✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00          ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 11/03/2020 वार - बुधवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *उन्हाळ्यात घेऊ या काळजी* http://nasayeotikar.blogspot.com/2019/03/blog-post_26.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    💥 ठळक घडामोडी :-  ● २००७ - २००७च्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचे उद्घाटन. ● २०११ - जपानजवळ समुद्रात रिश्टर मापनपद्धतीनुसार ८.९ तीव्रतेचा भूकंप. यात आणि यानंतरच्या त्सुनामीमध्ये शेकडो ठार. ● १८८६ पहिली भारतीय महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांना डॉक्टर ही पदवी मिळाली .भारतातील पहिली महिला डॉक्टर होण्याचा मान मिळवणाऱ्या डॉ. आनंदीबाई जोशी यांना फ़िलाडेफ़िल्या विद्यापीठाची एस.डी. ही पदवी बहाल करण्यात आली ● २००१ : बॅडमिंटनपटू पी. गोपीचंदने तब्बल एकवीस वर्षानी ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद भारतास मिळवून दिले. या आधी प्रकाश पदुकोण यांनी ते मिळवले होते. ● २००१ : कसोटी क्रिकेटमधे हॅटट्रिक घेणारा हरभजनसिंग हा पहिला भारतीय गोलंदाज बनला. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ही कामगिरी केली. ● १९९३ : उडिया कवी व साहित्यिक रमाकांत रथ यांना उपराष्ट्रपती के. आर. नारायणन यांच्या हस्ते ‘सरस्वती सन्मान’ पुरस्कार प्रदान. ● १८१८ : इंग्रज फौजांनी पुरंदरला वेढा घातला. 💥 जन्म :- ● १९८५ : अजंता मेंडिस – श्रीलंकेचा गोलंदाज ● १९१६ : हॅरॉल्ड विल्सन – इंग्लंडचे पंतप्रधान (मृत्यू: २४ मे १९९५) ● १९१५ : विजय हजारे – क्रिकेटपटू (मृत्यू: १८ डिसेंबर २००४) ● १९१२ : शं. गो. साठे – नाटककार ● १९८२ - हसन रझा, क्रिकेटपटू, वयाच्या १४व्या वर्षी कसोटीपटू झाला. 💥 मृत्यू :- ● १६८९: औरंगजेबाच्या कैदेमध्ये असलेल्या संभाजीराजांची अतिशय हालहाल करुन हत्या करण्यात आली. ● पेनिसिलीनचे शोधक सर फ्लेमिंग पुण्यतिथी. ● २००६ : स्लोबोदान मिलोसोव्हिच – सर्बिया व युगोस्लाव्हियाचे अध्यक्ष (जन्म: २० ऑगस्ट १९४१) ● १९९३ : शाहू मोडक – हिन्दी व मराठी चित्रपट अभिनेते, (संत ज्ञानेश्वर, माझा मुलगा, माणूस, त्यांनी [जन्माने ख्रिश्चन असूनही] २९ चित्रपटांत कृष्णाची भूमिका साकारली) (जन्म: २५ एप्रिल १९१८ – अहमदनगर) ● १९७० : अर्ल स्टॅनले गार्डनर – अमेरिकन लेखक आणि वकील (जन्म: १७ जुलै १८८९) ● १९६५ : गौरीशंकर गोवर्धनराम जोशी तथा ’धूमकेतू’ – गुजराथी कथाकार व कादंबरीकार. त्यांच्या ७ उत्कृष्ट कथांचा संग्रह ’सप्तपर्ण’ या नावाने प्रकाशित झाला आहे. (जन्म: १२ डिसेंबर १८९२) ● १९५५ : अलेक्झांडर फ्लेमिंग – नोबेल पारितोषिक विजेते स्कॉटिश शास्त्रज्ञ (जन्म: ६ ऑगस्ट १८८१) *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *महाराष्ट्रात कोरोनाचा शिरकाव ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज बोलावली महत्त्वाची बैठक* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *मध्यप्रदेशात कमलनाथ सरकार अल्पमतात, 6 मंत्र्यांसह 20 आमदारांचा राजीनामा सुपूर्द तर ज्योतिरादित्य शिंदे यांचा काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा, भाजपाकडून राज्यसभेवर जाण्याची शक्यता* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *राज्यसभेचे उमेदवार निश्चित करण्यासाठी भाजपच्या संसदीय बोर्डाची संध्याकाळी बैठक, उदयनराजे भोसले, रामदास आठवले यांच्यासह तिसरा उमेदवार ठरणार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *पुण्यात कोरोनाचे 2 रुग्ण आढळल्यानं आरोग्य यंत्रणेसह राज्य सरकार सतर्क, सार्वजनिक ठिकाणी गर्दी न करण्याचं विभागीय आयुक्तांचं आवाहन तर नाशिकच्या विपश्यना केंद्रातील शिबीरं अनिश्चित काळासाठी रद्द* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *राज्यभरात धुळवडीचा उत्साह, खासदार नवनीत राणांकडून मेळघाटात होळी साजरी, तर भिवंडीत कोळी बांधवांची 85 वर्षांची पारंपरिक होळी, मुंबईत धुलिवंदनाचा जल्लोष, ठिकठिकाणी होता पोलीस बंदोबस्त* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *अलिबाबा ग्रुपचे जॅक मा बनले आशियातील सर्वात धनाढ्य व्यक्ती ; मुकेश अंबानी आले दुसऱ्या स्थानावर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *मेरी कोमचं टोकियो ऑलिम्पिकचं तिकीट निश्चित; मेरीसह सात भारतीय बॉक्सर्सची ऑलिम्पिकमध्ये धडक* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃  *काव्यांगण - रोज एक बालकविता* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *👫 रविवार 👫* - संदीप ढाकणे, औरंगाबाद 7588512467 खुशीत आला रविवार धमाल घेऊन मजा करू आनंदाने साजरा रविवारला देऊ सजा || कसा झाला उशीर सांग एकदा मला रोज यायचे सोडून आठवडयाने आला || बांधू आता रविवारला जाणार नाही पळून कितीही रडला तरी नाही दयायचे सोडून || कसा आला तावडीत सोडव गाणित आवडीने धडा लिही चार पाने सुट्टी मिळेल सवडीने || नको बसू रडतपडत अभ्यास थोडा करत जा आता देतो सोडून तुला रोज भेटायला येत जा || ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *सौजन्य :- जि. प. प्रा. कन्या शाळा धर्माबाद* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *" पुरुष नावाच्या दगडाला आकार देण्याचं काम स्त्री नावाचं कलाकार करत असतो "* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *देशातील पहिले वैश्विक आण्विक ऊर्जा केंद्र कोठे उभारले जात आहे ?* बहादूरगड 2) *2011 च्या जनगणनेनुसार राज्यातील सर्वाधिक साक्षर जिल्हा कोणता ?* ठाणे 3) *आसाम राज्याचे पूर्वीचे नाव काय होते ?* कामरू 4) *महाराष्ट्रातील लेण्यांचा जिल्हा कोणता ?* औरंगाबाद 5) *'प्रत्येक वस्तू अतिसूक्ष्म कणांनी बनलेली असते' ही संकल्पना कोणी मांडली ?* कणाद ऋषी *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 विठ्ठल फुलारी, पत्रकार 👤 सचिन कावडे, पत्रकार 👤 महेंद्र पाटील 👤 अक्षय चिले 👤 किरण आचारी 👤 वैभव पांढरे 👤 प्रशिल सचिन जाधव 👤 अशोक बाजारे, संचालक भिमाशंकर पतसंस्था 👤 रिया राज गायकवाड 👤 सुयोग योगेश पायघन 👤 रुपाली युवराज सूर्यवंशी *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *अन्याय्य मार्गाने मिळवलेला पैसा स्वत:च्या आणि परिवाराच्या अध:पतनास कारणीभूत होतो. कितीही प्रयत्न केले तरी असला पैसा व्यक्तीला वाममार्गालाच नेतो. अनैतिक वर्तणूकीने काही काळ यशस्वी होत असल्याचा भास निर्माण झाला तरी पापाचे भूत पिच्छा सोडत नाही. पैसा मिळवू नये असे नाही. पैसा हे मानवाचे सहावे इंद्रिय आहे. त्याच्याशिवाय मूळही पाच इंद्रिय काम करणार नाहीत हे खरे आहे. प्रश्न पैसे मिळविण्याचा नाही, किती मिळवायचा हा आहे. जो पैसा मिळविताना माणुसकीची सारी तत्वे पायदळी तुडविली जातात आणि ज्या पैशाचा विनियोग माणसाच्या खरेदी-विक्रीत होतो, त्या पैशाला काय अर्थ आहे?* *ज्याप्रमाणे पैसा औषध विकत घेऊ शकतो; पण आरोग्य विकत घेऊ शकत नाही. पैसा सेवा विकत घेऊ शकला तरी माणूस विकत घेऊ शकत नाही. गैरमार्गाने आलेल्या संपत्तीला गैरमार्गाने जाण्यासाठीच पाय फुटतील ही काळ्या दगडावरची रेघ आहे. शेकडो वर्ष उलटली तरी आपण व्यास, वाल्मिकींना विसरलो नाही. राजघराण्यात जन्मल्यामुळे नव्हे, तर राजघराण्याचा त्याग केल्यामुळे वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांची नावे घेतली जातात. ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम, कबीर यांची नावे प्रात:स्मरणीय झाली आहेत ती त्यांनी सांगितलेल्या माणुसकीच्या धर्मामुळे. आपले नाव जनतेच्या जीभेवर असावे असे वाटणे स्वाभाविक आहे त्यासाठी पैशांबरोबर आत्मियतेची गरज आहे.* ••● *॥ रामकृष्णहरी ॥* ●•• 🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• सुप्रभात हमित्रांनो, लासलगावी एका कवी संमेलनात पाडगावकरांना जवळून ऐकण्याचा, पाहण्याचा योग आला. काल त्यांचा जन्मदिवस त्या निमित्ताने आठवणी जाग्या झाल्या. मी तिला विचारलं, तिनं लाजून होय म्हटलं , सोनेरी गिरक्या घेत, मनात गाणं नाचत सुटलं... तुम्ही म्हणाल, यात विशेष काय घडलं ?त्यालाच कळेल, ज्याचं असं मन जडलं...’किंवा इतुके आलो जवळ जवळ की जवळपणाचे झाले बंधन छेडणार जर होत आपण गीत नवे तर हवेच होते वीणेच्या तारांतून अंतर धुंदपणी त्या अंधपणी त्या भान राहिले नाही हे पण इतुके आलो जवळ जवळ की.....’ किंवा हाती धनुष्य ज्याच्या त्याला कसे कळावे, हृदयात बाण ज्याच्या त्यालाच दु:ख ठावे; तिरपा कटाक्ष भोळा, आम्ही इथे दिवाणे....मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे’ , नाहीतर, मी कुठे म्हणालो परी हवी,पण दिसायला जरा बरी हवी. असं म्हणणारे लोकप्रिय भावकवी मंगेश पाडगावकर . दहा मार्च १९२९ रोजी वेंगुर्ल्यात जन्मलेले मंगेश पाडगावकर हे अतिशय प्रतिभावंत कवी आणि गीतकार म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांच्या आईमुळे त्यांना कवितेची गोडी लागली. त्यांची आई त्यांना केशवसुत, बालकवी, गोविंदाग्रज यांच्या कविता त्यांच्या लहानपणी वाचून दाखवत असे आणि ते बाळकडू मिळालेल्या पाडगावकरांनी वयाच्या सोळाव्या वर्षापासूनच कविता लिहायला सुरुवात केली होती. त्यांच्या कविता मुख्यत्वेकरून प्रेम आणि निसर्ग याविषयीच्या असतात. हळुवार, स्वप्नील भाव त्यांच्या कवितेतून प्रकटतात. एकीकडे निसर्ग आणि प्रेमकविता लिहिणाऱ्या पाडगावकरांनी ‘सलाम’सारखी सामाजिक आणि राजकीय लांगुलचलनावर टीका करणारी कविता लिहिली आणि चक्क मिश्कील, झकास वात्रटिकासुद्धा लिहिल्या. कवितांबरोबरच त्यांनी बोलगाणी, गझल आणि भावगीतं हे प्रांत गाजवले. विंदा करंदीकर आणि वसंत बापट यांच्याबरोबर त्यांचं छान ट्युनिंग जमलं आणि या तिघांनी गावोगावी दौरे करून जवळपास चार दशकं काव्यवाचनाचे कार्यक्रम केले आणि गावोगावच्या लोकांना कवितांचा भरभरून आनंद दिला. त्यांच्या कवितांना एक सुंदर नाद किंवा गेयता असे.  कविता आणि गीतांखेरीज त्यांनी गद्यलेखनही केलं आहे. त्यांनी अनेक इंग्लिश पुस्तकांचे मराठी अनुवाद केले. बायबलसुद्धा मराठीत आणलं. शेक्सपिअरच्या ‘टेम्पिस्ट’ आणि ‘ज्युलियस सीझर’ नाटकांचे अनुवाद केले. कमला सुब्रह्मण्यम यांच्या महाभारत ग्रंथाचं दोन खंडी भाषांतर केलं. काही बालसाहित्यही लिहिलं आणि समीक्षापर लेखनही केलं.  २०१० साली भरलेल्या विश्व साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार, महाराष्ट्रभूषण पुरस्कार आणि पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. ३० डिसेंबर २०१५ रोजी त्यांचं निधन झालं.  अशोक कुमावत, नाशिक (राष्ट्रपती पुरस्कार विजेते) 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• संकटे ही माणसांच्या जीवनात सशाच्या गतीने येतात नि कासवाच्या मंद गतीने हळुहळू जातात.पण त्यामधला जो काळ दुःखाचा आणि वेदना सहन करण्याचा आहे त्याला शांत आणि धैर्याने,हिंमतीने तोंड देऊन विजय मिळवतो तोच जीवनात यशस्वी होतो. - व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद..9421839590. 🍃🌷🍃🌷🍃🌷🍃🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *सिंह आणि चित्ता* जंगलातील राज्यकारभार फार वाढल्यामुळे सिंहाने प्रधान नेमण्यासाठी सभा बोलावली होती, त्याने आलेल्या प्रत्येकाची मुलाखत घेतली आणि कोल्ह्याची नेमणूक केली. सर्वांना ती पसंत पडली. सर्व पशु निघून गेले, चित्ता तेथेच बसून राहिला. सिंहाने त्याला विचारले, “ काय रे ,काय हवे तुला? ” चित्ता म्हणाला, “ महाराज, तुम्ही कोल्ह्याची नेमणूक केली,हे चांगलं नाही केलं. त्याला ना रंग, ना रूप, मी बघा कसा आहे! माझा रंग बघा, माझे डोळे कसे आहेत बघा, माझे शेपूट बघा. माझ्यावर अन्याय झाला आहे .” सिंह म्हणाला, “ तू बोललास ते बरं झालं. मी मुलाखत घेतली, ती प्रधानाच्या पदासाठी. हा बुद्धिमान असावा लागतो. रूप नसलं तरी चालतं, हे तुला समजत नाही. हे तू सिद्ध केलंस. मी हे आधीच ओळखलं, म्हणून तुला नेमलं नाही.” चित्त्याला हे पटले, तो मुकाट्याने तिथून निघून गेला. तात्पर्य: आपली कुवत व बुद्धिमत्ता कितपत आहे, हे समजून आपली चूक मान्य करणे यातच खरे शहाणपण आहे. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment