✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00          ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 26/12/2019 वार - गुरूवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :-  ● २००४ - हिंदी महासागरात इंडोनेशियाजवळ रिश्टर मापनपद्धतीनुसार ९.३ तीव्रतेचा भूकंप. यानंतर आलेल्या त्सुनामीत भारत, श्रीलंका, इंडोनेशिया, थायलंड, मलेशिया, मालदीव, इ. देशात ३,००,०००हून अधिक मृत्युमुखी. ● १९९१: सोव्हिएत युनियन औपचारिकरित्या बरखास्त करण्यात आले. ● १९९७: विंदा करंदीकर यांना महाराष्ट्र फांऊंडेशन पुरस्कार. 💥 जन्म :- ● १८९३: आधुनिक चीनचे शिल्पकार माओ त्से तुंग  ● १९१४: कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनासाठी आयुष्य वाहून घेणारे थोर समाजसेवक डॉ. मुरलीधर देविदास ऊर्फ बाबा आमटे १९१४: स्वतंत्र भारताच्या पहिल्या आरोग्यमंत्री डॉ. सुशीला नायर  ● १९१७ - प्रभाकर माचवे मराठी व हिंदी साहित्यिक. ● १९३५ - डॉ. मेबल आरोळे मॅगसेसे पारितोषिक विजेत्या.(रजनीकांत आरोळे यांच्या पत्नी) ● १९४८: डॉ. प्रकाश आमटे 💥 मृत्यू :-  ● १९७२ - हॅरी ट्रुमन, अमेरिकन राष्ट्राध्यक्ष. ● १९९९: भारताचे ९ वे राष्ट्रपती व ८ वे उपराष्ट्रपती शंकरदयाळ शर्मा ● २०११ - सरेकोप्पा बंगारप्पा, कन्नड-भारतीय राजकारणी, कर्नाटकाचे मुख्यमंत्री. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *फडणवीसांच्या काळातच अजित पवारांना क्लीन चीट, सिंचन घोटाळ्याप्रकरणी एसीबीचे महासंचालक परमवीर सिंह यांचं हायकोर्टात शपथपत्र* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *मंत्रिमंडळ विस्तारात गृहखातं शिवसेनेकडून राष्ट्रवादीकडे जाण्याची शक्यता, अजित पवार, दिलीप वळसे पाटील, जयंत पाटलांमध्ये शर्यत* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *शालेय सहल घेऊन जाणाऱ्या ST बसला भीषण अपघात, 18 जण गंभीर जखमी, मुंबई-पुणे महामार्गावर भरधाव एसटीची ट्रॉलीला धडक, जखमींना पवना रुग्णालयात उपचारासाठी दाखल* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *मुंबई : राज्यात थंडीचा जोर वाढत असतानाच पुढील दोन दिवसात महाराष्ट्रात काही भागांत पावसाची शक्यता, महाराष्ट्रात मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात काही भागांत हलक्या पावसाच्या सरी अपेक्षित आहेत, असा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तविला आहे* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *जगभरात ख्रिसमसचं सेलिब्रेशन, वसई, मुंबईत चर्चेसना रोषणाई, तर सुट्टीनिमित्त पंढरपूर, महाबळेश्वर आणि शिर्डीमध्ये भाविकांची गर्दी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *नियम मोडणाऱ्या, कचरा करणाऱ्या मुंबईकरांवर 10 हजार कॅमेरांची नजर, बीएमसीकडून 'व्हिडीओ अॅनालिटिक्स टूल' तंत्राचा वापर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *राज्य सरकारकडून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या सुरक्षेत कपात, आदित्य ठाकरेंना मात्र 'Z' श्रेणी सुरक्षा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *विशेष बातमी :- दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेली नांदेड जिल्ह्यातील माळेगावची यात्रा उत्साहाच्या वातावरणात संपन्न* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *ग्रहण म्हणजे काय ?*     २६ डिसेंबर २०१९, रोजी होणार सूर्य  ग्रहण  कंकणाकृती अथवा  खंडग्रास   दिसणार आहे, तुम्ही सर्वानी ते नक्की पाहावं. मुंबई मध्ये हे ग्रहण  खंडग्रास दिसणार असून  भारतीय प्रमाण वेळेनुसार  सकाळी ८. ०४ मिनिटांनी सुरु होईल, पुढे ९. २१  मिनिटांवर अधिकाधिक ७८. टक्के सूर्याला झाकेल, ११.५५ मिनिटांवर ग्रहण पूर्णतः संपेल. ग्रहणा विषयी अधिक माहिती वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://fmbuletin2019.blogspot.com/2019/12/blog-post.html         ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *✍ स्तंभलेखक नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💉 *लस म्हणजे काय ?* 💉 *अनेकदा लस लसीकरण वा व्हॅक्सीनेशन हे शब्द आपण वाचतो. टीव्हीवर याच्या जाहिरातीही पाहत असतो. पण लस म्हणजे नक्की काय या विषयी शास्त्रीय माहिती आपल्याला नसते.* *बर्‍याचदा आपण बघतो की उन्हात जर एखादा दिवस खूप फिरलो तर लगेच डोकेदुखी, अंगदुखी, इत्यादींचा त्रास होतो. आपण त्याला ऊन बाधले असे म्हणतो. पण जर रोज उन्हात जायला लागलो तर मात्र उन्हाचा तेवढा त्रास होत नाही. नेहमी घरचेच वॉटरबॅगचे पाणी पिणारा मुलगा बाहेरचे पाणी प्यायला तर त्याच्या पोटात दुखते, संडास लागते. शरीराला एखाद्या गोष्टीची सवय झाली तर नंतर त्रास होत नाही, असे साध्या भाषेत म्हणता येईल. पण शरीराला जीवजंतूंची सवय होते का ? सवय म्हणण्यापेक्षा जीवजंतूंचा अनुभव येतो असे म्हणता येईल. एकदा अनुभव पाठीशी असला म्हणजे शरीर दुसऱ्यांदा त्या जीवजंतूंशी चांगला लढा देऊ शकते. एकदा गोवर झाल्यावर सहसा परत होत नाही, ते याचमुळे. हे का होते हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.* *शरीरात रोगप्रतिकार शक्ती दोन प्रकारे निर्माण होते. जंतू शरीरात शिरल्यानंतर त्यांच्यातील प्रथिन वा कर्बोदक घटकांसाठी शरीरात प्रतिकार करणारी द्रव्ये (अँटीबॉडीज) तयार होतात किंवा जंतूंना मारण्यासाठी पेशींचे प्रशिक्षण होते. या दोन्ही मार्गांनी जीवजंतू पुढच्यावेळी आले तर त्यांना मारून टाकता येते. पण प्रत्येक वेळी आधी जीवजंतूंचा शरीरात प्रवेश करून घेऊन रोगाला सामोरे जाणे परवडण्याजोगे नसते. यासाठी शास्त्रज्ञ जंतूंना अर्धमृत (Attenuate) करतात वा पूर्णपणे मारतात. असे अर्धमृत वा मृत जंतू शरीरात गेल्यावर रोग निर्माण करू शकत नाहीत. पण त्यांच्याविरुद्ध प्रतिकार करणारी द्रव्ये आणि प्रशिक्षित पेशी तयार होतात. लसी अशाच अर्धमृत वा मृत जंतू किंवा त्यांच्यातील घटकांपासून बनवलेल्या असतात. लस देण्याच्या क्रियेला लसीकरण म्हणतात. ५००० वर्षांपूर्वी चिनी लोक देवी रोग होऊ नये म्हणून लसीकरण करत. अशी वैद्यक इतिहासात नोंद आहे. पहिले शास्त्रोक्त लसीकरण करण्याचा मान एडवर्ड जेन्नरकडे जातो. त्याने १७९६ मध्ये देवी रोगाचा प्रतिबंध करण्यासाठी लसीकरण केले.