✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 13 मार्च 2024💠 वार - बुधवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/ng6uEjq2Rr24Kx52/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_ या वर्षातील ७३ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२००७:वेस्ट इंडीजमधे ९ व्या क्रिकेट विश्वकरंडक क्रिकेटस्पर्धेचे उद्‍घाटन झाले.**१९९९:जलाशयाच्या तळाला भोक पाडून त्यातील पाणी बोगद्याच्या साह्याने भूमिगत जलविद्युतगृअहात नेऊन त्याद्वारे वीजनिर्मिती करणार्‍या (Lake Tapping) आशिया खंडातील पहिल्या प्रयोगाच्या कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या चौथ्या टप्प्याचे उद्‌घाटन**१९९७:मदर तेरेसा यांचे वारस म्हणून कोलकात्यातील ’मिशनरीज ऑफ चॅरिटीज’ ने सिस्टर निर्मला यांची नियुक्ती केली.**१९६३:असामान्य क्रीडा नैपुण्यासाठी अर्जुन अवार्ड देणे सुरू* *१९४०:अमृतसर येथील जालियनवाला बाग हत्याकांडाचे समर्थन करणारे पंजाबचे गव्हर्नर मायकेल ओडवायर यांची उधमसिंग यांनी गोळया घालून हत्या केली.**१९३०:क्लाईड डब्ल्यू. टॉमबॉग या शास्त्रज्ञाने प्लूटो ग्रह शोधल्याचे हारवर्ड कॉलेज येथील वेधशाळेला कळवले. मात्र या ग्रहाचा शोध त्याला १८ फेब्रुवारी १९३० या दिवशीच लागला होता.**१९१०:पॅरिसहुन लंडनला येताच स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अटक झाली.**१७८१:विल्यम हर्षेल याने युरेनसचा शोध लावला.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९७८:अनुषा रिझवी-- चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथा लेखक**१९७४:नितीन राजेंद्र देशमुख-- प्रसिद्ध कवी, गझलकार,लेखक**१९६८:श्रीकांत पांडुरंग चौगुले-- प्रसिद्ध लेखक**१९५८:अश्विनी अनिल कुलकर्णी-- लेखिका* *१९५७:ऋतुजा चैतन्य माने -- कवयित्री, लेखिका* *१९५६:लोकनाथ यशवंत-- मराठी भाषेतील आंबेडकरवादी विचारांची प्रेरणा असलेले कवी, व दलित विश्वाचा नवा पैलू प्रकट करणारे मराठीतले लेखक**१९५१:यशोधरा पोतदार-साठे-- मराठी कवयित्री* *१९४६:जनार्दन कृष्णाजी पाटील (मगर)-- लेखक,समाजकार्य**१९४६:शकुंतला गंगाधर सोनार -- कवयित्री, लेखिका* *१९४६:अभिलाष-- सुप्रसिद्ध गीतकार 'इतनी शक्ति हमें देना दाता' (मृत्यू:२७ सप्टेंबर २०२०)**१९४६:श्रीराम विनायक साठे--ज्येष्ठ इतिहास अभ्यासक आणि लेखक(मृत्यू:२५ सप्टेंबर २०२३)**१९४३:प्रा.वामन सुदामा निंबाळकर--कवी विचारवंत व लेखक (मृत्यू:३ डिसेंबर २०१०)**१९४०:प्रा.डॉ.हेमा साने -- लेखिका* *१९३६:डॉ.वनमाला पानसे -- कवयित्री, लेखिका* *१९३३:सुलोचना चव्हाण --- मराठी गायिका, लेखिका (मृत्यू:१० डिसेंबर २०२२)**१९२६:रविन्द्र पिंगे –ललित लेखक (मृत्यू:१७ आक्टोबर २००८)**१९२६:लीला भालचंद्र गोळे-- संतांवर परिचयात्मक पुस्तके लिहिणाऱ्या मराठी लेखिका**१९०१:केशव बाबूराव लेले -- मूर्तिकार,हलत्या चित्रांचे प्रदर्शनकार व कलाप्रसार.(मृत्यू:५ जानेवारी १९४५)**१८९३:डॉ.वासुदेव विष्णू मिराशी – महामहोपाध्याय,संस्कृत विद्वान,आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भारतीय प्राच्यविद्यासंशोधक (मृत्यू:३ एप्रिल १९८५)**१८८१:दत्तात्रय विष्णू आपटे--इतिहास संशोधक,संपादक(मृत्यू:२७ ऑक्टोबर १९४३)**१७३३:जोसेफ प्रिस्टले – इंग्लिश रसायनशास्रज्ञ (मृत्यू:६ फेब्रुवारी १८०४)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१७:प्रा.मालतीबाई किर्लोस्कर-- प्रसिद्ध लेखिका (जन्म:१९२३)**२००४:उस्ताद विलायत खाँ – सतारवादक (जन्म:२८ ऑगस्ट १९२८)**१९९६:शफी इनामदार –अभिनेते व नाट्यनिर्माते (जन्म:२३ आक्टोबर १९४५)**१९९३:डॉ.मधुकर(मधू) शंकर आपटे--ज्येष्ठ रंगकर्मी व चित्रपट अभिनेते (जन्म:१ मार्च १९१९)**१९९४:श्रीपाद यशवंत कोल्हटकर – मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते व 'सिटू' या कामगार संघटनेचे लढवय्ये नेते**१९६७:सर फँक वॉरेल – वेस्ट इंडिजचे क्रिकेट खेळाडू (जन्म:१ऑगस्ट १९२४)**१९५९:गंगाधर भाऊराव निरंतर-- कादंबरीकार,ललित लेखक(जन्म:१५ जून १९०६)**१९५५:वीर विक्रम शाह ’त्रिभुवन’ – नेपाळचे राजे (जन्म:२३ जून १९०६)**१९०१:बेंजामिन हॅरिसन – अमेरिकेचे ३३वे राष्ट्राध्यक्ष (जन्म:२० ऑगस्ट १८३३)**१८९९:दत्तात्रेय कोंडो घाटे ऊर्फ ’कवी दत्त’--अर्वाचीन मराठी कवी(जन्म:२७ जून १८७५)**१८००:बाळाजी जनार्दन भानू उर्फ 'नाना फडणवीस' (जन्म:१२ फेब्रुवारी १७४२)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही._* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••* जिल्हा परिषद शाळा कात टाकतंय ...... *जिल्‍हा परिषदेच्‍या सरकारी शाळा म्‍हटले की, प्रत्‍येकांच्‍या डोळ्यासमोर एक वेगळेच चित्र उभे राहते. ज्‍या चित्रात त्‍या शाळाची, तेथील परिसराची, शिक्षकांची आणि विद्यार्थ्‍याच्या बाबतीतचे चित्रण भयानक दिसून येते. या शाळांची स्थिती कधीच सुधारणार नाही, अशी धारणा प्रत्‍येकाची बनलेली आहे. या शाळांत फक्त गरिबांची मुलेच शिकतात म्‍हणून यास गरिबांची शाळा असे सुध्‍दा संबोधले जाते............ ..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *पंढरपुरातील विठ्ठलाचं चरणस्पर्श दर्शन दीड महिन्यांसाठी बंद, गाभाऱ्याच्या कामासाठी विठुरायाची मूर्ती अनब्रेकेबल पेटीत ठेवणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *महाराष्ट्रातील पहिल्याच सभेत राहुल गांधींची गर्जना, सत्तेत आल्यास जातीय जनगणनेची हमी*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांचा राजीनामा, भाजप-जननायक जनता पार्टी युती तुटली, भाजपचे नायब सिंग सैनी यांची नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *दिल्लीत शिंदेंची मोठी डील; मुंबईत 6 पैकी 5 जागा भाजपच्या पारड्यात पडल्याची चर्चा, सेनेचे ज्येष्ठ नेते गजानन कीर्तीकरांचा पत्ता कट होण्याची चिन्हं*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *वसंत मोरे यांचा राजीनामा, मनसेच्या फायरब्रँड नेत्याचा राज ठाकरेंना जय महाराष्ट्र!*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *करीरोडचं नाव लालबाग, सॅण्डहर्स्ट रोडचं डोंगरी, कॉटन ग्रीनचं काळाचौकी; मुंबईतील 8 रेल्वे स्थानकांची नावे बदलणार ?*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *रणजी फायनलवर मुंबईची पकड घट्ट, मुशीरचं शतक, रहाणे-अय्यरची अर्धशतकं, विदर्भापुढे 538 धावांचे आव्हान*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••☀ *उन्हात काम करणारा माणूस का काळवंडतो ?* ☀उन्हात काम करणारा माणूस, तसेच भारतासारख्या उष्ण कटिबंधातील व्यक्ती सामान्यतः सावळी वा काळी असते. मेलॅनिन नावाचे रंगद्रव्य आपल्या त्वचेत असते आणि ते व्यक्तीस सावळा, काळा, गोरा इत्यादी रंग देते. या रंगद्रव्याचे प्रमाण कमी असल्यास व्यक्ती गोरी असते. हे प्रमाण अधिक असल्यास व्यक्ती सावळी वा काळी होते. सूर्यप्रकाशातील अतिनील किरणे ही त्वचेस हानिकारक असतात. त्यामुळे या किरणांपासून संरक्षण त्वचेतील रंगद्रव्य करत असते.उन्हात काम करणाऱ्या व्यक्तीच्या त्वचेचे अतिनील किरणांपासून संरक्षण करण्यासाठी मेलॅनिन हे रंगद्रव्य वाढावयास लागते. वाढलेल्या या मेलॅनिनमुळे ती व्यक्ती पूर्वीपेक्षा काळवंडलेली दिसते आणि उन्हात वावरणे कमी झाल्यावर रंग पूर्ववत होतो.युरोप, ऑस्ट्रेलियासारख्या शीत कटिबंधातील व्यक्तींमध्ये मेलॅनिन रंगद्रव्य अत्यल्प प्रमाणात असल्याने त्यांच्यामध्ये त्वचेच्या कर्करोगाचे प्रमाण जास्त असते. अतिनील किरणांचा प्रभाव टाळण्यासाठी म्हणूनच क्रिकेटपटू उन्हात खेळताना चेहऱ्याला संरक्षक मलम लावतात. भारत, श्रीलंका अशा उष्ण कटिबंधातील देशांमध्ये खेळायला येणारे गोरे खेळाडू अशी मलमे लावून (तोंडावर रंगरंगोटी करून !) खेळताना तुम्ही दूरदर्शनवर नक्कीच बघितले असेल.*डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित* यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातूनमनोविकास प्रकाशन👆*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••प्रत्येक प्रश्नाचे सर्वात चांगले उत्तरम्हणजे शांत राहणे.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *"मेरा जीवन ही मेरा संदेश है"* असे कोणी म्हटले होते ?२) गावाच्या नोंदीचे उतारे कोण देतो ?३) भारताचे दुसरे लोकपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?४) वाऱ्यामध्ये कोणत्या प्रकारची ऊर्जा असते ?५) पद्मनाभ स्वामी मंदिर कोणत्या राज्यात आहे ? *उत्तरे :-* १) महात्मा गांधी २) तलाठी ३) अजय खानविलकर ४) गतिज ऊर्जा ५) केरळ*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 भगवान कांबळे, नांदेडभूषण पत्रकार👤 डॉ. बालाजी खानापुरे, नांदेड👤 शेख रुस्तम, जि. प. नांदेड👤 सुरेश बोईनवाड👤 कामाजी धुतुरे👤 लक्ष्मण वडजे👤 साईनाथ बोमले*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *अभंगवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••दुकजियाला भ्रांति भाविकाला शांति । साधुची ती वृत्‍ती लिन झाली ॥१॥लीन झाली वृत्‍ती ब्रह्माते मिळाले । जळांत आटले लवण जैसे ॥२॥लवण जैसे पुन्‍हा जळाचे बाहेरी । येत नाही खरे त्‍यातुनिया ॥३॥त्‍या सारिखे तुम्‍ही जाणा साधुवृत्‍ती । पुन्‍हा न मिळती मायाजाळी ॥४॥मायाजाळ त्‍यांना पुन्‍हा रे बाधेना । सत्‍य सत्‍य जाणा तुका म्हणे ॥५॥।। संत तुकाराम महाराज ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मी म्हणजेच सर्वकाही, मला सर्व येते, मला सर्वच काही जमते, माझ्याकडे कशाचीही कमी नाही, मी कोणाच्यामागे धावणार नाही, मी सर्वात श्रेष्ठ व गुणवान आहे, हा अहंभाव जेव्हा, आपल्या अंगी शिरते त्यावेळी आपल्या अंतर्मनाला विचारून बघावे. नक्कीच या सर्व प्रश्नांची उत्तरे आपोआप, आपल्याला मिळतील. कुठेही शोधाशोध करण्यासाठी जावे लागणार नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *शिंपले* एक 6 वर्षाचा मुलगा आपल्या 4 वर्षाच्या लहान बहिणीसोबत बाजारातून जात असतो. अचानक त्याला जाणवते की त्याची बहीण मागे राहिली आहे. तो थांबतो व मागे वळून पाहतो तर त्याला दिसते की, त्याची बहीण एका खेळण्याच्या दुकानासमोर उभी राहून अतिशय कुतूहलाने काहीतरी पहात आहे. तो मुलगा मागे जातो व तिला विचारतो, "तुला काही हवे आहे का?" ती एका बाहुलीकडे बोट दाखविते. तो मुलगा तिचा हात धरतो व एका जबाबदार मोठ्या भावा प्रमाणे तिला ती बाहुली देतो. ती बहीण अत्यानंदीत होते. हे सर्व तो दुकानदार पहात असतो व त्या मुलाचे प्रगल्भ वागणे पाहून आश्चर्यचकित होतो.इतक्यात तो मुलगा काउंटर कडे येतो व त्या दुकानदाराला विचारतो "काका, किती किंमत आहे या बाहुलीची?" दुकानदार एक शांत माणूस असतो व त्याने जीवनाचे अनेक चढ उतार पाहिलेले असतात. तो त्या मुलाला प्रेमाने व आपुलकीने विचारतो "बोल तू काय देशील?" मुलगा आपल्या खिशातील सर्व शिंपले,जे त्याने व त्याच्या बहिणीने नुकतेच समुद्रकिनाऱ्यावर गोळा केलेले असतात ते बाहेर काढतो व दुकानदाराला देतो. दुकानदार ते घेतो व जणूकाही पैसे मोजत आहे या अविर्भावात मोजायला सुरु करतो. शिंपले मोजून झाल्यावर त्या मुलाकडे पाहताच मुलगा म्हणतो " कमी आहेत का ?" दुकानदार म्हणतो " नाही नाही, हे बाहुलीच्या किमतीपेक्षा जास्त आहेत. ज्यादाचे मी परत करतो. असे म्हणून तो केवळ 4 शिंपले घेतो व बाकी सर्व शिंपले त्याला परत करतो. मुलगा एकदम आनंदात ते शिंपले आपल्या खिशात ठेवतो व बहिणीसोबत निघून जातो. हे सर्व त्या दुकानातील कामगार पहात होता. त्याने आश्चर्याने मालकाला विचारले, " मालक ! इतकी महागडी बाहुली तुम्ही केवळ 4 शिंपल्यांच्या मोबदल्यात दिलीत ?" दुकानदार एक स्मित हास्य करीत म्हणाला, "आपल्यासाठी हे केवळ शिंपले आहेत. पण, त्या मुलासाठी हे शिंपले अतिशय मौल्यवान आहेत. आणि आत्ता या वयात त्याला नाही समजणार पैसे काय असतात. पण जेंव्हा तो मोठा होईल ना, तेंव्हा नक्कीच समजेल. आणि जेंव्हा त्याला आठवेल कि आपण पैश्यांच्या ऐवजी शिंपल्यांच्या मोबदल्यात बाहुली खरेदी केली होती, तेंव्हा त्याला माझी आठवण होईल आणि तो हा विचार करेल कि हे विश्व चांगल्या माणसांनी भरलेले आहे.हीगोष्ट त्याच्यातील सकारात्मक दृष्टीकोन वाढण्यासाठी मदतीची ठरेल आणि तो सुद्धा चांगला माणूस बनण्यासाठी प्रेरित होईल." *तात्पर्य* -- " पेरावे तसे उगवते." म्हणून केवळ पैशांच्या मागे न लागता, असे काहीतरी चांगले काम करा, जे पुढच्या पिढयांना चांगले काम करण्याची प्रेरणा देईल, सकारात्मक दृष्टीकोन देईल.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment