✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00          ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 16/03/2020 वार - सोमवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *बोलण्याचे संस्कार* आपल्यावर बोलण्याचे संस्कार आहेत काय ?असे कोणी विचारणा केली तर आपण संभ्रमात पडतो. बोलण्यासाठी कोणत्या संस्काराची गरज आहे ? किंवा तसे संस्कार करता येतात काय ? याविषयी आपण लहान असताना नकळत विचार करतो मात्र त्यास बोलण्याचे संस्कार.......... वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/10/blog-post_25.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    💥 ठळक घडामोडी :-  ● २००५ - सम्राट कनिष्क या एअर इंडियाच्या विमानावर बॉम्बहल्ला करून ३२९ प्रवासी व कर्मचाऱ्यांना मारल्याच्या आरोपातून रिपुदमनसिंग मलिक व अजायबसिंग बागरी यांची कॅनडाच्या न्यायालयाने सुटका केली. ● १९९२ : सत्यजित रे यांना ऑस्कर पारितोषिक प्रदान करण्यात आले. ● २००१ : नेल्सन मंडेला यांना राष्ट्रपती के. आर. नारायणन यांच्या हस्ते ‘गांधी शांतता पुरस्कार’ प्रदान ● २००० : हॉकीपटू धनराज पिल्ले आणि मध्य अंतराची धावपटू ज्योतिर्मय सिकदर यांना ’के. के. बिर्ला पुरस्कार’ जाहीर ● १९७६ : इंग्लंडचे पंतप्रधान हेरॉल्ड विल्सन यांनी राजीनामा दिला. ● १९६६ : अमल कुमार सरकार यांनी भारताचे ८ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला. ● १९४५ : दुसरे महायुद्ध – रॉयल एअर फोर्सने तुफानी बॉम्बफेक करून जर्मनीच्या वुर्झबर्ग शहराचा २० मिनीटांत विनाश केला. ● १९४३ : ’प्रभात’चा ’नई कहानी’ हा चित्रपट रिलीज झाला. ● १६४९ : शहाजीराजांच्या सुटकेसाठी शिवाजी महाराजांनी शहजादा मुराद (शहाजहानचा मुलगा) यास पत्र लिहीले. ● १५२८ : फत्तेपूर-शिक्री येथे राणा संग व बाबर यांचे घनघोर युद्ध होऊन राणा संग याचा पराभव झाला. [चैत्र शु. १४] 💥 जन्म :- ● १८७७ - मोहम्मद रझा शाह पेहलवी, इराणचा शहा. ●१९४१ - रॉबर्ट ग्वेई, कोटे दि'आयव्होरचा हुकुमशहा. राजपुतांच्या गृहिलोत वंशातील मेवाडचा राजा अमरसिंह. ● १९३६ : भास्कर चंदावरकर – संगीतकार (मृत्यू: २६ जुलै २००९) ● १९२१ : फहाद – सौदी अरेबियाचा राजा (मृत्यू: १ ऑगस्ट २००८) ● १९०१ : प्र. बा. गजेंद्रगडकर – भारताचे ७ वे सरन्यायाधीश (मृत्यू: १२ जून १९८१) ● १७८९ : जॉर्ज ओहम – जर्मन गणितज्ञ व भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू: ६ जुलै १८५४) ● १७५१ : जेम्स मॅडिसन – अमेरिकेचे चौथे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: २८ जून १८३६) ● १७५० : कॅरोलिन हर्षेल – जर्मन-ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ, ही प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ विल्यम हर्षेलची बहिण असुन तिने ८ धुमकेतू व ३ तारकासमुह शोधले आहेत. (मृत्यू: ९ जानेवारी १८४८) ● १६९३ : मल्हारराव होळकर – इंदूरच्या राज्याचे संस्थापक, मराठेशाहीतील पराक्रमी सेनापती व मुत्सद्दी (मृत्यू: २० मे १७६६) 💥 मृत्यू :- ● १९४५ - गणेश दामोदर सावरकर. ● २००७ : मंजुरूल इस्लाम – बांगला देशचा क्रिकेटपटू (जन्म: ४ मे १९८४) ● १९९९ : कुमुदिनी पेडणेकर – गायिका ● १९९९ : कुमुदिनी रांगणेकर – इंग्रजी लेखकांची मराठी वाचकांना ओळख करुन देणार्‍या लेखिका (जन्म: ? ? ????) ● १९९० : वि. स. पागे – स्वातंत्र्यसैनिक, गांधीवादी कार्यकर्ते, संत वाङ्‍मयाचे अभ्यासक, महाराष्ट्र विधानसभेचे सभापती, रोजगार हमी योजनेचे जनक (जन्म: २१ जुलै १९१०) ● १९४६ : ’गान सम्राट’ उस्ताद अल्लादियाँ खाँ – जयपूर -अत्रौली घराण्याचे संस्थापक व कोल्हापूर दरबारचे प्रसिद्ध गायक (जन्म: १० ऑगस्ट १८५५) ● १९४५ : गणेश दामोदर तथा ‘बाबाराव’ सावरकर – कट्टर हिंदुत्त्ववादी आणि ’अभिनव भारत’ संघटनेचे संस्थापक (जन्म: १३ जून १८७९) *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *मुंबई : करोनाचा फैलाव रोखण्यासाठी सरकारने राज्यातील सिनेमागृहे, म्युझियम व नाट्यगृहे बंद ठेवण्याचा आदेश दिल्याची माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रविवारी दिली* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *औरंगाबाद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादच्या अन्न-औषध प्रशासनाची मोठी कारवाई, 50 लाखांचं बनावट सॅनिटायझर जप्त* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *मुंबईच्या कमाल तापमानात आता वाढ; पारा ३७ अंशावर, राज्याचा विचार करता येत्या २४ ते २८ तासांत उत्तर कोकणासह मुंबईचे कमाल तापमान ३६ ते ३८ अंशाच्या घरात नोंदविण्यात येईल* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *मुंबई : राज्यात कोरोना व्हायरसचे रुग्ण आढळल्यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. आतापर्यंत राज्यात कोरोनाचे 32 जण रुग्ण सापडले आहेत. यावेळी खबरदारीसाठी MPSCच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा सूचना राज्य सरकारकडून देण्यात आल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *मुंबई: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत जमावबंदी; पोलीस खात्याने घेतला महत्त्वाचा निर्णय* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *मुंबईः १९५६च्या दीक्षासोहळ्याप्रसंगी माजी उपमहापौर व डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे सचिव सदानंद फुलझेले यांचे काल झाले निधन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *आयपीएल चे 13 वे सीझन लांबणीवर, 15 एप्रिलपासून सुरू होण्याची शक्यता* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃  *काव्यांगण - रोज एक बालकविता* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *माझा दोस्त* - विठ्ठल जाधव, शिरूर कासार जि. बीड 9421442995 संगणक माझा दोस्त मज ज्ञान देतो मस्त माउस खेळतो खेळ क्लीकने लावतो मेळ स्क्रिनवर दिसे कुत्रा सरचिंग करतो मित्रा करतो पेंटिंग भारी मजाच करतो सारी आता करीन शॉपिंग राहीन फुल्ल चार्जिंग जाऊ या का चंद्रावर मित्रा घेऊन बरोबर *सौजन्य :- जि. प. प्रा. कन्या शाळा धर्माबाद* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *" दृष्टिकोन हा मनाचा आरसा आहे, तो नेहमी विचारच परावर्तीत करतो "* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *नारळाचा मूळ देश कोणत्या देशाला मानले जाते ?* इंडोनेशिया 2) *'महाराष्ट्राचे मँचेस्टर' असे कोणत्या शहराला म्हटले जाते ?* इचलकरंजी 3) *कोणता पक्षी उलट्या दिशेने चालू शकतो ?* इमू 4) *पाण्याबाहेर जगू शकणारा मासा कोणता ?* ईल 5) *'विधवा विवाह कायद्याचे जनक' कोणाला म्हटले जाते ?* ईश्वरचंद्र विद्यासागर *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤  प्रा. डॉ. सुरेश तेलंग,      यशवंत महाविद्यालय, नांदेड 👤 अँड. कैलाश देशमुख गोरठेकर, उमरी 👤 अनिलकुमार जैस्वाल, कुपटी, माहूर 👤 अनिल कांबळे, लोहा 👤 कैलास एम. राखेवार, नांदेड 👤 शिवराज उर्फ बबलू भुसेवार, नांदेड 👤 शिवम भंडारे, येवती *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *माणूस कशासाठी काय कमावतो आहे, अन् नेमकं मोलाचं काय गमावून बसतो आहे; काहीच कळेनासं झालयं. आईबापाला म्हातारपणाची काठी म्हणून मुलगा हवा. मुलाला मेलेल्या आईची पेन्शन हवी; म्हणून मेल्यानंतरही अंगठ्यापुरती आई ठेवतो तो जिवंत. आईबापाचं घर हवं म्हणून मुलगा आई वडिलांना नारळपाण्यात विष देऊन मारतो. आईबापांच्या अंत्यसंस्कारासाठी वेळ नाहीय पोरांकडे. म्हणजे नेमकं काय करताहेत ही मुलं? देशाला महासत्ता बनवण्याच्या कार्यात गुंतली की काय? तर तसंही म्हणता येत नाही. एवढीशी निरागस मुलं आत्महत्या करताहेत. त्यांना एवढ्यात कोणी कंटाळून सोडलय?* *पालकांना हवे आहेत आपल्या मुलाला सगळ्या विषयात आऊट ऑफ मार्क. आई सारखा आभ्यासाचा लकडा पाठीमागे लावते म्हणून तिची हत्या करून मुलगा फरार होतो. त्याला कुठला अभ्यास कयायचा आहे माहीत नाही. आताची पिढी वरकरणी आहे खूप स्मार्ट पण मूल्यांचा तपास घ्यायला जाल, तर भेदरवून सोडल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही आता या मुलांना देऊ शकत नाही निबंध लिहिण्याची सूचना. ते एक अवाक्षरही कागदावर कोरणार नाही. त्यांनी निबंध लिहू नये हेच बरे! यास देशकालपरिस्थीती जितकी कारणीभूत आहे तितके आपणही , सगळ्यांनीच हिरावून घेतलेत निबंधाचे हळुवार कल्पकविषय आजच्या पिढीकडून.* *॥ रामकृष्णहरी ॥* 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺 *श्री संजय नलावडे, मुंबई* *मोबाईल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• सुप्रभात मित्रांनो, अवतार सिनेमातील एक गाणे आठवा, जिंदगी ये कैसी है,जैसे जियो वैसी है । त्यात राजेश खन्नानी जिंदगी जगण्याचे खूप छान मंत्र दिले आहेत. जीवनाचे गीत हे विविध चांगल्या छंदानी सजविले पाहिजे.आज युवापिढीला एका चांगल्या वाटाड्याची गरज आहे.उत्तम आदर्श त्यांच्यासमोर उभे करणे गरजेचे आहे. यशाची,संघर्षाची नशा त्यांना चढवेल अशा मद्याची मैफल त्याच्याभोवती पाहिजे. अनेक उच्चपदस्थ, उच्चभ्रू म्हणवले जाणारे प्रतिष्ठीत सुर्यास्ताबरोबर स्वत:ला काचेच्या पेल्यात बुडवतात. तरूण मुला-मुलींपुढे कुठले आदर्श आपण ठेवणार आहोत ? कोवळी, मिसरूड फुटलेली मुलं अलिकडे व्यसनांच्या आहारी जात आहेत. त्यांना कुणीतरी थांबवलं पाहिजे. त्यांची शक्ती विधायक कार्यासाठी संघटित व्हायला हवी. जगाची दारं आज त्यांच्यासाठी खुली आहेत. त्यांनी त्या दारापर्यंत पोहोचायला हवं. खरं म्हणजे आनंद-दु:ख, यश-अपयश व्यक्त करण्याची अनेक माध्यमं आहेत. मदिराप्राशन, हे माध्यम उचित ठरू शकत नाही. प्रत्येकानं मात्र आवडीचा छंद जोपासण्याची धुंदी चढू द्यावी. श्रमण्यातून मिळालेल्या यशाचा कैफ काही औरच असतो. दुस-याच्या दु:खानं गुंगी जरूर यावी नि, ती सोडविण्याचा अंमलही असावा. प्रेमाचा वर्षाव करत झिंगावं त्यानं आप्त-मित्रांसह, आणि जगण्याची खरी... नशा.. चढू द्यावी...! अशोक कुमावत, नाशिक (राष्ट्रपती पुरस्कार विजेते) 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• दैनंदिन जीवनात नाना प्रकारची माणसे सहवासात येतात.त्यापैकी काही माणसांचा सहवास नित्य हवासा वाटतो कारण त्यांच्याकडून काही ना काही आपल्याला शिकायला मिळते. ते उदार अंतःकरणाने कशाचीही अपेक्षा न करता देत असतात.ते कधीही गर्वाने किंवा कसल्याही अपेक्षेने कार्य करत नाही. ते स्वत:ही शांत आणि संयमी वृत्तीने वागत असल्याने जणू विशाल सागराप्रमाणेच रहाणे पसंत करतात.प्रत्यक्ष जीवनात इतरांनाही घेऊन चालतात.अशांचा सहवास लाभणे म्हणजे एक भाग्यच असावे लागते. तर काही माणसे अशी भेटतात की,त्यांचा सहवास नकोसा वाटतो.त्याचे कारणही तसेच असते. सतत काही ना काही काम नसताना निरर्थक बोलणारी,मी म्हणजेच सारे काही म्हणणारी अहंकाराने भरलेली,जे काही चालते ते माझ्यामुळेच अशी म्हणणारी, अशा माणसांचा स्वभाव म्हणजे एखाद्या उथळ पाण्यासारखा खळखळणारा असतो तो काही काळ खळखळ वाहतो आणि नंतर आवाज बंद होतो. अशा माणसांकडून काय अपेक्षा करणार आणि त्यांचा कोणता गुण घेणार असा प्रश्न उपस्थित राहतो.अशांचा सहवास आपल्या जीवनात कधीकधी घातक होऊ शकत़ो. म्हणून आपल्या जीवनाचे खरेच सार्थक करुन घ्यायचे असेल तर योग्य विचार करुनच योग्य सहवासाची निवड करावी व आपले जीवन चांगल्या पध्दतीने जगावे. © व्यंकटेश काटकर, नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *देतो तो देव* ही गोष्ट आहे विनोबा भावे यांची. विनोबाजी ना आई विनू म्हणायची, विष्णूच्या घरामागील परसामध्ये आंब्याची, फणसाची झाडे होती. झाडावरचा पिकलेला फणस काढून आईने कापला. त्यातील रसाळ गरे काढले. वेगवेगळ्या द्रोणांमध्ये भरून ठेवले. विनू पाहतच होता. रसाळ गऱ्यांचा पहिला द्रोन आपल्यालाच मिळणार याची त्याला खात्री होती. पण आईने त्यातले दोन द्रोन विनू च्या हातात दिले व शेजार्‍यांकडे पोहोचविण्यास सांगितले. विनूने दोन्ही घरी द्रोन नेऊन दिले. पण तो नाराज होऊन म्हणाला, " आपल्याच घरचे फळ नीआपल्याला मात्र सगळ्यात शेवटी." आई हसली आणि म्हणाली, " अरे आपल्या जवळ जे असतना त्या अगोदर इतरांना द्यावे आणि मग आपण घ्यावं. इतरांना विसरून आपण एकट्यानेच घेणे हे बरोबर नाही. लक्षात ठेव देतो तो देव आणि राखतो तो राक्षस. देणे हा देवाचा उत्तम गुण आणि फक्त स्वतःसाठीच राखून ठेवणे हा राक्षसांचा दुर्गुण आहे. आता तूच ठरव तुला देव व्हायचं आहे, की राक्षस? " विनू ची समजूत पटली. त्याने आनंदाने गरे खायला सुरुवात केली. तात्पर्यः स्वतःसाठी तर सर्वजण जगतात परंतु इतरांसाठी ही जगून पहावं. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment