✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 03 एप्रिल 2024💠 वार - बुधवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/wgv78RucPVxLfzas/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील ९४ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२०००:आय.एन.एस.आदित्य हे नौकांना इंधन पुरवणारे संपूर्ण भारतीय बनावटीचे वेगवान जहाज नौदलाच्या ताफ्यात दाखल झाले.**१९७५:बॉबी फिशरने अनातोली कार्पोव्ह विरुद्ध खेळण्यास नकार दिल्यामुळे अनातोली कार्पोव हा बुद्धिबळात जगज्जेता बनला.**१९७३:मार्टिन कूपर या मोटोरोला कंपनीतील संशोधकाने जगातील पहिला मोबाईल टेलिफोन कॉल बेल लॅब्जमधील डॉ.जोएल अँगेल याला केला**१९४८:ओरिसा उच्‍च न्यायालयाची स्थापना* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* •••••••••••••••••••••••••••••••••••••• *१९८२:निरंजन मुडे -- कवी* *१९७७:डॉ.रमेश तुळशीराम रावळकर-- कवी,लेखक,संपादक* *१९७१:माधुरी मगर-काकडे-- कवयित्री, लेखिका* *१९७१:रवींद्र सूर्यभान साळवे-- कवी,लेखक**१९७०:विनोद पितळे-- पत्रकार,लेखक**१९६७:सुधीर फाकटकर-- विज्ञान तंत्रज्ञान प्रचारक तथा लेखक* *१९६५:नाझिया हसन – पाकिस्तानी पॉप गायिका (मृत्यू:१३ ऑगस्ट २०००)**१९६५:लीलाधर सदाशिव महाजन-- कवी, लेखक* *१९६२:जयाप्रदा – प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री**१९६१:डॉ.शंकर किसन बोराडे-- स्तंभलेखक, समीक्षक(मृत्यू:२६ नोव्हेंबर २०२३)**१९५९:संदीप वासलेकर-- मराठी तत्त्वज्ञ आहेत. हे संघर्ष निवारण आणि जगाचे भवितव्य या विषयांवर आपले विचार मांडतात**१९५५:हरिहरन अनंत सुब्रमणी-- भारतीय पार्श्वगायक,भजन आणि गझल गायक* *१९५१:रवीप्रकाश कुलकर्णी-- चरित्र लेखक, पत्रकार* *१९५१:डॉ.किशोर रघुनाथ पवार-- प्रसिद्ध विज्ञान लेखक,व्याख्याते* *१९५१:अलका शशांक कुलकर्णी -- सुप्रसिद्ध लेखिका* *१९४१:दत्ता बाळ--तत्त्वचिंतक,ग्रंथकार (मृत्यू:३ सप्टेंबर १९८२)**१९४१:कृष्णराव पंढरीनाथ ऊर्फ शशिकांत देशपांडे--मराठी लेखक संपादक**१९३४:जेन गुडॉल – इंग्लिश प्राणिशास्त्रज्ञ**१९१४:फील्ड मार्शल सॅम माणेकशा (मृत्यू:२७ जून २००८)**१९०४:रामनाथ गोएंका – ’इन्डियन एक्सप्रेस’ वृत्तपत्रसमुहाचे संस्थापक, स्वातंत्र्य चळवळीतील नेते (मृत्यू:५ आक्टोबर १९९१)**१९०३:कमलादेवी चट्टोपाध्याय– मॅगसेसे पुरस्कार विजेत्या(१९६६) स्वातंत्र्यसैनिक व सामाजिक कार्यकर्त्या (मृत्यू:२९ आक्टोबर१९८८)**१८९५:कृष्णराव भाऊराव बाबर-- प्रसिद्ध लेखक ( मृत्यू:९ जून १९७४)**१८८२:द्वारकानाथ माधव पितळे उर्फ ’नाथमाधव’ – सामाजिक व ऐतिहासिक कादंबरीकार.(मृत्यू:२१ जून १९२८)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१७:किशोरी आमोणकर--- हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गायिका(जन्म:१० एप्रिल १९३१)* *१९९८:हरकिसन मेहता – प्रसिद्ध गुजराती कादंबरीकार,’चित्रलेखा प्रकाशन’चे मुख्य संपादक**१९९८:मेरी कार्टराइट – इंग्लिश गणितज्ञ (जन्म:१७ डिसेंबर १९००)**१९९२:उद्धव जयकृष्ण शेळके-- प्रसिद्ध कथाकार,कादंबरीकार(जन्म:८ ऑक्टोबर १९३१)**१९८८:डॉ.विष्णू श्रीधर वाकणकर--एक श्रेष्ठ भारतीय पुरातत्त्वज्ञ,संशोधक, शैलचित्रे अभ्यासक (जन्म:४ मे १९१९)* *१९८५:डॉ.वासुदेव विष्णू मिराशी – महामहोपाध्याय,संस्कृत विद्वान, प्राच्यविद्यासंशोधक (जन्म:१३ मार्च १८९३)**१८९१:एडवर्ड लूकास – फ्रेन्च गणिती (जन्म:४ एप्रिल १८४२)**_१६८०:छत्रपती शिवाजी राजे भोसले (जन्म:१९ फेब्रुवारी १६३०)_*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *आईच्या हातचे जेवण*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *शिंदेंच्या शिवसेना उमेदवारासाठी नरेंद्र मोदी यांची राज्यातील पहिली सभा:10 एप्रिल रोजी रामटेक तर 14 एप्रिल रोजी चंद्रपूर मध्ये दुसरी सभा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *भाजपचे आमदार अजय निषाद यांचा काँग्रेस मध्ये प्रवेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार संजय देशमुख यांनी उमेदवारी अर्ज भरला*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *खासदार संजय सिंह यांना आज सर्वोच्च न्यायालयानं जामीन मंजूर*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *राज्यातील धरणांनी तळ गाठला, मराठवाड्यात अवघं 19.36 टक्के पाणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *नवी दिल्लीत आयोजित ५६ व्या राष्ट्रीय खो खो अजिंक्यपद स्पर्धेचा किताब महाराष्ट्रानं पटकावला*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 फायबर ऑप्टिक ग्लास 📙 साधी काच कडक असते. पण काचेचाच एक प्रकारचा अतिशय शुद्ध स्वरूपातील विशिष्ट प्रक्रिया केलेला तंतू बनवला, तर त्यातून प्रकाशाचे वहन होऊ शकते. शिवाय हा तंतू पाहिजे तसा वाकवता, वळवता येऊ शकतो. त्याची जाडी अशी जवळपास नसतेच. या प्रकारालाच 'फायबर ऑप्टिक ग्लास' असे म्हणतात.१९५५ साली प्रथम फायबर ऑप्टिक ग्लास प्रायोगिकरित्या वापरली तयार केली गेली. पण व्यावहारिक उपयोग सुरू होण्यासाठी त्यानंतर जवळजवळ एक दशक जावे लागले. प्रथम अनेक वैद्यकीय उपकरणांत या तंतूंचा वापर केला गेला. त्यानंतर या तंतूंचा उपयोग दळणवळणासाठी म्हणजे टीव्ही सिग्नल्स, टेलिफोन यांसाठीही करता येऊ शकेल, असा विचार पुढे आला. आज घटकेला फायबर ऑप्टिक्सने जगच व्यापायला सुरुवात केली आहे.जेमतेम एक दशांश मिलिमीटर जाडीचा हा काचेचा तंतू नुसत्या डोळ्यांनी जेमतेम दिसू शकतो. अशी अडीचशे तंतूंची जुडी बांधली, तर ती जेमतेम इंचभराच्या जाडीची होते. पण यातील प्रत्येक तंत्रातून स्वतंत्र दळणवळण शक्य असते व त्याची गुणवत्ताही अन्य कशापेक्षाही उत्तम असते. प्रकाश सरळ रेषेत प्रवास करतो हे तत्त्व आपल्याला माहिती आहेच. तारेच्या एका टोकातून प्रकाश लहरी आत शिरल्या की, त्या थेट दुसऱ्या टोकापर्यंत टोटल इंटर्नल रिफ्लेक्शनमुळे पोहोचतात. कितीही वळणे वा तिढे असले तरीही तंतूंच्या आतील कडांवर आपटून त्या तशाच पुढे सरकत राहतात, त्यांना कसलाही अडथळा येत नाही. या प्रकारामध्ये होणाऱ्या वहनात 'अंगभूत विरोध' (Resistance or loss) होत नसल्याने दळणवळणाची गुणवत्ता सर्वोत्तम राहते, हे महत्त्वाचे.फायबर ऑप्टिक उपकरणांचा वापर मानवी शरीरांतर्गत तपासण्या करण्यासाठी खूपच मोठय़ा प्रमाणावर केला जात आहे. कितीही वेळा कशीही वाकवता येणारी नळी मानवी शरीरात घालून तिच्यातून प्रकाशझोत शरीरात पाठवला जातो. प्रकाशझोताचा उगम शरीराबाहेर असल्याने त्याची उष्णता तर शरीराला जाणवत नाही, पण तीव्रता भरपूर असल्याने स्वच्छ उजेडात आतील बाजू या फायबर ऑप्टिक नळीने न्याहाळता येते. आत झालेला बिघाड म्हणजे जठरातील, आतड्यातील व्रण, मोठ्या आतड्याचे कर्करोग, गुडघ्यासारख्या मोठ्या सांध्यातील आतील भाग हा सहज न्याहाळुन त्याचे निदान व गरजेप्रमाणे इलाजही करता येतो. मूत्रमार्गातील व अन्नमार्गातील कित्येक रोगांचे निदान व उपचार यात सुलभता आली आहे, याचे कारण फायबर ऑप्टिकचा वापर. फायबर ऑप्टिक धाग्यांचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे त्यांची लांबी. ही पाहिजे तेवढी असू शकते. येत्या दशकात या तंतूंचा वापर मोठ्या प्रमाणात केला जाऊन सर्व दळणवळण अधिक स्पष्ट, स्वच्छ, सुकर होईल असे अनेकांना वाटते.'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••तुमचा क्लास हा आर्थिक परिस्थितीवर नाही तर तुमच्या कर्तृत्वावर ठरत असते.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) तुर्कीमध्ये सारस पक्ष्याला काय म्हटले जाते ?२) २०२४ ची ऑस्ट्रेलियन फॉर्म्युला वन ग्रां पी कोणी जिंकली ?३) NIA च्या महासंचालकपदी कोणाची नेमणूक करण्यात आली आहे ?४) 'अरण्य' या शब्दाचे समानार्थी शब्द सांगा.५) आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे पहिले भारतीय न्यायाधीश कोण ? *उत्तरे :-* १) यारेन २) कार्लोस सेंझ, फेरारी संघ ३) सदानंद दाते ४) रान, वन, कानन, विपिन, जंगल ५) सर बी. एन. राव*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 भागवत जेठेवाड, केंद्रप्रमुख👤 चक्रधर शिंदे👤 माधव धुप्पे👤 प्रकाश साखरे, धर्माबाद👤 तुकाराम पचलिंग👤 संतोष अंबलगोंडे👤 माधव शिराळे👤 रंगराव वाकोडे👤 संभाजीराव गुनाळे👤 नागभूषणम भुसा👤 कामाजी सरोदे👤 गंगाधर सुगावकर*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *अभंगवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मजसवें आतां येऊं नका कोणी । सासुरवासिनी बाइयानो ॥१॥न साहवे तुम्हां या जनाची कूट । बोलती वाईट ओखटें तें ॥२॥तुका म्हणे जालों उदास मोकळ्या । विचरों गोवळ्यासवें आम्ही ॥३॥।। संत तुकाराम महाराज ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपण कोणाचे किती चांगले करतो, किंवा वाईट करतो किंवा कोणाची मदत करतो या विषयी आपल्याला माहित असते त्या सोबतच ज्यांना आपण कधीही वाचत नाही त्याला जरा या विषयी जास्त माहित असते. म्हणून स्वतःचे समाधान करण्यासाठी कोणाचे वाईट करण्याचा प्रयत्न करू नये.. शक्य ते चांगले करता येईल तेवढे करण्याचा नक्कीच प्रयत्न करावे कारण, चांगले करणाऱ्याकडेही बघणारे काही लोक या समाजात आजही आहेत. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *माणुसकी*इसाप हा एक गुलाम होता, पण आपल्‍या विद्वत्तेच्‍या जोरावर त्‍याने समाजात अत्‍युच्‍च स्‍थान निर्माण केले होते, ज्‍या धनाढ्याने इसापला विकत घेतले होते त्‍याचे नाव होते क्‍झेनथस, इसाप आपल्‍या आचरणातून क्‍झेनथसला सतत शिकवण देत असे.ज्‍या काळी रोममध्‍ये सार्वजनिक स्‍नानगृहे असत, सज्‍जन लोक सार्वजनिक स्‍नानगृहात जाऊन आंघोळ करत असत. एकदा क्‍झेनथसने इसापला स्‍नानगृहात गर्दी आहे की रिकामे आहे हे पाहून येण्‍यास सांगितले. इसापने जाऊन पाहिले तर तेथे बरेच लोक आंघोळीसाठी जमा झाले होते. तेवढयात त्‍याचे लक्ष स्‍नानगृहाच्‍या दारासमोर पडलेल्‍या एका मोठ्या दगडाकडे गेले. अनेक लोक त्‍या दगडाला अडखळून पडत होते, दगड रस्‍त्‍यात कसा म्‍हणून शिव्‍या देत होते. तेवढ्यात एक माणूस आला तोही त्‍या दगडाला अडखळून पडला, त्‍यानेही शिवी हासडली पण तो दगड त्‍याने उचलून दूर फेकला आणि मगच तो स्‍नानगृहात गेला.हे सर्व पाहून इसाप घरी गेला व मालकाला सांगितले की, स्‍नानगृहात फक्त एकच माणूस आंघोळीसाठी आला आहे. आंघोळीच्‍या पूर्ण तयारीनिशी क्‍झेनथस स्‍नानगृहात पोहोचला आणि पाहतो तर काय, तेथे तर प्रचंड गर्दी आहे. क्‍झेनथसने इसापला विचारले तू तर म्‍हणाला इथे फक्त एक माणूस आहे पण इथे तर प्रचंड गर्दी दिसते. इसाप उत्तरला,'' इथे रस्‍त्यात एक दगड पडला होता, येथे येणारा प्रत्‍येकजण दगडाला अडखळून पडत होता, शिव्‍या देत होता पण दगड उचलून टाकण्‍याचे शहाणपण फक्त एकानेच दाखविले. त्‍यामुळे फक्त एकच माणूस असल्‍याचे मी आपणास सांगितले.'' क्‍झेनथस निरूत्तर झाला.तात्‍पर्य- फक्त जीवंत असणे ही ओळख नसून जीवनाचा सदुपयोगच तुम्‍हाला स्‍वतंत्र ओळख देऊ शकते. आपल्‍या जीवनाचा इतरांनाही उपयोग व्‍हावा हेच खरे.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment