✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 17 जानेवारी 2024💠 वार - बुधवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://nasayeotikar.blogspot.com/2018/01/blog-post_76.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••*_ या वर्षातील १७वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२००१:अपारंपारिक ऊर्जा क्षेत्रातील ’सूर्या पुरस्कार’ शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एम.जी.ताकवले यांना जाहीर.**२००१:कथ्थक नृत्यांगना डॉ. रोहिणी भाटे यांना मध्य प्रदेश सरकारचा कालिदास सन्मान जाहीर**१९५६:बेळगाव – कारवार आणि बिदर या जिल्ह्यांतील मराठी भाग त्या वेळच्या म्हैसूर राज्यास जोडण्याची घोषणा**१९४६:संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची (United Nations Security Council) पहिली बैठक झाली.**१९४५:दुसरे महायुद्ध – रशियन फौजांनी पोलंडमधील वॉर्सा शहर उद्ध्वस्त केले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९६६:अशोक रामचंद्र भालेराव -- कवी, संपादक* *१९६६:मंगेश नारायणराव काळे-- कवी,लेखक**१९६४:सुहास मळेकर-- लेखक**१९५७:प्रा.संतोष मोतीराम मुळावकर -- एकांकिका व कथालेखन* *१९५६:दिलीप वर्धमान कस्तुरे-- कवी**१९५४:विलास रामचंद्र गावडे-- प्रसिद्ध कवी,लेखक* *१९५३:शेखर ताम्हाणे-- ज्येष्ठ निर्माता, नाटककार (मृत्यू:२८ एप्रिल २०२१)**१९५२:विजय शिवशंकर दीक्षित -- युरोपियन चित्रकला,कादंबरी लेखन* *१९५०:प्रा.अनिल थत्ते -- लेखक* *१९५०:प्रा.डॉ.विमल जयवंत भालेराव -- लेखिका* *१९५०:हनी इराणी-- भारतीय अभिनेत्री आणि पटकथा लेखिका* *१९४२:मुहम्मद अली ऊर्फ कॅशिअस क्ले – अमेरिकन मुष्टियोद्धा.अमेरिकन वर्णभेदाचा निषेध म्हणून त्याने धर्मांतर करुन मुहम्मद अली हे नाव स्वीकारले.**१९३३:चंद्रकांत प्रल्हाद पांढरीपांडे-- कवी, लेखक**१९३३:कमलाकर दिगंबर सोनटक्के -- कथालेखक,बालकुमार साहित्यकार* *१९३२:मधुकर केचे --प्रसिद्ध मराठी साहित्यिक (मृत्यू:२५ मार्च १९९३)**१९१८:रुसी मोदी – टाटा स्टीलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक,पद्मभूषण (१९८९) (मृत्यू:१६ मे २०१४)**१९१८:वसंत हरी कटककर-- लेखक* *१९१८:सईद अमीर हैदर कमाल नक्‍वी ऊर्फ ’कमाल अमरोही’ – चित्रपट निर्माता,दिग्दर्शक, संवादलेखक,पटकथाकार व कवी (मृत्यू:११ फेब्रुवारी १९९३)**१९१७:एम.जी.रामचंद्रन – अभिनेते व तामिळनडुचे मुख्यमंत्री (मृत्यू:२४ डिसेंबर १९८७)**१९०८:अक्किनेरी लक्ष्मीवर प्रसाद राव ऊर्फ ’एल.व्ही.प्रसाद’ – चित्रपट निर्माते व दिग्दर्शक (मृत्यू:२२ जून १९९४)**१९०६:शकुंतला परांजपे – कुटुंब नियोजनाच्या क्षेत्रात अनन्यसाधारण कार्य केलेल्या समाजसेविका (मृत्यू:३ मे २०००)**१९०५:दत्तात्रय रामचंद्र कापरेकर – गणितज्ञ (मृत्यू: १९८६)**१७०६:बेंजामिन फ्रँकलिन – अमेरिकन संशोधक आणि मुत्सद्दी (मृत्यू:१७ एप्रिल १७९०)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२१:कल्याण वासुदेव काळे-- मराठी लेखक आणि मराठी भाषा,साहित्य विषयाचे अभ्यासक (जन्म:१६ डिसेंबर १९३७)**२०२१:गुलाम मुस्तफा खान-- रामपूर-सहस्वान घराण्यातील हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत परंपरेतील भारतीय शास्त्रीय संगीतकार(जन्म:३ मार्च १९३१)**२०१४:रमा दासगुप्ता तथा सुचित्रा सेन – बंगाली व हिन्दी चित्रपट अभिनेत्री. उत्तमकुमारबरोबर त्यांची जोडी बंगाली चित्रपटांत चांगलीच गाजली. (जन्म:६ एप्रिल १९३१)**२०१३:ज्योत्स्‍ना देवधर – मराठी व हिन्दी लेखिका आणि आकाशवाणी निर्मात्या (जन्म:२७ फेब्रुवारी १९२६)**२०१०:ज्योति बसू – प. बंगालचे माजी मुख्यमंत्री (जन्म:८ जुलै १९१४)**२००८:रॉबर्ट जेम्स तथा ’बॉबी’ फिशर – अमेरिकन बुद्धिबळपटू व ग्रँडमास्टर (जन्म:९ मार्च १९४३)**२०००:सुरेश हळदणकर – गायक आणि अभिनेते**१९७३:बळीराम हिरामण राठोड (पाटील) बंजारा समाजातील सामाजसुधारक व लेखक (जन्म:१८९८)**१९७१:बॅ.नाथ पै – स्वातंत्र्य सैनिक व घटनातज्ञ (जन्म:२५ सप्टेंबर १९२२)**१९६१:पॅट्रिक लुमूंबा – काँगोचे पहिले पंतप्रधान (जन्म:२ जुलै १९२५)**१९३०:अँजेलिना येओवार्ड ऊर्फ ’गौहर जान’ – गायिका व नर्तिका (जन्म:२६ जून १८७३)**१८९३:रुदरफोर्ड हेस – अमेरिकेचे १९ वा राष्ट्राध्यक्ष (जन्म:४ आक्टोबर १८२२)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *साहित्यसेवा हेच खरे काम*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मिलिंद देवराच्या शिंदे गटात प्रवेशाचे दिल्लीत पडसाद ; काँग्रेसच्या हालचालींना वेग*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *भारतीय बासमती तांदूळ 'जगात भारी', जगातील सर्वोत्कृष्ट तांदळांच्या यादीत अव्वल*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *आता लढाई जनतेच्या न्यायालयात उद्धव ठाकरेचा एल्गार*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मुंबई आंदोलनावर मनोज जरांगे ठाम, सरकारकडून सग्या सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचे आश्वासन*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *यवतमाळ जिल्ह्यात भीषण अपघातात 6 ठार*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *दावोसमध्ये 70 हजार कोटीचे करार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत करारावर स्वाक्षऱ्या*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *आज बंगळुरू मध्ये भारत व अफगाणिस्तान यांच्यात तिसरा T20 सामना*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *बोटं मोडताना आवाज का येतो ?* 📙एखाद्यावर राग काढायचा असला, की त्याच्या नावानं बोटं मोडली जातात. त्या प्रत्येक वेळी आवाज का येत नाही हे नाही सांगता यायचं; पण बोटांमध्ये तणाव निर्माण झाला असला तरी तो मोकळा करण्यासाठी आपण बोटात ताणतो त्यावेळी मात्र हमखास कडकड असा आवाज येतो. कोणाच्या बाबतीत मोठ्यानं येतो, कोणाच्या बाबतीत ऐकू येईल न येईल असा येतो; पण येतो खरा. वास्तविक असा आवाज केवळ बोटांच्या बाबतीतच येतो असं नाही. कोणत्याही हाडांच्या सांध्याच्या बाबतीतही तो येत असतो. सांध्याच्या ठिकाणी दोन हाडं एकमेकांशी जोडलेली असतात; पण या सांध्यांची हालचाल होते तेव्हा ही हाडं निरनिराळ्या कोनांमधून फिरतात. ते सहजसाध्य व्हावं म्हणून जिथं ही हाडं जोडलेली असतात तिथे एक स्नायूंचा जाडसर थर असतो, अस्तरासारखा. तो नसला तर ती हाडं एकमेकांवर घासून त्यांची झीज होईल. शिवाय त्यांची मोडतोडही होण्याची शक्यता असते. तरीही ते थर एकमेकांवर घासतात ते घर्षणापायी उष्णता निर्माण होतेच. आपले तळवे आपण एकमेकांवर घासले तर ते गरम होतात. त्याचं कारणही हेच.या उष्णतेचा त्या थरांवर अनिष्ट परिणाम होतोच. त्यांची हालचालही मोकळी होत नाही. तशी ती व्हावी म्हणून तिथं एक प्रकारचं वंगण असतं. एक तेलासारखा पातळ स्निग्ध पदार्थ असतो. त्या वंगणात ऑक्सिजन, कार्बन डायॉक्साइड, नायट्रोजन यांसारखे वायू विरघळलेल्या स्थितीत असतात.बराच वेळ वापर झाला की ते सांधे थकल्यासारखे होतात. त्यांची मोकळी हालचाल होत नाही. कारण त्या हालचालीला मदत करणारे स्नायू जखडल्यासारखे होतात. त्या स्थितीत ते जरा ताणले तर सैलावतात. त्यांची परत मोकळी हालचाल होऊ शकते. पण तसे ते ताणले की त्या वंगणाच्या पिशव्याही फुगल्यासारख्या होतात. त्यांच्यामध्ये विरघळलेल्या स्थितीत असलेले वायू मोकळे होऊन त्यांचे बुडबुडे तयार होतात. ते फुटतात आणि त्यांचाच तो आवाज होतो. किती वेगानं हे बुडबुडे तयार होऊन फुटतात तसंच किती बुडबुडे तयार होतात, त्यावर किती मोठा आवाज होणार हे अवलंबून असतं. कोणत्याही सांध्याच्या वंगणाच्या बाबतीत हीच परिस्थिती असते; पण बोटांच्या सांध्यामध्ये बुडबुडे लवकर तयार होतात आणि पटकन फुटतातही. त्यामुळे त्यांचा आवाजही सहजगत्या होतो. शिवाय बोटांना तीन पेरं असतात. त्या तिन्ही पेरांची स्वतंत्र हालचाल होऊ शकते. म्हणजेच प्रत्येक बोटाला एकूण तीन सांधे असतात. ते जवळजवळही असतात. आपण जेव्हा बोटं ताणतो तेव्हा ते सगळेच सांधे ताणले जातात. सर्व ठिकाणच्या वंगणातल्या वायुंचे बुडबुडे तयार होऊन ते फुटतात. त्यामुळे बोटं ताणल्यानं नेहमीच कडकड असा आवाज होतो.*डाॅ. बाळ फोंडके यांच्या 'का ?' या पुस्तकातून**संकलन :- श्याम ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*" शरीराला श्रमाकडे, बुद्धीला मनाकडे आणि हृदयाला भावनेकडे वळविणे म्हणजे शिक्षण. "**संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) सलीम अली राष्ट्रीय पक्षी उद्यान कोठे आहे ?२) महाराष्ट्र राज्यात 'भूगोल दिन' साजरा करण्याची प्रथा १४ जानेवारी १९८८ पासून कोणी सुरू केली ?३) डॉ. प्रभा अत्रे यांचे नुकतेच निधन झाले आहे त्या कोण होत्या ?४) मकरसंक्रांतच्या दिवसापासून सूर्याचे कोणते आयण सुरू होते ?५) दोन नद्या एकत्र मिळतात त्या जागेला काय म्हणतात ? *उत्तरे :-* १) श्रीनगर, जम्मू काश्मीर २) डॉ. सुरेश गरसोळे, पुणे ३) ज्येष्ठ गायिका ४) उत्तरायण ५) संगम*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 जयप्रकाश भैरवाड, धर्माबाद👤 शेखर घुंगरवार👤 सचिन पाटील पार्डीकर 👤 धम्मपाल कांबळे👤 यश चेलमेल👤 राम घंटे👤 मन्मथ भुरे👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••बरा निश्चयो शाश्वताचा करावा। म्हणे दास संदेह तो वीसरावा॥ घडीने घडी सार्थकाची धरावी। सदा संगती सज्जनांची धरावी॥१६७॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••वैरता निर्माण करण्यासाठी डोंगरावर जावे लागत नाही. जेव्हा आपले बोलणे स्पष्ट असते, परखड विचाराची पेरणी असते, कोणाचे गुलाम बनून त्यांच्या मताप्रमाणे वागणे नसते, समाजाच्या हितासाठी कार्य करण्याची आवड असते आणि सत्याची वाट असते तेव्हा पहिली वैरता वेळ प्रसंगी कुटुंबातूनही सुरूवात व्हायला जास्त वेळ लागत नाही व एकदा तिची सुरूवात झाली की, मग त्याचा प्रसार मोठ्या वेगाने होत असतो. शेवटी सर्वच संपून जाते. म्हणून असे अनर्थ टाळण्यासाठी आधी त्या व्यक्तीला वाचणे आवश्यक आहे. भलेही साथ जरी देता नाही आले तरी चालेल पण, वैरताचे भागिदार होऊ नये. कारण जाळतांनी सर्वचजण सोबतीला असतात पण,शेवटी एकट्यालाच जळावे लागते.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*घामाचा पैसा*धन्नाशेटचा मुलगा राम अगदीच आळशी. घरांत गडगंज संपत्ती. एकुलता एक लाडाचा. काम कधी करावंच लागलं नाही. आता २१ वर्षाचा झाला. शेठजींना काळजी पडली. याचे कसे होणार साठलेला पैसा किती दिवस पुरेल. दुसरे दिवशी त्यांनी मुलाला बोलावले व म्हणाले हे बघ आज तू सकाळीच बाहेर जा. काहींतरी काम करून पैसे मिळवुन आण तरच तुला जेवायला मिळेल' मुलाला काहीच कळेना. तो बहिणीकडे गेला तिने त्याला एक रूपया दिला. शेठजींनी तो विहीरीत फेकून दिला. दुसर्‍या दिवशी आईकडून घेतला तिसर्‍या दिवशी मात्र कोणीही पैसे द्यायचे नाहीत हे उमजल्यावर स्वारी घराबाहेर पडली स्वारी घराबाहेर काम शोधायला निघाली. पण काय काम करणार ? बारा वाजे पर्यंत हिंडला. काम मिळेना. पोटात कावळे कोकलायला लागले. स्टेशनवरून एक जड बॅग घेऊन येणारा माणूस दिसला त्याला हमाल हवा होता. हा धावत पुढे गेला. 'साहेब, इकडे आणा'. ती बॅग त्याने डोक्यावर उचलली. घामाघूम झाला. साहेबांनी आठ आणे हातावर ठेवले. घरी आला. शेठजींच्या हातावर आठ आणे ठेवले. दोन दिवसाप्रमाणेच शेठजींनी ते विहीरीत फेकले हा चवताळून उठला. 'बाबा अहो तेवढे आठ आणे मिळवायला मला किती वणवण करावी लागली आणि तुम्ही ते फेकून दिलेत ?' शेठजींनी त्याला जवळ घेतले. पाठीवरून हात फिरवला, 'बाळा आता मला काहीं काळजी नाहीं कारण खर्‍या कष्टाची किंमत तुला आज कळली. दोन दिवस ह्याच्या दुप्पट रक्कम फेकली पण तुला राग आला नव्हता कारण त्या मागे कष्ट नव्हते.' स्वकष्टाची कमाई तीच खरी कमाई•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment