✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 12 एप्रिल 2024💠 वार - शुक्रवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.saamana.com/article-by-dr-yashawant-suroshe-on-education/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील १०३ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* ••••••••••••••••••••••••••••••••*१९९८:गेल्या शतकातील साठच्या दशकात हरितक्रांती घडवून आणण्यात मोलाची कामगिरी बजावणारे सी. सुब्रम्हण्यम यांना ’भारतरत्‍न’ हा सर्वोच्‍च नागरी सन्मान प्रदान**१९९७:पंतप्रधान एच.डी.देवेगौडा यांनी राजीनामा दिला.**१९९७:पूर्व प्राथमिक प्रवेशाकरता पाल्य अथवा पालकांच्या मुलाखती घेण्यास मनाई करण्याची तरतूद असणारे विधेयक विधानसभेत मंजूर**१९६७:कैलाश नाथ वांछू यांनी भारताचे १० वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला**१९६१:रशियाचा युरी गागारिन हा अंतराळात भ्रमण करणारा पहिला मानव बनला. त्याने अंतराळात १०८ मिनिटे भ्रमण करुन पृथ्वीप्रदक्षिणा केली**१९४५:अमेरिकेचे अध्यक्ष फ्रँकलिन डी. रुझव्हेल्ट यांचे कार्यालयात असतानाच निधन झाले.**१६०६:ग्रेट ब्रिटनने ’यूनियन जॅक’ला राष्ट्रीय ध्वज म्हणून मान्यता दिली.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••*१९८२:रेवती राहुल जोशी--पत्रकार,लेखिका, संपादिका* *१९७५:डॉ.सच्चिदानंद शंकर बिचेवार -- लेखक* *१९७५:आसाराम लोमटे -- लेखक* *१९७२:रवी वसंत सोनार-- कवी,लेखक गीतकार**१९६७:प्रा.डॉ.मनोहर नाईक -- कवी,लेखक**१९६४:प्रकाश दिनकर सकुंडे-- कवी* *१९६१:शशिकांत हिंगोणेकर-- सुप्रसिद्ध कवी,निवृत्त शिक्षण उपसंचालक**१९५८:चरणदास वैरागडे -- कवी* *१९५६:रामचंद्र अनंत देखणे--कथाकार, कादंबरीकार,लोककलांचे अभ्यासक(मृत्यू:२६ सप्टेंबर २०२२)**१९५४:विनय नारायणराव मिरासे(अशांत) -- प्रसिद्ध कवी,लेखक* *१९५४:सफदर हश्मी – मार्क्सवादी विचारसरणीचे पथनाट्यकार,लेखक, दिगदर्शक,कवि आणि गीतकार (मृत्यू:२ जानेवारी १९८९)**१९५०:विजयेंद्र घाटगे-- हिंदी चित्रपट आणि भारतीय दूरचित्रवाणी अभिनेते**१९४९:छाया महाजन-- मराठीतील प्रसिद्ध साहित्यिक* *१९४९:सुभाष त्र्यंबक अवचट-- चित्रकार, लेखक,कवी**१९४५:डॉ यशवंत शंकर साधू-- संत साहित्यांचे अभ्यासक (मृत्यू:१४ एप्रिल २०२०)**१९४३:सुमित्रा महाजन –भारतीय जनता पक्षाच्या मध्य प्रदेशमधील वरिष्ठ नेत्या पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित**१९४२:सुनीती जयंत आफळे -- कथाकार**१९३८:गुलशन बावरा(मेहरा)-- चित्रपट गीतकार(मृत्यू:७ ऑगस्ट२००९)**१९३२:लक्ष्मण कादिरमगार – श्रीलंकेचे परराष्ट्रमंत्री,मुत्सद्दी,वकील व तामिळ नेते (मृत्यू: १२ ऑगस्ट २००५)**१९२०:शैलजा प्रसन्नकुमार राजे--कथाकार, कादंबरीकार,चरित्रकार(मृत्यू:१६ ऑक्टोबर २००६)**१९१७:विनू मांकड – सलामीचे फलंदाज व डावखुरे मंदगती गोलंदाज (मृत्यू:२१ ऑगस्ट १९७८)**१९१४:कॄष्ण गंगाधर दिक्षीत ऊर्फ कवी संजीव – चित्रपटासाठी कथा,संवाद व गीतलेखन करणारे.(मृत्यू:२८ फेब्रुवारी १९९५)**१९१०:पुरुषोत्तम भास्कर तथा पु. भा. भावे – अष्टपैलू आणि प्रतिभासंपन्न साहित्यिक (मृत्यू:१३ ऑगस्ट १९८०)**१८७१:वासुदेव गोविंद आपटे – लेखक, भाषांतरकार,पत्रकार,संपादक,अनुवादक, निबंधकार व कोशकार (मृत्यू:२ फेब्रुवारी १९३०)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२०१४:शरद् पाटील--महाराष्ट्रातील एक विख्यात प्राच्यविद्यापंडित व सत्यशोधक मार्क्सवादी विचारवंत.(जन्म:१७ सप्टेंबर १९२५)* *२०११:सचिन भौमिक-- हिंदी चित्रपटांचे पटकथा लेखक(जन्म:१७ जुलै १९३०)* *२००६:राजकुमार – कन्नड चित्रपट अभिनेता व गायक (जन्म:२४ एप्रिल १९२९)**२००१:देवांग मेहता-- भारताच्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील एक अग्रणी व्यक्तिमत्त्व आणि नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर अँड सर्विस कंपनीजचे अध्यक्ष(जन्म:१० ऑगस्ट१९६०)**१९७७:भानुदास बळिराम शिरधनकर ऊर्फ भानू शिरधनकर-- मराठी लेखक(जन्म:१६ ऑक्टोबर १९१५)**१९४५:फ्रँकलिन डी. रुझव्हेल्ट – अमेरिकेचे ३२ वे राष्ट्राध्यक्ष (जन्म:३० जानेवारी १८८२)**१९०६:महामहोपाध्याय पण्डित महेशचंद्र ’न्यायरत्‍न’ भट्टाचार्य (जन्म:२२ फेब्रुवारी१८३६)**१८१७:चार्ल्स मेसिअर – फ्रेन्च खगोलशास्त्रज्ञ (जन्म:२६ जून १७३०)**१७२०:बाळाजी विश्वनाथ भट तथा पहिला पेशवा (जन्म:१ जानेवारी १६६२)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••दैनिक सामना मधील अग्रलेख*कृत्रिम बुद्धिमता आणि प्राथमिक शिक्षण*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *आगामी लोकसभा निवडणूक ही विकसित भारताच्या संकल्पाला नवी ऊर्जा देणारी ठरेल पंतप्रधान नरेंद्र मोदी*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *ही निवडणूक नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठीच होईल; केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा नांदेडमध्ये पुनरुच्चार*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ दादा पाटील हातकणंगलेतून निवडणूक लढवणार.*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *बेरोजगारी, शेतीमालाचा भाव आणि औद्योगिक वाढ या मूलभूत प्रश्नांना गृहीत धरूनच प्रचार - शशिकांत शिंदे*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *काँग्रेसच्या आयटी सेलचे मुख्य असलेले रोहन गुप्ता यांचा भाजपामध्ये प्रवेश.*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *यवतमाळमध्ये अवकाळी पावसाचा हाहाकार! वादळीवार्‍यामुळे ५८० घरांचे नुकसान*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *IPL T20 - मुंबई विरुद्ध बंगळुरू सामन्यात मुंबईचा सात विकेटने विजय, जसप्रीत बुमराह, ईशान किशन आणि सुर्यकुमार यादव चमकले*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📕 *डोळे मिटून चालताना तोल का जातो ?* 📕********************काय म्हणता? तुमचा तोल जात नाही? मग करूनच पाहा हा प्रयोग. रूमालाने डोळे बांधा आणि चालायला लागा! काय पडलात का ठेच लागून? डोळे उघडून चालतानाही ठेच लागते, पण ती आपल्या निष्काळजीपणामुळे डोळे मिटल्यानंतर मात्र सर्वांना थोडाफार त्रास होतो. याचे कारण आता पाहू.शरीराचा समतोल राखणे जनावरांना अगदी सोपे असते. कारण त्यांना चार पाय असतात. माणसाला मात्र दोन पायांवर शरीराचा तोल सांभाळावा लागतो. तोल सांभाळता येण्यासाठी लहान मेंदूचे कार्य खूप महत्वाचे असते. सर्कशीत तारेवर चालणारी मुलगी जसा शरीराचा तोल सांभाळत असते, त्याचप्रमाणे आपणही आपल्या नकळत शरीराचा तोल सांभाळत चालत असतो किंवा इतर हालचाली करत असतो. त्यामुळेच पार्किन्सन रोग किंवा सेरेबेलार सिन्ड्रोनसारख्या रोगांमध्ये माणूस नीट चालू शकत नाही. डोळे उघडे असूनही त्याचा तोल जातो. लहान मेंदूखेरीज शरीराच्या हात, पाय, मान या अवयवांच्या सुयोग्य हालचाली देखील तोल सांभाळण्यासाठी आवश्यक असतात.तोल सांभाळण्याच्या प्रक्रियेत डोळ्यांचाही काही प्रमाणात सहभाग असतो. दृष्टीमुळे आपल्याला जगाचे ज्ञान होते. आपण त्यामुळेच आत्मविश्वासाने पावले टाकतो. डोळे बंद केल्यानंतर एक प्रकारची असुरक्षिततेची भावना निर्माण होते. न दिसल्यामुळे अंतराचा, खोलीचाही अंदाज येत नाही. त्यामुळे आपण अडखळत यवकत थवकत चालू लागतो. एक गंमत तुम्ही अनुभवली असलेच.*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एकमेकांची प्रगती साधते तीच खरी मैत्री होय.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील *सितार व तानपुऱ्याला जीआय टॅग* देण्यात आला ?२) जागतिक होमिओपॅथी दिवस - २०२४ ची थीम काय आहे ?३) वाडा ( WADA ) चे full form काय आहे ?४) 'अनर्थ' या शब्दाचे समानार्थी शब्द सांगा.५) ध्वनीची तीव्रता मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात ? *उत्तरे :-* १) सांगली २) संशोधन मजबूत करणे, कार्यक्षमता वाढविणे ३) World Anti - Doping Agency ४) अरिष्ट, संकट ५) ऑडियोमीटर*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 अरुणा कलेपवार, उपक्रमशील शिक्षिका, नांदेड👤 गंगाधर पेंडपवार👤 आकाश वाघमारे👤 बालाजी चुनुपवार, येवती👤 गजानन कुरेवाड👤 मिनाज सय्यद👤 कलीम शेख👤 आसिफ शेख*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *अभंगवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••बहुतांच्या आम्ही न मिळो मतासी । कोणी कैसी कैसी भावनेच्या ॥१॥विचार करितां वांयां जाय काळ । लटिकें तें मूळ फजितीचें ॥२॥तुका म्हणे तुम्ही करा घटापटा । नका जाऊं वाटा आमुचिया ॥३॥।। संत तुकाराम महाराज ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• बोलत्या, चालत्या माणसाच्या मनात जेव्हा स्वार्थ आणि कपटासारखे महाभूत शिरते त्यावेळी मात्र त्या माणसाची जीवन जगण्याची दिशाच बदलून जाते. चांगले काय आणि वाईट काय ओळखण्याची त्याच्यात क्षमता नसते. आणि एकदा ती दिशा बदलली की, नंतर समोरची वाट मिळणे फार कठीण होऊन जाते.म्हणून स्वार्थ आणि कपट यासारख्या भूतांच्या मागे लागून सोन्यासारख्या जीवनाची माती करू नये. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*विद्येची किंमत*एकदा रामकृष्ण परमहंस गंगास्नानासाठी शिष्यासह गंगेवर गेले. त्यावेळी एक सिद्ध पुरुषही तिथे होते. त्यांनी एक चादर पाण्यावर पसरली व त्यावर उभे राहून नदी पार केली, तसेच परत आले व रामकृष्णांच्या एका शिष्याला म्हणाले तुमचे गुरु असा चमत्कार करू शकतील का ? बारा वर्षे तप करून मी ही सिद्धी मिळवली आहे.शिष्याने रामकृष्णांना हे सांगितले ते म्हणाले,” त्यांना सांग तुझा हा चमत्कार दोन आणे किमतीचा आहे.” शिष्याने हा निरोप सिद्ध पुरुषाला सांगितला. तो भलताच भडकला मनाला,” पुन्हा असे म्हणाला तर तुमचे भस्म करून टाकेन.” ‘रामकृष्णाने पुन्हा तसेच म्हटलं तेव्हा प्रत्यक्ष त्यांनाच सिद्ध पुरुषांनी त्याचा अर्थ विचारला रामकृष्ण म्हणाले, ‘नावाडी सुद्धा दोन आण्यात पैलतिराला नेतो. त्याचा इतरांना उपयोग होतो पण तुमची विद्या फक्त तुमच्या पुरतीच आहे. त्या विद्येचा लोकांना उपयोग होत. नाही तिची किंमत शून्य आहे.तात्पर्यः माणसाने आपल्या विद्येचा कर्तृत्वाचा समाजाला उपयोग करून द्यावा.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment