✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दि. 07/10/2022 वार - शुक्रवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 🎇 . *दिनविशेष . 🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••💥 ठळक घडामोडी :-★१९१९-महात्मा गांधींनी 'नवजीवन'हे वृत्तपत्र सुरू केले.★१९१२-हेलसिंकी स्टॉक एक्सचेंज सुरू झाले.★ ख्रिस्त पूर्व ३७६१-हिब्रू दिनदर्शिकेनुसार जगाचा पहिला दिवस.💥 जन्म :-◆१९०७ - प्रागजी डोसा, गुजराती नाटककार, लेखक. ◆१९७८ - झहीर खान, भारतीय क्रिकेट खेळाडू. ◆१९५२-ब्लादिमिर पुतीन ,रशियाचे राष्ट्राध्यक्ष.💥 मृत्यू :-●१७०८ - गुरू गोबिंद सिंघ, शीख गुरू. ●१९९८-भाऊसाहेब वर्तक,महाराष्ट्राचे माजी महसूल मंत्री.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *वेल डन इंडिया! कोरोना काळात गरीब देशांना मदतीचा हात, कोरोना महामारीमधील कामामुळे जागतिक स्तरावर भारताचं कौतुक*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *सणासुदीच्या काळात गव्हाच्या किंमतीत वाढ तर तांदळाच्या किंमती घसरल्या*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *शेवटच्या महिन्यात निधी खर्च करण्याची पद्धत बंद करा, उपमुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला खडसावले*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मुंबई - राज्यातील ऑक्टोबर ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित सुमारे 7 हजार 649 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या 13 ऑक्टोबर 2022 रोजी होणार प्रसिद्ध*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *रत्नागिरी जिल्ह्यात सध्या पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे याचा परिणाम आता भात शेतीवरती होत आहे. अंतिम टप्प्यात आलेली भात शेती वाया जाण्याची भीती असून काही ठिकाणी पावसाचा तडाख्यामुळे भात शेती जमिनीवर कोसळली आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) माजी संचालिका जयश्री पाटील-चुयेकर (वय 78) यांचे निधन झाले. गोकुळचे संस्थापक अध्यक्ष आनंदराव पाटील यांच्या त्या पत्नी होत.*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *लखनऊ येथे खेळल्या गेलेल्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताचा नऊ धावानी पराभव*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••*आकाश कंदील बनवणे👇**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/AkP6No6xxAQ~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*शिक्षण म्हणजे विचार करण्याची कला*प्रसिद्ध विचारवंत टी. एडवर्ड यांच्या मतानुसार, शिक्षण म्हणजे जन्मापासून मरेपर्यंत सर्व वातावरणाचा परिणाम, सर्व प्रकारचे शिक्षण, शिस्त आणि संस्कृतीची बेरीज. म्हणूनच आपण आजीवन विद्यार्थी म्हणून जगत असतो. ........... पूर्ण लेख खालील लिंकवर वाचता येईल.https://nasayeotikar.blogspot.com/2018/05/32.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *संघर्ष*गरुडाचे जीवनमान 70 वर्षांचे असते, परंतु तो जेव्हा 40 वर्षाचा होतो तेव्हा त्याला एक महत्वाचा निर्णय घ्यावा लागतो.त्या अवस्थेत त्याच्या शरीराचे 3 महत्वाचे अवयव निष्प्रभ होऊ लागलेले असतात, पंजे लांब आणि लवचिक होतात ज्यामुळे शिकार पकडतायेत नाही , चोच पुढील बाजूला वळते ज्यामुळे भोजन करता येत नाही, पंख जड होतात व छातीस चिकटल्यामूळे पूर्णपणे उघडत नाहीत, गरुड भरारी सीमित करतात. अन्न शोधणे, सावज पकडणे,अन्न खाणे या तिन्ही क्रिया त्याच्यासाठी अवघड बनून जातात. अशावेळी त्याच्याकडे तीन पर्याय असतात एक तर प्राण त्याग करणे आणि दुसरा आपली प्रवृत्ती सोडून गिधाडा प्रमाणे मृत अन्नावर गुजराण करणे आणि तिसरा पर्याय असतो आकाशाचा अनभिषिक्त सम्राट म्हणून स्वतः ला पुनर्स्थापित करणे !जिथे पहिले दोन पर्याय सोपे व सुलभ आहेत तिथे तिसरा अत्यंत कठीण आणि दुर्धर, गरुड तिसरा पर्याय निवडतो, एखाद्या उंच पहाडावर जातो एकांतात आपले घर बनवतो आणि स्वतः च्या पुनर्स्थापनेस प्रारंभ करतो सर्वप्रथम तो आपली चोच दगडावर मारून मारून तोडून टाकतो.एका पक्षासाठी चोच तोडण्याहून अधिक त्रासदायक दुसरे काय असेल? आणि प्रतीक्षा करतो चोच पुन्हा उगवून येण्याची, तसेच तो आपले पंजे तोडून टाकतो आणि प्रतीक्षा करतो पंजे पुन्हा उगवण्याची. नवीन चोच आणि पंजे आल्यानंतर तो आपल्या जड झालेल्या पंखांना एक एक करन उपसून टाकतो आणि वाट पाहतो नवे पंख फुटण्याची !150 दिवसाचा त्रास आणि प्रतिक्षे नंतर त्याला मिळते त्याची गरुड भरारी, या पुनरस्थापणे नंतर तो 30 वर्षे जगतो, ताकद आणि अभिमानाने !याच प्रकारे मानवाच्या आत्मविश्वास, सक्रियता आणि कल्पनाशक्ती या तिन्ही शक्ती दुर्बल होऊ लागतात. आपणही भूतकाळात अडकलेल्या बंधक अस्तित्वाचा त्याग करून कल्पनेची मुक्त उड्डाणे घेतली पाहिजेत !150 दिवस नाही, 60 दिवस द्या स्वतः ला पुनर्स्थापित करण्यासाठी ! जे शरीराला मनाला चिकटलेले आहे ते तोडताना आणि उचकटून काढताना यातना तर होणारच ! पण त्यानंतर जी उड्डाणे असतील ती उंच, अनुभवी आणि अनंताकडे झेपावणारी असतील !दररोज काही चिंतन करत रहा, तुम्ही असेएकमेव व्यक्ती आहेत जे स्वतः ला परिपूर्ण ओळखता, आणि तुम्हीच स्वतः मध्ये बदल घडवू शकता, गरज आहे ती लहान लहान गोष्टीतून बदलाची सुरुवात करण्याची.*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*“ इतिहास म्हणजे उदाहरणांवरून शिकलेले तत्वज्ञान होय. ”**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) २०२२ या वर्षाचा वैद्यकशास्त्राचा नोबेल पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे ? २) अयोध्येत राम जन्मभूमीकडे जाणाऱ्या मुख्य मार्गाजवळील 'नया घाट चौक' आता कोणत्या नावाने ओळखला जाणार आहे ?३) 'हायकू' काव्यप्रकार मराठीत कोणी आणला ? ४) तृणधान्यांची नावे सांगा.५) प्रवास आणि पर्यटन विकास निर्देशांक २०२१ नुसार भारताचा कितवा क्रमांक आहे ?*उत्तरे :-* १) स्वांते पाबो, शास्त्रज्ञ, स्वीडन २) लता मंगेशकर चौक ३) शिरीष पै ४) गहू, बाजरी, तांदूळ, ज्वारी इत्यादी ५) ५४ वा *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••● जादू पतंगे, वसमत● सुदर्शन कदम● दत्तात्रय देवकते● अभिषेक निगम● रवींद्र शेळके● सायरेड्डी चाकरोड● डॉ. रवी माळी● योगेश गाडे● दिपालीताई सतीश सावंत*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*माणूस जोवर जिवंत असतो, तेंव्हा त्याच्या अपेक्षा असतात. इच्छा असतात. त्या कुणाच्या गावाला पोहचत नाहीत. त्याच्या आकान्तहाका कुणाला ऐकू येत नाहीत. नंतर मात्र त्याच्या कौतुकाचे पाढे सुरू होतात, पोवाडे गायले जातात. जिवंतपणी त्याच्या हाकांचा कानोसा घेतला असता, तर नक्कीच त्याच्या जगण्याचे काही दिवस वाढले असते. भुकेल्याची अपेक्षा फार नसते, त्यास भाकर हवी असते, तहानलेल्याला पाणी, कष्टक-याला त्याच्या घामाचा मोबदला, कलाकाराला त्याच्या कलेची दाद, एवढीच तर अपेक्षा असते... फक्त एक सेकंद जगण्याची... पण त्याच्या हयातीत आपल्याला पकडता येत नाही त्याचा जिवंत सेकंद..**सोनं तोळ्यात मापतात. मात्र, त्याहीपेक्षा माणसाचा माणसासाठीचा कौतुकाचा, जिव्हाळ्याचा शब्द महागला आहे. माणसाचं अपयश हे की तो पैसे मिळविण्याचं तंत्र तर शिकलाच; तंत्रज्ञानालाही त्याने असे आत्मसात केले की तंत्र मानव म्हणून कुशल झाला. पृथ्वीवर तर त्याने सत्ता काबीज केलीच, पण आज तो इतर ग्रहावरही चढाई करतोय. मात्र जिवंत राहण्याचं तंत्र तो शिकू शकला नाही. जगण्या-मरण्यातल्या एका श्वासांचं अंतर जेव्हा माणसास कळेल तेव्हा त्याच्या आत माणुसकीचा दीप तेवून उठेल.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••म्हणतात ना स्वत:ची पाठ स्वत:ला कधीच दिसत नाही त्याचप्रमाणे आपल्यातील काही असलेले दोष आपल्याला लवकर कळत नाही.दुसरे जेव्हा आपल्यातील दोष काढायला लागतात तेव्हा आपल्याना त्यांचा खूप राग येतो आणि अशावेळी वाटायला लागते की,तो कोण आहे आपल्यातले दोष काढणारा ? आपल्यातला हा अहंपणा किंवा माझे तेच खरे आहे असा असणारा स्वभाव किंवा आपली मानसिकता यामुळे लोकांचे म्हणणे ऐकून घ्यायला तयार होत नाही त्यामुळे आपल्यातल्या दोषांवर आपणच पांघरुण घालतो आणि आपल्यातल्या लागणा-या दोषाला अधिक बळकटी देतो त्यामुळे आपल्या जीवनाचे खूप नुकसान होते,आपली चार माणसांमध्ये किंमत तर राहत नाही उलट आपल्यामध्ये थोडीबहुत जी काही माणुसकी आहे तीही संपून जाते.अशावेळी आपण आपल्यातील दोष दुसऱ्यांनी काढले म्हणून त्यांच्यावर रागावू नका किंवा त्यांच्याशी अबोलाही धरु नका.कारण तेच लोक आपल्यातील दोष जेव्हा दाखवतात यांचा अर्थ आपण समजून असा घ्यायचा की,आपल्याला सुधारणा करण्यासाठी संधी देत आहेत आणि त्याच संधीचा फायदा घेऊन आपल्या जीवनात असलेले दोष दूर करुन जीवन अधिक चांगल्या प्रकारे बनवून समृध्द करायला शिकले पाहिजे.उद्या आपणच त्यांच्यासमोर आदर्श म्हणून उभे राहू आणि आपल्या आदर्श विचारांचा स्वीकार करतील.अशावेळी आपले तेच म्हणण्यापेक्षा इतरांच्या ही विचारांचा विचार करायला हवा की,ज्यामुळे सगळ्यांचेच कल्याण होईल.© व्यंकटेश काटकर,नांदेडसंवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३.📚🍃📚🍃📚🍃📚🍃📚 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *यशाचा घडा* वसिष्ठांची पत्नी अरूंधती ज्ञानी, विद्वान, पतिव्रता होती.एकदा सूर्य अग्नी व वरूणासह वसिष्ठांच्या आश्रमात आले. तेंव्हा अरूंधती पाण्याचा घडा घेऊन नदीवर जायला निघाली होती. तिने तिघांना बसायला आसन दिलं आणि म्हणाली, 'थांबा थोडं, आता नदीवरून एवढा घडा भरून आणते.' त्यावर सूर्यदेव म्हणाले, 'आई नदीवर कशाला? मीच मंत्रसामर्थ्याने देतो घडा भरून' एवढे म्हणून त्यांनी मंत्रसामर्थ्याने घडा भरला, पण तो घडा १/२ रिकामाच राहिला. शेवटी तो पूर्ण भरण्याचे काम अरूंधतीने केले. नंतर ती म्हणाली कोणत्याही यशाचा ३/४ वाटा देवदत्त असला तरी १/४ भाग भरण्यासाठी मानवी प्रयत्नच लागतात. निढळाच्या घामाने उरलेला १/४ घडा भरणे भाग आहे.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment