जीवन विचार

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

   🌺जीवन विचार 🌺
〰〰〰〰〰〰〰〰
आपल्या जीवनात सुखासमाधानाचे रुतु जसे येतात तशी दुःखाची - वेदनेची पानगळही येत असते. आपण आपल्या सुखासाठी जसं धडपडत असतो तसं दुःखही चोर पावलांनी आपल्या मनात शिरत असतं.

         एकदा का आपण वेदनेच्या आहारी गेलो की जीवन उदास वाटतं.या जन्मात या जगात काहीच अर्थ नाही असं वाटतं. मग ती वेदना कोणतीही असो आपणास सतत पोखरत
राहते. एखादा किडा जसा लाकडाला पोखरत राहतो अगदी तसं !!

वेदनामुक्त जीवनात आनंदाची पहाट फुलत असते.चोखंदळ माणसांनी मुक्त जीवनाकडून
जीवन मुक्तीकडं जाण्याचा मार्ग चोखाळला पाहिजे.
वेदनेला मुळासकट उपटून टाकायचे असेल तर मनाच्या दुःखाचे दरवाजे बंद ठेवले पाहिजे.
वेदना ही शुगरकोटेड टँबलेट सारखी असते.वरुन गोड आणि आतून कडू. वेदना म्हणजे कडू औषधाचा घोटच. त्या औषधानं आपल्या मनाचा वैद्यच आपणाला रोगमुक्त-- वेदनामुक्त करत असतो.
==================
🙏🏼शब्दांकन/संकलन🙏🏼

No comments:

Post a Comment