✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दि. 01/10/2022 वार - शनिवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 🎇 . *दिनविशेष . 🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*आंतरराष्ट्रीय कॉफी दिन**आंतरराष्ट्रीयवृद्ध व्यक्ती दिन**आंतरराष्ट्रीय संगीत दिन*इ💥 ठळक घडामोडी :-◆१८३७-भारतातील पाहिले टपाल कार्यालय सुरू झाले.◆१९५८ - नासाची स्थापना.💥 जन्म :-◆१९०४ - ए.के. गोपालन, भारतीय कम्युनिस्ट नेता.◆१९१९ - ग.दि. माडगूळकर, मराठी कवी.💥 मृत्यू :-◆१९४२ - अँट्स पीप, एस्टोनियाचा पंतप्रधान.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *सर्वसामान्यांना महागाईचा झटका, 1 ऑक्टोबरपासून CNG-PNG च्या दरात वाढ, केंद्र सरकारनं नैसर्गिक गॅसची किंमत तब्बल 40 टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राजधानी दिल्लीमध्ये 5G सेवेचा शुभारंभ होणार*••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *नाशिक महापालिकेतील गेल्या पाच वर्षांपासून प्रलंबित नोकर भरतीसाठी राज्य सरकारकडून हिरवा कंदील मिळाला आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *पुढील 3 ते 4 दिवस राज्याच्या काही भागांत ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय.*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गांधीनगर-मुंबई 'वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन'ला दाखवला हिरवा झेंडा, मुंबईकरांसाठी आजपासून सेवेत*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *'गोष्ट एका पैठणी' हा राष्ट्रीय पुरस्कार विजेता सिनेमा 2 ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *अग्निपथ योजनेअंतर्गत 100 पदांसाठी सुमारे अडीच लाख महिलांनी लष्करी पोलिसांच्या (सीएमपी) सैन्य दलात भरतीसाठी नोंदणी केली आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••*व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/9mamp5qoB9o~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *दृष्टी तशी सृष्टी*https://nasayeotikar.blogspot.com/2018/05/30.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *साडेतीन अब्ज वर्षांपूर्वी ते दहा कोटी वर्षांपूर्वीपर्यंतचा सजीवांचा इतिहास काय ?* 📙मानवी आयुष्याचा काळ जेमतेम ७०-८० वर्षांचा आहे. जास्तीत जास्त १०० वर्षे धरली, तरीही त्याच्या दृष्टीने हजारभर वर्षे म्हणजे फार पुरातन काळ होतो. पण पृथ्वीवरील सजीवांचा इतिहास व त्यांची आजवरची वाटचाल पाहावयाची झाली, तर किमान दहा कोटी वर्षे मागे जावे लागते. दहा कोटी वर्षे मागे जाण्याचे कारण म्हणजे सध्याची आपल्याला ज्ञात असलेली पृथ्वी, तिच्यावरील खंडे, तेथील हवामान हे या सुमाराला रंगरूपाला वा आकाराला येऊ लागले. त्याला आता दहा कोटी वर्षांचा काळ लोटला आहे. या आधीचे प्राणी, वनस्पती हे कसे होते आणि त्यांची सध्याच्या सजीवांशी कितपत जवळीक होती, यांची उत्तरे या अतिप्राचीन कालखंडामध्येच शोधावी लागतात. आपले घर कसे होते, कोणी बांधले, येथे पूर्वी काय होते, गाव वसले कधी, त्याआधी जंगल होते काय - या प्रश्नांची तशी सामान्य माणूस आपल्या वडील, आजोबा, पणजोबांकडे चौकशी करतो, त्यात आस्था दाखवतो, अगदी तशीच आस्था शास्त्रज्ञांना या गोष्टींबद्दल नेहमी वाटत आली आहे.साडेतीन अब्ज वर्षांपूर्वीची अलगी या स्वरूपातील वनस्पती ऑस्ट्रेलियातील शार्कबे या भागातील फॉसिल्समध्ये सापडली आहे. वनस्पतीजीवनाचा हा उपलब्ध झालेला सर्वात जुना पुरावा. पंचेचाळीस कोटी वर्षांपूर्वी गोड्या पाण्यात व त्याच्या काठावर वनस्पती फोफावू लागल्या होत्या. प्रत्यक्ष झाडे या स्वरूपात वनस्पतीजीवन आढळले आहे, त्याला यावरही तीन कोटी वर्षे जावी लागली. एकपेशीय वा बुरशीजन्य वनस्पतींपासून ही प्रगती होण्याला एवढा मोठा काळ गेला आहे. बेचाळीस कोटी वर्षांपूर्वी या वनस्पती सर्वत्र पसरू लागल्या. बहुधा याच सुमाराला या वनस्पतींवर वाढणारे व त्यांच्या कुजण्यातून अन्नपोषण मिळवणारे सजीव प्राणी निर्माण झाले असावेत. सुमारे सदतीस कोटी वर्षांपूर्वी या काळात या प्राण्यांतूनच काही पृष्ठवंशीय किंवा व्हटेंब्रेट्स निर्माण झाले असणार. सरपटणारे रेप्टाईल जातीचे हे पृष्ठवंशीय प्राणी सर्वत्र वावरू लागले, पण उंच डोंगर पार करण्याकरता त्यांना अजून काही कालखंड लागला. अंदाजे सव्वीस कोटी वर्षांपूर्वी या प्राण्यांचा आकार वाढत गेला व त्यांनी सर्व पृथ्वीवर फेरफटका मारायला सुरुवात केली. आता त्यांना जमिनीवरचे विविध अडसर अडवू शकत नव्हते. रेप्टाईल या प्रकारातील पृष्ठवंशीय प्राण्यांचे दोन प्रकारांत याच सुमाराला रूपांतर झालेले आढळते. सस्तन प्राणी व मॅमल जातीकडे एका प्रकारची वाटचाल सुरू झाली, तर दुसरा प्रकार डायनाॅसाॅर या प्रकारात रूपांतरित होत गेला.आज वाचायला आश्चर्य वाटेल, पण संपूर्ण दिवसांवर या महाकाय डायनाॅसाॅरचेच राज्य असे व केवळ अंधारात यांना कमी दिसत असल्याने अन्य सस्तन प्राणी निकाराची भूमिका बजावत. नेमकी कारणे ज्ञात नाहीत; पण दहा कोटी ते सात कोटी वर्षांपूर्वीच्या दरम्यान हे महाकाय प्राणी पृथ्वीवरून अचानक नष्टप्राय झाले. त्यानंतरचा काळ म्हणजे सस्तन पृष्ठवंशीय प्राण्यांचा आहे. त्यांपैकीच एक म्हणजे माणूस. यांचे दिवसा व रात्री पृथ्वीवर अबाधित प्राबल्य आहे. निदान तसे आपण तरी समजतो.विविध कालखंडांचा क्रम पुढीलप्रमाणे : डेव्हिनियन (३७ कोटी वर्षांपूर्वी)पर्मियन (२७ कोटी वर्षांपूर्वी) ज्युरासिक (१७ कोटी वर्षांपूर्वी) क्रेटेशन (१० ते ७ कोटी वर्षांपूर्वी)*'सृष्टिविज्ञान गाथा' या पुस्तकातुन* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*“ विश्रांती देणारे एकमेव औषध म्हणजे झोप. ”**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) २०२० चा चित्रपट सृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला प्राप्त झाला ? २) अलीकडेच मशिदीत पाऊल ठेवणारे किंवा मदरशात जाऊन विद्यार्थ्यांशी बोलणारे पहिले संघप्रमुख कोण ठरले आहेत ?३) आंतररष्ट्रीय व्याघ्रदिन केव्हा साजरा केला जातो ?४) कठीण कवचाची फळांची नावे सांगा.५) भारतात पहिली बुलेट ट्रेन कोणत्या दोन शहरादरम्यान धावणार आहे ?*उत्तरे :-* १) आशा पारेख ( ७९ ), प्रसिध्द अभिनेत्री २) मोहन भागवत, संघप्रमुख, रा. स्व. संघ ३) २९ जुलै ४) नारळ, अक्रोड, कवठ, बदाम इत्यादी ५) मुंबई ते अहमदाबाद *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••● डॉ. सौ.सारीका शिंदे, संभाजीनगर.(श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे यांची कन्या)● अर्जुन वाकोरे● विशाल मस्के● निलेश पंतमवार● व्यंकट रेड्डी मुडेले● गोविंदराव इपकलवार● आनंद पेंडकर● व्यंकटेश काटकर, विचारवेध ● गजानन काळे ● सुभाष टेकाळे ● श्रीकांत भोसके ● माधव शिंदे ● साईनाथ पलीकोंडावार*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*'मानवी' नात्यांमधील ओलावा हा जन्मजात असतो. तो सगळ्यांच्याच मनात झिरपत असतो. पण बरेचदा आम्हीच अनेक आवरणांचे थर लेपून त्यात प्रतिबंध तयार करतो. इथूनच 'मैत्री'च्या नात्यांमधील दुरावे, विसंवाद प्रसवतात. स्वत:कडे दोष घेऊन नाते जपण्याची क्रिया आत्मशुद्धीकडे नेणारी असते. त्यातून ख-याखु-या अस्सल 'मैत्री'ची नाती निर्माण होतात.**बरेचदा आपल्या पुढाकारातून व घडलेल्या संवादातून दुभंगलेली मने सांधली जातात पण त्याकरिता मुखवटे उतरवून माणूस वाचता यायला हवा. मनात क्षमाभाव जागृत ठेवायला हवा. निर्मळ, शुद्ध प्रेमभाव बाळगल्यास वाट्याला येणारी निराशा गळून पडेल, आणि 'मैत्री' अभंग राहिल.. हीच भावना जीवनदर्शी महाकवी 'मिर्झा गालिब' अगदी सहजपणे सांगून जातात.....* *" कुछ इस तरह मैने* *जिंदगी को आसान कर दिया,* *किसी से मांग ली माफी,* *किसी को माफ कर दिया !"* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●••💥💥💥💥💥💥💥💥💥 *श्री संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• कोणत्या चित्रात कोणते आणि कसे रंग द्यायचे हे आपण आपल्या कल्पकतेने ठरवून ते चित्र पूर्ण करतो.पण जीवनाचे सुंदर चित्र बनवण्यासाठी कुठे,कसे रंग भरावे हे लवकर लक्षात येत नाही.जीवनाच्या चित्रात रंग भरण्यासाठी कल्पकतेबरोबर, कठोर परिश्रमाचीही आवश्यकता लागते, परिस्थितीनुसार कोणत्या वेळी कोणता रंग भरावा याचेही ज्ञान असावे लागते.कधीकधी घाई केली तर आपण ठरवलेल्या रंगांमध्ये एखाद्या रंगाचे प्रमाण कमीजास्त झाले तर त्या रंगाचा बेरंगही होऊन जातो.सांगण्याचा तात्पर्य हा की, परिस्थितीनुसार रंग बदलण्याचीही आपली तयारी ठेवायला हवी आणि समयसुचकतेनुसार विचार करुन जीवनाचे सुंदर चित्र काढायलाही आणि रंगवायलाही आले पाहिजे.नाहीतर जीवनच रंगहीन बनून जाईल.खरंच मूळातच जीवन सुंदर आहे आणि त्या सुंदर जीवनाला अधिक सुंदर बनवण्यासाठी वेगवेगळ्या रंगरुपी छटांचेही ज्ञान आणि कल्पकता ज्यांना अवगत आहे आणि ज्यांना साध्य करता येते त्यांना आपल्या जीवनाचे चित्र छान आणि सुंदर बनवता येते. हे मात्र खरे आहे.© व्यंकटेश काटकर,नांदेड.संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३.🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *कुत्रा आणि लांडगा*एक लांडगा फार दिवस उपाशी राहिल्यामुळे रोड झाला होता. काहीतरी खायला मिळाले तर पहावे म्हणून तो चांदण्या रात्री फिरत होता. तेव्हा त्याला एका कुणब्याच्या झोपडीजवळ दारावर एक लठ्ठ कुत्रा बसलेला दिसला. त्याने त्याला रामराम करून त्याचा आदरसत्कार केल्यावर लांडगा त्याला म्हणाला, ''तू फार चांगला दिसतोस, तुझ्यासारखा देखणा व धष्टपुष्ट प्राणी आजपर्यंत मी पाहिला नाही. याचे कारण तरी काय? मी तुझ्यापेक्षा जास्त उद्योग करतो, पण मला पोटभर खायला मिळत नाही.'' कुत्रा म्हणाला, ''अरे, मी करतो ते तू करशील तर माझ्यासारखाच तूही सुखी होशील.''त्यावर लांडग्याने विचारले, ''तू काय करतोस?'' कुत्रा म्हणाला, ''दुसरे काही नाही. रात्रीच्या वेळी मालकाच्या दारापुढे पाहारा करून मी चोराला येऊ देत नाही.'' लांडगा म्हणाला, ''एवढंच ना? ते मी मनापासून करीन बाबा. अरे मी रानात भटकत थंडीवारा सोसतो तर मला घराच्या सावलीत बसून पोटभर अन्न मिळाल्यास दुसरे काय पाहिजे?'' याप्रमाणे दोघांमध्ये बोलणे चालले असता कुत्र्याच्या गळ्याला दोरीचा करकोचा पडलेला लांडग्याने पाहिला. तेव्हा तो कुत्र्याला म्हणाला, ''मित्रा, तुझ्या गळ्यात काय रे हे?'' कुत्रा म्हणाला, ''अं हं. ते काही नाही.'' लांडगा म्हणाला, ''तरी पण काय ते मला कळू देत.'' कुत्रा म्हणाला, ''अरे, मी थोडासा द्वाड आहे, लोकांना चावतो, म्हणून मी दिवसा झोपलो तर रात्री चांगला पहारा करीन म्हणून माझा मालक मला दोरीने बंधून ठेवतो पण दिवस मावळला की तो मला सोडतोच. मग मी वाटेल ते करतो, वाटेल तिकडे फिरतो. खाण्यापिण्याविषयी विचारशील तर माझा मालक आपल्या हाताने मला भाकरी खाऊ घालतो. घरची सगळीच माणसं मला मायेने वागवतात. पानावर उरलेली भाकरी माझ्याशिवाय दुसर्‍या कोणाला देत नाहीत. तेव्हा तू पहा, माझ्यासारखा वागशील तर तही सुखी होशील.'' ते ऐकताच लांडगा मागच्यामागे पळू लागला. त्याला हाका मारीत कुत्रा म्हणाला, ''अरे, असा पळतोस काय?'' लांडगा दुरूनच म्हणाला, ''नको रे बाबा मला ते सुख, ते तुझे तुलाच लाभो. स्वतंत्रपणे वाटेल तसे वागता येत असेल तर तसली गोष्ट मला सांग, तुझ्यासारखे बांधून ठेऊन जर मला कोणी राजा केले तर ते राजेपणदेखील मला नको!''तात्पर्य : स्वतंत्रपणा असताना गरिबीही चांगली. पण परतंत्रपणा असेल तर श्रीमंतीचाही काही उपयोग नाही.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment