✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 04 एप्रिल 2024💠 वार - गुरुवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/sLZfHuz1NoyP6od8/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील ९५ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *१९९०:लता मंगेशकर यांना दादासाहेब फाळके पुरस्कार**१९८४ भारताचा पहिला अवकाशयात्री राकेश शर्मा यांचे सोविएत अवकाशायन सोयुझ टी- ११ द्वारे उडान**१९६८:मेम्फिस,टेनेसी येथे जेम्स अर्ल रे याने मार्टिन ल्युथर किंग (ज्युनिअर) यांची हत्या केली**१९६८:’नासा’ने ’अपोलो-६’ चे प्रक्षेपण केले**१९४९:पश्चिम युरोपातील अकरा देश आणि अमेरिका अशा १२ देशांनी संरक्षणविषयक सामंजस्य करार करुन ’नाटो’ची (NATO) स्थापना केली.**१९४४:दुसरे महायुद्ध – ब्रिटिश व अमेरिकन फौजांनी रुमानियातील बुखारेस्टवर केलेल्या बॉम्बहल्ल्यात ३००० नागरिक ठार झाले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८८:विजय गंगाप्रसाद देवडे-- लेखक* *१९८०:शेख पीरपाशा ईसाक -- कवी* *१९७२:अजय देशपांडे -- लेखक,कवी, गझलकार,समीक्षक* *१९७१:हेरंब कुलकर्णी-- मराठी वैचारिक आणि शिक्षणविषयक लेखन करणारे लेखक**१९६९:पल्लवी जोशी-- भारतीय अभिनेत्री,लेखिका आणि चित्रपट निर्माती* *१९६८:बबन मारोतराव आव्हाड -- लेखक, कवी* *१९६१:डॉ.सुधीर अनंत काटे -- कवी,लेखक* *१९६०:राजेंद्र विश्राम देसले-- चरित्रकार,कथा लेखक* *१९५९:नामदेव राठोड-- कवी**१९५८:नारायण वामनराव जोशी-- लेखक,धडपड मंच संयोजक तथा निवृत्त शिक्षण उपसंचालक* *१९५६:प्रकाश (अप्पा) जाधव -- लेखक* *१९५५:प्रेमा नारायण-- अभिनेत्री-नर्तिका**१९५४:परवीन बाबी-- भारतीय अभिनेत्री आणि मॉडेल(मृत्यू:२० जानेवारी २००५)**१९५३:सुरेश माणिकराव कुलकर्णी-- मुक्त पत्रकार,लेखक**१९५२:चंद्रशेखर नार्वेकर(एन.चंद्रा)-- भारतीय निर्माता,लेखक आणि दिग्दर्शक* *१९४९:नंदकुमार जयराम मुरडे-- कवी,लेखक**१९४८:महावीर रामचंद्र जोंधळे-- प्रसिद्ध कवी, कथाकार,बालसाहित्यकार,पत्रकार**१९४७:मच्छिंद्र कांबळी -- मालवणी नटसम्राट मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ अभिनेते,प्रसिद्ध नाट्यनिर्माते(मृत्यू:३० सप्टेंबर २००७)**१९४६:प्रभाकर लक्ष्मण मयेकर--मराठी नाटककार, कथाकार (मृत्यू:१८ आगस्ट २०१५)**१९३८:किशोर दिपचंद हिवाळे-- लेखक* *१९३८:प्रा.डॉ.अजीज नदाफ-- मराठी साहित्यिक,मराठी शाहिरीचे अभ्यासक, पुरोगामी वैचारिक चळवळीतील कार्यकर्ते* *१९३३:रामचंद्र गंगाराम तथा ’बापू’ नाडकर्णी – डावखुरे मंदगती गोलंदाज (मृत्यू:१७ जानेवारी २०२०)**१९२६:प्रा.बाळ केशव सावंगीकर--लेखक**१९२१:हरि कृष्ण लाल भगत-- माझी केंद्रीय मंत्री (मृत्यू:२९ ऑक्टोबर २००५)**१९१९:भालचंद्र महाराज कहाळेकर-- व्यासंगी अध्यापक,कुशल संघटक,प्रभावी भाषोपासक(मृत्यू:२८ मे १९७५)**१९०२:पं नारायणराव व्यास – ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक (मृत्यू:१ एप्रिल १९८४)**१८४२:एडवर्ड लूकास – फ्रेन्च गणिती (मृत्यू:३ आक्टोबर १८९१)**१८२३:सर कार्ल विल्हेम सिमेन्स – जर्मन/ब्रिटिश विद्युत अभियंता,(मृत्यू:१९ नोव्हेंबर १८८३)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२००१:गोविंद मल्हार कुलकर्णी-- समीक्षक( जन्म:२१ डिसेंबर १९१४)**२०००:नरेश कवडी--भाषातज्ञ,कथाकार, मर्मज्ञ समीक्षक,ज्ञानेश्वरीचे चिकित्सक अभ्यासक आणि अनुवादक.(जन्म:५ ऑगस्ट १९२२)* *१९९६:आनंद साधले – संस्कृत वाङ्‌मयातील अनेक ग्रंथांचा मोठ्या रसाळ पद्धतीने मराठीत परिचय करुन देणारे साहित्यिक (जन्म:५ जुलै १९२०)**१९८७:सच्‍चिदानंद हिरानंद वात्स्यायन तथा ’अज्ञेय’ – ज्ञानपीठ पारितोषिक (१९७८) व साहित्य अकादमी पुरस्कार (१९६४) विजेते हिन्दी लेखक व वृत्तपत्रकार (जन्म:७ मार्च १९११)**१९७९:पाकिस्तानचे चौथे राष्ट्राध्यक्ष आणि ९ वे पंतप्रधान झुल्फिकार अली भूट्टो यांना फाशी (जन्म:५ जानेवारी १९२८)**१९६८:मार्टिन ल्युथर किंग (ज्युनिअर) – कृष्णवर्णीयांचे गांधी म्हणून ओळखले जाणारे अमेरिकेतील मानवी हक्क कार्यकर्ते आणि नोबेल पारितोषिक विजेते यांची हत्या (जन्म:१५ जानेवारी १९२९)**१९२३:जॉन वेन – ब्रिटिश गणितज्ञ (जन्म: ४ ऑगस्ट १८३४)**१६१७:जॉन नेपिअर – स्कॉटिश गणितज्ञ, लॉगॅरिथम सारणीचे जनक (जन्म:१५५०)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*मतदार राजा जागा हो ....!*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा केरळमधील वायनाड मतदारसंघातून लोकसभा निवडणूक 2024 साठी उमेदवारी अर्ज दाखल*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मुंबई महापालिकेच्या करनिर्धारण व संकलन विभागाने सरलेल्या आर्थिक वर्षात म्हणजेच १ एप्रिल ते ३१ मार्च या कालावधीत ३ हजार १९६ कोटी रूपयांचा मालमत्ता कर संकलन*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *सलग पाच टर्म यवतमाळ वाशीम लोकसभेचे प्रतिनिधित्व केलेल्या भावना गवळी यांच्या ऐवजी हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना उमेदवारी*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *देशात यावर्षी तीव्र उष्णतेचा हवामान विभागाने दिला इशारा, त्यानंतर केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री मनसुख मांडविया यांनी घेतली बैठक*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *एकनाथ शिंदेंवर हिंगोलीची उमेदवारी मागे घेण्याची नामुष्की, बाबूराव कदम कोहळीकर यांना उमेदवारी जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *तैवान भूकंपानं हादरला, रिश्टर स्केलवर तीव्रता 7.5, जपानकडून त्सुनामीचा इशारा*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *कोलकत्ताने दिल्लीला 106 धावानी हरविले*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *पेसमेकर काय करतो ?* 📙 **************************खरं तर हा प्रश्न कृत्रिम किंवा यांत्रिक पेसमेकर काय करतो ? असा विचारायला हवा. कारण आपल्या शरीरात एक नैसर्गिक पेसमेकरही असतो. तो हृदयाचा ताल नियंत्रित ठेवतो. हृदयाचा हा तब्बलजी सायनो अॅंट्रियल नोड या नावाने ओळखल्या जाणाऱ्या पेशींच्या एका गुच्छात असतो. जेव्हा हृदयाचा ठोका पडतो तेव्हा या पेशी एक विद्युतस्पंद म्हणजेच विजेचा लोळ हृदयाच्या वरच्या टोकापासून खालच्या टोकाकडे पाठवतात. जसजसा हा विद्युतस्पंद हृदयाच्या निरनिराळ्या भागांवरून प्रवास करतो तसतसा तो त्या भागाचं आकुंचन आणि प्रसरण नियंत्रित करतो. प्रथम हृदयाचे दोन्ही वरचे कप्पे आकुंचन पावतात. ते जेव्हा प्रसरण पावतात त्या वेळी त्या कप्प्यांमधील रक्त खालच्या कप्प्यांमध्ये उतरतं आणि जेव्हा ते खालचे कप्पे प्रसरण पावतात तेव्हा ते रक्त शरीरभर जोरानं पाठवलं जातं. परत एकदा हृदयाच्या वरच्या भागात विद्युतस्पंद उभा राहतो आणि हे चक्र अविरत चालू राहतं. हृदय नियमित वेगानं आणि इमानेइतबारे आकुंचन प्रसरण पावत रक्त शुद्ध करून घेत ते शरीरभर खेळवत राहील अशी योजना राबवत राहतं.पण काही जणांच्या हृदयाचा हा ताल बिघडतो. ते हृदय एकदम जलद गतीने तरी धडधडू लागतं. या अवस्थेला टॅकीकार्डिया म्हणतात. किंवा उलट ते मंदगतीने दुडक्या चालीने चालत राहतं. या स्थितीला ब्रॅडीकार्डिया म्हणतात. किंवा अशा कोणत्याही नियमांनं न चालता ते अनियमितरित्या धडधडतं. अशावेळी नैसर्गिक पेसमेकरच्या मदतीला किंवा त्याचं काम करण्यासाठी बदली म्हणून पेसमेकर नावाचं यंत्र पोटाच्या किंवा छातीच्या पोकळीत बसवलं जातं. या यंत्रात विद्युतस्पंद तयार करणारा एक जनरेटर असतो; आणि हा जनरेटर हृदयाच्या कप्प्यांना जोडणाऱ्या तारा असतात. या तारा निलेमधून नेऊन थेट हृदयाच्या कप्प्यात सोडलेल्या असतात. साधारण अधेलीच्या आकाराचा हा पेसमेकर टायटॅनियम या धातूचा बनवलेला असतो. त्याच्यावर शरीरातील द्रवांचा कोणताही परिणाम होत नाही. तीच बाब तो पेसमेकर हृदयाच्या कप्प्यांना जोडणाऱ्या तारांची. पेसमेकरमधला जनरेटर चालविण्यासाठी दीर्घकाळ चालू राहणाऱ्या आण्विक बॅटरी वापरतात. त्यामुळे वरचेवर बॅटरी बदलण्यासाठी शस्त्रक्रिया करावी लागत नाही. हा पेसमेकर विवक्षित तालावर विद्युतस्पंदानं हृदयाला टोचणी देत त्याला आपला ताल नियमित राखायला मदत करतो. त्यामुळं मग त्या रुग्णाला सर्वसामान्य निरोगी जीवनशैली अंगीकारणे सोपं जातं.*बाळ फोंडके यांच्या 'काय ?' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अपमान व गोळ्या दातांनी चावता येत नाहीत.त्या सरळ पोटात गिळणेच चांगले.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *EVM* चा फुल फॉर्म काय आहे ?२) जगातील सर्वात मोठा लोकशाही व्यवस्थेचा देश कोणता ?३) EVM मध्ये सर्वाधिक किती मते नोंदली जाऊ शकतात ?४) भारतात EVM प्रथम कुठे वापरली गेली ?५) EVM कशावर चालते ? *उत्तरे :-* १) Electronic Voting Machine २) भारत ३) ३,८४० मते ४) परुर विधानसभा मतदारसंघ, केरळ ( १९८२ ) ५) अल्कलाईन बॅटरी*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 श्री हेरंब कुलकर्णी, शिक्षणतज्ञ👤 अंकुश शिंगाडे, साहित्यिक, नागपूर👤 शंकर भोजराज, जारीकोट👤 प्रताप रायघोळ👤 रमेश येलमे मंगनाळीकर👤 चंद्रकांत अमलापुरे, शिक्षक, नायगाव👤 बापूराव वाघमारे👤 राजेंद्र देसले👤 श्याम पांचाळ👤 गणेश कोकुलवार, सामाजिक कार्यकर्ते, नांदेड👤 शिलवंत डुमणे👤 शिवाजी भोसले👤 श्याम लोलापोड👤 राम गंगाधर नाईनवाड👤 प्रवीण पाटील👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *अभंगवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••शिकविलें तुम्हीं तें राहे तोंवरी । मज आणि हरी वियोग तों ॥१॥प्रसंगीं या नाहीं देहाची भावना । तेथें या वचना कोण मानी ॥२॥तुका म्हणे चित्तीं बैसला अनंत । दिसों नेदी नित्य अनित्य तें ॥३॥।। संत तुकाराम महाराज ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जी व्यक्ती परिस्थितीचा सामना करत त्या अनुभवातून पुन्हा एकदा नव्याने जगण्याचा प्रयत्न करत असते‌ ती व्यक्ती, दुसऱ्यांच्या विषयी नको, त्या गोष्टी करण्यासाठी आपली वेळ वाया घालवत नाही. कारण परिस्थिती कशी असते याची पूर्णपणे तिला जाणीव असते.म्हणून ती व्यक्ती , त्याच परिस्थितीला आपला गुरू मानून इतरांसाठी काही करता येईल का यासाठी धडपडत असते. आपणही ज्या, परिस्थितीवर मात करून जगण्याचा प्रयत्न केले असाल त्या परिस्थितीला कधीही विसरू नये. कारण, परिस्थिती माणसाला नवी दिशा दाखवत असते.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *खरे दुःख*एक सोनार होता. त्याच्या दुकानासमोरच एका लोहाराचे दुकान होते. सोनार जेव्हा काम करत असे तेंव्हा सोनाराच्या दुकानातून हळू आवाज होत असे पण जेंव्हा लोहार काम करत असे तेंव्हा मात्र लोखंडाचे काम होत असल्याने मोठा आवाज होत असे. तो आवाज मोठा कर्णकर्कश असे. एके दिवशी सोनाराच्या दुकानातील एक सोन्याचा कण कसा कोण जाणे पण लोहाराच्या दुकानात जावून पडला. त्या सोन्याच्या कणाची भेट एका लोखंडाच्या कणाशी झाली. खूप दिवसांची ओळख असल्यासारखे ते एकमेकांशी बोलू लागले. सोन्याच्या कणाने लोखंडाच्या कणाला म्हंटले,"दादा, आपले दुःख तर खरे एकसमान आहे. दोघानाही आगीत तापवले जाते आणि हातोड्याने ठोकले जाते. मी तर बाबा चुपचाप हे सहन करतो, पण तुझे काय?" लोखंडाचा कण सोन्याच्या कणाकडे पाहून दुःखी स्वरात म्हणाला,"अरे ! तुझे म्हणणे अगदी बरोबर आहे. दोघानाही तापवणारी आग एकच आहे आणि ठोकणारा हातोडाहि एकाच धातूचा आहे. पण खरे दुःख याचे आहे कि तुला ठोकणारा हातोडा हा तुझा कोणीच लागत नाही पण मला ठोकणारा लोखंडाचा हातोडा हा नात्याने माझा भाऊच लागतो. दुसऱ्याने दिलेल्या दुःखापेक्षा स्वकीयांनी दिलेला त्रास हा अगदी हृदयात वार करून जातो."तात्पर्य- आपल्या माणसांकडून होणारा त्रास हा कायमच दुःखदायक वाटतो•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment