✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दि. 01/12/2022 वार - गुरूवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 🎇 .  *दिनविशेष .  🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••जागतिक एड्स दिन💥 ठळक घडामोडी :- ◆१९६३ - नागालॅंड भारताचे १६वे राज्य झाले◆ १९६५ - भारताच्या सीमा सुरक्षा दलाची स्थापना💥 जन्म :-◆ १०८१ - लुई सहावा, फ्रांसचा राजा.◆ १०८३ - ऍना कॉम्नेना, बायझेन्टाईन इतिहासकार.◆ १९८० - मोहम्मद कैफ, भारतीय क्रिकेट खेळाडू.💥 मृत्यू :- ◆ ११३५ - हेन्री पहिला, इंग्लंडचा राजा.◆ १९७३ - डेव्हिड बेन गुरियन , इस्त्रायलचा पहिले पंतप्रधान.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱  9604481084•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *युनायटेड नेशन फाऊंडेशनच्या डेटा व्हॅल्यू अ‍ॅडव्होकेट फेलोशिपसाठी जगभरातून निवडलेल्या सात कार्यकर्त्यांमध्ये भारतातून मयुरी धुमाळ हिची निवड झाली आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *राज्यात समान नागरी कायदा लागू व्हावा यासाठी योग्य वेळी विचार करू : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *कोराना काळात कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या 597 परिचारिकांना कायमस्वरुपी करणार, शासनाचा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *सध्या देशात केंद्र सरकारकडून मोठ्या प्रमाणावर तांदळाची खरेदी सुरु आहे. मागील वर्षीच्या तुलनेत आत्तापर्यंत तांदळाच्या खरेदीत मोठी वाढ झाली आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *ज्येष्ठ साहित्यिक नागनाथ कोत्तापल्ले यांचं पुण्यात निधन झालं आहे. ते 74 वर्षांचे होते.*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *'टोयोटा'ला लोकप्रिय करणारा उद्योजक काळाच्या पडद्याआड, विक्रम किर्लोस्कर यांचं निधन, मृत्यूसमयी त्यांचे वय 64 वर्षे होते.*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारत आणि न्यूझीलंडमधील तिसरा सामनाही पावसामुळे रद्द, त्यामुळे भारताला वनडे मालिका गमवावी लागली*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         *कथा -  सुंदर*त्‍याचं नाव सुंदर, तसं त्‍याचं कामही सुंदर त्‍याप्रमाणेच मन ही सुंदरच होतं.  परंतु सारेच जण त्‍याला बंदर म्‍हणायचे.  कारण ही तसेच होते, मूळात तो दिसायचा आफ्रिका देशातील निग्रो लोकांसारखा एकदम काळाकुट्ट, अगदी बारीक नाक आणि गरगरीत लहान डोळे गालात खोल........वरील कथा पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा.http://kathamaala.blogspot.com/2017/05/blog-post_90.html    कथा वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🐤गोष्ट नव्या कावळा चिमणीची 🐧    कावळा चिमणीचा शेजारी .कावळ्याचं घरं शेणाचं , चिमणीचू घर मेनाचं.पाऊस झाला .कावळ्याचं घर गेलं वाहून, तो गेला चिमणीकडे धावून .चिमणी पिलातचं होती व्यस्त, कावळा भिजभिजला मस्त .       दिवस गेला , महिने गेले , वर्षे गेली .चिमणीचे पिलू भरारी घेऊन गेलं परदेशी .त्याच्या आठवणीनं चिमणी रोज रडे, फोटो त्याच्या घेऊन उशाशी .    पिल्लू परदेशातून पैसे पाठवी , चिमणीला पिलूचं हवे होतं , पैसे नको म्हणून खर्च न करता नुसतेच साठवी ...!   चिमणी अखेर आजारी पडली , तेव्हा कोणी नाही आले धावून .शेवटी कावळ्यानेच मदत केली , तर चिमणीचे डोळे गेले अश्रूंनी वाहून .   कावळा म्हणाला चिमणीला , "विचार करु नको फार, लक्षात ठेव मात्र, घरासोबत जोडावे मित्रही चार .    मित्र जर असतील पक्के ,त्यांच्यासोबत काढता येते, आपले आयुष्य अख्खे .....!*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*ज्यांचे डोळे चांगले ते जगाच्या प्रेमात पडतात, पण ज्यांची जीभ गोड असेल तर जग त्यांच्या प्रेमात पडते**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) 'जागतिक एड्स दिवस' केव्हा साजरा केला जातो ?२) एड्स होण्याची मुख्य कारणे कोणती ?३) जगात सर्वात प्रथम एड्सचा रुग्ण कोठे सापडला ?४) एड्सची लक्षणे कोणती ?५) भारतात एड्सचा पहिला रुग्ण कोठे सापडला ?*उत्तरे :-* १) १ डिसेंबर २) HIV रुग्णाचे रक्त दिल्याने, दुषित रक्त असलेल्या इंजेक्शनमधून, HIV बाधित आईकडून स्तनपान झाल्यावर, असुरक्षित लैंगिक संबंधामुळे इत्यादी ३) अमेरिका ( १९८१ ) ४) कित्येक आठवड्यापासून ताप येणे, खोकला येणे, वजन कमी होणे, तोंड येणे, सतत जुलाब, झोपतांना घाम येणे, भूक न लागणे इत्यादी ५) मुंबई ( १९८६ )*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••◆ श्याम दरबस्तेवार, शिक्षक◆ हेमंत भेंडे, शिक्षक◆ राजकुमार दाचावार, शिक्षक◆ श्याम नरवाडे◆ मारुती गिरगावकर, शिक्षक◆ विठ्ठलराव मुजळगे, शिक्षक◆ मारोती दिंडे◆ श्रीकांत लाडे◆ सुभाष सोनटक्के◆ शिवाजी पुरी◆ श्याम पाटील◆ विश्वनाथ पांचाळ◆ बालाजी कलकोटे*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*जगात प्रचंड विविधता आहे. किंबहुना, विविधता हेच जगाचे सौंदर्य आहे. तीच मानवतेची ताकद आहे; परंतु दुर्दैवाने विविधता आणि विषमता यातील फरक लक्षात न घेतल्यामुळे मानवा-मानवांत जात, पात, धर्म, पंथ यावरून गटतट पडले आहेत. समाजाला एकत्र ठेवण्याऐवजी, मतलबी मंडळींनी स्वार्थासाठी समाजात भांडणे लावून दिली आहेत. त्यातून अतिरेकी विचाराची माणसे निर्माण झाली आहेत. त्यातून हिंसाचार वाढीला लागला आहे. विवेकाचा आवाज दाबला जात आहे. सज्जनांची पीछेहाट आणि दुर्जनांचा विजय होताना दिसत आहे.**भारताला साधुसंतांचा देश म्हटले जाते. प्रचंड मोठी सांस्कृतिक परंपरा असलेला भारतीय माणूस मूलत: विचारी आहे. त्यामुळे फोलपट बाजूला ठेवून सार ग्रहण करणे त्याला सहज शक्य आहे. दोन धर्मांच्या तत्वज्ञानात अंतर असू शकते. धर्माच्या भाषा वेगवेगळ्या असू शकतात; परंतु कोणत्याही धर्माचा हेतू वाईट असू शकत नाही. रजनीश एकदा म्हटले होते, की, इश्क, प्रेम आणि अहिंसा हे एकाच मनोवृत्तीसाठी वापरलेले वेगवेगळे शब्द आहेत. वरवर विचार करणा-याला ते पटत नाही; पण खोलवर विचार केला असता हे पटायला लागते. आपल्या शरीराची ठेवण अलग अलग असू शकते, भाषा वेगवेगळ्या असू शकतात, परंतु आपल्या ह्रदयाची ठेवण, रक्ताचा रंग हे मात्र एकच असते. हे आपण पक्के ध्यानात ठेवायला हवे. मनुष्यजन्म दुर्मिळ आहे, त्याचा सदुपयोग करायला हवा.*              *॥ रामकृष्णहरी ॥*🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲          *श्री. संजय नलावडे, मुंबई*       *मोबाइल  - 9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    ज्यांच्या मुखावाटे निघणारे शब्द जर अडखळत असतील तर त्या शब्दांमध्ये ठाम विश्वास नसतो किंवा मनातले विचार स्पष्टपणे मांडता येत नाहीत.अशी ज्यांची परिस्थिती झालेली असते तेव्हा एकतर मनातून खचलेला असेल किंवा कुणाच्यातरी दडपणाखाली असेल.अशा परिस्थितीतून बाहेर पडायचे असेल तर पहिल्यांदा आपल्या मनातली जी काही भीती असेल किंवा दडपण असेल ते काढून टाकायला हवे.अशावेळी आपला आत्मविश्वास आपणच वाढवला पाहिजे.माझ्या मनावर कुणाचेही दडपण नाही किंवा जरी असले तरी ते काहीच करु शकत नाही.आपण त्याला खंबीरपणे प्रत्युत्तर देऊ आणि आपण पूवस्थितीत येऊ अशी धारणा मनामध्ये उत्पन्न करुन पूर्वीसारखे जीवन जगू असा विश्वास जागृत करायला हवा तरच मग आपल्या मुखावाटे निघणारे शब्द स्पष्टपणे यायला लागतील आणि आपले जे काही विचार असतील ते समोरच्या व्यक्तीला समजायला लागतील यात काही संशय नाही.जर आपणच घाबरायला लागलो तर समोरची व्यक्तीही आपल्याला जास्तच घाबरून टाकेल आणि आपला जो काही आत्मविश्वास आहे तोही कमी करुन टाकेल.म्हणून परिस्थिती कशीही असो त्या परिस्थितीला घाबरुन न जाता त्याला तोंड द्यायला शिकले पाहिजे.© व्यंकटेश काटकर, नांदेड.संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३.🍀🌸🍀🌸🍀🌸🍀🌸🍀•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••                     *जीवन**समुद्राच्या किना-यावर जेव्हा एक लाट आली तेव्हा जाताना एका लहान मुलाची एक चप्पल आपल्या सोबत घेऊन गेली*... *तो मुलगा वाळुवर बोटाने लिहीतो कि**"समुद्र चोर आहे".**त्याच समुद्राच्या दुस-या तटावर मासे पकडणारा खुप मासे पकडतो तो वाळुवर लिहीतो कि**"समुद्र पालनकर्ता आहे".**एक युवक समुद्रात बुडून मरतो तेव्हा त्याची आई वाळुवर लिहीते**"समुद्र खुनी आहे".**एका दूस-या किना-यावर एक गरीब वृध्द वाकड्या कंबरेने फिरत असतो त्याला एका मोठ्या सीपमध्ये एक अनमोल मोती सापडतो तर तो वाळुवर कसा लिहीतो**"समुद्र दाता है".**अचानक एक विशाल लाट येते आणि सर्व लिहीलेले पुसले जाते**लोकं काही म्हणू द्या*... *परंतु अथांग, विशाल समुद्र आपल्या लाटांमध्ये मस्त राहतो*... *आपली भरती आणि ओहोटी तो आपल्या पध्दतीने सिध्द करीत असतो*      *जर अथांग समुद्र बनायचे असेल तर कोणाच्या निर्णयावर लक्ष न देता जे करायचे ते आपल्या पद्धतीने करायचे...**भूतकाळातील विचार करत बसू नये*. *यश अपयश, मिळणे न मिळणे, सुख-दुख, या सगळ्यात मन विचलित होऊ देऊ नये*.*जर जीवन सुख शांति ने भरलेले असते तर मनुष्य जन्माला येताना रडला नसता**जन्माला येताना रडणे आणि मेल्यानंतर रडवणे यामधील संघर्षमय  वेळेलाच कदाचित जीवन म्हणतात...**संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दि. 30/11/2022 वार - बुधवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 🎇 .  *दिनविशेष .  🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••           💥 ठळक घडामोडी :- १८७२ - पहिला आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामना स्कॉटलंड वि. इंग्लंड हा हॅमिल्टन क्रेसेंट, ग्लासगो येथे खेळला गेला.💥 जन्म :-१८१७ - थियोडोर मोम्सेन, नोबेल पारितोषिक विजेता जर्मन लेखक.१८५८ - जगदीशचंद्र बोस, भारतीय भौतिकशास्त्रज्ञ.१८६९ - गुस्ताफ डालेन, नोबेल पारितोषिक विजेता स्वीडिश भौतिकशास्त्रज्ञ.१९१५ - हेन्री टॉब, नोबेल पारितोषिक विजेता कॅनडाचा रसायनशास्त्रज्ञ.१९३५ - आनंद यादव, मराठी लेखक.💥 मृत्यू :- २०१२ - विजय देवधर, मराठी लेखक.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱  9604481084•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *शिवनेरी, अश्वमेधमधूनही ७५ वर्षांवरील ज्येष्ठांना मुंबई-पुणे दरम्यान मोफत प्रवास. अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेत एसटीच्या या बससेवांचा समावेश करण्याचा एसटी महामंडळाचा निर्णय.*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *आंतरराष्ट्रीय-राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार मिळविणाऱ्या मराठी सिनेमांना राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत देण्यात येणारे प्रोत्साहन अनुदान दुप्पट करण्यात येईल असे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *बीसीसीआयच्या निवड समितीच्या सदस्यपदासाठी विनोद कांबळी, मनिंदर सिंग आणि सलिल अंकोला शर्यतीत. बीसीसीआयच्या सदस्य पदासाठी ५० पेक्षा जास्त खेळाडू इच्छुक*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *न्यायाधीशांची संख्या दुप्पट करण्याच्या मागणीवर सुनावणी करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *गोरेगावमधील आयटी पार्कच्या मागील जंगलात भीषण आग, जीवितहानी नाही*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *नवाब मलिकांच्या जामीनावर आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी, दिलासा मिळणार की अडचणी वाढणार?*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आज क्राइस्टचर्च येथील हॅग्ले ओव्हल येथे तिसरा एकदिवसीय सामना खेळला जाणार आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••*Opposite words विरुद्धार्थी शब्द👇**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/HUnNmxyrG7A~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••प्रतिलिपी डॉट कॉम वरील गत आठवणीचा हिंदोळा मधील लघूकथा             *सोन्याचे बिस्कीट*माधवराव आज खूप खुश दिसत होते. त्यांच्या चेहऱ्यावर ती खुशी स्पष्ट दिसत होती. कारण काल रात्री शेतात विहीर खणत असताना एक पेटी मिळाली होती आणि त्यात एक चमकदार अशी बिस्किटच्या आकाराची वस्तू दिसली. तसे त्यांचे डोळे दिपुन गेले. होय...ते सोन्याचेच बिस्किट होते ! हे मनाशी समजून घेतल्यावर त्यांचे पाय जमिनीवर नव्हतेच. कधी एकदा घरी जातो आणि पत्नी माधवीला सांगतो, असे झाले होते. तसा तो तडक घराकडे जायला निघाला. दोन कि.मी. चा रस्ता कधी........https://marathi.pratilipi.com/na-sa-yevtikar-nasa/sonyachi-biscuit         लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••📙 *मद्यपानामुळे काय दुष्परिणाम होतात ?* 📙'बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले' हे खरे असले तरी बोलताना व चालताना सारखेच अडखळणाऱ्या दारुड्याच्या बाबतीत मात्र हे सपशेल खोटे ठरते. मद्यपान करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. तरुण वयातच या दारूचे व्यसन लागते. पिक्चरमधील हिरोचे अनुकरण, मित्रांचा प्रभाव, कुतूहल, नाविन्याची आवड, साहसी वृत्ती, मानसिक अस्थिरता अशा अनेक कारणांमुळे लोक मद्यपानाला सुरुवात करतात. एकदा सुरुवात केली कि मग त्याला मर्यादा राहत नाही.आरोग्यावर मद्यपानाचे अनेक दुष्परिणाम होतात. यात यकृताचा कर्करोग, मधुमेहासारखा रोग लवकर होणे, रक्तवाहिन्यांची लवचिकता कमी होऊन हृदयाला रक्त पुरवठा होण्यात अडथळा निर्माण होणे व हृदयविकाराचा झटका येणे हे रोग दिसून येतात. मद्यपान केलेल्या व्यक्तीचे स्वत:वर नियंत्रण नसते. त्यामुळे असे लोक अपघातात सापडतात व मृत्युमुखीही पडतात.मद्यपानाचे आरोग्याखेरीच सामाजिक व आर्थिक परिणामही फार होतात. घरे उद्ध्वस्त होतात. नातीगोती तुटतात. आर्थिक विपन्नावस्था येते. दारू पिऊन व्यक्ती पत्नीला मुलांना मारहाण करते. घराकडे त्या व्यक्तीचे दुर्लक्ष झाल्याने मुलांचे शिक्षण नीट होत नाही. साहजिकच मुले अशिक्षित राहतात. समाजात बेरोजगारी वाढते व गुन्हेगारीच्या प्रमाणातही वाढ होते.दारूमुळे यकृत खराब होते आता पायांवर सूज येते पोटात पाणी होते. मेंदूवर परिणाम होऊन मानसिक रोग होतात. अशी ही सर्वनाशक दारू. आधी माणूस दारू पितो व नंतर हळूहळू ती त्याला त्याच्या घरादाराला पिऊन टाकते (संपवते); हे म्हणतात, ते खरेच आहे. त्यामुळे मद्यपानाच्या सवयीपासून दूर राहिलेले चांगले.*डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित*यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातूनमनोविकास प्रकाशन०२० ६५२६२९५०*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*आयुष्यात काय गमावलंत ह्यापेक्षा काय कमावलंत ह्याचा विचार करा.**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) 'अ' श्रेणी क्रिकेटमध्ये सलग पाच शतक झळकवण्याचा विश्वविक्रम कोणी केला ?२) 'तारक मेहता का उलटा चष्मा' मध्ये जेठालालच्या वडीलाची भूमिका करणारे चंपकचाचा अर्थात कोण ?३) भारतातील जिल्ह्यांची एकूण संख्या किती आहे ?४) महात्मा गांधीजींनी सेवाग्राम आश्रमाची स्थापना केव्हा केली ?५) टिपू सुलतानचे पूर्ण नाव काय होते ?*उत्तरे :-* १) जगदीशन नारायण, तामिळनाडू २) अमित भट्ट ३) ६४० जिल्हे ४) १९३६ ५) सुल्तान फतेह अली खान शाहाब *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••👤 राजेश दरेकर, सहशिक्षक, गडचिरोली👤 राजेश्वर येवतीकर, येवती👤 विलास वाघमारे, भैसा, तेलंगणा👤 रवी बुगावार, धर्माबाद👤 देविराज पिंगलवार, भोकर👤 उमेश खोकले*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*     [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*तुम्ही दु:खाचा स्विकार कराल तेंव्हाच सुखाच्या निकट पोहचाल. आयुष्याचा खरा अर्थ कळेल. राजपुत्र सिद्धार्थ दु:खाचा शोध घेतो, म्हणून ते तथागत गौतम बुद्ध होतात. हेच फार मोठं उदाहरण जगाच्या पाठीवर लिहून ठेवलं गेलंय, ते कुणीच पुसून टाकू शकत नाही. संकटातून, समस्यांतून बाहेर कसे पडायचे, हे विद्यापीठात शिकविले जात नाही. माणसाने स्वयंअध्ययनातून खूप काही शिकायचे असते. आजच्या नव्या पिढीला हे अध्ययन करू द्यायला हवे. मात्र, तसे होताना दिसत नाही. खुशी काही सेकंदांची असते. समाधान हे काही दिवसांचं असतं आणि ज्ञान अर्थात जीवन-जाणिवा ह्या आयुष्यभरासाठी असतात.**दुर्दैवाने मुलांना पाच रूपयांची कॅडबरी देऊन किंवा पाच-पन्नास पैशांचं चाॅकलेट देऊन खुश करण्याचं काम घरादारातून जोरकसपणे सुरू आहे. दु:खापासून त्यांना दूर ठेवण्यात येत आहे. त्यांना दु:खाची तोंडओळख करून दिली जात नाही. एक सुरक्षाकवच त्यांच्याभोवती पालक उभे करताहेत. सहाजिकच मुलांना दु:खाचा सराव होत नाही. मग जराशा दु:खाने ही मुले हडबडून जातात अन् आत्महत्येचे अर्थही माहीत नसलेले हे कोवळे जीव मारणारा कवटाळून बसताहेत. म्हणून दु:ख कळण्यासाठी दु:खाची उदाहरणे त्यांच्यासमोर ठेवणे गरजेचे आहे. टाकीचे घाव सोसल्याशिवाय दगडाला देवपण येत नाही, हे आपणांस ठाऊक, पण त्यांच्यापर्यंत ते पोहचत नाही. माणूस दु:खातून उभा राहून स्वत:चे अस्तित्व सिद्ध करतो. हीच दु:खाच्या रियाजाची सामुग्री आहे. तिचा अवलंब करणे म्हणजे दु:खाचा रियाज करणे होय.*             *॥ रामकृष्णहरी ॥*🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰        *श्री. संजय नलावडे, मुंबई*       *मोबाइल  - 9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••      संकल्प करा अथवा करु नका शेवटी निर्णय तुम्ही तुमच्या मनावर नियंत्रण ठेवण्यासाठी सज्ज रहा.कारण ज्या गोष्टी तुम्हाला आवडतात त्या गोष्टीसाठी सातत्याने प्रयत्न करा म्हणजे तुमचे तुम्हाला निश्चितच मिळेल.मी असे करणार आहे मी तसे करणार आहे असे जगाला सांगत सुटू नका.जग काही म्हणतील त्यांच्या म्हणण्यानुसार तुम्ही किती दिवस चालणार ?चार दिवस तुम्ही त्यांच्यासमोर करणार आणि काही दिवस निघून गेले की, पुन्हा तेच करणार.म्हणजे तुमचा तुमच्यावर विश्वास नाही असेच होईल ना ! संकल्प असे करा की,ते आयुष्यभर आपल्या जीवनासाठीच आहेत.मग तुम्हाला वर्षाची किंवा वर्ष संपल्यानंतर नवीन वर्षाच्या प्रारंभी करायची काही गरजच नाही.दिवस,महिने,वर्ष येतात जातात याकडे लक्ष देऊ नका,पण आयुष्य हे एकदाच येते आणि ते अमर्यादित म्हणजेच आयुष्याच्या शेवटपर्यंत असेल.आपण केलेले संकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी आपल्या मनाचा ठाम निर्धार असला की,काही दर वर्षी शेवटी सोडायचे आणि नवीन धरायचे किंवा करायचे असेही करायचे नाही.काळ आणि वेळ कुणासाठी थांबत नाही तर आपण काळाची पावले ओळखून आपण आपले जीवन आनंदमय आणि सुखमय कसे जाईल याकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे.तुम्ही निर्माण केलेले आणि प्रत्यक्ष जीवनात अनुसरलेले संकल्प हे इतर लोक आपोआपच अनुकरण करतील आणि करायलाही लागतील.हा तुमचा तुम्ही सुरवातीपासून केलेला आदर्श संकल्प नवीन वर्षासाठी इतरांना अनुकरणीय ठरेल यात शंकाच नाही.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद.९४२१८३९५९०/८०८७९१७०६३.🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••                 *सिंह  व बेडूक*  एका जंगलात एक सिंह राहायचा.त्याला त्या जंगलात कंटाळा आला तो दुसऱ्या  जंगलात राहायला गेला .एकदा सिंह मोठया ने गरजला.त्या जंगलात अनेक पशु-पक्षी तसेच काही बेडूक ही राहत होते .त्यांनी यापुर्वी सिंह पाहिले नव्हते .त्यांचा बेडूक पुढारी म्हणाला ,"कोणीतरी मोठा आवाज काढत आहे .आता मीही मोठा आवाज काढतो ."बेडकानी मोठा आवाज काढला . सिंहासाठी हा आवाज नवीन होता. सिंहाला वाटले , कोणीतरी आपल्याला आव्हान देत आहे, आपण सावध राहिले पाहिजे.' सिंहाने आपली गर्जना थांबवली. तो शांत उभा राहिला. बेडूक मोठ्या मोठ्याने ओरडत पुढे पुढे सरकू लागला. सिंहाने त्याला पहिले व त्याचा आवाज ऐकला. सिंह वेगाने पुढे सरकला. सिंहाने बेडकाचे डोक्यावर पाय दिला. बेडूक गयावया करू लागला. सिंहाने त्याला सोडून दिल. बेडूक आनंदाने पाण्यात गेला.बोध: आव्हान पेलण्याची ताकद असावी मग कोणी कितीही सामर्थ्यशाली असले तरी.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दि. 29/11/2022 वार - मंगळवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷   🎇 .  *दिनविशेष .  🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••           💥 ठळक घडामोडी :- १९९६: नोबेल पारितोषिक विजेत्या समाजसेविका मदर तेरेसा यांना त्यांची मायभूमी अल्बानियाचा सर्वोच्‍च नागरी पुरस्कार गोल्डन ऑनर जाहीर.२०००: शास्त्रीय गायक गुलाम मुस्तफा खाँ आणि घटमवादक टी. एच. विक्‍कू विनायक राम यांना उस्ताद हफीज अली खाँ स्मृती पुरस्कार जाहीर.२०००: दक्षिण अफ्रिकेचे माजी अध्यक्ष डॉ. नेल्सन मंडेला व बांगलादेशच्या ग्रामीण बँकेस गांधी शांतता पुरस्कार जाहीर.💥 जन्म :-१९०७: प्रसिद्ध लेखक गोपीनाथ तळवलकर यांचा जन्म. १९०८ - एन.एस. क्रिश्नन, तमिळ चित्रपट अभिनेता.१९३२ - जाक शिराक, फ्रांसचा राष्ट्राध्यक्ष.१९७७ - युनिस खान, पाकिस्तानचा क्रिकेट खेळाडू.💥 मृत्यू :- १९५९ - गोविंद सखाराम सरदेसाई - मराठी इतिहासकार१९९३: जे. आर. डी. टाटा तथा जहांगीर रतनजी दादाभॉय टाटा यांचे निधन. भारतीय उद्योजग तसेच ते भारताचे पहिले वैमानिक व भारतीय विमान वाहतुकीचे जनक होते. २०११ - इंदिरा गोस्वामी, आसामी साहित्यिक, कवयित्री, संपादिका.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱  9604481084•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी हेलिपॅड तयार करण्यात यावे, त्यासाठी जागांची निश्चिती करावी. गंभीर रूग्णाला एअर लिफ्ट करण्याकरता वैद्यकीय मदतीसाठी हेलिपॅडचा उपयोग होऊ शकतो, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *सहावी ते बारावीपर्यंतच्या मुलींना शाळेत मोफत सॅनिटरी पॅड द्या! याचिकेनंतर सुप्रीम कोर्टाची केंद्रासह राज्यांना नोटीस*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *नुकसानभरपाईबाबत शेतकऱ्यांचा सरकारला 4 डिसेंबरपर्यंतचे अल्टिमेटम, अन्यथा कुठल्याही ठिकाणी कोणत्याही वेळात 'जलसमाधी' घेणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *आता गोवरसाठीही क्वारंटाईन! गोवर नियंत्रणासाठी विलगीकरण व्यवस्था करा, टास्क फोर्सचे जिल्हा प्रशासन आणि महापालिकांना निर्देश*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *PSI, कर निरीक्षक, सहाय्यक कक्ष अधिकारी पदाच्या मुख्य परीक्षा पुढे ढकलल्या.. प्रशासकीय कारणास्तव वेळापत्रकात बदल*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *सक्तीच्या वीजबिल वसुली विरोधात 'ठाकरेंची सेना' उतरणार रस्त्यावर; चक्काजाम करणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *ऋतुराज गायकवाडने विजय हजारे ट्रॉफीत एका षटकामध्ये 7 सिक्सर साग झंझावाती द्विशतकासह केला वर्ल्ड रेकॉर्ड*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••*Story-The Nightingale and the nobleman👇**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/EgGfP7iJmFc~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••              *शिक्षकांना शिकवू द्या ...*शाळाबाह्य कामावर बहिष्कार टाकल्यामुळे 27 शिक्षकांवर निलंबनाची कारवाई झाल्याची बातमी वाचण्यात आली. राज्यातील बहुउद्देशीय कर्मचारी म्हणजे शिक्षक. कोणत्याही सरकारी कामासाठी सहज उपलब्ध होणारा आणि सांगितलेले काम मुकाट्याने करणारा कर्मचारी म्हणजे शिक्षक. वास्तविक पाहता शिक्षकांचे...........वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा.http://nasayeotikar.blogspot.com/2017/11/blog-post_27.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••📙 *म्हाताऱ्या लोकांच्या चेहऱ्यावर सुरकुत्या का पडतात ?* 📙वृद्धावस्था आली की माणसात अनेक बदल होतात. डोक्यावरचे केस गळायला लागतात व टक्कल पडते. तोंडातील दात हलायला लागतात व नंतर तोंडाचे बोळके होते. बोटांना कंप सुटतो, दृष्टी अधू होते, उत्साह कमी होतो. अशा या बदलांमुळे व्यक्ती चिडचिडी होते. त्यात भर म्हणजे विस्मरणही व्हायला लागते. त्यामुळे वृद्धत्व म्हणजे एक रोग असे वाटायला लागते.चेहऱ्यावर सुरकुत्या का पडतात, याविषयी माहिती घेऊ. त्वचेखाली स्नायूंच्या आकुंचन व प्रसरणाच्या दिशेने काटकोनात त्वचेची हालचाल होत असल्याने त्वचेच्या वारंवार घड्या पडतात. व तेथे नंतर सुरकुत्या पडतात. चेहऱ्याच्या त्वचेखाली इतर शरीराच्या त्वचेखाली असणारा जाडसर थर (deep fascia) नसतो व स्नायू व त्वचेचे थर एकमेकांत जखडलेले असतात. त्यामुळेही त्वचेवर जास्त ताण येतो व सुरकुत्या पडतात.दुसरे म्हणजे त्वचेखालील मेद पदार्थांचे प्रमाण कमी होते. साहजिकच त्वचा सैल व ढिली होते. तिसरे म्हणजे स्नायूंमधील ताण वयोमानानुसार कमी होतो. त्यामुळे त्वचेमध्ये खोवले जाणारे स्नायू शिथिल होतात व त्वचाही सैल होते. सर्व इंद्रियांवर त्वचेची जीवनशक्ती कमी झालेली असते. त्यामुळे या त्वचेची लवचिकता कमी होऊन ती सैल पडते. या सर्व गोष्टींमुळे सैल पडलेल्या त्वचेवर सुरकुत्या पडतात. तोंडातील दात पडल्याने जबड्याच्या हाडाची झीज झाल्याने चेहऱ्याचा आकारही बदलतो व त्वचा आणखीनच सैल होते. परिणामी वृद्ध व्यक्तींच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडतात. सुरकुत्या सर्व शरीरावर पडतात परंतु चेहऱ्यावर ती बाब जास्त प्रकर्षाने जाणवते.*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••"अनेक वेळा चांगले क्षण/ आशीर्वाद हे कठोर प्रसंगांच्या वेशभूषेत येतात."*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••👤 साईनाथ बोईनवाड👤 योगेश खवसे👤 पोतन्ना गुंटोड👤 प्रमोद पाटील बोमले*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*     [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*संत तुकाराम महाराज यांचा अतिशय सोपा दिसणारा अभंग आहे,'बोले तैसा चाले । त्याची वंदीन पाऊले ॥' येथे तुकोबा एक खूप मोठं मानसशास्त्रीय गूढ कमीत कमी शब्दांत उकलून देत आहेत. जसे बोलतो तसेच वागणारा माणूस भेटला तर त्याला मी वंदन करीन, असे तुकोबा म्हणतात. म्हणजे अशी माणसे दुर्मिळ आहेत का ? असा प्रश्न पडतो. माणसाचे आचरण त्याच्या चारित्र्याशी विसंगत असेल तर असण्यात आणि भासवण्यात एक दरी निर्माण होते. आपण ज्यांना चांगली माणसं म्हणतो त्यांच्याही असण्यात आणि दाखवण्यात व्यक्तिमत्वात दरी असतेच.**असण्याच्या आणि भासवण्याच्या मध्ये केवढी दरी आहे हे पाहिले पाहिजे. ती जेवढी मोठी तेवढा माणूस लहान आणि ती जेवढी लहान तेवढा माणूस मोठा, असे एक समीकरण मांडता येईल. असे होण्याच्या मागे एक बाह्य कारण आहे. आपल्या कृतीचे समर्थन करणे ही मानवाची नैसर्गिक प्रवृत्ती आहे. अगदी गुन्हेगारही गुन्हा का करावा लागला याचं समर्थन करत असतो. म्हणूनच मग 'बोले तैसा चाले' अशी व्यक्ती दुर्मिळ असते. आणि अशी व्यक्ती सापडलीच तर तो परीस असतो, तो इतरांचेही सोने करू शकतो.*              *॥ रामकृष्णहरी ॥*🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼       *श्री. संजय नलावडे, मुंबई*      *मोबाइल  - 9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••              *कासवाची चतुराई*एकदा एक कासव जंगलाकडे जायला निघाला. त्याला कोल्हा दिसला. कोल्हा त्याच्या दिशेनेच येत होता. कासव घाबरला. कासवाने आपली मान व पाय कवचात ओढून घेतले. कोल्ह्याने कवच पाहिले. आपल्या पायाने कवचाला ओरखडले. कोल्ह्याला वाटले," हा तर दगड आहे. “कोल्हा पुढे निघून गेला. कासवाने हळूच मान बाहेर काढली. ते पाण्यात शिरले. कासवाने कोल्ह्याला आवाज दिला.. कोल्ह्याने मागे वळून पाहिले. तो स्वतःशीच  म्हणाला अरे! शिकार हातची गेली..*बोध: चतुराईने केलेले  काम चांगलेच व   उपयोगी असते.**संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दि. 28/11/2022 वार - सोमवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷   🎇 .  *दिनविशेष .  🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••     💥 ठळक घडामोडी :- ● १०९५ - क्लेमोंटच्या सभेच्या शेवटच्या दिवशी पोप अर्बन दुसरा याने ले पो चा बिशप अधेमर व तुलुचा काउन्ट रेमंड चौथा यांना पहिल्या क्रुसेडचे नेता केले.● १५२० - फर्डिनांड मॅगेलनने दक्षिण अमेरिकेची सामुद्रधुनी पार केली व अटलांटिक महासागरातून पॅसिफिक महासागरात जहाज नेणारा पहिला युरोपियन ठरला● २०००: तेलगू भाषेतील महाकवी गुर्रम जाशुवा यांच्या नावाने दिला जाणारा साहित्य पुरस्कार कवी नारायण सुर्वे यांना जाहीर.💥 जन्म :-● १८५३ - हेलेन मॅगिल व्हाइट, पी.एच.डी.ची पदवी मिळवणारी पहिली अमेरिकन स्त्री.● १९११ - वाक्लाव रेंच, चेक कवी.● १९५० - एड हॅरिस, अमेरिकन अभिनेता.● १९५० - रसेल ऍलन हल्स, नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ.💥 मृत्यू :- ● १८९० - महात्मा जोतीराव फुले, भारतीय समाजसुधारक.● १९६७ - सशस्त्र क्रांतिकारक पांडुरंग महादेव तथा सेनापती बापट *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱  9604481084•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *विठुरायाचं मंदिर दिसणार 700 वर्षांपूर्वीच्या मूळ रूपात; 73 कोटी 80 लाखांचा आराखडा मंजूर, लवकरच कामाला सुरुवात होण्याची अपेक्षा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *गोवरचा विळखा वाढला, राज्यभरात 10 हजार 234 संशयित रुग्ण, अतिरिक्त लसीकरणासाठी मुंबई महापालिकेकडून हॉटस्पॉटमधील 1 लाख 40 हजार मुलांची यादी तयार*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *नाशिकमध्ये पोलीस भरती प्रक्रियेचे सर्व्हर डाऊन, उमेदवार रात्रभर सायबर कॅफेवर! पोलीस भरती प्रक्रियेत अर्ज करण्यासाठी उमेदवारांना पंधरा दिवसांची मुदतवाढ द्या; धनंजय मुंडेंची मागणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *भारतासाठी मोठी संधी, 2023 च्या G20 परिषदेत तरुणांनी सामील व्हा; पंतप्रधानांचं आवाहन*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मुंबईत सायकल ट्रॅक बांधण्याचा मार्ग अखेर मोकळा. आदित्य ठाकरेंचा 217 कोटींचा प्रस्ताव मुंबई पालिकेकडून मंजूर.*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *'करो या मरो'च्या सामन्यात अर्जेंटिनानं मेक्सिकोला 2-0 नं हरवलं; मेस्सी, एन्झो फर्नांडीझ ठरले विजयाचे हिरो*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर 2022 मध्ये झालेल्या आयपीएल फायनल सामन्याने केला विश्वविक्रम, प्रेक्षकांच्या संख्येनं या मैदानाची नोंद गिनिज बुकमध्ये*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••*Story-Kind Kondiba👇**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/fs5JTsw7RVw~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  *गोरगरीबांचे कैवारी : महात्मा फुले*भारतीय समाजसुधारणेत व स्वातंत्र्य चळवळीत ज्यांचे नाव मोठ्या आदराने घेतले जाते ती व्यक्ती म्हणजे जोतीराव गोविंदराव फुले. जोतिबा फुले यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन लोकांनी त्याना ‘महात्मा’ ही उपाधी दिली. त्यामुळे ज्योतिबा फुले हे महात्मा फुले या नावाने सर्वत्र ओळखले जाऊ लागले. महात्मा फुले यांच्या वडिलांचे नाव..........वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा.http://nasayeotikar.blogspot.com/2017/11/blog-post_26.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••                  *चिखलदरा*चिखलदरा हा भारतातील महाराष्ट्र राज्यातील अमरावती जिल्ह्यातील एक हिल स्टेशन व एक नगर परिषद आहे.महाभारतच्या महाकाव्यात वैशिष्ट्यपूर्ण, या ठिकाणी अशी भीती होती की भीमा यांनी एका भयंकर चढाओवातील खलनायक किचकचा वध केला आणि नंतर त्याला खोऱ्यात फेकून दिले. अशा प्रकारे कोच्चरदा-चिखलदरा हे त्याचे भ्रष्टाचार आहे म्हणून ओळखले जाऊ लागले.परंतु चिखलदराला अजून बरेच काही आहे. विदर्भातील एकमात्र हिल रिसॉर्ट, हे 1118 मीटरच्या उंचावर सर्वोच्च व्हॅरेट पॉईंट 1188 मीटर असून हे महाराष्ट्रातील एकमात्र कॉफ़ी-वाढविणारे क्षेत्र असण्याचे जोडलेले आहे. चिखलदराचे वार्षिक पाऊस 154 सेंमी आहे. उन्हाळ्यात तापमान 39 से हिवाळ्यात 5 से बदलते. भेट सर्वोत्तम महिने ऑक्टोबर ते जून पर्यंत आहेतहे वन्यजीवन-व्याघ्र, पेंटर, आळशीपणा अस्वल, सांबर, जंगली डुक्कर आणि अगदी क्वचितच पाहिलेले जंगली कुत्री आहे. जवळील प्रसिद्ध मेळघाट टायगर प्रकल्प आहे ज्यामध्ये 82 वाघ आहेत.चिखलदराचे निसर्गरम्य सौंदर्य चक्रीवादळ, प्रॉस्पेक्ट पॉईंट, आणि देवी पॉईंट मधून आनंद घेऊ शकतात. इतर मनोरंजक मोहिमा गव्हिल्गड आणि नारनला किल्ला, पंडित नेहरू बोटॅनिकल गार्डन्स, आदिवासी संग्रहालय आणि सेमादोह लेक यांचा समावेश आहे.*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*केवळ ज्ञान असून उपयोग नाही, ते कसं आणि केव्हा वापरायचं याचंही ज्ञान हवं.**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) महाराष्ट्रातील किती व कोणत्या शाळांना २०२२ चा केंद्राचा 'स्वच्छ विद्यालय पुरस्कार' प्राप्त झाला आहे ?२) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे ?३) सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी पहिल्यांदाच संधी मिळालेल्या महिलेचे नाव काय ?४) 'पाणी पंचायत' ह्या संकल्पनेचे जनक कोण ?५) शिवसेनेचे 'सामना' हे मुखपत्र केव्हा सुरू झाले ?*उत्तरे :-* १) तीन - सातारा ( २ शाळा ) , रायगड ( १ शाळा ) २) नागपूर ३) आशा बोथरा ४) विलासराव साळुंखे ५) २३ जानेवारी १९८९*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••👤 राम चव्हाण, नांदेड*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*     [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    *हसत दु:खाचा केला मी स्विकार,*    *वर्षिले चांदणे पिऊन अंधार..*    *प्रकाशाचे गाणे अवसेच्या रात्री,*    *आनंदयात्री, मी आनंदयात्री !**दु:खाचा स्विकारही हसत करायचा असतो. दु:खाला धैर्यानं सामोरे जायचे असते. दु:ख सत्वपरीक्षा घेतात. ज्याच्या त्याच्या क्षमतेप्रमाणे ज्याच्या त्याच्या भाळी दु:ख असते. अशा दु:खाचा बागुलबुवा करून अंधारयात्री व्हायचे, की या दु:खातून माझे आयुष्य तावून सुलाखून पुन्हा झळाळायचे आहे असं म्हणत प्रकाशाचे गाणे गात आनंदयात्री व्हायचे?**दु:खे समृद्ध अनुभवांची अनुभूती देतात.त्यामुळे खरं तर त्यांच्याबद्दल कृतज्ञ असायला हवे. कारण दु:खानंतरचे सुख आनंदाचा पारिजात फुलवते. जेवनातही विविध चवी हव्यात. चित्रातही अनेक रंग लागतात. गाण्यातही सप्तसूर. मग आयुष्य तरी एका चवीचे, एका रंगाचे, एका सुराचे का हवे? आपल्यात विश्व पाहणे आणि आपणच विश्व होणे. मग अणूरेणसारखे दु:ख आकाशाएवढे का करायचे? नसलेले दु:ख घेऊन का ऊर बडवायचे? वेदनेच्या कल्पनेने का हाय खायची? पायात वहाण नाही म्हणून शोक करणारी व्यक्ती जेंव्हा पाय नसलेल्या व्यक्तीला पाहते तेंव्हा तीचा शोक अनाठायी ठरतो. पाय गमावलेला सैनिक जेंव्हा सहजवानाचा मृतदेह पाहतो तेंव्हा त्याचे दु:ख कमी क्लेशदायी ठरते. जेंव्हा बागडायच्या वयातील छोटी मुले रूग्णालयात व्याधीग्रस्त होऊन मरणयातना भोगताना दिसतात, तेंव्हा वयाने वाढलेल्या आपल्या शरीराला आलेल्या सर्दी, ताप, खोकल्याचे दु:ख ते काय?*             *॥ रामकृष्णहरी ॥*🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀      *श्री. संजय नलावडे, मुंबई*     *मोबाइल  - 9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       जेव्हा रोज सकाळ ही नवीन सकाळ होऊन या जगात प्रवेश करते तेव्हा प्रत्येक सजीवांसाठी नवीन आशा पल्लवित करण्यासाठी.ती म्हणते काल जे काही चांगले-वाईट झाले त्यातील चांगले लक्षात ठेऊन त्याला सोबत घेऊन पुढे अधिक चांगले करण्याचा प्रयत्न करा आणि जे काही तुमच्या जीवनात वाईट घडून गेले त्याला विसरुन जा.त्याची पुनरावृत्ती होणार नाही याची दक्षता घ्या आणि आनंदाने जीवन जगा.ती म्हणते मी कधीच भूतकाळाला धरुन वर्तमानात जगत नाही आणि वर्तमानात जे काही जगते ते भविष्यकाळातही त्याचा  विचार करत नाही.त्यामुळेच मी रोजच्यारोज टवटवीत, प्रसन्न आणि प्रफुल्लीत असते.असा जर मी तुमच्यासारखा विचार करायला लागले असते तर  सगळ्या जीवसृष्टीला आवडले असते का ? नाही. म्हणून झाले गेले विसरा नि रोज तेवढ्याच प्रसन्न मनाने,प्रसन्न मुद्रेने माझ्यासारखं आनंदी रहायला शिका मग माझ्याप्रमाणेच रोज तुमचंही स्वागत करतील, तुमच्याबद्दल इतरांना आवड निर्माण होऊन तुमच्यावर प्रेम करायला लागतील.© व्यंकटेश काटकर, नांदेड.संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३.🌄🏞🌄🏞🌄🏞🌄🏞🌄🏞•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••                    *मित्रता*राम ,माझा (सिमा) व सुमनचा मित्र आहे. तो आजारी पडला. म्हणून त्याला भेटायला आम्ही निघालो. आम्ही त्याच्या घरी पोहोचलो आणि त्याला फळे दिली. “काळजी घे. वेळेवर जेवण कर, औषध घे लवकर बरा हो ”अशी तिकडे सुमन म्हणाली. तू लवकर बरा हो मग आपण  खूप खूप खेळू, मजा करू” असे सिमा म्हणालीराम म्हणाला “सीमा ,सुमन तुम्हाला भेटून मला आनंद झाला. आता मला बरं वाटतंय.” रामने आमचे आभार मानले. निघताना रामचा चेहरा हसरा दिसत होता. हे पाहून आम्हालाही आनंद झाला.*तात्पर्य : कधी पण मित्राच्या सुखदुःखात सहभागी व्हावे. हीच खरी मिञता असते.**संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दि. 26/11/2022 वार - शनिवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷   🎇 .  *दिनविशेष .  🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••            *भारतीय संविधान दिन*💥 ठळक घडामोडी :- ● १८६३: अमेरिकेचे अध्यक्ष अब्राहम लिंकन यांनी नोव्हेंबर २६ हा थँक्सगिव्हिंग डे म्हणून घोषित केला.● १९४९: भारताची घटना मंजूर झाली.● १९४९: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सादर केलेल्या संविधानास मान्यता मिळाली.● १९८२: दिल्ली येथे ९वी आशियाई क्रीडा स्पर्धा संपन्न झाली.● १९९७: शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना भारतरत्‍न हा सर्वोच्‍च नागरी सन्मान जाहीर.💥 जन्म :-● १९२१: भारतीय दुग्धोत्पादनातील धवल क्रांतीचे जनक, अमूलचे संस्थापक, राष्ट्रीय दुग्धोद्योग विकास महामंडळाचे (NDDB) संस्थापक अध्यक्ष व्हर्गिस कुरियन यांचा जन्म. 💥 मृत्यू :- ● १९८५: कवी यशवंत तथा दिनकर पेंढारकर यांचे निधन.● १९९४: चित्रपट महर्षी भालजी पेंढारकर यांचे निधन. ● २००८ - विजय साळसकर, मुंबईचे पोलिस अधिकारी● २००८ - हेमंत करकरे, मुंबईचे पोलिस अधिकारी● २००८ - अशोक कामटे, मुंबईचे पोलिस अधिकारी*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱  9604481084•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *एमपीएससीत निवड झालेल्या उमेदवारांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. ३० नोव्हेंबरला शिंदे-फडणवीसांच्या हस्ते नियुक्तीपत्र मिळणार आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *प्राध्यापक आनंद तेलतुंबडे यांना दिलेला जामीन योग्यच आहे, असं स्पष्ट करत या जामीनाविरोधात एनआयएनं सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका फेटाळून लावली.*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *कर्मचाऱ्यांनी स्वेच्छेने राजीनामा दिला, आम्ही कामावरून काढले नाही; कर्मचारी कपातीवर अॅमेझॉनचे स्पष्टीकरण*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *येस बँकेच्या राणा कपूर यांना जामीन मंजूर, 466 कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचा आरोप*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *गोरखपूरमध्ये कृषी संशोधन केंद्र उभारणार, गव्हासह मका उत्पादक शेतकऱ्यांना होणार फायदा, विद्यार्थ्यांना करता येणार संशोधन*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *जातपडताळणी प्रमाणपत्र प्रकरणात नवनीत राणांना 5 डिसेंबरपर्यंत दिलासा*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *फिफा विश्वचषक स्पर्धेत ख्रिस्तियानो रोनाल्डो कर्णधार असलेल्या पोर्तुगालने घानाला 3-2 ने मात देत विश्वचषकात दिली विजयी सलामी*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••*गोष्टींचा शनिवार-चिनू,मिनू व गोगो,Fun in Metro👇**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/DjS_bheqK64~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *भारतीय संविधान दिवस*देशाचा राज्य कारभार सुरळीत चालण्यासाठी तयार करण्यात आलेले कायदे ज्या ग्रंथात एकत्रित करण्यात आले त्यास भारताचे संविधान असे म्हणतात. संविधानास राज्यघटना असे सुध्दा म्हटले जाते. संविधानातील तरतुदी लेखी स्वरूपात आहेत. याच आधारावर देशांतील लोकप्रतिनिधी नियमांच्या चौकटीत राहून आपला कारभार करीत असतात. नागरिकांचे हक्क, शासन संस्थेची............वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा.http://nasayeotikar.blogspot.com/2017/11/blog-post_24.html            लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*भारतात नोटा कश्या तयार होतात ? खराब नोटांचं काय करतात ?*रुपया शब्दाचा प्रयोग सर्वप्रथम शेर शाह सुरीने भारतावर राज्य करीत असताना १५४०-१५४५ च्या कालखंडातकेला होता. सध्या भारतासमवेत इतर ८ देशांमधील चलनाला रुपया म्हटले जाते. भारतात नोटा आणि नाणी बनवण्याचे काम भारतीय रिजर्व बँकच्या अखत्यारीत येते. भारतात सर्वात पहिली वॉटरमार्क असलेली नोट १८६१ मध्ये छापण्यात आली होती. हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त भारतीय नोटांमध्ये इतर १५ भाषांचा वापर केला जातो.*.भारतात नोटा कुठे छापल्या जातात?.*देशात चार नोट प्रेस आणि एक पेपरमिल आहे.देवास (मध्य प्रदेश),नाशिक (महाराष्ट्र), सालबोनी (पश्चिम बंगाल) आणिम्हैसूर (कर्नाटक)या चार ठिकाणी नोटा छापल्या जातात.देवास येथील नोट प्रेस मध्ये एका वर्षात २६५ कोटी नोटा छापले जातात. इथे २०, ५०, १००, ५०० किंमतीच्या च्या नोटा छापल्या जातात नोटा छापण्यासाठी वापरण्यात येणारी शाईसुद्धा इथेच बनते.नाशिक नोट प्रेस मध्ये १९९१ सालापासून इथे १, २, ५, १०, ५०,१०० किंमतीच्या नोटा छापल्या जातात. सुरवातीला इथे ५० आणि १०० च्या नोटा छापल्या जात नव्हत्या.*.भारतात नाणी कुठे बनवली जातात?.*१. मुंबई२. कोलकत्ता३. हैदराबाद४.नोएडा*.नाण्यांच्या चिन्हावरून समजते की ते कुठे बनवले आहेत :.*प्रत्येक नाण्यावर असलेल्या चिन्हावरून समजते की ते नाणं कुठे बनवलं गेलं आहे. नाण्यावर छापलेल्या वर्षाच्या खाली जर स्टारचे चिन्ह असल्यास ते हैदराबादला बनवलं गेलं आहे. जर वर्षाच्या खाली टिंब असेल तर ते नाणं नोएडाला बनवण्यात आलं आहे. वर्षाच्या खाली डायमंड असल्यास ते नाणं मुंबईत बनवलं आहे. कोलकत्ता मध्ये बनवलेल्या नाण्यावर कोणतेच चिन्ह नसते.*.नोटा कोणत्या वस्तूने बनले जातात?.*रिजर्व बँक ऑफ इंडिया नोट बनवण्यासाठी कापसाच्या कागदाचा आणि विशिष्ट प्रकारच्या शाईचा वापर करते. या प्रकारच्या कागदाचे उत्पादन काही प्रमाणात महाराष्ट्रात (सीएनपी) होते, तर मोठ्या प्रमाणात मध्यप्रदेश मधील होशंगाबाद मध्ये होते. काही पेपर आयत सुद्धा केले जातात.*.भारतात प्रत्येक वर्षी किती नोटा छापल्या जातात?.*रिजर्व बँकेच्या एका अहवालानुसार भारत प्रत्येकवर्षी २००० कोटी नोटा छापतो .यामधील ४० टक्के खर्च कागद आणि शाई आयात करण्यामध्ये जातो. हा कागद जपान, जर्मनी आणि ब्रिटन सारख्या देशांमधून आयात केला जातो. नोटा किती छापल्या पाहिजेत, याविषयीचा निर्णय घेण्याचा अधिकार भारतीय रिजर्व बँकेला आहे. नाणी किती तयार केली जावीत याचा निर्णय पूर्णतः सरकार घेते.*.नोटा कशा छापल्या जातात?.*विदेशातून आयात होणाऱ्या आणि होशंगाबाद मधून येणाऱ्या पेपरशीटला एका खास मशिन सायमंटन मध्ये टाकले जाते आणि नंतर इंटाब्यू नावाच्या मशीनने त्यावर कलर केले जाते. याप्रकारे नोट तयार होतात. त्यानंतर चांगल्या आणि खराब नोटा वेगळ्या केल्या जातात. एका वेळेस एका शीट मध्ये ३२ ते ४८ नोटा छापण्यात येतात.*.खराब झालेल्या नोटांना कुठे जमा केले जाते?.*नोटा तयार करतानाच त्यांची ‘सेल्फ लाइफ’ (नोटा योग्य प्रकारे बनण्याचा अवधी) ठरवण्यात येते. हा अवधी संपल्यानंतर किंवा सारख्या वापरणे खराब झालेल्या नोटांना रिजर्व बँक परत घेते.*.फाटलेल्या जुना नोटांचे काय केले जाते?.*खराब झालेल्या आणि फाटलेल्या नोटा रिजर्व बँक परत चलनात आणत नाही, कारण तसे करणे योग्य नसते. रिजर्व बँक सर्व व्यावसायिक बँकांकडून फाटलेल्या आणि खराब नोटा मागवून एकत्र जमा करते. सुरवातीला या नोटा जाळल्या जात असतं, परंतु आता RBI ने पर्यावरणासंवर्धनाच्या दृष्टीने ह्या नोटा जाळणे बंद केले आहे. RBI ने एक ९ कोटींची मशीन आयत केली आहे, ही मशीन जुन्या नोटांचे छोटे तुकडे करते. त्यातून मजबूत अशी विट बनवली जाते .ह्या विटा खूप कामांमध्ये उपयोगी येतात.*भारतात प्रत्येक वर्षी ५ दशलक्ष नोटा चलनातून बाद होतात, ज्यांचे एकूण वजन ४५००० टन एवढे असते.—.**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*दुसऱ्याला आनंदी बघायला आवडणं हे अतिशय निरोगी मनाचे लक्षण आहे**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••👤 संतोष लक्ष्मणराव सज्जन👤 अर्जुन यनगंटीवार👤 मुरलीधर हंबर्डे पाटील👤 संजय बोंटावार*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*     [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*कोणतेही नाते प्रत्येक क्रियेने उज्ज्वल करता येणे, ही खरी सार्थकता. परंपरेने किंवा संस्कृतीने जी सणावारांची यादी केली, त्या प्रत्येक सणाचा अन्वयार्थ नव्याने शोधायला हवा; तरच आनंद-परमानंद-ब्रम्हानंद या पाय-या चढता येतील. वाद आणि भांडणाच्या प्रकारात जो अडकतो त्याचा फास आधिकाधिक घट्ट होण्याची शक्यता असते. त्यामुळे स्नेहभावनेतून जग जोडले पाहिजे. भारतीय संस्कृतीत प्रत्येक दिवस स्नेहाद्रता पेरत येतो, म्हणून सण हे उत्सवांचे प्रतीक म्हणून साजरे व्हावेत.**नात्यांचा, घटनांचा अर्थ लावत आपल्याला मनाचा स्वयंविकास जेव्हा साधता येईल, तेव्हाच सगळे सण-उत्सव प्रतीकरूप होतील. रोजचा दिवस येतो आणि जातो. रोजच्या कामात मग्न असणारे आपण काही नवीन करतो का, किंवा जे कुठलेही काम करतो त्याच्यात काही नवीन शोधतो का ? नसल्यास ते जमले पाहिजे. नित्यनूतनतेचा ध्यास जोवर लागत नाही, तोवर आयुष्यातून शिळेपणा जाणार नाही. प्रत्येक क्षणाचा उत्सव करणे हे आपले कर्तव्य आहे. या भावनेने जगण्याच्या अनेकविध अंगांकडे पाहता आले पाहिजे.*             *॥ रामकृष्णहरी ॥*  💥💥💥💥💥💥💥💥        *श्री. संजय नलावडे, मुंबई*       *मोबाइल  - 9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••तुम्ही केलेला संकल्प आणि संकल्पाच्या दिशेने जाणारी वाट ही नक्कीच तुमच्या यशाकडे जाणारी असली पाहिजे.कारण तुमचे संकल्प हे तुमच्या ध्येयपूर्तीसाठीच असतात.तुमच्या इच्छा, आकांक्षा,तुमचे कार्य आणि तुमचा विश्वास त्यात दडलेला असतो.तुमच्या संकल्पामुळे तुमच्या जीवनाचे तर कल्याण होईलच त्याचबरोबर इतरांना संकल्प करण्याची प्रेरणा सुध्दा मिळेल.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद..९४२१८३९५९०.🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••                *धाडसी  गीता*गीता नऊ दहा वर्षाची मुलगी होती. ती आणि तिचे आई बाबा शेतातील झोपडीत रहायचे. तिची आई बाबा शेतात काम करत होते. संध्याकाळ  झाली. गीता अभ्यास करत होती. एक  कोकरू बांधली होते. झोपडीत येऊन आईने चुलीवर भात शिजायला ठेवला. आणि गीताला भाताकडे लक्ष ठेवायला सांगितले. आणि विहिरीजवळ पाणी भरायला गेली. देवळात कोकराचा बँsबँs  ओरडण्याचा आवाज आला. तशी गीता धावतच झोपडीबाहेर आली, एक लांडगा दिसला. तो कोकरा कडे येत होता. गीता घाबरली. क्षणभर विचार केला आला आला. ते झटकन झोपडीत गेली. चुलीतील जळते लाकूड घेऊन बाहेर आली. लांडगा कोकरा वर धडक घालणार होता इतक्या गीता ने जळते लाकूड लांडग्याच्या दिशेने फेकले. आगीला  पाहून लांडगा घाबरला. तो पळाला. कोकराचा जीव वाचला. “पळापळा लांडगा आला, ” गीता जोरात जोरात ओरडू लागली. तिच्या आवाजाने शेतात काम करणारे आई बाबा धावत आले. गीताने त्यांना घडलेला प्रसंग सांगितला. आईने तिला जवळ घेतले. बाबांनी तिच्या डोक्यावरून हात फिरवला. गीताच्या धाडसी पणाची बातमी गावात पसरली. गावच्या सरपंचानी तिची पाठ थोपटली. शाळेतील शिक्षकांनी, मुख्याध्यापकांनी तिच्या धाडसा चे कौतुक केले.बोध: आपण कधीही  धाडसी राहिले पाहिजे. तरच आपण कोणाला भिणार नाही.समयसूचकता व धाडसीपणा हे दोन महत्त्वाचे गूण आहेत.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दि. 24/11/2022 वार - गुरूवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷   🎇 .  *दिनविशेष .  🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••💥 ठळक घडामोडी :-◆ १९६६ - टॅब्सो फ्लाइट १०१ हे बल्गेरियाचे विमान चेकोस्लोव्हेकियाच्या ब्रातिस्लावा शहराजवळ कोसळले. ८२ ठार💥 जन्म :-◆ १९६१ - अरुंधती रॉय, भारतीय लेखक.💥 मृत्यू :-◆ १९६३ - मारोतराव कन्नमवार, महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱  9604481084•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *निवडणूक आयोगात योग्य लोकांचीच निवड होतेय; केंद्र सरकारचं सर्वोच्च न्यायालयाला उत्तर*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *सिडको महामंडळाच्या महागृहनिर्माण योजना ऑगस्ट 2022 साठी संगणकीय सोडत सिडको भवन येथे काढण्यात आली. यावेळी हक्काचे घर लागल्याने लाभार्थ्यांनी आनंद व्यक्त केलाय.*••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *एकही गाव महाराष्ट्रातून बाहेर जाणार नाही, लोकांना मदत करू, देवेंद्र फडणवीसांची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *राज्य उत्पादन शुल्क विभागाची पुण्यात मोठी कारवाई, विदेशी मद्यासह 1 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *औरंगाबादच्या वैजापूर शहरातील मारुती सुझुकी चारचाकी शोरूमला भीषण आग*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *अमेरिकेत व्हर्जिनियातील चेसापीक येथील वॉलमार्ट स्टोअरमध्ये झालेल्या गोळीबारात 10 जणांचा मृत्यू*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *फिफामधील धक्कादायक निकालांचं सूत्र कायम, जपानचा जर्मनीवर 2-1 ने रोमहर्षक विजय*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••*The Magic herb-story👇**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/cG1cAIgbz-I~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        *सैनिक  :  देशाचा संरक्षक*भारतीय सैनिकाविषयी लिहिलेला लेख https://nasayeotikar.blogspot.com/2018/03/blog-post_26.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••📙 *निशाचर प्राणी कसे जगतात ?* 📙दिवसा दडुन विश्रांती घेणारे व रात्रीच्या वेळीच क्षुधाशमनाला बाहेर पडणारे प्राणी म्हणजे निशाचर प्राणी. यांची रात्रिचर्या हा एक जीवनाचा भागच असतो. त्यांची शरीररचनाही त्याला सोयीची असते. प्रकाशाशिवाय वावरता यायला मुख्यत: अन्य इंद्रियांचा सुलभ वापर आवश्यक असतो. नाकाने अगदी सूक्ष्मा गंधही ओळखणे, कानाला अतिदूरवरचे व जमिनीतून मिळणाऱ्या हादर्‍यातुन संदेश मिळणे किंवा तीक्ष्ण स्पर्शज्ञान असणे हे या प्राण्यांच्या बाबतीत विशेष आवश्यक ठरते.स्वतःचा जीव अन्य आक्रमकांपासून वाचवणे व निसर्गाचा समतोल राखणे या दृष्टीने ही रचना निसर्गानेच केली असावी. एखाद्या परिसरात सारे काही बारा तास चिडीचूप असावे, यापेक्षा रोज दिवसा काही प्राणी, तर रात्री निशाचर निसर्गात राबता ठेवतात. यामुळे पाणी, अन्न, वावरायला जागा या उपलब्धी आपोआपच दुभागल्या जाऊन सोयीच्या होतात.अनेक प्राण्यांना दिवसाचे चौदा तास झोप लागते; पण ही झोप फार सावध असते. जराशीही चाहूल लागली तरी कुत्रा व मांजर जसे कान टवकारते, तसाच हा प्रकार असतो. त्यामुळे ही झोपेची वेळ कधीची हा प्रश्न निशाचर प्राणी सहज सोडवतात. रात्रीचे आठ ते दहा तास त्यांचे उद्योग सलग चालतात.अनेक कीटक, सरपटणारे प्राणी, छोटे सस्तन प्राणी, अपृष्ठवंशीय प्राणी यांचा निशाचरांत समावेश होतो. पक्षी मात्र सहसा रात्री उडत नाहीत. खोल पाण्यातील मासे त्यांच्या हालचाली सोयीने करतच राहतात; पण सर्वसाधारण जलचर मात्र विश्रांती घेतात.घुबडे, वटवाघळे त्यांच्या चित्कारातुन मिळणाऱ्या परतीच्या संदेशातून सहजगत्या माहिती मिळवुन वावरतात. बिळात वास्तव्य करणारे प्राणी जमिनीतील ध्वनीच्या कंपनांद्वारे हालचाली करतात. काही प्राण्यांना असलेल्या लांबलचक मिशाही त्यांना उपयोगी पडतात. एखाद्या जागी आपला डोक्याचा शिरकाव होईल वा नाही, याचा नेमका अंदाज मिशांवरून त्यांना सहज येतो.निशाचर प्राण्यांमुळे जंगल कधी झोपले आहे, असे होतच नाही. भक्त ही हालचाल खजबज, खुसपूस, चित्कार या स्वरूपातच जाणवते.*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*          *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*" आयुष्य खडतर आहे, त्याची सवय करून घ्या - डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम "**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) अलीकडे नुकताच अचंता शरथ कमल यांना ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जाहीर झाला असून तो कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?२) सुभाषचंद्र बोस यांना 'देशनायक' म्हणून कोणी संबोधले ?३) बाळासाहेब ठाकरे यांचे टोपणनाव काय ?४) पाकिस्तानचे जनक कोण ?५) हिमाचल प्रदेशमध्ये नुकतेच बांधलेले जगातील सर्वात उंच मतदान केंद्र कोणते आहे ?*उत्तरे :-* १) टेबल टेनिस २) रविंद्रनाथ टागोर ३) हिंदुहृदयसम्राट ४) बॅरिस्टर जिना ५) ताशिगंग*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••● नागेश बबिलगेवार, किनवट● खंडू मोरे, नाशिक● नागेश सब्बनवार, कुंडलवाडी● चरण इंदूर● व्ही के पाटील● दत्तराम गडोड, धर्माबाद● अखिलेश जल्लोड● बालाजी दिवटे*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*     [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*'रियाज' म्हणजे आपल्यातील आपलाच शोध. या शोधातूनच कलावंताला आपल्या निर्मीतीचे कंद प्रतीत होतात. नव्या पायवाटांचे मागमूस कळतात. नव्या स्विकार-नकारांचे ध्वनी ऐकू येतात. नव्या प्रकाशाची किरणं मनाच्या आकाशात फाकू लागतात. सहस्त्ररश्मींचा मोरपिसारा मनामध्ये फुलून येतो. माणसाचं कवित्व रियाजानं अधिक प्रगल्भ आणि सहज सुलभ होतं. गाणं आधिक सकस आणि लयतत्व साकारत जातं.*         *'रियाज' आपल्यातील शक्यतांचा विस्तार नजरेत आणणारा विधी होय. आपल्या निर्मितीची किती क्षितीजं आपल्यासमोर उभा करतो तो. तो आनंदसोहळा होतो. हा आनंद हिंदोळ्यावर झोके घेतो. रसिकांच्या रसिकत्वाला आवाहन करीत राहतो. त्यांच्या चित्तवृत्ती पुलकित करीत राहतो. रियाजामुळे मनावर चढलेली पुटं नाहीशी होतात. ज्ञानेंद्रियांना अनेकविध चेतना मिळतात. त्या चेतनेने सारा भवताल 'चैतन्यपूर्ण' होतो.*                    🌹 *॥ रामकृष्णहरी  ॥* 🌹🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀      *श्री. संजय नलावडे, मुंबई*       *मोबाइल  - 9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••     *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••लेखक म्हणजे एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असणारा कलाकारच आहे.तो आपल्या बुध्दीने आणि लेखणीने सर्व कलाकारांना कला सादर करण्यासाठी प्रेरणा देतो.वाचक,नट, दिग्दर्शक,संगीतकार अशा कितीतरी लोकांना आपल्या लेखणीतून जसे पाहिजे तसे आविष्कार सादरीकरण करण्यासाठी त्यांना संधी आणि व्यासपीठ उपलब्ध करुन देतो.एवढेच नाही तर सर्व नवरसांचे केंद्र जर कुणाकडे असेल तर ते देखील लेखकाकडेच असते.म्हणून लेखक असणे आणि होणे म्हणजे ईश्वराच्या नंतरची जी भूमिका साकारणारी व्यक्ती असेल तर ती लेखन करणारी लेखक मंडळीच आहे.अशा चतुरस्त्र आणि अष्टपैलू  लेखकांना समाजामध्ये एक आगळेवेगळे स्थान आहे.© व्यंकटेश काटकर,नांदेडसंवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३📚✍🏻📚✍🏻📚✍🏻📚✍🏻📚✍🏻 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••             *एक छानशी कथा.....*एका प्रवासी बोटीला भर समुद्रात अपघात होतो. त्यावर एक जोडप प्रवास करत असत. ते दोघेही जीवरक्षक बोटीपाशी येतात.  त्यांना दिसत की बोटीत एकच जागा शिल्लक आहे. पती, पत्नीला बुडत्या बोटीवर मागे ठेउन जीवरक्षक बोटीत उडी मारतो. पत्नी बुडत्या बोटी वर थांबते. बोट पाण्याखाली जाण्याआधी ती पतीकड़े पाहून जीवाच्या आकांताने काही तरी ओरडून सांगते.शिक्षक गोष्ट सांगायचे थांबून विचारतात, पत्नी पतीला काय म्हणाली असेल?बहुतेक विद्यार्थी म्हणतात, 'मला तुम्ही धोका दिलात, मी तुम्हाला ओळखलेच नाही..!'एक मुलगा मात्र गप्पच असतो.शिक्षक त्याला विचारतात, "अरे, तुला काय वाटते ते पण सांग!"तो मुलगा म्हणतो, "गुरुजी, मला वाटत, त़ी म्हणाली असेल, मुलांना सांभाळा..!"शिक्षक चकित होउन विचारतात, "तुला ही गोष्ट माहीत आहे का?"तो नकारार्थी मान हलवतो आणि म्हणतो, "नाही गुरुजी, पण माझी आई वारली तेंव्हा शेवटच्या श्वासाला ती हेच म्हणाली होती!""तुझे उत्तर बरोबर आहे!"शिक्षक हलकेच म्हणाले.बोट बुडाली. पतीने घरी जाउन, मुलीला एकट्यानेच लहानाचे मोठे केल.खूप वर्षानंतर, वार्धक्याने त्या पतीला जेंव्हा मरण आले तेंव्हा, त्याच्या पश्चात राहिलेले सामान आवरत असताना, त्याच्या मुलीला एक डायरी सापडते.त्यातून असे समजते की तीच्या आईला आधीच दुर्धर आजार झालेला असतो आणि ती त्यातून वाचणार नसते. त्यामुळे पतीला स्वत: जीवंत रहाण्याव्यतिरिक्त दूसरा पर्यायच नसतो. त्या डायरीत पतीने पुढे लिहिलेले असते, "तुझ्या शेजारीच जलसमाधी घ्यायची माझी किती इच्छा होती. पण आपल्या मुलीसाठी मला तुला त्या सागराच्या तळाशी एकटीलाच कायमसाठी सोडून याव लागल!"ही गोष्ट आपल्याला सांगते की चांगल्या किंवा वाईट कृतीच्या पाठी, कधी कधी मोठी गुंतागुंत असते जी आपल्या सहज लक्षात येत नाही. त्यामुळे वरवर पाहून आपण कुणाहीबद्दल लगेच मत बनवून घेउ नये.जे मित्र आपली होटेलची बिलं भरतात, ते त्यांच्यापाशी खुप पैसा आहे म्हणून नव्हे, तर त्याना मित्र पैश्यापेक्षा अधिक प्रिय असतात म्हणून. जे कोणत्याही कामात पुढाकार घेतात, ते मुर्ख असतात म्हणून नव्हे तर त्याना त्यांची जबाबदारी कळते म्हणून.जे भांडल्यावर आधी क्षमा मागतात, त्यांची चुक असते म्हणून नव्हे,तर त्याना आपल्या माणसांची पर्वा असते म्हणून.जे तुम्हाला मदत करायला पुढे सरसावतात ते तुमचे काही देणे लागतात म्हणून नव्हे, तर ते तुम्हाला खरा मित्र मानतात म्हणुन...!*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दि. 23/11/2022 वार - बुधवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷   🎇 .  *दिनविशेष .  🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••💥 ठळक घडामोडी :- १९९२: आयबीएम सायमन हा पहिला स्मार्टफोन प्रकाशित करण्यात आला.१९९९: नागपूरचे संस्कृत महाकवी व संस्कृत पत्रकार डॉ. श्रीधर भास्कर वर्णेकर यांना या क्षेत्रातील कठोर तपश्चर्येबद्दल अप्पाशास्त्री राशिवडेकर पुरस्कार प्रदान.💥 जन्म :-१७५५: लॉर्डस क्रिकेट ग्राउंडचे संस्थापक थॉमस लॉर्ड१८८२: उद्योगपती वालचंद हिराचंद दोशी१८९७: साहित्य अकादमी पुरस्कार विजेते बंगाली/इंग्लिश लेखक निराद सी. चौधरी१९२३: लेखक नागनाथ संतराम तथा ना. सं. इनामदार💥 मृत्यू :- १९३७: नोबेल पारितोषिक विजेते भारतीय वनस्पतीशास्त्रज्ञ जगदीशचंद्र बोस१९५९ : अभिनेते व निर्माते नटवर्य चिंतामणराव कोल्हटकर२०१९ : दैनिक नवाकाळचे संपादक,'अग्रलेखांचे बादशाह' नीलकंठ खाडिलकर*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱  9604481084•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *खालावलेला शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी महाराष्ट्रातल्या शाळांमध्ये केरळ पॅटर्न राबवण्याची तयारी, सरकारकडून नवा प्रयोग करण्यात येणार. *•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऑनलाइन 'रोजगार मेळाव्यात' 71 हजार युवकांना नियुक्तीपत्रे देण्यात आली. सरकारी नोकरी देण्यासाठी सरकार मिशन मोडवर असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले.*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेण्यासाठी भारतीय लष्कर सज्ज असून सरकारने आदेश दिल्यानंतर कारवाई केली जाईल असं लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवदी यांनी म्हटलं आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *आता UPI पेमेंटवर निर्बंध येण्याची तयारी सुरु आहे. बँक व्यवहारा प्रमाणेच UPI पेमेंट मर्यादा घालण्याचा संबंधित रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाशी बोलणी सुरु आहेत.*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *17 हजार मुलांचं गोवर लसीकरण पूर्ण,आरोग्य विभागाची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *टीम इंडिया आणि न्युझीलंड यांच्यातील तिसरा टी20 सामना पावसामुळे बरोबरीत, टीम इंडियाने 1-0 ने जिंकली मालिका*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *फिफा विश्वचषक स्पर्धेत मोठा उलटफेर, मेस्सीचा अर्जेंटिना संघ सौदी अरेबियाकडून 2-1 ने पराभूत*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••*The sky is falling-story👇**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/wMNG3jvIugw~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  *स्मार्टफोनचा विळखा, वेळीच ओळखा*अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. पण कालांतराने या मूलभूत गरजामध्ये अजून कांही वस्तूची वाढ होत गेली त्यात प्रामुख्याने मोबाईलचा समावेश करणे अगत्याचे आहे. आज माणसाला एक वेळ अन्न, वस्त्र किंवा निवारा यांची कमतरता असेल तर चालून जाईल मात्र खिशात मोबाईल नसेल तर ती व्यक्ती जिवंत राहू शकत नाही, अशी परिस्थिती सर्वत्र निर्माण झाल्याचे............वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा.http://nasayeotikar.blogspot.com/2017/11/blog-post_22.html            लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       📙 *नागीण का होते ?* 📙तुमच्या घरात किंवा शेजारीपाजारी कोणालाही 'नागीण' झाल्याचे तुम्हाला समजले असेल, तेव्हा सुरुवातीला तुम्हाला आश्चर्य वाटले असेल. पण नंतर नागिन म्हणजे त्वचेवर येणारे विशिष्ट प्रकारचे पुरळ हे पाहिल्यावरच कळले असेल. कांजण्या हा रोग विषाणूंमुळे होतो. या विषाणूंसारख्या दुसर्या विषाणूंमुळे नागिन हा रोग होतो. कांजण्या होऊन गेल्यानंतर काही जणांच्या शरीरात हे विषाणू सुप्तावस्थेत राहतात व कित्येक वर्षांनी मज्जारज्जुतून एखाद्या नसेमार्फत त्वचेवर फोड निर्माण करतात. नागिनीची तीव्रता वयाबरोबर वाढते. मोठ्या वयात जास्त त्रास होतो. हे विषाणू मज्जापेशी व त्यांच्यामधून मज्जातंतुतुच्या रेषेवर वाढतात. आजाराची सुरुवात त्या मज्जातंतूंच्या मार्गावर खूप दुखणे सुरू होऊन होते. तीन चार दिवसांत तेथील त्वचेवर लालपणा येतो व पाठोपाठ पाण्याने भरलेले दुखरे फोड येतात. पाच सहा दिवस हे फोड वाळायला लागतात व खपली धरते. फोड गेले की दुखणे थांबते. काही वेळा सहा महिन्यांपर्यंत दुखरेपणा टिकतो. सामान्यतः बरगड्यांमधील नसांच्या रेषेवर फोड येतात. नागिन हा रोग त्रासदायक असला तरी सहसा फारसे गंभीर परिणाम होत नाहीत; पण डोळ्यात जर फोड आले तर मात्र दृष्टी जाऊ शकते. असायक्लोव्हीर या महागड्या औषधाने पुरळ लवकर बरे होते. पण आग होणे मात्र कमी होत नाही. एक गोष्ट लक्षात ठेवणे महत्त्वाचे ती म्हणजे इतर विषाणूजन्य रागांप्रमाणेच हाही रोग काही दिवसांत आपोआप बरा होतो. वेदना कमी होण्यासाठी ऍस्पिरिन, पॅरासिटेमॉल या औषधांचा वापर करता येतो. वेदना खूप दिवस होऊनही बंद न झाल्यास संबंधित नस मारून टाकतात. अर्थात यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेऊन त्यानुसार उपचार घ्यावे.*डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित*यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातूनमनोविकास प्रकाशन ०२० ६५२६२९५०*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*" जेव्हा कठीण परिश्रम केले जातात तेव्हा ते विजयाचे क्षण घेऊन येतात. "**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) जी - २० शिखर परिषदेचा अध्यक्ष म्हणून भारत केव्हापासून औपचारिकपणे अध्यक्षपद स्वीकारणार आहे ?२) टी - २० विश्वचषक २०२२ चा मालिकावीर किताब कोणी पटकावला ?३) बाळासाहेब ठाकरे कोण होते ?४) वनमहोत्सवाचे जनक कोण ?५) सूर्यप्रकाश पृथ्वीच्या किती भागावर पडतो ?*उत्तरे :-* १) १ डिसेंबर २०२२ २) सम कुरेन, इंग्लंड ३) व्यंगचित्रकार, शिवसेनेचे संस्थापक, हिंदुहृदसम्राट ४) के. एम. मुंशी ५) निम्म्या *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••👤 जुगलकिशोर बोरकर👤 सुनील बंडेवार, धर्माबाद👤 जगन्नाथ भगत👤 आदित्य खांडरे👤 कपिल दगडे*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*     [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*भारतभूमी संत-महंतानी, समाजसुधारकांनी पावन केली आहे. लोककल्याणासाठी चंदनासारखा देह झिजवत त्यांनी मानवता समृद्ध केली. काही अलौकिक प्रलोभनांमध्ये भोळ्याभाबड्या लोकांना अडकवून स्वत:ची वैभवी दुकानं थाटणं हे संतांचं ध्येय नसतं. त्यांच्या माणूसधर्माच्या शिकवणूकीचं आपल्याला मोल नसतं. संतांच्या जीवनात कुठलाच झगमगाट नसतो, चमत्कार नसतात. 'माणूस' घडवणं हेच त्यांचं ध्येय असतं. संतांना ना स्वत:ची जात असते, ना कोणता धर्म!  कुठल्या विशिष्ठ विचारांचा त्यांच्यावर पगडा नसतो. ते स्वत:च्या वाटेवरुन स्वतंत्रपणे चालत राहतात.**स्वर्ग-नरकाच्या जटील जाळ्यात संत अडकत नाहीत. कुणाला अडकवत नाहीत. जमिनीवरल्या सहज जगण्याचे व अंतरीच्या शाश्वत सुखाचे मंत्र ते देत राहतात. त्यांचं नातं केवळ सत्याशी असतं, सत्य कटू असतं. म्हणून आपण दगड मारतो सत्याच्या पुजा-यांना. यात संत असतात तसे वैज्ञानिक-विचारवंतही असतात. खरंतर या महामानवांच्या निमीत्तानं आपण सत्यालाच दगड मारत असतो. सत्याचा मार्ग गर्दीचा नसतो, पण खडतर असतो. म्हणूनच येशूला आपण क्रूसावर चढवलं. बुद्ध-महावीर यांना दगड मारले. एडिसनला मंदबुध्दी ठरवलं आणि गॅलिलिओला वेड्यात काढलं. विचारवंताना गोळ्या झाडणारेही आपणच. किती निष्ठुर आहोत आपण ! इमानाला सजा व दांभिकाची पूजा ! सत्याच्या मुखवट्यांना हार घालायचे, महानतेचे मुकुट चढवायचे ही आपली व्यवस्था, हे आपले करंटेपण.*             *॥ रामकृष्णहरी ॥*☀☀☀☀☀☀☀☀☀         *श्री. संजय नलावडे, मुंबई*       *मोबाइल- 9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्याकडे एक श्रद्धा अशी आहे की,घरात एखादा पाहुणा किंवा एखादी पाहुणी आली की,तुमच्या पायगुणाने आमचे खूप चांगले झाले आहे असे म्हणतो.हे कितपत योग्य आहे ? मला तरी ते मान्य नाही.जर असे काही होत असेल तर आपण रोजच पाहुण्यांना येण्याबद्दल आग्रहाचे निमंत्रण दिले असते.काहीच न करता असे जर होत असेल तर खुप काही आपण झालो असतो.विचार करायची गरज नाही,काम करायची गरज नाही किंवा प्रयत्नही करायची गरजही नाही.आपण चांगले विचार मनात आणले आणि मन लावून काम केले तर घरातही प्रसन्न वातावरण निर्माण होते.अशा परिस्थितीत बाहेरच्यांचे येणे हा निव्वळ योगायोग आहे असेच समजायचे.आपण आपल्या सद्सद्विवेक बुद्धीला विचारुन पाहिले तर ते आपल्याला खरेही वाटणार नाही.अशी श्रद्धा ठेवणे म्हणजे एक कल्पनाच आहे असे समजावे.ही डोळस श्रद्धा नसून एक अंधश्रद्धा समजावी.अशा प्रकारच्या कितीतरी श्रद्धा आहेत त्या आपण ज्ञानाच्या माध्यमातून,कर्तृत्वाच्या माध्यमातून आणि चांगल्या विचारांच्या माध्यमातून सिध्द करता येते.त्यासाठी ' केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे.' ह्याप्रमाणे जीवन जगायला शिकले पाहिजे.© व्यंकटेश काटकर,नांदेडसंवाद..९४२१८३९५९०.🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••              *आमचे चुकले*एकदा सानेगुरुजी रेल्वेने प्रवास करत होते. त्यांच्या शेजारचे प्रवासी शेंगा ,संत्री खात होते .टरफले, साली खाली टाकत होते. त्यांचे खाऊन झाल्यावर गुरुजी उठले. साली गोळा केल्या कागदात बांधून ठेवल्या. प्रवाशाला खंत वाटली नाही.आणखी  टरफले साली  गोळा केल्या. कागदात बांधून ठेवल्या गुरुजी आपल्या जागेवर बसले. शेंगा खाणारा प्रवाशांना खंत वाटली नाही. नंतर पुढच्या स्टेशनवर एक प्रवासी त्या डब्यात चढला. साने गुरुजींना पहातात त्यांनी वाकून नमस्कार केला. तेव्हा शेजारी ची प्रवासी मंडळी चमकली. त्यांनी चौकशी केली. चौकशी करतात सानेगुरुजी आहेत हे त्यांना कळले. ते सर्वच खजील झाले व म्हणाले गुरुजी आमचे चुकले क्षमा करा” गुरूजी  नम्रपणे म्हणाले “, मी कोण तुम्हाला क्षमा करणार? गाडीमध्ये आपण सर्वजण बसतो. प्रवास करतो गाडी स्वच्छ ठेवणे ही सर्वांची जबाबदारी आहे गाडी घाण होऊ नये म्हणून मी ती स्वच्छ केली. अशी गुरुजींची वृत्ती! आपल्या जीवनात कोणतीही काम कधीच हलके मानले नाही.*बोध: आपण कोठेही कचरा करु नये. आणि जर का झाला असेल तर  तर त्याला व्यवस्थितपणे टाकावे.  स्वच्छता ठेवणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे ,कर्तव्य आहे.आपली चूक आपण मान्य करावी आणि नंतर अशी चूक होणार नाही ही दक्षता घ्यावी.**संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दि. 21/11/2022 वार - सोमवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷  🎇 .  *दिनविशेष .  🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*महाराष्ट्र राज्य हुतात्मा दिन**जागतिक टेलिव्हिजन दिन*           💥 ठळक घडामोडी :- ● १९७१ - भारतीय वायु सैन्याची पाकिस्तानी सैन्याशी बांगलादेश मुक्ती युद्धांतील गरीबपुरच्या लढाईत पहिली चकमक. पाकिस्तानचा सपशेल पराभव.💥 जन्म :-● १६९४ - व्हॉल्तेर, फ्रेंच तत्त्वज्ञानी.● १८५४ - पोप बेनेडिक्ट पंधरावा.● १९१० - छ्यान चोंग्शू, चिनी भाषेमधील लेखक, अनुवादक.● १९४३ - लॅरी महान, अमेरिकन काउबॉय.● १९२७: नाटककार शं. ना. नवरे यांचा जन्म.💥 मृत्यू :- ● १८९९ - गॅरेट हॉबार्ट, अमेरिकेचा उपराष्ट्राध्यक्ष.● १९७० - सर सी.व्ही. रमण, भारतीय शास्त्रज्ञ.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱  9604481084•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *अरुणाचल प्रदेशातील पहिले ग्रीनफिल्ड विमानतळ ‘डोनी पोलो एअरपोर्ट, इटानगर’ चे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सुरु केलेल्या भारत जोडो यात्रा राज्यातील 14 दिवसांचा प्रवास पूर्ण करत पोहोचला मध्य प्रदेशात.*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *मुंबईत सीटबेल्ट सक्तीची अंमलबजावणी, 15 नोव्हेंबरपासून कारवाई सुरु. दोन वेळा मुदतवाढ, आता कारवाईला सुरुवात*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *गोव्यात 'इफ्फी' आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सुरुवात ;  आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मराठी सिनेमांचा डंका !*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *टार्गेट होण्याच्या भीतीने जिल्हा न्यायाधीश जामीन देण्यास टाळाटाळ करतात; देशाचे सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांची जाहीर खंत*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *राज्यात थंडीचा जोर वाढला, विविध जिल्ह्यात तापमानात घट तर परभणीत मोसमातील निचांकी तापमानाची नोंद*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *आधी सूर्यकुमारचं शतक, मग दीपक हुडाच्या 4 विकेट्स, भारताचा न्यूझीलंडवर 65 धावांनी विजय*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••*शिक्षण पर्व2022 ज्ञानरचनावादी अध्यापन👇**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/BzJxJ9peKwk~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••               *प्रसिध्दीचे वलय*      माणसांच्या जीवनात प्रसिद्धी खूप महत्वाचा भाग आहे. प्रत्येकांना वाटतं की आपण प्रसिद्ध व्हावं. त्यासाठी नाना प्रकारचे कार्य केल्या जाते. आपण ज्या क्षेत्रात काम करतो त्या क्षेत्रात सर्वोत्कृष्ट ठरावे, यासाठी प्रत्येकाची धडपड चालू असते. पण काही लोकं समाजात असे ही आढळून येतात की, ते प्रसिद्धीपासून चार हात दूर राहतात. तरी देखील ते एक ना एक दिवस प्रसिद्धीस येतात. कारण त्यांच्यामध्ये ती प्रतिभा असते. ......... लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लीक करावेhttp://tiny.cc/xnukgzलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  📙 *पोटात उठणे म्हणजे काय ?* 📙पोट फुगणे, दम लागणे वा पोट जास्त वेळा वर खाली होणे, या सर्वांनाच खेड्यात 'पोटात उठणे' असे म्हणतात. मग गंडेदोरे, मंत्रतंत्र, पोटावर डागणे असे अनेक उपाय केले जातात. अर्थात यांचा काहीही उपयोग होत नाही. पोटात का उठते याची अनेक कारणे आहेत. 'ड' जीवनसत्वाच्या अभावाने मुडदूस नावाचा रोग होतो. यात हातापायाच्या काड्या व पोटाचा नगारा होतो. पोटात जंत असले व यकृताचा आकार मलेरिया सारख्या रोगाने वाढलेला असल्यास पोट फुगते. दमा झाल्यास श्वासाची गती वाढते व पोट जास्त वेळा वर खाली होते. न्युमोनियामध्येही श्वासाचा दर खूप वाढून पोट जास्त प्रमाणात व वर खाली होते. पोटातील मूत्रपिंड, आतडे यांचा कर्करोग झाल्यास आतड्यांमध्ये अडथळा येऊन अन्न पाणी अडकून पडल्यास किंवा अांत्रपुच्छाचा दाह होऊन सूज आल्यास पोट फुगते. मुत्रपिंडाच्या रोगांमध्ये व पोटाच्या आतील आवरणात पाणी साठल्याने ही पोट फुगते. पोट फुगण्याची अशी अनेक कारणे आहेत. त्यामुळे नेमक्या कोणत्या कारणाने असे होत आहे हे ओळखून त्यावर उपचार करणे अगत्याचे ठरते. तरच पोटात उठणे कमी होऊ शकते. अन्यथा नाही.*डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित* यांच्या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*" अंधाराची कारस्थाने रोज घडतात, तरीही रोज सकाळी प्रकाशाचा विजय होतो. "*   *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) फिफा फुटबॉल विश्वचषक २०२२ ही स्पर्धा कोणत्या देशात आयोजित करण्यात आली आहे ?२) टी - २० विश्वचषक २०२२ मध्ये सर्वाधिक धावा कोणी पटकावल्या ?३) भारतात बनविलेल्या पहिल्या क्रुझचे नाव काय ?४) भारतीय सनदी सेवेचे जनक कोणत्या गव्हर्नर जनरल म्हणतात ?५) बिरसा मुंडा यांच्या आई - वडिलाचे नाव काय होते ?*उत्तरे :-* १) कतार २) विराट कोहली, भारत ( २९६ धावा ) ३) गंगा विलास क्रुझ ४) लॉर्ड कॉर्नवॉलिस ५) सुगना व करी *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••👤 प्रशांत शास्त्री, सेवानिवृत्त बँक अधिकारी👤 आबासाहेब विश्वनाथ पाटील, धर्माबाद👤 इलियास बावानी, पत्रकार, माहूर👤 विठ्ठल शिंदे👤 शुभम सुर्या पाटील👤 गंगाधर धुळेकर👤 माधव हर्ष👤 संगीताताई देशमुख, नांदेड👤 सोनू कुलकर्णी*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*     [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*हातात काय आहे? बरेचसे तर हाताबाहेरचे आहे. जन्म-मरण हातात नाही. पुढचा क्षण कसा असावा, ते हातात नाही. भूतकाळ मागे सुटलेला, असल्याच तर ब-या-वाईट आठवणी. भविष्याच्या गर्भात काय दडले, माहित नाही. त्यामुळे त्याची उत्सुकता आणि त्याच्या अनिश्चिततेतून वाटणारी असुरक्षितता. भविष्यातील असुरक्षिततेवर मात करण्यासाठी भविष्याविषयीचे स्वप्नरंजन करणे किंवा कल्पनेचे मनोरे बांधणे हाच काय तो उतारा. हाही उतारा कधी क्षणात उधळला जातो आणि कल्पनेचे मनोरे जमीनदोस्त होऊन जातात आणि उरते ती अगतिकता आणि असहायता.**थोडाफार हातात म्हटल्यापेक्षा चिमटीत आहे तो आताचा वर्तमानातील क्षण. तोही क्षण चिमटीत आहे म्हणता म्हणता निसटतो आणि भूतकाळाच्या शवागारात जमा होतो. वर्तमान हातात असतो, तेव्हा आपण ब-याच वेळा भूतकाळात रममाण असतो. नाहीतर भविष्यातील स्वप्नरंजनात दंग असतो. त्यामुळे हातात असलेला क्षण तसाच सटकून निसटून जातो. क्षणाक्षणाला प्रवाही असलेला क्षण जगता आला पाहिजे. तोच क्षण माझा; ना भूतकाळ माझा. तो तर मेलेला. ना भविष्य माझे; ते तर स्वप्न. आहे ते वर्तमान. यात जगता आले तरच ते जगणे. यासारखी नितांत सुंदर गोष्ट नाही.*            *॥  रामकृष्णहरी ॥*🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿         *श्री संजय नलावडे, मुंबई*      *मोबाइल- 9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••प्रत्येकजण आपल्या जीवनाबद्दल काही ना काही बोलत असतो.जेव्हा तो बोलत असतो तेव्हा त्याच्या जीवनात नव्वद टक्के नकारात्मक भूमिका असते.या जीवनात असे जीवन जगण्यात काय अर्थ आहे ? त्यापेक्षा न दिलेलेच बरे.आता जीवन जगणे असह्य आहे.असा जेव्हा विचार करतात त्यांनी जगण्याला आत्मविश्वास गमावलेला असतो.कोणतीही कृती न करता किंवा हातपाय न हलवता जीवन कसे सुखी बनेल ? हा विचार कधीच ते विसरुन बसले असणार आणि त्यामुळेच त्यांच्या जीवनात सदैव नैराश्याचे डोळ्यांसमोर काळे ढग दिसतात.अशी माणसे स्वत:ही जीवनाचा आनंद घेत नाहीत आणि इतरांच्या जीवनातला आनंदही त्यांना पाहवत नाही.अशा नैराश्ययुक्त व नकारात्मक विचार करणा-या माणसांनी थोडी डोळसपणे दुस-याच्या आनंदाने जीवन जगणाऱ्या माणसाकडे थोडा विचार करून पहायला हवे.त्यांची आत्मविश्वासाने व कृतीयुक्त शैलीने व आपल्यासमोर कितीही आणि कोणताही कठीण प्रसंग असो तो हसत हसत सामोरे जाऊन कसे जीवन जगतात याचे थोडे सूक्ष्म निरीक्षण करायला हवे.तसेच त्यांच्या जगण्याची जीवनशैली कशी आणि आपली जगण्याची जीवनशैली कशी हा प्रश्न स्वत:ला विचारुन पाहिला तर नक्कीच कळेल की,आपल्यामध्येच खरी त्रुटी आहे.आपणही त्यांच्यासारखे जीवन जगायला हवे.इतरांच्या जगण्यापेक्षा आपणही चांगले जीवन आपल्या कर्तृत्वाने, आत्मविश्वासाने जगू शकतो अशी शिकवण मिळाल्याशिवाय राहत नाही.नक्कीच चांगले बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न करेल.मग तो नैराश्यमय जीवन जगणारे नाही अशी प्रेरणा घेऊन व कर्तृत्ववान लोकांचे नक्कीच चांगले जीवन जगण्यासाठी प्रेरणा मिळेल.मग तोच जगाला जीवन कसे जगायचे याचे ज्ञान देण्यासाठी तयार होई.म्हणून इतरांच्या लोकांचे चांगले अनुकरण घ्यायला काय हरकत असा सकारात्मक विचार निर्माण झाल्याशिवाय राहत नाही.© व्यंकटेश काटकर,नांदेड.संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३.🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••            *ज्वारीचे तीन पोते.*ही तीन भावाची  कथा आहे. तिघेही भाऊ प्रेमाने राहायचे. तिघेही चतुर ,हुशार व इमानदार होते. मोठा  भाऊ किराणा दुकान मध्ये काम करायचा. सगळ्यात छोटा भावाने आता फक्त शिक्षण पूर्ण केलं होतं. आणि तिसरा भाऊ पुजारी होता. त्यांच्या बाबाचा मृत्यू झाला होता . एक दिवस त्यांच्या बाबाचे मित्र त्यांच्या घरी आले. ते त्या तिघांचाही आईला म्हणाले, “माझ्या मुलीचे लग्नाचे वय झाले आहे. मला एक छान मुलगा हवा जो माझ्या  मुलीला चांगले ठेवण व माझ्या कामाला मदत चांगली करेन.मला तुमचे तिन्ही मुलं चांगले वाटते. म्हणून मी तुमच्या तिनही  मुलाची परीक्षा घेणार आहे.” त्यांनी पूर्णपणे परीक्षा चा विचार करून निर्णय  घेतला. नंतर च्या दिवशी, त्यांनी सगळ्यांना एक एक ज्वारी चे पोते दिले. आणी म्हणाले, “मी काही  कामासाठी बाहेरगावी  चाललो. मी दोन-तीन महिन्यांनी येणार. आणि मी बघणार तुम्ही या त्याचे काय केले. नंतर दोन-तीन महिने झाले तरीपण मित्र वापस नाही आला. कमीत कमी एक दीड वर्ष गेले. मग ते परत आले. ते सगळ्यात पहिले पहिल्या भावाजवळ गेले. पहिला  भाऊ म्हणाला , “या मी तुमचे स्वागत करत आहे. तुम्हाला आठवण आहे तुम्ही मला दीड वर्षाखाली एक ज्वारीचे पोते दिले होते मी त्या पोत्याला माझ्या दुकान मध्ये विकून टाकले. हे घ्या त्याचे पैसे”. त्याच्यानंतर मित्र दुसऱ्या भावाजवळ गेले. तो म्हणाला “, मी एक पुजारी आहे. माझ्या मंदिरामध्ये खूप सारे गरीब आले होते मी त्यांना ती ज्वारी त्यांच्यात वाटली . आणि मला हे खात्री आहे की त्याचा आशीर्वाद तुम्हालाच भेटेन.” मित्र सगळ्यात शेवटी तिसऱ्या भाऊ कडे गेले. तो भाऊ म्हणाला “, तुम्हाला आठवण आहे तुम्ही मला दीड वर्षाखाली एक ज्वारीचं पोत दिलं होतं. माझ्या शेजारच्या येथे शेत आहे. मी त्याच्या घरी गेलो. त्याला विनंती केली की मी तुमचं अर्ध शेत वाहू  शकतो का? तो म्हणाला, “हो”. मि त्या अर्ध्या शेतात एका पोत्याच्या ज्वारीचे 25 पोते बनवले. त्याच्यातले 25 पैकी 5 पोते मी त्यांना विकले.” “हे घ्या पैसे आणि ही 20 पोते”.आता तुम्हाला तर माहीतच असेल की मित्राने आपला कोणता  जावई निवडला असेन? अर्थातच  तिसरा भाऊ.बोध: मेहनतीचे फळ कधी पण गोडच असते.विचार करून केलेल्या कार्याचे सुयोग्य सुयश नक्कीच  दडलेले असते.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दि. 19/11/2022 वार - शनिवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷   🎇 .  *दिनविशेष .  🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*जागतिक शौचालय दिन**आंतरराष्ट्रीय पुरूष दिन**महिला उद्योजकता दिन**राष्ट्रीय एकात्मता दिन*💥 ठळक घडामोडी :- ● १९६९ - अपोलो १२तून चांद्रमोहिमेवर गेलेल्या पीट कॉन्राड आणि आणि ऍलन बीनचे चंद्रावतरण.● १९९८ - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटनवर महाभियोग सुरू.💥 जन्म :-● १८२८ - मणिकर्णिका तांबे तथा राणी लक्ष्मीबाई.● १९१७ - इंदिरा गांधी, भारतीय पंतप्रधान.● १९७५-सुष्मीता सेन ,अभिनेत्री● १९२८- दारा सिंग ,मुष्टियोद्धदा व अभिनेता💥 मृत्यू :-● १९३१ - शू चीमो, चिनी भाषेमधील कवी.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱  9604481084•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *महाराष्ट्रातील भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणातील आरोपी गौतम नवलखा यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, गौतम नवलखा यांना 24 तासांत घरात नजरकैदेत पाठवण्याचे दिले आदेश.*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *देशातील पहिले खासगी रॉकेट 'विक्रम एस'चे यशस्वी उड्डाण, या रॉकेटचे विक्रम हे नाव भारतीय अंतराळ संशोधनाचे जनक डॉ. विक्रम साराभाई यांच्या नावावरुन देण्यात आलं आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन विधेयकाचा मसुदा जारी, 500 कोटी रुपयांच्या दंडाची तरतूद*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *भारताला 2028-29 पर्यंत 5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवायची असेल, तर त्यासाठी पुढील पाच वर्षे सतत 9 टक्के दराने GDP वाढवावा लागेल, असं रिझव्‍‌र्ह बँकेचे माजी गव्हर्नर म्हणाले*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *ईडीचे संचालक संजय कुमार मिश्रांचा एका वर्षाने कार्यकाल वाढवला, 18 नोव्हेंबर 2023 पर्यंत मुदतवाढ*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *कोरोना काळातील निर्बंध हटवल्यानंतर शिर्डीच्या साईचरणी भरभरुन दान, वर्षभरात 398 कोटी रुपये अर्पण*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *न्यूझीलंड वि. भारताचा पहिला टी-२० सामना पावसामुळे झाला रद्द*••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••जागतिक शौचालय दिनानिमित्त प्रासंगिक लेख*मोबाईल महत्वाचे की शौचालय*जगभरातील सुमारे एक अब्ज जनता आज ही उघड्यावर शौचास जाते आणि भारत देश यात अव्वलस्थानी असल्याचे मत संयुक्त राष्ट्राच्या तज्ञानी पिण्याचे पाणी व स्वच्छतेसंबंधीच्या एका अभ्यासाचा शुभारंभ करताना नुकतेच व्यक्त केले आहे. उघड्यावर मलमूत्र विसर्जन करण्याच्या बाबतीत.........पूर्ण लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावेhttps://nasayeotikar.blogspot.com/2017/11/blog-post_49.html?m=1            लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   📙 *फेफरे किंवा फीट येणे* 📙   *****************************एखाद्या शाळेचा वर्ग चालू असतो किंवा मैदानावर खेळाचा तास चाललेला असताना एखादा मुलगा बघता बघता उभ्याचा आडवा पडतो. नुसता तो आडवाच पडतो असे नव्हे तर त्याच्या तोंडातून फेस येतो, तो डोळे फिरवतो, क्वचित दातखीळ बसते व त्याच वेळी त्याचे हातपायपण पिळवटले जातात, ताठ होतात. काही वेळा त्याची बेशुद्धी काही क्षणच टिकते, तर काही वेळा विशेष औषधोपचार करून त्याला शुद्धीवर आणायला लागते. यालाच फेफरे येणे, फिट येणे असे म्हणतात. एपिलेप्टिक सीझर असे या आजाराचे स्वरूप सांगितले जाते; पण वस्तुतः हा आजार नव्हे, तर ही एक शारीरिक स्थिती आहे. मेंदूचे कामकाज चालू असताना तेथे सतत विद्युत संवेदना निर्माण होऊन शरीरभर पाठविल्या जात असतात. या संवेदनांच्या स्वरूपात तीव्र बदल झाल्यास फेफरे येते. फेफरे येण्याच्या काळात मेंदूच्या कामाचा आलेख (Electro-Encephalo Graph) काढला, तर त्यावरून ही स्थिती नीट समजते.एखाद्याला फेफरे येते म्हणून त्याच्या आयुष्यातील अन्य गोष्टींवर काही विपरीत परिणाम झालेला असतोच, असे मात्र नाही. काही वेळा याउलट मात्र असू शकते. मेंदूच्या गंभीर आजाराचे दृश्य स्वरूप म्हणून प्रथम फेफरे येणे ही स्थिती उद्भवलेली आढळून येते. उदाहरणार्थ मेंदूमध्ये उद्भवणाऱ्या कॅन्सरमध्ये, ब्रेनट्युमरमध्ये फेफरे ही पहिली तक्रार असू शकते.फेफरे येते, त्यावेळी अशा माणसाभोवती गर्दी न करता त्याला आहे तेथेच नीट कुशीवर वळवून झोपवावे. मान मागे करावी म्हणजे श्वास घ्यायला अडचण होत नाही. घशात लाळ साचून अडथळा येत नाही. दातखीळ बसत आहे. असे वाटल्यास एखादी लाकडी वस्तू दातात धरायला द्यावी व दोन दातांमध्ये ठेवावी. त्यांचे कपडे, पट्टा सैल करावा. त्याला कधीही पाणी पाजण्याचा प्रयत्न करू नये. बहुधा काही मिनिटांतच फेफरे जाते. त्यामुळे तात्काळ धावपळ करून डॉक्टर गाठण्याची गरज पडत नाही.फेफरे येण्यावर अलीकडे चांगली औषधे उपलब्ध असून या स्थितीवर खुपसे नियंत्रण मिळवण्यात यश मिळत आहे. सामान्यपणे लोकसंख्येच्या एक टक्क्यापेक्षा थोड्या कमी लोकांत हा प्रकार आढळतो. वाहन चालवणे, विस्तवाजवळ वा धोक्याच्या जागी काम करणे व पोहणे या गोष्टी मात्र फेफरे येणाऱ्यांनी कायम टाळाव्यात; कारण या तिन्हींमध्ये त्यांच्या जीवाला धोका उद्भवतो.*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*" संकटं तुमच्यातली शक्ती, जिद्द पाहण्यासाठीच येत असतात. "**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) डॉ. सलीम अली यांचे पूर्ण नाव काय ?२) जगाची एकूण लोकसंख्या किती आहे ?३) बिरसा मुंडा यांची समाधी कोठे आहे ?४) भारतीय उद्योगाचे जनक कोण ?५) हत्तीरोग ( हत्तीपाय रोग ) कोणता डास चावल्याने होतो ?*उत्तरे :-* १) सलीम मोईझुद्दीन अली २) ८ अब्ज ३) डिस्टिलरी पुल, रांची ४) जमशेदजी टाटा ५) क्युलेक्स *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••👤 सिध्देश घोले, माणगाव जि. रायगड👤 डॉ. विनायक माराले👤 संजय येरणे👤 श्वेता नरसुडे👤 कैलास पाटील खरबाळे👤 वैभव धुप्पे*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*     [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *सारा अंधारच प्यावा*       *अशी लागावी तहान ॥*        *एका साध्या सत्यासाठी*       *देता यावे पंचप्राण ॥**असं जगावेगळ पसायदान कवी म.म.देशपांडे यांनी 'तहान' या कवितेत मागितलं आहे. त्याचं तीव्रतेने स्मरण व्हावं अशी परिस्थिती आज आपल्या देशात आहे. कोणत्याही क्षेत्राकडे जा सारा अंधार आहे. अपवाद वगळले तर वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवनातून सत्य हद्दपार झालेलं आहे. असत्याच्या अंधारात संवेदनशील मनाची घुसमट होत आहे. 'सत्यमेव जयते' ही या देशाची घोषमुद्रा आहे. तथापि समाजाचं, देशाचं नेतृत्व करणा-यांपासून तर रूग्णांची सेवा करण्याची शपथ घेतलेल्या डाॅक्टरांपर्यत सर्वांनी तिचे पदोपदी धिंडवडे काढले आहेत. सर्वच क्षेत्रात असत्यानं, अप्रमाणिक वृत्तीनं थैमान घातलं आहे. स्वातंत्र्योत्तर काळात भारतमातेची दु:स्थिती आधिकच चिंतनीय झाली आहे. 'सत्य हे जीवनमूल्य लोप पावत आहे. 'असत्य' उजळ माथ्यानं वावरत आहे.**खरंतर सत्य, सत्याचा शोध, सत्याचा उद्धार आणि आचरण, सत्याचा पुरस्कार याला वैभवशाली परंपरा आहे. भीष्मनिती सांगते, 'सत्य हे प्रत्येक माणसाचं कर्तव्य आहे. माणसाचा सर्वश्रेष्ठ आधार आहे. शाश्वत कर्तव्य आहे. आसक्तीचं जाळ फक्त सत्यच तोडू शकतं. सत्य म्हणजेच अमरत्व. सत्यासाठी केलेला त्याग मानवी जीवनात सर्वश्रेष्ठ आनंदाचा उगम असतो. सदाचरणी माणूसच इतरांच्या हितासाठी दक्ष असतो आणि या मार्गानंच त्याचं स्वत:चही हित साधलं जातं. सत्यासारखं तप, पुण्य नाही. असत्यासारखं पाप नाही. ज्याच्या ह्रदयात सत्य असतं त्याच्या ह्रदयात परमशक्ती वास करते.*             *॥ रामकृष्णहरी ॥* 🔆🔆🔆🔆🔆🔆🔆🔆🔆          *श्री. संजय नलावडे, मुंबई*       *मोबाइल  - 9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••वर्तमान स्थितीमध्ये आपण कोणत्याही छोट्या छोट्या  गोष्टीसाठी खूप विचार करतो.हे माझ्या हातून पूर्ण होईल का ? पूर्ण होईल का असा जेव्हा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो तेव्हा नक्कीच समजून घ्यायचे की,आपला आत्मविश्वास डळमळीत झाला आहे.हा आत्मविश्वास जर आपल्याला मजबूत किंवा ठाम ठेवायचा असेल तर आपल्या मनाची कामातली एकाग्रता सातत्याने ठेवायला हवी.सद्यस्थितीत मला हे काम पूर्ण करायचे आहे आणि ते करावेच लागणार त्यांच्याशिवाय दुसरा पर्यायच नाही अशी मनाची धारणा ठेवली आणि काम केले तर नक्कीच तुमचे काम पूर्ण होईल.त्या कामातून आलेले यश हे तुमच्या पुढच्या कामासाठी आणि पूर्णतेसाठी शुभसंकेत आहेत.त्यामुळे अजून पुन्हा जोमाने काम करण्यासाठी प्रेरणा मिळते.मग ते वर्तमानातील असो की भविष्यातील असो.तुमचा आत्मविश्वास आणि तुमच्या कामातील सातत्य हेच तुमच्या यशाचे खरे रहस्य आहे.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३.🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••      *अपमान आणि उपकार*एकदा दोन मित्र वाळवंटातून चाललेले असतात, रस्त्यात त्यांच्यात काहीतरी बाचाबाची होते आणि बाचाबाचीचे रुपांतर भांडणात होते. इतके कडाक्याचे भांडण होते कि एक मित्र दुसऱ्या मित्राच्या थोबाडीत ठेवून देतो. ज्याला थोबाडीत बसते तो दुसरा मित्र खूप दुःखी होतो, गप्प बसतो आणि वाळूमध्ये बोटाने लिहितो," आज माझ्या प्राणप्रिय मित्राने मला थोबाडीत दिली, ज्याला मी जीवापाड मैत्री करतो त्याने मला आज मारले." ज्याने थोबाडीत मारलेली असते तो हे पाहतो पण काहीच न बोलता दोघेही पुढे चालत राहतात. पुढे गेल्यावर त्यांना एक तलाव दिसतो, दोघेही जण पाण्यात उतरून स्नान करायचे ठरवतात, अंघोळ करता करता थोबाडीत खाल्लेला मित्र अचानक पाण्यात घसरतो, तिथे नेमकी दलदल असते, तो जोरजोराने ओरडायला सुरुवात करतो. ज्याने थोबाडीत मारलेली असते तो मित्र क्षणाचाही विचार न करता आपल्या मित्राच्या सहाय्याला धावतो आणि त्याला त्या दलदलीतून बाहेर ओढून काढतो. जेंव्हा तो बुडणारा मित्र पाण्याबाहेर येतो, अंग कोरडे करतो तेंव्हा तो एका दगडाने दगडावर कोरून लिहितो,"आज माझ्या प्राणप्रिय मित्राने मला मरणाच्या दारातून ओढून परत आणले, मी आज मेलोच असतो पण त्याने स्वतःचा जीव धोक्यात घालून मला वाचविले." हे पण तो थोबाडीत देणारा वाचतो आणि त्याला राहवत नाही तो त्या मित्राला विचारतो कि,"पहिले मी तुला मारले तर ते तू वाळूत लिहिले आणि आता तुला पाण्यातून वाचविले तर ते तू दगडावर कोरून लिहिले हे असे का?" लिहिणारा मित्र म्हणाला," जेंव्हा कोणी आपल्या हृदयाला, मनाला, भावनेला ठेच लावेल तेंव्हा ते सर्व काही वाळूत लिहावे कारण काही काळानंतर वाळू हि विस्कळीत होऊन जाते आणि मनातील भावनाही फार काळ एकसारख्या राहत नाहीत. पण जर कुणी उपकार केले तर ते मात्र दगडावर कोरून लिहिले कारण दगडावर कोरलेले जसे कायमस्वरूपी टिकून राहते तसे उपकार हे कायम लक्षात ठेवले जावेत.तात्पर्य :-"माणसाने अपमान तत्काळ विसरून जावा आणि उपकार आजन्म लक्षात ठेवावे."*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दि. 16/11/2022 वार - बुधवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷   🎇 .  *दिनविशेष .  🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••            *जागतिक सहनशीलता दिवस*     *राष्ट्रीय पत्रकार दिवस*💥 ठळक घडामोडी :- ● २०१३- क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांची क्रिकेट मधून निवृत्ती .💥 जन्म :-● १९६३-मिनाक्षी शेषाद्री,अभिनेत्री● १९७३-पुलेंल्ला गोपीचंद,बॅडमिंटनपटू● १९२२ - जीन ऍमडाल, अमेरिकन संगणकशास्त्रज्ञ.● १९४० - क्रिस बाल्डरस्टोन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.● १९७१ - वकार युनिस, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.💥 मृत्यू :-● १२७२ - हेन्री तिसरा, इंग्लंडचा राजा.● २००६ - मिल्टन फ्रीडमन, अमेरिकन अर्थतज्ञ.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱  9604481084•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *जी -20 संमलेनच्या व्यासपीठावर पंतप्रधान मोदी, जगभरातील 10 नेत्यांची भेट घेणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *गुजरात निवडणुकीसाठी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर, अशोक चव्हाणांसह महाराष्ट्रातील चौघांचा समावेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *वाहन चालक आणि गट ड वर्गातील पदे वगळून इतर पदे भरण्यास मंजुरी देण्यात आली असून ही पदभरती जिल्हा निवड मंडळ तसेच जिल्हा परिषद अंतर्गत होणार आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांचे निकटवर्तीय गणेश गुप्ता आणि त्यांच्या पत्नी आभा गुप्ता यांच्या संबंधित जवळपास 30 ठिकाणी आयकर विभागाने छापे टाकले आहेत.*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *गोवर संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना करा, मुख्यमंत्र्यांचे बीएमसीला निर्देश*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *शेतात राबणाऱ्या मराठमोळ्या अविनाश साबळेच्या कष्टांना यश, राष्ट्रीय अर्जुन पुरस्कराने होणार सन्मान*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का, निवडणूक आयोगाविरुद्धची याचिका फेटाळली, दिल्ली हायकोर्टाचा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*चांगला माणूस ....*पूर्ण लेख खलील लिंक वर वाचता येईलhttp://nasayeotikar.blogspot.com/2021/05/good-man.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••📙 *'निऑन साइन्स' म्हणजे काय ?* 📙निआॅन म्हणजे नवीन. हा मूळ ग्रीक शब्द आहे. निआॅन, अरगॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, रेडॉन हे अगदी विरळ अवस्थेत असलेले वायु सुमारे १८९४ ते १९०० सालांदरम्यान ज्ञात होत गेले. यातील निआॅनचा वापर सर्वप्रथम केला जाऊन लाल रंगाची चमकदार निऑन चिन्हे वा निऑनसाइन्स बनवली गेली. निर्वात काचेच्या पोकळीत निऑन वायू कमी दाबाने भरला जाऊन त्यातुन विद्युतभार पाठवला असता हा वायू चमकदार लाल प्रकाश बाहेर टाकतो. या प्रकाराचा वापर केला जाऊन अत्यंत आकर्षक निआॅन चिन्हांचा वापर जगभर सुरू झाला. नंतर हे अन्य वायू वापरले असता इतर काही रंगांचा प्रकाश मिळू शकतो. हेही लक्षात आले. पण या प्रकारच्या चिन्हांचे नाव मात्र तेच कायम राहिले. या सर्व प्रकारच्या चिन्हांना निआॅन साइन्स म्हणूनच ओळखतात.निअाॅन साइन्सचा प्रकाश हा धुक्यातुनही लक्षात येतो. या गुणामुळे त्याचा फार मोठा व्यावहारिक उपयोग विमानतळावरील दिव्यांसाठी केला जातो. विमानांना मार्गदर्शक म्हणून हे दिवे वापरले जातात. धुक्यामध्ये विमाने हरवण्याचा धोका त्यामुळे टळतो.या विविध वायूंचे मिश्रण अनेक प्रकारे वापरले जाते. क्रिप्टॉन व अरगाॅनचे मिश्रण वापरले असता हिरवट पिवळा प्रकाश मिळतो. प्रकाशमान उजेडासाठी वापरल्या जाणाऱ्या अनेक फ्लुअोरेसंट दिव्यांत हे मिश्रण वापरतात. मात्र हल्ली डिस्प्लेबोर्डसाठी एलईडीचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. या सर्व वायूंना ना वास, ना रंग, ना चन. यांना काही जण 'नोबेल गॅसेस' असेही म्हणतात. यांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक वायू रेणूस्वरूपातच वातावरणात आढळतो. मोजक्याच वायूंबरोबर यांची संयुगे बनू शकतात. अन्य अनेक मुलद्रव्यांशी यांचा संयोग होऊ शकत नाही. यामुळे एखाद्या रासायनिकदृष्ट्या अस्थिर वस्तूभोवती अन्य कशाचा संबंध टाळण्यासाठी यांचे आच्छादन घालण्याची पद्धत वापरली जाते. या आच्छादनाखाली (ब्लॅंकेट) मूळ पदार्थ पाहिजे तसा जतनही करता येतो.अरगाॅन व नायट्रोजनचे मिश्रण विजेच्या दिव्यांमध्ये वापरले जाते. यामुळे दिव्यांचे आयुष्य वाढते. झेनाॅनचा वापर मुख्यतः फोटो काढायला वापरल्या जाणाऱ्या फ्लॅशबल्बमध्ये केला जातो. दूरवर प्रकाश टाकणाऱ्या झोतांसाठी (सर्चलाईट) झेनाॅनचा वापर केला जातो. काही संशोधनांमध्ये अणुसमुच्चय निरीक्षणातही झेनाॅनचा वापर करतात.*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*         *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*" अन्नाचा कण आणि आनंदाचा क्षण कधी ही वाया घालवू नये "**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) ९६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून कोणाची एकमताने निवड झाली ? २) 'आदिवासी बिरसा' किंवा 'धरती बाबा' असे कोणाला ओळखले जाते ?३) कामगार चळवळीचे जनक कोणाला म्हटले जाते ?४) २०२२ चा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे ?५) टी - २० विश्वचषक २०२२ चा विजेता संघ/देश कोणता ?*उत्तरे :-* १) माजी न्या. नरेंद्र चपळगावकर २) बिरसा मुंडा ३) नारायण मेघाजी लोखंडे ४) अचंता शरथ कमल ५) इंग्लंड *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••👤 संतोष पेटेकर, धर्माबाद👤 छोटू पाटील बाभळीकर👤 मोहन कानगुलवार👤 सदानंद बदलवाड👤 महेश देबडवार*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*     [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*प्रतिकूल परिस्थितीत सहाय्य करणारी माणसं ते निरपेक्ष करत नाहीत. आपण सतत त्यांच्या ताटाखालचं मांजर राहावं, अशी त्यांची धारणा असते. आजन्म लीन राहिलो की, अशी माणसं खुश असतात. पैसा, साधनसंपत्तीच्या जोरावर व्यक्तिगत प्रतिष्ठा जोपासण्याचा उद्योग अत्यंत चिड आणणारा आहे. 'शिक्षकदिनी' संस्थेतर्फे शिपायापासून प्राचार्यापर्यंत त्यांच्याप्रती आदर म्हणून एक छापील प्रमाणपत्र व फूल देऊन अध्यक्षांच्या हस्ते सत्काराचा कार्यक्रम पाहिला. सत्कार स्विकारल्या नंतर शिपाई ते प्राचार्य सर्वजण अध्यक्षांच्या नतमस्तक झाले. मूळ कार्यक्रमच मुळी सर्वांना वार्षिक दीन करण्याचा होता.**समाजव्यवस्थाच अशी बनून गेली आहे की, नोकरदारांना खिंडीत गाठून लीन, दीन, मलीन, अधीन करत ठेवायचे. त्याचं रूपांतर पाठीचा कणा नसलेला संप्रदाय आकाराला येऊ लागला आहे. त्यांना मन, मत, मनगट असून नसल्यासारखे आहे. 'खाल मान्या, हो नाम्या' असं जीणं त्यांनी आयुष्यभर जगायचं. काही कर्तृत्व नसताना संस्थापकांचा मुलगा, नातु, सून, मुलगी अध्यक्ष बनत राहतात, तर शिपाई, लिपीक, प्राध्यापक, प्राचार्य रोज कणाकणाने 'एक दर्जे का नीचे का इन्सान' बनत अस्तित्वशून्य होताहेत.**"समाज घडविणारे घटक अस्तित्वशून्य होणं, समाजाचा बुद्धिजीवी वर्ग मतिहीन करणे, त्यांना मतहीन बनवणे यासारखे सामाजिक अध:पतन दुसरे कोणते असू शकते ?"*    ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●••🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼      *श्री. संजय नलावडे, मुंबई*      *मोबाइल  - 9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••जीवनात आपण केलेल्या कर्माला विशेष असे स्थान आहे.आपण आपल्या चांगल्या कर्माने यशाकडे जातो आणि चांगले कर्म केल्यामुळे आपल्या मनाला समाधान वाटते तसेच तुमच्या चांगल्या केलेल्या कार्यामुळे लोक तुमच्याकडे आकर्षित होतात अर्थात तुमचा चाहता वर्ग अधिक वाढतो.त्यामुळे तुमचे व्यक्तिमत्व इतरांपेक्षा वेगळे निर्माण होते आणि तुमचे अनुकरण करायला लागतील.हे केवळ तुम्ही करत असलेल्या चांगल्या कर्मामुळेच.जर तुमचेच कर्म चांगले नसतील तर तुम्ही तुमच्या जीवनात अपयशी ठरताल.एवढेच नाही तर तुमच्या प्रत्येक गोष्टीत अपमानही सहन करावा लागेल.लोक तुमच्यापासून दूर पळायला लागतील आणि तुम्ही एकाकीपणे नैराश्यमय जीवन जगायला लागाल.मग तुम्ही या मनुष्य जन्माला येऊन कोणतेही ध्येय साध्य होणार नाही.    मग असे जीवन जगण्यात तरी काय अर्थ आहे असे नकारात्मक जीवन जगणे जणू यम यातनाच नाहीत का ?यापेक्षा चांगले कर्म करुन जीवनाला एक नवा अर्थ निर्माण करावे आणि स्वाभिमानाने जीवन जगावे.© व्यंकटेश काटकर, नांदेड.संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३.🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂        •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••               *उपयुक्त जीवन*कोणे एके काळी एक राजा होता. त्याला असे वाटत असे, जगात फक्त मनुष्य हाच उपयुक्त प्राणी आहे. बाकीचे जीव जंतू, किडे यांचा जगाला काही उपयोग नाही. हे सिद्ध करण्यासाठी त्याने आदेश दिला कि, कोणकोणते जीव-जंतू, किडे हे निरुपयोगी आहेत? याची यादी करा आणि मला सांगा. खूप काळ शोध घेतल्यावर त्याच्या माणसांनी असे संशोधन केले कि या जगात जंगली माशी आणि कोळी (जाळे विणणारा कीटक, spider) हे फारशे उपयोगी नाहीत. त्यांचा जगाला काही उपयोग नाही. राजाने तत्काळ आदेश दिला कि या दोन किड्यांना आपल्या राज्यातून नामशेष करावे. याच दरम्यान त्या राज्यावर दुसऱ्या राजाने आक्रमण केले. त्यात या राजाचा पराभव झाला, जीव वाचविण्यासाठी त्याला राज्य सोडून पलायन करावे लागले. राजा पळाला आणि जंगलात गेला. दुसऱ्या राजाचे सैनिक त्याचा पाठलाग करतच होते. त्यांना चुकवून राजा कसातरी एका झाडाखाली झोपला. खूप श्रमामुळे त्याला गाढ निद्रा आली. काही काळाने त्याला नाकावर काही तरी चावत असल्याची जाणीव झाली, पाहतो तर काय एक जंगली माशी त्याच्या नाकाला चावली होती. झोपमोड तर झाली आणि त्याचबरोबर त्याला शत्रूच्या सैनिकांची चाहूल लागली, राजा पुन्हा पळाला आणि उघड्यावर झोपल्यास सापडण्याची भीती वाटल्याने त्याने एका गुहेचा आधार घेतला. राजा गुहेत गेला व काही तासातच गुहेच्या दारावर कोळ्यांनी जाळे विणले, शत्रूचे सैनिक तेथेही आले. त्यांनी त्या गुहेकडे पाहिले व एकमेकात चर्चा केली कि ज्याअर्थी येथे कोळ्याने जाळे विणले आहे त्याअर्थी आतमध्ये कोणीही नसणार, कारण कोळ्याचे जाळे तोडून कोणी आत जावू शकत नाही. गुहेत बसून राजा त्यांचे बोलणे ऐकत होता आणि त्याच वेळी त्याच्या डोक्यात प्रकाश पडला कि जंगली माशी चावली नसती तर जंगलात सैनिकांच्या हाती तो सहज सापडला असता किंवा कोळ्याने जाळे विणले नसते तर गुहेत येवून सैनिकांनी त्याला मारून टाकले असते म्हणजेच या जगात कोणताही जीवजंतू असा नाही कि ज्याचा उपयोग नाही. प्रत्येकाचे कार्य निराळे आहे.*तात्पर्य-जगात प्रत्येक जीवाचा काही न काही उपयोग आहे. कोणीच निरुपयोगी नाही. त्यामुळे कोणी कुणाला किंवा स्वताला कमी समजू नये.**संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दि. 15/11/2022 वार - मंगळवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷  🎇 .  *दिनविशेष .  🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••                 *क्रांतिसूर्य बिरसा मुंडा जयंती*💥 ठळक घडामोडी :- ● १९८९ - सचिन तेंडुलकरने भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.💥 जन्म :-● १९५४ - आलेक्सांदेर क्वाशन्येफ्स्की, पोलंडचा तिसरा राष्ट्राध्यक्ष.● १९६१ - झहीद अहमद, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.● १९६८ - पीटर मार्टिन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.💥 मृत्यू :-● १९८२ - आचार्य विनोबा भावे (महाराष्ट्र) भारत*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱  9604481084•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी पेट्रोल आणि डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणण्यासाठी केंद्र सरकार तयार असल्याचं सांगितलं.*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया, विनयभंगाच्या गुन्ह्यापेक्षा राजकारणातून संन्यास बरा, असं म्हणत राजीनामा देत असल्याचं आव्हाडाचं ट्वीट*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *होम सेंटर रद्द, वाढीव वेळही मिळणार नाही; दहावी-बारावीच्या परीक्षांबाबत मोठा बदल*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *पुण्यात हुडहुडी वाढणार! महाबळेश्वरपेक्षा पुणे गार; 16 नोव्हेंबरपर्यंत गारठा कायम*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *गुजरात निवडणुकीसाठी काँग्रेस कडून विभागनिहाय जबाबदारीचे वाटप. बडोदा विभागाचे निरीक्षक म्हणून पृथ्वीराज चव्हाणांची नियुक्ती. तर मुकुल वासनिक यानांही काँग्रेसकडून जबाबदारी.*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *टाटा समूहाची मोठी तयारी, एअर इंडियामध्ये तिन्ही विमान कंपन्यांच्या विलीनीकरणाची प्रक्रिया सुरू -रिपोर्ट*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *आयसीसीच्या सर्वोत्तम संघात विराट, सूर्याला स्थान; तर हार्दिकची 12वा खेळाडू म्हणून निवड*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*जलसाक्षरता : काळाची गरज*वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा.http://nasayeotikar.blogspot.com/2021/03/23032021.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••📙 *निर्मलक (डिटर्जंट - Detergent) कसे काम करते ?* 📙भारतात निर्मलकांचा वापर १९६० च्या दशकात सुरू झाला. त्यांचे मुख्य काम म्हणजे पाण्याच्या साहाय्याने सर्व प्रकारचा मळ व तेलकटपणा मोकळा करून धुण्याच्या मिश्रणात उतरवणे. थोडक्यात पाण्याची पदार्थ 'विरघळवण्या'ची ताकद निर्मलक वाढवतो. मळलेले कपडे, तेलकट भांडी, तेलाचे मातीचे हात धुण्याची वेळ येते, तेव्हा त्याची हमखास आठवण येते. थोडासा विचार केला, तर निर्मलक आपल्या जीवनात किती व्यापक रीतीने शिरला आहे, हे लक्षात येईल. तो उपलब्ध नाही असे चार दिवस जरी गेले तरी आपले सगळे व्यवहार अडून बसतील. प्रक्षालक व निर्मलक म्हणजे व्यवहारात 'डिटर्जंट' हाच शब्द जास्त सहज वापरला जातो.पहिला डिटर्जंट बनवला गेला, त्याला आता किमान ७५ वर्षे झाली. फ्रिट्झ गुंथर या जर्मन संशोधकाने हा डिटर्जंट क्रूड ऑईलपासून बनवला होता. पण त्यानंतर कित्येक वर्षे त्याचा व्यावहारिक उपयोग केलाच गेला नाही. सुमारे १९५० च्या दशकात याचे व्यावसायिक उत्पादन सुरू झाले. सध्या ढोबळमानाने असे म्हणता येईल की, अल्फिलबेंझीन व सल्फ्युरिक अॅसिड यांच्या साह्याने तयार झालेल्या संयुगातील अॅसिडचा भाग सोडा अॅश वापरून काढला जातो. राहतो तो डिटर्जंट.डिटर्जंट तयार झाला तरी त्याची उपयुक्तता वाढविण्यासाठी आणखी काही खास प्रक्रिया केल्या जातात. फेस आल्याशिवाय 'साबण' वापरला असल्याचे समाधान मिळत नाही म्हणून फेसाळणारे काही घटक त्यात मिसळले जातात. रक्त, घाम, तेल यांचे डाग निघावेत म्हणून खास वितंचके (Enzymes) त्यात घालतात. याखेरीज कपडे अधिक शुभ्र दिसून चकाकी यावी, यासाठी ऑप्टिकल व्हाइट्नर घालण्याची पद्धत आहे. डिटर्जंटची पावडर जितकी हलकी, जितकी तिची लाही मोठी, तितकी ती लवकर काम करते. यासाठी तयार डिटर्जंट मोठाल्या ढवळून काढणाऱ्या मिक्सरमधून काढला जातो. त्यात आकर्षक दिसण्यासाठी हलकासा रंग व छान सुगंधी वास मिसळला जातो.याच वेळी काम करणाऱ्या हातांची कातडी, कपडे, भांडी, धुण्याच्या वापरातील बादल्या यांवर रासायनिक अपायकारक प्रक्रिया होऊ नये, ही पण काळजी डिटर्जंट घेत असतो. डिटर्जंटच्या आधी काम करणारा साबण व कॉस्टिक सोडा हा काम करणाऱ्याला त्रासदायक तर ठरेच, पण त्याची चिकट लगदास्वरूपी लुकणे कपड्याला चिकटून राहत असत. डिटर्जंट वापरायलाही खूपच सोपा असतो. पाण्यात झटकन विरघळवुन त्या मिश्रणात कपडे बुडवतात येतात. त्यामुळे अनेक कपडे एकदम धुवुन निघू शकतात.डिटर्जेंटचा वापर सुरू झाला आणि जवळपास दशकभराने नवीनच समस्या समोर उद्भवताना आढळू लागल्या. आज या समस्यांनी समोर थोडेसे आव्हान व थोडेसे गंभीर स्वरूप धारण केले आहे. सगळ्या वापरातला डिटर्जंट गटारावाटे जेव्हा एकत्र होतो, तेव्हा पाण्यातील जंतू त्याचे विघटन करू शकत नाहीतच; पण या डिटर्जंटमुळे पाण्यातील प्राणवायूच्या प्रमाणावर परिणाम होऊ लागतो. हे पाणी नदीत गेल्यास तेथील जलचरांवर त्याचा दुष्परिणाम दिसून त्यांची संख्या रोडावू लागते.यावर उपाय शोधणे चालू आहे. प्रयोग चालू आहेत; पण अजून समाधानकारक उत्तर मिळालेले नाही. डिटर्जंट तयार करणे फारसे अवघड नाही. अगदी घरगुती स्वरूपातही तो तयार करता येतो. कच्चा माल आपल्या देशात सहज उपलब्ध आहे. पावडर स्वरूपातील, वडी स्वरूपातील किंवा द्रव स्वरूपातील डिटर्जंट्स सध्या बाजारात उपलब्ध आहेत.आश्चर्य वाटेल अशी गोष्ट म्हणजे डिटर्जेंट तयार करणारी एक भारतीय कंपनी कसलीही आधुनिक यंत्रणा, वीज यंत्रे न वापरता डिटर्जंट तयार करते, विकते व तिची आज भारतीय डिटर्जंटच्या विक्री मध्ये निम्म्यापेक्षा जास्त टक्केवारी आहे. या उत्पादनासाठी फारसे शिक्षण न झालेल्या गृहिणींचा जास्तीत जास्त उपयोग करून घेतला जातो आहे. 'निरमा' हे तिचे नाव.*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*          *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*" हजारो मैलांचा प्रवास पहीले पाऊल पुढे टाकल्यानेच सुरू होतो. "**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) बिरसा मुंडा यांचा जन्म कोठे व केव्हा झाला ?२) 'अबुआ दिशुम अबुआ राज' म्हणजे 'आमचा देश आमचा राज' हा नारा कोणी दिला ?३) 'आदिवासी समाजक्रांतीचे जनक' म्हणून कोणाला ओळखले जाते ?४) बिरसा मुंडा यांचे निधन केव्हा झाले ?५) बिरसा मुंडा कोण होते ?*उत्तरे :-* १) उलिहातू, झारखंड ( १५ नोव्हेंबर १८७५ ) २) बिरसा मुंडा ३) बिरसा मुंडा ४) ९ जून १९०० ( रांची कारागृह ) ५) आदिवासी नेता, स्वातंत्र्य सेनानी व लोकनायक *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••👤 व्यंकटेश विरेश पाटील, येवती👤 सुनील शिंदे, पांगरी👤 राहुलकुमार सातव, कुपटी, माहूर👤 भगवान भूमे, देगलुर👤 अशोक चिंचोलीकर, धर्माबाद👤 दिनेश येवतीकर, येवती👤 कमलेश परब👤 मारोती कानगुलवार, येवती👤 गंगाधर मरकंठवाड, येवती👤 सोनाली कडवईकर, रत्नागिरी*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*     [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*झोका काय नि पाळणा काय. स्वप्नात नेणारी ही जादूभरी दुनिया. चंद्र दिसतो आकाशात. हाती येणार नसतो बाळाच्या. पण हात उंच करून धरू पाहणारे हात थांबत नाहीत. आनंद, दु:ख, भीती, ग्लानी, नीज. झोका थांबला की बाळ रडते. झोका दिला की गुंग होते. वास्तवापासून दूर नेतो झोका. विसरायला लावतो जे नको असते. देह आणि मनाचा खेळ सगळा.**जत्रा भरते तेव्हा उंच उंच रहाटपाळणे असतात तिथे. लहानपणी नव्हते एवढे उंच पाहण्यात. चार पाळण्याचे, कमी उंचीचे गावच्या जत्रेत असायचे..त्यात बसण्याची ओढ आणि उतरण्याची घाई असायची. एकेक पाळणा हाताच्या साह्याने फिरवत, पाळणा उंच जाई., खाली येई, गती वाढत जाई. उंच जाताना उचलण्याचा गोळा पोटात आणि खाली येताना भीतीचा खड्डा पोटात. उच्च आनंद आणि प्राणस्पर्श होणारी भीती. आयुष्यात येणा-या अशा अनेक प्रसंगाच्यावेळी हे भान ठेवावंच लागतं. नेमक्या वेळी नेमकी गोष्ट व्हायलाच हवी. नाहीतर साधी गोष्टसुद्धा प्राणस्पर्शापर्यंत घेऊन जाते आपल्याला.*             *दोन दोरांच्या हातांनी*             *झोका देहास वेढतो*             *मनालाही वेटाळून*             *झोका प्राणास छेडतो.*  ••●🌸 ‼ *रामकृष्णहरी* ‼🌸●••            🌸🌸🌸🌸🌸🌸         *संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*               📱 9167937040•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••ज्या व्यक्ती स्वत:च्या सौंदर्याकडे कधीच पाहत नाहीत परंतु जगाचे अर्थात इतरांचे सौंदर्य कसे अधिक चांगले दिसेल यासाठी कोणत्या ना कोणत्या माध्यमातून प्रयत्न करण्यासाठी धडपडत असतात आणि त्यातच त्यांच्या सौंदर्यात अर्थात इतरांच्या सौंदर्यात समाधान मानतात.जेव्हा अशी व्यक्ती समाजात क्वचित पहायला मिळते ते इतरांचे अहोभाग्य समजावे.हे लोक स्वत:कडे आणि स्वत:च्या जीवनाकडे कधीच झुकून पाहत नाहीत.त्यांना स्वत:च्या जीवनात काही रस नसतो.रस असतो तो जगाकडे आणि जगाला सुंदर करण्याकडे.अशी व्यक्ती कधीच स्वार्थी वृत्तीची नसते.म्हणूनचइतरांच्या हृदयात सामावले जातात.उलट ज्या व्यक्ती आपले स्वत:चे सौंदर्य अधिकाधिक कसे खुलेल आणि इतरांपेक्षा आपण कसे खुलून दिसू,लोक आपल्याकडे कसे पाहतील अशी जर भावना असेल तर ती व्यक्ती स्वार्थी आणि मतलबी समजावी.अशा व्यक्तींना कुठेही स्थान मिळत नाही.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३.🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸       •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••              *आईचे प्रेम*एकदा एका परीने  जाहीर केले,"ज्या प्राण्याचे पिल्लू सर्वात जास्त सुंदर असेल, त्याला मी छान बक्षीस देईन."      ते एकूण  सर्व प्राणी एका ठिकाणी जमा झाले. त्यांनी आपल्याबरोबर आपली पिले आणली होती. परीने एकामागून एक सर्व पिलांना निरखले. तिने माकडिणीच्या पिलाचे चपटे नाक पाहून म्हटले, "किती कुरुप आहे हे पिल्लू! या पिलाला कधी बक्षीस मिळणारच नाही."    परीचे हे बोलणे एकूण त्या पिलाच्या आईला खूप वाईट वाटले. तिने आपल्या पिलाला ह्दयाशी  धरले आणि ती पिलाच्या कानात कुजबुजली. " माझ्या लाडक्या बाळा, तू अजीबात मनाला लावून घेऊ  नकोस.माझे तुझ्यावर अतीशय प्रेम आहे. माझ्यासाठी तूच बक्षीस आहेस. मला इतर कोणतेही बक्षीस नको. ईश्वर तुला दीर्घायुष्य देवो."तात्पर्यः  'आईच्या प्रेमाची तुलना कशाशीही होऊ शकत नाही.' आईची महती जगात महान आहे.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दि. 14/11/2022 वार - सोमवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷   🎇 .  *दिनविशेष .  🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••            *बालदिन*💥 ठळक घडामोडी :- १९७१ - मरीनर ९ हे अंतराळयान मंगळाच्या कक्षेत पोचले.१९७५ - स्पेनने पश्चिम सहारातून पळ काढला.💥 जन्म :-१८८९ - जवाहरलाल नेहरू, प्रथम भारतीय पंतप्रधान१९२४ - रोहिणी भाटे, मराठी कथकनर्तिका.१९४२ - इंदिरा गोस्वामी, आसामी साहित्यिक, कवयित्री, संपादिका.💥 मृत्यू :-१९१४ - वेंगायिल कुन्हीरामन नयनार, मल्याळम लेखक, पत्रकार.१९७७ - ए.सी. भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद, भारतीय तत्त्वज्ञानी.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱  9604481084•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *ई-केवायसी पूर्ण न केल्याने मराठवाड्यातील साडेपाच लाखापेक्षा अधिक शेतकरी 'पंतप्रधान निधीला' मुकणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मुंबई विमानतळावर वेगवेगळ्या दोन घटनेत 61 किलो सोनं जप्त करण्यात आलंय. एकाच दिवशी कारवाई करत कस्टम विभागाने 32  कोटी किंमतीचं सोनं जप्त केलं आहे*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *तब्बल २५०हून अधिक लेखक, माजी संमेलन अध्यक्ष, माजी सनदी अधिकारी साहित्यिकांनी राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला दर्शवलाय पाठिंबा...*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *देशात धान्याचा तुटवडा भासणार नाही, तांदळाची मोठ्या प्रमाणात खरेदी : केंद्र सरकार*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मुंबईत 617 गोवर संशयित रुग्ण, पालिकेकडून मुंबईत नऊ लाख घरांचे सर्वेक्षण, गोवंडीत केंद्रीय समितीचा आढावा*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *'तुझ्यात जीव रंगला' फेम अभिनेत्री कल्याणी कुरळे-जाधव यांचं कोल्हापुरात अपघाती निधन*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *टी20 विश्वचषक 2022 च्या अंतिम सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानचा 5 गडी राखून केला पराभव*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*भारताचे शिल्पकार आणि जगाचे शांतीदूत - पंडीत जवाहरलाल नेहरू*  http://nasayeotikar.blogspot.com/2017/10/blog-post_27.htmlवरील लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा._चित्रांकन :- विनायक काकुळते, नाशिक_लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••📙 *रांजणवाडी म्हणजे काय ?* 📙रांजणवाडी होण्याचा अनुभव आपण कधी ना कधी तरी घेतलेला असतोच. 'काहीतरी चोरून खाल्ल्यावर रांजणवाडी होते बरं का !' असंही कोणी आपल्याला गमतीने म्हटलेले असते. रांजणवाडी हा डोळ्यांचा आजार आहे. पापण्यांच्या मुळाशी पू साठायला लागून हा रोग होतो. आपल्या पापण्यांच्या मुळाशी तैलग्रंथी असतात. त्यांना 'झीज' ग्रंथी असे म्हणतात. या ग्रंथीचे तोंड बंद होऊन आता ग्रंथीतील स्राव साठून त्यामध्ये जंतुसंसर्ग होतो व त्यामुळे या ठिकाणी पूर साठावयास लागतो. पापणी लाल, सोडलेली दिसते. डोळ्यांची उघडझाप करताना दुखते. स्पर्शाने वेदना होतात यालाच रांजणवाडी असे आपण म्हणतो.रांजणवाडी पिकल्यावर आपोआप फुटते व पू निघून गेल्यावर पापणी पूर्ण बरी होते.रांजणवाडीची नुसती सुरुवात असल्यास गरम पाण्यात कपडा बुडवून त्याने शिकल्याने रांजणवाडी एक दोन दिवसांत जिरू शकते. जिरली नाही तर तरी पिकण्यासाठी शेकल्याने मदत होते व ती लवकर फुगून फुटते. सुजेच्या सुरुवातीस पू निघण्यासाठी पापणी दाबून प्रयत्न करू नये. त्यामुळे कधी कधी तेथील जंतुसंसर्ग रक्तवाहिन्यांद्वारे मेंदूमध्ये नेला जाऊन मेंदूमध्ये संसर्ग होऊ शकतो. शेकणे या उपायांसोबतच आणखी एक उपाय घरच्या घरी करता येतो. लसणाच्या पाकळीचा रस सकाळ संध्याकाळ दोन दिवस लावला तर रांजणवाडी जिरते. वारंवार रांजणवाडी होणे हे शरीराची रोगप्रतिकार शक्ती कमी झाल्याचे लक्षण असू शकते. त्यामुळे असे होणार्‍या व्यक्तींनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. एखादे वेळी त्यांना मधुमेहही झालेला असू शकतो.*डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित*यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातूनमनोविकास प्रकाशन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••" खोटारडा जेव्हा खर बोलतो, तेव्हा कुणीही त्याच्यावर विश्वास ठेवत नाही.”*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते ?२) पं. जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो ?३) 'बाल दिवस' केव्हा साजरा केला जातो ?४) 'चाचा नेहरू' कोणाला म्हटले जाते ?५) भारतात प्रथम बाल दिवस केव्हा साजरा करण्यात आला ?*उत्तरे :-* १) पं. जवाहरलाल नेहरू २) बाल दिवस ३) १४ नोव्हेंबर ४) पं. जवाहरलाल नेहरू ५) १९६५*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••👤 सुहास चटने👤 सुभाष चंदने👤 शीतल चौगुले👤 खंडू सोळंखे👤 योगेश पाटील बादलगावकर👤 विनोद पांचाळ👤 मोहन लंगडापुरे👤 भारत शेळके👤 रितेश जाधव👤 निखिल थोरमोठे👤 विजय सदानंद👤 वसंत यशवंतकर*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*     [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*रोज सकाळी देवपूजा करून आपल्या कामाला लागणारी अगणित माणसे आपल्या अवतीभवती असतात. आपणही देवपूजा करीत रोजचे एक कर्म उरकत असतो. या सगळ्या क्रियेमध्ये भाव किती ?  हा खरा आजचा प्रश्न आहे. संत ज्ञानेश्वरांनी असे म्हटले आहे की,*         *भावेविण भक्ती। भक्तिविण मुक्ती।*          *बळेविण शक्ती। बोलू नये॥**या सगळ्या मुळाशी भाव ही गोष्ट मोलाची आहे. ती नसेल तर देवपूजा ही फक्त रोजच्या अनेकविध घटनांपैकी एक होऊन राहते. मन जर विकारांनी भरलेले असेल, तर तिथे भावशक्ती बळ धरू शकत नाही.**संत ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम, रामदास अथवा अलिकडचे संत गाडगेबाबा, तुकडोजी महाराज या सर्वांनाच समाजाने तत्कालीन कालखंडात जी वागणूक दिली ती  बहुतांश नकारात्मकच होती, असे आपल्या लक्षात येईल. पण तरीही कोणत्याही परिस्थितीत या सर्वांनी आपल्या मनातला देवाबद्दलचा स्थायीभाव ढळू दिला नाही. आपल्या मनात असलेले कार्य भावनांच्या बळावर ते करीत राहिले, त्यामुळे ते संतत्वाला पोहचले. हे संतत्व आपल्याला आयुष्यात कळले पाहिजे. ते एकदा कळले, की समस्याग्रस्त आयुष्यही सुलभ वाटू लागते. हे सगळे वाटणे आयुष्यात उतरण्यासाठी आपली पहिली पायरी आपल्या हातुन रोज होणा-या 'देवपूजे'ची आहे. ती देवपूजा आपण मनोभावे करू या..!*  ••●🌼‼ *रामकृष्णहरी* ‼🌼●••              🌼🌼🌼🌼🌼🌼      *संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*              📱 9167937040•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••तुम्ही कुणावर विश्वास ठेवा अथवा ठेऊ नका पण तुम्ही तुमच्या मनातून काम करत असलेल्या कामावर विश्वास ठेवा.कारण मनातून केलेले काम हेच तुमच्या विश्वासाचे खरे प्रतिक आहे.तीच तुमच्या विश्वासाने केलेल्या कामाची पावती आहे.या तुमच्या कामावरच लोक विश्वास ठेवतात.तुमच्या बोलण्यावर विश्वास ठेवतीलच असे नाही परंतु तुम्ही मनातून केलेल्या तुमच्या कामावर नक्कीच विश्वास ठेवतील.हीच तुमची खरी ओळख व विश्वासाने केलेल्या  कामाची पावती आहे.- व्यंकटेश काटकर,नांदेड.  संवाद.9421839590/          8087917063.🍃🌷🍃🌷🍃🌷🍃🌷🍃🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *कोळ्याने राजाला धडा शिकवला*एकदा दोन राज्यात युद्ध झाल. त्यात एका राजाचा पराभव झाला .पराभुत राजा शोध घेत होता .त्यांनी  त्या राजाला ठार मारायचे होते, म्हणून तो राजा जीव वाचवण्यासाठी जंगलात पळाला .आणि एका गुहेत जाऊन लपला. तो खूप दुःखी झाला होता. त्याच्या धीर खचला होता. एके दिवशी राजा गुहेत स्वस्थपणे पहुडला होता. भिंतीवरी सरपटणारा एका लहानशा कोळ्याने त्याचे लक्ष वेधले. तो सरपटत भिंतीवर चढायचा. असे बऱ्याचदा घडले. पण कोळ्याने आपला प्रयत्न सोडला नाही राजाने विचार केला. हा सरपटणारा छोटा  प्राणीसुद्धा आपले प्रयत्न सोडत नाही. मी तर राजा आहे. मग मी माझा प्रयत्न का बरे सोडले? मला पुन्हा प्रयत्न केलाच पाहिजे. त्याने शत्रु बरोबर पुन्हा युद्ध करण्याचा निश्चय  केला. राजा जंगलातून बाहेर पडला आणि आपल्या विश्वासू सहकाऱ्यांना भेटला. त्यांनी आपल्या राज्यातील शूर माणसे एकत्र केली. सर्व शक्तीनिशी त्यांनी आपल्या शत्रु बरोबर युद्ध केले. अखेरीस त्यांनी लढाई जिंकली. त्याला त्याचे राज्य परत मिळाले. एका कोळ्याने आपल्याला धङा शिकविले,हेत्याच्या कायम लक्षात राहिला.*तात्पर्यः जो अपयशाने खचून न जाता सतत प्रयत्न करतो, त्यालाच यश मिळते.*             *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दि. 11/11/2022 वार - शुक्रवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷  🎇 .  *दिनविशेष .  🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••💥 ठळक घडामोडी :- ◆ १९६६ - जेमिनी १२ अंतराळयानाचे प्रक्षेपण.◆ १९६८ - मालदीवमध्ये प्रजासत्ताक राष्ट्राची स्थापना.💥 जन्म :-◆ १९२४ रुसी मोदी, भारतीय क्रिकेट खेळाडू.💥 मृत्यू :-◆ २००४ - यासर अराफात, पॅलेस्टाइनचा शासक, दहशतवादी*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱  9604481084•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *जीएसटी आणून प्रत्येक गोष्टीवर कर लावून समस्या वाढवल्या, राज्यात भारत जोडो यात्रेत नांदेड येथे आयोजित सभेत राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपला केलं लक्ष्य*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *जगातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बांधण्यात येणारा मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाअंतर्गत मिसिंग लिंक प्रकल्प हा देशात पथदर्शी प्रकल्प होणार असून लाखो प्रवाशांना फायदेशीर ठरेल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *पुण्यात अन्न, औषध प्रशासनाचा कारवाईचा धडाका सुरुच; 50 हजार रुपयांचा प्रतिबंधित पदार्थाचा साठा जप्त*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *उत्तर प्रदेशमधील समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द होणार आहे. यूपीमधील रामपूरच्या सत्र न्यायालयाने स्थगिती देण्यास दिला नकार*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *केवळ 14 महिलांनाच तिकीट, गुजरात निवडणुकीसाठी भाजपची 160 उमेदवारांची यादी जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *आयसीआयसीआय बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर यांना हायकोर्टाचा दणका, बँकेनं कोचर यांच्याबाबत घेतलेले निर्णय वैध ठरवत त्यात कोणताही हस्तक्षेप करण्यास हायकोर्टाने नकार दिला आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *टी-20 विश्वचषक 2022 स्पर्धेच्या दुसऱ्या सेमीफायनलमध्ये इंग्लंडनं भारताचा 10 विकेट्स राखून पराभव केला.*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*शून्यातून विश्व साकारणाऱ्या सरकारी शाळा*जिल्हा परिषदेच्या सरकारी शाळा म्हटले की, प्रत्येकांच्या डोळ्यासमोर एक वेगळेच चित्र उभे राहते. ज्या चित्रात त्या शाळाची, तेथील परिसराची, शिक्षकांची आणि विद्यार्थ्याच्या बाबतीतचे चित्रण भयानक दिसून येते. या शाळांची स्थिती कधीच सुधारणार नाही, अशी धारणा प्रत्येकाची बनलेली आहे. या शाळांत फक्त गरिबांची मुलेच शिकतात म्हणून यास गरिबांची शाळा असे सुध्दा संबोधले जाते. सरकारी यंत्रणेमार्फत चालविण्यात येणारी ही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नियंत्रणाखालील.............वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा.http://nasayeotikar.blogspot.com/2017/11/blog-post_15.htmlwww.nasayeotikar.blogspot.com            लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••📙 *मूत्रपिंडाचे (किडनीचे) कार्य कसे चालते ?* 📙बर्‍याच जणांना मुत्रपिंड म्हणजेच जननेंद्रिय असे वाटते. हे चुकीचे आहे. मूत्रपिंडाचा संबंध शरीरातील टाकाऊ पदार्थ शरीराबाहेर टाकण्यासाठी आहे. तर जननेंद्रियांचा संबंध पुनरुत्पादनाशी आहे. माणसाच्या शरीरात घेवड्याच्या 'बी'च्या आकाराची दोन मूत्रपिंडे असतात. ३ x २ x १ इंच असा त्यांचा आकार असतो. मूत्रपिंडाचे कार्य गाळणीसारखे असते. शरीरात चयापचयामुळे अनेक टाकाऊ पदार्थ तयार होतात. यात युरिया, युरोबिलीनोजेन, मृत पेशीतील घटक आदींचा समावेश होतो. मूत्रपिंडामध्ये रक्त गाळले जाते. शरीराला आवश्यक असणाऱ्या गोष्टी रक्तातच राहतात; पण अतिरिक्त पाणी, क्षार व टाकाऊ किंवा विषारी पदार्थ रक्ताबाहेर काढले जातात. यालाच आपण लघवी म्हणतो. मूत्रपिंडातून मूत्रवहिन्यांद्वारे लघवी मूत्राशयात गोळा होते. मुत्रसंचयानंतर लघवी करण्याची इच्छा निर्माण होते व मूत्रमार्गाद्वारे लगेच शरीराबाहेर पडते.विषारी, टाकाऊ पदार्थ शरीराबाहेरील टाकण्याखेरीज शरीरात पाणी व क्षार यांचे संतुलन राखण्याचे महत्त्वाचे कार्य मूत्रपिंडे करतात. मधुमेह, उच्च रक्तदाब अशा रोगात मूत्रपिंडावर परिणाम होऊन ती अकार्यक्षम बनतात. काही सांसर्गिक रोगांमुळेही त्यांचे कार्य बंद पडू शकते. असे झाल्यास रक्तातील विषारी पदार्थांचे (जसे युरिया, अमोनिया) प्रमाण वाढते व यांचा मेंदू तसेच इतर इंद्रियांवर परिणाम होतो. त्यामुळे व्यक्ती कोमात जाते व मरण पावते. जिवंत राहण्यासाठी मूत्रपिंडे कार्यरत असणे अत्यंत आवश्यक आहे. एक निरोगी मूत्रपिंडदेखील दोन मूत्रपिंडांचे कार्य करू शकते.मूत्रपिंडांच्या कायमस्वरूपी रोगांमध्ये ज्यात त्यांचे कार्य पूर्णपणे बंद पडते. डायलिसिस वा मूत्रपिंडावरोपण हे दोन उपचार करता येतात. या दोन्ही पद्धतीत काही धोके असले तरी त्यामुळे रुग्णाचे आयुष्य आणि काही वर्षांनी वाढण्याची शक्यता असते.*डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित*यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातूनमनोविकास प्रकाशन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*बुडणाऱ्यांना किनाऱ्यावरुन सूचना देतात ते सामान्य आणि स्वत:चा जीव धोक्यात घालून त्यांना वाचवतात ते असामान्य !**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) स्वतंत्र भारताचे पहिले मतदार श्याम शरण नेगी यांनी पहिले मतदान केव्हा केले ?२) 'जंगलाचं देणं' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?३) काश्मीर हरीण आढळणारे एकमेव अभयारण्य कोणते आहे ?४) फोर्ब्सच्या यादीनुसार जगातील सर्वोत्कृष्ट कंपनी कोणती ?५) कोकण रेल्वेचे जनक कोणाला म्हटले जाते ?*उत्तरे :-* १) फेब्रुवारी १९५२, देशाची पहिली लोकसभा निवडणूक २) मारूती चितमपल्ली ३) दाचीगम ४) samsung कंपनी, दक्षिण कोरिया ५) ई श्रीधरन *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••👤 शिवकुमार ईबीतवार👤 ऋषिकेश बेळकोनीकर👤 माधव तनमुदले👤 रणजित लोखंडे👤 ज्ञानेश्वर आंचेवाड👤 बालाजी पांडागळे👤 सूर्यकांत राखोंडे👤 राजेश कुमार👤 शेषराव पाटील👤 संदीप पिकले👤 दिवाकर अष्टेकर👤 मल्लेश कमळे👤 राम वाघमारे👤 ऋषी देसाई*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*     [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*'मनुष्यस्वभाव' अगदी विपरित असतो. तो कायम दुस-याचे अनुकरण करण्यात मग्न असतो. त्याला 'स्वधर्म' पाळण्यापेक्षा परधर्माचे आकर्षण जास्त असते. जसे गुलाबाच्या झाडाने कमळाचे फूल उगवण्याचा अट्टहास करणे. परंतु अशा प्रयत्नात अपयश हे ठरलेले असते. खरं म्हणजे गुलाबाच्या झाडाने उत्तम गुलाबाचे फूल उगवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तोच त्याचा 'स्वधर्म' असतो. कमळाचे फूल उगवण्याचा प्रयत्न करणे म्हणजे केवळ परधर्माचे अनुकरण करणे होय. स्वत:ची फूले लहान निपजली तरी चालतील, परंतु दुस-याची मोठी फुले आपली मानणे हा अधर्म होय.**मनुष्याने आपला धर्म ओळखून, सारी क्षमता पणास लावून कार्य केले तर त्याचे 'कल्याणच' होईल. अन्यथा स्वधर्म सोडून नको त्या गोष्टींच्या मागे लागत राहिले तर वाट्याला केवळ दु:ख येईल. "दिवा मातीचा आहे की सोन्याचा हे महत्वाचे नसून त्याचा स्वधर्म आहे प्रकाश देणे !"*                          *॥ रामकृष्णहरी ॥*🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹       *संजय नलावडे, मुंबई*    *मोबाइल  - 9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••          *मोहित चा अनुभव*मोहित ची शाळा सुटली. तो घरी निघाला. वाटेत त्याला आई दिसली. तिच्या हातात दोन मोठ्या पिशव्या होत्या त्या खूप जाड असाव्यात, असे तिच्याकडे पाहून जाणवले. मी धावतच आईला गाठले. “अग आई, काय घेऊन चाललीस एवढं? ” मी आईला विचारले.तिच्या हातातील एक पिशवीघेऊ लागलो. “अरे हळू सामान सांडेल त्यातलं.” ती म्हणाली.“अगं आई, किती जड आहे पिशवी! काय आहे एवढ्यात ? मी म्हणालो. “हे आपल्या महिन्याभरच्या किराणा आहे” आई म्हणाली. एक पिशवी हातात धरल्यावर मला समजले, तीही किती जाड होते, आणि त्याने आईचे हात लालेलाल झाले होते. “एवढ्या सामानाला किती रुपये लागले ग आई?” किती लागले असावेत? असे आईच मला उलटून प्रश्न विचारून राहिली. मी सांगितले रक्कम एकूण आई हसू लागली आणि म्हणाली “, वा रे वा, तुझं ध्यान! वस्तूचे भाव गगनाला भिडले कुठे आहेस तू? बाजारात फिरत जा, मग तुला समजेल. मग महेश म्हणाला “आई जेव्हा माझ्या शाळेला सुट्टी असते तेव्हा आपण किराणा दुकान मध्ये जाऊ म्हणजे  मला तुला मदत करता येते व माझे व्यवहार ज्ञान ही वाढते.*तात्पर्यः वेळेचा सदउपयोग करून अनुभव मिळवणे व ज्ञान वाढविणे,कामात मदत होणे.**संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दि. 09/11/2022 वार - बुधवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷  🎇 .  *दिनविशेष .  🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         💥 ठळक घडामोडी :- ◆ 1997 - साहित्यिक गंगाधर गाडगीळ यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार प्रदान◆ 2000- उत्तराखंड उच्च न्यायालयाची स्थापना💥 जन्म :-◆ 1931 - भारतीय कायदे पंडित लक्ष्मी मल सिंघवी यांचा जन्म💥 मृत्यू :-◆ 2005 - भारताचे दहावे राष्ट्रपती के. आर. नारायणन यांचे निधन*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱  9604481084•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *सरकार रद्द करणार 10 लाख रेशनकार्ड, ‘या’ लोकांना मिळणार नाही मोफत धान्य*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *अशोक चव्हाणांच्या मुलीचं होणार राजकारणात पदार्पण ? सूचक ट्विटमुळे चर्चांना उधाण*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *राहुल गांधींच्या ‘भारत जोडो यात्रे’ला आदित्य ठाकरेंची मिळणार साथ, पदयात्रेत होणार सहभागी*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *दिल्ली- NCR ते उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के, नेपाळमध्ये भूकंपाचं केंद्र ; 3 जणांचा मृत्यू*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *सरन्यायाधीश उदय लळीत यांचा कोर्टाला भावपूर्ण निरोप, पायऱ्यांवर डोकं ठेवून अभिवादन*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *दिवाळीच्या प्रदीर्घ सुट्टी नंतर आजपासून महाराष्ट्रभर शाळांना सुरुवात*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य सामन्यात पाकिस्तान आणि न्यूझीलंड आमनेसामने*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *हेडफोनपासून दूर रहा*वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा.http://nasayeotikar.blogspot.com/2016/12/blog-post.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••      📙 *प्लॅस्टिक सर्जरी* 📙सर्जरी किंवा शस्त्रक्रिया याचे कितीतरी पोटविभाग गेल्या ३०-४० वर्षात प्रगत होत गेले आहेत. कान नाक घसा यांसाठीचे तज्ज्ञ, पोटाच्या व आतडय़ाच्या विकाराचे तज्ज्ञ, मूत्रशल्यविशारद, मेंदू व मज्जारज्जू शल्यविशारद, अस्थिरोगतज्ञ अशा विविध अवयवांनुसार त्यांची विभागणी होत गेली आहे. मात्र गेली साठएक वर्षे जनरल सर्जरीच्या बरोबरीने, पण स्वतःचे वेगळेपण राखणारी शाखा म्हणजे प्लॅस्टिक सर्जरी होय. भारतीय शल्यकर्म परंपरेतील सुश्रुतसंहितेमध्ये सुद्धा प्लास्टिक सर्जरीच्या आज केल्या जाणाऱ्या चेहऱ्यावरच्या नाकाच्या ठेवणीबद्दलच्या शस्त्रक्रियेसंदर्भात उल्लेख सापडतात. अर्थातच तंत्रांमध्ये खूप बदल होत गेला आहे.प्लॅस्टिक सर्जरी असे विचित्र नाव पडण्याचे कारण म्हणजे विद्रुप झालेला शरीराचा भाग वळूवून लवचिकपणे त्यात बदल करून त्याला आकार देण्याचे अवघड काम या शस्त्रक्रियेत अपेक्षित असते. आजकाल जरी प्लास्टिक सर्जरी ही खूपदा सौंदर्य वाढवण्याकरता केली जात असली तरी तिचा मूळ गाभा विद्रूपता दूर करणे व शरीररक्षणाला उपयुक्त ठरणे हाच आहे.जन्मत: दुभंगलेला वरचा ओठ व टाळू, बसके व अपरे नाक, पुरुषांच्या मूत्रमार्गातील जन्मतः असलेले दोष, हाताची पायाची सहा वा जास्त बोटे यांसारख्या जन्मजात दोषांवर शस्त्रक्रिया करून त्या व्यक्तीला सामान्यपण देऊ करणे हा प्लास्टिक सर्जरीच्या कामाचा मोठा भाग. पण अनेकदा भाजल्यामुळे काही मोठ्या भागातील त्वचा जळून जाते किंवा अाकसून त्या अवयवाची हालचाल कमी होते. (उदारणार्थ मान वळवणे, कोपरामधील त्वचा जळल्याने हात लांब न होणे इत्यादी) त्यावेळी अन्य भागातून त्वचा काढून त्या जागी तिचे रोपण करण्याचे काम प्लॅस्टिक सर्जन करतात. प्लास्टिक सर्जरीचा वापर १९५० नंतरच्या दशकात गुप्त हेरगिरीसाठी चेहरेपट्टी बदलून घेण्यासाठीही केला गेला आहे. असाच उपयोग वृद्धत्वाच्या खुणा झाकून चेहर्यावरील नको त्या सुरकुत्या काढण्यासाठी अनेक व्यक्तींनी, नटनट्यांनी केला आहे. डोक्यावरचे टक्कल कमी करण्यासाठी केशारोपण करून तेथे केस वाढवणे हा सुद्धा या शस्त्रक्रियेचाच एक भाग समजला जातो. सूक्ष्मदर्शक यंत्राचा सरसहा वापर अतिशय नाजूक सुया, अगदी पातळ तंतूवजा रेशमी धागे आणि तासनतास चिकाटीने चालणारे काम हा प्लास्टिक सर्जरीचा अत्यावश्यक भाग. प्रत्यक्ष शस्त्रक्रिया करताना शरीराची ठेवण बदलताना, त्वचेची अदलाबदल करताना त्या भागात होणारा रक्तपुरवठा अबाधित राखणे हा नियोजनाचा, आरेखनाचा अत्यंत कौशल्याचा भाग असतो. यामध्ये जरा जरी चूक झाली तरी आरोपण केलेली त्वचा निरुपयोगी ठरते.कॅन्सरसंदर्भातील विविध शस्त्रकर्मे केल्यावर काही भाग काढून टाकणे अत्यावश्यक ठरते. उदारणार्थ, चेहऱ्याच्या जबड्याचा निम्मा भाग, छातीच्या काही फासळ्या. अशा वेळी प्लॅस्टिक सर्जरीने अशा रुग्णाला शक्यतो नेहमीचे रूप देण्यासाठी कित्येक महिने प्रयत्न करावे लागतात. प्लॅस्टिक सर्जनचे कामाचे स्वरूप त्यामुळे सध्याच्या काळात प्लास्टिक, रिकन्स्ट्रक्टिव्ह व कॉस्मेटिक असे तिहेरी झाले आहे.*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••समता ही आजची हाक आहे. ती आपणास आवडो वा ना आवडो, समता आजचा युगधर्म आहे याची जाणीव ठेवली पाहिजे - विनोबा भावे*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) स्वतंत्र भारताचे पहिले मतदार म्हणून कोणाला ओळखले जाते ?२) २००६ साली सोलापूरमध्ये झालेल्या ८३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते ?३) आंतरराष्ट्रीय टी - २० क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा पहिल्याच चेंडूवर बळी घेणारा गोलंदाज कोण ?४) परिसंस्थेतील घटकांच्या चक्राला काय म्हणतात ?५) राष्ट्रपतीपदाची रिक्त जागा किती महिन्यात भरली जाणे आवश्यक आहे ?*उत्तरे :-* १) श्याम शरण नेगी, से. नि. शिक्षक, हिमाचल प्रदेश २) मारूती चितमपल्ली ३) भुवनेश्वर कुमार, भारत ( १७ वेळा ) ४) जैव रासायनिक चक्र ५) ६ महिने *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••👤 श्रीपाद पटेल राऊतवार👤 बाबुराव जाधव👤 माधव यादव👤 भगवान वाघमारे*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*     [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*ग्रंथपारायणात रस नसलेलो आम्ही पुस्तकांची पानं फाडून, होड्या बनवून पावसात सोडायचो. काही दु:ख वाटायचं नाही उलट मौज वाटायची. पुस्तकाची किती पानं फाडलीत हे कुठं कळायचं, आई-बापांना ! अशा पुरात सोडलेल्या होड्या वाहुन समुद्राला गेल्या; पण डोळ्यातील स्वप्नांना मात्र त्यांनी बुडू दिलं नाही. पुस्तकांच्या पानांच्या होड्या, विमानं, पतंग बनवायला मिळतात म्हणून शाळेची वाट गोड. मजबुरीने धरलेल्या वाटेवर याच ग्रंथाच्या होडीने अथांग दर्यावर हुकूमत गाजवणारा नावाडी बघता बघता कधी बनवून टाकले, कळलेच नाही. तेंव्हा वाटले नव्हते, की या कागदी नावेला स्वप्नांची वल्हं आणि स्वप्नांचा अमर्याद धागा जोडला आहे ते.!**आज ग्रंथांविषयी निराशापूर्ण वातावरण दिसते. ग्रंथांकडे समाज दुर्लक्ष करतोय, पण "किताबों पर धूल जम जाने से, कहानी थोडेही खत्म हो जाती है!" कुठल्याही काळात ही धूळ झटका, पुस्तकं पुन्हा भरभरून बोलतील. प्रत्येकाला ही कागदाची नाव आणि शाईचं इंधन पुरेसं आहे ; हा जीवनाचा अथांग दर्या तरून जायला.*  ••●🌸 ‼ *रामकृष्णहरी* ‼🌸●••            🌸🌸🌸🌸🌸🌸         *संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*               📱 9167937040•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••जीवनात तुम्हाला चांगले जगायचे तर येणा-या कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्याची तयारी ठेवा.कारण कोणतीही परिस्थिती चांगली असतेच असे नाही.कधी कधी वाईट आणि बिकट परिस्थितीतून ही मार्ग काढून सुखी जीवन जगण्यासाठी एखादा आशेचा किरण सापडत असतो.पण आता आपल्याला आपल्या जीवनात दु:खच आहे आणि दुःखच भोगावे लागणार त्याच्याशिवाय आता दुसरा पर्यायच नाही असे जर म्हटले तर मग जीवनात दु:खाशिवाय दुसरे काहीच भोगायला मिळणार नाही.उलट जर तुम्हाला त्यातून बाहेर पडायचे असेल आणि सुखाने जीवन जगायचे असेल तर हातपाय तर हलवावेच लागतील.मेहनत करावी लागेल,काहीतरी काम शोधावे लागेल,आपले निराशावादी मन आशेकडे न्यावे लागेल, नकारात्मक विचारांना सकारात्मक विचारांकडे न्यावे लागेल तर तुम्हाला सुखी जीवन जगण्याचा मार्ग सापडेल.अन्यथा मग आपल्या जीवनाच्या जीवनशैलीला आहे तसेच स्वीकारुन जीवनभर यातना,दु:ख यांना जवळ करावे लागेल.*व्यंकटेश काटकर,नांदेड.*  संवाद...९४२१८३९५९०.🌺🍃🌺🍃🌺🍃🌺🍃🌺🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••                *गरुड व घुबड*एक गरुड आणि घुबड फार दिवस एकमेकांशी भांडत असत. परंतु, एक दिवस, त्यांनी एकमेकांशी मैत्रीने वागण्याचे ठरविले, तसेच एकमेकांची पिल्ले खाऊ नये असेही ठरवले. तेव्हा घुबड गरुडाला म्हणाले, ''मित्रा! परंतु, माझी पिल्ले कशी आहेत ते तुला माहीत आहे का? नाहीतर दुसर्‍याचीच आहेत असे म्हणून तू त्यांना खाऊन टाकशील.'' गरुड म्हणाला, ''माझी पिल्ले खूप सुंदर आहेत. त्यांचे डोळे, पिसे, आवाज सगळेच खूप सुंदर आहे. आता येईल ना तुला ओळखता?'' पुढे एके दिवशी, झाडाच्या ढोलीत गरुडाला घुबडाची पिल्ले सापडली. ती पाहून तो म्हणाला, ''किती घाणेरडी आणि कुरूप पिल्ले आहेत ही. घुबडाची पिल्ले तर खूप सुंदर आहेत. म्हणजे ही काही घुबडाची पिल्ले नसणार. यांना मारून टाकावे. असे म्हणून त्याने सगळ्या पिलांचा फडशा उडवला.'' नंतर घुबडाने येऊन पाहिले तो ढोलीत पिल्ले नाहीत. ते गरुडास म्हणाले, ''मित्रा, तूच माझी पिल्ले खाल्लीस.'' गरुड म्हणाला, ''हो, मी खाल्ली; पण मला काय माहीत की ही कुरूप पिल्ले तुझी आहेत म्हणून ? तू तर म्हणालास की, माझी पिल्ले खूप सुंदर आहेत. मला वाटले ती दुसर्‍याच पक्ष्याची आहेत. आता यात माझी काय चूक?तात्पर्य: स्वत:ची खरी माहिती लपवून खोटी माहिती सांगितली असता मनुष्य संकटात सापडतो*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~