✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 06 एप्रिल 2024💠 वार - शनिवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://nasayeotikar.blogspot.com/2018/04/blog-post_6.html?m=1••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील ९७ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२०००:’मीर’ या रशियाच्या अंतरिक्ष प्रयोगशाळेला जीवदान देण्यासाठी सोडलेले ’सोयूझ’ हे अंतराळयान ’मीर’ला भेटले.**१९९८:भारतापर्यंत सहज पोहोचू शकणार्‍या मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांची पाकिस्तानने यशस्वी चाचणी केली.**१९६६:भारतीय जलतरणपटू मिहीर सेन यांनी भारत व पाकिस्तानला जोडणारी पाल्कची सामुद्रधुनी पोहून पार केली.इंग्लिश खाडीसह जगातील अनेक खाड्या त्यांनी पार केल्या होत्या.**१९६५:व्यापारी उपयोग करता येईल अशा प्रकारे संदेशवहन करण्याची सोय असलेला ’अर्ली बर्ड’ हा उपग्रह अमेरिकेने अंतराळात सोडला.या उपग्रहामुळे माहिती व करमणुकीच्या क्षेत्रात प्रचंड क्रांती घडली**१९३०:प्रसिद्ध दांडीयात्रेनंतर गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह सुरू केला.**१९१७:पहिले महायुद्ध – अमेरिकेने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले.**१८९६:आधुनिक ऑलिम्पिक खेळांची ग्रीसमधील अथेन्स येथे सुरूवात झाली. ग्रीक सम्राट थेडोसियस (पहिला) याने घातलेल्या बंदीमुळे १५०० वर्षे हे खेळ बंद होते.**१६५६:शिवाजीमहाराजांनी चंद्रराव मोरे यांचा पराभव करुन रायगड किल्ला ताब्यात घेतला.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८७:प्रा.अशोक बाळू पाटील-- लेखक**१९७८:संजय मुकुंदराव निकम-- कवी* *१९७४:आशुतोष अडोणी -- लेखक,संपादक, वक्ते* *१९५९:दिप्ती कोदंड कुलकर्णी -- कवयित्री लेखिका* *१९५९:प्रा.प्रवीण दवणे-- सुप्रसिद्ध मराठी लेखक,गीतकार,पटकथालेखक**१९५६:दिलीप वेंगसरकर – क्रिकेटपटू**१९५३:भारतकुमार राऊत-- राज्यसभेचे माजी खासदार प्रसिद्ध लेखक,संपादक* *१९४९:साहेबराव ठाणगे-- प्रसिद्ध कवी, लेखक* *१९४०:शैला द्वारकादास लोहिया-- मराठी साहित्यातील कथाकार,कादंबरीकार आणि लोकसाहित्याच्या अभ्यासक.(मृत्यू:२४ जूलै २०१३)**१९३४:नीळकंठ खाडिलकर:ज्येष्ठ पत्रकार दैनिक नवा काळचे संपादक(मृत्यू:२२ नोव्हेंबर २०१९)* *१९३१:गंगाधर गणेश पाटील--समीक्षक, संपादक**१९३१:रमा दासगुप्ता तथा सुचित्रा सेन – बंगाली व हिन्दी चित्रपट अभिनेत्री(मृत्यू:१७ जानेवारी २०१४ )**१९२८:जेम्स वॉटसन – फ्रान्सिस क्रीक व मॉरिस विल्कीन्स या जोडीदारांसह डीएनएची संरचना स्पष्ट करणारे नोबेल पारितोषिक (१९६२) विजेते जैवरसायनशास्त्रज्ञ**१९२७:विष्णू महेश्वर ऊर्फ ’व्ही.एम.’ तथा दादासाहेब जोग – उद्योजक (मृत्यू:२८ जून २०००)**१९१७:रघुनाथ विष्णू पंडित –कोकणी भाषेतील त्यांच्या काव्यात्मक निर्मितीसाठी ते प्रसिद्ध,कोंकणी कवी**१९१७:’काव्यतीर्थ’ हणमंत नरहर जोशी तथा कवी सुधांशु – मराठी कथाकार व कवी (मृत्यू:१८ नोव्हेंबर २००६)**१९०९:जी.एन.जोशी – भावगीतगायक व संगीतकार.एच.एम.व्ही.या कंपनीत काम करत असताना त्यांनी अनेक नवीन गायकांना संधी देऊन त्यांच्या ध्वनिमुद्रिका काढल्या.(मृत्यू:२२ सप्टॆंबर १९९४)**१८९०:अली सिकंदर ऊर्फ ’जिगर मोरादाबादी’ – उर्दू कवी व शायर (मृत्यू:९ सप्टेंबर १९६०)**१८८७:पांडुरंग श्रीधर आपटे--- मराठी साहित्यिक,भारतातली पहिली राष्ट्रीय शाळा आपटे गुरुजींनी येवला येथे काढली होती.(मृत्यू:१९ डिसेंबर१९५६)**१८६४:सर विल्यम हार्डी – ब्रिटिश जीवरसायनशास्त्रज्ञ (मृत्यू:२३ जानेवारी १९३४)**१७७३:जेम्स मिल – स्कॉटिश तत्त्ववेत्ते, इतिहासकार व अर्थशास्त्रज्ञ (मृत्यू:२३ जून १८३६)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२००६:आशा पोतदार -- मराठी नाट्य-चित्रपट सृष्टीतीलअभिनेत्री(जन्म:२१ ऑगस्ट१९३९)** २००१:देवीलाल-- भारताचे माजी उपपंतप्रधान व हरियाणा राज्याचे माजी मुख्यमंत्री(जन्म:१६ सप्टेंबर १९१४)**१९९२:आयझॅक असिमॉव्ह – अमेरिकन जीवरसायनशास्त्रज्ञ आणि विज्ञानकथालेखक (जन्म: २ जानेवारी १९२०)**१९८९:पन्नालाल पटेल – ज्ञानपीठ पारितोषिक विजेते गुजराथी कथा-कादंबरीकार.(जन्म:७ मे १९१२)**१९८३:जनरल जयंतीनाथ चौधरी – भारताचे लष्करप्रमुख (१९६२ - १९६६), हैदराबादचे लष्करी प्रशासक (१९४८ - १९४९) व भारताचे कॅनडातील राजदूत,पद्‌मविभूषण (जन्म:१० जून १९०८)**१९५५:विनायक महाराजा मसूरकर – धर्मभास्कर**१९४८:साधुदास(गोपाळ गोविंद मुजुदार. पाटणकर) --मराठी कवी,कादंबरीकार व चरित्रकार(जन्म:१८८३)* *११९९:रिचर्ड (पहिला) – इंग्लंडचा राजा (जन्म:८ सप्टेंबर ११५७)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जागतिक आरोग्य दिनानिमित्त प्रासंगिक लेख*... आरोग्यम धनसंपदा ....*मनुष्य पृथ्वी तलवार जन्म घेतल्यापासून तर मरेपर्यंत मानवाच्या शरीराचा आरोग्याशी संबंध येतो. शरीर सुदृढ असेल तर त्याचे आरोग्य देखील सुदृढ असते. आरोग्य सुदृढ असेल तर बाकी सगळ्या गोष्टी आपोआप सोईस्करपणे पार पडत असतात. इंग्रजीत एक म्हण आहे Sound in Body is Sound In Mind अर्थात शरीर मजबूत तर मन मजबूत.  मात्र आपले आरोग्य चांगले नसेल तर आपल्या जवळ सर्व काही असून ते काहीच कामाचे नसते. म्हणून प्रत्येक जण............ पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *30 लाख नोकऱ्या, आरक्षणाची मर्यादा वाढवणार, गरीब महिलांना 1 लाख, काँग्रेसने जाहीर केला जाहीरनामा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *आरबीआयकडून पतधोरण जाहीर, रेपो रेट 'जैसे थे', कर्जधारकांना दिलासा!*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *मोठ्या प्रमाणात रस्ते बांधले जातात पण महिलांसाठी स्वच्छतागृह नाही:पेट्रोल पंपावर स्वच्छतागृह बंधनकारक करावी-डॉ. निलम गोऱ्हे*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *हिंगोली जिल्ह्यात 114 जण हद्दपार:98 जणांवर कारवाई सुरू, निवडणुकीपूर्वी पोलिस ॲक्शन मोडवर; 39 जण कारागृहात स्थानबद्ध*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *बीडमध्ये झालेल्या जाहीर सभेत मराठा आरक्षण आंदोलन कर्ते मनोज जरांगे पाटील यांनी नागरिकांना मोठ्या संख्येने मतदान करण्याचे केले आवाहन*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *यूपीत मदरशातील शिक्षण सुरूच राहणार अलाहाबाद हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *IPL T20 - 2024 - *•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌞 *सौर वारा म्हणजे काय ?* 🌞 *************************हलत्या हवेला वारा म्हणतात. आपण शाळेतच हे शिकतो. पण सूर्यावर तर हवाच नाही हेही आपण शिकतो. मग तिथून वारा कसा काय वाहू लागेल ? हे खरं आहे. पण सौरवारा याचा शब्दश: अर्थ न घेता त्याचा भावार्थ समजून घ्यायला हवा. सूर्याच्या अंतरंगात अणुमिलनाच्या अणुभट्ट्या सतत धडधडत असतात. तिथलं तापमानही त्यामुळे कोट्यवधी अंशांइतकं वाढलेलं असतं. त्यापायी मग या ताऱ्याभोवती असलेलं वायूचं वातावरणही तापतं. या बाहेरच्या प्रभावळीतल्या वायूंचं प्लाझ्मा रूपात अवस्थांतर होतं. म्हणजेच त्या वायूच्या रेणूंचे घटक असलेले विद्युतभारधारी मूलकण स्वतंत्र होतात. त्यांच्याठायी असलेल्या प्रकार ऊर्जेमुळे वेगवानही होतात. सूर्यापासून दूरवर जाऊ पाहतात. जेव्हा पोटातल्या आगीपायी खदखदणाऱ्या ज्वालामुखीचा उद्रेक होतो त्या वेळी त्यातून राख, राळ आणि लाव्हा दूरदूरवर फेकला जातो. त्याचप्रकारे सूर्याच्या प्रभावळीतील प्लाझ्मा दूरदूरवर, संपूर्ण सौरमालिकेवर फेकला जातो. *या वेगवान मूलकणांच्या बहुतांश प्रोटॉनच्या, झोतालाच सौरवारा असं म्हणतात.* तसा हा सतत वाहतच असतो. पण अधूनमधून सूर्यावर काही वादळी घटना घडतात. सोलर फ्लेअर्स या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या तुफानांच्या वेळेस सौरवाराही वेगांनं वाहतो. त्याचा वेग सेकंदाला ९०० किलोमीटरपर्यंतही वाढतो.या झोताचा मारा संपूर्ण सौरमालिकेवर होत असतो. कोणताही ग्रह किंवा उपग्रह त्याच्या तावडीतून सुटत नाही. तरीही सूर्याला जवळ असणाऱ्या ग्रहांना त्याचा अधिक फटका बसू शकतो. वेगानं जाणाऱ्या प्रोटॉनच्या अंगी चुंबकीय बलही असतं. त्यामुळे त्या झोताचा प्रसार झालेल्या सर्वच प्रदेशावर चुंबकीय क्षेत्रही फैलावतं. सूर्य स्वतःभोवती गिरकी मारत असल्यामुळे या चुंबकीय क्षेत्राचा आकार एखाद्या स्प्रिंगसारखा किंवा गोलगोल जिन्यासारखा होतो. त्या क्षेत्राचा एक बुडबुडा तयार होऊन तो साऱ्या सौरमालिकेला गवसणी घालतो.ज्या ग्रहांना स्वतःचं चुंबकीय क्षेत्र नसतं त्यांना मग या चुंबकीय क्षेत्राच्या हमल्याच्या परिणामांना तोंड द्यावं लागतं. पृथ्वीचं स्वतःचं चुंबकीय क्षेत्र असल्यामुळे त्यावर आदळून हे मूलकण इतरत्र विखुरले जातात. पृथ्वीचा बचाव होतो. धरतीचं चुंबकीय क्षेत्र आणि सौरवारा यांच्यामध्ये होणाऱ्या या अभिक्रियेपोटीच धरतीच्या अतिउत्तरेच्या आणि अतिदक्षिणेच्या आकाशात नयनरम्य रंगांची उधळण करणाऱ्या आॅरोरांचा आविष्कार बघावयास मिळतो. आज आपण अवकाशात अनेक उपग्रह स्थापित केलेले आहेत. त्यांना चुंबकीय संरक्षक आवरण नसतं. त्यामुळे सौरवाऱ्याच्या झोतात सापडून त्यांच्या कामात बाधा येऊ शकते.*बाळ फोंडके यांच्या 'काय ?' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••चांगले विचार मनात फार वेळ टिकत नाहीत, म्हणून ते मनात येताच कृती करा.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *पहिला राष्ट्रीय सागरी दिवस* केव्हा साजरा केला गेला ?२) कनिष्ठ न्यायालयात किती व कोणत्या न्यायालयांचा समावेश होतो ?३) 'ब' जीवनसत्त्व एकूण बारा प्रकारची आहेत त्यांना काय म्हणतात ?४) 'आई' या शब्दाचे समानार्थी शब्द सांगा.५) २०२४ ला होणारी लोकसभेची कितवी निवडणूक आहे ? *उत्तरे :-* १) ५ एप्रिल १९६४ २) तीन - जिल्हा न्यायालय, तालुका न्यायालय व महसूल न्यायालय ३) बी - कॉम्प्लेक्स ४) माता, जननी, माउली, माय, मातोश्री, जन्मदात्री ५) १८ वी*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 लक्ष्मण दशरथ सावंत, कवी व शिक्षक, औरंगाबाद👤 गौरी हर्षल कुलकर्णी, समुपदेशक👤 अभिनंदन पांचाळ, धर्माबाद👤 साजिद सय्यद, शिक्षक तथा पत्रकार, धर्माबाद👤 व्यंकट चन्नावार, नायगाव👤 पोषट्टी सिरमलवार👤 दत्ताहरी पा. कदम👤 मारोती कदम👤 राजेश सुरकूटवार👤 रफिक सय्यद, सिंदखेडराजा*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *अभंगवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सासुरियां वीट आला भरतारा । इकडे माहेरा स्वभावें चि ॥१॥सांडवर कोणी न धरिती हातीं । प्रारब्धाची गति भोगूं आतां ॥२॥न व्हावी ते जाली आमुची भंडाई । तुका म्हणे काई लाजों आतां ॥३॥।। संत तुकाराम महाराज ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जीवन जगत असताना अनेकदा आपल्याला त्रास सहन करावा लागतो. पण,त्याच त्रासामधून कधीकधी आपल्याला नवी दिशा सुद्धा मिळत असते.पण, काही त्रास आपण स्वतः हून करवून घेतो. विनाकारण इतरांच्याकडे लक्ष देऊन आपली वेळ वाया घालविण्यात आणि आनंद शोधण्यात आपण.स्वतःला. धन्य समजून घेत असतो.त्यामुळे त्याचा कुठेतरी त्रास होत असतो. म्हणून नको त्या गोष्टींकडे लक्ष देऊन स्वतःला त्रास करून घेऊ नये.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आद्यगुरु शंकराचार्य हिमालयाकडे यात्रेसाठी चालले होते. त्यांच्याबरोबर त्यांचे सर्व शिष्य हि होते. प्रवास करता करता ते अलकनंदा नदीच्या पात्रापाशी येवून थांबले. तेंव्हा एका शिष्याने शंकराचार्यांची स्तुती करण्यास सुरुवात केली. शिष्य म्हणू लागला,"आचार्य ! आपण किती महान आहात, आपले ज्ञान किती मोठे आहे जणू या अलकनंदा नदीच्या पात्राप्रमाणे. हे पात्र जितके विस्तीर्ण आहे तितके तुमचे ज्ञान असावे असे मला वाटते. कदाचित यापेक्षा महासागराइतकेही तुमचे ज्ञान असू शकेल."त्याचवेळी शंकराचार्यांनी आपल्या हातातील दंड पाण्यात बुडवला आणि बाहेर काढला, शिष्य या कृतीकडे पाहत होता. पाण्यातून बाहेर काढलेला दंड शिष्याला दाखवून शंकराचार्य म्हणाले," बघ, किती पाणी आले या दंडावर? एक थेंब इतकेच ना! अरे! मला किती ज्ञान आहे ते सांगू का? जगातील ज्ञान म्हणजे अलकनंदा नदीचे पात्र आहे असे समज आणि दंड बुडवून बाहेर काढल्यावर त्यावर आलेला थेंब म्हणजे माझे ज्ञान." जगात प्रचंड ज्ञान आहे आणि त्यातील केवळ एक थेंब ज्ञान माझ्याकडे आहे असे आद्यगुरु शंकराचार्य म्हणतात.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment