✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00          ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 14/12/2019 वार - शनिवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    *शहीद बुद्धीजीवी दिन - बांगलादेश* *राज्य दिन - अमेरिका-अलाबामा* 💥 ठळक घडामोडी :- ● १२८७ - सेंट लुशियाचा पूर - नेदरलँड्समधील झुइडर झी समुद्री भिंत कोसळली. ५०,००० ठार. ● १९६२ - नासाचे मरिनर २ शुक्राच्या जवळून जाणारे पहिले मानवनिर्मित यान. ● १९८९ - पॅट्रिशियो एल्विन चिली च्या राष्ट्राध्यक्षपदी. 💥 जन्म :- ● १८९५ - जॉर्ज सहावा, इंग्लंडचा राजा. ● १९१८ - बी. के. एस.आय्यंगार, भारतीय योगतज्ञ. 💥 मृत्यू :- ● १९७७ - ग.दि. माडगूळकर, मराठी कवी. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *मुंबई: साधारणपणे आठवड्यातील तीन-चार दिवस चालणारं मंत्रालयाचं कामकाज आता दररोज सुरू राहणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुंबईचेच असल्याने हा निर्णय घेण्यात आला असल्याचं सूत्रांनी सांगितलं* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *नागरिकत्व सुधारणा विधेयकाला महाराष्ट्रातूनही विरोध, काँग्रेस नेत्यांकडून अंमलबजावणी न करण्याची मागणी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भूमिकेकडं राज्याचं लक्ष्य* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *रानकवी पद्मश्री ना. धों. महानोर यांच्या हस्ते त्र्यांनवाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन १० जानेवारी २०२० रोजी होणार असल्याची माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष नितीन तावडे यांनी दिली.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *इंग्लडमध्ये 364 जागा जिंकत जॉन्सनच्या हुजुर पक्षाला स्पष्ट बहुमत; ब्रेक्झिटचे समर्थन करणारे बोरीस जॉन्सन पुन्हा ब्रिटनच्या पंतप्रधानपदी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *राज्यातील पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतलेल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृतीसह इतर शिष्यवृत्ती योजनांचे ऑनलाइन अर्ज आता १५ डिसेंबरपर्यंत भरता येणार आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *संभाजीनगर की औरंगाबाद नावावरुन महापालिकेत भाजप-सेना नगरसेवक समोरासमोर, भाजप उपमहापौरांचा राजीनामा, पालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *भारत – वेस्ट इंडिज यांच्यातील एकदिवसीय मालिकेला १५ डिसेंबरपासून सुरूवात होणार आहे. भारताचा आघाडीचा अनुभवी गोलंदाज भुवनेश्वर कुमार हा दुखापतग्रस्त असल्याने त्याच्या जागेवर आता मुंबईकर शार्दुल ठाकूर याला पर्यायी खेळाडू म्हणून बीसीसीआयकडून संधी देण्यात आल्याचे सांगितलं जातं आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••            *आपली कामे आपणच करावीत* एखाद्या वेळी घरात आई किंवा बहीण नसेल तर आपली पंचाईत होते. जेवण करायचे असेल किंवा घरातील साफसफाईचा प्रश्न असेल, आपण सर्वस्वी आई किंवा बहिणीवर अवलंबून असतो. त्यामुळे आपणावर तसा प्रसंग ओढावतो. ज्यावेळी घरात वडील किंवा भाऊ नसतो, त्यावेळी तशीच काहीशी ......... वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/11/blog-post_59.html  लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *गॅसेस का होतात ?* 📙 खूप लोकांना गॅसेसचा त्रास होतो. म्हातारपणात तर बऱ्याच लोकांमध्ये हा त्रास आढळून येतो.‍ लहान मुलांमध्येही गॅसेस होऊ शकतात. गॅसेस किंवा वायूविकाराचे मुख्य कारण म्हणजे आपल्याला माहित नसताना हवा गिळण्याची सवय. खूप बोलणाऱ्या लोकांमध्ये (उदा. शिक्षक, राजकीय नेते) अशा प्रकारे जास्त हवा गिळली जाते आणि गॅसेसचा त्रास होतो. लहान मुलेही दूध पिताना हवा गिळतात आणि त्यामुळे गॅसेस होऊन त्यांचे पोट दुखायला लागते. मोठ्या आतड्यात सुक्ष्म जंतूंची अन्नावर क्रिया होऊनही वायू निर्माण होतो. याखेरीज शौचास साफ न झाल्यास किंवा बद्धकोष्ठाचा त्रास असल्यास मल शरीरात साचून राहतो व या मलाचे विघटन होऊनही वायू तयार होतात. वायू तयार झाल्यावर तो आतड्याच्या भिंतीवर ताण आणतो. त्यामुळे पोट दुखते. डोकेही दुखते. गॅसेसचा त्रास होऊ नये यासाठी जेवणाच्या वेळा नियमित असाव्यात. थोडीशी भूक ठेवूनच जेवावे. हरभऱ्याच्या डाळीचे किंवा तेलकट तुपकट पदार्थ कमी खावेत. बैठे काम करणाऱ्यांनी भरपूर व्यायाम करावा. सर्वांनीच निदान जास्तीत जास्त पायी चालण्याचा प्रयत्न करावा. पवनमुक्तासनसारख्या आसनांमुळे गॅसेस बाहेर पडतात. अनावश्यक बडबड टाळावी. हिंग्वाष्टक चूर्ण घेतल्यास गॅसेसवर चांगला उपचार होतो. बैठे काम करणाऱ्यांनी जेवणानंतर दीड दोन तासांनी ताठ बसून बेबी आत ओढून पाच ते पंधरा सेकंद तशीच ठेवण्याचा प्रयत्न करावा. असा उपाय वारंवार केल्याने गॅसेसचा त्रास नक्कीच कमी होतो. चार चौघे जमल्यावर आपल्याला लाज आणणारा हा वायूविकार आहाराच्या सुयोग्य सवयी आणि व्यायाम यामुळे आपण आटोक्यात आणू शकू. *डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित* यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *" ज्यांना जास्त गोष्टींची हाव असते त्यांना प्रत्येक गोष्टीची कमतरता असते. "* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *राज्यसभेवर निवडून गेलेली पहिली अभिनेत्री कोण ?* नर्गिस दत्त 2) *महाराष्ट्रातील कोणते उद्यान मगरीसाठी प्रसिद्ध आहे ?* ताडोबा ( चंद्रपूर ) 3) *पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरात हरीजनांना प्रवेश मिळावा यासाठी कोणी उपोषण केले ?* साने गुरुजी 4) *'भारताची फुलराणी' असे कोणत्या महिला खेळाडूला म्हटले जाते ?* सायना नेहवाल ( बॅडमिंटन ) 5) *'प्रतियोगीता सहकार' ही संकल्पना कोणी मांडली ?* लोकमान्य टिळक *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 सारंग भंडारे *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आपले आयुष्य तसे सामान्यच आणि स्वप्नेही तशीच; पण असामान्य व्यक्तींची 'स्वप्ने' लोकविलक्षणच असतात. संत एकनाथांना ज्ञानेश्वरांनी स्वप्नात येऊन दृष्टांत दिला की,'अजानवृक्षाची मुळी माझ्या गळ्याभोवती वेढली गेली आहे. ' एकनाथांनी मग आळंदीला जाऊन ज्ञानदेवांची समाधी शोधून काढली. तिचा जिर्णोद्धार केला. इतकेच नव्हे, तर ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत तयार केली. तुकारामांच्या स्वप्नात संत नामदेव आले आणि त्यांनी आपली शतकोटी अभंगाची प्रतिज्ञा पूर्ण करावी, असे तुकोबांना सुचविले. जिजाऊंनी शिवरायांच्या राज्याभिषेकाचे स्वप्न मनोमन पाहून शिवरायांना स्वराज्याचे तोरण बांधण्याची प्रेरणा दिली होती.* *स्वामी विवेकानंदांनी कन्याकुमारी येथे खडकावर, ध्यानमग्न स्थितीत, दैदिप्यमान भारताचे स्वप्न पाहिले. 'देशवासियांच्या जाड्याभरड्या अन्नवस्त्राची तरी सोय व्हावयास हवी.' हे रामकृष्ण परमहंसांचे बोल त्यांच्या मनात गुंजत होते. बोधिवृक्षाखाली ध्यानस्थ बसलेल्या गौतम बुद्धांचे मनही उपेक्षित लोकांसाठी तळमळत होते. स्वत:पलिकडे लोककल्याणाचा ध्यास घेतलेल्यांची स्वप्ने भव्य-दिव्य असतात. संत कबीर यांनी प्रत्येक जीवाने सत्-चित् , आनंदरूप व्हावे, अशी आस बाळगली, तर तुकडोजी महाराजांनी भेदभावरहित सुखी भारताची आकांक्षा धरली.* *॥ रामकृष्णहरी ॥* 🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाईल- 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो,* *जगात समस्या नाही असा माणूस नाही.आणि उपाय नाही अशी समस्या नाही.* *मग तुम्हीच ठरवा कण्हत कण्हत जगायचं की गाणं म्हणत.* *रडत रडत जगायचं की लढत जग जिंकायचं तुम्हीच ठरवा.* *भारतात शंभर समस्या आहेत, परंतु अब्जावधी उपायही आहेत...* - *कैलाश सत्यार्थी, नोबेल विजेते* *हव्या त्या वस्तू जगात सापडत नाही.त्या संपादन कराव्या लागतात.* *जसे की पसायदानात प्रार्थना केली जाते-* *दुरितांचे तिमिर जावो,विश्व स्वधर्म सूर्य पाहो.जो जे वांछिल तो ते लाहो, प्राणिजात.* *पण त्या अगोदर तुम्हांला स्वत:साठी व आपल्या समस्त मानवजातीसाठी पुढील प्रयत्न करावे लागतील-* “ *मागा म्हणजे तुम्हांला ते देण्यात येईल.* *शोधा आणि तुम्हांला ते सापडेल,* *ठोका आणि तुमच्यासाठी दार उघडले जाईल.* *नोकरी मिळविण्यासाठी अभ्यास करु नका.ती तर अशिक्षित मुलांना ही* *मिळते.गरज म्हणून अभ्यास* *करा,आवड आहे म्हणून नको.* *आपली आवड तर नेहमी बदलत* *राहते.आज पूजा तो कल* *कोई और दूजा.जसे शरीराला* *रोज अन्नाची गरज* *आहे.तसे आपल्याला अभ्यासाची गरज आहे.* *तुम्ही एखाद्या गोष्टीपासून जितके दूर पळाल तितकी की तुमच्या गळ्यात* *पडते.तेव्हा नैराश्याने अथवा आयोगाच्या कारभाराला* *कंटाळून इथेच थांबणार असाल व बस्स झाले आता, पोटापाण्यासाठी व* *समाजात एक पगारी माणूस म्हणून मिरवून* *घ्यायचे.असा पळपुटा विचार सोडून द्या. सावलीतील नोकरी* *मिळविण्यासाठी इकडे येत असाल तर सध्या जिथे आहात तिकडेच* *रहा.कारण ग्लोबल वार्मिंगचा फटका इथेही बसलेला आहे.* *जाळे फेकलेच आहे तर एकतरी मासा गळाला लागलाच पाहिजे.* *रिकाम्याहाती गंगामाईही जात नाही.तुम्ही लढा आमचे हात आहेच* *तुमच्या पाठीशी.* *इंग्रजी कळत नसेल तर मराठीत सांगतो...* *सगळेच अधिकारी झालेत तर झाडू कोण मारणार?* *तेव्हा पहा, ठरवा,निर्णय घ्या व कृती प्रत्यक्षात उतरवा.* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते )* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• काल तुम्ही दिवसभरात केलेल्या कामाची थोडी उजळणी करा आणि तुमच्या मनाला थोडं विचारा की,अरे मना माझ्याकडून जे काही घडले त्यात माझ्या कृतीपेक्षा तुझाच जास्त सहभाग आहे.कारण तुझ्या स्थिरतेमुळेच मी एवढे काम चांगले करु शकलो.तू जर चलबिचल झाला असता तर माझ्याकडून ब-याच चूका झाल्या असत्या,पण मला तू माझ्या बुद्धीला आणि हाताला दुसरीकडे कुठेच जाऊ दिले नाही.माझ्या कामात एकाग्रता आणि सातत्य ठेवल्यामुळे मला इतरत्र भटकण्याची संधी दिली नाही.म्हणून तुझे पहिल्यांदा आभार मानले पाहिजे. म्हणजेच काल जी आपल्या चांगल्या दृष्टीकोनातून कामाची तयारी आणि पूर्णत्वाकडे नेण्याची सर्वस्वी जबाबदारी मनाचीच होती.मनाचीच तयारी नसती तर कोणतेही काम पूर्णत्वाकडे गेले नसते. सदैव आपल्या मनाला कसल्याही प्रकारची मरगळ येऊ न देता प्रसन्न ठेवले पाहिजे आणि आजचे ही काम तितकेच जोमाने पार पडावे यासाठी तूच सर्वस्वी जबाबदार आहे आणि राहणार.थोडक्यात सांगायचे झाले तर कोणत्याही कामात यशस्वी होण्यासाठी पहिल्यांदा आपले मन आपल्या ताब्यात असायला हवे. त्यासाठी आपण सदैव तयार असायला हवे मग ते कोणतेही काम करणे सोपे जाईल. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍃🍂🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *गरीब माणूस आणि श्रीमंत माणूस* एक गरीब माणूस आणि एक श्रीमंत माणूस शेजारी शेजारी राहत होते. गरीब माणसाचे चपला जोडे शिवण्याची दुकान होते. काम करता करता तो अगदी आनंदाने गाणे गात असे.तो अगदी निर्धास्त जीवन जगत असे. आपल्या घराची दारे खिडक्या बंद ठेवाव्यात, त्यांना कुलूप कड्या लावाव्यात असे त्याला कधीच वाटत नसे.रोज रात्री तो देवाची प्रार्थना करून झोपी जात असे. शेजारी राहत असलेला श्रीमंत माणूस या गरिब आनंदी माणसाकडे नेहेमी पाहत असे. श्रीमंत माणसाला अनेक चिंता होत्या; स्वतःच्या पैशाची आणि सुरक्षेततेची त्याला नेहमी काळजी वाटत असे. आपल्या घराची दारे खिडक्या घट्ट बंद करत असे. एवढे करूनही त्याला शांत झोप लागत नसे. एके दिवशी श्रीमंत माणसाने गरीब माणसाला घरी बोलावले त्याने त्याला पाच हजार रुपये दिले आणि म्हणाला , " हे पैसे तुझ्याकडे ठेव मला या पैशांची गरज नाही.ते तुझेच पैसे आहेत असे समज.एवढे पैसे मिळाले म्हणून गरीब माणसाला पहिल्यांदा खूप आनंद झाला.पण त्या पैशांमुळे त्याच्या जीवनातील शांतता पार नाहीशी झाली.त्याने आयुष्यात पहिल्यांदाच आपल्या घराचे दार व सर्व खिडक्या बंद केल्या आणि त्यांना कड्या घातल्या आपले पैसे सुरक्षित आहेत ना, हे पाहण्यासाठी रात्री तो कितीतरी वेळा झोपेतून उठला. दुसऱ्याच दिवशी सकाळी तो गरीब माणूस श्रीमंत माणसाकडे आला. त्याने पाच हजार रुपये श्रीमंत माणसाला परत दिले आणि हात जोडून म्हणाला, " साहेब, हे तुमचे पैसे परत घ्या. आपण हे पैसे घेतलेत तरच माझं हसतं-गातं जीवन आणि शांत झोप मला परत मिळेल." *तात्पर्य सर्व सुख समाधान पैशात सामावलेले नसते.* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment