✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00          ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 24/12/2019 वार - मंगळवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    *भारतीय ग्राहक दिन* 💥 ठळक घडामोडी :- ● १२९४ - पोप सेलेस्टीन पाचव्याने राजीनामा दिल्यावर पोप बॉनिफेस आठवा सत्तेवर. ● १७७७ - जेम्स कूकला किरितिमाती तथा क्रिसमस द्वीप पहिल्यांदा दिसले. ● १८५१ - लायब्ररी ऑफ काँग्रेसला आग. ● १८६५ - अमेरिकेच्या दक्षिणेतील सेनापतींनी कु क्लुक्स क्लॅन या वर्णद्वेषी संस्थेची स्थापना केली. ● १९२४ - आल्बेनिया प्रजासत्ताक झाले. 💥 जन्म :- ● १८९९ - पांडुरंग सदाशिव साने तथा साने गुरुजी, मराठी लेखक. ● १९२५ - मोहम्मद रफी, भारतीय पार्श्वगायक. ● १९५९ - अनिल कपूर, हिंदी चित्रपट अभिनेता. 💥 मृत्यू :- ● १८७३ - जॉन्स हॉपकिन्स, अमेरिकन उद्योगपती व दानशूर. ● १९१४ - जॉन मुइर, अमेरिकन निसर्गसंवर्धक. ● १८६३ - एम.जी. रामचन्द्रन, तमिळनाडूचे मुख्यमंत्री. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *आयुष्मान खुराणा आणि विकी कौशल ठरले सर्वोत्कृष्ट अभिनेते, 'पाणी'साठी आदिनाथ कोठारेचाही गौरव* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *ठाकरे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर, 27 किंवा 30 डिसेंबरचा नवा मुहूर्त* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *2022 पर्यंत देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यार असून देशात २२ हजार गावात ग्रामीण कृषी मार्केटच जाळ उभारणार असल्याची माहिती केंद्राच्या शेतकरी उत्पन्न दुप्पट करणे अभ्यास समितीचे अध्यक्ष डॉ अशोक दलवाई यांनी दिली आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *भाजपला धोक्याची घंटा, एका वर्षात गमावली पाच राज्यातील सत्ता, काँग्रेस-जेएमएमचं सरकार निश्चित ,काँग्रेस, जेएमएम आणि राजद आघाडीला 42 जागांवर आघाडी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटेंवर पुणे जिल्हाबंदी, कोरेगाव-भीमा इथं होणाऱ्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी, 160 जणांनाही नोटीस* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *27 आणि 28 डिसेंबरला कोकण रेल्वेवर मेगाब्लॉक, दहा गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम, नाताळ आणि नववर्षानिमित्त कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना फटका* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या ट्वेन्टी ट्वेन्टी आणि वन डे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह सलामीवीर शिखर धवनचं संघात पुनरागमन तर रोहित शर्मा आणि गोलंदाज मोहम्मद शमीला विश्रांती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  *साने गुरुजी जयंतीनिमित्त प्रासंगिक लेख* *मानवतेची शिकवण देणारे साने गुरुजी* पांडुरंग सदाशिव साने ज्यांना आपण सर्वजण साने गुरुजी या नावाने ओळखतो. त्यांचा जन्म 24 डिसेंबर 1899 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड या गावी झाला. सदाशिवराव व यशोदाबाई यांच्या पोटी जन्मलेला दुसरा मुलगा असून तिसरे अपत्य म्हणजे साने गुरुजी. त्यांचे प्राथमिक शिक्षण गावातच पूर्ण झाले. त्यांचे वडील सारा गोळा करण्याचे काम करीत होते. साने गुरुजी यांची आई त्यांना श्याम या नावाने प्रेमाने ........ वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/12/blog-post_23.html             लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *मोहम्मद रफी* मोहम्मद रफी हिंदी सिनेमातील महान प्लेबॅक गायक होता.नाटकांच्या आवाजाचा आणि त्यांच्या आवाजाचा विस्तार करण्यासाठी त्यांनी आपल्या समकालीन गायिकांबरोबर ओळखले. त्यांना शायनशाह-ए-तारानुम असेही म्हटले जाते. मोहम्मद रफीच्या आवाजात त्यांच्या आगामी काळात अनेक गायकांनी प्रेरित केले. हे सोनू निगम , मोहम्मद अजीज आणिउदित नारायण च्या नाव आहे - या आता अनेक त्याच्या स्वत: च्या ओळख आहे तरी. 1 9 40 ते 1 980 पर्यंत सुरूत्याने एकूण 26,000 गाणी गायली. [2]मुख्य प्रवाहात हिंदी अतिरिक्त गीते गझल , भजने , देशभक्तीपर गीत, कव्वाली समावेश आणि इतर भाषांमध्ये गाणे गायली. कलाकार त्यांच्या संगीत चित्रित आहेत कोठे गुरु दत्त , दिलीप कुमार , देव आनंद , भारत भूषण , Johnnie वॉकर , जॉय मुखर्जी , शम्मी कपूर , राजेंद्र कुमार , राजेश खन्ना ,अमिताभ बच्चन ,  धर्मेंद्र ,  जितेंद्र  आणि  ऋषी कपूर ते गायक अभिनेता व्यतिरिक्त किशोर कुमारदेखील नाव समाविष्ट आहे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *" कोणतीही विद्या, ज्ञान कधीच वाया जात नाही. "* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *'शेती' हा विषय कोणत्या सुचीमध्ये समाविष्ट आहे ?* राज्यसूची 2) *समुद्राची खोली कोणत्या परिमाणात मोजतात ?* फॅदम 3) *नाताळ' केव्हा साजरा केला जातो ?* 25 डिसेंबर 4) *'पुरुज्जीवन राष्ट्रवाद' या संकल्पनाचे जनक कोण ?* योगी अरविंद घोष 5) *स्निग्ध पदार्थाच्या पचनास कोणत्या रसाची आवश्यकता असते ?* पित्त *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 निर्मला बोधरे, सहशिक्षिका, पुणे 👤 विठ्ठल मुजळगे, सहशिक्षक, धर्माबाद 👤 रणजित बाळासाहेब गुंजाळ, पत्रकार, *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आयुष्याच्या संध्याकाळी आपल्या कुटुंबासमवेत निवांतपणानं जगता यावं नि जीवनाचं सार्थक व्हावं, अशी प्रत्येकाची मनोमन ईच्छा असते. आज मात्र एकाकीपणाच्या गर्तेत स्वत:ला कोंडून घेण्याची वेळ अनेकांवर येताना दिसत आहे. पाश्चात्य देशातून आलेल्या संस्कृतीनं गेली अनेक वर्षे आमच्या सामाजिक रचनेला हादरे दिल्याने आमच्या कुटुंबव्यवस्थेला तडे गेले आहेत.* *संयुक्त कुटुंबव्यवस्थेत अनेक अडचणी व भौतिक सुखांच्या अभावातही आत्मिक सुखासाठी जगणारी माणसं आज हरवून गेली आहेत. पडद्यावरील आजी-आजोबा आम्हांला भावतात, पण वास्तवात प्रत्येकाला कुटुंब हवं ते चौकोनात बांधलेलं. त्यात इतरांना जागाच उरलेली नाही.* *"काळाच्या बदलात आलेली ही स्थित्यंतरं अत्यंत वेदनादायी आहेत, पण ती स्विकाराणं ही आमची अपरिहार्यता...?* *आहे....?...की.....?"* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *सज्जनहो,* *पी* *.एच. डी.करून किती* *अभ्यासकांनी जीवन आनंदी व* *कितीचं सुखकर झालं माहीत नाही,.* *पण जे कधी शाळेत गेले नाहीत* *त्यांचा अभ्यास पी.एच. डी.करणारे* *करतात हे मात्र सत्य आणि वास्तव आहे.* *त्याच मुळही तसेच आहे,या लोकांनी* *माणस वाचली,पाहिली,* *लिहिली,अभ्यासली आणि* *माणसाच्याच गराड्यात ही लोक* *राहिली.* *संत ज्ञानेश्वर, रवींद्रनाथ टागोर,* *बहिणाबाई चौधरी यांनी कधी शाळेच* *तोंड पाहिले नव्हते पण* *आज पी.एच. डी. करणारे या महान* *व्यक्तीचा अभ्यास करतात.* *तर मग एकच ठरवा मला माणसात* *रहायच , माझा आनंद* *माणूस आहे, माझं जीवन* *माणूस आहे,मी फ्लॅट मध्ये* *ब्लॉक होणार नाही,आणि* *ब्लॉकमध्ये फ्लॅट होणार* *नाही.माणसात राहून माणूस बनेल.* *माणसालाच सुखी करेल व सुखी* *राहील.* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••• ईश्वरावर श्रध्दा असणे काही चुकीचे नाही,पण ईश्वरच जे काही करेल ते मी स्वीकारेन असे म्हणून त्याच्यावर विसंबून राहणे मात्र चुकीचे ठरेल.ईश्वर ही आपल्यासाठी एक अप्रतक्ष प्रेरणा आहे.जेव्हा तुम्ही तुमच्या प्रयत्नाने आणि जिद्दीने प्रामाणिकपणे काम करता ते काम नक्कीच यशाकडे घेऊन जाते.त्या तुम्ही करत असलेल्या कामामध्ये ईश्र्वर नक्कीच प्रेरणा देतो.केवळ काम न करता मला माझ्या कामात नि जीवनात यश मिळू दे असं म्हणत असाल तर तो तुमचा विचार तुम्हाला पराभवाकडे घेऊन जाणाराच ठरेल.म्हणून प्रथम आपल्या कामाचा प्रारंभ प्रसन्न मनाने आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवून करायला सज्ज राहिलातकी,मग तुम्हीच तुमच्या मनातून ईश्र्वराचे आभार मानायला विसरणार नाहीत हे मात्र खरेच आहे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मातृभक्त लक्ष्मणदेव* एका गांवात एक स्त्री गांवाबाहेर आपल्या लहान मुलाला घेऊन एकटीच रहात होती. मुलाचे वडील त्याच्या लहानपणीच देवाघरी गेले होते. मुलाचे नाव होते लक्ष्मणदेव. आई धुणीभांडी करून आपला चरितार्थ चालवित होती. मुलगाही आईला कामात मदत करत असे. काम करून तो लांबच्या शाळेत पण जाई. एक दिवस तो शाळेतून परत आला तर आई झोपलेली होती. तिला खूप ताप भरला होता. लक्ष्मण आईची सेवा करू लागला. बरेच दिवस झाले तरी आईचा ताप उतरेना. खांण बंद झालं. ती खूप अशक्त झाली. लक्ष्मणाला घरची बाहेरची सर्वच कामे करावी लागत. आईची सेवा तो अगदी मन लावून करत असे. तिला दूध गरम करून देणे तिची औषधं वेळच्या वेळी देणे. एका रात्री आईने लक्ष्मणाला हाक मारली. 'लक्ष्मणा थोडे पाणी देतोस' लक्ष्मण घरात पाणी आणायला गेला. पाणी घेऊन तो परत आला तेवढयात आईला झोप लागली. गुंगीत आई पडून होती. रात्र संपली पहाट झाली. गार वार्‍याच्या झुळुकीबरोबर आईला जाग आली. तिने पाहिले समोर हातात पाण्याचा पेला घेऊन लक्ष्मण उभा होता. आई म्हणाली 'लक्ष्मणा अरे तु रात्री झोपलाच नाहीस का ? वेडया अरे मला उठवायचे नाही कां ? लक्ष्मण आईच्या हातात पाण्याचा पेला देत म्हणाला, 'आई अग माझ्या लहानपणी माझ्यासाठी तु किती रात्री जागुन काढल्यास मग मी एक रात्र तुझ्या करता जागलो तर काय झालं'. तिने त्याला पोटाशी धरले. तिच्या डोळयातले अश्रू त्याच्या मानेवर ओघळत होते. *तात्पर्यः आईवडीलाची सेवा करणे हीच खरी पुण्याई आहे.* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment