जीवन विचार

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
*माझी शाळा माझे उपक्रम*

  *🌺 जीवन विचार*🌺
〰〰〰〰〰〰〰
*🙏🙏गेले सांगून गाडगेबाबा, गाव स्वच्छ ठेवा कचरा जाळा, रोगराई पळवा मुखाने बोला बोला देवकीनंदन गोपाला ll*

*जीवनात स्वच्छता , आचार -विचारात स्वच्छता ही आजच्या काळाची गरज आहे. म्हणून खराटा, केरसुणी, खापर आणि खोरं ही तर निर्मळतेची धन्य धन्य  साधनं आहेत. ही झाडूची भावडंच आहेत.*

*संत गाडगेबाबा, महात्मा गांधी आणि सेनापती बापट या महापुरुषांनी आपल्या हाती झाडू घेतला.*
*संत गाडगेबाबांचा खराटा मनुष्याच्या अंतर्बाह्य स्वच्छ जीवनाचे प्रतीक* *आहे.स्वच्छता , समता आणि बंधुत्व या ञिवेणी संगमावरील तीर्थस्थान होतं गाडगेबाबांचं* !
*स्वातंत्र्य,  स्वावलंबन, स्वाध्याय आणि स्वाभीमान ही स्वच्छतेच्या पुस्तकातील पाने आहेत.सार्वजनिक स्वच्छता अंधश्रद्धा निर्मूलन यासाठी संत गाडगेबाबांनी स्वतः सातत्याने प्रयत्न करून कार्य  केले.*
*प्रत्येक मनुष्याच्या जीवनात स्वच्छतेचे स्फुल्लिंग निर्माण झालं तर सुखी आणि संपन्न देशाचं भाग्य जवळ आलं अस*
*म्हटलं पाहिजे !!*

*' जनसेवा हीच ईश्वरसेवा' मानणारे संत गाडगेबाबा हे देवत्वाची जागृत रोकड  उदाहरण होत.*🙏👏💐🙏

No comments:

Post a Comment