✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दि. 09/09/2022 वार - शुक्रवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 🎇 . *दिनविशेष . 🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••💥 ठळक घडामोडी :-◆१९९४ - सचिन तेंडुलकरने श्रीलंकेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपल्या एकदिवसीय क्रिकेटमधील कारकिर्दीतले पहिले शतक ठोकले💥 जन्म :-◆१९४१ - डेनिस रिची, अमेरिकन संगणकशास्त्रज्ञ.◆ १९६७ - अक्षय कुमार, हिंदी चित्रपट अभिनेता.◆ १९७४ - विक्रम बात्रा, भारतीय थलसेना अधिकारी.💥 मृत्यू :-◆२०१० - वसंत नीलकंठ गुप्ते, मराठी कामगार चळवळ कार्यकर्ते, लेखक.◆ २०१५ - दत्तात्रय हेलसकर, जालना*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *गणेश विसर्जनासाठी राज्यभर कडक बंदोबस्त, अनेक ठिकाणी वाहतूक मार्गात बदल, गणेश विसर्जनासाठी मुंबई सज्ज, पंधरा हजार पोलीस आणि SRPF च्या तुकड्या तैनात*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *गोकुळकडून गाय दूध खरेदी दरात 15 दिवसांत दुसऱ्यांदा वाढ, 11 सप्टेंबरपासून होणार अंमलबजावणी*••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *ठाण्यात ढगफुटीसदृश पाऊस; तासाभरात 71 मिमी पावसाची नोंद तर मुसळधार पावसानं मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *ब्रिटनच्या महाराणी क्वीन एलिझाबेथ डॉक्टरांच्या देखरेखीखाली, प्रकृती चिंताजनक असल्याचं वृत्त*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *देशात यंदा 3 हजार 157 लाख टन अन्नधान्याच्या उत्पादनाचा अंदाज, डाळींसह तेलबियांचं उत्पादनही वाढणार : कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *नागपूरमध्ये सोमवारी 12 सप्टेंबरपासून सकाळी 6.15 ते रात्री 10 पर्यंत चालणार मेट्रो सेवा*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *विराट कोहलीच्या वादळी शतकाच्या जोरावर भारतानं अफगाणिस्तानचा 101 धावांनी केला पराभव*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300~~~~~~~~~~~~~~~~~~~*मराठवाडा मुक्तीसंग्राम गौरव गाथा*भाग दुसरा - श्री गोविंदभाई श्रॉफhttps://youtu.be/GQdy7jj7QII*Subscribe Channel**🎤 निवेदक - नासा येवतीकर 📢*विषय शिक्षक, कन्या शाळा धर्माबाद,📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*एक पाऊल स्वच्छतेसाठी ......!*भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी म्हणत, ' प्रत्येक कामाची सुरुवात स्वच्छतेपासून करावी. ' .........https://nasayeotikar.blogspot.com/2018/03/blog-post_25.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *क्लोरीन म्हणजे काय ?* 📙खाण्याचे मीठ व पिण्याच्या पाण्याची शुद्धता या दोन महत्वाच्या गोष्टी क्लोरीनमुळेच शक्य झाल्या आहेत. क्लोरीन हा वायू स्वरूपात मिळवला व साठवला जातो. मात्र नैसर्गिकरित्या क्लोरीन आढळत नाही. सोडियम बरोबर त्याचे संयुग पटकन बनते. त्यालाच आपण मीठ म्हणतो. ‍१७७४ साली शील यांनी त्याचा शोध लावला. फिकट हिरव्या रंगावरून ग्रीक भाषेतील क्लोराॅस या शब्दावरून त्याचे नाव पडले आहे. क्लोरीन हा वायू मुख्यतः पाणी शुद्ध करण्याच्या ब्लिचिंग पावडरमध्ये वापरला जातो. त्याच्यामुळे पाण्यातील जंतू मरतात व मुक्त झालेला क्लोरिन हवेत मिसळतो. अगदी सहज पूर्ण झालेल्या या प्रक्रियेमुळेच आपण मोठ्या प्रमाणावर पाण्याचे शुद्धीकरण करून गावे, शहरे, महानगरे यांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करू शकतो.क्लोरिनचे अनेक औद्योगिक उपयोगही आहेत. क्लोरीनचा गैरवापर करून पहिल्या महायुद्धात शत्रूच्या सैनिकांवर त्या वायूचा मारा केला गेला होता. फुप्फुसदाहाने त्यांचा त्यात मृत्यू ओढवला. कोणत्याही जिवंत प्राण्यांसाठी क्लोरीन हा अतिशय घातक वायू आहे. मात्र संयुग स्वरूपातील त्याची उपयुक्तता वादातीत ठरावी. माणसाच्या खाण्यातील एक अत्यावश्यक घटक म्हणजे मीठ. शरीरातील सोडीयमचा साठा अनेक शरीरातील क्रियांना मदत करतो. असा हा घटक म्हणजे सोडियम व क्लोरीनचे संयुग होय. भूल देण्यासाठी कित्येक दशके वापरले गेलेले क्लोरोफार्म हे द्रव्यही क्लोरीनचेच संयुग. क्लोरिनमुळे अनेक पदार्थांचे ऑक्सिडेशन होते. त्यामुळे अनेक रंग, डाग यांचा रंगीतपणा जातो. कपड्यांना नवीन रंग देण्यापूर्वी, कपडे स्वच्छ करण्यासाठी ब्लिचिंग पद्धतीच्या प्रक्रियेत याचा वापर केला जातो. हायड्रोक्लोरिक अॅसिड मध्ये क्लोरिन असतो व विद्राव्य म्हणून त्याचा वापर अनेक उद्योगांत केला जातो. कार्बनबरोबरचे त्याचे संयुग कार्बनटेट्राक्लोराईड एक उत्तम विद्राव्य आहे. त्याचा वापर आग विझवण्यासाठी केला जातो.क्लोरीनची निर्मिती इलेक्ट्रोलायसिस पद्धतीने केली जाते. समुद्राचे पाणी किंवा पोटॅशियमबरोबरची त्याची निसर्गात सापडणारी संयुगे यांचा वापर त्यासाठी केला जातो. एका परीने या वायूचा शोध हा मानवी प्रगतीला लागलेला मोठा हातभारच आहे, यात शंका नाही.*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*“ जो माणूस स्वतःला सुखी समजत नाही तो कधीच सुखी नसतो. ”**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते ?२) ब्लुमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार गौतम अडाणी जगात कितव्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत ?३) हॉकीचे जादूगार ध्यानचंद यांना भारत सरकारने पद्मभूषण पुरस्काराने कोणत्या वर्षी गौरविण्यात आले ?४) टोकियो ऑलिंपिकमध्ये सुवर्ण जिंकून देणारा नीरज चोप्राचा भाल्याला BCCI ने किती रुपयात खरेदी केला ?५) INS विक्रांतचे घोषवाक्य ' जयेम सं युधि स्पृध:' चा अर्थ काय आहे ?*उत्तरे :-* १) डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् २) तिसऱ्या, संपत्ती - ११ लाख कोटी रुपये / १३७.४ अब्ज डॉलर ३) १९५६ ४) दीड कोटी ५) माझ्याविरुद्ध लढतील त्या सर्वांना मी पराभूत करीन.*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••● गणेश कल्याणकर, नांदेड● महेश ठाकरे, सकाळ प्रतिनिधी, अमरावती● पंढरीनाथ डोईफोडे येवतीकर● श्रीकांत पाटील, येवती● उमाकांत कोटूरवार● गंगाधर गुरलोड, येवती● मारोती ताकलोर● अर्षद खान● किशन माटकर● रमेश पेंडकर● गोविंदराव ईपकलवार*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*यज्ञ, विवाह, ई. धार्मिक विधींचे वेळी अग्रपूजेचा-म्हणजे प्रथम -पूजेचा मान कोणत्या देवाला द्यावा, याबद्दल एकदा देवांमध्ये वाद सुरु झाला. प्रत्येकाला हा मान आपल्याला मिळावा असे वाटू लागले.अखेर हा तंटा ब्रम्हदेवांकडे गेला असता, ते म्हणाले, 'आपण कुणाही एका देवाला अग्रपूजेचा मान दिला, तर इतर देव नाराज होतील. तेव्हा हा निर्णय कसा घ्यावा, याचा मी एक मार्ग सुचवतो. जो देव या पृथ्वीला प्रदक्षिणा घालून सर्वात अगोदर माझ्याकडे येईल, त्याला हा अग्रपूजेचा मान बहाल केला जावा.'सर्वच देवांना हा तोडगा मान्य करावा लागला. मग प्रत्येकजण आपापल्या वाहनांवर स्वार होऊन, पृथ्वी प्रदक्षिणेला निघाला. कुणी वाघावर, कुणी गरुडावर तर कुणी मोरावर.**श्रीगणेशाने विचार केला 'आपलं वाहन उंदीर, एकतर त्यावर बसून पृथ्वी प्रदक्षिणा करणं अशक्य आणि दुसरं म्हणजे ते शक्य झालंच, तरी या स्पर्धेत विजयी होणं हे त्याहूनही अशक्य!' हा विचार मनात येताच त्याला एक युक्ती सुचली. त्याबरोबर तो घरी गेला व पार्वतीला म्हणाला, 'आई, तू थोडा वेळ बाबांजवळ जाऊन बसतेस का? 'पार्वती म्हणाली, 'ही रे काय थट्टा आरंभलीस? 'यावर शंकर म्हणाले,'तो सांगतोय तर येऊन बैस ना तू माझ्याजवळ. पार्वती शंकराजवळ जाऊन बसताच, गणेश त्या दोघांना सात प्रदक्षिणा घालून पुन्हा ब्रम्हदेवाकडे आला, हा स्थूलदेही गणपती पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करुन एवढ्या लवकर कसा परत आला, असा ब्रम्हदेवांना प्रश्न पडला, पण गणेशाने आपण योजलेल्या युक्तीची माहिती देताच ब्रम्हदेवांना त्यांच॔ म्हणणं मान्य करावं लागलं. सर्व देवांपुढे उभे राहून ब्रम्हदेव म्हणाले, 'आई ही पृथ्वीस्वरुप असून, वडील नारायणस्वरुप आहेत. त्यामुळे त्यांना घातलेली प्रदक्षिणा ही पृथ्वीप्रदक्षिणेपेक्षाही श्रेष्ठ आहे. महाबुध्दीवान गणेशाने त्याच्या आई-वडिलांना एकच नव्हे, तर सात प्रदक्षिणा घातल्या व तो सर्वांच्या आधी मजकडे आला; म्हणून अग्रपूजेचा अधिकारी 'श्रीगणेश' असल्याचा निर्णय मी देत आहे.'* ••●‼ *श्रीगणेशाय नम:*‼●•• ☘☘☘☘☘☘☘☘☘ *संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल- 9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌟! ! *काव्यांगण - रोज एक कविता* ! !🌟•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*भान मैत्रीचे*ठेवुनिच भान या मैत्रीचे जपूया जीवनभर नातीनकोत हेवेदावे मैत्रीमध्येपाळू नकाच जातीपाती असावे भान अशा मैत्रीचेजपुया नाती सगळे छाननको रुसवे-फुगवे नखरेद्यावा परस्परांनाही मानटिकवावी निरंतर नातीराखावाच मानसन्मानठेवूनि भान सुंदर मैत्रीचेफुलावी अशी मैत्री छान देऊया मैत्रीचा हात हातीपीडित दु:खी पामरालादेवाजीची ही कृपा मर्जीवरदहस्त असा लेकराला बांधू रेशमी बंध नात्यांचाजुळवून मैत्रीचे अतूट धागेजीवन हे क्षणभंगुर असतासोडून देऊ रागरुसवे मागेफुलावीच मैत्री कुसुमासमदरवळावा नात्यांचा सुगंधहात साह्याचा देऊनी हातीराहू आनंदाने होऊ बेधूंदसौ.भारती सावंत, मुंबई•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••कोणत्याही क्षेत्रात यश आणि प्रगती व्हायची असेल तर त्यासाठी ठराविक कालावधी,वेळ, जिद्द,सातत्य,परिश्रम,ज्ञान, तंत्रज्ञान आणि कौशल्य हवे असते तर याशिवाय प्रगती होत नाही.याउलट अधोगतीचे आहे.अधोगतीला कोणतीही अट नाही.कोणत्याही क्षणी माणसाच्या डोक्यात कोणतेही विध्वंसक वाईट विचार आले की,अधोगती ही क्रांतीरुपाने होते आणि त्यांचे परिणाम सर्वांनाच भोगावे लागतात.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३.🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *घोडा आणि नदी*एकदा एका माणसाला त्याच्या घोड्यासमवेत एक नदी पार करायची असते. परंतु त्याला नदीची खोली माहीत नसल्याने तो तिथेच काठावर विचार करत बसतो. मदतीसाठी आजुबाजुला पाहत असताना त्याला तेथे एक लहान मुलगा दिसतो. तेव्हा त्या माणसाने लहान मुलाला नदीच्या खोलीबद्दल विचारले.मुलाने घोड्याकडे एकदा पाहीले आणि क्षणभर थांबुन तो विश्वासाने म्हणाला, " निश्चींतपणे जा, तुमचा घोडा नदी सहज पार करु शकेल".मुलाचा सल्ला मानुन त्या माणसाने नदी पार करण्यास सुरुवात केली. परंतु नदीच्या मध्यावर पोहोचल्यावर त्याच्या लक्षात आले की नदी खुप खोल आहे. आणि तो जवळ जवळ बुडायलाच आला.कसाबसा तो त्यातून सावरला आणि बाहेर येउन त्या मुलावर जोरात खेकसला. मुलगा पुरता घाबरला होता आणि घाबरत घाबरतच बोलला, "पण माझी बदके तर खुप लहान आहेत आणि ते दररोज नदी पार करतात. त्यांचे पाय तर तुमच्या घोड्यापेक्षा खुप लहान आहेत."उगाच कोणाचाही सल्ला ऐकण्याआधी त्यांना खरोखरच काही माहीती आहे का ते जाणुन घ्या....प्रत्येकजण आपआपल्या अनुभवाने सल्ला देतात. तो सल्ला कितपत योग्य आणि बरोबर आहे ते जाणून घेणे महत्त्वाचे आहे.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in📱 9403046894•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment