✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दि. 11/10/2022 वार - मंगळवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 🎇 . *दिनविशेष . 🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••💥 ठळक घडामोडी :-*आंतरराष्ट्रीय मुलगी दिन*💥 जन्म :-◆ १९४२ - अमिताभ बच्चन, भारतीय अभिनेता.💥 मृत्यू :-◆ १९६८ - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *सर्व केंद्रीय विद्यापीठांमध्ये, उच्च संस्थांमध्ये हिंदीचा वापर बंधनकारक करा, इंग्रजी भाषा पर्यायी ठेवा; अमित शाह समितीची शिफारस*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *स्टॉकहोम: यंदाच्या अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्काराची घोषणा, बेन बर्नानके, डगलस डायमंड आणि फिलिप डायविग या अमेरिकेच्या तीन शास्त्रज्ञांना हा पुरस्कार जाहीर.*••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *नांदेड जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे पिकाचं नुकसान, शेतकरी हवालदिल*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे आपल्याच विभागाकडे दुर्लक्ष; एक लाख विद्यार्थी 9 महिन्यांपासून विद्यावेतनापासून वंचित*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *केंद्रीय निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) असं नाव वापरण्यास परवानगी दिलेली आहे. तर शिंदे गटाला 'बाळासाहेबांची शिवसेना' असं नाव मिळालेलं आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *नवी दिल्ली: समाजवादी पक्षाचे संस्थापक आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांचे निधन, ते ८२ वर्षांचे होते. *•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *आयसीसी प्लेअर ऑफ दि मंथ पुरस्कार जिंकणारी पहिली महिला खेळाडू ठरली हरमनप्रीत कौर*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••*friut basket👇**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/y-VbWtmOi5E~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *अति क्रोध करू नये*https://nasayeotikar.blogspot.comमुलांनो, आज आपण ज्याविषयी चर्चा करणार आहोत ते म्हणजे क्रोध. क्रोध म्हणजे राग किंवा संताप. एखादी मागितलेली वस्तू तुम्हाला जर पटकन मिळाली नाही तर लगेच तुम्हाला राग येतो. हवी असलेली वस्तू मिळविण्यासाठी कधीकधी रुसून बसता, तर कधी मौनव्रत धारण करून आई बाबांना भंडावून सोडता. काही मुले तर याहीपुढे जाऊन घरातील वस्तूची आदळआपट करून आपला राग व्यक्त करतात. क्रोध ही दुर्बलतेची निशाणी आहे असे दयानंद सरस्वती म्हणतात. त्यामुळे आपण क्रोधावर नियंत्रण मिळविणे गरजेचे आहे. आपणाला लहानसहान गोष्टीवरून सुद्धा राग निर्माण होतो. जसे की टीव्हीवर कार्टूनचा वा इतर तुमच्या आवडीचा चांगला कार्यक्रम चालू असेल आणि आई-बाबा किंवा ताई दादांनी टिव्ही बंद केला की लगेच तुम्हाला राग येतो. खेळ रंगात येत असताना तुमचा खेळ बंद करून अभ्यासाचा तगादा लावला की राग येतो. कारण हे सर्व तुमच्या मनाविरुद्ध होते, म्हणूनच तुम्हाला राग येतो. त्याच प्रकारे आई-बाबांनी सांगितलेली बाब जर तुम्ही पूर्ण केली नाही तर त्यांनासुद्धा राग येतो की नाही ! गुरुजींनी सांगितलेला अभ्यास वा स्वाध्याय पूर्ण केला नाही तर त्यांनासुद्धा राग येतोच ना ! तुमच्यासारखेच आई बाबा व गुरुजी यांच्या मनाविरुद्ध काही घडल्यास त्यांनाही राग येतच असतो. त्यासाठी त्यांनी आपल्यावर रागावू नये आणि आपण त्यांच्याविरुद्ध राग निर्माण करून घेऊ नये असे जर वागलो तर जरूर याचा एकदा विचार केल्यास एकमेकांबद्दल राग ऐवजी प्रेम, लोभ, माया, ममता निर्माण होईल. त्याच्याऐवजी आपण आपली मनाची वेदना, मनातील दुःख स्पष्टपणे त्यांना सांगावे. असे जर केले नाही तर मनात अजून अधिक राग निर्माण होतो असे गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी म्हटले आहे. कधीकधी आपला क्रोध एवढ्या टोकाला जातो की त्यापासून काही नुकसान सुद्धा होते जॉन वेबस्टर म्हणतात की निसर्गामध्ये क्रोध हीच एकमेव गोष्ट अशी आहे की जी माणसाला पशु बनविते, विकृत करते. त्यामुळे आपल्या मनात राग निर्माण करायचा नाही, असा ठाम निर्णय करावा. समर्थ रामदास स्वामी यांचे श्लोक नेहमी स्मरणात ठेवावेत. ते श्लोक म्हणजे ' अति क्रोध करू नये । जिवलगास खेदू नये । मनी वीट मानू नये। सिकवणेचा ।।रागाने कधीही कुणाचे भले झाले नाही✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया whatsapp द्वारे वरील क्रमांकावर कळवावे•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*निंदकाचे घर असावे शेजारी - संत तुकाराम*असे तुकोबारायांनी म्हटले आहे. संत तुकारामांचे हे म्हणणे अगदी खरे आहे, प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते, असे म्हणतात. मग ही स्त्री आई, पत्नी, बहीण, मैत्रीण, सहचरीण किंवा सेक्रेटरीच्या रूपातसुद्धा असू शकेल. त्या जर "सकारात्मक टीकाकार' असतील तर त्या पुरुषाची चांगली प्रगती होते."लोकांच्या डोळ्यातील कुसळ दिसते, पण आपल्या डोळ्यातील मुसळ दिसत नाही' अशी मराठीमध्ये म्हण आहे. याचा अर्थ आपल्याला आपल्यातील मोठे मोठे दोषसुद्धा दिसत नाहीत, पण इतरांच्यातील बारीक बारीक दोषसुद्धा दिसत असतात. कुसळ म्हणजे बारीक काटा, तो डोळ्यात गेला तर धोकादायकच असतो. तो वेळेवर काढला नाही तर डोळ्याला इजा होऊ शकते किंवा डोळा जाऊ पण शकतो. पण, आपल्या टीकाकारांनी आपल्या डोळ्यातील हे कुसळ शोधून काढले, याबद्दल खरे तर त्यांचे आभारच मानायला हवेत. आपल्यावर होणाऱ्या टीकेकडे व विरोधाकडे अशा प्रकारच्या "सकारात्मक' नजरेने पाहिले तर आपली खूप प्रगती होणे शक्‍य आहे.आपल्याला प्रगती करायची असेल तर आपल्या आजूबाजूला टीकाकार किंवा विरोधक असणे आवश्‍यक आहे. त्यांच्या टीकेकडे किंवा विरोधाकडे सकारात्मक नजरेने पाहिले तर आपल्यालाच आपल्यातील अनेक दोष किंवा उणिवा सापडतील व त्यावर योग्य ती उपाययोजना वेळीच करता येईल.म्हणूनच *"निंदकाचे घर असावे शेजारी'!* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*" महान कारागीर हा काम सोपे करणारा असतो. "**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) सलग सहाव्यांदा देशातील सर्वात स्वच्छ शहर होण्याचा मान कोणत्या शहराने पटकावला ?२) भारतात सद्यःस्थितीला वाघांची संख्या किती आहे ?३) भारताचा सर्वोच्च कायदा अधिकारी म्हणून कोणाला मानले जाते ?४) इंग्रजांनी दक्षिण भारतातील आपली पहिली बखार/वखार इ. स. १६११ मध्ये कोठे स्थापन केली होती ?५) 'आंतरराष्ट्रीय संगीत दिवस' केव्हा साजरे केले जाते ?*उत्तरे :-* १) इंदौर शहर, मध्यप्रदेश २) २९६७ वाघ ( महाराष्ट्र - ४०० वाघ ) ३) एटर्नी जनरल / महान्यायवादी ४) मच्छलीपट्टणम ५) १ ऑक्टोबर *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••● बाबाराव पाटील कदम● चंद्रकांत पाटील पांगरीकर ● रवीकुमार सितावार● प्रवीण वाघमारे● विजय केंद्रे● सुमीत बोधने● दिनेश करपे● अजय वाघमारे● संदीप बोंबले*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*माणूस निसर्गाच्या हातातील बाहुलं असला तरी माणसाचं शरीर ही निसर्गाची अद्भुत रचना आहे. विज्ञान युगातही अशी अद्भुत रचना तयार करता आलेली नाही. शरीर एक विशाल प्रयोगशाळेसमान असले तरी. निरोगी शरीर हेच पहिलं सुख. त्यातच निरोगी विचार वास्तव्य करतात. ते जीवनभर प्रभाव टाकतात. अशक्य ते शक्य करण्याचा चमत्कार घडवू शकतात. सकारात्मक विचारांच्या उर्जेची ताकद तुमच्या विचारात आणि विश्वासात इतका बदल घडवते की, त्यामुळे जीवनाला वेगळी दिशा मिळते. जीवनात खरे सुख, शांती आणि स्वास्थ्याची गती लाभते. मानसिक अवस्था व आत्मिक स्थिती पवित्र होते, त्यामुळे जीवनही आपोआप उन्नत होत जाते.**शरीर दोन गोष्टींमुळे कमजोर होते. एक आधिक आराम आणि दुसरी पराकोटीची चिंता. 'जान है तो जहाँ है' असे उगीचच म्हणत नाहीत. जीवनात पद, प्रतिष्ठा महत्वाची आहेच; परंतु त्यापेक्षा महत्वाचं शरीर. आपलं महत्व तोपर्यंतच, जोवर शरीर तंदुरुस्त आहे. भगवान गौतम बुद्धांनी म्हटलयं, 'आपलं शरीर आरोग्यपूर्ण ठेवणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. त्याचं पालन केलं नाहीतर बुद्धि सतेज कशी राहील आणि मोक्षाच्या अंतिम ध्येयाप्रत आपण कसे पोहचणार? सर्व अवयवांवर माणसाचे नियंत्रण असते. तेव्हा स्वास्थ्यही त्याच्या हातात असते. त्यासाठी सकारात्मक ऊर्जा हवी. ती ठेवून कार्यरत राहिलं तरच शरीर आणि मनस्वास्थ्य राखता येईल.* ••● *॥ रामकृष्णहरी॥*●•• 🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰 *संजय नलावडे,मुंबई* *मोबाइल - 9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••तुमच्या चेहऱ्यावर दिसणारी एक स्मित हास्याची छटा दुःखी आणि उदास असणा-या माणसाला खूप काही विसरून जाण्यासाठी प्रेरणा देऊन जाते. तुमच्या एका आनंदी जीवनाचे रहस्य त्याला उलगडायला लावते.तुमच्या आनंदी जीवनाचे रहस्य नक्कीच विचार करायला लावते. तुमच्याकडे पाहून तो स्वत:शीच म्हणायला लागतो की, हा माणूस अनेक कामांत व्यस्त असूनही कसलाही आणि कुठलाही ताण न घेता आनंदी राहतो आणि नेहमी पहावे तेव्हा यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य कसे दिसते ? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी तो स्वत: नक्कीच विचार करायला लागतो.ताणतणाव हे कोणत्या ना कोणत्या कारणाने प्रत्येकाला असतातच, पण उदास आणि तोंड खाली पडून राहिल्याने कमी होणार आहेत का ? नाही ना ? उलट जास्त मानसिक तणाव निर्माण होऊन आपल्या जीवनाला अधिक दुःखात टाकल्यासारखेच आहे.मग त्यापेक्षा काम करत करत हसत रहायचे आणि हसत हसत काम करत रहायचे. अशा जीवन शैलीने जगत राहिलो तर आपल्याही चेहऱ्यावर स्मित हास्य फुलल्यावाचून राहणार नाही.तुमच्या चेहऱ्यावरच्या एका स्मित हास्याने तुम्ही ही आनंदीत रहालच आणि इतरांनाही आनंदीत राहण्यासाठी प्रेरणा द्याल हे नक्कीच.© व्यंकटेश काटकर,नांदेडसंवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३😟😕🙁😕🙁😟😂🤣😂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *अनमोल क्षण*प्रसिध्द लेखक कै. वि. स. खांडेकरांकडे अलोट गर्दी जमली होती. लोक हार घेऊन अभिनंदनासाठी तिष्ठत उभे होते. कॅमेरे सरसावुन फोटोग्राफर धावपळ करत होते. खांडेकरांना साहित्य ऍकेडमीचे पारितोषिक मिळाले तेव्हांचा प्रसंग.एका पत्रकाराने विचारले, 'आपल्या जीवनातील सर्वोच्च आनंदाचा क्षण कोणता ?' खांडेकरांनी दोन क्षण डोळे मिटले. प्रसंग त्यांच्या डोळयासमोर दिसु लागला. ते म्हणाले, 'आज सकाळीच एका अपरिचिताने येऊन माझ्या गळयात हार घातला. माझ्या पायावर डोकं ठेवलं मी विचारलं, 'कोण आपण? मी ओळखलं नाही'.'साहेब, आज मी आहे तो आपल्यामुळेच. फार फार वार्षापुर्वी मी एका तळयाच्या शेजारून फिरत असता अचानक तोल जाऊन मी पाण्यात पडलो. मला पोहता येत नव्हतं, मी गटांगळया खाऊ लागलो. माझी ती अवस्था आपण पाहिलीत आणि ताबडतोब पाण्यात उडी घेतलीत. घाबरलेला मी गळयाला मिठी मारली. आपण जोरात हिसका देऊन मिठी सोडवलीत व ओढतच मला पाण्याबाहेर काढलंत. कुठलीही ओळख न देता उपकाराची भावना प्रगट न करता आपण निघून गेलात. मागून मला कळले मला वाचवणारे सुप्रसिध्द लेखक खांडेकर होते. तेव्हांपासुन आपल्याकडे यायचे होते तो योग आज आला'.खांडेकर म्हणाले, 'कोणालातरी जगायला आपण मदत करू शकतो ही गोष्ट माझ्या दृष्टीने फार मोठी आहे. तोच क्षण माझ्या जीवनातला अनमोल क्षण होय'.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment