जीवन विचार


माणसांच्या विकासात इतरांचा वाटा असतो,हे खरेच आहे आणि या वाटयाबद्दल प्रत्येकाने कृतज्ञ असायलाच हवे. परंतू मनामध्ये ही कृतज्ञता बाळगत असतांनाच माणसाने आपल्या विकासासाठी आपला प्रयत्न,आपला विवेक ,आपले ध्येय आपले जीवनविषयक दृष्टिकोन इ.घटकावरच अवलंबुन राहायला हवे.
               आईवडील जन्म देतात आणि इतर अनेक व्यक्ती आपली जडनघडन करतात ,हे खरे असले तरी आपल्या जीवनाचे ध्येय मात्र ज्याचे त्यालाच शोधावे लागते.तो प्रवास ज्याचा त्यालाच करावा लागतो.विशेषतः जीवनाची काही अंगे तर इतकी सूक्ष्म असतात ,की तिथे बाहेरच्या मदतीपेक्षा माणसाच्या मनाची भरारीच महत्वाची असते.क्लिला बाहेरून जबरदस्ती करून उमलवता येत नाही.अणुबॉंमचा उपयोग करून आपण एखादा पहाड उध्वस्त करू शकू ,पण एवढ्या प्रचंड शक्तीने देखील त्या कळीला उमलवता येणार नाही.ती कळी तिच्या अंतर्यामीच्या जीवनरसानेच उमलू शकते.बाहेरच्या वातावरणाची वा इतर घटकांची तिला मदत लागत नाही असे नव्हे.पण उमलायचे असते ते तिचे तिनेच .तुकारामांनी हा आत्मविश्वासाचा खडतर प्रवास केला  होता.त्यांनी स्वतःच स्वतःला घडवले होते.एकेका कणाचा प्रवास करून स्वतःच स्वतःला थोडे थोडे उंचावर नेणे ही खरी साधना असते .या प्रवासात क्षणाक्षणाला माणसाचा एक नवा जन्म होत असतो  आणि म्हणूनच या प्रत्येक जन्माच्यावेळी त्याला स्वतःलाच जणूकाही प्रसूतिवेदना भोगाव्या लागतात.त्या वेदनाही स्वतःच भोगायच्या  आणि स्वतःला लाभलेले नवे देखणे रूप पाहून क्षणाक्षणाला रोमांचित व्हायचे ,तेही आपले आपणच.प्रथमदर्शनी विसंगत वाटणाऱ्या तुकारामांच्या वचनामध्ये ही अशी अंतर्गत सुसंगती आहे.


No comments:

Post a Comment