* *आज आपल्याकडे क्षयरोग, गोवर, घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात, पोलिओ, कॉलरा, रेबीज, विषमज्वर, कावीळ तसेच गालफुगी अत्याधिक रोगांवरील प्रतिबंधक लसी उपलब्ध आहेत. लसीकरणामुळे बऱ्याच गंभीर रोगांचा प्रतिबंध आपण करू शकलो आहोत.* *डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित* यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून, मनोविकास प्रकाशन ०२० ६५२६२९५० *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *" परिस्थिती हाताळण्याचे कौशल्य ज्याच्याकडे असते, तो जग जिंकण्याची जिद्द राखून पुढे जातो "* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *रक्तातील तांबड्या पेशींची निर्मिती शरीरात कोठे होते ?* अस्थीमज्जा 2) *ऍनिमिया हा आजार कोणत्या द्रव्याच्या कमतरतेमुळे होतो ?* लोह 3) *लिलीचे फुल हे कोणत्या देशाचे राष्ट्रचिन्ह आहे ?* फ्रान्स 4) *डॉ विक्रम साराभाई अवकाश संशोधन केंद्र कोठे आहे ?* थूम्ब 5) *भारताच्या कोणत्या सरन्यायाधीशानी राष्ट्रपती म्हणून कार्यभार सांभाळला होता ?* एम. हिदाय तुला *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 नरसिंग जिड्डेवार, भोकर 👤 आकाश सरकलवाड, धर्माबाद 👤 कपिल जोंधळे 👤 अशोक लंघे *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मानवाचं मन... अनेक प्रकारचे सुखदु:खात्म प्रसंग, विवंचना, काळजा, आसूया, स्पर्धा, द्वेष, मत्सर, उत्सुकता आणि कुतूहल...यांनी सदैव त्याचे मन 'पिसाट' झालेले. अप्राप्याचा ध्यास म्हणजे आपल्याकडे जे नाही ते मिळवण्याचा अथक प्रयत्न आपण सारे करीत असतो; पण 'मन:शांती' चा शोध घ्यायला नेमके विसरतो. 'मन:शांती' हे महत्वाचे जीवनसूत्र आहे, हेच आपण या सा-या धबडक्यात हरवून जातो. 'निरंजनी आम्ही बांधियेले घर' असे संतवचन आहे. ही निरांजनावस्था महत्वाची. जन्मापासून मृत्यूपर्यंत माणसाला सतत काही ना काही करावे लागते. यातून त्याची सुटका नाही. मनाची सर्वार्थाने मुक्तता तशी कठीणच. कारण वैयक्तिक भावभावना, विकार-विचार आणि अहंकार यापासून स्वत:ला अलग करणे जवळजवळ अशक्यप्राय.* *पाण्यात पडले म्हटले की कोणीही ओलाचिंब होणारच. मात्र एखादा खडक त्या जलाशयात असेल तर तो पाण्यात राहून अलिप्तच की ! अशी अलगता संसारात राहून साधायची, म्हणजे शरीरक्रिया चालू आहे पण मन मात्र अलिप्त आहे. त्याच्या पृष्ठभागावर कोणत्याच लहरी नाहीत, तरंग नाहीत. मनाच्या समधात अवस्थेचे वर्णन संत ज्ञानेश्वरांनी 'नुरोनिया ठेला' असे केले आहे. म्हणजे बाह्यस्वरूपी तो इतका निश्चल की जिवंत आहे का, हा इतरांना प्रश्न पडावा, आणि तो जिवंत असला तरी जणूकाही जिवंत नाही, असे वाटावे असा... त्याच्या मनाच्या या अवस्थेला 'सहजस्थिती किंवा 'निजस्थिती' असेही त्यांनी म्हटले आहे. हे क्षण प्राप्त व्हावे, असे वाटत असल्यास संतानी सांगितलेला उपाय म्हणजे नामस्मरण...' नामापरते सुख नाही रे सर्वथा !' हाच तो सद्रगुरूपदेश...* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🚩‼🚩‼🚩‼🚩‼🚩 *--संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो,* *काल आयुष्यातील एक अविस्मरणीय अनुभव घेतला.* *अंधारी व्याघ्र प्रकल्प ताडोबा, चंद्रपूर येथे 12 वाजता पोहचलो.जातांना* *200 की मी पूर्ण जंगलातून सफर अगोदरच भामरागडची करून आलो.आणि आता* *12 ते सायंकाळी 8 वाजेपर्यंत ताडोबात चित्तथरारक* *अनुभव घेतला. माहिती घेतली आणि* *2 वाजेपासून 6.30 वाजेपर्यंत जंगल सफारी केली.किर्रर्र* *झाडी,निर्मनुष्य जंगल,भयाण शांतता.जितेंद्र आणि* *सचिन असे 2 सफारी गाईड गाडी चालवणाऱ्याची कमाल म्हणावी* *लागेल,झाडाझुडुपांमध्ये गाडी चालतांना जीव मुठीत धरून सगळे* *शांत बसले होते.* *या प्रकल्पात जनगणना नुसार 96 वाघ ,लेफर्ड आहेत. जंगल 1100 चौ* *की मी ,600 कोअर जंगल,या मोसमात प्राणी जास्त बाहेर येत नाही,त्यांचा एकत्र राहण्यासाठी* *चा हा काळ असतो,प्रेग्नन्ट एरिया अस म्हणतात त्याला. 3 महिने बांधलेला* *असतो,उन्हाळ्यात पाण्यासाठी वाघ दुपारी जास्त बाहेर* *पडतात,उन्हल्यात स्थलांतरित होतात म्हणून जास्त* *दिसतात,जंगलात लोकवस्ती अगदी तुरळक आहे,कर्मचारी वर्ग जादाकरुन* *येथे राहतात. उंचावर त्यांच्या 2 ठिकाणी कुटी आहेत.सिंह* *आणि हत्ती सोडून जंगलात सर्व प्रकारचे प्राणी आहे,* *फिरण्याचा एरिया टोटल 42 की मी आहे ,4 तास फिरण्यासाठी मुभा* *दिली होती.* *कुणबी तेली माळी समाज या जंगलात पूर्वीपासून राहतात,सुधीर मुनगंटीवार यांची शेती जंगलात* *आहे,आत जंगलात गाव नाही,चिमूर पर्यंत परिसर आहे,आत प्राण्यांसाठी* *18* *ठिकाणी सोलर बोअरवेल बसवलेले आहे* *प्राणी इथे पाणी पिण्यासाठी येतात.* *वाघ समोर दिसला तरी ऍटॅक करत नाही, त्यांना त्रास दिला तरच प्राणी* *हल्ला करतात.* : *पर्यटक नियमित चालू असतात,मोहाची फुले वेचने, पर्यटक* *त्यांची सेवा,एवढाच या लोकांचा व्यवसाय ,पण अगदी आनंदी* *आणि काटक,शिक्षणा साठी मूल चंद्रपूर येथे पाठवतात, गाईड* *एम.ए.झालेला,पण रोजगार नाही म्हणून काम करतात. सचिन* *गाऊत्रे, माळी समाजाचा सुशिक्षित मुलगा,मुली मिळताना अडचणी येतात,नोकरीच्या शोधात भरपूर फिरलो पण नोकरी नाही,शेवटी स्थानिक व्यवसाय करतो.* *बुध्दापौर्णिमेल प्राणी पाणी पिण्यासाठी तळ्यावर येतात,तेव्हा* *रात्रभर येथे पर्यटक आधीपासूनच बुकिंग करून ठेवतात.* *2 कुटी वर आधिकारी असतात.* *मोहूर्ली गेट ,मामला गेट, असे दोन गेट आहेत.आजच्या सफरीत आम्ही* *अगदी नशीबवान ठरलो,कारण* *अस्वल,लांडगे,गवे,मोर,रानमांजर ,कोल्हे सोडून कुणालाही वाघ दिसले* *नाहीत,मात्र आम्हाला घनदाट जंगलात गाडी चिखलात गेल्याने सर्वांच्या हृदयाचे ठोके चुकले.कुणी गाडी सोडून खाली उतरायला तयार नव्हते,शेवटी एकमेकांच्या आधाराचे धाडस करून गाडी चिखलातून उचलून,काही लोटून बाहेर काढली.आयुष्यातील सर्वात खतरनाक शॉट अनुभवल्यानंतर सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला.पुढे गेल्यावर काही अवधीतच लांबलचक* *तब्बेतशीर चित्ता, आणि बिबट्या यांचे जवळून* *दर्शन झाले.सगळा ताण तिथेच विसरलो.प्राणी कितीतरी वेळ ते जंगलात घाबरून पळत गेले,तो* *पर्यंत आम्ही त्यांना नेहाळत बघत होतो.आयुष्यातील एक* *अनमोल क्षण ताडोबात घातला.* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• संकल्प असतात तरी काय ? हे कळायला खूप अवघड आहे.नवे वर्ष लागले की,लोकांचे कितीतरी संकल्प करताना सुरुवातीला जाहीर करतात आणि काही दिवस गेले की,कोणते संकल्प केले हेही विसरुन जातात.वर्ष संपत आले की,मग पुन्हा संकल्प करणार याचे नियोजन करतात.पण हे जे काही संकल्प करणारे आहेत ना ते सगळे जगाला बनवायला काही कमी नाहीत.उगीचच आम्ही काहीतरी करत असल्याचा भास लोकांना भासवितात पण प्रत्यक्षात काहीच करत नाही.अशा बनवना-या लोकांपासून सावध रहायला हवे.यांच्या ओठांवर एक आणि प्रत्यक्षात करायचे एक..! संकल्प केल्याने पूर्ण होत नाही किंवा सांगितल्याने पूर्ण करावेत असेही नाही.तर नेहमीच चांगले काम करण्यासाठी संकल्प करणा-याला येणारा प्रत्येक दिवस हा चांगला च असतो.तो कधीही सांगत सुटत नाही.मनामध्ये दृढ विश्वास असला आणि चांगले काम करण्याची प्रबळ इच्छा झाली की,तो निश्चितच स्वत:साठी व इतरांसाठी कल्याणकारी संकल्प करतोच.त्याला नवीन वर्षाची किंवा नवीन दिवसाच्या मुहर्ताची काहीच गरज नाही.संकल्प असे करावे की,आपले हित कमी व इतरांचे जास्त असायला हवे.त्यातून काहीतरी नवीन शिकले पाहिजे.ज्यामुळे स्वत:ला मानसिक समाधान आणि इतरांना काहीतरी वाममार्गाला लागलेल्यापासून दूर करण्यासाठी आपण काहीतरी केल्याचा आनंद निर्माण होईल असा काहीतरी उद्देश आपल्यासमोर ठेवून केलेले एखादे कार्य म्हणजेच माझ्यामते खरा संकल्प होईल अन्यथा संकल्पच्या ठिकाणी संकल्पनाच एक वल्गनाच होईल.मग तुम्हीच संकल्पाची संकल्पना कशी निर्माण करायची ते ठरवावी.चांगल्या संकल्पाला मुळीच काळ, वेळ आणि वर्ष याची काहीच गरज नाही. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🌞🌜🌞🌜🌞🌜🌞🌜🌞🌜 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *वडिलांना मदत* भगवान बुद्ध त्या काळात आपल्या शिष्यगणांसह गावोगावी जात होते. एका गावाच्या वेशीवर एक वृद्ध आपल्या मोठ्या टोपलीतून भाजी विकण्यास बसला होता. ती टोपली जड होती व त्याला तेथून दुसरीकडे जायचे होते म्हणून येणार्‍या - जाणार्‍या वाटसरुंना तो आपल्या डोक्यावर टोपली ठेवण्यास मदत करण्याची याचना करत होता. पण कोणीही त्याच्याकडे लक्ष देत नव्हते. ते शिष्यगणही मजा बघत होते. हे पाहताच भगवान बुद्ध स्वतः पुढे झाले व त्यांनी वृद्धाच्या डोक्यावर टोपली उचलून दिली. त्या वृद्धाने त्यांना ओळखले होते. तो म्हणाला, सार्‍या जगाच्या दृष्टीने ते कोणीही असोत, पण माझ्या दृष्टीने माझ्या मुलासारखे आहेत ! त्याचे बोलणे ऐकून शिष्य आश्चर्यचकित झाले. त्यांनी विचारले, हे कसे शक्य आहे ? तो वृद्ध उत्तरला, जगात प्रत्येक मुलगा हा आपल्या मातापित्यांचा आधार असतो. त्यांचे कष्ट उपसण्यास नेहमीच मदत करत असतो. आज त्यांनीही मला मदत केली आहे. माझे कष्ट हलके केले आहेत. मग ते माझ्या मुलासमानच नाहीत का ? सार्‍या शिष्यांनी त्या वृद्धाचे पाय धरले व क्षमा मागितली.  *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment