी माता आणि पित्‍याला उदास पाहून भारवीने मातेला याचे कारण विचारले असता माता म्‍हणाली,’’ तू विजयी होऊन आलास हे ठीक आहे, पण तू विजयी होण्‍यासाठी तुझ्या वडीलांनी घेतलेले परिश्रम तू विसरलास. तू शास्‍त्रार्थ करायला जाणार होतास त्‍याआधी दहा दिवस तुझ्यासाठी निर्जळी उपवास केले होते व त्‍या काळात ते परमेश्‍वराकडे एकच मागणे मागत होते माझ्या मुलाला यश मिळवून दे. लहानपणापासून केवळ तुझ्या यशासाठी त्‍यांनी कितीतरी स्‍वत:च्‍या इच्‍छा दाबून ठेवल्‍या व तुला शास्‍त्रपंडीत बनविले आणि केवळ एकाच यशाने उन्‍मत्त होऊन तू त्‍यांची उपेक्षा केलीस हेच आम्‍हा दोघांच्‍या खिन्नतेचे कारण आहे.’’ हे ऐकताच भारवीला आपली चूक समजली त्‍याने मातापित्‍याच्‍या चरणावर अक्षरश: लोळण घेतली. अनेकवेळा क्षमायाचना केली व आयुष्‍यात पुन्‍हा कधीही त्‍याने मातापित्‍यांची सेवा करण्‍यात कसूर केली नाही. तात्‍पर्य :- आयुष्‍यात आपल्‍याला कितीही मोठी यशाची शिखरे पादाक्रांत करण्‍यास मिळाली तरी त्‍यापाठीमागे आपल्‍या आईवडीलांची पुण्‍याई असते हे प्रत्‍येकानेच समजून घेतले पाहिजे. यश कितीही मिळाले तरी उन्‍मत्त होऊ नये कारण विद्या ही नेहमी विनय असणा-यांकडेच शोभून दिसते. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 13/09/2019 वार - शुक्रवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- ◆२००८- दिल्ली येथे झालेल्या बॉम्बस्फोटाच्या मालिकेत ३० जण ठार तर सुमारे १३० जण जखमी झाले. ◆२००३ - ज्येष्ठ गायक पं. दिनकर कैकिणी यांना तानसेन पुरस्कार, तर मेंडोलिन वादक यू. श्रीनिवास यांना राष्ट्रीय कुमार गंधर्व पुरस्कार जाहीर. ● १९४८- *ऑपरेशन पोलो*- विलीनीकरणासाठी भारतीय सैन्याने हैदराबाद वर चढाई केली. 💥 जन्म :- ●१९६९- शेन वार्न ,ऑस्ट्रेलियन लेग स्पिनर ●१९८० - वीरेन रास्किन्हा, भारतीय हॉकी खेळाडू. 💥 मृत्यू :- ●२०१२- रंगनाथ मिश्रा,भारताचे २१ वे सरन्यायाधीश. ●१९२८ - श्रीधर पाठक, हिंदी कवी. ●१९७१ - केशवराव दाते, रंगभूमीवरील अभिनेते. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *कुलभूषण जाधवांच्या काऊन्सलर अॅक्सेससाठी भारत पुन्हा आंतरराष्ट्रीय कोर्टात जाणार, पाकिस्ताननं दुसऱ्यांदा काऊन्सलर अॅक्सेसला नकार दिल्यानं भारत आक्रमक* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *पुढच्या वर्षी लवकर या म्हणत लाडक्या गणरायाला निरोप, चांद्यापासून बांद्यापर्यंत वाजत-गाजत बाप्पाच्या विसर्जन मिरवणुका, नागपूर, कोल्हापूर, नाशिक, पुण्यासह राज्यातील अनेक शहरांमध्ये विघ्नहर्त्याला निरोप* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *उदयनराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशाचा अखेर मुहूर्त ठरला; 14 तारखेला पंतप्रधानांच्या उपस्थितीत हाती घेणार कमळ* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *नितीन गडकरींच्या कायद्याला भाजपशासित राज्य सरकारांकडून खो, दिवाकर रावतेंकडूनही मोटार वाहन कायद्याबद्दल पुनर्विचार करण्याचं पत्र* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *महाराष्ट्रासह तीन राज्यांच्या निवडणुकांचा दिल्लीत केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आढावा, लवकरच निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, लोकेश राहुलला डच्चू तर शुभमन गिलला संधी ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *मेरी कोमसह यंदा 9 महिला खेळाडूंची पद्म पुरस्कारांसाठी शिफारस करण्यात आली आहे. त्यात जागतिक सुवर्णविजेती बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूचं नाव पद्मभूषण पुरस्कारासाठी सुचवण्यात आलं आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *रक्तदान : सर्वश्रेष्ठ दान* https://nasayeotikar.blogspot.com/2017/05/blog-post_7.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *चक्रीवादळे का येतात ?* 📙 उन्हाळ्याचे दिवस चालू असतात. भर दुपारी उन्हाचा कडाका अंगाची लाहीलाही करत असतो. जमीन अगदी चटके बसतील, अशी तापलेली व हवा अजिबात पडलेली. झाडाचे तर पानही हलत नाही आणि बघता बघता लांबवर कुठेतरी जमिनीवरची पडलेली पाने वाऱ्याने गोलगोल भिरभिरताना दिसू लागतात. बघता बघता तीच पाने उंचावर उचलली जातात. त्यांच्याबरोबरच धुळीचा लोटही उफाळताना, गरगरताना दिसतो. काही सेकंदातच वाऱ्याची वावटळ आपल्यालाही घेरून टाकते. हेलकावणारी झाडे, वाऱ्याचा सोसाट्याचा आवाज, नाकातोंडात जाणारी धूळमाती यांमुळे सारेच कसे भीषण वाटत असते. ही असते चक्रीवादळाची सुरुवात. चक्रीवादळ म्हणजे वातावरणातील एखाद्या विवक्षित ठिकाणी हवेचा दाब आसपासच्या काही मैलांच्या परिसरापेक्षा कमी अथवा जास्त झाल्याने दिसून येणारे वातावरणातील बदल. हे बदल फार मोठ्या वेगाने घडतात, त्यात वाऱ्याची फार मोठी ताकद सामावलेली असते. त्या विवक्षित ठिकाणी हवेचा दाब कमी होतो वाह वाढतो. तो चक्रीवादळाचा केंद्रबिंदूच असतो. दाब कमी झाल्यास तेथील हवेची पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न म्हणून वातावरणातील हवेत एक प्रकारचे भोवरे तयार होतात. याउलट दाब वाढला असल्यास त्या पट्टय़ातील हवा दाबामुळे केंद्राकडे खाली दाबली जात असते. याही क्रियेमध्ये वारे वाहणे वेगाने सुरू होते, पण त्यांची तीव्रता खूपच कमी असते. बहुतेक चक्रीवादळांचा केंद्रबिंदू समुद्रावरच सुरू होतो. कसलाही अडथळा वाटेत नसल्याने हे वादळ स्वतःभोवती फिरत वेगाने घोंगावत इकडे तिकडे हेलकावत राहते. पण समुद्री वार्‍यांमुळे हलके हलके जमिनीकडे येऊ लागते. सुरुवातीला जमिनीवरचा मोठा पट्टा त्यामुळे त्याच्या तडाख्यात सापडतो, पण त्याचबरोबर त्याचा वेग हळूहळू कमी होत पसरत जातो व काही काळाने ते संपूनही जाते. समुद्रपातळीपेक्षा जमिनीची वाढलेली उंची, वाटेत येणारे अडथळे व जमिनीवरील बरेचसे स्थिर तापमान यांमुळे या चक्रीवादळांचा वेग मंदावतो. चक्रीवादळ बहुधा स्वतःबरोबर सोसाटयाचा पाऊसही आणते. खूप मोठ्या आकारमानात हे पसरलेले असल्याने (चारशे ते सहाशे किलोमीटर) या सर्व भागातील निरनिराळे ढग यात ओढले गेलेले असतात. या ढगांचे एकत्रीकरण होताच त्यातील बाष्पही एकत्र येऊन त्यापासून पाऊस पडेल, असे मोठे बाष्पकण तयार होतात. सुरुवातीला प्रचंड वेगाने वाहणारे वारे, धुळीचे वातावरण व नंतरच्या पावसाचे तडाखे ही चक्रीवादळाची खासियतच म्हणायला हवी. चक्रीवादळांचा वेग जमिनीवर पोहोचल्यावर अनेकदा ताशी साठ ते ऐंशी किलोमीटर इतका असतो. समुद्रावरील वेग मोजण्याची पद्धत नाही, पण तो कदाचित यापेक्षाही जास्त असू शकतो. समुद्रावरील बोटी या वादळात सापडल्यास अनेकदा त्यांचे गंभीर नुकसान होण्याइतका त्यांना तडाखा बसलेला असतो. वादळाचा पट्टा ओलांडण्यास त्यांना एक ते चार दिवस लागत असल्याने तोवर राक्षसी लाटांचे तांडव असहाय्यपणे बघणे एवढेच त्यांच्या हातात असते. अनेकदा या लाटांची उंची तीस ते पस्तीस फुटांपर्यंतही असू शकते. ही वादळे सागरी अपघात व दुर्घटना यांचे एक मुख्य कारण असल्याने या वादळी टापूंची सतत माहिती घेऊन त्याप्रमाणे मार्ग आखणे, बदलणे बोटीच्या कप्तानाने कामच राहते. किनाऱ्यावर जेव्हा ही वादळे येतात, तेव्हा उंच झाडे उन्मळून पडणे, सागरी लाटा खोलवर घुसून त्यामुळे नुकसान होणे, घरांचे पत्रे उडणे या गोष्टी होतात. चक्रीवादळांची सूचना हल्ली उपग्रहांमुळे खूपच लवकर मिळू शकते. उपग्रहांमधून या सर्व वादळांचा नेमका प्रवास, हवेतील घडत जाणारे बदल यांचे फोटो मिळतात. या खेरीच एक मोठी विलक्षण पद्धत चक्रीवादळांच्या अभ्यासासाठी गेली २० वर्षे वापरली जात आहे. अत्यंत धोकादायक अशा पद्धतीत लष्करी जेट विमानातून संशोधक या चक्रीवादळाच्या केंद्रबिंदूकडेच प्रवास सुरू करतात. थेट केंद्रबिंदूचा वेध घेऊन विमान वर न्यावयाचे व त्या दरम्यान विविध शास्त्रीय निरीक्षणे करायची, अशी ही पद्धत आहे. निष्णात वैमानिक व जिवावर उदार झालेले संशोधक यांचा चमू हे काम करतो. या प्रकारात विमान पार वेडेवाकडे होऊन दोन तीन हजार फूट लांबवर एखाद्या खेळण्याप्रमाणे भिरकावलेही गेले आहे. तरीही सुखरूप उतरल्यावर नवीन चक्रीवादळाची सूचना कधी मिळते, इकडेच या चमूचे लक्ष असते. धाडस व जिज्ञासा यांचा संगम काय करू शकतो, याचे हे एक थरारक उदाहरण आहे. *'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *“ वाईट बातमीला पंख असतात तर शुभ बातमीला पायच नसतात. ”* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *विधानपरिषदेच्या सभासदांचा कार्यकाल किती वर्षाचा असतो ?* 6 वर्ष 2) *मुंबई उच्च न्यायालयाची खंडपीठे कोणती ?* औरंगाबाद, नागपूर, पणजी 3) *उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक कोण करतो ?* राष्ट्रपती 4) *राज्य पोलीस यंत्रणेतील सर्वोच्च अधिकारी कोण असतो ?* पोलीस महासंचालक 5) *जिल्हा पातळीवर कायदा व सुव्यवस्था कोण पाहतो ?* जिल्हा पोलीस अधीक्षक *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● योगेश वाघ ●  दिपश्री वाणी ●  कबीरदास गंगासागरे ●  नवीन रेड्डी ●  हरीश दादा बल्लाल *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *कळायला लागल्यापासून जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर कोणत्या ना कोणत्या कारणाने अनेक गोष्टी कराव्या लागतात. वयाचा काही काळ त्यांना संस्कार, संस्कृती या नावाने ओळखले जाते. तर एका विशिष्ट वयानंतर त्याला 'कर्तव्य' ही संज्ञा प्राप्त होते. मग कुटुंबात, नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी केले जाणारे काम हेही कर्तव्यात मोडते. 'कामात देव शोधा' हे जीवनाचे खरे तत्वज्ञान मानले पाहिजे. "कर्तव्याला मुकता माणूस, माणूस ना उरतो।" हे ज्याला कळले, तोच पुढे जातो.* *कामाशी साधली जाणारी एकरूपता, त्यातून दिसणारी तादात्म्यता हाही 'उपासना' मार्गच आहे.* *जो करी कर्म अहेतु निरंतर,* *देव तयास मिळो न मिळो रे।* *यातून कवीला जे सांगायच आहे, त्याचे चिंतन करूया. त्यासाठी 'मोहाच्या फुलबागा' दूर सारायला हव्यात. त्यासाठी मनाची अवस्था कोती असून चालणार नाही. आकाशाएवढे मन झाले, तरच नव्या पिढीसमोर आदर्श उभे राहतील. जन्मलेल्या प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या वेदनेला सामोरे जावे लागते. कुणीही त्यातून सुटत नाही. हे टाळून पुढे जाऊया, मनाचा विकास साधूया....* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो,* *बहिणाबाई यांनी मनाचे कंगोरे* *उलगडून दाखवतांना खूप सुंदर रचना* *केली.* *त्या म्हणतात* *मन वढाय वढाय उभ्या पिकातलं* *ढोर।* *किती हाकला हाकला फिरी येत* *पिकावर।असे असले तरी* *हे मन नदीसारखे असायला आणि* *करायला काही हरकत नाही.* *नदी म्हणते ,* *🤝🏻मी कोणाची , मी सर्वांची , बंधुनिया मज नेणाराची।* *जेथे जाईल तेथे फुलवीन बाग मनोहर* *आनंदाची।* *मानवी शरीर हे अनेक जडद्रव्यांचा* *नित्य असलेला प्रवाह* *आहे. नदी सारखे प्रत्येक* *क्षणी आपण त्यात नवनवीन द्रव्य* *टाकत असतो,भरत* *असतो.तसेच ते बाहेरही टाकत* *असतो.म्हणून शरीरासारखे मनाचे ही* *कार्य चालत असते,ते काही घेते* *काही देते.नदी जसे काहीही* *मिळो त्याचा स्वीकार* *करून त्याला निर्मळ करते तसे मनाने* *करावे.वाईटाचा अंत करून* *शुद्ध अमृत सर्वांना द्यावे.* *नदीतून पाण्याचे लोट सारखे एका* *ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असतात. पाणी क्षणाक्षणाला* *बदलत* *असते,किनाराही बदलत* *असतो,परिसरही सारखा बदलत असतो,तरीही नदी पवित्र* *राहते.परिवर्तनाच्या या मालिकेत मनाचे कार्य असे चालवता येते का ते* *बघा। जमले ना ,तर तुम्ही सुद्धा एक अलौकिक महात्मा बनू शकतात.* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्यामध्ये कमी असलेली बाजू इतरांसमोर कधीही मांडू नका कारण हेच लोक तुमच्यातल्या कमी असलेल्या बाजूचा फायदा उचलून तुम्हाला अजून कमकुवत करायला पाहतात.त्यामुळे आपण अधिक कमकुवत बनत जातो.त्यापेक्षा आपल्यात काय कमी आहे याचा शोध घेऊन आपली कमी असलेली बाजू अधिक भक्कम कशी करता येईल यासाठी प्रयत्न करायला हवे आणि तेही सातत्याने.मग तेच लोक आपला फायदा घेत होते आणि हसत होते आता त्यांना फायदा घेण्याची,हसण्याची संधी मिळणार नाही हे निश्चित. © व्यंकटेश काटकर,नांदेड 📲 ९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• . *आयुष्यभराची प्रतिष्ठा* महाभारतातील युध्द संपवून कृष्ण घरी परतल्यावर पत्नी रुक्मिणीने त्याच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. गुरु द्रोणाचार्य आणि पितामह भीष्म यांना ठार मारणाऱ्याच्या बाजुने तुम्ही कसे काय उभे राहिलात.? कृष्णाने उत्तर दिले. ते आयुष्यभर सत्याच्या मार्गावर चालत होते यात कुठलीच शंका नाही पण त्या दोघांकडून आयुष्यात एक पाप घडले. आणि त्यामुळे त्याच्या जीवनभराच्या सत्यमार्गावर पाणी फिरले. *रुक्मिणीने विचारले..* *कोणते पाप.?* कृष्ण म्हणाला. जेव्हा भर दरबारात द्रौपदीचे वस्त्रहरण होत होते तेव्हा ते दोघेही दरबारात उपस्थित होते. दरबारातील जेष्ठ व्यक्ति म्हणून ते हा प्रकार रोखू शकत होते. पण त्यांनी तसे केले नाही. त्यांचा हा एकच गुन्हा त्यांच्या सगळ्या सत्यमार्ग जगणे अर्थहीन करण्यास पुरेसा आहे. *रुक्मिणीने विचारले.* *मग कर्णाचे काय.?* कृष्ण म्हणाला, कर्ण दानशूर होता, यात कुठलीच शंका नाही. त्याच्याकडे कुणी काही मागितले तर त्याच्या तोंडून कधीही 'नाही' असा शब्द बाहेर पडला नाही. पण बलाढ्य सैन्यासमोर यशस्वीपणे लढताना अभिमन्यू जेव्हा जखमी झाला व रणांगणावर मृत्युची वाट पाहत पडला होता, तेव्हा त्याने शेजारी उभ्या असलेल्या कर्णाकडे पाणी मागितले. तिथेच स्वच्छ पाण्याचे डबके होते.पण अभिमन्युला पाणी देऊन आपल्या मित्राला म्हणजेच दुर्योधनाला दुखवायचे नाही, म्हणून कर्णाने मरण पंथाला लागलेल्या वीराला पाणी दिले नाही.नंतर त्याच डबक्यात कर्णाच्या रथाचे चाक अडकून पडले आणि त्याचा शेवट झाला. *तात्पर्य :-* तुमच्या एका अन्यायकारक कृत्याने तुमच्या आयुष्यभराच्या प्रामाणिकपणाची किंमत एका क्षणात शून्य होवून जाते.!! *चांगले कर्म, निस्वार्थी सेवा, स्वच्छ प्रतिमा आणि प्रामाणिकपणाच शेवटपर्यंत माणसाला अमर ठेवते यात तिळमात्र शंका नाही.* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 12/09/2019 वार - गुरूवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *अनंत चतुर्दशी गणेश विसर्जन* 💥 ठळक घडामोडी :- ◆१९९८- डॉ जयंत नारळीकर यांना 'पुण्यभूषण'पुरस्कार प्रदान. ◆ २००५-हॉंगकॉंग मधील disney Land सुरू झाले. ◆२००२ - 'मेटसॅट' या भारताच्या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण. ◆ १९४८-भारतीय सैन्य हैदराबाद संस्थानच्या हद्दीत घुसले. 💥 जन्म :- ●१५७५ - हेन्री हडसन, इंग्लिश शोधक. ●१९१३ - जेसी जेम्स, अमेरिकन धावपटू. ● १९१२- फिरोज गांधी, इंदिरा गांधी यांचे पती, पत्रकार व राजकारणी. 💥 मृत्यू :- ● १९५२ - सवाई गंधर्व उर्फ रामभाऊ कुंदगोळकर ●१९८० - सतीश दुभाषी रंगभूमी, चित्रपटसृष्टीतील अभिनेते. ● १९९२ - पंडित मल्लिकार्जुन मन्सूर, गायक. ● १९९६ - श्रीमती पद्मा चव्हाण नाट्य, चित्रपट अभिनेत्री. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *इस्रो ब्यालालु येथील ३२ मीटर अँटेनाचा वापर करुन विक्रम लँडरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे. ब्यालालु हे बंगळुरु जवळ असलेले इस्रोचे डीप स्पेस नेटवर्क सेंटर आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे देण्यात येणारा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जेष्ठ संगीतकार उषा खन्ना यांना जाहीर, ५ लाख रुपये, मानपत्र, स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी प्रसिध्दी पत्रकाच्या माध्यमातून या पुरस्काराची केली घोषणा* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *लातूरमध्ये गणेश विसर्जनाला दुष्काळाचा फटका, गणेशमूर्ती विसर्जित न करता दान करण्याचा गणेश मंडळांचा निर्णय* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *मुंबई - केंद्र सरकारने लागू केलेला नवीन मोटार वाहन कायदा तुर्तास महाराष्ट्रात लागू होणार नसल्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी पत्रकार परिषदेत सांगितले* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *आगामी विधानसभा निवडणुकीसाठी इव्हीएम, मनुष्यबळासह सर्व पूर्वयारी पूर्ण - मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंग* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *नांदेड : देगलूर येथे अक्षर मानव कडून प्रसिद्ध साहित्यिक रामदास फुटाणे यांचा आज आणि उद्या दोन दिवसीय संवाद सहवास कार्यक्रम* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *धर्मशाळा : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला टी-२० सामना हिमाचल प्रदेशच्या धर्मशाळा मैदानावर खेळवला जाणार आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार रविवारी धर्मशाळेत ढगाळ वातावरण असेल, त्यामुळे संध्याकाळी पावसामुळे सामन्यात व्यत्यय येण्याची शक्यता* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ही बुलेटीन audioमध्ये ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे. https://b.sharechat.com/aBzlVb3tUZ ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *एकच ध्यास ; वाचन विकास* https://nasayeotikar.blogspot.com/2018/01/blog-post_6.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *गुरुत्वाकर्षण म्हणजे काय ?* 📙 गुरुत्वाकर्षण सर्वत्र असते. गुरुत्वाकर्षणाची ताकद वस्तूमानाप्रमाणे बदलत जाते, पण प्रत्येक गोष्ट स्वतःचे गुरुत्वाकर्षण राखून असते. त्याचा प्रभाव कदाचित लक्षात येईल, जाणवेल किंवा नाही, ही गोष्ट वेगळी. व्यवहारत: प्रत्येक वस्तू दुसऱ्या वस्तूवर गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव राखून असते, हे विधान समजावुन देणे अशक्य आहे. पण जरा वेगळ्या पद्धतीने हे पटू शकते. चंद्रावर पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव आहे म्हणून तो तिच्या कक्षेत फिरतो, तर पृथ्वीवर सूर्याचे गुरुत्वाकर्षण प्रभाव ठेवून आहे. सूर्य आपल्या सर्व ग्रहांसह आकाशगंगेत आहे; कारण आकाशगंगेतील सुमारे लाखभर तारे एकमेकांवर गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव राखून आहेत. यात आपल्याला गुरुत्वाकर्षण जाणवते, ते फक्त पृथ्वीचे. याचा शोध न्यूटन यांनी लावला, हे ज्ञात आहेच. १६६५ साली वयाच्या केवळ २३ व्या वर्षी झाडाखाली बसलेले असताना सफरचंद खाली का पडते, या विचारातून गुरुत्वाकर्षणाबद्दलचा विचार त्यांनी पुढे मांडला. चालता चालता पाय घसरला, तर आपला तोल जातो. खुर्ची एका मर्यादेपलीकडे कलंडली, तर पडते. याचे कारण म्हणजे प्रत्येक वस्तूचा गुरुत्वाकर्षणामुळे निर्माण झालेला गुरुत्वमध्य एका मर्यादेपलीकडे ढळतो आहे, हेच आहे; कारण जणू काही त्या वस्तूचे वजन त्या बिंदूतच एकवटलेले असते. एखाद्या वस्तूच्या उंचीतील ओळंबा जेव्हा तिच्या पायाबाहेर जातो, तेव्हा हे घडते. आकाशगंगाच काय, पण विश्वातील अनेक वस्तू गुरुत्वाकर्षणामुळेच टिकून आहेत. ही प्रत्येक गोष्टीची मध्याकडे ओढ नसती, तर ज्या वस्तूमानाने, कणांनी प्रत्येक ग्रह, तारे बनले आहेत, ते वस्तुमान एकत्रच राहिले नसते. पृथ्वी विलक्षण वेगाने स्वतःभोवती फिरते, पण एवढे अवाढव्य समुद्राचे पाणी मात्र स्वतःच्या जागीच असते. इतकी उंच डोंगरशिखरे स्थिरच राहतात. पृथ्वीचे वातावरणही तिच्या वेगानेच फिरत राहते. याचेच कारण पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण. वस्तुमान व आकारमानाप्रमाणे गुरुत्वाकर्षणाची ताकद बदलते, हे तर प्रत्यक्षच सिद्ध झाले आहे. चंद्रावर गेलेल्यांचे वजन पृथ्वीवरच्यापेक्षा जेमतेम एकषष्ठांशच भरले होते. याउलट, पृथ्वीपेक्षा मोठ्या ग्रहावर जर यदाकदाचित माणूस पोहोचला, तर त्याचे वजन कितीतरी जास्त भरेल. ग्रहाच्या आकारमानाप्रमाणे तेथील वस्तूंचे वजन बदलेल. अवकाशात केल्यावर गुरुत्वाकर्षणरहीत अवस्थेत आपण असतो, असे अनेक वेळा म्हटले जाते. पृथ्वीभोवती कक्षेत फिरणार्‍या कोणत्याही वस्तूच्या बाबतीत ते खरे आहे. ज्याप्रमाणे उंचावरून पृथ्वीकडे झेपावतानासुद्धा पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण जाणवेनासे होते, वर वजनरहित अवस्था आहे, असे वाटत राहते, तशीच ही थोडीफार जाणीव असते. त्यालाच मायक्रोग्रॅव्हिटी म्हणता येईल. मायक्रोग्रॅव्हिटीत दैनंदिन व्यवहार किती कठीण असतात, ते अंतराळयानात वावरणाऱ्या अनेकांनी वर्णन केलेले आहेच. अन्न गिळणे, अंघोळ करणे, तोल राखणे, पाय जमिनीवर ठेवणे हेसुद्धा अंतराळात वावरताना अत्यंत कटकटीचे ठरते. अंघोळीसाठी विशिष्ट सूट घालून त्यातून पाणी शोषून घ्यावे लागते, तर अन्न पेस्टच्या स्वरुपात तोंडात कसेबसे गिळावे लागले. पाय तर जमिनीवर कधीच ठरत नाहीत. आणि हे सारे सांभाळत विविध कामे व प्रयोग पार पाडायचे असतातच. *'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *If you act to be happy, you will be happy.* *(जर तुम्ही आनंदी असण्याचा देखावा केला तर तुम्ही नक्कीच आनंदी व्हाल.)* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *जागतिक जलदिन केव्हा साजरा केला जातो ?* 22 मार्च 2) *भारतातील सर्वात मोठा व्याघ्र अभयारण्य कोणता ?* कार्बेट 3) *हिवताप कोणत्या डासांमुळे होतो ?* अनाफेलीस डास ( मादी ) 4) *चंद्रपूर जिल्ह्यात सर्वात जास्त आदिवासी जमात कोणती ?* गोंड 5) *लिएण्डर पेस हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?* टेनिस *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● शिवकन्या शशी ●  श्रीपाद चंद्रकांत कुलकर्णी ●  स्वप्नील पुलकंठवार ●  विकास पाटील जाधव ●  साईनाथ बोधूलवार ●  श्याम कांबळे ●  पुंडलिक बिरगले ●  शिवा शिवशेट्टी ●  साहिल सुगुरवाड ●  केतन जोशी *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *जगात प्रचंड विविधता आहे. किंबहुना, विविधता हेच जगाचे सौंदर्य आहे. तीच मानवतेची ताकद आहे; परंतु दुर्दैवाने विविधता आणि विषमता यातील फरक लक्षात न घेतल्यामुळे मानवा-मानवांत जात, पात, धर्म, पंथ यावरून गटतट पडले आहेत. समाजाला एकत्र ठेवण्याऐवजी, मतलबी मंडळींनी स्वार्थासाठी समाजात भांडणे लावून दिली आहेत. त्यातून अतिरेकी विचाराची माणसे निर्माण झाली आहेत. त्यातून हिंसाचार वाढीला लागला आहे. विवेकाचा आवाज दाबला जात आहे. सज्जनांची पीछेहाट आणि दुर्जनांचा विजय होताना दिसत आहे.* *भारताला साधुसंतांचा देश म्हटले जाते. प्रचंड मोठी सांस्कृतिक परंपरा असलेला भारतीय माणूस मूलत: विचारी आहे. त्यामुळे फोलपट बाजूला ठेवून सार ग्रहण करणे त्याला सहज शक्य आहे. दोन धर्मांच्या तत्वज्ञानात अंतर असू शकते. धर्माच्या भाषा वेगवेगळ्या असू शकतात; परंतु कोणत्याही धर्माचा हेतू वाईट असू शकत नाही. रजनीश एकदा म्हटले होते, की, इश्क, प्रेम आणि अहिंसा हे एकाच मनोवृत्तीसाठी वापरलेले वेगवेगळे शब्द आहेत. वरवर विचार करणा-याला ते पटत नाही; पण खोलवर विचार केला असता हे पटायला लागते. आपल्या शरीराची ठेवण अलग अलग असू शकते, भाषा वेगवेगळ्या असू शकतात, परंतु आपल्या ह्रदयाची ठेवण, रक्ताचा रंग हे मात्र एकच असते. हे आपण पक्के ध्यानात ठेवायला हवे. मनुष्यजन्म दुर्मिळ आहे, त्याचा सदुपयोग करायला हवा.* *॥ रामकृष्णहरी ॥* 🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो* *दोस्त दोस्त ना रहा,प्यार प्यार ना रहा।* *जिंदगी हमे तेरा एतबार ना रहा।* *असे उदास चेहरे रस्त्या-रस्त्यावर* *हल्ली बघायला* *मिळतात.सन्मार्ग* *दाखवणारे वाटाडे कुठे दिसत नाही.* *आज, साधू साधनेत कमी आणि* *साधनात जास्त प्रमाणात* *वावरतांना आपण* *पाहतो.फक्त पाहत नाही तर त्याच्या* *अंधश्रधारूपी विषारी* *वृक्षांना खत पाणी घालतो आणि* *आपल्याच विनाशासाठी* *वाढवतो.तारूण्य आणि संगत यांचे* *महत्व विशद करताना* *डॉ* *.कलाम 'आपले मित्र, चित्र आंणि* *चरित्र नेहमी पवित्र ठेवा; असे सांगतात.कारण तेच खरे जीवनाचे* *अस्त्र आहे. तुम्हाला तर हे माहित आहे की., चारित्र्याचे पतन* *होण्यासाठी बहुधा चुकीचे मित्र आणि चुकीचे चित्र यांचाच हात* *असतो. चुकीचे मित्र आणि चुकीचे चित्र हेच चारित्र्य नष्ट* *करण्याचे शस्त्र आहे किंवा असेही म्हणता येईल की, कधीही न चुकणारे* *ब्रम्हास्त्र आहे.' तारुण्याच्या सळसळत्या उर्जेवर* *स्वार्थी व्यवस्थांचा डोळा असतो. त्यामुळेच तारूण्याची ऊर्जा सैरभैर* *करून तिला आपल्या इच्छेप्रमाणे वापरण्याचे धूर्त* *राजकारण या स्वार्थी व्यवस्था करत असतात. तारुण्याच्या ऐन उमेदीचा* *कालखंड निरर्थकपणे या स्वार्थी व्यवस्थेच्या नेतृत्वामागे* *घालविला जातो.** *एखादी पाण्याची बाटली वापरून फेकून द्यावी, त्या पद्धतीने तरुणांच्या ऊर्जेचा वापर करून त्यांना शेवटी फेकून दिले जाते. सर्व बाजूंनी निष्क्रिय केलेल्या तरूणांवर शेवटी पश्चात्तापाची वेळ येते. तारूण्याचे रखरखीत वाळवंट होते. आपले तारूण्य विवेकशून्य व्यवस्थेच्या हाती द्यायचे की, स्वत:वर विश्वास ठेवत स्वकर्तृत्वाच्या बळावर समाज जीवनात उजळवून टाकायचे हे ज्याला समजले, त्याला तारुण्याचा खरा अर्थ कळला. माजी राष्ट्रपती डाॅ. ए.पी.जे. अब्दुल कलाम हे युवकांना देशाची संपत्ती म्हणायचे, ही संपत्ती देशासाठी आपत्ती ठरू नये म्हणून तरूणांनी आपले मित्र विचारपूर्वक निवडावेत.* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ज्यांच्याकडे धन,संपत्ती,ऐश्वर्य,नोकरचाकर आणि अभिमान आहे तो फार श्रीमंत आहे असे काहींना वाटत असेल तर ते चुकीचे आहे त्यापेक्षा ज्यांच्याकडे आई-वडील आहेत,तो निरंतर त्यांची सेवा करतो,त्यांचे मन कधीही दुखवत नाही,त्यांना वंदन करुन दैनंदिन कामाला लागतो,रक्ताच्या नात्याबरोबरच इतरांसोबत माणुसकीची नाती ही जपतो, इतरांच्या सुखदु:खात सहभागी होतो, वेळप्रसंगी मदतीचा हातही पुढे करतो आणि त्याला कशाचाही गर्व नाही अशी व्यक्ती या जगात फार श्रीमंत आहे आणि भाग्यवानदेखील आहे. ©व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आचार्य विनोबा भावे* भूदान चळवळीच्‍या काळातील ही गोष्‍ट आहे. या चळवळीचे प्रणेते आचार्य विनोबा भावे होते. त्‍यांची पदयात्रा सुरु होती. आपल्‍या काही शिष्‍यांसह विनोबाजी मीराजींच्‍या आश्रमात थांबले होते. अल्‍पशा विश्रांतीनंतर त्‍यांची पदयात्रा पुन्‍हा सुरु झाली. त्यावेळी ते हरिद्वारकडे चालले होते. विनोबाजींची प्रकृती थोडी ठीक नव्‍हती. त्‍यांची कंबर आणि पाय दुखत होते. त्‍यामुळे त्‍यांना खुर्चीत बसवून नेण्‍यात येत होते. मध्‍ये मध्‍ये खुर्चीतून उतरून पायी चालायचे. तेव्‍हा एक शिष्‍य त्‍यांच्‍याजवळ येऊन म्‍हणाला,'' बाबा, मला खूप राग येतो, मी काय करावे'' विनोबाजी म्‍हणाले,'' मी लहान असताना मलाही खूप राग यायचा, मग माझ्याजवळ मिश्री असायची ती मी तोंडात ठेवायचो, परंतु कधीकधी ती ही नसायची'' मग तुम्‍ही काय करत होता असे त्‍या व्‍यक्तीने विचारले. विनोबाजी म्‍हणाले,'' मी यावर खूप विचार केला, मग माझ्या मनात एक गोष्‍ट आली. जेव्‍हा आपल्‍या मनाविरूद्ध एखादी गोष्‍ट आली जेव्‍हा आपल्‍या मनाविरूद्ध गोष्‍ट घडली तर लगेच नाराज होतो जर तो क्षणच आपण टाळला तर रागावर विजय मिळवू शकतो. आनंद आणि नाराजी यावर आपण तेव्‍हाच प्रकट करतो तो पहिलाच क्षण आपल्‍यावर वरचढ ठरू पाहतो. तो क्षण टाळणे कठीण आहे. पण मनन करून तो टाळता येतो. मी यावर खूप मनन केले, यामुळेच जीवनात कितीही मोठी आपत्ती आली तरी मी संयम ढळू दिला नाही.'' *तात्‍पर्य :- विचारपूर्वक उचललेले पाऊल आयुष्‍याला योग्‍य दिशा देते.* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

*माझी शाळा माझे उपक्रम* *हस्ताक्षर स्पर्धा* ✍ आज दिनांक ११-०९-२०१९ रोजी इयत्ता दुसरीतील विद्यार्थ्यांची (वर्गपातळीवर) हस्ताक्षर स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धा घेताना विद्यार्थ्यांना वेळ देण्यात आली. व त्यानुसार विद्यार्थ्यांनी लेखन केले. स्पर्धेत सर्व सहभागी विद्यार्थ्यांच्यापैकी प्रथम व व्दितीय क्रमांक देऊन त्यांना बक्षिसही लगेचच देण्यात आले. प्रथम क्रमांकः कु.सोजल ढगे प्रथम क्रमांकः युवराज चंद्रवंशी व्दितीय क्रमांकः आनंद वाघमारे. या विद्यार्थ्यांनी पटकावले. *✍उद्दिष्ट* 👉विद्यार्थ्यांना लेखनाची आवड निर्माण व्हावी, 👉 व्याकरण चुका होऊ नये. 👉 अक्षर सुधारणा. 〰〰〰〰〰〰〰 *शब्दांकन* प्रमिला सेनकुडे (स.शि.) जि.प.प्रा.शा.गोजेगाव ता.हदगाव जि.नांदेड. 〰〰〰〰〰〰

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 11/09/2019 वार - बुधवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- १९४८ - आदल्या दिवशी झालेल्या मोहम्मद अली झीणाच्या मृत्यूचा फायदा घेउन भारतीय लष्कराने हैदराबाद संस्थानावर चाल केली व हैदराबाद मुक्त केले २००२ - 'मेटसॅट' या भारताच्या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण 💥 जन्म :- १८९५ - आचार्य विनोबा भावे १९१३ - जेसी ओवेन्स, अमेरिकन धावपटू 💥 मृत्यू :- १९५२ - सवाई गंधर्व उर्फ रामभाऊ कुंदगोळकर १९८० - सतीश दुभाषी रंगभूमी, चित्रपटसृष्टीतील अभिनेते. १९९२ - पंडित मल्लिकार्जुन मन्सूर, गायक. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *बेंगळुरू : भारताच्या चांद्रयान मोहिमेतील लँडर विक्रम चंद्रापासून 2 किमी अंतरावर असताना संपर्क तुटला. लँडर विक्रमशी संपर्क साधण्यासाठी इस्त्रो घेणार अमेरिकन अंतराळ संस्था नासाची मदत * ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *नवी दिल्ली - स्वित्झर्लंडच्या जिनिव्हा येथील संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेच्या बैठकीत भारताने पाकिस्तानकडून काश्मीरबाबत करण्यात आलेल्या आरोपांचे केले खंडन* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *मुंबई - मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळाच्या 100 दिवसांत शेअर बाजारातील गुंतवणुकदारांना साडे बारा लाख कोटी रुपयांचे झाले नुकसान* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *वाशीम जिल्ह्यातल्या दुर्गम आठ गावांमध्ये तब्बल 72 वर्षींनी पोहोचली वीज* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *पुणे शहर आणि परिसरात आजपासून तीन दिवस हलक्या सरींच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *पणजी : दक्षिण गोव्यातील रिवण येथील 16 वर्षीय प्रियव्रत पाटीलने सर्वात कमी वयात 'महापरीक्षा' उत्तीर्ण होत इतिहास रचला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याचं ट्विटरद्वारे अभिनंदन करत पाठ थोपटली आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *न्यूयॉर्क : रफाल नदालने अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धा जिंकत कारकिर्दीतील १९वे ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावले आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ या बुलेटीनची audioऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे. https://sharechat.com/post/Mv85XrK ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *प्रत्येक शाळेला संरक्षण भिंत हवे* https://nasayeotikar.blogspot.com/2018/01/blog-post_15.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *गरम पाण्याचे झरे* 📙 हिमालयात प्रवासाला जाणारे परतल्यावर नेहमीच एक आश्चर्याचा किस्सा सांगतात. गंगोत्रीच्या वाटेवर वाटेत काही कुंडे लागतात. कुडकुडणारी थंडी, दूरवर डोंगरमाथ्यावर सफेद बर्फाचे थर आणि या कुंडातून मात्र पाण्यातून चक्क वाफा निघत असतात. हात बुडवला तर चटका बसतो. एवढेच नवे अनेक जण जवळचे तांदूळ त्या पाण्यात काहीवेळा कापडी पुरचुंडी बांधून धरतात व आयता शिजलेला भात खातात. हे पाणी काढून मनसोक्त आंघोळ करण्याचा मोहही कोणी आवरून धरत नाही. असाच पण जरा वेगळा अनुभव वज्रेश्वरीला महाराष्ट्रात येतो. पण येथील झऱ्यांचे पाणी गंधक मिश्रित उग्र वासाचे आहे. येथील उष्ण पाण्यात अंघोळ करून निसर्गोपचार करून घेणाऱ्यांचीही कायम गर्दी उसळलेली असते. जगात असे गरम पाण्याचे कित्येक झरे आहेत. तसेच फक्त वाफेचेही झरे आहेत. वाफेच्या झर्‍यातून फक्त जोरात वाफ उसळून एखाद्या प्रेशरकुकरप्रमाणे तेथे शिट्टीचा आवाजही येत राहतो. या सगळ्या प्रकाराचे मूळ भूगर्भात खोलवर घडणाऱ्या घडामोडीत आहे. सुमारे तीस एक किलोमीटर खोलीवर तप्त मध्यावरणाचा पाण्याच्या वाहत्या साठ्याशी संबंध येतो. तिथे वाफ कोंडू लागते. या वाफेच्या दाबाने जमिनीतील खडकातील काही भेगांतून मार्ग काढला जाऊ शकतो. त्यातूनच हे झरे निर्माण होतात. काही ठिकाणी ज्वालामुखीच्या मुखापासून काही ठराविक अंतरावर प्रथम वाफेचे व नंतर गरम पाण्याचे झरे सलगपणे आढळतात. पण अनेक ठिकाणी ज्वालामुखीचा अलीकडच्या ज्ञात काळात कधीच संबंध आलेला नसतो. हेही लक्षात घ्यायला लागेल. यातही एक मोठा फरक आहे. वाफेचे झरे मधूनमधून नाहीसे होतात, पण गरम पाण्याचे झरे मात्र सलगपणे वर्षानुवर्षे उकळताना दिसतात. काही झर्‍यांत गंधकाचा अंश सापडतो. ते नक्कीच ज्वालामुखीच्या उगमाशी संबंधित असावेत असा संशय घ्यायला जागा आहे. पृथ्वीचा गाभा अत्यंत गरम आहे मध्यावरणही अतितप्त आहे. पण बाह्यावरणाचा काही भाग बऱ्याच ठिकाणी भरपूर गरम आहे असेही लक्षात आले आहे. आईसलँड, न्यूझीलंड येथील काही भागात जेमतेम एक ते तीन किलोमीटर अंतर खोलवर बोअरिंगचे छिद्र पाडले असता भूगर्भातील गरम पाणी व वाफ मिळवता येते असा अनुभव आहे. जरी एवढे खोल छिद्र पाडणे अत्यंत महागडे असले तरी यातून मिळणारी ऊर्जा ही अनेक वर्षे पुरणार असल्याने हा खर्च परवडतो. हे गरम पाणी वा वाफ वापरून घरे उष्ण ठेवण्याचा वा विद्युतनिर्मिती उद्योग यातूनच केला जातो. येथेही गमतीचा भाग कसा आहे बघा. आइसलँड व न्यूझीलंडसारख्या थंड प्रदेशातही निसर्गाने ही सोय करून ठेवली आहे. *'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *“ एक चागंली माता शंभर शिक्षकांच्या मोलाची असते. ”* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *'राष्ट्रीय युवक दिन' केव्हा साजरा केला जातो ?* 12 जानेवारी 2) *विधानसभेचा कार्यकाल किती वर्षाचा असतो ?* 5 वर्ष 3) *विधानसभेच्या सदस्याला काय म्हणतात ?* आमदार 4) *महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोठे होते ?* नागपूर 5) *राज्याचा प्रमुख कोण असतो ?* राज्यपाल *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● प्रशांत करखेलीकर ●  सुनील महामुनी ●  प्रशांत कोकाटे ●  कांचन जोशी ●  दिगंबर वंगरवार ●  ऋषीकेश बच्छाव ●  अमोल पाटील ●  गणेश यादव ● भगवान वाघमारे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *एक छोटी कथा सांगितली जाते. एका दुष्काळी प्रदेशातील एक दुष्काळी गाव. नद्या, विहिरी आटलेल्या, पाण्यासाठी दशदिशा, आम्हा फिरविशी जगदीशा...अशी अवस्था. पावसाळा सुरू होतो. पाऊस काही येईना. शेवटी सगळा गाव एकत्र येतो. गंभीर परिस्थितीवर गंभीर चर्चा होते. उपाय सुचविले जातात. शेवटचा प्रयत्न म्हणून गावालगतच्या डोंगरावर जाऊन पावसासाठी देवाची प्रार्थना करायचे ठरते. सारा गाव ठरल्याप्रमाणे एकत्र येतो. थकलेली, तहानलेली पावलं नव्या उमेदीनं डोंगराकडे चालायला लागतात.* *या सर्व मोठ्या माणसांमध्ये एक मुलगा हातात छत्री घेऊन चालत असतो. या मुलाकडे बघून सर्वांना आश्चर्य वाटते. पावसाचा टिपूस नाही. येण्याची शक्यताही नाही आणि हा चिमुरडा सोबत छत्री घेऊन आलाय. शेवटी एकजण त्या चिमुरड्याला विचारतो..'बाळा, तू ही छत्री सोबत आणलीस?' छोटा मुलगा उत्तरतो. 'पावसासाठी प्रार्थना करायला आपण डोंगरावर जात आहोत आणि मी प्रार्थना केल्यावर पाऊस येणारच आहे. म्हणून मी छत्री सोबत घेतलीय.' हा स्वत:च्या प्रार्थनेवरचा ठाम विश्वास! एकूण दुसरं पाऊल पडणार आहे. या विश्वासावरच पहिलं पाऊल उचलावं लागतं.* 〰 ‼ *रामकृष्णहरी* ‼ 〰 🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻 *संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो,* *संत कबीर वृत्तीने फकीर पण* *सामान्यांची बनवून गेले तकदीर।* *ते म्हणत--* *कबीर गाफील क्यों फिरय,* *क्या सोता घनघोर* *तेरे सिराने जाम खड़ा,* *ज्यों अंधियारे चोर ।* *महात्मा कबीर मृत्यूची आठवण* *करून देतात. हे मानवा* *तुला असा दुर्मिळ मनुष्य* *जन्म मिळालेला असताना तू असा गाफिलासारखा का फिरत* *आहेस ? कोणत्या* *घणघोर अंधार्‍या काळ कोठडीत तू* *स्वतःला जखडून घेत आहेस ?* *कुठल्याही संपत्तीच मोल* *देवूनही हा जन्म परत* *मिळणारा नाही . तुला मिळालेले* *ज्ञानेंद्रिये व कर्मेंद्रिये तुझ्या* *मुक्तीसाठीच विधात्याने दिलेली सर्वात* *महान भेट आहे. इत्तर* *प्राण्यांपेक्षा तू विधात्याला अधिक* *प्रिय म्हणून बुद्धी व बोलीचं* *अधिकचं वरदान तुला दिलं* *तर तू त्या वैभवाचा वापर* *करून या सृष्टीचा स्वर्ग करण्यासाठी* *धडपडायला* *पाहिजेस ! स्वर्ग निर्माणाचं जाऊ दे ,* *किमान या सृष्टीला तरी विद्रुप* *करण्याचं कुकर्म करू* *नकोस ! हे वैविध्याने भरलेले जग* *तुझ्याचसाठी आहे .याच्याकडे* *डोळे उघडे ठेवून* *पाहिलेस. त्याच्या रचनेला* *धक्का न देता त्याचा मानव* *कल्याणासाठी वापर करून घेतलास* *तर भविष्य सुंदर, नाही तर* *निसर्ग प्रकोप ठरलेलाच.* *तू* *कितीही सावध वागण्याचा* *प्रयत्न करीत असलास* *तरी हा मृत्यू रूपी चोर* *तुझ्यावर सारखी पाळत ठेवून* *आहे. तू भौतिक सुखसोयींचा* *कितीही आधार* *घेतलास तरी काचेच्या बंदिस्त* *महालातूनही तुझ्यातल्या चैतन्यरूपी* *आत्म्याला तो* *कोणत्याही क्षणी उचलल्याशिवाय* *राहाणार नाही.* *तेव्हा तू ज्या शरीर व रूपाला* *मोहवून हुरळून जातोस* *त्यापेक्षा सृष्टीकडं पाहाण्याची दिव्य* *दृष्टी देणार्‍या आत्मदृष्टीची* *जडणघडण चांगली* *होण्यासाठी मनाचा निकोप* *विकास होणे गरजेचे आहे.* *सुंदर मनेच सुंदर सुष्टी देवू* *शकतात. तेव्हा अज्ञानाचा* *अंधःकार दूर करून सत्यरूपी ज्ञान* *जाणून घे.* *या मधुर रचनेत कुठेही अंधश्रद्धा नाही* *तर कर्म व ज्ञान यांचा संयोग* *कबिरांनी दोन ओळीत* *सांगितला. समजून आचरणात* *आणता आले तर बघा।* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ज्यांनी आपल्या जीवनात कधीही असत्याला थारा दिला नाही,मनात कुणाचेही वाईट चिंतले नाही, इतरांकडे कधी वक्रदृष्टीने पाहिले नाही,दुस-या चे ते माझे कधी म्हटले नाही,कधीही कशाची मनात लालसा ठेवली नाही,कधीही कुणासोबत स्पर्धा केली नाही,जीवनात जे काही करायचे ते आपल्या प्रयत्नाने करायचे,जे काही शक्य आहे ते आपण मन लावून करायचे,जे काही मिळेल त्यात समाधानाने स्वीकारायचे असे गुण ज्यांच्या जीवनात परिपूर्ण आहेत तीच माणसे आपल्या जीवनात सुखी व समृद्ध होऊ शकतात आणि तीच माणसे इतरांना आपल्या जीवनासारखे जीवन जगण्यासाठी प्रेरीत करतात आणि आपणही त्यांचे गुण आत्मसात करून चांगले जीवन जगण्याचा मार्ग स्वीकारला पाहिजे तरच आपल्या जीवनाचे खरे कल्याण होईल. © व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🌾🌹🌾🌹🌾🌹🌾🌹🌾🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *एक गुरूंच्‍या घरी एक शिष्‍य मनोभावे गुरुंची सेवा करून शिक्षण घेत होता. त्‍याच्‍या या सेवेमुळे गुरु त्‍याच्‍यावर प्रसन्न होते. शिक्षण् पूर्ण झाल्‍यावर विद्यार्थी घरी जाण्‍यासाठी निघाला तेव्‍हा गुरुंकडे त्‍याने जाण्‍याची आज्ञा मागितली तेव्‍हा गुरुंनी त्‍याला आशीर्वाद म्‍हणून एक आरसा भेट दिला व सांगितले की, हा दिव्‍य आरसा (दर्पण) असून यात मानवी मनात चालणारे विचार प्रगट होऊन दिसतात. विद्यार्थी मोठा आनंदीत झाला. हा आरसा खरेच कार्य करतो की नाही याची शहानिशा करण्‍यासाठी त्‍याने लगेच आपल्‍या गुरुंसमोर हा आरसा धरला व गुरुंच्‍या मनात कोणते भाव आहेत, दुर्गुण आहेत हे पाहू लागला आणि गुरुंच्‍या समोर आरसा धरताच त्‍याच्‍या चेह-यावरचा रंग पार उडाला कारण तो आरसा गुरुंच्‍या अंतकरणात मोह, अहंकार, क्रोध आदि विकार दाखवित होता. त्‍याला याचे फारच दु:ख झाले की आपण ज्‍या गुरुची मनोभावे पूजा केली, ज्‍यांना पूर्ण ईश्र्वराचा दर्जा दिला त्‍यांच्‍या मनातही विकार आहेत, ते सुद्धा मानवी विकारापासून अजून सुटलेले नाहीत याचे त्‍याला वैषम्‍य वाटले. तो गुरुंना काहीच न बोलता तो आरसा घेवून गुरुकुलातून निघाला, रस्‍त्‍यात भेटणा-या प्रत्‍येकाच्‍या मनातील भाव पाहणे हे त्‍याचे कामच झाले होते. गावी परत जाताच त्‍याने आपल्‍या प्रत्‍येक परिचिताबरोबर हा प्रयोग करून पाहिला. त्‍याला प्रत्‍येकाच्‍या हृदयात कोणता ना कोणता दुर्गुण दिसून आला. शेवट त्‍याने आपल्‍या जन्‍मदात्‍या आई वडीलांच्‍या समोरही हा आरसा ठेवला. ते दोघेही पण त्‍यातून सुटले नाहीत. त्‍यांच्‍या हृदयात पण त्‍याला काही ना काही दुर्गुण दिसले. शेवटी या गोष्‍टीचा त्‍याला मनोमन राग आला व तो गुरुकुलातील गुरुंकडे धावला. गुरुंपाशी जाऊन मोठ्या विनम्रपणे तो म्‍हणाला,’’ गुरुदेव, मी आपण दिलेल्‍या या आरशातून प्रत्‍येकाच्‍या मनात, हृदयात, अंत:करणात डोकावून पाहिले आणि मला असे जाणवले की प्रत्‍येकाच्‍याच मनात काही ना काही विकार आहेच, काही ना काही दोष आहे. एखाद्याच्‍या मनात कमी तर कुणाच्‍या मनात जास्‍त असे विकार, दोष भरून राहिले आहेत. हे पाहून मी फार दु:खी झालो आहे, कृपया मला मार्गदर्शन करा.’’ गुरुंनी काहीच न बोलता तो आरसा फक्त त्‍याच्‍याकडे केला आणि काय आश्र्चर्य त्‍याला त्‍याच्‍या मनाच्‍या प्रत्‍येक कोप-यात राग, द्वेष, अहंकार, क्रोध, माया आदि दुर्गुण भरून राहिलेले दिसले. गुरुजी म्‍हणाले,’’ वत्‍सा, हा आरसा मी तुला तुझे दुर्गुण पाहून ते कमी करण्‍यासाठी दिला होता पण तू दुस-यांचे दुर्गुण पाहत बसलास आणि नको तितका वेळ खर्च केलास, अरे याच कालात जर तू जर स्‍वत:चे अवलोकन केले असते तर तुला तुझ्यातील दुर्गुण सुधारता आले असते. याच काळात तु एक असामान्‍य व्‍यक्ती झाला असता. मानवाची ही कमतरता आहे, कमजोरी आहे की तो दुस-यातील दुर्गुण पाहत बसतो आणि स्‍वत:ला सुधारण्‍याचा प्रयत्‍नही करत नाही. हेच या आरशातून मला तुला शिकवायचे होते. जे तुला शिकता आले नाही.’’* *तात्‍पर्य – आपण नेहमीच दुस-या व्‍यक्तीचे दुर्गुण बघतो, त्‍यावर टीका करतो पण आपल्‍यातील दुर्गुणांवर आपले कधीच लक्ष जात....* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 09/09/2019 वार - सोमवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- ◆१९९४ - सचिन तेंडुलकरने श्रीलंकेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपल्या एकदिवसीय क्रिकेटमधील कारकिर्दीतले पहिले शतक ठोकले 💥 जन्म :- ◆१९४१ - डेनिस रिची, अमेरिकन संगणकशास्त्रज्ञ. ◆ १९६७ - अक्षय कुमार, हिंदी चित्रपट अभिनेता. ◆ १९७४ - विक्रम बात्रा, भारतीय थलसेना अधिकारी. 💥 मृत्यू :- ◆२०१० - वसंत नीलकंठ गुप्ते, मराठी कामगार चळवळ कार्यकर्ते, लेखक. ◆ २०१५ - दत्तात्रय हेलसकर, जालना *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *बंगळुरू : भारताच्या चांद्रयान मोहिमेत अखेरच्या क्षणी संपर्क तुटलेल्या लँडर विक्रम सापडले असल्याची माहिती इस्रो प्रमुख के सिवन यांनी दिली आहे. * ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *महाबळेश्वर ठरले देशातील सर्वांत जलमय स्थान, तब्बल 7 हजार 631 मिमी पावसाची नोंद, चेरापुंजी आणि मॉसिनरामलाही टाकले मागे* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *इस्लामाबाद : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना आइसलॅंड दौऱ्यावर जाण्यासाठी पाकिस्तानच्या एअरस्पेसमधून जाण्यासाठी परवानगी मागण्यात आली पण पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने ही मागणी फेटाळली आहे. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांनी याबद्दल दिली माहिती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *मुंबई: शिक्षक-शिक्षकेतर तसेच, शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी या प्रमुख मागणीसह विविध प्रलंबित प्रश्‍नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी विविध शिक्षक संघटनांनी आज एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारला आहे. यामुळे राज्यातील शाळा बंद राहण्याची शक्‍यता आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *वैद्यकीय शिक्षकाना रडारवर आणण्यासाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने विद्यापीठाशी संलग्न असलेल्या सर्व वैद्यकीय महाविद्यालयातील शिक्षकांना व विद्यार्थ्यांनाही बायोमेट्रिक हजेरी केली सक्तीची* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *नवी दिल्ली - ज्येष्ठ वकील राम जेठमलानी यांचे निधन, दिल्लीतील राहत्या घरी त्यांनी घेतला अखेरचा श्वास, मृत्यूसमयी ते 95 वर्षाचे होते.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *भारत ‘अ’ आणि दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघांमधील पहिल्या कसोटी सामन्यास आजपासून प्रारंभ होत असून, सातत्यपूर्ण धावा करणाऱ्या शुभमन गिलला निवड समितीचे लक्ष वेधण्याची संधी मिळेल.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ बुलेटीन audio स्वरूपात ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे. https://b.sharechat.com/ID2NLkIuPZ ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *एक पाऊल स्वच्छतेसाठी ......!* भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी म्हणत, ' प्रत्येक कामाची सुरुवात स्वच्छतेपासून करावी. ' ......... https://nasayeotikar.blogspot.com/2018/03/blog-post_25.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *क्लोरीन म्हणजे काय ?* 📙 खाण्याचे मीठ व पिण्याच्या पाण्याची शुद्धता या दोन महत्वाच्या गोष्टी क्लोरीनमुळेच शक्य झाल्या आहेत. क्लोरीन हा वायू स्वरूपात मिळवला व साठवला जातो. मात्र नैसर्गिकरित्या क्लोरीन आढळत नाही. सोडियम बरोबर त्याचे संयुग पटकन बनते. त्यालाच आपण मीठ म्हणतो. ‍१७७४ साली शील यांनी त्याचा शोध लावला. फिकट हिरव्या रंगावरून ग्रीक भाषेतील क्लोराॅस या शब्दावरून त्याचे नाव पडले आहे. क्लोरीन हा वायू मुख्यतः पाणी शुद्ध करण्याच्या ब्लिचिंग पावडरमध्ये वापरला जातो. त्याच्यामुळे पाण्यातील जंतू मरतात व मुक्त झालेला क्लोरिन हवेत मिसळतो. अगदी सहज पूर्ण झालेल्या या प्रक्रियेमुळेच आपण मोठ्या प्रमाणावर पाण्याचे शुद्धीकरण करून गावे, शहरे, महानगरे यांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करू शकतो. क्लोरिनचे अनेक औद्योगिक उपयोगही आहेत. क्लोरीनचा गैरवापर करून पहिल्या महायुद्धात शत्रूच्या सैनिकांवर त्या वायूचा मारा केला गेला होता. फुप्फुसदाहाने त्यांचा त्यात मृत्यू ओढवला. कोणत्याही जिवंत प्राण्यांसाठी क्लोरीन हा अतिशय घातक वायू आहे. मात्र संयुग स्वरूपातील त्याची उपयुक्तता वादातीत ठरावी. माणसाच्या खाण्यातील एक अत्यावश्यक घटक म्हणजे मीठ. शरीरातील सोडीयमचा साठा अनेक शरीरातील क्रियांना मदत करतो. असा हा घटक म्हणजे सोडियम व क्लोरीनचे संयुग होय. भूल देण्यासाठी कित्येक दशके वापरले गेलेले क्लोरोफार्म हे द्रव्यही क्लोरीनचेच संयुग. क्लोरिनमुळे अनेक पदार्थांचे ऑक्सिडेशन होते. त्यामुळे अनेक रंग, डाग यांचा रंगीतपणा जातो. कपड्यांना नवीन रंग देण्यापूर्वी, कपडे स्वच्छ करण्यासाठी ब्लिचिंग पद्धतीच्या प्रक्रियेत याचा वापर केला जातो. हायड्रोक्लोरिक अॅसिड मध्ये क्लोरिन असतो व विद्राव्य म्हणून त्याचा वापर अनेक उद्योगांत केला जातो. कार्बनबरोबरचे त्याचे संयुग कार्बनटेट्राक्लोराईड एक उत्तम विद्राव्य आहे. त्याचा वापर आग विझवण्यासाठी केला जातो. क्लोरीनची निर्मिती इलेक्ट्रोलायसिस पद्धतीने केली जाते. समुद्राचे पाणी किंवा पोटॅशियमबरोबरची त्याची निसर्गात सापडणारी संयुगे यांचा वापर त्यासाठी केला जातो. एका परीने या वायूचा शोध हा मानवी प्रगतीला लागलेला मोठा हातभारच आहे, यात शंका नाही. *'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *“ जो माणूस स्वतःला सुखी समजत नाही तो कधीच सुखी नसतो. ”* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *'जागतिक साक्षरता दिवस' केव्हा साजरा केला जातो ?* 8 सप्टेंबर 2) *'जागतिक साक्षरता दिवस' कोणत्या वर्षीपासून साजरा केला जातो ?* 1966 3) *रयत शिक्षण संस्थेचे ब्रीदवाक्य कोणते ?* स्वावलंबी शिक्षण 4) *स्वामी विवेकानंद यांच्या गुरुचे नाव काय ?* रामकृष्ण परमहंस 5) *गगन नारंग हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?* शुटींग *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● गणेश कल्याणकर, नांदेड ●  महेश ठाकरे ●  पंढरीनाथ डोईफोडे येवतीकर ●  श्रीकांत पाटील ●  उमाकांत कोटूरवार ●  गंगाधर गुरलोड ●  मारोती ताकलोर ●  अर्षद खान ● किशन माटकर ● रमेश पेंडकर *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *यज्ञ, विवाह, ई. धार्मिक विधींचे वेळी अग्रपूजेचा-म्हणजे प्रथम -पूजेचा मान कोणत्या देवाला द्यावा, याबद्दल एकदा देवांमध्ये वाद सुरु झाला. प्रत्येकाला हा मान आपल्याला मिळावा असे वाटू लागले.अखेर हा तंटा ब्रम्हदेवांकडे गेला असता, ते म्हणाले, 'आपण कुणाही एका देवाला अग्रपूजेचा मान दिला, तर इतर देव नाराज होतील. तेव्हा हा निर्णय कसा घ्यावा, याचा मी एक मार्ग सुचवतो. जो देव या पृथ्वीला प्रदक्षिणा घालून सर्वात अगोदर माझ्याकडे येईल, त्याला हा अग्रपूजेचा मान बहाल केला जावा.'सर्वच देवांना हा तोडगा मान्य करावा लागला. मग प्रत्येकजण आपापल्या वाहनांवर स्वार होऊन, पृथ्वी प्रदक्षिणेला निघाला. कुणी वाघावर, कुणी गरुडावर तर कुणी मोरावर.* *श्रीगणेशाने विचार केला 'आपलं वाहन उंदीर, एकतर त्यावर बसून पृथ्वी प्रदक्षिणा करणं अशक्य आणि दुसरं म्हणजे ते शक्य झालंच, तरी या स्पर्धेत विजयी होणं हे त्याहूनही अशक्य!' हा विचार मनात येताच त्याला एक युक्ती सुचली. त्याबरोबर तो घरी गेला व पार्वतीला म्हणाला, 'आई, तू थोडा वेळ बाबांजवळ जाऊन बसतेस का? 'पार्वती म्हणाली, 'ही रे काय थट्टा आरंभलीस? 'यावर शंकर म्हणाले,'तो सांगतोय तर येऊन बैस ना तू माझ्याजवळ. पार्वती शंकराजवळ जाऊन बसताच, गणेश त्या दोघांना सात प्रदक्षिणा घालून पुन्हा ब्रम्हदेवाकडे आला, हा स्थूलदेही गणपती पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करुन एवढ्या लवकर कसा परत आला, असा ब्रम्हदेवांना प्रश्न पडला, पण गणेशाने आपण योजलेल्या युक्तीची माहिती देताच ब्रम्हदेवांना त्यांच॔ म्हणणं मान्य करावं लागलं. सर्व देवांपुढे उभे राहून ब्रम्हदेव म्हणाले, 'आई ही पृथ्वीस्वरुप असून, वडील नारायणस्वरुप आहेत. त्यामुळे त्यांना घातलेली प्रदक्षिणा ही पृथ्वीप्रदक्षिणेपेक्षाही श्रेष्ठ आहे. महाबुध्दीवान गणेशाने त्याच्या आई-वडिलांना एकच नव्हे, तर सात प्रदक्षिणा घातल्या व तो सर्वांच्या आधी मजकडे आला; म्हणून अग्रपूजेचा अधिकारी 'श्रीगणेश' असल्याचा निर्णय मी देत आहे.'* ••●‼ *श्रीगणेशाय नम:*‼●•• ☘☘☘☘☘☘☘☘☘ *संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल- 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रानो,* *काल चांद्रयान मोहिमेच्या निमित्ताने भारताच्या इतिहासात पुन्हा एक* *सोनेरी मुकुट खोवतांना नियतीने घात केला.* *परंतु म्हणावेसे वाटते ,भारतमाते पुत्र* *शहाणे अमित तुला लाभले।* *तुझ्या कुशीत परि जन्मली सारी* *वेडी मुले।* *खरंय ,आजपर्यंत माझ्या देशाला* *अभिमानाने उंचीवर नेऊन* *ठेवणारे प्रत्येक क्षेत्रातील* *महामानव लाभले.* *स्वामी विवेकानंदानी भारताच्या संस्कृतीचे दर्शन जगाला घडविले.* *तसेच मा.मोदीजींनी कालचा दिवस संपूर्ण भारतीयांच्या मनात एक* *अविस्मरणीय जागा ध्रुवताऱ्या* *सारखी करून ठेवली.* *बंधू-भगिनींनो--हार-जीत तो* *बहादूरके किस्मत को दो सितारे होते* *है।* *हे 56 इंच छातीच्या माणूस* *उभा* *करणाऱ्या अवलियाने* *काल आपल्या उक्ती* *आणि कृतीतून दाखवून दिले.* *मोदींचे संपूर्ण प्रेरणादायी भाषण* *अपयशी मनाला उभारी* *देण्याचा उत्तम वस्तुपाठ आहे .* *नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले, ‘‘जीवनात* *चढ उतार येतच* *असतात. प्रत्येक संघर्ष, प्रत्येक नवे* *आव्हान आपल्याला नवे काही* *शिकवून जाते. नव्या* *गोष्टींसाठी पुन्हा प्रवृत्त करते. त्यामुळे* *आपले चंद्रावर जाण्याचे* *स्वप्न आणखी प्रबळ झाले* *आहे. त्यामुळे इस्रोमधील* *शास्त्रज्ञांनी खचून जाण्याची गरज* *नाही.* *इस्रोमधील शास्त्रज्ञांच्या कामाचा* *गौरव करताना ते म्हणाले,* *मंगळावर प्रथमत: यान* *पाठवणारे आपणच आहोत.* *विविध मोहिमा यशस्वी* *करणारे आपणच आहोत.* *कधीही हार न* *मानणाऱ्या भारतीय संस्कृतीचे* *उदाहरण म्हणजे इस्रो आहे.* *तुम्ही प्रेरणेचा जिवंत सागर आहात.* *इतिहास घडवणारे आहात.* *तुमच्यात निराशेला स्थान नाही.* *वैज्ञानिक माणूस निराशेला आशेत* *परावर्तित करतो. त्यामुळे* *_शेवटच्या क्षणाच्या_* *अपयशानं तुमचं यश झाकोळून जात* *नाही. तुम्ही देशासाठी अमूल्य* *योगदान दिलंय.’’* *यातील काही अमृतथेंब ग्रहण करता* *आले तर बघा।* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• कोणत्याही क्षेत्रात यश आणि प्रगती व्हायची असेल तर त्यासाठी ठराविक कालावधी,वेळ, जिद्द,सातत्य,परिश्रम,ज्ञान, तंत्रज्ञान आणि कौशल्य हवे असते तर याशिवाय प्रगती होत नाही.याउलट अधोगतीचे आहे.अधोगतीला कोणतीही अट नाही.कोणत्याही क्षणी माणसाच्या डोक्यात कोणतेही विध्वंसक वाईट विचार आले की,अधोगती ही क्रांतीरुपाने होते आणि त्यांचे परिणाम सर्वांनाच भोगावे लागतात. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *घोडा आणि नदी* एकदा एका माणसाला त्याच्या घोड्यासमवेत एक नदी पार करायची असते. परंतु त्याला नदीची खोली माहीत नसल्याने तो तिथेच काठावर विचार करत बसतो. मदतीसाठी आजुबाजुला पाहत असताना त्याला तेथे एक लहान मुलगा दिसतो. तेव्हा त्या माणसाने लहान मुलाला नदीच्या खोलीबद्दल विचारले. मुलाने घोड्याकडे एकदा पाहीले आणि क्षणभर थांबुन तो विश्वासाने म्हणाला, " निश्चींतपणे जा, तुमचा घोडा नदी सहज पार करु शकेल". मुलाचा सल्ला मानुन त्या माणसाने नदी पार करण्यास सुरुवात केली. परंतु नदीच्या मध्यावर पोहोचल्यावर त्याच्या लक्षात आले की नदी खुप खोल आहे. आणि तो जवळ जवळ बुडायलाच आला. कसाबसा तो त्यातून सावरला आणि बाहेर येउन त्या मुलावर जोरात खेकसला. मुलगा पुरता घाबरला होता आणि घाबरत घाबरतच बोलला, "पण माझी बदके तर खुप लहान आहेत आणि ते दररोज नदी पार करतात. त्यांचे पाय तर तुमच्या घोड्यापेक्षा खुप लहान आहेत." उगाच कोणाचाही सल्ला ऐकण्याआधी त्यांना खरोखरच काही माहीती आहे का ते जाणुन घ्या.... प्रत्येकजण आपआपल्या अनुभवाने सल्ला देतात. तो सल्ला कितपत योग्य आणि बरोबर आहे ते जाणून घेणे महत्त्वाचे आहे. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 07/09/2019 वार - शनिवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *वेद दिन* 💥 ठळक घडामोडी :- ●१९५३ - निकिता ख्रुश्चेव सोवियेत संघाच्या सर्वेसर्वापदी. ● १९०६- बँक आफ इंडिया ची स्थापना झाली. 💥 जन्म :- ◆ १९३६ - बडी हॉली, अमेरिकन गायक, संगीतकार. ◆ १९५५ - अझहर खान, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- ●१५५२ - गुरु अनंग देव, दुसरे शीख गुरु. ● १९५३ - भगवान रघुनाथ कुळकर्णी, मराठी कवी, लेखक. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *पुणे : एमपीएससी परीक्षेत उत्तीर्ण होऊनही नियुक्ती न मिळालेले 1300 उमेदवार पुण्यातील सेंट्रल बिल्डिंगसमोर आंदोलनासाठी उतरले, जर तात्काळ नियुक्ती मिळाली नाही तर बेमुदत उपोषण करण्याचा पवित्रा त्यांनी घेतला आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *बॉलीवूड डेस्क - भारतीय चित्रपट संगीतात सात दशकांच्या अभूतपूर्व योगदानासाठी गान कोकिळा लता मंगेशकर यांना 'डॉटर ऑफ द नेशन'ची उपाधी बहाल करण्यात येणार आहे. त्यांच्या नव्वदाव्या वाढदिवशी (28 सप्टेंबर) त्यांना हा किताब प्रदान करण्यात येणार आहे.* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *मुंबई : काँग्रेसचे नेते, माजी खासदार एकनाथ गायकवाड यांची मुंबई अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याची माहिती काँग्रेसचे महासचिव के सी वेणुगोपाल यांनी पत्रकाद्वारे दिली* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *गडकिल्ले लग्न, हॉटेलिंगसाठी भाडेतत्वावर देणार नाही, अशी माहिती पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली, गडकिल्ल्यांच्या बाबतीत ही चुकीची अफवा पसरविण्यात आली, असल्याचेही ते म्हणाले.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *अनुसूचित जमातींच्या 13 योजना धनगर समाजाला लागू, राज्य सरकारचा शासन निर्णय जाहीर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *हवामान खात्याने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशारामुळे नागपूर जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नियोजित दौराही रद्द करण्यात आल्याचे नागपूर जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *मँचेस्टर : अॅशेस कसोटीतील इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या सामन्यात स्टीव्ह स्मिथने आपल्या कारकिर्दीतलं तिसरं दमदार द्विशतक झळकावलं. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने स्मिथच्या या खेळाचं केलं तोंडभरुन कौतुक* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *बुलेटीन audio मध्ये ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे* https://sharechat.com/post/6RGpy39 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *जागरूक पालकच खरे मालक* वास्तविक पाहता शिक्षण प्रक्रियेत विद्यार्थ्यासोबत त्यास शिकविणारे शिक्षक जेवढे जबाबदार आहेत त्याच्याच तुलनेत त्यांचे पालक सुद्धा विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत कारणीभूत घटक आहेत. शाळेतील शिक्षक मुलांवर चांगले संस्कार होण्यासाठी विविध उपक्रम राबवत जीवाचे रान करतांना, विद्यार्थ्यांच्या घरात मात्र दूषित वातावरण असेल तर पालथ्या घागरीवर पाणी नव्हे का ? ज्या ठिकाणी शिक्षक व पालक यांच्यात विद्यार्थ्यांच्या प्रगतीबाबत संवाद घडून येतो त्याच ठिकाणी आपणाला विद्यार्थ्यांची गुणवत्ता आणि प्रगती आढळून येते....... https://nasayeotikar.blogspot.com/2018/05/blog-post_61.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *संस्कारक्षम जीवन* *जीवनात संस्काराचे खूप महत्त्व आहे.* संस्काराशिवाय जीवन शून्य असते. संस्कारच मनुष्याला श्रेष्ठ बनवितात व उत्तरम आकार देतात. सर्वोत्तम जीवनाचा पाया उत्तम संस्कारांवरच अवलंबून असतो. संस्काराशिवाय जीवन म्हणजे ब्रेक नसलेल्या गाडीप्रमाणे असते. आदर्श जीवनाचा पाया म्हणजे संस्कारच आहेत. संस्कारक्षमतेविना जीवन म्हणजे पाण्याविणा मासा. कारण माशाच्या अस्तित्वासाठी पाणी हवेच तसेच मनुष्याच्या या जीवनाला उत्तम आकार हे संस्कारच देऊ शकतात. संस्कार म्हणजे मनुष्याच्या अंगी असणारे सद्विचार, सद्गुण. संस्कारशिल व्यक्‍तीच स्वतःची व समाजाची उन्नती करू शकतो हे आपणाला पाहिला मिळते आणि हेच संस्कार व्यवहारिक जीवनाबरोबर पारमार्थिक उन्नतीदेखील करून देते. त्यामुळेच एक चांगला व्यक्‍ती बनण्याची सुरुवात ही प्रत्येकाची आपल्या घरापासून सुरु होते. त्यामुळे ज्याच्या अंगी संस्कारयुक्‍त आचार विचार असतील त्याच्याद्वारे सर्व व्यवहार नियमबद्ध चाकोरीत चालतात. प्रकृतीही आपल्या नियमाने चालते. जसे कि, दिवस-रात्र, महिने, ऋतु सर्वकाही नियमाने चालतात. हिवाळा आणि उन्हाळा पण निसर्गनियमांप्रमाणे येतात व जातात. यामुळेच जगातील सर्व व्यवहार व्यवस्थितरितीने पार पाडतात. हे सर्व जगाच्या कल्याणासाठी घडत असते. असेच संस्कारित असणाऱ्या व्यक्‍तीकडूनही अशाप्रकार सर्वकाही नियमावलीनेच घडते. म्हणून मानवसमाजाने देखील आपले जीवन सुखी होण्यासाठी चांगले संस्कार स्वतःमध्ये रूजविले पाहिजे. या सर्व गोष्टींची सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे घरातूनच व्हायला पाहिजे. एक चांगला मनुष्य व आदर्श नागरिक बनविण्याची सुरुवात घरातूनच व्हायला हवी. *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *“ जो माणूस स्वतःला सुखी समजत नाही तो कधीच सुखी नसतो. ”* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *भारताच्या एकीकरणाचे शिल्पकार कोणाला म्हणतात ?* सरदार पटेल 2) *'सामाजिक न्याय दिन' केव्हा साजरा केला जातो ?* 26 जून 3) *'कमवा व शिका' या संकल्पनेचे जनक कोण ?* कर्मवीर भाऊराव पाटील 4) *जिल्हा न्यायाधीशांची नेमणूक कोण करतो ?* राज्यपाल 5) *कोणत्या क्रिकेटपटूने एकदिवसीय सामन्यात तीन वेळा द्विशतक झळकविण्याचा पराक्रम केला ?* रोहित शर्मा *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● प्र. श्री. जाधव ●  त्र्यंबक स्वामी ●  गजानन जाधव ●  भारत पाटील ●  सुमीत पेटेकर ●  हणमंत गायकवाड ●  गोविंद पटेल ●  सिद्धू पुरी ● भास्कर चटलोड ● दशरथ याटलवार ● प्रवीण कुमार ● पवन धनडु *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *"या जगात अनेक जातीचे प्राणी, अनेक जातीच्या वनस्पती इ. आहेत. (आंब्याची जात गोड चवीची तर कारल्याची जात कडू चवीची.) अशा अनेक जातींचे अनेक वेगवेगळे रंग आहेत. अशा अनेकविध जाती आणि त्यांच्या गुणधर्मानुसार व्यक्त होणारे रंग-ढंग एकत्र येऊन तर 'जग' हे नाव निर्माण झालं आहे." या जगात खूप काही असलं तरी हिताचं जे मोजकंच आहे, त्याला खरी किंमत आहे. 'शब्दज्ञान' किती मर्यादित असतं, याचं बोधक उदाहरण म्हणजे "उजेड काजव्यातूनही निघतो, पण तो फक्त त्याच्या पार्श्वभागापूरताच उजेड देतो, आणि तेही कायम नाही देत; तर चालू-बंद, चालू-बंद असा देतो." शब्दज्ञान हे काजव्याच्या उजेडासारखं आहे. ते देणा-याच्यासुद्धा समोर प्रकाश पाडत नाही. असा उजेड जगाला काय प्रकाश देणार? शब्दज्ञानानं समाजाचं जाऊ द्या, स्वतःचंही भलं होऊ शकत नाही.* *स्वतःसहीत समाजाचंही भलं करायचं असेल, तर कॉपी-पेस्ट बंद झालं पाहिजे. ज्ञान आता शब्दांचं नको तर अनुभवाचं असायला हवं.--* *तुका म्हणे झरा । आहे मुळचाची खरा ।।* *तुकोबा म्हणतात, "माझं ज्ञान हे काही कुठून आयात केलेलं नाही. ते कॉपी केलेलं नाही. माझ्या ज्ञानाचा जो झरा आहे, तो माझ्या अंतःकरणातून प्रकट होतो." याउलट शब्दज्ञानी माणसाचं ज्ञान समुद्राइतकं विशाल दिसत असलं, तरी ते अनेक नद्या, नाले, झरे यांच्यावाटे आलेलं आहे. जरी विशाल असला तरी समुद्राचं पाणी तहानलेल्याची तहान भागू शकत नाही, तसं शब्दज्ञान लोकांचं भलं करू शकत नाही. त्यासाठी आवश्यकता आहे ती अनुभवाच्या झ-याचीच.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल- 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो* *पहाट वारा अंगाला झोंबला,* *तसा उठून हातात पेपर पडला।* *नित्याचच हे रहाटगाडग।* *पण मस्तकात जोरात सनकी भरते ती* *बांडगुळा सारखे ,व पळकुटे पणाने* *जगणाऱ्याची.* *मध्येच भयानक चीड येते ती* *जीवनाला कंटाळून आत्महत्या* *करणाऱ्यांची.* *आणि नेमक्या ह्याच* *बातम्या फ्रंटला ,मोठया* *हेडिंगमध्ये येतात.* *लाख मोलाचे जीवन संपवतांना या* *पळकुट्याना आपण मागे काय* *टाकून जातो याची जराशीही* *भ्रांत पडत नाही.* *परिस्थिती बदलत असते,दोन हात* *करण्याची तयारी ठेवली* *पाहिजे.* *त्यांना सांगावं वाटत* *सुखदुःखाची उनसावली येते,जाते,राग* *नको.* *संकटास लीलया भिडावे, आयुष्याचा* *त्याग नको।* *बहुमोलाचे जीवन वेड्या कुणास* *फिरुनी मिळते का?* *मनासारखे सारे काही जीवनात या* *घडते का?* *मित्रांनो, जगात आलोच ना ,मग लढा* *ना ,कधी दोन* *देत,कधी दोन घेत.* *यातून कुणाचीही सुटका झालेली* *नाही.संत तुकारामांनी सांगितले* *आहे की--आपुली आपण* *करा सोडवणं।* *🤝🏻विचार करा, आम्हीबी घडलो,तुम्हींबी* *घडा।* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ज्या व्यक्ती अश्रूंचा सहारा घेऊन जगतात त्या जीवनात कुठेतरी पराभव पत्करलेल्या असतात किंवा त्यांच्या मनावर कुठेतरी आघात झालेला असतो किंवा कुणीतरी मनाविरुद्ध करण्यासाठी प्रवृत्त केलेले असते.हे जरी खरे असले तरी अशा व्यक्ती शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या कमकुवत झाल्याने त्यांना जीवनात जगण्याची काही अपेक्षा उरली नाही किंवा आता आपण जगून तरी काय करावे असा सतत विचार करत आणि डोळ्यांत अश्रू आणून कसेबसे जीवन जगतात.अशा दुबळ्या मनाने जीवन जगण्यापासून जीवनाला परावृत्त करायचे असेल तर जीवनात आणि आपल्यासमोर चांगले जीवन जगण्याची उमेद प्रथमत: नजरेसमोर ठेवायला हवी, नेहमी आपण काहीतरी असले तरी मी कोणत्याही कठीण प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी सक्षम आहे असा उदात्त विचार करून जगायला शिकले पाहिजे,कुणीजरी आपले मन दुखवण्याचा प्रयत्न केलातरी मी त्याकडे दुर्लक्ष करीन असाही सकारात्मक विचार केला आणि मन घट्ट करून जगायला शिकले तर अश्रूंचा आधार घेऊन जगायची काही गरजच भासणार नाही.जीवन तर सुखदु:खाने भरलेले आहे ते कुणाच्या वाट्याला कमी-जास्त असणारच.सुख जास्त झाले म्हणून जास्तही त्या सुखाचा अतिरेक होऊ द्यायचा नाही आणि दु:ख झाले म्हणून अति दु:खी व्हायचे नाही.आपण सारेजण सुखदु:खाच्या चक्रव्युहात अडकलेलोच आहोत आणि त्या चक्रव्युहाला भेदूनच चांगले जीवन जगायचे आहे हे लक्षात ठेवायला हवे. व्यंकटेश काटकर,नांदेड संवाद..९४२१८३९५९० 🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मनाची एकाग्रता* एकेकाळी एक वृद्ध योद्धा होता. त्‍याच्‍या काळातील तो सर्वत्र प्रसिद्ध असा योद्धा होता. त्‍याला कोणत्‍याही प्रकारच्‍या युद्धात कुणीच हरवू शकत नसे. त्‍याची ख्‍याती सर्वत्र पसरली होती. त्‍याने त्‍याच्‍या शिष्‍यांना व मुलांना युद्धकलेचे शिक्षण देण्‍यास सुरुवात केली होती. त्‍याचवेळी एक तरूण योद्धाही प्रसिद्ध होत होता. दिग्‍गज योद्धेही तरूण योद्ध्यासमोर हार मानत असत. प्रतिस्‍पर्ध्‍याचे कच्‍चे दुवे ओळखून त्‍याला सहज पराभूत करण्‍यात त्‍याचा हातखंडा होता. अतिशय कमी कालावधीत त्‍याने वृद्ध योद्धा सोडल्‍यास सर्व योद्ध्यांना पराभूत केले होते. त्‍याचे नाव सर्वत्र गाजू लागले. मिळणारी प्रसिद्धीचा आता त्‍याच्‍या मनात अहंकार जागृत झाला. त्‍याने विचार केला की या वृद्धालाही हरवून 'अजिंक्‍य' हे बिरूद लावून मिरवू. त्‍याने वृद्ध योद्ध्याला आव्‍हान दिले. शिष्‍यांनी मनाई केली तरी वृद्धाने त्‍याचे आव्‍हान स्‍वीकारले. तरूण योद्धा ठरलेल्‍या दिवशी वेळेवर रणांगणात येऊन उभा राहिला. भविष्‍यातील विजयाची कल्‍पना मनात धरून तो आनंदी होत होता. पण वृद्ध मात्र शांत आणि संयमित स्थितीमध्‍ये त्‍याच्‍यासमोर उभा होता. युद्ध सुरु झाले. तरूणाच्‍या प्रत्‍येक वाराला वृद्धाकडे प्रतिवार तयार होता.तरूण योद्धा हळूहळू का होईना दमू लागला आणि आपण युद्ध हरतो आहे हे लक्षात येताच त्‍याने वृद्धाला अपशब्‍द वापरण्‍यास सुरुवात केली. जेणेकरून वृद्धाचे लक्ष विचलित होईल पण त्‍याचा उपयोग झाला नाही. वृद्ध अविचल राहिला त्‍याचा संयम ढळला नाही. अखेरीस तरूण योद्धा पराजित झाला. त्‍याने स्‍वत:हून हार पत्‍करली व तेथून पराजित होऊन निघून गेला. तो गेल्‍यावर शिष्‍यांनी व वृद्धाच्‍या मुलांनी वृद्धाला विचारले,''बाबा, तो तरूण तुम्‍हाला अपशब्‍द वापरत होता तरी तुम्‍ही शांत कसे राहिलात'' तेव्‍हा वृद्ध गुरु म्‍हणाला,'' मुलांनो कोणत्‍याही युद्धात शारीरिक बळाबरोबरच मनाची एकाग्रता महत्‍वाची असते. कोणत्‍याही परिस्थितीत मन कणखर असेल तर तुमचा विजय निश्चित आहे.'' *तात्‍पर्य : मनाची एकाग्रता साधल्‍याने बरेचशी कामे साध्‍य होतात. मन एकाग्र करून कोणतेही काम केल्‍यास हमखास यश मिळतेच.* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 06/09/2019 वार - शुक्रवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *गौरी गणपतीच्या सर्वाना हार्दीक शुभेच्छा* 💥 ठळक घडामोडी :- ●१९६५ - भारत-पाकिस्तान दुसरे युद्ध-भारताने पाकिस्तानवर हल्ला केला. ●१९६६ - दक्षिण आफ्रिकेच्या पंतप्रधान हेन्ड्रिक व्हेरवोर्डची संसदेत भोसकून हत्या. 💥 जन्म :- ◆ १९२९ - यश जोहर, भारतीय चित्रपट निर्माता. ◆ १९७१ - देवांग गांधी, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- ●१९६६ - हेन्ड्रिक व्हेरवोर्ड, दक्षिण आफ्रिकेचा पंतप्रधान. ●१९९० - लेन हटन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *महाराष्ट्राचे नवनिर्वाचित राज्यपाल म्हणून भगतसिंग कोश्यारी यांनी घेतली शपथ, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंद्रजोग यांनी राज्यपालपदाची दिली शपथ, यावेळी भगतसिंग कोश्यारी यांनी मराठीतून घेतली राज्यपाल पदाची शपथ* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *रिलायन्स 'जियो गीगा फायबर' सेवा सुरू: 700 रुपयांत इंटरनेट, मोफत कॉलिंग, एचडी टीव्हीसह डिश तर काही ग्राहकांना टीव्ही देखील मोफत* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *मुंबई- राज्यातील वीज कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील वीज कर्मचाऱ्यांना भरघोस पगारवाढ देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला, या नव्या निर्णयामुळे राज्यातील वीज कर्मचाऱ्यांना पूर्वीच्या मूळ वेतनाच्या 32.50 टक्के वेतनवाढ दिली जाणार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *'नागरिकांनी नियमांचे पालन करावे म्हणून दंड वाढवला, पेट्रोल-डीझेल गाड्यांवर बंदी घालण्याचा आमचा विचार नाही'-  रस्ते आणि परिवहनमंत्री नितीन गडकरी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *'भाजप-शिवसेनेचा 135-135 चा फॉर्म्युला ठरला असून मित्रपक्षाला 18 जागा देणार', केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांची माहिती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *मुंबई: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सर्व बँकांना सर्व प्रकारची कर्जे येत्या एक ऑक्टोबरपासून रेपो रेटशी जोडण्याचे दिले आदेश, यामुळे गृह, वाहन कर्जदार तसेच लघूउद्योगांना स्वस्तातील कर्ज होणार उपलब्ध* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *ढाका: अफगाणिस्तानचा फिरकीपटू राशीद खानच्या नावावर एका नव्या विक्रमाची झाली नोंद, तो कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात लहान कर्णधार ठरला.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ बुलेटीन audio मध्ये ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे. https://b.sharechat.com/d2atmKNwKZ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *बलात्काराचे वाढते प्रमाण कधी थांबणार ?* https://nasayeotikar.blogspot.com/2018/04/blog-post_15.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *कुष्ठरोग म्हणजे काय ?* 📙 कुष्ठरोग हा एक संसर्गजन्य आजार आहे. यावर प्रतिबंधक लस तयार झाली आहे, पण ती अद्याप प्रयोगावस्थेत आहे. याखेरीज तिचा वापर कसा करावा, याविषयी शास्त्रज्ञ व डॉक्टर यांच्यामध्येच अजून एकमत नाही. मात्र विविध प्रकारच्या औषधांचा वापर करून कुष्ठरोग निर्मूलन आता आवाक्यात आले आहे. असे जागतिक आरोग्य संघटनेला वाटते. दर दहा हजार व्यक्तींमागे एक रुग्ण असे प्रमाण सध्या भारतात आढळते. अगदी प्रारंभिक अवस्थेतील रोगाचे निदान करून त्यावर औषधांचा उपयोग केल्यास कुष्ठरोग पूर्णपणे बरा करता येतो. कुष्ठरोग काटकीसारख्या दिसणाऱ्या सूक्ष्मजंतूंमुळे होतो. त्यांची कृत्रिम वाढ करणे शक्य झालेले नाही. या रोगाचे जंतू मानवी शरीरात जेव्हा प्रवेश करतात, तेव्हा त्यांचा पेशीजालाशी संघर्ष होतो. एका प्रकारात या संघर्षात जंतू व पेशीजाल या दोन्हींचा नाश घडतो. या प्रकाराला 'नॉन लेप्रोमॅटस' किंवा 'असंसर्गिक' समजतात. म्हणजे रोगाचे परिणाम जरी शरीरावर दिसत असले, तरी त्यात जंतू नसल्याने ही व्यक्ती संसर्ग देऊ शकत नाही. दुसऱ्या प्रकारात मात्र जंतूंची अनिर्बंध वाढ होत राहते. तेथे रुग्णाची प्रतिकारशक्ती कमी असते. मात्र जंतुंची संख्या वाढत गेल्यामुळे सर्व शरीरभर रोग पसरत राहतो. प्राथमिक अवस्थेत पेशीजाल फारसे नष्ट होत नाही. विकोपाला गेल्यावर मात्र ढोबळ चिन्हे दिसून येतात. हा प्रकार सांसर्गिक असतो. महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुष्ठरोग अत्यंत मंदगतीने वाढणारा आजार आहे. सुरुवातीची लक्षणे व प्रगत अवस्थेतील चिन्हे यात फारच फरक आहे. समाजासमोर प्रगत अवस्थाच येत असल्याने या रुग्णांबद्दल एक प्रचंड भीती व तिरस्कार अनेक शतके समाजात घट्ट गैरसमजुती निर्माण करत आहे. शारीरिक विद्रुपता व त्यापासून होणारे सामाजिक व आर्थिक परिणाम टाळण्यासाठी रोगाची सुरुवातीची लक्षणे ओळखून इलाज सुरू करणे महत्त्वाचे ठरते. शरीराच्या कोणत्याही भागावर त्वचेच्या रंगापेक्षा वेगळ्या रंगाचा लालसर चट्टा व डाग दिसून या रोगाची सुरुवात होते. कोडाप्रमाणे हे डाग पांढरे नसतात. अतिगडद त्वचेवरील डाग लक्षात यायला वेळही लागतो. मात्र महत्त्वाची गोष्ट म्हणजे या जागीच्या त्वचेचे स्पर्श, उष्णता व वेदना या तिन्हींचे ज्ञान गेलेले असते. अशा जागीची त्वचा किंचित खरवडून तिची सूक्ष्मदर्शक यंत्राखाली तपासणी करतात. त्यात रोगाचे जंतू असतील, तर तो सांसर्गिक प्रकार ठरवला जातो. जंतू नसतील, तो असांसर्गिक असतो. भारतातील सुमारे ८० टक्के रूग्ण असांसर्गिक प्रकारात असतात. जेमतेम २० टक्के रुग्णांचाच इतरांना संसर्ग होऊ शकतो. मुख्य गोष्ट म्हणजे दोन्ही प्रकारच्या रुग्णांना एक ते दोन वर्षे औषधयोजनेची गरज असते. अन्यथा अतिसंथपणे वाढणाऱ्या या रोगाचे चट्टे अनेक ठिकाणी दिसू लागतात. हातापायांची बोटे वाकडी होणे, क्षते पडणे, जखमा चिघळणे हे मुख्यतः संवेदना नष्ट झाल्याने वाढत जाते. रोगाचा उद्भव झाल्याने चेहऱ्यावरच्या गाठी, कानाच्या पाळ्यांवर व नाकावर येणारी विद्रुपता, भुवयांचे केस जाणे यांमुळे प्रगत अवस्थेतील रुग्ण हा समाजातून बाहेर फेकला जायला सुरुवात होते. पण ही अवस्था न आलेली किमान ९० टक्के कुष्ठरोगी समाजातच वावरत असतात. त्यांच्यामुळे होणारा संसर्ग टाळण्यासाठी त्यांच्यावर निदान व उपचार करणे हाच एकमेव प्रतिबंधाचा उपाय राहतो. कुष्ठरोग हाही एक जंतुजन्य रोग असून तो पूर्ण बरा होऊ शकतो, ही महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायलाच हवी. *'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *“ सर्वांनी एकत्र श्रम केल्याने कठीण काम हलके होते. ”* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *स्थानिक स्वराज्य संस्थांचे जनक कोणाला म्हटले जाते ?* लॉर्ड रिपन 2) *भारतीय भूदान चळवळीचे जनक कोणाला म्हणतात ?* आचार्य विनोबा भावे 3) *1983 च्या क्रिकेट वर्ल्ड कपचे भारतीय कप्तान कोण होते ?* कपिल देव 4) *'Golden Girl of India' असे कोणत्या खेळाडूला म्हटले जाते ?* पी टी उषा 5) *अभिनव बिंद्रा हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?* शुटींग *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● सुनील ठाणेकर ● गणेश शिंदे, शहापूर, ठाणे ●  महेश वडजे ●  विठ्ठल तुकडेकर ●  रितेश पोकलवार ●  प्रशिक कैवारे ●  विकास डुमणे ●  अनिल सोनकांबळे ●  आनंद गायकवाड ● सचिन पाटील *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• *तारूण्य आणि संगत यांचे महत्व विशद करताना जैन मुनीं तरूण सागर महाराज सांगतात, 'आपले मित्र, चित्र आंणि चरित्र नेहमी पवित्र ठेवा; कारण तेच खरे जीवनाचे अस्त्र आहे. तुम्हाला तर हे माहित आहे की., चारित्र्याचे पतन होण्यासाठी बहुधा चुकीचे मित्र आणि चुकीचे चित्र यांचाच हात असतो. चुकीचे मित्र आणि चुकीचे चित्र हेच चारित्र्य नष्ट करण्याचे शस्त्र आहे किंवा असेही म्हणता येईल की, कधीही न चुकणारे ब्रम्हास्त्र आहे.' तारुण्याच्या सळसळत्या उर्जेवर स्वार्थी व्यवस्थांचा डोळा असतो. त्यामुळेच तारूण्याची ऊर्जा सैरभैर करून तिला आपल्या इच्छेप्रमाणे वापरण्याचे धूर्त राजकारण या स्वार्थी व्यवस्था करत असतात. तारुण्याच्या ऐन उमेदीचा कालखंड निरर्थकपणे या स्वार्थी व्यवस्थेच्या नेतृत्वामागे घालविला जातो.* *एखादी पाण्याची बाटली वापरून फेकून द्यावी, त्या पद्धतीने तरुणांच्या ऊर्जेचा वापर करून त्यांना शेवटी फेकून दिले जाते. सर्व बाजूंनी निष्क्रिय केलेल्या तरूणांवर शेवटी पश्चात्तापाची वेळ येते. तारूण्याचे रखरखीत वाळवंट होते. आपले तारूण्य विवेकशून्य व्यवस्थेच्या हाती द्यायचे की, स्वत:वर विश्वास ठेवत स्वकर्तृत्वाच्या बळावर समाज जीवनात उजळवून टाकायचे हे ज्याला समजले, त्याला तारुण्याचा खरा अर्थ कळला. माजी राष्ट्रपती डाॅ. ए.पी.जे. अब्दुल कलाम हे युवकांना देशाची संपत्ती म्हणायचे, ही संपत्ती देशासाठी आपत्ती ठरू नये म्हणून तरूणांनी आपले मित्र विचारपूर्वक निवडावेत.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल- 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो,* *आज अवतार सिनेमातील गाणे,जिंदगी* *मौज* *उडानेका नाम है,कयाम है।अशी* *स्थिती तरुणांची बघायला मिळतेय.* *जीवन एक संघर्षयात्रा आहे.* *जंग सिनेमात एक गाणं आहे,* *जिंदगी हर कदम एक नई जंग है।* *याचप्रमाणे अगदी* *लहानपणातच एकदा संकट झेलायची* *सवय लागली की* *मोठेपणी कितीही वादळे येवु* *द्या .माणसं टक्कर घ्यायला सज्य* *असतात. स्वतःच्या* *आयुष्याची स्वतः वाट निर्माण* *करणारेच यशश्वी होत असतात.संकट* *आपल्याला* *अडवायला कधीच येत नाहीत तर* *संकट आपली उंची वाढवायला* *येत असतात.* *परंतु* *तरुणाई कुठंतरी* *भटकतेय,दिशाहीन अवस्था काही* *ठिकाणी बघायला* *मिळते.जीवनाची आशा सोडता कामा* *नये.* *आशा नावाची साखळी पायात* *घातली की तिच्या आवजानेच यशाचा* *राजमार्ग सापडतो.* *आणि हो , हा राजमार्ग मिळण्यासाठी* *तिला निराशेचे* *अनेक खडतर डोंगर पार करावे* *लागतात.* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ज्याप्रमाणे सुगंधीत असलेल्या फुलांना आम्ही सुगंधीत आहोत म्हणून तुम्ही आमच्याकडे या आणि सुगंध घ्या असं कधीच म्हणावं लागतं नाही.आपोआपच सुगंध असणा-या फुलांकडे लोक आकर्षित होतात. त्याचप्रमाणे सज्जन माणसे कधीच कुणाला म्हणत नाहीत की,तुम्हीआमच्याकडे आमच्या सहवासात या आणि आमचे सद्गुण घ्या. आपोआपच सर्वसामान्य माणसे सज्जनांच्या सहवासात जाऊन आपल्यातील असलेल्या दुर्गुणावर मात करुन सद्गुणी होण्याचा प्रयत्न करतात. तात्पर्य असा की सद्गुणांचा सहवास हाच दुर्गुणावर मात करु शकतो.त्यासाठी  आपली मानसिकता असावी  लागते. © व्यंकटेश काटकर,नांदेड संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *त्‍यागाचे महत्‍व* फार वर्षापूर्वी एक स्‍वाभिमानी राजा होऊन गेला. त्‍याचे राज्‍य मोठे होते आणि अपार संपत्तीने खजिना भरलेला होता. त्‍याचे महाल सोन्‍यापासून बनलेले होते. नोकरचाकरांची रेलचेल होती. मात्र त्‍याचे सल्‍लागार त्‍याच्‍या अहंकाराला प्रोत्‍साहन देत होते. एकदा त्‍याच्‍या दरबारात एक तेज:पुंज साधू आला. राजाला पाहूनच त्‍याने ओळखले की राजाला फार गर्व चढला आहे. राजाने मोठ्या तो-यात विचारले,''तुला काय पाहिजे?'' साधू म्‍हणाला,'' राजन, मला तुझ्याकडून काहीच नको आहे. उलट मीच तुला काहीतरी देण्‍यास आलो आहे.'' राजाचा अहंकार दुखावला व राजा मोठ्याने ओरडला,''लहान तोंडी मोठा घास घेतोस. लाज वाटते का नाही. तुझ्याजवळ फुटकी कवडी नाही अन तू मला काय देणार?'' साधू मंद स्मित करत म्‍हणाला,''राजन, त्‍यागाशिवाय भोगाला चव येत नाही. वैभवात जेव्‍हा त्‍याग समाविष्‍ट होते तेव्‍हा तो वंदनीय आणि प्रशंसनीय ठरतो. त्‍याग येताच अहंकार दूर होतो. आसक्ती दूर होते आणि मन परमात्‍म्‍याकडे पोहोचण्‍यासाठी तयार होते.'' फकीराच्‍या राजा खजील झाला आणि त्‍याचे डोळे उघडले. त्‍याने गर्वाचा त्‍याग केला. तात्‍पर्य :- त्‍यागाने अहंकाराचा नाश होतो. अहंकार हा मनुष्‍याचे नुकसान करतो. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 05/09/2019 वार - गुरूवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *शिक्षक दिन* 💥 ठळक घडामोडी :- ◆२००५ - मंडाला एरलाइन्स फ्लाइट ०९१ हे बोईंग ७३७-२०० प्रकारचे विमान इंडोनेशियातील सुमात्रा बेटावरील दाट वस्तीच्या भागात कोसळले. विमानातील १०४ व जमीनीवरील ३९ व्यक्ती ठार. 💥 जन्म :- ◆१८८८ - डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, भारताचे दुसरे राष्ट्रपती. ◆१९१० - फिरोझ पालिया, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- ●१९९७ - मदर तेरेसा, समाजसेविका. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *अण्णा हजारे रुग्णालयात दाखल, प्रकृती स्थिर, आण्णा हजारे यांना किमान आठ दिवस संपूर्ण विश्रांतीचा डॉक्टरांनी दिला सल्ला* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *राज्यात प्रथमच ऑनलाईन परीक्षा होणार असून या प्रक्रियेत पोलीस शिपाई पदाच्या ३ हजार ४५० जागा भरल्या जाणार* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *पुढील 48 तासांत मराठवाड्यात पावसाचे आगमन तर मुंबई आणि कोकणमध्ये अतिवृष्टीचा, हवामान खात्याचा अंदाज* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *पंजाबच्या गुरुदासपूरमध्ये फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट; 13 जणांचा मृत्यू तर अनेकजण गंभीर जखमी, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *आर्थिक मंदीमुळे बेरोजगारी वाढली, काँग्रेसने त्यांच्या काळात उत्तम काम करून मंदीतून बाहेर काढलं होतं, खासदार संजय राऊतांचा सरकारला घरचा आहेर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *गडचिरोलीत मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत, शंभरहून अधिक गावांचा संपर्क तुटला* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *लेफ्टनंट अनिल पुरी १ हजार २०० किमी लांब सायकल स्पर्धा ९० तासांत पूर्ण करणारे ठरले पहिले भारतीय, साहस फ्रान्समधील सर्वात जुन्या स्पर्धेत ६० देशांतील ६ हजार ५०० खेळाडूंनी घेतला होता सहभाग* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *शिक्षक दिनानिमित्त सर्व शिक्षक बंधू भगिनींना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• ऑडिओ ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे. https://b.sharechat.com/EV65u2FRIZ ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *शिक्षकदिन विशेष लेख* *बदलत्या काळात शिक्षकांची भूमिका* https://bit.ly/2kiaD5G लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *काँक्रिट म्हणजे काय ?* 📙 एखादी चर्चा चालू आहे. विविध सूचना केल्या जात आहेत. त्यावर फक्त चर्चाच होते आहे. पुन्हा सूचना येतात. पुन्हा चर्चा. अशा वेळी कोणीतरी वैतागून म्हणते, 'काहीतरी काँक्रीट घडू द्या ना !' म्हणजेच मूर्त किंवा साकार असे त्याला सुचवायचे असते. एखादी अत्यंत पक्की, नीट साधलेली, एकत्र बांधलेली गोष्ट म्हणजे काँक्रीट. व्यवहारात गेली सत्तर एक वर्षे काँक्रिट म्हणजे सिमेंट काँक्रिटच होय. सिमेंटचा शोध लागून वापर सुरू झाल्यावर त्यापासून विविध मिश्रणे वापरली गेली. सिमेंट व वाळूचे मिश्रण कायम पक्के राहत नाही. सिमेंट व खडी एकमेकांना बांधून राहत नाहीत. पण सिमेंट, बारीक वाळू, जाड वाळू, खडी यांचे मिश्रण करून त्यात योग्य प्रमाणात पाणी घालून कालवले, तर ते हवे तेवढे पक्के होते. अगदी दगडच म्हणा ना ! याला काँक्रिट किंवा शास्त्रीय भाषेत प्लेन सिमेंट काँक्रीट (PCC) म्हणतात. खूप मोठा भार सहन करण्याचा या काँक्रेटचा गुण बघून त्याचा वापर सुरू झाला. रस्ते बनवणे, विमानांच्या धावपट्टय़ा तयार करणे यांसाठी सिमेंट वापर वापरतात व धरणे बांधताना भिंतीसाठी काँक्रिटचे प्रचंड ठोकळेच वापरतात. एवढेच काय, पण समुद्र हटवण्यासाठीसुद्धा काँक्रिटचे मोठे आकाराचे विविध ठोकळे वापरून फुटणाऱ्या लाटांचा जोर त्यावर येईल, अशी व्यवस्था केली जाते. रेल्वेसाठी रूळ टाकताना जमिनीत जे स्लिपर्स आडवे घातले जातात, तेही गेली काही वर्षे काँक्रिटचेच वापरले जातात. एखाद्या पुलाचा पाया वा एखाद्या अतिउंच इमारतीचा पाया खोदून झाला की, प्रथम त्या खड्ड्यांमध्ये जवळपास फूटभर जाडीचे पीसीसीच ओतले जाते. ते पक्के झाले की मग त्यावर पुढचे काम सुरू होते. आपल्या देशात जवळपास न वापरला गेलेला पण अनेक देशांत उपयोगात आणलेला पीसीसीचा एक वापर म्हणजे अणुबाँब स्फोटापासून वाचवण्यासाठी तयार केलेली सुरक्षाघरे. या सुरक्षाघरांच्या भिंती दोन ते तीन फूट जाडीच्या पीसीसीने बनवतात. छतासाठी व पिलर्ससाठी सुद्धा खास रिएन्फोर्स्ड काँक्रीट (म्हणजे सळ्या घालून ताकद वाढवलेले, ताण सोसू शकणारे) वापरलेले असते. या काँक्रिटच्या जाडीतून रेडिओ उत्सर्जन आत पोहोचू शकत नाही. यासारखा दुसरा एक महत्त्वाचा उपयोग म्हणजे महासत्तांनी तयार केलेली आंतरखंडीय क्षेपणास्त्रे व त्यांवर बसवलेले अण्वस्त्रे सुरक्षित ठेवायला तयार केलेली महाप्रचंड तळघरे. यांना 'सिलो' म्हणतात. यांची बांधणीसुद्धा अशीच तीन तीन फूट जाडीच्या काँक्रिटने केलेली असते. शत्रूच्या क्षेपणास्त्रानेसुद्धा विध्वंस होणार नाही, इतकी पक्की रचना या सिलोंची असते. काँक्रिटच्या पक्केपणाचा महिमा हा असा आहे. *'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *“ दुसऱ्याला शिकवीत असतांना माणूस स्वतःला शिकवीत असतो. ”* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *'शिक्षक दिन' केव्हा साजरा केला जातो ?* 5 सप्टेंबर 2) *शिक्षक दिन कोणाच्या जन्म दिवसानिमित्त साजरा केला जातो ?* डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन 3) *जगात किती देशात शिक्षक दिवस साजरा केला जातो ?* 100 4) *भारतात कोणत्या वर्षी प्रथम शिक्षक दिवस साजरा केला गेला ?* 1962 5) *डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म केव्हा झाला ?* 5 सप्टेंबर 1888 *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● सौरभ सुरेश सावंत, नांदेड ●  नितीन शिंदे ●  रत्नाकर चिखले ●  राजकुमार काळे ●  रत्नजित पाटील पटारे ●  धोंडोपंत मानवतकर ●  लक्ष्मीनारायण येरकलवार ●  नरेश रेड्डी ● पांडुरंग बोमले *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *गरीब माणसाला घरापासून दूर राहून पोटाच्या चार घासासाठी प्रचंड मरमर करावी लागते. पण पैशावाल्याच्या बाबतीत हे होत नाही. "एका बसल्या ठिकाणी त्याचा व्यापार चालतो. त्याला घर सोडून कुठेही जावं लागत नाही." गरीबाला एका वस्तूसाठी पैशाअभावी कुढत मरावं लागतं. शेवटपर्यंत ती वस्तू मिळेलच असं होतं नाही. पण "श्रीमंताला मात्र पाहिजे असणारी कोणतीही वस्तू रानावनातच काय या पृथ्वीतलावर कुठंही असली तरी पैशाच्या जोरावर मिळवणं सोपं असतं आणि वस्तू कोणतीही असू द्या, कितीही अनमोल असू द्या, कितीही महत्वाची असू द्या, शक्यतो जास्तीचे पैसे देऊन मिळवता येणार नाही, इतकी ती अवघड नसतेच." थोडे जास्त पैसे देऊन अति मौल्यवान वस्तुसुद्धा पैश्यावाल्याला सहज मिळवता येते.* *म्हणून, पैसा माणसाच्या आयुष्यात यासाठी महत्वाचा आहे. पैसा वाईट मार्गाने कमवायचा तर नाहीच, पण चांगल्या मार्गाने खूप पैसा कमवून तो वाईट मार्गावर खर्च सुद्धा नाही करायचा. चांगल्या मार्गाने कमावलेला खूप पैसा 'आनंदी आणि सुखकर आयुष्य' जगण्यासाठी खर्च करायचा आहे. पैशाचा लोभ नाही आणि तिरस्कारही नाही. त्याची हाव नको आणि त्याच्याविषयी विरक्ती नको. पैसा कमवताना आनंदाने कमवायचा तसाच तो खर्च करतानासुद्धा जीवनात आनंदच असला पाहिजे. एवढा सुंदर असा 'मध्यम मार्ग' संतानी आपल्याला दिला आहे..* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱 *संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल- 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *सज्जनहो,* *मंजिले उन्हीको मिलती है,* *जिनके सपनोमे जान होती है।* *पंखोसे उडान नही होती,* *होसले बुलंद होने चाहीए।* *तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार.* *जीवनात येणारे प्रत्येक उदाहरण* *सोडवण्याचा प्रयत्न करा* *पण एका ठराविक वळणावर ते* *सोडून पण द्या.* *मात्र* *न थांबता मार्ग बदलून ध्येय साध्य* *करण्यासाठी पुढे चालत रहा,भले कितीही अडथळे येवोत. नदीचे ध्यान करा ती* *अडथळे अनेक येऊनही* *समुद्राला मिळाल्याशिवाय राहत* *नाही.* *सूर्याचे ध्यान करा तो रोज* *उगवल्याशिवाय राहत नाही.* *वाऱ्याचे ध्यान करा तो कुणाच्यानेही* *अडवला जात नाही.* *गवताचे ध्यान करा तर कितीही काढून* *टाकले तरी पुन्हा पुन्हा* *उगवते.* *हे सगळं करण्यासाठी स्वतःच्या* *विचारावर, भाषेवर,मनावर विश्वास* *ठेवा.* *प्रगतीचे विचार आणि वैज्ञानिक* *दृष्टिकोन बाळगा.* *अंतिम सत्य तेच आहे, कामात आहे राम नाहीतर आहेच देवाचे धाम।* *फक्त देवच रक्षण करीत असत तर मोठमोठाल्या मंदिरात सी.सी.कॅमेरे* *बसवण्याची वेळ* *कधीच आली नसती.* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• सर्वसामान्य माणसाच्या जीवनात मागचे दिवस आठवले की,अंगावर रोमांच उभे राहतात आणि भूतकाळ जसा एखाद्या चित्रपटातील क्रमाक्रमाने प्रसंग आठवायला लागतात.असे प्रसंग पुन्हा आपल्यासमोर उभे राहू नये म्हणून तो मागच्या प्रसंगातून काहीतरी शिकतो आणि म्हणतो पुन्हा असे दिवस माझ्या नशिबाला येऊ नयेत.भूतकाळही आपला एक समर्थ गुरूच असतो.जी झालेली चूक पुन्हा होऊ नये याची वारंवार सूचना करत असतो.विचारी माणूस मागच्या आठवणी जाणून पुढे पाऊल टाकत असतो. जर का असे नाही केले तर पुन्हा येरे मागचे हाल अशी अवस्था होऊन बसते.ती अवस्था ते प्रसंग येऊ नये असे वाटत असेल तर आपल्या प्रयत्नाने ते नक्कीच दूर करता येतात.आपल्याच हाताने आणि अथक परिश्रमाने ते काळोखी ढग दूर करता येतात.केवळ विचार करून चालणार नाही तर त्याला आपल्या आत्मविश्वासाची आणि प्रयत्नांची सांगड घालावी लागते. त्यामुळे नक्कीच आपले जीवन परिपूर्ण होऊन जाईल. भविष्याचा वेध हा भूतकाळातूनच घेता येतो आणि जीवन समृद्ध करता येते. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद ९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *ज्ञानाचा दिवा सतत तेवत ठेवा* द्रोणाचार्य जेंव्हा गुरुकुलामध्ये वर्गात कौरव आणि पांडवांना शिकविण्यासाठी गेले तेंव्हा ते अत्यंत प्रसन्न होते. द्रोणाचार्य स्वतः परम गुरु होते. मात्र त्यांना एका दिव्य ज्ञानाचा अनुभव आला होता. आणि तोच त्यांच्या सर्व अस्तित्वातून अभिव्यक्त होत होता. वर्गात गुरुदेव आल्याबरोबर त्यांनी तोच अनुभव विद्यार्थ्यांना सांगितला. त्यांनी सांगितले कि काल रात्री एक अशी घटना घडली कि, अर्जुन आश्रमात भोजन करीत होता. बाकी विद्यार्थ्यांचे भोजन आटोपले होते. रात्र बरीच झाली होती. अर्जुन एका दिव्याच्या प्रकाशात भोजन करत होता. अचानक हवेची झुळूक आली आणि दिवा विझला. मात्र त्यानंतरही अर्जुन भोजन करत राहिला.अंधारातही त्याला भोजन करण्यास बाधा वाटली नाही. भोजन पूर्ण झाले आणि अर्जुन उठला आणि धनुर्भ्यास करू लागला. गुरुनी पुढे सांगितले, बाणांचा आवाज ऐकून मी बाहेर आलो तेंव्हा अर्जुनाने मला सांगितले कि भोजनादरम्यान मला अंधाराचे काही वाटले नाही तसेच बाण चालवितानाही मला अंधाराचा अडसर आला नाही. बघा गुरुवर्य ! आपल्या कृपेमुळे मला अंधारातही बाण लक्ष्यापर्यंत पोहोचविता येत आहेत. गुरुजी म्हणाले,"अर्जुनाचा हा प्रयत्न अनुकरणीय आहे. दिवा फक्त उजेडाचा प्रसार करतो पण अंधारात मात्र ज्ञानाच्या दिव्याने, हृदयातील आत्मज्योतीने जर सराव केला तर कोणतेच काम अशक्य नाही." तात्पर्य :- सरावानेच माणूस लक्ष्य प्राप्त करू शकतो. एक विशिष्ट उंची गाठण्यासाठी, यश प्राप्तीसाठी अंतरीच्या ज्ञान ज्योतीला जागृत करणे गरजेचे आहे.ज्ञानारुपी दिवा नेहमी तेवत ठेवत राहणे. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 04/09/2019 वार - बुधवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- ◆ २०१३-रघुराम राजन यांनी 'रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया' चे २३ वे गव्हर्नर म्हणून पदभार स्वीकारला. ◆१९९८- स्टॅनफोर्ड विद्यापीठातील लॅरी पेज व सर्गेई ब्रिन या दोन विद्यार्थ्यांनी 'गुगल'ची स्थापना केली. 💥 जन्म :- ●१९६२-किरण मोरे,भारतीय यष्टिरक्षक. ●१९५२-ऋषी कपूर,चित्रपट अभिनेता. ●१९४१-सुशीलकुमार शिंदे,माजी केंद्रीय मंत्री. 💥 मृत्यू :- २०१३ - सुश्मिता बॅनर्जी, भारतीय लेखिका. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *मुंबई: जम्मू-काश्मीरला विशेषाधिकार देणारा अनुच्छेद ३७० रद्द झाल्यानंतर आता महाराष्ट्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला, लवकरच महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून (एमटीडीसी) काश्मीरमध्ये दोन रिसॉर्ट बांधण्यात येणार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *मुंबई: आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप स्वबळावर लढल्यास पक्षाला १६० जागांवर विजय मिळेल, असे भाकीत राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी वर्तविले आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *पूरग्रस्त भागातील मुलींच्या विवाहासाठी मदत करणार, महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली मोठी घोषणा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *कृष्णेच्या पाण्यासाठी महाराष्ट्र-कर्नाटक सरकार एकत्र, लवादाला आव्हान देणाऱ्या आंध्रच्या याचिकेला संयुक्तपणे विरोध* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ * येत्या ४८ तासांत मुंबई, कोकणसह राज्यात मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे., पाणीटंचाईग्रस्त मराठवाड्यात चांगला पाऊस झाला, नांदेडमधील धरण १०० टक्के भरले आहे. त्यामुळे येथील पाण्याचा मोठा प्रश्न सुटण्यास मदत झाली आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *राज्यपाल सी विद्यासागर राव यांचा कार्यकाळ पूर्ण, शासनातर्फे राजभवनात भावपूर्ण निरोप, राज्याचे नवे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा शपथविधी उद्या होणार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *मिताली राजने आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधून घेतला संन्यास, सर्वाधिक धावा करणारी भारतीय महिला क्रिकेटर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *या बुलेटीनची audio ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे.* https://sharechat.com/post/Bga1VrN ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *सुरक्षित प्रवास करू या* https://nasayeotikar.blogspot.com/2018/04/blog-post_26.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *कावीळ म्हणजे काय ?* 📙 कावीळ किंवा कामला हा एक स्वतंत्र विकार मानण्यापेक्षा ते एक रोगलक्षण मानणे सयुक्तिक आहे. यकृतातून बाहेर जाणाऱ्या पित्तरसापेक्षा अधिक पित्तरस यकृतात तयार होऊ लागला म्हणजे कावीळ होते. जास्तीचा शिल्लक राहिलेला पित्ताचा भाग रक्तात मिसळला जातो व सर्व शरीरभर पसरतो. यातूनच डोळ्यांचा पांढरा भाग पिवळा दिसू लागतो. त्वचेचा रंग पिवळसर होऊ लागतो. लघवी पिवळी होते व तीव्र काविळीत लालसर पिवळी दिसते. पित्त यकृतातून बाहेर पडताना पित्तनलिकेत किंवा प्रत्यक्ष यकृतांतर्गत अडथळा निर्माण झाला, तर शौचास पांढरेफिके होऊ लागते. कावीळ हे यकृतविकृतीचे किंवा रक्तातील तांबड्यापेशी जास्त नाश पावत असल्याचे चिन्ह होय. या रोगाचे निदान मुत्रपरीक्षेतून व रक्ताच्या चाचण्यांतून होते. नवजात बालकाला रक्तपेशींचे दान निसर्गाने जरा सढळपणे दिलेले असते. त्यामुळे जन्मानंतर काही दिवसांतच या जास्तीच्या पेशी नाश पावतात व मंद स्वरूपात कावीळ उद्भवते. पण ती आपोआपच थोड्याच दिवसांत नाहीशी होते. क्वचित ती तीव्र स्वरूपात व अगदी पहिल्या दुसऱ्या दिवशीच दिसल्यास त्या बालकाला फोटोथेरपी हा अल्ट्राव्हाॅयलेट किरणांचा उपचार दिला जातो. हिमोलायटिक ऍनिमिया या रक्तक्षयाच्या आजारातही रक्तपेशींचा नाश होत असल्याने कावीळ होते. मूळ कारण दूर झाल्यास ती बरी होते. आपण सहसा काविळीचा रुग्ण पाहतो, तो विषाणूजन्य पाण्यातून झालेल्या संसर्गाचा बळी असतो. तोंडावाटे पाण्यातून हे विषाणू शरीरात प्रवेश करतात व त्यामुळे यकृताला सूज येते, कार्यात अडथळा होतो. यकृताचे तांबड्या रक्तपेशी नष्ट करण्याचे काम नीट न झाल्याने कावीळ दिसू लागते. मळमळ, ओकारी, भूक मंदावणे, गुबारा धरणे, शरीराला कंड सुटणे, मलावरोध ही लक्षणे प्राधान्याने सर्वच रुग्णांत दिसतात. डोळ्यांचा, त्वचेचा व मूत्राचा रंग पिवळा होतो, तर शौचास पांढरट चिकणमातीसारखे होऊ लागते. पचनास आवश्यक पित्तरसाचा अभाव झाल्याने ही लक्षणे दिसतात. सामान्यपणे पाच ते दहा दिवसांत हा आजार बरा होतो. दुसऱ्या प्रकारच्या काविळीत म्हणजे रक्ताद्वारे संसर्ग होणाऱ्या काविळीत विषाणू एकाच्या रक्तातून दुसऱ्याच्या शरीरात प्रवेश करतात. इंजेक्शनच्या सुया, शस्त्रक्रियेच्या सुया वा रक्त यांच्याशी सतत संपर्क येणाऱ्या सिस्टर, डॉक्टर यांसारखी व्यक्ती, सर्जन यांना हा संसर्ग होण्याची शक्यता असते. ही कावीळ तीव्र स्वरूपाची असून बरी व्हायला खूप वेळ लागतो. काही वेळा यकृतदाह होऊन यकृताचे काम कायमचेच मंदावत जाते. यालाच 'लिव्हर सिर्‍हाॅसिस' असे म्हणतात. सिर्‍हाॅसिसमध्ये यकृत आक्रसत जाऊन त्याचे काम बंद पडत जाते. हा एक गंभीर रोग आहे. सध्या काविळीची लस (हेपॅटायटिस बी) टोचली जाते, ती या प्रकारच्या काविळीला प्रतिबंध करते. या प्रकारच्या काविळीवर उपचार नसल्याने प्रतिबंध हाच योग्य उपाय तर ठरतो. अंथरुणात पडून पूर्ण विश्रांती, तोंडावाटे भरपूर शर्करायुक्त पेयद्रव्ये, हलका कर्बयुक्त आहार घेतल्यास सर्वसामान्य कावीळ आपोआप नियंत्रणात येते. तीव्र लक्षणांत शिरेवाटे ग्लुकोज सलाईन देऊन रुग्णाच्या पचनसंस्थेला आराम देऊन मदत केली जाते. कावीळ हा विषाणूजन्य आजार असल्याने रुग्णाशी संपर्क आल्यास हात स्वच्छ धुणे, त्याची भांडी, अंथरूण, कपडे यांची वेगळी व्यवस्था करणे व अन्य लोकांनी पाणी उकळून पिणे हा प्रतिबंधाचा महत्त्वाचा मार्ग असतो. शेवटी पण महत्त्वाचे, काविळीची लक्षणे व प्रत्यक्ष संसर्ग होण्याची कारणे जरी दूर झाली, तरी रुग्णाच्या डोळ्यांचा रंग काही आठवडे पिवळसर राहतो व हळूहळू नेहमीसारखा होतो. *'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *A positive attitude can overcome a negative situation.* * ( सकारात्मक दृष्टीकोनाने नकारात्मक परिस्थितीवर मात करू शकते. )* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *'होमरुल लीग' ची स्थापना कोणी केली ?* डॉ अँनी बेझंट 2) *शिवसेनेचे पक्षप्रमुख कोण आहेत ?* उद्धव ठाकरे 3) *वनस्पती प्रकाश संश्लेषण क्रियेत हवेतील कोणता वायू शोषून घेतात ?* कार्बन डायआक्साईड 4) *भारतात सर्वप्रथम सूर्योदय व सूर्यास्त कोणत्या राज्यात होते ?* अरुणाचल प्रदेश 5) *'द वाल' असे कोणत्या क्रिकेट खेळाडूला म्हटले जाते ?* राहुल द्रविड *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● मुकेश धर्मले, नांदेड ●  जयेंद्र कुणे ●  श्रीपाद जोशी ● संतोष पेंडकर ●  सुनील अस्वले, कोल्हापूर ●  संगमेश्वर नलगिरे ●  सायारेड्डी सामोड ●  मुकेश पाटील ●  विशाल गंगुलवार ● कांचन कानतोडे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *"जो घाबरतो तो वाया जातो. पाण्यात पडल्यावर जो संयम ठेवत नाही, तो शेवटी गटांगळ्या खातो." 'बी' पेरलं की लगेचंच त्याचं झाड तयार होऊन त्याची फळं खायला मिळावीत, एवढा उतावीळपणा असणारी काही माणसं पाहायला मिळतात. पण असं होत नाही, उलट असं न झाल्याचं दुःखं मात्र नक्की होत असतं. म्हणून कोणत्याही कामात माणसानं संयम राखणं आवश्यक आहे. दुःखं कितीही मोठं असलं तरी 'काळ' हा त्यावर इलाज आहे. पण त्यासाठी काही वेळ जाऊ देण्याची वाट मात्र पहावी लागते. तेवढी वेळ जाऊ देण्याइतका संयम माणसाला ठेवावा लागतो. दुःखात व्यसनाच्या आहारी जाणे किंवा आत्महत्या करून घेणे, या गोष्टी माणसाच्या हातून घडतात.* *याबरोबरच कामात प्रचंड घाई करणारी माणसंसुद्धा पाहायला मिळतात. 'अति घाई, संकटात नेई' असं रस्त्यावरील फलकांवर वाचायलाही मिळते. विशाल वटवृक्षाची सुरुवात एका छोट्याशा कोंबापासून होते. जर हे "उगवलेलं कोंब मध्यातच वाळून गेलं तर ते वाया जातं. त्याप्रमाणं 'उतावीळ' माणसाची बुद्धी वाया जाणारीच समजावी. "कोंब वाळल्यावर जसं त्याचा वटवृक्ष बनणार नाही हे आपल्याला कळतं, तसं उतावीळपणा केल्यानं काम पूर्ण होणार नाही, हेही आपण समजून घेतलं पाहिजे.* ••● ‼ *रामकृष्णहरी* ‼ ●•• 🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो* , *देरे हरी * खाटल्यावरी ,हे कधी घडलं* *नाही आणि घडणारही नाही.* *आपले कर्तृत्व हीच आपली काशी.* *संत तुकारामांनी सांगितले आहे की* *असाध्य ते साध्य करिता सायास।* *कबीर म्हणतात, ** *एकही साधे सब साधे।* *श्रीकृष्ण म्हणतात,* *कर्मन्यवाधिकारस्ये मा फलेशु* *कदाचनम।* *जनार्धन स्वामी म्हणतात* , *चला उठा कामाला लागा।* *याचा अर्थ कुणीही खाटल्यावर देणार* *नाही ,आणि काम व सराव * या शिवाय पर्याय नाही.* *सचिनची बॅट फिरली सर्व सुख* *त्याच्या पुढ्यात उभी ठाकली. लता* *दीदीच्या फक्त गाण्याने जगाला* *वेड लावलं,आजही त्या* *गाणं गाण्यापूर्वी रियाज* *करतात.* *बहिणाबाई फक्त दिसलं त्यात वास्तव* *शोधून बोलत गेल्या गाणी* *कविता अजरामर झाल्या.* *गाडगेबाबा फक्त गल्लीबोल आणि* *माणसांची मने साफ* *करत ,राष्ट्रसंत झाले.* *बाबा आमटेनी कुष्ठरोग्यांच्या जीवनात* *प्रकाश पेरला, जगात* *किर्ती मिळाली.* *नीलिमा मिस्रांच्या गोधड्या* *सातासमुद्रापार गेल्या,सुरेखा* *पुणेकरांनी लावणीवर प्रेम केलं आणि* *लावणीसम्राज्ञी अस नाव* *मिळवलं.* *अशी कितीतरी मोठी यादी तयार* *होईल.* *ज्यांना एखादी गोष्ट कळली व त्यावर* *त्यांनी जीवापाड मेहनत* *घेतली तर नक्की त्या क्षेत्रात आपण* *शेहनशहा झाल्याशिवाय* *राहत नाही.* *नको अजरामर पण प्रयत्न करायला* *काय हरकत आहे.* *आखिर कोशिश करने वालोकी कभी* *हार नही होती।* *अशोक लक्ष्मण कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• सर्वसामान्य माणसाच्या जीवनात मागचे दिवस आठवले की,अंगावर रोमांच उभे राहतात आणि भूतकाळ जसा एखाद्या चित्रपटातील क्रमाक्रमाने प्रसंग आठवायला लागतात.असे प्रसंग पुन्हा आपल्यासमोर उभे राहू नये म्हणून तो मागच्या प्रसंगातून काहीतरी शिकतो आणि म्हणतो पुन्हा असे दिवस माझ्या नशिबाला येऊ नयेत.भूतकाळही आपला एक समर्थ गुरूच असतो.जी झालेली चूक पुन्हा होऊ नये याची वारंवार सूचना करत असतो.विचारी माणूस मागच्या आठवणी जाणून पुढे पाऊल टाकत असतो. जर का असे नाही केले तर पुन्हा येरे मागचे हाल अशी अवस्था होऊन बसते.ती अवस्था ते प्रसंग येऊ नये असे वाटत असेल तर आपल्या प्रयत्नाने ते नक्कीच दूर करता येतात.आपल्याच हाताने आणि अथक परिश्रमाने ते काळोखी ढग दूर करता येतात.केवळ विचार करून चालणार नाही तर त्याला आपल्या आत्मविश्वासाची आणि प्रयत्नांची सांगड घालावी लागते. त्यामुळे नक्कीच आपले जीवन परिपूर्ण होऊन जाईल. भविष्याचा वेध हा भूतकाळातूनच घेता येतो आणि जीवन समृद्ध करता येते. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद ९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *लोभी माणूस* एका लोभी माणसाने आपला सगळा पैसा शेतात पुरून ठेवला होता. तेथे दिवसातून दोन वेळा जाऊन त्या पुरलेल्या जागेकडे पाहून तो मोठे समाधान मानीत असे. ते त्याचे वागणे त्याच्या नोकराने पाहिले व त्याने तर्क केला की, आपला मालक या जागेकडे नेहमी पाहतो, तेव्हा तेथे काहीतरी पुरलेले असावे. रात्री त्याने तेथे जावून खणून पाहिले तर आत बरेच धन त्याला दिसले. ते घेऊन तो पळून गेला. दुसर्‍या दिवशी तो लोभी माणूस नेहमीप्रमाणे तेथे येऊन पाहतो तर सगळे धन चोरीला गेलेले त्याला दिसले. मग तो डोके बडवून घेत रडू लागला. तेव्हा त्याचा शेजारी त्याच्याजवळ येऊन रडण्याचे कारण विचारू लागला. लोभी माणसाने घडलेली हकीकत त्याला सांगितली. ते ऐकून शेजारी म्हणाला, ''अरे मला वाटते की तसे तुझे काहीच गेले नाही. आपला पैसा येथेच आहे, असे समजून तू पूर्वीप्रमाणेच या जागेकडे पहात जा म्हणजे झाले.'' तात्पर्य : लोभी माणसे पैसे असून दारिद्र्यी व अशांना पैश्यांचा उपयोग न होता दुसरेच कोणीतरी त्याचा उपयोग करून घेतात. जवळ असलेला पैसा वापरायचा नाही तर तो चोरीला गेल्यावर शोक करण्यात काय अर्थ? *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 03/09/2019 वार - मंगळवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- ◆ १९७१-कतारला स्वातंत्र्य मिळाले. ◆ १९१६-अँनी बेझंट यांनी 'होमरूल लीग 'ची स्थापना केली. 💥 जन्म :- ● १९६५ - चार्ली शीन, अमेरिकन अभिनेता. ● १९७६ - विवेक ओबेरॉय, हिंदी चित्रपट अभिनेता. 💥 मृत्यू :- ● १९६७ - अनंत हरी गद्रे, मराठी समाजसुधारक. ● १९९१ - फ्रँक काप्रा, अमेरिकन चित्रपट दिग्दर्शक. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्वच्छ भारत अभियान  राबविल्याबद्दल बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशनकडून पुरस्कार जाहीर, त्यांना मिळणारा हा जागतिक स्तरावरील दुसरा पुरस्कार आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *नवी दिल्ली - चंद्रयान-2 च्या ऑर्बिटरपासून लँडर विक्रम काल दुपारी सव्वा एक वाजता यशस्वीरित्या वेगळे झाले,7 सप्टेंबर 2019 रोजी विक्रम चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार आहे.* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *मुंबई, पुणेसह राज्यभरात गणेशोत्सवाची धूम, घरोघरी विराजमान झाले बाप्पा, देशातील अनेक शहरांमध्ये बाप्पाच्या भव्य आणि मनमोहक मूर्त्यांची स्थापना करण्यात आली* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *मुंबई : काँग्रेसचे माजी खासदार अब्दुल सत्तार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत केला प्रवेश* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचा हायकोर्टाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम, त्यामुळे बँकेच्या संचालक मंडळावर असलेले राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, विजयसिंह मोहिते-पाटील, आनंदराव अडसूळ, शिवाजीराव नलावडे आदींसह जवळपास 70 नेते अडचणीत* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *वायुसेनेत 3 सप्टेंबरला दाखल होणार 8 अपाचे लढाऊ हेलिकॉप्टर, भारत हे हेलिकॉप्टर वापरणारा 14 वा देश, 2015 मध्ये भारताने अमेरिकेच्या सरकारसोबत 22 अपाचे हेलिकॉप्टर खरेदीचा करार केला होता* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *मोहम्मद शमीने वेस्ट इंडीज विरुद्ध भारत कसोटी क्रिकेटमध्ये बळींचं दीड शतक साजरं केलं. शमीने आपल्या ४२ व्या कसोटी सामन्यात ही कामगिरी करुन दाखवली आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎙👆🏻📡 *"शालेय संस्कार"* ..कार्यक्रमांतर्गत विशेष सदर... *_बगळ्याची गोष्ट_* खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा आणि ▶यास टच करून ऐका..👉🏻📻 http://shaleyvrutta.blogspot.com/ 🎧 वाचकस्वर: *ना. सा. येवतीकर* शिक्षक - बिलोली *.. ऐका & शेअर करा..* ________________________ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *कार्बनचक्र म्हणजे काय ?* 📙 पृथ्वीवरील प्रत्येक सजीवामध्ये कार्बनचे अस्तित्व आहे. मात्र वातावरणातील कार्बन डायऑक्साइड वायूचे प्रमाण अत्यल्प आहे. प्राणवायूशिवाय कोणताच सजीव जगात नाही, हे आपल्याला माहीत आहेच. हवेतील प्राणवायू कायम राखण्याचे महत्त्वाचे काम वनस्पती करत असतात. हे काम जर झाले नसते, तर वातावरणातील प्राणवायू कधीच संपला असता. रात्रंदिवस वनस्पती हे जे काम करत असतात, त्यातून कार्बनचक्र अव्याहत चालू राहते. क्लोरोफिल या हिरव्या द्रव्याचा या प्रक्रियेत महत्त्वाचा भाग असतो. बहुतांश वनस्पती क्लोरोफिलचा वापर करून स्वतःचे अन्न तयार करतात. जमिनीतून मिळवलेले पाणी व अन्य अनेक रसायने यांचा यासाठी वापर होतो. मुख्यत: शर्करा तयार करताना वनस्पती सूर्यप्रकाशाचा दिवसा उपयोग करून घेतात. या क्रियेत वनस्पती हवेतील कार्बन डायऑक्साइड शोषून घेतात. ही क्रिया पुढील प्रमाणे होते - Energy + 6H2O ⬆ 6CO2 »» C6H12O6 + 6O2 ⬆ यातून ग्लुकोज तयार होऊन तिचा वनस्पती वापर करतात व हवेमध्ये ऑक्सिजन बाहेर टाकला जातो. रात्रीच्या वेळी मात्र सूर्यप्रकाशाचा अभाव असल्याने ही क्रिया घडत नाही. फक्त वनस्पतींचे श्वसन चालू राहते. त्यात प्राणवायू आत घेतला जाऊन कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो. वनस्पतींच्या वाढीसाठी लागणारा कार्बन प्रकाश संश्लेषण क्रियेद्वारेच मिळवला जातो. वनस्पतींच्या फांद्या, खोड, पाने बनवण्यात कार्बनचा मोठा वाटा असतो. वनस्पतीचे आयुष्य संपल्यावर शिल्लक राहतो, तो कार्बनचाच मोठा भाग असतो. मात्र हवेतील प्राणवायूचे प्रमाण कायम राखण्यात या सार्‍या प्रक्रियेचा मोठा वाटा असतो. *'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *“ इतिहास हा काळाचा साक्षीदार असतो आणि सत्याचा प्रकाश असतो. ”* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल कोण आहेत ?* भगत सिंह कोश्यारी 2) *'अँटीरेबीज लस' कोणी शोधून काढली ?* लुई पाश्चर 3) *ह्रदयरोपणाचे जनक कोणाला म्हटले जाते ?* ख्रिश्चन बर्नाड 4) *आधुनिक भारताचे जनक कोणाला म्हटले जाते ?* राजाराममोहन राय 5) *आधुनिक मराठी कवितेचे जनक कोणाला म्हणतात ?* केशवसुत *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● आशिष हातोडे ●  राज कुमारे ●  प्रदीप पंदिलवाड ●  भिमराव सोनटक्के *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *"जो घाबरतो तो वाया जातो. पाण्यात पडल्यावर जो संयम ठेवत नाही, तो शेवटी गटांगळ्या खातो." 'बी' पेरलं की लगेचंच त्याचं झाड तयार होऊन त्याची फळं खायला मिळावीत, एवढा उतावीळपणा असणारी काही माणसं पाहायला मिळतात. पण असं होत नाही, उलट असं न झाल्याचं दुःखं मात्र नक्की होत असतं. म्हणून कोणत्याही कामात माणसानं संयम राखणं आवश्यक आहे. दुःखं कितीही मोठं असलं तरी 'काळ' हा त्यावर इलाज आहे. पण त्यासाठी काही वेळ जाऊ देण्याची वाट मात्र पहावी लागते. तेवढी वेळ जाऊ देण्याइतका संयम माणसाला ठेवावा लागतो. दुःखात व्यसनाच्या आहारी जाणे किंवा आत्महत्या करून घेणे, या गोष्टी माणसाच्या हातून घडतात.* *याबरोबरच कामात प्रचंड घाई करणारी माणसंसुद्धा पाहायला मिळतात. 'अति घाई, संकटात नेई' असं रस्त्यावरील फलकांवर वाचायलाही मिळते. विशाल वटवृक्षाची सुरुवात एका छोट्याशा कोंबापासून होते. जर हे "उगवलेलं कोंब मध्यातच वाळून गेलं तर ते वाया जातं. त्याप्रमाणं 'उतावीळ' माणसाची बुद्धी वाया जाणारीच समजावी. "कोंब वाळल्यावर जसं त्याचा वटवृक्ष बनणार नाही हे आपल्याला कळतं, तसं उतावीळपणा केल्यानं काम पूर्ण होणार नाही, हेही आपण समजून घेतलं पाहिजे.* ••● ‼ *रामकृष्णहरी* ‼ ●•• 🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो,* *रोज सकाळी सकाळी उठल्यावर पेपरमध्ये डोकावतो तेव्हा एक* *जोराची सनक मेंदूला चिरून जाते.* *खून,दरोडा,बलात्कार,* *अपघात,हाणामारी, विनयभंग,* *बालके आणि वृद्धावस्थेत* *जनावरासारखी रस्त्यात फेकलेली* *जिवंत* *माणसे,लुटालूट,फरारी,हल्ला,* *यापेक्षा वेगळं काही भडक ,पेपरमध्ये* *क्वचितच दिसते.* *मन अगदी सुन्न होते आणि* *पुन्हा एकदा सानेगुरुजी आणि त्यांच्या* *आईची आवर्जून आठवण* *होते.* *श्यामला आई म्हणते श्याम पायाला* *घाण लागू नये म्हणून* *जपतोस तस मनाला घाण लागू नये म्हणून जप हं।* *आजच्या भयाण बाह्य* *वातावरणात ह्या संस्काराची गरज* *पदोपदी जाणवते.बाहेर काही* *असो--आजच्या धुळवडीच्या* *दिनी प्रयत्न करूया* *की आपली मुलं, त्यांचे* *मित्र-मैत्रणीचे, शेजारील* *बालके,अवती भवतीचे मुलं, यांच्या* *वरील बाह्य विघातक शक्ती* *कशा थांबवता येतील व श्याम* *तयार करण्याचा छोटासा* *प्रयत्न आपापल्या परीने करूया।* *एक त्रिकालवादी सत्य आहे, सर्वत्र* *अंधार असतांना कुठेतरी* *छोटीशी पणती प्रकाशाची वाट दाखवतेच ना।* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• काही लोकांच्या बाबतीत पैसा म्हणजे सर्वस्व आहे आणि पैशामुळे काहीही मिळवता येते. पैशामुळे तुम्हाला तुमच्या भौतिक सुविधा मिळवता येतात परंतु इतरांचे मन मिळवता येत नाही.इतरांचे मन जिंकायचे असेल तर या ठिकाणी पैसा चालत नाही.त्यासाठी हवे तुमचे उदार अंतःकरण,तुमची दुस-याबद्दलची आत्मियता,प्रेम इतरांना दिलात तर तेही तुमच्यावर अधिक प्रेम करायला लागतील.यासाठी तुमच्या जवळ असलेल्या पैशाची गरज नाही.एवढे सत्य आहे पैशाने सारे काही खरेदी करता येईल पण जगात असलेल्या सर्व जीवांचे मन आणि प्रेम कधीच खरेदी करता येत नाही.मग तुमच्या जगण्याला काय अर्थ आहे ? © व्यंकटेश काटकर, नांदेड ९४२१८३९५९०/८०८७९१७०६३ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *योग्य निर्णय* एक कुंभार मातीची चिलम बनवित होता. चिलमचा आकार केला सुध्दा ... पण थोड्याच वेळात त्याने तो आकार बदलला.. मातीने विचारले, अरे कुंभार दादा, तु छान चिलीम बनविली होती. मग का परत बदल केला? कुंभार म्हणाला, मी चिलम बनवत असताना माझी मति बदलली आणि घागर बनविण्याचा निर्णय घेतला. मातीने म्हणाली, कुंभार दादा, तुमची मति बदलल्या मुळे, माझे जीवनपण बदलले, मी चिलम झाले असते तर मी ही जळाले असते आणि दुसऱ्यांना ही जाळले असते ! आता मी घागर झाल्यावर मी ही शीतल राहिल आणि इतरांना ही शीतलता देइल. *तात्पर्य : जीवनात सुयोग्य निर्णय घेतल्यास, आपल्याला ही आनंद मिळतो आणि आपल्या मुळे इतरांना ही आनंद मिळतो.* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~