✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 05 जानेवारी 2024💠 वार - शुक्रवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://nasayeotikar.blogspot.com/2024/01/darpankar-balshastri-janbhekar.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_ या वर्षातील पाचवा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *१९९८:ज्येष्ठ जर्मन समाजशास्त्रज्ञ गेरहार्ड फिशर यांना कुष्ठरोग आणि पोलिओ नियंत्रणाच्या क्षेत्रात भारतात केलेल्या कार्याबद्दल राष्ट्रपतींच्या हस्ते ’महात्मा गांधी शांतता पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.**१९९७:रशियाने चेचेन्यातुन सैन्य मागे घेण्यास सुरूवात केली.**१९७४:अंटार्क्टिकामधील सर्वोच्‍च तापमानाची (१५º सेल्सिअस) नोंद**१९५७:विक्रीकर कायदा सुरू झाला.**१९४९:पुणे यथे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA) सुरू झाली.**१९४८:’रोझ बाऊल फुटबॉल’ स्पर्धेचा जगातील पहिला रंगीत माहितीपट (News Reel) ’वॉर्नर ब्रदर्स’ तर्फे जगांतील चित्रपटगृहांत प्रदर्शित करण्यात आला.**१९३३:सॅन फ्रान्सिस्को येथील गोल्डन गेट ब्रिजच्या बांधकामाला सुरूवात झाली.**१९१९:द जर्मन वर्कर्स पार्टीची स्थापना. या पार्टीचे पुढे नाझी पार्टीत रुपांतर झाले.**१६७१:मराठ्यांनी मुघलांबरोबर साल्हेरची लढाई जिंकली.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८६:दीपिका पदुकोण – कन्नड, हिन्दी आणि तामिळ चित्रपट अभिनेत्री**१९८१:विद्या सुर्वे-बोरसे-- लेखिका, समीक्षक**१९८०:अशोक कुबडे --- लेखक* *१९७६:प्रा.प्रवीण मधुकरराव घारपुरे-- लेखक**१९७६:मारुती नथुजी मुरके -- लेखक* *१९६९:प्रशांत विनायक आसलेकर -- लेखक* *१९६५:डॉ.संभाजी खराट-- प्रसिद्ध लेखक तथा निवृत्त उपसंचालक माहिती व जनसंपर्क* *१९६०:पराग घोंगे-- नाटककार,लेखक* *१९५९:ज्ञानेश्वर दुर्गादास रक्षक -- लेखक तथा प्रर्वतक,राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलन* *१९५६:माधव डहाळे-- कवी, कादंबरी, आत्मकथनाचे लेखन**१९५५:ममता बॅनर्जी – माजी केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री* *१९४८:सरोज निळकंठराव जोशी-- कवयित्री* *१९४८:फैय्याज – अभिनेत्री व गायिका**१९४८:पार्थसारथी शर्मा – क्रिकेटपटू (मृत्यू: २० आक्टोबर २०१०)**१९४६:गोविंद कुलकर्णी-- कवी* *१९४१:मन्सूर अली खान पतौडी – भारतीय क्रिकेट कप्तान आणि पतौडी संस्थानचे नबाब (मृत्यू:२२ सप्टेंबर २०११)**१९३६:श्यामला शिरोळकर-- बालसाहित्यिक (मृत्यू:२६ मे २००६)**१९३५:रामदास गणेश भटकळ -- लेखक,प्रकाशक**१९३५:डॉ.अभयकुमार व्यंकटेश सावजी-- लेखक* *१९३४:डॉ मुरली मनोहर जोशी-- भाजपचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री**१९२८:झुल्फिकार अली भुट्टो – पाकिस्तानचे चौथे राष्ट्राध्यक्ष आणि ९ वे पंतप्रधान (मृत्यू:४ एप्रिल १९७९)**१९२२:मोहम्मद उमर ’मुक्री’ – आपल्या अभिनयाद्वारे पाच दशके खळाळून हसवणारे विनोदी कलाकार व चरित्र अभिनेते (मृत्यू:४ सप्टेंबर २०००)**१९१२:वसंत रामकृष्ण वैद्य--कवी,कथाकार (मृत्यू:१४जानेवारी १९८०)**१९०९:श्रीपाद नारायण पेंडसे – प्रसिद्ध मराठी कथालेखक व कादंबरीकार (मृत्यू:२४ मार्च २००७)**१८९२:कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी – लेखक व मराठी भाषातज्ञ (मृत्यू:१२ जून १९६४)**१८८२:महादेव निळकंठ सहस्रबुद्धे -- शाहिरी वाड:मयाचे अभ्यासक (मृत्यू:आक्टोबर १९६३)**१८५७:यशवंत महादेव गद्रे-- कवी (मृत्यू:५ जानेवारी १९६३)**१८५५:किंग कँप जिलेट – अमेरिकन संशोधक व उद्योजक (मृत्यू:९ जुलै १९३२)**१५९२:शहाजहान – ५ वा मुघल सम्राट (मृत्यू:२२ जानेवारी १६६६)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९२:दत्तात्रय गणेश गोडसे – इतिहासकार, नाटककार,कलादिग्दर्शक,वेशभूषाकार आणि नेपथ्यकार (जन्म:३ जुलै १९१४)**१९९०:रमेश बहल – चित्रपट निर्माते व दिग्दर्शक* *१९८२:सी.रामचंद्र – संगीतकार (जन्म:१२ जानेवारी १९१८)**१९६१:नारायण धोंडोपंत ताम्हनकर-- मराठीतील कथा लेखक (जन्म:३१ ऑगस्ट १८९३)**१९४३:जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर – अमेरिकन वनस्पतीतज्ञ, शिक्षणतज्ञ, संशोधक आणि शास्त्रज्ञ (जन्म:१ फेब्रुवारी १८६४)**१९३३:काल्व्हिन कूलिज – अमेरिकेचे ३० वे राष्ट्राध्यक्ष (जन्म:४ जुलै १८७२)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *श्रीराम चव्हाण,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*दर्पणकार : बाळशास्त्री जांभेकर*घरातील वडीलधारी मंडळी रोज सकाळी वर्तमानपत्राची आतुरतेने वाट पाहतात. वर्तमानपत्र वाचल्याशिवाय त्यांची सकाळ सुरूच होत नाही. एखाद्या दिवशी वर्तमानपत्र वाचण्यास मिळाले नाही तर दिवसभर काही तरी हरवल्यासारखे वाटते. मग खरोखरच हे वर्तमानपत्र कुणी आणि केव्हा सुरु केले ? याची माहिती जाणून घेण्यात सुध्दा आपण नक्कीच उत्सुक असाल. ............. पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *नोव्हेंबर २००५ पूर्वीच्या जाहिरातीनुसार नोव्हेंबर २००५ नंतर रुजू शासकीय कर्मचाऱ्यांना जुन्या निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय देण्यासंदर्भात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *भारत जोडो यात्रेनंतर राहुल गांधींच्या नेतृत्वात आता मणिपूर ते मुंबई दरम्यान 6713 किमी यात्रेचं आयोजन, १४ जानेवारीला होणार सुरू*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *राज्यातील दुर्गम भागातील 2,395 घरांना मिळाली वीज, आदिम जमातींना वीज पुरवठ्याचे उद्दीष्ट महावितरणकडून केवळ बारा दिवसात पूर्ण*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *नांदेड-बिदर नवीन ब्रॉडगेज प्रकल्पाला वेग देणार. ७५० कोटीची मान्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *राज्याच्या पोलिस महासंचालक पदावर रश्मी शुक्ला यांची नियुक्ती*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *बोर्डाच्या परीक्षा तोंडावर असताना महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने मागण्या मान्य होईपर्यंत परीक्षांना बहिष्कार टाकण्याचा दिला इशारा*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *दक्षिण आफ्रिका दरम्यानच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने मिळविला ऐतिहासिक विजय*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 एड्स (AIDS) म्हणजे काय ? 📙 'अॅक्वायर्ड इम्युनो डिफिशियन्सी सिन्ड्रोम' म्हणजे (AIDS) 'एड्स'. शरीरातील प्रतिकारशक्ती कमी होत जाते व त्यामुळे आढळणारा हा लक्षणसमुच्चयरुपी रोग आहे. एका विषाणूंमुळे हा रोग होतो. असे खूप संशोधनानंतर लक्षात आले आहे. या विषाणूला नाव या रोगसदृश दिले गेले. ह्युमन इम्यूनो व्हायरस १- (HIV-1)आपल्या शरीरातील पांढर्‍या रक्तपेशींपैकी काही पेशींकडे सर्व प्रकारच्या रोगजंतूशी प्रतिकार करण्याचे काम सोपवलेले आहे. एड्सचे विषाणू शरीरात प्रवेश केल्यावर या विशिष्ट (टी-४) पेशींवरच हल्ला चढवतात. त्यामुळे शरीराची प्रतिकारक्षमताच नष्ट होते. अगदी नेहमी आढळणाऱ्या सर्दी, पडसे, जुलाब यांसारख्या साध्या रोगांनीसुद्धा असा रुग्ण हैराण होऊ लागतो; कारण या रोगांना आळा घालण्याची यंत्रणाच नष्ट झालेली असते. वरवर पाहता साध्या दिसणाऱ्या, पण पुन:पुन्हा सतत उद्भवत राहणाऱ्या आजारांनी रुग्णाचा काही महिन्यांतच बळी घेतला जातो. याच कारणामुळे ज्या वेळी एड्सचे रुग्ण प्रथमच आढळले, तेव्हा त्यांचे निदान होऊ शकले नाही. आजार नेहमीचा, औषधे नेहमीची होती. पण रुग्णाचा प्रतिसादच नाही. ही स्थिती भल्याभल्या डॉक्टरांना बुचकळ्यात पाडत होती.वारंवार केल्या गेलेल्या रक्ताच्या तपासण्यांतून मग या व्हायरसचा प्रथम शोध लागला. शास्त्रीय पद्धतीने त्याची वाढ करण्यातही (Culture) यश मिळाले. पण मुख्य अडचण म्हणजे या व्हायरसच्या वाढीला अटकाव करेल वा त्याला नष्ट करेल, असे औषध मिळवण्यात आजवर सतत अपयशच आले आहे. एवढेच नव्हे, तर त्याच्या विरोधी खात्रीशीर व निर्धोक प्रतिबंधक लस तयार करणे अजूनही शक्य झालेले नाही.एड्सचा प्रसार शरीरसंबंधातून होतो. दुसऱ्या प्रकारचा प्रसार रक्तामार्फत होऊ शकतो. एकाचे रक्त दुसऱ्याला दिले असता जर देणाऱ्याचे रक्त या विषाणूने दूषित झाले असेल तर रक्त घेणारा रुग्ण एड्सग्रस्त होऊ शकतो. हाच प्रकार अंमली पदार्थ टोचून घेणाऱ्यांच्या सुयांमार्फतही होऊ शकतो. अर्थातच वरील सर्व प्रकारांत एकाला एड्सची बाधा झालेली असणे आवश्यक असते. एड्सच्या प्रसाराची ही पद्धत पक्की लक्षात ठेवली म्हणजे एड्सची मनातील भीती जायला हरकत नाही.कोणत्याही परिस्थितीत एड्सच्या रुग्णाबरोबर गप्पा मारून, हस्तांदोलन करून, त्याच्या घरात वावरल्याने वा एकच फर्निचर, प्रसाधनगृह, वस्तू ताटवाट्या वापरल्याने एड्सचा प्रसार होत नाही.आज साऱ्या जगाला एड्सने भयग्रस्त केले आहे. मुख्य कारण म्हणजे एड्स झाल्यावर त्यावर कसलाही खात्रीचा इलाज आज उपलब्ध नाही. त्याला प्रतिबंध म्हणजे रुग्णांशी शरीरसंबंध व रक्तसंपर्क न येऊ देणे एवढाच. एड्सची लागण झाल्याचे पहिले लक्षण रक्ततपासणीमध्येच लक्षात येऊ शकते. एलिझा व वेस्टर्न ब्लॉट या रक्ततपासणीनंतर एखाद्याला या रोगाची लागण झाली आहे वा नाही एवढेच कळते. ही रोगाची सुप्तावस्था असते. या अवस्थेत कित्येक वर्षे तशीच जाऊ शकतात. यानंतरची अवस्था म्हणजे विषाणूचे आक्रमण सर्वांगीण होऊन रोग दिसू लागण्याची (Full Blown Aids). एकदा ही अवस्था सुरू झाली की मग रुग्णाचे आयुष्य जेमतेम सहा महिने ते साठ महिने एवढेच राहते.पाश्चात्य देशात सुमारे ३० वर्षे या रोगाने धुमाकूळ घातला आहे. भारतात १९८४ साली या रोगाने पहिला रुग्ण मरण पावला. पण त्यानंतर आज या आजाराचे कित्येक रुग्ण आपल्या इथे नोंदले गेले वा मृत झाले आहेत. हिमनग जसा एक अष्टमांश पाण्यावर दिसतो, तसाच हा रोग आहे म्हणा ना. एक रुग्ण दिसतो वा सापडतो, तेव्हा किमान दहा जण सुप्तावस्थेत लागण झालेले असतात.जागतिक आरोग्य संघटना व सर्व प्रगत देश यांचे सध्याचे सर्व लक्ष या रोगाचा प्रतिबंध करणे व त्यावर औषध शोधणे यांवरच एकवटलेले आहे. एड्स प्रतिबंधासाठी अनेक औषधांचा शोध सतत चालू असून त्यांपैकी एझेडटी या लघुनावाने ओळखले जाणारे औषध सध्या भारतात उपलब्ध आहे. एड्स झालेल्या मातेच्या नवजात अर्भकापासून एड्स झाल्याचे निश्चित झालेल्या कोणत्याही रुग्णासाठी याचा वापर केल्यास आयुर्मान वाढू शकते. मात्र खात्रीलायक प्रतिबंध करणारी प्रतिबंधक लस मात्र उपलब्ध नाही. तसेच एड्स पूर्ण बरा करणारे औषधही सापडलेले नाही.‘सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*" आयुष्यात कुठलीच नाती ठरवून जोडता येत नाही. "**संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) ब्राझील, रशिया,भारत, चीन व दक्षिण आफ्रिका या ब्रिक्स देशांच्या गटात आणखी किती देश सदस्य झाले ?२) पृथ्वी हे कोणत्या प्रकारचे क्षेपणास्त्र आहे ?३) भारताच्या राजमुद्रेवर कोणते वचन लिहिले आहे ?४) गौतम बुद्धाच्या मावशीचे नाव काय होते ?५) टिपेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ? *उत्तरे :-* १) पाच - इजिप्त, इथिओपिया, इराण, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती २) जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र ३) सत्यमेव जयते ४) गौतमी ५) यवतमाळ*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*   👤 भाऊसाहेब चासकर, उपक्रमशील शिक्षक व लेखक👤 जैपाल ठाकूर, गोंदिया👤 अशोक कुबडे, साहित्यिक, नांदेड👤 व्यंकटी केंद्रे, प्रा. शिक्षक, कंधार👤 गणराज गुरुपवार, नांदेड👤 नितीन उत्तरवार👤 राजकुमार बेरलीकर👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••दिसेना जनी तेचि शोधूनि पाहे।बरे पाहता गूज तेथेचि आहे॥करी घेउ जाता कदा आढळेना।जनी सर्व कोंदाटले ते कळेना॥१५५॥सरळ अर्थ - जे सहजासहजी दृष्टीस पडत नाही त्याचा शोध करून पहा. ते आहे तिथेच आहे तरी त्याला उचलून घेऊ म्हटले तर कुठे आहे ते दिसत नाही. ते तत्व, ते गौप्य चराचरात भरून राहिले आहे पण त्याचे आकलन होत नाही.।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••गाथा अशा व्यक्तीची वाचली जाते, ऐकली जाते जी व्यक्ती असंख्य संकटाचा सामना करून स्वतः पेक्षा इतरांच्या विषयी जास्त विचार करून प्रामाणिकपणे जगत असते. पण, काही मुखातून त्याच व्यक्तीची गाथा नको त्या शब्दात निघत असते. पण,काहीही असेल तरी एखाद्या व्यक्तीची गाथा चांगले असो किंवा वाईट पण, वेळात वेळ काढून वाचली जाते, बोलली‌ जाते, व कान लावून ऐकली‌ जाते ही फार मोठी गोष्ट आहे. कारण त्या व्यक्तीचे जीवनच पूर्णपणे समर्पित असते.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*संस्‍कारीत मुलेच यशस्‍वी*नैतिक मूल्‍यांचे शिक्षण देणा-या एका शिक्षकाने मुलांसाठी चॉकलेटस मागवली होती. त्‍यांनी सगळ्या मुलांना रांगेत बसवले होते. शिक्षक चॉकलेटस वाटायला सुरुवात करणार इतक्यात शाळेचा शिपाई त्‍या वर्गात येऊन पोहोचला व म्‍हणाला,''सर तुम्‍हाला आताच्‍या आत्‍ता प्राचार्यांनी काही महत्‍वाचे सांगण्‍यासाठी त्‍यांच्‍या कार्यालयात बोलावले आहे.'' शिक्षकांनी चॉकलेटचा डबा हातातून खाली ठेवला व मुलांना म्‍हणाले,'' मुलांनो मला काही कामासाठी प्राचार्यांकडे जावे लागत आहे. खरेतर ही चॉकलेटस मला माझ्या स्‍वत:च्‍या हाताने तुम्‍हाला द्यायची खूप इच्‍छा होती. परंतु मला जावे लागणार आहे. पाहिजे तर तुम्‍ही हाताने चॉकलेटस घेऊ शकता. अन्यथा मी परत आल्‍यावर तुम्‍हाला देईन'' ही चांगली संधी आहे. असा काही विद्यार्थ्‍यांनी विचार केला व त्‍यांनी चॉकलेटस स्‍वत:च्‍या हाताने घेऊन खाल्ली तर काही विद्यार्थ्‍यांनी शिक्षकांची वाट बघण्‍यात वेळ घालविला. शिक्षक परत आले व त्‍यांनी मुलांना विचारले,'' मुलांनो ज्‍यांनी ज्‍यांनी स्‍वत:च्‍या हाताने चॉकलेटस खाल्ली त्‍यांनी आपले हात वर करा'' ज्‍यांनी चॉकलेटस खाल्ली होती त्‍यांनी हात वर केले. मग शिक्षकांनी उरलेल्‍या मुलांना प्रेमाने चॉकलेटस वाटली. काही वर्षानंतर त्‍या शिक्षकांनी त्‍या विद्यार्थ्‍यांची माहिती मिळविली तेव्‍हा त्‍यांना असे दिसून आले की ज्‍या मुलांनी स्‍वत:च्‍या हाताने चॉकलेटस घेतले होते ती मुले सामान्‍य स्‍वरूपातील कामे करून उदरनिर्वाह करत होते तर ज्‍यांना शिक्षकांनी चॉकलेटस दिली ते सर्व विद्यार्थी उच्‍च पदावर काम करत होते. ही सर्व संस्‍कारांची देणगी होती.तात्‍पर्य :- संस्‍काराने माणूस घडतो. मिळालेली संधी आणि तिचा योग्य वापर करणे हे मानवाच्‍या हाती आहे. चुकीच्‍या मार्गाने गेल्‍यास व संयम न पाळल्‍यास योग्‍य संधी मिळूनही तिचा वापर करता येत नाही.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment