✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00          ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 28/02/2020 वार - शुक्रवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    *राष्ट्रीय विज्ञान दिवस - भारत* 💥 ठळक घडामोडी :-  ● २००२ - गुजरातमध्ये जातीय दंगली. ५५ मृत्यू. 💥 जन्म :- ● १९४७ - दिग्विजय सिंघ, भारतातील मध्यप्रदेश राज्याचे पूर्व मुख्यमंत्री आणि भारतीय राष्ट्रीय कांग्रेस चे नेते. ● १९४७ - विजय बहुगुणा, भारतातील उत्तराखंड राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत. ● १९५१ - करसन घावरी, भारतीय क्रिकेट खेळाडू. ● १९६९ - यू. श्रीनिवास, मेंडोलिन वादक, सप्टेंबर १३ २००३ रोजी त्यांना राष्ट्रीय कुमार गंधर्व पुरस्कार जाहीर झाला. ● १९७१ - परमजीत सिंघ, भारतीय खेळाडू, यांनी ४०० मीटर शर्यतीचा ३८ वर्षांचा मिल्खा सिंघ चा राष्ट्रीय रेकॉर्ड मोडला. 💥 मृत्यू :- ● १९३६ - कमला नेहरू, जवाहरलाल नेहरू यांच्या पत्नी. ● १९६३: भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेन्द्र प्रसाद *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *कोल्हापूर : जुनी पेन्शन लागू करा, यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी गुरुवारी सरकारी कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *यवतमाळ : जिल्हा परिषदेचे दोन कर्मचारी सेवेतून बडतर्फ. हेमंत निवल (विस्तार अधिकारी पंचायत) व महेश मंचलवार (ग्रामसेवक) अशी बडतर्फ कर्मचाऱ्यांची नावं आहेत.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *सोलापूर जात पडताळणी समितीने भाजपचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्या जातीचा दाखला अवैध असल्याचा निर्णय दिल्यानंतर आता आणखी एक वेगळीच माहिती समोर आली आहे. खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी आपला जातीचा दाखला हरवल्याची तक्रार पोलिसात दाखल केली आहे* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *राज्यात सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद मुंबईत झाली आहे. चालू मौसमातील आतापर्यंतचे सर्वाधिक कमाल तापमान आहे ३८.४* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे नागपूर येथील यशवंत स्टेडियममध्ये नवोत्साह 2020 शारीरिक प्रात्यक्षिक प्रदर्शन.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *भीमा कोरेगावहिंसाचाराप्रकरणी  दाखल ६४९ गुन्ह्यांपैकी ३४८ गुन्हे तर मराठा आरक्षण आंदोलनावेळी नोंदवलेल्या ५४८ गुन्ह्यांपैकी ४६० गुन्हे राज्य सरकारने घेतले मागे घेतले * ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *भारतीय महिला क्रिकेट संघाने न्यूझीलंड वर विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित केला, या सामन्यात शेफालीला सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार देण्यात आला. शेफालीने सलग दुसऱ्यांदा हा पुरस्कार पटकावला आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त ^श्रद्धा आणि अंधश्रद्धा* http://nasayeotikar.blogspot.com/2019/10/blog-post_31.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃  *काव्यांगण - रोज एक बालकविता* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *।। माझा गणेश ।।* - सौ.आशा मदन तेलंगे ठाणे माझा गणेश येता घरी आनंद झाला मनी स्थानापन्न करण्यास त्यास सज्ज आम्ही मंडळी सारी दिव्यांची तोरणे बांधिली रांगोळ्या काढिल्या दारीं फुलांच्या सुंदर मखरात विराजमान तो पाटावरी पूजाअर्चा, अभिषेक, आरती सोपस्कार सारे नवस सायास करुनी देवास साकडे घालूया रे कुणी लहानथोर उचनीच भेदभाव नसे याच्या दारी विद्येचे दान हे मागा बाप्पासी मिळुनी सारे शाळकरी दीड,पाच, सात,दहा, दिवसांच्या मुक्कामानंतर निरोप देऊ बाप्पाला पुढच्या वर्षी लवकर ये असे वचन दे आम्हाला *सौजन्य :- जि. प. प्रा. कन्या शाळा धर्माबाद* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *" यशस्वी होण्यासाठी कार्यमग्नता ही मनुष्याच्या जीवनाची एक अटळ अशी अवस्था असते. "* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *आयोडीन या घटकाच्या अभावामुळे कोणता रोग होतो ?* गलगंड 2) *पक्ष्याचा राजा, विष्णूचे वाहन असे कोणत्या पक्ष्याला म्हटले जाते ?* गरुड 3) *आचार्य विनोबा भावे यांचे जन्मगाव कोणते ?* गागोदे , रायगड 4) *महाभारतातील अर्जुनाच्या धनुष्याचे नाव काय होते ?* गांडीव 5) *संत जनाबाईचे समाधीस्थळ कोणते ?* गंगाखेड, परभणी *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 साईनाथ सुरेश येवतीकर, नांदेड 👤 चिं उत्कर्ष सुनील पल्लेवाद, नांदेड 👤 राजेश्वर भंडारे, सहशिक्षक, धर्माबाद 👤 आनंद आनेमवाड, सहशिक्षक 👤 मारुती पाटील 👤 प्रशांत चिखलीकर, सहशिक्षक, लातूर 👤 शंकर गर्दसवार 👤 श्रीकांत आदमवाड, सहशिक्षक 👤 निर्मला सोनी, साहित्यिक, अमरावती 👤 मुरलीधर राजूरकर, सहशिक्षक *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *स्नेहाने वैर जात असेल तर उगीच युद्ध का करा आणि दूधसाखरेने रोग जात असेल, तर कडुनिंबाचा रस का घ्यावा असा संदेश देणारा एक श्र्लोक आहे. अनेकदा छोट्या छोट्या गोष्टीतून, गैरसमजातून झालेले भांडण विनाकारण लांबत जाते आणि मैत्रीचे रूपांतर वैरात होऊन जाते. गैरसमज किंवा मूळ कारण नाहीसे करण्याऐवजी उभय पक्षांकडून नवनवीन मुद्द्यांची भर पडत जाते आणि वैराचे झाड मोठे होते. इतके, की त्यात दोन्ही पक्ष नेस्तनाबूत होतात. संशयाला बळी पडणे ही सामान्य बाब असली, तरी संशय खरा मानून भांडण काढणे चांगले नाही.* *एक गोष्ट आहे. दोन सन्यासी मित्र असतात. मैत्री तब्बल तीस वर्षांची. एकमेकांच्या आनंदात न्हायले आणि दु:ख वाटून घेतले. दोघांत मिळून तीन मडकी होती. तेवढीच त्यांची संपत्ती. ती तिन्ही मडकी वाटून घ्यायचे ठरले. थोरल्या संन्याशाला मोठेपणा देण्यासाठी धाकटा म्हणाला,'तुम्ही दोन घ्या; मी एक घेतो.' मात्र त्यामुळे मोठा संतापला. म्हणाला,'मला काय भिकारी समजतोस ?' दोघांमध्ये यावरून कडाक्याचे भांडण झाले आणि त्याची परिणती तिन्ही मडके फुटण्यात झाली. म्हणून भांडण टाळायचा प्रयत्न व्हायला हवा.* *॥ रामकृष्णहरी ॥* 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• मित्रांनो, आपण सहज एखाद्याविषयी बोलून जातो त्याच शेपूट नेहमी कुत्र्यासारख वाकडच असत. खर आहे आपण असे माणसाला त्याच्या स्वभावावरून आभूषण,अलंकार परिधान करून वर्णन करत असतो. एक कवी आपल्या श्लोकात वर्णन करताना म्हणतो, यश्च निंम्ब परशुता यश्चैनं मधुसर्पिषा याश्चैन गन्धमाल्याघै:सर्वस्य कटुरेव स: ।। काही जणांचे स्वभाव बदलत नाहीत हे एका दृष्टान्ताच्या आधारे स्पष्ट करतांना कवी म्हणतो, कडुलिंबाच्या झाडावर जो कुऱ्हाड चालवतो ,जो त्याच्या मुळाशी मद्य आणि तूप ओततो आणि जो गंध फुलमाळा वगैरेंनी त्यांची पूजा करतो त्या सगळ्यांनाच त्याच्या पानाफळाफुलांची चव कडूच लागते. हा श्लोक वाचल्यावर तुपात तळून साखरेत घोळल्यावरही आपल्या कडूपणाशी एकनिष्ठ राहणाऱ्या कारल्याची आठवण येते. असे कडुलिंब आणि कारली बहुतेक सर्वांच्या संचिताचा भाग असतात शत्रू , मित्र , भक्त-सगळ्यांना एकाच तराजून तोलणारी ही मंडळी आपलं बाळकडू म्हातारपणापर्यंत जपतात. कडू रसाचा आविष्कार हाच त्यांच्या वांचिक आणि आंगिक अभिनयाचा ध्यास असतो. आयुष्य आनंदानं जगण्यासाठी आणि आनंद आजूबाजूला लुटण्यासाठी असतं, हे त्यांच्या गावीही नसत. कपाळावर आठयांचं जाळ आणि जिभेवर कडुलिंबाचा रस या थाटात त्यांचा सर्वत्र संचार असतो.कुणी साधं प्रामाणिकपणे जरी विचारले ,"काय म्हणता?" तरी काय म्हणू बोडकं? मेलो नाही अजून,जिवंत आहे. अस उत्तर देऊन बोलणाऱ्याचा हिरमुड करतात. जेवायला वाढू का? तरी त्यात काय विचारायचे?ही भाजी वाढू का? तरी मला शंभर प्रश्न विचारलेले आवडत नाही, काय वाढायचे ते मुकाट्याने वाढ.नाहीतर जेवण नको.इथपर्यंत बहाद्दरांची मजल जाते. म्हणतात ना जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही.बदल हा निसर्ग नियम आहे,तो जो स्वीकारेल तो हा भावसागर तरुन जाईल. अशोक कुमावत (राष्ट्रपती पुरस्कार विजेते) 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• शिक्षणामुळे केवळ माणूस शहाणा होत नाही तर त्याच्यामध्ये असणारा अज्ञानपणा,अयोग्य दिशेने जाणारे पाऊल,आपल्यात असलेला कमीपणा दूर करण्याचा मार्ग आणि जीवनात कसे जगायचे याचे शास्त्रशुध्द ज्ञान शिक्षणामुळे मिळते.तसेच सुखी व समृद्ध जीवन म्हणजे काय याबद्दलचीही जाणीव शिक्षणामुळे मिळते.म्हणून शिक्षणाचा खरा मार्ग आपल्या जीवनासाठी आपल्या प्रगतीचे केंद्र मानून स्वीकारणे काळाची गरज आहे. *व्यंकटेश काटकर,नांदेड.*   संवाद..९४२१८३९५९०/             ८०८७९१७०६३. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *स्वार्थ साधून वागणे* एका मांजराने आपल्या मालकाचा आवडता पोपट मारून खाल्ला. तेव्हा मालकाने, ‘ते मांजर दिसले तर मारून टाकीन’ असे रागाने म्हटले. ते ऐकताच मांजर इतके घाबरले की ह्या प्रसंगातून देवाने आपल्याला वाचविले तर पुढे आपण कोणताही पक्षी कधीही मारून खाणार नाही अशी प्रतिज्ञा केली. थोड्या वेळाने दिवाणखाण्याच्या खिडकीतून एक वटवाघूळ अचानक आत आले ते पाहून असल्या मोह उत्पन्न करणार्‍या प्रसंगी कोणत्या प्रकारचे वर्तन करावे हा प्रश्न मांजराला पडला. एकीकडे भूक व दुसरीकडे प्रतिज्ञाभंग होण्याची भिती अशा पेचात ते सापडले असता काही वेळाने आपली भूक भागविण्याची एक युक्ती त्याला आढळून आली. वटवाघूळाकडे पाहून ते आपल्याशीच म्हणाले, ‘हा पक्षी आहे असं जर मानलं तर केलेल्या प्रतिज्ञेप्रमाणे याला हात लावण्याचा अधिकार मला नाही, पण याच्या तोंडाचं उंदराच्या तोंडाशी इतकं साम्य आहे की, याला मारून खाण्याचा अधिकार मला आहे.’ इतके बोलून तिने त्या वटवाघूळाला खाऊन टाकले. तात्पर्यः स्वार्थ साधण्याची वेळ आली असता लबाड लोक आपल्या युक्तीने स्वतःचा फायदा करून घेतात.मग ते स्वतःच्या हितासाठी सर्व नियम गुंडाळून ठेवतात. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment