कविता

"अडचणींशी लढताना
पाण्यासारखं व्हावं
बळ कमी पडत असेल
तर वळसा घालुन जावं

तोही मार्ग बंद झाला
तर थोडं थांबून घ्यावं
अन एके दिवशी अडचणीच्या डोक्यावरून जावं

मुठभरांची माणूसकी
जग चालवत असते
देणा-यांची दानत
ओंजळ भरत असते

अशांची कमतरता
नेहमी पडत असते
आयुष्याचीं लांबी रुंदी
कमी पडत असते

जमेल तेव्हड आपणही
ट्राय करून पहावं
पाण्यासारखं येइल त्याला ओलं करून जावं....

No comments:

Post a Comment