✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 09 जानेवारी 2024💠 वार - मंगळवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://nasayeotikar.blogspot.com/2017/12/blog-post_8.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*प्रवासी भारतीय दिवस*••••••••••••••••••••••••••••••••••••*_ या वर्षातील ९ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२००१नव्या सहस्त्रकातील पहिल्या महाकुंभमेळ्याला अलाहाबाद येथे प्रारंभ झाला.**२००१:नव्या सहस्रकातील पहिले खग्रास चंद्रग्रहण दिसले.**१९१५:महात्मा गांधींचे अफ्रिकेतुन भारतात आगमन**१८८०:क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांना देशद्रोहाच्या आरोपावरुन जन्मठेपेची शिक्षा**१७८८:कनेक्टिकट हे अमेरिकेचे ५ वे राज्य बनले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९७४:पंडित रामाजी लोंढे-- कवी* *१९७४:फरहान अख्तर-- भारतीय अभिनेता, चित्रपट निर्माता,लेखक,संवाद लेखक,गायक**१९६५:फराह खान -- भारतीय चित्रपट दिग्दर्शक,लेखिका,चित्रपट निर्माता,अभिनेत्री,नृत्यांगना आणि कोरिओग्राफर**१९६३:डॉ.लीना पांढरे -- लेखिका, अनुवादक**१९६३:सुरेश कृष्णाजी पाटोळे-- सुप्रसिद्ध लेखक,दिग्दर्शक**१९६०:डॉ.किशोर रामचंद्र महाबळ--अभ्यासू, लेखक तसेच अनेक वृत्तपत्रांतून लेखन (मृत्यू:५ फेब्रुवारी २०१५)**१९५१:प्रा.अजित मधुकर दळवी-- प्रसिद्ध नाटककार**१९५१:पं.सत्यशील देशपांडे – ख्यालगायक व पं. कुमार गंधर्व यांचे पट्टशिष्य**१९४६:सुभाषकुमार अनंतराव बागी-- कवी, लेखक* *१९३८:चक्रवर्ती रामानुजम – गणितज्ज्ञ (मृत्यू:२७ आक्टोबर १९७४)**१९३४:महेंद्र कपूर –पार्श्वगायक (मृत्यू:२७ सप्टेंबर २००८)**१९२७:राजाराम भालचंद्र पाटणकर-- मराठीतील लेखक, समीक्षक आणि सौंदर्यशास्त्रज्ञ (मृत्यू:२४ मे २००४)**१९२६:कल्याण कुमार गांगुली तथा अनुप कुमार – चित्रपट अभिनेते (मृत्यू:२० सप्टेंबर १९९७)**१९२२:हर गोविंद खुराना – जन्माने भारतीय असलेले अमेरिकन नोबेल पारितोषिक विजेते (मृत्यू:९ नोव्हेंबर २०११)**१९१८:प्रभाकर वामन ऊर्ध्वरेषे-- पत्रकार, समीक्षक,मार्क्सवादी विचारवंत(मृत्यु:१० जुलै १९८९)**१९१३:रिचर्ड निक्सन – अमेरिकेचे ३७ वे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू:२२ एप्रिल १९९४)**१८७७:केशवराव रघुनाथ देशमुख--ज्ञानेश्वरी प्रवचनकार व संतकव्याचे अनुवादक (मृत्यू:२७ एप्रिल १९४२)**१८५४:रावसाहेब गोविंद वासुदेव कानिटकर-- मराठी कवी व भाषांतरकार(मृत्यू:४ जून १९१८)**१८३१:फातिमा शेख-- भारतीय शिक्षणतज्ज्ञ आणि समाजसुधारक,महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या त्या सहकारी(मृत्यू:९ ऑक्टोबर १९००)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२३:विश्वास मेहेंदळे-- मराठी लेखक, वृत्तनिवेदक,चरित्रकार आणि अभिनेते (जन्म:१० जुलै १९३९)**२०१३:जेम्स बुकॅनन – नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन अर्थतज्ञ (जन्म:३ आक्टोबर १९१९)**२००४:शंकरबापू आपेगावकर – पखवाजवादक (जन्म:१९११)**२००३:कमर जलालाबादी – गीतकार व कवी (जन्म: १९१९)**१९४५:गोविंद रामचंद्र मोघे-- कवी,ग्रंथकार (जन्म:१८६०)**१९२३:सत्येंद्रनाथ टागोर – पहिले भारतीय सनदी अधिकारी(ICS)(जन्म:१ जून १८४२)**१८४८:कॅरोलिन हर्षेल – जर्मन-ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ, ही प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ विल्यम हर्षेलची बहिण असून तिनेही ८ धुमकेतू व ३ तारकासमुह शोधले (जन्म:१६ मार्च १७५०)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*जनसेवेतच ईश्वराचीही सेवा*माणसाच्या आयुष्यात संकटे आली की, त्याला कुणाचा तरी आधार हवा असतो. हा आधार शारीरिक जरी नसला मानसिक असला तरी त्यांना ते पुरेसे असते. त्यामुळे दुःखी, कष्टी माणसे देवाचा धावा करता.............. पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे अमेरिका, इंग्लंड, सौदी अरेबियासह 160 देशांमध्ये होणार लाईव्ह प्रक्षेपण*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *PM मोदींच्या भेटीनंतर लक्षद्वीपचं नशीबच पालटलं, पर्यटनात तब्बल ३४०० टक्क्यांची वाढ झाल्याचा दावा*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *बांग्लादेशची सत्ता शेख हसीना यांच्याकडेच; पाचव्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होणार, 300 पैकी 200 जागा जिंकल्या*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी निकालाचा मुहूर्त ठरला, 10 जानेवारीला लागणार निकाल*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *पुणे लोकसभा पोटनिवडणुकीला अखेर पूर्णविराम; उच्च न्यायालयाच्या आदेशाला 'सर्वोच्च' स्थगिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *नाशिक - मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसमोर अंगणवाडी सेविकांचा गोंधळ, पोलिसांनी घेतलं ताब्यात*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *दक्षिण आफ्रिकेचा स्टार फलंदाज हेन्रीच क्लासेन याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती केली जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 एन्फ्लुएंझा (फ्लू, बर्डफ्लू, स्वाइन फ्लू) म्हणजे काय ? 📙'फ्लू' या नावाने आपण याला ओळखतो. हा अति-संसर्गजन्य असा आजार आहे. जगाच्या पाठीवर अनेकवेळा या आजाराने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. गेली काही दशके प्रतिजैवक औषधे उपलब्ध झाल्याने या आजारातून गंभीर स्वरूप धारण करणाऱ्या अन्य उपद्रवांवर जरासा ताबा आपण मिळवला आहे, एवढेच. मात्र फ्लूवर आजही नेमके औषध उपलब्ध नाही. त्याचा प्रतिबंध करणारी लस शोधण्याचे अनेक प्रयत्न निरुपयोगी ठरलेले आहेत; कारण ज्या विषाणूमुळे हा आजार होतो, त्याच्या असंख्य प्रजाती अस्तित्वात असल्याने व त्यांतही सतत नवीन भर पडत असल्याने प्रतिबंधक लस तयार करून तिचा उपयोग होत नाही.फ्लूची साथ एखाद्या प्रदेशात पसरली की, अक्षरश: घराघरांतून आलटूनपालटून प्रत्येकाचा आजाराशी संबंध येतोच. सारे घर फ्लूने भेटले आहे, अशीही उदाहरणे जुन्या काळात भरपूर आहेत. सर्दी, पडसे, नाक गळणे, खोकला, तीव्र डोकेदुखी, सर्वांग दुखणे, अतिशय थकवा, भूक मंदावणे, ताप ही प्रमुख लक्षणे या आजारात दिसतात. मात्र सर्दी, पडसे जसे पटकन बरे होते तसे न होता आजार गेला तरी थकवा खूप दिवस राहतो.प्रत्यक्ष फ्लू धोकादायक नसून त्या विषाणूंच्या प्रादुर्भावानंतर श्वासनलिका, फुप्फुसे, त्यांची आवरणे यांमध्ये आलेल्या दुर्बलतेचा फायदा घेऊन अन्य जंतूंचा प्रवेश होतो. त्यातून न्युमोनिया, ब्राँकायटिस, प्लुरसी यांसारख्या गंभीर आजारात रूपांतर होते. गेल्या शतकात १९१८ साली सुरू झालेल्या फ्लूच्या साथीमध्ये अनेकांचा मृत्यू झालेला आहे. भारतात १९५७ साली फ्लूची शेवटची मोठी साथ येऊन गेली.फ्लुवरचे उपचार व निदान यांसाठी शक्यतो डॉक्टरी सल्ला घेतलेला बरा. महत्त्वाची गोष्ट म्हणजे साथ नसताना फ्लूचे निदान करणे तज्ज्ञ डॉक्टरांचे काम बनते. साथीच्या वेळी रुग्ण पटकन लक्षात येतो. पण अन्यथा किरकोळ लक्षणांमुळे आजाराकडे दुर्लक्ष होऊ शकते.विश्रांती, पोषक आहार, वेदनाशामक औषधे, भरपूर पेयद्रव्ये यांचा वापर या आजाराच्या उपचारात आवश्यक ठरतो. नंतरचा थकवा व दौर्बल्यावर शक्तिवर्धक औषधे, प्रथिनांचा पूरक वापर उपयोगी पडतो.सध्या गेली काही वर्षे आपण ऐकत असलेला 'बर्ड फ्लू' हा आजार नामसाधर्म्याने सारखाच असला व तोही विषाणूजन्य असला, तरी त्याचा प्रादुर्भाव मुख्यतः कोंबड्या व पक्षी यांच्यात होतो. क्वचितच माणसांना त्याची लागण होते. त्यावेळी फुप्फुसदाह व तीव्र ताप ही लक्षणे माणसात दिसतात. अर्थात पक्षी हाताळताना वा त्यांची विल्हेवाट लावताना प्रतिबंधक काळजी आवश्यक ठरते. नाक तोंड झाकणारे मास्क व हातमोजे गरजेचे ठरतात. पक्षांमध्ये होणारा हा आजार फार झपाट्याने पसरतो. खुराड्यातील सर्व पक्षी याला पटकन बळी पडू शकतात. मात्र अशी कोंबडी वा पक्षी खाण्यायोग्य राहत नाहीत. त्यामुळे बर्डफ्लुचा प्रादुर्भाव झाल्यास त्या भागातील सर्व पक्षी नष्ट करणे - मुख्यतः खुराड्यातील व पाळीव - हाच एक प्रतिबंधक उपाय ठरतो. त्यांची जाळून वा खोल जमिनीत गाडून विल्हेवाट लावावी लागते. भारतात २००६ साली या रोगाने कुक्कुट- पालनाच्या व्यवसायाला फार मोठा तडाखा दिला आहे. मात्र याच काळात बर्डफ्ल्यूने आजारी झालेल्या माणसांची संख्या जेमतेम हाताच्या बोटांवर मोजण्याइतकीच आहे, हेही ध्यानात ठेवायला हरकत नाही.'स्वाईन फ्ल्यू' या नावाने २००९ साली जगभर धुमाकूळ घातलेल्या आजाराची मेक्सिकोमध्ये सुरुवात झाली. साऱ्या जगभर त्याचा विलक्षण वेगाने प्रसार झाला. फ्लुच्या विषाणूतील H1N1 या एका जातीने हा आजार होतो. फ्लूसारखी अन्य लक्षणे असली, तरी सुमारे एक टक्का रुग्णांत जुलाब, उलट्या याही सुरू होतात. एक हजारांत चार रुग्ण दगावत असल्याने ही साथ गंभीर मानली गेली आहे. मात्र टॅमिफ्लू औषधाचा वापर केल्यास स्वाईन फ्लूची तीव्रता खूप कमी होते, असेही लक्षात आले आहे.‘सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*" विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात. "**संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) नाशिक येथे होणाऱ्या २७ व्या *राष्ट्रीय युवा महोत्सवाचे शुभंकर चिन्ह* काय आहे ?२) मध्यप्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात नुकतेच तीन बघड्यांना जन्म देणाऱ्या मादी चित्ताचे नाव काय ?३) 'वन नेशन, वन इलेक्शन' बाबत कोणाच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन करण्यात आली आहे ?४) ज्ञानवापी मस्जिद कोणत्या शहरात आहे ?५) महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता ? *उत्तरे :-* १) शेकरू, महाराष्ट्राचा राज्य प्राणी २) आशा ३) रामनाथ कोविंद, माजी राष्ट्रपती ४) वाराणसी ५) शेकरू *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 सुहास अनिल देशमुख👤 माधव नरवाडे👤 आमिर अली शेख👤 अजित राठोड👤 राजेश रामगिरवार👤 गजानन सोनटक्के👤 सुप्रिया ठाकूर👤 श्याम कुमारे👤 विष्णुकांत इंगळे👤 शिवकुमार पंतुलवार👤 हमीदसाब शेख👤 लालू अर्गे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जेणे मक्षिका भक्षिली जाणिवेची।तया भोजनाची रुची प्राप्त कैची॥अहंभाव ज्या मानसीचा विरेना।तया ज्ञान हे अन्न पोटी जिरेना॥१५९॥सरळ अर्थ - तोंडातून आत माशी गेली म्हणजे जसे मळमळते आणि पुढे जेवणात गोडी वाटत नाही तसेच मनात अहंभाव शिरल्याने चांगल्या ज्ञानाची गोडी येत नाही. ते पचत नाही.।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••श्रीमंत असला तरी तो माणूस असते गरीब असतो तरीही तो माणूसच असतो.म्हणून माणसा, माणसात कसलाही भेदभाव करू नये व कोणावर आलेल्या परिस्थितीकडे बघून त्याची योग्यता ठरवू नये. वेळ, प्रसंगी परिस्थिती बदलायला जास्त वेळ लागत नाही. आणि परिस्थिती कधी ,कोणावर कशी येईल कधीही सांगून येत नाही. इतिहासात असे अनेक दाखले सापडतात की जे आधी गरीब होते व त्यांनी आपल्या अफाट कष्टातून, संघर्ष करून उंच भरारी घेतलेली आहे. त्यांचे आपण अवश्य स्मरण करायला पाहिजे.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*छोटी-छोटी बातें*     पूर्व काल में घोडे का बहुत महत्व था। घोड़ों के पैरों मे नाल ठोंका करते थे। एक बार एक सवार ने कुछ दुर्लक्ष किया। उसके घोड़े की एक नाल का एक कीला निकल गया था। वह कुछ ही क्षणों का छोटा सा काम था; परन्तु उसने वह नहीं किया। संयोगवश उस दिन उसे एक महत्वपूर्ण संदेशा पहुंचाने का कार्य दिया गया। शत्रु सेना पर एक ही समय दोनों तरफ से आक्रमण करना निश्चित हुआ। किस समय किस ढंग से सेना का दूसरा भाग आक्रमण करेगा, इसकी विस्तृत सूचना लिखकर वह लिफाफा इस सवार को दिया गया। उसे वह दूसरे सेनापति को पहुंचाना था। वह लिफाफा लेकर घोड़े पर सवार हुआ। उसने अपने घोडे को बहुत तेजी से दौड़ाया। आधा अंतर उसने पार कर लिया होगा, तभी एकाएक नाल की और दो कीलें ढीली हो गयीं और नाल सर्र से बाहर निकल आयी। घोड़ा पूर्ण वेग से दौड रहा था। बाहर निकली हुई नाल किसी वृक्ष मूल में अटकी और घोडा अपने सवारी सहित धड़ाम् से गिर पडा। घोड़े के मर्मस्थल पर चोट लगने से वह वहीं मर गया। सवार घायल हुआ। बेहोश भी हुआ। थोडी देर के बाद उसे होश आया। घोडे को मरा पा कर उसे बहुत दुख हुआ। वह उठा और लंगडाते-कराहते भागने लगा। उसे महत्वपूर्ण संदेशा जो पहुंचाना था, उसने बहुत प्रयास किया परन्तु वह निर्धारित स्थान पर ठीक समय पर नहीं पहुंच सका। अतः व्यूह रचना असफल हुई। उसका देश युद्ध में हार गया, एक छोटी सी कील के कारण।   कील न ठुकाई, घोडा मरा।   स्वार न पहुंचा देश हारा॥•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment