✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 12/09/2019 वार - गुरूवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *अनंत चतुर्दशी गणेश विसर्जन* 💥 ठळक घडामोडी :- ◆१९९८- डॉ जयंत नारळीकर यांना 'पुण्यभूषण'पुरस्कार प्रदान. ◆ २००५-हॉंगकॉंग मधील disney Land सुरू झाले. ◆२००२ - 'मेटसॅट' या भारताच्या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण. ◆ १९४८-भारतीय सैन्य हैदराबाद संस्थानच्या हद्दीत घुसले. 💥 जन्म :- ●१५७५ - हेन्री हडसन, इंग्लिश शोधक. ●१९१३ - जेसी जेम्स, अमेरिकन धावपटू. ● १९१२- फिरोज गांधी, इंदिरा गांधी यांचे पती, पत्रकार व राजकारणी. 💥 मृत्यू :- ● १९५२ - सवाई गंधर्व उर्फ रामभाऊ कुंदगोळकर ●१९८० - सतीश दुभाषी रंगभूमी, चित्रपटसृष्टीतील अभिनेते. ● १९९२ - पंडित मल्लिकार्जुन मन्सूर, गायक. ● १९९६ - श्रीमती पद्मा चव्हाण नाट्य, चित्रपट अभिनेत्री. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *इस्रो ब्यालालु येथील ३२ मीटर अँटेनाचा वापर करुन विक्रम लँडरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे. ब्यालालु हे बंगळुरु जवळ असलेले इस्रोचे डीप स्पेस नेटवर्क सेंटर आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे देण्यात येणारा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जेष्ठ संगीतकार उषा खन्ना यांना जाहीर, ५ लाख रुपये, मानपत्र, स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी प्रसिध्दी पत्रकाच्या माध्यमातून या पुरस्काराची केली घोषणा* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *लातूरमध्ये गणेश विसर्जनाला दुष्काळाचा फटका, गणेशमूर्ती विसर्जित न करता दान करण्याचा गणेश मंडळांचा निर्णय* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *मुंबई - केंद्र सरकारने लागू केलेला नवीन मोटार वाहन कायदा तुर्तास महाराष्ट्रात लागू होणार नसल्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी पत्रकार परिषदेत सांगितले* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *आगामी विधानसभा निवडणुकीसाठी इव्हीएम, मनुष्यबळासह सर्व पूर्वयारी पूर्ण - मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंग* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *नांदेड : देगलूर येथे अक्षर मानव कडून प्रसिद्ध साहित्यिक रामदास फुटाणे यांचा आज आणि उद्या दोन दिवसीय संवाद सहवास कार्यक्रम* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *धर्मशाळा : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला टी-२० सामना हिमाचल प्रदेशच्या धर्मशाळा मैदानावर खेळवला जाणार आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार रविवारी धर्मशाळेत ढगाळ वातावरण असेल, त्यामुळे संध्याकाळी पावसामुळे सामन्यात व्यत्यय येण्याची शक्यता* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ही बुलेटीन audioमध्ये ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे. https://b.sharechat.com/aBzlVb3tUZ ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *एकच ध्यास ; वाचन विकास* https://nasayeotikar.blogspot.com/2018/01/blog-post_6.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *गुरुत्वाकर्षण म्हणजे काय ?* 📙 गुरुत्वाकर्षण सर्वत्र असते. गुरुत्वाकर्षणाची ताकद वस्तूमानाप्रमाणे बदलत जाते, पण प्रत्येक गोष्ट स्वतःचे गुरुत्वाकर्षण राखून असते. त्याचा प्रभाव कदाचित लक्षात येईल, जाणवेल किंवा नाही, ही गोष्ट वेगळी. व्यवहारत: प्रत्येक वस्तू दुसऱ्या वस्तूवर गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव राखून असते, हे विधान समजावुन देणे अशक्य आहे. पण जरा वेगळ्या पद्धतीने हे पटू शकते. चंद्रावर पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव आहे म्हणून तो तिच्या कक्षेत फिरतो, तर पृथ्वीवर सूर्याचे गुरुत्वाकर्षण प्रभाव ठेवून आहे. सूर्य आपल्या सर्व ग्रहांसह आकाशगंगेत आहे; कारण आकाशगंगेतील सुमारे लाखभर तारे एकमेकांवर गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव राखून आहेत. यात आपल्याला गुरुत्वाकर्षण जाणवते, ते फक्त पृथ्वीचे. याचा शोध न्यूटन यांनी लावला, हे ज्ञात आहेच. १६६५ साली वयाच्या केवळ २३ व्या वर्षी झाडाखाली बसलेले असताना सफरचंद खाली का पडते, या विचारातून गुरुत्वाकर्षणाबद्दलचा विचार त्यांनी पुढे मांडला. चालता चालता पाय घसरला, तर आपला तोल जातो. खुर्ची एका मर्यादेपलीकडे कलंडली, तर पडते. याचे कारण म्हणजे प्रत्येक वस्तूचा गुरुत्वाकर्षणामुळे निर्माण झालेला गुरुत्वमध्य एका मर्यादेपलीकडे ढळतो आहे, हेच आहे; कारण जणू काही त्या वस्तूचे वजन त्या बिंदूतच एकवटलेले असते. एखाद्या वस्तूच्या उंचीतील ओळंबा जेव्हा तिच्या पायाबाहेर जातो, तेव्हा हे घडते. आकाशगंगाच काय, पण विश्वातील अनेक वस्तू गुरुत्वाकर्षणामुळेच टिकून आहेत. ही प्रत्येक गोष्टीची मध्याकडे ओढ नसती, तर ज्या वस्तूमानाने, कणांनी प्रत्येक ग्रह, तारे बनले आहेत, ते वस्तुमान एकत्रच राहिले नसते. पृथ्वी विलक्षण वेगाने स्वतःभोवती फिरते, पण एवढे अवाढव्य समुद्राचे पाणी मात्र स्वतःच्या जागीच असते. इतकी उंच डोंगरशिखरे स्थिरच राहतात. पृथ्वीचे वातावरणही तिच्या वेगानेच फिरत राहते. याचेच कारण पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण. वस्तुमान व आकारमानाप्रमाणे गुरुत्वाकर्षणाची ताकद बदलते, हे तर प्रत्यक्षच सिद्ध झाले आहे. चंद्रावर गेलेल्यांचे वजन पृथ्वीवरच्यापेक्षा जेमतेम एकषष्ठांशच भरले होते. याउलट, पृथ्वीपेक्षा मोठ्या ग्रहावर जर यदाकदाचित माणूस पोहोचला, तर त्याचे वजन कितीतरी जास्त भरेल. ग्रहाच्या आकारमानाप्रमाणे तेथील वस्तूंचे वजन बदलेल. अवकाशात केल्यावर गुरुत्वाकर्षणरहीत अवस्थेत आपण असतो, असे अनेक वेळा म्हटले जाते. पृथ्वीभोवती कक्षेत फिरणार्‍या कोणत्याही वस्तूच्या बाबतीत ते खरे आहे. ज्याप्रमाणे उंचावरून पृथ्वीकडे झेपावतानासुद्धा पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण जाणवेनासे होते, वर वजनरहित अवस्था आहे, असे वाटत राहते, तशीच ही थोडीफार जाणीव असते. त्यालाच मायक्रोग्रॅव्हिटी म्हणता येईल. मायक्रोग्रॅव्हिटीत दैनंदिन व्यवहार किती कठीण असतात, ते अंतराळयानात वावरणाऱ्या अनेकांनी वर्णन केलेले आहेच. अन्न गिळणे, अंघोळ करणे, तोल राखणे, पाय जमिनीवर ठेवणे हेसुद्धा अंतराळात वावरताना अत्यंत कटकटीचे ठरते. अंघोळीसाठी विशिष्ट सूट घालून त्यातून पाणी शोषून घ्यावे लागते, तर अन्न पेस्टच्या स्वरुपात तोंडात कसेबसे गिळावे लागले. पाय तर जमिनीवर कधीच ठरत नाहीत. आणि हे सारे सांभाळत विविध कामे व प्रयोग पार पाडायचे असतातच. *'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *If you act to be happy, you will be happy.* *(जर तुम्ही आनंदी असण्याचा देखावा केला तर तुम्ही नक्कीच आनंदी व्हाल.)* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *जागतिक जलदिन केव्हा साजरा केला जातो ?* 22 मार्च 2) *भारतातील सर्वात मोठा व्याघ्र अभयारण्य कोणता ?* कार्बेट 3) *हिवताप कोणत्या डासांमुळे होतो ?* अनाफेलीस डास ( मादी ) 4) *चंद्रपूर जिल्ह्यात सर्वात जास्त आदिवासी जमात कोणती ?* गोंड 5) *लिएण्डर पेस हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?* टेनिस *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● शिवकन्या शशी ●  श्रीपाद चंद्रकांत कुलकर्णी ●  स्वप्नील पुलकंठवार ●  विकास पाटील जाधव ●  साईनाथ बोधूलवार ●  श्याम कांबळे ●  पुंडलिक बिरगले ●  शिवा शिवशेट्टी ●  साहिल सुगुरवाड ●  केतन जोशी *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *जगात प्रचंड विविधता आहे. किंबहुना, विविधता हेच जगाचे सौंदर्य आहे. तीच मानवतेची ताकद आहे; परंतु दुर्दैवाने विविधता आणि विषमता यातील फरक लक्षात न घेतल्यामुळे मानवा-मानवांत जात, पात, धर्म, पंथ यावरून गटतट पडले आहेत. समाजाला एकत्र ठेवण्याऐवजी, मतलबी मंडळींनी स्वार्थासाठी समाजात भांडणे लावून दिली आहेत. त्यातून अतिरेकी विचाराची माणसे निर्माण झाली आहेत. त्यातून हिंसाचार वाढीला लागला आहे. विवेकाचा आवाज दाबला जात आहे. सज्जनांची पीछेहाट आणि दुर्जनांचा विजय होताना दिसत आहे.* *भारताला साधुसंतांचा देश म्हटले जाते. प्रचंड मोठी सांस्कृतिक परंपरा असलेला भारतीय माणूस मूलत: विचारी आहे. त्यामुळे फोलपट बाजूला ठेवून सार ग्रहण करणे त्याला सहज शक्य आहे. दोन धर्मांच्या तत्वज्ञानात अंतर असू शकते. धर्माच्या भाषा वेगवेगळ्या असू शकतात; परंतु कोणत्याही धर्माचा हेतू वाईट असू शकत नाही. रजनीश एकदा म्हटले होते, की, इश्क, प्रेम आणि अहिंसा हे एकाच मनोवृत्तीसाठी वापरलेले वेगवेगळे शब्द आहेत. वरवर विचार करणा-याला ते पटत नाही; पण खोलवर विचार केला असता हे पटायला लागते. आपल्या शरीराची ठेवण अलग अलग असू शकते, भाषा वेगवेगळ्या असू शकतात, परंतु आपल्या ह्रदयाची ठेवण, रक्ताचा रंग हे मात्र एकच असते. हे आपण पक्के ध्यानात ठेवायला हवे. मनुष्यजन्म दुर्मिळ आहे, त्याचा सदुपयोग करायला हवा.* *॥ रामकृष्णहरी ॥* 🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो* *दोस्त दोस्त ना रहा,प्यार प्यार ना रहा।* *जिंदगी हमे तेरा एतबार ना रहा।* *असे उदास चेहरे रस्त्या-रस्त्यावर* *हल्ली बघायला* *मिळतात.सन्मार्ग* *दाखवणारे वाटाडे कुठे दिसत नाही.* *आज, साधू साधनेत कमी आणि* *साधनात जास्त प्रमाणात* *वावरतांना आपण* *पाहतो.फक्त पाहत नाही तर त्याच्या* *अंधश्रधारूपी विषारी* *वृक्षांना खत पाणी घालतो आणि* *आपल्याच विनाशासाठी* *वाढवतो.तारूण्य आणि संगत यांचे* *महत्व विशद करताना* *डॉ* *.कलाम 'आपले मित्र, चित्र आंणि* *चरित्र नेहमी पवित्र ठेवा; असे सांगतात.कारण तेच खरे जीवनाचे* *अस्त्र आहे. तुम्हाला तर हे माहित आहे की., चारित्र्याचे पतन* *होण्यासाठी बहुधा चुकीचे मित्र आणि चुकीचे चित्र यांचाच हात* *असतो. चुकीचे मित्र आणि चुकीचे चित्र हेच चारित्र्य नष्ट* *करण्याचे शस्त्र आहे किंवा असेही म्हणता येईल की, कधीही न चुकणारे* *ब्रम्हास्त्र आहे.' तारुण्याच्या सळसळत्या उर्जेवर* *स्वार्थी व्यवस्थांचा डोळा असतो. त्यामुळेच तारूण्याची ऊर्जा सैरभैर* *करून तिला आपल्या इच्छेप्रमाणे वापरण्याचे धूर्त* *राजकारण या स्वार्थी व्यवस्था करत असतात. तारुण्याच्या ऐन उमेदीचा* *कालखंड निरर्थकपणे या स्वार्थी व्यवस्थेच्या नेतृत्वामागे* *घालविला जातो.** *एखादी पाण्याची बाटली वापरून फेकून द्यावी, त्या पद्धतीने तरुणांच्या ऊर्जेचा वापर करून त्यांना शेवटी फेकून दिले जाते. सर्व बाजूंनी निष्क्रिय केलेल्या तरूणांवर शेवटी पश्चात्तापाची वेळ येते. तारूण्याचे रखरखीत वाळवंट होते. आपले तारूण्य विवेकशून्य व्यवस्थेच्या हाती द्यायचे की, स्वत:वर विश्वास ठेवत स्वकर्तृत्वाच्या बळावर समाज जीवनात उजळवून टाकायचे हे ज्याला समजले, त्याला तारुण्याचा खरा अर्थ कळला. माजी राष्ट्रपती डाॅ. ए.पी.जे. अब्दुल कलाम हे युवकांना देशाची संपत्ती म्हणायचे, ही संपत्ती देशासाठी आपत्ती ठरू नये म्हणून तरूणांनी आपले मित्र विचारपूर्वक निवडावेत.* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ज्यांच्याकडे धन,संपत्ती,ऐश्वर्य,नोकरचाकर आणि अभिमान आहे तो फार श्रीमंत आहे असे काहींना वाटत असेल तर ते चुकीचे आहे त्यापेक्षा ज्यांच्याकडे आई-वडील आहेत,तो निरंतर त्यांची सेवा करतो,त्यांचे मन कधीही दुखवत नाही,त्यांना वंदन करुन दैनंदिन कामाला लागतो,रक्ताच्या नात्याबरोबरच इतरांसोबत माणुसकीची नाती ही जपतो, इतरांच्या सुखदु:खात सहभागी होतो, वेळप्रसंगी मदतीचा हातही पुढे करतो आणि त्याला कशाचाही गर्व नाही अशी व्यक्ती या जगात फार श्रीमंत आहे आणि भाग्यवानदेखील आहे. ©व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आचार्य विनोबा भावे* भूदान चळवळीच्‍या काळातील ही गोष्‍ट आहे. या चळवळीचे प्रणेते आचार्य विनोबा भावे होते. त्‍यांची पदयात्रा सुरु होती. आपल्‍या काही शिष्‍यांसह विनोबाजी मीराजींच्‍या आश्रमात थांबले होते. अल्‍पशा विश्रांतीनंतर त्‍यांची पदयात्रा पुन्‍हा सुरु झाली. त्यावेळी ते हरिद्वारकडे चालले होते. विनोबाजींची प्रकृती थोडी ठीक नव्‍हती. त्‍यांची कंबर आणि पाय दुखत होते. त्‍यामुळे त्‍यांना खुर्चीत बसवून नेण्‍यात येत होते. मध्‍ये मध्‍ये खुर्चीतून उतरून पायी चालायचे. तेव्‍हा एक शिष्‍य त्‍यांच्‍याजवळ येऊन म्‍हणाला,'' बाबा, मला खूप राग येतो, मी काय करावे'' विनोबाजी म्‍हणाले,'' मी लहान असताना मलाही खूप राग यायचा, मग माझ्याजवळ मिश्री असायची ती मी तोंडात ठेवायचो, परंतु कधीकधी ती ही नसायची'' मग तुम्‍ही काय करत होता असे त्‍या व्‍यक्तीने विचारले. विनोबाजी म्‍हणाले,'' मी यावर खूप विचार केला, मग माझ्या मनात एक गोष्‍ट आली. जेव्‍हा आपल्‍या मनाविरूद्ध एखादी गोष्‍ट आली जेव्‍हा आपल्‍या मनाविरूद्ध गोष्‍ट घडली तर लगेच नाराज होतो जर तो क्षणच आपण टाळला तर रागावर विजय मिळवू शकतो. आनंद आणि नाराजी यावर आपण तेव्‍हाच प्रकट करतो तो पहिलाच क्षण आपल्‍यावर वरचढ ठरू पाहतो. तो क्षण टाळणे कठीण आहे. पण मनन करून तो टाळता येतो. मी यावर खूप मनन केले, यामुळेच जीवनात कितीही मोठी आपत्ती आली तरी मी संयम ढळू दिला नाही.'' *तात्‍पर्य :- विचारपूर्वक उचललेले पाऊल आयुष्‍याला योग्‍य दिशा देते.* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment