*🌺जीवन विचार* 🌺 〰〰〰〰〰〰〰 http://www.pramilasenkude.blogspot.in परमपूज्य महात्मा गांधी यांनी म्हटलेले आहे ' सत्याच्या खाणीत तुम्ही जितके अधिक खोल शिराल तितकी अधिक मौल्यवान रत्ने तुमच्या हाती येतील.' आणि हे मौल्यवान रत्ने आपल्याला मिळवायचे असेल तर सत्य ह्या सौंदर्य रुपाची कास धरावी लागेल. ही सत्यस्वरूप सौंदर्याची कास धरत असताना सत्यापासून वेगळे सौंदर्य असू शकत नाही, हि जाणीव ठेवूनच सत्यनिष्ठता अंगी रुजवणे बाळगणे आवश्यक असते, आणि अशा सत्यनिष्ठेसाठी निर्भयतेची गरज असते आणि निर्भयतेसाठी स्वावलंबनाची गरज असते.नम्रता म्हणजे 'मी' पणाचा आत्यंतिक क्षय. निर्भयतेने प्रगती करून घेता येते व नम्रतेने बचाव होतो.आपण स्वतःस वाचवु शकतो. नम्रतेच्या कोंदनातच अभय खुलून दिसते.आणि उदार वृत्ती वाढीस लागते."नम्रता म्हणजे लवचिकपणा. यामध्ये जिंकण्याची कला आहे आणि शौर्याची पराकाष्ठा आहे ". smt.pramila senkude *नम्रतेच्या उंचीला मोजमाप नाही*. 🙏 महात्मा गांधी नी म्हटलं आहे " सत्याचा शोध घेऊ इच्छिणाऱ्याने धुळीच्या कणापेक्षाही नम्र झाले पाहिजे. नम्रता ही अहिंसेची तेजस्वी मूर्ती आहे ". नम्र माणूस दुसऱ्याचा विचार करतो. पाणी ज्याप्रमाणे रस्त्यातला खड्डा भरून काढल्याशिवाय पुढे सरत नाही , त्याचप्रमाणे दुसऱ्याचे जीवन संपन्न केल्याशिवाय तो राहणार नाही. म्हणूनच कन्फ्यूशियसने म्हणले आहे 'फळांनी लहडलेल्या वृक्षांच्या शाखा ज्याप्रमाणे खाली वाकतात, त्याप्रमाणे महान लोक त्यांच्या महानतेने लीन बनतात.' ================== 🙏🏼शब्दांकन/संकलन🙏🏼 *✍श्रीमती प्रमिला सेनकुडे ता.हदगाव जि.नांदेड.

No comments:

Post a Comment