✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00          ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 08/02/2020 वार - शनिवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    💥 ठळक घडामोडी :-  ● १८९९ - रँडचा खून करण्यार्‍या चाफेकर बंधूंची नावे इंग्रज सरकारला सांगणार्‍या द्रविड बंधूंचा वासुदेव चाफेकर आणि महादेव रानडे यांनी गोळ्या झाडून खून केला. ● १९९४ - अष्टपैलू खेळाडू कपिलदेव निखंज यांनी श्रीलंकेविरुद्धच्या तिसर्‍या कसोटी सामन्यात पहिल्या दिवशी ४३२ वा बळी नोंदवून न्यूझीलंडचे रिचर्ड हॅडली यांचा सर्वाधिक बळींचा जागतिक विक्रम मागे टाकला. 💥 जन्म :- ● १९३६ - मनोहर हर्डीकर, भारतीय क्रिकेट खेळाडू. ● १९४१ - जगजीतसिंह, भारतीय गझलगायक, संगीतकार. ●१९६३ - मोहम्मद अझहरुद्दीन, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- ● १९९४ - गोपाळराव देऊसकर, ख्यातनाम चित्रकार. ● १९९९ - डॉ.इंदुताई पटवर्धन, आनंदग्रामच्या संस्थापिका, ज्येष्ठ समाजसेविका. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणूक मतदानासाठी निवडणूक आयोगाची तयारी पूर्ण, दिल्लीत दोन हजार ६८९ मतदान केंद्र आहेत. ४० हजार पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. पोलिसांना १९ हजार होमगार्डची मदत मिळणार आहे, आज होणार मतदान* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *वाढत्या वीजनिर्मिती खर्चाचा महानिर्मितीच्या उत्पादनाला फटका, औष्णिक विद्युत केंद्रांच्या क्षमतेच्या तुलनेत ४३ टक्के उत्पादन ठप्प* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *मुंबई: मुंबईत गुलाबी थंडी परतली आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुंबई शहर व उपनगरातील तापमानाचा पारा वेगाने घसरत असताना सोबतीला वाराही असल्याने मुंबईकरांना हुडहुडी भरली आहे. आज मुंबईचं किमान तापमान १४.२ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आलं आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *सेलिब्रेटी ब्रँड वॅल्यूमध्ये भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली पहिल्या स्थानावर कायम आहे. तर अभिनेता अक्षय कुमारने अभिनेत्री दीपिका पादुकोणला मागे टाकत दुसरा क्रमांक मिळविला आहे* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *ठाकरे सरकारचे केजरीवाल सरकारच्या पावलांवर पाऊल, राज्यात दरमहा 100 युनिट पर्यंत वीज वापर करणाऱ्याना मोफत वीज देण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याची माहिती ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिली* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *मुंबई : करप्रणाली अधिकाधिक सुटसुटीत आणि सहजसोपी व्हावी, यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. त्या दृष्टीनेच नवीन कर रचनेचा पर्याय देण्यात आला आहे. प्राप्ती करासंदर्भातील नव्या रचनेत ७० हून अधिक वजावटी रद्दबातल केल्या असल्या, तरी काही सवलती कायम ठेवण्यात येणार असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केले* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *एफआयएच’ प्रो हॉकी लीगमध्ये यशस्वी पदार्पण केल्यानंतर आता आत्मविश्वास उंचावलेल्या भारतीय पुरुष संघाला बेल्जियमच्या खडतर आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. शनिवारी आणि रविवारी भुवनेश्वर येथील कलिंगा स्टेडियमवर रंगणाऱ्या दुसऱ्या सामन्यात भारताला जगज्जेत्या बेल्जियमशी दोन हात करावे लागतील.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        *शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या ऑफलाईन होणार ?* शिक्षकांच्या बदल्याचे धोरण याविषयी मत http://nasayeotikar.blogspot.com/2020/02/blog-post.