✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 15 एप्रिल 2024💠 वार - सोमवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/BX8EgxHfZigDuFSk/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_जागतिक कला दिवस_* *_ या वर्षातील १०६ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *१९९७:मक्‍केपासून सहा किमी अंतरावरील मिना (सौदी अरेबिया) येथे हज यात्रेकरुंच्या तंबूला आग लागून किमान ३०० जण मृत्युमुखी पडले.**१९९४:भारताची गॅट करारावर स्वाक्षरी**१९५०:आचार्य विनोबा भावे यांनी आंध्र प्रदेशातील पंचमपल्ली येथून भूदान चळवळीस प्रारंभ केला**१९४०:दुसरे महयुद्ध – नाझी जर्मनीच्या ताब्यात असलेल्या नॉर्वेतील नॉर्विक शहरावर दोस्त राष्ट्रांच्या फौजांनी हल्ला सुरू केला.**१८९२:जनरल इलेक्ट्रिक कंपनीची स्थापना झाली**१६७३:मराठा साम्राज्याचे सरनौबत प्रतापराव गुजर यांनी बहलोलखान पठाणाविरुद्ध मोठी लढाई जिंकली.**१८६५:अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांचे निधन. अॅडयु जॅक्सन यांना अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९५:हेमंत दिनकर सावळे--लेखक**१९७६:प्रा.डॉ.संजय वाघोजी जगताप -- लेखक* *१९७३:अरुण झगडकर-- कवी,लेखक**१९७२:मंदिरा बेदी-- हिंदी चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री**१९७१:प्रा.डॉ.मिलिंद भाऊरावजी साठे-- लेखक* *१९६९:दिलीप तुळशिरामजी काळे -- कवी**१९६३:मनोज प्रभाकर-- भारतीय क्रिकेटपटूआणि प्रशिक्षक**१९६३:नरेंद्र प्रभू -- लेखक**१९६०:अशोक भैय्याजी लेकुरवाळे-- लेखक* *१९५९:विष्णु गुराबसिंह सोळंके-- प्रसिद्ध ज्येष्ठ कवी,गझलकार‎,लेखक**१९५५:डॉ.राजा दांडेकर-- लेखक**१९५२:मधुकर आरकडे--ज्येष्ठ कवी-गीतकार (मृत्यू:१५ मार्च २०१५)**१९४४:लक्ष्मीनारायण बोल्ली-- मराठी लेखक, अनुवादक व संशोधक,यांनी तेलुगु आणि मराठी अशा दोन्ही भाषांतून लेखन.(मृत्यू:२३ फेब्रुवारी २०१८)**१९३५:माधव राजाराम पोतदार -- प्रसिद्ध कवी,लेखक(मृत्यू:१६ एप्रिल २०२३)**१९३२:सुरेश भट – लोकप्रिय गझलकार, कवी (मृत्यू:१४ मार्च २००३)**१९२२:हसरत जयपुरी – गीतकार (मृत्यू:१७ सप्टेंबर १९९९)**१९१२:मल्हार सदाशिव तथा ’बाबूराव’ पारखे – उद्योजक व वेदाभ्यासक (मृत्यू:१३ जानेवारी १९९७)**१८९४:भालचंद्र लक्ष्मण पाटणकर-- संपादक, समीक्षक (मृत्यू:१४ सप्टेंबर १९७३)**१८९३:नरहर रघुनाथ तथा न.र.फाटक – चरित्रकार,टीकाकार,इतिहास संशोधक,संत साहित्याचे अभ्यासक व लेखक (मृत्यू:२१ डिसेंबर १९७९)**१८९२:पांडुरंग जीवाजी सबनीस-- वैचारिक निबंधलेखक,नाटककार (मृत्यू:२३ जून १९६९)**१८७४:त्र्यंबक सीताराम कारखानीस--मराठी नाट्यदिग्दर्शक(मृत्यू:८ जानेवारी १९५६)**१७०७:लिओनार्ड ऑयलर – स्विस गणितज्ञ (मृत्यू:१८ सप्टेंबर १७८३)**१४६९:गुरू नानक देव – शिख धर्माचे संस्थापक आणि पहिले गुरू (मृत्यू:२२ सप्टेंबर १५३९)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१५:विलास गोविंद सारंग--कवी, कथाकार,कादंबरीकार,समीक्षक (जन्म:११ जून १९४२)**२०१३:वि.रा.करंदीकर – संत साहित्याचे अभ्यासक (जन्म:२७ ऑगस्ट १९१९)**१९९५:पंडित लीलाधर जोशी – तत्कालीन मध्यभारत राज्याचे पहिले मुख्यमंत्री**१९९०:ग्रेटा लोविसा गुस्ताव्हसन ऊर्फ ’ग्रेटा गार्बो’ – हॉलिवूड अभिनेत्री (जन्म:१८ सप्टेंबर १९०५)**१९८०:जेआँ-पॉल सार्त्र – फ्रेन्च लेखक, कवी,तत्त्वज्ञ आणि नोबेल पारितोषिक विजेते (जन्म:२१ जून १९०५)**१९१२:एडवर्ड जे. स्मिथ – आर.एम.एस. टायटॅनिक जहाजाचा कप्तान (जन्म:२७ जानेवारी १८५०)**१८६५:अमेरिकेचे १६ वे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांची जॉन बूथ याने हत्या केली. (जन्म:१२ फेब्रुवारी १८०९)**१७९४:मोरेश्वर रामचंद्र पराडकर उर्फ ’मोरोपंत’ – पंडीतकवी(जन्म:१७२९)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••श्रीराम नवमी निमित्ताने प्रासंगिक लेख.... पूर्ण वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *सांगलीत उरूसातील बैलगाडा थेट गर्दीत घुसला, तरुण चाकाखाली अन् अनर्थ, गावात हळहळ*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मान्सूनपूर्व नियोजन : अमरावती जिल्ह्यात धोकादायक पुलांची पाहणी सुरु, अहवाल मागवला सार्वजनिक बांधकाम विभागाचे आदेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *खंडणीखोर वैभव देवरेने जमवली कोट्यावधींची 'माया', नाशिकमधील खासगी सावकाराचं पितळ पडलं उघडं*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त देशभरात विविध ठिकाणी अभिवादन*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *पुणे : लोकसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील चारही मतदारसंघांसाठी मतदान यंत्रांची (ईव्हीएम) ने-आण करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांना जीपीएस यंत्रणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार, अज्ञातांकडून चार राऊंड फायर, घटनेवेळी 'भाईजान' घरातच*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *लखनौ सुपरजायंट्सचा सलग दुसरा पराभव, आठ गडी राखून कोलकाता नाइट रायडर्सचा विजय तर चेन्नईने मुंबईला 20 धावाने हरविले*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *पेनिसिलिन म्हणजे काय ? पेनिसिलीनचा शोध कसा लागला ?* 📙अलेक्झांडर फ्लेमिंगना अचानकपणे पेनिसिलीनचा शोध लागला व एक मोठीच क्रांती घडून आली. पेनिसिलियम नोटेटम या प्रकारच्या बुरशीच्या आसपासचे जंतू नष्ट झालेले अपघातानेच त्यांना आढळले, म्हणून त्यावर अधिक लक्ष केंद्रित केले गेले व त्यातूनच पेनिसिलिनची निर्मिती झाली.पेनिसिलीननंतर अनेक प्रतिजैविके निर्माण झाली आहेत; पण आजही त्यालाच 'क्वीन ऑफ अँटीबायोटिक्स' असे म्हटले जाते. साठ वर्षांनंतरही या अँटीबायोटिकची उपयुक्तता सर्व डॉक्टरांना मान्य आहे. याचा शोध लागण्याआधी विविध स्वरूपाचे जीवघेणे आजार झाल्यावर रुग्ण वाचला, तर त्याचे नशीब बलवत्तर, असेच समजले जाई. न्युमोनिया, अंगावरील गळवे, मेंदूतील आवरणांचे मेनिंजायटीससारखे गंभीर आजार यांतून रुग्ण निश्चित बरा होईल, अशी खात्री पेनिसिलीनच्या वापरानंतरच वाटू लागली. याचा वापर १९६० सालच्या दशकात प्रचंड प्रमाणात सुरू झाला. पण याच सुमाराला त्याचे काही दुष्परिणामही लक्षात आले.पेनिसिलीन या औषधाला येणारी तीव्र अॅलर्जीची प्रतिक्रिया हीच मुळी जीवघेणी ठरू शकते, हे पूर्वीही ज्ञात होतेच. पण मोठ्या प्रमाणात याचा वापर सुरू झाल्यावर या रुग्णांचे प्रमाणही वाढू लागले. इंजेक्शन, गोळ्या, लहान मुलांचे औषध यांपैकी कोणत्याही प्रकारात हा त्रास हजारात एखाद्याला जाणवू शकतो. सध्या हे औषध वापरताना पूर्णत: काळजी घेऊनच वापरले जाते. १९७० सालच्या दशकात पेनिसिलीनचे कृत्रिमरीत्या उत्पादन करण्याची पद्धत विकसित होऊ लागली. आज पेनिसिलिन ग्रुप या नावाने यातील अनेक औषधे उपलब्ध आहेत. अँपिसिलिन, अॅमॉक्सिलीन, एरिथ्रोमायसिन अशा नावाच्या औषधांमध्ये त्या मानाने दुष्परिणामांचे स्वरूप खूपच कमी आहे.पेनिसिलीनचा खरा उपयोग आजही दोन प्रकारच्या रुग्णांसाठी अत्यावश्यक ठरतो. त्याला आजही फारसा पर्याय उपलब्ध नाही. लहान मुलांना सांधेदुखी व ताप यातून उद्भवणाऱ्या (Rheumatic Fever) आजारातून पुढे मागे हृदयाच्या झडपांवर परिणाम होण्याची शक्यता असते. अशा मुलांना पेनिसिलीनच्या प्रतिबंधाखाली ठेवले तर मात्र हा उपद्रव होत नाही. कित्येक वेळा १० ते १५ वर्षे हा वापर महिन्यातून एक इंजेक्शन देऊन केला जातो. दुसऱ्या प्रकारचा आजार म्हणजे सिफीलिसचा. गुप्तरोगांपैकी या आजारावरचे आजही सर्वात प्रभावी औषध म्हणून पेनिसिलीनचाच वापर करावा लागतो.किंमत, उपयुक्तता, देण्याची पद्धत व आजारावर होणाऱ्या परिणामांचा कालावधी या सर्वांचा विचार करता पेनिसिलिन नि:संशय 'क्वीन ऑफ अँटीबायोटिक्स'च म्हणावे लागेल.'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आयुष्यात यश मिळवण्यासाठी चिकाटीला जिवलग मित्र बनवा.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) शेणापासून कोणता गॅस मिळतो ?२) महाराष्ट्रात सर्वाधिक मतदारांची संख्या कोणत्या जिल्ह्यात आहे ?३) गंगा, यमुना व सरस्वती या तीन नद्यांचा संगम कोणत्या ठिकाणी झाला आहे ?४) 'आश्चर्य' या शब्दाचे समानार्थी शब्द सांगा.५) स्वतंत्र भारताचे पहिले आरोग्यमंत्री कोण होते ?*उत्तरे :-* १) मिथेन २) पुणे ३) प्रयागराज ४) नवल, अचंबा ५) राजकुमारी अमृत कौर*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 प्रा. श्रीराम गव्हाणे, संपादक, नांदेड👤 शिवाजी अंबुलगेकर, साहित्यिक, मुखेड👤 सुधीर गुट्टे, ADEI, नांदेड👤 इमरान शेख👤 चंद्रकांत देवके, सेवानिवृत्त शिक्षक, धर्माबाद👤 अंकुश दांडेवाड, उमरी👤 बबन साखरे, नांदेड👤 योगेश बलकेवाड, येवती👤 दत्ताहारी पाटील कदम, धर्माबाद👤 सुनील पलांडे, शिक्षक, पुणे👤 मुकुंद एडके, धर्माबाद👤 संदीप पारणे, धर्माबाद👤 रामकिशोर झंवर, व्यापारी, धर्माबाद👤 सारिका बलचिम, पुणे👤 संतोष लक्ष्मण पाटील, येवती👤 कालिदास बोगेवार, धर्माबाद*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *अभंगवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••न राहे रसना बोलतां आवडी । पायीं दिली बुडी माझ्या मनें ॥१॥मानेल त्या तुम्ही अइका स्वभावें । मी तों माझ्याभावें अनुसरलें ॥२॥तुका म्हणे तुम्हीं फिरावें बहुतीं । माझी तों हे गती जाली आतां ॥३॥।। संत तुकाराम महाराज ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••गालात हास्य ठेवून नेहमीच आनंदीत दिसणारी व्यक्ती, सुखात असेलच असेही नाही. सुख, आणि दु:ख या दोघांनाही ती पूर्णपणे परिचित असते. फरक एवढेच की,ती आपले दु:ख कोणालाही सांगत नाही कारण, त्या दु:खाशी त्याचे विशेष नाते जुळलेले असते. म्हणून आपणही आलेल्या प्रत्येक परिस्थितीचा सामना हसत मुखाने करावे. या प्रकारचे जगणे बघून दु:ख सुद्धा नतमस्तक होतात.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *निरीक्षण*वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापकांनी एक दिवस विद्यार्थ्यांची सूक्ष्म निरीक्षण शक्ती आणि किळस सोसण्याची क्षमता पाहण्यासाठी एक प्रयोग केला. विद्यार्थ्यांना म्हणाले, “या काचेच्या वाटीत घाणेरडे पाणी आहे. मी वाटीत बोट बुडवून तोंडात घालणार आहे. प्रत्येकाने पाहून तसेच करायचे. तिटकारा दर्शवायचा नाही. सरांनी वाटीत बोट बुडवूनचाखले. पाठोपाठ एका मागून एक विद्यार्थ्यांनी ते गढूळ पाणी काहीशा अनिश्चेनेच चाखले.प्राध्यापक म्हणाले, “किळस न मानण्याच्या गुणात तुम्ही सगळेच पास झालात, पण सूक्ष्मनिरीक्षणाच्या गुणात सगळेच फसलात.”‘मी करतो तसे तुम्ही करायचेहोते. तुमच्या कुणाच्याच लक्षात आले नाही, मी एक बोट वाटीत बुडवले व चाखले दुसरेच.’विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचे फसविले गेल्याचे भाव पाहून प्राध्यापकांनी वाटीतले सर्व पाणी पिऊन टाकले.  म्हणाले , ‘या पाण्यात अपायकारक काहीच नाही !’ आता विद्यार्थी खुष झाले. तात्पर्यः प्रयोगातून अप्रिय सत्य बाहेर आले तरी ते मनोमनपटते व त्यातूनच यशाचा मार्ग खुला होतो.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

1 comment:

  1. Get expert assignment help from our website and ace your grades. Our team of professionals is here to assist you with all your academic needs.

    ReplyDelete