✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00          ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 06/03/2020 वार - शुक्रवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    *स्वांतत्र्य दिन - घाना* *अलामो दिन - टेक्सास* 💥 ठळक घडामोडी :-  ● १९५३ : मराठीतील श्रेष्ठ नाटककार आचार्य अत्रे यांनी ‘श्यामची आई’ हा चित्रपट पडद्यावर आणला. ● १८६९: दिमित्री मेन्डेलीफने मूलभूत घटकपदार्थांची आवर्त सारणी प्रकाशित केली. ● २००० : शहर निर्वाह भत्ता (CCA), महागाई भत्ता (DA) आणि घरभाडे भत्ता (HRA) म्हणून मिळणारी रक्‍कम करपात्र असल्याचे सर्वोच्‍च न्यायालयाचे शिक्‍कामोर्तब ● १९९९ : जगप्रसिद्ध खजुराहो मंदिर समुहाच्या सहस्राब्दी सोहळ्याचे राष्ट्रपती के. आर. नारायणन यांच्या हस्ते उद्‍घाटन ● १९९८ : विख्यात गझलगायक जगजितसिंग यांना मध्यप्रदेश सरकारतर्फे दिला जाणारा ’लता मंगेशकर पुरस्कार’ जाहीर ● १९९७ : स्वाध्याय परिवाराचे संस्थापक पांडुरंगशास्त्री आठवले यांची टेंपलटन पुरस्कारासाठी निवड ● १९९२ : ’मायकेल अँजेलो’ नावाचा संगणक विषाणू पसरण्यास सुरूवात झाली. ● १९७५ : इराण व इराक यांच्यात सीमाप्रश्नावर संधी झाली. ● १९५३ : जॉर्जी मॅक्सिमिलानोव्हिच सोविएत रशियाचे अध्यक्ष झाले. ● १९४० : रशिया व फिनलंड मधे शस्त्रसंधी झाली. ● १८४० : बाल्टिमोर कॉलेज ऑफ डेंटल सर्जरी हे पहिले दंतवैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले ● १९६४ - कॉन्स्टन्टाईन दुसरा ग्रीसच्या राजेपदी. ● १९७५ - अल्जियर्सचा तह - ईराण व इराकने सीमाप्रश्नी संधी केली. 💥 जन्म :- ● १९५७ : अशोक पटेल, भारतीय क्रिकेट खेळाडू. ● १९६५ : देवकी पंडीत – गायिका ● १९४९ : शौकत अजिझ – पाकिस्तानी राजकारणी ● १४७५ : मायकेल अँजेलो – इटालियन शिल्पकार आणि चित्रकार (मृत्यू: १८ फेब्रुवारी १५६४) 💥 मृत्यू :- ● १९९२ : प्रसिध्द कादंबरीकार रणजित देसाई. कर्तबगार प्रशासक स.गो.बर्वे. ● २००० : नारायण काशिनाथ लेले – कृष्ण यजुर्वेद शाखेतील वेदमूर्ती ● १९९९ : सतीश वागळे – हिन्दी आणि मराठी चित्रपट निर्माते ● १९८२: रामभाऊ म्हाळगी – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक, जनसंघ या राजकीय पक्षाचे महाराष्ट्राचे पहिले सरचिटणीस आणि विधानसभेतील पहिले आमदार, तसेच भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्राचे पहिले प्रादेशिक अध्यक्ष ● १९८१ : गो. रा. परांजपे – मराठीतील आघाडीचे विज्ञान प्रसारक, नामवंत शास्त्रज्ञ, ’रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’चे पहिले भारतीय प्राचार्य ● १८९९ - व्हिक्टोरिया कैउलानी, हवाईची राजकुमारी. ● १९३२ - जॉन फिलिप सूसा, अमेरिकन संगीतकार. ● १९५० - आल्बेर लेब्रन, फ्रांसचा फ्रांसचा राष्ट्राध्यक्ष. ●१९५४ - पॉल, ग्रीसचा राजा. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *देशभरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या 30 वर, दिल्लीतील प्राथमिक शाळा 31 मार्चपर्यंत बंद, पंतप्रधान मोदींचा बेल्जियम दौरा रद्द तर घाबरुन न जाण्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं आवाहन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *मास्क घातल्याशिवाय त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांना नो एण्ट्री, साई मंदिरात स्वच्छतेवर भर, पंढरीत जनजागृती फलक लावले तर अंबाबाई मंदिरात भाविकांच्या हातावर सॅनिटायझर देणार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *दिल्लीतील निर्भयाच्या चारही गुन्हेगारांना 20 मार्चला पहाटे फाशीची शिक्षा, पटियाला हाऊस कोर्टाचं डेथ वॉरंट, आरोपींसमोरचे सर्व पर्याय संपले* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल सादर, दरडोई उत्पन्नात महाराष्ट्र पाचव्या क्रमांकावर तर कर्जाचा बोजाही वाढला, अहवालानुसार उद्योग, सेवा क्षेत्र, रोजगार अशा सर्वच आघाड्यांवर राज्याची घसरण झाली आहे* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *गोंधळ घातल्याप्रकरणी काँग्रेसच्या सात खासदारांचं निलंबन, उर्वरित सत्रात सहभाग घेता येणार नाही, लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांचा निर्णय* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *मुंबई : औरंगाबाद विमानतळाचे नाव बदलून छत्रपती संभाजी महाराज विमानतळ, औरंगाबाद असे करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत केली.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *भारतीय महिला संघाची पहिल्यांदाच टी 20 विश्वचषकाच्या फायनलमध्ये धडक, ऑस्ट्रेलियाशी 8 मार्चला होणार अंतिम मुकाबला* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  *जागतिक महिला दिन विशेष* *तिला मदत ......?* https://b.sharechat.com/imxWyG1XB4?referrer=copiedLink लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃  *काव्यांगण - रोज एक बालकविता* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आभाळाच्या शाळेत* - राजेंद्र अत्रे, जळगाव आभाळाच्या शाळेत ढग सारे आले। शिकत - शिकत हळू - हळू पेंगायला लागले। वारे गुरुजींचा तास सुरू झाला जेव्हा ... मैदानात आणले त्यांनी खेळायला तेव्हा। विजेरी शिट्टी फुंकून हुकुम त्यांनी दिला। गुद्दागुद्दी खेळायचा सुरू केला। खेळता - खेळता ढग खूप घामेघूम झाले। थेंब - थेंब अंगातून ओघळायला लागले। ढगांचा घाम आला खाली जमीनीवर। नाचायला लागली मुले रिमझिम तालावर॥ *सौजन्य :- जि. प. प्रा. कन्या शाळा धर्माबाद* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *" जिवाभावाची, जिवलग, जीवाला जीव देणारी माणसं म्हणजे आयुष्यातील खरी संपत्ती, पैसा तर काय आज आहे उद्या नाही ....! "* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *आंध्रप्रदेशातील नृत्यशैली कोणती ?* कुचिपुडी 2) *जगातील पहिल्या स्वयंचलित गाडीचे निर्माते कोण ?* कार्ल बेंज 3) *मासे कोणत्या इंद्रियाद्वारे श्वसन करतात ?* कल्ले 4) *भारतातील पहिला लाटांवर आधारित विद्युत प्रकल्प कोणता ?* कांडला 5) *सापाच्या कातडीचा मृतपेशींच्या थराला काय म्हणतात ?* कात *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 अशोक पाटील दगडे, सरपंच, चिरली 👤 माधव रामू गोटमवाड, गुरुकुल इंग्लिश स्कूल कंधार, 8379848078 👤 सुरेश बावनखुळे, सहशिक्षक, माहूर 👤 मीनल आलेवार 👤 अविनाश गायकवाड 👤 कैलास वाघमारे 👤 राजू कांबळे 👤 दत्ताहरी शिवलिंग दुड्डे 👤 प्रकाश राजफोडे 👤 शेख झुबेर *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *हातात काय आहे? बरेचसे तर हाताबाहेरचे आहे. जन्म-मरण हातात नाही. पुढचा क्षण कसा असावा, ते हातात नाही. भूतकाळ मागे सुटलेला, असल्याच तर ब-या-वाईट आठवणी. भविष्याच्या गर्भात काय दडले, माहित नाही. त्यामुळे त्याची उत्सुकता आणि त्याच्या अनिश्चिततेतून वाटणारी असुरक्षितता. भविष्यातील असुरक्षिततेवर मात करण्यासाठी भविष्याविषयीचे स्वप्नरंजन करणे किंवा कल्पनेचे मनोरे बांधणे हाच काय तो उतारा. हाही उतारा कधी क्षणात उधळला जातो आणि कल्पनेचे मनोरे जमीनदोस्त होऊन जातात आणि उरते ती अगतिकता आणि असहायता.* *थोडाफार हातात म्हटल्यापेक्षा चिमटीत आहे तो आताचा वर्तमानातील क्षण. तोही क्षण चिमटीत आहे म्हणता म्हणता निसटतो आणि भूतकाळाच्या शवागारात जमा होतो. वर्तमान हातात असतो, तेव्हा आपण ब-याच वेळा भूतकाळात रममाण असतो. नाहीतर भविष्यातील स्वप्नरंजनात दंग असतो. त्यामुळे हातात असलेला क्षण तसाच सटकून निसटून जातो. क्षणाक्षणाला प्रवाही असलेला क्षण जगता आला पाहिजे. तोच क्षण माझा; ना भूतकाळ माझा. तो तर मेलेला. ना भविष्य माझे; ते तर स्वप्न. आहे ते वर्तमान. यात जगता आले तरच ते जगणे. यासारखी नितांत सुंदर गोष्ट नाही.* *॥ रामकृष्णहरी ॥* 🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿 *श्री संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल- 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• मित्रांनो सर्वस्या: सरितो वारि प्रयात्यायाति चाकरात देहनद्या: पुनस्त्वायुर्यात्येवायाति नो पुन:।। शरीर नाशवंत आहे हे सांगताना कवी म्हणतो ,सगळया नद्यांच पाणी वाहून जात आणि त्याच्या उगमाकडून (नवीन) पाणी येत राहत. देहनदीच आयुष्यरूपी पाणी मात्र वाहून जात, पुन्हा (नवीन पाणी) येत नाही. मनुष्यदेह हा कवींच्या ,संतांच्या चिंतनाचा विषय आहे. त्यावर अनेक रूपक केलेली आढळतात. कुणी देहाला देवाच देऊळ मानून त्यात आत्म्याच्या रुपात विठ्ठलाला पाहिलं, तर कुणी देहाची तिजोरी करून तिच्यात भक्तीचा ठेवा पहिला. प्राचीन तत्वचिंतकांनी देहाला रथाची उपमा दिली आणि आत्मा या रथाचा सारथी आहे, अस म्हटलं. या कवीन देहाला नदीच्या रुपात पाहिलं. पाणी वाहून नेणारी नदी आणि आयुष्य वाहून नेणारी देहरूपी नदी या दोघींमध्ये वाहत राहणार हे साम्य आहे. परंतु जलवाहिनी नदी चिरंतन असते. काळाच्या ओघात तिच पाणी सतत वाहत असत. जरा बारकाईने पाहिलं तर लक्षात येत, की प्रतिक्षणी तीच पाणी बदलत असत. पहिल पाणी वाहत वाहत सागराला जाऊन मिळत आणि त्याची जागा घ्यायला उगमाकडून नव ताज पाणी येत राहत. नदीची ही प्रवाहनित्यता तिला चिरतरुण बनवते. देहनदीच तस नसत. तीही काळाच्या ओघात वाहत असते .शैशव, तारुण्य, प्रौढत्व, वार्धक्य अशी ठिकाण घेत घेत अखेर ती काळसागराला मिळते .पण जसजशी पुढे वाहते तसतस मागे वाळवंट शिल्लक राहत .तिच्या खाणाखुणाही राहत नाहीत. काही नद्या मात्र मागे वाळवंटात आपल्या सत्कृत्यांची भव्य शिल्प कोरून उरतात. जीवन त्यांना कळले हो,समजून घ्या. अशोक कुमावत, नाशिक (राष्ट्रपती पुरस्कार विजेते) 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• चंदन आणि संत यामध्ये खूप काही साम्य आहे.ज्याप्रमाणे चंदनाच्या सहवासात राहिलो तर चंदनाचा सुगंध आपल्या अंगाभोवती असल्याचे किंवा अंगाला येत असल्याचे जाणवते व आपणच चंदन झालो आहोत असे वाटायला लागते.चंदन जेव्हा सहानेवर पाणी टाकून घासायला लागतो तेव्हा ते स्वत: झिजायला लागते आणि त्याचा गंध सर्वत्र दरवळायला लागते. चंदनाचा गुण जसा आहे तसाच संतांचाही आहे.संतांच्या सहवासात जर आपण राहिलो तर आपल्या जीवनातले सारे दुर्गूण नष्ट होण्यास मदत होते तर त्यांचा सहवास आपल्याला चंदनासारखा नेहमी हवासा वाटायला लागतो.संत हे स्वत: जगाच्या कल्याणासाठी अविरत आपला देह झिजवतात ते स्वत:साठी जगत नाहीत तर आपल्या ईश्वराप्रती प्रेम निर्माण व्हावे,आपण सन्मार्गाला लागावे,आपण मानवतेच्या दृष्टीने आपल्याकडून काहीतरी चांगले कर्म घडावे.आपल्यातला खरा माणूस जागा व्हावा.आपला जन्म इतरांच्या काही चांगल्या कारणी लागावा यासाठी नेहमी सांगत असतात झिजवत असतात.चंदन आणि संत हे दोघेही तितकेच मानवाच्या जीवनात महत्वाचे आहेत.म्हणून चंदन आणि संत यांच्यात साम्य आहे आणि यांचा सहवास नित्य राहिला तर नक्कीच आपले कल्याण होईल. © व्यंकटेश काटकर, नांदेड संपर्क.९४२१८३९५९०/८०८७९१७०६३ 🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *कुणा ना व्यर्थ शिणवावे* एकदा महात्मा गांधींजीन कडे एक गृहस्थ आली होते. बोलता बोलता गांधींजींच्या लक्षात आले की त्या गृहस्थांच्या अंगातील सदऱ्याची बाही उसवली आहे. महात्मा गांधीजींनी त्यांच्या हे लक्षात आणून दिले. व त्या गृहस्थास हे लक्षात आल्यावर ते म्हणाले, " घरी गेल्यावर पत्नीकडून शिवून घेईन." यावर महात्मा गांधीजी म्हणाले, " एवढ्या साध्या गोष्टीसाठी कशाला त्यांना त्रास देता? " असे म्हणून महात्मा गांधींजींनी त्यांच्याकडे तो सदरा मागितला व सुई दोरा घेऊन स्वतः शिवून दिला. तात्पर्यः स्वतःची कामे स्वतः करावे. आपल्यामुळे कोणासही ञास होणार नाही, ही काळजी घ्यावी. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment