✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 20 फेब्रुवारी 2024💠 वार - मंगळवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://kathamaala.blogspot.com/2020/07/blog-post.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_जागतिक सामाजिक न्याय दिवस_*••••••••••••••••••••••••••••••••••••*_ या वर्षातील ५१ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२०१४:बर्‍याच गदारोळानंतर राज्यसभेतही आंध्र प्रदेशच्या विभाजनाचे विधेयक संमत झाल्याने ’तेलंगण’ हे भारताचे २९ वे राज्य बनले.**१९९९:भारत पाक दरम्यान दिल्ली ते लाहोर बस सेवेस प्रारंभ* *१९८८:महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून श्री कासू ब्रह्मानंद रेड्डी यांनी सूत्रे हाती घेतली* *१९८७:अरुणाचल प्रदेश स्थापना दिवस भारताच्या ईशान्य भागातील एक प्रमुख राज्य**१९८७:मिझोराम भारताचे २३ वे राज्य बनले**१९७८:शेवटचा ’ऑर्डर ऑफ व्हिक्टरी’ सन्मान लिओनिद ब्रेझनेव्ह यांना देण्यात आला.**१९७१:पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या अर्ध पुतळ्यांचे अनावरण उपराष्ट्रपती डॉ.गोपाळ स्वरूप पाठक यांच्या शुभहस्ते झाले.**१७९२:जॉर्ज वॉशिंग्टनने टपाल सेवा कायद्यावर सही केल्यामुळे अमेरिकेत टपाल खात्याची सुरूवात झाली.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८५:प्रणाली शैलेश चव्हाटे-- कवयित्री, लेखिका* *१९७८:रचना-- लेखिका,कवयित्री* *१९७६:रोहन सुनील गावस्कर-- भारतीय क्रिकेटपटू**१९६९:विजय अर्जुन सावंत-- कवी,लेखक**१९६३:नागेश सूर्यकांतराव शेवाळकर-- प्रसिद्ध मराठी साहित्यिक**१९६२:मीना शेट्टे-संभू-- संपादिका,लेखिका* *१९५७:प्रा.बसवराज कोरे-- जेष्ठ लेखक**१९५६:अन्नू कपूर-- भारतीय चित्रपट अभिनेता* *१९५५:लखनसिंह कटरे-- प्रसिद्ध कवी,कथाकार,झाडीबोली साहित्य संमेलनाचे पूर्व अध्यक्ष* *१९५२:डॉ.रा.गो.चवरे-- कादंबरीकार, कथाकार**१९५१:गॉर्डन ब्राऊन – इंग्लंडचे पंतप्रधान**१९४१:प्रा.माधव थोरात -- कवी* *१९३७:सुसंगति महादेव गोखले -- बालसाहितिक* *१९२८:आबाजी नारायण पेडणेकर-- मराठी साहित्यातील सुप्रसिद्ध कथाकार,कवी, समीक्षक आणि भाषांतरकार.(मृत्यू:११ ऑगस्ट २००४)**१९०४:अलेक्सी कोसिजीन – रशियाचे पंतप्रधान (मृत्यू:१८ डिसेंबर १९८०)**१८४४:लुडविग बोल्टझमन – ऑस्ट्रियन भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू:५ सप्टेंबर १९०६)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२३:बेला बोस- भारतीय नृत्यांगना आणि अभिनेत्री(जन्म:१८ एप्रिल १९४१)**२०१५:गोविंद पानसरे-- महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळीचे विचारवंत व कम्युनिस्ट कामगार नेते(जन्म:२४ नोव्हेंबर १९३३)**२०१२:डॉ.रत्‍नाकर मंचरकर – संत साहित्याचे गाढे अभ्यासक,साक्षेपी समीक्षक व संशोधक (जन्म:६ आक्टोबर १९४३)**२००७:डॉ.किशोर शांताबाई काळे--- डॉक्टर व प्रसिद्ध लेखक.काळे यांचा वयाच्या ३७ व्या वर्षी अपघाती मृत्यू झाला.(जन्म:१ जून १९६८)**२००१:इंद्रजित गुप्ता – माजी केन्द्रीय गृहमंत्री आणि कम्युनिस्ट पक्षाचे नेते (जन्म: १८ मार्च १९१९)**१९९७:श्री.ग.माजगावकर–पत्रकार,लेखक ’माणूस’ साप्ताहिकाचे संपादक(जन्म:०१ अगस्त १९२९)**१९९४:त्र्यं.कृ.टोपे – घटनातज्ञ व मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू* *१९७४:केशव नारायण काळे--- मराठीतील एक कवी,नाटककार,समीक्षक,चित्रपट निर्माते आणि नियतकालिकांचे संपादक(मृत्यू:२० फेब्रुवारी १९७४)* *१९५८:हरिश्चंद्र सखाराम भातावडेकर-- भारतात चित्रपट बनवणारे भारतीय(जन्म:१५ मार्च, १८६८)**१९५०:बॅ.शरदचंद्र बोस – स्वांत्र्यसेनानी, झुंजार पत्रकार,नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे वडील बंधू (जन्म:६ सप्टेंबर १८८९)**१९१०:ब्युट्रोस घाली– इजिप्तचे पंतप्रधान (जन्म:१८४६)**१९०५:विष्णुपंत छत्रे – भारतातील सर्कस उद्योगाचे जनक (जन्म: १८४६)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*कादंबरी - लक्ष्मी*मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व समाजाला कथेच्या माध्यमातून सांगावं तसेच लॉकडाऊन काळातील वेळेचा सदुपयोग व्हावा म्हणून दिनांक 01 जुलै 2020 रोजी लक्ष्मी या कादंबरी लेखनाला सुरुवात केली. आपल्या लेखन योग्य दिशेने जात आहे की नाही हे तपासून पाहण्यासाठी काही मित्रांना सोशल मिडियाद्वारे पाठवीत राहिलो. अनेक वाचकांना ही कथा पसंत येऊ लागली. काही वाचकांनी फोन करून लेखनास शुभेच्छा दिल्या. काही जणांनी ही कथा वास्तविक जीवनाशी निगडीत आहे, असे म्हटले. आमच्या जवळच्या एका शिक्षिकेने त्यांच्या जीवनात आलेल्या चढ-उताराची अनेक प्रसंग सांगून मन हलके केले. पुढचा भाग कधी येणार ? हा प्रश्न तर कित्येक वाचकांचा होता. आपल्या सर्वांच्या प्रेरणेने आणि मार्गदर्शनामुळे मी लक्ष्मी कादंबरी पूर्ण करू शकलो. आपले प्रेम असेच कायम लिहिणाऱ्याच्या पाठीवर असू द्यावे म्हणजे साहित्याची नवनिर्मिती होऊ शकेल. पुनश्च एकदा सर्वांचे मनःपूर्वक आभार मानतो.- नासा येवतीकर, धर्माबाद, 9423625769..... पूर्ण कादंबरी ( एकूण 10 भाग ) वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मराठा आरक्षणासंबंधी आज राज्य विधीमंडळाचं विशेष अधिवेशन, शिवजयंतीनिमित्त मुख्यमंत्र्यांचा पुनरुच्चार, मराठ्यांना किती टक्के आरक्षण मिळणार ? याकडे राज्याचं लक्ष*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *'छत्रपती शिवाजी महाराज की जय' या जयघोषात किल्ले शिवनेरी दुमदुमली ! गल्लीपासून दिल्लीपर्यंत शिवजयंतीचा उत्साह*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *शरद पवार गटाने चिन्हासाठी निवडणूक आयोगाकडे अर्ज करावा, आयोगाने नियमानुसार चिन्ह द्यावं, सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश, तर पुढील आदेशापर्यंत पवार गटाला मिळालेले नाव कायम राहणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *शिक्षकांनी निवडणुकीचं काम करु नये, कोण कारवाई करतं बघतोच, राज ठाकरेंचा निवडणूक आयोगाला इशारा*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *केंद्रीय बैठकीत सरकारने धान आणि गहू व्यतिरिक्त मसूर, उडीद, मका आणि कापूस पिकांवर एमएसपी म्हणजेच हमीभाव देण्याचे केले मान्य*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *एक लाख उद्योजक घडवण्याचे ध्येय ठेवून काम करणार:अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडचा 434 धावांनी पराभव केला अन् मालिकेत 2-1 ने मिळवली आघाडी*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *हवेचा दाब कसा मोजतात ?* 📙 ***************************आपल्याकडे सभोवती सगळीकडे हवा आहे. वारा वाहतो तेव्हा हवा असल्याचं आपल्याला जाणवतं. एरवी ती आपल्याला दिसत नाही. त्यामुळे तिला काही वजन असेल याची कल्पनाही आपल्याला येत नाही. पण जमिनीपासून थेट आकाशात कितीतरी उंचीपर्यंत हवा असते. त्यामुळे जमिनीवर तिचा सतत दाब पडत असतो. जमिनीच्या एक चौरस मीटरच्या तुकड्यावर हवेचा असा जो स्तंभ उभा असतो, त्याचा जो दाब पडतो त्याला हवेचा दाब म्हणतात. हवामानखातं जेव्हा उद्याच्या किंवा पुढील आठवड्याच्या हवामानाचा अंदाज देतं तेव्हा निरनिराळ्या ठिकाणी असलेल्या हवेच्या दाबाची माहितीही दिली जाते. जेव्हा अनपेक्षितरित्या पाऊस येतो तेव्हा कोणत्यातरी ठिकाणी कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे पाऊस पडत असल्याचं सांगण्यात येतं. त्यावेळीच आपल्याला हवेचाही दाब असतो हे आठवतं. हवेचा हा दाब पास्कल किंवा बार या एककांमध्ये मोजला जातो. पण ते झालं वैज्ञानिक परिमाण. एरवी आपल्याला ओळखीचं असणारं परिमाण म्हणजे पाऱ्याची उंची. जसा रक्तदाब नळीतल्या पाऱ्याच्या उंचीत मोजला जातो तसाच हवेचा दाबही मोजला जातो. यासाठी वापरण्यात येणाऱ्या यंत्राला बॅरोमीटर असं म्हणतात. त्यात एका भांड्यात पारा ठेवून त्यात एक उलटी नळी ठेवलेली असते. त्या नळीतील हवा काढून घेतलेली असल्याने तिच्यात निर्वात पोकळी निर्माण झालेली असते. भांड्यातल्या पाण्यावर पडणाऱ्या हवेच्या दाबामुळे पारा त्या नळीत चढतो. नळीतल्या पार्‍याचं वजन आणि त्या भांड्यातल्या नळीच्या तोंडाच्या क्षेत्रफळाएवढ्या जागेवरच्या हवेचं वजन समान असतं. त्यामुळे नळीतल्या पाऱ्याची उंची ही त्या हवेच्या दाबाचं माप असल्याचं धरलं जातं. सामान्यत: समुद्रसपाटीवर पाऱ्याची उंची ७६० मिलिमीटर असते. तोच हवेचा दाब मानला जातो. एका चौरस सेंटीमीटर क्षेत्रफळावरच्या हवेचा दाब एक किलोन्यूटन असतो.हे अर्थात अतिशय प्राथमिक स्वरूपाचं बॅरोमीटर झालं. हवेचा दाब मोजावयास सुरुवात झाली तेव्हा अशा यंत्राचा वापर होत असे. आजकाल याच तत्त्वावर आधारित पण अचूक मोजमाप करणारी इलेक्ट्रॉनिक बॅरोमीटर्स उपलब्ध आहेत. जसजसं उंचावर जावं तसतशी हवा विरळ होते. सहाजिकच तिथं हवेचा दाब घसरत जातो.*बाळ फोंडके यांच्या 'कसं ?' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••परीक्षा म्हणजे स्वत:च्या आत डोकावून पाहण्याची संधी.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) बुलढाणा जिल्ह्यातील खाऱ्या पाण्याचे लोणार सरोवराची निर्मिती कशामुळे झाली ?२) महिला कसोटी इतिहासात सर्वात वेगवान द्विशतकाचा विक्रम कोणी केला ?३) 'सणांचे शहर' असे कोणत्या शहराचे टोपणनाव आहे ?४) श्रीरामांनी बालीला कोणत्या वृक्षामागे लपून बाण मारला होता ?५) अतिथंड हवामानात पाण्याचे नळ ( पाईप ) का फुटतात ? *उत्तरे :-* १) उल्कापात २) अँनाबेल सदरलॅण्ड, ऑस्ट्रेलिया, २४८ चेंडूत ३) मदुराई ४) साल वृक्ष ५) पाण्याचे बर्फ होतांना ते प्रसरण पावते.*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*   👤 नागेश सु. शेवाळकर, जेष्ठ बालसाहित्यिक, पुणे👤 डुमलवाड शंकर राजेन्ना, स.शि.प्रा.शा.शिरूर ता. उमरी जि. नांदेड.👤 अनाम मैनुद्दीन शेख, नांदेड👤 शिरीष गिरी, सहशिक्षक, धारूर👤 दिलीप लिंगमपल्ले, धर्माबाद👤 विठ्ठल डोनगिरे👤 बालाजी विठ्ठल उगले👤 नागेश काळे, लातूर👤 साहेबराव पाटील कदम👤 उत्तम कानींदे, सहशिक्षक, किनवट👤 संतोष कामगोंडे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कळे आकळे रुप ते ज्ञान होता।तेथे आटली सर्वसाक्षी अवस्था॥मना उन्मनी शब्द कुंठीत राहे।तो रे तोचि तो राम सर्वत्र पाहे॥२००॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा.....🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कष्ट करून मिळालेले समाधान जगावेगळे असते . व इतरांनाच्या विषयी कपट, कारस्थान करून, धोका देऊन मिळविलेला आनंद स्वतःचा तसेच मानव जातीचा अपमान केल्यासारखे होते. दोन्ही मध्ये जमीन आसमानचा फरक आहे. म्हणून कष्ट करून जर आनंद मिळवता येत नसेल तर इतरांचे वाईट करून निसर्गाच्या नियमाचे उलंघन करू नये.कारण निसर्गाचे डोळे झाकले नसतात. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*🌅जीवनाचे सार* *एकदा एक शेतकरी देवावर खूप नाराज झाला. नाराजीचे कारणही तसेच होते कारण कधी पाऊस जास्त‍ पडत असे तर कधी पूर्ण दुष्काळ, कधी ऊन जास्त तर कधी ढगाळ वातावरण, कधी गारा पडून पीकाचे नुकसान होई तर कधी वा-याने उभे पीक आडवे होत असे. एक दिवस वैतागून त्याने देवाला साद घातली व देवास सांगितले,''तुम्ही सर्वव्यापी प्रभू परमेश्वर असाल इतर सर्व गोष्टीतले तुम्हा‍ला कळत असेल पण माझ्यामते तरी तुम्हाला शेतीतले काहीच कळत नाही. एक प्रार्थना तुम्हाला मी करतो की तुम्ही फक्त एक वर्षभर निसर्ग माझ्या ताब्या्त द्या मग बघा शेती कशी फुलते ते. घरोघरी मी धान्यांच्या राशी कशा घालतो ते पहाच तुम्ही..'' देव हसला आणि म्हणाला,''तथास्तू , तुझ्या म्हणण्या प्रमाणे आज, आतापासून मी निसर्गाचा लहरीपणा बंद करून तो तुझ्या ताब्यात मी देत आहे. तू तुला जसा पाहिजे तसा ऋतु बनवून घे व शेती कर'' इतके बोलून देव निघून गेला. शेतक-याने या वरदानाचा फायदा घेण्यासाठी गहू पेरले, जेव्हा त्याला जेवढे ऊन पाहिजे होते तेव्हा त्याने ऊन पाडले, जेव्हा त्याला पाणी द्यायचे होते तेव्हा त्याने पावसाचा वर्षाव केला. प्रचंड ऊन, गारा, पूर, सोसाट्याचा वारा याचा स्पर्शही कधी त्याने आपल्या् पीकांना होऊ दिला नाही. काळ निघून गेला आणि त्याची शेती बहरून आली. शेतक-याला मोठा आनंद झाला. कधी नव्हे् इतके पीक आले होते. शेतक-याने मनातल्या मनात विचार केला की आता देवाला कळेल की शेती कशी केली जाते, उगाचच तो शेतक-यांना कसा त्रास होईल ते वरून पाहत असतो. पीक कापणीस आले आणि शेतकरी मोठ्या आनंदाने, गर्वात पीक कापणीसाठी शेतात गेला. पीकाला हात लावून पाहिला आणि तो बेशुद्ध होऊनच खाली पडला. कारण गव्हाच्या ओंब्यांमध्ये एकही दाणा नव्हाताच मुळी. पीक नुसते आलेले दिसत होते पण एकही गव्हाचा दाणा भरला गेला नव्हता. थोड्यावेळाने तो शुद्धीवर आला आणि धाय ओकलून रडू लागला. त्याचे काळीज पिळवटणारे रूदन ऐकून परमात्मा परमेश्वर तेथे प्रकट झाला आणि म्हणाला,'' अरे वेड्या तुला काय वाटले, तू तुझ्या इच्छेेप्रमाणे जसा पाहिजे तसा वागला म्हणून पीक तसे येईल पण तसे होत नसते. त्या पिकाला तू कधीच संघर्ष करू दिला नाही. सोसाट्याच्या वा-यातच पिक उभे राहते तेव्हालाच त्याच्यात बळ येते. प्रचंड उन्हातही त्याच्यात जगण्याची इच्छा बळावते. संकटाशी जोपर्यंत सामना करत नाही तोपर्यंत त्याला त्याची कुवत कळत नाही. सगळे जर मनाप्रमाणे घडले तर कोणत्याच गोष्टीची किंमत राहत नाही. आव्हाने मिळाले नाही म्हणून तुझ्या पीकात दाणे भरलेच नाहीत. वारा सुटतो, गारा पडतात तेव्हाच त्या पिकात जगण्याची उमेद निर्माण होते आणि ते संघर्ष करून नवीन जीवन निर्माण करण्याचा प्रयत्न करते. तू हे कधीच होऊ दिले नाही म्ह्णून तुझे पीक हे पोकळ निघाले. सोन्याला सुद्धा चकाकी येण्या‍साठी आधी आगीतून जावे लागते तेव्हाच ते चकाकते. हातोडीचे मार सोसावे लागतात तेव्हाच सोन्याचा उत्कृष्ट दागिना बनतो.'' आता शेतक-याला जीवनाचे सार उमगले होते.* *🧠थोडक्यात- जीवनात जर संघर्षच नसेल तर, आव्हाने नसतील तर मनुष्य अगदी खिळखिळा बनून राहतो.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment