✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दि. 03/10/2022 वार - सोमवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 🎇 . *दिनविशेष . 🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••💥 ठळक घडामोडी :-★१९९०-पूर्व जर्मनी व पश्चिम जर्मनी चे एकत्रीकरण झाले.★ १६७९- शिवाजी महाराजांनी दुसऱ्यांदा सुरत लुटले.💥 जन्म :-◆१९०३-स्वामी रामानंद तीर्थ ,हैदराबाद संस्थानातील स्वातंत्र्य चळवळीचे नेते,समाजसुधारक आणि शिक्षणतज्ज्ञ.◆१९११ - सरोबिंदू नाथ बॅनर्जी, भारतीय क्रिकेट खेळाडू. ◆१९४९-जे पी दत्ता,चित्रपट दिग्दर्शक.💥 मृत्यू :-●२०१२-केदारनाथ सहानी,सिक्कीम चे राज्यपाल,दिल्लीचे महापौर.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *पुण्याच्या चांदणी चौकातला पूल जमीनदोस्त पूल पडला, रस्त्यावरील ढिगारे हटले, तब्बल 9 तासांनंतर वाहतूक सुरु*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *इंदूर सलग सहाव्यांदा सर्वात स्वच्छ शहर, राज्यांमध्ये मध्य प्रदेशची बाजी , 'सर्वोत्तम नागरिक अभिप्राय’ यामध्ये पिंपरी चिंचवड शहर देशात प्रथम, स्वच्छ सर्वेक्षण 2022 मध्ये बारामती नगरपरिषद देशात नववी *••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांची प्रकृती बिघडली आहे. त्यामुळे त्यांना दिल्लीतील मेदांता हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *राष्ट्रपती, पंतप्रधानांसह दिग्गजांकडून राजघाटावर महात्मा गांधीजींना अभिवादन*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *हॅलो ऐवजी 'वंदे मातरम्' म्हणा अभियान सुरु ; सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवारांची अधिकृत घोषणा, जीआरही निघाला*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *कोल्हापूरच्या शाही दसरा सोहळ्यात पहिल्यांदाच शासनाचा सहभाग, शाहू महाराजांच्या परवानगीने दीपक केसरकरांची घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *गुवाहाटी : दुसऱ्या टी20 सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंनी शानदार बॅटींगच्या बळावर दक्षिण आफ्रिकेचा 16 धावांनी केला पराभव*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••*One & many वाचन👇**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/BGIbX3JzGFc~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मी गरीब नाही*https://nasayeotikar.blogspot.com/2018/05/31.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••📙 *दात आणि त्यांचे प्रकार* 📙दात आहेत म्हणूनच चणे खाता येतात. दातांशिवाय जीवन कठीण असते. मानवाने कवळी शोधून काढली आहे किंवा अन्नपदार्थात बदल करून शिजवून तो खाऊ शकतो. पण अन्य प्राणी मात्र दात अधू झाल्यास, पडल्यास जिवालाच मुकतात. कारण एकच उपासमार.दातांची ठेवण व शास्त्रीय माहिती अगदी पहिलीपासूनच दिली जाते. त्यातील काही मोजके उल्लेख म्हणजे दाताचा वरचा पांढरा भाग एनॅमल म्हणजे कवच हा शरीरातील सर्वात कठीण भाग असतो. यापेक्षा कठीण शरीरात अन्य काही नाही. त्याच्या आतील भाग म्हणजे हाडासारखाच डेटिंगचा भाग. हाही कठीणच असतो, पण त्यामध्येच रक्तवाहिन्यांचे जाळे व मज्जातंतू येऊन पोहोचतात. डेन्टिन जबडय़ाच्या हाडात खोलवर सिमेंटने पक्के बसलेले असते. दाताचा वर दिसणारा भाग हा जेमतेम असतो. हिरड्यांनी व हाडांनी झाकलेला भाग खाली खोलवर असतो.दातांचा कवचाचा भाग कितीही कठीण असला तरीही त्यावर खाण्यातील पदार्थातून तयार होणाऱ्या अाम्ल पदार्थांचा परिणाम होतोच. साखर, तोंडात अडकून राहिलेले पिष्टमय पदार्थ यांवर लाळेचा परिणाम होऊन हे कवच हळूहळू खराब होते व तेथे दात किडू लागतो. हीच कीड पुढे खोलवर जाऊन डेन्टिनपर्यंत व नंतर दाताच्या मुळापर्यंत पोहचते. दाताला ठणका लागणे, गार गरम गोड पदार्थ न खाता येणे हे याच वेळी सुरू होते. दातांतील कीड काढून त्या जागी चांदी भरणे हे दंतवैद्य करतात व त्यामुळे दात काढून टाकावे लागणे वाचू शकते. दात दुखू लागण्याचा यात हे सर्व करणे योग्य ठरते.माणसाला जन्मतः दात नसतात. पण सहाव्या महिन्यापासून दुधाचे म्हणजे पडणारे दात येऊ लागतात. सहाव्या वर्षांपर्यंत एकूण वीस दात आलेले असतात. प्रत्येक जबड्याचे दोन सारखे भाग केले तर दोन दाढा, एक सुळा व दोन पुढचे दात अशी पाचांची विभागणी होते. हे दात वयाच्या सात ते अकरा यादरम्यान पडून मग प्रत्येक बाजूला आठ दात अशी बत्तीशी पूर्ण होते. यामध्ये दोन दाढा, दोन उपदाढा, एक सुळा व दोन पुढचे दात अशी विभागणी होते. तिसरी दाढ अक्कल दाढ मात्र थोड्या सावकाशीने म्हणजे सोळा ते वीस वर्षादरम्यान उगवते. वेडेवाकडे दात नीट करणे, कृत्रिम दात बसविणे, खराब दात नीट करून पुन्हा बसवणे, दातात चांदी भरणे, कवळी बनवणे यांसारखी अनेक प्रकारची उपचारपद्धती सध्या दंतवैद्य वापरतात. दात व हिरड्या यांच्या रोगामुळे संपूर्ण पचनसंस्थाच बिघडून आरोग्य कायमचे बिघडू शकते. यासाठी आवश्यक तेव्हा दातांवर उपचार करणे रास्त ठरते. दात दुखत असल्यास उपचार सगळेच करतात पण फक्त हे पुरेसे नसते. किडलेल्या दातांवरील उपचार पद्धतीत आता अनेक पद्धती वापरल्या जातात. दातांच्या मुळापर्यंत गेलेली कीड काढून ती पोकळी चांदीने भरली जाते. मोडक्या दातांवर टोपी (कॅप) बसवुन तो नव्यासारखा बनवला जातो. एक वा अनेक दातांच्या जागी हाडामध्ये स्क्रूचा आधार बसवुन त्यावर कृत्रिम दात बसवला जातो. याला 'इम्प्लांट पद्धती' असे म्हणतात. या पद्धतीत कवळीऐवजी कृत्रिम दातांची पक्की व्यवस्थित व्यवस्था केली जाते. दंतोपचारात आता विविध शाखांचा विस्तार झाला आहे.मानवी दातांची ठेवण, जबड्यातून कृत्रिम दात यांचा शोध घेऊन अनेक गूढ गुपितेही उलगडली आहेत. मृतांची ओळख पटवणे, गुन्हेगार ओळखणे यांसाठी याचा उपयोग झाला आहे.दातांचा वापर जितका करावा, तितकी त्यांची ताकद टिकते, ही एक विशेष गोष्ट आहे. दातांवरील कवच, दातांचा रक्तपुरवठा, हिरड्या यांना दातांच्या वापरातूनच पक्केपणा मिळत असतो. यामुळेच केवळ शिजवलेले अन्न व फळांचे रस घेण्यामुळे दात कमकुवत होऊ शकतात. कच्ची फळे, भाज्या, कोशिंबिरी व भरपूर चावावे लागणारे, चोथा असलेले पदार्थ खाल्ल्यास दात पक्के राहण्यास मदत होते. अर्थात दातांनी अतिकडक पदार्थ खाण्याचा अट्टाहास करून फायदा होतो, असा मात्र याचा अर्थ नाही.शुभ्र, दाणेदार, सलग दंतपंक्ती असल्या तर ती व्यक्ती चारचौघांत नक्कीच उठून दिसते. केवळ चेहऱ्याचे सौंदर्य यासाठी असावे लागते, असे नव्हे. मुळचे दात कसे आहेत, ही बाब अलहिदा, पण दातांची निगा राखून आरोग्य मिळवणे हे तर सर्वांच्याच हाती आहे. *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*“ वाईट मार्गाने मिळवलेले वाईट मार्गानेच खर्च होते. ”**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) वाघ, सिंह, चित्ता व बिबट असणारा जगातील एकमेव देश कोणता ?२) काँग्रेसमधून बाहेर पडलेले ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी कोणत्या नव्या पक्षाची स्थापना केली ? ३) सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता ?४) काटेरी वनस्पतींची नावे सांगा.५) बॉलिहूडमधील कोणत्या अभिनेत्याला 'किंग खान' असे संबोधले जाते ?*उत्तरे :-* १) भारत २) डेमोक्रॅटिक आझाद पक्ष ( DAP ) ३) गुरू ४) करवंद, बोर, गुलाब, लिंबू इत्यादी ५) शाहरुख खान *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••● रुपेश बालाजी सुंकेवार● पूर्वा श्यामसुंदर माडेवार● रणजित चंदावले● नागेश क्यातमवार● विश्वनाथ आरगुलवार● संदीप कडलग● साईनाथ राचेवाड● मारोती नरवाडे● पांडुरंग यलमलवाड ● शिवाजी मुटकुले ● दत्तप्रसाद ढगे ● शंकर ढगे ● नागनाथ लाड*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*नातेसंबंध टिकविण्यासाठी एकमेकांना समजून घेण्याची व प्रेमाची आवश्यकता असते. संत कबीर म्हणतात-"प्रेमाची अडीच अक्षरे ज्याला कळाली तो पंडित झाला." थोडे तारतम्य बाळगले, जीवनात शिस्त व करूणा आणली, तर सर्व आवडीच्या व्यक्तींशी आनंदाने नाते फुलवता येते. हे तारतम्य सुटले, अहंभाव जागवला, एकमेकांकडे दुर्लक्ष करून स्वार्थाचाच विचार केला, तर भरल्या घरात रितेपणा येऊन अशांती येते.**सफल प्रेम हे फळासारखे असते, ते हळूहळू पक्व होत जाते. त्यासाठी वेळ द्यावा लागतो. आई-वडील, पत्नी-मुले, भाऊ-बहीण, मित्र ही नाती जपणे व फुलवणे ही एक साधनाच असते. त्यासाठी त्यागाची गरज असते, अहंकाराला तीलांजली देऊन, स्पर्धा न करता, एकमेकांना न डिवचता, स्वातंत्र्य देत, मैत्रीचे दार उघडे ठेवले तर कुठलेही नाते अभंग राहील. म्हणून वडिलधा-यांच्या आठवणीतून घराण्याचे महाभारत ऐकावे, पत्नी नावाच्या श्रमदेवतेचे 'नवरात्रौत्सव' घरात साजरे करावे, समाजात पसायदानाच्या ओव्या कानी पडण्याकरिता प्रयत्नशील राहावे.* ••● ‼ *रामकृष्णहरी* ‼●•• *श्री. संजय नलावडे,मुंबई* *मोबाइल - 9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••कोणत्या चित्रात कोणते आणि कसे रंग द्यायचे हे आपण आपल्या कल्पकतेने ठरवून ते चित्र पूर्ण करतो.पण जीवनाचे सुंदर चित्र बनवण्यासाठी कुठे,कसे रंग भरावे हे लवकर लक्षात येत नाही. जीवनाच्या चित्रात रंग भरण्यासाठी कल्पकतेबरोबर, कठोर परिश्रमाचीही आवश्यकता लागते, परिस्थितीनुसार कोणत्या वेळी कोणता रंग भरावा याचेही ज्ञान असावे लागते.कधीकधी घाई केली तर आपण ठरवलेल्या रंगांमध्ये एखाद्या रंगाचे प्रमाण कमीजास्त झाले तर त्या रंगाचा बेरंगही होऊन जातो.सांगण्याचा तात्पर्य हा की, परिस्थितीनुसार रंग बदलण्याचीही आपली तयारी ठेवायला हवी आणि समयसुचकतेनुसार विचार करुन जीवनाचे सुंदर चित्र काढायलाही आणि रंगवायलाही आले पाहिजे.नाहीतर जीवनच रंगहीन बनून जाईल. खरंच मूळातच जीवन सुंदर आहे आणि त्या सुंदर जीवनाला अधिक सुंदर बनवण्यासाठी वेगवेगळ्या रंगरुपी छटांचेही ज्ञान आणि कल्पकता ज्यांना अवगत आहे आणि ज्यांना साध्य करता येते त्यांना आपल्या जीवनाचे चित्र छान आणि सुंदर बनवता येते. हे मात्र खरे आहे.© व्यंकटेश काटकर,नांदेड.संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३.🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *अनमोल जीवन**एकदा एका राजाने खुश होऊन लोहाराला चंदनाची बाग भेट दिली. लोहाराला चंदनाच्या झाडांच्या किंमतीचे नॉलेज नव्हते त्यामुळे त्याने त्या झाडांना कापून त्यांचा कोळसा करून विकला. हळू हळू सम्पूर्ण बाग रिकामी झाली.**एक दिवस असेच राजा त्याच्या घरा जवळून जात होता, राजाला वाटले लोहार आता खुप श्रीमंत झाला असेल. परंतु प्रत्यक्ष पाहिल्यावर लोहाराची परिस्थिति पहिल्या सारखीच आहे असे दिसले राजाला आश्चर्य वाटले.**सत्य समजल्यानंतर राजाने त्याला विचारले तुझ्याकडे एखादे लाकुड़ शिल्लक आहे का ? तेव्हा लोहारने कुऱ्हाडीचा दांडा दाखविला.**राजाने त्याला चंदनाच्या व्यापाऱ्या कडे पाठवले. तेंव्हां त्या छोटयाश्या तुकडयाचे त्याला खुप पैसे मिळाले. लोहार खुप रड़ू लागला, त्याने राजाला अजुन एक बाग देण्याची विनंती केली तेव्हा राजा म्हटला "अशी भेट वारंवार भेटत नाही."* *मित्रांनो आपले आयुष्य त्या लोहारा सारखेच आहे मानवी जीवनाच्या मुल्यांचे महत्व, आपल्याला जीवनाचे शेवटचे श्वास चालू असताना समजते.पण...**त्यावेळेस आपण म्हणतो देवा मला अजुन थोड़ा वेळ दे, परंतु त्यावेळी वेळ मिळणे अशक्य असते.**मानवी जीवन अनमोल आहे.* *असे जीवन परत मिळणार नाही.**बोध :-* *या जगात दुर्लभ गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे, मनुष्य देह त्या देहाचा कोळसा करायचा की, चंदन हे आपले आपण ठरवायचे.* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment