✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00          ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 14/02/2020 वार - शुक्रवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    *व्हॅलेन्टाईन्स डे* 💥 ठळक घडामोडी :-  ● १९२४ - संगणक तयार करणारी कंपनी आय.बी.एमची स्थापना. ● १९८९ - भोपाळ दुर्घटना - युनियन कार्बाइडने भारत सरकारला ४७,००,००,००० अमेरिकन डॉलर नुकसान भरपाई देण्याचे कबूल केले. 💥 जन्म:- ● १९३३ - मधुबाला, हिंदी चित्रपट अभिनेत्री. 💥 मृत्यू :- ● १९८९ - जेम्स बॉन्ड, अमेरिकन पक्षीशास्त्रज्ञ. ● १९८९ - जेम्स बॉन्ड, अमेरिकन पक्षीशास्त्रज्ञ. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *पाच दिवसांच्या आठवड्यावरुन सरकारचे मंत्री आमनेसामने, बच्चू कडूंचा घरचा आहेर, तर निर्णयामुळे सरकारचा एक दिवसाचा खर्च वाचल्याचा गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *औरंगाबाद महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंचा दौरा, मनसैनिकांची बाईक रॅली, संभाजीनगरचेही बॅनर झळकले, बॅनरवर राज यांचा हिंदूत्व नायक असा उल्लेख* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *चीन सराकरनं 50 हजार कोरोनाग्रस्तांना जाळल्याची माहिती सोशल मीडियावर व्हायरल तर जपानच्या जहाजावरील भारतीयांचे जीव वाचवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना साकडं* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *पाणी पिण्यासाठी विशेष घंटा वाजवण्याआधी पालिका शाळांमध्ये स्वच्छ पाणी पुरवा : हायकोर्टचे सरकारला निर्देश* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *मुंबईत अंधेरी पूर्वेतील एमआयडीसी परिसरात रोल्टा टेक्नॉलॉजी पार्क इमारतीमध्ये मोठी आग लागली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 18 गाड्या दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम युद्धस्तरावर सुरु आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *देशातील पहिल्या सामाजिक क्रांतीचे उद्घोषक महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांना 'भारतरत्न' या सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरविण्यात यावे, अशी मागणी काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई यांनी राज्यसभेत केली.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *लुसान : भारतीय संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग याला आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचा सर्वोत्तम पुरुष हॉकीपटूचा पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार पटकावणारा मनप्रीत हा भारताचा पहिला हॉकीपटू ठरला आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *व्हॅलेंटाईन दिनानिमित्त प्रासंगिक लेख* *जगाला प्रेम अर्पावे .....!* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2018/02/blog-post.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃  *काव्यांगण - रोज एक बालकविता* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *गाव लळा* - अरुण थोरात ,कन्नड जि. औ. बाद 9373787370 माझ्या गावाच्या घरात सुख गोकुळ भरल काळजा काळजात ब्रम्हकमळ फुलल गावच्या अंगणाला शोभा सडा रांगोळी ची साधु संतां च्या पद स्पर्शान रोज पावन माती माझ्या गावाच्या अळीत जनु गोकुळ नांदते पीठ भाकरी ऊसणवारीत आपुलकी सांधते गावाच्या देऊळात भावभक्ती च्या दिवावाती मंद प्रकाशात उजळती बंधुभाव काळजाची नाती काळजाची नाती माती समता ममतेच दर्शन नाही आल कधी जात पातीत विघण माझा गावाची शाळा पीढ्या पिढ्यांचा मायलळा राष्ठीय सणवारा सारा गाव होतो गोळा माझ्या गावाच गावपण माणुसकीच जिवंतपण येथे घेतला जन्म बांधिन सुवर्ण तोरण *सौजन्य :- जि. प. प्रा. कन्या शाळा धर्माबाद* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *" अंतरमनात कितीही संघर्ष असला तरी, चेहर्यावर हास्य दाखविणे हाच, जीवनातील सर्वश्रेष्ठ अभिनय* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *चाकाचा शोध कोणत्या युगात लागला ?* नवाश्म 2) *विदर्भातील सर्वात मोठे शहर कोणते ?* नागपूर 3) *भारतातील सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी कोणती ?* नर्मदा 4) *जिथे आकाश जमिनीला टेकल्यासारखे दिसते त्या ठिकाणाला काय म्हणतात ?* क्षितिज 5) *'गड आला पण सिंह गेला' हे उद्गार शिवाजींनी कोणाबद्दल काढले ?* तानाजी मालुसरे *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 श्री. विकास गोविंद बडवे नातेपुते जि. सोलापूर 👤 सतीश कुरमे, सहशिक्षक, माहुर 👤 धनराज जाधव, सहशिक्षक, वाशिम *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मान मागावा लागत नाही, तर तो मिळत असतो. त्यासाठी आवश्यकता असते ती पात्रतेची. आता पात्रता नसेल तर मान मिळण्याची इच्छा करून काय उपयोग? अपात्र माणसाला लोक मान कसा देतील? रिकाम्या माणसाला लोक खुर्ची देणार नाहीत. मला स्टेजवर पाहुणा म्हणून बसवा म्हणल्यानं लोक बसवणार तर नाहीतच; उलट 'काय हलकट माणूस आहे?' असं म्हणून अपमान करतील. पात्रतेवाचून मान मिळवण्याची इच्छा करणे म्हणजे अपमान करून घेणे होय. मुळात 'इच्छा' अपमान ओढवते. मानासाठी हापापलेली अनेक माणसं आपल्या अवती-भोवती पाहायला मिळतात. मान मिळाला नाही म्हणून 'बोहल्यावर' रुसून बसणारे नवरदेव आपण पाहिले असतील.* *राजकीयच काय पण सामाजिक, धार्मिक स्टेजवरही मान-पानावरुन लोक हाणामारी करायलाही मागेपुढे पहात नाहीत. मानाची तीव्र इच्छा हे सर्व घडवत असते. तुकोबा म्हणतात, "जो लोकांकडून मान मिळवण्याची इच्छा करतो, तो यामुळं 'हलकट' ठरत असल्याने त्याचा अपमान होतो. असा हा अभागी माणूस जिथं जाईल तिथं त्याच्यासोबत अपयश असते." म्हणून, अपमान करून घ्यायचा नसेल तर मान मिळण्याची इच्छा करू नये. 'निरपेक्ष वृत्तीने' काम करत राहा. लोक स्वतःच तुम्हाला खुर्चीवरच काय डोक्यावर बसवतील.* *॥ रामकृष्णहरी ॥* 🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱 *--संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• मित्रांनो, काल एका महान कादंबरीकारचा जन्मदिवस होता,त्या निमित्ताने त्याच्या अंतरंगातील काही गोष्टी आपल्या सगळ्यांना वेगळी दिशा देतील असे वाटते. तो महान कादंबरीकार म्हणजे जॉर्ज मेरिडिथ. जगाला आवडेल ते कराल तर एक “product” म्हणून रहाल आणि जर स्वताला आवडेल ते कराल तर, एक “Brand” म्हणून जगाल. असा ब्रँड म्हणून सदैव स्मरणात राहिलेला जॉर्ज मेरिडीथ ,नोबेल पुरस्कार पासून वंचित राहिला,पण लेखनाला आणि जनसामान्यांना त्याने कधी पारख केलं नाही. पोर्ट्समथमध्ये जन्मलेला जॉर्ज मेरिडिथ हा व्हिक्टोरियन काळातला एक महान ब्रिटिश कादंबरीकार आणि कवी म्हणून ओळखला जातो. त्याच्या बऱ्याच कविता निसर्गापासून स्फूर्ती घेतलेल्या असत. त्याच्या कादंबऱ्या उत्कृष्ट संवादशैली आणि शब्दांच्या नेमकेपणासाठी प्रसिद्ध होत्या. त्याच्या कादंबऱ्यांमधून त्या काळच्या जीवनशैलीचं यथार्थ आणि वास्तववादी दर्शन घडतं. मुख्य म्हणजे स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीनं स्थान असावं या मताचा तो पुरस्कर्ता होता. त्याची एक-दोनदा नव्हे तर सातवेळा साहित्याच्या ‘नोबेल’साठी शिफारस होऊनही संधी हुकली होती.  लेखनाच्या सुरुवातीच्या काळात तो कविताच लिहायचा; पण त्याला खरी प्रसिद्धी लाभली ती ‘दी शेव्हिंग ऑफ शॅगपत’ या त्याच्या एका सुरस आणि अद्भुत कादंबरीमुळे! शिबली नावाच्या एका पर्शियन न्हाव्याने जुलमी सुलतानाची हजामत केल्याची धमाल कथा सांगणारी ही अरेबियन नाइट्स धर्तीची कादंबरी वाचकांना आवडून गेली होती. त्याच्या पुढच्या ‘दी ऑर्डियल ऑफ रिचर्ड फिव्हरल’ या कादंबरीचंसुद्धा लोकांनी चांगलं स्वागत केलं. मेरिडिथला एव्हाना विनोदप्रचुर लिहिणं जमायला लागलं होतं. त्याची पुढची ‘इव्हान हॅरिंग्टन’ ही एका शिंप्याच्या मुलाच्या प्रेमाची कथा सांगणारी कादंबरीही लोकांना आवडली.   एमिला इन इंग्लंड, ऱ्होडा फ्लेमिंग, व्हिट्टोरिया, दी अॅडव्हेंचर्स ऑफ हॅरी रिचमंड, दी हाउस ऑन दी बीच, दी टेल ऑफ क्लो, दी अमेझिंग मॅरेज, दी इगोइस्ट अशा त्याच्या अनेक कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत. १८ मे १९०९ रोजी सरेमध्ये त्याचा मृत्यू झाला. मेरिडिथ च्या कार्याला सलाम. अशोक कुमावत (राष्ट्रपती पुरस्कार विजेते) 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आयुष्याची खरी सुरुवात तर तुमच्या वाडवडिलांच्या ख-या पुण्याईने सुरु झाली.जीवनाचा ' मध्य ' तर तुमच्या कर्तृत्वाने सिद्ध करायचा आहे.तो तुम्हाला चांगला करायचा आहे की,वाईट हे तुम्हालाच ठरवायचे आहे.कारण हे मात्र तुमच्या हातात आहे.यासाठी तुम्हाला कुणाच्या भरवशावर बसता येत नाही किंवा नशिबावर अवलंबून राहता येत नाही.म्हणून तुमच्या जीवनातला मध्यच महत्त्वाचा आहे.आणि शेवट मात्र आपल्या हाती नाही.भविष्यात केव्हा काय घडेल याचे काही ठामपणे सांगता येत नाही.म्हणून जे आज आणि आता तुमच्यासमोर आहे ते सत्य आहे ते स्वीकारा आणि त्याला कौशल्याने, धैर्याने आणि परिस्थितीनुरूप उत्तर द्यायला पुढे रहा.यातच तुमच्या जीवनाचे खरे सार आहे. *व्यंकटेश काटकर,नांदेड.*   संवाद..९४२१८३९५९०/             ८०८७९१७०६३ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *एकीचे बळ* एका गावातील एक सुतार रोज जंगलात जात असे. एकदा त्याने खड्डय़ात पडलेल्या जंगली कुत्र्याच्या पिल्याचा जीव वाचवला तेव्हापासून त्याला त्या पिलाचा लळा लागला. ते पिलू त्याला तेथे भेटत होते. ते पाहून इतरही जंगली कुत्रे त्याच्याजवळ येत असत. परंतु त्यांना सर्वाना एका वाघाने फार त्रस्त करून सोडले होते. तो रोज त्यांच्यावर हल्ले करत होता. सुताराने एक योजना बनविली. नेहमीप्रमाणे वाघ डोंगराच्या माथ्यावर आला. सर्व कुत्री वेगवेगळ्या ठिकाणी थांबून त्याच्यावर भुंकू लागली. वाघाने चवताळून एका कुत्र्यावर झेप घेतली तसा तो कुत्रा खाली बसला. वाघाची उडी थेट त्या कुत्र्याच्या मागे असणार्‍या एका मोठय़ा खड्डय़ात पडली. सगळ्या कुत्र्यांनी त्याच्यावर धाव घेतली व त्याच्यावर हल्ला करून त्याला ठार केले. *तात्पर्यः एकञितपणे शक्ती दाखवली तर कोणतेही अशक्य कार्य शक्य होते.एकीचे बळ महान असते..* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment