✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 19 एप्रिल 2024💠 वार - शुक्रवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.saamana.com/priya-bhosale-article-on-veteran-actress-lalita-pawar/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील ११० वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *१९८१:महाराष्ट्र विधान भवनाचे इंदिरा गांधी यांच्या शुभहस्ते उद्घाटन* *१९७५:’आर्यभट्ट’ हा भारताचा पहिला उपग्रह रशियन अंतराळस्थानकावरुन प्रक्षेपित करण्यात आला**१९७१:सिएरा लिओन प्रजासत्ताक बनले**१९५६:गीतरामायणातील शेवटचे गाणे पुणे आकाशवाणीवरुन प्रसारित झाले.**१९४८:ब्रह्मदेशचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश**१९४५:सोविएत रशिया आणि ग्वाटेमालामधे राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले.**१५२६:मोगल साम्राज्याचा संस्थापक जहीरुद्दीन महंमद बाबर याने दिल्लीच्या इब्राहीमखान लोदीचा पराभव करुन मोगल राजसत्तेचा पाया घातला.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८७:मारिया शारापोव्हा – रशियन लॉनटेनिस खेळाडू**१९७९:रंजना सतीश खेडकर-- कवयित्री* *१९७३:डॉ.अशोक लिंबेकर -- लेखक, समीक्षक**१९७२:सचिन जगताप-- प्रसिद्ध बासरी वादक**१९६८:रूपक कुलकर्णी-- बासरी वादक,पं. हरिप्रसाद चौरसिया यांचे शिष्य**१९६४:प्रा.डॉ.संदीप पांडुरंग ताटेवार-- लेखक* *१९६२:डॉ.आनंद सदाशिव सहस्त्रबुद्धे-- कथा,कादंबरी लेखन करणारे लेखक* *१९५७:मुकेश अंबानी – प्रसिद्ध उद्योगपती**१९५५:भिकू नारायण बारस्कर -- प्रसिद्ध कथाकार,चरीत्रकार,संपादक**१९४१:माधव सरपटवार-- लेखक,पत्रकार, संपादक**१९३७:भगवान भटकर-- प्रसिद्ध कवी, विचारवंत* *१९३३:डिकी बर्ड – ख्यातनाम क्रिकेट पंच**१९३०:मालती पांडे-बर्वे-- हिंदी आणि मराठी भाषांत गाणाऱ्या मराठी गायिका(मृत्यू:२७ डिसेंबर १९९७)**१९२६:प्रभाकर विष्णू सोवनी-- विज्ञान विषयक लेखन करणारे लेखक,संपादक (मृत्यू:२० नोव्हेंबर २०१५)**१९२५:अनंत रामचंद्र कुलकर्णी-- मध्ययुगीन महाराष्ट्राच्या इतिहासाचे अभ्यासक,संशोधक, इतिहासकार.(मृत्यू:२४ मे २००९)**१९१२:ग्लेन सीबोर्ग – नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ (मृत्यू:२५ फेब्रुवारी १९९९)**१८९५:केशव नारायण वाटवे-- साहित्यविमर्शकार,समीक्षक( मृत्यू:९ मे १९८१)**१८९२:ताराबाई मोडक – शिक्षणतज्ञ. कोसबाड येथील आदिवासींच्या जीवनात बालशिक्षण व सुधारणांचे नंदनवन त्यांनी फुलवले.(मृत्यू:३१ ऑगस्ट १९७३)**१८६८:पॉल हॅरिस – रोटरी क्लबचे संस्थापक (मृत्यू:२७ जानेवारी १९४७)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१०:मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष – लेखक व टीकाकार (जन्म:७ जून १९१३)**२००९:अहिल्या रांगणेकर – मार्क्सवादी कम्युनिस्ट नेत्या (जन्म:८ जुलै १९२२)**२००८:सरोजिनी बाबर – लेखिका, संतसाहित्याच्या अभ्यासिका(जन्म:७ जानेवारी १९२०)**१९९४:मेजर जनरल राजिंदरसिंग ‘स्पॅरो’ – पंजाबचे माजी मंत्री.पाकिस्तानच्या ’पॅटन’ रणगाड्यांचा धुव्वा उडवल्याबद्दल त्यांचा ’ईगल’ (गरूड) म्हणून गौरव केला असता,मी तर केवळ एक ’स्पॅरो’ (चिमणी) आहे,असे त्यांनी सांगितले,आणि तेच त्यांचे टोपणनाव रुढ झाले.**१९९३:डॉ.उत्तमराव पाटील – स्वातंत्र्यसैनिक, पत्री सरकारमधे त्यांचा सहभाग होता**१९७४:आयुब खान – फील्ड मार्शल आणि पाकिस्तानचे दुसरे राष्ट्राध्यक्ष (जन्म:१४ मे १९०७)**१९५५:जिम कॉर्बेट – ब्रिटिश - भारतीय वन्यजीवतज्ञ,शिकारी व लेखक (जन्म:२५ जुलै १८७५)**१९१०:अनंत कान्हेरे – क्रांतिकारक (जन्म: १८९१)**१९०६:पिअर क्यूरी – नोबेल पारितोषिकविजेते फ्रेन्च भौतिकशास्त्रज्ञ (जन्म:१५ मे १८५९)**१८८२:चार्ल्स डार्विन – उत्क्रांतीवादाचा सिद्धांत मांडणारे ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ (जन्म:१२ फेब्रुवारी १८०९)**१८८१:बेंजामिन डिझरेली – इंग्लंडचे पंतप्रधान (जन्म:२१ डिसेंबर १८०४)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••दैनिक सामनामध्ये प्रकाशित प्रिया भोसले यांचा प्रासंगिक लेख*ललिता पवार - जन्मदिन विशेष*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *आज पहिल्या टप्प्यातील मतदान :10 हजार 652 मतदान केंद्रांवर 95 लाख 54 हजार मतदार करणार उमेदवारांचा फैसला*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राच्या अडचणीत वाढ, ईडीने जप्त केली 97 कोटींची मालमत्ता*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *मोठी दुर्घटना ! कोयनेच्या शिवसागर जलाशयात स्पीड बोट बुडाली, तिघे करत होते प्रवास*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *ललित साहित्य म्हणजे सामाजिक इतिहासाचा दस्तऐवज:इतिहास अभ्यासक प्रा. डॉ. श्रद्धा कुंभोजकर यांचे प्रतिपादन*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *गीत रामायणातील 56 गीतांचे होणार सादरीकरण:पुण्यात 'हटके' कार्यक्रम; तब्बल 25 हून अधिक कलाकारांचा असेल समावेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *क्रेडाई देणार भावी अभियंत्यांना प्रशिक्षण:नवअभियंत्यांना 200 तासांचे कौशल्याधारित मार्गदर्शन; क्रेडाई मेट्रो-VIIT मध्ये सामंजस्य करार*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *मुंबई इंडियन्सने पंजाबला 9 धावाने हरविले*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📕 *उन्हाळी लागणे म्हणजे काय ?* 📕************************बऱ्याचदा उन्हामुळे असा त्रास आपल्याला होत असतो. उन्हाळी लागणे म्हणजे लघवी करताना जळजळ होणे व मूत्रमार्ग दुखणे. लघवीतील पाण्याचे प्रमाण कमी झाले, तर मूत्रनलिकेतील आवरणास इजा होते. त्यामुळे लघवी करताना आग होते. मूत्रनलिकेत आवरणाचा दाह होत असल्याने साध्या लघवीमुळे जळजळ होते. मूत्रपिंडामध्ये लघवी तयार होत असते. मूत्र तयार होण्याचा मुख्य उद्देश म्हणजे शरीरातील पाणी, क्षार यांचे संतुलन राखणे व शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर टाकणे हा आहे. साहजिकच पाणी कमी प्यायले, तर मूत्राचे प्रमाण कमी होते; परंतु मूत्रातील क्षारांचे व टाकाऊ पदार्थांचे प्रमाण तेवढेच राहते. साहजिकच त्यामुळे लघवी सौम्य न होता जळजळीत होते. अशावेळेस लघवी गडद पिवळी किंवा लालसर दिसते. यामुळे मूत्रनलिकेच्या आवरणाचा दाह होतो. पाणी कमी पिणे, या कारणाशिवाय जंतूसंसर्गामुळे, मूतखड्यामुळे मूत्रनलिकेला दाह होऊन लघवी करतेवेळी जळजळ होते.यावर उपाय म्हणजे नेहमीच विशेषत: उन्हाळ्यात जास्त पाणी पिणे. घामाचे प्रमाण लक्षात घेऊन दिवसभरात एक लिटर लघवी होईल इतके पाणी प्यावे. उन्हाळी लागलेली असल्यास लिंबूपाण्यात खाण्याचा सोडा टाकून प्यावे. १०० मिलीलिटर म्हणजे साधारणतः एक कप पाण्यात २.५ ग्रॅम धने भिजत ठेवून ते पाणी साखर टाकून १२-१२ तासांनी प्यायल्याने उतारा पडतो/ जळजळ कमी होण्यास मदत होते.*डाॅ. अंजली दिक्षित व डाॅ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••नम्रतेने जे लाभेल ते बळाने कधीच मिळणार नाही.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) 'फासे पारध्यांना माणसासारखे जगू द्यावे' हे उद्गार कोणाचे आहेत ?२) राज्यसभेचे सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात ?३) हडप्पा संस्कृती कोणत्या नदीच्या खोऱ्यात विकसित झाली ?४) 'आज्ञा' या शब्दाचे समानार्थी शब्द सांगा.५) भारतीय निवडणूक आयोगाने स्वतंत्र, निष्पक्ष व पारदर्शक निवडणूक होण्यासाठी कोणते पोर्टल सुरू केले आहे ? *उत्तरे :-* १) छत्रपती शाहू महाराज २) राष्ट्रपती ३) सिंधू ४) आदेश, हुकूम ५) सुविधा*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 हर्षवर्धन घाटे, पत्रकार, बिलोली👤 भक्ती जठार👤 संदीप बोलचेटवार, धर्माबाद👤 संतोष पुरणशेट्टीवार, धर्माबाद👤 मनोज रामोड👤 अझर शेख👤 बालाजी पोरडवार👤 संदीप काटमवाड, बिलोली👤 सचिन कनोजवार👤 कृष्णा राय*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *अभंगवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सावध जालों सावध जालों । हरिच्या आलों जागरणा ॥१॥तेथें वैष्णवांचे भार । जयजयकार गर्जतसे ॥ध्रु.॥पळोनियां गेली झोप । होतें पाप आड तें ॥२॥तुका म्हणे त्या ठाया । ओल छाया कृपेची ॥३॥।। संत तुकाराम महाराज ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••भांड्यावर झाकण असते पण, तोंडावर नाही. लाकडाचा तोंड राहिला असता तर केव्हाचाच फुटला असता. या, प्रकारचे शब्द अनेकांच्या बोलण्यातून ऐकायला मिळत असते. म्हणून ज्यांना ज्या,शब्दात बोलण्याची सवय आहे त्यांना बिनधास्तपणे बोलू द्यावे त्यांच्याकडे आपण जास्त लक्ष देऊ नये. ते आपले काम करतात आपण आपले काम करत रहावे.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*शास्त्राचा उपयोग कोणता ?*प्राचीन भारतात नागार्जुननावाचे एक महान रसायन शास्त्रज्ञ होऊन गेले. त्यांना एका सहाय्यकाची आवश्यकता होती.दोन तरुण या कामासाठी त्यांच्या मुलाखतीला आले म्हणा ना – आचार्यांनी दोघात एक पदार्थदिला व त्यापासून एक विशिष्ट रसायन करून आणायला सांगितलं. तीन दिवसाचा अवधी दिला. दोघे उत्साहाने कामाला लागले. तीन दिवसांनी परत आले. आचार्यांनी विचारले, ‘कामात काही अडचणी तर आल्या नाहीत?’ पहिला अभिमानाने म्हणाला, “आईला ताप होता वडील पोटदुखींना हैराण झाले होते. भाऊ पडल्यामुळे हाडाला मार लागला होता. पण माझी साधना मी सोडली नाही व हे रसायन करून आणल आहे.” दुसरा म्हणाला, आचार्य, क्षमा असावी. मी घरी जात असता वाटेत एक वृद्ध रुग्ण दिसला. निर्धनही होता बिचारा. त्याला औषधोपचार करून त्याचे व्यवस्था लावण्यातवेळ गेला. आपण दिलेलं काम पूर्ण करू शकलो नाही. कृपया आणखी दोन दिवसाची सवड द्यावी.आचार्यांनी त्याचीच निवड केली. ते म्हणाले, ‘रसायन शास्त्राचा उपयोग जीवन रक्षणासाठी झाला पाहिजे, समाजविन्मुख ज्ञानाचा काय उपयोग?’ तात्पर्यः ज्ञानाचा/शिक्षणाचा उपयोग समाजात झाला तर खऱ्या अर्थाने शिक्षणाचा उपयोग झाला असे समजावे.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment