✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00          ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 04/03/2020 वार - बुधवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    *औद्योगिक सुरक्षा दिवस* 💥 ठळक घडामोडी :-  ● १८६१ : अब्राहम लिंकन अमेरिकेचे १६ वे अध्यक्ष झाले ● १९६१ : भारतीय नौदलात १ ले विमानवाहू जहाज ‘विक्रांत’ दाखल झाले. ● १९८४ : महाराष्ट्रात वीजनिर्मितीचा नवा विक्रम याच दिवशी झाला. ● १९५१ : आशियायी सामन्यास प्रारंभ झाला. ● १९३० - दांडीयात्रेच्या सफलतेने प्रभावित भारतातील ब्रिटीश व्हाइसरॉय एडवर्ड फ्रेडरिक लिंडली वूड व महात्मा गांधींच्यात बैठक. भारतात देशी मिठाचा मुक्त वापर करू देण्याचा सरकारचा निर्णय तसेच दांडीयात्रेदरम्यान पकडललेल्या राजकैद्यांची मुक्तता करण्याचे आश्वासन. 💥 जन्म :- ● १९२२ - दीना पाठक, गुजराती व हिंदी अभिनेत्री. 💥 मृत्यू :- ● १९७१ : कोकणचे गांधी आप्पासाहेब पटवर्धन. ● २००७ : सुनील कुमार महातो, भारतीय संसदसदस्य. ● २०११ : अर्जुन सिंग, भारतीय राजकारणी. ● १९४८ : बाळकृष्ण शिवराम मुंजे, भारतीय-मराठी राजकारणी, हिंदू महासभेचे संस्थापक. ● ११८१ : टोरिन थॅचर, भारतीय अभिनेता. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *भारतात कोरोनाचा धोका वाढला, कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या सहावर, प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारचे शर्थीचे प्रयत्न, नाशिकमध्ये आढळलेल्या दुसऱ्या संशयितावर उपचार सुरु* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *मुस्लिम आरक्षणावरुन ठाकरे सरकारमध्ये दुमत, अध्यादेश काढणार असल्याचा मंत्री नवाब मलिकांचा दावा तर अद्याप निर्णय नसल्याचं मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *कर्जमाफीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर, आतापर्यंत 7 लाखांहून अधिक कर्जखात्यात 4 हजार 807 कोटींची रक्कम जमा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची माहिती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सर्वोच्च न्यायालयाचा दणका, निवडणूक प्रतिज्ञापत्र प्रकरणी पुनर्विचार याचिका फेटाळली* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *कालपासून दहावीच्या परीक्षेला प्रारंभ, जळगावात दहावीचा मराठीचा पेपर फुटला, परीक्षेत कॉपी बहाद्दरांचा सुळसुळाट, यवतमाळमध्ये भिंतीवर चढून कॉपी देण्यासाठी धडपड तर बीडमध्ये कॉपी पुरवण्यासाठी जीव धोक्यात* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *पुणेकरांना सार्वजनिक वाहतूकीकडे आकर्षित करण्यासाठी महापालिकेनं आणखी एक योजना आणलीय. PMPL बस मध्ये दहा रुपयात दिवसभर प्रवासाचा पास मिळणार, महापालिकेच्या वार्षिक अंदाजपत्रकात त्याची घोषणा करण्यात आलीये. * ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *शंभर युनिट पर्यंत वीज मोफत देणे तसेच शेतकऱ्यांना दिवसा देखील चार तास वीज देण्याचे प्रस्तावित आहे, असे उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी विधान परिषदेत सांगितले.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *शालांत परीक्षार्थींना शुभेच्छा* https://shopizen.page.link/ECzKbpKWAgvE6wio8 लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃  *काव्यांगण - रोज एक बालकविता* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मी अंधाराला घाबरत नाही* - बालाजी मदन इंगळे, औरंगाबाद 9881823833. गच्च काळोख सगळीकडे किर्रर्रर्र करती रातकिडे चालताना मी चाचरत नाही || मी अंधाराला घाबरत नाही… भुंकणे कुत्र्यांचे सुरू होते भूत गोष्टीतले समोर दिसते तरी छाती धडधडत नाही || मी अंधाराला घाबरत नाही… सारे दोस्त लपून बसतात घरामध्ये दडून बसतात मी बिनधास्त फिरत राही || मी अंधाराला घाबरत नाही… अंधार म्हणजे पृथ्वीची सावली त्यात आलीय भिती कसली मी भिऊन घरी बसत नाही || मी अंधाराला घाबरत नाही… *सौजन्य :- जि. प. प्रा. कन्या शाळा धर्माबाद* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *" कोणालाही नेहमीच दुःख होत नाही आणि कोणालाही नेहमीच सुख ही मिळत नाही "* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *आहाराचे मोजमाप कोणत्या एककात होते ?* कॅलरी 2) *भगवान बुद्धाचे निर्वाण स्थळ कोणते ?* कुशीनगर 3) *आग विझविण्यासाठी वापरला जाणारा वायू कोणता ?* CO2 4) *पृथ्वीच्या जागतिक तापमान वाढीस कारणीभूत असलेला वायू कोणता ?* CO2 5) *उष्णता मोजण्याचे एकक कोणते ?* कॅलरी *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 मारोती छपरे, माध्य. शिक्षक 👤 मजहर सौदागर, सहशिक्षक  👤 साहेबराव पहिलवान, धर्माबाद 👤 अनिल गडाख  👤 ज्ञानेश्वर नाटकर 👤 कृष्णा सुधीर बुधावले 👤 गणेश राजपुरे 👤 राहुल जाधव 👤 कैवल्य धनराज पवार *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *खूप हवे आहे. खूप गोष्टींचा हव्यास आहे. नाव पाहिजे. सन्मान पाहिजे. संपत्तीही हवीच आहे. समजा हे सर्व मिळाले तर त्यापेक्षा अधिक हवे आहे. पाहिजे ते मिळाले नाही तर स्वभाविकपणे निराशा आहे. मिळाले त्यापेक्षा अधिक मिळायला हवे होते. ते मिळाले नाही म्हणूनही निराशा आहे. अशा अवस्थेत,'ये सब मोह है, माया है' असे कोणी सांगतो. त्यातही दिलासा असतो. अखंड धडपड केल्यानंतरही कोल्ह्याला द्राक्ष मिळत नाहीत. त्याला कमालीची निराशा येते. त्या निराशेतून मुक्त होण्यासाठी मग तो त्या द्राक्षांनाच आंबट ठरवून मोकळा होतो. जे मिळत नाही ते 'आंबट' ठरवून मोकळे होणे काय किंवा त्याला 'मोह है, माया है' म्हणत बाद ठरविणे काय दोन्ही निराशेवर मात करण्यासाठी तेवढेच उपयोगी असतात.* *अशा ताणाच्या, निराशेच्या वेळी थोडासा 'भ्रम' किंवा थोडीशी 'भूल' माणसांना हवी असते का? ती 'देव' आणि 'धर्म' यातून मिळते का? म्हणून देवधर्माचे व्यापारी नाडवणूक, शोषण करतात. हे उघड सत्य आहे. धर्म ही 'अफूची गोळी' आहे, असे मार्क्स म्हणतो. ऑपरेशनची वेदना नको म्हणून त्या दरम्यान भूल दिली जाते. तेवढ्यापुरत्या का होईना वेदना सुसह्य होतात. 'जगणे ते मरणे' या दरम्यानच्या आयुष्याचे जे ऑपरेशन होत असते. त्यासाठी तर 'देव' आणि 'धर्म' या कल्पनांची आवश्यकता नसेल.* *॥ रामकृष्णहरी ॥* 🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁 *श्री संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• मित्रांनो सांगू तरी कसे मी भय कोवळे उन्हाचे, उसवून श्वास माझा, फसवून रात गेली. पिवळे तांबूस ऊन कोवळे पसरे चौफेर, उठी उठी गोपाळा, अरुणोदय झाला, ही सकाळची,पहाटेची गाणी ऐकली की जीवनात पुन्हा खोलवर जाऊन यथेच्छ डुबाव वाटत. सुंदर सकाळ पुन्हा उगवल्याच्या आनंदाने असंख्य पक्ष्यांचा मंजुळ प्रभातराग वातावरणाला संगीतसाज चढवतो आहे. निरभ्र, निळ्याशार आभाळाच्या क्षितिजाशेजारच्या टोकावर धुक्याच्या पांढुरक्या रेघेने सीमारेख आखली आहे. पूर्वेकडचं तांबुडकं हळूहळू रूपेरी झाक घेऊ लागलंय आणि डोंगरांच्या निळ्या रांगा आपल्या मूळ रंगानिशी जाग्या होऊ लागल्या आहेत... ही वेळ मोठी वेगळीच असते. खरं तर ही जीवनासाठी घेऊन येणारा नवा दिवस साजरा करण्याची वेळ! पण त्या साजरेपणासाठी वेळ काढण्याएवढा निवांतपणा सगळ्यांकडे नसतो. आपण ज्याला ‘जागं होणं’ म्हणतो, ज्या किलबिलाटाला संगीत वगैरे म्हणतो, ते सारं, खरं म्हणजे नव्या दिवसासाठी जगण्याच्या धडपडीचीच एक सुरुवात असते. ती जाणीव मनाला शिवू न देता बाजूला ठेवून आपण त्याकडे पाहतो, म्हणून तीदेखील आपल्याला सुरम्य वगैरे वाटत असते... म्हणूनच, जगण्यासाठीचं ‘जीवन’ शोधण्यासाठी अज्ञाताच्या भरवशावर पिल्लांना फांदीवरच्या घरट्यात सोडून आकाशात भरारी घेणारी बगळ्यांची रांग पाहून आपल्याला आनंद होतो, कविताही सुचतात... पण या रांगेतल्या प्रत्येकाच्याच मनात, लवकरात लवकर अन्न शोधून पिल्लांच्या चोचीत घास भरविण्यासाठी घरी परतण्याचीच आस असते. झाडांच्या पानापानाआड किलबिलाट करून, मंजुळ स्वरात गाण्याचे आलाप आळवणारी चिमणी पाखरं, काही सदान् कदा केवळ प्रणयगीतेच गात बागडत नसतात... या सुरांनी जेव्हा आपल्या कानांना सुखाची आणि आनंदाची अनुभूती येते, तेव्हा त्यांच्या नजरा आणि चोची मात्र जगण्याचं आणि पिल्लांना जगविण्याचं साधन असलेल्या अन्नाच्या शोधातच भिरभिरत असतात! . आत्ता, क्षणापूर्वी, आभाळातून, अशीच एक बगळ्यांची माळ फुलली, बघता बघता क्षितिजावरच्या त्या पांढुरक्या रेषेत विरघळून गेली. तिथे बहुधा, पाणवठा असावा... आता ती माळ जमिनीवर मात्र अस्ताव्यस्त विसावेल. बकध्यान सुरू होईल... ...आणि पाण्यातले मासे, भयभरल्या नजरांनी पाण्यापलीकडे पाहत, स्वत:स वाचविण्याची पळापळ सुरू करतील! उजाडलेल्या नव्या दिवसाची संध्याकाळ पाहावयास मिळेल की नाही या भयाने!... सकाळ ही अशीच असते! नेहमीच! कुणी जगण्याचा आनंद साजरा करू लागतो, तेव्हा दुसरा कुणी जेमतेम जगण्याची धडपड सुरू करत असतो! तरीही आपण मात्र एकमेकांना म्हणतो, ‘शुभ सकाळ’! कारण आपण नेहमीच पहिल्या वर्गात स्वत:ला पाहत असतो! जगण्याचा आनंद साजरा करणाऱ्या वर्गात!... अशोक कुमावत (राष्ट्रपती पुरस्कार विजेते) 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• एखाद्या मंदिरात जाऊन देवाला फुलांचा हार घालून प्रसाद म्हणून नारळ फोडण्यापेक्षा एखाद्या वाचनालयासाठी हार नारळासाठी लागणा-या पैशापेक्षा त्याच पैशातून एखादे पुस्तक घेऊन वाचकांसाठी वाचनालयास भेट दिली तर चारजण वाचण्यासाठी प्रवृत्त होतील आणि ज्ञान घेतील की,ज्यामुळे चांगले जीवन जगण्यासाठी त्यांना प्रेरणा मिळेल. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद..९४२१८३९५९०. 📓📚📓📚📓📚📓📚📓 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आत्मपरीक्षणाची गरज* एक दिवस नेहमीप्रमाणे ऑफीसमध्ये आलेला प्रत्येक कर्मचारी समोरच्या बोर्ड वाचून आश्चर्य चकित होत होता. " तुमची प्रगती रोखणाऱ्या व्यक्तीचा काल मृत्यु झाला आहे, त्याच्या अंतयात्रेत नक्की सामिल व्हा. " सुरवातीला प्रत्येकाला कुठल्या न कुठल्या सहकाऱ्या बद्दल वाईट वाटल.पण नंतर उत्सुकता वाढली, माझी प्रगती रोखणारा नक्की कोण???? यासाठी प्रत्येकजण,शवपेटीच्या जवळ जाऊ,लागला. शवपेटीत डोकावून बघताच प्रत्येकाचे डोळे विस्फरले, शरीर स्तब्ध झाले, तोंडातून शब्द फुटेना. कारण शवपेटीत एक मोठा आरसा ठेवला होता. प्रत्येकजण त्यात स्वतःला बघत होता. शवपेटीच्या जवळच एक बोर्ड ठेवला होता, "या जगात तुम्हाला जर कोणी प्रगती पासून रोखु शकतो तर तो फक्त अन फक्त तुम्ही स्वतः" कंटाळा, आळस, नाकर्तेपणा, कारणे सांगणे, प्रत्येक गोष्टीमधून पळवाट काढणे हे फक्त तुम्ही फक्त स्वतःसाठी करत असता. तुमच आयुष्य कधीही मित्र, कंपनी, जॉब, बॉस बदलल्यामुळे बदलत नाही. ते बदलते फक्त आणि फक्त तुम्ही बदलता तेव्हाच.आयुष्याच्या शेवटापर्यंत दुसऱ्याला कितीही दोष दिला तरी तुमची परिस्थिती बदलणाार नाही. दुसऱ्याच्या आड़ तुमचा नाकर्तेपणा किती दिवस झाकाल? तुम्ही तेव्हाच मोठे होवू शकता; जेव्हा तुम्ही स्वतः मोठे व्हायचं ठरवाल.त्यासाठी तुम्हाला स्वतःला कष्ट,मेहनत, परिश्रम घेण्याची तयारी ठेवावी लागेल. अन्यथा या जन्मात तुम्हाला मोठे करणे कुणालाही शक्य नाही. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

1 comment:

  1. आत्मपरीक्षणाची गरज हि संकल्पना खुप छान मांडली आहे.

    ReplyDelete