✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 09 फेब्रुवारी 2024💠 वार - शुक्रवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://nasayeotikar.blogspot.com/2018/02/blog-post_7.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_ या वर्षातील ४० वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२००३:संगीतकार रवींद्र जैन यांना मध्यप्रदेश सरकारचा लता मंगेशकर पुरस्कार प्रदान.**१९७३:बिजू पटनायक ओरिसा विधानसभेचे विरोधी पक्षनेते बनले.**१९६९:बोइंग-७४७ विमानाचे पहिले चाचणी उड्डाण झाले.**१९५१:स्वतंत्र भारताची पहिली जनगणना सुरू* *१९३३:साने गुरुजी यांनी नाशिकच्या कारागृहात असताना ’श्यामची आई’ या पुस्तकाच्या लेखनाला सुरुवात केली.* *१९००:लॉन टेनिस या खेळातील ’डेव्हिस कप’ या करंडकाची सुरूवात झाली.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८६:कांचन अभिजित जाधव (बाबर)-- कथालेखिका**१९८६:राजश्री विजय कुलकर्णी -- कवयित्री* *१९७०:ग्लेन मॅकग्रा – ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज**१९६९:जितेंद्र दत्तात्रय पराडकर-- प्रसिद्ध लेखक* *१९६७:प्रा.गिरीश चत्रु पाटील-- कवी,लेखक**१९६२:किशोर मांदळे-- लेखक* *१९५८:अमृता सिंग-- भारतीय अभिनेत्री**१९५५:वैशाली मुलमुले -- कवयित्री* *१९५०:शोभा अशोक बडवे--मराठी कवयित्री, लेखिका**१९४८:प्रा.शरद देशमुख -- कवी,लेखक* *१९४८:भाऊ तोरसेकर उर्फ गणेश वसंत तोरसेकर-- राजकीय विषयांवर वृत्तपत्रीय आणि दिवाळी अंकातून लिखाण,मराठी लेखक* *१९४५:विश्वजीत दत्तात्रय तुळजापूरकर-- कवी* *१९३३:श्रीकृष्ण गणेश पोंक्षे -- कवी,लेखक* *१९२९:बॅरिस्टर अब्दुल रहमान अंतुले-- माजी केंद्रीय अल्पसंख्यांक कार्य मंत्री व महाराष्ट्राचे आठवे माजी मुख्यमंत्री(मृत्यू:२ डिसेंबर २०१४)**१९२२:गजानन वासुदेव कवीश्वर-- वांड्:मय संशोधक तथा लेखक**१९२२:जिम लेकर – इंग्लिश क्रिकेट खेळाडू (मृत्यू:२३ एप्रिल १९८६)**१९१७:होमी जे.एच.तल्यारखान – गांधीवादी नेते,सिक्‍कीमचे पहिले माजी राज्यपाल,मंत्री व आमदार (मृत्यू:२७ जून १९९८)**१९१२: गजानन वासुदेव कवीश्‍वर--मराठी वाङ्मय संशोधक,लेखक**१९०४:दत्तात्रेय दामोदर जोशी-- बाल साहित्यिक**१९००:नारायणशास्त्री आंजलेॅकर जोशी-- लेखक* *१८७४:स्वातंत्र्यशाहीर गोविंद त्र्यंबक दरेकर उर्फ कवी गोविंद – लहानपणीच तापामुळे कमरेखालील सर्व अंग लुळे पडून त्यांना कायमचे अपंगत्व आले,त्यामुळे त्यांचे शिक्षणही होऊ शकले नाही. कविता मात्र बालपणापासून करीत (मृत्यू:२८ फेब्रुवारी १९२६)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२१:राजीव कपूर-- भारतीय अभिनेता, चित्रपट निर्माता,चित्रपट दिग्दर्शक(जन्म:२५ ऑगस्ट १९६२)**१९१२:ओ.पी. दत्ता-- भारतीय चित्रपट निर्माते आणि लेखक(जन्म:१९२२)**२००८:डॉ.मुरलीधर देविदास ऊर्फ बाबा आमटे – कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनासाठी आयुष्य वाहून घेणारे थोर समाजसेवक,लेखक (जन्म:२६ डिसेंबर १९१४)**२००४:वामन बाळकृष्ण भागवत-- लेखक, संस्कृत भाषातज्ज्ञ(जन्म:२४ जानेवारी १९१८)**२०००:शोभना समर्थ – चित्रपट अभिनेत्री व निर्माती (जन्म:१७ डिसेंबर १९१६)**१९८४:तंजोर बालसरस्वती – भरतनाट्यम नर्तिका (जन्म:१३ मे १९१८)**१९८१:एम.सी.छागला – न्यायाधीश,मुत्सद्दी आणि केंद्रीय मंत्री (जन्म:३० सप्टेंबर १९००)**१९७९:राजा परांजपे – चित्रपट दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते (जन्म:२४ एप्रिल१९१०)**१९६६:दामूअण्णा जोशी – बालमोहन नाटक मंडळीचे संस्थापक.* *१८७१:फ्योदोर दोस्तोवस्की – रशियन कादंबरीकार आणि तत्त्वज्ञ (जन्म:११ नोव्हेंबर १८२१)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*जन्म मृत्यूची नोंदणी*युनिसेफच्या एव्हरी चाईल्ड ब्राईट ईनेकविट्स अँड बर्थ रजिस्ट्रेशन या नुकतेच प्रकाशित करण्यात आलेल्या 161 देशातील आकडेवारी विश्लेषणाचा अहवालानुसार भारतात प्रत्येक तीन मुलामागे एकाच्या जन्माचे कोणतीही नोंद नसते.  पाच वर्षाखालील अशा अनोंदणीकृत मुलांची संख्या तब्बल 71 दशलक्ष असून जागतिक पातळीवर हीच संख्या दोनशे तीस दशलक्ष अशी आहे. यानुसार भारतात जन्म नोंदणीचे प्रमाण 41 टक्के आहे जी की जगात सर्वात कमी आहे. भारतातील हिंदू व मुस्लिम या दोन सर्वाधिक लोकसंख्येच्या समुदायात जन्म नोंदणीचे प्रमाण सर्वांत कमी असून याच्या तुलनेत अल्पसंख्यांक जैन व शीख समुदायात प्रमाण जास्त असल्याचे आढळून आले आहे............ पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *प्री-प्रायमरी ते 4थी पर्यंतची शाळा सकाळी 9 नंतर भरवा :राज्यशासनाचा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *सरकारचा गुगलबरोबर करार: प्रशासकीय कामात AI चा वापर होईल तर रोजगाराच्या असिमीत संधी येतील; देवेंद्र फडणवीसांचा विश्वास*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *​​​​​​​लोकसभा अध्यक्षांनी ​​​​​​​खा. हेमंत पाटील यांचा राजीनामा फेटाळला, मराठा आरक्षणाला पाठींबा देत दिला होता राजीनामा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *अमरावती :- श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालयात 'मराठी भाषा संवर्धन पंधरवडा' साजरा; भाषा संवर्धनाच्या दृष्टीने विविध कार्यक्रम संपन्न*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *आरबीआयकडून पतधोरण जाहीर, सलग सहाव्यांदा रेपो रेट जैसे थे, व्याजदरात कोणताही दिलासा नाही, जीडीपी 6.7 टक्क्यावरुन 7.2 टक्के होण्याचा अंदाज*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *राज्यसभेसाठी भाजपकडून तीन जागांसाठी नावं गुलदस्त्यात, नारायण राणे, विनोद तावडे, पंकजा मुंडे यांच्यासह नऊ जणांची यादी दिल्लीला पाठवली*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *U19 World Cup च्या दुसऱ्या सेमी फायनल मध्ये ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा 1 विकेटने केला पराभव, रविवारी भारतासोबत होणार फायनल*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 टेलिस्कोप म्हणजे काय ? 📙 खगोलदर्शनासाठी टेलिस्कोप वापरतात. अगदी सहज गंमत म्हणून गच्चीवरून तारे बघायचे असोत किंवा खगोलशास्त्राचा सखोल अभ्यास करावयाचा असो, यासाठीचे मुख्य माध्यम टेलिस्कोपच आहे. टेलिस्कोपचे दोन महत्त्वाचे प्रकार वापरले जातात. प्रकाश किरणांच्या भिंगातून वक्रीकरण करून बनवलेले टेलिस्कोप हे आकाराने खूपच लहान असतात व ते वापरणे सुटसुटीत असते. अर्थात यालाही अपवाद आहेतच. तब्बल एक मीटर व्यासाची बहिर्गोल भिंग वापरून अमेरिकेतील वेधशाळेतील टेलिस्कोप बनला आहे. मोठ्या भिंगातून एकत्रित केलेल्या किरणांची प्रतिमा प्रमाणबद्ध रीतीने दुसऱ्या डोळ्याजवळच्या भिंगातून बघितली जाते. डोळ्याजवळची भिंगे बदलून, त्यांची क्षमता वाढवून प्रतिमा लहान व मोठीही करता येते.प्रकाशकिरणांचे परावर्तन करणारे अंतर्गोल आरसे वापरणे हे जास्त सोयीचे पडते. आरशात प्रकाशाचे विश्लेषण होत नाही. प्रतिमा स्पष्ट राहते; कारण भिंगाची जाडी, वजन व त्यांना द्यावयाचा आधार यापेक्षा आरशाला आधार देऊन त्यातून परावर्तीत प्रतिमा दुसऱ्या आरशातून पुन्हा बघणे हे सोयीचे वाटते. यासाठी प्रचंड अंतर्गोल आरसे वापरले जातात व त्यातून परावर्तीत प्रतिमा साध्या अारशाद्वारे पुन्हा डोळ्याजवळील भिंगाकडे परावर्तित केली जाते. येथेही गरजेप्रमाणे डोळ्याजवळचे भिंग कमी जास्त ताकदीचे वापरता येते. रशियामध्ये सहा मीटर व्यासाचा आरसा वापरून जगातील सर्वात मोठा टेलिस्कोप बसवलेला आहे.मोठाले टेलिस्कोप हे यांत्रिक पद्धतीने हलविण्याची व्यवस्था केली जाते. नेमकी दिशा रोखण्यासाठी पूर्ण यांत्रिक व्यवस्था येथे आवश्यक असते. निरीक्षणासाठी बसणाऱ्या शास्त्रज्ञाला सोयीची बैठक व त्याच्या नजरेला समोरच दिसू शकेल, अशी दृश्य भिंगांची रचना यासाठी गरजेची ठरते. आकाशाकडे बघून निरीक्षण करणे येथे शक्यही नसते व अपेक्षितही नसते.काचेच्या भिंगांचा चष्मा करायचा वापर सुरू झाला, त्यानंतर टेलिस्कोपचा जन्म झाला असावा. नेमका कधी, कसा ते ज्ञात नाही, पण या बाबतीत *हॅन्स लिप्परशे* याचे नाव जनक म्हणून घेतले जाते. *गॅलिलिओ गॅलिली* यांनी व्हेनिसमध्ये १६०९ सालच्या सुमाराला टेलिस्कोप वापरला. यानंतरचा मुख्य शोध होता १६७२ मध्ये सर आयझॅक न्यूटनने परावर्तीत अंतर्गोल आरसा वापरून बनवलेल्या टेलिस्कोपचा.पृथ्वीवरून टेलिस्कोपद्वारे खगोलसंशोधन करताना वातावरणाच्या अडचणी येतात. मग यासाठी अंतराळात जाऊन निरीक्षण करणे जास्त सोयीचे, असे विचार मांडले गेल्याने त्या दिशेने संशोधन पुढे सरकत गेले. याच देशाची एक अवाढव्य निर्मिती म्हणजे हबल टेलिस्कोपची. २.४ मीटर व्यासाचा आरसा असलेला हा टेलिस्कोप १९९० साली अवकाशात पाठवला गेला आहे. पृथ्वीवरील निरीक्षणात दिसणारी अगदी स्पष्ट तारका यातून तब्बल पंचवीस पटींनी स्वच्छ बघता येते. हबमधील दुरुस्त्या करीत, तांत्रिक अडचणींवर मात करीत त्याने पाठवलेल्या असंख्य निरीक्षणांचे विश्लेषण सतत चालू असते. हे काम शास्त्रज्ञांना काही वर्षे पूरुन उरणार आहे.टेलिस्कोपचेच तत्त्व वापरून रेडिओलहरी गोळा करून त्याद्वारे खगोल संशोधन करण्याचाही प्रकार वापरला जातो. रेडिओलहरी, प्रकाशलहरी, क्ष-किरण, इन्फ्रारेड या साऱ्यांची 'जातकुळी' एकच असल्याने हे तत्त्वही सध्या वापरले जाते. पुणे जिल्ह्यातील नारायणगाव जवळच्या खोडद येथे या स्वरूपाचा एक मोठा जीएमआरटी प्रकल्प कार्यरत आहे.‘सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*" वयाने मान मिळतो पण आदर हा वर्तणुकीमुळे मिळतो. "**संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) भारतात सर्वप्रथम कोणत्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला ?२) अंतराळात सर्वाधिक दिवस राहण्याचा जागतिक विक्रम कोणी केला ?३) भारतीय नौदलाने कोणते वर्ष 'नौदल नागरिकांचे वर्ष' म्हणून घोषित केले आहे ?४) दरवर्षी भारतातील जागतिक पुस्तक मेळावा कोठे भरवला जातो ?५) राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह कोणाकडे देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला ? *उत्तरे :-* १) तमिळ ( २००४ ) २) ओलेग कोनोनेंको, रशियन अंतराळवीर ३) वर्ष २०२४ ४) नवी दिल्ली ५) अजित पवार गट *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 राजेश मनुरे, संपादक, धर्माबाद👤 राष्ट्रपाल सोनकांबळे, येवती👤 शेख राजू पटेल👤 व्यंकट केक👤 वैभव जाधव👤 मारुती फाळके👤 रमेश कदम👤 दिनेश रेडे👤 श्रीनिवास सैबी, पुणे👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मही निर्मिली देव तो ओळखावा। जया पाहतां मोक्ष तत्काळ जीवा॥ तया निर्गुणालागी गूणी पहावे। परी संग सोडुनि सुखे रहावे॥१८९॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••तोंडावर सर्वजण गोड बोलून आपली स्तुती करणारे असले तरी त्यातील सर्वजण पोटात गोड असतील असेही नाही. म्हणून अति गोड बोलणाऱ्याच्या नादी लागू नये. भलेही कटू सत्य बोलून मोकळे होणारे एकवेळचे दूर निघून जातात पण, केसाने गळा कापणारे आपल्या जवळ असून सुद्धा दृष्टीत पडत नाही म्हणून जरा सावध रहावे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*शेरास सव्वाशेर*एका शेतकर्‍याने पक्षी धरण्यासाठी एक जाळे मांडून ठेवले होते. त्यात एका पारव्यामागे लागलेली एक घार सापडली. जाळ्यातून सुटून जाण्यासाठी ती पंख फडफडावून धडपड करीत आहे, तोच शेतकरी त्या ठिकाणी आला व तिला धरून ठार मारू लागला. तेव्हा ती त्याची विनवणी करून म्हणाली, 'दादा, मला मारू नको, मी तुझा काही अपराध केलेला नाही. मी त्या पारव्याच्या मागे लागले होते. हे ऐकून शेतकरी तिला विचारू लागला, 'अग, मग त्या पारव्याने तरी तुझा कोणता अपराध केला होता?' असे म्हणून त्याने तिला ठार मारले.*तात्पर्य :-* जे लोक निरपराधी लोकांना विनाकारण त्रास देतात, त्यांना त्रास देणारा त्यांच्यापेक्षा बलिष्ठ असा भेटला म्हणजे ते अगदी दीन होऊन साधूत्वाचा आव आणतात, पण त्याचा काही उपयोग न होता, त्यांच्या वाईट कर्माची फळे त्यांना भोगावीच लागतात.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment