https://m.facebook.com/story.php?story_fbid=384361073332751&id=112133777222150&sfnsn=wiwspwa

https://m.facebook.com/story.php?story_fbid=244586531048281&id=102574415249494&sfnsn=wiwspwa

https://m.facebook.com/story.php?story_fbid=4493626550758848&id=1708917332563131&sfnsn=wiwspwa

*🌺उपक्रम🌺* *✍ सामान्यज्ञानावर आधारित प्रश्नोत्तरे.* http://www.pramilasenkude.blogspot.com *१) सजीवांचे दोन गट कोणते?* *उत्तर - प्राणी आणि वनस्पती .* *२) सजीवांना कशाची गरज असते?* *उत्तर - अन्न, पाणी, हवा आणि सूर्यप्रकाश.* *३) पाठीचा कणा असलेल्या सजीवांना काय म्हणतात ?* *उत्तर - पृष्ठवंशीय सजीव उदा.(जलचर, पक्षीवर्ग, सरपटणारे, सस्तन प्राणी.* *४) पाठीचा कणा नसलेल्या सजीवांना काय म्हणतात?* *उत्तर - अपृष्ठवंशीय सजीव उदा.(गोगलगाय)* *५) सजीवांची लक्षणे कोणकोणती आहेत ?* *उत्तर - वाढ, श्वसन, उत्सर्जन ,प्रजनन, चेतनाक्षमता ,हालचाल, ठराविक आयुर्मान ,पेशीमय रचना.* *६) वाढ होत नाही त्यांना काय म्हणतात ?* *उत्तर - निर्जीव* *७) निर्जीवांना कशाची गरज नसते?* *उत्तर - अन्न, पाणी ,हवा यांची गरज नसते,* *८) सजीवांची वाढ होण्यासाठी कोणत्या घटकांची गरज असते?* *उत्तर - निर्जिव* *९) एकपेशीय सजीवांची दोन नावे सांगा?* *उत्तर - अमीबा , पॕरोमेशिअम* *१०) बहुपेशीय सजीवांची नावे सांगा?* *उत्तर - मानव , वडाचे झाड , कांद्याचे रोप, गाय, उंदिर, झुरळ, हत्ती इत्यादी.* 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *✍संकलन/ लेखन* श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे. जि.प.प्रा. शाळा गोजेगाव. ता.हदगाव जि.नांदेड.

*🌺 जीवन विचार🌺* ➖➖➖➖➖➖➖ http://www.pramilasenkude.blogspot.in *तुम्ही उच्चारलेला प्रत्येक शब्द, केलेला प्रत्येक विचार आणि प्रत्येक कृत्य हे तुमचे कर्मसंचित घडवीत असते. दुष्ट विचार आणि दुष्ट कृती ह्या जशा तुमच्यावर वाघासारख्या झडप घालायला टपलेल्या असतात .तसेच तुमचे शुभ विचार आणि तुमची शुभ कर्मे हजारो लाखो देवदूतांची शक्ती धारण करून तुम्हाला सामर्थ्य देण्यासाठी, तुमचे रक्षण करण्यासाठी सदैव सिद्ध असतात.आपण आपल्या तनमनात सदैव भलेपणाची,चांगुलपणाची,मांगल्याची,निस्वार्थीवृत्तीने जीवन जगण्याची तेजोमय ज्योत तेवत ठेवली पाहिजे.* *'कर्मे ईशू भजावा'.आपण आपल्या कामालाच आपले दैवत मानले पाहिजे. व प्रामाणिकपणे, इमान इतबारे आपले काम करीत राहीले पाहिजे त्यासाठीच आपला देह झिजवला पाहिजे.आपल्या कामाची पूजा केली पाहिजे.आपल्या कार्यातच आपल्याला ईश्वर प्राप्त होतो.* *📚स्वामी विवेकानंद*🙏🏻 *माणसाचे कर्म चांगले असावे.चांगले कर्म असणाऱ्या व्यक्तीला भीती नसावी.* *पण जर का कोणी चांगले कर्म करण्याचा दिखावा करत असेल तर (मुखी राम बगल मे सुरी)* *अशा प्रकारचे देखावा करणारे लोक चांगल्या व्यक्तीच्या कामात विनाकारण अडथळा निर्माण करीत असतील तर अशा व्यक्तीला परमेश्वर कधी माफ करत नाही.* *कारण ज्यांचे कोणी नसते त्यांचा ईश्वर असते.परमेश्वर अशा व्यक्तीला चांगला धडा शिकवतो.मग तो स्वतःचे रुप कुठं ?आणि कसे दाखविल हे*?????? 〰〰〰〰〰〰 *🙏🏼शब्दांकन/संकलन🙏* ✍ *श्रीमती प्रमिला सेनकुडे*

*🌺जीवन विचार🌺* *〰〰〰〰〰〰〰* http://www.pramilasenkude.blogspot.in *"प्रयत्न तो देव जाणाव"* *"देवासकट सर्वकाही प्राप्त करून देण्याच"* *सामर्थ्य प्रयत्नात आहे म्हणून* *प्रयत्न हे रत्न देवापेक्षाही श्रेष्ठ होय".* *प्रयत्न हा प्रकारच इतका प्रभावी आहे की , प्रयत्न करण्याच्या प्रक्रियेत प्रयत्न करणाऱ्याला प्रकाश दिसू लागून त्या प्रकाशातूनच त्याला प्रभूचा प्रसाद प्राप्त होतो.थोडक्यात प्रयत्न करीत रहाणे हे मानवी जीवनाचे अविभाज्य घटक असून त्रिकालबाधित निसर्गनियमांशी ते सुसंगत आहे.* *Smt.Pramila Senkude.* *कोणतेही यश प्राप्त करावयाचे असल्यास ते यश आपण करीत असलेल्या प्रयत्नाला चिकटलेले असते. "प्रयत्न करून यश मिळणे हा नियम आहे" हे सत्य माणसाने सदैव लक्षात ठेवले पाहिजे. मात्र प्रयत्न योग्य दिशेने होण्यासाठी ते अभ्यासपूर्वक झाले पाहिजेत . नुसते कष्ट केल्याने किंवा प्रयत्न केल्याने यश मिळत नसते.* *थोडक्यात अभ्यासपूर्वक व प्रामाणिकपणे प्रयत्न केल्याने माणसांना जे धन व यश प्राप्त होते , ते त्यांना सुख शांती , समाधान , यश व समृद्धी प्राप्त करून तर देतेच शिवाय त्याचा इष्ट प्रभाव इतरांवरही पडत असतो.अस म्हणतात 'प्रयत्न हा परीस आहे, प्रयत्नामुळे नरकाचे नंदनवन होते.' शून्यातुन विश्व निर्माण करण्याची जिद्द माणसामध्ये असली की त्याचे कर्तृत्व दरवळायला वेळ लागत नाही.त्यासाठी हवी असते प्रामाणिकपणे अभ्यास व कष्ट करण्याची तयारी व असाध्य गोष्टीही साध्य करण्याची धडपड. ही सततची प्रामाणिक श्रमरुपी,अभ्यासपूर्व केलेली धडपड म्हणजेच यशस्वी वाटचालीसाठी केलेले प्रयत्न होय.* 〰〰〰〰〰〰〰 *🙏🏼शब्दांकन/संकलन🙏* ✍ *श्रीमती प्रमिला सेनकुडे* जि.प.प्रा.शा. गोजेगाव, ता.हदगाव, जिल्हा नांदेड. *~~~~~~~~~~~

*🌺वाचन विकास उपक्रम* *✍ ' जोडक्षरयुक्त शब्द '. वाचूया. लिहूया.* http://www.pramilasenkude.blogspot.com *१) ढ्य - मेंढ्या , पेंढ्या, बलाढ्य, धनाढ्य.* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *२) ण्य - फण्या , गोण्या, पुण्याई लावण्य, अरण्य.* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *३) त्य - पणत्या , त्याला , त्याच्या ,त्यांनी , त्याच्या ,त्यांच्या , त्यामुळे ,त्यामुळं, त्यामुळेच ,त्या ,त्यांनी, त्यांच्या, आत्या , चकत्या.* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *४) थ्य - तथ्य, पोथ्या पायथ्याशी ,पालथ्या ,काथ्या, मेथ्या.* 〰️〰️〰️〰️〰️〰️ http://www.pramilasenkude.blogspot.com *५) द्य - गद्य , पद्य, वाद्य, विद्यार्थी, विद्या, गाद्या , फांद्या , द्या , द्यावे , द्यावा द्यायला द्यायची द्यावे, द्यायचे , द्यायचा , द्यायचं .* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *६) ध्य - मध्य , ध्यान , ध्यास, संध्या, संध्याकाळ,ध्यानात , ध्यानी, ध्यानी , ध्यानात ,ध्येय ,ध्येये.* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *७) न्य - न्याय , धान्य, अन्य ,अन्यथा ,वन्य, वन्यजीव, अनन्या, अन्याय, न्यायला, न्यायाधीश ,न्यायालयाने ,न्यायला ,न्या , न्यायमूर्ती, न्यायालयात ,न्यायालय ,न्यायालयाने.* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *८) प्य - रौप्य ,सोप्या ,प्यायला ,प्यावे , प्याला.* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *९) फ्य - चाफ्याची, लिफाफ्यात, वाफ्यात.* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *१०) ब्य - लोंब्या ,तांब्या ,ओंब्या.* 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *✍संकलन/ लेखन* श्रीमती प्रमीला सेनकुडे

*सेनकुडे यांना विद्यार्थी गुणवत्ता विकास मंचाचा उपक्रमशील उत्कृष्ट सम्राज्ञी पुरस्कार प्रदान* https://rajmudralive.com/18677/24/19/15/ *ताज्या घडामोडी, महत्वपूर्ण लेख, दिग्गज मान्यवरांच्या प्रतिक्रिया, मुलाखती सर्वात आधी वाचण्यासाठी, पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्ह हे सर्वात लोकप्रिय ॲप्लिकेशन प्ले स्टोर वरून डाऊनलोड करा.* https://play.google.com/store/apps/details?id=com.rajmudranews.news.live

*🌺जीवन विचार* 🌺 〰〰〰〰〰〰〰 http://www.pramilasenkude.blogspot.in परमपूज्य महात्मा गांधी यांनी म्हटलेले आहे ' सत्याच्या खाणीत तुम्ही जितके अधिक खोल शिराल तितकी अधिक मौल्यवान रत्ने तुमच्या हाती येतील.' आणि हे मौल्यवान रत्ने आपल्याला मिळवायचे असेल तर सत्य ह्या सौंदर्य रुपाची कास धरावी लागेल. ही सत्यस्वरूप सौंदर्याची कास धरत असताना सत्यापासून वेगळे सौंदर्य असू शकत नाही, हि जाणीव ठेवूनच सत्यनिष्ठता अंगी रुजवणे बाळगणे आवश्यक असते, आणि अशा सत्यनिष्ठेसाठी निर्भयतेची गरज असते आणि निर्भयतेसाठी स्वावलंबनाची गरज असते.नम्रता म्हणजे 'मी' पणाचा आत्यंतिक क्षय. निर्भयतेने प्रगती करून घेता येते व नम्रतेने बचाव होतो.आपण स्वतःस वाचवु शकतो. नम्रतेच्या कोंदनातच अभय खुलून दिसते.आणि उदार वृत्ती वाढीस लागते."नम्रता म्हणजे लवचिकपणा. यामध्ये जिंकण्याची कला आहे आणि शौर्याची पराकाष्ठा आहे ". smt.pramila senkude *नम्रतेच्या उंचीला मोजमाप नाही*. 🙏 महात्मा गांधी नी म्हटलं आहे " सत्याचा शोध घेऊ इच्छिणाऱ्याने धुळीच्या कणापेक्षाही नम्र झाले पाहिजे. नम्रता ही अहिंसेची तेजस्वी मूर्ती आहे ". नम्र माणूस दुसऱ्याचा विचार करतो. पाणी ज्याप्रमाणे रस्त्यातला खड्डा भरून काढल्याशिवाय पुढे सरत नाही , त्याचप्रमाणे दुसऱ्याचे जीवन संपन्न केल्याशिवाय तो राहणार नाही. म्हणूनच कन्फ्यूशियसने म्हणले आहे 'फळांनी लहडलेल्या वृक्षांच्या शाखा ज्याप्रमाणे खाली वाकतात, त्याप्रमाणे महान लोक त्यांच्या महानतेने लीन बनतात.' ================== 🙏🏼शब्दांकन/संकलन🙏🏼 *✍श्रीमती प्रमिला सेनकुडे ता.हदगाव जि.नांदेड.