✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00          ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 02/03/2020 वार - सोमवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    💥 ठळक घडामोडी :-  ● १९७२- अमेरिकेचे ’पायोनिअर-१०’ यानाचे गुरुच्या दिशेने उड्डाण झाले 💥 जन्म :- ● १९३१ - सोव्हिएत संघाचे शेवटचे अध्यक्ष आणि नोबेल पारितोषिक विजेते मिखाईल गोर्बाचेव्ह ● १९७७ - इंग्लिश क्रिकेटपटू अँड्र्यू स्ट्रॉस 💥 मृत्यू :-  ● १५९८- संत मीराबाई. ● १९४९- सुप्रसिध्द कवयित्री, संयुक्त प्रांताच्या पहिल्या स्त्री गव्हर्नर सौ. सरोजिनी नायडू. ● १९८६- डॉ. काशिनाथ घाणेकर. ● १७००- छत्रपती राजाराम महाराज. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *मुंबई: शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'च्या संपादकपदी रश्मी ठाकरे यांची निवड, सामनाच्या पहिल्या महिला संपादक, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी 1988 मध्ये केली होती सामनाची सुरुवात* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *मुंबई : हिवाळ्यात देखील अवकाळी पाऊस झाल्यामुळे राज्यातील शेतकरी झाला हवालदिल, लातूर जिल्ह्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. रेणापूर, शिरूर अनंतपाळ, उदगीर तालुक्यात हलक्या आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस, त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा काढणीला आलेल्या हरभरा पिकाचे नुकसान* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *नवी दिल्लीः हिंदुस्थान एरोनॉटिक्‍स लिमिटेड (HAL)ने भारतीय सैन्यासाठी अत्याधुनिक 500 लढाऊ हेलिकॉप्टर बनवण्याच्या मेगा प्रोजेक्टवर काम सुरू केले आहे. 2027 पर्यंत हे अत्याधुनिक हेलिकॉप्टर तयार होईल, अशी माहिती HALचे प्रमुख आर माधवन यांनी दिली.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *कर्जमाफीच्या यादीत असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात आजपासून होणार पैसे जमा. 1 लाख 25 हजार 449 शेतकऱ्यांच्या खात्याचे प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात बार्टी यांच्या वतीने जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीसाठी 01 एप्रिल ते 30 जून 2020 याला कालावधीत विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती बार्टी कडून देण्यात आली आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *विरारच्या रसेल दिब्रिटो याने अवघ्या नऊ महिन्यांच्या तपश्चर्येनंतर ‘मुंबई-श्री’ या प्रतिष्ठेच्या किताबाला गवसणी घातली आहे. बॉडी वर्कशॉपच्या रसेलने विजेतेपदाचे दावेदार मानल्या जाणाऱ्या सुशील मुरकर आणि नीलेश दगडे यांचे आव्हान मोडून काढत ‘मुंबई-श्री’ किताबावर नाव कोरले.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *यजमान न्यूझीलंड संघाचा दुसऱ्या कसोटी सामन्यातही विजयाच्या दिशेने वाटचाल सुरु, भारताचा दुसरा डाव डाव १२४ धावांत गुंडाळल्यानंतर न्यूझीलंडला विजयासाठी १३२ धावांचं आव्हान, तिसऱ्या दिवशी पहिल्या सत्रापर्यंत न्यूझीलंडने एकही गडी न गमावता ४६ धावांपर्यंत मजल मारली आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         *वेळेचे नियोजन* http://nasayeotikar.blogspot.com/2019/08/blog-post.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃  *काव्यांगण - रोज एक बालकविता* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *चिऊताई* - राजेश जेठेवाड, नांदेड चिवचिव करत माझी चिऊताई फिरत होती इकडून तिकडे अन तिकडून इकडे उडत होती कुठे मिळेल पिल्लासाठी घास ती रानावनात शोधत होती सैरावैरा फिरून फिरून चिऊताई सारखी दमत होती दमून दमून ती पुन्हा आपल्या पिकांकडे जात होती कुठे ही मिळेना दानापाणी तवा डोळे भरून पिल्लांना पाहत होती *सौजन्य :- जि. प. प्रा. कन्या शाळा धर्माबाद* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• _* " एकदा वेळ निघून गेली की सर्व काही बिघडून जाते असे म्हणतात. पण कधी कधी सर्व काही सुरळीत होण्यासाठी सुद्धा काही वेळ जाऊ द्यावा लागतो. "*_ *🙏🙏 शुभ सकाळ🙏🙏* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *हत्तीरोगाचा प्रसार कोणत्या डासांमुळे होतो ?* क्युलेक्स मादी 2) *नॅशनल डिफेन्स अकॅडमी कोठे आहे ?* खडकवासला 3) *क्षय ( T. B.) या रोगासाठी कोणती लस वापरतात ?* बीसीजी लस 4) *जगातील साखरेचे कोठार कोणते ?* क्युबा 5) *लीप वर्षात एकूण किती दिवस असतात ?* 366 दिवस *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 गणेश पाटील हतनुरे, पत्रकार        👤 योगेश जी काटे, पत्रकार 👤 चिं. साई दीपक गायकवाड 👤 अभिजित बाळकृष्ण ढगे 👤 मुकुंद मोहन जाधव 👤 शुभम भोसले 👤 एकनाथ कणसे 👤 अविनाश साबरे 👤 राजू तायडे *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• लोकांनी आपल्या कार्यक्रमाला गर्दी करावी असं प्रत्येक कलावंताला वाटत असतं. लोक नाही जमले तर कलावंत नाराज होऊन संयोजकांना खडे बोल सुनावतात. कुमार गंधर्व एकदा म्हणाले होते, सभागृहात पाहून मी गातोच कुठं, मी आत पाहूनच गातो. लोक किती होते किंवा होते की नव्हते, याने मला काय फरक पडतो ? खरा कलावंत आत पाहून आपली कला सादर करतो. गायक स्टुडिओत रेकाॅर्डिंग करतात तेव्हा कुठे श्रोते असतात ?*         *आपली आई जेंव्हा जात्यावर गाणं म्हणायची, तेव्हा कोण होता तीचा श्रोता ? कुणाकडं पाहून, कोणाच्या समाधानासाठी ती गाणं म्हणायची ? कुणाच्या टाळीची तीला आपेक्षा होती ? कुमार गंधर्व जसे आत पाहून स्वत: साठी गायचे तशीच जात्यावर गाणारी प्रत्येक आई त्या चार भिंतीच्या आत आणि गडद अंधारात जे गाणं म्हणायची ते गाणंच तिच्यासाठी आयुष्यातला सगळ्यात मोठा 'उजेड' होता. माणसानं त्या उजेडासाठी कविता म्हटली पाहिजे, गाणं गायलं पाहिजे.*                    🎪 *॥ रामकृष्णहरी  ॥* 🎪            🎄🎄🎄🎄🎄🎄      *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• मित्रांनो दुःखाचे डोंगर चढून गेल्याशिवाय यशाची हिरवळ दिसत नाही. अपयश ही यशाची पहिली पायरी असते.ज्याने अपयश बघितले तोच पुढे यशाचा धनी होतो. अपयशातूनच मिळते दैदिप्यमान यश ही विलक्षण शौर्यकथा, इसवीसनापूर्वी पाचशे आठशेमध्ये घडली. रोमला, क्लुसियमच्या पोरसेना या राजाने वेढा घातला होता. त्यावेळी, म्युसियस नावाचा तरूण रोमन कैद केला गेला. कैद झाल्यावर, त्याने राजा पोरसेनाचा खून करण्याचा प्रयत्न केला. राजाला शंका होती की, त्याचे कोणी आणखी साथीदारही असतील. म्हणून त्याने म्युसियस, याचे हात जाळण्याचा हुकूम केला. अग्निकुंड पेटले, तेव्हा म्युसियस निर्भयतेने अग्निस्थंडिलापर्यंत आला. आणि त्याने शांतपणाने, आपला हात अग्नीच्या मुखावर धरला. जळत्या हाताची राख होत होती. राजा भयचकित् होऊन ते दृश्य पहात होता. आणि म्युसियस हसत होता. पोरसेना राजाच्या मनावर एवढा परिणाम झाला की, त्याने तरूण म्युसियसला मुक्त केलेच, पण रोमचा वेढाही उठवला. आता प्रश्न असा की, रोमला वेढा पडला, ते म्युसियसचे यश का अपयश? तो कैद झाला, तेव्हा त्याचे यश का अपयश? खुनाच्या प्रयत्नात तो धरला गेला, हे त्याचे यश का अपयश? त्याला हात जाळण्याची शिक्षा मिळाली, हे त्याचे यश का अपयश? हात जाळून बधत नाही असे पाहून त्याला संभाजीप्रमाणे सोलला असता तर? येथे विचारलेल्या पाच प्रश्नचिन्हांनंतर म्युसियसचे यश, इतिहासात नोंदले गेले. पण पूर्वीच्या पाच अपयशाच्या पायर्‍या नसत्या तर सहावी काही आकाशातून उगवली नसती! अशोक कुमावत (राष्ट्रपती पुरस्कार विजेते) 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• तुम्ही जेव्हा एखाद्या नवीन ठिकाणी जाता तेव्हा तुम्हाला तिथे काहीतरी नवीन पहायला किंवा अनुभवायला मिळणार त्याबद्दलची उत्सुकता लागून राहते आणि काहीतरी तेथून तुम्ही घेऊन येता.त्याचप्रमाणे तिथल्या लोकांनाही तुमच्याकडून काहीतरी नवीन अपेक्षा असतातच अर्थात तुमच्याजवळही असे एखादे त्यांना देण्याइतपत ज्ञान किंवा अनुभव असायला हवे जे की,तुमच्या भेटीतून त्यांनाही आनंद आणि समाधान मिळायला हवे.अशा देवाणघेवाणीतून तुमचे आणि नवीन ठिकाणचे नातेसंबंध अधिक दृढ होतील.केवळ आपण स्वार्थ साधण्यापुरते जर संबंध किंवा जवळिकता निर्माण केली तर त्यात काही अर्थ राहणार नाही.ज्याप्रमाणे आपली घेण्याची वृत्ती आहे त्याचप्रमाणे इतरांना काहीतरी देण्याचीही वृत्ती जोपासायला हवी तरच जीवनाला अर्थ राहील. © व्यंकटेश काटकर,नांदेड संवाद...९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. 🎋🥀🎋🥀🎋🥀🎋🥀🎋🥀 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *पैशात सुख शोधता येत नाही* एका नगरात एक व्यापारी राहत होता. तो राहत असलेल्या नगरमध्ये त्याचा व्यापार काहीच चालत नव्हता. कधीकधी तर दिवसभरातून एकही ग्राहक त्याच्याकडे यायचा नाही. त्याच्या कुटुंबाला कधीकधी उपाशी झोपावे लागत होते. अनेक दिवस असेच चालू राहिले आणि परिस्थितीही बदलली नाही. तेव्हा त्याच्या एका मित्राने त्याला दुसऱ्या नगरात जाऊन व्यापार करण्याचा सल्ला दिला. व्यापाऱ्याला मित्राचा सल्ला पटला. व्यापारी आपल्या पत्नी आणि मुलांना घरीच सोडून दुसऱ्या नगरात व्यापारासाठी गेला. नशिबाने त्याच्या मित्राचा सल्ला कामी आला आणि त्याला भरपूर फायदा होऊ लागला. तो अनेक दिवस दुसऱ्या शहरांमध्ये राहून व्यापार करू लागला. त्याने स्वतःच्या नगरात येऊन एक नवीन घर बांधले. पत्नी आणि मुलांना घेऊन नवीन घरात राहू लागला. तेव्हा पत्नी त्याला म्हणाली आता आपल्याकडे पर्याप्त धन जमा झाले आहे. यामध्ये आपण सुखी जीवन जगू शकतो. तुम्हाला आता इतर नगरांमध्ये जाऊन व्यापार करण्याची आवश्यकता नाही. मुलांनाही वेळ देण्याची आवश्यकता आहे. व्यापारी म्हणाला, मला आणखी धन कमावण्याची इच्छा आहे, ज्यामुळे तुम्हाला मी सर्व सुख-सुविधा देऊ शकेल, आपण जे दिवस पाहिले ते मला मुलांना परत दाखवायचे नाहीत. पत्नी म्हणाली, परंतु धन कमावण्यात जो वेळ निघून गेला आहे तो परत येणार नाही, आपण जीवनात सोबत राहण्याच्या आनंदापासून वंचित होत आहोत. व्यापारी म्हणाला, फक्त आणखी काही वर्ष व्यापार करू दे, आपण एवढे धन जमा करू की आपल्या पिढ्या सुखात जीवन व्यतीत करतील. व्यापारी पुन्हा व्यापार करण्यासाठी निघून गेला. काही वर्ष असेच निघून गेले. खूप धन जमा झाले. व्यापाऱ्याने पुन्हा नदीच्या काठावर एक सुदंर महाल बांधला. संपूर्ण कुटुंब त्या महालात राहू लागले. तो महाल एखाद्या स्वर्गाप्रमाणे होता. व्यापाऱ्याची मुलगी त्याला म्हणाली, बाबा आमचे सर्व बालपण निघून गेले परंतु आम्ही तुमच्यासोबत राहू शकलो नाहीत. आता आपल्याजवळ एवढे धन आहे की, पाच-सहा पिढ्या आपल्याला कोणतीही अडचण येणार नाही. आता तुम्ही आमच्या सोबतच राहा. व्यापारी म्हणाला, मुली आता मीही थकलो आहे आणि आता तुमच्यासोबत काहीकाळ व्यतीत करण्याची इच्छा आहे. मी उद्या फक्त दोन दिवसांसाठी शेजारच्या गावात जाऊन काही वसुली करायची आहे तेवढी करून येतो. त्यानंतर मी येथेच तुमच्यासोबत राहणार आहे. संपूर्ण कुटुंब आनंदी झाले. दुसऱ्या दिवशी व्यापारी शेजाऱ्याच्या गावात गेला आणि त्याच दिवशी मुसळधार पाऊस सुरु झाला आणि ज्या नदीच्या काठावर व्यापाऱ्याने महाल बांधला होता तो पुरामध्ये वाहून गेला. त्या पुरताच त्याचे संपूर्ण कुटुंब वाहून गेले. व्यापारी परत आल्यानंतर सर्वकाही नष्ट झालेले होते.व्यापारी हताश झाला.निर्बल झाला. त्याला काय करावे हे सूचेनासे झाले. *तात्पर्यः पैशात सुख शोधता येत नाही.त्यासाठी आपल्या कुटुंबाला वेळ द्या. पैसा कमावणे आवश्यक आहे परंतु काळासोबत नाते आणि एकमेकांमधील प्रेमासाठी आपल्या लोकांसोबत वेळ व्यतीत करणेही आवश्यक आहे. कारण धन कोणत्याही वेळी मेहनत करू कमावले जाऊ शकते परंतु जो काळ निघून गेला आहे तो परत येत नाही. वर्तमानात राहा, नात्यांच्या आनंदाचे सुख घ्या.आणि आपल्या लोकांना वेळ द्या.* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment