✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00          ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 05/03/2020 वार - गुरूवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    *समता दिन* 💥 ठळक घडामोडी :-  ● १९३१ : महात्मा गांधीजीनी उभारलेल्या सविनय कायदेभंगाच्या चळवळीनंतर गांधी आणि आयर्विन यांच्यामध्ये करार झाला. ● २००० : पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते कर्नाटकातील कैगा अणूवीजप्रकल्प (युनिट – २) राष्ट्राला अर्पण ● १९९९ : ’इंडियन फिजिक्स असोसिएशन’ तर्फे देण्यात येणार्‍या आर. डी. बिर्ला स्मृती पारितोषिकासाठी डॉ. जयंत नारळीकर व प्रा. अशोक सेन यांची निवड ● १९९८ : नेहमीच्या अस्त्रांबरोबरच कमी पल्ल्याची विमानभेदी क्षेपणास्त्रे सोडू शकणार्‍या, रशियाकडुन घेतलेल्या ’सिंधुरक्षक’ या पाणबुडीचे मुंबई येथे आगमन ● १९९७ : ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीच्या सप्तशताब्दीच्या सांगतेनिमित्त राष्ट्रपती शंकरदयाळ शर्मा यांच्या हस्ते ज्ञानेश्वरांची प्रतिमा असणार्‍या टपाल तिकिटाचे प्रकाशन ● १९६६ : मैसूरचे माजी संस्थानिक जयचामराजेन्द्र वडियार यांचा बंगळूर येथील राजवाडा व त्यासभोवतालची जागा राज्य सरकारच्या ताब्यात घेण्याची परवानगी देणारे विधेयक कर्नाटक विधानसभेत संमत ● १९३३ : भयानक मंदीमुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डी. रुझव्हेल्ट यांनी सर्व बँका काही दिवसांसाठी बंद केल्या व आर्थिक व्यवहारांवर बंदी घातली. ● १९३१ : दुसर्‍या गोलमेज परिषदेपुर्वी गांधी-आयर्विन करार झाला. ● १६६६ : शिवाजीमहाराजांनी राजगडावरून आग्र्यास प्रयाण केले. ● १८५१ : ’जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया’ची (GSI) स्थापना ● १५५८ : फ्रॅन्सिस्को फर्नांडीस याने धूम्रपानासाठी सर्वप्रथम तंबाखूचा वापर केला. ● १०४६ - पर्शियन कवी व प्रवासी नसीर खुश्रोने आपल्या सात वर्षांच्या मध्य-पूर्वेच्या भ्रमंतीची सुरुवात केल. या प्रवासाचे वर्णन त्याने सफरनामा या आपल्या पुस्तकात करून ठेवलेले आहे. ● २००१ - मक्केत हज सुरू असताना ३५ भाविकांचा चेंगरुन मृत्यू. 💥 जन्म :- ● १५१२ : भूगोलतज्ज्ञ, गणित आणि नकाशा शास्त्राचे जनक जेरार्डस मर्केटर. रामकृष्ण परमहंस. ● १९१६ : बिजू पटनायक – ओरिसाचे मुख्यमंत्री, केन्द्रीय पोलाद, खाणकाम आणि कोळसा मंत्री (मृत्यू: १७ एप्रिल १९९७) ● १९१३ : गंगूबाई हनगळ – किराणा घराण्याच्या शास्त्रीय गायिका (मृत्यू: २१ जुलै २००९) ● १९०८ : सर रेक्स हॅरिसन – ब्रिटिश आणी अमेरिकन रंगभूमीवरील आणि हॉलिवूड चित्रपटांतील अभिनेते (मृत्यू: २ जून १९९०) ● १८९८ : चाऊ एन लाय – चीनचे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: ८ जानेवारी १९७६) ● १५१२ : गेरहार्ट मरकेटर – नकाशाकार, गणितज्ञ आणि तत्त्वज्ञ (मृत्यू: २ डिसेंबर १५९४) ● १९४२ - फेलिपे गॉन्झालेझ, स्पेनचा पंतप्रधान. ● १९५९ - वाझ्गेन सर्ग्स्यान, आर्मेनियाचा पंतप्रधान. 💥 मृत्यू :- ● १९६८ : मराठीचे संशोधक नारायण गोविंद चाफेकर. ● १५३९ - नुनो दा कुन्हा, भारतातील पोर्तुगीझ गव्हर्नर. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळांशी निगडीत शाळा सुरु करण्याचा फडणवीस सरकारचा निर्णय ठाकरे सरकारनं रद्द केल्याने, हा निर्णय एकतर्फी घेण्यात आल्याचा आरोप करत उस्मानाबाद जिल्ह्यातल्या दोन गावांमध्ये सरकारविरोधात आंदोलन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *मुंबई : कोरोना व्हायरसच्या रुग्णांमधील मृत्यू दराचे प्रमाण 3.4 टक्के आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनाझेशनने दिलेल्या माहितीनुसार मृत्यू दराचे प्रमाण वाढत असून जगात आतापर्यंत 3200 लोकांचा मृत्यू झाला आहे तर जगात 93 हजार पेक्षा जास्त लोकांना याचा संसर्ग झाला आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *महाविद्यालयीन शिक्षकांचं मुंबईत आंदोलन, आंदोलनामुळे बारावीच्या निकालासाठी उशीर होण्याची चिन्ह, शिक्षकांची शंभर टक्के अनुदानित शाळेतील वाढीव पदांची मान्यता देण्यात यावी या मागणीसाठी आंदोलन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *मराठी चित्रपटांच्या तिकिटांवर असलेला १२ व १८ टक्के असा जीएसटी रद्द करावा, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची मागणी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *ललित कला क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानासाठी महाराष्ट्रातील तेजस्विनी सोनवणे, सागर कांबळे, रतनकृष्ण शहा, दिनेश पांड्या या चार कलाकारांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राष्ट्रीय ललित कला अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आले.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *येत्या 01 एप्रिलपासून पूर्वीप्रमाणेच सर्व आश्रमशाळांना बी पी एल दराने अन्नधान्य पुरवठा करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *भारताचे माजी कसोटीवीर सुनील जोशी यांची बीसीसीआयच्या सीनियर निवड समितीच्या अध्यक्षपदी करण्यात आली नियुक्ती.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *शिक्षण म्हणजे विचार करण्याची कला* http://nasayeotikar.blogspot.com/2018/05/32.html    लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃  *काव्यांगण - रोज एक बालकविता* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• एक होती कळी - एकनाथ आव्हाड, मुंबई एक होती कळी जराशी ती खुळी गुपचूप बसायची मुळीच नाही हसायची वारा आला बोलायला पाखरू आलं खेळायला तिला पडली भूल कळीचं झालं फूल फूल लागले डोलायला चुरचुरू डोलायला *सौजन्य :- जि. प. प्रा. कन्या शाळा धर्माबाद* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• _*प्रत्येकाला आपला त्रास सांगत बसू नका, कारण प्रत्येकाच्या घरात औषध नसतं, पण मीठ मात्र नक्की असतं…*"_ *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *अंतर मोजण्याचे एकक कोणते ?* किलोमीटर 2) *देशातील पहिलं महिलांचं पोलिसस्थानक कोणते ?* कालिकत 3) *'भारतीय शेक्सपिअर' असे कोणाला म्हटले जाते ?* कालिदास 4) *भारतीय हरितक्रांतीचे जनक कोण ?* एम. एस. स्वामिनाथन 5) *भारतातील सर्वात उंच मिनार कोणते ?* कुतूबमिनार *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 माणिक आहेर, सहशिक्षक, नाशिक 👤 गंगाधर मदनूरकर, सहशिक्षक 👤 बाळू भगत 👤 अशोक कहाळेकर 👤 गंगाधर नुकूलवार, सहशिक्षक, 👤बालाजी तिप्रेसवार, उमरी 👤 रमेश मेरलवार, करखेली 👤 समाधान शिंदे, कवी *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आपले आयुष्य तसे सामान्यच आणि स्वप्नेही तशीच; पण असामान्य व्यक्तींची 'स्वप्ने' लोकविलक्षणच असतात. संत एकनाथांना ज्ञानेश्वरांनी स्वप्नात येऊन दृष्टांत दिला की,'अजानवृक्षाची मुळी माझ्या गळ्याभोवती वेढली गेली आहे. ' एकनाथांनी मग आळंदीला जाऊन ज्ञानदेवांची समाधी शोधून काढली. तिचा जिर्णोद्धार केला. इतकेच नव्हे, तर ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत तयार केली. तुकारामांच्या स्वप्नात संत नामदेव आले आणि त्यांनी आपली शतकोटी अभंगाची प्रतिज्ञा पूर्ण करावी, असे तुकोबांना सुचविले. जिजाऊंनी शिवरायांच्या राज्याभिषेकाचे स्वप्न मनोमन पाहून शिवरायांना स्वराज्याचे तोरण बांधण्याची प्रेरणा दिली होती.* *स्वामी विवेकानंदांनी कन्याकुमारी येथे खडकावर, ध्यानमग्न स्थितीत, दैदिप्यमान भारताचे स्वप्न पाहिले. 'देशवासियांच्या जाड्याभरड्या अन्नवस्त्राची तरी सोय व्हावयास हवी.' हे रामकृष्ण परमहंसांचे बोल त्यांच्या मनात गुंजत होते. बोधिवृक्षाखाली ध्यानस्थ बसलेल्या गौतम बुद्धांचे मनही उपेक्षित लोकांसाठी तळमळत होते. स्वत:पलिकडे लोककल्याणाचा ध्यास घेतलेल्यांची स्वप्ने भव्य-दिव्य असतात. संत कबीर यांनी प्रत्येक जीवाने सत्-चित् , आनंदरूप व्हावे, अशी आस बाळगली, तर तुकडोजी महाराजांनी भेदभावरहित सुखी भारताची आकांक्षा धरली.* *॥ रामकृष्णहरी ॥* 🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाईल- 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• मित्रांनो, केशवकुमारांची एक कविता आठवली एके दिनी परंतु, पिल्लास त्या कळाले, भय वेड पार त्याचे,वाऱ्यासवे पळाले पाण्यात पाहतांना, चोरुनिया क्षण, त्याचेच त्या कळाले, तो राजहंस एक। आपल्यातील भयभीत पणाला दूर करा ,कुठल्याही परिस्थितीत संकटांचा स्वीकार करायला शिका. स्वप्ने ती नसतात,जी झोपल्यावर पडतात,स्वप्ने ती असतात जी जागेपणी पडतात. कुठलंही स्वप्नं खूप मोठं नसतं आणि स्वप्नं पाहणारा लहान नसतो”. मोठी स्वप्नं फक्त तुमच्याच नाही तर इतर अनेकांच्या सकारात्मक बदल घडवून आणत असतात. त्यांना प्रेरित करत असतात. त्यामुळे मोठी स्वप्नं बघा, त्या दिशेने काम करा आणि इतरांना सुद्धा प्रेरणा द्या. कारण जगात काहीही अशक्य नाही!!! सर रॉजर बॅनिस्टर, चार मिनिटांपेक्षाही कमी वेळात एक मैल अंतर धावणारी जगातील पहिली व्यक्ती. १९५४मध्ये त्यांनी हा कारनामा केला होता. तोपर्यंत चार मिनिटांत एक मैल धावणे ही लोकांना अशक्य गोष्टच वाटत होती. त्यांना वाटायचे मानवी शरीराच्या मर्यादांमुळे कुठलाही माणूस एवढ्या वेगाने पळू शकत नाही. ही अशक्य अशी गोष्ट आहे. पण बॅनिस्टर यांनी सगळ्यांना खोटे ठरवले. त्यांनी स्वतःवर मेहनत घेतली. कठोर परिश्रम केले आणि महत्त्वाचं म्हणजे आपण हे करू शकतो हा विश्वास कायम ठेवला. महान लोकांची हीच तर खासियत असते. ही माणसं म्हणजे त्या मेणबत्तीसारखी असतात, जी स्वतः जळून इतरांचं जीवन प्रकाशमान करत असते. त्यांच्या जीवनात आशेचा आणि प्रेरणेचा नवीन किरण जागवत असते. मग जर ते करू शकतात, तर तुम्हाला का नाही जमणार? जर तुम्ही स्वयंशिस्त, चिकाटी या गोष्टी आत्मसात केल्या, आयुष्यात नवनवीन आव्हानं स्वीकारत गेलात, चालढकल करणे थांबवले, तर तुमची स्वप्नं साकार करण्यापासून तुम्हाला कुणीही थांबवू शकणार नाही. आणि या प्रवासात तुम्ही अनेक लोकांच्या आयुष्यातील असा प्रकाशाचा किरण बनाल, ज्याच्यामुळे अनेकांना यश मिळवण्याच्या मार्गावर चालना मिळते. अशोक कुमावत (राष्ट्रपती पुरस्कार विजेते) 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जी स्वप्ने स्वत:च्या बाबतीत पहाता त्यावेळी तुमचे स्वप्न साकार करण्यासाठी खूप प्रयत्न करता आणि जिद्दीने पूर्ण करुन आनंदाने स्वीकारता तो तुमचा यशस्वी प्रयोग आहे.जसे तुम्ही तुमच्याबाबतीत दुसऱ्यांनी हस्तक्षेप करु नये असे वाटते आणि त्याप्रमाणे तुम्ही प्रयत्न ही करता.असाही विचार इतरांच्या बाबतीत केला जावा अशी धारणा आपण जर मनात निर्माण केली तर इतरांचीही स्वप्ने पूर्णत्वास जातील.त्यांच्या बाबतीत मनात कोणताही वाईट विचार आणू द्यायचा नाही.कारण दुसऱ्यांनी देखील तुमच्याबाबतीत कोणताही वाईट विचार आणला नव्हता म्हणून तर तुमचे स्वप्न साकार झाले.जसे आपल्याबाबतीत चांगले चिंतितो तसे इतरांच्या बाबतीतही चांगलेच चिंतायला हवे तरच दोघांचेही त्यात समाधान आहे आणि दोघेही सुखासमाधानाने राहून जीवन जगू शकतात. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *हुशार गाढव* रामू मटकी व विटा बनवत असे. त्याने गाढव व कुञा आहे प्राणी पाळले होते. कुत्रा घराची राखण करीत असे. गाढव स्वतःच्या पाठीवरून माती ,विटा वाहून नेत असे. रामू माठ बाजारात घेऊन जाताना कुत्र्याला सोबत नेत असे. त्यामुळे गाढवाला कुत्र्याचा खूप राग येई. त्याला वाटायचं, " हा कुत्रा कधी एक पैशाचं काम करत नाही की एक मातीचं पोत उचलत नाही. सारखा मालकाला मस्का मारत इकडेतिकडे फिरत राहतो." एक दिवस कुत्रा गाढवा जवळ आला आणि म्हणाला, " मला तुझी मदत हवी आहे. काल रात्री आपल्या अंगणातल्या झाडामागे एक जंगली कोल्हा लपला होता. अंधारात लुकलुकणारे त्याचे डोळे मी पाहिले. मी त्याच्यावर भुंकलो सुद्धा ! पण तो अजिबात भ्यायला नाही. उलट नख दाखवत माझ्यावरच गुरगुरला....... हे जर मालकाला कळलं तर तो माझी चटणी करेल." " पण मी काय मदत करणार?" गाढव म्हणाले. " गाढवाच्या खिंकाळण्याला जंगलातली कोल्हे जाम घाबरतात. गाढवं ओरडू लागले की, कोल्हे स्वतःचा जीव घेऊन पळू लागतात, अस मी ऐकलंय. म्हणून आज रात्री कोल्हा आला की मी तुला इशारा करेन. मग तू त्याच्याजवळ जाऊन जोरात खिंकाळलास की तो घाबरून धूम पळून जाईल आणि मालक मला शाबासकी देईल." कुत्र्याची लबाडी गाढवाचा लक्षात आली. तो म्हणाला, " असं कसं? काम मी करणार आणि मालकाची शाबासकी तुला मिळणार?" हे ऐकून कुत्रा खाली मान घालून निघून गेला. तात्पर्यः कोणी आपणास कितीजरी मूर्ख समजले तरी आपला हुशारीपणा योग्य वेळ आली की समोरच्याला दाखवायचा असतो. मग समोरचा किती जरी हुशार असला तरी त्याला खाली मान घालायची वेळ येईल. आपण केलेल्या मेहनतीचा कामाची शाबासकी स्वतः मिळवायची असते. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment