✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 24 एप्रिल 2024💠 वार - बुधवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/GWa1vbjp8h2WrxSP/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_जागतिक जलसंपत्ती दिन'_* *_भारतीय पंचायत राज दिवस_*•••••••••••••••••••••••••••••••••••• *_ या वर्षातील ११५ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *१९९३:७३ वी घटना दुरुस्ती महिलांना ३३% आरक्षण* *१९९३:इंडियन एअरलाइन्सच्या फ्लाईट ४२७ या दिल्लीहून श्रीनगरला जाणार्‍या विमानाचे ३ अतिरेक्यांनी अपहरण केले. ब्लॅक कॅट कमांडोजनी केलेल्या कारवाईत तिन्ही अतिरेकी ठार झाले व सर्व १४१ प्रवाशांची सुखरुप मुक्तता झाली**१९९०:डिस्कव्हरी या अंतराळयानातुन हबल ही दुर्बिण सोडण्यात आली.**१९७०:गाम्बिया प्रजासत्ताक बनले.**१९६८:मॉरिशस संयुक्त राष्ट्रांचा (United Nations) सदस्य बनला.**१९६७:वेळेवर पॅराशूट न उघडल्यामुळे व्लादिमिर कोमारोव्ह हा मरण पावणारा पहिला अंतराळवीर ठरला.**१९२९:इंग्लंड आणि भारत दरम्यान पहिले विमान उड्डाण* *१९२०:पोलंच्या सैनिकांचे युक्रेनवर आक्रमण**१८००:अमेरिकेतील महाप्रचंड अशा लायब्ररी ऑफ काँग्रेसची (Library of Congress) स्थापना झाली. हे जगातील सर्वोत्तम ग्रंथालय आहे.**१७१७:[वैशाख व. ९, शके १६३९] खंडेराव दाभाडे यांनी अहमदनगर येथे मोगलांचा पराभव केला**१६७४:भोर-वाई प्रांतातील केंजळगड शिवाजी महाराजांनी स्वारी करुन जिंकला.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८१:मेघना सुधीर एरंडे-- भारतीय अभिनेत्री* *१९७८:प्रसाद रामचंद्र नामजोशी -- लेखक, दिग्दर्शक**१९७३:सचिन तेंडुलकर – महान क्रिकेटपटू, भारतर‍त्‍न**१९७०:डॅमियन फ्लेमिंग – ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू**१९६३:डॉ.सुरुची सुधीर डबीर -- लेखिका* *१९४७:अरुण काकतकर-- दूरदर्शनचे प्रयोगशील निर्माते व लेखक* *१९५५:दिलीप मुरलीधर देशपांडे-- लेखक, ज्येष्ठ पत्रकार(विविध वृत्तपत्रामधून विविध विषयावर सातत्याने लेखन)**१९४३:पंडित श्रीराम शहापूरकर-- प्रसिद्ध हार्मोनियम वादक(मृत्यू:८ ऑक्टोबर २०१४)**१९४२:बार्बारा स्ट्रायसँड – अमेरिकन अभिनेत्री,गायिका,चित्रपट निर्माती व दिग्दर्शिका**१९३९:मीरा कोसंबी-- प्रख्यात भारतीय समाजशास्त्रज्ञ(मृत्यू:२६ फेब्रुवारी २०१५)* *१९३८:मॅक मोहन -- हिंदी चित्रपटांमधील अभिनेता(मृत्यू:१० मे २०१०)**१९३६:पद्माकर गोवईकर-- मराठी नाटककार व कादंबरीकार(मृत्यू:२२ जुलै २००१)**१९३५:डॉ.बिंदुमाधव दत्तात्रय पुजारी-- व्यवसायाने डॉक्टर असलेले लेखक**१९३०:बाळ ठाकूर (भालचंद्र श्रीराम ठाकूर)--महाराष्ट्रातील प्रख्यात मुखपृष्ठ चित्रकार (मृत्यू:८ जानेवारी २०२२)* *१९२९:राजकुमार – कन्नड चित्रपट अभिनेता व गायक (मृत्यू:१२ एप्रिल २००६)**१९२४:प्रल्हाद नरहर जोशी--- संत वाङ्मयाचे गाढे अभ्यासक,कादंबरीकार(मृत्यू:५ जून २००४)**१९१०:राजा परांजपे –चित्रपट दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते (मृत्यू:९ फेब्रुवारी १९७९)**१९०४:केशव नारायण काळे-- मराठीतील कवी,नाटककार,समीक्षक,चित्रपट निर्माते आणि नियतकालिकांचे संपादक(मृत्यू:२० फेब्रुवारी १९७४)**१८८९:सर स्टॅफोर्ड क्रिप्स – इंग्लिश राजकारणी (मृत्यू:२१ एप्रिल १९५२)**१८९६:रघुनाथ वामन दिघे – रसाळ लेखन करणारे कादंबरीकार.’पाणकळा’,’सराई’,’पड रे पाण्या’,’आई आहे शेतात’,’गानलुब्धा’, ’मृगनयना’ वगैरे त्यांच्या कादंबर्‍या अतिशय गाजल्या.(मृत्यू:४ जुलै १९८०)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_*••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०११:सत्यनारायण राजू ऊर्फ ’सत्य साईबाबा’ – आध्यात्मिक गुरू (जन्म:२३ नोव्हेंबर १९२६)**२००६:गोविंद मोघाजी गारे-- आदिवासी संस्कृती,आदिवासी साहित्य,आदिवासी कला यांचे गाढे अभ्यासक(जन्म:४ मार्च १९३९)**२००४: इंदुमती गंधे-- विदर्भातील बालसाहित्यिक,अनुवादक(जन्म:२० नोव्हेंबर १९२०)**१९९९:सुधेन्दू रॉय – चित्रपट व कला दिग्दर्शक (जन्म:१९२१)**१९९४:शंतनुराव किर्लोस्कर – पद्मभुषण पुरस्कार विजेते उद्योगपती,किर्लोस्कर उद्योगसमूहाचे आधारस्तंभ (जन्म:२८ मे १९०३)**१९९२:अनंत महादेव मेहंदळे-- महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध नारदीय कीर्तनकार(जन्म:७ फेब्रुवारी १९२८)**१९७४:रामधारी सिंह ’दिनकर’ – देशभक्त व हिन्दी साहित्यिक (जन्म:२३ सप्टेंबर १९०८)**१९७२:जामिनी रॉय – चित्रकार (जन्म:११ एप्रिल १८८७)**१९६०:लक्ष्मण बळवंत तथा अण्णासाहेब भोपटकर – नामवंत वकील,महाराष्ट्र मंडळाचे एक संस्थापक,केसरीचे संपादक आणि हिंदू महासभेचे नेते (जन्म:१८६०)**१९४२:मास्टर दीनानाथ मंगेशकर – शास्त्रीय व नाट्यसंगीत गायक व अभिनेते (जन्म:२९ डिसेंबर १९००)**१९३५:रघुनाथ पांडुरंग करंदीकर-- व्यासंगी कायदेपंडित,स्वातंत्र्य चळवळीतील प्रभावी नेते,साहित्यिक आणि लोकमान्य टिळकांचे सहकारी(मृत्यू:२१ ऑगस्ट१८५७)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सचिन रमेश तेंडुलकर यांच्या वाढदिवसानिमित्त श्री मुकुंद कुलकर्णी यांचा लेख*मास्टर ब्लास्टर भारतरत्न पुत्र*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *Lok Sabha Elections 2024: उष्णतेच्या लाटेमुळे मतदान होणार कमी? निवडणूक आयोगाने नेमली टास्क फोर्स*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मध्यम-श्रेणीच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राच्या नवीन व्हेरिएंटचे यशस्वी प्रक्षेपण*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *राज्यातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा तडाखा, गारपिठीमुळे शेतीचे मोठं नुकसान*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *खालापूर येथील S.H. केळकर कंपनीला भीषण आग, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *देशातील मतदानाची टक्केवारी कमी होणे चिंताजनक काँग्रेस नेते माणिक ठाकरे यांचे पत्रकार परिषदेत प्रतिपादन*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या खात्यातून तब्बल ४७ लाख ६० हजार रुपयाची चोरी*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *चेन्नईने लखनऊ समोर ठेवले 211 धावाचे लक्ष्य*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *पॅथॉलॉजी म्हणजे काय ?* 📙 शरीरांतर्गत अनेक क्रिया प्रक्रिया जन्मल्यापासून चालू असतात. शरीरक्रियाविज्ञानामध्ये त्यांचा वेध घेतला जातो. या कोणत्याही क्रियेमध्ये बिघाड झाला म्हणजे तो बिघाड शोधण्याची प्रक्रिया पॅथालॉजीमध्ये सुरू होते. रक्त, लघवी, थुंकी, रक्ताचे विविध घटक व त्यांचे बदलते प्रमाण या साऱ्यांची तपासणी करून त्यावरून निदान करण्यासाठी या शास्त्राची मदत सारखीच लागत असते. एवढेच नव्हे तर वरवर निरोगी दिसणाऱ्या माणसाच्या पॅथॉलॉजिकल तपासण्या केल्यास अनेक गोष्टी उघडकीला येऊ शकतात. उदाहरणार्थ, नुकताच शरीरात प्रवेश केलेला मधुमेह किंवा सतत थकवा जाणवत असेल, तर आढळणारा रक्तक्षय हा सहसा तपासणीतून अचानक सामोरा येतो.शरीरातील विविध द्रवांच्या चाचण्या घेण्यासाठी सुमारे ३० वर्षांपूर्वी अनेक रासायनिक क्रिया करून मगच निष्कर्षाप्रत येता येत असे. या तंत्रामध्ये इलेक्ट्रॉनिक बायोमेडिकल उपकरणांमुळे झपाट्याने प्रगती होत गेली. रक्तातील तांबड्या, पांढऱ्या पेशी मोजण्यासाठी आता सेलकाऊंटरसारखे उपकरण उपलब्ध झाल्याने काही मिनिटांत संपूर्ण तपासणी अचूक पद्धतीत पूर्ण होऊ शकते. रक्तातील साखर, अल्बुमिन किंवा अनेक घटक काही सेकंदात मोजू शकणारी उपकरणे आता रुग्ण स्वतःच्या घरीही वापरू शकतो.शरीरातील नलिकाविरहित ग्रंथींचे (एंडोक्राइन ग्लँड) स्रावांचे प्रमाण मोजणे, विविध हार्मोन्सची शरीरातील पातळी मोजणे हे काही वर्षांपूर्वी अत्यंत त्रासाचे व गुंतागुंतीचे होते. ते आता विविध उपकरणे व त्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या आधीच रासायनिक प्रक्रिया केलेल्या पट्ट्या किंवा द्रावांमुळे कोणत्याही शहरातील प्रशिक्षित तंत्रज्ञ करू शकतो. असे तंत्रज्ञ करा तयार करण्याचे (DMLT / BM Tech) अभ्यासक्रम जवळपास प्रत्येक जिल्ह्याच्या गावीही सुरू झाले आहेत. डॉक्टरी पदवी घेतल्यावर ३ वर्षांचा विशेष अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर पॅथालॉजी व बॅक्टेरियॉलॉजी या विषयात तज्ज्ञ म्हणून काम सुरू करता येते. अधिक अनुभवानंतर शरिरातील कोणत्याही अवयवाचे सूक्ष्म तुकडे सूक्ष्मदर्शक यंत्राखाली तपासून त्यांतील दोष निश्चित करता येतात. पेशींच्या रचनेचे बदल होऊन कॅन्सरची सुरुवात असेल असेल तर त्याचेही निदान तज्ज्ञ पॅथॉलॉजिस्टच करतात. शरीरातील द्रवात सापडणारे जंतू कृत्रिमरित्या वाढवून त्यांच्यावरील उपाययोजना सुचवणे हा बॅक्टेरियॉलॉजीचा भाग असतो.अनैसर्गिक मॄत्यू झाल्यास शवविच्छेदन करणे आवश्यक असते. अशा वेळी शरीरातील विविध भागांचे निरीक्षण करून मृत्यूचे कारण शोधून काढण्यासाठी तज्ज्ञ पॅथॉलॉजीस्टचीच मदत घेतली जाते.‘सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सन्मानाने सुख प्राप्त करण्याचे साधन म्हणजे शिक्षण.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *जागतिक वसुंधरा दिवस - २०२४ ची थीम* काय आहे ?२) कांदा कापतांना कोणता वायू बाहेर पडतो ?३) पायी चाललेल्या वारकऱ्यांच्या समूहास काय म्हणतात ?४) 'अंगार' या शब्दाचे समानार्थी शब्द सांगा.५) तानसा धरण कोणत्या नदीवर आहे ?*उत्तरे :-* १) प्लॅनेट विरुद्ध प्लास्टिक २) अमोनिया ३) दिंडी ४) निखारा ५) तानसा नदी, ठाणे *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 जगदीश पा. नवले, परभणी👤 भूमाजी मामीडवार👤 सौरभ कोटपल्लीवार👤 कवी विशाल मोरे👤 अझीझ पटेल👤 अनिरुद्ध उत्तरवार👤 महावीर जैन👤 दत्ता फत्तेपुरे, येवती*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *अभंगवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••वंदूं चरणरज सेवूं उष्टावळी । पूर्वकर्मा होळी करुनी सांडूं ॥१॥अमुप हे गांठीं बांधूं भांडवल । अनाथा विठ्ठल आम्हां जोगा ॥ध्रु.॥अवघे होती लाभ एका या चिंतनें । नामसंकीर्तनें गोविंदाच्या ॥२॥जन्ममरणाच्या खुंटतील खेपा । होईल हा सोपा सिद्ध पंथ ॥३॥गेले पुढें त्यांचा शोधीत मारग । चला जाऊं माग घेत आम्ही ॥४॥तुका म्हणे घालूं जीवपणा चिरा । जाऊं त्या माहेरा निजाचिया ॥५॥।। संत तुकाराम महाराज ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••प्रत्येकांपाशी बळ असते. मग ते बळ पैशाचे असो किंवा जबरदस्त संगतीचे असो किंवा अफाट धन संपत्तीचे. त्या बळामुळे माणूस मनाप्रमाणेच सर्वच काही कमावू शकतो, वाटू शकतो.पण, ज्याच्याकडे खऱ्या दर्जेदार शब्दांची व सत्य समजून घेण्याची ताकद असते ती ताकद मात्र ह्या सर्व, व्यर्थ ताकद पेक्षा कितीतरी महान असते. ही ताकद पैशाने विकत मिळत नाही तर संघर्षातून अनुभव आल्यानेच येत असते. म्हणून तिचा उपयोग चांगल्या कार्यासाठी करावा. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *अध्यात्म आणि व्यवहार*एकदा आद्यशंकराचार्य आपल्या शिष्यांसह चालले असता समोरून अचानकपणे एक पिसाळलेला हत्ती धावत येताना दिसला. अर्थातच इतरांच्याबरोबरच शंकराचार्यही हत्तीच्या मार्गातून दूर पळू लागले. त्यांच्या शिष्यवर्गात काही. खट्याळ, तरुण शिष्यही होते. त्यातील एकजण धाडस करून त्यांना म्हणाला, “तुम्हीच आजच्या प्रवचनात म्हणालात की केवळ ब्रह्म हे सत्य आहे व हे दृश्य जग मिथ्या आहे. म्हणजे हा हत्तीही मिथ्या आहे. मग आपण का पळताहात ?’शंकराचार्य लगेच म्हणाले, “पण माझं पळणं हेही मिथ्याच आहे ?” तो तरुण शिष्य ओशाळला. त्याने त्यांची क्षमा मागितली.होतं काय की, ‘ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या’ याचा चुकीचा अर्थ घेतल्याने अनेक घोटाळे होतात. व्यवहारात अध्यात्म आणू नये व अध्यात्मात व्यवहार आणू नये.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 19 एप्रिल 2024💠 वार - शुक्रवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.saamana.com/priya-bhosale-article-on-veteran-actress-lalita-pawar/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील ११० वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *१९८१:महाराष्ट्र विधान भवनाचे इंदिरा गांधी यांच्या शुभहस्ते उद्घाटन* *१९७५:’आर्यभट्ट’ हा भारताचा पहिला उपग्रह रशियन अंतराळस्थानकावरुन प्रक्षेपित करण्यात आला**१९७१:सिएरा लिओन प्रजासत्ताक बनले**१९५६:गीतरामायणातील शेवटचे गाणे पुणे आकाशवाणीवरुन प्रसारित झाले.**१९४८:ब्रह्मदेशचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश**१९४५:सोविएत रशिया आणि ग्वाटेमालामधे राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले.**१५२६:मोगल साम्राज्याचा संस्थापक जहीरुद्दीन महंमद बाबर याने दिल्लीच्या इब्राहीमखान लोदीचा पराभव करुन मोगल राजसत्तेचा पाया घातला.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८७:मारिया शारापोव्हा – रशियन लॉनटेनिस खेळाडू**१९७९:रंजना सतीश खेडकर-- कवयित्री* *१९७३:डॉ.अशोक लिंबेकर -- लेखक, समीक्षक**१९७२:सचिन जगताप-- प्रसिद्ध बासरी वादक**१९६८:रूपक कुलकर्णी-- बासरी वादक,पं. हरिप्रसाद चौरसिया यांचे शिष्य**१९६४:प्रा.डॉ.संदीप पांडुरंग ताटेवार-- लेखक* *१९६२:डॉ.आनंद सदाशिव सहस्त्रबुद्धे-- कथा,कादंबरी लेखन करणारे लेखक* *१९५७:मुकेश अंबानी – प्रसिद्ध उद्योगपती**१९५५:भिकू नारायण बारस्कर -- प्रसिद्ध कथाकार,चरीत्रकार,संपादक**१९४१:माधव सरपटवार-- लेखक,पत्रकार, संपादक**१९३७:भगवान भटकर-- प्रसिद्ध कवी, विचारवंत* *१९३३:डिकी बर्ड – ख्यातनाम क्रिकेट पंच**१९३०:मालती पांडे-बर्वे-- हिंदी आणि मराठी भाषांत गाणाऱ्या मराठी गायिका(मृत्यू:२७ डिसेंबर १९९७)**१९२६:प्रभाकर विष्णू सोवनी-- विज्ञान विषयक लेखन करणारे लेखक,संपादक (मृत्यू:२० नोव्हेंबर २०१५)**१९२५:अनंत रामचंद्र कुलकर्णी-- मध्ययुगीन महाराष्ट्राच्या इतिहासाचे अभ्यासक,संशोधक, इतिहासकार.(मृत्यू:२४ मे २००९)**१९१२:ग्लेन सीबोर्ग – नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ (मृत्यू:२५ फेब्रुवारी १९९९)**१८९५:केशव नारायण वाटवे-- साहित्यविमर्शकार,समीक्षक( मृत्यू:९ मे १९८१)**१८९२:ताराबाई मोडक – शिक्षणतज्ञ. कोसबाड येथील आदिवासींच्या जीवनात बालशिक्षण व सुधारणांचे नंदनवन त्यांनी फुलवले.(मृत्यू:३१ ऑगस्ट १९७३)**१८६८:पॉल हॅरिस – रोटरी क्लबचे संस्थापक (मृत्यू:२७ जानेवारी १९४७)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१०:मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष – लेखक व टीकाकार (जन्म:७ जून १९१३)**२००९:अहिल्या रांगणेकर – मार्क्सवादी कम्युनिस्ट नेत्या (जन्म:८ जुलै १९२२)**२००८:सरोजिनी बाबर – लेखिका, संतसाहित्याच्या अभ्यासिका(जन्म:७ जानेवारी १९२०)**१९९४:मेजर जनरल राजिंदरसिंग ‘स्पॅरो’ – पंजाबचे माजी मंत्री.पाकिस्तानच्या ’पॅटन’ रणगाड्यांचा धुव्वा उडवल्याबद्दल त्यांचा ’ईगल’ (गरूड) म्हणून गौरव केला असता,मी तर केवळ एक ’स्पॅरो’ (चिमणी) आहे,असे त्यांनी सांगितले,आणि तेच त्यांचे टोपणनाव रुढ झाले.**१९९३:डॉ.उत्तमराव पाटील – स्वातंत्र्यसैनिक, पत्री सरकारमधे त्यांचा सहभाग होता**१९७४:आयुब खान – फील्ड मार्शल आणि पाकिस्तानचे दुसरे राष्ट्राध्यक्ष (जन्म:१४ मे १९०७)**१९५५:जिम कॉर्बेट – ब्रिटिश - भारतीय वन्यजीवतज्ञ,शिकारी व लेखक (जन्म:२५ जुलै १८७५)**१९१०:अनंत कान्हेरे – क्रांतिकारक (जन्म: १८९१)**१९०६:पिअर क्यूरी – नोबेल पारितोषिकविजेते फ्रेन्च भौतिकशास्त्रज्ञ (जन्म:१५ मे १८५९)**१८८२:चार्ल्स डार्विन – उत्क्रांतीवादाचा सिद्धांत मांडणारे ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ (जन्म:१२ फेब्रुवारी १८०९)**१८८१:बेंजामिन डिझरेली – इंग्लंडचे पंतप्रधान (जन्म:२१ डिसेंबर १८०४)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••दैनिक सामनामध्ये प्रकाशित प्रिया भोसले यांचा प्रासंगिक लेख*ललिता पवार - जन्मदिन विशेष*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *आज पहिल्या टप्प्यातील मतदान :10 हजार 652 मतदान केंद्रांवर 95 लाख 54 हजार मतदार करणार उमेदवारांचा फैसला*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राच्या अडचणीत वाढ, ईडीने जप्त केली 97 कोटींची मालमत्ता*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *मोठी दुर्घटना ! कोयनेच्या शिवसागर जलाशयात स्पीड बोट बुडाली, तिघे करत होते प्रवास*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *ललित साहित्य म्हणजे सामाजिक इतिहासाचा दस्तऐवज:इतिहास अभ्यासक प्रा. डॉ. श्रद्धा कुंभोजकर यांचे प्रतिपादन*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *गीत रामायणातील 56 गीतांचे होणार सादरीकरण:पुण्यात 'हटके' कार्यक्रम; तब्बल 25 हून अधिक कलाकारांचा असेल समावेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *क्रेडाई देणार भावी अभियंत्यांना प्रशिक्षण:नवअभियंत्यांना 200 तासांचे कौशल्याधारित मार्गदर्शन; क्रेडाई मेट्रो-VIIT मध्ये सामंजस्य करार*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *मुंबई इंडियन्सने पंजाबला 9 धावाने हरविले*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📕 *उन्हाळी लागणे म्हणजे काय ?* 📕************************बऱ्याचदा उन्हामुळे असा त्रास आपल्याला होत असतो. उन्हाळी लागणे म्हणजे लघवी करताना जळजळ होणे व मूत्रमार्ग दुखणे. लघवीतील पाण्याचे प्रमाण कमी झाले, तर मूत्रनलिकेतील आवरणास इजा होते. त्यामुळे लघवी करताना आग होते. मूत्रनलिकेत आवरणाचा दाह होत असल्याने साध्या लघवीमुळे जळजळ होते. मूत्रपिंडामध्ये लघवी तयार होत असते. मूत्र तयार होण्याचा मुख्य उद्देश म्हणजे शरीरातील पाणी, क्षार यांचे संतुलन राखणे व शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर टाकणे हा आहे. साहजिकच पाणी कमी प्यायले, तर मूत्राचे प्रमाण कमी होते; परंतु मूत्रातील क्षारांचे व टाकाऊ पदार्थांचे प्रमाण तेवढेच राहते. साहजिकच त्यामुळे लघवी सौम्य न होता जळजळीत होते. अशावेळेस लघवी गडद पिवळी किंवा लालसर दिसते. यामुळे मूत्रनलिकेच्या आवरणाचा दाह होतो. पाणी कमी पिणे, या कारणाशिवाय जंतूसंसर्गामुळे, मूतखड्यामुळे मूत्रनलिकेला दाह होऊन लघवी करतेवेळी जळजळ होते.यावर उपाय म्हणजे नेहमीच विशेषत: उन्हाळ्यात जास्त पाणी पिणे. घामाचे प्रमाण लक्षात घेऊन दिवसभरात एक लिटर लघवी होईल इतके पाणी प्यावे. उन्हाळी लागलेली असल्यास लिंबूपाण्यात खाण्याचा सोडा टाकून प्यावे. १०० मिलीलिटर म्हणजे साधारणतः एक कप पाण्यात २.५ ग्रॅम धने भिजत ठेवून ते पाणी साखर टाकून १२-१२ तासांनी प्यायल्याने उतारा पडतो/ जळजळ कमी होण्यास मदत होते.*डाॅ. अंजली दिक्षित व डाॅ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••नम्रतेने जे लाभेल ते बळाने कधीच मिळणार नाही.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) 'फासे पारध्यांना माणसासारखे जगू द्यावे' हे उद्गार कोणाचे आहेत ?२) राज्यसभेचे सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात ?३) हडप्पा संस्कृती कोणत्या नदीच्या खोऱ्यात विकसित झाली ?४) 'आज्ञा' या शब्दाचे समानार्थी शब्द सांगा.५) भारतीय निवडणूक आयोगाने स्वतंत्र, निष्पक्ष व पारदर्शक निवडणूक होण्यासाठी कोणते पोर्टल सुरू केले आहे ? *उत्तरे :-* १) छत्रपती शाहू महाराज २) राष्ट्रपती ३) सिंधू ४) आदेश, हुकूम ५) सुविधा*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 हर्षवर्धन घाटे, पत्रकार, बिलोली👤 भक्ती जठार👤 संदीप बोलचेटवार, धर्माबाद👤 संतोष पुरणशेट्टीवार, धर्माबाद👤 मनोज रामोड👤 अझर शेख👤 बालाजी पोरडवार👤 संदीप काटमवाड, बिलोली👤 सचिन कनोजवार👤 कृष्णा राय*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *अभंगवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सावध जालों सावध जालों । हरिच्या आलों जागरणा ॥१॥तेथें वैष्णवांचे भार । जयजयकार गर्जतसे ॥ध्रु.॥पळोनियां गेली झोप । होतें पाप आड तें ॥२॥तुका म्हणे त्या ठाया । ओल छाया कृपेची ॥३॥।। संत तुकाराम महाराज ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••भांड्यावर झाकण असते पण, तोंडावर नाही. लाकडाचा तोंड राहिला असता तर केव्हाचाच फुटला असता. या, प्रकारचे शब्द अनेकांच्या बोलण्यातून ऐकायला मिळत असते. म्हणून ज्यांना ज्या,शब्दात बोलण्याची सवय आहे त्यांना बिनधास्तपणे बोलू द्यावे त्यांच्याकडे आपण जास्त लक्ष देऊ नये. ते आपले काम करतात आपण आपले काम करत रहावे.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*शास्त्राचा उपयोग कोणता ?*प्राचीन भारतात नागार्जुननावाचे एक महान रसायन शास्त्रज्ञ होऊन गेले. त्यांना एका सहाय्यकाची आवश्यकता होती.दोन तरुण या कामासाठी त्यांच्या मुलाखतीला आले म्हणा ना – आचार्यांनी दोघात एक पदार्थदिला व त्यापासून एक विशिष्ट रसायन करून आणायला सांगितलं. तीन दिवसाचा अवधी दिला. दोघे उत्साहाने कामाला लागले. तीन दिवसांनी परत आले. आचार्यांनी विचारले, ‘कामात काही अडचणी तर आल्या नाहीत?’ पहिला अभिमानाने म्हणाला, “आईला ताप होता वडील पोटदुखींना हैराण झाले होते. भाऊ पडल्यामुळे हाडाला मार लागला होता. पण माझी साधना मी सोडली नाही व हे रसायन करून आणल आहे.” दुसरा म्हणाला, आचार्य, क्षमा असावी. मी घरी जात असता वाटेत एक वृद्ध रुग्ण दिसला. निर्धनही होता बिचारा. त्याला औषधोपचार करून त्याचे व्यवस्था लावण्यातवेळ गेला. आपण दिलेलं काम पूर्ण करू शकलो नाही. कृपया आणखी दोन दिवसाची सवड द्यावी.आचार्यांनी त्याचीच निवड केली. ते म्हणाले, ‘रसायन शास्त्राचा उपयोग जीवन रक्षणासाठी झाला पाहिजे, समाजविन्मुख ज्ञानाचा काय उपयोग?’ तात्पर्यः ज्ञानाचा/शिक्षणाचा उपयोग समाजात झाला तर खऱ्या अर्थाने शिक्षणाचा उपयोग झाला असे समजावे.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 18 एप्रिल 2024💠 वार - गुरुवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.saamana.com/article-by-parth-bawskar-on-shree-ram-ramnavami/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_ जागतिक वारसा दिन_* *_ या वर्षातील १०९ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *_जागतिक वारसा दिन_**_आपल्या पूर्वजांनी प्राचीन काळी अनेक मंदिरे,गुहा,लेणी,किल्ले,स्मारके अशा गोष्टी बांधून ठेवल्या आहेत. त्यासंबंधात आस्था निर्माण करण्यासाठी व पुरातन गोष्टींचे जतन होण्यासाठी हा दिवस ’जागतिक वारसा दिन’ (World Heritage Day) म्हणून साजरा केला जातो._*••••••••••••••••••••••••••••••••••*२००१:भूसंलग्न उपग्रह प्रक्षेपक (GSLV- D1) वाहकाचे रशियन बनावटीच्या क्रायोजेनिक इंजिनाच्या साहाय्‍याने श्रीहरिकोटा तळावरून यशस्वी प्रक्षेपण**१९९४:वेस्टइंडीजचा फलंदाज ब्रायन लारा यांच्या विक्रमी३७५ धावा**१९८०:झिंबाब्वेचा स्वातंत्र्य दिन**१९७१:एअर इंडियाचे पहिले बोईंग ७४७ जंबो जेट विमान ’सम्राट अशोक’ शाही दिमाखात सकाळी ८-२० वाजता सांताक्रूझ विमानतळावर दाखल.**१९५४:गामल अब्दल नासर याने इजिप्तची सत्ता ताब्यात घेतली.**१९५०:आंध्र प्रदेशातील तेलंगणा येथील पोचमपल्ली खेड्यातील ८० एकर जमीनीच्या भूदानाने विनोबा भावे यांची भूदान चळवळ सुरू झाली**१९३६:पेशव्यांची राजधानी असणार्‍या पुण्यातील शनिवारवाडा पुरातत्व विभागाकडे सुपूर्त करण्यात आला.**१९३०:क्रांतिकारकांनी चितगाव येथील शस्त्रागार लुटले.**१९३०:आज काहीही बातमी नाही असे बी. बी.सी.या नभोवाणी केंद्रावरुन सांगण्यात आले**१९२७:पहिले ख्रिस्ती साहित्य संमेलन डॉ. निकल मॅक्निकल यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक येथे भरले**१९२४:सायमन व शूस्टर यांनी पहिले शब्दकोड्यांचे पुस्तक प्रकाशित केले.**१९१२:’टायटॅनिक’ मधील वाचलेले ७०५ प्रवासी घेऊन ’कार्पेथिया’ हे जहाज न्यूयॉर्कला पोचले**१८९८:जुलमी प्लेग अधिकारी रँड याचा खून करणारे दामोदर चापेकर यांना फाशी**१८५३:मुंबईहून ठाण्यापर्यंत नियमित रेल्वे सेवा सुरू झाली.**१८३१:’यूनिव्हर्सिटी ऑफ अलाबामा’ ची स्थापना झाली.**१७२०:शाहू छत्रपती यांच्याकडून पहिले बाजीराव पेशवे यांना कर्‍हाडनजीक मसूर येथे पेशवाईची वस्त्रे मिळाली.**१७०३:औरंगजेबाने सिंहगड ताब्यात घेतला.**_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९७६:शेखर गिरी-- कवी,गझलकार* *१९७६:किरण शिवहर डोंगरदिवे-- प्रसिद्ध कवी,समीक्षक आणि ललित लेखक**१९७५:नेहा बाजपेयी--भारतीय अभिनेत्री आणि निर्माती**१९७१:गणेश विठ्ठलराव कुंभारे-- कवी,लेखक**१९६७:विद्या बनाफर -- कवयित्री,लेखिका* *१९६६:अनिल सूर्या-- कवी,कथाकार**१९६५:प्रा.डॉ.निशा निळकंठ शेंडे -- लेखिका**१९६५:सविता प्रभुणे--- भारतीय अभिनेत्री* *१९५८:माल्कम मार्शल – वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू (मृत्यू:४ नोव्हेंबर १९९९)**१९५६:पूनम धिल्लन – अभिनेत्री**१९५०:अलका चंद्रकांत दराडे-- कवयित्री,लेखिका**१९४७:महेंद्र संधू--भारतीय अभिनेता* *१९२३: मधुसूदन परशुराम पेठे -- संत साहित्याचे अभ्यासक,ग्रंथालयशास्त्र तज्ञ* *१९१७:वसुंधरा कृष्णाजी पटवर्धन--कथाकार, कादंबरीकार,नाटककार,प्रवासवर्णनकार (मृत्यू:२ सप्टेंबर २०१०)**१९१६:ललिता पवार – अभिनेत्री (मृत्यू:२४ फेब्रुवारी १९९८)**१८५८:महर्षी अण्णासाहेब तथा धोंडो केशव कर्वे – स्त्रीशिक्षण व विधवा विवाह यातील कर्ते समाजसुधारक, पद्मभूषण,भारतरत्‍न (मृत्यू:९ नोव्हेंबर १९६२)**१८९९:काशीनाथ श्रीधर नायक-- कोंकणी कवी,प्रकाशक व मुद्रक**१७७४:सवाई माधवराव पेशवा-- यांचा पुरंदर किल्ल्यावर जन्म(मृत्यू:२७ आक्टोबर १७९५)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९९:रघूवीर सिंह – आंतरराष्ट्रीय ख्यातीचे छायाचित्रकार (जन्म:२२ आक्टोबर १९४२)**१९९५:पंडित धुंडिराजशास्त्री ऊर्फ अण्णा लक्ष्मण दाते – पंचांगकर्ते आणि ज्योतिषशास्त्राचे व्यासंगी अभ्यासक**१९७२:डॉ.पांडुरंग वामन काणे – विख्यात कायदेपंडित आणि धर्मशास्त्राचे अभ्यासक, महामहोपाध्याय, (जन्म:७ मे १८८०)**१९६६:जगन्नाथ गणेश गुणे तथा स्वामी कुवलयानंद – योगविद्येचे पुरस्कर्ते व शारीरिक शिक्षणतज्ञ,त्यांनी १९२४ मध्ये ’कैवल्यधाम’ नावाची योगशिक्षणसंस्था स्थापन केली.(जन्म:३० ऑगस्ट १८८३)**१९५५:अल्बर्ट आइनस्टाइन – जर्मन भौतिकशास्त्रज्ञ (जन्म:१४ मार्च १८७९)**१८९८:दामोदर हरी चापेकर यांना फाशी [चार्ल्स रँड याची हत्या करणारे] (जन्म:२४ जून १८६९)**१८८६:बजाबा रामचंद्र प्रधान-- इंग्रजी कवितेचा अनुवाद-अनुकरण करणारे मराठी कवी(जन्म:१८३८)* *१८५९:१८५७ च्या राष्ट्रीय उठावातील सेनापती रामचंद्र पांडुरंग तथा ’तात्या’ टोपे यांना फाशी देण्यात आले. (जन्म:१८१४)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••श्रीराम नवमी निमित्ताने दैनिक सामना मध्ये प्रकाशित श्री पार्थ बावसकर यांचा वाचनीय लेख*भारतीय लोकजीवनाचा आदर्श*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *शिरीष घाटपांडेंना अ. भा. मराठी प्रकाशक संघाचा जीवनगौरव पुरस्कार:तर साहित्यसेवा कृतज्ञता पुरस्कार डॉ. तारा भवाळकर यांना जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *निवडणूक प्रक्रियेला उद्यापासून प्रारंभ, प्रशासन सज्ज:जिल्हाधिकारी स्वामींनी घेतला आढावा; संभाजीनगरातील वाहतूक मार्गात उद्यापासून असणार बदल*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *देशभरात रामनवमी मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरी*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *‘टेस्ला’कडून भारतात २ ते ३ अब्ज डॉलरची गुंतवणूक? एलॉन मस्क यांच्या दौऱ्यादरम्यान घोषणा होण्याचा अंदाज*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मुंबईत आरटीई’ अंतर्गत १३८३ पात्र शाळांमध्ये एकूण २९ हजार ०१४ जागा उपलब्ध*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *वाहतूक कोंडीतून होणार मुंबईकरांची सुटका! शीव-पनवेल महामार्गाला जोडणार नवा पूल*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *IPL T20 - दिल्ली कॅपिटलने गुजरात टायटनचा केला 6 विकेटने केला पराभव*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *फेफरे किंवा फीट येणे* 📙 एखाद्या शाळेचा वर्ग चालू असतो किंवा मैदानावर खेळाचा तास चाललेला असताना एखादा मुलगा बघता बघता उभ्याचा आडवा पडतो. नुसता तो आडवाच पडतो असे नव्हे तर त्याच्या तोंडातून फेस येतो, तो डोळे फिरवतो, क्वचित दातखीळ बसते व त्याच वेळी त्याचे हातपायपण पिळवटले जातात, ताठ होतात. काही वेळा त्याची बेशुद्धी काही क्षणच टिकते, तर काही वेळा विशेष औषधोपचार करून त्याला शुद्धीवर आणायला लागते. यालाच फेफरे येणे, फिट येणे असे म्हणतात. एपिलेप्टिक सीझर असे या आजाराचे स्वरूप सांगितले जाते; पण वस्तुतः हा आजार नव्हे, तर ही एक शारीरिक स्थिती आहे. मेंदूचे कामकाज चालू असताना तेथे सतत विद्युत संवेदना निर्माण होऊन शरीरभर पाठविल्या जात असतात. या संवेदनांच्या स्वरूपात तीव्र बदल झाल्यास फेफरे येते. फेफरे येण्याच्या काळात मेंदूच्या कामाचा आलेख (Electro-Encephalo Graph) काढला, तर त्यावरून ही स्थिती नीट समजते.एखाद्याला फेफरे येते म्हणून त्याच्या आयुष्यातील अन्य गोष्टींवर काही विपरीत परिणाम झालेला असतोच, असे मात्र नाही. काही वेळा याउलट मात्र असू शकते. मेंदूच्या गंभीर आजाराचे दृश्य स्वरूप म्हणून प्रथम फेफरे येणे ही स्थिती उद्भवलेली आढळून येते. उदाहरणार्थ मेंदूमध्ये उद्भवणाऱ्या कॅन्सरमध्ये, ब्रेनट्युमरमध्ये फेफरे ही पहिली तक्रार असू शकते.फेफरे येते, त्यावेळी अशा माणसाभोवती गर्दी न करता त्याला आहे तेथेच नीट कुशीवर वळवून झोपवावे. मान मागे करावी म्हणजे श्वास घ्यायला अडचण होत नाही. घशात लाळ साचून अडथळा येत नाही. दातखीळ बसत आहे. असे वाटल्यास एखादी लाकडी वस्तू दातात धरायला द्यावी व दोन दातांमध्ये ठेवावी. त्यांचे कपडे, पट्टा सैल करावा. त्याला कधीही पाणी पाजण्याचा प्रयत्न करू नये. बहुधा काही मिनिटांतच फेफरे जाते. त्यामुळे तात्काळ धावपळ करून डॉक्टर गाठण्याची गरज पडत नाही.फेफरे येण्यावर अलीकडे चांगली औषधे उपलब्ध असून या स्थितीवर खुपसे नियंत्रण मिळवण्यात यश मिळत आहे. सामान्यपणे लोकसंख्येच्या एक टक्क्यापेक्षा थोड्या कमी लोकांत हा प्रकार आढळतो. वाहन चालवणे, विस्तवाजवळ वा धोक्याच्या जागी काम करणे व पोहणे या गोष्टी मात्र फेफरे येणाऱ्यांनी कायम टाळाव्यात; कारण या तिन्हींमध्ये त्यांच्या जीवाला धोका उद्भवतो.'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••वेळ आहे तर घाम गाळा नाहीतर काही दिवसांनी अश्रू गाळावे लागतील.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) भाजीपाला मिळण्याच्या ठिकाणाला काय म्हणतात ?२) देशातील ज्या भागांवर केंद्र सरकारचे थेट नियंत्रण असते, अशा भागांना काय म्हणतात ?३) कोणत्या देशाची टोपण नावे Lion City, Garden City, Red Dot अशी आहेत ?४) 'आस' या शब्दाचे समानार्थी शब्द सांगा.५) भारतातील पहिला विमानतळ कोणता ? *उत्तरे :-* १) भाजीमंडई २) केंद्रशासित प्रदेश ३) सिंगापूर ४) इच्छा, मनीषा ५) जुहू विमानतळ *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 गझलकार शेखर गिरी👤 मनोज खुटे👤 देवराव पाटील कदम👤 योगेश मरकंटी👤 राजू मेकाले👤 चंद्रकांत तालोड👤 चंद्रशेखर अनारे👤 बालाजी गादगे, शिक्षक *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *अभंगवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••नये जरी तुज मधुर उत्तर । दिधला सुस्वर नाहीं देवें ॥१॥नाहीं तयाविण भुकेला विठ्ठल । येइल तैसा बोल रामकृष्ण ॥ध्रु.॥देवापाशीं मागें आवडीची भक्ति । विश्वासेंशीं प्रीति भावबळें ॥२॥तुका म्हणे मना सांगतों विचार । धरावा निर्धार दिसेंदिस ॥३॥।। संत तुकाराम महाराज ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••काम लहान असो किंवा मोठे शेवटी काम ते कामच असते. असे, अनेकदा ऐकण्यात तसेच वाचण्यात आले आहे. .हाती घेतलेले काम पूर्ण श्रध्देने, निष्ठेने व स्वतः वर विश्वास ठेवून केल्यावर आपल्याला जो, समाधान मिळते तोच समाधान जगावेगळा असते. म्हणून कोणत्याही कामाला कमी लेखू नये व मिळालेल्या यशाला गर्वाच्या भोवऱ्यात अडकवून ठेवू नये.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *खरा शिष्य कोण ?*एकदा दोन तरुण स्वामीविवेकानंदाकडे गेले. त्यांना स्वामीजींचे शिष्य व्हायचे होते. तसे त्यांनी स्वामीजींनासांगितले. तरी स्वामीजी डोळे मिटून स्वस्त बसले. दुसरे दिवशी तोच प्रकार – कंटाळले– पण एकजन स्वामीजींची रोज पूजा करे तर दुसरा त्यांना दोष देई, “तुमच्यात माणुसकी नाहीतुम्ही कठोर आहात” वगैरे. पण दोघेही रोज येण्याचे थांबेनात. दोघांनाही वाटे आपणच त्यांचेशिष्य होण्यास योग्य आहोत. एक जण रोज पूजा करी दुसरा दोष देई. एक दिवस नदीलापूर आला पहिल्याने नाईलाजाने आपल्या काठावरच पूजा -स्तोत्र वगैरे कार्यक्रम केला. दोषदेणारा मात्र पुरातून जाऊन स्वामीजींची निंदा करून आला. असे तीन दिवस चालले. चौथ्यादिवशी पुर ओसरला. दोघेही गेले. स्वामीजींनी डोळे उघडले व शिव्या देणाऱ्याला शिष्य म्हणूनस्वीकारले. ते म्हणाले, “शिव्या देण्यासाठी का होईना तो संकटावर मात करून येतो. निष्ठाहवी. तामसी वृत्ती बदलता येईल. पण कच खाणारी निष्ठा शिष्याला अपात्र ठरवेल.”तात्पर्यः कोणतेही काम पूर्ण निष्ठेने आणि योगदानाने करावे.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 16 एप्रिल 2024💠 वार - मंगळवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/QTphTzLxRqraanB1/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*'जागतिक आवाज दिन (World Voice Day)'* *_ या वर्षातील १०७ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *१९९९: चालकरहित ’निशांत’ विमान व जमिनीवरुन हवेत मारा करणार्‍या ’त्रिशूल’ क्षेपणास्त्राची ऒरिसातील चंडीपूर येथे चाचणी**१९९५:देशातील लोकशाही टिकवुन ठेवण्यासाठी केलेल्या प्रयत्‍नांचा गौरव म्हणून मुख्य निवडणूक आयुक्त टी.एन.शेषन यांना ’ऑनेस्ट मॅन ऑफ द इयर’ हा पुरस्कार प्रदान**१९७२:केप कॅनव्हेरॉल, फ्लोरिडा येथून ’अपोलो-१६’ या अंतराळयानाचे प्रक्षेपण करण्यात आले**१९४८:राष्ट्रीय छात्र संघाची (NCC) स्थापना**१९२२:मुळशी सत्याग्रह सुरू झाला.**१८५३:भारतात प्रथमच बोरीबंदर ते ठाणे अशी प्रवासी रेल्वे सेवा सुरू झाली. ’ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वे’ (GIP Railway) या कंपनीने ही सेवा सुरू केली.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९३:सिद्धार्थ शंकर महादेवन-- गायक* *१९८२:स्वप्ना पाटकर --भारतीय लेखिका, गीतकार,आणि मराठी चित्रपटसृष्टीतल्या एक फिल्म निर्माता* *१९७८:कविता मोरणकर -- कवयित्री, लेखिका* *१९७८:लारा दत्ता – मॉडेल,हिन्दी चित्रपट अभिनेत्री व निर्माती,मिस युनिव्हर्स (२०००)**१९७८:प्रा.डॉ विनायक पवार-- कवी,चित्रपट कथा लेखक**१९६३:सलीम मलिक – पाकिस्तानी क्रिकेटपटू**१९६०:प्रा.डॉ.संपदा सुधीर कुल्लरवार-- कवयित्री,लेखिका**१९५६:सलीम आबालाल शेख -- लेखक**१९५३:ज्योत्स्ना श्रीकांत शिंत्रे -- लेखिका* *१९४८:ज.मो.अभ्यंकर- लेखक,अध्यक्ष,राज्य अल्पसंख्याक आयोग महाराष्ट्र राज्य,अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोग**१९४४:सुहासिनी कीर्तीकर-- लेखिका* *१९४०:बनवारीलाल पुरोहित-- पंजाब राज्याचे राज्यपाल**१९३४:रामचंद्र दामोदर तथा राम नाईक – माजी केन्द्रीय पेट्रोलिअम मंत्री,माजी राज्यपाल तथा लेखक**१९२६:श्यामराव कांबळे -- संगीत संयोजक (मृत्यू:१७ आक्टोबर २०१८)**१९२२:नीळकंठ पुरुषोत्तम जोशी -- आंतरराष्ट्रीय ख्यातीचे विद्वान आणि भारतीय मूर्तिशास्त्राचे गाढे अभ्यासक(मृत्यू:१५ मार्च २०१६)**१८८९:चार्ली चॅपलिन – अभिनेता,दिग्दर्शक आणि संगीतकार.त्यांच्या ‘लाईम लाईट‘ या चित्रपटाला ऑस्कर पारितोषिक मिळाले होते. ’कीड ऑटो रेसेस अ‍ॅट व्हेनिस’ या त्यांच्या दुसर्‍या चित्रपटातील डर्बी हॅट,घट्ट कोट ढगळ पँट,चौकोनी मिशा,बेढब जोडे आणि काठी या वेशभूषेमुळे चार्ली चॅप्लिन म्हणजे लोकांना मूर्तिमंत विनोद वाटू लागले. (मृत्यू:२५ डिसेंबर १९७७)**१८६७:विल्बर राईट – आपला भाऊ ऑर्व्हिल राईट याच्यासह इंजिनाच्या विमानाचा शोध लावणारे अमेरिकन अभियंते (मृत्यू:३० मे १९१२)**१८४८:कंदुकुरी वीरेसालिंगम-- मद्रास प्रेसिडेन्सी,ब्रिटिश भारतातील एक समाजसुधारक आणि लेखक(मृत्यू:२७ मे १९१९)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२३:माधव राजाराम पोतदार -- प्रसिद्ध कवी,लेखक(जन्म:१५ एप्रिल १९३५)**२०१९:गोपाळ मारुतीराव पवार(गो.मा) --महाराष्ट्रातील ख्यातनाम समीक्षक आणि महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे चरित्रकार (जन्म:१३ मे १९३२)* *२०००:दिनकर गोविंद तथा अप्पासाहेब पवार – ग्रामीण विकासाचा ध्यास घेतलेले कृषीतज्ञ, कोल्हापुरच्या शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू,शाहू महाराजांचे चरित्रकार (जन्म:१९३०)**१९९५:रमेश टिळेकर – अभिनेते व वकील, ’घाशीराम कोतवाल’ या नाटकातील भूमिकेसाठी प्रसिद्ध**१९८२:अच्युत महादेव बर्वे--कथाकार, कादंबरीकार(जन्म:३ फेब्रुवारी १९२७)**१९६६:नंदलाल बोस--जगविख्यात चित्रकार (जन्म:३ डिसेंबर १८८२)**१९२८:महादेव मल्हार जोशी-- संस्कृत भाषेचे व तत्त्वज्ञानाचे अभ्यासक(जन्म:२ जानेवारी १८७३)**१८५०:मेरी तूसाँ –’मॅडम तूसाँ वॅक्स म्युझियम’च्या संस्थापिका(जन्म:१ डिसेंबर १७६१)**१७५६:जॅक्स कॅसिनी – फ्रेन्च खगोलशास्त्रज्ञ (जन्म:८ फेब्रुवारी १६७७)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*अंघोळ किंवा स्नान*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *टेक्नोसॅव्ही निवडणूक आयोग, 9 अ‌ॅपद्वारे जाणून घेता येणार उमेदवार ते मतमोजणीचा प्रवास, दाद मागण्याचीही सोय*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *अमित शाहांच्या पुत्रप्रेमामुळे भारत वर्ल्डकप हरला, शाहांच्या टीकेला उद्धव ठाकरेंचं खोचक उत्तर*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *राजू शेट्टींचे हातकणंगल्यातून अर्ज दाखल करताना विराट शक्तीप्रदर्शन; म्हणाले, खोक्यांचा बाजार करणारी झुंड माझ्या विरोधात*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मी फक्त अजित पवारांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला, सुनेत्रा पवारांबाबतच्या त्या वक्तव्यावर शरद पवारांचं स्पष्टीकरण *•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पैशाचा पाऊस! रोज १०० कोटी रुपये; आतापर्यंत ४,६५० कोटी रुपये जप्त*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *यंदा सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज, 106 टक्के पाऊस होण्याचा हवामान विभागाचा मान्सूनबाबत पहिला अंदाज जाहीर, महाराष्ट्रसाठी आशादायी परिस्थिती *•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *हैद्राबादने बंगळुरू समोर ठेवले 288 धावाचे विशाल लक्ष्य*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *अनुवांशिकता म्हणजे काय ?* 📙 आमची वंशावळ' आमची जमात, अनुवांशिक रंगरूप व अनुवांशिक रोग इत्यादी गोष्टी सतत कानावर पडत असतात. काही वेळा चर्चेत येत असतात. अनुवांशिकी किंवा हेरिडिटी या संदर्भात महत्त्वपूर्ण संशोधन अॅबेट ग्रेगर जोहनान मेंडेल यांनी केले. मेंडलचे नियम म्हणून त्यांनी केलेले संशोधन जनुकशास्त्रात आजही आधारभूत मानले जाते.मेंडलचा पहिला नियम सांगतो की, विरुद्धगुणी शुद्ध बीजांचा संकर घडवला, तर त्यातील आक्रमक बीजाचे गुणधर्म पुढच्या पिढीत उतरतात. दुसऱ्या नियमानुसार एकापेक्षा जास्त जनुकांच्या जोडय़ा जर यात सामील असतील तर प्रत्येक जोडीतील आक्रमक जोडीचे संयुक्त गुणधर्म प्राधान्याने पुढच्या पिढीत दिसतात. याचाच एक सोपा अर्थ म्हणजे जसेच्या तसे संक्रमण होत नाही, तर त्यात प्राधान्यक्रम ठरवला जातो.या साऱ्या गोष्टी विविध वनस्पतींच्या रंगसंकरातून, उंच बुटक्या जातींतून मेंडेल यांनी सिद्ध केल्या. यानुसार अनुवंशिकीचा विचार माणसाच्या संदर्भात करायचा झाला तर एकाच बीजांडांचे विभाजन होऊन झालेली जुळी भावंडेच फक्त सारखी असू शकतात. अन्यथा पहिल्या पिढीतील सर्व गुणधर्म दुसऱ्या पिढीत कधीही आढळणार नाहीत. स्त्रीबीजांडात व पुरुष शुक्रजंतुत जर प्रत्येक २३ क्रोमोसोमच्या जोड्या असतील, तर विविध गुणोत्तरातून २^२३ म्हणजेच ८३,८८,६०८ इतक्या विविध प्रकारे (पणजोबा, आजोबा, वडील, मुलगा यांच्यात अनुवांशिकी गुणधर्म जसेच्या तसे येण्याची शक्यता ८३,८८,६०८ मध्ये एक एवढीच राहते.) अनुवंशिकी संक्रमण होऊ शकते.जगभरची सर्व माणसे जरी मूलतः आफ्रिकेत निवास करीत होती, तरीही चेहरेपट्टी, उंची, डोळ्यांचे रंग यात असंख्य बदल याच कारणाने विविध जाती जमाती आढळतात.याशिवाय हवामान, रहाणीमान, सूर्यप्रकाश यांचा परिणाम कातडीच्या रंगावर होत असतो, तो वेगळाच. त्यामुळेच जगातील असंख्य प्राणी, साडेसहाशे कोटी माणसे, विविध वनस्पती यांत विविध प्रकार आपल्याला सहजगत्या पाहावयास मिळतात.‘सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••नम्रतेने जे लाभेल ते बाळाने कधीच मिळणार नाही.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत ज्युरी म्हणून समावेश होणारी पहिली भारतीय महिला कोण ठरली आहे ?२) दक्षिण अमेरिका खंडातील सर्वात मोठा देश कोणता ?३) 'ग्रीन हाऊस इफेक्ट' कशाशी संबंधित आहे ?४) 'आपत्ती' या शब्दाचे समानार्थी शब्द सांगा.५) उत्तर कोरिया व दक्षिण कोरिया या दोन देशांदरम्यानच्या सीमारेषेला कोणते नाव आहे ? *उत्तरे :-* १) बिल्कीस मीर २) ब्राझील ३) वातावरणातील बदल ४) संकट ५) Parallel line*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 बाबू जिंकलोड👤 स्वप्नील भंडारे👤 माधव गायकवाड👤 अनिरुद्ध वंगरवार👤 नितीन अंबेकर👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *अभंगवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••न बोलतां तुम्हां कळों न ये गुज । म्हणउनी लाज सांडियेली ॥१॥आतां तुम्हां पुढें जोडीतसें हात । नका कोणी अंत पाहों माझा ॥२॥तुका म्हणे आम्ही बैसलों शेजारीं । करील तें हरी पाहों आतां ॥३॥।। संत तुकाराम महाराज ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••स्वतःसाठी जगताना आनंद तर वेळोवेळी मिळत असतो. पण,पाहिजे तेवढ्या प्रमाणात आपल्याला समाधान मिळत नाही. कारण समाधान ही संपत्ती कोणत्याही बाजारात विकत मिळत नाही. ती संपत्ती फक्त आपल्यापाशीच असते. जेव्हा, इतरांसाठी आपल्या हातून एखादे नि:स्वार्थ भावनेचे कार्य होत असतात त्यातून जो समाधान मिळतो तेच समाधान जगावेगळे असते म्हणून ती संपत्ती कशाप्रकारे मिळवता येईल यासाठी प्रयत्न करून बघावे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *प्रसंगाचे भान ठेवावे*एका सरोवरात कुबु ग्रीव् नावाचे कासव राहत होते. दोन हंस तिथे जलविहारासाठी येत. कासवाशी त्यांची मैत्री झाली. कासवाला ते चांगल्या चांगल्या कथा सांगत. एक वर्षी अवर्षणामुळे सरोवर आटले. हंस कासवाला म्हणाले, लवकरच राहिलेला चिखल सुद्धा आटेल. मग तुझं कसं होईल? सह विचारातून एक युक्ती सुचली. एक लांब काठी दोन बाजूंनी हंसाने तोंडात धरावी व मध्यभागी कासवाने पकडावे. हंसाने उडत उडत दुसऱ्या तलावात जावे. त्यांनी कासवाला उडत उडत दुसऱ्या तलावात घेऊन जावे. त्यांनी कासवाला बजावले, मधे कोणत्याही कारणासाठी तोंड उघडू नको. नाहीतर उंचावरून पडून प्राण गमावशील.उड्डाण सुरू झाले मधेच एका गावातील लोक आश्चर्याने पाहत म्हणाले, “हे हंस गोल गोल काय नेत आहेत?” कासव रागावले ते हंसाला म्हणणार होते. “या मूर्खांना एवढेही समजत नाही का?”  त्यासाठी त्याने तोंड उघडले आणि कासव जमिनीवर पडले.तात्पर्य - समाजात वागत असताना आपल्याला प्रत्येक वेळी प्रसंगाचे भान ठेवूनच वागले पाहिजे.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 15 एप्रिल 2024💠 वार - सोमवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/BX8EgxHfZigDuFSk/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_जागतिक कला दिवस_* *_ या वर्षातील १०६ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *१९९७:मक्‍केपासून सहा किमी अंतरावरील मिना (सौदी अरेबिया) येथे हज यात्रेकरुंच्या तंबूला आग लागून किमान ३०० जण मृत्युमुखी पडले.**१९९४:भारताची गॅट करारावर स्वाक्षरी**१९५०:आचार्य विनोबा भावे यांनी आंध्र प्रदेशातील पंचमपल्ली येथून भूदान चळवळीस प्रारंभ केला**१९४०:दुसरे महयुद्ध – नाझी जर्मनीच्या ताब्यात असलेल्या नॉर्वेतील नॉर्विक शहरावर दोस्त राष्ट्रांच्या फौजांनी हल्ला सुरू केला.**१८९२:जनरल इलेक्ट्रिक कंपनीची स्थापना झाली**१६७३:मराठा साम्राज्याचे सरनौबत प्रतापराव गुजर यांनी बहलोलखान पठाणाविरुद्ध मोठी लढाई जिंकली.**१८६५:अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांचे निधन. अॅडयु जॅक्सन यांना अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९५:हेमंत दिनकर सावळे--लेखक**१९७६:प्रा.डॉ.संजय वाघोजी जगताप -- लेखक* *१९७३:अरुण झगडकर-- कवी,लेखक**१९७२:मंदिरा बेदी-- हिंदी चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री**१९७१:प्रा.डॉ.मिलिंद भाऊरावजी साठे-- लेखक* *१९६९:दिलीप तुळशिरामजी काळे -- कवी**१९६३:मनोज प्रभाकर-- भारतीय क्रिकेटपटूआणि प्रशिक्षक**१९६३:नरेंद्र प्रभू -- लेखक**१९६०:अशोक भैय्याजी लेकुरवाळे-- लेखक* *१९५९:विष्णु गुराबसिंह सोळंके-- प्रसिद्ध ज्येष्ठ कवी,गझलकार‎,लेखक**१९५५:डॉ.राजा दांडेकर-- लेखक**१९५२:मधुकर आरकडे--ज्येष्ठ कवी-गीतकार (मृत्यू:१५ मार्च २०१५)**१९४४:लक्ष्मीनारायण बोल्ली-- मराठी लेखक, अनुवादक व संशोधक,यांनी तेलुगु आणि मराठी अशा दोन्ही भाषांतून लेखन.(मृत्यू:२३ फेब्रुवारी २०१८)**१९३५:माधव राजाराम पोतदार -- प्रसिद्ध कवी,लेखक(मृत्यू:१६ एप्रिल २०२३)**१९३२:सुरेश भट – लोकप्रिय गझलकार, कवी (मृत्यू:१४ मार्च २००३)**१९२२:हसरत जयपुरी – गीतकार (मृत्यू:१७ सप्टेंबर १९९९)**१९१२:मल्हार सदाशिव तथा ’बाबूराव’ पारखे – उद्योजक व वेदाभ्यासक (मृत्यू:१३ जानेवारी १९९७)**१८९४:भालचंद्र लक्ष्मण पाटणकर-- संपादक, समीक्षक (मृत्यू:१४ सप्टेंबर १९७३)**१८९३:नरहर रघुनाथ तथा न.र.फाटक – चरित्रकार,टीकाकार,इतिहास संशोधक,संत साहित्याचे अभ्यासक व लेखक (मृत्यू:२१ डिसेंबर १९७९)**१८९२:पांडुरंग जीवाजी सबनीस-- वैचारिक निबंधलेखक,नाटककार (मृत्यू:२३ जून १९६९)**१८७४:त्र्यंबक सीताराम कारखानीस--मराठी नाट्यदिग्दर्शक(मृत्यू:८ जानेवारी १९५६)**१७०७:लिओनार्ड ऑयलर – स्विस गणितज्ञ (मृत्यू:१८ सप्टेंबर १७८३)**१४६९:गुरू नानक देव – शिख धर्माचे संस्थापक आणि पहिले गुरू (मृत्यू:२२ सप्टेंबर १५३९)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१५:विलास गोविंद सारंग--कवी, कथाकार,कादंबरीकार,समीक्षक (जन्म:११ जून १९४२)**२०१३:वि.रा.करंदीकर – संत साहित्याचे अभ्यासक (जन्म:२७ ऑगस्ट १९१९)**१९९५:पंडित लीलाधर जोशी – तत्कालीन मध्यभारत राज्याचे पहिले मुख्यमंत्री**१९९०:ग्रेटा लोविसा गुस्ताव्हसन ऊर्फ ’ग्रेटा गार्बो’ – हॉलिवूड अभिनेत्री (जन्म:१८ सप्टेंबर १९०५)**१९८०:जेआँ-पॉल सार्त्र – फ्रेन्च लेखक, कवी,तत्त्वज्ञ आणि नोबेल पारितोषिक विजेते (जन्म:२१ जून १९०५)**१९१२:एडवर्ड जे. स्मिथ – आर.एम.एस. टायटॅनिक जहाजाचा कप्तान (जन्म:२७ जानेवारी १८५०)**१८६५:अमेरिकेचे १६ वे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांची जॉन बूथ याने हत्या केली. (जन्म:१२ फेब्रुवारी १८०९)**१७९४:मोरेश्वर रामचंद्र पराडकर उर्फ ’मोरोपंत’ – पंडीतकवी(जन्म:१७२९)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••श्रीराम नवमी निमित्ताने प्रासंगिक लेख.... पूर्ण वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *सांगलीत उरूसातील बैलगाडा थेट गर्दीत घुसला, तरुण चाकाखाली अन् अनर्थ, गावात हळहळ*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मान्सूनपूर्व नियोजन : अमरावती जिल्ह्यात धोकादायक पुलांची पाहणी सुरु, अहवाल मागवला सार्वजनिक बांधकाम विभागाचे आदेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *खंडणीखोर वैभव देवरेने जमवली कोट्यावधींची 'माया', नाशिकमधील खासगी सावकाराचं पितळ पडलं उघडं*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त देशभरात विविध ठिकाणी अभिवादन*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *पुणे : लोकसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील चारही मतदारसंघांसाठी मतदान यंत्रांची (ईव्हीएम) ने-आण करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांना जीपीएस यंत्रणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार, अज्ञातांकडून चार राऊंड फायर, घटनेवेळी 'भाईजान' घरातच*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *लखनौ सुपरजायंट्सचा सलग दुसरा पराभव, आठ गडी राखून कोलकाता नाइट रायडर्सचा विजय तर चेन्नईने मुंबईला 20 धावाने हरविले*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *पेनिसिलिन म्हणजे काय ? पेनिसिलीनचा शोध कसा लागला ?* 📙अलेक्झांडर फ्लेमिंगना अचानकपणे पेनिसिलीनचा शोध लागला व एक मोठीच क्रांती घडून आली. पेनिसिलियम नोटेटम या प्रकारच्या बुरशीच्या आसपासचे जंतू नष्ट झालेले अपघातानेच त्यांना आढळले, म्हणून त्यावर अधिक लक्ष केंद्रित केले गेले व त्यातूनच पेनिसिलिनची निर्मिती झाली.पेनिसिलीननंतर अनेक प्रतिजैविके निर्माण झाली आहेत; पण आजही त्यालाच 'क्वीन ऑफ अँटीबायोटिक्स' असे म्हटले जाते. साठ वर्षांनंतरही या अँटीबायोटिकची उपयुक्तता सर्व डॉक्टरांना मान्य आहे. याचा शोध लागण्याआधी विविध स्वरूपाचे जीवघेणे आजार झाल्यावर रुग्ण वाचला, तर त्याचे नशीब बलवत्तर, असेच समजले जाई. न्युमोनिया, अंगावरील गळवे, मेंदूतील आवरणांचे मेनिंजायटीससारखे गंभीर आजार यांतून रुग्ण निश्चित बरा होईल, अशी खात्री पेनिसिलीनच्या वापरानंतरच वाटू लागली. याचा वापर १९६० सालच्या दशकात प्रचंड प्रमाणात सुरू झाला. पण याच सुमाराला त्याचे काही दुष्परिणामही लक्षात आले.पेनिसिलीन या औषधाला येणारी तीव्र अॅलर्जीची प्रतिक्रिया हीच मुळी जीवघेणी ठरू शकते, हे पूर्वीही ज्ञात होतेच. पण मोठ्या प्रमाणात याचा वापर सुरू झाल्यावर या रुग्णांचे प्रमाणही वाढू लागले. इंजेक्शन, गोळ्या, लहान मुलांचे औषध यांपैकी कोणत्याही प्रकारात हा त्रास हजारात एखाद्याला जाणवू शकतो. सध्या हे औषध वापरताना पूर्णत: काळजी घेऊनच वापरले जाते. १९७० सालच्या दशकात पेनिसिलीनचे कृत्रिमरीत्या उत्पादन करण्याची पद्धत विकसित होऊ लागली. आज पेनिसिलिन ग्रुप या नावाने यातील अनेक औषधे उपलब्ध आहेत. अँपिसिलिन, अॅमॉक्सिलीन, एरिथ्रोमायसिन अशा नावाच्या औषधांमध्ये त्या मानाने दुष्परिणामांचे स्वरूप खूपच कमी आहे.पेनिसिलीनचा खरा उपयोग आजही दोन प्रकारच्या रुग्णांसाठी अत्यावश्यक ठरतो. त्याला आजही फारसा पर्याय उपलब्ध नाही. लहान मुलांना सांधेदुखी व ताप यातून उद्भवणाऱ्या (Rheumatic Fever) आजारातून पुढे मागे हृदयाच्या झडपांवर परिणाम होण्याची शक्यता असते. अशा मुलांना पेनिसिलीनच्या प्रतिबंधाखाली ठेवले तर मात्र हा उपद्रव होत नाही. कित्येक वेळा १० ते १५ वर्षे हा वापर महिन्यातून एक इंजेक्शन देऊन केला जातो. दुसऱ्या प्रकारचा आजार म्हणजे सिफीलिसचा. गुप्तरोगांपैकी या आजारावरचे आजही सर्वात प्रभावी औषध म्हणून पेनिसिलीनचाच वापर करावा लागतो.किंमत, उपयुक्तता, देण्याची पद्धत व आजारावर होणाऱ्या परिणामांचा कालावधी या सर्वांचा विचार करता पेनिसिलिन नि:संशय 'क्वीन ऑफ अँटीबायोटिक्स'च म्हणावे लागेल.'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आयुष्यात यश मिळवण्यासाठी चिकाटीला जिवलग मित्र बनवा.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) शेणापासून कोणता गॅस मिळतो ?२) महाराष्ट्रात सर्वाधिक मतदारांची संख्या कोणत्या जिल्ह्यात आहे ?३) गंगा, यमुना व सरस्वती या तीन नद्यांचा संगम कोणत्या ठिकाणी झाला आहे ?४) 'आश्चर्य' या शब्दाचे समानार्थी शब्द सांगा.५) स्वतंत्र भारताचे पहिले आरोग्यमंत्री कोण होते ?*उत्तरे :-* १) मिथेन २) पुणे ३) प्रयागराज ४) नवल, अचंबा ५) राजकुमारी अमृत कौर*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 प्रा. श्रीराम गव्हाणे, संपादक, नांदेड👤 शिवाजी अंबुलगेकर, साहित्यिक, मुखेड👤 सुधीर गुट्टे, ADEI, नांदेड👤 इमरान शेख👤 चंद्रकांत देवके, सेवानिवृत्त शिक्षक, धर्माबाद👤 अंकुश दांडेवाड, उमरी👤 बबन साखरे, नांदेड👤 योगेश बलकेवाड, येवती👤 दत्ताहारी पाटील कदम, धर्माबाद👤 सुनील पलांडे, शिक्षक, पुणे👤 मुकुंद एडके, धर्माबाद👤 संदीप पारणे, धर्माबाद👤 रामकिशोर झंवर, व्यापारी, धर्माबाद👤 सारिका बलचिम, पुणे👤 संतोष लक्ष्मण पाटील, येवती👤 कालिदास बोगेवार, धर्माबाद*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *अभंगवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••न राहे रसना बोलतां आवडी । पायीं दिली बुडी माझ्या मनें ॥१॥मानेल त्या तुम्ही अइका स्वभावें । मी तों माझ्याभावें अनुसरलें ॥२॥तुका म्हणे तुम्हीं फिरावें बहुतीं । माझी तों हे गती जाली आतां ॥३॥।। संत तुकाराम महाराज ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••गालात हास्य ठेवून नेहमीच आनंदीत दिसणारी व्यक्ती, सुखात असेलच असेही नाही. सुख, आणि दु:ख या दोघांनाही ती पूर्णपणे परिचित असते. फरक एवढेच की,ती आपले दु:ख कोणालाही सांगत नाही कारण, त्या दु:खाशी त्याचे विशेष नाते जुळलेले असते. म्हणून आपणही आलेल्या प्रत्येक परिस्थितीचा सामना हसत मुखाने करावे. या प्रकारचे जगणे बघून दु:ख सुद्धा नतमस्तक होतात.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *निरीक्षण*वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापकांनी एक दिवस विद्यार्थ्यांची सूक्ष्म निरीक्षण शक्ती आणि किळस सोसण्याची क्षमता पाहण्यासाठी एक प्रयोग केला. विद्यार्थ्यांना म्हणाले, “या काचेच्या वाटीत घाणेरडे पाणी आहे. मी वाटीत बोट बुडवून तोंडात घालणार आहे. प्रत्येकाने पाहून तसेच करायचे. तिटकारा दर्शवायचा नाही. सरांनी वाटीत बोट बुडवूनचाखले. पाठोपाठ एका मागून एक विद्यार्थ्यांनी ते गढूळ पाणी काहीशा अनिश्चेनेच चाखले.प्राध्यापक म्हणाले, “किळस न मानण्याच्या गुणात तुम्ही सगळेच पास झालात, पण सूक्ष्मनिरीक्षणाच्या गुणात सगळेच फसलात.”‘मी करतो तसे तुम्ही करायचेहोते. तुमच्या कुणाच्याच लक्षात आले नाही, मी एक बोट वाटीत बुडवले व चाखले दुसरेच.’विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचे फसविले गेल्याचे भाव पाहून प्राध्यापकांनी वाटीतले सर्व पाणी पिऊन टाकले.  म्हणाले , ‘या पाण्यात अपायकारक काहीच नाही !’ आता विद्यार्थी खुष झाले. तात्पर्यः प्रयोगातून अप्रिय सत्य बाहेर आले तरी ते मनोमनपटते व त्यातूनच यशाचा मार्ग खुला होतो.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 12 एप्रिल 2024💠 वार - शुक्रवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.saamana.com/article-by-dr-yashawant-suroshe-on-education/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील १०३ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* ••••••••••••••••••••••••••••••••*१९९८:गेल्या शतकातील साठच्या दशकात हरितक्रांती घडवून आणण्यात मोलाची कामगिरी बजावणारे सी. सुब्रम्हण्यम यांना ’भारतरत्‍न’ हा सर्वोच्‍च नागरी सन्मान प्रदान**१९९७:पंतप्रधान एच.डी.देवेगौडा यांनी राजीनामा दिला.**१९९७:पूर्व प्राथमिक प्रवेशाकरता पाल्य अथवा पालकांच्या मुलाखती घेण्यास मनाई करण्याची तरतूद असणारे विधेयक विधानसभेत मंजूर**१९६७:कैलाश नाथ वांछू यांनी भारताचे १० वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला**१९६१:रशियाचा युरी गागारिन हा अंतराळात भ्रमण करणारा पहिला मानव बनला. त्याने अंतराळात १०८ मिनिटे भ्रमण करुन पृथ्वीप्रदक्षिणा केली**१९४५:अमेरिकेचे अध्यक्ष फ्रँकलिन डी. रुझव्हेल्ट यांचे कार्यालयात असतानाच निधन झाले.**१६०६:ग्रेट ब्रिटनने ’यूनियन जॅक’ला राष्ट्रीय ध्वज म्हणून मान्यता दिली.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••*१९८२:रेवती राहुल जोशी--पत्रकार,लेखिका, संपादिका* *१९७५:डॉ.सच्चिदानंद शंकर बिचेवार -- लेखक* *१९७५:आसाराम लोमटे -- लेखक* *१९७२:रवी वसंत सोनार-- कवी,लेखक गीतकार**१९६७:प्रा.डॉ.मनोहर नाईक -- कवी,लेखक**१९६४:प्रकाश दिनकर सकुंडे-- कवी* *१९६१:शशिकांत हिंगोणेकर-- सुप्रसिद्ध कवी,निवृत्त शिक्षण उपसंचालक**१९५८:चरणदास वैरागडे -- कवी* *१९५६:रामचंद्र अनंत देखणे--कथाकार, कादंबरीकार,लोककलांचे अभ्यासक(मृत्यू:२६ सप्टेंबर २०२२)**१९५४:विनय नारायणराव मिरासे(अशांत) -- प्रसिद्ध कवी,लेखक* *१९५४:सफदर हश्मी – मार्क्सवादी विचारसरणीचे पथनाट्यकार,लेखक, दिगदर्शक,कवि आणि गीतकार (मृत्यू:२ जानेवारी १९८९)**१९५०:विजयेंद्र घाटगे-- हिंदी चित्रपट आणि भारतीय दूरचित्रवाणी अभिनेते**१९४९:छाया महाजन-- मराठीतील प्रसिद्ध साहित्यिक* *१९४९:सुभाष त्र्यंबक अवचट-- चित्रकार, लेखक,कवी**१९४५:डॉ यशवंत शंकर साधू-- संत साहित्यांचे अभ्यासक (मृत्यू:१४ एप्रिल २०२०)**१९४३:सुमित्रा महाजन –भारतीय जनता पक्षाच्या मध्य प्रदेशमधील वरिष्ठ नेत्या पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित**१९४२:सुनीती जयंत आफळे -- कथाकार**१९३८:गुलशन बावरा(मेहरा)-- चित्रपट गीतकार(मृत्यू:७ ऑगस्ट२००९)**१९३२:लक्ष्मण कादिरमगार – श्रीलंकेचे परराष्ट्रमंत्री,मुत्सद्दी,वकील व तामिळ नेते (मृत्यू: १२ ऑगस्ट २००५)**१९२०:शैलजा प्रसन्नकुमार राजे--कथाकार, कादंबरीकार,चरित्रकार(मृत्यू:१६ ऑक्टोबर २००६)**१९१७:विनू मांकड – सलामीचे फलंदाज व डावखुरे मंदगती गोलंदाज (मृत्यू:२१ ऑगस्ट १९७८)**१९१४:कॄष्ण गंगाधर दिक्षीत ऊर्फ कवी संजीव – चित्रपटासाठी कथा,संवाद व गीतलेखन करणारे.(मृत्यू:२८ फेब्रुवारी १९९५)**१९१०:पुरुषोत्तम भास्कर तथा पु. भा. भावे – अष्टपैलू आणि प्रतिभासंपन्न साहित्यिक (मृत्यू:१३ ऑगस्ट १९८०)**१८७१:वासुदेव गोविंद आपटे – लेखक, भाषांतरकार,पत्रकार,संपादक,अनुवादक, निबंधकार व कोशकार (मृत्यू:२ फेब्रुवारी १९३०)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२०१४:शरद् पाटील--महाराष्ट्रातील एक विख्यात प्राच्यविद्यापंडित व सत्यशोधक मार्क्सवादी विचारवंत.(जन्म:१७ सप्टेंबर १९२५)* *२०११:सचिन भौमिक-- हिंदी चित्रपटांचे पटकथा लेखक(जन्म:१७ जुलै १९३०)* *२००६:राजकुमार – कन्नड चित्रपट अभिनेता व गायक (जन्म:२४ एप्रिल १९२९)**२००१:देवांग मेहता-- भारताच्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील एक अग्रणी व्यक्तिमत्त्व आणि नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर अँड सर्विस कंपनीजचे अध्यक्ष(जन्म:१० ऑगस्ट१९६०)**१९७७:भानुदास बळिराम शिरधनकर ऊर्फ भानू शिरधनकर-- मराठी लेखक(जन्म:१६ ऑक्टोबर १९१५)**१९४५:फ्रँकलिन डी. रुझव्हेल्ट – अमेरिकेचे ३२ वे राष्ट्राध्यक्ष (जन्म:३० जानेवारी १८८२)**१९०६:महामहोपाध्याय पण्डित महेशचंद्र ’न्यायरत्‍न’ भट्टाचार्य (जन्म:२२ फेब्रुवारी१८३६)**१८१७:चार्ल्स मेसिअर – फ्रेन्च खगोलशास्त्रज्ञ (जन्म:२६ जून १७३०)**१७२०:बाळाजी विश्वनाथ भट तथा पहिला पेशवा (जन्म:१ जानेवारी १६६२)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••दैनिक सामना मधील अग्रलेख*कृत्रिम बुद्धिमता आणि प्राथमिक शिक्षण*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *आगामी लोकसभा निवडणूक ही विकसित भारताच्या संकल्पाला नवी ऊर्जा देणारी ठरेल पंतप्रधान नरेंद्र मोदी*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *ही निवडणूक नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठीच होईल; केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा नांदेडमध्ये पुनरुच्चार*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ दादा पाटील हातकणंगलेतून निवडणूक लढवणार.*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *बेरोजगारी, शेतीमालाचा भाव आणि औद्योगिक वाढ या मूलभूत प्रश्नांना गृहीत धरूनच प्रचार - शशिकांत शिंदे*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *काँग्रेसच्या आयटी सेलचे मुख्य असलेले रोहन गुप्ता यांचा भाजपामध्ये प्रवेश.*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *यवतमाळमध्ये अवकाळी पावसाचा हाहाकार! वादळीवार्‍यामुळे ५८० घरांचे नुकसान*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *IPL T20 - मुंबई विरुद्ध बंगळुरू सामन्यात मुंबईचा सात विकेटने विजय, जसप्रीत बुमराह, ईशान किशन आणि सुर्यकुमार यादव चमकले*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📕 *डोळे मिटून चालताना तोल का जातो ?* 📕********************काय म्हणता? तुमचा तोल जात नाही? मग करूनच पाहा हा प्रयोग. रूमालाने डोळे बांधा आणि चालायला लागा! काय पडलात का ठेच लागून? डोळे उघडून चालतानाही ठेच लागते, पण ती आपल्या निष्काळजीपणामुळे डोळे मिटल्यानंतर मात्र सर्वांना थोडाफार त्रास होतो. याचे कारण आता पाहू.शरीराचा समतोल राखणे जनावरांना अगदी सोपे असते. कारण त्यांना चार पाय असतात. माणसाला मात्र दोन पायांवर शरीराचा तोल सांभाळावा लागतो. तोल सांभाळता येण्यासाठी लहान मेंदूचे कार्य खूप महत्वाचे असते. सर्कशीत तारेवर चालणारी मुलगी जसा शरीराचा तोल सांभाळत असते, त्याचप्रमाणे आपणही आपल्या नकळत शरीराचा तोल सांभाळत चालत असतो किंवा इतर हालचाली करत असतो. त्यामुळेच पार्किन्सन रोग किंवा सेरेबेलार सिन्ड्रोनसारख्या रोगांमध्ये माणूस नीट चालू शकत नाही. डोळे उघडे असूनही त्याचा तोल जातो. लहान मेंदूखेरीज शरीराच्या हात, पाय, मान या अवयवांच्या सुयोग्य हालचाली देखील तोल सांभाळण्यासाठी आवश्यक असतात.तोल सांभाळण्याच्या प्रक्रियेत डोळ्यांचाही काही प्रमाणात सहभाग असतो. दृष्टीमुळे आपल्याला जगाचे ज्ञान होते. आपण त्यामुळेच आत्मविश्वासाने पावले टाकतो. डोळे बंद केल्यानंतर एक प्रकारची असुरक्षिततेची भावना निर्माण होते. न दिसल्यामुळे अंतराचा, खोलीचाही अंदाज येत नाही. त्यामुळे आपण अडखळत यवकत थवकत चालू लागतो. एक गंमत तुम्ही अनुभवली असलेच.*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एकमेकांची प्रगती साधते तीच खरी मैत्री होय.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील *सितार व तानपुऱ्याला जीआय टॅग* देण्यात आला ?२) जागतिक होमिओपॅथी दिवस - २०२४ ची थीम काय आहे ?३) वाडा ( WADA ) चे full form काय आहे ?४) 'अनर्थ' या शब्दाचे समानार्थी शब्द सांगा.५) ध्वनीची तीव्रता मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात ? *उत्तरे :-* १) सांगली २) संशोधन मजबूत करणे, कार्यक्षमता वाढविणे ३) World Anti - Doping Agency ४) अरिष्ट, संकट ५) ऑडियोमीटर*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 अरुणा कलेपवार, उपक्रमशील शिक्षिका, नांदेड👤 गंगाधर पेंडपवार👤 आकाश वाघमारे👤 बालाजी चुनुपवार, येवती👤 गजानन कुरेवाड👤 मिनाज सय्यद👤 कलीम शेख👤 आसिफ शेख*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *अभंगवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••बहुतांच्या आम्ही न मिळो मतासी । कोणी कैसी कैसी भावनेच्या ॥१॥विचार करितां वांयां जाय काळ । लटिकें तें मूळ फजितीचें ॥२॥तुका म्हणे तुम्ही करा घटापटा । नका जाऊं वाटा आमुचिया ॥३॥।। संत तुकाराम महाराज ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• बोलत्या, चालत्या माणसाच्या मनात जेव्हा स्वार्थ आणि कपटासारखे महाभूत शिरते त्यावेळी मात्र त्या माणसाची जीवन जगण्याची दिशाच बदलून जाते. चांगले काय आणि वाईट काय ओळखण्याची त्याच्यात क्षमता नसते. आणि एकदा ती दिशा बदलली की, नंतर समोरची वाट मिळणे फार कठीण होऊन जाते.म्हणून स्वार्थ आणि कपट यासारख्या भूतांच्या मागे लागून सोन्यासारख्या जीवनाची माती करू नये. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*विद्येची किंमत*एकदा रामकृष्ण परमहंस गंगास्नानासाठी शिष्यासह गंगेवर गेले. त्यावेळी एक सिद्ध पुरुषही तिथे होते. त्यांनी एक चादर पाण्यावर पसरली व त्यावर उभे राहून नदी पार केली, तसेच परत आले व रामकृष्णांच्या एका शिष्याला म्हणाले तुमचे गुरु असा चमत्कार करू शकतील का ? बारा वर्षे तप करून मी ही सिद्धी मिळवली आहे.शिष्याने रामकृष्णांना हे सांगितले ते म्हणाले,” त्यांना सांग तुझा हा चमत्कार दोन आणे किमतीचा आहे.” शिष्याने हा निरोप सिद्ध पुरुषाला सांगितला. तो भलताच भडकला मनाला,” पुन्हा असे म्हणाला तर तुमचे भस्म करून टाकेन.” ‘रामकृष्णाने पुन्हा तसेच म्हटलं तेव्हा प्रत्यक्ष त्यांनाच सिद्ध पुरुषांनी त्याचा अर्थ विचारला रामकृष्ण म्हणाले, ‘नावाडी सुद्धा दोन आण्यात पैलतिराला नेतो. त्याचा इतरांना उपयोग होतो पण तुमची विद्या फक्त तुमच्या पुरतीच आहे. त्या विद्येचा लोकांना उपयोग होत. नाही तिची किंमत शून्य आहे.तात्पर्यः माणसाने आपल्या विद्येचा कर्तृत्वाचा समाजाला उपयोग करून द्यावा.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 10 एप्रिल 2024💠 वार - बुधवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://sahityasevak.blogspot.com/2020/04/blog-post_20.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील १०१ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२००७:राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष जेष्ठ राजनीतिज्ञ,लेखक आणि विचारवंत डॉ.मोहम्मद हमीद अन्सारी यांची उपराष्ट्रपती पदी निवड**२००६:उत्तर प्रदेशातील मेरठ शहरातील व्हिक्टोरिया पार्कमध्ये व्यापार मेळाव्यात भीषण आग ५० मृत्युमुखी**१९९४:सर्वोच्च न्यायालयातील माजी न्यायाधीश श्री एस.आर.पंडियन अध्यक्ष असलेला पाचवा वेतन आयोग स्थापन* *१९५५:योहान साल्क या शास्त्रज्ञाने सर्वप्रथम पोलिओ लशीची यशस्वी चाचणी केली.**१९१२:इंग्लंडमधील साऊथॅम्प्टन बंदरातुन ’टायटॅनिक’ जहाजाचे पहिल्या (व शेवटच्या) सफरीवर प्रयाण.**१८७५:महर्षी स्वामी दयानंद यांनी आर्य समाजाची स्थापना केली.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९०:प्रियंका बर्वे -- मराठी गायिका**१९८१:अभिजित चव्हाण--हिंदी चित्रपट, टेलिव्हिजन आणि रंगमंच अभिनेता**१९७१:वंदना अनिल कुलकर्णी-- प्रसिद्ध कवयित्री,लेखिका**१९५८:मीनाक्षी मोहरील-- कथा लेखिका* *१९५१:प्रा.जीवन मुळे --- लेखक,वक्ते* *१९५०:डॉ.विक्रम कुवरलाल शाह-- व्यवसायाने डॉक्टर असून,लेखन करणारे लेखक**१९४५:अशोक बेंडखळे-- प्रसिद्ध मराठी लेखक,समीक्षक व संपादक**१९४०:प्रा.डॉ.दिनकर कुलकर्णी-- कवी, लेखक* *१९३७:नरेंद्र पुरुषोत्तम चपळगावकर-- निवृत्त न्यायाधीश,ज्येष्ठ विचारवंत,सुप्रसिद्ध साहित्यिक,फेब्रुवारी २०२३ मध्ये झालेल्या ९६व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष* *१९३३:डॉ.हणमंत विद्याधर सरदेसाई (ह.वि. सरदेसाई)-- मराठी डॉक्टर व लेखक(मृत्यू:१५ मार्च २०२०)* *१९३१:किशोरी आमोणकर – शास्त्रीय गायिका**१९३१:सुरेश रघुनाथ मथुरे -- कवी,कथाकार,विज्ञानलेखक (मृत्यू:२३ डिसेंबर १९९८)* *१९२७:मनाली कल्लट तथा एम.के.वैणू बाप्पा – भारतीय खगोलशास्त्रज्ञ.(मृत्यू:१० ऑगस्ट १९८२)**१९०७:मोतीराम गजानन तथा मो.ग. रांगणेकर – नाटककार,चित्रपट दिग्दर्शक व पत्रकार (मृत्यू:१ फेब्रुवारी १९९५)**१९०१: श्रीपाद रामचंद्र पारसनीस -- चरित्रकार,अनुवादक (मृत्यू:२२ जानेवारी १९८०)* *१९०१:डॉ.धनंजय रामचंद्र तथा द. रा. गाडगीळ – अर्थशास्त्रज्ञ,भारतीय अर्थशास्त्राचे प्रणेते,सहकारी चळवळीचे खंदे समर्थक,पुणे विद्यापीठाचे कुलगुरु (मृत्यू:३ मे १९७१)**१८९४:घनश्यामदास बिर्ला – व्यापारी पार्श्वभूमीतून पुढे येऊन पुढे प्रचंड औद्योगिक साम्राज्य उभारलेले उद्योगपती (मृत्यू:११ जून १९८३)**१८८८:पारुजी नारायण मिसाळ-- ‘बालसन्मित्र’कार सिंधुसाहित्यसरिता हा उपक्रम सुरू केला.(मृत्यू:२७ मे१९५५)**१८८०:सर सी.वाय.चिंतामणी – स्वातंत्र्यपूर्व काळातील प्रागतिक पक्षाचे नेते व श्रेष्ठ वृत्तपत्रकार,(मृत्यू:१ जुलै १९४१)**१८७६:वामन गोविंद काळे-- सुविख्यात भारतीय अर्थशास्त्रज्ञ व अनेक व्यापारी संस्थांचे प्रवर्तक(मृत्यू:२७ जानेवारी १९४६)**१८४७:जोसेफ पुलित्झर – हंगेरीयन- अमेरिकन राजकीय नेते आणि प्रकाशक, (मृत्यू:२९ आक्टोबर १९११)**१८४३:रामचंद्र भिकाजी गुंजीकर – ’मोचनगड’ या मराठीतील पहिल्या ऐतिहासिक कादंबरीचे लेखक आणि ’विविध ज्ञानविस्तार’ मासिकाचे संपादक (मृत्यू:१८ जून १९०१)**१७५५:डॉ.सॅम्यूअल हानेमान – होमिओपाथी या वैद्यकीय उपचारपद्धतीचे जनक (मृत्यू:२ जुलै १८४३)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०००:डॉ.श्रीधर भास्कर तथा ’दादासाहेब’ वर्णेकर – संस्कृत पंडित (जन्म:३१ जुलै १९१८)**१९९५:मोरारजी देसाई – भारताचे ४ थे पंतप्रधान,स्वातंत्र्यसेनानी व गांधीवादी नेते, ’भारतरत्‍न’ (जन्म:२९ फेब्रुवारी १८९६)**_१९६५:डॉ.पंजाबराव देशमुख – स्वतंत्र भारताचे पहिले कृषी मंत्री,विदर्भात त्यांनी केलेले शिक्षणप्रसाराचे कार्य कर्मवीर भाऊराव पाटलांच्या तोडीचे मानले जाते.(जन्म:२७ डिसेंबर १८९८)_**१९४९:बिरबल सहानी – पुरावनस्पती शास्त्रज्ञ, राष्ट्रीय विज्ञान अकादमीचे अध्यक्ष (जन्म:१४ नोव्हेंबर १८९१ )**१९३७:डॉ.श्रीधर व्यंकटेश केतकर – ज्ञानकोशकार (जन्म:२ फेब्रुवारी १८८४)**१९३१:खलील जिब्रान – लेबनॉनमधे जन्मलेले अमेरिकन कवी,लेखक व कलाकार (जन्म:६ जानेवारी १८८३)**१८१३:जोसेफ लाग्रांगे – इटालियन गणितज्ञ (जन्म:२५ जानेवारी १७३६)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *माणसात दिसला देव*याविषयावर अनेक साहित्यिकांचे लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *"वाटाघाटी नको पाठिंबा फक्त नी फक्त नरेंद्र मोदींसाठी", राज ठाकरेंनी स्पष्ट केली राजकीय भूमिका*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *जल्लोष नववर्षाचा.! राज्यभरात गुढीपाडव्याचा उत्साह; ठिकठिकाणी शोभायात्रा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्ली उच्च न्यायालयाकडून कुठला दिलासा मिळू शकला नाही, त्यामुळे जाणार सर्वोच्च न्यायालयात*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात 2 हजार 641 मतदान केंद्राची वाढ, गैरसोय टाळण्यासाठी निर्णय !*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *युनिकॉर्न स्टार्टअप्सच्या जागतिक यादीत भारत अमेरिका व चीन नंतर तिसऱ्या क्रमांकावर*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *दुसऱ्या टप्यातील निवडणुकीसाठी २०४ उमेदवार पात्र ठरले आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी पत्रकार परिषदेत दिली.*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *अटीतटीच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने पंजाबला 2 धावाने हरविले*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *प्रथिने म्हणजे काय ?* 📙 प्रथिनांची आवश्यकता आपण अनेक वेळा ऐकलेली असते. पेशींची रचना प्रथिनांशिवाय होत नाही, हे ज्ञात असते. पण प्रथिने म्हणजे काय, याचे नेमके उत्तर मात्र अनेकदा माहीत नसते. अॅमिनो अॅसिड या प्रकारची वीस द्रव्ये प्रथिने बनवण्यासाठी उपयुक्त ठरतात. त्यांचे अजूनही प्रकार आहेत, पण ते सजीव पेशी तयार होण्यासाठी उपयोगी पडत नाहीत.या वीस प्रकारच्या अमिनो अॅसिड्सच्या रेणूंची साखळी बनत जाते व विविध स्वरूपांची प्रथिने निर्माण होऊ लागतात. प्रथिनाच्या रचनेप्रमाणे त्याचे काम ठरते, कार्यकक्षा आखली जाते, उपयुक्तताही ठरते. स्नायूंच्या रचनेसाठी तीन लागतात, त्यावेळी त्यांच्यामुळे पेशी बनतात. याउलट शरीरात काम करणारी असंख्य प्रकारची वितंचके (Enzymes) ही सुद्धा प्रथिने असतात. तोंडातील लाळ, पोटातील पाचक रसातील पदार्थ, रक्तातील काही द्रव्ये, मज्जासंस्थेतील संदेशवहनास उपयोगी पडणारी रसायने हे सर्व प्रथिनांचेच प्रकार आहेत.वीस प्रकारच्या अमिनो अॅसिड्सच्या विविध पद्धतींनी जुळणाऱ्या जोड्यांतून असंख्य प्रथिने होतात. पण यांतील सर्वच अमिनो अॅसिड्स शरीरात तयार होतातच, असे मात्र नाही. ती अन्नातून मिसळावी लागतात. मग त्यांचे दोन प्रकार केले जातात - आवश्यक व अनावश्यक. यांतील आवश्यक प्रकार योग्य प्रमाणात मिळाले नाहीत, तर वाढीवर परिणाम होऊ लागतो, आजार निर्माण होऊ शकतात.आवश्यक प्रकारची अमिनो अॅसिड्स सर्व प्रकारच्या अन्नांत एकत्रित असतातच, असे नाही. कसलीतरी कमतरता असतेच. यासाठीच एकच एक पदार्थ खाऊन कोणीही प्राणी राहू शकत नाही. फक्त मांसावर जगणाऱ्या प्राण्यांना मात्र सर्व आवश्यक अमिनो अॅसिड्स मिळतात. याउलट शाकाहारी माणसाला जरी तांदळात, गव्हात, ज्वारी बाजरी प्रथिने मिळत असली, तरीही त्याबरोबर द्विदलांचा म्हणजे डाळींचा आसरा घ्यावाच लागतो. त्यातूनच आहारपद्धती ठरत गेल्या आहेत.रोजच्या पदार्थातील सर्वात जास्त प्रथिने सोयाबीनमध्ये आढळतात. त्याची टक्केवारी चाळीसपर्यंत असू शकते. यामुळेच शाकाहारी आहारात सोयाबीनला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तेवढेच काय, पण पाश्चात्य देशांत मांसाची कमतरता भरून काढण्यासाठीही सोयाचा वापर केला जातो. शेंगदाने, चीज यांचा क्रमांक त्यानंतरचा व त्यांतील प्रथिनांची टक्केवारी पंचवीस असते. मांसात २३ टक्के, तर अंड्यांमध्ये १२ टक्के प्रथिने असतात. गहू वा तांदळात ६ ते ८ टक्केच प्रथिने आढळतात. प्रथिनांबद्दल बोलताना अनेकदा प्रथम दर्जाची व दुय्यम दर्जाची अशी वर्गवारी केली जाते. याचा अर्थ ज्यात सर्व आवश्यक अमिनो अॅसिड्स आढळतात, ती प्रथम दर्जाची व अन्य सर्व दुय्यम समजली जातात. थोडक्यात प्राणिज प्रथिने प्रथम दर्जाची असतात. लहान मुले, गर्भावस्था, आजारपण यांमध्ये पेशींची झीज भरून काढणे व वाढीसाठी आवश्यक म्हणून प्रथिनांची गरज असते. मुळात ही गरज या काळात जास्तच असल्याने प्रमाण २० टक्के इतके वाढलेले असते. केवळ प्रथिनयुक्त अन्नाची चव मात्र काहीशी उग्र वासाची असते. थोडीशी कडवटही असते. क्वचित काहींना ती आवडतही नाही. यासाठीच प्रथिनयुक्त अन्न पिष्टमय वा वनस्पतिज पदार्थांबरोबर खाण्याची पद्धत पडली आहे. 'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जीवन सुंदर व यशस्वी करण्यासाठी तीन गुणांची जरुरी असते -प्रेम, ज्ञान व शक्ती.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) ऑक्टोपसला किती मेंदू असतात ?२) FIDE ने जाहीर केलेल्या रँकिंगनुसार कोणता बुद्धिबळ खेळाडू जगात प्रथम क्रमांकावर आहे ?३) केंद्रीय निवडणुक आयोगाने लोकसभा निवडणुक २०२४ साठी कोणाची युथ आयकॉन म्हणून निवड केली आहे ?४) 'आकाश' या शब्दाचे समानार्थी शब्द सांगा.५) १८ व्या लोकसभेत देशातील सर्वात लहान मतदारसंघ कोणता ?*उत्तरे :-* १) नऊ २) मॅग्नस कार्लसन ३) आयुष्यमान खुराणा ४) गगन, नभ, अंबर, व्योम, खग, आभाळ ५) लक्षद्वीप ( ४७,९७२ मतदार )*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 डॉ. शेख Mwh, मुख्याध्यापक तथा शिक्षक नेते, नांदेड👤 टी. अशोक साईनाथ, तेलंगणा👤 शिवराज सीताराम वडजे, शिक्षक, नांदेड👤 तुळशीराम सिरमलवार, शिक्षक, धर्माबाद👤 भाऊसाहेब आबा अहिरे,नाशिक👤 सचिन पवळे, धर्माबाद👤 नागेश तांबोळी, धर्माबाद👤 श्यामानंद लिंगमपल्ले, धर्माबाद👤 सुभाष बोडके👤 रामदास डुमणे, नांदेड👤 मारोती कोटगले, धर्माबाद👤 प्रकाश बंडेवार, धर्माबाद👤 विलास बोंबले, परभणी👤 बालाजी भाऊ पूर्णेकर*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *अभंगवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आहांच वाहांच आंत वरी दोन्ही । न लगा गडणी आम्हां तैशा ॥१॥भेऊं नये तेथें भेडसावूं कोणा । आवरूनि मना बंद द्यावा ॥२॥तुका म्हणे कांहीं अभ्यासावांचुनी । नव्हे हे करणी भलतीची ॥३॥।। संत तुकाराम महाराज ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपल्या विचारात किंवा करत असलेल्या कृतीत जर प्रामाणिकपणा ,नि:स्वार्थ भावना किंवा सत्यता असेल तर कुठेही फिरण्याची आवश्यकता पडत नाही. आणि आपल्या खिशातील पैसे सुद्धा खर्च करावे लागत नाही. कारण त्यात फक्त सत्कर्म असते. आणि तेच सत्कर्म करणे हेच आपले खरे कर्तव्य आहेत. बाकी दिखावूपणा करून नको त्या प्रकारचे जीवन जगण्याला कर्तव्य नाही तर स्वार्थ आणि प्रसिद्धी मिळवणे असे म्हणतात. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *कष्टाची कमाईच श्रेष्ठ*एका गावात दोन चोर राहत होते. ते प्रत्‍येक दिवशी चोरी करत आणि आलेले धन तीन हिस्‍से मध्ये वाटून घेत. आपापला हिस्‍से स्‍वत:साठी व एक हिस्‍सा ईश्‍वराला ठेवतात.असे खूप दिवस चालत होते .एका रात्री ते चोरीसाठी दुसऱ्या गावात निघाले. बरीच वेळ भटकंती करूनहीसुद्धा त्‍यांना काही चोरी करण्‍याची संधी मिळाली नाही.ते दोघेही थकून एका मंदिरात बसले. तेथे त्‍यांना एक साधू संत मादिरामध्ये झोपलेले दिसले. त्‍यांनी संताला उठवले व म्हणाले कि काही असेल तर द्या नाही तर मारून टाकले जाऊ.संताने त्यांना विचारला तर त्या चोरांनी सांगितले कि आम्ही चोर आहोत.आम्ही चोरी करतो .हे ऐकून संत म्‍हनाले, तुम्‍ही करता ते चांगलेआहे की वाईट याचा कधी विचार केला ?चोर म्‍हणाले,” आम्‍ही चांगलेच करतो कारण आम्ही चोरी करून जे धन मिळवतो ते आम्‍ही तीन हिस्‍से मध्ये वाटतो. एक एक भाग आम्‍ही घेतो आणि तिसरा भाग ईश्‍वराला चरणी अर्पण करतो.हे सगळे ऐकल्यावर संत त्यांच्या जवळील एक जिवंत कोंबडा काढला आणि त्यांना दिला व म्हणाले ”आज तुम्ही काहीही चोरी करू शकले नाहीत त्यामुळे तुम्हीला हा कोंबडादेऊ शकतो बाकी माझ्याकडे काही नाही.पण आता चोरापुढे प्रश्न पडला कि आता याचे हिस्‍से कसे करायचे. ते दोघेही चोर आश्‍चर्यचकित झाले.संताने त्यांना आशय समजावून म्हाणाले कि चोरी हा जगण्याचा पर्याय नाही. तुम्ही कष्‍टाची कमाई करून त्‍यातील एक हिस्‍सा ईश्‍वरचरणी ठेवा. ते खरे सार्थक आहे .हे सगळे म्हणणे त्या चोराला पटले आणि ते दोघेही संताला नमस्‍कार करूनचोरी सोडून द्यायचा निर्णय करून तेथून निघून गेले.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 10 एप्रिल 2024💠 वार - बुधवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://sahityasevak.blogspot.com/2020/04/blog-post_20.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील १०१ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२००७:राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष जेष्ठ राजनीतिज्ञ,लेखक आणि विचारवंत डॉ.मोहम्मद हमीद अन्सारी यांची उपराष्ट्रपती पदी निवड**२००६:उत्तर प्रदेशातील मेरठ शहरातील व्हिक्टोरिया पार्कमध्ये व्यापार मेळाव्यात भीषण आग ५० मृत्युमुखी**१९९४:सर्वोच्च न्यायालयातील माजी न्यायाधीश श्री एस.आर.पंडियन अध्यक्ष असलेला पाचवा वेतन आयोग स्थापन* *१९५५:योहान साल्क या शास्त्रज्ञाने सर्वप्रथम पोलिओ लशीची यशस्वी चाचणी केली.**१९१२:इंग्लंडमधील साऊथॅम्प्टन बंदरातुन ’टायटॅनिक’ जहाजाचे पहिल्या (व शेवटच्या) सफरीवर प्रयाण.**१८७५:महर्षी स्वामी दयानंद यांनी आर्य समाजाची स्थापना केली.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९०:प्रियंका बर्वे -- मराठी गायिका**१९८१:अभिजित चव्हाण--हिंदी चित्रपट, टेलिव्हिजन आणि रंगमंच अभिनेता**१९७१:वंदना अनिल कुलकर्णी-- प्रसिद्ध कवयित्री,लेखिका**१९५८:मीनाक्षी मोहरील-- कथा लेखिका* *१९५१:प्रा.जीवन मुळे --- लेखक,वक्ते* *१९५०:डॉ.विक्रम कुवरलाल शाह-- व्यवसायाने डॉक्टर असून,लेखन करणारे लेखक**१९४५:अशोक बेंडखळे-- प्रसिद्ध मराठी लेखक,समीक्षक व संपादक**१९४०:प्रा.डॉ.दिनकर कुलकर्णी-- कवी, लेखक* *१९३७:नरेंद्र पुरुषोत्तम चपळगावकर-- निवृत्त न्यायाधीश,ज्येष्ठ विचारवंत,सुप्रसिद्ध साहित्यिक,फेब्रुवारी २०२३ मध्ये झालेल्या ९६व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष* *१९३३:डॉ.हणमंत विद्याधर सरदेसाई (ह.वि. सरदेसाई)-- मराठी डॉक्टर व लेखक(मृत्यू:१५ मार्च २०२०)* *१९३१:किशोरी आमोणकर – शास्त्रीय गायिका**१९३१:सुरेश रघुनाथ मथुरे -- कवी,कथाकार,विज्ञानलेखक (मृत्यू:२३ डिसेंबर १९९८)* *१९२७:मनाली कल्लट तथा एम.के.वैणू बाप्पा – भारतीय खगोलशास्त्रज्ञ.(मृत्यू:१० ऑगस्ट १९८२)**१९०७:मोतीराम गजानन तथा मो.ग. रांगणेकर – नाटककार,चित्रपट दिग्दर्शक व पत्रकार (मृत्यू:१ फेब्रुवारी १९९५)**१९०१: श्रीपाद रामचंद्र पारसनीस -- चरित्रकार,अनुवादक (मृत्यू:२२ जानेवारी १९८०)* *१९०१:डॉ.धनंजय रामचंद्र तथा द. रा. गाडगीळ – अर्थशास्त्रज्ञ,भारतीय अर्थशास्त्राचे प्रणेते,सहकारी चळवळीचे खंदे समर्थक,पुणे विद्यापीठाचे कुलगुरु (मृत्यू:३ मे १९७१)**१८९४:घनश्यामदास बिर्ला – व्यापारी पार्श्वभूमीतून पुढे येऊन पुढे प्रचंड औद्योगिक साम्राज्य उभारलेले उद्योगपती (मृत्यू:११ जून १९८३)**१८८८:पारुजी नारायण मिसाळ-- ‘बालसन्मित्र’कार सिंधुसाहित्यसरिता हा उपक्रम सुरू केला.(मृत्यू:२७ मे१९५५)**१८८०:सर सी.वाय.चिंतामणी – स्वातंत्र्यपूर्व काळातील प्रागतिक पक्षाचे नेते व श्रेष्ठ वृत्तपत्रकार,(मृत्यू:१ जुलै १९४१)**१८७६:वामन गोविंद काळे-- सुविख्यात भारतीय अर्थशास्त्रज्ञ व अनेक व्यापारी संस्थांचे प्रवर्तक(मृत्यू:२७ जानेवारी १९४६)**१८४७:जोसेफ पुलित्झर – हंगेरीयन- अमेरिकन राजकीय नेते आणि प्रकाशक, (मृत्यू:२९ आक्टोबर १९११)**१८४३:रामचंद्र भिकाजी गुंजीकर – ’मोचनगड’ या मराठीतील पहिल्या ऐतिहासिक कादंबरीचे लेखक आणि ’विविध ज्ञानविस्तार’ मासिकाचे संपादक (मृत्यू:१८ जून १९०१)**१७५५:डॉ.सॅम्यूअल हानेमान – होमिओपाथी या वैद्यकीय उपचारपद्धतीचे जनक (मृत्यू:२ जुलै १८४३)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०००:डॉ.श्रीधर भास्कर तथा ’दादासाहेब’ वर्णेकर – संस्कृत पंडित (जन्म:३१ जुलै १९१८)**१९९५:मोरारजी देसाई – भारताचे ४ थे पंतप्रधान,स्वातंत्र्यसेनानी व गांधीवादी नेते, ’भारतरत्‍न’ (जन्म:२९ फेब्रुवारी १८९६)**_१९६५:डॉ.पंजाबराव देशमुख – स्वतंत्र भारताचे पहिले कृषी मंत्री,विदर्भात त्यांनी केलेले शिक्षणप्रसाराचे कार्य कर्मवीर भाऊराव पाटलांच्या तोडीचे मानले जाते.(जन्म:२७ डिसेंबर १८९८)_**१९४९:बिरबल सहानी – पुरावनस्पती शास्त्रज्ञ, राष्ट्रीय विज्ञान अकादमीचे अध्यक्ष (जन्म:१४ नोव्हेंबर १८९१ )**१९३७:डॉ.श्रीधर व्यंकटेश केतकर – ज्ञानकोशकार (जन्म:२ फेब्रुवारी १८८४)**१९३१:खलील जिब्रान – लेबनॉनमधे जन्मलेले अमेरिकन कवी,लेखक व कलाकार (जन्म:६ जानेवारी १८८३)**१८१३:जोसेफ लाग्रांगे – इटालियन गणितज्ञ (जन्म:२५ जानेवारी १७३६)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *माणसात दिसला देव*याविषयावर अनेक साहित्यिकांचे लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *"वाटाघाटी नको पाठिंबा फक्त नी फक्त नरेंद्र मोदींसाठी", राज ठाकरेंनी स्पष्ट केली राजकीय भूमिका*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *जल्लोष नववर्षाचा.! राज्यभरात गुढीपाडव्याचा उत्साह; ठिकठिकाणी शोभायात्रा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्ली उच्च न्यायालयाकडून कुठला दिलासा मिळू शकला नाही, त्यामुळे जाणार सर्वोच्च न्यायालयात*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात 2 हजार 641 मतदान केंद्राची वाढ, गैरसोय टाळण्यासाठी निर्णय !*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *युनिकॉर्न स्टार्टअप्सच्या जागतिक यादीत भारत अमेरिका व चीन नंतर तिसऱ्या क्रमांकावर*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *दुसऱ्या टप्यातील निवडणुकीसाठी २०४ उमेदवार पात्र ठरले आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी पत्रकार परिषदेत दिली.*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *अटीतटीच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने पंजाबला 2 धावाने हरविले*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *प्रथिने म्हणजे काय ?* 📙 प्रथिनांची आवश्यकता आपण अनेक वेळा ऐकलेली असते. पेशींची रचना प्रथिनांशिवाय होत नाही, हे ज्ञात असते. पण प्रथिने म्हणजे काय, याचे नेमके उत्तर मात्र अनेकदा माहीत नसते. अॅमिनो अॅसिड या प्रकारची वीस द्रव्ये प्रथिने बनवण्यासाठी उपयुक्त ठरतात. त्यांचे अजूनही प्रकार आहेत, पण ते सजीव पेशी तयार होण्यासाठी उपयोगी पडत नाहीत.या वीस प्रकारच्या अमिनो अॅसिड्सच्या रेणूंची साखळी बनत जाते व विविध स्वरूपांची प्रथिने निर्माण होऊ लागतात. प्रथिनाच्या रचनेप्रमाणे त्याचे काम ठरते, कार्यकक्षा आखली जाते, उपयुक्तताही ठरते. स्नायूंच्या रचनेसाठी तीन लागतात, त्यावेळी त्यांच्यामुळे पेशी बनतात. याउलट शरीरात काम करणारी असंख्य प्रकारची वितंचके (Enzymes) ही सुद्धा प्रथिने असतात. तोंडातील लाळ, पोटातील पाचक रसातील पदार्थ, रक्तातील काही द्रव्ये, मज्जासंस्थेतील संदेशवहनास उपयोगी पडणारी रसायने हे सर्व प्रथिनांचेच प्रकार आहेत.वीस प्रकारच्या अमिनो अॅसिड्सच्या विविध पद्धतींनी जुळणाऱ्या जोड्यांतून असंख्य प्रथिने होतात. पण यांतील सर्वच अमिनो अॅसिड्स शरीरात तयार होतातच, असे मात्र नाही. ती अन्नातून मिसळावी लागतात. मग त्यांचे दोन प्रकार केले जातात - आवश्यक व अनावश्यक. यांतील आवश्यक प्रकार योग्य प्रमाणात मिळाले नाहीत, तर वाढीवर परिणाम होऊ लागतो, आजार निर्माण होऊ शकतात.आवश्यक प्रकारची अमिनो अॅसिड्स सर्व प्रकारच्या अन्नांत एकत्रित असतातच, असे नाही. कसलीतरी कमतरता असतेच. यासाठीच एकच एक पदार्थ खाऊन कोणीही प्राणी राहू शकत नाही. फक्त मांसावर जगणाऱ्या प्राण्यांना मात्र सर्व आवश्यक अमिनो अॅसिड्स मिळतात. याउलट शाकाहारी माणसाला जरी तांदळात, गव्हात, ज्वारी बाजरी प्रथिने मिळत असली, तरीही त्याबरोबर द्विदलांचा म्हणजे डाळींचा आसरा घ्यावाच लागतो. त्यातूनच आहारपद्धती ठरत गेल्या आहेत.रोजच्या पदार्थातील सर्वात जास्त प्रथिने सोयाबीनमध्ये आढळतात. त्याची टक्केवारी चाळीसपर्यंत असू शकते. यामुळेच शाकाहारी आहारात सोयाबीनला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तेवढेच काय, पण पाश्चात्य देशांत मांसाची कमतरता भरून काढण्यासाठीही सोयाचा वापर केला जातो. शेंगदाने, चीज यांचा क्रमांक त्यानंतरचा व त्यांतील प्रथिनांची टक्केवारी पंचवीस असते. मांसात २३ टक्के, तर अंड्यांमध्ये १२ टक्के प्रथिने असतात. गहू वा तांदळात ६ ते ८ टक्केच प्रथिने आढळतात. प्रथिनांबद्दल बोलताना अनेकदा प्रथम दर्जाची व दुय्यम दर्जाची अशी वर्गवारी केली जाते. याचा अर्थ ज्यात सर्व आवश्यक अमिनो अॅसिड्स आढळतात, ती प्रथम दर्जाची व अन्य सर्व दुय्यम समजली जातात. थोडक्यात प्राणिज प्रथिने प्रथम दर्जाची असतात. लहान मुले, गर्भावस्था, आजारपण यांमध्ये पेशींची झीज भरून काढणे व वाढीसाठी आवश्यक म्हणून प्रथिनांची गरज असते. मुळात ही गरज या काळात जास्तच असल्याने प्रमाण २० टक्के इतके वाढलेले असते. केवळ प्रथिनयुक्त अन्नाची चव मात्र काहीशी उग्र वासाची असते. थोडीशी कडवटही असते. क्वचित काहींना ती आवडतही नाही. यासाठीच प्रथिनयुक्त अन्न पिष्टमय वा वनस्पतिज पदार्थांबरोबर खाण्याची पद्धत पडली आहे. 'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जीवन सुंदर व यशस्वी करण्यासाठी तीन गुणांची जरुरी असते -प्रेम, ज्ञान व शक्ती.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) ऑक्टोपसला किती मेंदू असतात ?२) FIDE ने जाहीर केलेल्या रँकिंगनुसार कोणता बुद्धिबळ खेळाडू जगात प्रथम क्रमांकावर आहे ?३) केंद्रीय निवडणुक आयोगाने लोकसभा निवडणुक २०२४ साठी कोणाची युथ आयकॉन म्हणून निवड केली आहे ?४) 'आकाश' या शब्दाचे समानार्थी शब्द सांगा.५) १८ व्या लोकसभेत देशातील सर्वात लहान मतदारसंघ कोणता ?*उत्तरे :-* १) नऊ २) मॅग्नस कार्लसन ३) आयुष्यमान खुराणा ४) गगन, नभ, अंबर, व्योम, खग, आभाळ ५) लक्षद्वीप ( ४७,९७२ मतदार )*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 डॉ. शेख Mwh, मुख्याध्यापक तथा शिक्षक नेते, नांदेड👤 टी. अशोक साईनाथ, तेलंगणा👤 शिवराज सीताराम वडजे, शिक्षक, नांदेड👤 तुळशीराम सिरमलवार, शिक्षक, धर्माबाद👤 भाऊसाहेब आबा अहिरे,नाशिक👤 सचिन पवळे, धर्माबाद👤 नागेश तांबोळी, धर्माबाद👤 श्यामानंद लिंगमपल्ले, धर्माबाद👤 सुभाष बोडके👤 रामदास डुमणे, नांदेड👤 मारोती कोटगले, धर्माबाद👤 प्रकाश बंडेवार, धर्माबाद👤 विलास बोंबले, परभणी👤 बालाजी भाऊ पूर्णेकर*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *अभंगवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आहांच वाहांच आंत वरी दोन्ही । न लगा गडणी आम्हां तैशा ॥१॥भेऊं नये तेथें भेडसावूं कोणा । आवरूनि मना बंद द्यावा ॥२॥तुका म्हणे कांहीं अभ्यासावांचुनी । नव्हे हे करणी भलतीची ॥३॥।। संत तुकाराम महाराज ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपल्या विचारात किंवा करत असलेल्या कृतीत जर प्रामाणिकपणा ,नि:स्वार्थ भावना किंवा सत्यता असेल तर कुठेही फिरण्याची आवश्यकता पडत नाही. आणि आपल्या खिशातील पैसे सुद्धा खर्च करावे लागत नाही. कारण त्यात फक्त सत्कर्म असते. आणि तेच सत्कर्म करणे हेच आपले खरे कर्तव्य आहेत. बाकी दिखावूपणा करून नको त्या प्रकारचे जीवन जगण्याला कर्तव्य नाही तर स्वार्थ आणि प्रसिद्धी मिळवणे असे म्हणतात. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *कष्टाची कमाईच श्रेष्ठ*एका गावात दोन चोर राहत होते. ते प्रत्‍येक दिवशी चोरी करत आणि आलेले धन तीन हिस्‍से मध्ये वाटून घेत. आपापला हिस्‍से स्‍वत:साठी व एक हिस्‍सा ईश्‍वराला ठेवतात.असे खूप दिवस चालत होते .एका रात्री ते चोरीसाठी दुसऱ्या गावात निघाले. बरीच वेळ भटकंती करूनहीसुद्धा त्‍यांना काही चोरी करण्‍याची संधी मिळाली नाही.ते दोघेही थकून एका मंदिरात बसले. तेथे त्‍यांना एक साधू संत मादिरामध्ये झोपलेले दिसले. त्‍यांनी संताला उठवले व म्हणाले कि काही असेल तर द्या नाही तर मारून टाकले जाऊ.संताने त्यांना विचारला तर त्या चोरांनी सांगितले कि आम्ही चोर आहोत.आम्ही चोरी करतो .हे ऐकून संत म्‍हनाले, तुम्‍ही करता ते चांगलेआहे की वाईट याचा कधी विचार केला ?चोर म्‍हणाले,” आम्‍ही चांगलेच करतो कारण आम्ही चोरी करून जे धन मिळवतो ते आम्‍ही तीन हिस्‍से मध्ये वाटतो. एक एक भाग आम्‍ही घेतो आणि तिसरा भाग ईश्‍वराला चरणी अर्पण करतो.हे सगळे ऐकल्यावर संत त्यांच्या जवळील एक जिवंत कोंबडा काढला आणि त्यांना दिला व म्हणाले ”आज तुम्ही काहीही चोरी करू शकले नाहीत त्यामुळे तुम्हीला हा कोंबडादेऊ शकतो बाकी माझ्याकडे काही नाही.पण आता चोरापुढे प्रश्न पडला कि आता याचे हिस्‍से कसे करायचे. ते दोघेही चोर आश्‍चर्यचकित झाले.संताने त्यांना आशय समजावून म्हाणाले कि चोरी हा जगण्याचा पर्याय नाही. तुम्ही कष्‍टाची कमाई करून त्‍यातील एक हिस्‍सा ईश्‍वरचरणी ठेवा. ते खरे सार्थक आहे .हे सगळे म्हणणे त्या चोराला पटले आणि ते दोघेही संताला नमस्‍कार करूनचोरी सोडून द्यायचा निर्णय करून तेथून निघून गेले.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 06 एप्रिल 2024💠 वार - शनिवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://nasayeotikar.blogspot.com/2018/04/blog-post_6.html?m=1••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील ९७ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२०००:’मीर’ या रशियाच्या अंतरिक्ष प्रयोगशाळेला जीवदान देण्यासाठी सोडलेले ’सोयूझ’ हे अंतराळयान ’मीर’ला भेटले.**१९९८:भारतापर्यंत सहज पोहोचू शकणार्‍या मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांची पाकिस्तानने यशस्वी चाचणी केली.**१९६६:भारतीय जलतरणपटू मिहीर सेन यांनी भारत व पाकिस्तानला जोडणारी पाल्कची सामुद्रधुनी पोहून पार केली.इंग्लिश खाडीसह जगातील अनेक खाड्या त्यांनी पार केल्या होत्या.**१९६५:व्यापारी उपयोग करता येईल अशा प्रकारे संदेशवहन करण्याची सोय असलेला ’अर्ली बर्ड’ हा उपग्रह अमेरिकेने अंतराळात सोडला.या उपग्रहामुळे माहिती व करमणुकीच्या क्षेत्रात प्रचंड क्रांती घडली**१९३०:प्रसिद्ध दांडीयात्रेनंतर गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह सुरू केला.**१९१७:पहिले महायुद्ध – अमेरिकेने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले.**१८९६:आधुनिक ऑलिम्पिक खेळांची ग्रीसमधील अथेन्स येथे सुरूवात झाली. ग्रीक सम्राट थेडोसियस (पहिला) याने घातलेल्या बंदीमुळे १५०० वर्षे हे खेळ बंद होते.**१६५६:शिवाजीमहाराजांनी चंद्रराव मोरे यांचा पराभव करुन रायगड किल्ला ताब्यात घेतला.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८७:प्रा.अशोक बाळू पाटील-- लेखक**१९७८:संजय मुकुंदराव निकम-- कवी* *१९७४:आशुतोष अडोणी -- लेखक,संपादक, वक्ते* *१९५९:दिप्ती कोदंड कुलकर्णी -- कवयित्री लेखिका* *१९५९:प्रा.प्रवीण दवणे-- सुप्रसिद्ध मराठी लेखक,गीतकार,पटकथालेखक**१९५६:दिलीप वेंगसरकर – क्रिकेटपटू**१९५३:भारतकुमार राऊत-- राज्यसभेचे माजी खासदार प्रसिद्ध लेखक,संपादक* *१९४९:साहेबराव ठाणगे-- प्रसिद्ध कवी, लेखक* *१९४०:शैला द्वारकादास लोहिया-- मराठी साहित्यातील कथाकार,कादंबरीकार आणि लोकसाहित्याच्या अभ्यासक.(मृत्यू:२४ जूलै २०१३)**१९३४:नीळकंठ खाडिलकर:ज्येष्ठ पत्रकार दैनिक नवा काळचे संपादक(मृत्यू:२२ नोव्हेंबर २०१९)* *१९३१:गंगाधर गणेश पाटील--समीक्षक, संपादक**१९३१:रमा दासगुप्ता तथा सुचित्रा सेन – बंगाली व हिन्दी चित्रपट अभिनेत्री(मृत्यू:१७ जानेवारी २०१४ )**१९२८:जेम्स वॉटसन – फ्रान्सिस क्रीक व मॉरिस विल्कीन्स या जोडीदारांसह डीएनएची संरचना स्पष्ट करणारे नोबेल पारितोषिक (१९६२) विजेते जैवरसायनशास्त्रज्ञ**१९२७:विष्णू महेश्वर ऊर्फ ’व्ही.एम.’ तथा दादासाहेब जोग – उद्योजक (मृत्यू:२८ जून २०००)**१९१७:रघुनाथ विष्णू पंडित –कोकणी भाषेतील त्यांच्या काव्यात्मक निर्मितीसाठी ते प्रसिद्ध,कोंकणी कवी**१९१७:’काव्यतीर्थ’ हणमंत नरहर जोशी तथा कवी सुधांशु – मराठी कथाकार व कवी (मृत्यू:१८ नोव्हेंबर २००६)**१९०९:जी.एन.जोशी – भावगीतगायक व संगीतकार.एच.एम.व्ही.या कंपनीत काम करत असताना त्यांनी अनेक नवीन गायकांना संधी देऊन त्यांच्या ध्वनिमुद्रिका काढल्या.(मृत्यू:२२ सप्टॆंबर १९९४)**१८९०:अली सिकंदर ऊर्फ ’जिगर मोरादाबादी’ – उर्दू कवी व शायर (मृत्यू:९ सप्टेंबर १९६०)**१८८७:पांडुरंग श्रीधर आपटे--- मराठी साहित्यिक,भारतातली पहिली राष्ट्रीय शाळा आपटे गुरुजींनी येवला येथे काढली होती.(मृत्यू:१९ डिसेंबर१९५६)**१८६४:सर विल्यम हार्डी – ब्रिटिश जीवरसायनशास्त्रज्ञ (मृत्यू:२३ जानेवारी १९३४)**१७७३:जेम्स मिल – स्कॉटिश तत्त्ववेत्ते, इतिहासकार व अर्थशास्त्रज्ञ (मृत्यू:२३ जून १८३६)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२००६:आशा पोतदार -- मराठी नाट्य-चित्रपट सृष्टीतीलअभिनेत्री(जन्म:२१ ऑगस्ट१९३९)** २००१:देवीलाल-- भारताचे माजी उपपंतप्रधान व हरियाणा राज्याचे माजी मुख्यमंत्री(जन्म:१६ सप्टेंबर १९१४)**१९९२:आयझॅक असिमॉव्ह – अमेरिकन जीवरसायनशास्त्रज्ञ आणि विज्ञानकथालेखक (जन्म: २ जानेवारी १९२०)**१९८९:पन्नालाल पटेल – ज्ञानपीठ पारितोषिक विजेते गुजराथी कथा-कादंबरीकार.(जन्म:७ मे १९१२)**१९८३:जनरल जयंतीनाथ चौधरी – भारताचे लष्करप्रमुख (१९६२ - १९६६), हैदराबादचे लष्करी प्रशासक (१९४८ - १९४९) व भारताचे कॅनडातील राजदूत,पद्‌मविभूषण (जन्म:१० जून १९०८)**१९५५:विनायक महाराजा मसूरकर – धर्मभास्कर**१९४८:साधुदास(गोपाळ गोविंद मुजुदार. पाटणकर) --मराठी कवी,कादंबरीकार व चरित्रकार(जन्म:१८८३)* *११९९:रिचर्ड (पहिला) – इंग्लंडचा राजा (जन्म:८ सप्टेंबर ११५७)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जागतिक आरोग्य दिनानिमित्त प्रासंगिक लेख*... आरोग्यम धनसंपदा ....*मनुष्य पृथ्वी तलवार जन्म घेतल्यापासून तर मरेपर्यंत मानवाच्या शरीराचा आरोग्याशी संबंध येतो. शरीर सुदृढ असेल तर त्याचे आरोग्य देखील सुदृढ असते. आरोग्य सुदृढ असेल तर बाकी सगळ्या गोष्टी आपोआप सोईस्करपणे पार पडत असतात. इंग्रजीत एक म्हण आहे Sound in Body is Sound In Mind अर्थात शरीर मजबूत तर मन मजबूत.  मात्र आपले आरोग्य चांगले नसेल तर आपल्या जवळ सर्व काही असून ते काहीच कामाचे नसते. म्हणून प्रत्येक जण............ पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *30 लाख नोकऱ्या, आरक्षणाची मर्यादा वाढवणार, गरीब महिलांना 1 लाख, काँग्रेसने जाहीर केला जाहीरनामा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *आरबीआयकडून पतधोरण जाहीर, रेपो रेट 'जैसे थे', कर्जधारकांना दिलासा!*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *मोठ्या प्रमाणात रस्ते बांधले जातात पण महिलांसाठी स्वच्छतागृह नाही:पेट्रोल पंपावर स्वच्छतागृह बंधनकारक करावी-डॉ. निलम गोऱ्हे*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *हिंगोली जिल्ह्यात 114 जण हद्दपार:98 जणांवर कारवाई सुरू, निवडणुकीपूर्वी पोलिस ॲक्शन मोडवर; 39 जण कारागृहात स्थानबद्ध*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *बीडमध्ये झालेल्या जाहीर सभेत मराठा आरक्षण आंदोलन कर्ते मनोज जरांगे पाटील यांनी नागरिकांना मोठ्या संख्येने मतदान करण्याचे केले आवाहन*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *यूपीत मदरशातील शिक्षण सुरूच राहणार अलाहाबाद हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *IPL T20 - 2024 - *•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌞 *सौर वारा म्हणजे काय ?* 🌞 *************************हलत्या हवेला वारा म्हणतात. आपण शाळेतच हे शिकतो. पण सूर्यावर तर हवाच नाही हेही आपण शिकतो. मग तिथून वारा कसा काय वाहू लागेल ? हे खरं आहे. पण सौरवारा याचा शब्दश: अर्थ न घेता त्याचा भावार्थ समजून घ्यायला हवा. सूर्याच्या अंतरंगात अणुमिलनाच्या अणुभट्ट्या सतत धडधडत असतात. तिथलं तापमानही त्यामुळे कोट्यवधी अंशांइतकं वाढलेलं असतं. त्यापायी मग या ताऱ्याभोवती असलेलं वायूचं वातावरणही तापतं. या बाहेरच्या प्रभावळीतल्या वायूंचं प्लाझ्मा रूपात अवस्थांतर होतं. म्हणजेच त्या वायूच्या रेणूंचे घटक असलेले विद्युतभारधारी मूलकण स्वतंत्र होतात. त्यांच्याठायी असलेल्या प्रकार ऊर्जेमुळे वेगवानही होतात. सूर्यापासून दूरवर जाऊ पाहतात. जेव्हा पोटातल्या आगीपायी खदखदणाऱ्या ज्वालामुखीचा उद्रेक होतो त्या वेळी त्यातून राख, राळ आणि लाव्हा दूरदूरवर फेकला जातो. त्याचप्रकारे सूर्याच्या प्रभावळीतील प्लाझ्मा दूरदूरवर, संपूर्ण सौरमालिकेवर फेकला जातो. *या वेगवान मूलकणांच्या बहुतांश प्रोटॉनच्या, झोतालाच सौरवारा असं म्हणतात.* तसा हा सतत वाहतच असतो. पण अधूनमधून सूर्यावर काही वादळी घटना घडतात. सोलर फ्लेअर्स या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या तुफानांच्या वेळेस सौरवाराही वेगांनं वाहतो. त्याचा वेग सेकंदाला ९०० किलोमीटरपर्यंतही वाढतो.या झोताचा मारा संपूर्ण सौरमालिकेवर होत असतो. कोणताही ग्रह किंवा उपग्रह त्याच्या तावडीतून सुटत नाही. तरीही सूर्याला जवळ असणाऱ्या ग्रहांना त्याचा अधिक फटका बसू शकतो. वेगानं जाणाऱ्या प्रोटॉनच्या अंगी चुंबकीय बलही असतं. त्यामुळे त्या झोताचा प्रसार झालेल्या सर्वच प्रदेशावर चुंबकीय क्षेत्रही फैलावतं. सूर्य स्वतःभोवती गिरकी मारत असल्यामुळे या चुंबकीय क्षेत्राचा आकार एखाद्या स्प्रिंगसारखा किंवा गोलगोल जिन्यासारखा होतो. त्या क्षेत्राचा एक बुडबुडा तयार होऊन तो साऱ्या सौरमालिकेला गवसणी घालतो.ज्या ग्रहांना स्वतःचं चुंबकीय क्षेत्र नसतं त्यांना मग या चुंबकीय क्षेत्राच्या हमल्याच्या परिणामांना तोंड द्यावं लागतं. पृथ्वीचं स्वतःचं चुंबकीय क्षेत्र असल्यामुळे त्यावर आदळून हे मूलकण इतरत्र विखुरले जातात. पृथ्वीचा बचाव होतो. धरतीचं चुंबकीय क्षेत्र आणि सौरवारा यांच्यामध्ये होणाऱ्या या अभिक्रियेपोटीच धरतीच्या अतिउत्तरेच्या आणि अतिदक्षिणेच्या आकाशात नयनरम्य रंगांची उधळण करणाऱ्या आॅरोरांचा आविष्कार बघावयास मिळतो. आज आपण अवकाशात अनेक उपग्रह स्थापित केलेले आहेत. त्यांना चुंबकीय संरक्षक आवरण नसतं. त्यामुळे सौरवाऱ्याच्या झोतात सापडून त्यांच्या कामात बाधा येऊ शकते.*बाळ फोंडके यांच्या 'काय ?' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••चांगले विचार मनात फार वेळ टिकत नाहीत, म्हणून ते मनात येताच कृती करा.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *पहिला राष्ट्रीय सागरी दिवस* केव्हा साजरा केला गेला ?२) कनिष्ठ न्यायालयात किती व कोणत्या न्यायालयांचा समावेश होतो ?३) 'ब' जीवनसत्त्व एकूण बारा प्रकारची आहेत त्यांना काय म्हणतात ?४) 'आई' या शब्दाचे समानार्थी शब्द सांगा.५) २०२४ ला होणारी लोकसभेची कितवी निवडणूक आहे ? *उत्तरे :-* १) ५ एप्रिल १९६४ २) तीन - जिल्हा न्यायालय, तालुका न्यायालय व महसूल न्यायालय ३) बी - कॉम्प्लेक्स ४) माता, जननी, माउली, माय, मातोश्री, जन्मदात्री ५) १८ वी*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 लक्ष्मण दशरथ सावंत, कवी व शिक्षक, औरंगाबाद👤 गौरी हर्षल कुलकर्णी, समुपदेशक👤 अभिनंदन पांचाळ, धर्माबाद👤 साजिद सय्यद, शिक्षक तथा पत्रकार, धर्माबाद👤 व्यंकट चन्नावार, नायगाव👤 पोषट्टी सिरमलवार👤 दत्ताहरी पा. कदम👤 मारोती कदम👤 राजेश सुरकूटवार👤 रफिक सय्यद, सिंदखेडराजा*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *अभंगवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सासुरियां वीट आला भरतारा । इकडे माहेरा स्वभावें चि ॥१॥सांडवर कोणी न धरिती हातीं । प्रारब्धाची गति भोगूं आतां ॥२॥न व्हावी ते जाली आमुची भंडाई । तुका म्हणे काई लाजों आतां ॥३॥।। संत तुकाराम महाराज ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जीवन जगत असताना अनेकदा आपल्याला त्रास सहन करावा लागतो. पण,त्याच त्रासामधून कधीकधी आपल्याला नवी दिशा सुद्धा मिळत असते.पण, काही त्रास आपण स्वतः हून करवून घेतो. विनाकारण इतरांच्याकडे लक्ष देऊन आपली वेळ वाया घालविण्यात आणि आनंद शोधण्यात आपण.स्वतःला. धन्य समजून घेत असतो.त्यामुळे त्याचा कुठेतरी त्रास होत असतो. म्हणून नको त्या गोष्टींकडे लक्ष देऊन स्वतःला त्रास करून घेऊ नये.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आद्यगुरु शंकराचार्य हिमालयाकडे यात्रेसाठी चालले होते. त्यांच्याबरोबर त्यांचे सर्व शिष्य हि होते. प्रवास करता करता ते अलकनंदा नदीच्या पात्रापाशी येवून थांबले. तेंव्हा एका शिष्याने शंकराचार्यांची स्तुती करण्यास सुरुवात केली. शिष्य म्हणू लागला,"आचार्य ! आपण किती महान आहात, आपले ज्ञान किती मोठे आहे जणू या अलकनंदा नदीच्या पात्राप्रमाणे. हे पात्र जितके विस्तीर्ण आहे तितके तुमचे ज्ञान असावे असे मला वाटते. कदाचित यापेक्षा महासागराइतकेही तुमचे ज्ञान असू शकेल."त्याचवेळी शंकराचार्यांनी आपल्या हातातील दंड पाण्यात बुडवला आणि बाहेर काढला, शिष्य या कृतीकडे पाहत होता. पाण्यातून बाहेर काढलेला दंड शिष्याला दाखवून शंकराचार्य म्हणाले," बघ, किती पाणी आले या दंडावर? एक थेंब इतकेच ना! अरे! मला किती ज्ञान आहे ते सांगू का? जगातील ज्ञान म्हणजे अलकनंदा नदीचे पात्र आहे असे समज आणि दंड बुडवून बाहेर काढल्यावर त्यावर आलेला थेंब म्हणजे माझे ज्ञान." जगात प्रचंड ज्ञान आहे आणि त्यातील केवळ एक थेंब ज्ञान माझ्याकडे आहे असे आद्यगुरु शंकराचार्य म्हणतात.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 05 एप्रिल 2024💠 वार - शुक्रवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - समुहात add होण्यासाठी https://chat.whatsapp.com/EgXNT8RopqQ82O3UfAlMy9••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_राष्ट्रीय सागरी दिवस_* •••••••••••••••••••••••••••••••••••• *_ या वर्षातील ९६ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२०००:अभिनेत्री सुलोचना यांच्या हस्ते डी. डी. - १० या मराठी उपग्रह वाहिनीचे ’सह्याद्री’ असे नामकरण करण्यात आले.**१९५७:कम्युनिस्ट पक्षाने भारतात प्रथमच केरळमध्ये निवडणूका जिंकल्या आणि इ. एम. एस.नंबुद्रीपाद हे केरळचे मुख्यमंत्री झाले.**१९५५:प्रकृती अस्वास्थ्यामुळे विन्स्टन चर्चिल यांनी ब्रिटनच्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला**१९४९:भारत स्काऊट आणि गाईडची स्थापना झाली**१९३०:२४१ मैल प्रवास करुन महात्मा गांधी यांनी दांडीयात्रा संपविली.**१६७९:राजारामास पकडण्यासाठी झुल्फिकारखानाने रायगडास वेढा दिला असता राजाराम रायगडावरुन प्रतापगडास गेला. पुढे प्रतापगडासही शत्रूने वेढा दिल्यावर राजारामास पन्हाळगडावर जावे लागले. [चैत्र व.१०]**१६६३:दहा हजार फौजेसह पुण्याच्या लाल महालात तळ देऊन राहिलेला मोगल सुभेदार शाहिस्तेखान याच्यावर शिवाजी महाराजांनी दोनशे स्वारांसह अकस्मात छापा घातला. शाहिस्तेखान खिडकीतुन पळून गेल्याने बचावला; मात्र पळुन जाण्याच्या प्रयत्‍नात त्याची तीन बोटे तुटली. या प्रसंगापासून मराठीत ’जिवावरचे बोटावर निभावले’ हा शब्दप्रयोग रुढ झाला.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०००:मुग्धा वैशंपायन-- झी मराठी वाहिनी वरील सारेगमपा लिटिल चॅम्प्स या कार्यक्रमातील आघाडीची गायिका**१९९३:प्रा.केशरचंद नारायण राठोड -- लेखक,कवी* *१९८५:आरती सिंग-- अभिनेत्री* *१९८०:नरेंद्र पाटील--- कवी**१९७९:प्रज्ञाधर ढवळे-- कवी**१९७७:रुपाली गांगुली-- भारतीय अभिनेत्री**१९७५:प्रा.डॉ.विनोद देवचंद राठोड-- लेखक, कवी**१९७१:संदीप नारायण राक्षे-- कवी,लेखक, चित्रपट निर्माता**१९६९:महेश रामराव मोरे- कवी, कादंबरीकार* *१९६३:उषा नाईक-- भारतीय अभिनेत्री, मराठी चित्रपटांमध्ये काम* *१९६१:प्रशांत पुरुषोत्तम दामले-- प्रसिद्ध मराठी अभिनेता**१९६०:महावीर शाह-- हिंदी आणि गुजराती चित्रपटांमध्ये काम करणारे प्रसिद्ध भारतीय टेलिव्हिजन आणि रंगमंच अभिनेता (मृत्यू:३१ऑगस्ट २०००)* *१९५३:अनुराधा कौतिकराव पाटील-- सुप्रसिद्ध कवयित्री,लेखिका व विविध पुरस्काराने सन्मानित**१९४९:डॉ.राम पंडित-- प्रसिद्ध मराठी गझलकार**१९४७:प्रकाश देशपांडे-- इतिहास-साहित्य संस्कृतीचे गाढे अभ्यासक* *१९४७:शाहीर विजय रामचंद्र जगताप-- प्रसिद्ध शाहीर,लेखक,संपादक**१९४६:आनंद बाबू हांडे-- प्रसिद्ध लेखक**१९४२:मधुकर सीताराम जोशी (मधू जामकर) -- प्रतिभावंत कवी व उत्तम समीक्षक**१९४०:वासंती अरुण मुझुमदार-- ललितलेखिका,कवयित्री(मृत्यू:७ नोव्हेंबर २००३)**१९३६:वसंत कोकजे--लेखक,कवी**१९३०:राम विठ्ठल नगरकर-- विनोदी नट, रामनगरी प्रसिद्ध आत्मचरित्र (मृत्यू:८:जून १९९५)**१९२३:शांता मुकुंद किर्लोस्कर-- कथाकार,कादंबरीकार,संपादक(मृत्यू:१५ सप्टेंबर २००७)**१९२०:डॉ.रफिक झकारिया – महाराष्ट्राचे माजी नगरविकासमंत्री आणि लोकसभा सदस्य (मृत्यू:९ जुलै २००५)**१९२०:आर्थर हॅले – इंग्लिश कादंबरीकार (मृत्यू:२४ नोव्हेंबर २००४)**१९०९:अल्बर्ट आर.ब्रोकोली – ’जेम्स बाँड’ पटांचे निर्माते (मृत्यू:२७ जून १९९६)**१९०८:बाबू जगजीवनराम – स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक,राजकारणी,माजी केंद्रीय मंत्री व भारताचे उपपंतप्रधान (मृत्यू:६ जुलै १९८६)**१८९०:आनंदराव कृष्णाजी टेकाडे-- कवी, गीतकार (मृत्यू:१६ फेब्रुवारी १९६४)**१८७७: माधवराव विनायक किबे (सरदार)-- संशोधक,लेखक (मृत्यू:१२ आक्टोबर १९६३)**१८५६:बुकर टी.वॉशिंग्टन – अमेरिकन निग्रोंच्या प्रश्नासाठी कार्य करणारे समाजसेवक, लेखक,वक्ते व शिक्षणतज्ञ (मृत्यू:१४ नोव्हेंबर १९१५)**१८२७:सर जोसेफ लिस्टर – निर्जंतुकीकरणामुळे जखमा लवकर बर्‍या होतात हे सिध्द करणारा ब्रिटिश शल्यविशारद (मृत्यू:१० फेब्रुवारी १९१२)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२१:अनिस चिस्ती-- इस्लाम धर्माचे व तत्त्वज्ञानाचे,तसेच उर्दू भाषेचे ज्येष्ठ अभ्यासक आणि लेखक**२०१३:राम उगावकर-- कवी,शाहीर,गीतकार (जन्म:५ मार्च१९२९)**२००२:मनोहर राजाराम तथा मनू छाबरिया – दुबईस्थित भारतीय उद्योगपती,जम्बो ग्रुपचे संचालक (जन्म:१९४६)**१९९८:रुही बेर्डे – चित्रपट व नाट्य अभिनेत्री**१९९६:भालचंद्र नीळकंठ तथा बाबा पटवर्धन – बालगंधर्वांना पंधरा वर्षे साथ करणारे ऑर्गनवादक**१९९३:दिव्या भारती – हिन्दी,तामिळ आणि तेलगु चित्रपट अभिनेत्री (जन्म:२५ फेब्रुवारी १९७४)**१९९२:सॅम वॉल्टन-- वॉलमार्टचे संस्थापक(जन्म:२९ मार्च १९१८)**१९६४:गोपाळ विनायक भोंडे – नकलाकार**१९४०:चार्लस फ्रिअरी तथा दीनबंधू अ‍ॅन्ड्र्यूज – इंग्लिश मिशनरी,महात्मा गांधींचे जवळचे मित्र,समाजसेवक आणि भारताच्या स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते (जन्म:१२ फेब्रुवारी १८७१)**१९२२:पंडिता रमाबाई – विधवा,परिक्त्यक्ता आणि स्त्रियांच्या सर्वांगीण उद्धारासाठी कार्य करणाऱ्या समाजसुधारक आणि ’आर्य महिला समाज’ च्या संस्थापिका,संस्कृत पंडित (जन्म:२३ एप्रिल १८५८)**१९१७:शंकरराव निकम – स्वातंत्र्यशाहीर* *_शुभ शुक्रवार _* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *फोर्ब्सनुसार 37 वर्षीय निखिल कामथ हा भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *नांदेड - उमेद स्वयंसहाय्यता समूहातल्या दोन लाख महिलांनी घेतली शंभर टक्के मतदान करण्याची शपथ*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *राज्यात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या तापमानामुळे 28 दिवसात 23 जणांचा उष्माघाताने मृत्यू*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *भारत पुढील तीन वर्षात जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल - केंद्रीय प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *प्रकाश आंबेडकरांच्या वंचितने परभणीतील उमेदवार अचानक बदलला; हवामान अभ्यासक पंजाबराव डख रिंगणात*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह हलका पाऊस पडण्याची शक्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *पंजाबने गुजरातला हरविले, मोठी धावसंख्या केली चेस*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *फंगस / बुरशी* 📙एखादा अन्नपदार्थ उघडा राहिला, तर त्यावर बुरशी धरू लागते. एखादे लाकूड पावसात भिजत राहिले, तर त्यावर सुद्धा झपाट्याने बुरशी धरते. या बुरशीमुळे अनेक गोष्टींचा वापर करणे अशक्य होऊन बसते. एवढेच नव्हे तर या बुरशीमुळे मानवांत, प्राण्यांत, वनस्पतीत कित्येक आजारांचाही उद्भव झालेला दिसतो.पिकांवर पडणारे बुरशीजन्य रोग बघताबघता सर्व पीक नष्ट करतात. ज्वारी - बाजरीवर पडणारा काळा बुरा, आंब्याच्या मोहरावर धरणारा चिकटा, मक्यावर पडणारी कोळशी ही बुरशीजन्य रोगांची काही उदाहरणे. पावसाळ्याच्या दिवसांत कातडीचे होणारे विकार, पायाला होणाऱ्या चिखल्या, डोक्यातील कोंडा, प्राण्यांचे झडणारे केस हेही आजार बुरशीजन्य. म्हणजे बुरशी ही वाईटच असते, असे मानायची गरज मात्र नाही. खरे सांगायचे म्हणजे बुरशीकडे निसर्गाने एक फार मोठे काम सोपवलेले आहे. नको असलेली प्रत्येक गोष्ट नष्ट करायला, पुन्हा जमीन समृद्ध करायला सर्व प्रकारची बुरशी मदत करत असते.फंगस ही वेगळी जीवसृष्टी आहे. आता सजीवांच्या सहा सृष्टी मानल्या जातात. अशा या वनस्पतीला स्वतःच्या पोषणासाठी कोणत्यातरी जिवंत वा मृत सजीवावर अवलंबून राहावे लागते. तिचे अस्तित्व त्यामुळेच फक्त सजीव वा त्यांचे अवशेष यांच्याशी संबंधित राहते. बुरशी एकपेशीय असेल व बहुपेशीय. एकपेशीय म्हणजे आपल्या माहितीचे यिस्ट वा किण्व. बहुपेशीय बुरशीचे उदाहरण कुत्र्यांच्या छत्र्या किंवा मशरूम. यालाच अळंबी पण म्हणतात. अळंबी खायला चविष्ट लागतात. म्हणून त्यांची लागवडही केली जाते. मोठाल्या तंतुरूप पेशींनी अळंबी वाढतात. एखाद्या मेलेल्या झाडाच्या खोडावर पावसाळ्यात बघता बघता अळंबी वाढलेली दिसतात. पण याआधी त्या खोडाच्या आतील चहूबाजूंनी बुरशीचे प्रवेश करून ते खोड पोखरलेले असते.बुरशीच्या असंख्य जाती निसर्गात आढळतात. मोजदाद अशक्य व्हावी एवढ्या जाती आज ज्ञात आहेत; पण नवीन जातींचा पत्ता ज्या वेगाने लागतो, तो लक्षात घेतला तर किमान 'तीन एक लाख प्रकारच्या जाती' पृथ्वीवर असाव्यात. बुरशीचे सर्व पुनरुत्पादन साध्या द्विभाजन पद्धतीने होत जाते. जेव्हा प्रतिकूल हवामान असेल तेव्हा स्पोअर जमिनीवर विखुरली जातात. बुरशीचा सलग पसरत गेलेला थर कित्येक मीटरपर्यंत जमिनीवर आढळतो. तसेच काही मीटर खोलवर ही बुरशी आढळते. बुरशीचा एखादा तंतू किंवा एखादे स्पोअर अनुकूल हवामानात इतक्या प्रचंड वेगाने तंतूनिर्मिती करते की या वेगापुढे अन्य कशाचीही पुनरुत्पादनाची गती कमीच पडावी. एखाद्या बुरशीच्या कणापासून जेमतेम चोवीस तासांत एक किलोमीटर लांबीची पुनर्निर्मिती होऊ शकते. बुरशीसाठी कवक हाही शब्द वापरला जातो.अळंबी खाण्यासाठी, यीस्ट पदार्थ फसफसण्यासाठी, चीजला चव आणण्यासाठी, सर्व प्रकारच्या प्रतिजैविकांच्या निर्मितीसाठी बुरशी वापरली जाते. उपयुक्त बुरशीचे वापर आठवले म्हणजे बुरशीबद्दलची किळस जरा कमी होईल.‘सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातूनl*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जीवाचे रान केल्याशिवाय विद्येचे उद्यान फुलत नाही.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना *'राष्ट्रसंत'* हा किताब कोणी दिला ?२) IPL मधील सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा विक्रम कोणाच्या नावावर आहे ?३) भारतात सोन्याची नाणी पाडण्याची सुरूवात कोणी केली ?४) 'अहंकार' या शब्दाचे समानार्थी शब्द सांगा.५) २०२३ या वर्षाचा 'सरस्वती सन्मान पुरस्कार' कोणाला जाहीर झाला आहे ? *उत्तरे :-* १) डॉ. राजेंद्र प्रसाद, १९५५ २) शॉन टेट, राजस्थान रॉयल्स, २०११, १५७.७१ किमी प्रतितास ३) कुशाण ४) गर्व, घमेंड ५) प्रभा राव*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*   👤 संग्राम निलपत्रेवार, नांदेड👤 हणमंत पवार👤 काझी मुजाहिद सय्यद👤 मोहमंद अफजल शेख👤 गोविंद दळवी👤 लोकेश शिंदे👤 गोविंद सोनपीर👤 गणेश सावंत, शिक्षक, भोकर👤 ईश्वर वाडीकर, शिक्षक, देगलूर👤 सुरेश घाळे👤 अनिल ईबीतदार👤 राजश्री संगपवाड👤 निलेश चंदेकर👤 लक्ष्मण सिरमलवार, धर्माबाद👤 नागेश यमेवार👤 संतोष पाटील चंदनकर*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *अभंगवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सांगतों तें तुम्हीं अइकावें कानीं । आमुचे नाचणीं नाचूं नका ॥१॥जोंवरी या तुम्हां मागिलांची आस । तोंवरी उदास होऊं नका ॥२॥तुका म्हणे काय वांयांविण धिंद । पति ना गोविंद दोन्ही नाहीं ॥३॥।। संत तुकाराम महाराज ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••हसत, खेळत रहाणे जीवन आहे. पण,इतरांचे हसते, खेळते जीवन बघून त्यात संकटे बनून त्यांचे सुखाचे, समाधानाचे दिवस उद्धस्त करणे व आपण स्वतः आनंदी होणे याला जीवन जगणे म्हणत नाही. तर स्वतः पेक्षा इतरांच्या दु:खात आपुलकीने सहभागी होऊन त्यांचे दुःख आपले दुःख हीच भावना मनात ठेवल्याने जीवन जगण्याचा खरा अर्थ कळत असतो. म्हणून कोणाच्याही जीवनात संकटे बनून राहण्यापेक्षा त्यांच्या जीवनातील संकटे कशाप्रकारे दूर करता येईल यासाठी माणुसकीच्या नात्याने एकदा तरी प्रत्येकांनी प्रयत्न करायला पाहिजे कारण, कोणत्याही संकटांना येण्यासाठी आमंत्रण द्यावे लागत नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एका गावात एक विद्वान अर्थतज्ज्ञ रहात होता . त्याची ख्याती सर्वदूर पसरलेली होती ...तिथल्या स्थानिक राजाने एकदा चर्चा करायला त्याला बोलवले,भरपूर वेळ चर्चा झाली मग राजा म्हणाला " महाशय तुम्ही अर्थशास्त्रात खरेचं फार विद्वान आहात पण मग तुमचा मुलगा असा बावळट का ? काही त्याला शिकवा. त्याला सोने आणि चांदी यात जास्त मुल्यवान काय इतके सुध्दा कळत नाही " आणि मोठ्याने हसू लागला ....हे ऐकून त्या विद्वानाला फार वाईट वाटले ... तो घरी गेला .... त्याने मुलाला विचारले " बाळा मुल्यवान काय आहे सोने का चांदी ? "" सोने " क्षणाचाही विलंब न लावता मुलगा उत्तरला" हो तुझे उत्तर बरोबर आहे . मग तो राजा असा का हसला ?म्हणाला तुला सोने आणि चांदी यात मुल्यवान काय माहीत नाही ..!माझी चार लोकात खिल्लीउडवली जाते .. तुला माहीत आहे मुल्यवान काय आहे..!!मुलगा म्हणालाराजा रोज त्याच्या वाड्याजवळ छोटा दरबार भरवतो ...रोज मी शाळेत जातो त्या रस्त्यातचं राजाचा वाडा आहेमी दिसताचं राजा मला बोलावून घेतो .. त्याच्या सोबत गावातीलसारे लोकं प्रतिष्ठीत तिथेचं असतात .... राजा एका हातातसोन्याचे नाणे आणि एका हातात चांदीचे नाणे माझ्या समोरधरतो आणि मला सांगतो यातले सगळ्यात किमती नाणे उचल ..आणि मी चांदीचे नाणे उचलतो .. त्यामुळे तिथे असलेले सगळेमोठ्याने हसतात ... सार्‍यांना मजा वाटते ....... असे रोज घडतेमुलाला सोने चांदी यातला फरक कळतो तरी हा रोज असे का करतोचांदीचे नाणे मुल्यवान म्हणून उचलतो हे मात्र त्याला उमगले नाहीन राहून त्याने मुलाला विचारले " मग तु सोन्याचे नाणे का उचलत नाही ?असल्या मुर्खपणा करुन माझी अब्रु चार लोकात का काढतो ?"मुलगा जरा हसला मग विद्वानाचा हात धरुन त्याला आत घेवून गेलाकपाटातून त्याने एक पेटी काढली आणि उघडली. ती पेटी चांदीच्यानाण्यांनी भरलेली होती ...हे पाहून विद्वान अवाकचं झाला ..मुलगा म्हणाला " ज्या दिवशी मी सोन्याचे नाणे उचलेल त्या दिवशी हा खेळ बंद होईल .. त्यांना मला मुर्ख सिध्द करुन मजा येत असेलतर येवू द्या .. पण जेव्हा मी हुशार होईल तेव्हा मला काहीचं मिळणार नाही. मुर्ख असणे वेगळे आणि मुर्ख समजणे वेगळे "सोन्याची एक संधी साधण्यापेक्षा प्रत्येक संधीचे सोने करा !!!•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 04 एप्रिल 2024💠 वार - गुरुवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/sLZfHuz1NoyP6od8/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील ९५ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *१९९०:लता मंगेशकर यांना दादासाहेब फाळके पुरस्कार**१९८४ भारताचा पहिला अवकाशयात्री राकेश शर्मा यांचे सोविएत अवकाशायन सोयुझ टी- ११ द्वारे उडान**१९६८:मेम्फिस,टेनेसी येथे जेम्स अर्ल रे याने मार्टिन ल्युथर किंग (ज्युनिअर) यांची हत्या केली**१९६८:’नासा’ने ’अपोलो-६’ चे प्रक्षेपण केले**१९४९:पश्चिम युरोपातील अकरा देश आणि अमेरिका अशा १२ देशांनी संरक्षणविषयक सामंजस्य करार करुन ’नाटो’ची (NATO) स्थापना केली.**१९४४:दुसरे महायुद्ध – ब्रिटिश व अमेरिकन फौजांनी रुमानियातील बुखारेस्टवर केलेल्या बॉम्बहल्ल्यात ३००० नागरिक ठार झाले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८८:विजय गंगाप्रसाद देवडे-- लेखक* *१९८०:शेख पीरपाशा ईसाक -- कवी* *१९७२:अजय देशपांडे -- लेखक,कवी, गझलकार,समीक्षक* *१९७१:हेरंब कुलकर्णी-- मराठी वैचारिक आणि शिक्षणविषयक लेखन करणारे लेखक**१९६९:पल्लवी जोशी-- भारतीय अभिनेत्री,लेखिका आणि चित्रपट निर्माती* *१९६८:बबन मारोतराव आव्हाड -- लेखक, कवी* *१९६१:डॉ.सुधीर अनंत काटे -- कवी,लेखक* *१९६०:राजेंद्र विश्राम देसले-- चरित्रकार,कथा लेखक* *१९५९:नामदेव राठोड-- कवी**१९५८:नारायण वामनराव जोशी-- लेखक,धडपड मंच संयोजक तथा निवृत्त शिक्षण उपसंचालक* *१९५६:प्रकाश (अप्पा) जाधव -- लेखक* *१९५५:प्रेमा नारायण-- अभिनेत्री-नर्तिका**१९५४:परवीन बाबी-- भारतीय अभिनेत्री आणि मॉडेल(मृत्यू:२० जानेवारी २००५)**१९५३:सुरेश माणिकराव कुलकर्णी-- मुक्त पत्रकार,लेखक**१९५२:चंद्रशेखर नार्वेकर(एन.चंद्रा)-- भारतीय निर्माता,लेखक आणि दिग्दर्शक* *१९४९:नंदकुमार जयराम मुरडे-- कवी,लेखक**१९४८:महावीर रामचंद्र जोंधळे-- प्रसिद्ध कवी, कथाकार,बालसाहित्यकार,पत्रकार**१९४७:मच्छिंद्र कांबळी -- मालवणी नटसम्राट मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ अभिनेते,प्रसिद्ध नाट्यनिर्माते(मृत्यू:३० सप्टेंबर २००७)**१९४६:प्रभाकर लक्ष्मण मयेकर--मराठी नाटककार, कथाकार (मृत्यू:१८ आगस्ट २०१५)**१९३८:किशोर दिपचंद हिवाळे-- लेखक* *१९३८:प्रा.डॉ.अजीज नदाफ-- मराठी साहित्यिक,मराठी शाहिरीचे अभ्यासक, पुरोगामी वैचारिक चळवळीतील कार्यकर्ते* *१९३३:रामचंद्र गंगाराम तथा ’बापू’ नाडकर्णी – डावखुरे मंदगती गोलंदाज (मृत्यू:१७ जानेवारी २०२०)**१९२६:प्रा.बाळ केशव सावंगीकर--लेखक**१९२१:हरि कृष्ण लाल भगत-- माझी केंद्रीय मंत्री (मृत्यू:२९ ऑक्टोबर २००५)**१९१९:भालचंद्र महाराज कहाळेकर-- व्यासंगी अध्यापक,कुशल संघटक,प्रभावी भाषोपासक(मृत्यू:२८ मे १९७५)**१९०२:पं नारायणराव व्यास – ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक (मृत्यू:१ एप्रिल १९८४)**१८४२:एडवर्ड लूकास – फ्रेन्च गणिती (मृत्यू:३ आक्टोबर १८९१)**१८२३:सर कार्ल विल्हेम सिमेन्स – जर्मन/ब्रिटिश विद्युत अभियंता,(मृत्यू:१९ नोव्हेंबर १८८३)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२००१:गोविंद मल्हार कुलकर्णी-- समीक्षक( जन्म:२१ डिसेंबर १९१४)**२०००:नरेश कवडी--भाषातज्ञ,कथाकार, मर्मज्ञ समीक्षक,ज्ञानेश्वरीचे चिकित्सक अभ्यासक आणि अनुवादक.(जन्म:५ ऑगस्ट १९२२)* *१९९६:आनंद साधले – संस्कृत वाङ्‌मयातील अनेक ग्रंथांचा मोठ्या रसाळ पद्धतीने मराठीत परिचय करुन देणारे साहित्यिक (जन्म:५ जुलै १९२०)**१९८७:सच्‍चिदानंद हिरानंद वात्स्यायन तथा ’अज्ञेय’ – ज्ञानपीठ पारितोषिक (१९७८) व साहित्य अकादमी पुरस्कार (१९६४) विजेते हिन्दी लेखक व वृत्तपत्रकार (जन्म:७ मार्च १९११)**१९७९:पाकिस्तानचे चौथे राष्ट्राध्यक्ष आणि ९ वे पंतप्रधान झुल्फिकार अली भूट्टो यांना फाशी (जन्म:५ जानेवारी १९२८)**१९६८:मार्टिन ल्युथर किंग (ज्युनिअर) – कृष्णवर्णीयांचे गांधी म्हणून ओळखले जाणारे अमेरिकेतील मानवी हक्क कार्यकर्ते आणि नोबेल पारितोषिक विजेते यांची हत्या (जन्म:१५ जानेवारी १९२९)**१९२३:जॉन वेन – ब्रिटिश गणितज्ञ (जन्म: ४ ऑगस्ट १८३४)**१६१७:जॉन नेपिअर – स्कॉटिश गणितज्ञ, लॉगॅरिथम सारणीचे जनक (जन्म:१५५०)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*मतदार राजा जागा हो ....!*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा केरळमधील वायनाड मतदारसंघातून लोकसभा निवडणूक 2024 साठी उमेदवारी अर्ज दाखल*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मुंबई महापालिकेच्या करनिर्धारण व संकलन विभागाने सरलेल्या आर्थिक वर्षात म्हणजेच १ एप्रिल ते ३१ मार्च या कालावधीत ३ हजार १९६ कोटी रूपयांचा मालमत्ता कर संकलन*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *सलग पाच टर्म यवतमाळ वाशीम लोकसभेचे प्रतिनिधित्व केलेल्या भावना गवळी यांच्या ऐवजी हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना उमेदवारी*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *देशात यावर्षी तीव्र उष्णतेचा हवामान विभागाने दिला इशारा, त्यानंतर केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री मनसुख मांडविया यांनी घेतली बैठक*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *एकनाथ शिंदेंवर हिंगोलीची उमेदवारी मागे घेण्याची नामुष्की, बाबूराव कदम कोहळीकर यांना उमेदवारी जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *तैवान भूकंपानं हादरला, रिश्टर स्केलवर तीव्रता 7.5, जपानकडून त्सुनामीचा इशारा*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *कोलकत्ताने दिल्लीला 106 धावानी हरविले*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *पेसमेकर काय करतो ?* 📙 **************************खरं तर हा प्रश्न कृत्रिम किंवा यांत्रिक पेसमेकर काय करतो ? असा विचारायला हवा. कारण आपल्या शरीरात एक नैसर्गिक पेसमेकरही असतो. तो हृदयाचा ताल नियंत्रित ठेवतो. हृदयाचा हा तब्बलजी सायनो अॅंट्रियल नोड या नावाने ओळखल्या जाणाऱ्या पेशींच्या एका गुच्छात असतो. जेव्हा हृदयाचा ठोका पडतो तेव्हा या पेशी एक विद्युतस्पंद म्हणजेच विजेचा लोळ हृदयाच्या वरच्या टोकापासून खालच्या टोकाकडे पाठवतात. जसजसा हा विद्युतस्पंद हृदयाच्या निरनिराळ्या भागांवरून प्रवास करतो तसतसा तो त्या भागाचं आकुंचन आणि प्रसरण नियंत्रित करतो. प्रथम हृदयाचे दोन्ही वरचे कप्पे आकुंचन पावतात. ते जेव्हा प्रसरण पावतात त्या वेळी त्या कप्प्यांमधील रक्त खालच्या कप्प्यांमध्ये उतरतं आणि जेव्हा ते खालचे कप्पे प्रसरण पावतात तेव्हा ते रक्त शरीरभर जोरानं पाठवलं जातं. परत एकदा हृदयाच्या वरच्या भागात विद्युतस्पंद उभा राहतो आणि हे चक्र अविरत चालू राहतं. हृदय नियमित वेगानं आणि इमानेइतबारे आकुंचन प्रसरण पावत रक्त शुद्ध करून घेत ते शरीरभर खेळवत राहील अशी योजना राबवत राहतं.पण काही जणांच्या हृदयाचा हा ताल बिघडतो. ते हृदय एकदम जलद गतीने तरी धडधडू लागतं. या अवस्थेला टॅकीकार्डिया म्हणतात. किंवा उलट ते मंदगतीने दुडक्या चालीने चालत राहतं. या स्थितीला ब्रॅडीकार्डिया म्हणतात. किंवा अशा कोणत्याही नियमांनं न चालता ते अनियमितरित्या धडधडतं. अशावेळी नैसर्गिक पेसमेकरच्या मदतीला किंवा त्याचं काम करण्यासाठी बदली म्हणून पेसमेकर नावाचं यंत्र पोटाच्या किंवा छातीच्या पोकळीत बसवलं जातं. या यंत्रात विद्युतस्पंद तयार करणारा एक जनरेटर असतो; आणि हा जनरेटर हृदयाच्या कप्प्यांना जोडणाऱ्या तारा असतात. या तारा निलेमधून नेऊन थेट हृदयाच्या कप्प्यात सोडलेल्या असतात. साधारण अधेलीच्या आकाराचा हा पेसमेकर टायटॅनियम या धातूचा बनवलेला असतो. त्याच्यावर शरीरातील द्रवांचा कोणताही परिणाम होत नाही. तीच बाब तो पेसमेकर हृदयाच्या कप्प्यांना जोडणाऱ्या तारांची. पेसमेकरमधला जनरेटर चालविण्यासाठी दीर्घकाळ चालू राहणाऱ्या आण्विक बॅटरी वापरतात. त्यामुळे वरचेवर बॅटरी बदलण्यासाठी शस्त्रक्रिया करावी लागत नाही. हा पेसमेकर विवक्षित तालावर विद्युतस्पंदानं हृदयाला टोचणी देत त्याला आपला ताल नियमित राखायला मदत करतो. त्यामुळं मग त्या रुग्णाला सर्वसामान्य निरोगी जीवनशैली अंगीकारणे सोपं जातं.*बाळ फोंडके यांच्या 'काय ?' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अपमान व गोळ्या दातांनी चावता येत नाहीत.त्या सरळ पोटात गिळणेच चांगले.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *EVM* चा फुल फॉर्म काय आहे ?२) जगातील सर्वात मोठा लोकशाही व्यवस्थेचा देश कोणता ?३) EVM मध्ये सर्वाधिक किती मते नोंदली जाऊ शकतात ?४) भारतात EVM प्रथम कुठे वापरली गेली ?५) EVM कशावर चालते ? *उत्तरे :-* १) Electronic Voting Machine २) भारत ३) ३,८४० मते ४) परुर विधानसभा मतदारसंघ, केरळ ( १९८२ ) ५) अल्कलाईन बॅटरी*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 श्री हेरंब कुलकर्णी, शिक्षणतज्ञ👤 अंकुश शिंगाडे, साहित्यिक, नागपूर👤 शंकर भोजराज, जारीकोट👤 प्रताप रायघोळ👤 रमेश येलमे मंगनाळीकर👤 चंद्रकांत अमलापुरे, शिक्षक, नायगाव👤 बापूराव वाघमारे👤 राजेंद्र देसले👤 श्याम पांचाळ👤 गणेश कोकुलवार, सामाजिक कार्यकर्ते, नांदेड👤 शिलवंत डुमणे👤 शिवाजी भोसले👤 श्याम लोलापोड👤 राम गंगाधर नाईनवाड👤 प्रवीण पाटील👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *अभंगवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••शिकविलें तुम्हीं तें राहे तोंवरी । मज आणि हरी वियोग तों ॥१॥प्रसंगीं या नाहीं देहाची भावना । तेथें या वचना कोण मानी ॥२॥तुका म्हणे चित्तीं बैसला अनंत । दिसों नेदी नित्य अनित्य तें ॥३॥।। संत तुकाराम महाराज ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जी व्यक्ती परिस्थितीचा सामना करत त्या अनुभवातून पुन्हा एकदा नव्याने जगण्याचा प्रयत्न करत असते‌ ती व्यक्ती, दुसऱ्यांच्या विषयी नको, त्या गोष्टी करण्यासाठी आपली वेळ वाया घालवत नाही. कारण परिस्थिती कशी असते याची पूर्णपणे तिला जाणीव असते.म्हणून ती व्यक्ती , त्याच परिस्थितीला आपला गुरू मानून इतरांसाठी काही करता येईल का यासाठी धडपडत असते. आपणही ज्या, परिस्थितीवर मात करून जगण्याचा प्रयत्न केले असाल त्या परिस्थितीला कधीही विसरू नये. कारण, परिस्थिती माणसाला नवी दिशा दाखवत असते.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *खरे दुःख*एक सोनार होता. त्याच्या दुकानासमोरच एका लोहाराचे दुकान होते. सोनार जेव्हा काम करत असे तेंव्हा सोनाराच्या दुकानातून हळू आवाज होत असे पण जेंव्हा लोहार काम करत असे तेंव्हा मात्र लोखंडाचे काम होत असल्याने मोठा आवाज होत असे. तो आवाज मोठा कर्णकर्कश असे. एके दिवशी सोनाराच्या दुकानातील एक सोन्याचा कण कसा कोण जाणे पण लोहाराच्या दुकानात जावून पडला. त्या सोन्याच्या कणाची भेट एका लोखंडाच्या कणाशी झाली. खूप दिवसांची ओळख असल्यासारखे ते एकमेकांशी बोलू लागले. सोन्याच्या कणाने लोखंडाच्या कणाला म्हंटले,"दादा, आपले दुःख तर खरे एकसमान आहे. दोघानाही आगीत तापवले जाते आणि हातोड्याने ठोकले जाते. मी तर बाबा चुपचाप हे सहन करतो, पण तुझे काय?" लोखंडाचा कण सोन्याच्या कणाकडे पाहून दुःखी स्वरात म्हणाला,"अरे ! तुझे म्हणणे अगदी बरोबर आहे. दोघानाही तापवणारी आग एकच आहे आणि ठोकणारा हातोडाहि एकाच धातूचा आहे. पण खरे दुःख याचे आहे कि तुला ठोकणारा हातोडा हा तुझा कोणीच लागत नाही पण मला ठोकणारा लोखंडाचा हातोडा हा नात्याने माझा भाऊच लागतो. दुसऱ्याने दिलेल्या दुःखापेक्षा स्वकीयांनी दिलेला त्रास हा अगदी हृदयात वार करून जातो."तात्पर्य- आपल्या माणसांकडून होणारा त्रास हा कायमच दुःखदायक वाटतो•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 03 एप्रिल 2024💠 वार - बुधवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/wgv78RucPVxLfzas/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील ९४ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२०००:आय.एन.एस.आदित्य हे नौकांना इंधन पुरवणारे संपूर्ण भारतीय बनावटीचे वेगवान जहाज नौदलाच्या ताफ्यात दाखल झाले.**१९७५:बॉबी फिशरने अनातोली कार्पोव्ह विरुद्ध खेळण्यास नकार दिल्यामुळे अनातोली कार्पोव हा बुद्धिबळात जगज्जेता बनला.**१९७३:मार्टिन कूपर या मोटोरोला कंपनीतील संशोधकाने जगातील पहिला मोबाईल टेलिफोन कॉल बेल लॅब्जमधील डॉ.जोएल अँगेल याला केला**१९४८:ओरिसा उच्‍च न्यायालयाची स्थापना* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* •••••••••••••••••••••••••••••••••••••• *१९८२:निरंजन मुडे -- कवी* *१९७७:डॉ.रमेश तुळशीराम रावळकर-- कवी,लेखक,संपादक* *१९७१:माधुरी मगर-काकडे-- कवयित्री, लेखिका* *१९७१:रवींद्र सूर्यभान साळवे-- कवी,लेखक**१९७०:विनोद पितळे-- पत्रकार,लेखक**१९६७:सुधीर फाकटकर-- विज्ञान तंत्रज्ञान प्रचारक तथा लेखक* *१९६५:नाझिया हसन – पाकिस्तानी पॉप गायिका (मृत्यू:१३ ऑगस्ट २०००)**१९६५:लीलाधर सदाशिव महाजन-- कवी, लेखक* *१९६२:जयाप्रदा – प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री**१९६१:डॉ.शंकर किसन बोराडे-- स्तंभलेखक, समीक्षक(मृत्यू:२६ नोव्हेंबर २०२३)**१९५९:संदीप वासलेकर-- मराठी तत्त्वज्ञ आहेत. हे संघर्ष निवारण आणि जगाचे भवितव्य या विषयांवर आपले विचार मांडतात**१९५५:हरिहरन अनंत सुब्रमणी-- भारतीय पार्श्वगायक,भजन आणि गझल गायक* *१९५१:रवीप्रकाश कुलकर्णी-- चरित्र लेखक, पत्रकार* *१९५१:डॉ.किशोर रघुनाथ पवार-- प्रसिद्ध विज्ञान लेखक,व्याख्याते* *१९५१:अलका शशांक कुलकर्णी -- सुप्रसिद्ध लेखिका* *१९४१:दत्ता बाळ--तत्त्वचिंतक,ग्रंथकार (मृत्यू:३ सप्टेंबर १९८२)**१९४१:कृष्णराव पंढरीनाथ ऊर्फ शशिकांत देशपांडे--मराठी लेखक संपादक**१९३४:जेन गुडॉल – इंग्लिश प्राणिशास्त्रज्ञ**१९१४:फील्ड मार्शल सॅम माणेकशा (मृत्यू:२७ जून २००८)**१९०४:रामनाथ गोएंका – ’इन्डियन एक्सप्रेस’ वृत्तपत्रसमुहाचे संस्थापक, स्वातंत्र्य चळवळीतील नेते (मृत्यू:५ आक्टोबर १९९१)**१९०३:कमलादेवी चट्टोपाध्याय– मॅगसेसे पुरस्कार विजेत्या(१९६६) स्वातंत्र्यसैनिक व सामाजिक कार्यकर्त्या (मृत्यू:२९ आक्टोबर१९८८)**१८९५:कृष्णराव भाऊराव बाबर-- प्रसिद्ध लेखक ( मृत्यू:९ जून १९७४)**१८८२:द्वारकानाथ माधव पितळे उर्फ ’नाथमाधव’ – सामाजिक व ऐतिहासिक कादंबरीकार.(मृत्यू:२१ जून १९२८)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१७:किशोरी आमोणकर--- हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गायिका(जन्म:१० एप्रिल १९३१)* *१९९८:हरकिसन मेहता – प्रसिद्ध गुजराती कादंबरीकार,’चित्रलेखा प्रकाशन’चे मुख्य संपादक**१९९८:मेरी कार्टराइट – इंग्लिश गणितज्ञ (जन्म:१७ डिसेंबर १९००)**१९९२:उद्धव जयकृष्ण शेळके-- प्रसिद्ध कथाकार,कादंबरीकार(जन्म:८ ऑक्टोबर १९३१)**१९८८:डॉ.विष्णू श्रीधर वाकणकर--एक श्रेष्ठ भारतीय पुरातत्त्वज्ञ,संशोधक, शैलचित्रे अभ्यासक (जन्म:४ मे १९१९)* *१९८५:डॉ.वासुदेव विष्णू मिराशी – महामहोपाध्याय,संस्कृत विद्वान, प्राच्यविद्यासंशोधक (जन्म:१३ मार्च १८९३)**१८९१:एडवर्ड लूकास – फ्रेन्च गणिती (जन्म:४ एप्रिल १८४२)**_१६८०:छत्रपती शिवाजी राजे भोसले (जन्म:१९ फेब्रुवारी १६३०)_*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *आईच्या हातचे जेवण*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *शिंदेंच्या शिवसेना उमेदवारासाठी नरेंद्र मोदी यांची राज्यातील पहिली सभा:10 एप्रिल रोजी रामटेक तर 14 एप्रिल रोजी चंद्रपूर मध्ये दुसरी सभा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *भाजपचे आमदार अजय निषाद यांचा काँग्रेस मध्ये प्रवेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार संजय देशमुख यांनी उमेदवारी अर्ज भरला*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *खासदार संजय सिंह यांना आज सर्वोच्च न्यायालयानं जामीन मंजूर*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *राज्यातील धरणांनी तळ गाठला, मराठवाड्यात अवघं 19.36 टक्के पाणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *नवी दिल्लीत आयोजित ५६ व्या राष्ट्रीय खो खो अजिंक्यपद स्पर्धेचा किताब महाराष्ट्रानं पटकावला*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 फायबर ऑप्टिक ग्लास 📙 साधी काच कडक असते. पण काचेचाच एक प्रकारचा अतिशय शुद्ध स्वरूपातील विशिष्ट प्रक्रिया केलेला तंतू बनवला, तर त्यातून प्रकाशाचे वहन होऊ शकते. शिवाय हा तंतू पाहिजे तसा वाकवता, वळवता येऊ शकतो. त्याची जाडी अशी जवळपास नसतेच. या प्रकारालाच 'फायबर ऑप्टिक ग्लास' असे म्हणतात.१९५५ साली प्रथम फायबर ऑप्टिक ग्लास प्रायोगिकरित्या वापरली तयार केली गेली. पण व्यावहारिक उपयोग सुरू होण्यासाठी त्यानंतर जवळजवळ एक दशक जावे लागले. प्रथम अनेक वैद्यकीय उपकरणांत या तंतूंचा वापर केला गेला. त्यानंतर या तंतूंचा उपयोग दळणवळणासाठी म्हणजे टीव्ही सिग्नल्स, टेलिफोन यांसाठीही करता येऊ शकेल, असा विचार पुढे आला. आज घटकेला फायबर ऑप्टिक्सने जगच व्यापायला सुरुवात केली आहे.जेमतेम एक दशांश मिलिमीटर जाडीचा हा काचेचा तंतू नुसत्या डोळ्यांनी जेमतेम दिसू शकतो. अशी अडीचशे तंतूंची जुडी बांधली, तर ती जेमतेम इंचभराच्या जाडीची होते. पण यातील प्रत्येक तंत्रातून स्वतंत्र दळणवळण शक्य असते व त्याची गुणवत्ताही अन्य कशापेक्षाही उत्तम असते. प्रकाश सरळ रेषेत प्रवास करतो हे तत्त्व आपल्याला माहिती आहेच. तारेच्या एका टोकातून प्रकाश लहरी आत शिरल्या की, त्या थेट दुसऱ्या टोकापर्यंत टोटल इंटर्नल रिफ्लेक्शनमुळे पोहोचतात. कितीही वळणे वा तिढे असले तरीही तंतूंच्या आतील कडांवर आपटून त्या तशाच पुढे सरकत राहतात, त्यांना कसलाही अडथळा येत नाही. या प्रकारामध्ये होणाऱ्या वहनात 'अंगभूत विरोध' (Resistance or loss) होत नसल्याने दळणवळणाची गुणवत्ता सर्वोत्तम राहते, हे महत्त्वाचे.फायबर ऑप्टिक उपकरणांचा वापर मानवी शरीरांतर्गत तपासण्या करण्यासाठी खूपच मोठय़ा प्रमाणावर केला जात आहे. कितीही वेळा कशीही वाकवता येणारी नळी मानवी शरीरात घालून तिच्यातून प्रकाशझोत शरीरात पाठवला जातो. प्रकाशझोताचा उगम शरीराबाहेर असल्याने त्याची उष्णता तर शरीराला जाणवत नाही, पण तीव्रता भरपूर असल्याने स्वच्छ उजेडात आतील बाजू या फायबर ऑप्टिक नळीने न्याहाळता येते. आत झालेला बिघाड म्हणजे जठरातील, आतड्यातील व्रण, मोठ्या आतड्याचे कर्करोग, गुडघ्यासारख्या मोठ्या सांध्यातील आतील भाग हा सहज न्याहाळुन त्याचे निदान व गरजेप्रमाणे इलाजही करता येतो. मूत्रमार्गातील व अन्नमार्गातील कित्येक रोगांचे निदान व उपचार यात सुलभता आली आहे, याचे कारण फायबर ऑप्टिकचा वापर. फायबर ऑप्टिक धाग्यांचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे त्यांची लांबी. ही पाहिजे तेवढी असू शकते. येत्या दशकात या तंतूंचा वापर मोठ्या प्रमाणात केला जाऊन सर्व दळणवळण अधिक स्पष्ट, स्वच्छ, सुकर होईल असे अनेकांना वाटते.'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••तुमचा क्लास हा आर्थिक परिस्थितीवर नाही तर तुमच्या कर्तृत्वावर ठरत असते.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) तुर्कीमध्ये सारस पक्ष्याला काय म्हटले जाते ?२) २०२४ ची ऑस्ट्रेलियन फॉर्म्युला वन ग्रां पी कोणी जिंकली ?३) NIA च्या महासंचालकपदी कोणाची नेमणूक करण्यात आली आहे ?४) 'अरण्य' या शब्दाचे समानार्थी शब्द सांगा.५) आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे पहिले भारतीय न्यायाधीश कोण ? *उत्तरे :-* १) यारेन २) कार्लोस सेंझ, फेरारी संघ ३) सदानंद दाते ४) रान, वन, कानन, विपिन, जंगल ५) सर बी. एन. राव*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 भागवत जेठेवाड, केंद्रप्रमुख👤 चक्रधर शिंदे👤 माधव धुप्पे👤 प्रकाश साखरे, धर्माबाद👤 तुकाराम पचलिंग👤 संतोष अंबलगोंडे👤 माधव शिराळे👤 रंगराव वाकोडे👤 संभाजीराव गुनाळे👤 नागभूषणम भुसा👤 कामाजी सरोदे👤 गंगाधर सुगावकर*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *अभंगवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मजसवें आतां येऊं नका कोणी । सासुरवासिनी बाइयानो ॥१॥न साहवे तुम्हां या जनाची कूट । बोलती वाईट ओखटें तें ॥२॥तुका म्हणे जालों उदास मोकळ्या । विचरों गोवळ्यासवें आम्ही ॥३॥।। संत तुकाराम महाराज ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपण कोणाचे किती चांगले करतो, किंवा वाईट करतो किंवा कोणाची मदत करतो या विषयी आपल्याला माहित असते त्या सोबतच ज्यांना आपण कधीही वाचत नाही त्याला जरा या विषयी जास्त माहित असते. म्हणून स्वतःचे समाधान करण्यासाठी कोणाचे वाईट करण्याचा प्रयत्न करू नये.. शक्य ते चांगले करता येईल तेवढे करण्याचा नक्कीच प्रयत्न करावे कारण, चांगले करणाऱ्याकडेही बघणारे काही लोक या समाजात आजही आहेत. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *माणुसकी*इसाप हा एक गुलाम होता, पण आपल्‍या विद्वत्तेच्‍या जोरावर त्‍याने समाजात अत्‍युच्‍च स्‍थान निर्माण केले होते, ज्‍या धनाढ्याने इसापला विकत घेतले होते त्‍याचे नाव होते क्‍झेनथस, इसाप आपल्‍या आचरणातून क्‍झेनथसला सतत शिकवण देत असे.ज्‍या काळी रोममध्‍ये सार्वजनिक स्‍नानगृहे असत, सज्‍जन लोक सार्वजनिक स्‍नानगृहात जाऊन आंघोळ करत असत. एकदा क्‍झेनथसने इसापला स्‍नानगृहात गर्दी आहे की रिकामे आहे हे पाहून येण्‍यास सांगितले. इसापने जाऊन पाहिले तर तेथे बरेच लोक आंघोळीसाठी जमा झाले होते. तेवढयात त्‍याचे लक्ष स्‍नानगृहाच्‍या दारासमोर पडलेल्‍या एका मोठ्या दगडाकडे गेले. अनेक लोक त्‍या दगडाला अडखळून पडत होते, दगड रस्‍त्‍यात कसा म्‍हणून शिव्‍या देत होते. तेवढ्यात एक माणूस आला तोही त्‍या दगडाला अडखळून पडला, त्‍यानेही शिवी हासडली पण तो दगड त्‍याने उचलून दूर फेकला आणि मगच तो स्‍नानगृहात गेला.हे सर्व पाहून इसाप घरी गेला व मालकाला सांगितले की, स्‍नानगृहात फक्त एकच माणूस आंघोळीसाठी आला आहे. आंघोळीच्‍या पूर्ण तयारीनिशी क्‍झेनथस स्‍नानगृहात पोहोचला आणि पाहतो तर काय, तेथे तर प्रचंड गर्दी आहे. क्‍झेनथसने इसापला विचारले तू तर म्‍हणाला इथे फक्त एक माणूस आहे पण इथे तर प्रचंड गर्दी दिसते. इसाप उत्तरला,'' इथे रस्‍त्यात एक दगड पडला होता, येथे येणारा प्रत्‍येकजण दगडाला अडखळून पडत होता, शिव्‍या देत होता पण दगड उचलून टाकण्‍याचे शहाणपण फक्त एकानेच दाखविले. त्‍यामुळे फक्त एकच माणूस असल्‍याचे मी आपणास सांगितले.'' क्‍झेनथस निरूत्तर झाला.तात्‍पर्य- फक्त जीवंत असणे ही ओळख नसून जीवनाचा सदुपयोगच तुम्‍हाला स्‍वतंत्र ओळख देऊ शकते. आपल्‍या जीवनाचा इतरांनाही उपयोग व्‍हावा हेच खरे.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 02 एप्रिल 2024💠 वार - मंगळवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/dmDpjpYGtDVvmEc2/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील ९३ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२०११:क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धेत भारताचा २८ वर्षांच्या कालखंडानंतर विजय**१९९८:कोकण रेल्वे वरून धावणारी निजामुद्दीन तिरुअनंतपुरम राजधानी एक्सप्रेस या गाडीचा शुभारंभ दिल्लीतील निजामुद्दीन स्थानकातुन झाला**१९९०:स्मॉल इन्डस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया (SIDBI) ची स्थापना**१९८४:सोयुझ टी-११ या अंतराळयानातुन राकेश शर्मा या पहिल्या भारतीय अंतराळवीराने उड्डाण केले. तो ७ दिवस २१ तास व ४० मिनिटे अवकाशात होता**१९८२:फॉकलंडचे युद्ध - अर्जेंटिनाने फॉकलंड बेटे पादाक्रांत केली.**१८७०:गणेश वासुदेव जोशी उर्फ ’सार्वजनिक काका’ यांच्या प्रेरणेने पुणे सार्वजनिक सभेची स्थापना झाली* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* •••••••••••••••••••••••••••••••••••••• *१९८५:सचिन शिवाजीराव बेंडभर पाटील-- प्रसिद्ध कवी,कादंबरीकार,कथाकार, बालसाहित्यिक* *१९८१:मायकेल जॉन क्लार्क-- ऑस्ट्रेलियन माजी क्रिकेटपटू* *१९७९:गणेश भारतराव रासने-- लेखक* *१९७६:अनधा जोशी मुधोळकर -- लेखिका* *१९७३:श्याम श्रीराम ठक-- प्रसिद्ध वऱ्हाडी कवी**१९७१:बबन शिंदे -- प्रसिद्ध लेखक,कवी* *१९६९:अजय वीरु देवगण – प्रसिद्ध अभिनेता**१९५९:भीमराव संपतराव सरवदे -- लेखक* *१९५७:प्रा.अविनाश राजाराम कोल्हे-- प्रसिद्ध लेखक**१९५३:रवींद्र दामोदर लाखे-- कवी आणि नाट्यदिग्दर्शक**१९५२:दीपक पराशर--भारतीय अभिनेता**१९५२:भारती बाबुराव हेरकर-- कवयित्री,लेखिका**१९५२:प्रा.अशोक नारायणराव आहेर-- सुप्रसिद्ध कादंबरीकार,कथाकार* *१९५१:डॉ.अलका सर्वोत्तम चिडगोपकर -- प्रसिद्ध लेखिका,समीक्षक* *१९५०:मोहन गणुजी नाईक ( भीमणीपुत्र)-- प्रसिद्ध लेखक,गोरबोली(बंजारा)अभ्यासक**१९४२:किरण नगरकर--भारतीय इंग्रजी कादंबरीकार,नाटककार आणि पत्रकार.(मृत्यू:५ सप्टेंबर २०१९)* *१९२६:सूर्यकांत रामचंद्र खांडेकर – कवी व गीतकार (मृत्यू:१५ जून १९७९)**१९२०:नानासाहेब शिरगोपीकर-- ट्रीकसीन्ससह भक्तिप्रधान नाटकं सादर करणारे कलाकार (मृत्यू:१४ ऑक्टोबर १९९४)**१९१०:शंकर दत्तात्रय भोसले-- कवी,लेखक(मृत्यू:१६ जून १९७२)**१९०७:गजानन जहागीरदार ---मराठी व हिंदी भाषांतील चित्रपट-अभिनेते आणि दिग्दर्शक(मृत्यू: १३ऑगस्ट १९८८)**१९०२:बडे गुलाम अली खाँ ऊर्फ ’सबरंग’ – पतियाळा घराण्याचे गायक व वीणावादक, त्यांच्या’याद पियाकी आये’,’का करु सजनी’ इ. ठुमर्‍या लोकप्रिय आहेत.(मृत्यू:२५ एप्रिल १९६८)**१८९८:हरिन्द्रनाथ चट्टोपाध्याय – भारतीय इंग्रजी कवी,नाटककार,संगीतकार हिन्दी चित्रपटांतील प्रसिद्ध चरित्र अभिनेते.(मृत्यू:२३ जून १९९०)**१८८४:विनायक सीताराम सरवटे-- स्वातंत्र्यसैनिक,राजकीय नेते आणि लेखक(मृत्यू:२६ जानेवारी १९७२)**१८७५:वॉल्टर ख्राइसलर – ’ख्राइसलर’ कंपनीचे संस्थापक (मृत्यू:१८ ऑगस्ट १९४०)**१८०५:हान्स अँडरसन – डॅनिश परिकथालेखक (मृत्यू:४ ऑगस्ट १८७५)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* •••••••••••••••••••••••••••••••••••••• *२०१७:अजय झनकर-- प्रख्यात लेखक आणि चित्रपट निर्माते(जन्म:१ सप्टेंबर १९५९)**२००९:गजाननराव वाटवे – गायक व संगीतकार (जन्म:८ जून १९१७)**२००५:पोप जॉन पॉल (दुसरा) (जन्म:१८ मे १९२०)**१९९२:आगाजान बेग ऊर्फ आगा – आपल्या निखळ विनोदानी रसिकांच्या पसंतीस उतरलेले अभिनेते**१९८८:मनू गंगाधर नातू--समीक्षक, निबंधकार,संपादक (जन्म:११ नोव्हेंबर १९१९)**१९३३:के.एस.रणजितसिंहजी – कसोटी क्रिकेट खेळाडू व महाराजा,यांच्या स्मरणार्थ १९३४ पासून ’रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा’ खेळल्या जातात.(जन्म:१० सप्टेंबर १८७२)**१८७२:सॅम्युअल मोर्स – ’मोर्स कोड’ व तारायंत्राचे जनक आणि चित्रकार (जन्म:२७ एप्रिल १७९१)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*लोकसहभागातून शाळेची प्रगती*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *अशोकराव चव्हाण यांची गाडी अडवल्या प्रकरणी 25 ते 30 मराठा आंदोलकावर नांदेडमध्ये गुन्हा दाखल*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार 6 एप्रिलला 2 हजार विद्यार्थ्यांना करणार मार्गदर्शन*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *जीएसटी महसूल दरवर्षी वाढत आहे, मार्च 2024 मध्ये, जीएसटीमध्ये 11.5 टक्के वाढीसह 1.78 लाख कोटी रुपये झाले जमा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *अरविंद केजरीवाल यांना 15 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *पाकिस्तानचे माजी पीएम इम्रान खान यांना मोठा दिलासा; 14 वर्षांच्या शिक्षेला उच्च न्यायालयात स्थगिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडर आता 30.50 रुपयांनी स्वस्त, नवीन आर्थिक वर्षात पहिल्याच दिवशी मोठा दिलासा*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *IPL T20 - वानखेडे स्टेडियम मध्ये खेळलेल्या सामन्यात राजस्थानने मुंबईचा 6 विकेटने केला पराभव, मुंबईचा सलग तिसरा पराभव*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *केंद्रशासित प्रदेश*केंद्राच्या शासनव्यवस्थेखाली असलेला प्रदेश. भारतीय संविधानाच्या ३६६ अनुच्छेदान्वये पहिल्या परिशिष्टात केंद्रशासित प्रदेश म्हणून निर्देशिलेले भारतीय भूभाग आणि सदर परिशिष्टात न उल्लेखिलेले परंतु भारतभूमीत समाविष्ट असलेले इतर प्रदेश म्हणजे केंद्रशासित प्रदेश होत.भारतीय संविधानात सुरुवातीस राज्याचे चार वर्ग पाडण्यात आले होते. ब्रिटिश अमदानीत चीफ कमिशनर प्रमुख अधिकारी असलेल्या अजमीर, कूर्ग व दिल्ली ह्या प्रांतांना ‘क’ राज्याचा दर्जा देण्यात आला. भारतात विलीन झालेल्या संस्थानांपैकी रेवा, बुंदेलखंड व बधेलखंड ही मध्य प्रदेशातील व पंजाबच्या उत्तर सीमेजवळील संस्थाने अतिशय मागासलेली असल्यामुळे आणि शेजारच्या प्रांतात त्यांना विलीन करण्यासंबंधी एकमत नसल्यामुळे त्यांचे अनुक्रमे विंध्य प्रदेश व हिमाचल प्रदेश असे दोन प्रांत करण्यात आले. कच्छ, मणिपूर, त्रिपुरा ही संस्थाने पाकिस्तानच्या सीमेलगत असल्याने ती केंद्र सरकारच्या अधिकाराखाली असणे आवश्यक वाटले. भोपाळमध्ये मुसलमानांची संख्या जास्त असल्यामुळे आणि विलासपूर येथे भाक्रानानगल हे प्रचंड धरण बांधले जात असल्यामुळे त्यांनाही वेगळ्या ‘क’ राज्याचा दर्जा मिळाला. अंदमान आणि निकोबार बेटांना ‘ड’ राज्य संबोधण्यात आले.या अकरा केंद्रशासित प्रदेशांपैकी भाषावार प्रांतरचनेच्या संदर्भात अनेकांना शेजारच्या राज्यांत विलीनीकरण झाले. १९५६ मध्ये अंदमान बेटे, लक्षद्वीप बेटे, हिमाचल प्रदेश, मणिपूर, त्रिपुरा आणि दिल्ली एवढेच केंद्रशासित प्रदेश उरले. दाद्रा व नगरहवेली (१९६१), गोवा, दीव, दमण (१९६२), पाँडिचेरी (१९६२) ही राज्ये भारतात सामील झाल्यावर त्यांची भर वरील राज्यांत पडली. पंजाब राज्यातून हरयाणा राज्य वेगळे झाल्यावर (१९७०) त्यांची संयुक्त राजधानी म्हणून चंडीगढ शहर केंद्रशासित बनले. तसेच आसाममधील मिझो जिल्हा आणि अरुणाचल प्रदेश यांस हा दर्जा १९७२ मध्ये देण्यात आला. याउलट १९७० मध्ये हिमाचल प्रदेश, १९७२ मध्ये मणिपूर, त्रिपुरा यांना संपूर्ण राज्याचा दर्जा मिळाला. अशा रीतीने १९७४ मध्ये ९ केंद्रशासित प्रदेश राहिले, ते असे: अंदमान व निकोबार बेटे, लक्षद्वीप, चंडीगढ, दाद्रा व नगरहवेली, दिल्ली, गोवा, दीव, दमण, मिझोराम, अरुणाचल प्रदेश आणि पाँडिचेरी.या प्रदेशांचे प्रशासन संविधानाच्या २३९ ते २४१ अनुच्छेदांन्वये चालविण्यात येते. राष्ट्रपती हाच या प्रदेशाचा कार्यकारी प्रमुख असतो. यांतील काही प्रांतांत, उदा., गोवा, पाँडिचेरी व मिझोराम यांत, विधानसभा व मंत्रिमंडळे स्थापन करण्यात आली असली, तरीही या सर्व राज्यांच्या संबंधी कायदे करण्याचा अंतिम अधिकार संसदेला आहे.(स्रोत : मराठी विश्वकोश)*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जर तुम्हाला सूर्यासारखे चमकायचे असेल तर प्रथम सूर्यासारखे चटके सहन करावे लागतील. *संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *महाराष्ट्र भूषण पुरस्कार - २०२४* कोणाला सन्मानित करण्यात आले आहे ?२) भारतातील पहिला कृतिम बुद्धिमत्तेवर आधारित चित्रपट कोणता ठरला आहे ?३) खानदेशामध्ये भिल्लांचे नेतृत्व कोणी केले ?४) 'अविरत' या शब्दाचे समानार्थी शब्द सांगा.५) नर्नाळा हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ?*उत्तरे :-* १) डॉ प्रदीप महाजन २) इराह ३) कजारसिंग ४) सतत, अखंड ५) अकोला*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*   👤 दादाराव शिरसाठ, SSA, नांदेड👤 राघवेंद्र कट्टी, फोटोग्राफर, नांदेड👤 जीवनसिंग खासावत, साहित्यिक, भंडारा 👤 कृष्णा येरावार, शिक्षक, धर्माबाद👤 बबन शिंदे, साहित्यिक, नांदेड👤 दिलीप नागोराव जाधव👤 मारोती होरके👤 रितेश चव्हाण👤 रविंद्र भागडे👤 वैजनाथ जाधव👤 सूर्यकांत भोगेवार👤 नामदेव जाधव👤 दिलीप भद्रे👤 कवी प्रशांत गवई👤 राजेश्वर माळगे, धर्माबाद👤 शेख समीर👤 प्रभाकर पवार👤 विलास थोरमोठे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *अभंगवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एका जिवें आतां जिणें जालें दोहीं । वेगळीक कांहीं नव्हे आतां ॥१॥नारायणा आम्हां नाहीं वेगळीक । पुरविली हे भाक सांभाळिली ॥२॥तुका म्हणे जालें सायासाचें फळ । सरली ते वेळ काळ दोन्ही ॥३॥।। संत तुकाराम महाराज ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••प्रत्येकाचा स्वभाव वेगवेगळ्या प्रकारचा असतो म्हणूनच म्हणतात ना की, स्वभावाला औषध नसते. प्रत्येकाचे विचार हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात म्हणून विचार जुळत नाही. पण, ज्यांच्या विचारातून किंवा स्वभावातून आपल्याला थोडेतरी शिकायला मिळत असेल तर आपण त्यांच्याकडून शिकून घेण्याचा नक्कीच प्रयत्न करावे. भलेही आपण कितीही हुशार किंवा अनुभवी असले तरी एखाद्या वेळी, आपल्याला मार्गदर्शनाची आवश्यकता पडत असते.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*कोल्हा आणि कोंबडी*एक कोल्हा एका खोपटात शिरून काही तरी खायला मिळविण्याच्या शोधात असता एक कोंबडी त्याच्या दृष्टीस पडली. पण ती उंच माळ्यावर बसली होती. यामुळे तिच्याजवळ त्याला जाता येईना. मग तिला युक्तीने खाली आणून मारून खावी या हेतूने कोल्हा तिला म्हणाला, ‘कोंबडीताई तुझी हाल हवाल कशी आहे? तू बरेच दिवस आजारी असून घरातच निजून असतेस असं समजलं. तेव्हापासून तुझ्या काळजीनं मला झोप येईना. खरंच ताई, आता तू बरी आहेस का? थोडावेळ खाली उतर म्हणजे मी तुझी नाडी तरी पाहीन.’ याप्रमाणे अघळपघळ बोलून कोल्हा तिची स्तुती करीत असता कोंबडी बसल्या जागेवरूनच म्हणाली, ‘खरच भाऊ, तू जी बातमी ऐकली ती अगदी खरी आहे. असा आजार मला कधीही झाला नव्हता. मी आता खाली उतरून तुझ्याकडे आले असते, पण वैद्याने मला अगदी बजावून सांगितले आहे की, तू आपली जागा सोडून कुठेही जाऊ नकोस. कारण अशक्तपणामुळे जागेवरून हालण्याचे श्रम माझ्याने सोसणार नाहीत, आणि म्हणून माझ्यानं खाली येववत नाही. तरी आता तू यावेळी जा. सध्या मी इतकी अशक्त आहे की, जर मी उतरून खाली असते तर माझे प्राणच जातील.’तात्पर्य – वाजवीपेक्षा अधिक अगत्य दाखवून एखादा माणूस दुसर्‍याची विनाकारण प्रशंसा करू लागला की, त्या माणसाला काही तरी स्वार्थ साधावयाचा आहे, असे समजून त्याच्या विषयी शक्य तितकी सावधगिरी ठेवावी.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 01 एप्रिल 2024💠 वार - सोमवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/DNBeSW9VzgvdCbcM/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील ९२ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२००४:’गूगल’ने gmail ही सेवा सुरू केली**१९९०:डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ’भारतरत्‍न’**१९७३:कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये ’प्रोजेक्ट टायगर’ची सुरूवात झाली.**१९५७:भारतात दशमान पद्धतीचा वापर सुरू झाला.मैल,फर्लांग,फूट,पाऊंड,शेर,आणा यांऐवजी दशमान पद्धतीची परिमाणे वापरात आली.६४ पैशांचा रुपया जाऊन १०० नव्या पैशांचा रुपया चलनात आला.**१९५५:गीतरामायणातील पहिले गाणे पुणे आकाशवाणीवरुन प्रसारित झाले. या दिवशी रामनवमी होती.**१९३६:ओरिसा राज्याची स्थापना झाली**१९३५:रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) या भारतातील मध्यवर्ती बँकेची स्थापना झाली**१९३३:भारतीय हवाईदलाच्या पहिल्या विमानाचे कराची येथे औपचारिक उड्डाण**१९२८:पुणे वेधशाळेच्या कामकजास प्रारंभ झाला. यापुर्वी हवामानखात्याचे कामकाज सिमला येथुन चालत असे. त्यामुळे या वेधशाळेला ’सिमला ऑफिस’ असेही म्ह्टले जात असे.**१९१२:भारताची राजधानी कलकत्त्याहून दिल्ली झाली* *१८८७:मुंबई अग्निशमन दलाची स्थापना झाली**१६६९:उत्तर भारतातील देवालये तोडण्यासाठी औरंगजेब याने विशेष फौज तैनात केली.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* •••••••••••••••••••••••••••••••••••••• *१९८१:महादेव माने -- लेखक* *१९७४:रामेश्वर परशराम घोलप -- लेखक**१९७१:रतन मोतीराम आडे-- प्रसिद्ध कवी* *१९६८:प्रा.डॉ.प्रेमाला रमेश मुखेडकर-- लेखिका* *१९६७:अयुब पठाण लोहगावकर-- प्रसिद्ध कवी,लेखक**१९६५:उमेश मोहिते-- प्रसिद्ध कादंबरीकार, कथाकार**१९६३:शोभा वेले-- कवयित्री,लेखिका* *१९६०:किशोर रामदास मेढे -- प्रसिद्ध कवी, अनुवादक* *१९५७:डेव्हिड इव्हॉन गोवर-- इंग्लिश क्रिकेट समालोचक आणि माजी क्रिकेटपटू* *१९५६:डॉ.जयमाला चंद्रशेखर डुंबरे -- लेखिका* *१९५४:प्रा.विश्वनाथ श्रीधर बापट(विसूभाऊ)- प्रसिद्ध एकपात्री कलाकार,कवी,लेखक**१९५१:सुभाष वामन अहिरे-- कवी* *१९४३:प्रा.जोगेंद्र लक्ष्मण कवाडे-- माजी खासदार,आमदार,सामाजिक कार्यकर्ते, अर्थतज्ज्ञ,पत्रकार* *१९४२:जयकुमार फासगोंडा पाटील तथा जे. एफ.पाटील-- ज्येष्ठ अर्थतज्ञ,समाजवादी प्रबोधिनीचे अध्यक्ष,लेखक (मृत्यू:७ डिसेंबर २०२२)* *१९४१:अजित वाडेकर – भारताचे क्रिकेट संघाचे माजी कप्तान**१९३९:डॉ.तारा भवाळकर-- वैचारिक लेखन करणाऱ्या जेष्ठ,प्रसिद्ध मराठी लेखिका**१९३८:वामन गोविंद होवाळ--कथाकार**१९३७:मोहम्मद हमीद अन्सारी-- भारताचे माजी उपराष्ट्रपती**१९३६:तरुण गोगोई – आसामचे माजी मुख्यमंत्री(मृत्यू:२३ नोव्हेंबर २०२०)**१९१९:शांता भास्कर मोडक-- मराठी नाट्य-चित्र अभिनेत्री व गायिका(मृत्यू:२८ एप्रिल२०१५)**१९००:न्या.सुरेश वसंत नाईक-- लेखक,कवी**१८८९:डॉ.केशव बळीराम हेडगेवार – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक व पहिले अध्यक्ष (मृत्यू:२१ जून १९४०)**१८१५:ऑटो फॉन बिस्मार्क – जर्मनीचा पहिला चॅन्सेलर (मृत्यू:३० जुलै १८९८)**१६२१:गुरू तेग बहादूर – शिखांचे नववे गुरू, विविध विषयांवर त्यांनी सुमारे ११६ पदे रचली आहेत.(मृत्यू:२४ नोव्हेंबर १६७५)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* •••••••••••••••••••••••••••••••••••••• *२०१५:कैलाश वाजपेयी-- प्रतिभावान हिंदी कवी(जन्म:११ नोव्हेंबर १९३६)**२०१२:एन.के.पी.साळवे – भारतीय राजकारणी,माजी केंद्रीय मंत्री व बी.सी.सी. आय.चे माजी अध्यक्ष (जन्म:१८ मार्च १९२१)**२०१२:प्रा.द.सा.बोरकर-- झाडीबोली साहित्यांचे अभ्यासक कादंबरीकार,कवी (जन्म:२८ जुलै १९३९)**२००८:प्राचार्य राम डोके--जेष्ठ विनोदी साहित्यिक आणि शिक्षणतज्ज्ञ(जन्म:१६ फेब्रुवारी १९२७)**२००६:राजा मंगळवेढेकर – बालसाहित्यकार चरित्रकार (जन्म:११ डिसेंबर १९२५)**२०००:संजीवनी मराठे – कवयित्री (जन्म:१४ फेब्रुवारी १९१६)**१९९९:श्रीराम भिकाजी वेलणकर – भारतीय टपालखात्याच्या ’पिन कोड’ प्रणालीचे जनक, संस्कृत व पाली भाषेचे गाढे अभ्यासक (जन्म: १९१५)**१९८९:रंगनाथ दत्तात्रेय वाडेकर--भाषातज्ज्ञ, संशोधक,संस्कृत पंडित(जन्म:१ जानेवारी १९००)**१९८९:श्रीधर महादेव तथा एस.एम.जोशी – समाजवादी,कामगार नेते,पत्रकार(जन्म:१२ नोव्हेंबर १९०४)**१९८४:दत्ता भट-- मराठी नाट्य-चित्रपट अभिनेते आणि नाट्यदिग्दर्शक(जन्म:२४ डिसेंबर १९२४)**१९८४:पं.नारायणराव व्यास – ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक (जन्म:४ एप्रिल १९०२)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*रोजच होतंय एप्रिल फुल*एक एप्रिल रोजी लोकांना एप्रिल फुल करण्याची एक प्रथा आहे. एप्रिल फुल म्हणजे मूर्ख बनविणे. फक्त आजच्या दिवशी लोकांना मूर्ख बनविले तर माफ असते कारण शेवटी कळते की एप्रिल फुल केलंय. पण कधी कधी याचा खूप राग येतो. एका हिंदी गाण्यात हे म्हटलं आहे, " एप्रिल फुल बनाया, तो उनको गुस्सा आया ।" मित्रांनो, हे ही खरंय, मित्रांना खूप राग येईल अशा प्रकारचा कोणतेही कृत्य करू नये............ पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *देशाचे माजी उपपंतप्रधान तथा भाजपचे जेष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते भारतरत्न पुरस्कार प्रदान*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *हिंगोली लोकसभा मतदार संघातून महाविकास आघाडीचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांचा उमेदवारी अर्ज ता. ३ एप्रील रोजी दाखल करण्याचा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *नाथषष्ठी सोहळा, 7 लाख भाविकांची मांदियाळी : भानुदास एकनाथांच्या गजराने दुमदुमली पैठण नगरी, टाळ-मृदगांच्या तालावर वारकऱ्यांना धरला ठेका*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *छगन भुजबळ पुन्हा अडचणीत ? अंजली दमानियांच्या प्रयत्नांना यश, सरन्यायधीशांच्या आदेशानंतर महाराष्ट्र सदन घोटाळ्याची आज सुनावणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित असलेली कोल्हापूर विमानतळावरून कोल्हापूर-तिरुपती विमानसेवा आता पुन्हा सुरू*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *मुंबईत राजभवनमध्ये राज्यपालांच्या हस्ते 61 व्या मर्चंट नेव्ही सप्ताहाचे उदघाटन*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *IPL T20 - गुजरातचा हैद्राबादवर सात विकेटनी विजय तर दुसऱ्या सामन्यात दिल्लीने चेन्नईला 30 धावाने हरवले.*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 📙 *फुफुसे* 📙 डावे व उजवे अशी दोन फुप्फुसे छातीच्या पोकळीत असतात. हृदयापूरती जागा सोडून अन्य सारी छातीची पोकळी त्यांनीच व्यापलेली असते. प्रत्येक फुप्फुसावर दुपदरी पातळ पिशवीसारखे आवरण असते. त्यालाच 'प्लुरा' असे म्हटले जाते. या आवरणाच्या आत दोन पदरांमध्ये बुळबुळीत पदार्थ असतो. त्यामुळे फुफ्फुसे आकुंचन प्रसरण पावताना घर्षण होत नाही. मात्र या दोन पदरांमध्ये निर्वात पोकळी अस्तित्वात असते. वातावरणातील हवा आपण फुप्फुसांत ओढून घेतो, त्याला त्याची मदत होते.नाकाने आत घेतलेली हवा प्रथम श्वसननलिकेद्वारे व त्यानंतर तिच्या झालेल्या असंख्य शाखांतून फुप्फुसांत पोहोचते. फुप्फुसांचा रंग भुरा करडा असतो. असंख्य वायूकोशांनी फुप्फुस बनते. प्रत्येक वायूकोशाला वेढणारी एक रक्तवाहिनी असते. प्रत्येक वायूकोशापर्यंत श्वासनलिकेची एक अत्यंत सूक्ष्म शाखा पोहोचलेली असते. वायूकोशाभोवती केशवाहिन्यांचे जाळे असते. त्यातील रक्तातील लाल पेशी प्राणवायू शोषून घेतात. कार्बन डायॉक्साइड किंवा कर्बद्विप्राणिल वायू व पाण्याची वाफ वायुकोशात सोडले जातात व उच्छवासाद्वारे ते बाहेर टाकले जातात. आपल्या श्वासातून वाफ बाहेर पडताना जाणवते, त्याचे हेच मूळ होय.वायूकोशांमधील स्थितीस्थापक तंतूंमुळे ते श्वास आत घेताना सहज फुगतात व पूर्वस्थितीला येताना उच्छ्वास बाहेर टाकतात. यामध्ये होणाऱ्या क्रियेलाच आपण प्राणवायू प्रदान असे म्हणतो. श्वास घेतला, तर सुमारे ५०० घन सेंटीमीटर हवा आपण आत ओढतो. त्यातील फक्त ३५० घन सेंटीमीटर हवाच वायूकोशात पोहोचते. अन्य हवा घसा, श्वासनलिका येथेच राहते. श्वास सोडल्यावरसुद्धा ३०० घनसेंटीमीटर हवा फुप्फुसांतच शिल्लक असते. दीर्घ श्वसन, प्राणायाम, भस्त्रिका यांच्या अभ्यासात या साचून असलेल्या हवेला आपण मुद्दाम बाहेर फेकतो. तसेच फुप्फुसांची स्थितीस्थापक क्षमताही या क्रियेत वाढते. म्हणून श्वसनाच्या आजारात त्यांचा उपयोग होऊ शकतो. निरोगी माणसाची श्वसनाची क्षमता वाढते. पाणबुडे, ऍथलेट, खेळाडू यांनी ही क्षमता कमावलेली असते.फुप्फुसांमध्ये जंतूंचा शिरकाव झाल्यास रुग्ण गंभीररित्या आजारी होतो. कारण फुप्फुस व फुप्फुसावरण दाहामध्ये शरीराचा प्राणवायू पुरवठा खंडित होऊ लागतो. अशा वेळी कृत्रिमरीत्या प्राणवायू देऊन किंवा तीव्र आजारात कृत्रिम श्वासोच्छ्वासाच्या यंत्राचा (व्हेंटिलेटर) वापर करून रुग्णाला मदत करणे आवश्यक ठरते.'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मोठा माणूस तोच जो आपल्या सोबत्याना कधीही छोटा समजत नाही. *संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा - २०२४* मध्ये कोणता खेळाडू *भारताचा ध्वजवाहक* असणार आहे ?२) जगाच्या एकूण क्षेत्रफळापैकी किती टक्के क्षेत्र भारताने व्यापले आहे ?३) भारताची सिलिकॉन व्हॅली म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते ?४) 'अवर्षण' या शब्दाचे समानार्थी शब्द सांगा.५) कोणता देश पहिल्यांदाच मिस युनिव्हर्स स्पर्धेत सहभागी होत आहे ? *उत्तरे :-* १) शरथ कमल २) २.४२ टक्के ३) बेंगळुरू ४) दुष्काळ, पाऊस न पडणे ५) सौदी अरेबिया*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 सोमेश पाटील सूर्यवंशी👤 साईनाथ कंदेवाड👤 विनायक भाई राजयोगी👤 दत्ता वंजे, साहित्यिक, नांदेड👤 सदाशिव मोकमवार, धर्माबाद👤 हरिहर पाठक👤 शीतल संखे, शिक्षिका, पालघर👤 गिरीष पांपटवार, धर्माबाद👤 प्रकाश नांगरे, शिक्षक, नांदेड👤 प्रा. सतीश गर्दसवार, धर्माबाद👤 अनिल पाटील, साहित्यिक, जळगाव👤 रवी कोटूरवार, धर्माबाद👤 संध्या जीरोनेकर👤 कुणाल सोनकांबळे👤 दिगंबर जगदंबे👤 मनीषा जोशी*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *अभंगवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आम्हां आम्ही आतां वडील धाकुटीं । नाहीं पाठीं पोटीं कोणी दुजें ॥१॥फावला एकांत एकविध भाव । हरि आम्हांसवें सर्व भोगी ॥२॥तुका म्हणे अंगसंग एके ठायीं । असों जेथें नाहीं दुजें कोणी ॥३॥।। संत तुकाराम महाराज ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••गोड फळाला लवकर कीड लागत असते तसंच कडू असलेल्या फळाला सुद्धा कीड लागत असते.फरक एवढेच की, कीड गोडाला पूर्ण संपवून टाकते पण, कडू फळाला मात्र पूर्णपणे संपवू शकत नाही कारण त्याचा अर्कच एवढे कडू असते की, उशीरा का होईना त्या किडीवर भारी पडत असतो. आपण सुद्धा त्या कडू असलेल्या अर्क कडून शिकण्याचा प्रयत्न करावे कारण तोच अर्क त्या फळाला किटका पासून वाचवत असतो.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *खरे दुःख*एक सोनार होता. त्याच्या दुकानासमोरच एका लोहाराचे दुकान होते. सोनार जेव्हा काम करत असे तेंव्हा सोनाराच्या दुकानातून हळू आवाज होत असे पण जेंव्हा लोहार काम करत असे तेंव्हा मात्र लोखंडाचे काम होत असल्याने मोठा आवाज होत असे. तो आवाज मोठा कर्णकर्कश असे. एके दिवशी सोनाराच्या दुकानातील एक सोन्याचा कण कसा कोण जाणे पण लोहाराच्या दुकानात जावून पडला. त्या सोन्याच्या कणाची भेट एका लोखंडाच्या कणाशी झाली. खूप दिवसांची ओळख असल्यासारखे ते एकमेकांशी बोलू लागले. सोन्याच्या कणाने लोखंडाच्या कणाला म्हंटले,"दादा, आपले दुःख तर खरे एकसमान आहे. दोघानाही आगीत तापवले जाते आणि हातोड्याने ठोकले जाते. मी तर बाबा चुपचाप हे सहन करतो, पण तुझे काय?" लोखंडाचा कण सोन्याच्या कणाकडे पाहून दुःखी स्वरात म्हणाला,"अरे ! तुझे म्हणणे अगदी बरोबर आहे. दोघानाही तापवणारी आग एकच आहे आणि ठोकणारा हातोडाहि एकाच धातूचा आहे. पण खरे दुःख याचे आहे कि तुला ठोकणारा हातोडा हा तुझा कोणीच लागत नाही पण मला ठोकणारा लोखंडाचा हातोडा हा नात्याने माझा भाऊच लागतो. दुसऱ्याने दिलेल्या दुःखापेक्षा स्वकीयांनी दिलेला त्रास हा अगदी हृदयात वार करून जातो."*तात्पर्य :- आपल्या माणसांकडून होणारा त्रास हा कायमच दुःखदायक वाटतो. तेव्हा आपली माणसे जपा त्यांना कधी दुखवु नका, आयुष्य फार सुंदर आहे त्याला आणखी सुंदर करा !!!*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 30 मार्च 2024💠 वार - शनिवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/JdKrJqvPkP3Js49M/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील ९० वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *१९४४:दुसरे महायुद्ध – दोस्त राष्ट्रांनी सोफिया, बल्गेरिया येथे तुफानी बॉम्बवर्षाव केला.**१९२९:भारत व इंग्लंडदरम्यान हवाई टपालसेवा सुरू झाली.**१८५६:पॅरिसचा तह झाल्याने क्रिमियन युद्ध संपले**१८४२:अमेरिकन शल्यविशारद डॉ. क्रॉफर्ड लाँग यांनी शस्त्रक्रिया करताना भूल देण्यासाठी इथर या द्रव्याचा प्रथमच वापर केला.**१७२९:थोरले बाजीराव पेशवे यांनी जैतपूर येथे महंमदशहा बंगश याचा पराभव केला.**१६६५:पुरंदर किल्ल्यावर दिलेरखानाशी लढताना वीर मुरारजी धारातीर्थी पडला* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* •••••••••••••••••••••••••••••••••••••• *१९६७:नागेश कुकुनूर--भारतीय चित्रपट दिग्दर्शक,निर्माता,पटकथा लेखक**१९६५:फ़िरोज़ ए.नाडियाडवाला-- भारतीय फिल्म निर्माता**१९६०:राजन लाखे -- प्रसिद्ध लेखक व कवी* *१९५१:पं.भीमराव पांचाळे-- सुप्रसिद्ध मराठी गजलगायक मराठी गजलकारांना प्रोत्साहन मिळण्यासाठी ते गजलसागर संमेलने आणि गजल कार्यशाळांचे आयोजन**१९४७:प्रा.दिलीप परदेशी--नाटककार व साहित्यिक(मृत्यू:४ नोव्हेंबर २०११)**१९४६:ए.के.शेख -- प्रसिद्ध गझलकार,कवी संपादक**१९४२:वसंत आबाजी डहाके – प्रसिद्ध भाषातज्‍ज्ञ,कोशकार,सुप्रसिद्ध लेखक आणि कवी,फेब्रुवारी २०१२ च्या चंद्रपूर येथे झालेल्या ८५ व्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष**१९४१:अशोक परांजपे--महाराष्ट्रातील लोककला संशोधक,गीतकार,नाटककार.(मृत्यू:९ एप्रिल २००९)**१९४०:अशोक महादेव जोशी-- कृषिलेखक, बालसाहित्यिक (मृत्यु:मार्च २०१४)**१९३०:ॲड.एकनाथ पांडुरंग साळवे-- चंद्रपूरचे माजी आमदार,‘एन्काऊंटर’कार, ज्येष्ठ समाजसेवक (मृत्यू:१४ मार्च २०२१)**१९३०:मधुकर श्रीपाद माटे-- पुरातत्त्व, इतिहास,वास्तुशास्त्र आणि वास्तुशिल्प ह्या विषयांचे अभ्यासक(मृत्यू:२३ एप्रिल २०१९)**१९२८:डॉ.दत्ता वाळवेकर-- भारतीय मराठी गायक आणि संगीत दिग्दर्शक,लेखक (मृत्यू:१६ मार्च २०१०)**१९०८:देविका राणी – अभिनेत्री (मृत्यू:९ मार्च १९९४)**१९०६:जनरल कोडेन्डेरा सुबय्या तथा के.एस.थिमय्या – भारतीय भूदलाचे ६ वे सरसेनापती,पद्मभूषण (मृत्यू:१७ डिसेंबर १९६५)**१८९९:शरदेंन्दू बंदोपाध्याय – बंगाली लेखक (मृत्यू:२२ सप्टेंबर १९७०)**१८९८:काशिनाथ रघुनाथ वैशंपायन--शिक्षक, लेखक (मृत्यू:८ नोव्हेंबर १९८५)**१८९५:निकोलाय बुल्गानिन – सोविएत युनियनचे अध्यक्ष (मृत्यू:२४ फेब्रुवारी १९७५)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* •••••••••••••••••••••••••••••••••••••• *२००६:मनोहर श्याम जोशी-- हिंदी लेखक, पत्रकार आणि पटकथा लेखक(जन्म:९ ऑगस्ट,१९३३)* *२००२:आनंद बक्षी – सुप्रसिद्ध गीतकार (जन्म:२१ जुलै १९२०)**१९९३:साबानंद मोनप्पा अर्थात एस.एम.पंडित -- चित्रकार (जन्म:२५ मार्च१९१६)**१९८९:गजानन वासुदेव तथा ’ग.वा.’बेहेरे – 'सोबत' साप्ताहिकाचे संस्थापक,संपादक व साहित्यिक (जन्म:२४ सप्टेंबर १९२२)**१९७६:रघुवीर मूळगावकर – चित्रकार (जन्म:१४ नोव्हेंबर १९१८)**१९६९:वासुदेव गोविंद मायदेव – कवी व समाजसेवक (जन्म:२६ जुलै १८९४)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आज डॉक्टर डे त्यानिमित्ताने प्रासंगिक लेख *डॉक्टर : देव की दानव*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *भर निवडणुकीत खातं गोठवलेल्या काँग्रेसला पुन्हा आयकर विभागाची नोटीस, तब्बल 1700 कोटींचा दंड!*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *श्रीनिवास पाटलांची सातारच्या रिंगणातून माघार,  शशिकांत शिंदे, सुनील माने, बाळासाहेब पाटील यांची नावं चर्चेत; साताऱ्याचा उमेदवार दोन ते तीन दिवसांत जाहीर करणार, शरद पवारांची घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *कुख्यात गँगस्टर मुख्तार अन्सारीचा तुरुंगात मृत्यू, घातपाताचा संशय; उत्तर प्रदेश पोलीस अलर्ट मोडवर!*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईसह कोकण वगळता महाराष्ट्रात तापमानाचा पारा हा  40 ते 42 डिग्री से. राहण्याची शक्यता आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *MHT CET 2024 - लोकसभा निवडणुकीमुळे सीईटी परीक्षेच्या तारखेत पुन्हा बदल*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *सत्तेत आल्यास सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांना 50 टक्के आरक्षण देणार, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी महिला आरक्षणाबाबत केली मोठी घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *IPL T20 - KKR ने RCB ला 7 विकेटने हरविले*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 फिजिओथेरपी 📙एकविसाव्या शतकात 'फिजिओ'ला म्हणजे फिजिओ-थेरेपिस्टला प्रचंड महत्त्व प्राप्त झाले आहे. सचिन तेंडुलकरचे लंगडणे असो, शोएब अख्तरचा खांदा दुखावणे असो किंवा बेकहॅमची पाठ दुखावणे, तात्काळ थेट ग्राऊंडवर येऊन खेळाडूला काही पाच मिनिटात खेळता येणारा हा थेरपिस्ट आपण थेट दूरचित्रवाणीवरही पाहतो. वेळेची प्रचंड निकड असलेल्या घाईगर्दीच्या जमान्यात आजारपणानंतरची विश्रांती, हाडांच्या वा स्नायूंच्या दुखापतीनंतरचा आराम हा प्रकारच नाहीसा होत चालला आहे. डॉक्टरी इलाज चालू असताना किंवा ते संपल्यावर शरीरातील विविध सांधे, स्नायू वा आवश्यक हालचाली संतुलितरित्या करवून घेणे व त्यामुळे कमजोर झालेल्या स्नायूंना बळकटी आणून पूर्ववत बनवणे हे फिजिओथेरपिस्टचे काम असते. शास्त्रशाखेतील बायोलॉजी घेऊन बारावी झालेल्या विद्यार्थ्यांना पूर्ण चार वर्षांचे शिक्षण घेऊन फिजिओथेरपिस्ट बनता येते. शरीररचना, शरीरक्रिया, स्नायू हाडे, मज्जासंस्था व मेंदू या संदर्भातील बारकावे समजून घेतल्यावर मग फिजिओथेरपीचे प्रशिक्षण प्रत्यक्ष सुरू होते. विविध वैद्यकीय तपासण्यांचे अहवाल वाचणे व त्यांचा अर्थ लावणे हाही भाग त्यात येतोच.एखादे हाड मोडल्यानंतर त्यावरचे उपचार जरी अस्थिरोगतज्ज्ञ करत असले, तरी त्या दरम्यान व त्यानंतर या रुग्णास स्वतःचे व्यवहार आधाराने, वॉकरच्या साहाय्याने, कुबडी व काठीच्या सहाय्याने करायला शिकवणे शरीरातील स्नायूंची कमजोरी सुरू होण्याच्या आतच तिला प्रतिबंध करणे महत्त्वाचे असते. हे काम फिजिओ करीत असतो. गंमतीची गोष्ट म्हणजे आपल्या खांद्याचे महत्त्वाचे स्नायू म्हणजे डेल्टॉइड याचा वापर जेमतेम पाच ते सहा दिवस न झाल्यास त्याचा आकार व गोलाई कमी होऊन तो रोडावू लागतो. यालाच 'मसल वेस्टिंग' असे म्हणतात. असाच प्रकार पायाच्या गुडघ्यावरील चतुरस्क स्नायूच्या बाबतीतही तिव्रतेने होतो. त्यामुळे हात मोडला म्हणून गळ्यात अडकवला वा पायाच्या इजेमुळे गुडघ्यांच्या हालचाली थांबल्या तर हे वाळत गेलेले स्नायू पूर्ववत व्हायला काही आठवडे लागतात. प्लॅस्टर असतानाही किंवा काढल्यावर यासाठी व्यायाम फिजिओ करवून घेतो.न्यूमोनियाच्या रुग्णाला छातीतील कफ बाहेर काढण्यासाठी प्रवृत्त करण्याचे व्यायाम, मेंदूच्या आजारामुळे विविध स्नायूंवरील गेलेले नियंत्रण परत मिळवणे अर्धांगवायू झालेल्याला स्वतःच्या हालचाली करायला शिकवणे इत्यादी गोष्टी या अभ्यासक्रमात येतात. प्रगत अभ्यासक्रमात ऑक्युपेशनल म्हणजेच विविध व्यवसायांशी संबंधित आजाराच्या संदर्भातील उपचार, विविध खेळासंदर्भातील दुखापतींवर उपचार, बालकांच्या अनियंत्रित हालचालींवर उपचार अशा निरनिराळ्या उपशाखांत विशेष प्रशिक्षण मिळते.सध्या फिजिओ अनेक प्रकारच्या यंत्रांचाही वापर करीत असतो. पूर्वापार चालत आलेली शरीरातील विविध स्नायूंकडुन हालचाली करून घेणारी, ताण देणारी यंत्रे वा उपकरणे आता कमी वजनाची, सहज घरीही हाताळता येणारी अशी झाली आहेत. पण त्याचबरोबर प्रगत अशा अल्ट्रासॉनिक वेव्हज, मसल स्टिम्युलेटर्स, शॉर्टवेव्ह डायाथर्मी, मज्जासंस्थेतील संवेदनाचा वेग व व्याप्ती मोजणारी यंत्रे अशांची मदत घेऊन उपचार केले जातात.आधुनिक उपचारपद्धतीत ज्यावेळी रुग्ण तीनपेक्षा जास्त दिवस रुग्णालयात मुक्काम वाढवतो, तेंव्हा फिजिओथेरपिस्ट बहुधा त्याच्या संपर्कात येतो. खाटेवर पडून राहणे, शरीराने नको तितका आराम करणे आधुनिक वैद्यकशास्त्र तब्येतीला घातक समजते, हेच त्यामागचे कारण आहे.‘सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ज्ञान ही वारसा हक्काने मिळणारी इस्टेट नाही, ते अभ्यास व कष्ट करूनच मिळवावे लागते.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *'निर्मानोंके के पावन युग में'* या हिंदी कवितेचे कवी कोण आहेत ?२) बाघ व वैनगंगा या दोन नद्यांचा संगम कोठे झाला आहे ?३) जगभरात एकूण किती भाषा बोलल्या जातात ?४) 'अमृत' या शब्दाचे समानार्थी शब्द सांगा.५) मानवी शरीराच्या बाहेरच्या त्वचा आवरणास इंग्रजीत काय म्हणतात ?*उत्तरे :-* १) अटल बिहारी वाजपेयी २) काटी, गोंदिया ३) ७,१०२ भाषा ४) पीयूष, सुधा, संजीवनी ५) एपिडर्मीस *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 उत्कर्ष देवणीकर, उमरगा👤 अनिल पवार👤 गुरुनाथ तुकाराम यादव, नांदेड👤 लक्ष्मीकांत बेंकट, करखेली👤 वैभव कण्हेरकर, अमरावती👤 रजनीश सिंग👤 दुष्यंत सोनाळे, मा. नगरसेवक, नांदेड*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *अभंगवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एका जिवें आतां जिणें जालें दोहीं । वेगळीक कांहीं नव्हे आतां ॥१॥नारायणा आम्हां नाहीं वेगळीक । पुरविली हे भाक सांभाळिली ॥२॥तुका म्हणे जालें सायासाचें फळ । सरली ते वेळ काळ दोन्ही ॥३॥।। संत तुकाराम महाराज ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एखादी व्यक्ती स्वतः चा विचार न करता सत्याच्या वाटेवर चालत इतरांसाठी जगत असेल तर तिला पूर्णपणे समजून न घेता लावारिस, लोफर, खोटारडा, बिनकाम्या, मूर्ख अशा अनेक शब्दांनी त्याची प्रतारणा करणे हे कितपत योग्य आहे. ? अभिव्यक्तीचा इतका स्वैराचार कोणीही करु नये. विचारांची मर्यादा माणसाने ओलांडू नये.जी, व्यक्ती दुसऱ्याला त्या शब्दात बोलून मोकळी होऊन जाते तेव्हा खऱ्या अर्थाने तीच व्यक्ती स्वतः मधील माणुसकी विसरलेली असते. म्हणून इतरांकडे बघण्याचा दृष्टीकोन‌ हा नेहमीच सकारात्मक असावा तर सर्वच चांगले दिसून येईल.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *निर्मळता*गुरु शिष्य भ्रमंतीला निघाले होते. फिरता फिरता ते एका जंगलात येवून पोहोचले. जंगलात काही अंतरावर एक झरा वाहत होता. गुरुजींना तहान लागली होती. त्यांनी शिष्याच्या हाती कमंडलू दिले आणि त्याला पाणी घेवून येण्यास सांगितले. शिष्य झऱ्या पाशी गेला आणि त्याला असे दिसले कि तेथून नुकतेच बैल गाड्या गेल्या आहेत, बैल पाण्यातून गेल्याने पाणी खूप गढूळ झाले आहे. पाण्यात झाडाची पाने पडलेली आहेत. त्याने विचार केला असे घाण झालेले पाणी गुरूंसाठी नेणे योग्य नाही. तो तसाच परत गुरूंकडे गेला आणि म्हणाला,"गुरुजी, पाणी खूप गढूळ आहे, आपल्याला दुसरी काही तरी व्यवस्था पहावी लागेल." गुरुजी म्हणाले," अरे त्यापेक्षा तू असे कर पुन्हा त्या झऱ्यापाशी जा आणि पुन्हा पाणी आणण्याचा प्रयत्न कर." शिष्य गेला, त्याला पुन्हा पाणी गढूळ दिसले, तो परत आला, गुरुनी त्याला परत पाठवले, असे चार पाच वेळेला झाले. शेवटी शिष्य कंटाळला, त्याच्या चेहऱ्यावर नाराजीचे आणि कंटाळलेले भाव दिसू लागले पण शिष्य गुरुज्ञा मोडायला तयार नव्हता. गुरुनी त्याला परत पाणी आणायला पाठवले. आताच्या वेळी त्याला मात्र आश्चर्य वाटले कारण या वेळी पाणी अगदी नितळ, स्वछ नि निर्मळ होते. त्याने ते पाणी कमंडलू मध्ये भरले आणि गुरूंसाठी घेवून आला. गुरुनी पाणी प्राशन केले आणि शिष्याला म्हणाले,"वत्सा ! आपल्या मनात सुद्धा असेच कुविचारांचे बैल धिंगाणा घालत असतात. ते मनाची निर्मळता कमी करून मनाला मलिन करण्याचा प्रयत्न करतात. पण आपण त्यापासून सावध राहिले पाहिजे. कुविचारांचा प्रभाव आपल्या मनावर होणार नाही याची दक्षता आपण घेतली पाहिजे. मनाच्या झरयातील पाणी शांत होण्याची प्रतीक्षा जर आपण केली तर मनात कायम स्वच्छ, चांगले विचार येतील. भावनेच्या भरात कधीही निर्णय घेवू नये."*तात्पर्य- भावनेच्‍या भरात कोणतेही निर्णय घेऊ नयेत. मनात कायम स्‍वच्‍छ, चांगले विचार कसे येतील हेच पाहावे.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 28 मार्च 2024💠 वार - गुरुवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/seeQPxsVALxnWC8G/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील ८८ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* ••••••••••••••••••••••••••••••••*१९९८:’सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अ‍ॅडव्हान्स्‌ड कॉम्प्युटिंग’ (C-DAC) या संस्थेने विकसित केलेला ’परम-१००००’ हा महासंगणक विधिपूर्वक देशाला अर्पण करण्यात आला.**१९९२:उद्योगपती जे.आर.डी.टाटा यांना राष्ट्रपती आर.वेंकटरमण यांच्या हस्ते ’भारतरत्‍न’ हा सर्वोच्‍च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला**१९७९:अमेरिकेतील ’थ्री माईल आयलंड’ या बेटावर असलेल्या अणूभट्टीतून किरणोत्सारी पदार्थांची गळती झाली.**१९४२:रासबिहारी बोस यांनी टोकियो येथे ’इंडियन इंडिपेन्डन्स लीग’ची स्थापना केली**१९३०:तुर्कस्तानमधील कॉन्स्टँटिनोपाल आणि अंगोरा शहरांची नावे बदलुन अनुक्रमे इस्तंबुल आणि अंकारा अशी करण्यात आली**१८५४:क्रिमियन युद्ध – फ्रान्सने रशियाविरुद्ध युध पुकारले.**१७३७:बाजीराव पेशव्यांनी दिल्लीवर हल्ला करुन मोगलांचा पराभव केला.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* •••••••••••••••••••••••••••••••••••••• *१९८८:भरत बलवल्ली--स्वराधीश,एक युवा दिग्गज शास्त्रीय गायक* *१९८२:प्रा.तात्यासाहेब शिवाजी काटकर -- लेखक**१९७५:अक्षय खन्ना--भारतीय अभिनेता**१९७१:प्रा.डॉ.अजय दिनकरराव कुलकर्णी-- लेखक,संपादक* *१९६८:नासिर हुसैन – इंग्लिश क्रिकेटपटू**१९६६:डॅा.संध्या राजन अणवेकर-- कवयित्री, लेखिका* *१९६३:राजकुमार सुदाम बडोले-- माजी मंत्री तथा लेखक* *१९५४:मून मून सेन-- भारतीय अभिनेत्री**१९४९:प्रा.डॉ.विजय पांढरीपांडे -- जेष्ठ साहित्यिक,विचारवंत,अनेक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित* *१९४४:भारती पांडे-- प्रसिद्ध लेखिका**१९३५:श्रीनिवास हवालदार-- जेष्ठ कवी लेखक* *१९२७:विना मजुमदार-- भारतीय शैक्षणिक व सामाजिक कार्यकर्त्या(मृत्यू:३० मे २०१३)**१९२६:पहलान रतनजी " पोली " उमरीगर-- भारतीयक्रिकेट खेळाडू(मृत्यू:७ नोव्हेंबर २००६)**१९२५:राजा गोसावी – अभिनेता (मृत्यू:२८ फेब्रुवारी १९९८)**१९०३:बाळकृष्ण मोरेश्वर कानिटकर -- पुराण वांड्:मय,शैक्षणिक व विज्ञानविषयक लेखन(मृत्यू:४ ऑक्टोबर १९७१)**१८६८:मॅक्झिम गॉर्की – रशियन लेखक (मृत्यू:१८ जून १९३६)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* •••••••••••••••••••••••••••••••••••••• *२००६:बबनराव नावडीकर (मूळ नाव: श्रीधर यशवंत कुलकर्णी)--मराठी गायक,कवि,लेखक व कीर्तनकार(जन्म:१९ऑगस्ट, १९२२)* *२०००:शांताराम द्वारकानाथ तथा राम देशमुख**१९९२:आचार्य सम्राट आनंदऋषीजी – स्थानकवासी जैनांचे सर्वश्रेष्ठ धर्मगुरू(जन्म:२४ नोव्हेंबर १८७७)**१९८८:श्री नाथ त्रिपाठी--भारतीय संगीतकार(जन्म:१४ मार्च १९१३)* *१९८४:विष्णू प्रभाकर लिमये--प्राच्यविद्या अभ्यासक,लेखक,संपादक(जन्म:२८ एप्रिल १९००)**१९४१:व्हर्जिनिया वूल्फ – ब्रिटिश लेखिका (जन्म:२५ जानेवारी १८८२)**१५५२:गुरू अंगद देव – शिखांचे दुसरे गुरू (जन्म:३१ मार्च १५०४)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*जुनी चालीरिती आणि आजची परिस्थिती*कोरोना काळात जुन्या चालीरीती ची पुन्हा एकदा ओळख झाली. त्यावर टाकलेला प्रकाश ........... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीची आठ उमेदवारांची पहिली यादी केली जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *राज्यात अकोला सर्वाधिक हॉट! आज 41.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद, विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांत उष्णतेचा पारा चाळीशीपार*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *नागपुरात उमेदवारी अर्ज भरण्याआधी नितीन गडकारींचे जोरदार शक्तिप्रदर्शन, विजयाची हॅटट्रिकचा केला निर्धार*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *राज्यात पहिल्यांदाच डॉक्टरांना निवडणुकीच्या कामाला जुंपणार, मुंबईतील  सुमारे 500 डॉक्टरांना लागली इलेक्शन ड्युटी*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *देहूमध्ये संत तुकाराम महाराज यांच्या त्रिशतकोत्तर अमृतमहोत्सवी बीज सोहळानिमित्त विविध कार्यक्रम*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी सदानंद वसंत दाते यांची राष्ट्रीय तपास संस्थेच्या महासंचालकपदी नियुक्ती*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *SRH ने रचला IPL च्या इतिहासातील सर्वोत्तम 277 धावसंख्या*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌪 *एल निनोमुळे काय होतं ?* 🌪 ************************शब्दश: एल निनो म्हणजे तान्हुलं बाळ. बाल ख्रिस्ताला उद्देशून हा शब्दप्रयोग केला जातो. पण नाताळच्या सुमारास होणाऱ्या हवामानातील बदलाला उद्देशून आता तो जगभर वापरला जातो. दक्षिण पॅसिफिक महासागराच्या विषुववृत्तीय विभागातील पाण्याचं तापमान सरासरीपेक्षा वाढतं. ही वाढ अर्धा अंश सेल्सियसहून अधिक असते. याच्याच जोडीला त्या भागातील हवेच्या दाबातही वाढ होते. या दोन्हींना मिळून वैज्ञानिक परिभाषेत 'एल निनो सदर्न ऑसिलेशन्स' असं भरभक्कम नाव आहे. पण सामान्यजनांच्या भाषेत या नैसर्गिक आविष्काराला 'एल निनो' असंच म्हटलं जातं. साधारण दर पाच वर्षांनी अशी परिस्थिती उद्भवते; पण काही वेळा ती दोन वर्षांतच परत उत्पन्न झालेलीही दिसून आली आहे, तर काही वेळा तीनं पुनरागमनासाठी तब्बल सात वर्ष घेतल्याचंही दिसून आले आहे. याउलट जेव्हा याच भागातील समुद्राच्या पाण्याचं सरासरी तापमान घटतं आणि त्याच्या जोडीला तिथल्या हवेच्या दाबातही घसरण होते तेव्हा त्याला 'ला निना' असे म्हणतात. एल निनो आणि ला निना यांचं अस्तित्व जरी जगाच्या एका अतिशय आडबाजूच्या कोपऱ्यात जाणवत असलं तरी त्याचे परिणाम मात्र जगभराच्या हवामानावर होत असतात. सगळीकडचं हवामान पार बदलून जातं. सामान्यत: जिथं भरपूर पाऊस पडतो तिथं एल निनोच्या प्रभावापोटी अवर्षण होतं, तर कोरडवाहू प्रदेशात पूर येतात. हवामानाच्या या लहरीपणापासून कोणत्याही खंडाची सुटका होत नाही.आपल्या देशाची अर्थव्यवस्था शेतीवर आणि शेती मान्सूनच्या पावसावर अवलंबून आहे. एल निनोचा प्रभाव मान्सूनच्या पावसावरही जाणवेल इतका पडतो. एल निनोच्या प्रतापापोटी मान्सूनच्या व पावसाच्या सरासरीत लक्षणीय घट होते. अलीकडच्या काळातील जवळजवळ प्रत्येक दुष्काळाचं उत्तरदायित्व आपण एल निनोच्या पदरात टाकू शकतो. उलटपक्षी जेव्हा ला निनाची सद्दी असते तेव्हा सरासरीइतका किंवा त्याहूनही अधिक पाऊस पडतो. मात्र ला निनाच्या काळात वादळांचं प्रमाणही वाढतं. उलट एल निनो वादळांना अटकाव करतो. एरवीच्या वादळग्रस्त प्रदेशांमध्ये शांततेचा अंमल सुरू असतो.एल निनोचा प्रभाव सहसा सात ते नऊ महिनेच टिकतो. त्यामुळे साधारणत: एकाच वर्षीच्या मान्सूनवर त्याचा अनिष्ट परिणाम होतो. लागोपाठ दोन वर्षे दुष्काळाची परिस्थिती क्वचितच उद्भवते. पण काही वेळा हा दोन दोन वर्षेही टिकून राहिल्याचे दिसून आले आहे. त्याच्या या अनियमित वागणुकीमुळे त्याच्याविषयी कसलंही भाकीत करणं अशक्य झालं आहे.*बाळ फोंडके यांच्या 'काय ?' या पुस्तकातून*👆*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••प्राण्यांना रोख रकमेची गरज नसते, परंतु अशीच तळमळ माणसाला प्राणी बनवते.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *न संपणारे ऊर्जा स्त्रोत* कोणते आहे ?२) यकृत हा अवयव शरीरातील कोणत्या संस्थेशी संबंधित आहे ?३) महर्षी कर्वे यांच्या आत्मचरित्राचे नाव काय आहे ?४) 'अत्याचार' या शब्दाचे समानार्थी शब्द सांगा.५) ग्वाल्हेरच्या शिंदे घराण्याचे सातारा जिल्ह्यातील मूळ गाव कोणते ?*उत्तरे :-* १) सौर ऊर्जा २) पचनसंस्था ३) आत्मवृत्त ४) अन्याय, जुलूम ५) कन्हेरखेड*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 जयश्री पाटील, शिक्षिका तथा लेखिका, वसमत👤 स्वानंद बेदरकर, निवेदक, नाशिक👤 अब्राहम खावडिया👤 नामदेव पांचाळ, धर्माबाद👤 श्री पाटील, नांदेड👤 जयवर्धन भोसीकर, रिपोर्टर, नांदेड👤 किरण कदम, धर्माबाद👤 प्रल्हाद धडे, अहमदपूर👤 रमेश राजफोडे, धर्माबाद👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *अभंगवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्षणभरी आम्ही सोसिलें वाईट । साधिलें अवीट निजसुख ॥१॥सांडी मांडी मागें केल्या भरोवरी । अधिक चि परी दुःखाचिया ॥२॥तुका म्हणे येणें जाणें नाहीं आतां । राहिलों अनंताचिये पायीं ॥३॥।। संत तुकाराम महाराज ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••चुलीवर शिजवत ठेवलेले मग ते कोणतेही पदार्थ असोत. शिजत असताना वेळोवेळी त्यांचा वेगवेगळ्या प्रकारचा वास यायला लागतो. वेळात जर त्यांच्याकडे काळजीपूर्वक लक्ष दिले तर ते खमंग पदार्थ खायला मिळतात. जर त्यांच्याकडे आपण वेळात लक्ष नाही दिले तर मात्र जळलेले पदार्थ हाती लागते.माणसाचेही तसंच आहे जर वेळेवर चांगल्या गोष्टीकडे लक्ष दिले तर जीवनाचे सार्थक होते. पण त्याच चांगल्या विचाराकडे व सत्याकडे दुर्लक्ष करून भलत्याच वाटेला गेल्याने जीवनाची माती होत असते. त्या चुलीवर शिजत असलेल्या पदार्थांकडून आपण शिकून घेण्याचा प्रयत्न करावे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *आनंदाची गोष्ट*लहान मुलाला काजु फार आवडत असल्याने एकदा काजुच्या बरणीत हात घालुन त्याने मुठ भरली. पण बरणीचं तोंड निमुळतं असल्याने हात काही बाहेर निघेना.. त्याने बराच प्रयत्न केला पण तरीही निघेना, त्याची ही धडपड बघणारी आजी त्याला सांगु लागली, *बाळा ती मुठ भरली आहेस ना ती सोड*, काजु बरणीत टाकुन दे, मग आपोआप हात बाहेर निघेल.. त्या लहान मुलाचा आजीवर खूप विश्वास आणि आपली आजी जे सांगेल ते बरोबर ह्या भोळ्या मनाने त्याने ते ऐकले आणि हातातली काजु सोडुन दिले. आणि खरंच आजीने सांगितल्याप्रमाणे त्याचा अडकलेला हात बाहेर निघाला.. आणि त्याचा चेहरा आनंदाने खुलला.. ही गोष्ट मला बरंच काही सुचवून गेली.. *किती गोष्टी धरून ठेवल्यात आपण, दुःख, राग, लोभ , क्रोध, मत्सर.. जुन्या कडु आठवणी* पण आपण धरुन बसलेलो आहोत.. आणि त्या मुला सारखंच स्वतःला अडकवुन बसलोय..तेव्हा लक्षात आलं की जीवनात दुःख असं नाहीच आहे.. *आपण धरुन ठेवलंय सगळ* ... हे तर लक्षातच घेतलं नाही कधी की अरे, फक्त सोडायचा अवकाश.... *आहे तो सगळा आनंदच आनंद..!* 😊😊😊😊😊😊😊😊 *जीवन हे एकदाच आहे*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 26 मार्च 2024💠 वार - मंगळवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://nasayeotikar.blogspot.com/2022/12/indian-scientist.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_जागतिक संगीतोपचार दिन_* *_ या वर्षातील ८६ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२०१३:त्रिपूरा उच्‍च न्यायालयाची स्थापना**२०००:ब्लादिमिर पुतिन यांची रशियाच्या अध्यक्षपदी निवड झाली.**१९७९:अन्वर सादात, मेनाकेम बेगिन आणि जिमी कार्टर यांनी वॉशिंग्टन (डी. सी.), येथे इस्त्रायल-इजिप्त शांतता करारावर सह्या केल्या**१९७४:गढवालमधील हेनवलघाटी येथे गौरा देवी यांच्या नेतृत्त्वाखाली ’चिपको’ आंदोलनाची सुरूवात**१९७२:नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे पहिल्या जागतिक संस्कृत परिषदेस सुरूवात झाली**१९१०:लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी औंध संस्थानातील कुंडलच्या माळावर कारखाना उभारण्यास सुरूवात केली. हा परिसर पुढे किर्लोस्करवाडी म्हणून ऒळखला जाऊ लागला**१९०२:नेमस्त पक्षाचे अध्वर्यू नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांचे मध्यवर्ती कायदेमंडळात अर्थसंकल्पावर पहिले भाषण झाले. या प्रभावी भाषणामुळे त्यांचे कर्तृत्व व नेतृत्व देशमान्य झाले.**१५५२:गुरू अमर दास शिखांचे तिसरे गुरू बनले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८६:प्रतिभा सुरेश खैरनार -- कवयित्री* *१९८२:डॉ.क्षितिज कुलकर्णी-- नाट्य लेखक**१९८५:प्रॉस्पर उत्सेया – झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू**१९६५:प्रकाश राज-- भारतीय अभिनेता, प्रसिद्ध तमिळ तेलुगू खलनायक व सहनायक.राष्ट्रिय पुरस्कार विजेता अभिनेता**१९५७:सुनील शिवाजी माने-- कवी* *१९५७:हृदय बलवंत चक्रधर-- प्रसिद्ध कवी**१९५६:उमेश कदम-- कादंबरीकार**१९५४:अ‍ॅड.विलास विश्वनाथ कुळवेकर -- कवी,लेखक* *१९४३:प्रा.डॉ.यशवंत मनोहर-- सुप्रसिद्ध कवी,लेखक आणि साहित्य समीक्षक**१९३९:प्रा.पुष्पा भावे-- स्त्री चळवळीच्या खंद्या कार्यकर्त्या,ख्यातनाम समीक्षक, रंगभूमीच्या भाष्यकार(मृत्यू:३ आक्टोबर २०२०)**१९०९:बाळकृष्ण दत्तात्रेय तथा बा.द. सातोस्कर – साहित्यिक,संशोधक,’दैनिक गोमंतक’चे पहिले संपादक (मृत्यू:२७ नोव्हेंबर २०००)**१९०७:महादेवी वर्मा – हिन्दी कवयित्री, स्वातंत्र्यसैनिक,शिक्षणतज्ञ,प्रयाग महिला विद्यापीठाच्या प्राचार्या (१९३३) व कुलगुरू, ’यामा’ या काव्यसंग्रहासाठी त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आला. (मृत्यू:११ सप्टेंबर १९८७)**१८७५:सिंगमन र्‍ही – दक्षिण कोरियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: १९ जुलै १९६५)**१८७४:रॉबर्ट फ्रॉस्ट – अमेरिकन कवी (मृत्यू:२९ जानेवारी १९६३)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२१:प्रा.विमलताई गाडेकर--विदर्भातील ख्यातनाम कवयित्री,लेखिका व समाजसेविका(जन्म:२ फेब्रुवारी १९५१)* *२०१२:माणिकराव गोडघाटे ऊर्फ ’ग्रेस’ – प्रसिद्ध गीतकार व कवी (जन्म:१० मे १९४०)**२०१०:अनंत पाटील -- ख्यातनाम गीतकार, नाटककार (जन्म:२२ डिसेंबर १९४१)**२००८:बाबुराव बागूल – सुप्रसिद्ध साहित्यिक (जन्म:१७ जुलै १९३०)**२००३:हरेन पंड्या-- गुजरातचे मंत्री हरेन पंड्या यांची हत्या* *१९९९:आनंद शंकर – प्रयोगशील संगीतकार (जन्म:११ डिसेंबर १९४२)**१९९७:नवलमल फिरोदिया – गांधीवादी, स्वातंत्र्यसैनिक आणि उद्योगपती (जन्म:९ सप्टेंबर १९१०)**१९९६:के.के.हेब्बर – चित्रकार (जन्म: १९११)**१९९६:डेव्हिड पॅकार्ड – ह्युलेट पॅकार्ड कंपनीचे एक संस्थापक (जन्म:७ सप्टेंबर १९१२)**१८२७:लुडविग व्हान बीथोव्हेन या कर्णबधिर संगीतकाराचे निधन.मी स्वर्गात नक्‍कीच संगीत ऐकू शकेन, (जन्म:१६ डिसेंबर १७७०)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*भारतातील काही थोर गणितज्ञ व शास्त्रज्ञ यांची थोडक्यात माहिती*..... पूर्ण माहिती वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *सोलापुरात प्रणिती शिंदे विरोधात भाजपची राम सातपुते यांना उमेदवारी*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *देशभरात होळीचा सण उत्साहात साजरा*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *आयएएस अधिकाऱ्याच्या विरोधात तक्रार करणाऱ्या तक्रारकर्ते अ‍ॅड. सतीश रोठे यांना राज्यात आचारसंहिता लागू असेपर्यंत पोलीस संरक्षण देण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने पोलिसांना दिल्या आहेत.*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *अजितदादांच ठरलं! 28 तारखेपर्यंत राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या नावाची घोषणा करणार, राष्ट्रवादीला महायुतीत 5 पेक्षा अधिक जागा मिळण्याची शक्यता *•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *बॉलीवूड क्वीन कंगना रणौतला भारतीय जनता पक्षाने मंडी लोकसभा मतदारसंघातून दिले तिकीट*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *राज्यात पाण्याची भीषण परिस्थिती, धरणसाठ्यात फक्त 40 टक्के पाणीसाठा शिल्लक; तब्बल 940 टँकरने पाणीपुरवठा, मराठवाड्यात टँकर 600 पार! विभागातील 399 गावात पाणी टंचाई*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *IPL 2024 चे उर्वरित वेळापत्रक जाहीर, चेन्नई मध्ये होईल अंतिम सामना*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*प्रदूषणाचा भस्मासुर रोखा* स्विस संस्था आयक्युएअरने जागतिक प्रदूषणावर एक अहवाल नुकताच प्रसिद्ध केला आहे. हा अहवाल भारतासाठी धक्कादायक आहे कारण या अहवालात भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाचा प्रदूषित देश असून बिहारमधील बेगुसराई हे जगातील सर्वाधिक प्रदूषित महानगर क्षेत्र तर जगातील १३४ देशांच्या राजधानीच्या शहरांपैकी दिल्ली हे सर्वात प्रदूषित राजधानीचे शहर असल्याची नोंद या अहवालात करण्यात आली आहे. या अहवालाच्या निर्मितीसाठी वातावरणातील प्रदूषणकारी घटक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पीएम - २.५ कणांचे प्रमाण बारकाईने तपासण्यात आले होते. जगातील १३४ देशांमध्ये बसविण्यात आलेल्या ३० हजार ग्राउंड मॉनिटरच्या माध्यमातून ७३०० शहरांची माहिती संकलित करण्यात आली. या अहवालातील निष्कर्ष पाहिल्यानंतर भारतातील प्रदूषणाची समस्या किती गंभीर आहे हे लक्षात येईल. विशेष म्हणजे जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत भारतातील दिल्ली, मुंबई, बेगुसाराई, गुवाहाटी, कोलकाता, हैदराबाद, चेन्नई यासारख्या मोठ्या आणि महत्वाच्या शहरांचा समावेश आहे. या शहरात वातावरणातील प्रदूषणकारी घटक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पीएम - २.५ कणांचे प्रमाण ५३.३ मायक्रोग्राम क्यूबिक मीटर या पातळीवर आले असून ते आरोग्य संघटनेने निर्धारित केलेल्या सुरक्षेच्या पातळीपेक्षा दहापटीने अधिक असल्याचे दिसून आले. स्विस संस्थेचा हा अहवाल देशातील नागरिकांची झोप उडवणारा आहे, कारण आज देशातील सर्वच महत्वाची शहरे प्रदूषणाने गुदमरत आहेत. त्या शहरात राहणाऱ्या नागरिकांचे जीवन प्रदूषणामुळे धोक्यात आले आहे. एकीकडे २१ व्या शतकातील सुखासीन जीवनाचे मनोहरी चित्र उभे केले जात आहे. स्मार्ट सिटीचे स्वप्न दाखवले जात आहे तर दुसरीकडे याच शहरांची फुफ्फुसे प्रदूषणाने निकामी होत आहेत. प्रदूषणामुळे या शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. प्रदूषणामुळे या शहरातील नागरिकांना फुफ्फुसाचे, हृदयाचे, रक्ताभिसरणाचे आजार मोठ्या प्रमाणावर होत आहेत. न्यूमोनिया, पक्षघात, हृदयविकार, फुफ्फुसाचा कर्करोग यासारखे मोठे आजार प्रदूषित हवेमुळेच होत आहेत. प्रदूषणामुळे दिल्लीसारख्या देशाच्या राजधानीची काय अवस्था झाली हे आपण पाहत आहोतच. प्रदूषणामुळे दिल्लीतील शाळा कॉलेजसना सुट्टी देण्याची वेळ प्रशासनावर आली होती. प्रदूषणामुळे दिल्लीत खेळला जाणारा रणजी सामना रद्द करावा लागला होता. चार वर्षांपूर्वी दिल्लीत इंग्लंड आणि भारत यांच्यात झालेल्या कसोटी सामन्यात खेळाडू चक्क मास्क लावून मैदानात उतरले होते. नंतर हा सामना देखील प्रदूषणामुळे रद्द करावा होता त्यामुळे भारताची जगात नाचक्की झाली होती. जे दिल्लीत आहे तेच मुंबईत आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई प्रदूषणाच्या बाबतीत देशाच्या राजधानीची बरोबरी करू लागली आहे. मुंबईचे प्रदूषणही उच्चतम पातळीवर पोहचले आहे. प्रदूषणामुळे लोकांना शुद्ध हवा मिळणे दुरापास्त झाले आहे. शुद्ध हवेसाठी लोकांना पैसे मोजावे लागत आहे. मुंबई - दिल्लीसारख्या मोठ्या लोकसंख्येच्या शहरात ऑक्सिजन बार सुरू करण्यात आले आहेत. एका तासाला २०० ते ५०० रुपये मोजून नागरिक ऑक्सिजन विकत घेत आहेत. इतके होऊनही आपण त्यातून बोध घेत नाही. या मोठ्या शहरात वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मुंबई, पुणे, नागपूर यासारख्या मोठ्या शहरात लोकसंख्येपेक्षा वाहनांची संख्या अधिक आहे. वाढत्या वाहनांमुळे प्रदूषणात भर पडत आहे. वाहनातून बाहेर पडणाऱ्या धुरात प्रदूषणाचे प्रमाण खूप असते. धूळ, कारखान्यातून निघणारा धूर, बांधकामातून पसरणारे कण, वृक्षतोड, पृथ्वीचे वाढते तापमान, प्लास्टिकचा भस्मासुर अशा अनेक कारणांमुळे प्रदूषणाचा आलेख उंचावत आहे. स्विस संस्थेने जाहीर केलेला हा अहवाल म्हणजे धोक्याची घंटा आहे. वाढते प्रदूषण कमी करण्यासाठी वेळीच ठोस उपाय करायला हवेत. कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या धुरातून प्रदूषणकारी घटक कमी करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करायला हवा. दगड खाणींवर नियंत्रण आणायला हवे. वाहनांची संख्याही कमी करायला हवी. प्रसंगी सम - विषम सारखे कठोर निर्णय घ्यायला हवेत. युरोपीय देशात प्रदूषण कमी करण्यासाठी काय उपाययोजना केल्या जातात याचा अभ्यास करायला हवा. नागरिकांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अधिकाधिक वापर केला पाहिजे. याशिवाय कचऱ्याचे योग्य वर्गीकरण आणि विल्हेवाट तसेच सौरऊर्जेच्या वापरावर भर द्यायला हवा. वृक्षारोपण करुन ते वृक्ष जगवले पाहिजेत. शासन, प्रशासन आणि नागरिकांच्या एकत्रित प्रयत्नांतूनच प्रदूषणाचा हा भस्मासुर रोखता येईल. *- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*९९२२५४६२९५••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••समजून घेणं ही एक कला आहे आणि ही कला प्रत्येकाला जमतेच असं नाही - गौतम बुद्ध*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) भारताच्या कोणत्या खेळाडूचा समावेश चीनच्या *'जागतिक बिलियर्ड्स हॉल ऑफ फेम'* मध्ये झाला आहे ?२) भारताच्या अणु कार्यक्रमाचे ब्रीदवाक्य कोणते आहे ?३) ग्रामपंचायतीच्या थकबाकीची वसुली करण्याचे अधिकार कोणास आहेत ?४) नुकताच चर्चेत असणारा सी. ए. ए. कायदा म्हणजे काय ?५) तैनाती फौजेचा अवलंब इंग्रजांनी सर्वात प्रथम कोणावरती केला ? *उत्तरे :-* १) पंकज अडवाणी २) शांततेसाठी अणु ३) ग्रामसेवक ४) Citizen Amendment Act ५) हैदराबादचा निजाम*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 महेश मुटकुळे👤 श्रेयस पेंडकर, धर्माबाद*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *अभंगवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••विसरले कुळ आपुला आचार । पती भावे दीर घर सोय ॥१॥सांडिला लौकिक लाज भय चिंता । रातलें अनंता चित्त माझें ॥२॥मज आतां कोणी आळवाल झणी । तुका म्हणे कानीं बहिरी जालें ॥३॥।। संत तुकाराम महाराज ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••वर्षभरात अनेक सण,उत्सव येत असतात. ते प्रत्येक सण आपल्याला काहीतरी शिकवून जात असतात. त्या शिकवणीतून थोडे तरी आपण शिकण्याचा प्रयत्न करावे. व इतरांनाही त्या विषयी सांगावे. कारण चांगले सांगितल्याने आपले नुकसान होत नाही तर त्यातून एक वेगळ्या प्रकारचे समाधान आपल्याला मिळत असते.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *काठीची जादू*एके दिवशी, एक श्रीमंत व्यापारी बिरबलकडे आला आणि म्हणाला, माझ्या घरी कोणीतरी चोरी केली व माझे दागिने चोरले आहेत. माझ्या घरी एकूण दहा नोकर आहेत. त्यांच्यापैकीच कोणीतरी ते चोरले असल्याचा माझा संशय आहे. मी त्यांच्यापैकी सगळ्यांना विचारले, पण त्यातील एकही कबूल झाला नाही. कृपा करून तुम्ही यातून काहीतरी मार्ग काढा.बिरबल त्या श्रीमंत व्यापाऱ्याच्या घरी गेला. त्याने त्या दहाही नोकरांना एकत्र बोलावले व त्यांना म्हणाला, की माझ्याकडे दहा जादूच्या काठया आहेत. त्या मी तुम्हाला देत आहे. या काठयांचे वैशिष्टय म्हणजे सर्व काठया समान आहेत. मी त्या तुम्हाला देत आहे. आज तुमच्याकडे ठेवा व उदया मला परत करा. ज्याने चोरी केली असेल, त्याची काठी रात्रीत एक इंचाने वाढेल.दागिने चोरणारा नोकर घाबरला. आपली चोरी पकडली जाईल म्हणून तो काठी एक इंचाने कापतो. त्याला वाटते की सकाळी ती परत एक इंचाने वाढेल व कुणाला काही कळणार नाही. दुसऱ्या दिवशी बिरबलाने नोकरांच्या हातातील काठ्या पाहिल्या. त्याला एका नोकराची काठी छोटी झाल्याचे आढळले. त्याच्याकडे बोट दाखवत बिरबल म्हणाला, 'हा नोकर चोर आहे. त्यानेच तुमचे दागिने चोरले आहे.' शेवटी, त्या नोकरानेही ते कबूल केले व त्या व्यापाऱ्याचे दागिने परत केले. तात्पर्य :- करावे तसे भरावे•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 23 मार्च 2024💠 वार - शनिवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/jadoochi_pishavi_nasa_yeotikar.pdf••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_जागतिक हवामान दिन_* *_शहीद स्मृती दिन_*•••••••••••••••••••••••••••••••• *_ या वर्षातील ८३ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *_हवेचे तापमान, वातावरणातील दाब, वाऱ्याची गती व दिशा यांच्या परस्परसंबंधातून निर्माण होणारी वादळे,ढग,पाऊस,विजांचा कडकडाट आदी घटनांची कालमानानुसार बदलणाऱ्या वागणुकीचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रास हवामानशास्त्र असे म्हणतात. वातावरणातील या घडामोदींचे निरिक्षण करुन त्यांचा अभ्यास करणे, त्यानुसार जवळच्या आणि दूरच्या भविष्यातील हवामानाविषयी अंदाज बांधणे हे हवामानशास्त्रज्ञांचे प्रमुख काम असते. २३ मार्च हा दिवस ‘जागतिक हवामानशास्त्र दिन' म्हणून साजरा होतो._**२०१२:राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या शुभहस्ते जळगाव विमानतळाचे उदघाटन**१९९९:पं. भीमसेन जोशी व लता मंगेशकर यांना 'पद्मविभूषण' सन्मानाने गौरविेण्यात आले**१९९९:क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि अभिनेत्री सुलोचना यांना 'पद्मश्री' सन्मान प्रदान करण्यात आला**१९९८:अभिनेते दिलीपकुमार यांना ’निशान-ए-इम्तियाज’ हा पाकिस्तानचा सर्वोच्‍च नागरी सन्मान जाहीर**१९८०:प्रकाश पदुकोण याने ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धा जिंकली. ही स्पर्धा जिंकणारा तो पहिला भारतीय आहे.**१९५६:पाकिस्तान हे जगातील पहिले इस्लामी प्रजासत्ताक बनले.**१९४०:संपूर्ण स्वतंत्र पाकिस्तानच्या निर्मितीचा ठराव लाहोर येथील मुस्लीम लीगच्या अधिवेशनात संमत**_१९३१:भगतसिंग,सुखदेव व राजगुरू यांना लाहोरच्या तुरूंगात फाशी देण्यात आले._* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* •••••••••••••••••••••••••••••••••••••• *१९८९:आशिष अशोक निनगुरकर -- प्रसिद्ध कवी, लेखक,विविध पुरस्कारांनी सन्मानित**१९७९:प्रा.डॉ.रेखा जगनाळे(मोतेवार)-- प्रसिद्ध लेखिका,संपादिका* *१९७२:संतोष पद्माकर पवार-- कवी,संपादक**१९७२:अरमान कोहली-- भारतीय अभिनेता**१९७०:ज्योती धुतमल-पंडित -- कवयित्री, लेखिका* *१९६८:माईक अ‍ॅथरटन – इंग्लिश क्रिकेटपटू**१९५६:पं.विनोद दिग्रजकर- ज्येष्ठ शास्त्रीय गायक**१९५३:किरण मुजूमदार शॉ – भारतीय महिला उद्योजक**१९५३:प्रकाश विठ्ठलराव खंडागळे -- कवी, लेखक* *१९४९:प्राचार्य सुभाष त्र्यंबक वसेकर -- कलामहर्षी,मराठवाड्यातील बालसाहित्यिक (मृत्यू:३० सप्टेंबर २०२२)**१९४८:वसीम बारी-- माजी पाकिस्तानी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू* *१९४८:मधुवंती दांडेकर -- मराठी संगीत नाट्यसृष्टीतल्या एक अभिनेत्री* *१९३५:रमेश विठ्ठल रघुवंशी -- लेखक,प्रकाशक* *१९३५:मृणालिनी त्र्यंबक ढवळे-- लेखिका, संपादिका* *१९३३:प्रा.डॉ.सुधाकर गजाननराव देशपांडे -- लेखक* *१९३१:व्हिक्टर कॉर्चनॉय – रशियन बुद्धीबळपटू**१९२९:डॉ.गोविंद स्वरूप -- भारतीय रेडिओ खगोलशास्त्राचे जनक(मृत्यू:७ सप्टेंबर २०२०)**१९२३:सदाशिव आठवले-- मराठीभाषक संशोधक, इतिहासकार आणि लेखक(मृत्यू:८ डिसेंबर २००१)**१९२३:हेमू कलाणी – क्रांतिकारक (मृत्यू:२१ जानेवारी १९४३)**१९१७:शरयू वासुदेव रानडे -- कवयित्री, लेखिका* *१९१६:हरकिशन सिंग सुरजित – मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते (मृत्यू:१ ऑगस्ट २००८)**१९१०:डॉ.राम मनोहर लोहिया – समाजवादी नेते,विख्यात संसदपटू,लोकसभेतील प्रभावी वक्ते व व्यासंगी लेखक.(मृत्यू:१२ आक्टोबर १९६७)**१८९८:नलिनीबाला देवी – आसामी कवयित्री व लेखिका (मृत्यू:२४ डिसेंबर १९७७)**१८९७:गुणवंत हनुमंत देशपांडे -- कवी, लेखक ( मृत्यू:२५ सप्टेंबर १९८५)* *१८८३:मंजेश्वर गोविंद पै तथा राष्ट्रकवी गोविंद पै – कन्‍नड कवी व श्रेष्ठ भाषा संशोधक, इतिहास व तत्त्वज्ञानाचे व्यासंगी,त्यांना कन्‍नड, कोंकणी,इंग्लिश,संस्कृत,तेलुगू,तामिळ,मराठी, कन्‍नड,बंगाली,पर्शियन,पाली, ऊर्दू,ग्रीक, जपानी इ. २५ भाषा अस्खलित येत असत. त्यांनी अनेक जपानी ग्रंथांचे कन्‍नडमध्ये भाषांतर केले. (मृत्यू:६ सप्टेंबर १९६३)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* •••••••••••••••••••••••••••••••••••••• *२०१९:प्रा.डॉ.यशवंत पाठक--संत साहित्याचे अभ्यासक आणि लेखक(जन्म:१९४६)* *२०११:एलिझाबेथ टेलर – ब्रिटिश-अमेरिकन अभिनेत्री (जन्म:२७ फेब्रुवारी १९३२)**२००७:श्रीपाद नारायण पेंडसे-- प्रसिद्ध कादंबरीकार,नाटककार,आत्मचरित्रकार (जन्म:५ जानेवारी १९१३)**२००८:गणपत पाटील – मराठी चित्रपट कलाकार (जन्म:२०ऑगस्ट १९१८)**१९३१:भगत सिंग – क्रांतिकारक (जन्म:२८ सप्टेंबर १९०७)**१९३१:’सुखदेव’ थापर – क्रांतिकारक (जन्म:१५ मे १९०७)**१९३१:शिवराम हरी ’राजगुरू’ – क्रांतिकारक (जन्म:२४ ऑगस्ट १९०८)**१९२७:सरस्वतीबाई विद्याधर भिडे-- कवयित्री,(जन्म:१८७२)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही._* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जागतिक पुस्तक दिनानिमित्त आजपर्यंत प्रकाशित झालेली माझी पुस्तके खालील प्रमाणेमाझी साहित्य संपदा वैचारिक लेखसंग्रह01) पाऊलवाट 02) संवेदना 03) जागृती 04) मी एक शिक्षक05) शाळा आणि शिक्षक06) रोज सोनियाचा दिनू07) हिंदू सणकथासंग्रह08) हरवलेले डोळे आणि 09) कुलदीपक10) जादूची पिशवीकवितासंग्रह11) सारीपाट 12) महापुरुषांची ओळख13) लॉकडाऊन काळातील कवितादीर्घकथा 14) ललाटरेषावरील सर्व पुस्तके वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर क्लीक करा आणि जादूची पिशवी कथासंग्रहासह इतर पुस्तकं डाउनलोड कराधन्यवाद ......!- नासा येवतीकर, धर्माबाद ~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या केंद्रीय संचालक मंडळाची ६०७ वी बैठक संपन्न*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *भाजपाच्या उमेदवार पंकजा मुंडे यांचं बीड जिल्ह्यात उत्साहत स्वागत.*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *पुष्पक - आरएलव्ही एलईएक्स- 02 लँडिंगची यशस्वी चाचणी.*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *काँग्रेसचे के सी वेणुगोपाल आणि खासदार डेरीक ओब्रायन यांनी नवी दिल्लीत निवडणुक आयुक्तांची भेट घेतली.*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *सर्वोच्च न्यायालयातून अरविंद केजरीवाल यांनी याचिका घेतली मागे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *इकबालसिंह चहल यांची मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून नियुक्ती : निवडणूक आयोगाने मुंबई मनपा आयुक्त पदावरुन हटवले होते*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *IPL 2024 - पहिल्याच सामन्यात CSK ने RCB चा 6 विकेटने केला पराभव*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *बायोगॅस* 📙 अनेक प्रकारचे सेंद्रिय पदार्थ टाकाऊ म्हणून आपण फेकून देत असतो. गायीगुरांचे शेण कंपोस्ट खतासाठी अनेक वर्षे वापरले जात होते. पण त्या व्यतिरिक्त त्याचा उपयोग शक्य आहे, याचा विचार मात्र गेली ४० वर्षेच केला गेला. झाडांचा पालापाचोळा, वाया जाणारे अन्नपदार्थ, खरकटे, भाजीची देठे व टरफले या साऱ्यांचा उपयुक्त वापर करण्याची कल्पना सतत मांडली जात आहे. मात्र त्याचा पाठपुरावा करून संपूर्ण वापर केले जाणे मात्र आजही घडत नाही. या साऱ्यापासून बायोगॅसची निर्मिती सहज शक्य असते. हा गॅस घरातील गॅस शेगडीसाठी जसा वापरता येतो, तसाच मोठ्या प्रमाणावर तयार केल्यास छोट्या हॉटेलला पण पूरक म्हणून उपयोगी पडू शकतो. १९७० च्या दशकात गोबरगॅस या नावाने ओळखला जाणारा हा गॅस मुख्यत: गायीगुरांचे शेण व पालापाचोळा यातून निर्माण केला जात असे. घराजवळच गोठ्यालगत विटांच्या बांधकामातून गोल हौदवजा टाकी बांधून त्यात हा कच्चा माल घातला जाई. त्यावर टोपीप्रमाणे बसणारी पण दट्ट्याप्रमाणे खालीवर होऊ शकणारी यंत्रणा बसवून आतील कच्चा माल कुजून दिला जाई. या कुजण्याला मदत म्हणून स्लरी - विशिष्ट प्रकारचे जंतू असलेले पाणी - त्यात सोडल्यावर सुमारे चाळीस दिवसांनी रोजच्या गॅसचा पुरवठा सुरू होत असे. या कुजण्यातून निर्माण झालेला गाळ व पाणी हे खत म्हणून वापरता येई.या प्रकारची गोबरगॅस संयंत्र संपूर्ण भारतात अनेकांनी बसवली. त्यासाठी ग्रामोद्योग मंडळाने प्रशिक्षण व सहाय्यसुद्धा दिले. काही वर्षांनी त्यांच्या डागडुजीची वेळ आली, तेव्हा कुचराई केल्याने अनेक ठिकाणी ही संयंत्रे बंद पडत गेली. हौदाचा गिलावा उडून होणारी गळती व लोखंडी भाग गंजणे हे त्याचे महत्त्वाचे कारण होते. या गॅसमध्ये मुख्यत: मिथेन वायू असतो. ज्वलनासाठी उपयुक्त व प्रदूषणविरहित असे त्याचे स्वरूप आहे. छोट्या गावात, दूरवरच्या वस्तीमध्ये लिक्विड पेट्रोलियम गॅसचा पुरवठा सिलिंडरद्वारे करणे कठीण असल्यास या पद्धतीचा वापर अत्यंत उपयुक्त होता. चीनमध्ये या स्वरूपाची स्थानिक संयंत्रे बसवून वापरली जात आहेत, पण आपल्याकडे मात्र हा प्रयोग मागे पडला आहे.या गोबरगॅसच्या अवाढव्य जागा व्यापणाऱ्या व शेणाची गरज असलेल्या संयंत्रात बरेच सुटसुटीत बदल करून पुणे येथील 'आरती' (अॅप्रोप्रिएट रुरल टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट) या संस्थेचे वैज्ञानिक डॉक्टर आनंद कर्वे यांनी बायोगॅस निर्मितीचे संयंत्र बनवले आहे. प्लास्टिकच्या एकात एक बसणाऱ्या मोठ्या पंपाचा वापर करून हे बनले आहे. गच्चीत, अंगणात कुठेही ठेवून त्याचा वापर शक्य होतो. महत्त्वाची गोष्ट यासाठी खरकटे अन्न व आसपासच्या झाडांचा, बागेचा पालापाचोळा पुरतो. शेणाची गरज लागत नसल्याने हाताळताना नकोसे वाटत नाही. याचा कसलाही वास आसपास पसरत नाही. महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्लरी घातल्यापासून जेमतेम तीन ते चार दिवसांत गॅसनिर्मिती सुरू होते. याचा खर्चही सहज परवडण्याजोगा आहे. कारण स्वस्त प्लॅस्टिकचा वापर त्यात केला आहे. या संयंत्राला 'अॅश्डेन' हे संशोधनाबद्दलचे मानाचे पारितोषिक दिले गेले आहे.उसाची चिपाडे, उसापासून साखर तयार करताना निर्माण होणारी मळी यांचा वापर करून मोठय़ा प्रमाणावर बायोगॅस तयार करावा व त्यापासून वीजनिर्मिती करावी, अशा स्वरूपाचा विचार सध्या मांडला जात आहे. अर्थातच हे प्रकल्प व्यावसायिक तत्वावरचे व प्रचंड पैसा लागणारे आहेत.स्वस्त, स्वच्छ इंधन व कचऱ्याचे प्रदूषण टाळणारे इंधन म्हणून बायोगॅसकडे आपण पाहिले तर त्याची उपयुक्तता मोलाची ठरते.‘सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••प्रत्येक वस्तूत सौंदर्य असते पण ते प्रत्येकाला दिसतेच असे नाही.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) संयुक्त राष्ट्राच्या अहवालानुसार *जगातील सर्वात आनंदी देश* कोणता ?२) माहिती अधिकार विधेयक लोकसभेत केव्हा सादर करण्यात आले ?३) भारतातील कोणत्या शहराला 'स्कॉटलंड ऑफ द ईस्ट' असे म्हणतात ?४) जगातील राजधानीच्या शहरांपैकी सर्वात प्रदूषित शहर कोणते ?५) जिथे आकाश जमिनीला टेकल्यासारखे दिसते त्या ठिकाणाला काय म्हणतात ? *उत्तरे :-* १) फिनलंड ( सातव्यांदा ) २) २२ डिसेंबर २००४ ३) शिलाँग ४) दिल्ली ५) क्षितिज*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 आचार्य सूर्यकांत, सेवानिवृत्त शिक्षक👤 साईनाथ सुत्रावे, पदवीधर शिक्षक, धर्माबाद👤 संतोष गुंडेटवार, शिक्षक, नांदेड👤 सौ. रंजना सत्यजित टिप्रेसवार, नांदेड👤 नरसिंग यमेवार👤 विनायक नरवाडे👤 अशोक गड्डमवार👤 संजय मनुरे, साहित्यिक, धर्माबाद*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *अभंगवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••नाहीं काम माझें काज तुम्हांसवें । होतें गुप्त ठावें केलें आतां ॥१॥व्यभिचार माझा पडिला ठाउका । न सर ती लोकांमाजी जालें ॥२॥न धरावा लोभ कांहीं मजविशीं । जालें देवपिशी तुका म्हणे ॥३॥।। संत तुकाराम महाराज ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••दुसऱ्याचे मन दुखावणे खूप सोपे असते. पण एखाद्या वेळी आपले जर कोणी मन दुखावले तर ते दु:ख सहन करणे मात्र खूप कठीण होऊन जाते. म्हणून आपण किती प्रामाणिक आहोत फक्त आपल्यालाच माहीत असते. म्हणून यशाच्या शिखरावर अवश्य पोहोचावे पण,प्रामाणिकपणा कायम असू द्यावे. कारण, इतरांना आपण खूप काही सांगू शकतो पण,स्वतःमध्ये जर प्रामाणिकपणाचे लक्षणे नसतील तर सर्व काही असून सुद्धा कधीच समाधान मिळत नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*इतिहासातील एक मनोरंजक घटना* स्कॉटलंड मध्ये एक अतिशय तुटपुंजी आर्थिक परिस्थिती असलेला एक शेतकरी होता. एके दिवशी नेहमी प्रमाणे त्याच्या शेतीच्या कामात व्यस्त होता तेंव्हा त्याला, एका लहान मुलाच्या किंकाळ ऐकू आल्या. जीवाच्या आकांताने ओरडत असलेल्या त्या हाका ऐकुन त्या शेतकऱ्याने हातातली अवजारे/शेतीच काम सोडून आवाजाच्या दिशेने धाव घेतली. सदर जागी जाऊन पाहतो तर एक चिमुरडा, दलदल मध्ये गळ्यापर्यंत रुतलेला दिसला. काही क्षणांचा विलंब आणि त्या मुलास जिवंत समाधी, अशी स्थिती पाहून त्या शेतकऱ्याने स्वतः चा जीव धोक्यात घालून, प्रचंड अरापिता करीत त्याच्या आजूबाजूचा गाळ काढला, आणि त्या जीवघेण्या संकटातून त्या मुलाची सुटका केली.दुसऱ्या दिवशी लवजम्या सहित एक आलिशान बग्गी त्या शेतकऱ्याच्या घरापाशी येऊन थांबली. त्या बग्गी मधून एक अतिशय धनवान व्यक्ती उतरली आणि त्या शेतकऱ्या च्या घरी गेली. त्या व्यक्तीने शेतकर्यास स्वतःचा परिचय दिला, की काल ज्या मुलाला तुम्ही मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढलं, त्या मुलाचा ती व्यक्ती पिता आहे, म्हणून शेतकऱ्याने केलेल्या उपकाराबद्दल धन्यवाद देणे करिता ते आले आहेत. त्यांचा वार्तालाप चालू होता, त्या धनाढ्य व्यक्तीला त्या दरम्यान जाणवलं की हा शेतकरी आर्थकदृष्टया तितका सक्षम नाही, तथापि अतिशय स्वाभिमानी आहे, हा कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत घेणार नाही.त्या शेतकऱ्याचा मुलगा, दरवाज्यातून आत येतो. त्या धनाढ्य व्यक्तीने त्या मुलाबद्दल शेतकऱ्याला चौकशी केली की हा कोणत्या शिकत आहे. शेतकऱ्याने त्यास उत्तर दिले की त्याचा मुलगा हा काही विद्यार्जन करत नसून, शेती कामात मदत करतो. यावर त्या धनाढ्य व्यक्तीने शेतकऱ्यास असे सुचविले की, की माझ्या मुलाला तुम्ही जीवनदान दिलं त्या बदल्यात तुमच्या मुलाच्या शिक्षणाची जबाबदारी मला घेऊ द्या, जेणेकरून मी तुमच्या मुलास उत्तम भविष्य, देऊ शकेन. यावर त्या शेतकऱ्यानं सहमती दर्शविली.त्या शेतकऱ्याच्या मुलाला इंग्लंड च्या नामांकित शिक्षण संस्थेत प्रवेश दिला गेला आणि त्या मुलाचं शिक्षण सुरू झालं. काही दिवसातच कळाल की हा मुलगा सर्वसामान्य नसून विलक्षण बुद्धिमान आहे, त्या मुलाने शिक्षण क्षेत्रात अतिशय कौशल्य दाखविले, आणि तो उच्चशिक्षण देखील घेऊ लागला. पुढे तो मुलगा संशोधन कार्यात उतरला.ही दोन्ही मुलं त्यांच्या ऐन तारुण्यात असताना, त्या धनाढ्य व्यक्तीचा मुलगा आजारी पडला. आजार वाढतच चालला होता, आर्थिकदृष्ट्या अतिशय बलवान असल्याने त्याच्या पित्याने उपलब्ध असणाऱ्या सर्व वैद्य, औषधोपचार केले, पण तरीही आजार उतरत नव्हता. त्या वेळेला त्या आजारास कोणतेही ठोस आणि खात्रीलायक औषध नव्हते. याच दरम्यान त्या शेतकऱ्याच्या मुलाने, त्याच्या संशोधन कार्यात एक जबरदस्त मजल मारली, आणि एक लस शोधून काढली, आणि नेमकी हीच लस म्हणजे त्या धनिकाच्या मुलाच्या आजारावर रामबाण औषध होती. त्या लसिमुळएच पुन्हा एकदा हा मुलगा मृत्यूच्या तोंडातून परत आला.बालपणी ज्याने जीवदान दिले, त्याच्याच मुलाने तारुण्यात पुन्हा एकप्रकारे त्याच धानिकाच्या मुलाचा जीव वाचविला होता. हा कुठेतरी प्रामाणिक पणाने, कृतज्ञ पणाने स्वतः च्या मुलाला वाचविले ची परतफेड करणे करिता केलेल्या कार्याची ही एक प्रकारे परतफेड होती.*आता ही सर्व पात्रे कोण ते सांगतो,*तो धनिक व्यक्तीचा मुलगा, म्हणजे इंग्लंडचा माजी पंतप्रधान, *विन्स्टन चर्चिल,*तो शेतकऱ्याचा मुलगा म्हणजे, थोर शास्त्रज्ञ *अलेक्झांडर फ्लेमिंग,* आणि त्याने शोधून काढलेली लस म्हणजे, *पेनिसिलीन.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 22 मार्च 2024💠 वार - शुक्रवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://nasayeotikar.blogspot.com/2021/03/23032021.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_ जागतिक जल दिवस_* *_जागतिक मुकाभिनय दिवस_*•••••••••••••••••••••••••••••••• *_ या वर्षातील ८२ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• 💧💧💧 *_'जागतिक जल दिन' एक आंतरराष्टीय दिवस प्रत्येक वर्षी २२ मार्च रोजी हा दिवस साजरा करण्यात येतो.स्वच्छ आणि ताज्या पाण्याच्या नैसर्गिक स्रोतांची काळजी घेणे व त्यांच्या शाश्वत संरक्षणासाठी कार्यरत राहणे याचा संदेश देणे यासाठी या दिवसाची योजना केली गेली आहे._* *१९९९:लता मंगेशकर व भीमसेन जोशी यांना ’पद्मविभूषण’**१९७१:ओरिसात राष्ट्रपती राजवट सुरू**१९७०:हमीद दलवाई यांनी पुणे येथे मुस्लिम सत्यशोधक मंडळाची स्थापना केली.**१९५५:ब्रह्मदेश व भारत यांच्यात रेडिओ टेलिफोन दळणवळण सुरू झाले**१९४७:शेवटचे व्हाईसराय लॉर्ड माऊंटबॅटन यांचे भारतात आगमन**१९४५:अरब लीगची स्थापना**१७३९:नादिरशहाने दिल्ली ताब्यात घेतली* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* •••••••••••••••••••••••••••••••••••••• *१९८८:आदित्य सील-- भारतीय अभिनेता**१९८१:रणजीत नारायण पवार-- लेखक* *१९७६:विशाखा सुभेदार-- टेलिव्हिजन आणि चित्रपट अभिनेत्री**१९७२:अश्विनी एकबोटे--प्रसिद्ध नाट्य-सिने अभिनेत्री आणि नृत्यांगना(मृत्यू:२२ ऑक्टोबर, २०१६)**१९५९:सुरेश नावडकर-- प्रसिद्ध ललित लेखक* *१९५८:देवका जगन्नाथ देशमुख -- कवयित्री, लेखिका,संपादिका* *१९५१:चारुदत्त लक्ष्मण(सी.एल.) कुलकर्णी-- सुप्रसिद्ध दूरदर्शन मालिका अभिनेते तथा प्रसिद्ध चित्रकार,कवी,लेखक* *१९४९:विलास बाबूराव मुत्तेमवार-- माजी खासदार* *१९४८:लक्ष्मण ढवळू टोपले-- लेखक,कवी* *१९४३:नंदा अनंत सुर्वे- मुक्त पत्रकार तथा प्रसिद्ध लेखिका* *१९२४:मधुसूदन कालेलकर – नाटककार, कथाकार आणि पटकथाकार (मृत्यू:१७ डिसेंबर १९८५)**१९२४:पंडित अमरनाथ-- भारतीय शास्त्रीय गायक आणि चित्रपट संगीतकार(मृत्यू:९ मार्च १९९६)**१९११:देवीसिंह व्यंकटसिंह चौहान-- इतिहास या विषयाचे एक अभ्यासक(मृत्यू:डिसेंबर २००४)**१९०६:भगवंत भिकाजी सामंत-- शिक्षणतज्ञ व सूचिकार* *१८७७:सदाशिव कृष्ण फडके-- लेखक (मृत्यू:१२ ऑक्टोबर १९७१)**१८५७:शंकरशास्त्री रघुनाथशास्त्री गोखले-- लेखक (मृत्यू:२१ आक्टोबर १९०४)* *१७९७:विल्हेल्म (पहिला) – जर्मन सम्राट (मृत्यू:९ मार्च १८८८)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* •••••••••••••••••••••••••••••••••••••• *२०१७:गोविंद श्रीपाद तळवलकर-- इंग्रजी-मराठीतले पत्रकार व लेखक वृत्तपत्रीय अग्रलेखांकरिता विशेषत्वाने परिचय असलेले ते एक स्तंभलेखक (जन्म:२२ जुलै १९२५)* *२००७:निसार बज्मी-- संगीतकार(जन्म:१ डिसेंबर १९२४)**२००५:रामासामी गणेशन(जेमिनी गणेशन) भारतीय अभिनेते(जन्म:१७ नोव्हेंबर १९२०)**२००४:बॅरिस्टर व्ही.एम.तथा ’भाऊसाहेब’ तारकुंडे – कायदेपंडित,स्वातंत्र्यसैनिक,मुंबई उच्‍च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश व सर्वोच्‍च न्यायालयात सामाजिक समस्यांसाठी लढा देणारे झुंजार कायदेतज्ञ (जन्म:३ जुलै १९०९)**१९९१:कविवर्य यादव मुकुंद पाठक (शशिमोहन)--कवी विदर्भ साहित्य संघाचे पूर्व अध्यक्ष (जन्म:२५ जून १९०५)**१९८४:प्रभाकर आत्माराम पाध्ये --संपादक, साहित्यिक,सौंदर्यमीमांसक,समीक्षक(जन्म:४ जानेवारी १९०९)**१८३२:योहान वूल्फगाँग गटें – जर्मन महाकवी, लेखक, कलाकार आणि राजकारणी.गटें यांनी कालिदासाच्या ’शाकुंतल’चे जर्मनमधे भाषांतर केले होते. (जन्म:२८ ऑगस्ट १७४९)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही._* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जागतिक जल दिनानिमित्त प्रासंगिक लेख*जलसाक्षरता : काळाची गरज*मानवी जीवनच नव्हे तर प्रत्येक सजीवांसाठी पाणी हा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. जीवन जगण्यासाठी ज्याप्रकारे अन्न आणि हवा याची गरज असते अगदी त्याचप्रमाणे पाण्याचीही गरज असते. पाणी कसे तयार होते ? याविषयीच्या जलचक्रची माहिती आपणा सर्वांना ज्ञात आहेच........... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *विकसित भारत संदर्भातले संदेश त्वरित थांबविण्याचे निवडणूक आयोगाचे निर्देश*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *आगामी लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *रामदास आठवले यांच्या गाडीला अपघात; सातारा-मुंबई महामार्गावर कारची कंटेनरला धडक; सर्व प्रवासी सुखरूप*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *पंतप्रधानांचे छायाचित्र असलेले बॅनर काढलेच नाही : हिंगोलीच्या रेल्वे स्टेशन प्रमुखांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *भावगंधर्वांनी जागवल्या लतादीदींच्या स्वरमयी आठवणी:विभावरी आपटे-जोशी यांना 'दीदी पुरस्कार' देऊन सन्मान*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *RBI च्या निर्देशांनुसार 31 मार्च 2024 अर्थात रविवारी देशभरातील सर्व बँका सुरु राहणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *ऋतुराज गायकवाड चेन्नई सुपरकिंग्जच्या कप्तानपदी, महेंद्रसिंह धोनीने सोडलं पद*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••⏰ *बायोलॉजिकल क्लॉक म्हणजे काय ?* ⏰ **************************'आजीच्या जवळी घडय़ाळ कसले आहे चमत्कारिक ?' असा प्रश्न छोट्या केशवकुमारांना पडला होता. आजच्या विज्ञानयुगातला मुलगा मात्र थोडासा वेगळा प्रश्न विचारेल. 'या पेशीच्या जवळी घडय़ाळ कसले आहे चमत्कारिक ?' कारण सर्व सजीवांचा मूळ घटक असलेल्या पेशींच्या अंगीही असलंच एखादं चमत्कारिक घड्याळ असावं, अशीच त्यांची वागणूक असते. नाहीतर फुलं नेहमी दिवसाच्या विशिष्ट वेळेलाच कशी फुलली असती ? फळझाडांना विशिष्ट ऋतूतच कसा मोहर आला असता ? प्राण्यांचा विणीचा हंगाम विशिष्ट दिवसांपुरताच कसा राहिला असता ? एवढंच काय पण आपल्यालाही विशिष्ट वेळेसच झोप कशी आली असती ? आणि त्या झोपेतूनही विशिष्ट वेळेसच जाग कशी आली असती ? याचं कारण आपण सगळे ज्या वातावरणात राहतो त्याचाही एक नैसर्गिक ताल असतो. दिवस रात्रीचं चक्र तर आपल्या ओळखीचं आहेच, पण निरनिराळ्या ऋतुंचंही चक्र पर्यावरणात नांदत असतं. या चक्राशी जुळवून घेण्यानंच आपलं जगणं अधिक सुसह्य होतं, हे सजीव फार पूर्वीच शिकले आहेत. उत्क्रांतीच्या ओघात ही जुळवून घेण्याची प्रक्रिया अंगी रुजली आहे. त्यामुळं आपल्या अनेक शरीरक्रियाही अशाच प्रकारे चक्राकार होत असतात. झोप, भुक यासारख्या शरीरक्रियांमधील ताल तर आपल्या माहितीचाच आहे. पण शरीराचं तापमान, रक्तदाब, संप्रेरकांचा पाझर हाही या तालानुसार होत असतो. वैज्ञानिकांनी यालाच सर्केडियन र्‍हीदम असं नाव दिलं आहे. दैनिक ताल. म्हणजेच एक दिवसाचं चक्र. याव्यतिरिक्त एका दिवसाहून कमी कालावधीचंही चक्र असतं. तसंच एका दिवसाहून अधिक कालावधीचंही चक्र असतं. स्त्रियांची मासिक पाळी हे या दुसर्‍या प्रकारच्या चक्राचं उत्तम उदाहरण आहे. हे चक्र किंवा हा ताल वातावरणातल्या काही सूचक घटकांना दाद देत असतो. दिवसचक्र हे सूर्यप्रकाशावर अवलंबून असतं. त्यामुळं दिवस आणि रात्र यावेळच्या शरीरक्रिया वेगवेगळ्या होत असतात. माणूस गुहांमध्ये राहत होता तेव्हापासून दिवसाचा प्रकाश आणि रात्रीचा अंधार यांच्याशी जुळवून घेत त्याच्या शरीरक्रियांचा ताल सुरू झाला. त्यानंतर माणसांनं दिव्याचा शोध लावून दिवस आणि रात्र यांच्यातला फरक कमी केला असला तरी हा मुळ ताल तसाच राहिला आहे. अंधारकोठडीची शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांना बाहेर दिवस आहे की रात्र आहे याचा पत्ताच लागत नाही. तरीही त्यांच्या झोपेच्या आणि जाग येण्याच्या वेळांमध्ये फारसा फरक पडत नसल्याचंच दिसून आलं आहे.आपल्या मेंदूमधील सुप्राकायॅस्मिक न्युक्लियस या भागाकडून या अंगभूत घड्याळाचं नियंत्रण होतं.*डाॅ. बाळ फोंडके यांच्या 'काय ?' या पुस्तकातुन* 👆*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*विचार हे भांडवल आहे, उद्योग हा मार्ग आहे आणि मेहनत हाच उपाय आहे.* *संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) रशियाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून पाचव्यांदा कोण निवडून आले आहेत ?२) सरपंच समितीचे पदसिद्ध सचिव कोण असतात ?३) पंढरपूर मधील पवित्र नदीचे नाव कोणते ?४) शरीराच्या तापमानावर नियंत्रण राखण्याचे कार्य कोणती ग्रंथी करते ?५) भारताचे 'INDIA' हे इंग्लिश नाव कोणत्या शब्दापासून बनले आहे ? *उत्तरे :-* १) ब्लादिमिर पुतीन २) विस्तार अधिकारी ( पंचायत ) ३) चंद्रभागा ४) थायरॉईड ग्रंथी ५) INDUS*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 सनीदेवल जाधव👤 रमेश कतुरवार, धर्माबाद👤 गणेश मैद👤 शंकर वर्ताळे👤 श्रीमंत ढवळे👤 अमित बडगे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *अभंगवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••हाचि नेम आतां न फिरें माघारी । बैसलें शेजारीं गोविंदाचे ॥१॥घररिघी जालें पट्टराणी बळें । वरिलें सांवळें परब्रम्ह ॥२॥बळियाचा अंगसंग जाला आतां । नाहीं भय चिंता तुका म्हणे ॥३॥।। संत तुकाराम महाराज ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जी व्यक्ती अपमान सहन करून सुद्धा, इतरांना मान, सन्मान, आदर देऊन प्रामाणिकपणे जगत असते त्या व्यक्तीला दुसऱ्याला मानसन्मान मागण्याची आवश्यकता पडत नाही. म्हणून आपण सुद्धा आपला स्वाभिमान कायम ठेवून जगण्याचा प्रयत्न करावे. कारण स्वाभिमान, प्रामाणिकपणा ठेवून सत्याच्या वाटेवर चालण्याची एकदा का सवय झाली की, इतर व्यर्थ गोष्टींच्या मोहात पडण्याची वेळ आपल्यावर येत नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🚩 *बोधकथा - संगत* 🚩आईनस्टाईन के ड्राइवर ने एक बार आइंस्टीन से कहा- "सर, मैंने हर बैठक में आपके द्वारा दिए गए हर भाषण को याद किया है।"आईनस्टाईन हैरान!उन्होंने कहा- "ठीक है, अगले आयोजक मुझे नहीं जानते। आप मेरे स्थान पर वहां बोलिए और मैं ड्राइवर बनूंगा।ऐसा ही हुआ, बैठक में अगले दिन ड्राइवर मंच पर चढ़ गया। और भाषण देने लगा...उपस्थित विद्वानों ने जोर-शोर से तालियां बजाईं।उस समय एक प्रोफेसर ने ड्राइवर से पूछा - "सर, क्या आप उस सापेक्षता की परिभाषा को फिर से समझा सकते हैं?"असली आईनस्टाईन ने देखा बड़ा खतरा!!इस बार वाहन चालक पकड़ा जाएगा। लेकिन ड्राइवर का जवाब सुनकर वे हैरान रह गए...ड्राइवर ने जवाब दिया - "क्या यह आसान बात आपके दिमाग में नहीं आई ? मेरे ड्राइवर से पूछिए, वह आपको समझाएगा।"शिक्षा :यदि आप बुद्धिमान लोगों के साथ चलते हैं, तो आप भी बुद्धिमान बनेंगे और मूर्खों के साथ ही सदा उठेंगे-बैठेंगे तो आपका मानसिक तथा बुद्धिमता का स्तर और सोच भी उन्हीं की भांति हो जाएगी!!!•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 21 मार्च 2024💠 वार - गुरुवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/EMQKpdbbxWmoFLTc/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_जागतिक वन दिवस_**_जागतिक काव्य दिन_*•••••••••••••••••••••••••••••••• *_ या वर्षातील ८१ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *_२१ डिसेंबर २०१२ रोजी संयुक्त राष्ट्रसंघ आमसभेद्वारे एक ठराव मंजूर करून दरवर्षी २१ मार्च हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय वन दिवस’ म्हणून साजरा करण्याची घोषणा करण्यात आली._**२००३:जळगाव महानगरपालिका अस्तित्वात आली**२०००:फ्रेंच गयानातील कोअरु येथून 'एरियन ५०५' या वाहकाद्वारे भारताचा 'इन्सॅट ३ बी ' हा उपग्रह यशस्वीपणे प्रक्षेपित करण्यात आला**१९९०:नामिबियाला दक्षिण अफ्रिकेपासून स्वातंत्र्य मिळाले.**१९८०:अमेरिकेने मॉस्को ऑलिम्पिक खेळांवर बहिष्कार टाकला.**१९७७:भारतातील आणीबाणी संपुष्टात आली**१९३५:शाह रझा पेहलवी यांनी पर्शियाचे नाव ईराण करावे असे आवाहन केले.**१८७१:ऑटो व्हॉन बिस्मार्क हा जर्मनीचा चॅन्सेलर बनला.**१८५८:इंग्रज सेनापती सर ह्यू रोझ याने झाशीस वेढा दिला.**१६८०:शिवाजी महाराजांनी कुलाबा (रायगड) किल्ल्याची बांधणी सुरू केली.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८६: हेमंत ढोमे -- अभिनेता,दिग्दर्शक* *१९७८:राणी मुखर्जी – अभिनेत्री**१९७६:प्रा.डॉ.नोमेश मेश्राम -- कवी* *१९७१:प्रदीप नारायण विघ्ने-- कवी,लेखक* *१९६७:हेमंत दिवटे -- प्रसिद्ध कवी,अनुवादक* *१९६०:राजेश महाकुलकर -- कवी,लेखक* *१९४६:ॲड.राम हरपाळे -- लेखक, व्याख्याते* *१९३४:बुटासिंग-- काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री (मृत्यू:२ जानेवारी २०२१)**१९२९:श्रीपाद गंगाधर कावळे-- कवी (मृत्यू:२००१)**१९२८:राम पटवर्धन-- मराठी अनुवादक आणि संपादक(मृत्यू:३ जून २०१४)**१९२१:चंद्रकांत कल्याणदास काकोडकर-- कादंबरीकार(मृत्यू:२३ नोव्हेंबर १९८८)**१९१६:उस्ताद बिस्मिल्ला ख़ाँ-- भारतातील प्रख्यात शहनाई वादक,भारत रत्न (मृत्यू:२१ ऑगस्ट २००६)**१९१३:मनोहर महादेव केळकर-- लेखक* *१९१२:ख्वाजा खुर्शीद अन्वर-- पाकिस्तानी चित्रपट निर्माता,लेखक,दिग्दर्शक आणि संगीतकार(मृत्यू:३० ऑक्टोबर १९८४)**१८८७:मानवेंद्रनाथ रॉय – देशभक्त, क्रांतिकारक व भारतातील कम्यूनिस्ट पक्षाचे संस्थापक (मृत्यू:२६ जानेवारी १९५४)**१८४७:बाळाजी प्रभाकर मोडक – ’कालजंत्री’कार,शालिवाहन शक व तिथी आणि ख्रिस्ती सन यांचा मेळ घालण्याचे कोष्टक तयार करणारे,विज्ञानप्रसारक,लेखक (मृत्यू:२ डिसेंबर १९०६)**१७६८:जोसेफ फोरियर – फ्रेन्च गणितज्ञ व भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू:१६ मे १८३०)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२३:वंदन राम नगरकर--प्रसिद्ध एकपात्री कलाकार,लेखक,व्यक्तिमत्त्व विकास तज्ज्ञ (जन्म:२४ मार्च१९६१)**२०१०:पांडुरंग लक्ष्मण तथा ’बाळ’ गाडगीळ – अर्थशास्त्रज्ञ व विनोदी लेखक (जन्म:२९ मार्च १९२६)**२००५:दिनकर द.पाटील – चित्रपट दिग्दर्शक, पटकथा व संवाद लेखक (जन्म:६ नोव्हेंबर १९१५)**१९९२:मोरेश्वर रामचंद्र वाळंबे-- शिक्षणतज्ज्ञ व मराठी भाषेचे व्याकरणकार(जन्म:३० जून १९१२)**१९८५:सर मायकेल रेडग्रेव्ह – ब्रिटिश अभिनेता (जन्म:२० मार्च १९०८)**१९७४:श्रीधर बाळकृष्ण रानडे --मराठी कवी,रविकिरण मंडळाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक.(जन्म:२४ जून १८९२)**१९७३:यशवंत रामकृष्ण दाते – कोशकार. चिं.ग.कर्वे यांच्या साहाय्‍याने त्यांनी ’महाराष्ट्र मंडळ कोश’ स्थापन करून आठ खंडांचा ’महाराष्ट्र शब्दकोश’ तयार केला. (जन्म:१७ एप्रिल १८९१)**१९७३:शंकर घाणेकर--’आतुन कीर्तन वरुन तमाशा’ या नाटकाचा प्रयोग करत असतानाच नटवर्य शंकर घाणेकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.(जन्म:१० फेब्रुवारी १९२६)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही._* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जागतिक काव्य दिनानिमित्त मनस्वी शुभेच्छा..... पूर्ण कविता वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून भूतानच्या दोन दिवसीय दौऱ्यावर.*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत 72 लाखांची रोकड जप्त, निवडणूक अधिकाऱ्यांचा तपास सुरु*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी भूषण गगराणी यांची नियुक्ती*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाचा पदभार स्वीकारला.*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी, पहिल्या टप्प्यातील १०२ जागांसाठी अधिसूचना, १९ एप्रिल रोजी होणार मतदान*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *पण मी कोणाकडेही उमेदवारी मागणार नाही, मी स्वबळावर लढणार - राजू शेट्टी*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *IPL 2024 मधून DRS आऊट, नवीन SRS सिस्टीम, उद्यापासून IPL 2024 चा थरार*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *बाळाची गर्भावस्था व पोषण* 📙 मानव 'मॅमल' या गटात मोडतात. म्हणजेच सस्तन प्राणिमात्र असल्याने एकपेशीय सुरुवातीपासून जन्म होईपर्यंत आईच्या पोटात त्यांची पूर्ण वाढ होते जाते. माणसाची गर्भावस्था ही अडतीस आठवड्यांची असते. हाच काळ छत्तीस ते चाळीस आठवडे येथपर्यंत मागे पुढे होऊ शकतो. या काळातील अवस्थेलाच 'गर्भावस्था' म्हणतात व आईच्या गर्भाशयात ही सर्व वाढ होते.गर्भाशयाला आतील बाजूने तळहाताएवढय़ा पसरट भागात जोडलेल्या अस्तराला 'प्लासेंटा' असे म्हणतात. याचे दुसरे टोक गर्भाच्या नाभीतून गर्भाला पोषणद्रव्ये रक्ताद्वारे पूरवत असते. पुरवठा करणाऱ्या रक्तनलिकांच्या या समुच्चयास 'नाळ' असे म्हणतात. बाळाची नाळ आईच्या गर्भाशयाशी आतील बाजूस जोडलेली असल्याने आईच्या रक्तातील पोषणद्रव्ये जशीच्या तशी बाळाला मिळत राहतात.दहाव्या आठवडय़ाच्या सुमारास बाळाचे अवयव स्पष्ट होऊ लागतात, बाविसाव्या आठवड्यात त्याच्या हृदयाच्या स्पंदनांचे ठोकेही ऐकू येऊ शकतात, तर बत्तीसाव्या आठवड्यात बाळ गर्भाशयात पूर्णपणे स्थिर स्थिती घेऊ शकते व या सर्व गोष्टी हल्ली अल्ट्रासाऊंड तपासणीद्वारे नीट दिसूही शकतात.गर्भावस्थेतील काही दोष असल्यास वरील तपासण्यांचा हल्ली उपयोग केला जातो. त्यावरून बाळाची वाढ, आकारमान यांचा नक्की पत्ता लागू शकतो. पूर्ण वाढ झाल्यावर अडतिसाव्या आठवड्यात एके दिवशी गर्भाशयाचे आकुंचन सुरू होते व गर्भावस्थेतील बाळ योनीमार्गे आईच्या पोटातून जगात जन्म घेते. बाळाचा जन्म झाल्यावर लगेच त्याची नाळ बांधून कापून टाकतात. याच जागी बाळाची बेंबी व नाभी काही दिवसांनी तयार होते.‘सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••वेगापेक्षा दिशा महत्वाची आहे, जर दिशा योग्य नसेल तर वेगाचा काहीच उपयोग नाही.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*७२४६)* जगात प्रदूषणात भारताचा कितवा क्रमांक लागतो ?*७२४७)* १८७०साली पुणे येथे पहिली शिवजयंती कोणी साजरी केली ?*७२४८)* ओरिसाच्या किनारी भागास काय म्हणतात ?*७२४९)* महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात पाण्याची बँक स्थापन करण्यात आली आहे ?*७२५०)* भारतातील सर्वात प्राचीन पर्वत कोणते ? *उत्तरे :-* *७२४६)* तिसरा *७२४७)* महात्मा फुले *७२४८)* उत्कल *७२४९)* सोलापूर *७२५०)* अरवली*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 साहेबराव कदम, बाभळी, धर्माबाद👤 शिवा जी. गुडेवार👤 पी. अनिल, तेलंगणा👤 स्नेहलता कुलथे, साहित्यिक👤 प्रवीण बडेराव👤 हर्षल जाधव👤 संतोष खोसे, उस्मानाबाद👤 गणेश धुप्पे👤 विलास सोनकांबळे👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *अभंगवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आधिल्या भ्रतारें काम नव्हे पुरा । म्हणोनि व्यभिचारा टेकलियें ॥१॥रात्रंदिस मज पाहिजे जवळी । क्षण त्यानिराळी न गमे घडी ॥२॥नाम गोष्टी माझी सोय सांडा आतां । रातलें अनंता तुका म्हणे ॥३॥।। संत तुकाराम महाराज ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आधी देणारे कमी होते पण,घेणारे मात्र जास्त होते.आज त्याही पेक्षा घेणाऱ्यांची संख्या जास्त वाढताना दिसत आहे. म्हणून कधी घेणाऱ्यांना पुजले जाते का. ..? या विषयी विचार करण्याची गरज आहे. कारण, देणाऱ्यांनाच दाता म्हणतात घेणाऱ्याला नाही. घेण्यासाठी तर आपल्याकडे संपूर्ण आयुष्य पडले आहे. माणसाचा जन्म मिळाला हेच सर्वांत श्रेष्ठ समजून देण्यासाठी वेळ, आपले हात,नि:स्वार्थ भावना व मन स्वच्छ, असणे आवश्यक आहे. घेण्यासाठी कुठेही वणवण भटकावे लागणार नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*समाधान* एकदा काही कोळिणींना बाजारातून गावी परतण्यास वेळ झाला. अंधार पडला म्हणून वाटेत एका फुलबागेकच्या शेजारी झोपडीजवळ त्या विश्रांतीसाठी थांबल्या. माळी म्हणाला, "बायांनो ! रात्र खूप झाली आहे, या गरीबाच्या झोपडीत रात्र काढा आणि पहाटेस निघा." कोळिणींना ते पटले, त्या सार्याजणी त्या वृद्ध माळीबाबांच्या झोपडीत मुक्कामास राहिल्या. पण त्यांना त्या झोपडीत जराही झोप लागली नाही. त्या रात्रभर इकडून तिकडे, या कुशीवरून त्या कुशीवर वळत राहिल्या. त्या खोलीतील एका कोपऱ्यात चमेलीच्या फुलांनी भरलेली करंडी होती. त्या फुलांचा सुगंध असह्य झाल्यानेच कोळिणींना झोप येत नव्हती. काही वेळाने एक कोळीण उठली. म्हणाली, "हा दुर्गंध काही जात नाही. वाढतोच आहे." असे म्हणून तिने आपल्या मासळीच्या टोपलीवर थोडे पाणी टाकले. ती टोपली उशाशी घेताच तिला गाढ झोप लागली. *तात्पर्य :* कोणाला कशाने समाधान लाभेल, हे ज्याच्या त्याच्या सवयीवर अवलंबून असते.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 20 मार्च 2024💠 वार - बुधवार~~~~~~~~~~~~~~~~~~~समुहात add होण्यासाठी Link - https://chat.whatsapp.com/EgXNT8RopqQ82O3UfAlMy9••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_जागतिक चिमणी दिन_*•••••••••••••••••••••••••••••••• *_ या वर्षातील ८० वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* ••••••••••••••••••••••••••••••••*१९५६:ट्युनिशियाला (फ्रान्सकडून) स्वातंत्र्य मिळाले**१९१७:महाडचा ’चवदार तळे’ सत्याग्रह**१९१६:अल्बर्ट आइन्स्टाईनने सापेक्षतावादाचा सिद्धांत मांडला.**१८५४:रिपब्लिकन पार्टी ऑफ अमेरिका या पक्षाची स्थापना झाली. या पक्षाला ’ग्रँड ओल्ड पार्टी’ असेही म्हणण्यात येते.**१८५८:झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांनी इंग्रजाविरुद्ध लढा पुकारताच सेनापती सर ह्य रोज यांनी झाशीच्या किल्ल्याला वेढा दिला.**१६०२:डच इस्ट इंडिया कंपनीची स्थापना* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८०:पुष्पलता युवराज मिसाळ -- कवयित्री* *१९७२:संजय दयाराम तिजारे-- कवी* *१९६६:प्रवीण दशरथ बांदेकर-- मराठी साहित्यिक**१९६६:अलका याज्ञिक – प्रसिद्ध भारतीय गायिका**१९५८:अशोक लोटणकर-- ललित कथाकार, कवी,समीक्षक**१९५५:दया मित्रगोत्री-- कवयित्री**१९५२:आनंद अमृतराज-- भारताचा आंतरराष्ट्रीय पातळीवरचा टेनिस खेळाडू**१९५१:मदनलाल उधौराम शर्मा-- माजी क्रिकेटपटू**१९५०:डॉ.भारती जयंत सुदामे -- प्रसिद्ध लेखिका,मराठी व हिंदी भाषेमध्ये लेखन व अनुवाद* *१९४७:प्रा.वसंत केशव पाटील-- ललित लेखक,कथाकार,कवी,गझलकार आणि राष्ट्रीय स्तरावरील भाषांतरकार साहित्यक* *१९३९:सुधीर दळवी -- भारतीय अभिनेता, मनोज कुमारच्या शिर्डी के साई बाबा या वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटात साईबाबाची भूमिका साकारली**१९२४: राम नारायण गबाले -- मराठी चित्रपट दिग्दर्शक,निर्माते,पटकथालेखक, संवादलेखक(मृत्यू:९ जानेवारी २००९)**१९२४:ईश्‍वर बगाजी देशमुख-- संस्थापक, सामाजिक कार्यकर्ते (मृत्यू:६ फेब्रुवारी २००६)**१९२१:पी.सी.अलेक्झांडर-- भारतातील मल्याळी राजकारणी व मुलकी सेवेतील माजी अधिकारी,महाराष्ट्राचे माजी राज्यपाल (मृत्यू:१० ऑगस्ट२०११)**१९२०:वसंत कानेटकर – नाटककार (मृत्यू:३१ जानेवारी २०००)**१९११:माधव मनोहर --समीक्षक,नाटककार, लेखक(मृत्यू:१६ मे,१९९४)**१९०८:सर मायकेल रेडग्रेव्ह – ब्रिटिश अभिनेता (मृत्यू:२१ मार्च १९८५)**१८२८:हेन्‍रिक इब्सेन – नॉर्वेजियन नाटककार,दिग्दर्शक आणि कवी (मृत्यू:२३ मे १९०६)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१५:कृष्णराव गणपतराव साबळे उर्फ शाहीर साबळे-- मराठी लोकशाहीर म्हणून प्रसिद्ध(जन्म:३ सप्टेंबर, १९२३)**१९५६:बा.सी.मर्ढेकर – मराठी नवकाव्याचे प्रणेते (जन्म:१ डिसेंबर १९०९)**१९२५:लॉर्ड कर्झन–ब्रिटिश मुत्सद्दी आणि भारताचे व्हॉइसराय(जन्म:११ जानेवारी १८५९)**१७२७:सर आयझॅक न्यूटन – इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ, गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञ. गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडला.गणितातील ‘कॅल्क्युलस’ या शाखेचे जनक (जन्म:२५ डिसेंबर १६४२)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही._* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••।। जागतिक चिमणी दिवस ।।आमच्या लहानपणी दिसणाराकुठे गेला लहानसा चिमणाचिवचिव आवाज झाला गायबकोणी खाईना अंगणातला दाणाबाळाला खाऊ घालतांनाआई बोलावित असे चिऊलाबाळ ही मिटकावून खात असेबघत बघत लहानश्या चिऊला- नासा येवतीकर, 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मुंबई उच्च न्यायालयाची माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांना जन्मठेपेची शिक्षा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातल्या निवासस्थानी पक्षाच्या खासदारांची बैठक संपन्न*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *भाजपा महायुतीचे उमेदवार म्हणून प्रचार करेल - आशिष शेलार*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसच्या ७ लोकसभा मतदारसंघांसाठी दिला पाठिंबा*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *बंगळुरू मधल्या नागरथ भागात १४४ कलम लागू.*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *चीनच्या प्रवक्त्यानं अरुणाचलप्रदेशाबद्दल केलेल्या विधानाचा प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी घेतला समाचार*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने WPL मध्ये पहिले विजेतेपद पटकावले:दिल्ली कॅपिटल्सचा 8 गडी राखून पराभव, श्रेयंका पाटीलने घेतल्या 4 विकेट*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *बायोमास* 📙 झाडेझुडपे, पालापाचोळा, काटक्या, कोळसा, शेण्या, गोवऱ्या, कुजलेले शेवाळे हे सर्व बायोमास या प्रकारात मोडतात. सूर्याची ऊर्जा मिळून त्यांची निर्मिती झालेली असते. या बायोमासचे ज्वलन करून तीच ऊर्जा पुन्हा उष्णतेच्या स्वरूपात बाहेर पडते. ग्रामीण जीवनात या बायोमासला फार महत्त्व आहे.रोजची चूल पेटण्याचा संबंध प्रथम कोरडे जळण मिळवण्यापासून सुरू होतो. झाडे तोडून लाकडे मिळवण्याचे दिवस कमी होत चालले आहेत. काट्याकुटक्या, झाडोर्‍याच्या फांद्या झपाट्याने नाहीशा होत चालल्या आहेत. पालापाचोळा शेकोटीला वा पाणी तापवायला उपयोगी पडतो; पण भाकऱ्या भाजणे व स्वयंपाक करणे यासाठी त्याचा उपयोग होत नाही. पुर्वापारची पद्धत म्हणजे शेणाच्या गोवऱ्या थापणे. जनावरांचे म्हणजे गायीगुरांचे शेण, त्यात थोडीशी कोळशाची पावडर घालून मळायचे. त्याचा गोल गोवऱ्या थापायच्या व भिंतीला लावून वाळवत ठेवायच्या. ग्रामीण जीवनाचे हे एक अविभाज्य अंग आहे.याच गोवर्‍या वाळल्या की मग पावसाळ्याच्या दिवसांतील जळणाची पंचाईत कमी होते. काहीजण या गोवऱ्या तयार करताना वाळका कडबासुद्धा बारीक चुरून वापरतात. दोन चार गोवर्‍या व एखादे मोठे लाकूड यांवर एक वेळचा स्वयंपाक कसाबसा पार पाडता येतो. चुलीची आचही चांगली राहते. धुर कमी होतो.या पद्धतीचे जळण वापरायची प्रथा जिथे गुरे हा जीवनाचा अविभाज्य अंग आहे तिथे कायम आहे. भारतातील सर्व ग्रामीण भागात कुठेही गेलात तरी गोवऱ्यांची चळत वळचणीला लावून रचलेली दिसेल व परसदारी भिंतीला गोवर्‍या थापून वाळवत लावलेल्या दिसतीलच. एवढेच नव्हे तर रानात गुरे चरायला जातात त्या वेळी त्यांच्यामागे जाणारी लहान मुले एखादी पाटी घेऊन शेण गोळा करायला कधीही विसरत नाहीत. जमेल तेवढे पाटीभर शेण घरी आणले की जळणाची सोय होते, हे त्यांना जणू बाळकडूच मिळालेले असते. गोवऱ्यांचा आणखी एक उपयोग आहे. घरातील वृद्ध म्हातारे माणूस रागाने म्हणताना कधी ऐकले आहे ? 'गेल्या आहेत माझ्या गौवऱ्या मसणात,' म्हणून ! अगदी बरोबर. अंत्यसंस्कार करताना अनेक ठिकाणी अजूनही भरपूर गोवऱ्या वापरतात. बहुमूल्य अशा लाकडाची ही त्यात बचत होते. हेही महत्त्वाचे नाही काय ?‘सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••साधेपणाने कर्तव्य करताना भीतीचे कारण नाही.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) देशातील पाण्याखालून जाणाऱ्या पहिल्या मेट्रोचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले ?२) रशियाच्या अवकाश संशोधन संस्थेचे नाव काय आहे ?३) घटक राज्यांमधील संविधानिक यंत्रणा बंद पडल्यास त्या ठिकाणी कोणत्या प्रकारची आणीबाणी लागू केले जाते ?४) कोडाई कॅनॉल हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे ?५) भारताची अर्थव्यवस्था सध्या जगात कितव्या क्रमांकाची आहे ? *उत्तरे :-* १) पंतप्रधान नरेंद्र मोदी २) रॉसकॉसमॉस ३) राष्ट्रपती राजवट ४) तामिळनाडू ५) पाचव्या*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 नागेश चिंतावार, शिक्षक, नांदेड👤 योगेश राजापूरकर, शिक्षक, उमरी👤 गणेश गुरुपवार, नांदेड👤 रमेश कोंडेकर👤 सर्जेराव ढगे👤 मनोहर किशनराव राखेवार, नांदेड👤 रामदयाल राऊत*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *अभंगवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••वाळो जन मज म्हणोत शिंदळी । परि हा वनमाळी न विसंबें ॥१॥सांडूनि लौकिक जालियें उदास । नाहीं भय आस जीवित्वाची ॥२॥नाइकें वचन बोलतां या लोकां । म्हणे जालों तुका हरिरता ॥३॥।। संत तुकाराम महाराज ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••दोन शब्द आपल्यासोबत कोणी हसून बोलत असतील तर आपल्याला आनंद होत असतो .पण आपल्याला कोणी कठोर शब्दात बोलले तर मात्र त्या शब्दांचा राग येत असतो. या दोन्ही मध्ये खूप फरक आहे. पण,थोडे विचार करून बघावे कधी,कधी हसून बोललेल्या शब्दात जे काही दडलेले असते त्याबद्दल आपल्याला पुरेपूर माहिती नसते व जे कोणी कठोर शब्दात बोलून मोकळे होतात. कधीकाळी ते आपल्या भल्यासाठीही असू असते म्हणून त्या दोन्ही मधील फरक आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *शासन*महाभारताच्या शांतीपर्वातील ही गोष्ट. शंख व लिखित नावंचे दोघे भाऊ यज्ञोपवित संस्कार झाल्यावर गुरूगृही विद्याध्यानासाठी गेले. संपूर्ण वेद वेदांगाचा अभ्यास करून गुरूची परवानगी घेऊन हे दोघे घरी परत आले. दोघांनीही दोन वेगवेगळया ठिकाणी आपले आश्रम बांधले. तिथे त्यांचे अध्यापनाचे काम सुरू झाले. बरेच दिवस झाले दोन्ही भावांची भेट नव्हती. लिखिताने शंखाकडे भेटीला जाण्याचे ठरवले. त्याप्रमाणे तो गेला पण शंख कामानिमित्त बाहेर गेला होता. निराश झालेला लिखित परत निघाला. दुपारी बाराची वेळ भूक लागली होती. समोर शंखाच्या आश्रमातील आंब्याच्या झाडाला खूप आंबे लागले होते. एक छानसा पिकलेला आंबा लिखिताने तोडला व पुढे चालू लागला.तेवढयात समोरून येणार्‍या शंखाने ते पाहिले व विचारले. 'आंबा कुठे मिळाला ?' शंख सहज म्हणाला 'अरे ! तुझ्याच झाडाचा छान पिवळा धम्मक दिसला तोडला'. शंख शांतपणे म्हणाला 'म्हणजे लिखिता तू चोरी केलीस झाडाच्या मालकाला न विचारता आंबा तोडलास' लिखिताला आपली चूक कळली. शरमेने त्याची मान खाली झुकली. 'शंखा माझ्या गुन्ह्याबद्दल मला हवी ती शिक्षा कर' 'काहीं गरज नाहीं त्याची जा आता पुन्हा असे घडणार नाही ह्याची खबरदारी घे' शंख एवढे बोलून निघून गेला.लिखित राजाकडे गेला. घडलेली सर्व हकीगत सांगितली. 'राजा मला शिक्षा कर' लिखित म्हणाला. ह्या विचित्र मागणीचे राजाला आश्‍चर्य वाटले. राजा म्हणाला 'लिखिता तू म्हणतोस ते खरंही असेल पण चोरीची फिर्याद कुणीच केलेली नाही. गुन्हा शाबीत झाला तर शिक्षा'. 'राजे पण गुन्हा शाबीत झाला तर ह्या गुन्ह्याला शिक्षा कोणती ?' लिखिताने विचारले, 'चोरी करणार्‍याचा हातच आम्ही कापतो' राजा म्हणाला. राजाच्या समोरच लिखिताने राजा शासन करत नाहीं म्हणून आपणच आपला हात कापून टाकला'.स्वत:च स्वत:ला शिक्षा करून घेणारी प्रजा उत्कृष्ट राज्य शासनाचे प्रतीक आहे.*📝 संकलन* 📝•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 18 मार्च 2024💠 वार - सोमवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://nasayeotikar.blogspot.com/2022/11/power-of-one-vote.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_ या वर्षातील ७८ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२००१:सरोदवादक अमजद अली खान यांना ’गंधर्व पुरस्कार’ तर तर बंगाली अभिनेत्री सावित्री चटर्जी यांना ’अप्सरा पुरस्कार’ जाहीर**१९४४:नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेने ब्रह्यदेशमार्गे प्रवेश करुन भारताच्या ईशान्य सीमेवर ब्रिटिशांचा पाडाव करुन तिरंगा फडकावला**१९४०:अमळनेर येथे साने गुरुजींनी सुरू केलेल्या 'काँग्रेस'या साप्ताहिकाचा शेवटचा अंक निघाला**१९२२:महात्मा गांधींना असहकार आंदोलनाबद्दल ६ वर्षे तुरूंगवास**१८५०:हेन्‍री वेल्स आणि विल्यम फार्गो यांनी ’अमेरिकन एक्सप्रेस’ची स्थापना केली.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९७४:प्रा.डॉ.उद्धव भाले-- लेखक**१९७०:देवेंद्र गावंडे--निवासी संपादक लोकसत्ता विदर्भ आवृत्ती तथा प्रसिद्ध लेखक* *१९६८:प्रा.डॉ.शंतनू रामचंद्र कुळकर्णी -- प्रसिद्ध कवी* *१९५९:मंगला मधुकर रोकडे -- प्रसिद्ध कवयित्री,लेखिका,संपादिका* *१९५७:रत्ना पाठक शाह-- भारतीय अभिनेत्री आणि दिग्दर्शिका* *१९५६:वासंती वर्तक--दूरदर्शनच्या प्रतिभावंत वृत्तनिवेदिका व लेखिका* *१९५५:संजय श्रीकृष्ण पाठक-- प्रसिद्ध विज्ञान लेखक* *१९५५:अरुण बुधाजी सोनवणे-- गझलकार* *१९४८:एकनाथ सोलकर – अष्टपैलू क्रिकेटपटू (मृत्यू:२६ जून २००५)**१९४६:नवीन निश्चल-- भारतीय अभिनेता(मृत्यू:१९ मार्च २०११)**१९४३: विंग कमांडर अशोक प्रभाकर मोटे-- भारतीय वायुसेनेचे अधिकारी ऐतिहासिक अशा कारगिलसह तीन प्रमुख युद्धांमध्ये सहभाग (मृत्यू:२५ डिसेंबर २०२०)**१९३८:बलबीरराज पृथ्वीराज कपूर तथा ’शशी कपूर’ – अभिनेता(मृत्यू:४ डिसेंबर २०१७)**१९३४:दशरथ तोंडवळकर-- कलावैभव'चे सर्वेसर्वा,ज्येष्ठ नाट्यनिर्माते (मृत्यू:७ आगस्ट २०१०)**१९३२:तुळशीराम माधवराव काजे-- प्रतिभावंत कवी(मृत्यू:१४ सप्टेंबर २०१८)* *१९२६:अक्कितम अच्युथन नंबूथिरी-- भारतातील मल्याळम भाषेतील कवी, 'अक्कितम' या नावाने प्रसिद्ध,त्यांनी रचलेल्या बालीदर्शनम या काव्यसंग्रहासाठी १९७३ मध्ये त्यांना साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित(मृत्यू:१५ ऑक्टोबर, २०२०)**१९२१:एन.के.पी. साळवे – भारतीय राजकारणी,माजी केंद्रीय मंत्री व बी.सी.सी. आय.चे अध्यक्ष (मृत्यू:१ एप्रिल २०१२)**१९१९:इंद्रजित गुप्ता – माजी केन्द्रीय गृहमंत्री आणि कम्युनिस्ट पक्षाचे नेते (मृत्यू:२० फेब्रुवारी २००१)**१९०५:मालती बेडेकर ऊर्फ ’विभावरी शिरुरकर’ – लेखिका (मृत्यू:७ मे २००१)**१९०४:लक्ष्मणराव सरदेसाई-- कोंकणी व मराठी भाषेतील लेखक(मृत्यू:४ फेब्रुवारी१९८६)**१९०१:कृष्णाजी भास्कर तथा ’तात्यासाहेब’ वीरकर – शब्दकोशकार,अनेक शैक्षणिक संस्थांचे संस्थापक* *१८८१:वामन गोपाळ तथा ’वीर वामनराव’ जोशी – स्वातंत्र्यसैनिक,पत्रकार,’राष्ट्रमत’ आणि ’स्वतंत्र हिन्दुस्तान’चे संपादक,लेखक व नाटककार (मृत्यू:३ जून १९५६)**१८६९:नेव्हिल चेंबरलेन – इंग्लंडचे पंतप्रधान (मृत्यू:९ नोव्हेंबर १९४०)**१८६७:महादेव विश्वनाथ धुरंधर – आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार व पोस्ट कार्ड आर्टिस्ट(मृत्यू:१ जून १९४४)**१८५८:रुडॉल्फ डिझेल – डिझेल इंजिनचा संशोधक (मृत्यू:२९ सप्टेंबर १९१३)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२०:अशोक शेवडे --प्रख्यात मुलाखतकार , लेखक (जन्म:२४ जानेवारी १९४४)* *२०१६:आशा अनंत जोगळेकर-- प्रसिद्ध नृत्यांगना (जन्म:१० सप्टेंबर १९३६)**२०११:दिनकर निलकंठराव देशपांडे-- मराठीतले पत्रकार आणि साहित्यिक(जन्म:१७ जुलै १९३३)**२००४:वसंत केशव दावतर- समीक्षक (जन्म:२७ ऑगस्ट १९२५)**२००१:विश्वनाथ नागेशकर – चित्रकार (जन्म: १९१०)**१९७५:हरी रामचंद्र दिवेकर--स्त्री-शिक्षणाचे पुरस्कर्ते,संस्कृत लेखक(जन्म:५ नोव्हेंबर १८८५)**१९०८:सर जॉन इलियट – भारतातील हवामानशास्त्रविषयक कार्यामुळे प्रसिद्धी पावलेले ब्रिटिश हवामानशास्त्रज्ञ. १८८७ ते १८९३ या कालावधीत ते भारत सरकारच्या हवामान खात्याचे प्रमुख होते. (जन्म:२५ मे १८३१)**१८९४:रावबहादुर शंकर पांडुरंग पंडित-- वेदाभ्यासक,उत्तम प्रशासक(जन्म:१ जानेवारी १८४०)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही._* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*एका वोट ची किंमत*ज्या ज्या वेळी आपण मतदार म्हणून निवडणुकीला तोंड द्यावे लागते त्या त्यावेळी आपल्या समोर एकच प्रश्न पडतो की, मतदार म्हणून मी काय करावे ? कोणत्या व्यक्तीला किंवा कोणत्या पक्षाला मतदान करावे ? आपण एक जागरूक मतदार असाल तर नक्कीच या प्रश्नाचे निराकरण स्वतःच्या मनाशी विचारून नक्की करू शकता. त्यासाठी स्वतः मतदार यांनी सर्वप्रथम कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नये............ पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *19 व्या लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला, महाराष्ट्रात पाच टप्यात होणार मतदान*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा मुंबईत समारोप, या सभेला महाविकास आघाडीचे दिग्गज नेते उपस्थित*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *'जय जय महाराष्ट्र माझा...' हे राज्यगीत आता शाळांमध्ये गायले आणि वाजविले जाणार असल्याचे परिपत्रक राज्य सरकारने काढले आहे*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *निर्भय व निष्पक्ष निवडणुकांसाठी प्रशासन सज्ज:संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी व्यक्त केला विश्वास*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *अमृतवाहिनीच्या डॉ. विजय गडाख यांना भारत सरकारचे पेटंट:कुरडया बनवण्याची नवीन मशीन, एका मिनिटात पाच कुरडया तयार*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *पुण्यात दोन दिवसीय काव्य महोत्सव संपन्न:साहित्यदीप प्रतिष्ठानतर्फे आयोजित संमेलनात दिग्गज कवीयत्रींनी उलगडला 'वारसा साहित्यीकांचा'*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *T20 World Cup 2024 : विराट कोहलीचं स्थान निश्चित, रोहित शर्माची मध्यस्थी*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📒 स्टेनलेस स्टीलला गंज का चढत नाही ? 📒साध्या पोलादाला गंज चढतो. तो त्या धातूला कुरतडत राहतो. कालांतरानं त्याचा भुगाच करतो. हे असं का होत ? हवेतल्या किंवा पाण्यातल्या ऑक्सिजनशी त्याची जी रासायनिक प्रक्रिया होते त्यातून तयार होणारी संयुगं साध्या लोखंडावर किंवा पोलादावर गंजाची पुटं चढायला कारणीभूत असतात. ही संयुगं पोलादाच्या पृष्ठभागावर एक परत तयार करतात. ही आयर्न ऑक्साईड किंवा हायड्रॉक्साईडची पुटं अस्थिर असतात. हवेतल्या, पाण्यातल्या ऑक्सिजनशी त्यांचा सतत संपर्क येतच राहतो. एवढंच काय, पण या पुटांमधून शिरकाव करून घेत पुढं पुढं जात त्यांच्या खालच्या पोलादाशीही तो संधान साधतो. आणखी संयुगं तयार करतो. त्यामुळे इतर काही उपाययोजना केली नाही तर मग या पुटांची जाडी वाढत राहते. डोळ्यांना सहज दिसेल इतकी ती वाढते. यालाच आपण गंज म्हणतो. त्यातील संयुगांच्या तपकिरी रंगामुळं तर ती अधिकच सहजपणे दिसून येतात.त्यांना प्रतिबंध करण्यासाठी पोलादात क्रोमियम, सिलिकॉन, मँगेनीज, कार्बन हे धातू मिसळून त्यापासून मिश्रधातू तयार करण्यात येतो. यालाच स्टेनलेस स्टील म्हणतात. काही स्टेनलेस स्टीलमध्ये निकेल किंवा मॉलिब्डेनम हे धातूही मिसळलेले असतात. जेव्हा असं स्टेनलेस स्टील हवेतल्या किंवा पाण्यातल्या ऑक्सिजनच्या संपर्कात येतं तेव्हा त्याची प्रक्रिया त्या मिश्रधातूतल्या लोखंडाशी होण्याआधी क्रोमियम किंवा निकेल यांसारख्या धातूंबरोबर होते. त्यांच्या संयुगामुळंही गंजाची एक रेण्वीय जाडीची परत तयार होते पण ती स्थिर असते. तिच्यामधून शिरकाव करून घेत खालच्या लोहाशी प्रक्रिया करणं ऑक्सिजनला शक्य होत नाही. त्यामुळे लोहाची संयुगं तयार होत नाहीत. एवढंच नाही, तर जे काही थोडंफार क्रोमियम किंवा निकेल उरलं असेल त्याच्याशीही ऑक्सिजन प्रक्रिया करू शकत नाही. त्यामुळे जे काही गंजाचं अतिशय पातळ पुट तयार झालं असेल, त्याची जाडीही वाढत नाही. ते अतिशय पातळ म्हणजे केवळ एका रेणूच्या जाडीएवढंच असल्यामुळं आणि त्याचा रंगही तपकिरी नसल्यामुळं डोळ्यांना ते दिसत नाही. म्हणजे स्टेनलेस स्टीललाही गंज चढतो पण तो अतिशय मामुली स्वरूपातला असल्यामुळं आणि त्याची वाढ होत नसल्यामुळं त्या धातूचं नुकसान मर्यादित राहतं. सतत वाढत जाऊन ते मूळ धातूला कुरतडत खाऊन टाकत नाही.या सर्वात कळीची भूमिका बजावली जाते ती क्रोमियमकडून. त्यामुळेच इतर धातू असोत-नसोत, स्टेनलेस स्टीलमध्ये क्रोमियमचा समावेश निश्चित असतो. किंबहुना, किमान दहा टक्के क्रोमियमचा अंतर्भाव केलेला असल्याशिवाय अशा धातूला स्टेनलेस स्टील असल्याचं प्रमाणपत्र दिलं जात नाही.डॉ. बाळ फोंडके यांच्या 'का ?' या पुस्तकातुन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अंधारातच प्रकाशाची खरी किंमत कळते.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) जगात वेगवेगळ्या कारणांनी इंटरनेट बंद करण्यात अव्वल देश कोणता ?२) जगात शस्त्रे खरेदी करणाऱ्या देशांच्या यादीत प्रथम क्रमांक कोणत्या देशाचा लागतो ?३) निवडणूक आयोगाकडून मतदारांना ई - ओळखपत्र देण्यास सुरूवात कोणत्या वर्षी झाली ?४) देशात फुलपाखरांच्या एकूण किती प्रजातींची नोंद आहे ?५) जगातील घनदाट जंगल कोणते ? *उत्तरे :-* १) भारत २) भारत ३) सन २०२१ ४) १४०० प्रजाती ५) अमेझोन*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 बालाजी आगोड👤 इरफान शेख, धर्माबाद👤 लक्ष्मण नरवाडे👤 सुहास भंडारे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *अभंगवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कर कटावरी तुळसीच्या माळा । ऐसें रूप डोळां दावीं हरी ॥१॥ठेविले चरण दोन्ही विटेवरी । ऐसें रूप हरी दावीं डोळां ॥ध्रु.॥कटीं पीतांबर कास मिरवली । दाखवीं वहिली ऐसी मूर्ती ॥२॥गरुडपारावरी उभा राहिलासी । आठवें मानसीं तें चि रूप ॥३॥झुरोनी पांजरा होऊं पाहें आतां । येईं पंढरीनाथा भेटावया ॥४॥तुका म्हणे माझी पुरवावी आस । विनंती उदास करूं नये ॥५॥।। संत तुकाराम महाराज ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपली वाट जर सत्याची असेल आणि त्या वाटेत आपल्याला अपमान, बदनाम करून स्वतः चे समाधान करून घेणारे मिळत असतील तर ते, आपले सर्वात मोठे भाग्य समजावे. व तो, आपल्याला मिळालेला मौल्यवान सन्मान समजावा. कारण, ते सर्व सहन करण्याची व त्या वाटेवर चालण्याची प्रत्येकात ताकद नसते.म्हणून जीवनात कितीही प्रसंग आले तरी आपण निवडलेल्या योग्य त्या वाटेवर चालत रहावे.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••बिल गेट्स पेक्षा श्रीमंत कोण आहे ?कुणीतरी बिल गेट्सना विचारलं, की तुमच्या पेक्षा श्रीमंत कुणी आहे का?ते म्हणाले, हो एकच आहे.बर्याच वर्षांपूर्वी माझी नोकरी गेली होती आणि त्यानंतर मी न्यूयॉर्क विमानतळावर गेलो. मी तेथे वृत्तपत्रांचे शीर्षक वाचले. मला त्यापैकी एक आवडले आणि मला ते विकत घ्यायचे होते. पण माझ्याकडे सुटे पैसे नव्हते. मी सोडून दिले, अचानक, एक सावळा मुलगा मला बोलावून म्हणाला, "आपल्यासाठी हे घ्या वृत्तपत्र." मी म्हणालो, पण माझ्याकडे सुटे पैसे नाहीत. तो म्हणाला, "काही हरकत नाही, मी तुला हे मोफत देतो आहे"योगायोगाने ३ महिन्यांनंतर मी पुन्हा तिथे गेलो. ती गोष्ट पुन्हा अगदी तशीच घडली आणि त्याच मुलाने पुन्हा एकदा मला आणखी एक वृत्तपत्र मोफत दिले.मी म्हणालो, मी स्वीकारू शकत नाही. परंतु तो म्हणाला, "मी हे तुला माझ्या नफ्यातून देतोय"१९ वर्षांनंतर जेंव्हा मी श्रीमंत झालो तेंव्हा मी त्या मुलाला शोधण्याचा निर्णय घेतला. सुमारे दीड महिन्यानंतर मी त्याला शोधले. मी त्याला विचारले, तू मला ओळखलेस? तो म्हणाला, "होय, आपण प्रसिद्ध बिल गेट्स आहात."मी म्हणालो, तु खूप वर्षांपूर्वी मला दोनदा मोफत वृत्तपत्र दिले होतेस. आता मला ते भरुन काढायचे आहे. मी तुला जे पाहिजे ते सर्व देईन. सावळा तरुण माणूस म्हणाला, "आपण ते भरपाई करू शकत नाही!"मी म्हणालो, का? तो म्हणाला, "मी तुम्हाला स्वतः गरीब असताना जे दिले, ते तूम्ही स्वतः श्रीमंत झाल्यावर मला कसे परत देऊ शकता?"बिल गेट्स म्हणाले, मला वाटते की तो सावळा तरुण माझ्यापेक्षा श्रीमंत आहे.*आपल्याला दान करण्यासाठी श्रीमंत असण्याची किंवा श्रीमंत होण्याची वाट पाहण्याची आवश्यकता नाही. त्यासाठी आपल्यात दानत असायला हवी*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 16 मार्च 2024💠 वार - शनिवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/JNN4WNgxUoQAENsi/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_ या वर्षातील ७६ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२०१२:सचिन तेंडुलकर यांचे क्रिकेट मध्ये शतकांचे शतक* *२००१:नेल्सन मंडेला यांना राष्ट्रपती के.आर. नारायणन यांच्या हस्ते 'गांधी शांतता पुरस्कार' प्रदान**२०००:हॉकीपटू धनराज पिल्ले आणि मध्य अंतराची धावपटू ज्योतिर्मय सिकदर यांना ’के. के.बिर्ला पुरस्कार’ जाहीर**१९९२:ज्येष्ठ चित्रपट निर्माते व दिग्दर्शक सत्यजित रे यांना ऑस्कर अवार्ड प्रधान**१९७६:इंग्लंडचे पंतप्रधान हेरॉल्ड विल्सन यांनी राजीनामा दिला.**१९६६:अमल कुमार सरकार यांनी भारताचे ८ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.**१९४५:दुसरे महायुद्ध – रॉयल एअर फोर्सने तुफानी बॉम्बफेक करून जर्मनीच्या वुर्झबर्ग शहराचा २० मिनीटांत विनाश केला.**१९४३:’प्रभात’चा ’नई कहानी’ हा चित्रपट रिलीज झाला.**१५२८:फत्तेपूर-शिक्री येथे राणा संग व बाबर यांचे घनघोर युद्ध होऊन राणा संग याचा पराभव झाला.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९७१:राजपाल यादव-- हिंदी चित्रपटांमधील विनोदी अभिनेता**१९६८:अनन्या खरे-- भारतीय टेलिव्हिजन आणि चित्रपट अभिनेत्री**१९६२:बाळू विठोबा श्रीराम-- कवी,लेखक* *१९६२:हरि सखाराम गोखले-- मराठी कवी आणि पुस्तक प्रकाशक**१९६१:किरण वसंत पुरंदरे-- पक्षितज्ज्ञ, निसर्ग अभ्यासक व लेखक* *१९५८:जनरल बिपीन रावत-- भारतीय लष्करातील 'फोर स्टार रँक' धारक जनरल,भारतीय लष्कराचे २६ वे लष्कर प्रमुखदेखील होते.२०२२ साली त्यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला(मृत्यू:८ डिसेंबर २०२१)**१९४६:मुकुंद धाराशिवकर --ज्येष्ठ लेखक विज्ञान प्रचारक(मृत्यू:१४ फेब्रुवारी २०१६)**१९३९:वामनराव तेलंग-- तरूण भारतचे माजी ज्येष्ठ संपादक,लेखक (मृत्यू:११ जून २०२०)**१९३६:प्रभाकर बर्वे -- आधुनिक भारतीय चित्रकलेचे प्रणेते(मृत्यू:६ डिसेंबर १९९५)* *१९३६:भास्कर चंदावरकर – संगीतकार (मृत्यू:२६ जुलै २००९)**१९३५:प्राचार्य बजरंग शामराव सरोदे -- प्रसिद्ध लेखक* *१९३५:शशिकांत यशवंत गुप्ते -- लेखक* *१९२१:फहाद – सौदी अरेबियाचा राजा (मृत्यू:१ ऑगस्ट २००८)**१९१४:भानुदास श्रीधर परांजपे-- कवी नाटककार(मृत्यू:१९ जानेवारी १९८५)**१९१३:पंढरीनाथ गंगाधर नागेशकर-- हिन्दुस्तानी शास्त्रीय संगीत क्षेत्रातील ख्यातनाम तबलावादक(मृत्यू:२६ मार्च २००८)**१९०१:प्र.बा.गजेंद्रगडकर – भारताचे ७ वे सरन्यायाधीश (मृत्यू:१२ जून १९८१)**१८७२:काशीनाथ हरी मोडक( माधवानुज)-- केशवसुत संप्रदायातील मराठी कवी(मृत्यू: २ मार्च१९१६)* *१७८९:जॉर्ज ओहम – जर्मन गणितज्ञ व भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू:६ जुलै १८५४)**१७५१:जेम्स मॅडिसन – अमेरिकेचे चौथे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू:२८ जून १८३६)**१७५०:कॅरोलिन हर्षेल – जर्मन-ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ(मृत्यू:९ जानेवारी १८४८)**१६९३:मल्हारराव होळकर – इंदूरच्या राज्याचे संस्थापक,मराठेशाहीतील पराक्रमी सेनापती व मुत्सद्दी (मृत्यू:२० मे १७६६)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१३:ॲड.ज्ञानेश्वर महादेव कुलकर्णी-- नामवंत वकील,इतिहासाचे गाढे अभ्यासक, लेखक (जन्म:१३ जून १९३०)* *२०१०:डॉ.दत्ता वाळवेकर-- भारतीय मराठी गायक आणि संगीत दिग्दर्शक(जन्म:३० मार्च१९२८)**२००७:मंजुरूल इस्लाम – बांगला देशचा क्रिकेटपटू (जन्म:४ मे १९८४)* *१९९९:कुमुदिनी पेडणेकर – प्रसिद्ध गायिका* *१९९०:वि.स.पागे – स्वातंत्र्यसैनिक, गांधीवादी कार्यकर्ते,संत वाङ्‍मयाचे अभ्यासक, महाराष्ट्र विधानसभेचे सभापती,रोजगार हमी योजनेचे जनक (जन्म:२१ जुलै १९१०)**१९८५:वसंत श्यामराव वरखेडकर-- कादंबरीकार,नाटककार(जन्म:१० सप्टेंबर १९१८)**१९४६:’गान सम्राट’ उस्ताद अल्लादियाँ खाँ – जयपूर -अत्रौली घराण्याचे संस्थापक व कोल्हापूर दरबारचे प्रसिद्ध गायक (जन्म:१० ऑगस्ट १८५५)**१९४५:गणेश दामोदर तथा 'बाबाराव' सावरकर – ’अभिनव भारत’ संघटनेचे संस्थापक (जन्म:१३ जून १८७९)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही._* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*अंधश्रद्धा कशी नष्ट होईल ?*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *राज्यातील सर्व शिक्षकांना आता ड्रेसकोड अनिवार्य, शिक्षणमंत्री केसरकर यांची घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *सर्वोच्च न्यायालयाने सीएए अर्थात नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर येत्या शुक्रवारी १९ मार्च रोजी होणार सुनावणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *सर्व शाळांमध्ये येत्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता पहिली ते इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी आठवड्यातील प्रत्येक शनिवारी ‘आनंददायी शनिवार’ हा उपक्रम राबविण्याबाबत शालेय शिक्षण विभागामार्फत परिपत्रक जारी*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मुंबई उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला मोठा झटका, सार्वजनिक आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभागाची दोन मोठी टेंडर केली रद्द*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मुंबई : राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांच्या सन्मान निधीत अकरा हजारावरून वीस हजार रुपये अशी भरीव वाढ करण्याचा राज्य शासनाने घेतला निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *ज्येष्ठ लेखिका डॉ. अरुंधती खंडकर यांचे निधन : वयाच्या 92 व्या वर्षी सिंगापुरात घेतला अखेरचा श्वास*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *'बारावी फेल' सर्वोत्कृष्ट चित्रपट तर विक्रांत सर्वोत्कृष्ट अभिनेता ; क्रिटिक्स चॉईस पुरस्कार*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••स्टीफन हॉकिंग यांच्या 10 प्रेरणादायी विचारातुन दिवसाची मस्त सुरूवात करूया...स्टीफन हॉकिंग हे जगभरातील अभ्यासकांचे प्रेरणास्ञोत होते. हॉकिंग बोलणारे एक-एक वाक्य हे प्रेरणादायी विचार म्हणून नोंदवल गेल.1) गमती नसतील आयुष्य एक शोकांतिका ठरेल.2) जरी मी हालचाल करू शकत नसलो, मला बोलण्यासाठी काॅम्प्युटरची मदत घ्यावी लागत असली, तरीही मी माझ्या मनातुन मुक्त आहे. 3) नेहमी आकाशातील तार्यांकडे पहा, आपल्या पायाखाली पाहू नका. जे पाहाल त्याचा अर्थ समजण्याचा प्रयत्न करा, कुतूहल जागरूक ठेवा.4) आयुष्य कितीही कठीण असलं तरी, त्यावर तुम्ही मात करू शकताच तुम्ही यशस्वी व्हाल. 5) आपल्याला जे-जे करता येईल ते सर्व करायला हवं. माञ जे आपल्या हातात नाहीच त्याबाबत पश्चाताप करू नये.6) दिव्यांगांना माझा सल्ला आहे, तुम्ही त्या गोष्टीवर लक्ष द्या, ज्या करण्यापासून तुम्हाला तुमच अपंगत्व रोखू शकणार नाही, किंवा तुमचं अपंगत्व त्या आड येणार नाही. लक्षात ठेवा आत्मा आणि शरीर दोन्हीही अपंग होऊ देऊ नका. 7) आक्रमकता मनुष्याची सर्वात वाईट सवय आहे, आक्रमकता सभ्यतेचा नाश करते. 8) कधीही करू शकत नाही, अस काहीही नाही.9) जे आपल्या बुद्ध्यांकाबद्दल/IQ बद्दल दावा करतात, ते अयशस्वी असतात.10) ब्रम्हांडापेक्षा मोठं आणि जुन काहीच नाही..!!*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••प्रत्येक दिवशी काहीतरी नवीन शिकत रहा. काय माहित जीवनात कशाची गरज पडेल ?*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) थर्मामीटरमध्ये चमकणारा पदार्थ कोणता ?२) भारतात पहिल्यांदा मतदारांना ओळखपत्रावर छायाचित्र प्रायोगिक तत्त्वावर कोणत्या वर्षी छापण्यात आले ?३) वारकरी संप्रदायाचे दुसरे नाव काय ?४) केंद्र सरकारने नागरिकत्व सुधारणा कायदा CAA देशभरात लागू केलेल्या कायद्याला संसदेने कोणत्या वर्षी मंजुरी दिली होती ?५) आपल्या तोंडातील लाळेत किती टक्के क्षार असतात ? *उत्तरे :-* १) पारा २) मे १९६० ( कोलकाता दक्षिण पश्चिम मतदारसंघ पोटनिवडणूक ) ३) विठ्ठल संप्रदाय ४) सन २०१९ ५) एक ते दीड टक्के क्षार*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*   👤 डॉ. प्रा. सुरेश तेलंग, यशवंत महाविद्यालय, नांदेड👤 अनिल कांबळे, नांदेड👤 शिवराज भुसेवार, नांदेड👤 शिवम भंडारे, येवती👤 अनिलकुमार जैस्वाल, येताळा👤 कैलास राखेवार, नांदेड👤 साईनाथ बोधनपोड*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *अभंगवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••राजस सुकुमार मदनाचा पुतळा । रविशशिकळा लोपलिया ॥१॥कस्तुरीमळवट चंदनाची उटी । रुळे माळ कंठीं वैजयंती ॥ध्रु.॥मुगुट कुंडले श्रीमुख शोभलें । सुखाचें ओतलें सकळ ही ॥२॥कासे सोनसळा पांघरे पाटोळा । घननीळ सांवळा बाइयानो ॥३॥सकळ ही तुम्ही व्हा गे एकीसवा । तुका म्हणे जीवा धीर नाहीं ॥४॥।। संत तुकाराम महाराज ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मोठे कपडे धुताना जास्त वेळ लागत नाही त्यापेक्षा लहान असलेले कपडे धुवायला जरा जास्त वेळ लागत असतो. तरीही त्यांना आपण स्वच्छ धुण्याचा प्रयत्न करत असतो. तसंच आपल्यात सुद्धा काही क्षुद्र विचार असतील तर त्यांनाही धुवून काढण्याचा प्रयत्न करून बघावे. असे केल्याने आपले मनही स्वच्छ राहील व आपली वेळही वाया जाणार नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎯🏆 *मोटिव्हेशनल सदर* 🏆🎯 एका गावात एक ज्ञानी विद्वान पंडीत होते. देशातील अनेक हुशार व व्‍यासंगी पंडीतांमध्‍ये त्‍यांच्‍या ज्ञानाची चर्चा होत असे. शास्‍त्रार्थामध्‍ये हुशार असणारे हे पंडीत महाशय एके दिवशी आपल्‍या घराजवळ राहणा-या लहान मुलांसमवेत खेळत होते. हे पाहून तेथून जाणा-या एका सदगृहस्‍थाने त्‍यांना थांबवून विचारले,’’ अहो देशात ज्‍यांच्‍या ज्ञानाची चर्चा होते असे तुम्‍ही पंडीत असूनसुद्धा तुम्‍ही चक्क लहान काय खेळता आहात?’’ गृहस्‍थांचे हे बोलणे ऐकून पंडीतजींनी आपला खेळ बंद केला व गृहस्‍थांना घेऊन ते जवळच्‍याच एका घरात गेले. त्‍या घरात एका खुंटीला एक धनुष्‍य अडकविले होते. त्‍या धनुष्‍याकडे बोट दाखवून पंडीतजी म्‍हणाले, "महोदय, त्‍या धनुष्‍याच्‍या प्रत्‍यंचेची दोरी सध्‍या का सोडून ठेवली आहे, याचे कारण तुम्‍हाला माहित आहे काय? कामाव्‍यतिरिक्तच्‍या वेळेसही जर धनुष्‍याच्‍या कांबीची दोन्‍ही टोके जर वाकवून त्‍या दोरीला बांधून ठेवली तर काही दिवसांनी ती कांबी मोडेल आणि धनुष्‍याची दोरी खेचायची बंद होईल. परिणामी ते धनुष्‍य निकामी होईल. त्‍याचप्रमाणे अखंड लेखन, वाचन व चिंतन करत राहिल्‍याने बुद्धीवरही प्रचंड ताण येऊन लवकरच बुद्धि थकून ती काम देईनाशी होते. ती तशी होऊ नये म्‍हणून अधूनमधून मला लहान मुलांमध्‍ये माझे वय, हुद्दा, बुद्धी विसरून खेळावे लागते."गृहस्‍थांचे या उत्‍तराने समाधान झाले. *तात्‍पर्य :- बुद्धीवर येणा-या प्रचंड ताणापासून सुटका करून घेण्‍यासाठी थोडावेळ तरी आपल्‍या छंदाला किंवा परिवाराला वेळ द्यावा ज्‍याने आपल्‍या मेंदूला थोडी विश्रांती मिळेल व पुन्‍हा परिश्रम करण्‍यास मेंदू तयार होईल.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 15 मार्च 2024💠 वार - शुक्रवार~~~~~~~~~~~~~~~~~~~लेखाची Link - http://nasayeotikar.blogspot.com/2017/11/blog-post_22.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_जागतिक ग्राहक दिन_**_ या वर्षातील ७५ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *१९९०:सोविएत संघाने लिथुआनियाचे स्वातंत्र्य नाकारले.**१९८५:symbolics.com हे internet वरील पहिले डोमेन नेम नोंदले गेले.**१९६१:ब्रिटिश राष्ट्रकुलातून दक्षिण अफ्रिका बाहेर पडली.**१९५९:महिला गृहउद्योग संस्था (लिज्जत पापड) या संस्थेची मुंबईत गिरगाव येथे स्थापना**१९३९:दुसरे महायुद्ध – जर्मनीने झेकोस्लोव्हाकिया गिळंकृत केले.**१९१९:हैदराबादच्या उस्मानिया विद्यापीठाचे उद्‍घाटन**१९०६:रोल्स रॉईस (Rolls Royce) कंपनीची स्थापना झाली.**१८७७:इंग्लंड व ऑस्ट्रेलियात पहिला क्रिकेट कसोटी सामना सुरू झाला.**१८३१:मराठीतील पहिले छापील पंचांग विक्रीस उपलब्ध झाले.**१८२७:टोरांटो विद्यापीठाची स्थापना झाली**१८२०:मेन हे अमेरिकेचे २३ वे राज्य बनले**१५६४:मुघल सम्राट अकबर याने हिंदुंवरील जिझीया कर रद्द केला.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९४:विक्रम मालन अप्पासो शिंदे -- कवी, लेखक,संपादक* *१९९३:आलिया भट्ट -- भारतीय सिने-अभिनेत्री* *१९८३:धर्मवीर भूपाल पाटील -- कवी, पत्रकार* *१९८३:हनी सिंग-- गायक,गीतकार आणि अभिनेता**१९८२:ऋतुजा देशमुख-- अभिनेत्री* *१९८१:स्वाती गणेश पाटील -- कवयित्री* *१९८०:प्रा.डॉ सारीपुत्र तुपेरे-- प्रसिद्ध कवी,लेखक* *१९७९:डॉ.पोर्णिमा शिरिष कोल्हे-- लेखिका* *१९७९:प्रा.प्रज्ञा मनिष पंडित--लेखिका, कवयित्री,समुपदेशक**१९७८:बबलू विनायकराव कराळे -- कवी, कथाकार* *१९६५:डॉ.अंजुषा अनिल पाटील-- लेखिका* *१९६५:पोपटराव काळे-- प्रसिद्ध काजवाकार, निवृत्त शिक्षणाधिकारी* *१९६१:गोविंद हरीभाऊ सालपे -- कवी* *१९६०:दशरथपंत नारायणराव अतकरी-- कवी* *१९५४:ईला अरुण-- अभिनेत्री,टीव्ही व्यक्तिमत्त्व आणि राजस्थानी लोकसंगीत आणि लोकसंगीत-पॉप गायिका**१९५०:डॉ.अशोक चौसाळकर -- प्रसिद्ध लेखक,संपादक* *१९४४:पुंडलिक भाऊराव गवांदे-- प्रसिद्ध विज्ञान लेखक**१९३५:लक्ष्मण त्र्य.जोशी -- प्रसिद्ध ज्येष्ठ पत्रकार,लेखक* *१९३४:कांशीराम -- भारतीय राजकारणी बहुजन समाज पक्षाचे संस्थापक (मृत्यू:९ ऑक्टोबर२००६)**१९३४:गजमल माळी-- लेखक,कवी व नाटककार(मृत्यू:२८ फेब्रुवारी २०१७)**१९२३:मीरा देव बर्मन -- भारतीय वित्त गीतकार आणि संगीतकार(मृत्यू:१५ ऑक्टोबर २००७)**१९१५:त्र्यंबक गोविंद माईणकर--भाषातज्ज्ञ, लेखक(मृत्यू:१७ सप्टेंबर १९८१)**१९१५:ह.वि.पळणीटकर-- विदर्भातील एक नाटककार,कवी व लघुकथालेखक (मृत्यू:२८ जानेवारी १९९४)**१९०१:विजयपाल लालाराम तथा ’गुरू हनुमान’ – पद्मश्री आणि द्रोणाचार्य पुरस्कार विजेते कुस्ती प्रक्षिशक (मृत्यू:२४ मे १९९९)**१८६८:हरिश्चंद्र सखाराम भातावडेकर-- ज्यांना सेव्ह दादा म्हणूनही ओळखले जाते,ते भारतात चित्रपट बनवणारे पहिले भारतीय होते(मृत्यू:२० फेब्रुवारी १९५८)**१८६०:डॉ.वाल्डेमर हाफकिन – प्लेग व कॉलरा प्रतिबंधक लशीचा शोध लावणारे सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ (मृत्यू:२६ आक्टोबर १९३०)**१७६७:अँड्र्यू जॅक्सन – अमेरिकेचे ७ वे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू:८ जून १८४५)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२०:इम्तियाज खान-- भारतीय अभिनेता(जन्म:१५ ऑक्टोबर १९४२)**२०१९:श्रीधर उपाख्य अप्पासाहेब इंदूरकर-- संगीताच्या अभ्यासकांचे ज्येष्ठ मार्गदर्शक,जेष्ठ संगीततज्ञ (जन्म:२७ मार्च)* *२०१६:नीळकंठ पुरुषोत्तम जोशी-- आंतरराष्ट्रीय ख्यातीचे विद्वान आणि भारतीय मूर्तिशास्त्राचे गाढे अभ्यासक(जन्म:१६ एप्रिल १९२२)**२०१६:शंकर भाऊ साठे--कादंबरीकार आणि शाहीर( जन्म:१६ आक्टोबर १९२५)**२०१५:नारायणभाई महादेवभाई देसाई-- गांधी कथाकार (जन्म:१९२४)**२०१५:मधुकर अरकडे -- ज्येष्ठ कवी-गीतकार(जन्म:१५ एप्रिल १९५२)**२०१४:सुधीर मोघे -- मराठी कवी,गीतकार व संगीतकार (जन्म:८ फेब्रुवारी १९३९)**२०१३कल्लम अंजी रेड्डी_ फार्मास्युटिकल उद्योगातील एक भारतीय उद्योजक (जन्म:१ फेब्रुवारी १९३९)**१९९२:डॉ.राही मासूम रझा – हिन्दी व ऊर्दू कवी,गीतकार व शायर (जन्म:१९२५)**१९३७:व्यंकटेश बळवंत ऊर्फ बापूराव पेंढारकर – रंगभूमीवरील अभिनेते व गायक (जन्म:१० डिसेंबर १८९२)**१८६५:गोविंद नारायण माडगांवकर--- मराठी लेखक(जन्म:१८१५)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही._* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*स्मार्टफोनचा विळखा, वेळीच ओळखा*अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. पण कालांतराने या मूलभूत गरजामध्ये अजून कांही वस्तूची वाढ होत गेली त्यात प्रामुख्याने मोबाईलचा समावेश करणे अगत्याचे आहे. आज माणसाला एक वेळ अन्न, वस्त्र किंवा निवारा यांची कमतरता असेल तर चालून जाईल मात्र खिशात मोबाईल नसेल तर ती व्यक्ती जिवंत राहू .............. पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम स्वनिधी योजनेच्या एक लाख विक्रेत्यांना कर्ज वितरण*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *लोकसभा निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला असून ज्ञानेश कुमार आणि बलविंदर संधू या दोन अधिकाऱ्यांची निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *काँग्रेस पक्षाकडून शेतकऱ्यांना मोठी आश्वासनं; राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांना दिली MSPकायद्यासह ५ गॅरंटी*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते फुलंब्री इथं विविध विकास प्रकल्पांचं भूमिपूजन आणि लोकार्पण*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *पुण्यात शरद पवार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेला निलेश लंके उपस्थित*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्क इथं रेल्वे टर्मिनल सेवांच्या संचालन परीक्षणाचा प्रारंभ*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *मुंबईने रणजी चषक जिंकला, विदर्भावर मात, 42 व्या जेतेपदावर नाव कोरलं!*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 बिग बँग / महास्फोट📙 जॉर्ज एडवर्ड लेमेत्रे या बेल्जियन अॅस्ट्रोफिजिसिस्टकडे बिग बँग वा महास्फोटाची कल्पना मांडण्याचे पहिले श्रेय त्यांच्याकडे जाते. १८९४ साली जन्मलेल्या या शास्त्रज्ञांनी १९२७ मध्ये ही कल्पना मांडली. या कल्पनेबद्दल विविध विचार त्यांनंतर तब्बल १० वर्षे मांडले जात होते.'साऱ्या विश्वाची उत्पत्ती एका महास्फोटामध्ये अंदाजे वीस अब्ज वर्षांपूर्वी झाली असून सर्व विश्वात सध्या विखुरलेले मूलकण एका अंडाकृती आकारात होते. त्यांचा अचानक महाप्रचंड स्फोट झाला. या स्फोटामुळे एकत्र असलेले मूलकण विलक्षण वेगाने, विलक्षण तप्तावस्थेत चहूकडे भिरकावले गेले. जसजसा यानंतरचा काळ लोटत गेला, तसतसे हे मूलकण हळूहळू गार होत गेले. त्यातूनच प्रथम विविध तारकासमूह निर्माण होत गेले. आपली आकाशगंगा ही या अनेकांतील एक. त्यानंतर आजही विश्व पसरतच असून ही क्रिया अव्याहत चालू राहणार आहे. महास्फोटाची कल्पना थोडक्यात अशी मांडली गेली.ही कल्पना मांडली गेल्यानंतर त्यावर विविध मते मांडली जाणे ओघानेच आले. काहींना ही कल्पनाच पूर्णत: विसंगत वाटत होती, तर काहींच्या मते ठरावीक कालांतराने विश्व आकुंचन पावून पुन्हा एकदा महास्फोट होण्याची प्रक्रिया सतत चालू राहणार होती. याशिवाय विश्व हे उत्पत्तीनंतर पसरत नसून एका 'कायमस्थिती'त असल्याचीही एक उपपत्ती जोरदारपणे मांडली जात होती. निरीक्षणे व सिद्धांत या दोन्हींच्या आधारावर ही चर्चा तब्बल तीस वर्षे चालू होती.यानंतरच्या अवकाश निरीक्षण व रेडिओलहरींच्या ग्रहणानंतर विश्व अफाटपणे पसरत आहे, हे लक्षात येत आहे. डॉपलर इफेक्ट म्हणजे दृश्य प्रकाशाच्या वर्णपटातल्या रेषा लाल / निळ्या टोकाकडे सरकलेल्या दिसतात. याचाही पडताळा आता मिळत आहे. अनेक आकाशगंगा लालसर रंगाचा प्रकाशलहरींचे तरंग पाठवत असल्याने विश्व पसरतच आहे, याची खात्री पटत आहे.संपूर्ण विश्वात पसरलेल्या अणूंची एका घनमीटरमध्ये असलेली संख्या हाही एक अभ्यासाचा व निष्कर्षांचा भाग मानला गेला आहे. अलीकडेच झालेल्या एका निरीक्षणात ही घनता जेमतेम एक अणू एका घनमीटरमध्ये एवढीच आहे; पण याहून जास्त अदृश्य पदार्थ अस्तित्वात असावेत.महास्फोटानंतरच्या पहिल्या काही मिनिटांतच विश्वात पसरलेल्या मूलकणांतून हेलियमचे अणू निर्माण झाले होते, हे गणित प्रथम १९४६ साली जॉर्ज गॅमी यांनी मांडले. आज विश्वात व आपल्या आकाशगंगेतील ग्रहांभोवती असलेल्या हेलियमचे प्रमाण २३ टक्के व अन्य मुलकणांचे ७७ टक्के (यात बव्हंशी हायड्रोजन) आढळते. यावरूनही महास्फोटाची कल्पना ग्राह्य मानावी लागते.महास्फोटानंतरच्या क्षणात प्रचंड प्रमाणात (रेडिएशन) होते व त्याचे तापमान अब्जाहून जास्त होते. प्रसरणामुळे थंडावत जाऊन आज त्याची ऊर्जा कमी झाली व तापमानही पुष्कळ कमी झाले असणारच, असा तर्क राल्फ अाल्फर व रॉबर्ट हर्मन या गॅमाँच्या सहकाऱ्यांनी १९४८ मध्ये मांडला होता. त्याची पुष्टी १९६५ मध्ये आर्नो पेंझियस व रॉबर्ट विल्सन या शास्त्रज्ञांना सापडलेल्या सूक्ष्म तरंगांच्या पार्श्वभूमीतून झाली, असा महास्फोट सिद्धांताच्या समर्थकांचा दावा आहे. या तरंगांचे तापमान शून्याखाली २७० अंश सेंटीग्रेड इतके कमी आहे.'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••खूप मोठा अडथळा आला की समजावं आपण विजयाच्या जवळ आलो.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) सर्वप्रथम ओळखपत्रावर मतदारांचे छायाचित्र छापण्याचा प्रस्ताव कोणत्या साली पुढे आला ?२) सरकारी दस्तऐवजामध्ये वडीलाच्या आधी आईचे नाव लावण्याचा निर्णय कोणत्या राज्य सरकारने घेतला आहे ?३) DRDO ने स्वदेशी बनावटीच्या कोणत्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे ?४) पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे कोणते नाव ठेवण्यास मंत्रिमंडळाची मान्यता देण्यात आली ?५) ९६ व्या ऑस्कर पुरस्कार २०२४ मध्ये 'ओपेनहायमर' या सर्वोत्कृष्ट चित्रपटाला एकूण किती पुरस्कार मिळाले आहेत ?*उत्तरे :-* १) सन १९५८ २) महाराष्ट्र ३) अग्नि ५ ४) राजगड ५) सात*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 विलास फुटाणे, प्रकाशक, औरंगाबाद👤 राजेंद्र महाजन, सहशिक्षक, औरंगाबाद👤 गणेश गिरी, सामाजिक कार्यकर्ते, धर्माबाद👤 बालाजी मामीलवाड👤 लक्ष्मीकांत धुप्पे👤 अंबादास पवार👤 लक्ष्मण चिंतावार, धर्माबाद👤 शुभम सांगळे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *अभंगवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती । रखुमाईच्या पती सोयरिया ॥१॥गोड तुझें रूप गोड तुझें नाम । देईं मज प्रेम सर्व काळ ॥ध्रु.॥विठो माउलिये हा चि वर देईं । संचरोनि राहीं हृदयामाजी ॥२॥तुका म्हणे कांहीं न मागे आणीक । तुझे पायीं सुख सर्व आहे ॥३॥।। संत तुकाराम महाराज ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपल्यात असलेल्या कलागुणांनामुळे उशीरा का होईना आपली ओळख होत असेल तर चांगली गोष्ट आहे. पण,त्याच कलेचा दुरूपयोग करून नको ती वाट निवडल्याने मात्र त्या असणाऱ्या कलेचा कुठेतरी अपमान होत असतो. त्याविषयी सहसा आपल्याला कळत नाही. म्हणून असं होण्याआधीच त्या सर्वांना आधी वाचणे गरजेचे आहे. अशी व्यर्थ चूक आपल्या हातून होणार नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एकदा सून आणि मुलगा बेडरूम मध्ये बोलत असताना आईच लक्ष जातं, मुलगा - "आपल्या job मुळेआईकडे लक्ष देता नाही येणार गं,तिचं आजारपण आणि देखभालकोण करेल......?" त्यामुळे आपण वृद्धाश्रमात ठेवलं तर तिच्याकडे लक्ष सुद्धा देतील ते "त्यावर त्याच्या बायकोचे उत्तर ऎकून आईच्या डोळ्यात पाणी आले.........सून - "पैसे कमवण्यासाठी पूर्ण जन्म बाकी आहे ऒ, पण आईंची माया किती कमवली तरी कमी आहे, त्यांना पैश्यापेक्षा आपल्यासहवासाची गरज आहे, मी जर job नाही केला तरी जास्त नुकसान होणार नाही.मी आईंजवळ थांबेन. घरी tution घेईन, त्यामुळे आईं जवळही राहता येईल. विचार करा लहानपणी बाबा नसूनही घरकाम करून तुम्हाला आईने वाढवलंय. त्यांनी तेंह्वा कधी शेजारच्या बाईकडे सुद्धा तुम्हाला ठेवल नाही, कारण तुमच्याकडे व्यवस्थित लक्ष देणार नाहीत म्हणून, आणि तूम्ही आज हे असंबोलताय...? तूम्ही कितीही म्हणा पण आई आपल्या जवळच राहतील, अगदी शेवटपर्यंत " सुनेने दिलेल्या उत्तरामुळे आई खूप रडते आणि बाहेरच्या खोलीत येउन देवा जवळ उभी राहते . . .आई देवाऱ्यापुढे उभी राहून त्याचे आभार मानते आणि म्हणते," देवा मला मुलगी नव्हती म्हणूनखूप भांडली रे मी तुझ्याशी, पण ही भाग्यलक्ष्मी दिल्याबद्दल तुझे आभार कसे मानू मी.....?" खरच देवा सार्थक केलस माझ आयुष्य अशी सुन देऊन.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 14 मार्च 2024💠 वार - गुरुवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/9cWGZ4rVLAhzgEBu/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_ या वर्षातील ७४ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२०१०:ज्येष्ठ कन्नड साहित्यिक डॉ.एस.एल. भैरप्पा यांच्या हस्ते 'लोकसंस्कृती'चे उपासक आणि संशोधक डॉ.रा.चिं.ढेरे यांना 'पुण्यभूषण पुरस्कार' पुण्यात देण्यात आला.**२००१:चोकिला अय्यर यांनी भारताच्या पहिल्या महिला परराष्ट्रसचिव म्हणून सूत्रे हाती घेतली**२००१:व्ही.व्ही.एस. लक्ष्मणने ईडन गार्डन या मैदानावरील सर्वोच्‍च धावांचा सुनील गावसकरचा विक्रम मोडला. तसेच एका डावात ४४ चौकार मारण्याच्या डॉन ब्रॅडमन यांच्या विक्रमाची बरोबरी केली.**२०००:कलकत्ता येथील ’टेक्‍निशियन आय’ हा देशातील सर्वात जुना स्टुडिओ आगीच्या भक्ष्यस्थानी पडला.**१९९५:महाराष्ट्राचे १२ वे मुख्यमंत्री म्हणून भाजपा सेना युतीचे मनोहर जोशी यांचा शपथविधी**१९९०:आकाश या क्षेपणास्त्राचे यशस्वी प्रक्षेपण* *१९५४:दिल्ली येथे साहित्य अकादमीची स्थापना झाली.**१९३१:’आलम आरा’ हा पहिला भारतीय बोलपट मुंबईतील नॉव्हेल्टी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९७४:रोहित शेट्टी-- यशस्वी भारतीय चित्रपट दिग्दर्शक* *१९७२:प्रा.डॉ.संगिता गणपतराव घुगे-- लेखिका**१९६५:आमिर खान _ भारतीय प्रसिद्ध अभिनेता,निर्माता व दिग्दर्शक**१९६३:पंडित रघुनंदन पणशीकर-- जयपूर घराण्याचे शास्त्रीय गायक* *१९५८:संध्या रमेश पुजारी -- कवयित्री* *१९५४:पांडुरंग डोमाजी कांबळे -- लेखक,कवी* *१९५३:अरुण कृष्णाजी कांबळे-- मराठी साहित्यातील चिकित्सक लेखक-संशोधक व साहित्याचे गाढे अभ्यासक(मृत्यू:२० डिसेंबर २००९)**१९५१:सुनील चिंचोळकर --समर्थ रामदास स्वामी यांचे विचार लेखणी आणि प्रवचनांद्वारे जनमानसांपर्यंत पोहोचवणारे(मृत्यू:२२ एप्रिल २०१८)**१९४८:प्रा.अरुणकुमार भागवत पाटील-- कवी,लेखक* *१९४६:माधव मुरलीधर देशपांडे--संस्कृत व प्राकृत भाषातज्ज्ञ**१९४२:अरुण निगवेकर-- भौतिकशास्त्रज्ञ, शिक्षणतज्ज्ञ,पुणे विद्यापीठाचे कुलगुरू,विद्यापीठ अनुदान आयोगाचे (UGC) अध्यक्ष(मृत्यू:२३ एप्रिल २०२१)**१९४०:चंद्रशेखर अर्जुन टिळेकर-- लेखक**१९३६:प्रभाकर गोविंद विद्यासागर-- लेखक* *१९३४:मीना सुधाकर देशपांडे-- आचार्य प्र.के.अत्रे यांच्या कन्या.प्रसिद्ध लेखिका(मृत्यू:६ सप्टेंबर २०२०)**१९३१:प्रभाकर पणशीकर –मराठी रंगभूमीवरील प्रसिद्ध अभिनेते,दिग्दर्शक आणि नाट्यनिर्माते (मृत्यू:१३ जानेवारी २०११)**१९१५: रामचंद्र शेवडे-- बालसाहित्यिक (मृत्यू:२ डिसेंबर २००१)**१९१३:श्रीनाथ त्रिपाठी-- भारतीय संगीतकार(मृत्यू:२८ मार्च१९८८)**१९०८:गणपत खंडेराव पवार -- कादंबरीकार,पत्रकार* *१८७९:अल्बर्ट आइनस्टाईन – नोबेल पारितोषिक विजेते जर्मन-अमेरिकन भौतिकशात्रज्ञ (मृत्यू:१८ एप्रिल १९५५)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१८:स्टीफन विल्यम हॉकिंग-- सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ आणि विश्वशास्त्रज्ञ(जन्म:८ जानेवारी १९४२)**२०१०:गोविंद विनायक तथा 'विंदा' करंदीकर – सुप्रसिद्ध लेखक,कवी,लघुनिबंधकार व टीकाकार.देशाच्या साहित्य क्षेत्रातला सर्वोच्‍च प्रतिष्ठेचा एकोणचाळिसावा ज्ञानपीठ पुरस्कार त्यांना ’अष्टदर्शने’ या साहित्यकृतीसाठी प्रदान करण्यात आला.(जन्म:२३ ऑगस्ट १९१८)**२००३:सुरेश भट-- सुप्रसिद्ध कवी,गझल सम्राट' (जन्म:१५ एप्रिल १९३२)**१९९८:दादा कोंडके – प्रसिद्ध अभिनेते,निर्माते,दिग्दर्शक,संवादलेखक (जन्म:८ ऑगस्ट १९३२)**१९९६:इंदुमती रामकृष्ण शेवडे--कथाकार, कादंबरीकार,प्रवासवर्णनकार,संशोधक, समीक्षक(जन्म:१६ ऑक्टोबर १९१७)**१९३२:जॉर्ज इस्टमन – अमेरिकन संशोधक व इस्टमन कोडॅक कंपनीचे संस्थापक (जन्म:१२ जुलै १८५४)**१८८३:कार्ल मार्क्स – जर्मन तत्त्वज्ञ व कम्युनिझमचे प्रणेते (जन्म:५ मे १८१८)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही._* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*जीवन गाणे - आनंदी तराणे*चित्रपटातील गाणे असो वा इतर कोणतेही गाणे कुणाला आवडत नाहीत. लहानापासून थोरांपर्यंत सर्वांनाच गाणे खूप आवडतात. मुळात मनुष्य लहानाचा मोठा होता ते गाणे ऐकतच. गाण्याचा आणि माणसाच्या आयुष्याचा फार जवळचा संबंध आहे. बाळाला छान झोप लागावी म्हणून आई छानशी अंगाई गीत गात असते जसे की निंबोनीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई ........... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *भाजपची दुसरी यादी जाहीर:महाराष्ट्रातील 20 उमेदवारांच्या नावांचा समावेश; बीडमधून पंकजा मुंडे, नागपूरमधून गडकरी तर नांदेडमधून चिखलीकर*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *अहमदनगर शहराचे तसेच जिल्ह्याचे नामकरण अहिल्यानगर करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *भारतरत्न लता मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाचे भूमीपूजन : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ऑनलाईन उपस्थिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *येवल्यातील शेतकऱ्यांना दिलासा, 63 हजार शेतकऱ्यांना 63 कोटींची दुष्काळी मदत*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुंबईत १८७ इंटरसेप्टरचे लोकार्पण*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधींची सभा नागपूरमध्ये येत्या 15 ते 17 मार्च दरम्यान होणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *हरमित सिंग ठरला 'महाराष्ट्र श्री' शरीरसौष्ठव स्पर्धेचा मानकरी तर उमेश गुप्ता ठरला उपविजेता*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••☀ *उष्माघात म्हणजे काय ?* ☀ भारतामध्ये काही भागात तापमान ४९ सेल्सियस इतके जास्त असू शकते. उन्हाळ्यामध्ये दरवर्षी अनेक लोक उष्माघाताने वा या उच्च तापमानामुळे मरण पावतात. राजस्थान, ओरिसा तसेच महाराष्ट्रात विदर्भ, मराठवाड्यातही उष्माघाताने मृत्यू होतात. उष्माघात याचा सोपा अर्थ उष्णतेचा आघात वा त्रास असा होतो. यात खूप ताप येणे, घाम न येणे, चक्कर येणे, लघवी न होणे, बेशुद्धी येणे अशी लक्षणे दिसून येतात. प्रसंगी मृत्यूही होतो. अति उष्णतेने शरीरातील प्रथिनांवर दुष्परिणाम होतात व पेशीमधील जीवनप्रक्रिया थांबते. शरीरातील सर्व पेशींमध्ये असेच होते व बहुतेक वेळा मेंदू सूज होऊन व्यक्ती मरते. आधी रुग्णास चक्कर येते, झटके येतात व दम लागतो. कधी कधी हृदयविकाराचा झटकाही येतो.उष्माघातावर तात्काळ उपचार करणे आवश्यक ठरते. रुग्णाला सावलीत नेऊन त्याच्या अंगावर ओली चादर टाकावी व त्याला वारा घालावा. थंडगार पाण्यात त्याला उभे केले तर फारच चांगले. रक्ताभिसरण सुधारण्यासाठी त्याचे हातपाय चोळावेत. त्याला क्षार व पाणी द्यावे. (लिंबू सरबत वैगरे पदार्थ) असे उपचार लवकर सुरू झाल्यास व्यक्ती बचावते. अन्यथा मृत्यू येण्याची शक्यता खूप जास्त असते. उष्माघात टाळण्यासाठी उन्हात जास्त वेळ फिरू नये, फिरायचे असल्यास डोक्यावर टोपी घालावी व पांढरे फडके बांधावे, थंडगार पाणी वारंवार प्यावे, वारंवार तोंड गार पाण्याने धुवावे. असे केल्याने उष्माघाताची शक्यता कमी करता येईल.*डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित* यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातूनमनोविकास प्रकाशन 👆*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*चांगल्या माणसांना चांगल्या गोष्टी नेहमी उशिरा मिळतात... फक्त आपल्यात सहनशीलता पाहिजे.**संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पहिल्या नॅशनल क्रिएटर अवॉर्डमध्ये *'कल्चरल अम्बेसिडर ऑफ दि अवॉर्ड'* कोणाला मिळाला आहे ?२) ऑस्कर २०२४ च्या पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला आहे ?३) मोबाईल उत्पादनाच्या बाबतीत जगात भारत देश कितव्या क्रमांकावर आला आहे ?४) सूर्यमालेतील कोणत्या ग्रहाला उपग्रह नाहीत ?५) तापी नदीचा उगमस्थान कोणत्या ठिकाणी आहे ? *उत्तरे :-* १) मैथिली ठाकूर २) ओपेनहायमर ३) दुसऱ्या ४) बुध व शुक्र ५) मुलताई, बैतूल जिल्हा*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 संजय भोसले, नांदेड👤 डॉ. प्रशांत मुदकोंडवार, नांदेड👤 किरण सोनटक्के👤 उत्तम सोनकांबळे👤 पार्थ पवार*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *अभंगवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सुंदर तें ध्यान उभे विटेवरी । कर कटावरी ठेवूनियां ॥१॥तुळसीचे हार गळां कासे पीतांबर । आवडे निरंतर तें चि रूप ॥ध्रु.॥मकरकुंडलें तळपती श्रवणीं । कंठीं कौस्तुभमणि विराजित ॥२॥तुका म्हणे माझें हें चि सर्व सुख । पाहीन श्रीमुख आवडीनें ॥३॥।। संत तुकाराम महाराज ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जी व्यक्ती परिस्थितीवर मात करून हिंमतीने जगत असते तिला कशाचीही भीती वाटत नाही व कोणासमोरही न घाबरता परखडपणे बोलण्याचा प्रयत्न करत असते. कारण त्या परिस्थितीत असताना सुद्धा तिला जे, अनुभव आलेले असतात तेच अनुभव आधार बनून मार्गदर्शन करत असतात म्हणूनच म्हणतात ना की, अनुभव हा सर्वात मोठा गुरु असतो. आपणही त्या गुरूचे सदैव स्मरण करावे व पुन्हा एकदा नव्याने जगण्याचा प्रयत्न करावे कारण जीवन हे अनमोल आहे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *निश्चय*एका राजाजवळ एक हत्ती होता. तो त्याला अत्यंत प्रिय होता. तो हत्ती स्वामीभक्त असण्याबरोबरच चांगला योद्धा होता. जेंव्हा केंव्हा राजाने त्याच्यावर बसून युद्ध केले तेंव्हा राजा त्यात विजयी झाला. काही काळ लोटल्यानंतर हत्ती वृद्ध होत चालला त्यामुळे राजाने त्याला युद्धात घेवून जाणे बंद केले. मात्र राजाचे त्या हत्तीवरचे प्रेम काही कमी झाले नाही. एके दिवशी तो हत्ती सरोवरामध्ये पाणी पीत होता. सरोवरामध्ये पाणी कमी होते त्यामुळे हत्ती पुढेपुढे गेला आणि दलदलीत फसला.वृद्धावस्थेमुळे हत्तीला दलदलीतून निघणे शक्य नव्हते, त्यामुळे तो जोरजोरात ओरडू लागला. त्याचा आवाज ऐकून माहूत त्याच्याकडे धावत आले, परंतु सरोवरातून त्याला बाहेर काढणे कुणालाही जमेना. तेंव्हा त्यांनी त्याच्या शरीराला भाले टोचायला सुरुवात केली. कारण भाल्याच्या टोचण्याने तो सर्व शक्तीनिशी प्रयत्न करेल आणि बाहेर येईल, पण हत्ती बाहेर येऊ शकला नाही. भाल्याच्या टोचण्याने हत्तीच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. राजापर्यंत हि वार्ता गेली. त्याने तत्काळ त्या हत्तीच्या जुन्या आणि अनुभवी माहुताला बोलावणे पाठविले. माहूत आला, राजा शेजारीच उभा होता.त्याने राजाला असा सल्ला दिला, ”महाराज! तत्काळ युद्धाचे नगारे वाजवा, सैन्य या सरोवराभोवती गोळा करा, आक्रमणाच्या घोषणा सैनिकांना द्यायला सांगा.” राजाने त्याचे म्हणणे ऐकले आणि युद्धाचे नगारे वाजविण्याचा हुकुम दिला. मग काय म्हणता, नगारे वाजू लागले, सैनिकांच्या रांगा शिस्तबद्धपणे लागल्या, आक्रमणाच्या घोषणा ऐकू येवू लागल्या. त्याबरोबर हत्तीच्या अंगात वीरश्री संचारली आणि तो त्या दलदलीतून बाहेर पडला. त्याचे मनोबल हे युद्धासाठी तयार झाले होते. राजाने जुन्या माहुताचे आभार मानले आणि बक्षीस दिले.नशीब जर काही ‘अप्रतिम’ देणार असेल तर त्याची सुरुवात ‘अशक्य’ गोष्टीने होते….!🚀•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 13 मार्च 2024💠 वार - बुधवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/ng6uEjq2Rr24Kx52/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_ या वर्षातील ७३ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२००७:वेस्ट इंडीजमधे ९ व्या क्रिकेट विश्वकरंडक क्रिकेटस्पर्धेचे उद्‍घाटन झाले.**१९९९:जलाशयाच्या तळाला भोक पाडून त्यातील पाणी बोगद्याच्या साह्याने भूमिगत जलविद्युतगृअहात नेऊन त्याद्वारे वीजनिर्मिती करणार्‍या (Lake Tapping) आशिया खंडातील पहिल्या प्रयोगाच्या कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या चौथ्या टप्प्याचे उद्‌घाटन**१९९७:मदर तेरेसा यांचे वारस म्हणून कोलकात्यातील ’मिशनरीज ऑफ चॅरिटीज’ ने सिस्टर निर्मला यांची नियुक्ती केली.**१९६३:असामान्य क्रीडा नैपुण्यासाठी अर्जुन अवार्ड देणे सुरू* *१९४०:अमृतसर येथील जालियनवाला बाग हत्याकांडाचे समर्थन करणारे पंजाबचे गव्हर्नर मायकेल ओडवायर यांची उधमसिंग यांनी गोळया घालून हत्या केली.**१९३०:क्लाईड डब्ल्यू. टॉमबॉग या शास्त्रज्ञाने प्लूटो ग्रह शोधल्याचे हारवर्ड कॉलेज येथील वेधशाळेला कळवले. मात्र या ग्रहाचा शोध त्याला १८ फेब्रुवारी १९३० या दिवशीच लागला होता.**१९१०:पॅरिसहुन लंडनला येताच स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अटक झाली.**१७८१:विल्यम हर्षेल याने युरेनसचा शोध लावला.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९७८:अनुषा रिझवी-- चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथा लेखक**१९७४:नितीन राजेंद्र देशमुख-- प्रसिद्ध कवी, गझलकार,लेखक**१९६८:श्रीकांत पांडुरंग चौगुले-- प्रसिद्ध लेखक**१९५८:अश्विनी अनिल कुलकर्णी-- लेखिका* *१९५७:ऋतुजा चैतन्य माने -- कवयित्री, लेखिका* *१९५६:लोकनाथ यशवंत-- मराठी भाषेतील आंबेडकरवादी विचारांची प्रेरणा असलेले कवी, व दलित विश्वाचा नवा पैलू प्रकट करणारे मराठीतले लेखक**१९५१:यशोधरा पोतदार-साठे-- मराठी कवयित्री* *१९४६:जनार्दन कृष्णाजी पाटील (मगर)-- लेखक,समाजकार्य**१९४६:शकुंतला गंगाधर सोनार -- कवयित्री, लेखिका* *१९४६:अभिलाष-- सुप्रसिद्ध गीतकार 'इतनी शक्ति हमें देना दाता' (मृत्यू:२७ सप्टेंबर २०२०)**१९४६:श्रीराम विनायक साठे--ज्येष्ठ इतिहास अभ्यासक आणि लेखक(मृत्यू:२५ सप्टेंबर २०२३)**१९४३:प्रा.वामन सुदामा निंबाळकर--कवी विचारवंत व लेखक (मृत्यू:३ डिसेंबर २०१०)**१९४०:प्रा.डॉ.हेमा साने -- लेखिका* *१९३६:डॉ.वनमाला पानसे -- कवयित्री, लेखिका* *१९३३:सुलोचना चव्हाण --- मराठी गायिका, लेखिका (मृत्यू:१० डिसेंबर २०२२)**१९२६:रविन्द्र पिंगे –ललित लेखक (मृत्यू:१७ आक्टोबर २००८)**१९२६:लीला भालचंद्र गोळे-- संतांवर परिचयात्मक पुस्तके लिहिणाऱ्या मराठी लेखिका**१९०१:केशव बाबूराव लेले -- मूर्तिकार,हलत्या चित्रांचे प्रदर्शनकार व कलाप्रसार.(मृत्यू:५ जानेवारी १९४५)**१८९३:डॉ.वासुदेव विष्णू मिराशी – महामहोपाध्याय,संस्कृत विद्वान,आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भारतीय प्राच्यविद्यासंशोधक (मृत्यू:३ एप्रिल १९८५)**१८८१:दत्तात्रय विष्णू आपटे--इतिहास संशोधक,संपादक(मृत्यू:२७ ऑक्टोबर १९४३)**१७३३:जोसेफ प्रिस्टले – इंग्लिश रसायनशास्रज्ञ (मृत्यू:६ फेब्रुवारी १८०४)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१७:प्रा.मालतीबाई किर्लोस्कर-- प्रसिद्ध लेखिका (जन्म:१९२३)**२००४:उस्ताद विलायत खाँ – सतारवादक (जन्म:२८ ऑगस्ट १९२८)**१९९६:शफी इनामदार –अभिनेते व नाट्यनिर्माते (जन्म:२३ आक्टोबर १९४५)**१९९३:डॉ.मधुकर(मधू) शंकर आपटे--ज्येष्ठ रंगकर्मी व चित्रपट अभिनेते (जन्म:१ मार्च १९१९)**१९९४:श्रीपाद यशवंत कोल्हटकर – मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते व 'सिटू' या कामगार संघटनेचे लढवय्ये नेते**१९६७:सर फँक वॉरेल – वेस्ट इंडिजचे क्रिकेट खेळाडू (जन्म:१ऑगस्ट १९२४)**१९५९:गंगाधर भाऊराव निरंतर-- कादंबरीकार,ललित लेखक(जन्म:१५ जून १९०६)**१९५५:वीर विक्रम शाह ’त्रिभुवन’ – नेपाळचे राजे (जन्म:२३ जून १९०६)**१९०१:बेंजामिन हॅरिसन – अमेरिकेचे ३३वे राष्ट्राध्यक्ष (जन्म:२० ऑगस्ट १८३३)**१८९९:दत्तात्रेय कोंडो घाटे ऊर्फ ’कवी दत्त’--अर्वाचीन मराठी कवी(जन्म:२७ जून १८७५)**१८००:बाळाजी जनार्दन भानू उर्फ 'नाना फडणवीस' (जन्म:१२ फेब्रुवारी १७४२)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही._* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••* जिल्हा परिषद शाळा कात टाकतंय ...... *जिल्‍हा परिषदेच्‍या सरकारी शाळा म्‍हटले की, प्रत्‍येकांच्‍या डोळ्यासमोर एक वेगळेच चित्र उभे राहते. ज्‍या चित्रात त्‍या शाळाची, तेथील परिसराची, शिक्षकांची आणि विद्यार्थ्‍याच्या बाबतीतचे चित्रण भयानक दिसून येते. या शाळांची स्थिती कधीच सुधारणार नाही, अशी धारणा प्रत्‍येकाची बनलेली आहे. या शाळांत फक्त गरिबांची मुलेच शिकतात म्‍हणून यास गरिबांची शाळा असे सुध्‍दा संबोधले जाते............ ..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *पंढरपुरातील विठ्ठलाचं चरणस्पर्श दर्शन दीड महिन्यांसाठी बंद, गाभाऱ्याच्या कामासाठी विठुरायाची मूर्ती अनब्रेकेबल पेटीत ठेवणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *महाराष्ट्रातील पहिल्याच सभेत राहुल गांधींची गर्जना, सत्तेत आल्यास जातीय जनगणनेची हमी*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांचा राजीनामा, भाजप-जननायक जनता पार्टी युती तुटली, भाजपचे नायब सिंग सैनी यांची नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *दिल्लीत शिंदेंची मोठी डील; मुंबईत 6 पैकी 5 जागा भाजपच्या पारड्यात पडल्याची चर्चा, सेनेचे ज्येष्ठ नेते गजानन कीर्तीकरांचा पत्ता कट होण्याची चिन्हं*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *वसंत मोरे यांचा राजीनामा, मनसेच्या फायरब्रँड नेत्याचा राज ठाकरेंना जय महाराष्ट्र!*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *करीरोडचं नाव लालबाग, सॅण्डहर्स्ट रोडचं डोंगरी, कॉटन ग्रीनचं काळाचौकी; मुंबईतील 8 रेल्वे स्थानकांची नावे बदलणार ?*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *रणजी फायनलवर मुंबईची पकड घट्ट, मुशीरचं शतक, रहाणे-अय्यरची अर्धशतकं, विदर्भापुढे 538 धावांचे आव्हान*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••☀ *उन्हात काम करणारा माणूस का काळवंडतो ?* ☀उन्हात काम करणारा माणूस, तसेच भारतासारख्या उष्ण कटिबंधातील व्यक्ती सामान्यतः सावळी वा काळी असते. मेलॅनिन नावाचे रंगद्रव्य आपल्या त्वचेत असते आणि ते व्यक्तीस सावळा, काळा, गोरा इत्यादी रंग देते. या रंगद्रव्याचे प्रमाण कमी असल्यास व्यक्ती गोरी असते. हे प्रमाण अधिक असल्यास व्यक्ती सावळी वा काळी होते. सूर्यप्रकाशातील अतिनील किरणे ही त्वचेस हानिकारक असतात. त्यामुळे या किरणांपासून संरक्षण त्वचेतील रंगद्रव्य करत असते.उन्हात काम करणाऱ्या व्यक्तीच्या त्वचेचे अतिनील किरणांपासून संरक्षण करण्यासाठी मेलॅनिन हे रंगद्रव्य वाढावयास लागते. वाढलेल्या या मेलॅनिनमुळे ती व्यक्ती पूर्वीपेक्षा काळवंडलेली दिसते आणि उन्हात वावरणे कमी झाल्यावर रंग पूर्ववत होतो.युरोप, ऑस्ट्रेलियासारख्या शीत कटिबंधातील व्यक्तींमध्ये मेलॅनिन रंगद्रव्य अत्यल्प प्रमाणात असल्याने त्यांच्यामध्ये त्वचेच्या कर्करोगाचे प्रमाण जास्त असते. अतिनील किरणांचा प्रभाव टाळण्यासाठी म्हणूनच क्रिकेटपटू उन्हात खेळताना चेहऱ्याला संरक्षक मलम लावतात. भारत, श्रीलंका अशा उष्ण कटिबंधातील देशांमध्ये खेळायला येणारे गोरे खेळाडू अशी मलमे लावून (तोंडावर रंगरंगोटी करून !) खेळताना तुम्ही दूरदर्शनवर नक्कीच बघितले असेल.*डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित* यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातूनमनोविकास प्रकाशन👆*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••प्रत्येक प्रश्नाचे सर्वात चांगले उत्तरम्हणजे शांत राहणे.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *"मेरा जीवन ही मेरा संदेश है"* असे कोणी म्हटले होते ?२) गावाच्या नोंदीचे उतारे कोण देतो ?३) भारताचे दुसरे लोकपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?४) वाऱ्यामध्ये कोणत्या प्रकारची ऊर्जा असते ?५) पद्मनाभ स्वामी मंदिर कोणत्या राज्यात आहे ? *उत्तरे :-* १) महात्मा गांधी २) तलाठी ३) अजय खानविलकर ४) गतिज ऊर्जा ५) केरळ*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 भगवान कांबळे, नांदेडभूषण पत्रकार👤 डॉ. बालाजी खानापुरे, नांदेड👤 शेख रुस्तम, जि. प. नांदेड👤 सुरेश बोईनवाड👤 कामाजी धुतुरे👤 लक्ष्मण वडजे👤 साईनाथ बोमले*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *अभंगवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••दुकजियाला भ्रांति भाविकाला शांति । साधुची ती वृत्‍ती लिन झाली ॥१॥लीन झाली वृत्‍ती ब्रह्माते मिळाले । जळांत आटले लवण जैसे ॥२॥लवण जैसे पुन्‍हा जळाचे बाहेरी । येत नाही खरे त्‍यातुनिया ॥३॥त्‍या सारिखे तुम्‍ही जाणा साधुवृत्‍ती । पुन्‍हा न मिळती मायाजाळी ॥४॥मायाजाळ त्‍यांना पुन्‍हा रे बाधेना । सत्‍य सत्‍य जाणा तुका म्हणे ॥५॥।। संत तुकाराम महाराज ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मी म्हणजेच सर्वकाही, मला सर्व येते, मला सर्वच काही जमते, माझ्याकडे कशाचीही कमी नाही, मी कोणाच्यामागे धावणार नाही, मी सर्वात श्रेष्ठ व गुणवान आहे, हा अहंभाव जेव्हा, आपल्या अंगी शिरते त्यावेळी आपल्या अंतर्मनाला विचारून बघावे. नक्कीच या सर्व प्रश्नांची उत्तरे आपोआप, आपल्याला मिळतील. कुठेही शोधाशोध करण्यासाठी जावे लागणार नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *शिंपले* एक 6 वर्षाचा मुलगा आपल्या 4 वर्षाच्या लहान बहिणीसोबत बाजारातून जात असतो. अचानक त्याला जाणवते की त्याची बहीण मागे राहिली आहे. तो थांबतो व मागे वळून पाहतो तर त्याला दिसते की, त्याची बहीण एका खेळण्याच्या दुकानासमोर उभी राहून अतिशय कुतूहलाने काहीतरी पहात आहे. तो मुलगा मागे जातो व तिला विचारतो, "तुला काही हवे आहे का?" ती एका बाहुलीकडे बोट दाखविते. तो मुलगा तिचा हात धरतो व एका जबाबदार मोठ्या भावा प्रमाणे तिला ती बाहुली देतो. ती बहीण अत्यानंदीत होते. हे सर्व तो दुकानदार पहात असतो व त्या मुलाचे प्रगल्भ वागणे पाहून आश्चर्यचकित होतो.इतक्यात तो मुलगा काउंटर कडे येतो व त्या दुकानदाराला विचारतो "काका, किती किंमत आहे या बाहुलीची?" दुकानदार एक शांत माणूस असतो व त्याने जीवनाचे अनेक चढ उतार पाहिलेले असतात. तो त्या मुलाला प्रेमाने व आपुलकीने विचारतो "बोल तू काय देशील?" मुलगा आपल्या खिशातील सर्व शिंपले,जे त्याने व त्याच्या बहिणीने नुकतेच समुद्रकिनाऱ्यावर गोळा केलेले असतात ते बाहेर काढतो व दुकानदाराला देतो. दुकानदार ते घेतो व जणूकाही पैसे मोजत आहे या अविर्भावात मोजायला सुरु करतो. शिंपले मोजून झाल्यावर त्या मुलाकडे पाहताच मुलगा म्हणतो " कमी आहेत का ?" दुकानदार म्हणतो " नाही नाही, हे बाहुलीच्या किमतीपेक्षा जास्त आहेत. ज्यादाचे मी परत करतो. असे म्हणून तो केवळ 4 शिंपले घेतो व बाकी सर्व शिंपले त्याला परत करतो. मुलगा एकदम आनंदात ते शिंपले आपल्या खिशात ठेवतो व बहिणीसोबत निघून जातो. हे सर्व त्या दुकानातील कामगार पहात होता. त्याने आश्चर्याने मालकाला विचारले, " मालक ! इतकी महागडी बाहुली तुम्ही केवळ 4 शिंपल्यांच्या मोबदल्यात दिलीत ?" दुकानदार एक स्मित हास्य करीत म्हणाला, "आपल्यासाठी हे केवळ शिंपले आहेत. पण, त्या मुलासाठी हे शिंपले अतिशय मौल्यवान आहेत. आणि आत्ता या वयात त्याला नाही समजणार पैसे काय असतात. पण जेंव्हा तो मोठा होईल ना, तेंव्हा नक्कीच समजेल. आणि जेंव्हा त्याला आठवेल कि आपण पैश्यांच्या ऐवजी शिंपल्यांच्या मोबदल्यात बाहुली खरेदी केली होती, तेंव्हा त्याला माझी आठवण होईल आणि तो हा विचार करेल कि हे विश्व चांगल्या माणसांनी भरलेले आहे.हीगोष्ट त्याच्यातील सकारात्मक दृष्टीकोन वाढण्यासाठी मदतीची ठरेल आणि तो सुद्धा चांगला माणूस बनण्यासाठी प्रेरित होईल." *तात्पर्य* -- " पेरावे तसे उगवते." म्हणून केवळ पैशांच्या मागे न लागता, असे काहीतरी चांगले काम करा, जे पुढच्या पिढयांना चांगले काम करण्याची प्रेरणा देईल, सकारात्मक दृष्टीकोन देईल.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 12 मार्च 20234💠 वार - मंगळवार~~~~~~~~~~~~~~~~~~~या समुहात add होण्यासाठी Link - https://chat.whatsapp.com/EgXNT8RopqQ82O3UfAlMy9••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_ या वर्षातील ७२ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२००१:राष्ट्रीय एकात्मता, लोकशाही मूल्ये, सामाजिक आणि आर्थिक विकास या क्षेत्रांतील बहुमोल कामगिरीबद्दल देण्यात येणारा ’यशवंतराव चव्हाण स्मृती पुरस्कार’ ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी व पर्यावरणवादी नेते सुंदरलाल बहुगुणा यांना प्रदान करण्यात आला**१९९९:सरकारी नोटांवर यापुढे महात्मा गांधींचेच चित्र असेल असा सरकारतर्फे निर्णय घेण्यात आला**१९९९:चेक प्रजासत्ताक, हंगेरी व पोलंड ’नाटो’ (NATO) मधे सामील झाले.**१९९३:मुंबई येथे झालेल्या १२ स्फोटांच्या मालिकेत ३०० हून अधिकजण ठार तर हजारो लोक जखमी**१९९२:स्वातंत्र्य मिळाल्यानंतर २४ वर्षांनी ब्रिटिश सत्तेची सर्व जोखडे झुगारुन देऊन मॉरिशस प्रजासत्ताक बनले.**१९८६:केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा देऊन शंकराव चव्हाण यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून सूत्रे हाती घेतली**१९६८:मॉरिशस (इंग्लंडपासून) स्वतंत्र झाला**१९५४:साहित्य अकादमीची स्थापना**१९३०:ब्रिटिश सरकारने भारतात तयार केलेल्या मिठावर बसवलेल्या अन्यायकारक करामुळे महात्मा गांधी यांनी २०० मैलाच्या दांडीयात्रेला सुरूवात केली**१९१८:रशियाची राजधानी सेंट पीट्सबर्ग येथून मास्को येथे हलविण्यात आली.**१९१२:कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांनी लिहीलेल्या ’संगीत मानापमान’ या नाटकाचा पहिला प्रयोग किर्लोस्कर नाटक मंडळीने मुंबईतील रिपन नाट्यगृहात केला.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८४:श्रेया घोषाल-- हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीची पार्श्वगायिका**१९८२:मनोज कुलकर्णी -- लेखक* *१९८१:अनधा विनय तांबोळी-- कवयित्री, लेखिका**१९७३:राम पांडुरंग गायकवाड-- कवी* *१९६९:प्रा.कल्याण पांडुरंग राऊत-- कवी* *१९६९:फाल्गुनी पाठक--भारतीय गायिका आणि संगीतकार**१९६१:डॉ.मालिनी अनिल अंबाडेकर -- कवयित्री* *१९५६:चंदन दास-- लोकप्रिय भारतीय गझल गायक**१९४३:डॉ.अविनाश बिनीवाले-- भाषाभ्यासक आणि बहुभाषाविद् लेखक* *१९४१:प्रा.जवाहर प्रेमराज मुथा-- ज्येष्ठ कवी,प्रसिद्ध लेखक,संपादक**१९४०:डॉ.श्रीकांत वामन चोरघडे -- बालरोगतज्ज्ञ व बालमानसशास्त्रज्ञ, लेखक,संपादक**१९३३:कविता विश्वनाथ नरवणे-- जेष्ठ मराठी लेखिका (मृत्यू २८ आगस्त २०२०)*१९२६:सुमन पुरुषोत्तम बेहरे-- लेखिका**१९२३:गजानन रामचंद्र कामत-- मराठी साहित्यिक व हिंदी-मराठी चित्रपटकथालेखक (मृत्यु:६ऑक्टोबर २०१५)**१९१५:डॉ.अ.ना.देशपांडे(अच्चुत नारायण देशपांडे)-- मराठी वाङ्मयाच्या इतिहासाचे सिद्धहस्त लेखक वाङ्मयेतिहासकार(मृत्यू:१४ आक्टोबर १९९०)**१९१३:यशवंतराव चव्हाण – भारताचे ५ वे उपपंतप्रधान,संरक्षणमंत्री व महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री (मृत्यू:२५ नोव्हेंबर १९८४)**१९११:दयानंद बाळकृष्ण ऊर्फ ’भाऊसाहेब’ बांदोडकर – गोव्याचे पहिले मुख्यमंत्री, महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाचे संस्थापक, उद्योगपती (जन्म:१२ ऑगस्ट १९७३)**१९०४:जगन्नाथ जनार्दन पुरोहित-- महाराष्ट्रातील एक प्रतिभावंत व नामवंत यशस्वी गायक व संगीताचार्य.(मृत्यू:२० ऑक्टोबर१९६८)* *१८९१:’नटवर्य’ चिंतामणराव कोल्हटकर – अभिनेते व निर्माते (मृत्यू:२३ नोव्हेंबर १९५९)**१८२४:गुस्ताव किरचॉफ – जर्मन भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू:१७ आक्टोबर १८८७)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२०:प्रा.मधुकर शंकर वाबगावकर (म.श.)-- लेखक,समीक्षक (जन्म:३ नोव्हेंबर १९३३)**२००१:रॉबर्ट लुडलुम – अमेरिकन लेखक (जन्म:२५ मे १९२७)**१९९९:यहुदी मेनुहिन – प्रसिद्ध व्हायोलिनवादक व वाद्यवृंदसंचालक (जन्म:२२ एप्रिल १९१६)**१९६०:विठ्ठल वामन हडप-- ऐतिहासिक कादंबरीकार,नाटककार(जन्म:१८ नोव्हेंबर १८९९)**१९५९:जनार्दन सखाराम करंदीकर--संपादक (जन्म:१५ फेब्रुवारी १८७५)**१९४२:रॉबर्ट बॉश – जर्मन अभियंते आणि उद्योजक (जन्म:२३ सप्टेंबर १८६१)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही._* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *देशभरात CAA अर्थात नागरिकत्व सुधारणा कायदा लागू, पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानतून आलेल्या  हिंदू, शीख, जैन, बौद्ध, पारसी आणि ख्रिश्चन समुदायातील नागरिकांना भारताचं नागरीत्व मिळणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *शासकीय कागदपत्रांवर आईचे नाव बंधनकारक, मुंबईत थीम पार्क उभारणार ; महाराष्ट्र सरकारचे कॅबिनेटमध्ये 19 धडाकेबाज निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *सर्वोच्च न्यायालयाचा SBI ला दणका, निवडणूक रोख्यांची उद्याच माहिती देण्याचे आदेश, निवडणूक आयोगालाही डेडलाईन, येत्या 15 मार्चला लोकसभा निवडणूक जाहीर होण्याची शक्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेचा उद्या नंदूरबारमधून महाराष्ट्रात प्रवेश:17 तारखेला शिवाजी पार्कवर लोकसभा प्रचाराचा नारळ फोडणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *ऑस्कर 2024 :- सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ऑस्कर पुरस्कार ‘ओपनहायमर’ या चित्रपटाने पटकावला*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटीलच्या हाती मशाल, 'मातोश्री'वर जाऊन उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश, सांगली लोकसभेतून उमेदवारी जवळपास निश्चित*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *टीम इंडियानं इंग्लंडविरोधातील कसोटी मालिका जिंकल्यानंतर टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉईंट्स टेबलमध्ये टीम इंडिया अव्वल स्थानी*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••👨‍👩‍👦‍👦 *मुले जुळी का होतात ?* 👨‍👩‍👧‍👧 ***************************राम-श्याम, सीता और गीता असे बरेच जुळ्यांवरचे सिनेमे आपण बघतो. त्यात उडणारा गोंधळ प्रत्यक्षातही आपण अनुभवला असेल. जुळ्या बहिणी, भावांमधील फरक आपल्याला ओळखू आला नसेल किंवा असेही झाले असेल की जुळे तर आहेत, पण दिसायला एकदम वेगळे आहेत किंवा जुळ्यातील एक मुलगा आहे आणि एक मुलगी आहे. ही अशी जुळी का बरे होत असतील. एरवी एकच मूल जन्माला येत असते.जुळ्यांचे आपण वर जे वेगवेगळे प्रकार पाहिले, त्याची भिन्नभिन्न कारणे आहेत. स्त्रीबीजाचे शुक्राणूकडून फलन झाल्यानंतर त्याचे दोन भाग, दोनाचे चार असे वाढून पेशींचा गोळा तयार होऊन एक गर्भ तयार होतो; परंतु काही वेळेस प्रथम फलन झाल्यावर स्त्रीबीजाचे जे दोन भाग होतात, ते वेगळे वेगळेच वाढायला लागून दोन गर्भ तयार होतात. असे जे जुळे असते ते दिसावयास अगदी सारखे असते आणि त्यांचे लिंगही एकच असते. म्हणजे दोन्ही मुली किंवा दोन्ही मुले. दुसऱ्या प्रकारात दोन वेगळे स्त्रीबीज दोन वेगवेगळ्या शुक्राणू फलित होऊन दोन गर्भ तयार होतात. हे जुळे मग समान लिंगाचे असू शकते किंवा भिन्न लिंगाचे. एक मुलगा व एक मुलगी अशा जोड्या तयार होतात. अशी जुळी दोन वेगळ्या स्त्रीबीजाकडून तयार झाल्याने दिसावयास सारखी नसतात. असे हे जुळ्यांचे दुखणे.*डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित* यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातूनमनोविकास प्रकाशन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जी माणसं आपला विचार बदलू शकत नाही, ते आयुष्यात काहीही करू शकत नाही.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *घूमर लोकनृत्य* कोणत्या राज्याशी संबंधित आहे ?२) भारतात एकूण रामसर स्थळे किती आहेत ?३) गावातील कोतवालांची संख्या कशावरून ठरवली जाते ?४) देशातील पाण्याखाली सर्वात खोल बांधलेले मेट्रो स्टेशन कोणते ?५) जगामध्ये सर्वात प्रथम कोणत्या देशामध्ये कुटुंब न्यायालय अस्तित्वात आले ? *उत्तरे :-* १) राजस्थान २) ८० रामसर स्थळे ३) लोकसंख्या ४) हावडा मेट्रो रेल्वे स्टेशन ५) अमेरिका*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 मधुकर काठेवाडे, शिक्षक, नायगाव👤 शिवराम पेंडकर, येवती👤 माधव पाटील दिग्रसकर*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *अभंगवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••गेली त्‍याची जाण ब्रह्म तोचि झाला । अंतरी निवाला पूर्णपणे ॥१॥पूर्णपेणे झाला राहतो कैशा रीती । त्‍याचि स्थिती सांगतो मी ॥२॥सांगतो मी तुम्‍हा ऐका मनोगत । राहतो मूर्खवत जगामाजी ॥३॥जगात पिशाश्‍च अंतरी शहाणा । सदाब्रह्मी जाणा निमग्‍न तो ॥४॥निमग्‍न तो सदा जैसा मकरंद । अंतर्बाहय भेद वेगळाले ॥५॥वेगळाले भेद किर्ती त्‍या असती । ह्र्यदगत त्‍याची गति न कळे कवणाला ॥६॥न कळे कवणाला त्‍याचे हेचि वर्म । योगी जाणे वर्म खुण त्‍याची ॥७॥खुण त्‍याची जाणे जे तैसे असती । तुका म्‍हणे भ्रांती दुजीयाला ॥८॥।। संत तुकाराम महाराज ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ज्याच्यात खरी माणुसकी व, विरता असते ती व्यक्ती, कधीही कोणाशी वैरता करत नाही आणि वैरता निर्माण करण्यासाठी मुळात कोणालाही साथ देत नाही. कारण, वैरताची आपल्यात भावना ठेवल्याने व साथ देल्याने त्याचे होणारे परिणाम कसे असतात त्याविषयी त्याला भक्कम अनुभव असतो. म्हणून आपणही अशाच प्रामाणिक, नि:स्वार्थी व माणुसकी असलेल्या व्यक्तीकडून शिकण्याचा प्रयत्न करावे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••असत्य जेव्हा पुनःपुन्हा कानी पडते, तेव्हा ते सत्य भासू लागते.=====================एका गावात 'मित्रशर्मा' नावाचा एक अग्निहोत्री ब्राह्मण राहात होता. एकदा यज्ञात 'बळी' देण्यासाठी त्याने बाहेरगावच्या एका ओळखीच्या माणसाकडून एक गलेलठ्ठ बोकड तसाच मिळविला व त्याला खांद्यावर घेऊन तो आपल्या गावाच्या रस्त्याला लागला.तो बोकड तीन भामट्यांच्या दृष्टीस पडला व त्यांनी त्या ब्राह्मणाला फसवून, त्या बोकडाला पळवून नेण्याचा आपपसांत बेत आखला. त्याप्रमाणे ते तिघे तो ब्राह्मण जाणार असलेल्या वाटेवर - त्याला दाद लागून न देता - थोडथोड्या अंतरावर उभे राहिले.खांद्यावर बोकड घेतलेला ब्राह्मण जरा पुढे जाताच वाटेत भेटलेला पहिला भामटा त्याला म्हणाला, 'काय भटजीबुवा, कुत्रा खांद्यावर घेऊन कुठे चाललात? अहो, याला असेच घेऊन गेलात तर तुमचे गावकरी तुम्हाला वेड्यात काढतील.''हा कुत्रा नसून बोकड आहे,' असे उत्तर त्या ब्राह्मणाने देताच तो भामटा त्याला म्हणाला, 'भटजी, कुणाला चांगलं सांगण्याची सोय नाही हेच खरं. तुम्हाला तो कुत्रा बोकड वाटतोय ना? मग वाटल्यास त्याला घरी नेऊन यज्ञात बळी द्या. मग तर झालं? माझं काय जातंय? तुमचं पाप तुम्हाला.'त्या भामट्याच्या या बोलण्याचा विचार करीत तो ब्राह्मण जरा पुढे जातो न जातो तोच, वाटेत भेटलेला दुसरा भामटा म्हणाला, 'काय हो शास्त्रीबुवा, तुम्हाला वेडबीड तर नाही ना लागलं? गायीचं मेलेलं वासरू खांद्यावर घेऊन कुठे चाललात? टाकून द्या त्याला इथंच आणि घरी जाताच गोमूत्र मिसळलेल्या पाण्यानं स्नान करून शुद्ध व्हा.'तो ब्राह्मण भांबावलेल्या मनःस्थितीत आणखी जरा पुढे जाताच तिसऱ्या भामट्याने विचारले, 'एका गाढवाच्या पोराला खांद्यावर घेऊन जाणे पंडितजी तुम्हाला शोभते का?'हे शब्द ऐकून मात्र तो ब्राह्मण मनी चरकून स्वतःशीच म्हणाला, 'ज्या अर्थी वाटेत भेटलेल्या एकाला हा माझा बोकड कुत्रा दिसला, दुसऱ्याला गाईचे मेलेले वासरू दिसले तर तिसऱ्याला गाढवाचे पिलू भासले, त्या अर्थी हा बोकड म्हणजे क्षणोक्षणी रूपे बदलणारा मायावी राक्षस असावा. तेव्हा याला घरी नेण्यात काय अर्थ? मनात असे म्हणून, त्याने त्या बोकडाला तिथेच सोडून दिले आणि तो आपल्या गावी परत गेला.तो ब्राह्मण जरा दूर जाताच त्या तीन भामट्यांनी त्या बोकडाला पळवून नेले.'•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 11 मार्च 2024💠 वार - सोमवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://googlyan.blogspot.com/2018/08/blog-post.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_ या वर्षातील ७१ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२०११:जपानमधील सेन्डाइच्या पूर्वेला झालेल्या ८.९ रिश्टर तीव्रतेच्या एका भूकंपाने त्सूनामीची प्रचंड लाट आली. यात जपानमधील हजारो लोक मृत्यूमुखी पडले.**२००१:बॅडमिंटनपटू पी.गोपीचंदने तब्बल एकवीस वर्षानी ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद भारतास मिळवून दिले.या आधी प्रकाश पदुकोण यांनी ते मिळवले होते.**२००१:कसोटी क्रिकेटमधे हॅटट्रिक घेणारा हरभजनसिंग हा पहिला भारतीय गोलंदाज बनला.त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ही कामगिरी केली**१९९३:उडिया कवी व साहित्यिक रमाकांत रथ यांना उपराष्ट्रपती के.आर.नारायणन यांच्या हस्ते 'सरस्वती सन्मान' पुरस्कार प्रदान.**१८८९:पंडिता रमाबाईंनी मुंबईत "शारदा सदन" ही विधवांसाठी व कुमारीकांसाठी शाळा सुरू केली**१८८६:अमेरिकेतील फिलाडेल्फिया विद्यापीठातून डॉक्टर होणारी पहिली भारतीय महिला आनंदीबाई गोपाळराव जोशी यांना पदवी प्रदान**१८१८:इंग्रज फौजांनी पुरंदरला वेढा घातला.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९०:शुभांगी सदावर्ते-- अभिनेत्री* *१९८५:अजंता मेंडिस – श्रीलंकेचा गोलंदाज**१९८१:भावना कुलकर्णी-भालेराव-- बालकथाकार,कवियित्री**१९७७:वृषाली हरीश कुलकर्णी -- कवयित्री,कथालेखिका* *१९६६:मोहित चौहान--भारतीय गायक**१९६०:रमेश चिल्ले -- कवी,लेखक* *१९५८:पुरुषोत्तम गं.निकते -- कवी* *१९५४:विनोद दुआ-- भारतातील हिंदी टेलिव्हिजन पत्रकार आणि कार्यक्रम संचालक(मृत्यू:४ डिसेंबर २०२१)**१९५२:प्रा.डॉ.विश्वास किसन पाटील-- लेखक**१९४९:डॉ.लिना विलास मोहाडीकर -- लेखिका* *१९४५:डॉ अनधा केसकर-- कादंबरीकार,कथाकार**१९४०:दया डोंगरे-- ज्येष्ठ अभिनेत्री* *१९३८:प्रा.डॉ सुनंदा देशपांडे--लेखिका, समीक्षक* *१९२९:मालती मोरेश्वर निमखेडकर-- कवयित्री,कथाकार (मृत्यू:२०१६)**१९२२:सरोज अहंकारी-- बालसाहित्यिक कवयित्री लेखिका**१९१७:धोंडो विठ्ठल देशपांडे-- लेखक, समीक्षक (मृत्यू:१९ जुलै १९९३)* *१९१६:हॅरॉल्ड विल्सन – इंग्लंडचे पंतप्रधान (मृत्यू:२४ मे १९९५)**१९१५:विजय हजारे – क्रिकेटपटू (मृत्यू:१८ डिसेंबर २००४)**१९१२:शंकर गोविंद साठे-- मराठीतले कवी, कथालेखक आणि नाटककार(मृत्यू:२४ डिसेंबर २०००)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१३:ब्रिज मोहन व्यास-- बॉलीवूडचा एक भारतीय अभिनेता(जन्म:२२ ऑक्टोबर, १९२०)**२००६:स्लोबोदान मिलोसोव्हिच – सर्बिया व युगोस्लाव्हियाचे अध्यक्ष (जन्म:२०ऑगस्ट १९४१)**१९९३:शाहू मोडक – हिन्दी व मराठी चित्रपट अभिनेते(जन्म:२५ एप्रिल १९१८)**१९८०:अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे--सर्वोदयी नेते व विचारवंत(जन्म:७ ऑक्टोबर १८९७)**१९७९:यशवंत कृष्ण उर्फ आप्पासाहेब खाडिलकर-- नवाकाळचे दुसरे संपादक(जन्म:१५ जानेवारी १९०५)**१९७०:अर्ल स्टॅनले गार्डनर – अमेरिकन लेखक आणि वकील (जन्म:१७ जुलै १८८९)**१९६५:गौरीशंकर गोवर्धनराम जोशी तथा ’धूमकेतू’ – गुजराथी कथाकार व कादंबरीकार. (जन्म:१२ डिसेंबर १८९२)**१९५५:अलेक्झांडर फ्लेमिंग – नोबेल पारितोषिक विजेते स्कॉटिश शास्त्रज्ञ (जन्म:६ ऑगस्ट १८८१)**१९४३:ॲड.यादव माधव उपाख्य अण्णासाहेब काळे-- विदर्भाच्या इतिहासाचाआद्याचार्य (जन्म:१८ फेब्रुवारी १८८२)**१६८९:छत्रपती संभाजी महाराज (जन्म:१४ मे १६५७)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही._* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*तुज आहे तुजपाशी*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीचे:PM मोदींच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन संपन्न; धावपट्टी वाढविण्यासाठी प्रयत्न- अजित पवार*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *आचारसंहिता लागण्यापूर्वी जीआरचा धडाका! दोन दिवसांत तब्बल 269 शासन निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त अरुण गोयल यांचा राजीनामा; आगामी लोकसभा निवडणुकांची धुरा आता एकट्या राजीव कुमार यांच्या खांद्यावर*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *युसूफ पठाण, शत्रुघ्न सिन्हांना तिकीट, नुसरत जहाँचा पत्ता कट; बंगालसाठी ममतादीदींच्या तृणमूलची यादी जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंकडूनही उमेदवारी जाहीर करण्यास सुरुवात, मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातून अमोल किर्तीकर यांना उमेदवारी जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *मराठा समाजाप्रमाणे धनगर आरक्षणाची अंमलबजावणी करा, अमरावती येथे आयोजित राज्यस्तरीय धनगर समाज अधिवेशनात एकमताने ठराव*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *बीसीसीआयने टेस्ट क्रिकेटर्सची सॅलरी वाढवली; 75 टक्के कसोटी सामने खेळणाऱ्या खेळाडूंना प्रत्येक सामन्यासाठी मिळतील सुमारे 45 लाख रुपये*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*तुम्हाला हा प्रश्न कधी पडलाय का की सातारच्या पेढ्यांना कंदी पेढे असच कां म्हणतात?*अहो मग भिडू कशा साठी आहे? आम्ही सांगायलाच बसलोय.गोष्ट आहे दीडशे वर्षापूर्वीची. भारतात ब्रिटीश राजवट सुरु होती. साताऱ्यात छत्रपतींच्या संस्थानावर देखील ब्रिटीश रिजंट बसवण्यात आले होते. हे अधिकारी इंग्लंडवरून आलेले होते. त्यांना गोड खाण्याची सवय होती. मग ते कायम वेगवगेळ्या मिठाईच्या शोधात असायचे.सातारा जिल्ह्यातील जो पाटणकडचा डोंगराळ भाग आहे तिथे त्याकाळात शेतीच प्रमाण कमी होतं. लोकांच उपजीविकेच साधन मुख्यसाधन हे पशुधन होतं. तिथल्या गायी म्हैशीच वैशिष्ट्य म्हणजे त्या रानावनात वाढलेल्या होत्या. विकतचा चारा हा प्रकार तिथे नव्हता. यामुळे त्यांचं दुध घट्ट आणि अस्सल असायचं. शिवाय ते मुबलक प्रमाणात उपलब्ध होतं होतं.हे दुध जवळच मोठ शहर म्हणून सातारला पाठवून दिल जायचं.काहींनी या दुधाला कढईत उकळून त्यात साखर किंवा गुळ टाकली. हे मिश्रण घट्ट झाल्यावर त्याचे छोटे छोटे गोळे बनवले. ते एका करंडीमध्ये भरून ब्रिटीश अधिकाऱ्यांना पेश केले. ब्रिटीशांना ही मिठाई प्रचंड आवडली.त्यांना करंडी म्हणता येत नसल्यामुळे त्यांनी त्याला कँडी म्हणायला सुरवात केली. पुढे याच कँडीच आपल्या सातारकरांनी कंदी केलं.साधारण याच काळात छत्रपतींच्या नवव्या वंशजानी महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील खडकलाट या गावातून काही मिठाई बनवणाऱ्या कुटुंबाना साताऱ्यात आणून वसवलं होतं. त्यांनी बनवलेले कंदी पेढे लोकप्रिय होत गेले. पुढे त्यांनाच लाटकर अस ओळखल जाऊ लागल.कंदी पेढ्याला सातासमुद्रापार नेलं ते मात्र तुळजाराम मोदी या हलवायांनी.त्यांनी सत्तरवर्षापूर्वी विमानात, लंडनमधील सुप्रसिद्ध ठिकाणी या कंदी पेढ्यांच्या जाहिराती लावल्या. त्यामुळेच हा पेढा कानाकोपऱ्यात पोहचला.आजही एवढ्या वर्षांनी एवढी तंत्रज्ञानात सुधारणा होऊनदेखील मोदी आणि लाटकर हलवाई मात्र कंदी पेढ्याचा खवा आजही कढईतच भाजतात व प्रत्येक पेढा हातावरच वळला जातो. खव्याची भाजणी विशिष्ट प्रकारे केल्यामुळे पेढ्याची पौष्टिकता, चव व टिकाऊपणा वाढतो.म्हणूनच गेली १०० वर्ष सातारच्या कंदी पेढ्यांची चव आणि गुणवत्ता तशीच टिकून आहे.भारतात अनेक ठिकाणचे पेढे प्रसिद्ध आहेत. पेढ्याची जन्मभूमीच मथुरा ही आहे. उत्तरेतून ठाकूरराम रतन सिंह यांनी हे पेढे दक्षिणेत धारवाड येथे आणले. त्यांना धारवाडी पेढे म्हणून ओळखल जात.महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणचे पेढे वैशिष्ट्यपूर्ण आहेत. यात कोल्हापूरचे फिक्के पेढे, कुंथलगिरीचे पेढे, वाडीचे पेढे व खूप काही. मात्र इतर पेढ्यांच्या तुलनेत सातारचे पेढे हे खवा जास्त भाजल्यामुळे भुरकट दिसतात. कमी साखर हे या पेढ्याचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. परिणामी हा पेढा सहा ते आठ दिवस सहज टिकतो.सातारच्या कंदी पेढ्याची सिक्रेट रेसिपी म्हणजे हे पेढे डबल भाजलेले आहेत, हे पेढे सह्याद्रीतल्या रानातला चारा खाणाऱ्या गाई म्हैशीपासून बनलेले आहेत. आणि सगळ्यात महत्वाच म्हणजे इथल्या पेढ्यांमधेय सातारच्या माणसांचा स्वॅग मिक्स झालाय.या सगळ्या मुळे सातारच्या पेढ्याचा ब्रँड जगात फेमस झालाय.*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जिथे एकमेकांची प्रगती साधली जाते तीच खरी मैत्री असते.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) देशातील पाण्याखालून जाणाऱ्या पहिल्या मेट्रोचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले ?२) रशियाच्या अवकाश संशोधन संस्थेचे नाव काय आहे ?३) घटक राज्यांमधील संविधानिक यंत्रणा बंद पडल्यास त्या ठिकाणी कोणत्या प्रकारची आणीबाणी लागू केले जाते ?४) कोडाई कॅनॉल हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे ?५) भारताची अर्थव्यवस्था सध्या जगात कितव्या क्रमांकाची आहे ? *उत्तरे :-* १) पंतप्रधान नरेंद्र मोदी २) रॉसकॉसमॉस ३) राष्ट्रपती राजवट ४) तामिळनाडू ५) पाचव्या *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 भाऊसाहेब उमाटे, इतिहास संशोधक, लातूर👤श्री प्रलोभ माधवराव कुलकर्णी, राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक जि. प. हा. वाघी जि. नांदेड.👤 विजय नागलवार, अभियंता, पुणे👤 सूर्यकांत सोनकांबळे👤 रमेश कवडेकर👤 संदीप दुगाडे👤 संतोष देवणीकर, शिक्षक, देगलूर👤 Tr. जब्बार मुलानी*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *अभंगवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मायाजाळ नासे या नामें करुनि । प्रिती चक्रपाणि असो द्यावी ॥१॥असो द्यावी प्रिती साधूचे पायंशी । कदा किर्तनासी सोडू नये ॥२॥सोडू नये पुराणश्रवण किर्तन । मनन निदिध्‍यास साक्षात्‍कार ॥३॥साक्षात्‍कार झालिया सहज समाधि । तुका म्‍हणे उपाधी गेली त्‍याची ॥४॥।। संत तुकाराम महाराज ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जीवन जगत असताना अनेक माणसं भेटत असतात. त्यातील सर्वजण एक सारखे विचाराचे असतील असेही नाही. सोबत ते आपल्याला समजून घेतीलच असेही नाही. त्यातील काही माणसं मार्गदर्शक, दिशादर्शक असतात तर काहीजण व्यावसायिक,‌ चालाख व अति स्वार्थी व्यापारी असतात म्हणून जरा सावध रहावे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   *हरिण व कोल्हा*एका कोल्हयाला फिरण्याचा फार नाद होता, तो या गावाहून त्या गावाला सारखा फिरत राही, प्रवास करता करता तो एका गावाला आला. तिथे त्याला एका तलावात पाणी पीत असलेली काही हरणे दिसली. ती पाणी पितापिता मधेच अकाशाकडे पहात होती हे पाहून कोल्हयाने त्यांना असे करण्याचे कारण विचारले, तेव्हा हरणे म्हणाली, 'आम्ही देवाचे आभार मानतो देवाच्याच दयेनं हे पाणी प्यायला मिळतं आहे.' हरणांचे हे बोलणे ऐकून कोल्हयाला हसू आले व तो त्यांची टिंगल करू लागला. यावर त्यातले एक स्पष्टवक्ते हरीण कोल्हयाला म्हणाले, 'अरे कोल्होबा ज्याची त्याची श्रध्दा असते, अशी दुसऱ्याची टिंगल उडविणे वाईट आहे. आपले वागणे वाईट अशा विकृत दृष्टिकोन असलेल्या तुझ्याकडून समंजसपणाची अपेक्षा का करावी.'तात्पर्यः  'दुसऱ्याच्या श्रध्देविषयी टिंगल करणे हे असभ्यपणाचे लक्षण आहे.'•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 09 मार्च 2024💠 वार - शनिवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/nRt3vVh2JcfZL3rQ/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_ या वर्षातील ६९ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *१९९२:कवी आणि लेखक डॉ. हरिवंशराय बच्‍चन यांना नवी दिल्ली येथे के.के.बिर्ला प्रतिष्ठानद्वारा आयोजित समारंभात पहिला 'सरस्वती पुरस्कार'उपराष्ट्रपतींच्या हस्ते देण्यात आला**१९९१:युगोस्लाव्हियाचे अध्यक्ष स्लोबोदान मिलोसोव्हिच यांच्याविरुद्ध राजधानी बेलग्रेड मधे प्रचंड निदर्शने**१९५९:’बार्बी’या जगप्रसिद्ध बाहुलीच्या विक्रीस सुरूवात झाली.**१९५२:महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांच्या हस्ते पुण्यातील पेशवे उद्यान प्राणी संग्रहालयाचे उद्घाटन**१९४५:अमेरिकेच्या बी-२९ विमानांनी जपानच्या टोकियो शहरावर बॉम्बहल्ला केला. यात १ लाखाहुन अधिक लोक मृत्युमुखी पडले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९७:दर्शील सफारी--- भारतीय अभिनेता, "तारे जमीन पर" मधील भूमिकेमुळे लोकप्रिय* *१९८८:अश्विनी रोशन दुरगकर-- लेखिका**१९८५:पार्थिव अजय पटेल-- माजी भारतीय क्रिकेटपटू यष्टिरक्षक-फलंदाज**१९८१:डॉ.अदिती टपळे-काळमेख -- कवयित्री* *१९७८:कमलेश विनायक गोसावी -- कवी, लेखक* *१९६२:प्रा.शिवाजी तुकाराम वाठोरे-- प्रसिद्ध कवी,लेखक* *१९६०:प्रा.रमेश गंगारामजी वाघमारे-- कवी, लेखक**१९५६:शशी थरूर – माजी केन्द्रीय मंत्री व अर्थतज्ञ**१९५१:उस्ताद झाकिर हुसेन – तबलावादक**१९५०:विजय रघुवीर उर्फ जादूगार रघुवीर ज्युनियर-- ज्येष्ठ जादूगार**१९४५:गणपती रामदास वडपल्लीवार-- नाट्यलेखक* *१९४३:रॉबर्ट जेम्स ऊर्फ ’बॉबी’ फिशर – अमेरिकन बुद्धिबळपटू व ग्रँडमास्टर (मृत्यू:१७ जानेवारी २००८)**१९४३:अ.शि.रंगारी-- कादंबरीकार* *१९३५:डॉ.पांडुरंग हरी कुलकर्णी-- संशोधक,लेखक* *१९३४:युरी गागारीन – पृथ्वीप्रदक्षिणा करणारा पहिला अंतराळवीर (मृत्यू:२७ मार्च १९६८)**१९३३:भिका शिवा शिंदे उर्फ आबा-- प्रसिद्ध नाटककार,साहित्यिक(मृत्यू:१० सप्टेंबर २००९)**१९३१:डॉ.करणसिंग-- माजी केंद्रीय मंत्री**१९३१:सदाशिव बाळकृष्ण क-हाडे-- समीक्षक,कादंबरीकार**१९३०:डॉ.युसुफखान महंमदखान(यू.म.) पठाण-- मराठी भाषेतील सुप्रसिद्ध लेखक व संतसाहित्याचे अभ्यासक आणि भाष्यकार* *१८९९:’राजकवी’ यशवंत दिनकर पेंढारकर (मृत्यू:२६ नोव्हेंबर १९८५)**१८९४:शंकर पुरुषोत्तम जोशी-- मराठी इतिहास संशोधक(मृत्यू:२० सप्टेंबर १९४३)**१८६३:लक्ष्मण बापूजी ऊर्फ ’भाऊराव’ कोल्हटकर – गायक नट (मृत्यू:१३ फेब्रुवारी १९०१)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१८:पतंगराव कदम-- माजी मंत्री, राजकारणी,भारती विद्यापीठाची स्थापना १९६८(जन्म:८जानेवारी १९४४)**२०१७:वि.भा.देशपांडे, अर्थात विश्वनाथ भालचंद्र देशपांडे--पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अनेक वर्षे पदाधिकारी, नाट्यसमीक्षक (जन्म:३१ मे १९३८)**२०१२:जॉय मुकर्जी – चित्रपट कलाकार आणि दिग्दर्शक (जन्म: २४ फेब्रुवारी १९३९)**२०००:उषा मराठे - खेर ऊर्फ ’उषा किरण’ – शंभराहून अधिक चित्रपटात व रंगभूमीवर अभिनेत्री, मुंबईच्या नगरपाल (जन्म: २२ एप्रिल १९२९)**१९९६:अख्तर उल इमान-- हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रख्यात उर्दू कवी आणि पटकथा लेखक(जन्म:१२ नोव्हेंबर १९१५)* *१९९४:देविका राणी – अभिनेत्री, पद्मश्री, दादासाहेब फाळके व सोविएत लँड नेहरू पुरस्कारांनी सन्मानित (जन्म:३० मार्च १९०८)**१९९२:मेनाकेम बेगीन – इस्त्रायलचे ६ वे पंतप्रधान व नोबेल पारितोषिक विजेते (जन्म:१६ ऑगस्ट १९१३)**१९७१:के.असिफ – हिंदी चित्रपट दिग्दर्शक, निर्माता व पटकथालेखक (जन्म:१४ जून १९२२)**१९६९:सर होर्मुसजी पेरोशॉ तथा ’होमी’ मोदी – उद्योगपती, प्रशासक व संसदपटू (जन्म:२३ सप्टेंबर १८८१)**१८८८:विल्हेल्म (पहिला) – जर्मन सम्राट (जन्म:२२ मार्च १७९७)**१८५१:हान्स क्रिस्टियन ओरस्टेड – डॅनिश भौतिकशास्त्रज्ञ (जन्म:१४ ऑगस्ट १७७७)**१६५०:संत तुकाराम यांचा वैकुंठवास (जन्म: १५७७)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही._* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••लघुकथा - टास्कशाळेतील मुलांना काही आव्हान दिल्यावर ते कशा पद्धतीने पूर्ण करतात. दिलेले आव्हान पूर्ण करतांना त्यांच्या मनाची तयारी व संस्कार कसे होतात ही सांगणारी लघुकथा ..... पूर्ण वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *रोहित पवारांच्या बारामती अँग्रोनं खरेदी केलेला कन्नड साखर कारखाना ईडीकडून जप्त, मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीची मोठी कारवाई*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *राष्ट्रपतीनियुक्त सदस्य म्हणून  इन्फोसिस फाऊंडेशनच्या अध्यक्षा सुधा मूर्तींची राज्यसभेवर निवड, पंतप्रधान मोदींची ट्वीट करुन माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *राज्यात आता थंडी हळूहळू गायब होत चालली आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार येणाऱ्या दिवसांत राज्यातील तापमानात वाढ होताना दिसणार आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मराठा आरक्षणानुसार कुठलीही भरती किंवा शैक्षणिक दाखले देताना ते कोर्टाच्या अंतिम निर्णयावर अवलंबून राहतील हे ध्यानात ठेवा, असे निर्देश दिले आहेत*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *भाजप नेतृत्त्वाकडून राज्यातील भाजप खासदारांच्या कामांचा सर्व्हे, स्ट्राईक रेट समाधानकारक नसलेल्या डझनभर खासदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *महाशिवरात्री निमित्त महाराष्ट्रासह देशभरातील शंकराच्या मंदिरांमध्ये भाविकांची मांदियाळी, शिवमंदिरं आकर्षक फुलं आणि विद्युत रोषणाईने सजली होती*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *इंग्लंडविरोधातील पाचव्या कसोटीत टीम इंडिया भक्कम स्थितीत, रोहित- गिलचा शतकी तडाखा, देवदत्त पडिक्कल पर्दापणात चमकला*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *विद्याधर गंगाधर पुंडलिक*मराठीतील एक प्रतिभावान लेखक विद्याधर पुंडलिक यांचा जन्म १३ डिसेंबर १९२८ रोजी झाला, आणि मृत्यू ९ऑक्टोबर १९८९ रोजी.पुंडलिकांच्या अश्विन नावाच्या मधल्या मुलाचा अपघातात दुर्दैवी अंत झाला. त्यानंतर पुंडलिक पूर्णपणे बदलून गेले. अश्विनच्या जाण्याचे त्यांनी 'आपल्याला अजून दोन मुले आहेत' हे विसरले असावेत असे वाटण्याइतके दु:ख केले. मराठी लेखिका मोनिका गजेंद्रगडकर या विद्याधर पुंडलिक यांच्या कन्या. 'बापलेकी' या विद्या बाळ आणि पद्मजा फाटक यांनी संपादित केलेल्या पुस्तकात, मोनिकाबाईंनी लिहिलेल्या लेखात त्यांनी त्या दिवसांबद्दल आणि त्या दुर्दैवी घटनेचा वडील-लेकीच्या नात्यावर झालेल्या परिणामांबद्दल लिहिले आहे.साहित्य संमेलनांच्या कार्यक्रमांमध्ये पुंडलिकांचा अधूनमधून सहभाग असायचा, पण संमेलनाध्यक्षपदाच्या भानगडीत ते कधी पडले नाहीत. चाहत्यांकडून त्यांना आग्रह होत नसे असे नाही. पण त्यांनी तो विषय नेहमीच हसण्यावारी नेला. आणीबाणीअखेर झालेल्या ऐतिहासिक निवडणुकांच्या प्रचारात पुंडलिकांनी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला साजेल अशा पद्धतीने भाग घेतला. पण त्यांची भूमिका स्पष्ट होती. अलीकडच्या काळातील साहित्यिकांप्रमाणे राजकारण्यांची हुजरेगिरी त्यांनी कधीच केली नाही, मात्र मनापासून वाटले तेव्हा, १९८० च्या लोकसभा निवडणुकीत ज्येष्ठ समाजवादी नेते नानासाहेब गोरे यांनाही स्वच्छ पाठिंबा देणारा उत्कृष्ट ललितशैलीचा लेख त्यांनी लिहिला. अशा प्रकारे, राजकीय भूमिका घेण्याचे आणि तरीही सवंग राजकारण व राजकारण्यांपासून दूर राहण्याचे व्रत पुंडलिकांनी अखेपर्यंत जपले.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सत्याचा शेवट सुख आणि समाधानाच्या मार्गाने जातो.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *स्टॅच्यू ऑफ नॉलेज* हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा कोणत्या जिल्ह्यात उभारण्यात येणार आहे ?२) देशातील पहिल्या एआय ( AI ) शिक्षिकेचे नाव काय आहे ?३) नविन शैक्षणिक धोरण लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते ?४) कोणता देश हा भारताची जनऔषधी योजना स्वीकारणारा पहिला देश ठरला आहे ?५) जगातील सर्वात मोठा पुरस्कार कोणता ? *उत्तरे :-* १) लातूर २) इरीस ( तिरुवनंतपुरम येथील शाळेत ) ३) हिमाचल प्रदेश ४) मॉरिशस ५) नोबेल पुरस्कार *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 शिवा वसमतकर, वसमत👤 शिवाजी साखरे👤 अरविंद फुलसिंग आडे👤 सतीश उशलवार👤 गजानन शिंदे पाटील👤 योगेश कदम*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *अभंगवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••भूती जीन व्‍हावे सांगावे न लगेचि । आता अहंकाराची शांती करा ॥१॥शांती करा तुम्‍ही ममता नसावी । अंतरी वसावी भूतदया ॥२॥भूतदया ठेवा मग काय उणे । प्रथम साधन हेचि असे ॥३॥असो हे साधन ज्‍यांचे चित्‍ती वसे । मायाजाळ नासे तुका म्‍हणे ॥४॥।। संत तुकाराम महाराज ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••गाढ चिखलात असताना सुद्धा अफाट संघर्ष करून जे वरती येऊन फुलत असतात त्यांचा सुंगध जिकडे, तिकडे कायमस्वरूपी दरवळत असतो. व जे, दुसऱ्यांना चिखलात ढकलून, फुलत यशस्वी होतात त्यांचा सुंगध मात्र स्वतः पुरते मर्यादित असते. सुंगध नाव एकसारखे आहे मात्र त्यात खूप फरक आहे. म्हणून खऱ्या अर्थाने फुलायचे असेल तर इतरांना आधार देऊन फुलावे दुसऱ्यांना चिखलात गाडून फुलल्याने, त्या नाजूक फुलांचा अपमान होतो.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*हे क्षण ही निघून जातील*एका राजाला जीवनाविषयी अपार कुतूहल होते.त्याच्या दरबारात येणाऱ्या प्रत्येक साधू, संत, फकिराला तो विचारत असे की मला एक असा छोटा मंत्र द्या की तो अगदी कुठल्याही क्षणाला मला उपयोगी पडेल.मला कायम आनंदी ठेवेल.अखेर एका फकिराने त्याला एक अंगठी दिली व सांगितले की यातील डबीत एका कागदावर मंत्र लिहिलेला आहे,पण जेव्हा जीवन-मरण असा प्रश्न तुझ्यापुढे उभा राहील तेव्हाच डबी उघड, तेव्हाच मंत्र कामाला येईल.बरीच वर्षे शांत गेल्यावर राजाचे दिवस फिरले.राज्यात बंडाळी झाली व त्याच्याच कपटी प्रधानाने त्याला तुरुंगात टाकले.पहाटेला फाशी द्यायचे ठरले.विश्वासू सेवकाने राजाला रात्री सोडवून, एक घोडा बरोबर दिला.मजल दरमजल करीत राजा सीमेपासून दूर पळाला.कळाल्यावर दुष्ट  प्रधानाने सैनिकांची तुकडी राजाच्या मागावर पाठवली.राजा एका डोंगराच्या शिखरापर्यंत पोहोचला.पुढे दरी होती.घोड्याला चरायला सोडून, मोठ्या खडकाआड लपला. त्याला वाटले आता थोडया वेळात सैनिक गाठणार व आपण मरणार.  त्या क्षणी त्याला फकिराच्या अंगठीची आठवण आली.ती त्याने उघडली.त्यात एकच वाक्य लिहिले होते,"This too shall pass "म्हणजे"हाही क्षण निघून जाईल"केवळ ते वाक्य वाचून राजाचे मन शांत झाले.आश्चर्य घडले.सैनिक तेथपर्यंत पोहचले.त्यांना वाटले फक्त घोडा दिसतोय म्हणजे राजा दरीत पडून मेला. ते परतले.राजाने शेजारच्या राज्याची मदत घेऊन काही दिवसांत आपले राज्य परत मिळवले. विश्वासघातकी प्रधानाचा शिरच्छेद केला.  विजयाचा जंगी समारंभ चालू असताना, नवीन प्रधानाने पाहिले की महाराज कुठेही अति-उत्साहित न होता प्रशांत मुद्रेने सिंहासनावर विराजमान आहेत.त्याने अदबीने विचारले," महाराज, आपल्या आयुष्यात एवढ्या भयानक घडामोडी घडल्या व त्यातून आपण सहीसलामत बाहेर पडला, तेव्हा आपण आज आनंदाने ओसंडून जायला हवे." राजा म्हणाला, " नाही, आता मला माझ्या मंत्राचा अर्थ व सामर्थ्य कळले आहे. जगात कुठलीही गोष्ट कायमची टिकून राहत नाही.परिवर्तन जगाचा शाश्वत नियम आहे.या जगात सुख ही राहात नाही, दुःखही राहात नाही.हे मला आता समजलेले आहे.म्हणून दुःखात खचू नये, सुखात नाचू नये."This too shall pass !हे क्षणही निघून जातील.ही बोधकथा आपल्याला जगायला शिकवेल.नुसतेच जगायला नव्हे तर प्रत्येक प्रसंगात मनाची शांती अबाधित ठेवण्याची, मन स्थिर ठेवण्याची गुरुकिल्लीच इथे दिलेली आहे.ही कथा पासवर्ड आहे आनंदी आयुष्याचा.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 07 मार्च 2024💠 वार - गुरुवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://nasayeotikar.blogspot.com/2024/03/world-womens-day.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_जागतिक गणित दिवस_**_ या वर्षातील ६७ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२००९:केपलर स्पेस ऑब्झर्व्हेटरी या संशोधन संस्थेची स्थापना.**२००६:लष्कर-ए-तैय्यबा या आतंकवादी संघटनेने वाराणसी येथे बॉम्बस्फोट घडवून आणले.**२००५:महिलांना मताधिकार मिळावा म्हणून कुवेत मध्ये संसदेसमोर प्रदर्शन* *१९४७:जयप्रकाश नारायण यांनी काँग्रेस कार्यकरणीचा राजीनामा दिला**१९३६:दुसरे महायुद्ध – व्हर्सायचा तह धुडकावून जर्मनीने र्‍हाईनलँडमधे सैन्य घुसवले**१८७६:अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल याला टेलिफोनचे पेटंट मिळाले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९२:रोहन बेनोडेकर -- लेखक* *१९८८:आदर्श आनंद शिंदे-- मराठी गायक, भीमगीतांसाठी प्रसिद्ध* *१९८४:नितीन अरुण थोरात-- प्रसिद्ध कादंबरीकार,बालसाहित्यिक,स्तंभलेखक,पत्रकार,उपसंपादक,कथालेखक* *१९७६:गणेश शिवाजी मरकड -- प्रसिद्ध कवी,लेखक तथा उपजिल्हाधिकारी* *१९६९:साधना सरगम किंवा साधना घाणेकर-- भारतीय प्रसिद्ध पार्श्वगायिका**१९६४:छाया भालचंद्र उंब्रजकर-- कवयित्री,लेखिका* *१९५८:अनिल शर्मा-- प्रसिद्ध दिग्दर्शक**१९५५:अनुपम खेर – प्रसिद्ध चित्रपट अभिनेता**१९५५:ज्योत्स्ना आफळे --कवयित्री,लेखिका* *१९५२:सर विवियन रिचर्ड्‌स–वेस्ट इंडिजचे क्रिकेटपटू**१९४९:गुलाम नबी आझाद-- राजकारणी माजी केंद्रीय मंत्री* *१९४२:वसंत काशिनाथ गोडबोले -- संत साहित्याचे व्यासंगी अभ्यासक,हस्ताक्षरतज्ञ* *१९४०:प्रा.वसंत सुदाम वाघमारे-- कवी* *१९३८:मुरलीधर अनंता उर्फ बाबा शिंगोटे-- दैनिक 'पुण्यनगरी'चे संस्थापक-संपादक (मृत्यू:६ आगस्ट २०२०)* *१९३४:नरी कॉन्ट्रॅक्टर – भारताचा यष्टिरक्षक**१९३३:आत्माराम कृष्णाजी सावंत-- मराठीतले लेखक,नट,नाटककार,दिग्दर्शक, पत्रकार(मृत्यू:४ मार्च१९९६)* *१९३१:प्राचार्य डॉ.मधुकर सुदाम पाटील-- समीक्षक* *१९२८:डॉ.केशव रामराव जोशी-- संस्कृत पंडित,तत्त्वचिंतक (मृत्यू:१२ जून २०१३)**१९२५:रवींद्र केळेकर-- कोकणी भाषेतील प्रसिद्ध साहित्यिक,२००६ सालच्या ज्ञानपीठ पुरस्कार विजेते(मृत्यू:२७ ऑगस्ट, २०१०)**१९१८:स्नेहलता दसनूरकर-- मराठी लेखिका, शिक्षणतज्ज्ञ (मृत्यू:३ जुलै २००३)**१९१३:डॉ.सुमती बाळकृष्ण क्षेत्रमाडे-- व्यवसायाने डॉक्टर असतानाही,मराठीत कादंबरीलेखन करणाऱ्या लेखिका(मृत्यू:८ ऑगस्ट १९९८)**१९११:सच्‍चिदानंद हिरानंद वात्स्यायन तथा ’अज्ञेय’ – ज्ञानपीठ पारितोषिक (१९७८) व साहित्य अकादमी पुरस्कार (१९६४) विजेते हिन्दी लेखक व वृत्तपत्रकार (मृत्यू:४ एप्रिल १९८७)**१९०३:रामचंद्रशास्त्री दत्तात्रेय किंजवडेकर-- संस्कृत पंडित (मृत्यू:२० एप्रिल १९४१)**१९०२:शंकर भास्कर जोंधळेकर-- लेखक* *१८९६:यशवंत गंगाधर लेले-- नाटककार, नाट्यसमीक्षक**१८७०:नारायण कृष्ण गद्रे-- मराठी लेखक आणि चरित्रकार ह्यांनी नाटक,कविता, कादंबरी,चरित्र,इतिहास अशा विविध साहित्यप्रकारांत लेखन केले आहे(मृत्यू:१४ जुलै १९३३)**१८४९:ल्यूथर बरबँक – महान वनस्पतीतज्ञ (मृत्यू:११ एप्रिल १९२६)**१७९२:सर जॉन विल्यम हर्षेल – ब्रिटिश गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ, रॉयल अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचा संस्थापक (मृत्यू:११ मे १८७१)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_*••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१२:रवि शंकर शर्मा ऊर्फ ’रवि’ – संगीतकार (जन्म:३ मार्च १९२६)**२०००:प्रभाकर तामणे– साहित्यिक व पटकथालेखक (जन्म:२९ आक्टोबर १९३१)**१९९६:नीळकंठ जनार्दन कीर्तने-- मराठ्यांच्या इतिहासाचे आद्य टीकाकार,चिकित्सक आणि साक्षेपी संशोधक(जन्म:१जानेवारी १८४४)**१९९३:इर्झा मीर – माहितीपट निर्मितीचे आद्य प्रवर्तक (जन्म:२६ आक्टोबर १९००)**१९६१:गोविंद वल्लभ पंत – स्वातंत्र्यसैनिक, भारताचे दुसरे गृहमंत्री व उत्तर प्रदेशचे पहिले मुख्यमंत्री,भारताचे पहाडी पुरूष,भारतरत्‍न (१९५७)(जन्म:१० सप्टेंबर १८८७)**१९२२:गणपतराव जोशी – रंगभूमीवरील असामान्य अभिनेते,शेक्सपियरच्या नाटकांतील त्यांच्या भूमिका अतिशय गाजल्या होत्या (जन्म:१५ ऑगस्ट १८६७)**१६४७:दादोजी कोंडदेव-- शिवाजी महाराजांचे बालपणाचे पालक, शिक्षक व मार्गदर्शक(जन्म:१५७७)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही._* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*जागतिक महिला दिनानिमित्त* कर्तृत्ववान महिलांची संघर्षगाथाभारतातील पहिल्या महिला न्यायाधीश - फातिमा बीबी तसेचभारतातील दुसरी महिला राष्ट्रपती - महामहिम द्रौपदी मुर्मु ..... यासह विविध लेख व कविता वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *प्रधानमंत्री पीक विमा योजनेत 56 कोटी 80 लाख शेतकऱ्यांनी केली नोंदणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात मोठी राजकीय खेळी ; महायुतीकडून मोहिनी नाईक यांना उमेदवारी देण्याबाबत जोरदार चर्चा*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *मुंबई : महाराष्ट्र भूषण प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांच्या बेस्ट ऑफ आशा फोटोबायोग्राफी पुस्तकाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते प्रकाशन*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *संविधानाचे रक्षण हाच आमचा जाहीरनामा:पृथ्वीराज चव्हाण यांचे प्रतिपादन; इंडिया आघाडी व समविचारी संघटनांची साताऱ्यात बैठक संपन्न*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *औंढा नागनाथ येथे महाशिवरात्री निमित्त जय्यत तयारी, गुरुवारी मध्यरात्री होणार महापूजा, शुक्रवारी पहाटे दोन वाजल्या पासून मंदिर होणार खुले*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *प्रकाश आंबेडकरांनी काही जागांची अदलाबदली करावी, पवार-ठाकरेंची भूमिका; वंचितच्या प्रस्तावावर महाविकास आघाडीचा 9 मार्च रोजी निर्णय होणार, संजय राऊतांची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *धर्मशालेत आजपासून भारत व इंग्लंड यांच्यातील शेवटचा पाचवा कसोटी सामना, बुमराहचे कमबॅक*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••2. नाश्ता करणं टाळणे -रात्रभर न जेवल्यानंतर दिवसभर काम करण्याची ऊर्जा नाश्त्यातून मिळते. पण आपल्यापैकी बरेच जण सकाळी घाई करतात आणि नाश्त्यासारखी महत्त्वाची गोष्ट सोडून देतात. असं केल्याने रक्तातील साखरेची पातळी कमी होते, ज्यामुळे मेंदूवर परिणाम होतो. दिवसेंदिवस न्याहारी न केल्याने मेंदूचे नुकसान होते, पेशींची कार्यक्षमता कमी होते. पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे मेंदूला सामान्य क्रियाकलाप करणं कठीण जातं. म्हणून नाश्ता करणे मेंदूसाठी चांगली गोष्ट आहे. या लेखातील माहिती ही हार्वर्ड मेडिकल स्कूल आणि अमेरिकेतील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर अँड स्ट्रोक यासह विविध संशोधन अहवालांमधून एकत्रित मांडली आहे. क्रमशः *संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••यशाचे शिखर पार करणारे, जास्त वेळ विश्रांती घेत नाहीत. *संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) महाराष्ट्राचा पहिला *वनभूषण* पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले ?२) गोंदिया जिल्ह्यातील 'पुस्तकांचे गाव' म्हणून कोणत्या गावाची निवड झाली आहे ?३) पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणून दुसऱ्यांदा कोणाची निवड झाली ?४) तापी नदीच्या उपनद्या कोणत्या ?५) "महाराष्ट्र हा भारताच्या सिंहद्वाराचा प्रहरी आहे," अशा शब्दात महाराष्ट्राचा गौरव कोणी केला ? *उत्तरे :-* १) चैत्राम पवार, बारीपाडा, जिल्हा - धुळे २) नवेगावबांध, ता. अर्जूनी मोरगाव ३) शाहबाझ शरीफ ४) गिरणा, पूर्णा ५) कवयित्री महादेवी वर्मा, ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 गोवर्धन शिंदे👤 विश्वनाथ स्वामी👤 मारोती लोणेकर👤 मनोज घोगरे👤 अविनाश मोटकोलू*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *अभंगवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ओळखारे वस्‍तु सांडारे कल्‍पना । नका आडराना जावूं झणी ॥१॥झणी जाल कोठे बुडवाल हीत । विचारी मनांत आपुलिया ॥२॥आपुलिया जीवे शिवासी पहावे । आत्‍मसुख घ्‍यावे वेळोवेळा ॥३॥घ्‍यावे आत्‍मसुख स्‍वरुपी मिळावे । भूती लीन व्‍हावे तुका म्‍हणे ॥४॥।। संत तुकाराम महाराज ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपण करत असलेल्या नि:स्वार्थ कार्याविषयी व परखडपणे मत व्यक्त करताना आपल्या मागे, पुढे निंदा, चुगली,टिंगल, टवाळी होत असेल किंवा आपल्यावर मोठ्याने हसत असतील तर तो, आपल्यासाठी आशीर्वाद समजावा. कारण ते, सर्व कार्य करण्याची तसेच ह्या फालतू गोष्टी कडे लक्ष न देण्याची आपल्याला योग्य ती कला जमलेली असते. आणि एका अर्थाने बघितले तर..ते काम पाहिजे तेवढे सोपे नाही. आणि ती कला प्रत्येकाला जमेलच असेही नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *हरिण व कोल्हा*एका कोल्हयाला फिरण्याचा फार नाद होता, तो या गावाहून त्या गावाला सारखा फिरत राही, प्रवास करता करता तो एका गावाला आला. तिथे त्याला एका तलावात पाणी पीत असलेली काही हरणे दिसली. ती पाणी पितापिता मधेच अकाशाकडे पहात होती हे पाहून कोल्हयाने त्यांना असे करण्याचे कारण विचारले, तेव्हा हरणे म्हणाली, 'आम्ही देवाचे आभार मानतो देवाच्याच दयेनं हे पाणी प्यायला मिळतं आहे.' हरणांचे हे बोलणे ऐकून कोल्हयाला हसू आले व तो त्यांची टिंगल करू लागला. यावर त्यातले एक स्पष्टवक्ते हरीण कोल्हयाला म्हणाले, 'अरे कोल्होबा ज्याची त्याची श्रध्दा असते, अशी दुसऱ्याची टिंगल उडविणे वाईट आहे. आपले वागणे वाईट अशा विकृत दृष्टिकोन असलेल्या तुझ्याकडून समंजसपणाची अपेक्षा का करावी.'तात्पर्यः  'दुसऱ्याच्या श्रध्देविषयी टिंगल करणे हे असभ्यपणाचे लक्षण आहे.'•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 06 मार्च 2024💠 वार - बुधवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://nasayeotikar.blogspot.com/2022/12/astronomy.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_राष्ट्रीय दंतचिकित्सक दिवस_**_ या वर्षातील ६६ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२०००:शहर निर्वाह भत्ता (CCA), महागाई भत्ता (DA) आणि घरभाडे भत्ता (HRA) म्हणून मिळणारी रक्‍कम करपात्र असल्याचे सर्वोच्‍च न्यायालयाचे शिक्‍कामोर्तब**१९९९:जगप्रसिद्ध खजुराहो मंदिर समुहाच्या सहस्राब्दी सोहळ्याचे राष्ट्रपती के.आर. नारायणन यांच्या हस्ते उदघाटन**१९९८:विख्यात गझलगायक जगजितसिंग यांना मध्यप्रदेश सरकारतर्फे दिला जाणारा ’लता मंगेशकर पुरस्कार’ जाहीर**१९९७:स्वाध्याय परिवाराचे संस्थापक पांडुरंगशास्त्री आठवले यांची टेंपलटन पुरस्कारासाठी निवड**१९९२:’मायकेल अँजेलो’ नावाचा संगणक विषाणू पसरण्यास सुरूवात झाली.**१९७५:इराण व इराक यांच्यात सीमाप्रश्नावर संधी झाली.**१९७५:मराठीतील पहिला राष्ट्रपती सुवर्णपदक विजेता चित्रपट "श्यामची आई" मुंबईत प्रदर्शित**१९५३:जॉर्जी मॅक्सिमिलानोव्हिच सोविएत रशियाचे अध्यक्ष झाले.**१९४०:रशिया व फिनलंड मधे शस्त्रसंधी झाली**१९०५:शांतिनिकेतन येथे महात्मा गांधी व रवींद्रनाथ टागोर यांची पहिली भेट**१८४०:बाल्टिमोर कॉलेज ऑफ डेंटल सर्जरी हे पहिले दंतवैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले.**१७७५:सुरत येथे राघोबादादा उर्फ रघुनाथराव पेशवे आणि इंग्रज यांच्या तह झाला.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९७:जान्हवी कपूर-- हिंदी चित्रपटातील अभिनेत्री**१९८१:सौरभ गोखले-- मराठी अभिनेता**१९६८:लक्ष्मण महादेव घागस-- लेखक,कवी* *१९६६:मकरंद देशपांडे-- रंगभूमीवरचा तसेच रुपेरी पडद्यावरचा नावाजलेला कलाकार,लेखक,दिग्दर्शक**१९६५:देवकी पंडीत – शास्त्रीय गायिका**१९५९:लेविन शाहुराव भोसले -- लेखक* *१९५३:माधुरी तळवलकर-- प्रसिद्ध मराठी लेखिका**१९५२:पंडित राजाराम उर्फ ​​राजा काळे-- भारतीय गायक,संगीतकार आणि भारतीय शास्त्रीय,आणि भक्ती संगीताचे अभ्यासक* *१९४८:राज एन.सिप्पी(राज सिप्पी)-- भारतीय चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माता**१९४१:डॉ.हेमंत लक्ष्मण विंझे-- व्यवसायाने डॉक्टर असलेले,कवी,लेखक* *१९३७:वासुदेव नरहर सरदेसाई-- मराठी गझलकार* *१९३६:माणिकलाल कोंडबाजी बारसागडे-- कवी,लेखक* *१९३४:डॉ.शशिकला जयंत कर्डिले-- प्रसिद्ध लेखिका,अनुवादक* *१९३४:मुरलीधर कापडी-- प्रसिद्ध दिग्दर्शक (मृत्यू:१२ऑक्टोबर २००६ )* *१९२५:नयनतारा देसाई-- लेखिका* *१९१६: वसंत अंबादासराव तुळजापूरकर-- कवी* *१९०१:डॉ.श्रीनिवास नारायण बनहट्टी (श्री.ना. बनहट्टी)-- संशोधक,समीक्षक,संपादक (मृत्यू:२२ एप्रिल १९७५)**१८९९:शिवराम लक्ष्मण करंदीकर-- चरित्र लेखक**१४७५:मायकेल अँजेलो – इटालियन शिल्पकार आणि चित्रकार (मृत्यू:१८ फेब्रुवारी १५६४)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२१:श्रीकांत मोघे-- भारतीय चित्रपट आणि थिएटर अभिनेता (जन्म:६ नोव्हेंबर १९२९)* *२०१८:वसंत नरहर फेणे--कथाकार, कादंबरीकार(जन्म:२८ एप्रिल १९२८)* *१९९९:सतीश वागळे – हिन्दी आणि मराठी चित्रपट निर्माते**१९९२:रणजित देसाई – सुप्रसिद्ध नामवंत मराठी साहित्यिक,’स्वामी’कार (जन्म:८ एप्रिल १९२८)**१९८६:माधवराव खंडेराव बागल-- महाराष्ट्रातील सामाजिक-सुधारणा चळवळीतील कृतीशील कार्यकर्ते, स्वातंत्र्यसैनिक,विचारवंत,लेखक आणि चित्रकार(जन्म:२८ मे १८९५)* *१९८२:रामभाऊ म्हाळगी – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक,जनसंघ या राजकीय पक्षाचे महाराष्ट्राचे पहिले सरचिटणीस (जन्म:९ जुलै १९२१)**१९८२:अ‍ॅन रँड – जन्माने रशियन असलेल्या अमेरिकन लेखिका(जन्म:२ फेब्रुवारी १९०५)**१९८१:गो.रा.परांजपे – मराठीतील आघाडीचे विज्ञान प्रसारक,नामवंत शास्त्रज्ञ,’रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’चे पहिले भारतीय प्राचार्य**१९७३:पर्ल एस.बक – नोबेल पारितोषिक विजेत्या (१९३८) अमेरिकन लेखिका (जन्म:२६ जून १८९२)**१९६७:स.गो.बर्वे – कर्तबगार प्रशासक (जन्म:२७ एप्रिल १९१४)* *१९५७:अमिया चक्रवर्ती -- भारतीय चित्रपट दिग्दर्शक, पटकथा लेखक आणि निर्माता(जन्म:३० नोव्हेंबर १९१२)**१९०५:गोविंद शंकरशास्त्री बापट-- भाषांतरकार संस्कृतचे व्यासंगी पंडित (जन्म:८ फेब्रुवारी१८४४)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही._* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*सूर्यमाला आणि ग्रह*सूर्यमाला ही सूर्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे त्याच्या भोवती फिरणाऱ्या खगोलीय वस्तूंनी बनलेली आहे. सूर्यमालेत आठ मुख्य ग्रह आहेत. सूर्यापासूनच्या अंतराप्रमाणे ग्रह असे आहेत - बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरू, शनी, युरेनस (हर्षल) व नेपच्यून (वरुण). प्लूटो हा त्याच्या शोधापासून (म्हणजेच १९३० पासून) सूर्यमालेतील नववा ग्रह मानला जातो...... चित्रासह पूर्ण माहिती वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *केंद्रीय निवडणूक आयोग लवकरच लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा करण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सात टप्प्यात मतदान होऊ शकतं.*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *केंद्रीय मंत्री अमित शाह  हे जळगाव दौऱ्यावर युवा संमेलनाच्या माध्यमातून हजारो तरुणांशी साधला संवाद*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात राहुल गांधींची सभा, ठाण्यात धडकणार भारत जोडो न्याय यात्रा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *नागपूर : कोराडी औष्णिक विद्युत केंद्रातील कंत्राटी कर्मचारी संपावर*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मंत्री छगन भुजबळ यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र:नाशिक शहरातील भूसंपादन प्रक्रिया स्थगित करण्याची मागणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *यंदाची गर्मी करणार अंगाची लाही लाही; जागतिक हवामानावर एल निनोचा प्रभाव कायम, WMO ची मोठी भविष्यवाणी !*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारत-पाक सामन्याचे तिकीट 1.86 कोटींवर पोहोचले : 9 जून रोजी न्यूयॉर्कमध्ये होणार सामना, दोन्ही संघांचे सर्व सामने अमेरिकेत होणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1) अपुरी झोप - अमेरिकेच्या न्यूरोलॉजी आणि वेलनेस सेंटरच्या मते, आपल्या मेंदूचं सर्वात जास्त नुकसान हे अपुऱ्या झोपेमुळं होतं.प्रौढांसाठी पुरेशी झोप म्हणजे दिवसातील 24 तासांपैकी 7 ते 8 तासांची झोप. रात्री सलग झोप घेणं अधिक प्रभावी राहातं, असं तज्ज्ञ सांगतात.झोपल्यानंतर मेंदूला विश्रांती मिळते. याशिवय झोपेच्यावेळेस मेंदू नवीन पेशी तयार करतो. परंतु जर तुम्ही 7 तासांपेक्षा कमी झोपला तर नवीन पेशी तयार होत नाहीत.परिणामी, तुम्हाला काहीही आठवत नाही. लक्ष केंद्रित करण्यात अडचण येते. चिडचिड होते. निर्णय घेण्यास त्रास होतो. झोपेच्या कमतरतेमुळे डिमेंशिया अल्झायमरचा धोकाही वाढतो.जर तुम्हाला तुमच्या मेंदूचं संरक्षण करायचं असेल, तर एकच उपाय आहे. रोज रात्री किमान सात तासांची झोप घेणं. आठ तास झोप घेतली तर आणखी उत्तम.त्यासाठी तुम्ही झोपी जाण्याआधी किमान एक तासआधी बेडवर जायला हवं. या काळात कोणतंही गॅझेट वापरू नका.झोपेचं वातावरण तयार करण्यासाठी बेडरूम अगोदर स्वच्छ करा. खोलीतील प्रकाश कमी करा. तुमचा बेड, कपडे, खोलीचं तापमान सर्वकाही आरामदायक करा.दुसरी गोष्ट - कधीही तोंडावर पांघरुण घेऊन झोपू नका. कारण त्यामुळे आपण नाकातून ऑक्सिजन शरीरात घेतो आणि कार्बन डायऑक्साइड वायू बाहेर सोडतो. या सततच्या प्रक्रियेमुळे तुमच्या चेहऱ्याभोवती CO2 जमा होतो. परिणामी तुम्हाला रात्रीतून ऑक्सिजनची कमतरता भासू शकते.क्रमशःवरील लेखातील माहिती ही हार्वर्ड मेडिकल स्कूल आणि अमेरिकेतील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर अँड स्ट्रोक यासह विविध संशोधन अहवालांमधून एकत्रित मांडली आहे.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ज्यांच्या कडून काही आशा नसतात तेच लोक अनेकदा चमत्कार करतात !*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) सातारा जिल्ह्यातील *'फुलपाखराचे गाव'* कोणते ?२) राज्य फुलपाखरू घोषित करणारे पहिले राज्य कोणते ?३) फुलपाखराचे आयुष्य किती दिवसाचे असते ?४) भारताचे राष्ट्रीय फुलपाखरू कोणते ?५) फुलपाखरे कशाचे प्रतीक आहेत ? *उत्तरे :-* १) महादरे २) महाराष्ट्र ३) १४ दिवस ४) ऑरेंज ओकलिफ ५) परिवर्तन, पुनरुत्थान, सहनशक्ती, आशा*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 श्री अशोक दगडे, पत्रकार, बिलोली👤 सुरेश बावनखुळे, सहशिक्षक, माहूर👤 महेश होकर्णे, प्रेस फोटोग्राफर, नांदेड👤 मीनल आलेवार👤 श्रीकांत संतोष येवतीकर👤 अविनाश गायकवाड👤 कैलास वाघमारे👤 राजकुमार कांबळे👤 माधव गोतमवाड👤 सुरेश कटकमवार👤 राज शंकरोड, धर्माबाद👤 मनोहर कोकुलवार, नांदेड*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *अभंगवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••दोष हे जातील अनंत जन्‍मीचे । पाय त्‍या देवाचे न सोडावे ॥१॥न सोडावे पाय निश्‍चय तो करा । आळवा शारंगधरा भावबळे ॥२॥धरुनि केशव आणा भावबळे । पापियां न कळे काहि केल्‍या ॥३॥न कळे तो देव संत संगावाचुणी । वासना जाळोनि शुध्‍द करा ॥४॥शुध्‍द करा मन देहातित व्‍हावे । वस्‍तुती ओळखावें तुका म्‍हणे ॥५॥।। संत तुकाराम महाराज ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••इतरांच्या वाटेत काटे पेरणाऱ्यांनी तसेच अडथळा निर्माण करणाऱ्यांनी स्वतः किती फुलासमान कोमल हदयाचे आहेत ते, ओळखण्यासाठी स्वतः चे एकदा तरी वेळात, वेळ काढून आत्मपरीक्षण करण्याचा अवश्य प्रयत्न करून बघावे. पुढे असे कोणतेही व्यर्थ कार्य करण्याची मुळात सवय लागणार नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जांभूळ आख्यान ही गोष्ट आहे द्रौपदीची..तिने आपद्धर्म म्हणुन पाच पतींशी विवाह केला..पण तरीही तिला पतिव्रता हा दर्जा दिला गेला..तिच्या पाच पतींनी आणखी वेगवेगळे विवाह केलेच..पण ते पुरुष होते त्यामुळे बहुपत्नीकत्व त्यांना परंपरेने बहाल केलं होतं.तर गोष्ट आहे द्रौपदीची..कुठल्या तरी समारंभाच्या वेळी कर्ण द्रौपदीच्या नजरेस पडला..तेव्हा तो पांडव आहे हे अर्थातच तिला माहिती नसणार.पण तरीही त्याचं देखणेपण पाहुन ती क्षणभर मोहीत झाली..आख्यानकार म्हणतात,” कर्णाला पाहुन द्रौपदीचं मन पाकुळलं ( पाघळलं).आख्यानकार आणखी पुढे म्हणतात की द्रौपदीला क्षणभर वाटुन गेलं की हा देखणा युवक सहावा पांडव असता तर?????आत्ता बारा महिन्यांची जशी विषम विभागणी झाली आहे त्याऐवजी ती सहा जणात दोन दोन महिने अशी झाली असती..अंतर्ज्ञानी कृष्णाच्या ही गोष्ट लक्षात आली..द्रौपदीच्या मनात परपुरुषाचा विचार येणं ही गोष्ट पांडवांच्या दृष्टीने धोक्याची होती..कारण द्रौपदी हे पांडवांना एकत्र बांधुन ठेवणारं सुत्र होतं.मग कृष्णाने वनविहाराचा बेत आखला..वनविहार झाल्यावर सर्वांना भूक लागली म्हणुन भीम फळं शोधण्यासाठी गेला..परंतु कृष्णाने आपल्या मायेने रानातली सर्व फळं नाहिशी केली..एका वृक्षावर एकुलतं एक जांभूळ शिल्लक होतं.भीमाने तेच तोडुन आणलं..त्या वनात कोणी एक ऋषी तप करीत होते..आणि बारा वर्षाचं तप पुर्ण झाल्यानंतर खाण्यासाठी म्हणुन त्यांनी ते जांभूळ राखुन ठेवलं होतं असं शुभ वर्तमान कृष्णाने सर्वांच्या कानी घातलं..आता पांडवांच्यात घबराट पसरली..जांभूळ जाग्यावर दिसलं नाही तर ऋषींचा कोप होणार..कृष्णाने सांगितलं,की तुमच्यापैकी ज्याचं मन स्वच्छ आहे ,ज्याच्या मनात कधीच परपुरुषाचा/परस्त्रीचा विचार आलेला नसेल त्याने मनापासुन प्रार्थना करावी.जांभूळ आपोआप झाडाला जाऊन चिकटेल..म्हणजे आता तिथे द्रौपदीपेक्षा योग्य व्यक्ती नाहीच कोणी.सगळ्यांच्या नजरा आता द्रौपदीकडे..द्रौपदी मनातुन खजील.भयभीत.जांभूळ चिकटलं नाही तर तिच्या पातिव्रत्यावरच घाला..कारण काही क्षणापुरता का होईना पण कर्णाचा विचार तिच्या मनात आलाच होता..तिने मनोमन कृष्णाची करुणा भाकली,पुन्हा अशी चूक होणार नाही अशी मनोमन कबुली दिली आणि हात जोडुन प्रार्थना केली आणि काय आश्चर्य ?जांभूळ परत झाडाला चिकटलं..पण उलट्या बाजुने..द्रौपदीला तिच्या चुकीची सतत आठवण रहावी यासाठी कृष्णाने केलेली ही योजना..म्हणजे एका अर्थी उलटं जांभूळ हे पापाचं प्रतीक..म्हणुन त्याला देवाच्या पुजेत ,उपासाच्या फळामधे स्थान नाही..आख्यानकार आणखीही सांगतो, की जांभूळ खाल्लेलं लपवता येत नाही..जीभ जांभळी करुन सोडतं ते..थोडक्यात - केलेलं पाप लपत नाही.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 05 मार्च 2024💠 वार - मंगळवार~~~~~~~~~~~~~~~~~~~काटकसर लेख वाचण्यासाठी Link - https://nasayeotikar.blogspot.com/2024/03/katakasar.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_ या वर्षातील ६५ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* ••••••••••••••••••••••••••••••••*२०००:पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते कर्नाटकातील कैगा अणूवीजप्रकल्प (युनिट - २) राष्ट्राला अर्पण**१९९९:’इंडियन फिजिक्स असोसिएशन’ तर्फे देण्यात येणार्‍या आर. डी. बिर्ला स्मृती पारितोषिकासाठी डॉ. जयंत नारळीकर व प्रा. अशोक सेन यांची निवड**१९९८:नेहमीच्या अस्त्रांबरोबरच कमी पल्ल्याची विमानभेदी क्षेपणास्त्रे सोडू शकणार्‍या, रशियाकडुन घेतलेल्या ’सिंधुरक्षक’ या पाणबुडीचे मुंबई येथे आगमन**१९९७:ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीच्या सप्तशताब्दीच्या सांगतेनिमित्त राष्ट्रपती शंकरदयाळ शर्मा यांच्या हस्ते ज्ञानेश्वरांची प्रतिमा असणार्‍या टपाल तिकिटाचे प्रकाशन* *१९६६:मैसूरचे माजी संस्थानिक जयचामराजेन्द्र वडियार यांचा बंगळूर येथील राजवाडा व त्यासभोवतालची जागा राज्य सरकारच्या ताब्यात घेण्याची परवानगी देणारे विधेयक कर्नाटक विधानसभेत संमत**१९३३:भयानक मंदीमुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डी. रुझव्हेल्ट यांनी सर्व बँका काही दिवसांसाठी बंद केल्या व आर्थिक व्यवहारांवर बंदी घातली.**१९३१:दुसर्‍या गोलमेज परिषदेपुर्वी गांधी-आयर्विन करार झाला.**१८५१:’जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया’ची (GSI) स्थापना**१६६६:शिवाजीमहाराजांनी राजगडावरून आग्र्यास प्रयाण केले.**१५५८:फ्रॅन्सिस्को फर्नांडीस याने धूम्रपानासाठी सर्वप्रथम तंबाखूचा वापर केला.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९७५:चंद्रकांत थावरु राठोड -- कवी, लेखक* *१९७४:हितेन तेजवानी-- दूरचित्रवाहिनी माध्यमातील भारतीय अभिनेता**१९७३:श्रीमंत सखाराम ढवळे -- कवी* *१९७२:प्रा.शर्मिला सुनील गोसावी-- कवयित्री लेखिका* *१९७०:डॉ.मिलिंद विनायक बागुल -- कवी, लेखक,संपादक* *१९६७:अंजली सत्यपाल श्रीवास्तव -- कथा लेखिका* *१९६७:प्रा.डॉ.रामनाथ गंगाधर वाढे -- लेखक,संशोधक* *१९६५:गजानन माधवराव माधसवार-- कवी, लेखक* *१९६३:सौरभ शुक्ला--भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन अभिनेता,दिग्दर्शक आणि पटकथा लेखक**१९५९:शिवराजसिंह चौहान-- मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री**१९५७:संगीता बापट -- कवयित्री,गायिका, संगीततज्ञ* *१९५६:डॉ.मधुसूदन दत्तात्रेय गादेवार -- कवी, लेखक* *१९४५:गोविंद गोडबोले -- प्रसिद्ध बालसाहित्यिक* *१९२९:संतोष आनंद-- सुप्रसिद्ध भारतीय गीतकार**१९२९:राम उगावकर -- कवी,शाहीर, गीतकार (मृत्यू:५ एप्रिल २०१३)* *१९२८:अॅलिक पदमसी-- भारतीय थिएटर व्यक्तिमत्व आणि जाहिरात चित्रपट निर्माता(मृत्यू:१७ नोव्हेंबर २०१८)**१९२५:वसंत पुरुषोत्तम साठे-- पूर्व कॅबिनेट मंत्री(मृत्यू:२३ सप्टेंबर २०११)* *१९१७:आनंदीबाई विजापुरे--आत्मचरित्रकार, कथाकार,कादंबरीकार(मृत्यू:२० ऑक्टोबर १९९९)**१९१६:बिजू पटनायक – ओरिसाचे माजी मुख्यमंत्री, केन्द्रीय पोलाद, खाणकाम आणि कोळसा मंत्री (मृत्यू:१७ एप्रिल १९९७)**१९१३:गंगूबाई हनगळ – किराणा घराण्याच्या शास्त्रीय गायिका (मृत्यू:२१ जुलै २००९)**१९११:सुब्रोतो मुखर्जी-- भारतीय वायुसेनेचे पहिले वायुसेना प्रमुख(मृत्यू:८ नोव्हेंबर, १९६०)**१९१०:श्रीपाद वामन काळे-- निंबंधकार. संपादक**१९०८:सर रेक्स हॅरिसन – ब्रिटिश आणी अमेरिकन रंगभूमीवरील आणि हॉलिवूड चित्रपटांतील अभिनेते (मृत्यू:२ जून १९९०)**१९०६:सुमंत मूळगावकर -- भारतीय उद्योगपती,टाटा मोटर्सचे आर्किटेक्ट(मृत्यू:१९८९)**१९०५:हरिहर वामन देशपांडे-- लेखक (मृत्यू:२० एप्रिल १९६५)**१८९८:चाऊ एन लाय – चीनचे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू:८ जानेवारी १९७६)**१८७३:लक्ष्मण नारायण जोशी--मराठीतील ऐतिहासिक आख्यायिकांचे संग्राहक,लेखक, ग्रंथसंपादक व पत्रकार(मृत्यू:१जुलै १९४७)**१८५६:राव बहाद्दुर पुरुषोत्तम बाळकृष्ण जोशी-- मुंबई इलाख्याची दर्शनिका (गॅझेटियर) तयार करण्यात सहभाग असलेले मानववंशशास्त्रज्ञ,इतिहासाचे अभ्यासक व कवी(मृत्यू:२६ मार्च, १९२९)**१५१२:गेरहार्ट मरकेटर – नकाशाकार, गणितज्ञ आणि तत्त्वज्ञ (मृत्यू:२ डिसेंबर १५९४)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१३:ह्युगो चावेझ – व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष (जन्म:२८ जुलै १९५४)**१९९५:जलाल आगा – चरित्र अभिनेता (जन्म:११ जुलै १९४५)**१९८९:बाबा पृथ्वीसिंह आज़ाद – क्रंतिकारी स्वातंत्र्यसैनिक,गदर पार्टीचे एक संस्थापक* *१९८५:पु.ग.सहस्रबुद्धे –’महाराष्ट्र संस्कृती’कार* *१९६८:नारायण गोविंद चाफेकर – समाजशास्त्रज्ञ व ग्रंथकार (जन्म:१८६९)**१९६६:शंकरराव मोरे – समाजवादी व साम्यवादी विचाराचे व्यासंगी नेते, पुणे जिल्हा स्कूल बोर्डाचे अध्यक्ष**१९५३:जोसेफ स्टालिन – सोविएत रशियाचे राष्ट्राध्यक्ष (जन्म:१८ डिसेंबर १८७८)**१८२७:अलासांड्रो व्होल्टा – इटालियन भौतिकशास्त्रज्ञ (जन्म:१८ फेब्रुवारी १७४५)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही._* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*काटकसर म्हणजे बचत*काटकसर म्हटले की, आपल्या डोळ्यासमोर येते ते म्हणजे पैश्याची बचत किंवा काटकसर. फक्त पैश्याचीच बचत किंवा काटकसर करता येते अन्य दुसऱ्या कोणत्याही वस्तूची आपणांस बचत वा काटकसर करता येत नाही का ? यावर देखील विचार करायलाच हवं. आपण पावलोपावली पैश्याची बचत कशी करावी ? याविषयी इतरांना सांगतो किंवा इतरांकडून ऐकतो. म्हणूनच त्या गोष्टीवर............... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *गुगलने आपले चॅटबॉट जेमिनी मधील आर्टिफिशल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाच्या गोंधळाबाबत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माफी मागितली*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिर भारतीयांसाठी तीर्थक्षेत्र बनेल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *उद्धव ठाकरेंनी फुंकले लोकसभा निवडणुकीचे रणशिंग : मावळ लोकसभा मतदारसंघातून संजोग वाघेरे तर रायगड मधून अनंत गीते यांना उमेदवारी जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *जालना- मुंबई जनशताब्दीचा हिंगोली पर्यंत विस्तार, पहाटे 5 वाजता निघून दुपारी 2 वाजता मुंबईत पोहोचणार; खा. हेमंत पाटलांची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *अखेर निगडीपर्यंतच्या मेट्रोच्या भूमिपूजनाला मुहूर्त; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवारी होणार भूमिपूजन*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *ऑक्टोबर १९८१ मधील गिरणी कामगारांना गृहयोजनेत सामावून घ्यावे, गिरणी कामगार कल्याणकारी संघाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *अष्टपैलू शार्दूल ठाकूरच्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर मुंबईने रणजी करंडक स्पर्धेच्या सेमी फायनलमध्ये तामिळनाडूवर एक डाव आणि ७० धावांनी मिळवला विजय*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 कावीळ म्हणजे काय ? 📙 कावीळ किंवा कामला हा एक स्वतंत्र विकार मानण्यापेक्षा ते एक रोगलक्षण मानणे सयुक्तिक आहे. यकृतातून बाहेर जाणाऱ्या पित्तरसापेक्षा अधिक पित्तरस यकृतात तयार होऊ लागला म्हणजे कावीळ होते. जास्तीचा शिल्लक राहिलेला पित्ताचा भाग रक्तात मिसळला जातो व सर्व शरीरभर पसरतो. यातूनच डोळ्यांचा पांढरा भाग पिवळा दिसू लागतो. त्वचेचा रंग पिवळसर होऊ लागतो. लघवी पिवळी होते व तीव्र काविळीत लालसर पिवळी दिसते. पित्त यकृतातून बाहेर पडताना पित्तनलिकेत किंवा प्रत्यक्ष यकृतांतर्गत अडथळा निर्माण झाला, तर शौचास पांढरेफिके होऊ लागते.कावीळ हे यकृतविकृतीचे किंवा रक्तातील तांबड्यापेशी जास्त नाश पावत असल्याचे चिन्ह होय. या रोगाचे निदान मुत्रपरीक्षेतून व रक्ताच्या चाचण्यांतून होते. नवजात बालकाला रक्तपेशींचे दान निसर्गाने जरा सढळपणे दिलेले असते. त्यामुळे जन्मानंतर काही दिवसांतच या जास्तीच्या पेशी नाश पावतात व मंद स्वरूपात कावीळ उद्भवते. पण ती आपोआपच थोड्याच दिवसांत नाहीशी होते. क्वचित ती तीव्र स्वरूपात व अगदी पहिल्या दुसऱ्या दिवशीच दिसल्यास त्या बालकाला फोटोथेरपी हा अल्ट्राव्हाॅयलेट किरणांचा उपचार दिला जातो. हिमोलायटिक ऍनिमिया या रक्तक्षयाच्या आजारातही रक्तपेशींचा नाश होत असल्याने कावीळ होते. मूळ कारण दूर झाल्यास ती बरी होते.आपण सहसा काविळीचा रुग्ण पाहतो, तो विषाणूजन्य पाण्यातून झालेल्या संसर्गाचा बळी असतो. तोंडावाटे पाण्यातून हे विषाणू शरीरात प्रवेश करतात व त्यामुळे यकृताला सूज येते, कार्यात अडथळा होतो. यकृताचे तांबड्या रक्तपेशी नष्ट करण्याचे काम नीट न झाल्याने कावीळ दिसू लागते. मळमळ, ओकारी, भूक मंदावणे, गुबारा धरणे, शरीराला कंड सुटणे, मलावरोध ही लक्षणे प्राधान्याने सर्वच रुग्णांत दिसतात. डोळ्यांचा, त्वचेचा व मूत्राचा रंग पिवळा होतो, तर शौचास पांढरट चिकणमातीसारखे होऊ लागते. पचनास आवश्यक पित्तरसाचा अभाव झाल्याने ही लक्षणे दिसतात. सामान्यपणे पाच ते दहा दिवसांत हा आजार बरा होतो.दुसऱ्या प्रकारच्या काविळीत म्हणजे रक्ताद्वारे संसर्ग होणाऱ्या काविळीत विषाणू एकाच्या रक्तातून दुसऱ्याच्या शरीरात प्रवेश करतात. इंजेक्शनच्या सुया, शस्त्रक्रियेच्या सुया वा रक्त यांच्याशी सतत संपर्क येणाऱ्या सिस्टर, डॉक्टर यांसारखी व्यक्ती, सर्जन यांना हा संसर्ग होण्याची शक्यता असते. ही कावीळ तीव्र स्वरूपाची असून बरी व्हायला खूप वेळ लागतो. काही वेळा यकृतदाह होऊन यकृताचे काम कायमचेच मंदावत जाते. यालाच 'लिव्हर सिर्‍हाॅसिस' असे म्हणतात. सिर्‍हाॅसिसमध्ये यकृत आक्रसत जाऊन त्याचे काम बंद पडत जाते. हा एक गंभीर रोग आहे. सध्या काविळीची लस (हेपॅटायटिस बी) टोचली जाते, ती या प्रकारच्या काविळीला प्रतिबंध करते. या प्रकारच्या काविळीवर उपचार नसल्याने प्रतिबंध हाच योग्य उपाय तर ठरतो.अंथरुणात पडून पूर्ण विश्रांती, तोंडावाटे भरपूर शर्करायुक्त पेयद्रव्ये, हलका कर्बयुक्त आहार घेतल्यास सर्वसामान्य कावीळ आपोआप नियंत्रणात येते. तीव्र लक्षणांत शिरेवाटे ग्लुकोज सलाईन देऊन रुग्णाच्या पचनसंस्थेला आराम देऊन मदत केली जाते.कावीळ हा विषाणूजन्य आजार असल्याने रुग्णाशी संपर्क आल्यास हात स्वच्छ धुणे, त्याची भांडी, अंथरूण, कपडे यांची वेगळी व्यवस्था करणे व अन्य लोकांनी पाणी उकळून पिणे हा प्रतिबंधाचा महत्त्वाचा मार्ग असतो.शेवटी पण महत्त्वाचे, काविळीची लक्षणे व प्रत्यक्ष संसर्ग होण्याची कारणे जरी दूर झाली, तरी रुग्णाच्या डोळ्यांचा रंग काही आठवडे पिवळसर राहतो व हळूहळू नेहमीसारखा होतो.‘सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपलं अस्तित्व आपल्या कामावर अवलंबून असते, कोणाच्या दृष्टिकोनावर नाही. *संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) कोणत्या धातूला *'व्हाईट गोल्ड'* म्हटले जाते ?२) "महाराष्ट्र म्हणजे कार्यकर्त्यांचे मोहोळ", अशा शब्दात महाराष्ट्राची प्रशंसा कोणी केली होती ?३) महाराष्ट्रातील प्रमुख आदिवासी जमाती कोणत्या ?४) कृष्णा नदीच्या उपनद्या कोणत्या ?५) वाचनालयाची चळवळ महाराष्ट्रभर कोणी सुरू केली ? *उत्तरे :-* १) लिथियम २) महात्मा गांधी ३) वारली, गोंड, कातकरी ४) कोयना, वेण्णा, वारणा, पंचगंगा, वेरुळा ५) गोपाळ हरी देशमुख*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 गंगाधर मदनुरकर, सहशिक्षक, धर्माबाद👤 भास्कर रेड्डी ऐंगोड, येताळा👤 गंगाधर नुकूलवार, सहशिक्षक, देगलूर👤 माणिक आहेर, सहशिक्षक, नाशिक👤 अशोक कहाळेकर, सहशिक्षक, नायगाव👤 रमेश मेरलवार, करखेली👤 प्रकाश पडकूटलावार👤 पोषट्टी सिरमलवार👤 रावसाहेब वाघमारे👤 उमाकांत पा. विभूते चोंडीकर👤 दिनेश चव्हाण👤 गौस पाशा शेख, सहशिक्षक, पालघर👤 गीता ढगे, सहशिक्षिका, बिलोली👤 बालाजी हेंबाडे👤 बालाजी तिप्रेसवार*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *अभंगवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ज्‍याची त्‍याला पदवी इतरां न साजे । संताला उमजे आत्‍मसूख ॥१॥आत्‍मसूख घ्‍यारे उघडा ज्ञानदृष्‍टी । याविण चावटी करु नका ॥२॥करु नका काही संतसंग धरा । पूर्विचा जो दोहरा उगवेल ॥३॥उगवेल प्रारब्‍ध संतसंगे करुनी । प्रत्‍यक्ष पुराणी वर्णियेले ॥४॥।। संत तुकाराम महाराज ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जगात केवळ आपणच दुःखी आहोत असं नाही. या पृथ्वीतलावर अनेकजण दुःखी आहेत. प्रत्येकांचे जीवन सुखा,दु:खाने भरलेले आहे. आपणच दुःखी आहोत म्हणून त्याच विवंचनेत न राहता आपण जरा आजुबाजूचा देखील विचार करायला पाहिजे. कदाचित त्यांच्यापेक्षा आपले दु:ख कमी असू शकतात. म्हणून त्यांचे दुःख आपुलकीने समजून घेण्याचा प्रयत्न केले पाहिजे व फुल नाही तर फुलाची पाकळी देऊन त्यांची मदत केली पाहिजे हा एक प्रकारचा माणुसकी धर्म आहे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••संस्‍कारीत मुलेच यशस्‍वीनैतिक मूल्‍यांचे शिक्षण देणा-या एका शिक्षकाने मुलांसाठी चॉकलेटस मागवली होती. त्‍यांनी सगळ्या मुलांना रांगेत बसवले होते. शिक्षक चॉकलेटस वाटायला सुरुवात करणार इतक्यात शाळेचा शिपाई त्‍या वर्गात येऊन पोहोचला व म्‍हणाला,''सर तुम्‍हाला आताच्‍या आत्‍ता प्राचार्यांनी काही महत्‍वाचे सांगण्‍यासाठी त्‍यांच्‍या कार्यालयात बोलावले आहे.'' शिक्षकांनी चॉकलेटचा डबा हातातून खाली ठेवला व मुलांना म्‍हणाले,'' मुलांनो मला काही कामासाठी प्राचार्यांकडे जावे लागत आहे. खरेतर ही चॉकलेटस मला माझ्या स्‍वत:च्‍या हाताने तुम्‍हाला द्यायची खूप इच्‍छा होती. परंतु मला जावे लागणार आहे. पाहिजे तर तुम्‍ही हाताने चॉकलेटस घेऊ शकता. अन्यथा मी परत आल्‍यावर तुम्‍हाला देईन'' ही चांगली संधी आहे. असा काही विद्यार्थ्‍यांनी विचार केला व त्‍यांनी चॉकलेटस स्‍वत:च्‍या हाताने घेऊन खाल्ली तर काही विद्यार्थ्‍यांनी शिक्षकांची वाट बघण्‍यात वेळ घालविला. शिक्षक परत आले व त्‍यांनी मुलांना विचारले,'' मुलांनो ज्‍यांनी ज्‍यांनी स्‍वत:च्‍या हाताने चॉकलेटस खाल्ली त्‍यांनी आपले हात वर करा'' ज्‍यांनी चॉकलेटस खाल्ली होती त्‍यांनी हात वर केले. मग शिक्षकांनी उरलेल्‍या मुलांना प्रेमाने चॉकलेटस वाटली. काही वर्षानंतर त्‍या शिक्षकांनी त्‍या विद्यार्थ्‍यांची माहिती मिळविली तेव्‍हा त्‍यांना असे दिसून आले की ज्‍या मुलांनी स्‍वत:च्‍या हाताने चॉकलेटस घेतले होते ती मुले सामान्‍य स्‍वरूपातील कामे करून उदरनिर्वाह करत होते तर ज्‍यांना शिक्षकांनी चॉकलेटस दिली ते सर्व विद्यार्थी उच्‍च पदावर काम करत होते. ही सर्व संस्‍कारांची देणगी होती.तात्‍पर्य :- संस्‍काराने माणूस घडतो. मिळालेली संधी आणि तिचा योग्य वापर करणे हे मानवाच्‍या हाती आहे. चुकीच्‍या मार्गाने गेल्‍यास व संयम न पाळल्‍यास योग्‍य संधी मिळूनही तिचा वापर करता येत नाही.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 04 मार्च 2024💠 वार - सोमवार~~~~~~~~~~~~~~~~~~~या समुहात add होण्यासाठी Link - https://chat.whatsapp.com/EgXNT8RopqQ82O3UfAlMy9••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_राष्ट्रीय सुरक्षा दिन_**_ या वर्षातील ६४ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२००१:पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते गुरुदासपूर येथील रणजितसागर धरण देशाला अर्पण**१९९६:चित्रकार रवी परांजपे यांना ’कॅग हॉल ऑफ फेम’ हा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार जाहीर**१९८०:प्रचंड बहुमताने निवडणुका जिंकून रॉबर्ट मुगाबे हे झिम्बाब्वेचे पहिले कृष्ण्वर्णीय पंतप्रधान बनले.**१९६१:१९४६ मधे इंग्लंडमधे बनवलेली युद्धनौका भारतीय सैन्यदलात दाखल झाली व तिचे ’आय.एन.एस.विक्रांत’ असे नामकरण करण्यात आले. ही भारतीय आरमारात दाखल झालेली पहिली विमानवाहू नौका होती.**१९५१:नवी दिल्ली येथे राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते पहिल्या आशियाई खेळांचे उद्‍घाटन झाले. या खेळांत ११ देशांतील ४८९ महिला व पुरुष स्पर्धकांचा सहभाग होता.**१९३८:सौदी अरेबियात प्रथमच खनिज तेल सापडले**१८६१:अब्राहम लिंकन अमेरिकेचे १६ वे अध्यक्ष झाले.**१७९१:व्हरमाँट हे अमेरिकेचे १४ वे राज्य बनले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८०:रोहन बोपन्ना_ भारतीय टेनिस खेळाडू**१९७७:निता प्रफुल्ल अलेल्वार -- कवयित्री, लेखिका**१९७३:प्रा.डॉ.केशव पाटील-- लेखक,संपादक* *१९७२:रवींद्र केदा देवरे -- कवी* *१९७१:वैशाली गावंडे-कोल्हे -- कवयित्री,लेखिका* *१९६७:डॉ.निर्मला पी.भामोदे-- चरित्रकार, वक्त्या* *१९५९:बबन ओंकार महामुने-- कवी , कथाकार* *१९४९:प्रा.डॉ.वामनराव जगताप -- कवी, लेखक**१९४४:शरद पुराणिक-- विज्ञान लेखक**१९३९:गोविंद मोघाजी गारे--आदिवासी संस्कृती,आदिवासी साहित्य,आदिवासी कला यांचे गाढे अभ्यासक,(मृत्यू:२४ एप्रिल २००६)**१९३५:गणपती साबाजी सेलोकर- कवी* *१९३५:प्रभा राव-- राजस्थान व हिमाचल प्रदेश राज्यांच्या माजी राज्यपाल (मृत्यू:२६ एप्रिल २०१०)* *१९२९:प्रल्हाद बापूराव वडेर--कथाकार, समीक्षक**१९२२:दीना पाठक – अभिनेत्री (मृत्यू:११ आक्टोबर २००२)**१९२१:फणीश्वर नाथ 'रेणु'-- हिन्दी भाषेचे साहित्यकार(मृत्यू:११ अप्रैल १९७७)**१९०९:दामोदर अच्युत कारे-- गोमंतकीय मराठी कवी.हे बा.भ.बोरकरांचे समकालीन होते(मृत्यू:२३ सप्टेंबर १९८५)**१९०६:फिशर इलेक्ट्रॉनिक्स चे निर्माते एवेरी फिशर यांचा जन्म. (मृत्यू:२६ फेब्रुवारी १९९४)**१८९५:दत्तात्रय केशव केळकर -- समीक्षक, लेखक (मृत्यू:८ आगस्ट १९६९)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२१:जगन्नाथ केशव कुंटे-- लेखक (जन्म: १५ मे १९४३)* *२०१६:पूर्ण ऐजिटक संगमा(पी.ए. संगमा)-- पूर्व लोकसभा अध्यक्ष (जन्म:१ सप्टेंबर १९४७)**२०११:अर्जुन सिंग – केन्द्रीय मानव संसाधन मंत्री,३ वेळा मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री आणि पंजाबचे राज्यपाल (जन्म:५ नोव्हेंबर १९३०)**२००९:बापू वाटवे-- चित्रपटविषयक लेखन करणारे एक प्रसिद्ध मराठी लेखक व चित्रपट दिग्दर्शक(जन्म:१९२४)**२०००:गीता मुखर्जी – स्वातंत्र्य सेनानी, कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या,लोकसभा सदस्य (जन्म:८ जानेवारी १९२४)**१९९६:आत्माराम सावंत – नाटककार व पत्रकार(जन्म:७मार्च १९३३)**१९९५:इफ्तिखार – चरित्र अभिनेता (जन्म:२२ फेब्रुवारी १९२०)**१९९२:शांताबाई परुळेकर – ’सकाळ’च्या प्रकाशिका आणि सकाळ पेपर्स प्रा.लि.च्या संचालिका**१९८५:पुरूषोत्तम गणेश सहस्रबुद्धे--मराठी गंथकार आणि विचारवंत.(जन्म:१० जून १९०४)**१९७६:वॉल्टर शॉटकी – जर्मन भौतिकशास्त्रज्ञ (जन्म:२३ जुलै १८८६)**१९५२:सर चार्ल्स शेरिंग्टन – मज्जापेशीवर संशोधन करणारे नोबेल पारितोषिक विजेते (१९३२) ब्रिटिश जैवरसायनशात्रज्ञ (जन्म:२७ नोव्हेंबर १८५७)**१९२५:ज्योतिरिंद्रनाथ टागोर – थोर बंगाली साहित्यिक,नाटककार,संगीतकार,चित्रकार व संपादक,रविंद्रनाथ टागोर यांचे वडील बंधू, त्यांनी लोकमान्य टिळकांच्या गीतारहस्याचे बंगालीत भाषांतर केले (जन्म:४ मे १८४९)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*आयुष्याची संध्याकाळ .....*प्रत्येक माणसाचं एक वैशिष्ट्य असते की, आयुष्याच्या शेवटच्या क्षणावर त्याला खूप काही चांगले विचार डोक्यात येत असतात. पण त्यावेळी त्याच्या हातात ना वेळ असते ना काम करण्याची क्षमता. म्हणून जीवन जगताना आपणाला जे शक्य आहे ते काम त्याचवेळी करत राहावे. आता वेळ नाही, नंतर करतो किंवा आताच काही गरज नाही याची हे काम नंतर करतो. असे म्हणून काम पुढे ढकलू नये. गेलेली वेळ परत कधीच येत नाही म्हणून योग्य वेळी योग्य निर्णय हेच यशस्वी जीवनाचे रहस्य आहे. वेळेवर जो विजय मिळवितो तो सर्वच गोष्टीवर विजय मिळवितो. घड्याळ्यातील तीन काटे नेहमी पळत राहतात पण काही ठराविक कालावधीनंतर एकमेकांना भेटत राहतात. तसे आपण कुटुंबात व परिवारात राहणारे आई-वडील, भाऊ-बहीण, पती-पत्नी कामाच्या निमित्ताने किंवा इतर कारणांनी दिवसभर फिरत राहतो पण त्या घड्याळ्यातील काट्याप्रमाणे ठराविक कालावधीनंतर एकत्र येणे विसरून गेलोत. त्यामुळे आपले जीवन नीरस बनत चालले आहे. पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब पद्धत होती. एका घरात विविध नात्यातील माणसं एकत्र राहत होती, त्यांच्यात प्रेम व श्रद्धा होती. विविध सण, समारंभ वा उत्सवाच्या निमित्ताने घराचं गोकुळ होत होते. पण कालांतराने कुटुंब पद्धत बदलत गेली. आज आम्ही दोघे राजा-राणी व दोन लेकरं, एवढाच विश्व झाल्याने माणूस एकलकोंडा होत चाललाय. सुखी जीवनाची व्याख्या बदलून गेली पण समाधान मात्र मिळालं नाही. म्हणून अंथरुणावर पडल्यावर माणसाला हे सारं आठवतं की, उभ्या आयुष्यात माझं काय काय चुकलं. पण तोपर्यंत वेळ गेलेली असते. म्हणून आयुष्यात सुखी व समाधानी राहायचं असेल तर रोज सर्वाना भेटत राहावे, सर्वांशी प्रेमाने बोलत राहावे, सर्वांची खुशाली विचारत राहावं, यातच जीवनाचे खरा सार लपलेला आहे. - नासा येवतीकर, स्तंभलेखक~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *लोकसभा निवडणूक २०२४साठी भाजपची पहिली यादी जाहीर, १९५ उमेदवारांची घोषणा; महाराष्ट्रातून एकही उमेदवाराची घोषणा नाही*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी पुन्हा मुस्लिम लीग ( एन ) चे जेष्ठ नेते शेहबाज शरीफ*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *नगर-बीड-परळी रेल्वेला आणखी गती, पंतप्रधान मोदींच्या हस्ते आष्टी-अमळनेर टप्प्याचे ऑनलाइन लोकार्पण*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *कार्यकर्त्यांच्या माध्यमातून फडणवीस मला मारू पाहतायत, असं माध्यम प्रतिनिधींशी बोलताना मनोज जरागे म्हणाले.*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *नाशिक : MBA CET परीक्षा एक दिवस पुढे ढकलली, राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत दि. ९ व १० मार्च रोजी घेतली जाणारी एमबीए / एमएमएस अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा आता दि. ९ ते ११ मार्च या कालावधीत घेतली जाणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *छ. संभाजीनगर : पाच हजारांची लाच पडली महागात, लाचखोर दुय्यम निबंधकाच्या घरी सापडली १ कोटी ३५ लाख रुपयांची रोख रक्कम*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *चाकूरजवळ झालेल्या कार अपघातात नांदेडचे चार तरुण ठार*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••भगवान बुध्दांनी सांगितलेले प्रकृतीचे तीन नियम *1. प्रकृतिचा पहिला नियम:*सुपीक शेतात बी पेरले नाहीतर निसर्ग अशी शेती तृण व घास-गवताने भरून टाकतो. अगदी तसेच मानवी मनात लहानपणा पासून व बुद्धीत *सकारात्मक* विचार भरले नाही तर *नकारात्मक* विचार आपोआप तयार होतात. हीच मनावरील कवचे होत.. *2. प्रकृतिचा दूसरा नियम:**ज्याच्याकडे जे आहे तो त्याचेच वाटप करतो.* सुखी *सुख* वाटतो, दुःखी *दुःख* वाटतो, ज्ञानी *ज्ञान* वाटतो,भ्रमित करणारा *भ्रम* वाटतो.घाबरणारा *भय* वाटतो, *3. प्रकृतिचा तिसरा नियम:*आपल्याला आयुष्यात जे काही मिळाले ते पचवायला शिका, त्यातच समाधानी रहा.. कारण*भोजन* जर पचले नाही तर *रोग* वाढतात,*पैसा* पचला नाही तर *देखावा* वाढतो,*बातचित* पचली नाही तर *चुगली* वाढते,*प्रशंसा* पचली नाही तर *अंहकार* वाढतो,*टिका* पचली नाही तर *दुश्मनी* वाढते,b *गोपनीयता* टिकली नाहीतर *खतरा* वाढतो,*दुःख* पचले नाही तर *निराशा* वाढते,आणि *सुख* पचले नाही तर *ऊन्मत्तपणा वाढतो...*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जीवन हे यश आणि अपयश यांचे मिश्रण आहे.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) जपानचे राष्ट्रीय फूल कोणते ?२) भारतात अत्तराची राजधानी म्हणून कोणते शहर ओळखले जाते ?३) लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवितो ?४) All India Radio चे घोषवाक्य काय आहे ?५) हवेमधील कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण किती असते ? *उत्तरे :-* १) सकुरा २) कन्नोज, उत्तरप्रदेश ३) लोकसभेचा सभापती ४) बहुजन हिताय, बहुजन सुखाय ५) ०.०३%*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*    👤श्री गोवर्धन कोळेकर, ACP, औरंगाबाद👤 मारोती राचप्पा छपरे, माध्य. शिक्षक, जि. प. हा. धर्माबाद👤 मजहर सौदागर, सहशिक्षक 👤 साहेबराव पहिलवान, धर्माबाद👤 अनिल गडाख 👤 ज्ञानेश्वर नाटकर👤 गोविंद उपासे, सहशिक्षक👤 गोविंद कोंपलवार, सहशिक्षक👤 शिवाजी पाटील ढगे👤 शेख इस्माईल शेख लतीफ👤 लक्ष्मण बोधनकर, सहशिक्षक👤 लक्ष्मण कुमरवाड👤 सचिन पा. हंबर्डे धनंजकर*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *अभंगवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जैसी गंगा वाहें जैसे त्‍याचे मन । भगवंत जाण तया जवळी ॥१॥त्‍याचे जवळी देव भक्ति भावे उभा । स्‍वानंदाचा गाभा तया दिसे ॥तया दिसे रुप अंगुष्‍ठ प्रमाण । अनुभवी खुण जाणति हे ॥३॥जाणती हे खूण स्‍वात्‍मानुभवी । तुका म्‍हणे म्‍हणे पदवी ज्‍याची त्‍याला ॥४॥।। संत तुकाराम महाराज ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मी म्हणजेच सर्वकाही,मला सर्व येते, मला सर्वच काही जमते,माझ्याकडे कशाचीही कमी नाही,मी कोणाच्यामागे धावणार नाही, मी सर्वात श्रेष्ठ व गुणवान आहे, हा अहंभाव जेव्हा,आपल्या अंगी शिरते त्यावेळी आपल्या अंतर्मनाला विचारून बघावे. नक्कीच या सर्व प्रश्नांची उत्तरे आपोआप, आपल्याला मिळतील. कुठेही शोधाशोध करण्यासाठी जावे लागणार नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*❃ परोपकार ❃*       ••◆•◆•◆★◆•◆•◆••   "अनेक वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एका गावात खूप उंदीर झाले होते. घरात, शेतात, दुकानात सगळीकडे नुसते उंदीरच उंदीर होते. त्यामुळे अन्न - धान्याचे नुकसान होत होते. कोणत्याही परिस्थितीत उंदरांचा नाश करायचा असे गावकरी ठरवतात. पण, अनेक उपाय करूनही उंदरांचा नाश होत नाही. त्यामुळे गावकरी खूप त्रस्त होतात. ही गोष्ट शेजारी राहणाऱ्या गावातील एका बासरीवाल्या मुलाला कळते. मग तो गावात येतो व गावकऱ्यांना सांगतो की, ‘मी या उंदरांचा बंदोबस्त करू शकतो पण त्या बदल्यात तुम्ही मला शंभर सुवर्णमुद्रा दयाव्यात.’ गावकरी तयार होतात. मग, तो बासरीवाला बासरी वाजवत गावात फिरू लागतो. त्याच्या बासरीच्या आवाजामुळे गावातील सर्व उंदीर त्याच्याकडे आकर्षित होतात व त्याच्यामागे धावू लागतात. तो मुलगा गावाबाहेरील नदीत जातो त्याच्याबरोबर उंदीरही पाण्यात जातात आणि पाण्यात बुडून मरतात. बासरीवाला मुलगा गावकऱ्यांकडे आपल्या कामाचा मोबदला मागतो परंतु गावकरी ठरल्याप्रमाणे त्याला शंभर सुवर्णमुद्रा दयायला नकार देतात. बासरीवाल्याला कळते की गावकरी लबाड आहेत. तो म्हणतो की, ‘आता मी तुम्हाला कशी अद्दल घडवतो ते बघा.’ तो पुन्हा गावात बासरी वाजवत फिरू लागतो. पण यावेळी बासरीच्या आवाजाने गावातील लहान मुले त्याच्याकडे आकर्षित होतात व तेही त्याच्यामागे धावू लागतात. गावकऱ्यांना भीती वाटू लागते की, बासरीवाला उंदराप्रमाणे आपल्या मुलांनाही नदीत घेऊन जाईल. त्यामुळे गावकरी त्याला थांबवतात व ठरल्याप्रमाणे शंभर सुवर्णमुद्रा देतात.        *_🌀तात्पर्य_ ::~*  जो आपल्यावर उपकार करतो त्याला कधीही विसरू नये. "**प्रत्येकाला त्याच्या कामाचा मोबदला मिळालाच पाहिजे*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 02 मार्च 2024💠 वार - शनिवार~~~~~~~~~~~~~~~~~~~या समुहात add होण्यासाठी Link - https://chat.whatsapp.com/EgXNT8RopqQ82O3UfAlMy9••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_ या वर्षातील ६२ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *१९६९:फ्रेन्च बनावटीच्या ’कॉन्कॉर्ड’ या पहिल्या स्वनातीत (ध्वनीपेक्षा अधिक वेगाने जाणार्‍या) विमानाचे यशस्वी उड्डाण**१९७८:स्वित्झर्लंडमधील दफनभूमीतुन चार्ली चॅप्लिनची शवपेटिका चोरीला गेली.**१९७०:ब्रिटनकडून स्वातंत्र्य घेऊन र्‍होडेशिया प्रजासत्ताक बनले.**१९५६:मोरोक्‍कोला फ्रान्सकडून स्वातंत्र्य मिळाले**१९५२:पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते सिंद्री येथील खत कारखान्याचे उद्‍घाटन**१९४९:न्यू मिलफोर्ड,कनेक्टिकट येथे रस्त्यावरील स्वंयंचलित दिवे बसविण्यात आले.**१९४६:हो ची मिन्ह यांची उत्तर व्हिएतनामचे अध्यक्ष म्हणून नेमणूक झाली.**१९३०:काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली नाशिक येथे करण्यात आला.**१९०३:’मार्था वॉशिंग्टन हॉटेल’हे फक्त महिलांसाठी असलेले जगातील पहिले हॉटेल न्यूयॉर्क मधे सुरू झाले.**१८५७:जे.जे.स्कूल ऑफ आर्टस सुरू झाले**१८५५:अलेक्झांडर (दुसरा) हा रशियाचा झार बनला.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९०:टायगर श्रॉफ--भारतीय सिने-अभिनेता**१९८०:मधुराणी गोखले प्रभुलकर-- मराठी अभिनेत्री,गायिका आणि संगीतकार**१९७७:अँड्र्यू स्ट्रॉस – इंग्लिश क्रिकेटपटू**१९७६:प्रा.डॉ.आनंद शामराव बल्लाळ -- लेखक, कवी**१९७५:आत्माराम गोविंदराव हारे-- कवी**१९७४:डॉ.संजीवनी तडेगावकर-- कवयित्री लेखिका,संपादिका* *१९६६:प्रा.डॉ श्याम मु.जाधव -- लेखक* *१९५९:डॉ.उमेश शामकांत करंबेळकर-- लेखक**१९५४:हेमा सुभाष लेले-- कवयित्री, बालसाहित्यकार आणि मराठी लेखिका**१९५२:प्राचार्य बाबुराव धोंडुजी देसाई -- प्रसिद्ध मराठी,हिंदी,अहिराणी लेखक तथा अहिराणी बोली भाषेचे अभ्यासक* *१९४७:प्रा.मृणालिनी वसंत चिंचाळकर-- लेखिका,कवयित्री**१९४६:डॉ.भालचंद्र लक्ष्मण मुणगेकर-- भारतीय अर्थशास्त्रज्ञ,शिक्षणतज्ज्ञ,समाज सेवक* *१९४४:रमेश डी चव्हाण -- पत्रकार,कवी गझलकार**१९४१:डॉ.भगवान नारायण काटे -- कवी* *१९४०:हनुमंत मोरेश्वर मराठे-- मराठी पत्रकार, कादंबरीकार व कथा लेखक(मृत्यू:२ ऑक्टोबर २०१७)**१९३६:राम हरिश्चंद्र देशमुख -- लेखक* *१९३३:आनंदजी वीरजी शाह--भारतीय संगीत दिग्दर्शक**१९३१:प्राचार्य राम शेवाळकर – उत्तम कीर्तनकार आणि प्रभावी वक्ते प्रतिभावंत सुप्रसिद्ध मराठी साहित्यिक (मृत्यू:३ मे २००९)**१९३१:मिखाईल गोर्बाचेव्ह – सोविएत संघाचे शेवटचे अध्यक्ष आणि नोबेल पारितोषिक विजेते**१९२५:शांता जोग – चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेत्री (मृत्यू:१२ सप्टेंबर १९८०)**१९२४:गुलशन राय -- भारतीय चित्रपट निर्माता आणि वितरक (मृत्यू:११ऑक्टोबर२००४)**१९१७:पुरुषोत्तम नागेश ओक-- विद्वान इतिहासकार,इतिहास संशोधक आणि लेखक(मृत्यू:४ डिसेंबर २००७)**१९०२:लक्ष्मण गोविंद विंझे-- मराठी लेखक आणि कवी(मृत्यू:१ऑक्टोबर १९७२)**१७४२:विश्वासराव – पानिपतच्या ३ र्‍या युद्धात मारले गेलेले नानासाहेब पेशव्यांचे ज्येष्ठ चिरंजीव (मृत्यू:१४ जानेवारी १७६१)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२१:प्रा.डॉ.किसन महादू पाटील-- प्रसिद्ध कवी,लेखक (जन्म:१२ जून १९५३)**२०१३:सुहास भालेकर-- अभिनेते, दिग्दर्शक(जन्म:११ ऑक्टोबर१९३१)**१९८६:डॉ.काशीनाथ घाणेकर-- मराठी नाट्यअभिनेते व हिंदी-मराठी चित्रपट अभिनेते(जन्म:१४ सप्टेंबर, १९३२)**१९८२:केश्तो मुखर्जी-- भारतीय अभिनेता आणि विनोदी कलाकार(जन्म:७ ऑगस्ट १९२५)* *१९७२:नासिर रझा काझमी-- उर्दू कवी(जन्म:८ डिसेंबर १९२५)**१९४९:सरोजिनी नायडू – प्रभावी वक्त्या, कवयित्री व स्वातंत्र्यसेनानी,रौलेट कायदा, मॉन्टेग्यू - चेम्सफर्ड सुधारणा,खिलाफत चळवळ,साबरमती करार,असहकार आंदोलन यांत त्यांचा सक्रिय सहभाग होता. (जन्म:१३ फेब्रुवारी १८७९)**१९३०:डी.एच.लॉरेन्स – इंग्लिश कादंबरीकार,कवी,नाटककार,टीकाकार आणि चित्रकार (जन्म:११ सप्टेंबर १८८५)**१७००:मराठा साम्राज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराज यांचे सिंहगडावर निधन (जन्म:२४ फेब्रुवारी १६७०)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *जीवन म्हणजे क्रिकेट*लिटल मास्टर सुनील गावसकर यांनी हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, थकला तो संपला असे म्हटले आहे, ते जर खोलात जाऊन विचार केलं तर नक्की वाटते की माणसाचे जीवन म्हणजे एक क्रिकेटच आहे.........आई - बाबा म्हणजे जीवनातील पंच आहेत, जे की आपल्या जीवनाला दिशा देतात, चुकत असल्यास लगेच इशारा देतात.पती - पत्नी म्हणजे पीचवर प्रत्येक चेंडूचा सामना करणारे फलंदाज. त्या पीचवर दोन खेळाडू मध्ये रनिंग बिटविन द विकेट चांगली राहणे गरजेचे असते. दोघांची एकमेकाला चांगली साथ असेल तरच धावसंख्या उभारू शकते अगदी तसेच संसारात पती - पत्नी एकमेकांना समजून घेणारे असतील तरच त्यांचे आयुष्य सुखी समाधानाचं असू शकते. जीवनातील संकटाला दोघांना देखील तोंड द्यावे लागते हे ही सत्यच आहे. मुलगा, मुलगी, जवळचे नातलग - म्हणजे मैदानावर असलेले अकरा खेळाडू. काही जण खुप जवळ असतात जसे किपर, सिली पॉईंट, गलीमधील खेळाडू म्हणजे अगदी जवळचे नातलग तर मिड ऑन किंवा मिड ऑफ म्हणजे दूरचे नातलग असे समजू या. गोलंदाजी करणारे खेळाडू म्हणजे मुलगा मुलगी. जे की आपल्या आई - बाबांना खूप कामाला लावतात. ते देखील आपल्या लेकारांसाठी प्रत्येक चेंडूचा म्हणजे संकटाचा सामना करत असतात. दूरचे नातलग देखील यांच्यावर निगराणी ठेवतात, प्रसंगी कामाला लावतात. प्रेक्षक :- म्हणजे संपूर्ण समाज जे की या परिवाराच्या बारीक बारीक गोष्टीवर आनंद आणि दुःख साजरा करतात. आपणाला जीवन जगण्यास प्रोत्साहित करतात.आहे की नाही आपलं जीवन म्हणजे क्रिकेट. शब्दांकन :- नासा येवतीकर, 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी:सुधारित राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजना लागू; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधिमंडळात घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *शेगावच्या गजानन महाराजांचा ०३ मार्च रोजी १४६वा प्रकटदिन, भक्तांसाठी दोन दिवस मंदिर खुले*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *राहुल नार्वेकरांच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात ७ मार्चला सुनावणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *राज्यात एक लाख कोटी पेक्षा अधिक थेट परदेशी गुंतवणूक आणत महाराष्ट्र पहिल्या स्थानावर - देवेंद्र फडणवीस*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *झारखंडमध्ये ३५ हजार ७०० कोटीच्या बहुविध विकास प्रकल्पाचं पंतप्रधानांच्या हस्ते उदघाटन*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *प्रत्येक गावातून १० जण रिंगणात,नांदेड लोकसभेला एक हजार उमेदवार, मराठा आंदोलकांची सगेसोयरेसाठी नवी रणनीती*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *2027 ची जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप बीजिंगमध्ये : ग्लासगो येथे झालेल्या जागतिक ॲथलेटिक्स कौन्सिलच्या बैठकीत घेतला निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*राम शेवाळकर*कयाधू नदीच्या काठावरील शेवाळ हे राम शेवाळकरांचे मूळ गाव. तिथूनच त्यांच्या घरून शेवाळकरांकडे साहित्याचा वसा आणि वारसा आला. त्यांचे मूळचे आडनाव धर्माधिकारी. कालांतराने अचलपुरास वस्तीला आल्यावर शेवाळकर झाले. गोपिका बाळकृष्ण शेवाळकर या त्यांच्या आई. वेदशास्त्रसंपन्न रामशास्त्री शेवाळकर हे राम शेवाळकरांचे पणजोबा, बाळकृष्ण काशीनाथ ऊर्फ भाऊसाहेब शेवाळकर हे त्यांचे वडील. त्यांनी पासष्ट वर्षे कीर्तनाने लोकांना मंत्रमुग्ध केले. अशा घराण्यात जन्मल्यामुळे राम शेवाळकरांना संस्कृत साहित्याची आवड लागली. त्यांच्यावर संस्कृत महाकाव्ये, मराठी संतसाहित्याच्या माध्यमातून वाङ्मयीन संस्कार झाले.राम शेवाळकरांचा जन्म २ मार्च १९३१ रोजी महाराष्ट्रातील  अमरावती जिल्ह्यामध्ये  अचलपूर  गावात झाला. पुढे त्यांनी नागपूर विद्यापीठातून  संस्कृत व मराठीत एम.ए. केल्यानंतर शिक्षकी पेशा स्वीकारला. वाशीम येथे शासकीय प्रशालेत ते शिक्षक होते. पुढे यवतमाळ महाविद्यालय, नांदेडातील पीपल्स कॉलेज, वणीतील लोकमान्य टिळक महाविद्यालयात त्यांनी प्राध्यापक म्हणून शिकवले. या सुमारासच त्यांनी संस्कृती विषयक साहित्यनिर्मितीही आरंभली.१९९४ साली गोव्यात पणजी येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. मराठी साहित्य महामंडळ, विश्वकोष निर्मिती मंडळ, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, अखिल भारतीय सानेगुरुजी कथामाला, महाराष्ट्र साहित्य परिषद, साहित्य अकादमी, नाट्य परीक्षण मंडळ, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ अशा संस्थांच्या कामात शेवाळकरांचा सहभाग होता.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••दुसऱ्याला सावली देणाऱ्या झाडाला मात्र उन्हात उभं राहावं लागतं.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) महाराष्ट्राचा *'राज्यपशू / राज्य प्राणी'* कोणता ?२) 'कवितांचे गाव' हा प्रकल्प राबविण्यासाठी प्रस्तावित असलेले मंगेश पाडगावकरांचे गाव कोणते ?३) आंतरराष्ट्रीय टी - २० क्रिकेटमधील सर्वात वेगवान शतक कोणी ठोकले ?४) गगनयान मोहिमेसाठी भारताने किती अंतराळवीर निवडले आहे ?५) काळाराम मंदिरात अस्पृश्यांच्या प्रवेशाची चळवळ कधी झाली ? *उत्तरे :-* १) शेखरू २) उभा दांडा, वेंगुर्ला ३) जॉन निकोल लॉफ्टी एटन, नामिबिया ( ३३ चेंडूत ) ४) चार ५) ३ मार्च १९३० *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 गणेश पाटील हतनुरे, लोकपत्र धर्माबाद तालुका प्रतिनिधी👤 मीनाक्षी रहाणे, पुणे👤 बालाजी धारजने👤 शेख जुनेद👤 सुरेश मिरझापुरे👤 संतोष कदम👤 चक्रधर ढगे👤 संभाजी सोनकांबळे👤 आकाश पाटील ढगे👤 अरुण भुरोड👤 सुभाष नाटकर👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *अभंगवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••हेचि थोर भक्ति आवडते देवा l संकल्पावी माया संसाराची ll १ llठेविले अनंते तैसेचि रहावे l चित्ती असो द्यावे समाधान ll २ llवाहिल्या उद्वेग दुखःची केवळ l भोगणे ते मूळ संचिताचे ll ३ llतुका म्हणे घालू तयावरी भार l वाहू हा संसार देवापाशी ll ४ ll।। संत तुकाराम महाराज ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••स्वतः ची पाठ स्वतःच थोपाटून समाधान मानून घेण्यात जरी आनंद मिळत असले तरी एखाद्याच्या अंगात असलेल्या खऱ्या गुणांचा विजय होताना पाहून त्याची आपुलकीने पाठ थोपटण्याचा जो,खरा आनंद मिळतो त्यासारखं दुसरं काही मोठे नसते. ज्यावेळी त्या व्यक्तीची आपल्याकडून पाठ थोपाटली जाते त्यावेळी त्या व्यक्तीला पुढे नवीन कार्य करण्याची इच्छा निर्माण होत असते.चांगल्या कार्याची प्रशंसा व स्तुती करायलाच पाहिजे.प्रशंसा व स्तुती केल्याने नवं कार्य करायला प्रेरणा मिळत असते.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *मदत*शंकर एक गरीब घरातील मुलगा होता. एके दिवशी जंगलातून लाकडे गोळा करून तो परत येत असताना त्याला झाडाखाली एक म्हातारा माणूस बसलेला दिसला. तो खूप थकलेला आणि भुकेलेला होता. शंकरने त्याची विचारपूस केली. पण त्याच्याकडे त्या म्हातार्‍याला द्यायला अन्न द्यायला नव्हते. तो तसाच पुढे गेला. पुढे एक हरिण दिसले. त्याला तहान लागलेली होती. पण शंकरकडे पाणीही नव्हते. शंकरला खूप वाईट वाटले पण त्याचा नाईलाज होता. तो तसाच पुढे गेला. पुढे गेल्यावर त्याला एक माणूस भेटला. त्याला शेकोटी पेटवायची होती पण त्याच्याकडे लाकडे नव्हती. शंकरने त्याला आपल्याकडची थोडी लाकडे दिली. त्या माणसाने त्याला आपल्याकडचे थोडे अन्न आणि पाणी दिले. शंकर ते घेऊन मागे फिरला. त्याने हरणाला पाणी पाजले आणि उरलेले पाणी आणि अन्न घेऊन तो भुकेलेल्या म्हातार्‍या माणसाकडे आला. त्याला अन्न दिले. काही दिवस गेले. शंकर असाच लाकडे गोळा करायला जंगलात गेला. अचानक वाघ समोर आला. वाघ झेप घेणार इतक्यात एका हरणाकडे त्याचे लक्ष गेले. त्या हरणाला शंकरने पाणी पाजले होते. वाघ हरणाकडे पाहतो आहे हे पाहून शंकर उठू लागला तेवढ्यात तेथे एक वृद्ध माणूस आला. त्याने शंकरला उचलून सुरक्षित ठिकाणी नेले आणि त्याचे प्राण वाचवले*तात्पर्य -आपण दुसर्‍याला मदत केली की आपल्यालाही मदत मिळते.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 01 मार्च 2024💠 वार - शुक्रवार~~~~~~~~~~~~~~~~~~~समुहात add होण्यासाठी Link - https://chat.whatsapp.com/EgXNT8RopqQ82O3UfAlMy9••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_जागतिक नागरी संरक्षण दिन_**_ या वर्षातील ६१ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *१९९८:दाक्षिणात्य गायिका एम.एस. सुब्बलक्ष्मी यांना ’भारतरत्‍न’ हा सर्वोच्‍च नागरी सन्मान राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात आला.**१९९२:बोस्‍निया व हेर्झेगोविनाला युगोस्लाव्हियापासून स्वातंत्र्य मिळाले.**१९५४:प्रशांत महासागरातील बिकिनी अटोल येथे अमेरिकेने हायड्रोजन बॉम्बची दुसरी चाचणी घेतली. हा स्फोट हिरोशिमाच्या स्फोटापेक्षा ६०० पट जास्त शक्तिशाली होता.* *१९४८:गुवाहाटी उच्‍च न्यायालयाची स्थापना**१९४७:आंतरराष्ट्रीय नाणे निधिच्या कामकाजास सुरूवात झाली.**१९४६:’बँक ऑफ इंग्लंड’चे राष्ट्रीयीकरण झाले**१९३६:अमेरिकेतील महाकाय ’हूव्हर धरण’ बांधून पूर्ण झाले.**१९२७:रत्‍नागिरीस गांधीजींनी सावरकरांची भेट घेउन चर्चा केली.**१९०७:’टाटा आयर्न अँड स्टील कंपनी’ची स्थापना**१८७२:’यलो स्टोन नॅशनल पार्क’ या जगातील पहिल्या राष्ट्रीय उद्यानाची स्थापना झाली**१८०३:ओहायो हे अमेरिकेचे १७ वे राज्य बनले**१५६५:रिओ डी जानिरो शहराची स्थापना झाली.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८८:संदीप लहू राठोड -- कवी**१९८४:विशाल भा.मोहोड -- प्रसिद्ध लेखक,कवी* *१९८३:मंगते चुंगनेजंग मेरी कोम-- सुप्रसिद्ध भारतीय बॉक्सिंगपटू* *१९८२:नंदिता पाटकर-- अभिनेत्री* *१९८०:विक्रम सोनबा अडसूळ -- राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक,लेखक**१९८०:शाहिद अफ्रिदी – पाकिस्तानी क्रिकेटपटू**१९७५:मनिषा टीकारामसिंग पाटील -- कवयित्री,लेखिका* *१९६८:चित्रा क्षीरसागर -- प्रसिद्ध कवयित्री, लेखिका* *१९६३:यशोधन बाळ-- मराठी अभिनेते* *१९५६:डॉ.सुरेश काशिनाथ हावरे -- प्रसिद्ध लेखक,विविध पुरस्कारांनी सन्मानित* *१९५१:अमित खन्ना-- भारतीय चित्रपट निर्माता,दिग्दर्शक,लेखक आणि पत्रकार* *१९५१:नितिशकुमार-- मुख्यमंत्री बिहार**१९५०:डॉ छाया प्रकाश कावळे-- प्रसिद्ध कथाकार**१९४७:शांताराम राजाराम हिवराळे -- प्रसिद्ध कवी,समीक्षक* *१९४७:बशीर मोमीन कवठेकर--- साहित्यिक ज्यांनी मराठी भाषेत लावणी,नाटक,धार्मिक भक्तिगीते,देशभक्तीपर गीते याबरोबरच विविध प्रकारची लोक गीते लिहिली (मृत्यू:१२ नोव्हेंबर २०२१)**१९४६:इलाही जमादार--- सुप्रसिद्ध गझलकार (मृत्यू: ३१ जानेवारी २०२१)**१९४५:शोभा फडणवीस-- माजी मंत्री तथा लेखिका* *१९४३:प्रा.डॉ.गजकुमार बाबुलाल शहा-- इतिहासतज्ज्ञ,संशोधक,साहित्यिक**१९४२:इंद्राणी मुखर्जी-- भारतीय चित्रपट अभिनेत्री* *१९३९:प्रा.विलास वाघ--मराठी लेखक, संपादक,प्रकाशक तसेच सामाजिक कार्यकर्ते (मृत्यू:२५ मार्च २०२१)* *१९३०:राम प्रसाद गोएंका – उद्योगपती (मृत्यू:१४ एप्रिल २०१३)**१९२३:शांताबाई कृष्णाजी कांबळे-- लेखिका (मृत्यू:२५ जानेवारी २०२३)**१९२२:यित्झॅक राबिन – इस्त्रायलचे ५ वे पंतप्रधान,संरक्षणमंत्री आणि नोबेल पारितोषिक विजेते (मृत्यू:४ नोव्हेंबर १९९५)**१९१४:भानुदास श्रीधर परांजपे- कवी आणि नाटककार**१९१९:मधुकर(मधू) शंकर आपटे-- अभिनेता(मृत्यू:१३ मार्च १९९३)**१९११:जयशंकर दानवे-- नटश्रेष्ठ आणि नाट्य दिग्दर्शक म्हणून प्रसिद्ध(मृत्यू:३ सप्टेंबर १९८६)**१९०१:बालाजी देवराव पाटील बोरकर-- संस्थापक, सामाजिक कार्यकर्ते(मृत्यू:३० ऑगस्ट १९८०)**१८९६:श्रीधर बळवंत टिळक -- श्रीधरपंत म्हणून ओळखले जाणारे पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते आणि मराठी लेखक(मृत्यू:२५ मे १९२८)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१७:तारक मेहता-- गुजराती विनोदी लेखक,नाटककार व सदरलेखक(जन्म: डिसेंबर १९२९)* *२०१४:प्रफुल्ला दिलीप डहाणूकर-- मराठी चित्रकार(जन्म:१ जानेवारी १९३४)**२००३:गौरी देशपांडे – कादंबरीकार, लघुकथालेखिका आणि कवयित्री (जन्म:११ फेब्रुवारी १९४२)**१९९९:दत्तात्रयशास्त्री धुंडिराज तथा ’दत्तमहाराज’ कवीश्वर – वेदविद्येचे आणि संस्कृतचे गाढे अभ्यासक,वेदांती पंडित (जन्म:१३ फेब्रुवारी १९१०)**१९९४:मनमोहन देसाई--निर्माते,दिग्दर्शक (जन्म:२६ फेब्रुवारी १९३७)**१९९३:मनोहर शंकर ओक--कवी, कादंबरीकार (जन्म:२७ मे १९३३)**१९८९:वसंतदादा पाटील – महाराष्ट्राचे ५ वे व ९ वे मुख्यमंत्री,सहकारी साखर कारखानदारीचे आधारस्तंभ (जन्म:१३ नोव्हेंबर १९१७)**१९५५:नारायण सदाशिव मराठे तथा ’केवलानंद सरस्वती’ – महाराष्ट्रातील धर्मसुधारणावादी श्रेष्ठ संस्कृत पंडित, संस्कृतमीमांसाकोशाचे संपादक (जन्म:८ डिसेंबर १८७७)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*वसंतराव बंडूजी पाटील*(१३ नोव्हेंबर १९१७ - १ मार्च १९८९) महाराष्ट्र राज्याचे पाचवे मुख्यमंत्री. वसंतदादांचा जन्म कोल्हापूर येथे झाला. ते पदमाळे, जिल्हा सांगली येथील शेतकरी कुटुंबातील होते. वडील बंडूजी व आई रुक्मिणीबाई. दादांचे शिक्षण जेमतेम सातवीपर्यंत झाले. १९३७ मध्ये वसंतदादांनी राजकारणात प्रवेश केला. १९४० मध्ये महात्मा गांधींनी वैयक्तिक सत्याग्रहाचा आदेश दिला. त्यात दादांनी भाग घेतला. त्यांना सहा महिन्यांची शिक्ष झाली. १९४२ च्या ‘छोडो भारत’ आंदोलनातही ते सहभागी झाले. ब्रिटिश सरकारने पकड वॉरंट (अधिपत्र) काढून त्यांना पकडण्यासाठी एक हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले. अखेर दादा पकडले गेले; दोन वर्षांची शिक्षा झाली; परंतु त्याच दिवशी ते तुरुंगातून पोलिसांच्या बंदुका घेऊन आपल्या काही सहकाऱ्यांसह पळून गेले. त्यांना पुन्हा पकडण्यात आले आणि एकूण तेरा वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. १९४६ मध्ये त्यांची मुदतपूर्व मुक्तता झाली. १९५२ मध्ये ते विधानसभेवर निवडून आले. १९६७ पर्यंत ते आमदार होते. १९४८ मध्ये त्यांनी सांगलीला शेतकरी सहकारी साखर कारखाना काढला. त्यानंतर त्यांनी सहकारी तत्त्वावर सूत गिरण्या आणि तेल गिरण्या उभारल्या.वसंतदादा पाटील हे महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष (१९६५), राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंधाचे संचालक व अध्यक्ष (१९७०-७२) व साखर निर्यात मंडळाचे अध्यक्ष (१९७०-७१) होते. यांशिवाय राज्य सहकारी बँक, राष्ट्रीय मिल मजदूर संघ आदी संस्थांचेही ते अनेक वर्षे अध्यक्ष होते. महाराष्ट्र प्रांतिक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली (१९६७). १९६९ साली काँग्रेसचे विभाजन झाले. त्याच वर्षी डिसेंबरमध्ये मुंबईस काँग्रेसचे अधिवेशन झाले. त्यांनी स्वागताध्यक्ष म्हणून काम केले. दादा १९७१ मध्ये अमेरिका येथे भरलेल्या चौदाव्या आंतरराष्ट्रीय ऊस तज्ञांच्या परिषदेस भारतीय शिष्टमंडळाचे नेते म्हणून हजर राहिले. यापूर्वी तीन वेळा त्यांनी जागतिक प्रवास केला होता. त्या वेळचे मुख्यमंत्री श्री. वसंतराव नाईक यांनी आपल्या मंत्रिमंडळात दादांची पाटबंधारे मंत्री म्हणून नेमणूक केली. ते १९७२ मध्ये विधान परिषदेवर बिनविरोध निवडून आले. शंकरराव चव्हाणांच्या कारकीर्दीत वर्षभर पाटबंधारे मंत्री होते. पुढे त्यांचा मंत्रिमंडळात अंतर्भाव झाला नाही. त्यानंतर त्यांनी काही दिवस राजकारणातून संन्यास घेतला.महाराष्ट्रात मार्च १९७७ मध्ये लोकसभेच्या निवडणुकीत ४८ पैकी वीसच काँग्रेस सदस्य निवडून आले. म्हणून त्यांनी पुन्हा राजकारणात प्रवेश केला. १७ एप्रिल १९७७ रोजी दादा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. मार्च १९७८ मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर दादांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस व इंदिरा काँग्रेस यांचे संयुक्त मंत्रिमंडळ अधिकारारूढ झाले. तथापि हे संयुक्त मंत्रिमंडळ समाधानकारक कार्य करू शकत नाही, या कारणास्तव अखिल भारतीय काँग्रेस कार्यकारिणीने वसंतदादांना मंत्रिमंडळ बरखास्त करण्याचा आदेश दिला. त्यानुसार त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला (१७ जुलै १९७८).श्रीमती शालिनीबाई या त्यांच्या सुविद्य पत्नी सामाजिक कार्यकर्त्या आहेत. त्यांनी राजमाता जिजाऊ प्रतिष्ठान स्थापन केले असून या प्रतिष्ठानाद्वारे महाराष्ट्रात, विशेषतः ग्रामीण भागात, सुसज्ज रुग्णालये उभारण्याची योजना आहे. त्यांच्या कार्यास विनम्र अभिवादन.*संकलन : नासा येवतीकर*~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या 7 ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *पंतप्रधान सूर्योदय योजनेंतर्गत एक कोटी घरांना मिळणार मोफत वीज, खर्च होणार 75 हजार कोटी, सरकारचा मोठा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *अर्थव्यवस्था सुस्साट; तिसऱ्या तिमाहीत GDP ८.४ टक्के, विकासाचा दर सर्वांच्या अंदाजापेक्षा अधिक*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *रिलायन्स अन् डिस्ने एकत्र येणार, देशातील सर्वात मोठ्या मनोरंजन कंपनीची कमान नीता अंबानींच्या हाती*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *साखर कारखान्यांना मोठा दिलासा; अकरा हजार कोटी कर्जाची पुर्नबांधणी- केंद्राचा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *आजपासून शालांत परीक्षेला प्रारंभ*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *सायकलस्वारी करताना ट्रॅक्सीची धडक, Intel कंपनीचे माजी अधिकारी अवतार सैनी यांचा मृत्यू*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *07 मार्च रोजी धर्मशाळा येथे होणाऱ्या पाचव्या कसोटीसाठी भारतीय संघाची घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••गझल सम्राट ; पंकज उधास आपल्या मलमली आवाजाने गझल गायकीला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणारे संगीत रसिकांचे आवडते गझल गायक पंकज उधास यांचे वयाच्या ७२ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने संगीत विश्वातील आणखी एक तारा निखळून पडला. पंकज उधास हे भारतातीलच नाही तर जगातील एक प्रमुख गझल गायक म्हणून ओळखले जात होते. १९८६ साली आलेल्या नाम चित्रपटातील त्यांनी गायलेल्या चिठ्ठी आई है.... आई है...या गाण्याने ते घराघरात पोहचले. हे गाणे आजही तितकेच लोकप्रिय आहे. नाम चित्रपट यशस्वी होण्यात या गाण्याचा खूप मोठा वाटा होता. या गाण्यांनंतर त्यांनी हिंदी चित्रपटात अनेक गाणी गायली. घायल, साजन, ये दिल्लगी, फिर तेरी कहाणी याद आई, मोहरा यासारख्या चित्रपटातून त्यांनी गाणी गायली. त्यांनी गायलेले ना कजरे की धार, आज फिर तुमपे प्यार आता है, जिये तो जीये कैसे, और आहिस्ता अशी कितीतरी गाणी लोकप्रिय झाली.व ही सर्व गाणी गाजली ती त्या गाण्यातील अर्थपूर्ण शब्दांनी आणि पंकज उधास यांच्या मधुर आवाजाने. चित्रपटातील त्यांनी गायलेले गाणी लोकप्रिय झाली तरी त्यांची ओळख ही गझल गायक म्हणूनच राहिली. त्यांचे मोठे बंधू मनहर उधास हे देखील प्रख्यात गझल गायक आहेत त्यांनीच पंकज उधास यांना पहिल्यांदा स्टेजवर गझल गाण्याची संधी दिली. १९७१ साली त्यांनी कर्मा या चित्रपटात पहिल्यांदा पार्श्वगायन केले मात्र त्यांची दखल कोणी घेतली नाही त्यामुळे ते कॅनडाला निघून गेले. तिथे त्यांनी छोट्या मोठ्या समारंभात गाण्यास सुरुवात केली. तिथे ते स्टेज शो देखील करू लागले. त्यांचे स्टेज शो ही लोकप्रिय होऊ लागले. भारतात परतल्यावर त्यांनी अनेक स्टेज शो केले मात्र चित्रपटात त्यांना म्हणावी तशी संधी मिळत नव्हती कारण तो जमाना मोहंमद रफी आणि किशोर कुमार यांचा होता. १९७९ साली त्यांना जवाब या चित्रपटातील मितवा रे मितवा... हे गाणे गाण्याची संधी मिळाली या संधीचे त्यांनी सोने केले. हे गाणे लोकप्रिय झाल्यावर त्यांनी गझल क्षेत्रात करियर करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान त्यांनी अनेक गझल गायली. पंकज उधास यांनी एक से बढकर एक गझल गात रसिकांना मंत्रमुग्ध केले. १९८० साली त्यांच्या गाण्याचा पहिला अल्बम आला. त्यानंतर त्यांच्या गाण्यांचा धडाका सुरू झाला. १९८१ साली मुकर्रर, १९८२ साली तरनुम, १९८३ साली महाफिल, १९८५ साली नायाब हे त्यांचे अल्बम आले. या अल्बम मधील सर्व गाणी रसिकांना आवडली. त्यांच्या गझला इतक्या लोकप्रिय झाल्या की रसिकांनी त्यांना गझल सम्राट ही पदवी दिली. सारं काही विसरायला लावणाऱ्या त्यांच्या गझला आजही रसिक गुणगुणताना दिसतात. त्यांनी आपल्या आवाजाने गझल क्षेत्राला आणि गझल गायकीला ऊर्जितावस्था मिळवून दिली. गझल गायकी लोकप्रिय करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. गझल गायन आणि संगीत क्षेत्रात त्यांनी भरीव योगदान दिले. त्यांच्या याच योगदानासाठी भारत सरकारने त्यांना पद्मश्री हा मानाचा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला. त्यांच्या निधनाने संगीत आणि गायन क्षेत्राची कधीही भरून न निघणारी हानी झाली आहे. गझल सम्राट पंकज उधास यांना भावपूर्ण श्रद्धांजली!*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*९९२२५४६२९५••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••धनाचा लोभ हा माणुसकीला लागलेला कलंक आहे.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *'वाघाची मावशी'* असे कोणत्या प्राण्याला म्हणतात ?२) नैसर्गिक पर्यावरणाचे जतन करण्याची बाब भारतीय संविधानाच्या कोणत्या भागामध्ये समाविष्ट आहे ?३) सर्वाधिक मधुमेहाचे रुग्ण आढळत असल्यामुळे कोणत्या देशाला 'मधुमेहाची राजधानी' असे म्हटले जाते ?४) एकही वृक्ष नसलेला देश कोणता ?५) भीमा नदीच्या उपनद्या कोणत्या ? *उत्तरे :-* १) मांजर ( 🐈 ) २) मूलभूत कर्तव्ये ३) भारत ४) कतार ५) मुळा, मुठा, घोड, निरा, सिना, इंद्रायणी, कुकडी, कऱ्हा *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 आशा तेलंगे, मुंबई👤 साहेबराव बोने, देगलुर👤 अमोल अलगुडे, उमरगा👤 राहुल मॅडमवार👤 साहेबराव गुंजाळ👤 नरेश सुरकूटलावार👤 संजय रामराव पाटील कदम, धर्माबाद👤 संतोष चिद्रावार👤 प्रभाकर गोरे👤 सौ. मीनल भाऊसाहेब चासकर👤 रुद्र व्यंकटेश पुलकंठवार*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *अभंगवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••उध्‍दरीले कुळ आपण तरला । तोचि एक झाला त्रेलोक्‍यात ॥१॥त्रेलोक्‍यत झाले द्वेतचि निमाले । ऐसे साधियले साधन बरवें ॥२॥बरवें साधन सुखशांती मना । क्रोध नाही जाणा तिळभरी ॥३॥तिळभरी नाही चित्तासि तो मळ । तुका म्‍हणे जळ गंगेचे ते ॥४॥।। संत तुकाराम महाराज ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••माणसाची ओळख जरी धनसंपत्ती व इतर गोष्टींमुळे होत असेल तरी खरी ओळख त्याच्यात असलेल्या माणुसकी मुळे,सहनशीलतेमुळे आणि खास करून दुसऱ्यांच्या विषयी आपुलकीने विचार करून संकट काळात धावून जाण्याने होत असते. अशा प्रकारची ओळख निर्माण करण्यासाठी पैसे मोजावे लागत नाही तर माणसात माणुसकी असावी लागते. म्हणून व्यर्थ गोष्टींच्या मोहात पडून पश्चाताप करण्यापेक्षा ज्या कार्यामुळे खऱ्या अर्थाने आपल्याला समाधान मिळतो तेच कार्य आपण करण्याचा प्रयत्न करावे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*आयुष्याची खरी किंमत*एका नातवाने आपल्या आजोबांना प्रश्न विचारला आयुष्याची खरी  किंमत काय असते हो? आजोबांनी त्याला एक दगड दिला आणि म्हणाले  ह्या अगोदर तू ह्या दगडाची खरी किंमत कळावी अशी माझी इच्छा आहे. दगडाची फक्त किंमत काढून ये , विकू नकोस सर्वप्रथम नातवाने एका फळवाल्याला त्या दगडाची किंमत विचारली .तो त्या चकाकणाऱ्या दगडाला बघून  म्हणाला -.या दगडाचा मोबदला म्हणून मी तुला एक डझन सफरचंदे देऊ शकतो. नातवाने  आजोबांच्या आज्ञेमुळे दगड विकू शकत नसल्याबद्दल त्याची माफी मागितली व निघाला, वाटेत त्याला एक भाजीवाला दिसला आणि त्याने त्याला त्या चकाकणाऱ्या दगडाची किंमत विचारली- मी तुम्हाला याच्या बदल्यात एक पूर्ण पोते भरून बटाटे देऊ शकतो. पुन्हा एकदा नातवाने आजोबांच्या आज्ञेमुळे दगड विकू शकत नसल्या बद्दल त्याची माफी मागितली व निघाला. आता त्याला एका सराफाचे दुकान लागले. आत जाऊन त्याने तो चमकणारा दगड सराफाला दाखवून त्याची किंमत विचारली. आपल्या भिंगातून त्या खड्याचे निरीक्षण करताच तो सराफ उत्तरला -या खड्यासाठी मी तुम्हाला  दश लक्ष रुपये देऊ शकतो. नातवंडाला फार आश्चर्य वाटले पण नातवाने  आजोबांच्या आज्ञेमुळे दगड विकू शकत नसल्या बद्दल  त्याची माफी मागितली व निघाला. थोडे पुढे आल्यावर त्याला अतिशय दुर्मिळ रत्न आणि मणी विकणारे दुकान दिसले. त्याने तो दगड तिथल्या रत्नपारख्यास दाखवला. तो रत्नपारखी ह्या विषयात अतिशय निष्णात होता.त्याने अलगद तो दगड एका मखमली कापडावर ठेवला. त्या दगडाच्या अवती भोवती प्रदक्षिणा घालत तो म्हणाला -अहो, एवढा अमूल्य दुर्मिळ अनघड हिरा तुम्ही कुठून बरे आणला? मी माझे अख्खे दुकान जरी विकले तरी सुध्दा ह्या हिऱ्याची किंमत तुम्हाला देऊ नाही शकणार, आता मात्र नातू अतिशय चकित झाला आणि गोंधळलेल्या मनःस्तिथीत तो आजोबांकडे परतला, त्याचे सर्व अनुभव ऐकून आजोबा म्हणाले - मला वाटते फळवाला, भाजीवाला, सराफ आणि रत्नपारखी ह्यांच्या उत्तरावरून तुला आयुष्याच्या मोलाविषयी कळले असेल. तुम्ही जरी अतिशय दुर्मिळ अमूल्य हिरा असलात तरी सुध्दा लोक तुमची किंमत त्यांच्या सीमित समजुती, आकलनशक्ती,हेतू आणि कुवती नुसारच करणार. त्यामुळे आयुष्यात स्वतःची किंमत जाणून घेणे सर्वात महत्वाचे असते. स्वतःचा आदर करा.इतरांबरोबर कोण्यात्याही निरर्थक तुलने मध्ये गुंतू नका, कारण तुम्ही या विश्वातील एक अभिनव आणि अद्वितीय निर्मिती आहेत.*तात्पर्य - तुमच्या सारखे फक्त तुम्हीच आहात. हीच तुमच्या आयुष्याची खरी किंमत आहे. आपल्या सर्वांनाही स्वतःची खरी किंमत कळून स्वतःवर प्रेम करायला शिकू.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 29 फेब्रुवारी 2024💠 वार - गुरुवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://nasayeotikar.blogspot.com/2018/03/01-26.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_२९ फेब्रुवारी लीप दिवस (लीप वर्ष)_* *_ या वर्षातील ६० वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_पृथ्वीला सूर्याची प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी साधारणपणे३६५ दिवस लागतात. खगोलशास्त्रीय आकडेवारीनुसार नेमका कालावधी३६५.२४२ दिवस इतका असतो. दरवर्षी०.२४२दिवसाचा वाढीव कालावधी शिल्लक राहतो. चार वर्षांमधील हा वाढीव कालावधी एकत्रित करुन त्याचा एक दिवस पूर्ण केला जातो.फेब्रुवारी महिन्यात २८ दिवस असल्यामुळे त्याला जोडून ‘लीप दिवस’ साजरा केला जातो._**२०१२:६३४ मीटर उंचीच्या टोकियो स्काय ट्री या जगातील सर्वात उंच मनोऱ्याचे (इमारत नव्हे) बांधकाम पूर्ण झाले.**२००८:अर्थसंकल्पात चार कोटी शेतकऱ्यांसाठी साठ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी**२०००:शशिकिरण भारताचा ५ वा ग्रँडमास्टर बनला.**१९९६:क्रिकेट जगतात नवखा आणि दुबळा संघ म्हणून ओळखल्या जाणार्‍या केनियाच्या संघाने विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत दोन वेळच्या जागतिक विजेत्या वेस्ट इंडीज संघाला ७३ धावांनी पराभूत करून ऐतिहासिक विजय नोंदविला.**१७७६:इंग्रज आणि मराठे यांच्यात प्रसिद्ध पुरंदरचा तह* *_जन्मदिवस/ वाढदिवस/जयंती:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८४:अॅडम सिंक्लेअर-- हॉकी खेळाडू**१९७६:सुधाकर तेलंग -- प्रसिद्ध कवी तथा शिक्षण उपसंचालक* *१९५६:महमूद कादिर याकुब रखांडी -- लेखक**१९५२:सुहास पटवर्धन-- लेखक**१९३०:प्रा.डॉ.वसंत दामोदर कुलकर्णी -- लेखक* *१९४०:शरदचंद्र कोपर्डेकर - लेखक संपादक* *१९३६:विष्णू जयंत बोरकर -- कादंबरीकार, कथाकार* *१९०४:वत्सलाबाई आंबेगावकर -- बालसाहित्यिक,लेखिका* *१९०४:रुक्मिणीदेवी अरुंडेल --भरतनाट्यम नर्तिका (मृत्यू:२४ फेब्रुवारी १९८६)**१८९६:मोरारजी देसाई -- भारतरत्न,भारताचे ४ थे पंतप्रधान(मृत्यू:१० एप्रिल १९९५)**१८२८:नारायण दाजी लाड: रसायनशास्त्र सचित्र व औषधविद्या हे ग्रंथ विलक्षण गाजले* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* •••••••••••••••••••••••••••••••••••*१९५६:एल्पिडियो क्विरिनो-- फिलिपाईन्सचे राष्ट्राध्यक्ष (जन्म:१६ नोव्हेंबर १८९०)**१९४०:एडवर्ड फ्रेडरिक-- इंग्लिश लेखक (जन्म:२४ फेब्रुवारी १९४७)**१९२०:नारायण तथा बापूराव बाळकृष्ण लेले -- ज्येष्ठ पत्रकार* *१५९२:अलेस्सांद्रो स्ट्रिजियो-- इटालियन संगीतकार*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*बालपणीचे संस्कार*एकूण 27 भाग वाचण्यासाठी..... वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदी यवतमाळ दौऱ्यावर, बचत गटाच्या अडीच लाख महिलांचा मेळावा, राज्यातल्या कोट्यवधींच्या विकासकामांचं उद्घाटन आणि लोकार्पण*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *निलेश राणेंच्या मालमत्तेवर पुणे महापालिकेची कारवाई, पावणे चार कोटींची थकबाकी असल्याने कारवाईचा बडगा*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *तलाठी भरती प्रक्रियेबाबत केलेल्या खोट्या आरोपानंतर रोहित पवारांवर गुन्हा दाखल करण्यासंदर्भात कार्यवाही सुरु; महसूलमंत्री विखेंची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *बारावीची परीक्षा असल्याने 3 मार्चपर्यंतचे आंदोलन स्थगित, फक्त धरणे आंदोलन सुरू राहणार, मनोज जरांगेंची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *जहांगीर आर्ट गॅलरीत २८ फेब्रुवारी ते ४ मार्च या कालावधीत प्रदर्शन, राज्यपालांच्या हस्ते ४७ राष्ट्रीय पुरस्कार विजेत्यांचा सत्कार*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *अशोक सराफ आणि रुतुजा बागवे यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *यशस्वी जैस्वालची गगनभरारी ! ICC Ranking मध्ये घेतली हनुमान उडी, विराटच्या जवळ पोहचला !*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *गरम पाण्याचे झरे* 📙हिमालयात प्रवासाला जाणारे परतल्यावर नेहमीच एक आश्चर्याचा किस्सा सांगतात. गंगोत्रीच्या वाटेवर वाटेत काही कुंडे लागतात. कुडकुडणारी थंडी, दूरवर डोंगरमाथ्यावर सफेद बर्फाचे थर आणि या कुंडातून मात्र पाण्यातून चक्क वाफा निघत असतात. हात बुडवला तर चटका बसतो. एवढेच नवे अनेक जण जवळचे तांदूळ त्या पाण्यात काहीवेळा कापडी पुरचुंडी बांधून धरतात व आयता शिजलेला भात खातात. हे पाणी काढून मनसोक्त आंघोळ करण्याचा मोहही कोणी आवरून धरत नाही. असाच पण जरा वेगळा अनुभव वज्रेश्वरीला महाराष्ट्रात येतो. पण येथील झऱ्यांचे पाणी गंधक मिश्रित उग्र वासाचे आहे. येथील उष्ण पाण्यात अंघोळ करून निसर्गोपचार करून घेणाऱ्यांचीही कायम गर्दी उसळलेली असते. जगात असे गरम पाण्याचे कित्येक झरे आहेत. तसेच फक्त वाफेचेही झरे आहेत. वाफेच्या झर्‍यातून फक्त जोरात वाफ उसळून एखाद्या प्रेशरकुकरप्रमाणे तेथे शिट्टीचा आवाजही येत राहतो. या सगळ्या प्रकाराचे मूळ भूगर्भात खोलवर घडणाऱ्या घडामोडीत आहे. सुमारे तीस एक किलोमीटर खोलीवर तप्त मध्यावरणाचा पाण्याच्या वाहत्या साठ्याशी संबंध येतो. तिथे वाफ कोंडू लागते. या वाफेच्या दाबाने जमिनीतील खडकातील काही भेगांतून मार्ग काढला जाऊ शकतो. त्यातूनच हे झरे निर्माण होतात. काही ठिकाणी ज्वालामुखीच्या मुखापासून काही ठराविक अंतरावर प्रथम वाफेचे व नंतर गरम पाण्याचे झरे सलगपणे आढळतात. पण अनेक ठिकाणी ज्वालामुखीचा अलीकडच्या ज्ञात काळात कधीच संबंध आलेला नसतो. हेही लक्षात घ्यायला लागेल. यातही एक मोठा फरक आहे. वाफेचे झरे मधूनमधून नाहीसे होतात, पण गरम पाण्याचे झरे मात्र सलगपणे वर्षानुवर्षे उकळताना दिसतात. काही झर्‍यांत गंधकाचा अंश सापडतो. ते नक्कीच ज्वालामुखीच्या उगमाशी संबंधित असावेत असा संशय घ्यायला जागा आहे.पृथ्वीचा गाभा अत्यंत गरम आहे मध्यावरणही अतितप्त आहे. पण बाह्यावरणाचा काही भाग बऱ्याच ठिकाणी भरपूर गरम आहे असेही लक्षात आले आहे. आईसलँड, न्यूझीलंड येथील काही भागात जेमतेम एक ते तीन किलोमीटर अंतर खोलवर बोअरिंगचे छिद्र पाडले असता भूगर्भातील गरम पाणी व वाफ मिळवता येते असा अनुभव आहे. जरी एवढे खोल छिद्र पाडणे अत्यंत महागडे असले तरी यातून मिळणारी ऊर्जा ही अनेक वर्षे पुरणार असल्याने हा खर्च परवडतो. हे गरम पाणी वा वाफ वापरून घरे उष्ण ठेवण्याचा वा विद्युतनिर्मिती उद्योग यातूनच केला जातो. येथेही गमतीचा भाग कसा आहे बघा. आइसलँड व न्यूझीलंडसारख्या थंड प्रदेशातही निसर्गाने ही सोय करून ठेवली आहे.'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••धनाच्या श्रीमंतीपेक्षा मनाची श्रीमंती श्रेष्ठ.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) 'मेटा'चे संस्थापक कोण आहेत ?२) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना 'बोधिसत्त्व' ही उपाधी कोठे प्रदान करण्यात आली ?३) अमेरिकेच्या पहिल्या व्यावसायिक अवकाश यानाचे नाव काय आहे ?४) एकही नदी नसलेला देश कोणता ?५) आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाहानंतर अनेक तरुण - तरुणींना सुरक्षित निवारा देण्याच्या उद्देशाने राष्ट्रातील पहिले आश्रयस्थळ महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीमार्फत कोणत्या ठिकाणी उभारण्यात आले आहे ? *उत्तरे :-* १) मार्क झुकरबर्ग २) काठमांडू, नेपाळ ३) ओडिसिस ४) सऊदी अरब ५) वाई*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 आनंद बालाजी आनेमवाड, तंत्रस्नेही शिक्षक👤 सुरज आहेर*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *अभंगवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अहर्निश सदा परमार्थ करावा । पाय न ठेवावा आडमार्गी ॥१॥आडमार्गी कोणी जन ते जातील । त्‍यातुनि काढील तोचि ज्ञानी ॥२॥तोचि ज्ञानी खरा तारी दुजीयासी । वेळोवेळा त्‍यासी शरण जावे ॥३॥आपण तरेल नव्‍हे ते नवल । कुळे उध्‍दरील सर्वांची तो ॥४॥शरण गेलियाने काय होते फळ । तुका म्‍हणे कुळ उध्‍दरीले ॥५॥।। संत तुकाराम महाराज ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जेव्हा आपली परिस्थिती चांगल्याने सुधारते त्यावेळी लाखो रूपयाच्या घरात जुन्या सामानाची आपल्याला अडचण होत असते. वेळ आल्यावर त्याला बाहेर सुद्धा ठेवल्या जाते.तसंच परखडपणे बोलणाऱ्या किंवा विचार मांडणाऱ्याला बाजूला सारण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न केले जाते. जेव्हा, गुलामगिरी पत्करली जाते व बुध्दी गहाण ठेवली जाते त्यावेळपासून जीवनाची दिशाच बदलून जाते. भलेही जुने सामान फेकल्याने आपली अडचण दूर होत असेल पण, स्पष्ट व सत्य बोलणाऱ्याला कितीही दूर सारण्याचा प्रयत्न जरी केले तरी काहीच फायदा होत नाही कारण तो, स्वयंप्रकाशित असतो. म्हणून सत्य नेमकं काय असते जाणून घेण्याचा सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे,असा सकारात्मक दृष्टीकोन ठेवल्याने जीवनाचे सार्थक होण्यास मदत होईल. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एका अरण्याच्या मध्यभागी एक मोठे सागवानाचे झाड उंच आणि सरळ वाढले होते. ते नेहमी आपल्या मोठेपणाच्या गर्वाने आपल्या खाली वाढलेल्या लहान झाडांचा धिक्कार करत असे. त्या झाडांमध्ये एक काटेझाड होते. सागवानाच्या झाडाचा गर्विष्ठ स्वभाव न आवडल्याने त्याने एकदा त्याला स्पष्ट विचारले, 'बाबा रे, तू एवढा गर्व कशासाठी करतोस ?' त्यावर तो म्हणाला, 'मी सर्व झाडांमध्ये श्रेष्ठ शोभिवंत आहे. माझ्या फांद्या ढगांना भिडल्या आहेत. त्या सतत हिरव्या टवटवीत असतात व तुम्ही अगदीच क्षुद्र आहात, जो येईल तो तुम्हाला पायाखाली तुडवतो. माझ्या पानांवरून जे पावसाचे पाणी वाहते त्यात तुम्ही बुडून जाता.' हे ऐकून काटेझाड म्हणाले, 'ते सगळे काही असू देत, पण मी तुला एकच गोष्ट सांगतो, ती लक्षात ठेव. जेव्हा लाकूडतोड्या तुझ्या बुंध्यावर कुर्‍हाडीचा घाव घालायला येईल, त्या वेळी आमच्यातल्या अगदी हलक्या झाडांच्या स्थितीशीही तू आपल्या स्थितीची अदलाबदल करायला तयार होशील.*तात्पर्य - मोठेपणाच्या मागे अनेक दुःखे असतात, ती लहानपणा मागे नसतात, तेव्हा त्यांचा धिक्कार करू नये.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 28 फेब्रुवारी 2024💠 वार - बुधवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://m.facebook.com/story.php?story_fbid=3514819611978121&id=100003503492582&mibextid=Nif5oz/2018/02/03.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_राष्ट्रीय विज्ञान दिन_**_ या वर्षातील ५९ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२००२:महाराष्ट्र शासनाचे महात्मा फुले जलभूमी संधारण अभियान सुरू* *१९३५:वॅलेस कॅरोथर्स या शास्त्रज्ञाने नायलॉनचा शोध लावला.**_१९२८:डॉ.सी.व्ही.रामन यांनी भौतिकशास्त्रातील एका परिणामाचा शोध लावला.त्याला रामन इफेक्ट असे नाव देण्यात आले. यामुळे हा दिवस 'राष्ट्रीय विज्ञान दिन' म्हणुन साजरा करण्यात येतो_**१९२२:इजिप्तला (युनायटेड किंग्डमपासुन) स्वातंत्र्य मिळाले.**१८४९:अमेरिकेच्या पूर्व आणि पश्चिम किनार्‍यांमध्ये नियमित जहाजसेवा सुरू झाली. न्यूयॉर्कहुन निघालेले एस.एस.कॅलिफोर्निया हे जहाज ४ महिने व २१ दिवसांनी सॅनफ्रान्सिस्कोला पोहोचले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८१:प्रा.डॉ.दिपक सुभाषराव सूर्यवंशी -- लेखक* *१९७५:डॉ.बलवंत जेऊरकर-- साहित्य अकॅडेमी पुरस्कारप्राप्त अनुवादक,वक्ते, लेखक**१९७५:रत्ना यशवंत मनवरे-- कवयित्री* *१९६९:निर्मला सोनी -- कवयित्री* *१९६८:वर्षा उसगांवकर-- मराठी,हिंदी चित्रपटातील अभिनेत्री**१९६५:सिद्धार्थ कुलकर्णी-- कवी,लेखक* *१९६४:डॉ.अशोक गोविंदराव काळे -- प्रसिद्ध लेखक* *१९६२:अशोक सदाशिव चोपडे-- लेखक, संपादक**१९६०:प्रमोद जोशी -- कवी,लेखक* *१९५१:करसन घावरी – भारतीय क्रिकेटपटू**१९४८:विदुषी पद्मा तळवलकर – ग्वाल्हेर/किराणा/जयपूर घराण्याच्या ख्याल गायिका**१९४७:दिग्विजय सिंग--- मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री**१९४४:रविन्द्र जैन – संगीतकार व गीतकार(मृत्यू:९ ऑक्टोबर, २०१५)**१९४४:प्रा.सुरेश द्वादशीवार-- मराठी पत्रकार आणि प्रसिद्ध कादंबरीकार**१९४२:प्रा.डॉ.कुमुद दिनकर गोसावी-- प्रसिद्ध लेखिका* *१९४२:ब्रायन जोन्स – ‘द रोलिंग स्टोन्स‘चे संस्थापक,गिटार,हार्मोनिका आणि पियानो वादक (मृत्यू:३ जुलै १९६९)**१९३६:कुसुम रामचंद्र अभ्यंकर-- कादंबरीकार(मृत्यू:५ एप्रिल १९८४)**१९३४:जेनिफर केंडल-- इंग्लिश अभिनेत्री आणि पृथ्वी थिएटरची संस्थापक(मृत्यू:७ सप्टेंबर १९८४)**१९२७:कृष्णकांत – भारताचे १० वे उपराष्ट्रपती (मृत्यू:२७ जुलै २००२)**१९२४:वसंत वैकुंठ कामत --- नाटककार (मृत्यू:३ जुलै १९९४)**१९१४:त्रिंबक कृष्णराव टोपे -- चरित्रकार, लेखक (मृत्यू:२० फेब्रुवारी १९९४)* *१९१३:पंडित नरेंद्र शर्मा-- हिंदी भाषेतील भारतीय लेखक,कवी आणि गीतकार(मृत्यू:१२ फेब्रुवारी १९८९)**१९०९:जयंत देसाई (जयंतीलाल झिनाभाई देसाई)-- भारतीय चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माता(मृत्यू:१९ एप्रिल १९७६)**१९०२:त्र्यंबक विष्णू पर्वते -- चरित्रकार,कवी, पत्रकार* *१९०१:लिनस कार्ल पॉलिंग – रसायनशास्त्रज्ञ आणि अण्वस्त्रांच्या विरोधात लढणारे सामाजिक कार्यकर्ते,नोबेल पारितोषिकाचे दोनदा विजेते [१९५४ - रसायनशास्त्र, १९६२ - शांतता] (मृत्यू:१९ ऑगस्ट १९९४)**१९००:मोरेश्वर दिनकर जोशी--शिक्षक, संस्थापक,संपादक(मृत्यू:३फेब्रुवारी १९७९)**१८९७:डॉ.शंकर दामोदर पेंडसे – मराठी ग्रंथकार आणि संतसाहित्याचे गाढे अभ्यासक. पंढरपूर येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे (१९५५) ते अध्यक्ष होते. (मृत्यू:२३ ऑगस्ट १९७४)**१८९६:केशव वामन साठे -- नाट्यसमीक्षक (मृत्यू:८आगस्ट १९७५)* *१८७३:सर जॉन सायमन – स्वातंत्र्यपूर्व काळात भारताला राजकीय सुधारणा देण्यासाठी नेमलेल्या ’सायमन कमिशन’ या आयोगाचे अध्यक्ष.क्लेमंट अ‍ॅटली हे देखील या आयोगाचे एक सदस्य होते, जे पुढे इंग्लंडचे पंतप्रधान झाले. (मृत्यू:११ जानेवारी १९५४)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९५:कॄष्ण गंगाधर दिक्षीत ऊर्फ कवी संजीव –’सासरमाहेर’,’भाऊबीज’,’चाळ माझ्या पायांत’ या चित्रपटांचे त्यांनी कथा,संवाद व गीतलेखन केले होते.(जन्म:१२ एप्रिल १९१४)**१९८६:स्वीडनचे २६ वे पंतप्रधान ओलोफ पाल्मे यांची हत्या (जन्म:३० जानेवारी १९२७)**१९६६:उदयशंकर भट्ट – आधुनिक हिंदी नाटककार,एकांकिकाकार,कवी आणि कादंबरीकार.(जन्म:३ ऑगस्ट १८९८)**१९६३:डॉ.राजेन्द्र प्रसाद – भारताचे पहिले राष्ट्रपती (जन्म:३ डिसेंबर १८८४)**१९३६:कमला नेहरू – पं. जवाहरलाल नेहरू यांच्या पत्‍नी (जन्म:१ ऑगस्ट १८९९)**१९२६:स्वातंत्र्यशाहीर गोविंद त्र्यंबक दरेकर उर्फ कवी गोविंद – लहानपणीच तापामुळे कमरेखालील सर्व अंग लुळे पडून त्यांना कायमचे अपंगत्व आले,त्यामुळे त्यांचे शिक्षणही होऊ शकले नाही.कविता मात्र बालपणापासून करीत होते. स्वातंत्रवीर सावरकरांशी निकटचे संबंध आल्यानंतर त्यांच्या कवितेला उत्कट राष्ट्रभक्तीची आणि तीव्र स्वातंत्र्याकांक्षेची दिशा गवसली. (जन्म:९ फेब्रुवारी १८७४)* *_राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा_~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त प्रासंगिक लेख*दुर्लक्षित विज्ञान विषय*..... डॉक्टर वा इंजिनिअर व्हायचे असेल तर विज्ञान शाखा निवडावी लागते त्याशिवाय डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण होत नाहीत. तसं पाहिलं तर सर्वानाच विज्ञान या विषयाची आवड असतेच अशातला ही भाग नाही मात्र आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करावे या हेतूने अनेक विद्यार्थी दहावीनंतर अकरावी-बारावीसाठी विज्ञान निवड करतात. त्यातल्या त्यात या विज्ञान शाखेची शिकवण्याची भाषा ही इंग्रजी असल्याने ग्रामीण भागातील अनेक मुलांना अडचणी ला तोंड द्यावे लागत आहे, हे ही विशेष नोंद घेण्यासारखी आहे........... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा:सातारा जिल्ह्यातील कोयना येथे MTDC तून जागतिक दर्जाचे जल पर्यटन विकसित करणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *राज्यातील 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित करण्यात आला आहे. तर विदर्भातील दुष्काळ दूर करण्यासाठी 2 हजार कोटींचा निधी, अर्थसंकल्पात अजित पवारांची घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *मराठा आरक्षण विधेयकावर राज्यपालांची सही:कायद्यात रुपांतर, राजपत्रही जारी; 26 फेब्रुवारीपासून आता 10% आरक्षण झाले लागू*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *भाविकांना सोयीसुविधा उपलब्ध होणार:तीर्थक्षेत्र विकास प्राधिकरणामुळे औंढा नागनाथच्या विकासाला चालना मिळणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांना जानेवारी 2026 पर्यंत मुदतवाढ*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *२८ फेब्रुवारी हा दिवस संपूर्ण देशभर पीएम किसान उत्सव दिवस म्हणून साजरा होणार ! केंद्रशासनाचे निर्देश*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *नामिबियाच्या जॉन निकोलने लॉफ्टी ईटन टी-२० क्रिकेट स्पर्धेत फक्त ३३ चेंडूत ११ चौकार आणि ८ षटकारांसह सर्वात वेगवान शतकाचा केला विक्रम*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••👨🏼‍⚕ *स्टेथोस्कोपमुळे डॉक्टरांना काय समजते ?* 👨🏼‍⚕ **************************स्टेथोस्कोप नसलेल्या डॉक्टरची कल्पनाही आपण करू शकत नाही. किंबहुना एखाद्या डॉक्टराने रुग्णाची तपासणी करताना स्टेथोस्कोप वापरला नाही तर रुग्णाच्या कपाळावर नक्कीच आठ्या पडतात व "काहीच तर तपासले नाही" असे उद्गारही तो काढतो. याचाच गंमतशीर प्रकार खेड्यात बघायला मिळतो. गुडघा दुखला तर गुडघ्यालाही स्टेथोस्कोप लावण्याची बिकट अवस्था डॉक्टरवर येऊ शकते वा क्वचित व्यवसायाच्या दृष्टीनेही तो तसे मुद्दाम करतो. या स्टेथोस्कोपमुळे डॉक्टरांना नेमके काय कळते, असा प्रश्न अनेकदा तुम्हाला पडला असेल. स्टेथोस्कोपमुळे डॉक्टरांना खूप काही कळते, हे जरी खरे असले तरी सगळेच काही कळते असे नाही.स्टेथोस्कोपचा छातीला लावण्याचा भाग, नळ्या व कानात ठेवायचे प्लग्ज असे तीन भाग पाडता येतील. छातीला लावण्याच्या भागास धातूची एक उघडी चपटी डबी व त्यावर एक पातळसा पडदा बसवलेला असतो. हा पातळ पडदा आवाजाची तीव्रता अनेक पटींनी वाढतो व त्यामुळे शरीरात निर्माण होणारे आवाज डॉक्टरांना ऐकू येतात. हृदय आकुंचन प्रसरण पावत असताना येणारे हृदयाचे ठोके, श्वास घेताना व सोडताना येणाऱ्या श्वसनाचे आवाज स्टेथोस्कोपच्या सहाय्याने ऐकता येतात. त्यांच्याच झालेल्या बदलामुळे हृदयाच्या झडपांचे आजार, फुप्फुसाचा न्युमोनिया, क्षयरोग, दमा अशा आजारांचे निदान करता येते. याखेरीज पोटाला स्टेथोस्कोप लावल्यास आतड्यांच्या आकुंचन प्रसरणामुळे येणारे आवाज ऐकता येतात. या आवाजामुळे आतडय़ांत अडथळा (obstruction) निर्माण झाला असल्यास त्याचे निदान होऊ शकते. गर्भवती स्त्रीच्या पोटावर स्टेथोस्कोप ठेवून तिच्या गर्भाशयातील बाळाच्या हृदयाचे ठोकेही मोजता येतात. मूल जिवंत आहे वा नाही, त्याला पुरेसा रक्तपुरवठा होतोय वा नाही हेही स्टेथोस्कोप ने कळू शकते. यावरून लक्षात येईल की स्टेथोस्कोपने अनेक रोगांचे निदान करता येते; पण डोके दुखण्यास डोक्याला, गुडघा दुखल्यास गुडघ्याला वा मान लचकल्यास मानेला स्टेथोस्कोप लावून काहीच उपयोग होणार नाही !*डॉ. जगन्नाथ दीक्षित**डाॅ. अंजली दीक्षित*यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून मनोविकास प्रकाशन०२० ६५२६२९५०👆🏼*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••यशस्वी होण्यासाठी कार्यमग्नता ही मनुष्याच्या जीवनाची एक अटळ अशी अवस्था असते.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *चिपको आंदोलन* कशाशी संबंधित आहे ?२) भारताबाहेरील किती व्यक्तींना 'भारतरत्न' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे ?३) पृथ्वीच्या अंतर्भागातील तापमान प्रत्येक ३२ मीटरला किती अंश सेल्सिअसने वाढते ?४) मराठा समाजाला किती आरक्षण देण्यासंबंधीचे विधेयक राज्य विधिमंडळात एकमताने संमत करण्यात आले ?५) महाबलीपुरमची स्थापना कोणी केली ? *उत्तरे :-* १) वृक्षतोड २) दोन - खान अब्दुल गफार खान - १९८७, नेल्सन मंडेला - १९९० ३) १° से. ४) १० टक्के ५) पल्लव*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 इंजि. साईनाथ सुरेश येवतीकर       विजय नगर, नांदेड👤 राजेश्वर भंडारे, सहशिक्षक, धर्माबाद👤 आनंद आनेमवाड, लोकमत पुरस्कार प्राप्त शिक्षक👤 मारुती पाटील👤 प्रशांत चिखलीकर, सहशिक्षक, लातूर👤 शंकर गर्दसवार👤 श्रीकांत आदमवाड, सहशिक्षक👤 निर्मला सोनी, साहित्यिक, अमरावती👤 मुरलीधर राजूरकर, सहशिक्षक👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *अभंगवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जन्‍माचें ते मूळ पाहिले शोधून । दु:खासी कारण जन्‍म घ्‍यावा ॥१॥पापपुण्‍य करुनि जन्‍मा येतो प्राणी । नरदेहा येवूनी हानि केली ॥२॥रजतमसत्‍व आहे ज्‍याचे अंगी । याची गुणी जग वाया गले ॥३॥तम म्‍हणजे काय नरकचि केवळ । रज तो सबळ मायाजाळ ॥४॥तुका म्‍हणे येथे सत्‍वाचे सामर्थ्‍य । करावा परमार्थ अहर्निशी ॥५॥।। संत तुकाराम महाराज ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••माणूस जो पर्यंत जिवंत आहे तोपर्यंत काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार, तिरस्कार, अभिमान, स्वार्थ आणि अशा बऱ्याच व्यर्थ भूतांच्या आधीन होऊन जगत असतो. जसं तोडांला आलं तसंच बोलून मोकळा होऊन जातो. एकाद्या व्यक्तीविषयी कितीही कपटकारस्थान रचण्याचा प्रयत्न केला तरी ते फक्त जिवंत असेपर्यंतच मर्यादित असते.बाकी एकदा ती,व्यक्ती निघून गेली की, मात्र त्या सर्व व्यर्थ भूतांना काहीही अर्थ नसतो. शेवटी वैऱ्याच्या सुद्धा डोळ्यात अश्रू येत असतात. म्हणून माणसासारखेच जगण्याचा प्रयत्न करावे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *संगत*एक गोसावी रानातून आपल्या गुहेकडे चालला होता. वाटेत त्याला एक अस्वल कण्हताना दिसले. गोसावी त्याच्या जवळ गेला, त्याने पाहिले, अस्वलाच्या पायात काटा रुतला होता. त्याने तो काढला तेव्हा अस्वल म्हणाले, "महाराज मला वेदनेतून मुक्त करून माझ्यावर फारच उपकार केलेत. मला त्याची परतफेड म्हणून तुमच्याबरोबर राहून तुमच्या सेवेची संधी द्या. गोसावी म्हणाला, "अरे मी काही उपकार केले नाहीत, माझा धर्मच आहे तो. तरीही अस्वल आपला हट्ट सोडेना. शेवटी गोसावी त्याला आपल्याबरोबर गुहेत घेऊन गेला. गोसावी विश्रांतीसाठी झोपला तेव्हा त्याच्या तोंडावर माशा बसत होत्या. गोसाव्याची सेवा करावी म्हणून ते अस्वल या माशांना मारू लागले, हाकलू लागले. पण एक धटींगण माशी गोसाव्याच्या नाकावर पुन्हा पुन्हा बसत होती. त्या माशीचा राग येऊन अस्वलाने आपला पंजा माशीला एवढ्या जोराने मारला की माशीचा चेंदामेंदा झाला, पण गोसाव्याचे नाकही तुटले व त्याचा चेहरा विद्रूप झाला!तात्पर्य : शहाण्याचे सेवक व्हावे, पण मूर्खाचे मालक होऊ नये. काही वेळा चांगल्या संगतीचा वेगळाच परिणाम होतो.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 27 फेब्रुवारी 2024💠 वार - मंगळवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://nasayeotikar.blogspot.com/2021/02/marathi-bhashaa-din.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_मराठी भाषा गौरव दिवस_**_ या वर्षातील ५८ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२००१:जमिनीवरून आकाशातील अनेक लक्ष्यांवर मारा करू शकणार्‍या ’आकाश’ या देशी बनावटीच्या क्षेपणास्त्राची चंडीपूर तळावर यशस्वी चाचणी**१९९९:पंधरा वर्षे सुरू असलेली लष्करी राजवट संपुष्टात येऊन नायजेरियात अध्यक्षीय निवडणूक**१९५१:अमेरिकेच्या राज्यघटनेत २१ वा बदल करण्य़ात आला ज्यायोगे एका व्यक्तिच्या राष्ट्राध्यक्षपदाचा जास्तीत जास्त कालावधी ८ वर्षे असा करण्यात आला.**१९४५:सोलापूर जिल्ह्यातील भंडारकवडे येथे साने गुरुजी वाचनालय सुरू* *१९००:ब्रिटन मधे मजूर पक्षाची (Labour Party) ची स्थापना**१८४४:डॉमिनिकन रिपब्लिकला (हैतीपासुन) स्वातंत्र्य मिळाले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८६:संदीप सिंग-- प्रसिद्ध हॉकी खेळाडू* *१९८०:प्रा.डॉ.महेश बापुरावजी जोगी -- लेखक* *१९६७:प्रा.शुभांगी विकास रथकंठीवार -- कवयित्री,लेखिका* *१९६४:डॉ.सुभाष हरिभाऊ कटकदौंड-- प्रसिद्ध कवी,गझलकार,लेखक* *१९६१:रुजारिओ पास्कल पिंटो -- कवी, लेखक* *१९५७:नारायण जाधव -- लेखक,दिग्दर्शक, ज्येष्ठ रंगकर्मी* *१९५६:शिवाजी तांबे -- लेखक,विचारवंत तथा निवृत्त शिक्षण संचालक* *१९५२:प्रकाश झा-- भारतीय चित्रपट निर्माता, अभिनेता,दिग्दर्शक आणि पटकथा लेखक**१९४६:मारोती तुकाराम खिरटकर -- लेखक* *१९४३:बुकनाकेरे सिद्धलिंगप्पा येडियुरप्पा-- कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री* *१९४१:डॉ.ऊषा अरविंद गडकरी-- कवयित्री, लेखिका* *१९४१:श्याम मनोहर आफळे-- मराठी कथा-कादंबरीकार व नाटककार**१९३४:सुरेश दामोदर जोशी-- क्यूरेटर, लेखक(मृत्यू:१६ ऑक्टोबर २०१२)**१९३४:चंद्रशेखर व-हाडपांडे-- संतकवी,लोकशिक्षक,नाट्यलेखक (मृत्यू:२०१५)**१९३२:एलिझाबेथ टेलर – ब्रिटिश-अमेरिकन अभिनेत्री (मृत्यू:२३ मार्च २०११)**१९२६:ज्योत्स्‍ना देवधर – मराठी व हिन्दी लेखिका (मृत्यू:१७ जानेवारी २०१३)**१९२१:आचार्य पार्वती कुमार(पार्वतीकुमार)-- भारतीय नृत्य दिग्दर्शक,नृत्य गुरु (मृत्यू:२९ नोव्हेंबर २०१२)**_१९१२:विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ ’कुसुमाग्रज’ – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते सुप्रसिद्ध लेखक,कवी व नाटककार (मृत्यू: १० मार्च १९९९)_**१८९६:मधुकर गंगाधर पेडणेकर(पी.मधुकर) -- हार्मोनिअम वादक,संगीतकार(मृत्यू:२० जुलै १९६७)**१८९४:कार्ल श्मिट – जर्मन रसायनशास्त्रज्ञ (मृत्यू:१३ जून १८२२)**१८६०:वैजनाथ काशीनाथ राजवाडे-- वाग्वैद्य, निरुक्त अभ्यासक,व्युत्पत्तिशास्त्रज्ञ(मृत्यु:१७ डिसेंबर १९४४)**१८०७:एच.डब्ल्यू.लाँगफेलो – अमेरिकन नाटककार व कवी (मृत्यू: २४ मार्च १८८२)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_*••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९७:श्यामलाल बाबू राय ऊर्फ ’इंदीवर’ – गीतकार (जन्म:१९२४)**१९९१:प्रा.डॉ.रुपराव पांडुरंग पाजणकर-- लेखक,संपादक,समीक्षक (जन्म:१९ जुलै १९३०)**१९५६:गणेश वासुदेव मावळणकर-- लोकसभेचे पहिले अध्यक्ष(जन्म:१५ मे १९५२)**१९३६:इव्हान पेट्रोव्हिच पाव्हलॉव्ह – चयापचय प्रक्रियेविषयी महत्त्वाचे संशोधन करणारे नोबेल पारितोषिक विजेते (१९०४) (जन्म:२६ सप्टेंबर १८४९)**१९३१:क्रांतिकारक चंदशेखर आझाद-- काकोरी कट व लाहोर कट यातील पोलिसांशी झालेल्या चकमकीत मृत्यू (जन्म:२३ जुलै १९०६)**१९८७:अदि मर्झबान – अभिनेते,दिग्दर्शक, नाटककार व संपादक* *१८९४:कार्ल श्मिट – जर्मन रसायनशास्त्रज्ञ (जन्म:१३ जून १८२२)**१७१२:बहादूरशाह जफर (पहिला) – मुघल सम्राट (जन्म:१४ आक्टोबर १६४३)* 💐💐 *_ मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 💐💐_*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*मराठी राजभाषा गौरव दिन*त्यानिमित्ताने एकंदरीत इंग्रजी आणि मातृभाषा याचा विचार केल्यास प्राथमिक शाळेतील मुलांसाठी कोणत्या भाषेतुन शिक्षण घ्यावे ? हा मोठा प्रश्न आहे. अनेक विचारवंत आणि तज्ञ मंडळी या प्रश्नाचे उत्तर देताना म्हणतात की, मुलांना आपल्या मातृभाषेत प्राथमिक शिक्षण द्यावे. कारण समजणाऱ्या भाषेत घेतलेले ज्ञान लवकर लक्षात येते आणि त्याचे आकलन ही होते. याउलट दुसऱ्या भाषेत शिक्षण घेतांना अनेक शब्द ओळखीचे नसतात त्यामुळे भाषा समजणे अवघड जाते तर संवाद करताना देखील अनंत अडचणी येतात.......संपूर्ण लेख व कविता वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *केंद्राने दिल्या सर्व राज्यांना सूचना, इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी किमान 6 वर्षे असावे वय*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *केंद्र सरकारच्या अमृत भारत योजने अंतर्गत 554 रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकास प्रकल्पाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुभारंभ*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *100% अनुदानाची मागणी:अंशतः अनुदानित शाळा महाविद्यालयातील 63 हजार शिक्षकांचा 10, 12 वीच्या उत्तर पत्रिका तपासणीवर बहिष्कार*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मनोज जरांगेंचं आमरण उपोषण स्थगित, अंतरवाली सराटीत साखळी उपोषण सुरू राहणार, पुन्हा राज्यभरात फिरुन रान उठवणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *10 व्या गानसरस्वती महोत्सवाचा समारोप:पं. रघुनंदन पणशीकरांच्या गायनाने कार्यक्रमात रंगत; 'गानतपस्विनी' पुरस्कार पं. विश्व मोहन भट्ट यांना प्रदान*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *ख्यातनाम गायक पंकज उधास यांचं प्रदीर्घ आजारानं निधन, वयाच्या 72व्या वर्षी मुंबईत घेतला अखेरचा श्वास*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीत भारताचा दणदणीत विजय, पाच विकेट्स राखून इंग्लंडवर मात, पाच सामन्यांची मालिका 3-1 ने खिशात*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 अमीबा म्हणजे काय ? 📙 साऱ्या जगात किमान दहा लाख प्रकारचे प्राणी सापडतात. पण प्राणीशास्त्राबद्दल चर्चा सुरू झाली किंवा अभ्यास करायचे ठरवले की सर्वप्रथम नाव निघते ते अमीबाचेच. एकपेशीय प्राणी हे त्याचे वैशिष्ट्य.१६६५ साली रॉबर्ट हुक या इंग्लिश निसर्गप्रेमी शास्त्रज्ञाने पेशी (Cell) हा शब्द प्रथम वापरला. बुचाच्या अभ्यासामध्ये त्याला आढळलेल्या पेशींचे वर्णन त्याने त्यावेळी करून ठेवले आहे. त्यानंतर मायक्रोस्कोपखाली सर्वच गोष्टी न्याहाळल्या जाऊ लागल्या. स्वतंत्रपणे जगू शकणारा. पुनरुत्पादनाची क्रिया स्वतंत्रपणेच करणारा एकपेशीय असा हा अमीबा त्यानंतर प्रसिद्ध पावला. अमीबा दिसण्यासाठी मायक्रोस्कोपची तशी गरज नसते. काही प्रकारचे अमीबा अर्धा मिलिमीटरएवढे मोठे असतात. ते नुसत्या डोळ्यांनीही पाण्याच्या थेंबात दिसतात. साधे भिंग वापरले, तर त्यांची हालचालही न्याहाळता येऊ शकते. काही जाती मात्र अगदी सूक्ष्मदर्शक यंत्राखाली पाहाव्या लागतात. जेलीचा एखादा गोळा कसा असावा, तसा हा प्राणी सतत स्वतःचा आकार पालटत हालचाल करत असतो. भक्षाच्या शोधात भटकंती करताना अंगाची वेटोळी लांबुडकी पसरत हा भक्षाच्या दिशेने सरकतो. भक्ष्य आवाक्यात आले की त्याला चहूबाजूंनी प्रथम तो गुरफटून टाकतो. अर्थातच याचे भक्ष्य म्हणजे त्याच्या जीवाच्या आकारास साजेसेच असते. छोटे जीवाणू, प्राणिज व वनस्पती शैवाळ सतत गट्टम करत जाणे हा त्याचा नित्यक्रम.भक्ष्य गुरफटून मग पेशीतील पेशीद्रव्यामध्ये विरघळवण्याची क्रिया सुरू होते. यावर नियंत्रण असते पेशीकेंद्राचे. गरजेप्रमाणे पाणीपण शोषले जात असतेच. पचन पूर्ण झाल्यावर नको असलेला भाग व तत्सम द्रव्ये बाहेर टाकली जातात.साध्या पेशीविभाजन पद्धतीने यांची वाढ होत असल्याने यांची संख्या फार मोठ्या प्रमाणावर वाढत असते. पाणी, मग ते कसलेही असो, अमीबाचा वावर तेथे आढळणारच. त्यातल्या त्यात साचलेले पाणी, डबकी, चिखल यांमध्ये यांची वाढ चांगली होते. वाहत्या पाण्यात त्या मानाने अमीबा कमी सापडतात. अमीबा या प्राण्याबद्दल माणसाला सतत जागरूक राहावे लागते. पिण्याच्या पाण्यातून माणसाच्या शरीरात अमीबाचा एकदा का प्रवेश झाला की त्याच्या शरीरात सर्वत्र संचार सुरू होतो. वाढही छान होते. सर्व पचनसंस्था पोखरून काढण्याची ताकद या एकपेशीय प्राण्यात आहे.पोटाचे विविध आजार, पोटदुखी, मोठ्या आतड्याचे आजार, यकृताची गंभीर दुखणी या अगदी लहान प्राण्यामुळे होतात. जेमतेम ३० वर्षांपूर्वी या दुखण्यांसाठी फारसे खात्रीचे उपायही नव्हते. आजकाल मात्र यांवर खात्रीची औषध उपलब्ध आहेत. जगाच्या पाठीवर सर्वत्र आढळ असलेला हा अमीबा भारतीय हवामानात सर्व प्रांतांत त्याचे राज्य पसरून आहे.‘सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कंजूष म्हणजे तो व्यक्ती, जो श्रीमंत म्हणून मरण्यासाठी आयुष्यभर गरिबीत जगतो.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *'मराठी भाषेचे शिवाजी'* म्हणून कोणास ओळखले जाते ?२) बार्डोली सत्याग्रहाचे नेता कोण होते ?३) छत्रपती शिवाजी महाराजांच्या साम्राज्यात एकूण किल्ले किती ?४) भारतीय क्रिकेट संघाने कसोटी सामन्याच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय कोणत्या देशाच्या संघाविरुद्ध मिळवला आहे ?५) अमेरिकेतील निग्रो चळवळीला अर्पण केलेला महात्मा फुले यांचा ग्रंथ कोणता ? *उत्तरे :-* १) विष्णुशास्त्री चिपळूणकर २) सरदार वल्लभभाई पटेल ३) ३७० किल्ले ४) इंग्लंड ५) गुलामगिरी*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 गंगाधर मुटे, वर्धा👤 श्यामल पाटील👤 साई पांचाळ👤 कु. श्रावणी भुसेवार, नांदेड*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••इतरांच्या सुखदुःखात सहभागी होणे हा माणुसकी धर्म आहे. पण, तेथेच एकाद्या व्यक्तीविषयी नको त्या शब्दात बोलून स्वतः समाधान करून घेणे किंवा व्यर्थ बडबड करणे हा माणुसकी धर्म नाही तर आपलीच अनमोल वेळ वाया घालवणे होय.सोबतच आपल्यात असलेल्या गुणांकडे दुर्लक्ष करून वेळ वाया घालवणे होय. म्हणून असे कोणतेही व्यर्थ काम आपल्या कडून होणार नाही याची काळजी घ्यावी व जर चांगले करता येत असेल तर मात्र वेळ वाया घालवू नये.🌷🌷🌷🌷🌷 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *उंदीर कोंबडा आणि मांजर*एका उंदिराचे पिटुकले पहिल्यांदाच आपल्या बिळातून बाहेर पडले होते. ते इकडे तिकडे फिरून पुन्हा बिळात गेल्यावर आपल्या आईस म्हणते, "आई, ज्या या लहानशा जागेत लहानाचे मोठे केले, ती जागा सोडून आज मी अंमल बाहेर जाऊन आलो. तेथे मी जी फौज पाहिली, ती काही विलक्षणच. रस्त्याच्या बाजूने फिरत असता, मी दोन प्राणी पाहिले, त्यापैकी एक प्राणी फार गडबड्या स्वरुपाचा असून त्याच्या डोक्यावर तांबड्या रंगाचा तुरा आहे. तो प्राणी जेव्हा जेव्हा आपली मान हालवी, तेव्हा तेव्हा तो तुराही हालत असे. मी त्याची ही मौज पहात आहे, इतक्यात त्याने आपले दोन्ही हातही हालविले आणि असा काही कर्कश्श शब्द केला, की त्याने माझ्या कानठळ्याच बसून गेल्या आणि दुसऱ्या प्राण्याची गोष्ट ऐक. तो प्राणी फार सभ्य आणि शांत असून, त्याच्या अंगावर रेशमासारखी मऊ लोकर होती. तो चांगला देखणा असून त्याचे एकंदर वर्तन असे होते, की मला त्याच्याशी आपली मैत्री व्हावी असे वाटल्याशिवाय राहिले नाही.' हे भाषण ऐकून उंदरी त्यास म्हणाली, "वेड्या पोरा! तुला काडीचीही अक्कल नाही. नुसत्या दिखाऊपणावर जाशील तर फसशील, हे लक्षात ठेव. तू जो प्राणी पाहिला आहे तो लबाड व क्रूर मांजर आहे. उंदराच्या मांसाशिवाय दुसरा कोणताही पदार्थ त्याला फारसा आवडत नाही, हे लक्षात ठेव.तात्पर्य : बाह्य देखावा आणि सौंदर्य यावरुन माणसाच्या अंतरंगाची परीक्षा होणे शक्य नाही.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 26 फेब्रुवारी 2024💠 वार - सोमवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://m.facebook.com/story.php?story_fbid=1914047385388693&id=100003503492582&mibextid=Nif5oz••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_ या वर्षातील ५७ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२००८:समुद्राखाली मारा करणा-या पहिल्या के-५ क्षेपणास्त्राची भारताने यशस्वी चाचणी केली.* *१९९९:आंतरराष्ट्रीय जनुक अभियांत्रिकी व जैवतंत्रज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ प्रा.जी.पी. तलवार यांची मानाच्या समजल्या जाणार्‍या मास्त्रोनी-सीगल पुरस्कारासाठी निवड**१९९९:आशिया खंडातील पहिले तरंगते हॉटेल अशी ख्याती असलेले ठाण्याच्या घोसाळे तलावातील ’अभिरुची हॉटेल’ आगीत भस्मसात झाले.**१९९८:परळी-वैजनाथ येथील औष्णिक केन्द्राने एका दिवसात १४.७०९ दशलक्ष युनिट विजेची निर्मिती करून वीजनिर्मितीचा (भारतातील व त्याकाळचा) नवा विक्रम नोंदवला.**१९९५:बारिंग्ज बँक ही इंग्लंडची सर्वात जुनी गुंतवणूक बँक दिवाळखोरीत निघाली.**१९८४:‘इन्सॅट-१-इ‘ हा संपूर्ण भारतीय बनावटीचा बहुउद्देशीय भारतीय उपग्रह राष्ट्राला समर्पित**१९७६:वि.स.खांडेकर यांना (ययाती कादंबरीसाठी) मराठीतील पहिला ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९२:चैतन्य सरदेशपांडे-- नाटककार* *१९७६:अशोक जाधव -- प्रसिद्ध चित्रकार, काष्ठ शिल्पकार* *१९६८:राजेश ओं.राजोरे -- लेखक,संपादक दै.देशोन्नती बुलडाणा आवृत्ती**१९६५:संजय ठिगळे-- लेखक* *१९६४:ऋता मिलिंद गोखले -- लेखिका* *१९६४:डॉ.मिलिंद दिगंबर पाटील-- लेखक* *१९५९:उषा दिनेश भालेराव -- कवयित्री, लेखिका* *१९५०:जयंत राळेरासकर--- ध्वनिमुद्रिका संग्राहक,लेखक**१९३७:मनमोहन देसाई – चित्रपट निर्माते, दिग्दर्शक (मृत्यू:१ मार्च १९९४)**१९२८:गणाधीश वासुदेव खांडेपारकर-- चरित्रकार,संपादक**१९२८:शोभना लक्ष्मण गोखले--महाराष्ट्रातील प्रसिद्ध पुराभिलेखतज्ज्ञा आणि नाणकशास्त्रज्ञा.(मृत्यू:२२ जून २०१३)**१९२२:मनमोहन कृष्ण – चरित्र अभिनेता (मृत्यू:३ नोव्हेंबर १९९०)**१९०४: त्रिंबक गोविंद ढवळे-- लेखक, खगोलशास्त्राचे अभ्यासक (मृत्यू:१० जानेवारी १९६०)* *१८७४:सूरसिंह तख्तसिंह गोहिल ऊर्फ ’कलापि’ – प्रसिद्ध गुजराथी (सौराष्ट्र) कवी, त्यांचा ’कलापिनो केकारव’ हा काव्यसंग्रह खूप गाजला (मृत्यू:१९००)**१८६६:हर्बर्ट डाऊ – अमेरिकन उद्योगपती (मृत्यू:१५ आक्टोबर १९३०)**१८२९:लेव्ही स्ट्रॉस – अमेरिकन उद्योजक (मृत्यू:२६ सप्टेंबर १९०२)**१८०२:व्हिक्टर ह्यूगो – जागतिक कीर्तीचे फ्रेन्च कादंबरीकार,कवी आणि लेखक (मृत्यू:२२ मे १८८५)**१६३०:गुरू हर राय – शिखांचे ७ वे गुरू (मृत्यू:६ आक्टोबर १६६१)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१५: इसाक मुजावर--हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीचा माहितीकोश समजले जाणारे,मराठी लेखक(जन्म:१९३४)**२०१०:चंडीकादास अमृतराव तथा नानाजी देशमुख – समाजसुधारक व संघप्रचारक, लोकसभा व राज्यसभा सदस्य,डी.लिट. (पुणे विद्यापीठ -१९९७), पद्मविभूषण. त्यांनी रचनात्मक ग्रामीण विकासाला वेगळी दृष्टी दिली.(जन्म:११आक्टोबर १९१६)**२००४:शंकरराव चव्हाण –माजी केंद्रीय अर्थमंत्री,गृहमंत्री आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री (जन्म:१४ जुलै १९२०)**२००३:राम वाईरकर – प्रख्यात व्यंगचित्रकार,(जन्म १९३६)* *२०००:बा.म.तथा ’रावसाहेब’ गोगटे – बेळगाव येथील उद्योगपती(जन्म:१६ सप्टेंबर१९१६)**१९६६:स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर-- महान क्रांतिकारक,प्रतिभासंपन्न कवी,नाटककार,प्रभावी वक्ते व लेखक (जन्म:२८ मे १८८३)**१९३७:एल.के.अनंतकृष्ण अय्यर – दक्षिण भारतातील जातिजमातींची सखोल पाहणी करुन माहिती गोळा करणारे मानववंशशास्त्रज्ञ (जन्म:६ जुलै १८६२)**१८८६:नर्मदाशंकर दवे ऊर्फ ’नर्मद’ – गुजराथी लेखक व समाजसुधारक, त्यांनी गुजराथी भाषेचा शब्दकोश सर्वप्रथम तयार केला. (जन्म:२४ ऑगस्ट १८३३)**१८७७:मेजर थॉमस कॅन्डी – कोशकार व शिक्षणतज्ञ, मराठीत विरामचिन्हे वापरण्यास त्यांनी प्रथम सुरूवात केली, इंडियन पीनल कोडचे त्यांनी मराठीत भाषांतर केले. (जन्म:१३ डिसेंबर १८०४)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*परिक्षेपेक्षा जीवन महत्वाचे आहे*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *युवकांनी विक्रमी संख्येने देशासाठी मतदान करावे - शेवटच्या मन की बात मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संदेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *देशात भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरी संरक्षण संहिता आणि भारतीय पुरावा कायदा हे 3 नवीन कायदे एक जुलैपासून लागू होणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *राम मंदिराला एका महिन्यात 25 कोटी रुपयांची देणगी*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *टोकाची भूमिका घेऊन आंदोलनाची दिशा बदलू नये; आमदार बच्चू कडू यांचा जरांगे पाटील यांना सल्ला*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *गाईला राष्ट्रमातेचा दर्जा द्या:अमरावतीच्या गौकुंभात संत-महंतांची मागणी, अन्यथा मुंबई मंत्रालयाला घेराव घालण्याचा इशारा*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *30 लाखांच्या दंडाच्या नोटिसा:हिंगोली उपविभागात अवैध गौण खनिज वाहतूक करणारी बारा तासात पकडली 16 वाहने*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *इंग्लंडचा दुसरा डाव अवघ्या 145 धावांमध्ये गुंडाळला, अश्विन आणि कुलदीपच्या फिरकीने टीम इंडियाने बाजी पलटली; भारताला विजयासाठी 152 धावांची गरज*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 चक्रीवादळे का येतात ? 📙 उन्हाळ्याचे दिवस चालू असतात. भर दुपारी उन्हाचा कडाका अंगाची लाहीलाही करत असतो. जमीन अगदी चटके बसतील, अशी तापलेली व हवा अजिबात पडलेली. झाडाचे तर पानही हलत नाही आणि बघता बघता लांबवर कुठेतरी जमिनीवरची पडलेली पाने वाऱ्याने गोलगोल भिरभिरताना दिसू लागतात. बघता बघता तीच पाने उंचावर उचलली जातात. त्यांच्याबरोबरच धुळीचा लोटही उफाळताना, गरगरताना दिसतो. काही सेकंदातच वाऱ्याची वावटळ आपल्यालाही घेरून टाकते. हेलकावणारी झाडे, वाऱ्याचा सोसाट्याचा आवाज, नाकातोंडात जाणारी धूळमाती यांमुळे सारेच कसे भीषण वाटत असते. ही असते चक्रीवादळाची सुरुवात.चक्रीवादळ म्हणजे वातावरणातील एखाद्या विवक्षित ठिकाणी हवेचा दाब आसपासच्या काही मैलांच्या परिसरापेक्षा कमी अथवा जास्त झाल्याने दिसून येणारे वातावरणातील बदल. हे बदल फार मोठ्या वेगाने घडतात, त्यात वाऱ्याची फार मोठी ताकद सामावलेली असते. त्या विवक्षित ठिकाणी हवेचा दाब कमी होतो वाह वाढतो. तो चक्रीवादळाचा केंद्रबिंदूच असतो. दाब कमी झाल्यास तेथील हवेची पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न म्हणून वातावरणातील हवेत एक प्रकारचे भोवरे तयार होतात. याउलट दाब वाढला असल्यास त्या पट्टय़ातील हवा दाबामुळे केंद्राकडे खाली दाबली जात असते. याही क्रियेमध्ये वारे वाहणे वेगाने सुरू होते, पण त्यांची तीव्रता खूपच कमी असते. बहुतेक चक्रीवादळांचा केंद्रबिंदू समुद्रावरच सुरू होतो. कसलाही अडथळा वाटेत नसल्याने हे वादळ स्वतःभोवती फिरत वेगाने घोंगावत इकडे तिकडे हेलकावत राहते. पण समुद्री वार्‍यांमुळे हलके हलके जमिनीकडे येऊ लागते. सुरुवातीला जमिनीवरचा मोठा पट्टा त्यामुळे त्याच्या तडाख्यात सापडतो, पण त्याचबरोबर त्याचा वेग हळूहळू कमी होत पसरत जातो व काही काळाने ते संपूनही जाते. समुद्रपातळीपेक्षा जमिनीची वाढलेली उंची, वाटेत येणारे अडथळे व जमिनीवरील बरेचसे स्थिर तापमान यांमुळे या चक्रीवादळांचा वेग मंदावतो.चक्रीवादळ बहुधा स्वतःबरोबर सोसाटयाचा पाऊसही आणते. खूप मोठ्या आकारमानात हे पसरलेले असल्याने (चारशे ते सहाशे किलोमीटर) या सर्व भागातील निरनिराळे ढग यात ओढले गेलेले असतात. या ढगांचे एकत्रीकरण होताच त्यातील बाष्पही एकत्र येऊन त्यापासून पाऊस पडेल, असे मोठे बाष्पकण तयार होतात. सुरुवातीला प्रचंड वेगाने वाहणारे वारे, धुळीचे वातावरण व नंतरच्या पावसाचे तडाखे ही चक्रीवादळाची खासियतच म्हणायला हवी. चक्रीवादळांचा वेग जमिनीवर पोहोचल्यावर अनेकदा ताशी साठ ते ऐंशी किलोमीटर इतका असतो. समुद्रावरील वेग मोजण्याची पद्धत नाही, पण तो कदाचित यापेक्षाही जास्त असू शकतो. समुद्रावरील बोटी या वादळात सापडल्यास अनेकदा त्यांचे गंभीर नुकसान होण्याइतका त्यांना तडाखा बसलेला असतो. वादळाचा पट्टा ओलांडण्यास त्यांना एक ते चार दिवस लागत असल्याने तोवर राक्षसी लाटांचे तांडव असहाय्यपणे बघणे एवढेच त्यांच्या हातात असते. अनेकदा या लाटांची उंची तीस ते पस्तीस फुटांपर्यंतही असू शकते. ही वादळे सागरी अपघात व दुर्घटना यांचे एक मुख्य कारण असल्याने या वादळी टापूंची सतत माहिती घेऊन त्याप्रमाणे मार्ग आखणे, बदलणे बोटीच्या कप्तानाने कामच राहते. किनाऱ्यावर जेव्हा ही वादळे येतात, तेव्हा उंच झाडे उन्मळून पडणे, सागरी लाटा खोलवर घुसून त्यामुळे नुकसान होणे, घरांचे पत्रे उडणे या गोष्टी होतात. चक्रीवादळांची सूचना हल्ली उपग्रहांमुळे खूपच लवकर मिळू शकते. उपग्रहांमधून या सर्व वादळांचा नेमका प्रवास, हवेतील घडत जाणारे बदल यांचे फोटो मिळतात. या खेरीच एक मोठी विलक्षण पद्धत चक्रीवादळांच्या अभ्यासासाठी गेली २० वर्षे वापरली जात आहे. अत्यंत धोकादायक अशा पद्धतीत लष्करी जेट विमानातून संशोधक या चक्रीवादळाच्या केंद्रबिंदूकडेच प्रवास सुरू करतात. थेट केंद्रबिंदूचा वेध घेऊन विमान वर न्यावयाचे व त्या दरम्यान विविध शास्त्रीय निरीक्षणे करायची, अशी ही पद्धत आहे. निष्णात वैमानिक व जिवावर उदार झालेले संशोधक यांचा चमू हे काम करतो. या प्रकारात विमान पार वेडेवाकडे होऊन दोन तीन हजार फूट लांबवर एखाद्या खेळण्याप्रमाणे भिरकावलेही गेले आहे. तरीही सुखरूप उतरल्यावर नवीन चक्रीवादळाची सूचना कधी मिळते, इकडेच या चमूचे लक्ष असते.धाडस व जिज्ञासा यांचा संगम काय करू शकतो, याचे हे एक थरारक उदाहरण आहे.'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••परिस्थिति गरीब असली तरी चालेल,पण विचार ‘भिकारी’ नसावेत…*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) शरद पवारांच्या राष्ट्रवादी गटाला निवडणूक आयोगाने कोणते नवीन चिन्ह बहाल केले आहे ?२) युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळाचे नामांकन कोणत्या दोन श्रेणीत केले जाते ?३) छत्रपती शिवाजी महाराजांनी 'सर्वात अभेद्य किल्ला' असे वर्णन कोणत्या किल्ल्याचे केले होते ?४) महाराष्ट्रातील एकूण आरक्षण आता किती टक्क्यांवर पोहोचले आहे ?५) आटाकामा वाळवंट कोणत्या खंडात आहे ? *उत्तरे :-* १) तुतारी २) सांस्कृतिक व नैसर्गिक श्रेणी ३) जिंजी, तामिळनाडू ४) ७२ टक्के ५) दक्षिण अमेरिका*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 सौ. प्रिया पारसेवार जि. प. प्रा. शाळा देवणेवाडी ता. लोहा जि. नांदेड👤 राजेश सब्बनवार, कुंडलवाडी👤 मुकेश पद्मपल्ले👤 ऊत्तम गवळे👤 गंगाधर मुटे, सामाजिक कार्यकर्ते👤 श्यामल पाटील👤 साई पांचाळ👤 राजेश्वर भंडारे👤 मुरलीधर राजूरकर, शिक्षक, मुखेड👤 निर्मला सोनी, साहित्यिका, अमरावती👤 प्रशांत चिखलीकर, शिक्षक, लातूर👤 मारोती पाटील*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मनाची शते ऐकता दोष जाती। मतीमंद ते साधना योग्य होती॥ चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी। म्हणे दास विश्वासत मुक्ति भोगी॥२०५॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आनंदाचे क्षण तर कधी चांगले वाईट प्रसंग जीवनात येत असतात. ते, खूप काही शिकवण देऊन जातात. फरक एवढाच की, त्यांना ओळखण्याची आपण संधी गमावून बसतो त्यामुळे ते सहसा कळत नाही. म्हणून आलेल्या प्रत्येक चांगले, वाईट, प्रसंगाला ओळखावे व त्यांना गुरू मानून त्यांचा सन्मान करावे.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एकदा एका माणसाला त्याच्या घोड्यासमवेत एक नदी पार करायची असते. परंतु त्याला नदीची खोली माहीत नसल्याने तो तिथेच काठावर विचार करत बसतो. मदतीसाठी आजुबाजुला पाहत असताना त्याला तेथे एक लहान मुलगा दिसतो. तेव्हा त्या माणसाने लहान मुलाला नदीच्या खोलीबद्दल विचारले.मुलाने घोड्याकडे एकदा पाहीले आणि क्षणभर थांबुन तो विश्वासाने म्हणाला, " निश्चींतपणे जा, तुमचा घोडा नदी सहज पार करु शकेल".मुलाचा सल्ला मानुन त्या माणसाने नदी पार करण्यास सुरुवात केली. परंतु नदीच्या मध्यावर पोहोचल्यावर त्याच्या लक्षात आले की नदी खुप खोल आहे. आणि तो जवळ जवळ बुडायलाच आला.कसाबसा तो त्यातून सावरला आणि बाहेर येउन त्या मुलावर जोरात खेकसला. मुलगा पुरता घाबरला होता आणि घाबरत घाबरतच बोलला, "पण माझी बदके तर खुप लहान आहेत आणि ते दररोज नदी पार करतात. त्यांचे पाय तर तुमच्या घोड्यापेक्षा खुप लहान आहेत."*उगाच कोणाचाही सल्ला ऐकण्याआधी त्यांना खरोखरच काही माहीती आहे का ते जाणुन घ्या....*       •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 24 फेब्रुवारी 2024💠 वार - शनिवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://m.facebook.com/story.php?story_fbid=1435523189907784&id=100003503492582&mibextid=Nif5oz••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_जागतिक मुद्रण दिन_*••••••••••••••••••••••••••••••••••••*_ या वर्षातील ५५ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२०१०:एक दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात द्विशतक करणारा सचिन तेंडुलकर हा पहिला खेळाडू बनला.**१९६१:मद्रास राज्याचे नाव बदलून तामिळनाडू असे करण्याचा सरकारने निर्णय घेतला.**१९५२:कर्मचारी राज्य विमा योजनेची (ESIC) सुरूवात झाली.**१९४२:’व्हॉइस ऑफ अमेरिका’ या रेडिओ केन्द्राचे प्रसारण सुरू झाले.**१९३८:ड्यु पाँ कंपनीने नायलॉनचा दात घासण्याचा ब्रश विकण्यास सुरुवात केली.**१९२०:नाझी पार्टीची स्थापना झाली.**१९१८:इस्टोनियाला (रशियापासुन) स्वातंत्र्य मिळाले.**१८२२:जगातील पहिल्या स्वामीनारायण मंदिराचे अहमदाबाद येथे उद्‍घाटन झाले*१८१२:पुण्यात शनिवार वाड्यास मोठी आग लागली**१६७०:राजगड येथे छत्रपती राजाराम यांचा जन्म* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९३:आकाश ठोसर-- मराठी चित्रपट अभिनेता**१९८७:धनंजय वसंत पोटे-- लेखक* *१९८१: रामकृष्ण मारखंडी रोगे -- कवी* *१९७४:डॉ.सुवर्णा सुखदेव गुंड-- कवयित्री, लेखिका* *१९७४:रवींद्र विष्णू गोळे-- पत्रकार,संपादक लेखक*१९७०:अरविंद भैय्यालाल कटरे -- लेखक* *१९६८:प्रा.विकास जनार्दन पिल्लेवान -- लेखक* *१९६६:उदयनराजे भोसले-- राज्यसभेचे खासदार**१९६३:संजय लीला भन्साळी--- भारतीय चित्रपट दिग्दर्शक,निर्माता व लेखक* *१९५९:ॲड.विठ्ठल काष्टे -- कवी* *१९५८:समीर अंजान-- भारतीय गीतकार**१९५६:डी.व्ही.कुलकणी-- सुप्रसिद्ध साहित्यिक* *१९५५:स्टीव्ह जॉब्ज – अ‍ॅपल कॉम्प्युटर्सचा सहसंस्थापक (मृत्यू:५ आक्टोबर २०११)**१९४८:जे.जयललिता – माजी मुख्यमंत्री आणि दक्षिणेतील अभिनेत्री(मृत्यू:५ डिसेंबर, २०१६)**१९४०:सुरेश भार्गव मुळे-- लेखक* *१९३९:शशिकांत दशरथ मालपेकर -- लेखक**१९३९:जॉय मुकर्जी – चित्रपट कलाकार आणि दिग्दर्शक (मृत्यू:९ मार्च २०१२)**१९२४:तलत महमूद – पार्श्वगायक व अभिनेता,गझलचे बादशहा (मृत्यू:९ मे १९९८)**१९१४:विनायक चिंतामण देवरुखकर-- लेखक* *१९०६:प्राचार्य प्र.रा.दामले -- लेखक* *१६७०:राजाराम – मराठा साम्राज्याचे तिसरे छत्रपती,शिवाजी महाराजांचे चिरंजीव (मृत्यू:२ मार्च १७००)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२१:सरदूल सिकंदर-- पंजाबी भाषेतील लोक आणि पॉप संगीताशी संबंधित भारतीय गायक(जन्म:१५ जानेवारी १९६१)* *२०१८:श्रीदेवी-- भारतीय चित्रपट अभिनेत्री(जन्म:१३ऑगस्ट१९६३)**२०११:अनंत पै ऊर्फ ’अंकल पै’ – ’अमर चित्र कथा’ चे जनक (जन्म:१७ सप्टेंबर १९२९)**१९९८:ललिता पवार – अभिनेत्री व चित्रपट निर्मात्या (जन्म:१८ एप्रिल १९१६)**१९९०:बाळकृष्ण रामचंद्र मोडक--लेखक 'मुलांचे मासिक' कार (जन्म:२१ फेब्रुवारी १८९८)**१९८६:रुक्मिणीदेवी अरुंडेल – भरतनाट्यम नर्तिका (जन्म:२९ फेब्रुवारी १९०४)**१९७५:निकोलाय बुल्गानिन – सोविएत युनियनचे अध्यक्ष (जन्म:३० मार्च १८९५)**१९३६:लक्ष्मीबाई टिळक –लेखिका, ’स्मृतिचित्रे’ हे त्यांचे आत्मचरित्र मराठी साहित्यात अजरामर झाले (जन्म:१ जून १८६८)**१८१५:रॉबर्ट फुल्टन – अमेरिकन अभियंते व संशोधक, वाफेच्या शक्तीवर चालणारी जहाजे त्यांनी शोधल्यामूळे शिडाच्या जहाजांचे युग संपुष्टात आले.(जन्म:१४ नोव्हेंबर १७६५)**१८१०:हेन्‍री कॅव्हँडिश – हायड्रोजन आणि आरगोन वायूंचा शोध लावणारे ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ (जन्म:१० आक्टोबर १७३१)**१६७४:कोल्हापूरजवळील नेसरीच्या खिंडीत बहलोलखानाच्या फौजेवर हल्ला करताना सेनापती प्रतापराव गुजर व त्यांचे ६ सहकारी मारले गेले.या घटनेवरच कवीश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी ’वेडात मराठे वीर दौडले सात’ हे काव्य लिहिले आहे.*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*कॉपी म्हणजे एक कलंक*कॉपी करणे म्हणजे नकला करणे असा सारासार अर्थ घेतला जातो. परीक्षेचा काळ आला की कॉपी हा शब्द कानावर पडतो. वर्षभर अभ्यास न करणारे विद्यार्थी परीक्षेच्या काळात कॉपी करण्याचा विचार करतात. नकला मारण्यासाठी ही मुले नाना प्रकारच्या क्लृप्त्या किंवा योजना तयार करतात. नकला मारणे म्हणजे एक प्रकारे चोरी करण्यासारखेच आहे........... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मुंबईतील शिक्षकांना निवडणुकीच्या कामातून वगळण्याचे आदेश, मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचे स्पष्ट आदेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मनोज जरांगेंच्या 24 तारखेच्या आंदोलनावरुन हायकोर्टात खडाजंगी, गुणरत्न सदावर्ते आणि जरागेंच्या वकिलांचा टोकाचा युक्तिवाद, कायदा आणि सुव्यवस्थेती स्थिती निर्माण होऊ नये, हायकोर्टाचे निर्देश*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *धनंजय मुंडे यांनी कृषिमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर २०२०, २०२१ आणि २०२२ करिताचे विभागनिहाय कृषी पुरस्कार जाहीर केले.*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *प्रत्येक जिल्ह्यात दिव्यांग भवन उभारणार:उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा, राज्यात लोकसंख्येच्या 4% लोक दिव्यांग*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मिळाले उद्या रायगडावर भव्य कार्यक्रम पार पडणार आहे. 'तुतारी' चिन्ह मिळाल्यानंतर रायगडावर चिन्हाचं लॉन्चिग होणार आहे. लोकसभा निवडणुकांसाठी रणशिंग फुकणार आहेत.*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे वयाच्या 86 व्या वर्षी निधन*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *चौथ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी जो रुटच्या शतकी खेळीने इंग्लंडचा डाव सावरला, सात बाद 302 पर्यंत मजल, भारताच्या आकाश दीपनं पहिल्याच कसोटीत घाम फोडला*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*अभिनेत्री श्रीदेवी स्मृतिदिन*१९७५ मध्ये फिल्म 'जूली'तून श्रीदेवीने डेब्यू केले. यात त्या चाइल्ड आर्टिस्टच्या रूपात दिसली होती. सुरुवातीच्या फिल्म्स मध्ये त्यांना फारसे यश मिळाले नाही. १९८३ मध्ये आलेल्या 'हिम्मतवाला'ने श्रीदेवीला स्टार बनवले. यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही.चित्रपट हिम्मतवालामधून श्रीदेवी यांनी बॉलीवुडमध्ये पदार्पण केले होते. श्रीदेवी शेवटी 'मॉम' या फिल्ममधून झळकल्या होत्या. मॉम फिल्म ७ जुलै २०१७ला प्रदर्शित झाली होती. त्याआधी २०१२ साली आलेल्या 'इंग्लिश-विंग्लिश' या चित्रपटातून श्रीदेवी यांनी बॉलिवूडमध्ये पुनरागमन केले.बोनी कपूर यांच्यासोबत विवाहबद्ध झाल्यानंतर त्यांनी जुदाई सिनेमा केला. तेव्हापासून श्रीदेवी चित्रपटसृष्टीपासून दूर होत्या. त्यानंतर सहा वर्षानंतर श्रीदेवी यांनी मिसेस मालिनी अय्यर या मालिकेतून छोट्या पडद्यावर एंट्री केली. श्रीदेवीला दोन मुली असून ते म्हणजे जाह्नवी कपूर व खूशी कपूर. श्रीदेवीने 'सोलहवां सावन' (१९७८), 'हिम्मतवाला' (१९८३), 'मवाली' (१९८३), 'तोहफा' (१९८४), 'नगीना' (१९८६), 'घर संसार' (१९८६), 'आखिरी रास्ता' (१९८६), 'कर्मा' (१९८७), 'मि. इंडिया' (१९८७) यासह अनेक सिनेमात काम केले. याचबरोबर, त्यांनी हिंदी चित्रपटांसह तमीळ, तेलगू, मल्याळम, कन्नड चित्रपटांमध्ये सुद्धा काम केले. २०१३ साली, अभिनय क्षेत्रात उत्तम कामगिरी केल्याबद्दल श्रीदेवी यांना भारत सरकारकडून पद्मश्री या पुरस्काराने गौरविण्यात आले होते. २४ फेब्रुवारी २०१८ रोजी त्यांचे दुबई, संयुक्त अरब अमिराती येथे निधन झाले. मृत्यूसमयी त्या ५४ वर्षाच्या होत्या. *संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*" जो शाळेचे दरवाजे उघडतो तो तुरुंगाचे दरवाजे बंद करतो."**संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) मिस वर्ल्ड २०२४ स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व कोण करणार आहे ?२) मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे ?३) भारतात सध्या जागतिक वारसास्थळे किती आहेत ?४) गोदावरी नदीच्या उपनद्या कोणत्या ?५) सत्यशोधक समाजाचे मुखपत्र कोणते होते ? *उत्तरे :-* १) शिनी शेट्टी २) ज्ञानेश्वर मुळे ३) ४२ ( ३४ सांस्कृतिक, ७ नैसर्गिक, १ मिश्र वारसास्थळे ) ४) प्रवरा, दारणा, सिंधफणा, मांजरा, पूर्णा ५) दीनबंधू*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 नरेश जे. वाघ, बालरक्षक👤 साईप्रसाद वंगल👤 मन देविदास तारु👤 अहमद सुतार👤 संस्कृती मसुरे, नांदेड*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मना संग हा सर्वसंगास तोडी।मना संग हा मोक्ष तात्काळ जोडी॥ मना संग हा साधना शीघ्र सोडी। मना संग हा द्वैत निःशेष मोडी॥२०४॥ ।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••विरोध करणारे व त्याला अडविणारे हजारो संख्येने जरी जागोजागी साखळी तयार करून उभे राहत असतील तरी समोर नेणारा एकतरी जण जन्माला येत असतो. म्हणून कोणाला अडविण्याचा प्रयत्न करू नये. कारण समोर नेणाऱ्याचेच गुणगान केल्या जाते व अडविणाऱ्याला एकदिवस नको त्या परिस्थितीचा सामना करावा लागतो.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष संतोष मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*एकतेची शक्ती*एकदा एक कबुतराचा मोठा थवा आकाशात अन्नाच्या शोधासाठी उडत होता. ते एका घनदाट जंगलात गेले. एक कबुतर आपल्या बाकीच्या सहकाऱ्यांना बोलले ‘मित्रांनो, आपण खूप लांबच्या अंतरावरून येत आहोत. आपल्यातील सर्वच खूप थकलेले आहेत. तर, आपण थोडा वेळ येथे आराम करू या.’पण मध्यम वयीन कबुतर बोलला ‘तू जे बोलत आहेस ते खरे आहे, पण आपण सर्व भूकेलो आहोत.’ आणि जर आपण उशीर केला तर आपल्याला अन्न मिळणार नाही. बाकीच्या कबुतरांचे पण तेच म्हणणे होते. सर्व कबुतर बरोबर उडायला लागले. त्यांनी बघितले की जमिनीवर धान्य पसरलेले होते.ज्या कबुतराला आराम हवा होता तो बोलला ‘बघा! आपले धान्य! चला आपण ते वेचूया.’ सर्व कबुतर धान्य वेचण्यासाठी खाली उतरले. तिथे भरपूर प्रमाणात धान्य होते. सर्वात जास्त वयस्कर कबुतर बोलतो की ‘या, या लवकरात लवकर धान्य उचला व खा.’जेव्हा सर्व कबुतर धान्य खात होते तेव्हा अचानक एक जाळी त्यांच्या अंगावर येऊन पडली. सर्व त्यामध्ये अडकले.‘आता आपण काय करायचे?’ सर्व रडायला लागले. एक शिकारी झाडावर बसलेला होता त्याच्याकडे धनुष्य व बाण होते. त्यामुळे एक कबुतर बोलला ‘मित्रांनो, माझी एक युक्ती आहे आपण सर्व जण मिळून ताकद लावून एकाच वेळेस जाळीसह वरती उडू या व आपण सहजपणे यातून सुटू शकतो.’सर्व कबुतरांनी त्यांची सर्व ताकद पणाला लावून जाळीसह वरती उडायला लागले व ते खूप उंचावर उडले आणि त्यांची अवघड परिस्थितीतून सुटका झाली.हे बघून तो शिकारी आश्चर्य चकित होऊन व स्तब्ध झाला.एक कबुतर बोलला ‘आपण शिकाऱ्यापासून सुटलो आहोत, आता आपण आपल्या उंदिर मित्राकडे जाऊ तो आपल्याला मदत करेल.’ते कबुतर पुन्हा आपली शक्ती एकत्र करून उडायला लागतात व डोंगराच्या पायथ्याजवळ जातात. तेथील बिळात राहणाऱ्या उंदराला ते मदतीसाठी बाहेर बोलवतात. उंदिर त्यांना मदत करायला तयार होतो, व काही मिनिटांतच तो आपल्या तीक्ष्ण दातांनी ती जाळी कुरतडून टाकतो व कबुतरांची जाळीतून मुक्तता करतो.शेवटी कबुतर उंदराचे आभार मानून आपल्या घरी जातात.*तात्पर्य - एकतेतच बळ असते. एकतेमुळे अवघडातल्या अवघड परिस्थितीमधून आपली सुटका होऊ शकते. "*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 23 फेब्रुवारी 2024💠 वार - शुक्रवार~~~~~~~~~~~~~~~~~~~समुहात जॉईन होण्यासाठी Link - https://chat.whatsapp.com/EgXNT8RopqQ82O3UfAlMy9••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_ या वर्षातील ५४ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२०००:संस्कृत पंडित रा. ना. दांडेकर आणि काश्मिरी कवी रेहमान राही यांना साहित्य अकादमीची फेलोशिप जाहीर**१९९६:कोकण रेल्वेच्या चिपळूण - खेड टप्प्यातील वाहतूकीचा शुभारंभ**१९६६:सीरियात लष्करी उठाव झाला.**१९६३:ब्रह्मदेशात बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले.**१९६२:दिल्ली विद्यापीठाच्या कुलगुरू पदी सी.डी.देशमुख यांची निवड**१९५२:संसदेने कामगार भविष्य निर्वाह निधी विधेयक मंजूर केले.**१९४७:आंतरराष्ट्रीय मानक संस्थेची (ISO) स्थापना**१९४५:दुसरे महायुद्ध – इवो जिमाची लढाई - अमेरिकन नौदलाचे काही सैनिक (मरीन्स) प्रशांत महासागरातील माउंट सुराबाचीवर पोचले व त्यांनी तेथे अमेरिकन झेंडा उभारला.**१९४५:दुसरे महायुद्ध – अमेरिकन सैन्याने फिलिपाईन्सची राजधानी मनिला जपानी सैन्यापासून मुक्त केली.**१९४५:दुसरे महायुद्ध – पोलंडच्या पोझ्नान शहरात जर्मन सैन्याने शरणागती पत्करली.**१९४५:दुसरे महायुद्ध – रॉयल एअर फोर्सच्या विमानांनी जर्मनीतील फोर्झेम शहर बेचिराख केले.**१९४१:डॉ.ग्लेन सीबोर्ग यांनी प्लूटोनिअम हे मूलद्रव्य प्रथमच वेगळे केले.**१७३९:चिमाजी अप्पाच्या वसई मोहिमेत मानाजी आंग्रे यांनी रेवदंड्यावर हल्ला चढवला.**१४५५:पाश्चिमात्य देशातील पहिले छापील पुस्तक ’गटेनबर्ग बायबल’ प्रकाशित झाले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९७४:हर्शेल हरमन गिब्स -- दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट प्रशिक्षक**१९७४:डॉ.पल्लवी परुळेकर-बनसोडे -- लेखिका,कवयित्री,संपादिका* *१९७३:रेखा व्यंकट कटरे -- कवयित्री**१९७१:डॉ.प्रज्ञा शरद देशपांडे-- कवयित्री, मराठी व संस्कृत भाषेतील लेखिका* *१९६९:भाग्यश्री पटवर्धन-- प्रसिद्ध भारतीय सिने-अभिनेत्री* *१९६९:अयुब खान-- अभिनेते**१९६८:कृतिका देसाई-- भारतीय चित्रपट, थिएटर आणि टेलिव्हिजन अभिनेत्री* *१९६५:हेलेना सुकोव्हा – झेकोस्लोव्हाकियाची टेनिस खेळाडू**१९६५:अशोक कामटे – मुंबईच्या आतंकवादी हल्ल्यात शहीद झालेले पोलिस कमिशनर (मृत्यू:२६ नोव्हेंबर २००८)**१९५७:येरेन नायडू – तेलगु देसम पक्षाचे नेते (मृत्यू:२ नोव्हेंबर २०१२)**१९५२: सुमती साईनाथ लांडे -- प्रसिद्ध कवयित्री,लेखिका व प्रकाशक* *१९४८:मीना अनिल किनीकर-- लेखिका, अनुवादक* *१९४५:पुंडलिक चिंतामण गवळी -- प्रसिद्ध लेखक,कवी* *१९३६:डॉ.प्रल्हाद अमृतकर -- लेखक, अनुवादक* *१९२९:प्राचार्य डॉ.विष्णू बाळकृष्ण कुलकर्णी (मधू कुलकर्णी)-- कथालेखक* *१९१३:प्रफुल्लचंद्र तथा पी.सी.सरकार – जादूगार (मृत्यू:६ जानेवारी १९७१)**१९०२: कृष्णाजी गंगाधर कवचाळे -- कवी,इतिहासलेखक,संपादक (मृत्यू:६ जानेवारी १९६४)* *१८७६:संत गाडगे महाराज(गाडगे बाबा)-- महाराष्ट्र राज्यातील एक कीर्तनकार,संत आणि समाजसुधारक (मृत्यू:२० डिसेंबर १९५६)**१६३३:सॅम्युअल पेपिस – विख्यात इंग्रजी रोजनिशीकार व कुशल प्रशासक (मृत्यू:२६ मे १७०३)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_*••••••••••••••••••••••••••••••••••••••*२००९:प्रा.श्री.मा.कुलकर्णी-- प्रसिद्ध लेखक, संशोधक,संपादक (जन्म:१७ मे १९२७)**२००४:सिकंदर बख्त – माजी केन्द्रीय परराष्ट्रमंत्री,केरळचे राज्यपाल व राज्यसभेतील विरोधी पक्षनेते (जन्म:२४ ऑगस्ट १९१८)**२००४:विजय आनंद – हिन्दी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक (जन्म:२२ जानेवारी १९३४)**२०००:वासुदेवशास्त्री धुंडिराज तांबे – वेदशास्त्राचे गाढे अभ्यासक* *१९९८:रमण लांबा – क्रिकेटपटू (जन्म:२ जानेवारी १९६०)**१९९०:अमृतलाल नगर-- प्रसिद्ध हिंदी लेखक(जन्म:१७ आगस्ट १९१६)**१९६९:मुमताज जहाँ बेगम देहलवी ऊर्फ मधुबाला – चित्रपट अभिनेत्री (जन्म:१४ फेब्रुवारी १९३३ )**१९४७:नारायण दासो बनहट्टी--लेखक, संपादक (जन्म:१८६२)**१९४४:लिओ हेन्ड्रिक आर्थर बेकेलँड – अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ(जन्म:१४ नोव्हेंबर १८६३)**१९०४:महेन्द्र लाल सरकार – होमिओपॅथ, समाजसुधारक व विज्ञानप्रसारक, (जन्म:२ नोव्हेंबर १८३३)**१७९२:सर जोशुआ रेनॉल्ड्स – ब्रिटिश चित्रकार व रॉयल अ‍ॅकॅडमीचे पहिले अध्यक्ष, व्यक्तिचित्रे काढण्याबद्दल त्यांची प्रसिद्धी होती. (जन्म:१६ जुलै १७२३)**१७७७:कार्ल फ्रेड्रिक गाऊस – जर्मन गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ,आर्किमिडीज व न्यूटन यांच्या तोडीचे गणितज्ञ,इलिप्टीक फंक्शन्स व नॉन युक्लिडियन जॉमेट्री इ.विषयांवर त्यांचा मोठा अभ्यास होता.(जन्म:३० एप्रिल १७७७)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*स्वच्छतेचे प्रसारक संत गाडगेबाबा*संत गाडगे बाबा यांचा जन्म २३ फेब्रुवारी १८७६ रोजी विदर्भातील शेनगाव येथे झाला. गाडगेबाबा म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्र राज्यातील एक कीर्तनकार, संत आणि समाजसुधारक होते. त्यांनी स्वेच्छेने गरीब रहाणी स्वीकारली होती. ते सामाजिक न्याय देण्यासाठी विविध गावांना भटकत असत. गाडगे महाराजांची सामाजिक न्याय, सुधारणा आणि स्वच्छता या विषयांत जास्त रुची होती. विसाव्या शतकातील समाजसुधार आंदोलनांमध्ये ज्या महापुरुषांचा सहभाग आहे, त्यापैकी एक महत्त्वाचे नाव गाडगे बाबा यांचे आहे. संत गाडगे महाराजांचे पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर होते. त्यांच्या वडिलांचे नाव झिंगराजी तर आईचे नाव सखुबाई असे होते. गाडगे महाराज हे वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले समाजसुधारक होते. दीनदलित आणि पीडितांच्या सेवेमध्ये आपले संपूर्ण आयुष्य व्यतीत करणारे होते. त्यांच कीर्तन म्हणजे लोक प्रबोधनाचा एक भाग असे. आपल्या कीर्तनातून समाजातील दांभिकपणा रूढी परंपरा यावर ते टीका करत. समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून देताना स्वच्छता आणि चारित्र्य याची शिकवण गाडगेबाबा देत.गाडगे महाराज हे गोरगरीब, दीनदलित यांच्यामधील अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी कार्य करणारे समाजसुधारक होते. तीर्थी धोंडापाणी देव रोकडा सज्जनी |" असे सांगत दीन, दुबळे, अनाथ, अपंगांची सेवा करणारे थोर संत म्हणजे गाडगेबाबा. "देवळात जाऊ नका, मूर्तिपूजा करू नका, सावकाराचे कर्ज काढू नका, अडाणी राहू नका, पोथी-पुराणे, मंत्र-तंत्र, देवदेवस्की, चमत्कार असल्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका." अशी शिकवण आयुष्यभर त्यांनी लोकांना दिली. माणसात देव शोधणाऱ्या या संताने लोकांनी दिलेल्या देणग्यांतील पैशांतून रंजल्या-गांजल्या, अनाथ लोकांसाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी धर्मशाळा, अनाथालये, आश्रम, व विद्यालये सुरू केली. रंजले-गांजले, दीन-दुबळे, अपंग-अनाथ हेच त्यांचे देव. या देवांतच गाडगेबाबा अधिक रमत असत. डोक्यावर झिंज्या, त्यावर खापराच्या तुकड्याची टोपी, एका कानात कवडी, तर दुसऱ्या कानात फुटक्या बांगडीची काच, एका हातात झाडू, दुसऱ्या हातात मडके असा त्यांचा वेश असे.समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, भोळ्या समजुती, अनिष्ट रूढी-परंपरा दूर करण्यासाठी त्यांनी आपले पूर्ण आयुष्य वेचले. यासाठी त्यांनी कीर्तनाच्या मार्गाचा अवलंब केला. आपल्या कीर्तनात ते श्रोत्यांनाच विविध प्रश्न विचारून त्यांना त्यांच्या अज्ञानाची, दुर्गुण व दोषांची जाणीव करून देत असत. त्यांचे उपदेशही साधे, सोपे असत. चोरी करू नका, सावकाराकडून कर्ज काढू नका, व्यसनांच्या आहारी जाऊ नका, देवा-धर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका, जातिभेद व अस्पृश्यता पाळू नका असे ते आपल्या कीर्तनातून सांगत. देव दगडात नसून तो माणसांत आहे हे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न केला. ते संत तुकाराम महाराजांना आपले गुरू मानीत. ‘मी कोणाचा गुरू नाही, मला कोणी शिष्य नाही’ असे ते कायम म्हणत. आपले विचार साध्या भोळ्या लोकांना समजण्यासाठी ते ग्रामीण भाषेचा (प्रामुख्याने वऱ्हाडी बोलीचा) उपयोग करत असत. गाडगेबाबांनी संत तुकारामांच्या नेमक्या अभंगांचा मुबलक वापरही वेळोवेळी केला. ‘देवभोळ्या माणसापासून ते नास्तिकापर्यंत, कोणत्याही वयोगटातील लोकांना गाडगेबाबा आपल्या कीर्तनात सहजपणे गुंतवून ठेवत, आपले तत्त्वज्ञान पटवून देत. त्यांच्या कीर्तनाचे शब्दचित्र उभे करणे माझ्या ताकदीबाहेरचे काम आहे .’ असे उद्गार बाबांचे चरित्रकार प्रबोधनकार ठाकरे यांनी काढले होते. संत गाडगेबाबा यांचे दिनांक २० डिसेंबर १९५६ रोजी अमरावती येथे मृत्यू झाला. *संकलन :- नासा येवतीकर*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मॉर्निंग कन्सल्टने जगभरातील लोकप्रिय नेत्यांची यादी केली जाहीर, पंतप्रधान नरेंद्र मोदी ठरले पुन्हा एकदा जगातील सर्वात लोकप्रिय नेते*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मध्य प्रदेश शालेय शिक्षण विभागाने 1ली ते 12 वी पर्यंतच्या शाळेत आठवड्यातून एक दिवस नो बॅग डे (No bag Day) ठेवण्याचा घेतला निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *मार्डच्या मागण्यांवर कॅबिनेटमध्ये निर्णय होणार:उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही; निवासी डॉक्टरांना संप मागे घेण्याचे केले आवाहन*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी रुग्णलयात दाखल, 10 महिन्यांपूर्वी झाला होता ब्रेन हॅमरेजचा त्रास*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *महाविकास आघाडीच्या 27 फेब्रुवारीच्या बैठकीत जागावाटपांवर शिक्कामोर्तब होणार,सूत्रांची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *ऊस शेती करणाऱ्यांसाठी एक गुड न्यूज, केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत ऊसाचा FRP 8% नी वाढवला (sugarcane at ₹340/quintal)*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *इंडियन प्रीमिअर लीग 2024 चं वेळापत्रक अखेर जाहीर, 22 मार्चला होणार CSK व RCB यांच्यात पहिला सामना*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🔍 *बोटांचे ठसे कसे मिळवतात ?* 🔍 आपल्या तळहातांनी आणि बोटांनी आपण अनेक वस्तू पकडतो. ती पकड सुलभ व्हावी यासाठी निसर्गानं या ठिकाणची कातडी वेगळ्या प्रकारची बनवलेली आहे. या कातडीवर केस उगवत नाहीत. शिवाय ही कातडी जर गुळगुळीत राहिली तर हातात धरलेल्या वस्तूंवर तिची पकड व्यवस्थित बसणार नाही. यासाठी या कातडीचं त्या वस्तूबरोबर घर्षण होईल आणि तसे होताना कातडीला इजा होणार नाही अशीही व्यवस्था केली आहे. त्यासाठी या कातडीवर निरनिराळ्या वळ्या पडतात. या वळ्यांच्या आत सतत घामाचा स्राव करणाऱ्या छिद्रांच्या रांगा असतात. त्या घामामुळं तळहाताला एक प्रकारचं वंगण मिळत राहतं. तसंच त्या छिद्रांना जोडलेल्या काही ग्रंथींमधून स्निग्ध पदार्थांचाही पाझर होत राहतो. जेव्हा एखाद्या वस्तूवर आपली बोटं टेकतात, तेव्हा हे घाम आणि स्निग्ध पदार्थ यांचं मिश्रण त्या वळ्यांमधून त्या वस्तूवर चिकटतं. तिथं त्या वळ्यांचा ठसा उमटतो. यालाच बोटांचा ठसा म्हणतात.बोटांवरच्या या घर्षणवळ्यांचा रचनाबंध प्रत्येक व्यक्ती जन्मतःच घेऊन येते. कोणाही दोन व्यक्तींचे अगदी एकसारख्या एक जुळ्यांचेही बोटांचे ठसे सारखे नसतात. त्यामुळे या बोटांच्या ठशावरून कोणाचीही निर्विवाद ओळख पटवणे सहज शक्य होतं. याच गुणधर्माचा उपयोग गुन्हेगारांची अशी ओळख पटवण्यासाठी केला जातो. त्याला न्यायालयाचीही मान्यता आहे. ज्या वस्तूला बोटांचा स्पर्श झालेला असेल त्या वस्तूवर बोटांच्या घर्षणवळ्यातील घाम आणि स्निग्ध पदार्थांचं मिश्रण चिकटतं; पण त्यापायी उमटलेला ठसा सुप्त स्वरूपातच असतो. तो डोळ्यांना सहजासहजी दिसत नाही. त्यासाठी खास प्रकाशलहरींचा वापर करावा लागतो. त्या प्रकाशझोतात तो दिसतो; पण तो डोळ्यांना सहज दिसावा यासाठी एका खास पावडरचा, भुकटीचा वापर केला जातो.बहुतेक भुजटींमध्ये रोझिन, काळ्या रंगाचं फेरीक ऑक्साइड आणि दिव्याची काजळी असते. इतर काही भुकटींमध्ये शिसं, पारा, कॅडमियम, तांबं, टायटॅनियम, बिस्मथ या सारखी रसायनंही असतात. ही भुकटी त्या वस्तूंवर शिंपडली की जिथे ठसा उमटला आहे तिथल्या घाम आणि स्निग्ध पदार्थांच्या मिश्रणाला ती चिकटून बसते. ब्रशनं हलक्या हातानं उरलेली भुकटी काढून टाकली की मग चिकटलेली पावडर म्हणजेच तो ठसा स्पष्ट दिसू लागतो. एक खास पॉलिएस्टरची पट्टी त्या ठिकाणी चिटकवली की तो ठसा त्या पट्टीवर उमटतो. त्याचं छायाचित्र घेता येतं, तसाच तो संगणकातही साठविता येतो.*बाळ फोंडके यांच्या 'कसं ?' या पुस्तकातून* 👆*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जीवनातील अनुभवातून घेतलेले ज्ञान माणूस कधी ही विसरू शकत नाही. *संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) उत्तर प्रदेशातील मुघल संग्रहालयाला कोणाचे नाव देण्यात आले आहे ?२) मिस वर्ल्ड २०२४ ही स्पर्धा कोणत्या देशात होत आहे ?३) भारत सध्या कोणत्या नावाचा अफाट ताकदीचा सुपर कॉम्प्युटर तयार करत आहे ?४) 'क्वाड' संघटनेत एकूण किती देश आहेत ?५) महाराष्ट्रात एकूण किती किल्ले आहेत ? *उत्तरे :-* १) छत्रपती शिवाजी महाराज २) भारत ३) परम शंख ४) ४ - भारत, अमेरीका, ऑस्ट्रेलिया, जपान ५) ३९० किल्ले*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 निलेश सितावार, धर्माबाद👤 मारोती बोईनवाड👤 डॉ. सचिन बी. कदम👤 सुनंदा पुलकंठवार, नांदेड👤 एकनाथ बोईनवाड👤 शेषराव विठ्ठल तालीमकर*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मना सर्वही संग सोडूनि द्यावा। अती आदरे सज्जनाचा धरावा॥ जयाचेनि संगे महादुःख भंगे। जनी साधनेवीण सन्मार्ग लागे॥२०३॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••माणसं वयाने, गुणाने, संपत्तीने लहानही असतात तसेच मोठे सुद्धा असतात. पण खऱ्या अर्थाने तेच माणसे मोठे असतात जे, रंजल्या, गांजलेल्यांना मान देऊन माणुसकी धर्म निभावून दाखवतात. त्यातच लहान माणसं तेच असतात ज्यांच्यापाशी सर्व काही असून सुद्धा स्वार्थी जीवन जगतात अशा जगण्याला भलेही मार्ग मिळत असले तरी ते, कोणाचेही मार्गदर्शक, प्रेरणास्थान बनू शकत नाही.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*सोनेरी शिंगे* " एका जंगलात एक हरीण रहात होते. त्या हरणाला सोनेरी शिंगे होती त्यमुळे त्या हरणाला शिंगाचा खूप गर्व होता. पण तो कधीही आनंदी नसे. कारण त्याला वाटे की, आपले पाय खूप काटकुळे व विद्रूप आहेत. जेव्हा तो शिंगाकडे पाही तेव्हा तो खूप खूष असे. पण जेव्हा त्याचे आपल्या पायाकडे लक्ष जाई तेव्हा त्याला त्याचा खूप राग येत असे.एक दिवस हरिण जंगलातील एका झऱ्यावर पाणी पीत होते. पाणी पिता पिता त्याला पाण्यात त्याची सोनेरी शिंगे दिसली. सुंदर सोनेरी शिंगे पाहून त्याला खूप आनंद झाला. तेवढ्यात त्याला कसलातरी आवाज ऐकू आला आणि मागे वळून पाहतो तर समोरच त्याला एक शिकारी दिसला. शिकारी त्याच्यावर निशाणा साधत होता. शिकाऱ्याला पाहून हरिण घाबरले आणि जोरजोरात पाळायला लागले.शिकारी त्याचा पाठलाग करू लागला. हरणाचे पाय त्याला उत्तम साथ देत होते. त्या पायांमुळे तो इतका जोरात पळत होता. परंतु पळता पळता हरणाची शिंगे एका झाडाच्या फांद्यामध्ये अडकली. हरिण खूप प्रयत्न करतो पण शिंगे काही निघत नव्हती. शेवटी शिकारी आला आणि हरणाला पकडून घेऊन गेला.हरणाला रडायला येते आणि ती स्वत: शीच पुटपुटतो,अरे माझी सुंदर शिंगेच माझ्यासाठी आज संकट बनली. त्यांच्यामुळे शिकाऱ्याने आज मला पकडले*तात्पर्य- फक्त सौंदर्यच सर्व काही नसते.कुठल्याही गोष्टीचे गुण-दोष पण पारखले पाहिजेत."*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 23 फेब्रुवारी 2024💠 वार - शुक्रवार~~~~~~~~~~~~~~~~~~~समुहात जॉईन होण्यासाठी Link - https://chat.whatsapp.com/EgXNT8RopqQ82O3UfAlMy9••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_ या वर्षातील ५४ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२०००:संस्कृत पंडित रा. ना. दांडेकर आणि काश्मिरी कवी रेहमान राही यांना साहित्य अकादमीची फेलोशिप जाहीर**१९९६:कोकण रेल्वेच्या चिपळूण - खेड टप्प्यातील वाहतूकीचा शुभारंभ**१९६६:सीरियात लष्करी उठाव झाला.**१९६३:ब्रह्मदेशात बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले.**१९६२:दिल्ली विद्यापीठाच्या कुलगुरू पदी सी.डी.देशमुख यांची निवड**१९५२:संसदेने कामगार भविष्य निर्वाह निधी विधेयक मंजूर केले.**१९४७:आंतरराष्ट्रीय मानक संस्थेची (ISO) स्थापना**१९४५:दुसरे महायुद्ध – इवो जिमाची लढाई - अमेरिकन नौदलाचे काही सैनिक (मरीन्स) प्रशांत महासागरातील माउंट सुराबाचीवर पोचले व त्यांनी तेथे अमेरिकन झेंडा उभारला.**१९४५:दुसरे महायुद्ध – अमेरिकन सैन्याने फिलिपाईन्सची राजधानी मनिला जपानी सैन्यापासून मुक्त केली.**१९४५:दुसरे महायुद्ध – पोलंडच्या पोझ्नान शहरात जर्मन सैन्याने शरणागती पत्करली.**१९४५:दुसरे महायुद्ध – रॉयल एअर फोर्सच्या विमानांनी जर्मनीतील फोर्झेम शहर बेचिराख केले.**१९४१:डॉ.ग्लेन सीबोर्ग यांनी प्लूटोनिअम हे मूलद्रव्य प्रथमच वेगळे केले.**१७३९:चिमाजी अप्पाच्या वसई मोहिमेत मानाजी आंग्रे यांनी रेवदंड्यावर हल्ला चढवला.**१४५५:पाश्चिमात्य देशातील पहिले छापील पुस्तक ’गटेनबर्ग बायबल’ प्रकाशित झाले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९७४:हर्शेल हरमन गिब्स -- दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट प्रशिक्षक**१९७४:डॉ.पल्लवी परुळेकर-बनसोडे -- लेखिका,कवयित्री,संपादिका* *१९७३:रेखा व्यंकट कटरे -- कवयित्री**१९७१:डॉ.प्रज्ञा शरद देशपांडे-- कवयित्री, मराठी व संस्कृत भाषेतील लेखिका* *१९६९:भाग्यश्री पटवर्धन-- प्रसिद्ध भारतीय सिने-अभिनेत्री* *१९६९:अयुब खान-- अभिनेते**१९६८:कृतिका देसाई-- भारतीय चित्रपट, थिएटर आणि टेलिव्हिजन अभिनेत्री* *१९६५:हेलेना सुकोव्हा – झेकोस्लोव्हाकियाची टेनिस खेळाडू**१९६५:अशोक कामटे – मुंबईच्या आतंकवादी हल्ल्यात शहीद झालेले पोलिस कमिशनर (मृत्यू:२६ नोव्हेंबर २००८)**१९५७:येरेन नायडू – तेलगु देसम पक्षाचे नेते (मृत्यू:२ नोव्हेंबर २०१२)**१९५२: सुमती साईनाथ लांडे -- प्रसिद्ध कवयित्री,लेखिका व प्रकाशक* *१९४८:मीना अनिल किनीकर-- लेखिका, अनुवादक* *१९४५:पुंडलिक चिंतामण गवळी -- प्रसिद्ध लेखक,कवी* *१९३६:डॉ.प्रल्हाद अमृतकर -- लेखक, अनुवादक* *१९२९:प्राचार्य डॉ.विष्णू बाळकृष्ण कुलकर्णी (मधू कुलकर्णी)-- कथालेखक* *१९१३:प्रफुल्लचंद्र तथा पी.सी.सरकार – जादूगार (मृत्यू:६ जानेवारी १९७१)**१९०२: कृष्णाजी गंगाधर कवचाळे -- कवी,इतिहासलेखक,संपादक (मृत्यू:६ जानेवारी १९६४)* *१८७६:संत गाडगे महाराज(गाडगे बाबा)-- महाराष्ट्र राज्यातील एक कीर्तनकार,संत आणि समाजसुधारक (मृत्यू:२० डिसेंबर १९५६)**१६३३:सॅम्युअल पेपिस – विख्यात इंग्रजी रोजनिशीकार व कुशल प्रशासक (मृत्यू:२६ मे १७०३)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_*••••••••••••••••••••••••••••••••••••••*२००९:प्रा.श्री.मा.कुलकर्णी-- प्रसिद्ध लेखक, संशोधक,संपादक (जन्म:१७ मे १९२७)**२००४:सिकंदर बख्त – माजी केन्द्रीय परराष्ट्रमंत्री,केरळचे राज्यपाल व राज्यसभेतील विरोधी पक्षनेते (जन्म:२४ ऑगस्ट १९१८)**२००४:विजय आनंद – हिन्दी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक (जन्म:२२ जानेवारी १९३४)**२०००:वासुदेवशास्त्री धुंडिराज तांबे – वेदशास्त्राचे गाढे अभ्यासक* *१९९८:रमण लांबा – क्रिकेटपटू (जन्म:२ जानेवारी १९६०)**१९९०:अमृतलाल नगर-- प्रसिद्ध हिंदी लेखक(जन्म:१७ आगस्ट १९१६)**१९६९:मुमताज जहाँ बेगम देहलवी ऊर्फ मधुबाला – चित्रपट अभिनेत्री (जन्म:१४ फेब्रुवारी १९३३ )**१९४७:नारायण दासो बनहट्टी--लेखक, संपादक (जन्म:१८६२)**१९४४:लिओ हेन्ड्रिक आर्थर बेकेलँड – अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ(जन्म:१४ नोव्हेंबर १८६३)**१९०४:महेन्द्र लाल सरकार – होमिओपॅथ, समाजसुधारक व विज्ञानप्रसारक, (जन्म:२ नोव्हेंबर १८३३)**१७९२:सर जोशुआ रेनॉल्ड्स – ब्रिटिश चित्रकार व रॉयल अ‍ॅकॅडमीचे पहिले अध्यक्ष, व्यक्तिचित्रे काढण्याबद्दल त्यांची प्रसिद्धी होती. (जन्म:१६ जुलै १७२३)**१७७७:कार्ल फ्रेड्रिक गाऊस – जर्मन गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ,आर्किमिडीज व न्यूटन यांच्या तोडीचे गणितज्ञ,इलिप्टीक फंक्शन्स व नॉन युक्लिडियन जॉमेट्री इ.विषयांवर त्यांचा मोठा अभ्यास होता.(जन्म:३० एप्रिल १७७७)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*स्वच्छतेचे प्रसारक संत गाडगेबाबा*संत गाडगे बाबा यांचा जन्म २३ फेब्रुवारी १८७६ रोजी विदर्भातील शेनगाव येथे झाला. गाडगेबाबा म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्र राज्यातील एक कीर्तनकार, संत आणि समाजसुधारक होते. त्यांनी स्वेच्छेने गरीब रहाणी स्वीकारली होती. ते सामाजिक न्याय देण्यासाठी विविध गावांना भटकत असत. गाडगे महाराजांची सामाजिक न्याय, सुधारणा आणि स्वच्छता या विषयांत जास्त रुची होती. विसाव्या शतकातील समाजसुधार आंदोलनांमध्ये ज्या महापुरुषांचा सहभाग आहे, त्यापैकी एक महत्त्वाचे नाव गाडगे बाबा यांचे आहे. संत गाडगे महाराजांचे पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर होते. त्यांच्या वडिलांचे नाव झिंगराजी तर आईचे नाव सखुबाई असे होते. गाडगे महाराज हे वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले समाजसुधारक होते. दीनदलित आणि पीडितांच्या सेवेमध्ये आपले संपूर्ण आयुष्य व्यतीत करणारे होते. त्यांच कीर्तन म्हणजे लोक प्रबोधनाचा एक भाग असे. आपल्या कीर्तनातून समाजातील दांभिकपणा रूढी परंपरा यावर ते टीका करत. समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून देताना स्वच्छता आणि चारित्र्य याची शिकवण गाडगेबाबा देत.गाडगे महाराज हे गोरगरीब, दीनदलित यांच्यामधील अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी कार्य करणारे समाजसुधारक होते. तीर्थी धोंडापाणी देव रोकडा सज्जनी |" असे सांगत दीन, दुबळे, अनाथ, अपंगांची सेवा करणारे थोर संत म्हणजे गाडगेबाबा. "देवळात जाऊ नका, मूर्तिपूजा करू नका, सावकाराचे कर्ज काढू नका, अडाणी राहू नका, पोथी-पुराणे, मंत्र-तंत्र, देवदेवस्की, चमत्कार असल्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका." अशी शिकवण आयुष्यभर त्यांनी लोकांना दिली. माणसात देव शोधणाऱ्या या संताने लोकांनी दिलेल्या देणग्यांतील पैशांतून रंजल्या-गांजल्या, अनाथ लोकांसाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी धर्मशाळा, अनाथालये, आश्रम, व विद्यालये सुरू केली. रंजले-गांजले, दीन-दुबळे, अपंग-अनाथ हेच त्यांचे देव. या देवांतच गाडगेबाबा अधिक रमत असत. डोक्यावर झिंज्या, त्यावर खापराच्या तुकड्याची टोपी, एका कानात कवडी, तर दुसऱ्या कानात फुटक्या बांगडीची काच, एका हातात झाडू, दुसऱ्या हातात मडके असा त्यांचा वेश असे.समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, भोळ्या समजुती, अनिष्ट रूढी-परंपरा दूर करण्यासाठी त्यांनी आपले पूर्ण आयुष्य वेचले. यासाठी त्यांनी कीर्तनाच्या मार्गाचा अवलंब केला. आपल्या कीर्तनात ते श्रोत्यांनाच विविध प्रश्न विचारून त्यांना त्यांच्या अज्ञानाची, दुर्गुण व दोषांची जाणीव करून देत असत. त्यांचे उपदेशही साधे, सोपे असत. चोरी करू नका, सावकाराकडून कर्ज काढू नका, व्यसनांच्या आहारी जाऊ नका, देवा-धर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका, जातिभेद व अस्पृश्यता पाळू नका असे ते आपल्या कीर्तनातून सांगत. देव दगडात नसून तो माणसांत आहे हे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न केला. ते संत तुकाराम महाराजांना आपले गुरू मानीत. ‘मी कोणाचा गुरू नाही, मला कोणी शिष्य नाही’ असे ते कायम म्हणत. आपले विचार साध्या भोळ्या लोकांना समजण्यासाठी ते ग्रामीण भाषेचा (प्रामुख्याने वऱ्हाडी बोलीचा) उपयोग करत असत. गाडगेबाबांनी संत तुकारामांच्या नेमक्या अभंगांचा मुबलक वापरही वेळोवेळी केला. ‘देवभोळ्या माणसापासून ते नास्तिकापर्यंत, कोणत्याही वयोगटातील लोकांना गाडगेबाबा आपल्या कीर्तनात सहजपणे गुंतवून ठेवत, आपले तत्त्वज्ञान पटवून देत. त्यांच्या कीर्तनाचे शब्दचित्र उभे करणे माझ्या ताकदीबाहेरचे काम आहे .’ असे उद्गार बाबांचे चरित्रकार प्रबोधनकार ठाकरे यांनी काढले होते. संत गाडगेबाबा यांचे दिनांक २० डिसेंबर १९५६ रोजी अमरावती येथे मृत्यू झाला. *संकलन :- नासा येवतीकर*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मॉर्निंग कन्सल्टने जगभरातील लोकप्रिय नेत्यांची यादी केली जाहीर, पंतप्रधान नरेंद्र मोदी ठरले पुन्हा एकदा जगातील सर्वात लोकप्रिय नेते*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मध्य प्रदेश शालेय शिक्षण विभागाने 1ली ते 12 वी पर्यंतच्या शाळेत आठवड्यातून एक दिवस नो बॅग डे (No bag Day) ठेवण्याचा घेतला निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *मार्डच्या मागण्यांवर कॅबिनेटमध्ये निर्णय होणार:उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही; निवासी डॉक्टरांना संप मागे घेण्याचे केले आवाहन*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी रुग्णलयात दाखल, 10 महिन्यांपूर्वी झाला होता ब्रेन हॅमरेजचा त्रास*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *महाविकास आघाडीच्या 27 फेब्रुवारीच्या बैठकीत जागावाटपांवर शिक्कामोर्तब होणार,सूत्रांची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *ऊस शेती करणाऱ्यांसाठी एक गुड न्यूज, केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत ऊसाचा FRP 8% नी वाढवला (sugarcane at ₹340/quintal)*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *इंडियन प्रीमिअर लीग 2024 चं वेळापत्रक अखेर जाहीर, 22 मार्चला होणार CSK व RCB यांच्यात पहिला सामना*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🔍 *बोटांचे ठसे कसे मिळवतात ?* 🔍 आपल्या तळहातांनी आणि बोटांनी आपण अनेक वस्तू पकडतो. ती पकड सुलभ व्हावी यासाठी निसर्गानं या ठिकाणची कातडी वेगळ्या प्रकारची बनवलेली आहे. या कातडीवर केस उगवत नाहीत. शिवाय ही कातडी जर गुळगुळीत राहिली तर हातात धरलेल्या वस्तूंवर तिची पकड व्यवस्थित बसणार नाही. यासाठी या कातडीचं त्या वस्तूबरोबर घर्षण होईल आणि तसे होताना कातडीला इजा होणार नाही अशीही व्यवस्था केली आहे. त्यासाठी या कातडीवर निरनिराळ्या वळ्या पडतात. या वळ्यांच्या आत सतत घामाचा स्राव करणाऱ्या छिद्रांच्या रांगा असतात. त्या घामामुळं तळहाताला एक प्रकारचं वंगण मिळत राहतं. तसंच त्या छिद्रांना जोडलेल्या काही ग्रंथींमधून स्निग्ध पदार्थांचाही पाझर होत राहतो. जेव्हा एखाद्या वस्तूवर आपली बोटं टेकतात, तेव्हा हे घाम आणि स्निग्ध पदार्थ यांचं मिश्रण त्या वळ्यांमधून त्या वस्तूवर चिकटतं. तिथं त्या वळ्यांचा ठसा उमटतो. यालाच बोटांचा ठसा म्हणतात.बोटांवरच्या या घर्षणवळ्यांचा रचनाबंध प्रत्येक व्यक्ती जन्मतःच घेऊन येते. कोणाही दोन व्यक्तींचे अगदी एकसारख्या एक जुळ्यांचेही बोटांचे ठसे सारखे नसतात. त्यामुळे या बोटांच्या ठशावरून कोणाचीही निर्विवाद ओळख पटवणे सहज शक्य होतं. याच गुणधर्माचा उपयोग गुन्हेगारांची अशी ओळख पटवण्यासाठी केला जातो. त्याला न्यायालयाचीही मान्यता आहे. ज्या वस्तूला बोटांचा स्पर्श झालेला असेल त्या वस्तूवर बोटांच्या घर्षणवळ्यातील घाम आणि स्निग्ध पदार्थांचं मिश्रण चिकटतं; पण त्यापायी उमटलेला ठसा सुप्त स्वरूपातच असतो. तो डोळ्यांना सहजासहजी दिसत नाही. त्यासाठी खास प्रकाशलहरींचा वापर करावा लागतो. त्या प्रकाशझोतात तो दिसतो; पण तो डोळ्यांना सहज दिसावा यासाठी एका खास पावडरचा, भुकटीचा वापर केला जातो.बहुतेक भुजटींमध्ये रोझिन, काळ्या रंगाचं फेरीक ऑक्साइड आणि दिव्याची काजळी असते. इतर काही भुकटींमध्ये शिसं, पारा, कॅडमियम, तांबं, टायटॅनियम, बिस्मथ या सारखी रसायनंही असतात. ही भुकटी त्या वस्तूंवर शिंपडली की जिथे ठसा उमटला आहे तिथल्या घाम आणि स्निग्ध पदार्थांच्या मिश्रणाला ती चिकटून बसते. ब्रशनं हलक्या हातानं उरलेली भुकटी काढून टाकली की मग चिकटलेली पावडर म्हणजेच तो ठसा स्पष्ट दिसू लागतो. एक खास पॉलिएस्टरची पट्टी त्या ठिकाणी चिटकवली की तो ठसा त्या पट्टीवर उमटतो. त्याचं छायाचित्र घेता येतं, तसाच तो संगणकातही साठविता येतो.*बाळ फोंडके यांच्या 'कसं ?' या पुस्तकातून* 👆*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जीवनातील अनुभवातून घेतलेले ज्ञान माणूस कधी ही विसरू शकत नाही. *संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) उत्तर प्रदेशातील मुघल संग्रहालयाला कोणाचे नाव देण्यात आले आहे ?२) मिस वर्ल्ड २०२४ ही स्पर्धा कोणत्या देशात होत आहे ?३) भारत सध्या कोणत्या नावाचा अफाट ताकदीचा सुपर कॉम्प्युटर तयार करत आहे ?४) 'क्वाड' संघटनेत एकूण किती देश आहेत ?५) महाराष्ट्रात एकूण किती किल्ले आहेत ? *उत्तरे :-* १) छत्रपती शिवाजी महाराज २) भारत ३) परम शंख ४) ४ - भारत, अमेरीका, ऑस्ट्रेलिया, जपान ५) ३९० किल्ले*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 निलेश सितावार, धर्माबाद👤 मारोती बोईनवाड👤 डॉ. सचिन बी. कदम👤 सुनंदा पुलकंठवार, नांदेड👤 एकनाथ बोईनवाड👤 शेषराव विठ्ठल तालीमकर*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मना सर्वही संग सोडूनि द्यावा। अती आदरे सज्जनाचा धरावा॥ जयाचेनि संगे महादुःख भंगे। जनी साधनेवीण सन्मार्ग लागे॥२०३॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••माणसं वयाने, गुणाने, संपत्तीने लहानही असतात तसेच मोठे सुद्धा असतात. पण खऱ्या अर्थाने तेच माणसे मोठे असतात जे, रंजल्या, गांजलेल्यांना मान देऊन माणुसकी धर्म निभावून दाखवतात. त्यातच लहान माणसं तेच असतात ज्यांच्यापाशी सर्व काही असून सुद्धा स्वार्थी जीवन जगतात अशा जगण्याला भलेही मार्ग मिळत असले तरी ते, कोणाचेही मार्गदर्शक, प्रेरणास्थान बनू शकत नाही.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*सोनेरी शिंगे* " एका जंगलात एक हरीण रहात होते. त्या हरणाला सोनेरी शिंगे होती त्यमुळे त्या हरणाला शिंगाचा खूप गर्व होता. पण तो कधीही आनंदी नसे. कारण त्याला वाटे की, आपले पाय खूप काटकुळे व विद्रूप आहेत. जेव्हा तो शिंगाकडे पाही तेव्हा तो खूप खूष असे. पण जेव्हा त्याचे आपल्या पायाकडे लक्ष जाई तेव्हा त्याला त्याचा खूप राग येत असे.एक दिवस हरिण जंगलातील एका झऱ्यावर पाणी पीत होते. पाणी पिता पिता त्याला पाण्यात त्याची सोनेरी शिंगे दिसली. सुंदर सोनेरी शिंगे पाहून त्याला खूप आनंद झाला. तेवढ्यात त्याला कसलातरी आवाज ऐकू आला आणि मागे वळून पाहतो तर समोरच त्याला एक शिकारी दिसला. शिकारी त्याच्यावर निशाणा साधत होता. शिकाऱ्याला पाहून हरिण घाबरले आणि जोरजोरात पाळायला लागले.शिकारी त्याचा पाठलाग करू लागला. हरणाचे पाय त्याला उत्तम साथ देत होते. त्या पायांमुळे तो इतका जोरात पळत होता. परंतु पळता पळता हरणाची शिंगे एका झाडाच्या फांद्यामध्ये अडकली. हरिण खूप प्रयत्न करतो पण शिंगे काही निघत नव्हती. शेवटी शिकारी आला आणि हरणाला पकडून घेऊन गेला.हरणाला रडायला येते आणि ती स्वत: शीच पुटपुटतो,अरे माझी सुंदर शिंगेच माझ्यासाठी आज संकट बनली. त्यांच्यामुळे शिकाऱ्याने आज मला पकडले*तात्पर्य- फक्त सौंदर्यच सर्व काही नसते.कुठल्याही गोष्टीचे गुण-दोष पण पारखले पाहिजेत."*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 22 फेब्रुवारी 2024💠 वार - गुरुवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://nasayeotikar.blogspot.com/2016/02/blog-post_20.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_आंतरराष्ट्रीय स्काउट दिवस_*••••••••••••••••••••••••••••••••••••*_ या वर्षातील ५३ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *१९९९:पुण्याच्या काका पवार यांनी इन्फाळ येथील राष्ट्रीय स्पर्धेत कुस्तीतील सुवर्णपदक मिळविले* *१९७९:’सेंट लुशिया’ ला (ब्रिटनपासून) स्वातंत्र्य मिळाले**१९७८:श्री.यशवंत विष्णू चंद्रचूड यांनी भारताचे १६ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला. या पदावर सर्वात प्रर्दीघ काळ (२६९६ दिवस) त्यांनी काम केले**१९४८:झेकोस्लोव्हाकियामध्ये कम्युनिस्ट क्रांती**१९४२:दुसरे महायुद्ध – फिलिपाईन्समध्ये जपानी सैन्याकडुन पराभव अटळ दिसत असल्यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष एफ. डी. रूझवेल्ट यांनी जनरल डग्लस मॅकआर्थरला माघार घ्यायचा हुकुम दिला**१८१९:स्पेनने फ्लोरिडा हा प्रांत अमेरिकेला ५० लाख डॉलरच्या मोबदल्यात विकला.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९४:केतकी माटेगांवकर--- मराठी अभिनेत्री व गायिका**१९८१:इंद्रजित गणपत घुले-- कवी लेखक संपादक अनुवादक**१९७७:नामदेव भोसले-- आदिवासी समाजसेवक तथा साहित्यिक* *१९७४:प्रदीप शंकर सुतार -- लेखक* *१९६५:प्रा.डॉ तीर्थराज कापगते --- कवी, लेखक**१९६५:सूरज आर.बडजात्या-- प्रसिद्ध भारतीय चित्रपट निर्माता* *१९६०:जयंत पवार--- पत्रकार,मराठी नाटककार आणि नाट्यसमीक्षक (मृत्यू:२९ ऑगस्ट २०२१)**१९५५:सुरेन्द्र पाथरकर -- लेखक* *१९५२:परशुराम खुणे-- झाडीपट्टीतील रंगभूमीचे कलाकार,पद्मश्री पुरस्काराने सन्मानित* *१९५०:नयना आपटे-- मराठी नाटक आणि चित्रपटांतील सुप्रसिद्ध अभिनेत्री**१९४९:विशाखा अनंत गुप्ते -- लेखक* *१९३६:रघुनाथ कृष्ण जोशी-- सुलेखनकार,डिझायनर, कवी आणि शिक्षक(मृत्यू:२० एप्रिल २००८)**१९३५:प्रा.चंद्रकुमार नलगे-- जेष्ठ साहित्यिक, विविध पुरस्काराने सन्मानित**१९२२:व्ही.जी.जोग – व्हायोलिनवादक (मृत्यू:३१ जानेवारी २००४)**१९२२:सुलोचना भीमराव खेडगीकर-- लेखिका* *१९२०:इफ्तिखार – चरित्र अभिनेता (मृत्यू:४ मार्च १९९५)**१९२०:कमल कपूर-- भारतीय अभिनेता आणि निर्माता(मृत्यू:२ऑगस्ट२०१०)**१९१०:रामचंद्रअनंत काळेले-- कवी,काव्यसमीक्षक(मृत्यू:१२ जून १९८१)**१९०८:न्या.राम केशव रानडे-- लेखक, विचारवंत,प्रवचनकार* *१९०६:पहारी सन्याल-- भारतीय अभिनेता आणि गायक(मृत्यू:१० फेब्रुवारी १९७४)**१९०२:फ्रिट्झ स्ट्रासमान – जर्मन भौतिकशात्रज्ञ (मृत्यू:२२ एप्रिल १९८०)**१८९८:कमला गोपाळ देशपांडे-- संस्थापक(मृत्यू:८ जुलै १९६५)**१८९०:नारायण केशव भागवत-- बौद्ध वाड्:मयाचे संशोधक,लेखक (मृत्यू:२०एप्रिल १९६२)**१८५७:हेन्‍रिच हर्ट्‌झ – जर्मन भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू:१ जानेवारी १८९४)**१८५७:लॉर्ड बेडन पॉवेल – बालवीर (Scout) चळवळीचे प्रणेते (मृत्यू:८ जानेवारी १९४१)**१८३६:महामहोपाध्याय पण्डित महेशचंद्र ’न्यायरत्‍न’ भट्टाचार्य (मृत्यू:१२ एप्रिल १९०६)**१७३२:जॉर्ज वॉशिंग्टन – अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष (मृत्यू:१४ डिसेंबर १७९९)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२००९:लक्ष्मण देशपांडे –’वर्‍हाड निघालंय लंडनला’साठी प्रसिद्ध असलेले लेखक, दिग्दर्शक व प्राध्यापक (जन्म:५ डिसेंबर १९४३)**२०००:विनायक सदाशिव तथा वि. स. वाळिंबे – लेखक व पत्रकार (जन्म:११ ऑगस्ट १९२८)**२०००:दामोदर दिनकर तथा मधुकाका कुलकर्णी – प्रकाशन व्यवसायात नवनवीन प्रयोगांसाठी ख्याती मिळवलेले प्रकाशक, ’श्री विद्या प्रकाशन’चे संस्थापक (जन्म:२३ आक्टोबर १९२३)**१९८२:जोश मलिहाबादी – ऊर्दू कवी (जन्म:५ डिसेंबर १८९४)**१९५८:मौलाना अबूल कलाम आझाद – स्वातंत्र्यचळवळीतील विद्वान नेते,भारताचे पहिले शिक्षणमंत्री,भारतरत्‍न (जन्म:११ नोव्हेंबर १८८८)**१९४४:कस्तुरबा गांधी यांचे पुण्यातील आगाखान पॅलेसमधे निधन (जन्म:११ एप्रिल १८६९)**१९२५:सर थॉमस क्लिफोर्ड ऑलबट – ज्वरमापीचा (Clinical thermometer) शोध लावणारे इंग्लिश डॉक्टर (जन्म:२० जुलै १८३६)**१८२७:चार्ल्स विल्सन पील अमेरिकन – चित्रकार, निसर्गवैज्ञानिक व सैनिक (जन्म:१५ एप्रिल १७४१)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••* शेतकऱ्यांना जगवायचे असेल तर . . . .  *भारतातील जवळपास ७५ टक्के जनता खेड्यांत राहते. लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती म्हणूनच भारत देश कृषिप्रधान आहे असे म्हटले जाते. भारतातील संपूर्ण व्यवहार हा शेतीवरच अवलंबून आहे. शेतातून निघणा-या उत्पादनावरच भारताचा विकास अवलंबून आहे. इतरांना जगवणारा, उत्पादक असा शेतकरी मात्र फारच बिकट अवस्थेत दिसून येतो. कवी इंद्रजित भालेराव यांच्या कवितेतील ओळीनुसार शेतकरी हा उभ्या जगाचा पोशिंदा आहे........... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदी २८ फेब्रुवारीला यवतमाळ दौऱ्यावर*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *२००५ नंतरच्या सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना ‘पेन्शन योजना’ लागू करावी, सत्यजीत तांबे यांनी राज्य सरकारला केली मागणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *राज्यातील १०० महाविद्यालयांमध्ये ४ मार्चपासून 'कौशल्य विकास केंद्र' होणार सुरू*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *तिन्ही वीज कंपन्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन:सेवेत सामावून घेण्यासह पगारात 30% वाढ करण्याची मागणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात भूमिका मांडल्याने अजय महाराज बारसकर यांची पक्षातून हकालपट्टी*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष ‘गोल्डमॅन’ पंढरीनाथ फडके यांचं निधन*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *NZ vs AUS T20 : अखेरच्या चेंडूवर न्यूझीलंडवर ऑस्ट्रेलियाचा रोमहर्षक विजय*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎇 *कृष्णविवर कसं पाहतात ?* 🎇 आइन्स्टाइनच्या सापेक्षतावादाच्या सिद्धांतानुसार कृष्णविवराची घनता इतकी प्रचंड असते, की त्यापायी त्याच्या ठायी असलेल्या गुरुत्वाकर्षणाच्या बलातून कोणाचीही सुटका होत नाही. प्रकाशकिरण त्यात जखडून पडतात. ते तसे बाहेर न पडल्यामुळे अर्थात ते दिसण्याची शक्यता मावळते. मग ते एखाद्या ठिकाणी असल्याचं आपल्याला समजतच कसं ? एखाद्या कोळशाच्या वखारीत लपलेल्या काळ्या मांजराला बघण्याइतकंच हे कठीण आहे अशी मल्लीनाथी स्टीफन हॉकिंगनंच केली आहे.तरीही या विश्वात असलेल्या कितीतरी कृष्णविवरांचा छडा वैज्ञानिकांनी लावला आहे. हे साध्य करण्यासाठी चार निरनिराळी तंत्र उपलब्ध आहेत. त्यापैकी एकाचा वापर करून कृष्णविवर बघता येतं.जेव्हा एखाद्या ताऱ्याचा मृत्यू होऊन त्याचं कृष्णविवरात रूपांतर होतं, त्यावेळी त्याच्या गुरुत्वाकर्षणात कोणताही बदल होत नाही. ते पूर्वीइतकंच राहतं. त्यामुळे त्या तार्‍याभोवती प्रदक्षिणा घालणाऱ्या ग्रहांच्या कक्षेतही काहीही बदल होत नाही. ते पूर्वीसारखेच आणि पूर्वीच्या वेगानंच आपली भ्रमंती करत राहतात. त्यामुळे कोणताही तारा नसलेल्या केंद्रकाभोवती असं एखादं ग्रहमंडळ घिरट्या घालत असलेलं दिसलं की तिथं कृष्णविवर असण्याची शक्यता असते.कृष्णविवराच्या तीव्र गुरुत्वाकर्षणाच्या ओढीपायी आसपासचे वायू आणि वायुंचे ढग त्याच्याकडे जोराने खेचले जातात. ही खेच इतकी जोरकस असते की त्या वायूंचं तापमान मोठ्या प्रमाणावर वाढतं. त्यापायी मग त्या वायूंकडुन क्ष किरणांचं उत्सर्जन होतं. त्यांची नोंद घेऊन कृष्णविवराच्या अस्तित्वाचा थांगपत्ता लावता येतो.कृष्णविवराच्या घनतेपायी ते एखाद्या भिंगासारखं काम करतं. जर आपण एखादी वस्तू आणि आपले डोळे यांच्यामध्ये भिंग धरलं तर त्या वस्तूवरून येणार्‍या प्रकाशकिरणांचं त्या भिंगांकडून वक्रीभवन झाल्यानं ती वस्तू आहे त्यापेक्षा मोठी दिसते. तसंच जर एखादं कृष्णविवर एखादा तारा आणि आपण यांच्यामधून गेलं तर त्या ताऱ्याकडून येणार्‍या प्रकाशाचीही तीच गत होते आणि त्या ताऱ्याचं तेज आकस्मात वाढतं. त्यावरूनही कृष्णविवराची माहिती मिळते.कृष्णविवराची घनता प्रचंड असते. त्यामुळे लहानशा क्षेत्रात फार मोठ्या प्रमाणावर अदृश्य वस्तुमानाची दाटीवाटी झालेली असते. त्यामुळे अवकाशातील वस्तुमानाचं मोजमाप करताना एखाद्या जागी जर अशी मोठ्या प्रमाणावर अदृश्य वस्तुमान असल्याची सूचना मिळाली, तर तिथं कृष्णविवर असल्याची शक्यता बळावते.*बाळ फोंडके यांच्या 'कसं ?' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अनुभव हा महान शिक्षक आहे पण तो मोबदला मात्र फार घेतो.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) शिवजयंती निमित्ताने महाराष्ट्र राज्याने *'राज्यशस्त्र'* म्हणून कोणते शस्त्र घोषित केले ?२) संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत असलेले ५ स्थायी देश कोणते ?३) राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली ?४) भारताचा पूर्व - पश्चिम अंतर किती किमी आहे ?५) भारतातील पहिल्या टेस्टट्यूब बेबीचे नाव काय आहे ? *उत्तरे :-* १) पट्टा किंवा दांडपट्टा २) अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, रशिया, चीन ३) हर्षवर्धन पाटील ४) २,९३३ किमी ५) कनुप्रिया अग्रवाल ( जगातली दुसरी )*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 शिवलिंग बेंडके, साहित्यिक, वसमत👤 शाहरूख शेख, धर्माबाद*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मना गुज रे तूज हे प्राप्त झाले। परी अंतरी पाहिजे यत्न केले॥ सदा श्रवणे पाविजे निश्चयासी। धरी सज्जनसंगती धन्य होसी॥२०२॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• स्वप्न तर सारेच पाहतात.स्वप्न पाहणेही काही गैर नाही.परंतू स्वप्न सत्यात उतरावयाचे झाल्यास त्यासाठी परिश्रमही करणे तितकेच महत्वाचे आहे. स्वप्न प्रत्यक्षात साकारण्यासाठी शक्य झाल्यास त्याचे नियोजन करावे.अशक्य वाटत असेल तर स्वप्न म्हणूनच त्याला मागे टाकावे.त्याबद्दल त्याचा जास्त विचारही करु नये. कारण जास्त विचार केला तर आपल्या मनावर काही परिणाम होणार नाही याची दक्षता घ्यावी. जे आहे त्यात बदल होत असेल तर बदल करून जीवनात आनंद आणि समाधान मानावे. विनाकारण स्वप्नांच्या जास्त मागे धावू नये. नाही तर आहे ते ही सुख गमावून बसल्याचा पश्चाताप होईल.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*चोर ते चोर अन वर शिरजोर*एका गावात एक पिठाची गिरणी होती. गिरणीचा मालक थोडासा लुच्‍चा इसम होता. तो गि-हाईकाच्‍या दळणातील थोडेसे धान्‍य अथवा पीठ काढून घेत असे. त्‍याची ही चोरी अनेकांच्‍या लक्षात येत असे पण गावात दुसरी गिरणी नसल्‍याने लोक गप्‍प बसत असत. एकेदिवशी धान्‍याच्‍या टोपलीत गिरणीमालकाला एक उंदीर सापडला. त्‍या उंदराला पकडून तो माणूस त्‍याच्‍या मांजराकडे देणार इतक्‍यात तो उंदीर विनवणीच्‍या सुरात त्‍या दळणक-याला म्‍हणाला, अहो मालक, मी चोर नाही. तुमच्‍याकडे येणा-या धान्‍यातील चारदोन दाणे खाऊन मी माझी भूक भागवितो आहे. तेव्‍हा मला कृपया तुम्‍ही सोडून द्यावे अशी माझी तुम्‍हाला विनंती आहे. त्‍याचे हे बोलणे ऐकून तो इसम त्‍याला म्‍हणाला,''अरे उंदरा धान्‍याचे चारदोन दाणे का होईना पण ते तू चोरून खातोसच ना. मग ही चोरीच आहे त्‍याबद्दल तुला शिक्षा झालीच पाहिजे.उंदीर म्‍हणाला, प्रत्‍येक दळणातले चारदोन दाणे खाणारा मी जरी चोर असलो तरी मी खूपच छोटी चोरी करतो तुम्‍ही तर प्रत्‍येक दळण दळण्‍याचे पैसेही घेता आणि वरून त्‍या दळणातील थोडे धान्‍य आणि थोडे पीठ अशी तिहेरी चोरी करता मग तुम्‍ही तर खूप मोठे चोर आहात. अशा या चोरीबद्दल तुम्‍ही स्‍वत:ला काय शिक्षा करून घेणार आहात. उंदराच्‍या या बोलण्‍याने माणूस खूपच संतापला व म्‍हणाला, चोरी करून ते करून वरून परत मलाच चोर ठरवतोस. काहीही झाले तरी माणूस आहे आणि माणूस हा पृथ्‍वीवरचा सर्वश्रेष्‍ठ प्राणी आहे. तो काय करतो, कुठे चुकतो, कुठे बरोबर असतो हे ठरवण्‍याचा अधिकार प्रत्‍यक्ष परमेश्‍वरालाही नाही. तू लहान का होईना चोरी केलीस आणि आता तू शिक्षेला पात्र आहेस असे म्‍हणून त्‍याने त्‍या उंदराला मांजराच्‍या स्‍वाधीन केले.*तात्‍पर्य - जगात लहान चोरांना शिक्षा मिळते आणि मोठ्या चोरांना प्रतिष्‍ठा मिळते.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 21 फेब्रुवारी 2024💠 वार - बुधवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://m.facebook.com/story.php?story_fbid=1431600076966762&id=100003503492582&mibextid=Nif5oz••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_जागतिक मातृभाषा दिन_* ••••••••••••••••••••••••••••••••••••*_ या वर्षातील ५२ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* ••••••••••••••••••••••••••••••••*१९७५:जयश्री गडकर व बाळ धुरी यांचा विवाह झाला**१९५१:नेपाळ बंडखोराविरुध्द भारत व नेपाळची संयुक्त लढाई सुरू झाली**१९२५:’द न्यूयॉर्कर’ या मासिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला.**१९१५:लाहोर कट – लाहोर, बनारस व मीरत या ठिकाणी सशस्त्र क्रांतिकारी उठाव झाला.**१८७८:न्यू हेवन, कनेक्टिकट येथे पहिली टेलिफोन डिरेक्टरी प्रकाशित करण्यात आली.**१८४८:कार्ल मार्क्स आणि फ्रेडरिक एंजल्स यांनी साम्यवादाचा जाहीरनामा ’द कम्युनिस्ट मॅनिफेस्टो’ प्रकाशित केला.**१८४२:जॉर्ज ग्रीनॉ याला शिवणाच्या मशिनचे पेटंट मिळाले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९७८:मुरलीधर ईश्वरदासजी खोटेले-- झाडी बोलीचे प्रसिद्ध कवी* *१९६७:डॉ,मनोज केशवराव फडणीस-- लेखक* *१९६४:प्रा.डॉ.तनुजा नाफडे -- संगीततज्ज्ञ, लेखिका* *१९५९:हर्षा हरिष वाघमारे -- कवयित्री* *१९५१:प्रा.डॉ.शशिकांत लोखंडे--लेखक, समीक्षक**१९५०:विजयराव दामोदर रुम --- लेखक, सामाजिक कार्यकर्ते* *१९५०:मीना वांगीकर-- मराठी-कन्‍नड अनुवाद करणाऱ्या एक लेखिका(मृत्यू:२८ ऑक्टोबर २०१५)**१९४५:अनिरुद्ध अनंत कुलकर्णी -- लेखक* *१९४५:डॉ.मधुकर केशव वर्तक-- लेखक, संपादक* *१९४२:डॉ.भगवान रंगनाथ कोठेकर -- लेखक* *१९४२:जयश्री गडकर – प्रसिद्ध अभिनेत्री (मृत्यू:२९ ऑगस्ट २००८)**१९३७:सुलभा अरविंद देशपांडे--- हिंदी-मराठी नाटक-चित्रपटांत आणि दूरचित्रवाणी मालिकांत काम करणाऱ्या अभिनेत्री(मृत्यू:४ जून २०१६)**१९३३:रा.रा.जांभेकर -- लेखक**१९३१:वसंत दामोदर कुलकर्णी -- मराठी वाङ्मयाचे अभ्यासक व संशोधक,संपादक* *१९२१:विद्याधर भास्कर उजगरे-- लेखक* *१९११:भबतोष दत्ता – अर्थतज्ञ (मृत्यू:११ जानेवारी १९९७)**१८९९:सूर्यकांत त्रिपाठी "निराला"-- प्रसिद्ध भारतीय कवी,कादंबरीकार,निबंधकार आणि कथा-लेखक(मृत्यू:१५ऑक्टोबर१९६१)**१८९८:बाळकृष्ण रामचंद्र मोडक-- लेखक,'मुलांचे मासिक'कार(मृत्यू:२४ फेब्रुवारी १९९०)**१८९४:डॉ.शांतिस्वरुप भटनागर – वैज्ञानिक (मृत्यू:१ जानेवारी १९५५)**१८७५:जीन काल्मेंट – १२२ वर्षे आणि १६४ दिवस जगलेली फ्रेन्च महिला (मृत्यू:४ ऑगस्ट १९९७)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१९:श्रीधर माडगूळकर-- ग.दि. माडगूळकर यांचे पूत्र आणि ज्येष्ठ लेखक(जन्म:६ फेब्रुवारी २९४७)**१९९८:ओमप्रकाश बक्षी ऊर्फ ’ओमप्रकाश’ – चरित्र अभिनेते (जन्म:१९ डिसेंबर १९१९)**१९९१:नूतन बहल – चित्रपट अभिनेत्री (जन्म:४ जून १९३६)**१९८४:मिखाईल अलेकसांद्रोविच शोलोखोव-- श्रेष्ठ रशियन लेखक,नोबेल पारितोषिक विजेते (जन्म:२४ मे १९०५)**१९७७:रा.श्री.जोग – साहित्य मीमांसक,कवी व विचारवंत (जन्म:१५ मे १९०३)**१९७५:गजानन हरी तथा राजा नेने – चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेते व दिग्दर्शक(जन्म: १८ सप्टेंबर १९१२)**१९६५:’माल्कम एक्स’ – कृष्णवर्णीयांच्या हक्कांसाठी लढणारे अमेरिकन नेते (जन्म:१९ मे १९२५)**१८२९:चन्नम्मा – कित्तूरची राणी (जन्म:२३ आक्टोबर १७७८)~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आजपासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात होत आहे, त्यानिमित्ताने सर्व परीक्षार्थी विद्यार्थ्यांना फ्रेश मॉर्निंग बुलेटिन टीम कडून हार्दीक शुभेच्छा .........!.... Motivational Article .....*आयुष्यातील महत्वपूर्ण वळण...!*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात 10 टक्के स्वतंत्र आरक्षण, राज्याच्या दोन्ही सभागृहात विधेयक एकमताने मंजूर*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *26 फेब्रुवारी ते 1 मार्च दरम्यान राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन:विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *आजपासून राज्यात बारावीच्या बोर्ड परीक्षेला सुरुवात*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि डॉ. अजीत गोपछडे यांच्यासह सोनिया गांधी व जेपी नड्डांची राज्यसभेवर बिनविरोध निवड*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *'आप'चे कुलदीप कुमार चंडीगडचे नवे महापौर; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश, निवडणूक अधिकाऱ्यावर खटला*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *शेतकरी आंदोलन: शेतकऱ्यांनी सरकारचा प्रस्ताव फेटाळला, 21 तारखेला दिल्लीकडे करणार कूच*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारतीय क्रिकेटमध्ये खळबळ, एकाचवेळी मनोज तिवारी, सौरभ तिवारी, वरुण अॅरोन, धवल कुलकर्णी आणि फैज फजल या पाच क्रिकेटर्सने केली निवृत्तीची घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*अंक / DIGIT* संख्यादर्शक चिन्हांना किंवा अक्षरांना ‘अंक’ म्हणतात. मोजण्याची. आवश्यकता मानवाला त्याच्या प्रारंभापासून स्वाभाविकपणेच भासली असावी. मानवजातीच्या बाल्यावस्थेत प्रत्येक मानवाला मी एक व हा दुसरा एवढे साधे ज्ञान असणार यात वाद नाही. म्हणजे दोन अंक मोजण्याइतपत त्याची प्रगती उपजतच असणार. त्याच्या पुढची पायरी म्हणजे त्याच्याजवळ असलेल्या वस्तूंची मोजदाद करावयास तो हळूहळू शिकला असेल. प्राथमिक अवस्थेमध्ये हाताची बोटे, गारगोट्या, झाडाची पाने, काठ्या यांचा उपयोग मोजण्यासाठी मानव करीत असे. जगातील बहुतेक जमाती प्राथमिक अवस्थेमध्ये सामान्यपणे अशाच तऱ्हेने अंकनिर्देश करीत असत. मानवास लेखनकला अवगत झाल्यावर तो एकेक अक्षराचा अंकासाठी उपयोग करू लागला. अशा तऱ्हेची पद्धती अ‍ॅरेमाइक, हिब्रू, खरोष्ठी, ब्राह्मी आणि ग्रीक लिपींत दिसून येते.मानवाने अंकाचा शोध लावला त्या वेळेस तो अंकांचे उच्चार कसे करीत असणार याविषयी गूढ वाटणे साहजिक आहे. वेदकालापासून सर्व ज्ञान एका पिढीपासून दुसऱ्या पिढीस मौखिक पद्धतीने शतकानुशतके दिले गेल्यामुळे भारतात अंकांचे उच्चार कोणते होते हे स्पष्ट होते; ते म्हणजे एक, द्वि, त्रि, चतुर्, पंचन्, षष्, सप्तन्, अष्टन्, नवन् आणि दशन् हे होत. या संस्कृत उच्चारांवरून पुढे मराठीत एक, दोन, तीन वगैरे संज्ञा अपभ्रष्ट स्वरूपात रूढ झाल्या.ईजिप्त : लेखनकलेचे सर्वांत प्रचीन नमुने ईजिप्तमध्ये सापडतात; तसेच अंकलेखनाचे नमुनेही (इ.स.पू.सु. ३४००) तेथेच सापडतात. तेथे एक ते नऊ ह्या अंकांसाठी उभ्या दंडांची योजना केलेली आढळते. ही रीत ⇨हायरोग्लिफिक लिपि-पद्धतीचा एक भाग आहे. दहा, शंभर, हजार ह्या संख्यांसाठी मात्र तेथे वेगळी चिन्हे वापरलेली आढळतात. लाखाकरिता बेडकाचे व दहा लाखाकरिता आश्चर्याचे बाहू पसरलेल्या मानवाचे चित्र काढले जाई. यानंतरच्या काळात ईजिप्तमध्ये हिअरेटिक अंक (इ.स.पू.सु. १२ वे शतक) आणि त्यापासून पुढे डेमॉटिक अंक (इ.स.पू.सु. ७ वे ते ३ रे शतक) उपयोगात आणले गेले. हिअरेटिक आणि डेमॉटिक अंकांतील फरक काटेकोरपणे दाखविणे कठिण असले, तरी हिअरेटिक अंकांपासून डेमॉटिक अंक विकसित झाले असावेत असे दिसते. जलद लेखनासाठी वरील दोन्ही पद्धती मूळ हायरोग्लिफिक पद्धतीपासून निघाल्या असाव्यात. हायरोग्लिफिक पध्दतीपेक्षा हिअरेटिक पद्धतीत अधिक चिन्हे असल्याने तीत लहानमोठ्या संख्या अधिक संक्षिप्तपणे दर्शविणे सोयीचे होते. हिअरेटिक अंकपद्धतीत आधी मोठ्या मूल्यांची चिन्हे आणि त्यानंतरत्यापुढे (उजवीकडे) कमी मूल्यांची चिन्हे लिहिली जात*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••खरी श्रीमंती शरीराची, बुद्धीची आणि मनाची असते. *संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) IPL स्पर्धेतील *सार्वकालिक महान कर्णधार* म्हणून कोणाची निवड झाली आहे ?२) संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत एकूण किती देश आहेत ?३) लोकमतच्या वतीने दिला जाणारा 'महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' हा पुरस्कार कोणत्या शिक्षकाला देऊन सन्मानित करण्यात आले ?४) राजा दशरथ यांनी बाणाने श्रवण कुमारला मारले त्या बाणाचे नाव काय होते ?५) २०२३ या वर्षाचा ५८ वा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला प्राप्त झाला आहे ? *उत्तरे :-* १) महेंद्रसिंग धोनी, भारत २) १५ देश ( ५ स्थायी व १० अस्थायी ) ३) आनंदा आनेम वाड, डहाणू, जि. पालघर ४) शब्दवेधी बाण ५) प्रख्यात उर्दू कवी, गीतकार गुलजार व संस्कृतचे महापंडित जगद्गुरु रामभद्राचार्य*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 सचिन मानधनी, धर्माबाद👤 विशाल चव्हाण, सहशिक्षक, धर्माबाद👤 संजय कासलोड👤 पियूष मुजळगे, धर्माबाद👤 एकनाथ पांचाळ👤 डॅनियल ग्राहम्बल, शिक्षक, देगलूर*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कदा ओळखीमाजि दूजे दिसेना। मनी मानसी द्वैत काही वसेना॥ बहूता दिसा आपली भेट जाली। विदेहीपणे सर्व काया निवाली॥२०१॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जो पर्यंत माणूस जिवंत असतो तो पर्यंत एकमेकांना आनंदाने , मिठी मारणे, हाताला , हात मिळवणे, सोबत मिळून, मिसळून खाणे, पिणे होत असते.पण, एकदा का त्या माणसाचा मृत्यू झाला की, लगेच त्यापासून पाच हात दूर रहाताना दिसतात. एवढेच नाही तर...त्या मृत शरिराला स्पर्श केल्यावर विटाळ मानून आंघोळ करून घेतात. तर कोणी साधं स्पर्श सुद्धा करत नाही. भलेही माणसाचे जीवन कितीही सुंदर असले तरी ते क्षणभंगुर आहे. म्हणून अति माजू नये व गर्वाच्या भोवऱ्यात अडकू नये.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*लेकीची माया*एका गावात एका माणसाचा मृत्यू झाला  ,तिरडी तयार करून लोक ती अंत्ययात्रा घेऊन स्मशानभूमीकडे जाऊ लागले तोच एक व्यक्ती तिथे आली आणि तिरडी धरणाऱ्या पैकी एकाचा पाय धरून ओरडू लागला की मेलेला मनुष्य माझे 15 लाख रुप्ये देणे आहे , जोपर्यंत माझे क़र्ज़ मला परत नाही मिळत तोपर्यंत अंत्यसंस्कार करू नाही देणार....जमलेले सर्व लोक चाललेला तमाशा बघु लागलेतेवढ्यात मृत व्यक्तीची मूले बोलू लागली की आमच्या वडिलांनी कधी आम्हाला या कर्जाच्या बाबत सांगितले नाही त्यामुळे आम्ही हे कर्ज नाही देणार.तेव्हा मृत व्यक्तीचे भाऊ बोलले की मुले जबाबदारी नाही घेत तर आम्ही पण देऊ शकत नाही.आता सगळे उभे राहिले व याने तर प्रेतयात्रा अडवलेली...जेव्हा खूप वेळ झाली तोपर्यंत ही गोष्ट घरातील बायकांपर्यंत गेली,ही गोष्ट जेव्हा मृत व्यक्तीच्या एकुलत्या मुलीला कळाली तेव्हा तात्काळ तिने आपले दागिने व घरातील ठेवलेले किमती वस्तू,पैसे इ. त्या माणसाकडे पाठविल्या आणि सांगितले की हे सर्व विकून त्याचे पैसे तुमच्याकडे ठेवा ,,, पण माझ्या वडिलांची प्रेतयात्रा थांबवू नका..मी सर्व कर्ज फेडून टाकेन आणि बाकी रक्कम लवकरच पाठवून देईन .....आता तो  माणूस उभा राहिला व सर्व उपस्थित लोकांना बोलू लागला ..की खरे पाहता गोष्ट अशी आहे की मेलेल्या माणसाकडून 15 लाख येणे नाही तर उलट मी त्याला देणे आहे,परंतु मी याच्या वारसदारांना ओळखत नव्हतो म्हणुन मी हा खेळ खेळला...आता मला कळाले की या मृत व्यक्तीचा वारस फक्त त्याची मुलगी असून इतर कोणी नाही, असे सांगून ती व्यक्ती निघून गेली,आता मुले व भाऊ मान खाली घालून फक्त हताशपणे उभे होते. .*आशय* ......मुली आपल्या आईवडिलांनाच आपली खरी दौलत समजतात.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 20 फेब्रुवारी 2024💠 वार - मंगळवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://kathamaala.blogspot.com/2020/07/blog-post.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_जागतिक सामाजिक न्याय दिवस_*••••••••••••••••••••••••••••••••••••*_ या वर्षातील ५१ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२०१४:बर्‍याच गदारोळानंतर राज्यसभेतही आंध्र प्रदेशच्या विभाजनाचे विधेयक संमत झाल्याने ’तेलंगण’ हे भारताचे २९ वे राज्य बनले.**१९९९:भारत पाक दरम्यान दिल्ली ते लाहोर बस सेवेस प्रारंभ* *१९८८:महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून श्री कासू ब्रह्मानंद रेड्डी यांनी सूत्रे हाती घेतली* *१९८७:अरुणाचल प्रदेश स्थापना दिवस भारताच्या ईशान्य भागातील एक प्रमुख राज्य**१९८७:मिझोराम भारताचे २३ वे राज्य बनले**१९७८:शेवटचा ’ऑर्डर ऑफ व्हिक्टरी’ सन्मान लिओनिद ब्रेझनेव्ह यांना देण्यात आला.**१९७१:पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या अर्ध पुतळ्यांचे अनावरण उपराष्ट्रपती डॉ.गोपाळ स्वरूप पाठक यांच्या शुभहस्ते झाले.**१७९२:जॉर्ज वॉशिंग्टनने टपाल सेवा कायद्यावर सही केल्यामुळे अमेरिकेत टपाल खात्याची सुरूवात झाली.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८५:प्रणाली शैलेश चव्हाटे-- कवयित्री, लेखिका* *१९७८:रचना-- लेखिका,कवयित्री* *१९७६:रोहन सुनील गावस्कर-- भारतीय क्रिकेटपटू**१९६९:विजय अर्जुन सावंत-- कवी,लेखक**१९६३:नागेश सूर्यकांतराव शेवाळकर-- प्रसिद्ध मराठी साहित्यिक**१९६२:मीना शेट्टे-संभू-- संपादिका,लेखिका* *१९५७:प्रा.बसवराज कोरे-- जेष्ठ लेखक**१९५६:अन्नू कपूर-- भारतीय चित्रपट अभिनेता* *१९५५:लखनसिंह कटरे-- प्रसिद्ध कवी,कथाकार,झाडीबोली साहित्य संमेलनाचे पूर्व अध्यक्ष* *१९५२:डॉ.रा.गो.चवरे-- कादंबरीकार, कथाकार**१९५१:गॉर्डन ब्राऊन – इंग्लंडचे पंतप्रधान**१९४१:प्रा.माधव थोरात -- कवी* *१९३७:सुसंगति महादेव गोखले -- बालसाहितिक* *१९२८:आबाजी नारायण पेडणेकर-- मराठी साहित्यातील सुप्रसिद्ध कथाकार,कवी, समीक्षक आणि भाषांतरकार.(मृत्यू:११ ऑगस्ट २००४)**१९०४:अलेक्सी कोसिजीन – रशियाचे पंतप्रधान (मृत्यू:१८ डिसेंबर १९८०)**१८४४:लुडविग बोल्टझमन – ऑस्ट्रियन भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू:५ सप्टेंबर १९०६)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२३:बेला बोस- भारतीय नृत्यांगना आणि अभिनेत्री(जन्म:१८ एप्रिल १९४१)**२०१५:गोविंद पानसरे-- महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळीचे विचारवंत व कम्युनिस्ट कामगार नेते(जन्म:२४ नोव्हेंबर १९३३)**२०१२:डॉ.रत्‍नाकर मंचरकर – संत साहित्याचे गाढे अभ्यासक,साक्षेपी समीक्षक व संशोधक (जन्म:६ आक्टोबर १९४३)**२००७:डॉ.किशोर शांताबाई काळे--- डॉक्टर व प्रसिद्ध लेखक.काळे यांचा वयाच्या ३७ व्या वर्षी अपघाती मृत्यू झाला.(जन्म:१ जून १९६८)**२००१:इंद्रजित गुप्ता – माजी केन्द्रीय गृहमंत्री आणि कम्युनिस्ट पक्षाचे नेते (जन्म: १८ मार्च १९१९)**१९९७:श्री.ग.माजगावकर–पत्रकार,लेखक ’माणूस’ साप्ताहिकाचे संपादक(जन्म:०१ अगस्त १९२९)**१९९४:त्र्यं.कृ.टोपे – घटनातज्ञ व मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू* *१९७४:केशव नारायण काळे--- मराठीतील एक कवी,नाटककार,समीक्षक,चित्रपट निर्माते आणि नियतकालिकांचे संपादक(मृत्यू:२० फेब्रुवारी १९७४)* *१९५८:हरिश्चंद्र सखाराम भातावडेकर-- भारतात चित्रपट बनवणारे भारतीय(जन्म:१५ मार्च, १८६८)**१९५०:बॅ.शरदचंद्र बोस – स्वांत्र्यसेनानी, झुंजार पत्रकार,नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे वडील बंधू (जन्म:६ सप्टेंबर १८८९)**१९१०:ब्युट्रोस घाली– इजिप्तचे पंतप्रधान (जन्म:१८४६)**१९०५:विष्णुपंत छत्रे – भारतातील सर्कस उद्योगाचे जनक (जन्म: १८४६)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*कादंबरी - लक्ष्मी*मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व समाजाला कथेच्या माध्यमातून सांगावं तसेच लॉकडाऊन काळातील वेळेचा सदुपयोग व्हावा म्हणून दिनांक 01 जुलै 2020 रोजी लक्ष्मी या कादंबरी लेखनाला सुरुवात केली. आपल्या लेखन योग्य दिशेने जात आहे की नाही हे तपासून पाहण्यासाठी काही मित्रांना सोशल मिडियाद्वारे पाठवीत राहिलो. अनेक वाचकांना ही कथा पसंत येऊ लागली. काही वाचकांनी फोन करून लेखनास शुभेच्छा दिल्या. काही जणांनी ही कथा वास्तविक जीवनाशी निगडीत आहे, असे म्हटले. आमच्या जवळच्या एका शिक्षिकेने त्यांच्या जीवनात आलेल्या चढ-उताराची अनेक प्रसंग सांगून मन हलके केले. पुढचा भाग कधी येणार ? हा प्रश्न तर कित्येक वाचकांचा होता. आपल्या सर्वांच्या प्रेरणेने आणि मार्गदर्शनामुळे मी लक्ष्मी कादंबरी पूर्ण करू शकलो. आपले प्रेम असेच कायम लिहिणाऱ्याच्या पाठीवर असू द्यावे म्हणजे साहित्याची नवनिर्मिती होऊ शकेल. पुनश्च एकदा सर्वांचे मनःपूर्वक आभार मानतो.- नासा येवतीकर, धर्माबाद, 9423625769..... पूर्ण कादंबरी ( एकूण 10 भाग ) वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मराठा आरक्षणासंबंधी आज राज्य विधीमंडळाचं विशेष अधिवेशन, शिवजयंतीनिमित्त मुख्यमंत्र्यांचा पुनरुच्चार, मराठ्यांना किती टक्के आरक्षण मिळणार ? याकडे राज्याचं लक्ष*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *'छत्रपती शिवाजी महाराज की जय' या जयघोषात किल्ले शिवनेरी दुमदुमली ! गल्लीपासून दिल्लीपर्यंत शिवजयंतीचा उत्साह*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *शरद पवार गटाने चिन्हासाठी निवडणूक आयोगाकडे अर्ज करावा, आयोगाने नियमानुसार चिन्ह द्यावं, सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश, तर पुढील आदेशापर्यंत पवार गटाला मिळालेले नाव कायम राहणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *शिक्षकांनी निवडणुकीचं काम करु नये, कोण कारवाई करतं बघतोच, राज ठाकरेंचा निवडणूक आयोगाला इशारा*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *केंद्रीय बैठकीत सरकारने धान आणि गहू व्यतिरिक्त मसूर, उडीद, मका आणि कापूस पिकांवर एमएसपी म्हणजेच हमीभाव देण्याचे केले मान्य*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *एक लाख उद्योजक घडवण्याचे ध्येय ठेवून काम करणार:अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडचा 434 धावांनी पराभव केला अन् मालिकेत 2-1 ने मिळवली आघाडी*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *हवेचा दाब कसा मोजतात ?* 📙 ***************************आपल्याकडे सभोवती सगळीकडे हवा आहे. वारा वाहतो तेव्हा हवा असल्याचं आपल्याला जाणवतं. एरवी ती आपल्याला दिसत नाही. त्यामुळे तिला काही वजन असेल याची कल्पनाही आपल्याला येत नाही. पण जमिनीपासून थेट आकाशात कितीतरी उंचीपर्यंत हवा असते. त्यामुळे जमिनीवर तिचा सतत दाब पडत असतो. जमिनीच्या एक चौरस मीटरच्या तुकड्यावर हवेचा असा जो स्तंभ उभा असतो, त्याचा जो दाब पडतो त्याला हवेचा दाब म्हणतात. हवामानखातं जेव्हा उद्याच्या किंवा पुढील आठवड्याच्या हवामानाचा अंदाज देतं तेव्हा निरनिराळ्या ठिकाणी असलेल्या हवेच्या दाबाची माहितीही दिली जाते. जेव्हा अनपेक्षितरित्या पाऊस येतो तेव्हा कोणत्यातरी ठिकाणी कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे पाऊस पडत असल्याचं सांगण्यात येतं. त्यावेळीच आपल्याला हवेचाही दाब असतो हे आठवतं. हवेचा हा दाब पास्कल किंवा बार या एककांमध्ये मोजला जातो. पण ते झालं वैज्ञानिक परिमाण. एरवी आपल्याला ओळखीचं असणारं परिमाण म्हणजे पाऱ्याची उंची. जसा रक्तदाब नळीतल्या पाऱ्याच्या उंचीत मोजला जातो तसाच हवेचा दाबही मोजला जातो. यासाठी वापरण्यात येणाऱ्या यंत्राला बॅरोमीटर असं म्हणतात. त्यात एका भांड्यात पारा ठेवून त्यात एक उलटी नळी ठेवलेली असते. त्या नळीतील हवा काढून घेतलेली असल्याने तिच्यात निर्वात पोकळी निर्माण झालेली असते. भांड्यातल्या पाण्यावर पडणाऱ्या हवेच्या दाबामुळे पारा त्या नळीत चढतो. नळीतल्या पार्‍याचं वजन आणि त्या भांड्यातल्या नळीच्या तोंडाच्या क्षेत्रफळाएवढ्या जागेवरच्या हवेचं वजन समान असतं. त्यामुळे नळीतल्या पाऱ्याची उंची ही त्या हवेच्या दाबाचं माप असल्याचं धरलं जातं. सामान्यत: समुद्रसपाटीवर पाऱ्याची उंची ७६० मिलिमीटर असते. तोच हवेचा दाब मानला जातो. एका चौरस सेंटीमीटर क्षेत्रफळावरच्या हवेचा दाब एक किलोन्यूटन असतो.हे अर्थात अतिशय प्राथमिक स्वरूपाचं बॅरोमीटर झालं. हवेचा दाब मोजावयास सुरुवात झाली तेव्हा अशा यंत्राचा वापर होत असे. आजकाल याच तत्त्वावर आधारित पण अचूक मोजमाप करणारी इलेक्ट्रॉनिक बॅरोमीटर्स उपलब्ध आहेत. जसजसं उंचावर जावं तसतशी हवा विरळ होते. सहाजिकच तिथं हवेचा दाब घसरत जातो.*बाळ फोंडके यांच्या 'कसं ?' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••परीक्षा म्हणजे स्वत:च्या आत डोकावून पाहण्याची संधी.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) बुलढाणा जिल्ह्यातील खाऱ्या पाण्याचे लोणार सरोवराची निर्मिती कशामुळे झाली ?२) महिला कसोटी इतिहासात सर्वात वेगवान द्विशतकाचा विक्रम कोणी केला ?३) 'सणांचे शहर' असे कोणत्या शहराचे टोपणनाव आहे ?४) श्रीरामांनी बालीला कोणत्या वृक्षामागे लपून बाण मारला होता ?५) अतिथंड हवामानात पाण्याचे नळ ( पाईप ) का फुटतात ? *उत्तरे :-* १) उल्कापात २) अँनाबेल सदरलॅण्ड, ऑस्ट्रेलिया, २४८ चेंडूत ३) मदुराई ४) साल वृक्ष ५) पाण्याचे बर्फ होतांना ते प्रसरण पावते.*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*   👤 नागेश सु. शेवाळकर, जेष्ठ बालसाहित्यिक, पुणे👤 डुमलवाड शंकर राजेन्ना, स.शि.प्रा.शा.शिरूर ता. उमरी जि. नांदेड.👤 अनाम मैनुद्दीन शेख, नांदेड👤 शिरीष गिरी, सहशिक्षक, धारूर👤 दिलीप लिंगमपल्ले, धर्माबाद👤 विठ्ठल डोनगिरे👤 बालाजी विठ्ठल उगले👤 नागेश काळे, लातूर👤 साहेबराव पाटील कदम👤 उत्तम कानींदे, सहशिक्षक, किनवट👤 संतोष कामगोंडे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कळे आकळे रुप ते ज्ञान होता।तेथे आटली सर्वसाक्षी अवस्था॥मना उन्मनी शब्द कुंठीत राहे।तो रे तोचि तो राम सर्वत्र पाहे॥२००॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा.....🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कष्ट करून मिळालेले समाधान जगावेगळे असते . व इतरांनाच्या विषयी कपट, कारस्थान करून, धोका देऊन मिळविलेला आनंद स्वतःचा तसेच मानव जातीचा अपमान केल्यासारखे होते. दोन्ही मध्ये जमीन आसमानचा फरक आहे. म्हणून कष्ट करून जर आनंद मिळवता येत नसेल तर इतरांचे वाईट करून निसर्गाच्या नियमाचे उलंघन करू नये.कारण निसर्गाचे डोळे झाकले नसतात. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*🌅जीवनाचे सार* *एकदा एक शेतकरी देवावर खूप नाराज झाला. नाराजीचे कारणही तसेच होते कारण कधी पाऊस जास्त‍ पडत असे तर कधी पूर्ण दुष्काळ, कधी ऊन जास्त तर कधी ढगाळ वातावरण, कधी गारा पडून पीकाचे नुकसान होई तर कधी वा-याने उभे पीक आडवे होत असे. एक दिवस वैतागून त्याने देवाला साद घातली व देवास सांगितले,''तुम्ही सर्वव्यापी प्रभू परमेश्वर असाल इतर सर्व गोष्टीतले तुम्हा‍ला कळत असेल पण माझ्यामते तरी तुम्हाला शेतीतले काहीच कळत नाही. एक प्रार्थना तुम्हाला मी करतो की तुम्ही फक्त एक वर्षभर निसर्ग माझ्या ताब्या्त द्या मग बघा शेती कशी फुलते ते. घरोघरी मी धान्यांच्या राशी कशा घालतो ते पहाच तुम्ही..'' देव हसला आणि म्हणाला,''तथास्तू , तुझ्या म्हणण्या प्रमाणे आज, आतापासून मी निसर्गाचा लहरीपणा बंद करून तो तुझ्या ताब्यात मी देत आहे. तू तुला जसा पाहिजे तसा ऋतु बनवून घे व शेती कर'' इतके बोलून देव निघून गेला. शेतक-याने या वरदानाचा फायदा घेण्यासाठी गहू पेरले, जेव्हा त्याला जेवढे ऊन पाहिजे होते तेव्हा त्याने ऊन पाडले, जेव्हा त्याला पाणी द्यायचे होते तेव्हा त्याने पावसाचा वर्षाव केला. प्रचंड ऊन, गारा, पूर, सोसाट्याचा वारा याचा स्पर्शही कधी त्याने आपल्या् पीकांना होऊ दिला नाही. काळ निघून गेला आणि त्याची शेती बहरून आली. शेतक-याला मोठा आनंद झाला. कधी नव्हे् इतके पीक आले होते. शेतक-याने मनातल्या मनात विचार केला की आता देवाला कळेल की शेती कशी केली जाते, उगाचच तो शेतक-यांना कसा त्रास होईल ते वरून पाहत असतो. पीक कापणीस आले आणि शेतकरी मोठ्या आनंदाने, गर्वात पीक कापणीसाठी शेतात गेला. पीकाला हात लावून पाहिला आणि तो बेशुद्ध होऊनच खाली पडला. कारण गव्हाच्या ओंब्यांमध्ये एकही दाणा नव्हाताच मुळी. पीक नुसते आलेले दिसत होते पण एकही गव्हाचा दाणा भरला गेला नव्हता. थोड्यावेळाने तो शुद्धीवर आला आणि धाय ओकलून रडू लागला. त्याचे काळीज पिळवटणारे रूदन ऐकून परमात्मा परमेश्वर तेथे प्रकट झाला आणि म्हणाला,'' अरे वेड्या तुला काय वाटले, तू तुझ्या इच्छेेप्रमाणे जसा पाहिजे तसा वागला म्हणून पीक तसे येईल पण तसे होत नसते. त्या पिकाला तू कधीच संघर्ष करू दिला नाही. सोसाट्याच्या वा-यातच पिक उभे राहते तेव्हालाच त्याच्यात बळ येते. प्रचंड उन्हातही त्याच्यात जगण्याची इच्छा बळावते. संकटाशी जोपर्यंत सामना करत नाही तोपर्यंत त्याला त्याची कुवत कळत नाही. सगळे जर मनाप्रमाणे घडले तर कोणत्याच गोष्टीची किंमत राहत नाही. आव्हाने मिळाले नाही म्हणून तुझ्या पीकात दाणे भरलेच नाहीत. वारा सुटतो, गारा पडतात तेव्हाच त्या पिकात जगण्याची उमेद निर्माण होते आणि ते संघर्ष करून नवीन जीवन निर्माण करण्याचा प्रयत्न करते. तू हे कधीच होऊ दिले नाही म्ह्णून तुझे पीक हे पोकळ निघाले. सोन्याला सुद्धा चकाकी येण्या‍साठी आधी आगीतून जावे लागते तेव्हाच ते चकाकते. हातोडीचे मार सोसावे लागतात तेव्हाच सोन्याचा उत्कृष्ट दागिना बनतो.'' आता शेतक-याला जीवनाचे सार उमगले होते.* *🧠थोडक्यात- जीवनात जर संघर्षच नसेल तर, आव्हाने नसतील तर मनुष्य अगदी खिळखिळा बनून राहतो.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 17 फेब्रुवारी 2024💠 वार - शनिवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://nasayeotikar.blogspot.com/2024/02/chatrpati-shivaji-maharaj.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_ या वर्षातील ४८ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२००८:कोसोव्होने स्वातंत्र्य जाहीर केले.**१९६४:अमेरिकन काँग्रेसचे सगळे मतदारसंघ सारख्याच लोकसंख्येचे असले पाहिजेत असा निर्णय अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाने दिला.**१९५२:नाना जोग लिखित 'भारती' या नाटकाचा प्रथम प्रयोग नागपूर नाट्य मंडळाने नागपूर येथे केला**१९४४:दुसऱ्या महायुद्धात जपानी जिंकलेली अंदमान निकोबार बेटे आजाद हिंद फौजेच्या स्वाधीन करण्यात आली**१९३३:अमेरिकेत दारुबंदी समाप्त झाली. १९२० साली ही दारुबंदी लागू झाली होतॊ.**१९२७:’रणदुंदुभि’ नाटकाचा पहिला प्रयोग झाला.**१९१२:राम गणेश गडकरी यांचे पहिले नाटक "प्रेम संन्यास" रंगभूमीवर आहे.**१८०१:अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत थॉमस जेफरसन व एरन बर यांना सारखीच मते मिळाली. हाउस ऑफ रिप्रेझेन्टेटिव्ह्सनी जेफरसन यांना राष्ट्राध्यक्ष तर बर यांना उपाध्यक्ष केले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९७८:प्रफुल्ल अंदुरकर-- कवी* *१९७५:प्रसाद ओक-- प्रसिद्ध अभिनेता* *१९६८:विनायक नारायण अनिखिंडी -- प्रसिद्ध कवी,लेखक**१९६५:सदानंद कदम-- प्रसिद्ध लेखक, संग्राहक* *१९६३:सुजाता मिलिंद बाबर -- लेखिका, संपादिका,अनुवादक**१९६१:संजीव वसंत वेलणकर -- लेखक,सोशल मीडियावर दैनंदिन लेखन**१९५७:हेमंत श्रीराम देशपांडे-- लेखक**१९५७:प्रफुल्ल मनोहरभाई पटेल-- माजी केंद्रीय मंत्री**१९५४:कल्‍वकुंतल चंद्रशेखर राव-- तेलंगणा राज्याचे पहिले मुख्यमंत्री* *१९५०:प्रा.जयंतकुमार गणपतराव बंड-- लेखक,संपादक* *१९५०:प्रा.उद्धव निंबा महाजन-- प्रसिद्ध कवी,लेखक**१९४३:डॉ.रूपचंद निखाडे-- लेखक**१९४२:प्राचार्य अनुराधा कृष्णराव गुरव --प्रसिद्ध लेखिका,कवयित्री,शैक्षणिक विचारवंत(मृत्यू:३०मे२०२०)**१९४०:गजानन जानोजी बागडे-- कवी (मृत्यू:१ सप्टेंबर २०१२)**१९३५:रवी टंडन-- भारतीय चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माता(मृत्यू:११ फेब्रुवारी २०२२)* *१९३२:सुहासिनी इर्लेकर---मराठी साहित्यातील सुप्रसिद्ध कवयित्री आणि समीक्षक(मृत्यू:२८ आॅगस्ट २०१०)**१९१८:कृष्ण भालचंद्र फडके -- लेखक* *१९०२:सीताराम गणपतराव मनाठकर-- कवी ( मृत्यू:मे १९४९)**१९०२:प्रभाकर वासुदेव बापट-- समीक्षक (मृत्यू:२६ जुलै १९४४)**१८७४:थॉमस वॉटसन – अमेरिकन उद्योगपती,आय.बी.एम.(IBM) चे अध्यक्ष (मृत्यू:१९ जून १९५६)**१८५४:फ्रेडरिक क्रूप्प – जर्मन उद्योगपती (मृत्यू:२२ नोव्हेंबर १९०२)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_*••••••••••••••••••••••••••••••••••••••*२००१:चंद्रकांत मांडरे--- प्रसिद्ध मराठी अभिनेते(जन्म:१३ ऑगस्ट१९१३)**१९९५:प्रा.पां.कृ.सावळापूरकर--जुन्या पिढितील संशोधक,विचारवंत (जन्म:१ जुलै १९०७)* *१९९४:चिमणभाई पटेल -- गुजरात राज्याचे माजी मुख्यमंत्री(जन्म:३ जून १९२९)**१९९१:कृष्णाबाई हरी मोटे--कथाकार, कादंबरीकार(जन्म:२८ जुलै १९०३)**१९८६:जे. कृष्णमूर्ती – भारतीय तत्त्वज्ञ (जन्म:१२ मे १८९५)**१९७८:पुरुषोत्तम शिवराम रेगे – कादंबरीकार,नाटककार,कवी आणि समीक्षक (जन्म:२ ऑगस्ट १९१०)**१८८३:वासुदेव बळवंत फडके--राजकीय भूमिका घेऊन इंग्रजांविरुद्ध सशस्त्र उठाव करणारे क्रांतिकारकांचे मेरुमणी,काळ्या पाण्याची शिक्षा भोगत असताना एडन येथे निधन (जन्म:४ नोव्हेंबर १८४५)**१८८१:लहुजी राघोजी साळवे ऊर्फ ’लहुजी वस्ताद’ – क्रांतीवीर,समाजसेवक (जन्म: १८११)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••शिवजयंती निमित्ताने प्रासंगिक लेख*महाराष्ट्राचे स्फूर्तिस्थान :- छत्रपती शिवाजी महाराज*महाराष्ट्राचे आराध्य दैवत, सर्वांचे स्फूर्तिस्थान आणि रयतेचा जाणता राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांचा इतिहास माहीत नाही असा एक ही व्यक्ती राज्यात शोधून ही सापडणार नाही. आपल्या राज्यातच नाहीतर देशातील अनेक राज्यात व जगातील काही देशांत शिवाजी महाराजांचे कार्य अनेकांना स्फूर्ती व प्रेरणा देत असते.................. पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाहीच, 20 तारखेआधी निर्णय घ्या ; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठीचा सर्वेक्षण अहवाल मुख्यमंत्र्यांना सुपूर्द, विक्रमी वेळेत, अहोरात्र काम करून सर्वेक्षण पूर्ण केल्याबद्दल कौतुक*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *धनगर समाजाला धक्का, ST प्रवर्गात समाविष्ट करण्याची मागणी करणाऱ्या याचिका फेटाळल्या, ‘धनगर’ आणि ‘धनगड’ एकच नसल्याचंही नोंदवलं निरीक्षण*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *अशोक चव्हाणांनी पक्ष सोडल्याचं दुःख, पण खासदार कॉंग्रेसचाच होणार; नांदेडच्या कार्यकर्त्यांचा निर्धार*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *दादर मुंबई येथे 22 व 23 फेब्रुवारी रोजी ग्रंथोत्सवाचे आयोजन, सर्वाना विनामूल्य प्रवेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *दयानंद घोटकर यांचा ‌‘प्रेम कवी' पुरस्काराने सन्मान:रंगत-संगत प्रतिष्ठानच्या काव्य विभागातर्फे पुरस्कार*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यात आर. अश्विनने गाठला 500 बळीचा टप्पा*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*उन्हाळ्यात का होते गारपीट, माहिती आहे का?*गारपीट होणं हे आपल्या महाराष्ट्रात नवं नाही. पावसाळ्याच्या तोंडावर किंवा अगदी ऐन उन्हाळ्यात अनेकदा गारपीट होते आणि आपण ती अनुभवतोसुद्धा विदर्भ असो, नाहीतर मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र सगळीकडंच गारपीट होतेच. कधी ती जास्त प्रमाणात होते, तर कधी चुकून-माकून. यामुळे शेतीचं नुकसान होतं, हाताशी आलेली पिकं आडवी होतात. पण आता फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांमध्ये हे घडणं म्हणजे डोक्यालाच हात लावायची पाळी! त्यामुळेच या घटनेकडं वेगळ्या दृष्टिकोनातून पाहावं लागेल.हवामानशास्त्राच्या परिभाषेत सांगायचं तर गारा पडण्यासाठी दोन गोष्टी आवश्यक असतात. एक- हवा जास्त उंचीपर्यंत जायला हवी आणि दुसरी- या हवेत बाष्पाचं प्रमाण जास्त हवं. अशी परिस्थिती अवतरली की गारपीट होण्याची शक्यता वाढते.बाष्पाचं प्रमाण वाढण्यासाठी कारणीभूत ठरतात ते पूर्वेकडून म्हणजे बंगालच्या उपसागरावरून येणारे किंवा कधीकधी अरबी समुद्रावरून येणारे वारे. ते येताना सोबत भरपूर बाष्प घेऊन येतात. तर हवा जास्त उंचीवर जाण्यासाठी कारणीभूत ठरतात - वाऱ्याचे जेट प्रवाह. ते अतिउंचावर असतात. साधारणपणे 9 ते 12 किलोमीटर उंचीवर. ते फेब्रुवारी-मार्च महिन्यात हिमालयाच्या आसपास असतात. काही कारणांमुळे ते दक्षिणेकडं सरकतात. त्यांचा प्रभाव महाराष्ट्रापर्यंत पोहोचतो. हे प्रवाह कोरडे असतात. त्यामुळे आता हे कोरडे प्रवाह वरच्या थरात आणि बाष्प असलेली आर्द्र हवा खालच्या थरात अशी स्थिती निर्माण होते. ही स्थिती हवामानात अस्थिरता निर्माण करते. या स्थितीत बाष्पयुक्त वारे भरपूर उंचापर्यंत पोहोचतात. ही स्थिती गारांच्या निर्मितीसाठी पूरक आहे. ही स्थिती अशीच दीर्घकाळ कायम राहिल्यास गारपीट तितक्या काळासाठी सुरू राहते.गारा घडताना या गारांचं विश्व भयंकर रंजक आहे. त्यांची निर्मिती, रचना, ढगात असणं, खाली पडणं सारं काही भन्नाट आहे. गारा म्हणजे नुसता बर्फाचा गोळा नव्हे. तिला कांद्यासारखे पापुद्रे असतात.हे पापुद्रे तिचा आकार वाढवतात. तिला मोठं, अधिक मोठं करतात. जितके पापुद्रे जास्त आणि जाड, तितकी गार मोठ्या आकाराची. गार कधी फोडली तर तिचे पापुद्रे पाहायला मिळतात.हे पापुद्रे का तयार होतात हे समजून घेण्यासाठी गारेची निर्मिती कशी होते ते माहीत करून घ्यावं लागेल. गार म्हणजे पावसाचाच एक प्रकार. फक्त पाण्याऐवजी गोठलेल्या स्वरूपात पडणारा. तसं होण्यासाठी बरंच रामायण घडावं लागतं. पाण्याचे थेंब गोठावे लागतात. त्यासाठी ढग इतक्या उंचीवर जायला हवेत की, जिथं त्यांच्यातून पडणारे पावसाचे थेंब गोठू शकतील. नाहीतर ढगातील पाणी गोठण्याची पातळी काही कारणामुळे खाली सरकावी लागते. हे घडतं, तेव्हाच गारा बनतात.गारेच्या अंतरंगात डोकावताना प्रचंड आकाराचा ढग. त्यात बाष्पाचे सूक्ष्म थेंब. हा ढग उंचावर जातो तेव्हा बाष्पाचे थेंब गोठायला लागतात. वाऱ्यामुळे हालचाल असेल, तर ते सैरावैरा धावतात. एकामेकांना चिकटतात आणि आकाराने मोठे होत जातात. एक थेंब मोठा झाला की त्याच्या भोवती इतर सूक्ष्म थेंब जमा होतात. ते गोठल्यामुळे गार तयार होते. हा झाला गारेचा गाभा, सर्वांत आतला भाग. ही गार वाऱ्यामुळे ढगात फिरत राहते. खाली-वर होत राहते. ती वर-खाली होते, तसे तिच्याभोवती बाष्पाचे थर तयार जमा होतात. हे थर म्हणजेच तिचे पापुद्रे. गार ढगात जितकी जास्त वेळ फिरेल, तितके जास्त थर तिच्याभोवती तयार होतात. तितका आकारही मोठा होतो. गारेचा हा वर-खाली होण्याचा खेळ अवलंबून असतो, दोन गोष्टींवर- गारेचं वजन आणि वरच्या दिशेने वाहणारा वारा. गारेचं वजन वाढलं की ती खाली पडायला लागते. पण वरच्या दिशेने वाहणारा वारा तिला परत वर भिरकावतो. तिचं वजन आणि या वाऱ्याची ताकत यांच्या चढाओढीत ती हेलकावे खात राहते. आकाराने मोठी होत जाते. या खेळात तिचं वजन वाऱ्यावर मात करतं, तेव्हा तिची ढगातून सुटका होते. ती खाली पडते. तिने ढगात कसे-किती हेलकावे खाल्ले आहेत, यावर तिचा आकार आणि तिची ओळख बनते. एवढ्यावरच हे संपत नाही. खाली येतानाही तिला अडथळे असतात. या जमिनीकडं येण्याच्या प्रवासात तिला तापमानाचा सामना करावा लागतो. त्याच्यामुळे ती वितळण्याची शक्यता असते. अनेकदा होतंही तसंच. ती ढगातून गार म्हणून पडायला लागते, पण पावसाचा थेंब म्हणून जमिनीवर पडते. उन्हाळी पावसात आपण पावसाचे टपोरे थेंब पाहतो. ते थेंब टपोरे का असतात, त्यामागचं हेच रहस्य असतं. ही सगळी दिव्यं पार केली तरच गार जमिनीवर पडते. पडल्यावरही कुतुहलाचा विषय बनते. एक मोठं कुतूहल असं की, गारा तासन् तास जमिनीवर पडून राहतात, लवकर विरघळत नाहीत. काही वेळा तर दुसऱ्या दिवशीसुद्धा त्या तशाच दिसतात. याची अनेक कारणं असतील, पण त्यापैकी मुख्य दोन. एकतर त्या पडल्यामुळे वातावरण थंडगार झालेलं असतं. दुसरं म्हणजे गारांचे पापुद्रे. गारेच्या या थरांमुळंसुद्धा त्या वितळण्याचा वेग कमी असतो. हवामान अभ्यासकांनी केलेली ही कारणमीमांसा. असं हे इवल्याशा गारेचं अनोखं विश्व. हवामान काय किंवा निसर्ग काय, त्याच्याकडं असं बारकाईने पाहिलं तर त्यात असलेली रंजकता उलगडता येते. गारेच्या निमित्ताने हा असाच एक प्रयत्न!बी.बी.सी मराठी*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••खूप हुशारीपेक्षा चिमुटभर विवेक श्रेष्ठ असतो.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *'गणित म्हणजे सर्व विज्ञानांची राणी'* हे विधान कोणी केले ?२) गाय व बैल यांचे वय त्यांच्या शरीराच्या कोणत्या भागावरून ओळखतात ?३) गुगामल राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे ?४) अंधारात चमकण्याच्या गुणधर्मास काय म्हणतात ?५) 'आशिया' या शब्दाची व्युत्पत्ती हिब्रू भाषेतील कोणत्या शब्दापासून झाली आहे ? *उत्तरे :-* १) कॉर्ल फ्रेडरिक गाउस, जर्मन गणितज्ञ २) दातांवरून ३) अमरावती ४) फॉस्फरसन्स ५) आसू*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 सुनील सामंत, ई साहित्य प्रकाशन, पुणे👤 अगस्ती भाऊसाहेब चासकर, 👤 साईनाथ अवधूतवार, धर्माबाद👤 रविकिरण एडके👤 विकास गायकवाड👤 लक्ष्मण गंगाराम होरके👤 अशोक इंदापुरे, विशेष मागास प्रवर्ग अभ्यासक सोलापूर*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••नभासारिखे रुप या राघवाचे।मनी चिंतिता मूळ तुटे भवाचे॥तया पाहता देहबुद्धी उरेना।सदा सर्वदा आर्त पोटी पुरेना॥१९७॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• इतरांना त्रास देऊन जर आपण आपले जीवन चांगल्याप्रकारे जगू म्हटले तर ते अयोग्यच आहे.कारण त्यांनी परिश्रमातून जे काही मिळवलेले असते ते गुण्यागोविंदाने जगण्याचे स्वप्न साकारत असतात.हे त्यांचे बघवत नाही आणि आपल्याने होत नाही म्हणून इतरांना त्रास देऊन त्यांचे सुख हिरावून घेणे हे वामवृत्तीचे लक्षणच म्हणावे.त्यामध्ये आपण सुखी होऊ शकतो का ? आपल्या बाबतीत इतरांनी असे केले तर आपणास कसे वाटेल ? ते आपल्या मनाला समाधान देते का ? ह्या सा-या गोष्टीचा आपण विचार केला तर नक्कीच त्याचे उत्तर सापडेल आणि पुन्हा आपण ती चूक करणार नाही याची नक्कीच जाणीव झाल्याशिवाय राहत नाही.इतरांच्याही सुखस्वप्नात आपणही सहभागी व्हावे हाच आपला माणुसकीचा खरा धर्म आहे.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *बढाईखोर माणूस*एक माणूस फार वर्षे प्रवास करून आपल्या घरी आला व आपण परदेशात असताना काय मौजा पाहिल्या हे त्याने आपल्या शेजार्‍यापाजार्‍यांना तिखट मीठ लावून सांगितले. आणि अगदी शेवटी एक थाप ठोकून दिली की, ‘मी अलकावतीला गेलो असता तेथील लोक पंधरा पंधरा हात उंच उड्या मारतात पण त्यांनी माझ्याशी पैज लावली असता माझ्याइतकी उंच उडी एकालाही मारता आली नाही.’ ऐकणार्‍या कोणालाही ही गोष्ट खरी वाटली नाही. तेव्हा त्यांची खात्री करण्यासाठी तो नाना प्रकारच्या शपथा घेऊन लागला. त्या वेळी त्या लोकातील एक माणूस त्याला म्हणाला, ‘अहो, अशा शपथा कशाला घेता. हातच्या काकणाला आरसा कशाला ? या वेळी तुम्ही अलकावतीला आहात असं समजून तिथे जशी उडी मारली तशी इथंही मारून दाखवा म्हणजे झालं.’ हे ऐकताच त्या बढाईखोर माणसाचे तोंड ताबडतोब बंद झाले.तात्पर्य – आपण प्रवासात पाहिलेल्या गोष्टी फुगवून सांगण्याची काही लोकांना सवय असते, पण एखादेवेळी त्यांचेच बोलणे त्यांच्या गळ्यात येऊन त्यांची फजिती झाल्याशिवाय राहात नाही.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 16 फेब्रुवारी 2024💠 वार - शुक्रवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://nasayeotikar.blogspot.com/2018/01/blog-post_6.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_ या वर्षातील ४७ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२००८: प्रसिद्ध गायक नितीन मुकेश यांना मध्य प्रदेश सरकारकडून लता मंगेशकर पुरस्कार देण्यात आला.* *१९८५:लेबनॉनमध्ये हिजबोल्ला या कट्टरपंथीय शिया मुस्लिम संघटनेची स्थापना.**१९५९:फिडेल कॅस्ट्रो क्यूबाच्या अध्यक्षपदी**१९२७:भारत आणि नेपाळ यांच्यात रेल्वे वाहतूक सुरू**१९१८:लिथुएनियाने (रशिया व जर्मनीपासून) स्वातंत्र्य जाहीर केले.**१९१४:लष्करी वस्तू संग्रहालयाची अहमदनगर येथे स्थापना* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८६:साबिना थाॅमस फोस-- कवयित्री* *१९८३:कीर्ती विजय लंगडे-- कवयित्री,लेखिका**१९८१:चिन्मयी ऋषिकेश चिटणीस -- कवयित्री* *१९७८:वासिम जाफर – भारतीय क्रिकेटपटू**१९७५:प्रा.डॉ.वर्षा तोडमल -- कवयित्री लेखिका,संपादिका**१९६९:गजेंद्र विठ्ठल अहिरे-- मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक,लेखक आणि कवी**१९६२:जयंत राजाराम पाटील--माजी मंत्री**१९५७:मल्लिका अमर शेख(मल्लिका नामदेव ढसाळ)-- मराठी लेखिका**१९५६:सरोज नंदकिशोर भागवत-- प्रसिद्ध लेखिका**१९५४:प्रा.डॉ.विजय लक्ष्मीकांत धारुरकर -- प्रसिद्ध लेखक* *१९५४:मायकेल होल्डिंग – वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू**१९५२:डॉ.सुमन नवलकर-- प्रसिद्ध बाल साहित्यिक* *१९४१:डॉ.वसुधा पांडे-- कवयित्री,लेखिका**१९३२:मनोहर गजानन काटदरे-- ज्येष्ठ नाटककार(मृत्यू:१० जुलै २०१४)* *१९२७:प्राचार्य राम डोके-- जेष्ठ विनोदी साहित्यिक (मृत्यू:१ एप्रिल २००८)**१९२४:उषा हरिश्चंद्र उजगरे -- लेखिका, प्रवासवर्णनकार (मृत्यू:१९ जून २००२)* *१९२०:इंद्र सेन जोहर (आय.एस.जोहर)-- भारतीय अभिनेता,लेखक,निर्माता आणि दिग्दर्शक(मृत्यू:१० मार्च १९८४)**१९११:डॉ.भालचंद्र गोपाळ बापट-- वृत्तपत्र संपादक व शिक्षणतज्ञ**१८८४:विनायक सदाशिव वाकसकर-- इतिहास अभ्यासक चरित्रकार**१८७६:रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे – भारतातील पहिले सिनिअर रँग्लर,फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य,पुणे विद्यापीठाचे कुलगुरू,मुंबई राज्याचे शिक्षणमंत्री(मृत्यू:६ मे १९६६)**१८१४:रामचंद्र ऊर्फ रघुनाथ पांडुरंग येवलेकर ऊर्फ तात्या टोपे-- सेनापती (मृत्यू:१८ एप्रिल १८५९)**१७४५:माधवराव बल्लाळ भट ऊर्फ ’थोरले’ माधवराव पेशवे – मराठा साम्राज्यातील ४ था पेशवा,१६ व्या वर्षी पेशवेपदावर विराजमान झालेला अत्यंत कर्तबगार पेशवा. पानिपतच्या युध्दानंतर विस्कटलेली मराठेशाहीची घडी त्यांनी बसविली.(मृत्यू:१८ नोव्हेंबर १७७२)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२१:प्राचार्य वामन ना. अभ्यंकर ऊर्फ भाऊ अभ्यंकर-- निगडी,पुणे येथील ज्ञान प्रबोधिनीचे संस्थापक(जन्म:१९४२)**२०१५:रावसाहेब रामराव पाटील(आर.आर. पाटील)- माजी उपमुख्यमंत्री (जन्म:१६ऑगस्ट १९५६)**२००१:रंजन साळवी – 'पिंजरा', 'सवाल माझा ऐका', 'केला इशारा जाता जाता' आदी मराठी चित्रपटांचे नृत्यदिग्दर्शक* *२०००:बेल्लारी शामण्णा केशवन – आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ग्रंथालयशास्त्रज्ञ,पद्मश्री, ’इंडियन नॅशनल सायंटिफिक डॉक्युमेंटेशन सेंटर’चे पहिले संचालक**१९९६:आर.डी.आगा – उद्योगपती,थरमॅक्स उद्योगसमुहाचे संस्थापक* *१९९४:पं.निवृत्तीबुवा सरनाईक – जयपूर-अत्रौली घराण्याचे गायक (जन्म:४ जुलै १९१२)**१९६८:नारायणराव सोपानराव बोरावके – कृषी शिरोमणी,पहिले मराठी साखर कारखानदार (जन्म:१७ आक्टोबर १८९२)**१९६४:आनंदराव कृष्णाजी टेकाडे--कवी, गीतकार(जन्म:५ एप्रिल १८९०)**१९५६:मेघनाद साहा – खगोल भौतिकशास्त्रज्ञ व संसदसदस्य(जन्म:६ आक्टोबर १८९३)**१९४४:धुंडिराज गोविंद ऊर्फ ’दादासाहेब’ फाळके – भारतीय चित्रपट उद्योगाचे जनक, लेखक,छायाचित्रकार,दिग्दर्शक,संकलक, वेशभूषाकार,कलादिग्दर्शक इ.अनेक जबाबदार्‍या ते सांभाळत असत (जन्म:३० एप्रिल १८७०)**१९२३:रावबहादुर विष्णू मोरेश्वर महाजनी -- मराठीतील समीक्षक,कवी व नाटककार(जन्म:१२ नोव्हेंबर १९५१)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*एकच ध्यास ; वाचन विकास*शिक्षण प्रक्रियेतील वाचन हे एक प्रमुख कौशल्य आहे. ज्यावर विद्यार्थ्यांची भविष्यातील प्रगती अवलंबून असते. भाषा विकासातील श्रवण व भाषण यानंतरचा टप्पा म्हणजे वाचनकौशल्याचा. प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ स्टुअर्ट रिची यांनी आपल्या संशोधनात असे म्हटले आहे की, मुलांची वाचन क्षमता आणि त्याला किती लहान वयात वाचन करता येते त्यावर त्याची पुढील प्रगती अवलंबून आहे. यासोबत ते पुढे असे म्हणतात की, आपल्या मुलांचा अभ्यास पक्का करायचा असेल तर तो शाळेतील पुस्तके वाचतो की नाही हे तर बघावेच, याशिवाय अन्य काही अवांतर पुस्तक वाचन करतो की नाही ................... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *तंत्रस्नेही शिक्षक आनंदा आनेमवाड यांना लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ दि इअर पुरस्कार*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *डॉक्टरांना माघारी पाठवलं, मनोज जरांगेंचे पुन्हा उपचार घेण्यास नकार... मुंबई हायकोर्टाने घेतली दखल*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांचाच, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा निर्णय, पक्षात फूट नसल्यामुळे दोन्हीही गटाचे आमदार पात्र*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *राज्यसभेसाठी सर्व उमेदवारांचा उमेदवारी अर्ज दाखल ! महायुतीकडून अशोक चव्हाण, डॉ. अजित गोपछडे, मेधा कुलकर्णी, मिलिंद देवरांसह प्रफुल्ल पटेलांनी मानले दिग्गजांचे आभार*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *इलेक्टोरल बाँड्स घटनात्मक दृष्ट्या अवैध ; सर्वोच्च न्यायालयाचा मोदी सरकारला धक्का*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 5311 घरांच्या लॉटरी सोडतीचा मुहूर्त 24 फेब्रुवारीला*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *रोहित शर्मा, रवींद्र जडेजाची शतकं, सरफराजचं पदार्पणात अर्धशतक, इंग्लंडविरोधात तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवसावर भारताचे वर्चस्व*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *हवेचा दाब कसा मोजतात ?* 📙 ***************************आपल्याकडे सभोवती सगळीकडे हवा आहे. वारा वाहतो तेव्हा हवा असल्याचं आपल्याला जाणवतं. एरवी ती आपल्याला दिसत नाही. त्यामुळे तिला काही वजन असेल याची कल्पनाही आपल्याला येत नाही. पण जमिनीपासून थेट आकाशात कितीतरी उंचीपर्यंत हवा असते. त्यामुळे जमिनीवर तिचा सतत दाब पडत असतो. जमिनीच्या एक चौरस मीटरच्या तुकड्यावर हवेचा असा जो स्तंभ उभा असतो, त्याचा जो दाब पडतो त्याला हवेचा दाब म्हणतात. हवामानखातं जेव्हा उद्याच्या किंवा पुढील आठवड्याच्या हवामानाचा अंदाज देतं तेव्हा निरनिराळ्या ठिकाणी असलेल्या हवेच्या दाबाची माहितीही दिली जाते. जेव्हा अनपेक्षितरित्या पाऊस येतो तेव्हा कोणत्यातरी ठिकाणी कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे पाऊस पडत असल्याचं सांगण्यात येतं. त्यावेळीच आपल्याला हवेचाही दाब असतो हे आठवतं. हवेचा हा दाब पास्कल किंवा बार या एककांमध्ये मोजला जातो. पण ते झालं वैज्ञानिक परिमाण. एरवी आपल्याला ओळखीचं असणारं परिमाण म्हणजे पाऱ्याची उंची. जसा रक्तदाब नळीतल्या पाऱ्याच्या उंचीत मोजला जातो तसाच हवेचा दाबही मोजला जातो. यासाठी वापरण्यात येणाऱ्या यंत्राला बॅरोमीटर असं म्हणतात. त्यात एका भांड्यात पारा ठेवून त्यात एक उलटी नळी ठेवलेली असते. त्या नळीतील हवा काढून घेतलेली असल्याने तिच्यात निर्वात पोकळी निर्माण झालेली असते. भांड्यातल्या पाण्यावर पडणाऱ्या हवेच्या दाबामुळे पारा त्या नळीत चढतो. नळीतल्या पार्‍याचं वजन आणि त्या भांड्यातल्या नळीच्या तोंडाच्या क्षेत्रफळाएवढ्या जागेवरच्या हवेचं वजन समान असतं. त्यामुळे नळीतल्या पाऱ्याची उंची ही त्या हवेच्या दाबाचं माप असल्याचं धरलं जातं. सामान्यत: समुद्रसपाटीवर पाऱ्याची उंची ७६० मिलिमीटर असते. तोच हवेचा दाब मानला जातो. एका चौरस सेंटीमीटर क्षेत्रफळावरच्या हवेचा दाब एक किलोन्यूटन असतो.हे अर्थात अतिशय प्राथमिक स्वरूपाचं बॅरोमीटर झालं. हवेचा दाब मोजावयास सुरुवात झाली तेव्हा अशा यंत्राचा वापर होत असे. आजकाल याच तत्त्वावर आधारित पण अचूक मोजमाप करणारी इलेक्ट्रॉनिक बॅरोमीटर्स उपलब्ध आहेत. जसजसं उंचावर जावं तसतशी हवा विरळ होते. सहाजिकच तिथं हवेचा दाब घसरत जातो.*बाळ फोंडके यांच्या 'कसं ?' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कृतीपेक्षा शब्दाने शत्रू निर्माण होण्याची शक्यता जास्त असते.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) २०२४ चा डॉ.मोहन धारिया राष्ट्रनिर्माण पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे ?२) भारतीय हरितक्रांतीचे जनक, भारतरत्न डॉ.एम.एस.स्वामीनाथन यांचे पूर्ण नाव काय आहे ?३) अबुधाबी येथे sandstone चा वापर करून आखातातील सर्वात मोठ्या मंदिराचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले ?४) नागपूर ते गोवा हा धार्मिक स्थळांना जोडणारा शक्तीपीठ महामार्ग एकूण किती जिल्ह्यातून जात आहे ?५) फुटबॉलमध्ये आता रेड आणि यलो कार्डनंतर कोणत्या नविन कार्डचा समावेश करण्यात येणार आहे ? *उत्तरे :-* १) पद्मभूषण डॉ.सायरस पूनावाला २) मोनकोंबू शिवसांबन स्वामीनाथन ३) नरेंद्र मोदी, पंतप्रधान ४) ११ जिल्हे ५) ब्ल्यू कार्ड*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*   👤 कु. सानिका कुणाल पवारे, कुंडलवाडी👤 बाप्पा महाजन, आदर्श शिक्षक, नाशिक👤 प्रदीप वाघमारे, पुणे👤 सतीश चौहान, चौसाळा👤 प्रमोद हिवराळे, धर्माबाद👤 लता विष्णु वायाळ (स.शिक्षिका) भोकर👤 मारोती गंगाधर जाधव👤 बजरंग येमुल, नांदेड👤 शंकर छपरे👤 बालाजी पाटील जाधव👤 राजू इटलावार👤 महंमद सादिक खान👤 शंकर मासूनवार👤 डॉ. मुखत्यार आतार*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••नभी वावरे जा अणुरेणु काही।रिता ठाव या राघवेवीण नाही॥तया पाहता पाहता तोचि जाले।तेथे लक्ष आलक्ष सर्वे बुडाले॥१९६॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••इतरांच्या विषयी नको त्या शब्दात बोलून स्वतःचे समाधान व आनंद मानण्यात किती सोपे आहे..? पण, खऱ्या अर्थाने आपल्या बोलण्यात किती तथ्य आहे.? याचा पडताळा आपण कधी तरी घेत असतो काय.? याचा साकल्याने विचार करण्याची गरज आहे.जर एखाद्याच्या विषयी चांगले बोलणे होत नसेल तर नको त्या शब्दात सांगून आपलीच वेळ वाया घालवू नये. भलेही आज स्वतःचा समाधान मानून घेण्यात जरी आनंद मिळत असेल तरी, ती व्यक्ती नसल्यावर ह्या सर्व गोष्टींना काहीही अर्थ नसतो.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *खरी नक्कल*भोजराजाकडे एक बहुरुपी गेला. राजाने त्याला आपले सोंग घ्यायला सांगितले. थोड्याच वेळात हुबेहुब त्या राजाप्रमाणे बनून, तो बहुरुपी राजसभेत शिरला.त्याचे त्याच्या कलेतील असामान्य कौशल्य पाहून खुष झालेल्या भोजराजाने त्याला एक मौल्यवान रत्नहार देऊ केला.भोजराजाचे सोंग घेतलेल्या त्या बहुरुप्याने तो रत्नहार तर स्विकारला नाहीच, पण राजाला साधा मुजरा करण्याचा शिष्टाचारही पाळला नाही. एवढंच नव्हे तर तो राजसभेत ज्या राजेशाही दिमाखांन आला, तशाच तऱ्हेनं निघून जाऊ लागला.दरबारी मंडळींना त्या बहुरुप्याचा हा उध्दटपणा आवडला नाही. त्यांच्यापैकी काहीजण राजाच्या कानात काहीतरी कुजबुजले. त्याबरोबर राजाने आपल्या सेवकांना त्या बहुरुप्याला पकडून, आपल्यापुढं हजर करण्याचा हुकुम सोडला.त्या बहुरुप्याला पकडून समोर आणताच राजा त्याला म्हणाला, ‘अरे उध्दटा ! तुला मी एवढा रत्नहार देऊ केला, पण तो तर तू स्वीकारला नाहीसच; पण मला मुजर करण्याचं साधं सौजन्यही न दाखवता, तू मला सरळ पाठ दाखवून निघून की रे गेलास ? तुझ्या या अपराधाबद्दल मी तुला आता कारावासाची शिक्षा ठोठावणार आहे.’बहुरुपी म्हणाला, ‘महाराज ! सोंग घेतलं असलं, तरी ते राजाधिराज भोजमहाराजांचं घेतलेलं आहे. तेव्हा इनाम म्हणून रत्नहार स्विकारणं, आपल्यापुढे वाकून मुजरा करणं किंवा आपल्याला पाठ न दाखविता उलटं चालत जाणं, या गोष्टी मी केल्या असत्या, तर आपला अपमान झाला असता, म्हणून मी हुबेहुब आपल्याप्रमाणे वागलो.’बहुरुप्यानं केलेल्या या खुलाशानं भोजराजा प्रसन्न झाला. त्याने त्याला दोन-तीन दिवस शाही पाहूणा म्हणून ठेवून घेतली आणि त्याल तो रत्नहार व एक हजार सुवर्ण मोहोरा इनाम म्हणून दिल्या•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 15 फेब्रुवारी 2024💠 वार - गुरुवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://nasayeotikar.blogspot.com/2024/02/kuldipak.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_ या वर्षातील ४६ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *१९९०:महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून श्री सुब्रहण्यम यांनी सूत्रे हाती घेतली* *१९६०:परभणी येथील कृषी महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचे यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन* *१९४२:दुसरे महायुद्ध – सिंगापुरमध्ये ब्रिटिश सैन्याची शरणागती.८०,००० भारतीय,ब्रिटिश व ऑस्ट्रेलियन सैनिक युद्धबंदी.**१९३९:काँग्रेसच्या अध्यक्षपदी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची निवड झाल्यावर मोठा पेचप्रसंग होऊन मतभेद झाले.त्यातून पंडित नेहरुंसह कार्यकारिणीच्या बारा सभासदांनी राजीनामे दिले.**१९३२:पुण्यात मॉडर्न एज्युकेशन सोसायटीच्या वतीने नौरोसजी वाडिया महाविद्यालय सुरू झाले**१८७९:अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात स्त्री वकिलांना खटले लढवण्यास परवानगी मिळाली.*  *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८३:श्रावण सखुबाई रंगनाथराव भवर -- कवी**१९८२:सचिन आत्माराम पाटील-होळकर-- कृषितज्ज्ञ,लेखक* *१९७२:किशोर ज्ञानेश्वर कुळकर्णी-- पत्रकार, लेखक* *१९६७:रमेश परसराम बोपचे-- कवी**१९६७:संजीव शंकरराव अहिरे-- मराठी व हिंदी भाषेमध्ये लेखन करणारे लेखक,कवी* *१९६४:आशुतोष गोवारीकर-- प्रसिद्ध भारतीय चित्रपट दिग्दर्शक,अभिनेता,पटकथा लेखक आणि निर्माता* *१९५९:कलानंद जाधव(पुंजाराव दताराव जाधव)-- कवी,बालगीतकार,लेखक* *१९५६:विनायक महादेव गोविलकर -- जेष्ठ अर्थशास्त्रज्ञ,व्याख्याते,लेखक* *१९५६:डेसमंड हेन्स – वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू**१९५४:राजेंद्र गजानन साळोखे -- लेखक* *१९५३:दत्तात्रय कडू लोहार-- कवी**१९४९:नामदेव लक्ष्मण ढसाळ – जेष्ठ साहित्यिक (मृत्यू:१५ जानेवारी २०१४)**१९४७:श्रीधर शंकरराव खंडापूरकर-- कवी,लेखक**१९४७:रणधीर राज कपूर-- भारतीय अभिनेता,चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक* *१९४६:महादेवराव नथुजी घाटुर्ले-- विदर्भातील कवी,लेखक**१९२८:शांता हरी मिसाळ-- जेष्ठ संगितसमिक्षक,कथाकार,कादंबरीकार(मृत्यू:७ मे २०१३)**१९१८:वसंत कृष्ण जोशी--संस्थापक संपादक-‘दक्षता’मासिक, लोकप्रिय पोलीस तपास कथाकार(मृत्यू:२० डिसेंबर २००४)**१९१७:गोविंद रामचंद्र आफळे-- मराठीतून कीर्तने करणारे परंपरागत कीर्तनकार(मृत्यू:१ नोव्हेंबर १९८८)**१८९६:रामचंद्र नारायण वेलिंगकर --ज्ञानेश्वरी शब्दकोशाचे कर्ते**१८७५:जनार्दन सखाराम करंदीकर-केसरी या वृत्तपत्राचे संपादक,लेखक (मृत्यू:१२ मार्च १९५९)**१८२४:राजेन्द्रलाल तथा राजा मित्रा – बंगालमधील प्राच्यविद्या संशोधक, एशियाटिक सोसायटीचे पहिले अध्यक्ष (१८८५),भारतीय चित्रकला,शिल्पकला,राजकीय आणि सामाजिक विषयांवरील भाष्यकार (मृत्यू:२६ जुलै १८९१)**१७१०:लुई (पंधरावा) – फ्रान्सचा राजा (मृत्यू:१० मे १७७४)**_१७३९:थोर मानवतावादी संत श्री.सेवालाल महाराज-- जन्म तत्कालीन म्हैसुर प्रांतामध्ये सुवर्णकूप्पा येथे,आजीवन ब्रह्मचारी राहुन दीन दुःखीतांच्या सेवेसाठी व सर्व प्राणीमात्राच्या कल्याणासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले._**१५६४:गॅलेलिओ गॅलिली – इटालियन खगोलशास्त्रज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू:८ जानेवारी १६४२)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२०:विनायक जोशी-- मराठी भावगीतांवर आधारित कार्यक्रम करणारे गायक(जन्म:११ मे १९६१)**२०१८:मनोहर मारोतीराव तल्हार-- प्रसिद्ध मराठी लेखक(जन्म:१४ अाॅक्टोबर१९३२)**२०१०:श्रीराम पांडुरंग कामत-- ज्येष्ठ विश्व चरित्रकोशकार (मृत्यू:१७ मे १९३४)**२००८:मनोरमा-- बॉलीवूडमधील भारतीय अभिनेत्री(जन्म:१६ ऑगस्ट१९२६)**१९८८:रिचर्ड फाइनमन – क्‍वांटम इलेक्ट्रोडायनॅमिक्स मधील मूलभूत संशोधनाबद्दल नोबेल पारितोषिक (१९६५) मिळवणारे अमेरिकन पदार्थवैज्ञानिक (जन्म: ११ मे १९१८)* *१९८०:कॉंम्रेड एस.एस.मिरजकर – भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक सदस्य व ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस (आयटक) चे अध्यक्ष* *१९५३:सुरेशबाबू माने – किराणा घराण्याचे प्रसिद्ध गायक (जन्म:१९०२)**१९४८:सुभद्राकुमारी चौहान – हिन्दी कवयित्री (जन्म:१६ ऑगस्ट १९०४)**१८६९:मिर्झा ग़ालिब – ऊर्दू शायर (जन्म:२७ डिसेंबर १७९७)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*जीवनातील नैतिक मूल्ये सांगणारा कथासंग्रह कुलदीपक*या कथासंग्रहातील कथांमधून जीवनातील नैतिक मूल्ये, चारित्र्य, सद्गुण, सकारात्मकता हे संस्कार मोती सहज मिळतात. एकूणच या कथासंग्रहातील एकूण 17 कथा ह्या मुलांसाठी संस्कारक्षम असून सर्वच वयोगटातील वाचकांसाठी वाचनीय असून वाचल्यावर मानसिक समाधान देणारे आहेत............. पूर्ण माहिती वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.पुस्तक परिचय - मीना खोंड, हैद्राबाद, 7799564212~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *अबुधाबीतील मंदिराचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन, अरब जगतातील पहिल्या हिंदू मंदिराबद्दल प्रचंड उत्साह*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपने अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि डॉ. अजित गोपछडे यांना दिली उमेदवारी तर एकनाथ शिंदेंकडून मिलिंद देवरांना संधी*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *मनोज जरांगे आक्रमक होताच मंत्रिमंडळाचा निर्णय : मराठा आरक्षणावर चर्चेसाठी 20 फेब्रुवारीला होणार विधिमंडळाचे एक दिवसीय विशेष अधिवेशन*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *आस्तिक कुमार यांची पुण्याला बदली : अ‌ॅड. दिलीप स्वामी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे नवे जिल्हाधिकारी*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *वैद्यकीय महाविद्यालयात इंटर्नशिप करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार दरमहा १८ हजार !*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *देशातील पहिली स्वच्छ भारत अकादमी ठाण्यात; स्वच्छ भारत अभियानाला मिळणार बळ*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *राजकोट येथे आजपासून भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यात तिसरा कसोटी सामना*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय ?* 📙 घरात घर हरघडीला ट्रान्सफॉर्मर लागतो, तर घराबाहेर, विशेषतः औद्योगिक पुरवठ्यासाठीही ट्रान्सफॉर्मरशिवाय भागत नाही. पण या दोन्हींमध्ये महत्त्वाचा फरक आहे. घरात वापरला जातो, त्यामध्ये विजेचा दाब कमी करून तीन, सहा, नऊ व बारा व्होल्ट्स इतका ठेवला जातो. या कमी केलेल्या दाबाचा वापर करून मग छोटे दिवे, नाइट लॅम्प, रेडिओ ट्रांजिस्टर, रेकॉर्ड प्लेअर, खेळणी यांचा उपयोग केला जातो. याउलट कारखान्यांना लागणारी वीज, शहराला दूरवरुन केला जाणारा पुरवठा हा अतिउच्च दाबाचा असतो. यासाठी ठिकठिकाणी दाब वाढवणारे ट्रान्सफॉर्मर बसवलेले असतात. वीजकेंद्रांपासून वीज आणण्यासाठीही त्यांचा वापर केला जातो.ट्रान्सफॉर्मरमध्ये विजेचा दाब लहानाचा जास्त वा जास्तीचा लहान केला जातो. या दोन्हींसाठी पद्धत एकच वापरली जाते. ती म्हणजे दोन्ही लोखंडी पट्ट्यांच्या सांगण्यावर (core) शेजारीशेजारी तारांचे वेटोळे गुंडाळले जाते. एक असते प्राथमिक, तर दुसरे दुय्यम. विजेचा प्रवाह जितका कमी वा जास्त करावयाचा, दाब कमी वा वाढवायाचा, तितके वेटाळ्यातील वेढे कमी जास्त केले जातात. प्राथमिक वेटोळ्यापेक्षा दुय्यम वेटोळ्यामधील वेढे जास्त असले, तर प्रवाहदाब वाढतो. याउलट स्थितीत तो कमी होतो.खरे म्हणजे दोन्ही वेटोळी ही पूर्णतः वेगळी असतात. पहिल्या वेटोळ्यात विद्युतप्रवाह येतो व बाहेर पडतो. हा अर्थातच अल्टर्नेटिंग करंट वा AC असतो. यामुळे सांगाड्यात विद्युतचुंबकीय क्षेत्र निर्माण होते व त्याचा परिणाम होऊन शेजारील दुसऱ्या वेटोळ्यातून प्रवाह वाहणे सुरू होतो. याचा दाब वेटोळ्याच्या वेढ्यांच्या संख्येनुसार वाढतो वा कमी होतो.ट्रान्सफॉर्मर छोटा असो वा मोठा; ज्यावेळी दाब कमी होतो, तेव्हा प्रवाह वाढतो; याउलट दाब वाढला, तर प्रवाहाची शक्ती कमी होत जाते. पण याचा फायदा वीज वाहून नेण्याच्या तारांच्या आकारमानात बदल करता आल्याने होतो. प्रवाहाची शक्ती कमी झाल्याने अतिदाबाच्या तारांची जाडी खूपच कमी ठेवता येते.ट्रान्सफॉर्मरचा वापर झाल्याने अनेक बाबतीत सोय होऊ शकते. वाहनांमध्ये जेमतेम बारा व्होल्टचा प्रवाह निर्माण होतो; पण त्यावर संस्कार करून, अतिदाबाच्या प्रवाहाची निर्मिती करून ठिणग्या पाडण्याचे व वाहन चालवण्याचे काम केले जाते, याउलट लहान मुले खेळताना चुकूनही धक्का बसू नये, अशी खेळणी वीज प्रवाहाचा दाब अत्यल्प ठेवून बनवली जातात.‘सृष्टी विज्ञानगाथा या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••' जिंकण्याचा एकमेव मार्ग म्हणजे इतर सर्वांपेक्षा जलद गतीने शिकणं "*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) गोंदिया जिल्ह्याचे क्षेत्रफळ किती चौकिमी आहे ?२) महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रफळ किती चौकिमी आहे ?३) भारताचे क्षेत्रफळ किती चौकिमी आहे ?४) अंडर १९ क्रिकेट विश्वकप - २०२४ कोणत्या देशाने जिंकला ?५) 'द इनसाइडर' हे आत्मचरित्र कोणाचे आहे ? *उत्तरे :-* १) ५,४३१ चौकिमी २) ३,०७,७१२ चौकिमी ३) ३२,८७,२६३ चौकिमी ४) ऑस्ट्रेलिया ५) पी. व्ही. नरसिंहराव, माजी पंतप्रधान*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 अशोक गायकवाड, पदवीधर शिक्षक 👤 दत्ता एम. भोसले, शिक्षक नेते, बिलोली 👤 जनाबाई निलपत्रेवार, शिक्षिका, धर्माबाद 👤 बाबूराव बोधनकर, सहशिक्षक, बिलोली👤 किरण गौड, धर्माबाद 👤 घनश्याम नानम, डाक घर, धर्माबाद 👤 रमेश सोनकांबळे 👤 गुलाब जाधव 👤 रमेश पाटील कदम 👤 अविनाश सातपुते 👤 गोविंद टेकुलवार, करखेली👤 प्रल्हाद घोरबांड, कवी व गो सेवक*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••बसे हृदयी देव तो जाण ऐसा।नभाचेपरी व्यापकू जाण तैसा॥सदा संचला येत ना जात कांही।तयावीण कोठे रिता ठाव नाही॥१९५॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अज्ञानाला दूर घालवायचे असेल, दु:खाला दूर करायचे असेल, आपल्या मनातील रागावर नियंत्रण ठेवावे वाटत असेल, इतरांना आपलेसे करावे वाटत असेल, अवघड समस्येतून मार्ग काढायचा असेल आणि जीवन सुखी व समृद्ध व्हावे असे वाटत असेल तर त्यावर एक आणि एकच सर्वोत्तम मार्ग आहे तो म्हणजे ज्ञानाचा. ज्यांनी ज्ञानाचा मार्ग स्वीकारला आहे त्यांनी ह्या सा-या गोष्टीतून ज्ञानाच्या सहाय्याने जीवन सुखी व समृद्ध केले आहे. ज्यांनी ज्ञान स्वीकारला नाही त्यांना त्यांच्या जीवनात कधीही सुखी होता आले नाही.ते जवळ असलेल्या सुखालाही मुकले आहेत कारण त्यांच्याजवळ ज्ञानाची जोड नव्हती म्हणून या जगात सर्वश्रेष्ठ जर काय असेल तर ते ज्ञान. जीवनातील अज्ञानाला दूर करण्याचे सामर्थ्य केवळ ज्ञानातच आहे हे कधीही विसरुन चालणार नाही. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद...९४२१८३९५९०. 🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*शासन* महाभारताच्या शांतीपर्वातील ही गोष्ट. शंख व लिखित नावंचे दोघे भाऊ यज्ञोपवित संस्कार झाल्यावर गुरूगृही विद्याध्यानासाठी गेले. संपूर्ण वेद वेदांगाचा अभ्यास करून गुरूची परवानगी घेऊन हे दोघे घरी परत आले. दोघांनीही दोन वेगवेगळया ठिकाणी आपले आश्रम बांधले. तिथे त्यांचे अध्यापनाचे काम सुरू झाले. बरेच दिवस झाले दोन्ही भावांची भेट नव्हती. लिखिताने शंखाकडे भेटीला जाण्याचे ठरवले. त्याप्रमाणे तो गेला पण शंख कामानिमित्त बाहेर गेला होता. निराश झालेला लिखित परत निघाला. दुपारी बाराची वेळ भूक लागली होती. समोर शंखाच्या आश्रमातील आंब्याच्या झाडाला खूप आंबे लागले होते. एक छानसा पिकलेला आंबा लिखिताने तोडला व पुढे चालू लागला. तेवढयात समोरून येणार्‍या शंखाने ते पाहिले व विचारले. 'आंबा कुठे मिळाला ?' शंख सहज म्हणाला 'अरे ! तुझ्याच झाडाचा छान पिवळा धम्मक दिसला तोडला'. शंख शांतपणे म्हणाला 'म्हणजे लिखिता तू चोरी केलीस झाडाच्या मालकाला न विचारता आंबा तोडलास' लिखिताला आपली चूक कळली. शरमेने त्याची मान खाली झुकली. 'शंखा माझ्या गुन्ह्याबद्दल मला हवी ती शिक्षा कर' 'काहीं गरज नाहीं त्याची जा आता पुन्हा असे घडणार नाही ह्याची खबरदारी घे' शंख एवढे बोलून निघून गेला. लिखित राजाकडे गेला. घडलेली सर्व हकीगत सांगितली. 'राजा मला शिक्षा कर' लिखित म्हणाला. ह्या विचित्र मागणीचे राजाला आश्‍चर्य वाटले. राजा म्हणाला 'लिखिता तू म्हणतोस ते खरंही असेल पण चोरीची फिर्याद कुणीच केलेली नाही. गुन्हा शाबीत झाला तर शिक्षा'. 'राजे पण गुन्हा शाबीत झाला तर ह्या गुन्ह्याला शिक्षा कोणती ?' लिखिताने विचारले, 'चोरी करणार्‍याचा हातच आम्ही कापतो' राजा म्हणाला. राजाच्या समोरच लिखिताने राजा शासन करत नाहीं म्हणून आपणच आपला हात कापून टाकला'. स्वत:च स्वत:ला शिक्षा करून घेणारी प्रजा उत्कृष्ट राज्य शासनाचे प्रतीक आहे.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 14 फेब्रुवारी 2024💠 वार - बुधवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://nasayeotikar.blogspot.com/2018/02/blog-post.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_ या वर्षातील ४५ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२००३: सुप्रसिद्ध नाटककार महेश एलकुंचवार यांची के.के. बिर्लाफांउंडेशनतर्फे दिल्या जाणार्‍या सरस्वती सन्मानासाठी निवड**२०००:अभिजित कुंटे हा भारताचा चौथा आणि महाराष्ट्राचा दुसरा ग्रॅंडमास्टर बनला.**१९८९:भोपाळ दुर्घटनेबद्दल भारत सरकारला ४७,००,००,००० अमेरिकन डॉलर नुकसान भरपाई देण्याचे यूनियन कार्बाईडने कबूल केले**१८८१:भारतातील पहिल्या होमिओपाथिक कॉलेजची कोलकाता येथे स्थापना**१९६३:अणुक्रमांक १०३ असलेले लॉरेन्सिअम हे मूलद्रव्य प्रथमच तयार करण्यात आले.**१९४६:पहिला संगणक 'एनियाक' युनिव्हर्सिटी ऑफ पेनसिल्व्हेनियात प्रदर्शित करण्यात आला.**१९४६:बँक ऑफ इंग्लंडचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले**१९४५:दुसरे महायुद्ध – रॉयल एअर फोर्स च्या विमानांनी तुफानी बॉम्बफेक करुन जर्मनीतील ड्रेस्डेन शहर बेचिराख केले.**१९४५:चिली, इक्वेडोर, पॅराग्वे व पेरू या देशांचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश**१८९९:अमेरिकेत निवडणुकांसाठी मतदान यंत्रे वापरण्यास सुरूवात झाली.**१८७६:अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल व एलिशा ग्रे यांनी एकाच दिवशी टेलिफोनच्या पेटंटसाठी अर्ज केला.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९७९: रेखा वाल्मिक पाटील-- कवयित्री* *१९६८:भाग्यश्री देसाई-- कवयित्री,अभिनेत्री, निर्माती**१९६२:विजय कोपरकर-- हिंदुस्थानी शास्त्रीय गायक* *१९६१:डॉ.माधुरी हेमंत वाघ-- कवयित्री, लेखिका**१९५९:प्रा.डॉ.सुनील विभुते -- प्रसिद्ध विज्ञान कथाकार* *१९५२:सुषमा स्वराज-- माजी केंद्रीय मंत्री (मृत्यू:६ ऑगस्ट २०१९)**१९५०:कपिल सिबल – सुप्रसिद्ध कायदे तज्ञ आणि माजी केंद्रीय मंत्री**१९३७: वसंतराव धोत्रे--माजी सहकार राज्य मंत्री,सहकार नेते,शिवाजी शिक्षण संस्थेचे पूर्व अध्यक्ष (मृत्यू:१०ऑगस्ट २०१८)**१९३३:मधुकर रामदास सोनार-- कवी, कथाकार (मृत्यू:१५ सप्टेंबर २००४)**१९३३:मुमताज जहाँ बेगम देहलवी ऊर्फ मधुबाला – अभिनेत्री (मृत्यू:२३ फेब्रुवारी १९६९)**१९३०:वृंदा रघुनाथ लिमये,-- कवयित्री लेखिका* *१९२६:डॉ.वसंत विठ्ठल पारखे -- लेखक संपादक**१९२५:मोहन धारिया –माजी केन्द्रीय मंत्री व सामाजिक कार्यकर्ते (मृत्यू:१४ आक्टोबर २०१३)**१९२२:प्रभाकर श्रीधर नेरूरकर-- ललित लेखक(मृत्यू:२९ जून १९९८)**१९१८:डॉ.मधुकर अनंत मेहेंदळे-- संस्कृत भाषा,ऋग्वेद,निरुक्त,महाभारत आणि अवेस्ता (पारशी धर्मग्रंथ) या विषयांचा सखोल अभ्यास असलेले आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रकांडपंडित(मृत्यू:१९ ऑगस्ट २०२०)**१९१६:संजीवनी मराठे – सुप्रसिद्ध कवयित्री (मृत्यू:१ एप्रिल २०००)**१९१४:जान निसार अख्तर – ऊर्दू शायर व गीतकार (मृत्यू:९ ऑगस्ट १९७६)**१४८३:बाबर – पहिला मुघल सम्राट, हिन्दुस्थानातील मुघल सत्तेचा संस्थापक (मृत्यू:२६ डिसेंबर १५३०)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_*••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९४:यशवंत नरसिंह केळकर--कवी, कोशकार, इतिहास संशोधक व इतिहासलेखक(जन्म:१९ जुलै १९०२)**१९७५:पी.जी.वूडहाऊस – इंग्लिश लेखक (जन्म:१५ आक्टोबर १८८१)**१९७५:ज्यूलियन हक्सले – ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ (जन्म:२२ जून १८८७)**१९७४:श्रीकृष्ण नारायण रातंजनकर – आग्रा घराण्याचे गायक,शास्त्रीय संगीताचे गाढे अभ्यासक व संगीत गुरू (जन्म:१ जानेवारी १९००)**१४०५:तैमूरलंग – मंगोलियाचा राजा (जन्म:८ एप्रिल १३३६)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *व्हॅलेंटाईन दिनानिमित्त प्रासंगिक लेख*शतदा प्रेम करावे .....!प्रेम म्हणजे काय असते? एकमेकांबद्दल असलेला जिव्हाळा, माया, ममता आणि लळा म्हणजे प्रेम. आपल्या आवडत्या व्यक्तीला त्रास होऊ नये म्हणून जे काळजी घेतली जाते तिथे प्रेम अनुभवयास मिळते. जीवनात प्रत्येक जण कुणावर नाही तर कुणावर प्रेम करतच असतो. आईचे मुलांवरील प्रेम असो किंवा बहिणीचे भावावरील प्रेम. काही जण आपल्या घरातील प्रत्येक सदस्यावर तर प्रेम करतातच त्याशिवाय घरातील पाळीव प्राण्यांवर देखील जीवापाड प्रेम करतात. या प्रेमापायी ते जनावर देखील त्यांच्यावर तेवढेच प्रेम करते. आमच्या बाजूला एकाच्या घरी कुत्रा होता. तो खूपच प्रामाणिक होता. त्याचे मालकांवर खूप प्रेम होते. मालकांचे देखील त्याच्यावर खूप प्रेम होते .................. पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार यांच्या उपस्थितीत अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये केला प्रवेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *केंद्र सरकारचा मोठा निर्णय,बारावीपर्यंत शिकवणाऱ्या शिक्षकांना TET अनिवार्य*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *तिसऱ्या टर्ममध्ये भारताला तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनवणार असा विश्वास पंतप्रधान मोदींनी अबूधाबीमध्ये बोलताना व्यक्त केले*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मुकेश अंबानींनी रचला इतिहास, रिलायन्स बनली देशातील पहिली 20 लाख कोटींची कंपनी*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *गणेश जयंती निमित्त पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर परिसरात आकर्षक फुलांची सजावट, दर्शनासाठी भाविकांची पहाटेपासूनच गर्दी*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *युनायटेड वर्ल्ड रेसलिंगचा मोठा निर्णय ! भारतीय कुस्ती महासंघावरील निलंबन घेतलं मागे*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *IPL सोडा, आधी रणजी खेळा ; ईशान किशन, कृणाल पांड्या, दीपक चाहरला BCCI ची तंबी*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*बहुपयोगी खजूर*खजूर हे पूर्ण अन्न आहे. खजूर उष्ण हवामानात व प्रदेशात तयार होतो. तो पोटात गेल्याबरोबर पचायला सुलभ अशा गुणांचाच असतो. खजूर जशाचा तसा पूर्णपणे आतडय़ांनी ग्रहण केला जातो. पचायला बिलकूल जड नाही. खजूर उष्ण आहे अशी समजूत आहे. खजूर वात व पित्तशामक कार्य करतो. वजन वाढवतो. शरीराला तृप्ती आणतो. म्हातारपणा दूर ठेवतो. खजूर तुपाबरोबर घेतल्यास त्याचे गुण वाढतात. खजुरात ए, बी, सी व्हिटॅमिन व भरपूर साखर तसेच लोह आहे.खजूर सारक आहे. त्यामुळे पोट साफ होते. त्वचेच्या सुरकुत्या दूर होतात. कांती सुधारते, रक्त वाढते.खजुराचा विशेष फायदा, मेंदू, हृदय, वृक्क या अवयवांना बल देण्यात होतो. अतिकृश बालकांना वजन वाढवायला खजुराचा उपयोग होतो.दिवसाची उत्तम सुरूवात करूया ...*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*" गौरव हा पडण्यात नाही; पडून उठण्यात आहे. "**संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) महाराष्ट्रातील *गिधाडांचे संवर्धन* करण्यासाठी वनविभाग व BNHS ने कोणता प्रकल्प हाती घेतला आहे ?२) पहिल्या शिवसन्मान पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात येणार आहे ?३) महाराष्ट्र राज्याचे भाषा विभागाचे मंत्री कोण आहेत ?४) भारतामध्ये उच्च शिक्षण देणाऱ्या संस्थांची गुणवत्ता प्रमाणित करण्यासाठी 'नॅक'ची स्थापना कधी झाली ?५) महाराष्ट्र शासनाचा २०२४ चा पं. भीमसेन जोशी पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे ? *उत्तरे :-* १) जटायू संवर्धन २) नरेंद्र मोदी ३) दीपक केसरकर ४) सन १९९४ ५) शशिकांत मुळे *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 प्रा.डॉ. अभयकुमार दांडगे, उपसंपादक, दै. प्रजावाणी👤 सतीश कुरमे, सहशिक्षक, माहुर👤 धनराज जाधव, सहशिक्षक, वाशिम👤 विकास बडवे, सहशिक्षक👤 अभिनव भूमाजी मामीडवार👤 योगेश वाघ👤 रुचिता जाधव👤 शिवम चिलकेवार👤 ऋषिकेश उटलवार👤 चंद्रकांत गाडे👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••वसे हृदयी देव तो कोण कैसा।पुसे आदरे साधकू प्रश्न ऐसा॥देहे टाकिता देव कोठे पहातो ।परि मागुता ठाव कोठे रहातो॥१९४॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• आयुष्याची खरी सुरुवात तर तुमच्या वाडवडिलांच्या ख-या पुण्याईने सुरु झाली.जीवनाचा ' मध्य ' तर तुमच्या कर्तृत्वाने सिद्ध करायचा आहे.तो तुम्हाला चांगला करायचा आहे की,वाईट हे तुम्हालाच ठरवायचे आहे.कारण हे मात्र तुमच्या हातात आहे.यासाठी तुम्हाला कुणाच्या भरवशावर बसता येत नाही किंवा नशिबावर अवलंबून राहता येत नाही.म्हणून तुमच्या जीवनातला मध्यच महत्त्वाचा आहे.आणि शेवट मात्र आपल्या हाती नाही.भविष्यात केव्हा काय घडेल याचे काही ठामपणे सांगता येत नाही.म्हणून जे आज आणि आता तुमच्यासमोर आहे ते सत्य आहे ते स्वीकारा आणि त्याला कौशल्याने, धैर्याने आणि परिस्थितीनुरूप उत्तर द्यायला पुढे रहा.यातच तुमच्या जीवनाचे खरे सार आहे.*व्यंकटेश काटकर,नांदेड.*  संवाद..९४२१८३९५९०••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*चांगल्या कर्माचे फलीत*एका जंगलामध्ये *एक म्हतारी* आणि तिची नात राहत होती .आणि त्याच जंगलामध्ये *चार दरोडेखोर* लुटमार करण्यासाठी येत असंत .एके दिवशी लुटमार करता करता संध्याकाळ झाली आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची सुरुवात झाली .ते चार दरोडेखोर जंगलामध्ये *आश्रयासाठी* सैरभैर पळु लागले .अचानक त्यांना म्हतारीची *झोपडी* दिसली .आणि ते म्हतारीच्या झोपडीकडे गेले. म्हतारीने त्यांना रात्री साठी आश्रय दिला.म्हतारीने जेवण बनवले सर्वजन जेवायला बसले आणि जेवता जेवता *पाप पुण्याचा विषय* निघाला.प्रत्येकजण आपल्या परीने विषय मांडत होता.शेवटी म्हतारीने *पैज लावली*. बाहेर विजा पडत आहेत प्रत्येकाने त्या समोरच्या झाडाला शिवुन पुन्हा झोपडीमध्ये यायचे  *ज्याच्या अंगावर विज पडेल तो पापी आणि जो सुखरुप पुन्हा झोपडीत येईल तो पुण्यवान.*प्रथम १ ला दरोडेखोर गेला झाडाला शिवुन सुखरुप झोपडीत आला.असे दुसरा गेला ,तिसरा गेला, चौथा गेला. आणि सर्वजण सुखरुप झोपडीत आले.आता पाळी आली म्हतारी आणि तिच्या नातीवर म्हतारीला मनामध्ये प्रश्न पडला की हे चारही दरोडेखोर पुण्यवान निघाले आपण नक्कीच पापी आहोत, विज आपल्याच अंगावर पडणार असा विचार करत असतानातिने नातीला कडेवर घेतले आणी झोपडीच्या बाहेर पाऊल टाकले. त्याचक्षणी विजेचा कडकडाट होऊन विज त्या झोपडीवर पडली आणि क्षणार्धात ते चारही दरोडेखोर जागीच भस्मसात झाले.तात्पर्य :- एका पुण्यवान माणसाच्या आश्रयामूळे आजही चार पापी माणसं जगु शकतात. पण त्याने जर साथ सोडली तर ते चारही भस्मसात होऊ शकतात.म्हणून पुण्याचा वाटा नेहमी घेत रहा. ते कधी संकटाच्या वेळी आडवे येइल हे आपल्याला ही नाही समजणार.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 13 फेब्रुवारी 2024💠 वार - मंगळवार~~~~~~~~~~~~~~~~~~~समुहात join होण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर क्लीक करावे. Link - https://chat.whatsapp.com/EgXNT8RopqQ82O3UfAlMy9••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_जागतिक रेडिओ दिन_**_जागतिक सूर्यनमस्कार दिन_*••••••••••••••••••••••••••••••••••••*_ या वर्षातील ४४ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२०१०:पुणे येथे दहशतवाद्यांनी केलेल्या बॉम्बस्फोटात १७ ठार,६० जखमी**२००३:चित्रपट निर्माते,दिग्दर्शक यश चोप्रा यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान**१९८४:युरी आन्द्रेपॉव्ह यांच्यानंतर कॉन्स्टान्टीन चेरेनेन्को सोविएत संघाचे अध्यक्ष झाले.**१९८२:भारत आणि फ्रान्स यांच्या संरक्षण करा मिराज विमानाचा समावेश**१७३९:कर्नालची लढाई – पर्शियाच्या नादिरशहाने मुघलांच्या मुहम्मदशहावर तीन तासांत विजय मिळवला. या विजयामुळे नादिरशहाचा दिल्लीत येण्याचा मार्ग सुकर झाला.* *१६६८:स्पेनने पोर्तुगालच्या स्वातंत्र्याला मान्यता दिली.**१६३०:आदिलशाही आणि निजामशाही संपवण्याच्या उद्देशाने मुघल बादशहा शहाजहान मध्य प्रदेशातील बुर्‍हाणपूर येथे पोहोचला.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९७६:शरद कपूर-- भारतीय अभिनेता* *१९६४:रामदास ग.खरे-- कवी,लेखक* *१९६०:स्वाती विनय गाणू-- लेखिका**१९५९:डॉ.गिरीश प्रभाकर पिंगळे -- खगोलशास्त्रचे अभ्यासक,लेखक* *१९४९:चंद्रशेखर ठाकूर--ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ* *१९४५:विनोद मेहरा – अभिनेता (मृत्यू:३० आक्टोबर १९९०)**१९३७:प्रतिभा द्वारकानाथ लेले-- जेष्ठ लेखिका**१९२८:श्रीकृष्ण दामोदर पानवलकर --कथाकार(मृत्यू:१९ ऑगस्ट १९८५)**१९२७:मृणालिनी मधुसूदन जोशी-- ज्येष्ठ लेखिका (मृत्यू:२७ आक्टोबर २०२२)* *१९२१:निर्मला भालचंद बापट-- कवयित्री* *१९११:फैज अहमद फैज – लेनिन शांतता पुरस्कार विजेते ऊर्दू शायर (मृत्यू:२० नोव्हेंबर १९८४)**१९१०:दत्तात्रयशास्त्री धुंडिराज तथा ’दत्तमहाराज’ कवीश्वर – वेदविद्येचे आणि संस्कृतचे गाढे अभ्यासक,वेदांती पंडित (मृत्यू:१ मार्च १९९९)**१८९४:वासुदेव सीताराम तथा वा. सी. बेन्द्रे – इतिहासकार (मृत्यू:१६ जुलै १९८६)**१८७९:सरोजिनी नायडू – प्रभावी वक्त्या, कवयित्री व स्वातंत्र्यसेनानी,रौलेट कायदा, मॉन्टेग्यू-चेम्सफर्ड सुधारणा,खिलाफत चळवळ,साबरमती करार,असहकार आंदोलन यांत त्यांचा सक्रिय सहभाग होता. (मृत्यू: २ मार्च १९४९)**१८३५:मिर्झा गुलाम अहमद – अहमदिया पंथाचे संस्थापक (मृत्यू:२६ मे १९०८)**१७६६:थॉमस माल्थस – प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ (मृत्यू:२३ डिसेंबर १८३४)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२२:नरेंद्र लांजेवार--ज्येष्ठ साहित्यिक (जन्म:११मे १९६८)**२०१४:दिनकर त्रिंबक धारणकर--मराठी नाट्यकर्मीं,साहित्यिक व ‘सत्य प्रकाश’ या साप्ताहिका’चे माजी संपादक (जन्म:१९३६)**२०१२:अखलाक मुहम्मद खान उर्फ कवी शहरयार – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ऊर्दू कवी (जन्म:१६ जून १९३६)**२००८:राजेन्द्र नाथ – हिन्दी व पंजाबी चित्रपटांतील विनोदी अभिनेते (जन्म:१९३१)**२००७:वामन केशव लेले--भाषा अभ्यासक, समीक्षक(जन्म:२९ मे १९३३)**१९९४:यशवंत नरसिंह केळकर उर्फ य.न. केळकर-- इतिहासविषयक लेखन करणारे मराठी लेखक(जन्म:१९ जुलै १९०२)**१९७४:’सूर रंग’ उस्ताद अमीर खॉं – इंदौर घराण्याचे संस्थापक व गायक (जन्म:१५ ऑगस्ट १९१२)**१९६८:गोपाळकृष्ण भोबे – संगीत समीक्षक, गीतकार व कथालेखक(जन्म:६ आॅगस्ट १९२०)* *१९५६:धुंडिराज गणेश बापट-- वैदिक वाङ्‌मयाचे भाषांतरकार(जन्म:१५ नोव्हेंबर १८८२)**१९०१:लक्ष्मण बापूजी ऊर्फ ’भाऊराव’ कोल्हटकर – गायक नट (जन्म:९ मार्च १८६३)**१८८३:रिचर्ड वॅग्‍नर – जर्मन संगीतकार, संगीतसंयोजक व दिग्दर्शक (जन्म:२२ मे १८१३)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~  *👬 मैत्री 👬*  ~~~~~मैत्री ही कापड्यातील धाग्यासारखे आहे. एका मित्राने आपले जीवन परिपूर्ण होतच नाही. अनेक धाग्यासारखे जीवनात अनेक मित्र असतात आणि त्याची आवश्यकता देखील पदोपदी जाणवत राहते. बालपणीच्या मित्रांपासून जी मैत्री चालू होते ते महाविद्यालयीन जीवनापर्यंत जाऊन पोहोचते. या सर्व कार्यकाळात असलेले मित्र सुख आणि दुःखाच्या प्रसंगी अधुनमधून जीवनात डोकावत असतात. नोकरीच्या ठिकाणी सुद्धा मैत्री होते पण ती काही ठिकाणी तात्पुरते बनते तर काही ठिकाणी ही मैत्री गट्ट दिसून येते. संकट काळात जो मदतीला धावून येतो तोच खरा मित्र असे म्हटले जाते. त्यासाठी जीवनात संकट यावे लागते हे ही सत्य आहे. आपल्या जीवनात संकटेच आली नाहीत तर खरी मैत्री देखील कळणार नाही.*मैत्री असावी जीवाभावाची**नसाव्यात कोरड्या शपथा**क्षणोक्षणी आठवावे आपुल्या**मैत्रीच्या आठवूणी कथा*लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा आणि आमदारकीचा दिला राजीनामा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *विश्वासदर्शक ठरावात नितीश कुमार पास, बिहार विधानसभेतून विरोधी आमदारांनी वॉक आऊट केल्यानंतर विश्वासदर्शक ठराव जिंकला*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *विदर्भ मराठवाड्यात अवकाळी पाऊस आणि गारपीटीचा कहर,  हरभरा, गहू, तूर आणि कपाशीचं मोठं नुकसान, नुकसानभरपाई देणार, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *आमरण उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास दिला नकार*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *हिंगोली जिल्हा ग्रामीण पाणी पुरवठा विभाग ॲक्शन मोडवर:संथ काम करणाऱ्या 168 कंत्राटदारांना नोटीस, अनेक ठिकाणी कामेच बंद*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *13 वर्षांनतर सीसीआयचे कापूस खरेदी केंद्र सुरु:​​​​​​​हिंगोलीत पहिल्याच दिवशी 500 क्विंटल कापूस खरेदी*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी के एल राहुलऐवजी आता कर्नाटकच्या देवदत्त पड्डीकलला टीम इंडियात स्थान मिळण्याची शक्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *राष्ट्रीय महिला दिन National Women's Day in India*भारतात दरवर्षी 13 फेब्रुवारी हा राष्ट्रीय महिला दिवस म्हणून साजरा केला जातो. देशातील महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. भारताच्या ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी कवयित्री आणि गानकोकिळा सरोजिनी नायडू यांचा जन्मदिवस राष्ट्रीय महिला दिवस म्हणून साजरा केला जातो. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात सरोजिनी नायडू यांचे विशेष योगदान आहे. सरोजिनी नायडू यांचा जन्म 13 फेब्रुवारी 1879 रोजी बंगाली कुटुंबात हैदराबाद येथे झाला. त्यांनी चेन्नई, लंडन आणि केंब्रिज येथे शिक्षण घेतले. 12 व्या वर्षापासूनच त्या कविता लिहायच्या. त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतला. त्याचबरोबर महिलांच्या हक्कासाठी त्यांनी खूप संघर्ष केला. भारताच्या महिला राज्यपाल म्हणून काम करणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत. सरोजिनी नायडू यांनी साहित्य क्षेत्रात देखील योगदान दिले आहे. संकलन ••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*" ध्येय प्राप्तीसाठी एकाग्रता फार महत्वाची आहे. "**संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाच्या वतीने दिला जाणारा २०२३ या वर्षाचा *'विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार'* कोणाला जाहीर झाला आहे ?२) भारत व पाकव्याप्त काश्मीर यांच्या सीमारेषेला काय म्हणतात ?३) २०२४ साली 'भारतरत्न' हा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे ?४) लोकशाही विकेंद्रीकरणाचा प्रथम प्रयोग कोणत्या राज्यात करण्यात आला होता ?५) LIC ( लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ) ची स्थापना कधी झाली ? *उत्तरे :-* १) डॉ. रवींद्र शोभणे २) एल. ओ. सी. ३) कर्पुरी ठाकूर, लालकृष्ण अडवाणी, पी.व्ही.नरसिंहराव, चौधरी चरण सिंह, डॉ.एम.एस.स्वामीनाथन ४) राजस्थान ५) १ सप्टेंबर १९५६*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 देवीसिंग ठाकूर, धर्माबाद👤 नागनाथ भद्रे, धर्माबाद👤 अशोक पाटील, धर्माबाद👤 संगीता ठलाल, लेखिका, गडचिरोली*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••नव्हे जाणता नेणता देवराणा। न ये वर्णिता वेदशास्त्रा पुराणा॥ नव्हे दृश्य अदृश्य साक्षी तयाचा। श्रुती नेणती नेणती अंत त्याचा॥१९३॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपण जे, काही कार्य करत आहोत त्या कार्याविषयी आपल्याच माणसांना सहसा कळत नसेल किंवा त्याविषयी त्यांना पुरेपूर अनुभव नसेल तर त्यांच्याकडून विरोध होतच असते किंवा पाहिजे तेवढी त्यांच्याकडून आपल्याला साथ मिळत नाही. त्यावेळी आपण दु:खी होऊ नये. भलेही ते साथ देत नसतील तरी उशीरा का होईना हळूहळू सर्वकाही त्यांनाही कळायला लागते. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *❃  एकाग्रता  ❃*         एकदा एक स्वामीजी काही मुलांचे निरीक्षण करत होते. ती मुले पुलावर उभे राहून नदीवर तरंगत जाणार्‍या अंड्याच्या टरफलावर बंदुकीने नेम साधण्याचा प्रयत्न करत होती. पाण्यामुळे ती टरफले वर-खाली होत होती. मुलांना त्यांच्यापैकी एकही टरफलावर नेम धरता आला नाही. त्यांनी अनेक वेळेला बंदूक झाडली पण प्रत्येकवेळी त्यांचा नेम चुकत राहिला. त्यांच्याकडे बराच वेळ स्वामीजींचे लक्ष होते. मुलेही हे पाहत होती. मुलांनी स्वामीजींना म्हटले," तुम्ही नुसतेच आमच्याकडे काय पाहत आहात? का आम्हाला नेम धरता येत नाही असे तुम्हाला वाटते? आणि असे असेल तर तुम्ही नेम धरून ती टरफले फोडून दाखवा. तुम्हाला जर असे वाटत असेल की तुम्हाला आमच्यापेक्षा अधिक चांगले जमते असे वाटते का?" स्वामीजी हसले आणि म्हणाले," मी प्रयत्न करून पाहतो." मुले म्हणाली," तुम्हाला वाटते तितके ते सोपे नाहीये." स्वामीजींनी बंदूक हातामध्ये घेतली आणि त्या अंड्याच्या टरफलावर नेम धरला, काही मिनिटे निश्चल राहिले, मग त्यांनी बंदूक चालवली, त्यांनी बारावेळा गोळ्या झाडल्या आणि बारावेळेला अंड्यांची टरफले उडविण्यात स्वामीजींना यश आले. त्या मुलांना फारच आश्चर्य वाटले,"एखादा माणूस पाण्यातील वाहणार्‍या अंड्याच्या टरफलावर इतका अचूक कसा नेम साधू शकतो?" असा प्रश्न त्यांना पडला. स्वामीजींनी मुलांच्या मनातील हे ओळखले, त्‍यांना ती मुले आवडली होती. ते म्‍हणाले,’’ जे काही तुम्‍ही करत होता त्‍यावर तुमचं मन एकाग्र करा. नेमबाजी करा किंवा अन्‍य काही. तुमचं लक्ष फक्त लक्ष्‍यावरच पाहिजे. तुमचा नेम कधीच चुकणार नाही. एकाग्रतेने बरेच काही साध्‍य करता येते. अवघड वाटणा-या गोष्टीसुद्धा या एकाग्रतेने सहजसाध्‍य होतात.’’ मुले स्‍वामींजींपुढे नतमस्‍तक झाली.         *_🌀 तात्पर्य_ :~*ध्येय प्राप्तीसाठी एकाग्रता फार महत्वाची आहे.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 12 फेब्रुवारी 2024💠 वार - सोमवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://nasayeotikar.blogspot.com/2019/02/blog-post_7.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_ या वर्षातील ४३ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* ••••••••••••••••••••••••••••••••*१९९३:एम. एन. वेंकटचलैय्या यांनी भारताचे २५ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.**१९७९:वसंत गोपाळ आपटे यांनी किर्लोस्करवाडी येथून "आपले जग" नावाचे साप्ताहिक सुरू केले**१९७६:पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या हस्ते हडेक्की (केरळ) प्रकल्प देशास अर्पण.**१५०२:लिस्बन, पोर्तुगाल येथून वास्को-द-गामा भारताच्या दुसर्‍या सफरीवर निघाला.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८३:नवनाथ रणखांबे-- कवी,लेखक* *१९८३:राजीव मासरूळकर-- कवी* *१९८०:भाऊसाहेब मिस्तरी(भाऊसाहेब वाल्मीक गवळे)-- कादंबरीकार,स्तंभ लेखन**१९७६:विजय ढाले-- कवी**१९६०:सुरेखा गावंडे -- प्रसिद्ध बालसाहित्यिक,कवयित्री* *१९५७:डॉ.तात्याराव पुंडलिकराव लहाने-- प्रसिद्ध नेत्रचिकित्सक* *१९५६:गिरीश चौक-- लेखक**१९५२:ई.झेड.खोब्रागडे-- निवृत्त सनदी अधिकारी* *१९५०:भास्कर चिंधूजी नंदनवार-- लेखक**१९४९:गुन्डाप्पा विश्वनाथ – शैलीदार फलंदाज**१९४८:डॉ.सुधाकर सोमेश्वर मोगलेवार-- कवी,लेखक**१९४३:सतीश काळसेकर-- मराठी साहित्यातील कवी,संपादक,अनुवादक, लघुनियतकालिकांच्या चळवळीतील अग्रणी कार्यकर्ते(मृत्यू:२४ जुलै २०२१)**१९३९:अजितसिंग चौधरी-- भारतीय शेतकरी नेते,राष्ट्रीय लोक दलाचे संस्थापक(मृत्यू:६ मे २०२१)**१९३४:प्रा.डॉ.शरद काशिनाथ कळणावत-- प्रसिद्ध लेखक,कवी,वक्ते* *१९२९:दत्तात्रेय धोंडोपंत रत्नपारखी-- लेखक* *१९२९:प्राचार्य डॉ.गोपाळ श्रीनिवास बनहट्टी-- लेखक,नाटककार* *१९२०:कृष्ण सिकंद ऊर्फ ’प्राण’ – चित्रपट अभिनेता (मृत्यू:१२ जुलै २०१३)**१९१४:दत्तात्रय कृष्ण पेठे-- कवी* *१८८१:अ‍ॅना पाव्हलोव्हा – ’द डाइंग स्वान’ म्हणून प्रसिद्ध असलेली रशियन बॅलेरिना (मृत्यू:२३ जानेवारी १९३१)**१८७६:थुब्तेन ग्यात्सो – १३ वे दलाई लामा (मृत्यू:१७ डिसेंबर १९३३)**१८७१:चार्लस फ्रिअरी तथा दीनबंधू अ‍ॅन्ड्र्यूज – इंग्लिश मिशनरी,महात्मा गांधींचे जवळचे मित्र,समाजसेवक आणि भारताच्या स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते (मृत्यू:५ एप्रिल १९४०)**१८२४:मूळशंकर करसनदास तिवारी तथा स्वामी दयानंद सरस्वती – संस्कृत विद्वान आणि आर्य समाजाचे संस्थापक (मृत्यू:३१ आक्टोबर १८८३)**१८०९:चार्ल्स डार्विन – उत्क्रांतीवादाचा सिद्धांत मांडणारे ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ (मृत्यू:१९ एप्रिल १८८२)**१८०९:अब्राहम लिंकन – अमेरिकेचे १६ वे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू:१५ एप्रिल १८६५)**१८०४:हेन्‍रिक लेन्झ – जर्मन भौतिकशास्त्रज (मृत्यू: १० फेब्रुवारी १८६५)**१७४२:बाळाजी जनार्दन भानू उर्फ 'नाना फडणवीस' – पेशव्यांच्या दरबारी असणारे मराठा साम्राज्यातील मुत्सद्दी,पेशवाईतील साडेतीन शहाण्यांपैकी एक (मृत्यू:१३ मार्च १८००)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२२:राहुल बजाज-- बजाज ग्रुप उद्योग समूहाचे चेरमन,माजी राज्यसभा सदस्य,पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित(जन्म:१० जून १९३८)**२०१६:वसंतराव राजूरकर-- ग्वाल्हेर घराण्याचे भारतीय शास्त्रीय संगीत गाणारे मराठी गायक(जन्म:२४ एप्रिल १९३२)**२०१२:प्रा.डॉ.रत्‍नाकर बापूराव मंचरकर तथा र.बा.मंचरकर-- मराठी साहित्याचे समीक्षक व संत साहित्याचे अभ्यासक(जन्म:६ आक्टोबर १९४३)**२००१:भक्ती बर्वे – अभिनेत्री (जन्म:१० सप्टेंबर १९४८)**२०००:विष्णुअण्णा पाटील – सहकार क्षेत्रातील नामवंत नेते* *१९९८:पद्मा गोळे – सुप्रसिद्ध कवयित्री (जन्म:१० जुलै १९१३)**१८०४:एमॅन्युएल कांट – जर्मन तत्त्ववेत्ता (जन्म:२२ एप्रिल १७२४)**१७९४:पेशवाईतील मुत्सद्दी महादजी शिंदे यांचे वानवडी येथे निधन (जन्म:१७३०)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••महर्षी मार्कंडेय जयंती निमित्ताने प्रासंगिक लेख*महर्षी मार्कंडेय : पद्मशाली समाजाचे कुलदैवत*ब्रह्मदेवाचे मानसपुत्र म्हणजे भृगु महर्षी. या भृगु महर्षी आणि त्यांची पत्नी कयार्थी यांना भार्गवी, धाता आणि विधाता अशी तीन अपत्ये होती. भार्गवी म्हणजे लक्ष्मी ही विष्णूची पत्नी. धाता व अयाती यांना प्राणूडु नावाचा पुत्र होता. तर विधाता आणि नियती यांच्या पुत्राचे नाव होते मृकंड. भगवान शंकराचे परमभक्त असलेले मृकंडला एकही पुत्र नव्हते. त्यांनी पुत्रप्राप्तीसाठी शंकर भगवानची कठोर तपस्या केली. त्यांच्या या कठोर तपश्चर्येला भगवान शंकर प्रसन्न झाले आणि............ पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मध्यप्रदेश मधल्या झाबुआ इथे पंतप्रधानाच्या हस्ते 7300 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पाचं उदघाटन*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *लोकांचं आरोग्य व्यवस्थित राहावं म्हणून केंद्र सरकारने आयुष्यमान भारत ही योजना सुरू - उपराष्ट्रपती*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *नाशिक :- राज्यातील पहिल्या वातानुकूलित बसस्थानकाचे लोकार्पण*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *नांदेड जिल्ह्याला गारपीटीचा तडाखा, हाता तोंडाशी आलेल्या रब्बी पिकांचे मोठे नुकसान, पंचनामे करून तातडीने मदत करण्याची शेतकऱ्यांकडून मागणी.*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *नमो महारोजगार मेळाव्यासाठी समन्वयाने काम करा : महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचे आवाहन ; विभागीय आयुक्त कार्यालयात आढावा बैठक*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *तलाठी संघटनेचे अधिवेशन : तलाठ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन सकारात्मक ; महसूल मंत्री विखे पाटील यांची ग्वाही*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *U19 World Cup - ऑस्ट्रेलियाने भारताला 79 धावांनी हरवून विश्वकप जिंकला*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🍖 *तुटलेली हाडं परत पूर्वीसारखी कशी होतात ?* 🍖 ***********************'उजव्या हाताच्या करंगळीचं फ्रॅक्चर झाल्यामुळे अनिल कुंबळेची कसोटीतून माघार' किंवा 'मनगटाचं फ्रॅक्चर झाल्यामुळे बोरिस बेकर विम्बल्डन खेळू शकणार नाही', अश्या बातम्या आपण वर्तमानपत्रांमधून वाचतो, त्यावेळी वाटतं की संपलं त्या खेळाडूंची कारकीर्द संपली. एवढंच नाही तर आता आयुष्यभर त्या तुटलेल्या अवयवानिशीच त्याला वावरावे लागणार आहे. पण नाही. दोन कसोटीनंतर अनिल कुंबळे आपल्या फिरकीची जादू घेऊन परत अवतरतो आणि बोरिस बेकर आपल्या झंझावाती सर्व्हिसेसने प्रतिस्पर्धी खेळाडूंना सळो की पळो करून सोडतो. मग साहजिकच प्रश्न पडतो की खरी जादू अनिल कुंबळेंनं नव्हे तर त्याच्या त्या मोडलेल्या हाडावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी केली तर केली नाही ?पण नाही जादू कोणी केलीच असेल तर ती निसर्गानं केली आहे. निसर्गानेच तुटलेली हाडं परत सांधण्याची व्यवस्था मुळातच करून ठेवली आहे. हाड टणक असते. त्यामुळे ते नखांसारखे निर्जीव आहे की काय असं वाटतं. पण तसं नाही. इतर कोणत्याही अवयवासारखा हाही चैतन्यानं सळसळणारा अवयव आहे. जेव्हा एखादं हाड तुटतं त्यावेळी त्याच्यातून जाणाऱ्या रक्तवाहिन्याही तुटतात. त्यांच्यामधून रक्त बाहेर सांडू लागतं. पण इतर जखमांप्रमाणेच तेही गोठतं आणि त्या ठिकाणी फ्रॅक्चर हॅमेटोमा तयार होतो. तो हाडाला स्थिर करून त्यांची तुटलेली टोकं परत सांधतील अशा जुळणीच्या स्थितीत आणून ठेवतो. गुठळी झाल्यामुळे त्या टोकांच्या वेड्यावाकड्या झालेल्या भागाला रक्तपुरवठा होत नाही. त्यामुळे ती झिजून जातात आणि परत सांधण्यासाठी गुळगुळीत पृष्ठभाग तयार होतो. त्या भागात नवीन रक्तवाहिन्या प्रस्थापित केल्या जातात. काही दिवसांनंतर तिथल्या पेशी नवीन स्नायूंचे धागे तसंच कुर्चा तयार करतो. त्यामुळे ती तुटलेली टोकं एकमेकांना बांधली जाऊ शकतात. त्या टोकांमध्ये तयार झालेली फट भरून काढण्याच्या दिशेने नवीन पेशी व उती तयार होऊ लागतात. आता आॅस्टीअोब्लास्ट या पेशी कामाला लागतात आणि त्या तिथं तयार झालेल्या उतीचं हाडांच्या पेशींमध्ये रूपांतर करू लागतात. थोडक्यात नवीन हाड तयार व्हायला लागतं. आता आजूबाजूच्या मांसल भागात आपलं स्थान पक्कं करण्याच्या दिशेने हाड कार्यरत होतं. मृत पेशीच आतल्या आत शोषल्या जातात आणि नवीन पेशी टणक होऊन दोन टोकांमधली फट भरून काढतात. हाड नव्यानं सांधलं जातं. कॅल्शियम आणि फॉस्फरसचा नव्यांनं पाझर होऊन त्या नवीन हाडाला पूर्वीचीच ताकद दिली जाते. बोरीस बेकरचे मनगट परत त्याच जोमाने चेंडू टोलवायला तयार होते.*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*" जी व्यक्ती तुमच्या चेहऱ्यावर हास्य फुलवू शकते, तीच तुमच्या आयुष्याला अर्थ देऊ शकते."**संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) पाण्याशिवाय वर्षभर जीवंत राहू शकणारे प्राणी कोणते ?२) निसर्गातील सफाई कामगार म्हणून ओळखला जाणारा पक्षी कोणता ?३) इतिहासात पहिल्यांदाच कोणत्या वर्षी ५ व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार घोषीत झाले आहे ?४) क्रिकेटच्या तिन्ही प्रकारामध्ये अव्वल स्थान पटकावणारा जसप्रीत बुमराह हा जगातील कितवा वेगवान गोलंदाज ठरला आहे ?५) अंटार्क्टिकावर जाणारी भारतातील पहिली महिला कोण ? *उत्तरे :-* १) विंचू व कासव २) गिधाड ३) वर्ष २०२४ ४) पहिला ५) अदिती पंत*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*   👤 भागेश्री देशमुख👤 नवनाथ रणखांबे👤 निलेश पाटील👤 नागनाथ चंदे👤 रविंद्र डुबिले👤 हणमंत गुरुपवार👤 विनोदकुमार भोंग👤 विजयकुमार पवारे👤 अशोक शिलेवाड, पो. पा. येवती👤 सुनील कवडे, कुपटी, माहूर👤 जलील अब्दुल👤 सौ. मनिषा जोशी, विषय शिक्षिका, कन्या शाळा धर्माबाद*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मना ना कळे ना ढळे रुप ज्याचे। दुजेवीण तें ध्यान सर्वोत्तमाचे॥ तया खुण ते हीन दृष्टांत पाहे। तेथे संग निःसंग दोन्ही न साहे ॥१९२॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷आजची विचारधारा......*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जीवन जगत असताना माणसाला अन्न,वस्त्र, निवारा, पाणी, पैसे अशा बऱ्याच आवश्यक असलेल्या वस्तूंची गरज भासत असते. पण सर्वात जास्त अन्नाची व पाण्याची गरज असते. अचानक त्यावेळी कोणी आपुलकीने अन्नाचा ताट हातात देत असेल तर चुकीच्या मार्गाने जाऊन त्या अन्नाचा किंवा अन्न देणाऱ्याचा कधीही अपमान करू नये. कारण एकदा का त्या दोघांचा अपमान झाला की, परत पुन्हा त्याच आपुलकीने तो अन्न,किंवा पाणी मिळेलच असे नाही.म्हणून असे चुकूनही करू नये.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••" उन्हाळ्याच्या दिवसात, एक सिंह, एका आंब्याच्या थंड छायेत सुस्त निजला होता; तिथे एक उंदीर येतो. तो उंदीर सिंहला खूप त्रास देतो. त्यामुळे जागा होऊन, सिंहने पंजात उंदीरला धरला आणि त्यास आता फाडून टाकणार इतक्यात, त्या उंदराने त्याची प्रार्थना केली, ‘महाराज, आपण थोर, सर्व श्वापदांचे राजे, मी आपल्यापुढे केवळ रंक, माझ्या रक्ताने आपले हात विटाळू नयेत. मला जीवदान दयावे, हेच आपणास उचित आहे.’ ते ऐकून सिंहास त्याची दया आली आणि त्याने त्यास सोडून दिले.पुढे एके दिवशी सिंह अरण्यात फिरत असताना आंब्याच्या झाडाजवळ जातो, त्याच आंब्याजवळ पारध्याने जाळे मांडले होते, त्यात सिंह सापडतो. त्यावेळी त्याने आपले सगळे बळ खर्चून फार धडपड केली. पण त्याची सुटका होईना. तेव्हा तो निराश झाला आणि मोठमोठयाने ओरडू लागला. ती ओरडणं ऐकून तो उंदीर त्या ठिकाणी आला आणि सिंहास म्हणाला, ‘राजा, भिऊ नको, स्वस्थ रहा. ’ इतके बोलून, त्याने आपल्या दातांनी ते जाळे कुरतडले व सिंहाची सुटका केली.*तात्पर्य:-* जे मोठे आहेत त्यांचेही एखादे मोठे काम लहानाच्या हातून, एखादे वेळी होते. यासाठी, कोणास क्षुद्र समजून त्याचा उपहास करू नये किंवा त्यास दुखवू नये. लहानाच्या हातूनही उपकार होऊ शकतात, हे लक्षात ठेवावे. वैभव कायम राहीलच, असा नेम नाही, यासाठी आपल्या चालत्या काळी, मनुष्याने लोकांवर उपकार करून ठेविले, तर पडत्या काळात तेच "•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 10 फेब्रुवारी 2024💠 वार - शनिवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://nasayeotikar.blogspot.com/2022/11/power-of-one-vote.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_ या वर्षातील ४१ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२००५:उत्तर कोरियाने आपण अण्वस्त्रसज्ज असल्याचे जाहीर केले.* *१९९६:आय. बी. एम. (IBM) कंपनीने बनवलेल्या "डीप ब्लू" या महासंगणकाने बुद्धीबळात गॅरी कास्पारॉव्हचा पराभव केला.**१९४८:पुणे विद्यापीठाची स्थापना* *१९३३:न्यूयॉर्कमध्ये झालेल्या एका मुष्टियुद्ध लढतीत प्रिमो कार्नेरा याने अर्नी शाफ याचा १३ व्या फेरीत पराभव केला.या लढतीत अर्नी शाफचा मृत्यू झाला.**१९२९:जे.आर.डी टाटा हे पहिले अधिकृत भारतीय वैमानिक बनले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८३:प्रा.डॉ.गजानन कोर्तलवार-- लेखक* *१९७८:अल्पना देशमुख-नायक-- लेखिका* *१९७७:उत्पल वनिता बाबुराव-- कवी,लेखक,संपादक* *१९७६:सुरेश प्रभाकरराव फुलारी-- कवी* *१९७५:अ‍ॅड.सोमदत वसंतराव मुंजवाडकर -- कवी,गीतकार,लेखक* *१९७३:प्रमोद बबनराव खराडे-- गझलकार**१९७२:अर्चना हरबुडे-धानोरकर-- कवयित्री**१९५९:डॉ.जिवबा रामचंद्र केळुस्कर-- कवी,लेखक* *१९४९:मोहन शिवराम सोनवणे-- जेष्ठ कवी, लेखक* *१९४६:ओंकारलाल चैत्रराम पटले-- कवी,लेखक* *१९४५:राजेश पायलट –माजी केंद्रीय मंत्री (मृत्यू:११ जून २०००)**१९३४:चंद्रकांत महामिने--ज्येष्ठ विनोदी साहित्यिक(मृत्यू:२२ आगस्ट २०२१)* *१९३१:नंद रामदास बैरागी(बालकवी बैरागी) -- भारतातील हिंदी कवी,चित्रपट गीतकार (मृत्यू:१३ मे २०१८)**१९२९:प्रा.डॉ.ग.का.रावते-- प्रसिद्ध लेखक* *१९२४:श्रीकांत नारायण आगाशे -- कवी, कुमारसाहित्यकार (मृत्यू:५ नोव्हेंबर १९८६)**१९१०:दुर्गा भागवत – साहित्यिका व मानववंशशास्त्रज्ञ (मृत्यू:७ मे २००२)**१८९४:हॅरॉल्ड मॅकमिलन – इंग्लंडचे पंतप्रधान (मृत्यू:२९ डिसेंबर १९८६)**१८०३:जगन्नाथ ऊर्फ ’नाना’ शंकरशेठ – दानशूर व शिक्षणतज्ञ (मृत्यू:३१ जुलै १८६५)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_*••••••••••••••••••••••••••••••••••••••*२००१:गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर – जयपूर - अत्रौली घराण्याच्या शास्त्रीय गायिका (जन्म:१५ जुलै १९०४)**१९८२:नरहर कुरुंदकर – विद्वान,टीकाकार आणि लेखक (जन्म:१५ जुलै १९३२)**१९७८:वालचंद रामचंद कोठारी---संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील सक्रिय नेते, प्रतिभाशाली विचारवंत,प्रसिद्ध साहित्यिक आणि समाजहितैषी पत्रकार(जन्म:१३ सप्टेंबर १८९२)**१९७८:पंडित बाळाचार्य माधवाचार्य खुपेरकरशास्त्री --राष्ट्रीय पंडित,तत्त्वचिंतक, संस्कृत तज्ज्ञ(जन्म:१२ सप्टेंबर १८८२)**१९२३:विलहेम राँटजेन – नोबेल पारितोषिकविजेते जर्मन भौतिकशास्त्रज्ञ (जन्म:२७ मार्च १८४५)**१९१२:सर जोसेफ लिस्टर – निर्जंतुकीकरणामुळे जखमा लवकर बर्‍या होतात हे सिध्द करणारा ब्रिटिश शल्यविशारद (जन्म:५ एप्रिल १८२७)**१८६५:हेन्‍रिक लेन्झ – जर्मन भौतिकशास्त्रज्ञ (जन्म:१२ फेब्रुवारी १८०४)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *एका वोटची किंमत*ज्या ज्या वेळी आपण मतदार म्हणून निवडणुकीला तोंड द्यावे लागते त्या त्यावेळी आपल्या समोर एकच प्रश्न पडतो की, मतदार म्हणून मी काय करावे ? कोणत्या व्यक्तीला किंवा कोणत्या पक्षाला मतदान करावे ? आपण एक जागरूक मतदार असाल तर नक्कीच या प्रश्नाचे निराकरण स्वतःच्या मनाशी विचारून नक्की करू शकता. त्यासाठी स्वतः मतदार यांनी सर्वप्रथम कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नये. छोट्या छोट्या आमिषाचा स्विकार करू नये. खाण्या-पिण्याच्या पार्टीला हजेरी लावू नये. बहुतांश वेळा निवडणुकीच्या काळात हे चित्र हमखास बघायला मिळते........... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *पी.व्ही. नरसिंह राव, चौधरी चरण सिंह, एम.एस. स्वामीनाथन यांना भारतरत्न पुरस्कार*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये देशातील एकूण मतदारांची संख्या ९७ कोटी तर यावेळी २.६३ कोटी नवे मतदारांची भर, केंद्रीय निवडणूक आयोगाने माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *परभणी परळी रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणासाठी १०० कोटींचा निधी, मराठवाड्यात रेल्वेचा वेग वाढणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न द्यायला हवा; मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मोठी मागणी!*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *वेरूळ-अजिंठाचा होणार कायापालट, केंद्राच्या स्वदेश दर्शन २.० या योजनेत समावेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *जेष्ठ कॉंग्रेस नेते रोहिदास पाटील यांची प्रकृती चिंताजनक; कोल्हापुरात उपचार सुरू*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *तीन ही फॉरमॅट मध्ये 100 पेक्षा जास्त सामने खेळण्याच्या यादीत डेव्हिड वॉर्नर जगात तिसरा फलंदाज*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *वातावरणातील वायूंचे उपयोग* 📙 **************************हवेतील वायू माहिती असतातच. त्यांचे प्रमाण, टक्केवारी, गुणधर्म यांबद्दलची माहिती प्रयोगशाळेत व शैक्षणिक वर्गात नेहमीच घेतली जात असते. पण अनेकदा दैनंदिन वापरात या वायूंची माहिती आपण उपयोगात आणत आहोत, हे मात्र लक्षात येत नाही. हवा बंद बाटलीतील एरिएटेड कोल्ड्रिंक पिताना चुरचुरणारी चव व फसफसणारे पेय हवेहवेसे वाटते. आत विरघळवलेला, दाबाखाली असलेला कार्बन डाय ऑक्साइड हे काम करत असतो. हेच पेय उघडे ठेवले, तर दहा मिनिटांनी त्यातील हा वायू निघून गेल्यावरची चव चांगली असेल; पण जिभेला चुरचुरणारी, गार लागणारी गम्मत निघून गेलेली असेल. सिनेमाचे शूटिंग चालू आहे किंवा स्टेजवर डिस्को रंगात आला आहे, त्याच वेळी धुराचे लोट व धुक्याचा थर सर्वांना वेढून टाकण्याचा अभ्यास निर्माण करायचा आहे, याही वेळा कार्बन डाय ऑक्साइडच उपयोगी पडतो. कोरडा बर्फ या प्रकारातील घन कार्बन डायॉक्साईड जेव्हा वायुरूप होतो, तेव्हा हा आभास निर्माण होतो. टॉन्सिल्सचे ऑपरेशन करायचे झाले, तर याच कोरड्या बर्फाचा वापर करून क्रायोसर्जरी पद्धतीने रक्तहीन ऑपरेशन करण्याची पद्धत जपानी सर्जन वापरतात. आग विझवण्याच्या उपकरणात कार्बन डाय ऑक्साइड वापरला जातोच. त्याचा थर आगीवर पसरवून प्राणवायूचा पुरवठा तोडणे हा त्यातील मुख्य हेतू असतो. नायट्रोजनचा व्यवहारात वापर अनेक ठिकाणी केला जातो. फक्त त्याची जाणीव आपल्याला फार क्वचित होते. ज्वालाग्राही पदार्थ, ज्वालाग्राही तेले, जीवनोपयोगी औषधे, साठवणीची धान्य प्लास्टिकच्या बंद पिशव्यांत भरली जातात वा बंद डब्यात भरतात, तेव्हा मोकळी जागा नायट्रोजनने भरण्याची प्रथा आहे. एवढेच काय निर्वात केलेल्या विजेच्या दिव्यातही नायट्रोजन भरला, तर त्यांचे आयुष्य वाढते, अशी विजेच्या दिव्यांचा वापर सुरू झाला, तेव्हाची पद्धत होती. त्यानंतर मात्र अन्य वायूंचा वापर विविध रंग मिळवण्यासाठी सुरू झाला. प्रत्यक्ष नायट्रोजनचा वापर औद्योगिक निर्मितीत फार मोठ्या प्रमाणावर केला जातो. उदाहरणार्थ खते, रंग, स्फोटके, इतकेच काय पण भूल देण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांतील एक म्हणजे नायट्रस ऑक्साइड हे नायट्रोजन व प्राणवायूचेच संयुग आहे. वातावरणातील मुख्य घटक नायट्रोजन असल्याने त्याची औद्योगिक निर्मिती वा साठवणही सहज शक्य होते. प्रयोगशाळेत व औद्योगिक वापरात याचा एक महत्त्वाचा वापर म्हणजे द्रव स्वरूपातील नायट्रोजन. एखादी गोष्ट अनंत काळपर्यंत टिकवायची असेल, तर याच्या तापमानाला ठेवायची व्यवस्था केल्यास ती नक्की टिकेल, असा विश्वास शास्त्रज्ञांना वाटतो. उदाहरणार्थ जिवंत पेशी या तापमानाला गोठवून पुन्हा पाहिजे त्या वेळी त्यांना नेहमीच्या तापमानात आणता येईल, या दिशेने सतत प्रयोग चालू असून त्यांना यश येत आहे. प्राणवायूशिवाय सजीव जगू शकत नाही. पण याच प्राणवायूचा अशुद्ध पदार्थ शुद्ध करायला गमतीदार वापर केला जातो. लोखंडापासून पोलाद बनवताना त्याची शुद्धता वाढवायला उकळत्या लोखंडाच्या रसात प्राणवायू सोडला जातो. त्याच्या सान्निध्याने अशुद्ध कण चक्क जळून नष्ट होतात, राहते ते शुद्ध लोखंड. हा सोपा उपाय अन्यही काही धातूंच्या शुद्धीकरणात वापरला जातो. शोभेची दारू व स्फोटके यांना हवेतील प्राणवायूचा पुरवठा कमी पडतो. त्यासाठी त्यातच ऑक्सिडायझर मिसळून त्यातून मोठ्या प्रमाणावर प्राणवायू पुरवण्याची व्यवस्था केली जाते. आजार्‍याला दिला जाणारा प्राणवायू तर सर्वांना माहिती आहेच. त्याचेच सुटसुटीत भावंड पाणबुडे व गिर्यारोहक वापरतात. हायड्रोजनचा वापर तेलापासून वनस्पती तूप व मार्गारीन बनवण्यासाठी केला जातो. तूप म्हणून वापरात असलेले डालडा हे वनस्पतिज तेलावरील हायड्रोजनेशन प्रक्रियेतून तयार होत. बलुन्समध्ये हेलियमचा वापर केला जातो. जखमा धुण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधासाठी म्हणजे हायड्रोजन पॅराॅक्साइडसाठी हायड्रोजनची गरज असतेच. हायड्रोजनचा वापर इंधन म्हणूनही करता येतो.*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*" मुलांवर प्रेम करा पण दुर्गुण पाठीमागे घालू नका. "**संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) मेंदू कोठे असतो ?२) जिल्ह्याचा सर्वोच्च अधिकारी कोण असतो ?३) ६६ व्या ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात किती भारतीयांना ग्रॅमी अवॉर्ड मिळाले ?४) उत्तराखंड राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत ?५) पर्शियन भाषेला अजून कोणत्या नावाने ओळखले जाते ? *उत्तरे :-* १) डोक्याच्या कवटीत २) जिल्हाधिकारी / कलेक्टर ३) पाच ४) पुष्कर सिंह धामी ५) फारसी भाषा*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 जगन्नाथ दिंडे, सहशिक्षक, नांदेड👤 आमिन जी. चौहान, यवतमाळ👤 विजय रच्चावार, संपादक👤 बाबू बनसोडे, सहशिक्षक, नायगाव👤 राहूल कतूरवार, धर्माबाद👤 सुधाकर अपुलवाड👤 राजू गोडगुलवार👤 म. जावेद, उर्दू हायस्कुल, धर्माबाद👤 प्रशांत येमेवार, पोलीस निरीक्षक👤 डॉ. प्रकाश बोटलावार👤 अशोक श्रीमनवार, नांदेड*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••नव्हे कार्यकर्ता नव्हे सृष्टिभर्ता। पुरेहून पर्ता न लिंपे विवर्ता॥ तया निर्विकल्पासि कल्पित जावे। परि संग सोडुनि सुखे रहावे॥१९०॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••दुसऱ्याला जेव्हा,आपणा कडून मदतीची गरज असते तेव्हा, आपण त्याकडे दुर्लक्ष करत असतो. अन् आपल्याला अडचण पडली की, मात्र त्याच व्यक्तीकडे सहकार्य करण्याची अपेक्षा आपण करत असतो. ज्यावेळी आपणच दुसऱ्याला मदत करत नाही तर दुसऱ्याकडून अपेक्षा ठेवणे कितपत योग्य आहे. .? म्हणून मदत जरी करता नाही आली तर चालेल पण, त्या प्रसंगी एवढीही पाठ फिरवू नये की, दुसऱ्यांदा मदत मागण्यासाठी जागा नसेल.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*विश्वासघात*करढोक नावाचा एक पक्षी नदीकाठी राहून व पाण्यात बुड्या मारून मासे धरून खातो. या जातीचा एक पक्षी म्हातारा झाल्याने त्याला पाण्यातले मासे दिसेनासे झाले. त्यामुळे काहीतरी ढोंग करून आपला चरितार्थ चालवण्याचा त्याने विचार केला, 'तो ज्या कालव्याजवळ बसला होता, त्यातला एक मासा पाण्याच्या पृष्ठभागावर आला असता, तो म्हातारा करढोक त्याला म्हणाला, 'अरे, तुला तुझ्या स्वतःच्या नि तुझ्या भाऊबंदांच्या जिवाबद्दल जर थोडी-बहुत काळजी वाटत असती तर कालव्याचा मालक एकदोन दिवसात कालव्यातलं सगळं पाणी बाहेर सोडणार आहे, याकरता तुम्ही आपले जीव वाचविण्यासाठी काहीतरी उपाय करा.' हे ऐकून तो मासा पाण्याच्या तळाशी गेला आणि सगळ्या माशांची सभा भरवून तो करढोकाचा निरोप त्याने सांगितला. तो ऐकताच आपल्यावर येणार्‍या संकटाची सूचना देणार्‍या त्या करढोकाचे आभार मानण्याचा व या संकटातून मुक्त होण्यासाठी उपाय सुचविण्याविषयी त्याला विनंती करण्याचा ठराव त्यांनी केला व तो त्या करढोकास कळविण्याचे काम त्या निरोप घेऊन येणार्‍या माशावर सोपविले. त्याप्रमाणे त्याने करढोकास जाऊन आपला ठराव त्याला कळविला. तो ऐकताच करढोक त्याला म्हणाला, 'या संकटातून वाचण्याचा एकच मार्ग आहे. तुम्ही सर्वांनी पाण्याच्या पृष्ठभागावर यावं म्हणजे मी तुम्हाला माझ्या घराशेजारच्या तलावात नेऊन पोहचवीन. ती गोष्ट माशांनी कबूल केली. मग करढोकाने त्यांना एका उथळ पाण्याच्या तलावात नेऊन सोडले व थोड्याच दिवसात त्या सर्वांना गट्ट केले.तात्पर्य - शत्रूच्या गोड शब्दावर विश्वास ठेवून त्याच्या जाळ्यात सापडणे हा मूर्खपणा होय.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 09 फेब्रुवारी 2024💠 वार - शुक्रवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://nasayeotikar.blogspot.com/2018/02/blog-post_7.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_ या वर्षातील ४० वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२००३:संगीतकार रवींद्र जैन यांना मध्यप्रदेश सरकारचा लता मंगेशकर पुरस्कार प्रदान.**१९७३:बिजू पटनायक ओरिसा विधानसभेचे विरोधी पक्षनेते बनले.**१९६९:बोइंग-७४७ विमानाचे पहिले चाचणी उड्डाण झाले.**१९५१:स्वतंत्र भारताची पहिली जनगणना सुरू* *१९३३:साने गुरुजी यांनी नाशिकच्या कारागृहात असताना ’श्यामची आई’ या पुस्तकाच्या लेखनाला सुरुवात केली.* *१९००:लॉन टेनिस या खेळातील ’डेव्हिस कप’ या करंडकाची सुरूवात झाली.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८६:कांचन अभिजित जाधव (बाबर)-- कथालेखिका**१९८६:राजश्री विजय कुलकर्णी -- कवयित्री* *१९७०:ग्लेन मॅकग्रा – ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज**१९६९:जितेंद्र दत्तात्रय पराडकर-- प्रसिद्ध लेखक* *१९६७:प्रा.गिरीश चत्रु पाटील-- कवी,लेखक**१९६२:किशोर मांदळे-- लेखक* *१९५८:अमृता सिंग-- भारतीय अभिनेत्री**१९५५:वैशाली मुलमुले -- कवयित्री* *१९५०:शोभा अशोक बडवे--मराठी कवयित्री, लेखिका**१९४८:प्रा.शरद देशमुख -- कवी,लेखक* *१९४८:भाऊ तोरसेकर उर्फ गणेश वसंत तोरसेकर-- राजकीय विषयांवर वृत्तपत्रीय आणि दिवाळी अंकातून लिखाण,मराठी लेखक* *१९४५:विश्वजीत दत्तात्रय तुळजापूरकर-- कवी* *१९३३:श्रीकृष्ण गणेश पोंक्षे -- कवी,लेखक* *१९२९:बॅरिस्टर अब्दुल रहमान अंतुले-- माजी केंद्रीय अल्पसंख्यांक कार्य मंत्री व महाराष्ट्राचे आठवे माजी मुख्यमंत्री(मृत्यू:२ डिसेंबर २०१४)**१९२२:गजानन वासुदेव कवीश्वर-- वांड्:मय संशोधक तथा लेखक**१९२२:जिम लेकर – इंग्लिश क्रिकेट खेळाडू (मृत्यू:२३ एप्रिल १९८६)**१९१७:होमी जे.एच.तल्यारखान – गांधीवादी नेते,सिक्‍कीमचे पहिले माजी राज्यपाल,मंत्री व आमदार (मृत्यू:२७ जून १९९८)**१९१२: गजानन वासुदेव कवीश्‍वर--मराठी वाङ्मय संशोधक,लेखक**१९०४:दत्तात्रेय दामोदर जोशी-- बाल साहित्यिक**१९००:नारायणशास्त्री आंजलेॅकर जोशी-- लेखक* *१८७४:स्वातंत्र्यशाहीर गोविंद त्र्यंबक दरेकर उर्फ कवी गोविंद – लहानपणीच तापामुळे कमरेखालील सर्व अंग लुळे पडून त्यांना कायमचे अपंगत्व आले,त्यामुळे त्यांचे शिक्षणही होऊ शकले नाही. कविता मात्र बालपणापासून करीत (मृत्यू:२८ फेब्रुवारी १९२६)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२१:राजीव कपूर-- भारतीय अभिनेता, चित्रपट निर्माता,चित्रपट दिग्दर्शक(जन्म:२५ ऑगस्ट १९६२)**१९१२:ओ.पी. दत्ता-- भारतीय चित्रपट निर्माते आणि लेखक(जन्म:१९२२)**२००८:डॉ.मुरलीधर देविदास ऊर्फ बाबा आमटे – कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनासाठी आयुष्य वाहून घेणारे थोर समाजसेवक,लेखक (जन्म:२६ डिसेंबर १९१४)**२००४:वामन बाळकृष्ण भागवत-- लेखक, संस्कृत भाषातज्ज्ञ(जन्म:२४ जानेवारी १९१८)**२०००:शोभना समर्थ – चित्रपट अभिनेत्री व निर्माती (जन्म:१७ डिसेंबर १९१६)**१९८४:तंजोर बालसरस्वती – भरतनाट्यम नर्तिका (जन्म:१३ मे १९१८)**१९८१:एम.सी.छागला – न्यायाधीश,मुत्सद्दी आणि केंद्रीय मंत्री (जन्म:३० सप्टेंबर १९००)**१९७९:राजा परांजपे – चित्रपट दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते (जन्म:२४ एप्रिल१९१०)**१९६६:दामूअण्णा जोशी – बालमोहन नाटक मंडळीचे संस्थापक.* *१८७१:फ्योदोर दोस्तोवस्की – रशियन कादंबरीकार आणि तत्त्वज्ञ (जन्म:११ नोव्हेंबर १८२१)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*जन्म मृत्यूची नोंदणी*युनिसेफच्या एव्हरी चाईल्ड ब्राईट ईनेकविट्स अँड बर्थ रजिस्ट्रेशन या नुकतेच प्रकाशित करण्यात आलेल्या 161 देशातील आकडेवारी विश्लेषणाचा अहवालानुसार भारतात प्रत्येक तीन मुलामागे एकाच्या जन्माचे कोणतीही नोंद नसते.  पाच वर्षाखालील अशा अनोंदणीकृत मुलांची संख्या तब्बल 71 दशलक्ष असून जागतिक पातळीवर हीच संख्या दोनशे तीस दशलक्ष अशी आहे. यानुसार भारतात जन्म नोंदणीचे प्रमाण 41 टक्के आहे जी की जगात सर्वात कमी आहे. भारतातील हिंदू व मुस्लिम या दोन सर्वाधिक लोकसंख्येच्या समुदायात जन्म नोंदणीचे प्रमाण सर्वांत कमी असून याच्या तुलनेत अल्पसंख्यांक जैन व शीख समुदायात प्रमाण जास्त असल्याचे आढळून आले आहे............ पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *प्री-प्रायमरी ते 4थी पर्यंतची शाळा सकाळी 9 नंतर भरवा :राज्यशासनाचा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *सरकारचा गुगलबरोबर करार: प्रशासकीय कामात AI चा वापर होईल तर रोजगाराच्या असिमीत संधी येतील; देवेंद्र फडणवीसांचा विश्वास*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *​​​​​​​लोकसभा अध्यक्षांनी ​​​​​​​खा. हेमंत पाटील यांचा राजीनामा फेटाळला, मराठा आरक्षणाला पाठींबा देत दिला होता राजीनामा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *अमरावती :- श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालयात 'मराठी भाषा संवर्धन पंधरवडा' साजरा; भाषा संवर्धनाच्या दृष्टीने विविध कार्यक्रम संपन्न*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *आरबीआयकडून पतधोरण जाहीर, सलग सहाव्यांदा रेपो रेट जैसे थे, व्याजदरात कोणताही दिलासा नाही, जीडीपी 6.7 टक्क्यावरुन 7.2 टक्के होण्याचा अंदाज*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *राज्यसभेसाठी भाजपकडून तीन जागांसाठी नावं गुलदस्त्यात, नारायण राणे, विनोद तावडे, पंकजा मुंडे यांच्यासह नऊ जणांची यादी दिल्लीला पाठवली*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *U19 World Cup च्या दुसऱ्या सेमी फायनल मध्ये ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा 1 विकेटने केला पराभव, रविवारी भारतासोबत होणार फायनल*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 टेलिस्कोप म्हणजे काय ? 📙 खगोलदर्शनासाठी टेलिस्कोप वापरतात. अगदी सहज गंमत म्हणून गच्चीवरून तारे बघायचे असोत किंवा खगोलशास्त्राचा सखोल अभ्यास करावयाचा असो, यासाठीचे मुख्य माध्यम टेलिस्कोपच आहे. टेलिस्कोपचे दोन महत्त्वाचे प्रकार वापरले जातात. प्रकाश किरणांच्या भिंगातून वक्रीकरण करून बनवलेले टेलिस्कोप हे आकाराने खूपच लहान असतात व ते वापरणे सुटसुटीत असते. अर्थात यालाही अपवाद आहेतच. तब्बल एक मीटर व्यासाची बहिर्गोल भिंग वापरून अमेरिकेतील वेधशाळेतील टेलिस्कोप बनला आहे. मोठ्या भिंगातून एकत्रित केलेल्या किरणांची प्रतिमा प्रमाणबद्ध रीतीने दुसऱ्या डोळ्याजवळच्या भिंगातून बघितली जाते. डोळ्याजवळची भिंगे बदलून, त्यांची क्षमता वाढवून प्रतिमा लहान व मोठीही करता येते.प्रकाशकिरणांचे परावर्तन करणारे अंतर्गोल आरसे वापरणे हे जास्त सोयीचे पडते. आरशात प्रकाशाचे विश्लेषण होत नाही. प्रतिमा स्पष्ट राहते; कारण भिंगाची जाडी, वजन व त्यांना द्यावयाचा आधार यापेक्षा आरशाला आधार देऊन त्यातून परावर्तीत प्रतिमा दुसऱ्या आरशातून पुन्हा बघणे हे सोयीचे वाटते. यासाठी प्रचंड अंतर्गोल आरसे वापरले जातात व त्यातून परावर्तीत प्रतिमा साध्या अारशाद्वारे पुन्हा डोळ्याजवळील भिंगाकडे परावर्तित केली जाते. येथेही गरजेप्रमाणे डोळ्याजवळचे भिंग कमी जास्त ताकदीचे वापरता येते. रशियामध्ये सहा मीटर व्यासाचा आरसा वापरून जगातील सर्वात मोठा टेलिस्कोप बसवलेला आहे.मोठाले टेलिस्कोप हे यांत्रिक पद्धतीने हलविण्याची व्यवस्था केली जाते. नेमकी दिशा रोखण्यासाठी पूर्ण यांत्रिक व्यवस्था येथे आवश्यक असते. निरीक्षणासाठी बसणाऱ्या शास्त्रज्ञाला सोयीची बैठक व त्याच्या नजरेला समोरच दिसू शकेल, अशी दृश्य भिंगांची रचना यासाठी गरजेची ठरते. आकाशाकडे बघून निरीक्षण करणे येथे शक्यही नसते व अपेक्षितही नसते.काचेच्या भिंगांचा चष्मा करायचा वापर सुरू झाला, त्यानंतर टेलिस्कोपचा जन्म झाला असावा. नेमका कधी, कसा ते ज्ञात नाही, पण या बाबतीत *हॅन्स लिप्परशे* याचे नाव जनक म्हणून घेतले जाते. *गॅलिलिओ गॅलिली* यांनी व्हेनिसमध्ये १६०९ सालच्या सुमाराला टेलिस्कोप वापरला. यानंतरचा मुख्य शोध होता १६७२ मध्ये सर आयझॅक न्यूटनने परावर्तीत अंतर्गोल आरसा वापरून बनवलेल्या टेलिस्कोपचा.पृथ्वीवरून टेलिस्कोपद्वारे खगोलसंशोधन करताना वातावरणाच्या अडचणी येतात. मग यासाठी अंतराळात जाऊन निरीक्षण करणे जास्त सोयीचे, असे विचार मांडले गेल्याने त्या दिशेने संशोधन पुढे सरकत गेले. याच देशाची एक अवाढव्य निर्मिती म्हणजे हबल टेलिस्कोपची. २.४ मीटर व्यासाचा आरसा असलेला हा टेलिस्कोप १९९० साली अवकाशात पाठवला गेला आहे. पृथ्वीवरील निरीक्षणात दिसणारी अगदी स्पष्ट तारका यातून तब्बल पंचवीस पटींनी स्वच्छ बघता येते. हबमधील दुरुस्त्या करीत, तांत्रिक अडचणींवर मात करीत त्याने पाठवलेल्या असंख्य निरीक्षणांचे विश्लेषण सतत चालू असते. हे काम शास्त्रज्ञांना काही वर्षे पूरुन उरणार आहे.टेलिस्कोपचेच तत्त्व वापरून रेडिओलहरी गोळा करून त्याद्वारे खगोल संशोधन करण्याचाही प्रकार वापरला जातो. रेडिओलहरी, प्रकाशलहरी, क्ष-किरण, इन्फ्रारेड या साऱ्यांची 'जातकुळी' एकच असल्याने हे तत्त्वही सध्या वापरले जाते. पुणे जिल्ह्यातील नारायणगाव जवळच्या खोडद येथे या स्वरूपाचा एक मोठा जीएमआरटी प्रकल्प कार्यरत आहे.‘सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*" वयाने मान मिळतो पण आदर हा वर्तणुकीमुळे मिळतो. "**संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) भारतात सर्वप्रथम कोणत्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला ?२) अंतराळात सर्वाधिक दिवस राहण्याचा जागतिक विक्रम कोणी केला ?३) भारतीय नौदलाने कोणते वर्ष 'नौदल नागरिकांचे वर्ष' म्हणून घोषित केले आहे ?४) दरवर्षी भारतातील जागतिक पुस्तक मेळावा कोठे भरवला जातो ?५) राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह कोणाकडे देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला ? *उत्तरे :-* १) तमिळ ( २००४ ) २) ओलेग कोनोनेंको, रशियन अंतराळवीर ३) वर्ष २०२४ ४) नवी दिल्ली ५) अजित पवार गट *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 राजेश मनुरे, संपादक, धर्माबाद👤 राष्ट्रपाल सोनकांबळे, येवती👤 शेख राजू पटेल👤 व्यंकट केक👤 वैभव जाधव👤 मारुती फाळके👤 रमेश कदम👤 दिनेश रेडे👤 श्रीनिवास सैबी, पुणे👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मही निर्मिली देव तो ओळखावा। जया पाहतां मोक्ष तत्काळ जीवा॥ तया निर्गुणालागी गूणी पहावे। परी संग सोडुनि सुखे रहावे॥१८९॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••तोंडावर सर्वजण गोड बोलून आपली स्तुती करणारे असले तरी त्यातील सर्वजण पोटात गोड असतील असेही नाही. म्हणून अति गोड बोलणाऱ्याच्या नादी लागू नये. भलेही कटू सत्य बोलून मोकळे होणारे एकवेळचे दूर निघून जातात पण, केसाने गळा कापणारे आपल्या जवळ असून सुद्धा दृष्टीत पडत नाही म्हणून जरा सावध रहावे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*शेरास सव्वाशेर*एका शेतकर्‍याने पक्षी धरण्यासाठी एक जाळे मांडून ठेवले होते. त्यात एका पारव्यामागे लागलेली एक घार सापडली. जाळ्यातून सुटून जाण्यासाठी ती पंख फडफडावून धडपड करीत आहे, तोच शेतकरी त्या ठिकाणी आला व तिला धरून ठार मारू लागला. तेव्हा ती त्याची विनवणी करून म्हणाली, 'दादा, मला मारू नको, मी तुझा काही अपराध केलेला नाही. मी त्या पारव्याच्या मागे लागले होते. हे ऐकून शेतकरी तिला विचारू लागला, 'अग, मग त्या पारव्याने तरी तुझा कोणता अपराध केला होता?' असे म्हणून त्याने तिला ठार मारले.*तात्पर्य :-* जे लोक निरपराधी लोकांना विनाकारण त्रास देतात, त्यांना त्रास देणारा त्यांच्यापेक्षा बलिष्ठ असा भेटला म्हणजे ते अगदी दीन होऊन साधूत्वाचा आव आणतात, पण त्याचा काही उपयोग न होता, त्यांच्या वाईट कर्माची फळे त्यांना भोगावीच लागतात.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 08 फेब्रुवारी 2024💠 वार - गुरुवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://nasayeotikar.blogspot.com/2018/02/blog-post.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_ या वर्षातील ३९ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२०००:छत्रपती शिवाजी महाराज जयंती १९ फेब्रुवारीस करण्याचा महाराष्ट्र शासनाचा निर्णय.**१९७१:NASDAQ हा अमेरिकन शेअर बाजाराचा निर्देशांक सुरू झाला.**१९६०:पंजाबच्या खडकसिंह या मल्लाविरुद्ध गुणांवर विजय मिळवून गणपत आंदळकर ’हिंदकेसरी’ बनले.**१९४२:दुसरे महायुद्ध – जपानने सिंगापूर ताब्यात घेतले.**१९३६:१६ सप्टेंबर १९३५ रोजी नोंदणी झालेल्या ’बँक ऑफ महाराष्ट्र’चे कामकाज सुरू झाले.**१९३१:महादेव विठ्ठल काळे यांनी 'आत्मोद्धार' नावाचे पाक्षिक सुरू केले.**१८९९:रँडचा खून करण्यार्‍या चाफेकर बंधूंची नावे इंग्रज सरकारला सांगणार्‍या गणेश  शंकर द्रविड व रामचंद्र शंकर द्रविड या बंधूंचा वासुदेव चाफेकर आणि महादेव रानडे यांनी गोळ्या झाडल्या**१७१४:छत्रपती शाहू महाराज (सातारा गादी) आणि सरखेल कान्होजी आंग्रे यांच्यात वळवंड (लोणावळा) येथे तह झाला.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९९:अ‍ॅड.संदीप सुधीर लोखंडे-- लेखक**१९९८:ऋषिकेश मठपती-- कवी* *१९८८:रुचा हसबनीस-जगदाळे-- भारतीय अभिनेत्री* *१९८८:प्रा.गणेश विठ्ठलराव मोताळे-- लेखक* *१९८८:सविता देविदास बांबर्डे-- लेखिका**१९६८:डॉ.ज्योती प्रदीप तुंडूलवार --लेखिका* *१९६३:मोहम्मद अजहरुद्दीन – भारतीय क्रिकेटपटू**१९५४:रेणू वामन देशपांडे -- कवयित्री, लेखिका* *१९४९:ज्योती सुभाष म्हापसेकर-- मराठी साहित्यिक,स्त्री मुक्ती संघटना या संस्थेच्या अध्यक्षा**१९४१:जगजीतसिंग – गझलगायक (मृत्यू:१० आक्टोबर २०११)**१९३९:सुधीर मोघे-- मराठी कवी,गीतकार व संगीतकार(मृत्यू:१५ मार्च२०१४)**१९३७:प्रा.यशवंत नारायण जोशी-- लेखक**१९३१:यशवंत गोविंद जोशी-- लेखक**१९२५:शोभा गुर्टू – शास्त्रीय गायिका (मृत्यू:२७ सप्टेंबर २००४)**१९२१:कीर्तन संजीवनी पुष्पलता रानडे-- मराठी कीर्तनकार आणि लेखिका(मृत्यू:११ सप्टेंबर २०१०)**१९११:प्रा.दया पटवर्धन -- लेखिका* *१९०९:प्रा.केशव विष्णू तथा ’बाबा’ बेलसरे – तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक,श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे शिष्य (मृत्यू:३ जानेवारी १९९८)**१८९७:डॉ.झाकिर हुसेन – भारताचे ३ रे राष्ट्रपती,शिक्षणतज्ञ.पद्मविभूषण व भारतरत्‍न हे सन्मान त्य आले होते. (मृत्यू:३ मे १९६९)**१८४४:गोविंद शंकरशास्त्री  बापट – भाषांतरकार(मृत्यू:६ मार्च १९०५)**१८३४:दिमित्री मेंदेलिएव्ह – रशियन रसायनशास्त्रज्ञ (मृत्यू:२ फेब्रुवारी १९०७)**१८२८:ज्यूल्स वर्न – फ्रेन्च लेखक (मृत्यू:२४ मार्च १९०५)**१७००:डॅनियल बर्नोली – डच गणितज्ञ (मृत्यू:१७ मार्च १७८२)**१६७७:जॅक्स कॅसिनी – फ्रेन्च खगोलशास्त्रज्ञ (मृत्यू:१६ एप्रिल १७५६)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९९:डॉ.इंदुताई पटवर्धन – आनंदग्रामच्या संस्थापिका व थोर समाजसेविका (जन्म:१४ मे १९२६)**१९९५:भास्करराव सोमण – भारताचे माजी नौदलप्रमुख, व्हाईस अॅडमिरल. १९६५ च्या भारत - पाक युद्धकाळात ते नौदलप्रमुख होते. (जन्म: मार्च १९१३)**१९९४:गोपाळराव देऊसकर – ख्यातनाम चित्रकार (जन्म:१९११)**१९९४:यशवंत नरसिंह केळकर – कवी, कोशाकार,इतिहास संशोधक,इतिहास लेखक, शाहिरी वाङ्मयाचे संग्राहक,संपादक व प्रकाशक (जन्म:१९ जुलै १९०२)**१९८९:रामचंद्र शंकर वाळिंबे--टीकाकार, समीक्षक (जन्म:९ नोव्हेंबर १९११)**१९७५:सर रॉबर्ट रॉबिनसन – वनस्पतिज रंग व अल्कलॉईड्सवर संशोधन करणारे ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेते (जन्म:१३ सप्टेंबर १८८६)**१९७१:डॉ.कन्हैय्यालाल मुन्शी – मुंबईचे पहिले गृहमंत्री,हैदराबाद संस्थानात भारत सरकारचे एंजट जनरल,नामवंत साहित्यिक (जन्म:३० डिसेंबर १८८७)**१९२७:बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर – ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक (जन्म:७ सप्टेंबर १८४९)**१७२५:पीटर द ग्रेट (पहिला) – रशियाचा झार (जन्म:९ जून १६७२)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *जगाला प्रेम अर्पावे .....!*प्रेम या अडीच अक्षरी शब्दात जादुई शक्ती आहे. प्रेमाशिवाय जीवन जगणे अशक्यच नाही तर असंभव आहे. प्रत्येक व्यक्ती जीवनात कुणावर नाहीतर कुणावर जीवापाड प्रेम करतो. जन्म देणाऱ्या आई-वडिलावर सर्वांचेच प्रेम असते कारण ते जन्मदाते असतात. भाऊ-बहिणींचा एकमेकींवर अतूट प्रेम असते, हे आपण सर्वचजण जाणतो. संसारातल्या विविध नातेसंबंधात आपणाला पदोपदी प्रेम दिसून येते. त्याशिवाय संबंध टिकूच शकत नाही. क्रोधी,  रागीट किंवा तापट स्वभावाचा व्यक्तीला सुद्धा प्रेमाने जिंकता येते शत्रुचे मन प्रेमाने वितळवितात येते. प्रेमात एवढी प्रचंड शक्ती आहे की............... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *उत्तराखंड विधानसभेत समान नागरी कायदा विधेयक मंजूर, UCC लागू करणारे ठरले पहिले राज्य !*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *राज्यातील निवासी डॉक्टरांकडून संप माघार, राज्यातील आरोग्य क्षेत्रावरील संकट टळले*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *शरद पवार गटाचं नाव ठरलं, "राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार" नवं नाव !*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मनसेचे तीन नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात गुप्त बैठक, लोकसभेच्या निवडणुकीआधी मनसे महायुतीत सामील होणार असल्याची चर्चा*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *संभाजीराजे छत्रपती कोल्हापुरातूनच लोकसभा निवडणूक लढवणार, 11 फेब्रुवारीला घोषणा करण्याची शक्यता, सूत्रांची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *रत्नागिरीहून मुंबईला येणारी खाजगी बस महाडजवळच्या सावित्री पुलाजवळ पेटली, विद्यार्थ्याच्या प्रसंगावधानामुळे 19 प्रवाशांसह 22 जण बचावले*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आयसीसी पुरुष कसोटी गोलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एखादी फालतू वाटणारी गोष्टसुद्धा जगाला पुढे घेऊन जाऊ शकते. --------------------------------------- पियाँटिक ह्या जनरल मोटर्सच्या शाखेला एके दिवशी एक तक्रार आली. 'माझ्या गाडीला व्हॅनिला आईसक्रीम आवडत नाही' जनरल मोटर्सने साहजिकच ह्यातक्रारीकडे दुर्लक्ष केले. काही दिवसांनी पुन्हा त्या व्यक्तीने हीच तक्रार केली. ह्यवेळीजनरल मोटर्सने त्याची चौकशी करायची ठरवले. त्यांनी त्या व्यक्तिला त्याची तक्रार व्यवस्थित सांगण्यास सांगितले. व्यक्तीने उत्तरदिले की तो, त्याची पत्नी आणि मुले रोज जेवण केल्यावर आईसक्रीम खायला जातात. रोज वेगवेगळे फ्लेवर घेतात. पण ज्या दिवशी ते व्हॅनिला फ्लेवर घेतात त्या दिवशी त्यांची गाडी सुरु होत नाही. जनरल मोटर्सने असे होउच शकत नाही असा दावा केला आणि दुर्लक्ष केले. इतर लोकांनी आणि कंपन्यांनीसुद्धा त्या व्यक्तीची चेष्टा केली. काही दिवसांनी त्या व्यक्तीने परत हीच तक्रार केली. आता मात्र जनरल मोटर्सपुढे त्याची चौकशी करण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यांनी आपला एक इंजीनिअर त्या व्यक्तिकडे पाठवला. इंजीनिअरने गाडी चेक केली. सगळे व्यवस्थित असल्यामुळे नाईलाजाने त्याला त्या व्यक्ती सोबत रहावे लागले. रात्री आईसक्रीम खायला जाताना इंजीनिअरपण सोबत गेला. आईसक्रीम खाऊन सगळे घरी आले. दुसऱ्या दिवशी परत आईसक्रीम खायला गेले. व्यक्तीने व्हॅनिला आईसक्रीम आणले आणि काय आश्चर्य त्या व्यक्तीने सांगितल्याप्रमाणे गाडी सुरुच झाली नाही. इंजीनिअरने परत गाडी चेक केली, पण सगळे नीट होते. शेवटी त्याने कंपनीला कळवले की व्यक्तीने सांगितलेली तक्रार खरी आहे. कंपनीने इंजीनियरला तिथेच राहून नीट लक्ष देण्यास सांगितले. त्याप्रमाणे इंजीनिअरने प्रत्येक गोष्टीची पाहणी करायला सुरवात केली. रोज त्या व्यक्तीबरोबर आईसक्रीम खायला गेल्यावरकाही दिवसानंतर इंजीनिअरच्या लक्षात आले की ती व्यक्ती जेव्हा बाकीचे फ्लेवर घेते तेव्हा त्याला गर्दीमुळे वेळ लागतो. पण व्हॅनिला फ्लेवरला जास्त मागणी असल्यामुळे त्याच्यासाठी वेगळे काउंटर होते आणि सर्विस पण तत्पर होती त्यामुळे तो ते घेऊन लवकर येतो आणि नेमकी हीच गोष्ट इंजीनिअरला पाहिजे होती. त्याने त्या गोष्टीवर खूप अभ्यास केला. तेव्हा लक्षात आले की ती व्यक्ति जेव्हा बाकीचे फ्लेवर घेते तेव्हा त्याला यायला वेळ लागतो. तोपर्यंत गाडीचे इंजिन थोडे गार होते आणि गाडी पुन्हा लगेच चालू होते. पण ती व्यक्ति जेव्हा व्हॅनिला फ्लेवर घेते तेव्हा तो लगेच परत येतो. त्यामुळे गाडीच्या इंजिनला गार होण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. त्यामुळे इंजिन मधील पेट्रोलचे इव्हॅपरेशन होतेआणि ते ब्लॉक होते व परत चालू होत नाही. आणि मग गाडीच्या इंजिनला गार करण्यासाठी लागणारे संशोधन सुरु झाले. जगातील अग्रमानांकित कंपनी मर्सिडीजने कार्ल बेंझ व विलिअम मेयबैकच्या मदतीने १९०१ साली आपल्या मर्सिडीज ३५' साठी पहिला रेडिएटर बसवला जो आजही इंजिनचा अविभाज्य भाग आहे. एखादी फालतू वाटणारी गोष्टसुद्धा जगालाकिती पुढे घेऊन जाते हेच यातून सिद्ध होते.*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*" काहीच हाती लागत नाही तेंव्हा मिळतो तो अनुभव. "**संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) पॅरिस ऑलिम्पिक २०२४ साठी *मशालवाहक* म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे ?२) भारतातील किती भाषांना अभिजात भाषांचा दर्जा आहे ?३) 'AI' हा शब्द १९५५ मध्ये प्रथम कोणी वापरला ?४) मानवाने सर्वप्रथम कोणत्या धातूचा उपयोग केला ?५) गोंदिया जिल्हा परिषदेचे नवीन सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे ? *उत्तरे :-* १) अभिनव बिंद्रा २) सहा - तमिळ, संस्कृत, कन्नड, तेलगू, मल्याळम आणि ओरिया ३) जॉन मॅक्कार्थी, संगणक शास्त्रज्ञ ४) तांबे ५) एम. मुरूगानंथम*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 सुनील ठमके, नांदेड👤 शर्मिष्ठा शिवाजीराव देव्हामुख, वसमत👤 राजेश मनुरे, पत्रकार धर्माबाद👤 राष्ट्रपाल सोनकांबळे, येवती👤 रविंद्र भापकर, सहशिक्षक अहमदनगर👤 राजेश्वर ऐनवाड, सहशिक्षक, धर्माबाद👤 दिलीप खोब्रागडे👤 मारोती पिकलेकर👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••देहेभान हे ज्ञानशस्त्रे खुडावे। विदेहीपणे भक्तिमार्गेचि जावे॥ विरक्तीबळे निंद्य सर्वै त्यजावे। परी संग सोडुनि सुखी रहावे॥१८८॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा.....🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपुलकीच्या नात्यातील संवाद एकाकी कधीच बंद होत नाही. पण, कधीकाळी एकाच्या मुखातून निघालेला भयंकर शब्द जेव्हा आतमध्ये प्रवेश करतो तेव्हा तो शब्द सर्वच संपवून टाकते. आणि मग तो चालू असलेला संवाद व ती आपुलकी आपोआप दिसणे बंद होऊन जाते.म्हणून कोणालाही बोलते वेळी दहा वेळा विचार करून योग्य शब्दांचा वापर करूनच बोलावे.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *स्वतःचे अस्तित्व जाणणे*एका बागेतील एका  काजव्याने रात्रीच्या वेळी बागेतल्या वाड्यात दिवे पेटले असता त्याचा लखलखीत प्रकाश पाहून, स्वतःचा प्रकाश मिणमिणता आहे अशी कुरकुर चालविली. परंतु त्याच्या बरोबर असलेला काजवा शहाणा होता. तो म्हणाला, 'अरे, थोडा वेळ थांब, आणि काय मजा होते ते पहा.' काही वेळाने त्या वाड्यातील सर्व दिवे विझले व वाडा व काळोखाने भरून गेला. हे पाहून तो शहाणा काजवा आपल्या मत्सरी सोबत्याला म्हणाला, ' मित्रा, हे दिवे थोडा वेळ प्रकाश पाडतात, नि विझून जातात, पण आपली स्थिती तशी नाही. आपला प्रकाश थोडा असला तरी तो कधी नाहीसा होत नाही.'तात्पर्य :- एकदम श्रीमंती येऊन ती पुन्हा लवकर नाहीशी होण्यापेक्षा कायम टिकणारी मध्यम स्थिती फार चांगली. दुसऱ्याच्या दिखाऊ तात्पुरत्या असलेल्या बाबींवर दुर्लक्ष करून आपल्याकडे असलेल्या कायम बाबींवर लक्ष केंद्रित केलेले कधीही उत्तमच.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 07 फेब्रुवारी 2024💠 वार - बुधवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://nasayeotikar.blogspot.com/2015/11/blog-post_29.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_ या वर्षातील ३८ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२००३:क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांना श्री शिवछत्रपती जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला.**१९९९:युवराज अब्दुल्ला जॉर्डनच्या राजेपदी**१९७४:ग्रेनाडा हा देश (युनायटेड किंग्डमपासुन) स्वतंत्र झाला.**१९७१:स्वित्झर्लंडमधे महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला.* *१९६५:मराठी नाटकात प्रथमच फिरत्या रंगमंचाचा वापर सुरू झाला.**१९४८:कसोटी क्रिकेटमधे शतक झळकवणारा नील हार्वे हा सर्वात लहान ऑस्ट्रेलियन खेळाडू ठरला.**१९२०:बाबूराव पेंटर यांच्या ’महाराष्ट्र फिल्म कंपनी’ने तयार केलेला ’सैरंध्री’ हा चित्रपट पुण्याच्या आर्यन सिनेमात प्रथम प्रकाशित झाला.**१९१५:गंगाधर नरहर ऊर्फ बापुसाहेब पाठक यांनी पुण्यातील 'आर्यन' हे पहिले चित्रपटगृह सुरु केले. तेथे प्रदर्शित झालेला पहिला मूकपट होता हिर्‍याची अंगठी**१८५६:ब्रिटिशांनी अवध साम्राज्य ताब्यात घेतले.सम्राट वाजिद अली शहा याला तुरुंगात टाकण्यात आले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९६५:बी.एल.खान-- कवी* *१९६४:नितीन आखवे-- मराठी गीतकार(मृत्यू:८ एप्रिल २०१२)**१९६३:डॉ.दिलीप नारायण पांढरपट्टे -- सुप्रसिद्ध गझलकार,सनदी अधिकारी* *१९५८:सुकुमार जयकुमार कोठारी -- मराठी, हिंदी व इंग्रजी भाषांमध्ये काव्य करणारे कवी* *१९५५:माधव रा.पवार -- प्रसिद्ध गीतकार, कवी* *१९५१:रवींद्र साठे-- मराठी चित्रपटांमध्ये व दूरचित्रवाणी मालिकांमध्ये पार्श्वगायन करीत असलेले पार्श्वगायक**१९४१:निळकंठ तुळशीराम रणदिवे -- लेखक, कवी**१९३८:एस.रामचंद्रन पिल्ले – कम्युनिस्ट नेते**१९३५:उषा वामन भट -- लेखिका* *१९३५:अशोक पुरुषोत्तम शहाणे-- लेखक, भाषातज्ज्ञ,संपादक,व प्रकाशक**१९३४:सुजित कुमार – चित्रपट अभिनेता व निर्माता (मृत्यू:५ फेब्रुवारी २०१०)**१९३२:माधव भीमराव थोरात -- लेखक* *१९२८:अनंत महादेव मेहंदळे-- महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध नारदीय कीर्तनकार(मृत्यू:२४ एप्रिल १९९२)**१९२५:उषा वामन भट-- लेखिका* *१९२३:प्रा.डॉ.बापूसाहेब देवेंद्र खोत-- लेखक* *१८९८:रमाबाई भीमराव आंबेडकर ( मृत्यू २७ मे १९३५)**१८१२:चार्ल्स डिकन्स – इंग्लिश कादंबरीकार व लेखक (मृत्यू:९ जून १८७०)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१४: डॉ.शरद कोलारकर-- विदर्भातील एक ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ,लेखक,विदर्भ संशोधन मंडळाचे माजी कार्याध्यक्ष (जन्म:१७ आक्टोबर १९३७)**१९९९:हुसेन – नवविचारांचा पुरस्कार करुन पश्चिम आशियातील शांततेसाठी अथक प्रयत्‍न करणारे जॉर्डनचे राजे (जन्म:१४ नोव्हेंबर १९३५)**१९९०:वामनराव हरी देशपांडे-- महाराष्ट्रातील ख्यातनाम संगीतज्ञ,संगीतसमीक्षक व लेखक (जन्म:२७ जुलै १९०७)**१९४७:वासुदेव दामोदर मुंडले-- चरीत्रकार(जन्म:१८८०)**१९३८:हार्वे फायरस्टोन – अमेरिकन उद्योजक (जन्म:२० डिसेंबर १८६८)**१२७४:श्री चक्रधर स्वामी – महानुभाव पंथाचे संस्थापक (जन्म:४ सप्टेंबर १२२१)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *हसा आणि हसवा*जीवनात हसण्याचे महत्व सांगणारा लेख ....!..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *केंद्र सरकारची मोठी घोषणा, 29 रुपये किलोने मिळणार तांदूळ*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *अंगणवाडी सेविकांना पेन्शन आणि पावणे दोन लाखांपर्यंत ग्रॅच्युईटी मिळणार, राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *मराठा आरक्षणासाठी 15 फेब्रुवारीला विशेष अधिवेशन बोलावण्याची शक्यता, राज्यातील 95 टक्के कुटुंबांचं सर्वेक्षण पूर्ण*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मंत्रिमंडळ बैठकीतील आणखी एक धडाकेबाज निर्णय, हायब्रिड ॲन्युईटी योजनेतून राज्यात 6 हजार किमी रस्त्यांची कामे होणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *राज्य परिवहन महामंडळाच्या ५ हजार डिझेल बसेसचे एलएनजीवर चालणाऱ्या वाहनामध्ये रूपांतर करण्यासाठी किंग गॅस कंपनीसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *शरद पवार यांना मोठा धक्का, राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवारांकडे; निवडणूक आयोगाचा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *U19 World Cup च्या सेमी फायनलमध्ये भारताचा 2 विकेटने विजय*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *वसाहती अंतराळातील* 📙 ***********************विज्ञानकथाकारांना आकर्षक वाटणारी अंतराळ वसाहतींची कल्पना आता मुर्त ठरू पाहत आहे. १९५७ साली स्पुटनिकने अंतराळ तंत्रज्ञानाची सुरुवात झाली. १९६९ मध्ये मानव चंद्रावर गेला. तर १९८०-९० सालच्या दशकात अंतराळवीरांनी पृथ्वीभोवती चक्कर मारणार्‍या स्पेस शटलसदृश यानात जास्त वेळ राहण्याचे विक्रम सुरू केले. अंतराळ वसाहत म्हणजे अशाच पद्धतीने पृथ्वीभोवताली फिरणारी वसाहतच, जी अंतराळात मानवी जीवनासाठी लागणार्‍या सर्व सुविधा पुरवू शकेल. अंतराळातील वसाहतीत पृथ्वीपेक्षा सर्वात मोठा जाणवणारा फरक म्हणजे तेथील अतिसूक्ष्म गुरुत्वाकर्षणाचा. पृथ्वीच्या आकर्षणामुळे प्रत्येक वस्तूला वजन असते. आपल्या शरीराला, मेंदूला, मनाला ह्या वजनाची सवय झालेली असते. अमुक वजन पेलता यावे म्हणून स्नायूंचे गठन झाले असते. अंतराळात गुरुत्वाकर्षण जवळजवळ नसल्याने आपण वसाहतीत तरंगू, तसेच वर खालीचा फरक नाही ! पेल्यातला द्रव पेला उघडा केला तर खाली पडत नाही. तो झटकून काढला की, गोळ्याच्या स्वरूपात तरंगतो. अर्थात हे विचित्र अनुभव आपल्याला खातापिताना आणि देहधर्मांसाठी येणार ! अाणि अशा स्थितीत सतत राहिल्याने मानसिक परिणाम काय होतील, ते सतत अभ्यासले जात आहेत. अंतराळात वसाहत उभी करणे वाटते तितके अवघडही नाही; कारण 'वजन' हा गुण नसल्याने सिमेंट काँक्रीटचे भव्य प्रासाद बांधायची सूर नाही, हलके साहित्य चालेल. अशा घरबांधणीचे अर्थातच नवे शास्त्र असेल. शिवाय गुरुत्वाकर्षणाचा अभाव असल्याने द्रव ठेवायला पेला नको, तसेच दोन द्रवांचे मिश्रण अधांतरी करता येईल. अशा स्थितीचा फायदा घेऊन काही अतिशुद्ध औषधे बनवता येतील, ज्यांना भांड्याचा संसर्ग नाही. धातूंची मिश्रणे (नव्या प्रकारची) करणेसुद्धा अंतराळात शक्य होईल. गुरुत्वाकर्षणविरहित अवस्थेतील वैज्ञानिक प्रयोग इथे करता येतील. एकूण अंतर वसाहत हे आता स्वप्न राहिले नसून विज्ञान तंत्रज्ञानाच्या विकासातील एक संभाव्य टप्पा आहे. केवळ पृथ्वीवर जागा नाही म्हणून अंतराळात राहावे, असे कोणी म्हणणार नाही. उलट तंत्रज्ञानाचा फायदा घेऊन लोकसंख्या काबूत आणणे अधिक व्यवहार्य आहे. परंतु जे औद्योगिक आणि वैज्ञानिक प्रकल्प गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीवर राबवणे शक्य नाही, ते अशा वसाहतीत करता येतील, हे त्यांचे वैशिष्ट्यच. शिवाय अंतराळात जवळजवळ पोकळी असल्याने वसाहतीबाहेरच्या पोकळीतदेखील वेगळे प्रयोग करता येतील. त्यांच्यासाठी पृथ्वीवर कृत्रिम पोकळी निर्माण करणे खर्चाचे असेल.*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*" धैर्य हे प्रेमासारखे आहे. नुसत्या आशेच्या बळावर ते वाटेल तितके वाढते. "**संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) पर्वतीय मृदेस कोणती मृदा म्हणतात ?२) १६ व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली आहे ?३) कसोटी क्रिकेटमधील सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा विक्रम कोणाच्या नावावर आहे ?४) संजीवनी बुटी आणण्यासाठी हनुमान यांनी कोणता पर्वत उचलून आणला होता ?५) गोंदिया जिल्ह्याचे नवे जिल्हाधिकारी कोण आहेत ?*उत्तरे :-* १) अपरिपक्व मृदा २) डॉ. अरविंद पनगडीया ३) मिचेल स्टार्क, ऑस्ट्रेलिया ( १६०.४ किमी प्रतीतास, २०१५ साली ) ४) द्रोणगिरी पर्वत ५) प्रजीत नायर*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 पवन गट्टूवार, सहशिक्षक, कुंडलवाडी👤 संतोष कोयलकोंडे, सहशिक्षक, देगलूर👤 पोतन्ना चिंचलोड, येवती👤 विनायक गोविंदराव पारवे👤 खंडू येरकलवाड, बेळकोणी👤 साईनाथ येनगंटीवार👤 कवी बी. एल. खान👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••भुते पिंड ब्रह्मांड हे ऐक्य आहे। परी सर्वही स्वस्वरुपी न साहे॥ मना भासले सर्व काही पहावे। परी संग सोडुनि सुखी रहावे॥१८७॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *आजची विचारधारा......*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपल्या कडून एखाद्याला अडीअडचणीच्या वेळी मदत होत असेल आणि त्याची वाईट परिस्थिती आपल्यामुळे चांगली होत असेल किंवा त्याच्या चेहऱ्यावर हसू येत असेल तर उत्तमच आहे ते,माणुसकीचे लक्षणे आहेत सोबतच तो माणुसकी धर्म आहे. पण,त्या केलेल्या मदतीचा दुरूपयोग जर त्या व्यक्तीकडून होताना आपल्याला बघायला मिळाले असेल तर मात्र, समोर मदत करताना त्या व्यक्तीला खोलवर जाऊन वाचणे आवश्यक आहे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *अंतःकरणातील दुःख*एका रानातल्या खडकावर दोन घोरपडी उन्ह खात बसल्या असता त्यापैकी एकजण दुसरीस म्हणाली, 'आमची स्थिती मोठी शोचनीय आहे ! आम्ही फक्त जिवंत आहोत एवढंच, बाकी सगळ्या जगात आमच्याकडे कोणी ढुंकूनही बघत नाही. आमच्या क्षुद्रतेचा धिक्कार असो ! यापेक्षा रानातल्या वार्‍यासारख्या उड्या मारणार्‍या हरणाचा जन्म मिळाला असता तर काय मजा आली असती !' हे बोलत असताच एक हरिणामागे लागलेल्या शिकारी कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज ऐकू आला व धावून थकलेल्या हरणाचा जीव कुत्र्याने घेतलेला तिने प्रत्यक्ष पाहिला. त्यावेळी दुसरी घोरपड आपल्या स्थितीविषयी कुरकुरणार्‍या पहिल्या घोरपडीला म्हणाली, 'ज्या हरणाचं जीवन आपल्याला मिळावं अशी इच्छा तू करीत होतीस त्या हरणाची स्थिती किती भयंकर आहे, हे आता प्रत्यक्षच पाहा अन् ज्या मोठेपणाबरोबर अनेक दुःखही भोगावी लागतात तो मोठेपणा देवाने आपणास दिला नाही याबद्दल त्याचे आभार मान !'*तात्पर्य :- बाह्य रूपावर जाऊन फसू नये, कारण त्याच्या अंतर्यामी दुःख असण्याचीच शक्यता असते.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 03 फेब्रुवारी 2024💠 वार - शनिवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://kathamaala.blogspot.com/2017/04/blog-post_53.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_ या वर्षातील ३४वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *१९६६:सोव्हिएत रशियाने लूना-९ हे मानवविरहित अंतराळयान चंद्रावर उतरवले.**१९२८:'सायमन गो बॅक' या घोषणांनी सायमन कमिशनचा मुंबईत निषेध करण्यात आला.**१९२५:भारतात पहिल्यांदाच विजेवर चालणारी रेल्वे व्हिक्टोरिया टर्मिनस ते कुर्ला या स्थानकांदरम्यान सुरू झाली.**१८७०:अमेरिकेच्या संविधानातील १५ वा बदल अमलात आला त्यामुळे मतदानातील वंशभेद संपुष्टात आले.**१७८३:स्पेनने अमेरिकेच्या स्वातंत्र्यास मान्यता दिली.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९५:गणेश बाळासाहेब निकम -- लेखक* *१९७८:धिरज पाटील (धनराज) -- कवी**१९७५:हंसिनी अरविंद उचित -- कवयित्री, सामाजिक कार्यकर्त्या,विविध पुरस्कारांनी सन्मानित**१९७३:प्रा.डॉ.गिरीश खारकर-- सुप्रसिद्ध मराठी गजलकार,प्रतिभावंत लेखक, प्रकाशक,(मृत्यू:१७ आक्टोबर २०१९)**१९६९:महेश रघुनाथ पानसे-- कवी**१९६७:गजानन निमकर्डे-- कवी* *१९६३गंगाधर त्र्यंबक अहिरे -- कवी,लेखक, संपादक* *१९६३:अंजली चितळे -- कवयित्री* *१९६३:रघुराम राजन – भारतीय अर्थतज्ञ**१९६२:प्रा.भाऊ काशिनाथ(भाऊसाहेब) गोसावी -- प्रसिद्ध कवी,लेखक* *१९६२:डॉ.जयराम काळे-- कवी,लेखक* *१९५२:नारायण गणपतराव निखाते -- लेखक* *१९५०:प्रा.डॉ.सुदाम जाधव-- आदिवासी साहित्याचे अभ्यासक तथा लेखक* *१९४५:प्रा.डॉ.रामचंद्र कामाजी क्षीरसागर -- लेखक* *१९४२:अरुण कृष्णराव हेबळेकर-- प्रसिद्ध कथाकार,कादंबरीकार**१९३८:वहिदा रहमान-- प्रसिद्ध अभिनेत्री**१९३५:नारायण बाळकृष्ण ठेंगडी-- पत्रकार, कवी आणि कथाकार (मृत्यू:२५ मार्च १९८८)**१९३१:प्रा.चंद्रकांत भालेराव-- प्रसिद्ध कथाकार* *१९२७: अच्युत महादेव बर्वे--कथाकार, कादंबरीकार(मृत्यू:१६ एप्रिल १९८२)**१९२७:वसंत शंकर सरवटे-- ख्यातनाम महाराष्ट्रीय व्यंगचित्रकार तसेच लेखक(मृत्यू:२३ डिसेंबर २०१६)**१९०६:अवधूत महादेव जोशी--कथाकार, चरित्रलेखक,टीकाकार**१९००:तिरुवेंकट राजेंद्र शेषाद्री – रसायनशास्त्रज्ञ (मृत्यू:२७ सप्टेंबर १९७५)**१८२१:डॉ.एलिझाबेथ ब्लॅकवेल – वैद्यकशास्त्रातील पहिली महिला पदवीधर (मृत्यू:३१ मे १९१०)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२००७:हरी अनंत फडके-- संशोधक, अभ्यासक (जन्म:१३ ऑक्टोबर १९३२)**१९९१:प्रा.कुसुमताई साठे-- लेखिका, कवयित्री,संपादिका (जन्म:१६ डिसेंबर १९२१)**१९७९:मोरेश्वर दिनकर जोशी-- संस्थापक, व्यवस्थापक, संपादक(जन्म:२८ फेब्रुवारी १९००)**१९६९:सी.एन.अण्णादुराई – तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री (जन्म:१५ सप्टेंबर १९०९)**१९२४:वूड्रो विल्सन – अमेरिकेचे २८ वे राष्ट्राध्यक्ष आणि नोबेल पारितोषिक विजेते (जन्म:२८ डिसेंबर १८५६)**१८३२: उमाजी नाईक --पहिले क्रांतिकारक व स्वातंत्र्यसैनिक उमाजी नाईक यांना ब्रिटिश सरकारने फाशी दिली.(जन्म:७ सप्टेंबर १७९१)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *कथा - गुरुदक्षिणा* ..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील सानेगुरुजी नगरी येथे 97 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास प्रारंभ*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *राज्य सरकारचा मोठा निर्णय; मनोज जरांगे यांना आता सरकारी सुरक्षा, 24 तास दोन पोलीस तैनात*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प सादर; 2024-25 साठी 59 हजार 954 कोटी रुपयांची तरतूद*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मुंबईतील कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याचं  19 फेब्रुवारीला उद्घाटन; पंतप्रधान मोदींच्या हस्ते 10 किलोमीटर मार्गाचं लोकार्पण*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *नाशिक: सिन्नरमध्ये अग्नितांडव; मुसळगाव एमआयडीसीतील कारखान्यात भीषण आग, आगीमुळे कारखान्याचे लाखोंचे नुकसान झाल्याचा अंदाज*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *पश्चिम उपनगरांसाठी मोठा दिलासा, गोखले पुलाचं 25 एप्रिलला लोकार्पण होणार, पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांची मोठी घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *शतकवीर यशस्वी जैस्वाल इंग्लंडविरोधात दिवसभर एकटाच लढला; टीम इंडियाचे धुरंदर पुन्हा अपयशी*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••⭐ *ताऱ्यांचं अंतर कसं मोजतात ?* ⭐ **************************तारे आपल्यापासून कितीतरी दूर असतात. आपल्याला सर्वात जवळचा असलेला तारा म्हणजे आपला सूर्य. तोच मुळी पंधरा कोटी किलोमीटर दूर आहे. इतर तारे तर त्याच्या कितीतरी पटींनी दूर आहेत. तेव्हा त्यांच्या पर्यंतचं अंतर मोजण्यासाठी तशीच काहीतरी खास युक्ती योजायला हवी. आपण जेव्हा एखाद्या वस्तूकडे पाहातो तेव्हा आपले दोन डोळे जरा वेगवेगळ्या कोनांमधुन त्या वस्तूकडे पाहतात. त्यामुळे तिच्या दोन प्रतिमा आपल्या डोळ्यांमध्ये उमटतात आणि त्यांच्यामध्ये काही अंतर असतं. समजा आपण आपला एक डोळा मिटला आणि समोरच्या दाराच्या चौकटीच्या बरोबर समोर येईल अशा तर्‍हेनं एक बोट समोर धरलं. आता तो डोळा उघडून दुसरा मिटला आणि परत पाहिलं तर ते बोट हल्ल्याचं दिसून येईल. कारण त्या दोन डोळ्यांतल्या प्रतिमांमध्ये अंतर असतं. यालाच पॅरॅलॅक्स असं वैज्ञानिक भाषेत म्हणतात. जितकं त्या बोटाचं आपल्या डोळ्यांपासूनचं अंतर कमी तितका पॅरलॅक्स जास्त. उलटपक्षी जितकं बोटाचं अंतर जास्त तितका पॅरलॅक्स कमी. म्हणजेच कोणत्याही वस्तूचं आपल्यापासून असलेलं अंतर आणि तिच्या प्रतिमांमधला पॅरॅलॅक्स यांचं एक नातं असतं. जर पॅरॅलॅक्स मोजला तर गणित करून ते अंतर शोधता येतं. जमिनीचा सर्व्हे करणारे तज्ज्ञ याचाच उपयोग करतात. पण आपल्या दोन डोळ्यांमधलं अंतरच इतकं कमी आहे की दूरवरच्या तार्‍याचा पॅरॅलॅक्स शून्यवतच असतो. दोन डोळ्यांमधलं अंतर तर वाढवता येत नाही. पण दोन वेगवेगळ्या ठिकाणांवरून जर पाहिलं तर त्या दोन प्रतिमांमध्ये काही पॅरॅलॅक्स तयार होतो. तरीही दूरवरच्या ताऱ्यांकडे पाहण्यासाठी पृथ्वीवरची दोन टोकंही जरी गाठली तरी ते अंतर अपुरंच पडतं. यासाठी मग पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या परिभ्रमणाचा वापर करण्यात येतो. सूर्याच्या अलीकडून आणि पलीकडून जर आपण पाहू शकलो तर त्या कक्षेच्या व्यासाइतकं अंतर दोन 'डोळ्यांमध्ये' आपण पाडू शकतो. त्यासाठी मग वर्षातल्या दोन वेगवेगळ्या वेळी एकाच ताऱ्याच्या घेतलेल्या प्रतिमांमधला पॅरॅलॅक्स मोजून त्या ताऱ्याचं आपल्यापासून असलेलं अंतर मोजता येतं. अर्थात अशा दूरवरच्या ताऱ्यांकडे पाहण्यासाठी तसेच तेजस्वी 'डोळे' ही असणे गरजेचं असतं. ही गरज अतिशय शक्तिशाली दुर्बिण वापरून पूर्ण केली जाते.*बाळ फोंडके यांच्या 'कसं ?' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*" जेव्हा कमजोरी शक्ती बनते, तेव्हा यश हमखास मिळते. "**संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) २०२३ चा *महाराष्ट्र भूषण* पुरस्कार कोणाला जाहीर करण्यात आले ?२) महाराष्ट्र राज्याचा सर्वोच्च नागरी सन्मान कोणता ?३) 'महाराष्ट्र भूषण पुरस्कारा'चे स्वरूप काय आहे ?४) प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये जगात सर्वात वेगवान त्रिशतकवीर कोण ?५) "अहिंसा हे दुर्बलांचे नव्हे तर बलवानाचे शस्त्र आहे", असे कोण म्हणाले होते ? *उत्तरे :-* १) अशोक सराफ, अभिनेता २) महाराष्ट्र भूषण ३) २५ लाख व मानपत्र ४) तन्मय अग्रवाल, भारत ( १४७ चेंडू ) ५) महात्मा गांधी*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*   👤 विजयकुमार वडेपल्ली, नांदेड  👤 हंसिनी उचित, साहित्यिक👤 गंगाधर धडेकर, पत्रकार, धर्माबाद👤 ऍड. मल्हार मोरे, भोकर👤 अर्शनपल्ली अजय👤 सुशील कुलकर्णी👤 राजेश पिकले👤 शिवकुमार देवकत्ते👤 विश्वास मापारी👤 ओमकार पाटील चोळाखेकर👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जनी भक्त ज्ञानी विवेकी विरागी। कृपाळु मनस्वी क्षमावंत योगी॥ प्रभु दक्ष व्युत्पन्न चातुर्य जाणे। तयाचेनि योगे समाधान बाणे॥१८३॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा ......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपण करत असलेले कार्य पाहून बाहेरच्या लोकांकडून होणारा विरोध तेवढा भयानक नसतो. कधी शिकायला सुद्धा भाग पाडत असते पण जेव्हा त्याच कार्याला आपल्या जवळचेच माणसं आपुलकीचा ढोंग करून विरोध करतात तेव्हा मात्र त्या विरोधाचे मानसिक तणावात रूपांतर होत असते. म्हणून कोणाला साथ देता येत नसेल तर विरोधही करू नये.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *मुंग्याची शिकवण*उन्हाळ्याच्या दिवसात काही मुंग्या आपल्या वारुळाजवळ बसून मिळवून आणलेले दाणे उन्हात वाळवीत होत्या. इतक्यात भुकेने व्याकुळ झालेला एक टोळ त्या ठिकाणी येऊन व दीनवाणे तोंड करून त्यांना म्हणाला, 'बायांनो, यातला एखादा तरी दाणा मला देऊन जर माझा प्राण वाचवाल तर तुम्हाला मोठं पुण्य लागेल.' हे ऐकून त्यातल्या एका मुंगीने त्याला विचारले, 'अरे, सुगीच्या दिवसात आम्ही जसं धान्य जमवून ठेवलं, तसं तू का ठेवलं नाहीस ?' टोळ त्यावर उत्तरला, 'माझा सगळा वेळ खाण्यापिण्यात आणि मौजा मारण्यात गेला. पुढे आपला चरितार्थ कसा चालेल ही कल्पनाही माझ्या मनात त्यावेळी आली नाही.' हे ऐकून मुंगी म्हणते, 'अरे, अशा रीतीने मौजा मारण्यात ज्यांनी आपले दिवस घालविले, ते पुढे उपाशी मरणार हे ठरलेलं आहे. मग आता तुझ्या चरितार्थाची तजवीज आम्ही काय म्हणून करावी बरं ?'तात्पर्य : ज्यांनी आपले तारुण्य केवळ चैनबाजीत घालविले त्यांना बहुतेक वेळा म्हातारपणी दुःख भोगावे लागल्याशिवाय राहात नाही.'आयुष्य ही चैनीची वस्तू नसून कर्तव्याची भूमी आहे.'•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 02 फेब्रुवारी 2024💠 वार - शुक्रवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://kathamaala.blogspot.com/2017/04/blog-post_48.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_जागतिक पाणथळ भूमी दिन_**_ या वर्षातील ३३वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *_१९७१:इराणमधील रामसर येथे पाणथळ भूमीचे महत्त्व या विषयावर एक परिषद आयोजित करण्यात आली होती. मानवी जीवनातील पाणथळ भूमीचे महत्त्व समजावे म्हणून दरवर्षी २ फेब्रुवारी हा दिवस जगभर ’जागतिक पाणथळ भूमी दिन’ म्हणून साजरा केला जावा असा त्या परिषदेत निर्णय घेण्यात आला._**१९७१:इदी अमीन हे युगांडाचे सर्वेसर्वा बनले.**१९५७:गोवा मुक्तीसंग्राम – नानासाहेब गोरे, मधू लिमये, जगन्नाथराव जोशी यांची गोव्यातील तुरूंगातुन मुक्तता.**१९४३:दुसरे महायुद्ध – स्टॅलिनग्राडच्या लढाईनंतर जर्मनीचे सैन्य सोवियेत संघाला शरण, जर्मन सैन्याच्या माघारीची सुरूवात**१९३३:अ‍ॅडॉल्फ हिटलरने जर्मनीची संसद बरखास्त केली.**१८४८:कॅलिफोर्निया गोल्ड रश – सोने मिळवण्याच्या उद्देशाने चिनी स्थलांतरितांचा पहिला जथा कॅलिफोर्नियात दाखल झाला.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८१:प्रज्ञा हंसराज बागुल --आंबेडकरी साहित्यामध्ये कथा लेखन करणाऱ्या लेखिका**१९८०:डॉ.बाळू दुगडूमवार -- कवी,लेखक* *१९७६:प्रा.अरुण विठ्ठल कांबळे-बनपुरीकर --- प्रसिद्ध कवी,लेखक* *१९७४:डॉ.श्रीकांत श्रीपती पाटील -- प्रसिद्ध साहित्यिक,सर्व साहित्य प्रकारांमध्ये विपुल लेखन,विविध पुरस्कारांनी सन्मानित* *१९७०:डॉ.देविदास तारु-- कवी,लेखक* *१९६८:प्रा.संतोष काळे-- कवी* *१९६५:छाया पाथरे --लेखिका**१९६२:मिलन मोहनीराज बसमतकर-कामोठे - प्रसिद्ध लेखिका* *१९५७:डॉ.अरुणा रामचंद्र ढेरे-- प्रसिद्ध मराठी भाषेतील लेखिका,कवयित्री**१९५३:डॉ.प्रदीप प्रभाकर गोखले--- कवी, लेखक व तत्त्वज्ञानाचे माजी प्राध्यापक**१९५१:प्रा.विमल गाडेकर-- विदर्भातील ख्यातनाम कवयित्री,लेखिका(मृत्यू:२६ मार्च २०२१)**१९४९:मंगला गोडबोले-- सामाजिक जाणीवेने लिहिणाऱ्या एक मराठी लेखिका**१९४८:राधिका भांडारकर -- कथा लेखिका**१९४२:रविकांत धोंडू मिरासी -- लेखक**१९४०:बाळ राणे --आत्मचरित्र,कादंबरी, ऐतिहासिक ग्रंथ,अध्यात्मिक ग्रंथ,समीक्षात्मक लेखन,कथा लेखन असे विपुल लेखन(मृत्यू:१२मे २०१६)* *१९४०:मनासाराम वंजी पाटील -- लेखक* *१९२६:वेणूबाई यशवंतराव चव्हाण-- महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पत्नी(मृत्यू:१ जून १९८३)**१९२३:ललित नारायण मिश्रा –माजी केंद्रीय रेल्वे मंत्री,पहिल्या,दुसर्‍या व पाचव्या लोकसभेचे सदस्य, राज्यसभा खासदार (मृत्यू:३ जानेवारी १९७५)**१९०८:वामन रावजी ढवळे-- कवी,संपादक, चरित्रकार(मृत्यू:३० जून १९८४)**१९०५:अ‍ॅन रँड – जन्माने रशियन असलेल्या अमेरिकन लेखिका व तत्त्ववेत्त्या (मृत्यू:६ मार्च १९८२)**१८८४:डॉ.श्रीधर व्यंकटेश केतकर – ज्ञानकोशकार.’महाराष्ट्रीय ज्ञानकोश’ हे त्यांचे सर्वात महत्त्वाचे कार्य होय.(मृत्यू:१० एप्रिल १९३७)**१८५६:स्वामी श्रद्धानंद – स्वामी दयानंदांचे शिष्य,गुरुकुल विश्वविद्यालयाचे संस्थापक, शिक्षणमहर्षी आणि आर्य समाजाचे प्रसारक (मृत्यू:२३ डिसेंबर १९२६)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन_* •••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२३:कासीनाधुनी विश्वनाथ -- भारतीय चित्रपट दिग्दर्शक,पटकथा लेखक(जन्म:१९ फेब्रुवारी १९३०)**२००९:अजित सोमण-- प्रसिद्ध बासरीवादक,संगीतज्ञ,संहितालेखक, जाहिरातलेखक आणि इंग्रजी भाषेचे प्राध्यापक(जन्म:६ ऑगस्ट १९४७)**२००७:विजय अरोरा – हिन्दी चित्रपट आणि टीव्ही अभिनेता (जन्म:२७ डिसेंबर १९४४)**१९८७:अनंत वामन वर्टी--संपादक, लेखक (जन्म:२ डिसेंबर १९११)**१९८७:अ‍ॅलिएस्टर मॅकलिन – स्कॉटिश साहसकथा लेखक (जन्म:२१ एप्रिल १९२२)**१९७०:बर्ट्रांड रसेल – ब्रिटिश गणितज्ञ, तत्त्वज्ञ आणि इतिहासकार (जन्म:१८ मे १८७२)**१९३०:वासुदेव गोविंद आपटे – लेखक, भाषांतरकार,पत्रकार,संपादक,अनुवादक, निबंधकार व कोशकार.त्यांनी लहान मुलांसाठी ’आनंद’ हे मासिक सुरू केले होते.(जन्म:१२ एप्रिल १८७१)**१९१७:महर्षी अण्णासाहेब पटवर्धन – लोकमान्य टिळकांचे स्‍नेही आणि विख्यात वैद्य यांनी देहत्याग केला. (जन्म:४ मे १८४७)**१९०७:दिमित्री मेंदेलिएव्ह – रशियन रसायनशास्त्रज (जन्म:८ फेब्रुवारी १८३४)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *प्रामाणिक वसंता*प्रामाणिकपणा मुळे वसंताचे क्लेक्टरकडून कौतुक आणि पन्नास हजार रूपयाचे पारितोषिक आजच्या सर्वच पेपर मध्ये ही बातमी झळकली. खरोखरच वसंताने कामच असे केले होते म्हणून स्वतः कलेक्टर साहेबांनी त्याचे कौतुक केले. वसंता एक ऑटो ड्रायव्हर. गरीब मात्र प्रामाणिक. त्याने कधी ही पैश्याची हाव केली नाही. ऑटो चालविताना वाहतुकीचे नियम तोडला नाही की कोठे छोटा अपघात देखील केला नाही. प्रवाश्यासोबत नेहमी प्रेमळ वागत असतो. वयोवृध्द व्यक्तिना कमी पैश्यात त्यांच्या इच्छित स्थळी सोडत असे. एक-दोन रूपयासाठी त्याने प्रवाश्यासोबत कधी घासाघीस केली नाही. प्रवाशी हेच आपले दैवत असे तो समजायचा................ पूर्ण लघुकथा वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल नाही, सात लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त; केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अंतरिम अर्थसंकल्प 2024-25 केला सादर*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *रेल्वेच्या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्राला 15 हजार 554 कोटी रुपयांची तरतूद, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी माध्यमांशी बोलताना दिली माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *महाराष्ट्राच्या धर्तीवर देशातील महिला उद्योजकांसाठी धोरण राबविण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार - विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मराठा आरक्षणासाठी दोन कोटी 12 लाखांहून अधिक घरांचं सर्वेक्षण, आज सर्वेक्षणाचा शेवटचा दिवस*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *क्राफ्ट इन्स्ट्रक्टर परीक्षेचा निकाल जाहीर; साताऱ्याची गौरी पाटील-पवार मुलींमध्ये राज्यात प्रथम*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *राज्यसभेच्या महाराष्ट्रातील 6 जागांसाठी होणारी निवडणूक बिनविरोध होणार असल्याचा दावा, या प्रकरणी सत्ताधारी व विरोधकांत एकमत*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना आज विशाखापट्टनम येथे सुरू होणार आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 अणू म्हणजे काय ? 📙अणू म्हणजे मूलतत्त्वाचा सर्वात लहान कण. अणुबद्दल अनेक पुस्तकातून, अनेक अभ्यासक्रमांतून, अनेक वेळा आपण शिकत आलो आहोतच. मग येथे वेगळे ते काय वाचायचे ?अणूचे अंतरंग केंद्रकाने बनलेले असते, हे माहित आहेच, पण हे केंद्र किती छोटे असावे ? एखाद्या शाळेच्या हॉलमध्ये मध्यभागी एखाद्या साखरेचा दाणा तरंगत ठेवला तर तो म्हणजे केंद्रक व हॉलचा बाह्यभाग व भिंती म्हणजे इलेक्ट्रॉनचा फिरण्याचा परीघ होय. एवढ्यावरच ही तुलना थांबत नाही. बॉलपेनचा शाईचा एक ठिपका कागदावर उमटवा. या ठिपक्यामध्ये किती अणू मावतील, असे बघितले तर आकडा येतो चार अब्जाचा. म्हणजेच या चार अब्जांतील एकाचे केंद्र किती छोटे असेल ? पण या अणूचे सर्व वजन मात्र या केंद्रकातच सामावलेले असते. इलेक्ट्रॉन प्रचंड गतीने फिरत असतात. या केंद्रकातील प्रोटॉनची संख्या आणि केंद्रकाभोवती घिरट्या घालणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या समान असल्याने विजेने भारलेल्या कणांचा बनलेला असूनही एकूण भार शून्य असल्याने अणु विद्युतदृष्ट्या उदासीन असतो. निसर्गात दिसणारी विविधता विविध प्रकारच्या अणूंच्या संयोगाने येते. उण्यापुऱ्या पन्नास मूळ अक्षरांतून सारे साहित्य निर्माण होते, तसेच हे अणू किती गतिमान आहेत, यावर पदार्थाची घन, द्रव, वायू वैगरे अवस्था ठरते.हायड्रोजन सर्वात हलका, युरेनियम खूपच जड; पण या दोघांचे अणूचे आकार मात्र सारखेच असतात. खरे म्हणजे जगातील जी काही शंभरच्या आसपास आढळणारी मुलद्रव्ये आहेत, त्या सर्वांच्या अणूचे आकार सारखेच असतात. फरक असतो तो त्यांच्या केंद्रकात असलेल्या न्यूट्रॉनचा व प्रोटॉनच्या संख्येत. प्रोटॉनच्या संख्येएवढी त्यांच्याभोवती फिरणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या असते. पण हे प्रोटॉन व न्यूट्रॉन इलेक्ट्रॉनपेक्षा प्रत्येकी जवळजवळ दोन हजार पटींनी जास्त जड असतात. हायड्रोजनचा अणू सर्वात हलका, पण त्यात फक्त एक प्रोटॉनच असतो. पण नेमका त्याच आकाराचा युरेनियम घेतला तर त्यात ९२ प्रोटॉन व ९२ न्यूट्रॉन असतात. म्हणून तो विलक्षण जड होतो.मुलद्रव्ये मोजकीच आहेत. पण मग अनेकदा युरेनियमसारख्या मूलद्रव्याच्या संज्ञेपुढे विविध आकडे असलेले वाचायला मिळतात. मूलद्रव्यातील प्रोटाॅनचा आकडा हा त्याचा अणुक्रमांक सांगतो. पण एकाच मूलद्रव्याच्या अणूच्या प्रोटॉनची संख्या तीच राहून न्यूट्रॉनची संख्या वेगवेगळी असलेले प्रवाह असू शकतात. त्यांना 'आयसोटोप' असे म्हटले जाते. प्रोटॉन व न्यूट्रॉनची बेरीज म्हणजे आयसोटोप्सचा आकडा येतो. असाच प्रकार रेडियम, क्लोरिन, आयोडिन इत्यादी बहुसंख्य मुलद्रव्यांबाबत आढळतो. सारे जग अशा या अणूंपासूनच बनलेले आहे. अगदी आपले सारे शरीरसुद्धा ! सृष्टी विज्ञानगाथा या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••शत्रूने केलेले कौतुक हीच आपली सर्वोत्तम कीर्ती होय.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) दुहेरीत ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकणारा सर्वात वयस्कर खेळाडू कोण ठरला आहे ?२) ७५ व्या प्रजासत्ताक दिनाची मुख्य संकल्पना काय होती ?३) हडप्पा संस्कृतीत कोणत्या ठिकाणी नांगरलेल्या शेताचा पुरावा मिळाला आहे ?४) उत्तर अमेरिका खंडातील सर्वात मोठा देश कोणता ?५) बिहार राज्याची विधानसभा सदस्यसंख्या किती आहे ? *उत्तरे :-* १) रोहन बोपण्णा, भारत ( ४३ वर्षे ३२९ दिवस ) २) विकसित भारत व भारत: लोकशाहीची जननी ३) कालीबंगण ४) कॅनडा ५) २४३ सदस्य*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 रुखमाजी भोगावार, नगरपालिका, धर्माबाद👤 डॉ. देविदास तारू, साहित्यिक, नांदेड👤 पोतन्ना चिंचलोड, येवती👤 बालाजी गोजे, सहशिक्षक👤 विनोद गुंडेवार👤 किरण बासरकर👤 चेतन घाटे, धर्माबाद👤 राजू जगदंबे, धर्माबाद 👤 चक्रधर ढगे, चिरली👤 गजानन वासमकर👤 सुंदर व्ही माने👤 पोतन्ना लखमावाड, पत्रकार, धर्माबाद👤 विनोद गुंडेवार👤 शिवाजी कौटकर, सहशिक्षक, बिलोली👤 राजू जगदंबे, धर्माबाद👤 दत्ता लिंगमपल्ले👤 संजय ढगे, चिरली👤 साहेबराव वानखेडे👤 शंकर गोपतवाड, सहशिक्षक, धर्माबाद*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••नव्हे वाउगी चाहुटी काम पोटी। क्रियेवीण वाचाळता तेचि मोठी॥ मुखे बोलिल्यासारिखे चालताहे। मना सद्गुरु तोचि शोधुनि पाहे॥१८२॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷आजची विचारधारा ...🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••लहान्याची चूक होते तेव्हा, त्याच्या झालेल्या चुकीविषयी सर्वचजण त्याला बोलत असतात. पण जेव्हा वयाने मोठे असणारे चुकतात त्यांना मात्र कोणीही बोलत नाही. म्हणूनच म्हणतात ना की, पिकतात पण शिकत नाही. कधी, कधी वयाने लहान असणारे चुकतात पण, त्यांना त्यांची चूक उशीरा का होईना कळत असते. आणि जेव्हा मोठे माणसे सर्व समजून, उमजून सुद्धा चुका करतात तेव्हा मात्र लहान्यांचे जगणे कठीण होऊन जाते. म्हणून चूक झाली असेल तर त्यावर आपणच विचार करून मार्ग काढण्याचा प्रयत्न करून बघावे पण, इतरांच्या सांगण्यावरून चुकीच्या मार्गाने जाऊन दुसऱ्याला त्रास देऊन स्वतः चा समाधान करू नये.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*॥ कथा 3 मित्रांची॥*   ज्ञान, धन, विश्वास हे चांगले मित्र होते. तिघांचे एकमेकांवर प्रेम होते. ते एकत्र रहात असत. पण एक दिवस.....     त्यांना वेगळे होण्याची वेळ आली. अरेरे.....  त्यांनी एकमेकांना शेवटचे प्रश्न विचरले....  "आता आपण परत भेटणार केव्हा?  कुठे? ? ?  ज्ञान :-मी विद्यालयात भेटेन...  धन:-मी तर श्रीमंताकडे भेटेन...   विश्वास मात्र शांत होता, त्याच्या डोळ्यातून अश्रू येत होते.   "कारे... ? का रडतोस?"  विश्वास हुंदके देत--  *"मी एकदा गेलो तर* ....         *पुन्हा*   *कधी नाही भेटणार*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 01 फेब्रुवारी 2024💠 वार - गुरुवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://nasayeotikar.blogspot.com/2018/05/32.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_ या वर्षातील ३२वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२००४:मक्‍का येथे चालू असलेल्या हज यात्रेत चेंगराचेंगरी होऊन २५१ यात्रेकरू ठार तर २४४ लोक जखमी झाले.**१९९२:भोपाळच्या मुख्य न्यायाधीशांनी युनियन कार्बाइडचा मुख्य अधिकारी वॉरेन अ‍ॅंडरसन याला फरारी घोषित केले.**१९८१:ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडमधील एक दिवसीय क्रिकेट सामन्यात शेवटच्या चेंडुवर न्यूझीलंडला ६ धावा हव्या असताना ग्रेग चॅपलने आपला भाऊ ट्रेव्हर चॅपलला अंडरआर्म बॉल टाकण्यास सांगितले. ट्रेव्हरने चॅपलने तसा चेंडू टाकला व ऑस्ट्रेलियाने सामना जिंकला परंतु यानंतर अंडरआर्म गोलंदाजी बेकायदा ठरवण्यात आली.**१९७९:१५ वर्षे विजनवासात काढल्यानंतर ईराणचे आयातुल्ला खोमेनी तेहरानला परतले.**१९६४:प्र.बा.गजेन्द्रगडकर यांनी भारताचे ७ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.**१९५६:सुधी रंजन दास यांनी भारताचे ५ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.**१९४६:नऊ शतकांची राजसत्ता बरखास्त करुन प्रजासत्ताक बनण्यास हंगेरीच्या संसदेने मान्यता दिली.**१९४१:डॉ.के.बी.लेले यांनी ’गुरुकिल्ली’ हे जादुविद्येला वाहिलेले मराठी भाषेतील पहिले नियतकालिक सुरू केले.**१८९३:थॉमस एडिसनने पहिल्या चलचित्रपटाची निर्मिती पूर्ण केली.**१८८४:’ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरी’ची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली.**१८३५:मॉरिशसमधे गुलामगिरी प्रथेचा अंत* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९२:विकी पांडुरंग कांबळे-- कवी**१९८१:प्रमोद अंबडकर-- कवी,गीतकार**१९७५:डॉ.प्रिया प्रवीण मदनकर (धांडे)-- कवयित्री* *१९७४:इंदिरा गोविंदराव चापले-भोयर-- कवयित्री**१९७२:यशवंत गोविंदा निकवाडे -- कवी, लेखक* *१९७२:भगवान मार्तंड पाटील-- कवी**१९७१:अजय जडेजा – प्रसिद्ध क्रिकेटपटू, अभिनेते**१९६०:सुरेश प्रल्हाद साबळे-- लेखक, समीक्षक,व्याख्याते,कवी**१९६०:जॅकी श्रॉफ – प्रसिद्ध अभिनेता**१९५९:रामदास लक्ष्मण राजेगावकर - बालकवी,लेखक,समीक्षक* *१९४५:मधुकर रामदास गजभिये-- कवी**१९४५:प्राचार्य रमेश भारदे-- लेखक* *१९४४:अरुण चिंतामण टिकेकर -- लोकसत्ता या दैनिक वृत्तपत्राचे ११ वर्षे संपादक,लेखक अनुवादक (मृत्यू:१९ जानेवारी २०१६)**१९४३:मधुकर पांडुरंग खरे-- लेखक**१९३१:बोरिस येलत्सिन – रशियन फेडरेशनचे पहिले अध्यक्ष (मृत्यू:२३ एप्रिल २००७)**१९३१:पांडुरंग पिलाजी धरत-- लेखक* *१९३१:शशिकांत दत्तात्रय कोनकर-- लेखक**१९२९:जयंत साळगावकर –ज्योतिर्भास्कर, लेखक व उद्योजक (मृत्यू:२० ऑगस्ट २०१३)**१९२७:मधुकर दत्तात्रय तथा म.द. हातकणंगलेकर – ज्येष्ठ समीक्षक आणि सांगली (२००८) येथील ८१ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष (मृत्यू:२६ जानेवारी २०१५)**१९२७:प्रा.बन्सीलाल लुकडू सोनार-- लेखक* *१९१७:ए.के.हंगल– चित्रपट अभिनेते व स्वातंत्र्यसैनिक (मृत्यू:२६ ऑगस्ट २०१२)**१९१२:राजा बढे – संपादक,चित्रपट अभिनेते,लेखक,गायक,कवी आणि गीतकार (मृत्यू:७ एप्रिल १९७७)**१९०४:बाबुराव रामचंद्र घोलप --शिक्षणतज्ज्ञ (मृत्यु:२६ मे १९८२)**१९०१:क्लार्क गेबल – अमेरिकन अभिनेता (मृत्यू:१६ नोव्हेंबर १९६०)**१८८४:सिद्धेश्वरशास्त्री विष्णू चित्राव – महामहोपाध्याय,वैदिक साहित्याचे अभ्यासक व मराठी कोशकार (मृत्यू:६ जानेवारी १९८४)**१८६४:जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर – अमेरिकन वनस्पतीतज्ञ,शिक्षणतज्ञ,संशोधक आणि शास्त्रज्ञ (मृत्यू:५ जानेवारी १९४३)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१२:अनिल मोहिले – संगीतकार व संगीत संयोजक* *२००३:कल्पना चावला – भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर (जन्म:१ जुलै १९६१)**१९९५:मोतीराम गजानन तथा मो.ग. रांगणेकर – नाटककार,चित्रपट दिग्दर्शक व पत्रकार (मृत्यू:१० एप्रिल १९०७)**१९७६:वेर्नर हायसेनबर्ग – ’क्‍वांटम मॅकॅनिक्स’मधील मूलभूत संशोधनासाठी नोबेल पारितोषिक मिळवणारे (१९३२) जर्मन भौतिकशास्त्रज्ञ (जन्म:५ डिसेंबर १९०१)**१९६४:नारायण पैकाजी पंडित(बाबाजी महाराज)-- प्रवचनकार,ग्रंथकार(जन्म:१२ जानेवारी १८८६)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*शिक्षण म्हणजे विचार करण्याची कला*मुलांनो, तुम्ही शाळेत कशासाठी जाता ? असा प्रश्न जर कोणी विचारला असता, मुले उत्तर देतात की,  शिकण्यासाठी तर कोणी म्हणतो की ज्ञान मिळवण्यासाठी. मग शिक्षण किंवा ज्ञान आपणाला फक्त शाळेतूनच मिळते काय ? प्रसिद्ध विचारवंत टी. एडवर्ड यांच्या मतानुसार, शिक्षण म्हणजे जन्मापासून मरेपर्यंत सर्व वातावरणाचा परिणाम, सर्व प्रकारचे शिक्षण, शिस्त आणि संस्कृतीची बेरीज. म्हणूनच आपण आजीवन विद्यार्थी म्हणून जगत असतो. शाळेतून फक्त आपणाला अक्षरज्ञान आणि संख्याज्ञान मिळते, तर समाजात वावरताना जे अनुभवाचे ज्ञान मिळते त्यावर आपण यशस्वी जीवन जगू शकतो. म्हणूनच आचार्य विनोबा भावे म्हणतात की.............. पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घराण्यातून देण्यात येणारा पहिला मानाचा "शिवसन्मान पुरस्कार" भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घोषित, साताऱ्यातील सैनिक स्कूलच्या भव्य मैदानावर १९ फेब्रुवारी २०२४ रोजी शिवजयंती दिनी गौरवपूर्ण प्रदान करण्यात येणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *हेमंत सोरेन यांचा राजीनामा, चंपाई सोरेन होणार झारखंडचे नवे मुख्यमंत्री*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *नॅशनल स्कूल ऑफ ड्रामातर्फे ‘25 वा भारत रंग महोत्सव’:1 ते 21 फेब्रुवारी दरम्यान होणार पुण्यात; NSDचे संचालक चित्तरंजन त्रिपाठींची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *शिंदे-फडणवीस सरकारचा निर्णय:राज्यातील 17 IAS अधिकाऱ्यांच्या तर CP, DCP, SPसह 42 पोलिस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *खा. सुप्रिया सुळेंची सरकारकडे मागणी:टंचाईचा आढावा घेऊन बारामती लोकसभा मतदार संघात चारा छावण्या, पाण्याचे टँकर सुरू करा*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *पोलिसांच्या 100 टक्के जागा भरण्यास अर्थ विभागाने दिली मंजुरी, राज्यात तब्बल 17 हजार 471 पोलिसांची भरती होणार, सरकारचा मोठा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण सहाव्यांदा संसदेत उभ्या राहून १ फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*अंतराळवीर कल्पना चावला*• काही लोक निधनांनतरही आपल्या आठवणीत सदैव जिवंत राहतात. अंतराळवीर कल्पना चावला यांचा शेवटचा अंतराळ प्रवास अनेकांच्या मनात कोरला आहे.• 17 मार्च 1962 रोजी जन्मलेली कल्पना चावला यांचं बालपण हरियाणाच्या कर्नालमध्ये गेलं. त्या अंतराळात भरारी घेणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या.• 1976 साली कर्नाल टागोर स्कूलमधून त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केलं. तर 1982 साली पंजाब इंजिनीअरिंग कॉलेजमधून वैमानिक इंजिनीअरिंग (Aeronautical Engineering) मध्ये पदवी घेतली. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी त्या अमेरिकेला गेल्या.• 1984 मध्ये टेक्सास युनिव्हर्सिटीतून वैमानिक इंजिनीअरिंगमध्ये त्यांनी मास्टर्स पूर्ण केलं.• अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था The National Aeronautics and Space Administration (NASA) इथं कल्पना यांनी 1988 पासून फ्ल्युड डायनॅमिक्समध्ये संशोधनाला सुरुवात केली.• नासामध्ये काम केल्यानंतर ओवरसेट मेथड्स कंपनीत उपप्रमुख म्हणून रुजू झाल्या. त्याठिकाणी त्यांनी एरोडायनॅमिक्समध्ये महत्त्वपूर्ण संशोधन केलं. त्यांचे रिसर्च पेपर अनेकदा चर्चेत राहिले.• नासाने 1994 साली संभाव्य अतंराळवीराच्या यादीत कल्पना यांचा समावेश केला. मार्च 1995 साली अंतराळ क्षेत्राचा विशेष अभ्यास करण्यासाठी नासाच्या जॉनसन एरोनॉटिक्स सेंटरमध्ये प्रशिक्षण चालू केलं.• त्या दरम्यान त्यांना अंतराळवीरांच्या 15 व्या फळीत ठेवण्यात आलं. तसंच एका वर्षाच्या प्रशिक्षणानंतर अंतराळयानाच्या नियंत्रण कक्षाच्या देखभालीचं काम देण्यात आलं.• नोव्हेंबर 1996 मध्ये नासानं एक घोषणा केली. त्यामध्ये ATS-87 मिशनच्या संशोधनाची जबाबदारी कल्पना याच्याकडं सोपवण्यात आली.• शेवटी तो दिवस उजाडला. 19 नोव्हेंबर 1997. त्यादिवशी हरियाणाच्या मुलीनं अंतराळात झेप घेतली. त्यावेळी त्यांनी 376 तास आणि 34 मिनिटं अंतराळात घालवली.• एका महत्त्वपूर्ण योजनेचं नेतृत्व करणाऱ्या कल्पना आणि त्यांच्या टीमने पृथ्वीला 252 फेऱ्या मारल्या म्हणजे त्यांनी 1 कोटी 46 हजार किमीहून अधिक प्रवास केला.*कल्पना यांचा शेवटचा प्रवास*• नासाने जेव्हा एक महत्त्वपूर्ण योजना आखली तेव्हा अनुभवी अंतराळवीर कल्पना चावला 7 सदस्यांच्या टीममध्ये महत्त्वाची जबाबदारीही त्याच्याकडं देण्यात आली.• जानेवारी 2003 च्या 16 दिवसांच्या मिशनमध्ये त्यांची विशेषतज्ज्ञ म्हणून नेमणूक केली. अंतराळात केले जाणारे प्रयोग हे कल्पना यांच्या नियंत्रणाखाली करण्यात आले होते.• 1 फेब्रुवारी 2003 ला कोलंबिया अंतराळयानाने पृथ्वीकडं येण्यासाठी अमेरिकेजवळच्या पॅसिफिक समुद्राकडं झेप घेतली. अंतराळवीरांनी स्पेस सुट घातला. त्यावेळी सर्व योग्यरीत्या सुरू होतं.• त्यावेळी स्थानिक वेळेनुसार सकाळच्या 8.40 वाजता कोलंबिया यानानं पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केला. अंतराळवीर आणि नासातल्या अंतराळयान नियंत्रण कक्षातले सगळेजण आनंदी होते.• 22 मिनिटांत ते यान पृथ्वीवर उतरणार होतं. सुमारे 8.54 वाजता यानाचा आणि नियंत्रण कक्षाचा संपर्क तुटायला सुरुवात झाली. 9.16 वाजता काही गोष्टी स्पष्ट व्हायला लागल्या आणि कोलंबिया यान इतिहासात जमा झालं.• तेव्हा कोलंबिया स्पेस शटलचा अपघात झाला आणि त्यातच सगळ्या अंतराळवीरांचं निधन झालं.।। विनम्र अभिवादन ।।संकलन••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*" उत्पतीशिवाय स्थिती नाही, स्थितीशिवाय लय नाही, लयावाचून पुनःउत्पती नाही. "**संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) भारतात सध्या किती व्याघ्र प्रकल्प आहेत ?२) संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम ( UNEP ) चे मुख्यालय कोठे आहे ?३) 'विक्टर सिटी' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?४) राष्ट्रीय पर्यटन दिवस केव्हा साजरा केला जातो ?५) ऑस्ट्रेलियन महिला ओपन टेनिस स्पर्धा २०२३ चे जेतेपद कोणी पटकावले ?*उत्तरे :-* १) ५३ २) नैरोबी, केनिया ३) सलमान रश्दी ४) २५ जानेवारी ५) आर्यना सबालेंका, बेलारूस *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 शेख एम. बी. केंद्रप्रमुख👤 नारायण गायकवाड👤 शिवानंद सूर्यवंशी👤 कवी गजानन काळे👤 अतुल भुसारे👤 शिवम पडोळे👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••नव्हे चेटकी चाळकू द्रव्यभोंदु। नव्हे निंदकू मत्सरू भक्तिमंदू॥ नव्हे उन्मतू वेसनी संगबाधू। जनी ज्ञानिया तोचि साधु अगाधू॥१८१॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *आजचा विचाधारा......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••नदीतील पाण्याच्या धारेला कितीही अडवण्याचा प्रयत्न जरी केले तरी त्या,धारेला आधार देण्यासाठी एखादा झरा आपोआप तयार होत असतो. कारण त्याला, त्याची महती कळत असते.तसंच सत्याच्या वाटेवर चालणाऱ्याच्या वाटेत टोकदार काटे पेरणारे कितीही असले तरी चालणाऱ्याला साथ देण्यासाठी त्या निर्मळ झऱ्याप्रमाणे एखादी व्यक्तीची साथ मिळत असते. म्हणून कोणालाही अडविण्याचा प्रयत्न करू नये. कारण वेळ एक, एक सेकंदाला बदलत असते. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*सम्राट आणि साधू*एक सम्राट रात्रीच्‍या वेळी राजधानीत फेरफटका मारीत असे आणि काय चालले आहे याचा आढावा घेत असे. फेरफटका मारत असताना सम्राटाला एक साधू जागा असलेला दिसायचा. त्‍याच्‍या कुटीत पाण्‍याचे मडके आणि दोन कपडयाशिवाय काहीच नव्‍हते तरी तो ‘’जागे रहा, झोपू नका, नाहीतर लुटले जाल’’ असा जोरजोरात आवाज देत असायचा. सम्राटाला वाटले हा साधू वेडा आहे मात्र त्‍याच्‍याशी एकदा बोलायला हवे. सम्राटाने एके दिवशी त्‍याला विचारले,’’तुमच्‍याकडे धनदौलत, गाडीघोडा, संपत्‍ती वगैरे काहीही नसतानासुद्धा तुम्‍ही इतके का जागता आणि सावधान राहता,’’ साधू म्‍हणाला,’’ राजा, आपण आपल्‍या महालात जो कचरा जमा केला आहे की, तो जर लुटला गेला तर काही फरक पडणार नाही, कारण आपण तो परत मिळवू शकता, परंतु या माझ्याकडे जे धन आहे ते लुटले गेले तर ते परत मिळणार नाही.त्‍यामुळे मी सदैव सावध राहतो.’’ राजा म्‍हणाला,’’ माझ्याकडे असलेल्‍या हत्ती घोडे, हिरे दागिने, सोने चांदी याला तुम्‍ही कचरा समजत आहात’’ साधूने उत्तर दिले,’’ ज्‍याला आपण अमूल्‍य समजत आहात ते धन, संपत्ती, हत्तीघोडे, राजवाडा कोणीही तुमच्‍याकडून हिसकावून घेऊ शकते पण माझी संपत्ती ही ईश्र्वरदत्त आहे. त्‍यामुळे मी स्‍वतला सावधान करतो, माझ्या मनात मोह, लोभ, मद, मत्‍सर, क्रोध, वासना, भय, अहंकार यांचा प्रवेश होऊ नये, अर्थात माझे मन हे ईश्‍वराने दिल्‍याप्रमाणे, लहान बालकाप्रमाणे कोरे असावे. या मानवी दुर्गुणांचा स्‍पर्श जर माझ्या मनाला झाला तर माझे कर्म बिघडेल आणि माझ्याकडून पाप घडेल. म्‍हणून मी रात्री स्‍वतलाच सांगत असतो नव्‍हे माझ्या आत्‍म्याला सांगत असतो झोपू नको, तू झोपलास तर हे विषय तुझ्यावर आक्रमण करतील व तुला गिळंकृत करतील.’’ साधुचे ते विचार ऐकून राजा त्‍याचे चरणी लीन झाला व साधुला गुरुस्‍थान दिले.*तात्पर्य :- मोह, लोभ, मद, मत्‍सर, क्रोध, वासना, भय, अहंकार यांची संगत न घेता जर जीवन जगण्‍याचा प्रयत्‍न केला तर जीवन सुखकर होते. वाईटापासून आपले संरक्षण होते.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 31 जानेवारी 2024💠 वार - बुधवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://nasayeotikar.blogspot.com/2024/01/ashok-saraf.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_ या वर्षातील ३१वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *१९५०:राष्ट्रपती म्हणून डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी संसदेपुढे पहिले भाषण केले.यापूर्वी ते घटना समितीचे अध्यक्ष होते.**१९५०:अमेरिकन राष्ट्राध्यक्ष हॅरी एस. ट्रूमन यांनी हायड्रोजन बॉम्ब बनवण्याच्या योजनेस मान्यता दिली.**१९४९:बडोदा व कोल्हापूर ही संस्थाने (तत्कालीन) मुंबई राज्यात विलीन झाली.**१९४५:युद्धातुन पळ काढल्याबद्दल एडी स्लोव्हिक या सैनिकाला अमेरिकेने मृत्यूदंड दिला.* *१९२९:सोविएत रशियाने लिऑन ट्रॉटस्की याला हद्दपार केले.**१९२०:डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ’मूकनायक’ या पाक्षिकाची सुरूवात**१९११:स्वातंत्र्यवीर सावरकर यांना दुसर्‍या जन्मठेपेची शिक्षा झाली.तत्कालीन ब्रिटिश साम्राज्यात दोनदा जन्मठेपेची शिक्षा झालेले ते एकमेव आहेत.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८३:सतीश जनाराव अहिरे-- कवी, गझलकार* *१९७५:प्रीती झिंटा – चित्रपट अभिनेत्री व उद्योजिका**१९६५:प्रा.डॉ.संजय निळकंठ पाटील-- लेखक**१९५८:प्रा.डॉ.शंकर चव्हाण -- लेखक, संपादक* *१९५२:डॉ.रमेश नारायण वरखेडे -- जेष्ठ समीक्षक,संशोधक संपादक* *१९५२:डॉ.सतीश शास्त्री -- लेखक (मृत्यू:२६ जानेवारी २०२३)**१९५०:लीना मेहेंदळे--भारतीय प्रशासन सेवेतील पूर्व सनदी अधिकारी आणि प्रसिद्ध लेखिका**१९४८:राजा सखाराम जाधव-- समीक्षक, दलित साहित्याचे अभ्यासक(मृत्यू:१९ डिसेंबर २००८)**१९३१:गंगाधर महांबरे – गीतकार कवी व लेखक (मृत्यू:२३ डिसेंबर २००८)**१९२१:प्रा.डॉ.गंगाधर विठ्ठल कुलकर्णी-- कवी,लेखक**१९१५:हरिश्चंद्र त्र्यंबक देसाई-- चरित्र लेखक* *१८९६:दत्तात्रय रामचंद्र बेन्द्रे तथा ’अंबिकातनयदत्त’ – कन्नड कवी,पद्मश्री (१९६८),त्यांच्या ’नाकु तंती’ या काव्यसंग्रहास १९७३ मधे ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. (मृत्यू:२१ आक्टोबर १९८१)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२१:इलाही जमादार-- सुप्रसिद्ध गझलकार आणि महाकवी(जन्म:१ मार्च १९४६)**२००४:व्ही.जी.जोग – व्हायोलिनवादक (जन्म:२२ फेब्रुवारी १९२२)**२००४:सुरैय्या जमाल शेख ऊर्फ ’सुरैय्या – गायिका व अभिनेत्री (जन्म:१५ जून १९२९)**२०००:वसंत कानेटकर – नाटककार (जन्म:२० मार्च १९२०)**२०००:कृष्ण नारायण तथा के.एन.सिंग – हिन्दी चित्रपटांतील गाजलेले खलनायक (जन्म:१ सप्टेंबर १९०८)**१९९५:सुरेश शंकर नाडकर्णी – बँकिंग तज्ञ, ’रोखे बाजार नियामक मंडळाचे’ (SEBI) चे अध्यक्ष,पद्मभूषण* *१९९४:वसंत जोगळेकर – मराठी व हिन्दी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक**१९९०:प्रा.श्रीनिवास रघुनाथ कावळे-- मराठी लेखक (जन्म:१३ सप्टेंबर,१९३०)**१९८६:विश्वनथ मोरे – संगीतकार* *१९७२:महेन्द्र – नेपाळचे राजे* *१९६९:अवतार मेहेरबाबा – आध्यात्मिक, मौनव्रती संत (जन्म:२५ फेब्रुवारी १८९४)**१९५४:ई.एच.आर्मस्ट्राँग – एफ.एम. रेडिओचे संशोधक (जन्म:१८ डिसेंबर १८९०)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*चेहऱ्यावरील हावभावाने विनोद निर्माण करणारा अभिनेता - अशोक सराफ*अशोक सराफ हे मराठी चित्रपटसृष्टीतील गुणी आणि दमदार अभिनेता म्हणून अवघ्या हिंदुस्थानाला परिचीत आहे. मराठी चित्रपटसृष्टी बरोबरच हिंदी चित्रपटसृष्टीतही त्यांनी आपले वेगळे अस्तित्व निर्माण केले आहे. अशोक सराफ यांना चार फिल्मफेअर मराठी पुरस्कारांसह अनेक पुरस्कार मिळाले आहेत. अशोक सराफ यांना 2023 महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाल्यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांनी त्यांचे अभिनंदन केले............... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मराठी व हिंदी चित्रपटातील जेष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना 2023 महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *राज्यसभेसाठी भाजपकडून चाचपणी सुरू, विनोद तावडे, पंकजा मुंडे आणि विजया रहाटकर यांच्या नावाची चर्चा*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *अमेरिकेत मराठी शिक्षणाऱ्या मुलांना बालभारती पुरवणार पाठ्यपुस्तकं, शिक्षण विभागाचा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *यंदाचा 'प्राईड ऑफ बीएमसीसी' पुरस्कार:प्रसिद्ध गायिका सावनी शेंडे आणि प्रसिध्द उद्योगपती डॉ. विक्रम मेहता यांना जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *प्रा. जी. रघुराम, डॉ. राजेंद्र सिंह, कौशिकी चक्रवर्ती व डॉ. अशोक गाडगीळ यांना भारत अस्मिता राष्ट्रीय पुरस्कार जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *एप्रिलनंतर वीज दरवाढीचा शॉक ; घरगुती वीजदर वाढण्याची शक्यता, छोट्या घरगुती ग्राहकांवर मोठा भार*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारतीय नौदलाच्या INS सुमित्राचा समुद्रात भीमपराक्रम; 19 पाकिस्तानी नागरिकांसह, 17 इराणी नागरिकांची समुद्री चाचांच्या तावडीतून सुटका*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *आम्लपित्त*आम्लता ही नेहमी आढळणारी तक्रार आहे. ब-याच माणसांना कधीना कधी याचा अनुभव येतोच. पण काही जणांना आम्लतेचा नेहमी त्रास होतो. अशांना वैद्यकीय सल्ल्याची गरज असते. आम्लता किंवा आम्लपित्त म्हणजे जठरात प्रमाणापेक्षा जास्त आम्ल (आंबट द्रव) तयार होणे. या जादा आम्लामुळे पोटात जळजळ, तोंडात आंबट पाणी येणे, छातीत जळजळ अशा तक्रारी निर्माण होतात. कधीकधी जठरातले पदार्थ उलटीवाटे बाहेर पडतात.खालील कारणांनी आम्लता येऊ शकते. - • नेहमी जास्त तिखट, मसालेदार, तेलकट पदार्थ खाणे. • मानसिक ताण, काळजी, सदैव घाई-गडबड. • अनियमित जेवणाची सवय आणि जागरण • धूम्रपान, तंबाखूसेवन, दारूसेवन, इत्यादी. • काही औषधांमुळे आम्लता होते. उदा. ऍस्पिरीन, सांधेदुखीची औषधे. • हेलिकोबॅक्टर नावाच्या एका जिवाणूंशी आम्लता आणि जठरव्रणाचा संबंध आढळला आहे. जठरव्रणापैकी साठसत्तर टक्के जठरव्रण हे या जिवाणूंमुळे होतात. (यासाठी डॉक्सी किंवा ऍमॉक्सिसिलीन हे औषध पाच दिवस देऊन पहावे.) • आम्लपित्तामुळे पुढे अल्सर (जठरव्रण) निर्माण होऊ शकतो. अल्सर असेल तर पोटात एका ठरावीक जागी दुखत राहते. जेवणामुळे हे दुखणे थांबते तरी किंवा वाढते तरी. आम्लपित्तावर उपचार करताना तो अल्सर नाही याच्याबद्दल खात्री करून घ्यावी.उपचार - • जेवणात नियमितता ठेवावी. • साधा आहार घ्यावा. • तेलकट, तिखट पदार्थ टाळावेत. • मानसिक ताण, काळजी, सदैव चिंता यांच्यावर नियंत्रण ठेवावे. (व्यायाम, विश्रांती, करमणूक वगैरेमुळे उपयोग होईल.) • आम्लविरोधी (ऍंटासिड) गोळया घेतल्यावर जळजळ कमी होते. • दुधामुळे काही जणांची आम्लता कमी होते तर काही जणांची वाढते.( इंटरनेटवर मिळालेली माहिती )••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सर्वोत्तम प्रयत्न केले की, यशाचा मार्ग मोकळा होतो.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) २०२४ च्या प्रजासत्ताक दिनानिमित्त महाराष्ट्राचा चित्ररथाची संकल्पना काय होती ?२) आयसीसी - २०२३ चा सर्वोत्कृष्ठ कसोटी क्रिकेटर कोण ठरला आहे ?३) आशिया खंडातील सर्वात मोठा देश कोणता ?४) घोड्यांना ठेवतात त्या जागेला काय म्हणतात ?५) बेळगावचा वाद हा कोणत्या दोन राज्यात आहे ? *उत्तरे :-* १) छत्रपती शिवाजी महाराज - लोकशाहीचे जनक २) उस्मान ख्वाजा, ऑस्ट्रेलिया ३) रशिया ४) तबेला किंवा पागा ५) महाराष्ट्र व कर्नाटक*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 विनायक हिरवे, सहशिक्षक, कोल्हापूर👤 राजेश्वर रामपुरे, धर्माबाद👤 जयेश पुलकंठवार, धर्माबाद*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जया मानला देव तो पुजिताहे। परी देव शोधुनि कोणी न पाहे॥ जगी पाहता देव कोट्यानुकोटी। जया मानली भक्ति जे तेचि मोठी॥१७८॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• या जगात कोणताही जीव जन्माला आला की,त्याचा जीवनप्रवास ख-या अर्थाने सुरू होतो.त्याला त्याचे जीवन कसे जगायचे यासाठी परमेश्वराने त्यांच्यासोबत मन आणि बुद्धी ह्या दोन महत्त्वाच्या गोष्टी त्याला म्हणजे विशेष करुन मानवाला आयुष्याच्या शेवटपर्यंत पुरेल अशी भेट म्हणून बहाल केली आहे. ह्याचा आधार घेऊनच जीवन कसे जगायचे याचे तंत्र तो शिकतो.त्यानंतर तो आपल्या मनाचा आणि बुध्दीचा चांगला सदुपयोग केला तर नक्कीच जीवनाचा प्रवास सुखावह करतो आणि जर का दुरुपयोग करायला लागला तर जीवनप्रवास दु:खमय व्हायला लागतो.ह्या दोन गोष्टी मन आणि बुद्धी यावरच अवलंबून आहेत.मग मानवरुपी जीवाने आपले जीवन कसे जगायचे आणि आपले जीवन जगण्यासोबत इतर जीवांना आपण न दुखवता कसे जगवायचे हे जरी कौशल्य मनाच्या आणि बुध्दीच्या सृजनशील कौशल्याने हाताळायला आले तरी परमेश्वराने दिलेल्या जन्माचे नक्कीच सार्थक झाल्याचे समाधान वाटेल.हा जन्म परत येणार नाही हे तर संत्र्याच्या आहेच.यानंतर आपले शरीररुपी अस्तित्व संपणार आहे पण आपण आपल्या जीवनात केलेले चांगले कार्य येणा-या जीवांच्या जीवनासाठी प्रेरणा ठेवून जाणार आहे अर्थात तुम्ही तुमच्या कार्याने अमर राहणार आहेत हे लक्षात असू द्यावे.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *समयसुचकता*एकदा अरण्याचा राजा सिंह याने आपल्या प्रजाजनांना दरबारात हजर राहण्याचा हुकूम सोडला. त्याप्रमाणे बहुतेक प्राणी सिंहाच्या दरबारी आले. अस्वलाला सिंहाच्या स्वयंपाक घरातून येणारा वास सहन न झाल्याने त्याने आपले नाक दाबून धरले. हा त्याचा उद्धटपणा पाहून सिंह रागावला व त्याने आपल्या पंजाच्या एका तडाख्यात अस्वलाला मारले. हा भयंकर प्रकार पाहून माकड भितीने थरथर कापू लागले. मग काहीतरी बोलायचे म्हणून ते सिंहास म्हणाले, 'राजेसरकारांच्या स्वयंपाक घरातून येणारा सुवास निरनिराळ्या उंची मसाल्याचा आहे. तो त्या मूर्ख अस्वलाला सहन झाला नाही. हे त्याचं दुर्दैव होय. राजे सरकारांचे पंजे तर फारच सुंदर आहेत, तसे इतर कोणाचेही नसतील.' माकडाचे हे बोलणे ऐकून सिंहाचे समाधान तर झाले नाहीच पण तो इतका चिडला की, एका क्षणात त्याने त्या माकडाच्या चिंधड्या उडविल्या. नंतर तो कोल्ह्याकडे वळून त्याला म्हणाला, 'कसे काय कोल्हेदादा ? माझ्या स्वयंपाकघरातून येणारा वास कशाचा असावा असं तुला वाटतं ?' त्यावर तो कोल्हा धूर्तपणे म्हणाला, 'महाराजाधिराज, नुसत्या वासावरून तो वास कशाचा आहे हे सांगता येण्याइतकं माझं नाक आधीच तीक्ष्ण नाही त्यातून मला आज पडसं झालेलं असल्यामुळे आपल्या घरातून येणार्‍या वासासंबंधाने अभिप्राय देण्याचं धाडस मी करत नाही.'तात्पर्य :- प्रसंगावधान व समयसूचकता या गुणांच्या बळावर माणुस वाटेल तसल्या संकटातून मुक्त होऊ शकतो.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 30 जानेवारी 2024💠 वार - मंगळवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://nasayeotikar.blogspot.com/2022/09/mahatma-gandhi.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_हुतात्मा दिन_**_कुष्ठरोग निवारण दिन_*••••••••••••••••••••••••••••••••*_ या वर्षातील ३०वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *१९९९:पण्डित रविशंकर यांना ’भारतरत्‍न’**१९९७:महात्मा गांधीच्या अस्थींचे त्यांचे पणतू तुषार अरूण गांधी यांनी अलाहाबाद येथील संगमात विसर्जन केले. ४७ वर्षे या अस्थी कटकमधील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या लॉकरमध्ये होत्या.**१९९४:पीटर लेंको बुद्धिबळातील सर्वात लहान वयाचा ग्रँडमास्टर झाला.**१९३३:अ‍ॅडॉल्फ हिटलरचा जर्मनीचा राष्ट्राध्यक्ष (चॅन्सेलर) म्हणून शपथविधी झाला.**१६४९:इंग्लंडचा राजा पहिला चार्ल्स याचा शिरच्छेद करण्यात आला.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९६९:प्रदीप मनोहर पाटील-- लेखक,कवी**१९५९:निर्मिती सावंत-- मराठी अभिनेत्री* *१९५३:सुधीर कोर्टीकर-- नाणे संग्रहाक,छायाचित्रकार,कवी,लेखक**१९५१:जयंत गुणे-- लेखक,अनुवादक**१९४९:डॉ.सतीश आळेकर – नाटककार, दिग्दर्शक आणि निर्माते**१९४८:स्मिता राजवाडे--कादंबरी,कथा, ललित,काव्यसंग्रह,अनुवादित कवितासंग्रह, बालसाहित्य,नाटक अशी त्यांची १७ पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत.(मृत्यू:१८जानेवारी २०२२)**१९४५:सदानंद हरी डबीर -- कवी,गीतकार, गझलकार**१९४३:भगवान माधवराव परसवाळे-- कवी**१९३६:पं.दिनकर पणशीकर जयपूर अत्रोली घराण्याचे ज्येष्ठ शास्त्रीय गायक(मृत्यू:३ नोव्हेंबर २०२०)**१९३३:शांताराम राजेश्वर पोटदुखे-- पत्रकार,माजी खासदार,माजी केंद्रीय राज्यमंत्री तथा लेखक (मृत्यू:२३ सप्टेंबर २०१८)**१९३०:सुनिता भास्कर देवधर-- लेखिका* *१९२९:रमेश देव – हिंदी,मराठी चित्रपटांतील व रंगभूमीवरील प्रसिद्ध अभिनेते,निर्माते व दिग्दर्शक(मृत्यू:२ फेब्रुवारी, २०२२)**१९२७:प्राचार्य मोतीचंद्र गुलाबचंद शहा-- लेखक**१९२७:ओलोफ पाल्मे – स्वीडनचे २६ वे पंतप्रधान (मृत्यू:२८ फेब्रुवारी १९८६)**१९१७:वामन दत्तात्रय पटवर्धन – स्फोटके व शस्त्रास्त्र तज्ञ (मृत्यू:२७ जुलै २००७)**१९११:पं.गजाननबुवा जोशी – शास्त्रीय गायक (मृत्यू:२८ जून १९८७)**१९१०:सी.सुब्रम्हण्यम – गांधीवादी नेते, केन्द्रीय मंत्री व महाराष्ट्राचे राज्यपाल (मृत्यू:७ नोव्हेंबर २०००)**१८९५:शंकरराव दत्तात्रय देव-- विचारवंत, लेखक (मृत्यू:३० डिसेंबर १९७५)**१८९१:गोपाळ रामचंद्र परांजपे-- विज्ञान लेखक (मृत्यू:६ मार्च १९८१)**१८८२:फ्रँकलिन डी. रुझव्हेल्ट – अमेरिकेचे ३२ वे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू:१२ एप्रिल १९४५)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२३:नंदू घाणेकर -- ज्येष्ठ संगीतकार व फिल्म मेकर (जन्म:४ नोव्हेंबर १९५८)**२०२०:विद्या बाळ-- मराठी स्त्रीवादी लेखिका/संपादिका (जन्म:१२ जानेवारी १९३७)**२००१:वसंत शंकर कानेटकर --- लोकप्रिय मराठी नाटककार,लेखक,कादंबरीकार आणि विचारवंत.(जन्म:२० मार्च १९२२ )**२०००:आचार्य जनार्दन हरी चिंचाळकर – मानववंशशास्त्रज्ञ व सामाजिक कार्यकर्ते* *१९९६:गोविंदराव पटवर्धन – हार्मोनियम व ऑर्गन वादक**१९४८:काशीबाई कानिटकर-- मराठी भाषेतील लेखिका व स्त्रीवादी समाजसुधारक होत्या.मराठी समाजात व स्थूलमानाने भारतीय समाजात स्त्रियांवर होणार्‍या अन्यायाविषयी त्यांनी आपल्या साहित्याद्वारे आवाज उठवला (जन्म:२० जानेवारी १८६१)**_१९४८:मोहनदास करमचंद गांधी- ’महात्मा’गांधी - राष्ट्रपिता (जन्म:२ आक्टोबर १८६९)_**१९४८:ऑर्व्हिल राईट – आपला भाऊ विल्बर राईट याच्यासह इंजिनाच्या विमानाचा शोध लावणारे अमेरिकन अभियंते (जन्म:१९ ऑगस्ट १८७१)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता - महात्मा गांधी*महात्मा गांधी हे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामतील प्रमुख नेते आणि तत्वज्ञ होते. त्यांनी देशहितासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढा दिला. स्वातंत्र्य चळवळीतील ते असे नेते होते ज्यांनी अहिंसेचा मार्ग अवलंबून ब्रिटीश राज्यकर्त्यांना सळो की पळो करून सोडले होते. महात्मा गांधींना राष्ट्रपिता म्हणूनही संबोधले जाते. ............ पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *राज्यसभेच्या 56 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर : 27 फेब्रुवारी रोजी होणार मतदान, निवडणूक आयोगाची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *परीक्षा पे चर्चा - विद्यार्थ्यांच्या समस्या, स्पर्धेची भावना, पालकांच्या चिंता, वेळेचे व्यवस्थापन अशा अनेक विषयांवर पंतप्रधान मोदींनी 2 तास चर्चा केली*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *महाराष्ट्रात गुंतवणुकीचा निप्पॉन स्टील सोबत सामंजस्य करार:40 हजार कोटींची गुंतवणूक; 20 हजार रोजगार निर्मिती - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मत्स्यव्यवसायात विदर्भातून 50 हजार कोटींची निर्यात शक्य:केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची माहिती; तलावाची स्वच्छता करण्याचे आवाहन*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मराठा व खुला प्रवर्ग सर्व्हेक्षणाचा विभागस्तरीय आढावा : 31 जानेवारीपर्यंत सर्व्हेक्षण पूर्ण करा; मागास आयोगाचे सदस्य डॉ. गजाजन खराटे*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *69 वा फिल्मफेअर पुरस्कार सोहळा : रणबीर कपूरला 'ॲनिमल'साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार तर 12th फेल सर्वोत्कृष्ट चित्रपट*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *दुसऱ्या टेस्टआधी भारताल दोन धक्के : जडेजा व राहुल दुखापतीमुळे बाहेर, सरफराज आणि सौरभ कुमारला संधी*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••✨ *तारे का लुकलुकतात ?* ✨ """""""""""""""""""""""""""""""""""""""""'ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार' यासारख्या बालगीतांमधून आपल्याला लहानपणापासूनच तारे लुकलुकतात, हे मनावर बिंबवलं जातं. 'टिमटिम करते तारे' सारख्या गीतांमधून हा समाज बळावतोच. तरीही तारे का लुकलुकतात, या सवालाचं मोहोळ घोंगावतच राहतं. तारे स्वयंप्रकाशित असतात. म्हणजे त्यांच्या अंतरंगात धडधडत असणाऱ्या अणुभट्ट्यांमधून जी ऊर्जा बाहेर पडते ती प्रकाशलहरींच्या रूपात उत्सर्जित केली जाते. या प्रकाशाचे किरण अनंत अवकाशातून प्रवास करताना बहुतांश निर्वात पोकळीतून जात असतात. ते जेव्हा आपल्यापर्यंत पोहोचतात तेव्हा त्यांना आपल्या या धरतीच्या सभोवती असलेल्या वातावरणातून प्रवास करावा लागतो. वातावरण ज्यांचं बनलेलं आहे त्या वायूंच्या ढगांमधून त्यांना पार पडावं लागतं. हे वायूचे ढग स्थिर नसतात. ते सतत हलत असतात. आकाशात जेव्हा आपण ढग पाहतो तेव्हा ते एका जागी स्थिर तर नसतातच; पण त्यांचे आकारही सतत बदलत असताना आपल्याला दिसतात. याचाच अर्थ वायु स्थिर नसतात. ते सतत हलत असतात. हवाही अशीच सतत हलत असते. त्यांच्यामधून जेव्हा ते किरण पार होतात तेव्हा मग ते किरणच स्थिर नसून सतत हलत असल्यासारखं वाटत राहतं. त्यामुळे तारे लुकलुकत असल्यासारखं वाटतं. वास्तविक हलत असते ती हवा.असं जर आहे तर मग मंगळ, शुक्र, गुरू यांसारख्या ग्रहांवरून परावर्तीत होणारा प्रकाशही त्याच वातावरणातून प्रवास करून आपल्यापर्यंत पोहोचत असतो. त्यापायी मग ते ग्रहही लुकलुकत असलेले दिसावयास हवे; पण तसं होत नाही. एवढंच कशाला पण जो आपल्याला प्रकाश देतो आणि जो आपला जीवनदाता आहे तो सूर्यही एक ताराच आहे; पण त्याचा प्रकाश तर स्थिर असतो. तो लुकलुकताना दिसत नाही. तेव्हा मग तारेच लुकलुकतात आणि ते हलत्या हवेपायी होतं हे कितपत खरं आहे ? वास्तविक कोणताही ग्रह काय किंवा तारा काय हा बिंदूमात्र नसतो. त्याला विशिष्ट आकारमान असतं. व्याप्ती असते. त्यामुळं आपल्या नजरेत ते बिंबासारखे किंवा चकतीसारखे असतात. त्यांच्यापासून निघणारा प्रकाश झोतासारखा असतो, एकमेव किरणासारखा नसतो. त्यामुळे त्याने झोताचे सर्वच किरण हलत्या हवेतून जातांनाही एकसाथ हालत नाहीत. त्यामुळे तो झोत लुकलूकल्यासारखा वाटत नाही. सूर्यापासून निघणारा प्रकाशही असाच झोतस्वरूप असतो. त्यामुळे तो विशाल पसरतो, लुकलुकत नाही; पण तारे आपल्यापासून लक्षावधी, कोट्यवधी प्रकाशवर्ष अंतरावर असतात, त्यामुळे इतक्या दूरवरून य त्यांचं बिंब एखाद्या बिंदूसारखंच दिसतं. त्यांच्यापासून प्रत्यक्षात जरी प्रकाशझोत निघत नसेल असला तरी तो एखाद्या एकमेव किरणासारखाच वाटतो. क्षीणही झालेला असतो. त्यामुळे मग हलत्या हवेतून येताना तोही हलल्यासारखा होतो. तो तारा लुकलुकतो.*बाळ फोंडके यांच्या 'का ?' या पुस्तकातून**संकलन :- श्याम ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*" अहिंसा हे बलवानाचे शस्त्र आहे.- महात्मा गांधीजी "**संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) रेल्वेत प्रवास करतांना आईबरोबर बाळालाही सुखद झोप मिळावी यासाठी बनविलेले *'बेबी बर्थ'* कोणत्या शिक्षक दाम्पत्यानी बनविले आहे ?२) आपल्या राष्ट्रध्वजाचा आकार कोणता असतो ?३) आयसीसी - २०२३ चा सर्वोत्कृष्ठ एकदिवसीय क्रिकेटर कोण ठरला आहे ?४) निवडणूक आयुक्ताची नेमणूक कोण करतात ?५) दक्षिण अमेरिका खंडातील सर्वात मोठा देश कोणता ? *उत्तरे :-* १) नितिन देवरे व हर्षाली देवरे २) आयताकृती ३) विराट कोहली, भारत ४) राष्ट्रपती ५) ब्राझील *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 प्रा. बालाजी कोंपलवार, अध्यक्ष बाभळी बंधारा कृती समिती, धर्माबाद👤 राजेश पटकोटवार, धर्माबाद👤 सचिन रामदिनवार, शिक्षक, मुखेड👤 सौ. सारिका सब्बनवार, शिक्षिका व लेखिका, कुंडलवाडी👤 बालाजी पुलकंठवार, शिक्षक धर्माबाद👤 मगदूम अत्तार, सहशिक्षक, देगलूर👤 देवराज बायस👤 सुरज एडके👤 सतीश गणलोड👤 शिवकुमार माचेवार👤 अंकुश निरावार👤 रंजना भिसे, शिक्षिका, पालघर*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••गुरु पाहता पाहता लक्ष कोटी। बहूसाल मंत्रावळी शक्ति मोठी॥ मनी कामना चेटके धातमाता। जनी व्यर्थ रे तो नव्हे मुक्तिदाता॥१८०॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••वैरता निर्माण करण्यासाठी डोंगरावर जावे लागत नाही. जेव्हा आपले बोलणे स्पष्ट असते, परखड विचाराची पेरणी असते, कोणाचे गुलाम बनून त्यांच्या मताप्रमाणे वागणे नसते, समाजाच्या हितासाठी कार्य करण्याची आवड असते आणि सत्याची वाट असते तेव्हा पहिली वैरता वेळ प्रसंगी कुटुंबातूनही सुरूवात व्हायला जास्त वेळ लागत नाही व एकदा तिची सुरूवात झाली की, मग त्याचा प्रसार मोठ्या वेगाने होत असतो. शेवटी सर्वच संपून जाते. म्हणून असे अनर्थ टाळण्यासाठी आधी त्या व्यक्तीला वाचणे आवश्यक आहे. भलेही साथ जरी देता नाही आले तरी चालेल पण, वैरताचे भागिदार होऊ नये. कारण जाळतांनी सर्वचजण सोबतीला असतात पण,शेवटी एकट्यालाच जळावे लागते.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*अंगीकारलेली माणुसकीची वागणूक*एका सिंहाने एक हरिण मारले व त्यास तो फाडून खाणार इतक्यात त्या वाटेने एक चोर जात होता. तो चोर सिंहाला म्हणाला, 'अरे सिंहा, या हरणाचं अर्ध मांस तुझ व अर्ध माझं.' हे ऐकून सिंह त्यास म्हणाला, 'अरे, निगरगट्ट माणसा, तुझा इथे काहीही संबंध नसता, एकदम पुढे येऊन मी मारलेल्या हरणाचं अर्ध मांस तू मागतोस, या तुझ्या वागण्याबद्दल मी तुला शिक्षा करण्यापूर्वी तू इथून चालता हो, नाही तर फुकट मरशील.' हे ऐकून तो चोर भिऊन पळून गेला.इतक्यात दुसरा एक भला माणूस त्या वाटेने चालला असता सिंहाला पाहून त्याला टाळण्यासाठी दुसर्‍या वाटेने जाऊ लागला. ते पाहून सिंहाने त्याला आदराने हाक मारली व म्हणाला, 'अरे भल्या माणसा, भिऊ नकोस. तुझ्या चांगल्या वागण्यामुळे या हरणाच्या मांसाचा अर्धा भाग घेण्यास तू अगदी योग्य आहेस. ये आणि हा वाटा घेऊन जा.' सिंहाने दोन वाटे केले. एक त्यास देऊन दुसरा त्याने स्वतः खाल्ला व अरण्यात निघून गेला.*तात्पर्यः माणसाची एकनिष्ठता आणि प्रामाणिकपणाचे वागणे पाहून सभ्य व भिडस्त लोकांना इतरजण आपण होऊन मान देतात त्या दिलेल्या  मानाचा मान टिकवून ठेवणे हे आपल्या वागण्यावर असते.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या फ्रेश मॉर्निंग बुलेटिन विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 27 जानेवारी 2024💠 वार - शनिवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://nasayeotikar.blogspot.com/2017/06/blog-post_86.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_ या वर्षातील २७वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *१९७३:पॅरिसमध्ये झालेल्या एका करारान्वये ३१ वर्षे चालू असलेले ’व्हिएतनाम युद्ध’ संपुष्टात आले. अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्राला व्हिएतनामसमोर माघार घ्यावी लागली.**१९६७:महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाची स्थापना झाली. सद्ध्या ही संस्था ’बालभारती’ या नावाने ओळखली जाते.**१९४५:दुसरे महायुद्ध – रशियाच्या _’रेड आर्मी’_ने पोलंडमधील _’ऑस्विच’_ येथील छळछावणीतील बंदिवानांची मुक्तता केली.**१९४४:दुसरे महायुद्ध – ८७२ दिवस लेनिनग्राडला घातलेला वेढा जर्मन फौजांनी उठवला.**१८८८:वॉशिंग्टन डी. सी. येथे _'द नॅशनल जिऑग्रॉफिक सोसायटी'_ची स्थापना* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८१:अरविंद उन्हाळे-- गझलकार* *१९७६:श्रेयस तळपदे --हिंदी आणि मराठी चित्रपट अभिनेता,चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माता**१९६७:बॉबी देओल – हिन्दी चित्रपट कलाकार**१९६३:डॉ.उत्तम भगवान अंभोरे-- मराठी साहित्यातील प्रसिद्ध कवी,लेखक**१९६३:आरती अंकलीकर टिकेकर-- भारतीय शास्त्रीय गायिका* *१९५१:आनंद दिघे--धर्मवीर नावाने प्रसिद्ध हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते(मृत्यू:२६ ऑगस्ट २००१)**१९३४:मुकुंद विष्णू टेकाडे -- बालसाहित्यिक, लेखक* *१९२७:वसंत विठ्ठल गाडे (गाडे गुरुजी)-- संघटक,संस्थापक, [विनोबा विचार केंद्र नागपूर] (मृत्यु:२४ जुलै २०१४)**१९२६:जनरल अरुणकुमार वैद्य – भारताचे १३ वे लष्करप्रमुख (मृत्यू:१० ऑगस्ट १९८६)**१९२२:अजित खान ऊर्फ ’अजित’ – हिन्दी चित्रपटांतील चरित्र अभिनेते (मृत्यू:२२ आक्टोबर १९९८)**१९२०:स्नेहलता यशवंत किनरे-- कवयित्री* *१९०९:डॉ.सविता भीमराव आंबेडकर(माईसाहेब) -- सामाजिक कार्यकर्त्या,लेखिका (मृत्यू:२९ मे २००३)* *१९०९:श्याम नीळकंठ ओक-- चित्रपट समीक्षक,लेखक(मृत्यू:१० मार्च १९८२)**१९०५:राजाराम प्रल्हाद कानिटकर -- लेखक संपादक* *१९०१:लक्ष्मण बाळाजी तथा तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी – महाराष्ट्रातील प्रबोधन युगाचे एक प्रमुख उद्‍गाते,विचारवंत,संस्कृत पंडित,मराठी विश्वकोशाचे प्रधान संपादक आणि साहित्य संस्कृती मंडळाचे पहिले अध्यक्ष,१९२३ मध्ये कलकत्त्याच्या शासकीय संस्कृत महाविद्यालयातून त्यांनी _’तर्कतीर्थ’_ ही पदवी संपादन केली. (मृत्यू:२७ मे १९९४)**१८५०:एडवर्ड जे. स्मिथ – आर.एम.एस. टायटॅनिक जहाजाचा कप्तान (मृत्यू:१५ एप्रिल १९१२)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_*••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२२:अनिल अवचट-- सामाजिक कार्यकर्ते आणि सुप्रसिद्ध लेखक (जन्म:२६ आगस्ट १९४४)**२०१६:दत्तात्रेय भिकाजी कुलकर्णी-- आधुनिक मराठी साहित्यातील विख्यात समीक्षक आणि ललितनिबंधकार (जन्म:२५ जुलै १९३४)**२००९:आर. वेंकटरमण – भारताचे ८ वे राष्ट्रपती,केन्द्रीय मंत्री,कायदेपंडित, स्वातंत्र्यसेनानी (जन्म:४ डिसेंबर १९१०)**२००८:डॉ.सुरेश महादेव डोळके-- धर्मशास्त्र व तत्त्वज्ञानाचे गाढे अभ्यासक, महानुभाव साहित्याचे संशोधक व ज्येष्ठ साहित्यिक (जन्म:२१ सप्टेंबर १९२६)* *२००८:सुहार्तो – इंडोनेशियाचे दुसरे राष्ट्राध्यक्ष (जन्म:८ जून १९२१)**२००७:कमलेश्वर – पद्मभूषण पुरस्कार विजेते हिन्दी लेखक,पटकथालेखक,दूरदर्शनचे अतिरिक्त संचालक (जन्म:६ डिसेंबर १९३२)**१९८६:निखिल बॅनर्जी – मैहर घराण्याचे सतारवादक (जन्म:१४ आक्टोबर १९३१)**१९६८:सदाशिव अनंत शुक्ल ऊर्फ ’कुमुदबांधव’ – नाटककार व साहित्यिक (जन्म:२६ मे १९०२)**१९४७:पॉल हॅरिस – रोटरी क्लबचे संस्थापक (जन्म:१९ एप्रिल १८६८)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*कमवा आणि शिका*स्वतःच्या विकासावर कुटुंबाचे विकास अवलंबून असते. कुटुंबाच्या विकासावर गावाचा विकास आणि मग राज्य व देशाचा विकास होतो. या विकासासाठी शिक्षण हे अत्यंत महत्त्वाची बाब आहे. शिक्षणाशिवाय कोणाचाही विकास अशक्य आहे. शिक्षणामुळे दोन डोळ्याचे माणसे तिसऱ्या डोळ्याने डोळस होऊ शकतात. अन्यथा डोळे असून ही आंधळ्याची अवस्था होते. महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिक्षणाचे महत्त्व सांगताना म्हटले आहे की, ............. पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *प्रजासत्ताक दिन संचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथाने जिंकली उपस्थितांची मनं, महाराष्ट्राच्या चित्ररथात छत्रपती शिवाजी महाराजांची गाथा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *आझाद मैदानाकडे निघालेल्या मनोज जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम, मान्य केलेल्या मागण्यांचे जीआर दुपारी 12 पर्यंत देण्याची मागणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *महामार्गावर तीन कोटींचा सशस्त्र दरोडा, आंतरराज्य टोळी जेरबंद; संशयितांमध्ये माजी सैनिकांचा समावेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *नितीश कुमार यांचा शपथविधी रविवारी होण्याची शक्यता, भाजपला दोन उपमुख्यमंत्रिपदं मिळणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *नागपुरातील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले अभिनंदन*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *दिग्गज अभिनेत्री वैजयंती माला आणि दाक्षिणात्य सुपरस्टार चिरंजीवी यांना पद्म विभूषण तर बॉलिवूड अभिनेते मिथुन चक्रवर्ती आणि उषा उथुप यांना पद्म भूषण पुरस्कार जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *इंग्लंडविरोधात पहिल्या कसोटीचा दुसरा दिवसही भारताच्या नावावर; केएल राहुल-जाडेजाची फटकेबाजी, भारताकडे 175 धावांची आघाडी*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी*तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री बाळाजी जोशी (जानेवारी २७, १९०१ - मे २७, १९९४) हे मराठी लेखक, कोशकार व सामाजिक शास्त्रांचे अभ्यासक-संशोधक होते.त्यांचा जन्म धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर येथे आणि शिक्षण वाई येथील प्राज्ञ पाठशाळेत झाले. त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय सहभाग घेतला होता. त्याकरिता इ.स. १९३२ साली त्यांना तुरुंगात जावे लागले.संस्कृत भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते हिंदू धर्माचा त्यांनी सखोल अभ्यास केला होता.  वेद, उपनिषदे, रामायण, महाभारतइत्यादी शास्त्रांवर ते अधिकारवाणीने बोलू शकत. हिंदू तत्त्वज्ञान त्यांनी चांगल्या प्रकारे अवगत केले होते.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••यशस्वी होण्याची पहिली पायरी म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवा.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *बोन्साय* ची मूळ कल्पना कोणत्या देशातील आहे ?२) महाराष्ट्रातील पहिली महिला रुग्णवाहिका ड्रायव्हर कोण ?३) राष्ट्रीय मतदार दिवस कोणत्या वर्षीपासून साजरा केला जातो ? *उत्तरे :-* १) चीन २) विषया लोणारे, भंडारा ३) सन २०११*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 माधवराव बोमले, चिरली👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••तुटेना फुटेना कदा देवराणा। चळेना ढळेना कदा दैन्यवाणा॥ कळेना कळेना कदा लोचनासी। वसेना दिसेना जगी मीपणासी॥१७७॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपले असणारे सर्वच नातेवाईक जर शेवटपर्यंत साथ देणारे राहिले असते तर त्यांचा समाजात कायम पर्यंत उदोउदो होताना बघायला मिळाले असते. पण, तसं कधीच होताना दिसत नाही म्हणून होऊन गेलेल्या थोर संतानी म्हटले आहे की, सोयरे, धायरे संपत्तीचे लोक त्यांची वाणी सत्य आहे. सदैव त्यांच्या विचारांचे आपण स्मरण करावे. व ज्यांनी आपल्यासाठी सोन्यासारखे जीवनाचे बलिदान दिले त्यांना शेवटच्या श्वासापर्यंत आठवणीत ठेवावे कारण खऱ्या अर्थाने तेच आपले नातेवाईक, प्रेरणास्थान, महात्यागी व मार्गदर्शक होते आणि आजही आहेत त्यांच्यामुळे आपल्याला न्याय, हक्क,शिक्षण,अधिकार सर्वच काही मिळाले आहे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *जंगलचा राजा !*एकदा एका अस्वलाने झाडामागे लपून सिंहाला जंगलात फिरताना पाहिलं.जंगलचा राजा सिंह जंगलात रुबाबात फिरे. थोडसं चालून मग पुन्हा एकदा मागे वळून बघे.अस्वलाला वाटलं...'आपण ही जंगलचा राजा व्हावं. सिंहासारखं रुबाबात फिरावं.'अस्वलानं ठरवलं... आता आपण रोज सिंहाचा पाठलाग करायचा. तो कसा चालतो? तो कसा बसतो? तो कसा खातो? तो कसा फिरतो? हे नीट पाहायचं. मग आपण ही तसंच करायचं. जंगलचा राजा व्हायचं. तेव्हापासून रोज ते अस्वल, सिंहाच्या पाळतीवर राहिलं. लांबून झाडामागून सिंहाच्या बारीक सारीक गोष्टी पाहू लागलं.सिंहाचं ऐटित चालणं. झाडाखाली त्याचं डौलदार बसणं. सिंहाची भरदार आयाळ. त्याचं राजा सारखं जंगलात फिरणं.पण, चार-पाच दिवसात अस्वल कंटाळलं. अस्वलाला वाटलं...खरं म्हणजे जंगलचा राजा मीच व्हायला पाहिजे. कारण सिंहापेक्षा मी जाडजूड आहे. सिंहाला तर फक्त मानेवरच आयाळ आहे.माझ्यातर सर्व अंगावर सिंहासारखी आयाळ आहे. आणि मी पण झाडाखाली डौलात बसतोच की! जंगलामधे फिरतोच की!पण...मला सिंहासारखं चालता येत नाही म्हणून मी जंगलचा राजा होत नाही! मी सरळ चालतना मागे वळून पाहात नाही म्हणून जंगलचा राजा होत नाही!बस्स!! आता ठरलं तर... आज पासून चालताना मधे-मधे मागे वळून पाहायचं आणि जंगलचा राजा व्हायचं. त्या दिवसापासून ते अस्वल चालताना मागे वळून पाहू लागलं. आपण चालताना मागे वळून पाहातो, हे इतर प्राणी पाहतात की नाही? हे पण पाहू लागलं.'मी किती जाडजूड आहे पाहा. माझी अंगभर आयाळ पाहा. माझं रुबाबदार चालणं पाहा. आता तरी मला राजा म्हणा..असं भेटेल त्या प्राण्यांना सांगू लागलं.पण...तरीही जंगलातले छोटे मोठे प्राणी त्याला राजा म्हणेनात.अस्वलाच्या पाठी हेच प्राणी ख्वॅ ख्वॅ, फॅक्वॅक फॅक्वॅक करुन हसायचे. शेपट्या हलवून, तोंडं वाकडी करुन त्याला चिडवायचे.अस्वल वैतागलं. भलतंच चिडलं. चराचरा केस खाजवत, कराकरा दात चावू लागलं.अस्वलाने ठरवलं... 'आजच काय तो फैसला करू.जंगलातल्या या चुटूक पुटूक प्राण्यांच्या नादी लागण्यात काही अर्थ नाही. आपला रुबाब, आपली चाल त्या सिंहालाच दाखवू. सिंहाशीच सरळ सरळ पंगा घेऊ. माझी राजेशाही चाल पाहताच सिंह आपोआपच मान खाली घालून जंगलातून निघून जाईल. मग या जंगलचा मीच राजा होईन!! अस्वल जे घरातून उठलं ते तरातरा सिंहासमोरच गेलं. सिंह झाडाखाली सुस्तावला होता. अस्वल सिंहाच्या सरळ समोर जाऊन ऊभं राहिलं. सिंहाने शेपटी उडवत अंगावरच्या माशा हाकलल्या. मान वाकडी करत डाव्या पायाने आयाळ खाजवली.अस्वल सिंहासमोरच सिंहासारखं चाललं. म्हणजे थोडसं चालून त्याने पुन्हा पुन्हा मागे वळून पाहिलं. चालताना सिंहासारखं ऐटित चालण्याचा प्रयत्न केला.आता...'हा कोण नवीन रुबाबदार राजा?' असं म्हणत सिंह चवताळून उठेल. किंवा... आपली ऐटबाज चाल पाहून सिंह हे जंगल सोडून पळूनच जाईल, असं अस्वलाला वाटलं होतं.पण....सिंहाने अस्वलाकडे पाहिलं ही नाही! त्याला काही किंमतच दिली नाही. सिंह आपल्याच मस्तीत होता. सिंह आरामात शेपटी उडवत माशा हाकलवत होता. आता मात्र अस्वल भलतं म्हणजे भलतंच चिडलं. त्याच्या अंगावरचे केस ताठ झाले. त्याने उजव्या हाताची नखं झाडावर कराकरा घासली. अस्वलाने ठरवलं... आता आपण सिंहापेक्षा वरचढ व्हायचंच. राजा सिंह सरळ चालताना मधे मधे मागे वळून पाहातो. ठीक आहे. पण आपण आता.. मागे मागे बघतच सरळ चालायचं. आणि जंगलचा राजा व्हायचं. अस्वल मागे मागे पाहात पुढे चालू लागलं. राजा होईन म्हणता म्हणता सरळ खड्यात पडलं!•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 26 जानेवारी 2024💠 वार - शुक्रवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://nasayeotikar.blogspot.com/2018/01/blog-post_25.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_🇮🇳भारतीय प्रजासत्ताक दिन🇮🇳_*••••••••••••••••••••••••••••••••*_ या वर्षातील २६वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२००१:गुजरातमधील कच्छ भागात झालेल्या मोठ्या भूकंपात सुमारे २०,००० लोक ठार झाले.**१९९८:कॅप्टन लक्ष्मी व उषा मेहता यांना ’पद्मविभूषण’ पुरस्कार प्रदान**१९७८:महाराष्ट्रात रोजगार हमी कायदा सुरू**१९५०:भारताची राज्यघटना अस्तित्त्वात आल्याने भारत हे सार्वभौम प्रजासत्ताक राष्ट्र बनले. भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून डॉ. राजेंद्रप्रसाद यांचा शपथविधी झाला.**१९५०:एच. जे. कनिया यांनी भारताचे पहिले सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.**१९४२:दुसरे महायुद्ध – अमेरिकन फौजांचे युरोपातील नॉर्दन आयर्लंड येथे आगमन**१९२४:रशियातील सेंट पीट्सबर्गचे लेनिनग्राड असे नामकरण करण्यात आले.**१८७६:मुंबई आणि कलकत्ता दरम्यान रेल्वे वाहतुकीस सुरूवात झाली.**१८३७:मिचिगन हे अमेरिकेचे २६ वे राज्य बनले.**१६६२:लोहगड-विसापूर आणि तिकोना या किल्ल्यांच्या परिसरात मुघल फौजांच्या चढाया**१५६५:विजयनगर साम्राज्य आणि दख्खनचे सुलतान यांच्यात तालिकोटा येथे लढाई झाली. या लढाईत रामरायाचा पराभव होऊन दक्षिण भारतात अनिर्बंध मुस्लिम सत्तेला सुरूवात झाली.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८१:भारती संजय तितरे -- कवयित्री**१९८०:संतोष पवार चोरटाकार-- लेखक* *१९८०:अ‍ॅड.मयुर परशुराम जाधव -- लेखक, विविध वृत्तपत्रांमध्ये स्तंभलेखन* *१९७९:संदीप शामरावजी धावडे -- कवी, लेखक**१९७८:डॉ.सुनील अभिमान अवचार-- समकालिन संवेदनशील कवी,चित्रकार* *१९७७:सारिका उबाळे परळकर -- प्रसिद्ध कवयित्री* *१९७४:किरणताई नामदेवराव मोरे (चव्हाण)-- कवयित्री* *१९७०:स्वप्निल श्रीकांत पोरे-- प्रसिद्ध लेखक कवी* *१९६८:वर्षा विद्याधर चौबे-- लेखिका* *१९६२:सुहिता थत्ते-- भारतीय मराठी अभिनेत्री**१९५८:उदय नारायण क्षीरसागर-- कवी* *१९५७:शिवलाल यादव – क्रिकेटपटू**१९५२:सुप्रिया सरवटे -- लेखिका* *१९२६:विनायक गजानन कानिटकर-- मराठी विचारवंत लेखक (मृत्यू:३०ऑगस्ट २०१६)**१९२५:पॉल न्यूमन – अभिनेता,दिग्दर्शक व रेस कार ड्रायव्हर (मृत्यू:२६ सप्टेंबर २००८)**१९२१:अकिओ मोरिटा – सोनी कार्पोरेशनचे संस्थापक (मृत्यू:३ आक्टोबर १९९९)**१९१९:लक्ष्मण वामनराव सबनीस -- लेखक* *१९११: विष्णू (पंडित) गंगाधर सप्रे-- कवी**१९११:भार्गव महादेव फाटक उर्फ बाबा फाटक-- क्रांतिवीर देशभक्त(मृत्यू:५ सप्टेंबर १९८१)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२३:डॉ.सतीश शास्त्री-- कादंबरीकार(जन्म:३१ जानेवारी १९५२)**२०२२: श्यामकांत विष्णू कुलकर्णी -- कवी, लेखक (जन्म:७ जुलै १९३३)**२०१८:गोरख शर्मा-- भारतीय गिटार वादक(जन्म:२८ डिसेंबर १९४६)**२०१५:रासीपुरम कृष्णस्वामी तथा आर.के. लक्ष्मण – व्यंगचित्रकार,पद्मभूषण (१९७१), रॅमन मॅगसेसे (१९८४), पद्मविभूषण (२००५) इत्यादि पुरस्कारांचे मानकरी (जन्म:२४ आक्टोबर १९२१)**१९६८:लोकनायक माधव श्रीहरी तथा 'बापूजी' अणे--शिक्षणतज्ज्ञ,स्वातंत्र्यसैनिक, राजकारणी आणि संस्कृत कवी (जन्म:२९ ऑगस्ट १८८०)**१९६५:प्रल्हादबुवा सीताराम सुबंध-- वारकरी संप्रदाय,कीर्तनकार,प्रवचनकार, लेखक (जन्म:१८९५)**१९५४:मानवेंद्रनाथ रॉय – देशभक्त, क्रांतिकारक व भारतातील कम्यूनिस्ट पक्षाचे संस्थापक (जन्म:२१ मार्च १८८७)**१८२३:एडवर्ड जेन्‍नर – देवीची लस शोधून काढणारे संशोधक व डॉक्टर (जन्म:१७ मे १७४९)* 🇮🇳🇮🇳🇮🇳 *_भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा_* 🇮🇳🇮🇳🇮🇳~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••26 जानेवारी - भारतीय प्रजासत्ताक दिन..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *भारताच्या 75 व्या प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन हे राहणार आहेत.*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्व देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देताना अयोध्येतील राम मंदिर, G20 शिखर परिषद, भारतरत्न कर्पूरी ठाकूर आणि खेळाडूंचे कौतुक केले.*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *भारताच्या Aditya-L1 ची आणखी एक मोठी कामगिरी, ग्रहांची शक्ती मोजणारे यंत्र केले स्थापित*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *आतापर्यंतचा सर्वात मोठा डेटा लीक, जगभरात 26 अब्ज अकाउंट्सची खासगी माहिती चोरीला*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *पुणे - द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न तातडीने मार्गी लावले जातील:उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आश्वासन, कोल्ड स्टोरेजचे उद्घाटन*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *आरक्षणासाठी मराठा समाजाला आंदोलनाची गरज नाही:सरकार सकारात्मक, सरकारला सहकार्य करण्याचे CM शिंदेंचे आवाहन*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *विराट कोहली ठरला 2023 मधील एकदिवसीय फॉरमॅट मधील सर्वोत्कृष्ट खेळाडू, ICC ची घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*राष्ट्रध्वज फडकावण्याचे नियम (ध्वजसंहिता)*२६ जानेवारी १९५० रोजी भारताने स्वतंत्र राज्यघटना स्वीकारली. म्हणूनच हा दिवस आपला गणतंत्र दिवस किंवा प्रजासत्ताक दिवस म्हणून ओळखला जातो. राष्ट्रीय प्रतीक असणाऱ्या आपल्या तिरंगी ध्वजाचा मान राखणे, हे आपल्या सगळ्यांचे कर्तव्य आहे. १९५० मध्ये भारत प्रजासत्ताक झाल्यावर ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डने १९५१ मध्ये पहिल्यांदा ध्वजासंदर्भात काही नियम जाहीर केले. १९६४ मध्ये यात बदल करण्यात आले. १७ ऑगस्ट १९६८ मध्ये यात आणखी काही बदल करण्यात आले. ध्वजाचा आकार, निमिर्ती, रंग आदी सर्व सर्वच बाबतीत हे नियम लागू करण्यात आले. सूर्यांदयाच्या वेळी ध्वजारोहण आणि सूर्यास्ताच्या वेळी ध्वज उतरवणे कायद्याने बंधनकारक आहे. काही खास प्रसंगी सार्वजनिक इमारतींवर रात्रीच्या वेळेसही ध्वज फडकावता येतो. इतर देशांच्या राष्ट्रध्वजांबरोबर ध्वज फडकावयाचा असेल, तर त्यासाठी असणाऱ्या खास नियमांचे पालन करावे लागते. नॉन नॅशनल फ्लॅग्ज म्हणजे कॉपोर्रेट फ्लॅग किंवा अॅडव्हर्टायझिंग बॅनरबरोबर ध्वज फडकावयाचा असल्यास राष्ट्रध्वज मध्यभागीच असायला हवा. मिरवणुकीच्या वेळेसही राष्ट्रध्वज अग्रभागी असायला हवा. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल, मुख्यमंत्री, केंदीय मंत्री आदी महत्त्वाच्या व्यक्तींच्याच गाडीवर राष्ट्रध्वज लावण्यास परवानगी आहे. अन्य कोणालाही आपल्या गाडीवर ध्वज लावता येत नाही. तसेच राजकीय महत्त्वपूर्ण व्यक्ती परदेशात जात असल्यास त्या विमानावर राष्ट्रध्वज लावता येतो. महत्त्वाच्या व्यक्तीचे निधन झाल्यास ध्वज अर्धवट उतरवण्यात येतो. ध्वज खराब झाल्यास तो जमिनीखाली पुरून किंवा जाळून नामशेष करावा लागतो, पण त्या वेळीसुद्धा त्याचा यथोचित मान राखायला लागतो. एकंदरच निमिर्तीपासून शेवटापर्यंत आपल्या राष्ट्रध्वजाचा मान राखणे हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. मंत्रालय आणि सिंधुदुर्ग किल्ल्यावरच सगळ्यात मोठे झेंडे फडकताना दिसतात.*संकलन :- श्याम ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••देशाने तुमच्यासाठी काय केले ? हे विचारण्यापेक्षा तुम्ही देशासाठी काय करत आहात ? हे स्वत:ला विचारा…*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) प्रजासत्ताक दिनी झेंडा कोणाच्या हस्ते झेंडा फडकविला जातो ?२) भारताचा राष्ट्रीय ध्वज कुणी तयार केला होता ?३) राष्ट्रीय शौर्य पुरस्कार कोणाला दिले जातात ?४) प्रजासत्ताक दिन साजरा करण्यास कधीपासून सुरुवात झाली ?५) राज्यघटनेत पंचवार्षिक योजनेची संकल्पना कुठून घेण्यात आली होती ?उत्तरे :- १) राष्ट्रपती २) पिंगली वेंकय्या ३) शूर मुला-मुलींना ४) 26 जानेवारी 1950 ५) सेव्हिएत संघाच्या (USSR) घटनेतून*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 सुरेश पवार👤 प्रा. रवींद्र मुपडे, धर्माबाद👤 शेख जावेद👤 सतिशकुमार साटले👤 चंद्रकांत लांडगे👤 दिलीप सोनकांबळे👤 ओमसाई कोटूरवार👤 सचिन पुरी👤 मारुती गुंटूरकर*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जगी द्वादशादित्य हे रुद्र अक्रा। असंख्यात संख्या करी कोण शक्रा॥ जगी देव धुंडाळिता आढळेना। जगी मुख्य तो कोण कैसा कळेना॥१७६॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मनन व चिंतन सतत चालणारी मानसिक प्रक्रिया आहे. मनातल्या मनात विचार करत राहणे,विचार येणे हा मनोव्यापार आहे. मनात कधी चांगले तर कधी वाईट विचार येतात.आपल्या मनात काय चालले आहे ते फक्त आपल्यालाच माहीत असते. आपले मनच जाणत असते.म्हणून जे काही चालले असेल ते चांगल्यासाठी असू द्यावे. कारण चांगल्या कार्याची भलेली उशीरा ओळख होत असेल तरी ती ओळख बघून मनाला एक वेगळ्याच प्रकारचा समाधान मिळत असतो.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••२६ जानेवारीलाच संविधान का लागू केले गेले?२६ जानेवारी १९५० रोजी या दिवशी संविधान लागू करण्यात आले, ज्याची अनेक कारणे होती. देश स्वतंत्र झाल्यानंतर २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने राज्यघटना स्वीकारली. त्याच वेळी २६ जानेवारी १९५० रोजी लोकशाही शासन प्रणालीसह संविधान लागू करण्यात आले. या दिवशी भारताला पूर्ण प्रजासत्ताक घोषित करण्यात आले. २६ जानेवारीला संविधान लागू करण्याचे मुख्य कारण म्हणजे १९३० मध्ये या दिवशी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने भारताच्या पूर्ण स्वातंत्र्याची घोषणा केली होती.सन १९२९ मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातून एक बैठक आयोजित करण्यात आली होती. ज्यामध्ये सर्वसंमतीने असे घोषित करण्यात आले की ब्रिटिश सरकारने २६ जानेवारी १९३० पर्यंत भारताला डोमिनियन दर्जा द्यावा. या दिवशी प्रथमच भारताचा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 25 जानेवारी 2024💠 वार - गुरुवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://nasayeotikar.blogspot.com/2018/01/blog-post_22.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_राष्ट्रीय पर्यटन दिन_* *_राष्ट्रीय मतदार दिन_*••••••••••••••••••••••••••••••••*_ या वर्षातील २५वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२००१:स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर व शहनाईनवाझ बिस्मिल्ला खाँ यांना ’भारतरत्‍न’**१९९५:अमेरिकेने धृवीय प्रकाशाची (Aurora Borealis) माहिती घेण्यासाठी एक क्षेपणास्त्र सोडले. रशियन सरकारच्या रडारवर ते दिसू लागताच अमेरिकेने अण्वस्त्र सोडले असावे, असा संशय रशियन अधिकार्‍यांनी व्यक्त केल्यामुळे रशियाचे अध्यक्ष बोरिस येल्त्सिन यांनी अमेरिकेवर अण्वस्त्रे डागण्यासाठी ’न्युक्लिअर ब्रिफकेस’ हातात घेतेली होती!**१९९१:मोरारजी देसाई यांना ’भारतरत्‍न’**१९८२:आचार्य विनोबा भावे यांना ’भारतरत्‍न’**१९७१:हिमाचल प्रदेशला पूर्ण राज्याचा दर्जा मिळाला व ते भारताचे १८ वे राज्य बनले.**१९४१:’प्रभात’चा ’शेजारी’ हा चित्रपट रिलीज झाला.**१९१९:पहिले महायुद्ध संपल्यानंतर लीग ऑफ नेशन्सची स्थापना झाली.**१८८१:थॉमस अल्वा एडिसन आणि अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल यांनी ओरिएंटल टेलिफोन कंपनीची स्थापना केली.**१७५५:मॉस्को विद्यापीठाची स्थापना झाली.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८४ स्वाती बाळासाहेब ठुबे-खोडदे-- कवयित्री* *१९७५:एकता मेनकुदळे--- लेखिका**१९७१:डॉ.मिलिंद चोपकर -- लेखक* *१९५८:कविता कृष्णमूर्ती – प्रसिद्ध पार्श्वगायिका**१९५४:मदन रामसिंह हजेरी -- कादंबरीकार,बालकथाकार**१९५२:प्रकाश नथुभाऊ खरात -- कवी,लेखक (मृत्यू:१९ एप्रिल २०२१)**१९५१:हेमलता प्रदीप गीते-- प्रसिद्ध कवयित्री**१९५१:अर्चना पंडित-- कवयित्री**१९३८:सुरेश विनायक खरे – मराठी नट, लेखक,दिग्दर्शक,जाहिरातपटकार,चित्रपट पटकथालेखक,नाट्यावलोकनकार, संवादक,मुलाखतकार,आणि मराठी नाटककार व समीक्षक**१९३३:दिनेश वामन वाळिंबे -- कवी**१९३१:डॉ.रामचंद्र विश्वनाथ मंत्री-- लेखक**१९१७:श्रीपाद दत्तात्रेय कुलकर्णी -- लेखक**१९१६:बापूसाहेब गोविंदराव लाखनीकर-- संस्थापक,लेखक (मृत्यू:२६ डिसेंबर २००१)**१९१४:जगन्नाथ शामराव देशपांडे-- प्राचीन मराठी संशोधक,संपादक* *१८८६:पांडुरंग नरसिंह पटवर्धन-- इतिहास संशोधक(मृत्यू:६ जुलै १९२१)**१८८३:आनंदीबाई धोंडो कर्वे ऊर्फ बाया कर्वे -- मराठी सामाजिक-शैक्षणिक कार्यकर्त्या (मृत्यू:२९ नोव्हेंबर १९५०)* *१८८२:व्हर्जिनिया वूल्फ – ब्रिटिश लेखिका (मृत्यू:२८ मार्च १९४१)**१८७४:डब्ल्यू. सॉमरसेट मॉम – इंग्लिश लेखक व नाटककार (मृत्यू:१६ डिसेंबर १९६५)**१८६२:रमाबाई रानडे – ’सेवा सदन’च्या संस्थापिका व सामाजिक कार्यकर्त्या (मृत्यू: १९२४)**१७३६:जोसेफ लाग्रांगे – इटालियन गणितज्ञ (मृत्यू:१० एप्रिल १८१३)**१६२७:रॉबर्ट बॉईल – आयरिश रसायनशास्त्रज्ञ (मृत्यू:३० डिसेंबर १६९१)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१५:मधुकर दत्तात्रय तथा म.द. हातकणंगलेकर – ज्येष्ठ समीक्षक आणि सांगली (२००८) येथील ८१ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष (जन्म:१ फेब्रुवारी १९२७)**१९९६:प्रशांत सुभेदार – रंगभूमी व चित्रपटांतील गुणी अभिनेते* *१९८०:लक्ष्मणशास्त्री दाते – सोलापूरचे ’दाते पंचांग’कर्ते (जन्म:१८९०)**१९६४:शंकरराव रामचंद्र कानिटकर-- शिक्षणतज्ज्ञ व समाजसेवक(जन्म:११ जुलै १८८७)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त* *मतदार राजा जागा हो....!*इंग्रजांच्या दीडशे वर्षे गुलामगिरीच्या नंतर 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत देश स्वतंत्र झाले. त्यानंतर 26 जानेवारी 1950 रोजी देश प्रजासत्ताक झाले. भारतात लोकशाही पद्धतीने राज्यकारभार चालविला जातो. जगात सर्वात यशस्वी लोकशाही............ पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मराठा आरक्षण विषयी मुंबईकडे कूच केलेल्या मनोज जरांगे पाटील यांना उच्च न्यायालयाची नोटीस*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *दहावी-बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना यावर्षी देखील दहा मिनिटं जादा वेळ, मंडळाची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्र्यांना आत्ताच अयोध्येतील राम मंदिरात न जाण्याचा दिला सल्ला*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *महाराष्ट्र तलाठी भरती परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर; महाराष्ट्र तलाठी अंतिम निकाल mahabhumi.gov.in या लिंकवर पाहता येईल*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *ऐन परीक्षेच्या काळात शिक्षकांना मराठा आरक्षण सर्व्हेचं काम, शिक्षण व्यवस्था सलाईनवर!*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *युक्रेनजवळ रशियन लष्कराचं विमान कोसळलं, किमान 65 जणांचा मृत्यू*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *44 वर्षांच्या टेनिस स्टारनं रचला इतिहास, रोहन बोपन्नाची ऑस्ट्रेलियन ओपनच्या सेमीफायनलमध्ये धडक*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🐝 *मधमाशी चावल्यावर काय होतं ?* 🐝डासांचा चावा असं म्हटलं जातं, पण मधमाशीचा असतो तो डंख. याचं कारण म्हणजे जेव्हा मधमाशी डसते तेव्हा ती एक विष आपल्या शरीरात सोडत असते. सहसा मधुपर्काच्या शोधात असलेली मधमाशी डंख करत नाही; पण ती तुडवली गेली आणि एखाद्या व्यक्तीपासून तिच्या पोळ्याला धोका आहे असं तिला जाणवलं तर मात्र त्वेषानं तुटून पडते. तरीही मधमाशी एकदाच डंख करू शकते, कारण डंख करण्यासाठी तिच्या अंगी जो एक सुईसारखा अवयव असतो, याला स्टिंग असंच म्हणतात, तो तुटून आपल्या शरीरातच अडकून पडतो. खरंतर ही सुई साधी नसते. या सुईच्या दोन्ही बाजूला तिला जोडलेले दोन काटेरी पट्टे असतात. ते वर खाली होऊ शकतात. यातला एक पट्टा आपल्या कातडीत शिरून तिथे अडकून पडतो. त्यामुळे तो आणखी आत ओढला जाऊन सुईला आपल्याबरोबर ओढून नेतो. त्याबरोबर आता दुसऱ्या बाजूचा काटेरी पट्टा आपली हालचाल करू लागतो. असं करत ते सुईला कातडी पार करून आपल्या मांसल स्नायूपर्यंत पोचवतात. त्यावेळीच ते विष शरीरात सोडलं जातं. हे सारं सव्यापसव्य करताना त्या काटेरी दातांसकट ती सुई मांसल भागात चांगलीच रुतून बसते. त्यामुळे ती परत बाहेर काढली जाऊ शकत नाही. पण माशी तसा प्रयत्न करते तेव्हा ती सुई तुटते. ती सुई माशीच्या पोटाला जोडलेली असल्यामुळे त्या ओढाताणीत तो पोटाचा भागही तुटून पडतो. ते सहन न होऊन माशी मरून पडते. विषाबरोबरच माशी एक गंधयुक्त रसायन, याला फेरोमोन म्हणतात, तिथं आणि हवेत पसरवते. त्याच्या ओढीनं इतर माशाही तिथं आकर्षित होतात. अशा वेळी मग एकाऐवजी अनेक माशांचा डंख पचवावा लागतो. सहसा या विषाचा फारसा परिणाम होत नाही. मात्र जळजळ आणि खाज येऊ लागते. काही जणांना या विषाची अॅलर्जी असते. त्यांना मात्र सावधगिरी बाळगावी लागते. तातडीने उपचार करून घेणं योग्य ठरतं. अन्यथा या अॅलर्जीची प्रतिक्रिया तीव्र होऊन ती घातकही ठरू शकते. या विषात मेलिटिनबरोबरच हिस्टमिनही असल्यामुळे सहसा हिस्टीमिनला नाकाम करणारी उपाययोजना केली जाते.उतारवयातल्या व्यक्तीला किंवा लहान मुलांना जर अनेक मधमाशांचा डंख झाला तर मात्र काही वेळा स्नायूंना इजा होऊ शकते. तसंच मूत्रपिंडांच्या कामातही बाधा आणली जाऊ शकते. तोंडात किंवा गळ्याजवळ डंख झाला तर त्यापायी श्वासनलिकेचं नियंत्रण करणारे स्नायू बाधित होतात व श्वासोच्छ्वासाला अडथळा होऊ शकतो. परंतु अशी परिस्थिती क्वचितच उद्भवते.*बाळ फोंडके यांच्या 'काय ?' या पुस्तकातून**संकलन :- श्याम ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••व्यक्तिमत्व सुंदर नसेल तर दिसण्याला काहीच अर्थ नाही. कारण सुंदर दिसण्यात अन असण्यात खूप फरक असतो.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) कर्पूरी ठाकूर यांच्या शंभराव्या जयंतीच्या पूर्वसंध्येला मरणोत्तर यांना कोणता पुरस्कार घोषित झाला ?२) बिहारचे जननायक म्हणून कोणाला ओळखले जाते ?३) बिहारचे पहिले बिगर काँग्रेसी मुख्यमंत्री कोण होते ?४) राज्यात मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण मोफत करणारे देशातील पहिले मुख्यमंत्री कोण ?५) बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांचा जन्म केव्हा झाला ? *उत्तरे :-* १) भारतरत्न २) कर्पूरी ठाकूर ३) कर्पूरी ठाकूर ४) कर्पूरी ठाकूर ५) २४ जानेवारी १९२४*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 श्रीमती कल्पना दत्ता हेलसकर, जालना👤 प्रा. वैशाली देशमुख, कुही नागपूर👤 ललेश पाटील मंगनाळीकर👤 राजीव सेवेकर👤 महेबूब पठाण👤 अंबादास कदम👤 राहुल आवळे👤 नरेश दंडवते👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••विधी निर्मिती लीहितो सर्व भाळी। परी लीहिता कोण त्याचे कपाळी॥ हरू जाळितो लोक संहारकाळी। परी शेवटी शंकरा कोण जाळी॥१७५॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपले नातेवाईक किंवा संगे, सोयरे सुख,दु:खात आपुलकीने साथ देणारे असतील तर त्यांच्या विषयी कायमच आपल्या मनात आदर राहतो व कोणाची वेळ निघून गेली की, ते विसरूनही जातात.पण, असे व्हायला नको. पण दिलेल्या मदतीची आपण जाणीव ठेवावी जे आपुलकीने मदत करतात त्यांना विसरू नये व जे कोणी मदत करत नाही. त्यांच्याकडून कोणतीही अपेक्षा ठेऊ नये.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *कृती महत्वाची*स्वामीजींच्या प्रवचनासाठी गावोगावहून लोक आले होते. स्वामीजी आपल्या श्रोत्यांना उत्तम उपदेश करत. या उपदेश सभेला ‘सत्संग‘ म्हणत. एकदा स्वामीजींना काही लोकांनी सत्संगासाठी निमंत्रित केल होत. दिवस थंडीचे होते. येणारे लोक शाली, स्वेटर घालून तसेच मफलर बांधून आले होते. त्यात काही काही उच्चभ्रू श्रीमंतही होते. मात्र, स्वामीजींचा वेश साधाच. अंगावर घाबळी पांघरलेली. एका मोठया प्रशस्त दिवाणखान्यात सभा सुरू झाली आधी एक भजन सुरू होते. मग स्वामीजींचा उपदेश. तेवढ्यात एक याचक त्या दिवाणखान्याच्या दाराशी आला. उघडाबंब थंडीने कुडकुडत, हातात कटोरा घेऊन उभा होता. दिनवाण्या मुद्रेने त्याने आत पाहिल. भजन सुरूच होत. स्वामीजी उठून त्या याचकाकडे गेले. आपल्या अंगावरची घाबळी त्याच्या अंगावर पांघरली आणि शिष्याला खूण केली. शिष्याने काही नाणी त्याच्या कटो-यात टाकली आणि मग तो गरीब याचक निघून गेला. हे सर्व दृष्य सर्वच लोक बघत होते. भजन संपलं.सत्संग सूत्रसंचालक म्हणाला, ‘आता स्वामीजी आपल्याला उपदेश करतील. आपले कान त्यासाठी आतुरले आहेत‘. पण स्वामीजी काही बोलेनात. बराच वेळ झाला तरी ते स्वस्थच बसून होते. श्रोत्यांमध्ये चुळबूळ सुरु झाली. अखेर सूत्रसंचालक म्हणाला, ‘स्वामीजी, आपण आम्हाला उपदेश देताय ना?‘‘मी उपदेश दिला आहे,‘ स्वामीजी खणखणीत आवाजात म्हणाले. ’आपण काहीच बोलला नाहीत,‘ सुत्रसंचालक म्हणाला.‘अस्स! म्हणजे तुम्हाला फक्त शब्दांचा उपदेश हवा आहे; कृती नको. त्या थंडीत कुडकुडणा-या माणसाची अवस्था तुमच्या ध्यानी नाही आली ? मी केलेली कृती हाच माझा उपदेश! सर्व श्रोते थक्क झाले.तात्पर्यः केवळ कोरड्या शब्दांपेक्षा कृती महत्वाची असते.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 24 जानेवारी 2024💠 वार - बुधवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://nasayeotikar.blogspot.com/2018/01/blog-post_25.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन_**_राष्ट्रीय बालिका दिवस_*•••••••••••••••••••••••••••••••••*_ या वर्षातील २४वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *१९८४:अ‍ॅपल मॅकिन्टॉश कॉम्प्युटर्सची विक्री सुरू झाली.**१९७६:’बर्मा शेल’ या ब्रिटिश तेलकंपनीचे राष्ट्रीयीकरण करुन तिचे नाव ’भारत रिफायनरीज’ असे ठेवण्यात आले. पुढे १ ऑगस्ट १९७७ रोजी त्या कंपनीचे नाव बदलून ’भारत पेट्रोलियम’ (BPCL) असे करण्यात आले.**१९७२:गुआममध्ये इ. स.१९४४ पासून लपलेला जपानी सैनिक,शोइची योकोइ सापडला.त्याला दुसरे महायुद्ध संपलेले माहितीच नव्हते.**१९६६:भारताच्या तिसर्‍या पंतप्रधान म्हणून इंदिरा गांधी यांचा शपथविधी झाला.**१९६६:एअर इंडियाचे 'कांचनगंगा' हे विमान युरोपातील आल्प्स पर्वतातील माँट ब्लँक या शिखरावर कोसळले. या अपघातात भारतातील अणूविज्ञानाचे शिल्पकार डॉ.होमी जहांगीर भाभा यांचे निधन झाले.**१९४३:पुण्यातील कॅपिटॉल चित्रपटगृहात बॉम्बस्फोट होऊन चार जण ठार**१९४२:दुसरे महायुद्ध – दोस्त राष्ट्रांनी बँकॉकवर बॉम्बहल्ला केला. यामुळे थायलँडला इंग्लंड व अमेरिकेविरुद्ध युद्ध पुकारणे भाग पडले.**१९१६:नागरी स्वातंत्र्यावर आक्रमण होते या कारणामुळे अमेरिकन सर्वोच्‍च न्यायालयाने प्राप्तिकर घटनाबाह्य ठरविला.**१८६२:बुखारेस्ट ही रुमानियाची राजधानी करण्यात आली.**१८५७:दक्षिण आशियातील पहिल्या विद्यापीठाची कोलकाता येथे स्थापना झाली.**१८४८:कॅलिफोर्निया गोल्डरश – कॅलिफोर्नियातील सटर्स मिल येथे एका ओढ्यात जेम्स मार्शल नावाच्या माणसाला मोठ्या प्रमाणात सोने सापडले. या बातमीमुळे जगभरातून लाखो लोक सोने मिळवण्यासाठी कॅलिफोर्नियात दाखल होऊ लागले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_*••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९७४:जयंत देवाजी लेंझे-- कवी* *१९७१:प्रा.डॉ.गणेश नत्थुजी चव्हाण -- प्रसिद्ध भरकाडीकार,लेखक,संपादक* *१९५६:रामकृष्ण दत्तात्रेय पराडकर-- कवी, लेखक,संपादक**१९५३:भगवान ठग-- प्रसिद्ध कवी आणि अनुवादक (मृत्यू:२२जानेवारी२००९)**१९४७:जयप्रकाश बाळकृष्ण म्हात्रे -- विज्ञान चळवळीचे कार्यकर्ते,वक्ते,लेखक* *१९४४:रामदास पाध्ये -- बोलक्या बाहुलीचे निर्माते आणि त्यांचे प्रयोग करणारे कलाकार* *१९४४:अशोक शेवडे --चित्रपट आणि नाटक विषयांवरील ज्येष्ठ पत्रकार (मृत्यू:१८ मार्च २०२१)**१९४३:सुभाष घई – प्रसिद्ध हिन्दी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व पटकथालेखक**१९३९:नामदेव वासुदेव लोटणकर-- कवी* *१९३६:लक्ष्मण बाकू रायमाने-- मराठी व कानडी साहित्याचे गाढे अभ्यासक,लेखक आणि समीक्षक**१९२६:जय ओम प्रकाश-- प्रसिद्ध भारतीय चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक(मृत्यू:७ ऑगस्ट २०१९)**१९२४:मेघश्याम पुंडलिक तथा मे. पुं. रेगे – तत्त्वचिंतक,मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष (मृत्यू:२८ डिसेंबर२०००)**१९२३:रतन साळगावकर ऊर्फ हंसा वाडकर – मराठी व हिन्दी चित्रपट अभिनेत्री ’सांगत्ये ऐका’ नावाचे त्यांचे आत्मचरित्रही प्रसिद्ध आहे. (मृत्यू:२३ ऑगस्ट १९७१)**१९१८:वामन बाळकृष्ण भागवत-- लेखक, संस्कृत भाषातज्ज्ञ(मृत्यू:९ फेब्रुवारी २००४)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१६:आनंद विनायक जातेगावकर--मराठी कथालेखक व कादंबरीकार(जन्म:६ जून १९४५)**२०११:स्वरभास्कर पण्डित भीमसेन जोशी – सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक (जन्म:४ फेब्रुवारी १९२२)**२००५:अनुताई लिमये – गोवा मुक्तिसंग्राम, संयुक्त महाराष्ट्राचा लढा यात सक्रीय सहभाग घेणार्‍या स्वातंत्र्यसेनानी आदिवासी महिला व बालकांच्या कल्याणासाठी झटणार्‍याव सामाजिक कार्यकर्त्या**२०००:केशव पांडुरंग जोग--राष्ट्रीय संस्कृत व्याख्याता,संशोधक(जन्म:२६ मार्च १९२५)**१९९६:वसंत देव-- भारतीय लेखक,गीतकार आणि पटकथा लेखक(जन्म:१९२९)**१९६६:एअर इंडियाचे ’कांचनगंगा’ हे विमान युरोपातील आल्प्स पर्वतात कोसळुन भारतीय भौतिकशास्त्रज्ञ डॉ.होमी जहांगीर भाभा मृत्यूमुखी पडले. (जन्म:३०आक्टोबर १९०९)**१९६५:विन्स्टन चर्चिल – दुसर्‍या महायुद्धकाळातील ब्रिटनचे पंतप्रधान, साहित्यिक,वृत्तपत्रकार,थोर राजकारणी आणि नोबेल पारितोषिक विजेते (जन्म:३० नोव्हेंबर १८७४)* *_शुभ बुधवार_* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*26 जानेवारी : प्रजासत्ताक दिन*आपल्या देशात प्रामुख्याने दोन दिवस राष्ट्रीय सण म्हणून मोठ्या उत्साहात साजरी केली जातात. एक म्हणजे स्वातंत्र्य दिन आणि दुसरे प्रजासत्ताक दिन होय. प्रजासत्ताक दिनाला गणराज्य दिन किंवा गणतंत्र दिवस म्हणून सुद्धा ओळखले जाते. ........... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *लोकसभा निवडणूक 16 एप्रिलला होणार या व्हायरल पत्राचे स्पष्टीकरण देत निवडणूक आयोग म्हणाले, ही तारीख फक्त कामकाजाच्या संदर्भासाठी*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकुर यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *सूरत डायमंड बोर्सकडे हिरे व्यापाऱ्यांची पाठ, वल्लभभाई लखानींसह बड्या व्यापाऱ्यांचा पुन्हा मुंबईकडे मोर्चा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मराठा आरक्षण सर्व्हेच्या पहिल्याच दिवशी अडथळे, सर्वर बंद झाल्याने काही वेळासाठी कामकाज रखडलं*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *पुण्यात 1 लाख 75 हजार मतदार वाढले, तरुण मतदारांच्या संख्येतही मोठी वाढ*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *सोन्या-चांदीचे दागिने महागणार? केंद्र सरकारने आयातकर वाढवला आणि उपकरही लावला*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *ICC कडून 2023 वनडे टीमची घोषणा, 6 भारतीयांना स्थान, रोहितकडे नेतृत्व, पाकिस्तानचा एकही खेळाडू नाही*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••केरळमधील एका रेस्टॉरंटमधील घटना सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. हे रेस्टॉरंटचं बिल हे मल्याळम भाषेत आहे. ही कहाणी मानवतेच्या दृष्टीकोनातून सर्वात महत्वाची मानली जात आहे. केरळमधील मल्लापुरम भागातील रेस्टॉरंटमध्ये एक जण जेवत होता. बाहेर उभ्या असलेल्या लहानशा भाऊ-बहिणीचे डोळे त्या व्यक्तीच्या जेवणाच्या ताटाकडे भूकेच्या नजरेने पाहत होते. त्या व्यक्तीने इशारा केला, चिमुकल्या भाऊ-बहिणींची नाजूक, पण गरीबीच्या खुणा असलेली पावलं, घाबरत-घाबरत रेस्टॉरंटमध्ये पडली. जेवत असलेल्या त्या व्यक्तीने काय खायचंय ? असा इशारा केल्यावर, भावा-बहिणीने त्या व्यक्तीच्या ताटाकडे इशारा केला. चिमुकल्यांसाठीही जेवण मागवण्यात आलं. मुलं लहानशा हातात येईल तेवढं, पटापट खात होते, त्यांचं लक्ष फक्त ताटाकडे होतं. भरपेट जेवा, असं सांगण्याचंही काम त्या व्यक्तीला आलं नाही. छोट्याशा निष्पाप पोटातली, भूकेची भीषण आग विझत असावी. मुलांचं जेवण झालं, रेस्टॉरंटच्या काऊंटरवरून बिल आलं, बिल पाहून व्यक्ती चक्रावला, बिलावरचा आकडा कधीही न विसरता येणारा होता, बिलावर लिहिलं होतं..."आमच्याकडे असं मशीन किंवा आकडा नाहीय, की ज्यात मानवतेची किंमत मोजता येईल, परमेश्वर तुमचं भलं करो..!"🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼*संकलन :- श्याम ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कारण सांगणारी लोक यशस्वी होत नाही आणि यशस्वी होणारे लोक कारण सांगत नाही.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 राहुल तांबे, मुंबई👤 मेघा हिंगमिरे👤 आशिष कोटगिरे👤 सोनू राजेंद्र येरमलवाड👤 प्रशांत उकिरडे, सहशिक्षक, बार्शी👤 रेश्मा कासार, पुणे👤 सिध्दांत मनूरकर, पाथर्डी👤 योगेश फत्तेपुरे👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जया चक्षुने लक्षिता लक्षवेना। भवा भक्षिता रक्षिता रक्षवेना॥ क्षयातीत तो अक्षयी मोक्ष देतो। दयादक्ष तो साक्षिने पक्ष घेतो॥१७४॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••दिवसभरात आपल्याला अनेक कल्पना सुचत असतात. काही कल्पना योग्य वाटतात तर काही नको वाटतात. म्हणून त्याकडे आपण दुर्लक्ष करायचे का...?. वेळ, प्रसंगी सांगता येत नाही एकादी कल्पना आपल्यासाठी दिशादर्शक ठरू शकते. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आत घेतलं. पण चौकशी करताना जेव्हा पहारेकऱ्याच्या कळालं कि ज्यांना रात्री आपण दरवाजावर आडवलं ते खरोखरच महाराजच होते तेव्हा मात्र त्याचे धाबे दणाणले. त्याला त्याचा कडेलोट  दिसू लागला. चेहरा भीतीने पंधरा पडला.पहारेकऱ्याची अवस्था महाराजांच्या लक्षात आली. ते शांत पावलानं पहारेकऱ्याजवळ गेले. त्याच्या पाठीवर शाब्बासकीची थाप दिली. स्वतःच्या गळ्यातला कंठा काढून त्याच्या गळ्यात घातला. आणि म्हणाले, "तुमच्यासारख्या  प्रामाणिक सोबत्यांच्या जिवावरच आमचं स्वराज्य उभं आहे. "•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 23 जानेवारी 2024💠 वार - मंगळवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://nasayeotikar.blogspot.com/2024/01/super-handwriting.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_ या वर्षातील २३वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२००२:वॉल स्ट्रीट जर्नलचा पत्रकार डॅनिअल पर्ल याचे कराचीतुन अपहरण**१९९७:मॅडलिन ऑलब्राईट या अमेरिकेच्या पहिल्या महिला परराष्ट्रमंत्री बनल्या.**१९७३:अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी व्हिएतनाम बरोबर शांतता करार झाल्याचे जाहीर केले.**१९६८:शीतयुद्ध – उत्तर कोरियाने अमेरिकेची यू.एस.एस.प्युएब्लो ही युद्धनौका ताब्यात घेतली.**१९४३:दुसरे महायुद्ध – ब्रिटिश सैन्याने त्रिपोली (लिबीयाची राजधानी) शहर जिंकले.**१९३२:’प्रभात’च्या ’अयोध्येचा राजा’ची हिन्दी आवृत्ती’अयोध्याका राजा’ मुंबईत प्रदर्शित झाली.**१८४९:डॉ.एलिझाबेथ ब्लॅकवेल ही वैद्यकशास्त्रातील पहिली महिला पदवीधर बनली.**१७०८:छत्रपती शाहू महाराजांनी स्वत:ला राज्याभिषेक करवून घेतला. त्याच दिवशी सातारा ही राज्याची नवी राजधानी जाहीर केली गेली.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९०:देविदास महादेव सौदागर -- कवी लेखक**१९७१:मेघना जोशी -- कवयित्री* *१९६९:अनिल मनोहर कपाटे (अनिल शेवाळकर)-- कवी,कथाकार,कादंबरीकार* *१९६६:भागवत घेवारे -- कवी* *१९६२:मेधा इनामदार -- लेखिका* *१९५५:भगवान कृष्णा हिरे -- लेखक, अभिनेता,दिग्दर्शक,तज्ञ परीक्षक* *१९५३:डॉ.विलास चिंतामण देशपांडे -- प्रसिद्ध ज्येष्ठ लेखक,संपादक* *१९५२:अशोक बाबुराव लोणकर-- कवी, लेखक,संपादक**१९५०:आसावरी काकडे-- सुप्रसिद्ध मराठी-हिंदी कवयित्री आणि गद्यलेखिका**१९४७:मेगावती सुकार्नोपुत्री – इंडोनेशियाच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष**१९४७:डॉ.प्रमिला जरग-- लेखिका**१९४६:विजय पांडुरंग शेट्ये-- कवी,लेखक**१९४६:डॉ.सुभाष सावरकर --साहित्यिक, समीक्षक,संपादक (मृत्यू:२३ सप्टेंबर २०१३)**१९३९:अ‍ॅड.जयंत काकडे -- सुप्रसिद्ध साहित्यिक,व्यंगचित्रकार* *१९३५:विलास शंकरराव साळोखे-- लेखक**१९३५:प्रमोद सच्चिनानंद नवलकर --- जेष्ठ साहित्यिक,माजी मंत्री,(मृत्यू:२० नोव्हेंबर २००७)**१९३४:सर विल्यम हार्डी – ब्रिटिश जीवरसायनशास्त्रज्ञ (मृत्यू:६ एप्रिल १८६४)**१९२६:बाळ केशव ठाकरे ऊर्फ बाळासाहेब ठाकरे -- महाराष्ट्रातील शिवसेना पक्षाचे संस्थापक,राजकारणी,संपादक,व्यंगचित्रकार (मृत्यू:१७ नोव्हेंबर २०१२)**१९२०:श्रीपाद रघुनाथ जोशी--- कोल्हापूर येथील मराठी लेखक,शब्दकोशकार व अनुवादक(मृत्यू:२४ सप्टेंबर २००२)* *१९१५:कमलनयन बजाज – उद्योगपती, जमनालाल बजाज यांचे चिरंजीव,बजाज आटो,बजाज इलेक्ट्रिकल्स,उदयपूर सिमेंट इ. कंपन्यांचे अध्यक्ष (मृत्यू:१ मे १९७२)**१८९८:पं.शंकरराव व्यास – गायक व संगीतशिक्षक,पं. विष्णू दिगंबर पलुसकर यांचे शिष्य (मृत्यू:१७ डिसेंबर १९५६)**१८९७:नेताजी सुभाषचंद्र बोस-- भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक अग्रेसर नेते (मृत्यू: १८ ऑगस्ट १९४५ )**१८१४:सर अलेक्झांडर कनिंगहॅम – भारतातील पुरातत्त्व संशोधनाची मुहूर्तमेढ करणारे ब्रिटिश अधिकारी (मृत्यू:२८ नोव्हेंबर १८९३)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१८:प्रा.डॉ.अनिल नितनवरे--मराठीचे गाढे अभ्यासक,कवी,प्रयोगशील एकांकिकाकार तथा समीक्षक(जन्म:१९६५)**२०१०:पं. दिनकर कैकिणी – शास्त्रीय गायक (जन्म:२ आक्टोबर १९२७)**१९९२:ह.भ.प.धुंडामहाराज देगलूरकर– भक्तिसांप्रदायिक आणि ज्ञानेश्वरीचे गाढेअभ्यासक(जन्म:१५ मे १९०४)**१९८९:साल्वादोर दाली – स्पॅनिश चित्रकार. (जन्म:११ मे १९०४)**१९८२:मुद्दू बाबू शेट्टी-- हिंदी चित्रपटातील स्टंटमन,अॅक्शन कोरिओग्राफर आणि अभिनेता(जन्म:१ जानेवारी १९३८)**१९५९:विठ्ठल नारायण चंदावरकर – शिक्षणतज्ञ आणि कायदेपंडित**१९३१:अ‍ॅना पाव्हलोव्हा – ’द डाइंग स्वान’ म्हणून प्रसिद्ध असलेली रशियन बॅलेरिना (जन्म:१२ फेब्रुवारी १८८१)**१९१९:राम गणेश गडकरी – नाटककार,ककवी व विनोदी लेखक(जन्म:२६ मे १८८५)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जागतिक हस्ताक्षर दिवस त्यानिमित्ताने प्रासंगिक लेख*सुंदर हस्ताक्षर : एक दागिना*शाळेतील विद्यार्थ्यांच्या गृहपाठाच्या वह्या तपासतांना सुंदर हस्ताक्षरात लिहलेल्या वह्या मनाला आनंदीत करून जातात. खरोखरच वळणदार अक्षराला किती महत्व आहे ! सुंदर हस्ताक्षर पाहुन त्या मुलाचे कौतूक केल्याशिवाय कुणालाच राहवत नाही............. पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *वनवास संपला, प्रभू रामलल्ला आता तंबूत राहणार नाहीत, ते दिव्य मंदिरात राहणार; प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे उद्गार*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *अयोध्येच्या राम मंदिरामुळे पर्यटक वाढणार आणि यूपीची तिजोरी भरणार, राज्याच्या महसुलात 25 हजार कोटींच्या वाढीची शक्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *श्रीराम मंदीर प्राणप्रतिष्ठापणा निमित्ताने देशभर दुसऱ्यांदा साजरी झाली दिवाळी*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सह त्यांच्या चाळीस आमदारांना सर्वोच्च न्यायालयाची नोटिस*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी प्रयत्न:राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांचे प्रतिपादन*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *रवी शास्त्री यांना जीवन गौरव तर शुभमन गील यांना BCCI कडून वर्षातील सर्वोत्तम खेळाडू पुरस्कार*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *किंग कोहलीची इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटीतून माघार; बीसीसीआयची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *आपल्याला भूक का लागते ?* 📙 आपलं शरीर सतत काम करत असतं. जेव्हा आपण विश्रांती घेत असतो किंवा झोपेत असतो तेव्हाही श्वसन, रक्ताभिसरण, हृदयाची धडधड यांसारख्या प्रक्रिया चालूच असतात. त्यामुळे शरीराला सतत ऊर्जेची गरज भासते. हिचा पुरवठा अखंड असण्यासाठी शरीराला वेळोवेळी पोषण मिळणं आवश्यक असतं. आपण जेव्हा अन्न खातो तेव्हा हे पोषण मिळतं. ते साठवूनही ठेवलं जातं. पण तो साठा संपला की परत पोषक पदार्थ शरीराला मिळण्याची गरज असते. याचीच जाणीव आपल्याला करून देण्यासाठी भुक लागण्याची भावना निर्माण होते.आपल्या मेंदूमधील हायपोथॅलॅमस या अवयवामध्ये भुकेवर नियंत्रण ठेवणारं केंद्र असतं. त्याला संदेश मिळाला की ते कार्यरत होतं आणि भुकेची भावना जागृत करतं. त्या केंद्राला मिळणारे संदेश विविध प्रकारचे असतात. त्यातले काही शरीराच्या आतून उत्पन्न होतात. म्हणजेच ते अंतर्गत असतात, तर काही बाहेरून येणारे असतात.शरीराला ऊर्जा मिळते ते ग्लुकोजच्या ज्वलनातून. त्यामुळे रक्तात ग्लुकोजचं प्रमाण एका निर्धारित पातळीवर नेहमी राहील याची व्यवस्था केलेली असते. ते जर त्या पातळीपेक्षा फारच चढलं तर ते आरोग्याला बाधक असल्यानं इन्सुलीन या संप्रेरकाचा पाझर सुरू होतो. ते संप्रेरक ग्लुकोजची निर्धारित पातळी राखण्यात मदत करतं. जर ग्लुकोजची पातळी या निर्धारित प्रमाणापेक्षा फारच घसरली तर तो संदेश मिळून भुकेचं केंद्र जागृत होतं. त्यावेळी आपण पुरेसं अन्न पोटात टाकलं तर मग भुक मिटल्याची भावनाही याच केंद्रातून निर्माण केली जाते.आपल्या पोटाचं आकारमानही विशिष्ट पातळीवर ठेवण्याची व्यवस्था केली जाते. तसंच ते काही विविक्षित प्रमाणात भरलेलं असेल हेही बघितलं जातं. पोट जर रिकामं झालं तर ते आकुंचन पावून त्याचं आकारमान घटतं. भुकेचं केंद्र जागृत करायला तोही एक संदेश पुरतो. अशा वेळी पाणी पिऊन आकारमान वाढवलं तरीही भुक भागल्याची भावना निर्माण होते.आज जरी आपल्याला हवं तेव्हा अन्न उपलब्ध होत असलं तरी आदिमानवाच्या काळात जेव्हा रानावनात कंदमुळे गोळा करून किंवा शिकार करून मनुष्यप्राणी आपली पोषणाची गरज भागवत होता. तेव्हा अन्न केव्हा मिळेल याची शाश्वती नव्हती. त्यामुळे असं ते मिळालं की प्रत्यक्ष पोषणाची आवश्यकता असो-नसो, त्याच्या दर्शनाने किंवा गंधानंही भुकेची भावना चाळवली जात असे. उत्क्रांतीच्या ओघात हा गुणधर्म टिकून राहिला आहे. त्यामुळे स्वादिष्ट अन्न दिसलं किंवा त्याचा दरवळ नाकपुड्यांना चाळवून गेला म्हणजेही आपल्याला भूक लागते.*बाळ फोंडके यांच्या 'का ?' या पुस्तकातून**संकलन :- श्याम ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कल्पनाशक्ती ही ज्ञानापेक्षा जास्त महत्वाची आहे.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) भारतातील सर्वात मोठी पाकोळी पक्ष्याची वीण वसाहत कोठे आहे ?२) लष्करी क्षमतेच्या बाबतीत सर्वात शक्तिशाली देश कोणता ?३) हेनले पासपोर्ट इंडेक्स २०२४ मध्ये भारताचा कितवा क्रमांक लागतो ?४) २०२३ चा 'फिफा प्लेअर ऑफ द इअर' हा पुरस्कार कोणी जिंकला ?५) मनोज जरांगे - पाटील कोण आहेत ? *उत्तरे :-* १) बर्ड आयलँड, वेंगुर्ला द्वीप समुह २) अमेरिका ३) ८० वा ४) लिओनेल मेस्सी ५) मराठा आंदोलनाचे नेते*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 संतोष बोधनकर, नांदेड👤 भालचंद्र गावडे, सोलापूर👤 दिनेश चिंतावाड, नांदेड👤 नम्रता उभाळे👤 यदुराज ढगे, चिरली👤 शंकर नरवाडे👤 श्याम खंडेलोटे👤 सुनील बंडेवार, धर्माबाद👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••स्वरुपी उदेला अहंकार राहो। तेणे सर्व आच्छादिले व्योम पाहो॥ दिशा पाहतां ते निशा वाढताहे। विवेके विचारे विवंचुनि पाहे॥१७३॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मानवी जीवनात विनोदाला विशेष महत्त्व आहे. जर एखादी व्यक्ती हसत असेल तर असे मानले जाते की व्यक्ती त्याच्या आयुष्यात आनंदी आहे. जर एखाद्याच्या आयुष्यात हास्य आणि उत्साह असेल तर त्याचे जीवन सुंदर मानले जाते.हसणे जीवन आहे, हसवणे ही एक प्रकारची कला आहे व स्वतः आनंदाने हसत राहून दुसऱ्याला रडवणे ही कुटनीती आहे. ह्या तिनही मध्ये खूप फरक आहे. म्हणून नेमकं हास्य काय असते हे कळणे आवश्यक आहे. जेव्हा या विषयी कळेल तेव्हा खऱ्या अर्थाने हास्य या नावाचा मान राहील. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*चल रे भोपळया टुणुक टुणुक*एक होती म्हातारी. एकदा ती आपल्या लेकीकडे जायला निघाली. लेक रहायची दुसर्‍या गावाला.रस्त्यांत होते मोठे जंगल. म्हातारी काठी टेकत, टेकत रस्त्याने निघाली. वाटेत तिला भेटला कोल्हा. तो म्हणाला 'म्हातारे, म्हातारे, मी तुला खातो'. पण म्हातारी होती हुषार. ती म्हणाली 'मला खाऊन तुझे पोट भरणार नाही. त्यापेक्षा थोडे दिवस थांब. लेकीकडे जाते , तूपरोटी खाते, लठ्ठ मुठ्ठ होते, मग मला खा.' कोल्ह्याला म्हातारीचे म्हणणे पटले.म्हातारी पुढे निघाली. तिला भेटला वाघ. तो म्हणाला 'म्हातारे, म्हातारे, मी तुला खातो'. त्याने डरकाळी फोडली. म्हातारी त्याला म्हणाली 'मला खाऊन तुझे पोट भरणार नाही.त्यापेक्षा थोडे दिवस थांब. लेकीकडे जाते , तूपरोटी खाते, लठ्ठमुठ्ठ होते, मग मला खा. ' वाघाची अशी समजूत काढून म्हातारी पुढे निघाली.लेकीकडे ती खूप दिवस मजेत राहिली. खाऊन पिऊन लठ्ठमुठ्ठ झाली. आपल्या घरी परत येताना तिने एक मोठा लाल भोपळा घेतला. त्यात बसून ती भोपळयाला म्हणाली ' चल रे भोपळया टुणुक टुणुक'. भोपळा रस्त्याने निघाला. वाटेत वाघाने भोपळा पाहिला. तो म्हणाला 'म्हातारे, म्हातारे थांब!' आतून म्हातारी म्हणाली 'कशाची म्हातारी आणि कशाची कोतारी. चल रे भोपळया टुणुक टुणुक'. त्याबरोबर भोपळा जोरात पळू लागला. पुढे गेल्या भेटला कोल्हा. कोल्ह्यानेही भोपळयाला थांबवण्याचा प्रयत्न केला. पण म्हातारी आतून म्हणाली 'चल रे भोपळया टुणुक टुणुक!'. पुन्हा भोपळा जोरात पळू लागला.अशी होती म्हातारी हुषार. कोल्हा आणि वाघाच्या तावडीत ती काही सापडली नाही. भोपळयात बसून ती सुखरूप आपल्या घरी पोचली.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 20 जानेवारी 2024💠 वार - शनिवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://nasayeotikar.blogspot.com/2016/11/blog-post_23.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_ या वर्षातील २०वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२००९:अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचा शपथविधी झाला.**१९९९:गिरीश कर्नाड यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर**१९९८:संगीत क्षेत्रातील नोबेल समजला जाणारा ’पोलार संगीत पुरस्कार’ विख्यात सतारवादक पं. रविशंकर यांना जाहीर**१९६३:चीन व नेपाळ या देशांत सरहद्दविषयक करार झाला.**१९४४:दुसरे महायुद्ध – रॉयल एअर फोर्सने बर्लिनवर २३०० टन बॉम्बवर्षाव केला.**१९३७:फ्रॅंकलिन डिलानो रूझवेल्ट यांनी अमेरिकेचे ३२ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून अमेरिकेच्या अध्यक्षपदाची शपथ घेतली. यानंतर २० जानेवारीलाच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा शपथविधी करण्याची प्रथा पडली.**१८४१:ब्रिटिशांनी हाँगकाँग बेटाचा ताबा घेतला.**१७८८:इंग्लडमधून हद्दपार केलेले गुन्हेगार वसाहतीसाठी ऑस्ट्रेलियातील न्यू साऊथ वेल्सच्या किनार्‍यावर उतरले. इथे वसाहत करण्यासाठी तयार झालेल्या गुन्हेगारांची शिक्षा माफ करण्यात आली होती.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८६:डॉ. कोंडबा भगवान हाटकर-- लेखक**१९८०:दिनेशकुमार रामदास अंबादे-- कवी* *१९७७:अॅड.नीता प्रफुल्ल कचवे-- कवयित्री,कादंबरी,कथालेखिका* *१९७२:भुपेश पांड्या --चित्रपट अभिनेते (मृत्यू:२३ सप्टेंबर २०२०)**१९७०:डॉ.मंजुषा सुनील सावरकर -- कथा लेखिका,संपादिका* *१९६८:प्रा.अन्नपूर्णा अजाबराव चौधरी-- कवयित्री,लेखिका**१९६४:साहेबराव आनंदराव नंदन-- समाज प्रबोधन,लेखक**१९६३:अमोल मारुती रेडीज -- लेखक,कवी* *१९६०:स्टीफन एम.परेरा-- कथाकार* *१९६०:आपा शेर्पा – १९ वेळा माऊंट एव्हरेस्टवर यशस्वी चढाई करणारे नेपाळी गिर्यारोहक**१९५४:विजय शं.माळी- प्रसिद्ध कवी,लेखक* *१९५१:वसंत सीताराम पाटणकर-- मराठी साहित्यातील प्रसिद्ध कवी,समीक्षक**१९५०:प्राचार्य डॉ.रमेश अंधारे-- कादंबरीकार,संपादक**१९४७:फुलचंद पत्रुजी खोब्रागडे -- कवी, लेखक* *१९४७:लीला प्रभाकर गाजरे-- कवयित्री**१९४६:डॉ.शोभा अभ्यंकर-- भारतीय संगीतशास्त्रज्ञ आणि मेवाती घराण्याच्या शिक्षिका(मृत्यू:१७ ऑक्टोंबर २०१४)**१९४५:डॉ.माणिक तुकाराम वैद्य-- कवी* *१९३७:प्राचार्य डॉ.दाऊद दळवी-- इतिहासाचे अभ्यासक(मृत्यू:३१ ऑगस्ट २०१६)**१९२४:मनोहर नामदेव वानखडे-- व्यासंगी साहित्यसमीक्षक आणि दलितांच्या वाङ्‌मयीन-सांस्कृतिक चळवळींचे नेते(मृत्यू:१ मे १९७८)**१९२०:विष्णुपंत पुरुषोत्तम भागवत-- लेखक, संपादक (मृत्यू:२३ डिसेंबर १९७५)**१८९८:कृष्णाजी गणेश फुलंब्रीकर तथा ’मास्टर कृष्णराव’ – प्रतिभावान गायक, अभिनेते व संगीतकार (मृत्यू:२० आक्टोबर १९७४)**१८७१:सर रतनजी जमसेटजी टाटा – टाटा घराण्यातील उद्योगपती व दानशूर व्यक्ति (मृत्यू:५ सप्टेंबर १९१८)**१८६१:काशीबाई गोविंदराव कानिटकर --आधुनिक मराठी साहित्यातील आद्यलेखिका(मृत्यू:३० जानेवारी १९४८)**१७७५:आंद्रे अ‍ॅम्पिअर – फ्रेन्च भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू:१० जून १८३६)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२००९:भगवान ठग -- कवी आणि अनुवादक(जन्म:२४ जानेवारी १९५३)**२००२:रामेश्वरनाथ काओ – रिसर्च अँड अ‍ॅनॅलेसिस विंग (RAW) या भारतीय गुप्तचर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष.काओ यांना भारतीय गुप्तचर यंत्रणेचे अध्वर्यू मानण्यात येते.(जन्म:१० मे १९१८)**२००९:बाळ गंगाधर सामंत--मराठी लेखक, विनोदकार व चरित्रकार (जन्म:२७ मे १९२४)**१९९३:ऑड्रे हेपबर्न – ब्रिटिश अभिनेत्री, संयुक्त राष्ट्रांच्या बालक निधीच्या (UNICEF) सदिच्छा प्रतिनिधी,’रोमन हॉलिडे’ या चित्रपटातील अभिनयाबद्दल त्यांना ऑस्कर पुरस्कार मिळाला. (जन्म:४ मे १९२९)**१९८८:खान अब्दुल गफार खान तथा ’सरहद गांधी’सरहद्द प्रांत आणि बलुचिस्तानमधील एक महान राजकारणी,ज्यांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला (जन्म:३ जून १८९०)**१९८०:कस्तुरभाई लालभाई – दानशूर व राष्ट्रवादी विचारसरणीचे उद्योगपती, पद्मभूषण(जन्म:१९ डिसेंबर १८९४)**१९५१:अमृतलाल विठ्ठलदास ठक्कर ऊर्फ ’ठक्कर बाप्पा’ – समाजसेवक (जन्म:२९ नोव्हेंबर १८६९)**१९३६:जॉर्ज (पाचवा) – इंग्लंडचा राजा (जन्म:३ जून १८६५)**१८९१:डेविड कालाकौआ – हवाईचा राजा (जन्म:१६ नोव्हेंबर १८३६)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*पाऊलवाट : शिक्षण क्षेत्रातील एक दिशादर्शक पुस्तक*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा निमित्ताने राज्यात २२ जानेवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *हवामान बदलामुळे गेल्या 10 वर्षांत भारतात मान्सूनमधील पर्जन्यमानामध्ये ५५ टक्‍के वाढ: CEEW चा अहवाल*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *हिंगोली - राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षकावर चाकूने हल्ला:हल्ल्यात शिक्षक गंभीर जखमी; हल्लेखोरांवर गुन्हा दाखल, चौकशी सुरू*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मुंबई : पर्यटन सदिच्छा दूतपदी माजी मिस इंडिया युनिव्हर्स नवेली देशमुख यांची नियुक्ती*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *20 ते 28 जानेवारी दरम्यान मुंबई फेस्टिव्हल 2024 चं आयोजन*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *मनोज जरांगेंचं वादळ राजधानीत धडकणार ! आज अंतरवाली सराटी येथून करणार सुरुवात*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *टीम इंडियाच्या युवा ब्रिगेडचं 'मिशन वर्ल्ड कप' दक्षिण आफ्रिकेत इतिहास रचण्यासाठी सज्ज*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••निसर्ग रुसल्याने नंदनवन ओस काश्मीर म्हणजे साक्षात पृथ्वीवरील नंदनवन. काश्मीर मधील निसर्गाची संपूर्ण जगाला भुरळ पडली आहे विशेषतः हिवाळ्यात काश्मीर मध्ये जाऊन काश्मीरमधील निसर्ग जीवनात एकदातरी अनुभवावा ही प्रत्येकाची इच्छा असते. निसर्गाने काश्मीरला जे दान दिले आहे तसे दान इतर कोणत्याही प्रदेशाला दिले नाही म्हणूनच काही जण काश्मीरला जमिनीवरचा स्वर्ग असेही म्हणतात. झेलम, चिनाब, निडर आदी नद्यांचे खळखळते पाणी, हिरवीगार जंगलसंपदा आणि बर्फाच्छादित पर्वत, धुक्याने पांघरलेली चादर त्यामुळे काश्मीर हे पर्यटकांचे आवडते थंड हवेचे ठिकाण आहे मात्र याच काश्मीरला गेल्या काही वर्षापासून कोणाची तरी नजर लागली. काश्मीरमध्ये पाकिस्तानने दहशतवाद पोसला सतत होणाऱ्या दहशतवादी कारवायांमुळे पृथ्वीवरील या नंदनवनात पर्यटक जीव मुठीत धरूनच येत असे मात्र केंद्र सरकारने काश्मीरला लागू असलेले ३७० वे कलम हटवल्याने तेथील दहशतवादी कारवाया कमी झाल्या त्यामुळे काश्मीरमध्ये पर्यटक पुन्हा परततील अशी आशा वाटू लागली. झालेही तसेच मागील वर्षी जानेवारीच्या मध्यापर्यंत जवळपास १ लाख पर्यटकांनी काश्मीरला भेट दिली होती त्यात परदेशी पर्यटकांची संख्याही लक्षणीय होती. काश्मीरमध्ये पर्यटक परतू लागल्याने स्थानिक काश्मिरी लोकांनाही रोजगार मिळू लागला. काश्मीरचे गेलेले वैभव परत येऊ लागले असे वाटत होते. गेल्या वर्षी पर्यटकांनी काश्मीरला पसंती दिल्याने यावर्षी मागील वर्षापेक्षा अधिक पर्यटक काश्मीरला भेट देतील असे वाटू लागले होते. पर्यटकांनी नंदनवन पुन्हा बहरू लागेल असे वाटत असतानाच काश्मीरला पुन्हा कोणाची तरी नजर लागली. यावर्षी काश्मीरमधील निसर्गाने खप्पा मर्जी केली. निसर्ग रुसल्याने यावर्षी म्हणावी तशी बर्फवृष्टी झाली नाही. गुलमर्ग हे काश्मीरमधील सर्वांचे आवडते थंड हवेचे ठिकाण. काश्मीरला जाणारा पर्यटक आवर्जून गुलमर्गचा निसर्ग अनुभवायला गुलमर्ग ला भेट देतोच मात्र यावर्षी गुलमर्ग बर्फाविना कोरडे पडले आहे. संपूर्ण काश्मीर खोऱ्यात च म्हणावी तशी बर्फवृष्टी झाली नाही. अगदी तुरळक बर्फवृष्टी झाल्याने पर्यटकांना बर्फातील स्कियिंग आणि अन्य खेळ खेळता येत नाहीत त्यामुळेच अनेक पर्यटकांनी काश्मीर चे केलेले बुकिंग रद्द केले आहे. यावर्षी मागील वर्षापेक्षा ५० टक्के पर्यटकही आले नाहीत. पर्यटक नसल्याने हिवाळ्यातील सर्व व्यवसाय थंड पडले आहेत. स्थानिक लोकांचा रोजगार बुडाला. काही चित्रपट निर्मात्यांनी काश्मीरमधील चित्रीकरणही रद्द केले आहे. पर्यटक येत नसल्याचा परिणाम काश्मीरच्या अर्थ्यवस्थेवरही झाला आहे. गेल्या वर्षी पर्यटकांनी बहरलेले हे नंदनवन आज पर्यटकांविना ओस पडले आहे. गेल्या अनेक वर्षात अशी परिस्थिती निर्माण झाली नव्हती असे तेथील जाणकार सांगतात. इतका कमी बर्फवृष्टी यापूर्वी कधी अनुभवली नव्हती असेही तेथील काही लोक सांगतात. यावर्षी निसर्गाने काश्मीरवर अवकृपा केल्याने काश्मीरच नाही तर देश चिंतेत आहे. यावर्षी जरी निसर्गाने अवकृपा केली असली तरी पुढील वर्षी तरी निसर्ग काश्मीरवर कृपा करेल पृथ्वीवरील हे नंदनवन पर्यटकांनी पुन्हा बहरेल अशी अपेक्षा स्थानिक नागरिकच नव्हे संपूर्ण देशातील नागरिक व्यक्त करत आहेत. श्याम ठाणेदार, दौंड जिल्हा पुणे ९९२२५४६२९५••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••चांगला गुरु यशाचे दरवाजे उघडून देऊ शकतो, पण त्यातून यशाच्या दिशेने जाण्यासाठी स्वतःलाच चालावे लागते.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) अयोध्या येथील राममंदिरात कोणत्या शिल्पकाराने तयार केलेली मूर्ती विराजमान होणार आहे ?२) आंतरराष्ट्रीय टी - २० क्रिकेट स्पर्धेत सर्वाधिक शतक कोणी केले ?३) महाराष्ट्रातील सर्वाधिक सिंचन क्षेत्र असलेला जिल्हा कोणता ?४) सर्वात जास्त विमान अपघात केव्हा होतात ?५) फोर्ब्सच्या ताज्या आकडेवारीनुसार सर्वाधिक अब्जाधीश लोक कोणत्या देशात आहेत ? *उत्तरे :-* १) अरूण योगिराज, म्हैसूर २) रोहित शर्मा, भारत ( ५ शतके ) ३) अहमदनगर ४) विमान लँडिंग होतांना ५) अमेरिका ( ७३५ ), भारत ( १६९ अब्जाधीश )*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 किशोर पाटील, युनिक कॉम्प्युटर्स, धर्माबाद👤 शंकर बेल्लूरकर👤 अहमद लड्डा सय्यद, पत्रकार👤 संतोष शेटकार👤 शरयू देसाई👤 माऊली जाजेवार👤 विशु पाटील वानखेडे👤 नागनाथ दिग्रसकर👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••देहेबुद्धि हे ज्ञानबोधे त्यजावी। विवेके तये वस्तुची भेटी घ्यावी॥ तदाकार हे वृत्ति नाही स्वभावे। म्हणोनी सदा तेचि शोधीत जावे॥१७०॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••प्रत्येकालाच एकटे यावे लागते आणि एकटेच जावे लागते हा निसर्गाचा नियम आहे. पण, या जगात जगत असताना आजुबाजूचाही आपण विचार करावा. कोणी आपुलकीने मदत करतात तर कोणाचे सांगता येत नाही. म्हणून कोणी आपुलकीच्या नात्याने मदत केली असेल त्यांना कधीही विसरू नये. व जे, कोणी तिरस्कार करतात त्यांचा राग धरू नये. कारण चांगले करणारेच अजरामर होऊन जातात व जे काहीच करत नाही त्यांचे जीवन व्यर्थ होऊन जाते भलेही सोबत कोणी काहीच घेऊन जात नसले तरी इतरांना केलेली मदत ही माणुसकीची साथ असते.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *कोल्हा आणि नगारा*एकदा एक कोल्हा भुकेने व्याकूळ होऊन जंगलात इकडे तिकडे फिरत होता. तेवढ्यात त्याला मोठा आवाज ऐकू येऊ लागला. त्या आवाजाने कोल्हा चांगलाच घाबरला. पण तो आवाज कोणता प्राणी काढतोय या उत्सुकतेपोटी दबकत दबकत आवाजाच्या दिशेने जाऊ लागला. तर त्याच्या नजरेस एक मोठा नगारा पडला. त्या नगार्‍यावर एका झाडाची फांदी वार्‍यामुळे आपटत होती. त्यामुळे तो मोठा आवाज येत होता. हे कोल्ह्याच्या लक्षात आल्यावर कोल्हा नगार्‍यावर आपला पंजा मारून लागला. तेवढ्यात त्याच्या लक्षात आले की नगार्‍याचे कातडे गुंडाळले आहे. ते ओरबाडले तर आत भरपूर मांस असेल. त्यामुळे निदान दोन दिवसांची तरी भूक शमेल. देवाची कृपा समजून त्याने नगार्‍याचे कातडे कुरतडून फाडले तर... आत काहीच नाही. नुसता पोकळ नगारा बघून कोल्हा दु:खी झाला, पण कातडे कुरतडताना त्याच्या दाढाही दुखावल्या.उपदेश : प्रसंग आनंदाचा किंवा भीतीचा असला तरी जो शहाणा माणूस मागचा पुढचा विचार करून वागतो त्याला पश्चात्ताप करण्याची पाळी येत नाही.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 19 जानेवारी 2024💠 वार - शुक्रवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://nasayeotikar.blogspot.com/2016/12/blog-post_7.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_ या वर्षातील १९वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *१९९६:उस्ताद अल्लारखा खाँ यांची मध्य प्रदेश सरकारच्या कालिदास सन्मानासाठी निवड**१९९६:प्रसिध्द मल्याळी लेखक एम. टी. वासुदेवन नायर यांची १९९५ च्या ज्ञानपीठ पुरस्कारासाठी निवड**१९६८:पहिली यशस्वी ह्रुदयरोपण शस्त्रक्रिया डॉ. ख्रिस्तोफर बर्नाड यांनी केली.**१९५६:देशातील सर्व विमा कंपन्यांचे राष्ट्रीयीकरण करण्याचा राष्ट्रपतींचा वटहुकूम**१९५४:कोयना धरणाच्या जलविद्युत प्रकल्पाचे भूमिपूजन**१९४९:पुणे नगरपालिका व उपनगरपालिका विसर्जित होऊन ’पुणे महानगरपालिका’ स्थापन झाली.**१९४९:क्यूबाने इस्त्रायला मान्यता दिली.**१९४२:दुसरे महायुद्ध – जपानी सैन्याने ब्रह्मदेशवर आक्रमण केले.**१९०३:अमेरिकेचे अध्यक्ष थिओडोर रुझव्हेल्ट यांनी इंग्लंडचे राजे एडवर्ड (सातवे) यांना बिनतारी संदेश पाठवला. अटलांटिक महासागरापार पाठवलेला हा पहिला बिनतारी संदेश होता.**१८३९:ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीने एडनचा ताबा घेतला.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९५: लक्ष्मीदेवी रेड्डी-- कवयित्री* *१९६७:स्वाती घाटे -- कवयित्री**१९६५:प्रा.डॉ.हेमंत खडके-- लेखक* *१९५८:संजीव लक्ष्मण साळगावकर -- लेखक**१९५७:गणेश निवृत्ती आवटे-- लेखक**१९५६:एकनाथ(जीजा) दगडू आवाड-- दलित चळवळीचे नेते आणि मानवी हक्क अभियानाचे राष्ट्रीय अध्यक्ष,लेखक (मृत्यू:२५ मे २०१५)**१९५१:नामदेव ज्ञानदेव आबने-- कवी, गझलकार,लेखक* *१९४९:अनंत शंकरराव भूमकर(नाईक)-- प्रसिद्ध कवी* *१९३९:शरद बापूजी मुंजवाडकर -- लेखक* *१९३६:झिया उर रहमान – बांगलादेशचे ७ वे राष्ट्राध्यक्ष्य (मृत्यू:३० मे १९८१)**१९२४:वसंत प्रभू-- महाराष्ट्रातील संगीतकार(मृत्यू:१३ ऑक्टोबर १९६८)**१९२०:शिवगौडा बाळाप्पा संकनवाडे -पाटील-- लेखक**१९२०:झेवियर पेरेझ द कुइयार – संयुक्त राष्ट्रांचे पाचवे सरचिटणीस**१९०६:विनायक दामोदर कर्नाटकी ऊर्फ ’मास्टर विनायक’ – अभिनेते,दिग्दर्शक व निर्माते.त्यांनी २२ चित्रपटातून भूमिका केल्या तर २९ चित्रपट दिग्दर्शित केले.(मृत्यू:१९ ऑगस्ट १९४७)**१८९२:चिं.वि.जोशी – विनोदी लेखक व पाली साहित्याचे संशोधक (२१: नोव्हेंबर १९६३)**१८८६:रामचंद्र गणेश कुंदगोळकर तथा ’सवाई गंधर्व’ – हिन्दुस्तानी शास्त्रीय गायक, खाँसाहेब अब्दुल करीम खाँ यांचे शिष्य,पं भीमसेन जोशी आणि गंगुबाई हनगळ यांचे गुरू,दादासाहेब खापर्डे यांनी त्यांना 'सवाई गंधर्व' ही पदवी दिली.(मृत्यू:१२ सप्टेंबर १९५२)**१८०९:एडगर अ‍ॅलन पो – अमेरिकन (गूढ व भयकथांचा) लेखक व कवी (मृत्यू:७ आक्टोबर १८४९)**१७३६:जेम्स वॉट – स्कॉटिश संशोधक व यंत्र अभियंता (मृत्यू:२५ ऑगस्ट १८१९)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१८:चारुदत्त सरपोतदार उर्फ चारूकाका--मराठी चित्रपट आणि नाटय़सृष्टीचा चालता-बोलता इतिहास, कलाकारांचे आधारवड, पुण्याचे सार्वजनिक काका (जन्म:१५ मे १९३५)**२००५: भानुदास श्रीधर परांजपे-- कवी,नाटककार (जन्म:१६ मार्च १९१४)**२०००:मुथ्थय्या अन्नामलाई तथा एम.ए. चिदंबरम – उद्योगपती व क्रिकेट प्रशासक, ’बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया’ (BCCI) चे अध्यक्ष;उपाध्यक्ष व खजिनदार,तामिळनाडू क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष, चेन्नईचे महापौर (१९५५),चेन्नईतील ’चेपॉक’ स्टेडियमला त्यांचे नाव देण्यात आले आहे.(जन्म:१२ आक्टोबर १९१८)**१९६०:रामचंद्र गोपाळ ऊर्फ ’दादासाहेब तोरणे – चित्रपट निर्माते व दिग्दर्शक,मराठी चित्रपटसृष्टीचे आद्य प्रवर्तक (जन्म:१३ एप्रिल १८९०)**१९५८:नारायण केशव बेहरे-- विदर्भातील कवी,कादंबरीकार व इतिहासकार (जन्म:४ जुलै १८९०)**१५९७:महाराणा प्रतापसिंह उदयसिंह_ राजस्थान राज्यातील उत्तर-पश्चिम भारतातील मेवाडचा तेरावा राजा (जन्म:९ मे, १५४०)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *हमें तो लूट लिया*मोबाईलमुळे आज जग बदलल्यासारखे आणि जवळ आल्यासारखे वाटत आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात मोबाईलची क्रांती संपूर्ण इतिहास बदलून टाकली आहे. आजही ते पोस्टातील पत्रव्यवहाराचे दिवस आठवले की " डाकिया डाक लाया " हे गीत आठवण आल्या शिवाय राहत नाही. पोस्टमन गावात आला म्हटले की, लोक उत्साहाने त्याच्याकडे पाहायचे कोणाचे पत्र आले म्हणून...........? ..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *कर्मचार्‍यांच्या उदंड भावना आणि त्यांच्या विनंतीमुळे केंद्र सरकारने 22 जानेवारी 2024 रोजी सर्व केंद्र सरकारची कार्यालयं, केंद्रीय संस्था आणि केंद्रीय औद्योगिक आस्थापनं राम मंदिर प्राणप्रतिष्ठानिमित्त दुपारी 2:30 वाजेपर्यंत अर्धा दिवस बंद ठेवण्याची घोषणा केली आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *16 वर्षाखालील विद्यार्थ्यांना कोचिंग क्लासेसमध्ये प्रवेश देता येणार नाही, केंद्राच्या नव्या मार्गदर्शक सूचना*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *अदानी ग्रुप महाराष्ट्रात करणार 50 हजार कोटींची गुंतवणूक, 20 हजार जणांना मिळणार रोजगार*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मराठा समाजाचे मागासलेपण तपासणी साठी येत्या 23 जानेवारीपासून सर्वेक्षण होणार सुरू*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *शिंदे समितीला सापडलेल्या 54 लाख नोंदीनुसार तात्काळ कुणबी प्रमाणपत्र देण्याचे आदेश, मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारची कार्यवाही*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना भागाकार जमेना, तर अनेकांना दुसरीतलं मराठीही वाचता येईना; ASER सर्वेक्षणाचा धक्कादायक निष्कर्ष*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *MPSC ची अंतिम गुणवत्ता यादी जाहीर, विनायक पाटील राज्यात प्रथम*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 तारामंडळे व आकाशगंगा 📙विश्वाचा विस्तार व त्यातील असंख्य तारामंडळे यांबद्दल सतत नवनवीन माहिती उपलब्ध होत असते. या सर्वांची गणना करणे हे काम जगभरातील ज्योतिर्विद अनेक वर्षे करत आहेत व ते तसेच चालूही राहील.दीर्घिका, सर्पाला व आकारहीन अशा तीन प्रकारांत विश्वातील तारामंडळे विभागली आहेत. लंबगोलाकृती मोठा पसरट गोल व मध्यभागी थोडी फुगठी असलेल्या तारकामंडळांना 'दीर्घिका' म्हणतात, तर वेटोळे आकृती दिसणाऱ्यांना 'सर्पिला' असे संबोधले जाते. ज्यांचा विशिष्ट आकार सांगता येत नाही, त्यांना 'आकारहीना' म्हणतात. आपली आकाशगंगा सर्पिला प्रकारात मोडते.आपली आकाशगंगा एक लाख प्रकाशवर्षे या अंतरात विस्तारली आहे. पण विश्वाच्या पसाऱ्यात ते एक किरकोळ तारामंडळ म्हणावे लागेल. सूर्य व ग्रहमाला हा आपल्या आकाशगंगेचा एक छोटा भाग. अनेक तारे आपल्या आकाशगंगेत असून सर्वांचा प्रकाश एकमेकांत मिसळल्याने पांढुरका पट्टाच आकाशात आपल्याला दिसतो. म्हणूनच आपल्या आकाशगंगेला 'मिल्की वे' असेही म्हटले जाते. त्या पट्ट्यात काही भाग काळेकुट्ट आहेत, जेथे धुळीमुळे ताऱ्यांचा प्रकाश शोषला गेला आहे. आपल्या आकाशगंगेच्या सर्पाकृती वेटोळ्याचे तीन वेगळे भाग केंद्रातून उगम पावताना स्पष्ट करता येतात. त्यांना ओरायन, परसियस व सॅजिटेरियस अशी नावे दिलेली आहे. सूर्यमालिका ओरायन या पट्ट्यामध्ये येते. सर्पिलाकृती वेटोळे स्वतःभोवती फिरण्याचा काळ ओरायन पट्टय़ाच्या बाबतीत दर पंचवीस कोटी व वर्षांनी पूर्ण होतो. आकाशगंगेचे वर्णन गॅलिलियोने प्रथम स्पष्ट केले. नंतर हर्षल यांनी आकाशातील ताऱ्यांच्या गणनेच्या संदर्भात आकाशगंगेचा आकार निश्चित वर्णन केला, तर हबल यांनी आकार व स्वरूप यांबद्दल १९२० साली महत्त्वाचे निष्कर्ष मांडले. रेडिओ अॅस्ट्रोनॉमीला १९४० साली सुरुवात झाल्यानंतर आकाशगंगेतील तीन पट्टे, त्यांना भरून राहणारे हायड्रोजनचे ढग, त्यातील रेडिओकिरण या सर्वांबद्दल पुरेशी माहिती उपलब्ध होत गेली. यासाठी २.१ सेमी वेव्हलेंथच्या लहरी उपयोगी पडल्या.आज आपली आकाशगंगा व जवळची काही तारामंडळे मिळून 'लोकल ग्रुप' या नावाने ओळखली जातात. यात एकंदर ३२ तारामंडळांची नोंद सध्या झाली आहे. यांतील सर्वात मोठे तारामंडळ अँड्रोमेडा सर्पिल आकाराचे आहे. दुसरा क्रमांक मिल्की वे चा. पृथ्वीवरून साध्या डोळ्यांनी अँन्ड्रोमेडा व मॅगेलान दिसू शकतात.कन्या राशीच्या दिशेने असलेल्या तारामंडळांच्या गटात प्रचंड आकाराची तारामंडळे अस्तित्वात असावीत, असे मार्च १९९३ मध्येच नोंदले गेले आहे. त्यांचा आकार आजवर माहीत असलेल्या अन्य तारामंडळांच्या कित्येकपट मोठा असावा, असेही भाकीत केले गेले आहे. म्हणूनच यांना 'दडलेले राक्षस' असे टोपणनाव दिले गेले आहे. सूर्यमालिका ही आपल्या आकाशगंगेत मुख्य केंद्राच्या एका बाजूला आहे. सूर्य केंद्रापासून किमान तीस हजार प्रकाश वर्षे दूर आहे. आकाशगंगेचा अभ्यास आपल्याला पृथ्वीवरील निरीक्षणातूनच करावा लागणार आहे. रेडिओ अॅस्ट्रोनॉमी प्रगत होत गेल्याने अन्य तारामंडळांत होणाऱ्या घडामोडींचा थोडाफार अंदाज येथे लागत आहे, एवढेच.आपल्या आकाशगंगेत १००-२०० अब्ज तारे असावेत. परंतु गेल्या दोन दशकांतील वेधातून असे दिसून येते की, आपल्या किंवा इतर आकाशगंगेत ताऱ्यांनी व्याप्त भागापलीकडे पुष्कळ लांबवर अदृश्य वस्तुमान भरले आहे. त्या पदार्थांचे गुरुत्वाकर्षण जाणवते, पण ते दिसत मात्र नाहीत! हे पदार्थ कशाचे बनले आहेत ते रहस्यही अद्याप उकललेले नाही.आपल्या किंवा इतर आकाशगंगांत तारे, धूळ, गॅस व अदृश्य पदार्थ याव्यतिरिक्त चुंबकीय क्षेत्रसुद्धा आढळते. विश्वकिरणांतील विद्युतभार असलेल्या कणांचे मार्ग या चुंबकीय क्षेत्राने नियंत्रित केले जातात. ‘सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून**संकलन :- श्याम ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••विचार असे मांडा कि तुमच्या विचारांवर कुणीतरी विचार केलाच पाहिजे.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) पंख असूनही उडता न येणाऱ्या पक्ष्याचे नाव काय ?२) मुंबईचा गवळीवाडा कोणत्या शहराला म्हणतात ?३) जागतिक हवामान संस्थेने ( WMO ) कोणत्या वर्षाला 'सर्वाधिक उष्ण वर्ष' म्हणून जाहीर केले ?४) पांडवांच्या वडिलांचे नाव काय होते ?५) इलेक्ट्रिक इस्त्रीमधील तापणारा घटक कोणता ? *उत्तरे :-* १) शहामृग २) नाशिक ३) वर्ष २०२३ ४) पंडू राजा ५) नायक्रोम*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 अजय कोंडलवाडे, सहशिक्षक, बिलोली👤 अजय परगेवार उमरेकर👤 माधव चपळे👤 शिवशंकर स्वामी👤 सिद्धार्थ कैवारे, चिरली👤 बालाजी सुरजकर👤 चंद्रकांत कुमारे, पांगरी*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••नसे अंत आनंत संता पुसावा। अहंकारविस्तार हा नीरसावा॥ गुणेवीण निर्गुण तो आठवावा। देहेबुद्धिचा आठवु नाठवावा॥१६९॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एकमत करून एखाद्याला एकटे पाडून त्याची मोठ्या आनंदाने मज्जा बघत राहणे म्हणजे माणुसकी नव्हे. बरेचदा आपल्या जीवनात वेळ, प्रसंगी बरेच लोक येतात आणि जातात. पण, शेवटपर्यंत कोणीच, कोणाला साथ देत नाही म्हणून ज्या गोष्टीला अर्थ नसते त्याच्या आधीन होऊ नये.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *एका गाढवाची गोष्ट*एक धोबी आपल्या गाढवाकडून दिवसभर ओझी वाहण्याचे काम करून घेई आणि रात्री तो त्याला गावाबाहेर चरायला सोडून देई. रात्रभर गवत, नाही तर कुणा ना कुणाच्या शेतातली धान्याची रोपे पोटभर खाऊन झाल्यावर पहाटे पहाटे ते गाढव आपल्या घरी जाई. या रात्रीच्या भ्रमंतीत त्याची एका कोल्ह्याशी ओळख झाली.एके रात्री पुनवेचे पिटूर चांदणे पडले असताना ते गाढव म्हणाले, 'कोल्होबा, या चांदण्यांमुळे मन कसे प्रफुल्लित झाले आहे. मी थोडा वेळ गाऊ का?'कोल्हा म्हणाला, 'मामा, तुम्ही आणि गाणार? म्हणजे प्रलयच धडकला म्हणायचा!''का रे, मला गाण्याची माहिती नाही, असे का तुला वाटते?' असा प्रश्न विचारून ते गाढव स्वर किती, सप्तके किती व राग किती वगैरे माहिती देऊन त्या कोल्ह्याला म्हणाले, 'आता तरी माझ्या रागदारीच्या ज्ञानाबद्दल तुझ्या मनात संशय उरला नाही ना?कोल्हा म्हणाला, 'नुसते ज्ञान असणे वेगळे आणि गाण्याचा आवाज वेगळा. त्यातून कुणी, कुठे व कसे वागायचे याबद्दल मार्गदर्शक असे काही नियम आहेत. उदाहरणच द्यायचे झाले, तर या जगात सुरळीतपणे जगण्याची इच्छा असेल, तर खोकला झालेल्याने व जो झोपाळू आहे त्याने चोरी करण्याच्या फंदात पडू नये व रोगग्रस्ताने जिभेचे चोचले पुरवू नयेत. खोकला झालेला जर कोणी चोरी करायला गेला आणि चोरी करता करता त्याला खोकला आला, तर ज्याप्रमाणे घरमालकाकडून मार खाण्याचा त्याच्यावर प्रसंग येईल, त्याचप्रमाणे तुम्ही जर या रात्रीच्या वेळी गाऊ लागलात, तर ज्याच्या शेतातली कोवळी कणसे आपण चोरून खात आहोत, तो शेतकरी जागा होईल आणि आपल्या दोघांनाही चोप देईल.'गाढव म्हणाले, 'कोल्होबा, तू अगदीच अरसिक कसा रे? तो स्मशानात राहणारा रुक्ष मनोवृत्तीचा शंकर जर त्या रावणाने सुकवलेल्या स्नायूंपासून तयार केलेल्या तंतुवाद्यातून रागदारीचे मधुर स्वर काढताच त्याच्यावर प्रसन्न झाला, तर माझे गोड गाणे ऐकून त्या शेताची रखवाली करणारा माणूस मला मारणे शक्य आहे का? उलट तो माझा सन्मानच करील.'हा आपले ऐकण्याचे लक्षण दिसत नाहीसे पाहून तो कोल्होबा त्या शेताच्या कुंपणाबाहेर पडून दूर उभा राहिला आणि त्या गाढवाने टिपेत गायला प्रारंभ केला. त्याबरोबर त्या शेताच्या जाग्या झालेल्या राखणदाराने त्याला बेदम मार दिला. त्या माराने ते गाढव मूच्र्छा येऊन जमिनीवर कोसळताच त्या राखणदाराने त्याच्या गळय़ात दोरखंडाने एक उखळ बांधले.एवढे करून तो पहारेकरी आपल्या झोपडीत जाताच शुध्दीवर आलेले ते गाढव गळय़ात बांधण्यात आलेल्या उखळासह कसेबसे घराकडे जाऊलागले, तेव्हा दूर उभा राहिलेला कोल्हा त्याला म्हणाला, 'गाढवमामा, तुमचा दिव्य गायनावर बेहद्द खूष होऊन त्या पहारेकर्‍याने तुमच्या सन्मानार्थ हा 'भव्य मणी' तुमच्या गळय़ात बांधला का?' पण लाजेने चूर झालेले ते गाढव एकही शब्द न बोलता निघून गेले.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 18 जानेवारी 2024💠 वार - गुरुवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://nasayeotikar.blogspot.com/2017/12/blog-post_25.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_ या वर्षातील १८वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२००५:एअरबस ए-३८० या जगातील सर्वात मोठ्या प्रवासी विमनाचे अनावरण करण्यात आले.**१९९९:नोबेल पारितोषिक विजेते अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांना ’भारतरत्‍न’ हा सर्वोच्‍च नागरी सन्मान जाहीर.**१९९८:मदनमोहन पूंछी यांनी भारताचे २८ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.**१९९७:नोर्वेच्या बोर्ग आऊसलंडने एकट्याने व कोणाच्याही मदतीशिवाय अटलांटिक महासागर पार केला.**१९७४:इजिप्त व इस्त्राएल यांच्यात शांतता करारावर सह्या झाल्या.**१९५६:संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वेळी मुंबईत ११४ वेळा गोळीबार**१९११:युजीन बी.इलायने सानफ्रान्सिस्कोच्या बंदरात उभ्या असलेल्या यु.एस.एस. पेनसिल्व्हेनिया या जहाजावर विमान उतरवले. जहाजावर विमान उतरण्याचा हा पहिलाच प्रसंग होता.**१७७८:कॅप्टन जेम्स कूक हा हवाई बेटांवर पोचणारा पहिला युरोपियन बनला.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९७५:मोनिका बेदी-- भारतीय अभिनेत्री आणि टेलिव्हिजन प्रस्तुतकर्ता**१९७३:प्रा.डॉ.रंजन दामोदर गर्गे-- विज्ञान लेखक,विविध पुरस्काराने सन्मानित* *१९७२:विनोद कांबळी –भारतीय क्रिकेटपटू**१९७१:महेंद्र भाऊरावजी सुके-- पत्रकार, लेखक**१९६६:अलेक्झांडर खलिफमान – रशियन बुद्धिबळपटू**१९५८:भूपेंद्र दामोदर संखे-- कवी,लेखक**१९५८:तुका उत्तमराव मोहतुरे-- लेखक,कवी**१९४७:प्रकाश गोपाळ सावरकर-- लेखक* *१९४५:डॉ.विजया वाड --प्रसिद्ध लेखिका, बालसाहित्यिक,मराठी विश्वकोश मंडळाच्या पूर्व अध्यक्षा**१९४५:माधवी करमळकर -- लेखिका* *१९३७:अरविंद रघुनाथ मयेकर --ख्यातमान सतारवादक आणि संगीतकार(मृत्यू:३० मार्च २०१९)**१९३३:जगदीश शरण वर्मा – भारताचे २७ वे सरन्यायाधीश (मृत्यू:२२ एप्रिल २०१३)**१९२५:मनोहरराय लक्ष्मणराव सरदेसाय-- कोकणी कवी,निबंधकार व अनुवादक (मृत्यू:२२ जून २००६)**१९२५:गजानन जोहरी-- लेखक* *१९०९:द.ग.देशपांडे (बाबुराव जाफराबादकर)-- लेखक,संगीत,नाटय क्षेत्रात योगदान* *१८९५:वि.द.घाटे तथा विठ्ठल दत्तात्रेय घाटे-- मराठी कवी,लेखक(मृत्यू:३ मे १९७८)**१८८९:शंकर काशिनाथ गर्गे तथा ’दिवाकर’ – नाट्यछटाकार (मृत्यू:१ आक्टोबर १९३१)**१८८९:देवनहळ्ळी वेंकटरामनय्या गुंडप्पा तथा डी.व्ही.जी.– कन्नड कवी व विचारवंत (मृत्यू:७ आक्टोबर १९७५)**१८४२:न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे – समाजसुधारक,धर्मसुधारक,अर्थशास्त्रज्ञ व न्यायाधीश (मृत्यू:१६ जानेवारी १९०९)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१६:आशा पाटील --मराठी चित्रपट, दूरचित्रवाणी आणि नाट्यक्षेत्रातील अभिनेत्री (जन्म:१९३६)**२०१५:शकुंतला महाजन तथा ’बेबी शकुंतला’ –वयाच्या ८२ व्या वर्षी ही ज्येष्ठ अभिनेत्री काळाच्या पडद्याआड गेली.(जन्म:१७ नोव्हेंबर १९३२)**२०११:पुरुषोत्तम दास जलोटा-- भारतीय शास्त्रीय आणि भक्ती संगीत गायक(जन्म :९ सप्टेंबर १९२५)**२००३:हरिवंशराय बच्‍चन – हिन्दी कवी (जन्म:२७ नोव्हेंबर १९०७)**१९९६:एन.टी.रामाराव – तेलगू अभिनेते, दिग्दर्शक,निर्माते व आंध्रप्रदेशचे १० वे मुख्यमंत्री (जन्म:२८ मे १९२३)**१९८३:आत्माराम रावजी भट – कृतिशील विचारवंत,’मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज’चे संस्थापक (जन्म:१२ मे १९०५)**१९४७:कुंदनलान सैगल – गायक व अभिनेते (जन्म:११ एप्रिल १९०४)**१९३६:रुडयार्ड किपलिंग – नोबेल पारितोषिकविजेते ब्रिटिश लेखक (जन्म:३० डिसेंबर १८६५)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *एका शेतकऱ्याची आत्मकथा*नमस्कार ....!मी एक शेतकरी आपल्याशी संवाद करीत आहे. या भारतातील जवळपास ७५ टक्के जनता खेड्यांत राहते आणि येथील लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती म्हणूनच भारत देश कृषिप्रधान आहे असे म्हटले जाते. भारतातील संपूर्ण व्यवहार हा शेतीवरच अवलंबून आहे. शेतातून निघणा-या उत्पादनावरच भारताचा विकास अवलंबून आहे. इतरांना जगवणारा, उत्पादक असा मी शेतकरी मात्र फारच बिकट अवस्थेत दिसून येतो. कवी इंद्रजित भालेराव यांच्या कवितेतील ओळीनुसार मी उभ्या जगाचा पोशिंदा आहे. मात्र ..................... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *कलश यात्रा राम मंदिरामध्ये पोहोचली, रामलल्लाच्या प्रतिष्ठापणेला सुरूवात*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *शिंदे गटाच्या याचिकेवर राहुल नार्वेकर आणि ठाकरे गटाला उच्च न्यायालयाची नोटीस, 8 फेब्रुवारीपर्यंत उत्तर देण्यासाठी मुदत*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *नारायण राणे ते अनिल देसाई, महाराष्ट्रातील 6 खासदारांसह देशातील 68 खासदारांचा राज्यसभेचा कार्यकाळ संपणार!*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *उच्च शिक्षण घेण्याची परवानगी घेतली नसल्याचा दावा करत महापालिका प्रशासनाने गुजरातमधील तीन शिक्षकांचं प्रमोशन रोखलं होतं. मात्र उच्च न्यायालयाने याबाबत निर्णय देताना तिन्ही शिक्षकांचं प्रमोशन कायम ठेवलं आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *स्कूलबसच्या धडकेत 4 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू:संतप्त जमावाने बस दिली पेटवून; संभाजीनगर जिल्ह्यातील चितेगाव-पांगरा रोडवरील घटना*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *शेअर बाजार कोलमडला, गुंतवणूकदारांचे एकाच दिवसात 4.5 लाख कोटी रुपये पाण्यात; 16 महिन्यातील सर्वात मोठी घसरण*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *अखेरच्या T20 सामन्यात भारताचा सुपर ओव्हर मध्ये विजय, कर्णधार रोहित शर्माचे पाचवे शतक*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *रेणू* 📙 *************मूलद्रव्याच्या लहानात लहान कणाला अणू म्हणतात. अणूची रचना काहीशी सूर्यमालेसारखी असते. अणूचे बहुतेक सर्व वस्तुमान अणूकेंद्रात असते. धनविद्युतभारित प्रोटॉन आणि तेवढ्याच वस्तुमानाचे पण विद्युतभार नसलेले न्यूट्रॉन यांनी अणुकेंद्र बनते. त्याच्याभोवती विविध कक्षांत इलेक्ट्रॉन घिरट्या घालीत असतात. प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन यांची संख्या समान म्हणून अणू मात्र विद्युतभाराच्या दृष्टीने किंवा विद्युतदृष्ट्या उदासीन असतो. चांदी, सोने इत्यादी अशा प्रकारची धातूरूप मुलद्रव्ये वगळता सृष्टीतील बाकी सर्व पदार्थ हे रेणूंनी बनलेले असतात. रेणू म्हणजे दोन किंवा अधिक अणू एकत्र गुंफून झालेली रचना. ऑक्सिजन, हायड्रोजन, नायट्रोजन ही मुलद्रव्ये त्यांच्या रेणूंची बनलेली असतात. त्यांच्या प्रत्येक रेणूत दोन अणू असतात. पाणी हे संयुग. ऑक्सिजनचा एक अणू आणि हायड्रोजनचे दोन अणू एकत्र आले की, पाण्याचा एक रेणू बनतो. नित्याच्या आढळतील बहुसंख्य पदार्थ संयुग स्वरूपातच असतात. शिवाय अनेक मुलद्रव्येही त्यांच्या रेणूंचीच बनलेली असल्यामुळे आपल्या पर्यावरणातील सारे विश्व रेणूंचे बनले आहे असे म्हणता येईल. रेणूंचे काही गुणधर्म विलक्षण आहेत. ऑक्सिजन आणि हायड्रोजन एकत्र येऊन बनणाऱ्या पाण्याचे गुणधर्म त्याच्या घटक मूलद्रव्यांच्या गुणधर्माहून किती वेगळे ! साखर तर हायड्रोजन, ऑक्सिजन आणि कार्बन यांनी बनते. परीक्षानळीत साखर तापवली की खाली काळा साका आणि नळीच्या तोंडाशी पाण्याचे बारीक थेंब मिळतात. कितीतरी प्रकारचे अणू एकत्र येऊन प्रचंड रेणू बनू शकतात. अमिनो आम्ले, प्रथिने, डीएनए हे सर्व गुंतागुंतीच्या रचनांचे रेणूच आहेत. मात्र तरीही रेणू खूप लहान असतो, हे विसरायचे नाही. घोटभर पाण्यात सहावर तेवीस शून्य इतके रेणू असतात ! असे असंख्य रेणू एकत्र येऊन पदार्थ बनतो. हे रेणू एकमेकांशी कसे गुंफलेले आहेत, यावर पदार्थाचे भौतिक गुणधर्म ठरतात. गुंफण घट्ट असेल, तर पदार्थ घन असतो. अगदी शिथिल असेल, तर द्रवरूप आणि प्रत्येक रेणू सुटा असेल तर पदार्थ वायुरूप असतो. रेणूची हालचाल तापमानावर अवलंबून असल्याने उष्णता देऊन पदार्थ वितळता येतो आणि द्रवाचे वायूत रूपांतर करता येते.*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*👆*संकलन :- श्याम ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कोणी कौतुक करो वा टीका लाभ तुमचाच, कौतुक प्रेरणा देते, तर टीका सुधारण्याची संधी.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) भारतातील कोणत्या व्याघ्र प्रकल्पाला *'इंटरनॅशनल डार्क स्काय पार्क'* म्हणून मान्यता देण्यात आली ?२) महाराष्ट्रात 'पहिला राज्य क्रीडा दिवस' केव्हा साजरा करण्यात आला ?३) वैनगंगा नदी कोणत्या नदीला मिळते ?४) भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?५) 'भूगोल दिन' केव्हा साजरा केला जातो ? *उत्तरे :-* १) पेंच व्याघ्र प्रकल्प २) १५ जानेवारी २०२४ ३) वर्धा / गोदावरी ४) रघुराम अय्यर ५) १४ जानेवारी*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 श्रीमती विजया वाड, प्रसिद्ध बालसाहित्यिका👤 पी. आर. कमटलवार, सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी, धर्माबाद👤 रामनाथ खांडरे, करखेली👤 त्र्यंबक आडे, नांदेड👤 महेश गोविंदवार, सहशिक्षक, माहूर👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••करी वृत्ती जो संत तो संत जाणा। दुराशागुणे जो नव्हे दैन्यवाणा॥ उपाधी देहेबुद्धीते वाढवीते। परी सज्जना केविं बाधु शके ते॥१६८॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सुख आणि दुःख एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आलेल्या दु:खाला कंटाळून जाणे म्हणजे जीवन जगणे नव्हे. दु:ख हे दोन दिवसाचे पाहुणे असतात सदैव लक्षात असू द्यावे. भलेही सुख खूप काही देत असेल तरी जे आपल्याला पाहिजे ते कधीच देत नाही म्हणून सुखाच्या मोहात पडू नये आणि दु:खाला कंटाळू नये . खऱ्या अर्थाने दु:खच जीवन जगण्यासाठी मार्ग दाखवत असतो.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*राक्षस, चोर आणि ब्राह्मण*एका गावात एक द्रोण नावाचा ब्राह्मण राहत होता. तो अतिशय गरीब होता. पूजापाठ करून जे द्रव्य मिळेत, त्यावरच तो आपला उदरनिर्वाह करीत असे. एके दिवशी एका यजमानने त्या गरीब ब्राह्मणाला दोन चांगल्या दुभत्या गायी दान दिल्या. दानात मिळालेल्या त्या दोनी गायी त्यानं घरी आणल्या अन् त्या दिवसापासून त्या ब्राह्मणाचं दैन्य पळालं. एके काळी शिळी पोळी भाजी खाणार तो ब्राह्मण! गावात दूध, दही, लोणी, तूप विकून घरातही दूध भाकरी खाऊ लागला. द्रोण ब्राह्मणाच्या त्या दोनही सुंदर गायींवर एका चोराची नजर होती. सुयोग्य संधी बघायची अन् ब्राह्मणाच्या या दोन्ही गायी पळवायच्या, असा त्या चोराचा डाव होता. एका अवसेच्या अंधारात तो चोर त्या गायी चोरून नेण्यासाठी येत असताना वाटेतच त्या चोराची गाठ एका राक्षसाबरोबर पडली. परस्परांनी एकमेकांना 'तू कुठे अन् का जातोस,' ते विचारलं. चोर म्हणाला, 'मी द्रोण ब्राह्मणाच्या गायी चोरायला चाललो आहे. पण तू कुठे चालला आहेस?' अरे, मी तर प्रत्यक्ष त्या ब्राह्मणालाच मारायला, त्याचे भक्षण करायला चाललो आहे. ह्या ब्राह्मणानं मंत्र-तंत्र करून माला दूर घालवायचं, माझं अन्न-पाणी तोडलंय, पण आज मी त्यालाच खाणार आहे झालं! दोघांचही लक्ष एक निघालं. दोघांनी मैत्रीचा हात पुढे केला. तो चोर अन् राक्षस हे दोघं त्या ब्राह्मणाच्या दारांत आले. दोघांनीही घरात डोकावून पाहिले, तर तो ब्राह्मण बिचारा शांत झोपला होता. राक्षस ब्राह्मणाला खायला जाणार, तोच चोर म्हणाला, अरे थांब! मी आधी दोन्ही गायी घेऊन जातो, मग तू त्याला खा. त्यावर राक्षस म्हणाला, वा रे वा! मोठा शहाणाच आहेस की तू!तू गायींना नेताना त्या हंबरल्या, तर तो जागा होणार नाही का ! मग मी काय करू? राक्षसाचं हे म्हणणं चोराला पटेना अन् चोर आपली घाई सोडेना. असं करता-करता हळूहळू त्यांचे एकमेकांचे आवाज तापू लागले. परस्परांतला संवाद संपू लागला. अन् वाद-विवाद भांडणं चालू झाली. त्यात त्या दोघांनी आपल्या मोठ्या आवाजचं भात राहिलं नाही. ते आवाज ऐकून गायी हंबरल्या. मोत्यानं भुंकायला सुरूवात केली. ब्राह्मणही झोपेतून जागा झाला. त्याने राक्षस अन् चोराला पकडून आरडा-ओरडा केला. त्या आवाजानं शेजारी मंडळी काठ्या, मशाली इ. घेऊन धावत आले. त्यांना पाहून राक्षस आगलील आणि चोर लोकांना पाहून धूम पळून गेला. तात्पर्य : फुकट शब्दानं शब्द वाढवून वादविवाद करू नये. भांडणाने फायदा तर होणे दूरच, पण अनेकदा नुकसानच होते.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 17 जानेवारी 2024💠 वार - बुधवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://nasayeotikar.blogspot.com/2018/01/blog-post_76.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••*_ या वर्षातील १७वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२००१:अपारंपारिक ऊर्जा क्षेत्रातील ’सूर्या पुरस्कार’ शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एम.जी.ताकवले यांना जाहीर.**२००१:कथ्थक नृत्यांगना डॉ. रोहिणी भाटे यांना मध्य प्रदेश सरकारचा कालिदास सन्मान जाहीर**१९५६:बेळगाव – कारवार आणि बिदर या जिल्ह्यांतील मराठी भाग त्या वेळच्या म्हैसूर राज्यास जोडण्याची घोषणा**१९४६:संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची (United Nations Security Council) पहिली बैठक झाली.**१९४५:दुसरे महायुद्ध – रशियन फौजांनी पोलंडमधील वॉर्सा शहर उद्ध्वस्त केले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९६६:अशोक रामचंद्र भालेराव -- कवी, संपादक* *१९६६:मंगेश नारायणराव काळे-- कवी,लेखक**१९६४:सुहास मळेकर-- लेखक**१९५७:प्रा.संतोष मोतीराम मुळावकर -- एकांकिका व कथालेखन* *१९५६:दिलीप वर्धमान कस्तुरे-- कवी**१९५४:विलास रामचंद्र गावडे-- प्रसिद्ध कवी,लेखक* *१९५३:शेखर ताम्हाणे-- ज्येष्ठ निर्माता, नाटककार (मृत्यू:२८ एप्रिल २०२१)**१९५२:विजय शिवशंकर दीक्षित -- युरोपियन चित्रकला,कादंबरी लेखन* *१९५०:प्रा.अनिल थत्ते -- लेखक* *१९५०:प्रा.डॉ.विमल जयवंत भालेराव -- लेखिका* *१९५०:हनी इराणी-- भारतीय अभिनेत्री आणि पटकथा लेखिका* *१९४२:मुहम्मद अली ऊर्फ कॅशिअस क्ले – अमेरिकन मुष्टियोद्धा.अमेरिकन वर्णभेदाचा निषेध म्हणून त्याने धर्मांतर करुन मुहम्मद अली हे नाव स्वीकारले.**१९३३:चंद्रकांत प्रल्हाद पांढरीपांडे-- कवी, लेखक**१९३३:कमलाकर दिगंबर सोनटक्के -- कथालेखक,बालकुमार साहित्यकार* *१९३२:मधुकर केचे --प्रसिद्ध मराठी साहित्यिक (मृत्यू:२५ मार्च १९९३)**१९१८:रुसी मोदी – टाटा स्टीलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक,पद्मभूषण (१९८९) (मृत्यू:१६ मे २०१४)**१९१८:वसंत हरी कटककर-- लेखक* *१९१८:सईद अमीर हैदर कमाल नक्‍वी ऊर्फ ’कमाल अमरोही’ – चित्रपट निर्माता,दिग्दर्शक, संवादलेखक,पटकथाकार व कवी (मृत्यू:११ फेब्रुवारी १९९३)**१९१७:एम.जी.रामचंद्रन – अभिनेते व तामिळनडुचे मुख्यमंत्री (मृत्यू:२४ डिसेंबर १९८७)**१९०८:अक्किनेरी लक्ष्मीवर प्रसाद राव ऊर्फ ’एल.व्ही.प्रसाद’ – चित्रपट निर्माते व दिग्दर्शक (मृत्यू:२२ जून १९९४)**१९०६:शकुंतला परांजपे – कुटुंब नियोजनाच्या क्षेत्रात अनन्यसाधारण कार्य केलेल्या समाजसेविका (मृत्यू:३ मे २०००)**१९०५:दत्तात्रय रामचंद्र कापरेकर – गणितज्ञ (मृत्यू: १९८६)**१७०६:बेंजामिन फ्रँकलिन – अमेरिकन संशोधक आणि मुत्सद्दी (मृत्यू:१७ एप्रिल १७९०)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२१:कल्याण वासुदेव काळे-- मराठी लेखक आणि मराठी भाषा,साहित्य विषयाचे अभ्यासक (जन्म:१६ डिसेंबर १९३७)**२०२१:गुलाम मुस्तफा खान-- रामपूर-सहस्वान घराण्यातील हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत परंपरेतील भारतीय शास्त्रीय संगीतकार(जन्म:३ मार्च १९३१)**२०१४:रमा दासगुप्ता तथा सुचित्रा सेन – बंगाली व हिन्दी चित्रपट अभिनेत्री. उत्तमकुमारबरोबर त्यांची जोडी बंगाली चित्रपटांत चांगलीच गाजली. (जन्म:६ एप्रिल १९३१)**२०१३:ज्योत्स्‍ना देवधर – मराठी व हिन्दी लेखिका आणि आकाशवाणी निर्मात्या (जन्म:२७ फेब्रुवारी १९२६)**२०१०:ज्योति बसू – प. बंगालचे माजी मुख्यमंत्री (जन्म:८ जुलै १९१४)**२००८:रॉबर्ट जेम्स तथा ’बॉबी’ फिशर – अमेरिकन बुद्धिबळपटू व ग्रँडमास्टर (जन्म:९ मार्च १९४३)**२०००:सुरेश हळदणकर – गायक आणि अभिनेते**१९७३:बळीराम हिरामण राठोड (पाटील) बंजारा समाजातील सामाजसुधारक व लेखक (जन्म:१८९८)**१९७१:बॅ.नाथ पै – स्वातंत्र्य सैनिक व घटनातज्ञ (जन्म:२५ सप्टेंबर १९२२)**१९६१:पॅट्रिक लुमूंबा – काँगोचे पहिले पंतप्रधान (जन्म:२ जुलै १९२५)**१९३०:अँजेलिना येओवार्ड ऊर्फ ’गौहर जान’ – गायिका व नर्तिका (जन्म:२६ जून १८७३)**१८९३:रुदरफोर्ड हेस – अमेरिकेचे १९ वा राष्ट्राध्यक्ष (जन्म:४ आक्टोबर १८२२)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *साहित्यसेवा हेच खरे काम*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मिलिंद देवराच्या शिंदे गटात प्रवेशाचे दिल्लीत पडसाद ; काँग्रेसच्या हालचालींना वेग*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *भारतीय बासमती तांदूळ 'जगात भारी', जगातील सर्वोत्कृष्ट तांदळांच्या यादीत अव्वल*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *आता लढाई जनतेच्या न्यायालयात उद्धव ठाकरेचा एल्गार*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मुंबई आंदोलनावर मनोज जरांगे ठाम, सरकारकडून सग्या सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचे आश्वासन*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *यवतमाळ जिल्ह्यात भीषण अपघातात 6 ठार*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *दावोसमध्ये 70 हजार कोटीचे करार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत करारावर स्वाक्षऱ्या*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *आज बंगळुरू मध्ये भारत व अफगाणिस्तान यांच्यात तिसरा T20 सामना*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *बोटं मोडताना आवाज का येतो ?* 📙एखाद्यावर राग काढायचा असला, की त्याच्या नावानं बोटं मोडली जातात. त्या प्रत्येक वेळी आवाज का येत नाही हे नाही सांगता यायचं; पण बोटांमध्ये तणाव निर्माण झाला असला तरी तो मोकळा करण्यासाठी आपण बोटात ताणतो त्यावेळी मात्र हमखास कडकड असा आवाज येतो. कोणाच्या बाबतीत मोठ्यानं येतो, कोणाच्या बाबतीत ऐकू येईल न येईल असा येतो; पण येतो खरा. वास्तविक असा आवाज केवळ बोटांच्या बाबतीतच येतो असं नाही. कोणत्याही हाडांच्या सांध्याच्या बाबतीतही तो येत असतो. सांध्याच्या ठिकाणी दोन हाडं एकमेकांशी जोडलेली असतात; पण या सांध्यांची हालचाल होते तेव्हा ही हाडं निरनिराळ्या कोनांमधून फिरतात. ते सहजसाध्य व्हावं म्हणून जिथं ही हाडं जोडलेली असतात तिथे एक स्नायूंचा जाडसर थर असतो, अस्तरासारखा. तो नसला तर ती हाडं एकमेकांवर घासून त्यांची झीज होईल. शिवाय त्यांची मोडतोडही होण्याची शक्यता असते. तरीही ते थर एकमेकांवर घासतात ते घर्षणापायी उष्णता निर्माण होतेच. आपले तळवे आपण एकमेकांवर घासले तर ते गरम होतात. त्याचं कारणही हेच.या उष्णतेचा त्या थरांवर अनिष्ट परिणाम होतोच. त्यांची हालचालही मोकळी होत नाही. तशी ती व्हावी म्हणून तिथं एक प्रकारचं वंगण असतं. एक तेलासारखा पातळ स्निग्ध पदार्थ असतो. त्या वंगणात ऑक्सिजन, कार्बन डायॉक्साइड, नायट्रोजन यांसारखे वायू विरघळलेल्या स्थितीत असतात.बराच वेळ वापर झाला की ते सांधे थकल्यासारखे होतात. त्यांची मोकळी हालचाल होत नाही. कारण त्या हालचालीला मदत करणारे स्नायू जखडल्यासारखे होतात. त्या स्थितीत ते जरा ताणले तर सैलावतात. त्यांची परत मोकळी हालचाल होऊ शकते. पण तसे ते ताणले की त्या वंगणाच्या पिशव्याही फुगल्यासारख्या होतात. त्यांच्यामध्ये विरघळलेल्या स्थितीत असलेले वायू मोकळे होऊन त्यांचे बुडबुडे तयार होतात. ते फुटतात आणि त्यांचाच तो आवाज होतो. किती वेगानं हे बुडबुडे तयार होऊन फुटतात तसंच किती बुडबुडे तयार होतात, त्यावर किती मोठा आवाज होणार हे अवलंबून असतं. कोणत्याही सांध्याच्या वंगणाच्या बाबतीत हीच परिस्थिती असते; पण बोटांच्या सांध्यामध्ये बुडबुडे लवकर तयार होतात आणि पटकन फुटतातही. त्यामुळे त्यांचा आवाजही सहजगत्या होतो. शिवाय बोटांना तीन पेरं असतात. त्या तिन्ही पेरांची स्वतंत्र हालचाल होऊ शकते. म्हणजेच प्रत्येक बोटाला एकूण तीन सांधे असतात. ते जवळजवळही असतात. आपण जेव्हा बोटं ताणतो तेव्हा ते सगळेच सांधे ताणले जातात. सर्व ठिकाणच्या वंगणातल्या वायुंचे बुडबुडे तयार होऊन ते फुटतात. त्यामुळे बोटं ताणल्यानं नेहमीच कडकड असा आवाज होतो.*डाॅ. बाळ फोंडके यांच्या 'का ?' या पुस्तकातून**संकलन :- श्याम ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*" शरीराला श्रमाकडे, बुद्धीला मनाकडे आणि हृदयाला भावनेकडे वळविणे म्हणजे शिक्षण. "**संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) सलीम अली राष्ट्रीय पक्षी उद्यान कोठे आहे ?२) महाराष्ट्र राज्यात 'भूगोल दिन' साजरा करण्याची प्रथा १४ जानेवारी १९८८ पासून कोणी सुरू केली ?३) डॉ. प्रभा अत्रे यांचे नुकतेच निधन झाले आहे त्या कोण होत्या ?४) मकरसंक्रांतच्या दिवसापासून सूर्याचे कोणते आयण सुरू होते ?५) दोन नद्या एकत्र मिळतात त्या जागेला काय म्हणतात ? *उत्तरे :-* १) श्रीनगर, जम्मू काश्मीर २) डॉ. सुरेश गरसोळे, पुणे ३) ज्येष्ठ गायिका ४) उत्तरायण ५) संगम*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 जयप्रकाश भैरवाड, धर्माबाद👤 शेखर घुंगरवार👤 सचिन पाटील पार्डीकर 👤 धम्मपाल कांबळे👤 यश चेलमेल👤 राम घंटे👤 मन्मथ भुरे👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••बरा निश्चयो शाश्वताचा करावा। म्हणे दास संदेह तो वीसरावा॥ घडीने घडी सार्थकाची धरावी। सदा संगती सज्जनांची धरावी॥१६७॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••वैरता निर्माण करण्यासाठी डोंगरावर जावे लागत नाही. जेव्हा आपले बोलणे स्पष्ट असते, परखड विचाराची पेरणी असते, कोणाचे गुलाम बनून त्यांच्या मताप्रमाणे वागणे नसते, समाजाच्या हितासाठी कार्य करण्याची आवड असते आणि सत्याची वाट असते तेव्हा पहिली वैरता वेळ प्रसंगी कुटुंबातूनही सुरूवात व्हायला जास्त वेळ लागत नाही व एकदा तिची सुरूवात झाली की, मग त्याचा प्रसार मोठ्या वेगाने होत असतो. शेवटी सर्वच संपून जाते. म्हणून असे अनर्थ टाळण्यासाठी आधी त्या व्यक्तीला वाचणे आवश्यक आहे. भलेही साथ जरी देता नाही आले तरी चालेल पण, वैरताचे भागिदार होऊ नये. कारण जाळतांनी सर्वचजण सोबतीला असतात पण,शेवटी एकट्यालाच जळावे लागते.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*घामाचा पैसा*धन्नाशेटचा मुलगा राम अगदीच आळशी. घरांत गडगंज संपत्ती. एकुलता एक लाडाचा. काम कधी करावंच लागलं नाही. आता २१ वर्षाचा झाला. शेठजींना काळजी पडली. याचे कसे होणार साठलेला पैसा किती दिवस पुरेल. दुसरे दिवशी त्यांनी मुलाला बोलावले व म्हणाले हे बघ आज तू सकाळीच बाहेर जा. काहींतरी काम करून पैसे मिळवुन आण तरच तुला जेवायला मिळेल' मुलाला काहीच कळेना. तो बहिणीकडे गेला तिने त्याला एक रूपया दिला. शेठजींनी तो विहीरीत फेकून दिला. दुसर्‍या दिवशी आईकडून घेतला तिसर्‍या दिवशी मात्र कोणीही पैसे द्यायचे नाहीत हे उमजल्यावर स्वारी घराबाहेर पडली स्वारी घराबाहेर काम शोधायला निघाली. पण काय काम करणार ? बारा वाजे पर्यंत हिंडला. काम मिळेना. पोटात कावळे कोकलायला लागले. स्टेशनवरून एक जड बॅग घेऊन येणारा माणूस दिसला त्याला हमाल हवा होता. हा धावत पुढे गेला. 'साहेब, इकडे आणा'. ती बॅग त्याने डोक्यावर उचलली. घामाघूम झाला. साहेबांनी आठ आणे हातावर ठेवले. घरी आला. शेठजींच्या हातावर आठ आणे ठेवले. दोन दिवसाप्रमाणेच शेठजींनी ते विहीरीत फेकले हा चवताळून उठला. 'बाबा अहो तेवढे आठ आणे मिळवायला मला किती वणवण करावी लागली आणि तुम्ही ते फेकून दिलेत ?' शेठजींनी त्याला जवळ घेतले. पाठीवरून हात फिरवला, 'बाळा आता मला काहीं काळजी नाहीं कारण खर्‍या कष्टाची किंमत तुला आज कळली. दोन दिवस ह्याच्या दुप्पट रक्कम फेकली पण तुला राग आला नव्हता कारण त्या मागे कष्ट नव्हते.' स्वकष्टाची कमाई तीच खरी कमाई•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 16 जानेवारी 2024💠 वार - मंगळवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://nasayeotikar.blogspot.com/2018/01/blog-post_15.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_ या वर्षातील १६वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२००८:टाटा मोटर्सच्या नॅनो या एक लाख रुपये किंमतीच्या 'पीपल्स कार'चे अनावरण**१९९८:ऊर्दू लेखक व कवी अली सरदार जाफरी यांना 'ज्ञानपीठ पुरस्कार’ जाहीर**१९९६:पुण्याचे शिल्पकार दिनकर शंकरराव थोपटे यांची ललित कला अकादमीच्या पुरस्कारासाठी निवड**१९९५:आयएनएस विद्युत या संपूर्ण देशी बनावटीच्या क्षेपणास्त्र नौकेचे गोवा येथे जलावतरण झाले.**१९७९:शहा ऑफ इराण यांनी कुटुंबासह इजिप्तमध्ये पलायन केले.**१९५५:पुणे येथील नॅशनल डिफेन्स अकॅडमीच्या इमारतीचे (तात्कालीन) मुंबई राज्याचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्या हस्ते उदघाट्न**१९४१:नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे देशाबाहेर प्रयाण**१९२०:अमेरिकेचे अध्यक्ष वूड्रो विल्सन यांच्या १४ कलमी कार्यक्रमानुसार स्थापन झालेल्या राष्ट्रसंघाची (League of Nations) पहिली बैठक झाली.**१९१९:अमेरिकेच्या संविधानात १८ वा बदल करण्यात आला आणि संपूर्ण देशात दारूबंदी लागू करण्यात आली.**_१६८१:छत्रपती संभाजी राजे यांचा ’छत्रपती’ म्हणून राज्याभिषेक झाला._**१६६०:रुस्तुम झमान आणि फाजल खान हे आदिलशहाचे सेनापती शिवाजी महाराजांवर चालुन आले आणि पराभूत होऊन परत गेले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९६२:प्रा.विनय अमृतराव पाटील -- कवी**१९६०:साहेबराव विश्वनाथ कांगुणे-- लेखक, वक्ते**१९५८:श्रीकांत सदाशिव मोरे-- प्रसिद्ध कवी, लेखक**१९५६:नारायण भगवानराव पांडव-- कवी* *१९५१:डॉ.जयप्रकाश रामचंद्र कुलकर्णी -- लेखक**१९५०:मधुकर सदाशिव वाघमारे -- कवी, लेखक* *१९४७: सिद्धार्थ यशवंत वाकणकर-- हस्तलिखितशास्त्र व भाषाशास्त्रज्ञ,संशोधक**१९४६:कबीर बेदी – चित्रपट अभिनेते**१९४३:नलिनी भीमराव खडेकर -- कवयित्री, लेखिका**१९४२:कृष्णा चौधरी --कवी,लेखक**१९२८:बाळासाहेब पित्रे--ज्येष्ठ उद्योजक व समाजसेवक(मृत्यू:१२ जानेवारी २०१८)**१९२८:रामचंद्र दत्तात्रेय लेले--वैद्यकशास्त्रज्ञ**१९२७:कामिनी कौशल-- भारतीय अभिनेत्री**१९२६:ओंकार प्रसाद तथा ओ.पी.नय्यर – संगीतकार (मृत्यू:२८ जानेवारी २००७)**१९२०:नानाभॉय अर्देशीर ऊर्फ ’नानी’ पालखीवाला – कायदेपंडित आणि अर्थतज्ञ (मृत्यू:११ डिसेंबर २००२)**१९१९:मधुसूदन ऊर्फ लालजी रघुनाथराव गोखले-- ज्येष्ठ तबलासम्राट(मृत्यू:१६ नोव्हेंबर २००२)**१९०९:विनायक रघुनाथ चितळे -- लेखक**१८५३:आंद्रे मिचेलिन – फ्रेन्च उद्योगपती (मृत्यू:४ एप्रिल १९३१)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२२:अरुण जाखडे-- मराठी ग्रंथप्रकाशक आणि लेखक(जन्म:७ जानेवारी १९५५)**२०१७:प्रा.पुरुषोत्तम पाटील-- मराठी कवी आणि केवळ मराठी कवितांना वाहिलेल्या नियतकालिकाचे संपादक होते (जन्म:३ मार्च १९२७)**२०११:प्रभाकर कृष्णराव काळे-- कवी, संपादक (जन्म:१९३८)* *२००५:श्रीकृष्ण हरी मेहेंदळे – संगीतकार, ’पेटीवाले’ मेहेंदळे*  *२००३:रामविलास जगन्नाथ राठी – सुदर्शन केमिकल्स उद्योगसमुहाचे संस्थापक* *१९९७:कामगार नेते डॉ. दत्ता सामंत यांची गोळ्या घालून हत्या (जन्म:१९३३)**१९८८:डॉ.लक्ष्मीकांत झा – आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अर्थतज्ञ,मुत्सद्दी,कुशल प्रशासक, रिझर्व बँकेचे गव्हर्नर,जम्मू काश्मीरचे राज्यपाल व भारताचे अमेरिकेतील राजदूत (जन्म:२२ नोव्हेंबर १९१३)**१९६७:रॉबर्ट व्हॅन डी ग्राफ – अमेरिकन पदार्थवैज्ञानिक (जन्म:२० डिसेंबर १९०१)**१९६६:साधू वासवानी – आध्यात्मिक गुरु व शिक्षणतज्ञ (जन्म:२५ नोव्हेंबर १८७९)**१९५४:बाबूराव पेंटर – चित्रपट निर्माते, दिग्दर्शक,चित्रकार,शिल्पकार आणि ’कलामहर्षी’ (जन्म:३ जून १८९०)**१९३८:शरदचंद्र चट्टोपाध्याय – बंगाली साहित्यिक,त्यांच्या ‘पथेर दाबी' या कादंबरीतील क्रांतिकारक विचारांनी ब्रिटिश राज्यकर्त्यांतही खळबळ उडवून दिली होती. पु.बा.कुलकर्णी यांनी त्या कादंबरीचे ’भारती’ या नावाने मराठीत भाषांतर केले आहे. (जन्म:१५ सप्टेंबर १८७६)**१९०९:न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे – समाजसुधारक,धर्मसुधारक,अर्थशास्त्रज्ञ व न्यायाधीश (जन्म:१८ जानेवारी १८४२)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*प्रत्येक शाळेला संरक्षणभिंत हवे*प्रत्येक गावात स्थानिक स्वराज्य संस्थेची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा असते. पूर्वीच्या शाळा कोणाच्या घरात, ओसरीवर किंवा झाडाखाली भरविली जात असे आणि सर्वाना शिकवायला एकच शिक्षक असायचा. मात्र ........... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदी आठवडाभरात पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर; सोलापुरात 19 जानेवारीला देशातील सर्वात मोठ्या गृहप्रकल्पाचं लोकार्पण,  30 हजार कामगारांच्या घराचे स्वप्न होणार पूर्ण*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *राहुल नार्वेकरांनी न्यायालयाचा अवमान केला, आमदार अपात्रतेच्या सुनावणीवर आक्षेप घेत ठाकरे गटाची सर्वोच्च न्यायालयात धाव, तर आम्हीच खरी शिवसेना, ठाकरेंचे 14 आमदार अपात्र करा,  शिंदे गटाची उच्च न्यायालयात याचिका*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *शरद मोहोळ हत्याकांडातील मुख्य आरोपी रामदास मारणेला अटक, आतापर्यंत 19 जणांना बेड्या, सर्व आरोपींना आज न्यायालयात हजर करणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीणच्या लाभार्थ्यांना 540 कोटी रुपयांचा पहिला हप्ता जारी*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *भारतीतील दारिद्र्य घटलं! गेल्या नऊ वर्षात सुमारे २५ कोटी भारतीयांचा राहणीमानाचा दर्जा सुधारला*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *22 जानेवारीला अयोध्येमध्ये राम मंदिराची प्राण प्रतिष्ठा होणार आहे. त्यानिमित्ताने एक ट्रिलियन आर्थिक उलाढाल अपेक्षित; राम मंदिरामुळे व्यवसायाला चालना!*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *कर्नाटकचा फलंदाज प्रखर चतुर्वेदीने मुंबईविरुद्ध खेळताना नाबाद 404 धावा करून वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लाराच्या विश्वविक्रमाची बरोबरी केली आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 #उत्क्रांती म्हणजे काय ? 📙 भाग ५ (५/६) - मानवी वाटचालगोरिला आणि चिंपांझी या माकडांच्या शरीरातील रक्तातील प्रथिने, हिमोग्लोबिन आणि डी.एन.ए. यांचे माणसाच्या शरीरातील याच घटकांची मोठ्या प्रमाणावर साम्य आहे. यावरूनच गोरिला, चिंपांझी आणि माणूस या तीन्ही शाखा सुमारे चाळीस ते पन्नास लाख वर्षांपूर्वी एकाच पूर्वजापासून जन्मल्या असाव्यात, असा अंदाज केला जातो. उत्खननात सापडणाऱ्या जीवाश्मांच्या मदतीने मानवाच्या उत्क्रांतीतील वाटचालीचा खुणा धुंडाळाव्या लागतात.सर्वात प्राचीन जीवाश्म आहे रामपिथेकसचा. भारत आणि पूर्व आफ्रिकेत आढळून आलेल्या अवशेषांवरून आजच्या माणसाशी साम्य सांगणाऱ्या शारीरिक खुणा रामपिथेकसमध्ये होत्या हे लक्षात येते. त्याचा काळ होता सुमारे एक कोटी वीस लाख वर्षांपूर्वीचा.त्यानंतर भेटतो सुमारे पस्तीस लाख वर्षांपूर्वी वावरणारा ऑस्ट्रेलोपिथेकस अफरेनिस. मागच्या दोन पायांवर उभे राहून ताठ चालणे हे मानवी प्राण्याचे वैशिष्ट्य या पूर्वजात पुर्ण रुजलेले आढळते. मात्र मेंदूचा आकार अद्याप लहानच होता. तर जबडा आणि दातांचा आकार मोठा होता. ऑस्ट्रेलोपिथेकस - आफ्रिकॅन्स ऑस्ट्रेलोपिथेकस - रोबोस्ट्स असे बदल होत सुमारे दहा लाख वर्षांपूर्वी 'होमो' या जातीचा जन्म झाला.होमो इरेक्ट्स ही ऑस्ट्रेलोपिथेकस आणि आजच्या मानवाच्या मधली पायरी होती.आजचा मानव म्हणजे होमो सेपियन्स. जीवाश्म स्वरूपात हा होमो सेपियन्स भेटतो साधारण पाच लाख वर्षांपूर्वीच्या काळात.मेंदूच्या आकारात वाढ होत गेली होती.सुरुवातीला होमो सेपियन्स निअँडरथालच्या कवटीची हाडे जाड होती, कपाळ अरुंद होते.हे सगळे शारीरिक बदल होत आजच्या स्वरूपातील माणूस सुमारे चाळीस हजार वर्षांपूर्वीच्या अवशेषांमध्ये भेटतो.सजीव सृष्टीची उत्पत्ती कशी झाली, हे कोडे विचारवंतांना अनेक वर्षे पडलेले आहे. 'देवाने प्रत्येक प्रकारच्या प्राण्याची एकेक जोडी बनवली,' या बायबलमधील मताशी सहमत होणे अनेकांना जड जात होते. अनेकांनी या कोड्याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला.उपलब्ध पुरावे, सूक्ष्म निरीक्षण आणि साऱ्यांची सांगड घालून मांडलेली तर्कशुद्ध शास्त्रीय उपपत्ती अशा स्वरूपात उत्क्रांतीवाद मांडणारा पहिला शास्त्रज्ञ ‘चार्ल्स डार्विन'क्रमश :- ‘सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*" विश्वास हा खोडरबर सारखा असतो तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी होत जातो. "**संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली ?२) स्वच्छ सर्वेक्षण २०२३ मध्ये एक लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरात 'देशातले सर्वात स्वच्छ शहर' कोणते ?३) कोणत्या प्राण्याला उडणारी खार किंवा भीम खार असेही म्हणतात ?४) बारामती येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली ?५) नुकतेच कोणत्या देशाने ५१ वर्षानंतर प्रथमच चंद्राचा अभ्यास करण्यासाठी पेरेग्रीन हे lander पाठविले आहे ? *उत्तरे :-* १) मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस अध्यक्ष २) सासवड, पुणे ३) शेकरू ४) स्वाती राजे ५) अमेरिका *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 साईनाथ सायबलू, मुख्याध्यापक, धर्माबाद👤 वैभव तुपे, शिक्षक, नाशिक👤 रमेश सरोदे👤 ज्ञानेश्वर मोकमवार👤 सचिन होरे, धर्माबाद👤 किरण शिंदे👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अहंकार विस्तारला या देहाचा।स्त्रियापुत्रमित्रादिके मोह त्यांचा॥बळे भ्रांति हें जन्मचिंता हरावी।सदा संगती सज्जनांची धरावी॥१६६॥सरळ अर्थ :- देहाच्या प्रेमाबरोबरच त्याच्या अहंकाराचा विस्तार होऊन त्याच्याशी संबंधित बायको, मुलं, मित्र, आप्त इत्यादींचा मोह वाढीला लागतो. परंतु हा मोह झटकून टाकून देहादिक प्रेमाचा भ्रम दूर केला पाहिजे.।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपलं ठेवावं झाकून आणि दुसऱ्याच पहावं वाकून या प्रकारची समाजात एक प्रचलित असलेली म्हण नेहमीच ऐकायला, वाचायला मिळत असते. म्हणजेच असे होत असावे म्हणून कदाचित ही म्हण प्रचलित झाली असावी. पण, त्यात एक गोष्ट अवश्य लक्षात असू द्यावे जेव्हा आपण स्वतः चा समाधान करण्यासाठी काळजीपूर्वक दुसऱ्याकडे वाकून बघत असतो त्यावेळी आपल्याकडेही दहा पटीने लोक वाकून बघत असतात. जर बघायचं असेल तर एखाद्याच्या डोळ्यातील अश्रू बघावे,कोणाच्या व्यथा जाणावे ,कोणाचे दु:ख बघून त्या दु:खात माणुसकीच्या नात्याने सहभागी व्हावे पापात जाणार नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*सुंदर माझे घर*बिट्टी बेडकुळी कितीतरी वेळ कमळाच्या पानावर लोळत होती. वरून पावसाच्या धारा येत होत्या. सगळया तळयात 'टिप...टिप..' आवाज येत होता, हवा कशी गार गार झाली होती. बिट्टीला मजेत गाणे गावेसे वाटत होते. तिने त्याप्रमाणे तोंड उघडलेही. इतक्यात पलीकडच्या झाडावरून मंजुळ स्वर ऐकू आले. बिट्टीने तिकडे पाहिले. एक छोटीशी मुनिया आपले घरटे विणीत होती. नाजुक, नाजुक काडयांचे विणकाम करताना मधेच गाणे गुणगुणत होती. आता मात्र बिट्टीला राहवले नाही. एका उडीतच तिने पलीकडचा काठ गाठला. म्हंटले 'माझे घर पाहिले कां केवढे मोठे आहे ते?आत कशी रंगीबेरंगी कमळे फुललीत. 'ती कौतुकाने तळयाकडे पाहत म्हणाली. 'शी! हे कसले सुंदर घर? आत भरला आहे गाळ अन् चिखल!' मुनिया नाक मुरडत म्हणाली. बिट्टी मग टुणटुणत पुढे निघाली. आज सगळीकडे कसा मऊ मऊ चिखल पसरला होता. त्यात घसरगुंडी खेळाविशी वाटत होती. बिट्टीला एक भलामोठा दगड दिसला. त्यावर उडी मारताच आतून आवाज आला, 'कोण आहे?' पाठोपाठ कासवदादा मान बाहेर काढून इकडेतिकडे पाहू लागले. 'अगबाई! कासवदादा तुम्ही त्यात राहता वाटते?' बिट्टीने विचारले. 'तर काय! हेच माझे घर!' पुन्हा आत शिरत ते म्हणाले. मजाच आहे नाही? बिट्टी मनाशी विचार करत पुढे जाऊ लागली. वाटेत झाडावर एक मधाचे मोठ्ठे पोळे लोंबत होते. त्याभोवती मधमाशा उडत होत्या. काही जात होत्या, तर काही येत होत्या. 'बायांनो! तुम्ही इतक्याजणी ह्या छोटयाशा घरात कशा ग राहता?' बिट्टीने विचारले. 'छोटेसे आहे कां ते? आत कशा षट्कोनी खोल्याच खोल्या आहेत! अगदी आरामात राहता येते सर्वांना!'. बिट्टीभोवती गुणगुणत एका माशीने उत्तर दिले. बिट्टी तिथेच थांबून इकडची तिकडची मजा बघत होती. किती गंमतीदार घरे आहेत नाही प्रत्येकाची, ती स्वत:शी म्हणत होती. रस्त्यावर फळांनी लगडलेले एक भलेमोठे झाड होते. त्यावर सुगरणींची लोंबती घरे होती. वाऱ्याने ती इकडून तिकडे हलत! सुगरणबाई उडत येऊन खालून वर जात होत्या. आपल्या इवल्याशा चोचीने विणकाम करत होत्या. बापरे! एवढया वा-यावादळातही घर कसे पडत नाही? बिट्टी वर पाहत असताना जवळून आवाज आला. 'माझे घर कित्ती छान आहे! खाऊच्याच घरात मी राहते.' बिट्टीने ह्या टोकाकडून त्या टोकाकडे डोळा फिरवत शोधाशोध केली.शेजारी एक भलामोठा पेरू पडला होता. त्यातून एक अळी डोके बाहेर काढून बिट्टीशी बोलत होती. 'हो! हे बाकी खरेच!' बिट्टीने मान डोलावली. इतक्यात आभाळातून पुन्हा गडाड-गुडूम आवाज आला व पाऊस पडू लागला. समोर एक भली मोठी छत्री उगवली होती. बिट्टी पळत पळत जाऊन त्याखाली उभी राहिली. आता मात्र तिला पुन्हा एकदा गाणे म्हणावेसे वाटले व त्या आनंदात ती गाऊ लागली. 'गार गार वारा अन् पावसाच्या धारा, भिजलेली राने अन् पानोपानी गाणे, झुळझुळणा-या पाण्यात थेंबांची नक्षी, फांदीवर डुलतात भिजलेले पक्षी, ओल्या मातीत सुगंधाची भर, सगळयात सुंदर सुंदर माझेच घर !! •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 15 जानेवारी 2024💠 वार - सोमवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://nasayeotikar.blogspot.com/2018/01/blog-post_12.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_भारतीय लष्कर दिन_**_ या वर्षातील १५वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२००१:सर्वांना मोफत असलेला ज्ञानकोश ’विकीपिडिया’ हा इंटरनेटवर प्रथमच उपलब्ध झाला.**१९९९:गायिका ज्योत्स्‍ना भोळे यांना राज्य सरकारच्या वतीने गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान करण्यात आला.**१९९६:भारतातील रेल्वेयुगाच्या प्रारंभापासून ब्रिटिश परंपरा व संस्कृतीचा डौल मिरवणाऱ्या बोरीबंदर (व्हिक्टोरिया टर्मिनस) या स्थानकाचे नाव बदलुन ते छत्रपती शिवाजी टर्मिनस (CST) असे करण्यात आले.**१९७३:जनरल गोपाळ गुरुनाथ बेवूर यांनी भारताचे ९ वे लष्करप्रमुख म्हणून सूत्रे हाती घेतली. हे लष्करप्रमुख होणारे पहिले महाराष्ट्रीयन आहेत.**१९७०:मुअम्मर गडाफी लीबीयाचे सर्वेसर्वा झाले.**१९४९:जनरल करिअप्पा यांनी ब्रिटिशांकडुन भारतीय सेनेची सूत्रे हाती घेतली.**१८८९:द पेंबरटन मेडिसिन कंपनी या कंपनीची अटलांटा, जॉर्जिया, यू. एस. ए. येथे स्थापना झाली. ही कंपनी सध्या द कोका कोला कंपनी म्हणून प्रसिद्ध आहे.**१८६१:एलिशा जी. ओटिस या संशोधकाला सुरक्षित उद्‌वाहकाचे (Lift) जगातील पहिले पेटंट मिळाले.**१७६१:पानिपतचे तिसरे युद्ध संपले.**१५५९:राणी एलिझाबेथ (पहिली) हिचा इंग्लंडची राणी म्हणून वेस्टमिन्स्टर अ‍ॅबे येथे राज्याभिषेक झाला.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८२:नील नितीन मुकेश चंद माथूर-- भारतीय अभिनेता,निर्माता आणि लेखक**१९७२:सुरेखा अशोक बो-हाडे-- कवयित्री, ललित लेखिका* *१९७२:गजानन कमल जानराव सोनोने -- कवी,लेखक* *१९६५:श्रीकांत परशुराम नाकाडे-- लेखक**१९५७:वंदना पंडित-- मराठी अभिनेत्री* *१९५६:जीवन बळवंत आनंदगावकर-- सुप्रसिद्ध कवी,लेखक तथा निवृत्त न्यायाधीश**१९५२:संजीव गोविंद लाभे-- लेखक**१९४३:जयराम पोतदार -- हार्मोनियम आणि आॅर्गन वादक व लेखक**१९३९:निलकांत ढोले--ज्येष्ठ गझलकार,कवी व लेखक (मृत्यू:१७ सप्टेंबर २०२२)**१९३१:वासुदेव बेंबळकर -- लेखक* *१९३१:शरच्चंद्र वासुदेव चिरमुले-- कथाकार (मृत्यू:२७ मार्च १९९२ )**१९२९:मार्टिन ल्युथर किंग (ज्युनिअर) – कृष्णवर्णीयांचे गांधी म्हणून ओळखले जाणारे अमेरिकेतील मानवी हक्क कार्यकर्ते आणि नोबेल पारितोषिक विजेते (मृत्यू:४ एप्रिल १९६८)**१९२८:राज कमल-- प्रसिद्ध भारतीय संगीतकार(मृत्यू :१ सप्टेंबर २००५)**१९२६:कुस्तीगीर खाशाबा दादासाहेब जाधव – १९५२ च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमधे वैयक्तिक पदक मिळवणारे पहिले भारतीय, शिवछत्रपती पुरस्कार [मरणोत्तर] (मृत्यू:१४ ऑगस्ट १९८४)**१९२१:बाबासाहेब भोसले – महाराष्ट्राचे ९ वे मुख्यमंत्री [कार्यकाल:२१ जानेवारी १९८२ ते १ फेब्रुवारी १९८३] (मृत्यू:६ आक्टोबर २००७)**१९२०:डॉ.आर.सी.हिरेमठ – कन्नड साहित्यिक,कर्नाटक विद्यापीठाचे कुलगुरू (मृत्यू:३ नोव्हेंबर १९९८)**१९१२:गजानन काशिनाथ रायकर -- लेखक, संपादक (मृत्यू:१६ मे २००२)**१९०५: यशवंत कृष्ण खाडिलकर-- कादंबरीकार,संपादक (मृत्यू:११ मार्च १९७९)* *१७७९:रॉबर्ट ग्रँट – मुंबई इलाख्याचे राज्यपाल,मुंबईतील ग्रँट मेडिकल कॉलेजचे एक संस्थापक,मुंबईतील ग्रँट रोड हा त्यांच्याच नावाने ओळखला जातो. (मृत्यू:१८३८)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१४:नामदेव लक्ष्मण ढसाळ – जेष्ठ साहित्यिक (जन्म:१५ फेब्रुवारी १९४९)**२०१३:डॉ.शरदचंद्र गोखले – समाजसेवक (जन्म:२९ सप्टेंबर १९२५)**२०१०:मंदाकिनी कमलाकर गोगटे-- मराठी लेखिका(जन्म:१६ मे१९३६)**२००२:विठाबाई भाऊ नारायणगावकर – राष्ट्रपतिपदक विजेत्या तमाशा कलावंत (जन्म: १९३५)**१९९८:गुलजारीलाल नंदा – भारताचे दुसरे पंतप्रधान,स्वातंत्र्यसैनिक व गांधीवादी कार्यकर्ते (जन्म:४ जुलै १८९८)**१९९४:हरिलाल उपाध्याय – गुजराथी लेखक, कवी व ज्योतिषी (जन्म:२२ जानेवारी १९१६)**१९७१:दीनानाथ दलाल – अत्यंत लोकप्रिय व प्रतिभावान चित्रकार (जन्म:३० मे १९१६)**१९१९:लक्ष्मण श्रीधर वाकणकर--लिपिकार, संशोधक(जन्म:१७ सप्टेंबर १९१२)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*मकर संक्रांती निमित्त लेख**बंधूभावाचा संदेश देणारा सण*मकरसंक्रांत हा नवीन वर्षातील पहिला सण आहे. ............. पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *आशियातील सर्वात मोठी महायात्रा; सोलापूरच्या ग्रामदैवत सिद्धेश्वर यात्रेला सुरुवात, लाखो भाविकांची उपस्थिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *काँग्रेस नेते राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेला मणिपूरमधून सुरूवात, 67 दिवसांत 110 जिल्ह्यांमध्ये प्रवास, महाराष्ट्रमध्ये होणार समारोप*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *काँग्रेसला रामराम करत मिलिंद देवरा शिवसेनेच्या शिंदे गटात, मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश, 10 माजी नगरसेवक आणि 25 पदाधिकाऱ्यांचाही प्रवेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *ग्रामपंचायतीला निधी न मिळाल्याने बच्चू कडूंची महायुतीच्या बैठकीला अनुपस्थिती, सध्या आमची भूमिका तटस्थ, वाट पाहू नाही तर गेम करू, बच्चू कडूंचं भाजपला पुन्हा आव्हान*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *अवयवदानात महाराष्ट्रातील पुणे जिल्हा ठरला अव्वल; वर्षभरात सर्वाधिक नोंदी तर दुसरा नंबर मुंबईचा*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *महाराष्ट्रात येत्या १९ जानेवारीपासून पारा घसरणार, उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळं महाराष्ट्रातील तापमान कमी होऊन थंडी वाढण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *दुसऱ्या T20 सामन्यात भारताने अफगाणिस्तानला 6 विकेटने हरवून 2-0 ने मालिका जिंकली*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*संक्रांतीच्या दिवशी तीळ का खातात ?*नव्या वर्षातील पहिला सण म्हणजे मकरसंक्रांती. या दिवशी तीळगूळाचे सेवन करतात. पण तीळगूळचं का? त्यामागे अनेक कारणे आणि फायदे पण आहेत त्याबद्दल थोडं पाहूया ...👉 तिळाच्या सेवनाने शरीराला मोठ्या प्रमाणात कॅल्शियम मिळते. तीळ खाल्ल्याने केस मजबूत होतात. 👉 जिम किंवा व्यायामशाळेत नियमित जाणाऱ्या मुलांनी तिळाचे नियमित सेवन करावे याने शरीरातील मांसधातू उत्तम पद्धतीने वाढतो.👉 थंडीमध्ये बाहेरील तापमान थंड असल्याने शरीराचे तापमान उष्ण राहण्यासाठी तिळाचे सेवन केले जाते.👉 जखम होऊन ती भरून येत नसेल तर तिळाची लगदी तिथे लावून ठेवावी. जखम फार चांगल्या पद्धतीने भरून येते.👉 थंडीमध्ये दररोज थोड्या प्रमाणात तिळाचे सेवन केल्यास मानसिक स्वास्थ्य चांगले राहते. 👉 तीळासोबत बदाम आणि खडीसाखर खाल्ल्यास पचनशक्ती वाढते. 👉 तिळात मोनोअनसॅच्युरेटेड मेदाम्लं अधिक प्रमाणात असतात. त्यामुळे रक्तातील कोलेस्टेरॉल नियंत्रित राहण्यास मदत होते.👉 बद्धकोष्ठ, मूळव्याध आदी विकार तिळाच्या सेवनाने कमी होतात. मुळव्याध होऊन सारखे रक्त पडत असेल तर काळे तीळ कुटून त्याची चटणी लोण्यासोबत खावी.👉 दातांच्या हिरड्याचे आयुष्य वाढून, दात मजबूत व्हावेत यासाठी काळे तीळ चावून खावेत. दात हालत असल्यास किंवा हिरड्यातून रक्‍त वा पू येत असल्यास तीळ खावेत.👉 तीळ स्निग्ध असल्यामुळे कोरडी त्वचा असणा-यांनी याचं तेल अंगाला चोळावे. त्यामुळे त्वचा मऊ होते. म्हणूनच थंडीच्या दिवसांत किंवा वर्षभरात तिळाचा आहारात समावेश करावा.*संकलन :- श्याम ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••दुसऱ्याबद्दल तेवढेच बोला जेवढे स्वतःबद्दल ऐकू शकाल.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) जगात सर्वात *नक्षीदार घरटे* कोणत्या पक्ष्याचे असते ?२) स्वच्छ सर्वेक्षण २०२३ मध्ये एक लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरात 'देशातले सर्वात स्वच्छ शहर' कोणते ?३) कोणत्या प्राण्यांच्या पिलांना जन्मतःच शिंग असतात ?४) भारतातील सर्वात मोठा सागरी सेतू कोणता ?५) लाल समुद्राचा लाल रंग कशाच्या अस्तित्वामुळे आहे ? *उत्तरे :-* १) सुगरण २) इंदोर ( सलग सातव्यांदा ) ३) जिराफ ४) अटलबिहारी वाजपेयी शिवडी - न्हावासेवा अटल सेतू ५) एकपेशीय वनस्पती*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*    👤 चिं. नीरज रामानंद रामदिनवार, नांदेड👤 साईनाथ अन्नमवार, नांदेड👤 दत्ता बेलूरवाड👤 एकनाथ पावडे👤 सागर घडमोडे👤 व्ही. एम. पाटील👤 सलीम शेख, बिलोली👤 कोमल ए. रोटे, सोलापूर👤 सतिष बोरखडे, यवतमाळ👤 सुरज लता सोमनाथ, श्रीरामपूर👤 शिवशंकर वाघमारे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••देहादीक प्रपंच हा चिंतियेला।परी अंतरी लोभ निश्चित ठेला॥हरीचिंतने मुक्तिकांता करावी।सदा संगती सज्जनांची धरावी॥१६५॥सरळ अर्थ :- देहाविषयीच्या चिंतेने प्रपंच केला म्हणजे मनात लोभ हा उपजत रहातोच. तो विसरून हरीचे चिंतन करावे. लोभी वृत्तीऐवजी अंतिम मुक्ती हीच आपली प्रियव्यक्ती असल्यासारखी तिच्या भेटीची आस ठेवावी. नेहमी सज्जनांची संगत धरावी.।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एखाद्याच्या जीवनात जेव्हा वाईट परिस्थिती येते त्याप्रसंगी आपण स्वतःचा समाधान करण्यासाठी त्यावर खळखळून हसत असतो एवढेच नाही तर त्या वाईट परिस्थितीची पेरणी करण्यासाठी आपण पूर्ण वेळ देत असतो. पण,सर्वच दिवस त्या प्रकारचे नसतात. ज्यावेळी आपण दुसऱ्यांवर हसतो त्याच वेळी नियती हसणाऱ्यांच्या बाजूने नाही तर ज्याचा खेळ मांडला असते त्याच्या बाजूने उभी असते, त्यात मात्र एक गोष्ट अशी की,ती कोणालाही दिसत नाही. शेवटी सत्याचाच विजय होतो म्हणून कोणावर आलेल्या परिस्थितीवर हसू नये.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *चतूर न्यायमुर्ती*एका गृहस्थाने आपली विहिर शेजा-याला विकली. नवा मालक या विहिरीचे पाणी काढायला गेला असता, विहिरीचा पहिला मालक त्याला पाणी भरु देईना.आश्चर्यचकीत झालेल्या नव्या मालकानं त्याला विचारलं, 'अरे ! मी पूरेपूर पैसे मोजून तुझी जमीन विकत घेतली असताना, तू मला तिचे पाणी का भरु देत नाहीस?'जुना मालक म्हणाला, 'मी तुला केवळ विहीर विकली आहे. तिच्यातलं पाणी काही विकलेलं नाही. तेव्हा त्या पाण्यावर तुझा बिलकूल हक्क नाही.' या अजब तर्कटाने संतापलेला त्या विहिरीचा नवा मालक न्यायालयात गेला. न्यायमुर्तींनी त्या विहीरीच्या नव्या व जुन्या दोन्ही मालकांना बोलावून घेतलं आणि त्या जुन्या मालकाला विचारलं, 'तू तुझी विहीर या तुझ्या शेजा-याला विकलीस हे खरे आहे काय?'जुना मालक - होय. पण विहिरीचं जे विक्रीखत झाले आहे त्यात मी माझी फ़क्त विहिरच काय ती याला विकली असल्याचा उल्लेख केला असल्याने, त्या विहिरीतील पाण्यावर या माझ्या शेजा-याचा बिलकूल हक्क नाही.न्यायमुर्ती - तुझं म्हणणं अगदी शंभर टक्के बरोबर आहे. जुना मालक - (आनंदून) न्यायमुर्ती ! आपल्यालासुध्दा माझं म्हणण रास्त वाटत आहे ना ? वाटणारच. पण असं असूनही हा माझा शेजारी, केवळ ती विहिर विकत घेतली, म्हणून तिच्यातील पाण्यावर हक्क सांगतो आहे !न्यायमुर्ती - ते त्याचं म्हणणं चूक आहे, पण त्याचबरोबर, तू तुझी विहीर विकली असूनही पाणी ठेवण्यासाठी तिचा वापर करतोस. तेव्हा आता त्या विहिरीचा असा वापर करीत राहीपर्यंत दर दिवशी पन्नास रुपये भाडे त्या विहिरीचा आता मालक झालेल्या तुझ्या शेजा-याला दिले पाहिजेस.'न्यायमुर्ती असे म्हणताच, तो मनुष्य़ त्यांना शरण गेला व केल्या अपराधाबद्दल क्षमा मागून, त्याने ती विहिर शेजा-याला पाण्यासह विकत दिल्याचे मान्य केले.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 13 जानेवारी 2024💠 वार - शनिवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link -  http://nasayeotikar.blogspot.com/2016/08/blog-post_27.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_ या वर्षातील १३ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२००७:के.जी.बालकृष्णन यांनी भारताचे ३७ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.**१९९६:'पुणे - मुंबई दरम्यान ’शताब्दी एक्सप्रेस’ सुरू झाली.**१९६७:पुण्यातील स.प. महाविद्यालयाचा सुवर्णमहोत्सव श्री.चिंतामणराव देशमुख यांच्या हस्ते संपन्न.**१९५७:हिराकूड धरणाचे पंडित नेहरूंच्या हस्ते उद्‍घाटन झाले.**१९५३:मार्शल टिटो युगोस्लाव्हियाच्या अध्यक्षपदी**१८९९:गोविन्द बल्लाळ देवल यांच्या ’संगीत शारदा’ या नाटकाचा पहिला प्रयोग इंदूर येथे झाला.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९४:वैभव भिवरकर-- प्रतिभावंत कवी, लेखक,वक्ते**१९८७:डॉ.कुणाल मुरलीधर पवार -- कवी* *१९८३:इम्रान खान – भारतीय चित्रपट कलाकार**१९८२:कमरान अकमल – पाकिस्तानी क्रिकेटपटू**१९७८:प्रा.कीरण नामदेवराव पेठे-- कवयित्री**१९७१:संतोष दत्तात्रय जगताप-- कवी,लेखक**१९७०:स्वाती प्रभाकरराव कान्हेगावकर-- लेखिका* *१९७०:सत्यवान सीताराम देवलाटकर -- लेखक**१९६३:मोरेश्वर रामजी मेश्राम-- कवी* *१९५५:सरिता रमेश आवाड -- लेखिका**१९४९:राकेश शर्मा–अंतरिक्षात जाणारे पहिले भारतीय, आणि जगाचे १३८ वेअंतराळवीर**१९४८:आत्माराम कनिराम राठोड(तांडाकार) -- प्रसिद्ध लेखक,कवी (मृत्यू:२३ मे २००५)**१९४७:प्रा.वसंत मारुतीराव जाधव-- कवी, संपादक* *१९४२:जावेद सिद्दीकी-- भारतातील हिंदी आणि उर्दू पटकथा लेखक,संवाद लेखक आणि नाटककार* *१९३८:पं.शिवकुमार शर्मा – प्रसिद्ध संतूरवादक व संगीतकार**१९२६:शक्ती सामंत – हिन्दी व बंगाली चित्रपट दिग्दर्शक व निर्माते (मृत्यू:९ एप्रिल २००९)**१९१९:एम.चेन्‍ना रेड्डी – आंध्र प्रदेशचे ११ वे मुख्यमंत्री, माजी राज्यपाल(मृत्यू:२ डिसेंबर १९९६)**१९१८:प्रा.अच्युत केशवराव भागवत -- लेखक संपादक,अनुवादक* *१९१५:प्रा.दत्तात्रय सखाराम दरेकर-- लेखक, चरित्रकार* *१९०८:रावसाहेब म्हाळसाकांत वाघमारे-- कवी,लेखक (मृत्यू:७ मार्च१९८९)**१८९६:मनोरमा श्रीधर रानडे-- मराठी कवयित्री,रविकिरण मंडळाच्या सदस्या(मृत्यू:१९२६)**१८९१:गोपाळ रामचंद्र परांजपे-- विज्ञान लेखक व संपादक ( मृत्यू:६ मार्च १९८१)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१४:अंजली देवी-- भारतीय अभिनेत्री,चित्रपट निर्माती (जन्म:२४ ऑगस्ट १९२७)**२०११:प्रभाकर विष्णू पणशीकर –मराठी रंगभूमीवरील अभिनेते,दिग्दर्शक आणि नाट्यनिर्माते (जन्म:१४ मार्च १९३१)**२००१:श्रीधर गणेश दाढे – संस्कृत पंडित व लेखक.कालिदासाचे ’मेघदूत’ कवींद्र परमानंद यांचे 'शिवभारत’ यांचे पद्यमय अनुवाद त्यांनी केले आहेत.* *१९९८:शंभू सेन – संगीत दिग्दर्शक व नृत्य दिग्दर्शक* *१९९७:मल्हार सदाशिव तथा ’बाबूराव’ पारखे – उद्योजक व वेदाभ्यासक (जन्म:१५ एप्रिल १९१२)**१९८९:श्रीकृष्ण जनार्दन जोशी-- लेखक (जन्म:१ ऑगस्ट १९१५)**१९८५:मदन पुरी – हिन्दी व पंजाबी चित्रपटांतील चरित्र अभिनेता (जन्म: १९१५)**१९७६:अहमद जाँ थिरकवा – सुप्रसिद्ध तबला वादक (जन्म: १८९२)**१९६७:हरी दामोदर वेलणकर-- संस्कृत पंडित व ग्रंथकार (जन्म:१८ऑक्टोबर १८९३)**१८३२:थॉमस लॉर्ड – लॉर्डस क्रिकेट ग्राउंडचे संस्थापक (जन्म:२३ नोव्हेंबर १७५५)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *तरुण भारत देश*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *पंतप्रधान मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्यात विकासकामांच्या उद्घाटनाचा सपाटा, शिवडी-न्हावा शेवा सी लिंकचं लोकार्पण, दिघा रेल्वे स्थानक, लेक लाडकी योजनेचा शुभारंभ, नाशिकमध्ये युवा महोत्सवाला हजेरी, काळाराम मंदिरात पूजा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *कोणतीही नशा करू नका, ड्रग्जपासून लांब राहा, माता बहिणींवरुन शिवीगाळ करु नका, युवा दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचं तरुणांना आवाहन*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *मनोज जरांगे यांना हायकोर्टाचा मोठा दिलासा, मराठा मोर्चा मुंबईत धडकणार, विरोधातील याचिका फेटाळली!*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *विश्व मराठी संमेलनात मराठी भाषा प्रेमींना सामावून घ्यावे - दीपक केसरकर*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *‘स्वत:ला स्वत:विरुद्ध उभं करताना’ कविता संग्रहास ‘युवा’ साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *पुणे :- समता परिषदेच्या कार्यकर्त्याचा स्तुत्य उपक्रम, जिल्हा परिषदेच्या १६० विद्यार्थ्यांना दाखवला ‘सत्यशोधक’ चित्रपट*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *पंतप्रधान मोदी यांनी अयोध्येतील राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठापने पूर्वी 11 दिवसांचं विशेष अनुष्ठान करणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *राकेश शर्मा*हे अंतरिक्षात जाणारे पाहिले भारतीय आहेत.भारताचा पहिला आणि जगाचा १३८ वा अंतराळवीर बनण्याचा सन्मान विंग कमांडर राकेश शर्मा यांनी पटकावला तो २ एप्रिल १९८४ रोजी भारत-रशिया अवकाश संशोधन मंडळ कार्यक्रमांतर्गत रशियाच्या सोयूझ टी-२ यानातून दोन रशियन अंतराळ संशोधकासमवेत राकेश शर्माने अवकाश सफरीचा अनुभव घेऊन या क्षेत्रात प्रगतीचे नवे दालन भारतीयांसाठी खुले केले.राकेश शर्मा पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी अंतराळातून बोलत होते. अंतराळातून भारत कसा दिसतो, या प्रश्‍नाला त्यांनी "सारे जहाँसे अच्छा हिंदोस्ताँ हमारा' असे अभिमानी उत्तर दिले होते.पटियाला येथे जन्मलेले राकेश भारतीय वायू दलात वैमानिक होते.नंतरच्या काळात त्यांचा अशोक चक्र देऊन सन्मान केल्या गेला.सौजन्य : इंटरनेट••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कारण सांगणारी लोक यशस्वी होत नाही..आणि यशस्वी होणारे लोक कारण सांगत नाही.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा कोण आहेत ?२) स्वच्छ सर्वेक्षण २०२३ मध्ये देशातील सर्वात स्वच्छ राज्य कोणते ?३) पंतप्रधान विश्वकर्मा योजना लागू करणारा देशातील पहिला केंद्रशासित प्रदेश कोणता ?४) हवेला वजन असते हे कोणी सिद्ध केले ?५) उच्च रक्तदाबाच्या स्थितीला काय म्हणतात ? *उत्तरे :-* १) उषा तांबे २) महाराष्ट्र ३) जम्मू काश्मीर ४) गॅलिलिओ ५) हायपरटेन्शन ( Hypertension )*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 कु. मित दर्शन भोईर, रायगड👤 माधव सोनटक्के, सहशिक्षक, बिलोली👤 व्यंकटेश भांगे, सहशिक्षक, धर्माबाद👤 विजयकुमार चिकलोड👤 बालाजी देशमाने*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••देहेबुद्धिचा निश्चयो दृढ जाला।देहातीत ते हीत सांडीत गेला॥देहेबुद्धि ते आत्मबुद्धि करावी।सदा संगती सज्जनाची धरावी॥१६३॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••दु:ख हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. दिखावूपणाचे दु:ख दाखवून डोळ्यातील अश्रू सांडवून वणवा पेटवणे खूप सोपे असते. पण, आतमधील दु:ख मात्र ओळखणे फार कठीण असते. जे खरे दु:खी असतात व त्या परिस्थितीतून जातात ते कधीच दुसऱ्याला दु:ख देत नाही. तर समजून घेतात म्हणून खरे दु:ख कसे असते हे ओळखल्या शिवाय कोणालाही बोल लावू नये.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *आरसा*       एका गुरूंच्‍या घरी एक शिष्‍य मनोभावे गुरुंची सेवा करून शिक्षण घेत होता. त्‍याच्‍या या सेवेमुळे गुरु त्‍याच्‍यावर प्रसन्न होते. शिक्षण् पूर्ण झाल्‍यावर विद्यार्थी घरी जाण्‍यासाठी निघाला तेव्‍हा गुरुंकडे त्‍याने जाण्‍याची आज्ञा मागितली  तेव्‍हा गुरुंनी त्‍याला आशीर्वाद म्‍हणून एक आरसा भेट दिला व सांगितले की, हा दिव्‍य आरसा (दर्पण) असून यात मानवी मनात चालणारे विचार प्रगट होऊन दिसतात. विद्यार्थी मोठा आनंदीत झाला. हा आरसा खरेच कार्य करतो की नाही याची शहानिशा करण्‍यासाठी त्‍याने लगेच आपल्‍या गुरुंसमोर हा आरसा धरला व गुरुंच्‍या मनात कोणते भाव आहेत, दुर्गुण आहेत हे पाहू लागला आणि गुरुंच्‍या समोर आरसा धरताच त्‍याच्‍या चेह-यावरचा रंग पार उडाला कारण तो आरसा गुरुंच्‍या अंतकरणात मोह, अहंकार, क्रोध आदि विकार दाखवित होता. त्‍याला याचे फारच दु:ख झाले की आपण ज्‍या गुरुची मनोभावे पूजा केली, ज्‍यांना पूर्ण ईश्र्वराचा दर्जा दिला त्‍यांच्‍या मनातही विकार आहेत, ते सुद्धा मानवी विकारापासून अजून सुटलेले नाहीत याचे त्‍याला वैषम्‍य वाटले. तो गुरुंना काहीच न बोलता तो आरसा घेवून गुरुकुलातून निघाला.रस्‍त्‍यात भेटणा-या प्रत्‍येकाच्‍या मनातील भाव पाहणे हे त्‍याचे कामच झाले होते. गावी परत जाताच त्‍याने आपल्‍या प्रत्‍येक परिचिताबरोबर हा प्रयोग करून पाहिला. त्‍याला प्रत्‍येकाच्‍या मनात कोणता ना कोणता दुर्गुण दिसून आला. शेवट त्‍याने आपल्‍या जन्‍मदात्‍या आई वडीलांच्‍या समोरही हा आरसा ठेवला. ते दोघेही पण त्‍यातून सुटले नाहीत. त्‍यांच्‍या हृदयात पण त्‍याला काही ना काही दुर्गुण दिसले. शेवटी या गोष्‍टीचा त्‍याला मनोमन राग आला व तो गुरुकुलातील गुरुंकडे धावला. गुरुंपाशी जाऊन तो म्‍हणाला,’’ गुरुदेव, मी आपण दिलेल्‍या या आरशातून प्रत्‍येकाच्‍या मनात, हृदयात, अंत:करणात डोकावून पाहिले आणि मला असे जाणवले की प्रत्‍येकाच्‍याच मनात काही ना काही विकार आहेच, काही ना काही दोष आहे. एखाद्याच्‍या मनात कमी तर कुणाच्‍या मनात जास्‍त असे विकार, दोष भरून राहिले आहेत. हे पाहून मी फार दु:खी झालो आहे, कृपया मला मार्गदर्शन करा.’’ गुरुंनी काहीच न बोलता तो आरसा फक्त त्‍याच्‍याकडे केला आणि काय आश्र्चर्य त्‍याला त्‍याच्‍या मनाच्‍या प्रत्‍येक कोप-यात राग, द्वेष, अहंकार, क्रोध, माया आदि दुर्गुण भरून राहिलेले दिसले. गुरुजी म्‍हणाले,’’ वत्‍सा, हा आरसा मी तुला तुझे दुर्गुण पाहून ते कमी करण्‍यासाठी दिला होता पण तू दुस-यांचे दुर्गुण पाहत बसलास आणि नको तितका वेळ खर्च केलास, अरे याच वेळेत जर तू स्‍वत:चे अवलोकन केले असते तर तुला तुझ्यातील दुर्गुण सुधारता आले असते. याच काळात तु एक असामान्‍य व्‍यक्ती झाला असता.मानवाची ही कमतरता आहे, कमजोरी आहे की तो दुस-यातील दुर्गुण पाहत बसतो आणि स्‍वत:ला सुधारण्‍याचा प्रयत्‍नही करत नाही. हेच या आरशातून मला तुला शिकवायचे होते. जे तुला शिकता आले नाही.’’*तात्‍पर्य : आपण नेहमीच दुस-या व्‍यक्तीचे दुर्गुण बघतो, त्‍यावर टीका करतो पण आपल्‍यातील दुर्गुणांवर आपले कधीच लक्ष जात नाही. कधीतरी जर आपण आत्‍मनिरीक्षण केले तर आपल्‍यालाही आपले दुर्गुण सापडतीलच.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 12 जानेवारी 2024💠 वार - शुक्रवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://nasayeotikar.blogspot.com/2018/01/blog-post_11.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *राष्ट्रीय युवक दिन*💥 ठळक घडामोडी :- १९३६ - डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची धर्मांतराची घोषणा.इ.स. २००६ - हज यात्रेच्या अखेरच्या दिवशी मक्केजवळ मीना येथे प्रतीकात्मक दगड फेकण्याचा विधी चालू असताना झालेल्या चेंगराचेंगरीत ३४५ मुस्लिम भाविकांचा मृत्यु व २९० जखमी.💥 जन्म :-१५९८ - छत्रपती शिवाजी राजांची आई राजमाता जिजाबाई१८६३ - भारतीय तत्त्वज्ञ स्वामी विवेकानंद, १९०२ - धुंडिराजशास्त्री विनोद,महर्षी न्यायरत्न.१९०६ - महादेवशास्त्री जोशी, भारतीय संस्कृतीकोशाचे व्यासंगी संपादक.१९१८ - सी.रामचंद्र, ज्येष्ठ संगीतकार.१९१७ - महाऋषी महेश योगी, भारतीय तत्त्वज्ञ.💥 मृत्यू :- १९४४ - वासुकाका जोशी, लोकमान्य टिळकांचे निकटचे सहकारी व चित्रशाळेचे विश्वस्त.१९९२ - पंडित कुमार गंधर्व, हिंदुस्थानी संगीताच्या क्षेत्रातील ख्यातनाम गायक.२००५ - अमरीश पुरी, भारतीय अभिनेता••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••राजमाता जिजाऊ जयंती विशेष**आई असावी जिजाऊसारखी*जिजाबाई शहाजीराजे भोसले यांचा जन्म १२ जानेवारी १५९८ रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे झाला. राजमाता जिजाऊ ह्या मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री होत्या. सिंदखेडचे लखुजी जाधव हे जिजाबाईंचे वडील तर आईचे नाव म्हाळसाबाई..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *01 फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन करणार देशाचं बजेट सादर, संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला 31 जानेवारी पासून होणार सुरुवात*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *चकाचक महाराष्ट्र, स्वच्छतेमध्ये देशात पहिला नंबर, स्वच्छ शहरांच्या यादीत नवी मुंबई तिसऱ्या नंबरवर तर इंदूर पहिल्या क्रमांकावर*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर, नाशिकमध्ये युवा महोत्सवाचं उद्घाटन, तर नवी मुंबईतील शिवडी- न्हावा शेवा अटल सेतूचं लोकार्पण करणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचं अजित पवारांना निमंत्रण, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यासह अयोध्येला जाण्याची शक्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *सोलापूरकरांची चिंता वाढणार, उजनी धरणात केवळ 9 टक्के पाणीसाठा; पाण्याची नासाडी केल्यास कारवाई*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *दिल्ली आणि भोवतालच्या परिसराला भूकंपाचा धक्का, जम्मू काश्मीरमध्येही भूकंपाचा धक्का. भूकंपामुळे भारतात जीवितहानी झाल्याची नोंद नाही.*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *मोहाली येथील पहिल्या टी 20 सामन्यात भारताने अफगाणिस्ताचा 6 विकेटनी केला पराभव*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *स्वामी विवेकानंद*स्वामी विवेकानंद (जानेवारी १२, १८६३ - जुलै ४, १९०२) हे भारताचे थोर संत व नेते होते. विवेकानंद यांचे खरे नाव नरेंद्रनाथ दत्त (नरेंद्र, नरेन) असे होते. ते मूळचे बंगालचे रहिवासी होते. ते श्री रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य होते. रामकृष्णांचा संदेश जनमानसांत पोहचवण्यासाठी त्यांनी रामकृष्ण मिशन सुरू केले. जगामध्ये रामकृष्ण मिशनच्या अनेक शाखा आहेत.कलकत्त्यातील सिमलापल्ली (सिमुलिया, उत्तर कोलकाता) येथे जानेवारी १२, १८६३, सोमवारी सकाळी ६:३३:३३ वा. (पौष कृष्ण सप्तमीच्या दिवशी) विवेकानंदांचा जन्म झाला.(जानेवारी १२, १८६३ हा दिवस योगा योगाने मकर संक्रती चा होता .) बाळाचे नाव नरेंद्र ठेवण्यात आले. वडील विश्वनाथ दत्त हे कोलकाता उच्च न्यायालयात (वकील)अ‍ॅटर्नी होते. ते सामाजिक आणि धार्मिक बाबीत पुरोगामी विचाराचे आणि दयाळू स्वभावाचे होते. आई भुवनेश्वरी देवी या धार्मिक वृत्तीच्या होत्या. नरेंद्रनाथाच्या विचारसरणीला आकार देण्यात त्यांच्या पालकांचा वाटा होता. नरेन्द्रनाथाला दर्शनशास्त्रे, इतिहास, समाजशास्त्रे,  कला,  साहित्य इत्यादी अनेक विषयांत रुची आणि गती होती. वेद, उपनिषदे, रामायण, महाभारत, भगवद्गीता आदि धार्मिक साहित्यात त्यानी विशेष आवड दाखवली. त्यांना शास्त्रीय संगीताची देखील जाण होती आणि त्यांनी बेनी गुप्ता आणि अहमद खान या उस्तादांकडून गायन आणि वादनाचे रीतसर शिक्षणही घेतले. किशोरावस्थेपासूनच त्यांनी व्यायाम, खेळ आदी उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेई. जुनाट अंधश्रद्धा आणि जात्याधारित भेदभाव यांच्या वैधतेसंबंधी त्यानी लहान वयातच प्रश्न उपस्थित केले होते आणि सारासार विचार आणि व्यवहारी दृष्टिकोण यांचा आधार नसलेली कुठलीही गोष्ट स्वीकारण्यास नकार दिला होता. विवेकानंद मित्र परिवारात प्रिय होते, त्यांचे मित्र त्यांना बिले या नावाने हाक मारत तर त्यांचे गुरु नोरेन या शब्दाने. त्यांना वाचन, व्यायाम, कुस्ती, मुष्टियुद्ध, पोहणे, होडी वल्हवणे, घोडेस्वारी, लाठीयुद्ध, गायन आणि वादन इ. छंद होते.सौजन्य :- इंटरनेट••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाही, भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *किर्गिस्तानचे राष्ट्रीय चिन्ह* म्हणून नुकतेच कोणत्या प्राण्याला घोषित करण्यात आले आहे ?२) पावसाळ्यात वीज पडून जिवीत हानी होऊ नये यासाठी उपाययोजना म्हणून भारत सरकारने कोणते ॲप तयार केले आहे ?३) महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसूबाई ( १६४६ मी. ) कोणत्या जिल्ह्यात आहे ?४) महात्मा फुलेंनी स्थापन केलेल्या 'सत्यशोधक समाजाच्या स्थापने'ला किती वर्षे पूर्ण झाली ?५) पृथ्वी जेव्हा सूर्याच्या सर्वात जवळ असते, त्या स्थितीस काय म्हटले जाते ? *उत्तरे :-* १) हिम बिबट्या २) दामिनी ॲप ३) अहमदनगर ४) १५० वर्षे ५) पेरीहेलिऑन*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 सुधाकर थडके, सहशिक्षक  अध्यक्ष, सहकारी पतपेढी, नांदेड👤 डी. बी. शेख, लोहा👤 कन्हैया भांडारकर, गोंदिया👤 रत्नाकर जोशी, साहित्यिक, जिंतूर👤 सुरेश गभाले👤 भारत राठोड👤 नागनाथ भिडे👤 गणेश पाटील भुतावळे👤 अरशद शेख👤 नरेश परकोटवार👤 अमरदीप वाघमारे👤 राहुल दुबे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अहंतागुणे नीति सांडी विवेकी।अनीतीबळे श्लाघ्यता सर्व लोकी॥परी अंतरी अर्वही साक्ष येते।प्रमाणांतरे बुद्धि सांडूनि जाते॥१६२॥सरळ अर्थ :- ज्ञानी माणसे आपल्या अहंकारापोटी कधीच नियम-कायदे पाळत नाहीत.नियमांच्या विरुद्ध जबरदस्तीने केलेले काम थोड्या काळासाठी चांगले वाटते पण आतून सत्य न समजल्यामुळे बुद्धी भ्रष्ट होते. त्यामुळे सत्य ओळखणे अत्यंत आवश्यक आहे. त्याच वेळी, सत्याच्या मार्गावर चालणे चांगले आहे.।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••विसर त्यांचा पडायला नको ज्यांनी स्वतः साठी न जगता इतरांसाठी जगून दाखविले. व जे स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी आपला वापर करून धोका देतात त्यांच्या आठवणीत कधीच वेळ वाया घालवू नये,दु:खी होऊ नये.आठवण त्यांची काढावे ज्यांनी जगायला शिकवले कारण खऱ्या अर्थाने तेच मानवी जीवनाचे उद्धारकर्ते होते. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *बुझणारा घोडा*  एका घोड्याला आपल्याच सावलीत बुझण्याची सवय होती. ही सवय जावी म्हणून त्याच्या स्वाराने बराच प्रयत्‍न केला. शेवटी काटेरी लगाम घालून पाहिला, पण तरीही त्याची सवय जाईना. तेव्हा तो स्वार घोड्याला म्हणाला, 'मूर्खा, सावली म्हणजे तुझीच सावली. तुझ्या शरीरातून प्रकाश आरपार जात नाही म्हणून सावली पडते. सावलीला दात नाहीत; पंजे नाहीत अन् तुझ्यासारख्याच्या आडही ती येऊ शकत नाही, तर मग तू तिला भितोस का?' घोड्याने उत्तर दिले, 'अहो कोणी कितीही मोठा झाला तरी त्याला कशाना कशाची तरी भीती वाटतेच. तुम्ही माणसं स्वप्नात भीता किंवा अंधारात एखाद्या लाकड्याच्या ओंडक्याला पाहून घाबरता ते काय म्हणून ? तिथे तरी तुमच्या कल्पनेशिवाय तुम्हाला घाबरवणारं कोणी असतं काम ?'*तात्पर्य* : - मी हसे लोकांना आणि शेंबूड माझ्या नाकाला•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 11 जानेवारी 2024💠 वार - गुरुवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://nasayeotikar.blogspot.com/2017/09/blog-post_12.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_ या वर्षातील ११ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२००१:एस.पी.भरुचा यांनी भारताचे ३० वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.**२०००:छत्तीसगड उच्‍च न्यायालयाची स्थापना**१९९९:’कमाल जमीनधारणा कायदा’ रद्द करणारा वटहुकूम केंद्र सरकारकडून जारी**१९८०:बुद्धिबळाच्या खेळात नायजेल शॉर्ट वयाच्या १४ व्या वर्षी जगातील सर्वात लहान ईंटरनॅशनल मास्टर झाला.**१९७२:पूर्व पाकिस्तानचे बांगला देश असे नामकरण करण्यात आले.**१९६६:गुलजारीलाल नंदा यांनी भारताचे हंगामी पंतप्रधान म्हणून कार्यभार स्वीकारला.**१९४२:दुसरे महायुद्ध - जपानी फौजांनी कुआलालंपूर जिंकले**१९२२:मधुमेहावर उपचार करण्यासाठी प्रथमच इन्सुलिनचा वापर करण्यात आला.**१७८७:विल्यम हर्षेल याने ’टिटानिया’ या युरेनसच्या सर्वात मोठ्या चंद्राचा शोध लावला. त्याच दिवशी त्याने ’ओबेरॉन’ या युरेनसच्या दुसर्‍या मोठ्या चंद्राचाही शोध लावला.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९२:डॉ.मयूर बंडू लहाणे-- लेखक* *१९७९:डॉ.रेणुका शरद बोकारे-- लेखिका, संपादिका* *१९७४:प्रा.डॉ.संभाजी व्यंकटराव पाटील-- लेखक* *१९७३:राहुल द्रविड_भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार,मुख्य प्रशिक्षक,उत्कृष्ट फलंदाज**१९६७:मधुकर गणपतराव कोटनाके-- कवी**१९६६:लक्ष्मण शंकर हेंबाडे-- कवी* *१९६५:धनंजय लक्ष्मीकांतराव चिंचोलीकर-- स्तंभलेखक,कथा,कादंबरी, नाटक या वाड:मय प्रकारात लेखन* *१९६१:राधिका मिलिंद राजंदेकर -- कवयित्री* *१९५५:आशा खाडिलकर – उपशास्त्रीय व नाट्यसंगीत गायिका**१९५४:चद्रकांत भोंजाळ-- प्रसिद्ध मराठी लेखक आणि जेष्ठ अनुवादक**१९५०:अरुण गुलाबराव डावखरे -- लेखक,अनुवादक* *१९४४:शिबू सोरेन – झारखंडचे ७ वे मुख्यमंत्री**१९४२:प्रा.डॉ.यशवंत देशपांडे-- विज्ञान कथा लेखक**१९३६:डॉ.नरसिंह महादेव जोशी-- प्रसिद्ध मराठी शिक्षणतज्ज्ञ आणि साहित्यिक**१९२८:पं.अरविंद रामचंद्र गजेंद्रगडकर-- बासरीवादक,लेखक(मृत्यू:३० मे २०१०)**१९२५:श्री.के.केळकर-- लेखक (मृत्यू:१० जानेवारी १९९६)**१८९८:विष्णू सखाराम खांडेकर -- सुप्रसिद्ध मराठी कादंबरीकार,ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित(ययाति १९७४ )(मृत्यू:२ सप्टेंबर, १९७६)**१८५९:लॉर्ड कर्झन – ब्रिटिश मुत्सद्दी आणि भारताचे व्हॉइसराय (मृत्यू:२० मार्च १९२५)**१८५८:श्रीधर पाठक – हिन्दी कवी,लखनौ येथे भरलेल्या पाचव्या हिन्दी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष (मृत्यू:१३ सप्टेंबर १९२६)**१८१५:जॉन ए.मॅकडोनाल्ड – कॅनडाचे पहिले पंतप्रधान (मृत्यू:६ जून १८९१)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२१:डाॅ जुल्फी शेख--संत साहित्याच्या अभ्यासिका,संवेदनशील कवयित्री डी.लिट.पदवीने संन्मानीत (नागपूर विद्यापीठ)(जन्म:७ मे १९५४)**२००८:य.दि.फडके – लेखक व इतिहाससंशोधक (जन्म:३ जानेवारी १९३१)**२००८:सर एडमंड हिलरी – माउंट एव्हरेस्टवर सर्वप्रथम चढाई करणारे न्यूझीलंडचे गिर्यारोहक (जन्म:२० जुलै १९१९)**१९९७:भबतोष दत्ता – अर्थतज्ञ (जन्म:२१ फेब्रुवारी १९११)**१९६६:स्वतंत्र भारताचे तिसरे पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांचे ताश्कंद येथे निधन झाले. त्यांना मरणोत्तर ’भारतरत्‍न’ सन्मानाने गौरविण्यात आले होते.(जन्म:२ आक्टोबर १९०४)**१९६४:शांताराम गोपाळ गुप्ते--कादंबरीकार, नाटककार (जन्म:१९०७)**१९५४:सर जॉन सायमन – स्वातंत्र्यपूर्व काळात भारताला राजकीय सुधारणा देण्यासाठी नेमलेल्या 'सायमन कमिशन’ या आयोगाचे अध्यक्ष.जे पुढे इंग्लंडचे पंतप्रधान झाले. (जन्म:२८ फेब्रुवारी १८७३)**१९२८:थॉमस हार्डी – इंग्लिश लेखक आणि कवी (जन्म:२ जून १८४०)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*शिक्षक आनंदी तर मुले आनंदी*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *शिंदे गट हीच खरी शिवसेना- राहुल नार्वेकरांचा ऐतिहासिक निकाल, ठाकरे गटाला मोठा धक्का*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *राज्य मंत्रिमंडळ बैठकीत सत्यशोधक हा मराठी सिनेमा करमुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेला मणिपूरमध्ये परवानगी नाकारली, इंफाळमधूनच सुरुवात करणार, काँग्रेस भूमिकेवर ठाम*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *अयोध्येतील राम मंदिराच्या कार्यक्रमात काँग्रेस सहभागी होणार नाही, भाजप आणि RSS चा इव्हेंट असल्याचा आरोप*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *नांदेड :- दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेल्या माळेगाव यात्रेस उत्साहात प्रारंभ*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत सासवड आणि लोणावळा नगरपरिषदेची बाजी, राष्ट्रपतींच्या हस्ते होणार गौरव*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील पहिल्या टी-20 सामन्यात स्टार खेळाडू विराट कोहली आज खेळणार नाही असे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*विष्णू सखाराम खांडेकर*(जन्म : ११ जानेवारी १८९८ - मृत्यू ०२ सप्टेंबर १९७६) हे मराठी कादंबरीकार, लेखक होते.इ.स. १९२० साली खांडेकरांनी  महाराष्ट्रातल्या  सिंधुदुर्ग  जिल्ह्यातील शिरोडे या गावी शिक्षकी पेशास सुरुवात केली. तेथे त्यांनी इ.स. १९३८ पर्यंत काम केले. ह्या काळात मिळालेल्या फावल्या वेळेत त्यांनी मराठी साहित्याच्या निरनिराळ्या प्रकारांमध्ये लेखन केलेआपल्या आयुष्यात त्यांनी १६ कादंबर्‍या, ६ नाटके, जवळपास २५० ललितलेख, १०० निबंध आणि कित्येक टीकाटिपण्या लिहिल्यावि.स. खांडेकर हे सोलापूरला १९४१ साली भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.साहित्य अकादमी पुरस्कार (१९६०) - ययाति (कादंबरी)पद्मभूषण पुरस्कार (१९६८)ज्ञानपीठ पुरस्कार (१९७४) - ययाति कादंबरीसाठीकोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाने त्यांना डी. लिट. (डॉक्टर ऑफ लिटरेचर) बहाल केली.सौजन्य : इंटरनेट*संकलन :- श्याम ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*" मनुष्या जवळची नम्रता संपली कि, त्याच्या जवळची माणुसकीच संपली म्हणून समजावे. "**संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) भारतातील *पहिल्या मुस्लिम महिला शिक्षिका* कोण ?२) नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्याशी जोडणाऱ्या सेतूचे नाव काय आहे ?३) 'ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स - २०२३' मध्ये प्रथम तीन देश कोणते ?४) सावित्रीबाई फुले यांनी कोणत्या वर्षी महिलांसाठी देशातील पहिली शाळा स्थापन केली ?५) ऑक्झिजनशिवाय माऊंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली भारतीय महिला कोण ? *उत्तरे :-* १) फातिमा शेख २) अटल बिहारी वाजपेयी शिवडी - नाव्हासेवा अटल सेतू ३) स्वित्झर्लंड, स्वीडन, अमेरिका ४) सन १८४८ ५) पियाली बसाक *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 बालाजी पुलकंठवार, सहशिक्षक, धर्माबाद👤 सिध्देश्वर मोकमपल्ले👤 हणमंत पांडे👤 राहूल ढगे, सहशिक्षक👤 लोकेश येलगंटवार👤 साई यादव, येवती👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अहंतागुणे सर्वही दुःख होते।मुखे बोलिले ज्ञान ते व्यर्थ जाते॥सुखी राहता सर्वही सूख आहे।अहंता तुझी तुंचि शोधुन पाहे॥१६१॥सरळ अर्थ - अहंकारामुळे माणसाला सर्वत्र दु:खच मिळते कारण अहंकारी माणूस काय बोलतो याकडेही कोणी लक्ष देत नाही. आनंदी आणि समाधानी वृत्तीने जगल्याने सर्वत्र आनंद आणि आनंद मिळतो. म्हणून मनुष्याने स्वतःचा अहंकारी स्वभाव शोधून तो सोडण्याचा प्रयत्न केला पाहिजे.।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एखाद्याने केलेला त्याग, समर्पण, संघर्ष, वेदना, दु:ख,तळमळ आणि जिव्हाळा हे सर्व अनमोल संपत्ती आहेत.या अंतर्गत गुणांना ओळखणे खूप कठीण असते.या अंतर्गत गुणांना जो ओळखत असतो. तीच व्यक्ती सामाजिक संबंध वृद्धिंगत करु शकते. त्यासाठी त्याच प्रकारची दृष्टी आपल्यात असणे आवश्यक आहे. एवढेच नाही तर अशांना समजून घेण्यासाठी आणि ओळखण्यासाठी आल्यात सुद्धा त्याच प्रकारची संपत्ती असणे आवश्यक आहे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*वानर व कोल्हा*        एकदा एक 🐒वानर व कोल्हा 🐕यांची अरण्यात🌳☘🌿🌱🍃🍀🌳🌴🍂🍁☘🌿🌱🌴🌳🌳 गाठ पडली तेव्हा वानर🐒 कोल्ह्याला म्हणाला, 'अरे, तुझ्या झुपकेदार शेपटाचा काही भाग तू मला देशील तर तो मी लावून वार्‍यापासून माझं रक्षण करीन. तुझे शेपूट तुला पुरून उरण्यासारख आहे. नाही तरी तू ते धुळीत मळवतोस. तर त्यातलं थोडं मला दिलस तर तुझी फारशी अडचण होणार नाही अन् माझंही काम होईल. हे ऐकून कोल्हा म्हणाला, 'अरे वानरा, तू म्हणतोस त्याप्रमाणे माझं शेपूट कदाचित मोठं असलं, तरी ते मी जन्मभर असंच धुळीत मळवीन पण त्यातला एक केसही तुला देणार नाही.'तात्पर्य - काही माणसांजवळ बरेच ऐश्वर्य असते पण ते स्वतः त्याचा उपयोग घेण्यास समर्थ नसतात, पण त्यांचा स्वभाव मात्र विलक्षण असतो की, त्या ऐश्वर्याचा ते नाश होऊ देतील पण दुसर्‍याला कधीही देणार नाहीत.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 10 जानेवारी 2024💠 वार - बुधवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://nasayeotikar.blogspot.com/2017/11/blog-post.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_ या वर्षातील १० वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *१९७२:पाकिस्तानमधील तुरुंगात ९ महिने काढल्यानंतर शेख मुजीबूर रहमान हे राष्ट्राध्यक्ष म्हणून स्वातंत्र्य मिळालेल्या बांगला देश मधे परतले.**१९६६:भारत व पाकिस्तान यांच्यात ’ताश्कंद करार’ झाला.**१९२९:जगात अमाप लोकप्रियता मिळालेले ’द अ‍ॅडव्हेंचर्स ऑफ टिनटिन’ हे कॉमिक प्रथमच प्रसिद्ध झाले.**१९२६:स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी हुतात्मा स्वामी श्रद्धानंदांच्या स्मरणार्थ ‘श्रद्धानंद’ साप्ताहिक मुंबईत सुरू केले.**१९२०:पहिले महायुद्ध – व्हर्सायचा तह अस्तित्त्वात आल्याने पहिले महायुद्ध संपले.**१८७०:बॉम्बे,बडोदा अँड सेंट्रल इंडिया रेल्वे (B.B.C.I.Railway) या ब्रिटिशकालीन रेल्वे कंपनीच्या इतिहासाचे साक्षीदार असलेले चर्चगेट रेल्वे स्थानक सुरू झाले. या स्थानकावर फक्त एक फलाट होता.**१८६३:चार्ल्स पिअर्सन याच्या आराखड्यानुसार रचना केलेल्या ७ किमी लांबीच्या व सात स्थानके असलेल्या भुयारी रेल्वेची लंडनमध्ये सुरूवात झाली.**१८०६:केपटाऊन येथे स्थायिक असलेले डच वसाहतवादी ब्रिटिशांना शरण गेले.**१७३०:पहिल्या बाजीरावाच्या कारकिर्दीत शनिवारवाड्याच्या बांधकामास सुरुवात झाली.**१६६६:सुरत वरून शिवाजीमहाराज राजगडाकडे निघाले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८२:कालिदास अंकुश शिंदे -- लेखक* *१९७५:राजेश गंगाराम जाधव-- कवी* *१९७४:प्रा.विजय काकडे-- कथाकार,लेखक, वक्ते* *१९७४:हृतिक रोशन – प्रसिद्ध सिनेकलाकार**१९७३:रेशम टिपणीस-- भारतीय टेलिव्हिजन अभिनेत्री**१९६९:प्रा.डॉ.विठ्ठल लक्ष्मणराव चौथाले -- लेखक* *१९६८:रमेश सूर्यभान डोंगरे -- प्रसिद्ध लेखक**१९६५:प्रा.डॉ.विलास विश्वनाथ तायडे-- लेखक,समीक्षक,संपादक* *१९६४:डॉ.समीरण वाळवेकर-- निवेदक, पत्रकारिता,वृत्त टेलिव्हिजन,शैक्षणिक टेलिव्हिजन,मनोरंजन टेलिव्हिजन,मालिका, चित्रपट,सहायक दिग्दर्शन,कादंबरी लेखन , निवेदन,या सर्व क्षेत्रात भरीव काम**१९५५:डॉ.दिलीप गरुड -- प्रसिद्ध लेखक* *१९५०:नजूबाई गावित-- आदिवासी, भूमिहीन,शेतकरी,धरणग्रस्त इत्यादींच्या लढ्यात सहभाग घेणाऱ्या आदिवासी समाजातील कार्यकर्त्या**१९४६:निरंजन घाटे-- विज्ञानकथा,कादंबऱ्या लिहिणारे एक मराठी लेखक* *१९४७:प्राचार्य डॉ.पंडितराव एस.पवार-- लेखक,संशोधक,संपादक* *१९४२:डॉ.अशोक प्रभाकर कामत-- हिंदी-मराठी साहित्यिक आणि संतवाङ्‌मयाचे चिकित्सक अभ्यासक**१९४०:के.जे.येसूदास – पार्श्वगायक व संगीतकार**१९१९:प्रा.श्रीपाद रघुनाथ भिडे-- लेखक* *१९०३:शामाचार्य नरसिंहाचार्य खुपेरकर (कालगावकर,अण्णाबुवा)--समर्थ संप्रदाय, संस्कृत पंडित,संपादक(मृत्यु:३ऑक्टोबर १९९९)**१९०१:डॉ.गणेश हरी खरे -- इतिहास संशोधक (मृत्यू:५जुन १९८५)**१९००:मारोतराव सांबशिव कन्नमवार – महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री (२० नोव्हेंबर १९६२ ते २४ नोव्हेंबर १९६३) (मृत्यू:२४ नोव्हेंबर १९६३)**१८९६:नरहर विष्णू तथा ’काकासाहेब’ गाडगीळ – स्वातंत्र्यसैनिक,लेखक,वक्ते, राजकीय नेते,केंद्रीय मंत्री आणि पंजाबचे राज्यपाल (मृत्यू:१२ जानेवारी १९६६)**१८९६:दिनकर गंगाधर केळकर--कवी, संपादक,संग्रहालयकार (मृत्यु:१७ एप्रिल १९९०)**१७७५:बाजीराव पेशवे (दुसरे) (मृत्यू:२८ जानेवारी १८५१)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२००२:पं.चिंतामणी रघुनाथ तथा सी.आर. व्यास – ख्यालगायक,गुरु व बंदिशकार (जन्म:९ नोव्हेंबर १९२४)**१९९९:आचार्य श्रीपाद कृष्ण केळकर – स्वातंत्र्य सैनिक व समाजवादी विचारवंत* *१७७८:कार्ल लिनिअस – स्वीडीश वनस्पतीतज्ञ,वनस्पतींच्या दुहेरी नामकरणाची आंतरराष्ट्रीय पद्धत त्याने विकसित केली. ही पद्धत त्याला इतकी आवडली की त्याने स्वत:चेही नाव बदलून कॅरोलस लिनिअस असे केले.(जन्म:२३ मे १७०७)**१७६०:दत्ताजी शिंदे – पानिपतच्या पहिल्या संग्रामातील रणवीर (जन्म:१७२३)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*राष्ट्रगीत आणि राष्ट्रभक्ती*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *ठाकरे-शिंदेच्या भवितव्याचा आज होणार ऐतिहासिक फैसला, विधानसभा अध्यक्ष चार वाजता वाचन करणार सुरू*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री योग आदित्यनाथ यांनी राज्यातील सर्व शिक्षण संस्थांना 22 जानेवारी रोजी सुट्टी जाहीर केली आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *वेळा अमावस्यानिमित्ताने लातूरच्या बस स्थानकात प्रवाश्याची प्रचंड गर्दी*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *आमदार सुनील केदार यांच्या शिक्षेला स्थगिती व जामीन ही मंजूर*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *संगीत क्षेत्रातील तारा निखळला, संगीत सम्राट उस्ताद रशीद खान याचे निधन*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *डॉक्टरांना आता कॅपिटल अक्षरात प्रिस्क्रिप्शन लिहावी लागणार, 'झिग-झॅग' लिहिणं बंद करा; हायकोर्टाचा आदेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *टीम इंडियाचा धडाकेबाज गोलंदाज मोहम्मद शामीचा सर्वोच्च गौरव, मानाच्या अर्जुन पुरस्कारानं सन्मानित*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••💉 *रक्त* 💉 **************शरीरात रक्ताचे काम काय असते ? शरीरभर पसरलेल्या सर्व पेशींना सतत प्राणवायूचा पुरवठा करणे, अन्नाचा म्हणजेच ग्लुकोजच्या स्वरूपात ऊर्जेचा पुरवठा करणे व पेशींनी बाहेर टाकलेली दूषित द्रव्ये वाहून नेणे हे काम रक्त करते. रक्तपेशींची निर्मिती हाडांमधल्या पोकळ्यां (Bone Marrow) मध्ये होते. रक्ताच्या कामाचे स्वरूप कळले म्हणजे प्रत्येक प्राण्याच्या शरीरातील रक्ताची गरज लक्षात येते. अगदी सूक्ष्म व छोट्या घडणीचे जीव सोडले, तर इतर प्रत्येकाच्या शरीरात रक्त या ना त्या स्वरूपात असतेच. मग काहींचे रक्त गरम असेल, तर काहींचे गार. हे रक्त शरीरात सतत खेळत राहण्याची व्यवस्था म्हणजेच रक्ताभिसरणसंस्था. रक्तातील घटकद्रव्ये रक्तरसात (प्लाझ्मा) तरंगत असतात. लाल पेशी, पांढऱ्या पेशी व रक्तबिंबिका (प्लेटलेट्स) या तीन प्रकारच्या पेशींकडे वेगवेगळी कामे सोपवलेली असून या तीन्ही पेशी रक्तरसात तरंगत असतात. रक्ताचा लाल रंग हा लाल पेशींमध्ये असलेल्या हिमोग्लोबिन या द्रव्यामुळे येतो. लाल पेशींची संख्या प्रचंड असते, त्यामुळे रक्तातील पांढऱ्या पेशींचे अस्तित्व दृश्य स्वरूपात जाणवत नाही. रक्ताच्या एका घनमिलीमीटरमध्ये सुमारे पन्नास लाख लाल पेशी, पाच हजार पांढऱ्या पेशी तर दोन लाखांच्या आसपास रक्तबिंबिका असतात. स्त्री, पुरुष, लहान मुले, वयस्कर माणूस, आजारी व आजाराचे स्वरूप याप्रमाणे रक्तातील पेशींचे प्रमाण बदलत जाते. सुरुवातीला सांगितलेल्या कामांखेरीज रक्ताचे एक प्रमुख काम म्हणजे शरीरातील जखमा तात्काळ भरून काढणे. अंतर्गत जखम असो, बाह्य कातडी फाटुन रक्त वाहत असो वा एखाद्या आजारात एखादा अवयव निकामी होत चाललेला असो, तेथील दुरुस्तीचे काम सर्वस्वी रक्तातील रक्तबिंबिका व लाल पेशींकडे सोपवले जाते. जखमेवर धरलेली खपली म्हणजे याच दुरुस्तीची एक पायरी असते. शरीरात फुप्फुसात श्वासोच्छ्वास क्रियेत खेळवलेला प्राणवायू रक्तातील लाल पेशी शोषून घेतात. यालाच आपण शुद्ध रक्त म्हणतो. ते लालभडक असते. या प्राणवायूचा पुरवठा शरीरातील सर्व पेशींना रोहिणीद्वारे केला जातो. प्रत्येक पेशीची चयापचयाची क्रिया या प्राणवायुवरच अवलंबून असते. या क्रियेत निर्माण होणारा कार्बन डायऑक्साईड रक्तातील लाल पेशी पुन्हा शोषून घेतात. हे रक्त म्हणजेच अशुद्ध रक्त मग धमन्यांद्वारे फुफ्फुसांकडे पाठवले जाते. ही क्रिया अव्याहत ह्रदयामार्फत चालूच असते. मोठ्या माणसाच्या शरीरात एकूण पाच लिटर रक्त असते. दर मिनिटाला हे रक्त संपूर्ण शरीरात खेळवण्याचे वा फिरवण्याचे काम हृदय करत असते. या एकूण रक्तापैकी दहा टक्के रक्त आपण रक्तदान करतो, तेव्हा घेता येते. खरे म्हणजे त्यापेक्षा कमी म्हणजे तीनशे ते साडेतीनशे मिलिलिटर रक्त काढले जाते. ते रक्त शरीर लगेच भरून काढते. ही क्रिया पाच सहा दिवसांत पूर्ण होते. म्हणूनच रक्तदान अजिबात धोकादायक नाही. जगाच्या पाठीवर रक्त हा प्रकार अजून कृत्रिमरीत्या बनवता आलेला नाही. म्हणूनच जेव्हा शरीरातील वीस टक्क्यांपेक्षा जास्त रक्त वाहून जाते वा शस्त्रकर्म किंवा अपघातात नष्ट होते; तेव्हा पुन्हा कोणाचे तरी रक्त देऊनच ते भरून काढावे लागते. रक्ताचे प्रमुख गट (A,B,AB,O) पाडलेले असून त्या गटातील रक्तच त्या माणसाला चालू शकते. रक्तातील पांढऱ्या पेशीकडे शरीराचे संरक्षण करण्याची कामगिरी सोपवलेली आहे. यालाच आपण शरीराची प्रतिकारयंत्रणा म्हणतो. रक्ताच्या कॅन्सरमध्ये शरीरातील या रक्तपेशींची निर्मिती बिघडते, आकार व संख्या यात बदल घडतात, त्यामुळे नेहमीच्या कामात अडथळा येतो. रक्त कमी झाल्यास व लाल पेशींची संख्या कमी झाल्यास अॅनिमिया वा पंडुरोग झाला आहे, असे म्हणतात.रक्ताचा सततचा पुरवठा प्रत्येक अवयवाला आवश्यक असतो. सर्वात जास्त रक्त मेंदूतील पेशींना लागते. सर्वात कमी रक्त चरबीच्या पेशींचा लागते. हृदय रक्तानेच भरलेले असते, पण त्याच्या स्नायूंनाही रक्ताचा वेगळा पुरवठा लागतो.*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून**संकलन :- श्याम ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••वाया घालवलेला वेळ आपलं भविष्य बिघडवत असतं.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) भारतीय संविधानाच्या मुळ प्रत पुस्तकातील पहिल्या भागाच्या सुरुवातीला कोणत्या संस्कृतीची चित्रशैली आहे ?२) भारतात प्रवेश करणारा पहिला पोर्तुगीज कोण ?३) 'ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स २०२३' मध्ये भारत कितव्या स्थानावर आहे ?४) जैवविविधता रजिस्टर मिळवणारे भारतातील पहिले मेट्रो शहर कोणते ?५) रसायनाचा राजा कोणाला म्हणतात ? *उत्तरे :-* १) सिंधू संस्कृती चित्रशैली २) वास्को - द - गामा ३) ४० व्या ४) कोलकाता ५) सल्फ्युरिक आम्ल*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 श्रीनिवास रेड्डी, धर्माबाद👤 साईनाथ सोनटक्के👤 राजेश कुंटोलू👤 गणेश वाघमारे👤 शत्रूघन झुरे👤 स्वरूप खांडरे👤 आकाश क्षीरसागर, सालेगाव*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••नको रे मना वाद हा खेदकारी।नको रे मना भेद नानाविकारी॥नको रे मना शीकवूं पूढिलांसी।अहंभाव जो राहिला तूजपासी॥१६०॥सरळ अर्थ - हे मना, खेदकारक असा वाद घालू नकोस, त्याच्यामुळे भेदाभेद, भांडण तंटे होतात. ते टाळ. तुझ्या मनात असलेल्या अहंकाराची दीक्षा पुढल्या पिढीला देऊ नकोस.।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••शरीराने जवळ आणि मनाने दूर असणाऱ्या व्यक्तीला कितीही समजावून सुद्धा काहीच फायदा होत नाही. तरीही माणुसकीच्या नात्याने एकदा तरी समजूत काढण्याचा प्रयत्न करून बघावे. बरेचदा काही गोष्टी उशीरा कळल्यावर फायदा होत असतो तर न ऐकणाऱ्याचे जीवन जगणे अवघड होऊन जाते. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *गुरू, परीक्षा, शिष्य*गुरुकुलातून तीन शिष्य  उत्तीर्ण होणार होते. त्यांच्या अंतिम परीक्षा सुरू होत्या. गुरू म्हणाले, “एक परीक्षा तुम्हाला न सांगता होईल. तीच तुमची खरी अंतिम परीक्षा असेल..आणि या परीक्षेत तुम्ही पास झाला तर तुमचे जीवन यशस्वी व सत्कारणी लागेल.आता आपल्या गुरुकुलातल्या सगळ्या परीक्षा झाल्या. ती विशेष  परीक्षा काही झाली नाही. गुरुकुलात सत्कार   सोहळाही झाला. प्रथेप्रमाणे तिन्ही विद्यार्थी पुढील जीवनातील आयुष्य यशस्वी करण्यासाठी बाहेर पडले. एके दिवशी ते संध्यासमयी जंगलातुन जात होती.आणखी काही क्षणांमध्ये  काळोख पसरणार होता .राञ होणार अंधार पडणार आणि त्या काळोखातुन त्यांना जंगल पार करून गावी  परतायचे होते . झपझप चालून पुढचं जंगल पार करायचं होतं, मुक्कामाचं गाव गाठायचं होतं. अचानक पुढे चालणारा विद्यार्थी  थबकला. वाटेत एक काटेरी झुडूप आडवं पडलं होतं. तो दोन पावलं मागे आला आणि धावत पुढे जाऊन त्याने एका झेपेत ते झुडुप पार केलं.दुसऱ्याने अंदाज घेतला आणि रस्ता सोडून खाली उतरून त्याने काटे पार केले आणि तो पलीकडच्या बाजूला पुन्हा वाटेवर आला..तिसरा मात्र थांबून काटे वेचू लागला. बाजूला एका छोट्या खड्ड्यात ते लोटू लागला. दोघे मित्र म्हणाले, “अरे, ही काटे वेचायची वेळ आहे का? कोणत्याही क्षणी अंधार पडेल.आता सांज होत आहे.अशा या संध्यासमयी  आपल्याला लवकरात लवकर  मुक्कामाचं गाव गाठायचं आहे. रस्त्यात कुठे वाट चुकलो, तर जंगलात भटकत राहू. चल लवकर..तिसरा युवक म्हणाला, अंधार पडणार आहे, म्हणूनच हे काटे वेचले पाहिजेत. आपल्याला ते दिसले तरी. आपल्यामागून जो वाटसरू  येईल, त्याला काटे दिसणारच नाहीत. त्याच्या पायात काटा घुसला तर त्याची इथे या भयाण जंगलात काय अवस्था होईल, विचार करा. तुम्ही पुढे निघा. मी हे काटे बाजूला करून गाठतोच तुम्हाला धावत..ते दोघे पुढे निघतात, तोच शेजारच्या झाडामागून गुरू बाहेर आले आणि म्हणाले, तुम्हा दोघांना पुन्हा गुरुकुलात यावं लागेल तुमचं शिक्षण अजून अपूर्ण आहे.*तात्पर्यः*अंतिम परीक्षा ज्ञानाची नव्हती, प्रेमाची होती,भावनिकतेची होती , अनुकंपेची होती, सहवेदनेची होती,दुःख वाटून घेण्याची होती.तुम्ही दोघेजण ज्ञान खूप शिकलात, प्रेम अजून शिकणं बाकी आहे.भावनिकतेची जोपासना होणे बाकी आहे.बस तेवढी जोपासयला शिका.मगच जीवनात सर्वोतोपरी यशस्वी व्हाल.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 09 जानेवारी 2024💠 वार - मंगळवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://nasayeotikar.blogspot.com/2017/12/blog-post_8.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*प्रवासी भारतीय दिवस*••••••••••••••••••••••••••••••••••••*_ या वर्षातील ९ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२००१नव्या सहस्त्रकातील पहिल्या महाकुंभमेळ्याला अलाहाबाद येथे प्रारंभ झाला.**२००१:नव्या सहस्रकातील पहिले खग्रास चंद्रग्रहण दिसले.**१९१५:महात्मा गांधींचे अफ्रिकेतुन भारतात आगमन**१८८०:क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांना देशद्रोहाच्या आरोपावरुन जन्मठेपेची शिक्षा**१७८८:कनेक्टिकट हे अमेरिकेचे ५ वे राज्य बनले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९७४:पंडित रामाजी लोंढे-- कवी* *१९७४:फरहान अख्तर-- भारतीय अभिनेता, चित्रपट निर्माता,लेखक,संवाद लेखक,गायक**१९६५:फराह खान -- भारतीय चित्रपट दिग्दर्शक,लेखिका,चित्रपट निर्माता,अभिनेत्री,नृत्यांगना आणि कोरिओग्राफर**१९६३:डॉ.लीना पांढरे -- लेखिका, अनुवादक**१९६३:सुरेश कृष्णाजी पाटोळे-- सुप्रसिद्ध लेखक,दिग्दर्शक**१९६०:डॉ.किशोर रामचंद्र महाबळ--अभ्यासू, लेखक तसेच अनेक वृत्तपत्रांतून लेखन (मृत्यू:५ फेब्रुवारी २०१५)**१९५१:प्रा.अजित मधुकर दळवी-- प्रसिद्ध नाटककार**१९५१:पं.सत्यशील देशपांडे – ख्यालगायक व पं. कुमार गंधर्व यांचे पट्टशिष्य**१९४६:सुभाषकुमार अनंतराव बागी-- कवी, लेखक* *१९३८:चक्रवर्ती रामानुजम – गणितज्ज्ञ (मृत्यू:२७ आक्टोबर १९७४)**१९३४:महेंद्र कपूर –पार्श्वगायक (मृत्यू:२७ सप्टेंबर २००८)**१९२७:राजाराम भालचंद्र पाटणकर-- मराठीतील लेखक, समीक्षक आणि सौंदर्यशास्त्रज्ञ (मृत्यू:२४ मे २००४)**१९२६:कल्याण कुमार गांगुली तथा अनुप कुमार – चित्रपट अभिनेते (मृत्यू:२० सप्टेंबर १९९७)**१९२२:हर गोविंद खुराना – जन्माने भारतीय असलेले अमेरिकन नोबेल पारितोषिक विजेते (मृत्यू:९ नोव्हेंबर २०११)**१९१८:प्रभाकर वामन ऊर्ध्वरेषे-- पत्रकार, समीक्षक,मार्क्सवादी विचारवंत(मृत्यु:१० जुलै १९८९)**१९१३:रिचर्ड निक्सन – अमेरिकेचे ३७ वे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू:२२ एप्रिल १९९४)**१८७७:केशवराव रघुनाथ देशमुख--ज्ञानेश्वरी प्रवचनकार व संतकव्याचे अनुवादक (मृत्यू:२७ एप्रिल १९४२)**१८५४:रावसाहेब गोविंद वासुदेव कानिटकर-- मराठी कवी व भाषांतरकार(मृत्यू:४ जून १९१८)**१८३१:फातिमा शेख-- भारतीय शिक्षणतज्ज्ञ आणि समाजसुधारक,महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या त्या सहकारी(मृत्यू:९ ऑक्टोबर १९००)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२३:विश्वास मेहेंदळे-- मराठी लेखक, वृत्तनिवेदक,चरित्रकार आणि अभिनेते (जन्म:१० जुलै १९३९)**२०१३:जेम्स बुकॅनन – नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन अर्थतज्ञ (जन्म:३ आक्टोबर १९१९)**२००४:शंकरबापू आपेगावकर – पखवाजवादक (जन्म:१९११)**२००३:कमर जलालाबादी – गीतकार व कवी (जन्म: १९१९)**१९४५:गोविंद रामचंद्र मोघे-- कवी,ग्रंथकार (जन्म:१८६०)**१९२३:सत्येंद्रनाथ टागोर – पहिले भारतीय सनदी अधिकारी(ICS)(जन्म:१ जून १८४२)**१८४८:कॅरोलिन हर्षेल – जर्मन-ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ, ही प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ विल्यम हर्षेलची बहिण असून तिनेही ८ धुमकेतू व ३ तारकासमुह शोधले (जन्म:१६ मार्च १७५०)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*जनसेवेतच ईश्वराचीही सेवा*माणसाच्या आयुष्यात संकटे आली की, त्याला कुणाचा तरी आधार हवा असतो. हा आधार शारीरिक जरी नसला मानसिक असला तरी त्यांना ते पुरेसे असते. त्यामुळे दुःखी, कष्टी माणसे देवाचा धावा करता.............. पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे अमेरिका, इंग्लंड, सौदी अरेबियासह 160 देशांमध्ये होणार लाईव्ह प्रक्षेपण*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *PM मोदींच्या भेटीनंतर लक्षद्वीपचं नशीबच पालटलं, पर्यटनात तब्बल ३४०० टक्क्यांची वाढ झाल्याचा दावा*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *बांग्लादेशची सत्ता शेख हसीना यांच्याकडेच; पाचव्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होणार, 300 पैकी 200 जागा जिंकल्या*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी निकालाचा मुहूर्त ठरला, 10 जानेवारीला लागणार निकाल*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *पुणे लोकसभा पोटनिवडणुकीला अखेर पूर्णविराम; उच्च न्यायालयाच्या आदेशाला 'सर्वोच्च' स्थगिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *नाशिक - मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसमोर अंगणवाडी सेविकांचा गोंधळ, पोलिसांनी घेतलं ताब्यात*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *दक्षिण आफ्रिकेचा स्टार फलंदाज हेन्रीच क्लासेन याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती केली जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 एन्फ्लुएंझा (फ्लू, बर्डफ्लू, स्वाइन फ्लू) म्हणजे काय ? 📙'फ्लू' या नावाने आपण याला ओळखतो. हा अति-संसर्गजन्य असा आजार आहे. जगाच्या पाठीवर अनेकवेळा या आजाराने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. गेली काही दशके प्रतिजैवक औषधे उपलब्ध झाल्याने या आजारातून गंभीर स्वरूप धारण करणाऱ्या अन्य उपद्रवांवर जरासा ताबा आपण मिळवला आहे, एवढेच. मात्र फ्लूवर आजही नेमके औषध उपलब्ध नाही. त्याचा प्रतिबंध करणारी लस शोधण्याचे अनेक प्रयत्न निरुपयोगी ठरलेले आहेत; कारण ज्या विषाणूमुळे हा आजार होतो, त्याच्या असंख्य प्रजाती अस्तित्वात असल्याने व त्यांतही सतत नवीन भर पडत असल्याने प्रतिबंधक लस तयार करून तिचा उपयोग होत नाही.फ्लूची साथ एखाद्या प्रदेशात पसरली की, अक्षरश: घराघरांतून आलटूनपालटून प्रत्येकाचा आजाराशी संबंध येतोच. सारे घर फ्लूने भेटले आहे, अशीही उदाहरणे जुन्या काळात भरपूर आहेत. सर्दी, पडसे, नाक गळणे, खोकला, तीव्र डोकेदुखी, सर्वांग दुखणे, अतिशय थकवा, भूक मंदावणे, ताप ही प्रमुख लक्षणे या आजारात दिसतात. मात्र सर्दी, पडसे जसे पटकन बरे होते तसे न होता आजार गेला तरी थकवा खूप दिवस राहतो.प्रत्यक्ष फ्लू धोकादायक नसून त्या विषाणूंच्या प्रादुर्भावानंतर श्वासनलिका, फुप्फुसे, त्यांची आवरणे यांमध्ये आलेल्या दुर्बलतेचा फायदा घेऊन अन्य जंतूंचा प्रवेश होतो. त्यातून न्युमोनिया, ब्राँकायटिस, प्लुरसी यांसारख्या गंभीर आजारात रूपांतर होते. गेल्या शतकात १९१८ साली सुरू झालेल्या फ्लूच्या साथीमध्ये अनेकांचा मृत्यू झालेला आहे. भारतात १९५७ साली फ्लूची शेवटची मोठी साथ येऊन गेली.फ्लुवरचे उपचार व निदान यांसाठी शक्यतो डॉक्टरी सल्ला घेतलेला बरा. महत्त्वाची गोष्ट म्हणजे साथ नसताना फ्लूचे निदान करणे तज्ज्ञ डॉक्टरांचे काम बनते. साथीच्या वेळी रुग्ण पटकन लक्षात येतो. पण अन्यथा किरकोळ लक्षणांमुळे आजाराकडे दुर्लक्ष होऊ शकते.विश्रांती, पोषक आहार, वेदनाशामक औषधे, भरपूर पेयद्रव्ये यांचा वापर या आजाराच्या उपचारात आवश्यक ठरतो. नंतरचा थकवा व दौर्बल्यावर शक्तिवर्धक औषधे, प्रथिनांचा पूरक वापर उपयोगी पडतो.सध्या गेली काही वर्षे आपण ऐकत असलेला 'बर्ड फ्लू' हा आजार नामसाधर्म्याने सारखाच असला व तोही विषाणूजन्य असला, तरी त्याचा प्रादुर्भाव मुख्यतः कोंबड्या व पक्षी यांच्यात होतो. क्वचितच माणसांना त्याची लागण होते. त्यावेळी फुप्फुसदाह व तीव्र ताप ही लक्षणे माणसात दिसतात. अर्थात पक्षी हाताळताना वा त्यांची विल्हेवाट लावताना प्रतिबंधक काळजी आवश्यक ठरते. नाक तोंड झाकणारे मास्क व हातमोजे गरजेचे ठरतात. पक्षांमध्ये होणारा हा आजार फार झपाट्याने पसरतो. खुराड्यातील सर्व पक्षी याला पटकन बळी पडू शकतात. मात्र अशी कोंबडी वा पक्षी खाण्यायोग्य राहत नाहीत. त्यामुळे बर्डफ्लुचा प्रादुर्भाव झाल्यास त्या भागातील सर्व पक्षी नष्ट करणे - मुख्यतः खुराड्यातील व पाळीव - हाच एक प्रतिबंधक उपाय ठरतो. त्यांची जाळून वा खोल जमिनीत गाडून विल्हेवाट लावावी लागते. भारतात २००६ साली या रोगाने कुक्कुट- पालनाच्या व्यवसायाला फार मोठा तडाखा दिला आहे. मात्र याच काळात बर्डफ्ल्यूने आजारी झालेल्या माणसांची संख्या जेमतेम हाताच्या बोटांवर मोजण्याइतकीच आहे, हेही ध्यानात ठेवायला हरकत नाही.'स्वाईन फ्ल्यू' या नावाने २००९ साली जगभर धुमाकूळ घातलेल्या आजाराची मेक्सिकोमध्ये सुरुवात झाली. साऱ्या जगभर त्याचा विलक्षण वेगाने प्रसार झाला. फ्लुच्या विषाणूतील H1N1 या एका जातीने हा आजार होतो. फ्लूसारखी अन्य लक्षणे असली, तरी सुमारे एक टक्का रुग्णांत जुलाब, उलट्या याही सुरू होतात. एक हजारांत चार रुग्ण दगावत असल्याने ही साथ गंभीर मानली गेली आहे. मात्र टॅमिफ्लू औषधाचा वापर केल्यास स्वाईन फ्लूची तीव्रता खूप कमी होते, असेही लक्षात आले आहे.‘सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*" विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात. "**संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) नाशिक येथे होणाऱ्या २७ व्या *राष्ट्रीय युवा महोत्सवाचे शुभंकर चिन्ह* काय आहे ?२) मध्यप्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात नुकतेच तीन बघड्यांना जन्म देणाऱ्या मादी चित्ताचे नाव काय ?३) 'वन नेशन, वन इलेक्शन' बाबत कोणाच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन करण्यात आली आहे ?४) ज्ञानवापी मस्जिद कोणत्या शहरात आहे ?५) महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता ? *उत्तरे :-* १) शेकरू, महाराष्ट्राचा राज्य प्राणी २) आशा ३) रामनाथ कोविंद, माजी राष्ट्रपती ४) वाराणसी ५) शेकरू *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 सुहास अनिल देशमुख👤 माधव नरवाडे👤 आमिर अली शेख👤 अजित राठोड👤 राजेश रामगिरवार👤 गजानन सोनटक्के👤 सुप्रिया ठाकूर👤 श्याम कुमारे👤 विष्णुकांत इंगळे👤 शिवकुमार पंतुलवार👤 हमीदसाब शेख👤 लालू अर्गे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जेणे मक्षिका भक्षिली जाणिवेची।तया भोजनाची रुची प्राप्त कैची॥अहंभाव ज्या मानसीचा विरेना।तया ज्ञान हे अन्न पोटी जिरेना॥१५९॥सरळ अर्थ - तोंडातून आत माशी गेली म्हणजे जसे मळमळते आणि पुढे जेवणात गोडी वाटत नाही तसेच मनात अहंभाव शिरल्याने चांगल्या ज्ञानाची गोडी येत नाही. ते पचत नाही.।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••श्रीमंत असला तरी तो माणूस असते गरीब असतो तरीही तो माणूसच असतो.म्हणून माणसा, माणसात कसलाही भेदभाव करू नये व कोणावर आलेल्या परिस्थितीकडे बघून त्याची योग्यता ठरवू नये. वेळ, प्रसंगी परिस्थिती बदलायला जास्त वेळ लागत नाही. आणि परिस्थिती कधी ,कोणावर कशी येईल कधीही सांगून येत नाही. इतिहासात असे अनेक दाखले सापडतात की जे आधी गरीब होते व त्यांनी आपल्या अफाट कष्टातून, संघर्ष करून उंच भरारी घेतलेली आहे. त्यांचे आपण अवश्य स्मरण करायला पाहिजे.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*छोटी-छोटी बातें*     पूर्व काल में घोडे का बहुत महत्व था। घोड़ों के पैरों मे नाल ठोंका करते थे। एक बार एक सवार ने कुछ दुर्लक्ष किया। उसके घोड़े की एक नाल का एक कीला निकल गया था। वह कुछ ही क्षणों का छोटा सा काम था; परन्तु उसने वह नहीं किया। संयोगवश उस दिन उसे एक महत्वपूर्ण संदेशा पहुंचाने का कार्य दिया गया। शत्रु सेना पर एक ही समय दोनों तरफ से आक्रमण करना निश्चित हुआ। किस समय किस ढंग से सेना का दूसरा भाग आक्रमण करेगा, इसकी विस्तृत सूचना लिखकर वह लिफाफा इस सवार को दिया गया। उसे वह दूसरे सेनापति को पहुंचाना था। वह लिफाफा लेकर घोड़े पर सवार हुआ। उसने अपने घोडे को बहुत तेजी से दौड़ाया। आधा अंतर उसने पार कर लिया होगा, तभी एकाएक नाल की और दो कीलें ढीली हो गयीं और नाल सर्र से बाहर निकल आयी। घोड़ा पूर्ण वेग से दौड रहा था। बाहर निकली हुई नाल किसी वृक्ष मूल में अटकी और घोडा अपने सवारी सहित धड़ाम् से गिर पडा। घोड़े के मर्मस्थल पर चोट लगने से वह वहीं मर गया। सवार घायल हुआ। बेहोश भी हुआ। थोडी देर के बाद उसे होश आया। घोडे को मरा पा कर उसे बहुत दुख हुआ। वह उठा और लंगडाते-कराहते भागने लगा। उसे महत्वपूर्ण संदेशा जो पहुंचाना था, उसने बहुत प्रयास किया परन्तु वह निर्धारित स्थान पर ठीक समय पर नहीं पहुंच सका। अतः व्यूह रचना असफल हुई। उसका देश युद्ध में हार गया, एक छोटी सी कील के कारण।   कील न ठुकाई, घोडा मरा।   स्वार न पहुंचा देश हारा॥•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 08 जानेवारी 2024💠 वार - सोमवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://nasayeotikar.blogspot.com/2018/01/blog-post_6.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_ या वर्षातील ८ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२००१:भारत व व्हिएतनाम दरम्यान सांस्कृतिक, पर्यटन आणि अणूऊर्जेचा शांततेसाठी वापर करण्याच्या तीन करारांवर सह्या झाल्या.**२०००:लता मंगेशकर यांची १९९९ साठीच्या एन. टी. रामाराव राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड**१९६३:लिओनार्डो डा व्हिन्सिच्या ’मोनालिसा’चे अमेरिकेत प्रथमच नॅशनल गॅलरी ऑफ आर्ट,वॉशिंग्टन येथे प्रदर्शन करण्यात आले.**१९५७:गोव्याच्या लष्करी न्यायालयात मोहन रानडे यांच्यासह तेवीस जणांना २४ वर्षांची शिक्षा झाली. भारत सरकारने दुर्लक्ष केल्यामुळे गोवा स्वतंत्र झाल्यानंतरही अनेक वर्षे ते पोर्तुगालमधील तुरुंगात खितपत पडून होते. अखेर तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री अण्णादुराई यांनी पोपकडे केलेल्या मध्यस्थीमुळे १९६९ मध्ये त्यांची सुटका झाली. त्यांना गोवा पुरस्कार (१९८६), पद्मश्री (२००१) व सांगली भूषण (२००६) इ. पुरस्कारांनी गौरविण्यात आले.**१९४७:राजस्थान विद्यापीठाची स्थापना झाली.**१९४०:दुसरे महायुद्ध – ब्रिटनने अन्नधान्यावर नियंत्रण (रेशनिंग) आणले.**१८८९:संख्यात्मक सामग्रीचे विश्लेषण करण्यासाठी डॉ. हर्मन होलरिथ यांना अमेरिकेत गणकयंत्राचे पेटंट मिळाले. अमेरिकेच्या जनगणनेत १८९० मध्ये या गणकयंत्राचा उपयोग करण्यात आला.**१८८०:सत्यशोधक समाजाच्या संस्काराने लावलेली लग्ने कायदेशीर असल्याचा मुंबई उच्‍च न्यायालयाचा निर्णय.**१८३५:अमेरिकेवरील राष्ट्रीय कर्ज पहिल्यांदाच आणि एकदाच शून्य झाले.* *_जन्मदिवस /वाढदिवस/जयंती:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८०:प्रशांत दत्तात्रय कोतकर -- कवी**१९७४:प्रतिभा रामचंद्र पाटील --कवी**१९७३:गणेश सहदेव सांगोळकर - कवी* *१९७१:संध्या विलासराव बोकारे -- कवयित्री, लेखिका* *१९७१:व्यंकटेश कुलकर्णी -- कवी, गझलकार* *१९५७:प्रा.दिनकर विष्णू पाटील-- लेखक**१९५५:दिलीप दत्तात्रेय कुलकर्णी-- लेखक* *१९५३:विठ्ठल अर्जुनराव साठे--कादंबरीकार* *१९४२:स्टिफन हॉकिंग – इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ आणि लेखक(मृत्यू:१४ मार्च २०१८**१९४५:डॉ.प्रभा गणोरकर -- मराठी साहित्यातील सुप्रसिद्ध कवयित्री,समीक्षक आणि संशोधिका**१९३९:प्राचार्य प्रभाकर बागले -- कवी, लेखक,संपादक* *१९३६:ज्योतिंद्रनाथ दिक्षीत – परराष्ट्रसचिव, मुत्सद्दी व राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (मृत्यू:३ जानेवारी २००५)**१९३५:पंढरीनाथ धोंडू सावंत-- लेखक संपादक* *१९३५:एल्व्हिस प्रिस्टले – अमेरिकन गायक, गिटारवादक, अभिनेता आणि ’किंग ऑफ द रॉक अँड रोल’(मृत्यू:१६ ऑगस्ट १९७७)**१९२९:सईद जाफरी – अभिनेता( मृत्यू:१५ नोव्हेंबर २०१५)**१९२६:केलुचरण महापात्रा – प्रसिद्ध ओडिसी नर्तक (मृत्यू:७ एप्रिल २००४)**१९२५:राकेश मोहन – हिन्दी नाटककार (मृत्यू:५ डिसेंबर १९७३)**१९२४:गीता मुखर्जी – स्वातंत्र्य सेनानी, कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या,लोकसभा सदस्य (मृत्यू:४ मार्च २०००)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९६:फ्रान्सवाँ मित्राँ – फ्रान्सचे २१ वे राष्ट्राध्यक्ष (जन्म:२६ आक्टोबर १९१६)**१९९५:मधू लिमये – स्वातंत्र्यसैनिक,पत्रकार, समाजवादी नेते व राजकारणी (जन्म:१ मे १९२२)**१९७६:चाऊ एन लाय – चीनचे राष्ट्राध्यक्ष (जन्म:५ मार्च १८९८)**१९७३:नारायण भिकाजी तथा 'नानासाहेब' परुळेकर – ’सकाळ’ वृत्तपत्राचे संस्थापक संपादक,प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाचे अध्यक्ष व भारतीय पत्रकारितेचे पितामह,स्वच्छ समाजदृष्टी,उक्ती व कृती यातील करडी शिस्त या असाधारण गुणांमुळे नानासाहेब परुळेकर हे स्वातंत्र्योत्तर काळातील मराठी पत्रकारितेतील सदैव स्मरणात रहावे असे व्यक्तिमत्त्व ठरले. त्यांना पद्मभूषण सन्मानाने गौरविण्यात आले होते. ‘निरोप घेता‘ हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे.(जन्म:२० सप्टेंबर १८९८)**१९६७:डॉ.श्रीपाद कृष्ण बेलवलकर – प्राच्यविद्यातज्ञ,संस्कृत पंडित.अमेरिकेच्या हॉर्वर्ड विद्यापीठात भवभूतीच्या उत्तर रामचरितावर प्रबंध लिहून त्यांनी डॉक्टरेट मिळवली.(जन्म:१० डिसेंबर १८८०)**१९६६:बिमल रॉय – प्रथितयश दिग्दर्शक (जन्म:१२ जुलै १९०९)**१९४१:लॉर्ड बेडन पॉवेल – बालवीर (Scout) चळवळीचे प्रणेते (जन्म:२२ फेब्रुवारी १८५७)**१८८४:केशव चंद्र सेन – ब्राम्हो समाजातील एक थोर पुरूष,समाजसुधारक आणि लोकसेवक (जन्म:१९ नोव्हेंबर १८३८)**१८२५:एली व्हिटनी – कापसाच्या जिनिंग मशीनचा संशोधक (जन्म:८ डिसेंबर १७६५)**१६४२:गॅलेलिओ गॅलिली – इटालियन खगोलशास्त्रज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ (जन्म:१५ फेब्रुवारी १५६४)* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *एकच ध्यास ; वाचन विकास*शिक्षण प्रक्रियेतील वाचन हे एक प्रमुख कौशल्य आहे. ज्यावर विद्यार्थ्यांची भविष्यातील प्रगती अवलंबून असते. भाषा विकासातील श्रवण व भाषण यानंतरचा टप्पा म्हणजे वाचनकौशल्याचा. प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ स्टुअर्ट रिची यांनी आपल्या संशोधनात असे म्हटले आहे की, मुलांची वाचन क्षमता आणि त्याला किती लहान वयात वाचन करता येते त्यावर त्याची पुढील प्रगती अवलंबून ................ पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *खासदार श्रीकांत शिंदे यांना यंदाचा संसद रत्न पुरस्कार जाहीर, १७ व्या लोकसभेतील कामगिरीचा गौरव*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *PM मोदींवर टिप्पणी केल्याबद्दल मालदीवच्या मंत्री निलंबित, मरियमसह तिघांवर कारवाई*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू; काँग्रेसने राज्यातील महत्त्वाच्या नेत्यांवर दिली मोठी जबाबदारी*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *तलाठी भरती परीक्षेत घोटाळा, विद्यार्थ्याला मिळाले 200 पैकी 214 गुण; विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांकडून चौकशीची मागणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *अभिनेते किरण माने यांचा ठाकरे गटात प्रवेश; हाती शिवबंधन बांधत म्हणाले," शिवसेना सर्वसामान्यांची आहे"*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *देशभरात थंडीचा कहर, पंजाबने 14 जानेवारीपर्यंत शाळांना सुटी केली जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *ना हार्दिक ना सूर्या, रोहित शर्माच असणार टी-ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाचा कॅप्टन!*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *माणूस कोणकोणते अवयव दुसऱ्याला दान करू शकतो ?* 📙 """""""""""""""""""""""""""""""""""""""""दानाचे महात्म्य फारच मोठे आहे. अन्नदान, वस्त्रदान, तसेच आर्थिक मदत इत्यादींना आपल्या संस्कृतीत महत्त्वाचे स्थान आहे. दानशूर कर्णाच्या गोष्टी तुम्ही वाचल्या असतीलच; परंतु या सर्व दानापेक्षाही मौल्यवान असे दान सामान्यातला सामान्य माणूस देऊ शकतो. आश्चर्य वाटले ना ? पण हे अगदी खरे आहे.हृदय, नेत्र, यकृत, मूत्रपिंड, अस्थिमज्जा, त्वचा इत्यादी अवयवांचे माणूस दुसऱ्याला दान करू शकतो. मेंदूचे कार्य थांबल्यास व्यक्तीला मृत समजावे, असा कायदा भारतीय संसदेने मंजूर केल्यामुळे इंद्रियदान करणे वा इंद्रियारोपण करणे शक्य झाले आहे.डोळ्यात फुल पडल्याने वा जखम झाल्याने नेत्रपटल निकामी झालेल्या लोकांना मृत व्यक्तीचे नेत्रपटल बसवतात. त्यामुळे त्यांना दृष्टी प्राप्त होते. यालाच नेत्रदान असे म्हणतात. मूत्रपिंड खराब झालेल्या व्यक्तीचे जवळचे रक्ताचे नातेवाईक त्याला स्वतःचे मूत्रपिंड दान करू शकतात. सामान्यपणे सर्व व्यक्तींना दोन मूत्रपिंडे असल्याने त्यापैकी एक दान केले तरी एका मुत्रपिंडाच्या द्वारे आयुष्यभर कार्य केले जाते. साहजिकच एका रुग्णाचे प्राण वाचतात.अपघातांमध्ये मेंदूला जबर दुखापत झाल्याने मेंदू निकामी झालेल्या रुग्णांचे हृदय नेत्र, यकृत, मूत्रपिंड असे अवयव काढून घेऊन गरजू रुग्णांचे प्राण वाचवता येतात. मरणोत्तर काही व्यक्ती देहदानही करू शकतात. यासाठी मरणोत्तर पोस्टमार्टेम झालेले नसावे. तसेच शरीरातील अवयव शस्त्रक्रियेने काढलेले नसावे. वैयक्तिक विद्यार्थ्यांना शरीररचना शास्त्राच्या अभ्यासासाठी त्याची मदत होते. अस्थिमज्जा नष्ट झालेल्या व्यक्तींना अस्थिमज्जा दुसर्‍या निरोगी व्यक्तीने दान करावी लागते.अशा प्रकारे माणूस अनेक अवयवांचे दान करू शकतो. काही जिवंतपणी तर काही मरणोत्तर. "मरावे परि कीर्तीरुपी उरावे" या उक्तीची प्रचिती या दानामुळे येऊ शकते.*डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित*यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून मनोविकास प्रकाशन ०२० ६५२६२९५*संकलन :- श्याम ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*" परीक्षा म्हणजे स्वत:च्या आत डोकावून पाहण्याची संधी."**संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 कवी बालाजी पेटेकर👤 आसिफ शेख, धर्माबाद👤 आकाश गाडे, येवती👤 मारोती गोडगे👤 आनंदा कुमारे👤 करण भंडारी*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••श्रुती न्याय मीमांसके तर्कशास्त्रे।स्मृती वेद वेदान्तवाक्ये विचित्रे॥स्वये शेष मौनावला स्थीर पाहे।मना सर्व जाणीव सांडून राहे॥१५८॥सरळ अर्थ - श्रुती, स्मृती, न्याय, मीमांसा, तर्कशास्त्र, वेद इत्यादी अनेक ग्रंथ आहेत. त्यांमध्ये जे ज्ञान वर्णन केले आहे ते परस्परविरोधी, विचित्र वाटते. त्या सगळ्या ग्रंथांच्या वाचनाने गोंधळ उडतो. हजार डोक्यांचा शेषनाग देखील विचारांच्या गोंधळामुळे  मौन धारण करता झाला आणि सर्व जाणीवा सोडून स्थिरपणे पहात रहाणे त्याने पत्करले.।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सोन्यासारख्या मौल्यवान धातूंच्या सानिध्यात लोखंडासारखा एखादा तुकडा जरी आला तरी त्या तुकड्याला सोन्याचाच तुकडा समजायला लागतात.कारण सहवास सोन्याचा असतो म्हणून.अशाचपध्दतीने सज्जनांचा सहवासात साधारण माणसे जर आली तर त्यांच्यातील असणारे दुर्गूण सज्जनांच्या सहवासाने काही प्रमाणात कमी होऊन तेही सज्जन होण्यास कारणीभूत ठरतात.म्हणून आपल्यातील काही दुर्गूण असतील तर ते दूर होण्यास सज्जनांची संगतच हवी.जीवनात दुर्जनांच्या संगतीत राहण्यापेक्षा सज्जनांच्या संगतीत राहणे केव्हाही चांगले.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*स्वतःमध्ये बदल**कोकिळ पक्षी कधी स्वतः घरटे बांधत नाही. अंडी घालायची वेळ आली म्हणजे कोकिळा आपली अंडी एखाद्या कावळ्याच्या घरट्यात घालते. पिल्ले बाहेर पडून उडू लागेपर्यंत कावळा त्यांचे रक्षण करतो. एकदा एक कोकिळा एका घुबडाजवळ येऊन त्याला म्हणाली, 'घुबडदादा, हे कावळे किती दुष्ट आहेत पहा ! माझी अंडी पूर्ण विश्वासाने मी त्यांच्या स्वाधीन करतो. पण याबद्दल ते मला काय बक्षीस देतात पहा ! मी कुठेही एकटी सापडले तर ते माझा पाठलाग करून जीव नकोसा करतात. ही काय त्याची रीत झाली ?' घुबड म्हणाले, 'अग कृतघ्न कोकिळे, तुझ्या पिल्लांना तू टाकून दिलंस, त्यावेळी ज्या कावळ्यांनी मायेने त्यांना वाढवलं, त्यांचे उपकार तू विसरून जातेस, त्या अर्थी कावळे तुला टोचतात हेच योग्य.'**तात्पर्य:- दुसर्‍याला उपदेश करण्या अगोदर आपल्यातील दोष दूर करून वागणूकीत बदल केलेला  कधीही चांगले असते.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 06 जानेवारी 2024💠 वार - शनिवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://nasayeotikar.blogspot.com/2019/12/blog-post_6.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_पत्रकार दिन_**_ या वर्षातील सहावा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *१९४४:दुसरे महायुद्ध – रशियन सैन्य पोलंडमध्ये शिरले.**१९२९:गोरगरिब व रुग्णांची सेवा करण्यासाठी मदर तेरेसा यांचे कोलकाता येथे आगमन**१९२४:राजकारणात भाग न घेणे व रत्‍नागिरी जिल्ह्यातच राहणे या अटींवर स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जन्मठेपेतुन सशर्त मुक्तता**१९१२:न्यू मेक्सिको हे अमेरिकेचे ४७ वे राज्य बनले.**१९०७:मारिया माँटेसरी यांनी पहिली माँटेसरी शाळा सुरूकेली.त्यांच्या शाळांमुळे पूर्वप्राथमिक शिक्षणात आमूलाग्र बदल झाला.**१८३२:पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी इंग्रजी व मराठीतील पहिले साप्ताहिक वृत्तपत्र ’दर्पण’ सुरू केले**१६७३:कोंडाजी फर्जंद यांनी अवघ्या ६० मावळ्यांनिशी पन्हाळा जिंकुन महाराजांचे १३ वर्षे अपुर्ण असलेले स्वप्‍न पूर्ण केले.**१६६५:शिवाजी महाराजांनी सूर्यग्रहणाच्या निमित्ताने राजमाता जिजाऊ व सोनोपंत विश्वनाथ डबीर यांची सुवर्णतुला केली. श्री क्षेत्र महाबळेश्वर येथील देवळासमोर ही सुवर्णतुला झाली.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८१:मुरहारी कराड -- कवी,लेखक संपादक* *१९७३:किरण दत्तात्रय दशमुखे-- लेखक, संपादक* *१९७१:श्रीकांत अनंत उमरीकर-- कवी,संपादक* *१९६६:ए.आर.रहमान – संगीतकार**१९६४:विनोद जनार्दन शिंदे-- कवी,लेखक**१९६३:प्रशांत प्रकाशचंद्र पनवेलकर -- प्रसिद्ध कवी**१९५९:कपिल देव निखंज – भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार समालोचक व प्रशिक्षक**१९५५:रोवान अ‍ॅटकिन्सन – विनोदी अभिनेते व पटकथालेखक**१९३१:डॉ.आर.डी.देशपांडे – पर्यावरण क्षेत्रातील शा’स्त्रज्ञ,’महाराष्ट्र असोसिएशन फॉर द कल्टिव्हेशन ऑफ सायन्स’चे (आघारकर रिसर्च इन्स्टिट्युट) अध्यक्ष**१९२८:विजय धोंडोपंत तेंडुलकर-- प्रसिद्ध मराठी नाटककार,लेखक,पटकथालेखक,तथा राजकीय विश्लेषक(मृत्यू:१९ मे २००८)**१९२७:राम तेलंग-- कवी,लेखक**१९२६:डॉ.पद्मिनी भांडारकर-- लेखिका(मृत्यू:४मार्च २०१३)* *१९२५:रमेश मंत्री – प्रवासवर्णनकार, कथाकार,विनोदी लेखक (मृत्यू:१९ जून १९९८)**१८८३:खलील जिब्रान – लेबनॉनमधे जन्मलेले अमेरिकन कवी, लेखक व कलाकार (मृत्यू:१० एप्रिल १९३१)**१८६८:गणेश दत्तात्रय सहस्रबुद्धे उर्फ 'दासगणू महाराज' – आधुनिक संतकवी, ’भक्तिरसामृत’,’भक्तकथामृत’ आणि ’संतकथामृत’ हे त्यांचे संतचरित्रात्मक ग्रंथ आहेत.(मृत्यू:२५ नोव्हेंबर १९६२)**१८१२:बाळशास्त्री जांभेकर – मराठी पत्रकारितेचे पितामह,१८३२ मधे 'दर्पण' हे वृत्तपत्र काढून त्यांनी वृत्तपत्र व्यवसायाचा पाया घातला.’दिग्दर्शन’हे मराठीतील पहिले मासिकही त्यांनीच १८४० मधे सुरू केले. (मृत्यू:१८ मे १८४६)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१८:तुलसीदास हरिश्चंद्र बेहेरे-- लोकसाहित्याचे अभ्यासक,नाटककार, दिग्दर्शक आणि दशावतार या लोकनाट्याचे अभ्यासक आणि संशोधक.(जन्म:१५ मे १९५२)**२०१०:प्रल्हाद ईरबाजी सोनकांबळे – लेखक व इंग्रजीचे प्राध्यापक (जन्म:१६ जुलै १९४३)**१९८४:’विद्यानिधी’ सिद्धेश्वरशास्त्री विष्णू चित्राव – महामहोपाध्याय,वैदिक साहित्याचे अभ्यासक व मराठी कोशकार (जन्म:१ फेब्रुवारी १८८४)**१९८१:ए.जे.क्रोनिन – स्कॉटिश लेखक (जन्म:१९ जुलै १८९६)**१९७१:प्रफुल्लचंद्र तथा पी.सी.सरकार – जादूगार (जन्म:२३ फेब्रुवारी १९१३)**१९१९:थिओडोर रुझव्हेल्ट – अमेरिकेचे २६ वे राष्ट्राध्यक्ष,नोबेल पारितोषिक विजेते (जन्म:२७ आक्टोबर १८५८)**१९१८:जी.कँटर – जर्मन गणितज्ञ (जन्म:३ मार्च १८४५)**१८८५:भारतेंदू हरिश्चंद्र – आधुनिक हिन्दी साहित्याचे जनक मानले जाणारे हिन्दी साहित्यिक,१८५० ते १९०० हा काळ हिन्दी साहित्यात’भारतेंदू काळ’ म्हणून ओळखला जातो.(जन्म:९ सप्टेंबर १८५०)**१८८४:ग्रेगोर मेंडेल – जनुकांची (genes) संकल्पना मांडणारा जर्मन जीवशास्त्रज्ञ (जन्म:२० जुलै १८२२)**१८५२:लुई ब्रेल–अंधांना उपयोगी पडणाऱ्या ब्रेल लिपीचे जनक व शिक्षक (जन्म:४ जानेवारी १८०९)**१८४७:त्यागराज – दाक्षिणात्य संगीतकार (जन्म:४ मे १७६७)**१७९६:जिवबा दादा बक्षी – महादजी शिंदे यांचे सेनापती,मुत्सद्दी* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*हिवाळा ऋतूतील खास रानमेवा*खास करून हिवाळा ऋतूमध्ये अनेक फळे खाण्यासाठी उपलब्ध होतात जसे जांभ आणि बोरं. ही दोन्ही फळं खाल्याने सर्दी आणि खोकला होण्याचा धोका असतो म्हणून पालक वर्ग मुलांना हे फळं खान्यापासून मज्जाव करतात. तरी देखील मुलं चोरी चोरी चुपके चुपके खातातच. सायंकाळच्या वेळेला जेंव्हा शिंक येते त्यावेळी आई बरोबर ओळखते आणि बोरं किंवा जांभ खाल्लं का ? म्हणून जोरात बोलते. लहान मुलांना खास करून आवडणारे फळ म्हणजे बोरं. जंगलातील हा रानमेवा................. पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *लोकसभा निवडणुकीआधी PM मोदींचा नाशिक दौरा, तब्बल दीड किलोमीटरपर्यंत करणार रोड शो*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *सरकारी योजनाचे लाभ नाकारता येणार; गिव्ह ईट अप योजना लागू करणार महाराष्ट्र ठरलं पहिलं राज्य*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *मराठा अन् ओबीसी समाज आझाद मैदानासाठी आग्रही; पोलिसांकडे परवानगीसाठी पत्र*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *"वेळेचे योग्य नियोजन हाच यशस्वी जीवनाचा मंत्र"; राज्यपाल रमेश बैस यांचे नाशकात वक्तव्य*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 5 सहकारी बँकांना RBI चा दणका, 50 हजार ते 5 लाखांचा ठोठावला दंड*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *मुंबई आयआयटीच्या 85 विद्यार्थांना एक कोटींपेक्षा जास्त पॅकेज*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *टी-२० वर्ल्ड कप १ जूनपासून वेस्ट इंडिज आणि अमेरिका या दोन्ही देशांत संयुक्यरित्या खेळवण्यात येणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*कपिलदेव निखंज*कपिल देव हे एक भारतीय क्रिकेट खेळाडू आहेत. यांच्याच नेत्रुत्वात भारताने इंग्लंड मध्ये 1983 मध्ये पहिला  क्रिकेट  विश्वचषक जिंकला होता. क्रिकेट क्षेत्रातील योगदान - कपिल देव हे एक भारतीय क्रिकेट खेळाडू आहेत. यांच्याच नेतृत्वात भारताने इंग्लंड मध्ये आपला पहिला क्रिकेट विश्वचषक जिंकला होता. रामलाल निखंज आणि पूर्वाश्रमीच्या राजकुमारी लाजवंती यांच्या सात अपत्यांमधील कपिल हे सहावे अपत्य. रावळपिंडीनजीकच्या एका खेड्यातून फाळणीच्या वेळी रामलालजी चंडीगढला येऊन राहिले होते आणि बांधकाम साहित्य व लाकडे पुरविण्याचा व्यवसाय ते करीत होते. वयाच्या बाराव्या वर्षी कपिल देशप्रेम आझादांचा चेला बनला. नोव्हेंबर १९७५ मध्ये कपिल सर्वप्रथम हरयाणासाठी खेळला आणि सहा बळी मिळवले. त्या हंगामात ३ सामन्यांमधून १२ बळी त्याने मिळवले. १९८२-८३ च्या हंगामात गावसकरला विश्रांती देण्यात आल्याने कपिलवर कर्णधारपदाची जबाबदारी टाकण्यात आली. वेस्ट इंडीज दौर्‍यापासून तो नियमित कर्णधार बनला आणि त्या दौर्‍यावर त्याच्या संघाची सर्वात मोठी कामगिरी म्हणजे वेस्ट इंडीजला एका एकदिवसीय सामन्यात हरविणे! गावसकरने या सामन्यात ९० तर कपिलने ७२ धावा केल्या होत्या आणि ४७ षटकांमध्ये २८२ धावा करून भारतीयांनी त्या राखल्या होत्या. १९८३ च्या विश्वचषकातील अजिंक्यपद हा कपिलच्या कारकिर्दीचा कळसाध्याय होता.सौजन्य :- इंटरनेट••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*" ज्याच्याजवळ उमेद आहे तो कधीही हरू शकत नाही."**संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) NHAI तर्फे महाराष्ट्रातील पहिला *'ऑक्झिजन बर्ड पार्क'* कोठे उभारण्यात येत आहे ?२) विश्व मराठी साहित्य संमेलन कोठे आयोजित करण्यात आले आहे ?३) आकाश हे कोणत्या प्रकारचे क्षेपणास्त्र आहे ?४) पोलीस दलात महिलांची नेमणूक करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ?५) बौद्ध धर्माचे साहित्य कोणत्या भाषेमध्ये आहे ? *उत्तरे :-* १) नागपूर २) वाशी, मुंबई ( २७ ते २९ जानेवारी २०२४ ) ३) जमिनीवरून आकाशात मारा करणारे क्षेपणास्त्र ४) महाराष्ट्र ५) पाली*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 अभिषेक अडकटलवार👤 साईनाथ जगदमवार👤 भगवान चव्हाण 👤 रितेश जोंधळे👤 बजरंग माने👤 सुदर्शन कोंपलवार👤 श्रीनिवास गंगुलवार👤 मोहन घोसले👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••म्हणे जाणता तो जनी मूर्ख पाहे।अतर्कासि तर्की असा कोण आहे॥जनीं मीपणे पाहता पाहवेना।तया लक्षितां वेगळे राहवेना॥१५६॥सरळ अर्थ - आपल्याला ते परब्रम्ह तत्व समजले आहे असे जो म्हणतो तो मूर्ख आहे. कारण जे अतर्क्य आहे त्याचा तर्कही कोणी करू शकत नसतो. ‘मी पाहिलं, मी जाणलं’ असा अहंकार बाळगून असणाऱ्याला तर ते दिसणार नाही,  कळणार नाही. त्याला पाहणं म्हणजे त्याच्यात सामावून जाणं. एकतत्व होणं. जिथं ‘मी’पणा आहे तिथं ते जमणं केवळ अशक्यच.।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सोन्यासारख्या मौल्यवान धातूंच्या सानिध्यात लोखंडासारखा एखादा तुकडा जरी आला तरी त्या तुकड्याला सोन्याचाच तुकडा समजायला लागतात.कारण सहवास सोन्याचा असतो म्हणून.अशाचपध्दतीने सज्जनांचा सहवासात साधारण माणसे जर आली तर त्यांच्यातील असणारे दुर्गूण सज्जनांच्या सहवासाने काही प्रमाणात कमी होऊन तेही सज्जन होण्यास कारणीभूत ठरतात.म्हणून आपल्यातील काही दुर्गूण असतील तर ते दूर होण्यास सज्जनांची संगतच हवी.जीवनात दुर्जनांच्या संगतीत राहण्यापेक्षा सज्जनांच्या संगतीत राहणे केव्हाही चांगले.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *हुशार गोनू*मिथिला नगरीत राहणार्‍या गोनूच्या हुशारीमुळे राजाची त्याच्यावर अतिशय मर्जी बसली होती. दरबारातल्या काही जणांना हे सहन होत नव्हते. अशांपैकी एक असलेला असूयानंद शास्त्री हा एकदा राजाच्या कानात कुजबुजला, 'महाराज, तसे पाहता चातुर्यात आम्ही इतर दरबारी मंडळीही काही कमी नाही, पण गोनूप्रमाणे उठल्या-बसल्या आपल्या चातुर्याचे प्रदर्शन करणे आम्हाला आवडत नसल्याने आपली मर्जी त्या गोनूवर कारण नसता जडली आहे. गोनू जर खरोखरच चतुर असेल, तर चिंचोळय़ा तोंडाच्या साधारण मोठय़ा मडक्यात बरोबर मावेल एवढय़ा आकाराचा काळा भोपळा ते मडके न फोडता भरून दाखवायला त्याला सांगा.'शास्त्रीबुवांच्या सुचनेनुसार एके दिवशी राजा गोनूला म्हणाला, 'गोनू, अद्यापपर्यंत मी तुला बरीच इनामे दिली, पण आता मला तुझ्याकडून एक भेट हवी आहे. ते बघ तिथे चिंचोळय़ा तोंडाचे मडके व मध्यम आकाराचा काळा भोपळा आहे. तू ते मडके न फोडता त्या मडक्यात तो भोपळा भरून आणून दे. माझी मागणी सामान्य आहे ना? करशील ती पूर्ण तू?'गोनू म्हणाला, 'का नाही पुरी करणार? अवश्य करीन, पण सध्या मी एका धार्मिक ग्रंथाचे पारायण करायला घेतले असल्याने येत्या दोन-तीन महिन्यांत मला कशी ती सवड नाही. त्या पारायणातून मोकळा झालो रे झालो की, आपल्याला हवी असलेली भेट मी घेऊन येईन, मात्र तोवर ते मडके मी माझ्या घरी नेऊन ठेवून येतो, म्हणजे मला आपल्या मागणीचा विसर पडणार नाही.'आपली विनंती राजाने मान्य करताच गोनू ते मडके घेऊन घरी गेला. त्याच दिवशी कुणाच्या लक्षात येणार नाही अशा तर्‍हेने ते मडके झाकून घेऊन तो जवळच असलेल्या खेड्यातील एका ओळखीच्या शेतकर्‍याकडे गेला. त्याच्या झोपडीच्या गवताने शाकारलेल्या छपरावर काळय़ा भोपळय़ाचा वेल चढला होता व त्या वेलावर मूठ मूठ आकाराचे कोवळे कोवळे भोपळे लागले होते.स्वत: गोनू त्या मडक्यासह त्या छपरावर चढला आणि त्याने एक मूठभर आकाराचा भोपळा त्याच्या वेलासकट त्या पक्क्या मडक्याच्या चिंचोळय़ा तोंडातून आत ढकलला. एवढे झाल्यावर त्याने त्या शेतकर्‍याला ती गोष्ट पूर्णपणे गुप्त ठेवायला सांगून त्याचा निरोप घेतला.तो भोपळा प्रतिदिवशी मडक्यातल्या मडक्यात थोडाथोडा वाहू लागला. त्याच्यावर नजर टाकण्यासाठी गोनू आठवड्यातून एक फेरी त्या शेतकर्‍याकडे मारत होताच. दोन-अडीच महिन्यांत जेव्हा त्या भोपळय़ाने त्या मडक्याचा बहुतांश अंतर्भाग व्यापून टाकला, तेव्हा 'आता अधिक दिवस हा भोपळा अशाच स्थितीत राहू दिला, तर हा मडके फोडून टाकेल, असा विचार करून गोनूने तो देठात कापला आणि एके दिवशी तो ते मडके दरबारात घेऊन गेला.आपण दिलेल्या पक्क्या मडक्याचे तोंड एवढे चिंचोळे असताना त्यात एवढा मोठा भोपळा गोनूने कसा घातला? असा पेच राजापुढे पडला. त्याने गोनूला 'तू हा चमत्कार कसा केलास?' अशी पृच्छा केली. आपण अवलंबिलेल्या युक्तीची कल्पना गोनूने देताच राजा त्याच्यावर प्रसन्न झाला. त्याला 1,000 मोहरा देत तो त्याला म्हणाला, 'गोनू, या तुझ्या चातुर्यावर प्रसन्न होऊन मी तुला 1,000 मोहरा तर देत आहेच, शिवाय तुझ्यावर जळणार्‍या ज्या असूयानंद शास्त्रांनी तुला या पेचात टाकण्याचा मला सल्ला दिला, त्या शास्त्रीबुवांनीही तुला 500 मोहरा द्याव्यात, अशी मी त्यांना आज्ञा करीत आहे.' •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 05 जानेवारी 2024💠 वार - शुक्रवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://nasayeotikar.blogspot.com/2024/01/darpankar-balshastri-janbhekar.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_ या वर्षातील पाचवा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *१९९८:ज्येष्ठ जर्मन समाजशास्त्रज्ञ गेरहार्ड फिशर यांना कुष्ठरोग आणि पोलिओ नियंत्रणाच्या क्षेत्रात भारतात केलेल्या कार्याबद्दल राष्ट्रपतींच्या हस्ते ’महात्मा गांधी शांतता पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.**१९९७:रशियाने चेचेन्यातुन सैन्य मागे घेण्यास सुरूवात केली.**१९७४:अंटार्क्टिकामधील सर्वोच्‍च तापमानाची (१५º सेल्सिअस) नोंद**१९५७:विक्रीकर कायदा सुरू झाला.**१९४९:पुणे यथे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA) सुरू झाली.**१९४८:’रोझ बाऊल फुटबॉल’ स्पर्धेचा जगातील पहिला रंगीत माहितीपट (News Reel) ’वॉर्नर ब्रदर्स’ तर्फे जगांतील चित्रपटगृहांत प्रदर्शित करण्यात आला.**१९३३:सॅन फ्रान्सिस्को येथील गोल्डन गेट ब्रिजच्या बांधकामाला सुरूवात झाली.**१९१९:द जर्मन वर्कर्स पार्टीची स्थापना. या पार्टीचे पुढे नाझी पार्टीत रुपांतर झाले.**१६७१:मराठ्यांनी मुघलांबरोबर साल्हेरची लढाई जिंकली.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८६:दीपिका पदुकोण – कन्नड, हिन्दी आणि तामिळ चित्रपट अभिनेत्री**१९८१:विद्या सुर्वे-बोरसे-- लेखिका, समीक्षक**१९८०:अशोक कुबडे --- लेखक* *१९७६:प्रा.प्रवीण मधुकरराव घारपुरे-- लेखक**१९७६:मारुती नथुजी मुरके -- लेखक* *१९६९:प्रशांत विनायक आसलेकर -- लेखक* *१९६५:डॉ.संभाजी खराट-- प्रसिद्ध लेखक तथा निवृत्त उपसंचालक माहिती व जनसंपर्क* *१९६०:पराग घोंगे-- नाटककार,लेखक* *१९५९:ज्ञानेश्वर दुर्गादास रक्षक -- लेखक तथा प्रर्वतक,राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलन* *१९५६:माधव डहाळे-- कवी, कादंबरी, आत्मकथनाचे लेखन**१९५५:ममता बॅनर्जी – माजी केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री* *१९४८:सरोज निळकंठराव जोशी-- कवयित्री* *१९४८:फैय्याज – अभिनेत्री व गायिका**१९४८:पार्थसारथी शर्मा – क्रिकेटपटू (मृत्यू: २० आक्टोबर २०१०)**१९४६:गोविंद कुलकर्णी-- कवी* *१९४१:मन्सूर अली खान पतौडी – भारतीय क्रिकेट कप्तान आणि पतौडी संस्थानचे नबाब (मृत्यू:२२ सप्टेंबर २०११)**१९३६:श्यामला शिरोळकर-- बालसाहित्यिक (मृत्यू:२६ मे २००६)**१९३५:रामदास गणेश भटकळ -- लेखक,प्रकाशक**१९३५:डॉ.अभयकुमार व्यंकटेश सावजी-- लेखक* *१९३४:डॉ मुरली मनोहर जोशी-- भाजपचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री**१९२८:झुल्फिकार अली भुट्टो – पाकिस्तानचे चौथे राष्ट्राध्यक्ष आणि ९ वे पंतप्रधान (मृत्यू:४ एप्रिल १९७९)**१९२२:मोहम्मद उमर ’मुक्री’ – आपल्या अभिनयाद्वारे पाच दशके खळाळून हसवणारे विनोदी कलाकार व चरित्र अभिनेते (मृत्यू:४ सप्टेंबर २०००)**१९१२:वसंत रामकृष्ण वैद्य--कवी,कथाकार (मृत्यू:१४जानेवारी १९८०)**१९०९:श्रीपाद नारायण पेंडसे – प्रसिद्ध मराठी कथालेखक व कादंबरीकार (मृत्यू:२४ मार्च २००७)**१८९२:कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी – लेखक व मराठी भाषातज्ञ (मृत्यू:१२ जून १९६४)**१८८२:महादेव निळकंठ सहस्रबुद्धे -- शाहिरी वाड:मयाचे अभ्यासक (मृत्यू:आक्टोबर १९६३)**१८५७:यशवंत महादेव गद्रे-- कवी (मृत्यू:५ जानेवारी १९६३)**१८५५:किंग कँप जिलेट – अमेरिकन संशोधक व उद्योजक (मृत्यू:९ जुलै १९३२)**१५९२:शहाजहान – ५ वा मुघल सम्राट (मृत्यू:२२ जानेवारी १६६६)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९२:दत्तात्रय गणेश गोडसे – इतिहासकार, नाटककार,कलादिग्दर्शक,वेशभूषाकार आणि नेपथ्यकार (जन्म:३ जुलै १९१४)**१९९०:रमेश बहल – चित्रपट निर्माते व दिग्दर्शक* *१९८२:सी.रामचंद्र – संगीतकार (जन्म:१२ जानेवारी १९१८)**१९६१:नारायण धोंडोपंत ताम्हनकर-- मराठीतील कथा लेखक (जन्म:३१ ऑगस्ट १८९३)**१९४३:जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर – अमेरिकन वनस्पतीतज्ञ, शिक्षणतज्ञ, संशोधक आणि शास्त्रज्ञ (जन्म:१ फेब्रुवारी १८६४)**१९३३:काल्व्हिन कूलिज – अमेरिकेचे ३० वे राष्ट्राध्यक्ष (जन्म:४ जुलै १८७२)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*दर्पणकार : बाळशास्त्री जांभेकर*घरातील वडीलधारी मंडळी रोज सकाळी वर्तमानपत्राची आतुरतेने वाट पाहतात. वर्तमानपत्र वाचल्याशिवाय त्यांची सकाळ सुरूच होत नाही. एखाद्या दिवशी वर्तमानपत्र वाचण्यास मिळाले नाही तर दिवसभर काही तरी हरवल्यासारखे वाटते. मग खरोखरच हे वर्तमानपत्र कुणी आणि केव्हा सुरु केले ? याची माहिती जाणून घेण्यात सुध्दा आपण नक्कीच उत्सुक असाल. ............. पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *नोव्हेंबर २००५ पूर्वीच्या जाहिरातीनुसार नोव्हेंबर २००५ नंतर रुजू शासकीय कर्मचाऱ्यांना जुन्या निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय देण्यासंदर्भात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *भारत जोडो यात्रेनंतर राहुल गांधींच्या नेतृत्वात आता मणिपूर ते मुंबई दरम्यान 6713 किमी यात्रेचं आयोजन, १४ जानेवारीला होणार सुरू*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *राज्यातील दुर्गम भागातील 2,395 घरांना मिळाली वीज, आदिम जमातींना वीज पुरवठ्याचे उद्दीष्ट महावितरणकडून केवळ बारा दिवसात पूर्ण*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *नांदेड-बिदर नवीन ब्रॉडगेज प्रकल्पाला वेग देणार. ७५० कोटीची मान्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *राज्याच्या पोलिस महासंचालक पदावर रश्मी शुक्ला यांची नियुक्ती*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *बोर्डाच्या परीक्षा तोंडावर असताना महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने मागण्या मान्य होईपर्यंत परीक्षांना बहिष्कार टाकण्याचा दिला इशारा*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *दक्षिण आफ्रिका दरम्यानच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने मिळविला ऐतिहासिक विजय*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 एड्स (AIDS) म्हणजे काय ? 📙 'अॅक्वायर्ड इम्युनो डिफिशियन्सी सिन्ड्रोम' म्हणजे (AIDS) 'एड्स'. शरीरातील प्रतिकारशक्ती कमी होत जाते व त्यामुळे आढळणारा हा लक्षणसमुच्चयरुपी रोग आहे. एका विषाणूंमुळे हा रोग होतो. असे खूप संशोधनानंतर लक्षात आले आहे. या विषाणूला नाव या रोगसदृश दिले गेले. ह्युमन इम्यूनो व्हायरस १- (HIV-1)आपल्या शरीरातील पांढर्‍या रक्तपेशींपैकी काही पेशींकडे सर्व प्रकारच्या रोगजंतूशी प्रतिकार करण्याचे काम सोपवलेले आहे. एड्सचे विषाणू शरीरात प्रवेश केल्यावर या विशिष्ट (टी-४) पेशींवरच हल्ला चढवतात. त्यामुळे शरीराची प्रतिकारक्षमताच नष्ट होते. अगदी नेहमी आढळणाऱ्या सर्दी, पडसे, जुलाब यांसारख्या साध्या रोगांनीसुद्धा असा रुग्ण हैराण होऊ लागतो; कारण या रोगांना आळा घालण्याची यंत्रणाच नष्ट झालेली असते. वरवर पाहता साध्या दिसणाऱ्या, पण पुन:पुन्हा सतत उद्भवत राहणाऱ्या आजारांनी रुग्णाचा काही महिन्यांतच बळी घेतला जातो. याच कारणामुळे ज्या वेळी एड्सचे रुग्ण प्रथमच आढळले, तेव्हा त्यांचे निदान होऊ शकले नाही. आजार नेहमीचा, औषधे नेहमीची होती. पण रुग्णाचा प्रतिसादच नाही. ही स्थिती भल्याभल्या डॉक्टरांना बुचकळ्यात पाडत होती.वारंवार केल्या गेलेल्या रक्ताच्या तपासण्यांतून मग या व्हायरसचा प्रथम शोध लागला. शास्त्रीय पद्धतीने त्याची वाढ करण्यातही (Culture) यश मिळाले. पण मुख्य अडचण म्हणजे या व्हायरसच्या वाढीला अटकाव करेल वा त्याला नष्ट करेल, असे औषध मिळवण्यात आजवर सतत अपयशच आले आहे. एवढेच नव्हे, तर त्याच्या विरोधी खात्रीशीर व निर्धोक प्रतिबंधक लस तयार करणे अजूनही शक्य झालेले नाही.एड्सचा प्रसार शरीरसंबंधातून होतो. दुसऱ्या प्रकारचा प्रसार रक्तामार्फत होऊ शकतो. एकाचे रक्त दुसऱ्याला दिले असता जर देणाऱ्याचे रक्त या विषाणूने दूषित झाले असेल तर रक्त घेणारा रुग्ण एड्सग्रस्त होऊ शकतो. हाच प्रकार अंमली पदार्थ टोचून घेणाऱ्यांच्या सुयांमार्फतही होऊ शकतो. अर्थातच वरील सर्व प्रकारांत एकाला एड्सची बाधा झालेली असणे आवश्यक असते. एड्सच्या प्रसाराची ही पद्धत पक्की लक्षात ठेवली म्हणजे एड्सची मनातील भीती जायला हरकत नाही.कोणत्याही परिस्थितीत एड्सच्या रुग्णाबरोबर गप्पा मारून, हस्तांदोलन करून, त्याच्या घरात वावरल्याने वा एकच फर्निचर, प्रसाधनगृह, वस्तू ताटवाट्या वापरल्याने एड्सचा प्रसार होत नाही.आज साऱ्या जगाला एड्सने भयग्रस्त केले आहे. मुख्य कारण म्हणजे एड्स झाल्यावर त्यावर कसलाही खात्रीचा इलाज आज उपलब्ध नाही. त्याला प्रतिबंध म्हणजे रुग्णांशी शरीरसंबंध व रक्तसंपर्क न येऊ देणे एवढाच. एड्सची लागण झाल्याचे पहिले लक्षण रक्ततपासणीमध्येच लक्षात येऊ शकते. एलिझा व वेस्टर्न ब्लॉट या रक्ततपासणीनंतर एखाद्याला या रोगाची लागण झाली आहे वा नाही एवढेच कळते. ही रोगाची सुप्तावस्था असते. या अवस्थेत कित्येक वर्षे तशीच जाऊ शकतात. यानंतरची अवस्था म्हणजे विषाणूचे आक्रमण सर्वांगीण होऊन रोग दिसू लागण्याची (Full Blown Aids). एकदा ही अवस्था सुरू झाली की मग रुग्णाचे आयुष्य जेमतेम सहा महिने ते साठ महिने एवढेच राहते.पाश्चात्य देशात सुमारे ३० वर्षे या रोगाने धुमाकूळ घातला आहे. भारतात १९८४ साली या रोगाने पहिला रुग्ण मरण पावला. पण त्यानंतर आज या आजाराचे कित्येक रुग्ण आपल्या इथे नोंदले गेले वा मृत झाले आहेत. हिमनग जसा एक अष्टमांश पाण्यावर दिसतो, तसाच हा रोग आहे म्हणा ना. एक रुग्ण दिसतो वा सापडतो, तेव्हा किमान दहा जण सुप्तावस्थेत लागण झालेले असतात.जागतिक आरोग्य संघटना व सर्व प्रगत देश यांचे सध्याचे सर्व लक्ष या रोगाचा प्रतिबंध करणे व त्यावर औषध शोधणे यांवरच एकवटलेले आहे. एड्स प्रतिबंधासाठी अनेक औषधांचा शोध सतत चालू असून त्यांपैकी एझेडटी या लघुनावाने ओळखले जाणारे औषध सध्या भारतात उपलब्ध आहे. एड्स झालेल्या मातेच्या नवजात अर्भकापासून एड्स झाल्याचे निश्चित झालेल्या कोणत्याही रुग्णासाठी याचा वापर केल्यास आयुर्मान वाढू शकते. मात्र खात्रीलायक प्रतिबंध करणारी प्रतिबंधक लस मात्र उपलब्ध नाही. तसेच एड्स पूर्ण बरा करणारे औषधही सापडलेले नाही.‘सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*" आयुष्यात कुठलीच नाती ठरवून जोडता येत नाही. "**संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) ब्राझील, रशिया,भारत, चीन व दक्षिण आफ्रिका या ब्रिक्स देशांच्या गटात आणखी किती देश सदस्य झाले ?२) पृथ्वी हे कोणत्या प्रकारचे क्षेपणास्त्र आहे ?३) भारताच्या राजमुद्रेवर कोणते वचन लिहिले आहे ?४) गौतम बुद्धाच्या मावशीचे नाव काय होते ?५) टिपेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ? *उत्तरे :-* १) पाच - इजिप्त, इथिओपिया, इराण, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती २) जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र ३) सत्यमेव जयते ४) गौतमी ५) यवतमाळ*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*   👤 भाऊसाहेब चासकर, उपक्रमशील शिक्षक व लेखक👤 जैपाल ठाकूर, गोंदिया👤 अशोक कुबडे, साहित्यिक, नांदेड👤 व्यंकटी केंद्रे, प्रा. शिक्षक, कंधार👤 गणराज गुरुपवार, नांदेड👤 नितीन उत्तरवार👤 राजकुमार बेरलीकर👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••दिसेना जनी तेचि शोधूनि पाहे।बरे पाहता गूज तेथेचि आहे॥करी घेउ जाता कदा आढळेना।जनी सर्व कोंदाटले ते कळेना॥१५५॥सरळ अर्थ - जे सहजासहजी दृष्टीस पडत नाही त्याचा शोध करून पहा. ते आहे तिथेच आहे तरी त्याला उचलून घेऊ म्हटले तर कुठे आहे ते दिसत नाही. ते तत्व, ते गौप्य चराचरात भरून राहिले आहे पण त्याचे आकलन होत नाही.।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••गाथा अशा व्यक्तीची वाचली जाते, ऐकली जाते जी व्यक्ती असंख्य संकटाचा सामना करून स्वतः पेक्षा इतरांच्या विषयी जास्त विचार करून प्रामाणिकपणे जगत असते. पण, काही मुखातून त्याच व्यक्तीची गाथा नको त्या शब्दात निघत असते. पण,काहीही असेल तरी एखाद्या व्यक्तीची गाथा चांगले असो किंवा वाईट पण, वेळात वेळ काढून वाचली जाते, बोलली‌ जाते, व कान लावून ऐकली‌ जाते ही फार मोठी गोष्ट आहे. कारण त्या व्यक्तीचे जीवनच पूर्णपणे समर्पित असते.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*संस्‍कारीत मुलेच यशस्‍वी*नैतिक मूल्‍यांचे शिक्षण देणा-या एका शिक्षकाने मुलांसाठी चॉकलेटस मागवली होती. त्‍यांनी सगळ्या मुलांना रांगेत बसवले होते. शिक्षक चॉकलेटस वाटायला सुरुवात करणार इतक्यात शाळेचा शिपाई त्‍या वर्गात येऊन पोहोचला व म्‍हणाला,''सर तुम्‍हाला आताच्‍या आत्‍ता प्राचार्यांनी काही महत्‍वाचे सांगण्‍यासाठी त्‍यांच्‍या कार्यालयात बोलावले आहे.'' शिक्षकांनी चॉकलेटचा डबा हातातून खाली ठेवला व मुलांना म्‍हणाले,'' मुलांनो मला काही कामासाठी प्राचार्यांकडे जावे लागत आहे. खरेतर ही चॉकलेटस मला माझ्या स्‍वत:च्‍या हाताने तुम्‍हाला द्यायची खूप इच्‍छा होती. परंतु मला जावे लागणार आहे. पाहिजे तर तुम्‍ही हाताने चॉकलेटस घेऊ शकता. अन्यथा मी परत आल्‍यावर तुम्‍हाला देईन'' ही चांगली संधी आहे. असा काही विद्यार्थ्‍यांनी विचार केला व त्‍यांनी चॉकलेटस स्‍वत:च्‍या हाताने घेऊन खाल्ली तर काही विद्यार्थ्‍यांनी शिक्षकांची वाट बघण्‍यात वेळ घालविला. शिक्षक परत आले व त्‍यांनी मुलांना विचारले,'' मुलांनो ज्‍यांनी ज्‍यांनी स्‍वत:च्‍या हाताने चॉकलेटस खाल्ली त्‍यांनी आपले हात वर करा'' ज्‍यांनी चॉकलेटस खाल्ली होती त्‍यांनी हात वर केले. मग शिक्षकांनी उरलेल्‍या मुलांना प्रेमाने चॉकलेटस वाटली. काही वर्षानंतर त्‍या शिक्षकांनी त्‍या विद्यार्थ्‍यांची माहिती मिळविली तेव्‍हा त्‍यांना असे दिसून आले की ज्‍या मुलांनी स्‍वत:च्‍या हाताने चॉकलेटस घेतले होते ती मुले सामान्‍य स्‍वरूपातील कामे करून उदरनिर्वाह करत होते तर ज्‍यांना शिक्षकांनी चॉकलेटस दिली ते सर्व विद्यार्थी उच्‍च पदावर काम करत होते. ही सर्व संस्‍कारांची देणगी होती.तात्‍पर्य :- संस्‍काराने माणूस घडतो. मिळालेली संधी आणि तिचा योग्य वापर करणे हे मानवाच्‍या हाती आहे. चुकीच्‍या मार्गाने गेल्‍यास व संयम न पाळल्‍यास योग्‍य संधी मिळूनही तिचा वापर करता येत नाही.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 04 जानेवारी 2024💠 वार - गुरुवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://nasayeotikar.blogspot.com/2017/10/blog-post_25.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_ या वर्षातील चौथा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *१९९६:साहित्यिक चंद्रकांत खोत यांच्या ’बिंब प्रतिबिंब’ या कादंबरीला कोलकता येथील भारतीय भाषा परिषदेचा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाला.**१९५९:लूना - १ हे अंतराळयान चंद्राच्या अगदी जवळ पोहोचले.**१९५८:१९५३ मध्ये माउंट एव्हरेस्टवर यशस्वी चढाई करणारे सर एडमंड हिलरी दक्षिण धॄवावर पोहोचले.**१९५४:मेहेरचंद महाजन यांनी भारताचे ३ रे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.**१९५२:ब्रिटिश सैन्याने सुएझ कालव्याची नाकेबंदी केली.**१९४८:ब्रम्हदेश (म्यानमार) ला (इंग्लंडपासुन) स्वातंत्र्य मिळाले.**१९४४:१०वर्षावरील सर्व मुलामुलींना राष्ट्राच्या युद्धसेवेत दाखल करुन घेण्याबद्दलचा हिटलरचा वटहुकूम जारी झाला.**१९३२:सविनय कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतल्याबद्दल पंडित नेहरूंना दोन वर्षांची शिक्षा**१९२६:क्रांतिकारकांच्या गाजलेल्या काकोरी खटल्याच्या सुनावणीस लखनौ येथे सुरुवात झाली.**१८८१:लोकमान्य टिळक यांनी पुणे येथे ’केसरी’ या वृत्तपत्राची सुरूवात केली.**१६४१:कर भरायला नकार देणार्‍या लोकप्रतिनिधींना पकडण्यासाठी इंग्लंडचा राजा पहिला चार्ल्स हाऊस ऑफ कॉमन्समध्ये शिरला.या अभूतपूर्व घटनेची परिणती यादवी युद्धात झाली.त्यात चार्ल्सचा पराभव होऊन मग त्याचा शिरच्छेद करण्यात आला.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९७१:प्रा.डॉ.विजय नरसिंग जाधव-- लेखक संपादक**१९७१:सुनील राम गोसावी-- लेखक,कवी**१९६७:जयश्री अनिल पाटील-- कवयित्री* *१९६७:श्रीमंत माने-- कार्यकारी संपादक लोकमत तथा लेखक* *१९६५:प्रा.गोविंद जाधव-- कवी**१९६४:प्रसाद कुलकर्णी - लोकप्रिय कवी, उत्तम व्याख्याते* *१९६४:मिलिंद शांताराम गांधी-- कवी, गीतकार* *१९६३:प्राचार्य डॉ.जगन्नाथ शामराव पाटील-- प्रसिद्ध लेखक**१९५५:प्राचार्य डॉ.श्रीकांत तिडके-- विदर्भातील प्रसिद्ध लेखक व वक्ते**१९४१:कल्पनाथ राय – माजी केन्द्रीय मंत्री, राज्यसभा खासदार काँग्रेसचे नेते (मृत्यू:६ ऑगस्ट १९९९)**१९४०:श्रीकांत वसंत सिनकर -- कथालेखक**१९३३:मनोहर सप्रे-- प्रसिद्ध व्यंगचित्रकार, लेखक* *१९३१:दिगंबर कुलकर्णी-- कथाकार कादंबरीकार* *१९२५:प्रदीप कुमार – हिन्दी व बंगाली चित्रपटसृष्टीतील अभिनेता (मृत्यू:२७ आक्टोबर २००१)**१९२४:विद्याधर गोखले – नाटककार व संपादक (मृत्यू:२६ सप्टेंबर १९९६)**१९२२:भालचंद्र शंकर भणगे-- लेखक (मृत्यू:२९ मार्च१९८०)**१९१४:इंदिरा संत –साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या सुप्रसिद्ध कवयित्री व लेखिका (मृत्यू:१३ जुलै २०००)**१९०९:प्रभाकर आत्माराम पाध्ये--संपादक, साहित्यिक,सौंदर्यमीमांसक, समीक्षक(मृत्यु:२२ मार्च १९८४)**१९०५:कृष्णाजी बाबुराव मराठे -- चरित्रकार* *१८१३:सर आयझॅक पिटमॅन – शॉर्टहँड या लघुलिपीचे जनक (मृत्यू:१२ जानेवारी १८९७)**१८०९:लुई ब्रेल – अंधांना उपयोगी पडणाऱ्या ब्रेल लिपीचे जनक व शिक्षक (मृत्यू:६ जानेवारी १८५२)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२२:सिंधूताई सपकाळ-- सामाजिक कार्यकर्त्या,अनाथाची माय पद्मश्री पुरस्काराने सन्मानित (जन्म:१४ नोव्हेंबर १९४८)**१९९४:राहूलदेव बर्मन तथा ’पंचमदा’ – संगीतकार (जन्म:२७ जून १९३९)**१९६५:टी.एस.इलियट – अमेरिकेत जन्मलेले ब्रिटिश कवी, नाटककार, टीकाकार आणि नोबेल पारितोषिक विजेते (जन्म:२६ सप्टेंबर १८८८)**१९६१:आयर्विन श्रॉडिंगर – नोबेल पारितोषिक विजेता ऑस्ट्रियन भौतिकशास्त्रज्ञ (जन्म:१२ ऑगस्ट १८८७)**१९१७:सखाराम कृष्ण देवधर(बापूसाहेब देवधर)--गायत्री मंत्राचे उपासक,ज्ञानेश्वरीचे अभ्यासक**१९०८:राजारामशास्त्री भागवत – विद्वान व समाजसुधारक, ज्ञानाच्या क्षेत्रातील मोठे प्रज्ञावंत, संपादक (जन्म:११ नोव्हेंबर १८५१)**१९०७:गोवर्धनराम त्रिपाठी – गुजराथी लेखक, 'सरस्वतीचंद्र’ हा गाजलेला चित्रपट त्यांच्याच चार भागांतील कादंबरीवर आधारलेला आहे. (जन्म:२० आक्टोबर १८५५)**१७५२:गॅब्रिअल क्रॅमर – स्विस गणिती (जन्म:३१ जुलै १७०४)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *बोलण्याचे संस्कार*आपल्यावर बोलण्याचे संस्कार आहेत काय ?असे कोणी विचारणा केली तर आपण संभ्रमात पडतो. बोलण्यासाठी कोणत्या संस्काराची गरज आहे ? किंवा तसे संस्कार करता येतात काय ? याविषयी आपण लहान असताना नकळत विचार करतो मात्र त्यास बोलण्याचे संस्कार............... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 15 जानेवारीपर्यंत मनाई आदेश जारी; पाच पेक्षा जास्त व्यक्ती जमण्यास देखील मनाई*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *यापुढे सरकारशी चर्चा बंद, 20 जानेवारीला मुंबईकडे निघणारच, मनोज जरांगेंची मोठी घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *कोकणातील यावर्षीचा प्रवासही खड्ड्यातूनच; मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी 31 डिसेंबर 2024 नवी डेडलाईन*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *ओबीसी आरक्षणाच्या विरोधात हायकोर्टात याचिका, 7 फेब्रुवारीला मुख्य न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर सुनावणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मुंबईतील शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतूवर टोलची रक्कम ठरली, तब्बल 500 रुपयांचा टोल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत शिक्कामोर्तब होणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *राज्यामध्ये 22 जानेवारी रोजी दिवाळीप्रमाणे उत्साह साजरा केला जाईल सोशल मीडियावरुन मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *केपटाऊनचं मैदान इतिहासाला जागलं, दुसऱ्या कसोटीत मोहम्मद सिराजनं भगदाड पाडलं, दक्षिण आफ्रिकेचा डाव अवघ्या 55 धावांत गुंडाळला, सिराजला 6 विकेट्स*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 उल्कापात म्हणजे काय ? 📙 रात्रीच्या वेळी शिळोप्याच्या गप्पा रंगल्या असताना निरभ्र आकाशात अचानक एखादा चमकदार पदार्थ झळाळत निखळताना दिसतो. सगळ्यांचेच लक्ष तिकडे वळते. पण हा झळाळणारा पांढराशुभ्र चमकदार पदार्थ पृथ्वीच्या नजीक आल्यावर दिसेनासाही होतो. हा असतो उल्कापातातला एक छोटासा तुकडा. पृथ्वीवर दरवर्षीच अनेक वेळा लहान मोठ्या उल्का कोसळत असतात. त्यांच्याबद्दल विविध अंदाज व्यक्त होतात. पृथ्वीपर्यंत पोहोचणाऱ्या उल्कांचा आकडा लक्षात घेतला तर रोज एखाद दुसरी उल्का जमिनीपर्यंत पोहोचते. पण न पोहोचणाऱ्या त्यापेक्षा कितीतरी जास्त असतात. त्या वातावरणात होणाऱ्या घर्षणाने तापून प्रकाशमान होतात, वितळतात व नंतर त्यांची वाफ होऊन वातावरणातच नष्ट पावतात. खऱ्या अर्थाने एखादी मोठी उल्का येथे येऊन आदळण्याचे प्रकारही अनेकदा घडले आहेत. असा सर्वात मोठा ज्ञात प्रकार अॅरिझोना या अमेरिकेतील राज्यात घडला असावा. किमान पंचवीस हजार वर्षांपूर्वी घडलेल्या या उल्कापातातील उल्केचे वजन पन्नास हजार टन असावे. यामुळे निर्माण झालेला खळगाच मुळी सव्वा किलोमीटर व्यासाचा आहे. भारतात लोणारचे तळे याच पद्धतीने तयार झाले असावे, असा अंदाज व्यक्त केला जातो. उल्कापाताने निर्माण झालेले खड्डे हे चंद्रावर तर ठायीठायी आढळतात. ऑस्ट्रेलिया व ब्राझीलमध्ये असे मोठाले उल्कापात अलीकडच्या शतकात झाले आहेत.उल्कापातातील दगड हे पृथ्वीवरच्या दगडांपेक्षा एकदम वेगळे असल्याने त्याबद्दल शास्त्रज्ञांना कुतूहल वाटत आले आहे. काही पूर्णत: लोहाचे काही पूर्णत: शिलांचे तर काहींमध्ये मिश्रा असे हे दगड असतात. सूर्य व ग्रहमालिका तयार झाली त्या वेळी काही अवशेष अवकाशातच भिरभिरत राहिले. त्यांतील काही शिळा, काही धूर, तर काही वायूरूप अवस्थेत आहेत. ग्रहांच्या आकर्षणाने ते ज्यावेळी कक्षेत खेचले जातात तेव्हा उल्कापात घडतात. पृथ्वीचे परिभ्रमण चालू असताना काही वेळा एखाद्या अशा धुळीच्या लोटातून पृथ्वी जाते. अनेक छोटेमोठे उल्कापात या वेळी होतात. गारांचा सडा पडावा तशा या छोट्यामोठ्या उल्का वातावरणात येतात; पण त्यांतील बहुसंख्य तेथेच वितळून चकाकत नष्ट होऊन जातात. पृथ्वीवर समुद्रात कोसळणाऱ्या उल्कांचा तर पत्ताच लागत नाही व अशांचा आकडा फार मोठा असणार आहे.उल्कांचा संग्रह करणारे अनेकजण आहेत. हा एक तेजीत चालणारा व्यवसाय आहे. उल्का वा पृथ्वीवरच्या दगड ही जाण त्यासाठी असणे ही प्रमुख अट. येथेच बरेचजण गळतात. त्यानंतर यासाठी करावी लागणारी वणवण व त्याला लागणारा अफाट पैसा ही दुसरी अडचण. तिसरी अडचण विविध देशांचे कायदे. पण यावरही मात करून अनेकजण ही हौस भागवतात, तर काहीजण यातूनच पैसा करतात. मोठ्या आकाराच्या उल्केला कित्येक हजार रुपयांची मागणी सतत असते, हे विशेष.उल्कापाताचा एक मोठा अंदाज फार पुरातन काळी झालेल्या उलथापालथीशी नेहमीच जोडला जातो. या महाप्रचंड उल्कापातानेच पृथ्वीवर मोठ्या प्रमाणात धूर, धूळ साचून सूर्यप्रकाश पोहोचायला अडथळा झाला असावा व येथील प्राणीजीवन खूपसे नष्ट झाले असावे, असे काहींचे म्हणणे आहे. डायनॉसॉर जातीचे महाकाय प्राणी किंवा सरपटणाऱ्या जाती यातच उपासमार होऊन नष्ट झाल्या असाव्यात, असे मानले जाते. या अंदाजाला पुष्टी देणारा त्या उल्कापाताचा मोठ्या आकाराचा पुरावा मात्र मिळत नाही, ही या अंदाजातील कमतरता म्हणावी लागते. तुम्ही राहता त्या गावातील संग्रहालयात एखादी उल्का आहे का याची चौकशी करा. नसल्यास कुठे बघायला मिळेल, याची माहिती संग्रहालयाच्या प्रमुखांना विचारा. चंद्रावरील आणलेले काही दगड नील आर्मस्ट्राँग यांनी आपल्या देशाला भेट दिले आहेत, हे ज्ञात आहे का ?‘सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून**संकलन :- श्याम ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*" स्वभावातील गोडीने आणि जिभेवरील माधुर्याने माणसे जोडली जातात "**संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *'कौन बनेगा करोडपती'* या प्रसिद्ध टीव्ही सिरीयलचा अँकर कोण आहे ?२) जगातील सर्वाधिक सुरक्षित शहर कोणते ठरले आहे ?३) १०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत ?४) 'Why Bharat Matters' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?५) कोणाच्या स्मरणार्थ इसवी सनाची सुरुवात झाली ? *उत्तरे :-* १) सुपरस्टार अमिताभ बच्चन २) अबुधाबी शहर ३) डॉ. जब्बार पटेल ४) एस. जयशंकर ५) येशू ख्रिस्त*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 बालाजी डिगोळे, सहशिक्षक, अहमदपूर👤 अंकुशराजे जाधव👤 माधव बोइनवाड, येवती👤 चंद्रभीम हौजेकर, पत्रकार, धर्माबाद👤 राजेश कुकूटलवार👤 निलेश आळंदे👤 माधव सूर्यवंशी, मुंबई👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••महावाक्य तत्त्वादिके पंचीकरणे।खुणे पाविजे संतसंगे विवरणे॥द्वितीयेसि संकेत जो दाविजेतो।तया सांडूनि चंद्रमा भाविजेतो॥१५४॥सरळ अर्थ - महावाक्ये, वेदांमधील तत्वे, पंचमहाभूते या केवळ खुणा आहेत अंतिम सत्य जाणण्याच्या. त्यांचे विवरण संतांकडून करून घेणे, समजून घेणे हे महत्वाचे. द्वितीयेचा चंद्र दाखवण्यासाठी वापरलेला संकेत सोडून प्रत्यक्ष चंद्र बघणे हे महत्वाचे.।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कोण कधी, कुठे आणि कधी भेटतील व अचानकपणे जुळतील हे सांगता येत नाही. हा एक प्रकारचा योगायोगच असतो आणि त्यात जुळलेले सर्वचजण नि:स्वार्थी असतील असेही नाही. पण त्यातील काहीजण चांगले देखील असू शकतात.त्यांनाही जवळून ओळखावे.पण आपण मात्र अशा ठिकाणी जुळून रहावे जेथे सुकल्यानंतर सुध्दा आपल्याला मायेचा आधार मिळेल ..जसे झाडात,वेल्यांमध्ये माया आणि नि:स्वार्थ भावना असते त्याप्रमाणे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*स्वतः मध्ये बदल**कोकिळ पक्षी कधी स्वतः घरटे बांधत नाही. अंडी घालायची वेळ आली म्हणजे कोकिळा आपली अंडी एखाद्या कावळ्याच्या घरट्यात घालते. पिल्ले बाहेर पडून उडू लागेपर्यंत कावळा त्यांचे रक्षण करतो. एकदा एक कोकिळा एका घुबडाजवळ येऊन त्याला म्हणाली, 'घुबडदादा, हे कावळे किती दुष्ट आहेत पहा ! माझी अंडी पूर्ण विश्वासाने मी त्यांच्या स्वाधीन करतो. पण याबद्दल ते मला काय बक्षीस देतात पहा ! मी कुठेही एकटी सापडले तर ते माझा पाठलाग करून जीव नकोसा करतात. ही काय त्याची रीत झाली ?' घुबड म्हणाले, 'अग कृतघ्न कोकिळे, तुझ्या पिल्लांना तू टाकून दिलंस, त्यावेळी ज्या कावळ्यांनी मायेने त्यांना वाढवलं, त्यांचे उपकार तू विसरून जातेस, त्या अर्थी कावळे तुला टोचतात हेच योग्य.'**तात्पर्य:- दुसर्‍याला उपदेश करण्या अगोदर आपल्यातील दोष दूर करून वागणूकीत बदल केलेला  कधीही चांगले असते.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 03 जानेवारी 2024💠 वार - बुधवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://nasayeotikar.blogspot.com/2016/12/savitribai-phule.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_बालिका दिन,महिला मुक्तिदिन_*••••••••••••••••••••••••••••••••••••*_ या वर्षातील तिसरा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२००४:नायगाव (ता. खंडाळा, जि. सातारा) येथील सावित्रीबाई फुले यांचे जन्मघर राष्ट्रीय स्मारक घोषित करुन राष्ट्राला अर्पण करण्यात आले.**१९५७:हॅमिल्टन इलेक्ट्रिक या कंपनीने जगातील पहिले बॅटरीवर चालणारे मनगटी घड्याळ विक्रीसाठी आणले.**१९५०:पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या हस्ते पुणे येथे राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे (NCL) उद्‍घाटन झाले.**१९४७:अमेरिकन संसदेच्या कामकाजाचे प्रथमच टेलिव्हिजन चित्रीकरण करण्यात आले.**१९२५:बेनिटो मुसोलिनी इटलीचा हुकूमशहा बनला.**१४९६:लिओनार्डो डा व्हिन्सीने उडणाऱ्या यंत्राची अयशस्वी चाचणी केली.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८३:मधुकर बाळासाहेब जाधव-- लेखक, कवी**१९८०:सुनिता झाडे -- लेखिका,संपादिका**१९७५:प्रा.डॉ.विजय फकिरा राठोड-- कवी लेखक,व्याख्याते* *१९७१:सरिता सुवास परसोडकर-- कवयित्री**१९७१:अशोक गणपतराव पाठक-- कवी**१९६५:धनंजय माधवराव मुळे-- लेखक,कवी**१९६२:डॉ.मेघा उज्जैनकर-- लेखिका**१९६१:राजेंद्र खेर - सुप्रसिद्ध कादंबरीकार**१९६०:डॉ.वृषाली किन्हाळकर -- लेखिका* *१९५८:दिगंबर पवार-- कवी**१९५६:शिरीष श्रीकृष्ण गंधे-- कवी,लेखक,चित्रकार,व्याख्याते,अभिनेते**१९५२:श्रीराम वसंतराव ढवळीकर-- लेखक, पत्रकार**१९५१:अशोक निळकंठ सोनवणे-- प्रसिद्ध मराठी साहित्यिक* *१९४७:मनोहर गणपत भारंबे-- लेखक**१९४६:प्रा.डॉ.दीनानाथ सिद्धराम फुलवाडकर-- कवी,कथाकार,संपादक (मृत्यू:१४ नोव्हेंबर २०२१)**१९३७:सिंधू सदाशिव डांगे--संस्कृत संशोधक, लेखिका,संपादक**१९३१:य.दि.फडके – लेखक,विचारवंत व इतिहाससंशोधक (मृत्यू:११ जानेवारी २००८)**१९२१:चेतन आनंद – हिन्दी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि पटकथालेखक (मृत्यू:६ जुलै १९९७)**१८८३:क्लेमंट अ‍ॅटली – इंग्लंडचे पंतप्रधान (मृत्यू:८ आक्टोबर १९६७)**१८५३:कृष्णाजी नारायण आठल्ये--संपादक, चित्रकार,टीकाकार,निबंधकार,कवी(मृत्यु:२९ नोव्हेंबर १९२६)**_१८३१:सावित्रीबाई फुले – भारतीय शिक्षिका,कवयित्री व समाजसुधारक त्यांनी आशिया खंडातील पहिली मुलींची शाळा सुरू केली.(मृत्यू:१० मार्च १८९७)_* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१९:डॉ.चंद्रशेखर शंकर धर्माधिकारी-- भारतीय न्यायाधीश,लेखक(जन्म:२० नोव्हेंबर १९२७)**२०१५:सरिता मंगेश पदकी--कवयित्री, कथालेखिका, बालसाहित्यकार, नाटककार आणि अनुवादिका(जन्म:१३ डिसेंबर १९२८)**२००२:सतीश धवन – इस्रोचे अध्यक्ष (जन्म:२५ सप्टेंबर १९२०)**२०००:डॉ.सुशीला नायर – स्वतंत्र भारताच्या पहिल्या आरोग्यमंत्री, महात्मा गांधींच्या स्वीय सहाय्यिका व डॉक्टर, गांधीवादी कार्यकर्त्या. त्यांनी सेवाग्राम येथे स्थापन केलेल्या एका छोट्या दवाखान्याचे आता ’महात्मा गांधी इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस’ या मोठ्या संस्थेत रुपांतर झाले आहे. (जन्म:२६ डिसेंबर १९१४)**१९९८:प्रा.केशव विष्णू तथा ’बाबा’ बेलसरे – तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक, श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे शिष्य (जन्म:८ फेब्रुवारी १९०९)**१९९४:अमरेन्द्र गाडगीळ – मराठी बालकुमार साहित्य चळवळीचे प्रवर्तक(जन्म:२५ जून १९१९)**१९७५:ललितनारायण मिश्रा--बिहारमधील समस्तीपूर रेल्वे स्थानकावरील बॉम्बहल्यात जखमी झालेले रेल्वेमंत्री ललितनारायण मिश्रा यांचे निधन.(जन्म:२ फेब्रुवारी १९२३)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*मी सावित्री बोलतेय....!*....!*नमस्कार .....मी सावित्रीबाई फुले माझा जन्म 03 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगांव येथे झाला. वयाच्या नवव्या वर्षी महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी माझा विवाह झाला. मला शिक्षणाचा अजिबात गंध नव्हता. पण माझे पती महात्मा फुले यांनी मला शिकविले आणि घडविले. पुण्यात भिडेच्या वाड्यात मुलींसाठी त्यांनी पहिली शाळा काढली. पण तिथे मुलींना शिकविण्यासाठी कोणीही तयार होत नव्हते. तेंव्हा ज्योतिबानी मला याठिकाणी शिकविण्यासाठी पाठविण्याचे ठरविले. मात्र मी होते अक्षरशत्रू, मला वाचताही येत नव्हते आणि लिहिताही. पण ............. पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *नाशिकला १२ जानेवारीपासून राष्ट्रीय युवा महोत्सव; पंतप्रधानांच्या हस्ते होणार उद्घाटन*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *ट्रक आणि टँकर चालकांचा संप अखेर मागे. केंद्रीय गृह मंत्रालय आणि ट्रान्सपोर्ट संघटनांची बैठकीत हिट अँड रनचा कायदा लागू न करण्याचा झाला निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *स्कूल बसच्या चालकांनी संपामध्ये सहभागी होऊ नये, अन्यथा कारवाई करणार, शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचा इशारा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मराठा-कुणबीसाठी अधिकारी रेकॉर्ड देत नाहीत, मग समितीचा उपयोग काय? जरांगेंचा मुख्यमंत्र्यांना थेट सवाल*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *1 जानेवारी उलटली तरी दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानाबाबत हालचाल नाही, किसान सभेचा आंदोलनाचा इशारा*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *अंबिका मसाल्याच्या प्रवर्तक कमल परदेशी यांचं 63 व्या वर्षी निधन, शेतमजूर ते कोट्यवधींची उलाढाल असलेल्या उद्योग समूहाच्या चेअरमन*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *अजिंक्य रहाणेला मिळाली रणजी साठी मुंबई कर्णधारपदाची जबाबदारी, नव्या वर्षाच्या सुरूवातीलाच मिळालं सर्वात मोठ गिफ्ट*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *ओझोन म्हणजे काय ?* 📙 या दशकातला बहुचर्चित वायू म्हणजे ओझोन. प्राणवायूमध्ये ऑक्सिजनच्या दोन अणूंनी रेणू बनतो. तर ओझोनच्या तीन अणूंनी. पण या छोट्याशा फरकाने दोन्हींच्या गुणांत खूपच फरक पडतो. ओझोन हा फिक्कट निळा, तीक्ष्ण वास असलेला वायू आहे. विजेची मोटार चालू करताना व विजेची बटणे सतत उघडझाप केल्यास एक विशिष्ट वास जाणवतो, तो ओझोनचा. ओझोन वातावरणाच्या अगदी वरच्या थरात म्हणजे वीस ते तीस किलोमीटरमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळतो. येथे त्याचे प्रमाण वातावरणातील दर दहा लाख अन्य रेणूंमध्ये दहा रेणू (10 parts per million) इतके आढळते. याचा उपयोग अतिनील किरणे पृथ्वीवर पोहोचू नयेत म्हणून होतो. याउलट हाच ओझोन जेव्हा वातावरणाच्या खालच्या थरात येतो, तेव्हा तो त्रासदायक बनतो. याच्या सान्निध्याने अनेक कृत्रिम गोष्टी म्हणजे रबर, प्लॅस्टिक, रसायने यांचे उन्हात विघटन होऊ लागते. धूळ, धूर व ओझोन यांच्या मिश्रणाने स्माॅग तयार व्हायला मदत होते. असेही एक मत आहे. ओझोनचा व्यावहारिक उपयोग पाणी शुद्धीकरण व ब्लीचिंगसाठी केला जातो. औद्योगिक वापरासाठी ओझोन तयार करण्याची पद्धत म्हणजे बंदिस्त वातावरणात ठरावीक दाबाचा हवेमध्ये विद्युत ठिणग्या सतत पाडल्या जातात. या हवेत ओझोनचे प्रमाण वाढत जाते व प्राणवायूचे कमी होत जाते. वातावरणात ज्यावेळी प्रचंड विजांचा कडकडाट नैसर्गिकरित्या होतो, तेव्हाही ओझोन तयार होतोच.१९७० सालच्या आसपास ओझोनचा थर अंटार्क्टिकांवरती काही भागांत नष्ट झाला असून तेथे अतिनील किरणांचे प्राबल्य वाढले असल्याचे लक्षात आले. याचा शोध घेताना मानवनिर्मित क्लोरोफ्लुरोकार्बन (सीएफसी) च्या द्रव्याचा हा परिणाम असल्याचे लक्षात आले. हा एक तर्क आहे. हे सीएससीचे निरुपद्रवी कण जेव्हा हळूहळू ओझोनच्या थरातील ओझोनबरोबर संयोग पावतात, तेव्हा मोठ्या प्रमाणातील विघटनाला सुरुवात होते. यामुळे अतिनील किरणांचा पृथ्वीवर मारा वाढल्यास कातडीचे कर्करोग वाढतील व उष्णता वाढून बर्फ वितळून पाण्याची जागतिक पातळी वाढेल, अशी भीती व्यक्त केली गेली. या सर्वांचा परिणाम म्हणून ओझोन वायू या दशकात चर्चेचा केंद्रबिंदुच बनला आहे. सीएफसीचा वापर सर्व एरोसोलमध्ये व शीतीकरणासाठी केला जातो. याचे उत्पादन बंद करून त्याचे पर्याय सर्वांनी वापरावेत, या स्वरूपाचा सर्व देशांनी एक करार मॉन्ट्रियल येथे केला आहे. टप्प्याटप्प्याने उत्पादन कमी करणे व पर्यायी वापर सुरू करणे हे त्यात अपेक्षित आहे.काही शास्त्रज्ञांच्या मते ओझोनचा थराची थर नष्ट होणे यामध्ये मानव व प्राणिजातीला अणुयुद्धाएवढाच धोका उद्भवतो. काहींचे मत याला प्रतिकूल आहे. पण एक गोष्ट निर्विवाद आहे, ती म्हणजे ओझोनचा थर आहे तसाच टिकणे, हे आपल्यालाच काय, पण पृथ्वीवरच्या सर्वच सजीव सृष्टीला आवश्यक आहे.सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*"शिक्षक हा विद्यार्थ्याचा दुसरा पालकच असतो. "**संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) भारताच्या आद्य शिक्षिका कोण ?२) *'बालिका दिवस'* केव्हा साजरा केला जातो ?३) 'स्त्री मुक्ती दिन' केव्हा साजरा केला जातो ?४) जालना ते मुंबई दरम्यान धावणारी महाराष्ट्रातील ही कितवी वंदे भारत एक्स्प्रेस आहे ?५) उत्तरप्रदेश राज्यात लोकसभा सदस्यसंख्या किती आहे ? *उत्तरे :-* १) क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले २) ३ जानेवारी ३) ३ जानेवारी ४) ६ वी ५) ८०*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 डॉ. वृषाली किन्हाळकर, साहित्यिक, नांदेड👤 ज्ञानेश्वर विजागत, शिक्षक👤 वर्षा भोळे, नांदेड👤 शुभांगी परळकर, नांदेड👤 संदीप जाधव वसूरकर👤 माधव पवार👤 योगेश पाटील👤 उत्तम जोंधळे👤 राजेश पिकले👤 डॉ. प्रशांत बोड्डेवाड, येवती👤 विठ्ठल सुवर्णकार, धर्माबाद*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••नव्हे पिंडज्ञाने नव्हे तत्त्वज्ञाने ।समाधान कांही नव्हे तानमाने॥नव्हे योगयागें नव्हे भोगत्यागें।समाधान ते सज्जनाचेनि योगे॥१५३॥सरळ अर्थ - केवळ भौतिक ज्ञान असण्याने किंवा केवळ अध्यात्मिक ज्ञानाची जाणीव असल्याने आपल्याला समाधान मिळत नाही. संगीत ऐकण्याने, कर्मयोग पालन करण्याने किंवा संन्यस्त राहण्यानेही जे समाधान मिळत नाही ते सज्जनांच्या संगतीत असण्याने मिळते.।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••पैसे असोत किंवा वस्तू कितीही लपवून ठेवण्याचा जरी प्रयत्न केले तरी ते जास्त दिवस लपून राहत नाही. त्यांची एक ना एक दिवस गरज पडत असते. तसंच कोणाविषयी कितीही वाईट बोलले तरी ते बोललेले शब्द फार काळ लपून राहत नाही. भलेही त्यावेळी एखाद्याच्या डोळ्यावर जरी पट्टी बांधण्याचा प्रयत्न केले असेल तरी अनेकांच्या डोळ्यावर बांधून असलेली पट्टी बिना आधाराने ही आपोआप सुटत असते म्हणून कोणाच्याही विषयी नको ते बोलून स्वतःचा समाधान करून घेऊ नये.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*स्‍वातंत्र्य-पारतंत्र्य*अमेरिकेत एकेकाळी गुलामगिरीची प्रचलित होती. निग्रो लोकांची शेळ्या मेंढ्यांप्रमाणे खरेदीविक्री होत असे. अब्राहम लिंकन यांनी गुलामगिरीची प्रथा मोडून काढण्‍यासाठी प्रयत्‍न केल्‍यामुळे या प्रथेचा अंत झाला व निग्रो लोकांची गुलामीतून सुटका झाली. मुक्त झाल्‍यानंतर निग्रो लोकांनी रोजगाराचा शोध सुरु केला. एक वृद्ध, अशक्‍त वृद्ध निग्रो माणूस कामाच्‍या शोधात भटकत होता. पण त्‍याला काम काही मिळाले नाही. फिरून फिरून तो थकला व एके जागी बसला. तेथे त्‍याची भेट एका मालक जातीच्‍या ओळखीच्‍या माणसाबरोबर झाली. वृद्ध निग्रोची ती अवस्‍था पाहून तो माणूस म्‍हणाला,''तुझे हे होणारे हाल मला पाहवत नाहीत. तू कशाने इतका त्रस्‍त झाला आहे'' वृद्ध म्‍हणाला,''मला काम मिळत नाही'' तो माणूस म्‍हणाला,''काही दिवसांपूर्वी तर तुझी अवस्‍था चांगली होती.'' निग्रो म्‍हणाला,'' त्‍यावेळी मला बराच आराम होता. माझा मालक खूप दयाळू माणूस होता. मला तो फारसे काम लावत नसे. माझ्यावर अत्‍याचार करत नसे. कठीण कामे करण्‍यास लावित नसे.'' सहानुभूती दाखवून तो माणूस म्‍हणाला,'' अरे मित्रा मग तर ते गुलामीचे दिवसच चांगले म्‍हणायला हवे की, ही मुक्ती काही तुला मानवली नाहीये असेच दिसून येतेय. ती तुझ्या कोणत्‍याच कामी येत नाहीये.'' हे ऐकताच बसलेला तो निग्रो माणूस ताडकन उठून उभा राहिला व उंच स्‍वरात ओरडून बोलला,''मालक, गुलामगिरी स्‍वीकारण्‍यापेक्षा हे मुक्त जीवन हजारपट चांगले आहे. कारण आमच्‍या जीवनावर केवळ आमचाच अधिकार आहे; ते सावरण्‍यासाठी आम्ही स्‍वतंत्र आहोत. मालकाकडून पिंज-यात मिळणा-या पेरूच्‍या फोडी खाण्‍यापेक्षा उंच आकाशात उपाशीपोटी भरारी घेणे पोपटाला खूप आवडते हे लक्षात आहे ना.''*तात्‍पर्य :- मनुष्‍याच्‍या सर्वांगीण विकासासाठी स्‍वातंत्र्य ही पहिली अट आहे, पारतंत्र्य पतनाचे तर मुक्ती प्रगतीचे द्वार आहे.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 02 जानेवारी 2024💠 वार - मंगळवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://nasayeotikar.blogspot.com/2017/06/blog-post_86.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_ या वर्षातील दुसरा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२०००:संत ज्ञानेश्वरांची प्रतिमा असलेल्या चलनी नाण्याचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते प्रकाशन.**२०००:पनामा सरकारने ८५ वर्षांच्या कालखंडानंतर पनामा कालव्याचा पूर्ण ताबा घेतला.**१९९८:डॉ.सरोजिनी बाबर यांना पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.वसंत गोवारीकर यांच्या हस्ते सन्माननीय डी.लिट.पदवी प्रदान**१९८९:मार्क्सवादी विचारसरणीचे पथनाट्यकार, लेखक, दिगदर्शक, कवि आणि गीतकार सफदर हश्मी यांची नवी दिल्ली येथे पथनाट्य करत असतानाच निर्घृण हत्या**१९५४:राष्ट्रपती डॉ. राजेन्द्रप्रसाद यांनी ’भारतरत्‍न’ पुरस्कारांची स्थापना केली.**१९४५:दुसरे महायुद्ध – दोस्त राष्ट्रांनी न्यूरेम्बर्ग, जर्मनी येथे तुफानी बॉम्बवर्षाव केला.**१९४२:दुसरे महायुद्ध – जपानी फौजांनी मनिला, फिलिपाइन्सवर ताबा मिळवला.**१९३६:मध्य प्रदेश उच्‍च न्यायालयाची स्थापना**१९०५:मांचुरियातील पोर्ट ऑर्थर सिटी येथील लढाईत जपानी सैन्याने रशियाचा पाडाव केला. आशियाई देशाने युरोपातील देशाचा केलेला पराभव ही त्या काळातील अतिशय महत्त्वाची घटना होती.**१८८५:पुणे यथे फर्ग्युसन महाविद्यालय सुरू झाले.**१८८१:लोकमान्य टिळकांनी संपादित केलेल्या ’मराठा’ या दैनिकाची सुरूवात झाली.**१७५७:प्लासीच्या लढाईत इंग्रजांनी बंगालच्या नबाबाचा पराभव केला. या विजयामुळे ईस्ट इंडिया कंपनी सरकारचा पाया घातला गेला आणी ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीने कोलकाता काबीज केले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८४:माणिक प्रल्हादबुवा गिरी-- लेखक* *१९८४:डॉ.चंदू हरी पवार -- कवी* *१९८०:गजानन नत्थुजी कावडे-- कवी* *१९७५:डॉ.देवेंद्र शेषराव तातोडे-- कवी लेखक* *१९६४:नंदू सामंत -- कवी* *१९६४:प्रा.राम कदम-- कथाकार**१९६२:प्रा.मधुकर बळीरामजी वडोदे -- लेखक,कवी* *१९६०:रमण लांबा – क्रिकेटपटू (मृत्यू:२३ फेब्रुवारी १९९८)**१९५९:किर्ती आझाद – क्रिकेटपटू आणि माजी खासदार**१९५७:उर्मिला देशपांडे-- कथा कादंबरी नाट्य लेखन* *१९५६:प्रा.डॉ.दीपक गोपाळराव कासराळीकर-- समीक्षक* *१९५०:प्रा.श्याम विद्याधरराव पाठक-- कवी, लेखक* *१९४९:निरंजन कचरुजी पाटील -- लेखक, कवी,संपादक* *१९३२:हरचंदसिंग लोंगोवाल – अकाली दलाचे अध्यक्ष (मृत्यू:२० ऑगस्ट १९८५)**१९३१:दिगंबर तुकारामजी होले -- लेखक, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक**१९२०:आयझॅक असिमॉव्ह – अमेरिकन जीवरसायनशास्त्रज्ञ आणि विज्ञानकथालेखक (मृत्यू:६ एप्रिल १९९२)**१९०१:महादेव मल्हार जोशी-- संस्कृत भाषेचे व तत्त्वज्ञानाचे अभ्यासक(मृत्यू:१९७८)**१८९२:गणेश पांडुरंग परांजपे-- वैद्यकशास्त्र विषयक ग्रंथाचे कर्ते (मृत्यू:२६ फेब्रुवारी १९७३)**१८८६:बाळकृष्ण वामन सावर्डेकर-- लेखक (मृत्यू:१४ जानेवारी १९४६)**१८७६:भा.वा.भट--इतिहास अभ्यासक (मृत्यु:२७ डिसेंबर १९५२)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२१:प्रा.डॉ.भालचंद्र रामचंद्र अंधारे--प्रसिद्ध इतिहासतज्ज्ञ,संस्थापक संचालक इतिहास संशोधन केंद्र नागपूर,विदर्भ संशोधन महर्षी, जीवन साधना,विदर्भ भूषण पुरस्कारांनी सन्मानित (जन्म:७ सप्टेंबर १९३५)**२०१६:अर्धेन्दु भूषण वर्धन-- भारतीय कम्युनिस्ट नेते, स्वतंत्र सेनानी(जन्म:२४ सप्टेंबर १९२४)**२०१३:डाॅ.विनय वाईकर-- गझल या विषयावर अनेक पुस्तके लिहिणारे लेखक ,भूलतज्ज्ञ (जन्म:१९४१)**२००२:अनिल अग्रवाल – पर्यावरणवादी (जन्म: १९४७)**१९९९:विमला फारुकी – भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या आणि महिला चळवळीतील कार्यकर्त्या* *१९८९:सफदर हश्मी – मार्क्सवादी विचारसरणीचे पथनाट्यकार,लेखक, दिगदर्शक,कवि आणि गीतकार (जन्म:१२ एप्रिल १९५४)**१९८७:हरे कृष्ण महाताब --भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील कार्यकर्ते,ओडिशाचे माजी मुख्यमंत्री(जन्म:२१ नोव्हेंबर १८९९)**१९४४:महर्षि विठ्ठल रामजी शिंदे – अस्पृश्यता निवारण हे जीवनध्येय मानलेले व्यासंगी समाजसुधारक (जन्म:२३ एप्रिल १८७३)**१९३५:मोरेश्वर वासुदेव तथा नरकेसरी अभ्यंकर – स्वातंत्र्यसैनिक,टिळकांच्या विचारसरणीचे मध्य प्रांताचे काँग्रेस नेते,वकील (जन्म:१९ ऑगस्ट १८८६)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*कमवा आणि शिका हेच उपयोगी*स्वतःच्या विकासावर कुटुंबाचे विकास अवलंबून असते. कुटुंबाच्या विकासावर गावाचा विकास आणि मग राज्य व देशाचा विकास होतो. या विकासासाठी शिक्षण हे अत्यंत महत्त्वाची बाब आहे. शिक्षणाशिवाय कोणाचेही विकास अशक्य आहे. शिक्षणामुळे दोन डोळ्याचे माणसे तिसऱ्या डोळ्याने डोळस होऊ शकतात. अन्यथा डोळे असून ही आंधळ्याची अवस्था होते. महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिक्षणाचे महत्त्व सांगताना.............. पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *पुण्यातील कोरेगाव भीमामध्ये 206 वा शौर्य दिनाचा उत्साह, अभिवादनासाठी भीम अनुयायांची गर्दी*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचे 12 जानेवारी रोजी PM मोदींच्या हस्ते उद्घाटन ? राज्य सरकारच्या हालचाली सुरू*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *नववर्षाची सुरुवात देवदर्शनाने; दगडूशेठ, शिर्डी आणि मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिरात भाविकांची गर्दी*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *कॅन्सर रुग्णांसाठी आशेचा किरण, AIIMS मध्ये कर्करोग रुग्णांसाठी खास उपचार*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *नववर्षाच्या पहिल्याच दिवशी ISRO च्या XSPECT ची अवकाशात भरारी; मोहिमेद्वारे कृष्णविवरांचं रहस्य उकलण्याचा प्रयत्न*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *नव्या वर्षाचे स्वागत सुरु असतानाच जपान शक्तीशाली भूकंपाने हादरला; पश्चिम समुद्र किनाऱ्यावर त्सुनामी*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *जीएसटीचे विक्रमी संकलन; 9 महिन्यात 15 लाख कोटींचा कर जमा, सरकारकडून आकडेवारी जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *आजारानंतर केस का गळतात ?* 📙 """""""""""""""""""""""""""""""""""""केस निरोगी, चमकदार, दाट असण्यासाठी त्यांचे पोषण होणे आवश्यक असते. हे पोषण आहारातील स्निग्धांश, प्रथिने याद्वारे होत असते. प्रथिनांचा उपयोग केसातील केरॅटिन, मेलानिन या प्रथिनांची झालेली झीज भरून काढण्यासाठी होतो. जीवनसत्त्व अ, ई, प्रथिने, स्निग्धांश यामुळे तेथील त्वचेचे पोषण होऊन मुळे मजबूत राहण्यास मदत होते.तसे दररोजच आपले केस थोड्या प्रमाणात गळत असतात. ते नैसर्गिक असते ; परंतु समतोल आहार न घेतल्यास, त्वचेचे काही आजार झाल्यास, केसात कोंडा झाल्यास, विंचरताना ओढाताण झाल्यास केस गळतात. वर सांगितल्याप्रमाणे आजारानंतर केस गळण्याचे कारण पोषण न होणे हे असते. आजारात आहार योग्य प्रकारे घेतला जात नाही. त्यासोबतच आजाराच्या प्रतिकारासाठी शरीरातील पोषक घटक वापरले जाऊन त्याची कमतरता निर्माण होऊन केसांचे पोषणही खालावते व त्यांची मुळे सैल होऊन ते गळावयास लागतात. लहान मुलांमध्ये प्रथिनांच्या कमतरतेमुळे होणाऱ्या क्वाशिअोरकाॅर या आजारात केस भुरकट होतात आणि थोडे वाढले तरी पटकन उपटले जातात.*डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित* यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातूनमनोविकास प्रकाशन*संकलन :- श्याम ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो, रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) जगातील सर्वात उंच युद्धक्षेत्र असलेल्या सियाचीन येथे तैनात होणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी कोण ?२) राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर पर्यंत कोणती यात्रा पूर्ण केली ?३) जगातील सर्वात मोठे ध्यानकेंद्र कोठे आहे ?४) भारताच्या अध्यक्षतेखाली आयोजित जी -२० शिखर परिषदेत कोणत्या देशाचा समावेश करून जी -२१ असा विस्तार करण्यात आला ?५) देशाचे पहिले कृषीमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांचे मूळगाव कोणते ?*उत्तरे :-* १) कॅप्टन शिवा चौहान, भारत २) भारत जोडो यात्रा ( ७ डिसेंबर २०२३ ते ३० जानेवारी २०२३ ) ३) वाराणसी ( स्वरवेद महामंदिर, २० हजार लोक एकत्र ध्यान करण्याची क्षमता ) ४) दक्षिण आफ्रिका ५) पापळ, अमरावती*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 संदीप ढाकणे, साहित्यिक, औरंगाबाद👤 मो. विखार, शिक्षक, धर्माबाद👤 कविता जोशी, शिक्षिका👤 साईनाथ ईबीतवार पांचाळ, येवती👤 महेंद्रकुमार पद्मावार👤 मोगरे शंकर👤 श्रीकांत काटेलवार👤 आनंदराव धोंड👤 रवी खांडरे👤 अक्षय घाटे👤 सचिन कौटवाड👤 संजय पांचाळ👤 संजय फडसे👤 महेंद्रकुमार पद्मावार👤 प्रदीप ढगे👤 नरसिंग पेंटम👤 शहाजी पालवे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••बहूतांपरी कुसरी तत्त्वझाडा।परी अंतरी पाहिजे तो निवाडा॥मना सार साचार ते वेगळे रे।समस्तांमधे एक ते आगळे रे॥१५२॥सरळ अर्थ - किती तरी गोष्टींविषयी अहमहमिकेने, अलंकारिक भाषेमध्ये बोलता येत असले तरी त्यातले सार काय आहे त्याचा आपल्याला मनात निश्चय झालेला असला पाहिजे. असे हे जे निश्चित झालेले सारतत्व असते ते इतर सगळ्या गोष्टींहून आगळेवेगळेच असते.।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जेथून स्वत:च्या ऐवजी इतरांचे भले होत असेल आणि मनाला समाधान मिळत असेल तर असे एखादे चांगले कार्य करण्याचा एकतरी संकल्प करावे. व आपल्यात असलेले वाईट विचार, वाईट सवयी, व्यर्थ गोष्टीचा त्याग करण्याचा प्रयत्न करावे. कारण चांगले कार्य कधीच वाईट नसतात तर उशीरा का होईना शेवटी त्याच्यामुळे सर्व चांगलेच झालेले बघायला मिळत असते.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली ••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*शासन*महाभारताच्या शांतीपर्वातील ही गोष्ट. शंख व लिखित नावंचे दोघे भाऊ यज्ञोपवित संस्कार झाल्यावर गुरूगृही विद्याध्यानासाठी गेले. संपूर्ण वेद वेदांगाचा अभ्यास करून गुरूची परवानगी घेऊन हे दोघे घरी परत आले. दोघांनीही दोन वेगवेगळया ठिकाणी आपले आश्रम बांधले. तिथे त्यांचे अध्यापनाचे काम सुरू झाले. बरेच दिवस झाले दोन्ही भावांची भेट नव्हती. लिखिताने शंखाकडे भेटीला जाण्याचे ठरवले. त्याप्रमाणे तो गेला पण शंख कामानिमित्त बाहेर गेला होता. निराश झालेला लिखित परत निघाला. दुपारी बाराची वेळ भूक लागली होती. समोर शंखाच्या आश्रमातील आंब्याच्या झाडाला खूप आंबे लागले होते. एक छानसा पिकलेला आंबा लिखिताने तोडला व पुढे चालू लागला.तेवढयात समोरून येणार्‍या शंखाने ते पाहिले व विचारले. 'आंबा कुठे मिळाला ?' शंख सहज म्हणाला 'अरे ! तुझ्याच झाडाचा छान पिवळा धम्मक दिसला तोडला'. शंख शांतपणे म्हणाला 'म्हणजे लिखिता तू चोरी केलीस झाडाच्या मालकाला न विचारता आंबा तोडलास' लिखिताला आपली चूक कळली. शरमेने त्याची मान खाली झुकली. 'शंखा माझ्या गुन्ह्याबद्दल मला हवी ती शिक्षा कर' 'काहीं गरज नाहीं त्याची जा आता पुन्हा असे घडणार नाही ह्याची खबरदारी घे' शंख एवढे बोलून निघून गेला.लिखित राजाकडे गेला. घडलेली सर्व हकीगत सांगितली. 'राजा मला शिक्षा कर' लिखित म्हणाला. ह्या विचित्र मागणीचे राजाला आश्‍चर्य वाटले. राजा म्हणाला 'लिखिता तू म्हणतोस ते खरंही असेल पण चोरीची फिर्याद कुणीच केलेली नाही. गुन्हा शाबीत झाला तर शिक्षा'. 'राजे पण गुन्हा शाबीत झाला तर ह्या गुन्ह्याला शिक्षा कोणती ?' लिखिताने विचारले, 'चोरी करणार्‍याचा हातच आम्ही कापतो' राजा म्हणाला. राजाच्या समोरच लिखिताने राजा शासन करत नाहीं म्हणून आपणच आपला हात कापून टाकला'.स्वत:च स्वत:ला शिक्षा करून घेणारी प्रजा उत्कृष्ट राज्य शासनाचे प्रतीक आहे.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~