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃  *काव्यांगण - रोज एक बालकविता* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *सौजन्य :- जि. प. प्रा. कन्या शाळा धर्माबाद* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *" काहीच हाती लागत नाही तेंव्हा मिळतो तो अनुभव "* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *सर्वात वेगवान पक्षी कोणता ?* पाकोळी 2) *छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर झाला ?* रायगड 3) *परळी वैजनाथ कशासाठी प्रसिद्ध आहे ?* ज्योतिर्लिंग 4) *भारतातील सर्वात मोठे पदक कोणते ?* परमवीरचक्र 5) *सम्राट अशोकाच्या राजधानीचे नाव काय होते ?* पाटलीपुत्र *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 सुनील ठमके, नांदेड 👤 रविंद्र भापकर, सहशिक्षक अहमदनगर 👤 राजेश्वर ऐनवाड, सहशिक्षक, धर्माबाद 👤 दिलीप खोब्रागडे 👤 👤 👤 👤 👤 👤 👤 👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *देवाचे खरे मंदिर कोणते - जेथे त्याला बंद दरवाज्यामागे कडी-कुलपात सुरक्षित ठेवले जाते ते ? जेथे प्रवेशासाठी तिकीट काढावे लागते ते ? जेथे आधिक पैसे देऊन लवकर दर्शन घेता येते ते ? की आपल्या घरातलाच तो पवित्र राखलेला एक कोपरा, जेथे आरती म्हटली जाते ? ज्या परमेश्वराने आकाश व पृथ्वी निर्माण केली तो मानवी हातांनी बांधलेल्या मंदिरात रहात नाही. त्याला तशा मंदिरांची गरज नाही.* *परमेश्वराचे खरे मंदिर आपणच आहोत; कारण त्याचा पवित्र आत्मा आपल्यात राहतो. आपल्या ह्रदयातील भव्य उपासना- मंदिराच्या परमपवित्र स्थानांत सर्वांना, अगदी अनिर्बंधितपणे जाता यावे ही एक सुंदर कल्पना आहे आणि ती लवकर साकार व्हावी. पण त्याआधी आपल्या अंत:करणावर आपण काय लिहिले आहे तेही बघितले पाहिजे. असे न होवो की, आपल्या अंत:करणावरची 'प्रवेश बंद' ची पाटी वाचुन परमेश्वर बाहेरच उभा राहिला असेल.* •• ● ‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो,* *मन ही एक अशी gallery आहे* *जिथे unlimited photos* *आणि old memories* *कितीही save केल्या तरी* *storage full होत नाही।..!* *"मी आहे ना..... नको काळजी करु"* *असं म्हणणारी व्यक्ती आयुष्यात असेल तर खचलेल्या मनाला पुन्हा उभारी मिळते*. *जेंव्हा मायेची आणि* ‪‎ *प्रेमाची‬ माणसं आपल्या* ‪‎ *जवळ‬ असतात..* *तेव्हा‬ दुःख ‪कितीही* *मोठं‬ असलं तरी त्याच्या ‪* *वेदना‬ जाणवत ‪नाहीत‬.* *तुम्हीच सांगा ........* *हल्ली आपलं आजारी पडण्याचं प्रमाण थोडं जास्तच वाढलं का नाही ?* *कधी पोटच दुखतं , कधी बी.पी.च वाढतो , कधी शुगर वर खाली होते* *कधी हृदयाचे ठोके वाढून चक्करच येते* *करमत नाही , मन लागत नाही* *छातीत धडधड , मनात* *भीती ....अशा एक ना अनेक तक्रारी .....!* *कारणं काय तर म्हणे ....* *अशुद्ध पाणी , कचरा , रासायनिक खतं , डासांची संख्या वाढणे ....वगैरे , वगैरे ...!* *मग ......* *मग वॉटर प्युरीफायर आलं , रूम फ्रेशनर आलं , डास प्रतिबंधक वड्या , उदबत्त्या , एवढंच काय घरा घरात डास मारण्याच्या बॅटी सुद्धा आल्या .....* *काय परिणाम झाला ?* *डासं मेले पण आजारपण गेलं का ?* *नाही ........* *मग...?* *तुम्ही आम्ही काय केलं आहे...* *जाणते अजाणते पणे सर्वांशी कट्टी धरली आहे !* *हल्ली माणसं एकमेकाला मोकळेपणाने बोलतच नाहीत ......हे खरं कारण आहे आजारी पडण्याचं !* *सख्खे , चुलत , मावस* *आई वडील , बहीण भाऊ* *शेजारी , सहकारी ...या सर्वांशी आपण अबोला धरला आहे !* *ओळख आहे पण संवाद नाही* *नातं आहे पण माया नाही* *अवांतर , मोक्कार विषयावर आपण खूप गप्पा मारतो पण खरं दुःख कुणीही कुणाला सांगत नाही ......हे एक आपल्या वारंवार आजारी पडण्याचं कारण असू शकतं !* *सगे सोयरे , घरकुल , गोकुळ* *नातीगोती , हॅपी फॅमिली , आपली माणसं* *.....अशा गोंडस नावांनी आपण Whats app चे ग्रुप बनवले ....* *पण त्यावर मनमोकळा संवाद होतोय का ?* *मी दुःख सांगितल्यावर मला हसतील का ? अशी जर भीती वाटत असेल ....* *मी Good news सांगितल्यावर आनंदी होतील का नाही ? अशी जर भीती वाटत असेल .....* *तर असे ग्रुप ,अशी नाती काय कामाची ?* *लक्षात ठेवा हिलस्टेशनला , युरोप टूरला जाऊन relax होता येईल ....पण हलकं वाटू शकेल का ?* *टेन्शन कमी होईल का ?* *त्यामुळे वारंवार आजारी पडण्याची कारणे कदाचित ही तर नसतील ......* *मनातल्या भावनांचा निचरा न होणे ...,* *सकारण , विनाकारण प्रत्येक नात्या सोबत झालेली कट्टी ...,* *खूप बोलावं वाटणे ...पण व्यक्त होण्यासाठी जागाच न उरणे ....* *मग आता काय करावं ?* *ज्या वादा मध्ये , अबोल्या मध्ये , फारसं तथ्य नाही असे वाद मिटवण्यासाठी स्वतः होऊन पुढाकार घ्यावा ....* *व्यक्त व्हा , बोला , दो करा* *कदाचित आपलं वारंवार आजारी पडणं थोडं कमी होईल* *लक्षात ठेवा इथून पुढे फक्त त्याच माणसांना दीर्घ आयुष्य मिळेल .....जी माणसं हसण्याच्या आणि रडण्याच्या जास्तीत जास्त जागा निर्माण करू शकतील !* *मग बघा कस जगावं ते.* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• शेतकरी शेतात बियाणे टाकून येणा-या किंवा उगवणा-या धान्याची वाट पाहणे हे सत्य आशा आहे. कारण त्याला त्याच्या केलेल्या कामावर, मेहनतीवर विश्वास आहे. तो कधीही राशीचक्रावरील राशीनुसार लिहिलेल्या भाकितावर विश्वास ठेवत नाही किंवा त्यानुसार चालतही नाही. जे राशीनुसार चालतात ते मात्र त्यावर विसंबून राहून आपल्याच जीवनात चांगल्याप्रकारे चाललेल्या संसारगाड्याला खीळ बसवतात. त्यामुळे व्हायची ती प्रगती होत नाही आणि करता येत नाही. म्हणून माणसाने कोणत्याही भाकितावर विश्वास न ठेवता आपण आपले काम प्रामाणिकपणे आणि सातत्याने जीव ओतून केले तर नक्कीच जीवनात यश मिळते तसेच जीवन सुखी व समृद्ध होते यात संशय नाही. © व्यंकटेश काटकर,नांदेड संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *दानशूर राजा आणि संत* एका राज्यात एक दानशूर राजा होता. त्या राजाची ही दानशूराची ख्याती ऐकून एक संत त्याच्या राजवाड्यात आला. तो राजाला भेटायला दरबारात, राजमहालात गेला आणि याचकांच्या रांगेत बसला. राजाने दान देण्यासाठी दोन सेवक ठेवले होते. जेंव्हा संताची वेळ आली तेंव्हा तो सेवकाला म्हणाला,''मित्रा! मी तुझ्या हाताने नाही तर राजाच्या हाताने दान घेईन. नाहीतर मला दान नको." राजाचा सक्त आदेश होता कि कोणीही रिक्त हस्ते जाता कामा नये. शेवटी सेवकांनी राजाची व संताची गाठ घालून दिली. राजाने संतांच्या पायाचे दर्शन घेतले व म्हणाला,"महाराज ! बोला आपली काय इच्छा आहे?" संत म्हणाले," मला इतके धन पाहिजे कि मी त्याद्वारे स्वर्गात जावू शकेन." राजा या उत्तराने हैराण झाला. त्याने विचारले," महाराज, धनाद्वारे आपण कसे काय स्वर्गात जावू शकता?, कृपया स्पष्ट करा!" तेंव्हा संताने सांगितले," राजन! मी आपल्याला हे सांगू इच्छितो कि, केवळ दान देण्याने आपण सुखी व्हाल आणि भिक्षा मागणारयांच्या जीवनात परिवर्तन येईल पण आपण असेच जर दान करीत राहिलात तर मात्र एक दिवस राज्याची तिजोरी मात्र खाली होवून जाईल." त्या क्षणी राजाचे डोळे उघडले, त्याने संताना यावरील उपाय विचारला असता ते म्हणाले, " आपण जे धन दान म्हणून देत आहात तेच रोजगाराच्या स्वरुपात द्या. यातून लोकांना काम मिळेल आणि फुकट खायची यांची सवय कमी होईल. आपल्या या सेवा वृत्तीने ते आयतखाऊ झालेत. आणि आळशी झाले आहेत. त्यांना परिश्रम करायला शिकवा तेच खरे पुण्याचे आणि सत्पात्री दान ठरेल.  तात्पर्य- स्वकष्टाने कमवलेल्या धनाचे महत्त्व अधिक असते. स्वावलंबन आत्मविश्वासाची अनिवार्य अट आहे. त्यावरच राष्ट्राचा विकास अवलंबून असतो. राष्ट्रहिताची जोपासना करणे ही सर्वांची जबाबदारी आणि कर्तव्य आहे. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment