जीवन विचार

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
 *माझी शाळा माझे उपक्रम*

   *🌺 जीवन विचार* 🌺
〰〰〰〰〰〰〰
*मराठी राजभाषा दिनाच्या सर्वांना सस्नेह शुभेच्छा!*🙏👏💐📚

*संत तुकाराम महाराज  म्हणतात 'शब्दचि आमुच्या जीवाचे जीवन l शब्द वाटू धन लोका ll '*

*शब्द हे भाषेचे अलंकार आहे कोणत्याही भाषेच सौंदर्य आणि सामर्थ्य शब्दांवर अवलंबून असतं.शब्दाचे सौंदर्य म्हणजे आत्मदेवाची भाषा होय.शब्दांचा पसारा हा मोरपिसार्यासारखा मनमोहक असतो.आपण आपल्या भाषेचे वैभव हे जपलेच पाहिजे मराठी भाषा हा आपला फार मोठा अनमोल ठेवा आहे.आपल्या मराठी भाषेचे हे वैभव अधिकाधिक समृद्ध होईल ह्यासाठी मराठी आमुचा श्वास ,ध्यास राहीला पाहिजे.मराठी भाषा ही सामर्थ्य संपन्न , विचारगर्भ प्रबोधनात्मक आणि आनंददायक आहे.*

   *माणसाच्या भाषेत वाणीत शब्दाचे सामर्थ्य , अनुभव आणि शब्दांनी सजविलेली वैभवशाली श्रीमंती असावी.*
*म्हणूनच समर्थ रामदासांनी मराठी भाषेचे सामर्थ्य ओळखून म्हटले आहे ' उत्तम पदार्थ निवडून द्यावा l शब्द निवडून बोलावा' ll*
〰〰〰〰〰〰〰
*🙏🏼शब्दांकन/संकलन🙏🏼*

No comments:

Post a Comment