✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00          ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 27/02/2020 वार - गुरूवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *जागतिक मराठी भाषा गौरव दिवस* 💥 ठळक घडामोडी :-  ● २००२ - गुजरातच्या गोधरा रेल्वे स्थानकात साबरमती एक्सप्रेसला आग लावण्यात आली. ५८ हिंदू यात्रेकरू ठार. या घटनेचा सूड म्हणून उसळलेल्या जातीय दंग्यांमध्ये १,००० हून अधिक व्यक्तींचे प्राण गेले. 💥 जन्म :- ● १९१२ - ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक, कवी व नाटककार विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांचा जन्म, म्हणून आज मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. 💥 मृत्यू :- ● १८८७ - आनंदीबाई गोपाळराव जोशी, भारतातील पहिल्या महिला डॉक्टर. ● १९५६: भारतीय वकील आणि राजकारणी गणेश वासुदेव मावळणकर *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *राज्यातील पहिली ते दहावी पर्यंतच्या सर्व शाळांमध्ये मराठी भाषा अनिवार्य करण्याचे विधेयक विधानपरिषदमध्ये मंजूर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *अनियमितता आणि तक्रारीमुळे महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ बरखास्त करण्याचे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले निर्देश* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *नवी दिल्ली : हजारो कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय केंद्रातल्या मोदी सरकारने घेतला आहे. अखेर कांद्यावरची निर्यातबंदी उठवण्यात आली आहे. अमित शहांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्र्यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली त्यानंतर रामविलास पासवान यांनी कांद्यावरील निर्यातबंदी उठवल्याचा निर्णय जाहीर केलं* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *कोरोना व्हायरसचा कापूस उत्पादकांना मोठा फटका, कवडीमोल भावात कापसाची विक्री* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *शहीद कॉन्स्टेबलच्या कुटुंबीयांना एक कोटीची मदत तर हिंसाचारातील मृतकांना दोन लाखांची मदत : अरविंद केजरीवाल* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *रशियाच्या मारिया शारापोव्हाने व्यावसायिक टेनिसमधून निवृत्तीची घोषणा केली आहे* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *मुंबई : मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून एसटी महामंडळातर्फे प्रत्येक बसस्थानकांवर आज विशेष उपक्रम राबवला जाणार, संपूर्ण बसस्थानक आणि त्याचा परिसर स्वच्छ, सुशोभित करून आकर्षकरित्या रांगोळी काढण्यात येणार अशी घोषणा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी केली आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मराठी भाषा गौरव दिन* https://nasayeotikar.blogspot.com/2016/02/blog-post_22.html?m=1 लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🍃  *काव्यांगण - रोज एक बालकविता* 🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• मराठी भाषा गौरव दिन *।। आम्ही मराठी ।।* - नासा येवतीकर, ९४२३६२५७६९   आम्ही ऐकतो मराठी आम्ही बोलतो मराठी आम्ही वाचतो मराठी आम्ही लिहितो मराठी मराठी आमची मातृभाषा मराठी आमची बोलीभाषा मराठी आमची ज्ञानभाषा मराठी आमची राजभाषा मराठी आहे आमची शान मराठीचा जगात मान मराठीचा आम्हां अभिमान मराठी हेच आमचे स्वाभिमान तुकारामांची गाथा मराठी एकनाथांची भारुडे मराठी बहिणाबाईची कवने मराठी शाहिरांचा पोवाडा मराठी मनामनात दिसे मराठी घराघरांत बोले मराठी क्षणाक्षणात भेटे मराठी प्रत्येकांच्या हृदयात मराठी आम्ही मराठी तुम्ही मराठी आपण सर्वचजण मराठी   *सौजन्य :- जि. प. प्रा. कन्या शाळा धर्माबाद* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *" कंजूष म्हणजे तो व्यक्ती, जो श्रीमंत म्हणून मरण्यासाठी आयुष्यभर गरिबीत जगतो. "* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *मुळ रेखावृत्त कोणत्या शहरातून जाते ?* ग्रीनिच 2) *पंचायतराज व्यवस्थेतील सर्वात खालचा स्तर कोणता ?* ग्रामपंचायत 3) *शिखांचा पवित्र आद्यग्रंथ कोणता ?* गुरुग्रंथ साहेब 4) *हवेला वजन असते हे कोणी सिद्ध केले ?* गॅलिलिओ 5) *भारताची राष्ट्रीय नदी कोणती ?* गंगा *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 गंगाधर मुटे, वर्धा 👤 श्यामल पाटील 👤 साई पांचाळ *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *माणूस शरीराने थकतो कारण शरीर काळाशी बांधलेले असते. मृत्यू अटळ असला, तरी मृत्यूच्या आधी असे काही कर्तृत्व दाखवायला हवे, की पुढील भविष्यातही आपले स्मरण केले जाईल. मानवी जीवन हे नवीन आव्हाने स्विकारण्यासाठी आणि नवे काहीतरी शोधण्यासाठी आहे. त्यामुळे बदलांचा हसतमुखाने स्विकार करा. स्वत:ला छंदांमध्ये, वाचनात, कौटुंबिक आणि समाजकार्यात गुंतवा. दृष्टी आनंदी असेल, तर सृष्टी मोहक वाटते आणि प्रसन्नतेची वृष्टी होते.* *विन्स्टन चर्चिल म्हणतात, आशावादी व्यक्ती प्रत्येक संकटात संधी शोधते, तर निराशावादी व्यक्तिला प्रत्येक संधीत संकट दिसत असते.. प्रत्येक क्षण आपल्यासाठी काही ना काही घेऊन येतो. काहीवेळा दृष्टीकोन ही किरकोळ बाब वाटते. 'सकारात्मक दृष्टीकोन' हे फक्त सांगण्यापुरते आहे, असेही वाटते; परंतु हे तसे नाही. या दृष्टीकोनात जीवन घडविण्याची किंवा बिघडविण्याची क्षमता आहे. स्वामी विवेकानंद म्हणतात,'जगात तुम्हाला तुमच्याशिवाय कोणीही दु:खी करू शकत नाही. तेव्हा आनंदी रहा... यशासाठी मधला मार्ग नाही.*                              ‼ *रामकृष्णहरी* ‼              🍂🍂🍂🍂🍂🍂      *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*          📱 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• मित्रांनो, पाण्याची सतत धार एखाद्या कठीणातल्या कठीण खडकावर पडत राहिली तर त्यालाही नक्की फोडून काढते हा निसर्ग नियम आहे.ज्याच्या आयुष्यात या नियमाने शिरकाव केला तो जगप्रसिद्ध झाल्याशिवाय राहणार नाही. काल एका महान कादंबरीकाराचा जन्म झाला त्या निमित्ताने सामान्य माणसाची लेखणी योग्य वयात आणि योग्य दिशेने वाटचाल करीत राहिली तर चमत्कार घडतो यासाठी त्यांचा किंचितसा मागोवा. २६ फेब्रुवारी १८०२ रोजी बेझान्सोनमध्ये जन्मलेला व्हिक्टर ह्युगो हा फ्रान्सचा श्रेष्ठ कवी, कादंबरीकार आणि नाटककार म्हणून प्रसिद्ध आहे. वयाच्या विसाव्या वर्षी त्याचा पहिला काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला. तसेच, वयाच्या तेविसाव्या वर्षी ‘हान्स ऑफ आईसलँड’ ही त्याची पहिली कादंबरी प्रसिद्ध झाली. त्या काळातल्या त्याच्या कवितांवर रोमँटिसिझमचा प्रभाव होता. त्याच्या ‘क्रॉमवेल’ या संगीतिकेतूनही त्याचा प्रत्यय येतो.नोत्र-दाम-द-पारी (इंग्लिश ‘हंचबॅक ऑफ नोत्र-दाम’) या कादंबरीने तो प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचला. ११व्या लुईच्या राजवटीतल्या पॅरिसमध्ये घडणारं हे कथानक. क्वाझीमोदो या कुबड्याची आणि ईझ्मेराल्दा या जिप्सी सुंदरीची ही कहाणी चांगलीच लोकप्रिय ठरली आणि त्याची अनेक भाषांत भाषांतरं झाली. पुढे त्यावर अनेकांनी सिनेमे काढले. चार्ल्स लॉटन आणि मॉरीन ओ-हाराचा १९३९ साली आलेला सिनेमा लक्षणीय होता. ह्युगोने दरम्यान अनेक नाटकं लिहिली. दी किंग्स’ फूल हे त्या वेळचं त्याचं एक गाजलेलं नाटक!  १८६२ साली प्रसिद्ध झालेली ‘लेस मिझराब्ल’ ही त्याची पुढची कादंबरी पुन्हा एकदा त्याचं श्रेष्ठत्व सिद्ध करून गेली.१९व्या शतकातल्या फ्रान्समधल्या गुन्हेगारी विश्वाच्या पार्श्वभूमीवर घडणारं हे कथानक. १९ वर्षं तुरुंगात काढून सुटून बाहेर आलेला जिआन वेल्जो पुढे एक मोठा उद्योगपती बनतो; पण त्याला जुन्या गुन्ह्याचं भूत सतावत असतं. तशात जावर्ट हा पोलीस इन्स्पेक्टर त्याच्या मागावर असतो. अखेर आपल्या मानलेल्या मुलीच्या म्हणजेच कोसेटच्या भल्यासाठी तो पोलिसांना शरण जातो, असं थोडक्यात कथासूत्र. यातली त्या काळाची वर्णनं भन्नाट होती. याही कादंबरीवर जगभर नाटकं आणि सिनेमे बनले.  २२ मे १८८५ रोजी त्याचा पॅरिसमध्ये मृत्यू झाला. सलाम व्हिक्टर ह्युगो अशोक कुमावत (राष्ट्रपती पुरस्कार विजेते) 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ईश्वराच्या नामस्मरणाने आपल्या चलबिचल झालेल्या मनाला स्थैर्य लाभते आणि नित्य चांगल्या कामामध्ये हात गुंतून राहिले तर तन आणि मन समाधानी होते.या दोन्ही मधून माणसाला सुखाने जीवन जगण्याचा खरा मार्ग सापडतो. *व्यंकटेश काटकर,नांदेड.*   संवाद..९४२१८३९५९०/             ८०८७९१७०६३. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मनाची एकाग्रता* मदन आणि संजय यांची खूप चांगली मैत्री होती. ते एकाच वर्गात शिकत होते. मदन मन लावून शिकायचा पण संजयचे मन मात्र सदैव इकडे तिकडे नेहमीच भरकटलेले असायचे. वर्गात शिक्षक शिकवत असताना संजयला नेहमी बोलणी खावी लागायची ती ह्याच लक्ष न देण्याच्या कारणावरून पण मदन मात्र नेहमीच अभ्यासात पुढे राहायचा व शाबासकी मिळवायचा.एके दिवशी विज्ञानाचे शिक्षक वर्गात शिकवीत होते. त्यांनी विद्यार्थ्यांना वहीमध्ये गृहपाठ करण्याची एक पद्धत सांगितली होती. त्यानुसार सर्व विद्यार्थ्यांनी गृहपाठ पूर्ण केला होता.पण संजयने मात्र आपल्या सवयीनुसार गृहपाठ व्यवस्थित पूर्ण केला नव्हता. त्याची वही पाहून शिक्षक रागाने त्याला म्हणाले,”हे तू काय केले आहेस? मी तर पानाच्या एका बाजूनेच लिहायला सांगितले होते पण तू दोन्ही बाजूने लिहीले आहेस.” आता संजय घाबरला. कारण शिक्षकांनी त्या दिवशी सुट्टी होण्याच्या आत वही पूर्ण करायला सांगितले होते आणि सुट्टी होण्यास फक्त दोनच तास राहिले होते. संजयला घाबरलेल्या अवस्थेत पाहून मदनने त्याला त्याच्या लक्ष न देण्याच्या सवयीबद्दल उपदेश केला व शिक्षकांकडून परवानगी घेवून बाजारात जावून नवीन वही आणली. इतकेच नाही तर संजयसोबत बसून त्याचा गृहपाठ पूर्ण केला आणि त्याची वही शिक्षकांकडे जमा केली. त्या दिवसापासून संजयने आपल्या स्वभावात बदल केला आणि तो कोणतेही ठिकाणी लक्षपूर्वक काम करू लागला. तात्पर्य- लक्षपूर्वक काम करणे आणि विवेकबुद्धी जागृत ठेवून काम करणे या दोन गोष्टी पाळल्यास अनेक संकटावर मात करता येते. तसेच होणारे नुकसान टाळता येते.कामात एकाग्रता असेल तर सर्व व्यवस्थित होते. वर्तमानपत्रातून संग्रहित. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment