✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00          ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 29/02/2020 वार - शनिवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    💥 ठळक घडामोडी :-  ● १९९६: क्रिकेट जगतात नवखा आणि दुबळा संघ म्हणून ओळखल्या जाणार्‍या केनियाच्या संघाने विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत दोन वेळच्या जागतिक विजेत्या वेस्ट इंडीज संघाला ७३ धावांनी पराभूत करून ऐतिहासिक विजय नोंदविला. ● २०००: शशिकिरण भारताचा ५ वा ग्रँडमास्टर बनला. ● २०१२:- ६३४ मीटर उंचीच्या टोकियो स्काय ट्री या जगातील सर्वात उंच मनोऱ्याचे (इमारत नव्हे) बांधकाम पूर्ण झाले 💥 जन्म :- ● १९४०-गोपीचंद हिंदुजा ,उद्योगपती ● १८९६ - मोरारजी देसाई, भारताचे माजी पंतप्रधान. ● १९८४: भारतीय हॉकी खेळाडू अॅडम सिंक्लेअर यांचा जन्म. 💥 मृत्यू :- ● १५९२: इटालियन संगीतकार अलेस्सांद्रो स्ट्रिजियो यांचे निधन. ● १९४०: इंग्लिश लेखक एडवर्ड फ्रेडरिक बेन्सन यांचे निधन. (जन्म: २४ फेब्रुवारी १९४७) ● १९४४: फिनलंडचे राष्ट्राध्यक्ष पेह्र एविंड स्विन्हुफ्वुड यांचे निधन. (जन्म: १५ डिसेंबर १८६७) ● १९५६: फिलिपाईन्सचे राष्ट्राध्यक्ष एल्पिडियो क्विरिनो यांचे निधन. (जन्म: १६ नोव्हेंबर १८९०) *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *मुंबई : राज्यात येत्या १ मेपासून सिंगल युज डिस्पोजेबल अर्थात एकदाच वापरले जाणारे प्लास्टिक पूर्णपणे बंद करण्यात येईल, अशी घोषणा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी विधानपरिषदेत केली* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *ओबीसींची जातीनिहाय जनगणना करा, छगन भुजबळांची विधानसभेत मागणी, विरोधकांकडून मागणीला समर्थन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *जगाची अर्थव्यवस्था कोरोनाच्या कचाट्यात, शेअर बाजारात गुंतवणुकदारांचे 5 लाख कोटी बुडाले, कोरोनाचा विळखा कमी झाला नाही तर सोनं 46 हजारांवर जाण्याची शक्यता* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे यांची मुदत आज संपणार असून त्यांच्या जागी कोणाची नियुक्ती करण्यात येणार याकडे सर्वांचं लक्षं लागलं आहे, अॅन्टी करप्शन ब्युरोचे प्रुमख परमबीर सिंह मुंबईचे नवे पोलीस आयुक्त होऊ शकतात.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *मुंबई : सध्या महाराष्ट्रात हवामान बदलाचे स्थित्यंतर पाहायला मिळत आहे. दोन दिवसानंतर मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात पावसाच्या तुरळक सरी कोसळू शकतात किंवा गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात येते* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी संघ जाहीर करण्यात आला असून यावेळी भारताच्या संघात उमेश यादव आणि रवींद्र जडेजा दोन खेळाडूंना संधी देण्यात आली आहे* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *कसोटी मालिकेत ०-१ ने पिछाडीवर पडलेल्या भारतीय संघाने दुसऱ्या कसोटी सामन्यात आश्वासक सुरुवात केली आहे. मुंबईकर पृथ्वी शॉने झळकावेल्या अर्धशतकी खेळाच्या जोरावर भारताने पहिल्या दिवशी उपहाराच्या सत्रापर्यंत २ बाद ८५ पर्यंत मजल मारली.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         *वेळ नाही मला* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/11/blog-post_14.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *काव्यांगण - रोज एक बालकविता* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *नाजूक ते फुलपाखरू* सौ . वर्षा निलेश भोज, पुणे कुठून आणलेस सुंदर पंख पंखावरील छान छान रंग || फुलांवर बसशी जाऊन अलगद तुला पाहुन आवरेना हा मोद || वाटे मजला घेऊन कवेत तुला मीही तुझ्यासवे भेटेन प्रत्येक फुला || पाहशीस मज करून बारीक डोळे फुलांभोवती तु नेहमी आनंदाने खेळे|| नाजूक नि सुंदर त्या पंखांवरती वेगवेगळी नक्षी कोण रे काढती || तुला धरण्या काही छोटे उगाच भांडती काही तुझ्या इकडून तिकडे उडण्यास भाळती | स्वछंद जगण्याची देतोस तु शिकवण मस्त नि मजेत घालवतोस तुझे छोटेसे जीवन || वाटे सर्वांना फुलपाखरासम असावे जीवन स्वछंदी राहण्यासाठी मात्र स्वच्छ असावे मन || *सौजन्य :- जि. प. प्रा. कन्या शाळा धर्माबाद* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *" श्वास व विश्वास दोन्हीं अदृश्य आहेत, परंतु दोघांत इतकी ताकद आहे की अशक्य गोष्टीला शक्य बनवून देतात "*         *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *नाना पाटील यांना कोणत्या उपाधीने ओळखले जाते ?* क्रांतिसिंह 2) *झाडाची पाने कोणत्या घटकामुळे हिरवी दिसतात ?* क्लोरोफिल 3) *कोणत्या झाडापासून कात मिळते ?* खैर 4) *महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कोणते ?* खोपोली 5) *खालसा या पंथाची स्थापना कोणी केली ?* गुरू गोविंदसिंग *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 ओवी अभिजित लकडे 👤 योगेश व्हनमाने 👤 तेजस्विनी विजय शेटे 👤 अमितशेठ जावळेकर 👤 सुधाकर चव्हाण 👤 श्री व सौ पेटकुले ( लग्नाचा वाढदिवस ) 👤 अभिनव विजय घोलप 👤 श्रेया गजानन मोरे 👤 शिवाजी पंडीत *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *माणसाने त्याच्या स्वार्थासाठी भिंतीचा वापर करायला सुरुवात केली. भिंतीची मूळ वैशिष्ट्ये संपुष्टात येऊन फक्त भेदासाठी भिंतीचा वापर सुरू केला गेला. माणूस सतत भिंत सोबत घेऊन फिरू लागला. एवढेच कशाला दर दोघांच्या मध्ये भिंत असतेच, इतकच मात्र तिचं अस्तित्व ढळढळीत असतं. सगळ्यात टणक आणि अभेद्य भिंती असतात जाती-पातीच्या, धर्माधर्माच्या. ह्या भिंती नष्ट व्हाव्यात म्हणून संतापासून समाजसुधारकांपर्यंत सगळ्यांनी निकराचे प्रयत्न केले. पण भिंती काही नष्ट झाल्या नाहीत. ज्ञानेश्वरांनी भिंत चालविली; ती जगाला चमत्कार करून दाखविण्यासाठी तर नक्कीच नाही; तर चौदाशे वर्षाच्या चांगदेवाने आपल्या भोवती जी अहंकाराची भिंत उभी केली होती, तिचा भेद करण्यासाठी.* *मात्र, इथे आपण सोयीचे अर्थ लावून आपल्या अहंकाराला कुरवाळीत बसलो आठशे वर्षात तर आतोनात भिंती उभ्या राहिल्या. वर्तमान काळात तर त्या आणखीन घेर वाढवून भक्कम झाल्या आहेत. माणसाने उभ्या केलेल्या भिंतींखाली चिणून त्याचाच अंत होऊ शकतो. माणूस सतत एक दुस-यापासून परका होत जातोय. भिंत आभाळाला भिडून गेलीय. रक्ताची नातीगोतीही त्यातून सुटली नाही. तुम्ही जिथे काम करता, जिथे राहता, जिथे जिथे श्वास घेता. अशा सर्वच ठिकाणी भिंतीच भिंती. या भिंती भेदण्याचं एकमेव प्रभावी अस्त्र आहे, ते म्हणजे 'मानवता.' याचा वापर एका बाजूने नाही करता येणार; दोन्ही बाजूने केला तरच या भिंती भेदल्या जातील.* *॥ रामकृष्णहरी ॥* 🔷🔸🔹 🔶 🔷 🔸🔹🔶 *श्री संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• मित्रांनो, काल राष्ट्रीय विज्ञान दिवस आपण साजरा केला.डॉ.सी.व्ही.रामन यांच्या रामन इफेक्ट सादरीकरणानंतर तो दिवस आपण राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा करतो. खर तर विज्ञान आणि अध्यात्म हे जर हातात हात घालून चालले तर नक्कीच सर्व काही चमत्कार घडतील. विज्ञानाचा शोध लागला, अंधारवाटा उजळल्या. बंदुकीचा शोध लागला, संरक्षणाचे साधन उपलब्ध झाले. रेडिओच्या शोधाने दूरपर्यंत संपर्क होऊ लागला. टेलिफोनच्या शोधाने हजारो मैलांपर्यत संवाद सुरू झाले. 'ज्ञान' हा मनुष्याचा डोळा आहे. ती त्याची दृष्टी आहे. तिने त्याला वाटेतील खाचखळगे दिसतात, काटेकुटे दिसतात. ते टाळून पुढे कसे जायचे हे त्याला समजते. पुढे शोध लागले, विज्ञानाने विलक्षण प्रगती केली. मग माणूस पुढील वाटचाल विज्ञानाच्या वेगवान वारूवर स्वार होऊन करू लागला. हा विज्ञानाचा वारू चौखुर उधळतोय, हे खरे आहे. पण या वारूला आत्मज्ञानाचा लगाम नसेल तर तो तसा उधळणारच. म्हणून.... 'विज्ञानाच्या घोड्याला आत्मज्ञानाचा लगाम घातला पाहिजे, तरच मनुष्य जीवनाची वाटचाल सुखकर होईल. विज्ञानाची कास धरा, अज्ञानाला दूर करा. अशोक कुमावत (राष्ट्रपती पुरस्कार विजेते) 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• तुमची वाणी स्पष्ट, चारित्र्य पवित्र ,जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन आणि जीवन व्यवहार चोख असतील तर तुम्ही इतरांच्या हृदयावर साम्राज्य सहजपणे करु शकाल. अन्यथा ह्या गोष्टी तुमच्या जीवनात नसतील तर तुम्हाला मनुष्य म्हणून जगण्याचा अधिकारही राहणार नाही.आपण मनुष्य म्हणून जन्माला आलो आणि मनुष्य म्हणूनच जगणार आहोत हा विचार समोर ठेवून जगण्यासाठी वरील महत्वाच्या चार गोष्टींना जीवनात प्राधान्य द्यायलाच हवे आणि त्या गोष्टी सहज करता येऊ शकतात. सुरुवातीला कठीण जाईल एकदा का सराव झाला की,मग आपोआपच व्हायला लागतात. *व्यंकटेश काटकर,नांदेड.*   संवाद..९४२१८३९५९०/             ८०८७९१७०६३. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *योग्य निवड.* मंगलसेन नावाचा राजा होता. त्याच्या दरबारात जगतराम नावाचा एक मंत्री होता . तो खूप म्हातारा झाला होता. एक दिवशी तो राजाला म्हणाला , महाराज मला आता सेवामुक्त वायचा आहे. असे त्यांनी विनंती केली. राजा म्हणाले , सगळ्यात पहिले तुम्ही तुमच्यासारखे असणारे सेवाभावी, इमानदार आणि परोपकारी चे निवड करा, मंत्री जगतराम नी प्रत्येक गावा मध्ये दवंडी पिटवायला लावली. त्या दवंडी मध्ये ते म्हणाले," गुरुवारी राजमहल मध्ये मंत्री ची निवडणूक होणार आहे. सगळे तेथे उपस्थित राहिले पाहिजे. गुरुवार दिवस आला. निवडणुकीची वेळ अकरा वाजता होती. निवडणुकीच्या दिवशी अकरा वाजले. सगळेजण राजमहल मध्ये उपस्थित होते पण करमवीर आणि मंत्री जगतराम उपस्थित नव्हते. कारण जेव्हा मंत्री जगतराम चिखलाचा रस्त्यांनी येत होते तेव्हा त्यांच्या बैलगाडीचे एक चाक चिखलामध्ये फसला. ते खूप प्रयत्न करत होते पण त्यांच्याच बैलगाडीचे एक चाक निघतच नव्हता, तेव्हा करमवीर ला हे सगळे दृश्य दिसले. तेव्हा त्यांनी तो चाक आपल्या हाताने काढला. स्पेनचे पूर्ण वस्त्र खराब झाले होते. ते पळत पळतच राजमहल मध्ये गेले. सगळेजण त्यांच्याकडे पाहून हसत होते. कारण त्यांचे कपडे चिखलानी भरून गेले होते. पण राजा म्हणाले, मला माहित आहे की तुमचे कपडे का भरले. आणि म्हणून मी तुम्हाला माझ्या राज्याचा मंत्री बनवले. कारण तुम्ही एका म्हाताऱ्या व्यक्तीची मदत केली. आणि ते कोणी दुसरे नव्हते तर मंत्री जगत राज होते. आज पासून माझ्या राज्याचे मंत्री तुम्ही म्हणल्या जाईन. बोध: दुसऱ्याची मदत करणे आपले काम आहे त्यामुळे आपल्याला चांगले फळ मिळते .योग्य व्यक्तीची निवड केल्यास कार्य पारदर्शक आणि सुरळीत चालते.म्हणून चाचपणी करून योग्य निवड करावी. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00          ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 28/02/2020 वार - शुक्रवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    *राष्ट्रीय विज्ञान दिवस - भारत* 💥 ठळक घडामोडी :-  ● २००२ - गुजरातमध्ये जातीय दंगली. ५५ मृत्यू. 💥 जन्म :- ● १९४७ - दिग्विजय सिंघ, भारतातील मध्यप्रदेश राज्याचे पूर्व मुख्यमंत्री आणि भारतीय राष्ट्रीय कांग्रेस चे नेते. ● १९४७ - विजय बहुगुणा, भारतातील उत्तराखंड राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत. ● १९५१ - करसन घावरी, भारतीय क्रिकेट खेळाडू. ● १९६९ - यू. श्रीनिवास, मेंडोलिन वादक, सप्टेंबर १३ २००३ रोजी त्यांना राष्ट्रीय कुमार गंधर्व पुरस्कार जाहीर झाला. ● १९७१ - परमजीत सिंघ, भारतीय खेळाडू, यांनी ४०० मीटर शर्यतीचा ३८ वर्षांचा मिल्खा सिंघ चा राष्ट्रीय रेकॉर्ड मोडला. 💥 मृत्यू :- ● १९३६ - कमला नेहरू, जवाहरलाल नेहरू यांच्या पत्नी. ● १९६३: भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेन्द्र प्रसाद *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *कोल्हापूर : जुनी पेन्शन लागू करा, यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी गुरुवारी सरकारी कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *यवतमाळ : जिल्हा परिषदेचे दोन कर्मचारी सेवेतून बडतर्फ. हेमंत निवल (विस्तार अधिकारी पंचायत) व महेश मंचलवार (ग्रामसेवक) अशी बडतर्फ कर्मचाऱ्यांची नावं आहेत.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *सोलापूर जात पडताळणी समितीने भाजपचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्या जातीचा दाखला अवैध असल्याचा निर्णय दिल्यानंतर आता आणखी एक वेगळीच माहिती समोर आली आहे. खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी आपला जातीचा दाखला हरवल्याची तक्रार पोलिसात दाखल केली आहे* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *राज्यात सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद मुंबईत झाली आहे. चालू मौसमातील आतापर्यंतचे सर्वाधिक कमाल तापमान आहे ३८.४* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे नागपूर येथील यशवंत स्टेडियममध्ये नवोत्साह 2020 शारीरिक प्रात्यक्षिक प्रदर्शन.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *भीमा कोरेगावहिंसाचाराप्रकरणी  दाखल ६४९ गुन्ह्यांपैकी ३४८ गुन्हे तर मराठा आरक्षण आंदोलनावेळी नोंदवलेल्या ५४८ गुन्ह्यांपैकी ४६० गुन्हे राज्य सरकारने घेतले मागे घेतले * ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *भारतीय महिला क्रिकेट संघाने न्यूझीलंड वर विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित केला, या सामन्यात शेफालीला सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार देण्यात आला. शेफालीने सलग दुसऱ्यांदा हा पुरस्कार पटकावला आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त ^श्रद्धा आणि अंधश्रद्धा* http://nasayeotikar.blogspot.com/2019/10/blog-post_31.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃  *काव्यांगण - रोज एक बालकविता* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *।। माझा गणेश ।।* - सौ.आशा मदन तेलंगे ठाणे माझा गणेश येता घरी आनंद झाला मनी स्थानापन्न करण्यास त्यास सज्ज आम्ही मंडळी सारी दिव्यांची तोरणे बांधिली रांगोळ्या काढिल्या दारीं फुलांच्या सुंदर मखरात विराजमान तो पाटावरी पूजाअर्चा, अभिषेक, आरती सोपस्कार सारे नवस सायास करुनी देवास साकडे घालूया रे कुणी लहानथोर उचनीच भेदभाव नसे याच्या दारी विद्येचे दान हे मागा बाप्पासी मिळुनी सारे शाळकरी दीड,पाच, सात,दहा, दिवसांच्या मुक्कामानंतर निरोप देऊ बाप्पाला पुढच्या वर्षी लवकर ये असे वचन दे आम्हाला *सौजन्य :- जि. प. प्रा. कन्या शाळा धर्माबाद* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *" यशस्वी होण्यासाठी कार्यमग्नता ही मनुष्याच्या जीवनाची एक अटळ अशी अवस्था असते. "* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *आयोडीन या घटकाच्या अभावामुळे कोणता रोग होतो ?* गलगंड 2) *पक्ष्याचा राजा, विष्णूचे वाहन असे कोणत्या पक्ष्याला म्हटले जाते ?* गरुड 3) *आचार्य विनोबा भावे यांचे जन्मगाव कोणते ?* गागोदे , रायगड 4) *महाभारतातील अर्जुनाच्या धनुष्याचे नाव काय होते ?* गांडीव 5) *संत जनाबाईचे समाधीस्थळ कोणते ?* गंगाखेड, परभणी *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 साईनाथ सुरेश येवतीकर, नांदेड 👤 चिं उत्कर्ष सुनील पल्लेवाद, नांदेड 👤 राजेश्वर भंडारे, सहशिक्षक, धर्माबाद 👤 आनंद आनेमवाड, सहशिक्षक 👤 मारुती पाटील 👤 प्रशांत चिखलीकर, सहशिक्षक, लातूर 👤 शंकर गर्दसवार 👤 श्रीकांत आदमवाड, सहशिक्षक 👤 निर्मला सोनी, साहित्यिक, अमरावती 👤 मुरलीधर राजूरकर, सहशिक्षक *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *स्नेहाने वैर जात असेल तर उगीच युद्ध का करा आणि दूधसाखरेने रोग जात असेल, तर कडुनिंबाचा रस का घ्यावा असा संदेश देणारा एक श्र्लोक आहे. अनेकदा छोट्या छोट्या गोष्टीतून, गैरसमजातून झालेले भांडण विनाकारण लांबत जाते आणि मैत्रीचे रूपांतर वैरात होऊन जाते. गैरसमज किंवा मूळ कारण नाहीसे करण्याऐवजी उभय पक्षांकडून नवनवीन मुद्द्यांची भर पडत जाते आणि वैराचे झाड मोठे होते. इतके, की त्यात दोन्ही पक्ष नेस्तनाबूत होतात. संशयाला बळी पडणे ही सामान्य बाब असली, तरी संशय खरा मानून भांडण काढणे चांगले नाही.* *एक गोष्ट आहे. दोन सन्यासी मित्र असतात. मैत्री तब्बल तीस वर्षांची. एकमेकांच्या आनंदात न्हायले आणि दु:ख वाटून घेतले. दोघांत मिळून तीन मडकी होती. तेवढीच त्यांची संपत्ती. ती तिन्ही मडकी वाटून घ्यायचे ठरले. थोरल्या संन्याशाला मोठेपणा देण्यासाठी धाकटा म्हणाला,'तुम्ही दोन घ्या; मी एक घेतो.' मात्र त्यामुळे मोठा संतापला. म्हणाला,'मला काय भिकारी समजतोस ?' दोघांमध्ये यावरून कडाक्याचे भांडण झाले आणि त्याची परिणती तिन्ही मडके फुटण्यात झाली. म्हणून भांडण टाळायचा प्रयत्न व्हायला हवा.* *॥ रामकृष्णहरी ॥* 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• मित्रांनो, आपण सहज एखाद्याविषयी बोलून जातो त्याच शेपूट नेहमी कुत्र्यासारख वाकडच असत. खर आहे आपण असे माणसाला त्याच्या स्वभावावरून आभूषण,अलंकार परिधान करून वर्णन करत असतो. एक कवी आपल्या श्लोकात वर्णन करताना म्हणतो, यश्च निंम्ब परशुता यश्चैनं मधुसर्पिषा याश्चैन गन्धमाल्याघै:सर्वस्य कटुरेव स: ।। काही जणांचे स्वभाव बदलत नाहीत हे एका दृष्टान्ताच्या आधारे स्पष्ट करतांना कवी म्हणतो, कडुलिंबाच्या झाडावर जो कुऱ्हाड चालवतो ,जो त्याच्या मुळाशी मद्य आणि तूप ओततो आणि जो गंध फुलमाळा वगैरेंनी त्यांची पूजा करतो त्या सगळ्यांनाच त्याच्या पानाफळाफुलांची चव कडूच लागते. हा श्लोक वाचल्यावर तुपात तळून साखरेत घोळल्यावरही आपल्या कडूपणाशी एकनिष्ठ राहणाऱ्या कारल्याची आठवण येते. असे कडुलिंब आणि कारली बहुतेक सर्वांच्या संचिताचा भाग असतात शत्रू , मित्र , भक्त-सगळ्यांना एकाच तराजून तोलणारी ही मंडळी आपलं बाळकडू म्हातारपणापर्यंत जपतात. कडू रसाचा आविष्कार हाच त्यांच्या वांचिक आणि आंगिक अभिनयाचा ध्यास असतो. आयुष्य आनंदानं जगण्यासाठी आणि आनंद आजूबाजूला लुटण्यासाठी असतं, हे त्यांच्या गावीही नसत. कपाळावर आठयांचं जाळ आणि जिभेवर कडुलिंबाचा रस या थाटात त्यांचा सर्वत्र संचार असतो.कुणी साधं प्रामाणिकपणे जरी विचारले ,"काय म्हणता?" तरी काय म्हणू बोडकं? मेलो नाही अजून,जिवंत आहे. अस उत्तर देऊन बोलणाऱ्याचा हिरमुड करतात. जेवायला वाढू का? तरी त्यात काय विचारायचे?ही भाजी वाढू का? तरी मला शंभर प्रश्न विचारलेले आवडत नाही, काय वाढायचे ते मुकाट्याने वाढ.नाहीतर जेवण नको.इथपर्यंत बहाद्दरांची मजल जाते. म्हणतात ना जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही.बदल हा निसर्ग नियम आहे,तो जो स्वीकारेल तो हा भावसागर तरुन जाईल. अशोक कुमावत (राष्ट्रपती पुरस्कार विजेते) 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• शिक्षणामुळे केवळ माणूस शहाणा होत नाही तर त्याच्यामध्ये असणारा अज्ञानपणा,अयोग्य दिशेने जाणारे पाऊल,आपल्यात असलेला कमीपणा दूर करण्याचा मार्ग आणि जीवनात कसे जगायचे याचे शास्त्रशुध्द ज्ञान शिक्षणामुळे मिळते.तसेच सुखी व समृद्ध जीवन म्हणजे काय याबद्दलचीही जाणीव शिक्षणामुळे मिळते.म्हणून शिक्षणाचा खरा मार्ग आपल्या जीवनासाठी आपल्या प्रगतीचे केंद्र मानून स्वीकारणे काळाची गरज आहे. *व्यंकटेश काटकर,नांदेड.*   संवाद..९४२१८३९५९०/             ८०८७९१७०६३. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *स्वार्थ साधून वागणे* एका मांजराने आपल्या मालकाचा आवडता पोपट मारून खाल्ला. तेव्हा मालकाने, ‘ते मांजर दिसले तर मारून टाकीन’ असे रागाने म्हटले. ते ऐकताच मांजर इतके घाबरले की ह्या प्रसंगातून देवाने आपल्याला वाचविले तर पुढे आपण कोणताही पक्षी कधीही मारून खाणार नाही अशी प्रतिज्ञा केली. थोड्या वेळाने दिवाणखाण्याच्या खिडकीतून एक वटवाघूळ अचानक आत आले ते पाहून असल्या मोह उत्पन्न करणार्‍या प्रसंगी कोणत्या प्रकारचे वर्तन करावे हा प्रश्न मांजराला पडला. एकीकडे भूक व दुसरीकडे प्रतिज्ञाभंग होण्याची भिती अशा पेचात ते सापडले असता काही वेळाने आपली भूक भागविण्याची एक युक्ती त्याला आढळून आली. वटवाघूळाकडे पाहून ते आपल्याशीच म्हणाले, ‘हा पक्षी आहे असं जर मानलं तर केलेल्या प्रतिज्ञेप्रमाणे याला हात लावण्याचा अधिकार मला नाही, पण याच्या तोंडाचं उंदराच्या तोंडाशी इतकं साम्य आहे की, याला मारून खाण्याचा अधिकार मला आहे.’ इतके बोलून तिने त्या वटवाघूळाला खाऊन टाकले. तात्पर्यः स्वार्थ साधण्याची वेळ आली असता लबाड लोक आपल्या युक्तीने स्वतःचा फायदा करून घेतात.मग ते स्वतःच्या हितासाठी सर्व नियम गुंडाळून ठेवतात. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

*गौरव मराठीचा* माय माझी मराठी मी तीच लेकरू किती करावी कौतुके माझ्या प्रेमळ मायेचे तिच्याच अंगा खांद्यावर मी वाढलो असे मराठी मायेच्या पदराखाली वाघिणीचे दूध असे तिच्या शब्दांचा रुबाब काय वाखानावा अक्षरा अक्षरात असे साखरेचा गोडवा दुसरी कुठलीच भाषा नाही इतुकी समृद्ध समास व्याकरण अलंकार यांनी नेहमी सज्ज कवी कुसुमाग्रज यांनी खूप नटविले या मायेला म्हणून मायेचा गौरव दिन त्यांच्या जन्म दिनाला । ~~~~~~~~~~~~~ ✍श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोजेगाव ता.हदगाव जिल्हा नांदेड.

*माय मराठीचा गोडवा* माऊलीची अवीट ज्ञानेश्वरी महाराष्ट्राच्या कणाकणात मराठमोळ्या मना मनात अन इथल्या साऱ्या साहित्यात तुकोबांच्या अभंगाची गोडी नामदेवांचे दोहे, नरहरी सोनार चोखोबा जनाईच्या ओव्या एकनाथी भारुड अन गौळणी आणिक कितीतरी हे संत महाराष्ट्र माझा संतांची भूमी माती इथली केली असे पावन ह्याच लहान थोर संतानी मनामनात पेरा गोड मराठी मनामनात रूजवा माझी महाराष्ट्राची भाषा मराठी आपुल्या तन मन अंतरंगात मराठी मराठी भाषेच्या उद्धारासाठी कित्येकांनी रचिल्या कथा ओवी अभंगातुनी गाऊनी गाथा अमृताहूंनही गोड जिंकून पैज मराठी भाषेचा हाअमुल्य साज ह्दयी दिप उजळूया श्वासाश्वासात जागूया माय मराठीची थोरवी सातासमुद्रापल्याड नेऊया जाऊनी मायबोलीला शरण गाऊनी मराठीची थोरवी शमवून तृष्णा विद्यार्जनाची जपती संस्कृती साहित्याची, काव्यवैभवाची अन् माधुर्याची मातीमातीतुनी उगवावी फुलाफुलातुनी फुलवावी मेघामेघातुनी बरसवावी ज्ञानकण वेचूनी माझी माय मराठी माय मराठी रूजवूया अभिमान मातृभूमिचा व्यथा,कथा,काव्य साहित्याचा उजळूया दाहीदिशा तुझ्या किर्तीचा शौर्याचा गाथांचा ध्येयपूर्ती अन् प्रगतीचा. 〰〰〰〰〰〰〰 ✍श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे. (ता.हदगाव जिल्हा नांदेड).

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00          ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 27/02/2020 वार - गुरूवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *जागतिक मराठी भाषा गौरव दिवस* 💥 ठळक घडामोडी :-  ● २००२ - गुजरातच्या गोधरा रेल्वे स्थानकात साबरमती एक्सप्रेसला आग लावण्यात आली. ५८ हिंदू यात्रेकरू ठार. या घटनेचा सूड म्हणून उसळलेल्या जातीय दंग्यांमध्ये १,००० हून अधिक व्यक्तींचे प्राण गेले. 💥 जन्म :- ● १९१२ - ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक, कवी व नाटककार विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांचा जन्म, म्हणून आज मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. 💥 मृत्यू :- ● १८८७ - आनंदीबाई गोपाळराव जोशी, भारतातील पहिल्या महिला डॉक्टर. ● १९५६: भारतीय वकील आणि राजकारणी गणेश वासुदेव मावळणकर *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *राज्यातील पहिली ते दहावी पर्यंतच्या सर्व शाळांमध्ये मराठी भाषा अनिवार्य करण्याचे विधेयक विधानपरिषदमध्ये मंजूर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *अनियमितता आणि तक्रारीमुळे महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ बरखास्त करण्याचे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले निर्देश* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *नवी दिल्ली : हजारो कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय केंद्रातल्या मोदी सरकारने घेतला आहे. अखेर कांद्यावरची निर्यातबंदी उठवण्यात आली आहे. अमित शहांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्र्यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली त्यानंतर रामविलास पासवान यांनी कांद्यावरील निर्यातबंदी उठवल्याचा निर्णय जाहीर केलं* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *कोरोना व्हायरसचा कापूस उत्पादकांना मोठा फटका, कवडीमोल भावात कापसाची विक्री* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *शहीद कॉन्स्टेबलच्या कुटुंबीयांना एक कोटीची मदत तर हिंसाचारातील मृतकांना दोन लाखांची मदत : अरविंद केजरीवाल* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *रशियाच्या मारिया शारापोव्हाने व्यावसायिक टेनिसमधून निवृत्तीची घोषणा केली आहे* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *मुंबई : मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून एसटी महामंडळातर्फे प्रत्येक बसस्थानकांवर आज विशेष उपक्रम राबवला जाणार, संपूर्ण बसस्थानक आणि त्याचा परिसर स्वच्छ, सुशोभित करून आकर्षकरित्या रांगोळी काढण्यात येणार अशी घोषणा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी केली आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मराठी भाषा गौरव दिन* https://nasayeotikar.blogspot.com/2016/02/blog-post_22.html?m=1 लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🍃  *काव्यांगण - रोज एक बालकविता* 🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• मराठी भाषा गौरव दिन *।। आम्ही मराठी ।।* - नासा येवतीकर, ९४२३६२५७६९   आम्ही ऐकतो मराठी आम्ही बोलतो मराठी आम्ही वाचतो मराठी आम्ही लिहितो मराठी मराठी आमची मातृभाषा मराठी आमची बोलीभाषा मराठी आमची ज्ञानभाषा मराठी आमची राजभाषा मराठी आहे आमची शान मराठीचा जगात मान मराठीचा आम्हां अभिमान मराठी हेच आमचे स्वाभिमान तुकारामांची गाथा मराठी एकनाथांची भारुडे मराठी बहिणाबाईची कवने मराठी शाहिरांचा पोवाडा मराठी मनामनात दिसे मराठी घराघरांत बोले मराठी क्षणाक्षणात भेटे मराठी प्रत्येकांच्या हृदयात मराठी आम्ही मराठी तुम्ही मराठी आपण सर्वचजण मराठी   *सौजन्य :- जि. प. प्रा. कन्या शाळा धर्माबाद* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *" कंजूष म्हणजे तो व्यक्ती, जो श्रीमंत म्हणून मरण्यासाठी आयुष्यभर गरिबीत जगतो. "* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *मुळ रेखावृत्त कोणत्या शहरातून जाते ?* ग्रीनिच 2) *पंचायतराज व्यवस्थेतील सर्वात खालचा स्तर कोणता ?* ग्रामपंचायत 3) *शिखांचा पवित्र आद्यग्रंथ कोणता ?* गुरुग्रंथ साहेब 4) *हवेला वजन असते हे कोणी सिद्ध केले ?* गॅलिलिओ 5) *भारताची राष्ट्रीय नदी कोणती ?* गंगा *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 गंगाधर मुटे, वर्धा 👤 श्यामल पाटील 👤 साई पांचाळ *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *माणूस शरीराने थकतो कारण शरीर काळाशी बांधलेले असते. मृत्यू अटळ असला, तरी मृत्यूच्या आधी असे काही कर्तृत्व दाखवायला हवे, की पुढील भविष्यातही आपले स्मरण केले जाईल. मानवी जीवन हे नवीन आव्हाने स्विकारण्यासाठी आणि नवे काहीतरी शोधण्यासाठी आहे. त्यामुळे बदलांचा हसतमुखाने स्विकार करा. स्वत:ला छंदांमध्ये, वाचनात, कौटुंबिक आणि समाजकार्यात गुंतवा. दृष्टी आनंदी असेल, तर सृष्टी मोहक वाटते आणि प्रसन्नतेची वृष्टी होते.* *विन्स्टन चर्चिल म्हणतात, आशावादी व्यक्ती प्रत्येक संकटात संधी शोधते, तर निराशावादी व्यक्तिला प्रत्येक संधीत संकट दिसत असते.. प्रत्येक क्षण आपल्यासाठी काही ना काही घेऊन येतो. काहीवेळा दृष्टीकोन ही किरकोळ बाब वाटते. 'सकारात्मक दृष्टीकोन' हे फक्त सांगण्यापुरते आहे, असेही वाटते; परंतु हे तसे नाही. या दृष्टीकोनात जीवन घडविण्याची किंवा बिघडविण्याची क्षमता आहे. स्वामी विवेकानंद म्हणतात,'जगात तुम्हाला तुमच्याशिवाय कोणीही दु:खी करू शकत नाही. तेव्हा आनंदी रहा... यशासाठी मधला मार्ग नाही.*                              ‼ *रामकृष्णहरी* ‼              🍂🍂🍂🍂🍂🍂      *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*          📱 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• मित्रांनो, पाण्याची सतत धार एखाद्या कठीणातल्या कठीण खडकावर पडत राहिली तर त्यालाही नक्की फोडून काढते हा निसर्ग नियम आहे.ज्याच्या आयुष्यात या नियमाने शिरकाव केला तो जगप्रसिद्ध झाल्याशिवाय राहणार नाही. काल एका महान कादंबरीकाराचा जन्म झाला त्या निमित्ताने सामान्य माणसाची लेखणी योग्य वयात आणि योग्य दिशेने वाटचाल करीत राहिली तर चमत्कार घडतो यासाठी त्यांचा किंचितसा मागोवा. २६ फेब्रुवारी १८०२ रोजी बेझान्सोनमध्ये जन्मलेला व्हिक्टर ह्युगो हा फ्रान्सचा श्रेष्ठ कवी, कादंबरीकार आणि नाटककार म्हणून प्रसिद्ध आहे. वयाच्या विसाव्या वर्षी त्याचा पहिला काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला. तसेच, वयाच्या तेविसाव्या वर्षी ‘हान्स ऑफ आईसलँड’ ही त्याची पहिली कादंबरी प्रसिद्ध झाली. त्या काळातल्या त्याच्या कवितांवर रोमँटिसिझमचा प्रभाव होता. त्याच्या ‘क्रॉमवेल’ या संगीतिकेतूनही त्याचा प्रत्यय येतो.नोत्र-दाम-द-पारी (इंग्लिश ‘हंचबॅक ऑफ नोत्र-दाम’) या कादंबरीने तो प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचला. ११व्या लुईच्या राजवटीतल्या पॅरिसमध्ये घडणारं हे कथानक. क्वाझीमोदो या कुबड्याची आणि ईझ्मेराल्दा या जिप्सी सुंदरीची ही कहाणी चांगलीच लोकप्रिय ठरली आणि त्याची अनेक भाषांत भाषांतरं झाली. पुढे त्यावर अनेकांनी सिनेमे काढले. चार्ल्स लॉटन आणि मॉरीन ओ-हाराचा १९३९ साली आलेला सिनेमा लक्षणीय होता. ह्युगोने दरम्यान अनेक नाटकं लिहिली. दी किंग्स’ फूल हे त्या वेळचं त्याचं एक गाजलेलं नाटक!  १८६२ साली प्रसिद्ध झालेली ‘लेस मिझराब्ल’ ही त्याची पुढची कादंबरी पुन्हा एकदा त्याचं श्रेष्ठत्व सिद्ध करून गेली.१९व्या शतकातल्या फ्रान्समधल्या गुन्हेगारी विश्वाच्या पार्श्वभूमीवर घडणारं हे कथानक. १९ वर्षं तुरुंगात काढून सुटून बाहेर आलेला जिआन वेल्जो पुढे एक मोठा उद्योगपती बनतो; पण त्याला जुन्या गुन्ह्याचं भूत सतावत असतं. तशात जावर्ट हा पोलीस इन्स्पेक्टर त्याच्या मागावर असतो. अखेर आपल्या मानलेल्या मुलीच्या म्हणजेच कोसेटच्या भल्यासाठी तो पोलिसांना शरण जातो, असं थोडक्यात कथासूत्र. यातली त्या काळाची वर्णनं भन्नाट होती. याही कादंबरीवर जगभर नाटकं आणि सिनेमे बनले.  २२ मे १८८५ रोजी त्याचा पॅरिसमध्ये मृत्यू झाला. सलाम व्हिक्टर ह्युगो अशोक कुमावत (राष्ट्रपती पुरस्कार विजेते) 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ईश्वराच्या नामस्मरणाने आपल्या चलबिचल झालेल्या मनाला स्थैर्य लाभते आणि नित्य चांगल्या कामामध्ये हात गुंतून राहिले तर तन आणि मन समाधानी होते.या दोन्ही मधून माणसाला सुखाने जीवन जगण्याचा खरा मार्ग सापडतो. *व्यंकटेश काटकर,नांदेड.*   संवाद..९४२१८३९५९०/             ८०८७९१७०६३. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मनाची एकाग्रता* मदन आणि संजय यांची खूप चांगली मैत्री होती. ते एकाच वर्गात शिकत होते. मदन मन लावून शिकायचा पण संजयचे मन मात्र सदैव इकडे तिकडे नेहमीच भरकटलेले असायचे. वर्गात शिक्षक शिकवत असताना संजयला नेहमी बोलणी खावी लागायची ती ह्याच लक्ष न देण्याच्या कारणावरून पण मदन मात्र नेहमीच अभ्यासात पुढे राहायचा व शाबासकी मिळवायचा.एके दिवशी विज्ञानाचे शिक्षक वर्गात शिकवीत होते. त्यांनी विद्यार्थ्यांना वहीमध्ये गृहपाठ करण्याची एक पद्धत सांगितली होती. त्यानुसार सर्व विद्यार्थ्यांनी गृहपाठ पूर्ण केला होता.पण संजयने मात्र आपल्या सवयीनुसार गृहपाठ व्यवस्थित पूर्ण केला नव्हता. त्याची वही पाहून शिक्षक रागाने त्याला म्हणाले,”हे तू काय केले आहेस? मी तर पानाच्या एका बाजूनेच लिहायला सांगितले होते पण तू दोन्ही बाजूने लिहीले आहेस.” आता संजय घाबरला. कारण शिक्षकांनी त्या दिवशी सुट्टी होण्याच्या आत वही पूर्ण करायला सांगितले होते आणि सुट्टी होण्यास फक्त दोनच तास राहिले होते. संजयला घाबरलेल्या अवस्थेत पाहून मदनने त्याला त्याच्या लक्ष न देण्याच्या सवयीबद्दल उपदेश केला व शिक्षकांकडून परवानगी घेवून बाजारात जावून नवीन वही आणली. इतकेच नाही तर संजयसोबत बसून त्याचा गृहपाठ पूर्ण केला आणि त्याची वही शिक्षकांकडे जमा केली. त्या दिवसापासून संजयने आपल्या स्वभावात बदल केला आणि तो कोणतेही ठिकाणी लक्षपूर्वक काम करू लागला. तात्पर्य- लक्षपूर्वक काम करणे आणि विवेकबुद्धी जागृत ठेवून काम करणे या दोन गोष्टी पाळल्यास अनेक संकटावर मात करता येते. तसेच होणारे नुकसान टाळता येते.कामात एकाग्रता असेल तर सर्व व्यवस्थित होते. वर्तमानपत्रातून संग्रहित. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00          ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 25/02/2020 वार - बुधवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    *मुक्ती दिन - कुवैत* 💥 ठळक घडामोडी :-  ● १९२७- ख्रिस्ती धर्मातील गोवेकरांनी हिंदूधर्मात प्रवेश करणाच्या मोहिमेचा प्रारंभ केला ● १९७६- मराठीतील पहिला ज्ञानपीठ पुरस्कार वि. स. खांडेकर यांनी मिळाला ● १९९५ - युनायटेड किंग्डमची सगळ्या जुनी गुंतवणुक बँक बेरिंग्स बँक कोसळली. काही दिवसांपूर्वी बँकेच्या एक अधिकारी निक लीसनने १.४ अब्ज डॉलरच्या पैजा हरल्यामुळे बँकेवर ही पाळी आली. 💥 जन्म :- ● १८६१ - फर्डिनांड, बल्गेरियाचा राजा. ● १८६१ - नादेझ्दा कॉन्स्तान्तिनोव्ह्ना कृप्स्काया, रशियन क्रांतीकारी, व्लादिमिर लेनिनची पत्नी. 💥 मृत्यू:- ● १९६६ - विनायक दामोदर सावरकर, भारतीय क्रांतिकारी, मराठी लेखक, कवि. ● २००४ - शंकरराव चव्हाण, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *खासदार अरविंद सावंत यांची महाराष्ट्र राज्य संसदीय समन्वय समितीच्या अध्यक्षपदी तर रवींद्र वायकर यांची मुख्यमंत्री कार्यालयातील प्रमुख समन्वयक पदावर नियुक्ती करण्यात आली होती. य़ा नियुक्त्या ठाकरे सरकारने केल्या रद्द* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी भूषण धर्माधिकारी यांची नियुक्ती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *'दिशा' कायद्यासाठी त्रिसदस्यीय समिती गठीत ; 10 दिवसात कायद्याचा मसुदा सादर करणार ; सूचना पाठवण्याचे गृहमंत्री सतेज पाटील यांचे लोकांना आवाहन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *सरपंचाची निवड ग्रामपंचायतीतूनच होणार, विधानसभेत विधेयक मंजूर, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांची निर्णयावर टीका* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *दिल्लीतल्या हिंसाचाराची केंद्राकडून गंभीर दखल, गृहमंत्री अमित शाह आणि अरविंद केजरीवाल यांच्यात बैठक, तर मौजपूरमध्ये दगडफेक आणि जाळपोळीत आत्तापर्यंत 9 जणांचा मृत्यू* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *दहशतवादाला खतपाणी घालणं थांबवा, डोनाल्ड ट्रम्प यांचा पाकिस्तानला सज्जड दम, तर तीन अब्ज डॉलर संरक्षण करारासह भारत-अमेरिकेत विविध करारांवर स्वाक्षऱ्या* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *कल्याण क्रीडा महोत्सवातील स्केटिंग स्पर्धेत संतोष अॅकॅडमीचा डंका; 18 सुवर्णपदकांसह विजेतेपदाचा मान* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••      *एक पाऊल स्वच्छतेसाठी* http://nasayeotikar.blogspot.com/2018/03/blog-post_25.html        लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃  *काव्यांगण - रोज एक बालकविता* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *सुंदर माझे गाव* - श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे, हदगाव ( काव्यप्रेमी शिक्षकमंच जिल्हाअध्यक्षा नांदेड ) नयनरम्य गर्द हिरवी कोवळी फुटली पालवी पर्वतावर घनदाट झाडी वळणावरून जाते गाडी रस्ते आहेत झाडातले हिरव्यागच्च पहाडातले झरे पाण्याचे दिसती चोहीकडे वाहत जाती पसरे हिरवळ मखमली धरणी जणू शाल पांघरली तेथे सुंदर माझे गाव पंचक्रोशीत त्याचे नाव तेथून प्रवास करती प्रवाशी लाल एसटी हवीहवीशी दाट झाडातून गाडी पळती सारेच कसे सुंदर दिसती 〰〰〰〰〰〰〰 *सौजन्य :- जि. प. प्रा. कन्या शाळा धर्माबाद* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *न रुचणाऱ्या गोष्टी सोडून द्यायला शिका, कारण घेतलेला श्वास सोडल्याशिवाय पुढला श्वास घेता येत नाही...!* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *पृथ्वीवरील सजीवांच्या उत्क्रांतीचा सिद्धांत कोणी मांडला ?* चार्ल्स डार्विन 2) *अहिल्याबाई होळकर यांचे जन्मस्थळ कोणते ?* चोंडी , अहमदनगर 3) *हवामहल कोणत्या शहरात आहे ?* जयपूर 4) *सक्तीची पहिली शिक्षणाची शाळा शाहू महाराजांनी कोठे काढली ?* चिपरीपेटा 5) *महात्मा गांधी यांचे राजकीय गुरू कोण ?* गोपालकृष्ण गोखले *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 सौ.विद्या पाटील, उपशिक्षिका, नांदगाव अध्यक्षा जायंट्स सहेली ग्रुप, नाशिक 👤 सौ.पारसेवार पी. एस. सहशिक्षिका जि.प.प्रा.शा. देवणेवाडी ता. लोहा 👤 शैलेश फडसे, मुख्याधिकारी 👤 घनश्याम बोरहाडे, साहित्यिक 👤 प्रदीप तळणीकर,पत्रकार, दै.सकाळ 👤 विलासराज भद्रे, साहित्यिक, नांदेड 👤 निलेश जोंधळे 👤 योगेश दरबस्तवार *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *विज्ञानाचा शोध लागला, अंधारवाटा उजळल्या. बंदुकीचा शोध लागला, संरक्षणाचे साधन उपलब्ध झाले. रेडिओच्या शोधाने दूरपर्यंत संपर्क होऊ लागला. टेलिफोनच्या शोधाने हजारो मैलांपर्यत संवाद सुरू झाले. 'ज्ञान' हा मनुष्याचा डोळा आहे. ती त्याची दृष्टी आहे. तिने त्याला वाटेतील खाचखळगे दिसतात, काटेकुटे दिसतात. ते टाळून पुढे कसे जायचे हे त्याला समजते.* *पुढे शोध लागले, विज्ञानाने विलक्षण प्रगती केली. मग माणूस पुढील वाटचाल विज्ञानाच्या वेगवान वारूवर स्वार होऊन करू लागला. हा विज्ञानाचा वारू चौखुर उधळतोय, हे खरे आहे. पण या वारूला आत्मज्ञानाचा लगाम नसेल तर तो तसा उधळणारच. म्हणून....*  *'विज्ञानाच्या घोड्याला आत्मज्ञानाचा लगाम घातला पाहिजे, तरच मनुष्य जीवनाची वाटचाल सुखकर होईल."*         ♻ *॥ रामकृष्णहरी ॥* ♻           🍁🍁🍁🍁🍁🍁     *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• मित्रांनो, संकटे रडणाऱ्याला भीक घालत नाहीत तर ती लढणाऱ्याला भिऊन पळून जातात अस म्हटल्या जात,ते अगदी खरे आहे.कधीच म्हणू नये दिवस आपले खराब आहेत, ठणकून सांगावे,काट्यांनी वेढलेला मी पण गुलाब आहे.आपण ईश्वरापाशी 'संकटे येऊ नयेत' अशी प्रार्थना करतो. संकटे माणसाला माणसासारखे वागायला लावतात. माणसे संकटातच परमेश्वराची आठवण काढतात. तेंव्हा अहंकार गळून पडतो. माणसे नम्रतेने, प्रामाणिकपणे वागू लागतात. आपल्या चूका शोधू लागतात. संकटेच सामर्थ्य वाढवीत असतात. प्रगती घडवीत असतात. आपण अडचणीत असताना सभोवतालच्या माणसाची खरी पारख होते. अडचणींमध्ये कुणी साथ दिली, साथ सोडून कोण गेले आणि अडचणीत कोणी आणले हेही कळते. त्यामुळे आपण हुशार बनतो, निर्भय बनतो, अनुभवी बनतो. जीवन यशस्वी करण्यास समर्थ होतो. संकटांमुळेच पाय जमिनीवर राहतात. *जगात जे नवीन शोध लागले त्यापैकी बहुतेक अडचणींमुळेच लागले. 'गरज ही शोधाची जननी आहे' असे आपण म्हणतो ते खरे आहे. कोणतीही परिस्थिती स्विकारण्याची मानसिक तयारी हवी. प्रतिकूलतेवर मात करून ते बदलण्याचे सामर्थ्य आपल्याकडे हवे. जगताना कोंडी, प्रश्न, अडचणी आणि संकटे आहेत म्हणूनच जीवन जगण्यात मजा आहे. पत्त्यांच्या खेळात हुकूमाची पाने हातात नसताना डाव जिंकणे आधिक आनंददायी असते. अंधारामुळे प्रकाशाचे खरे महत्व कळते. गरिबीमुळेच पैशाचे मूल्य समजते. दु:खामुळे सुखाची गोडी समजते. पराभवामुळे विजयाचा खरा आनंद समजतो. माणसाने पराभवही उत्सवासारखा साजरा करावा, कारण पराभवातून माणूस शिकतो. म्हणून पेला अर्धा भरला आहे असही म्हणता येत आणि पेला अर्धा सरला आहे असही म्हणता येत,काय म्हणायचे ते आपल्यावर असते. अशोक कुमावत (राष्ट्रपती पुरस्कार विजेते) 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• पक्षी जेव्हा आकाशाकडे झेप घेतात आणि आकाशात स्वच्छंदपणे विहार करतात तेव्हा त्यांची सारी दृष्टी खाली असलेल्या जमिनीकडेच असते. ते कधीच आकाशाकडे पाहत नाहीत. त्याचप्रमाणे कितीही आणि कोणतीही व्यक्ती आपल्या कर्तृत्वाने उच्च पदावर जाऊन पोहचली तरी त्यांची सारी दृष्टी सर्वसामान्यपणे जीवन जगणा-या माणसाकडेच असते. कारण त्यांच्या जीवनातला असलेला अंधःकार कशापध्दतीने दूर करता येईल याचा ती सतत विचार करत असते.अशीच व्यक्ती समाजाच्या दृष्टीकोनातून महान म्हणून ओळखली जाते.अशाच व्यक्ती उच्च पदावर जातात आणि नावलौकीकास पात्र ठरतात.त्यांना कधीच गर्वाने स्पर्श केलेला नसतो हे मात्र खरे आहे. - व्यंकटेश काटकर,नांदेड.   संवाद.9421839590/           8087917063. 🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *अहंकाराचे बीज* एक गाय गवत चरायला जंगलात जाते. संध्याकाळच्या वेळेस तिच्या लक्षात आले की, एक वाघ तिच्याकडे दबक्या पावलाने येत आहे. ती भीतीने इकडे तिकडे पळू लागली. वाघ सुद्धा तिच्या पाठीमागे धावू लागला. धावता धावता गाय एका तलावापाशी पोहचली आणि घाबरलेली गाय त्या तलावात शिरली.. वाघ देखील तिच्या पाठीमागे त्या तलावात शिरला. त्या दोघांनाही कळून चुकले की तलाव फारसा खोल नाही आणि त्यात पाणी सुद्धा कमी आहे ,मात्र चिखल जास्त आहे. त्या दोघांमधील अंतर तसे कमी होते परंतु ते दोघेही काही करू शकत नव्हते. गाय त्या चिखलात हळूहळू रुतायला लागली. वाघ तिच्या अगदी जवळ होता, परंतु तो सुद्धा त्यात रुतायला लागला होता. दोघेही अगदी गळ्यापर्यंत रुतलेली होती. दोघेही हलू शकत नव्हते. थोड्या वेळाने गाईने वाघाला विचारले, तुझा कोणी गुरू किंवा मालक आहे का ? वाघ घुश्यात म्हणाला , मी तर या जंगलाचा राजा आहे; माझा कोणी मालक नाही; मीच ह्या जंगलाचा मालक आहे. गाय त्याला म्हणाली ,परंतु तुझी शक्ती तुला याक्षणी काहीच उपयोगाची नाही. वाघ गायीला म्हणाला की, तुझे हाल देखील माझ्या सारखेच आहेत की . तेव्हा गाय त्याला हसून म्हणाली, बिलकुल नाही माझा मालक मला संध्याकाळ झाली अजून आली नाही म्हणून शोधत येईल आणि या चिखलातून मला काढून घेऊन जाईल. थोड्या वेळाने खरंच एक माणूस आला आणि गायीला चिखलातून बाहेर काढून घरी घेऊन गेला. जाताना गाय आणि मालक एकमेकांकडे कृतज्ञतेने पहात होते, त्यांच्या मनात असून सुद्धा ते वाघाला बाहेर काढू शकत नाही कारण त्यांच्या जीवाला धोका होता. आता या कथेतून बोध हा आहे की, गाय हे समर्पित हृदयाचे प्रतीक आहे. वाघ हे आपले अहंकारी मन आहे. मालक हे ईश्वराचे प्रतीक आहे ,तर चिखल हा संसार आहे आणि संघर्ष ही अस्तित्वाची लढाई आहे. कोणावर निर्भर असणे चांगली गोष्ट नाही ,परंतु मीच श्रेष्ठ आहे, मला कोणाची मदतीची गरज नाही, हाच अहंकार विनाशाचे बीज रोवते. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00          ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 25/02/2020 वार - मंगळवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    💥 ठळक घडामोडी :-  ● १५६८- सम्राट अकबर बादशहाने रजपुतांचा प्रचंड पराभव करुन चित्तोडगड आपल्या ताब्यात घेतला. ● १९८८- संपुर्ण भारतीय बनावटीच्या पृथ्वी या क्षेपणास्त्राची श्रीहरिकोट्टा या केंद्रावर यशस्वी चाचणी ● २००६ - या दिवशी जगाची लोकसंख्या अंदाजे ६.५ अब्ज झाली. 💥 जन्म :- ● १८९४ - मेहेर बाबा, भारतीय तत्त्वज्ञ. ● १९४८ - डॅनी डेंझोग्पा, हिंदी चित्रपटअभिनेता. ● १९८१ - शाहिद कपूर, हिंदी चित्रपटअभिनेता. 💥 मृत्यू :-  ● भगवंत भक्त संत एकनाथानी पैठण येथे आजच्या दिवशी समाधी ● १८८६- गुजराथी कवी नर्मदाशंकर दवे यांचे निधन ● हुतात्मा किसन आहिर व नानकसिंग पुण्यतिथी *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *महाविकास आघाडीकडून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची पहिली यादी जाहीर, यात 68 गावांतील 15 हजार 358 लाभार्थ्यांचा समावेश, महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी सन्मान योजनेची अंमलबजावणी येत्या एप्रिल अखेर होणार पूर्ण* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *मुंबई : राज्यातील खाजगी शिक्षण संस्थामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये व संबधित शिक्षण संस्थामध्ये शाळेच्या शुल्कावरून वारंवार वाद निर्माण होत असतात. त्यासाठी आता राज्यात 8 ठिकाणी शुल्क नियामक समित्या स्थापन करण्यास शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी तातडीने दिली मान्यता* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *दहशतवाद रोखण्यासाठी अमेरिका कटिबद्ध, डोनाल्ड ट्रम्प यांचं भारताला सहकार्य करण्याचं आश्वासन, तर आपल्या सीमा सुरक्षित ठेवण्याचा प्रत्येकाला अधिकार असल्याचं केलं वक्तव्य* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दाम्पत्याची ताजमहल व साबरमती आश्रमाला भेट, पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून चरखा चालवण्याचे धडे* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *ठाकरे सरकारच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला वादळी सुरुवात, शेतकरी, महिला सुरक्षेच्या मुद्द्यावरुन विरोधक आक्रमक, सरकारकडूनही विरोधकांवर टीकास्त्र* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *वेलिंग्टन कसोटीत यजमान न्यूझीलंडचा भारतावर दहा गडी राखून दणदणीत विजय, न्यूझीलंडचा कसोटी क्रिकेटमधील शंभरावा विजय * ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *भारतीय महिलांनी ऑस्ट्रेलियातल्या महिला टी ट्वेन्टी विश्वचषकात सलग दुसऱ्या विजयाची केली नोंद, या सामन्यात भारतानं बांगलादेशचा 18 धावांनी केला पराभव* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *बुडती हे जन देखवे न डोळा* http://nasayeotikar.blogspot.com/2018/05/35.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃  *काव्यांगण - रोज एक बालकविता* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *सफर जंगलाची.....* - स्नेहलता कुलथे बीड या झाडांच्या फांद्यावरूनी सैर करू या जंगलाची चला काऊनो आज घेऊ या भेट जंगलाच्या राजाची......1 वाघ राजा घेऊन बसले सभा सर्वच प्राण्यांची करतो कोल्हा कुई कुई अन् कोकिळा गोड स्वरांची.....2 पिसारा फुलवून मोर नाचे थुईथुई सोबत लांडोराची डौल हत्तीचा भारी बाबा पाठीवर स्वारी मनीमाऊची......3 उंचच उंच मान बघा ती पट्टेवाले भाऊ जिराफाची चपळ पहा तो किती राजस चाल शिवबाच्या घोड्याची.....4 गाऊ नाचु आनंदाने सफर झाली जंगलाची प्राणी पक्षी एक राहती शिकवण देती समतेची......5 ******************** *सौजन्य :- जि. प. प्रा. कन्या शाळा धर्माबाद* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *" नियमापेक्षा तत्त्वे ही अतिशय पवित्र असतात."* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *मानवी शरीरातील सगळ्यात मजबूत स्नायू कोणता ?* जीभ 2) *भारतीय नाणी शास्त्राचे जनक कोण ?* जेम्स प्रिन्सेप 3) *रेफ्रिजरेटरचा शोध कोणी लावला ?* जॉन गॅरी 4) *अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष कोण ?* जॉर्ज वॉशिंग्टन 5) *संत एकनाथाचे गुरू कोण होते ?* जनार्धनस्वामी *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 साई डिब्बेवाड, सहशिक्षक 👤 योगेश राजेश पापनवार 👤 बालाजी आगोड  👤 प्रदीप वल्लेमवाड 👤 नईम सय्यद 👤 अनुराग आठवले बारडकर 👤 दिलीप वाघमारे 👤 बालाजी चिंतावार 👤 प्रदीप पद्मावार *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आयुष्याला काही अर्थच उरला नाही. रोज उगवणा-या दिवसाच्या गर्भातून निराशाच निपजते का ? की आम्ही जगण्याच्या आकाक्षांना गोठवून टाकले आहे ? सगळं काही जवळ आहे, तरी ही निरर्थकता कोठून व का येते, याची उकलच होत नाही. खोल..आत..अगदी ह्रदयापाशी काहीतरी रूतुन बसतं आणि वाहात राहतं अश्वत्थाम्याच्या भाळी असणा-या जखमेसारखं. त्याला तर म्हणे शापच आहे अमरत्वाचा. ही भळभळणारी जखम घेऊन जगण्याचा... देहदंडापेक्षाही भयावह.* *पण, आम्ही का बरं निरंतर ठेवतो त्याला प्रवाहित? कदाचित, ही एक अवस्था असेल मानवी जगण्याची. का आहे प्रश्नांची न संपणारी मालिका अनुत्तरित. इथून सुरू होतो आत्मशोधाचा प्रवास. सत्य सापडत नाही...काय होत राहतं? कळत नाही. पण जगात असेही अनेक असतात की जे हा चक्रव्यूह भेदून उभे राहतात समरवीरासारखे....!!* *॥ रामकृष्णहरी ॥* 🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀 *संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• मित्रांनो, *अभ्यासात प्राप्यते दृष्टि:* *कर्मसिद्धि प्रकाशिनी।* *रत्नादि-सद्-असद्-ज्ञानाम्* *शास्राद एवं न जायते ।।* माहिती आणि ज्ञान या दोन गोष्टी अतिशय भिन्न आहेत. या दोन्हींमध्ये एक ठराविक अंतर आहे. द्राक्षे गोड असतात. हे विधान आपल्याला द्राक्षाच्या चवीबद्दल माहिती देते. पण ते चवीचे ज्ञान देऊ शकत नाही. त्यासाठी द्राक्ष प्रत्यक्ष चाखावी लागतील. त्यानंतर जी अनुभूती मिळते ती म्हणजेच ज्ञान होय. सरावाने हे ज्ञान पक्व होत असते. व्यवसायाचे पण असेच असते, ते अनुभवातूनच मिळत असते. बुद्धिवान व्यक्ती नवनव्या शोधातून त्याच्या कक्षा रुंदावत असतो. पाठांतर पंडितांना वाटते की ,आपण वाचलेली अथवा पाठ केलेली अक्षरें, म्हणजे ज्ञान होय. या लोकांच्या पोपटपंचीला ही भूललेले लोक त्यांना ग्रेट समजायला लागतात. स्वतःला मागे असल्याची भावना त्यांच्या मनात येते. कोणत्याही कर्मामध्ये सिद्धी प्राप्त करून देणारी दृष्टी ही अभ्यासातून म्हणजेच ते काम पुन्हा पुन्हा करण्यातून येते. रत्नाची पारख करायची असेल तर ती रत्ने अनेकदा हाताळावी लागतात. फक्त पुस्तके वाचून ती सांगता येणार नाही. म्हणूनच जुने लोक कधी कधी त्यागाने शब्द उच्चारतात, की उगीच उन्हाने पांढरे नाहीत झाले. अशोक कुमावत (राष्ट्रपती पुरस्कार विजेते) 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• या जगात घड्याळाकडे पाहून काम करणारे लोक पुष्कळ आहेत. फक्त त्यांना वेळ घालवायचा असतो. मग ते काम कसेही का होईना असा एवढाच विचार त्यांच्या डोळ्यासमोर असतो. असा विचार करणा-या माणसांच्या कामात चांगला दर्जा कसा येईल..? अशी माणसे वेळ कसा घालवावा आणि कसेतरी काम करुन मोकळे व्हावे हाच विचार करतात. अशा माणसाकडून चांगल्या  दर्जाची कामे होतील अशी अपेक्षाही करणे चूकीचे आहे. उलट जी माणसे हाती घेतलेल्या कामात पूर्ण लक्ष घालून काम चांगले आणि उत्कृष्टरित्या पार पाडतात. ते कधीच घड्याळाकडे लक्ष देत नाहीत. त्यांचे सारे लक्ष कामातच गुंतलेले असते. त्यांनी हाती घेतलेल्या कामातच त्यांची एकाग्रता असते. माणसाने कोणत्याही हाती घेतलेल्या कामात जीव ओतून काम केले तर त्यात त्यांना चांगल्याप्रकारे यश मिळते. ज्याने घड्याळाकडे पाहून काम करत राहिले तर ते काम निकृष्ट तर होईलच आणि त्या कामातला दर्जाही निकृष्टच राहणार यात शंकाच नाही. - व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद.9421839590. 🌹🌻🌹🌻🌹🌻🌹🌻🌹🌻 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *विचारपूर्वक कृती* एकदा एका माणसाला त्याच्या घोड्यासमवेत एक नदी पार करायची असते. परंतु त्याला नदीची खोली माहीत नसल्याने तो तिथेच काठावर विचार करत बसतो. मदतीसाठी आजुबाजुला पाहत असताना त्याला तेथे एक लहान मुलगा दिसतो. तेव्हा त्या माणसाने लहान मुलाला नदीच्या खोलीबद्दल विचारले. मुलाने घोड्याकडे एकदा पाहीले आणि क्षणभर थांबुन तो विश्वासाने म्हणाला, " निश्चींतपणे जा, तुमचा घोडा नदी सहज पार करु शकेल". मुलाचा सल्ला मानुन त्या माणसाने नदी पार करण्यास सुरुवात केली. परंतु नदीच्या मध्यावर पोहोचल्यावर त्याच्या लक्षात आले की नदी खुप खोल आहे. आणि तो जवळ जवळ बुडायलाच आला. कसाबसा तो त्यातून सावरला आणि बाहेर येउन त्या मुलावर जोरात खेकसला. मुलगा पुरता घाबरला होता आणि घाबरत घाबरतच बोलला, "पण माझी बदके तर खुप लहान आहेत आणि ते दररोज नदी पार करतात. त्यांचे पाय तर तुमच्या घोड्यापेक्षा खुप लहान आहेत." *उगाच कोणाचाही सल्ला ऐकण्याआधी त्यांना खरोखरच काही माहीती आहे का ते जाणुन घ्या....*         *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00          ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 24/02/2020 वार - सोमवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    *मध्यवर्ती उत्पादन शुल्क दिन* 💥 ठळक घडामोडी :-  ● १९३६- क्षयरोग निवारण दिन ● २००६ - फिलिपाईन्समध्ये लश्कर उठाव करणार असल्याची कुणकुण लागल्याने राष्ट्राध्यक्ष ग्लोरिया मॅकापगाल-अरोयोने देशात आणीबाणी लागू केली. 💥 जन्म :- ● १४८३- बाबर यांचा जन्म ● १९५५ - स्टीव जॉब्स, ॲपल कम्प्युटर्सचा संस्थापक. 💥 मृत्यू :- ● १९२५ - ह्यालमार ब्रँटिंग, स्वीडनचा पंतप्रधान. ● १९७५ - निकोलाइ बुल्गॅनिन, सोवियेत संघाचा राष्ट्राध्यक्ष. ● १९९८- मराठी चित्रपट अभिनेत्री ललिता पवार यांचे निधन *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी आज जाहीर होणार, येत्या तीन महिन्यात ही कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *लोअर परळमधील बीडीडी चाळीतील रहिवाशांना म्हाडाकडून घरे मिळणार, मुख्यमंत्र्यांच्या सूचना* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महाविकासआघाडीची बैठक, तिन्ही पक्षांमध्ये समन्वय साधण्याचा प्रयत्न* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *धोबी, परीट समाजाचा अनुसूचित जातींमध्ये सहभाग होऊ नये यासाठी मंत्रालयातील काही शासकीय अधिकारी अन् काही माजी मंत्र्यांनी प्रयत्न केला, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट * ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज आक्रमक, 26 फेब्रुवारीला मुंबईत सुंबराण आंदोलनाची हाक, मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांच्या घरात मेंढरं सोडण्याचा इशारा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारत दौऱ्यासाठी सहकुटुंब रवाना, डोनाल्ड ट्रम्प हे 36 तासांसाठी भारत दौऱ्यावर येत आहेत.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्या राज्यातील 63 क्रीडारत्नांचा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारानं गौरव, पुरस्कार सोहळ्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची उपस्थिती, पंढरीनाथ पठारे, रिशांक देवाडिगाला शिवछत्रपती पुरस्कार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••             *कागदाची बचत* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2018/02/03.html  लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃  *काव्यांगण - रोज एक बालकविता* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *चला जावूया शाळेत* अंकुश शिंगाडे नागपूर ९९२३७४७४९२ चला जावूया शाळेत मिळवूया ज्ञानज्योत शाळा आपुली चांगली ज्ञानछंद मला लावली शाळा चांगली दुपारची नसेल घाई उठण्याची चार भिंतीत मिळे ज्ञान तिथे कळतो सर्व विज्ञान लक्ष देवूनी ऐकण्याचा ठेवा आहे हा ज्ञानियेचा करु अभ्यासाचा चंग वाटेल प्रयागाचा संगम तेंव्हा नका राहू घरात चला जावूया शाळेत *सौजन्य :- जि. प. प्रा. कन्या शाळा धर्माबाद* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *" दोन अपूर्ण माणसांना एकमेकांना पुर्ण करण्याची जी विलक्षण तळमळ लागते तिचेच नाव प्रीती."* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *शरीराचे तापमान मोजण्याचे उपकरण कोणते ?* ज्वरमापी 2) *डेटा कमी जागेत बसविणारे संगणकीय सॉफ्टवेअर कोणते ?* झिप 3) *जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कोठे आहे ?* जिनिव्हा 4) *कोणत्या प्राण्यांच्या पिलांना जन्मतः च शिंग असतात ?* जिराफ 5) *पंचायतराज व्यवस्थेतील सर्वात वरचा स्तर कोणता ?* जिल्हा परिषद *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 नरेश जे. वाघ, सहशिक्षक, वर्धा *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *जिथे काही उगवत नाही, झाडा झुडुपांशिवाय काही असत नाही, तिथे एरंडाचे झाडच वृक्ष मानले जाते. वास्तविक एरंड कधी पिंपळ, वड, औदुंबर अशा वृक्षांची बरोबरी करेल का ? तुकोबांनी म्हटले आहे, 'उंच वाढला एरंड, तरी का होई इक्षुदंड.' कितीही उंच वाढला तरी एरंड कधी उसाची बरोबरी करू शकणार नाही. एरंड हे एक अतिसामान्य झाड, त्याची पाने गाढवही खात नाही म्हणे.* *परंतु अशा झाडालाही कधी कधी आपल्या एखाद दुस-या चकचकीत हिरव्या पानांचा गर्व होतो. क्षुद्र व्यक्तीलाही असा गर्व होतो, की आपण जणू महान आहोत.* *एरंडालाही आपण महावृक्ष असल्याचे वाटते. महावृक्ष केव्हाही थोरच. घनदाट शितल छाया, डेरेदार विस्तार, पशुपक्षी यांचे विसाव्याचे ठिकाण. ऋतुमानाप्रमाणे निरंतर येणारा बहर ही त्यांची श्रीमंती आणि वैभव. वृक्ष कुलातील हे ऋषीमुनी कुठे नि एरंड कुठे?*  *"जिथे काही उगवत नाही तिथे 'एरंड'लाच वृक्ष मानावे लागते हे दुर्दैव."*       🌴🌱 *॥ रामकृष्णहरी ॥*🌱🌴              🍂🍂🍂🍂🍂🍂     *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• मित्रांनो, मन पाखरू पाखरू त्याला किती मी आवरू, बहिणाबाई म्हणतात ,मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर, किती हाकला हाकला फिरी येत पिकावर. तहानलेल्या जन्मदात्यांना पाणी देण्यासाठी तळ्यावर आलेला श्रावण, दशरथाच्या बाणाला बळी पडला आणि पुत्रविरहाचा शाप मिळण्यास कारण ठरला. सिकंदर आणि नेपोलियन यांची जग जिंकण्याची 'तहान' अनेक युद्धांना सामोरी गेली आणि कित्येक राजे शरण जाऊन कफल्लक झाले. तहानलेले 'हरिण' वा 'पाडस' ही व्याघ्राची पोटापाण्याची सोय आहे. सत्तेची 'तहान'ही अशीच, त्यात महत्वकांक्षा मिसळली की व्याकूळ होते आणि सत्तापिपासू बनते. म्हणजे तहानेने विकृत रूप धारण केले की ती केवळ तहान न राहता 'जीवो जीवस्य जीवनम्' या तत्वाने तहानलेल्याला समोर दिसेल ते ग्रहण करण्याचे व्यसन लागते. अशावेळी चित्तवृत्ती बेभान होतात, ताळतंत्र सुटतो व विवेक संपून दुष्कृत्य घडते. तृष्णा' म्हणजे 'तहान'च आणि 'तहान' पाण्याशिवाय पूर्ण होत नाही. ही साधी तहान जेव्हा 'तृष्णा' होते तेव्हा तिच्यातले विविध पैलू दिसू लागतात. तहानेत असलेले आसुसलेपण मात्र स्वतंत्र असते, केव्हा एकदाचे 'पाणी' मिळते, अशी अवस्था होते. ही अवस्था 'तृष्णे'मधून येते. तेव्हाही आसुसलेपण येऊन इच्छापूर्ती न झाल्यास बुद्धी किंवा मनाचा आधार घेतला जातो. मनाच्या आहारी गेल्यास महत्वाकांक्षा भरकटते व तृष्णा भीषण रूप धारण करते .म्हणूनच मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक. अशोक कुमावत (राष्ट्रपती पुरस्कार विजेते) 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• मुळात निसर्गतः आपल्याला  शारीरिक सौंदर्य जे काही लाभलेले आहे त्यात आपल्याला काही बदल करता येत नाही.कुणाला कसे तर कुणाला कसे शारीरिक सौदर्य दिले आहे.पण ज्यांना काही अप्रतिम,लावण्यरुपी सौंदर्य लाभले आहे त्याने त्याचा गर्वही करु नये आणि इतरांना लाभलेल्या सौंदर्याशी तुलनाही करु नये.त्याने इतरांना लाभलेल्या सौंदर्याची अवहेलनाही करु नये.ज्यांना जे काही कमी जास्त प्रमाणात सौंदर्य मिळाले आहे त्याच्याबद्दलही आपण नाराज होऊ नये.जे आहे ते आपण आनंदाने स्वीकारुन आपल्या जीवनात सुखी आणि समाधानी राहावे.इतरांची आपल्यासोबत तुलना करुन स्वतः आपले आपण अपमानीत न होता आपल्या सौंदर्यांचा आदर करावा. आपल्याला जे काही दिले त्यात विधात्याचे आभारच मानायला हवे हे कधीही विसरु नये. - व्यंकटेश काटकर,नांदेड.   संवाद.9421839590. 🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *एकतेचे बळ* एकदा एक कबुतराचा मोठा थवा आकाशात अन्नाच्या शोधासाठी उडत होता. ते एका घनदाट जंगलात गेले. एक कबुतर आपल्या बाकीच्या सहकाऱ्यांना बोलले ‘मित्रांनो, आपण खूप लांबच्या अंतरावरून येत आहोत. आपल्यातील सर्वच खूप थकलेले आहेत. तर, आपण थोडा वेळ येथे आराम करू या.’  पण मध्यम वयीन कबुतर बोलला ‘तू जे बोलत आहेस ते खरे आहे, पण आपण सर्व भूकेलो आहोत.’ आणि जर आपण उशीर केला तर आपल्याला अन्न मिळणार नाही. बाकीच्या कबुतरांचे पण तेच म्हणणे होते. सर्व कबुतर बरोबर उडायला लागले. त्यांनी बघितले की जमिनीवर धान्य पसरलेले होते.  ज्या कबुतराला आराम हवा होता तो बोलला ‘बघा! आपले धान्य! चला आपण ते वेचूया.’ सर्व कबुतर धान्य वेचण्यासाठी खाली उतरले. तिथे भरपूर प्रमाणात धान्य होते. सर्वात जास्त वयस्कर कबुतर बोलतो की ‘या, या लवकरात लवकर धान्य उचला व खा.’  जेव्हा सर्व कबुतर धान्य खात होते तेव्हा अचानक एक जाळी त्यांच्या अंगावर येऊन पडली. सर्व त्यामध्ये अडकले.  ‘आता आपण काय करायचे?’ सर्व रडायला लागले. एक शिकारी झाडावर बसलेला होता त्याच्याकडे धनुष्य व बाण होते. त्यामुळे एक कबुतर बोलला ‘मित्रांनो, माझी एक युक्ती आहे आपण सर्व जण मिळून ताकद लावून एकाच वेळेस जाळीसह वरती उडू या व आपण सहजपणे यातून सुटू शकतो.’  सर्व कबुतरांनी त्यांची सर्व ताकद पणाला लावून जाळीसह वरती उडायला लागले व ते खूप उंचावर उडले आणि त्यांची अवघड परिस्थितीतून सुटका झाली.  हे बघून तो शिकारी आश्चर्य चकित होऊन व स्तब्ध झाला.  एक कबुतर बोलला ‘आपण शिकाऱ्यापासून सुटलो आहोत, आता आपण आपल्या उंदिर मित्राकडे जाऊ तो आपल्याला मदत करेल.’  ते कबुतर पुन्हा आपली शक्ती एकत्र करून उडायला लागतात व डोंगराच्या पायथ्याजवळ जातात. तेथील बिळात राहणाऱ्या उंदराला ते मदतीसाठी बाहेर बोलवतात. उंदिर त्यांना मदत करायला तयार होतो, व काही मिनिटांतच तो आपल्या तीक्ष्ण दातांनी ती जाळी कुरतडून टाकतो व कबुतरांची जाळीतून मुक्तता करतो.  शेवटी कबुतर उंदराचे आभार मानून आपल्या घरी जातात.  *तात्पर्य - एकतेतच बळ असते. एकतेमुळे अवघडातल्या अवघड परिस्थितीमधून आपली सुटका होऊ शकते. "* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00          ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 22/02/2020 वार - शनिवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    *स्वातंत्र्य दिन - सेंट लुशिया* 💥 ठळक घडामोडी :-  ● २००२ - एम.एच.४७-ई जातीचे हेलिकॉप्टर फिलिपाईन्सजवळ समुद्रात कोसळले. १० ठार. 💥 जन्म :- ● १९६३ - विजय सिंग, फिजीचा गोल्फ खेळाडू. 💥 मृत्यू :- ● १९२१ - सलीम अल-मुबारक अल-सबाह, कुवैतचा अमीर. ● १९४४ - महात्मा गांधी यांच्या पत्नी कस्तुरबा गांधी. ● २००९ - डॉ.लक्ष्मण देशपांडे, मराठी लेखक, दिग्दर्शक व कलाकार. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *सोलापूर-वैराग मार्गावरील राळेरास ते शेळगाव दरम्यान एसटी आणि क्रूजर गाडीचा भीषण अपघात; पाच जणांचा मृत्यू तर, सहा जण जखमी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणी आरोपी महिला डॉक्टरांना दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार, तर तिन्ही आरोपींना हॉस्पिटलच्या आवारात प्रवेश देण्यास नायर रूग्णालय प्रशासनाचा नकार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *आदिवासी विभागाच्या नावानं नोकरभरतीची खोटी जाहिरात व्हायरल, उमेदवारांची फसवणूक होण्याची शक्यता, आदिवासी विभाग प्रशासन तक्रार करणार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *डोनाल्ड ट्रम्प यांच्या पत्नीसोबत मुलगी इवांका ट्रम्पही पतीसह भारत दौऱ्यावर; इवांका ट्रम्पचा हा दुसरा भारत दौरा, 2017 मध्ये हैदराबादमधील ग्लोबल बिजनेस समिट सहभाग* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *काल महाशिवरात्रीनिमित्त देशभरात उत्साह, राज्यातील ज्योतिर्लिंगांसह शिवमंदिरात भाविकांची गर्दी, हर हर महादेवचा गजर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *भोपाळः मध्य प्रदेशातील मुख्यमंत्री कमलनाथ सरकारने वादग्रस्त नसबंदीचे सर्क्युलर मागे घेतले आहे. आरोग्यमंत्री तुलसी सहलावत आणि मंत्री पी. सी. शर्मा यांनी नसबंदीचा आदेश मागे घेतल्याचं सांगितलं. आदेशाचा अभ्यास केला जाईल, असं आरोग्य मंत्र्यांनी स्पष्ट केलं.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकात भारतीय महिलांची विजयी सलामी, गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचा 17 धावांनी उडवला धुव्वा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••            *दृष्टी तशी सृष्टी* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2018/05/30.html    लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃  *काव्यांगण - रोज एक बालकविता* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *माझी शाळा* - शुभांगी विलास पवार, (कंदी पेढा), नागठाणे-ता.जि.सातारा माझी शाळा, खूप भारी, गंमत गाणी, गाती सारी....!! शाळेत माझ्या, सवंगडी खूप, मिळून खातो, साखर-तूप .....!! गुरुजी शिकवती, गिरवायला अक्षरे, मध्येच विचारती, आहे का लक्ष रे.....!! घंटेचा टोला, टणटण करतो, चला लवकर, असे सांगतो.....!! गंमत गोष्टी, अंकांचे पाढे, एका सुरात, आवाज वाढे......!! मधली सुट्टी, मित्राशी गट्टी, चिंचगोळी देऊन, करायची बट्टी.......!! शाळा माझी, अशी मस्त, दिवस पटकन, होतो फस्त.......!! किती किती सांगू, शाळेची गंमत, मित्रांची जोडी, आणते खूप रंगत....!! *सौजन्य :- जि. प. प्रा. कन्या शाळा धर्माबाद* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *चूक त्यांच्या हातूनच होते जे जबाबदारी घेऊन काम करतात..बिनाकामाच्या लोकांचे जीवन तर दुसऱ्यांच्या चूका काढण्यातच संपून जाते....!* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *जगातील सर्वात लहान नाव असलेली नदी कोणती ?* डी 2) *ध्वनी मोजण्याचे एकक कोणते ?* डेसीबल 3) *जगातील पहिली तेलविहीर कोणी शोधून काढली ?* ड्रेक,1857 4) *मीनाक्षी मंदिर कोणत्या राज्यात आहे ?* तामिळनाडू 5) *भारतातील पहिले अणुविद्युत केंद्र कोणते ?* तारापूर *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 मिलिंद बोडके 👤 श्री व सौ. दिलीप ठाकूर ( लग्न वाढदिवस ) 👤 शाहरुख शेख 👤 रोहन पाटील *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मोबाइल, फेसबुकच्या आभासी जगाने एक नवी संस्कृती जन्माला घातली आहे. मे-फ्लाय संस्कृती' तिचं नाव ! मे-फ्लाय ही उडत्या किड्यांची प्रजाती. मे-फ्लाय प्रवर्गातील एक किडा अल्पकालिक असतो म्हणे. त्याला तोंड वा पोट नसते. असते फक्त विलासी इंद्रिय अन् तसलेच मनही ! तो रक्तहीन असला तरी रतिप्रविण असतो म्हणे. त्याचे आयुष्य चोवीस तासांचेही असत नाही. तीन तासांचे तारूण्य घेऊन जन्माला येणारा तो किडा फक्त पुनरूत्पादनासाठीच जन्मतो. संभोग झाला की मरतो. एकदम 'सर्जिकल स्ट्राइक'च म्हणाना. त्यात शृंगारक्रिया असत नाही. जीवनास्वाद नसतो. असते ओरबाडणे, भोगणे,मरणे नि मारणे..जगणे नसतेच.* *माणूस 'मे-फ्लाय' होणे हे आभासी, चंगळवादी, भोगवादी जीवनशैलीचे अपत्य होय. तुम्ही ठरवायचे की, तुम्हाला ATM जन्माला घालायचे आहे की माणूस! माणूस जन्माला घालायचा असेल, घडवायचा असेल तर जरा हवा येऊ द्या. घरी माणसे, पै-पाहुणे आले पाहिजेत. तुम्हींही इतरांच्या घरी जात येत रहा. गतीमान जीवनात उसंत शोधा. उसंत स्वत:साठी वापरू नका. निवांत म्हणजे स्मशान! आयुष्यात पाण्याचा खळखळाट ऐका. नुसते आभासी संदेशन, प्रक्रिया, प्रतिसादांनी मिळणारे सुख, समाधान, शांती हीसुद्धा आभासी असते. स्वत:पलीकडचे जग उघड्या डोळ्यांनी पहा. मुलांचे एकारलेपण उन्हाळी शिबिरांसाठी केवळ पैसे भरून निघणार नाही. त्यासाठी त्यांना वेळ द्या. दिले की संपले, असे पालकपण कारखान्याच्या मालकासारखे असते. आव्हानांना सामोरे जाणारे जीवन प्रत्यक्ष जगा नि पाल्यांना जगू द्या...* *॥ रामकृष्णहरी ॥* 🌺🌸🌺🌸🌺🌸🌺🌸🌺 *--संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• मित्रांनो, नक्तचर्या दिवास्वप्नम् आलस्यं पैशुनम् मदम्। अतियोगम् आयोगं च श्रेयसोsर्थी परित्यजेत। अस म्हटलं जातं की "जन्मला आला हेला,अन पाणी वाहून मेला." आयुष्यात येऊन माणसाने कुठलीतरी ध्येय डोळयासमोर ठेवले पाहिजे.केवळ जन्माला आला आणि जगत राहिला, व एक दिवस स्वर्गवासी झाला.हवं जगणं फक्त आणि फक्त पशूंनाच शोभून दिसते. जगायच तर संकटांना धडक देऊन जगल पाहिजे. आलोच आहे या उघड्या नागड्या जगात,जगायचेच आहे, तर कधी दोन देत कधी दोन घेत जगले पाहिजे.आपल्याहातून काहीतरी चांगलं घडलं पाहिजे.नाही काही तर आपल्या स्वतःच जीवन तरी काही जीवनमूल्ये घेऊन जगावं.अस ठरवलं तरी त्याला काहीतरी ध्येय आहे असं तरी म्हणता येईल.तात्पुरते का होईना अशी स्वप्ने माणसाला पडावी ही किमान अपेक्षा.आपले संकल्प कालानुरूप बदलत जाणारी असावीत.त्यासाठी शास्र आणि व्यवहार यांचीही सांगड घातली जावी. लहानपणापासून किंवा तरुणपणी केलेले संकल्प फार थोडे लोक आयुष्याच्या अखेरपर्यंत टिकवितात आणि त्यांनाच जग सलाम करते. हे सगळं करण्यासाठी प्रयत्न, कष्ट,जिद्द ,तळमळ या सगळ्या गोष्टी आल्याच. नाही तर दे रे हरी,खाटल्यावरी। अस कधी घडत नाही. मग हे करत असतांना माणसाने हे निश्चित लक्षात ठेवावे की काय करावे,काय करू नये.काय टाळावे,कुठे जावे,कुठे जाऊ नये.हे सर्व नियम पाळणे मग क्रमप्राप्त ठरते. अशोक कुमावत (राष्ट्रपती पुरस्कार विजेते) 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ईश्वराच्या नामस्मरणाने आपल्या चलबिचल झालेल्या मनाला स्थैर्य लाभते आणि नित्य चांगल्या कामामध्ये हात गुंतून राहिले तर तन आणि मन समाधानी होते.या दोन्ही मधून माणसाला सुखाने जीवन जगण्याचा खरा मार्ग सापडतो. *व्यंकटेश काटकर,नांदेड.*   संवाद..९४२१८३९५९०/             ८०८७९१७०६३. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *दारिद्र्य आणि व्यक्ति* *एकदा एका व्यक्तीवर त्याच सौख्य(भाग्य) रुसल आणि जाता जाता त्याला म्हणाल आता माझ्या जागी तुझ्या घरात दारिद्र्य येणार आहे. परंतु तू एक उत्कृष्ट व्यक्ती असल्याने. मी तुला एक वरदान मागण्याची संधी देत आहे. तुझी इच्छा असेल तर कोणतही वरदान तू मागु शकतोस..माणूस खूप समजदार होता, तो म्हणाला जर दारिद्र्य येणारंच असेल तर त्याला कोणी थांबवू शकत नाही, बस्स फक्त त्याला म्हणावं माझ्या परिवारात एकमेकांत प्रेम आणि जिव्हाळा कायमस्वरूपी राहू दे..* *सौख्य तथास्तु म्हणाल आणि निघून गेल.* *काही दिवसानंतर - धाकटी सून स्वयंपाक बनवत होती, तिनं भाजीला मीठमसाला टाकला आणि दुसऱ्या कामात गुंतली.. त्यानंतर मोठी सून आली, तीनं भाजी न चाखताच मीठ टाकलं, आणि दुसऱ्या कामाला घराबाहेर निघून गेली. त्याचप्रमाणे आणखी दोन सुनांनी न चाखताच भाजीत मीठ टाकलं आणि निघून गेल्या.* *जेव्हा कुटूंबप्रमुख व्यक्ती आला. आणि जेवायला बसला तर भाजी इतकी खारट होती की. त्याला ती जिभेवर ठेऊ वाटेना. परंतु तो समजून गेला की. दारिद्र्याने आपल्या घरात प्रवेश केलेला आहे. त्यानं काही न बोलता जेवण केलं आणि निघून गेला.* *त्या नंतर मोठा मुलगा जेवायला बसला, तेव्हा खारट लागल्या नंतर त्याने विचारलं? बाबांनी जेवण केलं का? तेव्हा बायकोनं हो म्हटलं. नंतर त्यानं विचार केला. जेव्हा वडील काही बोलले नाही तर मी कशाला बोलू?* *त्याचप्रमाणे परिवारातल्या सगळ्या सदस्यांनी एकमेकां विषयी विचारलं आणि काही न बोलता सर्वांनी जेवण केलं.* *संध्याकाळी दारिद्र्य त्या व्यक्तीसमोर आलं आणि म्हणालं मी निघून चाललो आहे.* *माणूस म्हणाला कां? तू तर स्वःइच्छेने आलास. अन आता लगेच निघालास अस का. ?* *दारिद्रय म्हणालं, तुम्ही लोकांनी किलोभर मीठ खाल्लं ... तरीपण भांडणं केले नाहीत....ज्या घरात इतक्या खारटपणानंतरही तुमची गोडी कमी झाली नाही, ज्या घरात भांडणं होत नाही. त्या घरात मला मुळीच* *करमत नाही... मी अशा घरात राहुच शकत नाही. जातो मी आता.* *तात्पर्य:* *भांडण आणि इर्षा यामुळं आपलच नुकसान होतं.* *ज्या घरात प्रेम, शांती, आणि आपुलकी असते तिथं भाग्य, सौख्य. आनंद, समाधान. रेलचेल, नेहमी नांदत असते.* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00          ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 20/02/2020 वार - गुरूवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    *जागतिक सामाजिक न्याय दिन* 💥 ठळक घडामोडी :-  ● २०१४-आंध्रप्रदेश चे विभाजन होऊन तेलंगणा हे भारताचे २९ वे राज्य अस्तित्वात आले. ● १९८७-मिझोरम हे भारताचे २३वे राज्य बनले. ● १८३५ - तीव्र भूकंपात चिलीतील कन्सेप्शन हे गाव नेस्तनाबूद. 💥 जन्म :- ● १९५१-गार्डन ब्राउन, इंग्लंडचे माजी प्रधानमंत्री 💥 मृत्यू :- ● २००१-इंद्रजित गुप्ता ,माजी केंद्रीय गृहमंत्री व कंम्युनिस्ट पक्षाचे नेते ● १९८५ - क्लॅरेन्स नॅश, अमेरिकन अभिनेता, डोनाल्ड डकचा आवाज. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *अयोध्येत भव्य राम मंदिर उभारणीसाठी केंद्र सरकारकडून श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास (ट्रस्ट)ची स्थापना करण्यात आली असून दिल्लीत पार पडलेल्या ट्रस्टच्या पहिल्या बैठकीत महंत नृत्य गोपाल दास यांची ट्रस्टच्या अध्यक्षपदी तर, विश्व हिंदू परिषदेचे चंपत राय यांची सरचिटणीस पदी निवड करण्यात आली* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *राज्य सरकारकडून विद्यार्थ्यांना मोफत चष्मे, दहा लाख विद्यार्थ्यांना चष्मा वाटण्याचा निर्णय, सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे दृष्टीदोष असलेल्या मुलांना निश्चित करण्यात आलेल्या पुरवठादाराकडून त्याच्या घरी अथवा शाळेत मोफत चष्मा पोहचविण्यात येईल, असा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *चीनमध्ये कोरोना विषाणू बळींची संख्या १८०० वर, एखाद्या रुग्णालयाचे संचालक कोरोना विषाणूचे बळी ठरल्याची ही पहिलीच घटना आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी एक महत्वपूर्ण व दिलासादायक घेतला निर्णय. पंतप्रधान पीक विमा योजनेत दुरुस्ती करण्यास सरकारने मान्यता देत, पीक विमा करायचा की नाही हे आता शेतकऱ्यांनाच ठरवता येणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत तीन प्रमुख निर्णय घेण्यात आले* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *अवघ्या दहा रुपयात उपलब्ध होणाऱ्या शिवभोजन थाळीला मिळणारा प्रतिसाद लक्षात घेऊन, या थाळींची संख्या दुप्पट करण्यात आली आहे. शिवसेनेने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात राज्यातील जनतेला अवघ्या १० रुपयात शिवभोजन थाळी उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन दिले होते* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *मुंबई :  जगभरात आपल्या कार्य आणि कर्तृत्वाच्या जोरावर वेगळी ओळख निर्माण केलेल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती संपूर्ण राज्यासह देशभरात साजरी करण्यात आली* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *पाकिस्तानचं एक पाऊल मागे, आशिया चषकाचं यजमानपद सोडण्याचे दिले संकेत, पाक क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षांचं सूचक वक्तव्य* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••          *ठेविले अनंते तैसेचि राहावे* http://nasayeotikar.blogspot.com/2018/05/07.html    लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃  *काव्यांगण - रोज एक बालकविता* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *घर वाळूचं - डॉ. दिलीप अर्जुने, नागपूर* आम्ही सगळी मंडळी रविवारची वाट पाहतो सुट्टीचा दिवस येताच मित्रांसोबत नदीवर जातो नदीच्या त्या किनारी वाळूत हात टाकून आनंदी होती आम्ही वाळूचं घर बांधून वाळूत खेळता खेळता दुपारी जातो आम्ही घरी शाळेचा अभ्यास करून सोमवारची प्रतीक्षा करी कसा निघून गेला रविवार कळत नाही येणाऱ्या रविवारची वाट पाहत राही *सौजन्य :- जि. प. प्रा. कन्या शाळा धर्माबाद* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• _*एकदा वेळ निघून गेली की सर्व काही बिघडून जाते असे म्हणतात. पण कधी कधी सर्व काही सुरळीत होण्यासाठी सुद्धा काही वेळ जाऊ द्यावा लागतो.*_ *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *पोंगल हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो ?* तामिळनाडू 2) *भारताच्या पूर्व दिशेला कोणता देश आहे ?* बांगलादेश 3) *महाराष्ट्रात राष्ट्रीय रसायन प्रयोगशाळा कोठे आहे ?* पुणे 4) *वानखेडे स्टेडियम कोठे आहे ?* मुंबई 5) *काळे सोने कशास म्हटले जाते ?* खनिज तेल *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 डुमलवाड शंकर राजेन्ना, स.शि.    प्रा.शा.शिरूर ता.उमरी,जि.नांदेड. 👤 अनाम मैनुद्दीन शेख, नांदेड 👤 शिरीष गिरी, सहशिक्षक, धारूर 👤 दिलीप लिंगमपल्ले, धर्माबाद 👤 नागेश पांडे शेवाळकर 👤 उत्तम कानिंदे 👤 संजय रुईकर, नांदेड 👤 सुनील साखरे 👤 शिरीष गिरी 👤 व्यंकटेश रोंटे 👤 शिवाजी पाटील 👤 साहेबराव कदम 👤 संतोष कामगोंडे 👤 विठठल डोनगिरे 👤 बालाजी उगले 👤 नागेश काळे 👤 विशाल खांडरे *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *खरंतर मरण्यासाठी शंभर बहाणे असले तरी जगण्यासाठी एक 'वजह' पुरेशी आहे. ही वजह सापडली की मनातील मळभ दूर होत जातं. इथेच संपतो माणसाच्या आत्मशोधाचा प्रवास. ही वजह उराशी कवटाळून जगणारी माणसं ख-या अर्थानं आनंदयात्रेमधील 'पाथेय' ठरतात. बाबा आमटे, प्रकाश आमटे, अनाथांची माई सिंधूताई सपकाळ हे एक वजह घेऊन जगले. काळाच्या ओघात हे संदर्भ बदलतात नि पुन्हा सुरू होतो शोध नवीन कारणांचा नि जगण्याच्या नवीन वजहचा.* *ब-याचदा ती वजह सापडतही नाही हातात..... पण माणूस वाट पाहतो विवशतेतही एक नवा आशावाद साठवून आणि उभा राहतो या अक्षयी नि निरंतर फिरणा-या चक्राच्या मध्यभागी....जीवनाच्या अंतिम श्वासापर्यंत !* *एक कवी लिहून जातो...* *...सदियाॅ बित गयी टूटी* *हुई डोर को थामे* *शायद कोई वजह मिल* *जाए जिने की....!* *॥ रामकृष्णहरी ॥* 💚💚💚💚💚💚💚💚💚 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *सुप्रभात* *तुम्हाला जर वाटले की तुम्ही एखाद्या* *घटनेत बरोबर आहात, तर* *समोरून कसलाही वर्षाव* *होऊदया, रागवण्याची गरजच नाही,* *आणि समजा तुम्ही चुकले असे मन* *सांगते तर समोरचे* *स्वीकारण्याची ताकद ठेवा,कारण* *तुम्हाला या ठिकाणी* *रागावण्याचा हक्कच* *नाही.* *प्रयोग करून बघा पुढे जाल.* *अशोक कुमावत* *(राष्ट्रपती पुरस्कार विजेते*) 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• या जगात कोणतीही वस्तू किंवा कोणताही जीव कायमस्वरुपी या जगात राहण्यासाठी किंवा टिकण्यासाठी आलेला  नाही. एखादी वस्तू चांगली आहे तोपर्यंत त्याचा वापर करतो आणि काम संपले की त्याला खराब झाली म्हणून अडगळीला टाकून देतो कारण त्याची किंमत शून्य होते. तसे मानवी जीवाचे नाही. मानवी जीवाचे वय वाढत जाते त्याबरोबरच मूल्यही (जगण्याचे महत्व) अधिकाधिक वाढत असते.जसजसे वय वाढत जाईल आणि तसे तसे अनुभवाने समृद्ध होत जाईल.जगण्याचे मूल्यही कळायला लागेल.पण त्या मिळालेल्या चांगल्या  अनुभवाचे पडसाद मागे राहणा-यावर पडले तर तुमच्या पश्चात ते अजरामरच राहणार आहेत. कारण आपणही  कधी ना कधी या जगातून निघूनच जाणार आहोत. मग आपण जाण्याचे दुःख बाळगायचे नाही तर आपण इतरांना काहीतरी चांगले देऊन गेलो याचे समाधान वाटून जीवन समर्पित करावे.यातच खरे जीवन जगण्याचे सार आहे. - व्यंकटेश काटकर,नांदेड.   संवाद. 9421839590. 🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *सकारत्मकता* एक दिवशी एक बैल विहिरीत पडला. बैल जोराने ओरडत होता. आणि मालक विचार करत होता, याला बाहेर कसे काढायचे .त्याने विचार केला बाहेर काढणे अवघड आहे. नाहीतरी बैल म्हातारा आहे .त्याला वाचवून काही फायदा नाही, त्यापेक्षा त्याला विहिरीतच पूरून टाकू. मालकांने आजूबाजूच्या लोकांना मदतीला बोलावले. सगळेजण विहिरीत माती लोटत होते .बैल आणखीनच हांब्रू लागला. थोडा शांत झाला. थोड्यावेळाने मालकांनी विहिरीत डोकावले, पाहतो तो काय बैलाच्या पाठीवर जशी माती पडत होती तसतसा ती माती झटकून तो मातीतून पाय काढून उभा राहत होता शेवटी विहीर बुजली . बैल विहिरीच्या बाहेर आला व वाट दिसेल तिकडे पळू लागला . तात्पर्यः तुमच्या आयुष्यात अनेकदा तुमच्यावर माती फेकली जाईल, वेगवेगळ्या प्रकारची घाण तुमच्यावर फेकली जाईल, पुढे जाण्यापासून तुम्हाला रोखले जाईल ,तुमच्यावर टीका होईल, तुमचे यश पाहून मत्सराने वाईट बोलतील ,अशावेळी खचून जायचे नाही. निराशेच्या विहिरीत पडून राहायचे नाही. धाडसाने अंगावरील घाण झटकून योग्य तो धडा घेऊन त्याचीच शिडी करून पुढे जायचे. त्यासाठी सकारात्मक विचारकरा सकारात्मक जगा. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00          ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 18/02/2020 वार - मंगळवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    💥 ठळक घडामोडी :-  ● २००१-संगीतकार व गायक भुपेन हजारीका यांना मध्यप्रदेश सरकारचा 'लता मंगेशकर पुरस्कार' पटदान ● १९९८-माजी केंद्रीय मंत्री व महाराष्ट्राचे माजी राज्यपाल सी सुब्रमण्यम यांना सर्वोच्च भारतीय नागरी सन्मान 'भारतरत्न' जाहीर 💥 जन्म :- ● १८२३ - गोपाळ हरी देशमुख, लोकहितवादी समाजसेवक ● १८८३-क्रांतीवीर मदनलाल धिंग्रा 💥 मृत्यू :- ● १९९४-पंडित गोपीकृष्ण,कथ्थक नृत्यशैलीचे बनारस घराण्याचे नर्तक *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कोकण दौऱ्यात 'नाणार'चा मुद्दा पुन्हा चर्चेत, मुख्यमंत्र्यांनी 'नाणार'वर बोलणं टाळलं; प्रकल्पविरोधक मुंबईत धडकणार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *सरकार पाच वर्ष टिकवायचं असेल तर समन्वय ठेवा, राष्ट्रवादीच्या बैठकीत शरद पवारांचा सल्ला, वादग्रस्त वक्तव्य टाळण्याच्याही मंत्र्यांना सूचना* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *एल्गार परिषद प्रकरणी राज्य सरकार एसआयटीमार्फत चौकशी करणार, राष्ट्रवादीच्या बैठकीनंतर नवाब मलिक यांची माहिती, सरकार आणि मंत्र्यांच्या कामाबाबतही मंथन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *मुंबईतील जीएसटी भवनाची आग तीन तासांनंतर आटोक्यात, सुदैवाने जीवितहानी नाही तर शिपाई कुणाल जाधवनं जीव धोक्यात घालून तिरंगा सुरक्षित उतरवला* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *तळकोकणातील प्रसिद्ध आंगणेवाडी यात्रेला सुरुवात, हजारो चाकरमानी कोकणात, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून भराडी देवीचं दर्शन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *लष्करातील महिलांना आता कायमस्वरुपी नियुक्ती मिळणार, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, महिलांना लष्करात समान संधी देण्याचे केंद्र सरकारला आदेश* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *भारत आणि न्यूझीलंड संघांमधली पहिली कसोटी शुक्रवारपासून सुरु होत आहे. न्यूझीलंडने दोन कसोटी सामन्यांच्या या मालिकेसाठी एजाझ पटेल या एकमेव फिरकी गोलंदाजाचा तेरा सदस्यीय संघात समावेश केला आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *विशेष बातमी - आजपासून बारावीच्या परीक्षेला प्रारंभ, राज्यातील नऊ मंडळात 3 हजार 36 केंद्रावर 15 लाख 5 हजार 27 विद्यार्थी परीक्षा देणार असल्याचे माहिती राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा डॉ. सौ. शकुंतला काळे यांनी पत्रकार परिषदेत दिली* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *बारावीची परीक्षा देणाऱ्या सर्व परीक्षार्थींना फ्रेश मॉर्निंग बुलेटीनच्या टीमकडून मनःपूर्वक शुभेच्छा ......Best Of Luck !* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••           *परीक्षेला जाता जाता .....!* फेब्रुवारी - मार्च महीना उजाडला की सर्वत्र परीक्षेचे वारे वाहायला लागते. माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा अर्थात दहावी - बारावीच्या परीक्षा दिनांक 18 फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. ........... वरील लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे https://nasayeotikar.blogspot.com/2018/02/blog-post_20.html?m=1 लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃  *काव्यांगण - रोज एक बालकविता* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *रानातील शाळा* ©विजय माळी. ९२०९२५३९७८ चला बघुया रानातील शाळा फांदिवरच्या चिमण्या बाळा .. तळ्याकाठी चुकार वासरू माय हरवता लागे बावरू गळ टाकूनी बसला बगळा वरून दिसतो साधा भोळा.. झऱ्यामधले झुळझुळ पाणी त्याच्या भवती चिवचिव वाणी.. उंच फांदीवर मधाचा पोळा अविरत माशा करती गोळा... माळावरती भुणभुण वारा फुलाफुलांचा किती पसारा... रानामधली बघता शाळा किती हरकला चिमण्या बाळा.. ----------------- *सौजन्य :- जि. प. प्रा. कन्या शाळा धर्माबाद* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *" समाजाचा काैल हा पुष्कळ वेळा भाषणापेक्षा माैन व्रतानेच अधिक प्रभावीपणे व्यक्त केल्या जातो."* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *मराठी चित्रपटातील पहिली नायिका कोण ?* दुर्गा खोटे 2) *मराठी भाषेतील पहिली स्त्री निबंधकार कोण ?* ताराबाई शिंदे 3) *भारतातील सर्वात श्रीमंत देवस्थान कोणते ?* तिरुपती 4) *तलम रेशीम देणारे किडे कोणत्या वनस्पतीवर वाढतात ?* तुती 5) *भारतातील पहिला पेट्रोरसायन प्रकल्प कोठे आहे ?* तुर्भे *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👥 सौ. रेखा बालाजी सुंकेवार, देगलुर लग्नाचा वाढदिवस 👤 निशांत कसबे 👤 लक्ष्मीकांत डेबेकर 👤 गणेश पाटील 👤 सोमेश्वर तांबोळी 👤 यशवंत कुलकर्णी 👤 चिं. रुद्रा गर्जेपालवे *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *तहानलेल्या जन्मदात्यांना पाणी देण्यासाठी तळ्यावर आलेला श्रावण, दशरथाच्या बाणाला बळी पडला आणि पुत्रविरहाचा शाप मिळण्यास कारण ठरला. सिकंदर आणि नेपोलियन यांची जग जिंकण्याची 'तहान' अनेक युद्धांना सामोरी गेली आणि कित्येक राजे शरण जाऊन कफल्लक झाले. तहानलेले 'हरिण' वा 'पाडस' ही व्याघ्राची पोटापाण्याची सोय आहे. सत्तेची 'तहान'ही अशीच, त्यात महत्वकांक्षा मिसळली की व्याकूळ होते आणि सत्तापिपासू बनते. म्हणजे तहानेने विकृत रूप धारण केले की ती केवळ तहान न राहता 'जीवो जीवस्य जीवनम्' या तत्वाने तहानलेल्याला समोर दिसेल ते ग्रहण करण्याचे व्यसन लागते. अशावेळी चित्तवृत्ती बेभान होतात, ताळतंत्र सुटतो व विवेक संपून दुष्कृत्य घडते.* *'तृष्णा' म्हणजे 'तहान'च आणि 'तहान' पाण्याशिवाय पूर्ण होत नाही. ही साधी तहान जेव्हा 'तृष्णा' होते तेव्हा तिच्यातले विविध पैलू दिसू लागतात. तहानेत असलेले आसुसलेपण मात्र स्वतंत्र असते, केव्हा एकदाचे 'पाणी' मिळते, अशी अवस्था होते. ही अवस्था 'तृष्णे'मधून येते. तेव्हाही आसुसलेपण येऊन इच्छापूर्ती न झाल्यास बुद्धी किंवा मनाचा आधार घेतला जातो. मनाच्या आहारी गेल्यास महत्वाकांक्षा भरकटते व तृष्णा भीषण रूप धारण करते* *॥ रामकृष्णहरी ॥* 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷 *--संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो,* *आपल्याला जुन्या अभ्यासात एक* *कविता होती,* *अरे अरे कळसा नको वळून तू पाहू,* *पायरीचा मी दगड ,अरे तुझाच की* *भाऊ।* *खरंय आज क्षणाक्षणाला माणुसकी* *हरवत चालल्याची* *उदाहरणे आपण पावलो पावली* *अनुभवतो आहे.* *माणूस म्हणून जन्मा आलो,माणूस* *म्हणून जगेन मी । ही* *भावना प्रत्येकाच्या ठाई असणं* *आवश्यक आहे.* *यावर कबीरजी खूप छान भाष्य* *करतात* *प्रेमभाव  एक  चाहिए ,*  *भेष  अनेक  बनाय  |* *चाहे  घर  में  वास  कर ,*  *चाहे  बन  को  जाए  |*        *मानवाचा धर्म मानवता .* *मानवता जपायची तर मानवाच्या* *अंतरात प्रेमभावनेचे* *अधिष्ठान महत्वाचे आहे. त्या शिवाय* *मानवता व मानव्य कसं* *प्रवाहित होणार ?  भौगोलिक व* *भौतिक परिस्थितीशी समायोजन* *साधण्यासाठी भिन्न वेष* *परिधान करा .   विभिन्न प्रकारच्या वास्तूत  किवा वनात वास्तव्य करा ते परिस्थितीनुरूप* *स्वाभाविक आहे. परंतु त्यात अवडंबर असता कामा नये. सत्य  व प्रेमभाव हाच खर्‍या जीवनाचा मुलाधार आहे.* *त्यामुळे जीवनाची गोडी व सुंदरता वाढते  म्हणून* *माणसाने  अशाश्वत अवडंबराच्या व बुवाबाजीच्या नादी* *लागून जगण्याला  विनाकारणच अंधानुकरणी व भंपक* *बनवू नये . ते मानवतेला* *पूरक असू शकत नाही.* *आणि* *शोभतही नाही.* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• तुम्ही जे काही चांगले काम हाती घेतले आहे ते काम पूर्ण होईपर्यंत थांबू नका. जर तुम्ही जे काम थांबवून पुन्हा करु असे म्हणत असाल किंवा मी हे काम पूर्ण करणार होतो पण ते जमले नाही असं म्हणून काम थांबवत असाल तर तुमच्या कामाला  थांबविण्याचे काम फक्त ' पण ' हा एक अक्षरी शब्दच कारणीभूत आहे. जर तुम्हाला प्रचिती पाहायची असेल तर तुम्ही पण हा शब्द वापरुन पहा.काय होतं ते.तुमच्या पूर्ण होणा-या कामाला आणि तुमच्यातल्या आत्मविश्वासाला तडा निर्माण करण्याला पण हा शब्दच  कारणीभूत आहे.त्यामुळे ' पण ' या शब्दाला तुमच्या जीवनात कधीही थारा न देता आपले काम पूर्ण होईपर्यंत चालू ठेवावे. - व्यंकटेश काटकर,नांदेड.   संपर्क..9421839590,   8087917063. 💠🍃💠🍃💠🍃💠🍃💠🍃💠🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• बढाईखोर इसम एक इसम फार वर्षे प्रवास करून आपल्या घरी आला व आपण परदेशात असताना काय मौजा पाहिल्या हे त्याने आपल्या शेजार्‍यापाजार्‍यांना तिखट मीठ लावून सांगितले. आणि अगदी शेवटी एक थाप ठोकून दिली की, ‘मी अलकावतीला गेलो असता तेथील लोक पंधरा पंधरा हात उंच उड्या मारतात पण त्यांनी माझ्याशी पैज लावली असता माझ्याइतकी उंच उडी एकालाही मारता आली नाही.’ ऐकणार्‍या कोणालाही ही गोष्ट खरी वाटली नाही. तेव्हा त्यांची खात्री करण्यासाठी तो नाना प्रकारच्या शपथा घेऊन लागला. त्या वेळी त्या लोकातील एक माणूस त्याला म्हणाला, ‘अहो, अशा शपथा कशाला घेता. हातच्या कंकणाला आरसा कशाला ? या वेळी तुम्ही अलकावतीला आहात असं समजून तिथे जशी उडी मारली तशी इथंही मारून दाखवा म्हणजे झालं.’ हे ऐकताच त्या बढाईखोर माणसाचे तोंड ताबडतोब बंद झाले. तात्पर्यः आपण प्रवासात पाहिलेल्या गोष्टी फुगवून सांगण्याची काही लोकांना सवय असते, पण एखादेवेळी त्यांचेच बोलणे त्यांच्या गळ्यात येऊन त्यांची फजिती झाल्याशिवाय राहात नाही. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00          ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 17/02/2020 वार - सोमवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    💥 ठळक घडामोडी :-  ● १९९६ - महासंगणक डीप ब्ल्यू बुद्धिबळात गॅरी कास्पारोव्हकडून पराभूत. 💥 जन्म :- ● १८१७ - विल्यम तिसरा, नेदरलँड्सचा राजा. 💥 मृत्यू :-  ● १९१९ - विल्फ्रिड लॉरिये, कॅनडाचा पंतप्रधान.  ● १९३४ - आल्बर्ट पहिला, बेल्जियमचा राजा. ● १९७८-पुरुषोत्तम शिवराम रेंगे, कादंबरीकार,नाटककार ● १९८६-जे कृष्णमूर्ती,भारतीय तत्त्वज्ञ *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *अरविंद केजरीवाल यांनी तिसऱ्यांदा घेतली दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ, अरविंद केजरीवाल यांच्यासह सहा मंत्र्यांनीही घेतली शपथ, दिल्लीच्या विकासासाठी मुख्यमंत्री केजरीवालांची नरेंद्र मोदींना साद* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *काल रविवारी पाचवी व आठवी वर्गातील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा संपन्न, नांदेड जिल्ह्यात 44 हजार विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *पुणे : तब्बल तीन तासांनंतर खेड-शिवापूर टोलनाक्यावरचं आंदोलन मागे, MH12 आणि MH14 पासिंग असलेल्या गाड्यांना टोलमाफ, केंद्रीय मंत्री गडकरींसोबत बैठक होणार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *दक्षिण कोकणची काशी आंगणेवाडीतील भराडीदेवीच्या यात्रेला आजपासून सुरुवात होत आहे. विशेष म्हणजे या यात्रेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *नाशिकचा दौरा रद्द करुन शरद पवार मुंबईत, आज राष्ट्रवादीच्या 16 मंत्र्यांची तातडीची बैठक, एल्गार प्रकरणाच्या समांतर तपासासाठी पवार आग्रही* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *पासष्टाव्या अॅमेझॉन फिल्मफेअर अवॉर्ड्समध्ये 'गली बॉय'चा डंका; सर्वश्रेष्ठ अभिनेता, अभिनेत्रीसह सर्वोत्कृष्ट चित्रपटाचाही मान* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *आयपीएलच्या तेराव्या हंगामाचं वेळापत्रक जाहीर, यंदा 29 मार्चला मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात पहिला सामना चेन्नईत रंगणार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *चला, राजे शिवाजी होऊ या ....!* महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्ण अक्षराने लिहिलेला काळ म्हणजे छत्रपती राजे शिवाजी महाराजांचा काळ होय. महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीला राजे शिवाजी महाराज यांचा अभिमान वाटतो. त्यांच्या नावाचा जयजयकार आज ही घराघरातून केला जातो. सर्वधर्मसमभाव म्हणजे काय असते ? याची शिकवण त्यांनी आम्हांला दिली आहे........ पूर्ण लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे...... https://shopizen.page.link/rvrhZva95nYpy2Np7 लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃  *काव्यांगण - रोज एक बालकविता* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ➖➖➖➖➖➖➖➖ *_स्वप्नातच सहल..!_* *© शशी त्रिभुवन, अस्तगाव(अहमदनगर)* *चलभाष : 8275032897* ➖〰〰〰〰〰〰〰➖ स्वप्नातच काढली सहल ढगांच्या त्या दूर देशात, आमच्यासारखी पोरं पोरी ढगांच्या त्या शूर वेशात! पांढरे करडे घालून झगे पळत सुटत ती गडगडा, ढगोबा आजोबांचा तर आवाज नुस्ता कडकडा! पाणी कसं होतं तयार पाहिली ना मज्जा यार; धार धार धरताना ती गोंधळ नि फज्जा यार! वाफ कोंडून घेते आभाळ पाहिलं तेही यंत्र मोठ्ठं, हॅन्डल फिरवत होतं कोण? कळलं नाही मात्र पोट्टं! गुरुजी म्हणे फारच चौकस इथे तिथे तुझेच सवाल, शिकवलेलं विसरलास ना- उत्तर तर लिहिलेस काल! प्रश्न प्रश्न घोकत मी मग स्वप्नातून झालो जागा, सहलीचा केला हिरमोड अभ्यासावर काढला त्रागा! ➖〰〰〰〰〰〰〰➖ *सौजन्य :- जि. प. प्रा. कन्या शाळा धर्माबाद* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जेंव्हा सगळंच संपून गेलंय असं आपल्याला वाटतं, तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरु होण्याची..!  *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *कन्याकुमारी भारताच्या कोणत्या दिशेला आहे ?* दक्षिण 2) *ब्रिटिश संसदेत निवडून गेलेले पहिले भारतीय कोण ?* दादाभाई नवरोजी 3) *कोकण कृषी विद्यापीठाचे मुख्यालय कोठे आहे ?* दापोली 4) *जगातील सर्वात मोठा पोकळ स्तूप कोणता ?* दीक्षाभूमी, नागपूर 5) *आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे मुख्यालय कोठे आहे ?* दुबई *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 सुनील सामंत, पुणे 👤 अशोक इंदापूरे, सोलापूर 👤 साईनाथ अवधूतवार, धर्माबाद 👤 रविकिरण एडके 👤 विकास गायकवाड 👤 लक्ष्मण गंगाराम होरके 👤 अजिंक्य गव्हाणे पाटील 👤 अंकुश चव्हाण 👤 माधव संगावार 👤 अरुनी शिंदे *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आपण ईश्वरापाशी 'संकटे येऊ नयेत' अशी प्रार्थना करतो. संकटे माणसाला माणसासारखे वागायला लावतात. माणसे संकटातच परमेश्वराची आठवण काढतात. तेंव्हा अहंकार गळून पडतो. माणसे नम्रतेने, प्रामाणिकपणे वागू लागतात. आपल्या चूका शोधू लागतात. संकटेच सामर्थ्य वाढवीत असतात. प्रगती घडवीत असतात. आपण अडचणीत असताना सभोवतालच्या माणसाची खरी पारख होते. अडचणींमध्ये कुणी साथ दिली, साथ सोडून कोण गेले आणि अडचणीत कोणी आणले हेही कळते. त्यामुळे आपण हुशार बनतो, निर्भय बनतो, अनुभवी बनतो. जीवन यशस्वी करण्यास समर्थ होतो. संकटांमुळेच पाय जमिनीवर राहतात.* *जगात जे नवीन शोध लागले त्यापैकी बहुतेक अडचणींमुळेच लागले. 'गरज ही शोधाची जननी आहे' असे आपण म्हणतो ते खरे आहे. कोणतीही परिस्थिती स्विकारण्याची मानसिक तयारी हवी. प्रतिकूलतेवर मात करून ते बदलण्याचे सामर्थ्य आपल्याकडे हवे. जगताना कोंडी, प्रश्न, अडचणी आणि संकटे आहेत म्हणूनच जीवन जगण्यात मजा आहे. पत्त्यांच्या खेळात हुकूमाची पाने हातात नसताना डाव जिंकणे आधिक आनंददायी असते. अंधारामुळे प्रकाशाचे खरे महत्व कळते. गरिबीमुळेच पैशाचे मूल्य समजते. दु:खामुळे सुखाची गोडी समजते. पराभवामुळे विजयाचा खरा आनंद समजतो. माणसाने पराभवही उत्सवासारखा साजरा करावा, कारण पराभवातून माणूस शिकतो.* *॥ रामकृष्णहरी ॥* 🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• मित्रांनो जीवनाच्या बँकेत जेव्हा पुण्याईचा बॅलंस कमी होतो, तेव्हा सुखाचे चेक बाउंस होतात. प्रत्येकाचं आयुष्य शून्यापासून सुरू होतं असतं.. परंतू त्या शून्यापुढे आकडे स्वतःच्या कर्तृत्ववाने लावावे लागतात...! निराशावादी प्रत्येक संधी मध्ये अडचण पाहतो; तर आशावादी प्रत्येक अडचणी मध्ये संधी पाहतो. आयुष्याची खरी सुरुवात तर तुमच्या वाडवडिलांच्या ख-या पुण्याईने सुरु झाली.जीवनाचा ' मध्य ' तर तुमच्या कर्तृत्वाने सिद्ध करायचा आहे.तो तुम्हाला चांगला करायचा आहे की,वाईट हे तुम्हालाच ठरवायचे आहे.कारण हे मात्र तुमच्या हातात आहे.यासाठी तुम्हाला कुणाच्या भरवशावर बसता येत नाही किंवा नशिबावर अवलंबून राहता येत नाही.म्हणून तुमच्या जीवनातला मध्यच महत्त्वाचा आहे.आणि शेवट मात्र आपल्या हाती नाही.भविष्यात केव्हा काय घडेल याचे काही ठामपणे सांगता येत नाही.म्हणून जे आज आणि आता तुमच्यासमोर आहे ते सत्य आहे ते स्वीकारा आणि त्याला कौशल्याने, धैर्याने आणि परिस्थितीनुरूप उत्तर द्यायला पुढे रहा.यातच तुमच्या जीवनाचे खरे सार आहे. अशोक कुमावत राष्ट्रपती पुरस्कार विजेते 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• इतरांना त्रास देऊन जर आपण आपले जीवन चांगल्याप्रकारे जगू म्हटले तर ते अयोग्यच आहे.कारण त्यांनी परिश्रमातून जे काही मिळवलेले असते ते गुण्यागोविंदाने जगण्याचे स्वप्न साकारत असतात.हे त्यांचे बघवत नाही आणि आपल्याने होत नाही म्हणून इतरांना त्रास देऊन त्यांचे सुख हिरावून घेणे हे वामवृत्तीचे लक्षणच म्हणावे. त्यामध्ये आपण सुखी होऊ शकतो का ? आपल्या बाबतीत इतरांनी असे केले तर आपणास कसे वाटेल ? ते आपल्या मनाला समाधान देते का ? ह्या सा-या गोष्टीचा आपण विचार केला तर नक्कीच त्याचे उत्तर सापडेल आणि पुन्हा आपण ती चूक करणार नाही याची नक्कीच जाणीव झाल्याशिवाय राहत नाही.इतरांच्याही सुखस्वप्नात आपणही सहभागी व्हावे हाच आपला माणुसकीचा खरा धर्म आहे. *व्यंकटेश काटकर,नांदेड.*   संवाद..९४२१८३९५९०/             ८०८७९१७०६३. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *गाढव आणि निर्दय मालक* एक खूप गरीब गाढव होते. त्याचा मालक त्याच्याकडून खूप काम करून घेत असे आणि त्याला पोटभर खायलाही देत नसे. असेच ते गाढव म्हातारे झाले. एके दिवशी मालकाने त्याच्या पाठीवर खूप मोठे ओझे लादले. रस्ता अवघड आणि खांचखळग्यांचा होता. त्यामुळे गाढव धडपडून पडले व त्याच्या पाठीवर लादलेली मातीची भांडी फुटून त्यांचे तुकडे तुकडे झाले. मालक खूप चिडला आणि दुष्टपणाने त्याला मारू लागला. तेव्हा, गाढव मान वर करून म्हणाले, ''अरे, दुष्ट माणसा, हे सगळे नुकसान तुझ्याचमुळे झाले. तू जर मला नीट खाऊ घातले असतेस तर मी चांगला शक्तिवान झालो असतो आणि हे ओझे मी सहज उचलू शकलो असतो.'' तात्पर्य : काही लोक कृतघ्न आणि दुष्ट असतात की ते प्रामाणिक आणि गरीब माणसांना छळण्यासही कमी करीत नाहीत *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00          ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 15/02/2020 वार - शनिवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  *ध्वज दिन - कॅनडा* *राष्ट्र दिन - सर्बिया* 💥 ठळक घडामोडी :-  ● १९४२ - दुसरे महायुद्ध - सिंगापुरमध्ये ब्रिटीश सैन्याची शरणागती. ८०,००० भारतीय, ब्रिटीश व ऑस्ट्रेलियन सैनिक युद्धबंदी. ● १९६१ - सबिना एर फ्लाइट ५४८ हे विमान बेल्जियममध्ये कोसळले. ७३ ठार. मृतांत अमेरिकेचा संपूर्ण फिगर स्केटिंग संघ व त्यांचे मार्गदर्शक. ● १९६५ - कॅनडाने नवीन ध्वज अंगिकारला. 💥 जन्म :- ● १९३० - वसंत दिवाणजी, कन्नड साहित्यात मौल्यवान योगदान देणारे प्रतिभावंत लेखक. 💥 मृत्यू :- ● १८६९ - मिर्झा गालिब, उर्दू कवी. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *यवतमाळ : वेगवेगळ्या बंगल्यावर आणि निवासस्थानावर केलेला वारेमाप खर्च सध्या चर्चेचा विषय आहे.परंतु यवतमाळ चे एक शासकीय निवासस्थान हे सर्व गोष्टीला अपवाद ठरत आहे. या शासकीय निवासस्थानी संपूर्ण परिसर हिरवागार झाला असून येथे स्वतः जिल्हाधिकारी अजय गुल्हाने शेतात राबून आपल्या 'शाल्मली' या निवासस्थानी हिरवागार मळा फुलवला आहे* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *मुख्यमंत्री लवकरच सरप्राईज देतील, औरंगाबादच्या संभाजीनगर नामांतरासंदर्भात खैरेंचं मोठं विधान, मनसेकडून मुद्दा हायजॅक होत असल्याचं समजताच सेना सरसावली* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *अकोला : गजानन महाराज प्रगटदिनासाठी शेगावला जाणाऱ्या पायदळ वारीतील दोन भक्तांना टिप्परने चिरडले, बाळापूर तालूक्यातील लोहारा गावातील मदरशाजवळची घटना, चार जण जखमी, विशाल पाटेकर, श्याम निवाणे अशी मृतांची नावं* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *एल्गारचा तपास एनआयएकडे सोपवण्यावरुन ठाकरे आणि पवारांमधले मतभेद चव्हाट्यावर, केंद्राला तपास सोपवल्यानं पवारांची नाराजी, सीएएलाही दर्शवला विरोध* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *मुंबई, ठाण्यातल्या बांग्लादेशी आणि अफगाणी घुसखोरांचा पर्दाफाश, दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये 9 जण ताब्यात, अवघ्या 2 हजारात आधार कार्ड बनवल्याची कबुली* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *अलिबाग रो-रो सेवेसाठी जहाज मुंबई बंदरावर, एक मार्चपासून सेवा होणार सुरू, तर मुंबई-पुणे मार्गावर धावणाऱ्या इलेक्ट्रिकल बसचा शुभारंभ* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *मुंबई : गर्भलिंग निदान चाचणीची निवड आणि पीसीपीएनडीटी कायद्याच्या उल्लंघनावरून सध्या चर्चेत असलेले कीर्तनकार इंदुरीकर महाराज आता शिक्षकांच्या बाबातीत उडवलेल्या खिल्लीमुळे पुन्हा एकदा वादात आले* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    *कमवा आणि शिका हेच उपयोगी* स्वतःच्या विकासावर कुटुंबाचे विकास अवलंबून असते. कुटुंबाच्या विकासावर गावाचा विकास आणि मग राज्य व देशाचा विकास होतो. या विकासासाठी शिक्षण हे अत्यंत महत्त्वाची बाब आहे. शिक्षणाशिवाय कोणाचेही विकास अशक्य आहे. शिक्षणामुळे दोन डोळ्याचे माणसे तिसऱ्या डोळ्याने डोळस होऊ शकतात. अन्यथा डोळे असून ही आंधळ्याची अवस्था होते. महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिक्षणाचे महत्त्व सांगताना......... वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/06/blog-post_86.html      लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃  *काव्यांगण - रोज एक बालकविता* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *"थंडी "* सौ. सरोज सुरेश गाजरे, भाईंदर मोबा. नं ९८६७३९४००१ अंग अंग कुडकुडतंय, बघ ना गं आई ! पडली आहे माघातली खूपच"थंडी" लवकर लवकर घाल गं मला ऊबदार असं स्वेटर अन बंडी //१// सकाळी सकाळी मला शाळेत जावेसे ना वाटे मस्त पांघरूणात पहुडावेसे वाटे //२// बघ ना गं अंगणात पेटल्यात शेकोट्या आम्हाला मात्र शाळेच्या खेळाव्या लागती आट्यापाट्या //३// गंधितसा गारवा मोह पडे नीजेला चिंचा, बोरं, गाजरं हुरडा मिळे खायला //४// *सौजन्य :- जि. प. प्रा. कन्या शाळा धर्माबाद* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *" भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो, रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो. "* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *नागार्जुनसागर हे धरण कोणत्या नदीवर बांधले आहे ?* कृष्णा नदी,आंध्रप्रदेश 2) *भारतातील सर्वात उंच वृक्ष कोणता ?* देवदार 3) *रिलायन्स उद्योग समूहाचे संस्थापक कोण होते ?* धीरुभाई अंबानी 4) *सातपुडा पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणते ?* धुपगड 5) *राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या कोणी केली ?* नथुराम गोडसे *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 अशोक गायकवाड, सहशिक्षक, बिलोली 👤 दत्ता एम. भोसले, शिक्षक, बिलोली 👤 जनाबाई निलपत्रेवार, शिक्षिका, धर्माबाद 👤 बाबूराव बोधनकर, सहशिक्षक, करखेली 👤 किरण गौड, धर्माबाद 👤 घनश्याम नानम, धर्माबाद *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *बहुतेक लोक त्यांच्या व्यक्तिमत्वाविषयी संतुष्ट नसतात. आपल्यात कशाची तरी उणीव असल्याची भावना त्यांना बोचत असते. आणि मग आजच्या ह्या स्पर्धेच्या जगात टिकून राहण्यासाठी ते सेल्फ-हेल्प प्रकारातील पुस्तके वाचतात. वयक्तिक समुपदेशन करून घेतात, धार्मिक प्रवचने ऐकतात, योगसाधना करतात, फिट रहावे म्हणून जिमखान्यात जातात, आकर्षक दिसण्यासाठी मेक-ओव्हर करून घेतात.*  *जीवनात यशस्वी होण्यासाठी सगळ्यांची सारखी धडपड सुरू असलेली आपण पाहतो. पण जीवनात यशाबरोबर अपेक्षित सुख प्राप्त होतेच असे नाही आणि वाढती समृद्धी हीदेखील असमाधानाचे एक कारण बनू शकते. म्हणून व्यक्तिमत्वाचा विकास शारीरीक गरजा भागवणे आणि मनाच्या आकांक्षा पूर्ण करणे एवढ्यापुरता मर्यादित राहू शकत नाही. शरीर आणि मनाबरोबर त्यात आत्माही आला पाहिजे. आपल्या आत्म्याचे पोषण आवश्यक आहे. आपली आत्मिक वाढ महत्वाची आहे. शरीर, मन आणि आत्मा ह्यांचे संतुलन राखणे गरजेचे आहे.*           ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●••     💥💥💥💥💥💥💥💥💥      *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*          📱 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• मित्रांनो, होगा मसीहा सामने तेरे, फिर भी न तू बच पाएगा  तेरा अपना खूनही आखिर तुझ को आग लगाएगा  आसमान में उडनेवाला मिट्टी में मिल जाएगा  कबिरा गर्व न कीजिए, काल गहे कर केस। ना जानौ कित मारिहै, क्या घर क्या परदेस।। जीवन कसे क्षणभंगुर आहे याची वारंवार आठवण करून देतांना कबीर नेहमी सांगतात की बाबांनो हे नश्वर आहे. पुढच्या क्षणी काय होईल हे कुणाला माहीत नाही. यासाठी माणसाने मिळालेल्या जीवनात कुठल्याही गोष्टींचा गर्व करू नये. संत कबीर म्हणतात मृत्यूच्या तावडीतून तुमची सुटका नाही, तुमची शेंडी नेहमी त्याच्या ताब्यात असते.या मृत्यूने किती लोकांना गिळले याची गणती करता येणार नाही. माणूस कुठेही असो हा त्याचा पाठलाग करत असतो.आणि जेव्हा पाहिजे तेव्हा अलगत कवेत घेतो.तो घरात असो वा परदेशात तो शोधूनच काढतो.माणसाला ज्या ज्या गोष्टींची घमेंड आहे त्या सर्व क्षणार्धात नाहीशा करण्याची ताकद मृत्यूत आहे.सगळं येथेच सोडून जावे लागते. माणसाने आपले यौवन,संपत्ती किंवा सौंदर्य यांचा तर अभिमान बिल्कुल बाळगू नये. कारण हे पंचतत्वापासून बनलेले शरीर नश्वर आहे.शेवटी काय तर तुलसीदासाच्या म्हणण्यानुसार, हम हम करि धन धाम सवॉरे,अंत चले उठि रीते। खाली हाथ आया है, खाली हाथ जायेगा। अशोक कुमावत (राष्ट्रपती पुरस्कार विजेते) 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• अज्ञानाला दूर घालवायचे असेल,दु:खाला दूर करायचे असेल,आपल्या मनातील रागावर नियंत्रण ठेवावे वाटत असेल,इतरांना आपलेसे करावे वाटत असेल,अवघड समस्येतून मार्ग काढायचा असेल आणि जीवन सुखी व समृद्ध व्हावे असे वाटत असेल तर त्यावर एक आणि एकच सर्वोत्तम मार्ग आहे तो म्हणजे ज्ञानाचा. ज्यांनी ज्ञानाचा मार्ग स्वीकारला आहे त्यांनी ह्या सा-या गोष्टीतून ज्ञानाच्या सहाय्याने सहज मारली काढून जीवन सुखी व समृद्ध केले आहे.ज्यांनी स्वीकारला नाही त्यांना त्यांच्या जीवनात कधीही सुखी होता आले नाही.ते जवळ असलेल्या सुखालाही मुकले आहेत कारण त्यांच्याजवळ ज्ञानाची जोड नव्हती म्हणून.या जगात सर्वश्रेष्ठ जर काय असेल तर ते ज्ञान. जीवनातील अज्ञानाला दूर करण्याचे सामर्थ्य केवळ ज्ञानातच आहे हे कधीही विसरुन चालणार नाही. ©व्यंकटेश काटकर,नांदेड संवाद...९४२१८३९५९०. 🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *बळी तो कान पिळी* एकदा प्राण्यांमध्ये रोगाची साथ सुरू होऊन हजारो प्राणी मरू लागले. आपण फार पाप केल्यामुळे देवाने हा कोप केला आहे असे सर्व प्राण्यांना वाटून त्यांनी आपली वाईट कृत्ये कबूल करायचे ठरविले व जो सर्वात मोठा अपराधी ठरेल त्याने देवाच्या कोपाला शांत करण्यासाठी बळी जावे असे ठरले. ठरल्या वेळी सगळेजण हजर झाले व न्यायाधीशाच्या जागी एकमताने कोल्ह्याची निवड केली गेली. प्रथम सिंहाने पुढे होऊन कबुली दिली, ‘मी फार गरीब कोकरांना ठार मारलं. त्यावर न्यायाधीश म्हाराज मोठ्या गंभीरतेने म्हणाले, ‘एखाद्या सामान्य प्राण्याने अशा गोष्टी केल्या असत्या तर नक्कीच मोठा अपराध ठरला असता. पण महाराजांना इतरांपेक्षा जास्त सवलती असतात. बकर्‍या खाणं हा काही मोठा अपराध नाही.’ या निकालामुळे हिंस्त्र प्राण्यांनी कोल्ह्याची तारीफ केली. यानंतर वाघ, चित्ता, अस्वल वगैरे प्राण्यांनी आपापल्या कबूली दिल्या व कोल्ह्याने वरीलप्रमाणेच निकाल दिला. शेवटी एक गरीब गाढव पुढे येऊन म्हणाले, ‘एका शेतकर्‍याच्या इनाम जमिनीतलं मूठभर हिरवं गवत मी खाल्लं. आणि त्याबद्दल मला पश्चात्ताप’ काय पश्चात्ताप ?’ न्यायाधीश झालेले कोल्होबा ओरडले. ‘अरे पाप्या नक्कीच तुझ्या पापामुळे सध्या हा देवाचा कोप झालेला आहे. यालाच मरणाची शिक्षा योग्य आहे !’ असा निकाल कोल्होबांनी देताच सगळ्यांनी मिळून त्या बिचार्‍या गाढवाला ठार मारले. *तात्पर्य: बळी तो कान पिळी.समाजात सत्याने वागत असलेल्यांची हेच गत आहे.* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00          ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 14/02/2020 वार - शुक्रवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    *व्हॅलेन्टाईन्स डे* 💥 ठळक घडामोडी :-  ● १९२४ - संगणक तयार करणारी कंपनी आय.बी.एमची स्थापना. ● १९८९ - भोपाळ दुर्घटना - युनियन कार्बाइडने भारत सरकारला ४७,००,००,००० अमेरिकन डॉलर नुकसान भरपाई देण्याचे कबूल केले. 💥 जन्म:- ● १९३३ - मधुबाला, हिंदी चित्रपट अभिनेत्री. 💥 मृत्यू :- ● १९८९ - जेम्स बॉन्ड, अमेरिकन पक्षीशास्त्रज्ञ. ● १९८९ - जेम्स बॉन्ड, अमेरिकन पक्षीशास्त्रज्ञ. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *पाच दिवसांच्या आठवड्यावरुन सरकारचे मंत्री आमनेसामने, बच्चू कडूंचा घरचा आहेर, तर निर्णयामुळे सरकारचा एक दिवसाचा खर्च वाचल्याचा गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *औरंगाबाद महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंचा दौरा, मनसैनिकांची बाईक रॅली, संभाजीनगरचेही बॅनर झळकले, बॅनरवर राज यांचा हिंदूत्व नायक असा उल्लेख* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *चीन सराकरनं 50 हजार कोरोनाग्रस्तांना जाळल्याची माहिती सोशल मीडियावर व्हायरल तर जपानच्या जहाजावरील भारतीयांचे जीव वाचवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना साकडं* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *पाणी पिण्यासाठी विशेष घंटा वाजवण्याआधी पालिका शाळांमध्ये स्वच्छ पाणी पुरवा : हायकोर्टचे सरकारला निर्देश* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *मुंबईत अंधेरी पूर्वेतील एमआयडीसी परिसरात रोल्टा टेक्नॉलॉजी पार्क इमारतीमध्ये मोठी आग लागली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 18 गाड्या दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम युद्धस्तरावर सुरु आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *देशातील पहिल्या सामाजिक क्रांतीचे उद्घोषक महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांना 'भारतरत्न' या सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरविण्यात यावे, अशी मागणी काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई यांनी राज्यसभेत केली.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *लुसान : भारतीय संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग याला आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचा सर्वोत्तम पुरुष हॉकीपटूचा पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार पटकावणारा मनप्रीत हा भारताचा पहिला हॉकीपटू ठरला आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *व्हॅलेंटाईन दिनानिमित्त प्रासंगिक लेख* *जगाला प्रेम अर्पावे .....!* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2018/02/blog-post.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃  *काव्यांगण - रोज एक बालकविता* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *गाव लळा* - अरुण थोरात ,कन्नड जि. औ. बाद 9373787370 माझ्या गावाच्या घरात सुख गोकुळ भरल काळजा काळजात ब्रम्हकमळ फुलल गावच्या अंगणाला शोभा सडा रांगोळी ची साधु संतां च्या पद स्पर्शान रोज पावन माती माझ्या गावाच्या अळीत जनु गोकुळ नांदते पीठ भाकरी ऊसणवारीत आपुलकी सांधते गावाच्या देऊळात भावभक्ती च्या दिवावाती मंद प्रकाशात उजळती बंधुभाव काळजाची नाती काळजाची नाती माती समता ममतेच दर्शन नाही आल कधी जात पातीत विघण माझा गावाची शाळा पीढ्या पिढ्यांचा मायलळा राष्ठीय सणवारा सारा गाव होतो गोळा माझ्या गावाच गावपण माणुसकीच जिवंतपण येथे घेतला जन्म बांधिन सुवर्ण तोरण *सौजन्य :- जि. प. प्रा. कन्या शाळा धर्माबाद* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *" अंतरमनात कितीही संघर्ष असला तरी, चेहर्यावर हास्य दाखविणे हाच, जीवनातील सर्वश्रेष्ठ अभिनय* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *चाकाचा शोध कोणत्या युगात लागला ?* नवाश्म 2) *विदर्भातील सर्वात मोठे शहर कोणते ?* नागपूर 3) *भारतातील सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी कोणती ?* नर्मदा 4) *जिथे आकाश जमिनीला टेकल्यासारखे दिसते त्या ठिकाणाला काय म्हणतात ?* क्षितिज 5) *'गड आला पण सिंह गेला' हे उद्गार शिवाजींनी कोणाबद्दल काढले ?* तानाजी मालुसरे *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 श्री. विकास गोविंद बडवे नातेपुते जि. सोलापूर 👤 सतीश कुरमे, सहशिक्षक, माहुर 👤 धनराज जाधव, सहशिक्षक, वाशिम *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मान मागावा लागत नाही, तर तो मिळत असतो. त्यासाठी आवश्यकता असते ती पात्रतेची. आता पात्रता नसेल तर मान मिळण्याची इच्छा करून काय उपयोग? अपात्र माणसाला लोक मान कसा देतील? रिकाम्या माणसाला लोक खुर्ची देणार नाहीत. मला स्टेजवर पाहुणा म्हणून बसवा म्हणल्यानं लोक बसवणार तर नाहीतच; उलट 'काय हलकट माणूस आहे?' असं म्हणून अपमान करतील. पात्रतेवाचून मान मिळवण्याची इच्छा करणे म्हणजे अपमान करून घेणे होय. मुळात 'इच्छा' अपमान ओढवते. मानासाठी हापापलेली अनेक माणसं आपल्या अवती-भोवती पाहायला मिळतात. मान मिळाला नाही म्हणून 'बोहल्यावर' रुसून बसणारे नवरदेव आपण पाहिले असतील.* *राजकीयच काय पण सामाजिक, धार्मिक स्टेजवरही मान-पानावरुन लोक हाणामारी करायलाही मागेपुढे पहात नाहीत. मानाची तीव्र इच्छा हे सर्व घडवत असते. तुकोबा म्हणतात, "जो लोकांकडून मान मिळवण्याची इच्छा करतो, तो यामुळं 'हलकट' ठरत असल्याने त्याचा अपमान होतो. असा हा अभागी माणूस जिथं जाईल तिथं त्याच्यासोबत अपयश असते." म्हणून, अपमान करून घ्यायचा नसेल तर मान मिळण्याची इच्छा करू नये. 'निरपेक्ष वृत्तीने' काम करत राहा. लोक स्वतःच तुम्हाला खुर्चीवरच काय डोक्यावर बसवतील.* *॥ रामकृष्णहरी ॥* 🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱 *--संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• मित्रांनो, काल एका महान कादंबरीकारचा जन्मदिवस होता,त्या निमित्ताने त्याच्या अंतरंगातील काही गोष्टी आपल्या सगळ्यांना वेगळी दिशा देतील असे वाटते. तो महान कादंबरीकार म्हणजे जॉर्ज मेरिडिथ. जगाला आवडेल ते कराल तर एक “product” म्हणून रहाल आणि जर स्वताला आवडेल ते कराल तर, एक “Brand” म्हणून जगाल. असा ब्रँड म्हणून सदैव स्मरणात राहिलेला जॉर्ज मेरिडीथ ,नोबेल पुरस्कार पासून वंचित राहिला,पण लेखनाला आणि जनसामान्यांना त्याने कधी पारख केलं नाही. पोर्ट्समथमध्ये जन्मलेला जॉर्ज मेरिडिथ हा व्हिक्टोरियन काळातला एक महान ब्रिटिश कादंबरीकार आणि कवी म्हणून ओळखला जातो. त्याच्या बऱ्याच कविता निसर्गापासून स्फूर्ती घेतलेल्या असत. त्याच्या कादंबऱ्या उत्कृष्ट संवादशैली आणि शब्दांच्या नेमकेपणासाठी प्रसिद्ध होत्या. त्याच्या कादंबऱ्यांमधून त्या काळच्या जीवनशैलीचं यथार्थ आणि वास्तववादी दर्शन घडतं. मुख्य म्हणजे स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीनं स्थान असावं या मताचा तो पुरस्कर्ता होता. त्याची एक-दोनदा नव्हे तर सातवेळा साहित्याच्या ‘नोबेल’साठी शिफारस होऊनही संधी हुकली होती.  लेखनाच्या सुरुवातीच्या काळात तो कविताच लिहायचा; पण त्याला खरी प्रसिद्धी लाभली ती ‘दी शेव्हिंग ऑफ शॅगपत’ या त्याच्या एका सुरस आणि अद्भुत कादंबरीमुळे! शिबली नावाच्या एका पर्शियन न्हाव्याने जुलमी सुलतानाची हजामत केल्याची धमाल कथा सांगणारी ही अरेबियन नाइट्स धर्तीची कादंबरी वाचकांना आवडून गेली होती. त्याच्या पुढच्या ‘दी ऑर्डियल ऑफ रिचर्ड फिव्हरल’ या कादंबरीचंसुद्धा लोकांनी चांगलं स्वागत केलं. मेरिडिथला एव्हाना विनोदप्रचुर लिहिणं जमायला लागलं होतं. त्याची पुढची ‘इव्हान हॅरिंग्टन’ ही एका शिंप्याच्या मुलाच्या प्रेमाची कथा सांगणारी कादंबरीही लोकांना आवडली.   एमिला इन इंग्लंड, ऱ्होडा फ्लेमिंग, व्हिट्टोरिया, दी अॅडव्हेंचर्स ऑफ हॅरी रिचमंड, दी हाउस ऑन दी बीच, दी टेल ऑफ क्लो, दी अमेझिंग मॅरेज, दी इगोइस्ट अशा त्याच्या अनेक कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत. १८ मे १९०९ रोजी सरेमध्ये त्याचा मृत्यू झाला. मेरिडिथ च्या कार्याला सलाम. अशोक कुमावत (राष्ट्रपती पुरस्कार विजेते) 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आयुष्याची खरी सुरुवात तर तुमच्या वाडवडिलांच्या ख-या पुण्याईने सुरु झाली.जीवनाचा ' मध्य ' तर तुमच्या कर्तृत्वाने सिद्ध करायचा आहे.तो तुम्हाला चांगला करायचा आहे की,वाईट हे तुम्हालाच ठरवायचे आहे.कारण हे मात्र तुमच्या हातात आहे.यासाठी तुम्हाला कुणाच्या भरवशावर बसता येत नाही किंवा नशिबावर अवलंबून राहता येत नाही.म्हणून तुमच्या जीवनातला मध्यच महत्त्वाचा आहे.आणि शेवट मात्र आपल्या हाती नाही.भविष्यात केव्हा काय घडेल याचे काही ठामपणे सांगता येत नाही.म्हणून जे आज आणि आता तुमच्यासमोर आहे ते सत्य आहे ते स्वीकारा आणि त्याला कौशल्याने, धैर्याने आणि परिस्थितीनुरूप उत्तर द्यायला पुढे रहा.यातच तुमच्या जीवनाचे खरे सार आहे. *व्यंकटेश काटकर,नांदेड.*   संवाद..९४२१८३९५९०/             ८०८७९१७०६३ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *एकीचे बळ* एका गावातील एक सुतार रोज जंगलात जात असे. एकदा त्याने खड्डय़ात पडलेल्या जंगली कुत्र्याच्या पिल्याचा जीव वाचवला तेव्हापासून त्याला त्या पिलाचा लळा लागला. ते पिलू त्याला तेथे भेटत होते. ते पाहून इतरही जंगली कुत्रे त्याच्याजवळ येत असत. परंतु त्यांना सर्वाना एका वाघाने फार त्रस्त करून सोडले होते. तो रोज त्यांच्यावर हल्ले करत होता. सुताराने एक योजना बनविली. नेहमीप्रमाणे वाघ डोंगराच्या माथ्यावर आला. सर्व कुत्री वेगवेगळ्या ठिकाणी थांबून त्याच्यावर भुंकू लागली. वाघाने चवताळून एका कुत्र्यावर झेप घेतली तसा तो कुत्रा खाली बसला. वाघाची उडी थेट त्या कुत्र्याच्या मागे असणार्‍या एका मोठय़ा खड्डय़ात पडली. सगळ्या कुत्र्यांनी त्याच्यावर धाव घेतली व त्याच्यावर हल्ला करून त्याला ठार केले. *तात्पर्यः एकञितपणे शक्ती दाखवली तर कोणतेही अशक्य कार्य शक्य होते.एकीचे बळ महान असते..* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00          ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 13/02/2020 वार - गुरूवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    💥 ठळक घडामोडी :-  ● २०१० - पुणे येथे दहशतवाद्यांनी बॉम्बस्फोट घडवून आणला. १७ ठार, ६० जखमी. 💥 जन्म :; ● १८७९ - सरोजिनी नायडू, बंगाली कवियत्री. १९६९ - सुब्रोतो बॅनर्जी, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- ● २०१२ - अखलाक मुहम्मद खान ऊर्फ कवी शहरयार, ज्ञानपीठ पुरस्कारविजेते उर्दू कवी, गीतकार. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *सरकारी कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा, राज्य सरकारचा मोठा निर्णय पण रोज 45 मिनिटं अधिक काम करावं लागणार, 29 फेब्रुवारीपासून अंमलबजावणी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *मराठवाड्यातील वॉटरग्रीड प्रकल्प रद्द होणार नाही, मंत्री अमित देशमुख यांची माहिती, टप्प्या-टप्प्यानं योजना राबवणार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *मंत्र्यांच्या बंगल्यांच्या नुतनीकरणासाठी कोट्यवधींची उधळपट्टी, 31 बंगल्यांसाठी तब्बल 15 कोटी खर्च, विरोधकांचं सरकारवर टीकास्त्र* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *विनाअनुदानित गॅस सिलिंडरच्या दरात 145 रुपयांची वाढ, दरवाढीविरोधात काँग्रेस आक्रमक, महिला कार्यकर्त्यांचं आज देशभरात आंदोलन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *बीडमध्ये पहिल्या वृक्ष संमेलनाची सुरुवात, अभिनेते सयाजी शिंदेंच्या सह्याद्री देवराईचा उपक्रम, झाडे जगवण्यासाठी मोहीम* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *पुणे: राज्यातील सर्व महाविद्यालयांमध्ये येत्या १९ फेब्रुवारीपासून राष्ट्रगीत सक्तीचे, महाविद्यालयाच्या कामकाजाची सुरुवात राष्ट्रगीत गायनाने व्हावी, असे निर्देश सर्व महाविद्यालयांना देण्यात आले आहेत, अशी माहिती राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये पहिली ते दहावीपर्यंत मराठी विषय बंधनकारक करण्यात येणार आहे. यासंबंधीचं विधेयक येत्या विधीमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंजूर करण्यात येणार आहे. उद्योग आणि मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी दिली माहिती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••              *अति क्रोध करू नये* http://nasayeotikar.blogspot.com/2018/03/14.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃  *काव्यांगण - रोज एक बालकविता* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *पाऊस* ... 🍁 *अलका कुलकर्णी* 🍁 पाऊस पाऊस नुसता पाऊस झरझर धारा रे... घमघमते अत्तर मातीचे दरवळ न्यारा रे... पहिला पाऊस आहे ढोंगी दराराच येण्याचा जंगी आई यंदा नवा हवा गं रेनकोट रंगीबेरंगी चिंब भिजूया तू आणिक मी वेचू गारा रे... सोडू कागद होडी या रे कपडे ओले करू नका रे वेचून घेऊ थेंब ओंजकी तळे साचले या ना सारे धूळ वादळे विजा कडाडे पिसाट वारा रे.. सरीसरींचा नाच अंगणी थपथप थपाक पाऊस गाणी न्हाऊ घाला मला ढगांनो शॉवर चालू केला कोणी स्वैर नाचू दे मोर मनाचा फुलव पिसारा रे.. *सौजन्य :- जि. प. प्रा. कन्या शाळा धर्माबाद* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *"यश" हे "सोपे," कारण ते कशाच्यातरी* "तुलनेत" असते, पण "समाधान" हे "महाकठीण", कारण त्याला "मनाचीच परवानगी" लागते..* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *जगातील सर्वात प्रतिष्ठेचा पुरस्कार कोणता ?* नोबेल पुरस्कार 2) *अरुणाचल प्रदेशचे जुने नाव काय होते ?* नेफा 3) *जगातील सर्वाधिक कर असलेला देश कोणता ?* नार्वे 4) *मध्यप्रदेशची उन्हाळी राजधानी कोणती ?* पचमढी 5) *भारतातील सर्वात संपन्न राज्य कोणते ?* पंजाब *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 देवीसिंग ठाकूर, धर्माबाद 👤 नागनाथ भद्रे, धर्माबाद 👤 अशोक पाटील, धर्माबाद 👤 👤 👤 👤 👤 👤 👤 👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *ज्याच्या मुखात भगवंताचे नाम आहे तो विनम्रतेने जगात संचार करतो. अहंकाराचा वारा त्याला स्पर्श करू शकत नाही आणि विरोधी लोकही त्याबद्दल आवाज उठवू शकत नाहीत. असे सर्वश्रेष्ठ नाम सर्वांनी घेतले पाहिजे. त्यात असणारे सामर्थ्य अमाप आहे. आत्मशांती, आत्मशक्ती, आत्मसुख, आणि आत्मानंद या शब्दांच्या अर्थ शोधार्थ कितीही ग्रंथ धुंडाळले तरी हाती काही लागणार नाही. उलट या शब्दांचा अर्थ अनुभूतीतून कळतो. म्हणून संत म्हणतात की, नाम घ्यावे आणि हा भवसिंधू तरूण जावा.* *ज्ञानमार्ग, योगमार्ग, कर्ममार्ग हे सहज पेलता न येणारे विषय आहेत; तसे नाममार्गाचे नाही. नाम हाच धर्म व कर्म हे ज्याला कळले तो सहज नामसाधना करू शकतो. येता-जाता, बसता-उठता जर नामजप घडला, तर मन आणि प्राण एक होतील आणि चैतन्यस्वरूपाचा आविष्कार दिसेल. अविद्येचा म्हणजे आज्ञानाचा भेद नामोच्चाराने दूर होतो. एखादा माणूस झोपेत असताना त्याला जर आपण त्याच्या नावाने आवाज दिला, तर तो खडबडून जागा होतो. तशी जाग आणण्याचे काम नाम करते. ह्रदयस्थित भगवंताला आपलेसे करण्याकरिता नामजपाशिवाय दुसरा सुलभ मार्ग नाही.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 💥💥💥💥💥💥💥💥💥 *संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• मित्रांनो रोजच्या वर्तमानपत्रात सध्या हिंगणघाट येथील प्राध्यापिका स्व.अंकिता पिसुड्डे यांच्या वेदनांचा हुंकार प्रत्येक जण आपापल्या परीने मांडतोय,निषेध, मोर्चा,शोकसभा,अशा अनेक प्रकारे समाजातील हे विकृत स्वरूप मांडतोय. पण एव्हढ्याने या रोज घडणाऱ्या घटना संपणार आहेत का? या विषारी विचारांवर जालीम उपाय शोधायचा असेल तर फक्त आणि फक्त संस्कार व पुरुषी मानसिकता बदलणे हेच होय. आज झी टी. व्ही.वरील चला हवा येऊद्या मधील श्रेया बुगडे अनेक वर्षांपासून पुरुषांबरोबरीने एकटी काम करतेय, तिच्यातील प्रगल्भता वाखाणण्याजोगी आहे.तिचा हेवा वाटावा असे काम ती करतेय. दोन फेब्रुवारी १९८८ रोजी श्रेया बुगडेचा जन्म झाला. श्रेया बुगडे हा छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध चेहरा. श्रेया मूळची पुण्याची आहे. बालपणापासूनच हुषार असलेली श्रेया कमी वयातच या इंडस्ट्रीत आली. बालनाट्यातून कमी वयातच तिने आपल्या अभिनयाची जादू दाखवून दिली. आठवीत असताना बाललैंगिक शोषणावर ‘वाटेवरच्या काचा गं’ हे छोटेसे प्रबोधनपर नाटक तिने केले होते. या नाटकाचे प्रयोग करण्याकरिता श्रेया इतरांबरोबर सगळीकडे फिरली.  शाळेचं शिक्षण पूर्ण होईपर्यंत श्रेयाने अनेक बालनाट्यात काम केलं होतं. कॉलेजला गेल्यानंतर कॉलेजसाठी काही तरी करायचं अशा विचारातून तिनं कॉलेजच्या अनेक एकांकिका, नाट्यस्पर्धांत भाग घ्यायला सुरुवात केली. कॉलेजमध्ये असताना मराठीतच नाही, तर गुजराती नाटकांमध्येही तिने काम केले आहे. त्यानंतर तिला मालिकांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. तू तिथे मी, अस्मिता, माझे मन तुझे झाले, फु बाई फू अशा अनेक मालिकांमध्ये श्रेयाने व्हिलन, सेकंड लीड रोल साकारले आहेत; मात्र खलनायिका रंगवणारी श्रेया विनोदी अभिनयसुद्धा तितक्याच ताकदीने साकारू शकते हे ‘चला हवा येऊ द्या’च्या माध्यमातून लोकांना कळले. अशोक कुमावत (राष्ट्रपती पुरस्कार विजेते) 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आनंद हा आनंदच असतो. आनंदाला कोणीही सहज स्वीकारतो. त्याचा कोणीही तिरस्कार करत नाही. जेथे सुख, समाधान, शांती आहे तेथे आनंद आनंदाने नांदत असतो. पण जेथे वाद, नैराश्य, दुःख, अस्थिर मन आहे तेथे आनंद संचार करत नाही. आनंदाला जवळ करायचे असेल तर मनातून त्याला हसत मुखाने व कोणत्याही कठीन परिस्थितीत स्थीर मनाने स्वीकारावे. इतरांच्या आनंदात सहभागी होऊन त्यात आनंद मिळवता येतो. त्यासाठी आपणही आनंद प्राप्त करण्यासाठी प्रयत्नशील असायला पाहिजे. कारण आनंद हा चांगल्या प्रयत्नाने आणि सातत्याने केलेल्या कामात व मनाच्या समाधानात मिळत असतो.तो कुणालाही विकत घेता येत नाही. - व्यंकटेश काटकर,नांदेड.   संवाद.9421839590. 🌷🍃🌷🍃🌷🍃🌷🍃🌷🍃🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *समाधानकारक वृत्तीने जगावे....* एक श्रीमंत सावकार होते , अलोट संपत्ती होती , पुढील सातपिढ्या जरी बसून खाल्या तरी संपणार नाही एवढी संपत्ती मिळवली होती, तरी पण हा श्रीमंत सुखी नव्हता . मनात काहीतरी विवंचना होती त्यामुळे रात्रभर झोप यायची नाही त्यामुळे खऱ्या सुखाला तो वंचित झाला होता. त्याने प्रत्येकाला विचारावे मी काय करू म्हणजे या विवंचनेतून मी सुटेन आणि मला सुखाची झोप लागेल ! त्याला कोणीतरी सांगितले तू संताना शरण जा म्हणजे संतचं यातून तुला सोडवतील . श्रीमंत संतांच्या शोधार्थ निघाला वाटेत एका झाडाखाली एक साधु महाराज बसले होते त्याना नमस्कार करून श्रीमंत म्हणाला महाराज मला काहीही कमी नाही पुढील सात पिढ्या बसुन खातील एवढं मिळवलं आहे तरी मी सुखी नाही, एक विवंचना मला झोप येवु देत नाही त्यामुळे मी सुखी नाही. साधु महाराज म्हणाले आधि विवंचना काय आहे ते सांग म्हणजे त्यातून कसे सुटायचे ते सांगतो , श्रीमंत म्हणाला महाराज तसं म्हणाल तर मला काहीही विवंचना नाही पण एकच विवंना आहे आणि ती म्हणजे माझ्या आठव्या पिढीचे काय होईल ? कारण सात पिढ्याचे कमवून ठेवले आहे चिंता आहे ती आठव्या पिढिची ! साधु महाराज हसले आणि म्हणाले काळजी करु नकोस मी तुला यातून सोडवतो . साधुनि त्याला एक किलोभर तांदळाची पिशवी दिली आणि सांगितले की त्या डोंगरावर एक म्हातारी एका झोपडीत राहते तिला हे तांदूळ देवून ये म्हणजे मी तुला तुझ्या विवंचनेतून मुक्त करतो . तांदूळ घेऊन श्रीमंत म्हातारीच्या झोपडीत आला ज्या झोपडीला दार सुद्धा नव्हते. ती भगवंताच्या भजनात दंग होती, तिची भावसमाधी लागली होती, श्रीमंताच्या पायाच्या आवाजाने आजीची भावसमाधी भंग पावली , तिने वर बघितले आणि म्हणाली का आलास बाबा ईथे ? तो म्हणाला म्हातारे तुला तांदूळ द्यायला आलो आहे हे घे मग मी जातो . ती म्हणाली कारे तुला मागीतले होते का ? तुझ्या समोर हात पसरला होता का ? नाही ना ? मग का आणलेस तांदूळ ? ही पिशवी उचल आणि चालायला लाग तो म्हणाला मला त्या झाडाखाली बसलेल्या साधुने पाठवले आहे म्हणून मी आलोय, ती म्हणाली त्या साधुला जाऊन सांग की अजून दोन दिवस पुरतील एवढे तांदूळ माझ्या झोपडीत आहेत . श्रीमंताने आपली अक्कल चालवली तो म्हणाला म्हातारे तिसर्‍या दिवसाला होतील राहू दे.ती म्हणाली माझ्या तिसऱ्या दिवसाची चिंता तुलाही नको आणि त्या साधुलाही नको त्याला सांग माझ्या तिसर्‍या दिवसाच्या तांदळाची चिंता मी ज्याच्यावर सर्वस्वाचा भार टाकून या निर्जन स्थळी भजन करत बसलेय त्याला आहे. हे ऐकून श्रीमंत पिशवी घेऊन परत आला आणि साधु समोर पिशवी ठेवून निघाला. साधुने त्याला हाक मारली अरे ! विवंचना घेऊन आला होतास ना ? मी तुला त्यातुन सोडवणार आहे. श्रीमंत खाली मान घालून म्हणाला महाराज मला उत्तर मिळाले तिसऱ्या दिवसाच्या तांदळाची चिंता न करणारी म्हातारी जेवढी सुखी आहे तेवढा मी महामूर्ख दुःखी आहे. तात्पर्यःसुख कशात आहे हे ओळखले पाहिजे,व उद्याची चिंता करण्यापेक्षा आजचा दिवस आनंदाने कसा जाईल हेच पाहीले पाहिजे. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00          ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 12/02/2020 वार - बुधवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    संकष्ट चतुर्थी 💥 ठळक घडामोडी :-  ● १९७६ - पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या हस्ते हडेक्की (केरळ) प्रकल्प देशास अर्पण. ● २००३ - आवाजापेक्षा दुप्पट वेगाने स्वनातीत जाणाऱ्या जहाजविरोधी ब्राह्मोस क्षेपणास्त्राची ओरिसाच्या किनाऱ्यापासून दूरवर खोल बंगालच्या उपसागरात यशस्वी चाचणी घेण्यात आली. 💥 जन्म :- ● १७४२ - नाना फडणवीस, पेशवाईतील नामवंत मुत्सद्दी. ● १८०९ - अब्राहम लिंकन, अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचा १६वा राष्ट्राध्यक्ष. ● १९४९ - गुंडप्पा विश्वनाथ, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- ● १७९४ - महादजी शिंदे, पेशवाईतील मुत्सद्दी. ● १९९८ - पद्मा गोळे कवयित्री. ● २००० - विष्णुअण्णा पाटील, सहकार क्षेत्रातील नामवंत नेते. ● २००१ - भक्ती बर्वे, मराठी अभिनेत्री. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *नवी दिल्लीः दिल्ली विधानसभा निवडणुकीतील सर्व ७० जागांचे निकाल जाहीर झालेत. निवडणुकीत 'आप' ६२ जागा जिंकल्या. तर भाजपला फक्त ८ जागा जिंकता आल्या. काँग्रेसने तर भोपळाही फोडला नाही. काँग्रेसने एकही जागा निवडणुकीत जिंकलेली नाही.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *कोकण मंडळाची ९,१४० घरांची लॉटरी महिनाभर लांबणीवर, लॉटरीतील घरे ही ठाणे, नवी मुंबई, कल्याण (पलावा) खोणी, शिरढोण अशा विविध ठिकाणी असतील.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याविरुद्धची निवडणूक याचिका हायकोर्टाने गुणवत्ताहीन ठरवून फेटाळली* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *सोलापूर-तुळजापूर महामार्गावर गॅस टाक्या घेऊन जाणाऱ्या ट्रकला आग लागली.. आणि ट्रकमधील गॅस टाक्यांचे एकामागोमाग एक स्फोट होऊ लागले* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *जगभरात अलर्ट ! चीनमध्ये कोरोना व्हायरसचं थैमान; आजपर्यंत 1011 जणांचा मृत्यू, कोरोना व्हायरसमुळे जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *सोलापूर : मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात रेल्वेचा ब्लॉक; 25 फेब्रुवारीपर्यंत 11 पॅसेंजर गाड्या रद्द* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *न्यूझीलंडने भारताला तिसऱ्या वनडे सामन्यात ही केले पराभूत, मालिका ३-० अशी सहजपणे खिशात टाकली* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *पाऊलवाट भाग 10 आराम हराम है ।* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2018/02/10.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃  *काव्यांगण - रोज एक बालकविता* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *सौजन्य :- जि. प. प्रा. कन्या शाळा धर्माबाद* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *" अपयश म्हणजे संकट नव्हे; आपल्याला योग्य मार्गावर आणणारे ते मार्गस्थ दगड आहेत. "* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *जगात नारळ उत्पादनात प्रथम क्रमांक कोणत्या देशाचा लागतो ?* भारत 2) *अयोध्या हे शहर कोणत्या नदीच्या काठावर वसले आहे ?* सरयु 3) *अग्निशामक यंत्रामध्ये कोणता वायू असतो ?* कार्बन डॉयऑक्सईड 4) *शुद्ध सोना किती कॅरेटचा असतो ?* 24 कॅरेट 5) *हॉपमॅन कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?* टेनिस *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 सौ. एम डी जोशी विषय शिक्षिका कन्या शाळा धर्माबाद 👤 सुनील कवडे, कुपटी, माहूर 👤 रविंद्र दुबिले, नांदेड 👤 विनोदकुमार भोंग, कोल्हापूर 👤 अशोक शिलेवाड, येवती 👤 विजयकुमार पवारे, कुंडलवाडी *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *संत कबीर यांनी मानवी जगण्यातल्या खोटेपणावर प्रहार करीत ख-या भक्तीची जाणीव आपल्या रचनांमधून करून दिली. त्या रचना फारच दिलासा देणा-या आहेत. कुणाचीही वेदना ही आपली सहवेदना झाली पाहिजे यावर भर देत संतानी जो विचार मांडला तो अमूल्य जीवनाचा विचार आहे. गुरूस्वरूप असणा-या संताबद्दल कबीर म्हणतात....* *संगत संतनकी कर ले।* *जनमका सार्थक कछु कर ले।* *उत्तम नरदेह पाया प्राणी इसका* *हित कछु कर ले ॥* *या सांगण्यातून कबीरांनी जीवनाचे सार्थक कशात आहे, हेच सांगितले. त्या सार्थकतेच्या पाठीमागे आपण केव्हा आणि कधी जाणार आहेत, याचा विचार जितक्या लवकर करता येईल तितक्या लवकर करायला हवा. संत हे कृपादृष्टी करणारे असल्याने त्यांच्याकडून कधीही कठोर वागणूक मिळणे अशक्य आहे. त्यांनी दाखविलेला मार्ग ही 'प्रकाशवाट' असते.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• ⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐ *--संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो* *देव पहावयासी गेलो देवच होऊनी आलो.* *देव देव्हाऱ्यात नाही,देव नाही देवालयी।* *देव शोधुनी पाहिलं अशी कोणाची पुण्याई।* *देवाचे खरे मंदिर कोणते - जेथे त्याला* *बंद दरवाज्यामागे* *कडी-कुलपात सुरक्षित ठेवले जाते* *ते ? जेथे प्रवेशासाठी तिकीट* *काढावे लागते ते ? जेथे* *आधिक पैसे देऊन लवकर दर्शन घेता येते ते ? की आपल्या घरातलाच तो* *पवित्र राखलेला एक कोपरा, जेथे आरती म्हटली जाते ?* *ज्या परमेश्वराने आकाश व पृथ्वी निर्माण केली तो मानवी हातांनी* *बांधलेल्या मंदिरात रहात नाही. त्याला तशा मंदिरांची गरज* *नाही.** *परमेश्वराचे खरे मंदिर आपणच आहोत; कारण त्याचा पवित्र आत्मा आपल्यात राहतो. आपल्या ह्रदयातील भव्य उपासना- मंदिराच्या परमपवित्र स्थानांत सर्वांना, अगदी अनिर्बंधितपणे जाता यावे ही एक सुंदर कल्पना आहे आणि ती लवकर साकार व्हावी. पण त्याआधी आपल्या अंत:करणावर आपण काय लिहिले आहे तेही बघितले पाहिजे. असे न होवो की, आपल्या अंत:करणावरची 'प्रवेश बंद' ची पाटी वाचुन परमेश्वर बाहेरच उभा राहिला असेल.* *देवाला शोधायचे असेल तर स्वतःमध्ये* *शोधा, नक्की सापडेल.* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते* ) 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्यातील अहंकाराने आपल्या  रागावर नियंत्रण कधीच ठेवता येत नाही आणि त्यामुळे आपल्या जीवनात अनेक कटू प्रसंग ओढवले जातात.त्या काळात काय होत आहे याचेही भान राहत नाही.जेव्हा आपल्यातील राग संपून जातो तरी अहंकारमात्र तसाच चिटकून राहतो. पुन्हा पुन्हा आपल्यातील अहंकार जागा होऊन तीच ती कृती करण्यासाठी प्रेरणा देतो.त्यामुळे आपल्या जीवनात खूप काही नुकसान सोसावे लागते.म्हणून आपला राग आणि अहंकार नष्ट करायचा असेल तर पहिल्यांदा आपल्यातील अहंकाराला तिलांजली द्यायला हवी नंतर आपोआपच आपल्यातील राग नष्ट होईल आणि हे दोन्ही आपल्या जीवनातून गेले की, जीवन सुखावह होईल. *व्यंकटेश काटकर,नांदेड.*   संवाद..९४२१८३९५९०/             ८०८७९१७०६३. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मुंगी व कोशातला किडा* एकदा एक मुंगी आपले चिमूकले पोट भरण्यासाठी खाद्य शोधत फिरत असता तिच्या नजरेस कोशातून नुकताच एक किडा बाहेर पडलेला तिला दिसला. कोशातून बाहेर पडलेले त्याचे पाय तो हळूहळू हालवीत होता. ते पाहून मुंगी म्हणाली, ‘अरेरे, काय ही तुझी स्थिती ? मला वाटेल तिकडे फिरता येतं. पण तुला या कोशात बंदीवान होऊन दिवस काढावे लागतात. तेव्हा तुझ्या व माझ्या स्थितीत फारच अंतर आहे असं म्हटले पाहिजे.’ यावर किडा काहीच बोलला नाही. पुढे काही दिवसांनी ती मुंगी पुनः तेथे गेली असता त्या किड्याचे फक्त कवच मात्र तेथे पडले असून तो किडा कोठेतरी निघून गेला आहे असे तिला दिसते. ती इकडे तिकडे फिरत आहे तोच एक सुंदर पतंग आपल्या पंखांनी तिला वारा घालत असताना तिला दिसला. तो तिला म्हणाला, ‘अग, त्या दिवशी बंदिवान म्हणून तू माझी कीव करीत होतीस, माझ्यापेक्षा तुझी स्वतःची स्थिती बरी असं म्हणत होतीस, तोच कोशातला किडा मी आहे हे लक्षात घे. आपल्याला वाटेल तिकडे फिरता येतं अशी बढाई मारायची असेल तर खुशाल मार. तोपर्यंत मी सहज थोडा आकाशात फिरून येतो.’ इतके बोलून त्याने एक भरारी मारली व उंच आकाशात गेला. तात्पर्यः संकटात असलेला माणूस पुनः कधीही वर डोके काढणार नाही अशा समजुतीने त्याचा उपहास करून त्याच्याजवळ स्वतःच्या वैभवाबद्दल बढाई मारणे हा मूर्खपणा होय.प्रत्येकाच्या परिस्थितीत वेळेनुसार बदल होतात आणि परिस्थिती बदलते. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00          ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 11/02/2020 वार - मंगळवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    💥 ठळक घडामोडी :-  ● १८३० - मुंबईचे हंगामी राज्यपाल सर सिडने ब्रेकनिथ यांच्या अध्यक्षतेखाली सभा होऊन ऍग्री हॉर्टिकल्चरल सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना. ● १९७९ - पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी अंदमान निकोबार बेटावरील सेल्युलर जेल राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले. ● १९३३ - म. गांधी यांच्या हरिजन वीकली चा पहिला अंक प्रसिद्ध झाला. ● १९९९ - मध्यप्रदेश सरकारतर्फे दिला जाणारा लता मंगेशकर पुरस्कार प्रसिद्ध संगीतकार इलायराजा यांना जाहीर. 💥 जन्म :- ● १९४२ - गौरी देशपांडे, मराठी लेखिका. 💥 मृत्यू :- ● १९४२ - जमनालाल बजाज, प्रसिद्ध गांधीवादी कार्यकर्ते आणि बजाज उद्योगसमूहाचे प्रवर्तक. ● १९६८ - पंडित दीनदयाळ उपाध्याय, भारतीय जनसंघाचे अध्यक्ष. ● १९९३ - कमाल अमरोही, चित्रपटांचे निर्माते, प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *राज्य सरकारचं 24 फेब्रुवारीपासून 18 दिवसांचं अर्थसंकल्पीय अधिवेशन, 5 मार्चला महिला सुरक्षा कायद्यावर विशेष चर्चा, तर 6 मार्चला अर्थसंकल्प होणार सादर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *हिंगणघाट जळीतकांड खटल्यासाठी विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती, खटला जलद गतीने चालवण्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं आश्वासन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *अॅट्रॉसिटी कायद्यात केंद्र सरकारने केलेल्या दुरुस्त्यांवर सर्वोच्च न्यायालयाचं शिक्कामोर्तब, चौकशीशिवाय गुन्हा दाखल करता येणार, अटकपूर्व जामिनाचा मार्गही बंद* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण लागू करण्यास राज्ये बांधील नाहीत, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंकडून नाराजी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *पुणे: शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्यासंदर्भात पुण्यात राज्यस्तरीय महत्त्वपूर्ण बैठक संपन्न* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *मुंबईकर मुलीनं रचला इतिहास, सर्वात कमी वयात दक्षिण अमेरिकेतील सर्वात उंच शिखरावर केली चढाई* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *यंदाच्या ऑस्करमध्ये पॅरासाईटला सर्वाधिक 4 पुरस्कार, जोकरचा वॉकिन फिनिक्स ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता, तर ज्युडीसाठी लॉरा डर्नचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून गौरव* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••          *शतदा प्रेम करावे*    या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे ........ लेख वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लीक करावे https://shopizen.page.link/xzi3G8QQ9svMitc97 लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃  *काव्यांगण - रोज एक बालकविता* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *अंकांचे भांडण* - कवी शरद ठाकर सेलू जि परभणी अंक सारे शुन्याला एकदा चिडू लागले किंमत नाही म्हणून शुन्य रडू लागले जो तो आपली किंमत शुन्याला सांगू लागला मीच तुझ्या पेक्षा श्रेष्ठ म्हणत पांगू लागला शुन्याला अंकांनी असे बेजार करून सोडले तु एकदम निरर्थक म्हणून देवाकडे धाडले देव म्हणे शुन्याला तु  कुठे आहेस रे छोटा तुझ्या मुळे प्रत्येक अंक होत असतो मोठा मोठं करणारा दुस-याला छोटा कधीचं नसतो शुन्य मग आनंदाने गालातल्या गालात हसतो      *सौजन्य :- जि. प. प्रा. कन्या शाळा धर्माबाद* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *" मनगटातली ताकद संपली की, मनुष्य हातातील भविष्य शोधतो "* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आजची प्रश्नमंजुषा* 1) *अंतराळ संशोधन करणारी अमेरिकेची संस्था कोणती ?* नासा 2) *ऑलम्पिक ध्वजावरील कड्यांची संख्या किती ?* 5 3) *जगातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्ट कोणत्या देशात आहे ?* नेपाळ 4) *वाघा बॉर्डर कोणत्या राज्यात आहे ?* पंजाब 5) *जगातील एकमेव हिंदुराष्ट्र कोणते ?* नेपाळ *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 माधव हिमगिरे, उपक्रमशील शिक्षक कन्या शाळा, धर्माबाद 👤 सागर भागवत धामणे 👤 नचिकेत राज धामणे 👤 👤 👤 👤 👤 👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *कृषिसंस्कृतीत सापाला अनन्य स्थान आहे. वावरात साप दिसला की तो आपला राखणदार आहे, असं लोकमानस मानतं. शेतक-याची संपत्ती म्हणजे त्याचं शेत आणि कुठल्याही संपत्तीचं; विशेषत: गुप्तधनाचं साप राखण करतो, अशी लोकांची भाबडी श्रद्धा असते.* *काया वावरात सरप ताजातुजा* *मारू नको बापा पुरवधीचा राजा* *अशी लोकवाङमयाची शिकवण असते. शेतक-यांच्या आणि सापांच्या कितीतरी लोककथा आहेत. सापाला पुरूषतत्वाचे प्रतिक मानतात. त्यामुळेच वारूळस्थ नागाची पूजा करतात. पृथ्वी स्त्रीरूप आणि साप पुरूषरूप.. त्यांच्या संयोगातून समृद्धी नांदते अशी लोकसमजूत असते. मुळात साप शेतीचा सहाय्यक म्हणून रक्षणकर्ता असतो, पण तो राखणदार असतो ही लोकश्रद्धा. काही का असेना पण वावरातील सापाला सहसा मारत नाहीत. तो शेतीला उपद्रवी उंदरांसारख्या प्राण्यांचा नाश करतो म्हणून शेतक-यांचा मित्र असतोच.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺 *--संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो* *"चूक झाली की साथ* *सोडणारे बरेच असतात* *पण चुक का झाली* *आणि ती कशी* *सुधारायची हे* *सांगणारे फार* *कमी असतात.* *"समोरच्या व्यक्तीशी नेहमीच* *चांगले वागा ती व्यक्ती* *चांगली आहे म्हणून नव्हे* *तर तुम्ही चांगले* *आहात म्हणून,,,* *जर श्वास हा शरीराला* *जिवंत ठेवत असेल* *तर, विश्वास हा* *नात्याला जिवंत ठेवतो..* *ओढ लावणारी माणसं जिथे आहेत मनाची पावलं नकळत तिथेच* *वळतात. माणसांपासून मुक्या प्राण्यांपर्यंत सगळ्यांना हा* *नियम लागू पडतो. मग अशा वेळी वस्तूंचं नाही तर व्यक्तींचं वैभव* *महत्वाचं ठरतं. साधी , सरळ माणसं कितीही फसवायला सोपी* *असली तरी फसवणूक करणाऱ्याच्या मनात " एका सज्जन माणसाला आपण फसवलं" ही सल* *रहातेच...तुमच्या सोबत अशी मनाने प्रेमळ आणि* *संपन्न माणसं अवतीभवती वावरत असली की तो परिसस्पर्श तुम्हालाही होत जातो.* *दिसायला अतिशय सामान्य पण माणुसकीला प्रचंड जपणारी ही माणसं तुमच्या* *सोबत असणं हेच खरं वैभव मग अशा ठिकाणाहून दुसरीकडे जाण्यासाठी मन तयार होत* *नाही. शरीराने जरी आपण दूर गेलो तरी* *मनाची ही श्रीमंती खुणावत राहते आणि आठवण* *नावाची ठेव जपली जाते नाही का ?* *मानवी जीवन यशस्वी व्हायचा तडजोड हाही एक मार्ग आहे.....माणसाने ती करायला शिकल पाहिजे;* *जिथं जिथं *तडा* *जाईल,* *तिथं तिथं *जोड* *देता आला की,* *कुठलंच नुकसान होत नाही..!!* *तडजोड म्हणजे शरणागती नव्हे,तर ती परिस्थितीवर केलेली* *मात असते..* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• वर्तमान स्थितीमध्ये आपण कोणत्याही छोट्या छोट्या गोष्टीसाठी खूप विचार करतो.हे माझ्या हातून पूर्ण होईल का ? पूर्ण होईल का असा जेव्हा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो तेव्हा नक्कीच समजून घ्यायचे की,आपला आत्मविश्वास डळमळीत झाला आहे.हा आत्मविश्वास जर आपल्याला मजबूत किंवा ठाम ठेवायचा असेल तर आपल्या मनाची कामातली एकाग्रता सातत्याने ठेवायला हवी.सद्यस्थितीत मला हे काम पूर्ण करायचे आहे आणि ते करावेच लागणार त्यांच्याशिवाय दुसरा पर्यायच नाही अशी मनाची धारणा ठेवली आणि काम केले तर नक्कीच तुमचे काम पूर्ण होईल.त्या कामातून आलेले यश हे तुमच्या पुढच्या कामासाठी आणि पूर्णतेसाठी शुभसंकेत आहेत.त्यामुळे अजून पुन्हा जोमाने काम करण्यासाठी प्रेरणा मिळते.मग ते वर्तमानातील असो की भविष्यातील असो.तुमचा आत्मविश्वास आणि तुमच्या कामातील सातत्य हेच तुमच्या यशाचे खरे रहस्य आहे. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *प्रामाणिक व चतुर मुलगा* *शेतात बोरं आणण्यासाठी चाललेल्या एका बारा तेरा वर्षाच्या मुलाला तहान लागली, म्हणून तो वाटेत लागलेल्या विहिरीत पाणी आहे किंवा काय, हे पाहण्यासाठी त्या विहिरीपाशी गेला. त्या विहिरीत तो डोकावून पाहू लागला असता, त्याला समोरुन एक उग्र व खुनशी चर्येचा चोर पाठीवर गाठोडं घेऊन, आपल्याच दिशेने येत असलेला दिसला.* *हा चोर एकतर आपल्याला मारील, किंवा पळवून नेऊन चो-या करायला लावील,' असं वाटल्यावरुन तो मुलगा त्या विहिरात पाहून मुद्दाम हमसाहमशी रडू लागला.त्या रडणा-या मुलाजवळ येऊन त्या चोरानं विचारलं, काय रे? तुला रडायला काय झालं?' तो मुलगा आपल्या रडण्यात खंड पडू न देता त्याला खोटच म्हणाला, ‘मी या विहिरीत किती पाणी आहे हे पाहण्यासाठी वाकून पाहू लागलो असता, माझ्या गळ्यातली सोन्याची कंठी या विहिरीत पडली. आता कंठी शिवाय जर मी घरी गेलो तर आई-बाबा मला मार देतील.'* *तुझी कंठी तुला काढून देतो, असं त्या मुलाला खोटचं सांगून, आणि चोरीचे पैसे व दागिने यांनी भरलेली आपली पिशवी त्याला विहिरीबाहेर उभे राहून सांभाळायला सांगून आपण विहिरीत उडी मारावी व कंठी हाती लागताच, आपली पिशवी व याची कंठी घेऊन आपण पसार व्हावं, असा बेत त्या चोरानं मनाशी केला. त्याप्रमाणे तो त्या मुलाला म्हणाला, ‘बाळा ! तू ही माझी पिशवी सांभाळ; मी तुला तुझी कंठी विहिरीतून काढून देतो.’* *त्या हुशार मुलाला चोराच्या मनातलं कळून आलं तरीही त्याने मुद्दाम त्या चोराला होकार दिला. त्याबरोबर त्या चोरानं विहिरीत उडी मारुन, तिच्या तळाशी त्या कंठीचा शोध सुरु केला. ही संधी साधून तो मुलगा त्या पिशवीसह तिथून पसार झाला.गावात जाताच त्या मुलाने ती पिशवी पोलिस ठाण्यावर नेऊन दिले. पोलीसांनी घोड्यावर स्वार होऊन त्या चोराचा पाठलाग केला व त्याला पकडले. नंतर त्या मुलाच्या प्रामाणिकपणाबद्दल व चातुर्याबद्दल त्यांनी त्याला बक्षीस दिले.* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00          ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 10/02/2020 वार - सोमवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    💥 ठळक घडामोडी :-  ● २००५- उत्तर कोरियाने आपण अण्णवस्त्र सज्ज असल्याचे जाहीर केले ● १२५८ - मोंगोल सरदार हुलागु खानने बगदाद लुटले व तेथील नागरिकांची हत्या केली. अंदाज १०,००० ते ८,००,०००. ● १९३१ - भारताची राजधानी कोलकात्याहुन नवी दिल्ली येथे हलवली. ● १९४८ - पुणे विद्यापीठाची स्थापना. ● २०१३ - महाकुंभमेळ्याच्या निमित्ताने जमलेल्या गर्दीमध्ये अलाहाबाद रेल्वेस्थानकात चेंगराचेंगरी होउन ३६ ठार आणि किमान ३९ जखमी 💥जन्म :- ● १९४५-राजेश पायलट, माजी केंद्रीय मंत्री ● १८०३- जगन्नाथ उर्फ 'नाना'शंकरशेठ , दानशूर व शिक्षणतज्ञ ● १८९४ - हॅरोल्ड मॅकमिलन, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान. ● १९५० - मार्क स्पित्झ, अमेरिकन तरणपटू. 💥 मृत्यू :- ● १२४२ - शिजो जपानी सम्राट. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *आरक्षणाला विरोध नाही, पण गुणवंतांना डावलू नका, सेव्ह मेरिट सेव्ह नेशनतर्फे राज्यभर अभियान* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *यापुढे दगडाला दगडाने अन् तलवारीला तलवारीने उत्तर दिलं जाईल, मनसेच्या मोर्चात राज ठाकरे यांचा घुसखोरांना इशारा, हिंदूंनाही सावध राहण्याचा सल्ला* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *आशिया खंडातील सर्वात मोठ्या गुफेत 'कचारगड' यात्रा सुरू, 18 राज्यातून भाविक गोंदियात दाखल* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *जळगाव जिल्ह्यातल्या धरणगावमध्ये जिनिंग प्रेसला लागलेल्या आगीत लाखोंचा कापूस जळून खाक झाला. शासनाच्या कापूस फेडरेशनतर्फे खरेदी करण्यात आलेला कापूस या प्रेसमध्ये ठेवण्यात आला होता* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *माघ पौर्णिमेनिमित्त काल पंढरपूरमधील विठ्ठल मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. यंदा विक्रमी यात्रा भरल्याने विठुरायाच्या दर्शनाला भाविकांची मोठी गर्दी होती. मंदिर समितीने विठ्ठल मंदिराचा गाभारा आकर्षक फुलांनी सजवल्यामुळे भाविकही सुखावून गेले.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *तारक मेहता का उलटा चष्मा या मालिकेचे मेकअप आर्टिस्ट आनंद परमान यांचे काल निधन झालं. गेल्या १० वर्षांपासून ते आजारी होते. मात्र तरीही ते सेटवर येऊन जमेल तेवढं काम करत होते. गेल्या १२ वर्षांपासून ते या मालिकेसोबत जोडले गेले होते.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या अंडर 19 विश्वचषक स्पर्धेचं विजेतेपद मिळवण्याचं भारतीय संघाचं स्वप्न अखेरीस भंगलं अंतिम फेरीत बांगलादेशने भारतावर तीन गडी राखून मात करत पहिल्यांदाच 19 वर्षाखालील विश्वचषकाचं विजेतेपद पटकावलं.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         *हेडफोन पासून दूर रहा*  वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2016/12/blog-post.html      लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃  *काव्यांगण - रोज एक बालकविता* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मसाला भात* गणेश दत्तू लोंढे, कासारी ता बार्शी जि सोलापूर रंगला अमुचा खेळ विटी दांडू चावडीसमोरी ताकतीने मारली विटी बघताच गेली पत्र्यावरी म्हातारी ओरडत आली घेऊन हाती काठी आम्ही भिऊन पळालो घेऊन दांडू विटी दमलो थकलो खेळून गडबडीत आलो घरी आई उभी होती रागाने वाटेत दारी बटाटा, मिरची टाकून आईनं केला होता भात चटकन घेतली चटई मांडी घालून बसलो खात *सौजन्य :- जि. प. प्रा. कन्या शाळा धर्माबाद* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *" आपले विचार म्हणजे विचार, उच्चार आणि आचार यांचा एकात्म आविष्कार हवा. "* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *भारतीय क्रिकेट संघाचा पहिला कर्णधार कोण ?* सी. के. नायडू 2) *गौतम बुद्धाने आपले तत्वज्ञान कोणत्या भाषेत सांगितले ?* पाली 3) *एकमेव द्रवरूप धातू कोणता ?* पारा 4) *थर्मामीटरमध्ये चमकणारा पदार्थ कोणता ?* पारा 5) *महाराष्ट्रातील समुद्रकिनारी असलेल्या जिल्ह्यांची संख्या किती ?* 5 *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 अमिन जी. चौहान, सहशिक्षक यवतमाळ 👤 विजय रच्चावार, संपादक, नांदेड 👤 बाबू बनसोडे, सहशिक्षक, बिलोली 👤 राहूल कतूरवार, धर्माबाद 👤 सुधाकर अपुलवाड 👤 राजू गोडगुलवार 👤 जगन्नाथ दिंडे, सहशिक्षक, नांदेड 👤 अशोक श्रीमनवार 👤 डॉ. प्रकाश बोटलावार 👤 प्रशांत यमेवार, पोलीस निरीक्षक 👤 डॉ. पुंडलिक जमदाडे *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *उत्सवांनंतरची रात्र आवर्जून पहावी. उत्सवाच्या काळात ती पोरकी होती. आपण तिच्याशी प्रतारणा करून स्वैर हिंडत होतो, पण तिच्या अजरतेवर कशाचाही ओरखडा उमटलेला नाही. अंधाराच्या रेशमानं तिच्या तारूण्याला वेढून टाकलेलं आहे. अमावस्येची चाहूल लागल्यानं तिचं रेशीम आधिक गाढं, काळं, होत जाणार आहे. तिच्या अजर तारूण्यात आतुन वाहणारं चैतन्याचं पाणी इतकं प्रबळ आहे की उत्सवातल्या पोरकेपणाचा विषण्ण थर वाहून गेलाय.*  *ही उत्सवानंतरची पहिली रात्र. कुठे कुठे तांबूस अभ्र आहेत, पण ती रात्रीशी विसंगत वाटत नाहीत. रस्त्यांवर केवळ दृष्टीला मदत करण्याइतकाच उजेड आहे. ही रात्र आहे, रात्रीसारखी. तिला असं पंधरवाड्याच्या विरामानंतर भेटणं किती विलक्षण. लांबच्या पाणवठ्यावरनं टिटवीचा ओरडा ऐकू येतोय. डोक्याच्या खूप वर, आंब्याच्या गचपणात वाघळाच्या पंखांची फडफड, माडाच्या झावळ्यांमधनं; पावसाचा भास जागवत वारा फिरतोय. एकेक प्रकाशमान खिडकी मालवून; पापण्या जडावलेली घरं अंथरूणाला पाठ टेकतायत. रात्र एखाद्या सखीसारखी माथ्यावरून हात फिरवत म्हणतीये....* *"खूप झालं जगणं, आता झोपायचं..."* *तिच्या स्पर्शानं उर भरून येतं. डोळे डबडबतात. माथ्यावरून रात्रीचा हात आणि अगदी खोलातून झोप येत असते.*  ••●⚜‼ *रामकृष्णहरी*‼⚜●••               🌸🌸🌸🌸🌸🌸          *--संजय नलावडे, मुंबई*          📱 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो* *मनुष्य के पास सबसे बड़ी पूंजी* *अच्छे विचार हैं!* *क्योंकि धन और बल किसी को भी गलत राह पर ले जा सकते हैं* *किन्तु अच्छे विचार सदैव* *अच्छे कार्यो के लिए ही प्रेरित करेंगे!!* *माणूस तेव्हा मोठा नसतो जेव्हा तो मोठ्या मोठ्या गोष्टी बोलतो.* *मोठा तर तो तेव्हा होतो जेव्हा तो लहान लहान गोष्टी समजून घेतो.* *राष्ट्रपती पदावर असलेला माणूस किती खोलवर विचार करून देशाचा* *एक एक रुपया वाचवतो.* *आज आपण कोणत्या गोष्टीवर, किती प्रमाणात,कसा खर्च करतो हा त्यांच्या* *मानाने संशोधनाचा विषय होईल.* *स्वतःचा वेळ,पैसा व्यर्थ जाणे म्हणजे देशाचे नुकसानच.* *गोष्ट आहे भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेन्द्रप्रसाद यांची. राजेंद्रबाबूंची* *राहणी खूपच साधी* *होती. एकदा चालताना* *राष्ट्रपती राजेन्द्रबाबुना त्रास होवू लागला. लक्षात असं आलं कि त्यांच्या* *चपला झिजल्या आहेत आणि त्याला मारलेला खिळा त्यांच्या* *पायाला टोचू लागला आहे. मग राष्ट्रपतींनी आपल्या स्वीय* *सहाय्यकाला नवीन चप्पल आणण्यास सांगितले. त्याने* *सेवकासोबत जावून नवीन चपलांचा जोड आणला. राष्ट्रपतींनी विचारले,"* *या चपलेची* *किंमत किती?" "सोळा* *रुपये" सहाय्यकाने सांगितले. "सोळा* *रुपये? गतवर्षी मी माझ्या* *चपला बारा रुपयांना घेतल्या* *होत्या.तुम्ही खात्री करा."राष्ट्रपती म्हणाले. यावर स्वीय* *सहाय्यक म्हणाले,"साहेब त्या दुकानात बारा रुपयांच्या पण चपला* *आहेत.पण त्यापेक्षा या चपला मऊ आणि चांगल्या आहेत.* *आणि मुख्य म्हणजे मऊ असल्याने टोचणार नाहीत. म्हणून* *सोळा रुपये देवून मीच आणल्या. आपल्या सेवकाचेही या* *चपलाबाबत मत चांगले वाटले.*" *राष्ट्रपती म्हणाले, "अहो* *मऊ चपला आहेत आणि चांगल्या दिसतील म्हणून तुम्ही चार रुपये* *जास्त मोजले कि. नको त्यापेक्षा असे करा कि या चपला* *दुकानात परत करा आणि मला बारा रुपयांच्याच चपला आणून द्या. आणि* *महत्वाचे म्हणजे त्यासाठी वेगळा असा हेलपाटा घालू* *नका. त्या बाजूला येणाऱ्या जाणाऱ्या कोणाकडून तरी हे काम* *करून घ्या. अन्यथा असे व्हायचे कि चपलेत चार रुपये* *वाचविण्यासाठी तुम्ही पाच रुपयांचे पेट्रोल खर्च करून गाडीने जाताल."* *स्वीय सहाय्यक हे सर्व ऐकतच राहिले. देशाच्या सर्वोच्च पदी* *बसणाऱ्या व्यक्तीबद्दल त्यांचा आदर आणखी वाढला.* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• सुख आणि दुःख हे प्रत्येक मानवी जीवनातले दोन वेगवेगळे रंग आहेत.सुखाच्या रंगात सारेच मिसळून जातात.त्यात एवढे रंगून जातात की,दुस-याची आठवणसुद्धा येत नाही.इतरांना आपल्यामध्ये सामावून घेण्याच्या प्रयत्नातही नसतात.एवढा अपार आनंद होतो.पण दु:खाचे तसे नाही.दु:खात मात्र त्याला सगळ्यांचीच आठवण येते.आपल्याला अशावेळी आपल्याजवळ कुणीतरी यावं आणि दिलासा द्यावा असं वाटतं.दु:ख पचविण्याची ताकत त्याच्यामध्ये कमी असते.म्हणून अशावेळी आपल्या मदतीला कुणीतरी यावं यासाठी धावा करतो.अशावेळी मात्र आपल्यापासून आपले आणि इतरही लोक दूर जातात.परंतू एक लक्षात ठेवायला हवे, सुखाच्यावेळी आपण कुणाला विचारले नाही मग दु:खाच्यावेळी कसे बरे विचारतील ?  म्हणून माणसाने सुख असो वा दु:ख असो दोन्ही समान मानून सदैव पाठीशी रहावे. एकमेकांच्या मदतीला धावून जावे.हाच सुखदु:खाचा मानवी जीवनव्यवहार आहे. हा व्यवहार आपल्या व इतरांच्या जीवनात समानतेने व्हावा एवढेच ज्ञात असावे. *व्यंकटेश काटकर,नांदेड.*   संवाद..९४२१८३९५९०/             ८०८७९१७०६३. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मदत कुणास करावी? आणि कुणास करू नये!* एकदा एक लाकूडतोड्या रानात गेला असता इकडे तिकडे पाहात रडू लागला. तेव्हा रानातल्या झाडांनी त्याला विचारले, ‘तू का रडतोस ? तुला काय हवं आहे ?’ तो म्हणाला, ‘माझ्या कुर्‍हाडीला दांडा नाही, त्यासाठी लाकडाचा एक लहानसा तुकडा मला द्याल तर बरं होईल.’ ते ऐकून झाडांना त्याची दया आली व त्याला चिंचेच्या चिवट लाकडाचा एक तुकडा दिला. लाकूडतोड्याने तो आपल्या कुर्‍हाडीला घातला व सगळी झाडे तोडण्याचा सपाटा लावला. तेव्हा एक झाड इतर झाडांना म्हणाले, ‘मित्रहो, आपण आपल्याच हाताने आपला नाश करून घेतला आहे. तेथे दुसर्‍याला नावं ठेवायला जागा नाही.’ तात्पर्यः शत्रूची दया करून त्याला साहित्य पुरविले तर शेवटी पश्चात्ताप करण्याची वेळ येते. शत्रूवरही उपकार करण्यात, त्याच्या चुकांबद्दल क्षमा करण्यात मोठेपणा आहे हे जरी खरे असले तरी ज्यामुळे आपला शत्रू बलवान होऊन आपल्यालाच उपद्रव देऊ शकेल. अशा प्रकारचे साह्य त्याला देणे हा मूर्खपणा होय.म्हणून मदत कुणास करावी हे समजायला हवं आणि कुणास करू नये हे समजून घ्याव. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00          ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 08/02/2020 वार - शनिवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    💥 ठळक घडामोडी :-  ● १८९९ - रँडचा खून करण्यार्‍या चाफेकर बंधूंची नावे इंग्रज सरकारला सांगणार्‍या द्रविड बंधूंचा वासुदेव चाफेकर आणि महादेव रानडे यांनी गोळ्या झाडून खून केला. ● १९९४ - अष्टपैलू खेळाडू कपिलदेव निखंज यांनी श्रीलंकेविरुद्धच्या तिसर्‍या कसोटी सामन्यात पहिल्या दिवशी ४३२ वा बळी नोंदवून न्यूझीलंडचे रिचर्ड हॅडली यांचा सर्वाधिक बळींचा जागतिक विक्रम मागे टाकला. 💥 जन्म :- ● १९३६ - मनोहर हर्डीकर, भारतीय क्रिकेट खेळाडू. ● १९४१ - जगजीतसिंह, भारतीय गझलगायक, संगीतकार. ●१९६३ - मोहम्मद अझहरुद्दीन, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- ● १९९४ - गोपाळराव देऊसकर, ख्यातनाम चित्रकार. ● १९९९ - डॉ.इंदुताई पटवर्धन, आनंदग्रामच्या संस्थापिका, ज्येष्ठ समाजसेविका. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणूक मतदानासाठी निवडणूक आयोगाची तयारी पूर्ण, दिल्लीत दोन हजार ६८९ मतदान केंद्र आहेत. ४० हजार पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. पोलिसांना १९ हजार होमगार्डची मदत मिळणार आहे, आज होणार मतदान* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *वाढत्या वीजनिर्मिती खर्चाचा महानिर्मितीच्या उत्पादनाला फटका, औष्णिक विद्युत केंद्रांच्या क्षमतेच्या तुलनेत ४३ टक्के उत्पादन ठप्प* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *मुंबई: मुंबईत गुलाबी थंडी परतली आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुंबई शहर व उपनगरातील तापमानाचा पारा वेगाने घसरत असताना सोबतीला वाराही असल्याने मुंबईकरांना हुडहुडी भरली आहे. आज मुंबईचं किमान तापमान १४.२ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आलं आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *सेलिब्रेटी ब्रँड वॅल्यूमध्ये भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली पहिल्या स्थानावर कायम आहे. तर अभिनेता अक्षय कुमारने अभिनेत्री दीपिका पादुकोणला मागे टाकत दुसरा क्रमांक मिळविला आहे* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *ठाकरे सरकारचे केजरीवाल सरकारच्या पावलांवर पाऊल, राज्यात दरमहा 100 युनिट पर्यंत वीज वापर करणाऱ्याना मोफत वीज देण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याची माहिती ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिली* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *मुंबई : करप्रणाली अधिकाधिक सुटसुटीत आणि सहजसोपी व्हावी, यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. त्या दृष्टीनेच नवीन कर रचनेचा पर्याय देण्यात आला आहे. प्राप्ती करासंदर्भातील नव्या रचनेत ७० हून अधिक वजावटी रद्दबातल केल्या असल्या, तरी काही सवलती कायम ठेवण्यात येणार असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केले* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *एफआयएच’ प्रो हॉकी लीगमध्ये यशस्वी पदार्पण केल्यानंतर आता आत्मविश्वास उंचावलेल्या भारतीय पुरुष संघाला बेल्जियमच्या खडतर आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. शनिवारी आणि रविवारी भुवनेश्वर येथील कलिंगा स्टेडियमवर रंगणाऱ्या दुसऱ्या सामन्यात भारताला जगज्जेत्या बेल्जियमशी दोन हात करावे लागतील.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        *शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या ऑफलाईन होणार ?* शिक्षकांच्या बदल्याचे धोरण याविषयी मत http://nasayeotikar.blogspot.com/2020/02/blog-post.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃  *काव्यांगण - रोज एक बालकविता* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *सौजन्य :- जि. प. प्रा. कन्या शाळा धर्माबाद* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *" काहीच हाती लागत नाही तेंव्हा मिळतो तो अनुभव "* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *सर्वात वेगवान पक्षी कोणता ?* पाकोळी 2) *छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर झाला ?* रायगड 3) *परळी वैजनाथ कशासाठी प्रसिद्ध आहे ?* ज्योतिर्लिंग 4) *भारतातील सर्वात मोठे पदक कोणते ?* परमवीरचक्र 5) *सम्राट अशोकाच्या राजधानीचे नाव काय होते ?* पाटलीपुत्र *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 सुनील ठमके, नांदेड 👤 रविंद्र भापकर, सहशिक्षक अहमदनगर 👤 राजेश्वर ऐनवाड, सहशिक्षक, धर्माबाद 👤 दिलीप खोब्रागडे 👤 👤 👤 👤 👤 👤 👤 👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *देवाचे खरे मंदिर कोणते - जेथे त्याला बंद दरवाज्यामागे कडी-कुलपात सुरक्षित ठेवले जाते ते ? जेथे प्रवेशासाठी तिकीट काढावे लागते ते ? जेथे आधिक पैसे देऊन लवकर दर्शन घेता येते ते ? की आपल्या घरातलाच तो पवित्र राखलेला एक कोपरा, जेथे आरती म्हटली जाते ? ज्या परमेश्वराने आकाश व पृथ्वी निर्माण केली तो मानवी हातांनी बांधलेल्या मंदिरात रहात नाही. त्याला तशा मंदिरांची गरज नाही.* *परमेश्वराचे खरे मंदिर आपणच आहोत; कारण त्याचा पवित्र आत्मा आपल्यात राहतो. आपल्या ह्रदयातील भव्य उपासना- मंदिराच्या परमपवित्र स्थानांत सर्वांना, अगदी अनिर्बंधितपणे जाता यावे ही एक सुंदर कल्पना आहे आणि ती लवकर साकार व्हावी. पण त्याआधी आपल्या अंत:करणावर आपण काय लिहिले आहे तेही बघितले पाहिजे. असे न होवो की, आपल्या अंत:करणावरची 'प्रवेश बंद' ची पाटी वाचुन परमेश्वर बाहेरच उभा राहिला असेल.* •• ● ‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो,* *मन ही एक अशी gallery आहे* *जिथे unlimited photos* *आणि old memories* *कितीही save केल्या तरी* *storage full होत नाही।..!* *"मी आहे ना..... नको काळजी करु"* *असं म्हणणारी व्यक्ती आयुष्यात असेल तर खचलेल्या मनाला पुन्हा उभारी मिळते*. *जेंव्हा मायेची आणि* ‪‎ *प्रेमाची‬ माणसं आपल्या* ‪‎ *जवळ‬ असतात..* *तेव्हा‬ दुःख ‪कितीही* *मोठं‬ असलं तरी त्याच्या ‪* *वेदना‬ जाणवत ‪नाहीत‬.* *तुम्हीच सांगा ........* *हल्ली आपलं आजारी पडण्याचं प्रमाण थोडं जास्तच वाढलं का नाही ?* *कधी पोटच दुखतं , कधी बी.पी.च वाढतो , कधी शुगर वर खाली होते* *कधी हृदयाचे ठोके वाढून चक्करच येते* *करमत नाही , मन लागत नाही* *छातीत धडधड , मनात* *भीती ....अशा एक ना अनेक तक्रारी .....!* *कारणं काय तर म्हणे ....* *अशुद्ध पाणी , कचरा , रासायनिक खतं , डासांची संख्या वाढणे ....वगैरे , वगैरे ...!* *मग ......* *मग वॉटर प्युरीफायर आलं , रूम फ्रेशनर आलं , डास प्रतिबंधक वड्या , उदबत्त्या , एवढंच काय घरा घरात डास मारण्याच्या बॅटी सुद्धा आल्या .....* *काय परिणाम झाला ?* *डासं मेले पण आजारपण गेलं का ?* *नाही ........* *मग...?* *तुम्ही आम्ही काय केलं आहे...* *जाणते अजाणते पणे सर्वांशी कट्टी धरली आहे !* *हल्ली माणसं एकमेकाला मोकळेपणाने बोलतच नाहीत ......हे खरं कारण आहे आजारी पडण्याचं !* *सख्खे , चुलत , मावस* *आई वडील , बहीण भाऊ* *शेजारी , सहकारी ...या सर्वांशी आपण अबोला धरला आहे !* *ओळख आहे पण संवाद नाही* *नातं आहे पण माया नाही* *अवांतर , मोक्कार विषयावर आपण खूप गप्पा मारतो पण खरं दुःख कुणीही कुणाला सांगत नाही ......हे एक आपल्या वारंवार आजारी पडण्याचं कारण असू शकतं !* *सगे सोयरे , घरकुल , गोकुळ* *नातीगोती , हॅपी फॅमिली , आपली माणसं* *.....अशा गोंडस नावांनी आपण Whats app चे ग्रुप बनवले ....* *पण त्यावर मनमोकळा संवाद होतोय का ?* *मी दुःख सांगितल्यावर मला हसतील का ? अशी जर भीती वाटत असेल ....* *मी Good news सांगितल्यावर आनंदी होतील का नाही ? अशी जर भीती वाटत असेल .....* *तर असे ग्रुप ,अशी नाती काय कामाची ?* *लक्षात ठेवा हिलस्टेशनला , युरोप टूरला जाऊन relax होता येईल ....पण हलकं वाटू शकेल का ?* *टेन्शन कमी होईल का ?* *त्यामुळे वारंवार आजारी पडण्याची कारणे कदाचित ही तर नसतील ......* *मनातल्या भावनांचा निचरा न होणे ...,* *सकारण , विनाकारण प्रत्येक नात्या सोबत झालेली कट्टी ...,* *खूप बोलावं वाटणे ...पण व्यक्त होण्यासाठी जागाच न उरणे ....* *मग आता काय करावं ?* *ज्या वादा मध्ये , अबोल्या मध्ये , फारसं तथ्य नाही असे वाद मिटवण्यासाठी स्वतः होऊन पुढाकार घ्यावा ....* *व्यक्त व्हा , बोला , दो करा* *कदाचित आपलं वारंवार आजारी पडणं थोडं कमी होईल* *लक्षात ठेवा इथून पुढे फक्त त्याच माणसांना दीर्घ आयुष्य मिळेल .....जी माणसं हसण्याच्या आणि रडण्याच्या जास्तीत जास्त जागा निर्माण करू शकतील !* *मग बघा कस जगावं ते.* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• शेतकरी शेतात बियाणे टाकून येणा-या किंवा उगवणा-या धान्याची वाट पाहणे हे सत्य आशा आहे. कारण त्याला त्याच्या केलेल्या कामावर, मेहनतीवर विश्वास आहे. तो कधीही राशीचक्रावरील राशीनुसार लिहिलेल्या भाकितावर विश्वास ठेवत नाही किंवा त्यानुसार चालतही नाही. जे राशीनुसार चालतात ते मात्र त्यावर विसंबून राहून आपल्याच जीवनात चांगल्याप्रकारे चाललेल्या संसारगाड्याला खीळ बसवतात. त्यामुळे व्हायची ती प्रगती होत नाही आणि करता येत नाही. म्हणून माणसाने कोणत्याही भाकितावर विश्वास न ठेवता आपण आपले काम प्रामाणिकपणे आणि सातत्याने जीव ओतून केले तर नक्कीच जीवनात यश मिळते तसेच जीवन सुखी व समृद्ध होते यात संशय नाही. © व्यंकटेश काटकर,नांदेड संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *दानशूर राजा आणि संत* एका राज्यात एक दानशूर राजा होता. त्या राजाची ही दानशूराची ख्याती ऐकून एक संत त्याच्या राजवाड्यात आला. तो राजाला भेटायला दरबारात, राजमहालात गेला आणि याचकांच्या रांगेत बसला. राजाने दान देण्यासाठी दोन सेवक ठेवले होते. जेंव्हा संताची वेळ आली तेंव्हा तो सेवकाला म्हणाला,''मित्रा! मी तुझ्या हाताने नाही तर राजाच्या हाताने दान घेईन. नाहीतर मला दान नको." राजाचा सक्त आदेश होता कि कोणीही रिक्त हस्ते जाता कामा नये. शेवटी सेवकांनी राजाची व संताची गाठ घालून दिली. राजाने संतांच्या पायाचे दर्शन घेतले व म्हणाला,"महाराज ! बोला आपली काय इच्छा आहे?" संत म्हणाले," मला इतके धन पाहिजे कि मी त्याद्वारे स्वर्गात जावू शकेन." राजा या उत्तराने हैराण झाला. त्याने विचारले," महाराज, धनाद्वारे आपण कसे काय स्वर्गात जावू शकता?, कृपया स्पष्ट करा!" तेंव्हा संताने सांगितले," राजन! मी आपल्याला हे सांगू इच्छितो कि, केवळ दान देण्याने आपण सुखी व्हाल आणि भिक्षा मागणारयांच्या जीवनात परिवर्तन येईल पण आपण असेच जर दान करीत राहिलात तर मात्र एक दिवस राज्याची तिजोरी मात्र खाली होवून जाईल." त्या क्षणी राजाचे डोळे उघडले, त्याने संताना यावरील उपाय विचारला असता ते म्हणाले, " आपण जे धन दान म्हणून देत आहात तेच रोजगाराच्या स्वरुपात द्या. यातून लोकांना काम मिळेल आणि फुकट खायची यांची सवय कमी होईल. आपल्या या सेवा वृत्तीने ते आयतखाऊ झालेत. आणि आळशी झाले आहेत. त्यांना परिश्रम करायला शिकवा तेच खरे पुण्याचे आणि सत्पात्री दान ठरेल.  तात्पर्य- स्वकष्टाने कमवलेल्या धनाचे महत्त्व अधिक असते. स्वावलंबन आत्मविश्वासाची अनिवार्य अट आहे. त्यावरच राष्ट्राचा विकास अवलंबून असतो. राष्ट्रहिताची जोपासना करणे ही सर्वांची जबाबदारी आणि कर्तव्य आहे. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00          ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 07/02/2020 वार - शुक्रवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    *स्वातंत्र्य दिन - ग्रेनेडा* 💥 ठळक घडामोडी :-  ● २००३ - महाराष्ट्र शासनातर्फे क्रीडामहर्षींचा गौरव करण्यासाठी दिला जाणारा श्री शिवछत्रपती जीवनगौरव पुरस्कार सचिन तेंडुलकरचे मार्गदर्शक रमाकांत आचरेकर यांना जाहीर. 💥 जन्म :- ●१९३८ - एस. रामचंद्रन पिल्ले, भारतीय कम्युनिस्ट पक्षातील नेता. 💥 मृत्यू :- ● २००३ - जीवनराव सावंत, ज्येष्ठ कामगार नेते. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *नवी दिल्ली : महाराष्ट्रासहपाणीटंचाईचा सहा राज्यांतील प्रश्न सोडवण्यासाठी केंद्र सरकारने जागतिक बँकेसोबत ‘अटल भूजल योजना’ सुरू केली आहे. सहा हजार कोटी रुपयांच्या या योजनेत महाराष्ट्रातील जालना, उस्मानाबाद, लातूर आदी जिल्ह्यासह१३ जिल्ह्यांचा समावेश* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *कलाकारांसाठी 'सांस्कृतिक केंद्र' तयार करण्यासाठी नियोजन करावे- अमित देशमुख* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *पेट्रोल खुल्या बाटलीत विकणाऱ्या पेट्रोलपंप मालकांवर कारवाई करा : आमदार प्रतिभाताई धानोरकर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *ठाणे : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा लोकार्पण सोहळा संपन्न; विविध नागरी कामांचा ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शुभारंभ* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *हिरे उद्योगाला 'कोरोना'चा फटका, 8000 कोटींचे नुकसान होण्याची शक्यता, 'दरवर्षी सूरतवरुन 50,000 कोटी रुपयांचे पॉलिश्ड हीरे हाँगकाँगला एक्सपोर्ट होतात'* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *बांगलादेशने उपांत्य फेरीच्या सामन्यात न्यूझीलंडवर विजय मिळवला आणि अंतिम फेरीत प्रवेश केला, आता युवा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत थरार रंगणार आहे तो भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *मुंबई : भारताचा सायकलपटू रोजित सिंग याने ऐतिहासिक कामगिरी करताना पहिल्यांदाच जागतिक अजिंक्यपद स्पर्धेची पात्रता मिळवली. या शानदार कामगिरीमुळे आता जगातील अव्वल १८ देशांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच भारताचा समावेश होईल* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••          *हसा आणि हसवा* जीवनात हसण्याचे महत्व ....! वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2015/11/blog-post_29.html     लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃  *काव्यांगण - रोज एक बालकविता* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *एक होता सावळा* - सौ. कुंदा विकास झोपे. उल्हासनगर ४.जि ठाणे. एक होता सावळा, भलताच बावळा. झाडावर दिसला, त्याला हो आवळा. उचलूनी दगड, आवळ्याला मारला, दगड सावळ्याच्या, डोक्यात पडला. झाडाने का मला, दगड मारला. सावळ्याला मोठा प्रश्न हा पडला. आईची शिकवण , आठवली त्याला. पेराल ते उगवेल, मनात बोलला. क्षमा मागितली, झाडाची त्याने. पुन्हा नाही मारणार, सांगतो मी खरे . झाड मग लागले, सावळ्याशी हसू. पान पान लागले, त्याच्या मनात ठसू. अलगद आली , वाऱ्याची झुळूक. पडता आवळे, खाल्ले चुटुक चुटुक. *सौजन्य :- जि. प. प्रा. कन्या शाळा धर्माबाद* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *" धैर्य हे प्रेमासारखे आहे. नुसत्या आशेच्या बळावर ते वाटेल तितके वाढते. "* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आजची प्रश्नमंजुषा* 1) *राम गणेश गडकरी यांचे रंगभूमीवर आलेले पहिले नाटक कोणते ?* प्रेमसंन्यास 2) *महाराष्ट्रातील कृष्णा व कोयना या नद्यांच्या संगमाला कोणत्या नावाने ओळखले जाते ?* प्रीतीसंगम 3) *आयफेल टॉवर कोणत्या शहरात आहे ?* पॅरिस ( फ्रान्स ) 4) *भारतातील पहिली अणुस्फोट चाचणी कोठे झाली ?* पोखरण 5) *सर्वाधिक खोली असणारा महासागर कोणता ?* पॅसिफिक महासागर *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 पंढरीनाथ बोकारे, पत्रकार, नांदेड 👤 भारत भाऊ राखेवार, नांदेड 👤 खंडु यरकलवाड बेळकोणीकर 👤 पवन गट्टूवार, सहशिक्षक, कुंडलवाडी 👤 विजय कुंडलीकर 👤 संतोष कोयलकोंडे, सहशिक्षक, देगलूर 👤 विनायक गोविंदराव पारवे 👤 साईनाथ येनगंटीवार 👤 कवी बी. एल. खान 👤 प्रसन्न करमरकर 👤 पोतन्ना चिंचलोड *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *सारा अंधारच प्यावा* *अशी लागावी तहान ॥* *एका साध्या सत्यासाठी* *देता यावे पंचप्राण ॥* *असं जगावेगळ पसायदान कवी म.म.देशपांडे यांनी 'तहान' या कवितेत मागितलं आहे. त्याचं तीव्रतेने स्मरण व्हावं अशी परिस्थिती आज आपल्या देशात आहे. कोणत्याही क्षेत्राकडे जा सारा अंधार आहे. अपवाद वगळले तर वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवनातून सत्य हद्दपार झालेलं आहे. असत्याच्या अंधारात संवेदनशील मनाची घुसमट होत आहे. 'सत्यमेव जयते' ही या देशाची घोषमुद्रा आहे. तथापि समाजाचं, देशाचं नेतृत्व करणा-यांपासून तर रूग्णांची सेवा करण्याची शपथ घेतलेल्या डाॅक्टरांपर्यत सर्वांनी तिचे पदोपदी धिंडवडे काढले आहेत. सर्वच क्षेत्रात असत्यानं, अप्रमाणिक वृत्तीनं थैमान घातलं आहे. स्वातंत्र्योत्तर काळात भारतमातेची दु:स्थिती आधिकच चिंतनीय झाली आहे. 'सत्य हे जीवनमूल्य लोप पावत आहे. 'असत्य' उजळ माथ्यानं वावरत आहे.* *खरंतर सत्य, सत्याचा शोध, सत्याचा उद्धार आणि आचरण, सत्याचा पुरस्कार याला वैभवशाली परंपरा आहे. भीष्मनिती सांगते, 'सत्य हे प्रत्येक माणसाचं कर्तव्य आहे. माणसाचा सर्वश्रेष्ठ आधार आहे. शाश्वत कर्तव्य आहे. आसक्तीचं जाळ फक्त सत्यच तोडू शकतं. सत्य म्हणजेच अमरत्व. सत्यासाठी केलेला त्याग मानवी जीवनात सर्वश्रेष्ठ आनंदाचा उगम असतो. सदाचरणी माणूसच इतरांच्या हितासाठी दक्ष असतो आणि या मार्गानंच त्याचं स्वत:चही हित साधलं जातं. सत्यासारखं तप, पुण्य नाही. असत्यासारखं पाप नाही. ज्याच्या ह्रदयात सत्य असतं त्याच्या ह्रदयात परमशक्ती वास करते.* *॥ रामकृष्णहरी ॥* 🔆🔆🔆🔆🔆🔆🔆🔆🔆 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• मित्रांनो, संकटे रडणाऱ्याला भीक घालत नाहीत, तर ती लढणाऱ्याला भिऊन दूर पळून जातात. जीवनाच्या संघर्षात लढणे विसरू नका.प्रत्येक लढा एक नवीन धडा देऊन जातो. जिंकलात तर जग डोक्यावर घेईल,हारलात तर नवा अनुभव देईल.दोघांपासून सुखच ,मग स्वतःवर भरवसा ठेवा.आणि उतारा लढ्यात अगदी महाकाल बनून. जीवन कधी कधी अडथळ्यांची शर्यत बनते. पराभव, अपयश, जिव्हाळ्याच्या व्यक्तीचा दुरावा किंवा मृत्यू, अपमान अशी संकटे एकापाठोपाठ येतात. कधी कधी एकापेक्षा आधिक संकटे एकत्र येऊन डोक्यावर धाडकन् आदळतात. आपण कोलमडून पडतो. निराशेच्या गर्तेत कोसळतो. सुखाचा किरणही कोठे दिसत नाही. भयाण काळोखात चाचपडताना बाहेर पडण्याची वाट सापडत नाही. खरंच, कधी कधी असं होतं पण; ही 'कधी कधी' घडणारी अवस्था तात्पुरती आणि आल्पकाल टिकणारी असते. ती संपून पुन्हा सुखाचा शिडकावा होणार असतो. सुखप्राप्ती ही माणसाची मुलभुत प्रेरणा आहे. त्या प्रेरणेच्या समाधानासाठी संकटाच्या किंवा दु:खाच्या प्रसंगी धीर धरावा लागतो. ओढवलेल्या परिस्थितीचा स्विकार करून, त्याच्यावर मात करण्याचे सामर्थ्य आणि स्वातंत्र्य आपल्याला माणूस म्हणून लाभले आहे, हे स्वत:ला पटवून दिले की दु:खाचा भयंकरपणा निम्म्याने कमी होतो. पुढची वाट दिसू लागते. आपल्याला हवा असलेला बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न करायचे असतात. त्यासाठी दुस-या कशावर किंवा कोणावर अवलंबून राहायचे नाही असे धोरण ठेवले तर दु:ख वेगाने दूर पळते आणि सुख चोरपावलांनी आत येते. जिंदगी हर कदम एक नई जंग है। जीत जायेंगें हम ,तू अगर संग है। अशोक कुमावत (राष्ट्रपती पुरस्कार विजेते) 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• सुख आणि दुःख हे प्रत्येक मानवी जीवनातले दोन वेगवेगळे रंग आहेत.सुखाच्या रंगात सारेच मिसळून जातात.त्यात एवढे रंगून जातात की,दुस-याची आठवणसुद्धा येत नाही.इतरांना आपल्यामध्ये सामावून घेण्याच्या प्रयत्नातही नसतात.एवढा अपार आनंद होतो.पण दु:खाचे तसे नाही.दु:खात मात्र त्याला सगळ्यांचीच आठवण येते.आपल्याला अशावेळी आपल्याजवळ कुणीतरी यावं आणि दिलासा द्यावा असं वाटतं.दु:ख पचविण्याची ताकत त्याच्यामध्ये कमी असते.म्हणून अशावेळी आपल्या मदतीला कुणीतरी यावं यासाठी धावा करतो.अशावेळी मात्र आपल्यापासून आपले आणि इतरही लोक दूर जातात.परंतू एक लक्षात ठेवायला हवे,सुखाच्यावेळी आपण कुणाला विचारले नाही मग दु:खाच्यावेळी कसे बरे विचारतील ? म्हणून माणसाने सुख असो वा दु:ख असो दोन्ही समान मानून सदैव पाठीशी रहावे.एकमेकांच्या मदतीला धावून जावे.हाच सुखदु:खाचा मानवी जीवनव्यवहार आहे.हा व्यवहार आपल्या व इतरांच्या जीवनात समानतेने व्हावा एवढेच ज्ञात असावे. © व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद...९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *रेघ लहान झाली.* अकबर आणि बिरबल एकदा फिरायला गेले होते. चालता चालता बादशाह अचानक थांबला. बादशहाने वाळूत बोटाने एक रेघ मारली आणि बिरबलाला विचारले. “ही रेघ पाहिलीस? ही रेघ लहान करायची, पण पुसायची नाही, जमेल तुला?” बिरबलाने एकवेळ बादशहाकडे व एकवेळ रेघेकडे पाहिले.  थोडा विचार केला. पटकन खाली वाकला. रेघेशेजारी दुसरी लांब रेघ मारली आणि म्हणाला, “झाली की नाही महाराज तुमची रेघ लहान?” बादशाह चकित होऊन पाहतच राहिला.! *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00          ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 06/02/2020 वार - गुरूवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    💥 ठळक घडामोडी :-  वैतंगी दिन - न्यू झीलँड. बॉब मार्ली दिन - जमैका, इथियोपिया. ● १९३२ - कोलकाता विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात वीणा दास या विद्यार्थिनीने बंगालचे राज्यपाल स्टॅन्ले जॅक्सन यांच्यावर गोळ्या झाडल्या. ● १९३२ - प्रभात कंपनीचा अयोध्येचा राजा (चित्रपट) हा पहिला मराठी बोलपट प्रदर्शित झाला. ● २००१ - सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यास आणि तंबाखूपासून बनविण्यात आलेल्या सर्व उत्पादनांची जाहिरात करण्य़ावर बंदी घालणार्‍या 'तंबाखू उत्पादने' विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. ● २००१ - पश्चिम रेल्वेचे मुख्यालय असलेल्या चर्चगेटच्या इमारतीला शंभर वर्षे पूर्ण झाल्याबद्दल डाक विभागातर्फे टपाल तिकीट प्रसिद्ध. ● २००३ - संत तुकाराम महाराज यांचे चित्र असलेल्या नाण्याचे प्रकाशन नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा हस्ते करण्यात आले. 💥 जन्म :- ● १९१२ - एव्हा ब्राउन, ऍडोल्फ हिटलरची सोबतीण. ● १९३९ - ब्रायन लकहर्स्ट, इंग्लिश क्रिकेट खेळाडू. ● १९४५ - बॉब मार्ली, जमैकन संगीतकार. 💥 मृत्यू :- ● १९३९ - सयाजीराव गायकवाड, बडोद्याचे महाराज. ● १९७६ - ऋत्विक घटक, चित्रपट निर्माते. ● १९८९ - चार्ल्स गुफ्फ्रोय, बर्लिनची भिंत ओलांडताना मृत्यु पत्करणारा शेवटचा माणूस. ● २००१ - बॅ.विठ्ठलराव गाडगीळ, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *अयोध्येमध्ये राम मंदिर बांधण्यासाठी  श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र या नावाने ट्र्स्टची स्थापना करण्याची महत्त्वपूर्ण घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेमध्ये केली.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *नागपूर महापालिकेच्या आपली बसमध्ये मोठया प्रमाणात तिकीट चोरी केली जाते. गेल्या महिना भरात तिकीट चोरी प्रकरणात २२ कंडक्टर बडतर्फ करण्यात आले असून ८१ कंडक्टरची आय.डी.लॉक करण्यात आल्याची माहिती परिवहन समितीचे सभापती बाल्या बोरकर यांनी दिली* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्या; खासदार गोपाळ शेट्टी यांची मागणी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, कोरोना व्हायरसमुळे झालेला आजार बरा करण्याकरीता समाजमाध्यमांमध्ये सध्या जे संदेश फिरत आहे ते पूर्णपणे चुकीचे आहेत, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन * ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *मुंबईः उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळानं तीन मोठे निर्णय घेतले आहेत. कंपनी एकत्रीकरण दस्तांच्या मुद्रांक शुल्कावर कमाल मर्यादा 50 कोटीपर्यंत वाढवण्याला मंजुरी देण्यात आली आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *ट्वेंटी-20 मालिकेतील मानहानीकारक पराभव, कर्णधार केन विलियम्सला झालेली दुखापत या दुहेरी संकटातून वाट काढत यजमान न्यूझीलंड संघानं वन डे मालिकेत दणक्यात सुरुवात केली. भारताचा केला पराभव* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *आयसीसीने भारतीय संघावर सामन्यानंतर दंड ठोठावला आहे. भारतीय संघाने निर्धारीत वेळेनंतर चार षटके टाकली होती. या षटकांसाठी आयसीसीने भारताय संघातील खेळाडूंच्या मानधनावर ८० टक्के दंड ठोठावला आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    *लिहिते व्हा......!* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/04/blog-post_15.html             लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃  *काव्यांगण - रोज एक बालकविता* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मसाला भात* - गणेश दत्तू लोंढे कासारी ता बार्शी जि सोलापूर रंगला अमुचा खेळ विटी दांडू चावडीसमोरी ताकतीने मारली विटी बघताच गेली पत्र्यावरी म्हातारी ओरडत आली घेऊन हाती काठी आम्ही भिऊन पळालो घेऊन दांडू विटी दमलो थकलो खेळून गडबडीत आलो घरी आई उभी होती रागाने वाटेत दारी आईनं केला होता बटाटा, मिरची टाकून भात मांडी घालून बसलो मी मसाला भात खात *सौजन्य :- जि. प. प्रा. कन्या शाळा धर्माबाद* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *" आंधळ्या श्रद्धेपेक्षा डोळस बुद्धीने विचार करणे केव्हाही श्रेष्ठ होय. "* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *रक्त शुद्धीकरणाचे काम कोणता अवयव करतो ?* फुफ्फुस 2) *जगातील सर्वात जुना खेळ कोणता ?* पोलो 3) *'सरोवराचा देश' असे कोणत्या देशाला म्हटले जाते ?* फिनलँड 4) *ऑक्सिजन या वायूचा शोध कोणी लावला ?* प्रिस्टले 5) *जगातील सर्वात मोठे महासागर कोणते ?* पॅसिफिक महासागर *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 सुहास सदावर्ते, दै. सकाळ, जालना 👤 कोंडेवार साईनाथ, भैसा *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *प्रचंड थकवा आल्यानंतर, दमल्यानंतर हळूहळू आपण आपला मूळ लयीतला श्वास गवसणं किती विलक्षण असतं. स्वत:चा ठाव लागणं, स्वत:चा थांग लागणं, जणू पुनर्जन्मच. म्हणून जगण्याच्या सुलभीकरणात थकवा गमावून बसू नये. थकव्या थकव्यात फरक करावा. प्राणपणानं जीव लावून खरंखुरं थकावं आणि थकव्याच्या गर्भातून स्वत:चं सर्जन होताना अनुभवावं. अर्थात इतकं सगळं घडलं तरी बाहेरच्या जगाला तुम्ही निव्वळ दमलेले, थकलेले दिसता. त्यांना जाणवतं की, तुमचा श्वास फुललाय, छातीचा भाता वरखाली होतोय. तुमच्या आप्तांना तुमची चिंता वाटते. त्यांना वाटतं की, तुम्ही इतकी दगदग करू नये. सकस, पौष्टिक अन्न खावं. आप्तांची चिंता रास्त असते.* *तरीसुद्धा आपली शक्ती पणाला लावून थकणं-दमणं योग्य असतं. थकण्याला घाबरून, न थकण्याचे उपाय शोधणं हा सर्वथा अलाभाचा व्यवहार आहे. त्यानं थकणं घटेल आणि आपले नवनवे जन्मही घटतील. श्वास फुलल्याशिवाय कसं कळणार श्वास घेतो आपण, छातीचा भाता वरखाली झाल्याशिवाय कसं कळणार की, प्राणवायुचं चलनवलन किती सुखाचं असतं. तो फुफ्फुसांना व्यापतो म्हणजे काय होतं हे कसं समजणार ? श्वासोच्छ्वासानं शरीरावर उठणा-या लाटांचं उठणं-विरणं कसं निरखता येणार? शक्तीपाताच्या अग्रावर जाऊन कोसळण्याच्या क्षणी स्वत:चा थांग सापडण्याची धडधड ऐकू येण्याला तुलना नाही. हेच थकव्यातलं सर्जन आणि हाच सर्जनाचा थकवा..!* *॥ रामकृष्णहरी ॥* 🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱 *श्री संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• मित्रांनो, भारतमाते पुत्र शहाणे अमित तुला लाभले, तुझ्या कुशीला परि जन्मली सारी वेडी मुले. ही केशवसुत याची कविता भारत मातेचे पुत्र नक्कीच प्रत्येक क्षेत्रात खरी करून दाखवतात. वर्ल्ड कपच्या सेमी फायनलला पाकिस्तानविरुद्ध सेंच्युरी मारणे आणि उत्तुंग षटकार ठोकून भारतीय टीमला विजयी करणे हे कोट्यवधी क्रिकेटप्रेमी भारतीयांचं स्वप्न असावं! एकोणीस वर्षांचा यशस्वी जयस्वाल हे स्वप्न आज जगला! १९ वर्षांखालील (U-19) वर्ल्ड-कपमध्ये नाबाद १०५ धावा करून, पाकिस्तानचा धुव्वा उडवून हे स्वप्न जगला. पण ही इतकीच गोष्ट नाहीये त्याची! एके काळी झोपडीत किंवा फुटपाथवर राहून, पाणीपुरी विकून उदरनिर्वाह करणारा अत्यंत गरीब घरातला मुलगा, भारतीय U19 टीमचं प्रतिनिधित्व करून टीमच्या विजयाचा शिल्पकार बनू शकतो हा ‘भारतीय स्वप्ना’चा उत्तुंग षटकार आहे!! उत्तर प्रदेशातल्या एका अत्यंत छोट्या खेड्यातल्या गरीब घरातला हा मुलगा, वयाच्या ११व्या वर्षी क्रिकेट खेळण्याच्या वेडापोटी मुंबईत आला. एका डेअरीमध्ये राहायची जागा मिळाली आणि क्रिकेट अॅकॅडमीत प्रवेश मिळाला. डेअरीतली पडेल ती कामं करून हा पोट भरायचा आणि दिवसभर क्रिकेट खेळायचा. क्रिकेटमुळे हा फार कामं करत नाही म्हणून डेअरीवाल्याने ह्याला हाकलून दिलं.मग त्याच्या एका काकांच्या मदतीने मुंबईतल्या मुस्लिम समाजाच्या एका तात्पुरत्या निवासाच्या ठिकाणी त्याला राहायला जागा मिळाली. तंबू/झोपड्या असं राहायचं ठिकाण. उन्हाळ्यात तिथे राहणं असह्य झालं की उघड्यावर, रस्त्यावर झोपायचं; पण काहीही झालं तरी दिवसभर क्रिकेट खेळायचं!! पोट भरण्यासाठी तो पाणीपुरी विकायचा!!ज्वाला सिंग नावाच्या एका क्रिकेट कोचला त्याचा खेळ आवडला आणि यशस्वीचं आयुष्य बदललं. ज्वाला सिंगने त्याला स्वतःच्या घरी राहायला नेलं. कोचिंग देत घडवलं आणि यशस्वी जोरदार क्रिकेट खेळायला लागला.२०१५च्या Giles Shield interschool च्या एका मॅचमध्ये ३१९ रन्स ठोकून आणि १३ विकेट्स घेऊन तो ‘लाइमलाइट’मध्ये आला आणि गेली पाच वर्षे तो ज्युनियर क्रिकेट आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये धडाकेदार विक्रम करत आहे!! यंदाच्या U19 ‘वर्ल्ड कप’ मध्ये तो भारतीय टीमसाठी जोरदार पराक्रम करत आहे अन् २०२०च्या ‘आयपीएल’साठी ‘राजस्थान रॉयल्स’ने दोन का अडीच कोटी रुपयांच्या करारावर त्याला टीममध्ये घेतले आहे!!अमेरिकेत, आपल्या टॅलेंटने झटपट मिलियन डॉलर्स कमावणे ह्याला ‘अमेरिकन ड्रीम’ म्हणतात. तसंच आपल्या टॅलेंट आणि कष्टांच्या जोरावर भरपूर पैसे आणि प्रसिद्धी मिळवणे, तीही क्रिकेट किंवा बॉलिवुडमध्ये, हे कदाचित ‘इंडियन ड्रीम’ म्हटलं पाहिजे!यशस्वी जयस्वाल हे एका अत्यंत यशस्वी इंडियन ड्रीमचं उदाहरण आहे!!त्यानं यशाचे नवनवे उत्तुंग षटकार मारत राहावेत अन् असे अनेक यशस्वी ‘ड्रीमर्स’ भारतात तयार होत राहावेत ही मनोमन सदिच्छा!! अशोक कुमावत (राष्ट्रपती पुरस्कार विजेते) 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जीवनात एखादे चांगले ध्येय आपल्या मनात नाश्चित करुन ते पूर्ण करण्यासाठी अनेक बिकट प्रसंगाशी सामना करावा लागतो. त्याच्याशिवाय ध्येयाचा प्रवास पूर्ण होऊ शकत नाही.केवळ ध्येय मनात ठेवले आणि आपण काहीच प्रयत्न केले नाही तर आपण आपल्या जीवनात अपयशी ठरलो आहोत हे निश्चित समजावे.म्हणून ध्येय प्राप्तीसाठी कोणताही खडतर प्रवास करण्याची तयारी ठेवावी लागते. © व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद...९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *खर्‍या भक्ताला रत्नांचे मूल्य दगडांइतकेच!* एकदा राजा कृष्णदेव यांच्या आमंत्रणानुसार भक्त पुरंदरदास राजवाड्यात गेले होते. परत जातांना राजाने दोन मुठी भरून तांदूळ त्यांच्या झोळीत टाकत म्हटले, महाराज, या लहानशा भेटीचा स्वीकार करून माझ्यावर कृपा करावी. राजाने त्या तांदळात थोडे हिरे मिसळले होते. पुरंदरदासांच्या पत्नीने घरी तांदूळ निवडतांना त्यांत काही मौल्यवान रत्ने असल्याचे पाहिले. तिने ती तांदळातून निवडून काढून कचरापेटीत फेकून दिली. भक्त पुरंदरदास प्रतिदिन राजसभेत जात होते. राजा प्रतिदिन त्यांना हिरे दोन मुठी तांदळात मिसळून द्यायचा; परंतु त्याच्या मनात विचार यायचा, पुरंदरदास धनाच्या लोभापासून मुक्त नाहीत. जर ते मुक्त असते, तर ते पुन्हा भिक्षेसाठी राजसभेत आले नसते.एके दिवशी राजा पुरंदरदासांना म्हणाला, भक्तराज, लोभ मनुष्याला आध्यात्मिक प्राप्तीपासून दूर करतो. आता तुम्ही स्वतःच स्वतःविषयी विचार करावा. राजाच्या तोंडून असे ऐकल्यावर भक्त पुरंदरदासांना अतिशय वाईट वाटले. ते दुसर्‍या दिवशी राजाला आपले घर दाखवायला घेऊन गेले. त्या वेळी पुरंदरदासाची पत्नी थाळीत तांदूळ घेऊन ते निवडत होती. त्या वेळी राजा आणि पुरंदरदासांची पत्नी यांच्यात पुढील संभाषण झाले. राजा : देवी, तुम्ही काय करत आहात ? ती (पुरंदरदासाची पत्नी) : महाराज, कोणीतरी भिक्षेत तांदळासह काही मौल्यवान रत्नेही मिसळून आम्हाला देतो. मी त्या दगडांना निवडून वेगळे करत आहे. राजा : तुम्ही त्यांचे काय करणार ? ती : घराबाहेरील कचरापेटीत फेकून देईन. आमच्यासाठी या दगडांचे काही मूल्य (किंमत) नाही. राजाने त्यांना दिलेली ती सर्वच मौल्यवान रत्ने कचरापेटीत पडलेली पाहिली. तेव्हा तो आश्‍चर्यचकीत झाला आणि त्याने त्या भक्त-दांपत्याच्या पायाशी लोटांगण घातले.आणि म्हणाला खरोखरच खरा भक्त कधीच धनाची लालसा करीत नाही.त्यास मौल्यवान रत्नाचे मूल्यही दगडासमान असते. संदर्भ : (ऋषीप्रसाद, एप्रिल २०१०) *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00          ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 05/02/2020 वार - बुधवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    💥 ठळक घडामोडी :-  ● १९९६ - मुंबई येथील चौथ्या आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवात 'सोना माटी' या भारतीय लघुपटाने सुवर्णपदक पटकावले. ● २००३ - अंतराळवीर कल्पना चावला यांचे नाव भारताने २००२ मध्ये सोडलेल्या पीएसएलव्ही सी-४ या हवामानविषयक उपग्रहाला देण्यात आल्याची पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची घोषणा. ● २००४ - पुण्याच्या स्वाती घाटेने वूमन ग्रँडमास्टर किताबाचा तिसरा व शेवटचा नॉर्म संपादन केला. 💥 जन्म :- ● १९०० - अडलाई स्टीवन्सन, अमेरिकन राजकारणी. ● १९७६ - अभिषेक बच्चन, भारतीय चित्रपट अभिनेता. 💥 मृत्यू :- ● १९२० - विष्णुबुवा जोग, वारकरी संप्रदायाचे कार्य पुढे नेणारे. ● २००० - वैद्य माधवशास्त्री जोशी, महाराष्ट्र आयुर्वेद महासंमेलनाचे माजी अध्यक्ष. ● २००३ - गणेश गद्रे, ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर ! ठाकरेंच्या राज्यात येणार पाच दिवसांचा आठवडा, केंद्राच्या धर्तीवर आता राज्यातही पाच दिवसांचा आठवडा करण्यात येणार आहे. यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले आहेत* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *मातृवंदना सप्ताहाच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र देशात दुसरा, पंतप्रधान मातृवंदना योजनेंतर्गत प्रथम प्रसव होणाऱ्या महिलांना पौष्टिक आहार मिळावा, मोल मजुरी करणाऱ्या महिलांना कामानिमित्त बाहेर जाताना आराम मिळावा, बाळाची निगा घेता यावी, यासाठी तीन हप्त्यांमध्ये एकूण 5 हजार रूपयांची आर्थिक मदत देण्यात येते.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *वाळूज महानगर :  ग्रामीण भागात रुग्णांच्या जिवाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरांविरुद्ध वाळूज महानगर जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. आता गावात बोगस डॉक्टर आढळून आल्यास संबंधित गावातील सरपंच व ग्रामसेवकाला जबाबदार धरले जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी दिला आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *अलिबाग, एलिफंटा बेटापर्यंतचा प्रवास सुखकर होणार; कुलाब्यातील जेट्टी, प्रवासी वाहतूक टर्मिनलला सरकारची मान्यता, बंदरविकास मंत्री अस्लम शेख यांची माहिती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *औरंगाबादच्या रफिक झकेरीया महिला महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी महाविद्यालय कॅम्पस मोबाईल मुक्त करण्याचा घेतला निर्णय* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भातची सुनावणी आज होणार असल्याची माहिती न्यायमूर्ती नागेश्वर राव यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने स्पष्ट केले आहे* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *मुंबईकर यशस्वी जैस्वालच्या नाबाद शतकी खेळाच्या जोरावर भारताने १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघावर 10 गडी राखून केली मात* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••              *जीवन सुंदर आहे.*  लेख वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लीक करावे http://nasayeotikar.blogspot.com/2016/12/blog-post_26.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃  *काव्यांगण - रोज एक बालकविता* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *छकुला* © डॉ. पवन कोरडे, नागपूर शोभे गोड गोंडस बाळ रांगता वाजे छुमछुम वाळ मनगटी कडा चांदीचा गाली बाळाच्या काजळतिळ छकुल्याची छकुली नजर भिरभिरते बाहुलीवर बाहुलीही साद देते छकुल्यासवे खेळण्या तत्पर कोण कसे सांगावे काय बाळाच्या मनात 'खाऊ' समजूनी छकुला धरे काहीही मुखात कुणाचा स्वर ऐकूनी दुडदुड धावतो घरी छकुला आधार घेऊनी ऊभा राहतो दारी पाहता हे कुकुलं बाळ लोपते मनातली मरगळ पात्यासम लवते कात निष्प्राण देही संचारते बळ *सौजन्य :- जि. प. प्रा. कन्या शाळा धर्माबाद* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *" तुमच्या जीवनाला वळण देण्याचा एक छोटा प्रयत्न म्हणजे ध्येयवेडा प्रवास "* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *रॅमन मॅगसेसे पुरस्कार कोणत्या देशाकडून दिला जातो ?* फिलिपाईन्स 2) *जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारी वनस्पती कोणती ?* बांबू 3) *कस्तुरबा गांधी यांचे टोपण नाव काय होते ?* बा 4) *कुष्ठरोग्यांसाठी वसाहत स्थापन करणारी भारतातील पहिली विभूती कोण ?* बाबा आमटे 5) *भारतात मोघल सत्तेची स्थापना कोणी केली ?* बाबर *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 अभिषेक बच्चन, सुपरस्टार 👤 सौ. रंजना जोशी, सहशिक्षिका, धर्माबाद 👤 सदाशिव मोकमवार, येताळा 👤 निलेश गोधने, सहशिक्षक, नांदेड 👤 भीमराव वाघमारे 👤 संदीप मुंगले, धर्माबाद 👤 श्याम राजफोडे 👤 विठ्ठल पेंडपवार, नांदेड 👤 बाळासाहेब कदम, सहशिक्षक, धर्माबाद 👤 अच्युत पाटील खानसोळे,  सहशिक्षक, नांदेड 👤 उमाकांत म्याकलवार 👤 वैजनाथ जाधव साहेब 👤 डॉ. जितेंद्र डोलारे, पुणे 👤 दत्ता हेलगंड, धर्माबाद *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *जीवन कधी कधी अडथळ्यांची शर्यत बनते. पराभव, अपयश, जिव्हाळ्याच्या व्यक्तीचा दुरावा किंवा मृत्यू, अपमान अशी संकटे एकापाठोपाठ येतात. कधी कधी एकापेक्षा आधिक संकटे एकत्र येऊन डोक्यावर धाडकन् आदळतात. आपण कोलमडून पडतो. निराशेच्या गर्तेत कोसळतो. सुखाचा किरणही कोठे दिसत नाही. भयाण काळोखात चाचपडताना बाहेर पडण्याची वाट सापडत नाही. खरंच, कधी कधी असं होतं पण; ही 'कधी कधी' घडणारी अवस्था तात्पुरती आणि आल्पकाल टिकणारी असते. ती संपून पुन्हा सुखाचा शिडकावा होणार असतो.* *सुखप्राप्ती ही माणसाची मुलभुत प्रेरणा आहे. त्या प्रेरणेच्या समाधानासाठी संकटाच्या किंवा दु:खाच्या प्रसंगी धीर धरावा लागतो. ओढवलेल्या परिस्थितीचा स्विकार करून, त्याच्यावर मात करण्याचे सामर्थ्य आणि स्वातंत्र्य आपल्याला माणूस म्हणून लाभले आहे, हे स्वत:ला पटवून दिले की दु:खाचा भयंकरपणा निम्म्याने कमी होतो. पुढची वाट दिसू लागते. आपल्याला हवा असलेला बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न करायचे असतात. त्यासाठी दुस-या कशावर किंवा कोणावर अवलंबून राहायचे नाही असे धोरण ठेवले तर दु:ख वेगाने दूर पळते आणि सुख चोरपावलांनी आत येते.* *॥ रामकृष्णहरी ॥* 🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो* *हिरवा निसर्ग हा भवतीने* *मन सरगम छेडा रे,* *जीवनाचे गीत गा रे,* *धुंद व्हा रे।* *खरय ही देणं स्वर्गाचं दर्शनच घडविते.* *भारताला लागलेला निसर्ग तर जगाला मोहिनी घालतो.* *आणि आपण त्यावर वेगवेगळे पाशवी अत्याचार करतो.* *निसर्गाच्या सानिध्यात घालविलेले क्षण मनाला प्रसन्न करतात.* *उमललेल्या नाजूक फुलांचा बहर, हिरव्यागार रानातून मंद* *शिळ घालणारा प्रसन्न वारा या सर्वांमध्ये निसर्गाचं एक दैवी रूप* *दडलेलं आहे. ही सुंदर कलाकृती पाहून अचंबित व्हायला* *होतं. निसर्गाचं निरीक्षण केल्यावर जाणवतं की, या नाजूक* *फुलांवर सुंदर रंगाची उधळण कोणी* *केली असेल ?* *हिरव्या रंगाने नटलेल्या धरणीवर निळं आकाश पसरलेलं आहे. या अथांग आकाशावर सर्व दिशांना उजळून टाकणारा अलौकिक रंगाचा मनमोहक चित्रण करणारा चित्रकार कोण आहे ? आपल्या आजूबाजूला पसरलेल्या निसर्गाचा चमत्कार व सुंदरता बघायला मानवाकडे फक्त एक नजर आहे. पण तो अनामिक चित्रकार असंख्य नजरेने क्षितिजा पलिकडे पाहात आहे. निसर्गाचे हे सगुण व प्रेरणेने भरलेलं भव्य सृष्टी चित्र सुंदरतेने चित्रित करणा-या चित्रकाराला माझा सलाम !!!* *निसर्गाला प्रणाम* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• बाह्य सौंदर्यापेक्षा आंतरिक सौंदर्य अधिक मौल्यवान आहे.कारण बाह्यसौंदर्य अधिक दिसण्यासाठी नानाप्रकारचे सौंदर्य प्रसाधने व मूल्य देऊन निर्माण केले तरी ते जास्त काळ टिकत नाही किंवा टिकवता येत नाही.ते अल्पकालीन आहे. आंतरिक सौंदर्य असे आहे की,त्याची किंमतही मोजून आणता येत नाही आणि अन्य माध्यमांतून प्राप्तही करता येत नाही.असे सौंदर्य आपल्या अंतःकरणात उपजतच असते फक्त त्याला योग्यप्रकारे हाताळता आले पाहिजे.ह्या आंतरिक सौंदर्यामुळे अनेक नाती जोडून जीवनातला आनंद उपभोगता येतो न इतरांनाही आपल्या आनंदात व इतरांच्या आनंदात भर पाडता येते तसेच कोणत्याही प्रकारचे मूल्य न देता शेवटपर्यंत टिकवता येते.फक्त त्याच्यासाठी आंतरिक तळमळ असायला हवी. © व्यंकटेश काटकर, नांदेड. संवाद...९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🎑📝🎑📝🎑📝🎑📝🎑📝🎑 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आत्मपरीक्षण* एक तरुण मुलगा पब्लिक फोन ठेवलेल्या दुकानात येतो. *तरुण*(अदबीने) : दुकानदार काका, मी एक फोन करू का ? तरुणाचे आदबशीर वागणे पाहून दुकानदार खुश होतो. तो तरुण फोन नंबर फिरवून रिसिव्हर कानाला लावतो. (डायलवाला जुन्या काळाचा फोन असल्याने पलीकडून बोलणाऱ्या व्यक्तीचा आवाज इकडे इतरांना देखील अस्पष्ट ऐकू यायचा !! तसे ते बोलणे दुकानदार हळूच ऐकू लागला) *** *तरुण* : बाईसाहेब, तुमच्या बागेच्या सफाईचे काम मला द्याल का ? मी माळीकाम खूप छान करतो. *महिला* : (तिकडून बोलतेय) नको. मी एक महिन्यापूर्वीच एकाला ठेवले आहे. *तरुण*: बाई, प्लिज, मला फार गरज आहे हो, आणि तुम्ही त्याला जितका पगार देता त्याच्या निम्म्या पगारात काम करायला मी तयार आहे !! *महिला* : पण माझ्याकडे जो आहे, त्याच्या कामावर मी समाधानी आहे. मग त्याला का काढून टाकू ? *तरुण* : बाई, बाग कामासोबतच मी तुमच्या घरातले सफाईचे काम फ्री करेन. प्लिज मला कामावर घ्या न !! *महिला* : तरीही नको बाबा !! दुसरीकडे काम पहा !! माझ्याकडे नाही !! *तरुण*: हसत हसत फोन ठेवून निघाला. दुकानदाराने त्याला थांबवले. आणि विचारले की, "तू प्रयत्न केलास पण नोकरी मिळाली नाही ना ? मला तुझा स्वभाव आवडला. कष्ट करण्याची तयारी आवडली. वाटल्यास तू माझ्या दुकानात नोकरी करू शकतोस" यावर पुन्हा हसून तो तरुण म्हणाला, "मला नोकरी नकोय. नक्की नकोय." *दुकानदार* : मग आत्ता तर त्या फोनवर इतक्या विनवण्या करत होतास न ? *तरुण* : मी खरेतर त्या बाईंना काम मागत नव्हतो तर स्वतःचे काम तपासत होतो. मीच त्या बाईंच्या बागेचे काम करतो. मी करत असलेले काम माझ्या मालकाला आवडतेय की नाही ? हे चेक करत होतो" असे म्हणून तो तरुण निघतो, दुकानदार त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे *चकित होऊन* पाहत राहतो.  *तात्पर्य* : अधूनमधून आपण स्वतःच स्वतःचे *आत्मपरीक्षण* करणे गरजेचे आहे. *तुम्ही नोकर असा की मालक*. ते महत्वाचे नाही तर तुम्ही करत असलेले काम चांगले होतेय का हे महत्वाचे आहे. आणि ते सर्वात जास्त कोण ओळखू शकतो तर *आपण स्वतः* !! *जो स्वतःला तटस्थपणे पाहून परीक्षण करू शकतो, तो नक्कीच इतरांपेक्षा पुढे जातो.* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00          ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 04/02/2020 वार - मंगळवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    *जागतिक कर्करोग दिन* 💥 ठळक घडामोडी :-  ● २००४-मार्क झुकरबर्ग ने फेसबुक ची स्थापना केली. ● १९४८-श्रीलंका देशाला स्वातंत्र्य मिळाले. ● १९४४-'चलो दिल्ली' चा नारा देत आझाद हिंद सेनेची दिल्लीकडे कूच. 💥 जन्म :- ● १९७४-ऊर्मिला मातोंडकर, अभिनेत्री. ● १९३८-पं बिरजू महाराज,कथ्थक नर्तक व गुरू ● १९२२ - स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी. 💥 मृत्यू :- ● २००१- पंकज रॉय,क्रिकेटपटू ● १९७४-सत्येंद्रनाथ बोस,भारतीय भौतिकशास्त्रज्ञ ● १६७०-नरवीर तानाजी मालुसरे *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *जम्मू-काश्मीर - रियासी जिल्ह्यात काल भारतीय लष्कराचं ‘चीता’ हे हेलिकॉप्टर कोसळलं, कसलीही जीवितहानी नाही* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *सांगली येथे २७ मार्च ते १४ जून या कालावधीत पार पडणाऱ्या १०० व्या नाट्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी खा. शरद पवार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *सोलापूर विमानतळ परिसरात लागली आग; अग्निशमन दलाच्या दहा गाड्या घटनास्थळी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून 8 लाख कर्करुग्णांवर उपचार- आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *चीनमध्ये वेगाने पसरणाऱ्या कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत 361 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *राज्यात थंडीचा जोर लवकरच ओसरणार; अनेक शहरांच्या किमान तापमानात वाढ, दक्षिणेकडून उष्ण वारे वाहू लागले* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *NZ vs IND : रोहित शर्माची न्यूझीलंड दौऱ्यातून माघार; हिटमॅनच्या कसोटी कारकिर्दीला मोठा धक्का* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         *तंबाखूमुक्त जीवन जगता येईल ?*      https://nasayeotikar.blogspot.com/2018/08/blog-post_10.html?m=1 लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃  *काव्यांगण - रोज एक बालकविता* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *अक्षरज्ञान* - मीना खोंड, हैद्राबाद शिकावे अक्षर व्हावे साक्षर ज्ञानामृताचा महिमा थोर ... मराठी अमृत करावी आत्मसात शब्द बोलती वेदवेदांत .... कथा सांगती कविता गाती पुस्तक आपुले मित्र असती .... वाचन सातत्य लेखन नित्य जीवनाचे तत्वज्ञान अक्षरा अक्षरात ..... *सौजन्य :- जि. प. प्रा. कन्या शाळा धर्माबाद* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *" सज्जन लोकांना जबाबदारीने काम करण्यासाठी कायदे सांगायची गरज पडत नाही पण दुर्जन मात्र कायद्याच्या पळवाटा शोधत असतात."* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *गाजरमध्ये कोणते जीवनसत्व असते ?* ब 2) *माऊंट एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली भारतीय महिला कोण ?* बचेंद्रि पाल 3) *भारताची सीमारेषा कोणत्या देशासोबत सर्वात जास्त आहे ?* बांग्लादेश 4) *तानसा धरण कोणत्या नदीवर आहे ?* तानसा नदी ( ठाणे ) 5) *कोणता रंग अधिक उष्णता आकर्षित करतो ?* काळा *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 कृष्णा तिम्मापुरे, पत्रकार, धर्माबाद 👤 राजरेड्डी गडमोड, येताळा 👤 संजय गायकवाड, धर्माबाद 👤 डी. एन. पाटील बेंबरेकर, देगलुर *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आयुष्यातील पहिल्या पंधरा, सोळा वर्षाचा कालावधी कमालीचा संवेदनशील असतो. या कालावधीत मुलांवर होणारे संस्कार महत्वाचे असतात. शारीरिक, भावनिक, बौद्धिक, आणि मानसिक विकासासाठी हा कालावधी महत्वाचा असतो. या दरम्यान मुलांसाठी सकारात्मक वातावरणाची पूर्तता करणे, ही पालकांची आणि समाजाचीही जबाबदारी असते. काही पालक त्यांच्या मुलांशी संवाद साधण्यात कमी पडतात. ए वन शाळा, काॅलेजात व क्लासमध्ये प्रवेश मिळवून देणे, आर्थिक बाबींची पूर्तता करणे, एवढीच जबाबदारी असल्यासारखे वागतात. स्वत: पैसे मिळविण्यासाठी धावत राहतात आणि मुलांवर आपल्या आपेक्षा लादून त्यांनाही आयुष्याच्या स्पर्धेत ढकलून मोकळे होतात.* *कौटुंबिक व सामाजिक परिस्थिती किंवा दैनंदिन वाईट सवयी युवकांच्या नैराश्याला कारणीभूत ठरतात. नकारात्मक प्रवृत्तींकडे आकर्षिले जाऊन वाईट सवयींचे शिकार बनतात. परिणामी सहका-यांशी, आई-वडिलांशी वाद होतात, त्याचे रूपांतर एकाकीपणात होते. एकाकीपण नैराश्याला निमंत्रित करते. नवनवीन गोष्टी शिकून घेण्याची उत्सुकता विकसित करायला हवा. निसर्गाशी संवाद साधता यायला हवा. जीवनमूल्यांचा अर्थ समजून घेऊन ती कृतीत उतरविणे जीवनात गरजेचे असते. विचार आणि आचार यांच्यात सुसंगती ठेवायला हवी. त्या त्या वयात सकारात्मक गोष्टी केल्याने व्यक्तिमत्व विकसित होते, आत्मविश्वास वाढतो, विवेकबुद्धी वाढते, निर्णयशक्ती वाढीस लागते. संत तुकाराम महाराज म्हणतात..मन प्रसन्न करू..मोकळेपणाने बोलू आणि सकारात्मक होऊ.!* ••● ‼ *रामकृष्णहरी* ‼ ●• 🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁 *संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• मित्रांनो, खूप मोठे व्हायचे, मग खूप सारी पुस्तके वाचली पाहिजेत,खूप मोठी डिग्री मिळवली पाहिजे असं काही नाही. आपले काम मनापासून करणे,त्यात जीव ओतणे हे महत्वाचे आहे. मौजे निट्टूर ता चंदगड येथील रामा सुतार या तरुणाने सेफ्टी बॅग तयार केलेली आहे ती बॅग जर कोणी चोरून न्यायच प्लॅन केलं तर त्या बागेतील सायरण मोबाईल aap च्या सहायणे चोर चोर असा आवाज करतो त्या प्रत्यक्षिकाच शूटिंग केलं आहे , रामा कदाचित घरच्या आर्थिक परिस्थिती मुळे दहावीपर्यंत पण शिकला नसेल पण आपल्या कल्पकतेच्या जोरावर सायन्स exibution मधील नवनवीन 100 च्या वर प्रयोग त्यांनी केले आहेत. रामा हा उत्तम कलाकार निर्माता, दिग्दर्शक आहे, उत्तम गायक आहे ,उत्तम फोटोग्राफर आहे,उ तबलावादक ,हार्मोनियम वादक आहे. एवढंच काय बिघडलेला कॉम्पुटर सुद्धा तो सहज करतो, बऱ्याच प्रकारची सॉफ्टवेअर ची निर्मिती सुद्धा त्याने केलेली आहे, त्यांनी तयार केलेली थर्मोकोल कटिंग ची मशीन मी स्वतः बघून थक्क झालो होतो,त्या मशीन ने केलेलं सुंदर नक्षीकाम व पोल कटिंग च कामआजही माझ्या नजरे समोरून जात नाही . अशोक कुमावत (राष्ट्रपती पुरस्कार विजेते) 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपण पुस्तके वाचायला शिकलो.त्यातून ज्ञान घेऊन जगायला शिकलो. पण माणसे जोडण्याचे काम मात्र शिकलो नाही. माणसे जोडण्यापेक्षा माणसापासून दूर दूर राहायला शिकलो. नातेसंबंध, प्रेम, आपुलकी, जिव्हाळा आपल्यातला हळुहळू कमी करायला शिकलो .खरे तर ज्ञानाने माणसे जोडली जातात पण माणसे तोडायला शिकलो. आम्ही चार पुस्तके शिकलो की, आमच्यासारखे या जगात कोणीच श्रेष्ठ नाही असे म्हणायला लागलो. अशा माणसांना खरे ज्ञान म्हणजे काय बहुतेक समजले नसावे .उलट अशी माणसे शिकून सवरुनही अज्ञानच आहेत असे म्हणायला काहीच हरकत नाही.ज्या ज्ञानाचा उपयोग आपल्या जीवनातील अज्ञान घालवणे आणि इतरांमधील असलेला अज्ञानपणा घालवून जीवन जगण्याची नवी दिशा दाखवने हा आहे. हा मुख्य उद्देश ठेऊन जगणे म्हणजे ज्ञान होय. अशा वर वर ज्ञान घेतलेल्या माणसांनी   खरे ज्ञान म्हणजे काय हे शिकून माणसे जोडण्याचे काम शिकायला हवे. - व्यंकटेश काटकर,नांदेड   संवाद.9421839590. 📚📖📚📖📚📖📚📖📚📖 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *संघटितपणाचे महत्त्व* एक गृहस्थ म्हातारपणामुळे बराच थकला होता. आयुष्यात चांगली कमाई करून आणि स्वत: चांगले जीवन जगूनसुद्धा त्याच्या पाच मुलांमध्ये सदान्-कदा चालणार्‍या भांडणांमुळे तो दु:खी होई. त्याने आपल्या मुलांना बराच उपदेश केला; पण उपड्या घडावर पाणी. एके दिवशी त्याने आपल्या पाचही मुलांना प्रत्येकी हातभर लांबीची एकेक काठी घेऊन यायला सांगितले. त्याप्रमाणे ती मुले एकेक काठी घेऊन आली. त्या गृहस्थाने त्यांच्यापैकी प्रत्येकाला आपापली काठी मोडण्यास सांगितले. वडिलांनी सांगितलेली ती गोष्ट प्रत्येक मुलाने लगेचच करून दाखवली. वडिलांनी पाच काठ्यांची जुडी करून प्रत्येकाला ती मोडायला सांगितल्यावर एकालाही ती मोडता नाही आली. पुन्हा त्या गृहस्थाने त्या मुलांना तशाच प्रकारची एकेक काठी घेऊन यायला सांगितले. पाच जणांनी पाच काठ्या आणून वडिलांपुढे ठेवल्या. वडिलांनी त्या पाच काठ्यांची एका दोरीने मोळी बांधली आणि प्रत्येकाला ती मोडायला सांगितली. पाच काठ्या एकत्र असलेली ती मोळी आपल्या पाच मुलांपैकी कुणालाच मोडता येत नसल्याचे पाहून तो गृहस्थ त्यांना म्हणाला, बघितलंत ना ? एकीचे बळ किती असते ते ? वडील एवढेच बोलले; पण ते सूज्ञ मुलगे समजायचे ते समजले. तेव्हापासून एकजुटीने वागू लागले. *तात्पर्यः एकीचे बळ फार मोठे असते.कोणतेही कार्य चांगले पार पाडण्यासाठी संघटित असणे फार महत्त्वाचे आहे.* संदर्भ : सनातन निर्मित ग्रंथ, ‘बाेधकथा’.. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00          ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 03/02/2020 वार - सोमवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    💥 ठळक घडामोडी :-  ● १९६६ - सोवियेत संघाचे लुना ९ हे मानवविरहीत अंतराळयान चंद्रावर उतरले. ● १९८४ - स्पेस शटल चॅलेंजरच्या अंतराळवीरांनी अंतराळात प्रथमतः अनिर्बंध पदार्पण केले. ● १९२८- 'सायमन गो बॅक' या घोषणांनी मुंबईत सायमन कमिशनचा निषेध करण्यात आला. 💥 जन्म :- ● १९६३ - रघुराम राजन, भारतीय अर्थशास्त्री,रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर 💥 मृत्यू :- ● १११६ - कोलोमान, हंगेरीचा राजा. ● १४५१ - मुराद दुसरा, ऑट्टोमन सम्राट. ● १९६३- सी एन अन्नादुराई, तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री ● १९२४- वुड्रो विल्सन, अमेरिकेचे २८वे राष्ट्राध्यक्ष आणि नोबेल पारितोषिक विजेते *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *चीनच्या वुहान शहरात अडकलेल्या 330 लोकांना घेऊन दुसरे विमान भारतात परतले, सर्वांना 14 दिवस डॉक्टरांच्या देखरेखीत ठेवणार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *फडणवीस सरकारच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात जाहिरांतीवर करण्यात आला 15 कोटी 51 लाख रुपयांचा खर्च, माहिती अधिकार मधून माहिती उघड* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे लिखित तुंबारा या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पुण्यात पार पडला. एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर यांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. या कार्यक्रमादरम्यान सयाजी शिंदे यांनी बीडमध्ये आयोजित वृक्ष संमेलनाची माहिती दिली. बीड जिल्ह्यातील डोंगरावर १३ आणि १४ डिसेंबरला हे वृक्ष संमेलन होणार आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *ओबीसींच्या विकासासाठी जातीयनिहाय जनगणना गरजेची, संताजी सेवा सांस्कृतिक मंडळ, कृष्णनगर वर्धाच्या वतीने आयोजीत तेली समाज उप वधु-वर व पालक परिचय मेळाव्यात खा. रामदास तडस बोलत होते.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *दोन वर्षांत 1 लाख 42 हजार बालकांना अतिसार; जगभरात दरवर्षी 15 लाख मुलांचा मृत्यू* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *शुभमन गिलच्या द्विशतकासह (नाबाद २०४) प्रियांक पांचाळ (११५) आणि हनुमा विहारी (१००) यांच्या शतकांच्या जोरावर भारत ‘अ’ संघाने न्यूझीलंड ‘अ’ संघाविरुद्धची चारदिवसीय पहिली कसोटी अनिर्णित राखली.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *भारतीय संघाची ऐतिहासिक कामगिरी, न्यूझीलंडला होमग्राउंडवर दिली क्लीन स्वीप, 5-0 फरकाने जिंकली टी ट्वेन्टीची मालिका* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *शिक्षण म्हणजे विचार करण्याची कला*      http://nasayeotikar.blogspot.com/2018/05/32.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃  *काव्यांगण - रोज एक बालकविता* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• शाळा आमची छान ....🖊 प्रसाद तुपे नाशिक....9822161037 फुलले जसे अक्षरांचे रान.. धडे गिरवू.. गणिते सोडवू.... सजवू शब्दांची बाग.... शाळा आमची छान... करू गट्टी निसर्गाशी...अन् प्रार्थना देवाची.... सुखी ठेव सर्वांना... राखू भारत भू ची शान.... शाळा आमची छान...छान... *सौजन्य :- जि. प. प्रा. कन्या शाळा धर्माबाद* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *" संधी येत नसते, आपण ती आपल्या कार्यातुन निर्माण करायची असते."* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *कुलाबा जिल्ह्याचे नामकरण रायगड असे कोणी केले ?* बॅरिस्टर अंतुले 2) *महाराष्ट्राचे पठार कोणत्या खडकांनी बनलेले आहे ?* बेसाल्ट 3) *भारतात कोळशाचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यात होते ?* बिहार 4) *राधानगरी धरण कोणत्या नदीवर आहे ?* भोगावती नदी ( कोल्हापूर ) 5) *उडणारा सस्तन प्राणी कोणता ?* वटवाघूळ *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 हंसिनी उचित, साहित्यिक 👤 गंगाधर धडेकर, पत्रकार, धर्माबाद 👤 अर्शन पल्ली अजय 👤 सुशील कुलकर्णी *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आयुष्याच्या संध्याकाळी आपल्या कुटुंबासमवेत निवांतपणानं जगता यावं नि जीवनाचं सार्थक व्हावं, अशी प्रत्येकाची मनोमन ईच्छा असते. आज मात्र एकाकीपणाच्या गर्तेत स्वत:ला कोंडून घेण्याची वेळ अनेकांवर येताना दिसत आहे. पाश्चात्य देशातून आलेल्या संस्कृतीनं गेली अनेक वर्षे आमच्या सामाजिक रचनेला हादरे दिल्याने आमच्या कुटुंबव्यवस्थेला तडे गेले आहेत.* *संयुक्त कुटुंबव्यवस्थेत अनेक अडचणी व भौतिक सुखांच्या अभावातही आत्मिक सुखासाठी जगणारी माणसं आज हरवून गेली आहेत. पडद्यावरील आजी-आजोबा आम्हांला भावतात, पण वास्तवात प्रत्येकाला कुटुंब हवं ते चौकोनात बांधलेलं. त्यात इतरांना जागाच उरलेली नाही.* *"काळाच्या बदलात आलेली ही स्थित्यंतरं अत्यंत वेदनादायी आहेत, पण ती स्विकाराणं ही आमची अपरिहार्यता...?* *आहे....?...की.....?"* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• मित्रांनो, मला जे काही मिळाले ते सगळ्यात श्रेष्ठ मिळाले हा विचार केला तर आपण जगातील सगळ्यात सुखी आहे असं समजा. कारण अशी अनेक थोर माणस होऊन गेली ज्यांना शरीर झाकायला वस्त्र नव्हते, की दोन वेळचे दोन घास मिळत नव्हते. म्हणजे राहायला घर असणं, घरात सुखसोई असणं, झोपायला अंथरून असणे, पांघरायला पांघरूण असणे, घालायला कपडे असणे, अभ्यासाला पुस्तक वह्या मिळणे, चांगल्या शाळेत शिक्षण मिळणे, चवीपरीने खायला मिळणे. जीवनावश्यक गरजा भागवण्यासाठी अर्थार्जनाची प्रतिष्ठित सोय असणे अशा एक नाही अनेक गोष्टीं निसर्गाचे आभार बाळगण्यासारख्या नाहीत का? . चहा थोडा गार झाला तर चिडतो मी. पण वनवासी पाड्यावर गेलं की लक्षात येतं की मुळात जगण्याची धडपड म्हणजे काय असते. दोन वेळच्या भरपेट जेवणाची किंमत काय? थंडी वाऱ्यापासून संरक्षण मिळण्यासाठी गरम कपडे सोडाच पण किमान कपडे असणं याची किंमत किती? एका घासासाठी वणवण भटकणारी मुलं, माणस बघितली की भाजी आवडत नाही म्हणून भरल्या ताटावरून उठून जाणाऱ्या मुलांची,माणसांची कीव येते तसेच घृणा पण येते. मला बंगला, गाडी, नोकरी ,सगळ्या सुख सोई मिळूनही मला त्यात सुख शोधता येत नाही.यात दोष कुणाचा? या साऱ्या गोष्टी मला सहज मिळाल्या आहेत तर मी याबाबत कृतज्ञता नको का बाळगायला? निसर्गाचे आभार माना आणि जपणूक करा. अशोक कुमावत (राष्ट्रपती पुरस्कार विजेते) 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• तुमच्या आशारुपी पंखांना खूप पसरु द्या.कारण तेच पंख तुमच्या आशा पूर्ण करण्यासाठी मदत करतात.त्यांना जर संकुचित वृत्तीने तुमच्याच मनामध्ये जवळ करुन ठेवलात तर तुमच्या मनातल्या असलेल्या इच्छा पूर्ण कशा होतील ? त्यापेक्षा त्या पंखामध्ये आत्मविश्वासरुपी बळ निर्माण करुन त्यांना नवे काहीतरी करण्यासाठी पसरु द्या म्हणजे तुम्हाला आनंदाने आणि समाधानाने जीवन जगण्यासाठी संधी निर्माण करुन देतील. पक्षी आकाशात स्वच्छंदपणे विहार करतात ते पंखाच्या बळावरच ना ! मग पंखच पसरले नसते किंवा एखादी बाजू पंख विरहित असली तर कसे बरे आकाशात विहार करु शकले असते नाही ना ? मग तसेच मानवी जीवनाचे आहे. आशारुपी पंखांचे तसेच आहे त्यांनाही थोडे स्वातंत्र्य द्या आणि जीवनरुपी आकाशात स्वच्छंदपणे विहार करायला प्रेरणा द्या. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद...९४२१८३९५९०. 🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *तेनालीराम चे वाक्चातुर्य* एकदा तेनालीराम तीन मासाची सुट्टी घेऊन बद्रिनाथाच्या यात्रेला गेला. तो जाताच मंत्री सेनापती आणि काही सरदारांचे संगनमत झाले. मंत्रीने सम्राट कृष्णदेवरायना सुचविले की, राज्याच्या सीमेवर नेहमीच शत्रुंच्या आक्रमणाचा धोका असतो. आपण अशी व्यवस्था केली पाहिजे की, ज्यामुळे सीमेच्या आसपास रहाणारी जनता निर्भय होऊन सुखाने जगेल. महाराजांना या गोष्टीत तथ्य वाटले. त्यांनी लगेच आदेश दिला की, याबाबतीत एक योजना बनवण्यात यावी. मंत्रीमंडळाने त्वरीत योजना बनवली. खर्चासहीत पूर्ण. तपशील महाराजांना प्रस्तुत केला. महाराजांनीही त्याला अनुमती दिली. मंडळाची मजाच झाली. त्यांनी आपल्या परिवारांतील सदस्यांनाच नाही, तर दूर दूरच्या नातेवाईकांनाही चाकरीला (नोकरीवर) ठेवले. पैसा व्यर्थ खर्च होऊ लागला. सम्राट मंत्र्यांना त्याविषयी विचारित, तेव्हा मंत्री एकच उत्तर द्यायचे ‘‘अन्नदाता, पहात रहा. ही योजना पूर्ण होताच विजयनगरच्या शत्रुला ह्या सीमा हिमालय पर्वतासारख्या भासतील.’’ होता-होता दोन मास लोटले. तिसर्‍या मासात तेनालीराम यात्रेवरुन आला. विजयनगरची सीमा ओलांडताच त्याला सुगावा लागला की, योजने अंतर्गत मंत्री, सेनापती पंडित तसेच अनेक दरबारीही आपआपला स्वार्थ साधत होते. सीमा सुरक्षेच्या नावाखाली अनेक वस्त्या जमीनदोस्त केल्या होत्या. कित्येक शेतमळे उध्वस्त केले होते. अत्याचार आणि अराजकता माजलेली होती आणि सम्राटाच्या जवळ कोणालाही जाऊ दिले जात नव्हते. सीमा क्षेत्रातील जनतेची करुण कहाणी ऐकून तो चिंताग्रस्त झाला; परंतु हे सर्व महाराजांना सांगणार कसे ? बराच विचार केल्यानंतर त्याला एक युक्ती सुचली. तीन मासांच्या रजेनंतर ज्या दिवशी तेनालीराम दरबारात हजर झाला, तेव्हा राजा कृष्णदेव रायनी हसून स्वागत केले. मग म्हणाले, ‘‘तेनालीराम तुझ्या अनुपस्थितीत आम्ही पुष्कळ मोठे कार्य केले आहे. आम्ही विजयनगरच्या सर्व सीमा अभेद्य बनवल्या, आता तेथील रहिवाशी निर्भयतेने राहू शकतात.’’ ‘‘खरे आहे महाराज ! ’’ तेनालीराम म्हणाला, ‘‘सीमा क्षेत्रात आपला जयजयकार होत आहे. मंत्रीजीच्या या महत्वपूर्ण कार्याला माझ्या शुभेच्छा आहेत.’’ मंत्री तेनालीराम थोडा वेळ थांबून म्हणाला, ‘‘अन्नदाता, शत्रुच्या आक्रमणापासून भयमुक्त होऊन सीमांत गाववाल्यांनी नाट्यमंडळ बनवले आहे. आपण तर कलेचे पारखी आहात म्हणूनच आपल्या पहिल्या नाटकाचे उद्घाटन आपल्याच हस्ते व्हावे, अशी त्यांची इच्छा आहे.’’ सम्राट कृष्णदेवराय प्रसन्न झाले. त्यांनी लगेच स्वीकृती दिली आणि दुसर्‍याच दिवशी रंगशाळेत नाटक आयोजित केले गेले. कृष्णदेवराय सहपरिवार उपस्थित झाले. सर्व दरबारी तसेच राज्यातील प्रतिष्ठित नागरिकांनाही आमंत्रित केले गेले. नाटक वेळेवर चालू झाले; पण ते नाटक कसले होते ? तर सीमांत रहीवाशांवर होणार्‍या अत्याचारांवरची जिवंत प्रतिमा होती. मधे-मधे विदुषक रंगमंचावर येई आणि सम्राट कृष्णदेवरायांकडे पाहून मोठ्या आवाजात म्हणे, ‘‘दया करा महाराज ! आम्हाला वाचवा ! शत्रूच्या आक्रमणापेक्षा अधिक आम्हाला आपल्या माणसांपासून सुरक्षा हवी आहे.’’ मंत्री, सेनापती, पंडीत, राजदरबारी, नागरिक सर्वच हैराण झाले. महाराजांचे डोळे रागाने लाल झाले होते. त्यांनी तेनालीरामला बोलवून विचारले, ‘‘हे सर्व काय आहे ?’’ ‘‘मला काही माहित नाही, महाराज’’ तेनालीराम भोळेपणाचा आव आणून म्हणाला, ‘‘तुम्ही ह्या लोकांनाच विचारा ना’’! महाराजांनी रंगशाळेतच विचारपूस केली. तेव्हा खरी गोष्ट समोर आली. त्याच क्षणी बर्‍याचशा दरबार्‍यांना मिळणारी सवलत थांबवली गेली. मंत्री, सेनापती तसेच पंडितजीवर मोठे मोठे खटले भरले गेले आणि तेनालीरामची स्तुती करत सम्राट कृष्णदेव राय म्हणाले, ‘‘राजनीतीमध्ये तुझ्यासारखा चतुर कोणीच नाही, तेनालीराम तू मारतोही आणि आवाजही होऊ देत नाहीस.’’ – (संदर्भ : जय हनुमान साप्ताहिक २ जानेवारी २०१६) *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~