✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00          ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 04/02/2020 वार - मंगळवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    *जागतिक कर्करोग दिन* 💥 ठळक घडामोडी :-  ● २००४-मार्क झुकरबर्ग ने फेसबुक ची स्थापना केली. ● १९४८-श्रीलंका देशाला स्वातंत्र्य मिळाले. ● १९४४-'चलो दिल्ली' चा नारा देत आझाद हिंद सेनेची दिल्लीकडे कूच. 💥 जन्म :- ● १९७४-ऊर्मिला मातोंडकर, अभिनेत्री. ● १९३८-पं बिरजू महाराज,कथ्थक नर्तक व गुरू ● १९२२ - स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी. 💥 मृत्यू :- ● २००१- पंकज रॉय,क्रिकेटपटू ● १९७४-सत्येंद्रनाथ बोस,भारतीय भौतिकशास्त्रज्ञ ● १६७०-नरवीर तानाजी मालुसरे *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *जम्मू-काश्मीर - रियासी जिल्ह्यात काल भारतीय लष्कराचं ‘चीता’ हे हेलिकॉप्टर कोसळलं, कसलीही जीवितहानी नाही* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *सांगली येथे २७ मार्च ते १४ जून या कालावधीत पार पडणाऱ्या १०० व्या नाट्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी खा. शरद पवार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *सोलापूर विमानतळ परिसरात लागली आग; अग्निशमन दलाच्या दहा गाड्या घटनास्थळी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून 8 लाख कर्करुग्णांवर उपचार- आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *चीनमध्ये वेगाने पसरणाऱ्या कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत 361 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *राज्यात थंडीचा जोर लवकरच ओसरणार; अनेक शहरांच्या किमान तापमानात वाढ, दक्षिणेकडून उष्ण वारे वाहू लागले* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *NZ vs IND : रोहित शर्माची न्यूझीलंड दौऱ्यातून माघार; हिटमॅनच्या कसोटी कारकिर्दीला मोठा धक्का* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         *तंबाखूमुक्त जीवन जगता येईल ?*      https://nasayeotikar.blogspot.com/2018/08/blog-post_10.html?m=1 लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃  *काव्यांगण - रोज एक बालकविता* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *अक्षरज्ञान* - मीना खोंड, हैद्राबाद शिकावे अक्षर व्हावे साक्षर ज्ञानामृताचा महिमा थोर ... मराठी अमृत करावी आत्मसात शब्द बोलती वेदवेदांत .... कथा सांगती कविता गाती पुस्तक आपुले मित्र असती .... वाचन सातत्य लेखन नित्य जीवनाचे तत्वज्ञान अक्षरा अक्षरात ..... *सौजन्य :- जि. प. प्रा. कन्या शाळा धर्माबाद* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *" सज्जन लोकांना जबाबदारीने काम करण्यासाठी कायदे सांगायची गरज पडत नाही पण दुर्जन मात्र कायद्याच्या पळवाटा शोधत असतात."* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *गाजरमध्ये कोणते जीवनसत्व असते ?* ब 2) *माऊंट एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली भारतीय महिला कोण ?* बचेंद्रि पाल 3) *भारताची सीमारेषा कोणत्या देशासोबत सर्वात जास्त आहे ?* बांग्लादेश 4) *तानसा धरण कोणत्या नदीवर आहे ?* तानसा नदी ( ठाणे ) 5) *कोणता रंग अधिक उष्णता आकर्षित करतो ?* काळा *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 कृष्णा तिम्मापुरे, पत्रकार, धर्माबाद 👤 राजरेड्डी गडमोड, येताळा 👤 संजय गायकवाड, धर्माबाद 👤 डी. एन. पाटील बेंबरेकर, देगलुर *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आयुष्यातील पहिल्या पंधरा, सोळा वर्षाचा कालावधी कमालीचा संवेदनशील असतो. या कालावधीत मुलांवर होणारे संस्कार महत्वाचे असतात. शारीरिक, भावनिक, बौद्धिक, आणि मानसिक विकासासाठी हा कालावधी महत्वाचा असतो. या दरम्यान मुलांसाठी सकारात्मक वातावरणाची पूर्तता करणे, ही पालकांची आणि समाजाचीही जबाबदारी असते. काही पालक त्यांच्या मुलांशी संवाद साधण्यात कमी पडतात. ए वन शाळा, काॅलेजात व क्लासमध्ये प्रवेश मिळवून देणे, आर्थिक बाबींची पूर्तता करणे, एवढीच जबाबदारी असल्यासारखे वागतात. स्वत: पैसे मिळविण्यासाठी धावत राहतात आणि मुलांवर आपल्या आपेक्षा लादून त्यांनाही आयुष्याच्या स्पर्धेत ढकलून मोकळे होतात.* *कौटुंबिक व सामाजिक परिस्थिती किंवा दैनंदिन वाईट सवयी युवकांच्या नैराश्याला कारणीभूत ठरतात. नकारात्मक प्रवृत्तींकडे आकर्षिले जाऊन वाईट सवयींचे शिकार बनतात. परिणामी सहका-यांशी, आई-वडिलांशी वाद होतात, त्याचे रूपांतर एकाकीपणात होते. एकाकीपण नैराश्याला निमंत्रित करते. नवनवीन गोष्टी शिकून घेण्याची उत्सुकता विकसित करायला हवा. निसर्गाशी संवाद साधता यायला हवा. जीवनमूल्यांचा अर्थ समजून घेऊन ती कृतीत उतरविणे जीवनात गरजेचे असते. विचार आणि आचार यांच्यात सुसंगती ठेवायला हवी. त्या त्या वयात सकारात्मक गोष्टी केल्याने व्यक्तिमत्व विकसित होते, आत्मविश्वास वाढतो, विवेकबुद्धी वाढते, निर्णयशक्ती वाढीस लागते. संत तुकाराम महाराज म्हणतात..मन प्रसन्न करू..मोकळेपणाने बोलू आणि सकारात्मक होऊ.!* ••● ‼ *रामकृष्णहरी* ‼ ●• 🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁 *संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• मित्रांनो, खूप मोठे व्हायचे, मग खूप सारी पुस्तके वाचली पाहिजेत,खूप मोठी डिग्री मिळवली पाहिजे असं काही नाही. आपले काम मनापासून करणे,त्यात जीव ओतणे हे महत्वाचे आहे. मौजे निट्टूर ता चंदगड येथील रामा सुतार या तरुणाने सेफ्टी बॅग तयार केलेली आहे ती बॅग जर कोणी चोरून न्यायच प्लॅन केलं तर त्या बागेतील सायरण मोबाईल aap च्या सहायणे चोर चोर असा आवाज करतो त्या प्रत्यक्षिकाच शूटिंग केलं आहे , रामा कदाचित घरच्या आर्थिक परिस्थिती मुळे दहावीपर्यंत पण शिकला नसेल पण आपल्या कल्पकतेच्या जोरावर सायन्स exibution मधील नवनवीन 100 च्या वर प्रयोग त्यांनी केले आहेत. रामा हा उत्तम कलाकार निर्माता, दिग्दर्शक आहे, उत्तम गायक आहे ,उत्तम फोटोग्राफर आहे,उ तबलावादक ,हार्मोनियम वादक आहे. एवढंच काय बिघडलेला कॉम्पुटर सुद्धा तो सहज करतो, बऱ्याच प्रकारची सॉफ्टवेअर ची निर्मिती सुद्धा त्याने केलेली आहे, त्यांनी तयार केलेली थर्मोकोल कटिंग ची मशीन मी स्वतः बघून थक्क झालो होतो,त्या मशीन ने केलेलं सुंदर नक्षीकाम व पोल कटिंग च कामआजही माझ्या नजरे समोरून जात नाही . अशोक कुमावत (राष्ट्रपती पुरस्कार विजेते) 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपण पुस्तके वाचायला शिकलो.त्यातून ज्ञान घेऊन जगायला शिकलो. पण माणसे जोडण्याचे काम मात्र शिकलो नाही. माणसे जोडण्यापेक्षा माणसापासून दूर दूर राहायला शिकलो. नातेसंबंध, प्रेम, आपुलकी, जिव्हाळा आपल्यातला हळुहळू कमी करायला शिकलो .खरे तर ज्ञानाने माणसे जोडली जातात पण माणसे तोडायला शिकलो. आम्ही चार पुस्तके शिकलो की, आमच्यासारखे या जगात कोणीच श्रेष्ठ नाही असे म्हणायला लागलो. अशा माणसांना खरे ज्ञान म्हणजे काय बहुतेक समजले नसावे .उलट अशी माणसे शिकून सवरुनही अज्ञानच आहेत असे म्हणायला काहीच हरकत नाही.ज्या ज्ञानाचा उपयोग आपल्या जीवनातील अज्ञान घालवणे आणि इतरांमधील असलेला अज्ञानपणा घालवून जीवन जगण्याची नवी दिशा दाखवने हा आहे. हा मुख्य उद्देश ठेऊन जगणे म्हणजे ज्ञान होय. अशा वर वर ज्ञान घेतलेल्या माणसांनी   खरे ज्ञान म्हणजे काय हे शिकून माणसे जोडण्याचे काम शिकायला हवे. - व्यंकटेश काटकर,नांदेड   संवाद.9421839590. 📚📖📚📖📚📖📚📖📚📖 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *संघटितपणाचे महत्त्व* एक गृहस्थ म्हातारपणामुळे बराच थकला होता. आयुष्यात चांगली कमाई करून आणि स्वत: चांगले जीवन जगूनसुद्धा त्याच्या पाच मुलांमध्ये सदान्-कदा चालणार्‍या भांडणांमुळे तो दु:खी होई. त्याने आपल्या मुलांना बराच उपदेश केला; पण उपड्या घडावर पाणी. एके दिवशी त्याने आपल्या पाचही मुलांना प्रत्येकी हातभर लांबीची एकेक काठी घेऊन यायला सांगितले. त्याप्रमाणे ती मुले एकेक काठी घेऊन आली. त्या गृहस्थाने त्यांच्यापैकी प्रत्येकाला आपापली काठी मोडण्यास सांगितले. वडिलांनी सांगितलेली ती गोष्ट प्रत्येक मुलाने लगेचच करून दाखवली. वडिलांनी पाच काठ्यांची जुडी करून प्रत्येकाला ती मोडायला सांगितल्यावर एकालाही ती मोडता नाही आली. पुन्हा त्या गृहस्थाने त्या मुलांना तशाच प्रकारची एकेक काठी घेऊन यायला सांगितले. पाच जणांनी पाच काठ्या आणून वडिलांपुढे ठेवल्या. वडिलांनी त्या पाच काठ्यांची एका दोरीने मोळी बांधली आणि प्रत्येकाला ती मोडायला सांगितली. पाच काठ्या एकत्र असलेली ती मोळी आपल्या पाच मुलांपैकी कुणालाच मोडता येत नसल्याचे पाहून तो गृहस्थ त्यांना म्हणाला, बघितलंत ना ? एकीचे बळ किती असते ते ? वडील एवढेच बोलले; पण ते सूज्ञ मुलगे समजायचे ते समजले. तेव्हापासून एकजुटीने वागू लागले. *तात्पर्यः एकीचे बळ फार मोठे असते.कोणतेही कार्य चांगले पार पाडण्यासाठी संघटित असणे फार महत्त्वाचे आहे.* संदर्भ : सनातन निर्मित ग्रंथ, ‘बाेधकथा’.. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment