✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00          ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 29/02/2020 वार - शनिवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    💥 ठळक घडामोडी :-  ● १९९६: क्रिकेट जगतात नवखा आणि दुबळा संघ म्हणून ओळखल्या जाणार्‍या केनियाच्या संघाने विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत दोन वेळच्या जागतिक विजेत्या वेस्ट इंडीज संघाला ७३ धावांनी पराभूत करून ऐतिहासिक विजय नोंदविला. ● २०००: शशिकिरण भारताचा ५ वा ग्रँडमास्टर बनला. ● २०१२:- ६३४ मीटर उंचीच्या टोकियो स्काय ट्री या जगातील सर्वात उंच मनोऱ्याचे (इमारत नव्हे) बांधकाम पूर्ण झाले 💥 जन्म :- ● १९४०-गोपीचंद हिंदुजा ,उद्योगपती ● १८९६ - मोरारजी देसाई, भारताचे माजी पंतप्रधान. ● १९८४: भारतीय हॉकी खेळाडू अॅडम सिंक्लेअर यांचा जन्म. 💥 मृत्यू :- ● १५९२: इटालियन संगीतकार अलेस्सांद्रो स्ट्रिजियो यांचे निधन. ● १९४०: इंग्लिश लेखक एडवर्ड फ्रेडरिक बेन्सन यांचे निधन. (जन्म: २४ फेब्रुवारी १९४७) ● १९४४: फिनलंडचे राष्ट्राध्यक्ष पेह्र एविंड स्विन्हुफ्वुड यांचे निधन. (जन्म: १५ डिसेंबर १८६७) ● १९५६: फिलिपाईन्सचे राष्ट्राध्यक्ष एल्पिडियो क्विरिनो यांचे निधन. (जन्म: १६ नोव्हेंबर १८९०) *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *मुंबई : राज्यात येत्या १ मेपासून सिंगल युज डिस्पोजेबल अर्थात एकदाच वापरले जाणारे प्लास्टिक पूर्णपणे बंद करण्यात येईल, अशी घोषणा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी विधानपरिषदेत केली* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *ओबीसींची जातीनिहाय जनगणना करा, छगन भुजबळांची विधानसभेत मागणी, विरोधकांकडून मागणीला समर्थन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *जगाची अर्थव्यवस्था कोरोनाच्या कचाट्यात, शेअर बाजारात गुंतवणुकदारांचे 5 लाख कोटी बुडाले, कोरोनाचा विळखा कमी झाला नाही तर सोनं 46 हजारांवर जाण्याची शक्यता* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे यांची मुदत आज संपणार असून त्यांच्या जागी कोणाची नियुक्ती करण्यात येणार याकडे सर्वांचं लक्षं लागलं आहे, अॅन्टी करप्शन ब्युरोचे प्रुमख परमबीर सिंह मुंबईचे नवे पोलीस आयुक्त होऊ शकतात.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *मुंबई : सध्या महाराष्ट्रात हवामान बदलाचे स्थित्यंतर पाहायला मिळत आहे. दोन दिवसानंतर मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात पावसाच्या तुरळक सरी कोसळू शकतात किंवा गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात येते* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी संघ जाहीर करण्यात आला असून यावेळी भारताच्या संघात उमेश यादव आणि रवींद्र जडेजा दोन खेळाडूंना संधी देण्यात आली आहे* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *कसोटी मालिकेत ०-१ ने पिछाडीवर पडलेल्या भारतीय संघाने दुसऱ्या कसोटी सामन्यात आश्वासक सुरुवात केली आहे. मुंबईकर पृथ्वी शॉने झळकावेल्या अर्धशतकी खेळाच्या जोरावर भारताने पहिल्या दिवशी उपहाराच्या सत्रापर्यंत २ बाद ८५ पर्यंत मजल मारली.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         *वेळ नाही मला* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/11/blog-post_14.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *काव्यांगण - रोज एक बालकविता* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *नाजूक ते फुलपाखरू* सौ . वर्षा निलेश भोज, पुणे कुठून आणलेस सुंदर पंख पंखावरील छान छान रंग || फुलांवर बसशी जाऊन अलगद तुला पाहुन आवरेना हा मोद || वाटे मजला घेऊन कवेत तुला मीही तुझ्यासवे भेटेन प्रत्येक फुला || पाहशीस मज करून बारीक डोळे फुलांभोवती तु नेहमी आनंदाने खेळे|| नाजूक नि सुंदर त्या पंखांवरती वेगवेगळी नक्षी कोण रे काढती || तुला धरण्या काही छोटे उगाच भांडती काही तुझ्या इकडून तिकडे उडण्यास भाळती | स्वछंद जगण्याची देतोस तु शिकवण मस्त नि मजेत घालवतोस तुझे छोटेसे जीवन || वाटे सर्वांना फुलपाखरासम असावे जीवन स्वछंदी राहण्यासाठी मात्र स्वच्छ असावे मन || *सौजन्य :- जि. प. प्रा. कन्या शाळा धर्माबाद* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *" श्वास व विश्वास दोन्हीं अदृश्य आहेत, परंतु दोघांत इतकी ताकद आहे की अशक्य गोष्टीला शक्य बनवून देतात "*         *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *नाना पाटील यांना कोणत्या उपाधीने ओळखले जाते ?* क्रांतिसिंह 2) *झाडाची पाने कोणत्या घटकामुळे हिरवी दिसतात ?* क्लोरोफिल 3) *कोणत्या झाडापासून कात मिळते ?* खैर 4) *महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कोणते ?* खोपोली 5) *खालसा या पंथाची स्थापना कोणी केली ?* गुरू गोविंदसिंग *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 ओवी अभिजित लकडे 👤 योगेश व्हनमाने 👤 तेजस्विनी विजय शेटे 👤 अमितशेठ जावळेकर 👤 सुधाकर चव्हाण 👤 श्री व सौ पेटकुले ( लग्नाचा वाढदिवस ) 👤 अभिनव विजय घोलप 👤 श्रेया गजानन मोरे 👤 शिवाजी पंडीत *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *माणसाने त्याच्या स्वार्थासाठी भिंतीचा वापर करायला सुरुवात केली. भिंतीची मूळ वैशिष्ट्ये संपुष्टात येऊन फक्त भेदासाठी भिंतीचा वापर सुरू केला गेला. माणूस सतत भिंत सोबत घेऊन फिरू लागला. एवढेच कशाला दर दोघांच्या मध्ये भिंत असतेच, इतकच मात्र तिचं अस्तित्व ढळढळीत असतं. सगळ्यात टणक आणि अभेद्य भिंती असतात जाती-पातीच्या, धर्माधर्माच्या. ह्या भिंती नष्ट व्हाव्यात म्हणून संतापासून समाजसुधारकांपर्यंत सगळ्यांनी निकराचे प्रयत्न केले. पण भिंती काही नष्ट झाल्या नाहीत. ज्ञानेश्वरांनी भिंत चालविली; ती जगाला चमत्कार करून दाखविण्यासाठी तर नक्कीच नाही; तर चौदाशे वर्षाच्या चांगदेवाने आपल्या भोवती जी अहंकाराची भिंत उभी केली होती, तिचा भेद करण्यासाठी.* *मात्र, इथे आपण सोयीचे अर्थ लावून आपल्या अहंकाराला कुरवाळीत बसलो आठशे वर्षात तर आतोनात भिंती उभ्या राहिल्या. वर्तमान काळात तर त्या आणखीन घेर वाढवून भक्कम झाल्या आहेत. माणसाने उभ्या केलेल्या भिंतींखाली चिणून त्याचाच अंत होऊ शकतो. माणूस सतत एक दुस-यापासून परका होत जातोय. भिंत आभाळाला भिडून गेलीय. रक्ताची नातीगोतीही त्यातून सुटली नाही. तुम्ही जिथे काम करता, जिथे राहता, जिथे जिथे श्वास घेता. अशा सर्वच ठिकाणी भिंतीच भिंती. या भिंती भेदण्याचं एकमेव प्रभावी अस्त्र आहे, ते म्हणजे 'मानवता.' याचा वापर एका बाजूने नाही करता येणार; दोन्ही बाजूने केला तरच या भिंती भेदल्या जातील.* *॥ रामकृष्णहरी ॥* 🔷🔸🔹 🔶 🔷 🔸🔹🔶 *श्री संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• मित्रांनो, काल राष्ट्रीय विज्ञान दिवस आपण साजरा केला.डॉ.सी.व्ही.रामन यांच्या रामन इफेक्ट सादरीकरणानंतर तो दिवस आपण राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा करतो. खर तर विज्ञान आणि अध्यात्म हे जर हातात हात घालून चालले तर नक्कीच सर्व काही चमत्कार घडतील. विज्ञानाचा शोध लागला, अंधारवाटा उजळल्या. बंदुकीचा शोध लागला, संरक्षणाचे साधन उपलब्ध झाले. रेडिओच्या शोधाने दूरपर्यंत संपर्क होऊ लागला. टेलिफोनच्या शोधाने हजारो मैलांपर्यत संवाद सुरू झाले. 'ज्ञान' हा मनुष्याचा डोळा आहे. ती त्याची दृष्टी आहे. तिने त्याला वाटेतील खाचखळगे दिसतात, काटेकुटे दिसतात. ते टाळून पुढे कसे जायचे हे त्याला समजते. पुढे शोध लागले, विज्ञानाने विलक्षण प्रगती केली. मग माणूस पुढील वाटचाल विज्ञानाच्या वेगवान वारूवर स्वार होऊन करू लागला. हा विज्ञानाचा वारू चौखुर उधळतोय, हे खरे आहे. पण या वारूला आत्मज्ञानाचा लगाम नसेल तर तो तसा उधळणारच. म्हणून.... 'विज्ञानाच्या घोड्याला आत्मज्ञानाचा लगाम घातला पाहिजे, तरच मनुष्य जीवनाची वाटचाल सुखकर होईल. विज्ञानाची कास धरा, अज्ञानाला दूर करा. अशोक कुमावत (राष्ट्रपती पुरस्कार विजेते) 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• तुमची वाणी स्पष्ट, चारित्र्य पवित्र ,जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन आणि जीवन व्यवहार चोख असतील तर तुम्ही इतरांच्या हृदयावर साम्राज्य सहजपणे करु शकाल. अन्यथा ह्या गोष्टी तुमच्या जीवनात नसतील तर तुम्हाला मनुष्य म्हणून जगण्याचा अधिकारही राहणार नाही.आपण मनुष्य म्हणून जन्माला आलो आणि मनुष्य म्हणूनच जगणार आहोत हा विचार समोर ठेवून जगण्यासाठी वरील महत्वाच्या चार गोष्टींना जीवनात प्राधान्य द्यायलाच हवे आणि त्या गोष्टी सहज करता येऊ शकतात. सुरुवातीला कठीण जाईल एकदा का सराव झाला की,मग आपोआपच व्हायला लागतात. *व्यंकटेश काटकर,नांदेड.*   संवाद..९४२१८३९५९०/             ८०८७९१७०६३. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *योग्य निवड.* मंगलसेन नावाचा राजा होता. त्याच्या दरबारात जगतराम नावाचा एक मंत्री होता . तो खूप म्हातारा झाला होता. एक दिवशी तो राजाला म्हणाला , महाराज मला आता सेवामुक्त वायचा आहे. असे त्यांनी विनंती केली. राजा म्हणाले , सगळ्यात पहिले तुम्ही तुमच्यासारखे असणारे सेवाभावी, इमानदार आणि परोपकारी चे निवड करा, मंत्री जगतराम नी प्रत्येक गावा मध्ये दवंडी पिटवायला लावली. त्या दवंडी मध्ये ते म्हणाले," गुरुवारी राजमहल मध्ये मंत्री ची निवडणूक होणार आहे. सगळे तेथे उपस्थित राहिले पाहिजे. गुरुवार दिवस आला. निवडणुकीची वेळ अकरा वाजता होती. निवडणुकीच्या दिवशी अकरा वाजले. सगळेजण राजमहल मध्ये उपस्थित होते पण करमवीर आणि मंत्री जगतराम उपस्थित नव्हते. कारण जेव्हा मंत्री जगतराम चिखलाचा रस्त्यांनी येत होते तेव्हा त्यांच्या बैलगाडीचे एक चाक चिखलामध्ये फसला. ते खूप प्रयत्न करत होते पण त्यांच्याच बैलगाडीचे एक चाक निघतच नव्हता, तेव्हा करमवीर ला हे सगळे दृश्य दिसले. तेव्हा त्यांनी तो चाक आपल्या हाताने काढला. स्पेनचे पूर्ण वस्त्र खराब झाले होते. ते पळत पळतच राजमहल मध्ये गेले. सगळेजण त्यांच्याकडे पाहून हसत होते. कारण त्यांचे कपडे चिखलानी भरून गेले होते. पण राजा म्हणाले, मला माहित आहे की तुमचे कपडे का भरले. आणि म्हणून मी तुम्हाला माझ्या राज्याचा मंत्री बनवले. कारण तुम्ही एका म्हाताऱ्या व्यक्तीची मदत केली. आणि ते कोणी दुसरे नव्हते तर मंत्री जगत राज होते. आज पासून माझ्या राज्याचे मंत्री तुम्ही म्हणल्या जाईन. बोध: दुसऱ्याची मदत करणे आपले काम आहे त्यामुळे आपल्याला चांगले फळ मिळते .योग्य व्यक्तीची निवड केल्यास कार्य पारदर्शक आणि सुरळीत चालते.म्हणून चाचपणी करून योग्य निवड करावी. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment