✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 11/09/2019 वार - बुधवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- १९४८ - आदल्या दिवशी झालेल्या मोहम्मद अली झीणाच्या मृत्यूचा फायदा घेउन भारतीय लष्कराने हैदराबाद संस्थानावर चाल केली व हैदराबाद मुक्त केले २००२ - 'मेटसॅट' या भारताच्या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण 💥 जन्म :- १८९५ - आचार्य विनोबा भावे १९१३ - जेसी ओवेन्स, अमेरिकन धावपटू 💥 मृत्यू :- १९५२ - सवाई गंधर्व उर्फ रामभाऊ कुंदगोळकर १९८० - सतीश दुभाषी रंगभूमी, चित्रपटसृष्टीतील अभिनेते. १९९२ - पंडित मल्लिकार्जुन मन्सूर, गायक. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *बेंगळुरू : भारताच्या चांद्रयान मोहिमेतील लँडर विक्रम चंद्रापासून 2 किमी अंतरावर असताना संपर्क तुटला. लँडर विक्रमशी संपर्क साधण्यासाठी इस्त्रो घेणार अमेरिकन अंतराळ संस्था नासाची मदत * ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *नवी दिल्ली - स्वित्झर्लंडच्या जिनिव्हा येथील संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेच्या बैठकीत भारताने पाकिस्तानकडून काश्मीरबाबत करण्यात आलेल्या आरोपांचे केले खंडन* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *मुंबई - मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळाच्या 100 दिवसांत शेअर बाजारातील गुंतवणुकदारांना साडे बारा लाख कोटी रुपयांचे झाले नुकसान* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *वाशीम जिल्ह्यातल्या दुर्गम आठ गावांमध्ये तब्बल 72 वर्षींनी पोहोचली वीज* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *पुणे शहर आणि परिसरात आजपासून तीन दिवस हलक्या सरींच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *पणजी : दक्षिण गोव्यातील रिवण येथील 16 वर्षीय प्रियव्रत पाटीलने सर्वात कमी वयात 'महापरीक्षा' उत्तीर्ण होत इतिहास रचला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याचं ट्विटरद्वारे अभिनंदन करत पाठ थोपटली आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *न्यूयॉर्क : रफाल नदालने अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धा जिंकत कारकिर्दीतील १९वे ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावले आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ या बुलेटीनची audioऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे. https://sharechat.com/post/Mv85XrK ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *प्रत्येक शाळेला संरक्षण भिंत हवे* https://nasayeotikar.blogspot.com/2018/01/blog-post_15.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *गरम पाण्याचे झरे* 📙 हिमालयात प्रवासाला जाणारे परतल्यावर नेहमीच एक आश्चर्याचा किस्सा सांगतात. गंगोत्रीच्या वाटेवर वाटेत काही कुंडे लागतात. कुडकुडणारी थंडी, दूरवर डोंगरमाथ्यावर सफेद बर्फाचे थर आणि या कुंडातून मात्र पाण्यातून चक्क वाफा निघत असतात. हात बुडवला तर चटका बसतो. एवढेच नवे अनेक जण जवळचे तांदूळ त्या पाण्यात काहीवेळा कापडी पुरचुंडी बांधून धरतात व आयता शिजलेला भात खातात. हे पाणी काढून मनसोक्त आंघोळ करण्याचा मोहही कोणी आवरून धरत नाही. असाच पण जरा वेगळा अनुभव वज्रेश्वरीला महाराष्ट्रात येतो. पण येथील झऱ्यांचे पाणी गंधक मिश्रित उग्र वासाचे आहे. येथील उष्ण पाण्यात अंघोळ करून निसर्गोपचार करून घेणाऱ्यांचीही कायम गर्दी उसळलेली असते. जगात असे गरम पाण्याचे कित्येक झरे आहेत. तसेच फक्त वाफेचेही झरे आहेत. वाफेच्या झर्‍यातून फक्त जोरात वाफ उसळून एखाद्या प्रेशरकुकरप्रमाणे तेथे शिट्टीचा आवाजही येत राहतो. या सगळ्या प्रकाराचे मूळ भूगर्भात खोलवर घडणाऱ्या घडामोडीत आहे. सुमारे तीस एक किलोमीटर खोलीवर तप्त मध्यावरणाचा पाण्याच्या वाहत्या साठ्याशी संबंध येतो. तिथे वाफ कोंडू लागते. या वाफेच्या दाबाने जमिनीतील खडकातील काही भेगांतून मार्ग काढला जाऊ शकतो. त्यातूनच हे झरे निर्माण होतात. काही ठिकाणी ज्वालामुखीच्या मुखापासून काही ठराविक अंतरावर प्रथम वाफेचे व नंतर गरम पाण्याचे झरे सलगपणे आढळतात. पण अनेक ठिकाणी ज्वालामुखीचा अलीकडच्या ज्ञात काळात कधीच संबंध आलेला नसतो. हेही लक्षात घ्यायला लागेल. यातही एक मोठा फरक आहे. वाफेचे झरे मधूनमधून नाहीसे होतात, पण गरम पाण्याचे झरे मात्र सलगपणे वर्षानुवर्षे उकळताना दिसतात. काही झर्‍यांत गंधकाचा अंश सापडतो. ते नक्कीच ज्वालामुखीच्या उगमाशी संबंधित असावेत असा संशय घ्यायला जागा आहे. पृथ्वीचा गाभा अत्यंत गरम आहे मध्यावरणही अतितप्त आहे. पण बाह्यावरणाचा काही भाग बऱ्याच ठिकाणी भरपूर गरम आहे असेही लक्षात आले आहे. आईसलँड, न्यूझीलंड येथील काही भागात जेमतेम एक ते तीन किलोमीटर अंतर खोलवर बोअरिंगचे छिद्र पाडले असता भूगर्भातील गरम पाणी व वाफ मिळवता येते असा अनुभव आहे. जरी एवढे खोल छिद्र पाडणे अत्यंत महागडे असले तरी यातून मिळणारी ऊर्जा ही अनेक वर्षे पुरणार असल्याने हा खर्च परवडतो. हे गरम पाणी वा वाफ वापरून घरे उष्ण ठेवण्याचा वा विद्युतनिर्मिती उद्योग यातूनच केला जातो. येथेही गमतीचा भाग कसा आहे बघा. आइसलँड व न्यूझीलंडसारख्या थंड प्रदेशातही निसर्गाने ही सोय करून ठेवली आहे. *'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *“ एक चागंली माता शंभर शिक्षकांच्या मोलाची असते. ”* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *'राष्ट्रीय युवक दिन' केव्हा साजरा केला जातो ?* 12 जानेवारी 2) *विधानसभेचा कार्यकाल किती वर्षाचा असतो ?* 5 वर्ष 3) *विधानसभेच्या सदस्याला काय म्हणतात ?* आमदार 4) *महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोठे होते ?* नागपूर 5) *राज्याचा प्रमुख कोण असतो ?* राज्यपाल *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● प्रशांत करखेलीकर ●  सुनील महामुनी ●  प्रशांत कोकाटे ●  कांचन जोशी ●  दिगंबर वंगरवार ●  ऋषीकेश बच्छाव ●  अमोल पाटील ●  गणेश यादव ● भगवान वाघमारे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *एक छोटी कथा सांगितली जाते. एका दुष्काळी प्रदेशातील एक दुष्काळी गाव. नद्या, विहिरी आटलेल्या, पाण्यासाठी दशदिशा, आम्हा फिरविशी जगदीशा...अशी अवस्था. पावसाळा सुरू होतो. पाऊस काही येईना. शेवटी सगळा गाव एकत्र येतो. गंभीर परिस्थितीवर गंभीर चर्चा होते. उपाय सुचविले जातात. शेवटचा प्रयत्न म्हणून गावालगतच्या डोंगरावर जाऊन पावसासाठी देवाची प्रार्थना करायचे ठरते. सारा गाव ठरल्याप्रमाणे एकत्र येतो. थकलेली, तहानलेली पावलं नव्या उमेदीनं डोंगराकडे चालायला लागतात.* *या सर्व मोठ्या माणसांमध्ये एक मुलगा हातात छत्री घेऊन चालत असतो. या मुलाकडे बघून सर्वांना आश्चर्य वाटते. पावसाचा टिपूस नाही. येण्याची शक्यताही नाही आणि हा चिमुरडा सोबत छत्री घेऊन आलाय. शेवटी एकजण त्या चिमुरड्याला विचारतो..'बाळा, तू ही छत्री सोबत आणलीस?' छोटा मुलगा उत्तरतो. 'पावसासाठी प्रार्थना करायला आपण डोंगरावर जात आहोत आणि मी प्रार्थना केल्यावर पाऊस येणारच आहे. म्हणून मी छत्री सोबत घेतलीय.' हा स्वत:च्या प्रार्थनेवरचा ठाम विश्वास! एकूण दुसरं पाऊल पडणार आहे. या विश्वासावरच पहिलं पाऊल उचलावं लागतं.* 〰 ‼ *रामकृष्णहरी* ‼ 〰 🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻 *संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो,* *संत कबीर वृत्तीने फकीर पण* *सामान्यांची बनवून गेले तकदीर।* *ते म्हणत--* *कबीर गाफील क्यों फिरय,* *क्या सोता घनघोर* *तेरे सिराने जाम खड़ा,* *ज्यों अंधियारे चोर ।* *महात्मा कबीर मृत्यूची आठवण* *करून देतात. हे मानवा* *तुला असा दुर्मिळ मनुष्य* *जन्म मिळालेला असताना तू असा गाफिलासारखा का फिरत* *आहेस ? कोणत्या* *घणघोर अंधार्‍या काळ कोठडीत तू* *स्वतःला जखडून घेत आहेस ?* *कुठल्याही संपत्तीच मोल* *देवूनही हा जन्म परत* *मिळणारा नाही . तुला मिळालेले* *ज्ञानेंद्रिये व कर्मेंद्रिये तुझ्या* *मुक्तीसाठीच विधात्याने दिलेली सर्वात* *महान भेट आहे. इत्तर* *प्राण्यांपेक्षा तू विधात्याला अधिक* *प्रिय म्हणून बुद्धी व बोलीचं* *अधिकचं वरदान तुला दिलं* *तर तू त्या वैभवाचा वापर* *करून या सृष्टीचा स्वर्ग करण्यासाठी* *धडपडायला* *पाहिजेस ! स्वर्ग निर्माणाचं जाऊ दे ,* *किमान या सृष्टीला तरी विद्रुप* *करण्याचं कुकर्म करू* *नकोस ! हे वैविध्याने भरलेले जग* *तुझ्याचसाठी आहे .याच्याकडे* *डोळे उघडे ठेवून* *पाहिलेस. त्याच्या रचनेला* *धक्का न देता त्याचा मानव* *कल्याणासाठी वापर करून घेतलास* *तर भविष्य सुंदर, नाही तर* *निसर्ग प्रकोप ठरलेलाच.* *तू* *कितीही सावध वागण्याचा* *प्रयत्न करीत असलास* *तरी हा मृत्यू रूपी चोर* *तुझ्यावर सारखी पाळत ठेवून* *आहे. तू भौतिक सुखसोयींचा* *कितीही आधार* *घेतलास तरी काचेच्या बंदिस्त* *महालातूनही तुझ्यातल्या चैतन्यरूपी* *आत्म्याला तो* *कोणत्याही क्षणी उचलल्याशिवाय* *राहाणार नाही.* *तेव्हा तू ज्या शरीर व रूपाला* *मोहवून हुरळून जातोस* *त्यापेक्षा सृष्टीकडं पाहाण्याची दिव्य* *दृष्टी देणार्‍या आत्मदृष्टीची* *जडणघडण चांगली* *होण्यासाठी मनाचा निकोप* *विकास होणे गरजेचे आहे.* *सुंदर मनेच सुंदर सुष्टी देवू* *शकतात. तेव्हा अज्ञानाचा* *अंधःकार दूर करून सत्यरूपी ज्ञान* *जाणून घे.* *या मधुर रचनेत कुठेही अंधश्रद्धा नाही* *तर कर्म व ज्ञान यांचा संयोग* *कबिरांनी दोन ओळीत* *सांगितला. समजून आचरणात* *आणता आले तर बघा।* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ज्यांनी आपल्या जीवनात कधीही असत्याला थारा दिला नाही,मनात कुणाचेही वाईट चिंतले नाही, इतरांकडे कधी वक्रदृष्टीने पाहिले नाही,दुस-या चे ते माझे कधी म्हटले नाही,कधीही कशाची मनात लालसा ठेवली नाही,कधीही कुणासोबत स्पर्धा केली नाही,जीवनात जे काही करायचे ते आपल्या प्रयत्नाने करायचे,जे काही शक्य आहे ते आपण मन लावून करायचे,जे काही मिळेल त्यात समाधानाने स्वीकारायचे असे गुण ज्यांच्या जीवनात परिपूर्ण आहेत तीच माणसे आपल्या जीवनात सुखी व समृद्ध होऊ शकतात आणि तीच माणसे इतरांना आपल्या जीवनासारखे जीवन जगण्यासाठी प्रेरीत करतात आणि आपणही त्यांचे गुण आत्मसात करून चांगले जीवन जगण्याचा मार्ग स्वीकारला पाहिजे तरच आपल्या जीवनाचे खरे कल्याण होईल. © व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🌾🌹🌾🌹🌾🌹🌾🌹🌾🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *एक गुरूंच्‍या घरी एक शिष्‍य मनोभावे गुरुंची सेवा करून शिक्षण घेत होता. त्‍याच्‍या या सेवेमुळे गुरु त्‍याच्‍यावर प्रसन्न होते. शिक्षण् पूर्ण झाल्‍यावर विद्यार्थी घरी जाण्‍यासाठी निघाला तेव्‍हा गुरुंकडे त्‍याने जाण्‍याची आज्ञा मागितली तेव्‍हा गुरुंनी त्‍याला आशीर्वाद म्‍हणून एक आरसा भेट दिला व सांगितले की, हा दिव्‍य आरसा (दर्पण) असून यात मानवी मनात चालणारे विचार प्रगट होऊन दिसतात. विद्यार्थी मोठा आनंदीत झाला. हा आरसा खरेच कार्य करतो की नाही याची शहानिशा करण्‍यासाठी त्‍याने लगेच आपल्‍या गुरुंसमोर हा आरसा धरला व गुरुंच्‍या मनात कोणते भाव आहेत, दुर्गुण आहेत हे पाहू लागला आणि गुरुंच्‍या समोर आरसा धरताच त्‍याच्‍या चेह-यावरचा रंग पार उडाला कारण तो आरसा गुरुंच्‍या अंतकरणात मोह, अहंकार, क्रोध आदि विकार दाखवित होता. त्‍याला याचे फारच दु:ख झाले की आपण ज्‍या गुरुची मनोभावे पूजा केली, ज्‍यांना पूर्ण ईश्र्वराचा दर्जा दिला त्‍यांच्‍या मनातही विकार आहेत, ते सुद्धा मानवी विकारापासून अजून सुटलेले नाहीत याचे त्‍याला वैषम्‍य वाटले. तो गुरुंना काहीच न बोलता तो आरसा घेवून गुरुकुलातून निघाला, रस्‍त्‍यात भेटणा-या प्रत्‍येकाच्‍या मनातील भाव पाहणे हे त्‍याचे कामच झाले होते. गावी परत जाताच त्‍याने आपल्‍या प्रत्‍येक परिचिताबरोबर हा प्रयोग करून पाहिला. त्‍याला प्रत्‍येकाच्‍या हृदयात कोणता ना कोणता दुर्गुण दिसून आला. शेवट त्‍याने आपल्‍या जन्‍मदात्‍या आई वडीलांच्‍या समोरही हा आरसा ठेवला. ते दोघेही पण त्‍यातून सुटले नाहीत. त्‍यांच्‍या हृदयात पण त्‍याला काही ना काही दुर्गुण दिसले. शेवटी या गोष्‍टीचा त्‍याला मनोमन राग आला व तो गुरुकुलातील गुरुंकडे धावला. गुरुंपाशी जाऊन मोठ्या विनम्रपणे तो म्‍हणाला,’’ गुरुदेव, मी आपण दिलेल्‍या या आरशातून प्रत्‍येकाच्‍या मनात, हृदयात, अंत:करणात डोकावून पाहिले आणि मला असे जाणवले की प्रत्‍येकाच्‍याच मनात काही ना काही विकार आहेच, काही ना काही दोष आहे. एखाद्याच्‍या मनात कमी तर कुणाच्‍या मनात जास्‍त असे विकार, दोष भरून राहिले आहेत. हे पाहून मी फार दु:खी झालो आहे, कृपया मला मार्गदर्शन करा.’’ गुरुंनी काहीच न बोलता तो आरसा फक्त त्‍याच्‍याकडे केला आणि काय आश्र्चर्य त्‍याला त्‍याच्‍या मनाच्‍या प्रत्‍येक कोप-यात राग, द्वेष, अहंकार, क्रोध, माया आदि दुर्गुण भरून राहिलेले दिसले. गुरुजी म्‍हणाले,’’ वत्‍सा, हा आरसा मी तुला तुझे दुर्गुण पाहून ते कमी करण्‍यासाठी दिला होता पण तू दुस-यांचे दुर्गुण पाहत बसलास आणि नको तितका वेळ खर्च केलास, अरे याच कालात जर तू जर स्‍वत:चे अवलोकन केले असते तर तुला तुझ्यातील दुर्गुण सुधारता आले असते. याच काळात तु एक असामान्‍य व्‍यक्ती झाला असता. मानवाची ही कमतरता आहे, कमजोरी आहे की तो दुस-यातील दुर्गुण पाहत बसतो आणि स्‍वत:ला सुधारण्‍याचा प्रयत्‍नही करत नाही. हेच या आरशातून मला तुला शिकवायचे होते. जे तुला शिकता आले नाही.’’* *तात्‍पर्य – आपण नेहमीच दुस-या व्‍यक्तीचे दुर्गुण बघतो, त्‍यावर टीका करतो पण आपल्‍यातील दुर्गुणांवर आपले कधीच लक्ष जात....* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment