✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 30 एप्रिल 2024💠 वार - मंगळवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.loksatta.com/sampadkiya/editorial/loksatta-editorial-on-d-gukesh-notable-performance-in-candidates-chess-tournament-amy-95-4340702/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_अंतरराष्ट्रीय जॅझ दिवस_* *_ या वर्षातील १२१ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२००९:ख्रायस्लर कंपनीने दिवाळखोरी घोषित केली. (स्थापना:१९२५)**२००७:दिलीप कुमार यांना फाळके रत्न पुरस्कार**१९९६: थेऊर येथील श्री चिंतामणी मंदिराच्या आवारातील श्रीमंत थोरले माधवराव पेशवे यांच्या स्मृ्तिमंदिराचे उद्‍घाटन झाले.**१९९५:ऊत्तर आयर्लंडला भेट देणारे बिल क्लिंटन हे अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष ठरले.**१९७७:९ राज्यांमधील विधानभा बरखास्त. जनसंघ,समाजवादी पक्ष,संघटना कांग्रेस आणि भारतीय लोकदल या पक्षांनी ‘जनता पक्ष‘ स्थापन करण्याचा निर्णय घेतला.**१९३६:वर्ध्याजवळ महात्मा गांधींनी सेवाग्राम आश्रम स्थापन केला.**१७८९:जॉर्ज वॉशिंग्टन हे अमेरिकेचे पहिले निवडलेले राष्ट्राध्यक्ष बनले.**१६५७:शिवाजी महाराजांनीमोगलांच्या ताब्यात असलेल्या जुन्नरवर हल्ला केले* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८७:रोहित शर्मा – प्रसिद्ध क्रिकेटपटू भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार**१९७०:सुवर्णा व्यंकट मुळजकर -- कवयित्री**१९६७:जयंत कमलाकर झामरे -- लेखक**१९६४:इयान अँड्र्यू हीली-- ऑस्ट्रेलियन माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू**१९६१:दिवाकर शेजवळ-- ज्येष्ठ पत्रकार, लेखक**१९५८:अरुण शेवते-- मराठी भाषेतील साहित्यिक,संपादक व प्रकाशक**१९५५:प्रदीप सरकार -- बॉलीवूडमध्ये काम करणारे भारतीय लेखक आणि दिग्दर्शक(मृत्यू:२४ मार्च २०२३)**१९५०:डॉ.ह.ना.जगताप -- शिक्षणतज्ज्ञ, लेखक* *१९५०:प्रा.अर्जुन बळीराम जाधव-- प्रसिद्ध लेखक**१९४८:डॉ.श्रीराम वसंत गीत-- संशोधक, लेखक**१९२६:श्रीनिवास खळे – प्रसिद्ध संगीतकार (मृत्यू:२ सप्टेंबर २०११)**१९२४:रामचंद्र सोवनी --जीवशास्त्रज्ञ,विज्ञान लेखक (मृत्यू:१ मे २००७)**१९१०:श्रीरंगम श्रीनिवास राव ऊर्फ ’श्री श्री’ – साहित्य अकादमी पुरस्कार विजेते तेलगु कवी व गीतकार (मृत्यू:१५ जून १९८३)**१९०९:माणिक बंडोजी इंगळे ऊर्फ ’राष्ट्रसंत तुकडोजी महाराज’(मृत्यू:११ आक्टोबर १९६८)**१८७०:धुंडिराज गोविंद ऊर्फ ’दादासाहेब’ फाळके – भारतीय चित्रपट उद्योगाचे जनक, लेखक,छायाचित्रकार,दिग्दर्शक,संकलक, वेशभूषाकार,कलादिग्दर्शक(मृत्यू:१६ फेब्रुवारी १९४४)**१८४३:रामचंद्र भिकाजी गुंजीकर--- मराठी ग्रंथकार आणि संपादक(मृत्यू:१८ जून १९०१)**१७७७:कार्ल फ्रेड्रिक गाऊस – जर्मन गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ(मृत्यू:२३ फेब्रुवारी १८५५)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२०: ऋषी कपूर- सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेते(जन्म:४ सप्टेंबर १९५२)**२०१२:अचला सचदेव--भारतीय चित्रपट अभिनेत्री(जन्म:३ मे १९२०)**२००३:वसंत पोतदार – मराठी लेखक, कथाकथनकार आणि स्वातंत्र्य चळवळीचे इतिहासकार (जन्म:२० नोव्हेंबर १९३९)**२००१:श्रीपाद अच्युत दाभोळकर – ‘प्रयोग परिवार‘ या संकल्पनेचे प्रवर्तक,गणितज्ञ आणि जमनालाल बजाज पुरस्काराने गौरवण्यात आलेले कृषीशास्त्रज्ञ (जन्म:२१ ऑगस्ट १९२४)**१९४५:नाझी जर्मनीचा हुकूमशहा अ‍ॅडॉल्फ हिटलर याने आत्महत्या केली (जन्म:२० एप्रिल १८८९)**१९१३:मोरो केशव दामले – व्याकरणकार व निबंधकार (जन्म:७ नोव्हेंबर १८६८)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••दैनिक लोकसत्ता अग्रलेख *महाराष्ट्र दीन*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *शासकीय दस्तऐवजांवर आईचे नाव बंधनकारक निर्णयाची अंमलबजावणी एक मे पासून होणार लागू*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *केंद्रीय लोकसेवा आयोगाची पूर्व परीक्षा 25 मे रोजी*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *गडचिरोली-गोंदिया पोलिसांच्या शिरपेचात मानाचा तुरा; प्रजासत्ताक दिनाच्या पथसंचलनात पटकावला राज्यात प्रथम क्रमांक*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *२५ मेपर्यंत बारावीचा तर दहावीचा निकाल ६ जूनपूर्वी जाहीर होण्याची शक्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *नागपूर विमानतळ बॉम्बने उडविणार! प्रशासनाला धमकीचा ई-मेल; सुरक्षेत वाढ, प्रवाशांची कसून तपासणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *लोकसभेच्या तोंडावर भाजपला धक्का, सहा टर्म खासदार, केंद्रीय राज्यमंत्रिपदही भूषवलेलं व्ही श्रीनिवास प्रसाद यांचे निधन*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *IPL T20 - कोलकत्ताने दिल्लीला सात विकेटने हरविले*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌫 *हिमालयाचा जन्म केव्हा झाला ?* 🌫 ************************'उत्तरम् यत्समुद्रस्य । हिमाद्रेश्चैव दक्षिणम् । वर्षं तद् भारतं नाम । भारती यंत्र संतत.' भारतवर्षांची - आपल्या देशाची अशी ओळख सांगितली आहे. म्हणजे सागराच्या उत्तरेस आणि हिमालयाच्या दक्षिणेस असणारा देश. यावरून आपला देश अस्तित्वात आला तेव्हापासून उत्तरेला हिमालयाचा कोट आपलं संरक्षण करत आला आहे अशी आपली समजूत होईल. पण ती बरोबर नाही. कारण हिमालयाचा जन्म आपली भूमी अस्तित्वात आल्यानंतर कितीतरी शतकांनी झाला आहे. किंबहुना धरतीतलावरच्या एकूण उत्तुंग पर्वतांपैकी हिमालय हा सर्वात कमी वयाचा पर्वत आहे.फार फार पूर्वीचं म्हणजे साधारण पृथ्वीचा धगधगता गोळा थंड झाल्यावरचं पृथ्वीचं भौगोलिक रूप फार वेगळं होतं. तिच्या पृष्ठभागापैकी जवळजवळ सारा भाग पाण्यानं व्यापलेला होता. जी काही कमी होती ती आग्नेय कोपऱ्यात म्हणजे आज जिथं साधारणपणे ऑस्ट्रेलिया आहे तिथं एकच एक मुटकुळं करून चुपचाप पडून राहिली होती. तिचं नाव होतं पॅनगाईया. या ग्रीक शब्दाचा अर्थ आहे समस्त भूमी. त्यानंतरचा कितीतरी काळ अशीच परिस्थिती राहिली. साधारण साडेबावीस कोटी वर्षांपूर्वी या भूमीच्या गाठोड्याला जात आली. तिच्यात हालचाल सुरू झाली आणि तिचे दोन प्रचंड तुकडे झाले. पुढच्या अडीच कोटी वर्षांमध्ये हे तुकडे एकमेकांपासून पूर्णपणे अलग झाले. उत्तरेचा लॉरेशिया आणि दक्षिणेला गोंडवनालँड. लाॅॆशियाचं वायव्य दिशेनं भ्रमण सुरू झालं. आजची उत्तर अमेरिका आणि युरोप खंडं त्यात समाविष्ट होते. गोंडवनालँडमध्ये आजची आफ्रिका, दक्षिण अमेरिका, ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका वगैरेंचा समावेश होतो. हे दोन्ही भूखंड एकमेकांपासून अलग होत पुढची साडेतेरा कोटी वर्षे दूर दूर जात राहिले. पृथ्वीच्या गाभ्यात तप्त शिलारस असून त्यावरच्या घन कवचाचे हे तुकडे तरंगत असतात. त्यांचं भटकणं अविरत चालूच असतं. यालाच आता वैज्ञानिक भाषेत प्लेट टेक्टॉनिक्स असं म्हणतात. या भूखंडांच्या भटकण्यातून या दोन प्रचंड भूखंडांचेही तुकडे झाले. त्यातूनच उत्तर अमेरिका आणि युरोपही एकमेकांपासून वेगळे झाले. गोंडवनालँडचे तर तीन चार तुकडे झाले. एकात दक्षिण अमेरिका आणि आफ्रिका होते. ते पश्चिमेकडे सरकू लागले. दुसऱ्यात ऑस्ट्रेलिया आणि अंटार्क्टिका होते. त्याचेही दोन तुकडे होऊन अंटार्क्टिका दक्षिण दिशेनं तर ऑस्ट्रेलिया थोडा अाग्नेयाकडे सरकला. एक दुसरा मोठा तुकडा बाजूला होऊन त्याचं एक बेट झालं. ते टेथिस महासागरात तरंगू लागलं. हेच भारतीय उपखंड. कालांतराने तेही वायव्येकडे सरकत राहिलं. आणि साधारण साडेसहा कोटी वर्षांपूर्वी त्यानं जाऊन आशिया खंडाला धडक दिली. त्यावेळी भारतीय उपखंडाच्या सरकण्याचा वेगही एका शतकात ९ मीटर एवढा होता. धडकीनंतर तो निम्म्यावर आला. आणि पाच कोटी वर्षांनंतर तो आताच्या एका वर्षांत २-३ सेंटीमीटर एवढा कमी झाला. जमिनीवरून आपण एखादा कागद सरकवत नेला तर तो सरकत राहतो. पण जेव्हा तो भिंतीला भिडतो तेव्हा पुढे सरकू शकत नाही. तरीही सरकण्याचा रेटा चालूच राहिला तर त्याला घड्या पडून तो तिथंच उंचावतो. भारतीय खंडाच्या आशिया खंडाला भिडलेल्या सीमारेषेवर तसाच प्रकार घडला आणि त्यातूनच हिमालयाचा जन्म झाला. टप्प्याटप्प्यानं त्याची उंची वाढत राहिली. ती अजूनही वाढतेच आहे. सर्वात उत्तुंग शहर एव्हरेस्टची उंची गेल्या शंभर वर्षांमध्ये ८-९ मीटरनी वाढली आहे. या रेट्यापायी तिबेटच्या पठाराचाही जन्म झाला. तो भूभाग पाच हजार मिटरने उंचावला गेला. तेव्हा हिमालयाचा जन्म हा गेल्या पाच कोटी वर्षांपूर्वीचा आहे. भारतवर्ष मात्र त्यापूर्वी कितीतरी कोटी वर्षं अस्तित्वात आलं होतं.*बाळ फोंडके यांच्या 'केव्हा ?' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *पॅरिस येथे आयोजित ३३ व्या बर्ड अँड नेचर फेस्टिवल छायाचित्र स्पर्धेत बैजू पाटील* यांच्या कोणत्या छायाचित्राला पहिले पारितोषिक मिळाले ?२) विधवा प्रथा मोडीत काढण्याचा ठराव घेणारी आपल्या राज्यातील पहिली ग्रामपंचायत कोणती ?३) भारतात कोणत्या राज्याची किनारपट्टी सर्वात मोठी आहे ?४) 'उदर' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा.५) तानसेनचे मूळ नाव काय होते ? *उत्तरे :-* १) फायर विंग्स २) हेरवाड, कोल्हापूर ३) गुजरात ४) पोट ५) रामतनू पांडे*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 सौ. अर्चना नागोराव येवतीकर👤 गजानन काटेवाडे, पीएसआय, नांदेड👤 शिवाजी भटापूरकर👤 श्रीकांत चिनापूरकर👤 रवीकुमार कमलाकर👤 अभिजित नाईनवाड👤 ओम कांबळे👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *अभंगवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••धर्माची तूं मूर्ती । पाप पुण्य तुझे हातीं ॥१॥मज सोडवीं दातारा । कर्मापासूनि दुस्तरा ॥ध्रु.॥करिसी अंगीकार । तरी काय माझा भार ॥२॥जिवींच्या जीवना । तुका म्हणे नारायणा ॥३॥।। संत तुकाराम महाराज ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••दिसणारे हे भले मोठे जग दिवसेंदिवस बदलणार आहे. कोणी म्हणतात की, जगाबरोबर आपण बदलले पाहिजे. पण, एवढेही आपण बदलू नये की, ज्यांनी मायेचा स्पर्श देऊन आलेल्या प्रत्येक परिस्थितीत सदैव सोबतीला राहून साथ दिली. जीवनात तर बरेच माणसे येतात आणि जातात पण,मायेचा स्पर्श व ती मिळालेली आपुलकी प्रत्येक माणसात नसते.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *पित्याचे ऋण*“बाई, तुमची लाकडं फोडायची आहेत का? घराची कौलं शाकारायचीत का? मला सांगा काम. चार पैसे मिळून जातील.” शाळेत जाणारा हा तेरा वर्षाचा मुलगा शाळेचा अभ्यास सोडून गावात घरोघरी जाऊन असली काम करायचा. शिकण्यापेक्षा त्याला अंगमेहेनतीची जास्त आवड. दुसऱ्यांची गुरं राखणं शेतात कामं करणं आणि एस. टी. स्टँडवर जाऊन हमाली करणे असले कोणतेही कष्टाचे काम असो ते करायची या मुलांची नेहमीच तयारी असायची. ही कष्टाची कामं करून आपण लवकरात लवकर स्वावलंबी व्हावे, स्वतःच्या पायावर उभे राहावे हे त्या मुलाचे स्वप्र. घरामध्ये अठरा विश्वे दारिद्र्य. पोटाला पुरेसे खायला नाही. अंगावर घालायला लंगोटीशिवाय दुसरे वस्त्र नाही. अशा परिस्थितीत अभ्यासात या मुलाचे मन कसे रमावे ? पण आपल्या मुलाने खूप शिकावे ही त्या मुलाच्या वडीलांची जिद्द.                या मुलाचे वडील म्हणजे रामजीबाबा संकपाळ. माणूस मोठ्या खटपट्या, धीट प्रामाणिक आणि सरळ वृत्तीचा. तरुणपणी लष्करात नोकरी करून अंगच्या गुणांनी नाव मिळवलं. शालेय शिक्षण मॅट्रिकपर्यंत झालेलं, पण वाचनाची विलक्षण आवड. कुणी शिकवलं नाही तरी मोठी खटपट करून संस्कृत भाषेचा अभ्यास केला. मराठी आणि इंग्रजी भाषेवर उत्तम प्रभुत्व आणि गणित हा तर आवडीचा विषय. लष्करात सुभेदार म्हणून त्यांना बढती मिळाली, पण लष्करातील सैनिकांना आणि त्यांच्या मुलांना प्राथमिक शिक्षण देणे हे त्यांचे मुख्य काम. लष्करातले मुख्याध्यापक म्हणूनच ते ओळखले जात. या पार्श्वभूमीवर मुलाने शाळेतील अभ्यास करायचा सोडून अंगमेहनत करून चार पैसे मिळवावेत हे त्यांना कसे पटावे? मुलाच्या अभ्यासात येणाऱ्या अडचणी ते सोडवायचे. त्याला शिकण्यासाठी सतत प्रोत्साहन द्यायचे. मुंबईच्या जुन्या चाळीत रामजीबाबांचे बिऱ्हाड. स्वयंपाक, जेवण, अभ्यास, विश्रांती सारे काही एकाच खोलीत. खोलीत एकीकडे लाकडे आणि गोवऱ्या, तर दुसरीकडे भांड्यांची उतरंड, दळणाचं जातं, दुधासाठी बकरी हा सारा सरंजाम.अशा या वातावरणात मुलाचा अभ्यास कसा व्हावा? अभ्यासासाठी थोडे निवांत वातावरण मिळायचे ते फक्त पहाटे, पण पहाटे अभ्यासाला मुलाला लवकर उठवायचे, तर घरात गजराचे घड्याळ नाही. मग रामजीबाबा रात्री २ पर्यंत स्वत:ची काही कामं करत जागत बसायचे, आणि मुलाला अभ्यासासाठी उठवून तिथेच कडेला स्वतः झोपायचे. मुलाला वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी तर त्यांनी विशेष खटपट केली. स्वतःच्या तुटपुंज्या मिळकतीत त्याच्या अभ्यासाची पुस्तके आणि आवडीची इतर पुस्तके हे सारे कसे जमावे? मग रामजीबाबा मुंडासं गुंडाळून थोरल्या मुलीकडे जायचे. तिच्याकडे पैसे नाही मिळाले तर मग धाकटीकडे जायचे. तिच्याकडे रोख पैसे नसले तर तिचा एखादा सोन्याचा दागिना मागून घ्यायचे. तो दागिना गहाण टाकून मारवाड्याकडून कर्ज काढायचे आणि पेन्शनचे पैसे आले की मारवाड्याचे पैसे देऊन दागिना सोडवून आणायचे आणि मुलीला परत करायचे. मुलाच्या शिक्षणासाठी केवढा आटापिटा ! अर्थातच वडील आपल्या शिक्षणासाठी किती धडपड करतात हे लक्षात आल्यावर त्या मुलातही जबाबदारीची जाणीव निर्माण झाली. हळूहळू अभ्यासातही गोडी वाटू लागली. हा मुलगा स्वभावाने खूप जिद्दी होता.पित्याचे आपला मुलगा खूप शिकावा हे स्वप्र पूर्ण करण्यासाठी त्या मुलाने पुढील आयुष्यात विद्येसाठी कठोर तपश्चर्या केली. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून बडोदा संस्थानाकडून शिष्यवृत्ती मिळवून परदेशात जाऊन शिक्षणाची एकामागून एक सर्वोच्च शिखरे सर केली. पण मुलाचे हे कौतुक पाहण्याचे भाग्य त्या प्रेमळ पित्याला लाभले नाही. अत्युच्य शिक्षण घेऊन सारे आयुष्य स्वतःच्या समाजाच्या उद्धारासाठी वेचणाऱ्या या थोर सुपुत्राचे नाव, डॉ. भीमराव रामजी आंबेडकर•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment