✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00          ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 01/01/2020 वार - बुधवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *नवीन वर्ष शुभारंभ* 💥 ठळक घडामोडी :- ● १८६२ - इंडियन पीनल कोड अस्तित्वात आले. 💥 जन्म :- ● १८९२ - महादेव हरिभाई देसाई गांधीवादी कार्यकर्ते. ● १८९४ - सत्येंद्रनाथ बोस भारतीय भौतिकशास्त्रज्ञ. ● १९०२ - कमलाकांत वामन केळकर भारतीय भूवैज्ञानिक. ● १९३६ - राजा राजवाडे साहित्यिक. ● १९४३ - रघुनाथ माशेलकर . 💥 मृत्यू :- ● १७४८ - योहान बर्नोली, स्विस गणितज्ञ. ● १९५५ - शांतिस्वरूप भटनागर भारतीय रसायनशास्त्रज्ञ. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *भाविकांच्या विरोधानंतरही 1 जानेवारीपासून पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात मोबाईल बंदी, मंदिर प्रशासनाकडून मोबाईल ठेवण्यासाठी अडीच हजार लॉकरची व्यवस्था* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी यासह विविध मागणीसाठी येत्या आठ जानेवारीला देशव्यापी संप पुकारण्यात आला आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *'कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभ परिसरात आज, एक जानेवारी रोजी गर्दी होणार असल्याने कोरेगाव भीमा, सणसवाडी येथील शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्यात येणार आहेत. मात्र, या भागातील कंपन्या सुरू राहणार आहेत,' असे निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांनी सांगितले.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *सरकारने एनपीआरचा नवा फॉर्म तयार केला आबे. सरकारी सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एनपीआरच्या नवीन डेटाबेसमध्ये आधार नंबर, पॅन नंबर, वोटर आयडी नंबरसह जवळपास 7 नवीन घटकांचा समावेश करण्यात आला आहे* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *मेट्रोच्या कामासाठी पुण्याच्या शिवाजीनगर बसस्थानकाचे स्थलांतर, शिवाजीनगर बसस्थानक खडकीत हलवल्यानं येथे जाण्यायेण्यासाठी जास्तीचा वेळ खर्ची पडणार आहे. तसेच या स्थानकावर येण्या जाण्याचा खर्चही वाढणार आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *देशाचे नवे लष्करप्रमुख म्हणून मराठमोळ्या मनोज मुकुंद नरवणे यांनी पदभार स्वीकारला, जनरल बिपिन रावत चीफ ऑफ डिफेन्स स्टाफपदावर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *न्यू ईयर सेलिब्रेशननिमित्त माथेरान हाऊसफुल्ल, मिनी ट्रेन सुरू झाल्याने पर्यटकांच्या संख्येत वाढ* ••••••••••••••••••••••••••••••••••••• नववर्षाभिनंदन ! फ्रेश मॉर्निंग बुलेटिनच्या सर्व वाचकांना नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा !!! ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         *नवीन वर्ष सुखाचे जावो* मुलांनो, ग्रेगरियन कॅलेंडरनुसार काल सरत्या वर्षाला निरोप देऊन आज आपण नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी सज्ज झालो आहोत. ख्रिसमस म्हणजे नाताळाचा सण संपला की, संपूर्ण जगाला नवीन वर्षाची चाहूल लागते. संपूर्ण जगात या नवीन वर्षाचे स्वागत वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. भारतात इंग्रज लोकांनी दीडशे वर्षे राज्य केले आणि जाता ...... वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/12/blog-post_31.html      लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃  *काव्यांगण - रोज एक बालकविता* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आले वर्ष नवे* ---------------------- सरले सरले वर्ष हे हो जुने स्वागत करूया आले हे वर्ष नवे... पाहू स्वप्ने नवी करू संकल्प नवे प्रयत्न करूया देई यश वर्ष नवे... गोड सदा बोलावे वाईट ना बोलावे मनापासून हेच नवं वर्षात करावे -------------------------------- -अरुण वि.देशपांडे-पुणे. 9850177342 ----------------------------------- *सौजन्य :- जि. प. प्रा. कन्या शाळा धर्माबाद* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जेव्हा एखादा मार्ग तुम्ही निवडता तेव्हा तो तुम्ही शेवट पर्यंत चालला पाहीजे.  व्यक्तीगत कारणासाठी त्यापासून दूर जाऊ नये. *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *भारताची राष्ट्रीय मिठाई कोणती ?* जिलेबी 2) *भारतातून चहाची आयात सर्वाधिक कोणता देश करतो ?* इंग्लंड 3) *शिकागो येथे भरलेल्या जागतिक सर्वधर्म परिषदेमध्ये हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व कोणी केले ?* स्वामी विवेकानंद 4) *ब्रह्मपुत्रा नदी बांग्लादेशात कोणत्या नावाने ओळखले जाते ?* जमुना 5) *जगातील सर्वात मोठा धबधबा कोणता ?* एंजल *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 अनिकेत भारती, नांदेड 👤 सुरेश सावंत, साहित्यिक, नांदेड 👤 दिलीप धामणे, साहित्यिक, हिंगोली 👤 संजय नलावडे, साहित्यिक, मुंबई 👤 पांडुरंग कोकुलवार, साहित्यिक, नांदेड 👤 पेंडम पवन, नवीपेट, तेलंगणा 👤 शिवराज पा. गाडीवान, पत्रकार, धर्माबाद 👤 शेख बिस्मिल्ला सोनोशी 👤 उमेश कोकुलवार *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌼 🌼 *_हार्दिक शुभेच्छा !!!_* 🌼 🌼 *'धूर' जसा वातावरणात 'प्रदूषण' करतो तसे 'शब्द'ही जगण्यात प्रदूषण करतात. तेव्हा निरोगी मनाच्या, निरोगी शब्दांच्या शोधात रहाणे, त्यांचा सहवास मिळविणे यात वेळ घालविणे आधिक चांगले. अशावेळी 'चुगलखोर' शब्दांना मूठमाती देणे आधिक चांगले.* *आज 31 डिसेंबरला नववर्षाच्या शुभेच्छा देताना सर्वांना एकच मॅसेज पाठवत आहे... 'मी जर तुमच्याविषयी काही वाईट बोललो असं जर तुम्हाला कुणी सांगितलं, तर मनात ठेवू नका. माझ्याशी 'संवाद' साधा. मला तुमच्याशी 'मैत्री' हवी आहे. शब्दांमुळे आपल्यात अंतर नको......'*        🌟  *_Good Bye -  2017_*  🌟 🌟💥 *_WELCOME - 2018_*💥🌟   *_नववर्ष मैत्रीपूर्ण, आनंददायी जावो !!!_*      *_मन:पुर्वक हार्दिक शुभेच्छा !!!_* 💐           *_--संजय नलावडे आणि परिवार_*    💥💥💥💥💥💥💥💥💥          📱 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो* *आज 2020 मध्ये आपण पदार्पण करीत आहोत.* *या संपूर्ण एका वर्षासाठी आजपासून नवीन संकल्प करा. ते डायरीत लिहून ठेवा. मित्र परिवारात जाहीर करा. वारंवार ते संकल्प आठवा* *काही संकल्प* १) प्रथम स्वतः वर प्रेम करा. २) वडिलधा-यांना मान द्या. ३) बचत करायला शिका. ४) निरोगी राहण्यासाठी प्रयत्न करा. ५) चांगला मित्र परिवार वाढवा. ६) व्यसनांपासून दूर रहा. ७) भक्तीमार्ग अवलंबा. ८) समाजसेवा करा. ९) आपल्या मागे आपली आठवण काढणारी माणसे आहेत, याची सदैव जाणीव ठेवा. १०) सल्ला घेऊनच प्रत्येक काम करा. ११) आजच्या तरूण पणावरच उद्याचे वृद्धत्व अवलंबून आहे. हे विसरू नका. १२) मागा म्हणजे मिळेल, आणि शोधा म्हणजे सापडेल. या प्रमाणे वागल्यास पुढेच जाल. १३) यशोगाथांचे वाचन करा. १४) नैसर्गिक जीवन जगा. १५) आयुष्य फार लहान आहे. प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. आदर्श जीवन जगण्यासाठी जरुर वाचा.. 💎1) चूक झाली तर मान्य करा. 💎2) समोरच्याचे मत विचारात घ्या. 💎3) चांगल्या कामाची स्तुती करा. 💎4) आभार मानायला विसरू नका. 💎5) मी ऐवजी आपण शब्द प्रयोग करा. 💎6) सतत हसतमुख रहा. 💎7) दुसऱ्यातील चांगले गुण ओळखा. 💎8) कुणाच्याही व्यंगावर हसु नका. 💎9) स्वतःची कुवत व ताकद ओळखा. 💎10) टिका तक्रार यात वेळ घालवु नका. 💎11) कृती पुर्व विचार करा. 💎12) लोकांच्या खांद्यावर अपयश लादू नका. 💎13) क्रोधावर नियंत्रण ठेवा. 💎14) मैत्री भावना कायम मनी राहु द्या. 💎15) नेहमी सत्याची कास धरा. 💎16) इतरांना चांगली वागणूक द्या. 💎17) सुखाचा गुणाकार व दुखाचा भागाकार करा. 💎18) विचार करून बोला. 💎19) वाहन चालवताना स्वतः ची काळजी घ्या 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺 *संकलन -:* *अशोक लक्ष्मण कुमावत.* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 🙏 *निवास* :-समर्थ,त्रिकोणी बंगला, अमृतधाम, पंचवटी, नासिक 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• प्रत्येकाने असा संकल्प केला पाहिजे की,आपल्या जीवनात कोणत्याही बाबतीत हार मानायची नाही किंवा माघार घ्यायची नाही. कारण आपण ज्या गोष्टी साध्य करणार आहोत त्या गोष्टींसाठी मनात जिद्द ठेवून आणि यश मिळविण्याचे लक्ष आपल्यासमोर ठेवून समोर येणा-या आव्हानाला प्रयत्नाने आणि त्या प्रयत्नामध्ये सातत्याने साध्य करण्यासाठी सज्ज झालात तर यश हे तुमच्यापासून कधीच दूर जात नाही.तुमच्या मनात हारण्याचीदेखील भावना स्पर्श करणार नाही. सदैव तुम्ही दिवसेंदिवस यशाकडेच मार्गक्रमण करत राहणार.पण तुमच्या मनाचा थोडाजरी आत्मविश्र्वास कमी झाला तरी तुमच्या यशस्वी जीवनामध्ये बाधा निर्माण करुन तुम्हाला तुम्हीच अपयशाला कारणीभूत ठरु शकाल हे मात्र नक्कीच. *व्यंकटेश काटकर,नांदेड.*   संवाद..९४२१८३९५९०/             ८०८७९१७०६३. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *एकीचे बळ* एका वृद्धाने सदान्- कदा भांडणार्‍या आपल्या मुलांना हातभर लांबीची एकेक काठी मोडायला सांगणे एक गृहस्थ म्हातारपणामुळे बराच थकला होता. आयुष्यात चांगली कमाई करून आणि स्वत: चांगले जीवन जगूनसुद्धा त्याच्या पाच मुलांमध्ये सदान्-कदा चालणार्‍या भांडणांमुळे तो दु:खी होई. त्याने आपल्या मुलांना बराच उपदेश केला; पण पालथ्या घडावर पाणी. एके दिवशी त्याने आपल्या पाचही मुलांना प्रत्येकी हातभर लांबीची एकेक काठी घेऊन यायला सांगितले. त्याप्रमाणे ती मुले एकेक काठी घेऊन आली. त्या गृहस्थाने त्यांच्यापैकी प्रत्येकाला आपापली काठी मोडण्यास सांगितले. वडिलांनी सांगितलेली ती गोष्ट प्रत्येक मुलाने लगेचच करून दाखवली. वडिलांनी पाच काठ्यांची जुडी करून प्रत्येकाला ती मोडायला सांगितल्यावर एकालाही ती मोडता न येणे पुन्हा त्या गृहस्थाने त्या मुलांना तशाच प्रकारची एकेक काठी घेऊन यायला सांगितले. पाच जणांनी पाच काठ्या आणून वडिलांपुढे ठेवल्या. वडिलांनी त्या पाच काठ्यांची एका दोरीने मोळी बांधली आणि प्रत्येकाला ती मोडायला सांगितली. पाच काठ्या एकत्र असलेली ती मोळी आपल्या पाच मुलांपैकी कुणालाच मोडता येत नसल्याचे पाहून तो गृहस्थ त्यांना म्हणाला, बघितलंत ना ? एकीचे बळ किती असते ते ? वडील एवढेच बोलले; पण ते सूज्ञ मुलगे समजायचे ते समजले. तेव्हापासून एकजुटीने वागू लागले.संघटित राहून केलेल्या कार्यास यश नक्कीच प्राप्त होते. तात्पर्यः एकीचे बळ फार मोलाचे असते. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~

*नवप्रेरणा* नवप्रेरणा जीवनी आली आनंदाचे क्षण पुलकीत झाले विसावल्या त्या क्षणाला विसरून सारे पुढे गेले अंतःकरणाचा पुलकीत क्षणाचा घेऊया आपण मागोवा रे उणेदुणे सोडून सारे विसरून त्याला जाऊयारे काळाचा वाहत्या ओघाचे आपण सारे आहोत भागीदार आयुष्याचा क्षणाक्षणाचा हिशेब मग आपण कसा ठेवणार? सर्वांनी द्यावी इतकी मायाआणि स्नेहमय छाया वैरत्वाचा वैरत्वाची प्रेमाने पालटुया आपणरे काया सरलेल्या आयुष्याचे क्षण नाही आपण मोजायचे आणि उरलेल्या आयुष्यात मनात माञ घर करुन राहायचे नवप्रेरणेने जीवन पुढील जगायचे,सुखदुःखाचे धागेदोरे मोजत नाही बसायचे हसतखेळत जीवन आपले छानसे रंगतदार करायचे. 💐💐💐💐💐💐 *सर्वांना नुतन वर्षाचा हार्दिक स्नेहमय शुभकामना*💐💐💐 〰〰〰〰〰〰 ✍ प्रमिलाताई सेनकुडे नांदेड.

वर्षे सरताना आठवणीचा शिदोरीने भरून गेले माझे मन वर्षे सरतानाही घेईन मागोवा नाही जातील त्या विसरून 〰〰〰〰〰〰

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00          ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 31/12/2019 वार - मंगळवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••     *वर्षातील शेवटचा दिवस* 💥 ठळक घडामोडी :-  ● १६००: ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीची स्थापना. 💥 जन्म :- ● १८७१: आधुनिक भारतीय व्यायामविद्येचे प्रवर्तक गजानन यशवंत ताम्हणे तथा माणिकराव ● १९१०: हिन्दुस्तानी शास्त्रीय गायक पं. मल्लिकार्जुन मन्सूर ● १९२५: भारतीय लेखक श्री लाल शुक्ला ● १९३४: भारतीय लेखक, कवी आणि विद्वान अमीर मुहम्मद अकरम अववान ● १९३७: वेल्श अभिनेता अँथनी हॉपकिन्स  💥 मृत्यू :-  ● १९२६: इतिहासाचार्य वि. का. राजवाडे ● १९९७: स्वरराज छोटा गंधर्व *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *महाविकास आघाडी सरकारचा मंत्रिमंडळ विस्ताराचा शपथविधी सोहळा विधिमंडळ परिसरात संपन्न झाला. एकूण ३६ आमदारांना राज्यपालांनी पद आणि गोपनियतेची शपथ दिली. अजित पवार, अशोक चव्हाण, दिलीप वळसे पाटील, आदित्य ठाकरे आणि जितेंद्र आव्हाड यांच्यासह २६ आमदारांनी कॅबिनेट मंत्रिपदाची तर दहा आमदारांनी राज्यमंत्रिपदाची घेतली शपथ* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदी अजित पवार यांची निवड होताच काटेवाडीत आनंदाला उधाण गुलालाची उधळण , फटाक्याची आताषबाजी करत आनंदोत्सव साजरा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *दोन लाखांवरच्या शेतकरी कर्जदारांसाठी कर्जमाफीची नवी योजना आणणार तर, नियमित कर्जफेड करणाऱ्यांसाठीही विशेष योजना राबवणार असल्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची माहिती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *बिपीन रावत भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ, केंद्र सरकारकडून घोषणा, लष्करप्रमुखपदावरून रावत आज निवृत्त होणार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *कोरेगाव भीमा येथे 1 जानेवारीच्या कार्यक्रमासाठी पोलिसांचा 'मास्टर प्लान', पोलिसांकडून 250 व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप्सना नोटीस तर फेसबुकवरून 12 पेजेस डिलीट* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *मुंबईतून तब्बल 26 खासगी रेल्वे धावणार, रेल्वेला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी रेल्वे मंत्रालयाचा प्रयत्न, 10 ते 15 दिवसात खासगी रेल्वेसाठी निविदा निघणार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पुसेसावळी (खटाव) शाखेत रविवारी अज्ञात व्यक्तींनी धाडसी दरोडा टाकला. यामध्ये बँकेतील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा सुमारे १ कोटी ६५ लाख ९६ हजार १५९ रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. या घटनेमुळे सातारा आणि सांगली जिल्हा परिसरात एकच खळबळ उडाली आहे* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  *स्मार्टफोनचा विळखा, वेळीच ओळखा* अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. पण कालांतराने या मूलभूत गरजामध्ये अजून कांही वस्तूची वाढ होत गेली त्यात प्रामुख्याने मोबाईलचा समावेश करणे अगत्याचे आहे. आज माणसाला एक वेळ अन्न, वस्त्र किंवा निवारा यांची कमतरता असेल तर चालून जाईल मात्र खिशात मोबाईल नसेल तर ती व्यक्ती जिवंत राहू ......... वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/11/blog-post_22.html       लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *मुरमान्स्कचे बंदर* 📙 जगातील सर्वात उत्तरेकडचे बंदर म्हणजे मुरमान्स्कचे बंदर. रशियाच्या उत्तरेकडच्या भागातील बव्हंशी भाग कायमचा गोठलेला असतो. विशेषत: हिवाळ्यात तर विचारायलाच नको. बॅरेंट्स समुद्रातील कोला खाडीजवळील एक भाग मात्र तेथील समुद्रप्रवाहामुळे बाराही महिने गोठतच नाही. संपूर्ण उत्तरेकडील समुद्राचे निरीक्षण करताना हा न गोठणारा बिंदू शोधून काढला तो दुसर्‍या निकोलस झारने. १९१६ साली बंदराची जागा नक्की केली जाऊन बंदर उभारणीसाठी तंत्रज्ञ तेथे पाठवले गेले. या शेवटच्या झारला भूगोल व विज्ञान दोन्हींची विलक्षण जाण होती. देशाला बारमाही बंदर हवेच, या कल्पनेने त्याला पूर्ण झपाटले होते. त्यातूनच या बंदराची उभारणी त्याने सुरू केली. मात्र बंदर पूर्ण होण्यापूर्वीच त्याची सत्ता जाऊन क्रूर हत्या झाली. १९१६ साली बंदरबांधणी झाली. त्या वेळी जेमतेम लाकडी घरातून उभारले गेलेले छोटेसे गाव आज आता मोठे शहर झाले आहे. सहा लाख वस्तीचे परिपूर्ण नांदते, रसरसते शहर ही सुद्धा या टोकाच्या हवामानातील एक वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणावी लागेल. झारची सत्ता गेली, तरी बंदर मोठ्या चिकाटीने उभे राहिले. ६९ अंश उत्तर अक्षांश व ३३ अंश पुर्व रेखांशांवर हे बंदर उभे आहे. आसपासचे वातावरण बहुधा वर्षभर शून्याच्या आसपास असते. रात्रीच्या वेळी उणे पंधरा ते उणे तीस सेंटिग्रेड यादरम्यान ते खाली जाते. आर्क्टिक प्रदेशातील झोंबरे वारे सतत वाहत असतातच. नोव्हेंबर महिन्यात इथला सूर्य शेवटचा मावळतो, तो एकदम संक्रांतीनंतरच उगवतो. प्रत्यक्ष बंदराच्या आसपास समुद्र जरी गोठत नसला तरी थोडा लांबचा टप्पा क्वचित गोठू लागतो. बंदरातील हिमफोड्या नौका ताबडतोब त्या दिशेने जाऊन रस्ते मोकळे करून देतात. अन्नधान्य, इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा बाहेरून आणावा लागतो. पण मुरमान्स्क येथे दोन गोष्टींची उणीव नाही. खनिज तेल व मासे यांची प्रचंड साठवण व निर्यात या बंदरातून जगभर होते. सैबेरियन भागातून तेलाच्या विहिरीतून काढलेले तेल पाइपातून येथे आणून मग ते ठिकठिकाणी पाठवले जाते. या बंदराची भरभराट याच कारणामुळे होत गेली आहे. दोन्ही महायुद्धांमध्ये रशियाची रसद व नाविक हालचालींची ताकद मुरमान्स्क बंदरातच एकवटली होती. तिथपर्यंत पोहचायची सवय व या हवामानाला तोंड देण्याची ताकद फक्त रशियन नौदलातील नावीकांना होती. रशियाची पश्चिम बाजू जर्मनांनी व्यापली असल्याने या बंदरातून सर्व आवश्यक तो पुरवठा केला गेला व रशिया महायुद्धातून सुखरूप बाहेर येऊ शकला. आज भौगलिक उपयुक्ततेनुसार मुरमान्स्कचे स्थान अढळ बनले आहे, ते युरोपकडून जपानकडे वा जपानकडून युरोपकडे होणाऱ्या मोठ्या जलवाहतुकीमुळे. या वाहतुकीला मार्ग दोन. दक्षिणेकडून किंवा उत्तरेकडून. मध्यंतरी अनेक वर्षे सुवेझचा कालवा बंद होता, तेव्हा ही वाहतूक उत्तरेकडून वळवली गेली होती. आजही जेव्हा जेव्हा मध्य आशियात अस्वस्थपणा येतो, तेव्हा हाच रस्ता वापरला जातो. त्या प्रत्येक वेळी रसदीसाठी, मधल्या मुक्कामासाठी, दुरुस्तीसाठी मुरमान्स्कचा थांबा अटळ राहतो. दोन्ही ध्रुवांवर मानवाने पाय रोवला असला तरी जवळपास तितक्याच दुर्गम हवामानात पाय रोवून बारमाही व्यावहारिक जीवन जगायचे म्हणजे मुरुमान्स्कमध्ये काम करायचे असे म्हटले तर ती अतिशयोक्ती ठरू नये. *'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• अडचणी येतात आणि जातात. फक्त जाताना आपलं वय घेऊन जातात. ~ वपु काळे | पार्टनर *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *कलकत्याहून वंदेमातरम हे वृत्तपत्र कोण प्रकाशित करत असे ?* अरविंद घोष 2) *महाराष्ट्राचे वर्तमान उपमुख्यमंत्री कोण आहेत ?* अजित पवार 3) *'माझे सत्याचे प्रयोग' या आत्मकथनात्मक ग्रंथाचे कर्ते कोण ?* महात्मा गांधी 4) *संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा समितीतील नकाराधिकार (व्हीटो) असलेल्या कायमच्या सदस्य राष्ट्राची संख्या किती ?* 5 5) *महाराष्ट्रात शेकरू ( उडणारी खार ) कोठे आढळते ?* भीमाशंकर *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 रामचंद्ररेड्डी सामोड, येताळा 👤 ताहेर पठाण, धर्माबाद 👤 किरण अबुलकोड, समराळा 👤 अमोल बुरुंगुले 👤 शशांक पुलकंठवार 👤 सचिन चव्हाण *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आपल्याला कोणी विचारले, कसे आहात, की आपले उत्तर असते "ठिक आहे, बरं चालले आहे" पण, झकास चालले आहे, मजेत आहोत." असे म्हणणारे कमीच असतात. परंतु शेजा-याचे, परिचिताचे कसे काय चालले आहे, असे विचारले तर मात्र आपले उत्तर बदलते. अर्थात तेही शेजारी किती सख्खे आहेत, परिचित किती जवळचे आहेत वगैरेवर अवलंबून असते. "ते एकदम मजेत आहेत. त्यांना काय धाड भरली आहे." वगैरे उत्तरे आपण देतो. आपल्याबद्दल बोलताना असणारी सावधगिरी इतरांच्या बाबतीत फारशी नसते.* *अर्थात हेही सारे सगळ्यांच्याच बाबतीत खरे असते असे नाही. स्वत:बद्दल गैरसमज असणारी मंडळीही असतात. आपण खूप विद्वान आहोत, खूप यशस्वी आहोत, खूप सुखी आहोत, असे मानणारे लोकही असतात. 'सुख' म्हणजे काय ? एक कल्पना? मनुष्य हा बुद्धिमान प्राणी आहे, असे म्हटले जाते. पण सुखाच्या कल्पनेमागे धावणा-या माणसाला पाहून ते खरे वाटत नाही. समर्थ रामदास म्हणतात--* *"जगी सर्व सुखी असा कोण आहे.* *विचारी मना तूचि शोधूनी पाहे."* *॥ रामकृष्णहरी ॥* 🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀 *संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो* *आज 31 डिसेंबर* *2019* *गेल्या दोन वर्षांपासून मी अखंड सुप्रभात ही लेखन मालिका चालू* *चालू ठेवली आहे.काही* *वाचतात,काही बघतात, काही डिलीट करतात,काही कॉपी पेस्ट करून* *फॉरवर्ड करतात,काही प्रतिसाद देतात,काही आठवण* *_काढतात.काहीही असो पण निमित्ताने भेटतात.जी जी_* *माणसं भेटत गेली, मला आवडली आणि मी ती जोडत गेलो !!* *चला..* *या वर्षाचा हा अखेरचा दिवस माझ्याकडून काही चुक झाली असल्यास क्षमस्व, आणि तुमच्या या प्रेमळ मैत्री व नात्यांबद्दल खुप सारे धन्यवाद..!!* *तुमच्या या मैत्रीची साथ* *अशीच कायम असू द्या...* *नव्या उमेदीने पुन्हा असेच ऋणानुबंध जपू या...* ✳ *आपला सदैव ऋणी* - *अशोक लक्ष्मण कुमावत.* *एम.ए. एम.एड.* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ज्याप्रमाणे प्रत्येक वस्त्रामध्ये आडवा आणि उभा तागा एकमेकांच्या साथीने मिळून घेतलेला असतो तेव्हा ते वस्त्र किंवा कापड तयार होते.त्याचप्रमाणे संसारातही पती-पत्नी आपल्या संसाररुपी वस्त्राला नेहमी जपत असतात.कुठे जरी फाटले तरी त्या संसाररुपी वस्त्राला आपल्या विचाररुपी सुईने आणि समजदारीच्या दो-याने सतत त्या संसाररुपी वस्त्राला शिवत राहतात.कितीही त्याला ठिगळ लागले तरी चालेल पण त्या ठिगळरुपी,वस्त्ररुपी संसारुपी गोधडी जीवनाच्या शेवटपर्यंत टिकून राहण्यासाठी ही दोन धागे कार्यरत असतात.जर का त्यापैकी एकजरी धागा कमकुवत झाला तर ते संसारुपी वस्त्र वस्त्र म्हणून राहत नाही किंवा त्याला वस्त्रही म्हणत नाही.मग त्याला वापरुन वापरुन राहिलेली चिंधी म्हणून बाजूला फेकून दिली जाते.मग संसाररुपी वस्त्र एकसंघ राहत नाही.संसारात दोघांनाही तेवढाच अधिकार आहे तेवढा वस्त्रामध्ये आडवा आणि उभा धागा एकमेकांत गुंतून आहे. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद...९४२१८३९५९०. 🏠🌷🏠🌷🏠🌷🏠🌷🏠 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *परीस* एक माणूस परीस ( पारस ) शोधायला निघाला.... त्यासाठी रस्त्यात जो दगड येईल तो घ्यायचा, गळ्यातल्या साखळीला लावायचा आणि फेकून द्यायचा असा त्याचा दिनक्रम सुरू झाला दिवस गेले... महिने लोटले... वर्षे सरली.... पण त्याच्या दिनक्रमात बदल झाला नाही ....दगड घ्यायचा, साखळीला लावायचा आणि मग तो फेकून द्यायचा.... शेवटी तो माणूस म्हातारा झाला.... आणि ज्या क्षणि तो आपले शेवटचे श्वास मोजत होता त्यावेळी अचानक त्याचे लक्ष त्याच्या गळ्यातील साखळीकडे गेले... ती साखळी सोन्याची झाली होती..... दगड घ्यायचा, साखळीला लावायचा आणि फेकून द्यायचा या नादात त्याचे साखळीकडे लक्षच गेले नाही.... तात्पर्य: प्रत्येकाच्या जीवनात एकदा तरी परीस येत असतो...कधी आई- वडिलांच्या रूपाने, तर कधी भाऊ-बहीनीच्या नात्याने...तर कधी मित्राच्या मैत्रिणीच्या नात्याने .....तर कधी मार्गदर्शकाच्या नात्याने..... कोणत्या ना कोणत्या रूपात तो आपल्याला भेटत असतो... आणि आपल्यातल्या लोखंडाचे सोने करीत असतो...... आपण जे काही असतो किंवा बनतो त्यात त्यांचा बराच हातभार असतो ....... पण फार कमी लोक या परीसाला ओळखू शकतात. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00          ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 30/12/2019 वार - सोमवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~ http://fmbuletin2019.blogspot.com/2019/12/30-2019.html •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    *रिझाल दिन - फिलिपाईन्स* 💥 ठळक घडामोडी :-  ● १८०३ - अंजनगाव सूर्जी येथे शिंदे व इंग्रज यांच्यात तह. ● १९४३ - नेताजी सुभाषचंद्र बोसनी अंदमान आणि निकोबारची राजधानी पोर्ट ब्लेर येथे पहिल्यांदा स्वतंत्र भारताचा ध्वज फडकाविला. ● १९५३ - जगात पहिल्यांदा रंगीत दूरचित्रवाणी संच अमेरिकेत विक्रीला. किंमत - १,१७५ डॉलर. ● १९९६ - आसाममध्ये बोडो अतिरेक्यांनी रेल्वेत बॉम्बस्फोट घडवून आणला. २६ ठार. ● २००४ - भारत व एशियन गटाच्या देशांदरम्यान व्यापारी सहकार्य व शांततेचा करार. 💥 जन्म :- ● १८६५ - रुड्यार्ड किप्लिंग, ब्रिटीश लेखक. मोगलीच्या कथा, कुमाऊंचे मानवभक्षक,जंगल बुक इ. लिहीले.मुंबईत जन्म. ● १८७९ - रमण महर्षी, भारतीय तत्त्वज्ञानी. ● १८८७ - कनैयालाल माणेकलाल मुन्शी, भारतीय स्वातंत्र्यसैनिक, शिक्षणतज्ञ, कायदेतज्ञ, गुजराती साहित्यिक.'भारतीय विद्याभवन' चे संस्थापक. 💥 मृत्यू :- ● १९७१ - विक्रम साराभाई, भारतीय अंतराळतज्ञ. ● १९७४ - शंकरराव देव, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा नेता व महात्मा गांधींचे सहकारी. ● १९९२ - शाहीरतिलक पिराजी रामजी सरनाईक, मराठी शाहीर. ● २००१ - हर्षद महेता, भारतीय शेअर दलाल. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *ठाकरे सरकारचा आज पहिला मंत्रिमंडळ विस्तार, अजित पवार, धनंजय मुंडे, आव्हाड, अशोक चव्हाण शपथ घेण्याची शक्यता, तर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईला 3 मंत्रिपदं मिळण्याची शक्यता * ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन यांनी झारखंडचे 11 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांच्यासोबत काँग्रेसच्या दोन तर आरजेडीच्या एका नेत्याने घेतली शपथ, राहुल गांधी, ममता बॅनर्जींसह अनेक नेते शपथविधीला उपस्थित* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *चित्रपटसृष्टीतील अत्यंत मानाच्या दादासाहेब फाळके पुरस्काराने बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा सन्मान, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला, यावेळी बच्चन कुटुंबीयांसह दिग्गजांची उपस्थिती पाहायला मिळाली.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *अर्ध्या देशात गोठवणारी थंडी, दिल्लीसह सहा राज्यांमध्ये रेड अलर्ट जारी तर दिल्लीतील अनेक भागात तापमानाचा पारा 2 अंश सेल्सिअसपेक्षा खाली* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *खिलाडी अक्षय कुमार आणि करीनाचा 'गुड न्यूज' चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; पहिल्या दिवशी 17.56 कोटींचा गल्ला तर दोन दिवसांत 39.34 कोटींची कमाई* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *वेगवान गोलंदाज पीटर सिडलचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा, न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटीतील चौथ्या दिवसाचा खेळ सुरू होण्यापूर्वी ड्रेसिंग रूममध्ये सहकाऱ्यांसमोर सिडलने निवृत्तीचा निर्णय जाहीर केला.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *दक्षिण आफ्रिकेने पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात चिवट वृत्तीच्या इंग्लंडला १०७ धावांनी केले पराभूत.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         *गरज तेथे मदत करा*      http://nasayeotikar.blogspot.com/2018/05/blog-post_8.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *किरणोपचार म्हणजे काय ?* 📙 ******************************* अनेक पदार्थ किरणोत्सर्गी असतात. यात नैसर्गिक व कृत्रिम पदार्थांचा समावेश होतो. क्ष-किरण, गॅमा किरण, अल्फा, बीटा व प्रोटॉन असे अनेक किरणोत्सर्ग आपल्याला ज्ञात आहेत. अणुबॉम्बसारख्या विध्वंसक अस्त्रामुळे होणाऱ्या दुष्परिणामांमध्ये किरणोत्सर्गाचे दुष्परिणाम खूप महत्त्वाचे असतात. किरणोत्सर्गाच्या प्रभावामुळे रक्ताचा कर्करोग इतर इंद्रियांचे कर्करोग तसेच आयुष्यमान कमी होणे हे तीन महत्त्वाचे दुष्परिणाम होतात. उपरोक्त किरणोत्सर्गांपैकी क्ष-किरण व गॅमा किरण हे शरीरात खोलवर जाऊ शकतात. क्ष-किरणांच्या शरीरातून आरपार जाऊ शकणाऱ्या गुणधर्माचा वापर क्ष-किरण फोटो काढण्यासाठी करतात. हाडे, स्नायू, हवा यांच्या वेगवेगळ्या घनतेमुळे कमी अधिक प्रमाणात क्ष-किरण त्यातून आरपार जाऊ शकतात व क्ष-किरण प्लेटवर पडतात. याचे दृश्य स्वरूप म्हणजे क्ष-किरण फोटो होय. किरणोत्सर्गी आयोडीनचा वापर थायरॉईड ग्रंथीचे कार्य व्यवस्थित चालू आहे वा नाही हे बघण्यासाठी होतो. गॅमा किरणांमुळे शरीरातील पेशी मरतात. या गुणधर्माचा वापर किरणोपचारात केला जातो. एका यंत्राच्या सहाय्याने किरणोत्सर्गी कोबाल्ट धातूपासून निघणारे किरण विशेष नियंत्रणाखाली कर्करोग झालेल्या इंद्रियावर सोडले जातात. हा उपचार गरजेनुसार अनेक वेळा केला जातो. किरणोत्सर्गामुळे कर्करोगाच्या पेशी मरतात. सामान्यत: शस्त्रक्रियेने अथवा औषधी चिकित्सेने कर्करोग बरा होण्यासारखा नसल्यास किरणोपचाराचा वापर करतात. अशा प्रकारे किरणोपचाराने हजारो कर्करोगग्रस्त रुग्णांचे आयुष्य वाढवता येते. *डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित* यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून, मनोविकास प्रकाशन ०२० ६५२६२९५० *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• एका ओघळणाऱ्या थेंबामागे, न गाळलेले हजारो अश्रू असतात. ~ वपु काळे | काही खरं काही खोटं *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया कोणी घातला ?* लॉर्ड मेकॅले 2) *भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान कोणता ?* भारतरत्न 3) *भारताचा सर्वोच्च लष्करी सन्मान कोणता ?* परमवीर चक्र 4) *स्त्रियांना मतदानाचा हक्क सर्वप्रथम कोणत्या देशाने बहाल केला ?* न्यूझीलंड 5) *मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले होते ?* सेनापती बापट *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 किरण रणवीरकर, साधनव्यक्ती       गटसाधन केंद्र, धर्माबाद 👤 मारोती छपरे 👤 निवृत्ती लोखंडे 👤 राजेश्वर रामपुरे 👤 साहेबराव कांबळे 👤 आनंद यडपालवार 👤 संजय भोसीकर 👤 भारत पाटील सावळे *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *'मोगरा' साक्षात ईश्वराची निर्मिती. मोगऱ्यासारखं फुल म्हणजे ईश्वराने आपल्यावर केलेलं भरभरून प्रेमच जणू.. या मोगऱ्याचे किती वर्णन करावे... मोगरा म्हणजे प्रेम. त्याचा दरवळ म्हणजे आत्मानुभूती. निसर्गाचं सुगंधी वाण. मोगरा फक्त देणं जाणतो. दुसऱ्या फुलांना लाभलेले नेत्रसुखद रंग याला लाभले नसले म्हणून काय झालं? मनमोहक, स्वर्गीय असं सुगंधाचं लेणं याला लाभलेलं आहे, जे तो स्वतःकडे न ठेवता सगळ्यांना मुक्तहस्ते वाटत असतो. त्याला फक्त सुगंधीत होणं कळतं. त्याचा शुभ्र रंग आपल्याला संमोहित करतो. तरी रंगापेक्षाही गंधाकडेच आपण वळतो. म्हणजे काय रंग महत्वाचा, पण गंध त्याहूनही अधिक महत्वाचा...वरवरचं उथळ असं काहीही फार काळ टिकत नाही.* *आपणही होऊ या नं मोगरा. कशाला हवाय बाह्य रंगाढंगाचा हेवा. करू या उधळण आपल्यातील गुणांची, हृदयात असलेल्या मायेची नं प्रेमाची, आपुलकीची अन माणुसकीची. आत्ममग्नता बाजूला सारून वाहू देऊ प्रेमाचा झरा. बरसू दे.. आत्मीयतेच्या धारा, दरवळू दे आसमंत सारा एकमेकांच्या सोबतीने. सुगंध देऊ या अन घेऊ या. आपली मनातील सद्भावना सतत इतरांना जाणवू दे. आपल्यातील गोडव्याने भवताल चिंब चिंब होऊ दे, तुम्ही आणि मी सारेच होऊयात ना 'मोगरा !'*          ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●••     🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸     *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*          📱 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *_मित्रांनो,_* *सदाचार हा माणसाचा खरा अलंकार आहे.* *होठोपे सच्चाई रहती है।* *जहाँ दिलमे सफाई होती है।* *हम उस देशके वासीं है,जिस देशमे* *गंगा बहती है।* *अस असलं तरी चेहरा न देखो दिलको देखो।* *चेहरे ने लाखोंको लुटा।* *दिल सच्चा और चेहरा झुटा।* *हे पण तितकेच महत्वाचे आणि खरे* *आहे.* *मनुष्याचं चारित्र्य कमकुवत करणारे दोन मुख्य अवगुण म्हणजे--लोभ* *आणि असत्य.मोठमोठ्या गोष्टीविषयी* *असणारा लोभ पटकन लक्षात येतो.* *पण सूक्ष्म स्तरावर असणारा लोभ लगेच लक्षात येत नाही.* *या छोट्या आणि सूक्ष्म लालसा म्हणजे,समाजामध्ये,मित्रांमध्ये* *लोकप्रिय होण्याची इच्छा, इतरांच्या तोंडून आपली स्तुती व्हावी ही* *अपेक्षा, आपण जसे आहोत, त्यापेक्षाही अधिक सुंदर* *दिसावं,कष्टाविना सुखसुविधा प्राप्त व्हाव्यात अशा इच्छा.* *या लालसाच माणसाला अपराध करण्यासाठी प्रवृत्त करतात. तसेच* *खोट बोलायला भाग पाडतात. त्यामुळे आपल्या शब्दांची ताकद नाहीशी होते.* *झूठे इंसान की ऊंची आवाज सच्चे इंसान को खामोश कर देती हैं l परंतु* *सच्चे इंसान की खामोशी झूठे इंसान की बुनियाद हिला देती है l* *सत्य परेशान होता है, पराजित नही।* *हे लक्षात ठेवून मार्गक्रमण करावे.* *खरा माणूस पहायला मिळेल.* *अशोक कुमावत, नाशिक* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ज्या व्यक्ती अश्रूंचा सहारा घेऊन जगतात त्या जीवनात कुठेतरी पराभव पत्करलेल्या असतात किंवा त्यांच्या मनावर कुठेतरी आघात झालेला असतो किंवा कुणीतरी मनाविरुद्ध करण्यासाठी प्रवृत्त केलेले असते.हे जरी खरे असले तरी अशा व्यक्ती शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या कमकुवत झाल्याने त्यांना जीवनात जगण्याची काही अपेक्षा उरली नाही किंवा आता आपण जगून तरी काय करावे असा सतत विचार करत आणि डोळ्यांत अश्रू आणून कसेबसे जीवन जगतात.अशा दुबळ्या मनाने जीवन जगण्यापासून जीवनाला परावृत्त करायचे असेल तर जीवनात आणि आपल्यासमोर चांगले जीवन जगण्याची उमेद प्रथमत: नजरेसमोर ठेवायला हवी, नेहमी आपण काहीतरी असले तरी मी कोणत्याही कठीण प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी सक्षम आहे असा उदात्त विचार करून जगायला शिकले पाहिजे,कुणीजरी आपले मन दुखवण्याचा प्रयत्न केलातरी मी त्याकडे दुर्लक्ष करीन असाही सकारात्मक विचार केला आणि मन घट्ट करून जगायला शिकले तर अश्रूंचा आधार घेऊन जगायची काही गरजच भासणार नाही.जीवन तर सुखदु:खाने भरलेले आहे ते कुणाच्या वाट्याला कमी-जास्त असणारच.सुख जास्त झाले म्हणून जास्तही त्या सुखाचा अतिरेक होऊ द्यायचा नाही आणि दु:ख झाले म्हणून अति दु:खी व्हायचे नाही.आपण सारेजण सुखदु:खाच्या चक्रव्युहात अडकलेलोच आहोत आणि त्या चक्रव्युहाला भेदूनच चांगले जीवन जगायचे आहे हे लक्षात ठेवायला हवे. व्यंकटेश काटकर,नांदेड संवाद..९४२१८३९५९० 🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *अहंकार आणि गर्व असू नये.* रामकृष्ण परमहंस आपल भक्तांसमोर प्रवचन देत होते. ते म्हणत होते, हे पहा, तुमच्यासमोर मी बसलेलो आहे, हे तुम्ही पाहता. पण मी एखादे वस्त्र माझसमोर धरले, तर मी तुम्हाला दिसणार नाही. तथापि, पूर्वीप्रमाणेच मी तुमच्याजवळ आहे. कपडय़ाआड असल्याने तुमच्या   दृष्टीस मात्र पडू शकणार नाही. म्हणजे तुमच्या दृष्टीने अदृश्य होईन. तसाच परमेश्वरसुद्धा तुमच्या-माझ्या सर्वांच्या जवळ असतो. परंतु अहंकाराच्या पडद्यामुळे आपण त्याला पाहू शकत नाही. तुम्ही आपल्या डोळ्यांसमोर लहानसा कापडाचा तुकडा जरी धरला, तरी समोरचा मोठा पर्वत दृष्टीला अगोचर होईल. तात्पर्यं - अहंकार आणि गर्व यांचा पडदा जोपर्यंत आपण बाजूला करीत नाही, तोपर्यंत ईश्वराचा साक्षात्कार, ज्ञानप्राप्ती आपणाला होणार नाही. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~

आठवणीची शिदोरी २९-१२-१९ स्मरण करता काव्याचे मन हर्षूनी जाते माझे आठवणीची शिदोरी जपून ठेवूया अंतरी 〰〰〰〰〰

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00          ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 28/12/2019 वार - शनिवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- ●१६१२ - गॅलेलियोने नेपच्यून ग्रहाची नोंद केली परंतु त्याचे वर्गीकरण स्थिर तारा असे केले. ●१८३६ - स्पेनने मेक्सिकोचे स्वातंत्र्य मान्य केले. ● १८४६ - आयोवा अमेरिकेचे २९वे राज्य झाले. ● १८७९ - डंडी, स्कॉटलंड येथे टे रेल्वे पूलावरून गाडी जात असताना गाडीसह कोसळला. ७५ ठार. 💥 जन्म :- ● १८९९ - गजानन त्र्यंबक माडखोलकर, मराठी साहित्यिक व पत्रकार. ● १९३२ - धीरूभाई अंबाणी, भारतीय उद्योगपती. ● १९३७ - रतन टाटा, भारतीय उद्योगपती. 💥 मृत्यू :- ● १९६७ - द.गो.कर्वे, अर्थशास्त्रज्ञ; कुलगुरू, पुणे विद्यापीठ; प्राचार्य, बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय. ● १९७१ - नानकसिंग, पंजाबी साहित्यिक. ● १९७७ - सुमित्रानंदन पंत, हिंदी कवी. ● २००० - मेघश्याम पुंडलिक रेगे, भारतीय विचारवंत. ● २००० - उस्ताद नसीर अमीनुद्दीन डागर, ध्रुपदगायक, डागरबंधूंपैकी एक. ● २००३ - चिंतामणी गणेश काशीकर, कुलगुरू, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ. ● २००३ - कृष्णाजी सुंदरराव तथा कुशाभाउ ठाकरे. ● २००६ - प्रभाकर पंडित, मराठी संगीतकार. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *10 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर सरसकट 10 टक्के कराची शिफारस ; आगामी अर्थसंकल्पात केंद्र सरकारकडून मध्यमवर्गीयांना दिलासा मिळण्याची शक्यता* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळात दिग्गजांसह नवख्या चेहऱ्यांना संधी; तिन्ही पक्षांकडून नावं जवळपास निश्चित* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *महाराष्ट्रात असलेल्या आठ न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा पैकी फक्त दोन ठिकाणी, म्हणजे कोल्हापूर व नांदेड येथे डीएनए प्रयोगशाळा नव्हते, परंतु येत्या वर्षात साधारणपणे मार्च महिन्यापर्यंत, या दोन्ही ठिकाणी हे विभाग सुरू करण्यात येतील.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *एसटीच्या चालकांसोबत वाहकांनाही ऑन ड्युटी मोबाईल वापरण्यास बंदी; वाहकांमधून तक्रारींचा सूर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *मराठीचा अभिमान बाळगा, दीक्षांत सोहळ्यात इंग्रजी भाषण करणाऱ्यांना राज्यपालांचा खोचक सल्ला; पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर विद्यापीठाच्या 15 व्या दीक्षांत सोहळ्यात वक्तव्य* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *मुंबईत एकीकडे सीएएविरोधात तर दुसरीकडे सीएएच्या समर्थनात रॅली, ऑगस्ट क्रांती मैदानात भाजपची जाहीर सभा, तर आझाद मैदानात विद्यार्थ्यांकडून निषेध* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *मुंबई :- वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या रणजी करंडकात रेल्वेची ऐतिहासिक कामगिरी, 41 वेळा रणजी विजेत्या मुंबईवर पहिल्यांदाच मात* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *विशेष बातमी : 10 ते 12 जानेवारी दरम्यान होणाऱ्या 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची निमंत्रण पत्रिका जाहीर ; संमेलनाच्या व्यासपीठावर एकही राजकीय व्यक्तीला स्थान नाही ; कवी पद्मश्री ना.धों. महानोर यांच्या हस्ते उदघाटन ; समारोप प्राचार्य रा.रं. बोराडे उपस्थित राहतील* *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••          *गुरुदक्षिणा* मोटे सरांना मोबाईलवर बोलल्यापासून डॉ.गिरीश अस्वस्थ वाटत होता. त्यांच्या चेहर्‍यावर काळजीची लकेर स्पष्ट दिसत होती. पहिल्यांदाच मोटे सरांनी त्यांच्याकडे एक अपेक्षा व्यक्त केली होती. ती अपेक्षा पूर्ण करणे डॉ.गिरीशच्या डाव्या हाताचा मळ होता. परंतु त्यासाठी मोटे सरांना डॉ.गिरीश ज्या दाते मेमोरियल ............ वरील कथा पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://kathamaala.blogspot.com/2017/04/blog-post_53.html      लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🔬 *सूक्ष्मदर्शक यंत्र कसे कार्य करते ?* 🔬 जीवशास्त्राचे प्रयोग दाखवताना तुम्हाला सरांनी सूक्ष्मदर्शक यंत्र दाखवले असेलच. सूक्ष्मदर्शक यंत्रातून पहिल्यावर पेशी किंवा इतर सूक्ष्म जीव कित्येक पटीने मोठे असलेले आपल्याला दिसतात. हे कसे होते ते आता पाहू. साधे काचेचे भिंग घ्या. त्या भिंगातून वर्तमानपत्रातील अक्षरांकडे पाहा. अक्षरे मोठी झालेली दिसतात. सूक्ष्मदर्शक यंत्र याच तत्त्वावर काम करते. सूक्ष्मदर्शक यंत्रांमध्ये भिंगे अशा प्रकारे बसवलेली असतात की त्यांच्या एकत्रित परिणामांमुळे आपल्याला वस्तू हजारो पट मोठ्या दिसतात. पेशी, सूक्ष्म जीवजंतू आपल्याला नुसत्या डोळ्यांनी दिसू शकत नाहीत. कारण त्यांचे मोजमाप १ मी.मी. च्या हजाराव्या भागाच्या प्रमाणात केले जाते. विषाणू तर याहूनही लहान असतात. त्यामुळे हजारो पट मोठे केल्यानंतरच हे जीव वा पेशी आपल्याला दिसू शकतात. पेशी व सूक्ष्म जीवजंतुच्या परीक्षणामुळे रोगाची अवस्था समजते आणि व्यक्ती रोगी आहे का ते कळते. रोग बरा होतो आहे काय तेही समजते. क्षयरोग, हिवताप, कुष्ठरोग, कॉलरा, हगवण आदी रोगांमध्ये तसेच रक्तक्षय, रक्ताचा कर्करोग, इतर कर्करोग यातदेखील सूक्ष्मदर्शकद्वारे केलेल्या तपासणीमुळे रोगाचे निदान होते व उपचार करण्यास मदत होते. *असे हे सूक्ष्मदर्शक यंत्र म्हणजे सूक्ष्म जीवांच्या अजब गुहेत प्रवेश करण्यासाठी मानवाला लाभलेला जादूचा दिवाच बनले आहे.* *डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित* यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून, मनोविकास प्रकाशन *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *" कोणतीही विद्या, ज्ञान कधीच वाया जात नाही. "* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *उटी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे ?* तामिळनाडू 2) *पाठीच्या कण्यात एकूण किती मणके असतात ?* 33 3) *अमेरिकेतील गुलामगिरीची प्रथा कायद्याने कोणी बंद केली ?* अब्राहम लिंकन 4) *भारतीय घटनेत भारताचा उल्लेख कसा केला आहे ?* संघराज्य 5) *'डिस्कव्हरी ऑफ इंडिया' हा ग्रंथ कोणी लिहिला ?* पं जवाहरलाल नेहरू *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 साई पाटील, धर्माबाद       श्री कंप्युटर्स & मल्टीसर्व्हिसेस 👤 वृषाली वानखडे, अमरावती       सामाजिक कार्यकर्ती & साहित्यिक 👤 श्रीधर सुंकरवार, नांदेड 👤 व्यंकटेश माडेवार, धर्माबाद 👤 अजय तुम्मे 👤 योगेश शंकर ईबीतवार, येवती 👤 नंदकिशोर सोवनी, पुणे 👤 ओमसाई सितावार, येवती 👤 ओमकार ईबीतवार *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *रंग, शब्द, स्वरास एकाग्रचित्ताची समाधी लागली की, अवीट सौंदर्याचा आविष्कार घडतो. राष्ट्रे मोठी होतात ती एकाग्रचित्तानं, प्रामाणिकपणे काम करणा-या माणसांच्या बळावर; आळशी माणसांवर नव्हे. जीवन सुखाने जगण्यासाठी, आनंदासाठी, हसण्यासाठी, गाण्यासाठी, खेळण्यासाठी आहे; रडण्यासाठी नव्हे. आळशी माणसांवर रडण्याची वेळ येते. आळसाची सवय झाली की, माणूस आळशीपणाचा गुलाम बनतो. खरंतर आळशी माणूस बंद पडलेल्या घड्याळासारखाच असतो. परमेश्वराने माणसाला दोन हात आणि एक तोंड दिले आहे. याचाच अर्थ, दोन हातांनी काम करा आणि तोंडाची भूक भागवा.* *माणसाच्या हाताची पाच बोटे म्हणजे एक सुंदर महाकाव्यच ! बोटांचा जिथं स्पर्श होईल तिथं स्वर्ग निर्माण होईल. यासाठी आळसाला कायमची सुट्टी द्या. आळशीपणा हेच अनेक दुर्गुणांचं उगमस्थान असतं. प्रेमाने प्रेम वाढते, द्वेशाने द्वेष, यशाने यश, विश्वासाने विश्वास वाढतो; तसे आळसाने आळस वाढतो. आपल्यासाठी कोणीतरी काम करावे आणि आपल्याला आरामात जगता यावे, ही आळशी माणसाची वृत्ती. आळशीपणाने सतत आराम करण्यात वेळ घालवणे म्हणजे जिवंतपणी आत्महत्या करण्यासारखे आहे. आळस माणसाच्या मनाला जडलेला कर्करोग आहे, असे हेडवूड नावाच्या विचारवंताने म्हटले आहे. 'दैव देईल ते मी घेईल' असे म्हणणारे लोक आळशीच. कष्ट करून मला मिळेल ते घेईन असे म्हणणारे लोक उद्योगी असतात.* *'हे ईश्वरा माझे हाती काम दे* *परी ते करण्याची शक्ती दे.'* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• ⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡ *--संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040** •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो* *मानवी मेंदू सर्वांनाच मिळाला आहे पण कोण कसा वापर करतो हे ज्याच्या त्याच्या हातात आहे.* *मानवी संगणक' शकुंतला देवी एक अदभुत किमयागार ठरली आहे.* *साधे गणित सोडवायचे असले तरी आपल्याला कंटाळा येतो, मग गणितातील समस्या अंकगणित, गुणाकार, भागाकार, समीकरणे, सुत्रे यामध्ये कोण पडणार? मात्र त्यासाठी ईश्वर कृपेचा वरदहस्त लाभलेल्या शकुंतलादेवी भारतात जन्मल्या.* *तर शकुंतला देवी यांचा जन्म 4 नोव्हेंबर 1929 रोजी कर्नाटकमधील बंगळूर येथे झाला. विशेष म्हणजे वयाच्या 3 ते 5 व्या वर्षातच त्या गणितज्ञ झाल्या, त्यावेळी त्यांचे साधारण शिक्षणही झाले नव्हते.* *बीबीसी लंडन या संस्थेने त्यांना एका कार्यक्रमासाठी निमंत्रण दिले. त्यावेळी त्यांनी फक्त संगणकावरच सोडविण्यासारखा प्रश्न विचारण्यात आला. मात्र त्यांनी क्षणार्धात तोंडी उत्तर देऊन सर्वांना अचंबित करून सोडले.* *अत्यंत किचकट अंकगणितातील प्रश्न त्यांनी तोंडी सोडवून दाखवून जगातील सर्व शास्त्रज्ञांना त्यांची नोंद घेण्यास भाग पाडले. शकुंतलादेवी संख्याशास्त्राबरोबरच फलज्योतिष्यशास्त्रातही आपली बुद्धिमत्ता वापरत असत.* *मानवी संगणक म्हणून ओळख* : *1977 मध्ये शकुंतलाचा सामना डॅलस युनिव्हर्सिटीत कॉम्प्यूटर 'युनिव्हॅक' शी झाला. शकुंतलाला 201 अंकाचे 23 वे वर्गमूळ काढायचे होते. ते सोडविण्यास त्यांना 50 सेकंद लागले. तर 'युनिव्हॅक'ला 62 सेकंद घेतले. तेव्हापासून शकुंतला जगभरात मानवी संगणक म्हणून ओळखली जाते.* *विशेष कामगिरी* : *1982 मध्ये नावाची ‘गिनीज बुक ऑफ रिकॉर्ड’ मध्ये नोंद.* ● *1988 मध्ये वाशिंगटन डी.सी. मध्ये ‘रामानुजन मॅथेमॅटिकल जीनियस अवार्ड’ ने सन्मानित.* ● *मृत्युच्या एक महिन्यापूर्वी 2013 मध्ये मुंबईमध्ये ‘लाइफटाइम अचीवमेंट अवार्ड’ ने सम्मानित.* ● *84 व्या जन्मदिवशी 4 नोव्हेंबर 2013 रोजी गूगलने त्यांच्या सन्मानार्थ ‘गूगल डूडल’ ठेवले.* *आपणास जमले तर बघा, मेंदूला योग्य दिशा आणि चालना द्या.* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• कोणत्याही संकटाला सामोरे जाण्यासाठी किंवा त्या संकटाला तोंड देण्यासाठी जी व्यक्ती सदैव तयार असते तीच व्यक्ती जीवनात यशस्वी होते. संकटं ही प्रत्येकाच्या जीवनात कमी-जास्त तर असणारच.... पण संकटाला पाहून दूर पळून जाणारी फार असतात.कारण एकीकडे त्यांच्यामध्ये प्रतिकार करण्याची क्षमता नसते,ते हतबल होतात,त्यांची मानसिकता नसते,दूरचा विचार करत नाहीत त्यामुळे त्यांचा जगण्याचा त्यांच्यावरच विश्वास नसतो.त्यामुळे संकटासमोर शरण जातात.तर दुसरीकडे काही व्यक्ती कोणत्याही संकटाला तोंड द्यायला तयार असतात.काही असो आपण त्या संकटाला तोंड दिलेच पाहिजे जर नाही दिले तर आपण जगणार कसे ? आपल्यासमोर उभे आयुष्य आहे ते कसे जगणार ?आज आपण सामोरे नाही गेलो तर जगण्याला अर्थच काय राहणार ? नाही आपल्याला जगायचे तर मग पुढे कसे जीवन जगणार ? जगायचेच असेल तर पहिल्यांदा आपला आपल्यावर आत्मविश्वास ठेवायला हवा आणि त्या आत्मविश्वासावरच पुढे पुढे पाऊल टाकायला हवे आणि त्याप्रमाणे जगायला हवे अशी सकारात्मक विचार घेऊन जगणारी व्यक्तीच जीवन चांगल्याप्रकारे जगू शकते. अशा आशादायी, ध्येयवादी असणा-या व्यक्तींचे अनुकरण करायला हवे आणि कोणत्याही संकटाला तोंड देणा-या अशा व्यक्तीकडे पाहिले तर अनुकरण करणा-या व्यक्तीला अधिक बळ मिळते आणि पुढील संकटाला सामोरे जाण्यासाठी तयार होते. म्हणून कोणत्याही संकटाला न घाबरता सामोरे जाऊन जीवन जगायला शिकले पाहिजे.तरच जीवन जगण्याला अर्थ आहे. अन्यथा जीवन व्यर्थच आहे असे समजावे. © व्यंकटेश काटकर,नांदेड संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *समाधान* मुंगी तांदळाचा दाणा घेऊन आनंदाने निघाली. पण तितक्यात वाटेत तिला डाळीचाही दाणा दिसला. मुंगी मनात म्हणाली, 'क्या बात है देवा! तू भाताची सोय केलीच होती, आता वरणाचीही सोय झाली.' पण एकावेळी दोन्ही दाणे उचलणे मु़ंगीला शक्य नसल्यामुळे ती खिन्न झाली. तेव्हा कबीर म्हणाले, 'वेडाबाई! तुला दोन्ही गोष्टी नाही मिळणार. तुला भात हवा असेल, तर वरणाचा त्याग करावा लागणार आणि वरण हवे असेल, तर भाताचा त्याग करावा लागणार.' तांदळाचा दाणा गवसल्यावर अतिशय आनंदाने, समाधानाने व लगबगीने आपल्या वारुळाच्या दिशेने निघालेल्या मुंगीचा आनंद व समाधान, डाळीने हिरावून घेतला. माणसाचंही तसंच आहे. जोवर समोर विकल्प उपलब्ध नसतो, तोवर माणूस आहे त्या गोष्टीत समाधानी असतो. पण विकल्प निर्माण झाले, की ते त्याचा आनंद आणि समाधन क्षणात हिरावून घेतात..! तात्पर्यः शक्य तेवढया मिळालेल्यात समाधानी राहणे हेच योग्य. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00          ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 27/12/2019 वार - शुक्रवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *डॉ पंजाबराव देशमुख जयंती* 💥 ठळक घडामोडी :- ●१७०३ - पोर्तुगाल व इंग्लंडने मेथुएनच्या तहावर सही केली. पोर्तुगालहून आयात केलेल्या मद्याला(वाइन) इंग्लंडमध्ये प्राधान्य. ● १८३१ - चार्ल्स डार्विन एच.एम.एस. बीगल या जहाजातून गॅलापागोसला जाण्यास निघाला. ●१९४५ - २८ देशांनी जागतिक बँकेची स्थापना केली. ● १९४५ - कोरियाची फाळणी. ●१९४९ - इंडोनेशियाला नेदरलँड्सपासून स्वातंत्र्य. ● १९७८ - ४० वर्षांच्या हुकुमशाहीनंतर स्पेन प्रजासत्ताक. 💥 जन्म :- ● १८९८ - पंजाबराव देशमुख, विदर्भातील सामाजिक नेता, शिक्षण प्रसारक, केंद्रीय कृषिमंत्री. ● १९६५ - सलमान खान, भारतीय चित्रपट अभिनेता. 💥 मृत्यू :- ● १९६५ - देवदत्त नारायण टिळक, मराठी साहित्यिक, संपादक, ज्ञानोदय. ● १९९७ - मालती पांडे-बर्वे, मराठी भावगीत गायिका. ● २००२ - प्रतिमा बरुआ-पांडे, असमी लोकगीत गायिका. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात पावसाचा अंदाज, कोल्हापुरात मुसळधार तर नागपूरसह विदर्भातील काही भागात पावसाच्या हलक्या सरी, पुण्यातही शिडकावा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *नवी दिल्लीः उत्तर भारतात थंडीने केला कहर, दोन दिवसांपासू या ठिकाणी जबरदस्त थंडी असून केवळ लुधियानात कमीत कमी ८ लोकांचा मृत्यू झाला आहे. उत्तर भारतात आणखी पाच दिवस कडाक्याची थंडी राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन मिळावी यासाठी भारतीय आयुर्विमा महामंडळ (लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया LIC) कडून राबवली जाणारी वय वंदना योजनेसाठी केंद्र सरकारने लाभार्थींना आधार कार्ड केले बंधनकारक* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *एस टी महामंडळाच्या एस टी प्रवासभाडे सवलतीसाठी स्मार्टकार्ड बंधनकारक, 15 फेब्रुवारी 2020 पासून मासिक, त्रैमासिक पासधारक तसेच विद्यार्थ्यांसाठी 1 जून 2020 पासून स्मार्टकार्ड बंधनकारक करण्यात येत आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *विद्यार्थ्यांची हजेरी बायोमेट्रीक पद्धतीनं घेणार असल्याचा नवा निर्णय सरकारनं घेतला आहे. केंद्र सरकारनं निश्चित केलेल्या परफॉरमन्स ग्रेड इंडेक्सनुसार शासकीय आणि अनुदानित शाळांना हा नियम असणार आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *दिल्ली विधानसभेसाठी काँग्रेसच्या स्क्रिनिंग कमिटी अध्यक्षपदी राजीव सातव यांची निवड, राजीव सातव हे सध्या गुजरातचे प्रभारी म्हणून काम पाहत आहेत.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *काल या दशकातील शेवटचं सूर्यग्रहण; केरळ, अबुधाबीमध्ये रिंग ऑफ फायरनं डोळ्याचं पारणं फेडलं, तर मुंबईत सूर्य आणि ढगांची लपाछपी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••      *मरावे परी अवयवरूपी उरावे* जन पळभर म्हणतील हाय हाय !  मी जाता राहील कार्य काय ? गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या आवाजातील कविवर्य भा. रा. तांबे यांची कविता रेडियोवर ऐकताना मन एकदम भूतकाळात गेले. इयत्ता दहाव्या वर्गात शिकत असताना ............. वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/11/blog-post_17.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🦈🐟 *मासे* 🐟🦈 ******************** मासे हे जलचर प्राणी आहेत. श्वसनासाठी त्यांना कल्ले असतात. शरीरामध्ये जवळपास संपूर्ण लांबीचे पाठीच्या कण्याचे हाड असतेच असते. या तीन महत्त्वाच्या गोष्टी कोणत्याही माशात आढळणारच. सजीवांची उत्पत्ती पाण्यात झाली. त्यांतील अनेक पाण्याबाहेर पडले, पण मासे पाण्यातच राहिले. जगातील पृष्ठवंशीय प्रकारच्या एकूण प्राण्यांतील निम्म्याहून अधिक जाती मासेच आहेत. पाण्यातून बाहेर पडलेले अनेक प्राणी वेगाने हालचाल करू शकतात. पण पाण्याच्या घनतेमुळे, वजनामुळे मासे त्या मानाने खूपच कमी वेगवान असतात. माशांचे शरीर खवल्यांनी भरलेले असते. हे खवलेच त्यांच्या पृष्ठभागाचे संरक्षण करतात. झीज झाल्यावर पुन्हा नवीन खवले येण्याची क्रिया सतत चालूच असते. खवल्यांमुळे माशांच्या हालचाली चमकदार दिसतात. माशांच्या हालचाली मुख्यत: शरीरातील स्नायूंच्या वेड्यावाकड्या आकुंचन प्रसारणातून होतात. यालाच मदत म्हणून त्रिकोणी पंखाकृतीच्या (फिनच्या) जोड्या काम करतात. माशाच्या छातीजवळचा भाग, तेथीलच तळाजवळचा भाग व पाठीवरचा भाग येथे एकेक पंखांची त्रिकोणी जोडी आढळते. माशांच्या जातीनुसार व आकारमानानुसार या पंखांची ताकद बदलत जाते. मुख्य पंख म्हणजे शेपटीचे. त्यांचा वापर सुकाणूसारखा तर केलाच जातो, पण खेरीज वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठीही हे पंख वापरले जातात. माशांची श्वसनक्रिया कल्ल्यांमार्फत होते. एखादा लांबलचक कंगवा असावा, तशी त्यांची रचना असते. तोंडातून घेतलेले पाणी या कल्ल्यांतून सतत बाहेर टाकले जाते. या क्रियेत येथील रक्तवाहिन्या पाण्यातून प्राणवायू शोषून घेतात. तोंडावाटे घेतलेले अन्न मात्र या कल्ल्यातून बाहेर पडू नये, अशी व्यवस्था आतील कडा वळवून केलेली असते. श्वसनक्रिया व अन्न गिळणे या दोन्ही गोष्टी एकदमच केल्या जाऊ शकतात. त्यामुळे अनेक मासे तोंडाने पाणी घेतानाच येणारे पदार्थ म्हणजे लहान मासे, प्लांक्टन वनस्पती, शेवाळे गिळतात व उरलेले पाणी कल्ल्यांवाटे बाहेर टाकतात. माशांचे खाद्य मुख्यतः मासेच. पण या खेरीज अनेक अन्य जलचरांची अंडी, अळ्या, शेवाळी या खाद्यांचीसुद्धा सर्व लहान माशांना गरज भासते. समुद्रातील प्रवाळांच्या खडकांमध्ये शिरून तेथील हे आयते खाद्य पटकावणे हा लहान माशांचा दिवसभरचा उद्योगच असतो. हे सर्व खडक ठराविक आकाराचे असल्याने त्यात शिरकाव करणे व बाहेर पडणे यासाठी ठराविक आकाराची जाडीच चालू शकते. पण याखेरीज काही अगडबंब मासे फारसे कष्ट न करता फक्त आ वासून वाटेत येणारे सर्व लहान मासे फस्त करत जातात. एखादा मध्यम आकाराचा शार्क दिवसभरात एखादा टन मासे सहज संपवतो. यावरून त्यांच्या भुकेची कल्पना येऊ शकेल. मासे व पृथ्वीवरचे अन्य प्राणी यांच्या संवेदना इंद्रियांत फारसा फरक नाही. डोळे तर नेहमीप्रमाणेच काम करतात. कान दिसत नाहीत, पण अन्य प्राण्यांप्रमाणेच तोल सावरणे, ऐकणे या गोष्टींसाठी माशांचे कान उपयुक्त ठरतात. आणखी एका प्रकारे संवेदना जाणवतात. आपल्या कातडीला हात लावल्यावर जशा संवेदना मिळतील, तशाच संवेदना पाण्यातील तरंगांच्या हालचालीतून संपूर्ण लांबीमधील पृष्ठभागातून माशाला मिळतात. याचा वापर करूनच लांबवरचा शत्रू, भक्ष्य, पाण्यावरील अन्य जलचरांचा वावर याचे ज्ञान मासा मिळवत राहतो. माशाचे आयुष्य किती ? मासे पाळले, तर सांगता येईल, अन्यथा अवघडच. पण मोठे मासे कित्येक म्हणजे पन्नासच्या वर वर्षे जगत असावे. लहान मासे मात्र जेमतेम वर्षभरातच आयुष्य संपवतात. याच काळात वाढ, अंडी घालणे वगैरे सर्व गोष्टी घडतात. पृथ्वीवरील सजीवांमध्ये आकारमान व आयुष्य यांची सांगड निसर्गाने घालून ठेवली आहे. मासे गोड्या पाण्यात असतात, समुद्रात, पाणथळीच्या जागी असतात, तसेच खोल डोहात, चिखलाच्या पाण्यात असतात, तसेच नितळ अशा सरोवरात. अत्यंत आकर्षक माशांप्रमाणेच अत्यंत बोजड विचित्र तोंडाचे माशांचे प्रकारही पाहायला मिळतात. जेमतेम चार ते पाच मिली ग्रॅम वजनाच्या छोटय़ा माशांपासून पस्तीस ते चाळीस टन वजनाच्या शार्क माशांपर्यंत माशांचे वजन आढळते. मासे खाणे हा मानवी आहाराचा एक नित्याचा भाग आहे. किंबहुना याचा फायदा म्हणून पृथ्वीवर, जमिनीवर निर्माण होणाऱ्या अन्नात आपण बचत करू शकतो आहोत. अत्यंत पौष्टिक असा आहार माशांपासून मिळू शकतो. या सागरी संपत्तीचा पूर्ण विनियोग करणे माणसाला शक्यच होणार नाही, इतकी ती अफाट आहे. जगातील ज्ञात आकडे एकत्र केले, तर वर्षांकाठी दहा कोटी टन मासे समुद्रातून पकडले जातात. यात गोड्या पाण्यातील माशांचा समावेश नाही. *'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• “ज्या माणसाजवळ संयम आहे तो प्रत्येक गोष्टीचा धनी असतो.” *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *'हिंदू ऑफ लाईफ' या पुस्तकाचे लेखक कोण ?* डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन 2) *लोकलेखा समिती आपला अहवाल कोणास सादर करतो ?* लोकसभा सभापती 3) *पंचायतराज योजनेचा सर्वप्रथम स्वीकार कोणत्या दोन राज्यांनी केला ?* राजस्थान व आंध्रप्रदेश 4) *दागिने तयार करण्यासाठी सोन्यात कोणते धातू मिसळतात ?* तांबे 5) *जिल्हा परिषदेमध्ये सर्वसाधारणपणे किती समित्या असतात ?* 10 *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 पूजा बागुल, साहित्यिक, नाशिक *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *'आपलं असं आहे की आपल्याला खोटं सहन होत नाही.' असं निक्षून सांगणारेही खोटं बोलतच असतात. कित्येकदा 'खोटं' हे ख-यापेक्षा सुंदर वाटतं. शतश: खरं किती लोक बोलत असतील हा संशोधनाचा विषय ठरेल. 'खोटं बोला पण रेटून बोला' असं म्हटलं जातं, ते व्यवहारात खूप खपत असतं; नव्हे त्याचीच जीवनाची दुकानदारी नफ्यात दिसते. सतत खरं बोलणारा, कल्पनाविश्वातही असत्याला न शिवणारा महात्मा किंवा संतही प्रसंगी असत्यासमोर हथप्रभ होतो. त्याच्या सत्यावर असत्य विजय धारण करून जातो.*  *परंतु माणसाचं अंतर्मन हे सतत सत्य असते. तुम्ही केलेले कृत्य हे काय आहे ? पवित्र आहे कि अपवित्र आहे? खरे आहे कि खोटे आहे? हे फक्त अंतर्मनात नेहमीकरता 'सेव्ह' अर्थात सुरक्षित झालेले असते. मग लोक तुमच्या खोटे दडवून टाकण्याच्या नाटकीपणामुळे प्रभावित होऊन तुमचे खोटे खरे मानू लागले तरी तुमच्या 'इनर माइंड'ला ते मान्य नसते. ते तुम्हाला सतत आठवण करून देत असते की बाबा रे, जगाच्या नजरेत तू निर्दोष नाही हे तुला ठाऊक आहे. सत्यावर असत्याचा 'पेहराव' हा नाटकातील नटाने धारण केलेल्या पात्रासारखा असतो. तो सर्वकाळासाठी नसतो. नटाला नाट्यप्रयोग संपताच सामान्य म्हणजे सत्यस्थितीत परतावेच लागते.*    ••● 🔸‼ *रामकृष्णहरी* ‼🔸●••             🔹🔹🔹🔹🔹🔹     *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो,* *किती पुजला देव तरी* *देव कुणाला पावला नाही,* *कुठे राहतो कुणास ठाऊक* *पण अजून कुणाला घावला नाही.* *ही गाडगेबाबांनी कविता ऐकली होती,आणि देव कुठे असतो हे* *समजत नव्हते,पण काल सकाळी 7* *वाजताच आनंदवन* *ता.वरोरा,जि.चंद्रपूर या बाबा* *आमटे यांच्या गावात पोहचलो आणि* *देव काय असतो,कुठे वसतो, कसा दिसतो,काय करतो या सगळ्या* *प्रश्नांची उत्तरे देत येथील कुष्ठरोगी जनतेने त्यांच्या* *चालण्या,बोलण्या आणि वागण्यातून दाखवून दिले.या महामानवाच्या* *म्हणजेच मुरलीधर* *आमटे(बाबा)व साधना* *आमटे यांच्या समधीस्थळी* *आम्ही नतमस्तक झालो,कारण ही पती पत्नीची समाधी* *शेजारी आणि अद्वितीय आहे.* *योग जुळून आला म्हणजे आज बाबांची जयंती ,आणि भारतीताईचा* *वाढदिवस साजरा* *करण्याचे भाग्य लाभले.* *घरची प्रचंड श्रीमती, वतनदारी असूनही बाबांनी सेवा तत्वामुळे घर* *सोडले.1939 ला आनंदवनात* *एक झोपडी आणि रोग्यांच्या सेवेसाठी 2 झोपड्या* *एवढ्यावर सुरू केलेला प्रपंच आज सातासमुद्रापार मोठ्या दिमाखाने* *बाबांची महती सांगतोय.* *मनाचे बळ इतके प्रचंड की* *कुष्ठरोग्यांच्या सेवेबरोबर बाबांनी ते जंतू शरीरात घालून जगाला मनाच्या* *ताकदिचा नवा संदेश दिला.* *आज बाबा नाहीत पण बाबांच्या रूपाने भारतभर* *दिनदलित ,अंध,अनाथ,कुष्ठरोग्यांच्या जीवनात एक देव अधिराज्य करतोय.* *पुरस्कारांच्या राशी आजही बाबांच्या पायाशी लोळण घालत आहे.* *बाबांच्या स्नुषा डॉ.भारतीताई विकास* *आमटे यांच्याशी तासभर दिलखुलास गप्पा मारल्या.मनातील* *सर्व प्रश्नांना आम्हीही मोकळी वाट करून दिली* *आणि साठी उलटलेल्या भारतीताईंनी तेव्हढ्याच प्रेमळपणे व* *भावनांच्या गोंगाटात कर्तव्य किती अनमोल असते हे मोठ्या खुबीने* *पटवून दिले.* *स्वातंत्र्यसैनिकाने व एका खासदाराच्या घरात मोठी झालेली* *भारतीताई एव्हढा मोठा त्याग करू शकते हे त्यांच्या व्यक्तिमत्वाकडे* *पाहून विश्वास न बसण्यासारखे होते.* *ज्यांच्या जवळ कुणी फिरकत नव्हते,ज्यांना समाजाने नाकारले होते* *अशा कुष्ठरोग्यांच्या आयुष्यात नवी पहाट दाखवणाऱ्या बाबांना शब्दात मांडणे माझ्या बुद्धीच्या पलीकडे आहे.* *बाबांना मानाचा मुजरा.* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जीवनात अनेक प्रश्न गुंतागुंतीचे असतात.असे प्रश्न आपण कितीही सोडवण्याचा प्रयत्न केला तरी ते सुटत नाहीत.अशावेळी आपण हतबल होतो. त्यातून आपली सुटका व्हावी.काहीतरी मार्ग निघावा असे वाटते. मग आपण जिथे यावर तोडगा निघणार आहे, आपल्या मनाला समाधान मिळणार आहे.अशाठिकाणी जाऊन आपण आपला संसारुपी भवसागर तरुण जाण्यासाठी   कुणाचातरी धावा करतो अर्थात परमेश्वराचा.पण परमेश्वर काही येत नाही. परंतू परमेश्वराने आपला प्रतिनिधी म्हणून आपल्याकडे गुरुला पाठविले. जीवनाला योग्य दिशा मिळावी म्हणून ज्यांचे आढळाचे स्थान आपल्या जीवनात आहे.ज्यांच्यावर आपली नितांत श्रद्धा आहे अशा ईश्वररुपी गुरुच्या सानिध्यात राहून त्यांचे मार्गदर्शन घेतो आणि आपल्या जीवनाचे कल्याण करुन घेतो.या जगात सर्वात जास्त आणि आपल्या जीवनाला योग्य दिशा देणारे गुरू हेच आपले परमेश्वर आहेत.हे कधीही विसरुन चालणार नाही. *व्यंकटेश काटकर,नांदेड.*   संवाद..९४२१८३९५९०/             ८०८७९१७०६३. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *यशाचे बिजगणित* आजोबा! तुम्ही हे कुठले विचित्र गणित सोडविताहात?' अदितीने विचारले. मी माझ्या दैनंदिनीमध्ये काही तरी लिहित होतो व अदिती अजोबाच्या मागे केव्हा येऊन उभी ठाकली हे कळलेच नाही. दैनंदिनीच्या पानावर लिहिले होते- (त+म+ध) न? 'हे एक नवे बीजगणित आहे नि मी ते सोडविण्याचा प्रयत्न करतोय, आजोबानी  टाइमपास म्हणून उत्तर दिले.  'मलाही समजावून सांगा ना!' -अदिती म्हणाली.  आजोबानी तिला म्हटले, मी तुला नक्की समजावून सांगेन. आधी मला हे सांग '(त+म+ध) न' याचा अर्थ काय आहे? तुही बीजगणित शाळेत शिकली आहेस ना!'  'सिम्पल आहे, आजोबा! यातील 'ब्रॅकेट' काढून 'तन+मन+धन', असे लिहिले असावे. कारण 'त', 'म', 'ध' हे तिनही अक्षरे 'न'शी गुणिले आहेत ना- अदिती बोलली. 'शाब्बास', आजोबा म्हटले- 'चल, आता प्रश्नचिह्नाचा विचार करू. तन, मन, धन अर्पण करणे म्हणजे तरी काय?'  'खूप परिश्रम' घेऊन काम करणे, अदितीने अचूक उत्तर दिले. तन+मन+धन हे परिश्रमाचे सूत्र आहे.  'वाह! क्या बात है!' असे म्हणून आजोबानी तिची पाठ थोपटून कौतुक केले.  'आजोबा! हे ठीक आहे. पण एखादे उदाहरण देऊन समजावून सांगा ना, प्लीज।' अदिती म्हणाली.  'ओके! बघ, तुझ्या अभ्यासाचे उदाहरण घेऊ या. तुला परीक्षेत पहिला नंबर काढायचाय का?  अदितीने मान हलवून होकार दिला व आजोबाकडे लक्ष देऊ लागली. 'पहिला नंबर येण्याकरीताही हा फॉर्म्युला लागू पडतो. खाण्‍या-पिण्याकडे लक्ष दिले पाहिजे, दररोज थोडेसे खेळले पाहिजे, व्यायाम केला पाहिजे, तसेच स्वच्छतेकडे लक्ष दिले पाहिजे तरच तन अर्थात शरीर स्वच्छ राहिल. आजारी पडलात तर तुमच्याकडून अभ्यासच होणार नाही. दूसरे म्हणजे, मन. मनाची एकाग्रता असेल तरच अभ्यासात मन लागेल व चांगला अभ्यास करू शकाल. वर्गात शिक्षकांकडून जे शिकविले जाते, ते चटकन लक्षात राहते.  'मला हे समजले आजोबा! मात्र, हे धन मी कोठून आणू? अदितीने अतिशय योग्य प्रश्न विचारला. मी म्हणालो, तु त्याचा विचार करू नकोस ती माझी व तुझ्या वडीलांची जबाबदारी आहे. मात्र तुला मिळणार्‍या 'पॉकेटमनी'चा तू चांगल्या कामात उपयोग करू शकते. थोडे-थोडे पैसे जमा करून तू एखादे जनरल नॉलेजचे पुस्तक, ज्ञानवर्धक विषयाचे पुस्तक, डिक्शनरी, कॅल्क्युलेटर वगैरे. खरेदी करू शकते. या माध्यमातून तू 'धना'चा सदुपयोग करू शकते.  ''खूप चांगले! 'थॅंक्स!' अदिति खुश होऊन बोलली। 'खरंच, यशाचा हा फॉर्मूला खूप मजेदार आहे. पहिला नंबर येण्याकरीताही हा फॉर्म्युला लागू पडतो. खाण्‍या-पिण्याकडे लक्ष दिले पाहिजे, दररोज थोडेसे खेळले पाहिजे, व्यायाम केला पाहिजे, तसेच स्वच्छतेकडे लक्ष दिले पाहिजे तरच तन अर्थात शरीर स्वच्छ राहिल. आजारी पडलात तर तुमच्याकडून अभ्यासच होणार नाही. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00          ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 26/12/2019 वार - गुरूवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :-  ● २००४ - हिंदी महासागरात इंडोनेशियाजवळ रिश्टर मापनपद्धतीनुसार ९.३ तीव्रतेचा भूकंप. यानंतर आलेल्या त्सुनामीत भारत, श्रीलंका, इंडोनेशिया, थायलंड, मलेशिया, मालदीव, इ. देशात ३,००,०००हून अधिक मृत्युमुखी. ● १९९१: सोव्हिएत युनियन औपचारिकरित्या बरखास्त करण्यात आले. ● १९९७: विंदा करंदीकर यांना महाराष्ट्र फांऊंडेशन पुरस्कार. 💥 जन्म :- ● १८९३: आधुनिक चीनचे शिल्पकार माओ त्से तुंग  ● १९१४: कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनासाठी आयुष्य वाहून घेणारे थोर समाजसेवक डॉ. मुरलीधर देविदास ऊर्फ बाबा आमटे १९१४: स्वतंत्र भारताच्या पहिल्या आरोग्यमंत्री डॉ. सुशीला नायर  ● १९१७ - प्रभाकर माचवे मराठी व हिंदी साहित्यिक. ● १९३५ - डॉ. मेबल आरोळे मॅगसेसे पारितोषिक विजेत्या.(रजनीकांत आरोळे यांच्या पत्नी) ● १९४८: डॉ. प्रकाश आमटे 💥 मृत्यू :-  ● १९७२ - हॅरी ट्रुमन, अमेरिकन राष्ट्राध्यक्ष. ● १९९९: भारताचे ९ वे राष्ट्रपती व ८ वे उपराष्ट्रपती शंकरदयाळ शर्मा ● २०११ - सरेकोप्पा बंगारप्पा, कन्नड-भारतीय राजकारणी, कर्नाटकाचे मुख्यमंत्री. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *फडणवीसांच्या काळातच अजित पवारांना क्लीन चीट, सिंचन घोटाळ्याप्रकरणी एसीबीचे महासंचालक परमवीर सिंह यांचं हायकोर्टात शपथपत्र* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *मंत्रिमंडळ विस्तारात गृहखातं शिवसेनेकडून राष्ट्रवादीकडे जाण्याची शक्यता, अजित पवार, दिलीप वळसे पाटील, जयंत पाटलांमध्ये शर्यत* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *शालेय सहल घेऊन जाणाऱ्या ST बसला भीषण अपघात, 18 जण गंभीर जखमी, मुंबई-पुणे महामार्गावर भरधाव एसटीची ट्रॉलीला धडक, जखमींना पवना रुग्णालयात उपचारासाठी दाखल* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *मुंबई : राज्यात थंडीचा जोर वाढत असतानाच पुढील दोन दिवसात महाराष्ट्रात काही भागांत पावसाची शक्यता, महाराष्ट्रात मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात काही भागांत हलक्या पावसाच्या सरी अपेक्षित आहेत, असा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तविला आहे* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *जगभरात ख्रिसमसचं सेलिब्रेशन, वसई, मुंबईत चर्चेसना रोषणाई, तर सुट्टीनिमित्त पंढरपूर, महाबळेश्वर आणि शिर्डीमध्ये भाविकांची गर्दी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *नियम मोडणाऱ्या, कचरा करणाऱ्या मुंबईकरांवर 10 हजार कॅमेरांची नजर, बीएमसीकडून 'व्हिडीओ अॅनालिटिक्स टूल' तंत्राचा वापर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *राज्य सरकारकडून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या सुरक्षेत कपात, आदित्य ठाकरेंना मात्र 'Z' श्रेणी सुरक्षा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *विशेष बातमी :- दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेली नांदेड जिल्ह्यातील माळेगावची यात्रा उत्साहाच्या वातावरणात संपन्न* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *ग्रहण म्हणजे काय ?*     २६ डिसेंबर २०१९, रोजी होणार सूर्य  ग्रहण  कंकणाकृती अथवा  खंडग्रास   दिसणार आहे, तुम्ही सर्वानी ते नक्की पाहावं. मुंबई मध्ये हे ग्रहण  खंडग्रास दिसणार असून  भारतीय प्रमाण वेळेनुसार  सकाळी ८. ०४ मिनिटांनी सुरु होईल, पुढे ९. २१  मिनिटांवर अधिकाधिक ७८. टक्के सूर्याला झाकेल, ११.५५ मिनिटांवर ग्रहण पूर्णतः संपेल. ग्रहणा विषयी अधिक माहिती वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://fmbuletin2019.blogspot.com/2019/12/blog-post.html         ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *✍ स्तंभलेखक नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💉 *लस म्हणजे काय ?* 💉 *अनेकदा लस लसीकरण वा व्हॅक्सीनेशन हे शब्द आपण वाचतो. टीव्हीवर याच्या जाहिरातीही पाहत असतो. पण लस म्हणजे नक्की काय या विषयी शास्त्रीय माहिती आपल्याला नसते.* *बर्‍याचदा आपण बघतो की उन्हात जर एखादा दिवस खूप फिरलो तर लगेच डोकेदुखी, अंगदुखी, इत्यादींचा त्रास होतो. आपण त्याला ऊन बाधले असे म्हणतो. पण जर रोज उन्हात जायला लागलो तर मात्र उन्हाचा तेवढा त्रास होत नाही. नेहमी घरचेच वॉटरबॅगचे पाणी पिणारा मुलगा बाहेरचे पाणी प्यायला तर त्याच्या पोटात दुखते, संडास लागते. शरीराला एखाद्या गोष्टीची सवय झाली तर नंतर त्रास होत नाही, असे साध्या भाषेत म्हणता येईल. पण शरीराला जीवजंतूंची सवय होते का ? सवय म्हणण्यापेक्षा जीवजंतूंचा अनुभव येतो असे म्हणता येईल. एकदा अनुभव पाठीशी असला म्हणजे शरीर दुसऱ्यांदा त्या जीवजंतूंशी चांगला लढा देऊ शकते. एकदा गोवर झाल्यावर सहसा परत होत नाही, ते याचमुळे. हे का होते हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.* *शरीरात रोगप्रतिकार शक्ती दोन प्रकारे निर्माण होते. जंतू शरीरात शिरल्यानंतर त्यांच्यातील प्रथिन वा कर्बोदक घटकांसाठी शरीरात प्रतिकार करणारी द्रव्ये (अँटीबॉडीज) तयार होतात किंवा जंतूंना मारण्यासाठी पेशींचे प्रशिक्षण होते. या दोन्ही मार्गांनी जीवजंतू पुढच्यावेळी आले तर त्यांना मारून टाकता येते. पण प्रत्येक वेळी आधी जीवजंतूंचा शरीरात प्रवेश करून घेऊन रोगाला सामोरे जाणे परवडण्याजोगे नसते. यासाठी शास्त्रज्ञ जंतूंना अर्धमृत (Attenuate) करतात वा पूर्णपणे मारतात. असे अर्धमृत वा मृत जंतू शरीरात गेल्यावर रोग निर्माण करू शकत नाहीत. पण त्यांच्याविरुद्ध प्रतिकार करणारी द्रव्ये आणि प्रशिक्षित पेशी तयार होतात. लसी अशाच अर्धमृत वा मृत जंतू किंवा त्यांच्यातील घटकांपासून बनवलेल्या असतात. लस देण्याच्या क्रियेला लसीकरण म्हणतात. ५००० वर्षांपूर्वी चिनी लोक देवी रोग होऊ नये म्हणून लसीकरण करत. अशी वैद्यक इतिहासात नोंद आहे. पहिले शास्त्रोक्त लसीकरण करण्याचा मान एडवर्ड जेन्नरकडे जातो. त्याने १७९६ मध्ये देवी रोगाचा प्रतिबंध करण्यासाठी लसीकरण केले.* *आज आपल्याकडे क्षयरोग, गोवर, घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात, पोलिओ, कॉलरा, रेबीज, विषमज्वर, कावीळ तसेच गालफुगी अत्याधिक रोगांवरील प्रतिबंधक लसी उपलब्ध आहेत. लसीकरणामुळे बऱ्याच गंभीर रोगांचा प्रतिबंध आपण करू शकलो आहोत.* *डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित* यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून, मनोविकास प्रकाशन ०२० ६५२६२९५० *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *" परिस्थिती हाताळण्याचे कौशल्य ज्याच्याकडे असते, तो जग जिंकण्याची जिद्द राखून पुढे जातो "* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *रक्तातील तांबड्या पेशींची निर्मिती शरीरात कोठे होते ?* अस्थीमज्जा 2) *ऍनिमिया हा आजार कोणत्या द्रव्याच्या कमतरतेमुळे होतो ?* लोह 3) *लिलीचे फुल हे कोणत्या देशाचे राष्ट्रचिन्ह आहे ?* फ्रान्स 4) *डॉ विक्रम साराभाई अवकाश संशोधन केंद्र कोठे आहे ?* थूम्ब 5) *भारताच्या कोणत्या सरन्यायाधीशानी राष्ट्रपती म्हणून कार्यभार सांभाळला होता ?* एम. हिदाय तुला *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 नरसिंग जिड्डेवार, भोकर 👤 आकाश सरकलवाड, धर्माबाद 👤 कपिल जोंधळे 👤 अशोक लंघे *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मानवाचं मन... अनेक प्रकारचे सुखदु:खात्म प्रसंग, विवंचना, काळजा, आसूया, स्पर्धा, द्वेष, मत्सर, उत्सुकता आणि कुतूहल...यांनी सदैव त्याचे मन 'पिसाट' झालेले. अप्राप्याचा ध्यास म्हणजे आपल्याकडे जे नाही ते मिळवण्याचा अथक प्रयत्न आपण सारे करीत असतो; पण 'मन:शांती' चा शोध घ्यायला नेमके विसरतो. 'मन:शांती' हे महत्वाचे जीवनसूत्र आहे, हेच आपण या सा-या धबडक्यात हरवून जातो. 'निरंजनी आम्ही बांधियेले घर' असे संतवचन आहे. ही निरांजनावस्था महत्वाची. जन्मापासून मृत्यूपर्यंत माणसाला सतत काही ना काही करावे लागते. यातून त्याची सुटका नाही. मनाची सर्वार्थाने मुक्तता तशी कठीणच. कारण वैयक्तिक भावभावना, विकार-विचार आणि अहंकार यापासून स्वत:ला अलग करणे जवळजवळ अशक्यप्राय.* *पाण्यात पडले म्हटले की कोणीही ओलाचिंब होणारच. मात्र एखादा खडक त्या जलाशयात असेल तर तो पाण्यात राहून अलिप्तच की ! अशी अलगता संसारात राहून साधायची, म्हणजे शरीरक्रिया चालू आहे पण मन मात्र अलिप्त आहे. त्याच्या पृष्ठभागावर कोणत्याच लहरी नाहीत, तरंग नाहीत. मनाच्या समधात अवस्थेचे वर्णन संत ज्ञानेश्वरांनी 'नुरोनिया ठेला' असे केले आहे. म्हणजे बाह्यस्वरूपी तो इतका निश्चल की जिवंत आहे का, हा इतरांना प्रश्न पडावा, आणि तो जिवंत असला तरी जणूकाही जिवंत नाही, असे वाटावे असा... त्याच्या मनाच्या या अवस्थेला 'सहजस्थिती किंवा 'निजस्थिती' असेही त्यांनी म्हटले आहे. हे क्षण प्राप्त व्हावे, असे वाटत असल्यास संतानी सांगितलेला उपाय म्हणजे नामस्मरण...' नामापरते सुख नाही रे सर्वथा !' हाच तो सद्रगुरूपदेश...* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🚩‼🚩‼🚩‼🚩‼🚩 *--संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो,* *काल आयुष्यातील एक अविस्मरणीय अनुभव घेतला.* *अंधारी व्याघ्र प्रकल्प ताडोबा, चंद्रपूर येथे 12 वाजता पोहचलो.जातांना* *200 की मी पूर्ण जंगलातून सफर अगोदरच भामरागडची करून आलो.आणि आता* *12 ते सायंकाळी 8 वाजेपर्यंत ताडोबात चित्तथरारक* *अनुभव घेतला. माहिती घेतली आणि* *2 वाजेपासून 6.30 वाजेपर्यंत जंगल सफारी केली.किर्रर्र* *झाडी,निर्मनुष्य जंगल,भयाण शांतता.जितेंद्र आणि* *सचिन असे 2 सफारी गाईड गाडी चालवणाऱ्याची कमाल म्हणावी* *लागेल,झाडाझुडुपांमध्ये गाडी चालतांना जीव मुठीत धरून सगळे* *शांत बसले होते.* *या प्रकल्पात जनगणना नुसार 96 वाघ ,लेफर्ड आहेत. जंगल 1100 चौ* *की मी ,600 कोअर जंगल,या मोसमात प्राणी जास्त बाहेर येत नाही,त्यांचा एकत्र राहण्यासाठी* *चा हा काळ असतो,प्रेग्नन्ट एरिया अस म्हणतात त्याला. 3 महिने बांधलेला* *असतो,उन्हाळ्यात पाण्यासाठी वाघ दुपारी जास्त बाहेर* *पडतात,उन्हल्यात स्थलांतरित होतात म्हणून जास्त* *दिसतात,जंगलात लोकवस्ती अगदी तुरळक आहे,कर्मचारी वर्ग जादाकरुन* *येथे राहतात. उंचावर त्यांच्या 2 ठिकाणी कुटी आहेत.सिंह* *आणि हत्ती सोडून जंगलात सर्व प्रकारचे प्राणी आहे,* *फिरण्याचा एरिया टोटल 42 की मी आहे ,4 तास फिरण्यासाठी मुभा* *दिली होती.* *कुणबी तेली माळी समाज या जंगलात पूर्वीपासून राहतात,सुधीर मुनगंटीवार यांची शेती जंगलात* *आहे,आत जंगलात गाव नाही,चिमूर पर्यंत परिसर आहे,आत प्राण्यांसाठी* *18* *ठिकाणी सोलर बोअरवेल बसवलेले आहे* *प्राणी इथे पाणी पिण्यासाठी येतात.* *वाघ समोर दिसला तरी ऍटॅक करत नाही, त्यांना त्रास दिला तरच प्राणी* *हल्ला करतात.* : *पर्यटक नियमित चालू असतात,मोहाची फुले वेचने, पर्यटक* *त्यांची सेवा,एवढाच या लोकांचा व्यवसाय ,पण अगदी आनंदी* *आणि काटक,शिक्षणा साठी मूल चंद्रपूर येथे पाठवतात, गाईड* *एम.ए.झालेला,पण रोजगार नाही म्हणून काम करतात. सचिन* *गाऊत्रे, माळी समाजाचा सुशिक्षित मुलगा,मुली मिळताना अडचणी येतात,नोकरीच्या शोधात भरपूर फिरलो पण नोकरी नाही,शेवटी स्थानिक व्यवसाय करतो.* *बुध्दापौर्णिमेल प्राणी पाणी पिण्यासाठी तळ्यावर येतात,तेव्हा* *रात्रभर येथे पर्यटक आधीपासूनच बुकिंग करून ठेवतात.* *2 कुटी वर आधिकारी असतात.* *मोहूर्ली गेट ,मामला गेट, असे दोन गेट आहेत.आजच्या सफरीत आम्ही* *अगदी नशीबवान ठरलो,कारण* *अस्वल,लांडगे,गवे,मोर,रानमांजर ,कोल्हे सोडून कुणालाही वाघ दिसले* *नाहीत,मात्र आम्हाला घनदाट जंगलात गाडी चिखलात गेल्याने सर्वांच्या हृदयाचे ठोके चुकले.कुणी गाडी सोडून खाली उतरायला तयार नव्हते,शेवटी एकमेकांच्या आधाराचे धाडस करून गाडी चिखलातून उचलून,काही लोटून बाहेर काढली.आयुष्यातील सर्वात खतरनाक शॉट अनुभवल्यानंतर सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला.पुढे गेल्यावर काही अवधीतच लांबलचक* *तब्बेतशीर चित्ता, आणि बिबट्या यांचे जवळून* *दर्शन झाले.सगळा ताण तिथेच विसरलो.प्राणी कितीतरी वेळ ते जंगलात घाबरून पळत गेले,तो* *पर्यंत आम्ही त्यांना नेहाळत बघत होतो.आयुष्यातील एक* *अनमोल क्षण ताडोबात घातला.* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• संकल्प असतात तरी काय ? हे कळायला खूप अवघड आहे.नवे वर्ष लागले की,लोकांचे कितीतरी संकल्प करताना सुरुवातीला जाहीर करतात आणि काही दिवस गेले की,कोणते संकल्प केले हेही विसरुन जातात.वर्ष संपत आले की,मग पुन्हा संकल्प करणार याचे नियोजन करतात.पण हे जे काही संकल्प करणारे आहेत ना ते सगळे जगाला बनवायला काही कमी नाहीत.उगीचच आम्ही काहीतरी करत असल्याचा भास लोकांना भासवितात पण प्रत्यक्षात काहीच करत नाही.अशा बनवना-या लोकांपासून सावध रहायला हवे.यांच्या ओठांवर एक आणि प्रत्यक्षात करायचे एक..! संकल्प केल्याने पूर्ण होत नाही किंवा सांगितल्याने पूर्ण करावेत असेही नाही.तर नेहमीच चांगले काम करण्यासाठी संकल्प करणा-याला येणारा प्रत्येक दिवस हा चांगला च असतो.तो कधीही सांगत सुटत नाही.मनामध्ये दृढ विश्वास असला आणि चांगले काम करण्याची प्रबळ इच्छा झाली की,तो निश्चितच स्वत:साठी व इतरांसाठी कल्याणकारी संकल्प करतोच.त्याला नवीन वर्षाची किंवा नवीन दिवसाच्या मुहर्ताची काहीच गरज नाही.संकल्प असे करावे की,आपले हित कमी व इतरांचे जास्त असायला हवे.त्यातून काहीतरी नवीन शिकले पाहिजे.ज्यामुळे स्वत:ला मानसिक समाधान आणि इतरांना काहीतरी वाममार्गाला लागलेल्यापासून दूर करण्यासाठी आपण काहीतरी केल्याचा आनंद निर्माण होईल असा काहीतरी उद्देश आपल्यासमोर ठेवून केलेले एखादे कार्य म्हणजेच माझ्यामते खरा संकल्प होईल अन्यथा संकल्पच्या ठिकाणी संकल्पनाच एक वल्गनाच होईल.मग तुम्हीच संकल्पाची संकल्पना कशी निर्माण करायची ते ठरवावी.चांगल्या संकल्पाला मुळीच काळ, वेळ आणि वर्ष याची काहीच गरज नाही. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🌞🌜🌞🌜🌞🌜🌞🌜🌞🌜 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *वडिलांना मदत* भगवान बुद्ध त्या काळात आपल्या शिष्यगणांसह गावोगावी जात होते. एका गावाच्या वेशीवर एक वृद्ध आपल्या मोठ्या टोपलीतून भाजी विकण्यास बसला होता. ती टोपली जड होती व त्याला तेथून दुसरीकडे जायचे होते म्हणून येणार्‍या - जाणार्‍या वाटसरुंना तो आपल्या डोक्यावर टोपली ठेवण्यास मदत करण्याची याचना करत होता. पण कोणीही त्याच्याकडे लक्ष देत नव्हते. ते शिष्यगणही मजा बघत होते. हे पाहताच भगवान बुद्ध स्वतः पुढे झाले व त्यांनी वृद्धाच्या डोक्यावर टोपली उचलून दिली. त्या वृद्धाने त्यांना ओळखले होते. तो म्हणाला, सार्‍या जगाच्या दृष्टीने ते कोणीही असोत, पण माझ्या दृष्टीने माझ्या मुलासारखे आहेत ! त्याचे बोलणे ऐकून शिष्य आश्चर्यचकित झाले. त्यांनी विचारले, हे कसे शक्य आहे ? तो वृद्ध उत्तरला, जगात प्रत्येक मुलगा हा आपल्या मातापित्यांचा आधार असतो. त्यांचे कष्ट उपसण्यास नेहमीच मदत करत असतो. आज त्यांनीही मला मदत केली आहे. माझे कष्ट हलके केले आहेत. मग ते माझ्या मुलासमानच नाहीत का ? सार्‍या शिष्यांनी त्या वृद्धाचे पाय धरले व क्षमा मागितली.  *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00          ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 24/12/2019 वार - मंगळवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    *भारतीय ग्राहक दिन* 💥 ठळक घडामोडी :- ● १२९४ - पोप सेलेस्टीन पाचव्याने राजीनामा दिल्यावर पोप बॉनिफेस आठवा सत्तेवर. ● १७७७ - जेम्स कूकला किरितिमाती तथा क्रिसमस द्वीप पहिल्यांदा दिसले. ● १८५१ - लायब्ररी ऑफ काँग्रेसला आग. ● १८६५ - अमेरिकेच्या दक्षिणेतील सेनापतींनी कु क्लुक्स क्लॅन या वर्णद्वेषी संस्थेची स्थापना केली. ● १९२४ - आल्बेनिया प्रजासत्ताक झाले. 💥 जन्म :- ● १८९९ - पांडुरंग सदाशिव साने तथा साने गुरुजी, मराठी लेखक. ● १९२५ - मोहम्मद रफी, भारतीय पार्श्वगायक. ● १९५९ - अनिल कपूर, हिंदी चित्रपट अभिनेता. 💥 मृत्यू :- ● १८७३ - जॉन्स हॉपकिन्स, अमेरिकन उद्योगपती व दानशूर. ● १९१४ - जॉन मुइर, अमेरिकन निसर्गसंवर्धक. ● १८६३ - एम.जी. रामचन्द्रन, तमिळनाडूचे मुख्यमंत्री. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *आयुष्मान खुराणा आणि विकी कौशल ठरले सर्वोत्कृष्ट अभिनेते, 'पाणी'साठी आदिनाथ कोठारेचाही गौरव* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *ठाकरे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर, 27 किंवा 30 डिसेंबरचा नवा मुहूर्त* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *2022 पर्यंत देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यार असून देशात २२ हजार गावात ग्रामीण कृषी मार्केटच जाळ उभारणार असल्याची माहिती केंद्राच्या शेतकरी उत्पन्न दुप्पट करणे अभ्यास समितीचे अध्यक्ष डॉ अशोक दलवाई यांनी दिली आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *भाजपला धोक्याची घंटा, एका वर्षात गमावली पाच राज्यातील सत्ता, काँग्रेस-जेएमएमचं सरकार निश्चित ,काँग्रेस, जेएमएम आणि राजद आघाडीला 42 जागांवर आघाडी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटेंवर पुणे जिल्हाबंदी, कोरेगाव-भीमा इथं होणाऱ्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी, 160 जणांनाही नोटीस* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *27 आणि 28 डिसेंबरला कोकण रेल्वेवर मेगाब्लॉक, दहा गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम, नाताळ आणि नववर्षानिमित्त कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना फटका* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या ट्वेन्टी ट्वेन्टी आणि वन डे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह सलामीवीर शिखर धवनचं संघात पुनरागमन तर रोहित शर्मा आणि गोलंदाज मोहम्मद शमीला विश्रांती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  *साने गुरुजी जयंतीनिमित्त प्रासंगिक लेख* *मानवतेची शिकवण देणारे साने गुरुजी* पांडुरंग सदाशिव साने ज्यांना आपण सर्वजण साने गुरुजी या नावाने ओळखतो. त्यांचा जन्म 24 डिसेंबर 1899 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड या गावी झाला. सदाशिवराव व यशोदाबाई यांच्या पोटी जन्मलेला दुसरा मुलगा असून तिसरे अपत्य म्हणजे साने गुरुजी. त्यांचे प्राथमिक शिक्षण गावातच पूर्ण झाले. त्यांचे वडील सारा गोळा करण्याचे काम करीत होते. साने गुरुजी यांची आई त्यांना श्याम या नावाने प्रेमाने ........ वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/12/blog-post_23.html             लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *मोहम्मद रफी* मोहम्मद रफी हिंदी सिनेमातील महान प्लेबॅक गायक होता.नाटकांच्या आवाजाचा आणि त्यांच्या आवाजाचा विस्तार करण्यासाठी त्यांनी आपल्या समकालीन गायिकांबरोबर ओळखले. त्यांना शायनशाह-ए-तारानुम असेही म्हटले जाते. मोहम्मद रफीच्या आवाजात त्यांच्या आगामी काळात अनेक गायकांनी प्रेरित केले. हे सोनू निगम , मोहम्मद अजीज आणिउदित नारायण च्या नाव आहे - या आता अनेक त्याच्या स्वत: च्या ओळख आहे तरी. 1 9 40 ते 1 980 पर्यंत सुरूत्याने एकूण 26,000 गाणी गायली. [2]मुख्य प्रवाहात हिंदी अतिरिक्त गीते गझल , भजने , देशभक्तीपर गीत, कव्वाली समावेश आणि इतर भाषांमध्ये गाणे गायली. कलाकार त्यांच्या संगीत चित्रित आहेत कोठे गुरु दत्त , दिलीप कुमार , देव आनंद , भारत भूषण , Johnnie वॉकर , जॉय मुखर्जी , शम्मी कपूर , राजेंद्र कुमार , राजेश खन्ना ,अमिताभ बच्चन ,  धर्मेंद्र ,  जितेंद्र  आणि  ऋषी कपूर ते गायक अभिनेता व्यतिरिक्त किशोर कुमारदेखील नाव समाविष्ट आहे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *" कोणतीही विद्या, ज्ञान कधीच वाया जात नाही. "* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *'शेती' हा विषय कोणत्या सुचीमध्ये समाविष्ट आहे ?* राज्यसूची 2) *समुद्राची खोली कोणत्या परिमाणात मोजतात ?* फॅदम 3) *नाताळ' केव्हा साजरा केला जातो ?* 25 डिसेंबर 4) *'पुरुज्जीवन राष्ट्रवाद' या संकल्पनाचे जनक कोण ?* योगी अरविंद घोष 5) *स्निग्ध पदार्थाच्या पचनास कोणत्या रसाची आवश्यकता असते ?* पित्त *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 निर्मला बोधरे, सहशिक्षिका, पुणे 👤 विठ्ठल मुजळगे, सहशिक्षक, धर्माबाद 👤 रणजित बाळासाहेब गुंजाळ, पत्रकार, *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आयुष्याच्या संध्याकाळी आपल्या कुटुंबासमवेत निवांतपणानं जगता यावं नि जीवनाचं सार्थक व्हावं, अशी प्रत्येकाची मनोमन ईच्छा असते. आज मात्र एकाकीपणाच्या गर्तेत स्वत:ला कोंडून घेण्याची वेळ अनेकांवर येताना दिसत आहे. पाश्चात्य देशातून आलेल्या संस्कृतीनं गेली अनेक वर्षे आमच्या सामाजिक रचनेला हादरे दिल्याने आमच्या कुटुंबव्यवस्थेला तडे गेले आहेत.* *संयुक्त कुटुंबव्यवस्थेत अनेक अडचणी व भौतिक सुखांच्या अभावातही आत्मिक सुखासाठी जगणारी माणसं आज हरवून गेली आहेत. पडद्यावरील आजी-आजोबा आम्हांला भावतात, पण वास्तवात प्रत्येकाला कुटुंब हवं ते चौकोनात बांधलेलं. त्यात इतरांना जागाच उरलेली नाही.* *"काळाच्या बदलात आलेली ही स्थित्यंतरं अत्यंत वेदनादायी आहेत, पण ती स्विकाराणं ही आमची अपरिहार्यता...?* *आहे....?...की.....?"* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *सज्जनहो,* *पी* *.एच. डी.करून किती* *अभ्यासकांनी जीवन आनंदी व* *कितीचं सुखकर झालं माहीत नाही,.* *पण जे कधी शाळेत गेले नाहीत* *त्यांचा अभ्यास पी.एच. डी.करणारे* *करतात हे मात्र सत्य आणि वास्तव आहे.* *त्याच मुळही तसेच आहे,या लोकांनी* *माणस वाचली,पाहिली,* *लिहिली,अभ्यासली आणि* *माणसाच्याच गराड्यात ही लोक* *राहिली.* *संत ज्ञानेश्वर, रवींद्रनाथ टागोर,* *बहिणाबाई चौधरी यांनी कधी शाळेच* *तोंड पाहिले नव्हते पण* *आज पी.एच. डी. करणारे या महान* *व्यक्तीचा अभ्यास करतात.* *तर मग एकच ठरवा मला माणसात* *रहायच , माझा आनंद* *माणूस आहे, माझं जीवन* *माणूस आहे,मी फ्लॅट मध्ये* *ब्लॉक होणार नाही,आणि* *ब्लॉकमध्ये फ्लॅट होणार* *नाही.माणसात राहून माणूस बनेल.* *माणसालाच सुखी करेल व सुखी* *राहील.* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••• ईश्वरावर श्रध्दा असणे काही चुकीचे नाही,पण ईश्वरच जे काही करेल ते मी स्वीकारेन असे म्हणून त्याच्यावर विसंबून राहणे मात्र चुकीचे ठरेल.ईश्वर ही आपल्यासाठी एक अप्रतक्ष प्रेरणा आहे.जेव्हा तुम्ही तुमच्या प्रयत्नाने आणि जिद्दीने प्रामाणिकपणे काम करता ते काम नक्कीच यशाकडे घेऊन जाते.त्या तुम्ही करत असलेल्या कामामध्ये ईश्र्वर नक्कीच प्रेरणा देतो.केवळ काम न करता मला माझ्या कामात नि जीवनात यश मिळू दे असं म्हणत असाल तर तो तुमचा विचार तुम्हाला पराभवाकडे घेऊन जाणाराच ठरेल.म्हणून प्रथम आपल्या कामाचा प्रारंभ प्रसन्न मनाने आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवून करायला सज्ज राहिलातकी,मग तुम्हीच तुमच्या मनातून ईश्र्वराचे आभार मानायला विसरणार नाहीत हे मात्र खरेच आहे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मातृभक्त लक्ष्मणदेव* एका गांवात एक स्त्री गांवाबाहेर आपल्या लहान मुलाला घेऊन एकटीच रहात होती. मुलाचे वडील त्याच्या लहानपणीच देवाघरी गेले होते. मुलाचे नाव होते लक्ष्मणदेव. आई धुणीभांडी करून आपला चरितार्थ चालवित होती. मुलगाही आईला कामात मदत करत असे. काम करून तो लांबच्या शाळेत पण जाई. एक दिवस तो शाळेतून परत आला तर आई झोपलेली होती. तिला खूप ताप भरला होता. लक्ष्मण आईची सेवा करू लागला. बरेच दिवस झाले तरी आईचा ताप उतरेना. खांण बंद झालं. ती खूप अशक्त झाली. लक्ष्मणाला घरची बाहेरची सर्वच कामे करावी लागत. आईची सेवा तो अगदी मन लावून करत असे. तिला दूध गरम करून देणे तिची औषधं वेळच्या वेळी देणे. एका रात्री आईने लक्ष्मणाला हाक मारली. 'लक्ष्मणा थोडे पाणी देतोस' लक्ष्मण घरात पाणी आणायला गेला. पाणी घेऊन तो परत आला तेवढयात आईला झोप लागली. गुंगीत आई पडून होती. रात्र संपली पहाट झाली. गार वार्‍याच्या झुळुकीबरोबर आईला जाग आली. तिने पाहिले समोर हातात पाण्याचा पेला घेऊन लक्ष्मण उभा होता. आई म्हणाली 'लक्ष्मणा अरे तु रात्री झोपलाच नाहीस का ? वेडया अरे मला उठवायचे नाही कां ? लक्ष्मण आईच्या हातात पाण्याचा पेला देत म्हणाला, 'आई अग माझ्या लहानपणी माझ्यासाठी तु किती रात्री जागुन काढल्यास मग मी एक रात्र तुझ्या करता जागलो तर काय झालं'. तिने त्याला पोटाशी धरले. तिच्या डोळयातले अश्रू त्याच्या मानेवर ओघळत होते. *तात्पर्यः आईवडीलाची सेवा करणे हीच खरी पुण्याई आहे.* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

🔰🌸🔰🌸🔰🌸🔰 *🌷🌷जीवन विचार*🌷🌷 *〰〰〰〰〰〰〰* मनुष्याच्या संग्रही वृत्तीला मर्यादा नाही.माणसाचा भयंकर शञू जर कोणी असेल तर तो आहे लोभ.लोभ हा सर्व सद्गूणांचा नाश करतो.गीतेत माणसाच्या नरकाची व्दारेच काम, क्रोध ,लोभ ही सांगितलेली आहेत. माणसाच्या लोभाची बरोबरी दुसरे कोणी करु शकत नाही. सर्व जिवात्म्यांमध्ये मनुष्यच असा प्राणी आहे की तो संग्रहवृत्तीने जगतो.मनुष्य कितीही क्रोधीही झाला तरी तो वाघाइतका क्रोधी होऊ शकत नाही आणि कितीही कामी झाला तरी तो चक्रवाक पक्ष्याइतका कामी होऊ शकत नाही असे म्हणतात. पशूंना द्रव्याची इच्छा नसते,परंतु तीच इच्छा माणसाला पशू बनविते. मानवाच्या अंगी जी लोभी प्रवृत्ती आहे त्याची बरोबरी कोणी करु शकत नाही.म्हणूनच धनाचा संचयाच्या मागे लागलेल्या लोभी प्रवृत्तीचा मनुष्यास साध्या व्यवहाराची शिकवण संतानी दिली... *संत कबीर सांगून गेले "पानी वाढो नाव में, घरमें बाढो दाम l दोनों हात उलीचिये , यही सयानो काम ll"* अर्थः माणसाला धनाची गरज आहे पण घरात नाही समाजात पाहिजे.नावेतील पाण्याने जसा धोका होतो तसा घरातील धन वाढल्याने धोका होतो. माणसाने आपल्या गरजेनुसार धनाचा वापर करावा. पण गरजेपेक्षा अधिक धनाचा संचय करणे म्हणजे ही झाली लोभी प्रवृत्ती. या लोभी प्रवृत्तीपासून जोपर्यंत माणूस दूर होत नाही तोपर्यंत तो समाधानकारक जीवन जगू शकत नाही. 〰〰〰〰〰〰〰 *'आपल्या श्रमाचे फळ, हीच जगातील सर्वोत्तम संपत्ती आहे.'* 〰〰〰〰〰〰〰 🌺🌸🌺🌸🌺🌸🌺 *🙏शब्दांकन/संकलन*🙏 *✍श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे).* जि.प.प्रा.शा.गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड.

आजची चारोळी अधीर मन झाले नांदत आहे सासरी भेटण्यासाठी भाऊराया अधीर मन झाले येशील काय तू घ्यावया. 〰〰〰〰〰〰 श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे नांदेड.

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00          ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 23/12/2019 वार - सोमवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *राष्ट्रीय किसान दिन* 💥 ठळक घडामोडी :-  ●१६२० - विल्यम ब्रॅडफोर्ड आणि मेफ्लॉवर पिल्ग्रिम्स प्लिमथ, मॅसेच्युसेट्स मध्ये प्लिमथ रॉक या ठिकाणी उतरले. यांची वसाहत म्हणजे अमेरिकेतील ब्रिटीश वसाहतींची मुहूर्तमेढ होय. ●१९५८ - चार्ल्स दी गॉल फ्रांसच्या अध्यक्षपदी. युनियन देस् देमोक्रातेस् पुर ला रिपब्लिक पक्षाला ७८.५%चे बहुमत. ●१९६८ - अपोलो ८चे केनेडी स्पेस सेंटरहून उड्डाण. फ्रँक बॉर्मन, जेम्स लोव्हेल आणि विल्यम ऍंडर्स अंतराळात. ●१९८७ - फिलिपाईन्सच्या तब्लास सामुद्रधुनीत प्रवासी फेरी दोन्या पाझ आणि तेलवाहू जहाज व्हेक्टर १ मध्ये टक्कर. १,०००हून अधिक ठार. 💥 जन्म :- ●१९६३- गोविंदा,हिंदी चित्रपट अभिनेता ●१९५९-कृष्णम्मचारी श्रीकांत,भारतीय क्रिकेटपटू ●१९०३ - भालचंद्र दिगंबर गरवारे उद्योगपती. ● १९२१ - पी.एन. भगवती भारताचे सतरावे सरन्यायाधीश 💥 मृत्यू :- ● १८२४ - कंपवाताचा मानवी मेंदुशी संबंध आहे हे सिद्ध करणारे जेम्स पार्किन्स ● १९४५ - जनरल जॉर्ज पॅटन दुसऱया महायुद्धातील यूरोपमधील अमेरिकन सेनापती. ● १९६५ - गणपतराव बोडस, मराठी संगीत नाटकांतील गायक-अभिनेता. ● २००४ - पी. व्ही. नरसिंहराव, भारतीय पंतप्रधान. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *आंदोलनांद्वारे तुम्हाला CAA चा विरोध करायचाच असेल तर तुम्ही माझे पुतळे जाळून आंदोलन करा, पण हिंसाचार, शासकीय मालमत्तेची हानी तसेच गरिबांची वाहने जाळू नका, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी केले.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *विलेपार्ले स्टेशन परिसरातील इमारतीला भीषण आग, अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल, इमारतीत काही लोक अडकल्याची शक्यता.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर पोलिसांची गाडी पलटली. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. ओझर्डे गावातच हा अपघात झाला आहे. या गाडीत चार पोलीस कर्मचारी होते.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून शेतकरी कर्जमाफीची घोषणा, सप्टेंबर 2019 पर्यंतचं 2 लाखाचं कर्ज माफ, सरसकट कर्जमाफीची शेतकरी नेते, विरोधकांची मागणी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *महाराष्ट्रात विभागनिहाय मुख्यमंत्री कार्यालय, 50 ठिकाणी 10 रुपयांत शिवभोजन तर पूर्व विदर्भात पोलाद प्रकल्प, मुख्यमंत्र्यांच्या 10 मोठ्या घोषणा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *जवळपास 26.7 कोटी फेसबुक युजर्सच्या डेटा ऑनलाइन लीक झाल्याची माहिती एका संशोधक कंपनीने दिली आहे. यात फेसबुक युजर्सच्या खासगी माहितीचा समावेश आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *कटक मध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात टीम इंडियाचा वेस्ट इंडिजवर चार विकेट्सने मात, मालिका 2-0 ने खिशात, विराट, रोहित, राहुलची अर्धशतकं* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *राष्ट्रीय किसान दिनानिमित्त* *शेतकऱ्यांना जगवायचे असेल तर .....!* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. https://nasayeotikar.blogspot.com/2016/02/blog-post_20.html?m=1 लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *" घोंगड्याने काम भागत असेल तर रेशमी वस्त्राचा हट्ट धरु नये. "* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *'भटनागर पुरस्कार' कोणत्या क्षेत्रात दिला जातो ?* विज्ञान 2) *जिल्हा निधीतून पैसा काढण्याचा आणि त्याचे वितरण करण्याचा अधिकार कोणास आहे ?* मुख्य कार्यकारी अधिकारी 3) *शून्यधारीत अर्थसंकल्पाचे आद्यप्रवर्तक कोण ?* पीटर पिहर 4) *रासायनिक द्रव्यांचे कारखाने महाराष्ट्रात कोठे आहेत ?* पनवेल व अंबरनाथ 5) *पृथ्वी स्वतः भोवती फिरते हे प्रथम कोणत्या भारतीय खगोल शास्त्रज्ञाने सांगितले ?* आर्यभट्ट *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 सार्थक सुगंधे, धर्माबाद 👤 चिं. श्रीपाद हणमंलू शंकरोड, येवती 👤 प्रवीण गुंटोड 👤 ज्ञानेश्वर ताटीकुंडलवार 👤 राजू पाटील कुरुंदे *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आपल्या मुखावाटे आपल्या शरीरात जे अन्न जाते, त्यावर आपण खूप नियंत्रण ठेवतो. आपण आपला आहार सदोदित संतुलित ठेवायचा प्रयत्न करतो. वैद्दकिय सल्ल्यानुसार आवश्यक ते पथ्य पाळतो. जेवायच्या आधी आपण दररोज स्वच्छ हात धुतो. शुद्ध पाणी पितो. वेळोवेळी आपण उपवास करतो. आपल्या तोंडातून जे काही आत जाते ते पोटात जाते आणि शेवटी ते शरीराबाहेर टाकले जाते. हे आपल्याला माहित असूनसुद्धा ही सगळी काळजी आपण घेतोच.* *पण आपल्या मुखावाटे बाहेर पडणा-या शब्दांची तशाच प्रकारची काळजी आपण घेत नाही. ज्या मुखातून आपण परमेश्वराचे गुणगान करतो, त्याच मुखातून आपण खुशाल अपशब्द उच्चारतो. ज्या झ-यातून केवळ निर्मळ पाणी झरले पाहिचे, तो झरा आपणच प्रदूषित करतो. आपल्या अमंगल वाणीने तो झरा आपणच विटाळून टाकतो.*                      ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●••      🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷     *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*          📱 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो* *काल दुपारी तीन वाजता पाटोदा,ता.गंगापूर, जि.औरंगाबाद* *येथे पोहचलो.नाव ऐकल्यानंतर तुम्ही पण ओळखलं असणार,पण प्रत्यक्ष अनुभव आणि अप्रत्यक्ष अनुभव यात फरक असतो म्हणून या गावाची प्रत्यक्ष पाहणी केली.* *गावात प्रवेश करताच स्वागताचे फलक,पुरस्कार मिळालेले फलक,समोरच ग्रामपंचायत* *कार्यालय, ते ही स्वप्नातील इमारत आहे की काय अस वाटलं.* *तिथे आशा कार्यकर्ती भाग्यश्री देवडे यांनी स्वागत केले,प्रथम कार्यालयात* *नेले.पाहून आश्चर्य वाटले,3350 लोकवस्तीच्या 7 वी* *शिकलेल्या सरपंच भास्करराव पेरे यांची व्हिडीओ क्लिप आणि प्रत्यक्ष करमत खरोखर वाखाणण्याजोगी* *आहे.* *हा माणूस गावासाठी 24 तास काम करतो.प्रत्येक कर्मचारी प्रथम ग्रामपंचायत कार्यालयात बायोमेट्रिक* *हजेरी थंब मशीनवर लावतो . गावात कुठे काय चालू आहे ,उदा.शाळेत काय* *चालत,अंगणवाडीत काय चालतय,धोबीघाट,मुख्य चौक,सभागृहात काय चालत ते* *ग्रामपंचायत मध्ये बसून समजते.संपुर्ण गावात प्लेव्हर ब्लॉक,मोफत वायफाय,मोफत शुद्ध* *पाणी,मोफत दळण, मोफत शेतीला पाणी,गरम पाणी,वापरायचे पाणी,प्रत्येक घरासमोर झाडे, त्यांना* *रोज पाणी.अशा कितीतरी बारीक बारीक गोष्टींचं सूत्रबद्ध नियोजन बघून* *खूप भारावून गेलो.आणि एव्हढी सगळी किमया बघून पैसा आणि पारितोषिक त्यांच्या पर्यंत धावून* *येतात. एक मोठं दालन पुरस्काराने भरलेले. हे सगळं बघून पी एच डी झालेले लोक अस काही का करत* *नाहीत किंवा अनेक पुढारी यांना का अस वाटत नाही की माझा गाव,माझा माणूस,माझा देश* *असा व्हावा.फक्त एकच काम या माणसाने केलं ते म्हणजे निष्काम कर्मयोग,24 तास जनसेवा,* *गावासाठी काहीही करायची तयारी.* *तिथेच त्यांनी सर्वांना चहा दिला ,आणि एक अविस्मरणीय अनुभव घेऊन तेथून विचारांच्या* *मनोयुध्दात निघालो.* *जर प्रत्येक भारतीयांच्या मनात आणि मनगटात हे पेरे नावाचं भूत शिरलं* *तर भारत महासत्ता व्हायला वेळ लागणार नाही.* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• एखाद्याच्या जीवनाचा जीवनसंघर्ष म्हणजे एक चित्रपटच असतो.त्यांच्या जीवनात अनेक प्रसंग सुखदु:खाच्या खाचखळग्यांनी ओतप्रोत भरलेले असते.तरीही ते डगमगत नाहीत. कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाऊन जीवन जगण्याचे खरे ध्येय ते गाठतातच.परिस्थिती कशीही असो त्याला हाताळण्याचे सामर्थ्य त्यांच्या ठायी ठायी वसलेले असते.म्हणूनच त्यांच्या आदर्शाचा परिपाठ आपण आपल्या जीवनात अनुसरायला हवा.तरच आपल्याला जीवन जगण्याची चांगली प्रेरणा मिळेल. *व्यंकटेश काटकर,नांदेड.*   संवाद..९४२१८३९५९०/             ८०८७९१७०६३. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *सिंहाचा जावई* एकदा एक सिंह जाळ्यात अडकला होता. एकदा उंदराने जाळे कुरतडून त्याला मुक्त केले. यामुळे सिंह उंदरावर प्रसन्न झाला आणि म्हणाला, "तुला हवं ते मागं. मी तुझी इच्छा पूर्ण करीन.' सिंहाने असे म्हणताच उंदीर म्हणाला, "महाराज आपण मला शब्द दिला आहे. माझी मागणी ऐकून आपण दिला शब्द मोडणार तर नाही ना?' यावर सिंह म्हणाला, "अरे नाही रे, मी राजा आहे आणि राजा आपले वचन कधीच मोडत नाही. माग तुला काय हवे ते'. यावर उंदीर म्हणाला, "मला तुमचा जावई करून घ्या.' सिंहाने ते मान्य केले. त्याप्रमाणे सिंहाने आपल्या मुलीशी उंदराचे लग्न लावून दिले. सर्व विधी झाले. पण सप्तपदीच्या वेळी नवरीच्या पायाखाली नवरदेव सापडले व चिरडून ठार झाले. तात्पर्यः *आपल्या कुवती बाहेरच्या एखाद्या गोष्टीची हाव धरलीतर स्वत:चाच नाश ओढवतो.* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *राष्ट्रीय किसान दिन* किसान दिन हा दरवर्षी भारतात २३ डिसेंबर या दिवशी साजरा करण्यात येतो. भारताचे पाचवे पंतप्रधान चौधरी चरणसिंग यांचा हा जन्मदिवस संपूर्ण भारतात किसान दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी किसान घाटावर त्यांना सलामी दिली जाते. शासनाकडून वेगवेगळी प्रदर्शने आणि शेती संबंधित कार्यशाळा आयोजित केल्या जातात. *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

चिञचारोळी दि.२२-१२-१९ बुट पाॕलीश करून पोट परिवाराचे भरतो आहे कष्टाची कमाई करून जीवन मी जगतो आहे. 〰〰〰〰〰〰 श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे नांदेड.

*डोळस प्रेम* (दि.२१-१२-१९) प्रेम कुणावरही कधीही करावं हे जरी खर असलं तरीही प्रेम हे कधी आंधळं नसावं प्रेम करताना ते सहज डोळस असावं जीवनाचा सारीपाट खेळताना हातचा डाव राखून खेळलेल बर म्हणजे आपण हरलो कधी तरीही खेळण्याचा आनंद नक्कीच मिळू शकेल असच प्रेमात ही आपण एकमेकांना ओळखून असलेलं नेहमी बर म्हणजे कडाक्याच्या भांडणातही कधी जास्त अबोला होणार नाही कधी सरासरी प्रेमा मध्ये प्रेमभंग हा बहुतेकांच्या नशिबी ठरलेला असतो असा प्रेम भंग कुणाचा कधी होऊ नये म्हणून म्हणतो प्रेम हे डोळस असावं.... 〰〰〰〰〰〰 श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे ता.हदगाव जिल्हा नांदेड.

डोळस प्रेम दि.२१-१२-१९ मनाने मनाशी जोडावे नाती, डोळस प्रेम करून निभवावी नाती,आयुष्यभर अशी जपावी नाती हीच डोळस प्रेमाची खरी महती... 〰〰〰〰〰〰〰 श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे ता.हदगाव जिल्हा नांदेड.

*डोळस प्रेम* (दि.२१-१२-२०१९) माझ्यासारखं कधी तरी, तू ही डोळस प्रेम करून बघ..... मनात वेदना असताना, तू ही माझासारख हसून खेळून राहून बघ..... माझासारख डोळस प्रेम तुही करून बघ.... विरहात होणाऱ्या यातना तू ही तुला सोसून बघ..... माझासारख डोळस प्रेम तुही करून बघ... कधी तरी आठवणीने माझा तु तुलाच हरवून बघ.. माझासारख डोळस प्रेम तूही करून बघ.... काट्यांकुट्यांच्या भरलेल्या वाटेवर तू ही कधीतरी चालून बघ..... माझासारख डोळस प्रेम तूही करून बघ.... सुख ,दुःखाचा अनुभव घेताना एकदा, तू ही रडून बघ..... माझासारख डोळस प्रेम तूही करून बघ.... माझासारख कधी तूही जगून बघ.. दु:ख काय असते स्वत:वर, तू ही झेलून बघ..... माझासारख डोळस प्रेम तूही करून बघ.... माझ्यासारखे जिवंतपणी, कधीतरी तू ही मरून बघ.. डोळ्यातून अश्रू, तू ही वाहून बघ..... माझासारख डोळस प्रेम तूही करून बघ... 〰〰〰〰〰〰 श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे ता.हदगाव जिल्हा नांदेड.

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00          ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 21/12/2019 वार - शनिवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 घडामोडी :- ● १६२० - विल्यम ब्रॅडफोर्ड आणि मेफ्लॉवर पिल्ग्रिम्स प्लिमथ, मॅसेच्युसेट्स मध्ये प्लिमथ रॉक या ठिकाणी उतरले. यांची वसाहत म्हणजे अमेरिकेतील ब्रिटीश वसाहतींची मुहूर्तमेढ होय. ● १९५८ - चार्ल्स दी गॉल फ्रांसच्या अध्यक्षपदी. युनियन देस् देमोक्रातेस् पुर ला रिपब्लिक पक्षाला ७८.५%चे बहुमत. ● १९६८ - अपोलो ८चे केनेडी स्पेस सेंटरहून उड्डाण. फ्रँक बॉर्मन, जेम्स लोव्हेल आणि विल्यम ऍंडर्स अंतराळात. ● १९८७ - फिलिपाईन्सच्या तब्लास सामुद्रधुनीत प्रवासी फेरी दोन्या पाझ आणि तेलवाहू जहाज व्हेक्टर १ मध्ये टक्कर. १,०००हून अधिक ठार. 💥 जन्म :- ● १९६३- गोविंदा,हिंदी चित्रपट अभिनेता ● १९५९-कृष्णम्मचारी श्रीकांत,भारतीय क्रिकेटपटू ● १९०३ - भालचंद्र दिगंबर गरवारे उद्योगपती. ● १९२१ - पी.एन. भगवती भारताचे सतरावे सरन्यायाधीश 💥 मृत्यू :- ● १८२४ - कंपवाताचा मानवी मेंदुशी संबंध आहे हे सिद्ध करणारे जेम्स पार्किन्स ● १९४५ - जनरल जॉर्ज पॅटन दुसऱया महायुद्धातील यूरोपमधील अमेरिकन सेनापती. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *भूकंपाच्या झटक्याने उत्तर भारत  हादरला, काश्मीरमध्ये भूकंपाची तीव्रता अधिक, अफगाणिस्तानच्या काबूल उत्तर पूर्वमध्ये भूकंपाचे केंद्र* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *अजित पवार होणार उपमुख्यमंत्री, पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात कुणाला मंत्रीपद मिळणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं असताना उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांच्या नावावर खा. संजय राऊत यांनी शिक्कामोर्तबच केले आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *विठुरायाच्या चरणावरील हार आता भाविकांच्या गळ्यात, हारांमुळे रोज किमान 500 किलोचे निर्माल्य तयार होत होते . यात्रा काळात हे निर्माल्य हजारो टनात तयार होत असल्याने कचरा ही मंदिर प्रशासनासाठी डोकेदुखी बनू लागली होती. यावर मार्ग काढण्यासाठी मंदिर प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *महाराष्ट्र विकास आघाडीच्या मंत्रीमंडळ विस्ताराचा मुहूर्त अखेर ठरला, 24 डिसेंबरला होणार मंत्रीमंडळ विस्तार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात महाराष्ट्रात जागोजागी आंदोलन, किरकोळ अपवाद वगळता शांततेत निदर्शने, काही ठिकाणी समर्थनार्थ मोर्चे, औरंगाबादमध्ये एमआयएमआयमचा विराट मोर्चा, देशभरात तीव्र पडसाद * ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *राज्यात 2018 पर्यंतच्या 66 हजार कोटी रुपयांच्या कामात अफरातफर, उपयोगिता (युटिलिटी) प्रमाणपत्रांच्या संख्येमध्ये तफावत असल्याचं  कॅगचं निरीक्षण* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *इंटरनेट शटडाऊन करण्यात भारताचा पहिला नंबर, इंटरनेट शटडाऊन ट्रॅकर या ऑनलाईन पोर्टलच्या माहितीनुसार या वर्षात 95 वेळा इंटरनेट शटडाऊन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 फलक लेखन आणि वाचन ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••      *उपक्रम :- वाचू आनंदे* इयत्ता पहिली ते आठवीसाठी उतारा खालील लिंकवर उपलब्ध आहे. http://projectforchild.blogspot.com/2019/12/21-2019.html उपक्रम वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *" खरा आनंद हा दुसऱ्यांना देण्यात असतो; घेण्यात किंवा मागण्यात नसतो. "* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *सर्व सजीव पेशींनी बनलेले असतात ही कल्पना प्रथमतः कोणी मांडली ?* श्वादन व श्वान 2) *कोणार्क हे प्रसिद्ध सुर्यमंदिर कोणत्या राज्यात आहे ?* ओडिसा 3) *महाराष्ट्राचे विद्यमान अर्थमंत्री कोण आहेत ?* मा.जयंत पाटील 4) *महाराष्ट्राचे विद्यमान गृहमंत्री कोण आहेत ?* मा. एकनाथ शिंदे 5) *कोणत्या घटनादुरुस्ती अन्वये भारतीय घटनेत मूलभूत कर्तव्याची तरतूद केली आहे ?* 42 वी *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 लक्ष्मी जैपाल ठाकूर, गोंदिया 👤 मन्मथ खंकरे 👤 श्रीमती माणिक नागावे 👤 गजानन गायकवाड 👤 संभाजी तोटेवाड 👤 जयश्री सोनटक्के *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *खरंतर मनाच्या कुपीत अत्तरासारखा जपून ठेवावा, असा अनमोल ठेवा असतो 'घर.' परस्परांशी लळा लागला की जुळून आलेले जन्माचे ऋणानुबंध घराला घरपण देतात. मग घरच मंदिर होऊन जातं. एकमेकांच्या स्वप्नांसाठी प्रार्थनेच्या स्वरांनी भरलेली घरं कुणालाही हवीहवीशी वाटतात. काही घरांची दारं मात्र सदैव बंद असतात. मनाची कवाडं जिथं बंद असतील, तिथं घराची कवाडं कशी उघडतील? अशा घरांच्या उंचीवरून घरातल्या रास्त आनंदाची मोजदाद होत नसते. तर आनंद हाच घरांचा, तिथल्या माणसांच्या उंचीचा मापदंड असतो. ज्या घरात कटुतेच्या भारानं मनं गुदमरलेली असतात, त्या घरातला प्रपंच सुखाचा कसा होईल?* *कृत्रिम वस्तूंच्या, बेगडी जगण्याच्या मायावी जाळ्यात अडकत चाललो आहोत का आपण? हे जाळं भल्याभल्यांना मोहवतं. घर जर आपुलकीवर, माया-ममतेच्या भिंतींवर उभं असेल तर येत्या जात्या वाटसरूंनाही ते आपलं वाटतं. जिथं तृप्तीची वीणा झंकारत असते. माझ्या घरातली सारी माणसं माझी आहेत ही भावनाच सा-यांना जोडून ठेवते. अशा मनस्वी माणसांच्या अस्तित्वाचं सर्वांना आकर्षण असतं, चुंबकासारखं. सुखी संसार त्याचीच परिणती असते. ही अथांग तृप्तीची गोळाबेरीज संपत्तीच्या पलिकडची असते."साधे गवत फुलण्याला सुख म्हटले मी, सहज भेटलेल्या जगण्याला सुख म्हटले मी, अवती भवती झगमगती नक्षत्रे होती, पण वातीच्या जळण्याला सुख म्हटले मी"* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• ☀☀☀☀☀☀☀☀☀ *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो* *मला माणूस हवाय,मला माणूस* *हवाय।* *देताय ना शोधून ,नाही,राग मानू नका* *गर्दीत हरवलाय म्हणून म्हटलो.* *मोगऱ्याचं फूल ओंजळीत घेतलं...* *की त्याचा गंध मनाला... शरीराला प्रसन्न करून जातो..* *सहवासातील माणसाचं देखील असंच असतं...* *काही माणसं काही क्षणातच मनाला खूप आवडतात...* *आपली होऊन जातात...* *तर काही कितीही सहवासात राहिली तरी आतून ओढ नसतेच...* *चेहरा बघण्यापेक्षा...* *नेहमीच समोरच्याच्या मनात उतरून बघावं...* *शोधूनही तिथं माणूसपण सापडत नसेल तर...* *त्याचं सुंदर दिसणंही मग किळसवाण वाटतं....* *शरीराची सुंदरता वयाबरोबर संपते* *तर मनाची सुंदरता,* *टिकून राहाते शेवटपर्यंत...* *शरीराला वय असतं....* *मनाला ते कधीच नसतं...* *शेवटी काय आपण व्यक्तीच्या स्वभावाच्या प्रेमात असतो...* *शरीर तर असतं निमित्तमात्र...* *माणसाच्या स्वभावात गोडवा...* *शालीनता...* *प्रामाणिकपणा...* *आणि विनयशीलता असेल...* *तर त्याची काही क्षण जरी सोबत मिळाली...* *तरी ती हवीहवीशीच वाटते...* *म्हणूनच बाहेर लक्ष दिव्याची सुंदर आरास असूनही,* *देवघरातील समईच्या तेजापुढं* *आपण नतमस्तक होतो...* *आयुष्यात अशी माणसं कधी भेटली तर...* *त्यांच्यावर जीवापाड प्रेम करावं...!* *आपल्या आवडत्या माणसाचं...* *आपल्यासोबत असणं...* *ही आयुष्यातील सगळ्यात मोठी कमाई...* *ती प्रत्येकाच्या वाट्याला येतेच असं नाही...* *आजकाल अशी माणसं भेटतात तरी कुठे ?* *नशिबानं कधी भेटलीच...* *तर हळुवार जतन करून ठेवावीत...* *कदाचित पुन्हा भेटतील न भेटतील...?* *माणूस बनुया,माणस जपुया,* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपण आपल्या दैनंदिन जीवनात काय केले आहे हे आपण जिथे नोंद करुन ठेवलेली असते.त्यात काल,आज आणि उद्या या तिन्ही काळाचा उलगडा केलेला असतो.आपण आपल्या जीवनात कसे वागलो आहोत त्याचीही नोंद केलेली असते.कधी आपल्याला विस्मरण झालेले असेल तर ते स्मरण करुन देण्याचे काम ती करते.आपण किती खरेखोटे जीवनात इतरांशी बोललो किंवा वागलो त्याचाही हिशोब ती आपणच नोंदवलेल्या शब्दांत आपल्यासमोर आरशासारखे काम करते.ती एक आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनलेली असते.तिला आपण कधीही विसरण्याचा प्रयत्न केला तरी विसरु शकत नाही.एवढे प्रेम ती आपल्यावर करते आणि आपण तिच्यावर करतो.ती आपल्याला आपल्या जीवनात सतत प्रेरणा देते आणि आपल्या जीवनाला तिला पाहून, वाचून सावरतो अशी प्राणप्रिय वस्तू म्हणजे डायरी अर्थात आपली रोजनिशी.जी माणसे जीवनात खरे यशस्वी होतात ती आपल्या जीवनात घडलेल्या, घडून गेलेल्या आणि घडणाऱ्या घटनांची सत्यतेची नोंद करतात आणि त्यासाठी ती डायरी अत्यंत मोलाचे काम करते.तीच आपल्यासाठी कोणत्याही काळात न बदलणारी,सत्य उलगडून आपल्यातील दोष दूर करण्यासाठी जाणीव करून देणारी खरी मैत्रीण असते ती आपल्या जीवनात असायलाच हवी नाहीतर आपल्या जीवनातले दुसरे कोणीही एवढे काम करणार नाही. © व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद..९४२१८३९५९०. 📚📝📚📝📚📝📚📝📚📝📚 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *राजा आणि संत* एका वनात दोन संत राहत होते. एकांतात आपल्‍या तपश्‍चर्येत लीन राहत होते. कधीतरी यात्रेकरूंचा जत्‍था जायचा तेव्‍हा ते संत त्‍यांच्‍याशी बोलत असत. त्‍याच यात्रेकरूकडून त्‍यांना तेथील राजास त्‍या संतांबाबत माहिती मिळाली. तो या दोघांना भेटण्‍यास निघाला. जेव्‍हा संतांना ही गोष्‍ट कळाली.तेव्‍हा त्‍या दोघांना वाटले की आता राजा येणार व त्‍याने आपला चांगूलपणा पाहिला तर तो आपणास सतत भेटण्‍यास येईल, त्‍याच्‍याबरोबर अनेक माणसे येतील, त्‍यां माणसांच्‍या संगतीने अजून काही माणसे येतील व अशाने या वनातील शांती भंग पावेल व एकांत मिळणार नाही व एकांत नसल्‍याने आपणास ध्‍यानसाधना करता येणार नाही. राजा आम्‍हाला दोघांना सामान्‍य माणूस समजेल असे काहीतरी केले पाहिजे. राजाचा लवाजमा तेथे पोहोचला तेव्‍हा राजाने पाहिले की ते दोघेही संत हातात लाठ्याकाठ्या घेऊन एकमेकांशी भांडत होते. पहिल्‍या संताने दुस-याला म्‍हटले,'' तू स्‍वत:ला कोण समजतोस, मी इतके ज्ञान मिळविले आहे की ते तू सात जन्‍मातही मिळवू शकणार नाही.'' दुसरा संत त्‍यावर म्‍हणाला,'' अरे तू तर पक्का खोटारडा आहेस, तुझ्या ज्ञानाच्‍या गप्पा मारून तू लहान मुलाला फसवू शकशील पण मला नाहीस. तुझ्यापेक्षा जास्‍त ज्ञान मी माझ्या शिष्‍यांना दिले आहे.'' राजाने व त्‍याच्‍याबरोबरच्‍या लोकांनी हे भांडण पाहिले व विचार करू लागले हे साधू संत तर सामान्‍य माणसाप्रमाणेच भांडत आहेत व त्‍यांनी सर्वांनी असल्‍या साधूसंतांचा संग नको म्‍हणून वनातून जाणेच पसंत केले. राजा व लोक जाताच दोन्‍ही संतांनी एकमेकांकडे पाहून मंदस्मित केले व गळाभेट घेतली. दोन्‍हीही साधू आपल्‍या साधनेत रममाण झाले. तात्‍पर्य : चांगली गोष्‍ट घडवून आणण्‍यासाठी कधीकधी असा देखावा करावा लागतो. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मानवी जनुकांचा नकाशा व जैविक रेणू* १९५३ साली डॉक्टर वॅटसन आणि क्रिक यांनी डीएनएची मुलभूत आण्विक रचना जगासमोर मांडली. त्यानंतरची सुमारे ५० वर्षे मानवी जनुकांचा शोध घेण्यात गेली. अत्यंत चिकाटीचे असे हे काम वैज्ञानिकांच्या आवाक्यात आले, आहे असे २६ जून २००० रोजी अमेरिकेचे अध्यक्ष बिल क्लिंटन यांनी जाहीर केले. हा दिवस शास्त्रज्ञांनी *'मानवी उत्क्रांतीचा सोनेरी अक्षरात लिहून ठेवण्यासारखा दिवस'* म्हणून साजरा केला. हे सारे काय आहे ? माणसाच्या शरीरात अब्जावधी पेशी असतात. प्रत्येक पेशीत सजीवातल्या 'प्राणांचे' अस्तित्व असते. प्रत्येक पेशी तेच तेच अन्न मिळवते व बिनबोभाट कामही करत राहते. प्रत्येक पेशीचे हे काम शिस्तीत आणि इतरांच्या जोडीने जनुकांच्या इशाऱ्यावर चाललेले असते, ज्या पेशीत विभाजनाची क्षमता असते, त्यांच्यातील केंद्रक हा गोलाकार भाग असतो. सूक्ष्म नळ्या व पापुद्रे यांनी बनवलेली कोशिकांगे पेशीत असतात. यांना 'ऑर्गॅनेल्स' म्हणतात. त्यांपैकीच एक म्हणजे सूत्रकणिका म्हणजे मायटोकॉंड्रिया. केंद्रक व सूत्रकणिकेत आपली जनुके म्हणजेच डीएनएचे (डीऑक्सि रायबोन्यूक्लिक अॅसिड) विशिष्ट तुकडे एका पातळशा पडद्याआड बंदिस्त असतात. शरीरातल्या सगळ्या पेशींच्या केंद्रांमध्ये डीएनएचा रेणू सारखाच असला, तरी तो ज्या पेशीत असतो, जी पेशी घडवणार असते, त्यानुसार त्याचे गुणधर्म प्रकट होतात. गर्भावस्थेच्या अगदी प्राथमिक स्थितीतच अवयवांचे अस्तित्व जाणवयाच्या आधीच साऱ्या पेशींनी आपापसात कोण बनायचे हे ठरवलेले असते. त्या पेशींची गर्भातली जागा आणि नियंत्रक जनुकांचा प्रभाव यानुसार पेशी ऊती अवयव संस्था शरीर बनते. त्यांमध्ये काही जनुके मुख्य बटणाची भूमिका बजावतात, तर काही विशिष्ट भागाच्या बटणाची. अशा पद्धतीत गर्भावस्थेपासून व त्यानंतरही असंख्य जनुकीय बदल नियंत्रितरित्या होतात व शरीराचे संवर्धन होत राहते. पेशींचे विभाजन होताना त्यांच्यातील डीएनए रेणूसुद्धा आपल्या दोन प्रती बनवतो. त्यातून पहिल्या पेशीचे सारे गुणधर्म दुसऱ्या पेशीकडे पोहोचतात. डीएनएचे घटक शरीररचनेतील अत्यावश्यक प्रतीने बनवतात. डीएनएमधील (एटीजीसी) अॅडीनाईड, थायमाइन, ग्वानाइन, सायटोसिन या चार रासायनिक घटकांच्या विशिष्ट क्रमवारीत आनुवंशिकतेचा सारा अर्थ सामावलेला असतो. अत्यावश्यक अमिनो अॅसिड अशा प्रथिनांचा विशिष्ट क्रम विशिष्ट प्रथिन बनवतो. हा बदलला वा चुकला, तर त्यातून बनणारे प्रथिन, पेशी, अवयव हे सारे दिसण्यात, वागण्यात बदलू शकते. डीएनएचा रेणू इतर काही घटकांबरोबर लांबलचक दोऱ्याच्या गुंडाळीसारखा मुडपून, दुमडून वेढे घेत रंगसूत्रांच्या (क्रोमोझोम) स्वरूपात केंद्रात आढळतो. माणसाच्या पेशीत प्रत्येकी ४६ रंगसूत्रे असतात. त्यातील २३ आईकडून तर २३ वडिलांकडून घेतल्यावर दोघांचीही जनुके मुलांच्या व मुलीच्या पेशीत येतात. अशाप्रकारे प्रत्येक पेशीतील ४६ रंगसूत्रे व त्यावरची २५ ते २७ हजार जनुके या साऱ्याला 'जीनोम' असे म्हटले जाते. समजा पुस्तकातील अक्षरांची उपमा द्यायची ठरवली तर हे २५ हजार अक्षरांचे पुस्तकच बनते. अक्षरांचा क्रम बदलला, तर अर्थ बदलतो, अर्थ बदलला तर अनर्थ होतो. म्हणजेच पेशीपासून बनलेले अवयव कमी प्रतीचे, चुकीचे काम करू लागतात. या बदलाला 'म्युटेशन' असे म्हणतात. ह्युमन जिनोम प्रोजेक्टमध्ये म्हणजेच जनुकांच्या नकाशामध्ये या प्रत्येक अक्षराची जागा त्याचे काम व त्याचे निरोगी अवस्थेतील सर्वसाधारण क्रम नोंदवला गेला आहे. यात बदल आढळला, तर तो डीएनएच्या चाचण्या करणाऱ्या प्रयोगशाळेत शोधता येतो. त्यातून आजाराचे, दोषांचे स्वरूप कळते. डीएनए चाचणी केल्यास अनुवंशिकतेच्या म्हणजेच जनुकांच्या वरून मुलाचे वडील व आई यांची निश्चिती करणे आता शक्य झाले आहे. हैदराबाद येथील प्रयोगशाळेत ही सोय झाली आहे. जनुकांचा नकाशा म्हणजे त्या त्या जिवांसंबंधातील एकत्रित संकलित संपूर्ण माहिती. कुठेही जपून ठेवता येण्याजोगी. जैविक रेणूंची बनलेली डीएनए व आरएनए म्हणजेच डीऑक्सीरायबो न्यूक्लिक अॅसिड व रायबोन्यूक्लिक अॅसिड हे प्रथिनांच्या साखळीने बनलेली असतात. जीवनाला आवश्यक अशी वीस अमायनो प्रथिने आहेत. याआधी पाहिलेल्या चारांचा (एटीजीसी) यात समावेश होतो. चयापचयाशी संबंधित प्राथमिक गोष्टींवर नियंत्रण व सहभाग हे त्यांचे सततचे काम. अन्नघटकातून आपण रोज त्यांची कमतरता भरून काढत असतो. या विसांपैकी कोणतेही एक कमी पडले, तर विशिष्ट लक्षणे सुरू होतात व आजाराला निमंत्रण मिळते. आरएनएचे काम पेशीतील प्रथिनांचा संचय राखणे हे असते. प्रत्येक जैविक रेणूमध्ये अमायनो घटक (-NH2) समूह व कार्बोक्झिल समूह (-COOH) असे असतात. अमायनो अॅसिडच्या रेणूंच्या साखळीने प्रीथिने बनतात. या साखळीतील छोटेमोठे असंख्य असे हजारांहून जास्त घटक असू शकतात. जी प्रथिने निव्वळ अमायनो अॅसिड बनतात त्यांना साधी सिंपल प्रथिने म्हणतात, तर अन्य बहुतेक कर्बोदके, फाॅस्फेट्स यांच्या बरोबरची संयुगे असतात. *'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

http://www.livemaharashtra.com/news_details.php?id=987

http://worldmediaorganization.weebly.com/wmo-india-blog/2188523 *जालनाजिल्हा ब्युरोचीफ :- राम किसन बोडखे* *वर्ल्ड मिडिया न्यूज़ चैनल अँड वेब पोर्टल*

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00          ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 20/12/2019 वार - शुक्रवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आंतरराष्ट्रीय मानवी एकता दिवस* *संत गाडगेबाबा पुण्यतिथी* 💥घडामोडी ● १५२२ - नाइट्स ऑफ ऱहोड्सची सुलेमान द मॅग्निफिसन्टपुढे शरणागति. जीवनदान मिळालेले हे सरदार माल्टात वसले व नाइट्स ऑफ माल्टा म्हणून प्रसिद्ध झाले. ● १८०३ - लुईझियाना खरेदी पूर्ण. ● १९४५-मुंबई-बंगलोर प्रवासी विमानसेवा सुरू. 💥जन्म ● १५३७ - जॉन तिसरा, स्वीडनचा राजा. ● १९४२-राणा भगवान दास,पाकिस्तानातील पहिले हिंदू मुख्य न्यायाधीश 💥मृत्यू ● २१७ - पोप झेफिरिनस. ● १९५६-डेबूजी झिंगराजी जानोरकर उर्फ संत गाडगेबाबा ● १९९६: बलुतंकार दलित लेखक दगडू मारुती तथा दया पवार *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *पुरवणी मागण्यांवर मतदानाच्या मागणीची विरोधकांची हुल आणि सत्ताधाऱ्यांची उडाली धावपळ, सभागृहात तळ ठोकून बसणाऱ्या अजित पवारांनी आलेल्या नवख्या आमदारांची शाळा घेतली तर काही ज्येष्ठ आमदारांना आल्याबद्दल हात जोडून आभार मानले.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *शिवाजीराव गर्जे आणि अदिती नलावडे राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेवर, राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून आज शपथ घेणार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधातील आंदोलनांमुळे संपूर्ण दिल्लीत 144 कलम लागू करण्याचे आदेश, लाल किल्ला, जामा मशीद, चांदनी चौक येथे जमावबंदी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांच्याविरोधात महाभियोगाचा पहिला प्रस्ताव खालच्या संसदेत 230 वि 197 मतांनी पास झाला* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *आज डिजिटल माध्यमांमुळे प्रत्येकाला मोठा उद्योगपती होण्याची संधी : माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांचे प्रतिपादन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *नांदेडमध्ये मोठा शस्त्रसाठा जप्त, पोलिसांना सापडल्या 25 तलवारी ही शस्त्रे नेमकी कशासाठी आणली होती आणि कुणाला विक्री केली जात होती त्याचा पोलीस आता तपास करत आहेत. त्यातून महत्त्वाची माहिती हाती लागेल अशी शक्यता व्यक्त केली जातेय.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *IPL 2020 : लोकेश राहुलचं प्रमोशन, पंजाबच्या कर्णधारपदी नियुक्ती, सह-मालक नेस वाडीया यांची माहिती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••              प्रतिलिपी डॉट कॉम वरील स्पर्धा गत आठवणीचा हिंदोळा मधील लघूकथा           *लहानपण देगा देवा* वीस-पंचवीस वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्या काळात कोणाच्या घरी लाइट नव्हते तर टीव्ही दुरची गोष्ट. रेडियो नावाची चालती बोलती वस्तू मात्र घरोघरी दिसून यायची. आकाशवाणी केंद्रचे अनेक चाहते होते. मात्र टीव्हीचे दिवाने अगणित होते. पण बघायला कुठे मिळायचे. ते दिवस आजही जशास तसे आठवते. टीव्ही वर दर रविवारी *रामायण* मालिका चालू झाली होती. गावात कुणाकडे ही टीव्ही नव्हती तेंव्हा तीन ........ वरील कथा पूर्ण वाचण्यासाठी खालील प्रतिलिपीच्या लिंक वर वाचन करावे आणि आपल्या मित्रांपर्यंत share करावे. https://marathi.pratilipi.com/na-sa-yevtikar-nasa/lahanpan लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *अश्फाकउल्ला खान* अश्फाकउल्ला खान यांच्यासारखा ध्येयवेडा क्रांतीकारक आपण कल्पना करू शकणार नाही अशा आनंदाने फाशी गेला.फाशीच्या एक दिवस आधी ते छानपैकी हसून हसून गप्पा मारत होते आणि भेटणार्यांना म्हणायचे , मित्रांनो, उद्या माझ लग्न होणार." दुसर्‍या दिवशी सकाळी त्यांना लवकर उठवण्यात आलं, फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी थोड्याच वेळात होणार होती , मरणाच्या उंबरठ्यावर असूनही त्यांच कवीमन नदीच्या पाण्यासारखं निखळ होत. तेवढ्या क्षणातसुद्धा त्यांनी काही शेर लिहून ठेवले होते , त्यापैकी एक असा , "फनाह है हम सबके लिए, हम पै कुछ नही मौकूफ ! वफा है एक फकत जाने की ब्रिया के लिए ॥ (अर्थ : नष्ट तर सगळेच होणार आहेत, फक्त आम्ही एकटे थोडेच आहोत.न मरणारा तर केवळ एक परमात्मा आहे.) अश्फाकउल्ला खान यांचे सहकारी आणि आदर्श रामप्रसाद बिस्मिल हे सुद्धा अचाट प्रतिभेचे कवी होते. काकोरी कटाचे प्रमुख म्होरक्या म्हणून त्यांच्यावर खटला चालवला गेला, तसे ते फार शिकलेले नव्हते पण मुख्य कोर्टात आपल अपील त्यांनी स्वतःच लिहिल होतं. ज्यावेळेस त्यांना फाशीच्या तख्तावर उभ करण्यात आलं त्यावेळेस ते म्हणाले - I wish the downfall of the British Empire. (ब्रिटिश साम्राज्याचे पतन हीच माझी सर्वात मोठी ईच्छा आहे) अश्फाक यांचा जन्म २२ ऑक्टोबर १९०० चा...चार भावंडांमध्ये सर्वात लहान त्यामुळे थोडे लाडके... घरची परिस्थिती उत्तम..सुखवस्तू असलेल्यांपैकी... महाविद्यालयीन दिवसांत १९२२ मध्ये त्यांचा संबंध रामप्रसाद बिस्मिल यांच्याशी आला. दोघेही चांगले मित्र होतेच पण बरोबर उत्तम उर्दू शायर देखील होते.राम प्रसाद हे टोपणनाव (तखल्लुस) 'बिस्मिल' तर, अशफाक 'वारसी' आणि नंतर 'हसरत' या उपनावाने लिहायचे... 'काकोरी कटाची' योजना दोघांच्या नेतृत्वाखालीच पार पडली आणि कटात दोषी आढळल्यामुळे दोघांना एकाच तारखेला, दिवशी आणि एकाच वेळी फाशी दिली गेली... केवळ जेल वेगळे (फरिजाबाद आणि गोरखपुर) देशाच्या स्वातंञ्यासाठी आपल्या कुटुंबकबिल्याचा त्याग करून तेवत असणाऱ्या धगधगत्या अग्निकुंडात सर्वस्व अर्पण करणार्‍या या सच्च्या क्रांतीकारकांना एक त्रिवार कुर्निसात...! *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *" घटनांना विचारांचे स्वरुप देणे हे वाङमयाचे कार्य आहे. "* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *बारडोली सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले ?* सरदार वल्लभभाई पटेल 2) *मराठीतील पहिले मासिक कोणते ?* दिग्दर्शन 3) *राज्यसभेचे सदस्य कोणत्या पद्धतीने निवडले जातात ?* प्रमाणशीर प्रतिनिधित्व 4) *'सिद्धांत शिरोमणी व लिलावती' या ग्रंथाचा कर्ता कोण ?* भास्कराचार्य ( गणित शास्त्रज्ञ ) 5) *कृत्रिम रेशमास कोणत्या नावानेही ओळखले जाते ?* रेयान *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 शंकर हासगुळे, सहशिक्षक, बिलोली 👤 पल्लवी टेकाळे, कुपटी, माहूर 👤 परमेश्वर नन्नवरे, सहशिक्षक, उस्मानाबाद 👤 विठ्ठल नरवाडे, सहशिक्षक, धर्माबाद 👤 गजानन मुडेले, देगलूर 👤 सोपान हेळंबे, उमरी *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• . *"गेले द्यायचे राहून,* *तुझे नक्षत्रांचे देणे !* *माझ्यापास आता कळ्या,* *थोडी ओली पाने !!"* *पाने ओली असेतोवरच ती देण्याघेण्यात मजा आहे. कोरडी पाने कुरकुरतात. माणसाच्या आयुष्यात प्रत्येक टप्याचा एक वेगळा 'गोडवा' आहे.* *बालपण कसे टिपूर टिपूर निरागसतेने भरलेले, पौगंडावस्थेत अदमु-या कुतूहलाचे काहूर, तारूण्यात भन्नाट मस्ती, चाळीशीत पोक्त पालवी, पन्नाशी हा फळे चाखायला सुरूवात करण्याचा काळ, साठीनंतरचे आयुष्य म्हणजे सेकंड इनिंग खरेतर बोनसच. त्यासाठी लागणारी तंदरूस्ती टिकवावी लागते. यातही 'दैवं चैवात्र पंचम'नामे घटक असतो, त्याने प्रभाव दाखवल्यास सगळेच देणे-घेणे राहून जाते, विशेषत: घेणे. 'दिल अभी भरा नही' सिच्यूएशनला भरल्या ताटावरून, भरल्या घरातून, रंगल्या मैफलीतून उठून जाणा-यांची 'वही कोरीच' राहते.* ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●•• 🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो* *थोडक्यात पण खूपच अर्थपूर्ण* *पाणी आयुष्यभर झाडाला मोठं* *करत...* *म्हणूनच कि काय पाणी लाकडाला कधीच बुडू देत नाही...!* *अगदि आपल्या आई-वडीलांसारख....!!* *याकरिता* *चार चौघात आई बापाची मान खाली झुकु नये असे लेकीने जगावं* *आणि* *आई वडिलांना कुणापुढे हात पसरायची वेळ येऊ नये अस मुलाने जगावं* *तुमच्याबद्दल कुणी वाईट बोलत असेल,तर तो आशीर्वाद समजा* *तुमची कुणी स्तुती करत* *असेल,तर ती प्रेरणा समजा* *तुमच्यावर कोणी खोटेनाटे* *आरोप करत असेल,तर ती तुमच्या सत्याची ताकद समजा* *अकारण कोणी तुमच्या* *मार्गात आडवे येत असेल,तर ती तुमच्या मार्गाची* *साफसफाई समजा* *उगाचच तुमच्याशी असलेले* *नाते कोणी तोडत असेल,तर तो तुमच्यातल्या नम्रतेचा विजय समजा* *तुमच्या सद्वर्तनाची कसोटी लागते तेव्हा तुम्ही योग्य मार्गावर आहात असे समजा.* *चांगले काम करणाराच्या मार्गात* *अडथळे असणारचं..* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• तुमच्या आशारुपी पंखांना खूप पसरु द्या.कारण तेच पंख तुमच्या आशा पूर्ण करण्यासाठी मदत करतात.त्यांना जर संकुचित वृत्तीने तुमच्याच मनामध्ये जवळ करुन ठेवलात तर तुमच्या मनातल्या असलेल्या इच्छा पूर्ण कशा होतील ? त्यापेक्षा त्या पंखामध्ये आत्मविश्वासरुपी बळ निर्माण करुन त्यांना नवे काहीतरी करण्यासाठी पसरु द्या म्हणजे तुम्हाला आनंदाने आणि समाधानाने जीवन जगण्यासाठी संधी निर्माण करुन देतील. पक्षी आकाशात स्वच्छंदपणे विहार करतात ते पंखाच्या बळावरच ना ! मग पंखच पसरले नसते किंवा एखादी बाजू पंख विरहित असली तर कसे बरे आकाशात विहार करु शकले असते नाही ना ? मग तसेच मानवी जीवनाचे आहे. आशारुपी पंखांचे तसेच आहे त्यांनाही थोडे स्वातंत्र्य द्या आणि जीवनरुपी आकाशात स्वच्छंदपणे विहार करायला प्रेरणा द्या. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद...९४२१८३९५९०. 🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *पारंगत* खूप वर्षापूर्वी रामपूर गावात एक आंधळा माणूस राहात होता. तो कोणत्याही पक्ष्यांला, प्राण्याला हात लावून तो कोणत्या प्रकारचा प्राणी आहे हे ओळखण्यात तो फार हुशार आणि प्रसिद्ध होता. एकदा एका माणसाने एक लांडग्याचे पिलू त्याच्याकडे परीक्षेसाठी आणले. आंधळ्याने त्याला जवळ घेऊन अंग चाचपून पाहिले, पण त्याची नीट परीक्षा त्याला झाली नाही. मग तो थट्टेने त्या लांडग्याच्या पोराला म्हणाला, 'अरे, तू कुत्र्याचं पिलू आहेस की लांडग्याचं हे मी खात्रीपूर्वक सांगू शकलो नाही, तरी तुला मेंढराच्या कळपात सोडण्याचा सल्ला मी कधीही देणार नाही.!' *तात्पर्य :- सुंदर जरी गाढवाचे पोर दिसले तरी त्याचा गाढवपणा कधीही लपत नाही.* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00          ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 19/12/2019 वार - गुरूवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *स्वातंत्र्य दिन - झांझिबार* *गोवा मुक्ती दिन* 💥 ठळक घडामोडी :- ● १९६१ - भारताने दमण आणि दीवचा ताबा घेतला.गोवा मुक्ती दिन. ● २००१ - व्यंगचित्रकार आर.के. लक्ष्मण यांच्या 'कॉमन मॅन'च्या पुतळ्याचे पुणे येथे अनावरण. 💥 जन्म :- ● १९६९ - नयन मोंगिया भारतीय क्रिकेटपटू. ● १७७८ - मरी तेरीस शार्लट, फ्रांसचा राजा लुई सोळावा व मरी आंत्वानेतची पहिली मुलगी. ● १९७४ - रिकी पाँटिंग, ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- ● १९५३ - रॉबर्ट अ‍ँड्र्युज मिलिकान ,नोबेल पारितोषिक विजेता. ● १९९८ - छ्यान चोंग्शू, चिनी भाषेमधील लेखक, अनुवादक. ● २०१० - गिरीधारीलाल केडिया, भारतीय उद्योगपती. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांचा मशाल मोर्चा, खा. सुप्रिया सुळेही सहभागी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *चंदा कोचर यांच्या बडतर्फीला दिलेली परवानगी कायदेशीरच, आरबीआयची हायकोर्टात माहिती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *मराठी साहित्यकार अनुराधा पाटील यांच्या कदाचित अजूनही या काव्य संग्रहाला यंदाचा साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालय शाळा कृती समितीतर्फे काढण्यात आलेल्या मोर्चाला अर्थमंत्री जयंत पाटील यांच्याकडून ठोस आश्वासन न मिळाल्यामुळे कडक थंडीत शिक्षकांनी मॉरिस कॉलेज टी पॉइंटवर ठिय्या आंदोलन सुरू केले.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *पुणेः नटसम्राट डॉ. श्रीराम लागू यांच्या पार्थिवावर शुक्रवारी होणार अंत्यसंस्कार, डॉ. लागू यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचे राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने काढले आदेश* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *वेस्ट इंडिजविरुद्ध विशाखापट्टणम येखील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात कुलदीप यादवने हॅटट्रीकची नोंद केली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दोनदा हॅटट्रीक नोंदवणारा कुलदीप ठरला पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *विशाखापट्टणम : भारताने विशाखापट्टणम् एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजवर १०७ धावांनी दणदणीत विजय मिळवत तीन सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. कटक येथे होणारा मालिकेतील तिसरा सामना आता निर्णायक ठरणार आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••             *शिक्षकांना स्वातंत्र्य हवं* http://nasayeotikar.blogspot.com/2019/11/blog-post_81.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• " एकदा एका मोठ्या ऑटोमोबाईल कंपनीचा मालक आपल्या अति महत्वाच्या उच्च अधिकाऱ्यांबरोबर , एका ठिकाणी तातडीच्या मिटिंग ला निघाला होता . . मोठी आलिशान गाडी होती . आणि प्रवास साधारण तीन चार तासाचा होता . सर्वजण सकाळी लवकर निघाले होते . . गाडी वाटेत आल्यावर . . गाडीच्या ड्रायव्हर ला लक्षात आले कि मागील एक चाक पंक्चर आहे , त्याने ती गाडी एका बाजूला घेतली . आणि सर्वाना उतरायला सांगितले . सर्वजण तसे खुश झाले कारण सगळे सकाळीच निघाल्याने आणि मध्ये न थांबल्याने ब्रेक हवाच होता . मालक आणि बाकी सर्वजण उतरून इकडे तिकडे गेले . कोणी जवळच्या धाब्यावर सिगारेट ओढू लागले . कोणी झुडुपाआड गेले . . अर्ध्यतासाने सर्वजण एका ठिकाणी एकत्र जमले पण सर्व टीम एकत्र आली मात्र मालक नाही दिसले . सगळे जण शोधायला लागले पण कुठे दिसेना . दहा मिनिटानी सर्वजण जिथे गाडी पंक्चर झाली होती तिथे जमले तर , मालक हातात स्पॅनर घेऊन . . शर्टाचे हात कोपरापर्यंत दुमडून . . घामेघूम होऊन . . चेहऱ्यावर मंद स्मित ठेवून ड्रायव्हर ला स्टेपनी चे चाक हातात घेऊन मदत करताना दिसले . . आणि तिथेच पहिला धडा सर्व उच्च अधिकार्यांना मिळाला . " थोर व्हायला . . . तुम्हाला जमिनीवर उतरून काम करावे लागते आणि जमिनीवरील प्रॉब्लेम माहित असावे लागतात . नुसते आदेश सोडून अधिकारी बनतात . . . मालक नाही होता येत . " . त्या उद्योपतीचे मालकाचे नाव . . " श्री. रतन टाटा " . . नाशिक येथे नेल्को ची टीम घेऊन जाताना प्रत्यक्ष घडलेला प्रसंग . . संदर्भ : The Habit of Winning *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *" कोणत्याही गोष्टीची उणीव भासल्याखेरीज तिची खरी किंमत कळत नाही. "* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1)  *मोगलांची राज्यकारभाराची भाषा कोणती होती ?*         पर्शियन 2)  *'समाजवाद' या शब्दाचा वापर सर्वप्रथम कोणी केला ?*         रॉबर्ट ओवेन 3)  *'मुंबई हाय' हे नाव कोणत्या उत्पादनाशी संबंधित आहे ?*          खनिजतेल 4)  *'मी म्हणजे राज्य होय' असे कोणी म्हटले होते ?*         फ्रान्सचा राजा 14 वा लुई 5)  *'रेडक्रॉस' या संघटनेची स्थापना कोणी केली ?*         जे. एच. डूनांट *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*         👤 संजय हरणे, सहशिक्षक, माहूर 👤 शंकर जाजेवार, येताळा 👤 सुभाष चिखले पाटील, औरंगाबाद *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• . *"गेले द्यायचे राहून,* *तुझे नक्षत्रांचे देणे !* *माझ्यापास आता कळ्या,* *थोडी ओली पाने !!"* *पाने ओली असेतोवरच ती देण्याघेण्यात मजा आहे. कोरडी पाने कुरकुरतात. माणसाच्या आयुष्यात प्रत्येक टप्याचा एक वेगळा 'गोडवा' आहे.* *बालपण कसे टिपूर टिपूर निरागसतेने भरलेले, पौगंडावस्थेत अदमु-या कुतूहलाचे काहूर, तारूण्यात भन्नाट मस्ती, चाळीशीत पोक्त पालवी, पन्नाशी हा फळे चाखायला सुरूवात करण्याचा काळ, साठीनंतरचे आयुष्य म्हणजे सेकंड इनिंग खरेतर बोनसच. त्यासाठी लागणारी तंदरूस्ती टिकवावी लागते. यातही 'दैवं चैवात्र पंचम'नामे घटक असतो, त्याने प्रभाव दाखवल्यास सगळेच देणे-घेणे राहून जाते, विशेषत: घेणे. 'दिल अभी भरा नही' सिच्यूएशनला भरल्या ताटावरून, भरल्या घरातून, रंगल्या मैफलीतून उठून जाणा-यांची 'वही कोरीच' राहते.* ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●•• 🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रानो* *थोडं सकारात्मक...* *स्वतः ला रोज सांगा,आजचा दिवस सुंदर आहे.मी रोज जे काही करतो* *किंवा मला वाटते त्यापेक्षा मी बरेच काही करू शकतो.... नुसती* *काळजी आणि दुःख करुन काहीच होणार नाही. मी स्वतःला* *झोकून प्रयत्न केले तर मी नक्कीच समाधानी होईन.रोजच असे* *क्षण असतात जे आनंदाने भारलेले असतात. आज मी स्वतः* *आनंदी राहीन आणि इतरांनाही आनंद देईन.जीवन सुंदर आहे आणि मी ते* *_अजुन सुंदर करणार आहे. येणारे दिवस आनंदाने* *जगणार._* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जीवनाच्या अनेक रंगमंचावर बहुरुपी होऊन अनेक पात्र साकार करण्यासाठी आपल्या आत्मविश्वासाची गरज लागते तेव्हा कुठे जीवनाची अनेक पैलू सहजपणे साकारता येतात.कधी गरिब तर कधी श्रीमंत व्हावे लागते तर कधी दु:ख आणि सुख सहन करुन जगासमोर भाव चेहऱ्यावर आणावे लागतात तर कधी एकाकीपणे जीवन जगण्याची आशा दृढ करावी लागते.अनेक जीवनातल्या नवरसांचे रसायन रंगमंचावर आपल्या अभिनयाने सादर करावे लागतात.अशा अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असणाऱ्या च व्यक्ती जीवन जगू शकतात.ज्यांना जमत नाही ती व्यक्ती जीवनातल्या रंगमंचामागील पडद्यामागचे जीवन जगतात त्यांचे कोणतेच रंग इतरांना दिसत नाही अर्थात त्याचे जीवन रंगहीन,रसहीन आणि उदासीन जीवन जगल्यासारखेच आहे.म्हणून जीवनाच्या प्रत्येक रंगमंचावर आत्मविश्वासाने पात्र साकारण्याची नेहमी तयारी ठेवायला शिकले पाहिजे तरच जीवनाला खरा अर्थ आहे अन्यथा जीवन व्यर्थच समजावे. © व्यंकटेश काटकर,नांदेड संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🦋🍃🦋🍃🦋🍃🦋🍃🦋🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *कर्म पूजा* एकदा एक बाई रामकृष्ण परमहंसाकडे आल्या आणि म्हणाल्या , " मला या संसाराचा विट आला आहे . मुलं मोठी झाली. आता प्रपंच सुटेल असे वाटले . पण नातवंडांच्या प्रेमात पडले . रोज त्याला सांभाळावे लागते . तेव्हा आता घर सोडायचा विचार आहे . " रामकृष्णांनी विचारले , " घर सोडून तुम्ही काय करणार ? " त्या बाई म्हणाल्या , " गंगेच्या तीरावर एक झोपडी बांधणार . त्यात श्रीकृष्णाची मूर्ती बसविणार . रोज त्या मूर्तीची पूजा करणार . कृष्णाला नेवैद्याने जेवू घालणार . कृष्णाला झोपेतून उठविणार, आंघोळ घालणार . " परमहंसांनी विचारले , " श्रीकृष्णाची मूर्ती दगडाची असणार न ? " तेव्हा त्याबाई ' हो ' म्हणाल्या . रामकृष्णांनी विचारले , " आपण दगडाच्या मूर्तीत श्रीकृष्ण पाहणार ? " त्या बाई ' हो ' म्हणाल्या . त्यावर रामकृष्ण म्हणाले . " आपण दगडाच्या मूर्तीत श्रीकृष्ण पाहणार , मग नातवंडामध्ये श्रीकृष्ण का पाहत नाहीत ? श्रीकृष्ण समजून नातवंडाला जेवू घाला. श्रीकृष्ण म्हणून आंघोळ घाला. श्रीकृष्ण म्हणून त्याला झोपवा. " तुम्ही तुमच्या नातवंडानाच तुमचा श्रीकृष्ण समजून वागा. मनातला भाव चांगला ठेवा. म्हणजे तुम्हाला सर्वत्रच भगवंत दिसेल आवश्यक नाही मुर्तीतच देव पाहणे.तुम्ही तुमच्या नित्यकर्मात पण देवाचे दर्शन घेऊ शकता. *तात्पर्य : नित्य कर्मामध्ये भगवतभाव ओतला की ते कर्म नाम साधनेच्या दर्जाचे होते व तेच कर्म पूजा ठरते.* *'कर्मे ईशू भजावा.'* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

चारोळी (दि.१८-१२-२०१९) मनःलहरी प्रगतीचा मार्ग दाखवती मनःलहरी माझा स्पंदनातील, प्रयत्न मजला करावे लागते यशस्वी ध्येयाचा उंचीचा कळस गाठण्याचा 〰〰〰〰〰〰 प्रमिलाताई सेनकुडे ता.हदगाव जिल्हा नांदेड .

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00          ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 18/12/2019 वार - बुधवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *अल्पसंख्याक हक्क दिन* *आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिन*     *प्रजासत्ताक दिन - नायजर.* 💥 ठळक घडामोडी :-  ◆ २०१२ - पुण्यात इमारतीचे बांधका करीत असताना छत कोसळून १३ कामगार ठार. ◆ २००६: संयुक्त अरब अमिरातींमध्ये (UAE) प्रथमच निवडणूका घेण्यात आल्या. 💥 जन्म :- ◆ १८५६ - सर जे.जे. थॉमसन, नोबेल पारितोषिक विजेता इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ. ◆ १९७१ - बरखा दत्त, भारतीय पत्रकार. ◆ १९७१ - अरांता सांचेझ व्हिकारियो, स्पेनची टेनिस खेळाडू. ◆ १८९०: एफ. एम. रेडिओचे संशोधक ई. एच. आर्मस्ट्राँग यांचा जन्म 💥 मृत्यू :-  ◆ १९९३: चित्रपट दिग्दर्शक राजा बारगीर ◆ १९९५: राष्ट्रीय कीर्तनकार कमलाकरबुवा औरंगाबादकर ◆ २०००: इतिहास संशोधक, वैदिक संस्कृतीचे अभ्यासक मुरलीधर गोपाळ तथा मु. गो. गुळवणी ◆ २००४: भारतीय क्रिकेटपटू आणि माजी कर्णधार विजय हजारे *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *बेकायदेशीर स्कूल व्हॅन्सविरोधात पोलिसांची राज्यभरात मोहिम राबवण्यात येत आहे. गेल्या पंधरा दिवसांत 1502 वाहनांवर कारवाई, 614 वाहनं जप्त तर 41 लाख 66 हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *अपघातांची वाढती संख्या, बसचे बिघडलेले वेळापत्रक, अस्वच्छता इत्यादी कारणांमुळे एसटीच्या शिवशाही वातानुकूलित बसकडे प्रवासी पाठ फिरवू लागले आहेत. मुंबई, पुणे प्रदेश वगळता अन्य शहरांत शिवशाहीला प्रवाशांकडून अल्प प्रतिसाद मिळत असून प्रति किलोमीटर ३ रुपये तोटा एसटीला सहन करावा लागत आहे* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) अनुत्तीर्ण असलेल्या राज्यभरातील शिक्षकांची सेवा समाप्त करण्याच्या अवर सचिवांच्या आदेशाची प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून अद्याप कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे प्राथमिक शिक्षण संचालनालय टीईटी अनुत्तीर्ण शिक्षकांना का पाठीशी घालत आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *वसंत आबाजी डहाके यांना महाराष्ट्र फाउंडेशनचा जीवनगौरव, केरळमधील कोझिकोडे येथील केरळ शास्त्र साहित्य परिषद या संस्थेला डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती पुरस्कार जाहीर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *आपल्या नैसर्गिक अभिनयाच्या बळावर मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवणारे चतुरस्त्र अभिनेते, मराठी रंगभूमीचा अनभिषिक्त नटसम्राट, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. श्रीराम लागू यांचं वृद्धापकाळाने झाले निधन झालं. ते ९२ वर्षचे होते* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *एकूण अर्थसंकल्पापैकी शैक्षणिक अर्थसंकल्पाची टक्केवारी ही 2008- 2009 साली 5.4 टक्के होती. ती 2019-20मध्ये जवळपास दुप्पट म्हणजे 9.5 टक्के झाली. मात्र अर्थसंकल्पचा टक्का जरी वाढला असला तरी दुसरीकडे 10 वर्षात विद्यार्थ्यांची संख्या 33 टक्के इतकी कमी झाल्याची माहिती समोर आली आहे* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *मुंबई : रणजी करंडकाच्या दुसऱ्या फेरीला आजपासून सुरुवात झाली. दुसऱ्या फेरीत आज पहिल्याच दिवशी विदर्भ आणि महाराष्ट्रानं वर्चस्व गाजवलं. विदर्भाच्या फलंदाजांचा दबदबा, कर्णधार फैझ फझलच्या दमदार शतकाच्या जोरावर विदर्भानं राजस्थानविरुद्ध पहिल्या दिवसअखेर 4 बाद 288 धावांची मजल मारली आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        *पालकांनी मुलांकडे लक्ष द्यावे* http://nasayeotikar.blogspot.com/2019/11/blog-post_29.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *मरूउद्यान (Oasis)* 📙 अफाट पसरलेल्या वाळवंटात अचानक एखादा हिरवागार टापू आढळतो. खजुराची झाडे, खुरटी हिरवी झुडपे, थोडीफार शेती व त्याला धरुन असलेली वस्ती माणसे आणि पाळीव प्राणी यांनी तेथे सुखाने वस्ती केलेली आढळते. या सगळ्याचे मोठे आश्चर्य येथे प्रथमच आलेल्याला वाटत राहते. पण तेथे राहत असलेल्यांना हे सारे नैसर्गिकच वाटत असते. त्यांच्या दृष्टीने या जागी त्यांना पाणीपुरवठ्याची कधीच अडचण वाटत आलेली नसते. या जागांना मरूउद्याने किंवा ओअॅसिस असे म्हणतात. वाळवंटातील हिरवळीचा भाग असेही याचे वर्णन करता येईल. येथील पाणीपुरवठा हा पावसावर अजिबात अवलंबून नसतो. दूरवरून येणारे पाण्याचे खोलवरचे प्रवाह येथे एक तर तळ्याच्या स्वरूपात वर येतात किंवा विहिरीच्या स्वरूपात पारंपरिकरित्या ज्ञात असतात. त्यामुळे या आसमंतात अजिबात पाऊस न पडला, तरीही येथील पाण्याचा साठा कायम राहतो. अर्थात याला मर्यादा आहेच. पण ही मर्यादा आपोआपच पाळली जाते. कारण येथील वस्तीत वाढ फारच क्वचित होते. शेती हे येथील उत्पन्नाचे व जीविताचे साधन सहसा नसल्याने पाण्याचा वापर त्याही कारणाकरता फार केला जात नाही. कापूस, फळभाज्या, बाजारी यांचे थोडेफार उत्पन्न या भागात घेतले जाते. मरूउद्यानांचे महत्त्व आजकालच्या यांत्रिक युगात तितकेसे जाणवणार नाही. कारण संपूर्ण वाळवंट काही तासांमध्ये यांत्रिक पद्धतीने पार करता येते. पण जेमतेम गेल्या शतकापर्यंत हा भाग पार करणे म्हणजे एक जीवावरचीच कसरत असे. महिनोनमहिने प्रवास करत वाळूची वादळे, विषम हवामान याला तोंड देत जाताना बव्हंशी रस्ते मरूउद्यानांना जोडत पार केले जात. भारतातील कच्छच्या रणात वा थरच्या वाळवंटात अशी अनेक छोटी छोटी मरूउद्याने सापडतात. जैसलमेर, जोधपूर, बिकानेर ही शहरेही अशा पाण्याच्या आधारानेच वसत गेली आहेत. सहारा वाळवंटातही अशी मरूउद्याने आहेतच. काही ठिकाणी तर विश्वास बसू नये, अशी विस्तीर्ण तळी पाण्याचा साठा राखून आहेत. मरूउद्याने आटण्याचे प्रकार घडतात, ते यांत्रिक पद्धतीने पाणी उपसा केल्याने. एकाच वेळी ठिकाणी अनेक विंधनविहिरी घेऊन यांत्रिक पाणी उपसा केल्याने हा प्रकार गेल्या पाच पंचवीस वर्षांत घडत आहे. दुसरे कारण म्हणजे झाडांची वाढती संख्या. यावर नियंत्रण न ठेवल्यामुळे खोलवर जाऊन पाणी तेथेच शोषू लागतात. वाळूची वादळे फार मोठ्या प्रमाणावर झाल्यास येथील पाणवठ्याच्या जागेत त्याचे थर जमू शकतात. या थरांची वेळीच देखभाल होऊ शकली नाही, तरीही मरुउद्याने धोक्यात येतात. जीवनातही खडतर प्रवासात ज्यावेळी एखादा आनंदाचा, विसाव्याचा क्षण मिळतो, तेव्हा त्याला आपण ओअॅसीसची उपमा सहजपणे देतो. दूरवरून उन्हातून आलेला, तहानलेला प्रवासी गरम बाजारीची भाकरी, ताजी भाजी, खजूर व दूध यांचा आस्वाद सावलीला बसून घेतो, तेव्हा त्यालाही अगदी अशीच अंतीव आनंदाची भावना होते. *'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *" कोणतीही विद्या, ज्ञान कधीच वाया जात नाही. "* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *1) 'एक झाड दोन पक्षी' हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?* विश्राम बेडेकर *2) कोणत्या मुघल राज्यकर्त्याने अमृतसरचे सुवर्णमंदिर बांधण्यासाठी जमीन दिली ?* अकबर *3) जगातील सर्वात मोठे अणुऊर्जा केंद्र कोणते ?* फुशियाना ( जपान ) *4) पुणे करारावर कोणी स्वाक्षरी केली ?* डॉ बाबासाहेब आंबेडकर *5) नैसर्गिक रबर अधिक लवचिक व मजबूत बनविण्यासाठी त्यामध्ये कशाचा वापर केला जातो ?* सल्फर *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 रवी यमेवार, धर्माबाद 👤 विजयकुमार भंडारे, सहशिक्षक 👤 उदयराज कोकरे *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *ज्या महापुरूषांनी आपलं कर्तृत्व सिद्ध केले आहे, ज्यांनी समाजासमोर आपले आदर्श उभे केले आहेत, ज्यांच्या विचारांनी समाजाला दिशा आणि गती मिळाली. अशा महापुरूषांचे पुतळे आपण उभे करतो किंवा केले आहेत. त्यांच्या विचारांची एक रेष पुसण्यासाठी ताकद न काळात असते न व्यवस्थेत. अर्थात, या पदापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी त्यांच्या आयुष्याची पुरेपूर किमंत मोजलेली असते. शाळा-महाविद्यालय तथा विद्यापीठीय पदव्यांची भेंडोळी त्यांनी मिळवलेली नसते. त्यांनी ज्या परिक्षा दिलेल्या असतात; जे पेपर सोडवलेले असतात; ते सामान्यांच्या आवाक्याबाहेरचे असतात.* *त्यांचा व्यासंग, त्यांची साधना, त्यांचा त्याग, त्यांची सेवा, त्याचं कर्तृत्व यामुळे त्यांनी गगनाएवढी उंची गाठलेली असते. मात्र, त्यांना एका झटक्यात आपण दगडाचा पुतळा करून खुजं करून टाकतो. याचं भान जसं आपल्याला नसतं, तसंच त्यांनी उभ्या केलेल्या मूल्यांचा न आपला अभ्यास असतो न तपास केलेला असतो. जयंती-पुण्यतिथीत मिरवणूक काढून डीजेच्या तालावर नाचून घेणे. ही त्यांच्या कार्याप्रती आपण परत केलेली पावती आपल्या स्वत:लाच वाटत असते. हाच मोठा विनोद आहे. ज्यांनी समाजाच्या उद्धारासाठी आपली संपूर्ण हयात खर्ची घातली, अशा महापुरूषांचे विचार आपल्या मनात रूजविण्याऐवजी आपण अतिशय उथळ कृतीत रममाण झालो आहोत. त्यांनी त्यांचे जे विचार इथल्या मातीत पेरलेले असतात, त्यांचे दरसाल उगवून येणे महत्वाचे असते. आपण थेट कोंभानाच खुरपं लावतो.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱 *संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल- 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो* *स्वप्नं, किती छोटा शब्द आहे.* *पण माणूस आयुष्यभर त्यांचा* *पाठलाग करत राहतो.काही दिवसा* *स्वप्न बघतात,काही रात्रीचे* *स्वप्न बघतात,तर काही* *दिवास्वप्न बघतात.* *स्वप्न नुसती बघायची नसतात तर रात्रंदिवस त्यांच्या मागे लागून कठोर* *परिश्रम करून त्यांना कवेत* *घेता आले पाहिजे.आपले* *आयुष्य तसे सामान्यच आणि स्वप्नेही तशीच; पण* *असामान्य व्यक्तींची 'स्वप्ने' लोकविलक्षणच असतात. संत* *एकनाथांना ज्ञानेश्वरांनी स्वप्नात येऊन दृष्टांत दिला की,'अजानवृक्षाची मुळी* *माझ्या गळ्याभोवती वेढली गेली आहे. '* *एकनाथांनी मग आळंदीला जाऊन ज्ञानदेवांची समाधी शोधून काढली.* *तिचा जिर्णोद्धार केला.* *इतकेच नव्हे, तर ज्ञानेश्वरीची* *शुद्ध प्रत तयार केली. तुकारामांच्या स्वप्नात संत नामदेव* *आले आणि त्यांनी आपली शतकोटी अभंगाची प्रतिज्ञा पूर्ण* *करावी, असे तुकोबांना सुचविले. जिजाऊंनी शिवरायांच्या राज्याभिषेकाचे स्वप्न मनोमन पाहून* *शिवरायांना स्वराज्याचे तोरण बांधण्याची प्रेरणा* *दिली होती.* *स्वामी विवेकानंदांनी कन्याकुमारी येथे खडकावर, ध्यानमग्न स्थितीत, दैदिप्यमान भारताचे स्वप्न पाहिले. 'देशवासियांच्या जाड्याभरड्या अन्नवस्त्राची तरी सोय व्हावयास हवी.' हे रामकृष्ण परमहंसांचे बोल त्यांच्या मनात गुंजत होते. बोधिवृक्षाखाली ध्यानस्थ बसलेल्या गौतम बुद्धांचे मनही उपेक्षित लोकांसाठी तळमळत होते. स्वत:पलिकडे लोककल्याणाचा ध्यास घेतलेल्यांची स्वप्ने भव्य-दिव्य असतात. संत कबीर यांनी प्रत्येक जीवाने सत्-चित् , आनंदरूप व्हावे, अशी आस बाळगली, तर तुकडोजी महाराजांनी भेदभावरहित सुखी भारताची आकांक्षा धरली.* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जीवनात सुंदरतेला अधिक महत्व आहे.सुंदरता ही दोन प्रकारची आहे. एक म्हणजे बाह्यस्वरुपाची आणि दुसरी आंतरिक स्वरुपाची. तुम्ही कसेही असा तुम्हाला जे काही नैसर्गिक जन्माबरोबर शारीरिक सुंदरता मिळाली आहे ते आपल्याला जसे आहे तसे स्वीकारणे आवश्यक आहे. त्यात आपल्याला बदल करता येत नाही. काहीजण बदलण्यासाठी खूप प्रयत्न करायला पाहतात. त्यासाठी विविध प्रकारची सुंदरतेची सौंदर्य प्रसाधने, पेहराव वापरतात. परंतू त्यात काही बदल घडून येत नाही. फक्त त्यात बाह्यस्वरुपात राहणीमान बदलल्याचा फरक दिसून येतो. यामुळे आपण कसे आहोत हे जगासमोर बाह्यस्वरुपात काही काळ दिसू शकतो पण जास्त काळ त्यांच्या मनावर राज्य करु शकत नाही. त्यावर कितीही पैसा खर्च करुनही वाया जाणारच..! त्यापेक्षा आंतरिक सुंदरतेचा जर अधिक विचार केला तर आपलेही स्वत:चे कल्याण तर होईलच त्याचबरोबर इतरांचेही. कारण तुमच्या आंतरिक सुंदरतेला अधिकाधिक सुंदर बनविण्यासाठी जास्त काही धन अर्थात पैसा खर्च करायची गरज नाही. गरज आहे ती चांगल्या लोकांच्या सहवासात राहण्याची. चांगल्या लोकांच्या सहवासाने आपल्या मधील असणारे दोष काय आहेत ते स्वत:ला ओळखता येतात आणि त्यात बदल घडवून आणता येतात. चांगल्याच्या संगतीत सदैव राहिले तर आपले संकुचित असलेल्या विचारांना पायबंद घालून चांगल्या विचारांची वाढ करता येईल. अशासाठी धन किंवा पैसा खर्च करण्याची काही गरज नाही. यासाठी हवी आहे फक्त तुमच्या मनाची तयारी. तुम्ही जर आंतरिक सौंदर्याने समृद्ध झालात तर जग तुमच्या सोबत नक्कीच राहील आणि एक दिवस तुमचे नक्कीच अनुयायी बनतील. हे केवळ तुमच्या आंतरिक सुंदरतेच्या झालेल्या बदलामुळे. तुमच्या बाह्य सुंदरतेपेक्षा आंतरिक सुंदरता तुम्ही व तुमचे सुंदर जग बनवण्यासाठी अधिक मोलाचे किंवा महत्वाचे ठरु शकते. हे मात्र विश्वासाने सांगता येते. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद..९४२१८३९५९०. 🌷🍃🌷🍃🌷🍃🌷🍃🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *लालसेपायी प्राण गेले* जय आणि विजय यांच्‍यात घनिष्‍ट मैत्री होती. दोघेही पट्टीचे पोहणारे होते. नदीच्‍या पाण्‍यात भरपूर मस्‍ती केली. तितक्‍यात स्‍थानिक प्रशासनाकडून बंधा-याकडून पाणी सोडण्‍यात येत असल्‍याची सूचना देण्‍यात आली. त्‍यामुळे दोघेही नदीच्‍या बाहेर आले. जेव्‍हा बंधा-यातील पाणी सोडण्‍यात आले तेव्‍हा नदीला पूर आल्‍यासारखी स्थिती निर्माण झाली. जय आणि विजय सुरक्षित स्‍थळी थांबले होते. नदीच्‍या पाण्‍याचा ओघ पाहत असतानाच नदीच्‍या प्रवाहात एक घोंगडी तरंगत येत असल्‍याचे दोघांच्‍याही दृष्‍टीस पडतील. विजयला ती घोंगडी ओढून आणावीशी वाटली. जयने त्‍याला थांबविण्‍याचा प्रयत्‍न केला. परंतु विजयने तोपर्यंत पाण्‍यात उडी मारली होती. तो घोंगडीजवळ गेला आणि तिला ओढत असतानाच त्‍याचे संतुलन बिघडले. विजय जितका जोम लावून किना-यावर येण्‍याचा प्रयत्‍न करत असतानाच पाण्‍यात उठणा-या लाटा त्‍याला दूर लोटत असत. मित्र असा संकटात सापडलेला पाहून जय ओरडला,''अरे मित्रा, घोंगडी सोड आणि परत निघून ये'' पण विजय म्‍हणाला,'' अरे जय मी घोंगडी सोडण्‍याचा खूप प्रयत्‍न करतो आहे पण घोंगडीनेच मला धरून ठेवले आहे.'' जयला कळून चुकले की विजयला त्‍या घोंगडीची लालसा निर्माण झाली आहे. विजयने घोंगडीसह किना-यावर येण्‍याचा खूप प्रयत्‍न केला पण तो अयशस्‍वी ठरला. शेवटी तो पाण्‍यात मृत्‍युमुखी पडला.त्याच्या लालसेने त्याचा जीव घेतला. तात्‍पर्य- कोणत्‍याही प्रकारची लालसा प्रसंगी आपल्‍या जीवाशी खेळू शकते.आणि त्यामध्ये आपले प्राणही जाते. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00          ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 17/12/2019 वार - मंगळवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    💥 ठळक घडामोडी :-  ● १७७७: फ्रान्सने अमेरिका या देशाला मान्यता दिली. ● १३९८ - तैमूर लंगने दिल्लीजवळ सुलतान नसिरुद्दीन मेहमूदच्या सैन्याचा पाडाव केला. ● १९२६ - लिथुएनियातील उठावात अंतानास स्मेतोनाने सत्ता बळकावली. ● १९२८: भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांनी ब्रिटिश पोलिस ऑफिसर जेम्स साँडर्स याची लाहोर येथे हत्या केली. ● १९६१ - गोवा मुक्तिसंग्राम - भारतीय सैन्याने गोव्याला पोर्तुगालपासून मुक्त केले. ● १९६७ - ऑस्ट्रेलियाचा पंतप्रधान हॅरोल्ड होल्ट पोर्टसी, व्हिक्टोरियाजवळ समुद्रात पोहत असताना गायब. ● १९७०: जयंतीलाल छोटालाल शहा यांनी भारताचे १३ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला. ● १९७० - पोलंडमध्ये ग्डिनिया शहरात सैनिकांनी कामगारांवर गोळ्या झाडल्या. सुमारे २५ ठार. ● २०१६: शरद पवार यांनी एमसीए (मुंबई क्रिकेट असोसिएशन) च्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. 💥 जन्म :- ● १९०१: मराठी लघुकथाकार व प्रसाद मासिकाचे संपादक यशवंत गोपाळ तथा य. गो. जोशी ● १९०८ - विल्लर्ड लिब्बी,कार्बन १४ किरणोत्सर्ग कालमापन पद्धतीचा शोध लावणारा नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ. ● १९०५: भारताचे सहावे उपराष्ट्रपती आणि अकरावे सरन्यायाधीश मुहम्मद हिदायतुल्लाह  ● १९७२: अभिनेते व मॉडेल जॉन अब्राहम  ● १९७८: हिंदी चित्रपट अभिनेते रितेश देशमुख 💥 मृत्यू :-  ● १९२९ - मनुएल गोम्स दा कॉस्टा, पोर्तुगालचा ९६वा पंतप्रधान आणि १०वा राष्ट्राध्यक्ष. ● १९६४ - व्हिक्टर फ्रांझ हेस, नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ. ● १९६७ - हॅरोल्ड होल्ट, ऑस्ट्रेलियाचा पंतप्रधान. ● १९८५: नाटककार, कथाकार आणि पटकथाकार मधुसूदन कालेलकर  ● २०००: अ‍ॅथलॅटिक्सचे पितामह आणि नामवंत प्रशिक्षक जाल पारडीवाला ● २०१०: पुणे विद्यापीठाचे कुलगुरू देवदत्त दाभोळकर *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *देशातील नागरिकांची सुरक्षा महत्त्वाची असल्याने हिंसक आंदोलनाला आळा घाला. तसेच फेक न्यूज आणि सोशल मीडियावरील अफवा त्वरीत रोखा, अशा सूचना केंद्रीय गृहमंत्रालायने राज्यांना दिल्या आहेत.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *फडणवीस सरकारने त्यांच्या कार्यकाळात घेतलेले दोन महत्वपूर्ण निर्णय रद्द करण्यासाठी ठाकरे सरकारने हालचाली सुरु केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. यात जनतेतून थेट नगराध्यक्ष, सरपंच निवड आणि चार प्रभाग पद्धतीचा समावेश आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *रिलायन्सने २५ हजार कोटींना विकला जिओचे टॉवर रिलायन्स इंडस्ट्री जिओचे टेलिकॉम टॉवर अॅसेट्स कॅनडाच्या ब्रुकफिल्ड इन्फ्रास्ट्रक्चर पार्टनर्स एलपीला विकणार असल्याची घोषणा केली* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *नाशिकमध्ये डिझेल अभावी एसटी महामंडळाची सेवा ठप्प झालेली आहे. नाशिकच्या आगार क्रमांक 1 मध्ये डिझेलचा तुटवडा निर्माण झाल्याने एसटीच्या 100 फेऱ्या रद्द कराव्या लागल्या* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *मुंबई : यंदाच्या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या मिस वर्ल्ड २०१९ या सौंदर्य स्पर्धेचा किताब जमॅका टोनी एन सिंग हिने पटकावला आहे. लंडनमध्ये मोठ्या दिमाखात हा झगमगता सोहळा पार पडला. सौंदर्यवतींच्या या स्पर्धेत भारताची कन्या सुमन रावने सेकेन्ड रनर अप होण्याचा मान मिळवला आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या ताज्या क्रमवारीनुसार कसोटी क्रिकेटमध्ये विराट कोहली फलंदाजीत तर टीम इंडिया संघाच्या यादीत अव्वल स्थानी आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *63व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचं आयोजन पुण्यात होणार असून पुण्यातील बालेवाडी येथे 2 ते जानेवारी मध्ये कुस्तीच्या लढती रंगणार आहेत.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         *एक राष्ट्र : एक रेशनकार्ड*      http://nasayeotikar.blogspot.com/2019/12/blog-post_4.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *मनुष्यप्राण्याचे मूळ* 📙 ************************** प्रत्येकाला आपल्या पूर्वजांबद्दल एक गूढ आकर्षण असतेच. मग समस्त शास्त्रज्ञांना मानवजातीच्या मुळाबद्दल प्रचंड आकर्षण वाटत राहिले, तर त्यात नवल ते काय ? पृथ्वी कशी निर्माण झाली व माणूस कसा निर्माण झाला, याबद्दलची चर्चा कधीही व कुठेही रंगतच जाते. अनेक वर्षांच्या संशोधनानंतर सध्याचे निष्कर्ष सांगतात की, पूर्व आफ्रिकेच्या भागात चाळीस लाख वर्षांपूर्वी आदिम मानवाचे वास्तव्य होते. एकूण चार विविध टप्प्यांतून सध्याच्या होमो सेपियन्स या मानवजातीची उन्नती होत गेली आहे. होमो सेपियन्स म्हणजे 'शहाणा माणूस'. ते चार टप्पे असे, १. *ऑस्ट्रेलोपिथेकस अफारेन्सिस* २. *ऑस्ट्रेलोपिथेकस रोबस्टस* ३. *होमो इरेक्ट्स* ४. *होमो सेपियन्स* अंदाजे अडीच लाख वर्षांपूर्वी सध्याचा मानवप्राणी सध्याच्या स्वरूपात उत्क्रांत झाला असावा. प्रथम आफ्रिकेत वास्तव्य असलेला मानवप्राणी हळूहळू समशीतोष्ण व थंड हवामानाकडे वाढत जाणाऱ्या संख्येमुळे स्थलांतर करू लागला. जसजसे स्थलांतर पसरत गेले, तसतसे हवामानातील घटकांनुसार रंग, ठेवण, शरीराची जडणघडण यातही बदल होऊ लागले. उत्तरेकडे ज्या जाती पसरल्या, त्यांना 'ड' जीवनसत्त्वाची गरज भागवण्यासाठी अधिक सूर्यप्रकाशाची गरज पडू लागली. सूर्यप्रकाश तर कमी होता. मग कातडीखालील रंगद्रव्यांची निर्मिती हळू हळू कमी होत कातडीतील काळेपणा कमी झाला. याचप्रमाणे प्रखर सूर्यप्रकाशाला ज्या प्रदेशात तोंड द्यावे लागते, अशा पूर्वेकडच्या लोकांची गालांचे खाडे उंचावून डोळे मिचमिचे व बारीक होत गेले. कायम बर्फाळ प्रदेशात राहणाऱ्या मंडळींना अधिक उबेची गरज असल्याने त्यांच्या चेहऱ्यावर चरबी वाढून उघड्या चेहऱ्याच्या संरक्षणाची निसर्गत: सोय झाली. बर्फाळ प्रदेशातील लोक गुबगुबीत चेहर्‍याचेच का, याचे उत्तर यामुळेच मिळते. माणसाचे स्थलांतर पृथ्वीवर कसे झाले, हे पाहणेसुद्धा औत्सुक्याचे ठरेल. पूर्व आफ्रिकेच्या प्रदेशातून प्रथम उत्तरेकडील भागात, नंतर पूर्वेकडील भागात मानव हळूहळू पुढे सरकत राहिला. युरोपमधील मोजका भाग व्यापून संपल्यावर आशिया खंडांकडे त्याचा मोर्चा वळला. सैबेरियातील काही भाग त्या काळी बर्फामुळे अलास्काच्या भागास जोडलेला होता. अतिशीत अशा या भागातून उन्हाळ्याच्या काळात बहुधा अमेरिका खंडात माणसाचा चंचुप्रवेश झाला. अलास्कापासून मग खाली उतरत उतरत त्याने सर्व अमेरिका खंड व्यापले. पॅसिफिक समुद्रातील मोजकी बेटे सोडली तर मानवाने सारे जग कित्येक हजार वर्षे व्यापलेलेच आहे. या बेटांवरील वस्ती मात्र जेमतेम सात आठ हजार वर्षांतली असावी. आपण जेव्हा विविध संस्कृतींचा विचार करतो, तेव्हा आपल्या डोळ्यांसमोरची वर्षे असतात हजारांत. मानवी मूळ शोधतानाची वर्षे आहेत लाखांत, हे येथे पक्के ध्यानात ठेवणे आवश्यक आहे. या लाखो वर्षांबद्दलचा पुरावा कुठल्याही लिखित स्वरूपात तर आपल्या हातात नाहीच. जे निरनिराळ्या अवशेषांतून हाती लागत आहे, त्यातूनच आपण उलगडा करून इतिहासाची पाने उलटत जातो. मानवी वस्ती जगभर पसरत गेली, स्थायिक होत गेली; पण प्रत्यक्ष शेतीची लागवड करण्याची सुरुवात मात्र जेमतेम दहा हजार वर्षांपूर्वीच झाली. या लागवडीला सुरुवात झाली आणि पुन्हा एकदा गरजेनुसार मोठ्या प्रमाणावर स्थलांतर सुरू झाले. या स्थलांतराची दिशा या वेळी भारत, मध्य आशिया ते युरोप व खाली उत्तर आफ्रिका अशी उलटी होती. ती लाट आफ्रिका खंडात जेव्हा पोहोचली, तेव्हा त्याआधीची कित्येक हजार वर्षे अस्तित्वात असलेली मूळ जात पुन्हा दक्षिणेकडे ढकलली गेली. सध्याची बांटू ही जात म्हणजे मूळ आफ्रिकन वास्तव्य केलेली मानवी जात समजली जाते. *"सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *" छोटे लोक नसते तर मोठ्या लोकांचे अस्तित्व शून्य असते "* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *प्राणवायू तयार करण्याच्या क्रियेत उत्प्रेरक म्हणून कोणता पदार्थ वापरतात ?* मॅग्नीज डायऑक्साईड 2) *PTI चे विस्तारित रूप काय ?* Press Trust of India 3) *भारताची राष्ट्रीय दूरचित्रवाणी कोणती ?* दूरदर्शन DD National 4) *भारताचे राष्ट्रीय सूचनापत्र कोणते ?* श्वेतपत्र 5) *'राजकवी' म्हणून कोणाला ओळखले जाते ?* भा. रा. तांबे *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤डॉ. सुधीर येलमे, संपादक 👤 श्रीनिवास नरडेवाड, धर्माबाद 👤 केशव कदम 👤 नारायण मुळे, धर्माबाद 👤 प्रतापसिंह मोहिते, बार्शी 👤 दिगंबर बेतीवर, नांदेड 👤 डॉ. प्रदीप आवटे, साहित्यिक 👤 विजय होकर्णे, वृत्तपत्र छायाचित्रकार 👤 जितेंद्र वल्लाकट्टी 👤 रामचंद्र नागनाथराव पाटील बन्नाळीकर *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आपण नेहमी खरं बोलावं, असं म्हणतो. मग माणसं खोटं का बोलतात? स्वार्थासाठी! स्वत:ला लपविण्यासाठी! खरं ते झाकण्यासाठी! जितकं आपण स्वत:ला झाकण्याचा प्रयत्न करू तितकं आपण केव्हा ना केव्हा तरी समाजापुढं चक्क उघडं पडु शकतो. अनेक माणसं बोलताना 'मी म्हणतो तेच खरं' असं ठासून म्हणतात; परंतु 'खरं तेच माझं' म्हणणारी माणसं फारच कमी असतात. दहा वेळा खोटं बोललं की, लोकांना ते खरं वाटतं; पण खरं तेच केव्हातरी उघडकीस येतं. आपण स्वत: जसे असाल तसे समाजपुढे दिसावे हे चांगले असते. परंतु आपण स्वत: जसे नसतो तसं समाजापुढं दिसावं हे काही चांगलं नाही.* *आपण नेहमीच खोटं बोलावं आणि समाजापुढं आपण नेहमीच खरं बोलतो असं भासवावं हे काही भल्या माणसाचं लक्षण नाही. आपण नेहमीच स्वार्थीपणानं जगावं आणि आपण नेहमी नि:स्वार्थीपणानं जगतो असं समाजापुढं भासवावं हे काही सभ्य माणसाचं लक्षण नाही. आपण एकदा का खोटं बोललो की, ते लपविण्यासाठी अनेकदा खोटं बोलावं लागतं. खोट्याला अनेक वाटा असतात. ख-याला मात्र पर्याय नसतो. खोटं बोलणं खोट्या पैशासारखं असतं. खरं बोलणं बंध्या रूपयासारखं असतं. खरं ते खरंच असतं आणि खोटं ते खोटंच असतं, हे काळच उघडकीस आणतो. म्हणून 'सत्य' हाच आपल्या जीवन यशाचा खरा सोबती समजला पाहिजे. 'सत्य' हेच आपल्या जीवनवैभवाचं खरं रहस्य समजलं पाहिजे.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो,* *चूक भूल देणे घेणे हा नियम आयुष्यात ज्यांना जमला त्यांना जीवन कळले अस मी म्हणेन.* *वाधीसाठी म्हैस मारणारी माणस अनेक बघितली पण सगळ्या चुका पोटात घालणारी आईसारखी दुसरी व्यक्ती शोधून सापडणं कठीण आहे.* *माणस समजून घ्यायला शिका.* *एक ताई बटाट्याची भाजी करण्यासाठी बटाटी कापत होती.* *अचानक तिला बटाट्याच्या वरिल बाजुला छिद्र पडलेले दिसले. तिने* *विचार केला की बटाटा खराब झाला आहे तो फेकून द्यावा. पण तिने तो फेकून न देता खराब झालेला तेव्हढा* *भाग कापून फेकून दिला.पुन्हा पाहिले असता अजून* *थोडा भाग खराब दिसला.* *तिने तो भागही कापून फेकून दिला. उरलेला बटाट्याचा अर्धा* *भाग कापून भाजीत टाकला. किती चांगली विचारसरणी आहे, 70* *पैशांचा बटाटा आपण किती ध्यान देऊन* *कापतो. जो भाग खराब आहे तो* *कापून फेकून देतो. उरलेला भाग* *स्विकारतो. खुप चांगलं आहे हे. मात्र* *दुख या गोष्टीचं आहे की,आपण माणसाबाबत एव्हढे कठोर का वागतो ? आपल्या जवळच्या एख्याद्या माणसाबाबत एक चुक दिसली तर त्याच्या पुर्ण व्यक्तीमत्वाला आपण कापून फेकून देतो.* *त्याच्या वर्षानुवर्षाच्या चांगल्या कामांकडे दुर्लक्ष करतो. आपण फक्त आपल्या अहंकारासाठी,मी पणासाठी त्याच्यासोबतचे प्रत्येक नाते तोडतो. मग एकच प्रश्न पडतो की,आपल्या जवळच्या माणसाची किंमत सत्तर पैशांच्या बटाट्यापेक्षाही कमी आहे का ?* *या छोट्याशा गोष्टीचा जरूर विचार करा. आणि आपल्या जवळच्या* *अमुल्य माणसांना लहान लहान चुकांसाठी जीवनातून वेगळे* *करु नका.* *माणूस म्हणुनी जन्मा आलो,माणूस* *म्हणुनी जगेल मी,हे* *तत्व अमलात आणा.* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• एखाद्यावेळी माणसाच्या हातून झालेली एखादी चूक कळत नकळत झाली असे समजावे.ती चूक जर दुस-यावेळी झाली तर समजावे की, दुर्लक्ष केल्यामुळे झाली आहे . तिस-यावेळी तीच चूक झाली तर असे समजावे की,तुमचे त्या कामात लक्ष नसल्यामुळे झाली आहे आणि पुन्हा पुन्हा जर तीच चूक झाली तर असे समजावे की,आपण इतरांपेक्षा जास्त चूका करण्याचा जणू संकल्प केला आहे आणि त्यातही तुम्ही महामूर्ख आहात हे सिद्ध झाल्याशिवाय राहणार नाही. मग तुम्हीच विचार करा. तुम्हाला तुमच्या जीवनात चूका करायच्या की चूका टाळायच्या ? *व्यंकटेश काटकर,नांदेड.*   संवाद..९४२१८३९५९०/             ८०८७९१७०६३. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *निस्वार्थी दानधर्म* हजरत उमर आपल्‍या रयतेची खूप काळजी घेत असत. ते स्‍वत:ची व आपल्‍या परिवाराची चिंता नकरता जनतेचे दु:ख निवारणार्थ झोकून देत. एका प्रसंगाची गोष्‍ट आहे, काही कारणाने राजधानीत आग लागली, आग इतक्‍या वेगाने पसरली की तिने शहराचा अर्धा भाग व्‍यापून टाकला. लोकांनी खूप पाणी टाकले पण आग आटोक्‍यात येण्‍याची काही चिन्‍हे दिसेनात. हजारो लोकांची घरे, दारे, पिके सगळे जळून खाक झाले. मनुष्‍यहानीही मोठया प्रमाणावर झाली. लोकांचा आक्रोश वाढत होता. आगीचा वणवा पसरतच चालला. आगीचे लोळ भडकत चालले. शेकडो घरे आगीच्‍या भक्ष्‍यस्‍थानी पडत होती. जनतेला एकाच भयाने ग्रासले होते. आग आटोक्‍यात कशी आणायची कशी, आग विझत नसल्‍याने लोकांनी हजरत उमरला उपाय विचारले, तेसुद्धा आग विझविण्‍यात तनमनधनाने व्‍यग्र होते. उमरनी लोकांना सांगितले, ''ही आग म्‍हणजे खुदाचा कोप असावा, तुम्‍ही लोकांनी आता आग विझविण्‍यासाठी पाणी टाकण्‍याचे काम सोडा, गरिबांना अन्नदान करा. कदाचित खुदा यामुळे प्रसन्न होईल आणि आगीपासून आपली सुटका करेल.'' जनतेतील लोक म्‍हणाले,''हजरत साहेब आपण धर्मादाय संस्‍‍थेचे सर्व दरवाजे सगळ्यांसाठी आधीच उघडे ठेवलेले आहेत. कोणीही गरीब आमच्‍याकडे आला तर आम्‍ही त्‍याला दान करतोच. मग आमच्‍यावर तो नाराज कसा'' हजरत उमरने समजावले,''तुम्‍ही जे दान करता त्‍यामागे निष्‍काम भावना नाही. तुम्‍हाला वाटते दानाचे पुण्‍य तसे मिळत नसते. हजरत उमरच्‍या खुलाशानंतर जनतेने आपली चूक सुधारली अन आश्‍चर्य म्‍हणजे आग पूर्णपणे विझून गेली. जनतेने खुदाचे व हजरत साहेबांचे आभार मानले. तात्‍पर्य :- नि:स्‍वार्थ भावनेने केलेले दान कधीही लोकांच्‍या अंतरआत्‍म्‍यापर्यंत पोहोचते. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

*आभासी जग* (दि.१६-१२-१९) आभासी या जगात कोणी कोणाचे नाही भावनेला एकमेकांच्या थारा देत नाही, अन् माणूसकीला माणूस माञ का? जपत नाही माणुसकीचे जग सारे संपुष्टात येत आहे तहानभूक विसरून माणूस पैशाच्या मागे जात आहे अन् माणूसकीला माणूस माञ का? जपत नाही पैशाने पैसा कमवत आहे भौतिक सुविधा माञ तो सर्वच मिळवत आहे अन् माणुसकीला माणूस माञ का? जपत नाही..... घरदार सर्वच असतात त्यांची छान आणि सुबक आईवडिलांचीच असते त्यांना उबक म्हणूनच दाखवतात ते त्यांना वृद्धाश्रमाची घरे अन् माणसा माणूसकीला तु का ? जपत नाही..... खाण्यापिण्याचा सवयी असतात त्यांच्या निरनिराळ्या चायनीज आणि पिजाने पोट त्यांचे भरते,गरीब माञ भाकरीलाही तरसते अन् माणसा माणूसकीला तु का? जपत नाही.... हाच प्रश्न मला पडते? हाच प्रश्न मला पडते? 〰〰〰〰〰〰〰 श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे. ता.हदगाव जिल्हा नांदेड.

चारोळी *आभासी जग* आभासी या जगात माणूस माणुसकी हरवतो आहे, नातीगोती जपायची सोडून हळूहळू कमी करतो आहे. 〰〰〰〰〰〰〰 श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे ता.हदगाव जिल्हा नांदेड.दि.१६-१२-१९.

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00          ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 16/12/2019 वार - सोमवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    बहरैन - राष्ट्रीय दिन. बांगलादेश - विजय दिन. कझाकस्तान - स्वातंत्र्य दिन. 💥 ठळक घडामोडी :-  ● १९९८ - ऑपरेशन डेझर्ट फॉक्स - अमेरिका व युनायटेड किंग्डमने इराकवर बाँबफेक केली. ● १९७१-भारत-पाक युद्ध,पाक सैन्याची शरणागती,बांगलादेश ची निर्मिती. ● १९०३- मुंबईतील ताजमहाल हॉटेल पॅलेस ग्राहकांसाठी खुले करण्यात आले. 💥 जन्म :- ● १७९० - लिओपोल्ड पहिला, बेल्जियमचा राजा. ● १८८२ - सर जॅक हॉब्स, इंग्लिश क्रिकेट खेळाडू. ● १९५२ - जोएल गार्नर, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- ● २००४- लक्ष्मीकांत बेर्डे,मराठी चित्रपट अभिनेता ● १९६०-चिंतामण गणेश कर्वे,मराठी कोशकार व लेखक ● १५१५ - अफोन्सो दि आल्बुकर्क, पोर्तुगालचा भ्रमंत. ● १९२२ - गेब्रियेल नारुतोविझ, पोलंडचा पहिला राष्ट्राध्यक्ष *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरुन दिल्लीत आंदोलन पेटलं, विद्यार्थ्यांनी तीन बससह मोटारसायकल पेटवल्या, पोलिस बंदोबस्त तैनात* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आज 8 मोर्चे येणार आहेत, त्यामध्ये सर्वशिक्षा अभियान अंतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा मोठा मोर्चा, शिवाय कोतवाल संघटना, सकल धनगर समाज, इंटक, समाजवादी पक्षाचे मोर्चे* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *छत्रपती शिवाजी स्मारक याबाबत कोणी घोटाळा केला असेल तर ते निंदाजनक आहे, जो कोणी जबाबदार असेल त्यावर कारवाई करू : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *विधानसभेत भाजपतर्फे आशिष शेलार यांची मुख्य प्रतोद आणि देवयानी फरांदे यांची प्रतोद पदी नियुक्ती निश्चित, तर सुजितसिंह ठाकूर यांचे विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेते पदी नाव ठरले, भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून हिरव्या कंदील दाखवण्याची प्रतिक्षा, अधिकृत घोषणेची औपचारिकता बाकी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *पालघर : पालघरमध्ये भूकंपाच्या धक्क्यांचं सत्र सुरुच, कासा, बोर्डी, धुंदलवाडी, चिंचले भागात पहाटे भूकंपाचे धक्के, पहाटे 4 आणि 6 वाजेच्या सुमारास भूकंपाचे धक्के, नागरिकांची माहिती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *राष्ट्रीय महामार्गावर फास्टटॅग अत्यावश्यक, विनाफास्टटॅग संबंधित मार्गिकेत शिरल्यास दुप्पट टोल आकारणी होणार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *टीम इंडियाचा वेस्ट इंडीजकडून आठ विकेट्सने पराभव, हेटमायर, होपच्या शतकाने विंडीजचा शानदार विजय, मालिकेत 1-0 ने आघाडी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••            एक देश, एक ओळखपत्र http://nasayeotikar.blogspot.com/2019/12/blog-post_7.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🐝 *मधमाशा* 🐝 ****************** नैसर्गिकरीत्या माणसाला ज्ञात असलेला गोड पदार्थ म्हणजे मध. साखरेचा वापर सुरू होण्याआधी अनेक ठिकाणी मधाचाच वापर केला जात असे. आजही मध आरोग्यदायी समजला जातो. हा मध मधमाशा गोळ्या करतात. मधमाशा जगभर आढळतात. संख्येने प्रचंड प्रमाणावर आढळणारी ही जात एखाद्या जमातीप्रमाणे वा कुटुंबाप्रमाणे राहते. अर्थातच एका पोळ्यामध्ये आढळणाऱ्या मधमाशा या त्या कुटुंबाच्याच घटक असतात. त्या तेथेच जन्माला येतात व वाढतात. षटकोनी आकाराची, एकात एक गुंतलेली सलग रचना असलेली मधाची पोळी वा स्वतःची वसतिस्थाने बांधण्याचे काम कामकरी माशा करतात, तर या पोळ्यात राहून फक्त अंडी घालून ती वाढविण्याचे काम राणी माशी करत असते. मुंग्या व अन्य किटकांच्या प्रमाणे या बाबतीत खूपच साधर्म्य आढळते. मोजकेच नर या पोळ्यात असू शकतात. नवीन राणीमाशीबरोबर संयोग झाल्यावर हे नर काही काळातच मरूनही जातात व राणीमाशी स्वतःचे घर बांधायला घेते. नवीन पोळे जन्माला येते. ज्या जंगलात ज्या प्रकारची झाडे असतील, फुले असतील, त्यांतील मध गोळा करून तो पोळ्यात साचवण्याचे काम मधमाशा अथकपणे करत असतात. हा मधाचा साठा जसजसा वाढत जातो, तसतसा पोळ्याचा आकार वाढत जातो. पोळे हे मुलत: नैसर्गिक मेणाचे बनलेले असते. मधाची चव फुलांनुसार बदलते. फुलामधील मध स्वतःच्या सोंडेने शोषून घ्यायचा व तो पोळ्यात आणून साठवायचा, ही क्रिया करत असताना मधमाशी आणखीही दोन कामे करते. एका फुलाचे परागकण पंखांना लागतात, ते दुसऱ्या फुलावर नंतर टाकले जाऊन वनस्पतींचे पुंसवन होते. याचवेळी मागील पायांना लागलेले परागकण पोळ्यात आणले जातात व ते नुकत्याच अंड्यांतून बाहेर पडलेल्या अळ्यांना खायला दिले जातात. यांवरच त्यांचे पोषण होते. काही काळातच त्यांचे पूर्ण मधमाशीत रूपांतर होते. मधमाशीचे आयुष्य हे सहसा ऋतूपरतेच मर्यादित असते. त्यातही ती जर कोणाला डसली तर शरीराच्या मागील टोकाला असलेली नांगी काटेदार रचनेमुळे तेथेच रुतून अडकते. नांगी शरीराला जोडणाऱ्या स्नायूंनाही दुखापत होऊन मधमाशी स्वतःचा जीव गमावते. ही वस्तुस्थिती लक्षात घेतली म्हणजे मधमाशी उगाचच हल्ला करून चावणार नाही, याची खात्री पटेल. पोळ्याला धोका आहे, हे कळल्यावर मात्र हजारो माशा आसपासच्या सर्वांवर हल्ला चढवतात. मधमाशांचा मध गोळा करण्याचा गुण लक्षात घेऊनच मधुमक्षिकापालन पेटी तयार केली गेली आहे. यात पोळे तसेच ठेवून सेंट्रीफ्युगल फोर्सने मध फक्त काढून घेतला जातो. रिकाम्या पोळ्यात मधमाशा पुन्हा मध गोळा करू लागतात. मधमाशा व गांधील माशा या दोन जाती तशा पोटजातीच आहेत. फक्त गांधीलमाशा मध गोळा करत नाहीत. त्यांची पोळी लहान असतात. त्या चावल्या तर जास्त त्रास होतो. आकाराने मधमाशीपेक्षा मोठ्या व लालभडक रंगाच्या असतात. मधमाशा एकमेकांना संदेश कसा देतात, हे मोठे विलक्षण आहे. एखादी माशी फुलांचा शोध घेऊन आल्यावर ती एक प्रकारचा नर्तनाचा प्रकार करून तिच्या सहचरींना फुलांची दिशा व अंतर यांची माहिती पुरवते. बघता बघता पोळ्यातील माशा तिकडे जातात. या संदेशव्यवस्थेचे अजूनही नीटसे आकलन झालेले नाही. *'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *" चारित्र्यात सूर्याची तेजस्विता अन अंत:करणात चंद्राची शीतलता हवी. "* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *रोपांना समतोल आहार कोणते खत पुरवते ?* कंपोस्ट खत 2) *विद्युतधारा मोजण्याचे परिमाण कोणते ?* अँपिअर 3) *शून्य अंश अक्षवृत्त म्हणजे काय ?* विषुववृत्त 4) *'देशबंधु' म्हणून आपण कोणाला ओळखतो ?* चित्तरंजन दास 5) *आगगाडीच्या गुलामध्ये काय वापरले जाते ?* पोटॅशियम क्लोरेट *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 उमेश कोटलवार, सहशिक्षक, रत्नागिरी 👤 योगेश गुजराथी, धर्माबाद 👤 शिवकुमार उपलंचवार, देगलूर 👤 विजय सोनोने, सहशिक्षक, वाशीम 👤 नरेश पांचाळ, धर्माबाद 👤 श्याम पेरेवार *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *कोणतेही नाते प्रत्येक क्रियेने उज्ज्वल करता येणे, ही खरी सार्थकता. परंपरेने किंवा संस्कृतीने जी सणावारांची यादी केली, त्या प्रत्येक सणाचा अन्वयार्थ नव्याने शोधायला हवा; तरच आनंद-परमानंद-ब्रम्हानंद या पाय-या चढता येतील. वाद आणि भांडणाच्या प्रकारात जो अडकतो त्याचा फास आधिकाधिक घट्ट होण्याची शक्यता असते. त्यामुळे स्नेहभावनेतून जग जोडले पाहिजे. भारतीय संस्कृतीत प्रत्येक दिवस स्नेहाद्रता पेरत येतो, म्हणून सण हे उत्सवांचे प्रतीक म्हणून साजरे व्हावेत.* *नात्यांचा, घटनांचा अर्थ लावत आपल्याला मनाचा स्वयंविकास जेव्हा साधता येईल, तेव्हाच सगळे सण-उत्सव प्रतीकरूप होतील. रोजचा दिवस येतो आणि जातो. रोजच्या कामात मग्न असणारे आपण काही नवीन करतो का, किंवा जे कुठलेही काम करतो त्याच्यात काही नवीन शोधतो का ? नसल्यास ते जमले पाहिजे. नित्यनूतनतेचा ध्यास जोवर लागत नाही, तोवर आयुष्यातून शिळेपणा जाणार नाही. प्रत्येक क्षणाचा उत्सव करणे हे आपले कर्तव्य आहे. या भावनेने जगण्याच्या अनेकविध अंगांकडे पाहता आले पाहिजे.* *॥ रामकृष्णहरी ॥* 💥💥💥💥💥💥💥💥💥 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल-9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो* *मी काल एक मला आवडलेली पोस्ट फॉरवर्ड केली.काही बंधू-भगिनी तुटून पडले माझ्यावर,मग काय बाबा* *पंढरपूरला जाण सोडून द्यायचे का* *आम्ही?आपली परंपरा काय म्हणते,संस्कृती काय सांगते?काही* *तर म्हटले अहो भाऊ भारत यावरच टिकून आहे,म्हणून आपली* *संस्कृती महान आहे.* *ओके,मला मान्य आहे.शिवाय नाण्याला दोन बाजू असतात.आणि* *श्रद्धा ,अंधश्रद्धा हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे हे* *ही बरोबर आहे.* *कुणाच्या भावना दुखवू नये हेही तितकेच खरे आहे.पण ही वास्तव पोस्ट होती.वाचनालये शेवटची घटका* *मोजत आहे.वैज्ञानिक दृष्टिकोन दूर जातांना दिसतोय.मंदिरे मात्र सुसज्ज,रोज बांधली* *जातात,अब्जावधी रुपये दानपेटीत जमा होतात.* *पण मित्रांनो भगिनींना राग येऊ नये ही अपेक्षा ,पण महिला वर्गावर* *अध्यात्म जास्त प्रमाणात छाप पाडते.* *थोडं धाडसाने म्हणेल की* *वास्तविक पुरुषांपेक्षा महिला जास्त* *कर्तबगार ,सहनशील असतात.पण त्यांना उजेडात येऊ दिले नाही हा* *इतिहास आहे. त्यात काही कमी-जास्त पणा असेलही.पण* *इतिहास सांगतो मैत्रेयी व गार्गी या महान स्रिया पूर्वी* *देशावर अधिराज्य गाजवत होत्या.* *मुलं आईच्या नावाने ओळखली जाते होती.* *महिला पूर्णपणे सक्षम असतात यात माझे दुमत नाही त्यांना समाजाने* *दुर्बल केले आणि ठरविले सुद्धा.* *यशोधराचेच बघा ना* *ज्या रात्री गौतम बुद्धांनी घर* *आणि पत्नीला सोडले, त्याच रात्री* *त्यांना पुत्रप्राप्ती झाली.* *पुत्रप्राप्तीचा आनंद असतानाही पतीने घर सोडल्याची बातमी जेव्हा* *तिला समजली तेव्हा ती उध्वस्त झाली. पण तिने कुणाकडे* *ही तक्रार केली नाही.* *आणि जग ज्याच्याकडे अभिमानाने पाहिल, अशा पद्धतीने मुलाला* *वाढविण्याचे तिने ठरवले. सोडून गेलेल्या पतीला* *विसरून तिने नवे आयुष्य सुरु करावे,असे तिला सर्वांनी* *सुचवले. दुसरे लग्न करण्याची गळ घातली, तिने त्यास* *नकार दिला.* *आणि एका सुंदर सकाळी.........* *ते परत आले आणि तिच्या समोर उभे राहिले.* *तिने शांतपणे त्यांना विचारले,* " *आता तुम्हाला लोक 'बुद्ध 'म्हणून ओळखतात ना?"* *त्यांनी ही तितक्याच शांत* *पणे उत्तर दिले, "होय, मी देखील तसे* *ऐकले आहे. "* *तिने पुढे विचारले, "त्याचा अर्थ काय?"* " *जगण्याचा अर्थ कळला आहे,* *अशी व्यक्ती !"ते म्हणाले.* *ती किंचितशी हसली आणि मग शांत बसली.* *काही वेळाने ती म्हणाली,* " *आपण दोघेही काहीतरी नवे* *शिकलो आहोत, असे मला वाटते.* *तुम्ही जे शिकला आहात,* *त्यातून हे जग सम्रुद्ध* *होईल पण मी जे शिकले आहे, ते* *फारसे जगापुढे येणारच नाही."* *बुद्धांनी तिला विचारले, "तू काय* *धडा शिकलीस ?"* *तिचे डोळे चमकले. डोळ्याच्या कडा पाणावल्या होत्या.* *"तो धडा म्हणजे धैर्य! स्त्रीला उभी* *रहाण्यासाठी कुणाचीही गरज* *लागत नाही. तिचे स्वतःचे* *व्यक्तिमत्व हे परिपूर्ण असते. ती न* *डगमगता कोणत्याही* *परिस्थितीतून खंबीरपणे मार्ग काढू शकते. "* *यशोधरेतील 'स्त्री'ला मनापासून नमस्कार ! आणि तिने विज्ञान आणि* *अध्यात्माला बरोबर घेऊन चालावे ही प्रामाणिक इच्छा.* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• हल्ली कुटुंबाची व्याख्याच सिमित झाली आहे.याचे कारणही तसेच आहे.आपापल्या स्वार्थापुरतं क्षेत्र निर्माण करुन तेवढ्यापुरतंच मर्यादित करुन जीवन जगताना दिसत आहे.आई-बाबा,भाऊ-बहीण, आजी-आजोबा आणि इतरही नाते नात्याची असलेली आणि विणलेली घट्ट वीण कुठल्यातरी कमी संस्कारामुळे ,स्वार्थामुळे सैल झाली आहे त्यामुळे आता ही नाती एकमेकांपासून दूर गेली आहेत हे पहायला मिळते.आपल्याच पिढीला नाते काय असते आणि कसे असते कुणाला काय म्हणावे हे सांगताना एखाद्या गोष्टीत सांगितल्याप्रमाणे होत आहे.अशा सर्व गोष्टींमुळे येणा-या पिढीच्या मानसिकतेवर फार मोठा आघात होत आहे.त्यासाठी कुटुंब आणि कुटुंबातील सारे सदस्य आपुलकीने,प्रेमाने, थोरामोठ्यांच्या मार्गदर्शनाखाली टिकवण्याची गरज आहे,प्रत्येकातील असणारा स्वार्थरुपी नाते संपुष्टात आणायला हवे,घरामध्ये कमावणा-या व्यक्तींचा सन्मान आणि न कमावणा-या व्यक्तींचा अपमान आणि तिरस्कार करणे टाळायला हवे.हे जर आपण आपल्यामध्ये प्रथम सुधारणा करून येणा-या पिढीला आदर्श संस्कारांची मात्रा त्यांना अधिक प्रमाणात दिली तर नात्यांची घट्ट वीण तयार होऊन एकमेकांबद्दल प्रेम,आदर,नाती, संबंध अधिक दृढ होण्यास मदत होईल.कुटुंब म्हणजे काय आणि नाते कसे असते हे निश्चितपणे पिढीला समजेल.मग ते कधीही कुणाच्या नात्यापासून दुरावणार नाहीत की,कुणाची मने दुखावणार नाहीत. © व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🥀🍃🥀🍃🥀🍃🥀🍃🥀🍃🥀 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *राणीने घेतलेली परीक्षा* एकदा शिबा राज्याच्या राणीने राजा सलोमन या प्रसिद्ध आणि चतुर राजाचा चातुर्याची परीक्षा घ्यायचे ठरवले. एके दिवशी ती फुलांचे दोन हार घेऊन राजाकडे गेली. दोन्ही हार दिसायला अगदी सारखे दिसत होते. पण एक हार खरोखरचा फुलांचा होता; तर दुसरा हार कागदी फुलांचा होता. राणीने दोन हातात दोन हार धरले ती राजाच्या समोर उभी राहिली ती राजाला म्हणाली, " हे चतुर, राजा या दोन हारा पैकी कोणता हार खऱ्या फुलांचा आहे हे मला सांग. जागेवरून न उठता तू मला याचे उत्तर दे." दोन्ही हार बारकाईने पाहिले.दोन्ही हार सारखे दिसत होते.कोणता हार खऱ्या फुलांचा आहे हे त्याला ओळखता येईना. हार फक्त पाहून त्यातील फरक ओळखणे अवघड आहे, हे त्याला कळले. राजा विचार करू लागला. त्याला एक नामी युक्ती सुचली. महालाच्या एका बाजूला फुलबाग होती. राजाने सेवकाला महालाच्या त्या बाजूची खिडकी उघडायला सांगितली. सेवकाने खिडकी उघडली. त्या बरोबर बागेतील मधमाश्‍या आत आल्या आणि राणीच्या उजव्या हातातील हाराभोवती फिरू लागल्या. राजाने स्मित केले आणि म्हणाला, " माझ्या बागेतील मधमाशांनी मला तुझ्या प्रश्नाचे उत्तर सांगितले आहे. तुझ्या उजव्या हातातील हार खऱ्या फुलांचा आहे." राणीने राजाला आदराने अभिवादन केले आणि म्हणाली," हे राजा, तुझे उत्तर बरोबर आहे. तू खरोखरच हुशार आहेस." *तात्पर्यः माणसाने योग्यवेळी शक्तीचा, बुद्धीचा, व युक्तीचा वापर केला तर जीवनात कोणतीही परीक्षा, गोष्ट अवघड नाही.* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

*हुरहूर* दि.१५-१२-२०१९ मन माझे दुःखी झाले हूरहूर तुझ्या भेटीची आस लागूनी जीवा मला चाहूल तुझ्या येण्याची तुच माझा सखासोबती तुझ्यावीन नाही माझी जीवन जगण्याची गोडी तुला पाहते मी माझा नजरेतूनी आणि विसावते थोडी तुझ्या आठवणीची हुरहूर लागुनी भास होतो मजला येशील काय माझा स्वप्नात देशील काय साथ तु अशी मजला 〰〰〰〰〰〰 प्रमिलाताई सेनकुडे ता.हदगाव जिल्हा नांदेड

चिञचारोळी स्पर्धेसाठी दि.१५-१२-२०१९ १) वृक्ष माझी काया वृक्ष माझी छाया जाणले चिमुकलीने पाणी घालती रोज तया 〰〰〰〰〰〰 २) एक एक झाड जगवूया पाणी तयास देऊया पर्यावरणाचा रक्षणाची जबाबदारी आपण घेऊया 〰〰〰〰〰〰 ३) जीव आहे माझा चिमुकला आॕक्सीजन मिळवूया हवेतला झाडांना पाणी देऊया जीवन त्यांचे जगवूया 〰〰〰〰〰〰 ४) माझा जीव आहे लहान पाणी झाडाला देऊन काम करते मी महान हाच वसा घेऊया सारे वाचवूया आपण वृक्ष सारे 〰〰〰〰〰〰 ५) झारीने पाणी घालीन मी रोजरोज झाडाला सृष्टीचे सौंदर्य खुलवीन साथ देऊ या निसर्गाला 〰〰〰〰〰〰 ✍प्रमिलाताई सेनकुडे ता.हदगाव जिल्हा नांदेड 〰〰〰〰〰〰

चारोळी दि.१५-१२-२०१९ हूरहूर १)शृंगारलेल्या माझा मनाला सोडून गेली तुझी काया हूरहूर लागे माझा जीवाला पडेल काय तुझी ती छाया 〰〰〰〰〰〰 २) हूरहूर लागली मजला दिस हा असा उजाडला खंत माझा मनाची का सख्या नाही तु समजला. 〰〰〰〰〰〰 ३) समजतच नाही मजला हूरहुर ही कशी लागली दाटूनी कंठ अंतरीचा नयनास त्या ओसरू लागली. 〰〰〰〰〰〰 ४) दूर तू गेलास परी सोडून माझी साथ हूरहूर लागते माझा जीवाला परतूनी येऊनी करशील काय मात 〰〰〰〰〰〰 ५) आईवडीलांची लाडाची लेक जाते जेव्हा सासरी हूरहूर होते त्यांचे मन उदासून जाते अंतरी 〰〰〰〰〰〰 प्रमिलाताई सेनकुडे ता.हदगाव जिल्हा नांदेड

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00          ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 14/12/2019 वार - शनिवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    *शहीद बुद्धीजीवी दिन - बांगलादेश* *राज्य दिन - अमेरिका-अलाबामा* 💥 ठळक घडामोडी :- ● १२८७ - सेंट लुशियाचा पूर - नेदरलँड्समधील झुइडर झी समुद्री भिंत कोसळली. ५०,००० ठार. ● १९६२ - नासाचे मरिनर २ शुक्राच्या जवळून जाणारे पहिले मानवनिर्मित यान. ● १९८९ - पॅट्रिशियो एल्विन चिली च्या राष्ट्राध्यक्षपदी. 💥 जन्म :- ● १८९५ - जॉर्ज सहावा, इंग्लंडचा राजा. ● १९१८ - बी. के. एस.आय्यंगार, भारतीय योगतज्ञ. 💥 मृत्यू :- ● १९७७ - ग.दि. माडगूळकर, मराठी कवी. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *मुंबई: साधारणपणे आठवड्यातील तीन-चार दिवस चालणारं मंत्रालयाचं कामकाज आता दररोज सुरू राहणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुंबईचेच असल्याने हा निर्णय घेण्यात आला असल्याचं सूत्रांनी सांगितलं* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *नागरिकत्व सुधारणा विधेयकाला महाराष्ट्रातूनही विरोध, काँग्रेस नेत्यांकडून अंमलबजावणी न करण्याची मागणी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भूमिकेकडं राज्याचं लक्ष्य* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *रानकवी पद्मश्री ना. धों. महानोर यांच्या हस्ते त्र्यांनवाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन १० जानेवारी २०२० रोजी होणार असल्याची माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष नितीन तावडे यांनी दिली.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *इंग्लडमध्ये 364 जागा जिंकत जॉन्सनच्या हुजुर पक्षाला स्पष्ट बहुमत; ब्रेक्झिटचे समर्थन करणारे बोरीस जॉन्सन पुन्हा ब्रिटनच्या पंतप्रधानपदी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *राज्यातील पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतलेल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृतीसह इतर शिष्यवृत्ती योजनांचे ऑनलाइन अर्ज आता १५ डिसेंबरपर्यंत भरता येणार आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *संभाजीनगर की औरंगाबाद नावावरुन महापालिकेत भाजप-सेना नगरसेवक समोरासमोर, भाजप उपमहापौरांचा राजीनामा, पालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *भारत – वेस्ट इंडिज यांच्यातील एकदिवसीय मालिकेला १५ डिसेंबरपासून सुरूवात होणार आहे. भारताचा आघाडीचा अनुभवी गोलंदाज भुवनेश्वर कुमार हा दुखापतग्रस्त असल्याने त्याच्या जागेवर आता मुंबईकर शार्दुल ठाकूर याला पर्यायी खेळाडू म्हणून बीसीसीआयकडून संधी देण्यात आल्याचे सांगितलं जातं आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••            *आपली कामे आपणच करावीत* एखाद्या वेळी घरात आई किंवा बहीण नसेल तर आपली पंचाईत होते. जेवण करायचे असेल किंवा घरातील साफसफाईचा प्रश्न असेल, आपण सर्वस्वी आई किंवा बहिणीवर अवलंबून असतो. त्यामुळे आपणावर तसा प्रसंग ओढावतो. ज्यावेळी घरात वडील किंवा भाऊ नसतो, त्यावेळी तशीच काहीशी ......... वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/11/blog-post_59.html  लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *गॅसेस का होतात ?* 📙 खूप लोकांना गॅसेसचा त्रास होतो. म्हातारपणात तर बऱ्याच लोकांमध्ये हा त्रास आढळून येतो.‍ लहान मुलांमध्येही गॅसेस होऊ शकतात. गॅसेस किंवा वायूविकाराचे मुख्य कारण म्हणजे आपल्याला माहित नसताना हवा गिळण्याची सवय. खूप बोलणाऱ्या लोकांमध्ये (उदा. शिक्षक, राजकीय नेते) अशा प्रकारे जास्त हवा गिळली जाते आणि गॅसेसचा त्रास होतो. लहान मुलेही दूध पिताना हवा गिळतात आणि त्यामुळे गॅसेस होऊन त्यांचे पोट दुखायला लागते. मोठ्या आतड्यात सुक्ष्म जंतूंची अन्नावर क्रिया होऊनही वायू निर्माण होतो. याखेरीज शौचास साफ न झाल्यास किंवा बद्धकोष्ठाचा त्रास असल्यास मल शरीरात साचून राहतो व या मलाचे विघटन होऊनही वायू तयार होतात. वायू तयार झाल्यावर तो आतड्याच्या भिंतीवर ताण आणतो. त्यामुळे पोट दुखते. डोकेही दुखते. गॅसेसचा त्रास होऊ नये यासाठी जेवणाच्या वेळा नियमित असाव्यात. थोडीशी भूक ठेवूनच जेवावे. हरभऱ्याच्या डाळीचे किंवा तेलकट तुपकट पदार्थ कमी खावेत. बैठे काम करणाऱ्यांनी भरपूर व्यायाम करावा. सर्वांनीच निदान जास्तीत जास्त पायी चालण्याचा प्रयत्न करावा. पवनमुक्तासनसारख्या आसनांमुळे गॅसेस बाहेर पडतात. अनावश्यक बडबड टाळावी. हिंग्वाष्टक चूर्ण घेतल्यास गॅसेसवर चांगला उपचार होतो. बैठे काम करणाऱ्यांनी जेवणानंतर दीड दोन तासांनी ताठ बसून बेबी आत ओढून पाच ते पंधरा सेकंद तशीच ठेवण्याचा प्रयत्न करावा. असा उपाय वारंवार केल्याने गॅसेसचा त्रास नक्कीच कमी होतो. चार चौघे जमल्यावर आपल्याला लाज आणणारा हा वायूविकार आहाराच्या सुयोग्य सवयी आणि व्यायाम यामुळे आपण आटोक्यात आणू शकू. *डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित* यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *" ज्यांना जास्त गोष्टींची हाव असते त्यांना प्रत्येक गोष्टीची कमतरता असते. "* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *राज्यसभेवर निवडून गेलेली पहिली अभिनेत्री कोण ?* नर्गिस दत्त 2) *महाराष्ट्रातील कोणते उद्यान मगरीसाठी प्रसिद्ध आहे ?* ताडोबा ( चंद्रपूर ) 3) *पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरात हरीजनांना प्रवेश मिळावा यासाठी कोणी उपोषण केले ?* साने गुरुजी 4) *'भारताची फुलराणी' असे कोणत्या महिला खेळाडूला म्हटले जाते ?* सायना नेहवाल ( बॅडमिंटन ) 5) *'प्रतियोगीता सहकार' ही संकल्पना कोणी मांडली ?* लोकमान्य टिळक *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 सारंग भंडारे *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आपले आयुष्य तसे सामान्यच आणि स्वप्नेही तशीच; पण असामान्य व्यक्तींची 'स्वप्ने' लोकविलक्षणच असतात. संत एकनाथांना ज्ञानेश्वरांनी स्वप्नात येऊन दृष्टांत दिला की,'अजानवृक्षाची मुळी माझ्या गळ्याभोवती वेढली गेली आहे. ' एकनाथांनी मग आळंदीला जाऊन ज्ञानदेवांची समाधी शोधून काढली. तिचा जिर्णोद्धार केला. इतकेच नव्हे, तर ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत तयार केली. तुकारामांच्या स्वप्नात संत नामदेव आले आणि त्यांनी आपली शतकोटी अभंगाची प्रतिज्ञा पूर्ण करावी, असे तुकोबांना सुचविले. जिजाऊंनी शिवरायांच्या राज्याभिषेकाचे स्वप्न मनोमन पाहून शिवरायांना स्वराज्याचे तोरण बांधण्याची प्रेरणा दिली होती.* *स्वामी विवेकानंदांनी कन्याकुमारी येथे खडकावर, ध्यानमग्न स्थितीत, दैदिप्यमान भारताचे स्वप्न पाहिले. 'देशवासियांच्या जाड्याभरड्या अन्नवस्त्राची तरी सोय व्हावयास हवी.' हे रामकृष्ण परमहंसांचे बोल त्यांच्या मनात गुंजत होते. बोधिवृक्षाखाली ध्यानस्थ बसलेल्या गौतम बुद्धांचे मनही उपेक्षित लोकांसाठी तळमळत होते. स्वत:पलिकडे लोककल्याणाचा ध्यास घेतलेल्यांची स्वप्ने भव्य-दिव्य असतात. संत कबीर यांनी प्रत्येक जीवाने सत्-चित् , आनंदरूप व्हावे, अशी आस बाळगली, तर तुकडोजी महाराजांनी भेदभावरहित सुखी भारताची आकांक्षा धरली.* *॥ रामकृष्णहरी ॥* 🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाईल- 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो,* *जगात समस्या नाही असा माणूस नाही.आणि उपाय नाही अशी समस्या नाही.* *मग तुम्हीच ठरवा कण्हत कण्हत जगायचं की गाणं म्हणत.* *रडत रडत जगायचं की लढत जग जिंकायचं तुम्हीच ठरवा.* *भारतात शंभर समस्या आहेत, परंतु अब्जावधी उपायही आहेत...* - *कैलाश सत्यार्थी, नोबेल विजेते* *हव्या त्या वस्तू जगात सापडत नाही.त्या संपादन कराव्या लागतात.* *जसे की पसायदानात प्रार्थना केली जाते-* *दुरितांचे तिमिर जावो,विश्व स्वधर्म सूर्य पाहो.जो जे वांछिल तो ते लाहो, प्राणिजात.* *पण त्या अगोदर तुम्हांला स्वत:साठी व आपल्या समस्त मानवजातीसाठी पुढील प्रयत्न करावे लागतील-* “ *मागा म्हणजे तुम्हांला ते देण्यात येईल.* *शोधा आणि तुम्हांला ते सापडेल,* *ठोका आणि तुमच्यासाठी दार उघडले जाईल.* *नोकरी मिळविण्यासाठी अभ्यास करु नका.ती तर अशिक्षित मुलांना ही* *मिळते.गरज म्हणून अभ्यास* *करा,आवड आहे म्हणून नको.* *आपली आवड तर नेहमी बदलत* *राहते.आज पूजा तो कल* *कोई और दूजा.जसे शरीराला* *रोज अन्नाची गरज* *आहे.तसे आपल्याला अभ्यासाची गरज आहे.* *तुम्ही एखाद्या गोष्टीपासून जितके दूर पळाल तितकी की तुमच्या गळ्यात* *पडते.तेव्हा नैराश्याने अथवा आयोगाच्या कारभाराला* *कंटाळून इथेच थांबणार असाल व बस्स झाले आता, पोटापाण्यासाठी व* *समाजात एक पगारी माणूस म्हणून मिरवून* *घ्यायचे.असा पळपुटा विचार सोडून द्या. सावलीतील नोकरी* *मिळविण्यासाठी इकडे येत असाल तर सध्या जिथे आहात तिकडेच* *रहा.कारण ग्लोबल वार्मिंगचा फटका इथेही बसलेला आहे.* *जाळे फेकलेच आहे तर एकतरी मासा गळाला लागलाच पाहिजे.* *रिकाम्याहाती गंगामाईही जात नाही.तुम्ही लढा आमचे हात आहेच* *तुमच्या पाठीशी.* *इंग्रजी कळत नसेल तर मराठीत सांगतो...* *सगळेच अधिकारी झालेत तर झाडू कोण मारणार?* *तेव्हा पहा, ठरवा,निर्णय घ्या व कृती प्रत्यक्षात उतरवा.* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते )* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• काल तुम्ही दिवसभरात केलेल्या कामाची थोडी उजळणी करा आणि तुमच्या मनाला थोडं विचारा की,अरे मना माझ्याकडून जे काही घडले त्यात माझ्या कृतीपेक्षा तुझाच जास्त सहभाग आहे.कारण तुझ्या स्थिरतेमुळेच मी एवढे काम चांगले करु शकलो.तू जर चलबिचल झाला असता तर माझ्याकडून ब-याच चूका झाल्या असत्या,पण मला तू माझ्या बुद्धीला आणि हाताला दुसरीकडे कुठेच जाऊ दिले नाही.माझ्या कामात एकाग्रता आणि सातत्य ठेवल्यामुळे मला इतरत्र भटकण्याची संधी दिली नाही.म्हणून तुझे पहिल्यांदा आभार मानले पाहिजे. म्हणजेच काल जी आपल्या चांगल्या दृष्टीकोनातून कामाची तयारी आणि पूर्णत्वाकडे नेण्याची सर्वस्वी जबाबदारी मनाचीच होती.मनाचीच तयारी नसती तर कोणतेही काम पूर्णत्वाकडे गेले नसते. सदैव आपल्या मनाला कसल्याही प्रकारची मरगळ येऊ न देता प्रसन्न ठेवले पाहिजे आणि आजचे ही काम तितकेच जोमाने पार पडावे यासाठी तूच सर्वस्वी जबाबदार आहे आणि राहणार.थोडक्यात सांगायचे झाले तर कोणत्याही कामात यशस्वी होण्यासाठी पहिल्यांदा आपले मन आपल्या ताब्यात असायला हवे. त्यासाठी आपण सदैव तयार असायला हवे मग ते कोणतेही काम करणे सोपे जाईल. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍃🍂🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *गरीब माणूस आणि श्रीमंत माणूस* एक गरीब माणूस आणि एक श्रीमंत माणूस शेजारी शेजारी राहत होते. गरीब माणसाचे चपला जोडे शिवण्याची दुकान होते. काम करता करता तो अगदी आनंदाने गाणे गात असे.तो अगदी निर्धास्त जीवन जगत असे. आपल्या घराची दारे खिडक्या बंद ठेवाव्यात, त्यांना कुलूप कड्या लावाव्यात असे त्याला कधीच वाटत नसे.रोज रात्री तो देवाची प्रार्थना करून झोपी जात असे. शेजारी राहत असलेला श्रीमंत माणूस या गरिब आनंदी माणसाकडे नेहेमी पाहत असे. श्रीमंत माणसाला अनेक चिंता होत्या; स्वतःच्या पैशाची आणि सुरक्षेततेची त्याला नेहमी काळजी वाटत असे. आपल्या घराची दारे खिडक्या घट्ट बंद करत असे. एवढे करूनही त्याला शांत झोप लागत नसे. एके दिवशी श्रीमंत माणसाने गरीब माणसाला घरी बोलावले त्याने त्याला पाच हजार रुपये दिले आणि म्हणाला , " हे पैसे तुझ्याकडे ठेव मला या पैशांची गरज नाही.ते तुझेच पैसे आहेत असे समज.एवढे पैसे मिळाले म्हणून गरीब माणसाला पहिल्यांदा खूप आनंद झाला.पण त्या पैशांमुळे त्याच्या जीवनातील शांतता पार नाहीशी झाली.त्याने आयुष्यात पहिल्यांदाच आपल्या घराचे दार व सर्व खिडक्या बंद केल्या आणि त्यांना कड्या घातल्या आपले पैसे सुरक्षित आहेत ना, हे पाहण्यासाठी रात्री तो कितीतरी वेळा झोपेतून उठला. दुसऱ्याच दिवशी सकाळी तो गरीब माणूस श्रीमंत माणसाकडे आला. त्याने पाच हजार रुपये श्रीमंत माणसाला परत दिले आणि हात जोडून म्हणाला, " साहेब, हे तुमचे पैसे परत घ्या. आपण हे पैसे घेतलेत तरच माझं हसतं-गातं जीवन आणि शांत झोप मला परत मिळेल." *तात्पर्य सर्व सुख समाधान पैशात सामावलेले नसते.* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00          ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 13/12/2019 वार - शुक्रवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :-  ● २००२ - ज्येष्ठ चित्रपट निर्माते-दिग्दर्शक यश चोप्रा यांना २००१ चा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर. ● २००३ - प्रसिद्ध बंगाली लेखिका महाश्वेता देवी यांना ऑफिसर ऑफ आर्टस ऍन्ड लिटरेचर हा फ्रान्सचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी किताब जाहीर. 💥 जन्म :- ● १८१८ - मेरी टॉड लिंकन, अब्राहम लिंकनची पत्नी. ● १८५४ - थॉमस वॉट्सन, अलेक्झांडर ग्रॅहॅम बेलचा मदतनीस. ● १९२४ - विद्याधर पुंडलिक, साहित्यिक ● १९२८ - सरिता पदकी, बालवाङ्मय लेखिका 💥 मृत्यू :-  ● १९८६ - स्मिता पाटील, हिंदी चित्रपट अभिनेत्री ● १९९४ - विश्‍वनाथ अण्णा ऊर्फ तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक. ● १९९६ - श्रीधर पुरुषोत्तम लिमये ऊर्फ शिरुभाऊ, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक व क्रांतिकारक. ● २००५ - रामानंद सागर, हिंदी चित्रपट निर्माता, निर्देशक. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *ठाकरे सरकारचं अखेर 15व्या दिवशी खातेवाटप, गृह, नगरविकास, सार्वजनिक बांधकाम, कृषि या महत्वाच्या खात्यासह शिवसेनेकडे तब्बल 22 खाती, राष्ट्रवादीकडे अर्थ, ग्रामविकाससह 13 तर काँग्रेसकडे महसूल, शिक्षणासह 15 खाती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *अयोध्या प्रकरणातील सर्वच्या सर्व 19 फेरविचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या, सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाचा निर्णय, राम मंदिराचा मार्ग मोकळा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *नागरिकत्व दुरुस्ती विधेयक देशाच्या इतिहासात मैलाचा दगड ठरेल, गेल्या अनेक वर्षांपासून ज्या लोकांवर अन्याय झाले, त्यांचं दु:ख दूर करणारं हे विधेयक, पंतप्रधान नरेंद्र मोदींची भावना* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *स्वीडनमधील पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गला टाइम मॅगझीनचा 'पर्सन ऑफ द इयर' पुरस्कार, 16 वर्षांच्या ग्रेटावर कौतुकाचा वर्षाव* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *80व्या जन्मदिनानिमित्त मुंबईत शरद पवारांचा भव्य सत्कार, पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, तर वाढदिवसानिमित्त 80 लाख रुपयांचा निधी शेतकऱ्यांसाठी गोळा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *हैदराबाद एन्काऊंटर प्रकरणी सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर झाली सुनावणी, या प्रकरणाचा तपास करण्यासाठी सुप्रीम कोर्टाने तीन सदस्यांच्या आयोगाची स्थापना केली असून 6 महिन्यात अहवाल येणार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *रणजीचा रणसंग्राम - मुंबईचा दणदणीत विजय, महाराष्ट्राची हार, विदर्भ-आंध्र सामना अनिर्णित, मुंबईच्या शम्स मुलानीनं दुसऱ्या डावात सर्वाधिक चार फलंदाजांना माघारी धाडलं. त्यानं या सामन्यात एकूण दहा विकेट्स घेऊन सामनावीराचा मानही मिळावला.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *स्थानिक बातमी - बिलोली तालुक्यातील माचनुर येथे श्री खंडोबा यात्रेनिमित्त भव्य पशु प्रदर्शन, पालकी सोहळा व जंगी कुस्ती संपन्न, यात्रा उत्सवा दरम्यान तेलंगणा, आंध्रप्रदेश येथील भाविकांसह महाराष्ट्रातील हजारो भाविक भक्त मोठ्या संख्येने घेतले दर्शन* •••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••          *कमवा आणि शिका हेच उपयोगी* स्वतःच्या विकासावर कुटुंबाचे विकास अवलंबून असते. कुटुंबाच्या विकासावर गावाचा विकास आणि मग राज्य व देशाचा विकास होतो. या विकासासाठी शिक्षण हे अत्यंत महत्त्वाची बाब आहे. शिक्षणाशिवाय कोणाचेही विकास अशक्य आहे. शिक्षणामुळे दोन डोळ्याचे माणसे तिसऱ्या डोळ्याने डोळस होऊ शकतात. अन्यथा डोळे असून ही आंधळ्याची अवस्था होते. महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिक्षणाचे महत्त्व सांगताना म्हटले आहे की, विद्येविना मति गेली, मतिविना नीती गेली, नितिविना गती गेली, गतिविना वित्त गेले, एवढे अनर्थ सारे एका अविद्येने केले........ वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/06/blog-post_86.html    लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *'इ' जीवनसत्त्वाच्या गोळ्या दररोज घ्याव्या का ?* 📙 अशक्तपणात वाटतो या कारणासाठी अनेक लोक टॉनिकच्या बाटल्या फस्त करत असतात. बी कॉम्प्लेक्सची इंजेक्शने, तर खेडय़ापाडय़ातील प्रशिक्षण न झालेल्या गावठी डॉक्टरांकडेही असतात. टॉनिक, व्हिटॅमिन्स घेण्याचे हे वेड शहरी भागातील सुशिक्षित लोकांमध्येही आढळते. मागणी तसा पुरवठा हे जरी खरे असले तरी बर्‍याचदा फायदा उकळणारी मंडळी इतरांची दिशाभूल करून निरुपयोगी असे पदार्थ बाजारात आणतात व त्याची गरजही निर्माण करतात. लोकांचे अज्ञान डॉक्टरांची धंदेवाईक वृत्ती व औषधी कंपन्यांनी अधिक नफा मिळवण्याची वृत्ती या सर्वांमुळे टॉनिकचा खप वाढतोच आहे. या व्हिटॅमिन्स / टॉनिकच्या स्पर्धेत गेल्या काही वर्षांत 'इ' जीवनसत्त्वाचा प्रवेश झाला आहे. अनेक जाहिरातीत जीवनसत्त्व 'इ' दररोज वापरल्याने सुदृढपणा येतो शक्ती येते. असे लिहिलेले असते. हे खरे आहे काय ते आता पाहू. जीवनसत्त्व 'इ' म्हणजेच टोकोफेराॅल, वनस्पतीज तेले, सरकी, सूर्यफुलाच्या बिया, अंड्याचे बलक तसेच लोणी या पदार्थांमध्ये जीवनसत्त्व 'इ' विपुल प्रमाणात आढळते. प्रौढ व्यक्तीला दर दिवशी दहा मिलिग्रॅम इतके जीवनसत्त्व 'इ' लागते. प्रत्येकाला जीवनसत्त्व 'इ' ची नितांत गरज असते हे जरी खरे असले तरी या जीवनसत्त्वाची कमतरता कोणाच्याही शरीरात निर्माण झाल्याचा पुरावा आजतागायत आढळलेला नाही. त्यामुळे जीवनसत्त्वाच्या गोळ्या दररोज घेण्याची काही गरज नाही असे म्हणता येते. शिवाय जीवनसत्त्व 'इ' चे प्रमाण खूप जास्त झाल्यास मानवी लिम्फोसाइट या पांढर्‍या रक्तपेशींवर विपरीत परिणाम होतो असे प्रयोगशाळेतील चाचण्यांमध्ये सिद्ध झालेले अाहे. या सर्व बाबींचा विचार करता इ जीवनसत्व दररोज घेऊ नये, हे तुम्हाला पटलेच असेल. *डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित* यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून मनोविकास प्रकाशन ०२० ६५२६२९५० *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *" जो स्वत: दु:खातून गेला नाही त्याला दुसऱ्याचे दु:ख कसे कळणार ?"* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *भारताच्या पहिल्या लोकसभेचे अध्यक्षपद कोणी भूषविले ?* ग. वा. मावळणकर 2) *शरीरातील सर्व इंद्रियांवर ताबा ठेवणाऱ्या शरीराअंतर्गत संस्थेस काय म्हणतात ?* चेतासंस्था 3) *विशाखापट्टणम येथे कार्यान्वित केलेली भारताची पहिली आण्विक पाणबुडी कोणती ?* INS चक्र 4) *विदर्भातील राष्ट्रभाषा प्रचार समितीचे मुख्यालय कोठे आहे ?* वर्धा 5) *पाणी कशाच्या संयुगाने तयार होते ?* हायड्रोजन व ऑक्सिजन *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 अनिल गायकवाड, सहशिक्षक, बिलोली 👤 रोहन कुरमुडे, धर्माबाद 👤 उज्वल मस्के, साहित्यिक, बीड 👤 राजेश वाघ, बुलढाणा 👤 विनोद राऊलवार 👤 श्रीनिवास भोसले, नांदेड 👤 राजेश जी गडाख, नाशिक *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *हातात काय आहे? बरेचसे तर हाताबाहेरचे आहे. जन्म-मरण हातात नाही. पुढचा क्षण कसा असावा, ते हातात नाही. भूतकाळ मागे सुटलेला, असल्याच तर ब-या-वाईट आठवणी. भविष्याच्या गर्भात काय दडले, माहित नाही. त्यामुळे त्याची उत्सुकता आणि त्याच्या अनिश्चिततेतून वाटणारी असुरक्षितता. भविष्यातील असुरक्षिततेवर मात करण्यासाठी भविष्याविषयीचे स्वप्नरंजन करणे किंवा कल्पनेचे मनोरे बांधणे हाच काय तो उतारा. हाही उतारा कधी क्षणात उधळला जातो आणि कल्पनेचे मनोरे जमीनदोस्त होऊन जातात आणि उरते ती अगतिकता आणि असहायता.* *थोडाफार हातात म्हटल्यापेक्षा चिमटीत आहे तो आताचा वर्तमानातील क्षण. तोही क्षण चिमटीत आहे म्हणता म्हणता निसटतो आणि भूतकाळाच्या शवागारात जमा होतो. वर्तमान हातात असतो, तेव्हा आपण ब-याच वेळा भूतकाळात रममाण असतो. नाहीतर भविष्यातील स्वप्नरंजनात दंग असतो. त्यामुळे हातात असलेला क्षण तसाच सटकून निसटून जातो. क्षणाक्षणाला प्रवाही असलेला क्षण जगता आला पाहिजे. तोच क्षण माझा; ना भूतकाळ माझा. तो तर मेलेला. ना भविष्य माझे; ते तर स्वप्न. आहे ते वर्तमान. यात जगता आले तरच ते जगणे. यासारखी नितांत सुंदर गोष्ट नाही.* *॥ रामकृष्णहरी ॥* 🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿 *श्री संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल- 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो,* *जीवन एक संघर्ष आहे.* *म्हणतात ना दुनिया पैशावर चालते।* *पण पैसा कमवण्यासाठी कष्टाची गरज आहे आणि कष्ट* *केल्यावर आरामाची गरज आहे.* *कष्ट आणि आराम दोघंही एकमेकांचे जिगरी यार आहेत.पण एकाने जरी मी पणा किंवा अतिरेक केला व एकाला धोका दिला तर जीवन कवडीमोल* *होऊन जाते.* *यार,खूप थकलो ,आरामाची गरज* *आहे,झोपच नाही झाली.* *हे शब्द कानावर नेहमी पडतात.दोन्ही जगायला अत्यंत महत्वाचे असतात.* *कितीही मिळाले तरी कमी असल्यासारखे वाटतात.* *दोन्ही कमी पडले तर जगणे कठीण होते.* *माणसाच्या जगण्याची इतिकर्तव्यता ह्या दोघातच सामावलेली आहे.* *कारण काही* *लोक पैसे मिळवण्यासाठी आणि उरलेले लोक शांत झोप* *मिळवण्यासाठी जगत असतात.* *दोघांपैकी काहीही "उडाले" तर* *भयंकर प्रॉब्लेम होऊ शकतो.* *दोघांचाही स्वप्नाशी गहिरा संबंध* *आहे कारण एक स्वप्न* *दाखवते आणि दुसरे स्वप्न पुरे करते.* *दोघांचाही मेहनतीशी गहिरा संबंध आहे. मेहनत करणा-यांवर बहुतेक वेळा पैसा आणि झोप प्रसन्न असतात* *ह्यातील एकाचा अतिरेक दुसऱ्याच्या अस्तित्वावर आणि वृद्धीवर परिणाम* *करू शकतो.* *दोघांपैकी कोणाचेही सोंग आणता येत नाही!* *दोघांचेही योग्य प्रमाणात असणे आयुष्य सुखकर करते.* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ज्या व्यक्तीच्या मनात संशयाने घर केलेले असेल तर त्याचे जीवन जगणे अवघड होऊन बसते.त्याच्या मनात नेहमी कोणत्याही व्यक्तीबद्दल संशयी दृष्टीनेच पाहतो.अशा पाहण्याने स्वत:च्या जीवनाचे नुकसान तर होतेच पण इतरांच्या जीवनातही संशयाचे विष कालवून त्याचे मनही अस्थिर करुन टाकते.अशा परिस्थितीत मग चांगले जीवन जगायला अवघड जाते.अशा संशयी व्यक्तींच्या सानिध्यात न राहणेच योग्य ठरेल.संशय हा संशयी व्यक्तींचा मित्र असतो तर इतरांचा शत्रू.म्हणून अशा शत्रूला आपल्यापासून चार पाऊले दूरच ठेवायला हवे. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *प्रयत्नांती यश* एकदा दोन राज्यांच्यात युद्ध झाले. त्यात एक राजा पराभव झाला. पराभूत राजा शौर्याने लढला होता. पण त्याचे सैन्य थोडे होते. विजय राजाचे सैनिक पराभूत राजाला शोधत होते. त्यांना त्या राजाला ठार मारायचे होते. म्हणून राजा जीव वाचवण्यासाठी जंगलात पळाला आणि एका गुहेत जाऊन लपला. तो खूप दुःखी झाला होता. त्याचा धीर खचला होता. एके दिवशी राजा गुहेत स्वस्थपणे पहुडला होता. भिंतीवरील एका लहानशा कोळ्याने त्याचे लक्ष वेधले. कोळी गुहेच्या भिंतीवर फार मेहनतीने जाळे विणत होता. तो सरपटत भिंतीवर चढायचा. मधेच एखादा धागा तुटायचा आणि कोळी जमिनीवर पडायचा. असे बरेचदा घडले. पण कोळ्याने आपला प्रयत्न सोडला नाही. तू चिकाटीने झाडे विनतच राहिला. अखेर जाळी विनत विनत तो छतापर्यंत पोहोचला. राजाने विचार केला, " हा सरपटणारा छोटासा प्राणी सुद्धा आपले प्रयत्न सोडत नाही. मी तर राजा आहे. मग मी माझे प्रयत्न का बर सोडले? मला पुन्हा प्रयत्न केलाच पाहिजे." त्याने शत्रु बरोबर पुन्हा युद्ध करण्याचा निश्चय केला. राजा जंगलातून बाहेर पडला आणि आपल्या विश्वासू सहकाऱ्यांना भेटला. त्याने आपल्या राज्यातील शूर माणसे एकत्र केली आणि बलवान सैन्य उभारले. सर्व शक्तीनिशी त्यांनी आपल्या शत्रू बरोबर युद्ध केले. अखेरीस त्याने लढाई जिंकली. त्याला त्याचे राज्य परत मिळाले. एका कोळ्याने आपल्याला धडा शिकवला, हे त्याच्या कायम लक्षात राहिले. *तात्पर्यः जो अपयशाने खचून न जाता सतत प्रयत्न करतो ,त्यालाच यश मिळते.* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00          ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 12/12/2019 वार - गुरूवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  💥 ठळक घडामोडी :-  ● १९८५ - ऍरो एर फ्लाइट १२८५ हे डी.सी.८ जातीचे विमान न्यू फाउंडलंडमधील गॅन्डर विमानतळावरून उडताच कोसळले. २५६ ठार. मृतांमध्ये अमेरिकेच्या १०१व्या एरबॉर्न डिव्हिजनचे २४८ सैनिक. ● १९९० - पाकिस्तान अंटार्क्टिकाला अभियान पाठविणारा ३७वा देश ठरला. ● २००१ - भारतीय हवाई दलासाठी खास विकसित केलेल्या अधिक मोठ्या पल्ल्याच्या पृथ्वी क्षेपणास्त्राची बालासोर येथे यशस्वी चाचणी. ● २००० - अमेरिकेचे सर्वोच्च न्यायालयने बुश वि. गोर खटल्यात निकाल दिला. ज्यॉर्ज डब्ल्यू. बुश राष्ट्राध्यक्षपदी. 💥 जन्म :- ● १८७२ - बाळकृष्ण शिवराम मुंजे, भारतीय-मराठी राजकारणी, हिंदू महासभेचे संस्थापक. ● १९४० - शरद पवार, माजी मुख्यमंत्री ● १९४९ - स्व. गोपीनाथ मुंडे, माजी उपमुख्यमंत्री ● १९५० - रजनीकांत तथा शिवाजीराव गायकवाड, तामिळ अभिनेता. ● १९८१ - युवराजसिंग, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :-  ● १९३० - बाबू गेनु, पुण्यात परदेशी मालाविरुद्ध निदर्शने करताना. ● १९९२ - पं. महादेव शास्त्री जोशी, भारतीय संस्कृतिकोशाचे लेखक. ● १९९२ - जसु पटेल, भारतीय क्रिकेट खेळाडू. ● २००४ - निरंजन उजगरे, मराठी कवी. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *नागरिकत्व सुधारणा विधेयक राज्यसभेत मंजूर, 117 विरुद्ध 92 च्या फरकानं विधेयक मंजूर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *आरेमधील मेट्रो कारशेडसाठी कापण्यात आलेल्या झाडांच्या चौकशीसाठी समिती गठीत करण्यात आली असून ही समिती वित्त विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली काम करेल. समितीमध्ये चार सदस्य असतील. समिती पुढील 15 दिवसात याबाबतचा अहवाल सादर करेल.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होऊन 14 दिवस उलटले. पण अजूनही खातेवाटपावरुन महाविकास आघाडीत गोंधळ सुरु असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिलीय.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *समृद्धी महामार्गाला हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव, मंत्रीमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव, येत्या तीन वर्षात प्रकल्प पूर्ण करणार शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदें यांनी दिली माहिती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *राज्याची केंद्राकडे 15 हजार 558 कोटी रुपयांची जीएसटी थकबाकी, राज्याच्या विकासासाठी हा निधी लवकर मिळावा यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना लिहिलं पत्र.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *तीन दशकांपेक्षा जास्त काळ चेन्नईमध्ये निर्वासितांप्रमाणे राहणाऱ्या तामीळ भाषिक श्रीलंकन नागरिकांना भारताचं नागरिकत्त्व प्रदान करण्याची आध्यात्मिक गुरु श्री श्री रवीशंकर यांनी सरकारकडे केली मागणी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *भारतीय अवकाश संशोधन संस्थेने म्हणजे इस्रोने रिसॅट - 2BR1 उपग्रहाचं केलं यशस्वी प्रक्षेपण, बालाकोटसारख्या मिशनमध्ये मदत मिळणार, या भारतीय उपग्रहासह इस्रोने इस्त्रायल, इटली, जपान आणि अमेरिका या देशांच्या नऊ उपग्रहांना अवकाशात पाठवलं आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *स्थानिक बातमी - नांदेड जिल्ह्यातील नायगाव विधानसभा अंतर्गत धर्माबाद उमरी आणि नायगाव तालुक्यातील जिल्हा परिषद शिक्षकांची एकदिवसीय कार्यप्रेरणा कार्यशाळा शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••     *साहस कथा* सातव्‍या वर्गात शिकत असतानाच सुधाचे लग्‍न मोठ्या थाटामाटात झालं.  अजून तिला खूप काही शिकायच होत, तसं आईला तिने बोलूनही दाखवलं, परंतु बाबांच्‍या रागासमोर दोघांचेही चालले नाही पाच सात एकर जमीन, मोठा वाडा, गोठ्यात दहा-पंधरा जनावरं, एकुलता ...... वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://kathamaala.blogspot.com/2017/12/blog-post.html            लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *भौतिकशास्त्र* 📙 ********************** विश्व हे पदार्थांनी (Matter) बनले आहे. या पदार्थाचे स्वरूप, उत्पत्ती, बदल, स्थित्यंतरे, त्यांतून निर्माण होणारी ऊर्जा किंवा ऊर्जेचा त्यांच्यावर होणारा परिणाम याबद्दल अभ्यास करावयाचे शास्त्र म्हणजे पदार्थविज्ञानशास्त्र वा भौतिकशास्त्र. यातील शास्त्रज्ञ (Physisist) नेमके काय करतो, त्याच्या कामाचा जगाला काही उपयोग आहे वा नाही याबद्दलच अनेक शास्त्रज्ञ साशंक असत. ही शास्त्रशाखा दुर्लक्षित होती, त्या परिस्थितीत अल्बर्ट आइन्स्टाइनपासून खूपच बदल घडत गेले. या बदलांना चक्क या शाखेबद्दलच्या आकर्षणाचे स्वरूप निर्माण झाले, ते अणुविभाजन व अणुस्फोटानंतर. यानंतर मात्र या शाखेत काम करतो आहे, हे सांगणेही मानाचे समजले जाऊ लागले. आज घटकेस भौतिकशास्त्र जवळपास आपल्या जीवनाशी संबंधित प्रत्येक बाबीस व्यापुन आहे. पण एक महत्त्वाचा घटक म्हणजे या शास्त्रातील प्राथमिक बाबी या तांत्रिक अभ्यासात (Engineering) जास्त शिकवल्या जातात. व्यवहारात: तो अभ्यास पुरेसा असल्याने केवळ या शास्त्रात रस घेऊन संशोधन करणारे आजही मोजकेच निघतात. उदाहरणार्थ, तेल विहीर खणायची आहे, भूकंपप्रवण भागाचा अभ्यास करावयाचा आहे, अंतराळयान सोडायचे आहे वा रेल्वेमार्ग घालावयचा आहे; तर यांपैकी प्रत्येक प्रकल्पासाठी कित्तेक इंजिनिअर व अन्य तंत्रज्ञ लागतील. पण प्राथमिक पाण्यासाठी जेमतेम एखाद्या भौतिकशास्त्रज्ञास बोलावून त्याचे मत आजमावले की, त्याचे काम कदाचित संपून तो अडगळीत पडेल. नंतरचे सारे काम फक्त तंत्रज्ञ व त्यांची प्रगत यंत्रे यांकरवीच केले जाईल. या स्वरूपाच्या कामाच्या पद्धतीमुळे या जमातीबद्दल सामान्यांच्या मनात खूपच कमी माहिती आढळते. उष्णता, विद्युत, आवाज, प्रकाश, चुंबकीय क्षेत्र, अणुरचना या मुलभुत बाबींचा अभ्यास आजही पुरेसा झाला आहे, असे अनेक शास्त्रज्ञांना वाटत नाही. त्यामुळे याबाबतीत सतत संशोधन चालू असते. पण या संशोधनाचे स्वरूप अत्यंत क्लिष्ट असल्याने व निष्कर्ष लगेच प्रसिद्ध होत नसल्याने सामान्यांना त्याची फारशी कल्पना येत नाही. काही प्रकल्प तर एवढे महाग व अशक्यप्राय खर्चाचे असतात की, अनेक देशांनी मिळून ते हातात घेतलेले असतात. जिनिव्हा येथील 'युरोपियन सेंटर फॉर न्यूक्लियर रिसर्च' ही प्रयोगशाळा असेच एक उद्या उदाहरण सांगता येईल. प्रचंड लांबीच्या निर्वात पोकळीमध्ये भुयारात अणुरचनेवर संशोधन येथे चालू असते. हा खर्च कोणत्याच एका देशाला न परवडणारा असल्याने अनेक देशांनी हा खर्च करून तेथे एकत्रित प्रयोग केले जातात. रसायनशास्त्राचे मुलभूत नियम आता भौतिकशास्त्रातून समजू शकतात. रेणूजीवशास्त्र (Molecular Biology) हे जीवशास्राच्या मुळाशी असलेले शास्त्रादेखील भौतिकशास्त्रातच मोडते. 'जगाच्या उत्पत्तीपासून विनाशापर्यंत प्रत्येक बाबतीतच डोके खुपसून त्याबद्दल छडा लावण्याचा प्रयत्न करणारे शास्त्र,' असेही विनोदाने या शास्त्राचे वर्णन करता येईल. *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *" जीवनाचा अर्थ विचारायचा असेल तर तो आकाशाला आणि समुद्राला विचारा. "* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *भारतातील कोणत्या केंद्रशासित प्रदेशात केशरचे उत्पादन होते ?* जम्मू काश्मीर 2) *कोणत्या वेदांचे स्वामी दयानंद सरस्वती यांनी हिंदीत रूपांतर केले आहे ?* ऋग्वेद व यजुर्वेद 3) *कोणत्या किरणांमुळे त्वचा काळी पडते ?* अल्ट्राव्हायोलेट 4) *फळे लवकर पिकवण्यासाठी कोणत्या वायूचा वापर केला जातो ?* इथिलीन 5) *'मृत्यूचे चुंबन घेणारा महाकवी' या शब्दात प्र. के. अत्रे यांनी कोणाचे वर्णन केले आहे ?* साने गुरुजी *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 कृष्णजीत केरबा उमाटे, मुखेड 👤 माधव सोनटक्के, सहशिक्षक, करखेली 👤 नागनाथ परसुरे, सहशिक्षक, माचनूर 👤 शुभानन गांगल, पुणे 👤 अशोक पाटील कदम 👤 समीर मुल्ला 👤 वतनदार पवनकुमार नारायण 👤 गजानन हुस्सेकर, सहशिक्षक, धर्माबाद 👤 महेश शिवशेट्टी 👤 माधव पाटील शिंदे 👤 राजकुमार इंगळे 👤 कु. योगेश्वरी बालाजी पेटेकर 👤 विपीन कासलीवाल 👤 डॉ. सुभाष नामदेव पाटील 👤 शुद्धधोन पवार, डोणगावकर 👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *तारूण्य आणि संगत यांचे महत्व विशद करताना जैन मुनीं तरूण सागर महाराज सांगतात, 'आपले मित्र, चित्र आंणि चरित्र नेहमी पवित्र ठेवा; कारण तेच खरे जीवनाचे अस्त्र आहे. तुम्हाला तर हे माहित आहे की., चारित्र्याचे पतन होण्यासाठी बहुधा चुकीचे मित्र आणि चुकीचे चित्र यांचाच हात असतो. चुकीचे मित्र आणि चुकीचे चित्र हेच चारित्र्य नष्ट करण्याचे शस्त्र आहे किंवा असेही म्हणता येईल की, कधीही न चुकणारे ब्रम्हास्त्र आहे.' तारुण्याच्या सळसळत्या उर्जेवर स्वार्थी व्यवस्थांचा डोळा असतो. त्यामुळेच तारूण्याची ऊर्जा सैरभैर करून तिला आपल्या इच्छेप्रमाणे वापरण्याचे धूर्त राजकारण या स्वार्थी व्यवस्था करत असतात. तारुण्याच्या ऐन उमेदीचा कालखंड निरर्थकपणे या स्वार्थी व्यवस्थेच्या नेतृत्वामागे घालविला जातो.* *एखादी पाण्याची बाटली वापरून फेकून द्यावी, त्या पद्धतीने तरुणांच्या ऊर्जेचा वापर करून त्यांना शेवटी फेकून दिले जाते. सर्व बाजूंनी निष्क्रिय केलेल्या तरूणांवर शेवटी पश्चात्तापाची वेळ येते. तारूण्याचे रखरखीत वाळवंट होते. आपले तारूण्य विवेकशून्य व्यवस्थेच्या हाती द्यायचे की, स्वत:वर विश्वास ठेवत स्वकर्तृत्वाच्या बळावर समाज जीवनात उजळवून टाकायचे हे ज्याला समजले, त्याला तारुण्याचा खरा अर्थ कळला. माजी राष्ट्रपती डाॅ. ए.पी.जे. अब्दुल कलाम हे युवकांना देशाची संपत्ती म्हणायचे, ही संपत्ती देशासाठी आपत्ती ठरू नये म्हणून तरूणांनी आपले मित्र विचारपूर्वक निवडावेत.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल- 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो,* *भारतमाते पुत्र शहाणे अमित तुला लाभले,* *तुझ्या कुशीला परी जन्मली ,* *सारी वेडी मुले.* *आज बाबू गेणूंचा स्मृतिदिन* *या भारतमातेच्या सुपुत्रांनी 150 वर्षे* *इंग्रजांच्या जोखडात बंदिस्त असलेल्या माझ्या भारतमातेला मुक्ती* *दिली.* *हे करत असतांना त्यांनी आपल्या घराची,संसाराची राखरांगोळी केली.* *तरुणांना खरा आदर्श वाटावा असे ज्वाजल्य देशप्रेम,रक्ताने भाळी लावलेला स्वातंत्रदेवतेचा टिळा.* *कुठलीही तमा न बाळगता प्राणाला सामोरे जाण्याची तयारी आज* *यत्किंचितही दिसत नाही.अवघ्या 22 व्या वर्षी 12 डिसेंम्बर 1930 रोजी माझ्या बाबू* *गेनू या शूर मर्दाने इंग्रजांच्या परदेशी मालाने भरलेल्या ट्रकला आडवा होऊन प्राणाची आहुती दिली.* *ही निष्ठा,हे देशप्रेम,ही राष्ट्रभक्ती आज खुर्चीसाठी भांडणाऱ्या सत्ताधाऱ्यांना खुणावतेय.* *देशात चाललेल्या अराजकतेला आळा घालण्यासाठी कुणी देशभक्त पुढे येतांना दिसत नाही.बाबू गेनू चे* *गाडीखाली जाणे एव्हढे सोडले तर फारसं कुणाला काही माहीत नाही.* *जिथे माझा हा निष्ठावान साथीदार गेला तिथे कुणी स्तंभ बांधला नाही ना वात पेटवली नाही.* *कुसुमाग्रज यांनी यावर फार उपरोधीत काव्य केले आहे.* *अनामविरा जिथे जाहला , तुझा जीवनअंत , स्तंभ तिथे ना कुणी बांधला,* *पेटली न वात.* *धगधगत्या या समराच्या ज्वाला* *देशकाशी,* *जळावयास्तव संसारातून उठोनिया जाशी।* *मुकपणाने तमी लोपती, संध्येच्या रेशा,* *मरणामध्ये विलीन होशी, ना भय ना आशा।* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• प्रत्येकाला आपल्या जीवनात आनंद मिळवायचा असेल तर प्रथम एकाकी जीवन व एकांतात राहणे सोडून द्यावे.कारण एकाकी जीवनात नको ते विचार मनात येतात आणि त्रस्त करतात.त्याचा परिणाम स्वत:च्या जीवन जगण्याच्या जीवनशैलीवर होतो आणि त्यामुळे सुखासमाधानाने असलेले जीवन दु:खात जगत असल्याचे वाटते.त्यापेक्षा इतरांच्या सानिध्यात राहून त्यांच्या आनंदी जीवनात आपणही राहावे.असे केल्याने आपल्या मनात आणि मनावर असलेले दडपण थोड्याप्रमाणात कमी होण्यास मदत होते.इतर लोक कसे जगतात याचेही अवलोकन करता येते.आपण दु:खी कशामुळे आहोत याचेही कारण शोधता येईल आणि शेवटी जीवन आनंदी जीवन कसे जगता येईल याचेही आपल्याला कौशल्य प्राप्त करता येईल.खरे जीवन जगण्याचा मंत्र आपल्या एकटेपणात मिळणार नाही तर इतरांच्या सानिध्यात राहिल्याने मिळतो हे आपल्याला नक्कीच मिळेल. © व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *अति तेथे माती* एकदा एक राजहंस एका बगळय़ाला म्हणाला, 'काय रे, तू आधाशी! पाण्यातला कोणताही प्राणी खायला तू मागे-पुढे पाहात नाहीस. बरे-वाईट, नासके-चांगले हा फरकसुद्धा तुला समजत नाही. माझे पाहा, मी फक्त पूर्ण उमललेल्या कमळातले तंतू तेवढे खाईन, दुसरा कसलाही पदार्थ माझ्या घशाखाली जाणार नाही.' आणि मला तसे आवडणार नाही. त्यावर बगळा म्हणाला, 'माझ्या दृष्टीने असा चोखंदळपणा बारकावा असणे बरे नव्हे. ज्यावेळी जे मिळेल ते खावे अन् सुखी राहावे. खाण्याचा पदार्थ दिसला की, तो खावा हेच शहाणपणाचे.' असे म्हणून बगळा उडाला व जवळच्या तलावाकाठी गेला. तेथे कडेला त्याला मासा दिसला. तेव्हा विचार न करता त्याने तो एकदम गिळला, पण आत असलेला गळ घशाला लागून तो जिवास मुकला. राजहंस आपले आवडते खाणे खाण्यासाठी दुसर्‍या कमळे असलेल्या तळय़ात गेला, पण तेथे हंस धरण्यासाठी जाळे असल्यामुळे तेथे तो अडकला. *तात्पर्यः कोणतीही गोष्ट अति केल्यावर त्याचे परिणाम भोगावे लागते म्हणून कोणत्याही गोष्टीचा अतिरेक नको.अति तेथे माती होणारच..* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00          ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 11/12/2019 वार - बुधवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  *आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस* *श्री दत्त जयंती* 💥 ठळक घडामोडी :-  १८१६ - इंडियाना अमेरिकेचे १९वे राज्य झाले. १९३०: सी. व्ही. रमण यांना नोबेल पारितोषिक जाहीर. १९४६: युनिसेफ (UNICEF) ची स्थापना 💥 जन्म :- १९६९ - विश्वनाथन आनंद, भारतीय बुद्धिबळ खेळाडू, ग्रँडमास्टर. १९०९ - नारायण गोविंद कालेलकर, भाषाशास्त्रज्ञ. १९२२ - दिलीपकुमार, हिंदी चित्रपट अभिनेता. १९२५: मराठी साहित्यिक राजा मंगळवेढेकर यांचा जन्म. १९३१: आचार्य रजनीश यांचा जन्म 💥 मृत्यू :- १९८७ - जी.ए. तथा गुरुनाथ आबाजी कुलकर्णी, मराठी लेखक. १९९८ - राष्ट्रकवी प्रदीप, हिंदी कवी. २००४ - एम.एस. सुब्बुलक्ष्मी, गायिका आणि भारतरत्न, रेमन मॅगसेसे पुरस्कारविजेत्या. १९६३ - कोवलम माधव पणिक्कर, राजकारणी, इतिहासकार. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *भारतातील पहिले फिरते पोटविकार केंद्र महाराष्ट्रात सुरु, गरीब रुग्णांना लाभ होणार, पद्मश्री डॉ. अमित मायदेव यांची संकल्पना * ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *राज्यात सत्ता स्थापनेच्या 13 दिवसांनंतरही महाराष्ट्र विकास आघाडीचं खातेवाटप जाहीर नाही; गृह, नगरविकास, गृहनिर्माण खात्यावरुन खातेवाटप रखडल्याची सूत्रांची माहिती * ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *आता टू व्हीलरवर बसणाऱ्या चिमुरड्यांनाही हेल्मेटसक्ती, अपघातांच्या पार्श्वभूमीवर मोटार वाहन कायद्यामध्ये सुधारणा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *खराब हवामानामुळे 24 दिवस बंद असलेली शिर्डी विमानसेवा आजपासून होणार पुन्हा सुरु, सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर भाविकांना दिलासा * ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *रखडलेल्या स्व. गोपीनाथ मुंडेंच्या स्मारकासाठी निधी देण्याचं मुख्यमंत्र्यांकडून आश्वासनं : एकनाथ खडसे यांचे प्रतिपादन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाबाबत स्पष्टता येत नाही तोपर्यंत राज्यसभेत पाठिंबा देणार नाही, शिवसेनेची भूमिका, विधेयकाची राज्यसभेतील वाट बिकट* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *रणजीचा रणसंग्राम - स्पर्धेचा पहिला दिवस मुंबईच्या फलंदाजांनी आणि विदर्भाच्या गोलंदाजांनी गाजवला होता. रणजी करंडकाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी विदर्भ आणि मुंबईनं आपापल्या सामन्यात वर्चस्व गाजवलं. तर महाराष्ट्राचा संघ मात्र अडचणीत सापडला आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••              *कळी उमलण्या आधी .....!* लघुकथा वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे https://storymirror.com/read/story/marathi/9fu28ady/klii-umlnnyaa-aadhii/detail कथा वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *भूतलावरची येती पन्नास वर्षे* 📙 ५० वर्षांनी काय घडेल, असा प्रश्न विचारला असता अनेकांचे अनेक उत्तरे येतील. सत्ताधारी स्वतःच्या सत्तेवरच्या पुढच्या पिढीबद्दल बोलेल, ज्योतिषी ग्रहांच्या युत्यांची गणिते मांडेल, शेतकरी कमी पडणाऱ्या पाण्याची चिंता करेल, तर सामान्य वाचक नातवाच्या अॅडमिशनची चिंता व्यक्त करेल ! कोणताही शास्त्रज्ञ मात्र या प्रश्नाकडे अत्यंत गंभीरपणे बघून नक्कीच विचारात गढून जाईल. त्याची कारणे तशीच आहेत. औद्योगिक प्रगतीचा वेग, त्यातून निर्माण होणारे रासायनिक प्रदूषणाचे प्रश्न, शहरातील बदलती राहणीची पद्धती, शेती, पाणीपुरवठा या विविध बाबींनी या प्रश्नाला इतके गंभीर स्वरूप आले आहे की कोणीही शास्त्रज्ञ या प्रश्नाला लगेच काहीच उत्तर देऊ शकणार नाही. एकमेकांत विचित्रपणे गुंतलेले असंख्य प्रश्न या पन्नास वर्षात काय काय घडणार आहे, याचे ठोक स्वरूप समोर येऊ देत नाहीत. प्रथम सध्याचे भीषण स्वरूपाचे प्रश्न कोणते, याची केवळ यादी बघू या - १. पृथ्वीवरील कार्बन डायऑक्साईडचे वाढते प्रमाण. १८५० साली हे प्रमाण २६५ पार्टस पर मिलियन किंवा पीपीएम होते, तर १९८८ साली नासाने केलेल्या मोजणीत ते ३५० पीपीएम इतके वाढले आहे. यामुळे पृथ्वीवरील तापमान १ अंश फॅरनहाइटने वाढ झाली आहे. असेच प्रमाण वाढत गेले, तर ५० वर्षांनी ४ अंश फॅरनहाइटने तापमान वाढेल, असा प्राथमिक अंदाज आहे. २. सीएफसी किंवा क्लोरोफ्लोरोकार्बनमुळे ओझोनचा थर कमी होत आहे. सूर्याच्या अतिनील किरणांना पृथ्वीवर प्रवेश करायला त्यामुळे जास्त संधी मिळणार आहे. ओझोनच्या थराने या किरणांपासून आपल्याला संरक्षण मिळत असते. याखेरीज पृथ्वीवरील तापमान वाढण्यास कार्बन डायऑक्साइडच्या प्रमाणाच्या जोडीला ही बाब मदतच करेल, असे वाटते. ३. एकूण तापमान वाढ झाल्यास ध्रुवीय बर्फसाठा वितळून समुद्र पातळी किमान पाच फुटांनी वाढण्याची शक्यता उद्भवते. मुळात जगातील सर्व बंदरे समुद्रपातळीलाच असल्याने पाच फुटांनी वाढलेली पातळी अनेक मोठ्या औद्योगिक शहरात हलकल्लोळ माजवेल. तसेच जगातील अनेक बेटे व बेटसदृश देश नष्टच होण्याची शक्यता आहे. उदारणार्थ आपल्या जवळची मालदीव बेटे. ४. लोकसंख्यावाढीने सध्याच जगाला हैराण केले आहे. पण हा प्रश्न ५० वर्षांनी वेगळ्या पद्धतीने सुटेल, असा विश्वास शास्त्रज्ञांना वाटतो. एका ठरावीक काळाने म्हणजे अजून चाळीसएक वर्षांनी जगाची लोकसंख्या स्थिरावेल. ५. अन्नधान्य, रोगराई प्रश्न दुय्यम राहून एड्सचा प्रसार हा प्रश्न मात्र भयानकरित्या समोर उभा ठाकणार आहे. अॅक्वायर्ड इम्यूनो डेफिशियन्सी सिंड्रोम हा प्रकार नवनवीन विषाणूंच्या स्वरुपात पृथ्वीवर ठाण मांडून राहणार आहे, असे दिसते. या प्रश्नांच्या अनुषंगाने व सध्याची आपली संशोधनातील गती बघता काय घडेल, याचा एक ओझरता आराखडा समोर येतो. त्यानुसार ५० वर्षांनी : जेनेटिक्समधील संशोधन खूपच प्रगत होत जाईल. सर्व प्रकारची बियाणे ही रोगराईला तोंड देण्यास समर्थ असतील, त्यामुळे रासायनिक औषधे फवारे मारणे बंद होईल. धान्योत्पादन दरवर्षी गरजेप्रमाणे केले जाऊ शकेल. पेट्रोलऐवजी अनेक ठिकाणी अल्कोहोलचा वापर सुरू झालेला असेल. आफ्रिका खंडात दुष्काळ जरी वाढला असला, तरी लोकसंख्यानियंत्रणाने व तेथील पाळीव जनावरांच्या मांसामुळे खाण्याची व अन्नाची टंचाई भासणार नाही. दुष्काळाने मृत्यू बंद झालेले असतील. पाण्याची पातळी वाढल्याने बांगलादेश, गंगेच्या तोंडाजवळील त्रिभुज प्रदेश, कच्छचे रण, केरळ व ओरिसाचा बराच भाग हा कायमचा पाण्याखाली गेलेला असेल. उन्हाळ्यामध्ये गंगेचा पूर हा स्थायी स्वरूपाची गोष्ट होऊ लागेल. वयाची नव्वदी गाठणे ही नित्याची बाब असल्याने हा मजकूर वाचलेले अनेकजण सत्तरी ओलांडलेली असूनही कामामध्ये व्यग्र असतील व त्यांच्या ताब्येतीही अगदी उत्तम असतील. निवृत्तीचे वय त्या वेळी बहुधा पंचाहत्तर असेल. विविध शहरांमध्ये शंभरमजली इमारतीवजा छोटी गावेच उभी असून तेथे राहणाऱ्यांचा 'दुसऱ्या अशाच गावांशी', क्वचित प्रत्यक्ष संबंध येत असेल; तर घर, शाळा, दुकान, पार्क, थिएटर, ऑफिस सर्व काही एकाच 'गावा'त असल्याने फक्त मजले बदलण्याचाच प्रश्न दिवसाकाठी वरचेवर येत राहील. या बहुउद्देशीय प्रचंड इमारतींचा विजेचा पुरवठा सर्वस्वी सूर्यऊर्जेपासून होत असल्याने भल्यामोठय़ा तारांचे जाळे सार्‍या शहरभर पसरवण्याची गरजच राहणार नाही. त्याचप्रमाणे दळणवळणासाठी थेट उपग्रहाद्वारेच दळणवळण साधने जात असल्याने टेलिफोन, टीव्ही केबल टीव्ही इत्यादींच्याही तारांचे जंजाळ कुठे आढळणार नाही. कागदी वृत्तपत्र हा प्रकार बंद झालेला असून आवडीचे वृत्तपत्र आयपॅडच्या पडद्यावरच वाचले जाईल. ५० वर्षांचा काळ मानवी जीवनात फार मोठा आहे. पण शास्त्राच्या प्रगतीच्या दृष्टीने तो अगदीच थोडा कालावधी आहे. त्यातूनही विसाव्या शतकातील प्रगतीचा वेग सर्वांनाच भोवंड आणणारा आहे. ५० वर्षांपूर्वीचा काळ आठवा. त्या काळी आजच्या घडणाऱ्या अनेक गोष्टींची शक्यता तर सोडाच, पण स्वप्नेही कोणी पाहिली नव्हती. मग अजून ५० वर्षांनी होणारी प्रगती कशी असेल, याचा अंदाज बांधायला तर काहीच हरकत नसावी, नाही काय ? *'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *" जीवनातला अंध:कार नाहीसा करणारी ज्योत म्हणजे हास्य ! "* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *'कर्नल' या नावाने ओळखला जाणारा भारताचा माजी कप्तान कोण ?* दिलीप वेंगसरकर 2) *भारतातील धवलक्रांतीचे जनक कोणाला म्हटले जाते ?* डॉ वर्गीस कुरियन 3) *हिंदी महासागराचा उल्लेख प्राचीन भारतात कोणत्या नावाने केला जाई ?* रत्नाकर 4) *वटवाघूळे अंधारात कशाच्या सहाय्याने मार्गक्रमण करतात ?* प्रतिध्वनी लहरींच्या सहाय्याने 5) *तुंगभद्रा ही कोणत्या नदीची उपनदी आहे ?* कावेरी *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 इलियास शेख, सर्पमित्र व शिक्षक 👤 प्रा. नितीन दारमोड, समाजभूषण संस्थापक व अध्यक्ष, जनसेवा प्रतिष्ठान 👤 दस्तगीर सय्यद शिक्षक व निवेदक 👤 दीपक पाठक, परभणी 👤 आकाश सोनटक्के 👤 👤 👤 👤 👤 👤 👤 👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *काहीही विपरीत घडले की त्याबद्दल इतरांना जबाबदार धरण्याची एक सार्वत्रिक प्रवृत्ती असते. आपली चूक कबूल करण्याऐवजी त्याला इतर लोक कसे दोषी आहेत, हेच बहुतेक जण सांगत असतात. चूक कबूल करण्यात बहुतेकांना कमीपणा वाटतो. त्यामुळे आपले चूक असले, तरी ते योग्य आहे असाच हेका अनेकजण लावतात. सार्वजनिक पातळीवर तर हे चित्र आणखी गडद होते आणि समाजातील सर्वच वाईट गोष्टींसाठी शासन यंत्रणेला दोषी ठरविले जाते. जनकल्याणाचे आश्वासन देऊन सत्तेवर आलेल्या सरकारकडून मोठ्या अपेक्षा असतात आणि बहुतेकदा अपेक्षाभंग होतो.* *देश आपल्यासाठी काय करणार यापेक्षा आपण देशासाठी काय करणार असे जाॅन. एफ. केनेडी यांनी म्हटले होते. 'मी साधा माणूस, मी काय करणार' असे उत्तर प्रत्येक जण देऊ शकतो. मात्र साधा माणूस खूप काही करू शकतो. सार्वत्रिक नियमांचे पालन करणे, आपला परिसर स्वच्छ ठेवणे, अफवा न पसरविणे अशा अनेक गोष्टी आपण करू शकतो. चांगला नागरिक बनण्याची सुरूवात घरापासून होते. सार्वजनिक नियमांचा आदर राखण्याची प्रवृत्ती मुलांमध्ये विकसित केली तरी पुष्कळ. लहान मुले मोठ्यांचे अनुकरण करतात, याची जाणीव न ठेवता मोठी माणसे गैरवर्तन करतात. त्यामुळे पुढील पिढीही तेच शिकते.* *॥ रामकृष्णहरी ॥* 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल-9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो,* *सायंकाळी कॉटवर जरा आडवा झालो आणि कानी घेताच सकाळ स्मार्ट सोबती मधील 'चिटवूमन' या जिगरबाज लेखावर नजर गेली.* *जो हो गया उसे सोचा नही करते,* *जो मिल गया उसे खोया नही करते,* *हासिल उन्हे होती है सफलता,* *जो वक्त और हालात पर रोया नहीं करते.* *अस जन्मतःच अपंगत्व घेऊन आलेली अमेरिकेची अँमी मलिन्स हिने आपल्या मनात कुठलाही किंतु न ठेवता उत्कृष्ट मॉडेल,नावाजलेली* *अभिनेत्री, जिगरबाज खेळाडू अशी अनेक* *बिरूदे लावून सर्व अशक्य गोष्टी करून जगाला नवा संदेश दिला.* *मलिन्सच्या स्वप्नांना मर्यादाच नव्हत्या.* *वयाच्या पहिल्या वर्षीच आईबापाने तिचे गुडघ्यापासून खालचे पाय कापून टाकले कारण ते वाढणारच नव्हते. आणि मग आयुष्य कस* *जगायचं हा मोठा प्रश्न.पण शक्य नाही ही गोष्ट मलिन्सच्या कानाला आणि मनाला* *तिने कधीच शिवू दिले नाही .* *प्रत्येक क्षेत्रात यशाची नवी शिखरे पादाक्रांत करत राहिली.आणि* *अमेरिकेतच नाही तर जागतिक पातळीवर आयडॉल बनली.* *या जगण्यावर* *सुरेश भटांच्या सुंदर ओळी..* *आठवल्याशिवाय राहत नाही---* *आयुष्य छान आहे थोडे लहान आहे !* *रडतोस काय वेड्या? लढण्यात शान आहे.!* *काट्यातही फुलांची झुलती कमान आहे !* *उचलून घे हवे ते , दुनिया दुकान आहे !* *जगणे निरर्थक म्हणतो तो बेइमान आहे.* *"सुखासाठी कधी हसावं लागंत ,तर कधी रडावं लागतं,* *कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरुन पडावं लागतं"...* *मलिन्स सारख कानाला अशक्य शब्द ऐकू देऊ नका.* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• परमेश्वराची प्रार्थना करण्यासाठी फक्त अंत:करण शुद्ध अथवा पवित्र असावे लागते. त्याचबरोबर आपले दोन्ही कर जोडून विनम्रतेने त्याचे नामस्मरण करावे म्हणजे ते परमेश्वरास मान्य होईल.अशी प्रार्थना कोणीही करू शकतो. त्यासाठी कोणतीही जात, कोणताही धर्म , कोणताही राव किंवा रंक हा भेद लागत नाही. परमेश्वर जसा निर्गूण निराकार आहे तसाच तो आपणा सा-यांच्या निस्वार्थपणे करणा-या भक्तीचा भुकेला आहे.तो नक्कीच आपल्याकडे धावून येईल. *व्यंकटेश काटकर,नांदेड.*   संवाद..९४२१८३९५९०/             ८०८७९१७०६३. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *शहरात किती कावळे आहेत?* अकबर बादशाह आपल्या दरबारातील सरदारांना नेहमी निरनिराळे प्रश्न विचारायचा. निराळी कोडी घालायचा. ज्ञान, हुशारी आणि चातुर्य यांची परीक्षा घ्यायचा. एकदा त्याने आपल्या सरदारांना एक चमत्कारिक प्रश्न विचारला, " आपल्या शहरात किती कावळे आहेत?" बादशहा उत्तराच्या अपेक्षेन एकएका सदाराकडे पाहत होता. सरदार एकामागून एक उभे राहत होते आणि निमूटपणे आपली मान खाली घालत होते. एकही सरदार बादशाच्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकला नव्हता. इतक्यात बिरबलाने दरबारात प्रवेश केला. तो दरबारातील सर्वात हुशार सरदार होता. पाहिले की, इतर सरदार माना खाली घालून उभे आहेत. बादशहाने घातलेल्या कोड्याचे उत्तर ते देऊ शकले नाहीत, हे बिरबलाने ताबडतोब ओळखले. वाकुन सलाम केला आणि तो आपल्या जागेवर जाऊन बसला. बादशहाने त्याला विचारले, " बिरबल, शहरात किती कावळे आहेत?" बिरबल लगेच उभा राहिला आणि म्हणाला," महाराज, आपल्या शहरात 50 हजार 378 कावळे आहेत." " बिरबल, तू हे एवढ्या खात्रीने कसं काय सांगू शकतोस?" बादशहाने आश्चर्यचकित होऊन विचारले. बिरबल म्हणाला "महाराज, आपण कृपया कावळे मोजून पहा. जर ते 50 हजार 378 पेक्षा जास्त असले, परगावाहून काही कावळे आपल्या मित्रांना , नातेवाईकांना भेटायला आले आहेत, असे खुशाल समजा. जर ते त्यापेक्षा कमी असतील, तर आपल्या शहरातील कावळे त्यांच्या मित्रांना, नातेवाईकांना भेटायला बाहेरगावी गेले आहेत उघडच आहे." बादशहा बिरबलाच्या चतुराईवर खुश झाला व आनंदून म्हणाला, " शाब्बास बीरबल, शाब्बास."तुझे चातुर्य आणि बुद्धिमत्ता खूप उत्कृष्ट आहे. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00          ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 10/12/2019 वार - मंगळवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *अल्फ्रेड नोबेल दिन*  *मानवी हक्क दिन* 💥 ठळक घडामोडी :-  २०१४-भारताचे कैलाश सत्यार्थी आणि पाकिस्थानची युसूफझाई यांना संयुक्तपणे नोबेल शांती पुरस्कार प्रदान करण्यात आला. २००८-प्रा अमर्त्य सेन यांना अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक बहाल करण्यात आले. १९०१-नोबेल पारितोषिक चे प्रथमच वितरण करण्यात आले. 💥 जन्म :- १८७० - सर जदुनाथ सरकार, इतिहासकार. १८७८ - चक्रवर्ती राजगोपालाचारी, स्वतंत्र पक्षाचे संस्थापक. १८८० - श्रीपाद कृष्ण बेलवलकर, प्राच्यविद्यापंडित. १८९२ - व्यंकटेश बळवंत पेंढारकर, मराठी नाट्य-अभिनेते, गायक. १९०८ - हसमुख धीरजलाल सांकलिया, भारतातील उत्खननविषयक संशोधनाचा पाया रचणारे पुरातत्त्ववेत्ते. 💥 मृत्यू :- १९४२ - डॉ. द्वारकानाथ कोटणीस. २००१ - अशोक कुमार गांगुली ऊर्फ दादामुनी, हिंदी चित्रपट अभिनेता. १८९६-अल्फ्रेड नोबेल, स्वीडिश संशोधक आणि नोबेल पुरस्काराचे प्रणेते *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचा नामविस्तार नको, अशी भूमिका ज्येष्ठ विचारवंत प्रा. एन डी पाटील यांनी घेतली आहे. नामविस्तार झाल्यास विद्यापीठाच्या नावाचा उल्लेख शॉर्ट फॉर्ममध्येच होईल, असंही ते म्हणाले.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रधान सचिव म्हणून विकास खारगे आणि भूषण गगराणी यांची निवड, कोल्हापूर जिल्ह्यातील दोन सुपुत्रांना एकाच वेळी मिळाली संधी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *जिल्हा मुख्यालय असलेल्या पालघर शहरातील रेल्वे स्थानकामध्ये आता कायमस्वरूपी भव्य असा राष्ट्रध्वज दिमाखात फडकत राहणार आहे. हा ध्वज ३० फूट लांब आणि २० फूट रुंदीचा आहे. शंभर फूट उंचीवर हा राष्ट्रध्वज फडकवण्यात आला आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये 1 जानेवारीपासून मोबाईल बंदी, मंदिर बैठक समितीमध्ये निर्णय* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *बृहन्मुंबईसह विविध महानगरपालिकांमधील सात रिक्तपदांसाठी 9 जानेवारीला मतदान, बृहन्मुंबई, नाशिक, मालेगाव, नागपूर, लातूर व पनवेल या सहा महानगरपालिकांमधील सात रिक्तपदांच्या पोटनिवडणुकीसाठी 9 जानेवारीला मतदान; तर 10 जानेवारी रोजी मतमोजणी, राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांची माहिती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *मुंबईतल्या 120 डबल डेकर बसेसपैकी 72 बसेस 2020 मध्ये स्क्रॅप होणार, मुंबईतल्या निम्म्यापेक्षा जास्त डबलडेकर बसचं आयुर्मान संपलं* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *रणजीचा रणसंग्राम : आदित्य सरवटे आणि रजनीश गुरबानीच्या प्रभावी माऱ्यासमोर विदर्भानं सलामीच्या रणजी सामन्यात आंध्रचा पहिला डाव 211 धावांत गुंडाळला. तर पृथ्वी शॉ आणि अजिंक्य रहाणेनं रणजी करंडकात बडोद्याविरुद्धच्या सामन्यात दमदार अर्धशतकं साजरी केली.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         *मानवी हक्क दिन* लहानपणी मला सर्वात जवळची आणि चांगली गोष्ट वाटायची ते म्हणजे माझा हक्क. मला माझी हवी असलेली वस्तू मिळायलाच हवे असे वाटायचे. बालपणीच्या वयात प्रत्येक गोष्ट मिळविण्यासाठी रडणे हा एक चांगला पर्याय असायचा. रडून ती वस्तू मिळविताना........... वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/12/blog-post_9.html      लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *भूगर्भशास्त्र* 📙 ********************* पृथ्वीच्या अंतरंगाचा, पृथ्वीच्या अंतर्बाह्य घटकांचा अभ्यास भूगर्भशास्त्रात (जिआॅलाॅजी) येतो. पृथ्वीच्या उगमापासून आजपर्यंत झालेल्या निर्मितीप्रक्रियेचा अभ्यास त्यात केला जातो. हे शास्त्र वरवर पाहता निरुपयोगी वाटते. कारण पृथ्वीचे थर, दगडगोटे व त्यांचा अभ्यास यात गुंतलेल्या शास्त्रज्ञाचा व्यवहाराशी काय संबंध, असे अनेकांना वाटते. पण तहान लागली, तर त्याच शास्त्रज्ञाला गाठायची वेळ येते. विहीर कुठे खोंदावी, पाणी किती खोलीवर लागेल, वेळ किती लागेल, याचा सल्ला हाच शास्त्रज्ञ देणार असतो. हीच गोष्ट कोळसा, खनिज तेल, खनिज वायूच्या साठ्यांच्या बाबतीत आहे. पण सध्याच्या जगात यांचे काम याहीपुढे गेले आहे. धरणाची जागा, इमारतीचा पाया, पुलाची रचना, मनोऱ्याची उंची व व वजन आणि त्याखालील जमीन या प्रत्येक बाबतीत यांचा सल्ला मोलाचा असतो. भूगर्भशास्त्राच्या प्रगतीनुसार सध्या अनेक शाखा कार्यरत आहेत. पेट्रोलॉजिस्ट हा भूगर्भशास्त्रज्ञ जमिनीचा कस, थर, बांधणी यांचा विशेष अभ्यास करतो. स्ट्रॅटीग्राफर जमिनीखालचे थर, त्यांची रचना, त्यांचे आयुष्य, त्यांचा परिसर यांबद्दल मोजक्या ठिकाणी उत्खननानंतर निष्कर्षावर येऊ शकतो. पॅलिअँटालाॅजिस्टला जिवाश्म, त्यांचा काळ, पृथ्वीच्या उत्पत्तीपासूनच्या घडामोडी यात रस असतो. जिओफिजिसिस्ट पृथ्वीचे विद्युतचुंबकीय वातावरण, चुंबकीय क्षेत्र, त्यांचे आजच्या जीवनावर होणारे परिणाम यांवर जास्त लक्ष केंद्रित करतो. जिआॅमाॅरफाॅलाॅजी ही त्यातल्या त्यात नवीन शाखा उदयाला येत आहे. दऱ्याखोऱ्यांतील जीवन, त्यांचा एकमेकांशी संबंध व नैसर्गिक स्रोत म्हणजे झरे, खनिज, झाडे यांवर ही शाखा अधिक अभ्यास करते. वर लिहिलेल्या स्वतंत्र शाखा म्हणून जरी अस्तित्वात असल्या, तरी मूलतः भूगर्भशास्त्राचा सुसंगत अभ्यास करताना प्रत्येक शाखेतील माहिती असावी लागते. फक्त पूर्ण शिक्षणोत्तर आवडीचा, संशोधनाचा वा कामाचा विषय या दृष्टीने त्या शाखेवर लक्ष केंद्रित केले जाते आणि त्या शाखेतील ज्ञानात व माहितीत भर घालायचा प्रयत्न होतो. सध्याच्या भूगर्भशास्त्रज्ञांचा सखोल अभ्यासाचा विषय अगदी वेगळ्याच दिशेने चालू आहे. अंटार्क्टिकावर सतत चाललेले संशोधन व सागराच्या तळाशी असलेल्या खनिज द्रव्यांबद्दल चाललेले संशोधन यांत अनेक मोठे व महत्त्वाचे भूगर्भशास्त्रज्ञ गुंतलेले आहेत. यासाठी अद्ययावत प्रयोगशाळा असलेली प्रचंड अवाढव्य बोट कायम समुद्री वास्तव्याला असून ती जगातील अनेक समुद्र सतत हिंदीतच आहे. गरम पाणी भूगर्भात आहे. ज्वालामुखीमुळे तर भूगर्भातील अंतर्भाग गरमच असतो, हेही माहीत आहे. जसजसे खोल जावे, तसतसे तापमान एकेक डिग्री सेंटीग्रेडने वाढत जाते, याचीही नोंद गेली अनेक वर्षे खाणशास्त्रज्ञांनी घेतलेली आहे. या सर्व माहितीचा वापर करून मग भूगर्भातील उष्णतेचा वीजनिर्मितीला का उपयोग करू नये, या दिशेने अनेकांचे प्रयत्न सुरू झाले. जमिनीला खोलवर भोके पाडून तप्त दगडांवर पाणी सोडावयाचे. या पाण्याची वाफ दुसऱ्या पाईपमधून वर घ्यावयाची व तिच्या शक्तीवर जनित्रे चालवून वीज निर्माण करायची, असे या विद्युतनिर्मितीचे स्वरूप आहे. आजमितीला सुमारे वीस देश या पद्धतीने वीजनिर्मिती करत आहेत. अमेरिका, इटली, न्यूझीलंड येथे तर एकापेक्षा जास्त 'जिओथर्मल पॉवर स्टेशन्स' उभारली गेली आहेत. यापुढील प्रगतीची दिशा म्हणजे खोलवरचे बोअरिंगचे पाणी अधिक खोल असलेल्या गरम खडकापर्यंत पोहोचवायची व्यवस्था करायची. जमिनीखाली उभारलेल्या वीजनिर्मिती केंद्रातच वीज निर्माण करावयाची व वर फक्त विजेच्या ताराच आणून विजेचे वाटप करायचे, अशी कल्पना शास्रज्ञ मनात खेळवत आहेत. *'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *ज्याच्या गरजा कमी, त्याला सुख आणि स्वास्थ्य अधिक !* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *भारतातील सर्वात लहान जिल्हा कोणता ?* गारो ( मेघालय ) 2) *नाशिक - मुंबई मार्गावर कोणता घाट आहे ?* कसारा घाट 3) *भारताचा पहिला सम्राट कोणास म्हणतात ?* चंद्रगुप्त मौर्य 4) *'झेंडूची फुले' या विडंबनात्मक कवितासंग्रहाचे लेखक कोण ?* प्र. के. अत्रे 5) *रशियाच्या संसदेस कोणत्या नावाने ओळखले जाते ?* ड्युमा *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 संदीप मस्के, सहशिक्षक 👤 दशरथ एम. शिंदे 👤 अनिल यादव, धर्माबाद 👤 शिवानंद हिंदोले 👤 श्रीकांत म्याकेवार 👤 अमोल पाटील सलगरे 👤 मच्छीन्द्र सपाटे 👤 मिलिंद गायकवाड 👤 स्वप्नील मसाने 👤 दशरथ शिंदे *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *"या जगात अनेक जातीचे प्राणी, अनेक जातीच्या वनस्पती इ. आहेत. (आंब्याची जात गोड चवीची तर कारल्याची जात कडू चवीची.) अशा अनेक जातींचे अनेक वेगवेगळे रंग आहेत. अशा अनेकविध जाती आणि त्यांच्या गुणधर्मानुसार व्यक्त होणारे रंग-ढंग एकत्र येऊन तर 'जग' हे नाव निर्माण झालं आहे." या जगात खूप काही असलं तरी हिताचं जे मोजकंच आहे, त्याला खरी किंमत आहे. 'शब्दज्ञान' किती मर्यादित असतं, याचं बोधक उदाहरण म्हणजे "उजेड काजव्यातूनही निघतो, पण तो फक्त त्याच्या पार्श्वभागापूरताच उजेड देतो, आणि तेही कायम नाही देत; तर चालू-बंद, चालू-बंद असा देतो." शब्दज्ञान हे काजव्याच्या उजेडासारखं आहे. ते देणा-याच्यासुद्धा समोर प्रकाश पाडत नाही. असा उजेड जगाला काय प्रकाश देणार? शब्दज्ञानानं समाजाचं जाऊ द्या, स्वतःचंही भलं होऊ शकत नाही.* *स्वतःसहीत समाजाचंही भलं करायचं असेल, तर कॉपी-पेस्ट बंद झालं पाहिजे. ज्ञान आता शब्दांचं नको तर अनुभवाचं असायला हवं.--* *तुका म्हणे झरा । आहे मुळचाची खरा ।।* *तुकोबा म्हणतात, "माझं ज्ञान हे काही कुठून आयात केलेलं नाही. ते कॉपी केलेलं नाही. माझ्या ज्ञानाचा जो झरा आहे, तो माझ्या अंतःकरणातून प्रकट होतो." याउलट शब्दज्ञानी माणसाचं ज्ञान समुद्राइतकं विशाल दिसत असलं, तरी ते अनेक नद्या, नाले, झरे यांच्यावाटे आलेलं आहे. जरी विशाल असला तरी समुद्राचं पाणी तहानलेल्याची तहान भागू शकत नाही, तसं शब्दज्ञान लोकांचं भलं करू शकत नाही. त्यासाठी आवश्यकता आहे ती अनुभवाच्या झ-याचीच.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल- 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो* *जे चांगले जगी या त्यांचा करा स्वीकार,* *जगी भावानेहुनी त्या कर्तव्य थोर जाणा।* *जगतांना आपला गोल निश्चित करा आणि त्याप्रमाणे मार्गक्रमण करा.* *लसूनकी चटणी, लगे मजेदार* *थोडी थोडी खाना,* *लगे मजेदार।* *कोणती गोष्ट किती प्रमाणात घ्यायची हे ज्याला कळलं योच या जगात टिकू* *शकतो.* *आपलं ध्येय एकदा निश्चित झालं की,* *तेवढ्यापुरतं निश्चित वागायचं. मला चटणी आवडते म्हणजे मी* *चटणी होणार नाहीय. ती* *फक्त नमुन्यापुरती, मसाल्यापुरती* *घ्यायची, त्यात बुडून* *जायचं नाही. चांगल्यातसुद्धा* *तुम्ही बुडून गेलात,* *तर ते बरोबर होणार नाही.* *मला सांगा, दूध हे चांगलं* *असतं की नाही? असतं. ठीक आहे.* *एक पन्नास लिटर दुधाची टाकी आहे, त्यात तुम्हाला बुडवलं,* *आणि पाच मिनिटं वर काढलं नाही तर चालेल का पन्नास* *लिटरच्या टाकीत तुम्हाला उलटं करून बुडवलं, तर चालणार* *नाही! साखर गोड खरी,* *पण साखरेची दोन मोठी पोती* *पाचव्या मजल्यावरून तुमच्या डोक्यावर टाकली; तर चालतील का?* *किंवा तोंड वर करा, आणि एवढी दोन साखरेची पोती* *टाकतो तुमच्या तोंडात; तर* *चालेल का? चालणार नाही.* *नुसती खाल्ली, तरी पचायची नाही,* *एवढी परिस्थिती आहे.* *म्हणून आपण काही एक विवेक केला पाहिजे, की आयुष्याचं* *माझ्या ध्येय काय? हेतू* *काय? मला काय साधायचंय* *त्याच्यापुरतं तेवढं फक्त आवश्यक ते घ्यायचं. आपलं पूर्ण* *चुकलं असं वाटलं, तर बदलावं.* *पण जोपर्यंत आपण* *ज्ञान मार्गाने पुढे पुढे जातो आहोत, तोपर्यंत मनाचा निश्चय म्हणून ढळू देता कामा नये.* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते* ) 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• काही माणसे आपल्या जीवनात खूप काही कमवण्याच्या प्रयत्नांमध्ये बरंच काही विसरुन जातात. त्यांना कमवण्याच्या मोह आवरत नाही. त्यांना  वाटते की, आपल्यासारखे दुसरे कोणी पुढे जाऊ नये व या जगात आपल्यासारखे वैभवसंपन्न दुसरे राहू नये पण ह्या मोहापायी तो रक्ताच्या नात्याला, मित्राला आणि इतरांनाही विसरायला लागतो. अशा त्याच्या हावरट वृत्तीमुळे सारं सारं विसरुन एकटाच सुसाट धावायला लागतो, परंतु अशा कृतीमुळे आणि लालची कृतीमुळे तो स्वत:चेही जवळ आलेले सुख दूर करुन नको त्या सुखासाठी मागे लागल्यामुळे जीवनात असमाधानाशिवाय काहीच मिळणार नाही हे त्याला समजायला पाहिजे. कितीही कमावले तरी आपल्यासोबत काहीच घेऊन जाता येत  नाही. माणसाने गरजा भागविण्यापुरते प्रयत्न करावेत. इतरांना तोडून, इतरांची मने कलुषित करुन जीवन जगणे म्हणजे मनुष्य जीवनाला काहीच अर्थ नाही. कोणताही मोह अति केल्याने जीवनाला घातकच असतो हे लक्षात असू द्यावे. *व्यंकटेश काटकर,नांदेड.*   संवाद..९४२१८३९५९०/             ८०८७९१७०६३. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *जीवन प्रवास* एक महिला एका बसमध्ये बसली होती. पुढच्याच स्टॉपमध्ये एक जाड आणि थोराड वयस्कर बाई आल्या आणि तिच्याजवळ बसल्या. जास्तित जास्त जागा तिने व्यापली आणि तिच्या सोबत तिने मोठमोठ्या पिशव्या पण आणल्या होत्या. त्यांनी पण खूप जागा व्यापली. त्या तरुणीच्या दुसऱ्या बाजूस बसलेला तरुण अस्वस्थ झाला. तो तिला म्हणाला की "तू काहीच का बोलत नाहीस?" तरुणीने स्मित करून प्रतिसाद दिला "अनावश्यक किंवा वायफळ काहीतरी बोलण्यात काहीच अर्थ नाही. आपला एकत्र प्रवास खूपच छोटा आहे. मी पुढच्याच स्टॉपवर उतरणार आहे." ही प्रतिक्रिया सुवर्ण अक्षरांमध्ये लिहिली जाण्यासाठी पात्र आहे. "इतक्या नगण्य गोष्टींवर भांडण करणे आवश्यक नाही, *आपला प्रवास खूपच छोटा आहे"* आपल्यापैकी प्रत्येकाने हे जाणले पाहिजे की, आपल्याला इथे वेळ इतका कमी आहे; की त्या वेळात भांडणे, निरर्थक वादविवाद करणे, इतरांना क्षमा न करणे, असमाधानीपणा आणि दोष शोधण्याची वृत्ती म्हणजे वेळ आणि उर्जेचा अपव्यय आहे. कोणी आपले मन दुखावलंय का? शांत रहा,कारण जीवन प्रवास खूप छोटा आहे. कुणी तुमचा विश्वास घात केला आहे का? तुम्हाला फसवलय का? सोडून द्या, शांत रहा, कारण *जीवन प्रवास खूप छोटा आहे.* कुणीही तुम्हाला त्रास दिला असल्यास, लक्षात ठेवा की, हा प्रवास किती मोठा किंवा छोटा आहे हे कुणालाच माहीत नाही. त्यांचा प्रवास कधी संपणार आहे ते कुणालाही माहीत नाही. आपला प्रवास खूप छोटा आहे. आपण मित्रमंडळी आणि नातेवाईक यांची कदर करूया. आपण एकमेकांचा आदर करू, एकमेकांशी प्रेमाने आणि आदराने वागूया. एकमेकांच्या आनंदात आपण पण आनंदी होऊया. कारण एकच की, *आपला प्रवास खूप छोटा आहे ..!* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

https://youtu.be/dDpJgPGqfpI

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00          ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 09/12/2019 वार - सोमवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   टांझानिया (पूर्वीचे टांगानिका) - स्वातंत्र्य दिन 💥 ठळक घडामोडी :-  १९४६ - न्युरेम्बर्ग खटला सुरू. १९६१ - टांगानिकाला ब्रिटनपासून स्वातंत्र्य. 💥 जन्म :- १६०८ - जॉन मिल्टन, इंग्लिश कवी. १९१९- ई. के. नयनार, केरळचा मुख्यमंत्री. १९२३ - बॉब हॉक, ऑस्ट्रेलियाचा तेविसावा पंतप्रधान. 💥 मृत्यू :-  १५६५ - पोप पायस चौथा. १६६९ - पोप क्लेमेंट नववा.  *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी ठाकरे सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार होणार छगन भुजबळ यांची माहिती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील श्री भराडीदेवीचं मंदिर एक जागृत देवस्थान म्हणून ओळखलं जातं. मालवणपासून अवघ्या 15 कि.मी. अंतरावर एका माळरानावर श्री भराडी देवीची यात्रा भरते. मालवणमधील आंगणेवाडी भराडी देवीच्या वार्षिक यात्रोत्सवाची तारीख निश्चित झाली असून देवीने कौल दिल्यानुसार 17 फेब्रुवारी 2020 रोजी यंदाची यात्रा होणार आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *देशातील सर्व राज्यातील पोलीस दलाचे सक्षमीकरण करण्यावर, केंद्र सरकार लक्ष देत आहे. त्यासाठी केंद्र सरकार कुठल्याही प्रकारचा निधी कमी पडू देणार नाही. असे केंद्रीय गृह राज्यमंत्री जी.किशन रेड्डी यांनी सांगितले.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *मुंबई : निमोनिया झाल्यामुळे  गेल्या 28 दिवसांपासून रूग्णालयात असलेल्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर काल आपल्या घरी परतल्या आहेत. लता दीदींनी स्वतः ट्वीटकरून याची माहिती दिली आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार, देशात मधुमेहींची संख्या इतक्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे की, येणाऱ्या पाच वर्षात या रोगाच्या रुग्णांच्या संख्या २६६ टक्के इतकी वाढण्याची शक्यता आहे. श्रीपाद येसो नाईक यांनी शुक्रवारी लोकसभेत दिली माहिती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा काढणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराटने रोहित शर्माला पुन्हा एकदा मागे टाकलं आहे* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *लेंडल सिमन्सच्या फटकेबाजीमुळे विंडीज विजयी, मालिकेत १-१ ने बरोबरी, भारतीय गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकांची ढिसाळ कामगिरी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    *जनसेवेतच ईश्वराचीही सेवा* माणसाच्या आयुष्यात संकटे आली की, त्याला कुणाचा तरी आधार हवा असतो. हा आधार शारीरिक जरी नसला मानसिक असला तरी त्यांना ते पुरेसे असते. त्यामुळे दुःखी, कष्टी माणसे देवाचा धावा करताना दिसून येतात. सुखाचा वेळी कशाचीही आठवण न करता खा, प्या, मजा करा अशी माणसे दुःखाच्या वेळी, कठीण समयी देवाचे स्मरण करतात. वर्षातून कमीतकमी एकदा.............. वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/12/blog-post_8.html           लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *उलटी का होते ?* 📙 उलटी होण्याची अनेक कारणे आहेत. कधी जास्त खाल्ल्याने अजीर्ण होऊन उलटी होते; तर काही जणांना बस, बोट लागून उलटी होते. हे तुम्ही अनुभवले असेल. पोटाला नको असलेला पदार्थ जठरात आला की मळमळ व्हावयास लागून उलटी होते. विषारी पदार्थ, काही औषधी, जास्तीचे जेवण, अति तेलकट पदार्थ, दारू यामुळे जठरातून हे पदार्थ बाहेर काढून टाकण्यासाठी प्रक्रिया सुरू होते व हे पदार्थ तोंडावाटे बाहेर टाकले जातात. म्हणजे उलटी होते. खराब अन्नातून विषबाधा झाल्यामुळे उलट्या व जुलाब होतात. आंबट पाणी पडण्याची सवय असलेल्या व्यक्तींमध्ये अधिक तिखट मसालेदार पदार्थ खाल्ल्याने उलटी होते. पचनसंस्थेच्या आजारांव्यतिरिक्त मेंदूच्या आवरणाच्या सुजेतही उलट्या होतात. या सुजेमुळे मस्तिष्क जलाचा दाब वाढून मज्जातंतूवर दाब येऊन उलट्या होतात. ती उलटी खूप जोरात होते. पोटात नको असलेला पदार्थ गेलेला असल्यास उलटीचे बाहेर पडतो. अशा वेळेस उलटी होण्यास मदत करावी. उलटी जुलाब होतच राहिले तर मीठ, साखर, पाणी थोडे थोडे सारखे देत राहावे. आम्लपित्तामुळे उलटी होत असल्यास ती अँटासिड गोळ्यांनी थांबते. गरोदर स्त्रियांमध्ये उलटी कोरडे पदार्थ खाल्ल्याने थांबते. थांबत नसल्यास अधिक तपासणी करावी लागते. तसेच जंतूसंसर्गामुळे उलट्या जुलाब होत असतील तर त्याची चिकित्सा करावी लागते. उलटी थांबत नसल्यास उलटीत रक्त किंवा लाल काळा करडा रंग दिसल्यास उलटीसोबत ताप, कावीळ, बेशुद्धी, मानतात ताठरणे अशी लक्षणे असल्यास ताबडतोब डॉक्टरांकडे न्यावे. *डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित* यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून मनोविकास प्रकाशन ०२० ६५२६२९५० *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *" जो स्वत: उत्तम वागू शकतो, तोच उपदेश करु शकतो. "* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *अशोक चक्राचा अर्थ काय आहे ?* देशाचा विकास व प्रगतीचे प्रतीक 2) *राजमुद्रेमध्ये खालच्या बाजूस असलेला बैल हा कशाचे प्रतीक आहे ?* कष्टाचे 3) *राजमुद्रेमध्ये घोडा हा प्राणी कशाचे प्रतीक आहे ?* गतीचे 4) *भारत मातेचे वाहन कोणता प्राणी आहे ?* सिंह 5) *भारताचे ब्रीदवाक्य कोणते ?* सत्यमेव जयते *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 अक्षय जाधव पाटील 👤 प्रतीक यम्मलवार 👤 सुहास रुक्मिणी दाभाडे 👤 जय सिंग चौहान 👤 आदित्य नलावडे, मुंबई *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *विकार आणि त्यावरील उपाय याचं सूत्रं स्वत:चं स्वत:ला शोधावं लागतं. एकदा ते सापडलं की मनामधील वैषम्य, मत्सर, तिरस्कार गळून पडायला सुरूवात होते. ही प्रक्रिया मन:शुद्धीकडे घेऊन जाणारी असते. एकदा ही अवस्था प्राप्त झाली, की मन गंगेसारखं निर्मळ नि प्रवाही होतं. एका सुंदर व निरामय जीवनानुभूतीकडं ते आपल्याला घेऊन जातं. संत कबीरांनी अतिशय सोप्या शब्दांत ही अवस्था मांडली आहे.*           *" बुरा जो देखन मैं चला,*                   *बुरा न मिलिया कोय,*           *जो दिल खोजा आपना,*                   *मुझसे बुरा न कोय !"* *आपलं मन हरवलं, त्यातील संवेदना संपल्या, तर जगातील सर्वात वाईट मीच आहे, हे चिंतन मनाला वास्तवाची जाणीव करून देणारं असतं. संत कबीर म्हणतात......* *"एकदा मन शुद्ध झालं की जगणं सुंदर होतं नि आम्ही हवेहवेसे वाटायला लागतो."*                  ••●🌼 ‼ *रामकृष्णहरी* ‼ 🌼●••     🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼      *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*          📱 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो,* *काय कधी संपल्या वेदना,* *पुन्हा नवा अवतार कशाला।* *जन्म दिला जर एकटीने,* *मग नेणारे हे चार कशाला।* *असा विचार करणारा एक तर ठार* *वेडा असू शकतो ,नाहीतर एक* *अलौकिक व्यक्तिमत्त्व तरी असू* *शकतो.* *पण मित्रांनो सहजीवनाची गोडी,* *आणि समूहातील आनंद* *काही औरच असतो.* *समूहाच्या वर्तनातून एक गोष्ट जाणवली,ती म्हणजे ,मी एखादा विचार मांडला किंवा कितीही पटवून* *सांगितला तरी त्याचा प्रभाव* *स्वीकारनाराची तयारी* *समोरच्या माणसाची काय* *आहे.त्यावर अवलंबून आहे.* *कारण," एखाद्या माणसावर इतरांच्या* *विचारांचा परिणाम* *तोपर्यंत होत नाही,जोपर्यंत तो स्वतः* *परिणाम होऊ देत नाही"* *आणि हाच खरा निसर्गाचा सिद्धांत* *आहे. so खंबीर* *राहा,आपल्या विचारांची पकड ढिली* *होऊ देऊ नका.* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपण आपल्या दररोजच्या जीवनात एक चांगला विचार केला आणि आचरणात आणला तर अनेक चांगल्या गोष्टींवर विजय मिळवू शकतो.तो विचार आपल्यासाठी प्रेरणा व इतरांसाठी प्रेरणादायी ठरु शकते.आपल्या एका चांगल्या विचारांमुळे इतरांच्या जीवनात जे वाईट विचार सदैव घोळत असतात आणि त्या विचारांमुळे त्यांच्या प्रगतीऐवजी दिवसेंदिवस अधोगती व्हायला लागते ती अधोगती आपल्या सानिध्यात आल्यामुळे व आपल्या चांगले विचार ऐकल्यामुळे थांबू शकते.आपल्या एका चांगल्या विचारांमुळे इतरांच्या जीवनात चांगली प्रगती होत असेल तर आपण आपल्यासाठीच नाही तर इतरांसाठी व समाजासाठी काहीतरी चांगले केल्याचे समाधान वाटेल.चांगल्या विचारातून केव्हाही चांगलेच उगवले जाते हे मात्र नक्की आहे. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३ 🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *भली खोड मोडली* एका इसम जवळ एक गाढव होते. तो माणूस मीठ विकण्याचा व्यवसाय करीत असे. दररोज सकाळी मिठविक्या गाढवाच्या पाठीवर मिठाच्या पिशव्या लागत असे. आजूबाजूच्या गावात विकायला नेत असे. त्याला जाताना अनेक ओढे आणि छोट्या नद्या ओलांडाव्या लागत असे. एके दिवशी नदी ओलांडत असताना गाढव अचानक धडपडले. गाढवाच्या पाठीवरील मिठ पाण्यात विरघळले. त्यामुळे गाढवाचे बरेचसे ओझे हलके झाले. मीठविक्या त्यादिवशी गाढवाचं नाराजीने घरी परतला. पण त्यादिवशी गाढवाला चांगलाच आराम मिळाला. दुसऱ्या दिवशी ते नेहमीप्रमाणे मिठी विकायला निघाले. वाटेतील पहिला ओढा ओलांडत असतानाच गाढवाने मुद्दामून पाण्यात डुबकी मारली. गाढवाच्या पाठीवरचे ओझे हलके झाले. मिठी विक्या त्यादिवशी घरी परतला. पण गाढवाने मुद्दामच पाण्यात डुबकी मारली, त्याच्या लक्षात आले. तो गाढव खूप रागावला. त्याने गाढवाला मारले आणि म्हणाला, " हे माझं मूर्ख जनावर मला जादा हुशारी दाखवतयं. याला मी नक्कीच धडा शिकवीन." दुसऱ्या दिवशी मीठविक्याने गाढवाच्या पाठीवर कापसाच्या पिशव्या लादल्या. गाढवाने कालचीच युक्ती करायचे ठरवले. ओढा येताच त्याने पाण्यात डुबकी मारली. पण आज झाले उलटेच! पिशवीतील कापसाने पाणी शोषून घेतले. त्यामुळे गाढवाच्या पाठीवरचे ओझे अधिकच जड झाले. गाढवाला पाण्यातून बाहेर येण्यासाठी त्याला खूप त्रास झाला. त्याला चांगलीच अद्दल घडली. त्या दिवसानंतर गाढवाने कामचुकारपणा केला नाही. पाण्यात मुद्दाम डुबकी मारण्याची खोट त्याने सोडून दिली. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00          ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 07/12/2019 वार - शनिवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  *भारतीय लष्कर ध्वज दिन* 💥 ठळक घडामोडी :-  ◆ १९८३ - स्पेनची राजधानी माद्रिदच्या बराहास आंतरराष्ट्रीय विमानतळावर दोन विमाने एकमेकांवर आदळली. ९३ ठार. ◆ १९८७ - पॅसिफिक साउथवेस्ट एरलाइन्स फ्लाइट १७७१ कॅलिफोर्नियात पासो रोब्लेसजवळ कोसळली. ४३ ठार. विमानातील एका प्रवाश्याने स्वतःच्या वरिष्ठ अधिकाऱ्यास गोळ्या घातल्या व वैमानिकांना मारून स्वतःवरही गोळ्या झाडल्या. ◆ १९८८ - आर्मेनियात स्पिताक प्रांतात रिश्टर मापनपद्धतिनुसार ६.९ तीव्रतेचा भूकंप. २५,००० ठार, १५,००० जखमी, ४,००,००० बेघर. 💥 जन्म :- ◆ १९०२ - जनार्दन नवले, भारतीय क्रिकेट खेळाडू. ◆ १९५७ - रोहन जयसेकरा, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू. ◆ १९५९ - सलीम युसुफ, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- ◆ १२५४ - पोप इनोसंट चौथा. ◆ १२७९ - बॉलेस्लॉ पाचवा, पोलंडचा राजा. ◆ १६३२ - सिसिनॉस, इथियोपियाचा सम्राट. ◆ २००५ - देवन नायर, सिंगापूरचा तिसरा राष्ट्राध्यक्ष. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे परळच्या बीआयटी चाळ इमारतीत दुसर्‍या माळ्यावर राहत होते. २२ वर्षे येथे त्यांचे वास्तव्य होते. हे निवासस्थान देखील राष्ट्रीय स्मारक म्हणून विकसित करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. महापरिनिर्वाण दिवसानिमित्ताने भेट दिली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *बहुचर्चित सिंचन घोटाळाप्रकरणी अजित पवार यांना क्लीनचीट, नियमबाह्य व्यवहार झाले नसल्याचं शपथपत्र मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात एसीबीने सादर केलंय.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *मुंबई - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 63 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानवाला अभिवादन करण्यासाठी मुंबईच्या चैत्यभूमीवर भीमसागर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *माथाडी कामगारांच्या ठेवींवर बँक अधिकाऱ्यांचा डल्ला, 100 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप, तब्बल 50 हजार माथाडी कामगारांच्या आयुष्याच्या पुंजीवर बँकांमधील अधिकाऱ्यांनी डल्ला मारल्याचा प्रकार समोर आला आहे. माथाडी कामगारांच्या ठेवी बँकेतील अधिकाऱ्यांन परस्पर इतर खात्यांवर वळवल्याचा आरोप होत आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *हैदराबाद प्रकरणातील चार ही आरोपी पोलिसांच्या एन काउंटर मध्ये ठार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *भारताच्या एकोणवीस वर्षाखालील विश्वचषक संघात निवड झालेल्या मुंबईच्या यशस्वी जैस्वाल आणि दिव्यांश सक्सेना यांचा दादर युनियन स्पोर्टिंग क्लबच्या वतीने भारताचा कसोटी उपकर्णधार अजिंक्य रहाणेच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियम, हैदराबाद येथे वेस्ट इंडिज आणि भारत यातील पहिल्या T-20 सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा सहा विकेटनी केला पराभव* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••            *स्मार्ट बॉय : काळाची गरज* मुलीने स्वतः ला तयार केले पाहिजे. कराटे शिकले पाहिजे, मुलांना प्रतिकार करता येईल असे काही केले पाहिजे, अर्थात स्मार्ट गर्ल व्हायला पाहिजे असा एक सुर सध्या सर्वत्र ऐकायला आणि पाहायला मिळत आहे. त्याऐवजी आपल्या घरातील मुलांना स्मार्ट बॉय करायला पाहिजे यावर कुठे ही चर्चा होतांना दिसत नाही. मुलांना नैतिकतेचे धडे शिकविले तर ........... पूर्ण लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे. http://nasayeotikar.blogspot.com/2019/12/blog-post_35.html  लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌳 *बोन्साय* 🌳 ***************** जपानी माणूस निसर्गप्रिय आहे. साराच निसर्ग घराच्या भिंतीत, आपल्या बागेत साठवता आला, तर या हट्टाने बोन्सायची निर्मिती जपानी कल्पकतेने केली गेली आहे. अनेक जातींची झाडे, वृक्ष, फळझाडे ही छोट्याशा कुंडीत लहान आकार कायम राखत विशिष्ट पद्धतीने जोपासायची, त्यांचे सर्व गुणधर्म मात्र कायम राखायचे अशा तंत्रातून निर्माण झालेल्या झाडाला 'बोन्साय' म्हणतात. वडाचे झाड जेमतेम फूटभर उंचीचे, पण त्याच्या फांद्यांना पारंब्या फुटलेल्या, संत्र्याचे झाड वीतभर उंचीचे, पण त्याला लिंबासारख्या आकाराची संत्री लागलेली, तीही संत्र्याच्या चवीची... असा प्रकार बोन्साय पद्धतीत घडवला जातो. अशा पद्धतीत विविध झाडे तयार करणे हे अत्यंत कौशल्याचे, चिकाटीचे व वनस्पतीशास्त्राची परिपूर्ण जाण असणारे काम आहे. झाडांना पुरेशी पोषण द्रव्ये देताना त्यांची वाढ मात्र कुंठीत ठेवायची, याचे तंत्र म्हणजे बोन्साय. केवळ वाढणार्‍या फांद्या छाटून बोन्साय कधीही तयार होत नाही. विशेषत: झाडाला आलेली फळे परिपूर्ण चवीची असणे हा त्यातील एक क्लिष्ट भाग ठरतो. बोन्साय तयार करण्याची पद्धत दिसायला साधीशीच आहे. प्रत्येक झाडाला दोन प्रकारची मुळे असतात. लांबवर जाणारी, खोल अन्नाच्या शोधात जमिनीत रोवणारी सोटमुळे व केशसंभासारखी तंतूमुळे. तंतूमुळे ही पाणी शोषून घेणे, जमिनीच्या आसपासची पृष्ठभागातील विविध रसायने गोळा करणे या कामात गुंतलेली असतात. त्यांचा झाडाला आधार देणे, वाढीला भक्कम पाठबळ देणे यात सहभाग नसतो. बोन्साय करताना मुख्य मुळे तारांनी बांधणे, वेळच्या वेळी त्यांना छाटणे, त्यांची वाढ न होऊ देणे यावर लक्ष्य केंद्रित केले जाते. ठराविक दिवसांनी ही प्रक्रिया करत राहिल्यास झाडाची वाढ खुंटते, पण झाडाचे मूळ स्वरूप कायम राहते. अर्थातच बोन्साय झाडांच्या कुंडय़ा यासाठी ठरावीक महिन्यांनी बदलत गेल्यावरच हे शक्य होते. बोन्सायचे कौतुक करणारी जशी मंडळी आहेत तशीच त्याला नावे ठेवणारी विरोधक मंडळीही आहेत. निसर्गाला स्वतःच्या मुठीत पकडण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे, असे विरोधकांचे मत पडते. याउलट साराच निसर्ग माझ्या दिवाणखान्यात मी कसा मांडला आहे, असे बोन्सायचे कौतुक करणारी मंडळी म्हणतात. एखाद्या प्रसिद्ध नावाजलेल्या व्यक्तीच्या छायेत कायम दुय्यम भूमिकेत वावरणाऱ्या मंडळींना आपण बोलीभाषेत 'बोन्साय' म्हणूनच संबोधतो, ते का, हे आता कळले ना ? *'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *" चारित्र्याचा विकास सुसंगतीत होतो आणि बुध्दीचा विकास एकांतात होतो. "* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *शाळा व्यवस्थापन समितीमध्ये पालकांचा किती टक्के समावेश असावा ?* 75 % 2) *शाळा व्यवस्थापन समितीचे पदसिद्ध सचिव कोण असतो ?* मुख्याध्यापक 3) *शाळा व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष कोणामधून निवडला जातो ?* पालकांमधून 4) *शाळा व्यवस्थापन समितीची महिन्याला किमान किती बैठक होणे आवश्यक आहे ?* 1 5) *शाळा व्यवस्थापन समितीचा ध्येय कोणता ?* शाळेचा सर्वांगीण विकास *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 धनंजय शंकर पाटील, सोलापूर 👤 साईनाथ जायेवाड, येवती 👤 भीमाशंकर बच्चेवार 👤 मनोज मनूरकर 👤 बाळासाहेब तांबे 👤 आश्विन जैस्वाल 👤 संतोष अनालदास *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आपल्या भोवती पसरलेला अथांग निसर्ग शत-शत पावलावर आपणांस आनंदाचे झोके देत असतो. डोंगराळ, खडकाळ प्रदेशातून खळखळ वाहणारा शांत निर्झर काय, सप्तरंगाने आकाशाला गवसणी घालणारा इंद्रधनुष्य काय, आकाशाचे चुंबन घेऊ पाहणारे उंचच उंच वृक्ष काय किंवा काळ्याकुट्ट ढगाला लागलेली रुपेरी किनार काय, हे सर्व पाहून कोणाला वेड लागणार नाही? नव्या तेजाने, नव्या ज्ञानाने , नव्या सौंदर्याने आंणि नव्या चैतन्याने निसर्ग सतत बदलत असतो. तो सतत आम्हांस काही तरी नवीन सांगत असतो. ते आपण नीट समजून घेतले पाहिजे.* *आपण विनाकारण निराश, दु:खी, अशांत, बेचैन, त्रस्त होण्यात काय अर्थ आहे? त्यासाठी निसर्ग हाच आपला गुरू आहे, हे प्रथम ओळखले पाहिजे. अहंकाराचा मोती होऊन कोणा राजाच्या मुकुटात चमकत राहण्यापेक्षा कमल पत्रावरील अस्मितापूर्ण दवबिंदू होऊन एखाद्या तहानलेल्या चिमणीच्या तोंडात पडण्यात केवढा मोठा आनंद आहे ! म्हणून निसर्गातील चैतन्याचा स्फुल्लिंग मनी बाळगावा आणि आपल्या ध्येयपूर्तीची स्फूर्ती मस्तकी धारण करावी. मगच जगण्यात आनंद आहे असे वाटेल. जीवन ही चैनीची वस्तू नसून कर्तव्याची भूमिका आहे हे समजले तरच जीवनातील 'आनंदाचे डोही आनंद तरंग' निर्माण करण्याची इच्छा बळावेल. स्वत: चंदनासारखे झिजत झिजत इतरांना सुगंधित करून सोडण्यात आपल्या जीवनाचे सार्थक आहे.* ‼ *रामकृष्णहरी* ‼ 🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो,* *सायंकाळी कॉटवर जरा आडवा झालो आणि कानी घेताच सकाळ स्मार्ट सोबती मधील 'चिटवूमन' या जिगरबाज लेखावर नजर गेली.* *जो हो गया उसे सोचा नही करते,* *जो मिल गया उसे खोया नही करते,* *हासिल उन्हे होती है सफलता,* *जो वक्त और हालात पर रोया नहीं करते.* *अस जन्मतःच अपंगत्व घेऊन आलेली अमेरिकेची अँमी मलिन्स हिने आपल्या मनात कुठलाही किंतु न ठेवता उत्कृष्ट मॉडेल,नावाजलेली* *अभिनेत्री, जिगरबाज खेळाडू अशी अनेक* *बिरूदे लावून सर्व अशक्य गोष्टी करून जगाला नवा संदेश दिला.* *मलिन्सच्या स्वप्नांना मर्यादाच नव्हत्या.* *वयाच्या पहिल्या वर्षीच आईबापाने तिचे गुडघ्यापासून खालचे पाय कापून टाकले कारण ते वाढणारच नव्हते. आणि मग आयुष्य कस* *जगायचं हा मोठा प्रश्न.पण शक्य नाही ही गोष्ट मलिन्सच्या कानाला आणि मनाला* *तिने कधीच शिवू दिले नाही .* *प्रत्येक क्षेत्रात यशाची नवी शिखरे पादाक्रांत करत राहिली.आणि* *अमेरिकेतच नाही तर जागतिक पातळीवर आयडॉल बनली.* *या जगण्यावर* *सुरेश भटांच्या सुंदर ओळी..* *आठवल्याशिवाय राहत नाही---* *आयुष्य छान आहे थोडे लहान आहे !* *रडतोस काय वेड्या? लढण्यात शान आहे.!* *काट्यातही फुलांची झुलती कमान आहे !* *उचलून घे हवे ते , दुनिया दुकान आहे !* *जगणे निरर्थक म्हणतो तो बेइमान आहे.* *"सुखासाठी कधी हसावं लागंत ,तर कधी रडावं लागतं,* *कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरुन पडावं लागतं"...* *मलिन्स सारख कानाला अशक्य शब्द ऐकू देऊ नका.* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• दगडाने कधीच कुणाजवळ हट्ट केला नाही.जिथे आहे मी तिथे चांगलाच आहे.कुठेही ठेवा पायरीवर ठेवा,उंबरठ्यावर ठेवा,घराच्या मुळव्यामध्ये ठेवा, ओट्यावर ठेवा, देवाच्या पायाखाली ठेवा, मूर्तीरुपात ठेवा किंवा स्मारकात ठेवा,पण मला कसल्याही प्रकारचा कमीपणा नाही.माझा सा-यांनीच कुठे ना कुठे उपयोग केला आहे.त्यामुळे माझं अस्तित्व कुठे ना कुठे असल्यामुळे मला सा-यांनीच मान सन्मान केला असल्यामुळे मी दगड जरी असलो तरी माणसांच्या हृदयात माझं कुठं ना कुठं तरी स्थान आहे.माझी किंमत सा-यांनीच केली आहे.जर मी दगड नसलो असतो तर मला देवत्वही प्राप्त झाले नसते.मानवाच्या प्रत्येक गोष्टीसाठी हजर राहून सगळ्यांना आपलेसे झालो आहे.ज्याप्रमाणे एखादा दगडासारखा माणूस जरी असला तरी तो कुठे ना कुठे इतरांच्या मदतीला धावून जातोच.शेवटी माणूसही आपापल्या भावना ओळखून इतरांच्या मदतीला जातच असतो.दगडासारखा दगड भावनाशून्य असतानाही आपण त्याला उपयोगात आणतो तर माणूस म्हणून इतरांच्या मदतीला प्रसंगानुरूप मदतीला धावून जाणे आणि आपले जीवन कारणी लावणे हे देखील दगडाइतकेच कामाला आल्यासारखेच आहे.हा परोपकारी विचार प्रत्येकाने करायला हवा मग कुठे ना कुठे कुणाच्यातरी हृदयात आदराचे निश्चितच स्थान मिळेल यात शंकाच नाही. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद...९४२१८३९५९०. 💠🍃💠🍃💠🍃💠🍃💠 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *कुत्रा आणि लांडगा* एक लांडगा फार दिवस उपाशी राहिल्यामुळे रोड झाला होता. काहीतरी खायला मिळाले तर पहावे म्हणून तो चांदण्या रात्री फिरत होता. तेव्हा त्याला एका कुणब्याच्या झोपडीजवळ दारावर एक लठ्ठ कुत्रा बसलेला दिसला. त्याने त्याला रामराम करून त्याचा आदरसत्कार केल्यावर लांडगा त्याला म्हणाला, ''तू फार चांगला दिसतोस, तुझ्यासारखा देखणा व धष्टपुष्ट प्राणी आजपर्यंत मी पाहिला नाही. याचे कारण तरी काय? मी तुझ्यापेक्षा जास्त उद्योग करतो, पण मला पोटभर खायला मिळत नाही.'' कुत्रा म्हणाला, ''अरे, मी करतो ते तू करशील तर माझ्यासारखाच तूही सुखी होशील.''त्यावर लांडग्याने विचारले, ''तू काय करतोस?'' कुत्रा म्हणाला, ''दुसरे काही नाही. रात्रीच्या वेळी मालकाच्या दारापुढे पाहारा करून मी चोराला येऊ देत नाही.'' लांडगा म्हणाला, ''एवढंच ना? ते मी मनापासून करीन बाबा. अरे मी रानात भटकत थंडीवारा सोसतो तर मला घराच्या सावलीत बसून पोटभर अन्न मिळाल्यास दुसरे काय पाहिजे?'' याप्रमाणे दोघांमध्ये बोलणे चालले असता कुत्र्याच्या गळ्याला दोरीचा करकोचा पडलेला लांडग्याने पाहिला. तेव्हा तो कुत्र्याला म्हणाला, ''मित्रा, तुझ्या गळ्यात काय रे हे?'' कुत्रा म्हणाला, ''अं हं. ते काही नाही.'' लांडगा म्हणाला, ''तरी पण काय ते मला कळू देत.'' कुत्रा म्हणाला, ''अरे, मी थोडासा द्वाड आहे, लोकांना चावतो, म्हणून मी दिवसा झोपलो तर रात्री चांगला पहारा करीन म्हणून माझा मालक मला दोरीने बंधून ठेवतो पण दिवस मावळला की तो मला सोडतोच. मग मी वाटेल ते करतो, वाटेल तिकडे फिरतो. खाण्यापिण्याविषयी विचारशील तर माझा मालक आपल्या हाताने मला भाकरी खाऊ घालतो. घरची सगळीच माणसं मला मायेने वागवतात. पानावर उरलेली भाकरी माझ्याशिवाय दुसर्‍या कोणाला देत नाहीत. तेव्हा तू पहा, माझ्यासारखा वागशील तर तही सुखी होशील.'' ते ऐकताच लांडगा मागच्यामागे पळू लागला. त्याला हाका मारीत कुत्रा म्हणाला, ''अरे, असा पळतोस काय?'' लांडगा दुरूनच म्हणाला, ''नको रे बाबा मला ते सुख, ते तुझे तुलाच लाभो. स्वतंत्रपणे वाटेल तसे वागता येत असेल तर तसली गोष्ट मला सांग, तुझ्यासारखे बांधून ठेऊन जर मला कोणी राजा केले तर ते राजेपणदेखील मला नको!'' तात्पर्य : स्वतंत्रपणा असताना गरिबीही चांगली. पण परतंत्रपणा असेल तर श्रीमंतीचाही काही उपयोग नाही. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

आज दिनांक ०६-१२-२०१९ रोजी जि.प.प्रा.शाळा गोजेगाव येथे *📘महामानव ,भारतरत्न,क्रांतीसूर्य,विश्ववंदनीय बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन* साजरा करण्यात आला.👏🙏 📘डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतीमेचे पूजन करून विनम्र अभिवादन केले . 👏👏💐💐 अशाप्रकारे विद्यार्थी, शिक्षक यांच्या भाषणातून आणि गितातून विनम्र आदरांजली वाहीली. 🙏 〰〰〰〰〰〰

*शिक्षण हे वाघीणीचे दुध आहे आणि जो ते प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही - डॉ. बाबासाहेब आंबेडकर*

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00          ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 06/12/2019 वार - शुक्रवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *महापरिनिर्वाण दिन* 💥 ठळक घडामोडी :-  ● २०००-थोर समाजसेवक बाबा आमटे यांना राष्ट्रपती के.आर.नारायणन यांच्या हस्ते केंद्र सरकारचा 'डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीयपुरस्कार' प्रदान करण्यात आला. ● १९९२ - अयोध्येमध्ये कारसेवकांनी बाबरी मशीद पाडली.त्यामध्ये उसळलेल्या दंगलीत सुमारे १५०० लोक ठार झाले ● १९९७ - सायबेरियातील इर्कुट्स्क शहरात रशियाचे ए.एन.१२४ जातीचे विमान रहिवासी भागात कोसळले. ६७ ठार. 💥 जन्म :- ● १९१४ - सिरिल वॉशब्रूक, इंग्लिश क्रिकेट खेळाडू. ● १९४६ - फ्रँक हेस, इंग्लिश क्रिकेट खेळाडू. ● १९५२ - रिक चार्ल्सवर्थ, इंग्लिश क्रिकेट खेळाडू, राजकारणी, हॉकीपटू व मार्गदर्शक. ● १९७७ - फ्रेड फ्लिन्टॉफ, इंग्लिश क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- ● १९७६- क्रांतिसिंह नाना पाटील ● *१९५६ - डॉ. भीमराव रामजी आंबेडकर, भारतीय संविधानकार, कायदेमंत्री व अर्थतज्ज्ञ* ● २००५ - देवन नायर, सिंगापूरचा तिसरा राष्ट्राध्यक्ष. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 फलक लेखन आणि वाचन ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *वाचू आनंदे* http://projectforchild.blogspot.com/2019/12/06-2019.html •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागताला जाणार, पुण्यात आजपासून पोलीस महासंचालकाच्या तीन दिवसीय परिषदेला सुरुवात होत आहे. त्यासाठी नरेंद्र मोदी दोन दिवस तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तीन दिवस पुण्यात असणार आहेत.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *मुंबई : शहरातील विविध पायाभूत सुविधा, झोपडपट्टी मुक्त मुंबई करणे, मुंबई २०३० दृष्टिक्षेप यात शहराचा सर्वांगीण विकास करण्यावर भर, पूर नियंत्रण आणि हवामान बदल, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या महापालिकेतील बैठकीत हे निर्देश देण्यात आले आहेत.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *परभणी रेल्वे स्थानकावरील हेल्थ इन्स्पेक्टर कार्यालयात शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत दोन वेटिंग रुम जळून खाक झाल्या आहेत. सुदैवाने या आगीमुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *पीएमसी बँक खातेधारकांना कोणताही दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार, खातेधारकांच्या आरबीआय विरोधातील याचिका हायकोर्टानं फेटाळल्या, भारतीय बँकांशी संबंधित सर्व निर्णय घेण्याचे अधिकार केवळ आरबीआयलाच, तेच सार्वभौम आहेत - हायकोर्ट * ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *सिंधुदुर्ग येथील मालवण तालुक्यातील देवबाग सुनामी बेटावर पर्यटकांची बोट बुडाली, ९ पर्यटक बोटीवर असल्याची माहिती, एका महिलेचा मृत्यू तर तीन जण गंभीर जखमी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *21 हजार मेट्रिक टन कांदा आयात करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. यापूर्वी 17 हजार मेट्रिक टन कांदा आयात करण्याचा निर्णय झाला होता* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन त्यानिमित्ताने मुंबईतील चैत्यभूमीत देशभरातून 25 लाखा पेक्षाही अधिक अनुयायी अभिवादन करण्यासाठी होणार दाखल* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन टीमकडून भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रज्ञासूर्य विशेषांक* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्यप्रदेश मधील महू येथे झाला. त्यांचे मूळ नाव भीमराव असॆ होते. परंतु भारतातच नाही तर परदेशात ते बाबासाहेब या नावानेच सुप्रसिध्द आहेत. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी तर आईचे नाव भीमाबाई होते. भीमराव लहान असताना त्यांची आई देवाघरी गेली. तेंव्हा त्यांच्या आत्यानी त्यांचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे वडील उद्योगी, महत्वाकांक्षी आणि शिस्तीने वागणारे होते. लष्कराच्या शाळेत....... खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा व विशेषांक download करून घ्यावे. https://drive.google.com/file/d/1kosTls7MJZs-ZqpbQIfouieMOvY65wbl/view?usp=drivesdk     विशेषांक वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *बाष्पीभवन व उत्कलन* 📙 ****************************** तापमानातील बदल, तापमानातील फरक, द्रव पदार्थांवरील वातावरणातील हवेचा दाब, द्रवपदार्थाचा उत्कलनबिंदू या साऱ्यांचा परिणाम बाष्पीभवन नावाच्या प्रक्रियेवर होत असतो. छोट्या छोट्या उदाहरणांतून हे आपण पाहिले, तर ते समजणे गमतीचे होते. उन्हाळा आल्यावर घरच्या कुत्र्यासाठी ताटलीत घातलेले पाणी संध्याकाळी कदाचित त्याने न पिता देखील नाहीसे झालेले असते. या उलट पावसाळ्यात पाऊस पडायचा थांबला तरीसुद्धा दारातील फरशीवर साचलेले पाणी सुद्धा कित्येक तास तसेच दिसते. कपभर चहा जेमतेम पाच मिनिटात आपण आपल्या गावात बनवतो. पण तोच कपभर चहा बनवायला गिर्यारोहकांना, हिमालयातील आपल्या सैनिकांना किमान पंधरा मिनिटे लागतात. डॉक्टर इंजेक्शन देण्यापूर्वी स्पिरिटचा बोळा फिरवतात; पण इंजेक्शन देऊन होण्यापूर्वीच ती जागा कोरडी झालेली असते. भल्यामोठ्या धरणातील पाणी काटकसरीने वापरूनसुद्धा कमी होत जाते किंवा आपल्याला नियमित पाणी पाऊस मिळतो, याचेही कारण समुद्रातील पाण्याचे, मोठ्या जलाशयांतील पाण्याचे बाष्पीभवन आहे. कोणत्याही द्रवपदार्थाच्या पृष्ठभागावरील कणांचे सतत वायुरूपात रुपांतर होत असते. वातावरणातील आर्द्रता, उष्णता यांचा त्यावर कमी जास्त परिणाम होत राहतो. द्रवाचे तापमान जसे वाढते, तशी ही प्रक्रिया वाढते. मात्र तापमान कमी झाले तरी ती पूर्णत: थांबत नाही, हे लक्षात घ्यायला हवे. थंडीच्या दिवसांत तळ्याच्या किंवा नदीच्या काठी उभे राहिलो तर पाण्यातून निघणाऱ्या या कणांनी बनलेल्या वाफा सहज आपल्या दृष्टीला पडू शकतात, त्याही सकाळच्या कडाक्याच्या थंडीत जेमतेम आठ ते दहा सेंटिग्रेड तापमानाला. द्रवाचा उत्कलनबिंदू कमी असला, तर हे बाष्पीभवन वेगाने होत असते. उदाहरणार्थ, पेट्रोल, स्पिरिट, टर्पेंटाइन ठेवलेली बाटली वा मोठा कॅन खोलीत नुसता उघडा राहिला, तरी त्या पदार्थांचा वास काही सेकंदात आपल्याला येऊ लागतो. प्रत्येक पदार्थाचा एक उत्कलनबिंदू ठरलेला असतो. हे अगदी घनपदार्थ वा धातुंनाही लागू आहे. पण आपण येथे मुख्यतः द्रवपदार्थाबद्दलच विचार करणार आहोत. उदाहरणार्थ, पाणी जेव्हा उत्कलनबिंदूएवढे तापवले जाते, तेव्हा त्यानंतर त्याला मिळणाऱ्या उष्णतेतून त्याचे तापमान वाढत नाही, तर पाण्याचे रूपांतर वाफेत होणे सुरू होते. ही वाफ झपाट्याने पाण्याच्या भांड्यातून बाहेर पडताना आपण पाहतो. उत्कलनबिंदूवर हवेच्या दाबाचा परिणाम होतो. दाब कमी झाल्यास उत्कलनबिंदू कमी झाल्याने तापमान कमी राहते. याउलट दाब वाढविल्यास द्रवाचे तापमान अधिक वाढू शकते. या तत्त्वाचा वापर करूनच घरगुती प्रेशर कुकरमध्ये तापमान सुमारे ५ पौंड दाबाखाली ११५ सेंटिग्रेडपर्यंत वाढवून अन्न लवकर शिजवले जाते. *'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी झाली ?* 1998 2) *भारताच्या राष्ट्रध्वजाची रचना कोणी केलेली आहे ?* वेंकय्या पिलई 3) *शाळा व्यवस्थापन समितीचा कार्यकाल किती वर्षाचा असतो ?* 2 वर्ष 4) *शाळा व्यवस्थापन समितीमध्ये किती टक्के महिला सदस्य असाव्यात ?* 50 % 5) *शाळा व्यवस्थापन समितीमध्ये स्वीकृत सदस्य म्हणून किती विद्यार्थ्यांची निवड करावी लागते ?* 2 *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 अमोल सेठ येमुल, पुणे 👤 डी. आर. भोसके, येवती 👤 अशोक हिंगणे 👤 शंकर बोंबले 👤 कैलास सोनकांबळे 👤 बालाजी गैनवार, चिकना 👤 नवनाथ राजीवाडे 👤 भगवान चव्हाण 👤 राजेश जाधव उमरेकर 👤 माधव हालकुडे 👤 प्रा. मंगल सांगळे 👤 दत्ता काशेवार 👤 विवेक क्षीरसागर 👤 देवानंद मुरमुरे 👤 नरेश पांचाळ 👤 राजेश आंपलवाड 👤 कैलास सोनकांबळे 👤 बाबासाहेब घागले 👤 लवकुमार मुळे *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *माणसाच्या स्वभावातील 'मी' पणा हाच त्याचा सर्वात मोठा शत्रू असतो. त्यामुळे 'मी' पणाच्या मगरमिठीतून त्याची सुटका होणे अशक्यप्राय असते. 'मी' पणा म्हणजेच अहंकार. हा अहंकार दगडी भिंतीसारखा असतो. सहज जरी दगडी भिंतीवर आपले डोके आपटले तरी ते रक्तबंबाळ होऊ शकते; परंतु अस्मिता ही खुल्या खिडकीसारखी असते. अशा खिडकीतून स्वच्छ आणि शुद्ध हवा आतून बाहेर खेळत असते. अहंकारी माणसे उगाचच सतत म्हणत असतात की, 'मी हे केले आणि मी ते केले'. 'मी' पणाची अशी वल्गना करण्यापेक्षा अस्मिता बाळगणारी माणसे म्हणत असतात की,'मी देखील हे करू शकतो, मी देखील ते करू शकतो.'* *अस्मितापूर्ण भाषेत सौजन्य असते, नम्रता असते, शहाणपण असते. अहंकार हा एखाद्या महावृक्षासारखा असतो. घोर संकटाच्या वादळात तो मुळासकट जमीनदोस्त होऊ शकतो; परंतु अस्मिता लव्हाळ्यासारखी असते. ती वा-याच्या तालावर आनंदाने डोलत असते. अहंकाराच्या महापुरात मोठ मोठे वृक्ष वाहत जाऊन नाहीसे होतात ; परंतु अस्मितेच्या वाटेवर स्वार होऊन छोटीशी मुंगी पैलतीरावर जाऊन हसत असते. आपले जगणे हसण्यासाठी आहे, रडण्यासाठी नाही. आपल्या जगण्यात आनंद आहे. तो अनुभवायाचा असतो. आपले जगणे आनंदाचे गाणे व्हावे असे वाटत असेल तर अहंकारमुक्त प्रांगणात स्वछंदपणे विहार करायला शिकले पाहिजे. अस्मितापूर्ण आकाशात गरूडभरारी घ्यायला शिकले पाहिजे. आपले जगणे मलयगिरी पर्वतावरील सुगंधित वा-यासारखे व्हावे असे वाटत असेल तर प्रथम आपण अहंकाराचा त्याग केला पाहिजे. कवी बा. भ. बोरकर म्हणतात..."जीवन त्यांना कळले हो । मीपण ज्यांचे पक्व फळापरि गळले हो ॥* ‼ *रामकृष्णहरी*‼ 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो,* *काल सायंकाळी एबीपी माझावर बातमी ऐकली, मन पुन्हा सुन्न झालं.उत्तरप्रदेशात उंननाई येथे एका* *तरुणीला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न झाला.कुठवर चालणार हे मातम?* *रोजचे विविध प्रकारचे करूणादायी मेसेज,वर्तमानपत्रातील लेख वाचून मन उद्विग्न होऊन चाललंय.* *किती दिवस लोकशाहीतील हे विकृत थैमान चालेल कुणास ठाऊक.* *गेली सांगून ज्ञानेश्वरी न* *माणसापरिस मेंढरं बरी।* *हेच मनात घोळवंतय.त्यात उपाय म्हणून नागपूर,बीड,नासिक* *पोलिसांनी होम ड्रॉप, कवच कक्ष,हलो पोलीस हे उपक्रम* *आशादायी, पण* *किती दिवस* *प्रियंका जनावरावर उपचार करायची.त्याचा अंदाज घेऊन एखाद्या* *पशूच्या जवळ जायची.नखे,दात लागतात का? याची काळजी घेऊन* *औषधे,इंजेक्शन द्यायची.कारण ते पशू होते,मात्र त्यांनी तिला माणूस म्हणून कधीच इजा केली नाही.त्या* *काळरात्री माणूस समजून ज्यांच्यावर तिने विश्वास ठेवला ते मात्र कातडे पांघरलेले* *अमानुष लांडगे निघाले.अक्षरशः तिचे लचके तोडले.दिड अब्जांच्या* *जवळपास असलेल्या लोकसंख्येच्या देशात असे चार -सहा सैतान निपजले म्हणजे त्यांचे प्रमाण* *अत्यल्प आहे असे म्हणून स्वतःची समजूत काढूही ,पण त्यांचे उपद्रवमूल्य किती भयंकर आहे* *हे आज सभोवार नजर टाकली तर अनेक* *निष्पाप डोळयांत दाटलेल्या भितीतून दिसून येईल. प्रियांकाने शेवटच्या क्षणी हात जोडून या सैतानांच्या* *नैतिकतेला आवाहन केले असेल,पाया पडली असेल पण ज्या विखारी उन्मादाने त्यांनी क्षणिक* *वासनेपोटी क्रौर्याची परिसीमा गाठली ती क्रूरता त्यांच्यात* *आली कोठून? इतकी अधर्मीवृत्तीअंजना,रिंकू,असिफा,गिता ,ट्विंकल,निर्भया ,इशा* *प्रियंका आणि त्यांच्यासारख्या अनेक* *निष्पापावर झालेल्या अत्याचाराच्या रुपाने का वाढताना दिसत आहे?* *शाळेतून नैतिकतेचे धडे शिकवले जातात,वर्षानुवर्षे पोत्याने पारायणे ऐकली जातात ,तरी* *समाजाचे अधःपतन होताना का दिसतेय?याचे* *एक कारण असे दिसते,मुल्ये सांगून भिनवता येत* *नाहीत.आचरणातूनच बिंबवता येतात.आज असा आचरणशील* *समाज भोवती दिसतोय का? कुठे शोधायचा?आणि कुणी शोधायचा* ? *स्टेजवरुन मूल्यांचे जीभेला न पेलवणारे शब्द ओकले* *जाताहेत.काही नेत्यांच्या आचार विचारातील गैरमेळ* *गाढवालाही लाजवेल असा सर्वांनी बघितलाय .ठराविक सरकारी बाबूंना हरामाच्या पैशांची भूक लागली* *आहे.धान्य सहज उपलब्ध होणार नाही पण दारु मात्र नाक्यानाक्यावर आहे.ग्रंथालये* *शेवटची घटका मोजतांना सगळे डोळसपणे पाहत आहे. इकडे डान्सबार हाऊसफुल्ल* *चाललेत.मैदाने ओस पडत चाललीत.कुशल,मूल्यनिर्धारीत* *खेळाडू तयार होत नाही ,अध्यात्मिक गुरुनींच लैंगिकतेचा बाजार मांडलेला* *उघड डोळ्यांनी बघितला तरी त्यांची पूजा थांबत नाही.विचार जेव्हा* *थांबतत् तेव्हा विकार भडकतात.आज समाजाचे नेमके तेच* *होत चालले आहे.विकार फैलावलेला दिसतोय.* *आज आजी,बाबा,काका,काकू,दादा,ताई* *घराघरातून संपली आहेत.नातवंडावर प्रेम* *करणारे,वर्तनाला वळण लावणारे नाते कुटुंबात उरले नाहीत.* *त्रिकोणी-चौकोनी कुटुंबात पाल्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही.कॉन्व्हेंटचा* *जमाना वाढलाय.पाठीवरचा मायेचा हात लुप्त* *झाला.हातात मोबाईल नावाचा सैतान आला आणि अकाली वयात* *अश्लील व्हिडिओंचे व्यसन अवेळी मुलांना लागले.निसर्ग नियम मोडीत* *काढलाय.काहीही करुन मलाही 'तो'अनुभव घ्यायचा आहे या विकृत भावनेने लोभस मनाचा ताबा* *घेतला.मग एखादी निष्पाप अंजना,रिंकू, प्रियंका,निर्भया,* *असिफा ,ट्विंकल,इशा त्यांना बळी पडली....समाज काही काळ* *हळहळतो,रडतो,मोर्चे काढतो,कोर्टात चेंडू जातो आणि गडद रेषा काही* *काळ पुसट होत जाते .पुन्हा गडद झाली की पुन्हा* *काही काळाने पुसट होते.किती दिवस चालायचं हे पाप.* *पालकांनी ज्याप्रमाणे ते बॅंकेतली रोकड वारंवार चेक करतात त्याप्रमाणे आपल्या पाल्याच्या ही* *बचत डोक्यात ठेवून वेळोवेळी डोकावून,चेक केली* *पाहिजे. एखादीं गोष्ट सडली तर तिचा दुर्गंध पसरतो .इतका* *सैतानी अत्याचार हे काही त्या नराधमांचे तत्कालिन कृत्य नव्हते.मेंदू सडण्याची प्रक्रिया खूप* *अगोदर झाली असली पाहिजे.सजग पालकाला हे सहज जाणवू* *शकते.यासाठी पाल्याशी सुसंवाद ठेवला पाहिजे.मेंदू सडत असलेला दिसला तर वेळीच उपाय केला* *पाहिजे.यासाठी कुटुंबाला वेळ दिला पाहिजे. नाहीतर एखादी निष्पाप (मग* *ती स्वतःच्या घरातीलही असेल) वारंवार बळी* *जाईल.* *समाजात चांगल्या लोकांची संख्या जास्त असली तरी व्यक्तीत लपलेला* *सैतान ओळखणारी 'एक्स-रे व्हिजन 'दृष्टी अजून विकसित झाली नाही.त्यासाठी* *सजगता हाच पर्याय आहे.मुलींनी सावधगिरी बाळगली पाहिजे.* *पालकांनीही दक्ष राहिले पाहिजे.आपल्या घरात ,आप्तांत ,असा गुन्हेगार असेल* *तर त्याला पाठीशी घालता कामा नये.अशा गुन्हेगारांना फाशीच झाली पाहिजे.तरच थोडा वचक* *राहण्याची शक्यता आहे.* *पटलं तर अंमलबजावणी स्वतःपासून करा.किती म्हाताऱ्या मेल्या तरी काळ* *सोकावण्याची वाट बघू नका ही विनंती.* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• माझा जसा परमेश्वरावर विश्र्वास आहे तसाच परमेश्वरानंतर पुस्तकावर जास्त विश्वास आहे.आणि परमेश्वराखालोखाल मी पुस्तकालाच मानतो. कारणही तसेच आहे.पुस्तके ही वयाच्या अगदी तिसऱ्या चौथ्यापासून साथ धरली आणि आजही त्यांचीच साथ आहे.पुस्तकामुळेच जीवनाला अर्थ आला,त्यानेच अन्नापाण्याला लावले, संस्कारक्षम बनवले,अज्ञान दूर घालवले,माणूस म्हणून जे काही घडलो ते ह्या पुस्तकामुळेच...! अन्यायाचा प्रतिकार करायला शिकवले त्या पुस्तकांनीच, जीवन कसे जगायचे,जीवनाचा आनंद कसा घ्यायचा,मन स्थिर कसे ठेवायचे,संयम कसा राखायचा,समोरच्या व्यक्तीसमोर आणि जगासमोर कसा व्यवहार करायचा हे पुस्तकांनीच शिकवले.पुस्तकाचा जन्म कधी झाला हे जरी माहीत नसले तरी पुस्तके ही प्रत्येक पिढीला आदर्शच राहून व्यक्तीला,समाजाला आणि राष्ट्राला चांगले आदर्श दिशा देणारे परमेश्र्वरच आहेत.थोरांचे विचार,संतांचे उपदेश,विचारवंतांचे विचार हे पुस्तंकांच्या किंवा ग्रंथांच्या माध्यमातून सामान्य माणसापर्यंत पोहचवण्याचे कार्य पुस्तकातूनच होते.म्हणून ज्ञानप्राप्तीचा मूळ पाया हा पुस्तकांचाच आहे.प्रत्येकांनी पुस्तकाच्या सानिध्यात राहायला तर हवेच.आपल्या ज्ञानाची भूक शमविण्याचे काम ही पुस्तकेच करतात.एकवेळ उपाशी राहिले तरी चालेल पण पुस्तके आपल्या जीवनासाठी आवश्यक आहेत आणि मी त्याच्याशिवाय जगू शकत नाही अशी भूमिका जर प्रत्येकाने घेतली आणि आपल्या घरात एक पुस्तकांसाठी छोटा खाणा किंवा एखादी जागा ठेवावी आणि नित्यनेमाने त्यातील एखाद्या पुस्तकाचे वाचन करावे.असे जर केले तर आपल्या मनावर असलेला ताण कमी तर होतोच पण एखाद्या संकटातून बाहेर जाण्याचा मार्ग निश्चितच सापडतो.माझे ज्या ज्या वेळी मन कोणत्याही कारणाने अस्थिर झाले असले तरी अशावेळी मी हातात एखादे पुस्तक घेऊन एका कोपऱ्यात वाचत बसतो आणि काही काळानंतर आलेला ताण हळूहळू कमी होतो तो केवळ पुस्तकामुळेच. प्रत्येकाच्या जीवनात जर सुख,शांती,समाधान, संस्कार,योग्य दिशा,जगण्याची आशा यांना मिळवण्याचे एकमेव माध्यम फक्त पुस्तकेच आहेत.त्यांच्या सानिध्यात राहायला शिकले पाहिजे. पुस्तकेच माझ्या खरे जीवन जगण्याचे आशाकेंद्र आहे .अशा पुस्तकरुपी परमेश्वराला शेवटच्या क्षणापर्यंत माझ्या हृदयात स्थान आहे हे निर्विवाद सत्य आहे. व्यंकटेश काटकर,नांदेड संवाद..९४२१८३९५९०. 📚📕📚📕📚📕📚📕📚 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मनाची एकाग्रता* पांडुरंग *' मनाची एकाग्रता कशी करावी '* या विषयाचा अभ्यास करत बसला होता. त्याला जो कोणी भेटावयास येई, त्याच्याकडे तो दुर्लक्ष करायचा. आपल्याच चिंतनात मग्न असायचा. एकदा त्याचे गुरु सहदेव महाराज त्याच्याकडे आले. पाहतात तर पांडुरंग शून्यात नजर लावून बसलेला ! पांडुरंगाचे आपल्या गुरुकडे लक्षही नव्हते. सहदेव महाराज मात्र न रागावता तेथेच थांबले. त्यांनी एक वीट आणली आणि दिवसभर ती वीट एका दगडावर घासत बसले. शेवटी न राहवून पांडुरंगाने महाराजांना विचारले, '' महाराज आपण हे काय करता आहात ? '' सहदेव म्हणाले, '' मला या विटेचा आरसा बनवायचा आहे.'' पांडुरंग म्हणाला, '' महाराज, या विटेला घासून कधी आरसा होईल का ? जीवनभर घासत बसले तरीही विटेचा आरसा होणार नाही.'' ते ऐकून सहदेव हसले. म्हणाले, '' मग तू तरी काय करत आहेस ? वीट जर आरसा होत नसेल, तर मनाचे तरी काय ? मनावरील धूळ जोपर्यंत जात नाही, तोपर्यंत साधना करुन तरी काय उपयोग ? मनाची एकाग्रता साधून जे कार्य केले जाते ते सर्वोत्तम असते. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00          ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 05/12/2019 वार - गुरूवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••      *आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिन* 💥 ठळक घडामोडी :-  १९४५ - फ्लाइट १९, फोर्ट लॉडरडेल, फ्लोरिडा येथून निघालेली अमेरिकन नौदलाच्या ५ टी.बी.एम.ऍव्हेन्जर जातीच्या विमानांची स्क्वॉड्रन बर्म्युडा त्रिकोनात गायब. १९८९ - फ्रांसच्या टीजीव्ही रेल्वेने ताशी ४८२.४ कि.मी.ची गती गाठून विश्वविक्रम रचला. 💥 जन्म :- १३७७ - ज्यान्वेन, चीनी सम्राट. १४४३ - पोप ज्युलियस दुसरा. 💥 मृत्यू :-  १५६० - फ्रांसिस दुसरा, फ्रांसचा राजा. १७९१ - वोल्फगांग आमाडेउस मोझार्ट, मध्यकालीन युरोपियन शास्त्रीय संगीतकार. १९२६ - क्लोद मोने, फ्रेंच चित्रकार. २०१३ - नेल्सन मंडेला, दक्षिण आफ्रिकेचा राष्ट्राध्यक्ष, राष्ट्रपिता, वर्णद्वेषविरोधी नेता. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *नवी दिल्ली: सुदानमध्ये सलुमी येथील फॅक्ट्रीत झालेल्या सिलिंडर स्फोटत २३ लोक ठार झाले असून त्यात १८ भारतीय कामगारांचा समावेश आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *नवी दिल्ली: आयएनएक्स मीडिया घोटाळ्याप्रकरणी तिहार तुरुंगात जावं लागलेले माजी केंद्रीय गृहमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम  १०६ दिवसानंतर तुरुंगातून जामिनावर बाहेर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *रत्नागिरी : सोबा चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टी भागात नवे संकट घोंघावण्याची शक्यता, पुढील बारा तासात वादळ सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी किनारपट्टीत धडकणार असून ताशी ४५ ते ५५ किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे धोका लक्षात घेऊन कोणीही समुद्रात जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *नवी दिल्ली: खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून मराठा आंदोलनातील गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी केली आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *मागच्या पाच वर्षात जी आंदोलने झाली त्याची व्यवस्थित माहिती घेऊन गुन्हे मागे घेण्यासंबंधीचा निर्णय घेऊ. सरकार सकारात्मक निर्णय घेईल. कुठल्याही निरपराध व्यक्तीला शासन होणार नाही असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने कसोटी फलंदाजांच्या आयसीसी क्रमवारीत पुन्हा नंबर वनवर झेप घेतली आहे. भारतीय कर्णधाराने बांगलादेशविरुद्धच्या डे-नाईट कसोटीत झळकावलेल्या शतकाने त्याला कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत मानाचं स्थान पुन्हा मिळवून दिलं आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *भारतीय क्रिकेट जगताला धक्का देणारी एक घटना घडली, त्रिपुराची राजधानी आगरतळा येथील मिथुन देवबर्मा या क्रिकेटपटूचा सामना सुरू असताना हृदयविकाराच्या झटक्याने झाला मृत्यू* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 फलक लेखन आणि वाचन ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *वाचू आनंदे* *दिनांक 05 डिसेंबर 2019 गुरुवार ••••••••★••••••••••★••••••••••★••••••••••• http://projectforchild.blogspot.com/2019/12/05-2019.html ••••••••★••••••••••★••••••••••★••••••••••• हा उपक्रम आपणांस कसे वाटले आम्हांला whatsapp करून जरूर कळवावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *पल्स पोलिओ म्हणजे काय ?* 📙 पोलिओ अर्थात बाल पक्षाघात हा सामान्यत: पाच वर्षांपेक्षा लहान वयाच्या मुलांना होणारा एक सांसर्गिक रोग आहे. तीन प्रकारच्या विषाणूंमुळे हा रोग होतो. हा विषाणू दूषित पाण्यामार्फत पसरतो. पोलिओच्या रुग्णाच्या विष्ठेचा पाण्याशी संपर्क येऊन ते दूषित होते. हेच पाणी निरोगी व्यक्ती प्यायल्यास तिला पोलिओ होऊ शकतो. पोलिओ हा रोग ९९% व्यक्तींमध्ये अत्यंत सौम्य स्वरूपाचा असतो. ९५% लोकांमध्ये तर कोणतीही विशिष्ट लक्षणे दिसत नाही. ३ ते ४% लोकांमध्ये ताप आढळून येतो. १% लोकांमध्ये मान व पाठ आखडणे, दुखणे अशी लक्षणे दिसतात. १% हून कमी रुग्णांमध्ये मात्र मज्जासंस्थेवर विषाणू आक्रमण करतो. याची परिणती एकतर श्वसन बंद पडून मृत्यू होण्यात किंवा हात पाय कायमस्वरूपी लुळे पडण्यामध्ये होते. पोलिओ हा गंभीर रोग असला तरी तो टाळणे सहज शक्य आहे. बाळाला जन्मल्यावर लगेच आणि त्यानंतर ते ६, १०,व १४ आठवडय़ांचे तसेच नंतर दीड वर्षांचे झाल्यावर पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन दोन थेंब पाजल्यास या रोगापासुन बाळाचे नक्कीच संरक्षण होऊ शकते. भारतात लसीकरणाचा कार्यक्रम प्रभावीपणे राबवला गेल्याने या रोगाचे प्रमाण अतिशय कमी झाले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने २००५ पर्यंत पोलियोचे जगातून निर्मूलन करण्यासाठी धडक कार्यक्रम हाती घेतला आहे. याला 'पल्स पोलिओ' असे म्हणतात. या कार्यक्रमाअंतर्गत विविध देशातील पाच वर्षांखालील बालकांना विशिष्ट दिवसांना पोलिओची लस दिली जाते. त्यामुळे सर्व बालकांच्या आतड्यांमध्ये लसीतील (रोग निर्माण करू न शकणारा) विषाणू प्रस्थापित होतो. साहजिकच रोगकारक विषाणूला राहण्यासाठी कोणत्याच बालकांचे आतडे मिळत नाही. परिणामी तो पर्यावरणात येतो व काही आठवड्यांनी नष्ट होतो. पल्स पोलिओ मोहीम यशस्वीपणे राबवली गेल्यास जगातून निर्मूलन होणारा देवी नंतरचा दुसरा रोग पोलिओ ठरेल यात शंका नाही. दुर्दैवाने काही व्यक्ती गैरसमजापोटी आपल्या बाळांना पोलिओची लस देण्यास टाळाटाळ करतात. त्यामुळे त्यांच्या बालकांना पोलिओ होण्याचा धोका निर्माण तर झालाच आहे पण पोलिओ निर्मूलनाच्या अभियानालाही खीळ बसत आहे. म्हणूनच अमिताभ बच्चन तसेच शाहरुख खान सारखे लोकप्रिय अभिनेते तसेच सचिन तेंडुलकरसारखे महान खेळाडू सर्व जनतेला पल्स पोलिओच्या दिवशी सर्व बालकांना 'दो बूंद जिंदगी के' देण्याचे टीव्हीवरून आवाहन करताना दिसत असतात ! *डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित* यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून मनोविकास प्रकाशन ०२० ६५२६२९५० *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *" सर्वात अधिक संकटे घेऊन येणारा क्षण आपल्याबरोबर येणार्‍या संकटासोबत विजयश्रीही घेऊन येतो. "* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *महाराष्ट्रात पादत्राणे बनविण्याचे प्रसिद्ध ठिकाण कोणते ?* कोल्हापूर 2) *पृथ्वी सूर्याच्या भोवती गोल फिरते हे प्रथम कोणी शोधून काढले ?* कोपर्निकस 3) *महाराष्ट्रात मालवणी ही भाषा प्रामुख्याने कोठे बोलली जाते ?* कोकण 4) *तेजस्विनी सावंत हे नाव कोणत्या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहे ?* नेमबाजी 5) *भारत आणि रशिया या दोन राष्ट्राच्या सहकार्याने विकसित करण्यात आलेल्या क्षेपणास्त्राचे नाव काय ?* ब्राह्मोस *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 विकास गणवीर, नागपूर 👤 साईनाथ कल्याणकर, येवती 👤 सूर्यकांत स्वामी 👤 राज डाकोरे 👤 संतोष रामराव शिंदे 👤 अशोक चिंचलोड, येवती, 👤 राजेश गटालावार 👤 राजू अलमोड 👤 योगेश पडोळे *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *शरीरातून जीव गेल्यानंतर कुठे असतो आपण ?  कुठल्या रूपात मागे उरतो आपण ? माझ्या घरात आज मी आहे.... उद्या मी नसेन....* *माझ्या जागी एक मिणमिणता दिवा असेल. दहा दिवसांनी तो दिवा विझेल. मग त्या जागी माझा एक फोटो असेल, लाकडी चौकट, कोरीव नक्षीकाम केलेला, हसरा चेहरा असलेला एक फोटो...* *काही दिवसांनी माझ्या लटकलेल्या फोटोवर साचलेली धूळ असेल... त्या फोटोची पातळ काच वेडीवाकडी तडकलेली असेल.. काही वर्षांनी माझा तो हसरा फोटो भिंतीवरच्या छिद्रातून खिळ्यासकट निखळलेला असेल... आणि मग त्यानंतर पिढ्यान्- पिढ्या माझ्याच घरात, माझ्या नावाचं फक्त उरलेलं एक छिद्र असेल.....!* *"आपलं रूपांतर अशा छिद्रात होण्यापूर्वी आपल्याला दानांत मिळालेल्या ह्या श्वासांच रूपांतर आपण 'सत्कर्माच्या सप्तरंगी उत्सवात' करायला काय हरकत आहे...?"*    ••●🌻‼ *रामकृष्णहरी* ‼🌻●••     🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃      *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*          📱 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो,* *ज्या लोकांना स्त्री ही उपभोगाची वस्तू* *आहे असे वाटते,ज्यांना ती अबला आहे,स्रियांचे हे काम नाही,* *बाईची बुद्धी हृदयात असते,अशा स्रियांना कमजोर* *समजणाऱ्या बंधुसाठी,आणि ज्या भगिनी स्वतःला स्त्री म्हणून कमजोर* *समजतात त्यांच्यासाठी वाचनात आलेला एक लेख* *पाठवतोय.* *Ad. दीपा चौदीकर यांची ही पोस्ट आहे.खरी गरज स्त्री-पुरुष या दोघांचेही विचार बदलण्याची आहे.* *घाट वळणातली वाघीण ....* . *आज वाघीण भेटली.... कोर्टातुन येत असताना माझ्या पुढे महींद्रा बोलेरो* *पिकअप होती... मला त्या* *गाडीला ओव्हरटेक करायचं होतं म्हणुन थोडं पुढे आले.. तेवढ्यात* *त्या बोलेरो मधुन ड्रायव्हींग सीटच्या बाजुने चक्क हातभर हिरव्या बांगड्यांचा हात* *बाहेर आलां ...... कुतुहलं वाटलं* *म्हणुन अजुन थोडी पुढे आले ....आणी त्या बोलेरोमध्ये नजर* *वळवली तर चक्क एक* *४०/४५ वर्षांची वाघीण महींद्रा पिकअप हाकत होती.....त्यांना* *सांगितलं काकु गाडी साईडला* *घ्या..... मग काय मॅडमनी ट्राफीक* *मधुन गाडी व्यवस्थित बाजुला घेतली.... त्या गाडीतून* *काॅन्फीडन्टली उतरल्या ..... नाव* *सांगितलं नकुसा म्हासाळ......या* *नकुसा काकु कवठेमंहकाळ* *तालुक्यातल्या एका खेडेगावातुन आहेत ज्या रोज कोकणात जातात* *स्वत: ड्राईव्ह करुन रत्नागिरी, लांजा , राजापुर या भागांत चार ते पाच टन भाजी घेऊन जातात* *तिथल्या बाजारात घालतात आणी हे काम त्या गेली वीस वर्ष करतायतं ....कोकणात ते पण* *घाटातुन रोजचा हा प्रवास......... कौतुक वाटलं .... आणी त्याही* *पेक्षा अभिमान जास्त वाटला या वाघीणीचा....कुठलही काम कमी* *दर्जाच कधीच नसतं आपण ज्या मेहनतीने ते करतो ती मेहनत ...... तो* *त्या कामाचा दर्जा वाढवतं* *असतं ......आज त्यांच्या गाडीत मागे* *लोखंडी सळ्या होत्या....म्हंटलं* *मग हे आज काय आहे गाडीत....तर म्हंटल्या गावाकडे बंगला बांधतेय मी त्याचचं सामान* *आहे हे घेऊन चाललीये गावाकडे....आमचीच गाडी* *आहे ही तेव्हा ड्रायव्हर ला पगार देण्यापेक्षा स्वत:च करते मी* *काम म्हणाल्या.......वीस वर्ष घाटवळणातून प्रवास चालुयं* *आयुष्याचा , कष्ट चालुय मग बंगला तो बनेगा ही भाई.....* *नकोशी मुलगी जन्माला आली म्हणुन आई वडीलानी कदाचित नकुसा नावं* *ठेवलं असावं, पण तीच्यात मला आजची सुपरवुमन* *दिसली....जिचं शिक्षण फक्त नववी पर्यंत झालंय पण तिचं कर्तृत्व बघून* *तिला आरटीओ ॲाफीसर नी मोफत लायसन्स काढून* *दिलं.........नकुसा काकू तुमच्या जिद्दीपुढे, तुमच्या* *कर्तुत्वापुढे , तुमच्या आत्मविश्वासापुढे मी खुप तोकडी वाटले मलाच......* *सलाम तुमच्या जिद्दीला आणि घाटवळणाच्या संघंर्षाला* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• पडलेल्या घराच्या भिंतीआत्मविश्वासाने आणि परिश्रमाने उभ्या करतायेतात नि घर उभे करता येते,परंतु चार माणसांची मने जर तुटली तर ती माणसं पुन्हा जोडणेआणि त्यांचे हृदयात घर करणे अतिशय अवघड आहे. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३ 🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *जीवनातील तणाव दूर करणे.* एका शिक्षिकेने अर्धा भरलेला पाण्याचा ग्लास हातात धरला आणि सर्व विद्यार्थ्यांवर एक नजर टाकली. प्रत्येकाला वाटले की आता मॅडम विचारतील की हा ग्लास भरलेला आहे की रिकामा ? पण एक स्मित हास्य करुन मॅडमने प्रश्न केला, " या ग्लासचं वजन किती असेल कुणी सांगेल का ?" कुणी म्हणालं 100 ग्रॅम तर कुणी 200 ग्रॅम. एक जण तर म्हणाला - मॅडम, अर्धा किलो ! मॅडमने पुन्हा एकदा स्मितहास्य करुन बोलण्यास सुरुवात केली, " याचं वजन मोजमाप करुन सांगितल्याने फारसा फरक पडणार नाही !मुळात वजन काहिही असो, जर का मी हा ग्लास एक मिनीट असाच धरुन ठेवला तर मला काही त्रास होणार नाही. एक तास धरुन ठेवला तर हात दुखेल आणि दिवस भर असाच ठेवला तर . ? तर हात खुप जड होईल, ईतका की बधीर होउन निकामीच ह्वावा ... आपल्या आयुष्यातील तणाव अन् चिंतांच पण असंच असतं. क्षण भर विचार करा , काही वाटणार नाही. पण मनात धरुन बसाल तर ... तुमचं मन पण असंच जड होत होत बधिर होईल ! ईतकं की तुम्ही काही करुच शकणार नाहीत ! तेव्हा व्यर्थ चिंता करणं सोडा व कायम आनंदी रहा. मनाला हलकं करा आणि निरंतर अल्हाददायक जीवन जगायला शिका ... आयुष्य खुप सुंदर आहे .....! आयुष्य जगण्याच्या दोन पध्दती : १) जे आवडते ते मिळवायला शिका. २) जे मिळवले आहे तेच आवडून घ्यायला शिका. नेहमी इतरांशी स्वतःची तुलना करत बसू नका. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00          ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 04/12/2019 वार - बुधवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    *भारतीय नौसेना दिवस* 💥 ठळक घडामोडी :-  १८२९ - भारतीयांचा कट्टर विरोध असूनही लॉर्ड बेंटिंकने जाहीनामा काढून सतीच्या प्रथेला मदत करणार्‍यांना खूनी ठरवले जाईल असा कायदा केला. १९७१ - भारत-पाकिस्तान तिसरे युद्ध) - भारत आणि पाकिस्तानमधील परिस्थिती चिघळत असल्याचे पाहून संयुक्त राष्ट्रांनी आणीबाणीची बैठक बोलवली. १९७१ - भारत-पाकिस्तान तिसरे युद्ध)-ऑपरेशन ट्रायडेंट - भारतीय आरमाराने कराचीवर हल्ला केला. 💥 जन्म :- १९१९ - इंद्रकुमार गुजराल, भारताचे पंतप्रधान. १९३२ - रोह तै-वू, दक्षिण कोरियाचा राष्ट्राध्यक्ष. १९४३ - फ्रान्सिस दिब्रिटो, कॅथॉलिक ख्रिस्ती फादर, मराठी लेखक. 💥 मृत्यू :-  १९७५ - हाना आरेंट, जर्मन तत्त्वज्ञ, लेखिका. १९८१ - ज.द. गोंधळेकर, मराठी चित्रकार. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *मुंबई : आम्ही कोणत्याही विकासकामांना स्थगिती दिलेली नाही. तसेच रद्द केलेली नाहीत. उलट ही कामे गतीने कशी पूर्ण होतील, याकडे आम्ही लक्ष देत आहोत, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. * ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *मुंबई : दूरसंचार कंपन्यांकडून आता ५० टक्के शुल्कवाढ केली जाणार आहे. एअरटेल, व्होडाफोन-आयडिया कंपनीची कालपासून तर जिओची दरवाढ ६ डिसेंबरपासून* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करुन मोठया उत्साहात किल्ले प्रतापगडावर शिवप्रताप दिन साजरा करण्यात आला.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *श्रीनगर : पाकिस्तानने पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन करत जम्मू-काश्मीरच्या (Jammu Kashmir) पुंछ सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्याकडून गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात दोन भारतीय नागरिक ठार झाले* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *काँग्रेसच्या प्रखर विरोधानंतरही लोकसभेपाठोपाठ राज्यसभेतही आवाजी मतदानाने सुरक्षा एसपीजी विधेयक मंजूर करण्यात आले. हे विधेयक मंजूर झाल्याने यापुढे केवळ विद्यमान पंतप्रधान आणि त्यांच्या कुटुंबीयांनाच एसपीजी सुरक्षा मिळणार आहे आणि माजी पंतप्रधान तसेच त्यांच्या कुटुंबीयांना ही सुरक्षा मिळणार नाही, हे या नव्या विधेयकामुळे स्पष्ट होत आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *आगामी वर्षातील एक जून पासून एक राष्ट्र एक रेशन कार्ड ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेतील महत्वाकांक्षी योजना लागू होणार आहे. यामुळे देशभरात कुठे ही स्वस्त धान्य उपलब्ध होणार आहे* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *अर्जेन्टीनाचा स्टार फुटबॉलर लियोनेल मेसीने सहाव्यांदा पटकावला 'बॅलन डी'ओर पुरस्कार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••            *कळी उमलण्याआधी .......* https://storymirror.com/read/story/marathi/9fu28ady/klii-umlnnyaa-aadhii/detail कथावाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *लिंबू पाणी पिल्याने आम्लपित्त कमी होते का ?* 📙 जठरामध्ये हायड्रोक्लोरिक आम्ल तयार होत असते. या आम्लाचा अन्नपचनासाठी खूप उपयोग असतो. जठरातील पेशीमधून हे अाम्ल स्रवत असते. या आम्लाचे प्रमाण कमी झाले तर अजीर्ण होते. अन्नाचे पचन व्यवस्थित होत नाही. या उलट आम्लाचे प्रमाण जास्त झाल्यास आम्लपित्ताचा त्रास होतो. तोंडात आंबट पाणी येते. छातीत जळ जळ होते. पोटात जळजळ होते. जठराचा व्रणही होऊ शकतो. किंवा लहान आतडय़ांच्या पहिल्या भागात व्रण होतो. आम्ल पित्त असणाऱ्या लोकांनी तिखट, तेलकट, आंबट पदार्थ खाऊ नये असा सल्ला दिला जातो. कारण अशा गोष्टींनी आम्ल जास्त प्रमाणात तयार होते. साहजिकच आम्लपित्ताच्या व्यक्तीला अजूनच त्रास होईल. अशा व्यक्तीने खायचा सोडा घेतल्यास त्याची जळजळ कमी होते. कारण आम्लाचा प्रभाव अल्कली मुळे कमी होतो. जेल्युसील सारख्या गोळ्यांनीही रुग्णाला बरे वाटते. लिंबू पाणी पिल्याने आम्लपित्त कमी होते का याचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन पाहा. लिंबात देखील सौम्य असे एक अाम्लच असते. आम्लपित्त कमी होण्याची दोन स्पष्टीकरणे देता येईल. एक म्हणजे हायड्रोजन आयर्न असतील (H+) तर आम्ल निर्मितीची व स्त्रवणाची जठारातील पेशींची क्रिया मंदावते. दुसरे म्हणजे लिंबू आपण पाण्यात टाकूनच पितो. साहजिकच या पाण्यामुळे जठरातील आम्ल सौम्य होते. या दोन गोष्टींमुळे काही लोकांमध्ये लिंबू पाणी पिल्याने आम्लपित्त कमी होत असावे. *डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित* यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून मनोविकास प्रकाशन *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *" चांगला स्वभाव हा गणितातल्या शून्यासारखा असतो, ज्याच्या सोबत असतो त्याची किंमत नेहमीच जास्त असते "* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा केव्हा अस्तित्वात आला ?* 2 फेब्रुवारी 2007 2) *भारत जागतिक व्यापार संघटनेचा सदस्य कोणत्या वर्षी झाला ?* 1995 3) *अल्कोहोलमध्ये काय असते ?* कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन 4) *पहिली जागतिक वसुंधरा परिषद कोठे पार पडली ?* ब्राझील ( 1992 ) 5) *अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर दहशतवादी हल्ला केव्हा झाला ?* 11 सप्टेंबर 2001 *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 उमाकांत शिंदे, नांदेड 👤 बबन साखरे 👤 शेख आलीम 👤 वैशाली बाळासाहेब भामरे *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *स्वत:वर खुश असणा-यांना लोक खूप घाबरतात. त्यांना या लोकांबद्दल खूप आसूया वाटते. सर्वसामान्य माणसे जगात सर्वाधिक नाराज जर कोणावर असतील, तर ती स्वत:वरच असतात. त्यांच्या हातुन चुका होतात. कधी कधी तर त्याच त्याच चुका परत परत होतात. नियतीचे फासे सततच असे पडत राहतात, की सारखेच हस्यास्पद व्हायची वेळ यावी. इतरांच्या हातात कायम राजे, एक्के आणि यांच्या हातात दुर्री-तिर्री, हे तर नेहमीचेच. यांनी चुका सुधारायच्या ठरविल्या तरी पटापट यांना त्या सुधारता येत नाही. त्याच त्याच बाॅलवर परत परत विकेट जात राहते.* *काय केले म्हणजे आपल्याला प्रतिष्ठा मिळेल ? लोक आपल्याला महत्वाचे आणि सन्माननीय समजतील? याचा विचार करण्यात यांचे तासन् तास जातात. तरीही त्यांना असाच निष्कर्ष काढावा लागतो, की अजून आपल्याला खूपच मेहनत करावी लागेल. आणि मग स्वत:ला दोष देत, स्वत:ला सुधारण्याचा पुन:पुन्हा प्रयत्न करत ते जगत राहतात. अशा खचलेल्या आणि जगाच्या गणितात हुकलेल्या लोकांनी सगळा परिसर भरलेला असताना जर एखादा नखशिखांत स्वत:वर खुश असेल तर जगाला त्रास होणारच.*  *"परंतु जो स्वत:वर प्रेम करीत नाही त्याच्यावर जग प्रेम करीत नाही."*    ••●⚜‼ *रामकृष्णहरी* ‼⚜●••      🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀        *संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*          📱 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो,* *जिच्या उदरातून मानवी देह मिळाला त्या नारीचा सन्मान हा फक्त दिखाऊ* *पणा असल्याची चर्चा सुरू झाली.टी. व्ही.,वर्तमानपत्र, चौका-चौकात,राजकीय,सामाजिक* *बांधिलकी म्हणून सगळ्यांच्या गप्पा रंगतील, सगळे वेगवेगळ्या* *शिक्षा सुचवतील. न्यायालयात याचिका दाखल करण्यात येईल.* *खटला कोपर्डी सारखा 7,8 वर्षे चालेल.सगळे थोड्याच दिवसात विसरून जातात.* *पण कोपर्डीची र्निर्भया,हैद्राबादची डॉ.प्रियांका रेड्डी,उल्लासनगरची रिंकू पाटील,अंजना जाधव अशा अनेक* *निर्भया परत येतील का?* *पुन्हा असे कृत्य घडणार नाही असा न्याय कुणी देईल का?* *त्यांच्या कुटूंबाच्या मनातील दडलेल्या ,आक्रोश करणाऱ्या* *मुलीला कुणी बाहेर काढले का?* *हो हे घडू शकते ,पण त्यासाठी पुन्हा महातम्यांनाच अवतार घ्यावा लागेल.* *कारण आताच्या समाजातील मनात ,मनगटात,मेंदूत ना शिवाजी* *महाराज आहे ना कुणी कृष्ण.* *गीतेतील श्रीकृष्ण द्रौपदीला कौरावांपासून वाचवितो,वस्त्रहरण* *थांबवितो. महावीर वर्धमान इंद्रियांवर विजय मिळवून जितेंद्रिय बनवून* *दाखवितात.अशोकवनात सीता एकटी राहूनही रावण तिला* *स्पर्श करीत नाही.शिवाजी महाराजांच्या* *काळात कल्याणच्या सुभेदाराची सून पळवून आल्यावर* *महाराजांनी तिला आईची उपमा देऊन सत्कार* *केला.* *राज्यातील लेकीबाळीवर हात टाकणाऱ्या रांजाच्या पाटलाचे हात* *कलम केले.* *महात्मा गांधींच्या अंथरुणात सुंदर तरुणींना झोपविले होते तरीही त्यांनी आपले ब्रम्हचर्य व्रत समाजाला पटवून* *दिले,त्यापासून तसूभरही हालले नाहीत.* *स्वामी विवेकानंदांनी त्यांच्या स्वागतासाठी सर्वात सुंदर वेश्या आणली आहे हे समजताच कार्यक्रम* *त्याग केला व सामीलही झाले पण स्वतःचे चारित्र्य सिद्ध करून दाखविले.* *लुधियाना येथील कर्तारसिंह सराबा दरडेखोर गणला गेला पण त्याच्या मुलुखात एखाद्या आई-बहिणीकडे* *कुणाची वाकडी नजर गेली तर तो गोळ्या घालून जागीच यम दाखयायचा.* *आज खऱ्या अर्थाने या भावांची गरज आहे.ही सर्व परिस्थिती बदलायची असेल तर पुन्हा आपल्यातूनच या* *महापुरूषांचा अवतार धारण करावा लागेल.* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• प्रत्येकाच्या जीवनात निराशा ही सवतीसारखी नेहमी मनाला छळत असते.ती सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने मनाला विचलीत करते.अशा स्थितीतून तिला हद्दपार करण्यासाठी काही ना काहीतरी करण्यासाठी तो आशेकडे धावतो आणि त्यातुन सुटका करून घेतो.अर्थात जीवनात निराशेने घर केले तर नक्कीच आशेचा शोध घेऊन निराशेला बाजूला सारतो आणि जीवन निराशेतून मुक्त करतो.निराशा जरी जीवनात आली तरी घाबरायचे नाही तिला हिमतीने तोंड देत आशेचा शोध घ्यायला शिकले पाहिजे आणि त्यादृष्टीने प्रयत्न केले पाहिजे.हीच आपल्या जीवनाची खरी परीक्षा आहे. © व्यंकटेश काटकर,नांदेड संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🥗🥙🥗🥙🥗🥙🥗🥙🥗🥙 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *हेतल चा अनुभव* हेतल दुपारी शाळेतून घरी आली. घराला कुलूप होते. कारण तिचे आई बाबा लग्नाला गेले होते. तिने कुलूप उघडले व घरात आली. खिडक्या उघडल्या. गणवेश बदलला. ती हात पाय धुऊन खाऊ शोधु लागली. अचानक जोरदार पाऊस पडू लागला. तिने पटापट दारे खिडक्या बंद केल्या. तिचे लक्ष घड्याळ कडे गेले. बराच उशीर झाला आहे, असे म्हणून ती जवळच्या खुर्चीत बसली. तिला हळूहळू पावसाचे गाणे आठवू लागले. ती हळूहळू गुणगुणू लागली. आता पावसाचा आवाज कमी झाला व तिने खिडक्या उघडल्या. तरीपण रिमझिम रिमझिम पाऊस पडत होता. हळूहळू पाऊस थांबला. पानाआड लपलेले पक्षी बाहेर आले व त्यांनी आपल्या पंखाना झटकले. बाहेर लख्ख ऊन पडले. बाहेर कसं स्वच्छ सुंदर वाटत होते. आता संध्याकाळ झाली. दारावरची बेल वाजली +डिंग डाँग) आई आली असे म्हणतात हेतल पळत दाराकडे गेली. तिने दार उघडले. आणि आईबाबा तिचा समोर उभे होते. इतक्यावेळ कंटाळलेली हेतल आईला जाऊन बिलगली. हाच होता तिचा अनुभव. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

*आमची शाळा आमचे उपक्रम* 🌸🌸🌸🌸🌸🌸 *उपक्रम क्रमांक (१) 🌹बालसभा🌹* 🌻🌻🌻🌻🌻🌻 आज दि.०२-१२-२०१९ रोजी आमच्या जि.प.प्रा.शा.गोजेगाव शाळेत बालसभा हा उपक्रम घेण्यात आला. *विषयः १)प्लॅस्टिकमुक्ती, आणि २)बेटी बचाओ, बेटी पढाओ* 👉विद्यार्थ्यांनी प्लास्टिक मुक्ती साठी पथनाट्याचे सादरीकरण,तसेच विविध संदेश घोषणा आणि माहिती सांगितले.तसेच अभिनय गीत सादरीकरण करून जनजागृती केली. 👉 मुलींनी 'बेटी बचाओ,बेटी पढाओ' याविषयी माहिती सांगितले व गीत सादरीकरण करून जनजागृती केली. 👨‍👨‍👧‍👦 👨‍👨‍👧‍👦👨‍👨‍👧‍👦👨‍👨‍👧‍👦👨‍👨‍👧‍👦👨‍👨‍👧‍👦 *उपक्रम क्रमांक (२)* *वाढदिवस* 💐🎂💐🎂💐🎂💐 आज वर्ग पाचवीतील कु.मिनाक्षी, कु.तनुजा ह्या दोघींचा वाढदिवस नेहमीप्रमाणे शाळेच्यावतीने पुष्पगुच्छ व पेन देऊन साजरा करण्यात आला. 👉 शेवटी सर्वांना गोड खाऊ वाटप करून बालसभा आटोपली. *बालसभेची काही क्षणचिञे..*👇👇 〰〰〰〰〰〰〰 ✍शब्दांकन श्रीमती प्रमिला सेनकुडे. 〰〰〰〰〰〰

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00          ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 03/12/2019 वार - मंगळवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *जागतिक विकलांग दिवस* 💥 ठळक घडामोडी :-  १९७१ - पाकिस्तानने भारतावर हल्ला केला. २००९ - सोमालियाची राजधानी मोगादिशूमधील आत्मघातकी बॉम्बहल्ल्यात तीन मंत्र्यांसह २५ ठार. 💥 जन्म :- १८८४ - डॉ. राजेंद्र प्रसाद, स्वतंत्र भारताचे प्रथम राष्ट्रपती. १९५८ - रिचर्ड रीड, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू. १९६३ - ऍशली डिसिल्व्हा, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू. १९७४ - चार्ल विलोबी, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :-  ११५४ - पोप अनास्तासियस चौथा. १७६५ - लॉर्ड जॉन फिलिप सॅकव्हिल, इंग्लिश क्रिकेट खेळाडू. १९१२ - प्रुदेन्ते होजे दि मोरे बारोस, ब्राझिलचा राष्ट्राध्यक्ष. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार रिफायनरी प्रकल्पाविरोधात आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. उद्धव ठाकरे यांचा दोन दिवसातील हा दुसरा मोठा निर्णय आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *नवी दिल्ली : पीएमसी बँक खातेदारांपैकी जवळपास ७८ टक्के खातेधारकांना त्यांच्या खात्यातले सर्व पैसे काढायची मुभा देण्यात आली असल्याची माहिती, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी लोकसभेत दिली* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *महापोर्टल परीक्षेचा पुण्यात फज्जा, वीज गेल्याने केंद्रावर गोंधळ, वर्ग तीन आणि वर्ग चार पदांच्या भरतीत पारदर्शकता यावी म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2017 मध्ये 'महापोर्टल' सुरु केलं होतं. परंतु वाढीव फी आणि भोंगळ कारभार यामुळे महापोर्टल बंद करण्याची मागणी विद्यार्थी करत आहेत.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *मुंबई : वेतनवाढ आणि विविध मागण्यांवरून एसटी महामंडळाचे कर्मचारी सध्या नाराज आहेत. नव्या सरकारच्या कार्यकाळात एसटी महामंडळाला चांगले दिवस येतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करा अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एसटी कर्मचारी करणार आहेत* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *कोल्हापूर-मुंबई विमानसेवा ७ डिसेंबर ते २७ डिसेंबर दरम्यान बंद राहणार आहे. मुंबई विमानतळावरील धावपट्टीच्या कामाचा परिणाम कोल्हापूर-मुंबई मार्गावरील विमानसेवेवर झालाय. २८ डिसेंबरपासून ही सेवा पूर्ववत केली जाणार असल्याची माहिती ट्रू जेट विमान कंपनीच्यावतीने देण्यात आली.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *आंतरराष्ट्रीय टी २० क्रिकेटमध्ये नेपाळच्या अंजली चंद हिने मालदीव्स या संघाविरोधात खेळताना एकही धाव न देता एकूण सहा बळी घेण्याची ऐतिहासिक कामगिरी केली, पुरूष आणि महिला अशा दोन्ही प्रकारच्या टी २० क्रिकेट कारकिर्दीत मिळून सर्वोत्तम कामगिरी ठरली.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *अ‍ॅडलेडच्या कसोटी सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानवर १ डाव आणि ४८ धावांनी विजय मिळवत मालिकेत २-० असं निर्भेळ यश संपादन केलं.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••     *सरकारी शाळा बंद करण्याचा घाट * कमी गुणवत्तेमुळे पटसंख्या खालावल्याने सरकारने राज्यातील तेराशे शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याची बातमी वाचण्यात आली आणि शैक्षणिक क्षेत्रात उलटसुलट चर्चेला सुरुवात झाली. राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक सुनिल चौहान यांनी जिल्हा ......... वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/12/blog-post.html         लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *रस्त्यांवर फेकलेल्या लिंबू मिरच्यांवर पाय पडला तर काय होते ?* 📙 शाळेत जाताना सकाळच्या वेळी रस्त्यांवर अनेक दुकानांच्या समोर लिंबू मिरच्यांच्या माळा फेकलेल्या तुम्ही पाहिल्या असतील. आई व वडिलांनी या लिंबू मिरच्यांवर पाय देऊ नकोस त्यांना ओलांडून जाऊ नकोस असही तुम्हाला बजावून सांगितले असेल. त्यामुळे तुम्ही त्यापासून दूर राहण्याचा नक्कीच प्रयत्न करत असाल. पण जर लिंबू मिरच्यांवर पाय पडला तर काय होईल हा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल. कोणाची वाईट नजर लागू नये आणि दुष्ट शक्तींपासून संरक्षण व्हावे या समजापायी दुकानदार दुकानांवर लिंबू मिरच्या, काळ्या बाहुल्या टांगून ठेवत असतात. दुसऱ्या दिवशी ते लिंबू मिरची रस्त्यावर फेकून देतात. दिवसभरात त्या लिंबू मिरच्यांमध्ये अनेक दुष्ट शक्तींचा प्रभाव जमा झाल्याविषयी विश्वास ठेवणाऱ्यांना खात्री वाटत असते ! खरे तर जगात भूते खेते नसतात. दुकानदारांना खरी भीती चोरांची, आगीची वैगरे असते. नुकसान टाळण्यासाठी सुरक्षा रक्षक वा आग प्रतिबंधक यंत्रणा या कामाला येतील का टांगलेल्या लिंबू मिरच्यांच्या माळा ? याचे उत्तर अगदी शेंबडा मुलगाही सांगू शकेल. पण तरीही चांगले शिकले सवरलेले लोक अशा अंधश्रद्धांना बळी पडून लिंबू मिरच्यांवर नाहक खर्च करत असतात. देशातील लाखो दुकानांवर दररोज लाखो लिंबे व करोडो मिरच्या टांगल्या जातात व दुसऱ्या दिवशी त्या फेकून दिल्या जातात. यात केवढे मोठे राष्ट्रीय नुकसान आहे याचा विचार सर्वांनी करायला हवा. लिंबू मिरच्यांचे वास्तव तुम्हाला कळले. आता निदान तुमच्या व तुमच्या नातेवाईकांच्या दुकानांवर लिंबू मिरच्यांच्या माळा दिसणार नाहीत आणि त्यावर पाय पडला तरी तुम्ही घाबरणार नाही याची मला खात्री वाटते. *डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित* यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून मनोविकास प्रकाशन ०२० ६५२६२९५० *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *" शब्द खोटं बोलू शकतात, मात्र कृती नेहमीच सत्य बोलते "* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री कोण आहेत ?* उद्धव ठाकरे 2) *महाराष्ट्र विधानसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष कोण आहेत ?* नाना पटोले 3) *महाराष्ट्र विधानसभेचे नवनिर्वाचित विरोधी पक्षनेते कोण आहेत ?* देवेंद्र फडणवीस 4) *महाराष्ट्र विधानसभेचे एकूण सदस्य किती आहेत ?* 288 5) *जागतिक दिव्यांग दिन केव्हा साजरा केला जातो ?* 3 डिसेंबर *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 साईप्रसाद पुलकंठवार, धर्माबाद 👤 रघुनाथ टेकुलवार, करखेली 👤 शिवाजी कल्याणकर 👤 सौ. अनुराधा श्यामसुंदर माडेवार 👤 विरेश रोंटे 👤 श्रेयस दिलीप धामणे 👤 पांडुरंग तम्मलवाड *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *"एका चांगल्या गोष्टीबरोबर दुसरी वाईट गोष्ट सोबतच असते. माणूस विद्वान तर आहे, पण त्याला धन आणि मानाची अपेक्षा असेल तर? ही अपेक्षाच त्याचा नाश करत असते, ही सिद्ध झालेली गोष्ट आहे." अपेक्षेसोबत अपेक्षाभंग असतो, हे पटवून देण्यासाठी प्रमाणाची आवश्यकता नाही. "आपण ज्या ज्या इच्छा करतो, जेवढ्या अपेक्षा बाळगतो त्या सर्वच्या सर्वच पूर्ण कशा होऊ शकतील? पण माणूस हे समजून घेत नाही. हे पाहिजे, ते पाहिजे या आणि अशा अनेक वासना माणसाला शेवटी भीक मागायला लावत असतात." हव्यासापोटी भिकेला लागण्याची वेळ आली तरी माणूस शहाणा होत नाही.* *जुगारात मिळण्याची अपेक्षा सर्व घालवून बसते. राज्यच काय पण बायकोला सुद्धा 'डावात' हरून बसल्याची साक्ष महाभारतासारखे ग्रंथ देतात. संत तुकाराम आपल्याला शहाणं करण्याचा प्रयत्न करत आहेत. इच्छेतून अपमानित होण्याची वेळ येणार नाही ही काळजी घेतलीच पाहिजे. "एखाद्या गाढवाचं 'राजहंस' असं अलंकारीक नाव जरी ठेवलं, तरी त्या नावाचं त्या गाढवाला काय भूषण वाटणार आहे?" गाढवाची राजहंस नाव ठेवण्याइतकीसुद्धा पात्रता नसते आणि त्याला त्याचं भूषणही वाटत नसतं.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 💥💥💥💥💥💥💥💥💥 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल- 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो,* *कोपर्डी घटनेनंतर, देशात पुन्हा एकदा विकृत मनोवृत्तीचे विद्रुप दर्शन डॉ.रेड्डी या तरुण युवतीच्या खुनाने* *दाखविले.* *ही सुप्त मनाची विकृत ताकद असते तिला घालवायचे असेल तर सकारात्मक मन तयार करणे गरजेचे आहे.याची ताकद खूप प्रचंड आहे.* *यासाठी काही उदाहरणे बघूया.* *सोलोमन बेटावर आदिवासी जमातीचे वास्तव्य आहे. ते आदिवासी लोक प्रथेनुसार झाडे तोडणे अपशकुनी* *समजतात.* *एखादे झाड तोडायचे असेल तर एकत्र येऊन दररोज झाडाभोवती वर्तुळाकार तास न तास बसून झाडाला नकरात्मक लहरींनी घायाळ* *करतात. आश्चर्याचा भाग* *म्हणजे काही आठवड्यात ते झाड शुष्क होऊन उन्मळून पडते.* *हे उदाहरण कोणालाही पचनी पडणे अवघड आहे.* *तेअविश्वसनीय वाटणे स्वाभाविक आहे. अदृश्य, न दिसणारे,* *नकारात्मक मन, चिन्तन करणारे विचार, एका झाडाचे* *अस्तित्व नष्ट करू शकतात का?* *तुम्हाला जर ब्रुस लिप्टनचे पुस्तक The Biology of Belief वाचण्याची संधी मिळाली तर तुम्ही* *सोलोमन बेटावरील गोष्टच नव्हे तर तुम्ही तुमच्याबद्दल आणि ज्याच्यावर प्रेम करतात त्याच्या* *विषयी नकारात्मक बोलण्यावेळी हजार वेळेस विचार कराल.* *लिप्टन यांनी या पुस्तकात जागृत (conscious) आणि सुप्त मनाच्या* ( *subconscious mind) ताकदीवर विस्तृत विवेचन* *केले आहे.* *सुप्त मनाची ताकद ही जागृत मनाच्या ताकदीपेक्षा दशलक्ष पटीने जास्त असते.* *दैनंदिन जीवनात सुप्त मनाचा नकळत प्रचंड प्रभाव असतो.* *पुष्कळ वेळा आपण आपल्या वाईट सवयी अथक प्रयत्न आणि इच्छाशक्ति असताना सुद्धा सोडू* *शकत नाही. त्याचे मुख्य कारण ह्या वाईट सवयी सुप्त मनामध्ये प्रभावीपणे प्रोग्राम केल्या जातात* *आणि ते आपले सर्व प्रयत्न निष्क्रिय करतात.* *जागृत मन (Conscious mind) ही सुप्त मनाची (Subconscious)* *केवळ सावली असते.* *सोलोमन बेटावरील आदिवासी हे प्रभावीपणे नकारात्मक लहरींनी झाडाच्या संवेदनेवर आघात करतात.* *झाडांना संवेदना असतात हे ही तितकेच खरे आहे.* *काही दिवसांनी त्या आघाताने त्या संवेदना झाडाच्या एक अंगीभूत भाग होऊन जातात आणि त्यामुळे* *झाडाची अणुरचना ढासळते. झाड आतूनच मरणासन्न होते.* *त्या पुस्तकात जागृत पालकत्वावर स्वतंत्र प्रकरण आहे.* *त्यात मुलावर सतत नकारात्मक बोलण्यामुळे, त्याच्या जडणघडणीवर विपरीत परिणाम होतात.* *याउलट सकारात्मक विचार, मुलाचे जीवनात उपयुक्त पडतात.* *तेच तेच सारखं बोलत राहणे सुप्त मनावर पगडा करते आणि तसेच घडत जाते याची प्रचिती दिसून येतेच.* *म्हणूनच रोज असे म्हणा_* " *मी सुखी आहे,* *मी सर्व गुणसंपन्न आहे,* *माझ्याकडे भरपूर पैसा, उत्तम* *आरोग्य, उत्तम नाती, उच्चकोटीचा* *समाज, असे सर्वांगीण सुख समृद्धीने परिपुर्ण* *जीवन मी जगत आहे.* *जे होत आहे आणि होणार आहे ते सर्व चांगलेच होणार आहे!"* *नेहमी असेच विचार मनात सतत असू द्या.* *हाच आपल्या सगळ्यांसाठी समृद्ध जीवनाचा कानमंत्र आहे !* *LAW OF ATTRACTION* *नुसार *आपन जे पॉझिटिव्ह किंवा negative विचार करतो.. त्या त्या* *गोष्टी आपण विचार मार्फत आपल्याकडे आकर्षित करत* *असतो.*चांगला विचार करा,समाजात रुजवा,विकृत मनोवृत्तीला थारा देऊ नका.* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• प्रत्येकजण आपल्या जीवनाच्या चित्रशाळेत स्वत:चे एक सुंदर जीवनाचे चित्र काढून रंगवण्याचा सातत्याने प्रयत्न करत असतो.जीवनाच्या चित्राचा आकार कसाही असला तरी त्यात रंग मात्र आपल्या कल्पक बुध्दीने भरण्याचा प्रयत्न करतो.त्यात असणारे रंग जरी वेगवेगळे असले तरी भरण्याचे कौशल्य ज्याला आहे तो आपल्या वेगळ्या पद्धतीने,कलेने भरुन जीवनाला आकर्षक बनवण्याचा प्रयत्न करतो.ज्याला ही कला अवगत झाली नाही त्याच्या जीवनचित्रात रंगही भरता येत नसल्यामुळे जीवनचित्र रंगहिन व आकारहिन बनते.म्हणून जीवनाच्या जीवनचित्रशाळेत यशस्वी व्हायचे असेल,जीवनाला रंगरुप आकार द्यायचा असेल तर आपल्यातील कल्पकतेला,कौशल्याला आणि नवनिर्माण शिलतेला जागृत ठेवून जीवन सुंदर आणि आनंददायी निर्माण करायला शिकले पाहिजे.त्यातून स्वत:ला आणि इतरांना जगण्यासाठी एक नाविण्यपूर्ण कला अवगत होईल आणि आनंदाने जीवन जगण्यासाठी प्रेरणा मिळेल यात शंकाच नाही. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🌱🎨🌱🎨🌱🎨🌱🎨🌱 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *लाख मोलाचा देह* एक भिकारी भीक मागता मागता एका श्रीमंत व्यापार्‍याच्या वाडयासमोर उभा राहून भीक मागू लागला. मालकाने सेवकाला त्याला वर बोलावयाला सांगितले. सेवक बोलवायला आलेला पाहून भिकार्‍याला खूप आनंद झाला. त्याच्या मनांत आशा निर्माण झाली की, वर बोलावलं म्हणजे बरच काही देणार असेल. वर गेल्यावर व्यापारी म्हणाला, 'हे बघ तुला मी पाचशे रूपये देतो पण त्याबद्दल देतो पण त्याबद्दल तु मला तुझे डोळे दे' 'छे ! छे ! हे कसं शक्य आहे ? डोळे दिले तर मी काहींच करू शकणार नाही.' भिकारी म्हणाला. 'बरं मग असं कर हात तरी देतोस कां?' व्यापारी म्हणाला. अशाप्रकारे व्यापारी प्रत्येक अवयवाची किंमत वाढवत होता पण भिकारी एकही अवयव द्यायला तयार नव्हता. व्यापारी म्हणाला 'बघ ५००-५०० रूपये म्हटले तरी तुझ्या देहाची किंमत लाखाच्यावर झाली. एवढा लाख मोलाचा धडधाकट देह असतांना भीक कां मागतोस ? कष्ट कर पैसे मिळवं'. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00          ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 02/12/2019 वार - सोमवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• राष्ट्र दिन - संयुक्त अरब अमीराती, ब्रिटनपासून स्वातंत्र्य. राष्ट्र दिन - लाओस. 💥 ठळक घडामोडी :-  १९८८ - बेनझीर भुट्टो पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी. १९८९ - भारताच्या पंतप्रधानपदी विश्वनाथ प्रताप सिंग यांचा शपथविधी. 💥 जन्म :- १९३३ - के. वीरमणी, द्रविड मुनेत्र कळघम नेता. १९३७ - मनोहर जोशी, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि लोकसभेचे माजी अध्यक्ष. १९४७ - धीरज परसाणा, भारतीय क्रिकेट खेळाडू. १९७२ - सुजीत सोमसुंदर, भारतीय क्रिकेट खेळाडू. १९७९ - अब्दुल रझाक, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :-  १९८० - चौधरी मुहम्मद अली, पाकिस्तानचा पंतप्रधान. १९९३ - पाब्लो एस्कोबार, कोलंबियाचा मादकद्रव्य व्यापारी. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *सातबारा नुसता कोरा करायचा नाही तर शेतकऱ्यांना चिंतामुक्त करायचं आहे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *मुंबई आयआयटीच्या प्लेसमेंट सिजनला झाली सुरवात, प्लेसमेंटच्या पहिल्या स्लॉटमध्ये एकूण आंतराष्ट्रीय आणि देशांतर्गत अशा 18 कंपन्या सहभागी होत्या. यामध्ये सर्वाधिक प्लेसमेंट ही मायक्रोसॉफ्ट कंपनीकडून मिळाली असून वार्षिक 1 कोटी 17 लाखांची प्लेसमेंट देण्यात आली आहे* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *नाना पटोले यांची विधानसभा अध्यक्षपदी निवडीची घोषणा, पदभार स्वीकारला, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं अभिनंदन आणि स्वागत* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *महाराष्ट्राचं कुलदैवत तुळजाभवानीच्या तिजोरीवर डल्ला, माणिक, दागिने आणि पुरातन नाणी गायब, चौकशी समितीच्या पाहणीनंतर वास्तव उजेडात* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *सरकारी नोकरभरतीसाठी सुरु करण्यात आलेले 'महापोर्टल' बंद करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *औषधांची ऑनलाईन विक्री करणाऱ्या ई-फार्मसी फ्लॅटफॉर्म आता स्वतःकडे औषध जमा करू शकणार नाहीत. छोटे व्यापारी आणि विक्रेत्यांबरोबर भागीदारी करून औषध ग्राहकांपर्यंत पोहचवली जातील. यासाठी आरोग्य मंत्रालयाने ई-फॉर्मसी नियमांमध्ये बदल केले आहेत* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *बीसीसीआयची वार्षिक सर्वसाधारण बैठक मुंबईमध्ये पार पडली. या बैठकीत लोढा कमेटीच्या शिफारसीमध्ये बदल करण्यास मंजूरी देण्यात आली आहे. उच्च पदांवरील अधिकाऱ्यांचा कार्यकाळ वाढवण्यात यावे यासाठी हे बदल करण्यात आले आहेत. हा प्रस्ताव सर्वोच्च न्यायालयाकडे पाठवण्यात आला असून, यास मंजूरी मिळाल्यास बीसीसीआयचे अध्यक्ष सौवर गांगुली यांचा कार्यकाळ वाढवला जावू शकतो.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *बलात्काराचे वाढते प्रमाण कधी थांबणार ?*     http://nasayeotikar.blogspot.com/2018/04/blog-post_15.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *काही मुलांना जन्मानंतर इन्क्युबेटरमध्ये (पेटी) का ठेवतात ?* 📙 काही महिलांना सातव्या महिन्यातच मूल होते. अशी मुले साहजिकच वजनाने कमी असतात. त्यांच्या शरीराची वाढही सामान्य नवजात बालकांपेक्षा कमीच असते. श्वसन व रक्ताभिसरण ही दोन महत्त्वाची कार्ये मात्र ते बालक करू शकते. बालकाला शरीराचे तापमान ठराविक पातळीवर राखण्याचे कार्यही करावे लागते. तसेच जंतूंपासून स्वतःचा बचावही करावा लागतो. ही शेवटची दोन कार्य करणे मात्र सातव्या महिन्यात जन्मलेल्या वजन अत्यंत कमी असलेल्या बाळासाठी खूप अवघड असते. त्यामुळे अशा मुलांना इनक्युबेटरमध्ये विशेष कक्षात ठेवले जाते. इनक्युबेटर ही काचेचे झाकण असलेली एक चौकोनी पेटी असते. यात तापमान शरीराच्या तापमानाशी मिळते जुळते (सुमारे ३७' सेंटिग्रेड) असे ठेवलेले असते. हवेतील रोगजंतूंचाही नायनाट करण्यात आलेला असतो. त्यामुळे असे बाळ, जे इन्क्युबेटर नसल्यास जंतूसंसर्गाने व तापमानाचे नियंत्रण न करता आल्याने मरण पावले असते, ते वाचू शकते. असे हे इनक्युबेटर जणू बालकांसाठी वरदानच होय. *डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित* यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून मनोविकास प्रकाशन ०२० ६५२६२९५० *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *" मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा; ज्ञानाचा प्रकाश कुठुन कधी येईल सांगता येत नाही "* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *'जागतिक एड्स दिन' कधी साजरा केला जातो ?* 1 डिसेंबर 2) *भारतातील पिकांचे साधारणपणे किती हंगाम असतात ?* 2 3) *इंदिरा गांधी निराधार योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांचे किमान वय किती असावे लागते ?* 65 वर्षे 4) *महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये ग्रामीण लोकसंख्येचे प्रमाण सर्वाधिक आहे ?* अहमदनगर 5) *भारतामध्ये नद्यांचे प्रदूषण रोखण्याचे काम कोणती संस्था करते ?* केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 संजय डाड, नांदेड 👤 सुरज पाटील रोशनगावकर 👤 अभि मामीडवार 👤 वैशाली गर्जेपालवे, सहशिक्षिका 👤 श्रीनिवास अवधुतवार, धर्माबाद 👤 जयानंद मठपती 👤 सूर्यकांत तोकलवाड 👤 शरद पवार, सहशिक्षक 👤 धनराज राखेवार, नांदेड 👤 संतोषकुमार राठोड 👤 दत्ता मुपडे 👤 कोमल पाटील 👤 आदित्य बालाजी धात्रक 👤 शिवराज दासरवार *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आज समाजात खलनायकी आणि नालायकीचे कौतुक, समर्थन केले जाते. दुर्दैवाने आज समाजाची अवस्था अशी झालीय की, लायक नायकांपेक्षा नालायक आणि खलनायकी वृत्तीचे नायक, नेतृत्व आणि वारस निपजत आहेत, पुढे येत आहेत. काळही लायकाला नालायक आणि नालायक खलनायकाला नायक ठरवतोय. ही शोकांतिका सारे गपगुमान बघत आहेत. 'एकेकाळी गुणवत्तेची कदर होती. आता फक्त दर आहेत'. पण गोष्ट फक्त दर आणि कदरपर्यंत राहिली नाहीय, तर पाणी घरात शिरलयं. पदर आणि चादरीपर्यंत आलयं. आम्ही मात्र काही माहितच नाही, असे सोंग पांघरून बसलोय.* *आपण रोजच वर्तमानकाळाचे चरित्र वाचतो. बलात्कार, लैंगिक शोषण, विनयभंग , गैरप्रकार हे आता कायदेशीरच ठरतायत की काय अशी स्थिती आहे. नोकरी, पदव्या, पुरस्कारापर्यंत नको नको ते बघायला मिळतयं. या सा-या खलनायकांना नायक म्हणून, लायक म्हणून नालायक पाठीराखेच पुढे आणतात. ज्यातून या सा-यांची हिमंत दिवसेदिवस वाढते आहे. ज्याला रोजच्या भाषेत बाई, बाटली आणि पैशाची पूजा करणारी व्यवस्था म्हटले जाते. गोष्ट सुन्न करणारी आहे पण वास्तव आहे. 'आपण काहीच करू शकत नाही,' असे म्हणू लागलो आहोत.... हे आपण होऊन स्विकारलेलं षंढत्व😌 सर्वत्र निपजतयं जे समाजाचा घात करणारे आहे..?..?..?* ••●★‼ *रामकृष्णहरी* ‼★●••     🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻     *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*          📱 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो* *जगामध्ये जेवढी गर्दी वाढत आहे तेवढेच लोक एकटे पडत चालले आहेत . कोणीही कोणाच्या जवळ नाही हीच मोठी समस्या आहे . म्हणून जगण्यात पौर्णिमा कमी आणि अमावस्या जास्त आहे.......* *मी मोठा आणि तू छोटा बस हा एकच विचार माणसाला माणूस बनवून देत नसते . माणसं जोडण्यासाठी धनाची नाही तर चांगल्या☘ मनाची गरज असते . परंतु जेथे अहंकार आहे तेथे प्रेमही नाही आणि ज्ञानही नाही ..* *रोज कितीही चांगले शब्द वाचा परंतु जो पर्यंत तुम्ही ते आचरणात आणणार नाही तो पर्यंत काहीही फायदा नाही . ज्ञानाला अर्थ कृती मुळे प्राप्त होतो . कृती नाहीतर ज्ञानाला अर्थ नाही ......* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• सर्वसामान्य माणसाच्या जीवनात मागचे दिवस आठवले की,अंगावर रोमांच उभे राहतात आणि भूतकाळ जसा एखाद्या चित्रपटातील क्रमाक्रमाने प्रसंग आठवायला लागतात.असे प्रसंग पुन्हा आपल्यासमोर उभे राहू नये म्हणून तो मागच्या प्रसंगातून काहीतरी शिकतो आणि म्हणतो पुन्हा असे दिवस माझ्या नशिबाला येऊ नयेत.भूतकाळही आपला एक समर्थ गुरूच असतो.जी झालेली चूक पुन्हा होऊ नये याची वारंवार सूचना करत असतो.विचारी माणूस मागच्या आठवणी जाणून पुढे पाऊल टाकत असतो. जर का असे नाही केले तर पुन्हा येरे मागचे हाल अशी अवस्था होऊन बसते.ती अवस्था ते प्रसंग येऊ नये असे वाटत असेल तर आपल्या प्रयत्नाने ते नक्कीच दूर करता येतात.आपल्याच हाताने आणि अथक परिश्रमाने ते काळोखी ढग दूर करता येतात.केवळ विचार करून चालणार नाही तर त्याला आपल्या आत्मविश्वासाची आणि प्रयत्नांची सांगड घालावी लागते. त्यामुळे नक्कीच आपले जीवन परिपूर्ण होऊन जाईल. भविष्याचा वेध हा भूतकाळातूनच घेता येतो आणि जीवन समृद्ध करता येते. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद ९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मिनूला मोरानी दिलेली भेट* मिनू चे घर शेतात होते. ती खेळता-खेळता घराच्या खूप दूर आली. तिला दोन पिसे दिसली. तीनी ते पिसे निरखून पाहिले. ती लहान होती म्हणून तिला ते पिसे कोणाची आहे हे कळाले नाही. पण तिला असे वाटले हे पिसे ज्याची असन ते त्या पिसाला शोधत असन . म्हणून तिने ठरवले की ही पिसे ज्याची असन मी त्याला शोधून त्याची पिसे वापस देऊन टाकीन. तिला रस्त्यात कोंबडी दिसली. तिने त्या कोंबडीला प्रेमाने विचारले, कोंबडीताई कोंबडीताई ही पिसे तुझी आहेत का? कोंबडी म्हणाली, नाही ही पिसे माझी नाहीत पण मला माहित आहेस की, ही पिसे कोणाची आहे? मिनू म्हणाली, सांगा सांगा ही पिसे कोणाची आहे? कोंबडी म्हणाली ही पिसे मोराची आहे. मिनू धन्यवाद म्हणून समोर निघाली. तिला रस्त्यात कबूतर दिसले. तिने मोराचा पत्ता कबुतराला विचारले . मिनू पळतच त्या पत्त्यावर गेली. तिने मोराला हाक मारली . मोर त्याच्या घरातून बाहेर आला. मिनू ने त्याची पिसे त्याला वापस दिली. पण मोरानी ती पिसे घेतली नाही तिला समजावले एकदा माझी पिसे पडली तर ती डबल मला जोडू शकत नाही व त्यांनी तिला ते पिसे भेट म्हणून दिली. मिनू ने आनंदाने पिसे आपल्याजवळ धन्यवाद म्हणून ठेवली. व ती पळतच घरी गेली मिनूने आईला घडलेली सर्व हकीकत सांगितली आणि ती पिसे पुस्तकात जपून ठेवली. बोधः कधी पण कोणी दिलेली भेट जपून ठेवावी. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~